राजकारण

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
6 May 2014 - 10:53 am

आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!

- नरेंद्र गोळे २०१४०५०६

समाजजीवनमानराहणीराजकारणप्रकटनमाहिती

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बद्दलच्या लेखाकरीता माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Apr 2014 - 7:03 pm

विकिपिडियावर माजी खासदारांची नावे चाळताना विठ्ठल गाडगीळ यांच्या बद्दल माहितीचा अगदीच अभाव असल्याचे लक्षात आले. मराठी विकिपीडियावर "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी त्यांचे निधन झाले." एवढीच ओळ आहे. इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या नावाचा लेखही आढळला नाही.

१) जन्म

२) व्यक्तीगत जीवन

३) कारकीर्द

४) लेखन आणि भाषणे

परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
24 Apr 2014 - 11:48 am

जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.

संस्कृतीइतिहासराजकारणविचार

गरोदर निवडणूक

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 4:20 pm

अजून मे महिना आणि त्याची १६ तारीख लई लांब आहेत. आणि आता कधी एकदाचं हे पोटुशा निवडणुकीचं बाळांतपण उरकून नव्या सरकारचा जन्म, त्याचं बारसं, आणि 'आईवर गेलाय अगदी...' चे नवलाईचे दिवस संपतायेत एकदाचे असं झालंय. अहो जिकडे बघावं तिकडे निवडणुकीशिवाय चर्चाच नाहीत! मागे काही दिवसांपूर्वी आमचे दुग्धदमित्र महिन्याचं बिल घ्यायला घरी आले होते. दुग्धदमित्र म्हणजे घरी दूध आणून देणारे हो; लंगोटीयार अशी मैत्रीची एक व्याख्या असू शकते तर दुग्धदमित्र का नाही? जसं जलद म्हणजे जल देणारे तसे दुग्धद म्हणजे दूध आणून देणारे. ते तसे कधीही उगवतात. महिना संपल्यावरच येतात असं नाही.

राजकारणविरंगुळा

राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 2:18 pm

एप्रिल २०१४

राजकारणविचार

केजरीवालांना निवडणूक आयोगाचे झूकते माप

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in काथ्याकूट
23 Apr 2014 - 1:23 am

केजरीवालांच्या विनंतीवरुन निवडणूक आयोगाने नॅचरल गॅसची दरवाढ पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडले. आता ह्या दरवाढीचा निर्णय नवीन सरकार स्थापन झाल्यावरच होईल.
रंगराजन समितीच्या शिफारसीवरुन कॅबिनेटने जुन २०१३ ला नॅचरल गॅस किंमत दरवाढीचा नवीन फॉर्म्युला मंजूर केला.
डिसेंबर २०१३ ला कॅबिनेटने ह्या फॉर्म्युल्याच्या व्यवहार्यतेला मान्यता देउन तेल मंत्रालयाला कळविले.ह्या नवीन फॉर्मुल्यानुसार हि दरवाढ एप्रिल २०१४ पासून लागू होणार होती.
नॅचरल गॅसची दरवाढ रोखून निवडणूक आयोगाने नेमके काय साधले????????
ह्या दरवाढीचा नेमका कोणत्या राजकीय पक्षाला फायदा होउ शकला असता व कसा?

नमोंची देशाकरताची आर्थीक रणनिती : इकॉनॉमीक टाइम्स मधील मुलाखत

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Apr 2014 - 8:23 pm

मोदींना पंतप्रधानपदाची संधी किती हे ठरवणारं घोडा मैदान दूर नाही, गणित जुळवा जूळवीत काही वेळ लागलातरी मे अखेर पर्यंत चित्रस्पष्ट होईलच. किमानपक्षी संसदेतेले एका मोठ्या पक्षाचे नेते हे बिरूद तर कुठेच नाही गेल. कोणत्याच पक्षाला २/३ बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने किमान महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाची मदत घ्यावीच लागेल. मोदी आणि त्यांच भविष्यातील अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय (व्यापारी) संबंध या बद्दल इतर मिपा धाग्यांवर चर्चा चालुच आहे.

जर मोदी पंतप्रधान झाले तर....

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
21 Apr 2014 - 4:30 pm

जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे.

मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल. अशावेळी एक मतदार म्हणून त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल.

मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)

अजित पवार, धरण आणि धमकी

काळा पहाड's picture
काळा पहाड in काथ्याकूट
19 Apr 2014 - 12:45 am

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे.

'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.

मतदान---शंभर टक्के

निलरंजन's picture
निलरंजन in काथ्याकूट
18 Apr 2014 - 8:54 pm

भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही

नक्की होतेय काय ?

कशी होईन समर्थ लोकशाही?

मतदान सक्तीचे करावे का?

लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का?

मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची?

निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल?