समाज
(शोध)
बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही
जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक
स्वप्नपूर्तीचा तो दिवस
दिल्लीला जाण्याची माझी ती चौथी वेळ होती. पण ही दिल्ली भेट सर्वात विशेष ठरणार होती. कारण त्यावेळी माझं अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत होतं. त्या स्वप्नपूर्तीला यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
अमानुषता आणि माणुसकी
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
"त्या" सिनेमातून आपोआप दिसणारा "तो" काळ
"हम आपके है कौन" म्हणजे "नदीया के पार" चा remake हे अनेकांना माहीतच असेल इथं. तो बघताना काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवल्या. त्यांची इथं नोंद,यादी करतोय. हम आपके है कौन १९९४चा. त्याचे बडजात्या निर्माते (राजश्री प्रॉडक्शन). हा बॉक्स ऑफिसवर सुपर्डुपर हिट असला तरी मुळात ह्याच राजश्री प्रॉडक्शनच्याच १९७०च्या काळात आलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. तो मूळ सिनेमाही भारतभर गाजला. विशेषत: उत्तर भारतात किंवा इतरत्रही ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा,जाणीवांशी जोडून घेणारं पब्लिक जिथं आहे, अशा ठिकाणी. टीनेजरी,नवतरुण दिसणारा "सचिन" त्यात आहे (म्हणजे सध्याचे टि व्ही वरचे "महागुरु").
माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २
(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा)
धावपटू- शतशब्दकथा
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी.
बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला.
रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते.
अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले.
गाव
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.
पुतळे आदर्शाचे
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नका उखडू पुतळे आदर्शाचे
जे आम्हा पुजनीय असती
नका विटंबवू आदर्श आमचे
जे आमच्या हृदयात वसती
हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत
अगदीच लेचेपेचे नाहीत
ते जीवंत जरी नसले तरीही
कार्य त्यांचे तळपत राहील
पुतळे जरी नष्ट केले
आदर्श नष्ट होत नसतात
त्यांच्या येथल्या असण्याने
तुम्ही येथे राहत असतात
- पाषाणभेद
२०/१२/२०२१