वावटळ
लेखनविषय (Tags)
पुस्तक_परिचय: वावटळ
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला.
______________________________________________
३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी भारतभर पसरली व संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. नथुराम गोडसे हा जातीने ब्राम्हण. त्यामुळे ब्राह्मण समाजाविरोधात वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राच्या विविध भागांत या घटनेचे पडसाद उमटले.
याच दरम्यान पुण्यात राहणारे शंकर, यशवंत व गोपू हे तीन ब्राह्मण तरुण आपल्या गावाकडे जायला निघतात. गावाकडे जाताना ते आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण, ठिकठिकाणी दंगली सुरू झाल्या होत्या, ब्राह्मणांची घरे जाळली जात होती.. आगीचे डोंब उसळत होते. आपण ब्राह्मण आहोत हे कळलं तर आपल्या जिवाचं बर वाईट होऊ शकतं ही भीती त्यांना वाटत असते. त्याचबरोबर आपल्या गावी काय परिस्थिती असेल? लोकांनी आपल्याही घरांची जाळपोळ केली असेल काय? आपल्या आई वडिलांच्या व कुटुंबाच्या काळजीने ते अजूनच भयभीत होतात. आपल्या गावातील लोक समजुतदार आहेत, आपल्याइथे अश्या घटना घडणार नाहीत असंही एक मन विचार करत असतं.
वाटेत येणाऱ्या अनेक अडथळ्यांतून मार्ग काढत ते आपल्या गावी पोहचतात. गावी जाऊन पाहतात तर त्यांची सगळी भीती समोर उभी असते. कादंबरीचा नायक असलेल्या शंकरचं गावाकडचं राहतं घर पूर्णपणे जळून खाक झालेलं असतं, त्याच्या मित्राचे व आजूबाजूची घरं सुद्धा जळालेली असतात. लोकांची घरे जाळण्याएवढी हिम्मत झालीच कशी असा प्रश्न इथे वाचणाऱ्याला पडतो. आयुष्यभर कोणाचंच काही वाईट केलं नव्हतं तरीसुद्धा सर्वकाही गमवावं लागलं. ओळखीचे लोकसुद्धा घरात घुसून लुटमार करीत होते.
या परिस्थितीचे वर्णन करताना व्यंकटेश माडगूळकर लिहितात,
जाळपोळ करण्यासाठी शेजारच्या गावातील लोक येत आहेत याची कुणकुण जेव्हा लागते तेव्हा काही लोक आपल्या घरातील दागिने व इतर मौल्यवान वस्तू आडात फेकून देतात. या दरम्यान काही सकारात्मक गोष्टी सुद्धा घडतात, जेव्हा घराला आग लागेलेली असते तेव्हा गावातील श्रीपती रामोशी लेखकाच्या घरातील देव आगीत शिरून बाहेर काढतो व आपल्या खोपटात नेउन ठेवतो.. घर जळल्यानंतर गावातील एक पाटील कुटुंब शंकरच्या कुटुंबाला आपल्या वाड्यात आसरा देते.
कादंबरीमध्ये भरपूर प्रसंग आहेत. त्यामाध्यमातून लेखकाने संपूर्ण घटनेचे व परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर एकंदरीत परिस्थिती काय होती हे तुम्हाला कळेल. कादंबरी वाचल्यानंतर काहीकाळ मन सुन्न होत, त्यातील काही प्रसंग तर हृदय पिळवटून टाकतात.
______________________________________________
हिंसा मग ती कोणत्याही प्रकारची असो, कोणत्याही कारणासाठी केलेली असो तिचं समर्थन कधीच करता येणार नाही..
एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाज दोषी ठरवला जातो ही भारतासारख्या देशातील खरी शोकांतिका आहे.!
आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या गांधीजींच्या तत्त्वांचा हा पराभव होता का? हा प्रश्न कादंबरी वाचत असताना पडतो.
या घटनेबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा त्यावेळच्या परिस्थितीची माहिती करून घ्यायची असेल तर हे पुस्तक जरूर वाचा आणि माझे हे माहितीपर उत्तर तुम्हाला कसे वाटले याबदल प्रतिसाद स्वरूपात नक्की कळवा. आणखी पुस्तकांबद्दल माहिती हवी असल्यास माझ्या प्रोफाइलला भेट द्या.
धन्यवाद..!! 🙏🙏
"आपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याच गावातील माणसे शत्रू होतील असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथम होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्याने ही मंडळी मुळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही. आता कशाची शाश्वती नाही. केव्हा काय होईल त्याचा नेम नाही!"
प्रतिक्रिया
वाचलंय हे पुस्तक. नथुराम
श्री. ज. जोशी यांच्या एका
दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी
तसेच “आपला” माणूस सत्तेत आला
काल परभणीत डॉ. देशपांडे
ब्राह्मण विरोधी राजनीति हा
अलिखित इतिहासाची पाने
१९८४ वाचणे.
शीर्षक - लेखक कोण आहेत? १९८४
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात,
पुस्तक बरेच वर्ष बॅन होते.
काल परभणीत डॉ. देशपांडे