माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....
मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही. कधी अतिशय भावविभोर करणारी तर कधी मनातल्या मनात खुदकन हसवणारी अशी अनेक गाणी आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.
जानपद गीतांची मराठी कवितेत एक मोठी परंपरा आहे, ग्रामीण जीवनाचे विविध रंग ढंग या रचनेतून आपल्याला बघायला मिळतात. गणदल-गंदल-गोंदल-गोंधळ अशा नावाने आणि पुढे तमाशात लोकप्रिय झालेला गण गौळणाची आपल्याला ओळख आहेच. काही गाण्यांची मजा वाचण्यात नाही तर ती ऐकण्यातच असते अशाच शाहिरी परंपरेच्या एका रांगड्या मराठी माणसाचं अर्थात दादा कोंडके यांच एक सोंगाड्या चित्रपटातलं गाणं मला खुप आवडतं. माळ्याच्या मळ्यामदी कोण गं उभी.
''माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी
राखण करते मी रावजी
रावजी, हात नका लावूजी,पाहील कुणी तरी.
दादा कोंडके मला नेहमीच चतुर आणि रंगेल असा माणुस वाटला आहे. गाण्यातील रंग आणि ढंग या बाबतीत अतिशय साधा भोळा असा रंगेलपणा दादा कोंडकेंनी गीतातून व्यक्त केला आहे. मळ्यामधे शेतात उभी असलेली ही साधी भोळी मंजुळा शेतीची राखण करते आहे. एका मळ्यात मचाणावर प्रेयसी तर आपल्या शेतात राखण करणारा प्रियकर यांची अतिशय प्रेमाची तरल भावना ग्रामीण ढंगाने दादा कोंडके इथे व्यक्त करतात. प्रेयसी शेतात या बांधावरुन त्या बांधावर फिरत आहे आणि तीची स्वत:ची इच्छा आहे की प्रियकराने आपल्याला हात लावला पाहिजे, पण तीच म्हण्ते की 'रावजी, हात नका लावूजी पाहील कुणी तरी’ आरती प्रभुंच्या नाही कसं म्हणु तुला म्हणते रे... या गाण्यातला जो नकार म्हणजेच होकार आहे, तो इथेही आपल्या दिसून येतो.
'औंदाचा ग वरीस बाई मी सोळावं गाठलं गं
चोळी दाटली अंगाला बाई कापड ग फ़ाटलं गं.
काळीज माझं धडधड करी, उड्ते पापणी वरचेवरी
रावजी हात नका लावूजी, पाहील कुणी तरी'
औंदाच्या म्हणजे या वर्षी प्रेयसी सोळाव्या वर्षात पदार्पण करीत आहे, तारुण्याच्या एका नव्या युगात प्रवेश करतांना शृंगाराच्या बाबतीत लौकिक पातळीवरचं वर्णन करतांना दादा कोंडके 'चोळी दाटली अंगाला बाई कापड गं फाटलं यातून’ स्त्रीच्या रुपाचे जे वर्णन करु पाहतात त्यातून जे प्रणय भावनेचं अतिशय सुंदर वर्णन येतं. 'काळीज धडधड करणे, पापणी उडणे, हे जे अविष्करण आहे त्यांची अभिरुची अशी उच्च दर्जाची उंची आपल्याला या गाण्यातुन आपल्याला दिसून येते. एका शाहिराची मला अशीच एक रचना आठवते.
''चुडा लकाकित जडाव अगदी कोंदण केले मधी रवा
तंग चोळीवर रंग कुसुंबी गोरे गाल जसा नरम खवा
उर पदराने झांकुन ठाकुन किती चालशी नटून जिवा
उदी शाल आंत साज भरजरी तंग काचोळी तडातडी”
त्याच पद्धतीची रचना इथेही आपल्याला दिसते-
''नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा धसला मनी
फुलराणी जीव माझा सजनी ग जडला तुझ्यावरी''
शाहिरांना 'चोळी' 'चोळी तडतडणे' 'गोरे गाल कसे तर कसा नरम खवा' 'अटकर बांधा' 'सुबक ठेंगणी' 'ठुसका बांधा' 'शरीर पातळ मी जशी नाजुक साय दुधाची' ही आणि अशा या स्त्री सौंदर्याची कल्पना खास म-हाटीची वळणाची दिसून येते. विविध उपमाही मराठीत आपल्याला दिसून येतात. दादा कोंडकेंनी अशा शब्दांचा जो चटकदारपणा निवडलाय त्या शब्दामधून ऐटदार शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि म्हणुनच त्या वर्णनाला एक गहिरेपण आलेलं दिसतं.
मला व्यक्तिगत मळ्याच्या मळ्यामधे ती उभी असतांना मधेच हे 'वांगे तोडणे' आवडलेलं नाही. पण गाण्यांमधे कधी कधी ग्रामजीवनांचं चित्र रेखाटतांना अधिक जीवंतपणा त्या प्रेमात आणि वास्तव चित्रणात यावा म्हणुन कदाचित अशी शब्दयोजना केली असावी, असे वाटते. निसर्ग प्रतिमांचा वापर करुन ते गाणं लोकप्रिय करावं हाच तो उद्देश त्या गाण्यांमागे असावा असाही एक विचार त्यातून डोकावून जातो.
शेतीवाड्यातल्या माणसांना जरा विरंगुळा हवा म्हणुन तारुण्यांच्या बहराचे वर्णन अशा गीतांमधून खटकेबाजपणाने यायलाच हवी अशी श्रोत्यांची अपेक्षाही असावी म्हणुन 'ज्वानीचा कहर' अशा गाण्यांमधुन आपल्याला दिसून येतो. 'गोरे गाल आणि प्रियकराची आठवण झाल्यावर ते लाल होणे' 'प्रेयसीला आंघोळीला बसल्यावर हसु येणं’ ’खांद्यावरचा पदर सतत घसरणे’ हे सर्व प्रेमात घसरल्याची लक्षणं या गीतातून प्रेमाची एक तरल भावना अतिशय तरलपणे व्यक्त झालेली दिसते.
प्रेयसीला चंद्र, चांदण्याची उपमा देणे ही परंपरा इथेही आपल्याला दिसून येते. आणि म्हणुनच मला हे गाणं खुप आवडतं. आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे गाणं लागलं की तेव्हाही आतुन आनंदाचे उमाळे फुटायचे आजही हे गाणं ऐकतांना पाहतांना असेच उमाळे फुटतात.
आपल्याला जर रसग्रहण आवडलं तर पुढंच गाणं निवड्लं आहे, 'काल रातीला सपान पडलं आन सपनात आला तुम्ही अन बै मी बडबडले’ तो पर्यंत मळ्याच्या मळ्यामधी हे गाणं ऐका. आणि काय चुक भुल असेल ते जरुर लिहा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरी परीक्षण झाले आहे सर !!
संपूर्ण लेख वाचून, मी पयला !!
अहाहा!
दादा कोंडके
अजून एक
झक्कास !!!
मस्त
नेमके.
परीक्षण आवडलं.
कं लिवलंया...
म हा न!
हमने ये परिक्शान..बहुत
परीक्षण अतिशय आवडले हेवेसांन
मस्त..
अगं माय गं !
___/\___
क्या बात!
पुरवणी.
+१
वांगे आणि सोळाव वरस
सर सांगा !
पैजारबुवा __/\__
@मग आता डोळे बंद करुन
खुपच छान..
प्रा.डॉ. धन्यवाद!
मस्त "रस ग्रहण " आणि जबदस्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणदादा कोंडके नंतर नंतर चावटपणाला चटावले !
वावावा .इकडे तिकडे गोफणीतून
भन्नाट 'रस'ग्रहण.
मस्त परीक्षण...
डीबी यु टू???
शाहीर दादा कोंडके यांना
हा हा हा. भारी! आता 'ढगाला
तुफ्फान...
सर, आप भी ...मान गये आपकी
जबरा !