मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

कर जरा कंट्रोल...! :-)

चलत मुसाफिर ·
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला? शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम बिघडले कोठे

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

जनोबा रेग्याचे वंशज!

kool.amol ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो.

'काव्यप्रेमी' कायप्पा घोळका विडंबन.

निओ ·
लेखनविषय:
कायप्पा वर कोणीतरी कवितेविषयी एका घोळक्यात मला ओढून घेतलं. असुदे काय घडतं ते पाहू म्हटलं. तर तिथे अनुभवलेल्या सदस्यांच्या काही गंमती जमती, तिथल्या सर्व मान्यवरांची माफी मागून सादर करत आहे. हि सगळी मंडळी हाडाचे कवी आहेत कारण एकमेकांच्या चारोळीला, कवितेला अजिबात दाद ना देण्याचे व्यवच्छेदक लक्षण या सर्व मान्यवरांना लागू पडतं. एक ताई आहेत, चारोळी चं सदर चालवतात. त्याचं शीर्षक 'संस्कार शिदोरी'. या ताई सकाळी सकाळी किमान सहा वाजताच आपली शिदोरी उघडून घोळक्यातील मेम्बरांवर की मेंढरांवर उपदेशांचा मारा करतात. चारोळी असते, तिला क्रमांक व शीर्षक असते. आजचा क्रमांक 'पुष्प -३३८, मी मराठी ' वेळ पहाटे ४:५०.

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

चित्रगुप्त ·
लेखनप्रकार
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

नको ना रे

पाषाणभेद ·
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

जावे IT च्या डिपार्टमेंटा

kool.amol ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे?

शब्द कल्लोळ

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शब्द कल्लोळ! शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने, (अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई. गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत. अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.      'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!

(चारोळी विडंबन)-लसं....ग्रहण

कर्नलतपस्वी ·
पेरणा-चारोळी विडंबन चहात इडली चहात गुलाबजाम चहात जिलेबी आणि आमची चारोळी संपली (उगाच इकडं तीकडं भटकू नये म्हनून वरीजनल चारोळी इथं डकवली आहे,अर्थात वरिजनल चारोळीकारांची इक्क्षमा मागुन) &#128540,&#128540 वरील चारोळी खुपच हुच्च दर्जाची असावी असे वाटते म्हणून दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे. खोलवर जाऊन पाहिले तर ही चारोळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाटते.

काकारहस्य

भागो ·
लेखनविषय:
“हेलो, नॅंसी, काय झालं?” “बॉस, तीन सभ्य गृहस्थ आपल्याला भेटू इच्छितात. तुम्हाला वेळ असेल तर.....” सेक्रेटरीने ‘सभ्य’ असा शब्द वापरून इशारा दिला होता. पण मी त्यांची भेट घायचे ठरवले. त्या आधी माझे पिस्तुल टेबलावर दिसेल अशा तऱ्हेने ठेवले. आणि सी सी टी वी वर नजर टाकली. खरेच जरा गुंडे दिसत होते खरे. “ओके,” मी बेदरकारपणे नॅंसीला सूचना दिली. “सर, पण जरा काळजी घ्या.” तिघे जण माझ्या केबिन मध्ये घुसले. “काय उकाडा आहे पुण्यात.” अस म्हणून एकाने फॅन फुल केला. “अरे रूम एसी असताना फॅन कशाला लावलास?” एकाने गॅलॅक्सी फोन काढून टेबलावर ठेवला.