मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

प्रसाद गोडबोले ·

वीणा३ 18/05/2018 - 09:56
या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

पुंबा 18/05/2018 - 11:29
वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अभ्या.. 18/05/2018 - 12:05
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

In reply to by अभ्या..

प्रचेतस 18/05/2018 - 13:15
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/05/2018 - 13:25
द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

In reply to by प्रचेतस

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 20:37
.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

In reply to by माहितगार

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 21:22
या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 09:04
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 09:00
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 09:49
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 10:29
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:01
यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 11:11
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:22
:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:26
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

राघव 18/05/2018 - 12:11
मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

शाली 18/05/2018 - 13:22
जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,

प्रचेतस 18/05/2018 - 18:23
दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त 18/05/2018 - 21:25
भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु 18/05/2018 - 23:10
भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु

In reply to by मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/05/2018 - 10:18
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 10:38
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 19/05/2018 - 11:26
कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

In reply to by मदनबाण

गणामास्तर 19/05/2018 - 12:36
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

In reply to by गणामास्तर

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस . आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =)) तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;) हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 19/05/2018 - 23:06
आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे (पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच) गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान 20/05/2018 - 01:53
मार्कस, खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही. मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार गा पै ! आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो " स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || " :(

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 20/05/2018 - 17:21
नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते . धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते. या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे . या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये) सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे. मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला . अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली . बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

एस 20/05/2018 - 05:08
उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

गामा पैलवान 20/05/2018 - 14:56
मार्कस, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो. १.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .
हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?
खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "
हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !
अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 11:14
अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले! Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला. "३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!" माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का) तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का? अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे. असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले. img

In reply to by गणामास्तर

माहितगार 21/05/2018 - 20:38
@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो ) आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे. मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

In reply to by माहितगार

गणामास्तर 22/05/2018 - 12:36
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

In reply to by अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =)))) ( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 22/05/2018 - 21:18
पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर
सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

In reply to by गणामास्तर

माहितगार 22/05/2018 - 18:13
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

In reply to by शब्दबम्बाळ

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार ! त्यामुळे पास !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 21:06
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे. ( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

In reply to by माहितगार

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत
>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.
तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/05/2018 - 21:58
तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 22:10
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 22:47
खी खी खी (उगाचच!) तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !
एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही
ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?
इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...

In reply to by शब्दबम्बाळ

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे ! सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?
कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही ! तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो
अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 22/05/2018 - 04:07
असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे
सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे. .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 24/05/2018 - 00:52
मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच! माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !
अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !
असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक 22/05/2018 - 00:15
इस्काॅन की सच्चाई जानिए ===================== दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥ ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness । एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है ! ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं ! आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है ! बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है ! कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें ! मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं ! कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया : मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%) ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%) मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%) अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%) ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है ! भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है ! हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!! कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

स्वधर्म 24/05/2018 - 16:11
लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 17:02
...नेमकं काय खटकलं?..
माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 19:30
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

In reply to by माहितगार

येस. तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता ! बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही ! पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते ! आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)

वीणा३ 18/05/2018 - 09:56
या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

पुंबा 18/05/2018 - 11:29
वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अभ्या.. 18/05/2018 - 12:05
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

In reply to by अभ्या..

प्रचेतस 18/05/2018 - 13:15
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/05/2018 - 13:25
द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

In reply to by प्रचेतस

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 20:37
.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

In reply to by माहितगार

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 21:22
या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 09:04
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 09:00
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 09:49
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 10:29
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:01
यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 11:11
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:22
:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:26
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

राघव 18/05/2018 - 12:11
मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

शाली 18/05/2018 - 13:22
जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,

प्रचेतस 18/05/2018 - 18:23
दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त 18/05/2018 - 21:25
भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु 18/05/2018 - 23:10
भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु

In reply to by मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/05/2018 - 10:18
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 10:38
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 19/05/2018 - 11:26
कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

In reply to by मदनबाण

गणामास्तर 19/05/2018 - 12:36
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

In reply to by गणामास्तर

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस . आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =)) तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;) हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 19/05/2018 - 23:06
आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे (पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच) गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान 20/05/2018 - 01:53
मार्कस, खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही. मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार गा पै ! आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो " स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || " :(

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 20/05/2018 - 17:21
नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते . धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते. या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे . या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये) सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे. मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला . अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली . बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

एस 20/05/2018 - 05:08
उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

गामा पैलवान 20/05/2018 - 14:56
मार्कस, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो. १.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .
हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?
खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "
हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !
अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 11:14
अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले! Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला. "३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!" माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का) तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का? अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे. असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले. img

In reply to by गणामास्तर

माहितगार 21/05/2018 - 20:38
@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो ) आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे. मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

In reply to by माहितगार

गणामास्तर 22/05/2018 - 12:36
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

In reply to by अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =)))) ( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 22/05/2018 - 21:18
पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर
सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

In reply to by गणामास्तर

माहितगार 22/05/2018 - 18:13
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

In reply to by शब्दबम्बाळ

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार ! त्यामुळे पास !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 21:06
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे. ( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

In reply to by माहितगार

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत
>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.
तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/05/2018 - 21:58
तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 22:10
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 22:47
खी खी खी (उगाचच!) तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !
एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही
ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?
इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...

In reply to by शब्दबम्बाळ

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे ! सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?
कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही ! तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो
अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 22/05/2018 - 04:07
असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे
सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे. .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 24/05/2018 - 00:52
मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच! माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !
अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !
असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक 22/05/2018 - 00:15
इस्काॅन की सच्चाई जानिए ===================== दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥ ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness । एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है ! ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं ! आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है ! बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है ! कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें ! मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं ! कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया : मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%) ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%) मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%) अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%) ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है ! भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है ! हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!! कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

स्वधर्म 24/05/2018 - 16:11
लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 17:02
...नेमकं काय खटकलं?..
माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 19:30
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

In reply to by माहितगार

येस. तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता ! बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही ! पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते ! आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

लाल टांगेवाला

रासपुतीन ·

सगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत. म्हणजे काय डेटा वेअर हाउस बनवणार का. तुमचा डेटा सायंटिस्टपणा इकडे काय करायचाय ? बळच.

सगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत. म्हणजे काय डेटा वेअर हाउस बनवणार का. तुमचा डेटा सायंटिस्टपणा इकडे काय करायचाय ? बळच.
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

अमर - कथा

jp_pankaj ·
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला. ***************************************************************************************** .केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता. केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा. पयका बरा भेटायच पण केश्याची जिंदगी बापा भोवतीच फिरायची.

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या.. ·

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

आळस

जव्हेरगंज ·
कधी कधी मन भरून येतं काठोकाठ जावंसं वाटतं दूर दऱ्या डोंगरात डुंबावं वाटतं भल्याथोरल्या समुद्रात पण अशावेळी मला आळसंच येतो मग झोप झोपतो मी गपगार पांघरुनात कधी वाटतं चमकाव्या विजा कडाडून आकाशात बरसाव्या धारा मुसळधार अंगणात पण रखरखीत उनंच पडतं दिवसभर मग बसावं लागतं सावलीत आडवं व्हावं लागतं काटकोनातलं जग दिसतं राहतं स्वप्नात आळसंच दाटलेला असतो म्हणा जगण्यात आळसाचे असतात प्रमुख तीन प्रकार ऑय य्यॉय याय ... उद्या सागेनॉय य्यॉय जरा आळसंच आलॉय य्यॉय यियॉय्य . . हम्म..

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

(छटाक) नंतर

नाखु ·

टवाळ कार्टा 03/04/2016 - 12:46
खि खि खि
चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.
हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

In reply to by विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली... त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

अभ्या.. 04/04/2016 - 11:29
हिहीही. नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

चिनार 05/04/2016 - 15:28
हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.
माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !

टवाळ कार्टा 03/04/2016 - 12:46
खि खि खि
चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.
हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

In reply to by विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली... त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

अभ्या.. 04/04/2016 - 11:29
हिहीही. नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

चिनार 05/04/2016 - 15:28
हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.
माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

बोट - अग्निशमन (Fire Fighting)

स्वीट टॉकर ·

एका वेगळ्याच विश्वाची सफर चालू आहे तर !धन्यवाद , स्विट टॉकरजी. जहाजावरील जीवन हे नुसते आरामशीर नसते हे कळत आहे या निमित्ताने . पुभाप्र ...

बदामची राणी 26/03/2016 - 11:54
एका वेगळ्या जगाची ओळख होतेय. तुमची लिहिण्याची शैली पण फारच interesting आहे. कोठला निर्णय योग्य ठरेल हे कसं सांगणार?> धोनी म्हणाला होता त्याप्रमाणे, "निर्णय कप्तान घेत असतो. पण त्याची अम्मलबजावणी फलन्दाज किन्वा गोलन्दाज करत असतो. यश मिळाले तर कप्तानाच्या निर्णयाचे खूप कौतुक होते, पण अपयश आले तर मात्र त्याच निर्णयाबाबत कप्तानाच्या अकलेचे धिन्दवडे निघतात."

जगप्रवासी 26/03/2016 - 12:01
आधी वाटायचं बोटीवरच लाइफ म्हणजे मस्त एकदम आरामदायी पण आता तुमची लेखमालिका वाचून मत बदलत चालल आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद नवीन जगाची ओळख करून देताय.

खेडूत 26/03/2016 - 15:19
वेगळ्या विश्वाची सफर घडवल्याबद्दल आभार! अजून वाचायला आवडेल- अन्य धोके, जसे चाचे, वादळे, दिशा भरकटणे वगैरे. तसेच प्रवासाचे नियोजन कसे करतात? म्हणजे एका दौर्यात दहा बंदरांवर जायचे असेल तर कसे मार्ग ठरवतात?

प्रचेतस 26/03/2016 - 20:17
गुंगवून टाकणारे लेखन. जहाजांबद्दलची माझी माहिती एलिस्टर मैकलीनच्या कादंबऱ्यांपुरतीच मर्यादित. तुमच्या लेखनाने मात्र सखोल माहिती तीही सुरेख लेखनशैलीत मिळत आहे

विकास... 27/03/2016 - 13:23
उपयुक्त माहिती.. फायर फाईटिंग आणी प्रथमोपचार याची माहिती प्रत्येकाला पाहिजेच. "एअर कंडिशनिंग मशिनरी" मधिल अनुभव यामधे श्वास बंद झाला तो कोणत्या वायुमुळे?.

स्वीट टॉकर 27/03/2016 - 13:35
सर्वजण, धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना लेख आवडला हे बरं झालं. माहितीपर लेखांचा हा जरा लोचा असतो. तो interesting होतोच असं नाही. बदामची राणी - तर मात्र त्याच निर्णयाबाबत कप्तानाच्या अकलेचे धिन्दवडे निघतात." प्रश्न धिंडवड्यात संपला तरी चालतं. स्पेन च्या उत्तरेला एक बोट बुडली. वादळात दोन तुकडे होऊन. त्यात कप्तानाची काही चूक नव्हती. बोट तुटण्याआधी कप्तानानी अतिशय शिस्तीत सगळ्यांना लाइफ बोटीत उतरवले आणि सगळे वाचले. पुढे या बोटीतलं तेल स्पेनच्या किनार्‍यावर पसरून चिकार हानी झाली. कप्तान ग्रीस देशाचा नागरिक होता. त्याला तुरुंगवास भोगायला लागला. त्यानी सगळ्यांना उत्तम तर्हेनी वाचवलं याला काहीही महत्व दिलं गेलं नाही. Such is life. जगप्रवासी - जे पैसे देऊन प्रवास करतात, उदा. paying passengers, त्यांचा प्रवास अर्थातच मस्त आणि आरामाचा असतो. ज्यांना त्याच प्रवासाचे पैसे मिळतात, उदा. बोटीवरचे कर्मचारी, त्यांचा तोच प्रवास खडतर असतो. हा जगाचाच नियम आहे. समुद्रावर वेगळा नियम असायचं काहीच कारण नाही. तुमचं नावच जगप्रवासी आहे. एकदा तरी क्रूझ शिपवर प्रवास कराच. धमाल असते. टवाळ कार्टा - बरोबर आहे. पॅनिक होणं ही आपली मोठी कमजोरी. गर्दीत जी चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोक हकनाक मरतात त्यालाही पॅनिक हे मुख्य कारण. खेडूत - वादळांबद्दल झालेलंच आहे. चाच्यांबद्दल येईलच. ज्या दहा बंदरांना जायचं आहे ती एकमेकांपासून दूर असली तर निर्णयस्वातंत्र्य रहातच नाही. जे आधी येईल ते घ्यावंच लागतं. मात्र जर जवळ असतील प्रश्न उभा रहातो. ही दहा बंदरं कशी ठरली? या बंदरांचा माल मिळाला म्हणून ठरली का इथे जायचं ठरलं म्हणून तिथला माल मिळाला? ज्या क्रमानी बंदरं घ्यायची त्या क्रमानी माल लादण्याचा प्रयत्न असतो. (हा नेहमीच सफल होतो असं नाही कारण माल जिथे लादला जातो ती देखील कधी कधी दहा बंदरं असतात.) कित्येक वेळा पुढच्या बंदराचा माल काढून बाजूला ठेवायचा, या बंदराचा unload करायचा आणि आधी बाजूला काढलेला माल पुन्हा भरायचा अशी दुप्पट हमाली करावी लागते. हल्ली संगणकांमुळे हे नियोजन सोपं झालं आहे. पूर्वी डोकं फिरायचीच पाळी यायची. कॅ जॅ स्पॅ - Traveling salesman algorithm =)) अर्थ समजला नाही.

नाखु 28/03/2016 - 10:54
नुसते अतरंग नाही तर अत्रंगही उलगडणारी लेखमाला.. वयक्तीक आणि सामाजीक सुऱक्षेचे शिक्षण शाळेत पुरेसे दिले जात नाही.दिले तर कोणी गांभेर्याने घेत नाही. ं अंमलबजावणी तर दूरच . खाजगी कंपन्याच जरा आग्रही आणी किमान सुरक्षेबाबत जागरूक आहेत. मंत्रालयाला लागलेल्या / (की लावलेल्या) आगीने अजून ही शिकले नाहीत त्यालाच शासन म्हणत असावेत. नितवाचक नाखु.

इडली डोसा 29/03/2016 - 01:42
ना.खू म्हणतात त्याप्रमाणे खाजगी कंपन्यांमधे अधुन मधुन फायर ड्रील्स होतात पण त्याला फार कोणी गांभिर्याने घेत नाही. आपल्यावर अशी वेळ प्रत्यक्षात कधी येणारच नाही याची खात्री असल्यासारखी (accidents happen to others ga.vi. theory) जनता अळम् टळम करत निवांत बाहेर पडत असते (मी सुद्धा आहे त्यात :( ) आता इथुन पुढे फायर ड्रील्स सिरिअसली घेणार.

अत्यंत सोप्या भाषेतला उत्तम लेख. इमर्जन्सी घंटा, त्यानंतर घ्यायच्या ऍक्शन्स यासोबतच आताच्या काळात अशा काही सिस्टिम्स असतात का की ज्याद्वारे आग लागल्यावर त्या कंट्रोल सिस्टिम द्वारा एका ठराविक क्रमाने मशिन्स, इंजिन हे आपोआप बंद होतील आणि मोठी दुर्घटना टळू शकेल. यात सगळं काही बंद करून चालणार नाहीच. पण ऑटोमॅटिक फायर फाईटिंग सिस्टिम ने यात हानी कमी व्हावी आणि जास्तीत जास्त सुरक्षितता मिळावी म्हणून काही करता येतं का? कुठलाही ऑइल प्लॅटफॉर्म किंवा एखादा केमिकल प्लांट यात हे सर्व अत्यावश्यक असते, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ते एका मर्यादेपर्यंत साध्य होऊ शकते पण त्यातही अनेक अपवाद असतात. शिवाय या प्रकारच्या यंत्रणे साठी होणारा खर्च देखील प्रचंड असतो. फक्त तसे काही या बोटींवर असते का किंवा त्यावर प्रयत्न चालू आहेत का याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

स्वीट टॉकर 06/04/2016 - 13:40
सर्व जण, पुन्हा धन्यवाद. इडली डो सा - जनता अळम् टळम करत निवांत बाहेर पडत असते यामुळे ऑफिसला/कारखान्याला असलेले दरवाजे, पायर्या वगैरे पुरेशा वाटतात. जेव्हां खरी आग लागते तेव्हां सगळे धूम पळतात आणि त्याच दरवाज्यात चेंगराचेंगरी होते. पायर्यांवरून लोक धडपडतात आणि मागचे त्यांच्यावर अडखळतात आणि दिल्लीच्या थियेटरमध्ये झाली तशी हकनाक जीवितहानी होते. तुम्ही यापुढे ही ड्रिल्स सीरियसली घेणार हे चांगलंच आहे. मात्र ह्या अळम टळम वृत्तीवर अतिशय सोपा उपाय आहे. वरिष्ठांनी घोषणा करायची की 'ड्रिलमध्ये आपण इतक्या सेकंदात/मिनिटात सुखरूपपणे बाहेर पडू अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत ही वेळ आपण गाठू शकत नाही तो पर्यंत आपण पुन्हा पुन्हा ड्रिल करणार आहोत.' आकार कसाही असो. सगळे पळतात हरणाप्रमाणे! मधुरा देशपांडे - आग लागल्यावर मशिनरी आपोआप बंद करण्याची सिस्टिम करणं अगदीच सोपं आहे. मात्र बोट ही स्थिर नसून चालत असल्यामुळे वेगळे प्रश्न उभे राहातात. जर मशिनरी बंद झाल्यामुळे बोटीवरचं नियंत्रण सुटलं तर ती दुसर्या बोटीवर, बंदरात जेट्टीवर, आपली आपण खडकांवर वगैरे आपटू शकेल. 'एक्झॉन वाल्डेझ' नावाची बोट अलास्का मध्ये खडकावर आपटून किती प्रचंड हानी झाली हे सगळ्यांना आठवत असेल. आगीमुळे जितकं नुकसान होऊ शकेल त्याच्या कित्येक पट नुकसान हकनाक मशिनरी बंद करून होऊ शकतं. त्यामुळे तो निर्णय माणसाच्या हातातच ठेवणं बरं! मात्र आग लवकर पसरू नये म्हणून एक सिस्टिम असते. त्याला म्हणतात 'हायपर मिस्ट सिस्टिम'. जर साधं पाणी प्रचंड दाबानी एखाद्या बारीक भोकातून पलिकडे ढकललं तर त्याचे अत्यंत छोटे तुषार (मिस्ट) तयार होतात. हे तुषार आगीतील उष्णता शोषून घेण्यात प्रवीण असतात. शिवाय पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मशिनरी चालू असेल तरीही तिचं नुकसान नगण्य होतं. ही सिस्टिम आग विझवू शकत नाही. मात्र लागलेली आग लवकर पसरू देत नाही. त्यामुळे जिकडे आग लागण्याची जास्त शक्यता आहे, उदा. बोटीचं मुख्य इंजिन, जनरेटर इंजिन, बॉइलर, कचरा जाळण्याचा इन्सिनरेटर, तेल शुद्धिकरणाचं मशीन (याला आम्ही 'फ्युएल ऑइल प्युरिफायर' म्हणतो) या सगळ्यांवर ही सिस्टिम लावलेली असते. ही संपूर्णतः स्वयंचलित असते. ऑइल टँकर्सवर ही सिस्टिम लावणं कायद्यानी बंधनकारक असतं.

गामा पैलवान 02/06/2016 - 21:57
स्वीट टॉकर, एकंदरीत मोठ्या नौकेवरची भडकलेली आग म्हणजे एक महाभयानक प्रकरण असते. इथे एक अनुभव आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/10/blog-post_9424.html या अनुभवानंतर संबंधित माणसाच्या पत्नीचा अनुभव इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/11/blog-post_522.html या अनुभवाचे श्रद्धापूर्वक केलेले अध्यात्मिक विवेचन इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2016/03/blog-post_62.html आ.न., -गा.पै.

स्वीट टॉकर 03/06/2016 - 11:29
गा पै - धन्यवाद! कुठलीही गोष्ट वाचल्यावर तुमचा त्याच्यावर आणखी शोध आणि अभ्यास असतो. ही फारच उत्तम सवय आहे.

गामा पैलवान 03/06/2016 - 21:33
धन्यवाद स्वीट टॉकर! शोधाभ्यासास पूरक वातावरण हे प्रशासक, संपादकमंडळ व मिपाधनी यांच्या अथक परिश्रमांमुळेच लाभते. आ.न., -गा.पै.

एका वेगळ्याच विश्वाची सफर चालू आहे तर !धन्यवाद , स्विट टॉकरजी. जहाजावरील जीवन हे नुसते आरामशीर नसते हे कळत आहे या निमित्ताने . पुभाप्र ...

बदामची राणी 26/03/2016 - 11:54
एका वेगळ्या जगाची ओळख होतेय. तुमची लिहिण्याची शैली पण फारच interesting आहे. कोठला निर्णय योग्य ठरेल हे कसं सांगणार?> धोनी म्हणाला होता त्याप्रमाणे, "निर्णय कप्तान घेत असतो. पण त्याची अम्मलबजावणी फलन्दाज किन्वा गोलन्दाज करत असतो. यश मिळाले तर कप्तानाच्या निर्णयाचे खूप कौतुक होते, पण अपयश आले तर मात्र त्याच निर्णयाबाबत कप्तानाच्या अकलेचे धिन्दवडे निघतात."

जगप्रवासी 26/03/2016 - 12:01
आधी वाटायचं बोटीवरच लाइफ म्हणजे मस्त एकदम आरामदायी पण आता तुमची लेखमालिका वाचून मत बदलत चालल आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद नवीन जगाची ओळख करून देताय.

खेडूत 26/03/2016 - 15:19
वेगळ्या विश्वाची सफर घडवल्याबद्दल आभार! अजून वाचायला आवडेल- अन्य धोके, जसे चाचे, वादळे, दिशा भरकटणे वगैरे. तसेच प्रवासाचे नियोजन कसे करतात? म्हणजे एका दौर्यात दहा बंदरांवर जायचे असेल तर कसे मार्ग ठरवतात?

प्रचेतस 26/03/2016 - 20:17
गुंगवून टाकणारे लेखन. जहाजांबद्दलची माझी माहिती एलिस्टर मैकलीनच्या कादंबऱ्यांपुरतीच मर्यादित. तुमच्या लेखनाने मात्र सखोल माहिती तीही सुरेख लेखनशैलीत मिळत आहे

विकास... 27/03/2016 - 13:23
उपयुक्त माहिती.. फायर फाईटिंग आणी प्रथमोपचार याची माहिती प्रत्येकाला पाहिजेच. "एअर कंडिशनिंग मशिनरी" मधिल अनुभव यामधे श्वास बंद झाला तो कोणत्या वायुमुळे?.

स्वीट टॉकर 27/03/2016 - 13:35
सर्वजण, धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना लेख आवडला हे बरं झालं. माहितीपर लेखांचा हा जरा लोचा असतो. तो interesting होतोच असं नाही. बदामची राणी - तर मात्र त्याच निर्णयाबाबत कप्तानाच्या अकलेचे धिन्दवडे निघतात." प्रश्न धिंडवड्यात संपला तरी चालतं. स्पेन च्या उत्तरेला एक बोट बुडली. वादळात दोन तुकडे होऊन. त्यात कप्तानाची काही चूक नव्हती. बोट तुटण्याआधी कप्तानानी अतिशय शिस्तीत सगळ्यांना लाइफ बोटीत उतरवले आणि सगळे वाचले. पुढे या बोटीतलं तेल स्पेनच्या किनार्‍यावर पसरून चिकार हानी झाली. कप्तान ग्रीस देशाचा नागरिक होता. त्याला तुरुंगवास भोगायला लागला. त्यानी सगळ्यांना उत्तम तर्हेनी वाचवलं याला काहीही महत्व दिलं गेलं नाही. Such is life. जगप्रवासी - जे पैसे देऊन प्रवास करतात, उदा. paying passengers, त्यांचा प्रवास अर्थातच मस्त आणि आरामाचा असतो. ज्यांना त्याच प्रवासाचे पैसे मिळतात, उदा. बोटीवरचे कर्मचारी, त्यांचा तोच प्रवास खडतर असतो. हा जगाचाच नियम आहे. समुद्रावर वेगळा नियम असायचं काहीच कारण नाही. तुमचं नावच जगप्रवासी आहे. एकदा तरी क्रूझ शिपवर प्रवास कराच. धमाल असते. टवाळ कार्टा - बरोबर आहे. पॅनिक होणं ही आपली मोठी कमजोरी. गर्दीत जी चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोक हकनाक मरतात त्यालाही पॅनिक हे मुख्य कारण. खेडूत - वादळांबद्दल झालेलंच आहे. चाच्यांबद्दल येईलच. ज्या दहा बंदरांना जायचं आहे ती एकमेकांपासून दूर असली तर निर्णयस्वातंत्र्य रहातच नाही. जे आधी येईल ते घ्यावंच लागतं. मात्र जर जवळ असतील प्रश्न उभा रहातो. ही दहा बंदरं कशी ठरली? या बंदरांचा माल मिळाला म्हणून ठरली का इथे जायचं ठरलं म्हणून तिथला माल मिळाला? ज्या क्रमानी बंदरं घ्यायची त्या क्रमानी माल लादण्याचा प्रयत्न असतो. (हा नेहमीच सफल होतो असं नाही कारण माल जिथे लादला जातो ती देखील कधी कधी दहा बंदरं असतात.) कित्येक वेळा पुढच्या बंदराचा माल काढून बाजूला ठेवायचा, या बंदराचा unload करायचा आणि आधी बाजूला काढलेला माल पुन्हा भरायचा अशी दुप्पट हमाली करावी लागते. हल्ली संगणकांमुळे हे नियोजन सोपं झालं आहे. पूर्वी डोकं फिरायचीच पाळी यायची. कॅ जॅ स्पॅ - Traveling salesman algorithm =)) अर्थ समजला नाही.

नाखु 28/03/2016 - 10:54
नुसते अतरंग नाही तर अत्रंगही उलगडणारी लेखमाला.. वयक्तीक आणि सामाजीक सुऱक्षेचे शिक्षण शाळेत पुरेसे दिले जात नाही.दिले तर कोणी गांभेर्याने घेत नाही. ं अंमलबजावणी तर दूरच . खाजगी कंपन्याच जरा आग्रही आणी किमान सुरक्षेबाबत जागरूक आहेत. मंत्रालयाला लागलेल्या / (की लावलेल्या) आगीने अजून ही शिकले नाहीत त्यालाच शासन म्हणत असावेत. नितवाचक नाखु.

इडली डोसा 29/03/2016 - 01:42
ना.खू म्हणतात त्याप्रमाणे खाजगी कंपन्यांमधे अधुन मधुन फायर ड्रील्स होतात पण त्याला फार कोणी गांभिर्याने घेत नाही. आपल्यावर अशी वेळ प्रत्यक्षात कधी येणारच नाही याची खात्री असल्यासारखी (accidents happen to others ga.vi. theory) जनता अळम् टळम करत निवांत बाहेर पडत असते (मी सुद्धा आहे त्यात :( ) आता इथुन पुढे फायर ड्रील्स सिरिअसली घेणार.

अत्यंत सोप्या भाषेतला उत्तम लेख. इमर्जन्सी घंटा, त्यानंतर घ्यायच्या ऍक्शन्स यासोबतच आताच्या काळात अशा काही सिस्टिम्स असतात का की ज्याद्वारे आग लागल्यावर त्या कंट्रोल सिस्टिम द्वारा एका ठराविक क्रमाने मशिन्स, इंजिन हे आपोआप बंद होतील आणि मोठी दुर्घटना टळू शकेल. यात सगळं काही बंद करून चालणार नाहीच. पण ऑटोमॅटिक फायर फाईटिंग सिस्टिम ने यात हानी कमी व्हावी आणि जास्तीत जास्त सुरक्षितता मिळावी म्हणून काही करता येतं का? कुठलाही ऑइल प्लॅटफॉर्म किंवा एखादा केमिकल प्लांट यात हे सर्व अत्यावश्यक असते, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ते एका मर्यादेपर्यंत साध्य होऊ शकते पण त्यातही अनेक अपवाद असतात. शिवाय या प्रकारच्या यंत्रणे साठी होणारा खर्च देखील प्रचंड असतो. फक्त तसे काही या बोटींवर असते का किंवा त्यावर प्रयत्न चालू आहेत का याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

स्वीट टॉकर 06/04/2016 - 13:40
सर्व जण, पुन्हा धन्यवाद. इडली डो सा - जनता अळम् टळम करत निवांत बाहेर पडत असते यामुळे ऑफिसला/कारखान्याला असलेले दरवाजे, पायर्या वगैरे पुरेशा वाटतात. जेव्हां खरी आग लागते तेव्हां सगळे धूम पळतात आणि त्याच दरवाज्यात चेंगराचेंगरी होते. पायर्यांवरून लोक धडपडतात आणि मागचे त्यांच्यावर अडखळतात आणि दिल्लीच्या थियेटरमध्ये झाली तशी हकनाक जीवितहानी होते. तुम्ही यापुढे ही ड्रिल्स सीरियसली घेणार हे चांगलंच आहे. मात्र ह्या अळम टळम वृत्तीवर अतिशय सोपा उपाय आहे. वरिष्ठांनी घोषणा करायची की 'ड्रिलमध्ये आपण इतक्या सेकंदात/मिनिटात सुखरूपपणे बाहेर पडू अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत ही वेळ आपण गाठू शकत नाही तो पर्यंत आपण पुन्हा पुन्हा ड्रिल करणार आहोत.' आकार कसाही असो. सगळे पळतात हरणाप्रमाणे! मधुरा देशपांडे - आग लागल्यावर मशिनरी आपोआप बंद करण्याची सिस्टिम करणं अगदीच सोपं आहे. मात्र बोट ही स्थिर नसून चालत असल्यामुळे वेगळे प्रश्न उभे राहातात. जर मशिनरी बंद झाल्यामुळे बोटीवरचं नियंत्रण सुटलं तर ती दुसर्या बोटीवर, बंदरात जेट्टीवर, आपली आपण खडकांवर वगैरे आपटू शकेल. 'एक्झॉन वाल्डेझ' नावाची बोट अलास्का मध्ये खडकावर आपटून किती प्रचंड हानी झाली हे सगळ्यांना आठवत असेल. आगीमुळे जितकं नुकसान होऊ शकेल त्याच्या कित्येक पट नुकसान हकनाक मशिनरी बंद करून होऊ शकतं. त्यामुळे तो निर्णय माणसाच्या हातातच ठेवणं बरं! मात्र आग लवकर पसरू नये म्हणून एक सिस्टिम असते. त्याला म्हणतात 'हायपर मिस्ट सिस्टिम'. जर साधं पाणी प्रचंड दाबानी एखाद्या बारीक भोकातून पलिकडे ढकललं तर त्याचे अत्यंत छोटे तुषार (मिस्ट) तयार होतात. हे तुषार आगीतील उष्णता शोषून घेण्यात प्रवीण असतात. शिवाय पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मशिनरी चालू असेल तरीही तिचं नुकसान नगण्य होतं. ही सिस्टिम आग विझवू शकत नाही. मात्र लागलेली आग लवकर पसरू देत नाही. त्यामुळे जिकडे आग लागण्याची जास्त शक्यता आहे, उदा. बोटीचं मुख्य इंजिन, जनरेटर इंजिन, बॉइलर, कचरा जाळण्याचा इन्सिनरेटर, तेल शुद्धिकरणाचं मशीन (याला आम्ही 'फ्युएल ऑइल प्युरिफायर' म्हणतो) या सगळ्यांवर ही सिस्टिम लावलेली असते. ही संपूर्णतः स्वयंचलित असते. ऑइल टँकर्सवर ही सिस्टिम लावणं कायद्यानी बंधनकारक असतं.

गामा पैलवान 02/06/2016 - 21:57
स्वीट टॉकर, एकंदरीत मोठ्या नौकेवरची भडकलेली आग म्हणजे एक महाभयानक प्रकरण असते. इथे एक अनुभव आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/10/blog-post_9424.html या अनुभवानंतर संबंधित माणसाच्या पत्नीचा अनुभव इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/11/blog-post_522.html या अनुभवाचे श्रद्धापूर्वक केलेले अध्यात्मिक विवेचन इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2016/03/blog-post_62.html आ.न., -गा.पै.

स्वीट टॉकर 03/06/2016 - 11:29
गा पै - धन्यवाद! कुठलीही गोष्ट वाचल्यावर तुमचा त्याच्यावर आणखी शोध आणि अभ्यास असतो. ही फारच उत्तम सवय आहे.

गामा पैलवान 03/06/2016 - 21:33
धन्यवाद स्वीट टॉकर! शोधाभ्यासास पूरक वातावरण हे प्रशासक, संपादकमंडळ व मिपाधनी यांच्या अथक परिश्रमांमुळेच लाभते. आ.न., -गा.पै.
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही. भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील.

दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)

स्वीट टॉकर ·

किस्सा वाचून अगदी सुन्न झालो , समुद्राच्या मध्या वर अस काही झाल तर काय करणार अक्षर्षा: पाचावर धारण बसली वाचून ....कोणाचा मृत्यू कधी आणि कशामुळे येईल हे सांगता यायच नाही ..:(

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:48
लेख वाचुन मन सुन्न झाले खरेच. बिचारा जोसेफ. मी तर ऐकुन होतो की परदेशात मानवी जीवनाची किंमत अमूल्य आहे. पण या केस मध्ये नर्स आणि अमेरिक नौदल या दोघांचीही वागणूक बघितली की त्यांच्यात शून्य माणुसकी आहे असे वाटते . ती मानवी जीवनाची किंमत वगैरे त्यांच्या नागरिकांसाठी. इतर लोक किडे मुंगी अशी त्यांची मानसिकता आहे असे वाटते. हरामखोर साले

नाखु 22/03/2016 - 11:55
दंडवत बाकी काही नाही... विलक्षण अनुभव आणि तितकेच प्रांजळ कथन ! जोसेफबाद्दल अनुकंपा आहे आणि तीव्र विषादही (त्याची काही चूक नसताना). जमीनीवरचा सुरक्षीत (?) नाखु

एस 22/03/2016 - 11:59
सुन्न! (एक सूचना, ही लेखमालिका असल्याने शीर्षकात तसा उल्लेख प्रत्येक भागात करा. उदा. 'बोटीवरील दिवस : दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)' असे.)

नाना स्कॉच 22/03/2016 - 12:06
हा लेख वाचुन सहज अंतरजालावर "MV JAG VIVEK" असे टाइप केले तेव्हा एसोसिएटेड प्रेस च्या आर्काइव्ज मधे बातमी सापडली . डोके आउट झाले हो! आमची खरेच काही बोलायची औकात नाही अजुन थोड़ा सर्च करता एक छोटे कत्रण मिळाले (द डेली, दिनांक 14/12/1988) . आपला अन जोसेफ चा असलेला ऋणानुबंध लक्षात घेता, आपण हा लेख लिहिलात म्हणजे आपण आपला मित्रशोक काही प्रमाणात पचवलात अन खंबीर झालात असा ग्रह झाल्यामुळे ही कॉमेंट पोस्ट करतोय, सदरहु कॉमेंट चा आपणांस त्रास झाल्यास किंवा वाटत असल्यास आपण प्लीज मला माफ़ करा, अन संपादक मंडळाने तड़क हा प्रतिसाद उड़वावा ही नम्र विनंती करतो -नाना

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह 22/03/2016 - 14:09
टक्या तुला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

समीरसूर 22/03/2016 - 14:08
खतरनाक अनुभव! अगदी स्तंभित करणारा. आपण ताकदीने लिहिला आहे. आपण अशा जगावेगळ्या अनुभवांवर एखादे पुस्तक लिहायला हवे. अनंत सामंत यांच्या 'एम ती आयवा मारू' आठवतेय आपले लेख वाचतांना. ती कादंबरीदेखील रोमांचक होती.

मदनबाण 22/03/2016 - 15:10
जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले. लष्करानी आम्हाला कळवलं, “तुम्ही सरावाच्या आयताच्या बाहेर पडलेले आहात. आता तुम्हाला पश्चिमेकडे जायला हरकत नाही.” मात्र त्या मूर्खानी भंगार बोटीच्या अक्षांश रेखांशाऐवजी आमचे टाकले होते ! त्या दिवशी मला काही महत्वाचं काम असल्या कारणानी मी ब्रिजवर उशिरा जायचं ठरवलं होतं. स्टुवर्डची साफसफाई सुरूच होती. दोन मिनिटात संपवून निघतो असं त्यानी सांगितलं पण जोसेफची थांबायची तयारी नव्हती. त्यानी जरा घुश्श्यांतच “आज काम नाही झालं तरी चालेल पण लगेच चालू लाग” असा आग्रह धरल्यामुळे नाखुशीनीच स्टुवर्ड रेडियो रुममधून बाहेर पडला. लगेच जोसेफ आत शिरला. ती बोट ग्रीस सोडून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशाची असती तर जोसेफच्या जागी माझी केबिन असती. म्रूत्यू हेच अंतिम सत्य आहे, जन्म आणि मॄत्यू यांच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य... हे असंच का होतं? या बद्धल मला नेहमीच नवल वाटते.भूकंप होतो, टोले जंग इमारती कोसळतात, अपघात होतात... धड धाकट,दांडगी माणसे पार्थीव देह म्हणुन ओळखली जातात पण नाजूक तान्ही बाळं मात्र या अश्या अपघातात अनेकदा बचावलेली सुद्धा दिसुन येतात... कशी ? का ? अनेक जण घटना घडणारे स्थान आयत्या वेळी सोडतात आणि काही जण कारण नसतानाही तिथे थांबायचे ठरवतात आणि काळाचा घास बनतात.सगळच अगम्य ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne

बोका-ए-आझम 22/03/2016 - 17:41
पु.लं.चं अपूर्वाई मधलं वाक्य आठवलं - आपण नाही पोळीकडे हात नेत आणि पापडाचा तुकडा मोडून तोंडात टाकत? रच्याकने जग विवेकची कंपनी Great Eastern का हो?

स्वीट टॉकर सर थरारक! तुमची लेखनशैली अप्रतिम! ----/\------- तुम्हाला भेटु शकलो परवा माझे भाग्य समजतो. बर आणखी एक..... शुभदा ताईंना जमल्यास ती सुंदर कविता लिहायला सांगा कट्ट्याच्या प्रतिसादात.

सटक 22/03/2016 - 18:50
काही अनुभव आयुष्य बदलून टाकणारे असतात! जबरदस्त लिहिले आहे तुम्ही!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे 23/03/2016 - 12:18
चाचणीसाठी असलेल्या क्षेपणास्त्रात डमी वॉरहेड ( फुसकी स्फोटके) असतात त्यामुळे त्याचा स्फोट होत नाही.

वाईट प्रसंग.... वाचताना सगळ डोळ्यासमोर येत होत आणी वाईट वाटत होत. तुम्ही जसे हतबल होता त्याक्षणी त्या परिस्थितीसमोर, तसेच, वाचतानाही जाणवत होते की पुढे वाईटच वाचायला मिळणार आहे पण वाचतच गेलो... Sandy

विकास 22/03/2016 - 22:20
माहीत नसलेल्या जोसेफची गोष्ट सांगून अस्वस्थ केलेत... लेखनशैली छानच आहे.

सतिश गावडे 22/03/2016 - 23:07
सुन्न करणारा अनुभव. तुम्ही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होतात त्यामुळे तुम्ही स्वतः या प्रसंगाला कसे सामोरे गेले असाल याची कल्पनाही करवत नाही.

रेवती 23/03/2016 - 00:59
जोसेफसाठी वाईट वाटले. आता त्याची मुलगी व पत्नी ठीक आहेत का? मुलगी मोठी झाली असेल. तुमची लेखनशैली अगदी जबरदस्त आहे. मृत्युंजयजी, परदेशात जिवाची किंमत आपल्याकडे असते त्यापेक्षा जरा बरी असते पण सगळे सोयिनुसार बदललेही जाते. कोणालाही कायद्याच्या कचाट्यात अडकायचे नसते.

रामपुरी 23/03/2016 - 02:06
जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां तो कुठे आणि केव्हां होणार आहे याची महिती ठराविक रेडियोलहरींवर (frequency) प्रसारित करतात याचा कधीच विचार केला नव्हता. हवाई दलाच्या सरावावेळी पण असंच करावं लागत असेल...

In reply to by रामपुरी

सुबोध खरे 23/03/2016 - 12:16
जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां नौकानयन मंत्रालयापासून आंतर राष्ट्रीय जहाज वाहतुकीच्या नियान्त्रानालायापर्यंत सर्वाना बातमी दिलेली असते आणी स्थानिक मच्छीमार समित्यांना सुद्धा त्याची आगाऊ सूचना दिलेली असते. माझा मित्र आय एन एस गोदावरी जहाजावर डॉक्टर असताना सरावासाठी पृष्ठभागावरून पृष्ठभागावर डागण्याच्या( SURFACE TO SURFACE MISSILE) क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी मुंबईच्या थेट पश्चिमेकडे २०० मैलावर एक चौरस ठरवला होता. तशी सूचना वरील सर्व लोकांना दिली होती. अशा वेळेस प्रत्यक्ष क्षेपणास्त्र डागण्याच्या वेळेस तेथे असलेल्या लक्ष्याच्या बाजूस एक जहाज असल्याचे जाणवले म्हणून क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित करून त्या जहाजाची तपासणी करण्याचे ठरले. जेंव्हा त्या जहाजाचा पाठलाग चालू केला तेंव्हा ते पळू लागले. या वर गोदावरीच्या कॅप्टन ने हेलीकॉप्टर पाठवले आणी मशिन् गन ने त्या बोटीच्या पुढे गोळ्या डागल्यावर ते पाण्यात उभे राहिले. हे दुबई वरून येणारे तस्करी करणारे होडके(DHOW) होते आणी त्यात बोटीच्या तळाशी १८ कोटी रुपयाची चांदी मिळाली. त्यांना पकडून अंमलबजावणी संचालनालयाकडे( ED) सुपूर्द करण्यात आले. सर्व साधारणपणे जेंव्हा पोलीस किंवा तटरक्षक दल जेंव्हा अशी तस्करी पकडत तेंव्हा त्यात मिळणाऱ्या रकमेच्या १० % रक्कम त्या जहाजाच्या कर्मचार्यांना मिळत असे. दुर्दैवाने नौदलाला असे पैसे देण्याचा कोणताही "नियम" नसल्याने सरकार कडून आमच्या नौसैनिकांना एक दमडी सुद्धा मिळाली नाही. एकदा असा "अपवाद" करावा (one time exception)या नौदलाच्या अर्जाला सरकारी बाबू लोकांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या. उलट त्या होडक्याच्या सव्यापसव्यात दोन दिवस गेल्याने दोन दिवस अजून समुद्रात क्षेपणास्त्र तयारी साठी काढावे लागले.

स्वीट टॉकर 23/03/2016 - 10:26
सर्व़जण, धन्यवाद. नाना स्कॉच - तुमच्या प्रतिसादात काहीही गैर नाही. जर मला प्रतिसादांचा त्रास होणार असं वाटलं असतं तर मी लेखच लिहिला नसता. जे झालं ते दुर्दैवी होतं यात शंकाच नाही. पण 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे!" हे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या आंतरजालावरच्या शोधामुळे बाकीच्या वाचकांना आणखी माहिती मिळाली. धन्यवाद! बोका-ए-आझम - बरोबर आहे. ग्रेट ईस्टर्न कंपनी. त्यांच्या सगळ्या बोटींची नावे 'जग' या शब्दापासून त्या काळी सुरू व्हायची. मी तिथे दहा वर्षं नोकरी केली. शांतिप्रिय आणि वसन्त चव्हाण - कृपया 'भेटून धन्य झालो' वगैरे लिहून मला लाजवू नका. आपण मिसळपाव आवडणारे मित्रमैत्रिणी आहोत आणि तसेच राहू या ! ती कविता शुभदाने लिहिलेली नव्हती. तिने कधीही कविता केलेली नाही. मात्र खूपच पाठांतर आहे. प्रतिसादात ती कविता टाकेल. कॅप्टन जॅक स्पॅरो - हाय एक्स्प्लोझिव असतं तर कठीण होतं की नाही मला माहीत नाही, मात्र ही हकीकत तुम्हाला वाचायला मिळाली नसती एवढं नक्की! रेवती - मोबाइल, ई मेल वगैरेंच्या आधीचा तो काळ. त्यांच्या कुटुंबाशी एक वर्षभर संपर्क होता. हळुहळु नाहिसा झाला.

स्रुजा 23/03/2016 - 21:27
बाप रे ! हाँट केलं असेल या अनुभवाने तुम्हाला.. जोसेफ बद्दल वाईट वाटलं :( तुमच्या लेखन शैलीचं कौतुक वाटतं. ही सीरिज वाचते आहे पहिल्या लेखापासुन पण प्रतिसाद मात्र द्यायला जमलं नव्हतं. तुम्ही लिहीत राहा. फार छान लिहीताय.

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव 24/03/2016 - 00:39
त्या हजारो टन गव्हाचं काय झालं ? इतका प्रचंड अन्नसाठा उशीरा पोचल्यामुळे काहि वेगळेच प्रॉब्लेम्स झाले नसतील ना.

स्वीट टॉकर 24/03/2016 - 11:07
सर्वजण, पुन्हा धन्यवाद! सुबोध खरेसाहेब, नेव्हीला दहा टक्के न मिळणं हे blatantly unfair! आपली न्यूसंस व्हॅल्यू सिद्ध करणं काही बाबूंकडून शिकावं! अर्धवटराव, आपल्या बिचार्‍या जनतेला अर्धपोटी राहाण्याची सवयच आहे. थोडे दिवस जास्त! भारतात परतल्यावर तो सगळा गहू आणि सबंद बोट (आमच्या सहित) रेडियोअ‍ॅक्टिव्हिटीसाठी तपासली गेली. (आपल्या नौसेनेनी ते काम केलं.) नशिबानी काही मिळालं नाही. मगच गहू उतरवला गेला आणि आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली.

उल्का 24/03/2016 - 17:29
आज तुमचे चारही लेख वाचले. छानच लिहिले आहेत. हा लेख वाचताना सुन्न झाले होते. शेवटचा इंग्रजीचा वाचला. कल्पना खूप आवडली. सागरी जीवनाचे आम्हाला अप्रूप! त्याविषयीचे तुमचे लेखन वाचायला खूप आवडते आहे. धन्यवाद!

गामा पैलवान 01/04/2016 - 23:45
स्वीट टॉकर, आपली यावर इतरत्र चर्चा होऊन गेली आहे. इथल्या वाचकांसाठी तिचा गोषवारा डकवतो. ---------------------- गोषवारा सुरू ---------------------------------- विकीवर थोडी शोधाशोध केली. तेव्हा हे सापडलं : http://www.nytimes.com/1988/12/13/world/us-rocket-hits-indian-ship-accidentally-killing-crewman.html हारपून एका एफ/ए - १८ हॉर्नेट विमानावरून डागलं गेलं होतं. त्या प्रकारची विमानाची ती तुलनेने नवी आवृत्ती (एफ/ए - १८ सी वा डी) असावी. अधिक माहिती इथे आहे : http://www.fas.org/man/dod-101/sys/ac/f-18.htm या दुव्यावर विमानावर जे हारपून क्षेपणास्त्र डकवता येते त्याचा दुवा मिळतो : http://www.fas.org/man/dod-101/sys/smart/agm-84.htm तिथे क्षेपणास्त्राकडून लक्ष्य कसे गाठले जाते त्याची माहिती दिली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की हारपूनवर स्फोटके नव्हती. ती असती तर एफ-१६ च्या व्यत्ययी हल्ल्यात त्यावरील स्फोटके पेटून ते वेळच्या वेळी (कदाचित बरंच आधीही) नष्ट झालं असतं! दैवाचा असाही एक खेळ! या घटनेतल्या एका योगायोगाचं नवल वाटतं. लेखकाने अपघाताचं वर्णन केलंय त्यात आग वा धूर नव्हता हे स्पष्ट आहे. त्यावरून आघातसमयी क्षेपणास्त्रात इंधन नव्हतं ही नौदलाने दिलेली माहिती खरी दिसते आहे. हे क्षेपणास्त्र उंचावरून प्रवास करत नसून समुद्राच्या पृष्ठभागाजवळून जातं. इंधन संपल्यावर ते लवकरच समुद्रार्पण होतं. उंचावरून प्रवास करणारं क्षेपणास्त्र अंगभूत फेकीमुळे थोडं दूरवर जाऊ शकतं. तसं या हारपूनचं नाही. प्रश्न असा आहे की बरोब्बर जगविवेक नौकेपर्यंतच पुरेल इतकं अचूक इंधन क्षेपणास्त्रात कसं भरलं गेलं असावं? हा नक्की योगायोगच आहे ना? थोडी आकडेमोड केली. हारपूनचा वेग = ताशी ८५५ किमी लक्ष्यापासून अंतर १२० मैल = १९२ किमी हारपूनचा प्रवासकाल = (१९२ ÷ ८५५ ) तास = ०.२२४५६ तास = ८०८.४२ सेकंद तर सुमारे ८१० सेकंदांपैकी फक्त शेवटचे २४० सेकंद हारपूनला हाकून लावण्यात कामी आले. म्हणजे पहिले ५७० सेकंद ( = साडेनऊ मिनिटे) केवळ निर्णय घेण्यात खर्ची पडले. अमेरिकेसारख्या प्रगत नौदलासंदर्भात हा कालावधी पटण्याजोगा नाही. हेच जर १२० नॉटिकल मैल असतील तर जास्तच वेळकाढूपणा झाला म्हणायचा! ---------------------- गोषवारा समाप्त ---------------------------------- अतिरिक्त विसंगती येणेप्रमाणे : तुम्ही लेखात म्हणालात की :
>> जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले. >> पण परमेश्वराच्या राज्यात चुकीला क्षमा नाही.
याउलट विकिवर हे सापडलं : >> A Notice to Mariners had been issued warning of the danger, but Jagvivek left port before >> receiving the communication and subsequently strayed into the test range area, and the >> Harpoon missile, loaded just with an inert dummy warhead, locked onto it instead of its >> intended target. जोसेफकडून खरोखरच संदेश हुकले होते का? का विकीवर अर्धवट माहिती दिलीये? धन्यवाद. आ.न., -गा.पै.

स्वीट टॉकर 06/04/2016 - 14:08
मी वेगवेगळ्या वेळेस जे प्रतिसाद दिले होते ते चिकटवतो म्हणजे वाचकांना सोपं जाईल. १. हारपूनचा मार्ग तेव्हां तरी वळवता येत नव्हता हे मला नक्की माहीत आहे. याला दोन दाखले आहेत. अ. मी ज्या एफ १६ बद्दल लिहिले होते त्यांनी मिसाइलला आमच्या बोटीशेजारीच गाठलं आणि त्यावर strafing देखील केलं पण त्याचा उपयोग झाला नाही. या गोष्टीला अशा बारीक फांद्या बर्‍याच आहेत पण गोष्ट अति लांब झाली की ती कंटाळवाणी होण्याची शक्यता असते म्हणून मी त्यांना छाटलं आहे. ब. अमेरिकेनी पाकिस्तानला ही हारपून मिसाइल्स दिली आहेत. त्यामुळे आमची बोट परत भारतात परतल्यावर इंडियन नेव्हीचे experts आमच्या बोटीवर investigation साठी आले होते. त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. हे मिसाइल originally पृष्ठभागावर आलेल्या पाणबुड्यांविरुद्ध वापरण्यासाठी बनवलं गेलं होतं. (पृष्ठभागावर आलेली पाणबुडी आणि छोटी बोट यात मिसाइलच्या दृष्टीनी काय फरक आहे हे काही मला माहीत नाही.) किमतीनी अतिशय स्वस्त असल्याकारणानं ते खूपच popular झालं. त्यांच्या investigations नुसार आमच्या बोटीला लागायच्या आधीच त्यातलं इंधन संपलं होतं. त्याचा वेग आणि उंचि झपाट्यानी कमी होत होती. आम्ही आणखी थोडे दूर असतो तर ते harmlessly पाण्यात पडलं असतं. २. सगळ्या फांद्या लिहिणे worth होणार नाही. त्यातली एक लिहितो. डेकवर जे खलाशी काम करंत होते त्यामध्ये एक अर्धवट मनुष्य होता. त्याची मतं इतकी भन्नाट होती की त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देत नसत. तो म्हणाला की बोटीवर लागलेला बॉम्ब नक्की पाण्याच्या आतून आला !! 'असं तुला का वाटतं?' असं विचारल्यावर तो म्हणाला की आवाज आल्यावर जेव्हां त्याने मागे बघितलं तेव्हां त्याला बोटीच्या मागे अर्धा मैल शंभरएक कारंजी दिसली. तिथूनच तो बॉम्ब आला असणार. आम्ही नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केलं. नंतर अमेरिकन न्यूजपेपर्सनी ही न्यूज शोधून छापली. त्या एफ १६ नी बॉम्बला आमच्या बोटीच्या जवळ असताना गाठलं होतं. त्याच्यावर strafing ही केलं होतं. आमच्या खलाशानी त्या strafing मुळे पाण्यात निर्माण झालेली कारंजी बघितली असणार. याचा अर्थ अमेरिकन नेव्हीला आमच्या बोटीला exactly कधी आणि कुठे मिसाइल लागलं हे ठाऊक होतं. तरी नुसतं उत्तर द्यायला वीस मिनिटं लावली. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला साडेनऊ मिनिटं लागली असली तर त्यात फारसं नवल मला वाटत नाही. दुसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे मी जी चार मिनिटं mention केली आहेत ती देखील नेव्हीकडून मिळालेल्या माहितीवरच आधारित आहेत. ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यांची चूक होती की त्यांनी सराव परिघाच्या बाहेरच्या बोटीवर बॉम्ब टाकला. लपविण्यासाठी खोटं सांगितलं देखील असेल. ३. बोटीला संदेश येण्यासाठी बंदरात असण्याची आवश्यकता नसते. म्हणून तर रेडियो ऑफिसर लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला मिसाइल लागलं तेव्हां आम्ही टेस्ट रेंजच्या बाहेर होतो. या दोन्ही बाबतीत विकी वरची माहिती बरोबर नाही. विकी ही जनरल माहिती पुरतीच ठीक आहे. ही केस कोर्टापर्यंत पोहोचली नाही. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून जोसेफच्या फॅमिलीला आणि आमच्या कंपनीला नौदलाने पैसे दिले.

गामा पैलवान 07/04/2016 - 22:00
स्वीट टॉकर, माहितीबद्दल धन्यवाद. :-) माझ्या मनातली शंका सांगून या अन्वेषणाचा समारोप करतो. ज्यांना पुढे अन्वेषण करायचे आहे त्यांनी खालील प्रश्न गांभीर्याने घ्यावा म्हणून सुचवेन. तर प्रश्न आहे की : नेमकं जगविवेक बोटीपर्यंत पुरेल इतकंच इंधन क्षेपणास्त्रात भरलं गेलं. हा नक्की योगायोगच आहे का? की मुद्दाम केलेली खेळी आहे? मी इथे थांबतो. आ.न., -गा.पै.

नमकिन 03/06/2016 - 22:20
नुकतेच झालेले संचलन प्रसंगी IST की GMT वेळेच्या गोंधळामुळे airstrip closed नव्हती, असा काही प्रकार ATC व नौसेना समन्वय अभाव, दोषारोप झालेले आठवतायत. एखादे प्रवासी विमान सापडले असते तर भारतीय सेना व नागरी उड्डयन संघाचे धिंडवडे निघाले असते. पुढे जीवितहनीची कल्पना करवत नाहीं ऊमद्या सहका-याला इतर कुणाच्या दुर्लक्ष, बेजबाबदारीमुळे प्राणास मुकावे लागणे व त्याचा न्याय निवाडा न होणे हे फार संतापजनक व क्लेषकारक. पुलेशु

किस्सा वाचून अगदी सुन्न झालो , समुद्राच्या मध्या वर अस काही झाल तर काय करणार अक्षर्षा: पाचावर धारण बसली वाचून ....कोणाचा मृत्यू कधी आणि कशामुळे येईल हे सांगता यायच नाही ..:(

मृत्युन्जय 22/03/2016 - 11:48
लेख वाचुन मन सुन्न झाले खरेच. बिचारा जोसेफ. मी तर ऐकुन होतो की परदेशात मानवी जीवनाची किंमत अमूल्य आहे. पण या केस मध्ये नर्स आणि अमेरिक नौदल या दोघांचीही वागणूक बघितली की त्यांच्यात शून्य माणुसकी आहे असे वाटते . ती मानवी जीवनाची किंमत वगैरे त्यांच्या नागरिकांसाठी. इतर लोक किडे मुंगी अशी त्यांची मानसिकता आहे असे वाटते. हरामखोर साले

नाखु 22/03/2016 - 11:55
दंडवत बाकी काही नाही... विलक्षण अनुभव आणि तितकेच प्रांजळ कथन ! जोसेफबाद्दल अनुकंपा आहे आणि तीव्र विषादही (त्याची काही चूक नसताना). जमीनीवरचा सुरक्षीत (?) नाखु

एस 22/03/2016 - 11:59
सुन्न! (एक सूचना, ही लेखमालिका असल्याने शीर्षकात तसा उल्लेख प्रत्येक भागात करा. उदा. 'बोटीवरील दिवस : दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)' असे.)

नाना स्कॉच 22/03/2016 - 12:06
हा लेख वाचुन सहज अंतरजालावर "MV JAG VIVEK" असे टाइप केले तेव्हा एसोसिएटेड प्रेस च्या आर्काइव्ज मधे बातमी सापडली . डोके आउट झाले हो! आमची खरेच काही बोलायची औकात नाही अजुन थोड़ा सर्च करता एक छोटे कत्रण मिळाले (द डेली, दिनांक 14/12/1988) . आपला अन जोसेफ चा असलेला ऋणानुबंध लक्षात घेता, आपण हा लेख लिहिलात म्हणजे आपण आपला मित्रशोक काही प्रमाणात पचवलात अन खंबीर झालात असा ग्रह झाल्यामुळे ही कॉमेंट पोस्ट करतोय, सदरहु कॉमेंट चा आपणांस त्रास झाल्यास किंवा वाटत असल्यास आपण प्लीज मला माफ़ करा, अन संपादक मंडळाने तड़क हा प्रतिसाद उड़वावा ही नम्र विनंती करतो -नाना

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह 22/03/2016 - 14:09
टक्या तुला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

समीरसूर 22/03/2016 - 14:08
खतरनाक अनुभव! अगदी स्तंभित करणारा. आपण ताकदीने लिहिला आहे. आपण अशा जगावेगळ्या अनुभवांवर एखादे पुस्तक लिहायला हवे. अनंत सामंत यांच्या 'एम ती आयवा मारू' आठवतेय आपले लेख वाचतांना. ती कादंबरीदेखील रोमांचक होती.

मदनबाण 22/03/2016 - 15:10
जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले. लष्करानी आम्हाला कळवलं, “तुम्ही सरावाच्या आयताच्या बाहेर पडलेले आहात. आता तुम्हाला पश्चिमेकडे जायला हरकत नाही.” मात्र त्या मूर्खानी भंगार बोटीच्या अक्षांश रेखांशाऐवजी आमचे टाकले होते ! त्या दिवशी मला काही महत्वाचं काम असल्या कारणानी मी ब्रिजवर उशिरा जायचं ठरवलं होतं. स्टुवर्डची साफसफाई सुरूच होती. दोन मिनिटात संपवून निघतो असं त्यानी सांगितलं पण जोसेफची थांबायची तयारी नव्हती. त्यानी जरा घुश्श्यांतच “आज काम नाही झालं तरी चालेल पण लगेच चालू लाग” असा आग्रह धरल्यामुळे नाखुशीनीच स्टुवर्ड रेडियो रुममधून बाहेर पडला. लगेच जोसेफ आत शिरला. ती बोट ग्रीस सोडून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशाची असती तर जोसेफच्या जागी माझी केबिन असती. म्रूत्यू हेच अंतिम सत्य आहे, जन्म आणि मॄत्यू यांच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य... हे असंच का होतं? या बद्धल मला नेहमीच नवल वाटते.भूकंप होतो, टोले जंग इमारती कोसळतात, अपघात होतात... धड धाकट,दांडगी माणसे पार्थीव देह म्हणुन ओळखली जातात पण नाजूक तान्ही बाळं मात्र या अश्या अपघातात अनेकदा बचावलेली सुद्धा दिसुन येतात... कशी ? का ? अनेक जण घटना घडणारे स्थान आयत्या वेळी सोडतात आणि काही जण कारण नसतानाही तिथे थांबायचे ठरवतात आणि काळाचा घास बनतात.सगळच अगम्य ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne

बोका-ए-आझम 22/03/2016 - 17:41
पु.लं.चं अपूर्वाई मधलं वाक्य आठवलं - आपण नाही पोळीकडे हात नेत आणि पापडाचा तुकडा मोडून तोंडात टाकत? रच्याकने जग विवेकची कंपनी Great Eastern का हो?

स्वीट टॉकर सर थरारक! तुमची लेखनशैली अप्रतिम! ----/\------- तुम्हाला भेटु शकलो परवा माझे भाग्य समजतो. बर आणखी एक..... शुभदा ताईंना जमल्यास ती सुंदर कविता लिहायला सांगा कट्ट्याच्या प्रतिसादात.

सटक 22/03/2016 - 18:50
काही अनुभव आयुष्य बदलून टाकणारे असतात! जबरदस्त लिहिले आहे तुम्ही!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे 23/03/2016 - 12:18
चाचणीसाठी असलेल्या क्षेपणास्त्रात डमी वॉरहेड ( फुसकी स्फोटके) असतात त्यामुळे त्याचा स्फोट होत नाही.

वाईट प्रसंग.... वाचताना सगळ डोळ्यासमोर येत होत आणी वाईट वाटत होत. तुम्ही जसे हतबल होता त्याक्षणी त्या परिस्थितीसमोर, तसेच, वाचतानाही जाणवत होते की पुढे वाईटच वाचायला मिळणार आहे पण वाचतच गेलो... Sandy

विकास 22/03/2016 - 22:20
माहीत नसलेल्या जोसेफची गोष्ट सांगून अस्वस्थ केलेत... लेखनशैली छानच आहे.

सतिश गावडे 22/03/2016 - 23:07
सुन्न करणारा अनुभव. तुम्ही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होतात त्यामुळे तुम्ही स्वतः या प्रसंगाला कसे सामोरे गेले असाल याची कल्पनाही करवत नाही.

रेवती 23/03/2016 - 00:59
जोसेफसाठी वाईट वाटले. आता त्याची मुलगी व पत्नी ठीक आहेत का? मुलगी मोठी झाली असेल. तुमची लेखनशैली अगदी जबरदस्त आहे. मृत्युंजयजी, परदेशात जिवाची किंमत आपल्याकडे असते त्यापेक्षा जरा बरी असते पण सगळे सोयिनुसार बदललेही जाते. कोणालाही कायद्याच्या कचाट्यात अडकायचे नसते.

रामपुरी 23/03/2016 - 02:06
जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां तो कुठे आणि केव्हां होणार आहे याची महिती ठराविक रेडियोलहरींवर (frequency) प्रसारित करतात याचा कधीच विचार केला नव्हता. हवाई दलाच्या सरावावेळी पण असंच करावं लागत असेल...

In reply to by रामपुरी

सुबोध खरे 23/03/2016 - 12:16
जगातल्या कोणत्याही देशाचं नौदल जेव्हां लढाईचा सराव करू इच्छितं तेव्हां नौकानयन मंत्रालयापासून आंतर राष्ट्रीय जहाज वाहतुकीच्या नियान्त्रानालायापर्यंत सर्वाना बातमी दिलेली असते आणी स्थानिक मच्छीमार समित्यांना सुद्धा त्याची आगाऊ सूचना दिलेली असते. माझा मित्र आय एन एस गोदावरी जहाजावर डॉक्टर असताना सरावासाठी पृष्ठभागावरून पृष्ठभागावर डागण्याच्या( SURFACE TO SURFACE MISSILE) क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी मुंबईच्या थेट पश्चिमेकडे २०० मैलावर एक चौरस ठरवला होता. तशी सूचना वरील सर्व लोकांना दिली होती. अशा वेळेस प्रत्यक्ष क्षेपणास्त्र डागण्याच्या वेळेस तेथे असलेल्या लक्ष्याच्या बाजूस एक जहाज असल्याचे जाणवले म्हणून क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित करून त्या जहाजाची तपासणी करण्याचे ठरले. जेंव्हा त्या जहाजाचा पाठलाग चालू केला तेंव्हा ते पळू लागले. या वर गोदावरीच्या कॅप्टन ने हेलीकॉप्टर पाठवले आणी मशिन् गन ने त्या बोटीच्या पुढे गोळ्या डागल्यावर ते पाण्यात उभे राहिले. हे दुबई वरून येणारे तस्करी करणारे होडके(DHOW) होते आणी त्यात बोटीच्या तळाशी १८ कोटी रुपयाची चांदी मिळाली. त्यांना पकडून अंमलबजावणी संचालनालयाकडे( ED) सुपूर्द करण्यात आले. सर्व साधारणपणे जेंव्हा पोलीस किंवा तटरक्षक दल जेंव्हा अशी तस्करी पकडत तेंव्हा त्यात मिळणाऱ्या रकमेच्या १० % रक्कम त्या जहाजाच्या कर्मचार्यांना मिळत असे. दुर्दैवाने नौदलाला असे पैसे देण्याचा कोणताही "नियम" नसल्याने सरकार कडून आमच्या नौसैनिकांना एक दमडी सुद्धा मिळाली नाही. एकदा असा "अपवाद" करावा (one time exception)या नौदलाच्या अर्जाला सरकारी बाबू लोकांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या. उलट त्या होडक्याच्या सव्यापसव्यात दोन दिवस गेल्याने दोन दिवस अजून समुद्रात क्षेपणास्त्र तयारी साठी काढावे लागले.

स्वीट टॉकर 23/03/2016 - 10:26
सर्व़जण, धन्यवाद. नाना स्कॉच - तुमच्या प्रतिसादात काहीही गैर नाही. जर मला प्रतिसादांचा त्रास होणार असं वाटलं असतं तर मी लेखच लिहिला नसता. जे झालं ते दुर्दैवी होतं यात शंकाच नाही. पण 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे!" हे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या आंतरजालावरच्या शोधामुळे बाकीच्या वाचकांना आणखी माहिती मिळाली. धन्यवाद! बोका-ए-आझम - बरोबर आहे. ग्रेट ईस्टर्न कंपनी. त्यांच्या सगळ्या बोटींची नावे 'जग' या शब्दापासून त्या काळी सुरू व्हायची. मी तिथे दहा वर्षं नोकरी केली. शांतिप्रिय आणि वसन्त चव्हाण - कृपया 'भेटून धन्य झालो' वगैरे लिहून मला लाजवू नका. आपण मिसळपाव आवडणारे मित्रमैत्रिणी आहोत आणि तसेच राहू या ! ती कविता शुभदाने लिहिलेली नव्हती. तिने कधीही कविता केलेली नाही. मात्र खूपच पाठांतर आहे. प्रतिसादात ती कविता टाकेल. कॅप्टन जॅक स्पॅरो - हाय एक्स्प्लोझिव असतं तर कठीण होतं की नाही मला माहीत नाही, मात्र ही हकीकत तुम्हाला वाचायला मिळाली नसती एवढं नक्की! रेवती - मोबाइल, ई मेल वगैरेंच्या आधीचा तो काळ. त्यांच्या कुटुंबाशी एक वर्षभर संपर्क होता. हळुहळु नाहिसा झाला.

स्रुजा 23/03/2016 - 21:27
बाप रे ! हाँट केलं असेल या अनुभवाने तुम्हाला.. जोसेफ बद्दल वाईट वाटलं :( तुमच्या लेखन शैलीचं कौतुक वाटतं. ही सीरिज वाचते आहे पहिल्या लेखापासुन पण प्रतिसाद मात्र द्यायला जमलं नव्हतं. तुम्ही लिहीत राहा. फार छान लिहीताय.

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव 24/03/2016 - 00:39
त्या हजारो टन गव्हाचं काय झालं ? इतका प्रचंड अन्नसाठा उशीरा पोचल्यामुळे काहि वेगळेच प्रॉब्लेम्स झाले नसतील ना.

स्वीट टॉकर 24/03/2016 - 11:07
सर्वजण, पुन्हा धन्यवाद! सुबोध खरेसाहेब, नेव्हीला दहा टक्के न मिळणं हे blatantly unfair! आपली न्यूसंस व्हॅल्यू सिद्ध करणं काही बाबूंकडून शिकावं! अर्धवटराव, आपल्या बिचार्‍या जनतेला अर्धपोटी राहाण्याची सवयच आहे. थोडे दिवस जास्त! भारतात परतल्यावर तो सगळा गहू आणि सबंद बोट (आमच्या सहित) रेडियोअ‍ॅक्टिव्हिटीसाठी तपासली गेली. (आपल्या नौसेनेनी ते काम केलं.) नशिबानी काही मिळालं नाही. मगच गहू उतरवला गेला आणि आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली.

उल्का 24/03/2016 - 17:29
आज तुमचे चारही लेख वाचले. छानच लिहिले आहेत. हा लेख वाचताना सुन्न झाले होते. शेवटचा इंग्रजीचा वाचला. कल्पना खूप आवडली. सागरी जीवनाचे आम्हाला अप्रूप! त्याविषयीचे तुमचे लेखन वाचायला खूप आवडते आहे. धन्यवाद!

गामा पैलवान 01/04/2016 - 23:45
स्वीट टॉकर, आपली यावर इतरत्र चर्चा होऊन गेली आहे. इथल्या वाचकांसाठी तिचा गोषवारा डकवतो. ---------------------- गोषवारा सुरू ---------------------------------- विकीवर थोडी शोधाशोध केली. तेव्हा हे सापडलं : http://www.nytimes.com/1988/12/13/world/us-rocket-hits-indian-ship-accidentally-killing-crewman.html हारपून एका एफ/ए - १८ हॉर्नेट विमानावरून डागलं गेलं होतं. त्या प्रकारची विमानाची ती तुलनेने नवी आवृत्ती (एफ/ए - १८ सी वा डी) असावी. अधिक माहिती इथे आहे : http://www.fas.org/man/dod-101/sys/ac/f-18.htm या दुव्यावर विमानावर जे हारपून क्षेपणास्त्र डकवता येते त्याचा दुवा मिळतो : http://www.fas.org/man/dod-101/sys/smart/agm-84.htm तिथे क्षेपणास्त्राकडून लक्ष्य कसे गाठले जाते त्याची माहिती दिली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की हारपूनवर स्फोटके नव्हती. ती असती तर एफ-१६ च्या व्यत्ययी हल्ल्यात त्यावरील स्फोटके पेटून ते वेळच्या वेळी (कदाचित बरंच आधीही) नष्ट झालं असतं! दैवाचा असाही एक खेळ! या घटनेतल्या एका योगायोगाचं नवल वाटतं. लेखकाने अपघाताचं वर्णन केलंय त्यात आग वा धूर नव्हता हे स्पष्ट आहे. त्यावरून आघातसमयी क्षेपणास्त्रात इंधन नव्हतं ही नौदलाने दिलेली माहिती खरी दिसते आहे. हे क्षेपणास्त्र उंचावरून प्रवास करत नसून समुद्राच्या पृष्ठभागाजवळून जातं. इंधन संपल्यावर ते लवकरच समुद्रार्पण होतं. उंचावरून प्रवास करणारं क्षेपणास्त्र अंगभूत फेकीमुळे थोडं दूरवर जाऊ शकतं. तसं या हारपूनचं नाही. प्रश्न असा आहे की बरोब्बर जगविवेक नौकेपर्यंतच पुरेल इतकं अचूक इंधन क्षेपणास्त्रात कसं भरलं गेलं असावं? हा नक्की योगायोगच आहे ना? थोडी आकडेमोड केली. हारपूनचा वेग = ताशी ८५५ किमी लक्ष्यापासून अंतर १२० मैल = १९२ किमी हारपूनचा प्रवासकाल = (१९२ ÷ ८५५ ) तास = ०.२२४५६ तास = ८०८.४२ सेकंद तर सुमारे ८१० सेकंदांपैकी फक्त शेवटचे २४० सेकंद हारपूनला हाकून लावण्यात कामी आले. म्हणजे पहिले ५७० सेकंद ( = साडेनऊ मिनिटे) केवळ निर्णय घेण्यात खर्ची पडले. अमेरिकेसारख्या प्रगत नौदलासंदर्भात हा कालावधी पटण्याजोगा नाही. हेच जर १२० नॉटिकल मैल असतील तर जास्तच वेळकाढूपणा झाला म्हणायचा! ---------------------- गोषवारा समाप्त ---------------------------------- अतिरिक्त विसंगती येणेप्रमाणे : तुम्ही लेखात म्हणालात की :
>> जोसेफ कामात चोख. नेमकं त्याच देवशी काय झालं कोणास ठाऊक. त्याच्याकडून हे संदेश हुकले. >> पण परमेश्वराच्या राज्यात चुकीला क्षमा नाही.
याउलट विकिवर हे सापडलं : >> A Notice to Mariners had been issued warning of the danger, but Jagvivek left port before >> receiving the communication and subsequently strayed into the test range area, and the >> Harpoon missile, loaded just with an inert dummy warhead, locked onto it instead of its >> intended target. जोसेफकडून खरोखरच संदेश हुकले होते का? का विकीवर अर्धवट माहिती दिलीये? धन्यवाद. आ.न., -गा.पै.

स्वीट टॉकर 06/04/2016 - 14:08
मी वेगवेगळ्या वेळेस जे प्रतिसाद दिले होते ते चिकटवतो म्हणजे वाचकांना सोपं जाईल. १. हारपूनचा मार्ग तेव्हां तरी वळवता येत नव्हता हे मला नक्की माहीत आहे. याला दोन दाखले आहेत. अ. मी ज्या एफ १६ बद्दल लिहिले होते त्यांनी मिसाइलला आमच्या बोटीशेजारीच गाठलं आणि त्यावर strafing देखील केलं पण त्याचा उपयोग झाला नाही. या गोष्टीला अशा बारीक फांद्या बर्‍याच आहेत पण गोष्ट अति लांब झाली की ती कंटाळवाणी होण्याची शक्यता असते म्हणून मी त्यांना छाटलं आहे. ब. अमेरिकेनी पाकिस्तानला ही हारपून मिसाइल्स दिली आहेत. त्यामुळे आमची बोट परत भारतात परतल्यावर इंडियन नेव्हीचे experts आमच्या बोटीवर investigation साठी आले होते. त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. हे मिसाइल originally पृष्ठभागावर आलेल्या पाणबुड्यांविरुद्ध वापरण्यासाठी बनवलं गेलं होतं. (पृष्ठभागावर आलेली पाणबुडी आणि छोटी बोट यात मिसाइलच्या दृष्टीनी काय फरक आहे हे काही मला माहीत नाही.) किमतीनी अतिशय स्वस्त असल्याकारणानं ते खूपच popular झालं. त्यांच्या investigations नुसार आमच्या बोटीला लागायच्या आधीच त्यातलं इंधन संपलं होतं. त्याचा वेग आणि उंचि झपाट्यानी कमी होत होती. आम्ही आणखी थोडे दूर असतो तर ते harmlessly पाण्यात पडलं असतं. २. सगळ्या फांद्या लिहिणे worth होणार नाही. त्यातली एक लिहितो. डेकवर जे खलाशी काम करंत होते त्यामध्ये एक अर्धवट मनुष्य होता. त्याची मतं इतकी भन्नाट होती की त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देत नसत. तो म्हणाला की बोटीवर लागलेला बॉम्ब नक्की पाण्याच्या आतून आला !! 'असं तुला का वाटतं?' असं विचारल्यावर तो म्हणाला की आवाज आल्यावर जेव्हां त्याने मागे बघितलं तेव्हां त्याला बोटीच्या मागे अर्धा मैल शंभरएक कारंजी दिसली. तिथूनच तो बॉम्ब आला असणार. आम्ही नेहमी प्रमाणे दुर्लक्ष केलं. नंतर अमेरिकन न्यूजपेपर्सनी ही न्यूज शोधून छापली. त्या एफ १६ नी बॉम्बला आमच्या बोटीच्या जवळ असताना गाठलं होतं. त्याच्यावर strafing ही केलं होतं. आमच्या खलाशानी त्या strafing मुळे पाण्यात निर्माण झालेली कारंजी बघितली असणार. याचा अर्थ अमेरिकन नेव्हीला आमच्या बोटीला exactly कधी आणि कुठे मिसाइल लागलं हे ठाऊक होतं. तरी नुसतं उत्तर द्यायला वीस मिनिटं लावली. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला साडेनऊ मिनिटं लागली असली तर त्यात फारसं नवल मला वाटत नाही. दुसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे मी जी चार मिनिटं mention केली आहेत ती देखील नेव्हीकडून मिळालेल्या माहितीवरच आधारित आहेत. ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यांची चूक होती की त्यांनी सराव परिघाच्या बाहेरच्या बोटीवर बॉम्ब टाकला. लपविण्यासाठी खोटं सांगितलं देखील असेल. ३. बोटीला संदेश येण्यासाठी बंदरात असण्याची आवश्यकता नसते. म्हणून तर रेडियो ऑफिसर लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला मिसाइल लागलं तेव्हां आम्ही टेस्ट रेंजच्या बाहेर होतो. या दोन्ही बाबतीत विकी वरची माहिती बरोबर नाही. विकी ही जनरल माहिती पुरतीच ठीक आहे. ही केस कोर्टापर्यंत पोहोचली नाही. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून जोसेफच्या फॅमिलीला आणि आमच्या कंपनीला नौदलाने पैसे दिले.

गामा पैलवान 07/04/2016 - 22:00
स्वीट टॉकर, माहितीबद्दल धन्यवाद. :-) माझ्या मनातली शंका सांगून या अन्वेषणाचा समारोप करतो. ज्यांना पुढे अन्वेषण करायचे आहे त्यांनी खालील प्रश्न गांभीर्याने घ्यावा म्हणून सुचवेन. तर प्रश्न आहे की : नेमकं जगविवेक बोटीपर्यंत पुरेल इतकंच इंधन क्षेपणास्त्रात भरलं गेलं. हा नक्की योगायोगच आहे का? की मुद्दाम केलेली खेळी आहे? मी इथे थांबतो. आ.न., -गा.पै.

नमकिन 03/06/2016 - 22:20
नुकतेच झालेले संचलन प्रसंगी IST की GMT वेळेच्या गोंधळामुळे airstrip closed नव्हती, असा काही प्रकार ATC व नौसेना समन्वय अभाव, दोषारोप झालेले आठवतायत. एखादे प्रवासी विमान सापडले असते तर भारतीय सेना व नागरी उड्डयन संघाचे धिंडवडे निघाले असते. पुढे जीवितहनीची कल्पना करवत नाहीं ऊमद्या सहका-याला इतर कुणाच्या दुर्लक्ष, बेजबाबदारीमुळे प्राणास मुकावे लागणे व त्याचा न्याय निवाडा न होणे हे फार संतापजनक व क्लेषकारक. पुलेशु
१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.