मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

पाषाणभेद ·

स्वतः गाडी चालवणार असाल तर आवडत्या गाण्यांची सी डी किंवा पेन ड्राईव्ह सोफ्रामायसीन आणि कैलासजिवन परदेशी जाणार असाल तर युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर सुई दोरा आणि काही बटणे कपडे वाळत घालायला दोरी आणि एखादी रिकामी बाटली किंवा टमरेल (परदेशात बर्‍याच वेळा टमरेल किंवा हँड स्प्रे नसला की पंचाईत होते) अजून आठवले की लिहितो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपल्या प्रवासाबरोबर सामानाचा एक टेंपोच घ्यायला सुचवत आहात की काय...? कुठेही जायचं तर एक तर कमी ओझं असलं पाहिजे. कमी बॅगा. अतिशय महत्वाचं जे असेल तेच घ्यावं उगा बॅगेत ओझं नसलं पाहिजे. आता आपण मोबाईल आणि सध्याच्या धावपळीच्या जगात नसत्या तापांनी विसरभोळे होत चाललेले आहोत. (असा काही विदा नाही पण वाटतं. ) प्रवास पाहून पैसे, आवश्यक सामानासहित एका व्यक्तीला एक बॅग. बस संपलं. काही आठवलं तर लिहितो. -दिलीप बिरुटे

दादा कोंडके 21/12/2019 - 17:20
माझे दोन थेंब, १. डिल्डो, मास्टरबेटर/वायब्रेटर २. जेली ३. निरोध ४. वायग्रा ५. हॉटेलजवळ असणारे मसाज सेंटर्सच फोन नंबंर्स

In reply to by दादा कोंडके

जॉनविक्क 21/12/2019 - 21:17
असे लिहायचे अगदी बोटांवर आले होते, पण धागकर्त्याचीहात आखडता घेतला :) आपण लिहून माझा भार हलका केला. आपल्या लिस्टशी सहमत.

In reply to by जॉनविक्क

दादा कोंडके 23/12/2019 - 01:22
भावना पतिव्रता प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच मी अतिशय सिरियसली प्रतिसाद दिला आहे. माझ्या मते या प्रवासासाठी लागणार्‍या गरजेच्या वस्तू आहेत. नेहमी प्रवास करणारे म्हणजे मोठ्ठे मार्केटींग ऑफिसर्स ते एम आर, आउटस्टेशन ड्रायवर्स ते देवस्थाने फिरणारे यात्रिक (इथं देवळं, वारी, पालखी, चर्च, मशिदी, दर्गा वगैरे सगळं आलं उगाच वस्सकन अंगावर येउ नये) यांना उपयोगाचे आहेत. बहुतेकजण उघड उघड मान्य करणार नाहीच कारण आपला समाज म्हणजे हिप्पोक्राईट.... (नेहमीच टॅण टॅण सुरू..*) *पुलंच्या म्हैस मधून साभार.

उत्तम धागा ! हा भटकंती विभागात काढला असता तर बरे झाले असते. ट्रेकविषयक लिखाण मी करत असल्याने, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अश्या तिन्ही ऋतुत कोणती काळजी घ्यायची याचे तीन वेगळे धागे काढले होते, त्याच्या लिंक देतो. पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks ) हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स ! उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

धन्यवाद. .. आम्ही आमच्या बॅगा भरायचे काम आमच्या सौ. कडे दिले आहे. आम्ही फक्त ओझे उचलतो.

वामन देशमुख 21/12/2019 - 23:28
कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी) प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची मी केलेली यादी खाली देत आहे, या यादीतील वस्तूंमध्ये खालील कारणांमुळे बदल / वाढ / घट होऊ शकते -
  • प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
  • प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
  • प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
  • इतर निकष :-
प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी - खाद्यपदार्थ :- सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ. इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे ) बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल, कपडे व इतर वस्तू: शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ. चप्पल, बूट, सॉक्स, उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे) साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच, लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ. नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ. नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ. मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ. महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे) ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ. याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-

चौकटराजा 22/12/2019 - 23:11
मी भारतात पुश्कळ प्रवास केला आहे . कुठलेही कार्ड प्रवासाला नेले नाही .काही अडले नाही. प्रथमोपचार साधने नेऊन उगीच वजन वाढवू नये. एख्गादा कोरा कागद बरोबर घ्यावा पेन घ्यावे बाकी स्टेशनरी जास्त घेऊ नये . उगीच जास्त फळे बरोबर घेऊन वजन वाढवू नये. स्त्रीयानी अनावश्यक पणे सौंदर्य प्रसाधने घेऊन पर्स चे वजन वाढवू नये. सर्व कुटुंबात मिळून एकच कंगवा चालू शकतो. प्रवासात नेलकटर ची काय गरज आहे ? नखे प्रवासाला निघतानाच कापून निघावे. पुरूषांनी पुरती शेव्हींग क्रिमची बाटली घेऊ नयेच सुटे थोडे बरोबर घ्यावे ! काही बिघडत नाही. ग्रुप मध्ये एडस किंवा टीबी चा रोगी नसेल तर प्रत्त्येकास एक टॉवेल घेण्याची घेण्याची गरज नाही . दोघात एक टॉवेल एका आंघोळीला पुरतो. पैसे जास्त गेले तरी चालतील पण चार चाके असलेली बॅग घ्यावी. कुलुपे सर्वांच्या सर्व नंबर ची घ्यावी. चावी हरवली वगैर समस्याच उद्भवत नाही. सीजन नसल्यास उगीचच छत्री बरोबर नकोत. युरोप मात्र याला अपवाद ! यात्रा कंपनी बरोबर प्रवास नसेल तर कपड्याची जबाबदारी (वजनाची) ज्याची त्याने घ्यावी असा नियम करावा .बायका मुकाटपणे कमी कपडे घेण्यास तयार होतात. जितके दिवस प्रवास आहे तितक्याच दिवस पुरेल इतकी टूथपेस्ट ,खोबरेल तेल साबण वडी घ्यावी . बचकाभर रबर बँड बरोबर घेऊ नयेत. सेफ्टी पिनांचे अख्ख्ये पाकीट बरोबर घ्यायची जरूर नसते. प्रवासात रोज एक नवा सेंट अंगावर करायचाच कशाला ? अनेक सेंट चा ज्याला शौक आहे त्याने उचलायच्या बँगेतच अशा वस्तू भराव्यात. प्रवासात तुमचे परस्पर प्रेम जरा बाजूला ठेवून ज्याचे ओझे त्यानेच उचलायचे असा नियम केल्यास सगळे प्रश्न सुटतात . प्रत्येक वेळी तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी हमाल मिळेलच याची गँरंटी अजिबात नसते.

In reply to by चौकटराजा

ती म्हणाली, मग लग्न करून काय उपयोग? लग्न करून एक गाढवपणा सिद्ध केलाच आहे. त्यामुळे आता ओझे बाळगणे, भागच आहे...

चिकित्सक 03/01/2020 - 18:21
प्रवासात लहान मुल असतील तर त्यांच्या साठी डाइपर , साबण , वाइप्स , टॉवेल , फॉर्मुला मिल्क , थर्मस , गरम पाणी आणि खेळणी , फोल्डिंग पाळणा घेणे भाग आहे | नुकताच पुणे ते भोपाळ ट्रेन ने प्रवास केला आणि ह्या पैकी एक जरी वस्तू विसरता काय भोगावलागत ह्याच अनुभव घेतला आहे!!

स्वतः गाडी चालवणार असाल तर आवडत्या गाण्यांची सी डी किंवा पेन ड्राईव्ह सोफ्रामायसीन आणि कैलासजिवन परदेशी जाणार असाल तर युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर सुई दोरा आणि काही बटणे कपडे वाळत घालायला दोरी आणि एखादी रिकामी बाटली किंवा टमरेल (परदेशात बर्‍याच वेळा टमरेल किंवा हँड स्प्रे नसला की पंचाईत होते) अजून आठवले की लिहितो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपल्या प्रवासाबरोबर सामानाचा एक टेंपोच घ्यायला सुचवत आहात की काय...? कुठेही जायचं तर एक तर कमी ओझं असलं पाहिजे. कमी बॅगा. अतिशय महत्वाचं जे असेल तेच घ्यावं उगा बॅगेत ओझं नसलं पाहिजे. आता आपण मोबाईल आणि सध्याच्या धावपळीच्या जगात नसत्या तापांनी विसरभोळे होत चाललेले आहोत. (असा काही विदा नाही पण वाटतं. ) प्रवास पाहून पैसे, आवश्यक सामानासहित एका व्यक्तीला एक बॅग. बस संपलं. काही आठवलं तर लिहितो. -दिलीप बिरुटे

दादा कोंडके 21/12/2019 - 17:20
माझे दोन थेंब, १. डिल्डो, मास्टरबेटर/वायब्रेटर २. जेली ३. निरोध ४. वायग्रा ५. हॉटेलजवळ असणारे मसाज सेंटर्सच फोन नंबंर्स

In reply to by दादा कोंडके

जॉनविक्क 21/12/2019 - 21:17
असे लिहायचे अगदी बोटांवर आले होते, पण धागकर्त्याचीहात आखडता घेतला :) आपण लिहून माझा भार हलका केला. आपल्या लिस्टशी सहमत.

In reply to by जॉनविक्क

दादा कोंडके 23/12/2019 - 01:22
भावना पतिव्रता प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच मी अतिशय सिरियसली प्रतिसाद दिला आहे. माझ्या मते या प्रवासासाठी लागणार्‍या गरजेच्या वस्तू आहेत. नेहमी प्रवास करणारे म्हणजे मोठ्ठे मार्केटींग ऑफिसर्स ते एम आर, आउटस्टेशन ड्रायवर्स ते देवस्थाने फिरणारे यात्रिक (इथं देवळं, वारी, पालखी, चर्च, मशिदी, दर्गा वगैरे सगळं आलं उगाच वस्सकन अंगावर येउ नये) यांना उपयोगाचे आहेत. बहुतेकजण उघड उघड मान्य करणार नाहीच कारण आपला समाज म्हणजे हिप्पोक्राईट.... (नेहमीच टॅण टॅण सुरू..*) *पुलंच्या म्हैस मधून साभार.

उत्तम धागा ! हा भटकंती विभागात काढला असता तर बरे झाले असते. ट्रेकविषयक लिखाण मी करत असल्याने, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अश्या तिन्ही ऋतुत कोणती काळजी घ्यायची याचे तीन वेगळे धागे काढले होते, त्याच्या लिंक देतो. पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks ) हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स ! उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

धन्यवाद. .. आम्ही आमच्या बॅगा भरायचे काम आमच्या सौ. कडे दिले आहे. आम्ही फक्त ओझे उचलतो.

वामन देशमुख 21/12/2019 - 23:28
कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी) प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची मी केलेली यादी खाली देत आहे, या यादीतील वस्तूंमध्ये खालील कारणांमुळे बदल / वाढ / घट होऊ शकते -
  • प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
  • प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
  • प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
  • इतर निकष :-
प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी - खाद्यपदार्थ :- सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ. इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे ) बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल, कपडे व इतर वस्तू: शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ. चप्पल, बूट, सॉक्स, उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे) साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच, लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ. नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ. नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ. मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ. महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे) ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ. याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-

चौकटराजा 22/12/2019 - 23:11
मी भारतात पुश्कळ प्रवास केला आहे . कुठलेही कार्ड प्रवासाला नेले नाही .काही अडले नाही. प्रथमोपचार साधने नेऊन उगीच वजन वाढवू नये. एख्गादा कोरा कागद बरोबर घ्यावा पेन घ्यावे बाकी स्टेशनरी जास्त घेऊ नये . उगीच जास्त फळे बरोबर घेऊन वजन वाढवू नये. स्त्रीयानी अनावश्यक पणे सौंदर्य प्रसाधने घेऊन पर्स चे वजन वाढवू नये. सर्व कुटुंबात मिळून एकच कंगवा चालू शकतो. प्रवासात नेलकटर ची काय गरज आहे ? नखे प्रवासाला निघतानाच कापून निघावे. पुरूषांनी पुरती शेव्हींग क्रिमची बाटली घेऊ नयेच सुटे थोडे बरोबर घ्यावे ! काही बिघडत नाही. ग्रुप मध्ये एडस किंवा टीबी चा रोगी नसेल तर प्रत्त्येकास एक टॉवेल घेण्याची घेण्याची गरज नाही . दोघात एक टॉवेल एका आंघोळीला पुरतो. पैसे जास्त गेले तरी चालतील पण चार चाके असलेली बॅग घ्यावी. कुलुपे सर्वांच्या सर्व नंबर ची घ्यावी. चावी हरवली वगैर समस्याच उद्भवत नाही. सीजन नसल्यास उगीचच छत्री बरोबर नकोत. युरोप मात्र याला अपवाद ! यात्रा कंपनी बरोबर प्रवास नसेल तर कपड्याची जबाबदारी (वजनाची) ज्याची त्याने घ्यावी असा नियम करावा .बायका मुकाटपणे कमी कपडे घेण्यास तयार होतात. जितके दिवस प्रवास आहे तितक्याच दिवस पुरेल इतकी टूथपेस्ट ,खोबरेल तेल साबण वडी घ्यावी . बचकाभर रबर बँड बरोबर घेऊ नयेत. सेफ्टी पिनांचे अख्ख्ये पाकीट बरोबर घ्यायची जरूर नसते. प्रवासात रोज एक नवा सेंट अंगावर करायचाच कशाला ? अनेक सेंट चा ज्याला शौक आहे त्याने उचलायच्या बँगेतच अशा वस्तू भराव्यात. प्रवासात तुमचे परस्पर प्रेम जरा बाजूला ठेवून ज्याचे ओझे त्यानेच उचलायचे असा नियम केल्यास सगळे प्रश्न सुटतात . प्रत्येक वेळी तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी हमाल मिळेलच याची गँरंटी अजिबात नसते.

In reply to by चौकटराजा

ती म्हणाली, मग लग्न करून काय उपयोग? लग्न करून एक गाढवपणा सिद्ध केलाच आहे. त्यामुळे आता ओझे बाळगणे, भागच आहे...

चिकित्सक 03/01/2020 - 18:21
प्रवासात लहान मुल असतील तर त्यांच्या साठी डाइपर , साबण , वाइप्स , टॉवेल , फॉर्मुला मिल्क , थर्मस , गरम पाणी आणि खेळणी , फोल्डिंग पाळणा घेणे भाग आहे | नुकताच पुणे ते भोपाळ ट्रेन ने प्रवास केला आणि ह्या पैकी एक जरी वस्तू विसरता काय भोगावलागत ह्याच अनुभव घेतला आहे!!
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

मला भेटलेले रुग्ण - १९

डॉ श्रीहास ·

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

द सियालकोट सागा

महासंग्राम ·

राजाभाउ 21/08/2019 - 14:12
तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
हो हे मला "द रोझबेल लाईन" वाचताना झालं होत. कुठ काय चाललय हेच कळत नव्हत, नंतर नंतर तर सगळे संदर्भच विसरायला होत होत. आता तर त्याची कथा पण आठवत नाही.

तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
ही अश्विन सांघवी ची स्टाईल आहे. कृष्णा की मध्येही त्याने हा प्रयोग केला होता. मुळात दा विन्ची कोड नंतर अश्या कादंबर्यांचे पेव फुटले होते व ह्या सर्व कादंबर्या परदेशी वाचक डोळ्यांसमोर ठेवुन लिहिल्या होत्या.

In reply to by महासंग्राम

राजाभाउ 22/08/2019 - 11:09
हो. दा विंची मध्ये इतिहास हा प्रसंगानुरुप पात्रांच्या तोंडी संवादांच्या स्वरुपात घातला आहे बहुतेक ठिकाणी त्यामुळे कथेची लिंक तुटत नाही उलट कथा जास्त फुलते, पण इथ मध्येच प्रकरणेच्या प्रकरणे येतात त्यामुळे मुळ कथा हारवुनच जाते. या आधीचा संदर्भ काय होता हे मागे जाउन शोधावे लागते.

राजाभाउ 22/08/2019 - 11:20
मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही पण इतीहासाच्या पार्श्वभुमीवरची मराठीतून लीहीलेली एक मस्त रहस्यकथा आहे. आगदी दा विंची च्या तोडीची नसली तरी मस्त आहे.

राजाभाउ 21/08/2019 - 14:12
तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
हो हे मला "द रोझबेल लाईन" वाचताना झालं होत. कुठ काय चाललय हेच कळत नव्हत, नंतर नंतर तर सगळे संदर्भच विसरायला होत होत. आता तर त्याची कथा पण आठवत नाही.

तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
ही अश्विन सांघवी ची स्टाईल आहे. कृष्णा की मध्येही त्याने हा प्रयोग केला होता. मुळात दा विन्ची कोड नंतर अश्या कादंबर्यांचे पेव फुटले होते व ह्या सर्व कादंबर्या परदेशी वाचक डोळ्यांसमोर ठेवुन लिहिल्या होत्या.

In reply to by महासंग्राम

राजाभाउ 22/08/2019 - 11:09
हो. दा विंची मध्ये इतिहास हा प्रसंगानुरुप पात्रांच्या तोंडी संवादांच्या स्वरुपात घातला आहे बहुतेक ठिकाणी त्यामुळे कथेची लिंक तुटत नाही उलट कथा जास्त फुलते, पण इथ मध्येच प्रकरणेच्या प्रकरणे येतात त्यामुळे मुळ कथा हारवुनच जाते. या आधीचा संदर्भ काय होता हे मागे जाउन शोधावे लागते.

राजाभाउ 22/08/2019 - 11:20
मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही पण इतीहासाच्या पार्श्वभुमीवरची मराठीतून लीहीलेली एक मस्त रहस्यकथा आहे. आगदी दा विंची च्या तोडीची नसली तरी मस्त आहे.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

हे असे का असावं?

तमराज किल्विष ·

हस्तर 05/08/2019 - 17:07
मला पन असेच वतते मि सादर चित्रपत म्हनुन धागे तक्ले ननतेर अचनक गायब एक अकु कका अमवस पुर्निमा झालि कि येतत

जॉनविक्क 05/08/2019 - 17:45
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो.
एखादे उदा. देता येईल का ऐकू येणाऱ्या संभाषणाचे ?

धन्यवाद जॉन विक्क जी . हा प्रकार चालूच राहतो. अतिशय सजगतेने पकडायला गेले तरी एखादं वाक्य हाती लागतं. जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते. हे वाक्य काहीही असतं. जसं एखाद्या हॉटेलात चाललेला कोलाहल. बस स्थानक, रेल्वे स्थानकावरील गोंगाट यासारखं.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 05/08/2019 - 21:25
अतिशय सजगतेने पकडायला जाताना मात्र बरेचदा आपण आपलेच वाक्य/विचार ऐकू येणाऱ्या गोंगाटात लादण्याची शक्यता नाकारता येत नाही

In reply to by तमराज किल्विष

सुबोध खरे 05/08/2019 - 20:19
कान बंद केल्यावर आवाज येत नाही असे असेल तर कानाच्या डॉक्टरला दाखवून घ्या आपल्या अन्तर कर्णात (INNER EAR) गडबड झाली तर असे होऊ शकते

डॉक्टर साहेब मला संभाषणं चालली असे भास होतात. शिट्टीसारखे आवाज येत नाहीत. मला तरी हा प्रकार अति जलद विचार करण्यामुळे होत असावा असे वाटते.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 05/08/2019 - 21:21
कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू येत नसतील तर काळजीचे कारण वाटत नाही. मात्र तरीही आवाज येत असतील तर टीनिटस, फ़ंगस साठी ENT तज्ञ गाठा जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल. नुसता विचार करून शरीरास लागलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे जर रक्त वाहिन्यांवर ताण येत नसेल तर असे आवाज ऐकू येणं हा मनोव्यापाराचाच प्रांत असू शकतो. मी माझी निरीक्षणे गांभीर्यानेच देत आहे, विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात :)

In reply to by जॉनविक्क

सुबोध खरे 06/08/2019 - 18:38
जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल. हेच लिहिणार होतो परंतु मानसोपचार तज्ञ म्हटले कि लोक लगेच घुमजाव करतात म्हणून अगोदर कानाच्या तज्ज्ञाकडे

सोत्रि 06/08/2019 - 09:07
जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते.
हे लक्षण चांगले आहे. युट्यूबवर ‘गायडेड मेडीटेशन‘चे व्हिडीयो बघून ध्यान करा किंवा चांगल्या ध्यानकेंद्रात जाऊन ध्यान करणए शिकून घ्या. - (ध्यानयोगी) सोकाजी

In reply to by तमराज किल्विष

गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. हे जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे याच्याशी अजिबात जुळत नाही.* ती दोन विधाने वाचून कोणी, "हा लेख म्हणजे तुम्ही फावल्या वेळेचा उद्योग चालवला आहे", असे म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका... आणि आजारपणाचे निमित्त काढून गळा तर अजिबात काढू नका. मात्र, वरची दोन्ही वाक्ये गंभीरपणे लिहिली असली तर, वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञाला गाठा. कारण, ती अवस्था, "फ्लाईट ऑफ थॉट्स" असू शकते, जी फार गंभीर गोष्ट आहे. हे मत एका मिपाकराच्याबद्दलच्या (तुमच्याबद्दलच्या) काळजीमुळे गंभीरपणे लिहिलेले आहे. ++++++++++++++++++ * जबानीतले असे निसटते क्षण चोरी पकडायला पोलिस वापरतात, असे म्हणतात. ;) :)

In reply to by जॉनविक्क

प्रतिसादांची हायरार्की पाहिली तर माझा प्रतिसाद धागा लेखकाला (तमराज किल्विष) आहे असे दिसेल. :)

तुम्ही हे गांभीर्याने लिहित असाल तर मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेणे हे उत्तम. हल्ली तर तरुण पोर देखील मूड मॅनेजमेंटसाठी सायकियाट्रिस्ट कडे जातात.

शक्तिमान सिरियल मधली गीता. प्रकाश जी सायकियाट्रिटकडे जावे की सायकॉलॉजीस्ट कडे जावे. एकदा सायकियाट्रीटच्या गोळ्या घेतल्या आहेत. फार भयंकर दुष्टचक्रात अडकल्यासारखे झाले होते. सतत गुंगी व शरीरक्रिया इतकी संथ झाली की बस. गोळ्या बंद केल्या तर वेड लागल्यासारखे होत होते. कसेतरी बाहेर पडलो.

In reply to by तमराज किल्विष

मेडिकेशन व थेरपि असे ढोबळ्मानाने दोन पन्थ आहेत ते प्राधान्यक्रमानुसार ,थेरपि वाले अग्रक्रमाने थेरपि ला मह्त्व देतात

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 07/08/2019 - 20:04
मग हे काय होते ? आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.

In reply to by जॉनविक्क

त्यांना त्यांच्या भरोशावर सोडा... ते इतरांच्या मनाची शक्ती ड्रेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. =))

जॉन भाऊ मला मागे अचानक कोणत्याही कारणाशिवाय डिप्रेशन आलं होतं तेव्हा ती ट्रिटमेंट घेतली होती. ती घेऊन पंधरा सोळा वर्षे झाली आहेत. आताचा प्रॉब्लेम वेगळा आहे.

राघव 09/08/2019 - 15:17
नमस्कार, तुम्ही हे सर्व फार गांभीर्यानं लिहिलं आहे आणि हा प्रॉब्लेम अजूनही तुम्हांस त्रास देतोय असं गृहित धरतो. हा प्रॉब्लेम मला होऊन गेला आहे. आणि मला तरी निदान कोणा डॉक्टरकडे जायची गरज पडली नाही. त्या अनुषंगानं काही प्रश्न खाली लिहिलेत. त्यांची उत्तरं इथे दिली नाहीत तरी चालेल, पण तुमच्या जवळ असू द्यात. जर कान बरोबर असेल आणि प्रॉब्लेम अजूनही असेल तर, या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होईल. - तुम्ही शांत अशी साधारण ६-७ तास सलग झोप शेवटची कधी घेतली होतीत? - सलग झोप लागत नसल्यास रात्रीत कितीवेळा तुम्हाला जाग येते? कारण काय? - ऑफिस कामाव्यतिरीक्त, खूप डोकं लावावं लागेल अथवा विचार करावं लागेल अशा किती बाबींमधे तुमचा [ कृतीशील्/सुप्त ] सहभाग आहे? त्यात तुमचा दिवसाचा किती वेळ जातो? - आपण जो विचार करतो तो दुसर्‍याला सांगतांना तुमच्या कधी असं लक्षात आलंय का, की समोरच्याला ते खूप हळू आकलन होतंय? - १ ते ५ च्या पट्टीवर, भावनिक दृष्ट्या कणखरतेबद्दल तुम्ही स्वतःला कुठे बघाल? - एखादी गोष्ट सलग खूप तास बिना ब्रेक घेता तुम्ही केली आहे काय? खासकरून जेथे खूप विचार करावा लागेल अशी? असेल तर किती वेळा? - एखादी जुनी आणि तुम्हाला न आवडणारी आठवण, तुम्ही घोळवत ठेवलीये का? असल्यास अगदी हसत हसत कुणाला सांगून पाहिली आहे का? तसे करून बघाल का? - तुम्ही डोकेदुखी, अंगदुखी किंवा तत्सम पीडेवर गोळ्या घेताय का? असल्यास महिन्यातून कितीवेळा? वैचारिक अतिरेकाच्या एका क्षणी असा अनुभव येतो, हा निदान माझा तरी अनुभव आहे. जर तुम्हाला आपण वैचारिक अतिरेक करत असल्याचे जाणवले तर खालील उपाय मदत करतील. - सकाळी उठल्यावर, कुत्रा/मांजर जेवढे स्ट्रेच करतात व जेवढावेळ करतात, तेवढा तरी व्यायाम करावा. - जर मैदानी खेळ खेळायला आवडत असेल तर जसे जमेल तसे, थोडे का होईना, जरूर खेळावे. - ज्या गोष्टीत, मी आत्ता स्वतः काहीही करू शकत नाही, त्यांना मी आत्ता तरी सोडतोय असं मनाला नीट समजवावं. या गोष्टीला थोडा वेळ लागतो, पण एखाद्या लहान अन् द्वाड मुलाला आपण कसं जवळ घेऊन नीट सांगायचा प्रयत्न करू.. तसं हे मनाला समजवावं लागतं. असे एकेक विषय नीट समजावून हातावेगळे करावेत. विचारांचा अतिरेक यामुळे नक्की कमी होतो. - शक्यतो घरच्यांच्या सोबत बसून, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवावं. - रात्री झोपण्याच्या आधी शांत, संथ पण आनंदमधुर असं संगीत ऐकावं [दु:खी नको]. जमल्यास गुणगुणावं. टीपः हे सर्व मी माझ्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. सगळ्यांनाच ते तसंच लागू पडेल असं नाही. पण मदत होईल असं वाटतं. जर नाही झाली तर सोडून द्यावं. राघव

खूप धन्यवाद राघवजी. मला झोप कधीकधी दहा ते बारा तास लागते, तर कधी रात्रभर जागा राहतो. मला माझ्या हातून घडलेल्या चूका ज्या समोरच्यांच्या लक्षातही राहिल्या नाहीत, किंवा त्यांनी ते सोडून दिले आहे अशा क्षुल्लक देखील चुकांची खूप बोचणी लागते, मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे. पण मला जी संभाषणं ऐकू येतात त्याचा नि याचा संबंध नसावा असे वाटते. मी कोणतेही औषध घेत नाही. वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे घेतच नाही.

In reply to by तमराज किल्विष

राघव 10/08/2019 - 10:25
ठीक आहे. तसंच काहिसं असेल असं वाटलं होतं. स्वतःच्या लहान लहान चुकांकडे त्रयस्थपणे बघून त्यांना हसण्यावारी नेणे.. अशा बहुतांश चुका आपल्या जवळच्या व्यक्तींच्या पुढे मांडून त्यावर स्वतःच विनोद करणे.. यामुळे मनावरचा ताण कमी होतो, त्या चुकांची आठवण कमी त्रासदायक होते हा स्वानुभव आहे. अर्थात् सगळ्याच गोष्टींबद्दल असं आपण करू शकत नाही, हे मान्य. असो. -- वर नमूद केलेले प्रयोग आपणांस वाटलेत तर जरूर करून पहावेत. बाकी चांगल्या मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा श्रेयस्कर मार्ग आहेच, जो कधीही उत्तम. शुभेच्छा.

जॉनविक्क 10/08/2019 - 11:31
मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे
तुम्ही प्रचंड तणवग्रस्त आहात. म्हणून निगेटिव इमोशन जास्त तीव्र अनुभवाला येत आहेत. आधी फक्त आवाजाचा त्रास होता असे वाटले, पण आता आपली परिस्थिती कठिण भासत आहे. आपण त्वरित समूपदेशन आणि औषधे दोन्ही घेणे श्रेयस्कर.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 10/08/2019 - 17:32
असा तणाव फार लहानपणा पासून असेल तर संवेदनशील स्वभाव अशी आपण समजूत करून घेतो. गिल्ट फिलिंग सुद्धा त्याचाच भाग.

In reply to by तमराज किल्विष

अशी स्वतःच्या आजाराबद्दल निदान स्वतःच करणे नंतर फार महागात पडू शकते. ते टाळावे. त्रास जास्त झाला की त्याबाबतीतल्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. https://www.misalpav.com/comment/1042463#comment-1042463

इथे प्रतिसादांची सरमिसळ होते आणि त्यामुळे गैरसमज होतो. माझ्या दुसऱ्या लेखावरही असेच झाले. माझ्या तमराज किल्विष या आयडीला उद्देशून उज्वल यांनी शक्तिमान, सुर्यांशी या शक्तिमान सिरियल मधली पात्रांची आठवण करून दिली. तेव्हा मी त्यांना मला गीता ( सिरियल मधली) फार आवडायची असा गंमतीशीर प्रतिसाद दिला. इकडे प्रतिसाद शेवटी जात नाही. मध्येच जातो. व मलाही क्रोम मध्ये नवीन प्रतिसाद कोणते आहेत हे लवकर लक्षात येवू नाही राहीले. ब्राऊजरचा प्रॉब्लेम असावा.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 11/08/2019 - 08:08
मिपा सन्यास घ्यावा असा एक त्वरित उपायहि सूचवतो कारण मिपाकरांच्या वैचारिक चर्चा वाचून तुमचा त्रास 200% वाढू शकतो.

जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ नका. माझ्या लेखणाचा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही संन्यास घ्या. तूमचा तणाव ३०० टक्के वाढलाय असं दिसतं.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 12/08/2019 - 12:05
तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही परंतु आपला त्रास कमी व्हावा असे मनापासून वाटत असल्याने मी फक्त आपलं निरीक्षण नोंदवले. मिपावर तुम्ही आम्हाला हवेच आहात. पण त्यासाठी तुम्ही तुमच्यामानसिक आरोग्याचा बळी द्यावा हे पटत नाही हो :(

तमराजजी, तुम्ही हे गांभीर्याने लिहिलं आहे असं गृहीत धरुन मी प्रतिसाद देत आहे. एक शक्यता म्हणून हे विचारात घ्या तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास वा काही दूर खरेच काही कोलाहल असू शकतो.. तो आवाज क्षीण असेल आणि इतरांना ऐकू येत नसेल पण तुम्हाला ऐकू येतो. याचा अर्थ तुमच्या कानांची क्षमता प्रचंड वाढलेली आहे असे असू शकते. दिवसा संभाषणांच्या आवाजाखेरीज असे अनेक आवाज तुम्हाला ऐकू येत असतील आणि त्यामुळे संभाषणाच्या आवाजाचा त्रास होत नसेल वा ते फारसे जाणवत नसतील. पण रात्री इतर आवाज कमी झाल्याने संभाषणांचे आवाज तुम्हाला जास्त जाणवत असतील.. तुम्ही ही शक्यता तपासून बघण्याकरिता खालील गोष्टी करु शकता १) संभाषणांच्या आवाजाव्यतिरिक्त इतर काही दूरचे आवाज (जसे बस, ट्रेनचे, भांड्यांचे ई ई) ऐकू येतात का ते बघा २) जिथे दूरदूर पर्यंत खरंच खूप शांतता आहे अशा एखाद्या ठिकाणी रात्री संभाषणांचे आवाज ऐकू येतात का ते बघा.. एखाद्या साउंडप्रुफ खोलीत हे तपासा जर ही शक्यता खरी निघाली तर या गोष्टीकडे समस्या म्हणून बघू नका.. ही एक निसर्गाची देणगी आहे. (मी दैवी वगैरे म्हणत नाही... हे फक्त व्हेरिएशन आहे) . जमिनीत एखाद्या ठिकाणी विहीर(वा बोअरवेल) खणली तर पाणी लागेल की नाही हे सांगू शकणारे काही विशिष्ट लोक असतात त्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? त्यात अंधश्रद्धा वगैरे नाहीये तर त्या लोकांची श्रवणक्षमता इतर सामान्य माणसांच्या तुलनेत खूप जास्त असते. जसं कुत्र्याची त्यातही श्वानपथकात असतात त्या जातीच्या कुत्र्यांची गंध समजण्याची क्षमता अतिप्रचंड असते आणि माणसांच्या दृष्टीने तर तो केवळ एक चमत्कारच.. तसंच काहीस काही माणसांच्या श्रवणक्षमतेबाबत असावं...

In reply to by मराठी कथालेखक

बराच वेळ प्रतिक्रिया वाचत होतो, पण हा मुद्दा म.क.नी नवीनच काढला. १. रात्री झोपताना कानात पोहताना घालायचे रबराचे स्टॉपर घालुन झोपा. २. झोपायच्या आधी ध्यान किवा जप करायची सवय असेल तर उत्तमच, नसल्यास लावुन घ्या ३. सकाळी किवा संध्याकाळी, जेव्हा वेळ असेल तेव्हा जॉगिंग करा, जॉगिंग करताना शरीराला पळवत ठेवुन आणि मन वेगळे विचार करत राहते असे मला जाणवते. कधी कधी काही समस्यांची उत्तरेही सापडतात तेव्हाच.

मराठी कथालेखक जी असा मी विचार केलेला नाही. पण बऱ्याचदा ओळखीच्या लोक प्रत्यक्ष बोलल्या प्रमाणे त्यांचं एखादं वाक्य गपकन कानावर येते. तसेच समोरासमोर बोलताना समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय. थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे. काही साधना मी केल्या आहेत. पण हे संभाषणं निरूपद्रवी असली तरी हे काय चाललंय ते न कळल्याने अस्वस्थता वाटते.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 13/08/2019 - 14:45
समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय.
ओह माय गॉड, तुम्हाला इतरांच्या मनातले विचार आवाज स्वरुपात ऐकू येतात होय... हे तर एकदम अगोबाई अरेच्चा सारखे प्रकरण वाटत आहे.

We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading. >> हा संदेश मला श्री उन्मेष दिक्षीत सरांनी पाठवला आहे व मला तो सर्वात जास्त आवडला आहे. त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद.

In reply to by उन्मेष दिक्षीत

जॉनविक्क 16/08/2019 - 22:00
पण वाचनाची गोडी पाहिजे, वाचनाची गोडी पाहिजे चे तूणतूणे लावणाऱ्याना तुम्ही वास्तवाची जी खणखणीत चपराक दिली त्यामुळे खरोखर मजा आ गया :) तयासाठी सर हा बहुमान आपणास द्यायलाच हवा.

In reply to by उन्मेष दिक्षीत

जॉनविक्क 17/08/2019 - 11:30
फक्त इडियट बॉक्स प्रमाणे वाचनाच्या अतिरेकाचेही दुष्परिणाम असतात हे देखील अधोरेखित होणे महत्वाचे आहे आणि आपण त्याची सुरूवात केलीत :)

हस्तर 05/08/2019 - 17:07
मला पन असेच वतते मि सादर चित्रपत म्हनुन धागे तक्ले ननतेर अचनक गायब एक अकु कका अमवस पुर्निमा झालि कि येतत

जॉनविक्क 05/08/2019 - 17:45
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो.
एखादे उदा. देता येईल का ऐकू येणाऱ्या संभाषणाचे ?

धन्यवाद जॉन विक्क जी . हा प्रकार चालूच राहतो. अतिशय सजगतेने पकडायला गेले तरी एखादं वाक्य हाती लागतं. जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते. हे वाक्य काहीही असतं. जसं एखाद्या हॉटेलात चाललेला कोलाहल. बस स्थानक, रेल्वे स्थानकावरील गोंगाट यासारखं.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 05/08/2019 - 21:25
अतिशय सजगतेने पकडायला जाताना मात्र बरेचदा आपण आपलेच वाक्य/विचार ऐकू येणाऱ्या गोंगाटात लादण्याची शक्यता नाकारता येत नाही

In reply to by तमराज किल्विष

सुबोध खरे 05/08/2019 - 20:19
कान बंद केल्यावर आवाज येत नाही असे असेल तर कानाच्या डॉक्टरला दाखवून घ्या आपल्या अन्तर कर्णात (INNER EAR) गडबड झाली तर असे होऊ शकते

डॉक्टर साहेब मला संभाषणं चालली असे भास होतात. शिट्टीसारखे आवाज येत नाहीत. मला तरी हा प्रकार अति जलद विचार करण्यामुळे होत असावा असे वाटते.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 05/08/2019 - 21:21
कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू येत नसतील तर काळजीचे कारण वाटत नाही. मात्र तरीही आवाज येत असतील तर टीनिटस, फ़ंगस साठी ENT तज्ञ गाठा जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल. नुसता विचार करून शरीरास लागलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे जर रक्त वाहिन्यांवर ताण येत नसेल तर असे आवाज ऐकू येणं हा मनोव्यापाराचाच प्रांत असू शकतो. मी माझी निरीक्षणे गांभीर्यानेच देत आहे, विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात :)

In reply to by जॉनविक्क

सुबोध खरे 06/08/2019 - 18:38
जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल. हेच लिहिणार होतो परंतु मानसोपचार तज्ञ म्हटले कि लोक लगेच घुमजाव करतात म्हणून अगोदर कानाच्या तज्ज्ञाकडे

सोत्रि 06/08/2019 - 09:07
जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते.
हे लक्षण चांगले आहे. युट्यूबवर ‘गायडेड मेडीटेशन‘चे व्हिडीयो बघून ध्यान करा किंवा चांगल्या ध्यानकेंद्रात जाऊन ध्यान करणए शिकून घ्या. - (ध्यानयोगी) सोकाजी

In reply to by तमराज किल्विष

गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. हे जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे याच्याशी अजिबात जुळत नाही.* ती दोन विधाने वाचून कोणी, "हा लेख म्हणजे तुम्ही फावल्या वेळेचा उद्योग चालवला आहे", असे म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका... आणि आजारपणाचे निमित्त काढून गळा तर अजिबात काढू नका. मात्र, वरची दोन्ही वाक्ये गंभीरपणे लिहिली असली तर, वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञाला गाठा. कारण, ती अवस्था, "फ्लाईट ऑफ थॉट्स" असू शकते, जी फार गंभीर गोष्ट आहे. हे मत एका मिपाकराच्याबद्दलच्या (तुमच्याबद्दलच्या) काळजीमुळे गंभीरपणे लिहिलेले आहे. ++++++++++++++++++ * जबानीतले असे निसटते क्षण चोरी पकडायला पोलिस वापरतात, असे म्हणतात. ;) :)

In reply to by जॉनविक्क

प्रतिसादांची हायरार्की पाहिली तर माझा प्रतिसाद धागा लेखकाला (तमराज किल्विष) आहे असे दिसेल. :)

तुम्ही हे गांभीर्याने लिहित असाल तर मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेणे हे उत्तम. हल्ली तर तरुण पोर देखील मूड मॅनेजमेंटसाठी सायकियाट्रिस्ट कडे जातात.

शक्तिमान सिरियल मधली गीता. प्रकाश जी सायकियाट्रिटकडे जावे की सायकॉलॉजीस्ट कडे जावे. एकदा सायकियाट्रीटच्या गोळ्या घेतल्या आहेत. फार भयंकर दुष्टचक्रात अडकल्यासारखे झाले होते. सतत गुंगी व शरीरक्रिया इतकी संथ झाली की बस. गोळ्या बंद केल्या तर वेड लागल्यासारखे होत होते. कसेतरी बाहेर पडलो.

In reply to by तमराज किल्विष

मेडिकेशन व थेरपि असे ढोबळ्मानाने दोन पन्थ आहेत ते प्राधान्यक्रमानुसार ,थेरपि वाले अग्रक्रमाने थेरपि ला मह्त्व देतात

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 07/08/2019 - 20:04
मग हे काय होते ? आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.

In reply to by जॉनविक्क

त्यांना त्यांच्या भरोशावर सोडा... ते इतरांच्या मनाची शक्ती ड्रेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. =))

जॉन भाऊ मला मागे अचानक कोणत्याही कारणाशिवाय डिप्रेशन आलं होतं तेव्हा ती ट्रिटमेंट घेतली होती. ती घेऊन पंधरा सोळा वर्षे झाली आहेत. आताचा प्रॉब्लेम वेगळा आहे.

राघव 09/08/2019 - 15:17
नमस्कार, तुम्ही हे सर्व फार गांभीर्यानं लिहिलं आहे आणि हा प्रॉब्लेम अजूनही तुम्हांस त्रास देतोय असं गृहित धरतो. हा प्रॉब्लेम मला होऊन गेला आहे. आणि मला तरी निदान कोणा डॉक्टरकडे जायची गरज पडली नाही. त्या अनुषंगानं काही प्रश्न खाली लिहिलेत. त्यांची उत्तरं इथे दिली नाहीत तरी चालेल, पण तुमच्या जवळ असू द्यात. जर कान बरोबर असेल आणि प्रॉब्लेम अजूनही असेल तर, या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होईल. - तुम्ही शांत अशी साधारण ६-७ तास सलग झोप शेवटची कधी घेतली होतीत? - सलग झोप लागत नसल्यास रात्रीत कितीवेळा तुम्हाला जाग येते? कारण काय? - ऑफिस कामाव्यतिरीक्त, खूप डोकं लावावं लागेल अथवा विचार करावं लागेल अशा किती बाबींमधे तुमचा [ कृतीशील्/सुप्त ] सहभाग आहे? त्यात तुमचा दिवसाचा किती वेळ जातो? - आपण जो विचार करतो तो दुसर्‍याला सांगतांना तुमच्या कधी असं लक्षात आलंय का, की समोरच्याला ते खूप हळू आकलन होतंय? - १ ते ५ च्या पट्टीवर, भावनिक दृष्ट्या कणखरतेबद्दल तुम्ही स्वतःला कुठे बघाल? - एखादी गोष्ट सलग खूप तास बिना ब्रेक घेता तुम्ही केली आहे काय? खासकरून जेथे खूप विचार करावा लागेल अशी? असेल तर किती वेळा? - एखादी जुनी आणि तुम्हाला न आवडणारी आठवण, तुम्ही घोळवत ठेवलीये का? असल्यास अगदी हसत हसत कुणाला सांगून पाहिली आहे का? तसे करून बघाल का? - तुम्ही डोकेदुखी, अंगदुखी किंवा तत्सम पीडेवर गोळ्या घेताय का? असल्यास महिन्यातून कितीवेळा? वैचारिक अतिरेकाच्या एका क्षणी असा अनुभव येतो, हा निदान माझा तरी अनुभव आहे. जर तुम्हाला आपण वैचारिक अतिरेक करत असल्याचे जाणवले तर खालील उपाय मदत करतील. - सकाळी उठल्यावर, कुत्रा/मांजर जेवढे स्ट्रेच करतात व जेवढावेळ करतात, तेवढा तरी व्यायाम करावा. - जर मैदानी खेळ खेळायला आवडत असेल तर जसे जमेल तसे, थोडे का होईना, जरूर खेळावे. - ज्या गोष्टीत, मी आत्ता स्वतः काहीही करू शकत नाही, त्यांना मी आत्ता तरी सोडतोय असं मनाला नीट समजवावं. या गोष्टीला थोडा वेळ लागतो, पण एखाद्या लहान अन् द्वाड मुलाला आपण कसं जवळ घेऊन नीट सांगायचा प्रयत्न करू.. तसं हे मनाला समजवावं लागतं. असे एकेक विषय नीट समजावून हातावेगळे करावेत. विचारांचा अतिरेक यामुळे नक्की कमी होतो. - शक्यतो घरच्यांच्या सोबत बसून, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवावं. - रात्री झोपण्याच्या आधी शांत, संथ पण आनंदमधुर असं संगीत ऐकावं [दु:खी नको]. जमल्यास गुणगुणावं. टीपः हे सर्व मी माझ्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. सगळ्यांनाच ते तसंच लागू पडेल असं नाही. पण मदत होईल असं वाटतं. जर नाही झाली तर सोडून द्यावं. राघव

खूप धन्यवाद राघवजी. मला झोप कधीकधी दहा ते बारा तास लागते, तर कधी रात्रभर जागा राहतो. मला माझ्या हातून घडलेल्या चूका ज्या समोरच्यांच्या लक्षातही राहिल्या नाहीत, किंवा त्यांनी ते सोडून दिले आहे अशा क्षुल्लक देखील चुकांची खूप बोचणी लागते, मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे. पण मला जी संभाषणं ऐकू येतात त्याचा नि याचा संबंध नसावा असे वाटते. मी कोणतेही औषध घेत नाही. वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे घेतच नाही.

In reply to by तमराज किल्विष

राघव 10/08/2019 - 10:25
ठीक आहे. तसंच काहिसं असेल असं वाटलं होतं. स्वतःच्या लहान लहान चुकांकडे त्रयस्थपणे बघून त्यांना हसण्यावारी नेणे.. अशा बहुतांश चुका आपल्या जवळच्या व्यक्तींच्या पुढे मांडून त्यावर स्वतःच विनोद करणे.. यामुळे मनावरचा ताण कमी होतो, त्या चुकांची आठवण कमी त्रासदायक होते हा स्वानुभव आहे. अर्थात् सगळ्याच गोष्टींबद्दल असं आपण करू शकत नाही, हे मान्य. असो. -- वर नमूद केलेले प्रयोग आपणांस वाटलेत तर जरूर करून पहावेत. बाकी चांगल्या मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा श्रेयस्कर मार्ग आहेच, जो कधीही उत्तम. शुभेच्छा.

जॉनविक्क 10/08/2019 - 11:31
मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे
तुम्ही प्रचंड तणवग्रस्त आहात. म्हणून निगेटिव इमोशन जास्त तीव्र अनुभवाला येत आहेत. आधी फक्त आवाजाचा त्रास होता असे वाटले, पण आता आपली परिस्थिती कठिण भासत आहे. आपण त्वरित समूपदेशन आणि औषधे दोन्ही घेणे श्रेयस्कर.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 10/08/2019 - 17:32
असा तणाव फार लहानपणा पासून असेल तर संवेदनशील स्वभाव अशी आपण समजूत करून घेतो. गिल्ट फिलिंग सुद्धा त्याचाच भाग.

In reply to by तमराज किल्विष

अशी स्वतःच्या आजाराबद्दल निदान स्वतःच करणे नंतर फार महागात पडू शकते. ते टाळावे. त्रास जास्त झाला की त्याबाबतीतल्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. https://www.misalpav.com/comment/1042463#comment-1042463

इथे प्रतिसादांची सरमिसळ होते आणि त्यामुळे गैरसमज होतो. माझ्या दुसऱ्या लेखावरही असेच झाले. माझ्या तमराज किल्विष या आयडीला उद्देशून उज्वल यांनी शक्तिमान, सुर्यांशी या शक्तिमान सिरियल मधली पात्रांची आठवण करून दिली. तेव्हा मी त्यांना मला गीता ( सिरियल मधली) फार आवडायची असा गंमतीशीर प्रतिसाद दिला. इकडे प्रतिसाद शेवटी जात नाही. मध्येच जातो. व मलाही क्रोम मध्ये नवीन प्रतिसाद कोणते आहेत हे लवकर लक्षात येवू नाही राहीले. ब्राऊजरचा प्रॉब्लेम असावा.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 11/08/2019 - 08:08
मिपा सन्यास घ्यावा असा एक त्वरित उपायहि सूचवतो कारण मिपाकरांच्या वैचारिक चर्चा वाचून तुमचा त्रास 200% वाढू शकतो.

जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ नका. माझ्या लेखणाचा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही संन्यास घ्या. तूमचा तणाव ३०० टक्के वाढलाय असं दिसतं.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 12/08/2019 - 12:05
तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही परंतु आपला त्रास कमी व्हावा असे मनापासून वाटत असल्याने मी फक्त आपलं निरीक्षण नोंदवले. मिपावर तुम्ही आम्हाला हवेच आहात. पण त्यासाठी तुम्ही तुमच्यामानसिक आरोग्याचा बळी द्यावा हे पटत नाही हो :(

तमराजजी, तुम्ही हे गांभीर्याने लिहिलं आहे असं गृहीत धरुन मी प्रतिसाद देत आहे. एक शक्यता म्हणून हे विचारात घ्या तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास वा काही दूर खरेच काही कोलाहल असू शकतो.. तो आवाज क्षीण असेल आणि इतरांना ऐकू येत नसेल पण तुम्हाला ऐकू येतो. याचा अर्थ तुमच्या कानांची क्षमता प्रचंड वाढलेली आहे असे असू शकते. दिवसा संभाषणांच्या आवाजाखेरीज असे अनेक आवाज तुम्हाला ऐकू येत असतील आणि त्यामुळे संभाषणाच्या आवाजाचा त्रास होत नसेल वा ते फारसे जाणवत नसतील. पण रात्री इतर आवाज कमी झाल्याने संभाषणांचे आवाज तुम्हाला जास्त जाणवत असतील.. तुम्ही ही शक्यता तपासून बघण्याकरिता खालील गोष्टी करु शकता १) संभाषणांच्या आवाजाव्यतिरिक्त इतर काही दूरचे आवाज (जसे बस, ट्रेनचे, भांड्यांचे ई ई) ऐकू येतात का ते बघा २) जिथे दूरदूर पर्यंत खरंच खूप शांतता आहे अशा एखाद्या ठिकाणी रात्री संभाषणांचे आवाज ऐकू येतात का ते बघा.. एखाद्या साउंडप्रुफ खोलीत हे तपासा जर ही शक्यता खरी निघाली तर या गोष्टीकडे समस्या म्हणून बघू नका.. ही एक निसर्गाची देणगी आहे. (मी दैवी वगैरे म्हणत नाही... हे फक्त व्हेरिएशन आहे) . जमिनीत एखाद्या ठिकाणी विहीर(वा बोअरवेल) खणली तर पाणी लागेल की नाही हे सांगू शकणारे काही विशिष्ट लोक असतात त्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? त्यात अंधश्रद्धा वगैरे नाहीये तर त्या लोकांची श्रवणक्षमता इतर सामान्य माणसांच्या तुलनेत खूप जास्त असते. जसं कुत्र्याची त्यातही श्वानपथकात असतात त्या जातीच्या कुत्र्यांची गंध समजण्याची क्षमता अतिप्रचंड असते आणि माणसांच्या दृष्टीने तर तो केवळ एक चमत्कारच.. तसंच काहीस काही माणसांच्या श्रवणक्षमतेबाबत असावं...

In reply to by मराठी कथालेखक

बराच वेळ प्रतिक्रिया वाचत होतो, पण हा मुद्दा म.क.नी नवीनच काढला. १. रात्री झोपताना कानात पोहताना घालायचे रबराचे स्टॉपर घालुन झोपा. २. झोपायच्या आधी ध्यान किवा जप करायची सवय असेल तर उत्तमच, नसल्यास लावुन घ्या ३. सकाळी किवा संध्याकाळी, जेव्हा वेळ असेल तेव्हा जॉगिंग करा, जॉगिंग करताना शरीराला पळवत ठेवुन आणि मन वेगळे विचार करत राहते असे मला जाणवते. कधी कधी काही समस्यांची उत्तरेही सापडतात तेव्हाच.

मराठी कथालेखक जी असा मी विचार केलेला नाही. पण बऱ्याचदा ओळखीच्या लोक प्रत्यक्ष बोलल्या प्रमाणे त्यांचं एखादं वाक्य गपकन कानावर येते. तसेच समोरासमोर बोलताना समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय. थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे. काही साधना मी केल्या आहेत. पण हे संभाषणं निरूपद्रवी असली तरी हे काय चाललंय ते न कळल्याने अस्वस्थता वाटते.

In reply to by तमराज किल्विष

जॉनविक्क 13/08/2019 - 14:45
समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय.
ओह माय गॉड, तुम्हाला इतरांच्या मनातले विचार आवाज स्वरुपात ऐकू येतात होय... हे तर एकदम अगोबाई अरेच्चा सारखे प्रकरण वाटत आहे.

We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading. >> हा संदेश मला श्री उन्मेष दिक्षीत सरांनी पाठवला आहे व मला तो सर्वात जास्त आवडला आहे. त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद.

In reply to by उन्मेष दिक्षीत

जॉनविक्क 16/08/2019 - 22:00
पण वाचनाची गोडी पाहिजे, वाचनाची गोडी पाहिजे चे तूणतूणे लावणाऱ्याना तुम्ही वास्तवाची जी खणखणीत चपराक दिली त्यामुळे खरोखर मजा आ गया :) तयासाठी सर हा बहुमान आपणास द्यायलाच हवा.

In reply to by उन्मेष दिक्षीत

जॉनविक्क 17/08/2019 - 11:30
फक्त इडियट बॉक्स प्रमाणे वाचनाच्या अतिरेकाचेही दुष्परिणाम असतात हे देखील अधोरेखित होणे महत्वाचे आहे आणि आपण त्याची सुरूवात केलीत :)
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही.

आय आय टी चा क्लास

रानरेडा ·

Nitin Palkar 27/12/2018 - 18:48
सतीश सारखा पिता सर्वांनाच मिळत नाही, किंबहुना खूप कमी जणांना मिळतो. माझ्या परिचयातल्या एका मुलाला एसएस्सीला जेमतेम साठ टक्के गुण होते. मुलाला इंजिनियर व्हायची इच्छा होती. एका खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या वर्षाच्या केट्या तीन वर्षे क्लिअर झाल्या नाहीत. अखेर मुलाने स्वतः वडलांना, ' मला इंजिनिअरिंग जमणार नाही' असे सांगितले. पण वडिलांनी अजिबात ऐकले नाही. कुठचा वाटेल तो क्लास लाव पण इंजिनियरच झालं पाहिजे अशी भूमिका घेतली. अखेर सहा वर्षांनी त्याने सर्व शिक्षण सोडले आणि, 'यापुढे काहीही शिकणार नाही' असे घरी सांगून टाकले. अठ्ठावीस वर्षांचा हा मुलगा सध्या अक्षरशः काही करत नाही. वाईट गोष्ट ही आहे की वडलांना आपला मुलगा नालायक आहे असे वाटते...

In reply to by Nitin Palkar

रानरेडा 27/12/2018 - 19:18
हे खरे आहे सर - या परीक्षा च्या स्ट्रेस चे वाईट परिणाम पाहिले आहेत . त्यात अगदी आत्महत्ये पर्यंत प्रकार ऐकले आहेत . त्यात खरे तर झेपत नसताना प्रवेश मिळाला कि अजूनच वाईट अवस्था होते . इजिनिअरिन्ग ला एक अतिशय वाईट ताणातून मी गेलो आहे . पण पालकांचा सपोर्ट होता , नापास होवून गेलेल्या वर्षाचा फार बाऊ केला नाही म्हणून तगून गेलो . यापलीकडे पालकांच्या अति प्रेशर खाली कोर्स ला जावून - आणि तो व्यवस्थित पूर्ण करून चांगली नोकरी / व्यवसाय करणारे - आणि पालकांशी अत्यंत कोरडे किंवा तुटलेले संबंध असलेले एक दोन जण पहाण्यात आहेत . आणि एक जण जे या नंतर च्या यशाने बेफाम झालेला - आई बापा ला फाट्यावर मारून - अगदी व्यसने बाई बाजी करणारा !

उत्तम धागा काढलात त्याबद्दल धन्यवाद. अजून उत्तमोत्तम धागे काढता येतील ईतकी माहिती तुमच्याकडे आहेच. तेव्हा थांबु नका. करिअर विषयक आणखी धागे काढण्यासाठी शुभेच्छा.

वरुण मोहिते 28/12/2018 - 00:30
दुर्गविहारी यांच्याशी सहमत. करीयर विषयी अजून लिहिते व्हा रानरेडा साहेब. इतरांनी पण आपले अनुभव सांगावेत.आयआयटी आणि यूपीएससी मुळे अनेकांची काही वर्षे गेलेली पहिली आहेत.

नाखु 28/12/2018 - 12:25
दाखवणारं लिखाण. वरीलपैकी सर्वांच्या विनंतीस मान देऊन एक तपशीलवार मार्गदर्शन लेखमाला सुरू केली तर नक्कीच आवडेल. कल, आवड,स्वारस्य,ध्यास आणि क्षमता यांची सरमिसळ करणं पालक आणि मुलं या दोघांनी टाळलं पाहिजे. जात्यातला पालक वाचकांची पत्रेवाला नाखु

Nitin Palkar 27/12/2018 - 18:48
सतीश सारखा पिता सर्वांनाच मिळत नाही, किंबहुना खूप कमी जणांना मिळतो. माझ्या परिचयातल्या एका मुलाला एसएस्सीला जेमतेम साठ टक्के गुण होते. मुलाला इंजिनियर व्हायची इच्छा होती. एका खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या वर्षाच्या केट्या तीन वर्षे क्लिअर झाल्या नाहीत. अखेर मुलाने स्वतः वडलांना, ' मला इंजिनिअरिंग जमणार नाही' असे सांगितले. पण वडिलांनी अजिबात ऐकले नाही. कुठचा वाटेल तो क्लास लाव पण इंजिनियरच झालं पाहिजे अशी भूमिका घेतली. अखेर सहा वर्षांनी त्याने सर्व शिक्षण सोडले आणि, 'यापुढे काहीही शिकणार नाही' असे घरी सांगून टाकले. अठ्ठावीस वर्षांचा हा मुलगा सध्या अक्षरशः काही करत नाही. वाईट गोष्ट ही आहे की वडलांना आपला मुलगा नालायक आहे असे वाटते...

In reply to by Nitin Palkar

रानरेडा 27/12/2018 - 19:18
हे खरे आहे सर - या परीक्षा च्या स्ट्रेस चे वाईट परिणाम पाहिले आहेत . त्यात अगदी आत्महत्ये पर्यंत प्रकार ऐकले आहेत . त्यात खरे तर झेपत नसताना प्रवेश मिळाला कि अजूनच वाईट अवस्था होते . इजिनिअरिन्ग ला एक अतिशय वाईट ताणातून मी गेलो आहे . पण पालकांचा सपोर्ट होता , नापास होवून गेलेल्या वर्षाचा फार बाऊ केला नाही म्हणून तगून गेलो . यापलीकडे पालकांच्या अति प्रेशर खाली कोर्स ला जावून - आणि तो व्यवस्थित पूर्ण करून चांगली नोकरी / व्यवसाय करणारे - आणि पालकांशी अत्यंत कोरडे किंवा तुटलेले संबंध असलेले एक दोन जण पहाण्यात आहेत . आणि एक जण जे या नंतर च्या यशाने बेफाम झालेला - आई बापा ला फाट्यावर मारून - अगदी व्यसने बाई बाजी करणारा !

उत्तम धागा काढलात त्याबद्दल धन्यवाद. अजून उत्तमोत्तम धागे काढता येतील ईतकी माहिती तुमच्याकडे आहेच. तेव्हा थांबु नका. करिअर विषयक आणखी धागे काढण्यासाठी शुभेच्छा.

वरुण मोहिते 28/12/2018 - 00:30
दुर्गविहारी यांच्याशी सहमत. करीयर विषयी अजून लिहिते व्हा रानरेडा साहेब. इतरांनी पण आपले अनुभव सांगावेत.आयआयटी आणि यूपीएससी मुळे अनेकांची काही वर्षे गेलेली पहिली आहेत.

नाखु 28/12/2018 - 12:25
दाखवणारं लिखाण. वरीलपैकी सर्वांच्या विनंतीस मान देऊन एक तपशीलवार मार्गदर्शन लेखमाला सुरू केली तर नक्कीच आवडेल. कल, आवड,स्वारस्य,ध्यास आणि क्षमता यांची सरमिसळ करणं पालक आणि मुलं या दोघांनी टाळलं पाहिजे. जात्यातला पालक वाचकांची पत्रेवाला नाखु
हि सत्य घटना आहे आणि ज्या बद्दल लिहित आहे तो माझा चांगल्या ओळखीचा आहे . काही नावे बदलली आहेत ) "हुशारी असली आय आय टी म्हणजे फार लक लागते. आणि आणि अति कडक मेहनत पण." सतीश बोलला, "खूप हुशारी लागते रे आणि मुले मेहनत पण करतात " मी काहीही तयारी न देता केलेला एक अटेम्प्ट आठवून बोललो . " आणि आता तर क्लासेस आहेत - आणि ऐकले कि हमखास तयारी करून घेतात , ते कोटा त्यासाठीच फेमस आहे ना ? " अजून एक मित्र . सतीश माझा गेल्या ३-४ वर्षात झालेला मित्र. खरे तर मित्राच्या गाळ्या जवळ गाळा असल्याने त्यांची ओळख झाली आणि मग माझी पण.

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास ·

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

चित्रगुप्त ·
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास ·

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ?

मला भेटलेले रुग्ण - १६

डॉ श्रीहास ·

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_
https://www.misalpav.com/node/42489 मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.

मला भेटलेले रुग्ण - १३

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 27/02/2018 - 19:22
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गवि 27/02/2018 - 19:47
स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले. -डॉक्टरला काय कळतंय? -हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला. -एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो. -डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो. -चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

shashu 28/02/2018 - 09:59
मस्तच...... पुन्हा एकदा तेच म्हणतो...... तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:33
मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

Ram ram 28/02/2018 - 15:52
चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

नाखु 03/03/2018 - 14:51
डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय. अर्थात पहिला दमदार आहे

प्रीत-मोहर 08/03/2018 - 07:58
Hats off doc!! मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.

Nitin Palkar 27/02/2018 - 19:22
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गवि 27/02/2018 - 19:47
स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले. -डॉक्टरला काय कळतंय? -हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला. -एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो. -डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो. -चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

shashu 28/02/2018 - 09:59
मस्तच...... पुन्हा एकदा तेच म्हणतो...... तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:33
मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

Ram ram 28/02/2018 - 15:52
चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

नाखु 03/03/2018 - 14:51
डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय. अर्थात पहिला दमदार आहे

प्रीत-मोहर 08/03/2018 - 07:58
Hats off doc!! मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? ..... जणू काही ह्याच प्रश्नाची वाट बघत होते दोघे जण , बोलू लागले घडाघडा “काय सांगू डाॅक्टर पोरगा बारवीची परिक्षा देतोय, पण पुढचं काय करावं (आयुष्याचं) काही माहिती नाही, ऐकत नाही अजिबात ‘....