प्रत्येक माणसाला उपजतच किंवा न कळत्या वयापासूनच कसली तरी भीती वाटत असते. अशी भीती ही बर्याचदा कोणाकडून तरी दाखवली गेलेली असते उदा. पाल, उडते छोटे किडे, झुरळ, अंधारी खोली, किंवा एखादी निर्जीव वस्तू देखील. अशी भीती काळानुसार कमी होते किंवा निघून जाते पण जर कळत्या वयात येउन त्या भीती मध्ये काहीही फरक पडला नाही तर काय करावे?
कारण अशा वेळी ती भीती हे खिल्लीचे कारणही ठरू शकते. जर ती भीती जनमानसात उघड झाल्यास त्या व्यक्तीला उगाच त्रास देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.