मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

पुस्तकांविषयी सर्वकाही...

मोदक ·

मोदक 27/02/2017 - 13:42
मी सुरूवात करतो. आज एकच दिवस मेहता प्रकाशनमध्ये मराठी भाषा दिनानिमीत्त सर्व पुस्तकांवर ४०% सूट आहे. किमान ३४००/- रूपयांची खरेदी आवश्यक, म्हणजे एकूण डिस्काऊंट मिळून बिल २०००/- दरम्यान होते.

सागर 27/02/2017 - 15:14
मोदका छान धागा सुरु केलास सध्या मी भा. रा. भागवतांनी अनुवाद केलेले "शाब्बास शेरलॉक होम्स" ही ५ छोट्या पुस्तकांची मालिका वाचतो आहे. डायमंड प्रकाशनाने गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" या दोन खंडांची पुनर्र्छ्पाई केली आहे. इतिहासाची आवड असणार्‍यांनी अवश्य संग्रही ठेवावा असा हा ग्रंध आहे. असो मला जुनी काही पुस्तके हवी आहेत. कोणी मदत करु शकले तर खूप आनंद होईल. - वारसा नॉस्ट्राडेमसचा - मूळ लेखक : रेमंड लिओनार्ड - मराठी अनुवाद : अनिल काळे - द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - शकुंतला - आनंद साधले (याची झेरॉक्स प्रत देखील चालेल )

In reply to by सागर

सागर 27/02/2017 - 15:19
गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" २ खंड ऑनलाईन ऑर्डर करता येतील. मी घेतले आहेत. २०% सवलतीने खरेदी करण्यासाठीचा दुवा : http://www.diamondbookspune.com/viewdetails.php?bid=118&disc=20

वरुण मोहिते 27/02/2017 - 15:38
मला एक पुस्तक हवंय..डार्क गॉड्स नावाचं .टेड क्लेन म्हणून लेखक आहेत अमेझॉन वरून मागवलं तर २० दिवसांनी त्यांचा परत मेल आला कि उपलब्ध नाही म्हणून. असं म्हणतात हे पुस्तक नारायण धारपांचं इन्स्पिरेशन आहे.ते गेल्यावर त्यांच्या घरातली पुस्तक जेव्हा विकली तेव्हा रद्दीत हे पुस्तक हृषीकेश जोशी सध्या भयकथा वैग्रे लिहितात त्यांना मिळालं . अशी कथा ऐकल्यावर उगाच उत्सुकता लागलीये ते पुस्तक वाचायची .

In reply to by वरुण मोहिते

सागर 27/02/2017 - 16:33
वरुण हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे पण खुप महाग आहे. अ‍ॅमेझॉन च्या साईट वर सर्च मधे नाहि सापडले. पण गूगल सर्च मधून सापडले. लिन्कः http://www.amazon.in/gp/offer-listing/0330297147/ref=dp_olp_used_mbc?ie=UTF8&condition=used बहुदा वापरलेले (सेकंड सेल आहे) पुस्तकाच्या रेटिंग वरुन बरेच प्रसिद्ध पुस्तक आहे असे दिसते.

वरुण मोहिते 27/02/2017 - 17:30
सातवाहन कालीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास ..महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ मंडळासाठी विजयानगर पुणे ३०... अशी बऱ्यापैकी रेअर असलेली यादी पण आहे . रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??

In reply to by वरुण मोहिते

मोदक 27/02/2017 - 17:46
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का?? हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.

दीपक११७७ 27/02/2017 - 18:19
मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे मला या पुस्तकाचं फक्त नावच पुसटस आठवत, हे पुस्तक अनुवदित आहे, जर कुणाला याबद्दल काही माहीत असल्यास क्रुपया सांगावे. छान धागा मोदक मित्रा!

Nitin Palkar 27/02/2017 - 18:49
१९९० ते २०११ या काळातील Readers Digest चे सुमारे शंभर मासिक अंक (संमिश्र, सलग नव्हेत) माझ्याकडे आहेत. हौशी संग्रहाकास नाममात्र किमतीस विकणे आहेत. संपर्क: ७०४५६ ३६३४६

आदूबाळ 27/02/2017 - 18:51
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ऑनलाईन ईबुक्स https://msblc.maharashtra.gov.in/pdf/ (यापद्धतीने लिंक द्यायचं कारण म्हणजे 'छुपी' पुस्तकंही दिसतात.)

केडी 27/02/2017 - 19:40
हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही म्हणून मग audible (ऍमेझॉन) वर पुस्तक श्रवण करतो, ऑफिस ला गाडीतून जाता येता. आधी थोडं वेगळं वाटत, पण सवय होते, आणि नंतर मज्जा येते. ह्यावर आवर्जून ऐकावे/वाचावे असे पुस्तक म्हणजे Man versus Wild च्या Bear Grylls चे पुस्तक Mud, Sweat and Tears. हे माझ्या १२ वर्षाच्या मुलाला देखील ऐकवले आणि त्याने मन लावून ऐकले। विलक्षण अनुभव आहेत ह्या माणसाचे. नक्की वाचून बघा।

गॅरी ट्रुमन 27/02/2017 - 21:41
India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जनेयुमधील प्राध्यापक व्ही.कृष्ण अनंत यांचे पुस्तक माझ्या अगदी 'ऑल टाईम फेव्हरेट' मध्ये आहे. हे पुस्तक भारतीय राजकारणात स्वातंत्र्यापासून जवळपास १९९० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेते. तसेच या पुस्तकामध्ये घटना जशा घडल्या तशा दिल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जनेयुमधील प्राध्यापक असले तरी जनेयु स्टाईलमध्ये हलकटपणा करायला स्कोप नाही. मिपावर राजकारणावरील चर्चांमध्ये माझ्या अनेक प्रतिसादांना या पुस्तकाचा आधार असतो. या पुस्तकात नेहरूंचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, आणीबाणी, जनता पक्ष, राजीव गांधींचा कालावधी इत्यादी काळात झालेले राजकीय चढउतार भरपूर सविस्तरपणे दिले आहेत. माझ्यासारख्या राजकारणात अतोनात रस असलेल्याला हे पुस्तक म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कितीही वेळा वाचले तरी मधूनमधून ते पुस्तक मी परत वाचत असतो. हे पुस्तक उत्तम आहेच फक्त पुस्तकात अनेकवेळा तारखांचा घोळ झाला आहे (म्हणजे फार घोळ नाही--२-४ दिवस इकडेतिकडे) ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पुंबा 01/03/2017 - 17:19
रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा आणि रामचंद्र गुहा या दोघांची स्वातंत्र्योत्तर भारतावरची पुस्तके संग्रही आहेत. आता हेदेखील वाचायला हवे.

सध्या आतिवास सविता ह्यांचे अफगाणिस्तानमधील अनुभवावर आधारित 'भय इथले' हे पुस्तक वाचत आहे. त्यानंतर जयंत नारळीकर ह्यांचे 'चार नगरातील माझे विश्व' वाचणार आहे.

प्रचेतस 28/02/2017 - 10:09
सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेले 'श्री राजा शिवछत्रपती' हे पुस्तक वाचत आहे. प्रचंड माहितीच्या ओघाने निव्वळ थक्क व्ह्यायला होतंय.

वरुण मोहिते 28/02/2017 - 10:27
वसंत वसंत लिमये यांचं . रहस्य कथा कथा वर्तमान काळाशी सुसंगत ह्या धर्तीवर . आधीचं लॉक ग्रिफिन पण तसेच होते. 'शोध 'पण असेच होते मुरलीधर खैरनार यांचे . अंग्रेजी मध्ये सध्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल ' वाचतोय शशी थरूर यांचे .

पुंबा 28/02/2017 - 10:28
नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द डझन' आणि 'सारे प्रवासी घडीचे' ही तीन पुस्तके वाचून संपवली. अत्यंत सुंदर पुस्तके आहेत तीनही. सध्या कथासंग्रह वाचायचा मूड आहे, दि बा मोकाशींचा 'दिवेलागण' आणि श्री दा पानवलकरांचा 'सूर्य' असे दोन कथासंग्रह वाचत आहे. मिपावर बॅटमॅन यांनी अफाट स्तुती केल्याने मराठी 'वांग्मयाचा गाळीव इतिहास' हे देखील आणले आहे, दुकानात चाळत असताना पहिली एक दोन पाने वाचूनच जो वेड्यासारखा हसत होतो. नॉन फिक्शनमध्ये मायकेल सँडेल यांचे 'जस्टिस: व्हॉट्स द राईट थिंग टू डू' आणि 'गावगाडा' ही दोन चालू आहेत पण तितका सलग वेळ देता येत नसल्याने एखादे प्रकरण वाचून थंड पडत आहेत. न सांगण्याजोगी गोष्ट आणले आहे, पण सुरू करण्यासाठीच मूड येत नाहीये. मुख्य ओढा कथासंग्रहांकडे असल्याने, मिपाकर, कृपया चांगले कथासंग्रह सुचवा. तसेच, 'जप्ती' ही कथा मी सातवीत असताना वाचली होती, ती खूप आवडली होती, दुर्दैवाने लेखिकेचे आणि कथासंग्रहाचे नाव लक्षात येत नाही. बहुदा, वसुंधरा पटवर्धन किंवा असेच काही तरी त्यांचे नाव होते. कुणाला ही कथा ठाऊक असल्यास अधिक माहिती द्यावी.

In reply to by पुंबा

मोदक 28/02/2017 - 11:14
सारे प्रवासी घडीचे जबरदस्त पुस्तक आहे. =)) ********************** अवांतर - मी पूर्वी कधीतरी या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते. ********************** सारे प्रवासी घडीचे ही कथा आहे एका कोकणातल्या एका प्रतिष्ठीत घरातील जमीनदाराच्या मुलाची. "आपू" ची. शिक्षणानंतर शहरात गेलेला आपू गावामध्ये एक दोन दिवसांसाठी येतो, वाड्याचे बंद दारही पाहण्याची सवय नसणारा आपू त्याच वाड्याच्या रिकाम्या उदास भकास खोल्यातून जुन्या आठवणी शोधत फिरतो, वाळवी व कसर लागलेले देव पाहून खिन्न होतो, एखाद्या पाहुण्यासारखे पूजा करणार्‍या भटजींच्या डब्यातले अन्न खातो या व अशा उदास वातावरणात आपूची आत्म-कथा सुरू होते. आपूला एकेक गोष्टी आठवतात.. या पुस्तकातील सर्व घटना माणसांभोवती विणलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला दळवींनी दिलेली विनोदाची झालर त्यांचे विनोदावरील प्रभुत्व दाखवून जाते.. निर्वीष, निर्वैयक्तीक आणि निव्वळ प्रसंग व संवादातून उभा केलेला विनोद!! आबा.. त्यांची ग्रामदैवत रवळनाथावरील निष्ठा. रवळनाथाचे त्यांना आलेले अनुभव. आबांचा कट्टर वैरी बाबुली. त्याच्याशी नेहमी सुरू असलेले कोर्टकचेरीतील दावे. आपूच्या शाळाप्रवेशाची नांदी. भविष्य पाहण्यासाठी आलेले भटजी व त्यांनी काढून दिलेला मुहूर्त. आपूचे व त्याच्या आजीचे विडी आणण्यावरून जमलेले द्वैत, आपू शाळेत गेला तर विड्यांचे काय ही आज्जीला लागलेली काळजी. शाळेत न जाण्याची आपूची तर त्याला शाळेत घालण्याची आबांची धडपड. "सरस्वती आयली तर लक्ष्मी जातली" हे आज्जीने सांगीतलेले तत्वज्ञान! आपूने शाळेतच बसावे - पळून जावू नये म्हणून केलेल्या दादुल्याची नेमणूक. शाळेतला "ढ" पण जिवलग मित्र नरू. "भो पंचम जॉर्ज"ची मनापासून प्रार्थना करणारे व शाळामास्तर हेच पोस्टमास्तर असलेले बागाईतकर मास्तर. "माका नाव W W कुळकर्णी असत" असे म्हणून V V कुळकर्णी नावाने आलेले पत्र नाकारणारे (पण कार्ड असेल तर वाचून परत देणारे) आपूचे शेजारी "वामन विष्णु कुळकर्णी" शाळेचे गॅदरींग, "घनतमी शुक्र राज्य करी" व "अहाहा चेंडू.." या गाण्यांच्या अयशस्वी प्रयोगानंतर सर्वानुमते ठरलेले "देवाजीने करूणा केली" हे गाणे. गॅदरींगमध्ये आपूच्या विळ्याने किरकोळ जखम झालेला परशा व त्यानंतर परशाचा विळा हातात घेवून बागाईतकरांचे धोतर (घामाने!) ओले होईपर्यंत भांडण केलेला परशाचा बा. बागाईतकरांच्या रिटायरमेंट नंतर शाळेत अवतरलेला पावटे मास्तर. हा मास्तर बाबुलीच्या गटातील असल्याने त्याने केलेले आपूचे हाल. पावटे मास्तरच्या हाताचा मार खाऊन खाऊन एक दिवस त्याच्या खुर्चीवर खाजकुयलीची कुसे टाकून व नंतर पावटे मास्तरच्या "दुर्गाबाय" नावाच्या एका विधवेशी असलेल्या प्रकरणावरून "दुर्गेदुर्गट भारी तुजविण संसारी.." हे आरती टाळ्या पिटून भर बाजारात पावटे मास्तरच्या मागी लागणारा नरू.. पावटे मास्तर जातपात पाळत असल्याने केशा चांभाराला शिक्षण कमीटीचा मेंबर म्हणून निवडून देणारे आबा व केशाने केलेले शाळेचे "इन्स्पेक्षन" एका चांभाराला निवडून देणारे गाव पुरोगामी असलेच पाहिजे म्हणून गावात अवतरलेले "खुळो डाक्टर" डॉ.रामदास. त्यांनी आयोजीत केलेले गावकर्‍यांनी सर्वभोजन. दारूचा गुत्ता चालवणारा पेस्तँव.. दारूडा बाबल्या मडवळ. पशू, पक्षी व वनस्पतींची जिवापाड काळजी घेणारा हाफमॅड तात्या. आपूला जेलमध्ये डांबले म्हणून गेम करून सस्पेंड केला गेलेला हवालदार मुंगी. दशावतारी जिवा, त्याने साकारलेला शंकासूर.. जिवाचा प्रतिस्पर्धी व रवळनाथाचा पुजारी बाबू गुरव. बाबूने केलेले एकमेव नाटक द्रौपदी वस्त्रहरण - ज्याचा शेवट "लंगोटीमध्ये उभी असलेली द्रौपदी विडी ओढणार्‍या भगवान कृष्णाच्या तोंडात भडकावते" असा होतो. गावातील रिकामटेकडे व सतत कोणाचीतरी माहिती काढत त्यावरून वेळ घालवणारे लोक.. त्यांनी वेगवेगळ्या सवईंवरून लोकांना बहाल केलेली झोंबणारी टोपणनावे.. नायनाय भाऊ, हाफमॅड तात्या, अमृतांजन प्रेमजी, दुलाजीचा मुलगा "यम" (रेड्यावर बसून शेतातून घरी येणारा म्हणून!) लंगडा तातू.. हे अगदी छोटेखानी पुस्तक हास्याचे कारंजे उडवते. या व अशा अनेक माणसांचे चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!

In reply to by मोदक

पुंबा 28/02/2017 - 13:47
मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण. सगळी उजळणी झाली मनातल्या मनात, परत हसतोय.
चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!
मी खरेच आहे असे मानतो.. :))

पुंबा 01/03/2017 - 17:17
मी ereader prestigio वापरतो. .mobi, तसेच epub दोन्हीही प्रकारची पुस्तके निश्चिंतपणे वाचता येतात. फाँट आणि मार्जिन कमी जास्त करता येते. google books व किंडल छानच आहेत पण मोबाईलमधील जास्त जागा खातात.

वरुण मोहिते 01/03/2017 - 18:03
मराठी _तुही यत्ता कंची?? तुही यत्ता लेखक -नामदेव ढसाळ अंग्रेजी -वॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टींग लेखक _एम टी राजू

In reply to by अमर विश्वास

मोदक 01/03/2017 - 19:54
टाटायनमधली अजित केरकर आणि टाटा फायनान्स (पेंडसे ?) ही दोन प्रकरणे वाचून धक्का बसला होता. बाकी टाटांसंबंधी पुस्तके वाचायची असतील तर आर एम लाला यांच्या पुस्तकांना पर्याय नाही. (तसेच बिझनेस लिजंड आणि बिझनेस महाराजे मधली जेआरडी आणि रतन टाटांची व्यक्तीचित्रे.) __/\__

मारवा 01/03/2017 - 20:34
तुनळीवर एक झकास वल्ली आहे पुस्तकांवर जबरा बोलतो व सुचवतो. विशेषता आधुनिकोत्तर एकदा जरुर आजमवा त्याच्याच सुचवणीवरुन सध्याच वाचन सुरु आहे. युट्युबात. जावुन bookchemist टाइप करा व सर्च करा मजा आजायेगा गॅरंटी !

अमर विश्वास 01/03/2017 - 22:02
मोदकजी ... टाटांबद्दल जेव्हडे वाचु तेभाडे कमीच आहे गिरीश कुबेर यांचे यांचे सध्याचे (लोकसत्ता जॉईन केल्या नंतर) लिखाण वाचल्यानंतर त्यांचे पुस्तक वाचायला भीतीच वाटते .. पण टाटायन चांगले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजित केरकर आणि टाटा फायनान्स ही दोन प्रकरणे खरच खळबळजनक आहेत. खुद्द पेंडसेंनी लिहिलेले जे आर डी - मी पाहिलेले हे पुस्तक ही वाचनीय आहे. त्याचप्रमाणे जे आर डी चे "key notes address " एकत्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे (मराठी भाषांतर) जरूर वाचा

In reply to by अमर विश्वास

मोदक 02/03/2017 - 17:00
कुबेरांबद्दल सहमत. ;) मी पाहिलेले जेआरडी लिहिणारे द. रा. पेंडसे - हे टाटा ग्रुप मध्ये वरिष्ठ अर्थतज्ञ होते. (टाटा फायनान्स वाले पेंडसे वेगळे.) तसेच टाटा याच विषयावर आर एम लाला यांचे "क्रिएशन ऑफ वेल्थ" नावाचे एक पुस्तक आहे. टाटांची सुरूवातीपासूनची कथा आणि मारिओ मिरांडा यांची विषयानुरूप बहारदार रेखाचित्रे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुण्यात मंगळदास रोडवर "टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज" आहे. तेथे कधीतरी जरूर भेट द्या.

In reply to by मोदक

अमर विश्वास 02/03/2017 - 21:47
धन्यवाद मोदक ... खुप वर्षांपूर्वी मी पाहिलेले जेआरडी हे पुस्तक वाचले होते.. नावात घोळ झाला .... चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज ला भेट दिली आहे .. तसेच कामानिमित्त बॉम्बे हाऊस ला ही भेट देण्याची संधी सुद्धा मिळाली ... आत्तापर्यंत अनेक कॉर्पोरेट हाऊसेस ना भेट दिली .. पण बॉम्बे हाऊस चा अनुभव वेगळाच होता

गॅरी ट्रुमन 02/03/2017 - 11:02
माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र Matters of Discretion: An Autobiography मध्यंतरी वाचले होते. माझ्या मते हे एक चांगले पुस्तक आहे पण त्यातील काही गॅप मात्र जाणवण्यासारख्या आहेत. १. गुजराल यांनी मॉस्कोमधील भारतीय वकिल म्हणून १९७६ ते १९८० ही चार वर्षे काम पाहिले. आज इंदरकुमार गुजराल हे नाव ऐकले की आपण परराष्ट्रधोरणाबरोबर ते नाव ताबडतोब निगडीत करतो. मला वाटते की गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील एकूणच दृष्टीकोन या काळात जास्त बदलला. गुजराल यांना हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ वाटत असणे स्वाभाविक आहे आणि त्यांनी पुस्तकातली अनेक प्रकरणे त्यावर दिली आहेत. पण अर्ध्याहून जास्त भारतीयांचा जन्म त्यांची मॉस्कोतील कारकिर्द संपल्यानंतर झालेला आहे. या वाचकवर्गाला त्यांचे मॉस्कोमधील अनुभव काहीसे कंटाळवाणे आणि फार रस वाटावे असे असतील असे वाटत नाही. त्यातील काही अनुभव तर खूपच विस्ताराने लिहिले आहेत असे मला वाटले. उदाहरणार्थ राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींच्या मॉस्को भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळी ब्रेझनेव्ह उपस्थित राहिले नाहीत हा रेड्डींना अपमान वाटला आणि त्यामुळे कूटनैतिक संकट उभे राहिले असते आणि ते कसे टळले यावर काही पाने खर्ची पाडली आहेत. हे अनुभव सामान्य भारतीय वाचकांना फार भावतील असे नाही. तसेच सोव्हिएट रशियाच्या इतिहासात रस असलेल्या वाचकालाही हे फार भावेल इतक्या विस्तारानेही या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. म्हणजे हे काही अनुभव कोणत्याच वाचकाला भावतील असे वाटले नाहीत आणि ते नक्की कशाकरता पुस्तकात आहेत असेही वाटले. २. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात गुजराल माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी आणीबाणीच्या काही दिवस आधी संजय गांधींनी त्यांच्यावर इंदिरा समर्थकांच्या सभांना रेडिओ-टिव्हीवर प्रसिध्दी द्या असा आदेश दिला होता आणि तो त्यांना मान्य नव्हता यावर त्यांनी लिहिले आहेच. पण आणीबाणी या स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटनेविषयी त्यांनी पुस्तकात फार लिहिलेले नाही हे पण जरा खटकलेच. ३. गुजराल सुरवातीपासून काँग्रेसशी संलग्न होते. पण एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडायचा प्रयत्न केला याविषयी त्यांनी लिहिले आहे. पण त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली याविषयी गुजराल यांनी काहीच लिहिले नाही हे नक्कीच खटकले. मला स्वतःला १९८९ पूर्वीच्या घटना केवळ पुस्तके वाचून माहित आहेत त्यामुळे अशा महत्वाच्या घटनेविषयी काहीच न लिहिलेले मात्र खटकले. ४. गुजराल पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत कल्याणसिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस केली होती. ती राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाकडे परत पाठवली. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर हा नक्कीच डाग होता. याविषयी त्यांनी मायावतींनी कल्याणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुजराल यांचे राज्यपाल रोमेश भंडारी यांच्याशी काय बोलणे झाले एवढेच लिहिले आहे. आणि त्यानंतर "उत्तर प्रदेशातील पेचप्रसंग सुटल्यावरच मला व्यवस्थित झोप लागू शकली" असे लिहिले आहे. पण तो पेचप्रसंग नक्की कसा सुटला याचा उलगडा मात्र वाचकांना होत नाही. ५. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरच्या त्यांच्या जीवनाविषयी फार त्यांनी लिहिलेले नाही. विशेषतः १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर गुजराल यांनी लोकसभेत वाजपेयी सरकार नक्की कोणत्या चुका करत आहे यावर भाष्य केले होते. गुजराल यांची इंग्रजी भाषेवरील पकड आणि वक्तृत्व मला नेहमीच भावत असे. त्यांचे लोकसभेतील हे भाषण मी मुद्दामून बघितले होते. तसेच गुजराल पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ही घटना दोन महिन्यातच झाली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रधोरणाला नवे वळण लावणारी ही घटना होती. गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील रस लक्षात घेता या महत्वाच्या घटनेवर त्यांनी काहीतरी लिहायला हवे होते असे वाटून गेले. ६. जेव्हा एखादा नेता आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्या जीवनात घडलेल्या घटना एकामागोमाग एक लिहिणे एवढाच त्याचा उद्देश नसावा असे वाटते. तर त्या नेत्याच्या विषयात पुढे काय घडामोडी होऊ शकतील याविषयीचे स्वतःचे मत असायला हवे असेही वाटते. विशेषतः गुजराल हे परराष्ट्रधोरणातील जाणकार असल्यामुळे यानंतरच्या काळात भारताला परराष्ट्रधोरणात नक्की कोणती आव्हाने उभी राहतील आणि ती पेलण्यासाठी काय करायला हवे याविषयी थोडे तरी भाष्य हवे होते असेही वाटले. एकूणच माझ्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असलेल्या वाचकाला इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाकडून ज्या अपेक्षा होत्या या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. हे पुस्तक गुजराल यांनी वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर प्रकाशित झाले होते. कदाचित त्यावेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसावी. तसेच गुजराल यांचे निधन होण्यापूर्वी दोनेक वर्ष त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या वयात हा विरहाचा धक्का पचविणे तसे कठिणच असेल याची कल्पना करता येते. तसेच प्रकाशकांना आधीच कबूल केल्यामुळे प्रकृती साथ देत आहे तोपर्यंत पुस्तक पूर्ण करायचे हे पण दडपण असेल. या सगळ्या कारणांमुळे त्यांचे आत्मचरित्र हे एखाद्या अपूर्ण मूर्तीप्रमाणे वाटले. हे पुस्तक त्यांनी ८-१० वर्षे आधी लिहिले असते तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे झाले असते असेही वाटून गेले. अर्थातच हे पुस्तक वाईट आहे असे नक्कीच नाही. गुजराल, अडवाणी इत्यादी नेत्यांचे राजकीय जीवन म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासच. या आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील पहिल्या ५० वर्षांचा लेखाजोखा थोडा तरी नक्कीच समजतो. तसेच वि.प्र.सिंग यांच्या मंत्रीमंडळातील लाथाळ्या, १९९० चे इराक-कुवेत प्रकरण इत्यादींचा चांगलाच आढावा त्यांनी घेतला आहे. पण असाच आढावा इतर महत्वाच्या घटनांचाही घेतला गेला असता तर बरे झाले असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटून गेले.

दा विन्ची 02/03/2017 - 16:48
माझ्याकडे मोबाईल वर वाचण्यासाठी ३०-४० इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत pdf फॉरमॅट मध्ये. साईझ साधारण १ ते २ Mb. सिडने शेल्डन, रॉबिन कुक, रॉबर्ट लुडलुम, मायकल क्रिश्टन, जॉन ग्रिशॅम आणि डॅन ब्राऊन ची. हवी असल्यास व्हाट्स अँप वर देऊ शकतो.

वरुण मोहिते 03/03/2017 - 14:12
मातोश्रीवर अर्धी रात्र लेखक -विजय तेंडुलकर ....काही अप्रकाशित कथा अंग्रेजी -गुड स्ट्रॅटेजी बॅड स्ट्रॅटेजी लेखक -रिचर्ड रुमेल्ट मॅनेजमेंट आवडणाऱ्या लोकांनी रुमेल्ट ह्यांचं पुस्तक वाचावं

हा एकच धागा असेल तर खरंच बरं होईल. मागे एकदा बोका भाऊंनी काही पुस्तकं मला एका धाग्यात सुचवली होती. तो धागा कोणता हेच मला आठवत नाही. कुणी कृपा करुन मिपावर आजवर पुस्तकांच्या याद्याविषयक आलेल्या धाग्यांच्या लिंक्स सुद्धा इथे देईल का? मी खुप दिवसात पुस्तकंच वाचलेले नाही. :( उद्याच लायब्ररीत जाईन. आणि इथे त्या पुस्तकाविषयी लिहेन. ह्या आधी वाचलेलं पुस्तक म्हणजे रिबेका. चांगलं आहे. शेवटाची ओढ लावतं पण शेवट नीटसा कळत नाही. भाषा मात्र अत्यंत प्रवाही आहे. कथा अप्रतिमपणे उभी केली आहे वाचकासमोर. गॉन विथ... वाचायला सुरूवात केली खरी. पण मला इतकी वर्णनं असलेली पुस्तकं वाचता येत नाहीत. त्यामुळे सोडुन दिलं.

In reply to by पिलीयन रायडर

पी. के. 04/03/2017 - 13:05
मिसळपाव वर असणारे पुस्तका विषयी हे काही जुने धागे वाचता वाचता वाढे..... मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र पुस्तक खरेदी - मदत दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके मला आवडलेले पुस्तक मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत) मला आवडलेली ५० पुस्तके ऑगस्ट महिन्यात "मला आवडलेली ५० पुस्तके" हा धागा वाचनात आला. प्रतिसाद वाचताना आपण पुस्तक वाचण्याच्या बाबतीत किती आळशी आहोत याची जाणीव झाली. वडिलांना आणी भावाला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे घरातील माळे, कपाटे, पलंगाचे कप्पे पुस्तकांनी तुडूंब भरलेले. मग काय झटकला आळस, काढली पुस्तकं कपाटातून बाहेर आणी केली सुरवात.. सद्य वि. ग. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल वाचतोय. मागच्या पाच महिन्यात वाचलेली पुस्तके. फकिरा:- अण्णाभाऊ साठे लोक माझे संगती:- शरद पवार राजा शिवछत्रपती :- बाबासाहेब पुरंदरे. डोंगरी ते दुबई हुसेन ज्वलज्वलनतेजास संभाजीराजे J R D मन मे है विश्वास राऊ स्वामी ययाती धागे अरब जगाचे पानिपत एक होता कार्व्हर अमृतवेल आजून ही खूप पुस्तकं आहेत घरात जी वाचायची बाकी आहेत. बघू कसं जमतंय ते शेवटी मिपाकरांचे आभार माझ्यात वाचायची आवड निर्माण केल्या बद्दल

In reply to by पिलीयन रायडर

एमी 22/03/2017 - 07:51
रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय कळलं नाही? मी फार पुर्वी पुस्तक वाचलंय आणि चित्रपट पाहिलाय. जमल्यास शंका समाधान करायचा प्रयत्न करेन.

गॅरी ट्रुमन 06/03/2017 - 12:39
अर्थशास्त्रातील २००२ चे नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्सटन विद्यापीठातील एमेरीटस प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow हे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच वाचले. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीतच. ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तरीही त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचे कारण सूक्ष्मअर्थशास्त्रातील ( मायक्रोइकॉनॉमिक्स) विविध मॉडेल ही माणसे 'रॅशनल' असतात या गृहितकावर आधारीत आहेत पण माणसे प्रत्यक्षात 'रॅशनल' नसतात हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील दुसरे मानसशास्त्रज्ञ कै. Amos Tversky यांनी १९७० च्या दशकात अनेक प्रयोग करून सिध्द केले. Thinking, Fast and Slow हे पुस्तक त्या दोघांनी (आणि इतरानी) केलेल्या विविध प्रयोगांवर आधारीत आहे. प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते आपण विचार करतो तो विचार दोन पातळ्यांवर होतो-- सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२. सिस्टिम-१ म्हणजे intuitive विचार करणारी व्यवस्था (फास्ट थिंकिंग) तर सिस्टिम-२ म्हणजे अधिक खोलात जाऊन अधिक वेळ घेऊन विचार करणारी व्यवस्था (स्लो थिंकिंग). प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते सिस्टिम-२ ही 'आळशी' व्यवस्था असते. म्हणजे शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे सिस्टिम-२ चा कल असतो. या दोन सिस्टिमचे कार्य कसे चालते आणि आपण नक्की कसा विचार करतो याविषयी पुस्तकात कित्येक उदाहरणे दिली आहेत. खरे तर या पुस्तकावरील प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. पण आतापुरते एक उदाहरण देतो: प्राध्यापक कॅनेमन यांनी एक 'लिंडा प्रॉब्लेम' म्हणून उदाहरण दिले आहे. त्यांनी लिंडा या एका काल्पनिक ३१ वर्षीय स्त्रीचे वर्णन दिले आहे. ती single, outspoken आणि तल्लख आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूध्द आणि सामाजिक न्यायाच्या बाजूची तिची स्पष्ट भूमिका आहे आणि तिने अण्वस्त्रांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतला आहे अशा स्वरूपाचे तिचे वर्णन आहे. हे वर्णन देऊन झाल्यानंतर प्राध्यापक कॅनेमन यांनी या प्रयोगातील लोकांना लिंडा नक्की कोणत्या पेशामध्ये असू शकेल याचे ८ पर्याय दिले. लोकांना ती ज्या पेशात असेल याची सर्वात जास्त शक्यता वाटेल त्या पेशाला क्रमांक १, त्यानंतर शक्यता असलेल्या पेशाला क्रमांक २ अशा पध्दतीने ८ पेशांची क्रमवारी लावणे अपेक्षित होते. त्या ८ पेशांच्या यादीत तिसरा पेशा होता-- "स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर", सहावा पेशा होता "बँकेत टेलर" आणि आठवा पेशा होता "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर". त्या प्रयोगात भाग घेणार्‍यांपैकी बहुसंख्य लोकांनी लिंडा "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" ला नुसत्या "बँकेत टेलर" पेक्षा वरचा क्रमांक दिला. वास्तविकपणे बँकेत टेलर असलेल्या समजा १०० स्त्रिया असतील तर स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या बँकेतील टेलर नक्कीच १०० पेक्षा कमी असतील. म्हणजे 'रॅशनल' माणूस "बँकेत टेलर" या पेशाला "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" पेक्षा वरचा क्रमांक देईल. पण तसे झाले नाही. आपण नक्की कसा विचार करतो याविषयी अशा कित्येक (किंबहुना काही शे) उदाहरणांचा खजिना आहे या पुस्तकात. या पुस्तकाने मला पूर्णपणे अंतर्बाह्य हलवून टाकले हे लिहिणे म्हणजे या पुस्तकाचा माझ्यावर जो परिणाम झाला आहे त्याचे अगदी मिळमिळीत वर्णन झाले. सूक्ष्मअर्थशास्त्रात मानसशास्त्राचाही अंतर्भाव असावा असे पूर्वीही अनेक रिसर्चर म्हणत असत.पण प्राध्यापक कॅनेमन आणि Amos Tversky यांच्या कामामुळे या प्रयत्नांना एक महत्वाची दिशा मिळाली. त्यातूनच 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हे सूक्ष्मअर्थशास्त्रातील एक महत्वाचे क्षेत्र विकसित झाले. याचा जाहिराती, सेल्स तसेच ह्युमन रिसोर्सेस इत्यादी अनेक मॅनेजमेन्टच्या क्षेत्रांवर अमूलाग्र परिणाम होऊ शकेल. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांना २००२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याबद्दलचे सायटेशन होते: "for having integrated insights from psychological research into economic science, especially concerning human judgment and decision-making under uncertainty".प्राध्यापक Amos Tversky यांचे १९९६ मध्ये निधन झाले. अन्यथा त्यांनाही प्राध्यापक कॅनेमन यांच्या बरोबरच नोबेल पारितोषिक मिळाले असते. युट्यूबवर प्राध्यापक कॅनेमन यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक व्हिडिओ या पुस्तकाविषयी गुगल टॉक्समध्ये आहे. तो पुढीलप्रमाणे:
असले जबरदस्त काम करणारे लोक बघितले की खरोखरच भारावून जायला होते. जरी अर्थशास्त्रात फार इंटरेस्ट नसेल तरी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी म्हणेन. आपण ज्या पध्दतीने विचार करतो त्यात कित्येक त्रुटी नकळतपणे कशा असू शकतात (ज्याविषयी आपल्याला काहीही माहित नसते) हे समजले की खरोखरच थक्क व्हायला होते. पुस्तकात Bayes' theorem , Binomial distribution याविषयीचे काही प्रोबॅबिलिटीतले उल्लेख आहेत. तो भाग माहित नसेल तर तेवढी २-३ प्रकरणे समजली नाहीत तरी इतर प्रकरणांमध्ये खरोखरच खजिना भरलेला आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन 14/03/2017 - 11:07
प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांनी म्हटल्याप्रमाणे विचार करायच्या सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ चे एक उदाहरण याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिले आहे. या पुस्तकावर आणखी काही लिहून विनाकारण टी.आर.पी वाढवायचा नाही पण हा विषय मला प्रचंड आवडला आहे. तसेच यावर नवा लेख लिहावा इतपत मसालाही नाही. त्यामुळे इथेच घुसखोरी करत आहे. समजा एका शहरात दोन मॅटर्निटी होम्स आहेत. एकात दररोज सरासरी १५ बालकांचा जन्म होतो तर दुसर्‍यात दररोज सरासरी ४५ बालकांचा जन्म होतो. त्यापैकी कोणत्या मॅटर्निटी होममध्ये एखाद्या दिवशी जन्मलेल्या बालकांपैकी ६०% मुली असायची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचे मी 'सिस्टिम-१' चा वापर करून दोन्ही मॅटर्निटी होममध्ये ही शक्यता सारखीच आहे हे उत्तर दिले. प्रत्यक्षात ही शक्यता लहान मॅटर्निटी होममध्ये (दररोज १५ जन्म होणार्‍या) जास्त आहे. हा प्रश्न बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सोडवता येईल. हे उत्तर लहान मॅटर्निटी होमसाठी सुमारे १५.३% तर मोठ्या मॅटर्निटी होमसाठी सुमारे ४.९% इतके येते. मी स्वतः बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांना गेली जवळपास ६ वर्षे शिकवत आलेलो आहे. हे उत्तर काढून ती शक्यता लहान मॅटर्निटी होमसाठी नक्कीच जास्त आहे हे मला समजले नसते असे नक्कीच नाही. पण अशा प्रकारची आकडेमोड करणे हे सिस्टिम-२ चे काम आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे सिस्टिम-२ आळशी असते. शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे त्या सिस्टिमचा कल असतो.त्यामुळे आपली सिस्टिम-१ एकदम intuitive उत्तर असते ते देते. एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक नाणे १० वेळा उडवले तर त्यात ६ छापे यायची (६०%) शक्यता बर्‍यापैकी असेल हे आपल्याला कळतेच. पण समजा तेच नाणे १ लाख वेळा उडवले तर त्यात ६० हजार छापे यायची (परत ६०%) शक्यता तितकी नसेल. कारण जसा सॅम्पल साईझ वाढतो त्याप्रमाणे 'अ‍ॅव्हरेज आऊट' होते आणि टोकाचे रिडिंग यायची शक्यता कमी होते. मी हा भाग स्वतः शिकवत असूनही आणि मी मुळातले पुस्तक वाचूनही (त्यात सॅम्पल साईझचा परिणाम काय होतो हे व्यवस्थित समजावून दिले आहे) माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले. हाच अनुभव मिपाकरांपर्यंत पोहोचवावा म्हणून इथेच घुसखोरी करत आहे. त्याबद्दल दिलगिरी. पण हे पुस्तक वाचलेत तर असे चकित व्हायचे अनुभव कित्येकवेळा येतील हे मात्र अगदी स्वानुभवावरून सांगतो.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते.... ...माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले.
माफ करा, जरा स्पष्टच विचारतो - ह्यात थक्क होण्यासारखे नक्की काय आहे? तुम्ही जरा विचार केला असतात, वेळ घेतला असतात आणि तुमच्याकडे असणाऱ्या सांख्यिकी ज्ञानाचा वापर केला असतात तर बरोबर उत्तर तुम्हाला सापडले असते. पण घाई केलीत आणि घोळ झाला. आता हे सांगायला मानस/अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? बाकी तुमच्या शिफारशीवरून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रच्याकने, सध्या 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स'ला आलेले 'अच्छे दिन' म्हणजे उत्क्रांतीवाद्यांनी डार्विनचे सिद्धांत चुकीचे आहेत हे मान्य करण्यासारखे आहे असे वाटते. सगळ्या अर्थशास्त्राचा डोलारा हा माणूस 'रॅशनल' (ह्याला मराठीत अचूक पर्यायी शब्द नाही) असण्यावर अवलंबून आहे. पण जवळपास सगळेच निर्णय घ्यायच्या वेळेस मनुष्य इररॅशनल वागतो हे अर्थशास्त्रद्यांना फार आधीच कळलेलं आहे. असो.

मोदक 14/03/2017 - 20:44
एका पुनर्जन्माची कथा हे पुस्तक वाचले.. Rheumatoid Arthritis नामक दुर्धर विकार झालेल्या मनोविकारतज्ञ डॉक्टरने, ओशो तत्त्वज्ञानाने या रोगाशी कसा सामना केला याचा विस्तृत अनुभव आहे.

In reply to by मोदक

पुंबा 15/03/2017 - 20:19
यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर)
याबद्दल कुतुहल वाटते आहे. वाचून झाल्यावर सांगा कसे वाटते ते. मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचेन.

In reply to by पुंबा

मोदक 15/03/2017 - 21:41
मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो - __/\__ किर्लोस्करांविषयी वाचायचे असेल तर पुढील पुस्तके जरूर वाचा. Cactus and Roses - शंतनुरावांचे आत्मचरित्र या पुस्तकाची शंतनुरावांच्या जन्मशताब्दीनिमीत्त निघालेली २००३ सालची प्रत सध्या उपलब्ध आहे किंवा येथे पीडीएफ डाऊनलोड करता येईल. कालापुढती चार पाऊले - सविता भावे (१९७९) यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर) - शं वा किर्लोस्कर (१९८७ चे पुनर्मुद्रण) एका नांगराची कहाणी - डॉ. भा. र. साबडे (१९८९) शंतनुराव - डॉ. भा. र. साबडे वरील यादीतील "कालापुढती चार पाऊले" सध्या सहज मिळेल, अन्य कोणतीही पुस्तके मिळाली तर नक्की सांगा, तसेच या यादीपेक्षा अन्य कोणती पुस्तके माहिती असतील तर प्रतिसादात कळवा. शंतनुराव किंवा एकंदर किर्लोस्करांविषयी आणखी कांही वाचायचे असेल तर कल्याणी आणि ओगले ग्लास वर्क्स यांची पुस्तके वाचा, त्यांच्या सुरूवातीच्या काळात शंतनुरावांचे अनन्यसाधारण योगदान आहे.

In reply to by पुंबा

मोदक 16/03/2017 - 17:28
मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण "यांत्रीकाची यात्रा" हे पुस्तक मला जुन्या पुस्तकाच्या दुकानात मिळाले. तुम्हाला नवीन पुस्तक मिळण्याची कितपत शक्यता आहे याची कल्पना नाही..

वरुण मोहिते 14/03/2017 - 20:56
दोन म्हातारे वं इतर कथा .अनुवाद -उमा कुलकर्णी इंग्लिश _ बऱ्यापैकी न आवडलेलं सियालकोट सागा _अश्विन संघी

पुंबा 15/03/2017 - 13:52
जी एंचं काजळमाया किंडलवर विकत घेतलं. त्यातली प्रदक्षिणा ही पहिली कथा कॉलेजला असताना वाचली होती. इतकं विकल होऊन जायला झालं होतं की सगळ्या कथा वाचवल्याच गेल्या नव्हत्या, सरळ पुस्तक ग्रंथालयात परत देऊन आलेलो. आता पुन्हा वाचायला सुरूवात केलीये. विकलता, एकटेपणा, जीवनाचं भयाण, क्रौर रूप, नियतीचा निर्दय सारीपाट, जगण्यातली विलक्षण गुंतागुंत मांडायला जी एंसारखा विलक्षण प्रतिभावंतच हवा.

In reply to by पुंबा

सानझरी 16/03/2017 - 17:40
जी एंचं कुठलंतरी पुस्तक वाचायला घेतलेलं. त्यातली रुपकं इतकी किळसवाणी वाटलेली कि पुढे वाचवलंच नाही. जी एंच्या २-३ कथा 'औदुंबर' पुस्तकात वाचल्यात तेवढ्याच.. बाकी जी एंच्या पत्रांची मी जबरदस्त फ्यॅन. (चारही खंड आणि जी एंची पत्रवेळा)

मदनबाण 18/03/2017 - 00:58
सध्या वेळ मिळेल तसे हे वाचतोय... P1 अतीशय सुंदर आणि समाधान देणारं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 10:13
मागे रघुराम राजन यांचे Fault Line: How Hidden Fractures Still Threaten the World Economy हे अप्रतिम पुस्तक वाचले होते. भूकंपशास्त्रात फॉल्टलाईन म्हणून एक संकल्पना आहे. जमिनीच्या खाली दोन भूगर्भाच्या प्लेट एकमेकांशेजारी असतात तिथे या फॉल्टलाईन्स असतात. या फॉल्टलाईन्सच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर दबाव तयार होतो आणि तो दबाव प्रमाणाबाहेर वाढला की त्यातूनच पुढे भूकंप होतात. राजनसाहेबांनी जागतिक अर्थकारणात अशा कोणत्या 'फॉल्टलाईन्स' आहेत हे या पुस्तकात खूपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे. या पुस्तकात राजनसाहेबांनी २००७-०८ चे अमेरिकेतील आर्थिक संकट, १९९७ चे पूर्व आशियाई संकट इत्यादींचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तसेच कोणत्याही जार्गनचा वापर न करता विषय अगदी साधीसाधी उदाहरणे वापरून समजावून दिला आहे. विशेषतः २००७-०८ च्या संकटाची मूळे बरीच मागे जातात आणि त्या संकटात सरकारनेही नकळतपणे कसा हातभार लावला होता हे त्यांनी समजावून सांगितले आहे. तसेच २००५ च्या जॅकसन होल कॉन्फरन्समध्ये इतर सगळे फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांचे गोडवे गात असताना नेमक्या रघुराम राजन यांनी Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून एका अर्थी सगळ्यांचाच रसभंग केला हे पण त्यांनी लिहिले आहे. हा विषय इतक्या सोप्या शब्दात समजावून देणारे दुसरे पुस्तक वाचायला मिळणे कठिण आहे. Rajan

Ranapratap 18/03/2017 - 19:55
अच्युत गोडबोले यांचे बोर्डरूम व अर्थात वाचून झाले. इतर हि पुस्तके वाचनीय आहेत, जसे मुसाफिर भाग 1 व 2, गुलाम, मनात. सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.

In reply to by Ranapratap

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 20:20
सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.
हे पुस्तक चांगले आहे. विविध शब्द चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहेत. पण हे पुस्तक खूपच प्राथमिक पातळीवरील आहे. इंग्रजी शब्दांसाठी आणखी दोन अक्षरशः खतरनाक पुस्तके सुचवतो. या पुस्तकात समानार्थी किंवा विरूध्दार्थी शब्द अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला पर्याय आहेत. अनेक प्रश्नांमधील मुळातला शब्द आणि पर्यायात दिलेला एकही शब्द माहित नव्हता. मला भाषांमध्ये वगैरे फार गती नाही पण तरीही इंग्रजी शब्द करायला खूपच आवडते. नवे शब्द कळले की त्यातून वेगळा आनंदही मिळतो. त्यामुळे मला ही दोन पुस्तके प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली. ही पुस्तके ६०-७० वर्षे जुनी असल्यामुळे प्रताधिकार वगैरे भानगडींमधून मुक्त झाली आहेत आणि खूप स्वस्तही आहेत (१०० रूपयाच्या आतबाहेर) १. All about words २. How to build a better vocabulary १ २

In reply to by पुंबा

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 11:01
या दोन पुस्तकांमधले शब्द करताना जाडीजुडी डिक्शनरी बरोबर घेऊन बसावे लागेल. पॉकेट डिक्शनरीचाही फार उपयोग होईल असे वाटत नाही :) हे शब्द केले की तेवढ्यापुरता आनंद मिळतोच. पण अर्थातच हे शब्द आपण दैनंदिन व्यवहारात वापरत नसल्यामुळे बर्‍याचशा शब्दांचा विसर पडतो. तरीही हे शब्द कुठेतरी बघितले/वाचले तर संदर्भातून त्याचा अर्थ समजतोही. पण तरीही स्वतःहून त्या शब्दांचा वापर तितक्या सफाईने करता आलेला नाही :(

सध्या तुनळीवर कधीपासुन वाचायच्या यादीत असणाऱ्या पुस्तकांची श्रवणरुपे (ऑडिओबुक्स) साडपली आहेत पण मूळ पुस्तक न वाचता सरळ 'ऐकण्याविषयी' मी साशंक आहे. एखादे आवर्जून वाचायचे पुस्तक तुम्ही सरळ 'ऐकले' आहे का? कसा होता तो अनुभव? विशेषतः ललित (फिक्शन. हाच पर्यायी शब्द आहे माहित नाही की नाही ते नक्की ठाऊक नाही)?

In reply to by मोदक

काफ्का (अजून कोण) - मेटामॉर्फोसिस
अतिशय गूढ वगैरे कथा असल्याने ऐकून कशी मजा येईल हे कळत नाहीये रच्याकने, मी आधी वाचून काढलेल्या कादंबऱ्यांची श्रवणपुस्तके ऐकण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळालेला आहे...

गणामास्तर 20/03/2017 - 10:19
शाळेत असताना मराठीला एक धडा होता. त्यात जहाजावर काम करणारा आणि लग्नाच्या सुट्टीसाठी घरी आलेला अबोल, थोडा तुसडा कथानायक होता. एका समारंभात लोक जमलेले असताना रेडिओवर एका बुडणाऱ्या जहाजावरून मोर्स कोडवरचे संदेश येऊ लागतात आणि तो ते समजावून देत असतो असे काही तरी कथानक होते. कुणाला आठवतंय का त्या कथा वा लेखकाचे नाव ?

In reply to by गणामास्तर

पुंबा 20/03/2017 - 10:51
रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी लामणदिवा ह्या कथासंग्रहात ही कथा आहे. सध्या तोच कथासंग्रह वाचत आहे.

In reply to by पुंबा

पुंबा 20/03/2017 - 10:56
अवांतरः मोकाशींचा रेडिओदुरूस्तीचा व्यवसाय होता स्वतःचा. ह्या गोष्टीत रेडिओ हे महत्वाचे पात्र म्हणून येते.

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 10:49
या धाग्याच्या निमित्ताने कधीकाळी वाचलेली पुस्तके आठवायला लागली आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमधील प्राध्यापक स्टीव्ह लेव्हिट यांचे Freakonomics: A Rogue Economist Explores the Hidden Side of Everything हे असेच एक पुस्तक. या पुस्तकात नुसत्या आकडेवारीचा अभ्यास करून अनेक गोष्टी कशा समजावून घेता येतात याविषयी लिहिले आहे. अनेकदा आपण असा विचारही केलेला नसतो. उदाहरणार्थ १९८० च्या दशकाच्या शेवटी आणि १९९० च्या दशकाच्या सुरवातीला अमेरिकेत 'टिनेज' गुन्हेगारांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यावेळी अजून १० वर्षात अमेरिकेतील कुठलेच शहर यापासून मुक्त नसेल आणि कधीही कुठेही अचानक १६-१८ वर्षाचा कोणी बंदूक दाखवून आपल्याला लुबाडेल अशा स्वरूपाचे चित्र सगळीकडे बघायला मिळेल वगैरे वगैरे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात झाले उलटेच.१९९५ पासून हा गुन्हेगारीचा दर लक्षणीय प्रमाणात कमी झाला. २००० पर्यंत तर हा दर १० वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा बराच कमी झाला होता. हे असे का झाले असावे? त्यासाठी १९९० च्या दशकात बिल क्लिंटनच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली आणि नोकर्‍या अधिक प्रमाणावर उपलब्ध झाल्या म्हणून गुन्हेगारी कमी झाली वगैरे कारणे दिली गेली. पण ही कारणे ज्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली त्याचा खुलासा करू शकत नाहीत हे पण प्रा.लेव्हिटने दाखवून दिले. मग असे काय झाले ज्यामुळे गुन्हेगारी अचानक कमी झाली? त्याचे कारण १९७३ मध्ये अमेरिकेत गर्भपाताला मान्यता मिळाली. एका कुणा स्त्रीची केस (नाव विसरलो) सुप्रीम कोर्टात गेली होती आणि त्यावेळी कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली. पूर्वी नको असलेली मुले जन्माला येत होती, परिणामी त्यांच्याकडे दुर्ल़क्ष होऊन मग तेच पुढे गुन्हेगार बनायचे प्रमाण जास्त होते. पण गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यावर नको असलेली मुले जन्माला यायचेच बंद झाले. अशा निर्णयांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे झाले असे की जे १९९० च्या दशकात बालगुन्हेगार व्हायची शक्यता सर्वात जास्त होती अशी मुले १९७० च्या दशकाच्या शेवटी आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीला जन्मालाच आली नाहीत. त्यातूनच हे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. काही वेळा अमेरिकेतील काही शाळाशिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली दिसावी (आणि त्याचे श्रेय आपल्याला मिळावे) म्हणून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षा संपल्यावर ओ.एम.आर शीटमध्ये बरोबर उत्तरे स्वतः भरत असत. हे कसे पकडावे याविषयीही पुस्तकात काही लिहिले आहे हे वाचल्याचे आठवते. पुस्तकातील काही गोष्टी अमेरिकेतील परिस्थितीला अनुसरून आहेत. त्या वाचायला आपल्याला कंटाळवाणे होऊ शकते. उदाहरणार्थ ड्रग माफियांचे राज्य कसे चालते याविषयी सुधीर वेंकटेश म्हणून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने तिथे जाऊन काढलेल्या माहितीवर अनेक पाने खर्ची घातली आहेत. मला तरी तो भाग वाचायला कंटाळवाणा झाला होता. तसेच गोर्‍या लोकांच्या केकेके संघटनेवरही काही लिहिले आहे. तो भागही तितका अपीलींग वाटला नाही. तरीही एकूण हे पुस्तक चांगलेच वाटले. या पुस्तकानंतर प्रा.स्टीव्ह लेव्हिट यांनी सुपर फ्रिकॉनॉमिक्स, थिंक लाईक अ फ्रिक अशी पुस्तकेही लिहिली आहेत. ती अजून वाचलेली नाहीत. तसेच त्यांचा हा ब्लॉगही इंटरेस्टींग आहे. अशा विषयांमध्ये रस असलेल्यांना प्रा.लेव्हिट यांचे हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. 1

अद्द्या 20/03/2017 - 11:48
मस्तच धागा , फक्त एक सूचना . लेखक , अनुवाद इत्यादी माहिती देताना .. जर आपल्याकडे पीडीएफ उपलब्ध असेल तर स्वतःचा मेल आयडी हि द्या. म्हणजे लोक त्यावर मेल करून पीडीएफ घेऊ शकतील .

मोदक 20/03/2017 - 21:57
पुस्तकांची यादी करणे सुरू आहे.. इथल्याच मित्रांनी सुचवल्याप्रमाणे पुस्तकाचा प्रकार - आत्मचरित्र / कादंबरी.. पुस्तकाचा प्रकार - वैद्यकीय / साहित्यीक... भाषा पुस्तकाचे नांव लेखकाचे नांव अशी यादी करतो आहे. आणखी काय ट्रॅक करावे..?

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 09:56
याची गुगल शीट बनवून सगळ्यांबरोबर शेअर करता आली तर चांगले होईल. बर्‍याचदा इतर मिपाकर वाचत असतील आणि आपण काहीही वाचत नसू तर त्यातून आपल्यालाही वाचायची प्रेरणा मिळते. व्यायामाविषयी हाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. तसेच वाचनाविषयीही होईल.

In reply to by मोदक

इडली डोसा 21/03/2017 - 11:34
छापील प्रत उपलब्ध आहे / नाही , शिवाय किंडल आवृत्ती उपलब्ध आहे नाही हे पण लिहिता येईल का? गुगल शीट केल्यास मला सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 13:58
मला वाटते की या धाग्यावर किंवा गुडरीडावर किंवा अन्यत्र कुठे लिहिले असेल अशा पुस्तकांचा समावेश व्हावा आणि हळूहळू ती गुगल शीट (आणि हा धागा) अपडेट केला जावा. म्हणजे इतर मिपाकर नक्की काय वाचत आहेत हे समजून त्याविषयी आपल्याला वाचायला कल्पना मिळतील. अर्थातच हा एक आयत्या वेळी बनविलेला सल्ला झाला. अन्य कुठल्या पध्दतीने हे काम करता आले तर फारच चांगले. पण 'अरे मी इतरांच्या मानाने फार वाचत नाही' ही टोचणी लागणे आणि त्यातून जास्त वाचन होणे महत्वाचे. मग ती टोचणी कशीही लागो :)

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 16:30
धन्यवाद. त्या स्प्रेडशीटमध्ये प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट आहे. आतापर्यंतच या धाग्यावर १५-२० पुस्तकांविषयी चर्चा झालीच आहे. आणि मी अजून बरीच भर त्यात टाकणार आहे काळजी नसावी :) तेव्हा प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट असल्यास काही काळानंतर (म्हणजे त्या स्प्रेडशीटमध्ये ३०-४० पुस्तकांची नोंद झाल्यावर) ते अडचणीचे ठरू शकेल. मी फार टेक सॅव्ही नाही त्यामुळे मला यावर उपाय सुचवता येणार नाही. तसेच मी ती स्प्रेडशीट मेन्टेनही करत नसल्यामुळे नुसते सल्ले देणेही कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही :)

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:03
अनेकदा आपल्याला पुस्तके कुठून मिळवावीत हा प्रश्न पडतोच. पुस्तके घरी घेऊन घरातील सामान वाढवावे असे अनेकांना वाटत नाही. मी पण त्यातलाच. अशावेळी किंडल उपयोगी ठरते. किंडलवर वाचताना डोळ्याला त्रासही होत नाही. बरीच पुस्तके छापील प्रतीपेक्षा स्वस्तात असतात आणि किंडलवर पुस्तक असले तर घरी किती पुस्तके साठवायची हा प्रश्नही येत नाही. तसेच किंडलवर 'अनलिमिटेड' म्हणून एक प्रकार असतो. त्यात किंडलवरची लायब्ररी असते. त्यात सगळी नाही तरी बरीच पुस्तके उपलब्ध असतात. तसेच घरपोच किंवा हापिसच्या डेस्कवर पुस्तके पोचती करणार्‍या लायब्ररी सेवाही उपलब्ध आहेतच. पूर्वी हापिसात क्वेंच कॉर्पोरेट लायब्ररीचा मी सदस्य होतो. नाममात्र फीमध्ये आपल्या डेस्कवर पुस्तके पोहोचती करायची/न्यायची सोय होती त्यात. त्याचबरोबर पै फ्रेंड्स लायब्ररी, लायब्ररीवाला.कॉम अशा काही सेवाही उपलब्ध आहेत.

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:39
या धाग्याच्या निमित्ताने मागे वाचलेली अनेक पुस्तके आठवायला लागली आहेत. जशी आठवतील तशी आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यावर लिहिणारच आहे. अनुज धर यांचे India's biggest cover-up हे पुस्तक असेच मागे वाचले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांचे तैपईतल्या विमान अपघातात निधन झाले असे म्हटले जाते. पण त्याविषयी अनेक वादविवाद आहेत. हे पुस्तक त्याविषयीच आहे. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी १९५६ मध्ये आझाद हिंद सेनेचे शाहनवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली तर १९७० मध्ये न्या.खोसला यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी काम निष्पक्षपणे न करता सरकारला हवा होता तो अहवाल दिला असा अनुज धर यांचा दावा आहे. पुढे १९९९ मध्ये न्या.मुखर्जींच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने बोसांचा त्या अपघातात मृत्यू झाला नाही असे म्हटले. अमुक एक साधू किंवा बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या होत्या.त्यातल्या काही वावड्यांचाही या पुस्तकात उल्लेख आहे आणि संबंधित साधू हे सुभाषचंद्र बोस असू शकणार नाहीत हे अनुज धर यांनी म्हटले आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचे नक्की काय झाले? त्यांचे त्या विमान अपघातात निधन झाले का? त्याविषयी लेखक अनुज धर यांनी काही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर एक स्पष्ट दावा केला आहे. तो दावा कोणता याविषयी इथे काहीही लिहित नाही (अन्यथा 'स्पॉईलर' होईल). एकूणच हे पुस्तक वाचताना 'सुभाषचंद्रांचे पुढे काय झाले' ही उत्कंठा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लेखकाने हे पुस्तक खूपच परिश्रमाने आणि खूप अभ्यास करून लिहिले आहे हे जाणवते. हे पुस्तकही नक्कीच वाचनीय आहे म्हणून रेकमेन्डेड :) Anuj Dhar

मोदक 27/02/2017 - 13:42
मी सुरूवात करतो. आज एकच दिवस मेहता प्रकाशनमध्ये मराठी भाषा दिनानिमीत्त सर्व पुस्तकांवर ४०% सूट आहे. किमान ३४००/- रूपयांची खरेदी आवश्यक, म्हणजे एकूण डिस्काऊंट मिळून बिल २०००/- दरम्यान होते.

सागर 27/02/2017 - 15:14
मोदका छान धागा सुरु केलास सध्या मी भा. रा. भागवतांनी अनुवाद केलेले "शाब्बास शेरलॉक होम्स" ही ५ छोट्या पुस्तकांची मालिका वाचतो आहे. डायमंड प्रकाशनाने गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" या दोन खंडांची पुनर्र्छ्पाई केली आहे. इतिहासाची आवड असणार्‍यांनी अवश्य संग्रही ठेवावा असा हा ग्रंध आहे. असो मला जुनी काही पुस्तके हवी आहेत. कोणी मदत करु शकले तर खूप आनंद होईल. - वारसा नॉस्ट्राडेमसचा - मूळ लेखक : रेमंड लिओनार्ड - मराठी अनुवाद : अनिल काळे - द हॉट झोन - रिचर्ड प्रेस्टन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - शकुंतला - आनंद साधले (याची झेरॉक्स प्रत देखील चालेल )

In reply to by सागर

सागर 27/02/2017 - 15:19
गजानन मेहेंदळे यांचे "श्री. राजा शिवछत्रपति" २ खंड ऑनलाईन ऑर्डर करता येतील. मी घेतले आहेत. २०% सवलतीने खरेदी करण्यासाठीचा दुवा : http://www.diamondbookspune.com/viewdetails.php?bid=118&disc=20

वरुण मोहिते 27/02/2017 - 15:38
मला एक पुस्तक हवंय..डार्क गॉड्स नावाचं .टेड क्लेन म्हणून लेखक आहेत अमेझॉन वरून मागवलं तर २० दिवसांनी त्यांचा परत मेल आला कि उपलब्ध नाही म्हणून. असं म्हणतात हे पुस्तक नारायण धारपांचं इन्स्पिरेशन आहे.ते गेल्यावर त्यांच्या घरातली पुस्तक जेव्हा विकली तेव्हा रद्दीत हे पुस्तक हृषीकेश जोशी सध्या भयकथा वैग्रे लिहितात त्यांना मिळालं . अशी कथा ऐकल्यावर उगाच उत्सुकता लागलीये ते पुस्तक वाचायची .

In reply to by वरुण मोहिते

सागर 27/02/2017 - 16:33
वरुण हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे पण खुप महाग आहे. अ‍ॅमेझॉन च्या साईट वर सर्च मधे नाहि सापडले. पण गूगल सर्च मधून सापडले. लिन्कः http://www.amazon.in/gp/offer-listing/0330297147/ref=dp_olp_used_mbc?ie=UTF8&condition=used बहुदा वापरलेले (सेकंड सेल आहे) पुस्तकाच्या रेटिंग वरुन बरेच प्रसिद्ध पुस्तक आहे असे दिसते.

वरुण मोहिते 27/02/2017 - 17:30
सातवाहन कालीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास ..महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ मंडळासाठी विजयानगर पुणे ३०... अशी बऱ्यापैकी रेअर असलेली यादी पण आहे . रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का??

In reply to by वरुण मोहिते

मोदक 27/02/2017 - 17:46
रोज इकडे एखाद पुस्तक शेयर करावं का?? हो करा की. तसेच पुस्तकाची ओळख आणि तुम्हाला त्यात काय आवडले हे ही जरूर लिहा.

दीपक११७७ 27/02/2017 - 18:19
मला 'विषातील विज्ञान' हे पुस्तक हवं आहे मला या पुस्तकाचं फक्त नावच पुसटस आठवत, हे पुस्तक अनुवदित आहे, जर कुणाला याबद्दल काही माहीत असल्यास क्रुपया सांगावे. छान धागा मोदक मित्रा!

Nitin Palkar 27/02/2017 - 18:49
१९९० ते २०११ या काळातील Readers Digest चे सुमारे शंभर मासिक अंक (संमिश्र, सलग नव्हेत) माझ्याकडे आहेत. हौशी संग्रहाकास नाममात्र किमतीस विकणे आहेत. संपर्क: ७०४५६ ३६३४६

आदूबाळ 27/02/2017 - 18:51
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ऑनलाईन ईबुक्स https://msblc.maharashtra.gov.in/pdf/ (यापद्धतीने लिंक द्यायचं कारण म्हणजे 'छुपी' पुस्तकंही दिसतात.)

केडी 27/02/2017 - 19:40
हल्ली वाचनाला वेळ मिळत नाही म्हणून मग audible (ऍमेझॉन) वर पुस्तक श्रवण करतो, ऑफिस ला गाडीतून जाता येता. आधी थोडं वेगळं वाटत, पण सवय होते, आणि नंतर मज्जा येते. ह्यावर आवर्जून ऐकावे/वाचावे असे पुस्तक म्हणजे Man versus Wild च्या Bear Grylls चे पुस्तक Mud, Sweat and Tears. हे माझ्या १२ वर्षाच्या मुलाला देखील ऐकवले आणि त्याने मन लावून ऐकले। विलक्षण अनुभव आहेत ह्या माणसाचे. नक्की वाचून बघा।

गॅरी ट्रुमन 27/02/2017 - 21:41
India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जनेयुमधील प्राध्यापक व्ही.कृष्ण अनंत यांचे पुस्तक माझ्या अगदी 'ऑल टाईम फेव्हरेट' मध्ये आहे. हे पुस्तक भारतीय राजकारणात स्वातंत्र्यापासून जवळपास १९९० पर्यंतच्या घटनांचा आढावा घेते. तसेच या पुस्तकामध्ये घटना जशा घडल्या तशा दिल्या आहेत त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जनेयुमधील प्राध्यापक असले तरी जनेयु स्टाईलमध्ये हलकटपणा करायला स्कोप नाही. मिपावर राजकारणावरील चर्चांमध्ये माझ्या अनेक प्रतिसादांना या पुस्तकाचा आधार असतो. या पुस्तकात नेहरूंचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, आणीबाणी, जनता पक्ष, राजीव गांधींचा कालावधी इत्यादी काळात झालेले राजकीय चढउतार भरपूर सविस्तरपणे दिले आहेत. माझ्यासारख्या राजकारणात अतोनात रस असलेल्याला हे पुस्तक म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कितीही वेळा वाचले तरी मधूनमधून ते पुस्तक मी परत वाचत असतो. हे पुस्तक उत्तम आहेच फक्त पुस्तकात अनेकवेळा तारखांचा घोळ झाला आहे (म्हणजे फार घोळ नाही--२-४ दिवस इकडेतिकडे) ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पुंबा 01/03/2017 - 17:19
रोचक वाटत आहे. बिपन चम्द्रा आणि रामचंद्र गुहा या दोघांची स्वातंत्र्योत्तर भारतावरची पुस्तके संग्रही आहेत. आता हेदेखील वाचायला हवे.

सध्या आतिवास सविता ह्यांचे अफगाणिस्तानमधील अनुभवावर आधारित 'भय इथले' हे पुस्तक वाचत आहे. त्यानंतर जयंत नारळीकर ह्यांचे 'चार नगरातील माझे विश्व' वाचणार आहे.

प्रचेतस 28/02/2017 - 10:09
सध्या गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेले 'श्री राजा शिवछत्रपती' हे पुस्तक वाचत आहे. प्रचंड माहितीच्या ओघाने निव्वळ थक्क व्ह्यायला होतंय.

वरुण मोहिते 28/02/2017 - 10:27
वसंत वसंत लिमये यांचं . रहस्य कथा कथा वर्तमान काळाशी सुसंगत ह्या धर्तीवर . आधीचं लॉक ग्रिफिन पण तसेच होते. 'शोध 'पण असेच होते मुरलीधर खैरनार यांचे . अंग्रेजी मध्ये सध्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल ' वाचतोय शशी थरूर यांचे .

पुंबा 28/02/2017 - 10:28
नुकतेच 'पाडस', 'चीपर बाय द डझन' आणि 'सारे प्रवासी घडीचे' ही तीन पुस्तके वाचून संपवली. अत्यंत सुंदर पुस्तके आहेत तीनही. सध्या कथासंग्रह वाचायचा मूड आहे, दि बा मोकाशींचा 'दिवेलागण' आणि श्री दा पानवलकरांचा 'सूर्य' असे दोन कथासंग्रह वाचत आहे. मिपावर बॅटमॅन यांनी अफाट स्तुती केल्याने मराठी 'वांग्मयाचा गाळीव इतिहास' हे देखील आणले आहे, दुकानात चाळत असताना पहिली एक दोन पाने वाचूनच जो वेड्यासारखा हसत होतो. नॉन फिक्शनमध्ये मायकेल सँडेल यांचे 'जस्टिस: व्हॉट्स द राईट थिंग टू डू' आणि 'गावगाडा' ही दोन चालू आहेत पण तितका सलग वेळ देता येत नसल्याने एखादे प्रकरण वाचून थंड पडत आहेत. न सांगण्याजोगी गोष्ट आणले आहे, पण सुरू करण्यासाठीच मूड येत नाहीये. मुख्य ओढा कथासंग्रहांकडे असल्याने, मिपाकर, कृपया चांगले कथासंग्रह सुचवा. तसेच, 'जप्ती' ही कथा मी सातवीत असताना वाचली होती, ती खूप आवडली होती, दुर्दैवाने लेखिकेचे आणि कथासंग्रहाचे नाव लक्षात येत नाही. बहुदा, वसुंधरा पटवर्धन किंवा असेच काही तरी त्यांचे नाव होते. कुणाला ही कथा ठाऊक असल्यास अधिक माहिती द्यावी.

In reply to by पुंबा

मोदक 28/02/2017 - 11:14
सारे प्रवासी घडीचे जबरदस्त पुस्तक आहे. =)) ********************** अवांतर - मी पूर्वी कधीतरी या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते. ********************** सारे प्रवासी घडीचे ही कथा आहे एका कोकणातल्या एका प्रतिष्ठीत घरातील जमीनदाराच्या मुलाची. "आपू" ची. शिक्षणानंतर शहरात गेलेला आपू गावामध्ये एक दोन दिवसांसाठी येतो, वाड्याचे बंद दारही पाहण्याची सवय नसणारा आपू त्याच वाड्याच्या रिकाम्या उदास भकास खोल्यातून जुन्या आठवणी शोधत फिरतो, वाळवी व कसर लागलेले देव पाहून खिन्न होतो, एखाद्या पाहुण्यासारखे पूजा करणार्‍या भटजींच्या डब्यातले अन्न खातो या व अशा उदास वातावरणात आपूची आत्म-कथा सुरू होते. आपूला एकेक गोष्टी आठवतात.. या पुस्तकातील सर्व घटना माणसांभोवती विणलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला दळवींनी दिलेली विनोदाची झालर त्यांचे विनोदावरील प्रभुत्व दाखवून जाते.. निर्वीष, निर्वैयक्तीक आणि निव्वळ प्रसंग व संवादातून उभा केलेला विनोद!! आबा.. त्यांची ग्रामदैवत रवळनाथावरील निष्ठा. रवळनाथाचे त्यांना आलेले अनुभव. आबांचा कट्टर वैरी बाबुली. त्याच्याशी नेहमी सुरू असलेले कोर्टकचेरीतील दावे. आपूच्या शाळाप्रवेशाची नांदी. भविष्य पाहण्यासाठी आलेले भटजी व त्यांनी काढून दिलेला मुहूर्त. आपूचे व त्याच्या आजीचे विडी आणण्यावरून जमलेले द्वैत, आपू शाळेत गेला तर विड्यांचे काय ही आज्जीला लागलेली काळजी. शाळेत न जाण्याची आपूची तर त्याला शाळेत घालण्याची आबांची धडपड. "सरस्वती आयली तर लक्ष्मी जातली" हे आज्जीने सांगीतलेले तत्वज्ञान! आपूने शाळेतच बसावे - पळून जावू नये म्हणून केलेल्या दादुल्याची नेमणूक. शाळेतला "ढ" पण जिवलग मित्र नरू. "भो पंचम जॉर्ज"ची मनापासून प्रार्थना करणारे व शाळामास्तर हेच पोस्टमास्तर असलेले बागाईतकर मास्तर. "माका नाव W W कुळकर्णी असत" असे म्हणून V V कुळकर्णी नावाने आलेले पत्र नाकारणारे (पण कार्ड असेल तर वाचून परत देणारे) आपूचे शेजारी "वामन विष्णु कुळकर्णी" शाळेचे गॅदरींग, "घनतमी शुक्र राज्य करी" व "अहाहा चेंडू.." या गाण्यांच्या अयशस्वी प्रयोगानंतर सर्वानुमते ठरलेले "देवाजीने करूणा केली" हे गाणे. गॅदरींगमध्ये आपूच्या विळ्याने किरकोळ जखम झालेला परशा व त्यानंतर परशाचा विळा हातात घेवून बागाईतकरांचे धोतर (घामाने!) ओले होईपर्यंत भांडण केलेला परशाचा बा. बागाईतकरांच्या रिटायरमेंट नंतर शाळेत अवतरलेला पावटे मास्तर. हा मास्तर बाबुलीच्या गटातील असल्याने त्याने केलेले आपूचे हाल. पावटे मास्तरच्या हाताचा मार खाऊन खाऊन एक दिवस त्याच्या खुर्चीवर खाजकुयलीची कुसे टाकून व नंतर पावटे मास्तरच्या "दुर्गाबाय" नावाच्या एका विधवेशी असलेल्या प्रकरणावरून "दुर्गेदुर्गट भारी तुजविण संसारी.." हे आरती टाळ्या पिटून भर बाजारात पावटे मास्तरच्या मागी लागणारा नरू.. पावटे मास्तर जातपात पाळत असल्याने केशा चांभाराला शिक्षण कमीटीचा मेंबर म्हणून निवडून देणारे आबा व केशाने केलेले शाळेचे "इन्स्पेक्षन" एका चांभाराला निवडून देणारे गाव पुरोगामी असलेच पाहिजे म्हणून गावात अवतरलेले "खुळो डाक्टर" डॉ.रामदास. त्यांनी आयोजीत केलेले गावकर्‍यांनी सर्वभोजन. दारूचा गुत्ता चालवणारा पेस्तँव.. दारूडा बाबल्या मडवळ. पशू, पक्षी व वनस्पतींची जिवापाड काळजी घेणारा हाफमॅड तात्या. आपूला जेलमध्ये डांबले म्हणून गेम करून सस्पेंड केला गेलेला हवालदार मुंगी. दशावतारी जिवा, त्याने साकारलेला शंकासूर.. जिवाचा प्रतिस्पर्धी व रवळनाथाचा पुजारी बाबू गुरव. बाबूने केलेले एकमेव नाटक द्रौपदी वस्त्रहरण - ज्याचा शेवट "लंगोटीमध्ये उभी असलेली द्रौपदी विडी ओढणार्‍या भगवान कृष्णाच्या तोंडात भडकावते" असा होतो. गावातील रिकामटेकडे व सतत कोणाचीतरी माहिती काढत त्यावरून वेळ घालवणारे लोक.. त्यांनी वेगवेगळ्या सवईंवरून लोकांना बहाल केलेली झोंबणारी टोपणनावे.. नायनाय भाऊ, हाफमॅड तात्या, अमृतांजन प्रेमजी, दुलाजीचा मुलगा "यम" (रेड्यावर बसून शेतातून घरी येणारा म्हणून!) लंगडा तातू.. हे अगदी छोटेखानी पुस्तक हास्याचे कारंजे उडवते. या व अशा अनेक माणसांचे चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!

In reply to by मोदक

पुंबा 28/02/2017 - 13:47
मोदकभौ, फार भारी लिहिलेत आपण. सगळी उजळणी झाली मनातल्या मनात, परत हसतोय.
चित्रण इतके जिवंत झाले आहे की पुस्तकाच्या शेवटी "सर्व पात्रे व प्रसंग काल्पनीक" ही ओळ वाचून मला खूप वाईट वाटले होते!!
मी खरेच आहे असे मानतो.. :))

पुंबा 01/03/2017 - 17:17
मी ereader prestigio वापरतो. .mobi, तसेच epub दोन्हीही प्रकारची पुस्तके निश्चिंतपणे वाचता येतात. फाँट आणि मार्जिन कमी जास्त करता येते. google books व किंडल छानच आहेत पण मोबाईलमधील जास्त जागा खातात.

वरुण मोहिते 01/03/2017 - 18:03
मराठी _तुही यत्ता कंची?? तुही यत्ता लेखक -नामदेव ढसाळ अंग्रेजी -वॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्वेस्टींग लेखक _एम टी राजू

In reply to by अमर विश्वास

मोदक 01/03/2017 - 19:54
टाटायनमधली अजित केरकर आणि टाटा फायनान्स (पेंडसे ?) ही दोन प्रकरणे वाचून धक्का बसला होता. बाकी टाटांसंबंधी पुस्तके वाचायची असतील तर आर एम लाला यांच्या पुस्तकांना पर्याय नाही. (तसेच बिझनेस लिजंड आणि बिझनेस महाराजे मधली जेआरडी आणि रतन टाटांची व्यक्तीचित्रे.) __/\__

मारवा 01/03/2017 - 20:34
तुनळीवर एक झकास वल्ली आहे पुस्तकांवर जबरा बोलतो व सुचवतो. विशेषता आधुनिकोत्तर एकदा जरुर आजमवा त्याच्याच सुचवणीवरुन सध्याच वाचन सुरु आहे. युट्युबात. जावुन bookchemist टाइप करा व सर्च करा मजा आजायेगा गॅरंटी !

अमर विश्वास 01/03/2017 - 22:02
मोदकजी ... टाटांबद्दल जेव्हडे वाचु तेभाडे कमीच आहे गिरीश कुबेर यांचे यांचे सध्याचे (लोकसत्ता जॉईन केल्या नंतर) लिखाण वाचल्यानंतर त्यांचे पुस्तक वाचायला भीतीच वाटते .. पण टाटायन चांगले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजित केरकर आणि टाटा फायनान्स ही दोन प्रकरणे खरच खळबळजनक आहेत. खुद्द पेंडसेंनी लिहिलेले जे आर डी - मी पाहिलेले हे पुस्तक ही वाचनीय आहे. त्याचप्रमाणे जे आर डी चे "key notes address " एकत्र पुस्तक रूपाने उपलब्ध आहे (मराठी भाषांतर) जरूर वाचा

In reply to by अमर विश्वास

मोदक 02/03/2017 - 17:00
कुबेरांबद्दल सहमत. ;) मी पाहिलेले जेआरडी लिहिणारे द. रा. पेंडसे - हे टाटा ग्रुप मध्ये वरिष्ठ अर्थतज्ञ होते. (टाटा फायनान्स वाले पेंडसे वेगळे.) तसेच टाटा याच विषयावर आर एम लाला यांचे "क्रिएशन ऑफ वेल्थ" नावाचे एक पुस्तक आहे. टाटांची सुरूवातीपासूनची कथा आणि मारिओ मिरांडा यांची विषयानुरूप बहारदार रेखाचित्रे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुण्यात मंगळदास रोडवर "टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज" आहे. तेथे कधीतरी जरूर भेट द्या.

In reply to by मोदक

अमर विश्वास 02/03/2017 - 21:47
धन्यवाद मोदक ... खुप वर्षांपूर्वी मी पाहिलेले जेआरडी हे पुस्तक वाचले होते.. नावात घोळ झाला .... चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज ला भेट दिली आहे .. तसेच कामानिमित्त बॉम्बे हाऊस ला ही भेट देण्याची संधी सुद्धा मिळाली ... आत्तापर्यंत अनेक कॉर्पोरेट हाऊसेस ना भेट दिली .. पण बॉम्बे हाऊस चा अनुभव वेगळाच होता

गॅरी ट्रुमन 02/03/2017 - 11:02
माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे आत्मचरित्र Matters of Discretion: An Autobiography मध्यंतरी वाचले होते. माझ्या मते हे एक चांगले पुस्तक आहे पण त्यातील काही गॅप मात्र जाणवण्यासारख्या आहेत. १. गुजराल यांनी मॉस्कोमधील भारतीय वकिल म्हणून १९७६ ते १९८० ही चार वर्षे काम पाहिले. आज इंदरकुमार गुजराल हे नाव ऐकले की आपण परराष्ट्रधोरणाबरोबर ते नाव ताबडतोब निगडीत करतो. मला वाटते की गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील एकूणच दृष्टीकोन या काळात जास्त बदलला. गुजराल यांना हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा काळ वाटत असणे स्वाभाविक आहे आणि त्यांनी पुस्तकातली अनेक प्रकरणे त्यावर दिली आहेत. पण अर्ध्याहून जास्त भारतीयांचा जन्म त्यांची मॉस्कोतील कारकिर्द संपल्यानंतर झालेला आहे. या वाचकवर्गाला त्यांचे मॉस्कोमधील अनुभव काहीसे कंटाळवाणे आणि फार रस वाटावे असे असतील असे वाटत नाही. त्यातील काही अनुभव तर खूपच विस्ताराने लिहिले आहेत असे मला वाटले. उदाहरणार्थ राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींच्या मॉस्को भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या मेजवानीच्या वेळी ब्रेझनेव्ह उपस्थित राहिले नाहीत हा रेड्डींना अपमान वाटला आणि त्यामुळे कूटनैतिक संकट उभे राहिले असते आणि ते कसे टळले यावर काही पाने खर्ची पाडली आहेत. हे अनुभव सामान्य भारतीय वाचकांना फार भावतील असे नाही. तसेच सोव्हिएट रशियाच्या इतिहासात रस असलेल्या वाचकालाही हे फार भावेल इतक्या विस्तारानेही या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. म्हणजे हे काही अनुभव कोणत्याच वाचकाला भावतील असे वाटले नाहीत आणि ते नक्की कशाकरता पुस्तकात आहेत असेही वाटले. २. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात गुजराल माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी आणीबाणीच्या काही दिवस आधी संजय गांधींनी त्यांच्यावर इंदिरा समर्थकांच्या सभांना रेडिओ-टिव्हीवर प्रसिध्दी द्या असा आदेश दिला होता आणि तो त्यांना मान्य नव्हता यावर त्यांनी लिहिले आहेच. पण आणीबाणी या स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटनेविषयी त्यांनी पुस्तकात फार लिहिलेले नाही हे पण जरा खटकलेच. ३. गुजराल सुरवातीपासून काँग्रेसशी संलग्न होते. पण एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडायचा प्रयत्न केला याविषयी त्यांनी लिहिले आहे. पण त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली याविषयी गुजराल यांनी काहीच लिहिले नाही हे नक्कीच खटकले. मला स्वतःला १९८९ पूर्वीच्या घटना केवळ पुस्तके वाचून माहित आहेत त्यामुळे अशा महत्वाच्या घटनेविषयी काहीच न लिहिलेले मात्र खटकले. ४. गुजराल पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत कल्याणसिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस केली होती. ती राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाकडे परत पाठवली. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर हा नक्कीच डाग होता. याविषयी त्यांनी मायावतींनी कल्याणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर गुजराल यांचे राज्यपाल रोमेश भंडारी यांच्याशी काय बोलणे झाले एवढेच लिहिले आहे. आणि त्यानंतर "उत्तर प्रदेशातील पेचप्रसंग सुटल्यावरच मला व्यवस्थित झोप लागू शकली" असे लिहिले आहे. पण तो पेचप्रसंग नक्की कसा सुटला याचा उलगडा मात्र वाचकांना होत नाही. ५. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावरच्या त्यांच्या जीवनाविषयी फार त्यांनी लिहिलेले नाही. विशेषतः १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर गुजराल यांनी लोकसभेत वाजपेयी सरकार नक्की कोणत्या चुका करत आहे यावर भाष्य केले होते. गुजराल यांची इंग्रजी भाषेवरील पकड आणि वक्तृत्व मला नेहमीच भावत असे. त्यांचे लोकसभेतील हे भाषण मी मुद्दामून बघितले होते. तसेच गुजराल पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ही घटना दोन महिन्यातच झाली होती. तसेच भारताच्या परराष्ट्रधोरणाला नवे वळण लावणारी ही घटना होती. गुजराल यांचा परराष्ट्रधोरणातील रस लक्षात घेता या महत्वाच्या घटनेवर त्यांनी काहीतरी लिहायला हवे होते असे वाटून गेले. ६. जेव्हा एखादा नेता आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्या जीवनात घडलेल्या घटना एकामागोमाग एक लिहिणे एवढाच त्याचा उद्देश नसावा असे वाटते. तर त्या नेत्याच्या विषयात पुढे काय घडामोडी होऊ शकतील याविषयीचे स्वतःचे मत असायला हवे असेही वाटते. विशेषतः गुजराल हे परराष्ट्रधोरणातील जाणकार असल्यामुळे यानंतरच्या काळात भारताला परराष्ट्रधोरणात नक्की कोणती आव्हाने उभी राहतील आणि ती पेलण्यासाठी काय करायला हवे याविषयी थोडे तरी भाष्य हवे होते असेही वाटले. एकूणच माझ्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असलेल्या वाचकाला इंदरकुमार गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाकडून ज्या अपेक्षा होत्या या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. हे पुस्तक गुजराल यांनी वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर प्रकाशित झाले होते. कदाचित त्यावेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसावी. तसेच गुजराल यांचे निधन होण्यापूर्वी दोनेक वर्ष त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या वयात हा विरहाचा धक्का पचविणे तसे कठिणच असेल याची कल्पना करता येते. तसेच प्रकाशकांना आधीच कबूल केल्यामुळे प्रकृती साथ देत आहे तोपर्यंत पुस्तक पूर्ण करायचे हे पण दडपण असेल. या सगळ्या कारणांमुळे त्यांचे आत्मचरित्र हे एखाद्या अपूर्ण मूर्तीप्रमाणे वाटले. हे पुस्तक त्यांनी ८-१० वर्षे आधी लिहिले असते तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे झाले असते असेही वाटून गेले. अर्थातच हे पुस्तक वाईट आहे असे नक्कीच नाही. गुजराल, अडवाणी इत्यादी नेत्यांचे राजकीय जीवन म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासच. या आत्मचरित्राच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील पहिल्या ५० वर्षांचा लेखाजोखा थोडा तरी नक्कीच समजतो. तसेच वि.प्र.सिंग यांच्या मंत्रीमंडळातील लाथाळ्या, १९९० चे इराक-कुवेत प्रकरण इत्यादींचा चांगलाच आढावा त्यांनी घेतला आहे. पण असाच आढावा इतर महत्वाच्या घटनांचाही घेतला गेला असता तर बरे झाले असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटून गेले.

दा विन्ची 02/03/2017 - 16:48
माझ्याकडे मोबाईल वर वाचण्यासाठी ३०-४० इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत pdf फॉरमॅट मध्ये. साईझ साधारण १ ते २ Mb. सिडने शेल्डन, रॉबिन कुक, रॉबर्ट लुडलुम, मायकल क्रिश्टन, जॉन ग्रिशॅम आणि डॅन ब्राऊन ची. हवी असल्यास व्हाट्स अँप वर देऊ शकतो.

वरुण मोहिते 03/03/2017 - 14:12
मातोश्रीवर अर्धी रात्र लेखक -विजय तेंडुलकर ....काही अप्रकाशित कथा अंग्रेजी -गुड स्ट्रॅटेजी बॅड स्ट्रॅटेजी लेखक -रिचर्ड रुमेल्ट मॅनेजमेंट आवडणाऱ्या लोकांनी रुमेल्ट ह्यांचं पुस्तक वाचावं

हा एकच धागा असेल तर खरंच बरं होईल. मागे एकदा बोका भाऊंनी काही पुस्तकं मला एका धाग्यात सुचवली होती. तो धागा कोणता हेच मला आठवत नाही. कुणी कृपा करुन मिपावर आजवर पुस्तकांच्या याद्याविषयक आलेल्या धाग्यांच्या लिंक्स सुद्धा इथे देईल का? मी खुप दिवसात पुस्तकंच वाचलेले नाही. :( उद्याच लायब्ररीत जाईन. आणि इथे त्या पुस्तकाविषयी लिहेन. ह्या आधी वाचलेलं पुस्तक म्हणजे रिबेका. चांगलं आहे. शेवटाची ओढ लावतं पण शेवट नीटसा कळत नाही. भाषा मात्र अत्यंत प्रवाही आहे. कथा अप्रतिमपणे उभी केली आहे वाचकासमोर. गॉन विथ... वाचायला सुरूवात केली खरी. पण मला इतकी वर्णनं असलेली पुस्तकं वाचता येत नाहीत. त्यामुळे सोडुन दिलं.

In reply to by पिलीयन रायडर

पी. के. 04/03/2017 - 13:05
मिसळपाव वर असणारे पुस्तका विषयी हे काही जुने धागे वाचता वाचता वाढे..... मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र पुस्तक खरेदी - मदत दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके मला आवडलेले पुस्तक मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत) मला आवडलेली ५० पुस्तके ऑगस्ट महिन्यात "मला आवडलेली ५० पुस्तके" हा धागा वाचनात आला. प्रतिसाद वाचताना आपण पुस्तक वाचण्याच्या बाबतीत किती आळशी आहोत याची जाणीव झाली. वडिलांना आणी भावाला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे घरातील माळे, कपाटे, पलंगाचे कप्पे पुस्तकांनी तुडूंब भरलेले. मग काय झटकला आळस, काढली पुस्तकं कपाटातून बाहेर आणी केली सुरवात.. सद्य वि. ग. कानिटकरांचे विन्स्टन चर्चिल वाचतोय. मागच्या पाच महिन्यात वाचलेली पुस्तके. फकिरा:- अण्णाभाऊ साठे लोक माझे संगती:- शरद पवार राजा शिवछत्रपती :- बाबासाहेब पुरंदरे. डोंगरी ते दुबई हुसेन ज्वलज्वलनतेजास संभाजीराजे J R D मन मे है विश्वास राऊ स्वामी ययाती धागे अरब जगाचे पानिपत एक होता कार्व्हर अमृतवेल आजून ही खूप पुस्तकं आहेत घरात जी वाचायची बाकी आहेत. बघू कसं जमतंय ते शेवटी मिपाकरांचे आभार माझ्यात वाचायची आवड निर्माण केल्या बद्दल

In reply to by पिलीयन रायडर

एमी 22/03/2017 - 07:51
रिबेकाच्या शेवटमधे नक्की काय कळलं नाही? मी फार पुर्वी पुस्तक वाचलंय आणि चित्रपट पाहिलाय. जमल्यास शंका समाधान करायचा प्रयत्न करेन.

गॅरी ट्रुमन 06/03/2017 - 12:39
अर्थशास्त्रातील २००२ चे नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्सटन विद्यापीठातील एमेरीटस प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांचे Thinking, Fast and Slow हे नितांतसुंदर पुस्तक अलीकडेच वाचले. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन हे मुळातले अर्थशास्त्रज्ञ नाहीतच. ते आहेत मानसशास्त्रज्ञ. तरीही त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचे कारण सूक्ष्मअर्थशास्त्रातील ( मायक्रोइकॉनॉमिक्स) विविध मॉडेल ही माणसे 'रॅशनल' असतात या गृहितकावर आधारीत आहेत पण माणसे प्रत्यक्षात 'रॅशनल' नसतात हे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील दुसरे मानसशास्त्रज्ञ कै. Amos Tversky यांनी १९७० च्या दशकात अनेक प्रयोग करून सिध्द केले. Thinking, Fast and Slow हे पुस्तक त्या दोघांनी (आणि इतरानी) केलेल्या विविध प्रयोगांवर आधारीत आहे. प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते आपण विचार करतो तो विचार दोन पातळ्यांवर होतो-- सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२. सिस्टिम-१ म्हणजे intuitive विचार करणारी व्यवस्था (फास्ट थिंकिंग) तर सिस्टिम-२ म्हणजे अधिक खोलात जाऊन अधिक वेळ घेऊन विचार करणारी व्यवस्था (स्लो थिंकिंग). प्राध्यापक कॅनेमन यांच्या मते सिस्टिम-२ ही 'आळशी' व्यवस्था असते. म्हणजे शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे सिस्टिम-२ चा कल असतो. या दोन सिस्टिमचे कार्य कसे चालते आणि आपण नक्की कसा विचार करतो याविषयी पुस्तकात कित्येक उदाहरणे दिली आहेत. खरे तर या पुस्तकावरील प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. पण आतापुरते एक उदाहरण देतो: प्राध्यापक कॅनेमन यांनी एक 'लिंडा प्रॉब्लेम' म्हणून उदाहरण दिले आहे. त्यांनी लिंडा या एका काल्पनिक ३१ वर्षीय स्त्रीचे वर्णन दिले आहे. ती single, outspoken आणि तल्लख आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूध्द आणि सामाजिक न्यायाच्या बाजूची तिची स्पष्ट भूमिका आहे आणि तिने अण्वस्त्रांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतला आहे अशा स्वरूपाचे तिचे वर्णन आहे. हे वर्णन देऊन झाल्यानंतर प्राध्यापक कॅनेमन यांनी या प्रयोगातील लोकांना लिंडा नक्की कोणत्या पेशामध्ये असू शकेल याचे ८ पर्याय दिले. लोकांना ती ज्या पेशात असेल याची सर्वात जास्त शक्यता वाटेल त्या पेशाला क्रमांक १, त्यानंतर शक्यता असलेल्या पेशाला क्रमांक २ अशा पध्दतीने ८ पेशांची क्रमवारी लावणे अपेक्षित होते. त्या ८ पेशांच्या यादीत तिसरा पेशा होता-- "स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर", सहावा पेशा होता "बँकेत टेलर" आणि आठवा पेशा होता "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर". त्या प्रयोगात भाग घेणार्‍यांपैकी बहुसंख्य लोकांनी लिंडा "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" ला नुसत्या "बँकेत टेलर" पेक्षा वरचा क्रमांक दिला. वास्तविकपणे बँकेत टेलर असलेल्या समजा १०० स्त्रिया असतील तर स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या बँकेतील टेलर नक्कीच १०० पेक्षा कमी असतील. म्हणजे 'रॅशनल' माणूस "बँकेत टेलर" या पेशाला "बँकेत टेलर आणि स्त्रीवादी चळवळीत आघाडीवर" पेक्षा वरचा क्रमांक देईल. पण तसे झाले नाही. आपण नक्की कसा विचार करतो याविषयी अशा कित्येक (किंबहुना काही शे) उदाहरणांचा खजिना आहे या पुस्तकात. या पुस्तकाने मला पूर्णपणे अंतर्बाह्य हलवून टाकले हे लिहिणे म्हणजे या पुस्तकाचा माझ्यावर जो परिणाम झाला आहे त्याचे अगदी मिळमिळीत वर्णन झाले. सूक्ष्मअर्थशास्त्रात मानसशास्त्राचाही अंतर्भाव असावा असे पूर्वीही अनेक रिसर्चर म्हणत असत.पण प्राध्यापक कॅनेमन आणि Amos Tversky यांच्या कामामुळे या प्रयत्नांना एक महत्वाची दिशा मिळाली. त्यातूनच 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हे सूक्ष्मअर्थशास्त्रातील एक महत्वाचे क्षेत्र विकसित झाले. याचा जाहिराती, सेल्स तसेच ह्युमन रिसोर्सेस इत्यादी अनेक मॅनेजमेन्टच्या क्षेत्रांवर अमूलाग्र परिणाम होऊ शकेल. प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांना २००२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याबद्दलचे सायटेशन होते: "for having integrated insights from psychological research into economic science, especially concerning human judgment and decision-making under uncertainty".प्राध्यापक Amos Tversky यांचे १९९६ मध्ये निधन झाले. अन्यथा त्यांनाही प्राध्यापक कॅनेमन यांच्या बरोबरच नोबेल पारितोषिक मिळाले असते. युट्यूबवर प्राध्यापक कॅनेमन यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील एक व्हिडिओ या पुस्तकाविषयी गुगल टॉक्समध्ये आहे. तो पुढीलप्रमाणे:
असले जबरदस्त काम करणारे लोक बघितले की खरोखरच भारावून जायला होते. जरी अर्थशास्त्रात फार इंटरेस्ट नसेल तरी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी म्हणेन. आपण ज्या पध्दतीने विचार करतो त्यात कित्येक त्रुटी नकळतपणे कशा असू शकतात (ज्याविषयी आपल्याला काहीही माहित नसते) हे समजले की खरोखरच थक्क व्हायला होते. पुस्तकात Bayes' theorem , Binomial distribution याविषयीचे काही प्रोबॅबिलिटीतले उल्लेख आहेत. तो भाग माहित नसेल तर तेवढी २-३ प्रकरणे समजली नाहीत तरी इतर प्रकरणांमध्ये खरोखरच खजिना भरलेला आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन 14/03/2017 - 11:07
प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन यांनी म्हटल्याप्रमाणे विचार करायच्या सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ चे एक उदाहरण याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिले आहे. या पुस्तकावर आणखी काही लिहून विनाकारण टी.आर.पी वाढवायचा नाही पण हा विषय मला प्रचंड आवडला आहे. तसेच यावर नवा लेख लिहावा इतपत मसालाही नाही. त्यामुळे इथेच घुसखोरी करत आहे. समजा एका शहरात दोन मॅटर्निटी होम्स आहेत. एकात दररोज सरासरी १५ बालकांचा जन्म होतो तर दुसर्‍यात दररोज सरासरी ४५ बालकांचा जन्म होतो. त्यापैकी कोणत्या मॅटर्निटी होममध्ये एखाद्या दिवशी जन्मलेल्या बालकांपैकी ६०% मुली असायची शक्यता जास्त आहे? या प्रश्नाचे मी 'सिस्टिम-१' चा वापर करून दोन्ही मॅटर्निटी होममध्ये ही शक्यता सारखीच आहे हे उत्तर दिले. प्रत्यक्षात ही शक्यता लहान मॅटर्निटी होममध्ये (दररोज १५ जन्म होणार्‍या) जास्त आहे. हा प्रश्न बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशनचा वापर करून सोडवता येईल. हे उत्तर लहान मॅटर्निटी होमसाठी सुमारे १५.३% तर मोठ्या मॅटर्निटी होमसाठी सुमारे ४.९% इतके येते. मी स्वतः बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांना गेली जवळपास ६ वर्षे शिकवत आलेलो आहे. हे उत्तर काढून ती शक्यता लहान मॅटर्निटी होमसाठी नक्कीच जास्त आहे हे मला समजले नसते असे नक्कीच नाही. पण अशा प्रकारची आकडेमोड करणे हे सिस्टिम-२ चे काम आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे सिस्टिम-२ आळशी असते. शक्यतो कार्यान्वित न होण्याकडे त्या सिस्टिमचा कल असतो.त्यामुळे आपली सिस्टिम-१ एकदम intuitive उत्तर असते ते देते. एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक नाणे १० वेळा उडवले तर त्यात ६ छापे यायची (६०%) शक्यता बर्‍यापैकी असेल हे आपल्याला कळतेच. पण समजा तेच नाणे १ लाख वेळा उडवले तर त्यात ६० हजार छापे यायची (परत ६०%) शक्यता तितकी नसेल. कारण जसा सॅम्पल साईझ वाढतो त्याप्रमाणे 'अ‍ॅव्हरेज आऊट' होते आणि टोकाचे रिडिंग यायची शक्यता कमी होते. मी हा भाग स्वतः शिकवत असूनही आणि मी मुळातले पुस्तक वाचूनही (त्यात सॅम्पल साईझचा परिणाम काय होतो हे व्यवस्थित समजावून दिले आहे) माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले. हाच अनुभव मिपाकरांपर्यंत पोहोचवावा म्हणून इथेच घुसखोरी करत आहे. त्याबद्दल दिलगिरी. पण हे पुस्तक वाचलेत तर असे चकित व्हायचे अनुभव कित्येकवेळा येतील हे मात्र अगदी स्वानुभवावरून सांगतो.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकंदरीत लहान सॅम्पलमध्ये टोकाचे (एक्स्ट्रीम) रिडिंग यायची शक्यता वाढते.... ...माझ्या 'सिस्टिम-१' ने पटकन दोन्ही ठिकाणी ती शक्यता सारखीच असेल हे उत्तर दिले. सिस्टिम-१ आणि सिस्टिम-२ मध्ये हा फरक आहे. हे लक्षात येताच खरोखरच थक्क व्हायला झाले.
माफ करा, जरा स्पष्टच विचारतो - ह्यात थक्क होण्यासारखे नक्की काय आहे? तुम्ही जरा विचार केला असतात, वेळ घेतला असतात आणि तुमच्याकडे असणाऱ्या सांख्यिकी ज्ञानाचा वापर केला असतात तर बरोबर उत्तर तुम्हाला सापडले असते. पण घाई केलीत आणि घोळ झाला. आता हे सांगायला मानस/अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? बाकी तुमच्या शिफारशीवरून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रच्याकने, सध्या 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स'ला आलेले 'अच्छे दिन' म्हणजे उत्क्रांतीवाद्यांनी डार्विनचे सिद्धांत चुकीचे आहेत हे मान्य करण्यासारखे आहे असे वाटते. सगळ्या अर्थशास्त्राचा डोलारा हा माणूस 'रॅशनल' (ह्याला मराठीत अचूक पर्यायी शब्द नाही) असण्यावर अवलंबून आहे. पण जवळपास सगळेच निर्णय घ्यायच्या वेळेस मनुष्य इररॅशनल वागतो हे अर्थशास्त्रद्यांना फार आधीच कळलेलं आहे. असो.

मोदक 14/03/2017 - 20:44
एका पुनर्जन्माची कथा हे पुस्तक वाचले.. Rheumatoid Arthritis नामक दुर्धर विकार झालेल्या मनोविकारतज्ञ डॉक्टरने, ओशो तत्त्वज्ञानाने या रोगाशी कसा सामना केला याचा विस्तृत अनुभव आहे.

In reply to by मोदक

पुंबा 15/03/2017 - 20:19
यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर)
याबद्दल कुतुहल वाटते आहे. वाचून झाल्यावर सांगा कसे वाटते ते. मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचेन.

In reply to by पुंबा

मोदक 15/03/2017 - 21:41
मला किर्लोस्कर घराण्याबद्दल विलक्षण लोभ वाटतो - __/\__ किर्लोस्करांविषयी वाचायचे असेल तर पुढील पुस्तके जरूर वाचा. Cactus and Roses - शंतनुरावांचे आत्मचरित्र या पुस्तकाची शंतनुरावांच्या जन्मशताब्दीनिमीत्त निघालेली २००३ सालची प्रत सध्या उपलब्ध आहे किंवा येथे पीडीएफ डाऊनलोड करता येईल. कालापुढती चार पाऊले - सविता भावे (१९७९) यांत्रिकाची यात्रा (लक्ष्मणराव किर्लोस्कर) - शं वा किर्लोस्कर (१९८७ चे पुनर्मुद्रण) एका नांगराची कहाणी - डॉ. भा. र. साबडे (१९८९) शंतनुराव - डॉ. भा. र. साबडे वरील यादीतील "कालापुढती चार पाऊले" सध्या सहज मिळेल, अन्य कोणतीही पुस्तके मिळाली तर नक्की सांगा, तसेच या यादीपेक्षा अन्य कोणती पुस्तके माहिती असतील तर प्रतिसादात कळवा. शंतनुराव किंवा एकंदर किर्लोस्करांविषयी आणखी कांही वाचायचे असेल तर कल्याणी आणि ओगले ग्लास वर्क्स यांची पुस्तके वाचा, त्यांच्या सुरूवातीच्या काळात शंतनुरावांचे अनन्यसाधारण योगदान आहे.

In reply to by पुंबा

मोदक 16/03/2017 - 17:28
मी वरती नोंदवायचे विसरलो.. पण "यांत्रीकाची यात्रा" हे पुस्तक मला जुन्या पुस्तकाच्या दुकानात मिळाले. तुम्हाला नवीन पुस्तक मिळण्याची कितपत शक्यता आहे याची कल्पना नाही..

वरुण मोहिते 14/03/2017 - 20:56
दोन म्हातारे वं इतर कथा .अनुवाद -उमा कुलकर्णी इंग्लिश _ बऱ्यापैकी न आवडलेलं सियालकोट सागा _अश्विन संघी

पुंबा 15/03/2017 - 13:52
जी एंचं काजळमाया किंडलवर विकत घेतलं. त्यातली प्रदक्षिणा ही पहिली कथा कॉलेजला असताना वाचली होती. इतकं विकल होऊन जायला झालं होतं की सगळ्या कथा वाचवल्याच गेल्या नव्हत्या, सरळ पुस्तक ग्रंथालयात परत देऊन आलेलो. आता पुन्हा वाचायला सुरूवात केलीये. विकलता, एकटेपणा, जीवनाचं भयाण, क्रौर रूप, नियतीचा निर्दय सारीपाट, जगण्यातली विलक्षण गुंतागुंत मांडायला जी एंसारखा विलक्षण प्रतिभावंतच हवा.

In reply to by पुंबा

सानझरी 16/03/2017 - 17:40
जी एंचं कुठलंतरी पुस्तक वाचायला घेतलेलं. त्यातली रुपकं इतकी किळसवाणी वाटलेली कि पुढे वाचवलंच नाही. जी एंच्या २-३ कथा 'औदुंबर' पुस्तकात वाचल्यात तेवढ्याच.. बाकी जी एंच्या पत्रांची मी जबरदस्त फ्यॅन. (चारही खंड आणि जी एंची पत्रवेळा)

मदनबाण 18/03/2017 - 00:58
सध्या वेळ मिळेल तसे हे वाचतोय... P1 अतीशय सुंदर आणि समाधान देणारं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 10:13
मागे रघुराम राजन यांचे Fault Line: How Hidden Fractures Still Threaten the World Economy हे अप्रतिम पुस्तक वाचले होते. भूकंपशास्त्रात फॉल्टलाईन म्हणून एक संकल्पना आहे. जमिनीच्या खाली दोन भूगर्भाच्या प्लेट एकमेकांशेजारी असतात तिथे या फॉल्टलाईन्स असतात. या फॉल्टलाईन्सच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर दबाव तयार होतो आणि तो दबाव प्रमाणाबाहेर वाढला की त्यातूनच पुढे भूकंप होतात. राजनसाहेबांनी जागतिक अर्थकारणात अशा कोणत्या 'फॉल्टलाईन्स' आहेत हे या पुस्तकात खूपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे. या पुस्तकात राजनसाहेबांनी २००७-०८ चे अमेरिकेतील आर्थिक संकट, १९९७ चे पूर्व आशियाई संकट इत्यादींचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तसेच कोणत्याही जार्गनचा वापर न करता विषय अगदी साधीसाधी उदाहरणे वापरून समजावून दिला आहे. विशेषतः २००७-०८ च्या संकटाची मूळे बरीच मागे जातात आणि त्या संकटात सरकारनेही नकळतपणे कसा हातभार लावला होता हे त्यांनी समजावून सांगितले आहे. तसेच २००५ च्या जॅकसन होल कॉन्फरन्समध्ये इतर सगळे फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांचे गोडवे गात असताना नेमक्या रघुराम राजन यांनी Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर सादर करून एका अर्थी सगळ्यांचाच रसभंग केला हे पण त्यांनी लिहिले आहे. हा विषय इतक्या सोप्या शब्दात समजावून देणारे दुसरे पुस्तक वाचायला मिळणे कठिण आहे. Rajan

Ranapratap 18/03/2017 - 19:55
अच्युत गोडबोले यांचे बोर्डरूम व अर्थात वाचून झाले. इतर हि पुस्तके वाचनीय आहेत, जसे मुसाफिर भाग 1 व 2, गुलाम, मनात. सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.

In reply to by Ranapratap

गॅरी ट्रुमन 18/03/2017 - 20:20
सद्या नॉर्मन लेवीस यांचे word power made easy वाचतोय, अभ्यासतोय इंग्रजी सुधारण्यासाठी उत्तम पुस्तक.
हे पुस्तक चांगले आहे. विविध शब्द चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहेत. पण हे पुस्तक खूपच प्राथमिक पातळीवरील आहे. इंग्रजी शब्दांसाठी आणखी दोन अक्षरशः खतरनाक पुस्तके सुचवतो. या पुस्तकात समानार्थी किंवा विरूध्दार्थी शब्द अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला पर्याय आहेत. अनेक प्रश्नांमधील मुळातला शब्द आणि पर्यायात दिलेला एकही शब्द माहित नव्हता. मला भाषांमध्ये वगैरे फार गती नाही पण तरीही इंग्रजी शब्द करायला खूपच आवडते. नवे शब्द कळले की त्यातून वेगळा आनंदही मिळतो. त्यामुळे मला ही दोन पुस्तके प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली. ही पुस्तके ६०-७० वर्षे जुनी असल्यामुळे प्रताधिकार वगैरे भानगडींमधून मुक्त झाली आहेत आणि खूप स्वस्तही आहेत (१०० रूपयाच्या आतबाहेर) १. All about words २. How to build a better vocabulary १ २

In reply to by पुंबा

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 11:01
या दोन पुस्तकांमधले शब्द करताना जाडीजुडी डिक्शनरी बरोबर घेऊन बसावे लागेल. पॉकेट डिक्शनरीचाही फार उपयोग होईल असे वाटत नाही :) हे शब्द केले की तेवढ्यापुरता आनंद मिळतोच. पण अर्थातच हे शब्द आपण दैनंदिन व्यवहारात वापरत नसल्यामुळे बर्‍याचशा शब्दांचा विसर पडतो. तरीही हे शब्द कुठेतरी बघितले/वाचले तर संदर्भातून त्याचा अर्थ समजतोही. पण तरीही स्वतःहून त्या शब्दांचा वापर तितक्या सफाईने करता आलेला नाही :(

सध्या तुनळीवर कधीपासुन वाचायच्या यादीत असणाऱ्या पुस्तकांची श्रवणरुपे (ऑडिओबुक्स) साडपली आहेत पण मूळ पुस्तक न वाचता सरळ 'ऐकण्याविषयी' मी साशंक आहे. एखादे आवर्जून वाचायचे पुस्तक तुम्ही सरळ 'ऐकले' आहे का? कसा होता तो अनुभव? विशेषतः ललित (फिक्शन. हाच पर्यायी शब्द आहे माहित नाही की नाही ते नक्की ठाऊक नाही)?

In reply to by मोदक

काफ्का (अजून कोण) - मेटामॉर्फोसिस
अतिशय गूढ वगैरे कथा असल्याने ऐकून कशी मजा येईल हे कळत नाहीये रच्याकने, मी आधी वाचून काढलेल्या कादंबऱ्यांची श्रवणपुस्तके ऐकण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळालेला आहे...

गणामास्तर 20/03/2017 - 10:19
शाळेत असताना मराठीला एक धडा होता. त्यात जहाजावर काम करणारा आणि लग्नाच्या सुट्टीसाठी घरी आलेला अबोल, थोडा तुसडा कथानायक होता. एका समारंभात लोक जमलेले असताना रेडिओवर एका बुडणाऱ्या जहाजावरून मोर्स कोडवरचे संदेश येऊ लागतात आणि तो ते समजावून देत असतो असे काही तरी कथानक होते. कुणाला आठवतंय का त्या कथा वा लेखकाचे नाव ?

In reply to by गणामास्तर

पुंबा 20/03/2017 - 10:51
रेडिओची गोष्टः दि बा मोकाशी लामणदिवा ह्या कथासंग्रहात ही कथा आहे. सध्या तोच कथासंग्रह वाचत आहे.

In reply to by पुंबा

पुंबा 20/03/2017 - 10:56
अवांतरः मोकाशींचा रेडिओदुरूस्तीचा व्यवसाय होता स्वतःचा. ह्या गोष्टीत रेडिओ हे महत्वाचे पात्र म्हणून येते.

गॅरी ट्रुमन 20/03/2017 - 10:49
या धाग्याच्या निमित्ताने कधीकाळी वाचलेली पुस्तके आठवायला लागली आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमधील प्राध्यापक स्टीव्ह लेव्हिट यांचे Freakonomics: A Rogue Economist Explores the Hidden Side of Everything हे असेच एक पुस्तक. या पुस्तकात नुसत्या आकडेवारीचा अभ्यास करून अनेक गोष्टी कशा समजावून घेता येतात याविषयी लिहिले आहे. अनेकदा आपण असा विचारही केलेला नसतो. उदाहरणार्थ १९८० च्या दशकाच्या शेवटी आणि १९९० च्या दशकाच्या सुरवातीला अमेरिकेत 'टिनेज' गुन्हेगारांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यावेळी अजून १० वर्षात अमेरिकेतील कुठलेच शहर यापासून मुक्त नसेल आणि कधीही कुठेही अचानक १६-१८ वर्षाचा कोणी बंदूक दाखवून आपल्याला लुबाडेल अशा स्वरूपाचे चित्र सगळीकडे बघायला मिळेल वगैरे वगैरे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात झाले उलटेच.१९९५ पासून हा गुन्हेगारीचा दर लक्षणीय प्रमाणात कमी झाला. २००० पर्यंत तर हा दर १० वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा बराच कमी झाला होता. हे असे का झाले असावे? त्यासाठी १९९० च्या दशकात बिल क्लिंटनच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली आणि नोकर्‍या अधिक प्रमाणावर उपलब्ध झाल्या म्हणून गुन्हेगारी कमी झाली वगैरे कारणे दिली गेली. पण ही कारणे ज्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली त्याचा खुलासा करू शकत नाहीत हे पण प्रा.लेव्हिटने दाखवून दिले. मग असे काय झाले ज्यामुळे गुन्हेगारी अचानक कमी झाली? त्याचे कारण १९७३ मध्ये अमेरिकेत गर्भपाताला मान्यता मिळाली. एका कुणा स्त्रीची केस (नाव विसरलो) सुप्रीम कोर्टात गेली होती आणि त्यावेळी कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली. पूर्वी नको असलेली मुले जन्माला येत होती, परिणामी त्यांच्याकडे दुर्ल़क्ष होऊन मग तेच पुढे गुन्हेगार बनायचे प्रमाण जास्त होते. पण गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यावर नको असलेली मुले जन्माला यायचेच बंद झाले. अशा निर्णयांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे झाले असे की जे १९९० च्या दशकात बालगुन्हेगार व्हायची शक्यता सर्वात जास्त होती अशी मुले १९७० च्या दशकाच्या शेवटी आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीला जन्मालाच आली नाहीत. त्यातूनच हे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. काही वेळा अमेरिकेतील काही शाळाशिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली दिसावी (आणि त्याचे श्रेय आपल्याला मिळावे) म्हणून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षा संपल्यावर ओ.एम.आर शीटमध्ये बरोबर उत्तरे स्वतः भरत असत. हे कसे पकडावे याविषयीही पुस्तकात काही लिहिले आहे हे वाचल्याचे आठवते. पुस्तकातील काही गोष्टी अमेरिकेतील परिस्थितीला अनुसरून आहेत. त्या वाचायला आपल्याला कंटाळवाणे होऊ शकते. उदाहरणार्थ ड्रग माफियांचे राज्य कसे चालते याविषयी सुधीर वेंकटेश म्हणून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने तिथे जाऊन काढलेल्या माहितीवर अनेक पाने खर्ची घातली आहेत. मला तरी तो भाग वाचायला कंटाळवाणा झाला होता. तसेच गोर्‍या लोकांच्या केकेके संघटनेवरही काही लिहिले आहे. तो भागही तितका अपीलींग वाटला नाही. तरीही एकूण हे पुस्तक चांगलेच वाटले. या पुस्तकानंतर प्रा.स्टीव्ह लेव्हिट यांनी सुपर फ्रिकॉनॉमिक्स, थिंक लाईक अ फ्रिक अशी पुस्तकेही लिहिली आहेत. ती अजून वाचलेली नाहीत. तसेच त्यांचा हा ब्लॉगही इंटरेस्टींग आहे. अशा विषयांमध्ये रस असलेल्यांना प्रा.लेव्हिट यांचे हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. 1

अद्द्या 20/03/2017 - 11:48
मस्तच धागा , फक्त एक सूचना . लेखक , अनुवाद इत्यादी माहिती देताना .. जर आपल्याकडे पीडीएफ उपलब्ध असेल तर स्वतःचा मेल आयडी हि द्या. म्हणजे लोक त्यावर मेल करून पीडीएफ घेऊ शकतील .

मोदक 20/03/2017 - 21:57
पुस्तकांची यादी करणे सुरू आहे.. इथल्याच मित्रांनी सुचवल्याप्रमाणे पुस्तकाचा प्रकार - आत्मचरित्र / कादंबरी.. पुस्तकाचा प्रकार - वैद्यकीय / साहित्यीक... भाषा पुस्तकाचे नांव लेखकाचे नांव अशी यादी करतो आहे. आणखी काय ट्रॅक करावे..?

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 09:56
याची गुगल शीट बनवून सगळ्यांबरोबर शेअर करता आली तर चांगले होईल. बर्‍याचदा इतर मिपाकर वाचत असतील आणि आपण काहीही वाचत नसू तर त्यातून आपल्यालाही वाचायची प्रेरणा मिळते. व्यायामाविषयी हाच प्रकार अनुभवायला मिळत आहे. तसेच वाचनाविषयीही होईल.

In reply to by मोदक

इडली डोसा 21/03/2017 - 11:34
छापील प्रत उपलब्ध आहे / नाही , शिवाय किंडल आवृत्ती उपलब्ध आहे नाही हे पण लिहिता येईल का? गुगल शीट केल्यास मला सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 13:58
मला वाटते की या धाग्यावर किंवा गुडरीडावर किंवा अन्यत्र कुठे लिहिले असेल अशा पुस्तकांचा समावेश व्हावा आणि हळूहळू ती गुगल शीट (आणि हा धागा) अपडेट केला जावा. म्हणजे इतर मिपाकर नक्की काय वाचत आहेत हे समजून त्याविषयी आपल्याला वाचायला कल्पना मिळतील. अर्थातच हा एक आयत्या वेळी बनविलेला सल्ला झाला. अन्य कुठल्या पध्दतीने हे काम करता आले तर फारच चांगले. पण 'अरे मी इतरांच्या मानाने फार वाचत नाही' ही टोचणी लागणे आणि त्यातून जास्त वाचन होणे महत्वाचे. मग ती टोचणी कशीही लागो :)

In reply to by मोदक

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 16:30
धन्यवाद. त्या स्प्रेडशीटमध्ये प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट आहे. आतापर्यंतच या धाग्यावर १५-२० पुस्तकांविषयी चर्चा झालीच आहे. आणि मी अजून बरीच भर त्यात टाकणार आहे काळजी नसावी :) तेव्हा प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वर्कशीट असल्यास काही काळानंतर (म्हणजे त्या स्प्रेडशीटमध्ये ३०-४० पुस्तकांची नोंद झाल्यावर) ते अडचणीचे ठरू शकेल. मी फार टेक सॅव्ही नाही त्यामुळे मला यावर उपाय सुचवता येणार नाही. तसेच मी ती स्प्रेडशीट मेन्टेनही करत नसल्यामुळे नुसते सल्ले देणेही कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही :)

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:03
अनेकदा आपल्याला पुस्तके कुठून मिळवावीत हा प्रश्न पडतोच. पुस्तके घरी घेऊन घरातील सामान वाढवावे असे अनेकांना वाटत नाही. मी पण त्यातलाच. अशावेळी किंडल उपयोगी ठरते. किंडलवर वाचताना डोळ्याला त्रासही होत नाही. बरीच पुस्तके छापील प्रतीपेक्षा स्वस्तात असतात आणि किंडलवर पुस्तक असले तर घरी किती पुस्तके साठवायची हा प्रश्नही येत नाही. तसेच किंडलवर 'अनलिमिटेड' म्हणून एक प्रकार असतो. त्यात किंडलवरची लायब्ररी असते. त्यात सगळी नाही तरी बरीच पुस्तके उपलब्ध असतात. तसेच घरपोच किंवा हापिसच्या डेस्कवर पुस्तके पोचती करणार्‍या लायब्ररी सेवाही उपलब्ध आहेतच. पूर्वी हापिसात क्वेंच कॉर्पोरेट लायब्ररीचा मी सदस्य होतो. नाममात्र फीमध्ये आपल्या डेस्कवर पुस्तके पोहोचती करायची/न्यायची सोय होती त्यात. त्याचबरोबर पै फ्रेंड्स लायब्ररी, लायब्ररीवाला.कॉम अशा काही सेवाही उपलब्ध आहेत.

गॅरी ट्रुमन 21/03/2017 - 10:39
या धाग्याच्या निमित्ताने मागे वाचलेली अनेक पुस्तके आठवायला लागली आहेत. जशी आठवतील तशी आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यावर लिहिणारच आहे. अनुज धर यांचे India's biggest cover-up हे पुस्तक असेच मागे वाचले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांचे तैपईतल्या विमान अपघातात निधन झाले असे म्हटले जाते. पण त्याविषयी अनेक वादविवाद आहेत. हे पुस्तक त्याविषयीच आहे. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी १९५६ मध्ये आझाद हिंद सेनेचे शाहनवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली तर १९७० मध्ये न्या.खोसला यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी काम निष्पक्षपणे न करता सरकारला हवा होता तो अहवाल दिला असा अनुज धर यांचा दावा आहे. पुढे १९९९ मध्ये न्या.मुखर्जींच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने बोसांचा त्या अपघातात मृत्यू झाला नाही असे म्हटले. अमुक एक साधू किंवा बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या होत्या.त्यातल्या काही वावड्यांचाही या पुस्तकात उल्लेख आहे आणि संबंधित साधू हे सुभाषचंद्र बोस असू शकणार नाहीत हे अनुज धर यांनी म्हटले आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचे नक्की काय झाले? त्यांचे त्या विमान अपघातात निधन झाले का? त्याविषयी लेखक अनुज धर यांनी काही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर एक स्पष्ट दावा केला आहे. तो दावा कोणता याविषयी इथे काहीही लिहित नाही (अन्यथा 'स्पॉईलर' होईल). एकूणच हे पुस्तक वाचताना 'सुभाषचंद्रांचे पुढे काय झाले' ही उत्कंठा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लेखकाने हे पुस्तक खूपच परिश्रमाने आणि खूप अभ्यास करून लिहिले आहे हे जाणवते. हे पुस्तकही नक्कीच वाचनीय आहे म्हणून रेकमेन्डेड :) Anuj Dhar
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

उपयोजक ·

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

Nitin Palkar 22/02/2017 - 20:53
नक्की आवडेल! मराठी शिवाय कोणतीही भाषा (मुंबईत बोलली जाणारी सोडून) येत नसल्याची खंत आहेच. कार्यालयीन गरजेमुळे हिंदी, इंग्लीश थोडी तरी समजते, बोलता येते, गुजराथी सहकार्यांमुळे जराशी गुजराथी कळते; पण इतर भारतीय भाषा शिकायला (whats app वर देखील) नक्की आवडेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सूड 24/02/2017 - 18:22
व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे धागा आला तर थोडी मदत होईल शिकायला,
+१ किंवा फेसबूक पेज तयार करा.

मागे एकदा लोकंनी वेड्यासारखे स्वतःचे नंबर इथे दिले होते. तसं करु नका फक्त. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला की त्याची लिंक देता येते लोकांना. ती लिंक इथे द्या. ज्याला व्हायचंय जॉइन तो त्या लिंकचा वापर करुन येऊ शक्तो ग्रुपमध्ये. ग्रुप इन्फो मध्ये ही लिंक मिळेल.

उपयोजक 22/02/2017 - 21:19
मग ही लिंक गावभर फिरते! जे या बाबतीत सिरियस असतील ते ठिकच! पण इथे लिंक दिली की हस्ते परहस्ते कुठे,कोणा टाईमपास करणा्र्‍याकडे जाईल याचा नेम नाही. मग मूळ विषय सोडून सुरु गुडमॉर्निंग,गुडनाईट,हा मेसेज आठ ग्रुपमधे पाठवा आणि मिळवा फुकट डेटा!,एक दिवा माझ्या दारी एक. . . . काही विचारु नका! सदस्य कमी असले तरी चालतील पण अवांतर पोस्टींग करणारे नसावेत.

In reply to by उपयोजक

पण मग त्यांना काढुन टाका ना. तुम्ही घेतलेले सदस्यही हे करु शकतातच. असो हा तुमचा प्रश्न आहे. मी आपली जस्ट माहिती दिली.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

उपयोजक 23/02/2017 - 06:14
तमिळ ही मूळ द्रविड भाषा आहे.त्यामुळे तेलुगु,मल्याळम् यांमध्ये तमिळ शब्दांची संख्या भरपूर आहे.याचा तेलुगू शिकण्यासाठी उपयोग होईल.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

समर्पक 22/02/2017 - 23:42
तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

समर्पक 22/02/2017 - 23:42
तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

समर्पक 23/02/2017 - 00:01
देवनागरीत लिहून शिकायचे का तमिऴ लिहा वाचायलाही शिकायचे आधी? काही अक्षरे आपल्याला नव्याने प्रचलित करावी लागतील मग. उदाहरणार्थ, ल ळ पेक्षा वेगळा ऴ

In reply to by समर्पक

उपयोजक 23/02/2017 - 06:04
सुरुवात देवनागरीपासूनच करावी.तमिळ लिपी सर्वांनाच वाचता येईल असं नाही.नंतर हळूहळू अक्षर अोळख,छोटी छोटी वाक्ये असं करु.

उत्तम! इथेच सुरू करा. मी फार वर्षांपूर्वी काही खास तमिळ वर्णांना देवनागरी पर्याय म्हणून नुक्ता वापरणे सुरू केले होते, अजूनही तसेच करतो. ऴ, ऩ, ऱ असे zh -- ऴ

अनिंद्य 24/02/2017 - 12:45
तमिळनाडुशी प्रेमाचे ऋणानुबंध आहेत, काही तमिळ मित्रांशी घरोबा आहे पण भाषा मात्र शिकता आली नाही. इथेच शिकवणी सुरु करा, सामील व्हायला आवडेल. तेलगू येतं कोंचम कोंचम, पण लिपी नाही येत.

वरुण मोहिते 24/02/2017 - 18:46
पण बाकीच्या राज्यात मराठी येत नाही शिकूया.. धडपड करत असा कोणता ग्रुप आहे का ?मराठी साहित्य छान आहे ते वाचायला शिकूया किंवा मराठी बोलता आलं पाहिजे असं कोणी आहे का?

उपयोजक 24/02/2017 - 20:41
समुह सुरु झाला आहे. तमिळ जराही येत नाही असं समजूनच शिकवायला सुरुवात केली आहे. रच्याकने,तमिळ शिकतानाची काही उपयुक्त माहिती इथे नक्की सामायिक करेन!

बॅटमॅन 25/02/2017 - 02:10
तमिळ शिकण्यासाठीचे दोन महत्त्वाचे दुवे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने. https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tamil%20Bhasha%20Pravesh_marathi%20madhyam.pdf यूट्यूबवर तमिळ व्हर्च्युअल अ‍ॅकॅडमी नामक चॅनल असून त्यांनी ८१ व्हिडिओज़ बनवलेले आहेत. शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी आणि अगदी बाराखडीपासून सुरुवात आहे. https://www.youtube.com/playlist?list=PL41DA461A06758121 तेव्हा हे दोन रिसोर्सेस वापरा, आणि त्यापुढे मग तमिळ पिच्चर इ. पहा, तमिळ भाषकांशी तमिळमध्ये बोला की काम झालेच म्हणून समजा. साधारणपणे वर्ष दीड वर्ष लागेल बर्‍यापैकी फ्लुएंट व्हायला. व्यक्तिपरत्वे अर्थातच हा कालखंड कमीजास्त होईल.

In reply to by बॅटमॅन

उपयोजक 26/02/2017 - 09:24
हे पुस्तक शिवाय अजुनही या विषयावरची पुस्तके आहेत.फक्त ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांना एकदम एवढा अभ्यास कदाचित सोयीचा पडणार नाही.त्यामुळे सध्या हळुहळू प्रगती चालू आहे. आपण सामील झालात तर आणखी मार्गदर्शन मिळेल. बाकी तमिळ चित्रपटांच्या वेडाने तमिळ शिकणारे खुप जण आहेत. व्हिडिओ लिंकबद्दल खरंच धन्यवाद!

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 26/02/2017 - 23:55
ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांच्यासाठीच बॅटमॅनने दुवे दिधलेत हो! अगदी बाराखडीपासून शिकवतात.. आता बाराखडीच्याही आधीचं काही शिकायचं असेल तर व्हॉट्सप गृपशिवाय पर्याय नाही हे मात्र खरं हां!

In reply to by सूड

संदीप डांगे 27/02/2017 - 18:52
आम्हास शिकायास कोण्या गृपची गरज नै बॉ... युनिफॉर्म पहनो और जो क्लास अच्छा लगे उसमें बैठ जाओ! बॅट्याभाऊने दिलेल्या लिन्का उत्तम आहेत. दोन एपिसोड झाले... अ, आ, इ, मस्त शिकवतेत ते काका... बॅट्यास अल्लग धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 19:02
मागे मी विद्युत उपकरणांसंबंधीच्या WhatsApp ग्रुपबद्दल लिहिलं होतं त्यालाही भरपुर विरोध झाला. जे काही लिहायचं ते इथं लिहा,WhatsApp कशाला असा सूर निघाला.याच विषयावर दोन धागेही निघाले.खरंतर ते चांगले माहितीपुर्ण धागे होते.पण धागे सुरु झाल्यानंतर जेमतेम आठवडाभरंच त्या धाग्यांवर आदानप्रदान झालं.अजूनपर्यंत कोणी तिकडे त्यानंतर परत फिरकलंच नाही. अशा प्रकारे चांगले उपक्रम बंद पडू नयेत म्हणूनच WhatsApp ची मदत घ्यावी लागतेय. इतरही तांत्रिक कारणं आहेत.बाकी WhatsApp वाल्यांना मिपाचे शत्रु समजणारेही काहीजण आहेत.असु द्यात.

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 28/02/2017 - 21:09
कसंय दादा! तुम्ही जे लिहिलंय ना वर त्यात एक पैशाचे लॉजिक सापडले नाही मला. व्हॉट्सप असो की मिपा, सदस्य जर काहीच अ‍ॅक्टीविटी करणार नसतील तर चर्चा थंडावतेच. तुम्ही जे वर म्हणताय तेच व्हॉट्सप गृपलाही लागू होतं.. २५० मेम्बरापैकी महिनाभर एकही मेम्बर बोलला नाही तर झुक्या येऊन तमिळ शिकवनार नाही तुम्हाला... किंवा ग्रुप आपोआप पॉप-अप नाही होत... अ‍ॅक्टीविटी लागतेच. त्यामुळे तुम्ही मिपावर तुमच्या धाग्याला प्रतिसाद न मिळण्याचे कारण देत आहात ते तकलादू आहे. इथेच सुरु असलेला व्यायामाचा धागा बघा... अजून काही जास्त बोलायची गरज नाहीये, तेवढे उदाहरण पुरेसे आहे. व्हॉट्सपवाल्यांना शत्रु नाही समजत मी.. पण मिसळपावच्या आयत्या युझरबेसचा फुकाफुकी फायदा घेणे (किंवा झुक्याला होणे) नैतिकतेला धरुन नाही. बाकी काही म्हणणं नाही.. चालुद्या!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 22:05
मिपाच्या तांत्रिक मर्यादाही याला कारणीभुत आहेत.पण त्याबद्दल मिपाचे दोष काढणं योग्य होणार नाही.मोफत उपक्रम एवढा चालवणं सोपं नाही. आयता युझरबेस म्हणता पण हा उपक्रम आहे.व्यवसाय नाही.नाहीतर यापुढे कुणीच इथे सल्ला हवा आहे,मार्गदर्शन हवं आहे,मदत हवी आहे असा धागा बनवून इथे येणार नाही.नाहितर परत त्यात कौन्सिलर,डॉक्टरकडे जाण्याचे पैसे वाचवायला बघतायत असं तुम्हाला वाटायचं!

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 28/02/2017 - 23:16
कॄपया भलतीकडे नेऊ नका. मिसळपाववर येऊन सल्ला, मदत, मार्गदर्शन मागणारे वेगळा व्हॉट्सप गृप चालवत नाहीत. त्यांच्या समस्यांवर मिळणारे उपाय मिसळपाव ह्या संस्थळावर कायमस्वरुपी सर्वांसाठी खुले असतात. त्याच पद्धतीचे प्रश्न असणार्‍यांठी ते पुढे मागे कामात येते. खुला व सर्वकाळ उपलब्ध मंच असण्याचा तो एक फायदा आणि उद्देशही आहे. जो इथे प्रश्न मांडतो, तो एका अर्थाने संस्थळावर आपले योगदान देत असतो, त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथल्या जाणकारांचे प्रतिसाद येऊन मिसळपाव वाचणार्‍या असंख्य वाचकांच्या ज्ञानात भर पडते, जीव समृद्ध होण्यात, उपाय सापडण्यात मदत मिळते. व्हॉट्सप वर क्लोज गृप चालवून हे सर्व होत नाही. मोफत उपक्रम आहे म्हणून मिसळपावला गॄहित धरण्याची आवश्यकता नाही. तसेच मिपाच्या तांत्रिक समस्या अधोरेखित करुन मिपाला कमीपणा दाखवण्याचीही गरज नाही. व्हॉट्सप वर मेंब्रं मिळवायला शेवटी तुम्हाला इथेच धागा काढावा लागलाय हे लक्षात असू द्या. व्हॉट्सअपवरुन इथे लोक येत नाहीत. वेब अ‍ॅनॅलिटिक्स माहिती असेल तर ह्याचे महत्त्व किती ते कळेल. हे सर्व तुम्हाला सांगतोय म्हणजे मी मालक समजत नाही स्वतःला मिपाचा, एक सामान्य सदस्यच आहे, पण मिपावर प्रेम करतो, मिपाचा फुकाफुकी लॉन्चपॅड म्हणुन वापर करणे मला पटत नाही. तुमचं शेवटचं वाक्य पार वाईड बॉल आहे... धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 23:30
WhatsApp वरुन मिपावर लोक येत नाहीत हे कोणी सांगितलं?कितीतरी जणांना मिपाची माहिती मिपाकर असणा्र्‍या WhatsApp मेंबर्सकडून दिली जाते.मिपाचा सदस्य होण्याबद्दल सुचवलं जातं.त्यावेळी तो सुचवणारा मी का माझ्या ग्रुपवरुन मिपाची माहिती देऊ असा विचार करत नाही. ग्रुपची मेबरं मिळवायला जसं मला इथं यायला लागलं तसंच आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का?

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 01/03/2017 - 00:02
आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का? >> ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या लिखाणाची जाहिरात होय...त्यात मिसळपावचा काय संबंध? बाकी तुम्ही इरेला पेटलाच असाल, तर तुमचे योग्य आहे असे म्हणतो. तुमच्या व माझ्या दृष्टिकोनात मूलभूत फरक आहे. तेव्हा इथेच थांबतो. धन्यवाद! तुमच्या वॉट्सपगृपला माझ्याकडून शुभेच्छा. तमिळ शिकून तमिळभाषेत एखादे संस्थळ चालवण्याइतके बळ आई जगदंबा तुम्हाला देवो! तुमचे अनेकोनेक व्हॉट्सगृप भरभरुन चालो... शुभम् भवतु!!

In reply to by बॅटमॅन

कंजूस 27/02/2017 - 19:52
पहिले >>महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने.>> डाउनलोड केलेय. भारी आहे.

साधा मुलगा 26/02/2017 - 12:21
जे व्हात्साप्प ग्रौप मध्ये नाहीत अथवा येऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हा धागा जागृत ठेवा , तुमचे रोजचे updates इथेही टाका. उपक्रमास शुभेच्छा!

उपयोजक 27/02/2017 - 09:09
आज मराठी राजभाषा दिन,मराठी आणि तमिळचा संबंध कसा आहे? मराठी आणि तमिळ भाषेत काही शब्द हे उच्चार व अर्थाच्या संबंधाने बर्‍यापैकी समान आहे. अक्का - मोठी बहीण अंडा - हंडा अतै - आत्या अप्पप्प - अबब आत्ताडी - हात्तीच्या इंगितम् - इंगित इंदोलम् - हिंदोळा इट्टीकै - वीट इडर - इडा(पीडा) इरावुत्तन् - राऊत इरुत्तु - रुतणे इवरदल् -वर्दळ उश्शी - डोके ऊरुळी - वर्तुळ(उरळीकांचन?) ओडै - ओढा कंकाळम् - घंगाळ कस्सु - कसा,कंबर कंजम् - गंज(भांडे) कत्तरी - कात्री कप्परै - खापर करप्पु - काळा (करपणे) कवळम् - घास कवाडम् - दरवाजा काय - कच्चे फळ(कायरस) कालवाय - कालवा कावाडी - कावड किलुकिली - किलबिल कुंची - डोके कुडारी - कुर्‍हाड केळवन् - मैत्री(केळवण) कै- हात(कैवार) कोट्टकै - गोठा शाणम् - शेण सीळकै - शीळ शुंभन् - शुंभ सुयमपाकी - स्वयंपाकी सुरुळ - सुरळी करणे सुवडु - चव(स्वाद) तट्टी - दरवाजा(ताटी उघडा ज्ञानेश्वरा) तट्टु - ताट तुतुंबु - तुडुंब तलै - डोके दारै - धार(पाण्याची) नाणल - गवत(नाणेघाट) नविदन् - न्हावी(नाभिक) अजुनही बरेच साम्यदर्शक शब्द आहेत. आणखी काही शब्द सुचताहेत का?

कंजूस 27/02/2017 - 19:15
हिंदी-तमिळ (रॅपिडेक्स) उत्तम पुस्तक आहे. त्यातून तमिळ शिकल्यावर ओफिसमधल्या तमिळ अण्णांनी माझ्यासमोर आपसापात तमिळमध्ये ओफिस राजकारण बोलणे बंद केले. मुख्य म्हणजे तमिळ लोकांना इतरांना त्यांची भाषा समजू लागलेलं आवडत नाही. तसा प्रकार गुजराती, कन्नड,बंगालीचा नाही. तुम्ही शिकताय म्हटलात तर ते आवर्जून त्या भाषेत बोलतील॥ हे सत्य आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

Nitin Palkar 22/02/2017 - 20:53
नक्की आवडेल! मराठी शिवाय कोणतीही भाषा (मुंबईत बोलली जाणारी सोडून) येत नसल्याची खंत आहेच. कार्यालयीन गरजेमुळे हिंदी, इंग्लीश थोडी तरी समजते, बोलता येते, गुजराथी सहकार्यांमुळे जराशी गुजराथी कळते; पण इतर भारतीय भाषा शिकायला (whats app वर देखील) नक्की आवडेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सूड 24/02/2017 - 18:22
व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे धागा आला तर थोडी मदत होईल शिकायला,
+१ किंवा फेसबूक पेज तयार करा.

मागे एकदा लोकंनी वेड्यासारखे स्वतःचे नंबर इथे दिले होते. तसं करु नका फक्त. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला की त्याची लिंक देता येते लोकांना. ती लिंक इथे द्या. ज्याला व्हायचंय जॉइन तो त्या लिंकचा वापर करुन येऊ शक्तो ग्रुपमध्ये. ग्रुप इन्फो मध्ये ही लिंक मिळेल.

उपयोजक 22/02/2017 - 21:19
मग ही लिंक गावभर फिरते! जे या बाबतीत सिरियस असतील ते ठिकच! पण इथे लिंक दिली की हस्ते परहस्ते कुठे,कोणा टाईमपास करणा्र्‍याकडे जाईल याचा नेम नाही. मग मूळ विषय सोडून सुरु गुडमॉर्निंग,गुडनाईट,हा मेसेज आठ ग्रुपमधे पाठवा आणि मिळवा फुकट डेटा!,एक दिवा माझ्या दारी एक. . . . काही विचारु नका! सदस्य कमी असले तरी चालतील पण अवांतर पोस्टींग करणारे नसावेत.

In reply to by उपयोजक

पण मग त्यांना काढुन टाका ना. तुम्ही घेतलेले सदस्यही हे करु शकतातच. असो हा तुमचा प्रश्न आहे. मी आपली जस्ट माहिती दिली.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

उपयोजक 23/02/2017 - 06:14
तमिळ ही मूळ द्रविड भाषा आहे.त्यामुळे तेलुगु,मल्याळम् यांमध्ये तमिळ शब्दांची संख्या भरपूर आहे.याचा तेलुगू शिकण्यासाठी उपयोग होईल.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

समर्पक 22/02/2017 - 23:42
तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

समर्पक 22/02/2017 - 23:42
तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

समर्पक 23/02/2017 - 00:01
देवनागरीत लिहून शिकायचे का तमिऴ लिहा वाचायलाही शिकायचे आधी? काही अक्षरे आपल्याला नव्याने प्रचलित करावी लागतील मग. उदाहरणार्थ, ल ळ पेक्षा वेगळा ऴ

In reply to by समर्पक

उपयोजक 23/02/2017 - 06:04
सुरुवात देवनागरीपासूनच करावी.तमिळ लिपी सर्वांनाच वाचता येईल असं नाही.नंतर हळूहळू अक्षर अोळख,छोटी छोटी वाक्ये असं करु.

उत्तम! इथेच सुरू करा. मी फार वर्षांपूर्वी काही खास तमिळ वर्णांना देवनागरी पर्याय म्हणून नुक्ता वापरणे सुरू केले होते, अजूनही तसेच करतो. ऴ, ऩ, ऱ असे zh -- ऴ

अनिंद्य 24/02/2017 - 12:45
तमिळनाडुशी प्रेमाचे ऋणानुबंध आहेत, काही तमिळ मित्रांशी घरोबा आहे पण भाषा मात्र शिकता आली नाही. इथेच शिकवणी सुरु करा, सामील व्हायला आवडेल. तेलगू येतं कोंचम कोंचम, पण लिपी नाही येत.

वरुण मोहिते 24/02/2017 - 18:46
पण बाकीच्या राज्यात मराठी येत नाही शिकूया.. धडपड करत असा कोणता ग्रुप आहे का ?मराठी साहित्य छान आहे ते वाचायला शिकूया किंवा मराठी बोलता आलं पाहिजे असं कोणी आहे का?

उपयोजक 24/02/2017 - 20:41
समुह सुरु झाला आहे. तमिळ जराही येत नाही असं समजूनच शिकवायला सुरुवात केली आहे. रच्याकने,तमिळ शिकतानाची काही उपयुक्त माहिती इथे नक्की सामायिक करेन!

बॅटमॅन 25/02/2017 - 02:10
तमिळ शिकण्यासाठीचे दोन महत्त्वाचे दुवे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने. https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tamil%20Bhasha%20Pravesh_marathi%20madhyam.pdf यूट्यूबवर तमिळ व्हर्च्युअल अ‍ॅकॅडमी नामक चॅनल असून त्यांनी ८१ व्हिडिओज़ बनवलेले आहेत. शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी आणि अगदी बाराखडीपासून सुरुवात आहे. https://www.youtube.com/playlist?list=PL41DA461A06758121 तेव्हा हे दोन रिसोर्सेस वापरा, आणि त्यापुढे मग तमिळ पिच्चर इ. पहा, तमिळ भाषकांशी तमिळमध्ये बोला की काम झालेच म्हणून समजा. साधारणपणे वर्ष दीड वर्ष लागेल बर्‍यापैकी फ्लुएंट व्हायला. व्यक्तिपरत्वे अर्थातच हा कालखंड कमीजास्त होईल.

In reply to by बॅटमॅन

उपयोजक 26/02/2017 - 09:24
हे पुस्तक शिवाय अजुनही या विषयावरची पुस्तके आहेत.फक्त ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांना एकदम एवढा अभ्यास कदाचित सोयीचा पडणार नाही.त्यामुळे सध्या हळुहळू प्रगती चालू आहे. आपण सामील झालात तर आणखी मार्गदर्शन मिळेल. बाकी तमिळ चित्रपटांच्या वेडाने तमिळ शिकणारे खुप जण आहेत. व्हिडिओ लिंकबद्दल खरंच धन्यवाद!

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 26/02/2017 - 23:55
ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांच्यासाठीच बॅटमॅनने दुवे दिधलेत हो! अगदी बाराखडीपासून शिकवतात.. आता बाराखडीच्याही आधीचं काही शिकायचं असेल तर व्हॉट्सप गृपशिवाय पर्याय नाही हे मात्र खरं हां!

In reply to by सूड

संदीप डांगे 27/02/2017 - 18:52
आम्हास शिकायास कोण्या गृपची गरज नै बॉ... युनिफॉर्म पहनो और जो क्लास अच्छा लगे उसमें बैठ जाओ! बॅट्याभाऊने दिलेल्या लिन्का उत्तम आहेत. दोन एपिसोड झाले... अ, आ, इ, मस्त शिकवतेत ते काका... बॅट्यास अल्लग धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 19:02
मागे मी विद्युत उपकरणांसंबंधीच्या WhatsApp ग्रुपबद्दल लिहिलं होतं त्यालाही भरपुर विरोध झाला. जे काही लिहायचं ते इथं लिहा,WhatsApp कशाला असा सूर निघाला.याच विषयावर दोन धागेही निघाले.खरंतर ते चांगले माहितीपुर्ण धागे होते.पण धागे सुरु झाल्यानंतर जेमतेम आठवडाभरंच त्या धाग्यांवर आदानप्रदान झालं.अजूनपर्यंत कोणी तिकडे त्यानंतर परत फिरकलंच नाही. अशा प्रकारे चांगले उपक्रम बंद पडू नयेत म्हणूनच WhatsApp ची मदत घ्यावी लागतेय. इतरही तांत्रिक कारणं आहेत.बाकी WhatsApp वाल्यांना मिपाचे शत्रु समजणारेही काहीजण आहेत.असु द्यात.

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 28/02/2017 - 21:09
कसंय दादा! तुम्ही जे लिहिलंय ना वर त्यात एक पैशाचे लॉजिक सापडले नाही मला. व्हॉट्सप असो की मिपा, सदस्य जर काहीच अ‍ॅक्टीविटी करणार नसतील तर चर्चा थंडावतेच. तुम्ही जे वर म्हणताय तेच व्हॉट्सप गृपलाही लागू होतं.. २५० मेम्बरापैकी महिनाभर एकही मेम्बर बोलला नाही तर झुक्या येऊन तमिळ शिकवनार नाही तुम्हाला... किंवा ग्रुप आपोआप पॉप-अप नाही होत... अ‍ॅक्टीविटी लागतेच. त्यामुळे तुम्ही मिपावर तुमच्या धाग्याला प्रतिसाद न मिळण्याचे कारण देत आहात ते तकलादू आहे. इथेच सुरु असलेला व्यायामाचा धागा बघा... अजून काही जास्त बोलायची गरज नाहीये, तेवढे उदाहरण पुरेसे आहे. व्हॉट्सपवाल्यांना शत्रु नाही समजत मी.. पण मिसळपावच्या आयत्या युझरबेसचा फुकाफुकी फायदा घेणे (किंवा झुक्याला होणे) नैतिकतेला धरुन नाही. बाकी काही म्हणणं नाही.. चालुद्या!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 22:05
मिपाच्या तांत्रिक मर्यादाही याला कारणीभुत आहेत.पण त्याबद्दल मिपाचे दोष काढणं योग्य होणार नाही.मोफत उपक्रम एवढा चालवणं सोपं नाही. आयता युझरबेस म्हणता पण हा उपक्रम आहे.व्यवसाय नाही.नाहीतर यापुढे कुणीच इथे सल्ला हवा आहे,मार्गदर्शन हवं आहे,मदत हवी आहे असा धागा बनवून इथे येणार नाही.नाहितर परत त्यात कौन्सिलर,डॉक्टरकडे जाण्याचे पैसे वाचवायला बघतायत असं तुम्हाला वाटायचं!

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 28/02/2017 - 23:16
कॄपया भलतीकडे नेऊ नका. मिसळपाववर येऊन सल्ला, मदत, मार्गदर्शन मागणारे वेगळा व्हॉट्सप गृप चालवत नाहीत. त्यांच्या समस्यांवर मिळणारे उपाय मिसळपाव ह्या संस्थळावर कायमस्वरुपी सर्वांसाठी खुले असतात. त्याच पद्धतीचे प्रश्न असणार्‍यांठी ते पुढे मागे कामात येते. खुला व सर्वकाळ उपलब्ध मंच असण्याचा तो एक फायदा आणि उद्देशही आहे. जो इथे प्रश्न मांडतो, तो एका अर्थाने संस्थळावर आपले योगदान देत असतो, त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथल्या जाणकारांचे प्रतिसाद येऊन मिसळपाव वाचणार्‍या असंख्य वाचकांच्या ज्ञानात भर पडते, जीव समृद्ध होण्यात, उपाय सापडण्यात मदत मिळते. व्हॉट्सप वर क्लोज गृप चालवून हे सर्व होत नाही. मोफत उपक्रम आहे म्हणून मिसळपावला गॄहित धरण्याची आवश्यकता नाही. तसेच मिपाच्या तांत्रिक समस्या अधोरेखित करुन मिपाला कमीपणा दाखवण्याचीही गरज नाही. व्हॉट्सप वर मेंब्रं मिळवायला शेवटी तुम्हाला इथेच धागा काढावा लागलाय हे लक्षात असू द्या. व्हॉट्सअपवरुन इथे लोक येत नाहीत. वेब अ‍ॅनॅलिटिक्स माहिती असेल तर ह्याचे महत्त्व किती ते कळेल. हे सर्व तुम्हाला सांगतोय म्हणजे मी मालक समजत नाही स्वतःला मिपाचा, एक सामान्य सदस्यच आहे, पण मिपावर प्रेम करतो, मिपाचा फुकाफुकी लॉन्चपॅड म्हणुन वापर करणे मला पटत नाही. तुमचं शेवटचं वाक्य पार वाईड बॉल आहे... धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 23:30
WhatsApp वरुन मिपावर लोक येत नाहीत हे कोणी सांगितलं?कितीतरी जणांना मिपाची माहिती मिपाकर असणा्र्‍या WhatsApp मेंबर्सकडून दिली जाते.मिपाचा सदस्य होण्याबद्दल सुचवलं जातं.त्यावेळी तो सुचवणारा मी का माझ्या ग्रुपवरुन मिपाची माहिती देऊ असा विचार करत नाही. ग्रुपची मेबरं मिळवायला जसं मला इथं यायला लागलं तसंच आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का?

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 01/03/2017 - 00:02
आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का? >> ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या लिखाणाची जाहिरात होय...त्यात मिसळपावचा काय संबंध? बाकी तुम्ही इरेला पेटलाच असाल, तर तुमचे योग्य आहे असे म्हणतो. तुमच्या व माझ्या दृष्टिकोनात मूलभूत फरक आहे. तेव्हा इथेच थांबतो. धन्यवाद! तुमच्या वॉट्सपगृपला माझ्याकडून शुभेच्छा. तमिळ शिकून तमिळभाषेत एखादे संस्थळ चालवण्याइतके बळ आई जगदंबा तुम्हाला देवो! तुमचे अनेकोनेक व्हॉट्सगृप भरभरुन चालो... शुभम् भवतु!!

In reply to by बॅटमॅन

कंजूस 27/02/2017 - 19:52
पहिले >>महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने.>> डाउनलोड केलेय. भारी आहे.

साधा मुलगा 26/02/2017 - 12:21
जे व्हात्साप्प ग्रौप मध्ये नाहीत अथवा येऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हा धागा जागृत ठेवा , तुमचे रोजचे updates इथेही टाका. उपक्रमास शुभेच्छा!

उपयोजक 27/02/2017 - 09:09
आज मराठी राजभाषा दिन,मराठी आणि तमिळचा संबंध कसा आहे? मराठी आणि तमिळ भाषेत काही शब्द हे उच्चार व अर्थाच्या संबंधाने बर्‍यापैकी समान आहे. अक्का - मोठी बहीण अंडा - हंडा अतै - आत्या अप्पप्प - अबब आत्ताडी - हात्तीच्या इंगितम् - इंगित इंदोलम् - हिंदोळा इट्टीकै - वीट इडर - इडा(पीडा) इरावुत्तन् - राऊत इरुत्तु - रुतणे इवरदल् -वर्दळ उश्शी - डोके ऊरुळी - वर्तुळ(उरळीकांचन?) ओडै - ओढा कंकाळम् - घंगाळ कस्सु - कसा,कंबर कंजम् - गंज(भांडे) कत्तरी - कात्री कप्परै - खापर करप्पु - काळा (करपणे) कवळम् - घास कवाडम् - दरवाजा काय - कच्चे फळ(कायरस) कालवाय - कालवा कावाडी - कावड किलुकिली - किलबिल कुंची - डोके कुडारी - कुर्‍हाड केळवन् - मैत्री(केळवण) कै- हात(कैवार) कोट्टकै - गोठा शाणम् - शेण सीळकै - शीळ शुंभन् - शुंभ सुयमपाकी - स्वयंपाकी सुरुळ - सुरळी करणे सुवडु - चव(स्वाद) तट्टी - दरवाजा(ताटी उघडा ज्ञानेश्वरा) तट्टु - ताट तुतुंबु - तुडुंब तलै - डोके दारै - धार(पाण्याची) नाणल - गवत(नाणेघाट) नविदन् - न्हावी(नाभिक) अजुनही बरेच साम्यदर्शक शब्द आहेत. आणखी काही शब्द सुचताहेत का?

कंजूस 27/02/2017 - 19:15
हिंदी-तमिळ (रॅपिडेक्स) उत्तम पुस्तक आहे. त्यातून तमिळ शिकल्यावर ओफिसमधल्या तमिळ अण्णांनी माझ्यासमोर आपसापात तमिळमध्ये ओफिस राजकारण बोलणे बंद केले. मुख्य म्हणजे तमिळ लोकांना इतरांना त्यांची भाषा समजू लागलेलं आवडत नाही. तसा प्रकार गुजराती, कन्नड,बंगालीचा नाही. तुम्ही शिकताय म्हटलात तर ते आवर्जून त्या भाषेत बोलतील॥ हे सत्य आहे.
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

चांदणे संदीप ·

प्रचेतस 24/11/2016 - 23:19
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.

वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन. आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो. काय पण योगायोग ना.

मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल. असो, एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...

In reply to by इरसाल कार्टं

धन्यवाद ह. घेतल्याबद्दल. तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :) Sandy

प्रचेतस 24/11/2016 - 23:19
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.

वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन. आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो. काय पण योगायोग ना.

मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल. असो, एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...

In reply to by इरसाल कार्टं

धन्यवाद ह. घेतल्याबद्दल. तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :) Sandy
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

चित्रगुप्त ·

In reply to by भालचंद्र_पराडकर

भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद

कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती - "नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.." याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :) -दिलीप बिरुटे

In reply to by भालचंद्र_पराडकर

भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद

कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती - "नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.." याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :) -दिलीप बिरुटे
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

सल्ला हवा आहे

_मनश्री_ ·

पाटीलभाऊ 05/09/2016 - 14:40
MCM वाल्याना IT क्षेत्रात संधी आहे...पण केवळ पगार कमी आहे म्हणून क्षेत्र बदलणे पटत नाही. IT मध्ये पगार जास्त असला तरी मानसिक तणाव जास्त असतो. अजून एक, MCM होऊन ८-९ वर्ष झाली असली तरी IT मध्ये आल्यावर फ्रेशर म्हणूनच संधी मिळेल..जिथे सुरुवातीला पगार कमी असेल आणि स्ट्रगल फार करावं लागेल.

MCM ला करीअर संधी कमी आहेत हे खरेच. इतकं की आता course अनेक ठिकाणी बंद पडला आहे. त्यामुळे पुर्वी ज्यांनी MCM करुन कमी पगाराची का होईना पण software क्षेत्रातली नोकरि मिळवण्याची धडपड केली ते यथावकाश गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात स्थिरावले. पण या मुलाने ८-९ वर्षे BPO मध्ये काम केलय. तिथून आता त्याला IT मध्ये संधी मिळणं कठीण आहे. शिवाय IT मधील अद्ययावत तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी त्याला पुन्हा काही कोर्सेस करावे लागतील. इतकं करुन त्याला IT मध्ये संधी मिळाली तरी पुन्हा पहिल्या पायरीपासून सुरुवात करावी लागण्याचीच शक्यता खूप जास्त. त्यापेक्षा त्याने MBA करुन BPO मध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या/आस्थापनेच्या customer service च्या प्रांतात अधिक वरच्या स्थानावरील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

In reply to by मराठी कथालेखक

गॅरी ट्रुमन 05/09/2016 - 20:13
त्यापेक्षा त्याने MBA करुन BPO मध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या/आस्थापनेच्या customer service च्या प्रांतात अधिक वरच्या स्थानावरील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.
८-९ वर्षांचा BPO मधील अनुभव म्हणजे वय ३० च्या आसपास असेल. या वयात MBA करण्यापूर्वी दोनदा विचार करावा असे सुचवेन. जर MBA चे कॉलेज चांगले मिळाले तर ठिक आहे अन्यथा दोन वर्षे पूर्णवेळ शिक्षण घेणे (म्हणजे त्या काळात नोकरी सोडावी लागणे) आणि MBA साठीची अवाच्या सव्वा फी भरणे तितक्या प्रमाणावर किफायतशीर राहिल की नाही ही शंका नक्कीच आहे. MBA पूर्ण होतान प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर काही लाखांचे कर्ज असते. हा विचार करता आणि मधली दोन वर्षे नोकरी नसणार हा विचार करता २० वरून किमान ५०-५५ पर्यंत उडी मारता येईल अशा MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला हवा. ८-९ वर्षे BPO मध्ये नोकरी केल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये MBA ला प्रवेश मिळायची शक्यताही कमी होईल. आणि दुसरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी MBA कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर कोर्स पूर्ण होईपर्यंत ३२ वर्षे वय झाले असेल. जर कॉलेजमधील इतर विद्यार्थी २२-२३ वर्षांचे असतील तर अशा विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात आणि त्यामानाने अधिक वय असलेल्यांना मात्र निराशा येऊ शकते. (वयाच्या ३० व्या वर्षी MBA कॉलेजात गेलेला आणि ३२ व्या वर्षी MBA पूर्ण केलेला) गॅरी ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

MBA part time करावं. अर्थात MBA करुन मिळणारं ज्ञान महत्वाचं, part time MBA च्या certificate कडे बघून लगेच कुणी नोकरी / पदोन्नती देणार नाहीच. शेवटी ज्ञान , आत्मविश्वास, skills (technical आणि soft) आणि हे सगळं प्रत्यक्ष कामात उतरवून परिणाम साधणे महत्वाचे, नुसत्या पदव्यांच्या कागदांनी करिअर घडत नाही

_मनश्री_ 05/09/2016 - 14:50
.
पण केवळ पगार कमी आहे म्हणून क्षेत्र बदलणे पटत नाही..
सध्या काही कारणास्तव त्याला अधिक उत्पन्नाची आवश्यकता आहे,सध्या फक्त २० हजार पगार आहे त्याला , त्याने आता जर IT मधे प्रयत्न केले तर सध्या काय संधी मिळतील आणि आहे तीच नोकरी कंटिन्यू ठेवली तर पुढे फ्युचर मध्ये काही चांगल्या संधी मिळतील का ? सॉरी मी फार प्रश्न विचारतेय पण मी आर्टस् ची असल्यामुळे मला IT क्षेत्रातली अक्षरशः शून्य माहिती आहे

In reply to by _मनश्री_

वीस हजार आहे असे म्हणता तर , IT क्षेत्रात अगदी तितक्याच पगाराची जरी नोकरी मिळाली तरी त्याने ती संधी सोडू नये असं म्हणेन. IT मध्ये लवकरच चांगली प्रगती होवू शकते फक्त त्याला स्वतःला आपल्या कौशल्यांबद्दल आत्मविश्वास असावा

कपिलमुनी 05/09/2016 - 17:55
MCM या कोर्स चा मोठा झोल आहे . या नंतर तुम्हाला मोठ्या कंपन्या घेत नाहीत . शिक्षकी पेशात या नंतर नेट सेट , पी एच डी करता येत नाही त्यामुळे तिथेही वाट बंदच होते . छोट्या कंपनीत नोकरी करून अनुभव आला की पुढे डीग्रीचा फार फरक पडत नाही .

मोदक 05/09/2016 - 19:18
माफ करा पण एक गोष्ट स्पष्ट विचारतो... तो मुलगा MCM झाल्याझाल्या BPO मध्ये नोकरी करू लागला का..? उत्तर हो असे असल्यास - इतकी वर्षे BPO मध्ये नोकरी करून ९ वर्षांच्या अनुभववावरती एकच प्रमोशन (सिनीयर असोसिएट) आणि २० हजार रूपये पगार म्हणजे अगदीच अविश्वसनीय वाटत आहे. वेगळे काहीही न करता फक्त नोकरी टिकवूनही याहून जास्त प्रगती होणे अपेक्षीत आहे. नसल्यास कंपनी बदलणे अत्यावश्यक आहे. (यासाठीच धागा आहे याची जाणीव आहे) उत्तर हो नसल्यास त्याने मध्ये आणखी वेगळ्या क्षेत्रात हातपाय मारले असल्यास तेही आवर्जुन लिहा. ९ वर्षांनंतर MCM च्या रेफरन्सने जॉब शोधणे थोडे अवघड आहे कारण ती टेक्नॉलॉजी आणि स्किल्स आज कितपत उपयोगी असतील याची कल्पना नाही... पण उपयोगी असल्यास त्या टेक्नॉलॉजीचे आजच्या काळात लागू असलेले एखादे सर्टिफिकेशन करणे गरजेचे आहे. त्याचे आत्ताचे जॉब प्रोफाईल जर कळवलेत तर कोर्स सुचवायला आणखी मदत होईल.

त्याला त्याच्या सद्यस्थितीचा असा विचार करता येईल. १) मला पगार कमी का आहे ? २) माझं काम अपेक्षित गुणवत्तेच नाही का ? ३) फक्त मलाच कमी आहे की माझ्या सोबत काम करणार्‍या साधारणपणे सारखेच काम करणार्‍या /अनुभव असणार्‍या व्यक्तीला माझ्याच कंपनीतल्या सहकार्‍याला माझ्यापेक्षा बराच जास्त पगार आहे का ? ४) ३ चे उत्तर हो असे असेल तर त्याचा अर्थ माझे या कामात मन लागत नाही, किंवा मला या कामात गती नाही. ५) मी दुसरे कोणते काम केले तर त्यात माझे मन रमेल ? ६) असं दुसरं काम करण्याची संधी मला माझ्याच कंपनीत मिळवता येईल का ? ७) ६ चे उत्तर होकारार्थी असेल तर त्याने स्वतःच्या कंपनीत लगेच त्या दृष्टीने प्रयत्न सुरु करावेत ८) ६ चे उत्तर नकारार्थी असेल तर त्याला दुसर्‍या कंपनीत नोकरी शोधावी लागेल पण कंपनी बदलताना कामाचे स्वरुप बदलणे कठीण असते. दुसरी कंपनी तुम्ही आतापर्यंत करत असलेल्या कामाकरिता तुमच्यावर विश्वास दाखवू शकते पण पुर्णतः नवीन प्रकारच्या कामाकरिता (जे तुम्ही आधी केलेले नाही) तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवणे त्या कंपनीला शक्य नसते. मग अशा वेळी अधिक शिक्षणाची जोड देणे किंवा योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा आपल्याला हवी तशी संधी चालून येईल याची वाट बघणे हेच पर्याय राहतात ९) जर ३ चे उत्तर नकारार्थी असेल तर : याच क्षेत्रात , याच प्रकारचे पण दुसर्‍या कंपनीत काम करणार्‍यांना माझ्यापेक्षा बराच जास्त पगार आहे का ? १०) जर ९ चे उत्तर होकारार्थी असेल तर फक्त कंपनी बदलणे पुरेसे आहे. पण हे उत्तर होकारार्थी अस्ण्याची शक्य्रता तशी कमीच. जर हे उत्तर होकारार्थी असेल तर माझे अनेक सहकारी जॉब बदलत असतील, बदलल्ला असेल. ते कुठे जात आहेत ते कळालं की मी पण तिथे प्रयत्न करु शकतो. ११) माझ्या सध्याच्या जॉबमध्ये प्रगतीच्या काय संधी आहेत ? माझ्या मॅनेजरला किती पगार मिळतो ? तो काय काम करतो ? मला मॅनेजर बनायला किती काळ लागेल ? त्याकरिता काय कौशल्ये शिकावी लागतील ?

MCM होऊन ८-९ वर्ष झालीत म्हणजे आता त्यांना काही संधी मिळेल आय.टी. मधे असे मला वाटत नाही. फक्त नोकरीच करायची आहे का दुसरे काही करायची तयारी आहे ?

ताजा कलमः- मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही. आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!! बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!! Modak

श्रीगुरुजी 09/09/2016 - 15:11
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती (MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)
त्याला संगणक क्षेत्रातील नक्की कोणत्या विषयांचा अनुभव आहे/होता हे स्पष्ट नाही. त्याला जावा, सी++, एचटीएमएल इ. भाषांचे ज्ञान/अनुभव आहे का? डाटाबेसचा अनुभव आहे का? खालील पर्यायांवर विचार करता येईल. १) मोठ्या आयटी कंपनीत संधी मिळणे खूप अवघड आहे. त्याऐवजी अगदी लहान कंपनीत संधी मिळू शकते. त्यासाठी एखाद्या प्लेसमेंट कंपनीकडून प्रयत्न करावा. २) तो बीपीओ मध्ये कोणत्या बिझनेस डोमेन मध्ये काम करीत आहे (फायनान्स, एअरलाईन, इन्शुरन्स इ.)? या डोमेनमध्ये त्याला इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासारख्या संस्थातून बहि:स्थ एमबीए करून नंतर बिझनेस अ‍ॅनालिस्ट होता येऊ शकेल. ३) सीड किंवा एखाद्या तत्सम प्रशिक्षण संस्थेतून वेबसाईट तयार करणे, वेबपेज डिझाईन इ. शिकून त्याच क्षेत्रात पुढे काही तरी करता येईल. ४) एखाद्या प्रशिक्षण संस्थेतून सर्टीफाईड क्वालिटी अ‍ॅडव्हायझरची परीक्षा पास करून क्वालिटी ऑडीट या क्षेत्रात प्रवेश करता येईल. सर्व आयटी व बीपीओ कंपन्यांना नियमित क्वालिटी ऑडीट करणे हे सक्तीचे असते. त्यामुळे या क्षेत्राला मरण नाही. ५) बीपीओतील अनुभवाचा फायदा घेऊन या क्षेत्रात नव्याने प्रवेश करू पाहणार्‍या नवोदितांना या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरू करता येईल.

चंपाबाई 10/09/2016 - 22:52
तो बीपीओत असला तरी प्रोफाइल कस्टमर केअरचा आहे... म्हणजे त्याचे मूलभूत क्षेत्र कस्टमर केअर आहे.... बीपीओच्या टेक्निकल वर्कशी प्रत्यक्ष सहभाग नसेल असे वाटते... मग बीपीओत पुढची पोस्त कशी मिळेल ?

पाटीलभाऊ 05/09/2016 - 14:40
MCM वाल्याना IT क्षेत्रात संधी आहे...पण केवळ पगार कमी आहे म्हणून क्षेत्र बदलणे पटत नाही. IT मध्ये पगार जास्त असला तरी मानसिक तणाव जास्त असतो. अजून एक, MCM होऊन ८-९ वर्ष झाली असली तरी IT मध्ये आल्यावर फ्रेशर म्हणूनच संधी मिळेल..जिथे सुरुवातीला पगार कमी असेल आणि स्ट्रगल फार करावं लागेल.

MCM ला करीअर संधी कमी आहेत हे खरेच. इतकं की आता course अनेक ठिकाणी बंद पडला आहे. त्यामुळे पुर्वी ज्यांनी MCM करुन कमी पगाराची का होईना पण software क्षेत्रातली नोकरि मिळवण्याची धडपड केली ते यथावकाश गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात स्थिरावले. पण या मुलाने ८-९ वर्षे BPO मध्ये काम केलय. तिथून आता त्याला IT मध्ये संधी मिळणं कठीण आहे. शिवाय IT मधील अद्ययावत तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी त्याला पुन्हा काही कोर्सेस करावे लागतील. इतकं करुन त्याला IT मध्ये संधी मिळाली तरी पुन्हा पहिल्या पायरीपासून सुरुवात करावी लागण्याचीच शक्यता खूप जास्त. त्यापेक्षा त्याने MBA करुन BPO मध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या/आस्थापनेच्या customer service च्या प्रांतात अधिक वरच्या स्थानावरील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

In reply to by मराठी कथालेखक

गॅरी ट्रुमन 05/09/2016 - 20:13
त्यापेक्षा त्याने MBA करुन BPO मध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या/आस्थापनेच्या customer service च्या प्रांतात अधिक वरच्या स्थानावरील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.
८-९ वर्षांचा BPO मधील अनुभव म्हणजे वय ३० च्या आसपास असेल. या वयात MBA करण्यापूर्वी दोनदा विचार करावा असे सुचवेन. जर MBA चे कॉलेज चांगले मिळाले तर ठिक आहे अन्यथा दोन वर्षे पूर्णवेळ शिक्षण घेणे (म्हणजे त्या काळात नोकरी सोडावी लागणे) आणि MBA साठीची अवाच्या सव्वा फी भरणे तितक्या प्रमाणावर किफायतशीर राहिल की नाही ही शंका नक्कीच आहे. MBA पूर्ण होतान प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर काही लाखांचे कर्ज असते. हा विचार करता आणि मधली दोन वर्षे नोकरी नसणार हा विचार करता २० वरून किमान ५०-५५ पर्यंत उडी मारता येईल अशा MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला हवा. ८-९ वर्षे BPO मध्ये नोकरी केल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये MBA ला प्रवेश मिळायची शक्यताही कमी होईल. आणि दुसरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी MBA कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर कोर्स पूर्ण होईपर्यंत ३२ वर्षे वय झाले असेल. जर कॉलेजमधील इतर विद्यार्थी २२-२३ वर्षांचे असतील तर अशा विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात आणि त्यामानाने अधिक वय असलेल्यांना मात्र निराशा येऊ शकते. (वयाच्या ३० व्या वर्षी MBA कॉलेजात गेलेला आणि ३२ व्या वर्षी MBA पूर्ण केलेला) गॅरी ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

MBA part time करावं. अर्थात MBA करुन मिळणारं ज्ञान महत्वाचं, part time MBA च्या certificate कडे बघून लगेच कुणी नोकरी / पदोन्नती देणार नाहीच. शेवटी ज्ञान , आत्मविश्वास, skills (technical आणि soft) आणि हे सगळं प्रत्यक्ष कामात उतरवून परिणाम साधणे महत्वाचे, नुसत्या पदव्यांच्या कागदांनी करिअर घडत नाही

_मनश्री_ 05/09/2016 - 14:50
.
पण केवळ पगार कमी आहे म्हणून क्षेत्र बदलणे पटत नाही..
सध्या काही कारणास्तव त्याला अधिक उत्पन्नाची आवश्यकता आहे,सध्या फक्त २० हजार पगार आहे त्याला , त्याने आता जर IT मधे प्रयत्न केले तर सध्या काय संधी मिळतील आणि आहे तीच नोकरी कंटिन्यू ठेवली तर पुढे फ्युचर मध्ये काही चांगल्या संधी मिळतील का ? सॉरी मी फार प्रश्न विचारतेय पण मी आर्टस् ची असल्यामुळे मला IT क्षेत्रातली अक्षरशः शून्य माहिती आहे

In reply to by _मनश्री_

वीस हजार आहे असे म्हणता तर , IT क्षेत्रात अगदी तितक्याच पगाराची जरी नोकरी मिळाली तरी त्याने ती संधी सोडू नये असं म्हणेन. IT मध्ये लवकरच चांगली प्रगती होवू शकते फक्त त्याला स्वतःला आपल्या कौशल्यांबद्दल आत्मविश्वास असावा

कपिलमुनी 05/09/2016 - 17:55
MCM या कोर्स चा मोठा झोल आहे . या नंतर तुम्हाला मोठ्या कंपन्या घेत नाहीत . शिक्षकी पेशात या नंतर नेट सेट , पी एच डी करता येत नाही त्यामुळे तिथेही वाट बंदच होते . छोट्या कंपनीत नोकरी करून अनुभव आला की पुढे डीग्रीचा फार फरक पडत नाही .

मोदक 05/09/2016 - 19:18
माफ करा पण एक गोष्ट स्पष्ट विचारतो... तो मुलगा MCM झाल्याझाल्या BPO मध्ये नोकरी करू लागला का..? उत्तर हो असे असल्यास - इतकी वर्षे BPO मध्ये नोकरी करून ९ वर्षांच्या अनुभववावरती एकच प्रमोशन (सिनीयर असोसिएट) आणि २० हजार रूपये पगार म्हणजे अगदीच अविश्वसनीय वाटत आहे. वेगळे काहीही न करता फक्त नोकरी टिकवूनही याहून जास्त प्रगती होणे अपेक्षीत आहे. नसल्यास कंपनी बदलणे अत्यावश्यक आहे. (यासाठीच धागा आहे याची जाणीव आहे) उत्तर हो नसल्यास त्याने मध्ये आणखी वेगळ्या क्षेत्रात हातपाय मारले असल्यास तेही आवर्जुन लिहा. ९ वर्षांनंतर MCM च्या रेफरन्सने जॉब शोधणे थोडे अवघड आहे कारण ती टेक्नॉलॉजी आणि स्किल्स आज कितपत उपयोगी असतील याची कल्पना नाही... पण उपयोगी असल्यास त्या टेक्नॉलॉजीचे आजच्या काळात लागू असलेले एखादे सर्टिफिकेशन करणे गरजेचे आहे. त्याचे आत्ताचे जॉब प्रोफाईल जर कळवलेत तर कोर्स सुचवायला आणखी मदत होईल.

त्याला त्याच्या सद्यस्थितीचा असा विचार करता येईल. १) मला पगार कमी का आहे ? २) माझं काम अपेक्षित गुणवत्तेच नाही का ? ३) फक्त मलाच कमी आहे की माझ्या सोबत काम करणार्‍या साधारणपणे सारखेच काम करणार्‍या /अनुभव असणार्‍या व्यक्तीला माझ्याच कंपनीतल्या सहकार्‍याला माझ्यापेक्षा बराच जास्त पगार आहे का ? ४) ३ चे उत्तर हो असे असेल तर त्याचा अर्थ माझे या कामात मन लागत नाही, किंवा मला या कामात गती नाही. ५) मी दुसरे कोणते काम केले तर त्यात माझे मन रमेल ? ६) असं दुसरं काम करण्याची संधी मला माझ्याच कंपनीत मिळवता येईल का ? ७) ६ चे उत्तर होकारार्थी असेल तर त्याने स्वतःच्या कंपनीत लगेच त्या दृष्टीने प्रयत्न सुरु करावेत ८) ६ चे उत्तर नकारार्थी असेल तर त्याला दुसर्‍या कंपनीत नोकरी शोधावी लागेल पण कंपनी बदलताना कामाचे स्वरुप बदलणे कठीण असते. दुसरी कंपनी तुम्ही आतापर्यंत करत असलेल्या कामाकरिता तुमच्यावर विश्वास दाखवू शकते पण पुर्णतः नवीन प्रकारच्या कामाकरिता (जे तुम्ही आधी केलेले नाही) तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवणे त्या कंपनीला शक्य नसते. मग अशा वेळी अधिक शिक्षणाची जोड देणे किंवा योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा आपल्याला हवी तशी संधी चालून येईल याची वाट बघणे हेच पर्याय राहतात ९) जर ३ चे उत्तर नकारार्थी असेल तर : याच क्षेत्रात , याच प्रकारचे पण दुसर्‍या कंपनीत काम करणार्‍यांना माझ्यापेक्षा बराच जास्त पगार आहे का ? १०) जर ९ चे उत्तर होकारार्थी असेल तर फक्त कंपनी बदलणे पुरेसे आहे. पण हे उत्तर होकारार्थी अस्ण्याची शक्य्रता तशी कमीच. जर हे उत्तर होकारार्थी असेल तर माझे अनेक सहकारी जॉब बदलत असतील, बदलल्ला असेल. ते कुठे जात आहेत ते कळालं की मी पण तिथे प्रयत्न करु शकतो. ११) माझ्या सध्याच्या जॉबमध्ये प्रगतीच्या काय संधी आहेत ? माझ्या मॅनेजरला किती पगार मिळतो ? तो काय काम करतो ? मला मॅनेजर बनायला किती काळ लागेल ? त्याकरिता काय कौशल्ये शिकावी लागतील ?

MCM होऊन ८-९ वर्ष झालीत म्हणजे आता त्यांना काही संधी मिळेल आय.टी. मधे असे मला वाटत नाही. फक्त नोकरीच करायची आहे का दुसरे काही करायची तयारी आहे ?

ताजा कलमः- मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही. आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!! बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!! Modak

श्रीगुरुजी 09/09/2016 - 15:11
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती (MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)
त्याला संगणक क्षेत्रातील नक्की कोणत्या विषयांचा अनुभव आहे/होता हे स्पष्ट नाही. त्याला जावा, सी++, एचटीएमएल इ. भाषांचे ज्ञान/अनुभव आहे का? डाटाबेसचा अनुभव आहे का? खालील पर्यायांवर विचार करता येईल. १) मोठ्या आयटी कंपनीत संधी मिळणे खूप अवघड आहे. त्याऐवजी अगदी लहान कंपनीत संधी मिळू शकते. त्यासाठी एखाद्या प्लेसमेंट कंपनीकडून प्रयत्न करावा. २) तो बीपीओ मध्ये कोणत्या बिझनेस डोमेन मध्ये काम करीत आहे (फायनान्स, एअरलाईन, इन्शुरन्स इ.)? या डोमेनमध्ये त्याला इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासारख्या संस्थातून बहि:स्थ एमबीए करून नंतर बिझनेस अ‍ॅनालिस्ट होता येऊ शकेल. ३) सीड किंवा एखाद्या तत्सम प्रशिक्षण संस्थेतून वेबसाईट तयार करणे, वेबपेज डिझाईन इ. शिकून त्याच क्षेत्रात पुढे काही तरी करता येईल. ४) एखाद्या प्रशिक्षण संस्थेतून सर्टीफाईड क्वालिटी अ‍ॅडव्हायझरची परीक्षा पास करून क्वालिटी ऑडीट या क्षेत्रात प्रवेश करता येईल. सर्व आयटी व बीपीओ कंपन्यांना नियमित क्वालिटी ऑडीट करणे हे सक्तीचे असते. त्यामुळे या क्षेत्राला मरण नाही. ५) बीपीओतील अनुभवाचा फायदा घेऊन या क्षेत्रात नव्याने प्रवेश करू पाहणार्‍या नवोदितांना या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरू करता येईल.

चंपाबाई 10/09/2016 - 22:52
तो बीपीओत असला तरी प्रोफाइल कस्टमर केअरचा आहे... म्हणजे त्याचे मूलभूत क्षेत्र कस्टमर केअर आहे.... बीपीओच्या टेक्निकल वर्कशी प्रत्यक्ष सहभाग नसेल असे वाटते... मग बीपीओत पुढची पोस्त कशी मिळेल ?
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती (MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)

दीर्घकालीन रोगांचे उपचार : समज-गैरसमजातून जाणारी निर्णयप्रक्रिया

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by स्पा

धन्यवाद ! पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे लेखाचा उद्द्येश "व्यावहारीक निर्णयात उपयोगी पडणारे काही विचार" इतकाच सीमीत आहे... हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

राही 25/07/2016 - 10:39
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार.

कंजूस 25/07/2016 - 10:57
लेख दुर्धर रोगांच्या बाबतीत आहे आणि >>सर्व माहिती मिळाल्यावर अंतिम निर्णय मात्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने घेणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी सर्व काही त्यांनाच निभाऊन न्यायचे असते.>>हे अगदी खरे आहे.

चौकटराजा 25/07/2016 - 11:05
हा लेख बारकाईने वाचल्यास फारच बदल आपल्या रोगाला व्यवस्थापित करण्यात होईल. रोगाबरोबरच घरातील इतर लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यात होईल. अल्झायमर (सौम्य) झालेल्या माझ्या आईकडे ती एकदा "रूग्ण" आहे . अल्झायमर दुरूस्त होणारा नाही हे कळल्यावर माझी मनोभूमिका बदलली व ताण कमी झाला. मला डायबेटीस झाला व रक्तदाबही सुरू झाला याचा मला अजिबात मानसिक धक्का बसला नाही. कारण मी खवय्या नाही व मला भटकणे हे आनंदाचे निधान वाटते. आता "आम्ही जायाचं तर की कवातरी पटदिशी " या वसंत बापटांच्या कविते प्रमाणे मृत्यूकडेही पहाण्याचा दृष्टीकोन आहे. देव दयेने मला लाभली जगावेगळी श्रीमंती अशी मनोधारणा होण्यासाठी ग्लास किती भरला आहे हे पहावे लागते रिकाम्याच्या विचार अस्वस्थता या पलिकडे काहीही देत नाही. आनंदी वृती 'तो' दिवस जवळ आल्यावर शारिरीक वेदनांवर किती मात करते यावर आपण खरंच काही कमावले आहे का याचे उत्तर मिळेल.

विटेकर 25/07/2016 - 12:58
उत्तम लेख ! दुर्दैवाने सगळेच डोक्टर असा विचार करत नाहीत. रोग व्यवस्थापन हा मोठा विषय आहे.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साती 25/07/2016 - 22:22
डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

उत्तम लेख. दीर्घ मुदतीचं खडतर जीवन आणि कमी मुदतीचं सुसह्य/आनंददायी जीवन यांमधला 'योग्य' पर्याय निवडण्याची गरज असते. ही निवड सोपी नसते, आणि प्रत्येकासाठी त्या खडतर/सुसह्य/आनंददायी या शब्दांची व्याख्या वेगळी असते. पण किमान या दोन पर्यायांचा विचार व्हायला हवा हा मुद्दा चांगल्या रीतीने अधोरेखित केलेला आहे. फक्त स्वतःच्या आणि इतर काहींच्या अनुभवावर आधारित असलेल्या मतापेक्षा अधिकारी व्यक्तीच्या संकलित ज्ञानावर आधारित असलेल्या विचारपूर्व आणि संयत सल्ल्याला अधिक महत्त्व मिळायला हवं.

सोनू 31/07/2016 - 23:12
उत्तम लेख. आताचे काही धागे व प्रतिक्रीया पाहता खरच गरज होती याची.

विदेशी वचाळ 01/08/2016 - 06:58
आजारी माणसाचा आजार हा केवळ त्या माणसावर घाव घालत नाही. तो कुटुंबातल्या इतरांना हि त्रास देत असतो . आणि इतरांचे स्वभाव पण त्यामुळे बदलतात. डॉक्टर साहेबांनी उदाहरणे घेतलेली योग्य आहेत. जास्तीत जास्त समाजात अशी मंडळी सापडतातच (मधुमेह असणारी किंवा रक्त दाब असणारी ). आणि त्या बाबत आता समाज जागृत पण झाला आहे. पण दुर्धर रोगांचेबाबतीत आपण फारच मागे असतो. लोकांना नेमके काय झाले आहे हेच माहिती नसते. पूर्वग्रह जबरदस्त असतो . माहितीतली उदाहरणे हि अपूर्ण माहितीचे अड्डे असतात . कर्क रोग बाबत थोडेसे सांगतो . मला जेवढे कळते त्यावरून हा रोग म्हणजे एका रोग नाही . अनेक प्रकारचे कर्क रोग असतात . आणि त्यांवर उपाय म्हणून आज पर्यंत तरी किमो आणि रेडिएशन हेच माहिती होते. आता इम्युनो थेरपी म्हणून नवा प्रकार आहे. पण आज पर्यंत मी कोठलाच डॉक्टर सरसकट सगळे कर्क रोग मिटवून देतो म्हणून प्रसिद्धी पावलेला पाहिलेला नाही आहे. पण जवळच्या एका व्यक्तीस हा रोग झाल्यावर गंडे ताईत यांपासून अंगारे धुपारे येथे पर्यन्त सगळे उपाय सांगणारे येऊन गेले. आमचे औषध कुठलाही कर्क रोग लगेच बारा करते असे सांगणारे येऊन गेले. झाडाच्या सालीचे औषध देणारे झाले. टोमॅटो चा जूस प्या म्हणणारे झाले .केवळ हळदी घ्या सांगून झाले. पण ह्या पैकी कोणीही हे औषध का लागू पडेल हे सांगत नाही . बरे तसे विचारले तर औषध देणाऱ्यांपेक्षा त्यांची माहिती सांगणारच जास्त दुखावतो. हे सगळे उपाय करत असताना रोगी सोडून घराचे इतर लोकांना किती भोगावे लागत असेल ह्याचा कोठेच हिशोब नसतो . अमका बाबा म्हणाला कि 'दही खाऊ नका' कि पुढचे दोन आठवडे दही बंद. मग दुसरा कोणीतरी येतो तो सांगतो कि केवळ दही खाऊनच कोणाचा कर्क रोग गेला . कि दही जोरात. तेच नारळ पाण्याचे. कोणीतरी सांगितले कि डाळ कुकर मध्ये शिजवली कि सत्व जाते. कि गेला कुकर माळ्यावर . चार आठवड्यांनी परत खाली आला. पण ह्या सगळ्या मागे एका मोठे कारण आहे . ते म्हणजे अज्ञान . आपल्याला जीव शास्त्रात गती नसणे . ज्या माणसाला कर्क रोग कशाने होते हे जराजरा कळले तो माणूस उगाच कुकर माळ्यावर चढवत नाही. तेव्हां डॉक्टर साहेब , विषय खूप चांगला आहे पण गरज आहे ती समाज प्रबोधनाची. कर्करोग म्हणजे माणसाचा डी एन ए मध्ये होणारे असाध्य बदल . हे जर लोकांना सोप्या भाषेत समजावू शकलो तर कितीतरी त्रास वाचू शकेल . आणि आपण आपले आयुष्य / जीवन समजू शकू . आणि जसा कर्क रोग तसाच दुसरा कोठलाही दुर्धर रोग, हे सांगणे ना लगे .

मंजूताई 01/08/2016 - 06:59
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार. +1 डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.+ साती , मनावर घ्याच

In reply to by स्पा

धन्यवाद ! पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे लेखाचा उद्द्येश "व्यावहारीक निर्णयात उपयोगी पडणारे काही विचार" इतकाच सीमीत आहे... हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

राही 25/07/2016 - 10:39
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार.

कंजूस 25/07/2016 - 10:57
लेख दुर्धर रोगांच्या बाबतीत आहे आणि >>सर्व माहिती मिळाल्यावर अंतिम निर्णय मात्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाने घेणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी सर्व काही त्यांनाच निभाऊन न्यायचे असते.>>हे अगदी खरे आहे.

चौकटराजा 25/07/2016 - 11:05
हा लेख बारकाईने वाचल्यास फारच बदल आपल्या रोगाला व्यवस्थापित करण्यात होईल. रोगाबरोबरच घरातील इतर लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यात होईल. अल्झायमर (सौम्य) झालेल्या माझ्या आईकडे ती एकदा "रूग्ण" आहे . अल्झायमर दुरूस्त होणारा नाही हे कळल्यावर माझी मनोभूमिका बदलली व ताण कमी झाला. मला डायबेटीस झाला व रक्तदाबही सुरू झाला याचा मला अजिबात मानसिक धक्का बसला नाही. कारण मी खवय्या नाही व मला भटकणे हे आनंदाचे निधान वाटते. आता "आम्ही जायाचं तर की कवातरी पटदिशी " या वसंत बापटांच्या कविते प्रमाणे मृत्यूकडेही पहाण्याचा दृष्टीकोन आहे. देव दयेने मला लाभली जगावेगळी श्रीमंती अशी मनोधारणा होण्यासाठी ग्लास किती भरला आहे हे पहावे लागते रिकाम्याच्या विचार अस्वस्थता या पलिकडे काहीही देत नाही. आनंदी वृती 'तो' दिवस जवळ आल्यावर शारिरीक वेदनांवर किती मात करते यावर आपण खरंच काही कमावले आहे का याचे उत्तर मिळेल.

विटेकर 25/07/2016 - 12:58
उत्तम लेख ! दुर्दैवाने सगळेच डोक्टर असा विचार करत नाहीत. रोग व्यवस्थापन हा मोठा विषय आहे.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साधा मुलगा 25/07/2016 - 13:24
डॉ म्हात्रे, डॉ खरे, डॉ अजया डॉ साती, डॉ आनंदी गोपाळ अश्या डॉ लोकांचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि उपयुक्त असतात, या आणि अश्या मिपावरील सर्व डॉ लोकांनी एक आरोग्य विशेषांक लिहावा असे वाटते, कोणी हॉस्पिटल मध्ये नर्स किंवा NGO बरोबर काम केले असेल तर त्यांचेही अनुभव/ लेख वाचायला आवडतील.

साती 25/07/2016 - 22:22
डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.

उत्तम लेख. दीर्घ मुदतीचं खडतर जीवन आणि कमी मुदतीचं सुसह्य/आनंददायी जीवन यांमधला 'योग्य' पर्याय निवडण्याची गरज असते. ही निवड सोपी नसते, आणि प्रत्येकासाठी त्या खडतर/सुसह्य/आनंददायी या शब्दांची व्याख्या वेगळी असते. पण किमान या दोन पर्यायांचा विचार व्हायला हवा हा मुद्दा चांगल्या रीतीने अधोरेखित केलेला आहे. फक्त स्वतःच्या आणि इतर काहींच्या अनुभवावर आधारित असलेल्या मतापेक्षा अधिकारी व्यक्तीच्या संकलित ज्ञानावर आधारित असलेल्या विचारपूर्व आणि संयत सल्ल्याला अधिक महत्त्व मिळायला हवं.

सोनू 31/07/2016 - 23:12
उत्तम लेख. आताचे काही धागे व प्रतिक्रीया पाहता खरच गरज होती याची.

विदेशी वचाळ 01/08/2016 - 06:58
आजारी माणसाचा आजार हा केवळ त्या माणसावर घाव घालत नाही. तो कुटुंबातल्या इतरांना हि त्रास देत असतो . आणि इतरांचे स्वभाव पण त्यामुळे बदलतात. डॉक्टर साहेबांनी उदाहरणे घेतलेली योग्य आहेत. जास्तीत जास्त समाजात अशी मंडळी सापडतातच (मधुमेह असणारी किंवा रक्त दाब असणारी ). आणि त्या बाबत आता समाज जागृत पण झाला आहे. पण दुर्धर रोगांचेबाबतीत आपण फारच मागे असतो. लोकांना नेमके काय झाले आहे हेच माहिती नसते. पूर्वग्रह जबरदस्त असतो . माहितीतली उदाहरणे हि अपूर्ण माहितीचे अड्डे असतात . कर्क रोग बाबत थोडेसे सांगतो . मला जेवढे कळते त्यावरून हा रोग म्हणजे एका रोग नाही . अनेक प्रकारचे कर्क रोग असतात . आणि त्यांवर उपाय म्हणून आज पर्यंत तरी किमो आणि रेडिएशन हेच माहिती होते. आता इम्युनो थेरपी म्हणून नवा प्रकार आहे. पण आज पर्यंत मी कोठलाच डॉक्टर सरसकट सगळे कर्क रोग मिटवून देतो म्हणून प्रसिद्धी पावलेला पाहिलेला नाही आहे. पण जवळच्या एका व्यक्तीस हा रोग झाल्यावर गंडे ताईत यांपासून अंगारे धुपारे येथे पर्यन्त सगळे उपाय सांगणारे येऊन गेले. आमचे औषध कुठलाही कर्क रोग लगेच बारा करते असे सांगणारे येऊन गेले. झाडाच्या सालीचे औषध देणारे झाले. टोमॅटो चा जूस प्या म्हणणारे झाले .केवळ हळदी घ्या सांगून झाले. पण ह्या पैकी कोणीही हे औषध का लागू पडेल हे सांगत नाही . बरे तसे विचारले तर औषध देणाऱ्यांपेक्षा त्यांची माहिती सांगणारच जास्त दुखावतो. हे सगळे उपाय करत असताना रोगी सोडून घराचे इतर लोकांना किती भोगावे लागत असेल ह्याचा कोठेच हिशोब नसतो . अमका बाबा म्हणाला कि 'दही खाऊ नका' कि पुढचे दोन आठवडे दही बंद. मग दुसरा कोणीतरी येतो तो सांगतो कि केवळ दही खाऊनच कोणाचा कर्क रोग गेला . कि दही जोरात. तेच नारळ पाण्याचे. कोणीतरी सांगितले कि डाळ कुकर मध्ये शिजवली कि सत्व जाते. कि गेला कुकर माळ्यावर . चार आठवड्यांनी परत खाली आला. पण ह्या सगळ्या मागे एका मोठे कारण आहे . ते म्हणजे अज्ञान . आपल्याला जीव शास्त्रात गती नसणे . ज्या माणसाला कर्क रोग कशाने होते हे जराजरा कळले तो माणूस उगाच कुकर माळ्यावर चढवत नाही. तेव्हां डॉक्टर साहेब , विषय खूप चांगला आहे पण गरज आहे ती समाज प्रबोधनाची. कर्करोग म्हणजे माणसाचा डी एन ए मध्ये होणारे असाध्य बदल . हे जर लोकांना सोप्या भाषेत समजावू शकलो तर कितीतरी त्रास वाचू शकेल . आणि आपण आपले आयुष्य / जीवन समजू शकू . आणि जसा कर्क रोग तसाच दुसरा कोठलाही दुर्धर रोग, हे सांगणे ना लगे .

मंजूताई 01/08/2016 - 06:59
अतिशय सुंदर लेख. मधुमेह बरा होण्याच्या धाग्यात हा जीवनशैली बदलून अधिक खडतर होण्याचा मुद्दा मला वाटते श्री घासकडवी यांनी पुढे आणला होता. माझ्याही मनात ही शंका होतीच. या लेखामुळे बर्‍याच गोष्टींबाबतचा संभ्रम दूर झाला आणि माहीत असलेल्या काही गोष्टी अधिक ठाशीवपणे कळल्या. आभार. +1 डोळे उघडवणारा आणि उत्तम लेख. यातल्या प्रत्येक ठाशीव मुद्द्यावर एक एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.+ साती , मनावर घ्याच
"दुर्धर" आणि/अथवा "दीर्घकालीन" आणि/अथवा "असाध्य" रोग हे केवळ रुग्णाच्या शरिरावरच नाही तर मनावर व जीवनशैलीवर जोरदार आघात करतात. याशिवाय ते रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांच्यावरही शारिरीक, मानसिक व भावनिक प्रभाव टाकतात. अर्थातच, अश्या रोगांचे उपचार ठरविताना रुग्णाच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीबरोबर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या शरिरीक व मानसिक ताकद-कमजोरीचा विचार अत्यावश्यक ठरतो. हा एक फार मोठा व गुंतागुंतीचा विषय आहे. याबाबतीत, फार खोलात न जाता, पण तरीही शास्त्रिय पद्धतिने, निर्णयप्रक्रिया करता यावी यासाठी खालील काही विचार उपयोगी ठरावेत.

आय टी आर .... एक प्रश्न

चौकटराजा ·

असंका 29/05/2016 - 10:54
डिस्क्लेमर १- माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस नगण्य आहे. डिस्क्लेमर २ - कुठलीही जबाबदारी न घेता माझे उत्तर असे- आपल्याला आय टी आर एक भरता येणार नाही. दीर्घ कालीन भांडवली नफ्यावर कर लागू नये म्हणून आपण गुंतवणूक केलीत ते बरोबर. त्यामुळे कर वाचू शकतो हेही बरोबर. पण या दोन्ही गोष्टी (नफा आणि गुंतवणूक) आपल्याला आपल्या रीटर्न मध्ये जाहीर कराव्या लागतील. हे जाहीर करण्यासाठी आय टी आर एक मध्ये जागा दिलेली असेल असे वाटत नाही. आय टी आर २ भरावा लागेल असे दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.

In reply to by असंका

चौकटराजा 29/05/2016 - 13:44
आता पुन्हा मी तो लेख वाचला . आपले म्हणणे बरोबर आहेसे वाटते. कारण नफा व गुंतवणूक दोन्ही साठी जागा आय टी आर १ मधे नसण्याचीच शक्यता किंवा नाहीच आहे. आता फक्त २ आंतरजालावरचा नीट वाचून पहातो. धन्यवाद !

कंजूस 29/05/2016 - 14:00
cnbc aawaj 18 ,>> taxguru .शनि सकाळी साडेसात ,नंतर रीपीट करतात.हे सर्व प्रश्न घेतात.

असंका 29/05/2016 - 10:54
डिस्क्लेमर १- माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस नगण्य आहे. डिस्क्लेमर २ - कुठलीही जबाबदारी न घेता माझे उत्तर असे- आपल्याला आय टी आर एक भरता येणार नाही. दीर्घ कालीन भांडवली नफ्यावर कर लागू नये म्हणून आपण गुंतवणूक केलीत ते बरोबर. त्यामुळे कर वाचू शकतो हेही बरोबर. पण या दोन्ही गोष्टी (नफा आणि गुंतवणूक) आपल्याला आपल्या रीटर्न मध्ये जाहीर कराव्या लागतील. हे जाहीर करण्यासाठी आय टी आर एक मध्ये जागा दिलेली असेल असे वाटत नाही. आय टी आर २ भरावा लागेल असे दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.

In reply to by असंका

चौकटराजा 29/05/2016 - 13:44
आता पुन्हा मी तो लेख वाचला . आपले म्हणणे बरोबर आहेसे वाटते. कारण नफा व गुंतवणूक दोन्ही साठी जागा आय टी आर १ मधे नसण्याचीच शक्यता किंवा नाहीच आहे. आता फक्त २ आंतरजालावरचा नीट वाचून पहातो. धन्यवाद !

कंजूस 29/05/2016 - 14:00
cnbc aawaj 18 ,>> taxguru .शनि सकाळी साडेसात ,नंतर रीपीट करतात.हे सर्व प्रश्न घेतात.
आजच्या दैनिक सकाळ मधे कोणी कोणता आय टी आर अर्थात आयकर रिटर्न फॉर्म भरावा या संबंधी मार्गदर्शन करणारा लेख आला आहे. त्यात आय टी आर १ हा पगारदार वा सेवा निवृत्त यांचे साठी प्रामुख्याने असल्याचे नमूद केले आहे. पण काही अधिक निकष लागू होत असतील तर आय टी आर १ हा पगारदार व सेवानिवृत्त यानाही भरता येणार नाही असे म्हटले आहे. त्यात एक अट अशी आहे की अल्प व दीर्घकालीन भांडवली नफा ( घराची खरेदी किंमत व विक्रि किमत यांचे इन्डेक्सेशन केल्यावर) असेल तर आय टी आर १ भरता येणार नाही.

... काय म्हणतील!

रातराणी ·

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

मुक्त विहारि ·

एस 11/05/2016 - 14:38
तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-) बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 11/05/2016 - 16:05
श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता.. मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे. खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो. अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे 11/05/2016 - 16:28
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही. त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

In reply to by सूड

मन१ 11/05/2016 - 18:14
मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :) साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे. दीड तास ??? मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

In reply to by मन१

आदूबाळ 11/05/2016 - 18:20
+२ दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode 11/05/2016 - 19:38
फळं खात नाहीत ? फलाहार कमी पडतोय. बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

In reply to by सतिश गावडे

माझ्याकडून दूढ उतू गेले. बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.) असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये. आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. कधीही जेवायला या. @ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही. @ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका." ओके. @ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा. @ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का? @ बोका-ए-आझम ===> २२ मे २०१६ जमेल का? @ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे. @ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा." माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो. @ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले. पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे. "आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा." ओके.प्रयत्न करतो. @ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता. @ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा. बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली. @ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले. ===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा." गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही. त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल. फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

mugdhagode 12/05/2016 - 08:11
शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ? नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो. तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

रेवती 12/05/2016 - 01:29
बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता. होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;) पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते. बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

In reply to by रेवती

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते." अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले. असो, स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

In reply to by मुक्त विहारि

स्रुजा 12/05/2016 - 08:15
पुरावा नाहिसा केला आहे :) बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__ असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 13/05/2016 - 21:40
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे. a

In reply to by मुक्त विहारि

आनंदी गोपाळ 15/05/2016 - 16:17
किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे. दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

पैसा 12/05/2016 - 09:54
झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण. डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

चित्रगुप्त 12/05/2016 - 11:18
यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो: १. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे २. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे: ..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय. ३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम. ४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम. ५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम. ६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात. ७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील. ८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

In reply to by चित्रगुप्त

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते 12/05/2016 - 11:35
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर. बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली. ६६, ६८, ७०… गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले. सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती. पण… वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता! तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे! अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

In reply to by भाते

अभ्या.. 12/05/2016 - 13:59
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात
ये क्या सुन रहा हूं मै? मुविकाका, यू टू. एनीवे. लै लै शुभेच्छा. मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 12/05/2016 - 14:16
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

सुबोध खरे 12/05/2016 - 19:41
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/05/2016 - 21:06
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

जेपी 12/05/2016 - 21:36
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

नेत्रेश 14/05/2016 - 03:02
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

In reply to by यशोधरा

नाखु 17/05/2016 - 08:36
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई

एस 11/05/2016 - 14:38
तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-) बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 11/05/2016 - 16:05
श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता.. मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे. खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो. अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे 11/05/2016 - 16:28
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही. त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

In reply to by सूड

मन१ 11/05/2016 - 18:14
मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :) साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे. दीड तास ??? मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

In reply to by मन१

आदूबाळ 11/05/2016 - 18:20
+२ दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode 11/05/2016 - 19:38
फळं खात नाहीत ? फलाहार कमी पडतोय. बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

In reply to by सतिश गावडे

माझ्याकडून दूढ उतू गेले. बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.) असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये. आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. कधीही जेवायला या. @ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही. @ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका." ओके. @ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा. @ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का? @ बोका-ए-आझम ===> २२ मे २०१६ जमेल का? @ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे. @ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा." माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो. @ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले. पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे. "आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा." ओके.प्रयत्न करतो. @ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता. @ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा. बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली. @ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले. ===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा." गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही. त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल. फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

mugdhagode 12/05/2016 - 08:11
शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ? नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो. तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

रेवती 12/05/2016 - 01:29
बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता. होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;) पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते. बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

In reply to by रेवती

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते." अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले. असो, स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

In reply to by मुक्त विहारि

स्रुजा 12/05/2016 - 08:15
पुरावा नाहिसा केला आहे :) बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__ असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 13/05/2016 - 21:40
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे. a

In reply to by मुक्त विहारि

आनंदी गोपाळ 15/05/2016 - 16:17
किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे. दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

पैसा 12/05/2016 - 09:54
झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण. डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

चित्रगुप्त 12/05/2016 - 11:18
यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो: १. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे २. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे: ..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय. ३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम. ४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम. ५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम. ६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात. ७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील. ८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

In reply to by चित्रगुप्त

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते 12/05/2016 - 11:35
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर. बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली. ६६, ६८, ७०… गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले. सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती. पण… वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता! तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे! अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

In reply to by भाते

अभ्या.. 12/05/2016 - 13:59
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात
ये क्या सुन रहा हूं मै? मुविकाका, यू टू. एनीवे. लै लै शुभेच्छा. मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 12/05/2016 - 14:16
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

सुबोध खरे 12/05/2016 - 19:41
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/05/2016 - 21:06
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

जेपी 12/05/2016 - 21:36
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

नेत्रेश 14/05/2016 - 03:02
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

In reply to by यशोधरा

नाखु 17/05/2016 - 08:36
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एख