मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ - मत म्हणजे मत म्हणजे मत असते

नीलकंठ देशमुख ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

चौथा कोनाडा 31/10/2024 - 17:54
समर्पक रचना ... आवडली असं कसं म्हणाव ? रचना .. पण... पण लैच आदर्शवादी झालीय !
कुण्या ऐऱ्यागैऱ्याची मालमत्ता नसते. प्रत्येक मताची एक किं'मत'असते. उगाच वाटायची ती खिरापत नसते. ते बदलायची कुणाची हिंमत नसते.
नेते आणी गुंड याची दहशत असेल तर मत ही त्यांचीच मालमत्ता असते. या विरुद्ध बंड केले तर अन्नाला महाग झाल्याची उदाहरणे दिसुन येतात !
भोगण्या त्यांनी सत्ता, होण्या पद लाभांकित, भरण्या खिसे आणि बांधण्या घरे अगणित, त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अखंडित, त्यांनी 'उडवावी आश्वासनकारंजी, स्वप्नरंजित! पोकळ आश्वासनाने व्हावे आपण आनंदित, तृप्त होउन, त्या कोरड्या, मामुली सवलतीत झोकून द्यावे अलगद याच्या त्याच्या झोळीत.
.. पण दुर्दैवाने हेच सगळीकडं चाललंय ! घोडेबाजार कायमच तेजीत असलेला स्पष्ट दिसतो
निष्ठा ज्यांची विष्ठेवरल्या माशी जैशी, स्पर्धा ज्यांची रंग बदलत्या सरड्यांशी! मांदियाळी अशा स्वार्थी भोंदू दलबदलू नेत्यांची. भुलविती जे देऊन रंगीत चविष्ट गोळी जात-धर्माची.
या बद्दल काय लिहिणार ? सगळी बजबजपुरी माजलीय ! महाराष्ट्रातील घोडा मैदान जवळच आहे .. पाहू काय होते ते !

पाषाणभेद 31/10/2024 - 19:33
आपल्याकडच्या निवडणूकांची पद्धत बदलायला हवी. जिंकणारा उमेदवार अन ज्याला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली आहे त्यांच्यात साधारण ४०% अंतर असले पाहिजे असला नियम हवा. तसेच समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा.

In reply to by पाषाणभेद

विवेकपटाईत 04/11/2024 - 11:52
या घटकेला आपली पद्धत सर्वश्रेष्ठ आहे. या पद्धतीत एक हाती सत्ता मिळते. निर्णय घेता येतात. गठबंधन सरकारात निर्णय घेता येत नाही आणि भ्रष्टाचार ही रोखता येत नाही. या शिवाय समाजाच्या सर्व घटकांना सत्तेत भागीदारी मिळते. उदाहरण, उत्तर परदेशात यादव आणि दलित दोन्ही समाजाचे मुख्यमंत्री बनले. हरियाणात जाट, विश्नोई, पंजाबी शरणार्थी, सैनी समाजाचे व्यक्ति मुख्यमंत्री बनले. राजस्थान सारख्या राज्यात ब्राम्हण मुख्यमंत्री बनू शकतो. बाकी गेल्या दहा वर्षांत एका ही निर्दोष व्यक्तीवर ईडीची धाड पडलेली नाही. किमान ईडीला बिना प्रमाण खोटे आरोप कोर्टात दाखील करता येत नाही. गेल्या दहा वर्षांत ईडी आणि आयकर विभागाने त्याधील दहावर्षांत जेवढा पैसा जब्त केल्या होत्या त्यापेक्षा 25 पट जास्त या दहावर्षांत केला आहे.

चौकस२१२ 01/11/2024 - 05:00
समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा. बरोबर आहे हे होऊच नये जर निवडलेले लोकप्रतिनिधी काम करतील तर .. आणि हो हे सर्व पक्षाच्या लोकांना लागू होते पण हे हि बरोबर नाही कि दरवेळी या संस्था "स्वत्रंत्र " नाहीत असे धरूनच चालणे हा रोग दशकांपासून चालू आहे , आणीबाणीत आणि मोदी काळात थोडी शिस्त आली तेवढीच ( आता त्यावर रणकंदन नको ) दोन्ही काळात काहीतरी चांगले घडले असावे कारण काही तरी वाचक पण मूलभूत हक्कांची पायमल्ली वगैरे... त्यावर रणकंदन वेगळे करू पुढल्या दिवाळी अंकात

Bhakti 06/11/2024 - 09:16
दान' ते श्रद्धेने द्यावे साऱ्यांच्या कल्याणासाठी, हे कधी म्हणजे कधीच विसरायचे नसते.
+१ ज्या वेळेस १००% गेला बाजार ९०% टक्के तरी मतदान होईल तो सुदिन आहे.४०-४५% काय मतदान असतं का नुसती हक्कांसाठी लोकशाही,कर्तव्याचे काय?

चौथा कोनाडा 31/10/2024 - 17:54
समर्पक रचना ... आवडली असं कसं म्हणाव ? रचना .. पण... पण लैच आदर्शवादी झालीय !
कुण्या ऐऱ्यागैऱ्याची मालमत्ता नसते. प्रत्येक मताची एक किं'मत'असते. उगाच वाटायची ती खिरापत नसते. ते बदलायची कुणाची हिंमत नसते.
नेते आणी गुंड याची दहशत असेल तर मत ही त्यांचीच मालमत्ता असते. या विरुद्ध बंड केले तर अन्नाला महाग झाल्याची उदाहरणे दिसुन येतात !
भोगण्या त्यांनी सत्ता, होण्या पद लाभांकित, भरण्या खिसे आणि बांधण्या घरे अगणित, त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अखंडित, त्यांनी 'उडवावी आश्वासनकारंजी, स्वप्नरंजित! पोकळ आश्वासनाने व्हावे आपण आनंदित, तृप्त होउन, त्या कोरड्या, मामुली सवलतीत झोकून द्यावे अलगद याच्या त्याच्या झोळीत.
.. पण दुर्दैवाने हेच सगळीकडं चाललंय ! घोडेबाजार कायमच तेजीत असलेला स्पष्ट दिसतो
निष्ठा ज्यांची विष्ठेवरल्या माशी जैशी, स्पर्धा ज्यांची रंग बदलत्या सरड्यांशी! मांदियाळी अशा स्वार्थी भोंदू दलबदलू नेत्यांची. भुलविती जे देऊन रंगीत चविष्ट गोळी जात-धर्माची.
या बद्दल काय लिहिणार ? सगळी बजबजपुरी माजलीय ! महाराष्ट्रातील घोडा मैदान जवळच आहे .. पाहू काय होते ते !

पाषाणभेद 31/10/2024 - 19:33
आपल्याकडच्या निवडणूकांची पद्धत बदलायला हवी. जिंकणारा उमेदवार अन ज्याला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली आहे त्यांच्यात साधारण ४०% अंतर असले पाहिजे असला नियम हवा. तसेच समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा.

In reply to by पाषाणभेद

विवेकपटाईत 04/11/2024 - 11:52
या घटकेला आपली पद्धत सर्वश्रेष्ठ आहे. या पद्धतीत एक हाती सत्ता मिळते. निर्णय घेता येतात. गठबंधन सरकारात निर्णय घेता येत नाही आणि भ्रष्टाचार ही रोखता येत नाही. या शिवाय समाजाच्या सर्व घटकांना सत्तेत भागीदारी मिळते. उदाहरण, उत्तर परदेशात यादव आणि दलित दोन्ही समाजाचे मुख्यमंत्री बनले. हरियाणात जाट, विश्नोई, पंजाबी शरणार्थी, सैनी समाजाचे व्यक्ति मुख्यमंत्री बनले. राजस्थान सारख्या राज्यात ब्राम्हण मुख्यमंत्री बनू शकतो. बाकी गेल्या दहा वर्षांत एका ही निर्दोष व्यक्तीवर ईडीची धाड पडलेली नाही. किमान ईडीला बिना प्रमाण खोटे आरोप कोर्टात दाखील करता येत नाही. गेल्या दहा वर्षांत ईडी आणि आयकर विभागाने त्याधील दहावर्षांत जेवढा पैसा जब्त केल्या होत्या त्यापेक्षा 25 पट जास्त या दहावर्षांत केला आहे.

चौकस२१२ 01/11/2024 - 05:00
समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा. बरोबर आहे हे होऊच नये जर निवडलेले लोकप्रतिनिधी काम करतील तर .. आणि हो हे सर्व पक्षाच्या लोकांना लागू होते पण हे हि बरोबर नाही कि दरवेळी या संस्था "स्वत्रंत्र " नाहीत असे धरूनच चालणे हा रोग दशकांपासून चालू आहे , आणीबाणीत आणि मोदी काळात थोडी शिस्त आली तेवढीच ( आता त्यावर रणकंदन नको ) दोन्ही काळात काहीतरी चांगले घडले असावे कारण काही तरी वाचक पण मूलभूत हक्कांची पायमल्ली वगैरे... त्यावर रणकंदन वेगळे करू पुढल्या दिवाळी अंकात

Bhakti 06/11/2024 - 09:16
दान' ते श्रद्धेने द्यावे साऱ्यांच्या कल्याणासाठी, हे कधी म्हणजे कधीच विसरायचे नसते.
+१ ज्या वेळेस १००% गेला बाजार ९०% टक्के तरी मतदान होईल तो सुदिन आहे.४०-४५% काय मतदान असतं का नुसती हक्कांसाठी लोकशाही,कर्तव्याचे काय?

दिवाळी अंक २०२४ - आरोग्यं धनसंपवा!

आजी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

वामन देशमुख 31/10/2024 - 17:58
आरोग्यं धन संपवा!
हे कॅप्शन आवडले! बाकी, तुमच्या लेखातील खुसखुशीतपणा अजून किमान २५ वर्षे वाहत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!

चौथा कोनाडा 02/11/2024 - 16:56
वा.. मस्त... खुसखुशीत... आणि अतिशय ओघावते ही... काही पॅंचेस खासच मजा आली वाचायला तुमच्या समवेत सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटलची भ्रमंती... अशाच फिट रहा आजी बै आन आम्हाला तुमचं असं सुंदर लेखन अनुभवयला द्या.

Bhakti 06/11/2024 - 09:11
अगदी आरोग्य धन संपवा स्थिती तर आहेच.
डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक बाॅंड हवाच. डॉक्टरांनी आपलं नुसतं ऐकून घेतलं एवढ्यानेच पेशंटचं निम्मं दुखणं बरं होतं. असिस्टंट्सनी तयार केलेले रिपोर्ट्स बघून, त्यावरून औषधं लिहून देऊन पेशंटकडे वळूनही न बघता, त्याच्याशी न बोलता निघून जाणाऱ्या डॉक्टरांशी पेशंट रिलेटच होऊ शकत नाही."
त्यासाठीच फॅमिली डॉक्टर, ओळखीचे डॉक्टर पाहिजेत.

सविता००१ 07/11/2024 - 21:51
किती खुसखुशीत आणि सुंदर लिहिलात तुम्ही.. खूदूखुदू पासून हाहाहा पर्यन्त हसून प्रसन्न झाले मी. काळजी घ्या तब्येतीची आणि अशाच हसवा आम्हाला. फार आवडलाय लेख

वाह आजी. लेखन नेहमीप्रमाणेच खुसखुशीत. 'आरोग्यधन संपवा' हे लेखन संपवेपर्यंत लक्षात आलंच नव्हतं. आता आरोग्यासाठी इतक्या चाचण्या आणि इतके डॉक्टर तरीही योग्य निदान कोणता करेल याची खातरी नाही. आजी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

वामन देशमुख 31/10/2024 - 17:58
आरोग्यं धन संपवा!
हे कॅप्शन आवडले! बाकी, तुमच्या लेखातील खुसखुशीतपणा अजून किमान २५ वर्षे वाहत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!

चौथा कोनाडा 02/11/2024 - 16:56
वा.. मस्त... खुसखुशीत... आणि अतिशय ओघावते ही... काही पॅंचेस खासच मजा आली वाचायला तुमच्या समवेत सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटलची भ्रमंती... अशाच फिट रहा आजी बै आन आम्हाला तुमचं असं सुंदर लेखन अनुभवयला द्या.

Bhakti 06/11/2024 - 09:11
अगदी आरोग्य धन संपवा स्थिती तर आहेच.
डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक बाॅंड हवाच. डॉक्टरांनी आपलं नुसतं ऐकून घेतलं एवढ्यानेच पेशंटचं निम्मं दुखणं बरं होतं. असिस्टंट्सनी तयार केलेले रिपोर्ट्स बघून, त्यावरून औषधं लिहून देऊन पेशंटकडे वळूनही न बघता, त्याच्याशी न बोलता निघून जाणाऱ्या डॉक्टरांशी पेशंट रिलेटच होऊ शकत नाही."
त्यासाठीच फॅमिली डॉक्टर, ओळखीचे डॉक्टर पाहिजेत.

सविता००१ 07/11/2024 - 21:51
किती खुसखुशीत आणि सुंदर लिहिलात तुम्ही.. खूदूखुदू पासून हाहाहा पर्यन्त हसून प्रसन्न झाले मी. काळजी घ्या तब्येतीची आणि अशाच हसवा आम्हाला. फार आवडलाय लेख

वाह आजी. लेखन नेहमीप्रमाणेच खुसखुशीत. 'आरोग्यधन संपवा' हे लेखन संपवेपर्यंत लक्षात आलंच नव्हतं. आता आरोग्यासाठी इतक्या चाचण्या आणि इतके डॉक्टर तरीही योग्य निदान कोणता करेल याची खातरी नाही. आजी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

दिवाळी अंक २०२४ - स्पेशल लसूण चटणी

सरनौबत ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

किल्लेदार 04/11/2024 - 04:02
आंबेमोहोर तांदळाचा गुरगुट्या भात, चिंचगुळाची आमटी आणि त्याबरोबर लसणाची चटणी हाही प्रकार अफलातून. पण चिंचगुळाच्या आमटीसाठी कसलेले हात हवेत !!!

सरनौबत 04/11/2024 - 12:39
सर्वांचे आभार. @किल्लेदार चिंगू (चिंचगुळाच्या) आमटीसाठी चिंगू नव्हे तर चांगले कसलेले हात हवेत

Bhakti 04/11/2024 - 13:00
पाच दिवस झाले गोड गोड कंटाळा आला ,तेव्हा बाजरीची भाकरी काळा मसाल्यातलंं वांगे केले. फोडलेला नारळ दिसला की माझा नवरा लगेच चटणी करतो,लसणाची आठवण करून द्यावी लागते पण..

चौथा कोनाडा 08/11/2024 - 22:26
तों पा सू चटणी पाकृ .. फोटो लै चिकणे.. चटणी डायरेक तोंडात टाकावी असं वाटतयला लावणारे. ... कांदा चटणी भाकर आपलं आवडतं खाद्य.. मजा येईल.. मस्तच.. धन्यवाद.

किल्लेदार 04/11/2024 - 04:02
आंबेमोहोर तांदळाचा गुरगुट्या भात, चिंचगुळाची आमटी आणि त्याबरोबर लसणाची चटणी हाही प्रकार अफलातून. पण चिंचगुळाच्या आमटीसाठी कसलेले हात हवेत !!!

सरनौबत 04/11/2024 - 12:39
सर्वांचे आभार. @किल्लेदार चिंगू (चिंचगुळाच्या) आमटीसाठी चिंगू नव्हे तर चांगले कसलेले हात हवेत

Bhakti 04/11/2024 - 13:00
पाच दिवस झाले गोड गोड कंटाळा आला ,तेव्हा बाजरीची भाकरी काळा मसाल्यातलंं वांगे केले. फोडलेला नारळ दिसला की माझा नवरा लगेच चटणी करतो,लसणाची आठवण करून द्यावी लागते पण..

चौथा कोनाडा 08/11/2024 - 22:26
तों पा सू चटणी पाकृ .. फोटो लै चिकणे.. चटणी डायरेक तोंडात टाकावी असं वाटतयला लावणारे. ... कांदा चटणी भाकर आपलं आवडतं खाद्य.. मजा येईल.. मस्तच.. धन्यवाद.

दिवाळी अंक २०२४ - आमचं स्टेकेशन

सर्वसाक्षी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

चौकस२१२ 31/10/2024 - 12:52
हे तर चक्क स्टेकेशन!? ओह..... म्हणजे वेगळ्या जागी "रात्र ( किंवा दिव शी ) "गेम खेळता" आले म्हणून जी काय खुमारी आली असेल ती होय? बाकी शहरातील पक्षांबद्दल माहिती चांगली मिळाली

प्रचेतस 04/11/2024 - 07:02
सर्वसाक्षी यांचा लेख म्हणजे प्रश्नच नाही. लेखन, फोटो, व्हिडीओ सर्व काही आवडले. वर्णनही सुंदर. विविध पक्ष्यांचे निरीक्षण करणे अतिशय आनंददायक आणि चैतन्यदायी असते.

Bhakti 04/11/2024 - 13:22
पहिल्या फोटोत तर सगळ्या चिमण्या गुलाबीच वाटल्या :) माझ्या पण बाल्कनीत धान्य ठेवते. चिमण्या,पारवा, भारद्वाज, फुलपाखरू येतात.कर्दळीच्या फुलांसाठी वेगवेगळ्या रंगांचे सूर्यपक्षी येतात.यांचा लळा लागला.यांच्याशिवाय करमत नाही ,हे खरंच आहे ‌

चौथा कोनाडा 13/11/2024 - 20:18
व्वा ... एक नंबर पक्षी स्टे-केशन ! मजा आली प्रचि आणी चलचित्रं पाहताना ! किती भाग्यवान आहात असा शेजार मिळालाय !
हळूहळू घराचं काम संपत आलं होतं. पुन्हा आवराआवर, बांधाबांध. परत घरी जायची ओढ होती, ..... पण चिमण्यांचा दंगा असा पाहायला मिळणार नाही, याची चुटपुट लागून राहिली होती.
कातरवाक्य !

चौकस२१२ 31/10/2024 - 12:52
हे तर चक्क स्टेकेशन!? ओह..... म्हणजे वेगळ्या जागी "रात्र ( किंवा दिव शी ) "गेम खेळता" आले म्हणून जी काय खुमारी आली असेल ती होय? बाकी शहरातील पक्षांबद्दल माहिती चांगली मिळाली

प्रचेतस 04/11/2024 - 07:02
सर्वसाक्षी यांचा लेख म्हणजे प्रश्नच नाही. लेखन, फोटो, व्हिडीओ सर्व काही आवडले. वर्णनही सुंदर. विविध पक्ष्यांचे निरीक्षण करणे अतिशय आनंददायक आणि चैतन्यदायी असते.

Bhakti 04/11/2024 - 13:22
पहिल्या फोटोत तर सगळ्या चिमण्या गुलाबीच वाटल्या :) माझ्या पण बाल्कनीत धान्य ठेवते. चिमण्या,पारवा, भारद्वाज, फुलपाखरू येतात.कर्दळीच्या फुलांसाठी वेगवेगळ्या रंगांचे सूर्यपक्षी येतात.यांचा लळा लागला.यांच्याशिवाय करमत नाही ,हे खरंच आहे ‌

चौथा कोनाडा 13/11/2024 - 20:18
व्वा ... एक नंबर पक्षी स्टे-केशन ! मजा आली प्रचि आणी चलचित्रं पाहताना ! किती भाग्यवान आहात असा शेजार मिळालाय !
हळूहळू घराचं काम संपत आलं होतं. पुन्हा आवराआवर, बांधाबांध. परत घरी जायची ओढ होती, ..... पण चिमण्यांचा दंगा असा पाहायला मिळणार नाही, याची चुटपुट लागून राहिली होती.
कातरवाक्य !

दिवाळी अंक २०२४ - कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ?

चौथा कोनाडा ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

श्वेता२४ 01/11/2024 - 13:54
तुम्ही असं वर्णन केला आहे की वाचक प्रत्यक्ष तिथे नसला तरी तुमच्या लिखाणाच्या द्वारे तिथेच सर्व काही पाहत आहे . पहिले शाळू मातीचे गोळे पाहून मला असे वाटले की आता यातून कसे काय शिल्प होईल बरे? त्यातही श्री प्रफुल्ल सरांचे शिल्प करणे सोपे नाही. कारण दाढीचा आकार इत्यादी. पण तुम्ही टप्प्याटप्प्याने जी काही फोटो टाकले आहेत ते पाहता आता पुढे काय होईल याची उत्सुकता होती आणि शेवटचा फोटो बघताच बाप रे!! असे वाटले. ते हुबेहुब शिल्प बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू? वा!! मजा आली!!! श्री. चंदू जोशी सरांबद्दल माहित नव्हते .अशा अष्टपैलू कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!

In reply to by श्वेता२४

चौथा कोनाडा 03/11/2024 - 11:41
खुप सुंदर अभिप्राय !
श्री प्रफुल्ल सरांचे शिल्प करणे सोपे नाही. कारण दाढीचा आकार इत्यादी.
अगदी नेमकं हेरलंत ! .. खरोखरच , त्यांनी याचा कसा आदमास घेतला असेल आणि ते कसं उतरवलं असेल याचं मला तेव्हाही नवल वाटलेलं (आणि आताही वाटत आहे) तुमचा हा सुंदर प्रतिसाद त्यांच्या पर्यंंत पोहोचवत आहे ! मन:पुर्वक धन्यवाद, श्वेता२४ !

नठ्यारा 02/11/2024 - 18:04
एकदम शॉल्लेट चौफेर फटकेबाजी आहे. सृजनशील हाताची व त्यामागील माणसाची ओळख करवून दिलेला लेख आवडला. -नाठाळ नठ्या

ऋषितुल्य कलाकार मा. चंदू जोशी यांना मानवंदना देण्यासाठी कितीही शब्द लिहीले तरी कमीच. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कडक मानवंदना.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 06/11/2024 - 20:26
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.
अगदी परफेक्ट मानवंदना.... मनःपुर्वक धन्यवाद, कर्नल साहेब !

बबन ताम्बे 05/11/2024 - 15:24
एका महान कलातपस्वीची सुंदर ओळख. ते नामवंत क्रिकेटपट्टू पण होते हे तुमच्या या लेखामुळेच माहित पडले. तुमची समर्पक वर्णन शैली आणि त्यासोबत अनुरुप छायाचित्रे यामुळे लेखाला चार चांद लागले आहेत. अजुनही माहित नसलेली अशी काही अज्ञात रत्ने तुम्ही तुमच्या सिद्ध हस्त लेखणीने ज्ञात करुन द्याल हि अपेक्षा. गावस्कर, संदीप पाटिल, नाना पाटेकर या नामवंतांबरोबरची चंदु कुलकर्णी यांची छायाचित्रे खासच !! धन्यवाद चौको.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 06/11/2024 - 20:36
कलातपस्वीची सुंदर ओळख.
खरोखरच तपस्वी म्हणायला हवेत ! आज वयाच्या ९२ व्या वर्षी इतक्या कमी वेळेत अशी कलाकृती साकार करतात केवढी तपस्या असेल त्यांची ! स्वतः कोविड साथीत बालंबाल बचावले, पत्नीने कोविड साथीनंतर त्या दीड-दोन वर्षांतच जगाचा निरोप घेतला ... तरी ही प्रतिकुल परिस्थितीतून उभारी घेत पुन्हा कला-व्यासंग सुरु केला... काय म्हणावे या उभारीला ? ..शब्दच नाहीत ... ...... हे सगळं .. हरुन सुद्धा परत मैदानात उतरुन जिंकायची जिद्द धरायची हे कदाचित दिर्घ काळ क्रिकेट खेळल्यामुळेचं साध्य होत असेल ? मनापासून आभार, बबन ताम्बे .. हा समर्पक अभिप्राय दिल्याबद्दल !

टर्मीनेटर 10/11/2024 - 14:08
आज वयाच्या ९२ व्या वर्षी इतक्या कमी वेळेत अशी कलाकृती साकार करतात केवढी तपस्या असेल त्यांची !
🙏 अतिशय सुरेख पद्धतीने ओळख करुन दिली आहे तुम्ही ह्या कलंदर व्यक्तीमत्वाची! लेख खुप आवडला 👍

MipaPremiYogesh 17/11/2024 - 02:26
काय अशक्य प्रकार आहे हा..लेख मस्त जुळून आहे..काय vrushitulya व्यक्तिमत्त्व आहे...अप्रतिम

श्वेता२४ 01/11/2024 - 13:54
तुम्ही असं वर्णन केला आहे की वाचक प्रत्यक्ष तिथे नसला तरी तुमच्या लिखाणाच्या द्वारे तिथेच सर्व काही पाहत आहे . पहिले शाळू मातीचे गोळे पाहून मला असे वाटले की आता यातून कसे काय शिल्प होईल बरे? त्यातही श्री प्रफुल्ल सरांचे शिल्प करणे सोपे नाही. कारण दाढीचा आकार इत्यादी. पण तुम्ही टप्प्याटप्प्याने जी काही फोटो टाकले आहेत ते पाहता आता पुढे काय होईल याची उत्सुकता होती आणि शेवटचा फोटो बघताच बाप रे!! असे वाटले. ते हुबेहुब शिल्प बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू? वा!! मजा आली!!! श्री. चंदू जोशी सरांबद्दल माहित नव्हते .अशा अष्टपैलू कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!

In reply to by श्वेता२४

चौथा कोनाडा 03/11/2024 - 11:41
खुप सुंदर अभिप्राय !
श्री प्रफुल्ल सरांचे शिल्प करणे सोपे नाही. कारण दाढीचा आकार इत्यादी.
अगदी नेमकं हेरलंत ! .. खरोखरच , त्यांनी याचा कसा आदमास घेतला असेल आणि ते कसं उतरवलं असेल याचं मला तेव्हाही नवल वाटलेलं (आणि आताही वाटत आहे) तुमचा हा सुंदर प्रतिसाद त्यांच्या पर्यंंत पोहोचवत आहे ! मन:पुर्वक धन्यवाद, श्वेता२४ !

नठ्यारा 02/11/2024 - 18:04
एकदम शॉल्लेट चौफेर फटकेबाजी आहे. सृजनशील हाताची व त्यामागील माणसाची ओळख करवून दिलेला लेख आवडला. -नाठाळ नठ्या

ऋषितुल्य कलाकार मा. चंदू जोशी यांना मानवंदना देण्यासाठी कितीही शब्द लिहीले तरी कमीच. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कडक मानवंदना.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 06/11/2024 - 20:26
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.
अगदी परफेक्ट मानवंदना.... मनःपुर्वक धन्यवाद, कर्नल साहेब !

बबन ताम्बे 05/11/2024 - 15:24
एका महान कलातपस्वीची सुंदर ओळख. ते नामवंत क्रिकेटपट्टू पण होते हे तुमच्या या लेखामुळेच माहित पडले. तुमची समर्पक वर्णन शैली आणि त्यासोबत अनुरुप छायाचित्रे यामुळे लेखाला चार चांद लागले आहेत. अजुनही माहित नसलेली अशी काही अज्ञात रत्ने तुम्ही तुमच्या सिद्ध हस्त लेखणीने ज्ञात करुन द्याल हि अपेक्षा. गावस्कर, संदीप पाटिल, नाना पाटेकर या नामवंतांबरोबरची चंदु कुलकर्णी यांची छायाचित्रे खासच !! धन्यवाद चौको.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 06/11/2024 - 20:36
कलातपस्वीची सुंदर ओळख.
खरोखरच तपस्वी म्हणायला हवेत ! आज वयाच्या ९२ व्या वर्षी इतक्या कमी वेळेत अशी कलाकृती साकार करतात केवढी तपस्या असेल त्यांची ! स्वतः कोविड साथीत बालंबाल बचावले, पत्नीने कोविड साथीनंतर त्या दीड-दोन वर्षांतच जगाचा निरोप घेतला ... तरी ही प्रतिकुल परिस्थितीतून उभारी घेत पुन्हा कला-व्यासंग सुरु केला... काय म्हणावे या उभारीला ? ..शब्दच नाहीत ... ...... हे सगळं .. हरुन सुद्धा परत मैदानात उतरुन जिंकायची जिद्द धरायची हे कदाचित दिर्घ काळ क्रिकेट खेळल्यामुळेचं साध्य होत असेल ? मनापासून आभार, बबन ताम्बे .. हा समर्पक अभिप्राय दिल्याबद्दल !

टर्मीनेटर 10/11/2024 - 14:08
आज वयाच्या ९२ व्या वर्षी इतक्या कमी वेळेत अशी कलाकृती साकार करतात केवढी तपस्या असेल त्यांची !
🙏 अतिशय सुरेख पद्धतीने ओळख करुन दिली आहे तुम्ही ह्या कलंदर व्यक्तीमत्वाची! लेख खुप आवडला 👍

MipaPremiYogesh 17/11/2024 - 02:26
काय अशक्य प्रकार आहे हा..लेख मस्त जुळून आहे..काय vrushitulya व्यक्तिमत्त्व आहे...अप्रतिम

दिवाळी अंक २०२४ - गण्याची धामीण

दुर्गविहारी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

शशिकांत ओक 01/11/2024 - 01:16
गण्याने चवताळलेली वळवळणारी धामीण पटकन सॅकमधे टाकली... रंगतदार ग्रामीण भागाचे दर्शन करवणारी कथा आवडली. बालपणी ‍वडिलांच्या खांद्यावर बसून शिराळ्यात साप गळ्यात घालून घेतला होता,,,

सतरा,आठरा एकोणीस मधे असचं असतयं. कुठं काय दाखवायचं ते कळतच नाही.नाही त्या ठिकाणी नाही ते दाखवलं जातं आणी असा घोळ होतो. आमचा पण असाच काहीसा घोळ झाला अन धामणं हातातून निसटली. कथे मुळे आठवण झाली. कुठं असलं बरं ,आता ठावं नाय. कथा आवडली.

गवि 01/11/2024 - 10:19
दैव देते आणि कर्म नेते. विनाशकाले विपरीत बुद्धी गीदड की जब मौत आती है तब.. अति शहाणा त्याचा.. इतरही अनेक म्हणी लागू होतील. कथा भारी. वाक्यरचना तर क्या केहने.. !!

चौथा कोनाडा 25/12/2024 - 12:59
खतरी रंगवलीय कथा ! मस्त, आवडली.. PinkLOVE गुलाबी तडका पण झकास दिलाय ! लिहित रहा ... यात पुढील भागचा स्कोप दिसतोय : उदा: असंच एक दिड वर्षे गेली .. गण्याला स्नेहाची जाम आठवण येत रहायची. आक्का नं दोन चार पोरी दाखवल्या .. पण गण्याचं मन स्नेहातच अडकलं होतं ..... त्याला कळून चुकलं होतंं की "धामण सरप्राइझ. प्रपोझ" हा टोट्ल बावळटपणा झाला.... प्रौढ शिक्षण वर्गाला आता सुप्रिया ताई खुळे शिक्षिका म्हणून आल्या होत्या. मध्यमवयीन मायाळू .. विद्यार्थ्यांना जीव लावणार्‍या .. त्यांना कळलं गण्यानं शाळा सोडलीय.. त्या गण्याच्या घरी गेल्या अन त्याची समजुत काढली .. अन गण्या परत शाळेत जाऊण सिन्सिअरपणे शिकायला लागला .... जीव तोडून अभ्यास केला अन इंगलिश फुल्ल आत्मसात केली... गण्या आता व्हीलॉगर झाला होता .. आजूबाजूचा निसर्ग , प्राणी, पक्षी किटक यावर व्हिडिओ बनवु लगला ... मोठा रीलस्टार झाला ... ... अन एक दिवस अचानक त्याला स्नेहा भेटली ...कुठं भेटली ? कशी भेटली ? कधी भेटली ? दोघांचं प्रेम परत जुळलं का ? जाणुन घेण्यासाठी वाचा : मिपा दिवाळी अंक २०२५ ????

शशिकांत ओक 01/11/2024 - 01:16
गण्याने चवताळलेली वळवळणारी धामीण पटकन सॅकमधे टाकली... रंगतदार ग्रामीण भागाचे दर्शन करवणारी कथा आवडली. बालपणी ‍वडिलांच्या खांद्यावर बसून शिराळ्यात साप गळ्यात घालून घेतला होता,,,

सतरा,आठरा एकोणीस मधे असचं असतयं. कुठं काय दाखवायचं ते कळतच नाही.नाही त्या ठिकाणी नाही ते दाखवलं जातं आणी असा घोळ होतो. आमचा पण असाच काहीसा घोळ झाला अन धामणं हातातून निसटली. कथे मुळे आठवण झाली. कुठं असलं बरं ,आता ठावं नाय. कथा आवडली.

गवि 01/11/2024 - 10:19
दैव देते आणि कर्म नेते. विनाशकाले विपरीत बुद्धी गीदड की जब मौत आती है तब.. अति शहाणा त्याचा.. इतरही अनेक म्हणी लागू होतील. कथा भारी. वाक्यरचना तर क्या केहने.. !!

चौथा कोनाडा 25/12/2024 - 12:59
खतरी रंगवलीय कथा ! मस्त, आवडली.. PinkLOVE गुलाबी तडका पण झकास दिलाय ! लिहित रहा ... यात पुढील भागचा स्कोप दिसतोय : उदा: असंच एक दिड वर्षे गेली .. गण्याला स्नेहाची जाम आठवण येत रहायची. आक्का नं दोन चार पोरी दाखवल्या .. पण गण्याचं मन स्नेहातच अडकलं होतं ..... त्याला कळून चुकलं होतंं की "धामण सरप्राइझ. प्रपोझ" हा टोट्ल बावळटपणा झाला.... प्रौढ शिक्षण वर्गाला आता सुप्रिया ताई खुळे शिक्षिका म्हणून आल्या होत्या. मध्यमवयीन मायाळू .. विद्यार्थ्यांना जीव लावणार्‍या .. त्यांना कळलं गण्यानं शाळा सोडलीय.. त्या गण्याच्या घरी गेल्या अन त्याची समजुत काढली .. अन गण्या परत शाळेत जाऊण सिन्सिअरपणे शिकायला लागला .... जीव तोडून अभ्यास केला अन इंगलिश फुल्ल आत्मसात केली... गण्या आता व्हीलॉगर झाला होता .. आजूबाजूचा निसर्ग , प्राणी, पक्षी किटक यावर व्हिडिओ बनवु लगला ... मोठा रीलस्टार झाला ... ... अन एक दिवस अचानक त्याला स्नेहा भेटली ...कुठं भेटली ? कशी भेटली ? कधी भेटली ? दोघांचं प्रेम परत जुळलं का ? जाणुन घेण्यासाठी वाचा : मिपा दिवाळी अंक २०२५ ????

दिवाळी अंक २०२४ - दिपवाळीचे दिवशी..

श्वेता२४ ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

कमलताईं आजच्या मावळत्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. थोड्याफार प्रमाणात सर्वांची अशी अवस्था. तरूण पिढीची ओढाताण. वृद्धपकाळाचे आपले गाणे कुणी रडगाणे म्हणतील. कोणाचाच दोष नाही. एकट्याने जगता यायला हवे. संदर व्यथा मांडली आहे. धन्यवाद.

गवि 02/11/2024 - 15:13
सुंदर कथा आहे. अनेक वृद्ध लोक यात स्वतःला पाहू शकतील. शिवाय कधी काळी भेट दिलेली वाडी, तिथली नदी, घाट हे सर्व डोळ्यासमोर येऊन छान वाटले. अगदी पेढ्याची चव जिभेवर आली. धन्यवाद.

In reply to by गवि

श्वेता२४ 02/11/2024 - 19:59
तुमचं म्हणणं खरं आहे. ज्या लोकांनी नरसोबावाडी पाहिली आहे,तिथला अनुभव घेतला आहे, त्यांना यातील संदर्भ अधिक ठळकपणे जाणवतील.. विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...

शेखरमोघे 02/11/2024 - 20:54
वाडीतल्या एका दिवसाचे छान वर्णन! आवडले!! "शाश्वत अशी कोणतीच गोष्ट या संसारात नाही" हे पटण्यासाठी आयुष्यात बरेच अनुभव मिळावे लागतात, एरवी ते भगवद्गीतेतले काहीतरी लाम्बलचक तत्वज्ञानच वाटते.

श्वेता२४ 03/11/2024 - 15:11
"शाश्वत अशी कोणतीच गोष्ट या संसारात नाही" हे पटण्यासाठी आयुष्यात बरेच अनुभव मिळावे लागतात, 100% खरं आहे... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

सस्नेह 03/11/2024 - 21:40
साधीसरळ , निर्मळ श्रद्धायुक्त कथा. नीटनेटकी मांडली आहे. आवडली. वाडीला महिना दोन महिन्यातून एकदा जाणे होते. उजळ वाटते. पण अशी सखोल श्रद्धा नाही मजकडे. _/\_

Bhakti 04/11/2024 - 13:42
भक्तीभावाने ओतप्रोत अशी मार्मिक कथा आहे.वार्ध्यकाची करुण किनारही आहे पण त्यातही मार्ग दाखवत गेला हे छान लिहिले आहे. पण एक सांगू का..‌.तो 'देऊळबंद' सिनेमा आठवला!त्याची अशीच कथा आहे होती.

श्वेता२४ 04/11/2024 - 14:06
देऊळबंद सिनेमा पाहिलेला नाही. पण तुम्ही म्हणताय तर नक्की पाहीन. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सविता००१ 07/11/2024 - 21:13
नरसोबाची वाडी अगदी आवडती आहे म्हणून सगळेच संदर्भ कळले, पटले. वृद्धत्त्वात मनाची स्थिती किती हळवी होते ते चित्रण फार सुंदर केलं आहे

श्वेता२४ 09/11/2024 - 12:25
कुटुंबातल्या दत्तोपासक मंडळींनाही वाचायला दिली होती, त्यांनाही कथा आवडली आहे! व्वा!! हे वाचून मला खरंच खूप आनंद झाला. आपले खूप खूप आभार!!

चौथा कोनाडा 12/01/2025 - 14:05
अप्रतिम सुंदर कथा ! redHRT नरसोबच्या वाडीची बोट धरुन फिरवत गुंतवून ठेवणारी कथा .. ओघवत्या शैलीमुळे कमलताईंसारखंच कृतज्ञत व्ह्यायला झालं ! लिहित रहा श्वेता२४ !

कमलताईं आजच्या मावळत्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. थोड्याफार प्रमाणात सर्वांची अशी अवस्था. तरूण पिढीची ओढाताण. वृद्धपकाळाचे आपले गाणे कुणी रडगाणे म्हणतील. कोणाचाच दोष नाही. एकट्याने जगता यायला हवे. संदर व्यथा मांडली आहे. धन्यवाद.

गवि 02/11/2024 - 15:13
सुंदर कथा आहे. अनेक वृद्ध लोक यात स्वतःला पाहू शकतील. शिवाय कधी काळी भेट दिलेली वाडी, तिथली नदी, घाट हे सर्व डोळ्यासमोर येऊन छान वाटले. अगदी पेढ्याची चव जिभेवर आली. धन्यवाद.

In reply to by गवि

श्वेता२४ 02/11/2024 - 19:59
तुमचं म्हणणं खरं आहे. ज्या लोकांनी नरसोबावाडी पाहिली आहे,तिथला अनुभव घेतला आहे, त्यांना यातील संदर्भ अधिक ठळकपणे जाणवतील.. विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...

शेखरमोघे 02/11/2024 - 20:54
वाडीतल्या एका दिवसाचे छान वर्णन! आवडले!! "शाश्वत अशी कोणतीच गोष्ट या संसारात नाही" हे पटण्यासाठी आयुष्यात बरेच अनुभव मिळावे लागतात, एरवी ते भगवद्गीतेतले काहीतरी लाम्बलचक तत्वज्ञानच वाटते.

श्वेता२४ 03/11/2024 - 15:11
"शाश्वत अशी कोणतीच गोष्ट या संसारात नाही" हे पटण्यासाठी आयुष्यात बरेच अनुभव मिळावे लागतात, 100% खरं आहे... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

सस्नेह 03/11/2024 - 21:40
साधीसरळ , निर्मळ श्रद्धायुक्त कथा. नीटनेटकी मांडली आहे. आवडली. वाडीला महिना दोन महिन्यातून एकदा जाणे होते. उजळ वाटते. पण अशी सखोल श्रद्धा नाही मजकडे. _/\_

Bhakti 04/11/2024 - 13:42
भक्तीभावाने ओतप्रोत अशी मार्मिक कथा आहे.वार्ध्यकाची करुण किनारही आहे पण त्यातही मार्ग दाखवत गेला हे छान लिहिले आहे. पण एक सांगू का..‌.तो 'देऊळबंद' सिनेमा आठवला!त्याची अशीच कथा आहे होती.

श्वेता२४ 04/11/2024 - 14:06
देऊळबंद सिनेमा पाहिलेला नाही. पण तुम्ही म्हणताय तर नक्की पाहीन. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सविता००१ 07/11/2024 - 21:13
नरसोबाची वाडी अगदी आवडती आहे म्हणून सगळेच संदर्भ कळले, पटले. वृद्धत्त्वात मनाची स्थिती किती हळवी होते ते चित्रण फार सुंदर केलं आहे

श्वेता२४ 09/11/2024 - 12:25
कुटुंबातल्या दत्तोपासक मंडळींनाही वाचायला दिली होती, त्यांनाही कथा आवडली आहे! व्वा!! हे वाचून मला खरंच खूप आनंद झाला. आपले खूप खूप आभार!!

चौथा कोनाडा 12/01/2025 - 14:05
अप्रतिम सुंदर कथा ! redHRT नरसोबच्या वाडीची बोट धरुन फिरवत गुंतवून ठेवणारी कथा .. ओघवत्या शैलीमुळे कमलताईंसारखंच कृतज्ञत व्ह्यायला झालं ! लिहित रहा श्वेता२४ !

दिवाळी अंक २०२४ - अभिजात म्हणजे रे काय भाऊ?

शेखरमोघे ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

यात शंकाच नाही. जनमानसात आगोदरच अभिजात आहे. मातृभाषा ही अभिजातच असते. फक्त सरकारी अनुमोदन मिळाले की बरोबर अनुदान मिळते.बाकी सरकारी मोहोर लागली की ती सरकार दरबारी अभिजात झाली.. ग्रंथालये समृद्ध व्हायला हवी,पुस्तक प्रकाशन व्यवसायाचे पुनरूज्जीवन व्हायला हवे,वाचकांना पुस्तके माफक दरात तर लेखकांना योग्यतेनुसार मोबदला मिळायला हवा. छान आढावा घेतला आहे. लेखकाच्या मताशी पुर्ण सहमत.

In reply to by कर्नलतपस्वी

शेखरमोघे 02/11/2024 - 20:12
प्रतिसादाबद्दल आभार. अभिजातपणाचा शिक्का मिळणे हे अभिनन्दनीयच, पण त्याखेरीज आणखीही बरेच काही करणे जरूर आहे, खासकरून भविष्य काळासाठी, हे अधोरेखित करण्याचा उद्देश होता.

In reply to by अथांग आकाश

शेखरमोघे 02/11/2024 - 20:15
प्रतिसादाबद्दल आभार. अभिजातपणाचा शिक्का तर मिळाला पण भविष्य काळासाठी देखील मराठी उपयोगी आणि प्रचलित रहाण्यासाठी आपण सगळ्यानीच प्रयत्न केले पाहिजेत.

श्वेता२४ 02/11/2024 - 23:20
लेखातून अत्यंत योग्य मुद्दा मांडला गेला आहे .तो म्हणजे पाश्चिमात्य ज्ञान हे त्या त्या देशांनी आपल्या भाषेमध्ये लोकांना उपलब्ध करून दिले गेले. नेमकी हीच दूरदृष्टी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आजवर दाखवलेली नाही. महाराष्ट्रामध्ये जे कोणी मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांना अनेक पाश्चिमात्य संदर्भ ग्रंथ भाषांतरित करून घेण्याच्या कामे वापरले गेले पाहिजे. जेणेकरून महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मातृभाषित घेणे शक्य होईल. मी माझा स्वतःचा एक सोपा अनुभव सांगते. ज्यावेळी मी यूपीएससी करत होते त्यावेळी संपूर्ण वर्गामध्ये मराठी भाषेतून यूपीएससी देणारी माझ्यासारखी फक्त दोन विद्यार्थी होते आणि इतर काही विद्यार्थी लाजेने हात सुद्धा वर करत नव्हते.तेथील शिक्षकांनी आम्हाला सांगितले होते की मराठीतून जर यूपीएससी करणार असाल तर चांगल्या दर्जाचे संदर्भ ग्रंथ मराठीतून उपलब्ध नाही. त्यामुळे इंग्रजीत वाचनाची सवय लावा आणि खरंच त्यावेळी याचा पुरेपूर अनुभव आला. की बरेचसे उत्तम साहित्य हे हिंदीमध्ये उपलब्ध असायचे परंतु मराठी मध्ये मात्र उपलब्ध नसायचे .बर जे मराठी मध्ये उत्तम दर्जाचे प्राध्यापक वगैरे मंडळींनी लिहिलेले पुस्तके जी असायची ती इंग्रजी पुस्तकांच्या तोडीची अजिबात नसायची. त्याचवेळी हा मनात विचार आला की ही प्रस्थापित असलेली अनेक पुस्तके आजवर मराठीमध्ये का बरं भाषांतरित झाली नसावीत? त्यामुळे मराठी भाषा ही प्रवाही ठेवायची असेल दीर्घकालीन टिकवून ठेवायची असेल तर त्याचा व्यवहारात जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण जर मातृभाषेतून द्यायचे असेल तर सगळ्या चांगल्या संदर्भ ग्रंथांचे मराठी मध्ये भाषांतर करून घेण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने राबवला पाहिजे. त्यामुळे जे काही मराठीचे शिक्षक, प्राध्यापक असतील त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि मराठी ही भाषा बिनकामाची नसून उपयोजित भाषा आहे हे सर्व जनमानसात रूढ होईल. दुसरे म्हणजे अनेक नवनवीन इंग्रजी शब्द व्यवहारात असतात त्यांच्यासाठी पर्यायी मराठी शब्द शोधून काढले पाहिजेत व ते रुळले पाहिजेत. काही वर्षांपूर्वी भाषा संचलनालयाने कार्यालयामध्ये वापरायचे प्रचलित नवीन इंग्रजी शब्द व त्यासाठी मराठी पर्यायी शब्द सुचवण्यासाठी एक परिपत्रक सर्व विभागांमध्ये फिरवले. त्याला प्रतिसाद देणारी व निरनिराळे पर्यायी मराठी शब्द सुचवणारी मी एकमेव अधिकारी होते. त्यामुळे नवनवीन इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द शोधणे व ते जनमानसात रुढ करणे हे एक मोठे काम आहे. तिसरे म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तेव्हा केवळ आणि केवळ पूर्णतः मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणे व कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर करणे. जेणेकरून ऐकून ऐकून समोरचा माणूस ते मराठी शब्द संवादात वापरायला लागेल. माझे एक निरीक्षण आहे की आपण जाणीवपूर्वक एखादा मराठी शब्द सारखा सारखा म्हणला तर समोरचा माणूस देखील त्याची पुनरावृत्ती करतो. जसे की मी माझ्या कार्यालयांमध्ये कधीही कॉम्प्युटर म्हणत नाही तर संगणक संगणक असे सतत संवादात म्हणत राहते. मग माझे वरिष्ठ व सहकारी देखील कॉम्प्युटर या शब्दावरून संगणक वरती येतात. :D असो. लेखक महोदयांनी अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे व महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबद्दल धन्यवाद!! टीप: मी इंग्रजी भाषेची विरोधक नाही. इंग्रजी व्यवहारात महत्त्वाचे नाही असे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. माझ्या बोलण्यात देखील हल्ली बरेच इंग्रजी शब्द येत असतात. त्यामुळे उगाच कोणी मराठी इंग्रजी , मराठी - हिंदी असा वाद उकरून काढू नये ही नम्र विनंती. मराठीचा व्यवहारात वापर वाढला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे.

शेखरमोघे 03/11/2024 - 08:32
प्रतिसादाबद्दल आभार. मराठीला अभिजात दर्जा मिळल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जो आनन्द व्यक्त केला गेला त्यात पुन्हा "भूतकालातील घटना आणि रचना" यातील स्वारस्य दिसले पण भविष्याची तयारी किन्वा किमान त्याबद्दल विचार वा कष्ट करण्याची तयारी अजिबात दिसली नाही. काही काळापूर्वी मराठीतून अभियान्त्रिकी, वैद्यकशास्त्र इ. इ. मधील उच्च शिक्षण सुरू करण्याची इच्छा जाहीर करताना (फक्त) २०-३० (आता पक्का आकडा लक्षात नाही, पण एकूणच मोजकीच) पुस्तके (क्रमिक? संदर्भ ग्रंथ ?) विद्यार्थ्यान्साठी "तयार" असल्याचे आणि म्हणून आणखी काही फारशी तयारी करण्याची जरूर नसल्याचे सूर होते. भूतकाळातच रमायचे आहे की भविष्याची जरूर ती तयारी करण्याची जिद्द, आस आणि कुवत जोपासायची आहे हेच आधी अनिश्चित असताना जर अभिजातपणाचा पाठपुरावा होत असेल तर तो फक्त आणखी एक बिरुद मिरवण्याचा सोस आहे असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

चौथा कोनाडा 03/11/2024 - 11:32
महत्वाचा प्रश्न आहे. अ ति शय योग्य पद्धतीने मांडले आहे ! जपानमधील १९व्या शतकातिळ Meiji Restoration चा संदर्भ महत्वाचा आहे ! शेवटी शेवटी तर " मराठीला अभिजात भाषेचा दर्जा" ही चळवळ फक्त साहित्यिक आणी ठराविक मंडळींपुरतीच उरली होती ! राजकिय लोकांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बाजी मारली ... आणी आम्ही काही तरी मोठं मिळवलं अशी काही काळ बढाई मिरवली. पुढं काय ........ ? एक ही राजकिय नेता या बद्द्ल बोलायला तयार नाही ... काही योजना मांडल्या ... धन आणलं असं ही कोणी बोलत नाहिय. ते लोक मुग गिळून बसले म्हटल्यावर साहित्यिक आणि मराठी प्रेमी काय बोलणार ? मराठी भाषेला मायबोलीप्रेमी सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी असलेला राजिकिय खरोखरचा "जाणता राजा" मिळालयाशिवाय पुढं काही होइल असं वाटत नाही !

In reply to by चौथा कोनाडा

शेखरमोघे 04/11/2024 - 08:22
प्रतिसादाबद्दल आभार. एका राजकीय पक्षाचे नेते आम्हीच पहिल्यान्दा "मराठीला अभिजात दर्जा मिळवा" हा प्रस्ताव (१० वर्षापूर्वी) मांडल्याची प्रौढी मिरवतो तर दुसरा पक्ष आम्हीच तो दर्जा मिळवला हे सान्गतो. शाबासकी दोघानाही हवी आहे पण "पुढे काय" हे कुणालाच नक्की सान्गता येत नाही किन्वा त्यान्च्याकडे सान्गायला काही नाही.

In reply to by शेखरमोघे

चौथा कोनाडा 05/11/2024 - 17:47
राजकीय पक्षाचे नेते ...
या बाबतीत सर्वच राजकिय पक्षांबाबत भ्रम निरास झाला आहे ! मराठी समाजाचं विस्कळीतपण आणि दिवसेंदिवस सत्ताकेंद्री राज्य स्तरावरचे सामजिक, सांस्कृतिक आणि राजकिय नेतृत्व हे पाहता मायमराठीला नैराश्य आलं तर नवल नाही !

विवेकपटाईत 04/11/2024 - 09:33
जो पर्यन्त भाषा रोजगारशी जोडली जात नाही. अभिजात घोषित करण्याचा काहीही उपयोग नाही. राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे सुरू केले पाहिजे. तरच काही लाभ होईल.

In reply to by विवेकपटाईत

शेखरमोघे 04/11/2024 - 20:48
प्रतिसादाबद्दल आभारी. "जो पर्यन्त भाषा रोजगारशी जोडली जात नाही. अभिजात घोषित करण्याचा काहीही उपयोग नाही. राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे सुरू केले पाहिजे. तरच काही लाभ होईल." कमीत कमी कष्ट घेऊन भाषा रोजगाराशी जोडायची असे ठरवले तर सगळेच सोपे होऊन जाते - सध्या चालू असलेले काहीच न बदलणे आणि सध्यासारखेच सगळे फक्त इन्ग्लिशमध्येच चालू ठेवणे. तसे ठेवणे म्हणजे राज्यकर्त्याना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतो आहोत हे म्हणण्याची सन्धी मिळत नाही आणि म्हणून ते " आपण काहीतरी केले आहे" हे दाखवण्यासाठी धडपडत रहातात. "राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे" सुरू करण्याचे काही कारणाने अगदी पक्के ठरवले तरी त्या करता लागणारी पूर्ण यन्त्रणा - जसे शिक्षक, पाठ्य पुस्तके, मराठीतील सर्वमान्य तान्त्रिक शब्द्/मापदन्ड इ. इ. आणि "मराठी डॉक्टर" हे "मराठी रुग्ण" या जमातीकरता " acceptable" व्हावेत या साठी "जे जे लागेल ते" (म्हणजे काय हे उमगण्याकरता जरूर असलेल्या सगळ्या प्रयत्नान्च्या सकट) - हे सगळे उभे करावे लागेल. म्हणजेच एका सरकारच्या कारकीर्दीत कदाचित न होण्यासारखे काम, म्हणजेच नेहमीच "बोलाचीच कढी, बोलाचाच भात" हे तत्व पाळत रहाणे, असेच चालू राहील. इथे फक्त "QED" म्हणून माझा प्रतिसाद थाम्बवणे उचित, पण कोणी हे प्रमेय "सोदाहरण" आणी "सोपपत्तिक" खोडून काढू शकल्यास आनन्दच वाटेल.

Bhakti 04/11/2024 - 13:11
खुप महत्वाचे प्रश्न मांडले.इंग्रजी मावशीला इतकं प्रेम देताना,माय मराठीची लाज वाटेल, इतक्या टोकापर्यंत अनेक ठिकाणी वातावरण असते. मी सुचवेल, मराठी ग्रंथालय आणि मराठी परिसंवाद जास्तीत जास्त घडावेत. +१
किमान सध्या अनेक मराठी भाषकांना मराठी बोलण्यात वाटत असलेला कमीपणा आणि एकमेकांतसुद्धा मराठीऐवजी मोडक्यातोडक्या का होईना, पण इंग्लिशमध्ये बोलण्याचा अट्टाहास जर सामूहिक प्रयत्नातून कमी झाला, तर मराठी भाषेला नक्कीच बरे दिवस येतील.

In reply to by Bhakti

शेखरमोघे 04/11/2024 - 21:29
प्रतिसादाबद्दल आभार. "मराठी ग्रंथालय आणि मराठी परिसंवाद जास्तीत जास्त घडावेत" हा स्तुत्य विचार. सद्य परिस्थितीचे एक उदाहरण - पुण्यात मी शोधलेल्या "मराठी ग्रन्थालयात" (सकाळ नगरमधील "सकाळ"चे ग्रन्थालय) जी मला, भारत/महाराष्ट्र/मराठी सम्बन्धित विषयान्साठी उपयोगी मराठी पुस्तके मिळाली त्यात असलेल्यापेक्षा जास्त माहिती मला (इन्ग्रजीतून) अन्तर्जालावर मिळत असे. "सकाळ"चे ग्रन्थालय नन्तर बन्द देखील झाले (कारण त्याना पुस्तके साठवणे देणे घेणे यापेक्षा त्या जागेचा जास्त लाभदायक पर्यायी उपयोग करायचा होता, असे ऐकले). त्याहूनही मोठ्या असलेल्या (म्हणजे जास्त विविध पुस्तके असण्याची शक्यता) पुणे विद्यापीठाच्या ग्रन्थालयात मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी नसल्यामुळे मला प्रवेश नाही आणि काही खटाटोपातून ते जमवलेच तर तेथील पुस्तके काय तर्‍हेची असतील ही काहीच कल्पना नसल्यामुळे हा खटाटोप करावा की नाही याबद्दल खात्री नाही. इतर बर्‍याच ग्रन्थालयात बहुतेक बाबा आदमच्या काळातल्या कादम्बर्‍या/अनुवादित मराठी पुस्तकेच असतात आणि त्यात ती देखील "दोन/चार दिवसात वाचा आणि परत करा, नाहीतर दन्ड भरा" अशा तर्‍हेची असतात. पुन्हा माझ्या उपयोगाची/आवडीची माहिती अन्तर्जालावर मिळाली की (जरी इन्ग्रजीत असली तरी माझे अडत नसल्याने) माझे काम होते. वाचक नाहीत म्हणून नवे फारसे काही तयार होत नाही आणि त्यामुळे नवे वाचक आकर्षित होत नाहित, असे हे अभेद्य वर्तुळ. मी इच्छा असूनही कुठल्या मराठी ग्रन्थालयाचा आणि कसा उपयोग करणार?

अकिलिज 04/11/2024 - 15:39
मराठी वाहिन्यांवर थोडीफार बंधने घातली पाहिजेत. आजकालच्या कुठल्याही (सह्याद्री अपवाद) कार्यक्रमात कलाकाराचे कलादर्शन झाल्यावर, ''एक्सलंट परफॉरमन्स'' किंवा ''माईंण्ड ब्लोईंग'' अश्या अभिप्राय सारख्या गोष्टींचा सतत मारा होत असेल तर हळू हळू तेच तोंडवळणी पडत जाते. एका वेळेला तर हे ही मराठीच आहे इथपर्यंत आलेलं आहे. आणि जर ख्यातनाम व्यक्ती जर असे बोलत असेल तर त्यांचा कित्ता गिरवणं आलंच. याला एकेका पायरीने आवर घातला पाहिजे. मध्येच असाच एक तेलुगु कार्यक्रम पाहण्यात आला. तिथेही तेच आहे. ते इतकं ईंग्रजाळलेलं तेलुगु बोलत होते कि तेलुगुचा गंध नसलेल्यालाही सगळे कळत होते.

In reply to by अकिलिज

Bhakti 04/11/2024 - 16:36
अगदी बरोबर.सह्याद्री वाहिनीची कोणताही जुना कार्यक्रम पाहिला की दिवस सुंदर होतोच मन अस्सल मराठी भूतकाळात फेरी मारून येते.

श्रीगणेशा 21/11/2024 - 09:45
आमच्या इथे वसाहत मोठी असल्याने अनेक मराठी कुटुंबे राहतात, साधारण ५० ते १०० असावेत. आमच्या कायप्पा समूहाचं नाव "मराठी कट्टा" ठेवलं आहे. पण बहुतेक सर्व संवाद इंग्रजीतूनच. किंवा फारतर रोमन लिपी वापरून. मोबाईलवर देवनागरी लिपीतील लिखाण एवढं सोपं झालं असताना, स्वतःच्या मातृभाषेत, देवनागरी लिपीत लिहिण्याचा एवढा कंटाळा का असावा?

श्रीगणेशा 21/11/2024 - 09:48
लेख आवडला. निराशावादी वाटेल, पण कटू सत्य हेच आहे की, आपली मातृभाषा रोजगाराशी जोडण्याची संधी आपण कधीच गमावली आहे, असं मला वाटतं.

शेखरमोघे 15/12/2024 - 10:35
प्रतिसादाबद्दल आभार. आपली मातृभाषा रोजगाराशी जोडण्याची संधी मिळण्यासाठी रोजचे सर्व तर्‍हेचे व्यवहार मातृभाषेतून (मराठीतून) होणे गरजेचे आहे. ते तर महाराष्ट्रातही मराठीतून होत नाहीत - जे काही थोडेबहुत होतात त्यासाठी ही इन्ग्रजी किन्वा हिन्दीचा पर्याय असतोच. अशी वस्तुस्थिती असतानाही, ती बदलण्याचा काहीच प्रयत्न न करता राज्यकर्ते वैद्यकीय आणि अभियान्त्रिकी शिक्षण आणि म्हणून त्याच्याशी निगडित व्यवहार मराठी भाषेतून होतील अशी आशा बाळगतात आणि दाखवतात. मराठी भाषेतून शिकलेल्याना महाराष्ट्राबाहेर व्यावसायिक किन्वा इतर कुठल्याच तर्‍हेच्या सन्धी उपलब्ध नसतील ही देखील लक्षात ठेवणे जरूर आहे.

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:14
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा शासकीय अध्यादेश अर्थात जी आर अजूनही संबंधित संस्थांकडे पोहोचला नाही असे आज सांगितले. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व कागदपत्रे केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेली आहेत आणि लोक जी चर्चा करत आहेत तिकडे दुर्लक्ष करावे असे सांगितले आहे. आता काय खरे समजायचे ? अभिजात भाषेचा दर्जा देता देता दहा वर्ष अशीच मोदी सरकारने काढली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाषेचा दर्जा दिला दिल्याची घोषणा केली. आता प्रत्यक्ष जीआर काढायला किती दशकं लावणार ?

In reply to by चौथा कोनाडा

माझ्या दृष्टीने तेच वाक्य... निदान दहा वर्षांत तरी मोदी सरकारने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.१९५० ते २०१४ पर्यंत हे का जमले नाही? ------ आत्ता कुठे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. GR वगैरे सोपस्कार होत राहतील.

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 06/01/2025 - 20:13
निदान दहा वर्षांत तरी मोदी सरकारने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.१९५० ते २०१४ पर्यंत हे का जमले नाही?
संशोधन आणि कागद्पत्रांची पुर्तता करणे सुरू होते. मोदी सरकार ने काम हाती घेतले आणि आशा पल्लवीत झाल्या. सगळी संशोधन आणि कागदपत्रे जमा केली (सं: मधू मंगेश कर्णिक समिती होती तर २-४ वर्षात काम व्हायला हरकत नव्हती !
आत्ता कुठे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. GR वगैरे सोपस्कार होत राहतील.
लवकरात लवकर झाल्यास उत्तम !

In reply to by चौथा कोनाडा

होईल.. मी तरी माझ्या पासुन सुरुवात केली आहे.. विक्रेत्या बरोबर मराठीतच बोलायचे. गरज आपल्याला नसेल तर, मराठीत संभाषण करण्याचा आग्रह धरायचा.

यात शंकाच नाही. जनमानसात आगोदरच अभिजात आहे. मातृभाषा ही अभिजातच असते. फक्त सरकारी अनुमोदन मिळाले की बरोबर अनुदान मिळते.बाकी सरकारी मोहोर लागली की ती सरकार दरबारी अभिजात झाली.. ग्रंथालये समृद्ध व्हायला हवी,पुस्तक प्रकाशन व्यवसायाचे पुनरूज्जीवन व्हायला हवे,वाचकांना पुस्तके माफक दरात तर लेखकांना योग्यतेनुसार मोबदला मिळायला हवा. छान आढावा घेतला आहे. लेखकाच्या मताशी पुर्ण सहमत.

In reply to by कर्नलतपस्वी

शेखरमोघे 02/11/2024 - 20:12
प्रतिसादाबद्दल आभार. अभिजातपणाचा शिक्का मिळणे हे अभिनन्दनीयच, पण त्याखेरीज आणखीही बरेच काही करणे जरूर आहे, खासकरून भविष्य काळासाठी, हे अधोरेखित करण्याचा उद्देश होता.

In reply to by अथांग आकाश

शेखरमोघे 02/11/2024 - 20:15
प्रतिसादाबद्दल आभार. अभिजातपणाचा शिक्का तर मिळाला पण भविष्य काळासाठी देखील मराठी उपयोगी आणि प्रचलित रहाण्यासाठी आपण सगळ्यानीच प्रयत्न केले पाहिजेत.

श्वेता२४ 02/11/2024 - 23:20
लेखातून अत्यंत योग्य मुद्दा मांडला गेला आहे .तो म्हणजे पाश्चिमात्य ज्ञान हे त्या त्या देशांनी आपल्या भाषेमध्ये लोकांना उपलब्ध करून दिले गेले. नेमकी हीच दूरदृष्टी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आजवर दाखवलेली नाही. महाराष्ट्रामध्ये जे कोणी मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांना अनेक पाश्चिमात्य संदर्भ ग्रंथ भाषांतरित करून घेण्याच्या कामे वापरले गेले पाहिजे. जेणेकरून महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मातृभाषित घेणे शक्य होईल. मी माझा स्वतःचा एक सोपा अनुभव सांगते. ज्यावेळी मी यूपीएससी करत होते त्यावेळी संपूर्ण वर्गामध्ये मराठी भाषेतून यूपीएससी देणारी माझ्यासारखी फक्त दोन विद्यार्थी होते आणि इतर काही विद्यार्थी लाजेने हात सुद्धा वर करत नव्हते.तेथील शिक्षकांनी आम्हाला सांगितले होते की मराठीतून जर यूपीएससी करणार असाल तर चांगल्या दर्जाचे संदर्भ ग्रंथ मराठीतून उपलब्ध नाही. त्यामुळे इंग्रजीत वाचनाची सवय लावा आणि खरंच त्यावेळी याचा पुरेपूर अनुभव आला. की बरेचसे उत्तम साहित्य हे हिंदीमध्ये उपलब्ध असायचे परंतु मराठी मध्ये मात्र उपलब्ध नसायचे .बर जे मराठी मध्ये उत्तम दर्जाचे प्राध्यापक वगैरे मंडळींनी लिहिलेले पुस्तके जी असायची ती इंग्रजी पुस्तकांच्या तोडीची अजिबात नसायची. त्याचवेळी हा मनात विचार आला की ही प्रस्थापित असलेली अनेक पुस्तके आजवर मराठीमध्ये का बरं भाषांतरित झाली नसावीत? त्यामुळे मराठी भाषा ही प्रवाही ठेवायची असेल दीर्घकालीन टिकवून ठेवायची असेल तर त्याचा व्यवहारात जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण जर मातृभाषेतून द्यायचे असेल तर सगळ्या चांगल्या संदर्भ ग्रंथांचे मराठी मध्ये भाषांतर करून घेण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने राबवला पाहिजे. त्यामुळे जे काही मराठीचे शिक्षक, प्राध्यापक असतील त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि मराठी ही भाषा बिनकामाची नसून उपयोजित भाषा आहे हे सर्व जनमानसात रूढ होईल. दुसरे म्हणजे अनेक नवनवीन इंग्रजी शब्द व्यवहारात असतात त्यांच्यासाठी पर्यायी मराठी शब्द शोधून काढले पाहिजेत व ते रुळले पाहिजेत. काही वर्षांपूर्वी भाषा संचलनालयाने कार्यालयामध्ये वापरायचे प्रचलित नवीन इंग्रजी शब्द व त्यासाठी मराठी पर्यायी शब्द सुचवण्यासाठी एक परिपत्रक सर्व विभागांमध्ये फिरवले. त्याला प्रतिसाद देणारी व निरनिराळे पर्यायी मराठी शब्द सुचवणारी मी एकमेव अधिकारी होते. त्यामुळे नवनवीन इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द शोधणे व ते जनमानसात रुढ करणे हे एक मोठे काम आहे. तिसरे म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तेव्हा केवळ आणि केवळ पूर्णतः मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणे व कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर करणे. जेणेकरून ऐकून ऐकून समोरचा माणूस ते मराठी शब्द संवादात वापरायला लागेल. माझे एक निरीक्षण आहे की आपण जाणीवपूर्वक एखादा मराठी शब्द सारखा सारखा म्हणला तर समोरचा माणूस देखील त्याची पुनरावृत्ती करतो. जसे की मी माझ्या कार्यालयांमध्ये कधीही कॉम्प्युटर म्हणत नाही तर संगणक संगणक असे सतत संवादात म्हणत राहते. मग माझे वरिष्ठ व सहकारी देखील कॉम्प्युटर या शब्दावरून संगणक वरती येतात. :D असो. लेखक महोदयांनी अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे व महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबद्दल धन्यवाद!! टीप: मी इंग्रजी भाषेची विरोधक नाही. इंग्रजी व्यवहारात महत्त्वाचे नाही असे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. माझ्या बोलण्यात देखील हल्ली बरेच इंग्रजी शब्द येत असतात. त्यामुळे उगाच कोणी मराठी इंग्रजी , मराठी - हिंदी असा वाद उकरून काढू नये ही नम्र विनंती. मराठीचा व्यवहारात वापर वाढला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे.

शेखरमोघे 03/11/2024 - 08:32
प्रतिसादाबद्दल आभार. मराठीला अभिजात दर्जा मिळल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जो आनन्द व्यक्त केला गेला त्यात पुन्हा "भूतकालातील घटना आणि रचना" यातील स्वारस्य दिसले पण भविष्याची तयारी किन्वा किमान त्याबद्दल विचार वा कष्ट करण्याची तयारी अजिबात दिसली नाही. काही काळापूर्वी मराठीतून अभियान्त्रिकी, वैद्यकशास्त्र इ. इ. मधील उच्च शिक्षण सुरू करण्याची इच्छा जाहीर करताना (फक्त) २०-३० (आता पक्का आकडा लक्षात नाही, पण एकूणच मोजकीच) पुस्तके (क्रमिक? संदर्भ ग्रंथ ?) विद्यार्थ्यान्साठी "तयार" असल्याचे आणि म्हणून आणखी काही फारशी तयारी करण्याची जरूर नसल्याचे सूर होते. भूतकाळातच रमायचे आहे की भविष्याची जरूर ती तयारी करण्याची जिद्द, आस आणि कुवत जोपासायची आहे हेच आधी अनिश्चित असताना जर अभिजातपणाचा पाठपुरावा होत असेल तर तो फक्त आणखी एक बिरुद मिरवण्याचा सोस आहे असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

चौथा कोनाडा 03/11/2024 - 11:32
महत्वाचा प्रश्न आहे. अ ति शय योग्य पद्धतीने मांडले आहे ! जपानमधील १९व्या शतकातिळ Meiji Restoration चा संदर्भ महत्वाचा आहे ! शेवटी शेवटी तर " मराठीला अभिजात भाषेचा दर्जा" ही चळवळ फक्त साहित्यिक आणी ठराविक मंडळींपुरतीच उरली होती ! राजकिय लोकांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बाजी मारली ... आणी आम्ही काही तरी मोठं मिळवलं अशी काही काळ बढाई मिरवली. पुढं काय ........ ? एक ही राजकिय नेता या बद्द्ल बोलायला तयार नाही ... काही योजना मांडल्या ... धन आणलं असं ही कोणी बोलत नाहिय. ते लोक मुग गिळून बसले म्हटल्यावर साहित्यिक आणि मराठी प्रेमी काय बोलणार ? मराठी भाषेला मायबोलीप्रेमी सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी असलेला राजिकिय खरोखरचा "जाणता राजा" मिळालयाशिवाय पुढं काही होइल असं वाटत नाही !

In reply to by चौथा कोनाडा

शेखरमोघे 04/11/2024 - 08:22
प्रतिसादाबद्दल आभार. एका राजकीय पक्षाचे नेते आम्हीच पहिल्यान्दा "मराठीला अभिजात दर्जा मिळवा" हा प्रस्ताव (१० वर्षापूर्वी) मांडल्याची प्रौढी मिरवतो तर दुसरा पक्ष आम्हीच तो दर्जा मिळवला हे सान्गतो. शाबासकी दोघानाही हवी आहे पण "पुढे काय" हे कुणालाच नक्की सान्गता येत नाही किन्वा त्यान्च्याकडे सान्गायला काही नाही.

In reply to by शेखरमोघे

चौथा कोनाडा 05/11/2024 - 17:47
राजकीय पक्षाचे नेते ...
या बाबतीत सर्वच राजकिय पक्षांबाबत भ्रम निरास झाला आहे ! मराठी समाजाचं विस्कळीतपण आणि दिवसेंदिवस सत्ताकेंद्री राज्य स्तरावरचे सामजिक, सांस्कृतिक आणि राजकिय नेतृत्व हे पाहता मायमराठीला नैराश्य आलं तर नवल नाही !

विवेकपटाईत 04/11/2024 - 09:33
जो पर्यन्त भाषा रोजगारशी जोडली जात नाही. अभिजात घोषित करण्याचा काहीही उपयोग नाही. राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे सुरू केले पाहिजे. तरच काही लाभ होईल.

In reply to by विवेकपटाईत

शेखरमोघे 04/11/2024 - 20:48
प्रतिसादाबद्दल आभारी. "जो पर्यन्त भाषा रोजगारशी जोडली जात नाही. अभिजात घोषित करण्याचा काहीही उपयोग नाही. राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे सुरू केले पाहिजे. तरच काही लाभ होईल." कमीत कमी कष्ट घेऊन भाषा रोजगाराशी जोडायची असे ठरवले तर सगळेच सोपे होऊन जाते - सध्या चालू असलेले काहीच न बदलणे आणि सध्यासारखेच सगळे फक्त इन्ग्लिशमध्येच चालू ठेवणे. तसे ठेवणे म्हणजे राज्यकर्त्याना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतो आहोत हे म्हणण्याची सन्धी मिळत नाही आणि म्हणून ते " आपण काहीतरी केले आहे" हे दाखवण्यासाठी धडपडत रहातात. "राज्य सरकारने आधुनिक वैद्यक शास्त्र , वास्तु शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादि विषय मराठीत शिकविणे" सुरू करण्याचे काही कारणाने अगदी पक्के ठरवले तरी त्या करता लागणारी पूर्ण यन्त्रणा - जसे शिक्षक, पाठ्य पुस्तके, मराठीतील सर्वमान्य तान्त्रिक शब्द्/मापदन्ड इ. इ. आणि "मराठी डॉक्टर" हे "मराठी रुग्ण" या जमातीकरता " acceptable" व्हावेत या साठी "जे जे लागेल ते" (म्हणजे काय हे उमगण्याकरता जरूर असलेल्या सगळ्या प्रयत्नान्च्या सकट) - हे सगळे उभे करावे लागेल. म्हणजेच एका सरकारच्या कारकीर्दीत कदाचित न होण्यासारखे काम, म्हणजेच नेहमीच "बोलाचीच कढी, बोलाचाच भात" हे तत्व पाळत रहाणे, असेच चालू राहील. इथे फक्त "QED" म्हणून माझा प्रतिसाद थाम्बवणे उचित, पण कोणी हे प्रमेय "सोदाहरण" आणी "सोपपत्तिक" खोडून काढू शकल्यास आनन्दच वाटेल.

Bhakti 04/11/2024 - 13:11
खुप महत्वाचे प्रश्न मांडले.इंग्रजी मावशीला इतकं प्रेम देताना,माय मराठीची लाज वाटेल, इतक्या टोकापर्यंत अनेक ठिकाणी वातावरण असते. मी सुचवेल, मराठी ग्रंथालय आणि मराठी परिसंवाद जास्तीत जास्त घडावेत. +१
किमान सध्या अनेक मराठी भाषकांना मराठी बोलण्यात वाटत असलेला कमीपणा आणि एकमेकांतसुद्धा मराठीऐवजी मोडक्यातोडक्या का होईना, पण इंग्लिशमध्ये बोलण्याचा अट्टाहास जर सामूहिक प्रयत्नातून कमी झाला, तर मराठी भाषेला नक्कीच बरे दिवस येतील.

In reply to by Bhakti

शेखरमोघे 04/11/2024 - 21:29
प्रतिसादाबद्दल आभार. "मराठी ग्रंथालय आणि मराठी परिसंवाद जास्तीत जास्त घडावेत" हा स्तुत्य विचार. सद्य परिस्थितीचे एक उदाहरण - पुण्यात मी शोधलेल्या "मराठी ग्रन्थालयात" (सकाळ नगरमधील "सकाळ"चे ग्रन्थालय) जी मला, भारत/महाराष्ट्र/मराठी सम्बन्धित विषयान्साठी उपयोगी मराठी पुस्तके मिळाली त्यात असलेल्यापेक्षा जास्त माहिती मला (इन्ग्रजीतून) अन्तर्जालावर मिळत असे. "सकाळ"चे ग्रन्थालय नन्तर बन्द देखील झाले (कारण त्याना पुस्तके साठवणे देणे घेणे यापेक्षा त्या जागेचा जास्त लाभदायक पर्यायी उपयोग करायचा होता, असे ऐकले). त्याहूनही मोठ्या असलेल्या (म्हणजे जास्त विविध पुस्तके असण्याची शक्यता) पुणे विद्यापीठाच्या ग्रन्थालयात मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी नसल्यामुळे मला प्रवेश नाही आणि काही खटाटोपातून ते जमवलेच तर तेथील पुस्तके काय तर्‍हेची असतील ही काहीच कल्पना नसल्यामुळे हा खटाटोप करावा की नाही याबद्दल खात्री नाही. इतर बर्‍याच ग्रन्थालयात बहुतेक बाबा आदमच्या काळातल्या कादम्बर्‍या/अनुवादित मराठी पुस्तकेच असतात आणि त्यात ती देखील "दोन/चार दिवसात वाचा आणि परत करा, नाहीतर दन्ड भरा" अशा तर्‍हेची असतात. पुन्हा माझ्या उपयोगाची/आवडीची माहिती अन्तर्जालावर मिळाली की (जरी इन्ग्रजीत असली तरी माझे अडत नसल्याने) माझे काम होते. वाचक नाहीत म्हणून नवे फारसे काही तयार होत नाही आणि त्यामुळे नवे वाचक आकर्षित होत नाहित, असे हे अभेद्य वर्तुळ. मी इच्छा असूनही कुठल्या मराठी ग्रन्थालयाचा आणि कसा उपयोग करणार?

अकिलिज 04/11/2024 - 15:39
मराठी वाहिन्यांवर थोडीफार बंधने घातली पाहिजेत. आजकालच्या कुठल्याही (सह्याद्री अपवाद) कार्यक्रमात कलाकाराचे कलादर्शन झाल्यावर, ''एक्सलंट परफॉरमन्स'' किंवा ''माईंण्ड ब्लोईंग'' अश्या अभिप्राय सारख्या गोष्टींचा सतत मारा होत असेल तर हळू हळू तेच तोंडवळणी पडत जाते. एका वेळेला तर हे ही मराठीच आहे इथपर्यंत आलेलं आहे. आणि जर ख्यातनाम व्यक्ती जर असे बोलत असेल तर त्यांचा कित्ता गिरवणं आलंच. याला एकेका पायरीने आवर घातला पाहिजे. मध्येच असाच एक तेलुगु कार्यक्रम पाहण्यात आला. तिथेही तेच आहे. ते इतकं ईंग्रजाळलेलं तेलुगु बोलत होते कि तेलुगुचा गंध नसलेल्यालाही सगळे कळत होते.

In reply to by अकिलिज

Bhakti 04/11/2024 - 16:36
अगदी बरोबर.सह्याद्री वाहिनीची कोणताही जुना कार्यक्रम पाहिला की दिवस सुंदर होतोच मन अस्सल मराठी भूतकाळात फेरी मारून येते.

श्रीगणेशा 21/11/2024 - 09:45
आमच्या इथे वसाहत मोठी असल्याने अनेक मराठी कुटुंबे राहतात, साधारण ५० ते १०० असावेत. आमच्या कायप्पा समूहाचं नाव "मराठी कट्टा" ठेवलं आहे. पण बहुतेक सर्व संवाद इंग्रजीतूनच. किंवा फारतर रोमन लिपी वापरून. मोबाईलवर देवनागरी लिपीतील लिखाण एवढं सोपं झालं असताना, स्वतःच्या मातृभाषेत, देवनागरी लिपीत लिहिण्याचा एवढा कंटाळा का असावा?

श्रीगणेशा 21/11/2024 - 09:48
लेख आवडला. निराशावादी वाटेल, पण कटू सत्य हेच आहे की, आपली मातृभाषा रोजगाराशी जोडण्याची संधी आपण कधीच गमावली आहे, असं मला वाटतं.

शेखरमोघे 15/12/2024 - 10:35
प्रतिसादाबद्दल आभार. आपली मातृभाषा रोजगाराशी जोडण्याची संधी मिळण्यासाठी रोजचे सर्व तर्‍हेचे व्यवहार मातृभाषेतून (मराठीतून) होणे गरजेचे आहे. ते तर महाराष्ट्रातही मराठीतून होत नाहीत - जे काही थोडेबहुत होतात त्यासाठी ही इन्ग्रजी किन्वा हिन्दीचा पर्याय असतोच. अशी वस्तुस्थिती असतानाही, ती बदलण्याचा काहीच प्रयत्न न करता राज्यकर्ते वैद्यकीय आणि अभियान्त्रिकी शिक्षण आणि म्हणून त्याच्याशी निगडित व्यवहार मराठी भाषेतून होतील अशी आशा बाळगतात आणि दाखवतात. मराठी भाषेतून शिकलेल्याना महाराष्ट्राबाहेर व्यावसायिक किन्वा इतर कुठल्याच तर्‍हेच्या सन्धी उपलब्ध नसतील ही देखील लक्षात ठेवणे जरूर आहे.

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:14
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा शासकीय अध्यादेश अर्थात जी आर अजूनही संबंधित संस्थांकडे पोहोचला नाही असे आज सांगितले. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व कागदपत्रे केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेली आहेत आणि लोक जी चर्चा करत आहेत तिकडे दुर्लक्ष करावे असे सांगितले आहे. आता काय खरे समजायचे ? अभिजात भाषेचा दर्जा देता देता दहा वर्ष अशीच मोदी सरकारने काढली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाषेचा दर्जा दिला दिल्याची घोषणा केली. आता प्रत्यक्ष जीआर काढायला किती दशकं लावणार ?

In reply to by चौथा कोनाडा

माझ्या दृष्टीने तेच वाक्य... निदान दहा वर्षांत तरी मोदी सरकारने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.१९५० ते २०१४ पर्यंत हे का जमले नाही? ------ आत्ता कुठे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. GR वगैरे सोपस्कार होत राहतील.

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 06/01/2025 - 20:13
निदान दहा वर्षांत तरी मोदी सरकारने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.१९५० ते २०१४ पर्यंत हे का जमले नाही?
संशोधन आणि कागद्पत्रांची पुर्तता करणे सुरू होते. मोदी सरकार ने काम हाती घेतले आणि आशा पल्लवीत झाल्या. सगळी संशोधन आणि कागदपत्रे जमा केली (सं: मधू मंगेश कर्णिक समिती होती तर २-४ वर्षात काम व्हायला हरकत नव्हती !
आत्ता कुठे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. GR वगैरे सोपस्कार होत राहतील.
लवकरात लवकर झाल्यास उत्तम !

In reply to by चौथा कोनाडा

होईल.. मी तरी माझ्या पासुन सुरुवात केली आहे.. विक्रेत्या बरोबर मराठीतच बोलायचे. गरज आपल्याला नसेल तर, मराठीत संभाषण करण्याचा आग्रह धरायचा.

दिवाळी अंक २०२४ - हॅप्पी दिवाळी

Bhakti ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ 02/11/2024 - 18:54
तपशीलवार म्हणाल तर.... आमचे लग्न झाले त्यावेळी नोकरीनिमित्त मी पुण्यात तर नवरा कोल्हापूरात... लग्नासाठी अगदी 3 आठवडे रजा काढल्यामुळे नंतर केवळ लागून सुट्ट्या आल्या तरच घरी जाणे व्हायचे. अगदी दोन दोन महिन्यानंतर भेट व्हायची. त्यामुळे पहिल्या दिवाळी आणि लग्न यादरम्यान केवळ दोन-तीनदाच भेटलो होतो. आणि अशातच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी चक्क सहा-सात दिवस राहण्याचा योग आला!!!! म्हणजे खरंच काय दिवाळी असेल याची कल्पना करा ;))) याहून अधिक 'तपशिलात' जायचे म्हटले तर अजून एक अठरा + कथाच व्हायची :D अशी कथा लिहिण्याचे ना माझ्या धाडस आहे, ना प्रतिभा!!! त्यामुळे माझे तपशील इथेच संपवते. ;D

In reply to by श्वेता२४

अरे वाह ! मस्त आठवणी...! प्रसिद्ध शायर वसीम बरेलवीचा शेर अर्ज है... 'कोई इशारा दिलासा न कोई व'अदा मगर जब आई शाम तिरा इंतिज़ार करने लगे' -दिलीप बिरुटे

म्हणजे, नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी -गदिमा नंतर काही वर्षांनी, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामीनी -शांताबाई कथा चांगली फुलवली आहे.

सविता००१ 07/11/2024 - 20:55
मस्त कथा. सगळ्यांना (माझ्यासह) आपापली पहिली दिवाळी नक्की आठवली असणार

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ 02/11/2024 - 18:54
तपशीलवार म्हणाल तर.... आमचे लग्न झाले त्यावेळी नोकरीनिमित्त मी पुण्यात तर नवरा कोल्हापूरात... लग्नासाठी अगदी 3 आठवडे रजा काढल्यामुळे नंतर केवळ लागून सुट्ट्या आल्या तरच घरी जाणे व्हायचे. अगदी दोन दोन महिन्यानंतर भेट व्हायची. त्यामुळे पहिल्या दिवाळी आणि लग्न यादरम्यान केवळ दोन-तीनदाच भेटलो होतो. आणि अशातच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी चक्क सहा-सात दिवस राहण्याचा योग आला!!!! म्हणजे खरंच काय दिवाळी असेल याची कल्पना करा ;))) याहून अधिक 'तपशिलात' जायचे म्हटले तर अजून एक अठरा + कथाच व्हायची :D अशी कथा लिहिण्याचे ना माझ्या धाडस आहे, ना प्रतिभा!!! त्यामुळे माझे तपशील इथेच संपवते. ;D

In reply to by श्वेता२४

अरे वाह ! मस्त आठवणी...! प्रसिद्ध शायर वसीम बरेलवीचा शेर अर्ज है... 'कोई इशारा दिलासा न कोई व'अदा मगर जब आई शाम तिरा इंतिज़ार करने लगे' -दिलीप बिरुटे

म्हणजे, नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी -गदिमा नंतर काही वर्षांनी, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामीनी -शांताबाई कथा चांगली फुलवली आहे.

सविता००१ 07/11/2024 - 20:55
मस्त कथा. सगळ्यांना (माझ्यासह) आपापली पहिली दिवाळी नक्की आठवली असणार

दिवाळी अंक २०२४ - कधी कधी असं घडतं

नूतन ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

साहेब, बायकांनी एखादी गोष्ट एकदा डोक्यात घेतली की.. ब्रह्मदेवसुद्धा काही करू शकत नाही!" ३७ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवा नंतर १००% टक्के सहमत. अनुवाद अतीशय सुंदर, समर्पक. डिस्क्लेमर नसते दिले व जागा आणी पात्रांची नावे भारतीय परिप्रेक्षातून दिली असती तर ओरिजिनल कथा तुमचीच वाटली असती. या आगोदरच्या आपल्या अनुवादित कथा वाचल्या आहेत. आपल्या अनुवादित कथांचा पंखा..

श्वेता२४ 02/11/2024 - 19:21
मोपासा च्या कथा मला नेहेमीच आवडतात. मानवी वर्तनाचे अत्यंत वास्तवदर्शी असे निरनिराळे पैलू त्यात मांडलेले असतात. आपला अनुवाद नेहमीप्रमाणेच अतिशय वाचनीय झाला आहे.

सन्जोप राव 03/11/2024 - 21:36
वाचताना हा अनुवाद आहे हे जाणवले, पण ते काही लेखनाचे अपयश मानता येणार नाही. ( हा अनुवाद न करता हे स्वैर भाषांतर केले असते तर कसे झाले असते? उदा. एखादे वसंतराव आणि एखाद्या शांताबाई एखाद्या ठिकाणी एकांतात सापडल्या असत्या तर? पण हे विषयांतर झाले) मिसळपाव दिवाळी अंकाचीची यंदाची मध्यवर्ती कल्पना बाजूला ठेवली तरी वाचावी वाटावी अशी कथा आहे.

नूतन 03/11/2024 - 23:25
प्रतिसादाबद्दल आभार. स्वैर अनुवाद करण्याचं धाडस अजून झालं नाही. बघू, प्रयत्न करु.

श्रीगणेशा 30/11/2024 - 13:45
कथा आवडली. पण कथेसारख्या सविस्तर लिखाणाचा अनुवाद करताना आणि वाचताना, कृत्रिमतेची हुरहूर बऱ्याचदा जाणवते.

साहेब, बायकांनी एखादी गोष्ट एकदा डोक्यात घेतली की.. ब्रह्मदेवसुद्धा काही करू शकत नाही!" ३७ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवा नंतर १००% टक्के सहमत. अनुवाद अतीशय सुंदर, समर्पक. डिस्क्लेमर नसते दिले व जागा आणी पात्रांची नावे भारतीय परिप्रेक्षातून दिली असती तर ओरिजिनल कथा तुमचीच वाटली असती. या आगोदरच्या आपल्या अनुवादित कथा वाचल्या आहेत. आपल्या अनुवादित कथांचा पंखा..

श्वेता२४ 02/11/2024 - 19:21
मोपासा च्या कथा मला नेहेमीच आवडतात. मानवी वर्तनाचे अत्यंत वास्तवदर्शी असे निरनिराळे पैलू त्यात मांडलेले असतात. आपला अनुवाद नेहमीप्रमाणेच अतिशय वाचनीय झाला आहे.

सन्जोप राव 03/11/2024 - 21:36
वाचताना हा अनुवाद आहे हे जाणवले, पण ते काही लेखनाचे अपयश मानता येणार नाही. ( हा अनुवाद न करता हे स्वैर भाषांतर केले असते तर कसे झाले असते? उदा. एखादे वसंतराव आणि एखाद्या शांताबाई एखाद्या ठिकाणी एकांतात सापडल्या असत्या तर? पण हे विषयांतर झाले) मिसळपाव दिवाळी अंकाचीची यंदाची मध्यवर्ती कल्पना बाजूला ठेवली तरी वाचावी वाटावी अशी कथा आहे.

नूतन 03/11/2024 - 23:25
प्रतिसादाबद्दल आभार. स्वैर अनुवाद करण्याचं धाडस अजून झालं नाही. बघू, प्रयत्न करु.

श्रीगणेशा 30/11/2024 - 13:45
कथा आवडली. पण कथेसारख्या सविस्तर लिखाणाचा अनुवाद करताना आणि वाचताना, कृत्रिमतेची हुरहूर बऱ्याचदा जाणवते.