मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पत्रास कारण की

युयुत्सु ·

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:55
संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. भाषा हिंसक आहे हे कुणी ठरवायचे? कुराणात काफिरांना छळ करून देहदंड द्या असे तीन चार ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे. कुराणावर बंदी घाला असा अर्ज का करत नाही आपण ?

संदर्भ कळेल का? बाकी सरन्यायाधीशाना पत्र लिहिलेत ते ठिकाय पण राष्ट्रपती नी पंतप्रधान ह्यांना कशाला? खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उगी उगी
खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..
तेच की. कतले दुत्त दुत्त हाहेत ते. आपन ना त्याचं गल उन्हात बांधू ! मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! तो पलयंत गत्ती फू आहे मी त्यांच्याशी. दुत्त कुतले !!

In reply to by प्रसाद गोडबोले

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:06
काहीही हं, प्रगो!
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !
हे वाचून पहिल्यांदा तर मला असेच काहीतरी वाटले! fart आम्ही असेच पांचट लोकं! काय करणार? बाकी, तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे, इथे भरपूर मजा येणार आहे हे नक्की!

In reply to by प्रसाद गोडबोले

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! २०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:07
मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
नेमकं कुठे काय घडलं ते तरी सांगा.

In reply to by वामन देशमुख

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 16:56
नेमके कुठे घडले ते सांगतो त्यासाठी काही उदाहरणे • 3 charges under IPC Section-506 related to Punishment for criminal intimidation • 1 charge under IPC Section-409 related to Criminal breach of trust by a public servant, or by banker, merchant or agent • 1 charge under IPC Section-363 related to Punishment for kidnapping • 1 charge under IPC Section-365 related to Kidnapping or abducting with intent secretly and wrongfully to confine a person • 1 charge under IPC Section-368 related to Wrongfully concealing or keeping in confinement, a kidnapped or abducted person • 1 charge under IPC Section-324 related to Voluntarily causing hurt by dangerous weapons or means • 1 charge under IPC Section-420 related to Cheating and dishonestly inducing delivery of property • 9 charges under IPC Section-143 related to Punishment for Being a member of an unlawful assembly • 6 charges under IPC Section-149 related to Every member of unlawful assembly guilty of an offence committed in prosecution of a common object • 5 charges under IPC Section-147 related to Punishment for Rioting • 4 charges under IPC Section-341 related to Punishment for wrongful restraint • 4 charges under IPC Section-145 related to Joining or continuing in unlawful assembly, knowing it has been commanded to disperse • 3 charges under IPC Section-144 related to Joining unlawful assembly armed with a deadly weapon • 3 charges under IPC Section-188 related to Disobedience to order duly promulgated by a public servant • 2 charges under IPC Section-290 related to Punishment for public nuisance in cases not otherwise provided for • 2 charges under IPC Section-291 related to Continuance of nuisance after injunction to discontinue • 2 charges under IPC Section-146 related to Rioting • 2 charges under IPC Section-148 related to Rioting, armed with a deadly weapon • 2 charges under IPC Section-323 related to Punishment for voluntarily causing hurt • 2 charges under IPC Section-504 related to Intentional insult with intent to provoke breach of the peace • 2 charges under IPC Section-427 related to Mischief causing damage to the amount of fifty rupees • 1 charge under IPC Section-109 related to Punishment of abetment, if the act abetted, is committed in consequence, and where no express provision is made for its punishment • 1 charge under IPC Section-447 related to Punishment for criminal trespass • 1 charge under IPC Section-336 related to an Act endangering the life or personal safety of others • 1 charge under IPC Section-153 related to Wantonly giving provocation with intent to cause riot-if rioting to be committed-if not committed • 1 charge under IPC Section-186 related to Obstructing public servants in the discharge of public functions • 1 charge under IPC Section-141 related to Unlawful assembly • या सगळ्या केसेस एकाच व्यक्तीवर आहेत. या व्कतीबाबत आणखी एक क्लू देतो या माणसाने अनंत करमुसे या व्यक्तीला पोलीस आणि आपले खाजगी अंगरक्षकांकरवी मारहाण केली. आणखी एक विश्वप्रवक्ते आणि सर्वविषयातले जाणकार सामना या जगद्विख्यात दैनीकाचे संपादक.यांचे कर्तृत्व सर्वच जण जाणतात. स्वप्ना पाटकर या स्त्रीला अश्लाघ्य भाषेत शिव्या देणे वगैरे , किंवा कंगना राणावतचे घर तोडणे इत्यादी अश्राप बाललीला यांसाठी प्रसिद्ध आहेत. फक्त काही वानगीदाखल हे लिहिलेय

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 17:15
इतके गंभीर गुन्हे असूनही हे गुंड कोणत्याही कारवाईविना मोकळे का आहेत? या तक्षकांना कोणत्या इंद्राने संरक्षण दिले आहे?

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 19:12
त्यांना अधिकार नाही. अधिकार असलेला इंद्र वेगळा आहे. त्याने अश्या सर्व तक्षकांना संरक्षण दिलंय.

In reply to by विजुभाऊ

म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या नेत्यांविरुद्ध धागा काढलाय तर. अनंत करमुसे हा काही साधू महात्मा होता का? तसेच कंगना रानवताचे घर अतिक्रमणात होते. सरन्यायाधीशांनी ह्या पत्राची दखल घेऊन ह्याना चांगला जबर दंड ठोकावा नि जमेल तर चार दोन महिने आई सहाल घडवून आणावी! म्हणजे सरन्यायाधीश नी मीपकरांचा वेळ वाचेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, विजूभाऊ, भाजप नेत्यांवर किती केसेस आहे यादी देऊ का? चांगल्या कामासाठी नाही बर का! तोडीपणी, भ्रष्टाचार गुंडगिरी ह्यासाठीचे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 02/19/2025 - 10:34
राऊत आणि जितुद्दीन हे अत्यंत सालस आणि सोज्वल प्रवृत्तीचे नेते आहेत असे म्हणयचे आहे का? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल तर तुम्ही त्या भाषेचे आणि वृत्तीचे समर्थन करताय असेच म्हणावे लागेल. असो. मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.

In reply to by विजुभाऊ

मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो. वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल अनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.

चित्रगुप्त Tue, 02/18/2025 - 15:27
संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
--- संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:42
मुळात कोणताही धर्म देशाच्या संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही, त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. अशा वक्तव्याचा प्रत्यक्ष परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असतो. रणवीर अलाहाबदियाचे विधान कितीही चूकीचे असले तरी त्याला शिक्षा करायचा अधिकार फक्त सक्षम यंत्रणाना आहे. त्याला मारण्याची धमकी देण्या इतका हा गंभीर गुन्हा आहे का? वि० त्याने बिनशर्त माफी मागितलेली असताना...माणसाचा विवेक २४/७ १००% जागा राहू शकत नाही. ते जैविकदृष्ट्या अशक्य आहे. आउट ऑफ कॉटेक्स्ट म्ह० संदर्भ सोडून वाचायची सध्या सर्वत्र साथ असल्याने जास्त तपशीलात जाऊ शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - "गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 15:56
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी. ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:59
कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?म हिंदु लॉसाठी स्मृती महत्त्वाचा आधार मानल्या गेल्या आहेत. मला मनुस्मृती टिळक विद्यापिठात विशारद्च्या दुस-या वर्षाला अभ्यासाला होती. सध्याचे माहित नाही.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 16:20
हिंदू लॉ मधील कोणते कायदे मनुस्मृतीवर आधारीत आहेत? कोणत्या पदवीसाठी मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 16:30
हे प्रश्न कृपया ए० आय० ला विचारायची सवय लावावी. प्र० Which part of Hindu law is borrowed from Smriti literarture? उ० The part of Hindu law that is borrowed from Smriti literature is the concept of "Dharma" and the rules governing social and familial relationships, such as: - Laws of inheritance (Dayabhaga and Mitakshara) - Laws of marriage (types of marriages, rules of marriage, etc.) - Laws of adoption - Laws of partition and joint family property - Rules of caste and social hierarchy Smriti literature, which includes texts like the Manusmriti, Yajnavalkyasmriti, and Naradasmriti, provides guidance on these aspects of Hindu law. These texts are considered authoritative and have been influential in shaping Hindu law and customs.

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 16:16
मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -
हा नेहमीचाच डावा डाव आहे. आधी खाजवून खरूज काढायचे आणि मग victim blaming करायची. संबंध नसताना मनुस्मृती आणायची मग हिंदूंना झोडायचे. जगाला पोखरणारी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/19/2025 - 11:47
मनुस्मृती मधील पुढील श्लोक .... मनुस्मृती आणि कुराण दोन्ही वर बंदी घालण्यासाठी अर्ज करा. सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कडे आहे का हिम्मत? असले मुळमुळीत अर्ज केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मिपा वर लिहिण्यात काय हशील आहे?

In reply to by सुबोध खरे

कॉमी Wed, 02/19/2025 - 13:35
सर "अमुक पुस्तकात आक्षेपार्ह गोष्ट आहे म्हणून त्या पुस्तकावरच सरसकट बंदी घाला" आणि "संसदिय पदावर आणि इतर जबाबदारीच्या पब्लिक ऑफिस मध्ये असलेल्या लोकांनी तारतम्य बाळगावे, हिंसेला खतपाणी घालणारी वक्तव्ये करू नयेत. तसे होत असेल तर त्यांच्या वरिष्ठ व्यक्तीने समज द्यावी" हया दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी नाहीत का?

मनुवादी स्वतला उजवे समजतात खर तर ते डाव्यांपेक्षा जास्त धोकेदायक आहेत, भारताला पोखरणारी मनुवादी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे. बाकी युयुत्सु सरांवर आता मनुवादी तोंडसुख घेतील.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 02/19/2025 - 13:15
कोणत्याही विषयावर धागा असो, खफ असो . . . हे तेथे जाऊन घाण करतातच. बरं त्या विषयातलं काही समजत असतं, काही विश्वसनीय माहिती दिली असती, काही विचारी प्रतिसाद दिले असते तर विरूद्ध लिहिलेले सुद्धा चाललं असतं. पण कोणत्याही विषयातील कणभरही माहिती नाही, विषय अजिबात समजत नाही पण तरीही सातत्याने पिंका टाकून धाग्याचा सत्यानाश करण्याचे घाणेरडे व्यसन जाणार तरी कधी?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, विद ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही नि तुमच्या सारखे अनेक जाणकार मीपावर आहेत. प्रत्येक वेळी माहिती असेल तरच लिहायचे का? काही वेळा माहिती मिळवायला किंवा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यायला देखील प्रतिसाद दिला जातो ह्याचा अर्थ असा नाही की धाग्याचा सत्यानाश करतो. भावना समजून घ्याल अशी अपेक्षा! _/\_

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 09:30
हे खुले पत्र लिहील्यानंतर ते कदाचित व्हायरल झालं असावं कारण तेव्हाचा सोलापूरकर इशू शांत झाला. कदाचित ते तेव्हाच्या सरन्यायाधीशांपर्यंत कुणीतरी पोचवले असावे (अर्थात या माझ्या भाबड्या स्मजुती आहेत) कारण नंतर फेबु मला पिपल यु मे नो मध्ये जस्टीस संजीव खन्नांचे नाव बरेच दिवस दाखवत असे. पण या पत्रावर कार्यवाही झाली असती तर कालचा विधानभवनातला राडा कदाचित टळला असता. "अतिडाव्या" विचारसरणीने चिंतेत असलेले मा०मु० असे राडे टाळ्ण्यासाठी कोणते कायदे करणार? का हाणामारी अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते?

गामा पैलवान Sat, 07/19/2025 - 17:51
युयुत्सु,
"गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"
रोचक विधान आहे. माझ्या आकलनानुसार याचा आर्थ अतिरेक्यास ताबडतोब ठार मारावे असा आहे. भले आतंकी गुरू, वृद्ध, बालक वा बहुश्रुत ब्राह्मण असला तरीही. मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? आणि अफजल गुरूसाठी रात्री न्यायालय का म्हणून उघडायचं? सरळ उडवून टाकायचं की त्याला. अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी मनुस्मृतीतला सदर श्लोक एकदम जालीम उपाय आहे. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 18:22
मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? हिंदू लॉ स्मृतींवर आधारीत असला तरी भारतीय न्यायव्यवस्था मनुस्मृतीवर आधारित नाही. याशिवाय काही गोष्टी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी केल्या जातात.

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:55
संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. भाषा हिंसक आहे हे कुणी ठरवायचे? कुराणात काफिरांना छळ करून देहदंड द्या असे तीन चार ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे. कुराणावर बंदी घाला असा अर्ज का करत नाही आपण ?

संदर्भ कळेल का? बाकी सरन्यायाधीशाना पत्र लिहिलेत ते ठिकाय पण राष्ट्रपती नी पंतप्रधान ह्यांना कशाला? खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उगी उगी
खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..
तेच की. कतले दुत्त दुत्त हाहेत ते. आपन ना त्याचं गल उन्हात बांधू ! मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! तो पलयंत गत्ती फू आहे मी त्यांच्याशी. दुत्त कुतले !!

In reply to by प्रसाद गोडबोले

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:06
काहीही हं, प्रगो!
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !
हे वाचून पहिल्यांदा तर मला असेच काहीतरी वाटले! fart आम्ही असेच पांचट लोकं! काय करणार? बाकी, तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे, इथे भरपूर मजा येणार आहे हे नक्की!

In reply to by प्रसाद गोडबोले

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! २०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:07
मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
नेमकं कुठे काय घडलं ते तरी सांगा.

In reply to by वामन देशमुख

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 16:56
नेमके कुठे घडले ते सांगतो त्यासाठी काही उदाहरणे • 3 charges under IPC Section-506 related to Punishment for criminal intimidation • 1 charge under IPC Section-409 related to Criminal breach of trust by a public servant, or by banker, merchant or agent • 1 charge under IPC Section-363 related to Punishment for kidnapping • 1 charge under IPC Section-365 related to Kidnapping or abducting with intent secretly and wrongfully to confine a person • 1 charge under IPC Section-368 related to Wrongfully concealing or keeping in confinement, a kidnapped or abducted person • 1 charge under IPC Section-324 related to Voluntarily causing hurt by dangerous weapons or means • 1 charge under IPC Section-420 related to Cheating and dishonestly inducing delivery of property • 9 charges under IPC Section-143 related to Punishment for Being a member of an unlawful assembly • 6 charges under IPC Section-149 related to Every member of unlawful assembly guilty of an offence committed in prosecution of a common object • 5 charges under IPC Section-147 related to Punishment for Rioting • 4 charges under IPC Section-341 related to Punishment for wrongful restraint • 4 charges under IPC Section-145 related to Joining or continuing in unlawful assembly, knowing it has been commanded to disperse • 3 charges under IPC Section-144 related to Joining unlawful assembly armed with a deadly weapon • 3 charges under IPC Section-188 related to Disobedience to order duly promulgated by a public servant • 2 charges under IPC Section-290 related to Punishment for public nuisance in cases not otherwise provided for • 2 charges under IPC Section-291 related to Continuance of nuisance after injunction to discontinue • 2 charges under IPC Section-146 related to Rioting • 2 charges under IPC Section-148 related to Rioting, armed with a deadly weapon • 2 charges under IPC Section-323 related to Punishment for voluntarily causing hurt • 2 charges under IPC Section-504 related to Intentional insult with intent to provoke breach of the peace • 2 charges under IPC Section-427 related to Mischief causing damage to the amount of fifty rupees • 1 charge under IPC Section-109 related to Punishment of abetment, if the act abetted, is committed in consequence, and where no express provision is made for its punishment • 1 charge under IPC Section-447 related to Punishment for criminal trespass • 1 charge under IPC Section-336 related to an Act endangering the life or personal safety of others • 1 charge under IPC Section-153 related to Wantonly giving provocation with intent to cause riot-if rioting to be committed-if not committed • 1 charge under IPC Section-186 related to Obstructing public servants in the discharge of public functions • 1 charge under IPC Section-141 related to Unlawful assembly • या सगळ्या केसेस एकाच व्यक्तीवर आहेत. या व्कतीबाबत आणखी एक क्लू देतो या माणसाने अनंत करमुसे या व्यक्तीला पोलीस आणि आपले खाजगी अंगरक्षकांकरवी मारहाण केली. आणखी एक विश्वप्रवक्ते आणि सर्वविषयातले जाणकार सामना या जगद्विख्यात दैनीकाचे संपादक.यांचे कर्तृत्व सर्वच जण जाणतात. स्वप्ना पाटकर या स्त्रीला अश्लाघ्य भाषेत शिव्या देणे वगैरे , किंवा कंगना राणावतचे घर तोडणे इत्यादी अश्राप बाललीला यांसाठी प्रसिद्ध आहेत. फक्त काही वानगीदाखल हे लिहिलेय

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 17:15
इतके गंभीर गुन्हे असूनही हे गुंड कोणत्याही कारवाईविना मोकळे का आहेत? या तक्षकांना कोणत्या इंद्राने संरक्षण दिले आहे?

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 19:12
त्यांना अधिकार नाही. अधिकार असलेला इंद्र वेगळा आहे. त्याने अश्या सर्व तक्षकांना संरक्षण दिलंय.

In reply to by विजुभाऊ

म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या नेत्यांविरुद्ध धागा काढलाय तर. अनंत करमुसे हा काही साधू महात्मा होता का? तसेच कंगना रानवताचे घर अतिक्रमणात होते. सरन्यायाधीशांनी ह्या पत्राची दखल घेऊन ह्याना चांगला जबर दंड ठोकावा नि जमेल तर चार दोन महिने आई सहाल घडवून आणावी! म्हणजे सरन्यायाधीश नी मीपकरांचा वेळ वाचेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, विजूभाऊ, भाजप नेत्यांवर किती केसेस आहे यादी देऊ का? चांगल्या कामासाठी नाही बर का! तोडीपणी, भ्रष्टाचार गुंडगिरी ह्यासाठीचे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 02/19/2025 - 10:34
राऊत आणि जितुद्दीन हे अत्यंत सालस आणि सोज्वल प्रवृत्तीचे नेते आहेत असे म्हणयचे आहे का? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल तर तुम्ही त्या भाषेचे आणि वृत्तीचे समर्थन करताय असेच म्हणावे लागेल. असो. मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.

In reply to by विजुभाऊ

मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो. वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल अनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.

चित्रगुप्त Tue, 02/18/2025 - 15:27
संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
--- संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:42
मुळात कोणताही धर्म देशाच्या संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही, त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. अशा वक्तव्याचा प्रत्यक्ष परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असतो. रणवीर अलाहाबदियाचे विधान कितीही चूकीचे असले तरी त्याला शिक्षा करायचा अधिकार फक्त सक्षम यंत्रणाना आहे. त्याला मारण्याची धमकी देण्या इतका हा गंभीर गुन्हा आहे का? वि० त्याने बिनशर्त माफी मागितलेली असताना...माणसाचा विवेक २४/७ १००% जागा राहू शकत नाही. ते जैविकदृष्ट्या अशक्य आहे. आउट ऑफ कॉटेक्स्ट म्ह० संदर्भ सोडून वाचायची सध्या सर्वत्र साथ असल्याने जास्त तपशीलात जाऊ शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - "गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 15:56
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी. ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:59
कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?म हिंदु लॉसाठी स्मृती महत्त्वाचा आधार मानल्या गेल्या आहेत. मला मनुस्मृती टिळक विद्यापिठात विशारद्च्या दुस-या वर्षाला अभ्यासाला होती. सध्याचे माहित नाही.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 16:20
हिंदू लॉ मधील कोणते कायदे मनुस्मृतीवर आधारीत आहेत? कोणत्या पदवीसाठी मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 16:30
हे प्रश्न कृपया ए० आय० ला विचारायची सवय लावावी. प्र० Which part of Hindu law is borrowed from Smriti literarture? उ० The part of Hindu law that is borrowed from Smriti literature is the concept of "Dharma" and the rules governing social and familial relationships, such as: - Laws of inheritance (Dayabhaga and Mitakshara) - Laws of marriage (types of marriages, rules of marriage, etc.) - Laws of adoption - Laws of partition and joint family property - Rules of caste and social hierarchy Smriti literature, which includes texts like the Manusmriti, Yajnavalkyasmriti, and Naradasmriti, provides guidance on these aspects of Hindu law. These texts are considered authoritative and have been influential in shaping Hindu law and customs.

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 16:16
मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -
हा नेहमीचाच डावा डाव आहे. आधी खाजवून खरूज काढायचे आणि मग victim blaming करायची. संबंध नसताना मनुस्मृती आणायची मग हिंदूंना झोडायचे. जगाला पोखरणारी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/19/2025 - 11:47
मनुस्मृती मधील पुढील श्लोक .... मनुस्मृती आणि कुराण दोन्ही वर बंदी घालण्यासाठी अर्ज करा. सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कडे आहे का हिम्मत? असले मुळमुळीत अर्ज केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मिपा वर लिहिण्यात काय हशील आहे?

In reply to by सुबोध खरे

कॉमी Wed, 02/19/2025 - 13:35
सर "अमुक पुस्तकात आक्षेपार्ह गोष्ट आहे म्हणून त्या पुस्तकावरच सरसकट बंदी घाला" आणि "संसदिय पदावर आणि इतर जबाबदारीच्या पब्लिक ऑफिस मध्ये असलेल्या लोकांनी तारतम्य बाळगावे, हिंसेला खतपाणी घालणारी वक्तव्ये करू नयेत. तसे होत असेल तर त्यांच्या वरिष्ठ व्यक्तीने समज द्यावी" हया दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी नाहीत का?

मनुवादी स्वतला उजवे समजतात खर तर ते डाव्यांपेक्षा जास्त धोकेदायक आहेत, भारताला पोखरणारी मनुवादी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे. बाकी युयुत्सु सरांवर आता मनुवादी तोंडसुख घेतील.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 02/19/2025 - 13:15
कोणत्याही विषयावर धागा असो, खफ असो . . . हे तेथे जाऊन घाण करतातच. बरं त्या विषयातलं काही समजत असतं, काही विश्वसनीय माहिती दिली असती, काही विचारी प्रतिसाद दिले असते तर विरूद्ध लिहिलेले सुद्धा चाललं असतं. पण कोणत्याही विषयातील कणभरही माहिती नाही, विषय अजिबात समजत नाही पण तरीही सातत्याने पिंका टाकून धाग्याचा सत्यानाश करण्याचे घाणेरडे व्यसन जाणार तरी कधी?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, विद ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही नि तुमच्या सारखे अनेक जाणकार मीपावर आहेत. प्रत्येक वेळी माहिती असेल तरच लिहायचे का? काही वेळा माहिती मिळवायला किंवा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यायला देखील प्रतिसाद दिला जातो ह्याचा अर्थ असा नाही की धाग्याचा सत्यानाश करतो. भावना समजून घ्याल अशी अपेक्षा! _/\_

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 09:30
हे खुले पत्र लिहील्यानंतर ते कदाचित व्हायरल झालं असावं कारण तेव्हाचा सोलापूरकर इशू शांत झाला. कदाचित ते तेव्हाच्या सरन्यायाधीशांपर्यंत कुणीतरी पोचवले असावे (अर्थात या माझ्या भाबड्या स्मजुती आहेत) कारण नंतर फेबु मला पिपल यु मे नो मध्ये जस्टीस संजीव खन्नांचे नाव बरेच दिवस दाखवत असे. पण या पत्रावर कार्यवाही झाली असती तर कालचा विधानभवनातला राडा कदाचित टळला असता. "अतिडाव्या" विचारसरणीने चिंतेत असलेले मा०मु० असे राडे टाळ्ण्यासाठी कोणते कायदे करणार? का हाणामारी अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते?

गामा पैलवान Sat, 07/19/2025 - 17:51
युयुत्सु,
"गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"
रोचक विधान आहे. माझ्या आकलनानुसार याचा आर्थ अतिरेक्यास ताबडतोब ठार मारावे असा आहे. भले आतंकी गुरू, वृद्ध, बालक वा बहुश्रुत ब्राह्मण असला तरीही. मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? आणि अफजल गुरूसाठी रात्री न्यायालय का म्हणून उघडायचं? सरळ उडवून टाकायचं की त्याला. अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी मनुस्मृतीतला सदर श्लोक एकदम जालीम उपाय आहे. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 18:22
मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? हिंदू लॉ स्मृतींवर आधारीत असला तरी भारतीय न्यायव्यवस्था मनुस्मृतीवर आधारित नाही. याशिवाय काही गोष्टी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी केल्या जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मा० राष्ट्रपती मा० पंतप्रधान मा० सरन्यायाधीश, भारत सरकार स० न० वि० वि० या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते. माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

मराठी / हिंदी चित्रपटा मधील चाली

स्वरुपसुमित ·

मेरी मर्जी--- मेरी मर्ज़ी मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी

अनेक गाणी सांगता येतील. मै तुझ को भगा लया हु, तेरे घर से, तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रह था.. साडी के फॉलसा कभी मॅच किया रे कभी छोड दिया दिल , कभी कॅच किया रे.

चित्रगुप्त Mon, 02/17/2025 - 08:54
शीर्षकातल्या 'चाली' या शब्दावरून सिनेसंगिताचे संगीत दिग्दर्शक, अरेंजर्स, वादक वगैरेंविषयी हा अभ्यासपूर्ण धागा असावा, ओ पी नय्यर, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार वगैरेंच्या संगीताचे रसग्रहण, दुर्मिळ माहिती वगैरे यात वाचायला मिळेल या आशेने, मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण अगदीच फुसका निघाला.

कॉमी Mon, 02/17/2025 - 09:08
दिल्ली बेली मध्ये अशी मुद्दामून विचित्र गाणी आहेत - १. आय हेट यु, लाईक आय लव्ह यु २. फुल नहीं परी नहीं सडा हुआ आलू है तू ३. डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी ४. [नक्कद वाले डिस्को, उधार वाले खिसको] दिल टुकडे टुकडे हो गया, ऊस रात मै जल्दी सो गया... एकूण हिंदीमधला अत्यंत युनिक अल्बम आहे. अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.

हेरा फेरी मधील गाणेही असेच अर्थहीन आहेत. जुलमी ह्या अक्षयकुमारच्या १९९८ मधील सिनेमातील एक अर्थहीन गाणे मेर लिए तो फिट है तू, ऑल इंडिया हिट है तू :)

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Mon, 02/17/2025 - 20:21
मला उमगलेला अर्थः आपल्या या प्रेमसहवासाच्या रात्री या सुंदर क्षणांना चंद्र साक्षीला आहेच पण पानं फुलं सुद्धा जागे झाले आहेत आपले प्रीतीचे क्षण पहायला ! .. अजून काही विशेष अर्थ असेल तर जाणकार सांगतीलच ! गीतकार बहुधा जगदीश खेबूडकर.

कॉमी Mon, 02/17/2025 - 20:16
आगळ्यावेगळ्या गाण्यांचा आणखी एक अल्बम. आय एम अ हंटर सारख्या पोरकट गाण्यापासून तार बिजली से पतले हमारे पिया हे वर वर पोरकट वाटणारे गंभीर गाणे- सगळे आहे ह्यात. आय याम ए हंटर, शी वॉन्ट टु सी माय गन, व्हेन आय पुल इट आउट, द वुमन स्टार्ट टु रन दूर तक है फेमस, करदे सबको बेबस, उसको मिलता दर्सन जिसके मनमे है लगन | आणि त्याच सिनेमात- बोलेगा बबुना, चल जै हो पटना पटना बहाने वो, चाहेगा सटना दै हो ना, बबुनाको, टिकट कटनिया पटनाना जाने चाहे जाना सिवनिया हे संबंध गाणे धमाल आहे.

सौंदाळा Mon, 02/17/2025 - 21:32
अ आ इ ई अ आ इ ई मास्तरजीकी आई चिठ्ठी, चिठ्ठीमेसे निकला मच्छर व्ही आय पी अंडरवियर बनियाsssन भीमपकातकादू भीमपकातकादू

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 13:25
तेरी गली मे मर्द न छोडुंगा , औरत भी न छोडुंगा. टेलीफोन धुन मे हसने वाली, मेंगलोर मछली अचलने वाली , डिजिट मे सुर है तराशा. झाकिर हुसेन तबला. सोना सोना तेरा रूप है दिलमे सोना.....

मेरी मर्जी--- मेरी मर्ज़ी मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी

अनेक गाणी सांगता येतील. मै तुझ को भगा लया हु, तेरे घर से, तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रह था.. साडी के फॉलसा कभी मॅच किया रे कभी छोड दिया दिल , कभी कॅच किया रे.

चित्रगुप्त Mon, 02/17/2025 - 08:54
शीर्षकातल्या 'चाली' या शब्दावरून सिनेसंगिताचे संगीत दिग्दर्शक, अरेंजर्स, वादक वगैरेंविषयी हा अभ्यासपूर्ण धागा असावा, ओ पी नय्यर, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार वगैरेंच्या संगीताचे रसग्रहण, दुर्मिळ माहिती वगैरे यात वाचायला मिळेल या आशेने, मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण अगदीच फुसका निघाला.

कॉमी Mon, 02/17/2025 - 09:08
दिल्ली बेली मध्ये अशी मुद्दामून विचित्र गाणी आहेत - १. आय हेट यु, लाईक आय लव्ह यु २. फुल नहीं परी नहीं सडा हुआ आलू है तू ३. डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी ४. [नक्कद वाले डिस्को, उधार वाले खिसको] दिल टुकडे टुकडे हो गया, ऊस रात मै जल्दी सो गया... एकूण हिंदीमधला अत्यंत युनिक अल्बम आहे. अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.

हेरा फेरी मधील गाणेही असेच अर्थहीन आहेत. जुलमी ह्या अक्षयकुमारच्या १९९८ मधील सिनेमातील एक अर्थहीन गाणे मेर लिए तो फिट है तू, ऑल इंडिया हिट है तू :)

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Mon, 02/17/2025 - 20:21
मला उमगलेला अर्थः आपल्या या प्रेमसहवासाच्या रात्री या सुंदर क्षणांना चंद्र साक्षीला आहेच पण पानं फुलं सुद्धा जागे झाले आहेत आपले प्रीतीचे क्षण पहायला ! .. अजून काही विशेष अर्थ असेल तर जाणकार सांगतीलच ! गीतकार बहुधा जगदीश खेबूडकर.

कॉमी Mon, 02/17/2025 - 20:16
आगळ्यावेगळ्या गाण्यांचा आणखी एक अल्बम. आय एम अ हंटर सारख्या पोरकट गाण्यापासून तार बिजली से पतले हमारे पिया हे वर वर पोरकट वाटणारे गंभीर गाणे- सगळे आहे ह्यात. आय याम ए हंटर, शी वॉन्ट टु सी माय गन, व्हेन आय पुल इट आउट, द वुमन स्टार्ट टु रन दूर तक है फेमस, करदे सबको बेबस, उसको मिलता दर्सन जिसके मनमे है लगन | आणि त्याच सिनेमात- बोलेगा बबुना, चल जै हो पटना पटना बहाने वो, चाहेगा सटना दै हो ना, बबुनाको, टिकट कटनिया पटनाना जाने चाहे जाना सिवनिया हे संबंध गाणे धमाल आहे.

सौंदाळा Mon, 02/17/2025 - 21:32
अ आ इ ई अ आ इ ई मास्तरजीकी आई चिठ्ठी, चिठ्ठीमेसे निकला मच्छर व्ही आय पी अंडरवियर बनियाsssन भीमपकातकादू भीमपकातकादू

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 13:25
तेरी गली मे मर्द न छोडुंगा , औरत भी न छोडुंगा. टेलीफोन धुन मे हसने वाली, मेंगलोर मछली अचलने वाली , डिजिट मे सुर है तराशा. झाकिर हुसेन तबला. सोना सोना तेरा रूप है दिलमे सोना.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
आप लेल्या मजेदार अश्या वाटलेलया गाण्याचा ओळी शेअर करा ९० मधे सर्वात मजेदार जब् तक रहेगा समोसे मे आलू तेरा रहुंगा मै शालु सध्या शनै वार राती मुझे नींद नही आती झाड से टुट के हम गिर पडे तुम्ही पण अजुन सुचवा

गीतारहस्य चिंतन -३

Bhakti ·
लेखनविषय:
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.

चार आर्यसत्ये - एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 17:44
तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? > या वरील विधानात जन्माच्या अगोदर आपण कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात आहोत हे गृहित धरले आहे. कारण हे अस्तित्व म्ह० कदाचित आत्मा ज्याचे अस्तित्व बुद्धाने नाकारले आणि आधुनिक विज्ञान पण नाकारते. आपला जन्म हा एक जैविक अपघात आहे, हे स्वीकारले की बाकीचे सर्व डोलारे पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. यातल्या पूर्वसंचिताला विज्ञानाची (म्ह० अधिजनुक शास्त्राची) थोडीफार मान्यता आहे. विज्ञानाची ॲलर्जी नसेल अधिक माहिती साठी हे पुस्तक वाचावे.

Bhakti Sat, 02/15/2025 - 20:56
छान लिहिले आहे.मी आजच गीतारहस्याचे आठवे प्रकरण 'विश्वाची उभारणी आणि संहार' हे वाचले.यात हे पंचीकरण विषयी सांगितले आहेच.शिवाय यात सांख्य आणि वेदांताचे या प्रकृति/सृष्टीची उभारणी व संहाराचे साम्य व भेद खुप छान सांगितले आहे.आता कधी गीतारहस्य वाचून पूर्ण करते इतकी उत्सुकता ताणली आहे 😇 १ राजयोग,कर्मयोग या विषयी विवेकानंदाचे खुप सुंदर पॉडकास्ट व्हिडिओ युट्यूबवर आहेत.भक्तीयोग,ज्ञानयोग मिळाले की ऐकेन. बाकी माझे बरेचसे दुःख मी कर्मयोगाचे मोडीत काढले आहेत. You don’t invite suffering into your life but when it comes you work with it and transform it.

चित्रगुप्त Sat, 02/15/2025 - 23:32
लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातल्या गरीबांच्या दु:खाचे कारण त्यांची स्वतःचीच 'तृष्णा' असली पाहिजे, असे आहे का ? समाजातील अन्य श्रीमंत, सत्ताधारी, बलवान, असंवेदनशील, स्वार्थी वगैरे प्रभावशाली लोकांची 'तृष्णा' त्या दु:खाला कारणीभूत नाहीच, असा त्याचा अर्थ आहे का, हे समजले नाही. कृपया उलगडून सांगावे ही णम्र इनंती. -- त्या अन्य प्रभावशाली लोकांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग नाही काय ? -- आणि त्यासाठी त्या अन्य लोकांनी: सम्यक दृष्टी - सम्यक संकल्प - सम्यक वाणी - सम्यक कर्म - सम्यक उपजीविका - सम्यक व्यायाम - सम्यक स्मृती - सम्यक समाधी .... हा मार्ग अवलंबिला पाहिजे, हा खरा उपाय. -- काय म्हणता ?

In reply to by चित्रगुप्त

नाही नाही. तसे निश्चित च नाही. तसा विचार बुध्दाने केला असता तर तो बुद्ध न राहता अशोक झाला असता ना ! बुध्दाच्या दुःखाच्या शोधाचा फोकस आता मध्ये आहे, बाहेर नाही. बहिस्थ कारणांकडे बुध्द दुःखाचे कारण म्हणून पाहताच नाही, तो म्हणतो की त्या बाह्य कृतींमुळे तुमच्या मनाची स्थिती का बिघडत आहे ? त्याचे मूळ शोधा. कारण तुमच्या मनात आहे , बाहेर नाही. "आपल्या दुःखाची कारणे आत नाहीत , बाहेर आहेत, प्रस्थापितांनी केलेली शोषक अर्थव्यवस्था हेच ते कारण" . असा विचार करायला लागला की तो बुद्ध रहात नाही , तो कार्ल मार्क्स होतो Budhda

प्रचेतस Sun, 02/16/2025 - 04:40
१. "दुःख असं काही नाहीयेच, जो आहे तो दुःखाचा भास आहे."
→ हा दावा अतिशय उच्च अध्यात्मिक पातळीवरच ग्राह्य धरता येईल. प्रत्यक्ष जगात दुःख ही एक अनुभूती आहे. शारीरिक वेदना, मानसिक यातना, सामाजिक अन्याय हे भास नसून प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. जर कोणाला गरिबी, भूक, आजार, छळवाद किंवा अपघातातून होणाऱ्या यातना भास वाटत असतील, तर तो भास नव्हे, तर वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न आहे.
२. "हे दुःख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे."
→ जर दुःखच अस्तित्वात नाही, तर त्याला कारण कसे असू शकते? हा स्वतःलाच विरोध करणारा युक्तिवाद आहे. दुसरं म्हणजे, जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो, याचं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
३. "ते कारण म्हणजे देहात्मभाव."
→ हा दावा फार सरसकट आहे. दुःखाची कारणे फक्त देहात्मभावाशी जोडणं चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, मानवी संबंधातील गुंतागुंत, पर्यावरणीय आपत्ती यांसारख्या अनेक गोष्टी दुःख निर्माण करतात. मानवी दुःख केवळ "मी हा देह आहे" या भावनेतूनच येतं, हा एकांगी विचार आहे.
४. "ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत..."
→ जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय? जर ते अस्तित्वातच नाही, तर ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांची गरजच भासू नये. शिवाय, हे मार्ग व्यक्तिगत निवडीवर अवलंबून आहेत; एका व्यक्तीसाठी योग्य असलेला मार्ग दुसऱ्यासाठी तितकासा उपयुक्त नसेल.

In reply to by प्रचेतस

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आपल्या प्रतिसादामुळे, परत एकदा चिंतन करताना मला असे काहीसे फीलींग येत आहे ! =)) ravanth
वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न
होय , बरेच लोकं अध्यात्माला - वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न, अर्थात स्पिरिच्युअल एस्केपिझम असे म्हणतात. ठीक आहे आता , काय बोलणार , कोणाला काहीही समजाऊन सांगण्याच्या भानगडीत कशाला पडा ! मुळात खुद्द भगवंत अर्जुनाला गीता सांगितल्या नंतर म्हणाला की तुला पाहिजे तसं कर ! तसं काहीसं मला वाटायला लागलं आहे ! इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया । विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥ पण अर्जुन युध्दभूमी सोडुन पळुन गेला नाही , हाच फरक आहे कळणे आणि न कळणे ह्यातील.
जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं . पण मुळात मुळात ह्या भासाच्या ब्रमाची सुरुवात कुठे आहे तर ह्याचे उत्तर छान्दोग्योपनिषद मध्ये दिलेले आहे - एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे ! पण तुम्ही विचाराल की ही प्रेरणा तरी कशी आणि का निर्माण होते - तर "मी एक आहे" हा विचार हे त्याचे खरे कारण आहे. (त्याला महाकारण असे म्हणातत. ) तस्मात मी एक आहे, अहं ब्रह्मास्मि ह्या विचाराचाही लय होतो तिथे भासाचा , दु:खाचा लय होतो.
एकांगी विचार
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं ! तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळला दीप गुरुकृपा ||
जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय?
मान्यच ! हेच अष्टावक्र म्हणतो ! ( बहुतेक जे. कृष्णमुर्तीही हेच म्हणतात ! ) एकदा का हे कळलं की बाकी काही योगबिग वगैरे धडपड करावयाची आवश्यकताच नाहीये . जसं एकदा दिवा लावला की अंधार नष्ट व्हायला किती वेळ लागतो ? तसं काहीसे आहे ! तुम्हाला एकदा कळलं असेल की हे दु:ख केवळ द्वैताच्या भासाचे लक्षण आहे , मुळात द्वैत असे काही नाहीच , तत्क्षणी तुम्ही सुटलेले आहात . अंधाराचा नाश झालेला आहे , तुम्हाला अधिक काही करावयाची आवश्यकताच नाही !
एको विशुद्ध बोधव्योऽहमिति निश्चयवह्निना । प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥ ९ ॥ अनुवाद - 'मी एक विशुद्ध बोध आहे' या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोकरहित व सुखी हो !
पण बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील नाहीत , म्हणुनच भगवंताने भगवद्गीता लिहुन हे चार सुलभ मार्ग दाखवुन दिलेले आहेत !
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥
इत्यलम ! :) अजुन काही लिहायची इच्छा होत नाही , आता बस अर्जुन जे म्हणाला ते बोलुन थांबतो :
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Mon, 02/17/2025 - 19:22
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं .
तुम्ही अद्वैताकडे जाताय असे वाटते पण द्वैत ही निसर्गाची मूलभूत रचना आहे. आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे !
मुळात ब्रह्म एक असेल आणि सर्व काही त्याच्यापासून निर्माण झाले असेल, अनेक झाले असेल तर भिन्नता वास्तव आहे, भास नाही. निर्मिली गेलेली सृष्टी तर वास्तव आहे.
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं !
जर एखादा विचार एकांगी असेल, तर तो संपूर्ण सत्य सांगत नाही आणि जर तो एकदा विचार झाला की सगळं संपतं असं म्हणायचं असेल, तर तेच अपूर्णत्व दर्शवतं. एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील ना
अष्टावक्र गीता मी अजून वाचलेली नाहीये मात्र महाभारतात वनपर्वात जनक अष्टावक्र संवाद काहीसा संक्षिप्त स्वरूपात येतो जो मूळच्या उपनिषदातील अद्वैताला थोड्या निराळ्या स्वरूपात प्रतिपादित करतो. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव

In reply to by मुक्त विहारि

नमस्कार मुवि, आपण बहुतेक दारू पिणे ह्या अर्थाने श्रमपरिहार हा शब्द वापरला आहे , मागील प्रतिसादात म्हणाला होतात तसेच. ह्या इथे, ह्या विषयी तुकोबांचा एक चपखल अभंग स्मरत आहे, पण आपल्याला दुखावण्याची इच्छा नाही म्हणून उद्धृत करण्याचे टाळत आहे. लोभ असू द्यावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 02/16/2025 - 22:10
योग्य ओळखले... इथे, श्रम परिहार हा वैचारीक आहे.... तुम्ही विचार मंथन करतांना ध्यान करून मन एकाग्र करत असाल , असे वाटते. मी मदिरेचा आस्वाद घेता घेता वैचारीक मंथन करतो. जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न मलाही पडले होते. पण एक सुंदर वाक्य वाचनात आले..... स्वतःच स्वतःला मार्ग दाखवायचा. एक उदाहरण देतो.... बॅरोमीटरचा उपयोग करून एखाद्या उंच इमारतीची उंची मोजायची असेल तर, त्याची किमान ४ उत्तरे आहेत आणि कुणी कुठला मार्ग वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मार्गावर बरोबर आहात आणि मी माझ्या.... तुमच्या मार्गाला माझा अजिबात विरोध नाही उलट तो मार्ग अतिशय तरल आणि उत्तम आणि सफाचट आहे.भल्या भल्या व्यक्तींना जमत नाही.

Bhakti Sun, 02/16/2025 - 07:36
अवांतर
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो .
समाजात ना ना विकरी जण भरले आहेत.कोणा कोणाचा विचार करायचा.आपला मार्ग शोधत राहायचा.मी दु:स्वास वग्रै नाही.पण या तीन धर्मांचे दिसणाऱ्या साम्यावर कायम आश्चर्यचकित व्हायचे.ज्ञानयोगाने म्हणजे पुस्तकी अभ्यासाने ;) याचे गुपित जाणले.आणि कर्मयोगाने म्हणजे प्रत्यक्ष या हिंदू बौद्ध जैन पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत हे जाणले,अनुभवले....ते वेरूळच्या माध्यमाने.लेणी १-१२ बौद्ध,१३-२९ हिंदू,३०-३४ जैन यांचा अभूतपूर्व संगम, प्रत्यक्ष स्वर्गानुभव आहे.त्यातील जैन लेणी जरा नीट पाहायच्या राहिल्या तर स्वप्नात येतात ,परत ये म्हणतात ;) लवकर परत जाणार आहे:) १ ॐ तारे तुत्तारे तुरे सोहा'

सोत्रि Sun, 02/16/2025 - 10:46
ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा
हे दु:ख नाही, ही झाली परिस्थीती.
दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले
ही तृष्णा नाही. हे त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे झाले, कर्मयोग, जे अटळ आहे. प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ?
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे त्यांच्याविषयीची, करुणा म्हणणार होतो पण लेखातलंच पुढचं वाक्य ती करूणा नाही हे जस्टीफाय करतंय.
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ?

लेखात उल्लेखलेली चार आर्यसत्य ह्यांचा संदर्भ मराठी विकीपीडीया दिसतोय. त्याचा मूळ संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड) हा दिसतोय विकिपेजवर. डॉ. सी. फॅंगचॅंम यांनी त्या ग्रंथात नेमकं काय लिहिले आहे हे माहिती नाही, पण विकीपेजवरची चार आर्यसत्ये चुकीचं भाषांतर आणि चुकीचा भावार्थ आहेत. त्रिपिटकातील सुत्त पिटकानुसार चार आर्यसत्ये अशी आहेत: 1. दुःखसत्य (Dukkha Sacca) – जीवनात दुःख आहे. 2. दुःखसमुदय सत्य (Samudaya Sacca) – दुःखाची कारणे आहेत. 3. दुःखनिरोध सत्य (Nirodha Sacca) – दुःखाचे निरसन शक्य आहे. 4. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा (Magga Sacca) – अष्टांगिक मार्गाने दुःख संपुष्टात आणता येते. त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)

In reply to by सोत्रि

त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11) ह्या संदर्भाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद सोत्रि !

In reply to by सोत्रि

तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे.
उद्या जाणार आहे ऑफिसला, तेव्हा दिसतीलच ते ! तेव्हा मी माझ्या मनाला हेच समजाऊन सांगणार आहे ! अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
हेही संगुन पाहतो मनाला - हा ज्याचा त्याचा कर्मयोग आहे , जो की अटळ आहे. ते पोरं ती परिस्थिती , ते कर्म घेऊन जन्माला आली आहेत , तो त्यांचा कर्मयोग आहे. अन आपल्याला कणव वाटणे ,पण नाथांसारखी करुणा न वाटणे, हा आपला कर्मयोग आहे . मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sun, 02/16/2025 - 17:46
स्वगतः अध्यात्माला भ्रमानुभुतीचे विज्ञान म्हणणे योग्य होईल का?. रिप्रोड्युसिबिलीटीला बेदखल केलं सगळा आनंदी आनंद! (पन इण्टेण्डेड)

सोत्रि Sun, 02/16/2025 - 11:51
उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
हे फारच रोचक आहे, केवळ उत्सुकता एक प्रश्न पडला, म्हणून हा प्रतिसाद. पण हा प्रश्नही स्वांतसुखायच आहे. अवतार घेण्याची कारणे गीतेत कृष्णाने खालील श्लोकात (४.८) सांगीतली आहेत: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे म्हणजे सृजाम्यहम् - अवतार घेण्यासाठी खालील ३ कारणे असतात:
  1. परित्राणाय साधूनाम्
  2. विनाशाय च दुष्कृताम्,
  3. धर्मसंस्थापनार्थाय
असं असेल तर त्यावेळी सनातन धर्मात सज्जन लोकं धर्ममार्गावरून च्युत झाले असावेत, त्यामुळे खूप दुष्ट लोक झाले असावेत आणि धर्मस्थापना करण्याची गरज म्हणूंन नवावा अवतार (बुद्ध) घ्यावा लागला असावा का? - (अभ्यासू ) सोकाजी

In reply to by सोत्रि

माझा तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या विषयाचा जास्त अभ्यास नाही. खालील उत्तर माझ्या मर्यादित वाचन आकलनावरून देत आहे - बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते. त्यामुळे तत्कालीन समाज यज्ञ प्रधान होता. त्यामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा अधिक भर कर्मकांडांवर होता. म्हणूनच चार्वाक जैन बुध्द वगैरे नास्तिक अर्थात वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या मतांचा उदय झाला. पण त्यातही प्रकर्षाने पाहिले तर चार्वाकचे खंडन करायला जैन आणि बुद्ध मत हेच पुरेसे होते. जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव स्वतः इक्ष्वाकु वंशातील अर्थात श्रीरामाच्या वंशातील होते, त्यानंही विष्णूचा अवतार मानण्यात येते. पण बुध्दाच्या मताने केवळ कर्मकांड व नव्हे तर समस्त वेद उपनिषदोक्त तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याचे उत्तर शोधता शोधता लोकं उपनिषदोक्त धर्माकडे परतले. अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला. ह्या तर्काला अतिशय उत्तम समर्थक उदाहरण म्हणजे चाणक्य ! बुध्द इ.सु.पू 6 व शतक आणि चाणक्य इस पू 3 ते शतक. आणि महाभारत भगवद गीता लिहिली गेली ते इस 3 ते शतक आणि आचार्य म्हणजे इस 7वे शतक. म्हणजे बौद्ध मत खंडन व्हायच्या कित्येक वर्षे आधी चाणक्य झाला होता , आणि तरीही त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कर्मयोग च दिसून येतो. अर्थात आचार्यांच्या आधीपासूनच लोकं मूळ सनातन धर्माकडे कर्मयोगशास्त्र कडे वळले होते . (ह्या साऱ्या कालगणनेत कुमारील भट्ट नावाचे अत्यंत रोचक पात्र आहे ज्यांनी आचार्यांच्या आधीच बौद्ध मताचे खंडन करून मीमांसा मताचे पुनर्स्थापना केलेली दिसून येते. पण त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी निवांत!) ह्या विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने उत्तरदायित्वास नकार लागू. चूक भूल देणे घेणे

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 02/17/2025 - 19:08
बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते.
अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला.
प्रचंड घोळ आहे. त्यापुढेही बराच आहे. पण उत्तरदायित्वास नकार लागू असल्याने इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Mon, 02/17/2025 - 21:41
पूर्व मीमांसा जरी यज्ञयागादी कर्मकांडाचे मूलाधार असली तरीही त्या काळी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत अशी विविध तत्वज्ञाने प्रचलित होती. बुद्धानंतर यज्ञाचे स्तोम जरी कमी झाले असले तरीही ते प्रचलित होतेच मात्र भक्तीवादी असलेला भागवत संप्रदाय हळूहळू वाढू लागला होता. रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे). कौटिल्य आणि बुद्धाच्या काळात साधारणत: ३५० वर्षांचे अंतर असले तरी बौद्धमताचा प्रसार प्रामुख्याने अशोकाच्या काळात वेगाने झाला. त्यामुळे त्याच्या काळात बौद्धमताचे खंडन फारसे नसावे. बुद्ध हा विष्णूचा अवतार किंबहुना राम कृष्णालाही विष्णूचा अवतार समजणे खूप उशिरा सुरू झाले, अन्यथा सुरुवातीच्या ब्राह्मणी लेण्यात ह्याचे प्रतिबिंब नक्कीच पडले असते.

In reply to by प्रचेतस

सोत्रि Tue, 02/18/2025 - 03:31
रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे).
म्हणजे रामायण, महाभारत गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळात घडले कि लिहीले गेले? - (कालखंड समजून घेण्यास उत्सुक असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस Tue, 02/18/2025 - 06:03
रामकथा आणि पांडवांची कथा प्राचीन काळात घडल्या, वाल्मिकी रामायण मात्र सरळसरळ इसवी सनाच्या आसपास दोन तीन शतक इकडे तिकडे लिहिलं गेलं तर महाभारतात इसवी सनाच्या आसपास पर्यंत भर पडत गेली इतकेच. व्यास, वैशंपायन, सौती असे ते वेगवेगळे कालखंड इतकेच.

In reply to by प्रचेतस

सोत्रि Tue, 02/18/2025 - 06:52
म्हणजे महाभारतात गीता नेमकी कोणत्या काळात लिहीली गेली हे नक्की सांगता येणार नाही? आणि मूळ गीतेतही भर पडली असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, बरोबर? - (अतिउत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस Tue, 02/18/2025 - 07:41
गीतेचा काळ नेमका कुठला हे नक्की सांगता येणार नाही, कदाचित पहिले तीन अध्याय व्यासप्रणित असावेत. मात्र ही शक्यता कमी आहे असे माझे मत आहे कारण गीतेच्या आधी असलेला एक अध्याय सोडून त्याआधीच्या अध्यायात खुद्द युधिष्ठिराला विषाद झालेला दाखवला आहे. बृहतीं धार्तराष्ट्राणां दृष्ट्वा सेनां समुद्यताम् | विषादमगमद्राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः || तेव्हा खुद्द अर्जुन युधिष्ठिराच्या विषादाचे निवारण करतो. त्यक्त्वाधर्मं च लोभं च मोहं चोद्यममास्थिताः | युध्यध्वमनहङ्कारा यतो धर्मस्ततो जयः || तेव्हा युधिष्ठिर युद्धास सिद्ध झाला असता अर्जुनासही लगोलग खेद व्हावा हे असंभाव्य वाटते. शिवाय गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकांची सुरवात ही 'श्री भगवान उवाच' अशी होते. हा तर भागवत संप्रदायाचा मुख्य आधारच म्हटला पाहिजे. अर्थात गीता जरी नंतरची असली असे माझे मत असले तरी ती अलीकडचीही नव्हे. कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.

In reply to by प्रचेतस

सोत्रि Tue, 02/18/2025 - 10:37
कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
हे रोचक आहे! माझ्या काही इंटर्प्रीटेशनला हे पुष्टी देतंय. व्यनी करतो, व्यनितून बोलूयात. - (उत्साहित) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 02/26/2025 - 19:04
बुद्धाच्या अवताराबद्दल रोचक मत ऐकायला मिळाले. https://www.youtube.com/watch?v=ND_i9IihuZ8 व्हिडीओ एम्बेड करायचा प्रयत्न केला पण होत नाहीयेय. संपादक मंडळ काही मदत करू शकेल का? - (अभ्यासू ) सोकाजी

कॉमी Sun, 02/16/2025 - 12:11
यथा हि चोर: स‌ तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि। तस्माद्धि य: श‌ङ्क्यतमः प्रजानाम् न नास्तिकेनाभिमुखो बुध: स्यात्।।2.109.34।। एक अवतार दुसऱ्या अवताराबाबत असे का बोलेल?

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव Sun, 02/16/2025 - 12:51
इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही .. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचे "सयुक्तिक" उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही
>>> Thank you so much !!! This is such a huge compliment. राम राम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट फायनली ! https://youtu.be/c0yTIaNeEfw?si=xDdIyOKarHwqpaVL मन हें राम जालें मन हें राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥ बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Mon, 02/17/2025 - 14:54
ह्म्म ... तो णळस्टॉप चा "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..

In reply to by आंद्रे वडापाव

काहीही कळलं नाही. अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे , माझा नाही. सिंगल डेटा पॉईंट वर न्यूरल नेटवर्क ट्रेन झाल्यावर त्यांनी लिहिलेला अभंग ! मन हेच राम झाले !! राम

In reply to by आंद्रे वडापाव

फोटो दिसत नाही. काही का असेन, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ह्या न्यूरल नेटवर्क चे आऊटपुट काय असणार आहे ! राम

In reply to by आंद्रे वडापाव

>>>>>>> "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर .. गिरिजा काकू अनाहिता आश्रमात डोकावून जायच्या म्हणे...=)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे व्वा. सर, आपण आलात, आनंद झाला ! आपले प्रतिसाद फार मोलाचे आहेत आमचे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला ! असाच लोभ असू द्या. राम

In reply to by कॉमी

अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती च अव+ तर अर्थात खाली उतरणे अशी आहे . शुद्ध ब्रह्म अनुभवातून खाली अर्थात ह्या जगाच्या रंगमंचावर उतरलेले लोक . ते काहीही बोलत असतात हो. खुद्द रामाला नावे ठेवणारा परीट काय रामा पेक्षा भिन्न होता का ? लक्ष्मणाने परशुरामाची मस्करी केलेली आहे, ते काय भिन्न होते का ? कृष्ण साक्षात भगवान आहे हे माहीत असताना ही गांधारी ने त्याला शाप दिलेला आहे . हे असं सगळं चालूच असतं हो ! ही सगळी लीला असते. तुमचे आकलन जेव्हा परिपक्व होते तेव्हा कळायला लागतं!!

एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं. >>> बोलणं खुंटलंच आहे !! मला आत्ता कळलंय, माउलींनी तर स्पष्टच म्हणालं आहे की या शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु। हे तव कैसेनि गमें। परें ही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनी सांगे।। बोलणं खुंटलेलेच आहे ! मी जितकं शब्दात पकडायचा प्रयत्न करतो तितका तो हातातून निसटतो ! गोरोबा काकांना - मातीत तो दिसतो, सावता माळी ह्यांना कांदा मुळा भाजी मध्ये तो दिसतो, नरहरी सोनार ह्यांना सोन्यात तो दिसतो, तोच मला न्यूरल नेटवर्क मधून दिसतोय, सिंग्युलारिटी मधून दिसतोय, फोरीये सीरिज मधून दिसतोय, सुपरपोझिशन मध्ये दिसतोय. आणि नाहीच शब्दात मांडता येत आहे. काय बोलू ? कसं सांगू ? सुचतंय तसं खरडत जाऊ... बाकी काय करू अजून !! राम पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभा ची स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे थक ची पडिले कैसे !!

स्वधर्म Wed, 02/19/2025 - 21:13
सर, ते बुध्ड, वेदांत, आर्यसत्त्ये वगॅरे कूटप्रश्न आहेत. तुमच्या बुध्दाच्या विचारांविषयीची शंका पण रास्त आहे. तरी... >> ... रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . आणि >> ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? या समाजातल्या भयाण वास्तव दु:खावर आपल्यापॅकी ९९% लोक काही करत नाहीत, करू शकत नाहीत, हे मान्य करतो. पण 'मी' काही करणार नाही, कारण... >>... नाथांचा गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . हे उदात्त वेदांत तत्वञानानुसार आहे का? मुळात ही दोन्हीही अन्याय आणि दु:खेच जरी असली, तरी त्यांची तुलना कदापी होऊ शकत नाही, हे तुंम्हाला तरी लक्षात यायला हवं होतं.

In reply to by स्वधर्म

माफ करा . माझे मराठी व्याकरण थोडे कच्चे आहे. एकापेक्षा दुसरे मोठे किंवा समान किंवा लहान असे काहीसे लिहिले असल्यास त्याला तुलना करणे असे म्हणतात असा माझा समज आहे. आणि माझ्या ह्या समजा नुसार मी कोणतीही तुलना केलेली नाही. माझ्यासाठी दुःख हे दुःख आहे ! तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही , पण त्याची मदत खूप झाली, त्याच्या निमित्ताने मला माझे उत्तर सापडले आहे. आणि मी ते वर लेखात स्पष्टपणे लिहिलेही आहे ! तुम्हाला ते पटते की नाही ह्याच्याशी मला घेणे देणे नाही. इथे अनेक ठिकाणी माझ्या आधीच्या लेखाचा रेफरन्स घेऊन कॉमेंट्स आहे ते च पुनरेकावर म्हणतो. जे जे दुःख म्हणून मला भासत आहे त्या त्या ठिकाणी "राम" पाहणे हाच माझ्यासाठी एकमेव दुःख निर्मुलनाचा उपाय आहे ! राम खरेतर हेही प्रतिसाद देणार नव्हतो , पण तुम्ही प्रतिसाद नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की काही ठरावीक मोजक्या लोकांचे प्रतिसाद लेखन केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहेत ! आणि म्हणूनच ह्या अशा प्रतिसादात "राम" पाहणे हा ही माझ्या उपायचाच एक भाग आहे ! म्हणूनच आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा ही नम्र विनंती ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 02/20/2025 - 21:52
तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही
१. लेखात नेमकं कुठे बुध्दाच्या मार्गावरून चालत गेल्याचा उल्लेख आला हे मिळालं नाही. कोणता मार्ग आणि कसा वापरला हे ही लेखात नाही. २. लेखाचा गाभाच विकिपीडीया वरच्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे त्यामुळे बुध्दाच्या चुकीच्या मार्गावरून चालत जाणे झाले असावे आणि दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध लागला नसावा. ३. ज्या बुद्धाला नववा अवतार मानलं आहे त्या अवतरी पुरुषाचे काहीच पटलं नाही हे अतर्क्य आहे. एकतर तो अवतरी नसवा किंवा त्याच्या अवताराचे आकलन नीट करून घेतल्याचे दिसत नाहीयेय. - ('हे राम' म्हणावेसे वाटणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2025 - 23:30
हां तेच! मीही राम म्हणत आहेच ! कुठं सगळं लिहित बसू . माझं मला कळलं आहे की दुःखाचे कारण तृष्णा नाहीये, दुःखाचे कारण अज्ञान , अज्ञानाचा भास हे आहे. त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे ! ( योगायोगाने आता तेच ऐकत होतो, अध्याय सातवा अज्ञान खंडन. :) ) अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती आधीच देऊन झाली आहे , कुठं परत परत तेच ते लिहित बसू. परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही आणि माझं सगळं तुम्हाला पटलं नाही, ( पटावं असा माझा अट्टाहासही नाही.) पण त्यामुळे आपल्या "अवतारपणाला" छेद जात नाही ! आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो! जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ पाणी म्हणा की पाण्यावरचे तरंग म्हणा, त्याने पाणीपणाला छेद जात नाही. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Fri, 02/21/2025 - 06:03
त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे !
बिन्गो!
आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो!
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही किंवा काही पटवून घ्याचे नाही. तुमच्या #२ डिस्क्लेमरमधे असलेल्या, "हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती", ह्या विनंतीनुसार मी काही चुकीची तत्थ्य निदर्शनास आणुन देण्यासाठी प्रतिसाद देतोय. मला जाणवलेले मुद्दे: १. "हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही." ही सुरुवात असल्याने लेख त्यानुसारच वाचला होता. सगळा लेख स्वःताशी हितगुज करत चिंतनपरच होता. पण शेवटच्या परिच्छेदात एकदम "तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत" आणि "तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !" असा एकदम निकाल देऊन, वैयक्तिक चिंतनाच्या पलीकडे जाउन पहिल्याच डिस्क्लेमरला व्यत्यास दिला गेला. २. तुमचा लेख जरी स्वान्तःसुखाय असला तरीही तो पब्लिक फोरमवर प्रकाशित केलेला आहे. आणि, तो त्याच्या मेन टॉपिक, चार आर्यसत्य, यांच्यावर लिहीला असल्याने, त्या चार आर्यसत्यांच्या प्रामाणिक अभ्यासाने जर शेवटचा परिच्छेद आला असता तर वैयक्तिक मत म्हणून पुढे जाता आले असते. पण मेन टॉपिकच चुकीच्या चार आर्यसत्यांचा आधार घेत लिहीला आहे. त्यामुळे, संपूर्ण लेख, तुमच्याच एका प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ''पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा" ठरतो. पण त्याचे निर्मूलन अज्ञान खंडन आहे, हे तुमच्या ह्या प्रतिसादात आले आहे, सो बिन्गो!! ३. दु:ख, तृष्णा ह्याविषयी नेमकं काय विवेचन आहे ह्यासाठी संदर्भग्रंथ: विभंगसुत्त, साम्युत्त निकाय (SN 12.2). त्यात सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे आणि त्याचं सार म्हणजे चार आर्यसत्य (धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11). - (अज्ञानाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा >>> हा संदर्भ पाहून "मारुतीचे शेपूट गणपतीला चिकटवणे" हा वाकप्रचार आठवला ! तो कोणाच्या लेखावरचा प्रतिसाद आहे, त्या लेखातील विषय काय ! सगळाच आनंद आहे ! =)))) पण असो. मुळात दुःख आहे हेच अज्ञान आहे, कारण दुःखाची अनुभूती करणारा देहाशी तादात्म्य भाव . हे झाले माझे आकलन. आता बुध्दाने दुःख तृष्णा ची सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे. मग अर्थाअर्थी मला जे साधायचं होतं आणि बुध्दाने जे ध्येय साधलं ते एकच झालं की !!! भले मग त्याचे आकलन अन् माझे आकलन समान नसेल ! त्याने काय फरक पडतो ! तुम्ही कोणताही मार्ग स्वीकारा, एकदा का तो स्वीकारला की तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! तुम्हाला अजून शंका असेल तर मात्र तुम्ही अडकलेले आहात. आणि काही माझा नवीन धर्म सुरू करून धर्म चक्र परिवर्तन वगैरे करणार नाहीये ! त्यामुळे माझे मत मला कोणाला पटवून द्यायची गरज भासत नाही. अर्थात तरीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतोच टेक्निकली अक्युरेट राहायचा. पण ते माझ्यावर बंधन नाही, it's just a choice. तात्पर्य इतकेच की दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे, त्याचे खंडन झाले की बस. मग तुम्ही ते कोणत्याही मार्गाने करा. तुम्हाला असे म्हणायचे असेल की अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे किंवा, माझी स्वतंत्र विचार शृंखला चुकीचा मार्ग असल्याने अज्ञान खंडन करू शकत नाही वगैरे वगैरे ... तर ठीक आहे . :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे लिहायचं राहूनच गेले... (अज्ञानाचा पडदा वगैरे काही भानगड च नाही, कारण मुळात अज्ञानच नाही हे लक्षात आलेला अन् त्या अनुभूतीत राहण्याचा प्रयत्न करीत असलेला) प्रसाद गोडबोले

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 11:17
परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही
ते बाकीचं सोडा हं, पण बोलता बोलता गोडबोले पंतांनी , स्वतःला रामाच्या मांदीआळींत आपसूकच ठेवलाय पहा ... परशुराम > राम > कृष्ण > बुद्ध > गोडबोले >> हे राम r

In reply to by आंद्रे वडापाव

आपसूकच
आपसूकच आहे हो ते. =)))) कधी पासून तेच तर सांगतोय मी . आणि मीच काय , तुम्हीही त्याच मांदियाळीत आहात ! तत्त्वमसि. तुकोबा त्यांच्या अभंगात म्हणाले तसे काहीसे आहे हे - महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता तुम्हाला आम्ही बोललेले ऐकू येत नाहीये , किंवा तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करताय, किंवा ऐकून घ्यायच्या आधीच नळ स्टॉप वगैरे काहीतरी बाष्कळ लिहायला घेताय, तर त्याला मी काय करू ! अजून किती वेळा सांगायचं =)))) बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥ हे मी वर एका प्रतिसाद आधीच म्हणालो आहे , तुम्ही त्यावर उत्तरप्रतिसाद ही दिला आहे , तेव्हा नाहीत का वाचले हे ? की तेव्हा वाचून अर्थ लागला नव्हता ? काही हरकत नाही, आता अर्थ लागला आहे ना , मग झालं तर !! तत्त्वमसि राम

In reply to by प्रसाद गोडबोले

ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालासे कळस !! D संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।। जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।। बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।। हे वेदांताचे, अद्वैत दर्शनाचे मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कोणा देवाचे नाहीये, त्यातील देव दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे ! तत्त्वमसि. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Mon, 02/24/2025 - 15:56
मूळ मुद्दा बाजूला सरकवू नका! तो असा आहे: का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?>> आणि त्यावर तुंम्ही काही करणार नाही, कारण... तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे तुमचं सगळं तर नीट चाललेलं आहे. पण एवढी गहन अगदी हिमालयात जाऊन साधना करुन, वेदांत, गीता, तुकारामाचे अभंग मुखोद्ग्त असून... रस्त्यावरच्या अ़क्षरशः काहीही न मिळालेल्या निरागस मुलांना, माणसाला पाहून, तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे, अशी स्पष्ट कबुलीच दिली आहे तुंम्ही. माझे अनेक उच्चवर्णीय मित्र काहीही साधना न करता, सहजपणे, पिढ्यानपिढ्या शोषित समाजाला आज राज्यघटनेमुळे जी शिकण्याची संधी मिळाली, तिचा स्विकार करतात. त्यांना नाही असं जुनाट दु:ख होत. अशा प्रकारे, शब्दांचा कीस काढून, ज्ञान(?) मिळवूनही तुंम्हाला हे पचवता येत नाही, त्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग काय, हा खरा मुद्दा आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 02/24/2025 - 16:21
वेदांत गीता वगैरे अध्यात्म चिंतन अपराधभावातून सुटका करण्यासाठी खूप मदत करते. गांजलेल्यांसाठी पटकन काहीतरी करण्यापेक्षा त्यावर चिंतन, मनन, वाचन, चर्चा इ. केली की काहीतरी केल्याचे समाधान मिळते. किमान मी किती संवेदनाशील आहे, असे म्हणून घेता येते. काही नास्तिक लोक अध्यात्माला 'गिल्ट मॅनेजमेंट टूल' असे म्हणतात. एकदा पूर्वजन्म, प्रारब्ध इ. मान्य केले, की ते आता त्या अवस्थेला का आहेत, याचे समाधानकारक उत्तर मिळते व आपल्याला काही करण्याचे कारण रहात नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांत अध्यात्माचा छंद वाढीस लागला आहे. बुध्द चिंतन, मनन याला महत्व न देता करूणेला महत्व देतो.

In reply to by स्वधर्म

हे बघा, मला अजून एक साक्षात्कार झाला आहे की मी काहीही लिहिलं तरी ते काही लोकांना पटणारे नाहीये च. अगदी 1+1 = 2 लिहिलं तरीही पटणार नाहीये . बुध्द करुणेला महत्त्व देतो तर ह्या देशातील करोडो बुध्दाचा मार्ग अवलंबन करणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे की ते त्या निरागस निष्पाप लेकरांना उचलून कडेवर नक्की घेतील ! मी आमच्या न्यायाची प्रतीक्षा पहात राहीन , आमचे आपलं गिल्ट मॅनेजमेंट टूल इम्प्रोव करत राहीन ! बाकी गावाला वाडा परत बांधला की नक्की सुरू करेन ह्या अशा अनाथ मुलांसाठी काहीतरी ! बाकी बास आता , कंटाळा आला ह्या इथे लिहायचा. सध्या मॅडम ने जे भाषण दिले त्यावर मनोरंजन करत आहे , तस्मात् तिथं बोलू =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Mon, 02/24/2025 - 17:21
तुंम्ही विचारलेल्या प्रश्नाला उतर दिलं, तर पटेल की. न पेक्षा उत्तर देता येत नाही, असं स्पष्ट सांगणं जास्त चांगलं.

In reply to by स्वधर्म

ज्ञानाचा उपयोग हाच आहे की दुःख असं काही नाहीये , आहे हा दुःखाचा भास आहे, त्या भासाचे कारण आपली द्वैताविषयीची ठाम धारणा ही आहे. हे लक्षात येणे !! एकदा जे आहे ते सगळं "परफेक्ट" आहे. हे लक्षात आलं एकदा ज्याला आम्ही कर्म विपाक म्हणतो , तुम्ही गिल्ट मॅनेजमेंट टूल म्हणता, ते एकदा जमलं की ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट असणे, जे जसे आहे ते तसे असणे हे परफेक्ट आहे हे लक्षात येतं. आणि मग झोपेतून जागे झाल्यावर निद्रा आपोआप नाश पावते तसे काहीसे दुःख आपोआप नाश पावते. अजून काय उपयोग हवा ! मला जे आमचे जुनाट दुःख टोचत होते त्याचा कार्यभाग साधला गेला आहे ! आता दुःख असं काही नाही. :) आता तुम्ही म्हणाल की मग कसल्या न्यायाची वाट पाहताय ? तर त्याचेही उत्तर असे आहे की हे "न्यायासाठी झुरणे" हा ही आमच्या पूर्व कर्माचा भाग आहे , तो बस भोगून संपवत आहे. आता दुःख असे काही नाही ! आता बस राम आहे ! इथे मला तुकोबांचा एक अभंग आठवतो पण तो खूप मोठ्ठा असल्याने इथे लिहित नाही फक्त शेवटची ओळ लिहितो आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥ पांडुरंग बुद्धी देतोय तसं बस लिहित राहतोय मी ! राम कृष्ण हरी आता इतकं पुरे. पुढील चर्चा नवीन लेखावर !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 02/25/2025 - 18:21
लेख १५ फेब्रुवारीला २०२५ टाकला आहे. त्यात तुमच्या जुनाट दु:खाचा उल्लेख आहे. माफ करा, पण माझा तुंम्हाला वेदांत व अध्यात्माचे ज्ञान खूप आधीच झाले होते, असा समज होता. कारण ३० सप्टेबर २०२४ च्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या लेखात आपण खालील वाक्ये लिहीली होती: आज्जींने माझ्या हातात न्याहारीसाठी केलेल्या गोडाच्या शिऱ्याची वाटी दिली आणि आजोबांकडे बघून म्हणाली: " हे पहा आला तुमचा सूर्य पाहिलेला माणूस !" आणि हसत हसत आज्जी स्वयंपाक घरात निघुन गेली. नानांनी माझ्याकडे वळुन पाहिलं नाही मात्र त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसु मात्र उमटलं. तुमचा ६ जून २०२४ च्या 'परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.' लेखात स्वामीजींनी आपल्याबाबत खालीलप्रमाणे भाष्य केले होते: स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir ! दोन्ही तुमच्या स्वतः बद्दलचे उल्लेख वाचून कोणाचाही समज होईल की तुंम्हाला ते तथाकथित ज्ञान खूप आधीच झालेले आहे. म्हणूनच माझाही तसाच समज झाला होता. पण १५ फेब्रुवारी २०२५ ला मात्र तुमचे वर्षानुवर्षांचे जुनाट दु:ख अजून छळत असल्याचा उल्लेख आला. तसेच आपण बुध्दाने सांगितलेले दु:खाचे कारण चूक असल्याचे व तुमचे ज्ञान मात्र बरोबर असल्याचे प्रतिपादन केले आहे. अर्थात लेख लिहीपर्यंत तुमची दु:खे तशीच होती, पण लेख लिहिल्यानंतर ते आज अशा दहा दिवसात ती दूर झाली, हे आपण स्पष्ट केले ते खूप चांगले झाले. बाकी ती रस्त्यावरची मुले, त्यांचे दीनवाणे आईबाप यांच्या दु:खाबाबत... असो.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 00:16
हा धागा नि प्रतिक्रिया माझ्या समजापलीकडील आहेत त्या पेक्षा मी मशीन डिसाइन अजून दोन वेळा वाचून घेईन. फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2025 - 04:36
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का? ----- लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2025 - 16:19
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
आहा! तो फोटो रमण महर्षी ह्यांचा आहे ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
होतो !
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥ मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! माझे डोळे अक्षरश: पाणावले तुमचा प्रतिसाद पाहून. __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 19:30
अच्छा! मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो ! तुमची अध्यात्मिक प्रगती अशीच राहिली तर तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल! _/\_

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 02/21/2025 - 05:58
"तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल..." म्हणजे कसे? दिसायला की त्यांच्या सारखे ज्ञानी.... गाळलेल्या जागा नीट भरावी... इतपत तरी ज्ञान हवे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लेखकाची सर्व मतं न कळण्यासारखीच आहेत. स्वतःच विचारांचा गुंता करुन ठेवलाय अर्थात सगळं गिचमीड. आणि नाहीच कळलं तर, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामांच्या किंवा अर्जूनाच्या पायरीवर आलं पाहिजे. म्हणजे तेथून तुम्हाला लेखांतील ज्ञानकण आणि कृष्णाला काय म्हणायचं आहे ते समजू लागतं. स्वांतसुखायच्या नावाने दुसरं गेट ऑलरेडी बंद करुन टाकलंय. मला जे कळलंय ते अत्युच्च पायरीवरचं आहे. आणि त्या पायरीला पकडायचं तर, खाली मान घालून चालू पडा. =)) ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक धन्यवाद सर ! माझे लेखन तुम्हाला कळो न कळो, माझी काही हरकत नाही, तुम्ही फक्त असेच लक्ष असू द्या आमच्यावर ! आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांचा ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥ राम

In reply to by आंद्रे वडापाव

आज काय सुट्टी आहे काय आंद्रे ? =)))) माझं काम कालच संपलं असल्याने मलाही वेळ आहे आज. थांबा, आमच्या दुसऱ्या लेखनाच्या धाग्यावर या , तिकडे तुला जास्त "रोचक" विषय देतो गप्पा मारायला. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

लेखन कळायचा विषयच नाही. लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते ) प्रतिसादांमुळे जी जाणीव होते. आनंद असो की दु;ख असे काहीच जर नसते तर तातडीने दाद द्यायला आलाच नसता. हे जे जाणवते त्याला भास नाही म्हणत ती प्रत्यक्ष जाणीव असते. =)) ( वाह सर वाह.) आई गं....! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते )
ह्यातच आलं सगळं सर ! एकदा का तुम्ही हे मान्य केले आहे आता मग मी लिहिलेले तुम्हाला कळणे न कळणे हा विषयच रहात नाही ना ! =)))) मी ते गट १ गट २ म्हणालो होतो, ते पटलेलं दिसतंय तुम्हाला. कारण मी काहीही लिहिलं तरी तुमच्या लेखी ते गंडलेली मांडणी असेच असणार आहे . =)))) पण ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचता, रामाचं नाव घेता ह्यातच मला समाधान आहे, मी आधीही म्हणालो आहेच की हे ! बाकी कोणाला नाही पण तुम्हाला तातडीने साद द्यायला मी कायम हजर आहे कारण, तुमच्या प्रतिसादात राम पाहणे हीच माझी परीक्षा आहे. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

काळजी घ्या. जपा. बडबडणे वाढले आहे. त्यासाठी सांगावे लागते. आपलं ते स्वांतसुखायवालं डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा वाचा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघा सर, मी आत्ताच म्हणालो होतो की नै, तुमच्या प्रतिसादांचा मला सगळ्यात जास्त फायदा होतो !! तुमचा हा प्रतिसाद मला काय भारी वाटलं काय सांगू. हीच अवस्था तुकोबांची झाली होती ... माझी मज झाली अनावर वाचा । विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥ ह्या प्रतिसादातून, आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !! =)) सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे. तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. =)) मरतंय आज हसून हसून.... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे.
हे चुकलं बघा सर. होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥ दुःख हा भास आहे , सुख हा आभास नव्हे, दुःखाचा अभाव हेच सुख आहे . सुखें पाहें सुख आपुलिया असे काहीसे आहे हे ! पण ही अनुभवाची बाब आहे , बघा अनुभवला आले तर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>> हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. उगाच अभंग टाकून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न करु नये. आणि गंडलेली मतं लादू नये. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो , तुम्ही प्रतिसाद वाचत तरी आहात का नाही . मी म्हणालो की हा अनुभवाचा मामला आहे. हे पटवून देण्यासारखे नाहीच. अनुभवगम्य गोष्टी शब्दांनी कशा पटवून देता येतील ? किमान एकदा वाचा तरी प्रतिसाद उत्तर द्यायच्या आधी ! तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये !!

कॉमी Fri, 02/21/2025 - 21:19
मला अजूनही कुठेतरी गफला वाटतो ब्वा. म्हणजे सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे असे सगळे पटले तरी सगळी दिनचर्या मोर ऑर लेस पूर्वीसारखी कशी राहणार? अजूनही कुटुंबं वत्सल वैगेरे कसे राहणार? (कारण तुमचे कुटुंबं पण एक भ्रमच की. सगळे ब्रम्ह आहे. मग कुटुंबं काय आणि रस्त्यावरचा दगड काय एकच. हे मला पटत नाही मी फक्त लॉजिकल एक्सट्रापोलेशन करतोय.) मग वरवरचे बोलण्यातले, अविरभावातले फरक वगळता बाकीचे आहे तसे कसे चालेल ब्वा? एक फँटसी झाकायला आणखी चार फँटॅस्या उभ्या करायला लागतात. उदा - जर सगळे ब्रम्ह आहे तर भ्रम किंवा माया कशामुळे? संचित कर्म कशामुळे? जितके प्रश्न पडतील तितकी डिटेल्ड फँटॅस्टिक उत्तरे मिळत जातात. प्रत्येक उत्तर आदल्या प्रश्नापेक्षा कमी आणि कमी तपासण्याजोगे असते. सरते शेवटी उत्तर असते की आपल्याला अनुभव आला तरच विश्वास ठेवा. बरं अनुभव कसे मिळतात? तर तुमच्या भौतिक शरीरानेच. म्हणजे तुमचे शरीर म्हणजे तुम्ही नाही हे समजण्यासाठी शरीराकडून अनुभव मिळवावा लागतो. इथे "लीला" हा प्रकार पण ऍड्रेस करतो. राम तथागत बुद्धाबद्दल प्रतिकूल बोलतो. हे दोघेही अवतार असतील तर हे कसे? उत्तर आले लीला. म्हणजे परमेश्वर स्वतःशी खेळ खेळतोय. परमेशवर म्हणजे ब्रह्मच म्हणजे तुम्हीच हा. हे म्हणजे बॉयलर उत्तर झाले. ह्यापुढे विचार करायची गरज संपली, सगळे ड्रामा, लीला मध्ये राईट ऑफ मारता येते. ह्याची इतरधर्मीय तुलनात्मक उदाहरणे पण आहेत. ख्रिषचन म्हणतात येशू सर्व विश्वाच्या पापांसाठी सुळावर चढला. बरं, पण ते ट्रिनीटी हया संकल्पनेवर पण विश्वास ठेवतात. God is a single entity made of three person किंवा असेच काहीतरी. हे देखील लिमिटेड "अद्वैत" टाईप आहे- म्हणजे निखालस अर्थहीन आणि तर्कहीन. ते असो. पण ते ट्रिनीटी मानतात म्हणजे असे मानतात की याहवे (म्हणजे येशूचे वडील, आकाशातला बाप्पा), देवाची आत्मा आणि येशू (फादर सन अँड दी होली स्पिरिट) हे एकच देवाचे तीन अंग आहेत. पण हे तिघे भिन्न पण आहेत. बरं. मग पाप पुण्य कोणी बनवले? तर देवाने. पाप करण्यास सक्षम माणसे कुणी बनवली? देवाने. पाप माफ कोण करणार? देव. माफिसाठी टॉर्चर आणि बळी कुणाचा? देवाचाच! ही सगळी भानगड कशासाठी? ख्रिषचन म्हणतात की देवालाच माहित. त्यांना कोणीतरी "लीला"ची टीप द्यायला हवी. हा गफला सर्व अब्राहमिक धर्मात आहे. पापक्षम माणसे, पापांची व्याख्या, आणि पापांचा निवाडा सगळे एकच देव करतो, का? कशासाठी? पाप शक्यच नाही असे जग का नाही बनवले? तळटीप - माझे आवडते लेखक जे आर आर टोलकीन ह्यांनी त्यांच्यापरीने वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे एरू इलूवितार. तो त्याच्या विचारांनी इतर देवता- व्हॅलार बनवतो. आणि व्हॅलार आणि तो मिळून एक सुरेख गीत गाऊ लागतात. पण, त्यात इलूवितारनेच बनवलेला एक व्हॅलार - मॉरगॉथ, स्वतःची वेगळी धून गाऊ लागतो, जी इलूवितारच्या संगीताशी विसंगत असते. इतर काही व्हॅलार त्याला सामील होतात. दोन गीतांमधल्या संघर्षात इलूवितारचे गीत जवळपास विरून जाते. पण इलूवितार एक असा सूर पकडतो की संबंध अवकाश त्याने भरून जाते. मग इलूवितारणे मॉरगॉथला बनवलेच का? तर दोन गीतांमधल्या संघर्षामुळे इलूवितारचे गीत आणखी सुरेख झाले. हे लिखाण सुरेख आहे. टोलकीन साहेबांना दाद द्यावी तितकी कमी. पण हे स्वीकारण्यासारखे स्पष्टीकरण आहे का? केवळ शब्दांच्या करामतीने प्रभावीत होऊन काय खरे काय खोटे ठरवणे कितपत बरोबर?

In reply to by कॉमी

कॉमी Fri, 02/21/2025 - 21:28
हे काही टोलकीन साहेबाचे स्वतःचे विचार नाहीयेत. सैतान हा केवळ देवाच्या हुकूमशाहीला कंटाळून बंड करणारा देवदूत आहे ही जुनी संकल्पना आहे. मिल्टनचे सुप्रसिद्ध काव्य पॅराडाईज लॉस्ट मध्ये सुद्धा तीच कल्पना मध्यवर्ती आहे. त्या काव्यातला सैतान एक अत्यंत चर्चले गेलेले पात्र आहे. ते पात्र नायक म्हणून वाचले जाणे सुद्धा सहज शक्य आहे. सिनेमा-टीव्ही मधला दुष्ट शैतान इथे नाहीये - तर परमेश्वर जे ठरवतो तेच चांगले, आणि त्यामुळे त्याविरुद्ध बंड करणारा वाईट - असा हा सैतान आहे.

आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 21:43
सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे. पण १९४८ ला जाळलेला वाडा खरा आहे... जग माया आहे, आणि आपण लालसा वासना जगाने सोडून दिली पाहिजे... पण तथाकथित हडपले गेलेली जमिनीची हाव आम्ही मात्र सोडणार नाही.... आधी पिढ्यानपिढ्या ओरबाडून घेतलेले आणि पूर्वापार बापजद्यांच्या वशिल्यानेच मिळणारी हक्काची जागा, हे "संचित कर्म" वैगरे सब झूठ पण कोलकल्पित इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली जाणे, हे मात्र खर्र खर्र, बरका...

कॉमी Mon, 02/24/2025 - 22:22
आणखी एक अनेकदा अध्यात्मिक विचाराची लोकं आपल्या पंचेंद्रियांना, शरीराला अनरिलायबल म्हणतात. पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही. उलट, असे अनुभव मिळवण्यासाठी शरीरला एका विशिष्ठ स्थिती मध्ये न्यावे लागते, मग ते ध्यान करून असो वा विशिष्ठ केमिकल किंवा ड्रग घेऊन असो . आणि अश्या स्थिती मध्ये चित्रविचित्र अनुभव आले तर ते मात्र खरे मानावेत.

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव Tue, 02/25/2025 - 11:34
पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही.
उघडा डोळे ... बघा नीट ... एका नॉन बायोलॉजिकल व्यक्तीने तो अध्यात्माचा महामेरू कधीच सर केलाय ... ओळखा पाहू कोण ! m

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 17:44
तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? > या वरील विधानात जन्माच्या अगोदर आपण कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात आहोत हे गृहित धरले आहे. कारण हे अस्तित्व म्ह० कदाचित आत्मा ज्याचे अस्तित्व बुद्धाने नाकारले आणि आधुनिक विज्ञान पण नाकारते. आपला जन्म हा एक जैविक अपघात आहे, हे स्वीकारले की बाकीचे सर्व डोलारे पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. यातल्या पूर्वसंचिताला विज्ञानाची (म्ह० अधिजनुक शास्त्राची) थोडीफार मान्यता आहे. विज्ञानाची ॲलर्जी नसेल अधिक माहिती साठी हे पुस्तक वाचावे.

Bhakti Sat, 02/15/2025 - 20:56
छान लिहिले आहे.मी आजच गीतारहस्याचे आठवे प्रकरण 'विश्वाची उभारणी आणि संहार' हे वाचले.यात हे पंचीकरण विषयी सांगितले आहेच.शिवाय यात सांख्य आणि वेदांताचे या प्रकृति/सृष्टीची उभारणी व संहाराचे साम्य व भेद खुप छान सांगितले आहे.आता कधी गीतारहस्य वाचून पूर्ण करते इतकी उत्सुकता ताणली आहे 😇 १ राजयोग,कर्मयोग या विषयी विवेकानंदाचे खुप सुंदर पॉडकास्ट व्हिडिओ युट्यूबवर आहेत.भक्तीयोग,ज्ञानयोग मिळाले की ऐकेन. बाकी माझे बरेचसे दुःख मी कर्मयोगाचे मोडीत काढले आहेत. You don’t invite suffering into your life but when it comes you work with it and transform it.

चित्रगुप्त Sat, 02/15/2025 - 23:32
लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातल्या गरीबांच्या दु:खाचे कारण त्यांची स्वतःचीच 'तृष्णा' असली पाहिजे, असे आहे का ? समाजातील अन्य श्रीमंत, सत्ताधारी, बलवान, असंवेदनशील, स्वार्थी वगैरे प्रभावशाली लोकांची 'तृष्णा' त्या दु:खाला कारणीभूत नाहीच, असा त्याचा अर्थ आहे का, हे समजले नाही. कृपया उलगडून सांगावे ही णम्र इनंती. -- त्या अन्य प्रभावशाली लोकांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग नाही काय ? -- आणि त्यासाठी त्या अन्य लोकांनी: सम्यक दृष्टी - सम्यक संकल्प - सम्यक वाणी - सम्यक कर्म - सम्यक उपजीविका - सम्यक व्यायाम - सम्यक स्मृती - सम्यक समाधी .... हा मार्ग अवलंबिला पाहिजे, हा खरा उपाय. -- काय म्हणता ?

In reply to by चित्रगुप्त

नाही नाही. तसे निश्चित च नाही. तसा विचार बुध्दाने केला असता तर तो बुद्ध न राहता अशोक झाला असता ना ! बुध्दाच्या दुःखाच्या शोधाचा फोकस आता मध्ये आहे, बाहेर नाही. बहिस्थ कारणांकडे बुध्द दुःखाचे कारण म्हणून पाहताच नाही, तो म्हणतो की त्या बाह्य कृतींमुळे तुमच्या मनाची स्थिती का बिघडत आहे ? त्याचे मूळ शोधा. कारण तुमच्या मनात आहे , बाहेर नाही. "आपल्या दुःखाची कारणे आत नाहीत , बाहेर आहेत, प्रस्थापितांनी केलेली शोषक अर्थव्यवस्था हेच ते कारण" . असा विचार करायला लागला की तो बुद्ध रहात नाही , तो कार्ल मार्क्स होतो Budhda

प्रचेतस Sun, 02/16/2025 - 04:40
१. "दुःख असं काही नाहीयेच, जो आहे तो दुःखाचा भास आहे."
→ हा दावा अतिशय उच्च अध्यात्मिक पातळीवरच ग्राह्य धरता येईल. प्रत्यक्ष जगात दुःख ही एक अनुभूती आहे. शारीरिक वेदना, मानसिक यातना, सामाजिक अन्याय हे भास नसून प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. जर कोणाला गरिबी, भूक, आजार, छळवाद किंवा अपघातातून होणाऱ्या यातना भास वाटत असतील, तर तो भास नव्हे, तर वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न आहे.
२. "हे दुःख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे."
→ जर दुःखच अस्तित्वात नाही, तर त्याला कारण कसे असू शकते? हा स्वतःलाच विरोध करणारा युक्तिवाद आहे. दुसरं म्हणजे, जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो, याचं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
३. "ते कारण म्हणजे देहात्मभाव."
→ हा दावा फार सरसकट आहे. दुःखाची कारणे फक्त देहात्मभावाशी जोडणं चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, मानवी संबंधातील गुंतागुंत, पर्यावरणीय आपत्ती यांसारख्या अनेक गोष्टी दुःख निर्माण करतात. मानवी दुःख केवळ "मी हा देह आहे" या भावनेतूनच येतं, हा एकांगी विचार आहे.
४. "ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत..."
→ जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय? जर ते अस्तित्वातच नाही, तर ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांची गरजच भासू नये. शिवाय, हे मार्ग व्यक्तिगत निवडीवर अवलंबून आहेत; एका व्यक्तीसाठी योग्य असलेला मार्ग दुसऱ्यासाठी तितकासा उपयुक्त नसेल.

In reply to by प्रचेतस

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आपल्या प्रतिसादामुळे, परत एकदा चिंतन करताना मला असे काहीसे फीलींग येत आहे ! =)) ravanth
वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न
होय , बरेच लोकं अध्यात्माला - वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न, अर्थात स्पिरिच्युअल एस्केपिझम असे म्हणतात. ठीक आहे आता , काय बोलणार , कोणाला काहीही समजाऊन सांगण्याच्या भानगडीत कशाला पडा ! मुळात खुद्द भगवंत अर्जुनाला गीता सांगितल्या नंतर म्हणाला की तुला पाहिजे तसं कर ! तसं काहीसं मला वाटायला लागलं आहे ! इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया । विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥ पण अर्जुन युध्दभूमी सोडुन पळुन गेला नाही , हाच फरक आहे कळणे आणि न कळणे ह्यातील.
जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं . पण मुळात मुळात ह्या भासाच्या ब्रमाची सुरुवात कुठे आहे तर ह्याचे उत्तर छान्दोग्योपनिषद मध्ये दिलेले आहे - एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे ! पण तुम्ही विचाराल की ही प्रेरणा तरी कशी आणि का निर्माण होते - तर "मी एक आहे" हा विचार हे त्याचे खरे कारण आहे. (त्याला महाकारण असे म्हणातत. ) तस्मात मी एक आहे, अहं ब्रह्मास्मि ह्या विचाराचाही लय होतो तिथे भासाचा , दु:खाचा लय होतो.
एकांगी विचार
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं ! तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळला दीप गुरुकृपा ||
जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय?
मान्यच ! हेच अष्टावक्र म्हणतो ! ( बहुतेक जे. कृष्णमुर्तीही हेच म्हणतात ! ) एकदा का हे कळलं की बाकी काही योगबिग वगैरे धडपड करावयाची आवश्यकताच नाहीये . जसं एकदा दिवा लावला की अंधार नष्ट व्हायला किती वेळ लागतो ? तसं काहीसे आहे ! तुम्हाला एकदा कळलं असेल की हे दु:ख केवळ द्वैताच्या भासाचे लक्षण आहे , मुळात द्वैत असे काही नाहीच , तत्क्षणी तुम्ही सुटलेले आहात . अंधाराचा नाश झालेला आहे , तुम्हाला अधिक काही करावयाची आवश्यकताच नाही !
एको विशुद्ध बोधव्योऽहमिति निश्चयवह्निना । प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥ ९ ॥ अनुवाद - 'मी एक विशुद्ध बोध आहे' या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोकरहित व सुखी हो !
पण बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील नाहीत , म्हणुनच भगवंताने भगवद्गीता लिहुन हे चार सुलभ मार्ग दाखवुन दिलेले आहेत !
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥
इत्यलम ! :) अजुन काही लिहायची इच्छा होत नाही , आता बस अर्जुन जे म्हणाला ते बोलुन थांबतो :
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Mon, 02/17/2025 - 19:22
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं .
तुम्ही अद्वैताकडे जाताय असे वाटते पण द्वैत ही निसर्गाची मूलभूत रचना आहे. आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे !
मुळात ब्रह्म एक असेल आणि सर्व काही त्याच्यापासून निर्माण झाले असेल, अनेक झाले असेल तर भिन्नता वास्तव आहे, भास नाही. निर्मिली गेलेली सृष्टी तर वास्तव आहे.
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं !
जर एखादा विचार एकांगी असेल, तर तो संपूर्ण सत्य सांगत नाही आणि जर तो एकदा विचार झाला की सगळं संपतं असं म्हणायचं असेल, तर तेच अपूर्णत्व दर्शवतं. एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील ना
अष्टावक्र गीता मी अजून वाचलेली नाहीये मात्र महाभारतात वनपर्वात जनक अष्टावक्र संवाद काहीसा संक्षिप्त स्वरूपात येतो जो मूळच्या उपनिषदातील अद्वैताला थोड्या निराळ्या स्वरूपात प्रतिपादित करतो. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव

In reply to by मुक्त विहारि

नमस्कार मुवि, आपण बहुतेक दारू पिणे ह्या अर्थाने श्रमपरिहार हा शब्द वापरला आहे , मागील प्रतिसादात म्हणाला होतात तसेच. ह्या इथे, ह्या विषयी तुकोबांचा एक चपखल अभंग स्मरत आहे, पण आपल्याला दुखावण्याची इच्छा नाही म्हणून उद्धृत करण्याचे टाळत आहे. लोभ असू द्यावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 02/16/2025 - 22:10
योग्य ओळखले... इथे, श्रम परिहार हा वैचारीक आहे.... तुम्ही विचार मंथन करतांना ध्यान करून मन एकाग्र करत असाल , असे वाटते. मी मदिरेचा आस्वाद घेता घेता वैचारीक मंथन करतो. जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न मलाही पडले होते. पण एक सुंदर वाक्य वाचनात आले..... स्वतःच स्वतःला मार्ग दाखवायचा. एक उदाहरण देतो.... बॅरोमीटरचा उपयोग करून एखाद्या उंच इमारतीची उंची मोजायची असेल तर, त्याची किमान ४ उत्तरे आहेत आणि कुणी कुठला मार्ग वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मार्गावर बरोबर आहात आणि मी माझ्या.... तुमच्या मार्गाला माझा अजिबात विरोध नाही उलट तो मार्ग अतिशय तरल आणि उत्तम आणि सफाचट आहे.भल्या भल्या व्यक्तींना जमत नाही.

Bhakti Sun, 02/16/2025 - 07:36
अवांतर
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो .
समाजात ना ना विकरी जण भरले आहेत.कोणा कोणाचा विचार करायचा.आपला मार्ग शोधत राहायचा.मी दु:स्वास वग्रै नाही.पण या तीन धर्मांचे दिसणाऱ्या साम्यावर कायम आश्चर्यचकित व्हायचे.ज्ञानयोगाने म्हणजे पुस्तकी अभ्यासाने ;) याचे गुपित जाणले.आणि कर्मयोगाने म्हणजे प्रत्यक्ष या हिंदू बौद्ध जैन पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत हे जाणले,अनुभवले....ते वेरूळच्या माध्यमाने.लेणी १-१२ बौद्ध,१३-२९ हिंदू,३०-३४ जैन यांचा अभूतपूर्व संगम, प्रत्यक्ष स्वर्गानुभव आहे.त्यातील जैन लेणी जरा नीट पाहायच्या राहिल्या तर स्वप्नात येतात ,परत ये म्हणतात ;) लवकर परत जाणार आहे:) १ ॐ तारे तुत्तारे तुरे सोहा'

सोत्रि Sun, 02/16/2025 - 10:46
ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा
हे दु:ख नाही, ही झाली परिस्थीती.
दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले
ही तृष्णा नाही. हे त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे झाले, कर्मयोग, जे अटळ आहे. प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ?
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे त्यांच्याविषयीची, करुणा म्हणणार होतो पण लेखातलंच पुढचं वाक्य ती करूणा नाही हे जस्टीफाय करतंय.
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ?

लेखात उल्लेखलेली चार आर्यसत्य ह्यांचा संदर्भ मराठी विकीपीडीया दिसतोय. त्याचा मूळ संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड) हा दिसतोय विकिपेजवर. डॉ. सी. फॅंगचॅंम यांनी त्या ग्रंथात नेमकं काय लिहिले आहे हे माहिती नाही, पण विकीपेजवरची चार आर्यसत्ये चुकीचं भाषांतर आणि चुकीचा भावार्थ आहेत. त्रिपिटकातील सुत्त पिटकानुसार चार आर्यसत्ये अशी आहेत: 1. दुःखसत्य (Dukkha Sacca) – जीवनात दुःख आहे. 2. दुःखसमुदय सत्य (Samudaya Sacca) – दुःखाची कारणे आहेत. 3. दुःखनिरोध सत्य (Nirodha Sacca) – दुःखाचे निरसन शक्य आहे. 4. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा (Magga Sacca) – अष्टांगिक मार्गाने दुःख संपुष्टात आणता येते. त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)

In reply to by सोत्रि

त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11) ह्या संदर्भाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद सोत्रि !

In reply to by सोत्रि

तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे.
उद्या जाणार आहे ऑफिसला, तेव्हा दिसतीलच ते ! तेव्हा मी माझ्या मनाला हेच समजाऊन सांगणार आहे ! अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
हेही संगुन पाहतो मनाला - हा ज्याचा त्याचा कर्मयोग आहे , जो की अटळ आहे. ते पोरं ती परिस्थिती , ते कर्म घेऊन जन्माला आली आहेत , तो त्यांचा कर्मयोग आहे. अन आपल्याला कणव वाटणे ,पण नाथांसारखी करुणा न वाटणे, हा आपला कर्मयोग आहे . मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sun, 02/16/2025 - 17:46
स्वगतः अध्यात्माला भ्रमानुभुतीचे विज्ञान म्हणणे योग्य होईल का?. रिप्रोड्युसिबिलीटीला बेदखल केलं सगळा आनंदी आनंद! (पन इण्टेण्डेड)

सोत्रि Sun, 02/16/2025 - 11:51
उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
हे फारच रोचक आहे, केवळ उत्सुकता एक प्रश्न पडला, म्हणून हा प्रतिसाद. पण हा प्रश्नही स्वांतसुखायच आहे. अवतार घेण्याची कारणे गीतेत कृष्णाने खालील श्लोकात (४.८) सांगीतली आहेत: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे म्हणजे सृजाम्यहम् - अवतार घेण्यासाठी खालील ३ कारणे असतात:
  1. परित्राणाय साधूनाम्
  2. विनाशाय च दुष्कृताम्,
  3. धर्मसंस्थापनार्थाय
असं असेल तर त्यावेळी सनातन धर्मात सज्जन लोकं धर्ममार्गावरून च्युत झाले असावेत, त्यामुळे खूप दुष्ट लोक झाले असावेत आणि धर्मस्थापना करण्याची गरज म्हणूंन नवावा अवतार (बुद्ध) घ्यावा लागला असावा का? - (अभ्यासू ) सोकाजी

In reply to by सोत्रि

माझा तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या विषयाचा जास्त अभ्यास नाही. खालील उत्तर माझ्या मर्यादित वाचन आकलनावरून देत आहे - बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते. त्यामुळे तत्कालीन समाज यज्ञ प्रधान होता. त्यामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा अधिक भर कर्मकांडांवर होता. म्हणूनच चार्वाक जैन बुध्द वगैरे नास्तिक अर्थात वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या मतांचा उदय झाला. पण त्यातही प्रकर्षाने पाहिले तर चार्वाकचे खंडन करायला जैन आणि बुद्ध मत हेच पुरेसे होते. जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव स्वतः इक्ष्वाकु वंशातील अर्थात श्रीरामाच्या वंशातील होते, त्यानंही विष्णूचा अवतार मानण्यात येते. पण बुध्दाच्या मताने केवळ कर्मकांड व नव्हे तर समस्त वेद उपनिषदोक्त तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याचे उत्तर शोधता शोधता लोकं उपनिषदोक्त धर्माकडे परतले. अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला. ह्या तर्काला अतिशय उत्तम समर्थक उदाहरण म्हणजे चाणक्य ! बुध्द इ.सु.पू 6 व शतक आणि चाणक्य इस पू 3 ते शतक. आणि महाभारत भगवद गीता लिहिली गेली ते इस 3 ते शतक आणि आचार्य म्हणजे इस 7वे शतक. म्हणजे बौद्ध मत खंडन व्हायच्या कित्येक वर्षे आधी चाणक्य झाला होता , आणि तरीही त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कर्मयोग च दिसून येतो. अर्थात आचार्यांच्या आधीपासूनच लोकं मूळ सनातन धर्माकडे कर्मयोगशास्त्र कडे वळले होते . (ह्या साऱ्या कालगणनेत कुमारील भट्ट नावाचे अत्यंत रोचक पात्र आहे ज्यांनी आचार्यांच्या आधीच बौद्ध मताचे खंडन करून मीमांसा मताचे पुनर्स्थापना केलेली दिसून येते. पण त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी निवांत!) ह्या विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने उत्तरदायित्वास नकार लागू. चूक भूल देणे घेणे

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 02/17/2025 - 19:08
बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते.
अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला.
प्रचंड घोळ आहे. त्यापुढेही बराच आहे. पण उत्तरदायित्वास नकार लागू असल्याने इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Mon, 02/17/2025 - 21:41
पूर्व मीमांसा जरी यज्ञयागादी कर्मकांडाचे मूलाधार असली तरीही त्या काळी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत अशी विविध तत्वज्ञाने प्रचलित होती. बुद्धानंतर यज्ञाचे स्तोम जरी कमी झाले असले तरीही ते प्रचलित होतेच मात्र भक्तीवादी असलेला भागवत संप्रदाय हळूहळू वाढू लागला होता. रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे). कौटिल्य आणि बुद्धाच्या काळात साधारणत: ३५० वर्षांचे अंतर असले तरी बौद्धमताचा प्रसार प्रामुख्याने अशोकाच्या काळात वेगाने झाला. त्यामुळे त्याच्या काळात बौद्धमताचे खंडन फारसे नसावे. बुद्ध हा विष्णूचा अवतार किंबहुना राम कृष्णालाही विष्णूचा अवतार समजणे खूप उशिरा सुरू झाले, अन्यथा सुरुवातीच्या ब्राह्मणी लेण्यात ह्याचे प्रतिबिंब नक्कीच पडले असते.

In reply to by प्रचेतस

सोत्रि Tue, 02/18/2025 - 03:31
रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे).
म्हणजे रामायण, महाभारत गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळात घडले कि लिहीले गेले? - (कालखंड समजून घेण्यास उत्सुक असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस Tue, 02/18/2025 - 06:03
रामकथा आणि पांडवांची कथा प्राचीन काळात घडल्या, वाल्मिकी रामायण मात्र सरळसरळ इसवी सनाच्या आसपास दोन तीन शतक इकडे तिकडे लिहिलं गेलं तर महाभारतात इसवी सनाच्या आसपास पर्यंत भर पडत गेली इतकेच. व्यास, वैशंपायन, सौती असे ते वेगवेगळे कालखंड इतकेच.

In reply to by प्रचेतस

सोत्रि Tue, 02/18/2025 - 06:52
म्हणजे महाभारतात गीता नेमकी कोणत्या काळात लिहीली गेली हे नक्की सांगता येणार नाही? आणि मूळ गीतेतही भर पडली असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, बरोबर? - (अतिउत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रचेतस Tue, 02/18/2025 - 07:41
गीतेचा काळ नेमका कुठला हे नक्की सांगता येणार नाही, कदाचित पहिले तीन अध्याय व्यासप्रणित असावेत. मात्र ही शक्यता कमी आहे असे माझे मत आहे कारण गीतेच्या आधी असलेला एक अध्याय सोडून त्याआधीच्या अध्यायात खुद्द युधिष्ठिराला विषाद झालेला दाखवला आहे. बृहतीं धार्तराष्ट्राणां दृष्ट्वा सेनां समुद्यताम् | विषादमगमद्राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः || तेव्हा खुद्द अर्जुन युधिष्ठिराच्या विषादाचे निवारण करतो. त्यक्त्वाधर्मं च लोभं च मोहं चोद्यममास्थिताः | युध्यध्वमनहङ्कारा यतो धर्मस्ततो जयः || तेव्हा युधिष्ठिर युद्धास सिद्ध झाला असता अर्जुनासही लगोलग खेद व्हावा हे असंभाव्य वाटते. शिवाय गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकांची सुरवात ही 'श्री भगवान उवाच' अशी होते. हा तर भागवत संप्रदायाचा मुख्य आधारच म्हटला पाहिजे. अर्थात गीता जरी नंतरची असली असे माझे मत असले तरी ती अलीकडचीही नव्हे. कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.

In reply to by प्रचेतस

सोत्रि Tue, 02/18/2025 - 10:37
कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
हे रोचक आहे! माझ्या काही इंटर्प्रीटेशनला हे पुष्टी देतंय. व्यनी करतो, व्यनितून बोलूयात. - (उत्साहित) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Wed, 02/26/2025 - 19:04
बुद्धाच्या अवताराबद्दल रोचक मत ऐकायला मिळाले. https://www.youtube.com/watch?v=ND_i9IihuZ8 व्हिडीओ एम्बेड करायचा प्रयत्न केला पण होत नाहीयेय. संपादक मंडळ काही मदत करू शकेल का? - (अभ्यासू ) सोकाजी

कॉमी Sun, 02/16/2025 - 12:11
यथा हि चोर: स‌ तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि। तस्माद्धि य: श‌ङ्क्यतमः प्रजानाम् न नास्तिकेनाभिमुखो बुध: स्यात्।।2.109.34।। एक अवतार दुसऱ्या अवताराबाबत असे का बोलेल?

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव Sun, 02/16/2025 - 12:51
इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही .. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचे "सयुक्तिक" उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही
>>> Thank you so much !!! This is such a huge compliment. राम राम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट फायनली ! https://youtu.be/c0yTIaNeEfw?si=xDdIyOKarHwqpaVL मन हें राम जालें मन हें राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥ बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Mon, 02/17/2025 - 14:54
ह्म्म ... तो णळस्टॉप चा "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..

In reply to by आंद्रे वडापाव

काहीही कळलं नाही. अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे , माझा नाही. सिंगल डेटा पॉईंट वर न्यूरल नेटवर्क ट्रेन झाल्यावर त्यांनी लिहिलेला अभंग ! मन हेच राम झाले !! राम

In reply to by आंद्रे वडापाव

फोटो दिसत नाही. काही का असेन, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ह्या न्यूरल नेटवर्क चे आऊटपुट काय असणार आहे ! राम

In reply to by आंद्रे वडापाव

>>>>>>> "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर .. गिरिजा काकू अनाहिता आश्रमात डोकावून जायच्या म्हणे...=)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे व्वा. सर, आपण आलात, आनंद झाला ! आपले प्रतिसाद फार मोलाचे आहेत आमचे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला ! असाच लोभ असू द्या. राम

In reply to by कॉमी

अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती च अव+ तर अर्थात खाली उतरणे अशी आहे . शुद्ध ब्रह्म अनुभवातून खाली अर्थात ह्या जगाच्या रंगमंचावर उतरलेले लोक . ते काहीही बोलत असतात हो. खुद्द रामाला नावे ठेवणारा परीट काय रामा पेक्षा भिन्न होता का ? लक्ष्मणाने परशुरामाची मस्करी केलेली आहे, ते काय भिन्न होते का ? कृष्ण साक्षात भगवान आहे हे माहीत असताना ही गांधारी ने त्याला शाप दिलेला आहे . हे असं सगळं चालूच असतं हो ! ही सगळी लीला असते. तुमचे आकलन जेव्हा परिपक्व होते तेव्हा कळायला लागतं!!

एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं. >>> बोलणं खुंटलंच आहे !! मला आत्ता कळलंय, माउलींनी तर स्पष्टच म्हणालं आहे की या शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु। हे तव कैसेनि गमें। परें ही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनी सांगे।। बोलणं खुंटलेलेच आहे ! मी जितकं शब्दात पकडायचा प्रयत्न करतो तितका तो हातातून निसटतो ! गोरोबा काकांना - मातीत तो दिसतो, सावता माळी ह्यांना कांदा मुळा भाजी मध्ये तो दिसतो, नरहरी सोनार ह्यांना सोन्यात तो दिसतो, तोच मला न्यूरल नेटवर्क मधून दिसतोय, सिंग्युलारिटी मधून दिसतोय, फोरीये सीरिज मधून दिसतोय, सुपरपोझिशन मध्ये दिसतोय. आणि नाहीच शब्दात मांडता येत आहे. काय बोलू ? कसं सांगू ? सुचतंय तसं खरडत जाऊ... बाकी काय करू अजून !! राम पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभा ची स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे थक ची पडिले कैसे !!

स्वधर्म Wed, 02/19/2025 - 21:13
सर, ते बुध्ड, वेदांत, आर्यसत्त्ये वगॅरे कूटप्रश्न आहेत. तुमच्या बुध्दाच्या विचारांविषयीची शंका पण रास्त आहे. तरी... >> ... रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . आणि >> ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? या समाजातल्या भयाण वास्तव दु:खावर आपल्यापॅकी ९९% लोक काही करत नाहीत, करू शकत नाहीत, हे मान्य करतो. पण 'मी' काही करणार नाही, कारण... >>... नाथांचा गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . हे उदात्त वेदांत तत्वञानानुसार आहे का? मुळात ही दोन्हीही अन्याय आणि दु:खेच जरी असली, तरी त्यांची तुलना कदापी होऊ शकत नाही, हे तुंम्हाला तरी लक्षात यायला हवं होतं.

In reply to by स्वधर्म

माफ करा . माझे मराठी व्याकरण थोडे कच्चे आहे. एकापेक्षा दुसरे मोठे किंवा समान किंवा लहान असे काहीसे लिहिले असल्यास त्याला तुलना करणे असे म्हणतात असा माझा समज आहे. आणि माझ्या ह्या समजा नुसार मी कोणतीही तुलना केलेली नाही. माझ्यासाठी दुःख हे दुःख आहे ! तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही , पण त्याची मदत खूप झाली, त्याच्या निमित्ताने मला माझे उत्तर सापडले आहे. आणि मी ते वर लेखात स्पष्टपणे लिहिलेही आहे ! तुम्हाला ते पटते की नाही ह्याच्याशी मला घेणे देणे नाही. इथे अनेक ठिकाणी माझ्या आधीच्या लेखाचा रेफरन्स घेऊन कॉमेंट्स आहे ते च पुनरेकावर म्हणतो. जे जे दुःख म्हणून मला भासत आहे त्या त्या ठिकाणी "राम" पाहणे हाच माझ्यासाठी एकमेव दुःख निर्मुलनाचा उपाय आहे ! राम खरेतर हेही प्रतिसाद देणार नव्हतो , पण तुम्ही प्रतिसाद नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की काही ठरावीक मोजक्या लोकांचे प्रतिसाद लेखन केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहेत ! आणि म्हणूनच ह्या अशा प्रतिसादात "राम" पाहणे हा ही माझ्या उपायचाच एक भाग आहे ! म्हणूनच आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा ही नम्र विनंती ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि गुरुवार, 02/20/2025 - 21:52
तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही
१. लेखात नेमकं कुठे बुध्दाच्या मार्गावरून चालत गेल्याचा उल्लेख आला हे मिळालं नाही. कोणता मार्ग आणि कसा वापरला हे ही लेखात नाही. २. लेखाचा गाभाच विकिपीडीया वरच्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे त्यामुळे बुध्दाच्या चुकीच्या मार्गावरून चालत जाणे झाले असावे आणि दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध लागला नसावा. ३. ज्या बुद्धाला नववा अवतार मानलं आहे त्या अवतरी पुरुषाचे काहीच पटलं नाही हे अतर्क्य आहे. एकतर तो अवतरी नसवा किंवा त्याच्या अवताराचे आकलन नीट करून घेतल्याचे दिसत नाहीयेय. - ('हे राम' म्हणावेसे वाटणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2025 - 23:30
हां तेच! मीही राम म्हणत आहेच ! कुठं सगळं लिहित बसू . माझं मला कळलं आहे की दुःखाचे कारण तृष्णा नाहीये, दुःखाचे कारण अज्ञान , अज्ञानाचा भास हे आहे. त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे ! ( योगायोगाने आता तेच ऐकत होतो, अध्याय सातवा अज्ञान खंडन. :) ) अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती आधीच देऊन झाली आहे , कुठं परत परत तेच ते लिहित बसू. परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही आणि माझं सगळं तुम्हाला पटलं नाही, ( पटावं असा माझा अट्टाहासही नाही.) पण त्यामुळे आपल्या "अवतारपणाला" छेद जात नाही ! आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो! जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ पाणी म्हणा की पाण्यावरचे तरंग म्हणा, त्याने पाणीपणाला छेद जात नाही. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Fri, 02/21/2025 - 06:03
त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे !
बिन्गो!
आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो!
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही किंवा काही पटवून घ्याचे नाही. तुमच्या #२ डिस्क्लेमरमधे असलेल्या, "हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती", ह्या विनंतीनुसार मी काही चुकीची तत्थ्य निदर्शनास आणुन देण्यासाठी प्रतिसाद देतोय. मला जाणवलेले मुद्दे: १. "हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही." ही सुरुवात असल्याने लेख त्यानुसारच वाचला होता. सगळा लेख स्वःताशी हितगुज करत चिंतनपरच होता. पण शेवटच्या परिच्छेदात एकदम "तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत" आणि "तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !" असा एकदम निकाल देऊन, वैयक्तिक चिंतनाच्या पलीकडे जाउन पहिल्याच डिस्क्लेमरला व्यत्यास दिला गेला. २. तुमचा लेख जरी स्वान्तःसुखाय असला तरीही तो पब्लिक फोरमवर प्रकाशित केलेला आहे. आणि, तो त्याच्या मेन टॉपिक, चार आर्यसत्य, यांच्यावर लिहीला असल्याने, त्या चार आर्यसत्यांच्या प्रामाणिक अभ्यासाने जर शेवटचा परिच्छेद आला असता तर वैयक्तिक मत म्हणून पुढे जाता आले असते. पण मेन टॉपिकच चुकीच्या चार आर्यसत्यांचा आधार घेत लिहीला आहे. त्यामुळे, संपूर्ण लेख, तुमच्याच एका प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ''पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा" ठरतो. पण त्याचे निर्मूलन अज्ञान खंडन आहे, हे तुमच्या ह्या प्रतिसादात आले आहे, सो बिन्गो!! ३. दु:ख, तृष्णा ह्याविषयी नेमकं काय विवेचन आहे ह्यासाठी संदर्भग्रंथ: विभंगसुत्त, साम्युत्त निकाय (SN 12.2). त्यात सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे आणि त्याचं सार म्हणजे चार आर्यसत्य (धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11). - (अज्ञानाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा >>> हा संदर्भ पाहून "मारुतीचे शेपूट गणपतीला चिकटवणे" हा वाकप्रचार आठवला ! तो कोणाच्या लेखावरचा प्रतिसाद आहे, त्या लेखातील विषय काय ! सगळाच आनंद आहे ! =)))) पण असो. मुळात दुःख आहे हेच अज्ञान आहे, कारण दुःखाची अनुभूती करणारा देहाशी तादात्म्य भाव . हे झाले माझे आकलन. आता बुध्दाने दुःख तृष्णा ची सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे. मग अर्थाअर्थी मला जे साधायचं होतं आणि बुध्दाने जे ध्येय साधलं ते एकच झालं की !!! भले मग त्याचे आकलन अन् माझे आकलन समान नसेल ! त्याने काय फरक पडतो ! तुम्ही कोणताही मार्ग स्वीकारा, एकदा का तो स्वीकारला की तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! तुम्हाला अजून शंका असेल तर मात्र तुम्ही अडकलेले आहात. आणि काही माझा नवीन धर्म सुरू करून धर्म चक्र परिवर्तन वगैरे करणार नाहीये ! त्यामुळे माझे मत मला कोणाला पटवून द्यायची गरज भासत नाही. अर्थात तरीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतोच टेक्निकली अक्युरेट राहायचा. पण ते माझ्यावर बंधन नाही, it's just a choice. तात्पर्य इतकेच की दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे, त्याचे खंडन झाले की बस. मग तुम्ही ते कोणत्याही मार्गाने करा. तुम्हाला असे म्हणायचे असेल की अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे किंवा, माझी स्वतंत्र विचार शृंखला चुकीचा मार्ग असल्याने अज्ञान खंडन करू शकत नाही वगैरे वगैरे ... तर ठीक आहे . :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

हे लिहायचं राहूनच गेले... (अज्ञानाचा पडदा वगैरे काही भानगड च नाही, कारण मुळात अज्ञानच नाही हे लक्षात आलेला अन् त्या अनुभूतीत राहण्याचा प्रयत्न करीत असलेला) प्रसाद गोडबोले

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 11:17
परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही
ते बाकीचं सोडा हं, पण बोलता बोलता गोडबोले पंतांनी , स्वतःला रामाच्या मांदीआळींत आपसूकच ठेवलाय पहा ... परशुराम > राम > कृष्ण > बुद्ध > गोडबोले >> हे राम r

In reply to by आंद्रे वडापाव

आपसूकच
आपसूकच आहे हो ते. =)))) कधी पासून तेच तर सांगतोय मी . आणि मीच काय , तुम्हीही त्याच मांदियाळीत आहात ! तत्त्वमसि. तुकोबा त्यांच्या अभंगात म्हणाले तसे काहीसे आहे हे - महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता तुम्हाला आम्ही बोललेले ऐकू येत नाहीये , किंवा तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करताय, किंवा ऐकून घ्यायच्या आधीच नळ स्टॉप वगैरे काहीतरी बाष्कळ लिहायला घेताय, तर त्याला मी काय करू ! अजून किती वेळा सांगायचं =)))) बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥ हे मी वर एका प्रतिसाद आधीच म्हणालो आहे , तुम्ही त्यावर उत्तरप्रतिसाद ही दिला आहे , तेव्हा नाहीत का वाचले हे ? की तेव्हा वाचून अर्थ लागला नव्हता ? काही हरकत नाही, आता अर्थ लागला आहे ना , मग झालं तर !! तत्त्वमसि राम

In reply to by प्रसाद गोडबोले

ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालासे कळस !! D संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।। जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।। बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।। हे वेदांताचे, अद्वैत दर्शनाचे मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कोणा देवाचे नाहीये, त्यातील देव दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे ! तत्त्वमसि. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Mon, 02/24/2025 - 15:56
मूळ मुद्दा बाजूला सरकवू नका! तो असा आहे: का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?>> आणि त्यावर तुंम्ही काही करणार नाही, कारण... तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे तुमचं सगळं तर नीट चाललेलं आहे. पण एवढी गहन अगदी हिमालयात जाऊन साधना करुन, वेदांत, गीता, तुकारामाचे अभंग मुखोद्ग्त असून... रस्त्यावरच्या अ़क्षरशः काहीही न मिळालेल्या निरागस मुलांना, माणसाला पाहून, तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे, अशी स्पष्ट कबुलीच दिली आहे तुंम्ही. माझे अनेक उच्चवर्णीय मित्र काहीही साधना न करता, सहजपणे, पिढ्यानपिढ्या शोषित समाजाला आज राज्यघटनेमुळे जी शिकण्याची संधी मिळाली, तिचा स्विकार करतात. त्यांना नाही असं जुनाट दु:ख होत. अशा प्रकारे, शब्दांचा कीस काढून, ज्ञान(?) मिळवूनही तुंम्हाला हे पचवता येत नाही, त्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग काय, हा खरा मुद्दा आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 02/24/2025 - 16:21
वेदांत गीता वगैरे अध्यात्म चिंतन अपराधभावातून सुटका करण्यासाठी खूप मदत करते. गांजलेल्यांसाठी पटकन काहीतरी करण्यापेक्षा त्यावर चिंतन, मनन, वाचन, चर्चा इ. केली की काहीतरी केल्याचे समाधान मिळते. किमान मी किती संवेदनाशील आहे, असे म्हणून घेता येते. काही नास्तिक लोक अध्यात्माला 'गिल्ट मॅनेजमेंट टूल' असे म्हणतात. एकदा पूर्वजन्म, प्रारब्ध इ. मान्य केले, की ते आता त्या अवस्थेला का आहेत, याचे समाधानकारक उत्तर मिळते व आपल्याला काही करण्याचे कारण रहात नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांत अध्यात्माचा छंद वाढीस लागला आहे. बुध्द चिंतन, मनन याला महत्व न देता करूणेला महत्व देतो.

In reply to by स्वधर्म

हे बघा, मला अजून एक साक्षात्कार झाला आहे की मी काहीही लिहिलं तरी ते काही लोकांना पटणारे नाहीये च. अगदी 1+1 = 2 लिहिलं तरीही पटणार नाहीये . बुध्द करुणेला महत्त्व देतो तर ह्या देशातील करोडो बुध्दाचा मार्ग अवलंबन करणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे की ते त्या निरागस निष्पाप लेकरांना उचलून कडेवर नक्की घेतील ! मी आमच्या न्यायाची प्रतीक्षा पहात राहीन , आमचे आपलं गिल्ट मॅनेजमेंट टूल इम्प्रोव करत राहीन ! बाकी गावाला वाडा परत बांधला की नक्की सुरू करेन ह्या अशा अनाथ मुलांसाठी काहीतरी ! बाकी बास आता , कंटाळा आला ह्या इथे लिहायचा. सध्या मॅडम ने जे भाषण दिले त्यावर मनोरंजन करत आहे , तस्मात् तिथं बोलू =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Mon, 02/24/2025 - 17:21
तुंम्ही विचारलेल्या प्रश्नाला उतर दिलं, तर पटेल की. न पेक्षा उत्तर देता येत नाही, असं स्पष्ट सांगणं जास्त चांगलं.

In reply to by स्वधर्म

ज्ञानाचा उपयोग हाच आहे की दुःख असं काही नाहीये , आहे हा दुःखाचा भास आहे, त्या भासाचे कारण आपली द्वैताविषयीची ठाम धारणा ही आहे. हे लक्षात येणे !! एकदा जे आहे ते सगळं "परफेक्ट" आहे. हे लक्षात आलं एकदा ज्याला आम्ही कर्म विपाक म्हणतो , तुम्ही गिल्ट मॅनेजमेंट टूल म्हणता, ते एकदा जमलं की ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट असणे, जे जसे आहे ते तसे असणे हे परफेक्ट आहे हे लक्षात येतं. आणि मग झोपेतून जागे झाल्यावर निद्रा आपोआप नाश पावते तसे काहीसे दुःख आपोआप नाश पावते. अजून काय उपयोग हवा ! मला जे आमचे जुनाट दुःख टोचत होते त्याचा कार्यभाग साधला गेला आहे ! आता दुःख असं काही नाही. :) आता तुम्ही म्हणाल की मग कसल्या न्यायाची वाट पाहताय ? तर त्याचेही उत्तर असे आहे की हे "न्यायासाठी झुरणे" हा ही आमच्या पूर्व कर्माचा भाग आहे , तो बस भोगून संपवत आहे. आता दुःख असे काही नाही ! आता बस राम आहे ! इथे मला तुकोबांचा एक अभंग आठवतो पण तो खूप मोठ्ठा असल्याने इथे लिहित नाही फक्त शेवटची ओळ लिहितो आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥ पांडुरंग बुद्धी देतोय तसं बस लिहित राहतोय मी ! राम कृष्ण हरी आता इतकं पुरे. पुढील चर्चा नवीन लेखावर !

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 02/25/2025 - 18:21
लेख १५ फेब्रुवारीला २०२५ टाकला आहे. त्यात तुमच्या जुनाट दु:खाचा उल्लेख आहे. माफ करा, पण माझा तुंम्हाला वेदांत व अध्यात्माचे ज्ञान खूप आधीच झाले होते, असा समज होता. कारण ३० सप्टेबर २०२४ च्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या लेखात आपण खालील वाक्ये लिहीली होती: आज्जींने माझ्या हातात न्याहारीसाठी केलेल्या गोडाच्या शिऱ्याची वाटी दिली आणि आजोबांकडे बघून म्हणाली: " हे पहा आला तुमचा सूर्य पाहिलेला माणूस !" आणि हसत हसत आज्जी स्वयंपाक घरात निघुन गेली. नानांनी माझ्याकडे वळुन पाहिलं नाही मात्र त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसु मात्र उमटलं. तुमचा ६ जून २०२४ च्या 'परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.' लेखात स्वामीजींनी आपल्याबाबत खालीलप्रमाणे भाष्य केले होते: स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir ! दोन्ही तुमच्या स्वतः बद्दलचे उल्लेख वाचून कोणाचाही समज होईल की तुंम्हाला ते तथाकथित ज्ञान खूप आधीच झालेले आहे. म्हणूनच माझाही तसाच समज झाला होता. पण १५ फेब्रुवारी २०२५ ला मात्र तुमचे वर्षानुवर्षांचे जुनाट दु:ख अजून छळत असल्याचा उल्लेख आला. तसेच आपण बुध्दाने सांगितलेले दु:खाचे कारण चूक असल्याचे व तुमचे ज्ञान मात्र बरोबर असल्याचे प्रतिपादन केले आहे. अर्थात लेख लिहीपर्यंत तुमची दु:खे तशीच होती, पण लेख लिहिल्यानंतर ते आज अशा दहा दिवसात ती दूर झाली, हे आपण स्पष्ट केले ते खूप चांगले झाले. बाकी ती रस्त्यावरची मुले, त्यांचे दीनवाणे आईबाप यांच्या दु:खाबाबत... असो.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 00:16
हा धागा नि प्रतिक्रिया माझ्या समजापलीकडील आहेत त्या पेक्षा मी मशीन डिसाइन अजून दोन वेळा वाचून घेईन. फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2025 - 04:36
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का? ----- लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2025 - 16:19
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
आहा! तो फोटो रमण महर्षी ह्यांचा आहे ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
होतो !
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥ मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! माझे डोळे अक्षरश: पाणावले तुमचा प्रतिसाद पाहून. __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 19:30
अच्छा! मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो ! तुमची अध्यात्मिक प्रगती अशीच राहिली तर तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल! _/\_

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 02/21/2025 - 05:58
"तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल..." म्हणजे कसे? दिसायला की त्यांच्या सारखे ज्ञानी.... गाळलेल्या जागा नीट भरावी... इतपत तरी ज्ञान हवे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लेखकाची सर्व मतं न कळण्यासारखीच आहेत. स्वतःच विचारांचा गुंता करुन ठेवलाय अर्थात सगळं गिचमीड. आणि नाहीच कळलं तर, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामांच्या किंवा अर्जूनाच्या पायरीवर आलं पाहिजे. म्हणजे तेथून तुम्हाला लेखांतील ज्ञानकण आणि कृष्णाला काय म्हणायचं आहे ते समजू लागतं. स्वांतसुखायच्या नावाने दुसरं गेट ऑलरेडी बंद करुन टाकलंय. मला जे कळलंय ते अत्युच्च पायरीवरचं आहे. आणि त्या पायरीला पकडायचं तर, खाली मान घालून चालू पडा. =)) ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक धन्यवाद सर ! माझे लेखन तुम्हाला कळो न कळो, माझी काही हरकत नाही, तुम्ही फक्त असेच लक्ष असू द्या आमच्यावर ! आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांचा ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥ राम

In reply to by आंद्रे वडापाव

आज काय सुट्टी आहे काय आंद्रे ? =)))) माझं काम कालच संपलं असल्याने मलाही वेळ आहे आज. थांबा, आमच्या दुसऱ्या लेखनाच्या धाग्यावर या , तिकडे तुला जास्त "रोचक" विषय देतो गप्पा मारायला. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

लेखन कळायचा विषयच नाही. लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते ) प्रतिसादांमुळे जी जाणीव होते. आनंद असो की दु;ख असे काहीच जर नसते तर तातडीने दाद द्यायला आलाच नसता. हे जे जाणवते त्याला भास नाही म्हणत ती प्रत्यक्ष जाणीव असते. =)) ( वाह सर वाह.) आई गं....! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते )
ह्यातच आलं सगळं सर ! एकदा का तुम्ही हे मान्य केले आहे आता मग मी लिहिलेले तुम्हाला कळणे न कळणे हा विषयच रहात नाही ना ! =)))) मी ते गट १ गट २ म्हणालो होतो, ते पटलेलं दिसतंय तुम्हाला. कारण मी काहीही लिहिलं तरी तुमच्या लेखी ते गंडलेली मांडणी असेच असणार आहे . =)))) पण ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचता, रामाचं नाव घेता ह्यातच मला समाधान आहे, मी आधीही म्हणालो आहेच की हे ! बाकी कोणाला नाही पण तुम्हाला तातडीने साद द्यायला मी कायम हजर आहे कारण, तुमच्या प्रतिसादात राम पाहणे हीच माझी परीक्षा आहे. राम

In reply to by प्रसाद गोडबोले

काळजी घ्या. जपा. बडबडणे वाढले आहे. त्यासाठी सांगावे लागते. आपलं ते स्वांतसुखायवालं डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा वाचा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघा सर, मी आत्ताच म्हणालो होतो की नै, तुमच्या प्रतिसादांचा मला सगळ्यात जास्त फायदा होतो !! तुमचा हा प्रतिसाद मला काय भारी वाटलं काय सांगू. हीच अवस्था तुकोबांची झाली होती ... माझी मज झाली अनावर वाचा । विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥ ह्या प्रतिसादातून, आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !! =)) सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे. तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. =)) मरतंय आज हसून हसून.... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे.
हे चुकलं बघा सर. होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥ दुःख हा भास आहे , सुख हा आभास नव्हे, दुःखाचा अभाव हेच सुख आहे . सुखें पाहें सुख आपुलिया असे काहीसे आहे हे ! पण ही अनुभवाची बाब आहे , बघा अनुभवला आले तर !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>> हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. उगाच अभंग टाकून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न करु नये. आणि गंडलेली मतं लादू नये. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो , तुम्ही प्रतिसाद वाचत तरी आहात का नाही . मी म्हणालो की हा अनुभवाचा मामला आहे. हे पटवून देण्यासारखे नाहीच. अनुभवगम्य गोष्टी शब्दांनी कशा पटवून देता येतील ? किमान एकदा वाचा तरी प्रतिसाद उत्तर द्यायच्या आधी ! तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये !!

कॉमी Fri, 02/21/2025 - 21:19
मला अजूनही कुठेतरी गफला वाटतो ब्वा. म्हणजे सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे असे सगळे पटले तरी सगळी दिनचर्या मोर ऑर लेस पूर्वीसारखी कशी राहणार? अजूनही कुटुंबं वत्सल वैगेरे कसे राहणार? (कारण तुमचे कुटुंबं पण एक भ्रमच की. सगळे ब्रम्ह आहे. मग कुटुंबं काय आणि रस्त्यावरचा दगड काय एकच. हे मला पटत नाही मी फक्त लॉजिकल एक्सट्रापोलेशन करतोय.) मग वरवरचे बोलण्यातले, अविरभावातले फरक वगळता बाकीचे आहे तसे कसे चालेल ब्वा? एक फँटसी झाकायला आणखी चार फँटॅस्या उभ्या करायला लागतात. उदा - जर सगळे ब्रम्ह आहे तर भ्रम किंवा माया कशामुळे? संचित कर्म कशामुळे? जितके प्रश्न पडतील तितकी डिटेल्ड फँटॅस्टिक उत्तरे मिळत जातात. प्रत्येक उत्तर आदल्या प्रश्नापेक्षा कमी आणि कमी तपासण्याजोगे असते. सरते शेवटी उत्तर असते की आपल्याला अनुभव आला तरच विश्वास ठेवा. बरं अनुभव कसे मिळतात? तर तुमच्या भौतिक शरीरानेच. म्हणजे तुमचे शरीर म्हणजे तुम्ही नाही हे समजण्यासाठी शरीराकडून अनुभव मिळवावा लागतो. इथे "लीला" हा प्रकार पण ऍड्रेस करतो. राम तथागत बुद्धाबद्दल प्रतिकूल बोलतो. हे दोघेही अवतार असतील तर हे कसे? उत्तर आले लीला. म्हणजे परमेश्वर स्वतःशी खेळ खेळतोय. परमेशवर म्हणजे ब्रह्मच म्हणजे तुम्हीच हा. हे म्हणजे बॉयलर उत्तर झाले. ह्यापुढे विचार करायची गरज संपली, सगळे ड्रामा, लीला मध्ये राईट ऑफ मारता येते. ह्याची इतरधर्मीय तुलनात्मक उदाहरणे पण आहेत. ख्रिषचन म्हणतात येशू सर्व विश्वाच्या पापांसाठी सुळावर चढला. बरं, पण ते ट्रिनीटी हया संकल्पनेवर पण विश्वास ठेवतात. God is a single entity made of three person किंवा असेच काहीतरी. हे देखील लिमिटेड "अद्वैत" टाईप आहे- म्हणजे निखालस अर्थहीन आणि तर्कहीन. ते असो. पण ते ट्रिनीटी मानतात म्हणजे असे मानतात की याहवे (म्हणजे येशूचे वडील, आकाशातला बाप्पा), देवाची आत्मा आणि येशू (फादर सन अँड दी होली स्पिरिट) हे एकच देवाचे तीन अंग आहेत. पण हे तिघे भिन्न पण आहेत. बरं. मग पाप पुण्य कोणी बनवले? तर देवाने. पाप करण्यास सक्षम माणसे कुणी बनवली? देवाने. पाप माफ कोण करणार? देव. माफिसाठी टॉर्चर आणि बळी कुणाचा? देवाचाच! ही सगळी भानगड कशासाठी? ख्रिषचन म्हणतात की देवालाच माहित. त्यांना कोणीतरी "लीला"ची टीप द्यायला हवी. हा गफला सर्व अब्राहमिक धर्मात आहे. पापक्षम माणसे, पापांची व्याख्या, आणि पापांचा निवाडा सगळे एकच देव करतो, का? कशासाठी? पाप शक्यच नाही असे जग का नाही बनवले? तळटीप - माझे आवडते लेखक जे आर आर टोलकीन ह्यांनी त्यांच्यापरीने वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे एरू इलूवितार. तो त्याच्या विचारांनी इतर देवता- व्हॅलार बनवतो. आणि व्हॅलार आणि तो मिळून एक सुरेख गीत गाऊ लागतात. पण, त्यात इलूवितारनेच बनवलेला एक व्हॅलार - मॉरगॉथ, स्वतःची वेगळी धून गाऊ लागतो, जी इलूवितारच्या संगीताशी विसंगत असते. इतर काही व्हॅलार त्याला सामील होतात. दोन गीतांमधल्या संघर्षात इलूवितारचे गीत जवळपास विरून जाते. पण इलूवितार एक असा सूर पकडतो की संबंध अवकाश त्याने भरून जाते. मग इलूवितारणे मॉरगॉथला बनवलेच का? तर दोन गीतांमधल्या संघर्षामुळे इलूवितारचे गीत आणखी सुरेख झाले. हे लिखाण सुरेख आहे. टोलकीन साहेबांना दाद द्यावी तितकी कमी. पण हे स्वीकारण्यासारखे स्पष्टीकरण आहे का? केवळ शब्दांच्या करामतीने प्रभावीत होऊन काय खरे काय खोटे ठरवणे कितपत बरोबर?

In reply to by कॉमी

कॉमी Fri, 02/21/2025 - 21:28
हे काही टोलकीन साहेबाचे स्वतःचे विचार नाहीयेत. सैतान हा केवळ देवाच्या हुकूमशाहीला कंटाळून बंड करणारा देवदूत आहे ही जुनी संकल्पना आहे. मिल्टनचे सुप्रसिद्ध काव्य पॅराडाईज लॉस्ट मध्ये सुद्धा तीच कल्पना मध्यवर्ती आहे. त्या काव्यातला सैतान एक अत्यंत चर्चले गेलेले पात्र आहे. ते पात्र नायक म्हणून वाचले जाणे सुद्धा सहज शक्य आहे. सिनेमा-टीव्ही मधला दुष्ट शैतान इथे नाहीये - तर परमेश्वर जे ठरवतो तेच चांगले, आणि त्यामुळे त्याविरुद्ध बंड करणारा वाईट - असा हा सैतान आहे.

आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 21:43
सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे. पण १९४८ ला जाळलेला वाडा खरा आहे... जग माया आहे, आणि आपण लालसा वासना जगाने सोडून दिली पाहिजे... पण तथाकथित हडपले गेलेली जमिनीची हाव आम्ही मात्र सोडणार नाही.... आधी पिढ्यानपिढ्या ओरबाडून घेतलेले आणि पूर्वापार बापजद्यांच्या वशिल्यानेच मिळणारी हक्काची जागा, हे "संचित कर्म" वैगरे सब झूठ पण कोलकल्पित इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली जाणे, हे मात्र खर्र खर्र, बरका...

कॉमी Mon, 02/24/2025 - 22:22
आणखी एक अनेकदा अध्यात्मिक विचाराची लोकं आपल्या पंचेंद्रियांना, शरीराला अनरिलायबल म्हणतात. पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही. उलट, असे अनुभव मिळवण्यासाठी शरीरला एका विशिष्ठ स्थिती मध्ये न्यावे लागते, मग ते ध्यान करून असो वा विशिष्ठ केमिकल किंवा ड्रग घेऊन असो . आणि अश्या स्थिती मध्ये चित्रविचित्र अनुभव आले तर ते मात्र खरे मानावेत.

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव Tue, 02/25/2025 - 11:34
पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही.
उघडा डोळे ... बघा नीट ... एका नॉन बायोलॉजिकल व्यक्तीने तो अध्यात्माचा महामेरू कधीच सर केलाय ... ओळखा पाहू कोण ! m
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते !

बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)

युयुत्सु ·

धन्यवाद. काल खेळता खेळता चुकून २२५०० चा पुट पावणे ३ वाजता घेतल्या गेल्या! बाजारा सोबत माझा बीपी देखील खालीवर होत होता! शेवटी ४५० रुपये प्रॉफिट देऊन तो गेला!

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 11:46
 वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! पाच दिवस - पिरीअडॉसिटीच्या निफ्टीचा आलेख तपासला तर कदाचित बारीक रॅली येऊ शकते पण टिकेल की नाही ते आत्ता सांगता येत नाही. तेव्हा वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! जरा धीर धरा!

वामन देशमुख Sat, 02/15/2025 - 12:42
@युयुत्सु धागे फॉलो करत आहे.‌ मागच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे, मंदीमध्येही चांदी करता येते. तेव्हा अनुभवी व्यापाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. #BearBanoBewakoofNahi ---

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 15:22
चांदी तेव्हा करता येते जेव्हा तेजी अथवा मंदीची निश्चिती असते. येत्या आठवड्यासाठी असे निश्चित विधान वरील मॉडेल वापरून करता येत नाही.

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 15:19
प्रिय संपादक कृपया डिस्क्लेमर मध्ये खालील दुरुस्ती माझ्यावतीने पण करावी. डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' आणि लेखक जवाबदार असणार नाहीत.

युयुत्सु Mon, 02/17/2025 - 15:56
युयुत्सुनेट मध्ये आता बरेच ट्युनिंग केले असल्याने ( अचूकतेला धक्का न लावता ट्रेनिंग टाईम १० मि वरून ६-७ मि० वर आणला आहे) दैनिक कालऔकटीवर (टाईमफ्रेम) काय सांगते याची उत्सुकता असते. फक्त दैनिक भाकीत अगोदरअनेक कारणांसाठी जाहिर करत नाही. विश्वासार्हतेसाठी कालमोहर (टाईमस्टॅम्प) पहावी. पुढील भाकितात अचूकता आणण्यासाठी १० ऐवजी १५ मॉडेल तयार केली (हे म्ह० चॅट्जीपिटीकडे १५ वेगवेगळे पर्याय मागण्यासारखे आहे.)  न्युरलनेट नेट इण्ट्राडे साठी आणि डोळे बंद करून वापरण्यामधला एक सर्वात मोठा धोका - न्युरल नेट विश्वास बसणार नाही अशी भाकीते करते आणि तुम्ही पैसे पण कमावता. पण सगळं व्यवस्थित चालू असताना मार्केट एकच झटका असा देते की आतापर्यंत मिळवलेले तुम्ही एका ट्रेडमध्ये गमावता. न्युरल नेट वरचा विश्वास तुम्हाला मार्केट उलटे फिरले आहे हे वास्तव स्वीकारू देत नाही.

सुबोध खरे गुरुवार, 02/20/2025 - 11:55
DE HUSKED PIGEON PEA LEGUME from the family Fabaceae COOKED ON SLOW HEAT TO PERFECTION ADDED TO SLOW COOKED STEAMING ORGANIC ORYZA SATIVA SPECIALLY PICKED UP FROM MAVAL REGION OF PUNE DISTRICT FOR ITS OLFACTORY GRANDEUR. साध्या शब्दात वरण भात

धन्यवाद. काल खेळता खेळता चुकून २२५०० चा पुट पावणे ३ वाजता घेतल्या गेल्या! बाजारा सोबत माझा बीपी देखील खालीवर होत होता! शेवटी ४५० रुपये प्रॉफिट देऊन तो गेला!

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 11:46
 वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! पाच दिवस - पिरीअडॉसिटीच्या निफ्टीचा आलेख तपासला तर कदाचित बारीक रॅली येऊ शकते पण टिकेल की नाही ते आत्ता सांगता येत नाही. तेव्हा वेट आणि वॉच म्ह० वेट आणि वॉच ! जरा धीर धरा!

वामन देशमुख Sat, 02/15/2025 - 12:42
@युयुत्सु धागे फॉलो करत आहे.‌ मागच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे, मंदीमध्येही चांदी करता येते. तेव्हा अनुभवी व्यापाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. #BearBanoBewakoofNahi ---

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 15:22
चांदी तेव्हा करता येते जेव्हा तेजी अथवा मंदीची निश्चिती असते. येत्या आठवड्यासाठी असे निश्चित विधान वरील मॉडेल वापरून करता येत नाही.

युयुत्सु Sat, 02/15/2025 - 15:19
प्रिय संपादक कृपया डिस्क्लेमर मध्ये खालील दुरुस्ती माझ्यावतीने पण करावी. डिस्क्लेमर : सदरील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं असून त्याच्या फायदा अथवा होणा-या कोणत्याही नुकसानीस 'मिपा व्यवस्थापन' आणि लेखक जवाबदार असणार नाहीत.

युयुत्सु Mon, 02/17/2025 - 15:56
युयुत्सुनेट मध्ये आता बरेच ट्युनिंग केले असल्याने ( अचूकतेला धक्का न लावता ट्रेनिंग टाईम १० मि वरून ६-७ मि० वर आणला आहे) दैनिक कालऔकटीवर (टाईमफ्रेम) काय सांगते याची उत्सुकता असते. फक्त दैनिक भाकीत अगोदरअनेक कारणांसाठी जाहिर करत नाही. विश्वासार्हतेसाठी कालमोहर (टाईमस्टॅम्प) पहावी. पुढील भाकितात अचूकता आणण्यासाठी १० ऐवजी १५ मॉडेल तयार केली (हे म्ह० चॅट्जीपिटीकडे १५ वेगवेगळे पर्याय मागण्यासारखे आहे.)  न्युरलनेट नेट इण्ट्राडे साठी आणि डोळे बंद करून वापरण्यामधला एक सर्वात मोठा धोका - न्युरल नेट विश्वास बसणार नाही अशी भाकीते करते आणि तुम्ही पैसे पण कमावता. पण सगळं व्यवस्थित चालू असताना मार्केट एकच झटका असा देते की आतापर्यंत मिळवलेले तुम्ही एका ट्रेडमध्ये गमावता. न्युरल नेट वरचा विश्वास तुम्हाला मार्केट उलटे फिरले आहे हे वास्तव स्वीकारू देत नाही.

सुबोध खरे गुरुवार, 02/20/2025 - 11:55
DE HUSKED PIGEON PEA LEGUME from the family Fabaceae COOKED ON SLOW HEAT TO PERFECTION ADDED TO SLOW COOKED STEAMING ORGANIC ORYZA SATIVA SPECIALLY PICKED UP FROM MAVAL REGION OF PUNE DISTRICT FOR ITS OLFACTORY GRANDEUR. साध्या शब्दात वरण भात
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा) ==================================== युयुत्सु-नेटचे १लेच जाहिर भाकीत अचूक ठरले त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि म्हणून मी केरास साठी हायपर पॅरामिटर-ट्युनिंग करून बघायचे ठरवले. त्यातून अधिक चांगली भाकीते मिळतील अशी आशा करूया. पुढच्या पाच दिवसांचे भाकीत करण्याचे एकंदर २ टप्पे आहेत. १. पुढील ५ दिवसांसाठी वेगवेगळी दैनिक (डेली) मॉडेल्स तयार करून त्यांचा एकत्रित स्क्यूनेस तपासणे. हा अभ्यास केल्या नंतर बाजारात अनिश्चितता दिसते.  २.

सूर्य पाहिलेला माणूस-नाटक

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
A मी एक ठार सूर्य वेडी आहे.दूर डोंगरावर जाऊन होणारा सूर्योदय पाहणं माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत.सूर्यनमस्काराने माझ्या शरीरातील चैतन्याचे नातं त्यांच्याभोवती फिरत राहतं.सर्वत्र त्यांच्या उष्णतेची दाहकता नाही तर ऊब..स्निग्ध ऊब सृष्टी धारण करत असते.खुप लहानपणीच मी 'सूर्य पाहिलेला माणूस ' या वेग

शब्दांचा दंश जिव्हारी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
शब्दांचा दंश जिव्हारी- होता मी विमुक्त झालो माथ्यावर सूर्य तरीही काजव्यासवे झगमगलो शब्दांची अविरत गाज भवताल भारूनी उरली नादावर अनुनादाची हलकेच लहर शिरशिरली शब्दांचा अबलख वारू चौखूर उधळुनी गेला अर्थाचा लगाम लहरी हातून कधीचा सुटला

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथचे अद्भुत मंदिर-१

kool.amol ·

चित्रगुप्त Wed, 02/12/2025 - 15:28
त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!
या लेखमालेचे स्वरूप/हेतु भारतातल्या एका प्रमुख धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तसेच वास्तुकला, पुरातत्व याही दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जागेविषयी समग्र माहिती देण्याचे आहे असे मी मानतो. या दृष्टीने विचार करता अशी भाषा मलातरी छचोरपणाची वाटली. कृपया फक्त पारंपारिक शुद्ध मराठीत गांभिर्याने लेखन केल्यास चांगले होईल.

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 16:30
चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ---- मग ह्याच न्यायाने, अकबर या मुस्लिम राजाला पण हिंदू धर्मियांनी देव मानायचे का? -------- हिंदू सोशिक आहेत , म्हणून काहीही लिहायचे का?

In reply to by मुक्त विहारि

kool.amol Wed, 02/12/2025 - 17:59
तुमच्या ह्या कमेंटला काय उत्तर द्यावे हे खरेच समजत नाहीय, कारण तुम्ही जो संबंध लावला आहे तो जबरदस्त आहे. माझ्या मनात हे लॉजिक दूर दूर पर्यंत आले नव्हते. ती वाक्य काढून टाकतोय. धन्यवाद!

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 18:18
प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश ह्याने अकबर प्रशस्ती रचली होती. अखिलं भुवनं याति यस्य शासनमण्डले। स विष्णुरिव धर्मात्मा कालौ अकबरनामकः॥ ज्याच्या शासनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे, तोच धर्मात्मा अकबर या कलियुगातील विष्णूसमान राजा आहे. ह्याशिवाय बिरबल आणि इतर काही हिंदू कविंनी सुद्धा अकबराला परमेश्वरासमान मानले आहे. जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत पण त्यांचे संदर्भ मजकडे नाहीत. सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 20:32
हो... पण, आता तरी हिंदूंनी वैचारिक आणि शारीरिक गुलामगिरी सोडून दिली पाहिजे. संभल मध्ये पण परिवर्तन घडत आहेच की आणि आजच्या घडीला अमानतुल्लाह खान पण परागंदा झाला आहे. लाचारीचा इतिहास जितक्या लवकर हिंदू विसरतील तितके उत्तम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 02/14/2025 - 20:45
जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत.
गोनिदांची "दास डोंगरी राहतो" ही ऑडियो बुक ऐकली.. त्यात हे असे उल्लेख आहेत .. ही परिस्थिती आणि दास्य पाहून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. मनी निश्चय झाला... या बेडीतुन सर्वांची मुक्ति करायची आणि समर्थांनी राष्ट्रजागर सुरू केला ... अध्यात्मिकते सह बलोपासनेचे संस्कार सुरु केले ! हे जाता जाता आठवले. धन्यवाद प्रचेतस ... या निमित्त रोचक चर्चा घडताहेत. अश्या सक्रिय आणि ज्ञानी मिपाकरांमुळे मिपा सोडावेसे वाटत नाही.. किती ही व्हाटस्प, फेसबुक.. इन्स्टा खेळले तरी आपली पंढरी मिपाच .. माझे माहेर मिपा हीच भावना !

In reply to by मुक्त विहारि

कॉमी Sun, 03/16/2025 - 17:07
देव आहे म्हणून इतक्या बायका करू शकला असा विनोद आहे. ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःहून सगळे जास्त बायका असणारे हिंदू देव आहेत हा काढत आहात. हि लॉजिकल उडी तुमची स्वतःची आहे, लेखकाची नाही.

In reply to by चित्रगुप्त

kool.amol Wed, 02/12/2025 - 17:54
सर्वप्रथम ह्यातल्या काही शब्दांमुळे पोस्ट आवडली नसेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी बोलतो. काही मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यामुळे भाषा छचोर कशी काय होऊ शकते? Reverse, sub clause ह्या शब्दात काय आक्षेपर्ह आहे मला तरी समजले नाही. तरी पण तुमची सूचना स्वीकारतो, पुढील लेखामध्ये शक्यतो इंग्रजी शब्द येणार नाहीत ह्याची काळजी घेईन.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 18:19
मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली नाही, उलट वेगळ्या शैलीत लिहिल्यामुळे छान वाटलं त्यामुळे लेख पुस्तकी आणि रुक्ष न राहता एक वेगळाच टच आलाय.

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 18:23
सुरुवात चांगली पण लेख अगदी त्रोटक झाला आहे, लेखनात जास्त कंटेंट आणि छायाचित्रे आणून लेख समृद्ध करता येईल. बाकी पाटण हा शब्द मूळच्या पट्टण ह्या संस्कृत शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ म्हणजे व्यापारी केंद्र असलेले शहर. सर्वसाधारणपणे किनारपट्टीनजीक असलेल्या व्यापारी केंद्रांना पट्टण ही जोडणी देण्याची पद्धत होती.

In reply to by प्रचेतस

kool.amol Fri, 02/14/2025 - 22:46
ही माहिती नवीन आहे. तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की पाटण हे जुनं नाव आहे पण तुम्ही सांगितलेली व्युत्पत्ती जास्त योग्य वाटते आहे. लेख मोठा होणार नाही ह्याची काळजी घेतली होती पण पुढचे लेख विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करेन

सौंदाळा गुरुवार, 02/13/2025 - 07:53
लेख आवडला भाषेचे काही अप्रस्तुत वाटले नाही. गजनी, अहिल्याबाई होळकर, वल्लभभाई पटेल यांचे देखील उल्लेख पुढच्या भागात कदाचित येतील. पुभाप्र

कंजूस Fri, 02/14/2025 - 17:35
लेखाला सुरुवात करून चालना दिलीत. आपल्याकडे महाराष्ट्रातून बरेच भाविक गुजरातमध्ये ( सौराष्ट्रात) धार्मिक स्थळांची सहल करतात. द्वारका, सोमनाथ, जुनागढचे गिरनार ही मुख्य स्थाने. काही जण डाकोरलाही जातात. तोंडी वर्णन सांगतात पण कुठे लिहीत नाहीत. जैनांचे मुख्य ठिकाण पालिताणा. सोमनाथजवळ दीव सुद्धा आहे. पर्यटनाचे ठिकाण. गुजरात थोडा पाहिला आहे. सौराष्ट्र पूर्ण बाकी आहे. बघू कसं जमतं ते.

In reply to by कंजूस

kool.amol Fri, 02/14/2025 - 22:50
धन्यवाद! हो हे खरं आहे, सगळ्यात जास्त पर्यटक ह्याठिकाणी मध्य प्रदेश मधून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्रातून. बरेचदा सोमनाथ द्वारका अशी यात्रा केली जाते. ही दोन्ही ठिकाणं तशी जवळ आहेत. त्यात गिर चे अभयारण्य सुद्धा येते.

सौन्दर्य Sun, 03/02/2025 - 10:40
"ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे." मी राजकोटला नोकरीनिमित्त्ये पाच वर्षे राहिलो. ह्या पाच वर्षांत मी कमीतकमी २ ० ते २ ५ वेळा प्रभासपाटण, सोमनाथला गेलो आहे. मला तेथे तीन नद्या तर जाऊच द्या, सोमनाथ जवळच्या समुद्रात विलिन होणारी एकही नदी दिसली नाही. इतकेच नाही तर तेथील स्थानीय लोकांशी देखील फार जवळून संबंध आला , पण एकानेही अश्या संगमाबद्दल उल्लेख केला नाही . तुमच्या ह्या प्रथम लेखात पौराणिक संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आले की कदाचित त्या संगमाविषयी अधिक माहिती मिळेल अशी आशा करतो . मुंबईतील मूळ निवासी 'पाठारे प्रभू' हे प्रभास पाटणहुन मुंबईला आले अशी देखील एक आख्याईका आहे . मिपावरचे जाणकार ह्या वर अधिक प्रकाश टाकतील ह्या प्रतीक्षेत आहे . तुम्हाला तुमच्या पुढील भागासाठी शुभेच्छा .

In reply to by सौन्दर्य

kool.amol Sun, 03/16/2025 - 14:57
छान प्रतिक्रिया. नशीबवान आहात इतक्या जवळ राहायला मिळाले तुम्हाला. मुख्य मंदिरापासून जवळच एक राम मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो. त्या मंदिराच्या मागेच 2 नद्या आधी परस्परांना आणि थोड्याच अंतरावर समुद्राला मिळतात. तिथेच संगम आहे आपण तो बघू शकतो. हे मंदिर बरेच प्रसिद्ध सुद्धा आहे त्यामुळे मला थोडे आश्चर्य वाटते आहे.

चित्रगुप्त Wed, 02/12/2025 - 15:28
त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!
या लेखमालेचे स्वरूप/हेतु भारतातल्या एका प्रमुख धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तसेच वास्तुकला, पुरातत्व याही दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जागेविषयी समग्र माहिती देण्याचे आहे असे मी मानतो. या दृष्टीने विचार करता अशी भाषा मलातरी छचोरपणाची वाटली. कृपया फक्त पारंपारिक शुद्ध मराठीत गांभिर्याने लेखन केल्यास चांगले होईल.

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 16:30
चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ---- मग ह्याच न्यायाने, अकबर या मुस्लिम राजाला पण हिंदू धर्मियांनी देव मानायचे का? -------- हिंदू सोशिक आहेत , म्हणून काहीही लिहायचे का?

In reply to by मुक्त विहारि

kool.amol Wed, 02/12/2025 - 17:59
तुमच्या ह्या कमेंटला काय उत्तर द्यावे हे खरेच समजत नाहीय, कारण तुम्ही जो संबंध लावला आहे तो जबरदस्त आहे. माझ्या मनात हे लॉजिक दूर दूर पर्यंत आले नव्हते. ती वाक्य काढून टाकतोय. धन्यवाद!

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 18:18
प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश ह्याने अकबर प्रशस्ती रचली होती. अखिलं भुवनं याति यस्य शासनमण्डले। स विष्णुरिव धर्मात्मा कालौ अकबरनामकः॥ ज्याच्या शासनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे, तोच धर्मात्मा अकबर या कलियुगातील विष्णूसमान राजा आहे. ह्याशिवाय बिरबल आणि इतर काही हिंदू कविंनी सुद्धा अकबराला परमेश्वरासमान मानले आहे. जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत पण त्यांचे संदर्भ मजकडे नाहीत. सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Wed, 02/12/2025 - 20:32
हो... पण, आता तरी हिंदूंनी वैचारिक आणि शारीरिक गुलामगिरी सोडून दिली पाहिजे. संभल मध्ये पण परिवर्तन घडत आहेच की आणि आजच्या घडीला अमानतुल्लाह खान पण परागंदा झाला आहे. लाचारीचा इतिहास जितक्या लवकर हिंदू विसरतील तितके उत्तम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 02/14/2025 - 20:45
जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत.
गोनिदांची "दास डोंगरी राहतो" ही ऑडियो बुक ऐकली.. त्यात हे असे उल्लेख आहेत .. ही परिस्थिती आणि दास्य पाहून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. मनी निश्चय झाला... या बेडीतुन सर्वांची मुक्ति करायची आणि समर्थांनी राष्ट्रजागर सुरू केला ... अध्यात्मिकते सह बलोपासनेचे संस्कार सुरु केले ! हे जाता जाता आठवले. धन्यवाद प्रचेतस ... या निमित्त रोचक चर्चा घडताहेत. अश्या सक्रिय आणि ज्ञानी मिपाकरांमुळे मिपा सोडावेसे वाटत नाही.. किती ही व्हाटस्प, फेसबुक.. इन्स्टा खेळले तरी आपली पंढरी मिपाच .. माझे माहेर मिपा हीच भावना !

In reply to by मुक्त विहारि

कॉमी Sun, 03/16/2025 - 17:07
देव आहे म्हणून इतक्या बायका करू शकला असा विनोद आहे. ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःहून सगळे जास्त बायका असणारे हिंदू देव आहेत हा काढत आहात. हि लॉजिकल उडी तुमची स्वतःची आहे, लेखकाची नाही.

In reply to by चित्रगुप्त

kool.amol Wed, 02/12/2025 - 17:54
सर्वप्रथम ह्यातल्या काही शब्दांमुळे पोस्ट आवडली नसेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी बोलतो. काही मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यामुळे भाषा छचोर कशी काय होऊ शकते? Reverse, sub clause ह्या शब्दात काय आक्षेपर्ह आहे मला तरी समजले नाही. तरी पण तुमची सूचना स्वीकारतो, पुढील लेखामध्ये शक्यतो इंग्रजी शब्द येणार नाहीत ह्याची काळजी घेईन.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 18:19
मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली नाही, उलट वेगळ्या शैलीत लिहिल्यामुळे छान वाटलं त्यामुळे लेख पुस्तकी आणि रुक्ष न राहता एक वेगळाच टच आलाय.

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 18:23
सुरुवात चांगली पण लेख अगदी त्रोटक झाला आहे, लेखनात जास्त कंटेंट आणि छायाचित्रे आणून लेख समृद्ध करता येईल. बाकी पाटण हा शब्द मूळच्या पट्टण ह्या संस्कृत शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ म्हणजे व्यापारी केंद्र असलेले शहर. सर्वसाधारणपणे किनारपट्टीनजीक असलेल्या व्यापारी केंद्रांना पट्टण ही जोडणी देण्याची पद्धत होती.

In reply to by प्रचेतस

kool.amol Fri, 02/14/2025 - 22:46
ही माहिती नवीन आहे. तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की पाटण हे जुनं नाव आहे पण तुम्ही सांगितलेली व्युत्पत्ती जास्त योग्य वाटते आहे. लेख मोठा होणार नाही ह्याची काळजी घेतली होती पण पुढचे लेख विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करेन

सौंदाळा गुरुवार, 02/13/2025 - 07:53
लेख आवडला भाषेचे काही अप्रस्तुत वाटले नाही. गजनी, अहिल्याबाई होळकर, वल्लभभाई पटेल यांचे देखील उल्लेख पुढच्या भागात कदाचित येतील. पुभाप्र

कंजूस Fri, 02/14/2025 - 17:35
लेखाला सुरुवात करून चालना दिलीत. आपल्याकडे महाराष्ट्रातून बरेच भाविक गुजरातमध्ये ( सौराष्ट्रात) धार्मिक स्थळांची सहल करतात. द्वारका, सोमनाथ, जुनागढचे गिरनार ही मुख्य स्थाने. काही जण डाकोरलाही जातात. तोंडी वर्णन सांगतात पण कुठे लिहीत नाहीत. जैनांचे मुख्य ठिकाण पालिताणा. सोमनाथजवळ दीव सुद्धा आहे. पर्यटनाचे ठिकाण. गुजरात थोडा पाहिला आहे. सौराष्ट्र पूर्ण बाकी आहे. बघू कसं जमतं ते.

In reply to by कंजूस

kool.amol Fri, 02/14/2025 - 22:50
धन्यवाद! हो हे खरं आहे, सगळ्यात जास्त पर्यटक ह्याठिकाणी मध्य प्रदेश मधून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्रातून. बरेचदा सोमनाथ द्वारका अशी यात्रा केली जाते. ही दोन्ही ठिकाणं तशी जवळ आहेत. त्यात गिर चे अभयारण्य सुद्धा येते.

सौन्दर्य Sun, 03/02/2025 - 10:40
"ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे." मी राजकोटला नोकरीनिमित्त्ये पाच वर्षे राहिलो. ह्या पाच वर्षांत मी कमीतकमी २ ० ते २ ५ वेळा प्रभासपाटण, सोमनाथला गेलो आहे. मला तेथे तीन नद्या तर जाऊच द्या, सोमनाथ जवळच्या समुद्रात विलिन होणारी एकही नदी दिसली नाही. इतकेच नाही तर तेथील स्थानीय लोकांशी देखील फार जवळून संबंध आला , पण एकानेही अश्या संगमाबद्दल उल्लेख केला नाही . तुमच्या ह्या प्रथम लेखात पौराणिक संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आले की कदाचित त्या संगमाविषयी अधिक माहिती मिळेल अशी आशा करतो . मुंबईतील मूळ निवासी 'पाठारे प्रभू' हे प्रभास पाटणहुन मुंबईला आले अशी देखील एक आख्याईका आहे . मिपावरचे जाणकार ह्या वर अधिक प्रकाश टाकतील ह्या प्रतीक्षेत आहे . तुम्हाला तुमच्या पुढील भागासाठी शुभेच्छा .

In reply to by सौन्दर्य

kool.amol Sun, 03/16/2025 - 14:57
छान प्रतिक्रिया. नशीबवान आहात इतक्या जवळ राहायला मिळाले तुम्हाला. मुख्य मंदिरापासून जवळच एक राम मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो. त्या मंदिराच्या मागेच 2 नद्या आधी परस्परांना आणि थोड्याच अंतरावर समुद्राला मिळतात. तिथेच संगम आहे आपण तो बघू शकतो. हे मंदिर बरेच प्रसिद्ध सुद्धा आहे त्यामुळे मला थोडे आश्चर्य वाटते आहे.
लेखनविषय:
ह्या पहिल्या भागात पाहूया प्रभास पाटण चे पौराणिक महत्व! प्रभास हे इथल्या भागाचे नाव! आणि पाटण हे गावाचं नाव. सोमनाथच्या मंदिराची इथे स्थापना होण्याच्या आधीपासून पाटणचे धार्मिक महत्व आहे. ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे. मग येते मुख्य कथा! भारतीय पुराणांची काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गातल्या गोष्टींना पुराणात खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कथामध्ये गुंफले आहे. त्यात काही देव आणि देवता हे वारंवार येतात.

साहित्याचा आधारवड : रा.रं.बोराडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 12:05
बोरांडे सरांना आदरांजली सरांविषयी खूप काही ऐकलेले आहे. पण त्यांचे लेखन अजून वाचलेले नाही. आपल्या श्रद्धांजलीपर लेकामुळे अल्पसा का होईना त्यांच्या लेखनाविषयी परिचय झाला. त्यांचे साहित्य वाचायला हवे आता.

In reply to by चित्रगुप्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/13/2025 - 08:09
रा.रं.बोराडे सरांची ओळखच 'पाचोळा' कादंबरीपासून होते मला विचाराल तर, पाचोळाच वाचा असे म्हणेन. 'पाचोळा' 'सावट' आणि 'आमदार सौभाग्यवती' या तिन्ही कादंब-यामधून स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या समाजाचे चित्रण येते. स्वातंत्र्यानंतर पहिली पिढी शिकली आणि लिहिती झाली. साठोत्तरी काळातील कादंबरीकार म्हणूनच सरांना ओळखले जाते. पाचोळा (१९७१) पहिल्याच कादंबरीने त्यांना प्रतिष्ठा मिळाली, नाव झालं. तत्पूर्वी आनंद यादवांचा ग्रामीण समकालीन लेखकाचा काळ होता. आनंद यादवांच्या लेखनात ग्रामीण बोलीतलं निवेदन होतं तर, पाचोळातलं ग्रामीण स्त्रीच्या बोलीतलं निवेदन आलं ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की एक अशिशिक्षीत स्त्रीची बोली वाचकांचं लक्ष वेधून घेते. गंगाराम शिंपी हा त्या स्त्रीचा नवरा आपला परंपरागत शिंप्याचा व्यवसाय करतो; आधुनिक जगाचे जे चटके बसायचे ते बसायला सुरुवात होते. नव्या फॅशन्स येतात आणि त्याच्या आपत्तीची ही कथा रंगत जाते. संघर्ष सुरु होतो. गंगाराम शिंपी आणि भाना या बापमुलांच्या संघर्षाची बाजू त्यात दिसते. जगणं आणि जिद्द बघायला मिळते. पाचोळा ही पारंपरिक ग्रामव्यवस्था उध्वस्त होणा-या संक्रमणकाळातील समाजजीवन रेखाटणारी कादंबरी आहे. खेडेगावातील ग्रामीण कारागीर आपापल्या व्यवसायात स्थिर होते, चांगलं चाललं होतं. आणि आधुनिक जगाचा जो काही फटका बसायचा तो या कारागीरांना बसायला लागला. जे चांगलं असतं, नवं असतं, सुबक असेल त्याचं आकर्षण हा मानवी स्वभाव. यामुळे सामान्य माणसांनी या कारागिरांकडे पाठ फिरवली. आणि यांच्या व्यवसायावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. सुतार, चांभार, लोहार, शिंपी, यांच्या व्यवसायांची वाताहात झाली. नव्या बदलांना गंगाराम सामोरं जातो का ? मुलं काय करतात ? पारबती काय विचार करते ? गावाच्या मागणीनुसार तो नव्या फॅशनचे कपडे शिवतो का ? की खेड्यातील स्त्रीयांच्या चोळ्या व गोरगरिबांचे कपडे शिवतो की जुन्यापुराण्या कपड्यांना ठाकठीक करतो या सर्व प्रश्नांची उत्तरे पाचोळात मिळतील. नक्की वाचा आणि कळवा. -दिलीप बिरुटे ( शिक्षक )

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 12:05
बोरांडे सरांना आदरांजली सरांविषयी खूप काही ऐकलेले आहे. पण त्यांचे लेखन अजून वाचलेले नाही. आपल्या श्रद्धांजलीपर लेकामुळे अल्पसा का होईना त्यांच्या लेखनाविषयी परिचय झाला. त्यांचे साहित्य वाचायला हवे आता.

In reply to by चित्रगुप्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/13/2025 - 08:09
रा.रं.बोराडे सरांची ओळखच 'पाचोळा' कादंबरीपासून होते मला विचाराल तर, पाचोळाच वाचा असे म्हणेन. 'पाचोळा' 'सावट' आणि 'आमदार सौभाग्यवती' या तिन्ही कादंब-यामधून स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या समाजाचे चित्रण येते. स्वातंत्र्यानंतर पहिली पिढी शिकली आणि लिहिती झाली. साठोत्तरी काळातील कादंबरीकार म्हणूनच सरांना ओळखले जाते. पाचोळा (१९७१) पहिल्याच कादंबरीने त्यांना प्रतिष्ठा मिळाली, नाव झालं. तत्पूर्वी आनंद यादवांचा ग्रामीण समकालीन लेखकाचा काळ होता. आनंद यादवांच्या लेखनात ग्रामीण बोलीतलं निवेदन होतं तर, पाचोळातलं ग्रामीण स्त्रीच्या बोलीतलं निवेदन आलं ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की एक अशिशिक्षीत स्त्रीची बोली वाचकांचं लक्ष वेधून घेते. गंगाराम शिंपी हा त्या स्त्रीचा नवरा आपला परंपरागत शिंप्याचा व्यवसाय करतो; आधुनिक जगाचे जे चटके बसायचे ते बसायला सुरुवात होते. नव्या फॅशन्स येतात आणि त्याच्या आपत्तीची ही कथा रंगत जाते. संघर्ष सुरु होतो. गंगाराम शिंपी आणि भाना या बापमुलांच्या संघर्षाची बाजू त्यात दिसते. जगणं आणि जिद्द बघायला मिळते. पाचोळा ही पारंपरिक ग्रामव्यवस्था उध्वस्त होणा-या संक्रमणकाळातील समाजजीवन रेखाटणारी कादंबरी आहे. खेडेगावातील ग्रामीण कारागीर आपापल्या व्यवसायात स्थिर होते, चांगलं चाललं होतं. आणि आधुनिक जगाचा जो काही फटका बसायचा तो या कारागीरांना बसायला लागला. जे चांगलं असतं, नवं असतं, सुबक असेल त्याचं आकर्षण हा मानवी स्वभाव. यामुळे सामान्य माणसांनी या कारागिरांकडे पाठ फिरवली. आणि यांच्या व्यवसायावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. सुतार, चांभार, लोहार, शिंपी, यांच्या व्यवसायांची वाताहात झाली. नव्या बदलांना गंगाराम सामोरं जातो का ? मुलं काय करतात ? पारबती काय विचार करते ? गावाच्या मागणीनुसार तो नव्या फॅशनचे कपडे शिवतो का ? की खेड्यातील स्त्रीयांच्या चोळ्या व गोरगरिबांचे कपडे शिवतो की जुन्यापुराण्या कपड्यांना ठाकठीक करतो या सर्व प्रश्नांची उत्तरे पाचोळात मिळतील. नक्की वाचा आणि कळवा. -दिलीप बिरुटे ( शिक्षक )
लेखनविषय:
लेखनप्रकार

आदरणीय, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे सर, यांचे वृद्धापकाळाने काल सकाळी निधन झाले. सर, ब-याच दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार सरांना जाहीर झाला होता, मसापच्या वतीने तो पुरस्कार साहित्य परिषदेच्या पदाधिका-यांनी घरी जाऊन सरांना तो पुरस्कार दिला तेव्हा, सरांची खालावलेली तब्येत, थकलेपणा, आणि वृद्धापकाळ स्पष्ट दिसत होता.

बजेट आले आणि लग्न तुटले.

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त गुरुवार, 02/13/2025 - 04:12
आणखी एक नवीन टूम म्हणजे विवाहित जोडपी आधीपासूनच निर्णय घेतात की मुलं होऊच द्यायची नाहीत. मग या बाबतीत ते कुणाचेच ऐकत नाहीत. आई-वडील / सासू-सासरे तसेही नकोच असतात.

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि गुरुवार, 02/13/2025 - 12:34
मुलांची जबाबदारी घ्यायला त्यांना जमत नसेल. अर्थात, माझ्या ओळखीत एक जोडपे आहे. त्यांनी ठरवूनच हा निर्णय घेतला आहे. पसंत अपनी अपनी, खयाल अपना अपना

चित्रगुप्त गुरुवार, 02/13/2025 - 04:12
आणखी एक नवीन टूम म्हणजे विवाहित जोडपी आधीपासूनच निर्णय घेतात की मुलं होऊच द्यायची नाहीत. मग या बाबतीत ते कुणाचेच ऐकत नाहीत. आई-वडील / सासू-सासरे तसेही नकोच असतात.

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि गुरुवार, 02/13/2025 - 12:34
मुलांची जबाबदारी घ्यायला त्यांना जमत नसेल. अर्थात, माझ्या ओळखीत एक जोडपे आहे. त्यांनी ठरवूनच हा निर्णय घेतला आहे. पसंत अपनी अपनी, खयाल अपना अपना
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले. ग्राऊंड फ्लोर वर एक मोठा हॉल, दोन बेड रूम, मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर पाहुण्यासाठी एक रूम ही. घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती.