मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक मैत्रिण

विवेकवि ·

अनिला 23/02/2008 - 19:53
खरेच मैत्रीण असणे आवशयक आहे. लग्न झालेल्या बायकान्ना तर असलीच पाहिजे एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात... माझ्या मनीची भावना स्प्ष्त झाली

सोपी बाळबोध स्पष्ट अर्थ असलेली कविता. जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात... या ओळी आवडल्या. कीप इट अप. आणखी येऊ द्यात. शुभेच्छा.

इनोबा म्हणे 24/02/2008 - 01:13
यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते. ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा,मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही. बाकी कविता झक्कासच...! (कविताप्रेमी) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

सरपंच 24/02/2008 - 09:32
यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते. हम्म! ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा, कवितेखाली मिनु जोशी अशी सही आहे. तरी कृपया आपणच मिनु जोशी आहात आणि ही कविता आपलीच आहे किंवा नाही याबाबत स्पष्ट खुलासा अपेक्षित आहे.. मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही. सहमत आहे. या बाबत काय तो स्पष्ट खुलासा न आल्यास येत्या २४ ते ३६ तासात ही कविता मिसळपाववर अप्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.. चूभूद्याघ्या... सरपंच.

अनिला 23/02/2008 - 19:53
खरेच मैत्रीण असणे आवशयक आहे. लग्न झालेल्या बायकान्ना तर असलीच पाहिजे एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात... माझ्या मनीची भावना स्प्ष्त झाली

सोपी बाळबोध स्पष्ट अर्थ असलेली कविता. जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात... या ओळी आवडल्या. कीप इट अप. आणखी येऊ द्यात. शुभेच्छा.

इनोबा म्हणे 24/02/2008 - 01:13
यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते. ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा,मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही. बाकी कविता झक्कासच...! (कविताप्रेमी) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

सरपंच 24/02/2008 - 09:32
यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते. हम्म! ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा, कवितेखाली मिनु जोशी अशी सही आहे. तरी कृपया आपणच मिनु जोशी आहात आणि ही कविता आपलीच आहे किंवा नाही याबाबत स्पष्ट खुलासा अपेक्षित आहे.. मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही. सहमत आहे. या बाबत काय तो स्पष्ट खुलासा न आल्यास येत्या २४ ते ३६ तासात ही कविता मिसळपाववर अप्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.. चूभूद्याघ्या... सरपंच.
लेखनविषय:
एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी ! एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी ! एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा.. एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर तुमच्या व्यथा वेदनांवर तिने घालावी हळूच फुंकर.. एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा तुमचासुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.. एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्री

अभिनयक्षमता

सृष्टीलावण्या ·

नंदन 24/02/2008 - 02:41
आहे व्हिडिओ. भाषा सुद्धा बंगालीसारखी कानाला गोड वाटतेय ऐकायला. कुठली आहे (फ्रेंच/इटालियन?) याचा मात्र काही पत्ता लागत नाही :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान 

मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा 

आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही 

हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या 

पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.

चतुरंग 25/02/2008 - 21:03

इतका उत्स्फूर्त आणि जिवंत परफॉर्मन्स फक्त देवाच्या तालमीत तयार झालेल्या लहानग्यांमधेच असतो, बाकी माणसाच्या तालमीत एकदा ती आली की सुरु होतात ती 'नाटकं'!

चतुरंग

नंदन 24/02/2008 - 02:41
आहे व्हिडिओ. भाषा सुद्धा बंगालीसारखी कानाला गोड वाटतेय ऐकायला. कुठली आहे (फ्रेंच/इटालियन?) याचा मात्र काही पत्ता लागत नाही :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान 

मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा 

आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही 

हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या 

पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.

चतुरंग 25/02/2008 - 21:03

इतका उत्स्फूर्त आणि जिवंत परफॉर्मन्स फक्त देवाच्या तालमीत तयार झालेल्या लहानग्यांमधेच असतो, बाकी माणसाच्या तालमीत एकदा ती आली की सुरु होतात ती 'नाटकं'!

चतुरंग

लेखनविषय:
लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते.... विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

प्रेम

विवेकवि ·

मनस्वी 22/02/2008 - 18:15
जर काहीच कठीण वाटत नसेल तरच ते प्रेम असतं नाहीतर ते प्रेमच नसतं, प्रेमच नसतं, प्रेमच नसतं... मनस्वी

छोटा डॉन 22/02/2008 - 18:25
आपण तर जास्त खोलात शिरतच नाही .... सोपं, कठिण, अवघड , ते निभावणं अशा भानगडीत तर आपण पडतच नाही .... कारण "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं .........." छोटा डॉन

मनस्वी 22/02/2008 - 18:15
जर काहीच कठीण वाटत नसेल तरच ते प्रेम असतं नाहीतर ते प्रेमच नसतं, प्रेमच नसतं, प्रेमच नसतं... मनस्वी

छोटा डॉन 22/02/2008 - 18:25
आपण तर जास्त खोलात शिरतच नाही .... सोपं, कठिण, अवघड , ते निभावणं अशा भानगडीत तर आपण पडतच नाही .... कारण "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं .........." छोटा डॉन
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रेमात पडणं सोपं असतं प्रेमात पडणं सोपं असतं पण प्रेम निभावणं कठीण असतं..... हातात हात घेउन चालणं सोपं असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन पाउलवाट शोधणं कठीण असतं, कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोपं असतं पण ती गुतंवणूक आयुष्यभर जपणं कठीणं असतं माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोपं असतं पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचालं करणं मात्र कठीणं असतं प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं पण ती वचनं आणि शपथा निभावनं मात्र फ़ारच कठीणं असतं प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं पण खर बोलून प्रेम टिकवनं मात्र नक्कीच कठीणं असतं म्हणून सांगते की प्रेमात पडणं सोपं नसतं, सोपं नसतं, सोपं नसतं.... एक वेडा प्रेमी

मी कोण होणार? : भाग १

आनंद घारे ·

लबाड मुलगा 22/02/2008 - 18:11
आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुसर्‍या लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते. खरे आहे (छोटा ) पक्या

लबाड मुलगा 22/02/2008 - 18:11
आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुसर्‍या लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते. खरे आहे (छोटा ) पक्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

मेतकुट भात

शेखर ·

विसोबा खेचर 22/02/2008 - 17:16
असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम.. खल्लास! आपला, (सहमत) तात्या.

सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!! खरे तर आम्ही त्याला गुरगुटा भात किंवा आटवल म्हणतो. खूप पाणी घालून चुलीवर/ गॅसवर भात करायचा. शक्यतो वासाचा बारीक तांदुळ वापरायचा. व्वा काय मस्त चविष्ट आठवण!

In reply to by स्वाती राजेश

सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!

 

मानलं बुवा तुमच्या आवडीला, तुम्ही तर अगदी काळजालाच हात घातलात..

 पण मी एकच म्हणेन उडदाच्या पापडापेक्षा पेणचे तिखटजाळ पोह्याचे पापड 

म्हणजे अगदी मर्माघातच. ब्रह्मानंदीच टाळी लागते...

लबाड मुलगा 22/02/2008 - 18:03
एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा माणसाचा भात कसा काय करतात बॉ....:) पक्या

In reply to by लबाड मुलगा

आपला सवाल लई आवडला. "एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा" म्हणजे एका माणसाला पुरेसा. :) पुण्याचे पेशवे

अहो , आटवल आणि मेतकूट काय भारी लागते म्हणून सांगू. आणि जर का ते तुम्ही केळीच्या पानावर खाल्लत तर अजूनच मजा येते. पुण्याचे पेशवे

प्राजु 22/02/2008 - 23:21
असा वासाच्या तांदळाचा मऊ भात, त्यावर तूप, मेतकूट किंवा लिंबाचे गोडाचे/तिखट लोणचे... सोबत भाजलेली सालपापडी... - प्राजु

चित्रा 23/02/2008 - 08:10
बारीक तांदळाच्या भातात ताक घालून मेतकूट घालून तुपात जिर्‍याची फोडणी, मिरचीचे तुकडे , मीठ घालून बुडबुडे फुटून आवाज येईपर्यंत गरम करायचे. खमंग लागते. चित्रा

आवडाबाई 23/02/2008 - 10:28
मेतकुटाची पाकृ कोणी द्याल काय? माझी आजी, 'मम्मी'ची आई :-) काय छान करायची !! पण आता ती थकली बिचारी आणि तिच्या मुलींना काही 'तसे' जमत नाही बुवा!! कदाचित नातवंडांसाठी करताना जरा जास्तच मन लावून करतात वाटतं ह्या आज्या ! आणि मला वाटतं कोकणातल्या वस्तुंची चवच वेगळी असते. एनिवे, पण म्हणून काय आम्ही आता मेतकूट करूच नये की काय? मग सांगताय ना मला पाकृ?

शुचि 04/05/2010 - 01:48
आपल्या बाळाला गुरगुट्या मेतकुट भात भरवता येणं यासारखं सुख नाही :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

रेवती 04/05/2010 - 06:18
मस्तच! मेतकूट भात म्हणजे काही बोलायलाच नको! मी इथे जी कृती देतीये ती माझ्याकडच्या 'स्वयंपाक' या पुस्तकातील आहे. श्रेय लेखिका सौ. सिंधूताई साठे यांना द्यावे. ४ वाट्या हरभरा डाळ, १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी उडीद डाळ, २ टेस्पू धने, १ टेस्पू जिरे, ५ ते ६ लवंगा, ८ ते १० साधे वेलदोडे, एक जायफळ, सुंठीची २ कुडी, १ टीस्पू. लाल तिखट, अर्धा टिस्पू हळद, तेवढाच हिंग, १ टिस्पू मोहरी. फक्त डाळी व तांदूळ बदामी रंगावर खमंग भाजून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून दळून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. माझा मुलगा लहान असताना मेतकूट मी घरी करत असे. त्याला गुरगुट्या भात मेतकूट घालून फार आवडत असे........आताही आवडतोच! सध्या विकतचे मेतकूट वापरते, ते संपले कि घरीच करीन. रेवती

प्रभो 04/05/2010 - 06:23
च्यायला , घरून आणलेलं मेतकूट संपलय...सध्या वांदे चालू आहेत... असो, मेतकूट दह्यात कालवून गरम गरम पोळी सोबत खायलाही मजा येते..

मीली 04/05/2010 - 06:26
मेतकुट करायची कृती दिल्याबद्दल धन्यवाद ! करून बघायला हवे. मीली

विसोबा खेचर 22/02/2008 - 17:16
असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम.. खल्लास! आपला, (सहमत) तात्या.

सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!! खरे तर आम्ही त्याला गुरगुटा भात किंवा आटवल म्हणतो. खूप पाणी घालून चुलीवर/ गॅसवर भात करायचा. शक्यतो वासाचा बारीक तांदुळ वापरायचा. व्वा काय मस्त चविष्ट आठवण!

In reply to by स्वाती राजेश

सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!

 

मानलं बुवा तुमच्या आवडीला, तुम्ही तर अगदी काळजालाच हात घातलात..

 पण मी एकच म्हणेन उडदाच्या पापडापेक्षा पेणचे तिखटजाळ पोह्याचे पापड 

म्हणजे अगदी मर्माघातच. ब्रह्मानंदीच टाळी लागते...

लबाड मुलगा 22/02/2008 - 18:03
एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा माणसाचा भात कसा काय करतात बॉ....:) पक्या

In reply to by लबाड मुलगा

आपला सवाल लई आवडला. "एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा" म्हणजे एका माणसाला पुरेसा. :) पुण्याचे पेशवे

अहो , आटवल आणि मेतकूट काय भारी लागते म्हणून सांगू. आणि जर का ते तुम्ही केळीच्या पानावर खाल्लत तर अजूनच मजा येते. पुण्याचे पेशवे

प्राजु 22/02/2008 - 23:21
असा वासाच्या तांदळाचा मऊ भात, त्यावर तूप, मेतकूट किंवा लिंबाचे गोडाचे/तिखट लोणचे... सोबत भाजलेली सालपापडी... - प्राजु

चित्रा 23/02/2008 - 08:10
बारीक तांदळाच्या भातात ताक घालून मेतकूट घालून तुपात जिर्‍याची फोडणी, मिरचीचे तुकडे , मीठ घालून बुडबुडे फुटून आवाज येईपर्यंत गरम करायचे. खमंग लागते. चित्रा

आवडाबाई 23/02/2008 - 10:28
मेतकुटाची पाकृ कोणी द्याल काय? माझी आजी, 'मम्मी'ची आई :-) काय छान करायची !! पण आता ती थकली बिचारी आणि तिच्या मुलींना काही 'तसे' जमत नाही बुवा!! कदाचित नातवंडांसाठी करताना जरा जास्तच मन लावून करतात वाटतं ह्या आज्या ! आणि मला वाटतं कोकणातल्या वस्तुंची चवच वेगळी असते. एनिवे, पण म्हणून काय आम्ही आता मेतकूट करूच नये की काय? मग सांगताय ना मला पाकृ?

शुचि 04/05/2010 - 01:48
आपल्या बाळाला गुरगुट्या मेतकुट भात भरवता येणं यासारखं सुख नाही :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

रेवती 04/05/2010 - 06:18
मस्तच! मेतकूट भात म्हणजे काही बोलायलाच नको! मी इथे जी कृती देतीये ती माझ्याकडच्या 'स्वयंपाक' या पुस्तकातील आहे. श्रेय लेखिका सौ. सिंधूताई साठे यांना द्यावे. ४ वाट्या हरभरा डाळ, १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी उडीद डाळ, २ टेस्पू धने, १ टेस्पू जिरे, ५ ते ६ लवंगा, ८ ते १० साधे वेलदोडे, एक जायफळ, सुंठीची २ कुडी, १ टीस्पू. लाल तिखट, अर्धा टिस्पू हळद, तेवढाच हिंग, १ टिस्पू मोहरी. फक्त डाळी व तांदूळ बदामी रंगावर खमंग भाजून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून दळून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. माझा मुलगा लहान असताना मेतकूट मी घरी करत असे. त्याला गुरगुट्या भात मेतकूट घालून फार आवडत असे........आताही आवडतोच! सध्या विकतचे मेतकूट वापरते, ते संपले कि घरीच करीन. रेवती

प्रभो 04/05/2010 - 06:23
च्यायला , घरून आणलेलं मेतकूट संपलय...सध्या वांदे चालू आहेत... असो, मेतकूट दह्यात कालवून गरम गरम पोळी सोबत खायलाही मजा येते..

मीली 04/05/2010 - 06:26
मेतकुट करायची कृती दिल्याबद्दल धन्यवाद ! करून बघायला हवे. मीली
मेतकुट भात न आवडणारे फारच कमी लोक भेटतील. मेतकुट भात हा माझा वीक पॉइंट... मी जरा वेगळ्या प्रकारे करुन खातो. एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा. त्यात ३ ते ४ चमचे मेतकुट व ३ चमचे तुप घालावे. भांडे मंद आचेवर ठेवावे. त्यात अर्धा कप पाणी घालावे. हे सगळे मिश्रण नीट एकत्र करावे. भात गरम व चांगला गुरगुटा होऊन द्यावा. असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम.. शेखर.

हज़ारों ख्वाहिशें ऐसी ...

आनंदयात्री ·

विसोबा खेचर 22/02/2008 - 14:13
मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय. आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे. !!! क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! जियो आनंदयात्री....! आपला, (हे सगळं वाचून क्षणात काही वर्षांपूर्वीच्या गतस्मृतीत गेलेला!) तात्या.

अतिशय अप्रतीम .......जोपर्यन्त "दिल मे दर्द" असत नाही, तो पर्यन्त लेखणीतून असे शब्द निघणे केवळ अशक्य.....वाचून अगदी Nostalgic व्हायला झाल. आणखी एक शेर इथे अर्ज करावासा वाटतो. जब दर्द नही था सीने मे, क्या खाक मझा था जीने मे, अब के बरस हम भी रोए, सावन के महीने मे आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

मुक्तसुनीत 22/02/2008 - 18:55
तुमचे हे स्फुट चटका लावणारे झाले आहे. कोवळ्या वयात झालेल्या अशा घावांमुळे - मग तो प्रेमभंग असेल, अपेक्षाभंग असेल , कारकीर्दीतील अपेश असेल... झालेल्या काही जखमा बुजत नाहीत. त्यावर खपली सहज धरली जात नाही. आणि बुजल्यासारखी झाली तरी आठवणींचे व्रण रहातातच. अपेक्षाभंग, परित्यक्ततेची जाणीव, एकाकीपण या सर्व मानवी अवस्था आहेत. आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला कधी न कधी याचा स्पर्श झाला असेलच.

गमत्या 22/02/2008 - 19:33
तुझ्या लेखनावरुन अंदाज़ येतो की खुप मोठी जखम तुला झाली आहे. पण मला वाटते की ह्या आणि ह्याही पेक्षा मोठया जखमा असणार्या व्यक्ति ह्या जगात आहेत. अरे ज्याच्या नावातुन इतका आनंद ओसांडत आहे आणि तुझ्यासारखा जो आनंदाच्या मार्गाचा यात्रि आहे त्याला रे कसली आली आहे दुखा़ ची चिन्ता. मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी) क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! गमत्या

In reply to by गमत्या

विसोबा खेचर 23/02/2008 - 00:14
मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी) क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! येस्स! तुमचे बरोबर आहे गंमत्याराव! :) आता मी ही, खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! असेच म्हणेन! :) असो, सर्वांचे प्रतिसाद आवडले, गाण्यांचे दुवेही छान आहेत... तात्या.

माझे बाबा कायम एक उदाहरण द्यायचे ते म्हणजे... कार मध्ये बसलेल्या माणसाने स्कुटर वाल्या माणसाकडे पाहावे, स्कुटर वर बसलेल्या माणसाने पायी चालत असलेल्या माणसाकडे पाहावे, पायी चालत असलेल्या माणसाने लंगडया माणसाकडे पाहावे.... म्हणजे आपण किती सुखी आहोत ते कळते.

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत? बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात... - वा.रा. कान्त. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं हैं, अब तो हर वक्त यही बात सताती है हमे... - चित्रपट: उमराव जान

In reply to by सृष्टीलावण्या

चतुरंग 22/02/2008 - 20:01
किती छान आठवण दिलीत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात! स्व.वसंतराव देशपांड्यांनी गायलेलं हे गाणं त्यांच्या नातवाने, राहुल देशपांडेने गायलेले इथे ऐकता येईल. चतुरंग

In reply to by सृष्टीलावण्या

विद्याधर३१ 23/02/2008 - 07:52
तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत? बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात... - वा.रा. कान्त. अतिशय सुन्दर काव्य ... आत्ता तेच ऐकतो आहे. ( मनकवडा) विद्याधर

In reply to by सृष्टीलावण्या

कोलबेर 23/02/2008 - 01:31
राहूलने गाणं छानच म्हंटलं आहे पण थोडं नैसर्गिक गायला हवं होत असं माझं ('ढ') वैयक्तिक मत आहे.. तसेच पावसाचे अभ्रकाचे ह्यातला 'च' चैतन्य मधल्या 'च' सारखा उच्चारला आहे ते समजले नाही...त्यामूळे एखादा सिंधी माणूस गातो आहे असे वाटते :)

तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी. "मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे वेल दारी सायलीची रोज अजूनी बार देते लाख पुष्पे तोडील्याविण ये भरोनी पात्र माझे ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहीले" हे ही असेच आमच्या वसंतरावांनी म्हटलेले आणि मला वेड लावणारे गाणे.. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मुक्तसुनीत 22/02/2008 - 21:39
एका अनोख्या , अतिशय सुंदर गाण्याची आठवण जागवल्याबद्दल तुम्हाला दाद द्यावी तितकी थोडी !

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चतुरंग 22/02/2008 - 22:17
हे संपूर्ण गाणे इथे वाचता येईल. आणि इथे ऐकता/उतरवून घेता येईल. चतुरंग

ऋषिकेश 22/02/2008 - 22:16
मनाला चटका लावणारे मुक्तक.. खूप छान -ऋषिकेश

धनंजय 22/02/2008 - 23:15
आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! अत्यंत समर्पक दृष्टांत! गा़लिबच्या त्याच ग़जलेतला हा शेर त्या मानाने थोडा आशादायी वाटतो : मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का उसी को देख के जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले आणि तुमच्या मुक्तकालाही लागू आहे असे वाटते - लेखकाचे भावविश्व "तू"मुळे उद्ध्वस्त झाले, पण "तू"च्या आठवणींनीच तग धरून आहे.

आनंदयात्री 24/02/2008 - 11:48
केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.

बंडा मामा 24/10/2011 - 06:20
मला इमेलमधुन या लेखाची लिंक मिळाली होती. लगेच इथली मेंबरशीप घेतली. फार छान लेखन!

विसोबा खेचर 22/02/2008 - 14:13
मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय. आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे. !!! क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! जियो आनंदयात्री....! आपला, (हे सगळं वाचून क्षणात काही वर्षांपूर्वीच्या गतस्मृतीत गेलेला!) तात्या.

अतिशय अप्रतीम .......जोपर्यन्त "दिल मे दर्द" असत नाही, तो पर्यन्त लेखणीतून असे शब्द निघणे केवळ अशक्य.....वाचून अगदी Nostalgic व्हायला झाल. आणखी एक शेर इथे अर्ज करावासा वाटतो. जब दर्द नही था सीने मे, क्या खाक मझा था जीने मे, अब के बरस हम भी रोए, सावन के महीने मे आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

मुक्तसुनीत 22/02/2008 - 18:55
तुमचे हे स्फुट चटका लावणारे झाले आहे. कोवळ्या वयात झालेल्या अशा घावांमुळे - मग तो प्रेमभंग असेल, अपेक्षाभंग असेल , कारकीर्दीतील अपेश असेल... झालेल्या काही जखमा बुजत नाहीत. त्यावर खपली सहज धरली जात नाही. आणि बुजल्यासारखी झाली तरी आठवणींचे व्रण रहातातच. अपेक्षाभंग, परित्यक्ततेची जाणीव, एकाकीपण या सर्व मानवी अवस्था आहेत. आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला कधी न कधी याचा स्पर्श झाला असेलच.

गमत्या 22/02/2008 - 19:33
तुझ्या लेखनावरुन अंदाज़ येतो की खुप मोठी जखम तुला झाली आहे. पण मला वाटते की ह्या आणि ह्याही पेक्षा मोठया जखमा असणार्या व्यक्ति ह्या जगात आहेत. अरे ज्याच्या नावातुन इतका आनंद ओसांडत आहे आणि तुझ्यासारखा जो आनंदाच्या मार्गाचा यात्रि आहे त्याला रे कसली आली आहे दुखा़ ची चिन्ता. मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी) क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! गमत्या

In reply to by गमत्या

विसोबा खेचर 23/02/2008 - 00:14
मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी) क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! येस्स! तुमचे बरोबर आहे गंमत्याराव! :) आता मी ही, खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! असेच म्हणेन! :) असो, सर्वांचे प्रतिसाद आवडले, गाण्यांचे दुवेही छान आहेत... तात्या.

माझे बाबा कायम एक उदाहरण द्यायचे ते म्हणजे... कार मध्ये बसलेल्या माणसाने स्कुटर वाल्या माणसाकडे पाहावे, स्कुटर वर बसलेल्या माणसाने पायी चालत असलेल्या माणसाकडे पाहावे, पायी चालत असलेल्या माणसाने लंगडया माणसाकडे पाहावे.... म्हणजे आपण किती सुखी आहोत ते कळते.

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत? बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात... - वा.रा. कान्त. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं हैं, अब तो हर वक्त यही बात सताती है हमे... - चित्रपट: उमराव जान

In reply to by सृष्टीलावण्या

चतुरंग 22/02/2008 - 20:01
किती छान आठवण दिलीत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात! स्व.वसंतराव देशपांड्यांनी गायलेलं हे गाणं त्यांच्या नातवाने, राहुल देशपांडेने गायलेले इथे ऐकता येईल. चतुरंग

In reply to by सृष्टीलावण्या

विद्याधर३१ 23/02/2008 - 07:52
तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत? बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात... - वा.रा. कान्त. अतिशय सुन्दर काव्य ... आत्ता तेच ऐकतो आहे. ( मनकवडा) विद्याधर

In reply to by सृष्टीलावण्या

कोलबेर 23/02/2008 - 01:31
राहूलने गाणं छानच म्हंटलं आहे पण थोडं नैसर्गिक गायला हवं होत असं माझं ('ढ') वैयक्तिक मत आहे.. तसेच पावसाचे अभ्रकाचे ह्यातला 'च' चैतन्य मधल्या 'च' सारखा उच्चारला आहे ते समजले नाही...त्यामूळे एखादा सिंधी माणूस गातो आहे असे वाटते :)

तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी. "मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे वेल दारी सायलीची रोज अजूनी बार देते लाख पुष्पे तोडील्याविण ये भरोनी पात्र माझे ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहीले" हे ही असेच आमच्या वसंतरावांनी म्हटलेले आणि मला वेड लावणारे गाणे.. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मुक्तसुनीत 22/02/2008 - 21:39
एका अनोख्या , अतिशय सुंदर गाण्याची आठवण जागवल्याबद्दल तुम्हाला दाद द्यावी तितकी थोडी !

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चतुरंग 22/02/2008 - 22:17
हे संपूर्ण गाणे इथे वाचता येईल. आणि इथे ऐकता/उतरवून घेता येईल. चतुरंग

ऋषिकेश 22/02/2008 - 22:16
मनाला चटका लावणारे मुक्तक.. खूप छान -ऋषिकेश

धनंजय 22/02/2008 - 23:15
आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! अत्यंत समर्पक दृष्टांत! गा़लिबच्या त्याच ग़जलेतला हा शेर त्या मानाने थोडा आशादायी वाटतो : मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का उसी को देख के जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले आणि तुमच्या मुक्तकालाही लागू आहे असे वाटते - लेखकाचे भावविश्व "तू"मुळे उद्ध्वस्त झाले, पण "तू"च्या आठवणींनीच तग धरून आहे.

आनंदयात्री 24/02/2008 - 11:48
केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.

बंडा मामा 24/10/2011 - 06:20
मला इमेलमधुन या लेखाची लिंक मिळाली होती. लगेच इथली मेंबरशीप घेतली. फार छान लेखन!
लेखनविषय:
मी मनात तो विषयच येउ देत नाही,अगदीच मनाचे सगळे बंध तोडुन आला जरी; तरी दुर ढकलुन देतो मी त्याला, अगदी दुर. खरे तर मी तिच्या अस्तित्वालाच नकार दिलाय..... तरीपण स्वप्नाच्या अन सत्याच्या धुसर सीमेवर ती मला भेटतच रहाते ... वेगवेगळ्या रुपातुन .. कधी सहचारिणी बनुन तर कधी अभिसारिका बनुन. कधी रागावते ओरडते तर कधी काळजी घेते, माझ्या जखमांना औषध लावते.

न्यूनगंड

सृष्टीलावण्या ·

लंबूटांग 22/02/2008 - 11:22
मला पसार्‍यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.
सहमत आणि आवरून ठेवले की डोळ्यासमोरची गोष्ट पण दिसत नाही. घरी असताना मातोश्रींबरोबर नेहमीच ह्या वरून सुखसंवाद व्हायचा. "तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही."

राजमुद्रा 22/02/2008 - 11:48
मलाही पसार्‍यातच राहायला आवडते, घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. बाकी टापटिप घरात मला टेन्शन येतं. होटेलात राहिल्यासारखं वाटतं राजमुद्रा :)

धमाल मुलगा 22/02/2008 - 11:59
"तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही." ल॑बूटा॑ग, गेल्या जन्मीचा माझा जुळा भाऊ आहेस की काय? एकदम शेम टू शेम क॑डिक्शन आपली पण. "सगळ॑ नीट आवरून ठेवा..समोरची वस्तूसुध्दा सापडणार नाही, तेच जर का उभ॑ घर व्यायल॑ असेल तर त्या पसार्‍यात हात घालून हव्व॑ ते लगेच काढतो...कसल॑ कार्ट॑ जन्माला आल॑य देव जाणे" (आमच्या आऊसाहेबा॑च॑ आमच्या बाबतीत अत्य॑त लाडक॑ मत.) मलाही पसार्‍यातच राहायला आवडते, घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. बाकी टापटिप घरात मला टेन्शन येतं. होटेलात राहिल्यासारखं वाटतं राजमुद्रा ताई माझ॑ही अगदी हेच मत. मी नेहमी आईला अस॑च वाक्य ऐकवतो. "घर आणि हॉटेलच॑ रिसेप्शन ह्यात काहीतरी फरक असायला हवा ना? असा पसारा असला की कस॑ आपल॑ जवळच॑ जिव्हाळ्याच॑ वाटत...तस॑ त्या टापटीपीतल्या हॉटेलात वाटत का? नाही ना? शहाणी ना माझी आई ती?? मग असा त्रास नाही द्यायचा मला :)" लगेच 'तुर॑त से भी पहेले' आमची आयशी हातात जे काही असेल ते घेऊन चालून येते..आपण लगेच "दुर्गे दुर्घट भारी..." चालू करायच॑ आणि आजीमाग॑ लपायच॑.............. ह्म्म्म.. च्यामारी, लय आठवण यायला लागली बॉ घरची :-( आपला, - पसार्‍यात पसरलेला ध मा ल

मनस्वी 22/02/2008 - 11:54
थोडा पसारा चालतो.. नाहीतर ते घर कसलं.. पण खूपच असेल तर वेड लागतं. तो आवरायचा सोडून मी त्याच्याकडे अर्धा तास बघत बसते.. मग आवरायला घेते. (पदर खोचून (..जीन्सला पदर नसतो बहुतेक)) मनस्वी

भुमन्यु 22/02/2008 - 12:13
हे खरंय!!!!!!!!!!! कारण मला पण पसार्‍यात सगळं सापडत (कारण ऑर्डर लाईज ईन युवर माईंड)............................पण खुप पसारा पण नाही आवडत.

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत 22/02/2008 - 21:46
"अवर हाउस वॉज नीट अँड क्लीन लास्ट वीक. सॉरी यू मिस्ड इट." बाथरूम मधे : "अवर एम इज टू कीप धिस प्लेस क्लीन. जेन्ट्स, यूअर एम विल हेल्प ! लेडिज, प्लीज रीमेन सीटेड थ्रु द एंटायर एक्सरसाइज ! "

घरी असताना मातोश्रींबरोबर नेहमीच ह्या वरून सुखसंवाद व्हायचा. "तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही." एकदम सहमत बुवा. पण हल्ली काय होते की घरी कोण येणार असले तर आई घर आवरायला सांगते. मग जो बकरा(मी किंवा भाऊ) उपलब्ध असेल त्याने घर आवरायचे. मग तिथे ज्याचे ज्याचे कपडे, वस्तू असतील त्या त्याच्या त्याच्या कपाटात टाकून्(कोंबून) कपाटाचे मुस्काट दाबायचे. यथावकाश पाहुणे येऊन गेले की एखाद्या वेळेस वस्तू मिळत नसेल तर प्रश्न "परवा कोणाची मुन्सिपालिटी फिरली होती?"(घर कोणी आवरले होते?) मग ती वस्तू शोधून द्यायची जबाबदारी त्याची. अशा गोष्टी आईसमोर बिलकूल बोलायच्या नाहीत नाहीतर 'गेले बाबांच्या वळणावर' असे ऐकायला मिळते. मग त्या गरीब बिचर्‍या कपाटाचे तोंड उघडले की ते पोटातल्या सर्व गोष्टी झटक्यासरशी बाहेर काढते. आणि त्याच झटक्यात हवी असलेली वस्तू बाहेर पडली तर होणारा आनंद म्हणजे 'ते ब्रम्हज्ञान गवसल्याच्या' आनंदाच्या तोडीचा असतो. ('पसारा' व्यवस्थेचा पुरस्कार करणारा) डॅनी पुण्याचे पेशवे

ऋषिकेश 22/02/2008 - 23:00
तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही
हा हा हा!!! माझ्या घरची वाक्य ही अशीच.. पण त्या पसार्‍यालाही एक ऑर्डर असते :) त्या ढिगात कोणती गोष्ट अधी गेली, कोणती नंतर हे लक्षात असतं ;)

प्राजु 22/02/2008 - 23:07
हा एक कधिही न संपणारा विषय आहे. आमच्या घरात पसार्‍याशिवाय काहीच नसतं. आणि त्यात आणखी भर घालायचं अतिशय महत्वाचं काम आमचे सुपुत्र (वय वर्षे ४) अगदी चोख बजावत असतात. आणि पसारा न आवरण्याची भीष्मप्रतिज्ञाच केल्याप्रमाणे पतिदेव घरात वावरत असतात. कधी कधी मात्र तो पसारा पाहून डोकं फिरतं आणि मग सगळं घर अगदी झपाटून कामाला लागतं तो पसारा आवरण्याच्या. मलाही पसारा आवडतो पण खूप नाही.. पसारा करावा पण तो केल्यानंतर स्वतःच आवरावा या मताची मी आहे. घरच्या स्त्रीला तिच्या कामात मदत नाही करता आली तर निदान तिचे काम आपण वाढवू तरी नये अशीच आईचि शिकवण मिळाली त्याचा हा परिणाम. - (शक्यतो नीटनेटकी)प्राजु

चतुरंग 23/02/2008 - 00:30
लहान असताना आणि त्यानंतर कालेजात असताना. पण मुळात मी जसा 'पसारेवाला' कॅटेगरी मधला नाही तसा प्रचंड शिस्तीचाही नाही. थोडा पसारा चालतो पण घर हे 'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र झाले तर मात्र चालत नाही. अवांतर - 'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ केंद्र'? - होय हे दिव्य नाव मी स्वतः वाचलेले आहे - बिचारे ज्ञानेश्वर, त्यांच्या नावाचा असा वापर केलेला बघून त्यांना वाटले असते की रेड्यामुखी वेद वदवले, भिंत चालवली पण ह्या नारळांना शिकवू शकलो नाही!:)) चतुरंग

विसोबा खेचर 23/02/2008 - 00:42
माझ्या मते पसार्‍याशिवाय घराला घरपणच नाही! च्यामारी, स्वच्छ, टापटीप, नीटनेटक्या घरात वावरताना खूप परकेपणा वाटतो! मी तर स्वच्छ आणि टापटीप आणि पॉश घरं असलेल्या लोकांकडे सहसा जातसुद्धा नाही. आपल्याला तर बॉ तिथे फारच अवघडल्यासारखं वाटतं. मोकळेपणा नाही वाटत! आपला, (पसाराखोर) तात्या. ता क - आत्ता हे लेखन करत असताना माझा संगणक जिथे ठेवला आहे तिथे बोंबलायला मजबूत पसारा पडला असून माझे काही महत्वाचे कागदपत्र त्यातच कुठेतरी आसरा घेऊन आहेत. मी त्यांना शोधतो आहे परंतु अजून गावले नाहीत! जाऊ द्या, गेलं सालं बा...! आत्ता झोपतो, उद्या सकाळी जरा निवांतपणे शोधेन म्हण्तो! :) आपला, (स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणाची शाणपत्ती करणार्‍यांना फाट्यावर मारणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 23/02/2008 - 00:55
>>मी तर स्वच्छ आणि टापटीप आणि पॉश घरं असलेल्या लोकांकडे सहसा जातसुद्धा नाही पण लोकांकडे गेल्याशिवाय ते स्वच्छ, टापटीप, नीटनेटके की पसारेवाले हे कसं कळणार ?:}} ( हा उगीचच एक चावा, ह.घ्या.!) चतुरंग

आनंद घारे 24/02/2008 - 12:38
घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. छान! ते घदते पसार्‍यामुळेच! सगळ्या गोष्टी नीटनेटक्या दिसतील अशा ठेवल्या तर त्याचे शोरूम होते. पसारा करणारा एकच माणूस असेल तर त्याला हवी असलेली वस्तू लगेच सापडते हे खरे असले तरी घरातले अनेक लोक आपापल्या परीने त्यात भर टाकत असले तर मात्र त्यात कोणालाच कांही सापडत नाही हा फक्त एकच दोष त्यात आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापले वेगवेगळे पसारे करावे हे उत्तम. फक्त घरातच पसारा असतो असे नाही. माझ्या संगणकावरील फाइलींच्या पसार्‍यातून हवी असलेली फाईल शोधणे माझ्याखेरीज दुसरा कोणीही करू शकत नाही, अगदी शोधयंत्रांच्या सहाय्यानेसुद्धा!

विजुभाऊ 28/02/2008 - 15:35

'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र ...पुन्यात शनिवार पेठेत सकाळ च्या कोपर्यावर होते....महित नाही अजुन आहे का?

पण बर्याच रद्दी डेपोची नावे ज्ञानेश्वर रद्दी डेपो अशी का असतात ?

ज्ञानेश्वर आद्य मराठी साहित्यीक होते त्याचा असा सूड घेतला जाइल असे त्याना ही वाट्ले नसेल

पार्टनर 03/06/2008 - 10:01
शनिवारवाड्याच्या मागच्या गल्लीत आहे.पहिल्यांदा नाव वाचलं तेव्हा हसून हसून गाल दुखायला लागले होते ! - यात्रा,एकादशी, आणि गर्दीला न जुमानता आळंदीला चार वर्षे (बसमधून) वारी केलेला नादिष्ट

ऋचा 03/06/2008 - 10:43
मला पसारा 'च' आवडतो, पण खुप नाही चालत (कारण मलाच आवरावा लागतो) :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेदश्री 03/06/2008 - 12:42
मलातर पसारा खूपच आवडतो पण आवरायला ! मग तो अगदी गावातल्या आमच्या गोठ्यातला पसारा असो किंवा माझ्या रूममधल्या माझ्या तांत्रिक गोष्टींचा.. सुट्टीच्या दिवशी जर घरी असेन तर अथवा फावला वेळ मिळताच आवडीची गाणी लावून अशी आवरासावर करण्याचा मला भारी उचका येतो. धमाल मजा येते. माझ्या लॅप्टॉपमध्ये झालेला गाण्यांचा पसारा आवरायला मात्र अज्जुन जमलेले नाही मला कारण पसारा आवरायला उत्साह देणारी गाणी कशी ऐकणार मग मी.. झोल आहे ! काहितरी युक्ती काढून तो लवकरच आवरावा लागणारे हे मात्र निश्चित.

मन 03/06/2008 - 13:28
अहो, अगदि अस्साच पसारा माझ्या खोलीवर वरही असतो. पण येणार्‍या प्रत्येकालाच उलट माझ्या समाधानी-आत्मानंदी वृत्तेचं कौतुकमिश्रित हेवा वाटतो. आणि त्यांनाच न्युनगंड ते जगत असलेल्या अतिसामान्य-तथाकथित व्यव्स्थित आयुष्याबद्दल. मग मला चहा वगैरे झाल्यावर उगिचच त्यांचं साअम्त्वन वगैरे करावं लागतं. आणि सम्जवावं लागतं:- "जाउ द्या हो साहेब, नस्तं एकेकाच्या भाग्यात पसारा करुन ठेवण्याचं सौख्य. त्यात काय इतकं "वगैरे... आपलाच, मनोबा

शितल 03/06/2008 - 18:13
मला तर घर व्यवस्थित लावायला आवडते, पण खुप पसारा करून म्हणजे मी दिवसातुन एकदाच घर आवरते, माझ॑ लेकरू तर खेळणी, भा॑डी आणि डा. टेबलच्या खुर्च्याच्या गाड्या करून घर भर फिरवत असतो, बाहेरचा आल्यावर आम्ही त्याच्या पुढे आवराआवरीचे प्रयत्न करतो पण पाठ फिरली की परत ये रे माझ्या मागला. आणि पसार्‍यातीलच वस्तु हाताला पटकन मिळते जर ती आवरून ठेवली तर हरवली हे समजायचे.

लंबूटांग 22/02/2008 - 11:22
मला पसार्‍यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.
सहमत आणि आवरून ठेवले की डोळ्यासमोरची गोष्ट पण दिसत नाही. घरी असताना मातोश्रींबरोबर नेहमीच ह्या वरून सुखसंवाद व्हायचा. "तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही."

राजमुद्रा 22/02/2008 - 11:48
मलाही पसार्‍यातच राहायला आवडते, घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. बाकी टापटिप घरात मला टेन्शन येतं. होटेलात राहिल्यासारखं वाटतं राजमुद्रा :)

धमाल मुलगा 22/02/2008 - 11:59
"तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही." ल॑बूटा॑ग, गेल्या जन्मीचा माझा जुळा भाऊ आहेस की काय? एकदम शेम टू शेम क॑डिक्शन आपली पण. "सगळ॑ नीट आवरून ठेवा..समोरची वस्तूसुध्दा सापडणार नाही, तेच जर का उभ॑ घर व्यायल॑ असेल तर त्या पसार्‍यात हात घालून हव्व॑ ते लगेच काढतो...कसल॑ कार्ट॑ जन्माला आल॑य देव जाणे" (आमच्या आऊसाहेबा॑च॑ आमच्या बाबतीत अत्य॑त लाडक॑ मत.) मलाही पसार्‍यातच राहायला आवडते, घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. बाकी टापटिप घरात मला टेन्शन येतं. होटेलात राहिल्यासारखं वाटतं राजमुद्रा ताई माझ॑ही अगदी हेच मत. मी नेहमी आईला अस॑च वाक्य ऐकवतो. "घर आणि हॉटेलच॑ रिसेप्शन ह्यात काहीतरी फरक असायला हवा ना? असा पसारा असला की कस॑ आपल॑ जवळच॑ जिव्हाळ्याच॑ वाटत...तस॑ त्या टापटीपीतल्या हॉटेलात वाटत का? नाही ना? शहाणी ना माझी आई ती?? मग असा त्रास नाही द्यायचा मला :)" लगेच 'तुर॑त से भी पहेले' आमची आयशी हातात जे काही असेल ते घेऊन चालून येते..आपण लगेच "दुर्गे दुर्घट भारी..." चालू करायच॑ आणि आजीमाग॑ लपायच॑.............. ह्म्म्म.. च्यामारी, लय आठवण यायला लागली बॉ घरची :-( आपला, - पसार्‍यात पसरलेला ध मा ल

मनस्वी 22/02/2008 - 11:54
थोडा पसारा चालतो.. नाहीतर ते घर कसलं.. पण खूपच असेल तर वेड लागतं. तो आवरायचा सोडून मी त्याच्याकडे अर्धा तास बघत बसते.. मग आवरायला घेते. (पदर खोचून (..जीन्सला पदर नसतो बहुतेक)) मनस्वी

भुमन्यु 22/02/2008 - 12:13
हे खरंय!!!!!!!!!!! कारण मला पण पसार्‍यात सगळं सापडत (कारण ऑर्डर लाईज ईन युवर माईंड)............................पण खुप पसारा पण नाही आवडत.

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत 22/02/2008 - 21:46
"अवर हाउस वॉज नीट अँड क्लीन लास्ट वीक. सॉरी यू मिस्ड इट." बाथरूम मधे : "अवर एम इज टू कीप धिस प्लेस क्लीन. जेन्ट्स, यूअर एम विल हेल्प ! लेडिज, प्लीज रीमेन सीटेड थ्रु द एंटायर एक्सरसाइज ! "

घरी असताना मातोश्रींबरोबर नेहमीच ह्या वरून सुखसंवाद व्हायचा. "तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही." एकदम सहमत बुवा. पण हल्ली काय होते की घरी कोण येणार असले तर आई घर आवरायला सांगते. मग जो बकरा(मी किंवा भाऊ) उपलब्ध असेल त्याने घर आवरायचे. मग तिथे ज्याचे ज्याचे कपडे, वस्तू असतील त्या त्याच्या त्याच्या कपाटात टाकून्(कोंबून) कपाटाचे मुस्काट दाबायचे. यथावकाश पाहुणे येऊन गेले की एखाद्या वेळेस वस्तू मिळत नसेल तर प्रश्न "परवा कोणाची मुन्सिपालिटी फिरली होती?"(घर कोणी आवरले होते?) मग ती वस्तू शोधून द्यायची जबाबदारी त्याची. अशा गोष्टी आईसमोर बिलकूल बोलायच्या नाहीत नाहीतर 'गेले बाबांच्या वळणावर' असे ऐकायला मिळते. मग त्या गरीब बिचर्‍या कपाटाचे तोंड उघडले की ते पोटातल्या सर्व गोष्टी झटक्यासरशी बाहेर काढते. आणि त्याच झटक्यात हवी असलेली वस्तू बाहेर पडली तर होणारा आनंद म्हणजे 'ते ब्रम्हज्ञान गवसल्याच्या' आनंदाच्या तोडीचा असतो. ('पसारा' व्यवस्थेचा पुरस्कार करणारा) डॅनी पुण्याचे पेशवे

ऋषिकेश 22/02/2008 - 23:00
तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही
हा हा हा!!! माझ्या घरची वाक्य ही अशीच.. पण त्या पसार्‍यालाही एक ऑर्डर असते :) त्या ढिगात कोणती गोष्ट अधी गेली, कोणती नंतर हे लक्षात असतं ;)

प्राजु 22/02/2008 - 23:07
हा एक कधिही न संपणारा विषय आहे. आमच्या घरात पसार्‍याशिवाय काहीच नसतं. आणि त्यात आणखी भर घालायचं अतिशय महत्वाचं काम आमचे सुपुत्र (वय वर्षे ४) अगदी चोख बजावत असतात. आणि पसारा न आवरण्याची भीष्मप्रतिज्ञाच केल्याप्रमाणे पतिदेव घरात वावरत असतात. कधी कधी मात्र तो पसारा पाहून डोकं फिरतं आणि मग सगळं घर अगदी झपाटून कामाला लागतं तो पसारा आवरण्याच्या. मलाही पसारा आवडतो पण खूप नाही.. पसारा करावा पण तो केल्यानंतर स्वतःच आवरावा या मताची मी आहे. घरच्या स्त्रीला तिच्या कामात मदत नाही करता आली तर निदान तिचे काम आपण वाढवू तरी नये अशीच आईचि शिकवण मिळाली त्याचा हा परिणाम. - (शक्यतो नीटनेटकी)प्राजु

चतुरंग 23/02/2008 - 00:30
लहान असताना आणि त्यानंतर कालेजात असताना. पण मुळात मी जसा 'पसारेवाला' कॅटेगरी मधला नाही तसा प्रचंड शिस्तीचाही नाही. थोडा पसारा चालतो पण घर हे 'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र झाले तर मात्र चालत नाही. अवांतर - 'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ केंद्र'? - होय हे दिव्य नाव मी स्वतः वाचलेले आहे - बिचारे ज्ञानेश्वर, त्यांच्या नावाचा असा वापर केलेला बघून त्यांना वाटले असते की रेड्यामुखी वेद वदवले, भिंत चालवली पण ह्या नारळांना शिकवू शकलो नाही!:)) चतुरंग

विसोबा खेचर 23/02/2008 - 00:42
माझ्या मते पसार्‍याशिवाय घराला घरपणच नाही! च्यामारी, स्वच्छ, टापटीप, नीटनेटक्या घरात वावरताना खूप परकेपणा वाटतो! मी तर स्वच्छ आणि टापटीप आणि पॉश घरं असलेल्या लोकांकडे सहसा जातसुद्धा नाही. आपल्याला तर बॉ तिथे फारच अवघडल्यासारखं वाटतं. मोकळेपणा नाही वाटत! आपला, (पसाराखोर) तात्या. ता क - आत्ता हे लेखन करत असताना माझा संगणक जिथे ठेवला आहे तिथे बोंबलायला मजबूत पसारा पडला असून माझे काही महत्वाचे कागदपत्र त्यातच कुठेतरी आसरा घेऊन आहेत. मी त्यांना शोधतो आहे परंतु अजून गावले नाहीत! जाऊ द्या, गेलं सालं बा...! आत्ता झोपतो, उद्या सकाळी जरा निवांतपणे शोधेन म्हण्तो! :) आपला, (स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणाची शाणपत्ती करणार्‍यांना फाट्यावर मारणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 23/02/2008 - 00:55
>>मी तर स्वच्छ आणि टापटीप आणि पॉश घरं असलेल्या लोकांकडे सहसा जातसुद्धा नाही पण लोकांकडे गेल्याशिवाय ते स्वच्छ, टापटीप, नीटनेटके की पसारेवाले हे कसं कळणार ?:}} ( हा उगीचच एक चावा, ह.घ्या.!) चतुरंग

आनंद घारे 24/02/2008 - 12:38
घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. छान! ते घदते पसार्‍यामुळेच! सगळ्या गोष्टी नीटनेटक्या दिसतील अशा ठेवल्या तर त्याचे शोरूम होते. पसारा करणारा एकच माणूस असेल तर त्याला हवी असलेली वस्तू लगेच सापडते हे खरे असले तरी घरातले अनेक लोक आपापल्या परीने त्यात भर टाकत असले तर मात्र त्यात कोणालाच कांही सापडत नाही हा फक्त एकच दोष त्यात आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापले वेगवेगळे पसारे करावे हे उत्तम. फक्त घरातच पसारा असतो असे नाही. माझ्या संगणकावरील फाइलींच्या पसार्‍यातून हवी असलेली फाईल शोधणे माझ्याखेरीज दुसरा कोणीही करू शकत नाही, अगदी शोधयंत्रांच्या सहाय्यानेसुद्धा!

विजुभाऊ 28/02/2008 - 15:35

'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र ...पुन्यात शनिवार पेठेत सकाळ च्या कोपर्यावर होते....महित नाही अजुन आहे का?

पण बर्याच रद्दी डेपोची नावे ज्ञानेश्वर रद्दी डेपो अशी का असतात ?

ज्ञानेश्वर आद्य मराठी साहित्यीक होते त्याचा असा सूड घेतला जाइल असे त्याना ही वाट्ले नसेल

पार्टनर 03/06/2008 - 10:01
शनिवारवाड्याच्या मागच्या गल्लीत आहे.पहिल्यांदा नाव वाचलं तेव्हा हसून हसून गाल दुखायला लागले होते ! - यात्रा,एकादशी, आणि गर्दीला न जुमानता आळंदीला चार वर्षे (बसमधून) वारी केलेला नादिष्ट

ऋचा 03/06/2008 - 10:43
मला पसारा 'च' आवडतो, पण खुप नाही चालत (कारण मलाच आवरावा लागतो) :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेदश्री 03/06/2008 - 12:42
मलातर पसारा खूपच आवडतो पण आवरायला ! मग तो अगदी गावातल्या आमच्या गोठ्यातला पसारा असो किंवा माझ्या रूममधल्या माझ्या तांत्रिक गोष्टींचा.. सुट्टीच्या दिवशी जर घरी असेन तर अथवा फावला वेळ मिळताच आवडीची गाणी लावून अशी आवरासावर करण्याचा मला भारी उचका येतो. धमाल मजा येते. माझ्या लॅप्टॉपमध्ये झालेला गाण्यांचा पसारा आवरायला मात्र अज्जुन जमलेले नाही मला कारण पसारा आवरायला उत्साह देणारी गाणी कशी ऐकणार मग मी.. झोल आहे ! काहितरी युक्ती काढून तो लवकरच आवरावा लागणारे हे मात्र निश्चित.

मन 03/06/2008 - 13:28
अहो, अगदि अस्साच पसारा माझ्या खोलीवर वरही असतो. पण येणार्‍या प्रत्येकालाच उलट माझ्या समाधानी-आत्मानंदी वृत्तेचं कौतुकमिश्रित हेवा वाटतो. आणि त्यांनाच न्युनगंड ते जगत असलेल्या अतिसामान्य-तथाकथित व्यव्स्थित आयुष्याबद्दल. मग मला चहा वगैरे झाल्यावर उगिचच त्यांचं साअम्त्वन वगैरे करावं लागतं. आणि सम्जवावं लागतं:- "जाउ द्या हो साहेब, नस्तं एकेकाच्या भाग्यात पसारा करुन ठेवण्याचं सौख्य. त्यात काय इतकं "वगैरे... आपलाच, मनोबा

शितल 03/06/2008 - 18:13
मला तर घर व्यवस्थित लावायला आवडते, पण खुप पसारा करून म्हणजे मी दिवसातुन एकदाच घर आवरते, माझ॑ लेकरू तर खेळणी, भा॑डी आणि डा. टेबलच्या खुर्च्याच्या गाड्या करून घर भर फिरवत असतो, बाहेरचा आल्यावर आम्ही त्याच्या पुढे आवराआवरीचे प्रयत्न करतो पण पाठ फिरली की परत ये रे माझ्या मागला. आणि पसार्‍यातीलच वस्तु हाताला पटकन मिळते जर ती आवरून ठेवली तर हरवली हे समजायचे.
लेखनविषय:
शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग... लेखक एकटे राहणार्‍या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात. लेखक विचारतो, "अरे हे काय?" तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात" त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो.

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

इनोबा म्हणे ·

विसोबा खेचर 22/02/2008 - 09:23
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

"हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ

जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स

विसोबा खेचर 22/02/2008 - 09:23
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

"हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ

जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स
"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्‍हाणे घालण्यात येणार आहे.

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

छोटा डॉन ·

विसोबा खेचर 21/02/2008 - 23:46
छोटे डॉनराव, तुमचा लेख अगदी तंतोतंत पटला बरं का! आपण तर भैय्या पार हैराण होऊन गेलो आहोत अश्या प्रकारच्या मेल्समुळे! ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी ............... हा हा हा! हे मात्र अगदी खरं आहे! मेल्समधून येणार्‍या हे नाना तर्‍हेचे बंगल्याबिंगल्यांचे, गाड्या विमानांचे, कुत्र्यामांजराचे फोटू पाहून मी देखील साफ कंटाळून गेलो आहे. अगदी वात आणतात हे फोटू! तात्या.

प्राजु 22/02/2008 - 02:47
असे मेल्स न वाचताच डिलीट करते... जाम कंटाळा येतो. मला आश्चर्य वाटतं मला ते फोर्वर्ड करणार्‍यांचं.. त्यांनाही कंटाळा येत असेलच ना मग ते का पाठवतात तेच मेल पुढे? आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍याच्या डोक्याला व्हावा म्हणून का? न सुटलेला प्रश्न. - प्राजु.

मनस्वी 22/02/2008 - 10:22
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

भुमन्यु 22/02/2008 - 12:25
हे खरय यार मई पण जाम वे॓ताग येतोय...आणि आतातर् नविनच प्रकार बघतोय आणि तो आहे होरोस्कोप पाठवायचा. आणि बर्‍याचदा तर अस बघायला मिळतं की अशा मित्रांना आपली आठवण असे फालतु मेल्स पाठवायला मिळतो अशा मित्रांना मी मेल करुन रागवण्याचं करतोय्......कोणाला दुसरा पर्याय माहित असेल तर सांगा.....

अनिला 22/02/2008 - 12:39
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

शेखर 22/02/2008 - 14:02
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. शेखर.

In reply to by शेखर

विसोबा खेचर 22/02/2008 - 14:06
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. हा हा हा! हा उपाय मात्र ब्येस वाटतो! :) तात्या.

विसोबा खेचर 21/02/2008 - 23:46
छोटे डॉनराव, तुमचा लेख अगदी तंतोतंत पटला बरं का! आपण तर भैय्या पार हैराण होऊन गेलो आहोत अश्या प्रकारच्या मेल्समुळे! ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी ............... हा हा हा! हे मात्र अगदी खरं आहे! मेल्समधून येणार्‍या हे नाना तर्‍हेचे बंगल्याबिंगल्यांचे, गाड्या विमानांचे, कुत्र्यामांजराचे फोटू पाहून मी देखील साफ कंटाळून गेलो आहे. अगदी वात आणतात हे फोटू! तात्या.

प्राजु 22/02/2008 - 02:47
असे मेल्स न वाचताच डिलीट करते... जाम कंटाळा येतो. मला आश्चर्य वाटतं मला ते फोर्वर्ड करणार्‍यांचं.. त्यांनाही कंटाळा येत असेलच ना मग ते का पाठवतात तेच मेल पुढे? आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍याच्या डोक्याला व्हावा म्हणून का? न सुटलेला प्रश्न. - प्राजु.

मनस्वी 22/02/2008 - 10:22
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

भुमन्यु 22/02/2008 - 12:25
हे खरय यार मई पण जाम वे॓ताग येतोय...आणि आतातर् नविनच प्रकार बघतोय आणि तो आहे होरोस्कोप पाठवायचा. आणि बर्‍याचदा तर अस बघायला मिळतं की अशा मित्रांना आपली आठवण असे फालतु मेल्स पाठवायला मिळतो अशा मित्रांना मी मेल करुन रागवण्याचं करतोय्......कोणाला दुसरा पर्याय माहित असेल तर सांगा.....

अनिला 22/02/2008 - 12:39
अशा मेल्स न बघताच डिलीट करते- हे करा, ते करू नका, मदत करा, चमत्कार होइल, कुत्री, मांजरी इत्यादी. पण काही काही मेल्स (विनोदी वगैरे) असतात चांगल्या. त्या मी पण देते फॉरवर्ड करून! मनस्वी

शेखर 22/02/2008 - 14:02
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. शेखर.

In reply to by शेखर

विसोबा खेचर 22/02/2008 - 14:06
ह्यावर उपाय म्हणजे तीच मेल ज्याने पाठवली आहे त्यालाच ती मेल १०० पाठवावी. एकादा त्रास होईल पण अश्या मेल येणे बंद होईल. हा हा हा! हा उपाय मात्र ब्येस वाटतो! :) तात्या.
लेखनप्रकार
"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा "कसं जगायचं , कसं वागायचं ? कोणी सांगेल का मला ? " अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो .......... काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ".

शाळेतील गमती जमती

स्वाती राजेश ·

मी एक टिंब तू एक टिंब, आपण दोघे टिंब टिंब, उगवले बघ सूर्यबिंब, दोघे मिळून लढवूया प्रेमाची खिंड, पावसात भिजूया ओले चिंब...

ऋषिकेश 21/02/2008 - 21:29
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय हे लई झ्याक.. ढकलपत्र (फॉरवर्ड) आवडलं :) -ऋषिकेश

विसोबा खेचर 21/02/2008 - 21:40
वा स्वातीताई, अतिशय सुंदर कविता... धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय, कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय, कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय प्रामाणिकपणे सांगायचं तर कविता वाचून खूप भरून आलं आणि अक्षरश: डोळ्यातनं पाणी आलं! असो, मी या विषयावर अधिक काही लिहू शकेन असं वाटत नाही! शाळेची आठवण निघाली की मी खूप हळवा होतो! परंतु इतर सभासदांच्या आठवणी मात्र नक्कीच वाचायला आवडतील! आपला, (शाळाप्रेमी) तात्या.

वर्गात रसायन शास्त्राचा प्रयोग होता. क्लोरीन वायू तयार करण्यात आला. पोपटी रंग, मिरमिरीत वास इ. इ. तास संपल्यावर सरांनी मला मदतीला बोलावून घेतले. (केवढा अभिमान वाटायचा अशा वेळी). त्यांनी इतर उपकरणं घेतली आणि मी पोपटी रंगाच्या क्लोरीनने भरलेले वायुपात्र घेतले. सर पुढे निघून गेले. (मलाही तेच हवे होते) मी जाता वायूपात्रावरील झाकण बाजूला करून तो वायू जोरात हुंगला आणि जे हाल झालेत म्हणून सांगू. कसाबसा प्रयोगशाळेत वायुपात्र नेऊन ठेवलं. वर्गात आलो. तर उलटीची भावना होऊ लागली. डोळ्यात पाणी. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मित्राने नवीन आलेल्या शिक्षकांना सागितलं. मला वर्गाबाहेरच्या बाकावर झोपवून रसायन शास्त्राच्या सरांना बोलावून आणलं. त्यांना मी खरं खरं सांगितलं (दूसरा उपायच नव्हता, मला वाटलं आता मी मरणार्) सगळ्यांची धावपळ झाली. क्लोरीन पाण्यात विरघळतो म्हणून पाणी पाजण्यात आलं तर क्लोरीन हा 'जड' वायू असल्यामुळे शिर्षासन करायला सांगा असा उपायही कोणी तरी सुचवला. (नशिबाने तेवढा दूर्धर प्रसंग आला नाही) मोकळ्या हवेत पडून राहिल्यावर किंचित बरं वाटू लागलं. त्यामुळे त्या बाकड्यावर अर्धा-पाऊण तास अंडर ऑब्झर्व्हेशन झोपवून ठेवल्यावर मी उठून बसलो. आणि रसायन शास्त्राच्या सरांच्या चेहर्‍यावरील ताण दूर झाला. नंतरचा तास गणिताचा होता त्यामुळे तो बुडविण्यासाठी मी 'नाटक' केलं असा माझ्या काही दुष्ट मित्रांनी (?) प्रचार केला. आता सायन्सच्या उपकरणांना हात लावण्याची आपल्याला मिळणारी मुभा जाणार आणि वर्गात भाव खाता येणार नाही असे मला वाटले परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. लाज वाचली.

In reply to by प्रभाकर पेठकर

सौन्दर्य 20/12/2015 - 10:16
अगदी असाच प्रसंग दहावीत असताना माझ्यावर ओढवला होता. बाईनी वर्गात टेस्ट ट्यूबमध्ये क्लोरीन वायू तयार केला होता आणि त्याचे गुणधर्म सांगत होत्या. त्यात त्या म्हणाल्या हा पोपटी रंगाचा वायू असतो. मला त्यात टेस्ट ट्यूबमध्ये पोपटी रंग खरंच दिसत नव्हता म्हणून मी म्हणालो, "ह्यात कुठे आहे क्लोरीन वायू ?" त्यावर बाईनी जवळ बोलवून नळी हुंगायला दिली आणि त्यानंतर जो काही घसा सुकला, नाका-डोळ्यांतून पाणी यायला लागले, खोकला येऊ लागला, त्याला काही अंतच नव्हता. अनेक वेगवेगळे उपाय झाले, शेवटी कोणीतरी सुक्या खोबर्याचा तुकडा खायला दिला. घशाची ती खवखव काही दिवसानीच गेली. कित्येक किस्से आहेत, सवडीने सांगत राहीन. चागला विषय दिल्याबद्दल आभार.

झाकण उघडून आत काय आहे त्याचा वास घ्यायची अजुनी सवय आहे म्हणायची.:)))) फक्त भांडी बदलली. ते प्रयोगशाळेतील होते आत स्वयंपाक घरातील हो ना? जस्ट किडिंग...

झकासराव 22/02/2008 - 11:25
हा एक छान धागा सुरु केलाय स्वाती यानी :) मी पहिलीत होतो तेव्हाची गोष्ट. मधली सुट्टी झाली होती. डबा खाल्ला. आणि पुर्ण वॉटर बॅग भरुन पाणी प्यायलो खेळता खेळता मी आणि माझ्या एका वर्गातलयाच मुलाने. सुट्टी संपत आली आणि मग माझ्या लक्षात आल की अरे आपण "सु" करायला गेलोच नाही. तोवर सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि मला जोरात "सु सु" आली. आमच्या बाई बाहेर येवुन चला मुलानो वर्गात चला अस म्हणत होत्या (नुसती घंटा ऐकुन पहिलीतली मुल थोडीच वर्गात पळतात लग्गेच. ती अजुन खेळण्याच्याच मुड मध्ये असतात.) आणि मी तिकडे सु करत होतो बराच वेळ :) (मनात भिती बाई आल्या आहेत बोलवायला आणि इकडे तर जोराची "सु सु" ) वर ही कामगिरी घरी जावुन आईला सांगितली होती. :) आता आठवल तरी खुप हसु येतय.

विजुभाऊ 22/02/2008 - 12:45
ओफ्फ तासाला एखद वेळेस शिक्शक वर्गावर वेळेत आले नहित कि आम्हि सगळे रान्ग करून हातात दप्तर घेउन वर्गाबाहेर पडायचो....आणि तसेच सरळ शाळेच्या मेन गेट मधुन रान्गेत बाहेर जायचो..थेट घरि... रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही. विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 22/02/2008 - 16:02
विजुभाऊ...च्यामारी, एकदम खल्लास आयडिया ! एकदम आवडली. आमचे उद्योग (टवाळक्या): १.ऑफ तासाला जमेल तेव्हढ॑ अन् जमेल त्या शिक्षका॑च्या नकला करण॑ २.तळमजल्यावर आमचा वर्ग असताना तब्बल ३ महिन्या॑च्या परिश्रमा॑न॑तर "हॅक-सॉ" ब्लेडने खिडकीचा गज कापण्यात आलेल॑ यश, आणि तो गज हळूच काढून वर्गातून पळून जाणे. (लवकर घरी जायच॑ असेल तर इतर वर्गातली मुल॑पण आमच्याकडे यायची आणि आमचा एक गृहपाठ करून देण्याच्या बोलीवर हा "खुष्कीचा मार्ग" वापरायची) ३.बे॑चच्या फटीत ब्लेड अडकवून "चावणार्‍या" गुर्जी॑च्या तासाला ते वाजवण॑ (केल्याशिवाय कळायच॑ नाही देवा, काय मजा येते) ४. स्वच्छतागृहात कोपर्‍यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! ) ५. प्राण्या॑ना घाबरणार्‍या शिक्षका॑च्या तासाला त्या॑च्या टेबलावर सरडा / सापसुरळी / मा॑जराचे पिल्लू / वर्गात नेमबाजीच्या स्पर्धेत कर्कटक फेकून मारलेली पाल इ.इ. आणून ठेवणे. ६.मारकुटे मास्तर टेबलावर जिथे नेहमी हात ठेऊन शिकवतात तिथे अगदी "वस्त्रगाळ" खाजखुयलीची पूड टाकणे.. हुश्श.. एव्हढ्यावरच था॑बतो नाहीतर मिपावाले मला हाकलून देतील 'असल॑ नतद्रष्ट कार्ट इथे नको' म्हणून :) (हे प्रकार अत्य॑त निष्णात टवाळा॑नी केले असून त्यामागे कित्येक वर्षा॑ची मेहनत असते. कृपया अनुकरण करण्याच्या फ॑दात पडू नये, होणार्‍या परिणामा॑स आम्ही जबाबदार नाही.) आपला 'णम्र' - टवाळ ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

sagarparadkar 21/05/2010 - 17:22
समस्त 'नूमविय' कोठे गेले ? 'भावे स्कूल' चा 'हल्ला' होतोय, चला चला, पटापट प्रकट व्हा येथे ... आपल्याकडे तर कित्येक 'नररत्न' होती ... गके, सहस्रबुद्धे (लाथा घालून मोकळा करीन ), पोरे, श्रोत्रिय ( ट्ठो sss), 'झिन्झाथ्रोपस' (हे रत्न गळाले बहुतेक), देखणे ... लेट द शो बिगिन ....

In reply to by एक

पितळे सर्(काळागेंडा), दांडेकार बाई(सिलिंडर), पी.के.कुलकर्णी(पिक्या) हे होते का तुम्हाला? पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

एक 06/03/2008 - 00:52
काळा गेंडा, सिलिंडर, पिक्या आम्हाला होते.. आम्हाला ३ वर्षे मराठी शिकवायला बुट्टी लेडी (श्री. वा.) होते. पण जोक्स अपार्ट अतिशय सुरेख शिक्षक होते ते.. त्यांच्यामुळेच माझं मराठी वाचन वाढलं. संस्कृत ला चंबू .(खरं नाव विसरलो.. बहुतेक कुलकर्णी) होत्या. आणि मुख्याध्यापक "कि. भा. बळी" (ज्याचा लाँग फॉर्म .. किड* भाड** बळी असा होता.) कुठली बॅच तुझी? मी १९९२ ला १०वी पास आउट.

In reply to by एक

नंतर मी विमलाबाई गरवारे शाळेत गेलो. १० वी पास मी १९९९ साली झालो. बळी सराना मी पाचवीला असताना ज्यु. कॉलेजच्या मुलांनी शाळेत बेदम मारुन मुतारीत नेऊन टाकले होते. ६ वी च्या वेळेला शाळेत गोसावी सर होते मुख्याध्यापक. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

एक 06/03/2008 - 02:50
म्हणजे आमच्या नंतरची पिढी फारच पुढे गेली होती तर.. आम्ही फक्त त्यांना प्रयोगशाळेत कोंडलं होतं ;-( (सभ्य ठिकाणी लिहितो आहे म्हणून "ते त्यांना" असं म्हणतो आहे.. नाहीतर.. किड* भाड** बळ्याच..) बाय द वे, मी असं ऐकलं होतं कि तो आधी बारामती च्या शाळेत होता तिथल्या पोरांनी त्याला झाडावरून खाली टाकला होता.

In reply to by एक

धमाल मुलगा 10/03/2008 - 15:04
आम्हाला पण होता बारामतीमध्ये. एक्या तुझी माहिती बरोबर आहे. एक न॑बरच॑ खत्रुड होत॑ बेण॑....मग लै मारला त्याला. मी वैयक्तिकरित्या देखील त्याला जबरा छळला होता. मला ९वीत असताना कॉपी केली म्हणून पकडल॑..आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही! त्या॑च॑ आणि आमच्या तिर्थरुपा॑च॑ एकदम कॅपिटल ३६...मग काय, आम्ही केला त्याचाच इश्यू...जे बो॑ब ठोकली, मी वैयक्तिक द्वेषाचा बळी....होपलेस आहे बळी!!! पोर॑ पार पेटवली... वर घरी जाऊन आबा॑ना सा॑गितल॑ (तिखट-मीठ लाऊन) आबा डायरेक्ट खू॑खार झाले...दुसर्‍या दिवशी शाळेत आबा॑नी बळ्याला जे झाडला, स॑स्थेच्या अध्यक्षा॑कडेच चाललो आत्ताच्या आत्ता म्हणाले.... बळ्या गारगार!!!!!! पुढ॑ वर्षभर मला काहीच बोलला नाही. पण ईतरा॑ना फार त्रास द्यायचा. असो, समद्वेषी भेटल्याचा आन॑द झाला. आपला -म.ए.सो.चा सह अध्यायी ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

एक 19/04/2008 - 02:06
"आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही!..." हॅ ही काय कॉपी झाली.. कॉपी क्वालिफिकेशन साठी कमीतकमी पुस्तकाच पान सापडलं पाहिजे.. मला वाटलचं होतं तू म. ए. सो. चाच निघणार..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बरखा 24/12/2013 - 12:40
मुख्याध्यापक (विमलाबाई गरवारे) मला ते मुख्याध्यापक नक्की कोण हे नीटसे आठवत नाही. परन्तु भाषणाच्या वेळेला त्यान्चे एक ठरलेले वाक्य आठवते " माझ्या चिमण्या फुलपाखरानो" ह्या वाक्य शिवाय त्यान्चे भषण पुर्ण होतच न्हवते. हे वाक्य येताच ८, ९, १० ची मुल ईतकी हसायची कि बस्स्स्स.... , फुलपाखरु ह्या शब्दावरुन लगेचच मागुन मुलान्ची कुजबुज सुरु व्हायची. कुणाला आठ्वत असेल तर अजुन गमती सान्गा.

चंबा मुतनाळ 22/02/2008 - 14:08
रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही. आयला, मला हि आयडीया सॉल्लिड आवडली. निदान त्या साठीतरी परत शाळेत जाऊन बसायला आवडेल!

शाळेत आमचा Outstanding Performance होता. कारण ८ पैकी किमान ३-४ तास तरी आम्ही वर्गाबाहेर Standing Out असायचो. आठवी नववीत तर शिक्शक फळ्यावरती लिहित असताना पाठीमागून कुणाचाही आवाज आला तरी जास्ती चौकशी न करता आम्हा ठरावीक ३-४ मुलाना नियमीतपणे वर्गाबाहेर काढीत असत. नन्तर नन्तर तर आम्हाला वर्गाबाहेर जायची इतकी सवय झालेली की, शिक्शकानी "कोण आवाज करतय?" अस नुसत विचारला तरिही आम्ही ३-४ जण चुप-चाप मान खाली घालून वर्गाबाहेर जाऊन उभे रहात असू. :) -ओम फट स्वाहा तात्या विन्चू

मनस्वी 22/02/2008 - 15:24
आमचा ग्रूप आणि दुसर्‍या वर्गातील अजून मैत्रिणी अशा १५-२० जणी मिळून आम्ही शाळा सुटल्यावर बास्केटबॉलच्या ग्राउंडवर विषामृत किंवा जोडीसाखळी खेळत असू. असेच एकदा आम्ही ग्राउंडवर जमलो. पण दुसर्‍या वर्गातल्या मैत्रिणी काही आल्या नाहीत. त्यांच्या इंग्रजीच्या (करकरे) बाई एक्स्ट्रॉ तास घेत होत्या. (करकरे बाई एकदम कडक. एंग्रजीतला "t" जर "+" असा काढला तर १/२ मार्क कट! ) तर आमची हरहुन्नरी जया त्या वर्गाच्या खिडकीवर उभी राहून आमच्या त्या वर्गातल्या मैत्रिणींना हळूचकन हाक मारायला लागली. आणि ते करकरे बाईंनी पाहिलं! झालं! जयाला बाईंनी वर्गात बोलावलं आणि काय करत होतीस विचारलं. जयानी सांगितलं घाबरत घाबरत ही मी अमूक अमूकला बाहेर बोलावत होते. बाकीच्या मुली फिदीफिदी हसत होत्या म्हणून बाईंना आणखीनच राग आला. जयाच्या तोंडावर मात्र १२ वाजले होते. बाईंनी जयाला तास होईपर्यंत वर्गात भिंतीकडे तोंड करून उभे केले. तास होईपर्यंत जयाचा रुमाल पूर्ण ओला झाला होता. तेव्हा जयाची टरकली होती. पण नंतर आम्ही हा प्रसंग आठवून खूप हसत असू. तेव्हा पण जयाचा चेहेरा बघण्यासारखा होई. (जयाच्या आठवणीत रमलेली) मनस्वी, १०वी ब

४. स्वच्छतागृहात कोपर्‍यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! ) याला आम्ही टाईम बॉम्ब म्हणत असू. पुण्याचे पेशवे

चतुरंग 22/02/2008 - 21:32
फळ्याला तेल लावून ठेवले आणि वर्तमानपत्राच्या तुकड्यांनी पुसून घेतले. मग काय 'चकचकीत' फळ्यावर खडू उमटेना आणि वर्गात आमची हसू दाबता-दाबता भंबेरी, पार डोळ्यातून पाण्याच्या धारा! मास्तर वैतागले, एका घरभेद्याने नावे सांगितली - उलट्या मुठीवर डस्टरने जाम मार पडला (साला, काय त्यावेळी मारायचे ना? आता पोरांना मास्तरही हात लावत नाही आणि आई-बापही नाही, सगळी मजा संपली!;) 'सूर्याजी पिसाळ' कोण हे समजताच त्याची आम्ही सर्वांनी अशी धुलाई केली की बास! यथासावकाश फळ्याला नवीन काळा रंग द्यावा लागला. -------------------------------------------------------------- बोअर तासाला डस्टर गायब करणे हा तर आमचा नित्याचा प्रकार असे. मग मास्तर किंवा बाई डस्टर शोधायला लागल्या की आपण तयारीत - "अरे, कोणीतरी कॉमनरुम मधून डस्टर घेऊन या रे", हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत आम्ही वर्गाबाहेर - कारण चक्क तासाला वर्गाबाहेर पडून शाळेत भटकायला मिळण्याची मजा काही औरच. मग इतर वर्गापाशी उभे राहून खिडकीतून कोणाला तरी उचकव त्याला बोलणी बसायला लागली की तिथून पळून जा, असे करत करत निम्मा तास संपल्यावर आम्ही वर्गात डस्टर घेऊन हजर. तो पर्यंत वर्गातच लपवलेले आधीचे डस्टर सापडलेले नसले तर मग हातानेच थोडा फळा पुसून शिकवणे चालू झालेले असे. मग मानभावी पणाने स्वतः पुढे होऊन उरलेला फळा वैगेरे स्वच्छ करुन देणार! (बोलणी खायला नकोत!) -------------------------------------------------------------- पहिली ते चौथी आम्ही ज्या शाळेत होतो तिथे वर्गात बसण्याची व्यवस्था म्हणजे जाड मोठ्याच्यामोठ्या सतरंज्या असत. अगदी १२ फूट बाय १२ फूट वैगेरे असतील. मधल्या सुट्टीतला आमचा एक खेळ म्हणजे रोज कोणातरी एका-दोघांना सतरंजीत गुंडाळणे व कोपर्‍यात नेऊन त्यावर इतर सर्वांनी ढीग रचणे. तो झाला की मग दुसरा. आता ते आठवून असे वाटते की कोणाचेही हातपाय मोडणे, मूल गुदमरणे वैगेरे प्रकार तेव्हा झाले कसे नाहीत? आणि आम्हाला हे करु नका अन् ते करु नका असंही कोणी सांगितले नाही! ------------------------------------------------------------- तेव्हाचीच आणखी एक मजा म्हणजे लाकडी पट्यांची मारामारी. आमच्या शाळेत फळ्यावर खडूने रेघा मारण्यासाठी चार्-साडेचार फुटी लाकडी पट्ट्या ठेवलेल्या असत. दोन वर्गांच्या मधे दुमडले जाणारे लाकडी पार्टिशन होते. सुट्टीच्या आधीच्या तासाला आमची पट्ट्यांची जमवाजमवी सुरु असे आणी वर्गाच्या मागे जाऊन बसणे. पलीकडच्या वर्गात हेच सुरु असे. सुट्टी झाली रे झाली आणि शिक्षक बाहेर पडले की पार्टिशन ढकलून "हर, हर, महादेव" असे ओरडत एकमेकांच्या आंगावर पट्ट्या घेऊन आम्ही तुटून पडत असू. जाम दे दणादण मारामारी. कित्येक वेळा हातावर-बोटांवर फटके बसून सूज येई. पण आम्ही कोणी एकमेकांविरुध्द तक्रारी वैगेरे केलेल्या आठवत नाहीत. शिवाय शाळा सुटली की पुन्हा गळ्यात गळे घालून रमतगमत घरी. ते सगळं तेवढ्यापुरतं असे. ------------------------------------------------------------- चतुरंग

आमच्या शाळेत फळ्याला तेल वगैरे लावण्यापेक्षा आईने डोक्यावर थापलेले तेल पोरं फळ्यावर डोके घासून उतरवत. मग शाळेने हिरव्या रंगचे काचेचे फळे आणले. मग मुले त्यावर ओल्या खडूने लिहून ठेवत. ओल्या खडूने लिहिले की ते पुसायला मास्तरना फार कष्ट पडत. तासाची पहिली ५-१० मिनीटे तशीच निघून जात. :) :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चतुरंग 22/02/2008 - 22:22
पण त्यामधे डोक्याला खडूची भुकटी लागून पोरं पिठाच्या गिरणीतून आल्यासारखी दिसत आणि चावटपणा पकडला जाई - त्यामुळे ही नवीन शक्कल लढवावी लागली! :) (आपल्या कामात सतत सुधारणा करा! - हा आजचा कॉर्पोरेट मूलमंत्र आम्ही किती पूर्वीच अमलात आणला होता पहा! द्रष्टेच आम्ही!!::)) चतुरंग

मी १०वी ला होते तेव्हाची गोष्ट .वर्गात शेवटचा तास अर्थशास्त्राचा होता. आमचे सर पहिले ३० मि. वाचून दाखवायचे आणि म्हणायचे आता तुम्ही वाचा.म्हणजे पहिल्या बाकावरच्या मुलाने उठून वाचायला सुरवात करायची. प्रत्येकाने १० ओळी वाचायच्या असे करत करत शेवटपर्यंत वाचायचे. तो पर्यंत हे सर समोरच्या टेबलावर हाताची घडी करून मस्त घोरत असायचे. एक दिवस एक मुलगा वाचत होता. बहुतेक त्याचा आवाज मोठा होता त्यामुळे कि काय? एकदम सर जागे झाले आणि त्याच्या मुस्काटात मारली. त्याला ५ मिनिटे कळलेच नाही ......का मारले? बहुतेक सरांची झोपमोड झाली असेल असा आम्ही तर्क लढवत घरी गेलो.

In reply to by स्वाती राजेश

चतुरंग 22/02/2008 - 22:30
अहो आम्ही सहावीत असताना आम्हाला मराठीचे एक मास्तर होते - आडनाव काळे बहुधा - शिकवायचे खूप छान. पण त्यांची एक खोड होती - कोणाचीही पाठ दिसली की ते जोरात धपका घालायचे - कारण माहीत नाही. त्यामुळे ते बेंचेस मधल्या रांगेतून मागे मागे जाऊ लागले की बेंचवर पुढे झुकून लिहिणारी वाअचणारी सर्व मुले मागे मागे वळत अंग ताठ करून बसत जेणेकरुन त्यांना पाठ दिसू नये! त्यामुळे पाच मिनिटेच काय पण सहावीचे संपूर्ण वर्ष आम्हाले ते का मारत होते ते कळलं नाही!! चतुरंग

एकदा आमच्या वर्गात कोणीतरी एक शोध लावला. चिंचोका खूप वेळ घासला की खूप गरम होतो. मग काय.... आयडिया तयार. आमच्या एक बाई होत्या. अतिविशाल महिला मंडळाच्या सभासद. त्यांच्यावर हा प्रयोग करायचा कट शिजला. आमच्या वर्गातून बाहेर जायला जो रस्ता होता, तो एक बाक एक्स्ट्रा टाकल्यामुळे जरा अडला गेला होता. तिथे हल्ला (ambush) करायचे ठरले. आणि ह्या कटात सगळा वर्ग सामिल झाला होता... (शिष्ट मुली सुद्धा). दरवाज्या जवळ जे २-३ बाक होते तिथली मुलं १५-२० मिनिटे तो चिंचोका घासत बसली होती. तास संपल्याची बेल झाली... बाई बाहेर जायला निघाल्या... त्या अरूंद जागी त्या थोड्या अडकत असत. तिथे १०-१२ मुलं आणि मुली त्यांच्या भोवती घोळका करून त्यांना काहीतरी विचारायला लागले. आणि..... त्या गर्दीत तो छान गरम झालेला चिंचोका कोणितरी बाईंच्या हाताला लावला. मग काय मंडळी... पुढे जे काही घडले त्याची आठवण आजही ताजी आहे. वर्गात सगळयांना आमच्या हेडमास्तरांनी मोजून १०-१० छड्या मारल्या होत्या. बिपिन.

कोंबडा करणे, अंगठे धरणे, खुर्ची करणे अशा काही सजा आम्हाला शाळेत असताना होत असत. कधी कधी वैयक्तिक कारणासाठी आणि काही काही वेळेला सार्वजनिक कारणासाठी. एकावेळेला एकापेक्षा अधिक मुले अंगठे धरुन उभी असतील किंवा कोंबडा करुन उभी असतीत तर एकमेकांना पार्श्वभागाने धक्के मारुन पाडायचा खेळ आम्ही मनमुराद खेळत असू. :) एकदा तर एका ढिगार्‍याने इतका जोरात धक्का मारला की बास ओळीने अंगठे धरुन उभे असलेले ५-७ पडले. बाईंना कळले की शिक्षा करुनही मुले काही दंगा करायची बंद झाली नाहीत. :):) मग सर्वाना मैदानावर अंगठे धरुन उभे केले होते. पण काय एन्जॉय केला तो दिवस आम्ही. :) स्टीलची फूटपट्टी बाकाच्या फटीत घालून वाजवण्याची मजा तर काही औरच. किंवा बाकाच्या वही ठेवायच्या फळीच्या खालच्या फळीवर डोके ठेऊन झोपायची मजा देखील काही औरच. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भाग्यश्री 24/02/2008 - 02:00
गाडगीळ सरांच्या किंवा पाचकुडवे सरांच्या शिक्षा सांग! :) माईकवरून यथेच्छ शिव्या न काय काय.. हे आमचे (विमलाबाई गरवारेचे) गाडगीळ सर कायम धोतर न सदरा या वेशात असत.. आणि अतिशय कडक आणि फाटक्या तोंडाचे.. पण, एकदा बँडच्या प्रॅक्टीसला रविवारी बोलवलं होतं, तेव्हा ते चक्क जिन्स न टीशर्ट घालून आले होते!! :) आम्ही इतके हसलो होतो!! बर्‍याच गमती जमती आहेत...

In reply to by भाग्यश्री

आम्ही तर गाडगीळ सराना शर्ट आणि पँट मधे पण पाहीले आहे. आणि तेव्हा पण आम्ही फार हसलो होतो. आणि ते जर कोणाला ओरडत असतील तर त्यांच्या आवडत्या शिव्या म्हणजे "बेवकूफ आहेस, मुसलमान आहेस" :):) तसेच आमच्या शाळेत शनिवारी शाळा भरायच्या आधी सभा (सर्वानी ग्राऊंडवर येऊन प्रार्थना म्हणायची) असायची . तेव्हा तर फार मजा यायची. गाडगीळ सर पुढे चौथर्‍यावर उभे राहून कोण कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवायचे आणि नंतर एकेकाचा पुढे बोलावून सत्कार करायचे. आमच्या शाळेतले पाचकुडवे सर रोज पितात अशी एक वदंता होती. आणि शनिवारी(इतर वेळेला शाळा दुपारी असे) सकाळी त्यांचे तारवटलेले डोळे बघून ते खरे पण वाटे. :) त्यांचे एक प्रसिध्द वाक्य "बेंच खाली घालून तुडवील". भूगोलाच्या कानडे सराना आम्ही 'गावठी बच्चन' म्हणत असू. ते दहावीला आम्हाला शिकवताना नेहेमी म्हणत असत की "मला बाहेर हाच विषय शिकवला तर तासाला १००० रु. मिळतील पण तुम्हाला शिकवायला म्हणून मी इकडे येतो."(किती थोर ते उपकार आमच्यावर!) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भाग्यश्री 05/03/2008 - 05:54
ते कानडे सर आणि भुगोल? आम्हाला ते ९वी ला मराठी ला होते. तसेही त्यांना काय येत होतं म्हणून ठेवले होते देवालाच माहीत. माझे सगळ्यात नावडते शिक्षक.. पाचकुडवे मला कधीच नव्हते, पण मोठ्या भावाकडून खूप किस्से ऐकले आहेत त्यांचे. सिरसीकर नावाच्या बाई इंग्लिश शिकवायच्या, खूप छान शिकवायच्या. पण कायम "ठीकेकीनै" असं वाक्य दर ५-१० वाक्यांनंतर ! :)) आमचं ते मोजण्याकडेच जास्त लक्ष.. ! ८वी ला सेमी ईंग्लिश सुरू झाले तेव्हा सायन्स शिकवायला लोखंडे मॅडम होत्या.. ( त्या आमच्या शाळेतल्या सगळया मुलांच्या अगदी "आवडत्या" मॅडम होत्या! :) ) त्यांचि शिकवण्याची पद्धत म्हणजे, आम्ही धड्यातले अवघड शब्द लिहून आणायचे, अर्थ न स्पेलींग सकट.. आणि नंतर तो धडा त्या वाचून दाखवणार! एकदा सगळ्यांनी लिहून आणले होते, पण मी एक पण लिहीला नव्हता.. मॅडमनी मला अगदी चिडून पुढे बोलवलं.. आणि म्हणाल्या सगळे शब्द येतायत का तुला.. ? सांग बरं, मिस्लेनिअस चा अर्थ आणि स्पेलिंग.. :) आणि मला तेव्हा जमलं होतं.. बाई म्हणाल्या बर बर ठिक आहे. जा जागेवर! मी एकदम भाव खात जागेवर येऊन बसले होते मग.. :D ( तेव्हा माझे बरे दिवस होते बहुतेक.. कारण त्या सहामाही का तिमाही ला सायन्स मधे मी पहीली आले होते! आयुष्यात मिळालेला पहीला न शेवटचा पहीला नंबर.. नंतर मी अभ्यास करणं सोडलं.. ) :D आमच्या शाळेत संध्याकाळी शाळा सुटल्यावर रोज प्रार्थना, पसायदान्,ओंकार्,विविध भाषेतील गाणी म्हणणे(उदा. मल्याळी,संस्कृत! ई..) असा कार्यक्रम व्हायचा. असं कुठल्या शाळेत होते की नाही माहीत नाही.. खूप मजा यायची.. खूप टीपी पण चालायचा आमचा.. मल्याळी वगैरे गाणी म्हणण्यामागचा उद्देश मला अजुन कळला नाहीय.. इजगान साठी यल्ल रे, ओ यम्मानिकु.. असं काहीतरी असंबद्ध गाणं होते ते! :) संस्कृत मात्र मस्त होतें.. कृत्वा नवदृढ संकल्पम, वितरन्तो नवसंदेशम वगैरे.. सर्वात शेवटी वंदे मातरम.. ते म्हणताना खूप छान वाटायचे .. शहारे यायचे इतक्या सगळ्या जणांच्या तोंडून ते ऐकताना.. !! असो.. जरा जास्तच भरकटले.. पण काय मस्त विषय आहे हा.. सगळं जुनं आठवलं !! धन्यवाद हा विषय चालू केल्याबद्दल.. :)

In reply to by भाग्यश्री

काय सांगू, किती प्रेमाने मारायच्या हो त्या! मी तर ८वी ला असताना माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कधीच अभ्यास करत नसे म्हणून रोज रोज मार खायचो लोखंडे बाईंचा. आणि स्पेलिंगसकट अर्थ तर मी कधीच लिहून आणले नव्हते. म्हणून तर रोज मार खायचो. :) :) इंग्रजीच्या राजलक्ष्मी पाटील बाई तर साक्षात कडकलक्ष्मी होत्या. मी २-३ वेळा सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे १०वी ला त्यानी आमच्या वर्गशिक्षिका झाल्यावर मला पहील्या बाकावर बसवले होते. :( पुण्याचे पेशवे

In reply to by भाग्यश्री

बरखा 24/12/2013 - 12:07
गाडगीळ सर पाचकुड्वे सर कानडे सर कडक्लक्ष्मी बाई ..... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. अजुन एक माझ्या आठ्वनितिल किस्सा, त्या वेळी मुलिना हस्तकलेचा तास असायचा गोल रिन्ग मधे कापड अडकवुन त्या वर रेशमी धाग्याने वेग वेगळे टाके घालणे आणि ते बरोबर जमलेत की नाही हे बाईना नेउन दाखवायचे असायचे. ज्या ज्या मुलीन्चे काम पुर्ण व्ह्यायचे त्या बाईन जवळ घोळ्का करुन उभ्या रहायच्या. मि हि एकदा त्या घोळ्क्यात नेमकी बाइच्या ( बहुदा जोशी नाव असाव) जवळ उभी होते, एका हातात रिन्ग धरलेली आणि दुस-या हातात सुई-धागा. कुणीतरी मागुन हळुच धक्का मारला त्याच क्षणि हातात धरलेली सुई बाईन्च्या दन्डाला टोचली..... मला हे समजताच घोळक्याचा फायदा घेउन मि पटकन मागे झाले. बाईना सुई जोरात टोचली होती. त्यानी आमच्या बाजुला वळुन बघे पर्यन्त मी मागे झाले होते. त्या मुळे नेमकी कोणाची सुई टोचली ते काही कळाले नाही. माझी सुटका तर झाली होती. पण त्या दिवसानन्तर बाई एक एक करुन आम्हाला पुढ बोलवु लागल्या. कानडे सरान्चा तर आम्हा खुप मुलिना राग अजुनही आहे. कारण.. वर्गात शिकवताना काही आचरट मुलिन्चि शिक्क्षा विनाकारन आम्हाला हि मिळली होती, ती साधि-सुधि शिक्षा नव्हती. चार मुलीन बरोबर आमच्या पुर्ण ओळिला सरानी नापास करण्याची शिक्षा केली. आम्हि ते मजा म्हणुन त्या कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा प्रगती पुस्तक हातात आले तेव्हा निकाल बघुन धक्का बसला, माझ्या बरोबर त्या ओळितिल सर्व मुली पण नापस झाल्या होत्या. ती माझी पहीली आणि शेवटची शिक्षा होती.

झकासराव 23/02/2008 - 09:52
जबरी आहेत एकेक किस्से. :) हा एक किस्सा अगदीच शाळेतला नाही पण मी कॉलेजात असताना पहिल्याच वर्षीचा. दिवाळीच्या सुट्टी नंतर कॉलेज सुरु झाले होते नुकतेच. एक लेक्चर ऑफ होत. मग बरेच पोर पोरी टवाळक्या करायला गेले होते. वर्गात २-४ पोर उरले होते. त्यात मी एक सज्जन (अजुन कालेजच वार लागल नव्हत हो) आणि २-३ टारगट पोर आणि २-४ सज्जन आणि शिष्ट मुली. तर माज म्हणा वळवळणारा किडा म्हणा किंवा अजुन काही म्हणा. एका पोराने एक सुतळी बाँब वर्गात लावला. आणि तो तिथुन बाहेर पडुन रिकाम्या पॅसेज मध्ये जावुन उभा राहिला. अर्थात हे वर्गात सगळ्याच उपस्थितानी पाहिले. एक मोठ्ठा आवाज मग काय बरेच जण येवुन पाहु लागले काय झाल म्हणुन. मग कॉलेजचा एक शिपाई आला. त्याने पाहिले तर त्याला अवशेषांवरुन तर कळालेच की कोणीतरी वर्गात फटाका फोडला. त्याने येवुन आधी मला विचारले मी बोललो माहित नाही. मी आताच आलो वर्गात. मग तो मुलींकडे वळाला. तर त्यानी उत्तर दिले की मुलांनी लावले. तो शिपाई गेला आणि आमच्या वर्गाच रजिस्टर घेवुन आला १० मिनटानी आणि म्हणाला ह्यात "मुलानी" ह्या आडनावाचा कोणीच नाहिये की. :) असल फिस्स्कन हसु आल होत मला ते ऐकुन. बाकी काही म्हणा. बाकीच्या कालेजापेक्षा इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :)

In reply to by झकासराव

स्वाती महेश 04/03/2008 - 09:07
इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :) का हो? तुमच्या त्या महामुर्ख शिपायाने त्याचा मुर्खपणा दाखवला तर पोरींची डोकी हटेलेच असतात होय? आणि तुम्हाला विचारले कुणी फटाका उडवला तर सांगताना तुमची फॅ फॅ झाली म्हणून दोष मुलिंना देताय होय..तेव्हा कुठं गेली तुमची मर्दानगी? मुलिंची डोकी तुम्हाला हटेली वाटतात म्हणजे तुम्ही जरा मतीमंदच वाटताय! जरा डोळे उघडून त्याच मुलींनी केलेली प्रगती पहा!

In reply to by स्वाती महेश

झकासराव 04/03/2008 - 10:46
माफ करा इतके दिवस इथे पाहिलेच नाही मी. मी फक्त मुलींची डोस्की हटेली असतात अस नाही लिहिलेल. पोरा पोरींची अस लिहिलय ते वाचा. आणि माझी फॅ फॅ उडली हे कशावरुन लिहिताय तुम्ही????/ माझ्याच वर्गातील मुलांची नाव मी का म्हणुन सांगेन?????? म्हणुन मी माहित नाही अस सांगितल होत अस लिहिलय मी. तुम्ही काहितरी एकांगी अर्थ घेवुन मला मतिमंद म्हणताय अस वाटल म्हणुन हे उत्तर लिहिलय मी. या उप्पर माझ्यावर काही आरोप केले तरी मी उत्तर लिहिनच अस नाही.

मराठी मेडियमच्या पोराच्या आठवणी वाचून वाटतंय, आपून सारे एकाच वर्गात होतो की काय ? :) गणिताच्या मास्तराने पावकीचा पाढा म्हणायला लावल्यावर ( सिलॅबसला नव्हता ) सांगता आला नाही, म्हणुन ठोकुन काढल्यावर,घरचा राग माझ्यावर काढला रे !!! या अविर्भावात दात काढणारे आम्ही !!! तेव्हापासून गणित आयुष्यातून जे निघून गेले ते आतापर्यंत....!!! दिलीप बिरुटे नाकात शिल्लक काही राहिले तर नाही ना !!! सतत चाचपून पाहणारा :) वर्ग ६ वी,तुकडी 'अ '

आम्ही सातवीत असताना मधल्या सुट्टीत क्रिकेट मॅच साठी घरी पळून गेलो आणखी एका मित्राबरोबर.... त्यच्याकडे छान मॅच पाहिली, दिवस्भर धमाल केली...घरी आलो, मला वाटत होते की शाळेत काही कळणार नाही...दुसर्‍या दिवशी सकाळी क्लासटीचर बाईंनी उभे केले , आणि माझ्याबरोबरच पळालेल्या मित्राने आजारी होतो अशी पालकांची चिठी आणली ( आमच्या काळात डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे लागत नसे)....मी अवाक्, खरंतर पकडले गेल्यावर काय योजना आखायची हे आमचे आदल्या दिवशी मुळीच ठरले नव्हते, पण त्याने शिताफीने चिठी आणली आणि वाचला...आणि मी छड्या काय खाल्ल्या, अंगठे धरून एक तास वर्गाबाहेर काय उभा राहिलो, मी अगदी शिक्षकांच्या जाण्या येण्याच्या वाटेत उभा होतो तोंड लपवत्..प्रत्येक शिक्षक येऊन विचारत असे, " का रे, आज ही वेळ आली का तुझ्यावर?"..मग सगळ्यांना नाईलाजाने सगळी गोष्ट सांगायला लागत असे...आत जाऊन मित्राला खूप शिव्या घातल्या, "चिठीचं मला का नाही सांगितलस? "म्हणत...( तो मित्र बर्‍याच वर्षांनी भेटला, त्याला ही आठवण होती... खूप हसलो ) ( एकट्यापेक्षा समूहशिक्षा एंजॉय करणारा)स. भडकमकर

संस्कृतला तांबे सर होते. त्यांना अण्णा म्हटले की भडकायचे. आठवीत वर्ग तळमजल्याला होता. कांही मुले त्यांच्या तासाला शाळेबाहेर जाऊन बाहेरच्या बाजूने खिडकीत येत व अण्णाअसे ओरडून पळून जात. खिडकीतील मुलगा मार खाई.

In reply to by सुधीर कांदळकर

धमाल मुलगा 25/02/2008 - 12:20
का॑दळकर शेठ, आमच्या शाळेत पण एक कुलकर्णी सर होते, त्या॑ना अण्णा म्हणाल॑ की भय॑कर राग यायचा..

मुल॑ असली भारी, ते शिकवत असले की "अण्णा" अशी जोरात हाक मारायचे आणि अण्णा पेटले की "कोणितरी खिडकीरून ओरडून पळाला" अस॑ आम्ही सा॑गायचो, त्या "कोणितरी" ला शोधण्यात उरलेला सगळा तास भुर्रर्र... :)

१०त असताना शाळेतल्या रात्र-अभ्यास वर्गाला गेलो होतो...च्यामारी एकदाच गेलो आणि कानाला खडा लावला.

कोणितरी मेन-स्विच ब॑द केला आणि त्यादिवशी (रात्री) कुलकर्णी सर होते, अ॑धार झाल्यावर पोरा॑नी शाळेच्या मधल्या चौकात येऊन अण्णा च्या नावाने जो काय हैदोस घातला..अगगगग !!! अण्णा॑नी दोन हातात दोन छड्या घेऊनअ॑धारातच मुरारबाजीच्या आवेशात जी काही तलवारबाजी केली...पार सगळी कार्टी फोडून काढली....त्यात जोडीला आई-माईवरून शिव्या...आपलीतर जाम टरकली..परत म्हणून गेलो नाही रात्र-अभ्यासवर्गाला.

किशोरी 25/02/2008 - 14:59

शाळेत असताना धमाल यायची,शाळा सुट्ल्यावर बाहेर येताना पुढच्याला ढकलायचे आनी मग माग्च्याला
'का ढकललस?' म्हणुन ओरडायचे मग पुढचा आपल्याला काहि म्हनत नाही,आनी मागच्याशीच भांडायला लागायचा
त्यातच भर म्हनुन जीन्यामधे पुढच्याच्या दप्तराची बटने खोलुन टाकायची मग पुस्तक खाली यायला
लागली की पुस्तक भरोस्तोवर जीन्यात ट्राफीक जाम,कधी कधी सॅक चे जे माघे लोंबनारे बेल्ट असतात ते
दोघांचे गुपचुप बांघुन टाकायचे मग ते सोडवन्यात अशी धांदल उडायची त्या मुलांची,आम्ही आपली ही सारी
काम करुन पटकन पुढे निघुन जायचो
एकदा वर्गामध्ये नवीन सर आले होते,नवीन अस्ल्यामुळे ते थोडेशे घाबरलेले आम्ही प्लास्टीकची कॅरी बॅग फुगवुन
ती फोडायचो 'फट्!' असा आवाज यायचा पन सरांना कळायचेच नाही की आवाज कुठुन येतो ते,१५ दिवस खूप्
त्रास दिला त्याना,गृहपाठ केला नसेल की वही नेहमी घरी असायची(आपन ऐवढे हुश्शार सगळ डोक्यात राहत मग वहीत
कशाला लिहायचे असा माझा समज)घरी पाठवलच तर जायचे आनी मस्त तास संपल्यावर परत,सरांनी विचारलच तर
घरी कुलुप आहे अशी थाप मारायची.खुप मस्ती केली शाळेत असताना

 

लेले 03/03/2008 - 10:59
मि चौथित असेल तेव्हा आम्हाला बाई॑नी ग्रूहपाठ करुन आणयला सा॑गितला होता...... आणि नेहमिप्रमाणे मि काहि केला नव्ह्ता...... न॑तरच्या तासाला मग बाई॑ना कोणितरी सा॑गितला कि मिएका मुलिला 'LOVE LETTER' लिहीला म्हणुन......... मग काय तेव्हा बाई काहि बोलल्या नाहि पण न॑तर जेव्हा ग्रुहपाठ विचारायला आल्या तेव्हा मला त्या॑नि खुप छड्या मारलेल्या... आणि त्या॑च वेळी त्या म्हणालेल्या....."कि तुम्हि मुला॑ना ग्रुहपाठ करायला वेळ नाहिए आणि इथे मुली॑ ना 'LOVE LETTER' लिहायला मात्र जमत॑य" पण खर॑च मि कोणालाच कोणतही 'LOVE LETTER' वगैरे काहिही लिहीला न व्हता. पण शाळा म्ह॑टली कि मला ..........

सर्किट 04/03/2008 - 09:11
चौथ्या वर्गात "प्रिया आज माझी नसे साथ द्याया" हे गाणे म्हटल्याने आमच्या बाईंचा खूप मार खाल्ला होता. असो. - सर्किट

विजुभाऊ 04/03/2008 - 12:42
आमचे उप शालाप्रमुख ( शाळेनंतर हा शब्द प्रथमच लिहीला) सबनीस सर्..त्याना का कोणास ठाउक सगळे शंभो असे म्हणत तसे म्हणताना एक्दा मी सापडालो.त्यानी मला वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे केले. येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम मला का उभे केले आहे असे विचारत. मी त्याना मी सबनीस सराना शंभो असे म्हणालो म्हणूनउभे केले आहे असे खरे सांगायाला लागलो. त्यावर येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम जाताना वर्गात पाहुन हसत जात राहीले... त्या प्रकाराला कंटाळून मला सबनीस सरानी वर्गात परत बोलावुन घेतले. आणि शि़क्षा संपविली

अनामिका 08/04/2008 - 18:50
कविता खुपच छान आहे. अगदी मनाला स्पर्श करणारी आणि पुन्हा मनाने शाळेत नेवुन बसवणारी. मला अजुन आठवतय अश्या काही कविता कुणी केल्या कि आम्ही त्या फळ्यावर लिहायचो. फळा लिहिणे एक मोठे कार्य असायचे पण मन लावुन (प्रसंगी वेळ काढुपणा करत केवळ तास बुडवायचा म्हणुन)ते करायचो आम्ही. शाळेच्या इमारतीच्या प्रत्येक कोपर्‍याशी काहि ना काहि आठवणी निगडीत आहेत. शाळा या विषयावर खुप काहि लिहिता येइल.लिहुन कढायचा मानस देखिल आहे . वेळ मिळाला की लिहिन. याच कवितेचा उर्वरित भाग "बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आता थोडा कळायला लागलाय, तो बरोबर आहे ना.. हे विचारयला... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय सौजन्य -ऑरकुट अनामिका

ॐकार 19/04/2008 - 08:57
पावसाळ्यात एकदा अर्थशास्त्राच्या तासाला (हल्ली तासिका वगैरे म्हणतात) आम्ही ४-५ कार्ट्यांनी मिळून तब्बल सव्वादोनशे होड्या बनवल्या होत्या. त्यासाठीचा कच्चा माल आधीच्या हस्तकलेच्या तासाला गोळा केला होता. चालू तासाला होड्या बनवणं मोठ कठीण! आम्ही आपले लाकडी बाकांच्या खणात हात घालून (आणि लक्ष फळ्याकडे देत) होड्या बनवत बसलो होतो. --- वक्तृत्वस्पर्धेला मी आणि माझा मित्र गूळ खात होतो. हॉल मध्ये खाली बसून जाम कंटाळा आला होता. भाषणं तीच ती. आम्हाला जमिनीवर एक डोंगळा दिसला. तासभर आम्ही त्या डोंगळ्याने गूळ खावा म्हणून त्याला सारखं गुळाच्या खड्याजवळ ढकलत , खेळवत होतो. शेवटी पी.टी. च्या सरांनी आम्हाला उचलला आणि बुकलला. --- एका बाईंना ( हल्ली मिस् म्हणतात) धडे वाचताना बाकड्यांच्या कडांना टेकून आणि रांगांमधून फिरत फिरत वाचायची सवय होती. आम्ही सगळ्या कडा डस्टर ने रंगवत असू. त्या बाईंना आपोआप काठ पदर पांढरा स्वच्छ होऊन मिळत असे. --- आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्‍या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही. --- माझा एक मित्र - त्याला चित्रकलेचा प्रचंड वैताग! त्याचा मोठा भाऊही आमच्याच शाळेत, ३ वर्षांचं अंतर. चित्रकलेला एकच बाई, सॉरी मिस् होत्या! त्यांचा आणि ह्या दोघा भावांचा नेहमीच 'सुसंवाद' चालत असे. एकदा वैतागून त्या माझ्या मित्राला म्हणाल्या होत्या - " तू आणि तुझा भाऊ! किती फरक आहे. तुला चित्रकलेच्या तासाला दरवेळेस बर्गाबाहेर काधावं लागतं. तुझा भाऊ स्वतःहून वर्गाच्या बाहेर जातो." ह्यानंतर अख्खा वर्ग ५-७ मि. हसत होता. --- एकदा पी.टी. चे सर आणि इतिहासाच्या बाईंनी शिवाजी - जिजाऊ चा प्रसंग-संवाद त्यांच्या आवाजत ध्वनिमुद्रित केले होते. ते ऐकवायला ते वर्गात टेपरेकॉर्डर/प्लेअर घेऊन आले. पण कॅसेट वाजायच्या ऐवजी ए एम चालू झालं आणि त्यावर "चढ गया उपर रे.. गुटर गुटर" हे गाणं वाजू लागलं. त्यांचे लांब झालेले चेहरे आणि पोरांचं खिदळणं अजूनही लक्षात आहे.

In reply to by ॐकार

नंदन 19/04/2008 - 11:39
आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्‍या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही. -- हेच. आठवी-नववीत याची भयंकर क्रेझ होती :) दुसरी टूम होती ती पेन-फायटिंगची. रेनॉल्ड्सची बॉलपेन्स घेऊन टिचकीने बेन्चवर असलेलं दुसर्‍याचं पेन पाडण्याचा हा खेळ शिक्षकांचा डोळा चुकवून खेळताना धमाल यायची.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सुबक ठेंगणी 21/05/2010 - 03:47
पेन फाईटसाठी मुद्दाम जड जड पेनं विकत घ्यायची, एनफाईट खेळताना ती निरागसपणे "बरोब्बर" एखाद्या बाकाच्या खाली घालायची, मग जाऊन घेऊन यायची...लई मजा केली. :)

मदनबाण 19/04/2008 - 09:59
शाळेत कारागीर पोरांची काही कमतरता नसते,,,,,बाकड्यावर करटकाने विविध आकाराचे खड्डे पाडायचे कशासाठी तर--बॉलबेअरिंग चा खेळ खेळण्यासाठी, आमच्यावेळी रामानदं सागरची अलिफ-लैला नावाची मालिका बर्‍याच पोरांना आवडायची,,,विशेष म्हणजे त्यातील नायका जवळ असलेली तलवारे सुलेमानी..... मग काय प्रत्येक बाकड्यावर त्या तलवारीची प्रतीमा करकटकाने खोदुन तयार.....(अगदी त्यावरील नक्षी सकट.) वर्गातील विशेष उध्योगः-- कागदाचे विमान तयार करायचे त्याचे टोक तोंडाने चाव चाव चावायचे आणि वर्गाच्या छतावर फेकुन मारायचे.....वर्गभर छताला चिकटलेली विमाने..... माझ्या वर्गातल्या बारी नावाच्या मुलाला तर मी मजबुत बुकलुन काढल्याचे मला स्मरते.....(मग माझ्या पालकांना घेऊन यावे असे फर्मान शाळेने काढले होते.....) (सावरकर प्रेम बहुधा माझ्या रक्तातच असाव....:))))) ) (ठाण्याच्या मो.ह.विध्यालयातील खट्याळ पोरगा) मदनबाण

ह्या धकाधकीच्या जीवनात तुझ्या कवितेने, पुर्ण बालपण नजरेसमोरुन गेले, मी तर हे हि विसरलेली शाळेत माझ नाव स्वप्ना होत, माझी आठ् वण मला पड्लेले गणितात मार्क दहावीला असताना फक्त दिड मार्क, मग काय आमचा आणि गणिताचा ३६ चा आकडा, त्या सरांशीसुद्धा ३६ चा आकडा, नेहमिच वाकड, सरांनी सर्वांसमोर जी तारिफ केली वीचारता सोय नाही, ९४ ला आमच्या वर्गात ९४ च मुले एकत्र, तेच नेमके क्लास टिचर , त्यांचि ईच्छा ९४ सालात १०० % रिझल्ट लावायचा पण होता, रीझल्ट १००% च लागला, पण ९३ मुल पास झाले, कारण आमच्यातील एक तारा प्रकाशित होण्याआधिच निखळुन गेला प्रविण देसले हुशार, स्मार्ट, शांत, नेहंमीच सर्वांना मदत करणारा, तो सुद्धा आमच्या सेन्ड - ऑफच्या दिवशी , कॅन्सर झाला होता त्याला,तेव्हा मनात एक विचार येउन गेला आयुष्यात कॅन्सरच्या रोगा विरुध्द लढा द्यायचा, ठरवुन नाही, पण योगायोगाने आयुष्यात्,नर्स बनण्याचा योग आला, आणी पहील्या दिवसापासुन नोकरी लागल्यापासुन ते आजतागायत कॅन्सर युनिट मध्येच काम करतेय, फार फार् आभार देवाचे ज्याने मल एवढी चांगली सन्धी दिली

धमाल मुलगा 20/05/2010 - 21:58
आपली सदस्यसंख्या एवढी प्रचंड आणि शाळेत दंगा केलेले आम्ही फक्त एव्हढेच? च्छ्या:! कलीयुग संपुन सत्ययुगाला सुरुवात झाली की काय? :D

In reply to by धमाल मुलगा

ओ धमाल राव आम्ही आहोत की.. एकेकाच्या आठवणी वाचुन मनसोक्त हसलो.. साला शाळेच्या आठवणी निघाल्यावर माणुस हळवा होतोच. एवढे सगळ्यांनी लिहीले. आहो धोतर घालुन येणार्‍या मास्तरांच्या पाठीमागे शाईपेनाच्या तलवारी तुम्ही चालवत नव्हता का??? पकडले गेल्यास मार हमखास... आठवीतला एक प्रसंग... असाच एक ऑफ पिरेड कोणीच मास्तर फिरकले नव्हते आणि खेळायला मैदानात सोडले पण नव्हते. सगळ्यांनी शांत बसुन राहयचे आणि तो मॉनिटर नाव लिहुन घेत होता.. सगळे शांत चालु होते तेवढ्यात माझ्या बाजुला बसलेल्या प्रसादला खुसफुसायची हुक्की आली... तो माझ्या कानात बोलायला लागला तेवढ्यात मॉनिटरने आम्हाला पाहिले आणि आमचे नाव लिहुन घेतले. पाच एक मिनिटाने वर्गात फिरताना आमचा मॉनिटर पडला... झाले सर्व वर्ग हसुन हसुन बेजार.. तेवढ्यात शेजारच्या वर्गातले एक सर आले ते मारकुटे म्हणुन आधिच फेमस होते. त्यांनी मॉनिटरला विचारले "कोण गोंधळ घालत होते???" मॉनिटरने आमचे नाव सांगीतले... झाले आम्हाला समोर बोलवुन दोन दोन कानाखाली देण्यात आल्या... मग सर आम्हाला त्यांचा वर्गात घेउन गेले. आणि भरपुर शिव्या घालणे चालुच होते. शेवटी ते फळ्याकडे वळले... त्यांनी एक गणित तिकडे लिहिले होते. त्याकडे पाहुन परत तोंडाचा पट्टा सुरु झाला... हे गणित सोडवता येतच नसणार.. बाईंनी शिकवले नाही तर पुढचे आपण स्वःता करुन बघावे वैगेरे वैगरे... आम्ही आपले खाली मान घालुन उभे. एक खडुची मिसाईल आमच्या कडे आली आणि पुढच्या क्षणी मला ते गणित सोडवायला सांगीतले. गणित सोडवायला खडु हातात घेउन मी गणित सोडवायला लागलो तरी ह्यांची बडबड सुरुच होती "हा काय सोडवणार???" "ह्यांना नुसता दंगा करायला पाहिजे " मधेच पोर हसायला लागली तेव्हा त्यांनी पाहिले मी गणित सोडवुन खडुचे हात झटकत होतो... एकदम स्टाईल मधे.. सरांचा पारा भडकला जाम धुतले पुढे मला... त्याचा पुढे संरांनी चार वेळा एकच प्रश्न विचारला "एवढे गणित येते तर मग गोंधळ कश्याला करत होता???" मग माझ्यातही टिळक कुठुन संचारले माहीत नाही... "सर मी गोंधळ करत नव्हतो मी फक्त एकदाच ह्याचाशी बोललो तेव्हा मॉनिटरने माझे नाव लिहुन घेतले" परत दोन कानाखाली... शेवटी मॉनिटरला बोलावले खरे खोटे तपासण्यासाठी... खरे कळ्यालावर मॉनिटरला वाकवुन पाठीवर जाम गुंद्दे घातले... शेवटी कसाबसा तास संपला.... आणि आम्ही सुटलो.. त्या मॉनिटरने परत कधी नाव लिहिले नाही राव माझे... असे बरेच कीस्से आहेत .. मी एकुण सात वेळा शाळा बदलली आहे.. नवीन गाव नवीन शाळा नवीन मित्र मजा असते राव.. ;) (७ शाळांचा माजी विद्यार्थी)निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

धमाल मुलगा 21/05/2010 - 03:01
असल्या गुर्जीला आमी बरोब्बर खोड्यात पकडायचो... डायरेक सहीची निवेदनं मुख्याध्यापकाच्या टेबलावर.. वर निवेदनात शब्दपण भारी.. "अन्याय..आपपरभाव..जातीयवाद..गावात वट नसलेल्या पालकांच्या मुलांवर जबरदस्ती" खंप्लीट विलेक्षानच्या टैमाचं राजकारण. दुसर्‍या दिवशी मास्तरनं निस्तं खुन्नस देऊ देऊ बघतच बसलं पायजे..आणि आपण त्याच्यापुढुन २२ इंची छाती ४२ इंची करुन फुगवुन तोर्‍यात चालायचं... असो.. एके काळी केलेला संप, पाठ्यपुस्तकाचं केलेल कॉमिक्स हे टाकतोच सवडीनं. :)

मस्त कलंदर 20/05/2010 - 23:24
आमच्या कन्या शाळेत एक जोशी आडनावाचे प्रचंड मारकुटे मास्तर होते.. ते म्हणजे एकदम धम्माल होती.. त्यांनी शेंडी राखली होती, आणि म्हणून ते टोपी घालायचे. कधी कधी ती शेंडी बाहेर डोकावे मग आम्हीही खुसुखुसु हसायचो.. हातात नेहमी पोहोची घालायचे.. बोलताना नेहमी तिच्याशी खेळायचे. स्वभावाने अतिशय कडक होते. मुली त्यांच्यासमोर जायला जाम घाबरायच्या.. एकदा ऑफ पिरियड्ला मी त्यांच्याच स्टाईलमध्ये टेबलावर जाऊन बसले. त्यांच्यासारखेच न थांबता एका दमात काहीतरी व्याख्या म्हणून दाखवत होते. नि मी ते शेंडी बाहेर येऊ नये म्हणून टोपी मागून सरकवत तशीच सरकवून त्यांचा टिपिकल शब्द "ध्यान द्या" म्हणायला नि तेच दारात दत्त म्हणून उभे रहायला गाठ पडली. आतापर्यंत खिदळणार्‍या कार्ट्या गप्प का म्हणून मागे पाहिले, तर लालबुंद डोळ्यांचे जोशी मास्तर समोर!!!!! मी... एकदम नि:शब्द!!!! तोवर तेच म्हणाले, "काय नाटकं लावली आहेस गं मके??? चल पळ जागेवर" हुश्श!!! मी जोरात धूम ठोकली. (त्याचाही खरंतर उपयोग नव्हता.. कारण अस्मादिकांना उंचीप्रमाणे नेहमीच प्रथम बाकावर बसण्याचा मान होता ) अजूनही बरेच किस्से आहेत.. पण टंकाळा आलाय म्हणून इथेच थांबते!! :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

भारद्वाज 21/05/2010 - 09:40
आह ....लै भारी टॉपिक आलाय भो........ शाळेत तसा मी हुशार, सभ्य, शांत म्हणूनच प्रसिद्ध होतो. पण संधी आली की मस्ती सुचायची. मारामारी हा प्रकार मात्र नाही केला कधी. *इयत्ता ६ वी 'अ': मराठीला खिलारे सर होते. गृहपाठ झाला का ते तपासत बसले होते. सगळ्यांनी वह्या तयार ठेवल्या. मी मात्र सपशेल विसरलो होतो गृहपाठ करायला. सर मुलींच्या वह्या तपासत होते. मुलांचा नं. सुरू होईपर्यंत उरकुन टाकू म्हटले आणि घात झाला. त्यांनी मधेच मुलांच्या वह्या घेतल्या.....खल्ल्ल्ल्ल्ल्लास. बेदम मार खाल्ला त्यादिवशी. *इयत्ता ७ वी 'अ': बेंचवर पेन-फाईट खेळणे हा त्यावेळी वर्गातला जगप्रसिद्ध खेळ होता !!! यात एकमेकांच्या पेनला क्रॅक पडायचे. दर दोन दिवसांनंतर नवीन पेन विकत घ्यावा लागे. Rotomac च्या पेनने खुप दिवस साथ दिली होती. मुलींची मॉनिटर जाम नाटकं करायची. आम्ही खेळायला लागलो की स्टाफरूममधे जावून कोणालाही तासावर बोलवायची. मात्र या गेमची पण खासियत होती. दुसर्‍याचा पेन पाडताना आपल्या पेनने त्याला इतक्या जोरात शॉट मारायचा की तो पेन बाजूच्याच लाईनीत आवडत्या मुलीच्या बेंचखाली पडला पाहिजे. तेवढाच बोलण्याचा चान्स !!! सिद्धेश कामतेकरचा पोपटः या सिद्धेशने घरी पोपट पाळला होता. एकदा शाळा भरल्यावर तो वर्गात म्हणाला, "अरे यार, आज माझा पोपट उडाला रे" या अनपेक्षित वाक्याने आमची ह.ह.पु.वा. झाली. त्याला समजलंच नाही. तो तसाच पुढे म्हणत राहिला,"पिंजर्‍याचं दार उघडंच राहिलं माझ्याकडनं !!!" शाळा सुटेपर्यंत जाम ह.ह.पु.वा. झाली होती. =)) वडलांच्या नावावरून चिडवायची (बेकार)पद्धत आमच्याकडेही होती. त्या कॅटेगरीत 'शिबू' हे नाव जाम फेमस. पुढे या शिबूचं 'शडंबो' झालं (एका शनिवारी टी.व्ही.वर मिस्टर इंडिया लागला आणि मोगँबो चं यमक म्हणून शडंबो) *इयत्ता १० वी 'अ': आजारी पडलेल्या /(मुद्दामून) पडलेल्या मित्राला घरी सोडून यायची ट्रीक सुरू केली. एकदा स्वप्नील नावाचा मित्र कंटाळा आला म्हणून आजारी पडला. मधल्या सुट्टीत जितू स्वतःच्या वहीचा कागद फाडून स्वतः अर्ज लिहून वानखेडे टिचरांची सही घेऊन आला. गेटवर स्वप्नील ला सोडायला १०-१२ जणांचा घोळका. यात जितू सगळ्यांना मागे लोटतोय. मी डाव साधून स्वप्नीलची बॅग माझ्या हातात घेऊन स्वप्नीलच्याही आधी गेटच्या बाहेर !!! वॉचमनकाकाने बाकी सगळ्यांना परत वर्गाकडे पिटाळले. आईशप्पथ......जितूचे तोंड बघण्यासारखे झाले होते. आम्ही दोघं मग सायकलवर अख्खी सी.बी.डी. पालथी घालून आलो. त्याला घरी सोडून २ तासांनी वर्गात पोहोचलो. जितू धुमसतच होता.... :D इंग्लिशच्या वानखेडे टिचर आपल्या सर्वांत सर्वांत आवडत्या. काही शिक्षक व टोपणनावे: बीजगणिताच्या पाटील टिचर - कोकीजी कार्यानुभवच्या कासारे टिचर - प्रेमाशालिनी १० वी चे इतिहासाचे जाधव सर- ढगळ्या ६ वी च्या मराठीच्या पाटील टिचर- चिमणी (यांचा एकच डायलॉग-- ए पोरा,बुलु नको. यांच्या मराठीच्या तासाला तर गुपचुप मागच्या बेंचवर जाउन चोरून डबे खाण्याची बातंच निराळी. शिवाय आम्ही प्लॅस्टीकची २-३ रुपयांची छोटीशी चिमणी आणायचो वर्गात. तिच्यात पाणी भरुन शेपटीकडून वाजवली की अख्ख्या वर्गात शिट्टी 'दुमदुमायची'. ) स्वगतः एक हळवा कोपरा होता माझ्या मनाचा. पण कधीच बोलू शकलो नाही......तिचं लग्न झालं २ वर्षांपूर्वी #o - भारती विद्यापीठचा माजी

मिलिंद बोकील यांचं "शाळा" हे पुस्तक वाचा, लय जबरा आहे. त्यातली शिरोडकर तिच्यातर प्रेमातच पडलोय मी. फावड्या, सु-या, चिमण्या, अंबाबाई एकेक खतरनाक कॅरेक्टर आहेत. मी तर हातात घेतलं आणि संपवल्यावरच खाली ठेवलं ! B)

In reply to by सोम्यागोम्या

बेसनलाडू 21/05/2010 - 04:07
सॅन-फ्रान्सिस्को ते भारत आणि परत असे एकाच प्रवासात दोनदा सलग वाचले. आता जवळपास पाठही झाले आहे. सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या जवळच्या आणि ओळखीच्या झाल्या आहेत, की आपणा पुन्हा शालेय जीवन जगतोय, असे वाटते. (शाळकरी)बेसनलाडू या पुस्तकावरच आधारीत 'गमभन' ही एकांकिका तितकीशी आवडली नाही. बरी वाटली. (रसिक)बेसनलाडू

शुचि 21/05/2010 - 03:15
मी पोपट, प्रोफेसर आणि गणपती झाले होते नाटकात :) नेहेमी पहील्या बाकावर बसत असे. कधी दंगा नाही. सर्वात मागे ढ मुली बसत लांब लांब कानातले घालणार्‍या. होच मुळी आमच्या वर्गात तरी तसच होतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चिर्कुट 21/05/2010 - 11:01
आमची पण (हजारोंमधील) एक आठवण.. आम्ही साता-याला 'रयत'च्या 'गुरूकुल' प्रकल्पात शिकत होतो. होस्टेल शाळेतच होतं. आमची रात्र अभ्यासिका असायची. या वेळेचा आमचा आवडता खेळ म्हणजे झोपलेल्यांना (खडू मारून) उठवणे. एकदा अशा अभ्यासिकेच्या वेळी ही मारामारी चालू होती. समोर खुर्चीत सर निवांत झोपले होते आणि अचानक एक खडू सरांना लागला. सर दचकून उठले आणि काय झालं ते कळाल्याबरोबर सगळ्यांचे हात बघत सुटले. एका मित्राला सर काय करत आहेत ते कळून त्याने हात पुसायच्या आधी सर तिथे हजर.. त्याचे खडूने पांढरे झालेले हात बघून आम्ही समजलो की हा गेला आता, पण शेवटी आमचाच मित्र!!! B) त्याने अतिशय गरीब तोंड करून आधीच सरांना हातातले खडू दाखवले आणि वर म्हणाला, "सर, मलाच कुणीतरी मारलेत!!" :)) काहीही न बोलता सर परत जाउन झोपले आणि आमचे चेकिंग ही वाचले..आजही त्या मित्राला भेटलो की ही आठवण हमखास निघतेच.. अवांतर : आमच्या मनाच्या हळव्या कोप-याचं परवा लगिन आहे.. :( --चिर्कुट (दहावी 'क')

परवाच हापिसात या 'रम्य' आठवणी निघाल्या होत्या. आमच्या वर्गातल्या पोरांनी एकदा पंख्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि संस्कृतच्या बाईंना काही यायचं नाही म्हणून त्या शिरल्या शिरल्या पंखा सुरू करून दिला. आता गुलाबाच्या पाकळ्या उडवल्या म्हणून काय शिक्षा करायची का? वर्गात झोपा काढायची सवय मला ९-१०वीत लागली असेल. अशीच एकदा आराम करत होते तर आवाज आला, "अदिती, काय चाललं आहे?" मी साळसूदपणे काही सुरू नाही असं नाटक केलं, जे लवकरच उघडं पडलं. अर्थात बाई चांगल्या असल्यामुळे पाच मिनीटांच्या लेक्चरवर काम निभावलं. सगळ्यात हाईट्ट होती ती त्याच संस्कृतच्या बाईंची! त्या नवनीत गाईडमधून सगळं उतरवून द्यायच्या; तर आमच्या वर्गातली एक दोन पोरं गाईडच समोर धरून बसली होती! नेमकं बेंचेसच्या रांगातून फिरताना ते गाईड बाईंना सापड्लं. मग काय महाराजा, गाईडच जप्त! ज्याचं गाईड "पळवलं" होतं तो दोन दिवस शांत होतं; दोन-तीन दिवसांनी पोरांचा दंगा सुरू झाला तर नंतर समजलं. दुसर्‍या एका पोराला याच बाईंनी त्यांच्या लॉकरमधून काहीतरी आणायला सांगितलं, तर त्याला लॉकरमधे दोन गाईड्स सापडली, एक पोराचं आणि एक बाईंचं! शाळेत गाईडवर बंदी, पण या पठ्ठ्याने दोन्ही गाईड्स उचलून आणली! बाईंनी दोन दिवस शिक्षण-संप पुकारला ... आणि नंतर साळसूदपणे गाईड परत केल्यावर म्हणे, "दहावीच्या मुलांचं नुकसान नको असं मुख्याध्यापकांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा शिकवायला सुरूवात करत आहे." पोरं जी खोखो हसली होती तेव्हा ...! माझ्या "कारकीर्दी"तला उच्चांक हा: आमच्या शाळेत कसलीही स्पर्धा असेल तर लगेच सगळ्यांना ती कंपल्सरी करण्याची वैट्ट सवय! सुंदर चित्र काढणार्‍यांना सक्तिने विज्ञानाच्या परीक्षा द्यायला लावायच्या, माझ्यासारख्या गद्य लोकांना चित्रं काढायला लावायची वगैरे वगैरे! मला चित्रं काढायचा पूर्वीपासूनच कंटाळा, आता जीवशास्त्रात ठीक होतं, नावं-बिवं देता येतात. असंच एक मोठं वादवजा भांडण घरी केलं आणि एका अशाच सक्तीच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी शाळेत गेले. रागबिग आला नव्हता, पण दंगा करायची सवय जुनीच! तर परीक्षेला काय काय विषय होते चित्रांचे, एक होता 'रामायणातील एक प्रसंग'. माझी तिरकस खोपडी लगेच विचार करायला लागली ... काय करावं. मग चित्रं काढायला घेतलं, एका तासात संपवलं आणि सायकलवरून आख्खं ठाणं (तेव्हा आमचं ठाणं लहान होतं हो!) उंडारायला बाहेर पडले. घरी आले, बाबांना प्रश्न पडला एवढ्यात कसं काय हिचं चित्रं पूर्ण करून झालं! माझं उत्तर तयार, "अहो बाबा, सोप्पंय! मी 'रामायणातला एक प्रसंग' काढला." बाबा: काय काढला प्रसंग? लहानपणी तुम्हाला दोघांना 'गीत रामायणा'तलं गाणं आहे ना, 'अनुपमेय हो सुरू युद्ध हे ..' त्यातली 'हाणा मारा कापा तोडा' ही ओळ खूप आवडायची. मी: नाही हो, तसलं काही नाही केलं मी! बाबा: (चेहेर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह) मी: अहो काही नाही! एक झोपडं काढलं, दोन-चार झाडं काढली आणि वर एक लाईन मारली (च्च्च ... जीभ चावत), नाही म्हणजे एक आर्क काढली, तिच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असं दाखवलं.... बाबा: आणि मग काय सीता आणि रावण .... मी: नाही नाही! वर टीप लिहीली. "राम आणि लक्ष्मण हरणाच्या पाठी गेले आहेत आणि सीतेला रावणाने पळवून नेलं आहे, तेव्हाची झोपडी!" बाबा आणि मी पोट दुखेपर्यंत हसलो. आख्ख्या वर्गासमोर माझी एकदाच पूजा बांधली गेली होती! अदिती

वेळ असला की मी जुने लेख वाचत बसतो. म्हणुन खरडवहीत जुने मी. पा. कार कुठे गेलेत ते लिहले आहे. गेले दोन तास हा लेख वाचत होतो खुपच नॉस्टॅलजिक झालो. आज्च्या मी.पा. च्या नविन सद्स्यांना हा धागां माहित व्हावा आणि त्यांनी काही तरी आप्ल्या शाळेचे लिहावे म्हाणुन हा धागा वर काढतोय. तुम्ही लिहीपर्यंत मी ही काही तरी खरडतोच.

मिनेश 18/12/2013 - 10:31
न केलेल्या चुकीसाठी एकदा प्रचंड मार खाल्लाय शाळेत.....बाकीच्या आठवणी एक वेळ विस्मरणात जातील पण ही आठवण नाही....

ज्ञानव 18/12/2013 - 12:23
हाताच्या बोटांमध्ये ४ खडू ठेऊन मग शेक हेंड करायचे आणि मुलगा बोम्बलला की शिकवता शिकवता "ए ओरडतो कशाला?" हि शिक्षा झालीय का कुणाला ?

तिरकीट 18/12/2013 - 19:53
आमच्या ठाकुर सरांची आठवण झाली....त्यांचा १ डायलॉग होता....................... "सरपाळे, तु जोपर्यंत दहावी पास होत नाहीस तोपर्यंत मी दाढी करणार नाही (स्वतःची)" अक्षर लैच भारी होतं राव त्यांचं

आम्हाला नववी ला मराठी शिकवायला एक म्याडम होत्या . त्यान्ची खासियत म्हणजे धडा किम्वा कविता शिकवताना त्या अगदी बाबामहाराज सातारकरान्प्रमाणे रसाळ प्रवचन करायच्या ! आणि त्या आख्यानात आपल्या घरात घडणार्या घटनान्चा उल्लेख करून भरपुर माल-मसाला टाकलेला असायचा . त्याना आत्मप्रौढी मिरवण्याची भारी हौस! प्रत्येक वर्शी येणार्या विद्यार्थ्याना ''यन्दा आम्ही कार (चारचाकी गाडी ) घेणार'' असे सान्गायच्या . शेवटी वैतागून एका मुलाने त्याना ऊत्तर दिले... बाई ,गेली दहा वर्शे आम्ही ऐकतोय गाडी घेणार म्हणून , साधी बैलगाडी तरी घेणार का या वर्शी? ......मग काय ? तो मुलगा त्या वर्शी मराठीत नापास!!! याच बाईनी कुत्री पाळली होती , त्या बाई वर्गात तासाला येण्यापूर्वी धावत ती कुत्री यायची आणि टेबलाखाली बसायची .....मग काय? कुत्री दिसली रे दिसली की पोरे कल्ला करायची ..... क्षक्षक्ष बाई आल्या रे ! ;)

परिंदा 19/12/2013 - 14:25
असेच आम्हाला विज्ञानाला साळसकर सर होते. ते विज्ञान कमी आणि इतर बाताच जास्त मारत बसायचे. कुठल्याही गोष्टीचा संबंध ते आपल्या मित्रांशी लावायचे. माझ्या एका मित्राकडे हे आहे आणि ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ थापाच असायच्या हे देखील सर्वांना माहिती होते. :) एकदा सौरउर्जेविषयी सांगताना म्हणाले होते, "एकदा मित्राकडे जेवायला गेलो होतो, तेव्हा भात कमी झाला. तिने पटकन सौरकुकर लावला आणि १० मिनीटात भात तयार!" हा १० मिनीटात भात तयार करणारा कुकर खरोखरच सौरकुकर होता की प्रेशरकुकर हे साळसकर सर आणि त्यांचा मित्रच जाणो.

एम.जी. 19/12/2013 - 14:50
नूमवि... भूगोलाच्या भिडे सरांना " मामा" का म्हणायचे माहीत नाही..पण म्हणायचे. अशाच एका ऑफ तासाला मामा भिडे वर्गासमोरून जात असताना एकाने त्यांना " ए मामा " म्हणून हाक मारली. ते आत आले आणि त्या पोराला यथेच्छ झोडपले... सर वर्गाबाहे निघाले तर दुसर्‍याने " ए काका " म्हणून हाक मारली. सर पुन्हा वळले आणि त्या पोराला धरले.. त्याला मारण्यासाठी हात उचलणार तेव्हढ्यात तो म्हणाला..." सर..सर.. मी काका म्हणालो..मामा नाही म्हणालो.." इतक्या प्रामाणिक कन्फेशननंतरही त्याला सरांनी वेडेवाकडे बडवून काढले.

देव मासा 24/12/2013 - 13:22
शाळेतला सर्वात पुचाट विनोद, आपन पेनातलि शाहि संपल्यावर, मित्राला विचारावे ''ए तुज्ह्या जवळ दोन पेन आहेत ?'' मित्र ''आहे ना आपन केविलवाणी नजरेणने म्हनावे ''एक दे ना मला.... आपले मित्र '' दोन पेन आहे रे , पण एक घरि ठेवला आहे. ... आनि मग संधि आणी आपलि वेळ आल्यावर हाच आहेर आपन पुढे करायचा

ज्ञानव 24/12/2013 - 13:26
वाचून शिक्षणावरची वासना अकाली का उडाली त्याचे उत्तर सापडते. पण शाळेतल्या शिक्षकांमध्ये प्रेम आणि आत्मीयता होती म्हणून तेच आठवतात. महाविद्यालयीन "कर्मचारी"(पद्धतीचे शिक्षक)फारसे लक्षात राहत नाहीत.

धडपड्या 19/12/2015 - 23:19
हा कसा काय राहिला होता? नंतर देवाकडे टवाळखोरीच्या रसायनाची कमतरता पडली होती का काय?

मयुरMK 20/12/2015 - 11:43
मला भाषण एइकताना अक्षरशः झोप यायची खास करूँ आमच्या मुख्याध्यापकांचे आत्ता इथेच थांबतो काम आहे परत केव्हा तर संदर्भासहित स्पष्टीकरण.

गॅरी ट्रुमन 21/12/2015 - 11:25
मिपावर पूर्वी असा आणखी एक धागा आला होता. त्यावरील प्रतिक्रिया इथे चोप्य-पस्ते करत आहे. १. आम्ही दहावीत असताना सगळ्यांना क्रिकेट खेळायचे वेड लागले होते.आमची शाळा दुपारची असे.तेव्हा शाळा भरायच्या आधी तासभर, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तासभर क्रिकेट खेळणे हा कार्यक्रम असे. त्यासाठी आमच्या वर्गातील गोखले अडनावाचा एक मुलगा बॅट घेऊन येत असे.एकदा आमच्या गणित शिकविणाऱ्या शिक्षिकांनी पोर्शन पुढे न्यायला म्हणून इतर कोणा शिक्षकाकडून तास मागून घेतला.पण तास सुरू होऊन १० मिनिटे होताच त्यांचे गोखल्याकडील बॅटकडे लक्ष गेले.आणि ती बॅट कशाला, कधी खेळता या सगळ्या प्रश्नांची माहिती करून घेऊन तासाचा उरलेला सगळा वेळ ’दहावीच्या वर्षात परीक्षा इतकी जवळ आलेली असताना क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवणे कसे अयोग्य आहे’ यावर त्यांनी लेक्चर दिले.गणिताचा पोर्शन पुढे नेणे बाजूलाच राहिले. दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खोलीत आमच्या वर्गातील मुले क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवतात यावर चर्चा झाली.त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या आपटे बाईंनी ताबडतोब गोखल्याकडील बॅट जप्त केली आणि त्याला सांगितले की मार्चमध्ये परीक्षा संपल्यावर येऊन बॅट घेऊन जा आणि तोपर्यंत बॅट अजिबात मिळणार नाही. अजून दोन दिवसांनी गणिताचा तास होता. गोखल्याकडे बॅट नाही हे बघून गणिताच्या बाईंना वाटले असावे की आपल्या लेक्चरचा परिणाम म्हणून त्याने बॅट आणली नाही आणि क्रिकेट खेळणे बंद केले. त्यांनी गोखल्याला विचारले,"काय गोखले, आज बॅट कुठे आहे"? आणि त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली". यावर सगळ्या वर्गात जोरदार हशा पिकला हे सांगायलाच नको. २. एकदा मराठी शिकविणाऱ्या बाईंनी ’कलंक मतीचा झडो दुराभिमान सारा गळो’ या ओळी एकाला वाचायला सांगितल्या. त्याने मतीचा ऐवजी ’कलंक मातीचा झडो’ असे म्हटले.बाईंनी परत वाचायला सांगितल्यावरही तो ’कलंक मातीचा झडो’ असेच वाचत होता.त्यावर बाईंनी त्याला विचारले की तुला या ओळी वाचताना काही वेगळे वाटत नाही का? यावर माझ्या मित्राची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती--’त्याच्या मतीचीच माती झाली असल्यामुळे त्याला मतीऐवजी माती असेच दिसत आहे’.

मी एक टिंब तू एक टिंब, आपण दोघे टिंब टिंब, उगवले बघ सूर्यबिंब, दोघे मिळून लढवूया प्रेमाची खिंड, पावसात भिजूया ओले चिंब...

ऋषिकेश 21/02/2008 - 21:29
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय हे लई झ्याक.. ढकलपत्र (फॉरवर्ड) आवडलं :) -ऋषिकेश

विसोबा खेचर 21/02/2008 - 21:40
वा स्वातीताई, अतिशय सुंदर कविता... धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय, कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय, कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय प्रामाणिकपणे सांगायचं तर कविता वाचून खूप भरून आलं आणि अक्षरश: डोळ्यातनं पाणी आलं! असो, मी या विषयावर अधिक काही लिहू शकेन असं वाटत नाही! शाळेची आठवण निघाली की मी खूप हळवा होतो! परंतु इतर सभासदांच्या आठवणी मात्र नक्कीच वाचायला आवडतील! आपला, (शाळाप्रेमी) तात्या.

वर्गात रसायन शास्त्राचा प्रयोग होता. क्लोरीन वायू तयार करण्यात आला. पोपटी रंग, मिरमिरीत वास इ. इ. तास संपल्यावर सरांनी मला मदतीला बोलावून घेतले. (केवढा अभिमान वाटायचा अशा वेळी). त्यांनी इतर उपकरणं घेतली आणि मी पोपटी रंगाच्या क्लोरीनने भरलेले वायुपात्र घेतले. सर पुढे निघून गेले. (मलाही तेच हवे होते) मी जाता वायूपात्रावरील झाकण बाजूला करून तो वायू जोरात हुंगला आणि जे हाल झालेत म्हणून सांगू. कसाबसा प्रयोगशाळेत वायुपात्र नेऊन ठेवलं. वर्गात आलो. तर उलटीची भावना होऊ लागली. डोळ्यात पाणी. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मित्राने नवीन आलेल्या शिक्षकांना सागितलं. मला वर्गाबाहेरच्या बाकावर झोपवून रसायन शास्त्राच्या सरांना बोलावून आणलं. त्यांना मी खरं खरं सांगितलं (दूसरा उपायच नव्हता, मला वाटलं आता मी मरणार्) सगळ्यांची धावपळ झाली. क्लोरीन पाण्यात विरघळतो म्हणून पाणी पाजण्यात आलं तर क्लोरीन हा 'जड' वायू असल्यामुळे शिर्षासन करायला सांगा असा उपायही कोणी तरी सुचवला. (नशिबाने तेवढा दूर्धर प्रसंग आला नाही) मोकळ्या हवेत पडून राहिल्यावर किंचित बरं वाटू लागलं. त्यामुळे त्या बाकड्यावर अर्धा-पाऊण तास अंडर ऑब्झर्व्हेशन झोपवून ठेवल्यावर मी उठून बसलो. आणि रसायन शास्त्राच्या सरांच्या चेहर्‍यावरील ताण दूर झाला. नंतरचा तास गणिताचा होता त्यामुळे तो बुडविण्यासाठी मी 'नाटक' केलं असा माझ्या काही दुष्ट मित्रांनी (?) प्रचार केला. आता सायन्सच्या उपकरणांना हात लावण्याची आपल्याला मिळणारी मुभा जाणार आणि वर्गात भाव खाता येणार नाही असे मला वाटले परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. लाज वाचली.

In reply to by प्रभाकर पेठकर

सौन्दर्य 20/12/2015 - 10:16
अगदी असाच प्रसंग दहावीत असताना माझ्यावर ओढवला होता. बाईनी वर्गात टेस्ट ट्यूबमध्ये क्लोरीन वायू तयार केला होता आणि त्याचे गुणधर्म सांगत होत्या. त्यात त्या म्हणाल्या हा पोपटी रंगाचा वायू असतो. मला त्यात टेस्ट ट्यूबमध्ये पोपटी रंग खरंच दिसत नव्हता म्हणून मी म्हणालो, "ह्यात कुठे आहे क्लोरीन वायू ?" त्यावर बाईनी जवळ बोलवून नळी हुंगायला दिली आणि त्यानंतर जो काही घसा सुकला, नाका-डोळ्यांतून पाणी यायला लागले, खोकला येऊ लागला, त्याला काही अंतच नव्हता. अनेक वेगवेगळे उपाय झाले, शेवटी कोणीतरी सुक्या खोबर्याचा तुकडा खायला दिला. घशाची ती खवखव काही दिवसानीच गेली. कित्येक किस्से आहेत, सवडीने सांगत राहीन. चागला विषय दिल्याबद्दल आभार.

झाकण उघडून आत काय आहे त्याचा वास घ्यायची अजुनी सवय आहे म्हणायची.:)))) फक्त भांडी बदलली. ते प्रयोगशाळेतील होते आत स्वयंपाक घरातील हो ना? जस्ट किडिंग...

झकासराव 22/02/2008 - 11:25
हा एक छान धागा सुरु केलाय स्वाती यानी :) मी पहिलीत होतो तेव्हाची गोष्ट. मधली सुट्टी झाली होती. डबा खाल्ला. आणि पुर्ण वॉटर बॅग भरुन पाणी प्यायलो खेळता खेळता मी आणि माझ्या एका वर्गातलयाच मुलाने. सुट्टी संपत आली आणि मग माझ्या लक्षात आल की अरे आपण "सु" करायला गेलोच नाही. तोवर सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि मला जोरात "सु सु" आली. आमच्या बाई बाहेर येवुन चला मुलानो वर्गात चला अस म्हणत होत्या (नुसती घंटा ऐकुन पहिलीतली मुल थोडीच वर्गात पळतात लग्गेच. ती अजुन खेळण्याच्याच मुड मध्ये असतात.) आणि मी तिकडे सु करत होतो बराच वेळ :) (मनात भिती बाई आल्या आहेत बोलवायला आणि इकडे तर जोराची "सु सु" ) वर ही कामगिरी घरी जावुन आईला सांगितली होती. :) आता आठवल तरी खुप हसु येतय.

विजुभाऊ 22/02/2008 - 12:45
ओफ्फ तासाला एखद वेळेस शिक्शक वर्गावर वेळेत आले नहित कि आम्हि सगळे रान्ग करून हातात दप्तर घेउन वर्गाबाहेर पडायचो....आणि तसेच सरळ शाळेच्या मेन गेट मधुन रान्गेत बाहेर जायचो..थेट घरि... रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही. विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 22/02/2008 - 16:02
विजुभाऊ...च्यामारी, एकदम खल्लास आयडिया ! एकदम आवडली. आमचे उद्योग (टवाळक्या): १.ऑफ तासाला जमेल तेव्हढ॑ अन् जमेल त्या शिक्षका॑च्या नकला करण॑ २.तळमजल्यावर आमचा वर्ग असताना तब्बल ३ महिन्या॑च्या परिश्रमा॑न॑तर "हॅक-सॉ" ब्लेडने खिडकीचा गज कापण्यात आलेल॑ यश, आणि तो गज हळूच काढून वर्गातून पळून जाणे. (लवकर घरी जायच॑ असेल तर इतर वर्गातली मुल॑पण आमच्याकडे यायची आणि आमचा एक गृहपाठ करून देण्याच्या बोलीवर हा "खुष्कीचा मार्ग" वापरायची) ३.बे॑चच्या फटीत ब्लेड अडकवून "चावणार्‍या" गुर्जी॑च्या तासाला ते वाजवण॑ (केल्याशिवाय कळायच॑ नाही देवा, काय मजा येते) ४. स्वच्छतागृहात कोपर्‍यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! ) ५. प्राण्या॑ना घाबरणार्‍या शिक्षका॑च्या तासाला त्या॑च्या टेबलावर सरडा / सापसुरळी / मा॑जराचे पिल्लू / वर्गात नेमबाजीच्या स्पर्धेत कर्कटक फेकून मारलेली पाल इ.इ. आणून ठेवणे. ६.मारकुटे मास्तर टेबलावर जिथे नेहमी हात ठेऊन शिकवतात तिथे अगदी "वस्त्रगाळ" खाजखुयलीची पूड टाकणे.. हुश्श.. एव्हढ्यावरच था॑बतो नाहीतर मिपावाले मला हाकलून देतील 'असल॑ नतद्रष्ट कार्ट इथे नको' म्हणून :) (हे प्रकार अत्य॑त निष्णात टवाळा॑नी केले असून त्यामागे कित्येक वर्षा॑ची मेहनत असते. कृपया अनुकरण करण्याच्या फ॑दात पडू नये, होणार्‍या परिणामा॑स आम्ही जबाबदार नाही.) आपला 'णम्र' - टवाळ ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

sagarparadkar 21/05/2010 - 17:22
समस्त 'नूमविय' कोठे गेले ? 'भावे स्कूल' चा 'हल्ला' होतोय, चला चला, पटापट प्रकट व्हा येथे ... आपल्याकडे तर कित्येक 'नररत्न' होती ... गके, सहस्रबुद्धे (लाथा घालून मोकळा करीन ), पोरे, श्रोत्रिय ( ट्ठो sss), 'झिन्झाथ्रोपस' (हे रत्न गळाले बहुतेक), देखणे ... लेट द शो बिगिन ....

In reply to by एक

पितळे सर्(काळागेंडा), दांडेकार बाई(सिलिंडर), पी.के.कुलकर्णी(पिक्या) हे होते का तुम्हाला? पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

एक 06/03/2008 - 00:52
काळा गेंडा, सिलिंडर, पिक्या आम्हाला होते.. आम्हाला ३ वर्षे मराठी शिकवायला बुट्टी लेडी (श्री. वा.) होते. पण जोक्स अपार्ट अतिशय सुरेख शिक्षक होते ते.. त्यांच्यामुळेच माझं मराठी वाचन वाढलं. संस्कृत ला चंबू .(खरं नाव विसरलो.. बहुतेक कुलकर्णी) होत्या. आणि मुख्याध्यापक "कि. भा. बळी" (ज्याचा लाँग फॉर्म .. किड* भाड** बळी असा होता.) कुठली बॅच तुझी? मी १९९२ ला १०वी पास आउट.

In reply to by एक

नंतर मी विमलाबाई गरवारे शाळेत गेलो. १० वी पास मी १९९९ साली झालो. बळी सराना मी पाचवीला असताना ज्यु. कॉलेजच्या मुलांनी शाळेत बेदम मारुन मुतारीत नेऊन टाकले होते. ६ वी च्या वेळेला शाळेत गोसावी सर होते मुख्याध्यापक. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

एक 06/03/2008 - 02:50
म्हणजे आमच्या नंतरची पिढी फारच पुढे गेली होती तर.. आम्ही फक्त त्यांना प्रयोगशाळेत कोंडलं होतं ;-( (सभ्य ठिकाणी लिहितो आहे म्हणून "ते त्यांना" असं म्हणतो आहे.. नाहीतर.. किड* भाड** बळ्याच..) बाय द वे, मी असं ऐकलं होतं कि तो आधी बारामती च्या शाळेत होता तिथल्या पोरांनी त्याला झाडावरून खाली टाकला होता.

In reply to by एक

धमाल मुलगा 10/03/2008 - 15:04
आम्हाला पण होता बारामतीमध्ये. एक्या तुझी माहिती बरोबर आहे. एक न॑बरच॑ खत्रुड होत॑ बेण॑....मग लै मारला त्याला. मी वैयक्तिकरित्या देखील त्याला जबरा छळला होता. मला ९वीत असताना कॉपी केली म्हणून पकडल॑..आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही! त्या॑च॑ आणि आमच्या तिर्थरुपा॑च॑ एकदम कॅपिटल ३६...मग काय, आम्ही केला त्याचाच इश्यू...जे बो॑ब ठोकली, मी वैयक्तिक द्वेषाचा बळी....होपलेस आहे बळी!!! पोर॑ पार पेटवली... वर घरी जाऊन आबा॑ना सा॑गितल॑ (तिखट-मीठ लाऊन) आबा डायरेक्ट खू॑खार झाले...दुसर्‍या दिवशी शाळेत आबा॑नी बळ्याला जे झाडला, स॑स्थेच्या अध्यक्षा॑कडेच चाललो आत्ताच्या आत्ता म्हणाले.... बळ्या गारगार!!!!!! पुढ॑ वर्षभर मला काहीच बोलला नाही. पण ईतरा॑ना फार त्रास द्यायचा. असो, समद्वेषी भेटल्याचा आन॑द झाला. आपला -म.ए.सो.चा सह अध्यायी ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

एक 19/04/2008 - 02:06
"आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही!..." हॅ ही काय कॉपी झाली.. कॉपी क्वालिफिकेशन साठी कमीतकमी पुस्तकाच पान सापडलं पाहिजे.. मला वाटलचं होतं तू म. ए. सो. चाच निघणार..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बरखा 24/12/2013 - 12:40
मुख्याध्यापक (विमलाबाई गरवारे) मला ते मुख्याध्यापक नक्की कोण हे नीटसे आठवत नाही. परन्तु भाषणाच्या वेळेला त्यान्चे एक ठरलेले वाक्य आठवते " माझ्या चिमण्या फुलपाखरानो" ह्या वाक्य शिवाय त्यान्चे भषण पुर्ण होतच न्हवते. हे वाक्य येताच ८, ९, १० ची मुल ईतकी हसायची कि बस्स्स्स.... , फुलपाखरु ह्या शब्दावरुन लगेचच मागुन मुलान्ची कुजबुज सुरु व्हायची. कुणाला आठ्वत असेल तर अजुन गमती सान्गा.

चंबा मुतनाळ 22/02/2008 - 14:08
रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही. आयला, मला हि आयडीया सॉल्लिड आवडली. निदान त्या साठीतरी परत शाळेत जाऊन बसायला आवडेल!

शाळेत आमचा Outstanding Performance होता. कारण ८ पैकी किमान ३-४ तास तरी आम्ही वर्गाबाहेर Standing Out असायचो. आठवी नववीत तर शिक्शक फळ्यावरती लिहित असताना पाठीमागून कुणाचाही आवाज आला तरी जास्ती चौकशी न करता आम्हा ठरावीक ३-४ मुलाना नियमीतपणे वर्गाबाहेर काढीत असत. नन्तर नन्तर तर आम्हाला वर्गाबाहेर जायची इतकी सवय झालेली की, शिक्शकानी "कोण आवाज करतय?" अस नुसत विचारला तरिही आम्ही ३-४ जण चुप-चाप मान खाली घालून वर्गाबाहेर जाऊन उभे रहात असू. :) -ओम फट स्वाहा तात्या विन्चू

मनस्वी 22/02/2008 - 15:24
आमचा ग्रूप आणि दुसर्‍या वर्गातील अजून मैत्रिणी अशा १५-२० जणी मिळून आम्ही शाळा सुटल्यावर बास्केटबॉलच्या ग्राउंडवर विषामृत किंवा जोडीसाखळी खेळत असू. असेच एकदा आम्ही ग्राउंडवर जमलो. पण दुसर्‍या वर्गातल्या मैत्रिणी काही आल्या नाहीत. त्यांच्या इंग्रजीच्या (करकरे) बाई एक्स्ट्रॉ तास घेत होत्या. (करकरे बाई एकदम कडक. एंग्रजीतला "t" जर "+" असा काढला तर १/२ मार्क कट! ) तर आमची हरहुन्नरी जया त्या वर्गाच्या खिडकीवर उभी राहून आमच्या त्या वर्गातल्या मैत्रिणींना हळूचकन हाक मारायला लागली. आणि ते करकरे बाईंनी पाहिलं! झालं! जयाला बाईंनी वर्गात बोलावलं आणि काय करत होतीस विचारलं. जयानी सांगितलं घाबरत घाबरत ही मी अमूक अमूकला बाहेर बोलावत होते. बाकीच्या मुली फिदीफिदी हसत होत्या म्हणून बाईंना आणखीनच राग आला. जयाच्या तोंडावर मात्र १२ वाजले होते. बाईंनी जयाला तास होईपर्यंत वर्गात भिंतीकडे तोंड करून उभे केले. तास होईपर्यंत जयाचा रुमाल पूर्ण ओला झाला होता. तेव्हा जयाची टरकली होती. पण नंतर आम्ही हा प्रसंग आठवून खूप हसत असू. तेव्हा पण जयाचा चेहेरा बघण्यासारखा होई. (जयाच्या आठवणीत रमलेली) मनस्वी, १०वी ब

४. स्वच्छतागृहात कोपर्‍यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! ) याला आम्ही टाईम बॉम्ब म्हणत असू. पुण्याचे पेशवे

चतुरंग 22/02/2008 - 21:32
फळ्याला तेल लावून ठेवले आणि वर्तमानपत्राच्या तुकड्यांनी पुसून घेतले. मग काय 'चकचकीत' फळ्यावर खडू उमटेना आणि वर्गात आमची हसू दाबता-दाबता भंबेरी, पार डोळ्यातून पाण्याच्या धारा! मास्तर वैतागले, एका घरभेद्याने नावे सांगितली - उलट्या मुठीवर डस्टरने जाम मार पडला (साला, काय त्यावेळी मारायचे ना? आता पोरांना मास्तरही हात लावत नाही आणि आई-बापही नाही, सगळी मजा संपली!;) 'सूर्याजी पिसाळ' कोण हे समजताच त्याची आम्ही सर्वांनी अशी धुलाई केली की बास! यथासावकाश फळ्याला नवीन काळा रंग द्यावा लागला. -------------------------------------------------------------- बोअर तासाला डस्टर गायब करणे हा तर आमचा नित्याचा प्रकार असे. मग मास्तर किंवा बाई डस्टर शोधायला लागल्या की आपण तयारीत - "अरे, कोणीतरी कॉमनरुम मधून डस्टर घेऊन या रे", हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत आम्ही वर्गाबाहेर - कारण चक्क तासाला वर्गाबाहेर पडून शाळेत भटकायला मिळण्याची मजा काही औरच. मग इतर वर्गापाशी उभे राहून खिडकीतून कोणाला तरी उचकव त्याला बोलणी बसायला लागली की तिथून पळून जा, असे करत करत निम्मा तास संपल्यावर आम्ही वर्गात डस्टर घेऊन हजर. तो पर्यंत वर्गातच लपवलेले आधीचे डस्टर सापडलेले नसले तर मग हातानेच थोडा फळा पुसून शिकवणे चालू झालेले असे. मग मानभावी पणाने स्वतः पुढे होऊन उरलेला फळा वैगेरे स्वच्छ करुन देणार! (बोलणी खायला नकोत!) -------------------------------------------------------------- पहिली ते चौथी आम्ही ज्या शाळेत होतो तिथे वर्गात बसण्याची व्यवस्था म्हणजे जाड मोठ्याच्यामोठ्या सतरंज्या असत. अगदी १२ फूट बाय १२ फूट वैगेरे असतील. मधल्या सुट्टीतला आमचा एक खेळ म्हणजे रोज कोणातरी एका-दोघांना सतरंजीत गुंडाळणे व कोपर्‍यात नेऊन त्यावर इतर सर्वांनी ढीग रचणे. तो झाला की मग दुसरा. आता ते आठवून असे वाटते की कोणाचेही हातपाय मोडणे, मूल गुदमरणे वैगेरे प्रकार तेव्हा झाले कसे नाहीत? आणि आम्हाला हे करु नका अन् ते करु नका असंही कोणी सांगितले नाही! ------------------------------------------------------------- तेव्हाचीच आणखी एक मजा म्हणजे लाकडी पट्यांची मारामारी. आमच्या शाळेत फळ्यावर खडूने रेघा मारण्यासाठी चार्-साडेचार फुटी लाकडी पट्ट्या ठेवलेल्या असत. दोन वर्गांच्या मधे दुमडले जाणारे लाकडी पार्टिशन होते. सुट्टीच्या आधीच्या तासाला आमची पट्ट्यांची जमवाजमवी सुरु असे आणी वर्गाच्या मागे जाऊन बसणे. पलीकडच्या वर्गात हेच सुरु असे. सुट्टी झाली रे झाली आणि शिक्षक बाहेर पडले की पार्टिशन ढकलून "हर, हर, महादेव" असे ओरडत एकमेकांच्या आंगावर पट्ट्या घेऊन आम्ही तुटून पडत असू. जाम दे दणादण मारामारी. कित्येक वेळा हातावर-बोटांवर फटके बसून सूज येई. पण आम्ही कोणी एकमेकांविरुध्द तक्रारी वैगेरे केलेल्या आठवत नाहीत. शिवाय शाळा सुटली की पुन्हा गळ्यात गळे घालून रमतगमत घरी. ते सगळं तेवढ्यापुरतं असे. ------------------------------------------------------------- चतुरंग

आमच्या शाळेत फळ्याला तेल वगैरे लावण्यापेक्षा आईने डोक्यावर थापलेले तेल पोरं फळ्यावर डोके घासून उतरवत. मग शाळेने हिरव्या रंगचे काचेचे फळे आणले. मग मुले त्यावर ओल्या खडूने लिहून ठेवत. ओल्या खडूने लिहिले की ते पुसायला मास्तरना फार कष्ट पडत. तासाची पहिली ५-१० मिनीटे तशीच निघून जात. :) :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चतुरंग 22/02/2008 - 22:22
पण त्यामधे डोक्याला खडूची भुकटी लागून पोरं पिठाच्या गिरणीतून आल्यासारखी दिसत आणि चावटपणा पकडला जाई - त्यामुळे ही नवीन शक्कल लढवावी लागली! :) (आपल्या कामात सतत सुधारणा करा! - हा आजचा कॉर्पोरेट मूलमंत्र आम्ही किती पूर्वीच अमलात आणला होता पहा! द्रष्टेच आम्ही!!::)) चतुरंग

मी १०वी ला होते तेव्हाची गोष्ट .वर्गात शेवटचा तास अर्थशास्त्राचा होता. आमचे सर पहिले ३० मि. वाचून दाखवायचे आणि म्हणायचे आता तुम्ही वाचा.म्हणजे पहिल्या बाकावरच्या मुलाने उठून वाचायला सुरवात करायची. प्रत्येकाने १० ओळी वाचायच्या असे करत करत शेवटपर्यंत वाचायचे. तो पर्यंत हे सर समोरच्या टेबलावर हाताची घडी करून मस्त घोरत असायचे. एक दिवस एक मुलगा वाचत होता. बहुतेक त्याचा आवाज मोठा होता त्यामुळे कि काय? एकदम सर जागे झाले आणि त्याच्या मुस्काटात मारली. त्याला ५ मिनिटे कळलेच नाही ......का मारले? बहुतेक सरांची झोपमोड झाली असेल असा आम्ही तर्क लढवत घरी गेलो.

In reply to by स्वाती राजेश

चतुरंग 22/02/2008 - 22:30
अहो आम्ही सहावीत असताना आम्हाला मराठीचे एक मास्तर होते - आडनाव काळे बहुधा - शिकवायचे खूप छान. पण त्यांची एक खोड होती - कोणाचीही पाठ दिसली की ते जोरात धपका घालायचे - कारण माहीत नाही. त्यामुळे ते बेंचेस मधल्या रांगेतून मागे मागे जाऊ लागले की बेंचवर पुढे झुकून लिहिणारी वाअचणारी सर्व मुले मागे मागे वळत अंग ताठ करून बसत जेणेकरुन त्यांना पाठ दिसू नये! त्यामुळे पाच मिनिटेच काय पण सहावीचे संपूर्ण वर्ष आम्हाले ते का मारत होते ते कळलं नाही!! चतुरंग

एकदा आमच्या वर्गात कोणीतरी एक शोध लावला. चिंचोका खूप वेळ घासला की खूप गरम होतो. मग काय.... आयडिया तयार. आमच्या एक बाई होत्या. अतिविशाल महिला मंडळाच्या सभासद. त्यांच्यावर हा प्रयोग करायचा कट शिजला. आमच्या वर्गातून बाहेर जायला जो रस्ता होता, तो एक बाक एक्स्ट्रा टाकल्यामुळे जरा अडला गेला होता. तिथे हल्ला (ambush) करायचे ठरले. आणि ह्या कटात सगळा वर्ग सामिल झाला होता... (शिष्ट मुली सुद्धा). दरवाज्या जवळ जे २-३ बाक होते तिथली मुलं १५-२० मिनिटे तो चिंचोका घासत बसली होती. तास संपल्याची बेल झाली... बाई बाहेर जायला निघाल्या... त्या अरूंद जागी त्या थोड्या अडकत असत. तिथे १०-१२ मुलं आणि मुली त्यांच्या भोवती घोळका करून त्यांना काहीतरी विचारायला लागले. आणि..... त्या गर्दीत तो छान गरम झालेला चिंचोका कोणितरी बाईंच्या हाताला लावला. मग काय मंडळी... पुढे जे काही घडले त्याची आठवण आजही ताजी आहे. वर्गात सगळयांना आमच्या हेडमास्तरांनी मोजून १०-१० छड्या मारल्या होत्या. बिपिन.

कोंबडा करणे, अंगठे धरणे, खुर्ची करणे अशा काही सजा आम्हाला शाळेत असताना होत असत. कधी कधी वैयक्तिक कारणासाठी आणि काही काही वेळेला सार्वजनिक कारणासाठी. एकावेळेला एकापेक्षा अधिक मुले अंगठे धरुन उभी असतील किंवा कोंबडा करुन उभी असतीत तर एकमेकांना पार्श्वभागाने धक्के मारुन पाडायचा खेळ आम्ही मनमुराद खेळत असू. :) एकदा तर एका ढिगार्‍याने इतका जोरात धक्का मारला की बास ओळीने अंगठे धरुन उभे असलेले ५-७ पडले. बाईंना कळले की शिक्षा करुनही मुले काही दंगा करायची बंद झाली नाहीत. :):) मग सर्वाना मैदानावर अंगठे धरुन उभे केले होते. पण काय एन्जॉय केला तो दिवस आम्ही. :) स्टीलची फूटपट्टी बाकाच्या फटीत घालून वाजवण्याची मजा तर काही औरच. किंवा बाकाच्या वही ठेवायच्या फळीच्या खालच्या फळीवर डोके ठेऊन झोपायची मजा देखील काही औरच. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भाग्यश्री 24/02/2008 - 02:00
गाडगीळ सरांच्या किंवा पाचकुडवे सरांच्या शिक्षा सांग! :) माईकवरून यथेच्छ शिव्या न काय काय.. हे आमचे (विमलाबाई गरवारेचे) गाडगीळ सर कायम धोतर न सदरा या वेशात असत.. आणि अतिशय कडक आणि फाटक्या तोंडाचे.. पण, एकदा बँडच्या प्रॅक्टीसला रविवारी बोलवलं होतं, तेव्हा ते चक्क जिन्स न टीशर्ट घालून आले होते!! :) आम्ही इतके हसलो होतो!! बर्‍याच गमती जमती आहेत...

In reply to by भाग्यश्री

आम्ही तर गाडगीळ सराना शर्ट आणि पँट मधे पण पाहीले आहे. आणि तेव्हा पण आम्ही फार हसलो होतो. आणि ते जर कोणाला ओरडत असतील तर त्यांच्या आवडत्या शिव्या म्हणजे "बेवकूफ आहेस, मुसलमान आहेस" :):) तसेच आमच्या शाळेत शनिवारी शाळा भरायच्या आधी सभा (सर्वानी ग्राऊंडवर येऊन प्रार्थना म्हणायची) असायची . तेव्हा तर फार मजा यायची. गाडगीळ सर पुढे चौथर्‍यावर उभे राहून कोण कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवायचे आणि नंतर एकेकाचा पुढे बोलावून सत्कार करायचे. आमच्या शाळेतले पाचकुडवे सर रोज पितात अशी एक वदंता होती. आणि शनिवारी(इतर वेळेला शाळा दुपारी असे) सकाळी त्यांचे तारवटलेले डोळे बघून ते खरे पण वाटे. :) त्यांचे एक प्रसिध्द वाक्य "बेंच खाली घालून तुडवील". भूगोलाच्या कानडे सराना आम्ही 'गावठी बच्चन' म्हणत असू. ते दहावीला आम्हाला शिकवताना नेहेमी म्हणत असत की "मला बाहेर हाच विषय शिकवला तर तासाला १००० रु. मिळतील पण तुम्हाला शिकवायला म्हणून मी इकडे येतो."(किती थोर ते उपकार आमच्यावर!) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भाग्यश्री 05/03/2008 - 05:54
ते कानडे सर आणि भुगोल? आम्हाला ते ९वी ला मराठी ला होते. तसेही त्यांना काय येत होतं म्हणून ठेवले होते देवालाच माहीत. माझे सगळ्यात नावडते शिक्षक.. पाचकुडवे मला कधीच नव्हते, पण मोठ्या भावाकडून खूप किस्से ऐकले आहेत त्यांचे. सिरसीकर नावाच्या बाई इंग्लिश शिकवायच्या, खूप छान शिकवायच्या. पण कायम "ठीकेकीनै" असं वाक्य दर ५-१० वाक्यांनंतर ! :)) आमचं ते मोजण्याकडेच जास्त लक्ष.. ! ८वी ला सेमी ईंग्लिश सुरू झाले तेव्हा सायन्स शिकवायला लोखंडे मॅडम होत्या.. ( त्या आमच्या शाळेतल्या सगळया मुलांच्या अगदी "आवडत्या" मॅडम होत्या! :) ) त्यांचि शिकवण्याची पद्धत म्हणजे, आम्ही धड्यातले अवघड शब्द लिहून आणायचे, अर्थ न स्पेलींग सकट.. आणि नंतर तो धडा त्या वाचून दाखवणार! एकदा सगळ्यांनी लिहून आणले होते, पण मी एक पण लिहीला नव्हता.. मॅडमनी मला अगदी चिडून पुढे बोलवलं.. आणि म्हणाल्या सगळे शब्द येतायत का तुला.. ? सांग बरं, मिस्लेनिअस चा अर्थ आणि स्पेलिंग.. :) आणि मला तेव्हा जमलं होतं.. बाई म्हणाल्या बर बर ठिक आहे. जा जागेवर! मी एकदम भाव खात जागेवर येऊन बसले होते मग.. :D ( तेव्हा माझे बरे दिवस होते बहुतेक.. कारण त्या सहामाही का तिमाही ला सायन्स मधे मी पहीली आले होते! आयुष्यात मिळालेला पहीला न शेवटचा पहीला नंबर.. नंतर मी अभ्यास करणं सोडलं.. ) :D आमच्या शाळेत संध्याकाळी शाळा सुटल्यावर रोज प्रार्थना, पसायदान्,ओंकार्,विविध भाषेतील गाणी म्हणणे(उदा. मल्याळी,संस्कृत! ई..) असा कार्यक्रम व्हायचा. असं कुठल्या शाळेत होते की नाही माहीत नाही.. खूप मजा यायची.. खूप टीपी पण चालायचा आमचा.. मल्याळी वगैरे गाणी म्हणण्यामागचा उद्देश मला अजुन कळला नाहीय.. इजगान साठी यल्ल रे, ओ यम्मानिकु.. असं काहीतरी असंबद्ध गाणं होते ते! :) संस्कृत मात्र मस्त होतें.. कृत्वा नवदृढ संकल्पम, वितरन्तो नवसंदेशम वगैरे.. सर्वात शेवटी वंदे मातरम.. ते म्हणताना खूप छान वाटायचे .. शहारे यायचे इतक्या सगळ्या जणांच्या तोंडून ते ऐकताना.. !! असो.. जरा जास्तच भरकटले.. पण काय मस्त विषय आहे हा.. सगळं जुनं आठवलं !! धन्यवाद हा विषय चालू केल्याबद्दल.. :)

In reply to by भाग्यश्री

काय सांगू, किती प्रेमाने मारायच्या हो त्या! मी तर ८वी ला असताना माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कधीच अभ्यास करत नसे म्हणून रोज रोज मार खायचो लोखंडे बाईंचा. आणि स्पेलिंगसकट अर्थ तर मी कधीच लिहून आणले नव्हते. म्हणून तर रोज मार खायचो. :) :) इंग्रजीच्या राजलक्ष्मी पाटील बाई तर साक्षात कडकलक्ष्मी होत्या. मी २-३ वेळा सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे १०वी ला त्यानी आमच्या वर्गशिक्षिका झाल्यावर मला पहील्या बाकावर बसवले होते. :( पुण्याचे पेशवे

In reply to by भाग्यश्री

बरखा 24/12/2013 - 12:07
गाडगीळ सर पाचकुड्वे सर कानडे सर कडक्लक्ष्मी बाई ..... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. अजुन एक माझ्या आठ्वनितिल किस्सा, त्या वेळी मुलिना हस्तकलेचा तास असायचा गोल रिन्ग मधे कापड अडकवुन त्या वर रेशमी धाग्याने वेग वेगळे टाके घालणे आणि ते बरोबर जमलेत की नाही हे बाईना नेउन दाखवायचे असायचे. ज्या ज्या मुलीन्चे काम पुर्ण व्ह्यायचे त्या बाईन जवळ घोळ्का करुन उभ्या रहायच्या. मि हि एकदा त्या घोळ्क्यात नेमकी बाइच्या ( बहुदा जोशी नाव असाव) जवळ उभी होते, एका हातात रिन्ग धरलेली आणि दुस-या हातात सुई-धागा. कुणीतरी मागुन हळुच धक्का मारला त्याच क्षणि हातात धरलेली सुई बाईन्च्या दन्डाला टोचली..... मला हे समजताच घोळक्याचा फायदा घेउन मि पटकन मागे झाले. बाईना सुई जोरात टोचली होती. त्यानी आमच्या बाजुला वळुन बघे पर्यन्त मी मागे झाले होते. त्या मुळे नेमकी कोणाची सुई टोचली ते काही कळाले नाही. माझी सुटका तर झाली होती. पण त्या दिवसानन्तर बाई एक एक करुन आम्हाला पुढ बोलवु लागल्या. कानडे सरान्चा तर आम्हा खुप मुलिना राग अजुनही आहे. कारण.. वर्गात शिकवताना काही आचरट मुलिन्चि शिक्क्षा विनाकारन आम्हाला हि मिळली होती, ती साधि-सुधि शिक्षा नव्हती. चार मुलीन बरोबर आमच्या पुर्ण ओळिला सरानी नापास करण्याची शिक्षा केली. आम्हि ते मजा म्हणुन त्या कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा प्रगती पुस्तक हातात आले तेव्हा निकाल बघुन धक्का बसला, माझ्या बरोबर त्या ओळितिल सर्व मुली पण नापस झाल्या होत्या. ती माझी पहीली आणि शेवटची शिक्षा होती.

झकासराव 23/02/2008 - 09:52
जबरी आहेत एकेक किस्से. :) हा एक किस्सा अगदीच शाळेतला नाही पण मी कॉलेजात असताना पहिल्याच वर्षीचा. दिवाळीच्या सुट्टी नंतर कॉलेज सुरु झाले होते नुकतेच. एक लेक्चर ऑफ होत. मग बरेच पोर पोरी टवाळक्या करायला गेले होते. वर्गात २-४ पोर उरले होते. त्यात मी एक सज्जन (अजुन कालेजच वार लागल नव्हत हो) आणि २-३ टारगट पोर आणि २-४ सज्जन आणि शिष्ट मुली. तर माज म्हणा वळवळणारा किडा म्हणा किंवा अजुन काही म्हणा. एका पोराने एक सुतळी बाँब वर्गात लावला. आणि तो तिथुन बाहेर पडुन रिकाम्या पॅसेज मध्ये जावुन उभा राहिला. अर्थात हे वर्गात सगळ्याच उपस्थितानी पाहिले. एक मोठ्ठा आवाज मग काय बरेच जण येवुन पाहु लागले काय झाल म्हणुन. मग कॉलेजचा एक शिपाई आला. त्याने पाहिले तर त्याला अवशेषांवरुन तर कळालेच की कोणीतरी वर्गात फटाका फोडला. त्याने येवुन आधी मला विचारले मी बोललो माहित नाही. मी आताच आलो वर्गात. मग तो मुलींकडे वळाला. तर त्यानी उत्तर दिले की मुलांनी लावले. तो शिपाई गेला आणि आमच्या वर्गाच रजिस्टर घेवुन आला १० मिनटानी आणि म्हणाला ह्यात "मुलानी" ह्या आडनावाचा कोणीच नाहिये की. :) असल फिस्स्कन हसु आल होत मला ते ऐकुन. बाकी काही म्हणा. बाकीच्या कालेजापेक्षा इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :)

In reply to by झकासराव

स्वाती महेश 04/03/2008 - 09:07
इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :) का हो? तुमच्या त्या महामुर्ख शिपायाने त्याचा मुर्खपणा दाखवला तर पोरींची डोकी हटेलेच असतात होय? आणि तुम्हाला विचारले कुणी फटाका उडवला तर सांगताना तुमची फॅ फॅ झाली म्हणून दोष मुलिंना देताय होय..तेव्हा कुठं गेली तुमची मर्दानगी? मुलिंची डोकी तुम्हाला हटेली वाटतात म्हणजे तुम्ही जरा मतीमंदच वाटताय! जरा डोळे उघडून त्याच मुलींनी केलेली प्रगती पहा!

In reply to by स्वाती महेश

झकासराव 04/03/2008 - 10:46
माफ करा इतके दिवस इथे पाहिलेच नाही मी. मी फक्त मुलींची डोस्की हटेली असतात अस नाही लिहिलेल. पोरा पोरींची अस लिहिलय ते वाचा. आणि माझी फॅ फॅ उडली हे कशावरुन लिहिताय तुम्ही????/ माझ्याच वर्गातील मुलांची नाव मी का म्हणुन सांगेन?????? म्हणुन मी माहित नाही अस सांगितल होत अस लिहिलय मी. तुम्ही काहितरी एकांगी अर्थ घेवुन मला मतिमंद म्हणताय अस वाटल म्हणुन हे उत्तर लिहिलय मी. या उप्पर माझ्यावर काही आरोप केले तरी मी उत्तर लिहिनच अस नाही.

मराठी मेडियमच्या पोराच्या आठवणी वाचून वाटतंय, आपून सारे एकाच वर्गात होतो की काय ? :) गणिताच्या मास्तराने पावकीचा पाढा म्हणायला लावल्यावर ( सिलॅबसला नव्हता ) सांगता आला नाही, म्हणुन ठोकुन काढल्यावर,घरचा राग माझ्यावर काढला रे !!! या अविर्भावात दात काढणारे आम्ही !!! तेव्हापासून गणित आयुष्यातून जे निघून गेले ते आतापर्यंत....!!! दिलीप बिरुटे नाकात शिल्लक काही राहिले तर नाही ना !!! सतत चाचपून पाहणारा :) वर्ग ६ वी,तुकडी 'अ '

आम्ही सातवीत असताना मधल्या सुट्टीत क्रिकेट मॅच साठी घरी पळून गेलो आणखी एका मित्राबरोबर.... त्यच्याकडे छान मॅच पाहिली, दिवस्भर धमाल केली...घरी आलो, मला वाटत होते की शाळेत काही कळणार नाही...दुसर्‍या दिवशी सकाळी क्लासटीचर बाईंनी उभे केले , आणि माझ्याबरोबरच पळालेल्या मित्राने आजारी होतो अशी पालकांची चिठी आणली ( आमच्या काळात डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे लागत नसे)....मी अवाक्, खरंतर पकडले गेल्यावर काय योजना आखायची हे आमचे आदल्या दिवशी मुळीच ठरले नव्हते, पण त्याने शिताफीने चिठी आणली आणि वाचला...आणि मी छड्या काय खाल्ल्या, अंगठे धरून एक तास वर्गाबाहेर काय उभा राहिलो, मी अगदी शिक्षकांच्या जाण्या येण्याच्या वाटेत उभा होतो तोंड लपवत्..प्रत्येक शिक्षक येऊन विचारत असे, " का रे, आज ही वेळ आली का तुझ्यावर?"..मग सगळ्यांना नाईलाजाने सगळी गोष्ट सांगायला लागत असे...आत जाऊन मित्राला खूप शिव्या घातल्या, "चिठीचं मला का नाही सांगितलस? "म्हणत...( तो मित्र बर्‍याच वर्षांनी भेटला, त्याला ही आठवण होती... खूप हसलो ) ( एकट्यापेक्षा समूहशिक्षा एंजॉय करणारा)स. भडकमकर

संस्कृतला तांबे सर होते. त्यांना अण्णा म्हटले की भडकायचे. आठवीत वर्ग तळमजल्याला होता. कांही मुले त्यांच्या तासाला शाळेबाहेर जाऊन बाहेरच्या बाजूने खिडकीत येत व अण्णाअसे ओरडून पळून जात. खिडकीतील मुलगा मार खाई.

In reply to by सुधीर कांदळकर

धमाल मुलगा 25/02/2008 - 12:20
का॑दळकर शेठ, आमच्या शाळेत पण एक कुलकर्णी सर होते, त्या॑ना अण्णा म्हणाल॑ की भय॑कर राग यायचा..

मुल॑ असली भारी, ते शिकवत असले की "अण्णा" अशी जोरात हाक मारायचे आणि अण्णा पेटले की "कोणितरी खिडकीरून ओरडून पळाला" अस॑ आम्ही सा॑गायचो, त्या "कोणितरी" ला शोधण्यात उरलेला सगळा तास भुर्रर्र... :)

१०त असताना शाळेतल्या रात्र-अभ्यास वर्गाला गेलो होतो...च्यामारी एकदाच गेलो आणि कानाला खडा लावला.

कोणितरी मेन-स्विच ब॑द केला आणि त्यादिवशी (रात्री) कुलकर्णी सर होते, अ॑धार झाल्यावर पोरा॑नी शाळेच्या मधल्या चौकात येऊन अण्णा च्या नावाने जो काय हैदोस घातला..अगगगग !!! अण्णा॑नी दोन हातात दोन छड्या घेऊनअ॑धारातच मुरारबाजीच्या आवेशात जी काही तलवारबाजी केली...पार सगळी कार्टी फोडून काढली....त्यात जोडीला आई-माईवरून शिव्या...आपलीतर जाम टरकली..परत म्हणून गेलो नाही रात्र-अभ्यासवर्गाला.

किशोरी 25/02/2008 - 14:59

शाळेत असताना धमाल यायची,शाळा सुट्ल्यावर बाहेर येताना पुढच्याला ढकलायचे आनी मग माग्च्याला
'का ढकललस?' म्हणुन ओरडायचे मग पुढचा आपल्याला काहि म्हनत नाही,आनी मागच्याशीच भांडायला लागायचा
त्यातच भर म्हनुन जीन्यामधे पुढच्याच्या दप्तराची बटने खोलुन टाकायची मग पुस्तक खाली यायला
लागली की पुस्तक भरोस्तोवर जीन्यात ट्राफीक जाम,कधी कधी सॅक चे जे माघे लोंबनारे बेल्ट असतात ते
दोघांचे गुपचुप बांघुन टाकायचे मग ते सोडवन्यात अशी धांदल उडायची त्या मुलांची,आम्ही आपली ही सारी
काम करुन पटकन पुढे निघुन जायचो
एकदा वर्गामध्ये नवीन सर आले होते,नवीन अस्ल्यामुळे ते थोडेशे घाबरलेले आम्ही प्लास्टीकची कॅरी बॅग फुगवुन
ती फोडायचो 'फट्!' असा आवाज यायचा पन सरांना कळायचेच नाही की आवाज कुठुन येतो ते,१५ दिवस खूप्
त्रास दिला त्याना,गृहपाठ केला नसेल की वही नेहमी घरी असायची(आपन ऐवढे हुश्शार सगळ डोक्यात राहत मग वहीत
कशाला लिहायचे असा माझा समज)घरी पाठवलच तर जायचे आनी मस्त तास संपल्यावर परत,सरांनी विचारलच तर
घरी कुलुप आहे अशी थाप मारायची.खुप मस्ती केली शाळेत असताना

 

लेले 03/03/2008 - 10:59
मि चौथित असेल तेव्हा आम्हाला बाई॑नी ग्रूहपाठ करुन आणयला सा॑गितला होता...... आणि नेहमिप्रमाणे मि काहि केला नव्ह्ता...... न॑तरच्या तासाला मग बाई॑ना कोणितरी सा॑गितला कि मिएका मुलिला 'LOVE LETTER' लिहीला म्हणुन......... मग काय तेव्हा बाई काहि बोलल्या नाहि पण न॑तर जेव्हा ग्रुहपाठ विचारायला आल्या तेव्हा मला त्या॑नि खुप छड्या मारलेल्या... आणि त्या॑च वेळी त्या म्हणालेल्या....."कि तुम्हि मुला॑ना ग्रुहपाठ करायला वेळ नाहिए आणि इथे मुली॑ ना 'LOVE LETTER' लिहायला मात्र जमत॑य" पण खर॑च मि कोणालाच कोणतही 'LOVE LETTER' वगैरे काहिही लिहीला न व्हता. पण शाळा म्ह॑टली कि मला ..........

सर्किट 04/03/2008 - 09:11
चौथ्या वर्गात "प्रिया आज माझी नसे साथ द्याया" हे गाणे म्हटल्याने आमच्या बाईंचा खूप मार खाल्ला होता. असो. - सर्किट

विजुभाऊ 04/03/2008 - 12:42
आमचे उप शालाप्रमुख ( शाळेनंतर हा शब्द प्रथमच लिहीला) सबनीस सर्..त्याना का कोणास ठाउक सगळे शंभो असे म्हणत तसे म्हणताना एक्दा मी सापडालो.त्यानी मला वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे केले. येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम मला का उभे केले आहे असे विचारत. मी त्याना मी सबनीस सराना शंभो असे म्हणालो म्हणूनउभे केले आहे असे खरे सांगायाला लागलो. त्यावर येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम जाताना वर्गात पाहुन हसत जात राहीले... त्या प्रकाराला कंटाळून मला सबनीस सरानी वर्गात परत बोलावुन घेतले. आणि शि़क्षा संपविली

अनामिका 08/04/2008 - 18:50
कविता खुपच छान आहे. अगदी मनाला स्पर्श करणारी आणि पुन्हा मनाने शाळेत नेवुन बसवणारी. मला अजुन आठवतय अश्या काही कविता कुणी केल्या कि आम्ही त्या फळ्यावर लिहायचो. फळा लिहिणे एक मोठे कार्य असायचे पण मन लावुन (प्रसंगी वेळ काढुपणा करत केवळ तास बुडवायचा म्हणुन)ते करायचो आम्ही. शाळेच्या इमारतीच्या प्रत्येक कोपर्‍याशी काहि ना काहि आठवणी निगडीत आहेत. शाळा या विषयावर खुप काहि लिहिता येइल.लिहुन कढायचा मानस देखिल आहे . वेळ मिळाला की लिहिन. याच कवितेचा उर्वरित भाग "बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आता थोडा कळायला लागलाय, तो बरोबर आहे ना.. हे विचारयला... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय सौजन्य -ऑरकुट अनामिका

ॐकार 19/04/2008 - 08:57
पावसाळ्यात एकदा अर्थशास्त्राच्या तासाला (हल्ली तासिका वगैरे म्हणतात) आम्ही ४-५ कार्ट्यांनी मिळून तब्बल सव्वादोनशे होड्या बनवल्या होत्या. त्यासाठीचा कच्चा माल आधीच्या हस्तकलेच्या तासाला गोळा केला होता. चालू तासाला होड्या बनवणं मोठ कठीण! आम्ही आपले लाकडी बाकांच्या खणात हात घालून (आणि लक्ष फळ्याकडे देत) होड्या बनवत बसलो होतो. --- वक्तृत्वस्पर्धेला मी आणि माझा मित्र गूळ खात होतो. हॉल मध्ये खाली बसून जाम कंटाळा आला होता. भाषणं तीच ती. आम्हाला जमिनीवर एक डोंगळा दिसला. तासभर आम्ही त्या डोंगळ्याने गूळ खावा म्हणून त्याला सारखं गुळाच्या खड्याजवळ ढकलत , खेळवत होतो. शेवटी पी.टी. च्या सरांनी आम्हाला उचलला आणि बुकलला. --- एका बाईंना ( हल्ली मिस् म्हणतात) धडे वाचताना बाकड्यांच्या कडांना टेकून आणि रांगांमधून फिरत फिरत वाचायची सवय होती. आम्ही सगळ्या कडा डस्टर ने रंगवत असू. त्या बाईंना आपोआप काठ पदर पांढरा स्वच्छ होऊन मिळत असे. --- आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्‍या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही. --- माझा एक मित्र - त्याला चित्रकलेचा प्रचंड वैताग! त्याचा मोठा भाऊही आमच्याच शाळेत, ३ वर्षांचं अंतर. चित्रकलेला एकच बाई, सॉरी मिस् होत्या! त्यांचा आणि ह्या दोघा भावांचा नेहमीच 'सुसंवाद' चालत असे. एकदा वैतागून त्या माझ्या मित्राला म्हणाल्या होत्या - " तू आणि तुझा भाऊ! किती फरक आहे. तुला चित्रकलेच्या तासाला दरवेळेस बर्गाबाहेर काधावं लागतं. तुझा भाऊ स्वतःहून वर्गाच्या बाहेर जातो." ह्यानंतर अख्खा वर्ग ५-७ मि. हसत होता. --- एकदा पी.टी. चे सर आणि इतिहासाच्या बाईंनी शिवाजी - जिजाऊ चा प्रसंग-संवाद त्यांच्या आवाजत ध्वनिमुद्रित केले होते. ते ऐकवायला ते वर्गात टेपरेकॉर्डर/प्लेअर घेऊन आले. पण कॅसेट वाजायच्या ऐवजी ए एम चालू झालं आणि त्यावर "चढ गया उपर रे.. गुटर गुटर" हे गाणं वाजू लागलं. त्यांचे लांब झालेले चेहरे आणि पोरांचं खिदळणं अजूनही लक्षात आहे.

In reply to by ॐकार

नंदन 19/04/2008 - 11:39
आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्‍या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही. -- हेच. आठवी-नववीत याची भयंकर क्रेझ होती :) दुसरी टूम होती ती पेन-फायटिंगची. रेनॉल्ड्सची बॉलपेन्स घेऊन टिचकीने बेन्चवर असलेलं दुसर्‍याचं पेन पाडण्याचा हा खेळ शिक्षकांचा डोळा चुकवून खेळताना धमाल यायची.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सुबक ठेंगणी 21/05/2010 - 03:47
पेन फाईटसाठी मुद्दाम जड जड पेनं विकत घ्यायची, एनफाईट खेळताना ती निरागसपणे "बरोब्बर" एखाद्या बाकाच्या खाली घालायची, मग जाऊन घेऊन यायची...लई मजा केली. :)

मदनबाण 19/04/2008 - 09:59
शाळेत कारागीर पोरांची काही कमतरता नसते,,,,,बाकड्यावर करटकाने विविध आकाराचे खड्डे पाडायचे कशासाठी तर--बॉलबेअरिंग चा खेळ खेळण्यासाठी, आमच्यावेळी रामानदं सागरची अलिफ-लैला नावाची मालिका बर्‍याच पोरांना आवडायची,,,विशेष म्हणजे त्यातील नायका जवळ असलेली तलवारे सुलेमानी..... मग काय प्रत्येक बाकड्यावर त्या तलवारीची प्रतीमा करकटकाने खोदुन तयार.....(अगदी त्यावरील नक्षी सकट.) वर्गातील विशेष उध्योगः-- कागदाचे विमान तयार करायचे त्याचे टोक तोंडाने चाव चाव चावायचे आणि वर्गाच्या छतावर फेकुन मारायचे.....वर्गभर छताला चिकटलेली विमाने..... माझ्या वर्गातल्या बारी नावाच्या मुलाला तर मी मजबुत बुकलुन काढल्याचे मला स्मरते.....(मग माझ्या पालकांना घेऊन यावे असे फर्मान शाळेने काढले होते.....) (सावरकर प्रेम बहुधा माझ्या रक्तातच असाव....:))))) ) (ठाण्याच्या मो.ह.विध्यालयातील खट्याळ पोरगा) मदनबाण

ह्या धकाधकीच्या जीवनात तुझ्या कवितेने, पुर्ण बालपण नजरेसमोरुन गेले, मी तर हे हि विसरलेली शाळेत माझ नाव स्वप्ना होत, माझी आठ् वण मला पड्लेले गणितात मार्क दहावीला असताना फक्त दिड मार्क, मग काय आमचा आणि गणिताचा ३६ चा आकडा, त्या सरांशीसुद्धा ३६ चा आकडा, नेहमिच वाकड, सरांनी सर्वांसमोर जी तारिफ केली वीचारता सोय नाही, ९४ ला आमच्या वर्गात ९४ च मुले एकत्र, तेच नेमके क्लास टिचर , त्यांचि ईच्छा ९४ सालात १०० % रिझल्ट लावायचा पण होता, रीझल्ट १००% च लागला, पण ९३ मुल पास झाले, कारण आमच्यातील एक तारा प्रकाशित होण्याआधिच निखळुन गेला प्रविण देसले हुशार, स्मार्ट, शांत, नेहंमीच सर्वांना मदत करणारा, तो सुद्धा आमच्या सेन्ड - ऑफच्या दिवशी , कॅन्सर झाला होता त्याला,तेव्हा मनात एक विचार येउन गेला आयुष्यात कॅन्सरच्या रोगा विरुध्द लढा द्यायचा, ठरवुन नाही, पण योगायोगाने आयुष्यात्,नर्स बनण्याचा योग आला, आणी पहील्या दिवसापासुन नोकरी लागल्यापासुन ते आजतागायत कॅन्सर युनिट मध्येच काम करतेय, फार फार् आभार देवाचे ज्याने मल एवढी चांगली सन्धी दिली

धमाल मुलगा 20/05/2010 - 21:58
आपली सदस्यसंख्या एवढी प्रचंड आणि शाळेत दंगा केलेले आम्ही फक्त एव्हढेच? च्छ्या:! कलीयुग संपुन सत्ययुगाला सुरुवात झाली की काय? :D

In reply to by धमाल मुलगा

ओ धमाल राव आम्ही आहोत की.. एकेकाच्या आठवणी वाचुन मनसोक्त हसलो.. साला शाळेच्या आठवणी निघाल्यावर माणुस हळवा होतोच. एवढे सगळ्यांनी लिहीले. आहो धोतर घालुन येणार्‍या मास्तरांच्या पाठीमागे शाईपेनाच्या तलवारी तुम्ही चालवत नव्हता का??? पकडले गेल्यास मार हमखास... आठवीतला एक प्रसंग... असाच एक ऑफ पिरेड कोणीच मास्तर फिरकले नव्हते आणि खेळायला मैदानात सोडले पण नव्हते. सगळ्यांनी शांत बसुन राहयचे आणि तो मॉनिटर नाव लिहुन घेत होता.. सगळे शांत चालु होते तेवढ्यात माझ्या बाजुला बसलेल्या प्रसादला खुसफुसायची हुक्की आली... तो माझ्या कानात बोलायला लागला तेवढ्यात मॉनिटरने आम्हाला पाहिले आणि आमचे नाव लिहुन घेतले. पाच एक मिनिटाने वर्गात फिरताना आमचा मॉनिटर पडला... झाले सर्व वर्ग हसुन हसुन बेजार.. तेवढ्यात शेजारच्या वर्गातले एक सर आले ते मारकुटे म्हणुन आधिच फेमस होते. त्यांनी मॉनिटरला विचारले "कोण गोंधळ घालत होते???" मॉनिटरने आमचे नाव सांगीतले... झाले आम्हाला समोर बोलवुन दोन दोन कानाखाली देण्यात आल्या... मग सर आम्हाला त्यांचा वर्गात घेउन गेले. आणि भरपुर शिव्या घालणे चालुच होते. शेवटी ते फळ्याकडे वळले... त्यांनी एक गणित तिकडे लिहिले होते. त्याकडे पाहुन परत तोंडाचा पट्टा सुरु झाला... हे गणित सोडवता येतच नसणार.. बाईंनी शिकवले नाही तर पुढचे आपण स्वःता करुन बघावे वैगेरे वैगरे... आम्ही आपले खाली मान घालुन उभे. एक खडुची मिसाईल आमच्या कडे आली आणि पुढच्या क्षणी मला ते गणित सोडवायला सांगीतले. गणित सोडवायला खडु हातात घेउन मी गणित सोडवायला लागलो तरी ह्यांची बडबड सुरुच होती "हा काय सोडवणार???" "ह्यांना नुसता दंगा करायला पाहिजे " मधेच पोर हसायला लागली तेव्हा त्यांनी पाहिले मी गणित सोडवुन खडुचे हात झटकत होतो... एकदम स्टाईल मधे.. सरांचा पारा भडकला जाम धुतले पुढे मला... त्याचा पुढे संरांनी चार वेळा एकच प्रश्न विचारला "एवढे गणित येते तर मग गोंधळ कश्याला करत होता???" मग माझ्यातही टिळक कुठुन संचारले माहीत नाही... "सर मी गोंधळ करत नव्हतो मी फक्त एकदाच ह्याचाशी बोललो तेव्हा मॉनिटरने माझे नाव लिहुन घेतले" परत दोन कानाखाली... शेवटी मॉनिटरला बोलावले खरे खोटे तपासण्यासाठी... खरे कळ्यालावर मॉनिटरला वाकवुन पाठीवर जाम गुंद्दे घातले... शेवटी कसाबसा तास संपला.... आणि आम्ही सुटलो.. त्या मॉनिटरने परत कधी नाव लिहिले नाही राव माझे... असे बरेच कीस्से आहेत .. मी एकुण सात वेळा शाळा बदलली आहे.. नवीन गाव नवीन शाळा नवीन मित्र मजा असते राव.. ;) (७ शाळांचा माजी विद्यार्थी)निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

धमाल मुलगा 21/05/2010 - 03:01
असल्या गुर्जीला आमी बरोब्बर खोड्यात पकडायचो... डायरेक सहीची निवेदनं मुख्याध्यापकाच्या टेबलावर.. वर निवेदनात शब्दपण भारी.. "अन्याय..आपपरभाव..जातीयवाद..गावात वट नसलेल्या पालकांच्या मुलांवर जबरदस्ती" खंप्लीट विलेक्षानच्या टैमाचं राजकारण. दुसर्‍या दिवशी मास्तरनं निस्तं खुन्नस देऊ देऊ बघतच बसलं पायजे..आणि आपण त्याच्यापुढुन २२ इंची छाती ४२ इंची करुन फुगवुन तोर्‍यात चालायचं... असो.. एके काळी केलेला संप, पाठ्यपुस्तकाचं केलेल कॉमिक्स हे टाकतोच सवडीनं. :)

मस्त कलंदर 20/05/2010 - 23:24
आमच्या कन्या शाळेत एक जोशी आडनावाचे प्रचंड मारकुटे मास्तर होते.. ते म्हणजे एकदम धम्माल होती.. त्यांनी शेंडी राखली होती, आणि म्हणून ते टोपी घालायचे. कधी कधी ती शेंडी बाहेर डोकावे मग आम्हीही खुसुखुसु हसायचो.. हातात नेहमी पोहोची घालायचे.. बोलताना नेहमी तिच्याशी खेळायचे. स्वभावाने अतिशय कडक होते. मुली त्यांच्यासमोर जायला जाम घाबरायच्या.. एकदा ऑफ पिरियड्ला मी त्यांच्याच स्टाईलमध्ये टेबलावर जाऊन बसले. त्यांच्यासारखेच न थांबता एका दमात काहीतरी व्याख्या म्हणून दाखवत होते. नि मी ते शेंडी बाहेर येऊ नये म्हणून टोपी मागून सरकवत तशीच सरकवून त्यांचा टिपिकल शब्द "ध्यान द्या" म्हणायला नि तेच दारात दत्त म्हणून उभे रहायला गाठ पडली. आतापर्यंत खिदळणार्‍या कार्ट्या गप्प का म्हणून मागे पाहिले, तर लालबुंद डोळ्यांचे जोशी मास्तर समोर!!!!! मी... एकदम नि:शब्द!!!! तोवर तेच म्हणाले, "काय नाटकं लावली आहेस गं मके??? चल पळ जागेवर" हुश्श!!! मी जोरात धूम ठोकली. (त्याचाही खरंतर उपयोग नव्हता.. कारण अस्मादिकांना उंचीप्रमाणे नेहमीच प्रथम बाकावर बसण्याचा मान होता ) अजूनही बरेच किस्से आहेत.. पण टंकाळा आलाय म्हणून इथेच थांबते!! :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

भारद्वाज 21/05/2010 - 09:40
आह ....लै भारी टॉपिक आलाय भो........ शाळेत तसा मी हुशार, सभ्य, शांत म्हणूनच प्रसिद्ध होतो. पण संधी आली की मस्ती सुचायची. मारामारी हा प्रकार मात्र नाही केला कधी. *इयत्ता ६ वी 'अ': मराठीला खिलारे सर होते. गृहपाठ झाला का ते तपासत बसले होते. सगळ्यांनी वह्या तयार ठेवल्या. मी मात्र सपशेल विसरलो होतो गृहपाठ करायला. सर मुलींच्या वह्या तपासत होते. मुलांचा नं. सुरू होईपर्यंत उरकुन टाकू म्हटले आणि घात झाला. त्यांनी मधेच मुलांच्या वह्या घेतल्या.....खल्ल्ल्ल्ल्ल्लास. बेदम मार खाल्ला त्यादिवशी. *इयत्ता ७ वी 'अ': बेंचवर पेन-फाईट खेळणे हा त्यावेळी वर्गातला जगप्रसिद्ध खेळ होता !!! यात एकमेकांच्या पेनला क्रॅक पडायचे. दर दोन दिवसांनंतर नवीन पेन विकत घ्यावा लागे. Rotomac च्या पेनने खुप दिवस साथ दिली होती. मुलींची मॉनिटर जाम नाटकं करायची. आम्ही खेळायला लागलो की स्टाफरूममधे जावून कोणालाही तासावर बोलवायची. मात्र या गेमची पण खासियत होती. दुसर्‍याचा पेन पाडताना आपल्या पेनने त्याला इतक्या जोरात शॉट मारायचा की तो पेन बाजूच्याच लाईनीत आवडत्या मुलीच्या बेंचखाली पडला पाहिजे. तेवढाच बोलण्याचा चान्स !!! सिद्धेश कामतेकरचा पोपटः या सिद्धेशने घरी पोपट पाळला होता. एकदा शाळा भरल्यावर तो वर्गात म्हणाला, "अरे यार, आज माझा पोपट उडाला रे" या अनपेक्षित वाक्याने आमची ह.ह.पु.वा. झाली. त्याला समजलंच नाही. तो तसाच पुढे म्हणत राहिला,"पिंजर्‍याचं दार उघडंच राहिलं माझ्याकडनं !!!" शाळा सुटेपर्यंत जाम ह.ह.पु.वा. झाली होती. =)) वडलांच्या नावावरून चिडवायची (बेकार)पद्धत आमच्याकडेही होती. त्या कॅटेगरीत 'शिबू' हे नाव जाम फेमस. पुढे या शिबूचं 'शडंबो' झालं (एका शनिवारी टी.व्ही.वर मिस्टर इंडिया लागला आणि मोगँबो चं यमक म्हणून शडंबो) *इयत्ता १० वी 'अ': आजारी पडलेल्या /(मुद्दामून) पडलेल्या मित्राला घरी सोडून यायची ट्रीक सुरू केली. एकदा स्वप्नील नावाचा मित्र कंटाळा आला म्हणून आजारी पडला. मधल्या सुट्टीत जितू स्वतःच्या वहीचा कागद फाडून स्वतः अर्ज लिहून वानखेडे टिचरांची सही घेऊन आला. गेटवर स्वप्नील ला सोडायला १०-१२ जणांचा घोळका. यात जितू सगळ्यांना मागे लोटतोय. मी डाव साधून स्वप्नीलची बॅग माझ्या हातात घेऊन स्वप्नीलच्याही आधी गेटच्या बाहेर !!! वॉचमनकाकाने बाकी सगळ्यांना परत वर्गाकडे पिटाळले. आईशप्पथ......जितूचे तोंड बघण्यासारखे झाले होते. आम्ही दोघं मग सायकलवर अख्खी सी.बी.डी. पालथी घालून आलो. त्याला घरी सोडून २ तासांनी वर्गात पोहोचलो. जितू धुमसतच होता.... :D इंग्लिशच्या वानखेडे टिचर आपल्या सर्वांत सर्वांत आवडत्या. काही शिक्षक व टोपणनावे: बीजगणिताच्या पाटील टिचर - कोकीजी कार्यानुभवच्या कासारे टिचर - प्रेमाशालिनी १० वी चे इतिहासाचे जाधव सर- ढगळ्या ६ वी च्या मराठीच्या पाटील टिचर- चिमणी (यांचा एकच डायलॉग-- ए पोरा,बुलु नको. यांच्या मराठीच्या तासाला तर गुपचुप मागच्या बेंचवर जाउन चोरून डबे खाण्याची बातंच निराळी. शिवाय आम्ही प्लॅस्टीकची २-३ रुपयांची छोटीशी चिमणी आणायचो वर्गात. तिच्यात पाणी भरुन शेपटीकडून वाजवली की अख्ख्या वर्गात शिट्टी 'दुमदुमायची'. ) स्वगतः एक हळवा कोपरा होता माझ्या मनाचा. पण कधीच बोलू शकलो नाही......तिचं लग्न झालं २ वर्षांपूर्वी #o - भारती विद्यापीठचा माजी

मिलिंद बोकील यांचं "शाळा" हे पुस्तक वाचा, लय जबरा आहे. त्यातली शिरोडकर तिच्यातर प्रेमातच पडलोय मी. फावड्या, सु-या, चिमण्या, अंबाबाई एकेक खतरनाक कॅरेक्टर आहेत. मी तर हातात घेतलं आणि संपवल्यावरच खाली ठेवलं ! B)

In reply to by सोम्यागोम्या

बेसनलाडू 21/05/2010 - 04:07
सॅन-फ्रान्सिस्को ते भारत आणि परत असे एकाच प्रवासात दोनदा सलग वाचले. आता जवळपास पाठही झाले आहे. सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या जवळच्या आणि ओळखीच्या झाल्या आहेत, की आपणा पुन्हा शालेय जीवन जगतोय, असे वाटते. (शाळकरी)बेसनलाडू या पुस्तकावरच आधारीत 'गमभन' ही एकांकिका तितकीशी आवडली नाही. बरी वाटली. (रसिक)बेसनलाडू

शुचि 21/05/2010 - 03:15
मी पोपट, प्रोफेसर आणि गणपती झाले होते नाटकात :) नेहेमी पहील्या बाकावर बसत असे. कधी दंगा नाही. सर्वात मागे ढ मुली बसत लांब लांब कानातले घालणार्‍या. होच मुळी आमच्या वर्गात तरी तसच होतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चिर्कुट 21/05/2010 - 11:01
आमची पण (हजारोंमधील) एक आठवण.. आम्ही साता-याला 'रयत'च्या 'गुरूकुल' प्रकल्पात शिकत होतो. होस्टेल शाळेतच होतं. आमची रात्र अभ्यासिका असायची. या वेळेचा आमचा आवडता खेळ म्हणजे झोपलेल्यांना (खडू मारून) उठवणे. एकदा अशा अभ्यासिकेच्या वेळी ही मारामारी चालू होती. समोर खुर्चीत सर निवांत झोपले होते आणि अचानक एक खडू सरांना लागला. सर दचकून उठले आणि काय झालं ते कळाल्याबरोबर सगळ्यांचे हात बघत सुटले. एका मित्राला सर काय करत आहेत ते कळून त्याने हात पुसायच्या आधी सर तिथे हजर.. त्याचे खडूने पांढरे झालेले हात बघून आम्ही समजलो की हा गेला आता, पण शेवटी आमचाच मित्र!!! B) त्याने अतिशय गरीब तोंड करून आधीच सरांना हातातले खडू दाखवले आणि वर म्हणाला, "सर, मलाच कुणीतरी मारलेत!!" :)) काहीही न बोलता सर परत जाउन झोपले आणि आमचे चेकिंग ही वाचले..आजही त्या मित्राला भेटलो की ही आठवण हमखास निघतेच.. अवांतर : आमच्या मनाच्या हळव्या कोप-याचं परवा लगिन आहे.. :( --चिर्कुट (दहावी 'क')

परवाच हापिसात या 'रम्य' आठवणी निघाल्या होत्या. आमच्या वर्गातल्या पोरांनी एकदा पंख्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि संस्कृतच्या बाईंना काही यायचं नाही म्हणून त्या शिरल्या शिरल्या पंखा सुरू करून दिला. आता गुलाबाच्या पाकळ्या उडवल्या म्हणून काय शिक्षा करायची का? वर्गात झोपा काढायची सवय मला ९-१०वीत लागली असेल. अशीच एकदा आराम करत होते तर आवाज आला, "अदिती, काय चाललं आहे?" मी साळसूदपणे काही सुरू नाही असं नाटक केलं, जे लवकरच उघडं पडलं. अर्थात बाई चांगल्या असल्यामुळे पाच मिनीटांच्या लेक्चरवर काम निभावलं. सगळ्यात हाईट्ट होती ती त्याच संस्कृतच्या बाईंची! त्या नवनीत गाईडमधून सगळं उतरवून द्यायच्या; तर आमच्या वर्गातली एक दोन पोरं गाईडच समोर धरून बसली होती! नेमकं बेंचेसच्या रांगातून फिरताना ते गाईड बाईंना सापड्लं. मग काय महाराजा, गाईडच जप्त! ज्याचं गाईड "पळवलं" होतं तो दोन दिवस शांत होतं; दोन-तीन दिवसांनी पोरांचा दंगा सुरू झाला तर नंतर समजलं. दुसर्‍या एका पोराला याच बाईंनी त्यांच्या लॉकरमधून काहीतरी आणायला सांगितलं, तर त्याला लॉकरमधे दोन गाईड्स सापडली, एक पोराचं आणि एक बाईंचं! शाळेत गाईडवर बंदी, पण या पठ्ठ्याने दोन्ही गाईड्स उचलून आणली! बाईंनी दोन दिवस शिक्षण-संप पुकारला ... आणि नंतर साळसूदपणे गाईड परत केल्यावर म्हणे, "दहावीच्या मुलांचं नुकसान नको असं मुख्याध्यापकांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा शिकवायला सुरूवात करत आहे." पोरं जी खोखो हसली होती तेव्हा ...! माझ्या "कारकीर्दी"तला उच्चांक हा: आमच्या शाळेत कसलीही स्पर्धा असेल तर लगेच सगळ्यांना ती कंपल्सरी करण्याची वैट्ट सवय! सुंदर चित्र काढणार्‍यांना सक्तिने विज्ञानाच्या परीक्षा द्यायला लावायच्या, माझ्यासारख्या गद्य लोकांना चित्रं काढायला लावायची वगैरे वगैरे! मला चित्रं काढायचा पूर्वीपासूनच कंटाळा, आता जीवशास्त्रात ठीक होतं, नावं-बिवं देता येतात. असंच एक मोठं वादवजा भांडण घरी केलं आणि एका अशाच सक्तीच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी शाळेत गेले. रागबिग आला नव्हता, पण दंगा करायची सवय जुनीच! तर परीक्षेला काय काय विषय होते चित्रांचे, एक होता 'रामायणातील एक प्रसंग'. माझी तिरकस खोपडी लगेच विचार करायला लागली ... काय करावं. मग चित्रं काढायला घेतलं, एका तासात संपवलं आणि सायकलवरून आख्खं ठाणं (तेव्हा आमचं ठाणं लहान होतं हो!) उंडारायला बाहेर पडले. घरी आले, बाबांना प्रश्न पडला एवढ्यात कसं काय हिचं चित्रं पूर्ण करून झालं! माझं उत्तर तयार, "अहो बाबा, सोप्पंय! मी 'रामायणातला एक प्रसंग' काढला." बाबा: काय काढला प्रसंग? लहानपणी तुम्हाला दोघांना 'गीत रामायणा'तलं गाणं आहे ना, 'अनुपमेय हो सुरू युद्ध हे ..' त्यातली 'हाणा मारा कापा तोडा' ही ओळ खूप आवडायची. मी: नाही हो, तसलं काही नाही केलं मी! बाबा: (चेहेर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह) मी: अहो काही नाही! एक झोपडं काढलं, दोन-चार झाडं काढली आणि वर एक लाईन मारली (च्च्च ... जीभ चावत), नाही म्हणजे एक आर्क काढली, तिच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असं दाखवलं.... बाबा: आणि मग काय सीता आणि रावण .... मी: नाही नाही! वर टीप लिहीली. "राम आणि लक्ष्मण हरणाच्या पाठी गेले आहेत आणि सीतेला रावणाने पळवून नेलं आहे, तेव्हाची झोपडी!" बाबा आणि मी पोट दुखेपर्यंत हसलो. आख्ख्या वर्गासमोर माझी एकदाच पूजा बांधली गेली होती! अदिती

वेळ असला की मी जुने लेख वाचत बसतो. म्हणुन खरडवहीत जुने मी. पा. कार कुठे गेलेत ते लिहले आहे. गेले दोन तास हा लेख वाचत होतो खुपच नॉस्टॅलजिक झालो. आज्च्या मी.पा. च्या नविन सद्स्यांना हा धागां माहित व्हावा आणि त्यांनी काही तरी आप्ल्या शाळेचे लिहावे म्हाणुन हा धागा वर काढतोय. तुम्ही लिहीपर्यंत मी ही काही तरी खरडतोच.

मिनेश 18/12/2013 - 10:31
न केलेल्या चुकीसाठी एकदा प्रचंड मार खाल्लाय शाळेत.....बाकीच्या आठवणी एक वेळ विस्मरणात जातील पण ही आठवण नाही....

ज्ञानव 18/12/2013 - 12:23
हाताच्या बोटांमध्ये ४ खडू ठेऊन मग शेक हेंड करायचे आणि मुलगा बोम्बलला की शिकवता शिकवता "ए ओरडतो कशाला?" हि शिक्षा झालीय का कुणाला ?

तिरकीट 18/12/2013 - 19:53
आमच्या ठाकुर सरांची आठवण झाली....त्यांचा १ डायलॉग होता....................... "सरपाळे, तु जोपर्यंत दहावी पास होत नाहीस तोपर्यंत मी दाढी करणार नाही (स्वतःची)" अक्षर लैच भारी होतं राव त्यांचं

आम्हाला नववी ला मराठी शिकवायला एक म्याडम होत्या . त्यान्ची खासियत म्हणजे धडा किम्वा कविता शिकवताना त्या अगदी बाबामहाराज सातारकरान्प्रमाणे रसाळ प्रवचन करायच्या ! आणि त्या आख्यानात आपल्या घरात घडणार्या घटनान्चा उल्लेख करून भरपुर माल-मसाला टाकलेला असायचा . त्याना आत्मप्रौढी मिरवण्याची भारी हौस! प्रत्येक वर्शी येणार्या विद्यार्थ्याना ''यन्दा आम्ही कार (चारचाकी गाडी ) घेणार'' असे सान्गायच्या . शेवटी वैतागून एका मुलाने त्याना ऊत्तर दिले... बाई ,गेली दहा वर्शे आम्ही ऐकतोय गाडी घेणार म्हणून , साधी बैलगाडी तरी घेणार का या वर्शी? ......मग काय ? तो मुलगा त्या वर्शी मराठीत नापास!!! याच बाईनी कुत्री पाळली होती , त्या बाई वर्गात तासाला येण्यापूर्वी धावत ती कुत्री यायची आणि टेबलाखाली बसायची .....मग काय? कुत्री दिसली रे दिसली की पोरे कल्ला करायची ..... क्षक्षक्ष बाई आल्या रे ! ;)

परिंदा 19/12/2013 - 14:25
असेच आम्हाला विज्ञानाला साळसकर सर होते. ते विज्ञान कमी आणि इतर बाताच जास्त मारत बसायचे. कुठल्याही गोष्टीचा संबंध ते आपल्या मित्रांशी लावायचे. माझ्या एका मित्राकडे हे आहे आणि ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ थापाच असायच्या हे देखील सर्वांना माहिती होते. :) एकदा सौरउर्जेविषयी सांगताना म्हणाले होते, "एकदा मित्राकडे जेवायला गेलो होतो, तेव्हा भात कमी झाला. तिने पटकन सौरकुकर लावला आणि १० मिनीटात भात तयार!" हा १० मिनीटात भात तयार करणारा कुकर खरोखरच सौरकुकर होता की प्रेशरकुकर हे साळसकर सर आणि त्यांचा मित्रच जाणो.

एम.जी. 19/12/2013 - 14:50
नूमवि... भूगोलाच्या भिडे सरांना " मामा" का म्हणायचे माहीत नाही..पण म्हणायचे. अशाच एका ऑफ तासाला मामा भिडे वर्गासमोरून जात असताना एकाने त्यांना " ए मामा " म्हणून हाक मारली. ते आत आले आणि त्या पोराला यथेच्छ झोडपले... सर वर्गाबाहे निघाले तर दुसर्‍याने " ए काका " म्हणून हाक मारली. सर पुन्हा वळले आणि त्या पोराला धरले.. त्याला मारण्यासाठी हात उचलणार तेव्हढ्यात तो म्हणाला..." सर..सर.. मी काका म्हणालो..मामा नाही म्हणालो.." इतक्या प्रामाणिक कन्फेशननंतरही त्याला सरांनी वेडेवाकडे बडवून काढले.

देव मासा 24/12/2013 - 13:22
शाळेतला सर्वात पुचाट विनोद, आपन पेनातलि शाहि संपल्यावर, मित्राला विचारावे ''ए तुज्ह्या जवळ दोन पेन आहेत ?'' मित्र ''आहे ना आपन केविलवाणी नजरेणने म्हनावे ''एक दे ना मला.... आपले मित्र '' दोन पेन आहे रे , पण एक घरि ठेवला आहे. ... आनि मग संधि आणी आपलि वेळ आल्यावर हाच आहेर आपन पुढे करायचा

ज्ञानव 24/12/2013 - 13:26
वाचून शिक्षणावरची वासना अकाली का उडाली त्याचे उत्तर सापडते. पण शाळेतल्या शिक्षकांमध्ये प्रेम आणि आत्मीयता होती म्हणून तेच आठवतात. महाविद्यालयीन "कर्मचारी"(पद्धतीचे शिक्षक)फारसे लक्षात राहत नाहीत.

धडपड्या 19/12/2015 - 23:19
हा कसा काय राहिला होता? नंतर देवाकडे टवाळखोरीच्या रसायनाची कमतरता पडली होती का काय?

मयुरMK 20/12/2015 - 11:43
मला भाषण एइकताना अक्षरशः झोप यायची खास करूँ आमच्या मुख्याध्यापकांचे आत्ता इथेच थांबतो काम आहे परत केव्हा तर संदर्भासहित स्पष्टीकरण.

गॅरी ट्रुमन 21/12/2015 - 11:25
मिपावर पूर्वी असा आणखी एक धागा आला होता. त्यावरील प्रतिक्रिया इथे चोप्य-पस्ते करत आहे. १. आम्ही दहावीत असताना सगळ्यांना क्रिकेट खेळायचे वेड लागले होते.आमची शाळा दुपारची असे.तेव्हा शाळा भरायच्या आधी तासभर, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तासभर क्रिकेट खेळणे हा कार्यक्रम असे. त्यासाठी आमच्या वर्गातील गोखले अडनावाचा एक मुलगा बॅट घेऊन येत असे.एकदा आमच्या गणित शिकविणाऱ्या शिक्षिकांनी पोर्शन पुढे न्यायला म्हणून इतर कोणा शिक्षकाकडून तास मागून घेतला.पण तास सुरू होऊन १० मिनिटे होताच त्यांचे गोखल्याकडील बॅटकडे लक्ष गेले.आणि ती बॅट कशाला, कधी खेळता या सगळ्या प्रश्नांची माहिती करून घेऊन तासाचा उरलेला सगळा वेळ ’दहावीच्या वर्षात परीक्षा इतकी जवळ आलेली असताना क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवणे कसे अयोग्य आहे’ यावर त्यांनी लेक्चर दिले.गणिताचा पोर्शन पुढे नेणे बाजूलाच राहिले. दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खोलीत आमच्या वर्गातील मुले क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवतात यावर चर्चा झाली.त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या आपटे बाईंनी ताबडतोब गोखल्याकडील बॅट जप्त केली आणि त्याला सांगितले की मार्चमध्ये परीक्षा संपल्यावर येऊन बॅट घेऊन जा आणि तोपर्यंत बॅट अजिबात मिळणार नाही. अजून दोन दिवसांनी गणिताचा तास होता. गोखल्याकडे बॅट नाही हे बघून गणिताच्या बाईंना वाटले असावे की आपल्या लेक्चरचा परिणाम म्हणून त्याने बॅट आणली नाही आणि क्रिकेट खेळणे बंद केले. त्यांनी गोखल्याला विचारले,"काय गोखले, आज बॅट कुठे आहे"? आणि त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली". यावर सगळ्या वर्गात जोरदार हशा पिकला हे सांगायलाच नको. २. एकदा मराठी शिकविणाऱ्या बाईंनी ’कलंक मतीचा झडो दुराभिमान सारा गळो’ या ओळी एकाला वाचायला सांगितल्या. त्याने मतीचा ऐवजी ’कलंक मातीचा झडो’ असे म्हटले.बाईंनी परत वाचायला सांगितल्यावरही तो ’कलंक मातीचा झडो’ असेच वाचत होता.त्यावर बाईंनी त्याला विचारले की तुला या ओळी वाचताना काही वेगळे वाटत नाही का? यावर माझ्या मित्राची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती--’त्याच्या मतीचीच माती झाली असल्यामुळे त्याला मतीऐवजी माती असेच दिसत आहे’.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाळेतील गमती जमती.... यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत. तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका..... यावर एक मेल द्वारे आलेली कविता मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.