मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे पाप कुणाचं

मनस्वी ·

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 18:31
अतिशय स्पष्ट आणि नेमकेपणाने लिहीलेला लेख आहे. मराठी माणसानेच, मराठी माणसाच्या विरोधात, मुंबई परप्रांतीयांना विकली आहे. आंदोलन अशा आमदार, नगरसेवक आणि प्रशासकिय अधिकार्‍यांच्या विरोधात हवे. मराठी माणसाने मतदानातून अशा पुढार्‍यांना धडा शिकवावा. आपण मराठी माणसाच्या हिताआड आलो तर आपल्याला डच्चू मिळेल अशी दहशत पुढार्‍यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रशासकिय अधिकार्‍यांना तेच वठणीवर आणतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी Tue, 02/19/2008 - 19:06
आता ३०% मराठी जनतेने असा लढा देणे अवघड वाटत आहे, पण अशक्य नाही. पण ज्यांनी मुंबई विकली अशा निवृत्त अधिकारी / नगरसेवक / आमदार यांना धडा कोण आणि कसा शिकवणार! मतदानातून काय निष्पन्न होते ते आजवर आपण पहात आलो आहोतच. ३०% मराठी जनतेच्या मतांचा निभाव विकलेल्या ७०% अमराठी मतांसमोर कसा लागणार! त्यासाठी टॅक्सीवाले, पाणीपुरीवाले ह्यांना २ दिवसापुरता चोप न देता, एका विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक योजनेची गरज आहे. हे काही २ दिवसांत होणारे काम नाही. आणि ह्या योजनेचा पुढारी अतिशय विचारी, कार्यक्षम आणि चतुर असणे आवश्यक आहे. मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 23:01
काश्मिरात तिथल्या मुसलमानांनी हिंदू पंडीतांना मारहाण करून परागंदा केले. प्रसंगी जेवणाच्या ताटावरून उठवून हात धूण्यासही संधी न देता घरा बाहेर काढले आणि मुस्लिम टक्केवारी वाढविली. आज न उद्या कदाचित महाराष्ट्रातही हेच घडेल. मराठी माणूस तितका अतिरेकी किंवा मूलतत्ववादी नसला तरी हाताबाहेर जाणारी परिस्थिती त्याच्या स्वभावात/वृत्तीत कांही विनाशकारी बदल घडवू शकते. हे सर्व टाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिपुत्रांचा हक्क त्यांना मिळेल ह्या कडे लक्ष द्यावे आणि भूमिपुत्रांनी स्वतःचा कस वाढवून अस्तित्त्वाची लढाई जिंकावी.

चतुरंग Wed, 02/20/2008 - 00:10
इस्राइलकडे बघून समजते. जगभरातून हाकलल्या गेलेल्या यहुदी माणसांच्या समोर त्यांच्या भूमीचा तुकडा इतराअंनी फेकला तेव्हा त्या वाळवंटातही ते असे काही तरारून उठले की आज जगात त्यांचं अनेक क्षेत्रात नाव आहे. परिस्थितीने आणि इतर जागतिक राजकारणाने त्यांना कट्टर बनवले आहे, पण त्यांची जिद्द आणि देशप्रेम निर्विवाद आहे. आकाराने पुणे+नगर+औरंगाबाद इतक्याच असणार्‍या ह्या देशाकडून आपल्या महाराष्ट्राला खूप शिकण्यासारखे आहे. आपला प्रश्न त्यांच्यामानाने अगदीच किरकोळ वाटावा अशी परिस्थिती आहे. ह्यात मराठी माणसाला कुठेही कमी लेखण्याचा हेतू नसून डोळे उघडे ठेवून परिस्थितीचे अवलोकन करणे आणि चाकोरीबध्द विचारातून झटपट बाहेर पडणे ह्यातूनच आपण आपले भले घडवू शकतो अन्यथा आपल्या भूमीत आपणच उपरे असण्यासारखी लांछनास्पद स्थिती नाही! चतुरंग

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 14:21
बापरे! खरंच असं झालं तर? मला खूप वाटतं असं होऊ नये म्हणून, पण नक्की काय करावं तेच समजत नाही. कुणाकडे काही पर्याय असल्यास नक्की सांगा राजमुद्रा :)

मनस्वी Wed, 02/20/2008 - 14:53
हे असंच चालू राहीलं तर १५-२० वर्षातील हे जळजळीत सत्य! सुरुवात आपल्यापासूनच करा. आपण काही चळवळ वगैरे सुरु नाही करू शकत. पण पाणीपुरी फक्त मराठी माणसाच्या गाडीवरच खा. पाणीपुरीचा ठेला हे त्यांचे एक साधन आहे शिरकाव करण्याचे. हळूहळू अशी एक एक साधने बंद करा. मला सध्यातरी येवढेच सुचते. चूक की बरोबर माहीत नाही. त्यांनी तरी कुठे विचार केला चूक की बरोबर याचा! पोटाची खळगी भरण्यासाठी सगळेच क्षम्य.. अरे पण उद्या तीच खळगी आपल्याला पडणार आहे! आणि तेव्हा सामान्य मराठी माणसाला शिरकाव करायला कोणतीच जागाच नसेल! (कॉमन मॅन) मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 15:01
दुर्दैव असे आहे की मुंबईत पाणीपुरीचे ८० टक्के गिर्‍हाईक हे 'मराठी' नसून 'गुजराथी' आहे. ते तर, 'ते घाटी लोगला काय समजते? ते काय म्हनते ना, गाढवाला गुलाची काय चव, तसे आहे त्याचे. तद्दन रानटी जमात हाय.' असे म्हणून मिटक्या मारत मारत पाणीपुर्‍या जास्तच चापतील. म्हणजे कणाहीन वृत्तीने आपली मुंबई तर गेलीच गेली आणि तत्त्वामुळे पाणीपुरीही गेली. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी अवस्था व्हायची.

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 15:33
मराठी माणसाने झणझणीत, चमचमीत पाणीपुरी बनवावी. भैय्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे. भैय्यांकडे ढुंकूनही पाहणार नाही कोणी. पाणी आणि पुर्‍या घरीच बनवून मनसोक्त हादडतो. तसेच, पाणीपुरी बनवायला शिकवून, भैयाला परदेशी चलनात पगार देऊन, पाणी पुरी विकणारा मराठी माणूस आहे मी.

मनस्वी Wed, 02/20/2008 - 15:08
अरे आमच्या कल्याण भेळ कडे काय मस्त पाणीपुरी मिळते. भेळसुद्धा. कल्पना, पुष्करिणी, महाराणा प्रताप बागेजवळच्या मावशींची भेळ आणि पाणीपुरी, संभाजी बागेतली पूनम भेळ आणी पाणीपुरी - आता विषयांतर नको - पण भैंयाकडे पाणीपुरी नाही नाही म्हणजे नाही. (ठाम) मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/21/2008 - 18:15
मराठी माणुस पाणीपुरीचा धंदा इतका मन लावून करेल का ? आणि केला तर इतक्या प्रेमाने खाऊ घालेल ?? :) ABCD0001 आज आम्ही या भैय्याच्या पोराकडून पाच रुपयाच्या दहा पाणीपुरी बमकावल्या, खट्टा आणि मिठा अशा दोन स्टीलच्या पीपात त्याने बूडवून बुडवून बोटा सहीतकाढलेल्या पाणीपुरीची टेष्ट लै भारी होती. :) त्याला विचारले मनसेसे डर नही लगता क्या ? तेव्हा काही बोललं नाही......सुकीपाणीपुरीचा आग्रह केला. फोटो घेतल्यावर तर ते आणखीणच टरकलं....!!! ( पण फोटो घेण्यापुर्वी कोण काय करतं असा त्याच्या चेहर्‍यावर भाव होता भौ ) मिसळपाव बातमीसाठी औरंगाबादहून प्रा.डॉ....:)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी गुरुवार, 02/21/2008 - 18:40
महाराणाप्रतापच्या इथल्या आमच्या मावशी प्रेमाने, मायेने, आपुलकीने, आग्रहाने देतात - स्वच्छ आणि चविष्ट! आणि कल्याणवालेपण देतात. ** आमच्या मावशींनी (ज्यांना लिहिता वाचता येत नाही) धडाडीने, स्वकर्तुत्वावर एका गाडीच्या चार गाड्या केल्या आहेत! सांगण्याचा उद्देश - त्या पाणीपुरीचा धंदा कमालीच्या मन लावून करतात. ((पुण्यात(महाराष्ट्रात))मराठी पाणीपुरी खाणारी) मनस्वी

In reply to by मनस्वी

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 18:51
तू सुध्दा महाराणाप्रतापच्या इथल्या मावशीकडे खातेस का पाणीपूरी? मी सुध्दा त्यांच्याकडेच खाते नेहमी. म. फुले मंडई जवळ सुध्दा मस्त मराठी पाणीपूरी मिळते. महत्वाच म्हणजे भैंयांकडे पाणी पूरी खाणारे लोक मला कोण वाट्तात माहित आहे? भारत पारतंत्र्यात असताना ईग्रंजांकडे गुलामी करणारे लोक. त्यांचेही विचार असेच होते. माझ पोट भरतयं ना? मला सगळं चांगलं मिळतय ना? मग देश गेला खड्ड्यात. असो पण त्यामुळे काही देश स्वतंत्र व्हायचा राहिला नाही . तो झालाच. तसे भैय्येही जातील. आपण आपला खारीचा वाटा उचलू. राजमुद्रा :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 19:08
भैय्या मंडळी पुन्हा कामाला लागल्याचं पाहून कौतुक वाटलं! आपण मराठी मंडळी मात्र अजून हाच विषय चघळतो आहोत! :) मलाही पाणीपुरी अतिशय आवडते आणि एखाद्या मराठी माणसाची उत्तम पाणीपुरीची गाडी निदान ठाण्या-मुंबईत तरी कुठे असल्याचं मला माहीत नाही! कुणाला माहीत असल्यास त्याचा पत्ता मला जरूर सांगावा. मी एक मराठी माणूस म्हणून अगदी जरूर त्याच्याकडे जाईन आणि पाणीपुरी खाईन! परंतु तोपर्यंत जर मला पाणीपुरी खावीशी वाटली तर मी ती भैय्याकडचीच खाणार! आणि मी म्हणतो का खाऊ नये? माझे मराठी बांधव जर रस्त्यावर उभं राहून, अपार कष्ट करून, न लाजता पाणीपुरीची गाडी चालवत नसतील तर तो काय माझा दोष? आणि मग आम्ही पाणीपुरी खायची तरी कुठे? की खायचीच नाही? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी गुरुवार, 02/21/2008 - 19:42
पेठकर साहेबांनी उपाय दिला आहे! (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.) अजून १ उपायः मराठी संघटनेने बेकारांना चविष्ट पाणीपुरी बनवायचे धडे देउन गाड्या उभ्या कराव्यात. लय पैसा अस्तो या धंद्यात! बेकारी पण मिटेल, आपल्याला पाणीपुरी पण मिळेल, आंणि आपले उद्दिष्ट साध्य पण होइल - कसें..?? मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:04
पेठकर साहेबांनी उपाय दिला आहे! (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.) मला तरी व्यक्तिश: नाही जमणार हा उपाय! कारणे दोन. एक तर घरी पाणीपुरी करून खायला जमणार नाही आणि दुसरं म्हणजे आज वर्षानुवर्ष भैय्याकडची पाणीपुरी खाण्यात जी मजा आहे, जी चव आहे ती घरच्या पाणीपुरीला नाही! आणि मुख्य म्हणजे माझ्या मते पाणीपुरी हा घरी बनवून खायचा पदार्थच नाही! त्याची चव रस्त्यावरच आणि चौपाटीवर किंवा बागेतच! तिथेच ती अधिक छान लागते! शिवाय जी गोष्ट बाहेर सहजासहजी अगदी उत्तम मिळते, चवीलाही छान असते, खिशालाही परवडते, ती घरी करून खायचा उपद्व्याप कोण करणार? आणि तेवढा वेळ नको का जवळ? आणि का? तर पाणीपुरी करणारा केवळ एक भैय्या आहे म्हणून? मग नुसतं बोलत आणि हक्कांकरता भांडत बसण्यापेक्षा टाकावी की एखाद्या मराठी माणसाने गाडी! आम्ही तिकडे जाऊ! मराठी संघटनेने बेकारांना चविष्ट पाणीपुरी बनवायचे धडे देउन गाड्या उभ्या कराव्यात. अगदी जरूर कराव्यात! आम्हीही त्याच गाडीवर पाणीपुरी खायला जाऊ! बेकारी पण मिटेल, आपल्याला पाणीपुरी पण मिळेल, आंणि आपले उद्दिष्ट साध्य पण होइल - कसें..?? अगदी बरोबर! तात्या. -- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 11:39
तात्या, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारावासा वाटतो, सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी झालेली गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हे चित्र तुम्हाला दिसत नाहीए की तुम्हाला बघायच नाहीए? हे तुम्हाला योग्य वाटते का? परप्रातीयांशी आमचे कुठलेही वैर नाही, त्यांना आम्हाला हाकलायचेही नाही. मला हेही दिसतय की जेवढा त्रास त्यांचा आपल्याल होतो, त्यापेक्षा कित्येक पट त्रास त्यांना स्वता:ला होतो. त्यांना नसेल वाटत आपण आपल्या माणसात राहावं?आपण त्यांची पाणीपूरी मिटक्या मारत खातो पण ते कुठे राहतात? काय खातात? हे माहित आहे तुम्हाला? जर माहित असेल तर ते तुम्हाला योग्य वाटते का? यासगळ्याला कारणीभूत आपण आहोत आणि आपल्यापेक्षा आपले राजकिय नेते. अशीच शहरात गर्दी वाढत राहिली आणि खेडी ओसाड पडत राहिली तर त्यांच्या आणि आपल्या पुढ्च्या पिढीचे काय होईल सांगू शकाल? प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी असेल तर तिचा निरोगी विकास होतो. आपल्या जागेवरून सरकलेल्या गोष्टी सगळ्याच घटकांना त्रासदायक ठरतात. आत्ता प्रश्न आहे ही गर्दी कमी करायची कशी? ठिक आहे आपण मान्य करू भैय्याना येथे राहण्याचा हक्क आहे. मग हाकलायचे कुणाला? भूमीपुत्रांना? आणि मराठी माणसांना हाकललं तर परप्रांतिय आपल्याला स्वीकारतील? तुम्ही म्हणाल अगोदरच कितीतरी मराठी माणसे परप्रांतात आहेत. हो पण ती त्रासदायक नाहीत. नाहीतर तिथेही भूमीपुत्र पेटून उठले असते. दुसरं म्हणजे आज तुम्ही जर (मूळ मुद्दा पाहता ) पाणीपूरीसारख्या छोट्याश्या गोष्टीचा त्याग नाही करू शकत, तर उद्या तुम्हाला तुमच्या जन्मभूमीत गर्दीमुळे चिरडून श्वास नाही घेता आला तर तुम्हाला तक्रार करण्याचाही हक्क राहणार नाही. आपणच आपले आणि त्यांचे मारक असू. मला माहित आहे, 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' पण तो दिवस लांब नाही जेव्हा सगळ्यांचच जळेल. आपण मध्यमवर्गीय सेफ आहोत्,म्हणून आपल्याला या विषयात काहीच सिरीयस वाटत नाही. आपल्याला पाणीपूरीची चव महत्वाची वाटते. महाराष्ट्राचं स्वास्थ नाही. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

मनस्वी Fri, 02/22/2008 - 11:47
माझ्या मते चांगल्या जम बसलेल्या भैय्याचे गावाकडे व्यवस्थित घर, गाडी असते. अहो दिवसाचाच धंदा केवढा होतो.. आणि त्यावरून महिन्याचा (मराठी फौजदाराला हप्ते वगैरे वजा करून!) ह्याचा हिशोब बोटांवर करण्यासारखा आहे. मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 12:18
अहो दिवसाचाच धंदा केवढा होतो.. आणि त्यावरून महिन्याचा (मराठी फौजदाराला हप्ते वगैरे वजा करून!) ह्याचा हिशोब बोटांवर करण्यासारखा आहे. अगदी खरं! माझ्या माहितीप्रमाणे त्या भैय्यासारखे पैसे कमवायला मराठी माणसाला कुणीही मनाई केलेली नाही! त्यानेही कमवावेत की पैसे लोकांना आवडणार्‍या वस्तू विकून! फक्त प्रश्न आहे तो काहीतरी झडझडून कष्ट करण्याचा आहे, मेहनत करण्याचा आहे! १० ते ५ वृत्तीतून आणि नुसत्याच गप्पा मारून हे शक्य होईलसं वाटत नाही! तात्या.

In reply to by राजमुद्रा

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 12:14
तुमच्याच भाषेत सांगायचं तर तुमच्या लेखाचं पोस्टमॉर्टेम करून उत्तर देतो.. :) सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी झालेली गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हे चित्र तुम्हाला दिसत नाहीए की तुम्हाला बघायच नाहीए? दिसतंय की! हे तुम्हाला योग्य वाटते का? नाही वाटत. आपण त्यांची पाणीपूरी मिटक्या मारत खातो पण ते कुठे राहतात? काय खातात? हे माहित आहे तुम्हाला? हो माहीत आहे की! जर माहित असेल तर ते तुम्हाला योग्य वाटते का? इथे मला योग्य किंवा अयोग्य वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? इथे येण्याचा निर्णय त्यांचा आहे, रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी विकण्याचा निर्णय त्यांचा आहे, ते कुठे राहतात हा देखील त्यांनी घेतलेला निर्णय आहे, तेव्हा यात मला योग्य किंवा अयोग्य वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? मला एवढंच माहित्ये की त्यांनी केलेली पाणीपुरी मला आवडते. ती मी माझ्या कष्टाच्या पैशाने खातो. ती खाऊन मला शारिरीक आणि मानसिक समाधान मिळतं आणि त्या विक्रेत्यालाही चार पैसे मिळतात! ते जर मिळत नसते तर कुणाला हौस आहे दुपारपासून कष्ट करून तयारी करायची आणि संध्याकाळचे चार-पाच तास रस्त्यावर उभं रहायची?? अशीच शहरात गर्दी वाढत राहिली आणि खेडी ओसाड पडत राहिली तर त्यांच्या आणि आपल्या पुढ्च्या पिढीचे काय होईल सांगू शकाल? प्रामाणिकपणे सांगायचं तर नक्की काय होईल ते मी नाही सांगू शकणार! मी कुणी द्रष्टा मनुष्य नाही! मग हाकलायचे कुणाला? भूमीपुत्रांना? माझ्या आठवणीप्रमाणे निदान मी तरी भूमिपुत्रांना हाकलायची भाषा कुठेही केलेली नाही. मी स्वत:देखील इथला भूमिपूत्रच आहे आणि मला आवडणारे पदार्थ, वस्तू जर मला भूमिपुत्रांकडून उपलब्ध होणार असतील तर त्या मी त्यांच्याकडूनच घेईन असंच मी म्हटलं आहे! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचून पाहा! दुसरं म्हणजे आज तुम्ही जर (मूळ मुद्दा पाहता ) पाणीपूरीसारख्या छोट्याश्या गोष्टीचा त्याग नाही करू शकत, का करावा? मला असं मुळीच वाटत नाही की मी भैय्याकडून पाणीपुरी खातो म्हणजे काही भयंकर पाप करतो, गुन्हा करतो किंवा राष्ट्रद्रोह करतो! आणि अहो तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे एक वेळ मी पाणीपुरीचा त्याग करीनही, पण मला सांगा, आज जर मुंबईत मला कुठे टॅक्सीने जायचं म्हटलं तर रस्त्यावर अर्धा-अर्धा तास उभं राहूनही** मला मराठी टॅक्सिवाला भेटत नाही मग म्हणून काय मी टॅक्सीचाही त्याग करायचा का?? आपल्याला पाणीपूरीची चव महत्वाची वाटते. महाराष्ट्राचं स्वास्थ नाही. मला दोन्हीही गोष्टी महत्वाच्या वाटतात! मराठी माणसाने पाणीपुरी विकावी, ती मला भैय्याच्या पाणीपुरी इतकीच किंवा त्यापेक्षा अधिक चवदार लागेल एवढे निश्चित! तात्या. **गेल्या मंगळवारीच मी हा प्रयोग केला. मुद्दाम चांगला पाऊण तास थांबून कुठे मराठी टॅक्सिवाला मिळतो का ते बघत होतो. परंतु मला तो कुठेच दिसला नाही आणि शेवटी एका भैय्याच्याच टॅक्सीतून मला प्रवास करावा लागला! आता ही काय माझी चूक? की मला मीटरप्रमाणे पैसे घेऊन योग्य स्थळी सोडणार्‍या भैय्याची? मी तर तयार होतो मराठी माणसाच्या टॅक्सीने जायला! असो...

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 12:39
गेल्या मंगळवारीच मी हा प्रयोग केला. मुद्दाम चांगला पाऊण तास थांबून कुठे मराठी टॅक्सिवाला मिळतो का ते बघत होतो. परंतु मला तो कुठेच दिसला नाही आणि शेवटी एका भैय्याच्याच टॅक्सीतून मला प्रवास करावा लागला! आता ही काय माझी चूक? की मला मीटरप्रमाणे पैसे घेऊन योग्य स्थळी सोडणार्‍या भैय्याची? मी तर तयार होतो मराठी माणसाच्या टॅक्सीने जायला! सहमत तात्या! पण यावर काहीच पर्याय नाही का? जो आपण कृतीत आणू शकू?जसं चाललय ते चालू द्याव का? केवळ यावर उपाय शोधण्यासाठीच मी चर्चेत भाग घेतला होता. मला वाटलं होतं आपण सगळे मिळून काहीतरी उपाय शोधू. छोटी का होईना काहीतरी कृतीतून सुरूवात करू.पण त्याचा उपाय सापडण्याऍवजी आपल्यातच गैरसमज व्हायला लागले आहेत. ठिक आहे, जे सगळ्याच होईल तेच माझंही होईल. गर्दिमुळे जीव गुदमरून किड्यामुंग्यांसारखे सगळेच मरून जातील. यात काळजीचे काहीच कारण नाही. राजमुद्रा :)

In reply to by मनस्वी

माझी दुनिया Fri, 02/22/2008 - 11:16
पेठकर काका, तुम्हीच टाकलीत पाणीपुरीची गाडी तरी चालेल. "लई डीमांड दिसतेय मराठी मान्साच्या पानीपुरीच्या गाडीची". सुगरण तर तुम्ही आहातच. हवं तरं महाराष्ट्रातल्या इतर शहरातही शाखा काढू. म्हणजे सगळ्या पाणीपुरी खवय्यांची सोय होऊन जाईल. याच धर्तीवर दूध, लॉंड्री आणि इतर उद्योगही मराठी माणसांनी आपल्या ताब्यात घ्यायला सुरूवात करावी. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

मनस्वी Fri, 02/22/2008 - 11:25
पेठकर काकांना पूर्ण पाठींबा. काका, जर तुम्ही मनावर घेतले (तुम्ही यात अनुभवी आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा बाळगून आहोत) तर खरच एक छान संधी आहे - तुम्हाला आणि मराठी बेकारांना. बघा विचार करून. तुमची जाहिरात करण्याची जबाबदारी आम्ही मिसळपावकर पेलायला तयार आहोत.. बोला मंडळी...... (ताई माई अक्का विचार करा पक्का मराठी पाणीपुरीवर मारा शिक्का).............. मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Fri, 02/22/2008 - 13:50
माझी दुनिया आणि मनस्वी.... मराठी माणसांना 'तयार' करून हॉटेलचा व्यवसाय करणं मलाही अभिमानास्पद वाटेल. दुर्दैवाने मराठी माणसांचा माझाही अनुभव अजिबात चांगला नाही. गृहसजावटीच्या वेळी अस्खलीत मराठी बोलणारा भय्या मला भेटला. अतिशय कुशल, मेहनती आणि वक्तशीर. त्याच संदर्भात दोन मराठी व्यावसायिक भेटले. एक होता लाकूड सप्लायर. भेट झाल्यापासून वर्षभरात त्याने बाजारात मोठमोठी कर्जे घेऊन त्याची परतफेड करू न शकल्याने शेवटी धंदाच बंद केला. दूसरा व्यावसायिक सिव्हील काँट्रॅक्टर. त्याने तर माझ्या नाकी दम आणला. काम आणि दाम एक ठरवायचं आणि दाम आधी वसूल करून कामाची टाळाटाळ करायची. ३ दिवसांचे काम ३ महिने चालले. असो. माझ्या मस्कत मधील कॅफेटेरीयासाठी मी २९ कुक्सच्या हातची पावभाजी खाल्ली. ५ शॉर्टलिस्ट केले. ४ मराठी १ मल्याळी. चारही मराठी कुक्सनी टांग दिली. मल्याळी त्वरीत तयार झाला, आला आणि आज गेली १८ वर्षे माझ्याजवळ इमानदारीत काम करतो आहे. माझ्या अर्ध्या व्यावसायिक यशाचा वाटेकरी तो आहे. दुसरा एक मराठी (ख्रिश्चन) माझ्या जवळ काम करतो. पण तो अकुशल आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तिसरा मराठी एक आहे तो प्रामाणिक आहे. पण त्याचे इतर स्टाफ बरोबर अजिबात पटत नाही. त्याला मी सांगितले की 'बाबारे! इथे (मस्कत मधे) काही आपल्याला जन्मभर राहायचे नाही. तू मटण छान बनवतोस. इतर ८-१० आयटम्स मी तुला शिकवतो. वरून भांडवलही पुरवतो पण तू गावाकडे स्वतःचे, छोटेसे का होईना, हॉटेल किंवा फास्ट्फुड जॉइंट सुरू कर.' पण रामा-शिवा-गोविंदा. मेहनत करण्यास तयार नाही. इथे पुण्यात इडली-डोसे बनवायला एक मराठी मुलगा शोधून काढला. सुरुवातीला बरा होता. पण लवकरच त्याचे डोके कोणीतरी फिरवले. जास्त पगाराची, सुट्यांची आणि असिस्टंटची मागणी करू लागला. ताबडतोब मी दूसरा कारगिर पाहिला. ओरिसाचा आहे. आपला जॉब जातो आहे असे पाहिल्यावर मराठी जरा वठणीवर आला. असो. भय्यांच्या पाणीपुरीवर बहिष्कार घाला अथवा नका घालू. त्या मागणी मागील भावना समजून घ्या. त्या भावनेचा आदर करा. जमेल तितका स्वाभिमान, अस्मिता आणि मराठी बांधवांप्रती प्रेम जोपासा. आपल्या सानिध्यातील, माहितीतील एखाद्या मराठी बेरोजगाराचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा. श्रम संस्कृती वाढीस लागेल असे उपदेश संकुचित मनोवृत्तीच्या बांधवांना करा. एकूण काय तर मराठी माणूस पुढे येईल ह्या साठी प्रयत्नशील राहा. दूसरा उपाय नसेल तर भय्याकडची पाणीपुरी अवश्य खा पण स्वत्व विसरू नका. भय्यांच्या विषयावरून मराठी माणसं आपापसात किती भांडणार? जमेल तशी कृती करा. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 13:59
धन्यवाद पेठकर साहेब! जमेल तशी कृती करा. (आणि इतरांना स्वता:ची कृती करू द्या) हे माझे म्हणणे आहे. राजमुद्रा :)

In reply to by प्रभाकर पेठकर

माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 14:09
जमेल तशी कृती करा.

आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी काल घरी पाणीपुरी करून यथेच्छ हादडली.
(ता.क. : मी पाणीपुरी ब-याचदा घरीच करून खाते.)

शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून) आता मनसे ने मराठी / भूमिपुत्रांचा सोडून पाणीपुरीचा प्रश्न धसास  लावायचा ठरवलेले दिसते.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 14:09

शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून)

माझ्या मते प्रश्न पाणीपुरीवाचून सुकण्याचा अथवा ओलं होण्याचा नाही! प्रश्न आहे तो ठाण्या-मुंबईत मराठी माणूस पाणीपुरी विकणार किंवा नाही याचा!

असो..

(आपला वस्तुस्थिती सांगणारा!) तात्या.

In reply to by माझी दुनिया

मनस्वी Mon, 02/25/2008 - 15:41

मादुताईंनी दिलेल्या link वरील बातमी वाचली.

मनसेने फक्त भाषण झोडून हात झटकले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या प्रयत्नांत आहे हे वाचून अत्यानंद झाला.

आता ही कृती नव्याचे नऊ दिवस न रहाता आपले भाऊ लवकरच सर्वत्र दिसावेत हीच इच्छा, म्हणजे परमानंद होइल.

(भाऊंची पाणीपुरी खाण्यास आतुर) मनस्वी

विजुभाऊ Wed, 02/20/2008 - 15:56
मुळात हा प्रश्न ज्यान्च्यामुळे तयार झाल त्या बिहारी नेत्याना कोणी बोलताना दिसत नाहि. मुलायम सिन्ग किन्वा अबु आझ्मि यानि युपी बिहार सठी काय केले याचा जाब त्यान कोणिच विचारत नाहि?

In reply to by विजुभाऊ

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 16:16
पाणी पुरी खाल्लि नाहि म्हनुन भैय्या जाणर नाहि अहो विजयशाह, तेच विचारते आहे, मग कसे जातील? राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 01:11
नुसते पाणीपुरी बंद करून काय होणार आहे. आख्खी मुंबई भैय्याचे(म्हणजे त्याच्या म्हशीचे) दूध पिते. मग तुम्ही दूध पिणे पण बंद करणार का? त्या ऐवजी काढा एखादी डेअरी.... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 12:49
तुम्हाला नक्की म्हणायचय काय? मला खरच कळलं नाही, मी प्रामाणिकपणे एक मराठी माणूस म्हणून योग्य ते सर्व प्रयत्न करायला तयार आहे. मान्य आहे पाणीपूरी भैय्याकडे खाणे बंद करून भैंय्या जाणार नाही, पण सुरूवात कुठून तरी केलीच पाहीजे ना? आणि तुमच्या सल्ल्याप्रमाणे डेअरी काढून तरी जातील का? खरंच जाणार असतील तर मी तेही करायला तयार आहे. हाच तर मूळ मुद्दा आहे, मराठी माणसाकडे सर्व आहे. सगळे म्हणतात तेवढा (माझ्या मते) मराठी माणूस आळशीही नाही. एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे - यश मिळेपर्यंत वाट पाहण्याची तयारी किंवा पेशंन्स आपल्याला आकाशात उडणार्‍या कल्पना आवडतात, पण त्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात म्हणून आपण धड्पड्तोही. पण जेव्हा आपल्या लक्ष्यात येतं की त्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागणार आहे, तेव्हा आपले पेशंन्स संपतात. आपल्याला सगळ्या गोष्टी एका मिनिटात व्हाव्यात असं वाटत असत. समाजात बदल व्हावा असं मनापासून आपल्याला वाटतं पण फक्त एका मिनिटात. विचार केल्यानंतर मला वाटलं पाणीपूरी बंद करून मी कुठुनतरी सुरूवात तर करत आहे ना?मला माहित आहे, अगदी काहीही केलं तरी भैंय्या एका मिनिटात जाणार नाहीत आणि गेले तरी ते सर्वांसाठीच घातक आहे (विचार करा आपल्याला काय काय मिळ्णार नाही?) त्यासाठी वाट पाहावी लागेल. पण हातावर हात ठेवून नाही. छोटी का होईना पण सुरूवात करावी लागेल. कदाचित उद्या यातूनच समाजात बदल घडेल. ही अतिशयोक्ति नाही. आठवून बघा आपला देश काही एका मिनिटात स्वतंत्र झाला नाही. पण सुरूवात एका छोट्याश्या उठावाने झाली होती. दुसरा मुद्दा म्हणजे राजकारणाचा, बिहार किंवा इतर प्रांतातल्या नेत्यानी स्वच्छ कारभार चालवला तर बर्‍याच तरूणाना रोजगार मिळेल आणि शहरातली बरीच गर्दी कमी होईल असे बर्‍याच जणांचे मत आहे. पण माफ करा मी सद्ध्या तरी याबाबतीत काहीच करू शकत नाही. अगदी छोटीशी सुरूवात सुद्धा ! कारण राजकिय नेत्यांमध्ये परीवर्तन घडवून आणण्याची ताकद सद्ध्यातरी माझ्याकडे नाही. माझा भैंयाकडे पाणीपूरी न खाण्याचा निर्णय छोटा जरी असला तरी माझी वाट पाहण्याची तयारी आहे. कदाचित आपल्या पुढच्या पिढीला मराठी महाराष्ट्रात राहायला मिळेल. समाजात बदल योग्य त्या वेगाने झाला तर ते समाजासाठी घातक ठरत नाही असे माझे मत आहे. फक्त एकच ईच्छा, माझा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्यापेक्षा जर प्रत्यक्ष क्रुतीत उतरवता येण्यासारखा योग्य उपाय सांगितलात तर मी त्याचे स्वागतच करेन. शेवटी महाराष्ट्राच हित महत्वाच! राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/21/2008 - 13:06
माझा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्यापेक्षा ..... निर्णय अजिबात चूक नाही. आदर्शवादी आहे आणि तो शक्यतो सर्वांनी पाळावा. माझ्या प्रतिसादात मी आपल्या निर्णयाला चूक म्हंटलेले नाही पण मराठी माणसाची व्यथा आणि असहाय्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भय्याकडच्या पाणीपुरीवर बहिष्कार घालणं हे एक छोटसं असल तरी परंप्रांतीयांच्या मुंबई आकर्षणाला ठेचून काढण्याच्या प्रयत्नातील पहिलं पाऊल असेल. (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.) पाणीपुरी वरील बहिष्कार हे प्रातिनिधीक उदहरण झाले. त्याच प्रमाणे भय्याकडून मासे नघेणे, पान न खाणे इत्यादी अनेक मार्ग आहेत. मुळ उद्देश हा की भय्यांवर सर्वतोपरी बहिष्कार घातला पाहिजे. त्याशी मी सहमत आहे. इतर भाषिक (गुजराथी, बंगाली, कानडी, मारवाडी...इ.) ह्या बहिष्कारात सामिल होणार नाहीत हे दुर्दैव आहे. थोडीफार हाणामारी करावीच लागणार. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 14:22
माफ करा पेठकर साहेब, माझा प्रतिसाद आपल्या प्रतिसादाला उद्देशून नव्हता. भैंयाकड्चे दूध बंद करून तुम्ही डेअरी चालू करा, असा सल्ला मिळाला म्हणून मला वरील अभिप्राय द्यावा लागला. त्याऍवजी मी दूध डेअरी चालू करतो. असा अभिप्राय आला असता तर अश्या वैयक्तिक निर्णयाला माझी हरकत नाही. एकदम मान्य ! आजपासून् पाणीपूरीबरोबरच भय्याकडून मासे घेणे, पान खाणे बंद! राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 22:38
भैंयाकड्चे दूध बंद करून तुम्ही डेअरी चालू करा, असा सल्ला मिळाला म्हणून मला वरील अभिप्राय द्यावा लागला. आता बघा सगळ्या मुंबईमधल्या मराठी लोकांनी भैयाकडचे दूध घेणे बंद केले तर त्याना दूधाचा मराठी पर्याय उपलब्ध आहे? 'गोकुळ','कृष्णा','वारणा' इ. मराठी ब्रँडची दुधे वितरण करणारे मोठे व्यापारीपण सर्वत्र मराठी नाहीत. तुम्ही मुंबई मधे समजा भैयाकडची पाणिपुरी बंद केलीत तर मुंबईत सर्वत्र मराठी पाणिपुरीचे पर्याय उपलब्ध आहेत? मध्यंतरी आनंद दिघे हयात असताना त्यानी मंडईमधले भैये सर्व हाकलून बाहेर काढले होते. मग ते परत कसे आले? मराठी माणसाने भाजी विकण्याऐवजी गाळा भाड्याने देऊन फुकट खाणे पसंत केले ना? मूळ मुद्दा हा आहे. हाच मुद्दा मी मागे एका चर्चेमधे व्यक्त केला होता. दुखण्यावर वर वर चे ईलाज करण्यापेक्षा जखमेच्या मूळाशी जाऊन उपाय करणार कोण? मध्यंतरी देवगडमधे आंबा उत्पादकांनी दलालांची नफेखोरी आणि त्यामुळे आंबा उत्पादकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 'सोसायटी' स्थापन करून आंबा वितरण चालू केले होते.(याला चांगला उपाय म्हणता येईल) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मनस्वी Fri, 02/22/2008 - 10:04
गाळे जरूर भाड्याने द्यावेत, पण ते फक्त मराठी माणसालाच द्यावेत. (जसे खात्रीशीर माहित नाही पण डबेवाले फक्त मराठी माणसांनाच घेतात म्हणे धंद्यात!) करायचे झाल्यास सगळेच शक्य आहे हळू हळू का होईना. नाहीतर मग हजार सबबी आहेत. (कासव) मनस्वी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 10:36
मध्यंतरी देवगडमधे आंबा उत्पादकांनी दलालांची नफेखोरी आणि त्यामुळे आंबा उत्पादकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 'सोसायटी' स्थापन करून आंबा वितरण चालू केले होते.(याला चांगला उपाय म्हणता येईल) पुण्याचे पेशवे मिराशीसाहेब खूप चांगला पर्याय आहे. असा पर्याय कृतीत उतरला तर सगळेच प्रश्न लवकरच मिटतील. पण खरा प्र्श्न आहे, तो वास्तवतेचा! आता आपण सगळे आपापले व्यवसाय सोडून केवळ भैंयांना हाकलायचे म्हणून त्यांचे व्यवसाय नाही स्वीकारू शकत. आणि बेकार मराठी तरूण शोधून त्यांना कामधंद्याला नाही लावू शकत. कारण आपली शक्ती कमी पडेल. यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. पण पुन्हा सुरूवात कुठुन करायची ? राजमुद्रा :)

मदनबाण गुरुवार, 02/21/2008 - 10:13
इथे येता येत नाही ,,,आता हा सन्देश सर्व मराठी जनते ने दिला पहिजे . मुंबई ही यूपी वाल्याच्या बापाची नाही. हमार तोहार आता बस झाले.

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 10:18
हे असले बिहरी ओझे वागवत बसण्यापेक्शा महाराश्ट्राने स्वतन्त्र व्हावे........ किन्वा महाराश्ट्रात इतराना येन्यास प्रतिबन्ध घालावा

सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 12:44
आहे. उरलेल्या ७३ टक्क्यातील लोक थोडेच केवळ तो मराठी म्हणून त्याचे ग्राहक होणार? जास्त चांगल्या दर्जाचा माल, जास्त चांगल्या प्रतीची सेवा आणि वाजवी किंमत ही या ७३ टक्के बाजाराची अपेक्षा आहे. या कसोटयावर मराठी माणूस श्रेष्ठ ठरला तर जरूर टिकाव धरेल. डार्विनच्या 'फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल' या तत्त्वाला अनुसरून मराठी माणसाने या निकषावर आपली श्रेष्ठता वाढवली तरच तो टिकेल. आपण कंठशोष केल्याने नाही. स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे.

मदनबाण Mon, 02/25/2008 - 13:37

मला मेल मधुन आलेल्या चारोळ्या.....

चांगल्या भाषेत सांगीतले

परप्रांतियांना काही समजत नाही

दोन कानाखाली बसल्याशिवाय

त्यांना मराठी ताकद उमगत नाही

------------------------------

अमरसिंग नावाची पिडा

अमिताभला छळू लागली आहे

शहाणी वाटणारी जया देखील

नको ते बरळू लागली आहे

-----------------------------

मराठी दणका बसताच

परप्रांतियांची पळताभुई थोडी झाली

मगरुर टॅक्सीवाले,दुधवाले भैयांच्या

भाषेत देखील आता गोडी आली

------------------------------

प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो

तो मागुन मिळत नाही

बिहारच्या "चालू" यादवला

सांगुनही हे कळत नाही.

-------------------------------

हिंदी न्यूज चॅनलांचे कालच

जोरात बारसे झाले चांगले

मराठी लोक आता त्यांना

"भैय्या" न्यूजचॅनल म्हणू  लागले 

 

मदनबाण Mon, 02/25/2008 - 14:49

मला मेल मधुन आलेली ही आणखीन एक कविता:-----

खूप सहन केली

मराठी माणसाची व्यथा

आता या परप्रातियांच्या

कमरेत घालणार लाथा

तुम्ही दिडदमडीचे लोक

आम्हाला शिकवता देशभक्ती

ब्रिटीशांच्या विरुद्ध लढली

सर्वात ज्यास्त मराठीशक्ती

खबरदार जर केली

नजर जरादेखील करडी

तर उगारलेल्या काठीवरच

बांधू आम्ही तुमची तिरडी

भारत देशासाठी सदैव

बलिदानास तयार मराठी

आमच्या घरात घुसुन धमकावाल

तर बसेल डोक्यात काठी

तुमची मातृभाषा कोणतीही असो

तुमचे कर्तव्य ईथली संस्कॄति जपणे

येथे तुम्ही मराठीचा आदर करा

एवढेच आहे मराठी माणसाचे म्हणणे

-------------------------------

महाराष्ट्र ..... मराठी मनांचा

जय महाराष्ट्र

(मदन-बाण)

In reply to by मदनबाण

ब्रिटीशांशीच नाही तर सर्व परकीयांशी. अहमदशहा अब्दालीशी लढणारे मराठेच होते.  'औरंग्या पाप्याला' बुडविणारे पण मराठेच होते. एक राणा प्रताप आणि सुरुवातीचे काही रजपूत राजे सोडले तर सर्व रजपूत राजांनी एक मुल़गी मुघल सम्राटाला अर्पण करायचे धोरण ठेवले होते.

शेवटी स्वाभिमान रक्तातच असावा लागतो तो बाहेरून भरता येत नाही.

 हे भय्ये कितीही चांगली पाणीपुरी बनवत असले तरी ती त्याना त्यांच्या प्रदेशात विकता येत नाही कारण एकतर तिथल्या लोकांची क्रयशक्ती नाही आणि दुसरे म्हणजे तिथले स्थानिक गुंड त्याना सुखासुखी धंदा करू देणार नाहीत. इकडचे पोलीस हफ्ता घेतल्यावर का होईना पण त्याना सुखाने धंदा करू देतात.

पुण्याचे पेशवे

माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 17:34
अ'राज'क माजवणा-या माननीय श्री. राज ठाकरे यांच्या भाषणातला काही भाग इथे एका.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 18:31
अतिशय स्पष्ट आणि नेमकेपणाने लिहीलेला लेख आहे. मराठी माणसानेच, मराठी माणसाच्या विरोधात, मुंबई परप्रांतीयांना विकली आहे. आंदोलन अशा आमदार, नगरसेवक आणि प्रशासकिय अधिकार्‍यांच्या विरोधात हवे. मराठी माणसाने मतदानातून अशा पुढार्‍यांना धडा शिकवावा. आपण मराठी माणसाच्या हिताआड आलो तर आपल्याला डच्चू मिळेल अशी दहशत पुढार्‍यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रशासकिय अधिकार्‍यांना तेच वठणीवर आणतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी Tue, 02/19/2008 - 19:06
आता ३०% मराठी जनतेने असा लढा देणे अवघड वाटत आहे, पण अशक्य नाही. पण ज्यांनी मुंबई विकली अशा निवृत्त अधिकारी / नगरसेवक / आमदार यांना धडा कोण आणि कसा शिकवणार! मतदानातून काय निष्पन्न होते ते आजवर आपण पहात आलो आहोतच. ३०% मराठी जनतेच्या मतांचा निभाव विकलेल्या ७०% अमराठी मतांसमोर कसा लागणार! त्यासाठी टॅक्सीवाले, पाणीपुरीवाले ह्यांना २ दिवसापुरता चोप न देता, एका विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक योजनेची गरज आहे. हे काही २ दिवसांत होणारे काम नाही. आणि ह्या योजनेचा पुढारी अतिशय विचारी, कार्यक्षम आणि चतुर असणे आवश्यक आहे. मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 23:01
काश्मिरात तिथल्या मुसलमानांनी हिंदू पंडीतांना मारहाण करून परागंदा केले. प्रसंगी जेवणाच्या ताटावरून उठवून हात धूण्यासही संधी न देता घरा बाहेर काढले आणि मुस्लिम टक्केवारी वाढविली. आज न उद्या कदाचित महाराष्ट्रातही हेच घडेल. मराठी माणूस तितका अतिरेकी किंवा मूलतत्ववादी नसला तरी हाताबाहेर जाणारी परिस्थिती त्याच्या स्वभावात/वृत्तीत कांही विनाशकारी बदल घडवू शकते. हे सर्व टाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिपुत्रांचा हक्क त्यांना मिळेल ह्या कडे लक्ष द्यावे आणि भूमिपुत्रांनी स्वतःचा कस वाढवून अस्तित्त्वाची लढाई जिंकावी.

चतुरंग Wed, 02/20/2008 - 00:10
इस्राइलकडे बघून समजते. जगभरातून हाकलल्या गेलेल्या यहुदी माणसांच्या समोर त्यांच्या भूमीचा तुकडा इतराअंनी फेकला तेव्हा त्या वाळवंटातही ते असे काही तरारून उठले की आज जगात त्यांचं अनेक क्षेत्रात नाव आहे. परिस्थितीने आणि इतर जागतिक राजकारणाने त्यांना कट्टर बनवले आहे, पण त्यांची जिद्द आणि देशप्रेम निर्विवाद आहे. आकाराने पुणे+नगर+औरंगाबाद इतक्याच असणार्‍या ह्या देशाकडून आपल्या महाराष्ट्राला खूप शिकण्यासारखे आहे. आपला प्रश्न त्यांच्यामानाने अगदीच किरकोळ वाटावा अशी परिस्थिती आहे. ह्यात मराठी माणसाला कुठेही कमी लेखण्याचा हेतू नसून डोळे उघडे ठेवून परिस्थितीचे अवलोकन करणे आणि चाकोरीबध्द विचारातून झटपट बाहेर पडणे ह्यातूनच आपण आपले भले घडवू शकतो अन्यथा आपल्या भूमीत आपणच उपरे असण्यासारखी लांछनास्पद स्थिती नाही! चतुरंग

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 14:21
बापरे! खरंच असं झालं तर? मला खूप वाटतं असं होऊ नये म्हणून, पण नक्की काय करावं तेच समजत नाही. कुणाकडे काही पर्याय असल्यास नक्की सांगा राजमुद्रा :)

मनस्वी Wed, 02/20/2008 - 14:53
हे असंच चालू राहीलं तर १५-२० वर्षातील हे जळजळीत सत्य! सुरुवात आपल्यापासूनच करा. आपण काही चळवळ वगैरे सुरु नाही करू शकत. पण पाणीपुरी फक्त मराठी माणसाच्या गाडीवरच खा. पाणीपुरीचा ठेला हे त्यांचे एक साधन आहे शिरकाव करण्याचे. हळूहळू अशी एक एक साधने बंद करा. मला सध्यातरी येवढेच सुचते. चूक की बरोबर माहीत नाही. त्यांनी तरी कुठे विचार केला चूक की बरोबर याचा! पोटाची खळगी भरण्यासाठी सगळेच क्षम्य.. अरे पण उद्या तीच खळगी आपल्याला पडणार आहे! आणि तेव्हा सामान्य मराठी माणसाला शिरकाव करायला कोणतीच जागाच नसेल! (कॉमन मॅन) मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 15:01
दुर्दैव असे आहे की मुंबईत पाणीपुरीचे ८० टक्के गिर्‍हाईक हे 'मराठी' नसून 'गुजराथी' आहे. ते तर, 'ते घाटी लोगला काय समजते? ते काय म्हनते ना, गाढवाला गुलाची काय चव, तसे आहे त्याचे. तद्दन रानटी जमात हाय.' असे म्हणून मिटक्या मारत मारत पाणीपुर्‍या जास्तच चापतील. म्हणजे कणाहीन वृत्तीने आपली मुंबई तर गेलीच गेली आणि तत्त्वामुळे पाणीपुरीही गेली. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी अवस्था व्हायची.

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 15:33
मराठी माणसाने झणझणीत, चमचमीत पाणीपुरी बनवावी. भैय्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे. भैय्यांकडे ढुंकूनही पाहणार नाही कोणी. पाणी आणि पुर्‍या घरीच बनवून मनसोक्त हादडतो. तसेच, पाणीपुरी बनवायला शिकवून, भैयाला परदेशी चलनात पगार देऊन, पाणी पुरी विकणारा मराठी माणूस आहे मी.

मनस्वी Wed, 02/20/2008 - 15:08
अरे आमच्या कल्याण भेळ कडे काय मस्त पाणीपुरी मिळते. भेळसुद्धा. कल्पना, पुष्करिणी, महाराणा प्रताप बागेजवळच्या मावशींची भेळ आणि पाणीपुरी, संभाजी बागेतली पूनम भेळ आणी पाणीपुरी - आता विषयांतर नको - पण भैंयाकडे पाणीपुरी नाही नाही म्हणजे नाही. (ठाम) मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/21/2008 - 18:15
मराठी माणुस पाणीपुरीचा धंदा इतका मन लावून करेल का ? आणि केला तर इतक्या प्रेमाने खाऊ घालेल ?? :) ABCD0001 आज आम्ही या भैय्याच्या पोराकडून पाच रुपयाच्या दहा पाणीपुरी बमकावल्या, खट्टा आणि मिठा अशा दोन स्टीलच्या पीपात त्याने बूडवून बुडवून बोटा सहीतकाढलेल्या पाणीपुरीची टेष्ट लै भारी होती. :) त्याला विचारले मनसेसे डर नही लगता क्या ? तेव्हा काही बोललं नाही......सुकीपाणीपुरीचा आग्रह केला. फोटो घेतल्यावर तर ते आणखीणच टरकलं....!!! ( पण फोटो घेण्यापुर्वी कोण काय करतं असा त्याच्या चेहर्‍यावर भाव होता भौ ) मिसळपाव बातमीसाठी औरंगाबादहून प्रा.डॉ....:)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी गुरुवार, 02/21/2008 - 18:40
महाराणाप्रतापच्या इथल्या आमच्या मावशी प्रेमाने, मायेने, आपुलकीने, आग्रहाने देतात - स्वच्छ आणि चविष्ट! आणि कल्याणवालेपण देतात. ** आमच्या मावशींनी (ज्यांना लिहिता वाचता येत नाही) धडाडीने, स्वकर्तुत्वावर एका गाडीच्या चार गाड्या केल्या आहेत! सांगण्याचा उद्देश - त्या पाणीपुरीचा धंदा कमालीच्या मन लावून करतात. ((पुण्यात(महाराष्ट्रात))मराठी पाणीपुरी खाणारी) मनस्वी

In reply to by मनस्वी

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 18:51
तू सुध्दा महाराणाप्रतापच्या इथल्या मावशीकडे खातेस का पाणीपूरी? मी सुध्दा त्यांच्याकडेच खाते नेहमी. म. फुले मंडई जवळ सुध्दा मस्त मराठी पाणीपूरी मिळते. महत्वाच म्हणजे भैंयांकडे पाणी पूरी खाणारे लोक मला कोण वाट्तात माहित आहे? भारत पारतंत्र्यात असताना ईग्रंजांकडे गुलामी करणारे लोक. त्यांचेही विचार असेच होते. माझ पोट भरतयं ना? मला सगळं चांगलं मिळतय ना? मग देश गेला खड्ड्यात. असो पण त्यामुळे काही देश स्वतंत्र व्हायचा राहिला नाही . तो झालाच. तसे भैय्येही जातील. आपण आपला खारीचा वाटा उचलू. राजमुद्रा :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 19:08
भैय्या मंडळी पुन्हा कामाला लागल्याचं पाहून कौतुक वाटलं! आपण मराठी मंडळी मात्र अजून हाच विषय चघळतो आहोत! :) मलाही पाणीपुरी अतिशय आवडते आणि एखाद्या मराठी माणसाची उत्तम पाणीपुरीची गाडी निदान ठाण्या-मुंबईत तरी कुठे असल्याचं मला माहीत नाही! कुणाला माहीत असल्यास त्याचा पत्ता मला जरूर सांगावा. मी एक मराठी माणूस म्हणून अगदी जरूर त्याच्याकडे जाईन आणि पाणीपुरी खाईन! परंतु तोपर्यंत जर मला पाणीपुरी खावीशी वाटली तर मी ती भैय्याकडचीच खाणार! आणि मी म्हणतो का खाऊ नये? माझे मराठी बांधव जर रस्त्यावर उभं राहून, अपार कष्ट करून, न लाजता पाणीपुरीची गाडी चालवत नसतील तर तो काय माझा दोष? आणि मग आम्ही पाणीपुरी खायची तरी कुठे? की खायचीच नाही? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी गुरुवार, 02/21/2008 - 19:42
पेठकर साहेबांनी उपाय दिला आहे! (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.) अजून १ उपायः मराठी संघटनेने बेकारांना चविष्ट पाणीपुरी बनवायचे धडे देउन गाड्या उभ्या कराव्यात. लय पैसा अस्तो या धंद्यात! बेकारी पण मिटेल, आपल्याला पाणीपुरी पण मिळेल, आंणि आपले उद्दिष्ट साध्य पण होइल - कसें..?? मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:04
पेठकर साहेबांनी उपाय दिला आहे! (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.) मला तरी व्यक्तिश: नाही जमणार हा उपाय! कारणे दोन. एक तर घरी पाणीपुरी करून खायला जमणार नाही आणि दुसरं म्हणजे आज वर्षानुवर्ष भैय्याकडची पाणीपुरी खाण्यात जी मजा आहे, जी चव आहे ती घरच्या पाणीपुरीला नाही! आणि मुख्य म्हणजे माझ्या मते पाणीपुरी हा घरी बनवून खायचा पदार्थच नाही! त्याची चव रस्त्यावरच आणि चौपाटीवर किंवा बागेतच! तिथेच ती अधिक छान लागते! शिवाय जी गोष्ट बाहेर सहजासहजी अगदी उत्तम मिळते, चवीलाही छान असते, खिशालाही परवडते, ती घरी करून खायचा उपद्व्याप कोण करणार? आणि तेवढा वेळ नको का जवळ? आणि का? तर पाणीपुरी करणारा केवळ एक भैय्या आहे म्हणून? मग नुसतं बोलत आणि हक्कांकरता भांडत बसण्यापेक्षा टाकावी की एखाद्या मराठी माणसाने गाडी! आम्ही तिकडे जाऊ! मराठी संघटनेने बेकारांना चविष्ट पाणीपुरी बनवायचे धडे देउन गाड्या उभ्या कराव्यात. अगदी जरूर कराव्यात! आम्हीही त्याच गाडीवर पाणीपुरी खायला जाऊ! बेकारी पण मिटेल, आपल्याला पाणीपुरी पण मिळेल, आंणि आपले उद्दिष्ट साध्य पण होइल - कसें..?? अगदी बरोबर! तात्या. -- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 11:39
तात्या, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारावासा वाटतो, सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी झालेली गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हे चित्र तुम्हाला दिसत नाहीए की तुम्हाला बघायच नाहीए? हे तुम्हाला योग्य वाटते का? परप्रातीयांशी आमचे कुठलेही वैर नाही, त्यांना आम्हाला हाकलायचेही नाही. मला हेही दिसतय की जेवढा त्रास त्यांचा आपल्याल होतो, त्यापेक्षा कित्येक पट त्रास त्यांना स्वता:ला होतो. त्यांना नसेल वाटत आपण आपल्या माणसात राहावं?आपण त्यांची पाणीपूरी मिटक्या मारत खातो पण ते कुठे राहतात? काय खातात? हे माहित आहे तुम्हाला? जर माहित असेल तर ते तुम्हाला योग्य वाटते का? यासगळ्याला कारणीभूत आपण आहोत आणि आपल्यापेक्षा आपले राजकिय नेते. अशीच शहरात गर्दी वाढत राहिली आणि खेडी ओसाड पडत राहिली तर त्यांच्या आणि आपल्या पुढ्च्या पिढीचे काय होईल सांगू शकाल? प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी असेल तर तिचा निरोगी विकास होतो. आपल्या जागेवरून सरकलेल्या गोष्टी सगळ्याच घटकांना त्रासदायक ठरतात. आत्ता प्रश्न आहे ही गर्दी कमी करायची कशी? ठिक आहे आपण मान्य करू भैय्याना येथे राहण्याचा हक्क आहे. मग हाकलायचे कुणाला? भूमीपुत्रांना? आणि मराठी माणसांना हाकललं तर परप्रांतिय आपल्याला स्वीकारतील? तुम्ही म्हणाल अगोदरच कितीतरी मराठी माणसे परप्रांतात आहेत. हो पण ती त्रासदायक नाहीत. नाहीतर तिथेही भूमीपुत्र पेटून उठले असते. दुसरं म्हणजे आज तुम्ही जर (मूळ मुद्दा पाहता ) पाणीपूरीसारख्या छोट्याश्या गोष्टीचा त्याग नाही करू शकत, तर उद्या तुम्हाला तुमच्या जन्मभूमीत गर्दीमुळे चिरडून श्वास नाही घेता आला तर तुम्हाला तक्रार करण्याचाही हक्क राहणार नाही. आपणच आपले आणि त्यांचे मारक असू. मला माहित आहे, 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' पण तो दिवस लांब नाही जेव्हा सगळ्यांचच जळेल. आपण मध्यमवर्गीय सेफ आहोत्,म्हणून आपल्याला या विषयात काहीच सिरीयस वाटत नाही. आपल्याला पाणीपूरीची चव महत्वाची वाटते. महाराष्ट्राचं स्वास्थ नाही. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

मनस्वी Fri, 02/22/2008 - 11:47
माझ्या मते चांगल्या जम बसलेल्या भैय्याचे गावाकडे व्यवस्थित घर, गाडी असते. अहो दिवसाचाच धंदा केवढा होतो.. आणि त्यावरून महिन्याचा (मराठी फौजदाराला हप्ते वगैरे वजा करून!) ह्याचा हिशोब बोटांवर करण्यासारखा आहे. मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 12:18
अहो दिवसाचाच धंदा केवढा होतो.. आणि त्यावरून महिन्याचा (मराठी फौजदाराला हप्ते वगैरे वजा करून!) ह्याचा हिशोब बोटांवर करण्यासारखा आहे. अगदी खरं! माझ्या माहितीप्रमाणे त्या भैय्यासारखे पैसे कमवायला मराठी माणसाला कुणीही मनाई केलेली नाही! त्यानेही कमवावेत की पैसे लोकांना आवडणार्‍या वस्तू विकून! फक्त प्रश्न आहे तो काहीतरी झडझडून कष्ट करण्याचा आहे, मेहनत करण्याचा आहे! १० ते ५ वृत्तीतून आणि नुसत्याच गप्पा मारून हे शक्य होईलसं वाटत नाही! तात्या.

In reply to by राजमुद्रा

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 12:14
तुमच्याच भाषेत सांगायचं तर तुमच्या लेखाचं पोस्टमॉर्टेम करून उत्तर देतो.. :) सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी झालेली गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हे चित्र तुम्हाला दिसत नाहीए की तुम्हाला बघायच नाहीए? दिसतंय की! हे तुम्हाला योग्य वाटते का? नाही वाटत. आपण त्यांची पाणीपूरी मिटक्या मारत खातो पण ते कुठे राहतात? काय खातात? हे माहित आहे तुम्हाला? हो माहीत आहे की! जर माहित असेल तर ते तुम्हाला योग्य वाटते का? इथे मला योग्य किंवा अयोग्य वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? इथे येण्याचा निर्णय त्यांचा आहे, रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी विकण्याचा निर्णय त्यांचा आहे, ते कुठे राहतात हा देखील त्यांनी घेतलेला निर्णय आहे, तेव्हा यात मला योग्य किंवा अयोग्य वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? मला एवढंच माहित्ये की त्यांनी केलेली पाणीपुरी मला आवडते. ती मी माझ्या कष्टाच्या पैशाने खातो. ती खाऊन मला शारिरीक आणि मानसिक समाधान मिळतं आणि त्या विक्रेत्यालाही चार पैसे मिळतात! ते जर मिळत नसते तर कुणाला हौस आहे दुपारपासून कष्ट करून तयारी करायची आणि संध्याकाळचे चार-पाच तास रस्त्यावर उभं रहायची?? अशीच शहरात गर्दी वाढत राहिली आणि खेडी ओसाड पडत राहिली तर त्यांच्या आणि आपल्या पुढ्च्या पिढीचे काय होईल सांगू शकाल? प्रामाणिकपणे सांगायचं तर नक्की काय होईल ते मी नाही सांगू शकणार! मी कुणी द्रष्टा मनुष्य नाही! मग हाकलायचे कुणाला? भूमीपुत्रांना? माझ्या आठवणीप्रमाणे निदान मी तरी भूमिपुत्रांना हाकलायची भाषा कुठेही केलेली नाही. मी स्वत:देखील इथला भूमिपूत्रच आहे आणि मला आवडणारे पदार्थ, वस्तू जर मला भूमिपुत्रांकडून उपलब्ध होणार असतील तर त्या मी त्यांच्याकडूनच घेईन असंच मी म्हटलं आहे! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचून पाहा! दुसरं म्हणजे आज तुम्ही जर (मूळ मुद्दा पाहता ) पाणीपूरीसारख्या छोट्याश्या गोष्टीचा त्याग नाही करू शकत, का करावा? मला असं मुळीच वाटत नाही की मी भैय्याकडून पाणीपुरी खातो म्हणजे काही भयंकर पाप करतो, गुन्हा करतो किंवा राष्ट्रद्रोह करतो! आणि अहो तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे एक वेळ मी पाणीपुरीचा त्याग करीनही, पण मला सांगा, आज जर मुंबईत मला कुठे टॅक्सीने जायचं म्हटलं तर रस्त्यावर अर्धा-अर्धा तास उभं राहूनही** मला मराठी टॅक्सिवाला भेटत नाही मग म्हणून काय मी टॅक्सीचाही त्याग करायचा का?? आपल्याला पाणीपूरीची चव महत्वाची वाटते. महाराष्ट्राचं स्वास्थ नाही. मला दोन्हीही गोष्टी महत्वाच्या वाटतात! मराठी माणसाने पाणीपुरी विकावी, ती मला भैय्याच्या पाणीपुरी इतकीच किंवा त्यापेक्षा अधिक चवदार लागेल एवढे निश्चित! तात्या. **गेल्या मंगळवारीच मी हा प्रयोग केला. मुद्दाम चांगला पाऊण तास थांबून कुठे मराठी टॅक्सिवाला मिळतो का ते बघत होतो. परंतु मला तो कुठेच दिसला नाही आणि शेवटी एका भैय्याच्याच टॅक्सीतून मला प्रवास करावा लागला! आता ही काय माझी चूक? की मला मीटरप्रमाणे पैसे घेऊन योग्य स्थळी सोडणार्‍या भैय्याची? मी तर तयार होतो मराठी माणसाच्या टॅक्सीने जायला! असो...

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 12:39
गेल्या मंगळवारीच मी हा प्रयोग केला. मुद्दाम चांगला पाऊण तास थांबून कुठे मराठी टॅक्सिवाला मिळतो का ते बघत होतो. परंतु मला तो कुठेच दिसला नाही आणि शेवटी एका भैय्याच्याच टॅक्सीतून मला प्रवास करावा लागला! आता ही काय माझी चूक? की मला मीटरप्रमाणे पैसे घेऊन योग्य स्थळी सोडणार्‍या भैय्याची? मी तर तयार होतो मराठी माणसाच्या टॅक्सीने जायला! सहमत तात्या! पण यावर काहीच पर्याय नाही का? जो आपण कृतीत आणू शकू?जसं चाललय ते चालू द्याव का? केवळ यावर उपाय शोधण्यासाठीच मी चर्चेत भाग घेतला होता. मला वाटलं होतं आपण सगळे मिळून काहीतरी उपाय शोधू. छोटी का होईना काहीतरी कृतीतून सुरूवात करू.पण त्याचा उपाय सापडण्याऍवजी आपल्यातच गैरसमज व्हायला लागले आहेत. ठिक आहे, जे सगळ्याच होईल तेच माझंही होईल. गर्दिमुळे जीव गुदमरून किड्यामुंग्यांसारखे सगळेच मरून जातील. यात काळजीचे काहीच कारण नाही. राजमुद्रा :)

In reply to by मनस्वी

माझी दुनिया Fri, 02/22/2008 - 11:16
पेठकर काका, तुम्हीच टाकलीत पाणीपुरीची गाडी तरी चालेल. "लई डीमांड दिसतेय मराठी मान्साच्या पानीपुरीच्या गाडीची". सुगरण तर तुम्ही आहातच. हवं तरं महाराष्ट्रातल्या इतर शहरातही शाखा काढू. म्हणजे सगळ्या पाणीपुरी खवय्यांची सोय होऊन जाईल. याच धर्तीवर दूध, लॉंड्री आणि इतर उद्योगही मराठी माणसांनी आपल्या ताब्यात घ्यायला सुरूवात करावी. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

मनस्वी Fri, 02/22/2008 - 11:25
पेठकर काकांना पूर्ण पाठींबा. काका, जर तुम्ही मनावर घेतले (तुम्ही यात अनुभवी आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा बाळगून आहोत) तर खरच एक छान संधी आहे - तुम्हाला आणि मराठी बेकारांना. बघा विचार करून. तुमची जाहिरात करण्याची जबाबदारी आम्ही मिसळपावकर पेलायला तयार आहोत.. बोला मंडळी...... (ताई माई अक्का विचार करा पक्का मराठी पाणीपुरीवर मारा शिक्का).............. मनस्वी

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Fri, 02/22/2008 - 13:50
माझी दुनिया आणि मनस्वी.... मराठी माणसांना 'तयार' करून हॉटेलचा व्यवसाय करणं मलाही अभिमानास्पद वाटेल. दुर्दैवाने मराठी माणसांचा माझाही अनुभव अजिबात चांगला नाही. गृहसजावटीच्या वेळी अस्खलीत मराठी बोलणारा भय्या मला भेटला. अतिशय कुशल, मेहनती आणि वक्तशीर. त्याच संदर्भात दोन मराठी व्यावसायिक भेटले. एक होता लाकूड सप्लायर. भेट झाल्यापासून वर्षभरात त्याने बाजारात मोठमोठी कर्जे घेऊन त्याची परतफेड करू न शकल्याने शेवटी धंदाच बंद केला. दूसरा व्यावसायिक सिव्हील काँट्रॅक्टर. त्याने तर माझ्या नाकी दम आणला. काम आणि दाम एक ठरवायचं आणि दाम आधी वसूल करून कामाची टाळाटाळ करायची. ३ दिवसांचे काम ३ महिने चालले. असो. माझ्या मस्कत मधील कॅफेटेरीयासाठी मी २९ कुक्सच्या हातची पावभाजी खाल्ली. ५ शॉर्टलिस्ट केले. ४ मराठी १ मल्याळी. चारही मराठी कुक्सनी टांग दिली. मल्याळी त्वरीत तयार झाला, आला आणि आज गेली १८ वर्षे माझ्याजवळ इमानदारीत काम करतो आहे. माझ्या अर्ध्या व्यावसायिक यशाचा वाटेकरी तो आहे. दुसरा एक मराठी (ख्रिश्चन) माझ्या जवळ काम करतो. पण तो अकुशल आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तिसरा मराठी एक आहे तो प्रामाणिक आहे. पण त्याचे इतर स्टाफ बरोबर अजिबात पटत नाही. त्याला मी सांगितले की 'बाबारे! इथे (मस्कत मधे) काही आपल्याला जन्मभर राहायचे नाही. तू मटण छान बनवतोस. इतर ८-१० आयटम्स मी तुला शिकवतो. वरून भांडवलही पुरवतो पण तू गावाकडे स्वतःचे, छोटेसे का होईना, हॉटेल किंवा फास्ट्फुड जॉइंट सुरू कर.' पण रामा-शिवा-गोविंदा. मेहनत करण्यास तयार नाही. इथे पुण्यात इडली-डोसे बनवायला एक मराठी मुलगा शोधून काढला. सुरुवातीला बरा होता. पण लवकरच त्याचे डोके कोणीतरी फिरवले. जास्त पगाराची, सुट्यांची आणि असिस्टंटची मागणी करू लागला. ताबडतोब मी दूसरा कारगिर पाहिला. ओरिसाचा आहे. आपला जॉब जातो आहे असे पाहिल्यावर मराठी जरा वठणीवर आला. असो. भय्यांच्या पाणीपुरीवर बहिष्कार घाला अथवा नका घालू. त्या मागणी मागील भावना समजून घ्या. त्या भावनेचा आदर करा. जमेल तितका स्वाभिमान, अस्मिता आणि मराठी बांधवांप्रती प्रेम जोपासा. आपल्या सानिध्यातील, माहितीतील एखाद्या मराठी बेरोजगाराचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा. श्रम संस्कृती वाढीस लागेल असे उपदेश संकुचित मनोवृत्तीच्या बांधवांना करा. एकूण काय तर मराठी माणूस पुढे येईल ह्या साठी प्रयत्नशील राहा. दूसरा उपाय नसेल तर भय्याकडची पाणीपुरी अवश्य खा पण स्वत्व विसरू नका. भय्यांच्या विषयावरून मराठी माणसं आपापसात किती भांडणार? जमेल तशी कृती करा. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 13:59
धन्यवाद पेठकर साहेब! जमेल तशी कृती करा. (आणि इतरांना स्वता:ची कृती करू द्या) हे माझे म्हणणे आहे. राजमुद्रा :)

In reply to by प्रभाकर पेठकर

माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 14:09
जमेल तशी कृती करा.

आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी काल घरी पाणीपुरी करून यथेच्छ हादडली.
(ता.क. : मी पाणीपुरी ब-याचदा घरीच करून खाते.)

शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून) आता मनसे ने मराठी / भूमिपुत्रांचा सोडून पाणीपुरीचा प्रश्न धसास  लावायचा ठरवलेले दिसते.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 14:09

शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून)

माझ्या मते प्रश्न पाणीपुरीवाचून सुकण्याचा अथवा ओलं होण्याचा नाही! प्रश्न आहे तो ठाण्या-मुंबईत मराठी माणूस पाणीपुरी विकणार किंवा नाही याचा!

असो..

(आपला वस्तुस्थिती सांगणारा!) तात्या.

In reply to by माझी दुनिया

मनस्वी Mon, 02/25/2008 - 15:41

मादुताईंनी दिलेल्या link वरील बातमी वाचली.

मनसेने फक्त भाषण झोडून हात झटकले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या प्रयत्नांत आहे हे वाचून अत्यानंद झाला.

आता ही कृती नव्याचे नऊ दिवस न रहाता आपले भाऊ लवकरच सर्वत्र दिसावेत हीच इच्छा, म्हणजे परमानंद होइल.

(भाऊंची पाणीपुरी खाण्यास आतुर) मनस्वी

विजुभाऊ Wed, 02/20/2008 - 15:56
मुळात हा प्रश्न ज्यान्च्यामुळे तयार झाल त्या बिहारी नेत्याना कोणी बोलताना दिसत नाहि. मुलायम सिन्ग किन्वा अबु आझ्मि यानि युपी बिहार सठी काय केले याचा जाब त्यान कोणिच विचारत नाहि?

In reply to by विजुभाऊ

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 16:16
पाणी पुरी खाल्लि नाहि म्हनुन भैय्या जाणर नाहि अहो विजयशाह, तेच विचारते आहे, मग कसे जातील? राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 01:11
नुसते पाणीपुरी बंद करून काय होणार आहे. आख्खी मुंबई भैय्याचे(म्हणजे त्याच्या म्हशीचे) दूध पिते. मग तुम्ही दूध पिणे पण बंद करणार का? त्या ऐवजी काढा एखादी डेअरी.... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 12:49
तुम्हाला नक्की म्हणायचय काय? मला खरच कळलं नाही, मी प्रामाणिकपणे एक मराठी माणूस म्हणून योग्य ते सर्व प्रयत्न करायला तयार आहे. मान्य आहे पाणीपूरी भैय्याकडे खाणे बंद करून भैंय्या जाणार नाही, पण सुरूवात कुठून तरी केलीच पाहीजे ना? आणि तुमच्या सल्ल्याप्रमाणे डेअरी काढून तरी जातील का? खरंच जाणार असतील तर मी तेही करायला तयार आहे. हाच तर मूळ मुद्दा आहे, मराठी माणसाकडे सर्व आहे. सगळे म्हणतात तेवढा (माझ्या मते) मराठी माणूस आळशीही नाही. एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे - यश मिळेपर्यंत वाट पाहण्याची तयारी किंवा पेशंन्स आपल्याला आकाशात उडणार्‍या कल्पना आवडतात, पण त्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात म्हणून आपण धड्पड्तोही. पण जेव्हा आपल्या लक्ष्यात येतं की त्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागणार आहे, तेव्हा आपले पेशंन्स संपतात. आपल्याला सगळ्या गोष्टी एका मिनिटात व्हाव्यात असं वाटत असत. समाजात बदल व्हावा असं मनापासून आपल्याला वाटतं पण फक्त एका मिनिटात. विचार केल्यानंतर मला वाटलं पाणीपूरी बंद करून मी कुठुनतरी सुरूवात तर करत आहे ना?मला माहित आहे, अगदी काहीही केलं तरी भैंय्या एका मिनिटात जाणार नाहीत आणि गेले तरी ते सर्वांसाठीच घातक आहे (विचार करा आपल्याला काय काय मिळ्णार नाही?) त्यासाठी वाट पाहावी लागेल. पण हातावर हात ठेवून नाही. छोटी का होईना पण सुरूवात करावी लागेल. कदाचित उद्या यातूनच समाजात बदल घडेल. ही अतिशयोक्ति नाही. आठवून बघा आपला देश काही एका मिनिटात स्वतंत्र झाला नाही. पण सुरूवात एका छोट्याश्या उठावाने झाली होती. दुसरा मुद्दा म्हणजे राजकारणाचा, बिहार किंवा इतर प्रांतातल्या नेत्यानी स्वच्छ कारभार चालवला तर बर्‍याच तरूणाना रोजगार मिळेल आणि शहरातली बरीच गर्दी कमी होईल असे बर्‍याच जणांचे मत आहे. पण माफ करा मी सद्ध्या तरी याबाबतीत काहीच करू शकत नाही. अगदी छोटीशी सुरूवात सुद्धा ! कारण राजकिय नेत्यांमध्ये परीवर्तन घडवून आणण्याची ताकद सद्ध्यातरी माझ्याकडे नाही. माझा भैंयाकडे पाणीपूरी न खाण्याचा निर्णय छोटा जरी असला तरी माझी वाट पाहण्याची तयारी आहे. कदाचित आपल्या पुढच्या पिढीला मराठी महाराष्ट्रात राहायला मिळेल. समाजात बदल योग्य त्या वेगाने झाला तर ते समाजासाठी घातक ठरत नाही असे माझे मत आहे. फक्त एकच ईच्छा, माझा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्यापेक्षा जर प्रत्यक्ष क्रुतीत उतरवता येण्यासारखा योग्य उपाय सांगितलात तर मी त्याचे स्वागतच करेन. शेवटी महाराष्ट्राच हित महत्वाच! राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/21/2008 - 13:06
माझा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्यापेक्षा ..... निर्णय अजिबात चूक नाही. आदर्शवादी आहे आणि तो शक्यतो सर्वांनी पाळावा. माझ्या प्रतिसादात मी आपल्या निर्णयाला चूक म्हंटलेले नाही पण मराठी माणसाची व्यथा आणि असहाय्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भय्याकडच्या पाणीपुरीवर बहिष्कार घालणं हे एक छोटसं असल तरी परंप्रांतीयांच्या मुंबई आकर्षणाला ठेचून काढण्याच्या प्रयत्नातील पहिलं पाऊल असेल. (उपाय: पाणीपुरी घरच्या घरी बनवून मजा करा.) पाणीपुरी वरील बहिष्कार हे प्रातिनिधीक उदहरण झाले. त्याच प्रमाणे भय्याकडून मासे नघेणे, पान न खाणे इत्यादी अनेक मार्ग आहेत. मुळ उद्देश हा की भय्यांवर सर्वतोपरी बहिष्कार घातला पाहिजे. त्याशी मी सहमत आहे. इतर भाषिक (गुजराथी, बंगाली, कानडी, मारवाडी...इ.) ह्या बहिष्कारात सामिल होणार नाहीत हे दुर्दैव आहे. थोडीफार हाणामारी करावीच लागणार. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 14:22
माफ करा पेठकर साहेब, माझा प्रतिसाद आपल्या प्रतिसादाला उद्देशून नव्हता. भैंयाकड्चे दूध बंद करून तुम्ही डेअरी चालू करा, असा सल्ला मिळाला म्हणून मला वरील अभिप्राय द्यावा लागला. त्याऍवजी मी दूध डेअरी चालू करतो. असा अभिप्राय आला असता तर अश्या वैयक्तिक निर्णयाला माझी हरकत नाही. एकदम मान्य ! आजपासून् पाणीपूरीबरोबरच भय्याकडून मासे घेणे, पान खाणे बंद! राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 22:38
भैंयाकड्चे दूध बंद करून तुम्ही डेअरी चालू करा, असा सल्ला मिळाला म्हणून मला वरील अभिप्राय द्यावा लागला. आता बघा सगळ्या मुंबईमधल्या मराठी लोकांनी भैयाकडचे दूध घेणे बंद केले तर त्याना दूधाचा मराठी पर्याय उपलब्ध आहे? 'गोकुळ','कृष्णा','वारणा' इ. मराठी ब्रँडची दुधे वितरण करणारे मोठे व्यापारीपण सर्वत्र मराठी नाहीत. तुम्ही मुंबई मधे समजा भैयाकडची पाणिपुरी बंद केलीत तर मुंबईत सर्वत्र मराठी पाणिपुरीचे पर्याय उपलब्ध आहेत? मध्यंतरी आनंद दिघे हयात असताना त्यानी मंडईमधले भैये सर्व हाकलून बाहेर काढले होते. मग ते परत कसे आले? मराठी माणसाने भाजी विकण्याऐवजी गाळा भाड्याने देऊन फुकट खाणे पसंत केले ना? मूळ मुद्दा हा आहे. हाच मुद्दा मी मागे एका चर्चेमधे व्यक्त केला होता. दुखण्यावर वर वर चे ईलाज करण्यापेक्षा जखमेच्या मूळाशी जाऊन उपाय करणार कोण? मध्यंतरी देवगडमधे आंबा उत्पादकांनी दलालांची नफेखोरी आणि त्यामुळे आंबा उत्पादकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 'सोसायटी' स्थापन करून आंबा वितरण चालू केले होते.(याला चांगला उपाय म्हणता येईल) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मनस्वी Fri, 02/22/2008 - 10:04
गाळे जरूर भाड्याने द्यावेत, पण ते फक्त मराठी माणसालाच द्यावेत. (जसे खात्रीशीर माहित नाही पण डबेवाले फक्त मराठी माणसांनाच घेतात म्हणे धंद्यात!) करायचे झाल्यास सगळेच शक्य आहे हळू हळू का होईना. नाहीतर मग हजार सबबी आहेत. (कासव) मनस्वी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 10:36
मध्यंतरी देवगडमधे आंबा उत्पादकांनी दलालांची नफेखोरी आणि त्यामुळे आंबा उत्पादकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 'सोसायटी' स्थापन करून आंबा वितरण चालू केले होते.(याला चांगला उपाय म्हणता येईल) पुण्याचे पेशवे मिराशीसाहेब खूप चांगला पर्याय आहे. असा पर्याय कृतीत उतरला तर सगळेच प्रश्न लवकरच मिटतील. पण खरा प्र्श्न आहे, तो वास्तवतेचा! आता आपण सगळे आपापले व्यवसाय सोडून केवळ भैंयांना हाकलायचे म्हणून त्यांचे व्यवसाय नाही स्वीकारू शकत. आणि बेकार मराठी तरूण शोधून त्यांना कामधंद्याला नाही लावू शकत. कारण आपली शक्ती कमी पडेल. यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. पण पुन्हा सुरूवात कुठुन करायची ? राजमुद्रा :)

मदनबाण गुरुवार, 02/21/2008 - 10:13
इथे येता येत नाही ,,,आता हा सन्देश सर्व मराठी जनते ने दिला पहिजे . मुंबई ही यूपी वाल्याच्या बापाची नाही. हमार तोहार आता बस झाले.

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 10:18
हे असले बिहरी ओझे वागवत बसण्यापेक्शा महाराश्ट्राने स्वतन्त्र व्हावे........ किन्वा महाराश्ट्रात इतराना येन्यास प्रतिबन्ध घालावा

सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 12:44
आहे. उरलेल्या ७३ टक्क्यातील लोक थोडेच केवळ तो मराठी म्हणून त्याचे ग्राहक होणार? जास्त चांगल्या दर्जाचा माल, जास्त चांगल्या प्रतीची सेवा आणि वाजवी किंमत ही या ७३ टक्के बाजाराची अपेक्षा आहे. या कसोटयावर मराठी माणूस श्रेष्ठ ठरला तर जरूर टिकाव धरेल. डार्विनच्या 'फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल' या तत्त्वाला अनुसरून मराठी माणसाने या निकषावर आपली श्रेष्ठता वाढवली तरच तो टिकेल. आपण कंठशोष केल्याने नाही. स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे.

मदनबाण Mon, 02/25/2008 - 13:37

मला मेल मधुन आलेल्या चारोळ्या.....

चांगल्या भाषेत सांगीतले

परप्रांतियांना काही समजत नाही

दोन कानाखाली बसल्याशिवाय

त्यांना मराठी ताकद उमगत नाही

------------------------------

अमरसिंग नावाची पिडा

अमिताभला छळू लागली आहे

शहाणी वाटणारी जया देखील

नको ते बरळू लागली आहे

-----------------------------

मराठी दणका बसताच

परप्रांतियांची पळताभुई थोडी झाली

मगरुर टॅक्सीवाले,दुधवाले भैयांच्या

भाषेत देखील आता गोडी आली

------------------------------

प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो

तो मागुन मिळत नाही

बिहारच्या "चालू" यादवला

सांगुनही हे कळत नाही.

-------------------------------

हिंदी न्यूज चॅनलांचे कालच

जोरात बारसे झाले चांगले

मराठी लोक आता त्यांना

"भैय्या" न्यूजचॅनल म्हणू  लागले 

 

मदनबाण Mon, 02/25/2008 - 14:49

मला मेल मधुन आलेली ही आणखीन एक कविता:-----

खूप सहन केली

मराठी माणसाची व्यथा

आता या परप्रातियांच्या

कमरेत घालणार लाथा

तुम्ही दिडदमडीचे लोक

आम्हाला शिकवता देशभक्ती

ब्रिटीशांच्या विरुद्ध लढली

सर्वात ज्यास्त मराठीशक्ती

खबरदार जर केली

नजर जरादेखील करडी

तर उगारलेल्या काठीवरच

बांधू आम्ही तुमची तिरडी

भारत देशासाठी सदैव

बलिदानास तयार मराठी

आमच्या घरात घुसुन धमकावाल

तर बसेल डोक्यात काठी

तुमची मातृभाषा कोणतीही असो

तुमचे कर्तव्य ईथली संस्कॄति जपणे

येथे तुम्ही मराठीचा आदर करा

एवढेच आहे मराठी माणसाचे म्हणणे

-------------------------------

महाराष्ट्र ..... मराठी मनांचा

जय महाराष्ट्र

(मदन-बाण)

In reply to by मदनबाण

ब्रिटीशांशीच नाही तर सर्व परकीयांशी. अहमदशहा अब्दालीशी लढणारे मराठेच होते.  'औरंग्या पाप्याला' बुडविणारे पण मराठेच होते. एक राणा प्रताप आणि सुरुवातीचे काही रजपूत राजे सोडले तर सर्व रजपूत राजांनी एक मुल़गी मुघल सम्राटाला अर्पण करायचे धोरण ठेवले होते.

शेवटी स्वाभिमान रक्तातच असावा लागतो तो बाहेरून भरता येत नाही.

 हे भय्ये कितीही चांगली पाणीपुरी बनवत असले तरी ती त्याना त्यांच्या प्रदेशात विकता येत नाही कारण एकतर तिथल्या लोकांची क्रयशक्ती नाही आणि दुसरे म्हणजे तिथले स्थानिक गुंड त्याना सुखासुखी धंदा करू देणार नाहीत. इकडचे पोलीस हफ्ता घेतल्यावर का होईना पण त्याना सुखाने धंदा करू देतात.

पुण्याचे पेशवे

माझी दुनिया Mon, 02/25/2008 - 17:34
अ'राज'क माजवणा-या माननीय श्री. राज ठाकरे यांच्या भाषणातला काही भाग इथे एका.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
गेले काही दिवस मिसळपाववरच काय पण सगळीकडेच "मुंबई आणि मराठी माणूस" यावर प्रत्येकजण आपापले मत मांडत आहे. त्याचसंदर्भात हा लेख वाचनात आला आणि तुमच्याबरोबर share करावासा वाटला. कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. "काथ्याकुट" मध्ये अशासाठी की तुमच्याही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. मनस्वी

स्वैराचाराला मान्यता ?

माझी दुनिया ·

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 23:09
जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ? निरोधच्या वापरासाठी पुरुष विवाहित असण्याची काय गरज? विवाहित पुरूष स्वैराचारी नसतात असे कोणी आणि कुठे म्हंटले आहे?

पिवळा डांबिस Tue, 02/19/2008 - 23:34
मला तरी त्या बातमीतलं, "आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार बनवण्यात येणारे निरोध भारतीय माणसासाठी मोठे असतात." हे विधान जास्त चिंताजनक (व अपमानास्पद?) वाटलं... या विधानाचा व्यत्यास काय होतो त्याचा विचार करा... :))

चतुरंग Tue, 02/19/2008 - 23:56
हे बाकी थेट 'विषया'लाच हात घालणं आपल्याला आवडलं हां! तसा आशियामधील माणूस एकूणच पाश्चिमात्य लोकांपेक्षा चणीने लहानच असतो आणि (तरीही!) एकूण भारतीयांचा जननदर पाहता लोकसंख्यावाढीची चिंताच जास्त वाटायला हवी;)) चतुरंग

पिवळा डांबिस Wed, 02/20/2008 - 09:01
चतुरंगांनी मांडलेला लहान चणीचा मुद्दा अगदी मान्य आहे. मलाही हेच म्हणायचे आहे. माझा आक्षेप बातमीत वापरलेल्या "जागतिक प्रमाण" या शब्दप्रयोगावर आहे. जपान, अवघी अतिपूर्व, आणि चीन देशांतल्या लोकांची शरीरयष्टी (चण) आपल्यापेक्षाही लहान आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानातील लोक आपल्या चणीचेच आहेत. जगातील बहुसंख्य लोकसंख्या या भागात एकवटली असतांना 'जागतीक प्रमाण' ठरवायचे ते इथल्या जनतेचे ठरवायला हवे. त्यामुळे या बातमीतला आणि त्या संस्थेच्या पत्रकातला 'जागतिक प्रमाण' हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. फारतर "पाश्चात्य प्रमाण'" म्हणा हवं तर.... उगाच आमच्या पोरांना न्यूनगंड द्यायचा म्हणजे काय? :)) आणि पाश्चात्य प्रमाण भारतीय प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. एकतर त्यांची चण मोठी आहे आणि त्यांचे मेंदूही तिथेच एकवटले आहेत! म्हणून तर त्यांच्या लग्नसंस्थेची ही तर्‍हा!! :))

In reply to by पिवळा डांबिस

एक गुरुवार, 02/21/2008 - 06:15
गोष्ट नेहमी सांगितली जाते.. खेळातलं यश तलवार चालवण्याच्या कसबावर अवलंबून असतं तलवारीच्या मोजमापावर नाही.. (समझने वालों को इशारा काफी है! ;-)) -एक एपी फेन्सर.

In reply to by एक

पिवळा डांबिस Sun, 02/24/2008 - 22:49
खेळातलं यश तलवार चालवण्याच्या कसबावर अवलंबून असतं तलवारीच्या मोजमापावर नाही..

(समझने वालों को इशारा काफी है! ;-))

इशारा तो समझ गये, जनाब! :)

लेकिन माशाल्ला, तरवारकी जगह तो तरवारही चाहिये ना?  वहां 'कट्यार' तो नही चलती!! :))

In reply to by पिवळा डांबिस

धनंजय Mon, 02/25/2008 - 01:56
कट्यार.

बाजी़में फतह तो हथियार हजा़र! 

(बहुतेक शिकारीसाठी दोन इंचांची कुशल कट्यार पुरते. वाघनख [एक] पुरणार नाही,पण बहुतेक वाघांकडे केवळ एक वाघनख तेवढेच नसते. त्यामुळे तो विषय ९९.९९% काढायची गरज नाही.)

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 01:20
"आणि पाश्चात्य प्रमाण भारतीय प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. एकतर त्यांची चण मोठी आहे आणि त्यांचे मेंदूही तिथेच एकवटले आहेत! म्हणून तर त्यांच्या लग्नसंस्थेची ही तर्‍हा!! :))" अगदी खरे आहे.... ;) (अमेरीकेतही ब्रम्हचर्य जपलेला) डॅनी पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 01:30
अवांतर शंका/प्रश्न! (अमेरीकेतही ब्रम्हचर्य जपलेला) फक्त शरीरानं ब्रह्मचर्य जपलंत की मनानेही जपलंत? कृपया प्रामाणिक उत्तर द्या. अर्थात, सक्ती नाही! मनानेही जपलं असेल तर खरंच कौतुकास्पद आहे! नायतर फक्त शरीराने तेवढे ब्रह्मचारी आणि मनामध्ये मात्र फँटसिज सुरूच असतात म्हणून म्हटलं! :) नाही, पुष्कळदा प्रॉपर चान्स मिळाला नाही म्हणूनदेखील शारिरिक ब्रह्मचर्य (सक्तिचं!) हे आपसुकच पदरात पडतं म्हणून विचरतो! ;) असो.. आपला, (अविवाहीत!) तात्या. -- 'फक्त शरीरापासून दूर गेलास की गेलास का मोहापासून दूर? जरूर मन जिंकायला शिक पण अगोदर त मन कुठं बसलंय हे तर बघशील की नाही?!' -- इति काकाजी. (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

धनंजय गुरुवार, 02/21/2008 - 01:53
पुष्कळदा प्रॉपर चान्स मिळाला नाही म्हणूनदेखील शारिरिक ब्रह्मचर्य (सक्तिचं!) हे आपसुकच पदरात पडतं म्हणून विचरतो! ;) ... 'फक्त शरीरापासून दूर गेलास की गेलास का मोहापासून दूर? जरूर मन जिंकायला शिक पण अगोदर त मन कुठं बसलंय हे तर बघशील की नाही?!' -- इति काकाजी. (नाटक - तुझे आहे तुजपाशी) हाहाहा! माझ्या मते नैतिकतेचा लैंगिक संबंधांशी १-ला-१ संबंध (१-तु-१ कॉरस्पाँडन्स) नाही. अगदी लग्न होऊनही पती/पत्नीला इच्छा नसताना शारिरिक संबंध ठेवणे माझ्या मते अनैतिक. आणि आपल्या हाताला मऊ लागते आहे म्हणून काही कुस्करल्याचे भान राहू नये, हे अनैतिक. (मग तिथे लैंगिक संबंध न ठेवताही, प्रेमात फसवले तर अनैतिकच!) आणि दोघांच्या आनंदाची जोपासना होत असेल, दूरान्वयेही नुकसान होत नसेल, तर लैंगिक संबंधांत काही अनैतिक नाही. (येथे रोगांच्या बाबतीत निष्काळजी असणे = दूरान्वये नुकसान = अनैतिक, हे उदाहरणादाखल घ्यावे.) या बाबतीत र. धों. कर्वे यांचे असेच काही मत होते असे ऐकून आहे (म्हणजे लैंगिक संबंध आणि नैतिकता यांचा १-ला-१ संबंध नाही, असे काही.) पण त्यांचे मूळ लेखन मी वाचलेले नाही.

In reply to by विसोबा खेचर

'संदीप खरे ' याची एक उत्तम कविता आठवली. "अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा, अजून तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा| कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी, कुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुकमी, अन शब्दांचे जाम भरोनि पाजियले कोणी, अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा|" ब्रम्हचर्य जपलेला :) म्हटले आहे पाळलेला (सक्तीने ट्रॅफिकचे नियम पाळतो ) नाहीये. :) (ह्.घ्या.) :) :) पुण्याचे पेशवे

चतुरंग गुरुवार, 02/21/2008 - 03:11
तात्या म्हणतात तसे शारीरिक ब्रम्हचर्य ही फारच वरवरची बाब आहे. विवेकानंदांनी म्हटले आहे "माणूस सार्वजनिक ठिकाणी नैतिकतेनेच वागतो (अर्थात आजच्या काळातले महाभाग बघून स्वामींनी हे म्हणण्याचे धाडस केले नसते!) पण तो एकांतात असताना कसा वागतो त्यावरुन त्याचे वागणे नैतिक की अनैतिक हे ठरवता येते." ह्याठिकाणी लैंगिक गोष्टींचा संबंध यायलाच हवा असे नाही. नैतिकतेमधे विचारांचा संबंध प्रथम येतो, मग मनाचा आणि त्यानंतर कृतीचा. चतुरंग

In reply to by चतुरंग

कोलबेर गुरुवार, 02/21/2008 - 06:28
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू विवेकानंद, निदान एकांतात तरी माणसाला एकटे सोडावे! :) बाकी नैतिक अनैतिक चालू द्या!!!

सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 13:58
... मिळावी म्हणूनच हल्ली वार्ताहर असे शब्दप्रयोग करतात. मीडियाचे हे आता नेहमीच वापरले जाणारे सवंग तंत्र आहे. आपण लक्ष देण्याइअतकी या बातमीची लायकी नाही. अनुल्लेखाने मारावे.

परीचा परा Mon, 02/25/2008 - 12:59

अहो कसला स्वैराचाराला पाठिंबा सरकार देतोय असे वाटते आहे?

ज्याला स्वैराचार करायचाच तो करणारच...

मग सरकारला काय कायदा करायचा तो करु दे....

तसेही सरकारच्या सध्याच्या कायद्यामुळे काही  मुलींचे  पालक आपल्या मुलीची चूक असली तरी आपल्या प्रतिष्ठेसाठी मुलावर डायरेक्ट बलात्काराची खोटी केस ठोकतात.... बरे यात मुलाचीच बदनामी होते ...भोगावे मुलाच्या कुटुंबियांनाच... मुलीचे आणि घरच्यांचे नाव सुरक्षित राहते. किमान या असल्या गोष्टीला तरी या नव्या कायद्यामुळे आळा बसेल... कारण प्रेमविवाह असेल तर मुला-मुलींचे पालक पहिले वय बघतात आणि अल्पवयीन या सवलतीखाली आपली मनमानी करतात... बर्‍याच वेळा ते योग्यदेखील असतात. पण त्या योग्य बाजूचे समर्थन करण्याचा हा मार्ग नव्हे असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते....

रोखठोक प्रेमी ...

{परीच्या प्रतिक्षेत} परा ....

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 23:09
जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ? निरोधच्या वापरासाठी पुरुष विवाहित असण्याची काय गरज? विवाहित पुरूष स्वैराचारी नसतात असे कोणी आणि कुठे म्हंटले आहे?

पिवळा डांबिस Tue, 02/19/2008 - 23:34
मला तरी त्या बातमीतलं, "आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार बनवण्यात येणारे निरोध भारतीय माणसासाठी मोठे असतात." हे विधान जास्त चिंताजनक (व अपमानास्पद?) वाटलं... या विधानाचा व्यत्यास काय होतो त्याचा विचार करा... :))

चतुरंग Tue, 02/19/2008 - 23:56
हे बाकी थेट 'विषया'लाच हात घालणं आपल्याला आवडलं हां! तसा आशियामधील माणूस एकूणच पाश्चिमात्य लोकांपेक्षा चणीने लहानच असतो आणि (तरीही!) एकूण भारतीयांचा जननदर पाहता लोकसंख्यावाढीची चिंताच जास्त वाटायला हवी;)) चतुरंग

पिवळा डांबिस Wed, 02/20/2008 - 09:01
चतुरंगांनी मांडलेला लहान चणीचा मुद्दा अगदी मान्य आहे. मलाही हेच म्हणायचे आहे. माझा आक्षेप बातमीत वापरलेल्या "जागतिक प्रमाण" या शब्दप्रयोगावर आहे. जपान, अवघी अतिपूर्व, आणि चीन देशांतल्या लोकांची शरीरयष्टी (चण) आपल्यापेक्षाही लहान आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानातील लोक आपल्या चणीचेच आहेत. जगातील बहुसंख्य लोकसंख्या या भागात एकवटली असतांना 'जागतीक प्रमाण' ठरवायचे ते इथल्या जनतेचे ठरवायला हवे. त्यामुळे या बातमीतला आणि त्या संस्थेच्या पत्रकातला 'जागतिक प्रमाण' हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. फारतर "पाश्चात्य प्रमाण'" म्हणा हवं तर.... उगाच आमच्या पोरांना न्यूनगंड द्यायचा म्हणजे काय? :)) आणि पाश्चात्य प्रमाण भारतीय प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. एकतर त्यांची चण मोठी आहे आणि त्यांचे मेंदूही तिथेच एकवटले आहेत! म्हणून तर त्यांच्या लग्नसंस्थेची ही तर्‍हा!! :))

In reply to by पिवळा डांबिस

एक गुरुवार, 02/21/2008 - 06:15
गोष्ट नेहमी सांगितली जाते.. खेळातलं यश तलवार चालवण्याच्या कसबावर अवलंबून असतं तलवारीच्या मोजमापावर नाही.. (समझने वालों को इशारा काफी है! ;-)) -एक एपी फेन्सर.

In reply to by एक

पिवळा डांबिस Sun, 02/24/2008 - 22:49
खेळातलं यश तलवार चालवण्याच्या कसबावर अवलंबून असतं तलवारीच्या मोजमापावर नाही..

(समझने वालों को इशारा काफी है! ;-))

इशारा तो समझ गये, जनाब! :)

लेकिन माशाल्ला, तरवारकी जगह तो तरवारही चाहिये ना?  वहां 'कट्यार' तो नही चलती!! :))

In reply to by पिवळा डांबिस

धनंजय Mon, 02/25/2008 - 01:56
कट्यार.

बाजी़में फतह तो हथियार हजा़र! 

(बहुतेक शिकारीसाठी दोन इंचांची कुशल कट्यार पुरते. वाघनख [एक] पुरणार नाही,पण बहुतेक वाघांकडे केवळ एक वाघनख तेवढेच नसते. त्यामुळे तो विषय ९९.९९% काढायची गरज नाही.)

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 01:20
"आणि पाश्चात्य प्रमाण भारतीय प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. एकतर त्यांची चण मोठी आहे आणि त्यांचे मेंदूही तिथेच एकवटले आहेत! म्हणून तर त्यांच्या लग्नसंस्थेची ही तर्‍हा!! :))" अगदी खरे आहे.... ;) (अमेरीकेतही ब्रम्हचर्य जपलेला) डॅनी पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 01:30
अवांतर शंका/प्रश्न! (अमेरीकेतही ब्रम्हचर्य जपलेला) फक्त शरीरानं ब्रह्मचर्य जपलंत की मनानेही जपलंत? कृपया प्रामाणिक उत्तर द्या. अर्थात, सक्ती नाही! मनानेही जपलं असेल तर खरंच कौतुकास्पद आहे! नायतर फक्त शरीराने तेवढे ब्रह्मचारी आणि मनामध्ये मात्र फँटसिज सुरूच असतात म्हणून म्हटलं! :) नाही, पुष्कळदा प्रॉपर चान्स मिळाला नाही म्हणूनदेखील शारिरिक ब्रह्मचर्य (सक्तिचं!) हे आपसुकच पदरात पडतं म्हणून विचरतो! ;) असो.. आपला, (अविवाहीत!) तात्या. -- 'फक्त शरीरापासून दूर गेलास की गेलास का मोहापासून दूर? जरूर मन जिंकायला शिक पण अगोदर त मन कुठं बसलंय हे तर बघशील की नाही?!' -- इति काकाजी. (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

धनंजय गुरुवार, 02/21/2008 - 01:53
पुष्कळदा प्रॉपर चान्स मिळाला नाही म्हणूनदेखील शारिरिक ब्रह्मचर्य (सक्तिचं!) हे आपसुकच पदरात पडतं म्हणून विचरतो! ;) ... 'फक्त शरीरापासून दूर गेलास की गेलास का मोहापासून दूर? जरूर मन जिंकायला शिक पण अगोदर त मन कुठं बसलंय हे तर बघशील की नाही?!' -- इति काकाजी. (नाटक - तुझे आहे तुजपाशी) हाहाहा! माझ्या मते नैतिकतेचा लैंगिक संबंधांशी १-ला-१ संबंध (१-तु-१ कॉरस्पाँडन्स) नाही. अगदी लग्न होऊनही पती/पत्नीला इच्छा नसताना शारिरिक संबंध ठेवणे माझ्या मते अनैतिक. आणि आपल्या हाताला मऊ लागते आहे म्हणून काही कुस्करल्याचे भान राहू नये, हे अनैतिक. (मग तिथे लैंगिक संबंध न ठेवताही, प्रेमात फसवले तर अनैतिकच!) आणि दोघांच्या आनंदाची जोपासना होत असेल, दूरान्वयेही नुकसान होत नसेल, तर लैंगिक संबंधांत काही अनैतिक नाही. (येथे रोगांच्या बाबतीत निष्काळजी असणे = दूरान्वये नुकसान = अनैतिक, हे उदाहरणादाखल घ्यावे.) या बाबतीत र. धों. कर्वे यांचे असेच काही मत होते असे ऐकून आहे (म्हणजे लैंगिक संबंध आणि नैतिकता यांचा १-ला-१ संबंध नाही, असे काही.) पण त्यांचे मूळ लेखन मी वाचलेले नाही.

In reply to by विसोबा खेचर

'संदीप खरे ' याची एक उत्तम कविता आठवली. "अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा, अजून तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा| कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी, कुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुकमी, अन शब्दांचे जाम भरोनि पाजियले कोणी, अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा|" ब्रम्हचर्य जपलेला :) म्हटले आहे पाळलेला (सक्तीने ट्रॅफिकचे नियम पाळतो ) नाहीये. :) (ह्.घ्या.) :) :) पुण्याचे पेशवे

चतुरंग गुरुवार, 02/21/2008 - 03:11
तात्या म्हणतात तसे शारीरिक ब्रम्हचर्य ही फारच वरवरची बाब आहे. विवेकानंदांनी म्हटले आहे "माणूस सार्वजनिक ठिकाणी नैतिकतेनेच वागतो (अर्थात आजच्या काळातले महाभाग बघून स्वामींनी हे म्हणण्याचे धाडस केले नसते!) पण तो एकांतात असताना कसा वागतो त्यावरुन त्याचे वागणे नैतिक की अनैतिक हे ठरवता येते." ह्याठिकाणी लैंगिक गोष्टींचा संबंध यायलाच हवा असे नाही. नैतिकतेमधे विचारांचा संबंध प्रथम येतो, मग मनाचा आणि त्यानंतर कृतीचा. चतुरंग

In reply to by चतुरंग

कोलबेर गुरुवार, 02/21/2008 - 06:28
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू विवेकानंद, निदान एकांतात तरी माणसाला एकटे सोडावे! :) बाकी नैतिक अनैतिक चालू द्या!!!

सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 13:58
... मिळावी म्हणूनच हल्ली वार्ताहर असे शब्दप्रयोग करतात. मीडियाचे हे आता नेहमीच वापरले जाणारे सवंग तंत्र आहे. आपण लक्ष देण्याइअतकी या बातमीची लायकी नाही. अनुल्लेखाने मारावे.

परीचा परा Mon, 02/25/2008 - 12:59

अहो कसला स्वैराचाराला पाठिंबा सरकार देतोय असे वाटते आहे?

ज्याला स्वैराचार करायचाच तो करणारच...

मग सरकारला काय कायदा करायचा तो करु दे....

तसेही सरकारच्या सध्याच्या कायद्यामुळे काही  मुलींचे  पालक आपल्या मुलीची चूक असली तरी आपल्या प्रतिष्ठेसाठी मुलावर डायरेक्ट बलात्काराची खोटी केस ठोकतात.... बरे यात मुलाचीच बदनामी होते ...भोगावे मुलाच्या कुटुंबियांनाच... मुलीचे आणि घरच्यांचे नाव सुरक्षित राहते. किमान या असल्या गोष्टीला तरी या नव्या कायद्यामुळे आळा बसेल... कारण प्रेमविवाह असेल तर मुला-मुलींचे पालक पहिले वय बघतात आणि अल्पवयीन या सवलतीखाली आपली मनमानी करतात... बर्‍याच वेळा ते योग्यदेखील असतात. पण त्या योग्य बाजूचे समर्थन करण्याचा हा मार्ग नव्हे असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते....

रोखठोक प्रेमी ...

{परीच्या प्रतिक्षेत} परा ....

नुकतीच ही बातमी वाचनात आली. आधीच शासनाने लग्नाचे वय कमी करण्याचा घेतलेला निर्णय. शिवाय सध्याच्या युगात लग्नापुर्वी एड्सची चाचणी सक्तीची न करण्याचा घेतलेला निर्णय असे काही निर्णय पहाता तरूण पिढी चुकीच्या दिशेने/वाटेने चालली आहे याची काळजी वाटते. या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, जे १००० इच्छूक तरूण भाग घेणार आहेत ते किमान विवाहीत असतील याची खातरजमा कंपनी करणार आहे का ? अन्यथा तो स्वैराचाराला पाठींबाच ठरेल.

श्रीमंतयोगी..

सरपंच ·

In reply to by सृष्टीलावण्या

पिवळा डांबिस गुरुवार, 02/21/2008 - 23:38
महाराज असते तर.... काही विधायक काम करण्याऐवजी मि. पा. कट्ट्यावर चकाट्या पिटणार्‍या आपल्याला पाहून म्हणाले असते, "कोण आहे ते तिकडे? या सगळ्या रिकामटेकड्या हरामखोरांना उलटे टांगून राखेचे तोबरे द्या!!" :))

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट Fri, 02/29/2008 - 12:29
म्हणूनच हल्ली आम्ही महाराजांचं लक्ष नाही, असं पाहून हळूच मिपावर येतो :-) बाकी डांबिसराव, क्यालिफोर्नियात एक पिवळा ड्यांबिस आहे हे बघून लय झ्याक वाटलय बघा.

- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 10:48

तुम्हाला व्यक्तीगत संदेश द्यायचा प्रयत्न केला पण हे तिच्यायला जेंव्हापासून साईट अपडेट केलंय ना तेंव्हापासून हजार अडचणी येतायत!!

जर कधी आलांत लॉस एंजेलिस परिसरात तर मला कळवा आणि जरूर माझ्याकडे रहायलाच या.  जर मी बे एरियात आलो तर जरूर कळवीन...

स्नेह व्हावा व तो वाढावा ही कामना.

आपला,

पिवळा डांबिस

 

In reply to by रविराज

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:00
समर्थांनी, 'निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसि आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी! असं म्हटलं आहे. 'श्रीमानयोगी' हे रणजीत देसायांच्या कादंबरीचे नांव आहे. अवांतर - माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे. आपला, (कुरुंदकरप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Tue, 02/19/2008 - 23:48
माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे. विशेषतः शिवरायांना अवतार मानण्यापेक्षा, एक अलौकिक कर्तबगारीचा, पण आदर्श मानवच माना हे सूत्र त्यात अतिशय परिणामकारकरित्या मांडले आहे. आदर्श मानला तर त्याचे गुण आपल्यात यावे यासाठी माणूस प्रयत्न करतो. एकदा अवतार मानला की गंध, फुलं, अक्षता वाहून मोकळे व्हायची आपली परंपरा आहे... शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी|| शिवरायांचा डोळस भक्त, पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

तळेकर Wed, 02/20/2008 - 13:30
मला सुद्धा नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना आवडली, इतकी की पुन्हा पुन्हा वाचली. त्यांचे इतर साहित्य येथे देता आले तर काय बहार येईल. तात्या मग काय ?

अनिता Tue, 02/19/2008 - 07:34
श्रीमंतयोगी / श्रीमानयोगी...मला वाटते दोन्ही बरोबर आहेत. थो. आबासाहेबासाठीच दोन्ही बिरुद जन्मास आलीत बहुतेक!

विकास Tue, 02/19/2008 - 09:25
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करताना जसे श्रीमंत योगी हे अचूक विशेषण आठवते तसेच त्यांच्यातील जे आवश्यक असलेले गूण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काव्यबद्ध केलेत त्यांची पण आठवण होते: जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी जी युक्ती पातशाह्यास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शुद्धी हेतूची कर्मी लाहूदे ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूदे ती शक्ती शोणितामाजी वाहू दे दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुझ ज्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||

In reply to by विकास

रयतेचा राजा, निश्चयाचा महामेरु, सकल जनांचा आधारु, छत्रपती शिवाजी महाराजांना आमचाही मानाचा मुजरा.......!!!! अवांतर :) विकासराव, गडावर जुने मावळे दिसले की जरा बरं वाटतं !!!!

प्राजु Tue, 02/19/2008 - 09:27
थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा.... मिसळपाव. कॉम चा वटवृक्ष असाच बहरत राहो. उत्तमोत्तम साहित्य इथे वाचायला मिळो... हीच श्रींची इच्छा...! - प्राजु

सर्वसाक्षी Tue, 02/19/2008 - 09:56
ज्या युगपुरूषाच्या दैदिप्यमान कर्तृत्वाने पुढे तीन शतकांनंतर जन्मलेल्या परंतु त्याचाच स्वातंत्र्य प्राप्तिचा वारसा चालविलेल्या क्रांतिकारकांना प्रभावित केले त्या महान शिवप्रभुंना सादर प्रणाम (महाराष्ट्रा पासुन शेकडो मैलांवर जन्मलेल्या हुतात्मा भगतसिंहांनी एक पत्रकार या नात्याने जेव्हा महाराष्ट्रात यायची त्यांना संधी मिळाली तेव्हा रायगडाला आवर्जुन भेट दिली होती तर ब्रिटिशांच्या नजरकैदेतुन सुटण्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्रांनी जदुनाथ सरकार लिखित शिवचरित्राचे पारायण केले होते - विशेषत: आग्र्याहून सुटकेचे)

सुमीत Tue, 02/19/2008 - 10:18
आमचा देखील त्रिवार मुजरा, बाकी तात्या सांगतात तसे "श्रीमान योगी" मध्ये मला पण नरहर कुरंदकरांची प्रस्तावना जास्त आवडली .

मनस्वी Tue, 02/19/2008 - 10:21
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर गायक :लता मंगेशकर संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर ========================= शिवरायांना माझा मानाचा मुजरा =========================

डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/19/2008 - 10:22
साजि चतुर॑ग बिर र॑ग मे॑ तुर॑ग चढि सरजा शिवाजी ज॑ग जीतन चलत है॑ । भूषन भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैब रनके रलत है॑ ॥ 'सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी' कु॑भकन्न असुर औतारी अवर॑गजेब कीन्ही कत्ल मथुरा दोहाई फेरी रब की ॥ खोदी डारे देवी देव सहर महल्ला बा॑के लाखन तुरूक कीन्हे छूटि गयी तब की ॥ भूषण भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ और कौन गिनतीमे॑ भूली गति भबकी ॥ चारो॑ वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ॥ देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डुबे राव राजे सभी गये लबकी ॥ गौरी गनपति आप औरनको देत ताप आपनीही बार सब मारि गये दबकी ॥ पीरा पयग॑बरा दिग॑बरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रबकी ॥ कासीहूकी कला जाती मथुरा मसीत होती सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ॥

विकास Tue, 02/19/2008 - 10:41
उरलेले कडवे... (कदाचीत आजच्या परिस्थितीसपण ज्याचा भावार्थ लागू होत असेल असे) .... हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा भग्न आज जयदुर्ग आसंवांमाजी ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा गड कोट जंजिरे सारे | भंगले जाहली राजधान्यांची | जंगले परदास्य-पराभविं सारी | मंगले या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

नीलकांत Tue, 02/19/2008 - 10:43
महाराष्ट्राच्या अखंड स्फुर्तीस्त्रोताला, जाणत्या राजाला... मानाचा मुजरा. नीलकांत

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 13:27
गो-ब्राम्हण क्षत्रियकुलावत॑स सि॑हासनाधिश्वर राजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराजा॑चे चरणि लक्ष लक्ष प्रणाम ! थोरल्या महाराजा॑ची जय॑ती आम्ही "कळसुत्री सरकार" तारिख ठरवत॑ म्हणून कधीही साजरी करत नाही. ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!! तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही. आपला - पिढ्या॑न् पिढ्या स्वराज्याच्या लग्नात आहुतीत उड्या मारायला गुढग्याला बाशि॑ग बा॑धून तयार राहणार्‍या देशमुखा॑चा अभिमानी वारस ध मा ल. अवा॑तर : मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही...जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो. सरप॑च, आपला हेतु खचितच स्तुत्य आहे, त्याबद्दल धन्यवाद. कृपया गैरसमज नसावा. माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 14:08
धमालराव, वादात आम्हालाही पडायचं नव्हते/नाही! महाराज केव्हा जन्मले यापेक्षा त्यांनी आयुष्यात काय कार्य केले, हे अधिक महत्वाचे! हा महापुरुष वर्षातनं फक्त एकच दिवस नव्हे तर अगदी रोजच प्रात:स्मरणीय आहे हेही नक्की. परंतु वर्षात एखाद् दिवस सर्वांनी मिळून त्यांचं पुण्यस्मरण करणे हेही आम्हाला अगत्याचे वाटले/वाटते आणि त्याच भावनेतून, केवळ आणि केवळ श्रद्धेपोटी आज येथे त्यांचे हे पुण्यस्मरण मिसळपाव करत आहे. आम्ही मोठे इतिहासकारही नाही, किंवा इतिहासाचे गाढे अभ्यासकही नाही. प्रांजळपणे सांगायचे तर चक्क कालनिर्णय बघून जगणारी माणसे आम्ही! आजचा १९ फेब्रुवारी हा दिवस त्यात शिवजयंती म्हणून नोंद झालेला आहे आणि तोच संदर्भ घेऊन मिसळपावने त्यांचे पुण्यस्मरण केलेले आहे आणि त्यामागे केवळ महाराजांच्या ठायीची असीम श्रद्धा असून अन्य कुठलेच कारण नाही. ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!! अगदी अवश्य होऊ द्या! मिसळपावने मात्र ती आजच साजरी केली आहे. प्रेमाने आणि श्रद्धेने! तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही. शिवाय हेही तुम्हीच म्हणताय! चांगला विरोधाभास आहे..! मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही... आणि असूही नये! जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो. वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय? माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे. मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो... आपला, (दु:खी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 14:29
चुकीची समजुत करून घेतलीत की हो.... माझ॑ म्हणण॑ तस॑ मुळीच॑ नाहीये. कदाचित माझी दरिद्री शब्दस॑पत्ती माझ्या योग्य भावना पोहोचवण्याच्या आड येते आहे...कस॑ सा॑गाव॑ हेच कळत नाहीये. वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय? वाईट वाटल॑ तात्या. माझ्या गाढवपणामुळ॑ अस॑ काही होईल ह्याची तीळमात्रही कल्पना नव्हती. मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो... ठिक आहे. चूक झाली. समस्त मिपाकर हो, माझ्या ह्या गाढवपणाची मी जाहिर माफी मागतो आहे. क्षमस्व. नाही त्या गोष्टी॑मुळे वातावरणात विष कालवल॑ जात असेल तर योग्य त्या वेळी उपाय केला पाहिजे. तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो. -कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 14:49
तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो. कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला अरे छोड दो यार! चलता है.. मला तुझा प्रतिसाद अस्थानी वाटला आणि म्हणून मी तसं लिहिलं! तुला ते पटलं आणि तू मोठ्या मनाने, खुल्या दिलाने दिलगिरी व्यक्त केलीस यातच सगळं आलं! तेव्हा आता हा विषय मिटला/संपला/गर्दीस मिळाला! :) बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय! तात्या. -- घाटातून जाताना वाटायचं की एकदा तरी मराठी सैन्य चढता उतरताना दिसावं! :) हरितात्यांनी आम्हाला कधी पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान दिला! चिमुकल्या मनगटात कसल्यातरी जोमाच्या मनगट्या घातल्या. त्यावेळी दिसल्या नाहीत तिच्या अदृष्य वळ्या. पंण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात! -- इति भाईकाका. (हरितात्या)

In reply to by धमाल मुलगा

सुधीर कांदळकर Wed, 02/20/2008 - 20:40
मेहेंदळे नावाच्या संशोधकांनी संशोधन करून ठरविली आहे. सरकारने नवे. वयाच्या २३व्या वर्षापासून ३९व्या वर्षापर्यंत त्यांनी या संशोधनासाठी वेचली. सर्व विद्वानांनी १९ फेब्रु. ही तारीख मान्य केली आहेत. फक्त शिवसेनादि राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी ती अमान्य केली.

In reply to by सुधीर कांदळकर

मालोजीराव गुरुवार, 09/16/2010 - 19:43
गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिला म्हणजे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे, आयुष्यभर झटून त्यांनी शिवचरित्र तयार केलं आज अनेक इतिहास कारांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते...पण मेहेंदळे यांच्या बाबत असे काही ऐकिवात नाही , सरदार आप्पा बळवंत मेहेंदळे यांचे ते वंशज आहेत असा ऐकून आहे !

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 11:38
इंद्र जिमि जृंभपर ! बाडव सुअंभपर ! रावण सदंभपर ! रघुकुल राज है !! पौन वारिवाह पर ! संभु रतिनाह पर ! ज्यो सहसवाह पर ! राम द्विज राज है ! दावा दृमदंड पर ! चिता मृगझुंड पर ! भूषण वितुंड पर ! जैसे मृगराज है !! तेज तमंअंस पर ! कन्न्ह जिमि कंस पर ! त्यों म्लेंच्छ बंस पर ! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! कवीराज भूषण.

मनस्वी Tue, 02/19/2008 - 11:46
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर, तुच्छ केले देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा गायक :लता मंगेशकर संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

केशवराव Tue, 02/19/2008 - 13:25
महाराष्ट्र धर्म वाढविणार्‍या , गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायापुढे सतत नतमस्तक !!!! शिवभक्त .... केशवराव .

बापु देवकर Tue, 02/19/2008 - 13:40
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ,आपणास मानाचा मुजरा..... राज....

समर्थांनी शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांना लिहीलेल्या पत्रातून "शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायाचे कैसे बोलणे || शिवरायाचे सलगी देणे| कैसे असे|| याहून करावे विशेष| तरीच म्हणावे पुरुष|| याऊपरी विशेष | काय सांगावे||" (थोरल्या राजांचे राज्य त्यांचा सेवक म्हणून चलवणारे) -पुण्याचे पेशवे

अव्यक्त Tue, 02/19/2008 - 23:39
कासीहूकी कला जाती मथुरा मसीत होती सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ॥ छत्रपतिना त्रिवार मुजरा.... आमच्या वन्शजाना लाख लाख अभिवादन.... प्रसाद सावन्त (भोसले) अव्यक्त

अनामिका Tue, 04/01/2008 - 19:35
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो | अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं || राखी रजपुती , रजधानी राखी राजन की | धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं || भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की | देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं || साही के सपूत , सिवराज समशेर तेरी | दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं || वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत | रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं || हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की | कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं || मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह | बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं || राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज | देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं || देवल गिराविते , फिराविते निसान अली | ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी || गौर गणपती आप , औरनको देत ताप | आपनी ही बार सब , मारी गये दबकी || पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत | सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की || कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी || - कविराज भूषण. {{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती} अश्या एका महान युगप्रवर्तकाच्या भुमित जन्म घेतल्याने खरच अयुष्याचे सार्थक झाले!

अनामिका Fri, 02/20/2009 - 17:02
जेंव्हा करपून निघाली धरणी यवनांच्या जालाखाली... विकून टाकली अब्रू स्वधार्माच्या चितेखाली... एक तेजस्वी सूर्य उगवला महाराष्ट्राच्या क्षितिजावरती.. गातो गान तयाचे..आजच्या शुभ मुहूर्तावरती...!!! महाराजांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार मुजरा.... "अनामिका"

In reply to by सृष्टीलावण्या

पिवळा डांबिस गुरुवार, 02/21/2008 - 23:38
महाराज असते तर.... काही विधायक काम करण्याऐवजी मि. पा. कट्ट्यावर चकाट्या पिटणार्‍या आपल्याला पाहून म्हणाले असते, "कोण आहे ते तिकडे? या सगळ्या रिकामटेकड्या हरामखोरांना उलटे टांगून राखेचे तोबरे द्या!!" :))

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट Fri, 02/29/2008 - 12:29
म्हणूनच हल्ली आम्ही महाराजांचं लक्ष नाही, असं पाहून हळूच मिपावर येतो :-) बाकी डांबिसराव, क्यालिफोर्नियात एक पिवळा ड्यांबिस आहे हे बघून लय झ्याक वाटलय बघा.

- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 10:48

तुम्हाला व्यक्तीगत संदेश द्यायचा प्रयत्न केला पण हे तिच्यायला जेंव्हापासून साईट अपडेट केलंय ना तेंव्हापासून हजार अडचणी येतायत!!

जर कधी आलांत लॉस एंजेलिस परिसरात तर मला कळवा आणि जरूर माझ्याकडे रहायलाच या.  जर मी बे एरियात आलो तर जरूर कळवीन...

स्नेह व्हावा व तो वाढावा ही कामना.

आपला,

पिवळा डांबिस

 

In reply to by रविराज

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:00
समर्थांनी, 'निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसि आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी! असं म्हटलं आहे. 'श्रीमानयोगी' हे रणजीत देसायांच्या कादंबरीचे नांव आहे. अवांतर - माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे. आपला, (कुरुंदकरप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Tue, 02/19/2008 - 23:48
माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे. विशेषतः शिवरायांना अवतार मानण्यापेक्षा, एक अलौकिक कर्तबगारीचा, पण आदर्श मानवच माना हे सूत्र त्यात अतिशय परिणामकारकरित्या मांडले आहे. आदर्श मानला तर त्याचे गुण आपल्यात यावे यासाठी माणूस प्रयत्न करतो. एकदा अवतार मानला की गंध, फुलं, अक्षता वाहून मोकळे व्हायची आपली परंपरा आहे... शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी|| शिवरायांचा डोळस भक्त, पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

तळेकर Wed, 02/20/2008 - 13:30
मला सुद्धा नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना आवडली, इतकी की पुन्हा पुन्हा वाचली. त्यांचे इतर साहित्य येथे देता आले तर काय बहार येईल. तात्या मग काय ?

अनिता Tue, 02/19/2008 - 07:34
श्रीमंतयोगी / श्रीमानयोगी...मला वाटते दोन्ही बरोबर आहेत. थो. आबासाहेबासाठीच दोन्ही बिरुद जन्मास आलीत बहुतेक!

विकास Tue, 02/19/2008 - 09:25
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करताना जसे श्रीमंत योगी हे अचूक विशेषण आठवते तसेच त्यांच्यातील जे आवश्यक असलेले गूण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काव्यबद्ध केलेत त्यांची पण आठवण होते: जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी जी युक्ती पातशाह्यास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शुद्धी हेतूची कर्मी लाहूदे ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूदे ती शक्ती शोणितामाजी वाहू दे दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुझ ज्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||

In reply to by विकास

रयतेचा राजा, निश्चयाचा महामेरु, सकल जनांचा आधारु, छत्रपती शिवाजी महाराजांना आमचाही मानाचा मुजरा.......!!!! अवांतर :) विकासराव, गडावर जुने मावळे दिसले की जरा बरं वाटतं !!!!

प्राजु Tue, 02/19/2008 - 09:27
थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा.... मिसळपाव. कॉम चा वटवृक्ष असाच बहरत राहो. उत्तमोत्तम साहित्य इथे वाचायला मिळो... हीच श्रींची इच्छा...! - प्राजु

सर्वसाक्षी Tue, 02/19/2008 - 09:56
ज्या युगपुरूषाच्या दैदिप्यमान कर्तृत्वाने पुढे तीन शतकांनंतर जन्मलेल्या परंतु त्याचाच स्वातंत्र्य प्राप्तिचा वारसा चालविलेल्या क्रांतिकारकांना प्रभावित केले त्या महान शिवप्रभुंना सादर प्रणाम (महाराष्ट्रा पासुन शेकडो मैलांवर जन्मलेल्या हुतात्मा भगतसिंहांनी एक पत्रकार या नात्याने जेव्हा महाराष्ट्रात यायची त्यांना संधी मिळाली तेव्हा रायगडाला आवर्जुन भेट दिली होती तर ब्रिटिशांच्या नजरकैदेतुन सुटण्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्रांनी जदुनाथ सरकार लिखित शिवचरित्राचे पारायण केले होते - विशेषत: आग्र्याहून सुटकेचे)

सुमीत Tue, 02/19/2008 - 10:18
आमचा देखील त्रिवार मुजरा, बाकी तात्या सांगतात तसे "श्रीमान योगी" मध्ये मला पण नरहर कुरंदकरांची प्रस्तावना जास्त आवडली .

मनस्वी Tue, 02/19/2008 - 10:21
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर गायक :लता मंगेशकर संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर ========================= शिवरायांना माझा मानाचा मुजरा =========================

डॉ.प्रसाद दाढे Tue, 02/19/2008 - 10:22
साजि चतुर॑ग बिर र॑ग मे॑ तुर॑ग चढि सरजा शिवाजी ज॑ग जीतन चलत है॑ । भूषन भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैब रनके रलत है॑ ॥ 'सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी' कु॑भकन्न असुर औतारी अवर॑गजेब कीन्ही कत्ल मथुरा दोहाई फेरी रब की ॥ खोदी डारे देवी देव सहर महल्ला बा॑के लाखन तुरूक कीन्हे छूटि गयी तब की ॥ भूषण भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ और कौन गिनतीमे॑ भूली गति भबकी ॥ चारो॑ वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ॥ देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डुबे राव राजे सभी गये लबकी ॥ गौरी गनपति आप औरनको देत ताप आपनीही बार सब मारि गये दबकी ॥ पीरा पयग॑बरा दिग॑बरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रबकी ॥ कासीहूकी कला जाती मथुरा मसीत होती सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ॥

विकास Tue, 02/19/2008 - 10:41
उरलेले कडवे... (कदाचीत आजच्या परिस्थितीसपण ज्याचा भावार्थ लागू होत असेल असे) .... हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा भग्न आज जयदुर्ग आसंवांमाजी ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा गड कोट जंजिरे सारे | भंगले जाहली राजधान्यांची | जंगले परदास्य-पराभविं सारी | मंगले या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

नीलकांत Tue, 02/19/2008 - 10:43
महाराष्ट्राच्या अखंड स्फुर्तीस्त्रोताला, जाणत्या राजाला... मानाचा मुजरा. नीलकांत

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 13:27
गो-ब्राम्हण क्षत्रियकुलावत॑स सि॑हासनाधिश्वर राजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराजा॑चे चरणि लक्ष लक्ष प्रणाम ! थोरल्या महाराजा॑ची जय॑ती आम्ही "कळसुत्री सरकार" तारिख ठरवत॑ म्हणून कधीही साजरी करत नाही. ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!! तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही. आपला - पिढ्या॑न् पिढ्या स्वराज्याच्या लग्नात आहुतीत उड्या मारायला गुढग्याला बाशि॑ग बा॑धून तयार राहणार्‍या देशमुखा॑चा अभिमानी वारस ध मा ल. अवा॑तर : मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही...जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो. सरप॑च, आपला हेतु खचितच स्तुत्य आहे, त्याबद्दल धन्यवाद. कृपया गैरसमज नसावा. माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 14:08
धमालराव, वादात आम्हालाही पडायचं नव्हते/नाही! महाराज केव्हा जन्मले यापेक्षा त्यांनी आयुष्यात काय कार्य केले, हे अधिक महत्वाचे! हा महापुरुष वर्षातनं फक्त एकच दिवस नव्हे तर अगदी रोजच प्रात:स्मरणीय आहे हेही नक्की. परंतु वर्षात एखाद् दिवस सर्वांनी मिळून त्यांचं पुण्यस्मरण करणे हेही आम्हाला अगत्याचे वाटले/वाटते आणि त्याच भावनेतून, केवळ आणि केवळ श्रद्धेपोटी आज येथे त्यांचे हे पुण्यस्मरण मिसळपाव करत आहे. आम्ही मोठे इतिहासकारही नाही, किंवा इतिहासाचे गाढे अभ्यासकही नाही. प्रांजळपणे सांगायचे तर चक्क कालनिर्णय बघून जगणारी माणसे आम्ही! आजचा १९ फेब्रुवारी हा दिवस त्यात शिवजयंती म्हणून नोंद झालेला आहे आणि तोच संदर्भ घेऊन मिसळपावने त्यांचे पुण्यस्मरण केलेले आहे आणि त्यामागे केवळ महाराजांच्या ठायीची असीम श्रद्धा असून अन्य कुठलेच कारण नाही. ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!! अगदी अवश्य होऊ द्या! मिसळपावने मात्र ती आजच साजरी केली आहे. प्रेमाने आणि श्रद्धेने! तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही. शिवाय हेही तुम्हीच म्हणताय! चांगला विरोधाभास आहे..! मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही... आणि असूही नये! जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो. वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय? माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे. मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो... आपला, (दु:खी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 14:29
चुकीची समजुत करून घेतलीत की हो.... माझ॑ म्हणण॑ तस॑ मुळीच॑ नाहीये. कदाचित माझी दरिद्री शब्दस॑पत्ती माझ्या योग्य भावना पोहोचवण्याच्या आड येते आहे...कस॑ सा॑गाव॑ हेच कळत नाहीये. वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय? वाईट वाटल॑ तात्या. माझ्या गाढवपणामुळ॑ अस॑ काही होईल ह्याची तीळमात्रही कल्पना नव्हती. मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो... ठिक आहे. चूक झाली. समस्त मिपाकर हो, माझ्या ह्या गाढवपणाची मी जाहिर माफी मागतो आहे. क्षमस्व. नाही त्या गोष्टी॑मुळे वातावरणात विष कालवल॑ जात असेल तर योग्य त्या वेळी उपाय केला पाहिजे. तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो. -कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 14:49
तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो. कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला अरे छोड दो यार! चलता है.. मला तुझा प्रतिसाद अस्थानी वाटला आणि म्हणून मी तसं लिहिलं! तुला ते पटलं आणि तू मोठ्या मनाने, खुल्या दिलाने दिलगिरी व्यक्त केलीस यातच सगळं आलं! तेव्हा आता हा विषय मिटला/संपला/गर्दीस मिळाला! :) बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय! तात्या. -- घाटातून जाताना वाटायचं की एकदा तरी मराठी सैन्य चढता उतरताना दिसावं! :) हरितात्यांनी आम्हाला कधी पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान दिला! चिमुकल्या मनगटात कसल्यातरी जोमाच्या मनगट्या घातल्या. त्यावेळी दिसल्या नाहीत तिच्या अदृष्य वळ्या. पंण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात! -- इति भाईकाका. (हरितात्या)

In reply to by धमाल मुलगा

सुधीर कांदळकर Wed, 02/20/2008 - 20:40
मेहेंदळे नावाच्या संशोधकांनी संशोधन करून ठरविली आहे. सरकारने नवे. वयाच्या २३व्या वर्षापासून ३९व्या वर्षापर्यंत त्यांनी या संशोधनासाठी वेचली. सर्व विद्वानांनी १९ फेब्रु. ही तारीख मान्य केली आहेत. फक्त शिवसेनादि राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी ती अमान्य केली.

In reply to by सुधीर कांदळकर

मालोजीराव गुरुवार, 09/16/2010 - 19:43
गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिला म्हणजे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे, आयुष्यभर झटून त्यांनी शिवचरित्र तयार केलं आज अनेक इतिहास कारांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते...पण मेहेंदळे यांच्या बाबत असे काही ऐकिवात नाही , सरदार आप्पा बळवंत मेहेंदळे यांचे ते वंशज आहेत असा ऐकून आहे !

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 11:38
इंद्र जिमि जृंभपर ! बाडव सुअंभपर ! रावण सदंभपर ! रघुकुल राज है !! पौन वारिवाह पर ! संभु रतिनाह पर ! ज्यो सहसवाह पर ! राम द्विज राज है ! दावा दृमदंड पर ! चिता मृगझुंड पर ! भूषण वितुंड पर ! जैसे मृगराज है !! तेज तमंअंस पर ! कन्न्ह जिमि कंस पर ! त्यों म्लेंच्छ बंस पर ! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! शेर शिवराज है !! कवीराज भूषण.

मनस्वी Tue, 02/19/2008 - 11:46
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर, तुच्छ केले देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा गायक :लता मंगेशकर संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

केशवराव Tue, 02/19/2008 - 13:25
महाराष्ट्र धर्म वाढविणार्‍या , गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायापुढे सतत नतमस्तक !!!! शिवभक्त .... केशवराव .

बापु देवकर Tue, 02/19/2008 - 13:40
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ,आपणास मानाचा मुजरा..... राज....

समर्थांनी शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांना लिहीलेल्या पत्रातून "शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायाचे कैसे बोलणे || शिवरायाचे सलगी देणे| कैसे असे|| याहून करावे विशेष| तरीच म्हणावे पुरुष|| याऊपरी विशेष | काय सांगावे||" (थोरल्या राजांचे राज्य त्यांचा सेवक म्हणून चलवणारे) -पुण्याचे पेशवे

अव्यक्त Tue, 02/19/2008 - 23:39
कासीहूकी कला जाती मथुरा मसीत होती सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी ॥ छत्रपतिना त्रिवार मुजरा.... आमच्या वन्शजाना लाख लाख अभिवादन.... प्रसाद सावन्त (भोसले) अव्यक्त

अनामिका Tue, 04/01/2008 - 19:35
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो | अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं || राखी रजपुती , रजधानी राखी राजन की | धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं || भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की | देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं || साही के सपूत , सिवराज समशेर तेरी | दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं || वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत | रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं || हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की | कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं || मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह | बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं || राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज | देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं || देवल गिराविते , फिराविते निसान अली | ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी || गौर गणपती आप , औरनको देत ताप | आपनी ही बार सब , मारी गये दबकी || पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत | सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की || कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी || - कविराज भूषण. {{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती} अश्या एका महान युगप्रवर्तकाच्या भुमित जन्म घेतल्याने खरच अयुष्याचे सार्थक झाले!

अनामिका Fri, 02/20/2009 - 17:02
जेंव्हा करपून निघाली धरणी यवनांच्या जालाखाली... विकून टाकली अब्रू स्वधार्माच्या चितेखाली... एक तेजस्वी सूर्य उगवला महाराष्ट्राच्या क्षितिजावरती.. गातो गान तयाचे..आजच्या शुभ मुहूर्तावरती...!!! महाराजांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार मुजरा.... "अनामिका"
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपाव परिवाराचा शिवरायांना मानाचा मुजरा...

सूर्यास्त - २

सर्वसाक्षी ·

ऋषिकेश Mon, 02/18/2008 - 20:52
आजि म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था करून टाकलीत हो! एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे!! खूपच सुंदर!! (मंत्रमुग्ध) ऋषिकेश

धनंजय Mon, 02/18/2008 - 22:23
क्षितिजावरील पूर्ण चंद्राची चित्रे लावा. तुमच्या हातून ती सुंदर येतील. सर्वच चित्रे छान, पण क्रमांक ३, ४, ५ अधिक आवडली. क्र ३ कमीतकमी गाजावाजा करता खूप सांगते (जपानी रेखाचित्रांसारखे). (४, ५ गुंतागुंत चित्रित करतात. ) क्र ४ मधे मला सूर्य व्यूहात अडकलेल्या वीरासारखा वाटतो. क्र ५ मध्ये लेसच्या ओढणीमागे सरणारी स्त्री आठवते. तुमच्या मनात काही का असेना - माझ्या कल्पनाशक्तीला वाव देणारी चित्रे आहेत. थोड्या जिज्ञासू चांभारचौकशा : ही चित्रे काढताना तुम्ही कॅमेराच्या पडद्याचा वेग (शटर स्पीड) किती ठेवता, जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या केंद्रीभवनाने आतील इलेक्ट्रॉनिक्स जळून न जावेत? (काळी काच [न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर] न लावता सूर्याचा फोटो श्क्यतोवर काढू नये, असे मी पूर्वी ऐकले होते.) किती मे.पि.चा कॅमेरा आहे, आणि साधारण किती क्रॉप केले?

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 00:23
साक्षीदेवा, तुझ्या सूर्यास्ताने वेड लावलं रे! मला तिसरं आणि पाचवं चित्र भन्नाट आवडलं. फोटोग्राफी या कलेसंदर्भात मनात तुझ्याबद्दल कौतुक तर होतंच पण आता ती जागा आदराने घेतली आहे! साक्षिदेवा, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला मारवा हा राग संध्याकाळी गातात. वरील प्रत्येक चित्रं हे त्या हुरहूर लावणार्‍या मारव्याची आठवण करून देतं! विशेष करून तिसरं चित्रं! हे चित्रं पाहताना तर आमिरखासाहेबांचा मारवा कुठूनतरी नकळत एकू येऊ लागतो...! आपला, (सूर्यास्त पाहून उगाचंच उदास होणारा!) तात्या. एक फर्माईश - जमल्यास कधी समुद्रकिनारच्या सूर्यास्ताची चित्रेही इथे दे. अथांग सागरापलिकडे क्षितिजापार अस्ताला जाणारा तो सूर्य माणसाला खूप काही शिकवून जातो! तात्या.

धनंजय Tue, 02/19/2008 - 05:18
असे लक्षात आले, की ज्यांनी-ज्यांनी विशेष करून फोटोंचा उल्लेख केला आहे, त्यांत क्र१ आणि क्र२ कुठेच दिसत नाहीत. क्र१ त्याच्या जनकाला संदर्भामुळे प्रिय आहे, पण त्याविषयी बहुतेक आस्वादविषयक चर्चा होऊ शकणार नाही. (कोणी मला त्यातलीही सौंदर्यस्थाने दाखवलीत, तर तेही छानच होईल.) क्र२ बद्दल मात्र विचार करायला गेले तर रसग्रहणाच्या दृष्टीने त्यात खूप काही "जागा" आहेत. खालचा तृतीयांश घेणारी सुंदर महिरपी भिंत, डावा तृतीयांश विभागणारे गमतीदार झाड, गच्चीच्या आणि दोन फांद्यांच्या त्रिकोणी कोंदणात मण्यासारखा सूर्य... मग (माझ्यासकट) कोणी त्याचा विशेष उल्लेख का केला नाही? याबद्दल कुतूहल वाटते. गच्चीच्या महिरपीलाही फोकसमध्ये घेतले असते, (छिद्र आणखी थोडे लहान करून) काही फरक पडला असता का? हे चित्र वेगळे कातरायला (क्रॉप करायला) हवे काय? येथील चित्रसेनांनी म्हणा, नेत्रसेनांनी म्हणा जरा विचार मांडावेत.

In reply to by धनंजय

कोलबेर Tue, 02/19/2008 - 08:41
नं. दोन चित्रामध्ये भिंगाचे छीद्र थोडे छोटे केले असते तर गच्चीची कड आणि सूर्य दोन्हीही फोकस मध्ये आले असते. तसेच त्याच चित्रातील गच्चीची बाजू कापून टाकली असती तरी चालली असती. अर्थातच हे माझे वैयक्तिक मत. शेवटी ज्याला जसे योग्य वाटते तसे त्याने चित्र काढावे. साक्षीजींची माफी काढून मी ह्या चित्रात थोडेसे फेरबदल केले आहेत ते इथे चिकटवतो. बदल पटलेच पाहिजेत असे नाही! बाकीची चित्रे छानच!

सर्वसाक्षी Tue, 02/19/2008 - 09:45
मनःपूर्वक केलेले रसग्रहण, दिलेले अभिप्राय व सुचविलेल्या अनेक सुधारणांबद्दल रसिकांचे आभार. थोडेसे दुसर्‍या चित्राविषयी. जर तटबंदी आणि सूर्य हे दोन्ही एकाच वेळी किरणात घेतेले असते व आकृति स्पष्ट ठेवल्या असत्या तर त्याबरोबर तो निष्पर्ण वृक्ष देखिल त्या तटबंदीत विलिन झाला असता व एकप्रतलीय व सपाट अशी प्रतिमा उमटली असती. त्रिमित परिणाम साधून वृक्ष, थोडी दूर असलेली भींत व खूप दूरवर क्षितिजावर असलेला सूर्य या तिन्ही प्रतिमा प्रकाश व सुस्पष्टता याद्वारे आपले स्वतंत्र अस्तित्व राखून असाव्यात व तरीही एकाच दृश्यात सामावल्या जाव्यात असा या रचनेचा उद्देश होता (कितपत जमला माहित नाही:)) सर्व जाणकारांच्या सूचनांबद्दल पुन्हा एकदा आभार. माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे. आपला स्नेहांकित साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 10:43
अप्रतीम...केवळ अप्रतीम !!! हे जास्त छान अन् ते कमी अस॑ मला काही वाटल॑च नाही. साक्षीदेवा...खर॑च काय जबरा आहे तुमचा तिसरा डोळा... माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे. अस॑ का? बर॑ ! मिपाकर हो, जर हा मनुष्य स्वतःला "हौशी" सदरात मोडतोय, तर "एक्सपर्ट" काय असेल हो???

In reply to by कोलबेर

चतुरंग Wed, 02/20/2008 - 21:20
सूर्य एका कोपर्‍यात असल्यामुळे तिथे नजर खिळते आणि हलकेच पुलावरून सरकत येऊन काठावरच्या झाडावर स्थिरावते. मिसिसिपीच्या पुलामुळे आणि कमानींमुळे त्रिमितीचा सुरेख भास होतोय. आकाश-नदी जोडीत अडकलेल्या क्षितिजावरची रंगांची उधळण आणि अस्ताला जाणारा सूर्य जणू सर्व शक्तीनिशी किरण उधळीत निघाला आहे असे जाणवते! चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

एकलव्य गुरुवार, 02/21/2008 - 06:21
श्री. सर्वसाक्षी ह्याचे सर्व सुर्यास्त भन्नाट आहेत. मान गये हुजूर. श्री. कोलबेर मिसिसिपी सुर्यास्त सिंप्ली ग्रेट...!

ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 06:51
उत्तमोत्तम छायाचित्रकारांनो, आजच्या ग्रहणकाळातील चंद्राचे छायाचित्र कोणी काढल्ंय का?.. असल्यास इथे डकवावे ही विनंती :) -ऋषिकेश

वरदा गुरुवार, 02/21/2008 - 07:00
खूपच छान आहेत सगळेच फोटो...आणि वर्णनही झकास...

पिवळा डांबिस Fri, 03/07/2008 - 09:44
ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हॄदया, अता मधूचे नांव कासया, लागले नेत्र हे पैलतीरी||

आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 16:59
सर्वसाक्षीशेठ आणि कोलबेरशेठ काय अप्रतिम चित्रे काढता हो. जरा इथल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगा की. (आनंदित) आजानुकर्ण

ऋषिकेश Mon, 02/18/2008 - 20:52
आजि म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था करून टाकलीत हो! एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे!! खूपच सुंदर!! (मंत्रमुग्ध) ऋषिकेश

धनंजय Mon, 02/18/2008 - 22:23
क्षितिजावरील पूर्ण चंद्राची चित्रे लावा. तुमच्या हातून ती सुंदर येतील. सर्वच चित्रे छान, पण क्रमांक ३, ४, ५ अधिक आवडली. क्र ३ कमीतकमी गाजावाजा करता खूप सांगते (जपानी रेखाचित्रांसारखे). (४, ५ गुंतागुंत चित्रित करतात. ) क्र ४ मधे मला सूर्य व्यूहात अडकलेल्या वीरासारखा वाटतो. क्र ५ मध्ये लेसच्या ओढणीमागे सरणारी स्त्री आठवते. तुमच्या मनात काही का असेना - माझ्या कल्पनाशक्तीला वाव देणारी चित्रे आहेत. थोड्या जिज्ञासू चांभारचौकशा : ही चित्रे काढताना तुम्ही कॅमेराच्या पडद्याचा वेग (शटर स्पीड) किती ठेवता, जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या केंद्रीभवनाने आतील इलेक्ट्रॉनिक्स जळून न जावेत? (काळी काच [न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर] न लावता सूर्याचा फोटो श्क्यतोवर काढू नये, असे मी पूर्वी ऐकले होते.) किती मे.पि.चा कॅमेरा आहे, आणि साधारण किती क्रॉप केले?

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 00:23
साक्षीदेवा, तुझ्या सूर्यास्ताने वेड लावलं रे! मला तिसरं आणि पाचवं चित्र भन्नाट आवडलं. फोटोग्राफी या कलेसंदर्भात मनात तुझ्याबद्दल कौतुक तर होतंच पण आता ती जागा आदराने घेतली आहे! साक्षिदेवा, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला मारवा हा राग संध्याकाळी गातात. वरील प्रत्येक चित्रं हे त्या हुरहूर लावणार्‍या मारव्याची आठवण करून देतं! विशेष करून तिसरं चित्रं! हे चित्रं पाहताना तर आमिरखासाहेबांचा मारवा कुठूनतरी नकळत एकू येऊ लागतो...! आपला, (सूर्यास्त पाहून उगाचंच उदास होणारा!) तात्या. एक फर्माईश - जमल्यास कधी समुद्रकिनारच्या सूर्यास्ताची चित्रेही इथे दे. अथांग सागरापलिकडे क्षितिजापार अस्ताला जाणारा तो सूर्य माणसाला खूप काही शिकवून जातो! तात्या.

धनंजय Tue, 02/19/2008 - 05:18
असे लक्षात आले, की ज्यांनी-ज्यांनी विशेष करून फोटोंचा उल्लेख केला आहे, त्यांत क्र१ आणि क्र२ कुठेच दिसत नाहीत. क्र१ त्याच्या जनकाला संदर्भामुळे प्रिय आहे, पण त्याविषयी बहुतेक आस्वादविषयक चर्चा होऊ शकणार नाही. (कोणी मला त्यातलीही सौंदर्यस्थाने दाखवलीत, तर तेही छानच होईल.) क्र२ बद्दल मात्र विचार करायला गेले तर रसग्रहणाच्या दृष्टीने त्यात खूप काही "जागा" आहेत. खालचा तृतीयांश घेणारी सुंदर महिरपी भिंत, डावा तृतीयांश विभागणारे गमतीदार झाड, गच्चीच्या आणि दोन फांद्यांच्या त्रिकोणी कोंदणात मण्यासारखा सूर्य... मग (माझ्यासकट) कोणी त्याचा विशेष उल्लेख का केला नाही? याबद्दल कुतूहल वाटते. गच्चीच्या महिरपीलाही फोकसमध्ये घेतले असते, (छिद्र आणखी थोडे लहान करून) काही फरक पडला असता का? हे चित्र वेगळे कातरायला (क्रॉप करायला) हवे काय? येथील चित्रसेनांनी म्हणा, नेत्रसेनांनी म्हणा जरा विचार मांडावेत.

In reply to by धनंजय

कोलबेर Tue, 02/19/2008 - 08:41
नं. दोन चित्रामध्ये भिंगाचे छीद्र थोडे छोटे केले असते तर गच्चीची कड आणि सूर्य दोन्हीही फोकस मध्ये आले असते. तसेच त्याच चित्रातील गच्चीची बाजू कापून टाकली असती तरी चालली असती. अर्थातच हे माझे वैयक्तिक मत. शेवटी ज्याला जसे योग्य वाटते तसे त्याने चित्र काढावे. साक्षीजींची माफी काढून मी ह्या चित्रात थोडेसे फेरबदल केले आहेत ते इथे चिकटवतो. बदल पटलेच पाहिजेत असे नाही! बाकीची चित्रे छानच!

सर्वसाक्षी Tue, 02/19/2008 - 09:45
मनःपूर्वक केलेले रसग्रहण, दिलेले अभिप्राय व सुचविलेल्या अनेक सुधारणांबद्दल रसिकांचे आभार. थोडेसे दुसर्‍या चित्राविषयी. जर तटबंदी आणि सूर्य हे दोन्ही एकाच वेळी किरणात घेतेले असते व आकृति स्पष्ट ठेवल्या असत्या तर त्याबरोबर तो निष्पर्ण वृक्ष देखिल त्या तटबंदीत विलिन झाला असता व एकप्रतलीय व सपाट अशी प्रतिमा उमटली असती. त्रिमित परिणाम साधून वृक्ष, थोडी दूर असलेली भींत व खूप दूरवर क्षितिजावर असलेला सूर्य या तिन्ही प्रतिमा प्रकाश व सुस्पष्टता याद्वारे आपले स्वतंत्र अस्तित्व राखून असाव्यात व तरीही एकाच दृश्यात सामावल्या जाव्यात असा या रचनेचा उद्देश होता (कितपत जमला माहित नाही:)) सर्व जाणकारांच्या सूचनांबद्दल पुन्हा एकदा आभार. माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे. आपला स्नेहांकित साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 10:43
अप्रतीम...केवळ अप्रतीम !!! हे जास्त छान अन् ते कमी अस॑ मला काही वाटल॑च नाही. साक्षीदेवा...खर॑च काय जबरा आहे तुमचा तिसरा डोळा... माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे. अस॑ का? बर॑ ! मिपाकर हो, जर हा मनुष्य स्वतःला "हौशी" सदरात मोडतोय, तर "एक्सपर्ट" काय असेल हो???

In reply to by कोलबेर

चतुरंग Wed, 02/20/2008 - 21:20
सूर्य एका कोपर्‍यात असल्यामुळे तिथे नजर खिळते आणि हलकेच पुलावरून सरकत येऊन काठावरच्या झाडावर स्थिरावते. मिसिसिपीच्या पुलामुळे आणि कमानींमुळे त्रिमितीचा सुरेख भास होतोय. आकाश-नदी जोडीत अडकलेल्या क्षितिजावरची रंगांची उधळण आणि अस्ताला जाणारा सूर्य जणू सर्व शक्तीनिशी किरण उधळीत निघाला आहे असे जाणवते! चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

एकलव्य गुरुवार, 02/21/2008 - 06:21
श्री. सर्वसाक्षी ह्याचे सर्व सुर्यास्त भन्नाट आहेत. मान गये हुजूर. श्री. कोलबेर मिसिसिपी सुर्यास्त सिंप्ली ग्रेट...!

ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 06:51
उत्तमोत्तम छायाचित्रकारांनो, आजच्या ग्रहणकाळातील चंद्राचे छायाचित्र कोणी काढल्ंय का?.. असल्यास इथे डकवावे ही विनंती :) -ऋषिकेश

वरदा गुरुवार, 02/21/2008 - 07:00
खूपच छान आहेत सगळेच फोटो...आणि वर्णनही झकास...

पिवळा डांबिस Fri, 03/07/2008 - 09:44
ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हॄदया, अता मधूचे नांव कासया, लागले नेत्र हे पैलतीरी||

आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 16:59
सर्वसाक्षीशेठ आणि कोलबेरशेठ काय अप्रतिम चित्रे काढता हो. जरा इथल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगा की. (आनंदित) आजानुकर्ण
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

झटपट न्याहारी

सृष्टीलावण्या ·

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 20:42
पाककृती मस्तच आहे. माझी पाककृतीही अशीच आहे.... दह्यात आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार मिसळून वरून जिर्‍याची फोडणी द्यावी. किंचीत पातळसर करुन एका काचेच्या पसरट सटात जीरा बटर मांडून त्यावर ओतावे. वरून बारीक चिरलेली कोथींबिर, लाल तिखटाची आणि जिरे पावडरची रांगोळी काढावी. एकदम झटपट.

In reply to by प्रभाकर पेठकर

सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 21:30
तसेच एका खाद्यवेड्याने केलेल्या कौतुकाचे मोल दुसर्‍या खाद्यवेड्यालाच माहित. आता तुमची पण पाककृति उद्याच करून पाहते [कारण मनोहर बिस्किट मार्ट ८.३० लाच बंद झाले असेल ना म्हणून नाही तर खाण्याच्या बाबतीत आपले धोरण आज आत्ता ताबडतोब असे आहे (कामाच्या बाबतीत ते थोडे वेगळे म्हणजे उद्या, परवा, केव्हातरी असे आहे)]. ह्यावरून सहज सुचले म्हणून सांगते की थळला माझी एक दूरची मावशी राहत होती तिने एकदा फर्मान काढले की तुम्ही लोक पुढच्यावेळी ज्यावेळी कोकणप्रवासाला निघाल त्यावेळी पहिला टप्पा आमच्याकडे मुक्काम करून करावा. आम्ही लगेच हो म्हटले. मामा, माम्या, मावश्या आणि पुढची पिढी वैगरे एकूण १७ जण त्यावेळी आम्ही कुटुंबसहलीला निघालो. पोहोचल्यावर सगळ्या लहानांनी गिल्ला केला भूक लागली. तिने उत्साहाने पहिला चेंडू टाकला, "काय घेणार, थंड का गरम?" त्यावर आमच्यापैकी एकाने निरागसपणे सांगितले, गरम होईपर्यंत गार चालेल. तिचा भांबावलेला चेहरा पाहून खुलासा केला की चहा होईपर्यंत सरबत चालेल. तिला पुढे काय वाढून ठेवलय याची अंधुक कल्पना आली. तिने जर नंतर उपमा की पोहे असे विचारले असते तर उत्तर मिळाले असते उपमा होईपर्यंत कोळाचे पोहे चालतील असे तिला उत्तर मिळाले असते. जेवणाला वेळ होता म्हणून आम्ही ओले पोहे हाणले आणि समुद्रावर पळालो. परत आल्यावर पंगत तयारच होती. तिने आनंदाने सांगितले की तांदळाची खिचडी आणि पोह्याचे पापड असा बेत आहे आणि खिचडी तयार असून निवायला ठेवलेली आहे. "आत्ता आणते" असे म्हणून ती माजघरात गेली. तेव्हढ्यात आम्हा बकासुर वंशजांना हाताला लोणच्याची बाटली लागली. तिची खिचडी निवून येईपर्यंत (२-३ मिनिटे) ते किलोभर लोणचे सफाचट. रात्रीपर्यंत राहिलो असतो तर बिचारीला कांदाच हुंगवावा लागला असता.

In reply to by सृष्टीलावण्या

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 16:43
कारण मनोहर बिस्किट मार्ट ८.३० लाच बंद झाले असेल ना म्हणून नाही तर खाण्याच्या बाबतीत आपले धोरण आज आत्ता ताबडतोब असे आहे क्या बाऽऽऽऽत है| ह्यालाच खवय्येगिरी म्हणतात. मनसोक्त खा, आत्ताच, उद्याचा कोणी भरवसा द्यावा?

In reply to by संजय अभ्यंकर

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 16:47
चुकीची दूरूस्ती: वरील वाक्य 'एकंदर मि.पा.वर खवय्यांना तोटा नाही.' असे वाचावे. खादाड पोट भरून खातो, खवय्या मनभरून खातो.

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:55
झकास पा कृ! सृष्टीलावण्य, आता पेठकरशेठ आणि स्वाताताईच्या संगतीने तुम्हीही मिपाच्या रसोईघरात दाखल झालात याचा आनंद वाटला... अरे कुणीतरी पानं घ्या रे, मंडळी जेवायची खोळंबली आहेत! :) आपला, (भुकेलेला) तात्या.

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 14:00
वा ! सृष्टीलावण्य, एकदम झकास पाकक्रुती :) अश्याच साध्या सोप्या पाकक्रुती आणखी येवू देत. वेळखाऊ पाकक्रुती करायला मला मुळातच कंटाळा येतो बाकी खाण्याचा कधीच कंटाळा नाही हो :) राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

सृष्टीलावण्या Wed, 02/20/2008 - 17:09
अशी समजूत आहे की भरपूर वस्तु घातलेले (मुख्यत: सुकामेवा इ.) आणि वेळकाढू पदार्थ चांगले पण महाराष्ट्रात मात्र साधे सोपे, झटपट पदार्थ करण्याकडे जास्त कल असतो अपवाद अनरसे, केळफूलाची भाजी इ. चा.

In reply to by सृष्टीलावण्या

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 17:21
अनरसे,केळफूलाची भाजी दोन्ही माझ्या आवडीच्या गोष्टी. केळफूलाच्या भाजीची रेसिपी असल्यास नक्की कळवा. आईकडून करून घेईन. एकदा गावाकडे एका काकूंकडे खाल्ली होती. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

सृष्टीलावण्या गुरुवार, 02/21/2008 - 10:10
आणि ती अस्सल कोकणी 'पोलं आणि केळफुलाची भाजी' करते. ती मला पाकृ सांगेल पण माझा सल्ला ऐका बापु, हा केळफुलाच्या भाजीचा स्वत: करण्याचा नाद सोडा... कारण केळफुलाच्या भाजीची सुरवात केळफुलाच्या पेरातील विशिष्ट तंतु काढण्यापासून होतो . . . आणि . . आमच्या कडे पाकृ सांगण्याची सुरुवात भांड कुठल्या आकाराचे घ्यायचे, कुठल्या धातुचे, जाड बुडाचे की पातळ बुडाचे, फोडणीत कुठल्या पदार्थानंतर किती वेळाने कुठला पदार्थ टाकायचा इ. ने होते. मला पाकृ लिहायला ४ तास आणि ती वाचून पचायला तुम्हाला ८ तास. ... पाकृची शेवटची ओळ वाचेपर्यंतच तुम्हाला धाप लागेल. म्हणून हा नाद सोडा आणि संसिद्ध (readymade) केळफुलाची भाजी खा.

In reply to by राजमुद्रा

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 13:04
केफूच्या भाजीची पाकृ आईला विचारून मी लवकरच येथे देईन.. आमची म्हातारी ही भाजी फार सुरेख करते... आपला, (केळीच्या बनातला) तात्या जळगावकर.

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 13:20
तुमच्या आईच्या पाकक्रुतीची (वाचून आईला फक्त सांगण्यासाठी)मनापासून वाट पाहत आहे. कारण आईच्या हातची केफूची भाजी खाणेच सोयीस्कर आहे. मी केलेली भाजी माझ्याच आरोग्यास अपायकारक होऊ शकते. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 21:59
मधे मला इथे अमेरिकेत केळफुलाची खूप आठवण येत होती. एका गोर्‍या अमेरिकन स्नेह्याच्या घरी केळ्याचं झाड आहे. त्याला केळफूल लागलं होतं. आपल्याकडे त्याची भाजी करतात हे त्याला सांगितल्यावर त्याने ते चक्क काढून मला दिलं :) आणि म्हणाला उद्या करून आण भाजी :) आता आली का पंचाईत करता कोणाला येतेय.. मग मी घरी फोन करून टप्प्या टप्प्याने भाजी करायला लागलो. आधी ते तंतु (त्याला आम्ही कावळे चिमण्या म्हणतो ;) ) काढले मग हळद-मिठाच्या पाण्यात केळफूल चिरून ठेवले. मग पुन्हा आईला फोन आणि मग ट्प्प्या टप्प्याने भाजी बनली.. पण काय झकास बनली म्हणून सांगू..तेहि इथे आम्रिकेत केळफूल खाण्याचा आनंद काय सांगावा. पण आता पूर्ण कृती आठवत नाहि :( (पुढच्या विकांताला)भारतात गेलो की आईला पुन्हा विचारून सांगतो :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

धनंजय गुरुवार, 02/21/2008 - 23:33
हे आग्नेय आशियाई दुकानांत (किंवा पूर्व/ईशान्य आशियाई/कोरियन दुकानांत) मिळते. केळफूल मी जास्तीत जास्त वर्षातून एकदा आणतो. त्यातल्या प्रत्येक फुलाचा स्त्रीकेसर आणि एक बाहेरचा पदर वेगळा काढून टाकून द्यावा लागतो (कावळे चिमण्या). तासाभराच्या कामानंतर झालेली मूठभर भाजी बघून दर वेळा म्हणतो "पुन्हा कधी नाही!" मग पुन्हा कधी दुकानातले केळफूल मला त्याच्या मोहजालात पकडते... केळीची पाने मेक्सिकन दुकानांत मिळतात. पण ही बर्फात थिजवलेली असतात, म्हणून दिसायला सुंदर नसतात. अशा केळ्याच्या पानांचे हे उपयोग मला सुचले आहेत (मी करून बघितले आहेत) : १. एका थाळीत पाने पसरायची, वर कढत भात पसरायचा, मग त्यातून भात डिशमध्ये वाढायचा. केळीच्या पानांचा मंद सुवास (काही प्रमाणात केळीच्या पानातच जेवल्यासारखा) येतो. २. थालीपीठ थापायला प्लास्टिकच्या कागदाऐवजी (किंवा तुम्ही प्लास्टिकचा कागद वापरत नसला तर मुद्दामून) वापरायची. पानासकट थालीपीठ तव्यावर टाकायचे (म्हणजे थाळीपीठाच्या एका बाजूला तवा, दुसर्‍या बाजूला केळीचे पान. पानाच्या "झाकणा"मुळे थालीपीठ वाफेत शिजते, त्याला केळीच्या पानाचा सुरेख वास येतो. ३. माशाच्या तुकड्यांना चटणी माखून ते केळीच्या पानांचे पुडे करून बांधायचे. मग ते पुडे वाफवायचे/किंवा ओव्हनमध्ये भाजायचे.

In reply to by ऋषिकेश

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 13:49
धन्यवाद ऋषिकेश ! तुम्ही एवढ्या प्रयत्नपूर्वक, कष्टाने रेसिपी सांगणार आहात, तर माझीही भाजी करण्याची तयारी आहे. राजमुद्रा :)

मोहन Wed, 02/20/2008 - 14:00
विसरल्यागेलेल्या पाककृतीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. एक व्हेरिएशन - "दहीवड्यांवर" वरुन फोडणी टाकल्यास गंमत येते आपला मोहन

In reply to by सृष्टीलावण्या

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 19:37
माझ्या मते तुपाची. कारण दहिवड्यावरील फोडणीत चवीच्या दृष्टीने 'जीरे' असणे आवश्यक आहे आणि 'जीरे' म्हंटले की तुपाची फोडणी, हे समीकरण चवदार आहे.

स्वाती राजेश गुरुवार, 02/21/2008 - 23:42
मी केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून करते. तात्यांच्या मातोश्रींची कशी पद्धत आहे? वाट पाहात आहे लवकर पाठवा भाजी नव्हे कृती.:)

In reply to by स्वाती राजेश

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:51
मी केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून करते. करेक्ट! आमच्या आईचीही तीच पद्धत आहे. मी पाकृ द्यायला विसरूनच गेलो! आत्ता म्हातारी झोपली आहे गुडुप! उद्या सकाळी विचारतो तिला! :) (मातृभक्त) तात्या.

प्राजु Fri, 02/22/2008 - 02:33
आजी (आईची आई) अतिशय सुंदर करते केळ फुलाची भाजी. फणसाची भाजी आणि केळफुलाची भाजी... उत्तम करते ती. इथे, भारतीय दुकानातून मी, टिन्ड कच्च्या फणसाचे तुकडे आणले होते. त्याची शेंगदाणे घालून भाजी केली. चवीला खूप छान झाली होती. पण व्हिनेगर मधल्या फणसाच्या तुकड्यांमुळे घसा खवखवू लागला.. चालायचेच. तात्यांच्या मातोश्रींच्या केफू च्या भा़जीच्या पाकृ ची मी ही वाट पहाते आहे. - प्राजु

स्वाती दिनेश Fri, 02/22/2008 - 13:38
हं...केळफूलाची भाजी...काय आठवण करून दिलीत.. केळफुलाच्या भाजीत आमच्याकडे डाळिंब्या घालतात.आधीच त्या कावळेचिमण्या वेगळे करा, डाळिंब्या सोला..भरपूर आटापिटा...पण काय झकास भाजी होते... केळफुलातील पुकेसर वेगळा काढून टाका, नंतर ती चिरा,चिरताना विळी/सुरीला आणि हातालाही तेलाचे बोट लावा म्हणजे राप चढणार नाही.डाळिंब्या (कडवे वाल)सोलून,वाफवून घ्या.केळफूलही वाफवून्/उकडून घ्या.तेलाची फोडणी करून त्यात वाफवलेले केळफूल घाला,नंतर त्यात आधी वाफवलेल्या डाळिंब्या घाला. ओले खोबरे जरा सढळ हस्ते घाला,:) शिजत आल्यावर मीठ,गूळ ,तिखट घाला.कोथिंबीर घाला. (काही जण यात गोडा मसाला घालतात,आमच्याकडे नाही घालत ह्या भाजीत.)

In reply to by स्वाती दिनेश

धनंजय Fri, 02/22/2008 - 21:04
केळफूल चिरताना तुकडे आंबट ताकात टाकले तर त्यांचा रंग काळा पडत नाही. (काळा पडला तरी हरकत नाही, भाजी छानच लागते.)

In reply to by स्वाती दिनेश

माझी दुनिया Tue, 02/26/2008 - 11:08
आमच्याकडे डाळींब्यांच्या ऍवजी मुगाची डाळ वापरतात. रात्री भिजवून ठेवायची. फोडणीत ...तिखटावर....आधी ती भिजवलेली डाळ घालून मग वरून उकडून ,निथळवलेले केळफूल घालायचे. फक्त मीठ घालून चांगलीपरतायची. साखर.....खोबरे.....या भाजीकरता वापरत नाही.
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by आनंद घारे

स्वाती राजेश Tue, 02/26/2008 - 00:58
साहित्यः
१ केळ्फुल
५० ग्रॅम काळे वाटाणे
२ हिरव्या मिरच्या
२ टी.स्पून गोडा मसाला/ भाजीचा मसाला
१/२ टी.स्पून हळद
१/२टी.स्पून साखर
१ कांदा
१ वाटी ओले खोबरे
चवीनुसार मीठ
तेल

केळ्फुल सोलून बारीक चिरावे.सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतीलजाडसर कावळा(केसर) काढून टाकावा. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा म्हणजे त्यातील चीक निघून जाईल. धुवून निथळतठेवावा.काळे वाटाणे रात्रभर भिजत घालावेत्.कुकरमध्ये वाटाणेशिजवून घ्यावेत.
एका पतेल्यात तेल घेऊन तेल टाकावे. तेल तापल्यावर थोडा हिंग, चिरलेलाकंदा वमिरची घालून परतावी. कांदा गुलाबी झाल्यावर त्यातचिरलेले केळ्फुल, शिजलेले वाटाणे,हळद, मसाला, थोडी साखर, मीठ घालूनझाकणीवर पाणी ठेऊन भाजी शिजवून घ्यावी. वरून ओले खोबरे पेरावे.

तात्यांच्या मातोश्रींनी केलेली भाजीची रेसिपीची वाट पाहात आहे.......

In reply to by स्वाती राजेश

राजमुद्रा Tue, 02/26/2008 - 10:11

धन्यवाद स्वाती!

मी तुझी खूप खूप आभारी आहे, मी नक्की सांगेन तुला भाजी कशी झाली ते. अर्थात तुझी रेसिपी म्हणजे भाजी छानच होणार.

खरच तुझे खूप खूप आभार :)

राजमुद्रा :)

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 17:13

"पानगे " हा काय प्रकार आहे ? कोणी सांगेल क? मी श्री ना पेंडसेंच्या कादम्बरीत वाचले आहे हे नाव.

खास कोकणी...ते ही तळकोकणात बनव्तात म्हणे....

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 20:42
पाककृती मस्तच आहे. माझी पाककृतीही अशीच आहे.... दह्यात आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार मिसळून वरून जिर्‍याची फोडणी द्यावी. किंचीत पातळसर करुन एका काचेच्या पसरट सटात जीरा बटर मांडून त्यावर ओतावे. वरून बारीक चिरलेली कोथींबिर, लाल तिखटाची आणि जिरे पावडरची रांगोळी काढावी. एकदम झटपट.

In reply to by प्रभाकर पेठकर

सृष्टीलावण्या Mon, 02/18/2008 - 21:30
तसेच एका खाद्यवेड्याने केलेल्या कौतुकाचे मोल दुसर्‍या खाद्यवेड्यालाच माहित. आता तुमची पण पाककृति उद्याच करून पाहते [कारण मनोहर बिस्किट मार्ट ८.३० लाच बंद झाले असेल ना म्हणून नाही तर खाण्याच्या बाबतीत आपले धोरण आज आत्ता ताबडतोब असे आहे (कामाच्या बाबतीत ते थोडे वेगळे म्हणजे उद्या, परवा, केव्हातरी असे आहे)]. ह्यावरून सहज सुचले म्हणून सांगते की थळला माझी एक दूरची मावशी राहत होती तिने एकदा फर्मान काढले की तुम्ही लोक पुढच्यावेळी ज्यावेळी कोकणप्रवासाला निघाल त्यावेळी पहिला टप्पा आमच्याकडे मुक्काम करून करावा. आम्ही लगेच हो म्हटले. मामा, माम्या, मावश्या आणि पुढची पिढी वैगरे एकूण १७ जण त्यावेळी आम्ही कुटुंबसहलीला निघालो. पोहोचल्यावर सगळ्या लहानांनी गिल्ला केला भूक लागली. तिने उत्साहाने पहिला चेंडू टाकला, "काय घेणार, थंड का गरम?" त्यावर आमच्यापैकी एकाने निरागसपणे सांगितले, गरम होईपर्यंत गार चालेल. तिचा भांबावलेला चेहरा पाहून खुलासा केला की चहा होईपर्यंत सरबत चालेल. तिला पुढे काय वाढून ठेवलय याची अंधुक कल्पना आली. तिने जर नंतर उपमा की पोहे असे विचारले असते तर उत्तर मिळाले असते उपमा होईपर्यंत कोळाचे पोहे चालतील असे तिला उत्तर मिळाले असते. जेवणाला वेळ होता म्हणून आम्ही ओले पोहे हाणले आणि समुद्रावर पळालो. परत आल्यावर पंगत तयारच होती. तिने आनंदाने सांगितले की तांदळाची खिचडी आणि पोह्याचे पापड असा बेत आहे आणि खिचडी तयार असून निवायला ठेवलेली आहे. "आत्ता आणते" असे म्हणून ती माजघरात गेली. तेव्हढ्यात आम्हा बकासुर वंशजांना हाताला लोणच्याची बाटली लागली. तिची खिचडी निवून येईपर्यंत (२-३ मिनिटे) ते किलोभर लोणचे सफाचट. रात्रीपर्यंत राहिलो असतो तर बिचारीला कांदाच हुंगवावा लागला असता.

In reply to by सृष्टीलावण्या

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 16:43
कारण मनोहर बिस्किट मार्ट ८.३० लाच बंद झाले असेल ना म्हणून नाही तर खाण्याच्या बाबतीत आपले धोरण आज आत्ता ताबडतोब असे आहे क्या बाऽऽऽऽत है| ह्यालाच खवय्येगिरी म्हणतात. मनसोक्त खा, आत्ताच, उद्याचा कोणी भरवसा द्यावा?

In reply to by संजय अभ्यंकर

प्रभाकर पेठकर Tue, 02/19/2008 - 16:47
चुकीची दूरूस्ती: वरील वाक्य 'एकंदर मि.पा.वर खवय्यांना तोटा नाही.' असे वाचावे. खादाड पोट भरून खातो, खवय्या मनभरून खातो.

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:55
झकास पा कृ! सृष्टीलावण्य, आता पेठकरशेठ आणि स्वाताताईच्या संगतीने तुम्हीही मिपाच्या रसोईघरात दाखल झालात याचा आनंद वाटला... अरे कुणीतरी पानं घ्या रे, मंडळी जेवायची खोळंबली आहेत! :) आपला, (भुकेलेला) तात्या.

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 14:00
वा ! सृष्टीलावण्य, एकदम झकास पाकक्रुती :) अश्याच साध्या सोप्या पाकक्रुती आणखी येवू देत. वेळखाऊ पाकक्रुती करायला मला मुळातच कंटाळा येतो बाकी खाण्याचा कधीच कंटाळा नाही हो :) राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

सृष्टीलावण्या Wed, 02/20/2008 - 17:09
अशी समजूत आहे की भरपूर वस्तु घातलेले (मुख्यत: सुकामेवा इ.) आणि वेळकाढू पदार्थ चांगले पण महाराष्ट्रात मात्र साधे सोपे, झटपट पदार्थ करण्याकडे जास्त कल असतो अपवाद अनरसे, केळफूलाची भाजी इ. चा.

In reply to by सृष्टीलावण्या

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 17:21
अनरसे,केळफूलाची भाजी दोन्ही माझ्या आवडीच्या गोष्टी. केळफूलाच्या भाजीची रेसिपी असल्यास नक्की कळवा. आईकडून करून घेईन. एकदा गावाकडे एका काकूंकडे खाल्ली होती. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

सृष्टीलावण्या गुरुवार, 02/21/2008 - 10:10
आणि ती अस्सल कोकणी 'पोलं आणि केळफुलाची भाजी' करते. ती मला पाकृ सांगेल पण माझा सल्ला ऐका बापु, हा केळफुलाच्या भाजीचा स्वत: करण्याचा नाद सोडा... कारण केळफुलाच्या भाजीची सुरवात केळफुलाच्या पेरातील विशिष्ट तंतु काढण्यापासून होतो . . . आणि . . आमच्या कडे पाकृ सांगण्याची सुरुवात भांड कुठल्या आकाराचे घ्यायचे, कुठल्या धातुचे, जाड बुडाचे की पातळ बुडाचे, फोडणीत कुठल्या पदार्थानंतर किती वेळाने कुठला पदार्थ टाकायचा इ. ने होते. मला पाकृ लिहायला ४ तास आणि ती वाचून पचायला तुम्हाला ८ तास. ... पाकृची शेवटची ओळ वाचेपर्यंतच तुम्हाला धाप लागेल. म्हणून हा नाद सोडा आणि संसिद्ध (readymade) केळफुलाची भाजी खा.

In reply to by राजमुद्रा

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 13:04
केफूच्या भाजीची पाकृ आईला विचारून मी लवकरच येथे देईन.. आमची म्हातारी ही भाजी फार सुरेख करते... आपला, (केळीच्या बनातला) तात्या जळगावकर.

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा गुरुवार, 02/21/2008 - 13:20
तुमच्या आईच्या पाकक्रुतीची (वाचून आईला फक्त सांगण्यासाठी)मनापासून वाट पाहत आहे. कारण आईच्या हातची केफूची भाजी खाणेच सोयीस्कर आहे. मी केलेली भाजी माझ्याच आरोग्यास अपायकारक होऊ शकते. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 21:59
मधे मला इथे अमेरिकेत केळफुलाची खूप आठवण येत होती. एका गोर्‍या अमेरिकन स्नेह्याच्या घरी केळ्याचं झाड आहे. त्याला केळफूल लागलं होतं. आपल्याकडे त्याची भाजी करतात हे त्याला सांगितल्यावर त्याने ते चक्क काढून मला दिलं :) आणि म्हणाला उद्या करून आण भाजी :) आता आली का पंचाईत करता कोणाला येतेय.. मग मी घरी फोन करून टप्प्या टप्प्याने भाजी करायला लागलो. आधी ते तंतु (त्याला आम्ही कावळे चिमण्या म्हणतो ;) ) काढले मग हळद-मिठाच्या पाण्यात केळफूल चिरून ठेवले. मग पुन्हा आईला फोन आणि मग ट्प्प्या टप्प्याने भाजी बनली.. पण काय झकास बनली म्हणून सांगू..तेहि इथे आम्रिकेत केळफूल खाण्याचा आनंद काय सांगावा. पण आता पूर्ण कृती आठवत नाहि :( (पुढच्या विकांताला)भारतात गेलो की आईला पुन्हा विचारून सांगतो :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

धनंजय गुरुवार, 02/21/2008 - 23:33
हे आग्नेय आशियाई दुकानांत (किंवा पूर्व/ईशान्य आशियाई/कोरियन दुकानांत) मिळते. केळफूल मी जास्तीत जास्त वर्षातून एकदा आणतो. त्यातल्या प्रत्येक फुलाचा स्त्रीकेसर आणि एक बाहेरचा पदर वेगळा काढून टाकून द्यावा लागतो (कावळे चिमण्या). तासाभराच्या कामानंतर झालेली मूठभर भाजी बघून दर वेळा म्हणतो "पुन्हा कधी नाही!" मग पुन्हा कधी दुकानातले केळफूल मला त्याच्या मोहजालात पकडते... केळीची पाने मेक्सिकन दुकानांत मिळतात. पण ही बर्फात थिजवलेली असतात, म्हणून दिसायला सुंदर नसतात. अशा केळ्याच्या पानांचे हे उपयोग मला सुचले आहेत (मी करून बघितले आहेत) : १. एका थाळीत पाने पसरायची, वर कढत भात पसरायचा, मग त्यातून भात डिशमध्ये वाढायचा. केळीच्या पानांचा मंद सुवास (काही प्रमाणात केळीच्या पानातच जेवल्यासारखा) येतो. २. थालीपीठ थापायला प्लास्टिकच्या कागदाऐवजी (किंवा तुम्ही प्लास्टिकचा कागद वापरत नसला तर मुद्दामून) वापरायची. पानासकट थालीपीठ तव्यावर टाकायचे (म्हणजे थाळीपीठाच्या एका बाजूला तवा, दुसर्‍या बाजूला केळीचे पान. पानाच्या "झाकणा"मुळे थालीपीठ वाफेत शिजते, त्याला केळीच्या पानाचा सुरेख वास येतो. ३. माशाच्या तुकड्यांना चटणी माखून ते केळीच्या पानांचे पुडे करून बांधायचे. मग ते पुडे वाफवायचे/किंवा ओव्हनमध्ये भाजायचे.

In reply to by ऋषिकेश

राजमुद्रा Fri, 02/22/2008 - 13:49
धन्यवाद ऋषिकेश ! तुम्ही एवढ्या प्रयत्नपूर्वक, कष्टाने रेसिपी सांगणार आहात, तर माझीही भाजी करण्याची तयारी आहे. राजमुद्रा :)

मोहन Wed, 02/20/2008 - 14:00
विसरल्यागेलेल्या पाककृतीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. एक व्हेरिएशन - "दहीवड्यांवर" वरुन फोडणी टाकल्यास गंमत येते आपला मोहन

In reply to by सृष्टीलावण्या

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 19:37
माझ्या मते तुपाची. कारण दहिवड्यावरील फोडणीत चवीच्या दृष्टीने 'जीरे' असणे आवश्यक आहे आणि 'जीरे' म्हंटले की तुपाची फोडणी, हे समीकरण चवदार आहे.

स्वाती राजेश गुरुवार, 02/21/2008 - 23:42
मी केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून करते. तात्यांच्या मातोश्रींची कशी पद्धत आहे? वाट पाहात आहे लवकर पाठवा भाजी नव्हे कृती.:)

In reply to by स्वाती राजेश

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:51
मी केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून करते. करेक्ट! आमच्या आईचीही तीच पद्धत आहे. मी पाकृ द्यायला विसरूनच गेलो! आत्ता म्हातारी झोपली आहे गुडुप! उद्या सकाळी विचारतो तिला! :) (मातृभक्त) तात्या.

प्राजु Fri, 02/22/2008 - 02:33
आजी (आईची आई) अतिशय सुंदर करते केळ फुलाची भाजी. फणसाची भाजी आणि केळफुलाची भाजी... उत्तम करते ती. इथे, भारतीय दुकानातून मी, टिन्ड कच्च्या फणसाचे तुकडे आणले होते. त्याची शेंगदाणे घालून भाजी केली. चवीला खूप छान झाली होती. पण व्हिनेगर मधल्या फणसाच्या तुकड्यांमुळे घसा खवखवू लागला.. चालायचेच. तात्यांच्या मातोश्रींच्या केफू च्या भा़जीच्या पाकृ ची मी ही वाट पहाते आहे. - प्राजु

स्वाती दिनेश Fri, 02/22/2008 - 13:38
हं...केळफूलाची भाजी...काय आठवण करून दिलीत.. केळफुलाच्या भाजीत आमच्याकडे डाळिंब्या घालतात.आधीच त्या कावळेचिमण्या वेगळे करा, डाळिंब्या सोला..भरपूर आटापिटा...पण काय झकास भाजी होते... केळफुलातील पुकेसर वेगळा काढून टाका, नंतर ती चिरा,चिरताना विळी/सुरीला आणि हातालाही तेलाचे बोट लावा म्हणजे राप चढणार नाही.डाळिंब्या (कडवे वाल)सोलून,वाफवून घ्या.केळफूलही वाफवून्/उकडून घ्या.तेलाची फोडणी करून त्यात वाफवलेले केळफूल घाला,नंतर त्यात आधी वाफवलेल्या डाळिंब्या घाला. ओले खोबरे जरा सढळ हस्ते घाला,:) शिजत आल्यावर मीठ,गूळ ,तिखट घाला.कोथिंबीर घाला. (काही जण यात गोडा मसाला घालतात,आमच्याकडे नाही घालत ह्या भाजीत.)

In reply to by स्वाती दिनेश

धनंजय Fri, 02/22/2008 - 21:04
केळफूल चिरताना तुकडे आंबट ताकात टाकले तर त्यांचा रंग काळा पडत नाही. (काळा पडला तरी हरकत नाही, भाजी छानच लागते.)

In reply to by स्वाती दिनेश

माझी दुनिया Tue, 02/26/2008 - 11:08
आमच्याकडे डाळींब्यांच्या ऍवजी मुगाची डाळ वापरतात. रात्री भिजवून ठेवायची. फोडणीत ...तिखटावर....आधी ती भिजवलेली डाळ घालून मग वरून उकडून ,निथळवलेले केळफूल घालायचे. फक्त मीठ घालून चांगलीपरतायची. साखर.....खोबरे.....या भाजीकरता वापरत नाही.
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by आनंद घारे

स्वाती राजेश Tue, 02/26/2008 - 00:58
साहित्यः
१ केळ्फुल
५० ग्रॅम काळे वाटाणे
२ हिरव्या मिरच्या
२ टी.स्पून गोडा मसाला/ भाजीचा मसाला
१/२ टी.स्पून हळद
१/२टी.स्पून साखर
१ कांदा
१ वाटी ओले खोबरे
चवीनुसार मीठ
तेल

केळ्फुल सोलून बारीक चिरावे.सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतीलजाडसर कावळा(केसर) काढून टाकावा. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा म्हणजे त्यातील चीक निघून जाईल. धुवून निथळतठेवावा.काळे वाटाणे रात्रभर भिजत घालावेत्.कुकरमध्ये वाटाणेशिजवून घ्यावेत.
एका पतेल्यात तेल घेऊन तेल टाकावे. तेल तापल्यावर थोडा हिंग, चिरलेलाकंदा वमिरची घालून परतावी. कांदा गुलाबी झाल्यावर त्यातचिरलेले केळ्फुल, शिजलेले वाटाणे,हळद, मसाला, थोडी साखर, मीठ घालूनझाकणीवर पाणी ठेऊन भाजी शिजवून घ्यावी. वरून ओले खोबरे पेरावे.

तात्यांच्या मातोश्रींनी केलेली भाजीची रेसिपीची वाट पाहात आहे.......

In reply to by स्वाती राजेश

राजमुद्रा Tue, 02/26/2008 - 10:11

धन्यवाद स्वाती!

मी तुझी खूप खूप आभारी आहे, मी नक्की सांगेन तुला भाजी कशी झाली ते. अर्थात तुझी रेसिपी म्हणजे भाजी छानच होणार.

खरच तुझे खूप खूप आभार :)

राजमुद्रा :)

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 17:13

"पानगे " हा काय प्रकार आहे ? कोणी सांगेल क? मी श्री ना पेंडसेंच्या कादम्बरीत वाचले आहे हे नाव.

खास कोकणी...ते ही तळकोकणात बनव्तात म्हणे....

Taxonomy upgrade extras
दही बटर घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे. मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित् मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा. दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार.

संडे स्पेशल (दुधापासून केलेले पदार्थ)

स्वाती राजेश ·

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 20:45
झकास रेसिपीज्. कोल्ड कॉफीवर कोको पावडर भुरभुरून सर्व्ह करावे. मस्त दिसते.

वरदा Mon, 02/18/2008 - 21:26
मिल्क शेक (बदाम्/खजुर) हे कसं करतेस? प्लीज सांग ना मला... कस्टर्ड कसं करतेस तेही सांग तुला वेळ मिळाला तर...

वरदा Mon, 02/18/2008 - 21:28
सांगायचं राहीलं..गव्हाची खीर छान आहे..मी नुसत्या गव्हाची केलेय पण त्यात तांदुळ घालुन नाही पाहिलेत आता करुन पाहेन...

छोटा डॉन Mon, 02/18/2008 - 23:43
स्वातीताई अतिशय आभारी आहे...... मला वाटते की मला " खीर " नक्कीच जमेल .... बघतो आता ट्राय करून ..... अवांतर : फालूदा कसा करतात ?

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:45
गव्हाची खीर मस्तच झाल्ये, आवडली...:) अरे कुणीतरी बालूशाहीची पा कृ द्या रे! आपला, (बालूशाहीवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 18:47
साहित्य: मैदा ३ कप तूप किंवा लोणी १ कप दही ३/४ कप वेलदोडे पूड १/२ चहाचा चमचा खाण्याचा सोडा १/२ चहाचा चमचा साखर ८ कप पाणी ३ कप तेल तळण्यासाठी क्रूती: प्रथम पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर साखर घालावी.साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा. प्रथम मैदा, वेलदोडे पूड , खाण्याचा सोडा एकत्र मिसळून घ्यावा.नंतर त्यात लोणी किंवा तूप घालून मळून घ्यावे. नंतर एक एक चमचा दही घालून चांगले (खूप)घट्ट पीठ भिजवावे. नंतर तेल तापण्यास ठेवावे. पीठाचा छोटा गोळा घेवून गोल करावा. नंतर किंचित तळहातावर दाबून चपटा करावा. मग त्या गोळ्याच्या मधोमध अंगठ्याने थोडासा खड्डा (बीळ नाही) करावा. मग हे गोळे तेलात लालसर खरपूस तळून कढावेत.हे गोळे पाकातून काढावेत, वरून पिस्त्याचे तुकडे घालून सजवावे. बालूशाही तय्यार :) राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 18:53
माझ्या प्रयोगशाळेत माझे प्रयोग चालू होतेच. पण मनासारखी बालूशाही बनत नव्हती (त्याचा 'बाळूशाही'बनत होता). आता तुमच्या पद्धतीने करून पाहिन बालूशाही. पाककृती स्वतंत्र दिली असती तर भविष्यात कधी गरज भासल्यास शोधायला बरे पडले असते. असो. अभिनंदन.

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 20:45
झकास रेसिपीज्. कोल्ड कॉफीवर कोको पावडर भुरभुरून सर्व्ह करावे. मस्त दिसते.

वरदा Mon, 02/18/2008 - 21:26
मिल्क शेक (बदाम्/खजुर) हे कसं करतेस? प्लीज सांग ना मला... कस्टर्ड कसं करतेस तेही सांग तुला वेळ मिळाला तर...

वरदा Mon, 02/18/2008 - 21:28
सांगायचं राहीलं..गव्हाची खीर छान आहे..मी नुसत्या गव्हाची केलेय पण त्यात तांदुळ घालुन नाही पाहिलेत आता करुन पाहेन...

छोटा डॉन Mon, 02/18/2008 - 23:43
स्वातीताई अतिशय आभारी आहे...... मला वाटते की मला " खीर " नक्कीच जमेल .... बघतो आता ट्राय करून ..... अवांतर : फालूदा कसा करतात ?

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:45
गव्हाची खीर मस्तच झाल्ये, आवडली...:) अरे कुणीतरी बालूशाहीची पा कृ द्या रे! आपला, (बालूशाहीवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 18:47
साहित्य: मैदा ३ कप तूप किंवा लोणी १ कप दही ३/४ कप वेलदोडे पूड १/२ चहाचा चमचा खाण्याचा सोडा १/२ चहाचा चमचा साखर ८ कप पाणी ३ कप तेल तळण्यासाठी क्रूती: प्रथम पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर साखर घालावी.साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा. प्रथम मैदा, वेलदोडे पूड , खाण्याचा सोडा एकत्र मिसळून घ्यावा.नंतर त्यात लोणी किंवा तूप घालून मळून घ्यावे. नंतर एक एक चमचा दही घालून चांगले (खूप)घट्ट पीठ भिजवावे. नंतर तेल तापण्यास ठेवावे. पीठाचा छोटा गोळा घेवून गोल करावा. नंतर किंचित तळहातावर दाबून चपटा करावा. मग त्या गोळ्याच्या मधोमध अंगठ्याने थोडासा खड्डा (बीळ नाही) करावा. मग हे गोळे तेलात लालसर खरपूस तळून कढावेत.हे गोळे पाकातून काढावेत, वरून पिस्त्याचे तुकडे घालून सजवावे. बालूशाही तय्यार :) राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

प्रभाकर पेठकर Wed, 02/20/2008 - 18:53
माझ्या प्रयोगशाळेत माझे प्रयोग चालू होतेच. पण मनासारखी बालूशाही बनत नव्हती (त्याचा 'बाळूशाही'बनत होता). आता तुमच्या पद्धतीने करून पाहिन बालूशाही. पाककृती स्वतंत्र दिली असती तर भविष्यात कधी गरज भासल्यास शोधायला बरे पडले असते. असो. अभिनंदन.
काही वेळा घरी दुध उरते अशावेळी तुम्ही काय करता? १.मी कस्टर्ड करते आणि फ्रिज मध्ये ठेवते आणि जी फळे असतील त्यांच्या फोडी करून ऐनवेळी त्यात घालून देते.

"आय टी " कंपन्या व "प्रोजेक्ट डिलीव्हरी अर्थातच मुल जन्माला घालणे ...... "

छोटा डॉन ·

संजय अभ्यंकर Mon, 02/18/2008 - 21:47
एवढे तास काम करुन माणसची कार्यक्षमता तर संपतेच, परंतु व्याधीही मागे लागतात. बाxxxx तो साहेब (आणि ती डेडलाईन), त्याला फाट्यावर मारुन घरी जाणे हाच उपाय. वयाच्या तिशीत मी असले उपद्व्याप करित असे. पण असे लक्षात येऊ लागले की: १)डेड लाईन जन्मात कधी संपत नाही. २)कं. पगार देते म्हणजे नोकरांनी राबलेच पाहेजे, ही व्यवस्थापनाची ठाम समजुत असते. (टाटाचा इंडिका प्लांट उभा रहात असताना, दिवाळिच्या सुमारास ती कुप्रसिद्ध डेडलाईन आली. तिथल्या एका उच्चपदस्थाने (बॉसने), सगळ्यांची दिवाळीची सुट्टी रद्द करुन, त्यांना धक्याला लावले आणि स्वतः मात्र दिवाळी साजरी करायला, पोराबाळांसहित, गोव्याला निघुन गेला. ह्यात आमच्या काही सहकार्‍यांचीही दिवाळी बुडाली.) ३)जितके ज्यास्त तास काम तितक्या जास्त चुका. ४-५ तास काम करुन मिळवलेले यश, नंतरच्या ६ तासात आपण गमावतो. आणी दुसर्‍या दिवशी सकाळी आदल्यादिवशीच्या चुका सुधारत बसतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 12:26
डॉन भाऊ, माझी सहानुभुती रे! ज्याच॑ जळत॑ त्यालाच कळत॑ म्हणतात ते खोट॑ नाही. तुम्ही जात्यात दिसताय...आम्हीही सुपात आहोत..पुढच्या महिन्यात आहे आमचा जोरदार शिमगा!!! मग काय, प्रोजेक्ट मॅनेजरच्या बैलाला... असो, बाकी ते मेल मात्र यच्चयावत I.T. हमाला॑च॑ आवडत॑ आहे बहुधा :) आपला - ध मा ल. (सुपातला)

संजय अभ्यंकर Mon, 02/18/2008 - 21:47
एवढे तास काम करुन माणसची कार्यक्षमता तर संपतेच, परंतु व्याधीही मागे लागतात. बाxxxx तो साहेब (आणि ती डेडलाईन), त्याला फाट्यावर मारुन घरी जाणे हाच उपाय. वयाच्या तिशीत मी असले उपद्व्याप करित असे. पण असे लक्षात येऊ लागले की: १)डेड लाईन जन्मात कधी संपत नाही. २)कं. पगार देते म्हणजे नोकरांनी राबलेच पाहेजे, ही व्यवस्थापनाची ठाम समजुत असते. (टाटाचा इंडिका प्लांट उभा रहात असताना, दिवाळिच्या सुमारास ती कुप्रसिद्ध डेडलाईन आली. तिथल्या एका उच्चपदस्थाने (बॉसने), सगळ्यांची दिवाळीची सुट्टी रद्द करुन, त्यांना धक्याला लावले आणि स्वतः मात्र दिवाळी साजरी करायला, पोराबाळांसहित, गोव्याला निघुन गेला. ह्यात आमच्या काही सहकार्‍यांचीही दिवाळी बुडाली.) ३)जितके ज्यास्त तास काम तितक्या जास्त चुका. ४-५ तास काम करुन मिळवलेले यश, नंतरच्या ६ तासात आपण गमावतो. आणी दुसर्‍या दिवशी सकाळी आदल्यादिवशीच्या चुका सुधारत बसतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा Tue, 02/19/2008 - 12:26
डॉन भाऊ, माझी सहानुभुती रे! ज्याच॑ जळत॑ त्यालाच कळत॑ म्हणतात ते खोट॑ नाही. तुम्ही जात्यात दिसताय...आम्हीही सुपात आहोत..पुढच्या महिन्यात आहे आमचा जोरदार शिमगा!!! मग काय, प्रोजेक्ट मॅनेजरच्या बैलाला... असो, बाकी ते मेल मात्र यच्चयावत I.T. हमाला॑च॑ आवडत॑ आहे बहुधा :) आपला - ध मा ल. (सुपातला)
च्यायला ह्या "प्रोजेक्ट डिलीव्हरीच्या डेडलाईन " मुळे पार डोक्याची मंडई झाली पण काम काही संपतच नाही . त्या पच्छिम बंगालमध्ये चहाच्या मळ्यात राबणाऱ्या 'वेठबीगार' मजुरांच्या पेक्षा आमची अवस्था बेकार झाली आहे. ३२ तास झाले अजून घरी गेलो नाही. आमचा मॅनेजर , ती टेस्टींग टीम, तो ऑनसाईट को-ऑर्डीनेटर पार 'रक्ताची चटक लागलेल्या खविसासारखे' मागे लागले आहेत.

न्याहारीचा पदार्थ उकरपेंडी

संजय अभ्यंकर ·

मनिष Mon, 02/18/2008 - 19:57
उकरपेंडी हा वर्‍हाडी पदार्थ आहे. गव्हाच्या कोंड्यापासून बनवतात त्यामुळे 'फायबर रीच' असतो. आमच्या घरात हा बर्‍याच वेळा बनतो - विचारून पाककृती देतो.

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 20:35
महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. दाक्षिणात्य न्याहारींमध्ये (जेवढ्या मला माहित आहेत तेवढ्यात तरी...) एकदा चटणी सांबार बनवून ठेवले असले की मुख्य पदार्थ झटपट होतो, त्याचा निर्मिती खर्च एकदम अल्प असतो त्यामुळे ढोबळ नफा अधिक असतो. गिर्‍हाईकाला पदार्थ गरम्-गरम मिळतो, झटकन टेबलवर येतो, पचायला हलका स्वादीष्ट आणि रुचकर असतो. त्यामुळे तो प्रसिद्धी पावला. गुजराथी न्याहारीत, पुरी-भाजी, खमण ढोकळा, पांढरा ढोकळा, सुरळीच्या वड्या, फापडा, भजीया, मेथी गोटे, कचोरी असे अनेक पदर्थ थोडे कष्टप्रद पण अत्यल्प निर्मिती खर्चाचे आहेत. त्यामुळे त्यांचेही बाजारात बर्‍यापैकी वर्चस्व असते. मराठी न्याहारीत पोहे, बटाटावडा, वडापाव हे तीन(च) पदार्थ ह्या निकषांवर खरे उतरतात. तरी पण त्यात निर्मिती खर्च (तुलनात्मक दृष्टया) अधिक आहे. कष्ट अधिक आहेत. त्यामुळे बिचारे मागे पडले. पंजाबी न्याहारीत कष्ट आणि निर्मिती खर्चाचे वाढते प्रमाण ह्या मुळे ते पदार्थ जरा (आपल्याही) मागे आहेत. उकरपेंड की उकडपेंड? (संभ्रमात).

In reply to by प्रभाकर पेठकर

मोहन Tue, 02/19/2008 - 14:44
पुणे कोल्हापूर हायवे वर खंबाटकी घाट ऊतरलाकी एका विरंगुळा नावाच्या हॉटेलात बरेच मराठी पदार्थ मिळतात. उदा: मिसळ- साधी /उपासाची, बटाटा/कांदा/मिरची भजी, थालीपीठ, ऊपासाचे थालीपीठ तर अप्रतीम! सकाळ्च्यावेळात तर माझ्यासारख्या ऊड्प्यांना कंटाळलेल्यांची तूफान गर्दी असते. गे ल्या ४ - ५ वर्षात विरंगुळाची भरभराट पाहाण्या सारखी आहे. आपले पदार्थ चांगले मार्केट झाले नाहीत हेच खरे. आपला मोहन

सूर्य Mon, 02/18/2008 - 20:59
असाच शब्द ऐकला आहे. मी खालील प्रमाणे उकडपेंडी करतो. गव्हाचे पीठ थोडे भाजुन घेतो. त्यानंतर तेल तापवुन त्यात मोहरी, कांदा, मिरची टाकुन फोडणी तयार करुन घेतो. त्यात तिखट, मीठ, व दही (भरपुर) टाकुन नंतर भाजलेले पीठ व थोडे पाणी त्यात टाकतो व हलवतो. सगळे व्यवस्थित मिसळले की झाकण ठेवुन वाफवतो. नंतर मिटक्या मारत खातो. ;-) असो. हीच उकडपेंडी असा मात्र माझा दावा नाही ;-)). जाणकारांनी जरुर पाकक्रिया द्यावी. आपला (खादाड) सूर्य

In reply to by सूर्य

लिखाळ Mon, 02/18/2008 - 21:58
वा ! ही पाकृ चांगली वाटत आहे. आता करुन पाहतो. कणिक घरी आणून नुसतीच फडताळात ठेवली आहे आणि पोळ्या करायचा कंटाळा करित आहे. या पाकृ मुळे थोडे गहु पोटात जातील. पोळ्या करणे टाळण्यासाठी मी नेहमीच नवे उपाय शोधत असतो. पाकृ साठी आभार. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळ खाल्ल्यावर थंड ताक आम्हाला पाहिजे असते.

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 00:58
संजयभाऊ, फार सुंदर आठवण करून दिलीत. उकरपेंडी हा पदार्थ मी एक दोनदाच खाल्ला आहे एका मित्राच्या मावशीच्या घरी. अतिशय सुरेख लागतो... उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. अगदी खरं आहे. आपण अगदी मर्मावर बोट ठेवलंत! पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. हो, परंतु गरमागरम इडली आणि चटणी सकाळच्या वेळेत खायला फारच छान लागते हेही खरंच! सकाळच्या टायमाला दोनचार गरमागरम इडल्या आणि चटणी खाल्ली की अगदी समाधान होतं, खूप बरं वाटतं! असो, न्याहरीच्या पदार्थात मिसळपाव ही माझी नेहमीच प्रथम पसंती आहे.. त्यानंतर अर्थातच मऊभात ही दुसरी पसंती..! आणि त्यानंतर पानगी, इडली, वगैरे वगैरे वगैरे... आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल. संजयदादा, अहो आम्ही देवगडातली गरीब कोकणी माणसं! कलमी आंब्याचे लहानसे बागायतदार! थोडीफार सुपारी आणि कोकमांची उलाढाल! आमच्या घरी कोकणात न्याहरीला पानगी किंवा मऊभातच बरं का! छानशी, प्रसन्न अशी देवगडातली सकाळ आहे. दत्तू अभ्यंकराकडची मंडळी उठली आहेत, घरात हासण, खिदळणं, गप्पा टप्पा सुरू आहेत. आंगण्यात छानसं सारवलेलं आहे. आंब्याफोफळीच्या वाडीतनं शिपणाचा आवाज ऐकू येतो आहे, रहाटाची करकर मन प्रसन्न करते आहे. आते-मामे-चुलत-मावस भावंड सुट्टीत जमली आहेत त्यांची किलबील सुरू झालेली आहे. कुठल्यातरी मावशीची भलतीच देखणी पुतणी प्रथमच कोकण पाहायला आलेली आहे. ती प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने बघते आहे. लहानसहान गोष्टींची कारणमिमांसा मोठ्या कुतुहलाने तात्याला विचारते आहे. तात्या संध्याकाळी समुद्रावर हिला एकटीलाच कसं घेऊन जाता येईल या विचारात पडला आहे. घरातल्या कुठल्यातरी मोठ्या काकूने 'आंघोळीपांघोळी केल्याशिवाय कुणीही व्यापार किंवा झब्बू खेळायला बसायचं नाहीये!' असा समस्त बच्चेकंपनीला दम भरलेला आहे, घरातल्या मंडळीत 'काल रात्री आंगण्यातून राखणदार सळसळत गेला, तुम्हाला दिसला का?' अशी चर्चा होते आहे, आणि अश्यातच... केळीच्या पानातली पानगी समोर येते आहे. सोबत लोण्याचा गोळा नी फोडणीची मिरची! किंवा, केळीच्या पानावर मस्त घोटलेला मऊमेतकूट भात, वर तुपाची धार, आंबोशीचं लोणचं, आणि सोबत भाजलेला पोह्यचा पापड! :) संजयभाऊ, अहो यापेक्षा अजून काय उत्तम न्याहरी पाहिजे तुम्हाला, बोला!! असो.. आपला, (मऊभातातला आणि पानगीतला!) तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

संजय अभ्यंकर Tue, 02/19/2008 - 12:48
तात्या, फार आठवणी काढु नका, जीवाला लई तरास होतो. मी माळव्यातला असलोतरी बायको देवगडची आहे, त्या मुळे घरात माळवी आणी कोकणी अश्या दोन्ही कडचे पदार्थ बनतात. परंतु, सासुने बनवलेलेच आयते आणी मऊभात फार छान लागतात (बायकोच्या अपरोक्ष सांगतोय..). सासुने आणलेल्या (फुकट) साजुक तुप व मेतकुटा शिवाय मऊ भाताला मजा नाही. (पण ह्या नोकरीमुळे आम्हाला कोकण कधीतरीच पहायला मिळते.) ता.क.: आठळ्यांची भाजी आणी तांदळाची भाकर खाऊन बरेच दिवस झालेत. फार दिवस झाले, ओल्या काजुगरांची उसळही जीभेला लागलेली नाही. (उन्हाळ्याची चातका सारखी वाट पहातोय). मुंबईत हे कोण बनवतो?.. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

खरेतर आम्ही फणसाच्या भाजीला कशालातरी लावून खायचा पदार्थ समजत होतो पण आमच्या आजीने हा आमचा भ्रम गावी गेल्यावर पहील्याच दिवशी दूर केला. 'तुला इकडे पोळ्या करून घालायला कोण आणणार आहेस?कोण नाही ना मग दिले आहे ते खा मुकाट्याने' असा कोकणी टोमणेयुक्त दम भरला. आणि तो पदार्थ मी तोंडात घातला..आहाहा! काय चव. ती फणसाची खाकटून केलेली भाजी होती. 'इकडे लोक न्याहारीला हेच खातात. गेल्या वर्षी भात चांगले झाले नाही. मग लोक दिवस काढत आहेत असे खाऊन.' अशी अधिक माहीती पण मिळाली. पण काही म्हणा ती भाजी मला फार आवडली. लाल सुक्या मिरचीची फोडणी देऊन, काळे वाटाणे घालून केलेली ती फणसाची भाजी फार फार आवडली. (तसेच उकडगर्‍याची पण भाजी करतात ती पण मला फार आवडते.) (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे गाववाले-पोंभुर्लेकर) डॅनी. पुण्याचे पेशवे

अनिला Tue, 02/19/2008 - 10:42
जाडसर गव्हाचे पीठ १ वाटी तेल पाव वाटी मोहरी, कान्दा, कधिपता, ताक्(गोड नाही) तेल तापवा, मोहरी हिन्ग घाला, कान्दा,हळद , हि.मिरची, कधिपता फोड्णी घाला जाडसर गव्हाचे पीठ घाला खूप परता. सुन्दर वास आला की त्यात ताक घाला, भराभरा परता, गोळे होऊ देऊ नका. मीठ घाला. वाफ येऊ द्या. गरम खा. वि.सु.=उपमा करताना जास्त पाणी/ताक घालतात ते रवा शोशून घेतो, तसेउकरपेन्डीचे नाही. येथे जरा बेताने घालावे. चुकुन जास्त झाले तर झाकण ठेऊ नये.

अनिला Tue, 02/19/2008 - 10:45
जसे कणीक पोळ्यासाठी भिज्विताना पाणी किती घलावे याचे माप नाही, तसे उकरपेन्डी ला ताक कुश्ल्तेनेच घालावे

मनस्वी Tue, 02/19/2008 - 12:22
तांदळाच्या पीठाची गरम गरम उकड पण छान लागते! उकरर्पेंडी प्रथमच ऐकला (वाचला).. लवकरच करून बघणार! मनस्वी

मनस्वी Tue, 02/19/2008 - 12:47
अजून काही न्याहारीचे मराठी पदार्थः मिसळ पोहे सांजा (उपमा) शिरा (मला केळं घालून आवडतो.) उकड थालिपीठ चकुल्या (वरणफळं) फोडणीचा भात (फोभा) फोडणीची पोळी (फोपो) धिरडी सुशिला (चुरमुर्‍याचा पोह्यांसारखा पदार्थ - मी अक्कलकोट, सोलापूरला खाल्ला होता.) बटाटेवडा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी शिंगोळ्या (माहित नाही कसा करतात. भाजणी उकडून केला असावा. मावशीकडे खाल्ला होता. प्रचंड पौष्टीक असतो म्हणे!) शिळी तळलेली पोळी चहात बुडवून पण मस्त लागते. - अजून आठवतील तसे लिहीन. (शिंगोळ्या आवडलेली) मनस्वी

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 13:37
ही एक पाककृति जी मराठी घराघरांत बनविली जाते. कृती - शिळी, बेचव भाजी जी संपायची सुतराम शक्यता नाही ती भज्याच्या सारणात घालून त्याची भजी किंवा भाजणीत बेमालूनपणे घालून त्याची थालीपीठे मुलांच्या पुढे सरकवायची आणि कमी आहेत असे आधीच सांगायचे म्हणजे मुले एकमेकांपेक्षा जास्त खायची स्पर्धा लावतात. भज्यासोबत टोमॅटो सॉस द्यायला विसरू नये.

In reply to by सृष्टीलावण्या

सख्याहरि Tue, 02/19/2008 - 21:23
अगदी लहानपणीची आठवण झाली... आम्च्या मातोश्रिंनी केलेला हा पदार्थ.. १०-१५ वर्षांनन्तर यची आठवण करून दिल्याबद्दल आपले आभार... शिळ्या भज्या, आमटी, भात, शेंगदाण्याचे कूट आणी तूप अणि वाट्ल्यास कैरिचे लोणचे..हे सर्व मिसलून गरम करावे ह ही त्यातलाच प्रकार.. अत्यन्त सत्विक.. आणि चविष्ठ... दूध नासले तर त्यात गूळ आणि वेल्दोडे घलून फार मस्त पदर्थ आमची आजी बनवीत असे.. (भुकेला) सख्याहरी

बापु देवकर Tue, 02/19/2008 - 14:08
फोडणीची पोळी म्हन्जेच शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी..की अजून काही... पोहे/थालिपीठ...वाचुनच पाणी सुटले हो तोन्डाला.. राज....

In reply to by बापु देवकर

सख्याहरि Tue, 02/19/2008 - 21:28
फो.पो. म्हणजे शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी.. कुर्कुरीत भाज्ल्यास मस्त लाग्ते.. चिमूट्भर सखर घलून पहा.. मस्त लागते. वाचुनच पाणी सुटले तोंडाला.. -सख्याहरी

संजय अभ्यंकर Tue, 02/19/2008 - 22:29
फोडणीची पोळी: ह्याला आमचे माळवी - मराठी लोक कुस्करा म्हणतात. नांव कुस्करा दिले की हा प्रकार सर्वसमावेशक होतो. केवळ शिळ्या पोळ्याच नव्हे तर रात्रीचा उरलेला भात, पाव, पावचे स्लाइस (कुस्करुन) हे सुद्धा फोडणी देउन बनवता येते. जर वरिल पैकी एकाहून अधिक प्रकार (पोळ्या व भात इ.) उरले असतील, तर ते एकत्र करुन त्यास फोडणी दिली जाते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

लिखाळ Fri, 02/22/2008 - 20:06
सूर्य आणि अनिला, मी आज सकाळी आपण दिलेल्या पाकृनिसार उकरपेंडी करुन पाहिली. अतिशय चविष्ट आणि खमंग असा पदार्थ आहे. मला महत्वाचे वाटते ते म्हणजे गव्हाचे पिठ पोटात जाते ते ! पोळ्या करायचा आळस असल्याने आता मी अनेकदा हा पदार्थ करिन. आभार. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मनिष Mon, 02/18/2008 - 19:57
उकरपेंडी हा वर्‍हाडी पदार्थ आहे. गव्हाच्या कोंड्यापासून बनवतात त्यामुळे 'फायबर रीच' असतो. आमच्या घरात हा बर्‍याच वेळा बनतो - विचारून पाककृती देतो.

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 20:35
महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. दाक्षिणात्य न्याहारींमध्ये (जेवढ्या मला माहित आहेत तेवढ्यात तरी...) एकदा चटणी सांबार बनवून ठेवले असले की मुख्य पदार्थ झटपट होतो, त्याचा निर्मिती खर्च एकदम अल्प असतो त्यामुळे ढोबळ नफा अधिक असतो. गिर्‍हाईकाला पदार्थ गरम्-गरम मिळतो, झटकन टेबलवर येतो, पचायला हलका स्वादीष्ट आणि रुचकर असतो. त्यामुळे तो प्रसिद्धी पावला. गुजराथी न्याहारीत, पुरी-भाजी, खमण ढोकळा, पांढरा ढोकळा, सुरळीच्या वड्या, फापडा, भजीया, मेथी गोटे, कचोरी असे अनेक पदर्थ थोडे कष्टप्रद पण अत्यल्प निर्मिती खर्चाचे आहेत. त्यामुळे त्यांचेही बाजारात बर्‍यापैकी वर्चस्व असते. मराठी न्याहारीत पोहे, बटाटावडा, वडापाव हे तीन(च) पदार्थ ह्या निकषांवर खरे उतरतात. तरी पण त्यात निर्मिती खर्च (तुलनात्मक दृष्टया) अधिक आहे. कष्ट अधिक आहेत. त्यामुळे बिचारे मागे पडले. पंजाबी न्याहारीत कष्ट आणि निर्मिती खर्चाचे वाढते प्रमाण ह्या मुळे ते पदार्थ जरा (आपल्याही) मागे आहेत. उकरपेंड की उकडपेंड? (संभ्रमात).

In reply to by प्रभाकर पेठकर

मोहन Tue, 02/19/2008 - 14:44
पुणे कोल्हापूर हायवे वर खंबाटकी घाट ऊतरलाकी एका विरंगुळा नावाच्या हॉटेलात बरेच मराठी पदार्थ मिळतात. उदा: मिसळ- साधी /उपासाची, बटाटा/कांदा/मिरची भजी, थालीपीठ, ऊपासाचे थालीपीठ तर अप्रतीम! सकाळ्च्यावेळात तर माझ्यासारख्या ऊड्प्यांना कंटाळलेल्यांची तूफान गर्दी असते. गे ल्या ४ - ५ वर्षात विरंगुळाची भरभराट पाहाण्या सारखी आहे. आपले पदार्थ चांगले मार्केट झाले नाहीत हेच खरे. आपला मोहन

सूर्य Mon, 02/18/2008 - 20:59
असाच शब्द ऐकला आहे. मी खालील प्रमाणे उकडपेंडी करतो. गव्हाचे पीठ थोडे भाजुन घेतो. त्यानंतर तेल तापवुन त्यात मोहरी, कांदा, मिरची टाकुन फोडणी तयार करुन घेतो. त्यात तिखट, मीठ, व दही (भरपुर) टाकुन नंतर भाजलेले पीठ व थोडे पाणी त्यात टाकतो व हलवतो. सगळे व्यवस्थित मिसळले की झाकण ठेवुन वाफवतो. नंतर मिटक्या मारत खातो. ;-) असो. हीच उकडपेंडी असा मात्र माझा दावा नाही ;-)). जाणकारांनी जरुर पाकक्रिया द्यावी. आपला (खादाड) सूर्य

In reply to by सूर्य

लिखाळ Mon, 02/18/2008 - 21:58
वा ! ही पाकृ चांगली वाटत आहे. आता करुन पाहतो. कणिक घरी आणून नुसतीच फडताळात ठेवली आहे आणि पोळ्या करायचा कंटाळा करित आहे. या पाकृ मुळे थोडे गहु पोटात जातील. पोळ्या करणे टाळण्यासाठी मी नेहमीच नवे उपाय शोधत असतो. पाकृ साठी आभार. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळ खाल्ल्यावर थंड ताक आम्हाला पाहिजे असते.

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 00:58
संजयभाऊ, फार सुंदर आठवण करून दिलीत. उकरपेंडी हा पदार्थ मी एक दोनदाच खाल्ला आहे एका मित्राच्या मावशीच्या घरी. अतिशय सुरेख लागतो... उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. अगदी खरं आहे. आपण अगदी मर्मावर बोट ठेवलंत! पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. हो, परंतु गरमागरम इडली आणि चटणी सकाळच्या वेळेत खायला फारच छान लागते हेही खरंच! सकाळच्या टायमाला दोनचार गरमागरम इडल्या आणि चटणी खाल्ली की अगदी समाधान होतं, खूप बरं वाटतं! असो, न्याहरीच्या पदार्थात मिसळपाव ही माझी नेहमीच प्रथम पसंती आहे.. त्यानंतर अर्थातच मऊभात ही दुसरी पसंती..! आणि त्यानंतर पानगी, इडली, वगैरे वगैरे वगैरे... आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल. संजयदादा, अहो आम्ही देवगडातली गरीब कोकणी माणसं! कलमी आंब्याचे लहानसे बागायतदार! थोडीफार सुपारी आणि कोकमांची उलाढाल! आमच्या घरी कोकणात न्याहरीला पानगी किंवा मऊभातच बरं का! छानशी, प्रसन्न अशी देवगडातली सकाळ आहे. दत्तू अभ्यंकराकडची मंडळी उठली आहेत, घरात हासण, खिदळणं, गप्पा टप्पा सुरू आहेत. आंगण्यात छानसं सारवलेलं आहे. आंब्याफोफळीच्या वाडीतनं शिपणाचा आवाज ऐकू येतो आहे, रहाटाची करकर मन प्रसन्न करते आहे. आते-मामे-चुलत-मावस भावंड सुट्टीत जमली आहेत त्यांची किलबील सुरू झालेली आहे. कुठल्यातरी मावशीची भलतीच देखणी पुतणी प्रथमच कोकण पाहायला आलेली आहे. ती प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने बघते आहे. लहानसहान गोष्टींची कारणमिमांसा मोठ्या कुतुहलाने तात्याला विचारते आहे. तात्या संध्याकाळी समुद्रावर हिला एकटीलाच कसं घेऊन जाता येईल या विचारात पडला आहे. घरातल्या कुठल्यातरी मोठ्या काकूने 'आंघोळीपांघोळी केल्याशिवाय कुणीही व्यापार किंवा झब्बू खेळायला बसायचं नाहीये!' असा समस्त बच्चेकंपनीला दम भरलेला आहे, घरातल्या मंडळीत 'काल रात्री आंगण्यातून राखणदार सळसळत गेला, तुम्हाला दिसला का?' अशी चर्चा होते आहे, आणि अश्यातच... केळीच्या पानातली पानगी समोर येते आहे. सोबत लोण्याचा गोळा नी फोडणीची मिरची! किंवा, केळीच्या पानावर मस्त घोटलेला मऊमेतकूट भात, वर तुपाची धार, आंबोशीचं लोणचं, आणि सोबत भाजलेला पोह्यचा पापड! :) संजयभाऊ, अहो यापेक्षा अजून काय उत्तम न्याहरी पाहिजे तुम्हाला, बोला!! असो.. आपला, (मऊभातातला आणि पानगीतला!) तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

संजय अभ्यंकर Tue, 02/19/2008 - 12:48
तात्या, फार आठवणी काढु नका, जीवाला लई तरास होतो. मी माळव्यातला असलोतरी बायको देवगडची आहे, त्या मुळे घरात माळवी आणी कोकणी अश्या दोन्ही कडचे पदार्थ बनतात. परंतु, सासुने बनवलेलेच आयते आणी मऊभात फार छान लागतात (बायकोच्या अपरोक्ष सांगतोय..). सासुने आणलेल्या (फुकट) साजुक तुप व मेतकुटा शिवाय मऊ भाताला मजा नाही. (पण ह्या नोकरीमुळे आम्हाला कोकण कधीतरीच पहायला मिळते.) ता.क.: आठळ्यांची भाजी आणी तांदळाची भाकर खाऊन बरेच दिवस झालेत. फार दिवस झाले, ओल्या काजुगरांची उसळही जीभेला लागलेली नाही. (उन्हाळ्याची चातका सारखी वाट पहातोय). मुंबईत हे कोण बनवतो?.. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

खरेतर आम्ही फणसाच्या भाजीला कशालातरी लावून खायचा पदार्थ समजत होतो पण आमच्या आजीने हा आमचा भ्रम गावी गेल्यावर पहील्याच दिवशी दूर केला. 'तुला इकडे पोळ्या करून घालायला कोण आणणार आहेस?कोण नाही ना मग दिले आहे ते खा मुकाट्याने' असा कोकणी टोमणेयुक्त दम भरला. आणि तो पदार्थ मी तोंडात घातला..आहाहा! काय चव. ती फणसाची खाकटून केलेली भाजी होती. 'इकडे लोक न्याहारीला हेच खातात. गेल्या वर्षी भात चांगले झाले नाही. मग लोक दिवस काढत आहेत असे खाऊन.' अशी अधिक माहीती पण मिळाली. पण काही म्हणा ती भाजी मला फार आवडली. लाल सुक्या मिरचीची फोडणी देऊन, काळे वाटाणे घालून केलेली ती फणसाची भाजी फार फार आवडली. (तसेच उकडगर्‍याची पण भाजी करतात ती पण मला फार आवडते.) (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे गाववाले-पोंभुर्लेकर) डॅनी. पुण्याचे पेशवे

अनिला Tue, 02/19/2008 - 10:42
जाडसर गव्हाचे पीठ १ वाटी तेल पाव वाटी मोहरी, कान्दा, कधिपता, ताक्(गोड नाही) तेल तापवा, मोहरी हिन्ग घाला, कान्दा,हळद , हि.मिरची, कधिपता फोड्णी घाला जाडसर गव्हाचे पीठ घाला खूप परता. सुन्दर वास आला की त्यात ताक घाला, भराभरा परता, गोळे होऊ देऊ नका. मीठ घाला. वाफ येऊ द्या. गरम खा. वि.सु.=उपमा करताना जास्त पाणी/ताक घालतात ते रवा शोशून घेतो, तसेउकरपेन्डीचे नाही. येथे जरा बेताने घालावे. चुकुन जास्त झाले तर झाकण ठेऊ नये.

अनिला Tue, 02/19/2008 - 10:45
जसे कणीक पोळ्यासाठी भिज्विताना पाणी किती घलावे याचे माप नाही, तसे उकरपेन्डी ला ताक कुश्ल्तेनेच घालावे

मनस्वी Tue, 02/19/2008 - 12:22
तांदळाच्या पीठाची गरम गरम उकड पण छान लागते! उकरर्पेंडी प्रथमच ऐकला (वाचला).. लवकरच करून बघणार! मनस्वी

मनस्वी Tue, 02/19/2008 - 12:47
अजून काही न्याहारीचे मराठी पदार्थः मिसळ पोहे सांजा (उपमा) शिरा (मला केळं घालून आवडतो.) उकड थालिपीठ चकुल्या (वरणफळं) फोडणीचा भात (फोभा) फोडणीची पोळी (फोपो) धिरडी सुशिला (चुरमुर्‍याचा पोह्यांसारखा पदार्थ - मी अक्कलकोट, सोलापूरला खाल्ला होता.) बटाटेवडा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी शिंगोळ्या (माहित नाही कसा करतात. भाजणी उकडून केला असावा. मावशीकडे खाल्ला होता. प्रचंड पौष्टीक असतो म्हणे!) शिळी तळलेली पोळी चहात बुडवून पण मस्त लागते. - अजून आठवतील तसे लिहीन. (शिंगोळ्या आवडलेली) मनस्वी

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 13:37
ही एक पाककृति जी मराठी घराघरांत बनविली जाते. कृती - शिळी, बेचव भाजी जी संपायची सुतराम शक्यता नाही ती भज्याच्या सारणात घालून त्याची भजी किंवा भाजणीत बेमालूनपणे घालून त्याची थालीपीठे मुलांच्या पुढे सरकवायची आणि कमी आहेत असे आधीच सांगायचे म्हणजे मुले एकमेकांपेक्षा जास्त खायची स्पर्धा लावतात. भज्यासोबत टोमॅटो सॉस द्यायला विसरू नये.

In reply to by सृष्टीलावण्या

सख्याहरि Tue, 02/19/2008 - 21:23
अगदी लहानपणीची आठवण झाली... आम्च्या मातोश्रिंनी केलेला हा पदार्थ.. १०-१५ वर्षांनन्तर यची आठवण करून दिल्याबद्दल आपले आभार... शिळ्या भज्या, आमटी, भात, शेंगदाण्याचे कूट आणी तूप अणि वाट्ल्यास कैरिचे लोणचे..हे सर्व मिसलून गरम करावे ह ही त्यातलाच प्रकार.. अत्यन्त सत्विक.. आणि चविष्ठ... दूध नासले तर त्यात गूळ आणि वेल्दोडे घलून फार मस्त पदर्थ आमची आजी बनवीत असे.. (भुकेला) सख्याहरी

बापु देवकर Tue, 02/19/2008 - 14:08
फोडणीची पोळी म्हन्जेच शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी..की अजून काही... पोहे/थालिपीठ...वाचुनच पाणी सुटले हो तोन्डाला.. राज....

In reply to by बापु देवकर

सख्याहरि Tue, 02/19/2008 - 21:28
फो.पो. म्हणजे शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी.. कुर्कुरीत भाज्ल्यास मस्त लाग्ते.. चिमूट्भर सखर घलून पहा.. मस्त लागते. वाचुनच पाणी सुटले तोंडाला.. -सख्याहरी

संजय अभ्यंकर Tue, 02/19/2008 - 22:29
फोडणीची पोळी: ह्याला आमचे माळवी - मराठी लोक कुस्करा म्हणतात. नांव कुस्करा दिले की हा प्रकार सर्वसमावेशक होतो. केवळ शिळ्या पोळ्याच नव्हे तर रात्रीचा उरलेला भात, पाव, पावचे स्लाइस (कुस्करुन) हे सुद्धा फोडणी देउन बनवता येते. जर वरिल पैकी एकाहून अधिक प्रकार (पोळ्या व भात इ.) उरले असतील, तर ते एकत्र करुन त्यास फोडणी दिली जाते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

लिखाळ Fri, 02/22/2008 - 20:06
सूर्य आणि अनिला, मी आज सकाळी आपण दिलेल्या पाकृनिसार उकरपेंडी करुन पाहिली. अतिशय चविष्ट आणि खमंग असा पदार्थ आहे. मला महत्वाचे वाटते ते म्हणजे गव्हाचे पिठ पोटात जाते ते ! पोळ्या करायचा आळस असल्याने आता मी अनेकदा हा पदार्थ करिन. आभार. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. आपल्याकडे प्राजु, स्वातीजीं सारख्या सुग्रणी आहेत. तसेच पेठकर साहेबांसारखे बल्लवाचार्य हि आहेत. त्यांना एक प्रश्न: महाराष्ट्रातला एक न्याहारीचा पदार्थ म्हणजे उकरपेंडी. त्याची पाककृती आपण देऊ शकाल काय. बरीच वर्षे पत्नीच्या मागे धोशा लावलाय, परंतु तीला काही ती कृती ठाऊक नाही. २. उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. संपूर्ण भारत फिरल्यावर मला असे आढळते की, महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे.

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

तळेकर ·

तळेकर Tue, 02/19/2008 - 11:01
मिसळपाव - बुधवार दिनांक २०-०२-०८ ला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ०९ ते १२ पर्यंत तात्पुरते बंद आहे. म्हणुन म्हटलं ईतर सुधारणा करता आहातच तर हेही करा. "ल "हे अक्षर चे वर म्हटल्याप्रमाणे वळणदार असावे. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही.

बेसनलाडू Tue, 02/19/2008 - 11:09
१. सध्याचे वळण काही वाईट नाही. मी शाळेत असल्यापासून आतापर्यंत आता आहे त्याच वळणाने 'ल' हे अक्षर लिहिले आहे; त्यात काही गैर आहे, ते वळण शुद्धलेखनाच्या नियमानुसार चुकीचे वगैरे आहे, असेही नाही. तसेही मिसळपावावर शुद्धलेखनाचे नियम पाळायचे असतात, असे नाही. २. मनोगताला जमलेल्या गोष्टी मिसळपावाला जमतीलच/जमायलाच हव्यात (आणि vice versa) असे नाही. सबब, सध्याचे वळण तसेच राहिले तरी चालेलसे वाटते. (विश्लेषक)बेसनलाडू

चतुरंग Tue, 02/19/2008 - 11:22
"ल" असाच मी ही लिहित आलेलो आहे. त्यात काही चूक आहे असे मलाही वाटत नाही. असेनाका ते असेच, अहो सगळ्यांनीच एकसारख्या गोष्टी कशासाठी करायच्या जर तो नियमभंग नसेल तर? चतुरंग

तळेकर Tue, 02/19/2008 - 11:30
मला आपलं वाटलं मराठीत "ळ " आहे हिंदी मधे नाही. हेच आपल्या मराठीच वेगळंपण "ल " अक्षरातही ऊठूण दिसावं/असावं.

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 11:30
तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:15
तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. अहो हे फार होतंय हो! नाही, मायमराठीबद्दल आम्हालाही पिरेम आहे, परंतु केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. आणि जर तसे असेल तर मराठी अस्मिता अगदीच कमकुवत म्हटली पाहिजे! जय महाराष्ट्र, जय मराठी! आपला, (हिंदीप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 20:34
मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? फरक आहे आणि तो पण मामुली जसा आपण टंकलेखनात हिंदीतला 'श्व' मान्य केला जो मराठीत आपण लिहित नाही. असो. मुद्दा देवनागरी लिपीचा नसून आपल्या शासनाने हिंदी वर्णमाला जशीच्या तशी स्विकारण्याचा आहे. केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. हं, हे पण खरेच.

प्रमोद देव Tue, 02/19/2008 - 12:56
ल हे अक्षर मराठी पद्धतीने लिहिल्यास ते जास्त आवडेल. मी स्वत: हिंदी लिहितानाही मराठी पद्धतीचा ल च लिहितो. इथे मात्र तो तसा टंकला जात नाहीये.

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 17:44
अरे नीलकांता, जरा मंडळी काय म्हणताहेत ते बघ रे प्लीज आणि जमलं तर आपल्यालाही मनोगतासारखा जळ्ळा तो 'ल' काढता येतोय का ते बघ! :) आपला, (संपादक) तात्या. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही. अहो तळेकर साहेब, कुठे ते थोर मनोगत आणि कुठे मिसळपाव! का उगाच उच्चवर्णीय, उच्चभ्रू, सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, हुश्शार आणि स्कॉलर मनोगताची मिसळपावच्या टपरीशी तुलना करताय? अहो तिकडच्यासारखे भाषेचे, व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे कडक नियम मिसळपावच्या रांगड्या प्रकृतीला झेपणार नाहीत हो! :) आज मनोगत हे एक मराठीतलं एक बलाढ्य संकेतस्थळ आहे. दीपस्तंभच म्हणा ना! त्या मानाने मिसळपाव हे अगदीच एक लहान गलबत! परंतु आम्ही एक गोष्ट मात्र अभिमानाने म्हणू इच्छितो की मिसळपावच्या या लहान गलबताला अगदी अंधार्‍या वादळी रात्रीही मार्गदर्शनाकरता कधी कुठल्या दीपस्तंभाकडे बघायची सवय नाही आणि नसेल! मग भले ते एखाद्या खडकावर आपटून फुटलं तरी बेहत्तर! आपला, (वादळवार्‍यातला) तात्या. बाय द वे, मला एक सांगा तळेकर साहेब, आपण म्हणता तो 'ल' वापरल्याने आणि मिसळपावचा 'ल' वापरल्याने अर्थात नक्की काय फरक पडणार आहे? आणि अहो तुम्ही तर 'शाहूस्पर्ष शाहू महाराज' या लेखात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातही मिसळपाववर आहे तोच 'ल' आहे की! :) आपला, तात्या बर्वा, रत्नांग्री. :) असो..! तरीही आपल्या म्हणण्याला मान देऊन मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव त्यांच्या परिने तुम्हाला हवा तसा 'ल' देण्याचा प्रयत्न करतील एवढे आश्वासन तूर्तास देतो. जमल्यास उत्तमच, नाय जमल्यास माफ करा! :) आपला, तात्या वेलणकर. :)

तळेकर Tue, 02/19/2008 - 18:08
तात्या, नीलकांताला हे जमेल. आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा.

In reply to by तळेकर

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:46
तात्या, नीलकांताला हे जमेल. तसं झालं तर उत्तमच आहे! आपल्याला तर बुवा कुठलाही 'ल' चालणार आहे! :) आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. तळेकर साहेब, आपण जर माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक वाचलात, तर मिसळपावला मी कुठेही कमी लेखलेलं नाही हे आपल्या सहज लक्षात येईल! :) रांगडा स्वभाव, टपरी, गलबत असे शब्द वापरणं म्हणजे माझ्या मते तरी कुठेही कमी लेखणं होत नाही! :) अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. ओहोहो, क्या केहेने तळेकरसाहेब! जियो...!! :) मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा. अहो छे हो, त्यात क्षमा वगैरे कसली मागताय? मी आपली अशीच गंमतीत काही मुक्ताफळे उधळली होती त्याकरता उलटपक्षी तुम्हीच मला क्षमा करा! :) आणि मनोगत काय किंवा इतर कुठले संस्थळ काय, मिपाची कुणाही सोबत तुलना केल्यामुळे मी कधीच दुखावला जाणार नाही! In fact, मनोगत हे आजही माझं पहिलं प्रेम आहे. अहो मुळचा मनोगतीच मी! :) आणि खरं विचाराल तर मी देखील आता पुन्हा मनोगत जॉईन करण्याचा सिरियसली विचार करत आहे. अहो आमच्या वेलणकरशेठने मनात कुठलीही अढी न ठेवता केव्हाच मिपाचे सभासदत्व घेतले आहे! :) मग मीच का मागे राहू? मीही पुन्हा एकदा मनोगत जॉईन करून बसंतच्या लग्नाचे, शिंत्रेगुरुजींचे, आणि सालस चे पुढील भाग तिथेच पुरे करेन म्हणतो! :) आपला, (मुळचा मनोगती आणि मुख्य म्हणजे सर्वच मराठी संस्थळांबद्दल मनात प्रेम असणारा!) तात्या. असो! वादावादी, भांडणं, मारामार्‍या वगैरे चालायच्याच! त्या शिवाय मजा नाही! :) झगडा, मतभेद असलेच तर ते माणसांशी/चालकमालकांशी! 'मराठी संकेतस्थळ' या आपलेपणाच्या, मराठीपणा जोपसणार्‍या 'संकल्पने'शी नाही! कधीही नाही..! असो.. ! आपला, (मराठी) तात्या.

डॉ. साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला तात्याचा प्रतिसाद पाहून बरे वाटले. मला तात्याचा दिलदार पणा आवडतोच, पण महेश वेलणकर ही ग्रेटच. त्यांनीही इथे सदस्यत्व घेतले आणि ते सुद्धा खर्‍या नावानेच, सरळ.... टोपणनाव वगैरे भानगड नाही. रोखठोक मामला. असे पाहिजे. राग आपापसात. तो संस्थळांवर का काढा? तात्या, मागे तू कुठे तरी लिहिले होतेस ना की, मनोगत हे नेहमीच तुझे 'first love' राहील. तू तिथे परत जायचा विचार करतो आहेस.... व्हेरी गुड. बिपिन.

तळेकर Tue, 02/19/2008 - 11:01
मिसळपाव - बुधवार दिनांक २०-०२-०८ ला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ०९ ते १२ पर्यंत तात्पुरते बंद आहे. म्हणुन म्हटलं ईतर सुधारणा करता आहातच तर हेही करा. "ल "हे अक्षर चे वर म्हटल्याप्रमाणे वळणदार असावे. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही.

बेसनलाडू Tue, 02/19/2008 - 11:09
१. सध्याचे वळण काही वाईट नाही. मी शाळेत असल्यापासून आतापर्यंत आता आहे त्याच वळणाने 'ल' हे अक्षर लिहिले आहे; त्यात काही गैर आहे, ते वळण शुद्धलेखनाच्या नियमानुसार चुकीचे वगैरे आहे, असेही नाही. तसेही मिसळपावावर शुद्धलेखनाचे नियम पाळायचे असतात, असे नाही. २. मनोगताला जमलेल्या गोष्टी मिसळपावाला जमतीलच/जमायलाच हव्यात (आणि vice versa) असे नाही. सबब, सध्याचे वळण तसेच राहिले तरी चालेलसे वाटते. (विश्लेषक)बेसनलाडू

चतुरंग Tue, 02/19/2008 - 11:22
"ल" असाच मी ही लिहित आलेलो आहे. त्यात काही चूक आहे असे मलाही वाटत नाही. असेनाका ते असेच, अहो सगळ्यांनीच एकसारख्या गोष्टी कशासाठी करायच्या जर तो नियमभंग नसेल तर? चतुरंग

तळेकर Tue, 02/19/2008 - 11:30
मला आपलं वाटलं मराठीत "ळ " आहे हिंदी मधे नाही. हेच आपल्या मराठीच वेगळंपण "ल " अक्षरातही ऊठूण दिसावं/असावं.

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 11:30
तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:15
तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. अहो हे फार होतंय हो! नाही, मायमराठीबद्दल आम्हालाही पिरेम आहे, परंतु केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. आणि जर तसे असेल तर मराठी अस्मिता अगदीच कमकुवत म्हटली पाहिजे! जय महाराष्ट्र, जय मराठी! आपला, (हिंदीप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 20:34
मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? फरक आहे आणि तो पण मामुली जसा आपण टंकलेखनात हिंदीतला 'श्व' मान्य केला जो मराठीत आपण लिहित नाही. असो. मुद्दा देवनागरी लिपीचा नसून आपल्या शासनाने हिंदी वर्णमाला जशीच्या तशी स्विकारण्याचा आहे. केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. हं, हे पण खरेच.

प्रमोद देव Tue, 02/19/2008 - 12:56
ल हे अक्षर मराठी पद्धतीने लिहिल्यास ते जास्त आवडेल. मी स्वत: हिंदी लिहितानाही मराठी पद्धतीचा ल च लिहितो. इथे मात्र तो तसा टंकला जात नाहीये.

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 17:44
अरे नीलकांता, जरा मंडळी काय म्हणताहेत ते बघ रे प्लीज आणि जमलं तर आपल्यालाही मनोगतासारखा जळ्ळा तो 'ल' काढता येतोय का ते बघ! :) आपला, (संपादक) तात्या. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही. अहो तळेकर साहेब, कुठे ते थोर मनोगत आणि कुठे मिसळपाव! का उगाच उच्चवर्णीय, उच्चभ्रू, सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, हुश्शार आणि स्कॉलर मनोगताची मिसळपावच्या टपरीशी तुलना करताय? अहो तिकडच्यासारखे भाषेचे, व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे कडक नियम मिसळपावच्या रांगड्या प्रकृतीला झेपणार नाहीत हो! :) आज मनोगत हे एक मराठीतलं एक बलाढ्य संकेतस्थळ आहे. दीपस्तंभच म्हणा ना! त्या मानाने मिसळपाव हे अगदीच एक लहान गलबत! परंतु आम्ही एक गोष्ट मात्र अभिमानाने म्हणू इच्छितो की मिसळपावच्या या लहान गलबताला अगदी अंधार्‍या वादळी रात्रीही मार्गदर्शनाकरता कधी कुठल्या दीपस्तंभाकडे बघायची सवय नाही आणि नसेल! मग भले ते एखाद्या खडकावर आपटून फुटलं तरी बेहत्तर! आपला, (वादळवार्‍यातला) तात्या. बाय द वे, मला एक सांगा तळेकर साहेब, आपण म्हणता तो 'ल' वापरल्याने आणि मिसळपावचा 'ल' वापरल्याने अर्थात नक्की काय फरक पडणार आहे? आणि अहो तुम्ही तर 'शाहूस्पर्ष शाहू महाराज' या लेखात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातही मिसळपाववर आहे तोच 'ल' आहे की! :) आपला, तात्या बर्वा, रत्नांग्री. :) असो..! तरीही आपल्या म्हणण्याला मान देऊन मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव त्यांच्या परिने तुम्हाला हवा तसा 'ल' देण्याचा प्रयत्न करतील एवढे आश्वासन तूर्तास देतो. जमल्यास उत्तमच, नाय जमल्यास माफ करा! :) आपला, तात्या वेलणकर. :)

तळेकर Tue, 02/19/2008 - 18:08
तात्या, नीलकांताला हे जमेल. आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा.

In reply to by तळेकर

विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:46
तात्या, नीलकांताला हे जमेल. तसं झालं तर उत्तमच आहे! आपल्याला तर बुवा कुठलाही 'ल' चालणार आहे! :) आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. तळेकर साहेब, आपण जर माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक वाचलात, तर मिसळपावला मी कुठेही कमी लेखलेलं नाही हे आपल्या सहज लक्षात येईल! :) रांगडा स्वभाव, टपरी, गलबत असे शब्द वापरणं म्हणजे माझ्या मते तरी कुठेही कमी लेखणं होत नाही! :) अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. ओहोहो, क्या केहेने तळेकरसाहेब! जियो...!! :) मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा. अहो छे हो, त्यात क्षमा वगैरे कसली मागताय? मी आपली अशीच गंमतीत काही मुक्ताफळे उधळली होती त्याकरता उलटपक्षी तुम्हीच मला क्षमा करा! :) आणि मनोगत काय किंवा इतर कुठले संस्थळ काय, मिपाची कुणाही सोबत तुलना केल्यामुळे मी कधीच दुखावला जाणार नाही! In fact, मनोगत हे आजही माझं पहिलं प्रेम आहे. अहो मुळचा मनोगतीच मी! :) आणि खरं विचाराल तर मी देखील आता पुन्हा मनोगत जॉईन करण्याचा सिरियसली विचार करत आहे. अहो आमच्या वेलणकरशेठने मनात कुठलीही अढी न ठेवता केव्हाच मिपाचे सभासदत्व घेतले आहे! :) मग मीच का मागे राहू? मीही पुन्हा एकदा मनोगत जॉईन करून बसंतच्या लग्नाचे, शिंत्रेगुरुजींचे, आणि सालस चे पुढील भाग तिथेच पुरे करेन म्हणतो! :) आपला, (मुळचा मनोगती आणि मुख्य म्हणजे सर्वच मराठी संस्थळांबद्दल मनात प्रेम असणारा!) तात्या. असो! वादावादी, भांडणं, मारामार्‍या वगैरे चालायच्याच! त्या शिवाय मजा नाही! :) झगडा, मतभेद असलेच तर ते माणसांशी/चालकमालकांशी! 'मराठी संकेतस्थळ' या आपलेपणाच्या, मराठीपणा जोपसणार्‍या 'संकल्पने'शी नाही! कधीही नाही..! असो.. ! आपला, (मराठी) तात्या.

डॉ. साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला तात्याचा प्रतिसाद पाहून बरे वाटले. मला तात्याचा दिलदार पणा आवडतोच, पण महेश वेलणकर ही ग्रेटच. त्यांनीही इथे सदस्यत्व घेतले आणि ते सुद्धा खर्‍या नावानेच, सरळ.... टोपणनाव वगैरे भानगड नाही. रोखठोक मामला. असे पाहिजे. राग आपापसात. तो संस्थळांवर का काढा? तात्या, मागे तू कुठे तरी लिहिले होतेस ना की, मनोगत हे नेहमीच तुझे 'first love' राहील. तू तिथे परत जायचा विचार करतो आहेस.... व्हेरी गुड. बिपिन.
"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ? lalaa शक्य असेल तर जरुर करा. आणि ते आमच्या संगणकात कसे करता येईल तेही सांगा.

हृदयाच्या अंतर्हृदयाला....

सृष्टीलावण्या ·

आनंदयात्री Mon, 02/18/2008 - 15:36
बर्‍याच दिवसांनी बालकवींची ही कविता वाचली. नाव फक्त "दिव्य औषधी कसली त्याला " असे आहे असे स्मरते.

विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 18:39
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! वा! छान आहे कविता... अवांतर - मिसळपाववर बालकवी, कुसुमाग्रज, भाईकाका आणि इतरही अनेक प्रतिभावंताच्या/दिग्गजांच्या साहित्याचे स्वागत आहेच हे प्रथम नमूद करतो. परंतु त्याचबरोबर सभासदांनी खास त्यांचे स्वत:चे असे काही लेखन येथे केल्यास ते मिसळपावला अधिक आवडेल, किंबहुना मराठी मंडळींना त्यांचे स्वत:चे साहित्यिक, वैचारिक लेखन येथे करता यावे हाच मिसळपावचा मुख्य उद्देश आहे... हिंदी, उर्दू, संस्कृत यांसारख्या भाषेतल्या साहित्यिकांची मराठीतून ओळख तसेच त्यांच्या साहित्याच्या मराठी रसग्रहणाचे/ भाषांतर-अनुवादाचेही मिसळपाववर स्वागत आहे... तात्या.

आनंदयात्री Mon, 02/18/2008 - 15:36
बर्‍याच दिवसांनी बालकवींची ही कविता वाचली. नाव फक्त "दिव्य औषधी कसली त्याला " असे आहे असे स्मरते.

विसोबा खेचर Mon, 02/18/2008 - 18:39
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! वा! छान आहे कविता... अवांतर - मिसळपाववर बालकवी, कुसुमाग्रज, भाईकाका आणि इतरही अनेक प्रतिभावंताच्या/दिग्गजांच्या साहित्याचे स्वागत आहेच हे प्रथम नमूद करतो. परंतु त्याचबरोबर सभासदांनी खास त्यांचे स्वत:चे असे काही लेखन येथे केल्यास ते मिसळपावला अधिक आवडेल, किंबहुना मराठी मंडळींना त्यांचे स्वत:चे साहित्यिक, वैचारिक लेखन येथे करता यावे हाच मिसळपावचा मुख्य उद्देश आहे... हिंदी, उर्दू, संस्कृत यांसारख्या भाषेतल्या साहित्यिकांची मराठीतून ओळख तसेच त्यांच्या साहित्याच्या मराठी रसग्रहणाचे/ भाषांतर-अनुवादाचेही मिसळपाववर स्वागत आहे... तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।। येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळावयाला? कुणीकडे हा झुकतो वारा? हाका मारी जीव कुणाला? मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! - बालकवी