मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न्याहारीचा पदार्थ उकरपेंडी

संजय अभ्यंकर ·

मनिष 18/02/2008 - 19:57
उकरपेंडी हा वर्‍हाडी पदार्थ आहे. गव्हाच्या कोंड्यापासून बनवतात त्यामुळे 'फायबर रीच' असतो. आमच्या घरात हा बर्‍याच वेळा बनतो - विचारून पाककृती देतो.

महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. दाक्षिणात्य न्याहारींमध्ये (जेवढ्या मला माहित आहेत तेवढ्यात तरी...) एकदा चटणी सांबार बनवून ठेवले असले की मुख्य पदार्थ झटपट होतो, त्याचा निर्मिती खर्च एकदम अल्प असतो त्यामुळे ढोबळ नफा अधिक असतो. गिर्‍हाईकाला पदार्थ गरम्-गरम मिळतो, झटकन टेबलवर येतो, पचायला हलका स्वादीष्ट आणि रुचकर असतो. त्यामुळे तो प्रसिद्धी पावला. गुजराथी न्याहारीत, पुरी-भाजी, खमण ढोकळा, पांढरा ढोकळा, सुरळीच्या वड्या, फापडा, भजीया, मेथी गोटे, कचोरी असे अनेक पदर्थ थोडे कष्टप्रद पण अत्यल्प निर्मिती खर्चाचे आहेत. त्यामुळे त्यांचेही बाजारात बर्‍यापैकी वर्चस्व असते. मराठी न्याहारीत पोहे, बटाटावडा, वडापाव हे तीन(च) पदार्थ ह्या निकषांवर खरे उतरतात. तरी पण त्यात निर्मिती खर्च (तुलनात्मक दृष्टया) अधिक आहे. कष्ट अधिक आहेत. त्यामुळे बिचारे मागे पडले. पंजाबी न्याहारीत कष्ट आणि निर्मिती खर्चाचे वाढते प्रमाण ह्या मुळे ते पदार्थ जरा (आपल्याही) मागे आहेत. उकरपेंड की उकडपेंड? (संभ्रमात).

In reply to by प्रभाकर पेठकर

मोहन 19/02/2008 - 14:44
पुणे कोल्हापूर हायवे वर खंबाटकी घाट ऊतरलाकी एका विरंगुळा नावाच्या हॉटेलात बरेच मराठी पदार्थ मिळतात. उदा: मिसळ- साधी /उपासाची, बटाटा/कांदा/मिरची भजी, थालीपीठ, ऊपासाचे थालीपीठ तर अप्रतीम! सकाळ्च्यावेळात तर माझ्यासारख्या ऊड्प्यांना कंटाळलेल्यांची तूफान गर्दी असते. गे ल्या ४ - ५ वर्षात विरंगुळाची भरभराट पाहाण्या सारखी आहे. आपले पदार्थ चांगले मार्केट झाले नाहीत हेच खरे. आपला मोहन

सूर्य 18/02/2008 - 20:59
असाच शब्द ऐकला आहे. मी खालील प्रमाणे उकडपेंडी करतो. गव्हाचे पीठ थोडे भाजुन घेतो. त्यानंतर तेल तापवुन त्यात मोहरी, कांदा, मिरची टाकुन फोडणी तयार करुन घेतो. त्यात तिखट, मीठ, व दही (भरपुर) टाकुन नंतर भाजलेले पीठ व थोडे पाणी त्यात टाकतो व हलवतो. सगळे व्यवस्थित मिसळले की झाकण ठेवुन वाफवतो. नंतर मिटक्या मारत खातो. ;-) असो. हीच उकडपेंडी असा मात्र माझा दावा नाही ;-)). जाणकारांनी जरुर पाकक्रिया द्यावी. आपला (खादाड) सूर्य

In reply to by सूर्य

लिखाळ 18/02/2008 - 21:58
वा ! ही पाकृ चांगली वाटत आहे. आता करुन पाहतो. कणिक घरी आणून नुसतीच फडताळात ठेवली आहे आणि पोळ्या करायचा कंटाळा करित आहे. या पाकृ मुळे थोडे गहु पोटात जातील. पोळ्या करणे टाळण्यासाठी मी नेहमीच नवे उपाय शोधत असतो. पाकृ साठी आभार. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळ खाल्ल्यावर थंड ताक आम्हाला पाहिजे असते.

विसोबा खेचर 19/02/2008 - 00:58
संजयभाऊ, फार सुंदर आठवण करून दिलीत. उकरपेंडी हा पदार्थ मी एक दोनदाच खाल्ला आहे एका मित्राच्या मावशीच्या घरी. अतिशय सुरेख लागतो... उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. अगदी खरं आहे. आपण अगदी मर्मावर बोट ठेवलंत! पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. हो, परंतु गरमागरम इडली आणि चटणी सकाळच्या वेळेत खायला फारच छान लागते हेही खरंच! सकाळच्या टायमाला दोनचार गरमागरम इडल्या आणि चटणी खाल्ली की अगदी समाधान होतं, खूप बरं वाटतं! असो, न्याहरीच्या पदार्थात मिसळपाव ही माझी नेहमीच प्रथम पसंती आहे.. त्यानंतर अर्थातच मऊभात ही दुसरी पसंती..! आणि त्यानंतर पानगी, इडली, वगैरे वगैरे वगैरे... आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल. संजयदादा, अहो आम्ही देवगडातली गरीब कोकणी माणसं! कलमी आंब्याचे लहानसे बागायतदार! थोडीफार सुपारी आणि कोकमांची उलाढाल! आमच्या घरी कोकणात न्याहरीला पानगी किंवा मऊभातच बरं का! छानशी, प्रसन्न अशी देवगडातली सकाळ आहे. दत्तू अभ्यंकराकडची मंडळी उठली आहेत, घरात हासण, खिदळणं, गप्पा टप्पा सुरू आहेत. आंगण्यात छानसं सारवलेलं आहे. आंब्याफोफळीच्या वाडीतनं शिपणाचा आवाज ऐकू येतो आहे, रहाटाची करकर मन प्रसन्न करते आहे. आते-मामे-चुलत-मावस भावंड सुट्टीत जमली आहेत त्यांची किलबील सुरू झालेली आहे. कुठल्यातरी मावशीची भलतीच देखणी पुतणी प्रथमच कोकण पाहायला आलेली आहे. ती प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने बघते आहे. लहानसहान गोष्टींची कारणमिमांसा मोठ्या कुतुहलाने तात्याला विचारते आहे. तात्या संध्याकाळी समुद्रावर हिला एकटीलाच कसं घेऊन जाता येईल या विचारात पडला आहे. घरातल्या कुठल्यातरी मोठ्या काकूने 'आंघोळीपांघोळी केल्याशिवाय कुणीही व्यापार किंवा झब्बू खेळायला बसायचं नाहीये!' असा समस्त बच्चेकंपनीला दम भरलेला आहे, घरातल्या मंडळीत 'काल रात्री आंगण्यातून राखणदार सळसळत गेला, तुम्हाला दिसला का?' अशी चर्चा होते आहे, आणि अश्यातच... केळीच्या पानातली पानगी समोर येते आहे. सोबत लोण्याचा गोळा नी फोडणीची मिरची! किंवा, केळीच्या पानावर मस्त घोटलेला मऊमेतकूट भात, वर तुपाची धार, आंबोशीचं लोणचं, आणि सोबत भाजलेला पोह्यचा पापड! :) संजयभाऊ, अहो यापेक्षा अजून काय उत्तम न्याहरी पाहिजे तुम्हाला, बोला!! असो.. आपला, (मऊभातातला आणि पानगीतला!) तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, फार आठवणी काढु नका, जीवाला लई तरास होतो. मी माळव्यातला असलोतरी बायको देवगडची आहे, त्या मुळे घरात माळवी आणी कोकणी अश्या दोन्ही कडचे पदार्थ बनतात. परंतु, सासुने बनवलेलेच आयते आणी मऊभात फार छान लागतात (बायकोच्या अपरोक्ष सांगतोय..). सासुने आणलेल्या (फुकट) साजुक तुप व मेतकुटा शिवाय मऊ भाताला मजा नाही. (पण ह्या नोकरीमुळे आम्हाला कोकण कधीतरीच पहायला मिळते.) ता.क.: आठळ्यांची भाजी आणी तांदळाची भाकर खाऊन बरेच दिवस झालेत. फार दिवस झाले, ओल्या काजुगरांची उसळही जीभेला लागलेली नाही. (उन्हाळ्याची चातका सारखी वाट पहातोय). मुंबईत हे कोण बनवतो?.. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

खरेतर आम्ही फणसाच्या भाजीला कशालातरी लावून खायचा पदार्थ समजत होतो पण आमच्या आजीने हा आमचा भ्रम गावी गेल्यावर पहील्याच दिवशी दूर केला. 'तुला इकडे पोळ्या करून घालायला कोण आणणार आहेस?कोण नाही ना मग दिले आहे ते खा मुकाट्याने' असा कोकणी टोमणेयुक्त दम भरला. आणि तो पदार्थ मी तोंडात घातला..आहाहा! काय चव. ती फणसाची खाकटून केलेली भाजी होती. 'इकडे लोक न्याहारीला हेच खातात. गेल्या वर्षी भात चांगले झाले नाही. मग लोक दिवस काढत आहेत असे खाऊन.' अशी अधिक माहीती पण मिळाली. पण काही म्हणा ती भाजी मला फार आवडली. लाल सुक्या मिरचीची फोडणी देऊन, काळे वाटाणे घालून केलेली ती फणसाची भाजी फार फार आवडली. (तसेच उकडगर्‍याची पण भाजी करतात ती पण मला फार आवडते.) (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे गाववाले-पोंभुर्लेकर) डॅनी. पुण्याचे पेशवे

अनिला 19/02/2008 - 10:42
जाडसर गव्हाचे पीठ १ वाटी तेल पाव वाटी मोहरी, कान्दा, कधिपता, ताक्(गोड नाही) तेल तापवा, मोहरी हिन्ग घाला, कान्दा,हळद , हि.मिरची, कधिपता फोड्णी घाला जाडसर गव्हाचे पीठ घाला खूप परता. सुन्दर वास आला की त्यात ताक घाला, भराभरा परता, गोळे होऊ देऊ नका. मीठ घाला. वाफ येऊ द्या. गरम खा. वि.सु.=उपमा करताना जास्त पाणी/ताक घालतात ते रवा शोशून घेतो, तसेउकरपेन्डीचे नाही. येथे जरा बेताने घालावे. चुकुन जास्त झाले तर झाकण ठेऊ नये.

अनिला 19/02/2008 - 10:45
जसे कणीक पोळ्यासाठी भिज्विताना पाणी किती घलावे याचे माप नाही, तसे उकरपेन्डी ला ताक कुश्ल्तेनेच घालावे

मनस्वी 19/02/2008 - 12:22
तांदळाच्या पीठाची गरम गरम उकड पण छान लागते! उकरर्पेंडी प्रथमच ऐकला (वाचला).. लवकरच करून बघणार! मनस्वी

मनस्वी 19/02/2008 - 12:47
अजून काही न्याहारीचे मराठी पदार्थः मिसळ पोहे सांजा (उपमा) शिरा (मला केळं घालून आवडतो.) उकड थालिपीठ चकुल्या (वरणफळं) फोडणीचा भात (फोभा) फोडणीची पोळी (फोपो) धिरडी सुशिला (चुरमुर्‍याचा पोह्यांसारखा पदार्थ - मी अक्कलकोट, सोलापूरला खाल्ला होता.) बटाटेवडा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी शिंगोळ्या (माहित नाही कसा करतात. भाजणी उकडून केला असावा. मावशीकडे खाल्ला होता. प्रचंड पौष्टीक असतो म्हणे!) शिळी तळलेली पोळी चहात बुडवून पण मस्त लागते. - अजून आठवतील तसे लिहीन. (शिंगोळ्या आवडलेली) मनस्वी

ही एक पाककृति जी मराठी घराघरांत बनविली जाते. कृती - शिळी, बेचव भाजी जी संपायची सुतराम शक्यता नाही ती भज्याच्या सारणात घालून त्याची भजी किंवा भाजणीत बेमालूनपणे घालून त्याची थालीपीठे मुलांच्या पुढे सरकवायची आणि कमी आहेत असे आधीच सांगायचे म्हणजे मुले एकमेकांपेक्षा जास्त खायची स्पर्धा लावतात. भज्यासोबत टोमॅटो सॉस द्यायला विसरू नये.

In reply to by सृष्टीलावण्या

सख्याहरि 19/02/2008 - 21:23
अगदी लहानपणीची आठवण झाली... आम्च्या मातोश्रिंनी केलेला हा पदार्थ.. १०-१५ वर्षांनन्तर यची आठवण करून दिल्याबद्दल आपले आभार... शिळ्या भज्या, आमटी, भात, शेंगदाण्याचे कूट आणी तूप अणि वाट्ल्यास कैरिचे लोणचे..हे सर्व मिसलून गरम करावे ह ही त्यातलाच प्रकार.. अत्यन्त सत्विक.. आणि चविष्ठ... दूध नासले तर त्यात गूळ आणि वेल्दोडे घलून फार मस्त पदर्थ आमची आजी बनवीत असे.. (भुकेला) सख्याहरी

बापु देवकर 19/02/2008 - 14:08
फोडणीची पोळी म्हन्जेच शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी..की अजून काही... पोहे/थालिपीठ...वाचुनच पाणी सुटले हो तोन्डाला.. राज....

In reply to by बापु देवकर

सख्याहरि 19/02/2008 - 21:28
फो.पो. म्हणजे शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी.. कुर्कुरीत भाज्ल्यास मस्त लाग्ते.. चिमूट्भर सखर घलून पहा.. मस्त लागते. वाचुनच पाणी सुटले तोंडाला.. -सख्याहरी

फोडणीची पोळी: ह्याला आमचे माळवी - मराठी लोक कुस्करा म्हणतात. नांव कुस्करा दिले की हा प्रकार सर्वसमावेशक होतो. केवळ शिळ्या पोळ्याच नव्हे तर रात्रीचा उरलेला भात, पाव, पावचे स्लाइस (कुस्करुन) हे सुद्धा फोडणी देउन बनवता येते. जर वरिल पैकी एकाहून अधिक प्रकार (पोळ्या व भात इ.) उरले असतील, तर ते एकत्र करुन त्यास फोडणी दिली जाते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

लिखाळ 22/02/2008 - 20:06
सूर्य आणि अनिला, मी आज सकाळी आपण दिलेल्या पाकृनिसार उकरपेंडी करुन पाहिली. अतिशय चविष्ट आणि खमंग असा पदार्थ आहे. मला महत्वाचे वाटते ते म्हणजे गव्हाचे पिठ पोटात जाते ते ! पोळ्या करायचा आळस असल्याने आता मी अनेकदा हा पदार्थ करिन. आभार. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मनिष 18/02/2008 - 19:57
उकरपेंडी हा वर्‍हाडी पदार्थ आहे. गव्हाच्या कोंड्यापासून बनवतात त्यामुळे 'फायबर रीच' असतो. आमच्या घरात हा बर्‍याच वेळा बनतो - विचारून पाककृती देतो.

महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. दाक्षिणात्य न्याहारींमध्ये (जेवढ्या मला माहित आहेत तेवढ्यात तरी...) एकदा चटणी सांबार बनवून ठेवले असले की मुख्य पदार्थ झटपट होतो, त्याचा निर्मिती खर्च एकदम अल्प असतो त्यामुळे ढोबळ नफा अधिक असतो. गिर्‍हाईकाला पदार्थ गरम्-गरम मिळतो, झटकन टेबलवर येतो, पचायला हलका स्वादीष्ट आणि रुचकर असतो. त्यामुळे तो प्रसिद्धी पावला. गुजराथी न्याहारीत, पुरी-भाजी, खमण ढोकळा, पांढरा ढोकळा, सुरळीच्या वड्या, फापडा, भजीया, मेथी गोटे, कचोरी असे अनेक पदर्थ थोडे कष्टप्रद पण अत्यल्प निर्मिती खर्चाचे आहेत. त्यामुळे त्यांचेही बाजारात बर्‍यापैकी वर्चस्व असते. मराठी न्याहारीत पोहे, बटाटावडा, वडापाव हे तीन(च) पदार्थ ह्या निकषांवर खरे उतरतात. तरी पण त्यात निर्मिती खर्च (तुलनात्मक दृष्टया) अधिक आहे. कष्ट अधिक आहेत. त्यामुळे बिचारे मागे पडले. पंजाबी न्याहारीत कष्ट आणि निर्मिती खर्चाचे वाढते प्रमाण ह्या मुळे ते पदार्थ जरा (आपल्याही) मागे आहेत. उकरपेंड की उकडपेंड? (संभ्रमात).

In reply to by प्रभाकर पेठकर

मोहन 19/02/2008 - 14:44
पुणे कोल्हापूर हायवे वर खंबाटकी घाट ऊतरलाकी एका विरंगुळा नावाच्या हॉटेलात बरेच मराठी पदार्थ मिळतात. उदा: मिसळ- साधी /उपासाची, बटाटा/कांदा/मिरची भजी, थालीपीठ, ऊपासाचे थालीपीठ तर अप्रतीम! सकाळ्च्यावेळात तर माझ्यासारख्या ऊड्प्यांना कंटाळलेल्यांची तूफान गर्दी असते. गे ल्या ४ - ५ वर्षात विरंगुळाची भरभराट पाहाण्या सारखी आहे. आपले पदार्थ चांगले मार्केट झाले नाहीत हेच खरे. आपला मोहन

सूर्य 18/02/2008 - 20:59
असाच शब्द ऐकला आहे. मी खालील प्रमाणे उकडपेंडी करतो. गव्हाचे पीठ थोडे भाजुन घेतो. त्यानंतर तेल तापवुन त्यात मोहरी, कांदा, मिरची टाकुन फोडणी तयार करुन घेतो. त्यात तिखट, मीठ, व दही (भरपुर) टाकुन नंतर भाजलेले पीठ व थोडे पाणी त्यात टाकतो व हलवतो. सगळे व्यवस्थित मिसळले की झाकण ठेवुन वाफवतो. नंतर मिटक्या मारत खातो. ;-) असो. हीच उकडपेंडी असा मात्र माझा दावा नाही ;-)). जाणकारांनी जरुर पाकक्रिया द्यावी. आपला (खादाड) सूर्य

In reply to by सूर्य

लिखाळ 18/02/2008 - 21:58
वा ! ही पाकृ चांगली वाटत आहे. आता करुन पाहतो. कणिक घरी आणून नुसतीच फडताळात ठेवली आहे आणि पोळ्या करायचा कंटाळा करित आहे. या पाकृ मुळे थोडे गहु पोटात जातील. पोळ्या करणे टाळण्यासाठी मी नेहमीच नवे उपाय शोधत असतो. पाकृ साठी आभार. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळ खाल्ल्यावर थंड ताक आम्हाला पाहिजे असते.

विसोबा खेचर 19/02/2008 - 00:58
संजयभाऊ, फार सुंदर आठवण करून दिलीत. उकरपेंडी हा पदार्थ मी एक दोनदाच खाल्ला आहे एका मित्राच्या मावशीच्या घरी. अतिशय सुरेख लागतो... उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. अगदी खरं आहे. आपण अगदी मर्मावर बोट ठेवलंत! पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली. हो, परंतु गरमागरम इडली आणि चटणी सकाळच्या वेळेत खायला फारच छान लागते हेही खरंच! सकाळच्या टायमाला दोनचार गरमागरम इडल्या आणि चटणी खाल्ली की अगदी समाधान होतं, खूप बरं वाटतं! असो, न्याहरीच्या पदार्थात मिसळपाव ही माझी नेहमीच प्रथम पसंती आहे.. त्यानंतर अर्थातच मऊभात ही दुसरी पसंती..! आणि त्यानंतर पानगी, इडली, वगैरे वगैरे वगैरे... आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल. संजयदादा, अहो आम्ही देवगडातली गरीब कोकणी माणसं! कलमी आंब्याचे लहानसे बागायतदार! थोडीफार सुपारी आणि कोकमांची उलाढाल! आमच्या घरी कोकणात न्याहरीला पानगी किंवा मऊभातच बरं का! छानशी, प्रसन्न अशी देवगडातली सकाळ आहे. दत्तू अभ्यंकराकडची मंडळी उठली आहेत, घरात हासण, खिदळणं, गप्पा टप्पा सुरू आहेत. आंगण्यात छानसं सारवलेलं आहे. आंब्याफोफळीच्या वाडीतनं शिपणाचा आवाज ऐकू येतो आहे, रहाटाची करकर मन प्रसन्न करते आहे. आते-मामे-चुलत-मावस भावंड सुट्टीत जमली आहेत त्यांची किलबील सुरू झालेली आहे. कुठल्यातरी मावशीची भलतीच देखणी पुतणी प्रथमच कोकण पाहायला आलेली आहे. ती प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने बघते आहे. लहानसहान गोष्टींची कारणमिमांसा मोठ्या कुतुहलाने तात्याला विचारते आहे. तात्या संध्याकाळी समुद्रावर हिला एकटीलाच कसं घेऊन जाता येईल या विचारात पडला आहे. घरातल्या कुठल्यातरी मोठ्या काकूने 'आंघोळीपांघोळी केल्याशिवाय कुणीही व्यापार किंवा झब्बू खेळायला बसायचं नाहीये!' असा समस्त बच्चेकंपनीला दम भरलेला आहे, घरातल्या मंडळीत 'काल रात्री आंगण्यातून राखणदार सळसळत गेला, तुम्हाला दिसला का?' अशी चर्चा होते आहे, आणि अश्यातच... केळीच्या पानातली पानगी समोर येते आहे. सोबत लोण्याचा गोळा नी फोडणीची मिरची! किंवा, केळीच्या पानावर मस्त घोटलेला मऊमेतकूट भात, वर तुपाची धार, आंबोशीचं लोणचं, आणि सोबत भाजलेला पोह्यचा पापड! :) संजयभाऊ, अहो यापेक्षा अजून काय उत्तम न्याहरी पाहिजे तुम्हाला, बोला!! असो.. आपला, (मऊभातातला आणि पानगीतला!) तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, फार आठवणी काढु नका, जीवाला लई तरास होतो. मी माळव्यातला असलोतरी बायको देवगडची आहे, त्या मुळे घरात माळवी आणी कोकणी अश्या दोन्ही कडचे पदार्थ बनतात. परंतु, सासुने बनवलेलेच आयते आणी मऊभात फार छान लागतात (बायकोच्या अपरोक्ष सांगतोय..). सासुने आणलेल्या (फुकट) साजुक तुप व मेतकुटा शिवाय मऊ भाताला मजा नाही. (पण ह्या नोकरीमुळे आम्हाला कोकण कधीतरीच पहायला मिळते.) ता.क.: आठळ्यांची भाजी आणी तांदळाची भाकर खाऊन बरेच दिवस झालेत. फार दिवस झाले, ओल्या काजुगरांची उसळही जीभेला लागलेली नाही. (उन्हाळ्याची चातका सारखी वाट पहातोय). मुंबईत हे कोण बनवतो?.. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

खरेतर आम्ही फणसाच्या भाजीला कशालातरी लावून खायचा पदार्थ समजत होतो पण आमच्या आजीने हा आमचा भ्रम गावी गेल्यावर पहील्याच दिवशी दूर केला. 'तुला इकडे पोळ्या करून घालायला कोण आणणार आहेस?कोण नाही ना मग दिले आहे ते खा मुकाट्याने' असा कोकणी टोमणेयुक्त दम भरला. आणि तो पदार्थ मी तोंडात घातला..आहाहा! काय चव. ती फणसाची खाकटून केलेली भाजी होती. 'इकडे लोक न्याहारीला हेच खातात. गेल्या वर्षी भात चांगले झाले नाही. मग लोक दिवस काढत आहेत असे खाऊन.' अशी अधिक माहीती पण मिळाली. पण काही म्हणा ती भाजी मला फार आवडली. लाल सुक्या मिरचीची फोडणी देऊन, काळे वाटाणे घालून केलेली ती फणसाची भाजी फार फार आवडली. (तसेच उकडगर्‍याची पण भाजी करतात ती पण मला फार आवडते.) (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे गाववाले-पोंभुर्लेकर) डॅनी. पुण्याचे पेशवे

अनिला 19/02/2008 - 10:42
जाडसर गव्हाचे पीठ १ वाटी तेल पाव वाटी मोहरी, कान्दा, कधिपता, ताक्(गोड नाही) तेल तापवा, मोहरी हिन्ग घाला, कान्दा,हळद , हि.मिरची, कधिपता फोड्णी घाला जाडसर गव्हाचे पीठ घाला खूप परता. सुन्दर वास आला की त्यात ताक घाला, भराभरा परता, गोळे होऊ देऊ नका. मीठ घाला. वाफ येऊ द्या. गरम खा. वि.सु.=उपमा करताना जास्त पाणी/ताक घालतात ते रवा शोशून घेतो, तसेउकरपेन्डीचे नाही. येथे जरा बेताने घालावे. चुकुन जास्त झाले तर झाकण ठेऊ नये.

अनिला 19/02/2008 - 10:45
जसे कणीक पोळ्यासाठी भिज्विताना पाणी किती घलावे याचे माप नाही, तसे उकरपेन्डी ला ताक कुश्ल्तेनेच घालावे

मनस्वी 19/02/2008 - 12:22
तांदळाच्या पीठाची गरम गरम उकड पण छान लागते! उकरर्पेंडी प्रथमच ऐकला (वाचला).. लवकरच करून बघणार! मनस्वी

मनस्वी 19/02/2008 - 12:47
अजून काही न्याहारीचे मराठी पदार्थः मिसळ पोहे सांजा (उपमा) शिरा (मला केळं घालून आवडतो.) उकड थालिपीठ चकुल्या (वरणफळं) फोडणीचा भात (फोभा) फोडणीची पोळी (फोपो) धिरडी सुशिला (चुरमुर्‍याचा पोह्यांसारखा पदार्थ - मी अक्कलकोट, सोलापूरला खाल्ला होता.) बटाटेवडा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी शिंगोळ्या (माहित नाही कसा करतात. भाजणी उकडून केला असावा. मावशीकडे खाल्ला होता. प्रचंड पौष्टीक असतो म्हणे!) शिळी तळलेली पोळी चहात बुडवून पण मस्त लागते. - अजून आठवतील तसे लिहीन. (शिंगोळ्या आवडलेली) मनस्वी

ही एक पाककृति जी मराठी घराघरांत बनविली जाते. कृती - शिळी, बेचव भाजी जी संपायची सुतराम शक्यता नाही ती भज्याच्या सारणात घालून त्याची भजी किंवा भाजणीत बेमालूनपणे घालून त्याची थालीपीठे मुलांच्या पुढे सरकवायची आणि कमी आहेत असे आधीच सांगायचे म्हणजे मुले एकमेकांपेक्षा जास्त खायची स्पर्धा लावतात. भज्यासोबत टोमॅटो सॉस द्यायला विसरू नये.

In reply to by सृष्टीलावण्या

सख्याहरि 19/02/2008 - 21:23
अगदी लहानपणीची आठवण झाली... आम्च्या मातोश्रिंनी केलेला हा पदार्थ.. १०-१५ वर्षांनन्तर यची आठवण करून दिल्याबद्दल आपले आभार... शिळ्या भज्या, आमटी, भात, शेंगदाण्याचे कूट आणी तूप अणि वाट्ल्यास कैरिचे लोणचे..हे सर्व मिसलून गरम करावे ह ही त्यातलाच प्रकार.. अत्यन्त सत्विक.. आणि चविष्ठ... दूध नासले तर त्यात गूळ आणि वेल्दोडे घलून फार मस्त पदर्थ आमची आजी बनवीत असे.. (भुकेला) सख्याहरी

बापु देवकर 19/02/2008 - 14:08
फोडणीची पोळी म्हन्जेच शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी..की अजून काही... पोहे/थालिपीठ...वाचुनच पाणी सुटले हो तोन्डाला.. राज....

In reply to by बापु देवकर

सख्याहरि 19/02/2008 - 21:28
फो.पो. म्हणजे शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी.. कुर्कुरीत भाज्ल्यास मस्त लाग्ते.. चिमूट्भर सखर घलून पहा.. मस्त लागते. वाचुनच पाणी सुटले तोंडाला.. -सख्याहरी

फोडणीची पोळी: ह्याला आमचे माळवी - मराठी लोक कुस्करा म्हणतात. नांव कुस्करा दिले की हा प्रकार सर्वसमावेशक होतो. केवळ शिळ्या पोळ्याच नव्हे तर रात्रीचा उरलेला भात, पाव, पावचे स्लाइस (कुस्करुन) हे सुद्धा फोडणी देउन बनवता येते. जर वरिल पैकी एकाहून अधिक प्रकार (पोळ्या व भात इ.) उरले असतील, तर ते एकत्र करुन त्यास फोडणी दिली जाते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

लिखाळ 22/02/2008 - 20:06
सूर्य आणि अनिला, मी आज सकाळी आपण दिलेल्या पाकृनिसार उकरपेंडी करुन पाहिली. अतिशय चविष्ट आणि खमंग असा पदार्थ आहे. मला महत्वाचे वाटते ते म्हणजे गव्हाचे पिठ पोटात जाते ते ! पोळ्या करायचा आळस असल्याने आता मी अनेकदा हा पदार्थ करिन. आभार. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. आपल्याकडे प्राजु, स्वातीजीं सारख्या सुग्रणी आहेत. तसेच पेठकर साहेबांसारखे बल्लवाचार्य हि आहेत. त्यांना एक प्रश्न: महाराष्ट्रातला एक न्याहारीचा पदार्थ म्हणजे उकरपेंडी. त्याची पाककृती आपण देऊ शकाल काय. बरीच वर्षे पत्नीच्या मागे धोशा लावलाय, परंतु तीला काही ती कृती ठाऊक नाही. २. उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. संपूर्ण भारत फिरल्यावर मला असे आढळते की, महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे.

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

तळेकर ·

तळेकर 19/02/2008 - 11:01
मिसळपाव - बुधवार दिनांक २०-०२-०८ ला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ०९ ते १२ पर्यंत तात्पुरते बंद आहे. म्हणुन म्हटलं ईतर सुधारणा करता आहातच तर हेही करा. "ल "हे अक्षर चे वर म्हटल्याप्रमाणे वळणदार असावे. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही.

बेसनलाडू 19/02/2008 - 11:09
१. सध्याचे वळण काही वाईट नाही. मी शाळेत असल्यापासून आतापर्यंत आता आहे त्याच वळणाने 'ल' हे अक्षर लिहिले आहे; त्यात काही गैर आहे, ते वळण शुद्धलेखनाच्या नियमानुसार चुकीचे वगैरे आहे, असेही नाही. तसेही मिसळपावावर शुद्धलेखनाचे नियम पाळायचे असतात, असे नाही. २. मनोगताला जमलेल्या गोष्टी मिसळपावाला जमतीलच/जमायलाच हव्यात (आणि vice versa) असे नाही. सबब, सध्याचे वळण तसेच राहिले तरी चालेलसे वाटते. (विश्लेषक)बेसनलाडू

चतुरंग 19/02/2008 - 11:22
"ल" असाच मी ही लिहित आलेलो आहे. त्यात काही चूक आहे असे मलाही वाटत नाही. असेनाका ते असेच, अहो सगळ्यांनीच एकसारख्या गोष्टी कशासाठी करायच्या जर तो नियमभंग नसेल तर? चतुरंग

तळेकर 19/02/2008 - 11:30
मला आपलं वाटलं मराठीत "ळ " आहे हिंदी मधे नाही. हेच आपल्या मराठीच वेगळंपण "ल " अक्षरातही ऊठूण दिसावं/असावं.

तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:15
तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. अहो हे फार होतंय हो! नाही, मायमराठीबद्दल आम्हालाही पिरेम आहे, परंतु केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. आणि जर तसे असेल तर मराठी अस्मिता अगदीच कमकुवत म्हटली पाहिजे! जय महाराष्ट्र, जय मराठी! आपला, (हिंदीप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? फरक आहे आणि तो पण मामुली जसा आपण टंकलेखनात हिंदीतला 'श्व' मान्य केला जो मराठीत आपण लिहित नाही. असो. मुद्दा देवनागरी लिपीचा नसून आपल्या शासनाने हिंदी वर्णमाला जशीच्या तशी स्विकारण्याचा आहे. केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. हं, हे पण खरेच.

प्रमोद देव 19/02/2008 - 12:56
ल हे अक्षर मराठी पद्धतीने लिहिल्यास ते जास्त आवडेल. मी स्वत: हिंदी लिहितानाही मराठी पद्धतीचा ल च लिहितो. इथे मात्र तो तसा टंकला जात नाहीये.

विसोबा खेचर 19/02/2008 - 17:44
अरे नीलकांता, जरा मंडळी काय म्हणताहेत ते बघ रे प्लीज आणि जमलं तर आपल्यालाही मनोगतासारखा जळ्ळा तो 'ल' काढता येतोय का ते बघ! :) आपला, (संपादक) तात्या. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही. अहो तळेकर साहेब, कुठे ते थोर मनोगत आणि कुठे मिसळपाव! का उगाच उच्चवर्णीय, उच्चभ्रू, सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, हुश्शार आणि स्कॉलर मनोगताची मिसळपावच्या टपरीशी तुलना करताय? अहो तिकडच्यासारखे भाषेचे, व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे कडक नियम मिसळपावच्या रांगड्या प्रकृतीला झेपणार नाहीत हो! :) आज मनोगत हे एक मराठीतलं एक बलाढ्य संकेतस्थळ आहे. दीपस्तंभच म्हणा ना! त्या मानाने मिसळपाव हे अगदीच एक लहान गलबत! परंतु आम्ही एक गोष्ट मात्र अभिमानाने म्हणू इच्छितो की मिसळपावच्या या लहान गलबताला अगदी अंधार्‍या वादळी रात्रीही मार्गदर्शनाकरता कधी कुठल्या दीपस्तंभाकडे बघायची सवय नाही आणि नसेल! मग भले ते एखाद्या खडकावर आपटून फुटलं तरी बेहत्तर! आपला, (वादळवार्‍यातला) तात्या. बाय द वे, मला एक सांगा तळेकर साहेब, आपण म्हणता तो 'ल' वापरल्याने आणि मिसळपावचा 'ल' वापरल्याने अर्थात नक्की काय फरक पडणार आहे? आणि अहो तुम्ही तर 'शाहूस्पर्ष शाहू महाराज' या लेखात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातही मिसळपाववर आहे तोच 'ल' आहे की! :) आपला, तात्या बर्वा, रत्नांग्री. :) असो..! तरीही आपल्या म्हणण्याला मान देऊन मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव त्यांच्या परिने तुम्हाला हवा तसा 'ल' देण्याचा प्रयत्न करतील एवढे आश्वासन तूर्तास देतो. जमल्यास उत्तमच, नाय जमल्यास माफ करा! :) आपला, तात्या वेलणकर. :)

तळेकर 19/02/2008 - 18:08
तात्या, नीलकांताला हे जमेल. आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा.

In reply to by तळेकर

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:46
तात्या, नीलकांताला हे जमेल. तसं झालं तर उत्तमच आहे! आपल्याला तर बुवा कुठलाही 'ल' चालणार आहे! :) आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. तळेकर साहेब, आपण जर माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक वाचलात, तर मिसळपावला मी कुठेही कमी लेखलेलं नाही हे आपल्या सहज लक्षात येईल! :) रांगडा स्वभाव, टपरी, गलबत असे शब्द वापरणं म्हणजे माझ्या मते तरी कुठेही कमी लेखणं होत नाही! :) अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. ओहोहो, क्या केहेने तळेकरसाहेब! जियो...!! :) मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा. अहो छे हो, त्यात क्षमा वगैरे कसली मागताय? मी आपली अशीच गंमतीत काही मुक्ताफळे उधळली होती त्याकरता उलटपक्षी तुम्हीच मला क्षमा करा! :) आणि मनोगत काय किंवा इतर कुठले संस्थळ काय, मिपाची कुणाही सोबत तुलना केल्यामुळे मी कधीच दुखावला जाणार नाही! In fact, मनोगत हे आजही माझं पहिलं प्रेम आहे. अहो मुळचा मनोगतीच मी! :) आणि खरं विचाराल तर मी देखील आता पुन्हा मनोगत जॉईन करण्याचा सिरियसली विचार करत आहे. अहो आमच्या वेलणकरशेठने मनात कुठलीही अढी न ठेवता केव्हाच मिपाचे सभासदत्व घेतले आहे! :) मग मीच का मागे राहू? मीही पुन्हा एकदा मनोगत जॉईन करून बसंतच्या लग्नाचे, शिंत्रेगुरुजींचे, आणि सालस चे पुढील भाग तिथेच पुरे करेन म्हणतो! :) आपला, (मुळचा मनोगती आणि मुख्य म्हणजे सर्वच मराठी संस्थळांबद्दल मनात प्रेम असणारा!) तात्या. असो! वादावादी, भांडणं, मारामार्‍या वगैरे चालायच्याच! त्या शिवाय मजा नाही! :) झगडा, मतभेद असलेच तर ते माणसांशी/चालकमालकांशी! 'मराठी संकेतस्थळ' या आपलेपणाच्या, मराठीपणा जोपसणार्‍या 'संकल्पने'शी नाही! कधीही नाही..! असो.. ! आपला, (मराठी) तात्या.

डॉ. साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला तात्याचा प्रतिसाद पाहून बरे वाटले. मला तात्याचा दिलदार पणा आवडतोच, पण महेश वेलणकर ही ग्रेटच. त्यांनीही इथे सदस्यत्व घेतले आणि ते सुद्धा खर्‍या नावानेच, सरळ.... टोपणनाव वगैरे भानगड नाही. रोखठोक मामला. असे पाहिजे. राग आपापसात. तो संस्थळांवर का काढा? तात्या, मागे तू कुठे तरी लिहिले होतेस ना की, मनोगत हे नेहमीच तुझे 'first love' राहील. तू तिथे परत जायचा विचार करतो आहेस.... व्हेरी गुड. बिपिन.

तळेकर 19/02/2008 - 11:01
मिसळपाव - बुधवार दिनांक २०-०२-०८ ला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ०९ ते १२ पर्यंत तात्पुरते बंद आहे. म्हणुन म्हटलं ईतर सुधारणा करता आहातच तर हेही करा. "ल "हे अक्षर चे वर म्हटल्याप्रमाणे वळणदार असावे. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही.

बेसनलाडू 19/02/2008 - 11:09
१. सध्याचे वळण काही वाईट नाही. मी शाळेत असल्यापासून आतापर्यंत आता आहे त्याच वळणाने 'ल' हे अक्षर लिहिले आहे; त्यात काही गैर आहे, ते वळण शुद्धलेखनाच्या नियमानुसार चुकीचे वगैरे आहे, असेही नाही. तसेही मिसळपावावर शुद्धलेखनाचे नियम पाळायचे असतात, असे नाही. २. मनोगताला जमलेल्या गोष्टी मिसळपावाला जमतीलच/जमायलाच हव्यात (आणि vice versa) असे नाही. सबब, सध्याचे वळण तसेच राहिले तरी चालेलसे वाटते. (विश्लेषक)बेसनलाडू

चतुरंग 19/02/2008 - 11:22
"ल" असाच मी ही लिहित आलेलो आहे. त्यात काही चूक आहे असे मलाही वाटत नाही. असेनाका ते असेच, अहो सगळ्यांनीच एकसारख्या गोष्टी कशासाठी करायच्या जर तो नियमभंग नसेल तर? चतुरंग

तळेकर 19/02/2008 - 11:30
मला आपलं वाटलं मराठीत "ळ " आहे हिंदी मधे नाही. हेच आपल्या मराठीच वेगळंपण "ल " अक्षरातही ऊठूण दिसावं/असावं.

तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:15
तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे. अहो हे फार होतंय हो! नाही, मायमराठीबद्दल आम्हालाही पिरेम आहे, परंतु केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. आणि जर तसे असेल तर मराठी अस्मिता अगदीच कमकुवत म्हटली पाहिजे! जय महाराष्ट्र, जय मराठी! आपला, (हिंदीप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना? फरक आहे आणि तो पण मामुली जसा आपण टंकलेखनात हिंदीतला 'श्व' मान्य केला जो मराठीत आपण लिहित नाही. असो. मुद्दा देवनागरी लिपीचा नसून आपल्या शासनाने हिंदी वर्णमाला जशीच्या तशी स्विकारण्याचा आहे. केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. हं, हे पण खरेच.

प्रमोद देव 19/02/2008 - 12:56
ल हे अक्षर मराठी पद्धतीने लिहिल्यास ते जास्त आवडेल. मी स्वत: हिंदी लिहितानाही मराठी पद्धतीचा ल च लिहितो. इथे मात्र तो तसा टंकला जात नाहीये.

विसोबा खेचर 19/02/2008 - 17:44
अरे नीलकांता, जरा मंडळी काय म्हणताहेत ते बघ रे प्लीज आणि जमलं तर आपल्यालाही मनोगतासारखा जळ्ळा तो 'ल' काढता येतोय का ते बघ! :) आपला, (संपादक) तात्या. "मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही. अहो तळेकर साहेब, कुठे ते थोर मनोगत आणि कुठे मिसळपाव! का उगाच उच्चवर्णीय, उच्चभ्रू, सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, हुश्शार आणि स्कॉलर मनोगताची मिसळपावच्या टपरीशी तुलना करताय? अहो तिकडच्यासारखे भाषेचे, व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे कडक नियम मिसळपावच्या रांगड्या प्रकृतीला झेपणार नाहीत हो! :) आज मनोगत हे एक मराठीतलं एक बलाढ्य संकेतस्थळ आहे. दीपस्तंभच म्हणा ना! त्या मानाने मिसळपाव हे अगदीच एक लहान गलबत! परंतु आम्ही एक गोष्ट मात्र अभिमानाने म्हणू इच्छितो की मिसळपावच्या या लहान गलबताला अगदी अंधार्‍या वादळी रात्रीही मार्गदर्शनाकरता कधी कुठल्या दीपस्तंभाकडे बघायची सवय नाही आणि नसेल! मग भले ते एखाद्या खडकावर आपटून फुटलं तरी बेहत्तर! आपला, (वादळवार्‍यातला) तात्या. बाय द वे, मला एक सांगा तळेकर साहेब, आपण म्हणता तो 'ल' वापरल्याने आणि मिसळपावचा 'ल' वापरल्याने अर्थात नक्की काय फरक पडणार आहे? आणि अहो तुम्ही तर 'शाहूस्पर्ष शाहू महाराज' या लेखात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातही मिसळपाववर आहे तोच 'ल' आहे की! :) आपला, तात्या बर्वा, रत्नांग्री. :) असो..! तरीही आपल्या म्हणण्याला मान देऊन मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव त्यांच्या परिने तुम्हाला हवा तसा 'ल' देण्याचा प्रयत्न करतील एवढे आश्वासन तूर्तास देतो. जमल्यास उत्तमच, नाय जमल्यास माफ करा! :) आपला, तात्या वेलणकर. :)

तळेकर 19/02/2008 - 18:08
तात्या, नीलकांताला हे जमेल. आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा.

In reply to by तळेकर

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:46
तात्या, नीलकांताला हे जमेल. तसं झालं तर उत्तमच आहे! आपल्याला तर बुवा कुठलाही 'ल' चालणार आहे! :) आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. तळेकर साहेब, आपण जर माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक वाचलात, तर मिसळपावला मी कुठेही कमी लेखलेलं नाही हे आपल्या सहज लक्षात येईल! :) रांगडा स्वभाव, टपरी, गलबत असे शब्द वापरणं म्हणजे माझ्या मते तरी कुठेही कमी लेखणं होत नाही! :) अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे. ओहोहो, क्या केहेने तळेकरसाहेब! जियो...!! :) मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा. अहो छे हो, त्यात क्षमा वगैरे कसली मागताय? मी आपली अशीच गंमतीत काही मुक्ताफळे उधळली होती त्याकरता उलटपक्षी तुम्हीच मला क्षमा करा! :) आणि मनोगत काय किंवा इतर कुठले संस्थळ काय, मिपाची कुणाही सोबत तुलना केल्यामुळे मी कधीच दुखावला जाणार नाही! In fact, मनोगत हे आजही माझं पहिलं प्रेम आहे. अहो मुळचा मनोगतीच मी! :) आणि खरं विचाराल तर मी देखील आता पुन्हा मनोगत जॉईन करण्याचा सिरियसली विचार करत आहे. अहो आमच्या वेलणकरशेठने मनात कुठलीही अढी न ठेवता केव्हाच मिपाचे सभासदत्व घेतले आहे! :) मग मीच का मागे राहू? मीही पुन्हा एकदा मनोगत जॉईन करून बसंतच्या लग्नाचे, शिंत्रेगुरुजींचे, आणि सालस चे पुढील भाग तिथेच पुरे करेन म्हणतो! :) आपला, (मुळचा मनोगती आणि मुख्य म्हणजे सर्वच मराठी संस्थळांबद्दल मनात प्रेम असणारा!) तात्या. असो! वादावादी, भांडणं, मारामार्‍या वगैरे चालायच्याच! त्या शिवाय मजा नाही! :) झगडा, मतभेद असलेच तर ते माणसांशी/चालकमालकांशी! 'मराठी संकेतस्थळ' या आपलेपणाच्या, मराठीपणा जोपसणार्‍या 'संकल्पने'शी नाही! कधीही नाही..! असो.. ! आपला, (मराठी) तात्या.

डॉ. साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला तात्याचा प्रतिसाद पाहून बरे वाटले. मला तात्याचा दिलदार पणा आवडतोच, पण महेश वेलणकर ही ग्रेटच. त्यांनीही इथे सदस्यत्व घेतले आणि ते सुद्धा खर्‍या नावानेच, सरळ.... टोपणनाव वगैरे भानगड नाही. रोखठोक मामला. असे पाहिजे. राग आपापसात. तो संस्थळांवर का काढा? तात्या, मागे तू कुठे तरी लिहिले होतेस ना की, मनोगत हे नेहमीच तुझे 'first love' राहील. तू तिथे परत जायचा विचार करतो आहेस.... व्हेरी गुड. बिपिन.
"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ? lalaa शक्य असेल तर जरुर करा. आणि ते आमच्या संगणकात कसे करता येईल तेही सांगा.

हृदयाच्या अंतर्हृदयाला....

सृष्टीलावण्या ·

आनंदयात्री 18/02/2008 - 15:36
बर्‍याच दिवसांनी बालकवींची ही कविता वाचली. नाव फक्त "दिव्य औषधी कसली त्याला " असे आहे असे स्मरते.

विसोबा खेचर 18/02/2008 - 18:39
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! वा! छान आहे कविता... अवांतर - मिसळपाववर बालकवी, कुसुमाग्रज, भाईकाका आणि इतरही अनेक प्रतिभावंताच्या/दिग्गजांच्या साहित्याचे स्वागत आहेच हे प्रथम नमूद करतो. परंतु त्याचबरोबर सभासदांनी खास त्यांचे स्वत:चे असे काही लेखन येथे केल्यास ते मिसळपावला अधिक आवडेल, किंबहुना मराठी मंडळींना त्यांचे स्वत:चे साहित्यिक, वैचारिक लेखन येथे करता यावे हाच मिसळपावचा मुख्य उद्देश आहे... हिंदी, उर्दू, संस्कृत यांसारख्या भाषेतल्या साहित्यिकांची मराठीतून ओळख तसेच त्यांच्या साहित्याच्या मराठी रसग्रहणाचे/ भाषांतर-अनुवादाचेही मिसळपाववर स्वागत आहे... तात्या.

आनंदयात्री 18/02/2008 - 15:36
बर्‍याच दिवसांनी बालकवींची ही कविता वाचली. नाव फक्त "दिव्य औषधी कसली त्याला " असे आहे असे स्मरते.

विसोबा खेचर 18/02/2008 - 18:39
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! वा! छान आहे कविता... अवांतर - मिसळपाववर बालकवी, कुसुमाग्रज, भाईकाका आणि इतरही अनेक प्रतिभावंताच्या/दिग्गजांच्या साहित्याचे स्वागत आहेच हे प्रथम नमूद करतो. परंतु त्याचबरोबर सभासदांनी खास त्यांचे स्वत:चे असे काही लेखन येथे केल्यास ते मिसळपावला अधिक आवडेल, किंबहुना मराठी मंडळींना त्यांचे स्वत:चे साहित्यिक, वैचारिक लेखन येथे करता यावे हाच मिसळपावचा मुख्य उद्देश आहे... हिंदी, उर्दू, संस्कृत यांसारख्या भाषेतल्या साहित्यिकांची मराठीतून ओळख तसेच त्यांच्या साहित्याच्या मराठी रसग्रहणाचे/ भाषांतर-अनुवादाचेही मिसळपाववर स्वागत आहे... तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।। येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळावयाला? कुणीकडे हा झुकतो वारा? हाका मारी जीव कुणाला? मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! - बालकवी

प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)

विसोबा खेचर ·

ऋषिकेश 18/02/2008 - 09:16
अरे वा! दोन्ही बर्थडे एकाच दिवशी.. डबल मजा :) प्राजु तुला दोन्ही वाढदिवसांच्या अनेकोत्तम शुभेच्छा!.. एन्जॉय :) -ऋषिकेश

विसोबा खेचर 18/02/2008 - 09:31
प्राजू आणि जगदिशराव, या दिवसाचे औचित्य साधून आपण किमान १००१ रुपायांचा देणगी धनादेश आमच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या भाऊबीज फंडाकरता पाठवावात अशी आपल्या आग्रहवजा विनंती.. आपला, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज फंड, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

वा !!! वा !!! काय योग आहेत. दोन्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

अवांतर :) प्राजुला चारोळीतुन शुभेच्छा द्या राव कोणी तरी !!!!
त्या शिवाय आपण वाढदिवस सिलेब्रेट करतोय असे वाटणार नाही :)

प्राजु 18/02/2008 - 09:49
तात्या, ऋषिकेश, दिलीपजी, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तात्या, पुणे ट्रीप मध्ये मी नक्की तिथे धनादेश स्वतः जाऊन सुपूर्त करेन. - (आभारी) प्राजु

चतुरंग 18/02/2008 - 09:51
तुझा आणि लग्नाचा सुध्दा वाढदिवस एकाच दिवशी! वा वा मजाच आहे की!! मनापासून दोन-दोन शुभेच्छा तुला आणि तुझ्या 'ह्यांना'! ;)) चतुरंग

धमाल मुलगा 18/02/2008 - 10:19
प्राजुताई प्राजुताई, दोन दोन वाढदिवसा॑च्या दोन दोन वेळा वेळा खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा...मनापासून मनापासून :)) ए॑जॉय !!! आपला - ध मा ल ध मा ल.

नंदन 18/02/2008 - 11:23
दोन्ही वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा! नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

केशवराव 18/02/2008 - 14:24
प्राजु , तूला वाढदिवसाच्या आणि तुम्हा दोघांना विवाहाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ! असेच सुखी रहा. औक्षवंत व्हा. शुभेच्छुक..... केशवराव.

वैयक्तिक आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती. चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी.

नीलकांत 18/02/2008 - 14:41
अनेक शुभकामना. //एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती. चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी. खरंय अगदी खरंय ! नीलकांत

केशवसुमार 18/02/2008 - 16:49
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या ही हर्दिक शुभेच्छा! केशवसुमार.

वरदा 18/02/2008 - 17:39
माझ्याकडूनही तुला दोन्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

छोटा डॉन 18/02/2008 - 18:35
आम्ही चारोळीतून शूभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहोत .... "लग्नच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात, लग्नाचे 'वाढदिवस' मात्र पॄथ्वीतलावरच साजरे होतात ....." हा शूभदिन आपल्या ऊभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्शे येवो हीच आमुची शूभेच्छा .... *** छोटा डॉन ***

प्राजु 18/02/2008 - 23:48
आपल्या सर्वांचं प्रेम ही खरोखरच सगळ्यात मोठी माझ्या वाढदिवसाची भेट मला मिळाली आहे. हे प्रेम असेच अबाधित राहुदे. उत्तरोत्तर ते वाढतच राहुदे.. हीच आजच्या दिवशी मी त्या ईश्वराकडे प्रार्थना करते. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल मी आणि जगदिश आपले आभारी आहोत. भारतात आले की मिसळपावचा कट्टा जमवू आपण माझ्या घरी. - प्राजु

प्रमोद देव 19/02/2008 - 00:26
थोड्या उशीराने का होईना पण माझ्याही प्राजुला तिच्या वाढदिवसाबद्दल अनेक उत्तम शुभेच्छा. तसेच श्री व सौ.प्राजु ह्या उभयतांना त्यांच्या विवाह जयंतीनिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा! प्रमोदकाका

कोलबेर 19/02/2008 - 08:47
अरे वा! जगदीशजींना एकाच दगडात दोन पक्षी मिळाले की! :) ह.घ्या अनेक शुभेच्छा! -कोलबेर

अव्यक्त 20/02/2008 - 00:14
अजि प्राजक्ताचा (जन्म) दिनु... वर्शे सद्धिचाचा घनु मि. पा. लागे सजु... जणु शोभे जगदिश्वराचि प्राजु...

प्राजु 20/02/2008 - 00:59
अव्यक्त, आपली चारोळी रूपी शुभेच्छा...खूप आवडली. आपल्या शुभेच्छा देण्याची पद्धात खूपच छान आहे. धन्यवाद. (हळवी) प्राजु सगळ्या मिसळपाव करांचे मनापासून धन्यवाद.

ऋषिकेश 18/02/2008 - 09:16
अरे वा! दोन्ही बर्थडे एकाच दिवशी.. डबल मजा :) प्राजु तुला दोन्ही वाढदिवसांच्या अनेकोत्तम शुभेच्छा!.. एन्जॉय :) -ऋषिकेश

विसोबा खेचर 18/02/2008 - 09:31
प्राजू आणि जगदिशराव, या दिवसाचे औचित्य साधून आपण किमान १००१ रुपायांचा देणगी धनादेश आमच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या भाऊबीज फंडाकरता पाठवावात अशी आपल्या आग्रहवजा विनंती.. आपला, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज फंड, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

वा !!! वा !!! काय योग आहेत. दोन्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

अवांतर :) प्राजुला चारोळीतुन शुभेच्छा द्या राव कोणी तरी !!!!
त्या शिवाय आपण वाढदिवस सिलेब्रेट करतोय असे वाटणार नाही :)

प्राजु 18/02/2008 - 09:49
तात्या, ऋषिकेश, दिलीपजी, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तात्या, पुणे ट्रीप मध्ये मी नक्की तिथे धनादेश स्वतः जाऊन सुपूर्त करेन. - (आभारी) प्राजु

चतुरंग 18/02/2008 - 09:51
तुझा आणि लग्नाचा सुध्दा वाढदिवस एकाच दिवशी! वा वा मजाच आहे की!! मनापासून दोन-दोन शुभेच्छा तुला आणि तुझ्या 'ह्यांना'! ;)) चतुरंग

धमाल मुलगा 18/02/2008 - 10:19
प्राजुताई प्राजुताई, दोन दोन वाढदिवसा॑च्या दोन दोन वेळा वेळा खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा...मनापासून मनापासून :)) ए॑जॉय !!! आपला - ध मा ल ध मा ल.

नंदन 18/02/2008 - 11:23
दोन्ही वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा! नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

केशवराव 18/02/2008 - 14:24
प्राजु , तूला वाढदिवसाच्या आणि तुम्हा दोघांना विवाहाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ! असेच सुखी रहा. औक्षवंत व्हा. शुभेच्छुक..... केशवराव.

वैयक्तिक आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....! एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती. चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी.

नीलकांत 18/02/2008 - 14:41
अनेक शुभकामना. //एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती. चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी. खरंय अगदी खरंय ! नीलकांत

केशवसुमार 18/02/2008 - 16:49
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या ही हर्दिक शुभेच्छा! केशवसुमार.

वरदा 18/02/2008 - 17:39
माझ्याकडूनही तुला दोन्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

छोटा डॉन 18/02/2008 - 18:35
आम्ही चारोळीतून शूभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहोत .... "लग्नच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात, लग्नाचे 'वाढदिवस' मात्र पॄथ्वीतलावरच साजरे होतात ....." हा शूभदिन आपल्या ऊभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्शे येवो हीच आमुची शूभेच्छा .... *** छोटा डॉन ***

प्राजु 18/02/2008 - 23:48
आपल्या सर्वांचं प्रेम ही खरोखरच सगळ्यात मोठी माझ्या वाढदिवसाची भेट मला मिळाली आहे. हे प्रेम असेच अबाधित राहुदे. उत्तरोत्तर ते वाढतच राहुदे.. हीच आजच्या दिवशी मी त्या ईश्वराकडे प्रार्थना करते. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल मी आणि जगदिश आपले आभारी आहोत. भारतात आले की मिसळपावचा कट्टा जमवू आपण माझ्या घरी. - प्राजु

प्रमोद देव 19/02/2008 - 00:26
थोड्या उशीराने का होईना पण माझ्याही प्राजुला तिच्या वाढदिवसाबद्दल अनेक उत्तम शुभेच्छा. तसेच श्री व सौ.प्राजु ह्या उभयतांना त्यांच्या विवाह जयंतीनिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा! प्रमोदकाका

कोलबेर 19/02/2008 - 08:47
अरे वा! जगदीशजींना एकाच दगडात दोन पक्षी मिळाले की! :) ह.घ्या अनेक शुभेच्छा! -कोलबेर

अव्यक्त 20/02/2008 - 00:14
अजि प्राजक्ताचा (जन्म) दिनु... वर्शे सद्धिचाचा घनु मि. पा. लागे सजु... जणु शोभे जगदिश्वराचि प्राजु...

प्राजु 20/02/2008 - 00:59
अव्यक्त, आपली चारोळी रूपी शुभेच्छा...खूप आवडली. आपल्या शुभेच्छा देण्याची पद्धात खूपच छान आहे. धन्यवाद. (हळवी) प्राजु सगळ्या मिसळपाव करांचे मनापासून धन्यवाद.
लेखनविषय:
राम राम मंडळी, मिसळपावची सदस्या आणि आमची मैत्रीण प्राजू हिला वाढदिवसाबद्दल समस्त मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा... प्राजू, हॅपी बर्थडे टू यू ...! :) आणि दुग्धशर्करा योग असा की आजच प्राजूच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या मिसळपावचे जावई जगदिशराव आणि प्राजू या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाबद्दल मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! :) तुम्हा दोघाचा संसार सुखासमाधानाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...! तात्या. अवांतर - सध्या गडबडीत आहे परंतु नंतर जरा सवडीने आमच्या लाडक्या अनुष्काचं पेश्शल भेटकार्ड बनवून आम्ही ते इथे डकवूच! :) आपला, (अनुष्काप्रेमी) तात्या.

शीर्षक सुचत नाही - २

बेसनलाडू ·

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

(शीर्षक सुचत नाही)

केशवसुमार ·

केशवकुमार तुमच्या कवितेला(विडंबन) प्रतिसाद काय द्यायचा? इतक्या सुंदर कविता करता. ही मस्त वाटली कारण असे दृश्य १० पैकी ९ घरात असते त्यामुळे वास्तव वाटले.:))))) मस्त अशाच कविता येऊ देत. आम्ही वाचक आहोत तुमच्या कवितेचे.

लिखाळ 18/02/2008 - 00:19
वा वा वा... साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले तू मुळात ज्यांना जरा हलवले होते नेहमी प्रमाणेच फार सुंदर ... -- लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

विसोबा खेचर 18/02/2008 - 08:39
लीलया चघळले कर्वे मी जीवनभर ते ऊस सोलणे परी न जमले होते वा! या ओळी मस्त... तात्या.

केशवकुमार तुमच्या कवितेला(विडंबन) प्रतिसाद काय द्यायचा? इतक्या सुंदर कविता करता. ही मस्त वाटली कारण असे दृश्य १० पैकी ९ घरात असते त्यामुळे वास्तव वाटले.:))))) मस्त अशाच कविता येऊ देत. आम्ही वाचक आहोत तुमच्या कवितेचे.

लिखाळ 18/02/2008 - 00:19
वा वा वा... साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले तू मुळात ज्यांना जरा हलवले होते नेहमी प्रमाणेच फार सुंदर ... -- लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

विसोबा खेचर 18/02/2008 - 08:39
लीलया चघळले कर्वे मी जीवनभर ते ऊस सोलणे परी न जमले होते वा! या ओळी मस्त... तात्या.
लेखनविषय:
आमची प्रेरणा मिलिंद फणसेंना शीर्षक न सुचलेली गझल. लाटणे जरी मी तुझे चुकवले होते दारावर अमुचे तोंड अपटले होते साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले तू मुळात ज्यांना जरा हलवले होते राहिल्यात मागे स्मृतिपोकळ्या आता ते घाव मी जरी सर्व विसरले होते 'ते' दुरावल्याचे दुःख कराया हलके मी मुखात नकली दात बसवले होते लीलया चघळले कर्वे मी जीवनभर ते ऊस सोलणे परी न जमले होते भ्रम,"केश्या"ला विडंबन आवडल्याचा रे खुळ्या, तुला हे लोक हासले होते !

आठवणीतली कविता

सृष्टीलावण्या ·

ह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्या आठवणीतील कविता सुंदर आहे, त्यासोबत डकवलेले चित्रही तितकेच सुंदर आहे.
चित्रातला  घाट पाहिला  आणि आम्हाला कसा-या घाटाची आठवण झाली.पावसळ्यात अशीच निसर्गाची मुक्त उधळण तिथे पाहवयास मिळते.
>> ह्या कवितेचे कवि कोण
ह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.
कवीची माहिती नसली तरी ती आपल्या आठवणीतील कविता आहे,असा आपण उल्लेख केला आहे.  त्यामुळे ती कविता कोणाचीतरी आहे इतके आम्हाला कळले आहे. शोध घेणा-यांनी  त्याचा शोध  घेत राहावा. बाकी कोणाला आवडला असेल / नसेल पण आपण ज्यांच्यासाठी वापरला असेल/ नसेल तो चिंतातुरजंतु  हा शब्द आम्हाला फार आवडला !!! आनंदीजंतु प्रा.डॉ.... ..........

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र ताम्हणी घाटाचे आहे आणि चिंतातुर जंतु हा शब्द गोविंदाग्रजांचा आहे. चित्र मला पण बेहद्द आवडते पण मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोभारीत (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते. "चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन.

In reply to by सृष्टीलावण्या

लिखाळ 18/02/2008 - 22:01
"चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन. वा नक्कीच द्या...वाट पाहत आहे. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

आठवणीतल्या कविता नावाचे ४ (किंवा कदाचित ५) भागात प्रसिध्द केलेले पुस्तक उपलब्ध आहे. त्यात कदाचित या कवितेबद्दल माहिती मिळू शकेल. त्यात माझ्या आवडीच्या अनेक कविता आहेत. "गायी पाण्यावर काय म्हणून आल्या" अशी सुरुवात असलेली "माझी कन्या" नावाची कवि 'बी' उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता किंवा 'कठीण समय येता कोण कामास येतो' ही रघुनाथ पंडीत यांची कविता. या त्यामधे आहेत. पं. दुर्गादास आसाराम तिवारी यांच्या 'गोकलखां लढनेवाला','मोहरा इरेला पडला','एक काळ ऐसा होता','फेकला तटाहून घोडा' अशा अनेक कविता पण त्यामधे आहेत. ता.क. वर उल्लेखित कवि आणि कविता यांचे नाते माझ्या घोर अज्ञानानुसार वेगळे असू शकते. (चू.भू.द्या.घ्या.) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यातील कविता साधारण १९७५ च्या बालभारती पर्यंतच्या आहेत. त्यात ही कविता नक्की नाही. गाई पाण्यावरच्या आठवणीने मन भरून आले. ती कविता माझ्या मोठ्या बहिणीला होती, मला नव्हती. पण संध्याकाळी परवचा, पाढे, शुभंकरोति, रामरक्षा म्हणताना कविता पण म्हटल्या जायच्या. त्यामुळे पुढे अभ्यासक्रम बदलला तरी मला तिच्या बालभारतीच्या अनेक कविता मला पाठ होत्या.

लिखाळ 17/02/2008 - 23:57
काय मस्त कविता ! मस्त शाळेतले दिवस आठवले. अजून अश्या जून्या कविता वाचायला आवडातील. प्रकाशचित्रंसुद्धा फारच उत्तम. अशीच एक माझी आवडाती कविता म्हणजे 'फूलपाखरु छान किती दिसते..' आणि एक चिमणीची कविता होती 'माझा घरटा कोणी नेला....' ---- लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

चतुरंग 17/02/2008 - 23:59
साधी, सोपी, छान कविता आणि बरोबर तितकेच छान प्रकाशचित्र. धन्यवाद. चतुरंग

In reply to by चतुरंग

ह्या कवितेची एक आठवण म्हणजे साधारण १९८४ च्या काळात ठाण्याजवळील येऊर निर्जन अरण्य होते जिथे वाघ फिरायचे, तिथे माझे आजोळ होते. तिथल्या घाटातून जाताना आम्ही मोठमोठ्याने ही कविता म्हणत / कोकलत जायचो.

'आवडतो मज अफाट सागर अथा॑ग पाणी निळे निळ्या जा॑भळ्या जळात केशर साय॑काळी मिळे फेस फुला॑चे सफेद शि॑पीत वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळीतो किती द॑गल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या स॑गती स॑थ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तूफान जेव्हा भा॑डत येते सागरही गर्जतो त्यावेळी मी चतूरपणाने दूर जरा राहतो खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगा-ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाश दाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी दूर डो॑गरावरी चमकती निळे जा॑भळे दिवे सा॑गतात ते मजला आता घरी जायला हवे..घरी जायला हवे' -कुसुमाग्रज

प्राजु 19/02/2008 - 00:22
वावा.. डॉक्टरसाहेब.. अहो ही कविता माझा जीव की प्राण होती. आणि आवाज जरा बरा आणि थोडीफार संगिताची जाण असल्याने शाळेत सगळ्या कवितांना मला चाल लावून म्हणायला सांगत आमचे सर. ही कविता मी फारच छान म्हंटल्याचे त्यानी कौतुकाने आमच्या मुख्याध्यापकांना सांगितले होते. आणि मला त्यांच्याकडून शाबासकी मिळाली होती. मला अजून एक आठवते ती कविता म्हणजे.."बाभळी" बाभळी सारख्या काटेरी विषयावर इंदिरा संतांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. इथे देत आहे.. लवलव हिरवीगार पालवी काट्यांचीवर मोहक जाळी घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे कुसरकलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रिती दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे.. - कवयित्री इंदिरा संत.

धन्यवाद 'प्राजू'. या अशा काही कविता होत्या की ज्या एकदा वाचल्या की आपोआप पाठ होत असत. 'माणूस माझे नाव माणूस माझे नाव बि॑दूमात्र मी क्षुद्र खरोखर परि जि॑कले सातही सागर उ॑च गाठला गौरीश॑कर अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव माणूस माझे नाव' -बाबा आमटे तशीच हि॑दीमधील हरिव॑शराय बच्चन या॑ची.. 'चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते,पा॑व बढाते मन मुस्काते गाते गीत हम भारत कि अमर जवानी सागर कि लहरे॑ लासानी ग॑ग जमुन के निर्मल पानी सब के प्रेरक रक्षक मीत चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते पा॑व बढाते मन मुस्काते गाते गीत..' पुढील स॑स्कृत ओळी अशाच.. 'रात्रीर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उदेष्यति हसिष्यति प॑कजश्री इत्थ॑ विच॑तयति कोषगत द्विरेफे हा ह॑त ह॑त नलिनिम गज-उज्जहारः' (खूप वर्षा॑नी स॑स्कृत लिहित असल्याने चुका असण्याची शक्यता आहे)

विसोबा खेचर 19/02/2008 - 10:20
भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। वा! सुंदर कविता... आपला, (तिसरीतला) तात्या.

हो...मी तिसरीत असताना (१९८३) घाटातली वाट ही कविता शिकलोय... मस्त कविता..झक्कास फोटो... मला माझ्या दहावीच्या काही आवडत्या पण अर्धवट आठवणाया कविता द्याव्याशा वाटत आहेत...

ह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्या आठवणीतील कविता सुंदर आहे, त्यासोबत डकवलेले चित्रही तितकेच सुंदर आहे.
चित्रातला  घाट पाहिला  आणि आम्हाला कसा-या घाटाची आठवण झाली.पावसळ्यात अशीच निसर्गाची मुक्त उधळण तिथे पाहवयास मिळते.
>> ह्या कवितेचे कवि कोण
ह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.
कवीची माहिती नसली तरी ती आपल्या आठवणीतील कविता आहे,असा आपण उल्लेख केला आहे.  त्यामुळे ती कविता कोणाचीतरी आहे इतके आम्हाला कळले आहे. शोध घेणा-यांनी  त्याचा शोध  घेत राहावा. बाकी कोणाला आवडला असेल / नसेल पण आपण ज्यांच्यासाठी वापरला असेल/ नसेल तो चिंतातुरजंतु  हा शब्द आम्हाला फार आवडला !!! आनंदीजंतु प्रा.डॉ.... ..........

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र ताम्हणी घाटाचे आहे आणि चिंतातुर जंतु हा शब्द गोविंदाग्रजांचा आहे. चित्र मला पण बेहद्द आवडते पण मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोभारीत (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते. "चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन.

In reply to by सृष्टीलावण्या

लिखाळ 18/02/2008 - 22:01
"चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन. वा नक्कीच द्या...वाट पाहत आहे. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

आठवणीतल्या कविता नावाचे ४ (किंवा कदाचित ५) भागात प्रसिध्द केलेले पुस्तक उपलब्ध आहे. त्यात कदाचित या कवितेबद्दल माहिती मिळू शकेल. त्यात माझ्या आवडीच्या अनेक कविता आहेत. "गायी पाण्यावर काय म्हणून आल्या" अशी सुरुवात असलेली "माझी कन्या" नावाची कवि 'बी' उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता किंवा 'कठीण समय येता कोण कामास येतो' ही रघुनाथ पंडीत यांची कविता. या त्यामधे आहेत. पं. दुर्गादास आसाराम तिवारी यांच्या 'गोकलखां लढनेवाला','मोहरा इरेला पडला','एक काळ ऐसा होता','फेकला तटाहून घोडा' अशा अनेक कविता पण त्यामधे आहेत. ता.क. वर उल्लेखित कवि आणि कविता यांचे नाते माझ्या घोर अज्ञानानुसार वेगळे असू शकते. (चू.भू.द्या.घ्या.) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यातील कविता साधारण १९७५ च्या बालभारती पर्यंतच्या आहेत. त्यात ही कविता नक्की नाही. गाई पाण्यावरच्या आठवणीने मन भरून आले. ती कविता माझ्या मोठ्या बहिणीला होती, मला नव्हती. पण संध्याकाळी परवचा, पाढे, शुभंकरोति, रामरक्षा म्हणताना कविता पण म्हटल्या जायच्या. त्यामुळे पुढे अभ्यासक्रम बदलला तरी मला तिच्या बालभारतीच्या अनेक कविता मला पाठ होत्या.

लिखाळ 17/02/2008 - 23:57
काय मस्त कविता ! मस्त शाळेतले दिवस आठवले. अजून अश्या जून्या कविता वाचायला आवडातील. प्रकाशचित्रंसुद्धा फारच उत्तम. अशीच एक माझी आवडाती कविता म्हणजे 'फूलपाखरु छान किती दिसते..' आणि एक चिमणीची कविता होती 'माझा घरटा कोणी नेला....' ---- लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

चतुरंग 17/02/2008 - 23:59
साधी, सोपी, छान कविता आणि बरोबर तितकेच छान प्रकाशचित्र. धन्यवाद. चतुरंग

In reply to by चतुरंग

ह्या कवितेची एक आठवण म्हणजे साधारण १९८४ च्या काळात ठाण्याजवळील येऊर निर्जन अरण्य होते जिथे वाघ फिरायचे, तिथे माझे आजोळ होते. तिथल्या घाटातून जाताना आम्ही मोठमोठ्याने ही कविता म्हणत / कोकलत जायचो.

'आवडतो मज अफाट सागर अथा॑ग पाणी निळे निळ्या जा॑भळ्या जळात केशर साय॑काळी मिळे फेस फुला॑चे सफेद शि॑पीत वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळीतो किती द॑गल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या स॑गती स॑थ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तूफान जेव्हा भा॑डत येते सागरही गर्जतो त्यावेळी मी चतूरपणाने दूर जरा राहतो खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगा-ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाश दाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी दूर डो॑गरावरी चमकती निळे जा॑भळे दिवे सा॑गतात ते मजला आता घरी जायला हवे..घरी जायला हवे' -कुसुमाग्रज

प्राजु 19/02/2008 - 00:22
वावा.. डॉक्टरसाहेब.. अहो ही कविता माझा जीव की प्राण होती. आणि आवाज जरा बरा आणि थोडीफार संगिताची जाण असल्याने शाळेत सगळ्या कवितांना मला चाल लावून म्हणायला सांगत आमचे सर. ही कविता मी फारच छान म्हंटल्याचे त्यानी कौतुकाने आमच्या मुख्याध्यापकांना सांगितले होते. आणि मला त्यांच्याकडून शाबासकी मिळाली होती. मला अजून एक आठवते ती कविता म्हणजे.."बाभळी" बाभळी सारख्या काटेरी विषयावर इंदिरा संतांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. इथे देत आहे.. लवलव हिरवीगार पालवी काट्यांचीवर मोहक जाळी घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे कुसरकलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रिती दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे.. - कवयित्री इंदिरा संत.

धन्यवाद 'प्राजू'. या अशा काही कविता होत्या की ज्या एकदा वाचल्या की आपोआप पाठ होत असत. 'माणूस माझे नाव माणूस माझे नाव बि॑दूमात्र मी क्षुद्र खरोखर परि जि॑कले सातही सागर उ॑च गाठला गौरीश॑कर अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव माणूस माझे नाव' -बाबा आमटे तशीच हि॑दीमधील हरिव॑शराय बच्चन या॑ची.. 'चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते,पा॑व बढाते मन मुस्काते गाते गीत हम भारत कि अमर जवानी सागर कि लहरे॑ लासानी ग॑ग जमुन के निर्मल पानी सब के प्रेरक रक्षक मीत चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते पा॑व बढाते मन मुस्काते गाते गीत..' पुढील स॑स्कृत ओळी अशाच.. 'रात्रीर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उदेष्यति हसिष्यति प॑कजश्री इत्थ॑ विच॑तयति कोषगत द्विरेफे हा ह॑त ह॑त नलिनिम गज-उज्जहारः' (खूप वर्षा॑नी स॑स्कृत लिहित असल्याने चुका असण्याची शक्यता आहे)

विसोबा खेचर 19/02/2008 - 10:20
भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। वा! सुंदर कविता... आपला, (तिसरीतला) तात्या.

हो...मी तिसरीत असताना (१९८३) घाटातली वाट ही कविता शिकलोय... मस्त कविता..झक्कास फोटो... मला माझ्या दहावीच्या काही आवडत्या पण अर्धवट आठवणाया कविता द्याव्याशा वाटत आहेत...
लेखनविषय:
लेखनप्रकार
घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।। निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।। खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।। भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। - बालभारती इ. ३ री (१९८४)

संडे स्पेशल ( कोळंबीचा भात)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर 17/02/2008 - 10:10
स्वातीताई, माझ्या विनंतीला मान देऊन कोलंबीभाताची पा कृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद... माझी ही अत्यंत म्हणजे अत्यंत फेवरेट पा कृ आहे... :) तात्या.

व्वा..व्वा... रविवार सकाळी सकाळी मिपा उघडले आणि .....उघडले स्वर्गाचे द्वार... कोलंबी भाऽऽऽत...... खल्लास! नारळाच्या दुधाने कोलंबी भाताला खास राजेशाही चव येणार ह्यात शंका नाही. धन्यवाद.

विसोबा खेचर 17/02/2008 - 10:10
स्वातीताई, माझ्या विनंतीला मान देऊन कोलंबीभाताची पा कृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद... माझी ही अत्यंत म्हणजे अत्यंत फेवरेट पा कृ आहे... :) तात्या.

व्वा..व्वा... रविवार सकाळी सकाळी मिपा उघडले आणि .....उघडले स्वर्गाचे द्वार... कोलंबी भाऽऽऽत...... खल्लास! नारळाच्या दुधाने कोलंबी भाताला खास राजेशाही चव येणार ह्यात शंका नाही. धन्यवाद.
तात्यांच्या विनंतीला मान देऊन...... साहित्यः १/२ किलो कोलंबी १/२ किलो तांदुळ ४-५ वाट्या नारळाचे दुध (साधारण २ नारळाचे) १ टी.स्पून तिखट २ टी.स्पून आले, लसुण पेस्ट ( १ इंच आले व ७-८ लसूण पाकळ्या) १वाटी तेल मसाला (४ लवंगा,२ दालचिनीचे तुकडे, ४ वेल्दोडे, १/२ टी.स्पून जिरे, २ तमाल पत्रे) १ टी.स्पून गरम मसाला १ टी.स्पून बडीशेप, १ टी.स्पून जिरे पावडर १.टी.स्पून हळद चवीनुसार मीठ १.तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. २.कोळंबी धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. ३.पातेल्यात तेल गरम करून त्यात वरील मसाला घालावा.

संडे स्पेशल ( कोंबडी वडे)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर 17/02/2008 - 10:19
ख ल्ला स..! तूर्तास इतकेच म्हणतो...! संतमंडळी म्हणतात, 'मनात मोह, माया. लोभ यांना थारा देऊ नका.' अहो पण या अश्या पा कृ वाचल्यावर कसं जमायचं हो हे?! :) असो.. स्वातीताई, तुमच्यामुळे आणि प्रभाकरपंतांमुळे मिपाचं स्वयंपाकघर दिससेंदिवस समृद्ध होत आहे एवढं मात्र खरं!... आपला, (तृप्त!) तात्या.

एकाच दिवशी कोलंबी भात आणि कोंबडी- वडे अशा दोन दोन फर्मास पाककृत्या दिल्यावर काय करावे बरे....? काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते.

नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती.
कोंबड्याच्या  तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या  पीसाचे आम्ही चाहते.
आपली पाककृती  " आमच्या  किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन.
बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी,  ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?

अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक.
आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची   टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(

डॉ. बिरुटे सर, वरील पाककृती दिली कारण मी जशी करते तशी पाककृती मी अगोदर दिली आहे तरी पण आता देत आहे. तशी केलीत तर मस्त टेस्ट येईल. १/२ किलो चिकन, २टे.स्पून तीळ,१ टे.स्पून खसखस,२ टे.स्पून सुके खोबरे,२ टे.स्पून ओले खोबरे,२+१ कांदे, १/२ टी.स्पून लसूण,१/४ टी.स्पून आले, १/४ टी.स्पून हळद, १ टी.स्पून गरम मसाला.२टी.स्पून तेल, मीठ चवीनुसार प्रथम खोबरे, तीळ्,खसखस, कांदे भाजून घ्यावे. आले,लसुण कोथिंबीर वाटून घ्यावे एका पातेल्यात तेल घालून १ कांद बारीक चिरून त्यात घालावा,नंतर तिखट घालावे व परतावे. नंतर वरील बारीक केलेल मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतणे.नंतर चिकन घालून शिजवणे.चवीनुसार मीठ घालणे. रस्सा जास्त पातळ नको.

प्राजु 19/02/2008 - 02:04
स्वाती.. 'मिसळपाव' म्हंटले की, केवळ कोल्हापूरी मिसळच आठवते तसेच मिसळपाव . कॉम म्हंटले की कोल्हापूरी पाककृतीच आठवायला लागल्या आहेत. इतकी मस्त रेसिपी दिली आहेस ना इथे.. काय सांगू? आता तात्याना, इथे कोल्हापूर दरबार नावाचा एक पाककृतींचा टॅग बनवायला सांगायला हवा. - (कोल्हापूरी मिरची) प्राजु

विसोबा खेचर 17/02/2008 - 10:19
ख ल्ला स..! तूर्तास इतकेच म्हणतो...! संतमंडळी म्हणतात, 'मनात मोह, माया. लोभ यांना थारा देऊ नका.' अहो पण या अश्या पा कृ वाचल्यावर कसं जमायचं हो हे?! :) असो.. स्वातीताई, तुमच्यामुळे आणि प्रभाकरपंतांमुळे मिपाचं स्वयंपाकघर दिससेंदिवस समृद्ध होत आहे एवढं मात्र खरं!... आपला, (तृप्त!) तात्या.

एकाच दिवशी कोलंबी भात आणि कोंबडी- वडे अशा दोन दोन फर्मास पाककृत्या दिल्यावर काय करावे बरे....? काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते.

नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती.
कोंबड्याच्या  तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या  पीसाचे आम्ही चाहते.
आपली पाककृती  " आमच्या  किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन.
बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी,  ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?

अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक.
आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची   टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(

डॉ. बिरुटे सर, वरील पाककृती दिली कारण मी जशी करते तशी पाककृती मी अगोदर दिली आहे तरी पण आता देत आहे. तशी केलीत तर मस्त टेस्ट येईल. १/२ किलो चिकन, २टे.स्पून तीळ,१ टे.स्पून खसखस,२ टे.स्पून सुके खोबरे,२ टे.स्पून ओले खोबरे,२+१ कांदे, १/२ टी.स्पून लसूण,१/४ टी.स्पून आले, १/४ टी.स्पून हळद, १ टी.स्पून गरम मसाला.२टी.स्पून तेल, मीठ चवीनुसार प्रथम खोबरे, तीळ्,खसखस, कांदे भाजून घ्यावे. आले,लसुण कोथिंबीर वाटून घ्यावे एका पातेल्यात तेल घालून १ कांद बारीक चिरून त्यात घालावा,नंतर तिखट घालावे व परतावे. नंतर वरील बारीक केलेल मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतणे.नंतर चिकन घालून शिजवणे.चवीनुसार मीठ घालणे. रस्सा जास्त पातळ नको.

प्राजु 19/02/2008 - 02:04
स्वाती.. 'मिसळपाव' म्हंटले की, केवळ कोल्हापूरी मिसळच आठवते तसेच मिसळपाव . कॉम म्हंटले की कोल्हापूरी पाककृतीच आठवायला लागल्या आहेत. इतकी मस्त रेसिपी दिली आहेस ना इथे.. काय सांगू? आता तात्याना, इथे कोल्हापूर दरबार नावाचा एक पाककृतींचा टॅग बनवायला सांगायला हवा. - (कोल्हापूरी मिरची) प्राजु
धोंडोपंत भाऊ यांच्या विनंती वरून ही रेसपी देत आहे. कोल्हापूर मध्ये ही वडा कोंबडा या नावाने ओळखतात.

मला आलेले एक स्वारस्यपूर्ण अग्रप्रेषित (Forward)

सृष्टीलावण्या ·

माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. का? आणि मग - स्केटिंग करणे, घोड्यावर बसणे, कडा चढून जाणे - का नको? छे, काहीतरीच!! मी तर म्हणेन की आजच्या काळात माणसाला खालील तीन गोष्टी आल्याच पाहिजेतः (कॉम्प्युटरवर) टायपिंग करणे, ड्रायव्हिंग करणे, आणि कमीतकमी स्वतःच्या पैशांचा जमाखर्च मांडता येणे! आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रात चहा घेउनच जा, जेवूनच जा असेच म्हणतात.... आणि ते पाळतातही... पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 17/02/2008 - 01:30
मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत डांबीसा,हे बाकी बरोबर बोललास.आमच्या पुण्यात अगदी लग्नाची पत्रीका द्यायला गेले तरी 'लग्नाला आल्यावर जेवणार का?' म्हणून विचारतात.मात्र ही सदाशिव पेठी संस्कृती.आमच्याकडे नाही हो! हवे तेव्हा घरी या,जेवल्याशिवाय सोडणार नाही. आपलाच, -इनोबा

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 18/02/2008 - 07:11
माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. मला असं वाटतं की ज्या काळात ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तो काळ, आणि भारताचा संदर्भ ह्या प्रमाणे तीनही मूलभूत गोष्टी योग्य वाटतात. किंबहुना मी ही ह्याच तीनही वाचलेल्या आठवतात. शिवाय आजच्या काळाला अनुसरून आपण म्हणता त्या तीनही वाढवायला हरकत नाही. आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. आता ह्याबाबत काय बोलावे? फक्त पुणे असे नाही तर इतरही ठिकाणी असं विचारणारी तर्‍हेवाईक माणसे मी पाहिली आहेत. चतुरंग

२) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात. ह्या ओळी जास्त आवडल्या.

धमाल मुलगा 18/02/2008 - 11:13
कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात. अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी! भारीच. इतरही चा॑गले. हे भाऊ म्हणजे एकदम भारी व्यक्तिमत्व दिसत॑य. -ध मा ल.

चंबा मुतनाळ 21/02/2008 - 06:37
आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावर काय पिंकीआज्जी म्हणणार का? -- हे मात्र पटले. भाऊंना दंडवत. बाकी सर्व वचने देखील उदबोधक आहेत

माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. का? आणि मग - स्केटिंग करणे, घोड्यावर बसणे, कडा चढून जाणे - का नको? छे, काहीतरीच!! मी तर म्हणेन की आजच्या काळात माणसाला खालील तीन गोष्टी आल्याच पाहिजेतः (कॉम्प्युटरवर) टायपिंग करणे, ड्रायव्हिंग करणे, आणि कमीतकमी स्वतःच्या पैशांचा जमाखर्च मांडता येणे! आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रात चहा घेउनच जा, जेवूनच जा असेच म्हणतात.... आणि ते पाळतातही... पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे 17/02/2008 - 01:30
मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत डांबीसा,हे बाकी बरोबर बोललास.आमच्या पुण्यात अगदी लग्नाची पत्रीका द्यायला गेले तरी 'लग्नाला आल्यावर जेवणार का?' म्हणून विचारतात.मात्र ही सदाशिव पेठी संस्कृती.आमच्याकडे नाही हो! हवे तेव्हा घरी या,जेवल्याशिवाय सोडणार नाही. आपलाच, -इनोबा

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 18/02/2008 - 07:11
माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. मला असं वाटतं की ज्या काळात ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तो काळ, आणि भारताचा संदर्भ ह्या प्रमाणे तीनही मूलभूत गोष्टी योग्य वाटतात. किंबहुना मी ही ह्याच तीनही वाचलेल्या आठवतात. शिवाय आजच्या काळाला अनुसरून आपण म्हणता त्या तीनही वाढवायला हरकत नाही. आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. आता ह्याबाबत काय बोलावे? फक्त पुणे असे नाही तर इतरही ठिकाणी असं विचारणारी तर्‍हेवाईक माणसे मी पाहिली आहेत. चतुरंग

२) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात. ह्या ओळी जास्त आवडल्या.

धमाल मुलगा 18/02/2008 - 11:13
कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात. अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी! भारीच. इतरही चा॑गले. हे भाऊ म्हणजे एकदम भारी व्यक्तिमत्व दिसत॑य. -ध मा ल.

चंबा मुतनाळ 21/02/2008 - 06:37
आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावर काय पिंकीआज्जी म्हणणार का? -- हे मात्र पटले. भाऊंना दंडवत. बाकी सर्व वचने देखील उदबोधक आहेत
लेखनविषय:
दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिला खेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकर यांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्र वाचन सर्वांगीण आहे. दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेक संतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे - १) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. २) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.