यादों की बारात !
'स्वाती राजेश' ह्यांनी आज सुरू केलेला 'शाळेतील गमती जमती' हा धागा पाहिला आणि शाळकरी जीवनातल्या आठवणींबद्दल मी लिहिलेली एक कविता इथे द्यावं असं वाटलं :)
----------------------------------
काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे....
सकाळ, दुपार, संध्याकाळ..वेगवेगळ्या तासांचे
आनंद, कंटाळा, मस्ती अशा भाव आणि भावनांचे
गणिताच्या पायाचे, कवितेच्या झुल्यांचे
जीव-भौतिक-रसायनच्या इति-भूगोल-नाशाचे... १
टोपणनावांनी हाक मारून सगळ्यांना बोलवायचे
दंगा-मस्ती करताना तहान-भूक विसरायचे
तसे निरागस होते दिवस पण बिलंदरही बनायचे
गृहपाठ नाही केला तर, "वही विसरलो" सांगायचे...२
पाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे
'लहानपण देगा देवा', अग्गदी खोटं वाटायचे
चांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे
तीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे...३
मधल्या सुट्टीचे खेळ, आधीच्या तासांना ठरवायचे
रडीचा डाव खेळला तर कडकडून भांडायचे
सुट्टी संपण्याआधी मात्र सगळं विसरून जायचे
आपल्या डब्यांची बिनधास्त वाटावाटी करायचे... ४
आवडीच्या तासाला अगदी मनापासून रमायचे
नाटकाच्या तालमींना सगळ्यांआधी पोचायचे
मुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे..पण
अर्ध्या कळत्या वयातले स्वप्नं रेशमी गुंफायचे... ५
किती धन गोळा करतोय, तेव्हा नाही समजायचे
अजून काय घेऊ शकू, तेही नाही उमगायचे
पण खरंच....काय दिवस होते ना शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे...
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे... ६
----------------------------------
माझा ब्लॉगः www.atakmatak.blogspot.com
----------------------------------
बालपणा सदैव नटवायचं असतं आणि शाळा
अगदी अगदी...
तसे निरागस
थोड्या
छान कविता
मस्त
पाठीवरच्य