मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****

छोटा डॉन ·

भाग्यश्री 12/06/2008 - 07:31
मला लेख खूपच आवडला..! खरं सांगते इतका विचार मी कधी केला नव्हता.. अर्थात इथे(अमेरिकेमधे) आल्यापासून मला बर्‍याचदा असे वाटते की, या या गोष्टी आपल्याकडे यायला पाहीजेत,सुधारणा व्हायला पाहीजे अमुक गोष्टीत... किंवा तुलना सारखीच होत असते.. बाकी कितीतरी गोष्टींमधे भारत पुढे असला , "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरी, "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" हे अगदी पटते.. हे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत अजुनही.. आणि ते सुटल्याखेरीज संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.. त्यासाठी काय केले पाहीजे हे मात्र मला उमगत नाही.. मला वाटते आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामानाने कमी रिसोर्सेस हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.. त्यासाठी पहीला उपाय केला पाहीजे.. लोकसंख्येला आळा घालणं.. चीनमधे हे प्रयत्न सरकारमार्फत चालू असतात असे वाचले होते.. चु.भु.द्या.घ्या.. असो.. छान लिहीलयंस.. मला राजकारण आणि ई. गोष्टींमधलं फार कळत नाही,तुझा लेख वाचून पहील्यांदा नीट बसून विचार केला.. विचार करावासा वाटला..आता इतरांची मते वाचायला आवडतील.. http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर 12/06/2008 - 07:49
डॉनराव, अभ्यासपूर्ण भाष्य असलेला अतिशय सुरेख लेख! तुझं खरंच कौतुक वाटतं! मला विचारशील तर लोकसंख्यावाढीचा भयानक कॅन्सर सध्या भारताला गिळू पाहात आहे, त्याला प्रथम युद्धपातळीवर आळा घातला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतु जोपर्यंत हा कॅन्सर आपण थोपवू शकत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. उलट दिचसेंदिवस परिस्थिती अजूनच कठीण होईल! तात्या.

राजे 12/06/2008 - 09:24
तुलनात्मक जगने व व्यवहारीक जगणे ह्यात खुप मोठा फरक आहे... ! "वन नेशन " एक देश ही संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीला नविन नाही.... ईतिहासामध्ये अनेकवेळा अनेक राजे महाराजांनी भारत देशाला आपल्या आधिपत्यामध्ये आणले... पण ख-या अर्थाने स्वराज्य हे १९४७ नंतर मिळाले. पहले दहा वर्ष आपण देश कसा उभा करायचा घ्यात खर्ची पडले.... पुढील दहा वर्ष लढाया व हरीतक्रांती मध्ये गेली... पुढील दहा वर्षे आपण विविध छोटे-मोठे आनंदोलन व अगलाववाद निपटवण्यात खर्ची घातली...पुढील वीस वर्षे आपण राजकीय अस्थीरते मुळे व्यर्थ घालवली.... त्याची मुख्य कारणे होती... पंजाब मधील आतंकवाद... आयोध्या प्रकरण... मुंबई ब्लास्ट.. दंगे... नेत्यांची आपसी दुश्मनी... पण आपण खुप काही कमवले.. .. ह्या मताशी मी पुर्ण सहमत नाही आहे... महागाईवर आपला अजून अंकुश नाही आहे... पावसावर आधारीत आपलि शेती व्यवस्था नष्ट झाली व जमीनीतील पाण्यावर पोसली जाणारी व अनेक रसायनांचा मारा झेलणारी शेती व्यवस्था आपण उभी केली.. त्याची फळे आज तुर्त दिसत नसतील ही पण येत्या काही वर्षामध्ये दिसतील... प्रचंड प्रमाणामध्ये आपण झाडे तोडली त्याचा ही त्रास पुढे (आज) होत राहील व होत आहे.... भाषीक राजनीती अजून ही आपली मुळे घट पकडून आहे.. व त्याला राजनेते रोज खतपाणी घालतच आहेत्...गरीबी रेखे खाली जवळ जवळ ४०% भारतीय समाज राहतो ह्याची खरंतर लाज वाटावयास हवी... मागे कोठेतरी वाचले होते की जवळ जवळ ७०% मुले व मुली ७वी नंतर शिक्षण सोडून देतात अथवा परिस्थीतीमुळे सोडावे लागते.... पुर्ण रस्ते अजून ही नाही आहेत.. दुरवर माहीत नाही.. पण दिल्ली जवळील (७५ कीमी च्या आसपास) अनेक गावे व कसब्बे आहेत जेथे रस्ते नाही आहेत... मग नागालॅड व मिजोरोम ... येथे काय हाल असावा ?? भारतामध्ये फक्त ७% टक्केच रस्ते चारपदरी आहेत. रेल्वे चा जो रोज गाजावाजा होत आहे त्याचे देखील आकडे काही खुपच चांगले नाही आहेत... फुगा आहे लवकर फुटेल (६०%च्यावर रेल्वे गाड्या जुन्या व र्जजर हालत मध्ये आहेत... ही अवस्था आहे आपल्या वन नेशन ची !! सगळेच चित्र काही भीतीदायक नाही व सगळेच काही आशावादी नाही... पण विचित्र समतोल साधण्याची कला आपण भारतीयांना जन्मापासूनच विरासत द्वारे मिळत राहतो व आपण व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत जिवन जगत जातो... एखादे पुस्तक / चित्रपट येतो व आम्हाला काही क्षण अस्वस्थ करुन जातो.... मेरा भारत महान !!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

ऋचा 12/06/2008 - 10:08
विचार करायला लावणारा लेख आहे. खरं तर आधी प्रत्येकाने स्वतःला सुधारलं पाहीजे. नेहमी दुसर्‍याला नावं ठेवून पुढे कसं जाता येईल? अजुनही काही ठीकाणं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी झगसावं लागत आहे. "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरीही अजुनही लोकांना अन्नाची भ्रांत आहे. इतकं असुनही "मेरा भारत महान आहे".. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक 12/06/2008 - 11:52
डॉन भाए अतिशय समयोचीत लेख !! 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नन्तर खरोखर अस्वस्थ होते (अविनाश धर्माधिकारीं बरोबर चर्चा करण्याचा २/३ वेळा योग आला ) माझ्या मते 'भाषावार प्रान्तरचना ही चूक भारताला महाग पडते आहे (|: ह्या सगळ्या समस्यान्वर कही उपाय नक्की आहेत , भारताला विचरवन्त नाही तर प्रत्यक्षात क्रूती करण्यची गरज आहे . आणी सूरवात स्वतापसून करायला पाहिजे सरकार कहीतरी करेल ह्यावर विसम्बून रहाण्यात कोणचेच भले नाही आपण तथाकथीत बूद्धीजीवि वर्गाने आपल्या हस्तीदन्ती मनोरया मधुन बाहेर पडायला पाहीजे मजेदार विदुषक

काळा_पहाड 12/06/2008 - 14:40
छोटा डॉनचे मनःपुर्वक अभिनंदन. 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नंतर अस्वस्थ होत नसल्यास वाचणाय्राने आपल्या संवेदनशीलतेविषयी चिंता करावी अशीच ती 'डायरी' आहे. मात्र डॉनने मांडलेले विचारही त्याच्या विचारशील मनाची ग्वाही देतात. इंडीया-दी वन नेशन याविषयी मला असे वाटते की भारतीयांना तर्कशीलता व विचारक्षमता या गोष्टींत प्रगती साधली पाहिजे. हा उपाय योजण्यास फार मोठ्या कालावधीची आवश्यकता आहे हे मान्य. पण इतर उपाय फक्त मलमपट्टीचेच काम करतात. काळा पहाड

आनंदयात्री 12/06/2008 - 15:04
विचार करायला लावणारा लेख. काही गोष्टी अश्या असावाश्या वाटतात,
  1. कायद्याने धर्म-जात पुर्णपणे वैयक्तिक गोष्ट ठरवली पाहिजे, म्हणजे जातीआधारित आरक्षण पुर्ण पणे रद्द करायला हवे.
  2. निदान १०वी पर्यंतचे शिक्षण सगळ्या शाळांमधे पुर्णपणे मोफत असावे. (मुलगा मुलगी दोहोंसाठी)
  3. शिक्षण इंग्रजीत असावे.
  4. सरकारी कामकाजाची भाषा इंग्रजी असावी.

शितल 12/06/2008 - 17:52
डॉन, तु खुपच छान ज्वल॑त लिहिले आआहेस. भारत हा आज आतुन पोखरला गेला आहे, ते ही जाती सारख्या गोष्टीनी तर त्या॑चे क॑बरडे मोडले आहे. आणि आन॑दयात्री म्हणतो ते तर १००% बरोबर. असेच जर केले तर भारतात पुढच्या पिढ्या॑ना जगणे शक्य आहे नाही तर भावी पिढीचे भविष्य अधा॑रमय आहे.

विकास 12/06/2008 - 19:57
लेख आवडला. "अस्वस्थ दशकाची डायरी" काही वर्षांपूर्वी वाचले होते तसेच धर्माधिकारींना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. हे सर्वकाही आठवले. लेख मोठा असल्याने आणि त्यातील मुद्दे तळमळीने मांडलेले असल्याने कदाचीत एकापेक्षा जास्त प्रतिसादात जसे सुचेल तसे लिहीनः "देश आणि राष्ट्र" ह्या दोन विभिन्न संकल्पना आहेत असे वाटते. युरोपिअन (आणि नंतर अमेरिकन) पद्धतीप्रमाणे अधुनिक देश म्हणून बहुतांशी भारत जरी १९४७ ला स्वतंत्र झाला असला (काही भाग नंतर आला, उ.दा. गोवा), तरी संस्कृतिक राष्ट्र म्हणून भारत प्राचिन काळापासून एक होते आणि तसे भारतीय मनात दडलेले (सबकॉन्शस माईंड) असते - विशेष करून जर त्यात आपण पाश्चात्यांच्या नजरेतून न पहाता स्वतःच्या स्थानिक पाहीले तर. याचे कारण इतकेच की पाश्चात्य जेंव्हा आपल्याकडे पहातात (आणि तेच थोड्याफार फरकाने आपण इतर संस्कृतीकडे पहातो) तेंव्हा आपली "फ्रेम ऑफ रेफरन्स" ही आपली पद्धत / संस्कृती इत्यादी असते. दोन प्राचीन ऐतिहासीक उदाहरण पहा: १. चाणक्य - आत्ताच्या पाकीस्तानातील भागात जन्म अथवा केरळात (कुणाचे वाचता यावर अवलंबून) पण बाहेरून या भारतवर्षावर येणार्‍या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी राजा शोधला कुठे तर आत्ताच्या बिहार मधे. २. आदी शंकराचार्य - हिंदू धर्मातील तत्वांना बांधून त्याप्रमाणे कायमस्वरूपी आजच्या भाषेत "थिंक टँक" (पॉवर सेंटर नाही) आणि अर्थातच तत्कालीन भाषेत मठ स्थापले - ते कुठेतर भारताच्या चार दिशांमधे त्यात स्वतःची जन्मभूमी केरळ नाहीच. जर भारत एक राष्ट्र नव्हते तर या दोन महान विभूतींना असे करावेसे का वाटले असते? आता जरा फास्ट फॉरवर्ड करा: १८५७ चे स्वातंत्र्यसमर - दिल्लीचे तख्त हे हिंदूस्थानचा बादशहा - बहाद्दूर शहा जफर असे मान्य करायला तत्कालीन स्वातंत्र्य योद्धे का तयार झाले? कारण तो पर्यंत बहाद्दूर शहा जफर हा अनेक पिढ्यांनी भारतीय झाला होता आणि ब्रिटीश बाहेरून येऊन सत्ता गाजवत होते. त्याही पुढे आले आणि पूर्वेतील वंगभंगा विरुद्धची चळवळ ही पश्चिमेकडील टिळकांनी चालू करण्यात योगदान दिले. ह्या सर्व गोष्टी जर भारत "वन नेशन" नसते तर होऊ शकल्या असत्या असे वाटते का? ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? या संदर्भात मला इतकेच सांगावेसे वाटेल की आज जेंव्हा हिंदू माणूस/संघटना/पक्ष काहीही जेंव्हा धर्मांध वाटू शकेल अथवा तसे ते प्रत्यक्षात असेल असे समाजात बोलतात/वागतात तेंव्हा तमाम हिंदू विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती त्याचा जाहीर निषेध करतात, टिका करतात - त्यातील कुठली योग्य कुठली अयोग्य हे वादाचे मुद्दे राहू शकतील पण मुद्दा इतकाच की आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचा जाहीर निषेध करायला हिंदू विचारवंत आणि समाजमान्य व्यक्ती मागेपुढे पहात नाहीत. पण हे चित्र आपल्याला इतर धर्मांतील विचारवंत/प्रतिष्ठीत व्यक्ती स्वतःच्या धर्मातील धर्मांधते विरुद्ध बोलताना दिसतात का? सानिया मिर्झाला जर तिच्या धर्मगुरू/बंधूंवर होणारे हल्ले व्यथित करत असतील तर तेच धर्मगुरू/बंधू तिच्या विरुद्ध बोलतात तेंव्हा तिला काय वाटत असेल याचा विचार पण ती करते का हा देखील प्रश्न आहे. हिंदूमूलतत्ववादाविरुद्ध आवाज करणारी शबाना (अगदी त्यातून अप्रत्यक्षपणे लता पण सुटली नाही ) आणि तीचा नवरा जावेद अख्तर हे तीच्या नेल्सन मंडेला प्रसंगावरून जो तिच्याच धर्मगुरूंनी थयथयाट केला तेंव्हा मात्र काही बोलल्याचे ऐकले नाही. तेंव्हा अशा व्यक्तींना आपण म्हणजे "परधर्मिय" हिंदू हे उपरे नसतो तर भारतीय म्हणून आधार असतो. कारण त्यांचे नशिब म्हणून त्या भारतीय आहेत - त्यांच्या धर्माच्या धर्माधारीत देशवासीय नाहीत...थोडक्यात आपण लिहीले आहे तितका हा प्रश्न सरळ नाही त्याला विविध छटा आहेत. बाकी नंतर जसे सुचेल तसे.... धन्यवाद.

मुक्तसुनीत 12/06/2008 - 20:10
मूळ लेख आणि विकासराव यांची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी आवडल्या. मूळ लेखामधली "भारलेपणाची" , ओतप्रोत भरून लिहील्याच्या भावनेची जाणीव अगदी ठळकपणे जाणवते. धर्माधिकारी यानी जो झंझावाती दौरा केला; त्यात जे जे पाहिले नि नोंद केले त्या सगळ्या उर्जेने "डॉन" याना भारून टाकले आहे यात शंका नाही. आपल्या स्फुटामधे त्यानी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. विकासरावांनी म्हण्टल्याप्रमाणे , यातील अनेक गोष्टींचा सुटेपणाने परामर्श घेणे योग्य. या दृष्टीने , खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता आणि या सार्‍यांचे जटिल मुद्दे एका लेखातून आणि काही फुटकळ प्रतिक्रियातून कवेत घेणे अशक्यप्राय आहे. या गोष्टींकडे एकत्र पाहू गेल्यास माझ्यासारख्याचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. (विकासराव , वाचताय ना ? :-) )

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 12/06/2008 - 21:14
मी जेव्हा लेख लिहयला घेतला तेव्हा तो फक्त "वन नेशन" ह्यावर लिहायचा माझ्या मनात होते व त्याच्या अनुषंगाने फक्त "प्रादेशिक अस्मिता" हा प्रश्न हाताळायचा होता. पण लिहण्याच्या व विचाराच्या प्रवाहात असे लक्षात आले की फक्त "प्रादेशिक नव्हे तर धार्मीक आणि जातीय" अस्मितांचा पण "वन नेशन" बनवण्यात मोठा रोल आहे, तेव्हा ओघाने हे मुद्दे पण शक्य तितक्या "कमी शब्दात" लिहले. पण आपले म्हणणे बरोबर आहे, "वन नेशन, प्रादेशिक अस्मिता, जातीय अस्मिता व धार्मीक अस्मिता ह्या बाबी वेगवेगळ्या चर्चेला घेता येतील. मी त्या दॄष्टीने अभ्यास व तयारी सुरु करतो म्हणजे आपल्याला चर्चेला सोपे जाईल... बाकी अनेक बाबी मला फिल्टर कराव्या लागल्या की ज्यांचा समावेश हा "पर्सनल व्यक्तींशी व काही संवेदनाशील मुद्द्यांशी" होता. आता पुढच्या लेखनात "त्या बाबी" याव्या की नको याबद्दल मार्गदर्शन हवे ... काही मुद्दे सध्या "वादग्रस्त" असल्याने "अनावश्यक" वादंग नको म्हणून मी टाळले, आता पुढील लेखात काय करु ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

विकास 12/06/2008 - 21:43
खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. हा योग्य सल्ला आहे. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. या संबंधी आत्ता जास्त लिहीता आले नाही तरी थोडे लिहीतो.: टिळकांना बलोपासना अतिशय महत्वाची वाटायची. कॉलेजात असताना एक मुलगा कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेताना दिसल्यावर ते ओरडले, असले कसले शरीर सांभाळायचे? त्या ऐवजी व्यायाम करून शरीर संपदना कर. आज विचार करा जर व्यायाम न करता केवळ आर्टीफिशल हरमोन्स घेउन कोणी तगडे होयचे ठरवले तर तसे होऊ शकेल का? उत्तर आहे नाही... त्याचा कदाचीत थोडाफार कॅटॅलीस्ट सारखा उपयोग होऊ शकेल पण ते उत्तर नाही... तसेच काहीसे हे समाजपुरूषाबद्दल आहे असे म्हणूया ना. म्हणजे असे की बाहेरील विचारवंत हे कॅटॅलिस्ट होउ शकतील पण आतून होणारा बदल हा त्या समाजपुरूषातील हालचालींनी / व्यायामानेच होणार. मगासच्या प्रतिसादात मी सानीया आणि शबाना वर लिहीले. ते लिहीताना निव्वळ निरीक्षण होते, त्यांच्या विरुद्ध आकस नव्हता/नाही. पण जर मुसलमानसमाज हा जर बदलायचा असेल, अधुनीक होणे महत्वाचे असेल तर त्यासाठीचे बदल हे आतून घडणे महत्वाचे नाही का? विचार करा, जर राजा राम मोहन रॉय, आगरकर, म. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, सावरकर आदी हिंदू पुढार्‍यांनी हिंदू धर्मावर कोरडे ओढले नसते तर आज आपण ही फार वेगळे झाले असतो का? जे धर्माधारीत समाजाचे तेच राष्ट्राधारीत समाजाचे म्हणजे या संदर्भात भारताचे. प्रश्न अनेक आहेत आणि ते समांतर पद्धतीने सोडवण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जण पूर्णवेळ देऊ शकणार नाही पण स्वतःचे कर्तव्य समजून जे काही चांगले करता येईल ते करायला पाहीजे त्यात हातभार लागणे महत्वाचे वाटते. पण त्यासाठी स्वतःला दिशा मिळणे आणि स्वतःला आवडेल असे काम करायला मिळणे हे महत्वाचे आणि बर्‍याचदा सुरवातीला अवघड ठरू शकते. धर्माधिकारींनी अस्वस्थ दशकातून स्वतःची सुटका करताना आयएएस अधिकारीपदातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर वादविवाद होऊ शकतील पण तो त्यांचा स्वतःचा स्वतःसाठी विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. लोकसभेसाठी उभे रहाणे वगैरे झाल्यावर त्यातून हवा तो "राम" दिसत नसताना त्यांच्या लक्षात आले की अनेक समस्यांचे मूळ हे सरकार ज्या पद्धतीने चालते त्यात आहे. मग ते जर बदलायचे असतील तर पुढच्या पिढीतील सरकारी अधिकारी वेगळे असायला हवेत. त्यासाठी चाणक्यचा वारसा आठवून नवीन विचारी पिढी उभी केली गेली पाहीजे. म्हणून मग त्यांनी चाणक्य मंडळ स्थापले त्यातून स्पृहणीय आकड्याने (आत्ता आठवत नाही पण नंतर सांगू शकेन) आज अनेक जण एमपीएससी आणि आयएएस मधे जात आहेत. त्याच बरोबर लोकशिक्षणाचे कार्यपण जोरात चालले आहे. थोडक्यात आतुन बदल घडवत आहेत. असे अनेक जण अनेक संस्था आहेत. एखादा मुद्दा मन लावून हातात घेतात आणि त्यावर काम करतात. यात सर्व धर्माचे आहेत, सर्व विचारसरणीचे आहेत. जो पर्यंत असे काम करत असताना स्पर्धात्मक होते पण द्वेषमुलक होत नाही तो पर्यंत ठिक असते. पण जर एकमेकांचा (धर्म/विचारसरणीमुळे) द्वेष चालू केला तर तो त्या कार्याच्या नाशाला आणि समाजपुरूषाच्या जडणघडणीला मारक ठरतो. या संदर्भात एक आठवण सांगतो: भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी ती सांगितली होती - ६० च्या दशकात भारतीय तत्वज्ञानाच्या/संस्कॄतीच्या दृष्टीकोनातून (आयात केलेल्या विचाराने नाही) कामगारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी भामस स्थापण्याचे ठरवले. तेंव्हा कम्युनिस्टांचा जोर मोठा होता. प्राथमिक बैठकीत त्यांनी हजर असलेल्या सदस्यांना प्रश्न विचारला की ,"तुमच्यातील किती जणांना कम्यूनिस्टांना उपटून काढायचे आहे?" त्यावर काही जणांनी ताबडतोब हात वर केला. त्यांना उद्देशून दत्तोपंत म्हणाले की ,"मग तुम्ही इतरत्र जा. ही संस्था फक्त सकारात्मक काम करायला काढली आहे. इतरांचा द्वेष करायला अथवा इरीशिरीने नाही. राहता राहीला कम्यूनिझमचा प्रश्न... ती विचारसरणी पुढच्या ३० वर्षात जगातून निघून जाणार आहे त्यांना घालवण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका". ती भामस नंतर नावारूपाला आली, कम्युनिस्ट चायना आणि कॅपीटॅलीस्ट अमेरिकन सरकारने दत्तोपंतांना बोलावले होते वगैरे... पण मूळ मुद्दा इतकाच की काही तरी काम तयार करून मन लावून करणे, तसे जमत नसेल (सर्वांना शक्यच नाही आणि गरज पण नाही) तर निदान अशा कामात काहीतरी मदत करणे - ह्याने गोष्टी हळू हळू बदलतात. टिळकांना स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळणार नाही याची खात्री होती, तसे ते म्हणायचे देखील. तरी देखील भारतीय राजकारण आणि ब्रिटीशांच्या विरुद्धचा लढा तयार करण्यात योगदान दिले. तेंव्हा ही कामे घाईने करायची नसतात, ताबडतोब फळ मिळेल या अपेक्षेने करायची नसतात तर सातत्याने करायची असतात. दत्तोपंतांना कोणी स्वाक्षरी आणि संदेश देयला सांगीतले की ते जे लिहीत तो या सर्व शब्दबंबाळ लिहीण्याचा मतितार्थ आहे. ते फक्त स्वाक्षरीबरोबर लिहायचे, "patience pays".

छोटा डॉन, एक राष्ट्र संकल्पनेच्या निमित्ताने केलेला अस्वस्थ डायरीचा उहापोह आवडला. लेख वाचल्यानंतर असंख्य प्रश्नांनी अस्वस्थ केले, अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे, अशी घालमेल मनात झाली. मुळ लेखांबरोबर अनेक प्रतिसादही आवडले. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता हे आणि इतर अनेक प्रश्नांचा वेध घेणे कठीन वाटते. अजूनही लेखातील काही मुद्यांवर विवेचन करता आले असते असे वाटले, असो, मुळ लेखांबरोबर विकासरावांचे प्रतिसादही आवडले. डॉन भाय, विचार करायला लावणारे असेच लेखन येऊ दे !!!

सहज 13/06/2008 - 07:44
लेख आवडला. वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे मुळ लेखातील सर्व मुद्यांचा एकत्रीत विचार करण्याऐवजी "शांत डोक्याने" एकेका मुद्द्यावर ही चर्चा सुरु रहावी असे वाटते.

छोटा डॉन यांचा मूळ लेख उत्तम, त्यावरच्या विकास यांच्या दोन्ही प्रतिक्रिया आवडल्या... .... खूप मोठा विषय आहे , त्यामुळे एकदम काय लिहावे , कुठून सुरुवात करावी सुचत नाहीये.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

hsodaye 13/06/2008 - 10:51
लेख आवडला, मुद्दयावर चर्चा चागलि गोष्ट आहे, पण देशामधे या वाइट गोष्टिना आपणच खत देतो. या सर्व गोस्टि घालवण्यासाठि आपण आयुष्यात काय केले हे चचेपेक्श्या जास्त मह्त्वाचे. दुसर्याकडे बोट दाखवताना तिन बोटे आपल्याकडे असतात हे देशबाधवाना कळ्णे ज्ररुरि आहे.

आजानुकर्ण 15/06/2008 - 19:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. आपला, (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/06/2008 - 21:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. ते झाले तुमचे विचार थोडक्यात "तुम्हाला तसे" वाटते... इतरांना तसे वाटत असेलच अशातला भाग नाही आणि आपण तसा हट्ट करत नसावात अशी आशा करतो. बाकी छोटा डॉन चा मूळ लेख हा ते पुस्तक वाचल्यावर जे काही "भारतात आजच्या काळात जे चालते आहे" त्या बद्दल वाटत गेले त्या संदर्भातील होता. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. आज भारतात धार्मिक, जातीय आणि प्रादेशीक अस्मितेचा जो गैरवापर होतो त्याबद्दलचा उहापोह करणारा तो लेख होता - पुस्तक परीक्षण नव्हते हे जे कोणी नेहमी पुस्तके वाचते त्यांना सहज समजू शकेल... पण त्या बद्दल काही बोलावेसे न वाटणे आणि चष्मे वापरत तिरस्काराची भाषा लिहीणे हे आपल्यासारख्या वाचका कडून होताना पाहून खेद वाटला... व्यक्ती तितक्या प्रकृती असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे पण प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का?

मुक्तसुनीत 15/06/2008 - 21:51
मला 'कर्ण यांना सुचवावेसे वाटते की , त्यांनी आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ काही लिहावे , थोडे दाखले द्यावेत. धर्माधिकारी यानी नव्वदीच्या दशकामधे भाजप चे तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे. परंतु पुस्तक १९८७ च्या आधीचे/त्या सुमाराचे आहे. मला आता नेमके संदर्भ आठवत नाही , पण पुस्तकात त्यानी आपल्या स्वत:च्या राजकीय प्रवासाचे - उथळ उपहासाकडून समजून घेण्याच्या भूमिकेकडे जाण्याचे - जे वर्णन केले ते मला त्या काळात हृदयस्पर्शी वाटले होते इतके आठवते. पुस्तक एकांगी असू शकते , पूर्वग्रहदूषितसुद्धा. पण "भंपक" म्हणून त्याची वासलात लावायच्या आधी थोडी मीमांसा आवश्यक आहे. अजानुकर्ण एक अभ्यस्त, जबाबदार सदस्य आहेत. त्यांची अनेक पोस्ट्स् माहितीपूर्ण असतात. मतेमतांतरे कितीही झाली एरवी त्यांचे लिखाण भरपूर दाखले-पुरावे-मुद्दे-मीमांसा यांनी परिपूर्ण असतात. या खेपेला सुद्धा त्यानी तसे करावे.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 17/06/2008 - 11:17
"आजानुकर्णसाहेब" आपल्यासारख्या हुशार व अभ्यासू माणसाने २ ओळीत पुस्तक हे एकांगी व भंकस आहे हे म्हणणे हे आपल्या इमेजनुसार नाही ... आपण डितेलमध्ये लिहा आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते ... बाय द वे, मी काही "पुस्तकाचे परिक्षण" वगैरे लिहलेले नाही, अशा पुस्तकांचे परिक्षण लिहणारे आम्ही कोण ??? असो. आपले अभ्यासपुर्ण व संदर्भ स्पष्ट करणारे विवेचन वाचायला आवडेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का? सहमत आहे. 'बुद्धीवाद्यांनी विचारकलहास घाबरु नये, वाटेल त्याच्यावर मते व्यक्त करावीत. पण हे भंकप आहे, म्हणुन थांबू नये असे वाटते. त्याच्यातला भंपकपणा आपण दाखवावा वाचायला आवडेल. जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक प्रश्नात भारतीय माणूस गुरफटून गेला आहे. त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे, किमान प्रयत्न तरी लेखाच्या निमित्ताने झाला पाहिजे असे वाटते. अवांतर : शेषराव मो-यांचे 'विचारकलह' चाळत होतो. त्यात' कुरुंदकरांनी राजकारण हे धर्माच्या जुनाट चौकटीतून चालते असे म्हटल्यावर त्यांचे विवेचन कोणाला तरी सेक्युलर म्हणुन दाखवायचे होते का ? त्याचा परखड समाचार पळशीकर, शेषराव मोरे घेतात. ते विवेचन वाचण्यासारखे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झंप्या 17/06/2008 - 09:05
आमचा डॉन्या असली वैचारीक पुस्तके वगैरे वाचतो हाच धक्का आहे. तसेही लेखापेक्षा काही प्रतिसादच जास्त आवडले ह्या बाकिच्यांच्या म्हणण्याशी सहमत आहोत. :)

भाग्यश्री 12/06/2008 - 07:31
मला लेख खूपच आवडला..! खरं सांगते इतका विचार मी कधी केला नव्हता.. अर्थात इथे(अमेरिकेमधे) आल्यापासून मला बर्‍याचदा असे वाटते की, या या गोष्टी आपल्याकडे यायला पाहीजेत,सुधारणा व्हायला पाहीजे अमुक गोष्टीत... किंवा तुलना सारखीच होत असते.. बाकी कितीतरी गोष्टींमधे भारत पुढे असला , "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरी, "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" हे अगदी पटते.. हे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत अजुनही.. आणि ते सुटल्याखेरीज संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.. त्यासाठी काय केले पाहीजे हे मात्र मला उमगत नाही.. मला वाटते आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामानाने कमी रिसोर्सेस हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.. त्यासाठी पहीला उपाय केला पाहीजे.. लोकसंख्येला आळा घालणं.. चीनमधे हे प्रयत्न सरकारमार्फत चालू असतात असे वाचले होते.. चु.भु.द्या.घ्या.. असो.. छान लिहीलयंस.. मला राजकारण आणि ई. गोष्टींमधलं फार कळत नाही,तुझा लेख वाचून पहील्यांदा नीट बसून विचार केला.. विचार करावासा वाटला..आता इतरांची मते वाचायला आवडतील.. http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर 12/06/2008 - 07:49
डॉनराव, अभ्यासपूर्ण भाष्य असलेला अतिशय सुरेख लेख! तुझं खरंच कौतुक वाटतं! मला विचारशील तर लोकसंख्यावाढीचा भयानक कॅन्सर सध्या भारताला गिळू पाहात आहे, त्याला प्रथम युद्धपातळीवर आळा घातला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतु जोपर्यंत हा कॅन्सर आपण थोपवू शकत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. उलट दिचसेंदिवस परिस्थिती अजूनच कठीण होईल! तात्या.

राजे 12/06/2008 - 09:24
तुलनात्मक जगने व व्यवहारीक जगणे ह्यात खुप मोठा फरक आहे... ! "वन नेशन " एक देश ही संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीला नविन नाही.... ईतिहासामध्ये अनेकवेळा अनेक राजे महाराजांनी भारत देशाला आपल्या आधिपत्यामध्ये आणले... पण ख-या अर्थाने स्वराज्य हे १९४७ नंतर मिळाले. पहले दहा वर्ष आपण देश कसा उभा करायचा घ्यात खर्ची पडले.... पुढील दहा वर्ष लढाया व हरीतक्रांती मध्ये गेली... पुढील दहा वर्षे आपण विविध छोटे-मोठे आनंदोलन व अगलाववाद निपटवण्यात खर्ची घातली...पुढील वीस वर्षे आपण राजकीय अस्थीरते मुळे व्यर्थ घालवली.... त्याची मुख्य कारणे होती... पंजाब मधील आतंकवाद... आयोध्या प्रकरण... मुंबई ब्लास्ट.. दंगे... नेत्यांची आपसी दुश्मनी... पण आपण खुप काही कमवले.. .. ह्या मताशी मी पुर्ण सहमत नाही आहे... महागाईवर आपला अजून अंकुश नाही आहे... पावसावर आधारीत आपलि शेती व्यवस्था नष्ट झाली व जमीनीतील पाण्यावर पोसली जाणारी व अनेक रसायनांचा मारा झेलणारी शेती व्यवस्था आपण उभी केली.. त्याची फळे आज तुर्त दिसत नसतील ही पण येत्या काही वर्षामध्ये दिसतील... प्रचंड प्रमाणामध्ये आपण झाडे तोडली त्याचा ही त्रास पुढे (आज) होत राहील व होत आहे.... भाषीक राजनीती अजून ही आपली मुळे घट पकडून आहे.. व त्याला राजनेते रोज खतपाणी घालतच आहेत्...गरीबी रेखे खाली जवळ जवळ ४०% भारतीय समाज राहतो ह्याची खरंतर लाज वाटावयास हवी... मागे कोठेतरी वाचले होते की जवळ जवळ ७०% मुले व मुली ७वी नंतर शिक्षण सोडून देतात अथवा परिस्थीतीमुळे सोडावे लागते.... पुर्ण रस्ते अजून ही नाही आहेत.. दुरवर माहीत नाही.. पण दिल्ली जवळील (७५ कीमी च्या आसपास) अनेक गावे व कसब्बे आहेत जेथे रस्ते नाही आहेत... मग नागालॅड व मिजोरोम ... येथे काय हाल असावा ?? भारतामध्ये फक्त ७% टक्केच रस्ते चारपदरी आहेत. रेल्वे चा जो रोज गाजावाजा होत आहे त्याचे देखील आकडे काही खुपच चांगले नाही आहेत... फुगा आहे लवकर फुटेल (६०%च्यावर रेल्वे गाड्या जुन्या व र्जजर हालत मध्ये आहेत... ही अवस्था आहे आपल्या वन नेशन ची !! सगळेच चित्र काही भीतीदायक नाही व सगळेच काही आशावादी नाही... पण विचित्र समतोल साधण्याची कला आपण भारतीयांना जन्मापासूनच विरासत द्वारे मिळत राहतो व आपण व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत जिवन जगत जातो... एखादे पुस्तक / चित्रपट येतो व आम्हाला काही क्षण अस्वस्थ करुन जातो.... मेरा भारत महान !!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

ऋचा 12/06/2008 - 10:08
विचार करायला लावणारा लेख आहे. खरं तर आधी प्रत्येकाने स्वतःला सुधारलं पाहीजे. नेहमी दुसर्‍याला नावं ठेवून पुढे कसं जाता येईल? अजुनही काही ठीकाणं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी झगसावं लागत आहे. "गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला, तरीही अजुनही लोकांना अन्नाची भ्रांत आहे. इतकं असुनही "मेरा भारत महान आहे".. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक 12/06/2008 - 11:52
डॉन भाए अतिशय समयोचीत लेख !! 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नन्तर खरोखर अस्वस्थ होते (अविनाश धर्माधिकारीं बरोबर चर्चा करण्याचा २/३ वेळा योग आला ) माझ्या मते 'भाषावार प्रान्तरचना ही चूक भारताला महाग पडते आहे (|: ह्या सगळ्या समस्यान्वर कही उपाय नक्की आहेत , भारताला विचरवन्त नाही तर प्रत्यक्षात क्रूती करण्यची गरज आहे . आणी सूरवात स्वतापसून करायला पाहिजे सरकार कहीतरी करेल ह्यावर विसम्बून रहाण्यात कोणचेच भले नाही आपण तथाकथीत बूद्धीजीवि वर्गाने आपल्या हस्तीदन्ती मनोरया मधुन बाहेर पडायला पाहीजे मजेदार विदुषक

काळा_पहाड 12/06/2008 - 14:40
छोटा डॉनचे मनःपुर्वक अभिनंदन. 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नंतर अस्वस्थ होत नसल्यास वाचणाय्राने आपल्या संवेदनशीलतेविषयी चिंता करावी अशीच ती 'डायरी' आहे. मात्र डॉनने मांडलेले विचारही त्याच्या विचारशील मनाची ग्वाही देतात. इंडीया-दी वन नेशन याविषयी मला असे वाटते की भारतीयांना तर्कशीलता व विचारक्षमता या गोष्टींत प्रगती साधली पाहिजे. हा उपाय योजण्यास फार मोठ्या कालावधीची आवश्यकता आहे हे मान्य. पण इतर उपाय फक्त मलमपट्टीचेच काम करतात. काळा पहाड

आनंदयात्री 12/06/2008 - 15:04
विचार करायला लावणारा लेख. काही गोष्टी अश्या असावाश्या वाटतात,
  1. कायद्याने धर्म-जात पुर्णपणे वैयक्तिक गोष्ट ठरवली पाहिजे, म्हणजे जातीआधारित आरक्षण पुर्ण पणे रद्द करायला हवे.
  2. निदान १०वी पर्यंतचे शिक्षण सगळ्या शाळांमधे पुर्णपणे मोफत असावे. (मुलगा मुलगी दोहोंसाठी)
  3. शिक्षण इंग्रजीत असावे.
  4. सरकारी कामकाजाची भाषा इंग्रजी असावी.

शितल 12/06/2008 - 17:52
डॉन, तु खुपच छान ज्वल॑त लिहिले आआहेस. भारत हा आज आतुन पोखरला गेला आहे, ते ही जाती सारख्या गोष्टीनी तर त्या॑चे क॑बरडे मोडले आहे. आणि आन॑दयात्री म्हणतो ते तर १००% बरोबर. असेच जर केले तर भारतात पुढच्या पिढ्या॑ना जगणे शक्य आहे नाही तर भावी पिढीचे भविष्य अधा॑रमय आहे.

विकास 12/06/2008 - 19:57
लेख आवडला. "अस्वस्थ दशकाची डायरी" काही वर्षांपूर्वी वाचले होते तसेच धर्माधिकारींना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. हे सर्वकाही आठवले. लेख मोठा असल्याने आणि त्यातील मुद्दे तळमळीने मांडलेले असल्याने कदाचीत एकापेक्षा जास्त प्रतिसादात जसे सुचेल तसे लिहीनः "देश आणि राष्ट्र" ह्या दोन विभिन्न संकल्पना आहेत असे वाटते. युरोपिअन (आणि नंतर अमेरिकन) पद्धतीप्रमाणे अधुनिक देश म्हणून बहुतांशी भारत जरी १९४७ ला स्वतंत्र झाला असला (काही भाग नंतर आला, उ.दा. गोवा), तरी संस्कृतिक राष्ट्र म्हणून भारत प्राचिन काळापासून एक होते आणि तसे भारतीय मनात दडलेले (सबकॉन्शस माईंड) असते - विशेष करून जर त्यात आपण पाश्चात्यांच्या नजरेतून न पहाता स्वतःच्या स्थानिक पाहीले तर. याचे कारण इतकेच की पाश्चात्य जेंव्हा आपल्याकडे पहातात (आणि तेच थोड्याफार फरकाने आपण इतर संस्कृतीकडे पहातो) तेंव्हा आपली "फ्रेम ऑफ रेफरन्स" ही आपली पद्धत / संस्कृती इत्यादी असते. दोन प्राचीन ऐतिहासीक उदाहरण पहा: १. चाणक्य - आत्ताच्या पाकीस्तानातील भागात जन्म अथवा केरळात (कुणाचे वाचता यावर अवलंबून) पण बाहेरून या भारतवर्षावर येणार्‍या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी राजा शोधला कुठे तर आत्ताच्या बिहार मधे. २. आदी शंकराचार्य - हिंदू धर्मातील तत्वांना बांधून त्याप्रमाणे कायमस्वरूपी आजच्या भाषेत "थिंक टँक" (पॉवर सेंटर नाही) आणि अर्थातच तत्कालीन भाषेत मठ स्थापले - ते कुठेतर भारताच्या चार दिशांमधे त्यात स्वतःची जन्मभूमी केरळ नाहीच. जर भारत एक राष्ट्र नव्हते तर या दोन महान विभूतींना असे करावेसे का वाटले असते? आता जरा फास्ट फॉरवर्ड करा: १८५७ चे स्वातंत्र्यसमर - दिल्लीचे तख्त हे हिंदूस्थानचा बादशहा - बहाद्दूर शहा जफर असे मान्य करायला तत्कालीन स्वातंत्र्य योद्धे का तयार झाले? कारण तो पर्यंत बहाद्दूर शहा जफर हा अनेक पिढ्यांनी भारतीय झाला होता आणि ब्रिटीश बाहेरून येऊन सत्ता गाजवत होते. त्याही पुढे आले आणि पूर्वेतील वंगभंगा विरुद्धची चळवळ ही पश्चिमेकडील टिळकांनी चालू करण्यात योगदान दिले. ह्या सर्व गोष्टी जर भारत "वन नेशन" नसते तर होऊ शकल्या असत्या असे वाटते का? ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? या संदर्भात मला इतकेच सांगावेसे वाटेल की आज जेंव्हा हिंदू माणूस/संघटना/पक्ष काहीही जेंव्हा धर्मांध वाटू शकेल अथवा तसे ते प्रत्यक्षात असेल असे समाजात बोलतात/वागतात तेंव्हा तमाम हिंदू विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती त्याचा जाहीर निषेध करतात, टिका करतात - त्यातील कुठली योग्य कुठली अयोग्य हे वादाचे मुद्दे राहू शकतील पण मुद्दा इतकाच की आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचा जाहीर निषेध करायला हिंदू विचारवंत आणि समाजमान्य व्यक्ती मागेपुढे पहात नाहीत. पण हे चित्र आपल्याला इतर धर्मांतील विचारवंत/प्रतिष्ठीत व्यक्ती स्वतःच्या धर्मातील धर्मांधते विरुद्ध बोलताना दिसतात का? सानिया मिर्झाला जर तिच्या धर्मगुरू/बंधूंवर होणारे हल्ले व्यथित करत असतील तर तेच धर्मगुरू/बंधू तिच्या विरुद्ध बोलतात तेंव्हा तिला काय वाटत असेल याचा विचार पण ती करते का हा देखील प्रश्न आहे. हिंदूमूलतत्ववादाविरुद्ध आवाज करणारी शबाना (अगदी त्यातून अप्रत्यक्षपणे लता पण सुटली नाही ) आणि तीचा नवरा जावेद अख्तर हे तीच्या नेल्सन मंडेला प्रसंगावरून जो तिच्याच धर्मगुरूंनी थयथयाट केला तेंव्हा मात्र काही बोलल्याचे ऐकले नाही. तेंव्हा अशा व्यक्तींना आपण म्हणजे "परधर्मिय" हिंदू हे उपरे नसतो तर भारतीय म्हणून आधार असतो. कारण त्यांचे नशिब म्हणून त्या भारतीय आहेत - त्यांच्या धर्माच्या धर्माधारीत देशवासीय नाहीत...थोडक्यात आपण लिहीले आहे तितका हा प्रश्न सरळ नाही त्याला विविध छटा आहेत. बाकी नंतर जसे सुचेल तसे.... धन्यवाद.

मुक्तसुनीत 12/06/2008 - 20:10
मूळ लेख आणि विकासराव यांची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी आवडल्या. मूळ लेखामधली "भारलेपणाची" , ओतप्रोत भरून लिहील्याच्या भावनेची जाणीव अगदी ठळकपणे जाणवते. धर्माधिकारी यानी जो झंझावाती दौरा केला; त्यात जे जे पाहिले नि नोंद केले त्या सगळ्या उर्जेने "डॉन" याना भारून टाकले आहे यात शंका नाही. आपल्या स्फुटामधे त्यानी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. विकासरावांनी म्हण्टल्याप्रमाणे , यातील अनेक गोष्टींचा सुटेपणाने परामर्श घेणे योग्य. या दृष्टीने , खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता आणि या सार्‍यांचे जटिल मुद्दे एका लेखातून आणि काही फुटकळ प्रतिक्रियातून कवेत घेणे अशक्यप्राय आहे. या गोष्टींकडे एकत्र पाहू गेल्यास माझ्यासारख्याचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. (विकासराव , वाचताय ना ? :-) )

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 12/06/2008 - 21:14
मी जेव्हा लेख लिहयला घेतला तेव्हा तो फक्त "वन नेशन" ह्यावर लिहायचा माझ्या मनात होते व त्याच्या अनुषंगाने फक्त "प्रादेशिक अस्मिता" हा प्रश्न हाताळायचा होता. पण लिहण्याच्या व विचाराच्या प्रवाहात असे लक्षात आले की फक्त "प्रादेशिक नव्हे तर धार्मीक आणि जातीय" अस्मितांचा पण "वन नेशन" बनवण्यात मोठा रोल आहे, तेव्हा ओघाने हे मुद्दे पण शक्य तितक्या "कमी शब्दात" लिहले. पण आपले म्हणणे बरोबर आहे, "वन नेशन, प्रादेशिक अस्मिता, जातीय अस्मिता व धार्मीक अस्मिता ह्या बाबी वेगवेगळ्या चर्चेला घेता येतील. मी त्या दॄष्टीने अभ्यास व तयारी सुरु करतो म्हणजे आपल्याला चर्चेला सोपे जाईल... बाकी अनेक बाबी मला फिल्टर कराव्या लागल्या की ज्यांचा समावेश हा "पर्सनल व्यक्तींशी व काही संवेदनाशील मुद्द्यांशी" होता. आता पुढच्या लेखनात "त्या बाबी" याव्या की नको याबद्दल मार्गदर्शन हवे ... काही मुद्दे सध्या "वादग्रस्त" असल्याने "अनावश्यक" वादंग नको म्हणून मी टाळले, आता पुढील लेखात काय करु ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

विकास 12/06/2008 - 21:43
खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. हा योग्य सल्ला आहे. धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. या संबंधी आत्ता जास्त लिहीता आले नाही तरी थोडे लिहीतो.: टिळकांना बलोपासना अतिशय महत्वाची वाटायची. कॉलेजात असताना एक मुलगा कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेताना दिसल्यावर ते ओरडले, असले कसले शरीर सांभाळायचे? त्या ऐवजी व्यायाम करून शरीर संपदना कर. आज विचार करा जर व्यायाम न करता केवळ आर्टीफिशल हरमोन्स घेउन कोणी तगडे होयचे ठरवले तर तसे होऊ शकेल का? उत्तर आहे नाही... त्याचा कदाचीत थोडाफार कॅटॅलीस्ट सारखा उपयोग होऊ शकेल पण ते उत्तर नाही... तसेच काहीसे हे समाजपुरूषाबद्दल आहे असे म्हणूया ना. म्हणजे असे की बाहेरील विचारवंत हे कॅटॅलिस्ट होउ शकतील पण आतून होणारा बदल हा त्या समाजपुरूषातील हालचालींनी / व्यायामानेच होणार. मगासच्या प्रतिसादात मी सानीया आणि शबाना वर लिहीले. ते लिहीताना निव्वळ निरीक्षण होते, त्यांच्या विरुद्ध आकस नव्हता/नाही. पण जर मुसलमानसमाज हा जर बदलायचा असेल, अधुनीक होणे महत्वाचे असेल तर त्यासाठीचे बदल हे आतून घडणे महत्वाचे नाही का? विचार करा, जर राजा राम मोहन रॉय, आगरकर, म. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, सावरकर आदी हिंदू पुढार्‍यांनी हिंदू धर्मावर कोरडे ओढले नसते तर आज आपण ही फार वेगळे झाले असतो का? जे धर्माधारीत समाजाचे तेच राष्ट्राधारीत समाजाचे म्हणजे या संदर्भात भारताचे. प्रश्न अनेक आहेत आणि ते समांतर पद्धतीने सोडवण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जण पूर्णवेळ देऊ शकणार नाही पण स्वतःचे कर्तव्य समजून जे काही चांगले करता येईल ते करायला पाहीजे त्यात हातभार लागणे महत्वाचे वाटते. पण त्यासाठी स्वतःला दिशा मिळणे आणि स्वतःला आवडेल असे काम करायला मिळणे हे महत्वाचे आणि बर्‍याचदा सुरवातीला अवघड ठरू शकते. धर्माधिकारींनी अस्वस्थ दशकातून स्वतःची सुटका करताना आयएएस अधिकारीपदातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर वादविवाद होऊ शकतील पण तो त्यांचा स्वतःचा स्वतःसाठी विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. लोकसभेसाठी उभे रहाणे वगैरे झाल्यावर त्यातून हवा तो "राम" दिसत नसताना त्यांच्या लक्षात आले की अनेक समस्यांचे मूळ हे सरकार ज्या पद्धतीने चालते त्यात आहे. मग ते जर बदलायचे असतील तर पुढच्या पिढीतील सरकारी अधिकारी वेगळे असायला हवेत. त्यासाठी चाणक्यचा वारसा आठवून नवीन विचारी पिढी उभी केली गेली पाहीजे. म्हणून मग त्यांनी चाणक्य मंडळ स्थापले त्यातून स्पृहणीय आकड्याने (आत्ता आठवत नाही पण नंतर सांगू शकेन) आज अनेक जण एमपीएससी आणि आयएएस मधे जात आहेत. त्याच बरोबर लोकशिक्षणाचे कार्यपण जोरात चालले आहे. थोडक्यात आतुन बदल घडवत आहेत. असे अनेक जण अनेक संस्था आहेत. एखादा मुद्दा मन लावून हातात घेतात आणि त्यावर काम करतात. यात सर्व धर्माचे आहेत, सर्व विचारसरणीचे आहेत. जो पर्यंत असे काम करत असताना स्पर्धात्मक होते पण द्वेषमुलक होत नाही तो पर्यंत ठिक असते. पण जर एकमेकांचा (धर्म/विचारसरणीमुळे) द्वेष चालू केला तर तो त्या कार्याच्या नाशाला आणि समाजपुरूषाच्या जडणघडणीला मारक ठरतो. या संदर्भात एक आठवण सांगतो: भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी ती सांगितली होती - ६० च्या दशकात भारतीय तत्वज्ञानाच्या/संस्कॄतीच्या दृष्टीकोनातून (आयात केलेल्या विचाराने नाही) कामगारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी भामस स्थापण्याचे ठरवले. तेंव्हा कम्युनिस्टांचा जोर मोठा होता. प्राथमिक बैठकीत त्यांनी हजर असलेल्या सदस्यांना प्रश्न विचारला की ,"तुमच्यातील किती जणांना कम्यूनिस्टांना उपटून काढायचे आहे?" त्यावर काही जणांनी ताबडतोब हात वर केला. त्यांना उद्देशून दत्तोपंत म्हणाले की ,"मग तुम्ही इतरत्र जा. ही संस्था फक्त सकारात्मक काम करायला काढली आहे. इतरांचा द्वेष करायला अथवा इरीशिरीने नाही. राहता राहीला कम्यूनिझमचा प्रश्न... ती विचारसरणी पुढच्या ३० वर्षात जगातून निघून जाणार आहे त्यांना घालवण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका". ती भामस नंतर नावारूपाला आली, कम्युनिस्ट चायना आणि कॅपीटॅलीस्ट अमेरिकन सरकारने दत्तोपंतांना बोलावले होते वगैरे... पण मूळ मुद्दा इतकाच की काही तरी काम तयार करून मन लावून करणे, तसे जमत नसेल (सर्वांना शक्यच नाही आणि गरज पण नाही) तर निदान अशा कामात काहीतरी मदत करणे - ह्याने गोष्टी हळू हळू बदलतात. टिळकांना स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळणार नाही याची खात्री होती, तसे ते म्हणायचे देखील. तरी देखील भारतीय राजकारण आणि ब्रिटीशांच्या विरुद्धचा लढा तयार करण्यात योगदान दिले. तेंव्हा ही कामे घाईने करायची नसतात, ताबडतोब फळ मिळेल या अपेक्षेने करायची नसतात तर सातत्याने करायची असतात. दत्तोपंतांना कोणी स्वाक्षरी आणि संदेश देयला सांगीतले की ते जे लिहीत तो या सर्व शब्दबंबाळ लिहीण्याचा मतितार्थ आहे. ते फक्त स्वाक्षरीबरोबर लिहायचे, "patience pays".

छोटा डॉन, एक राष्ट्र संकल्पनेच्या निमित्ताने केलेला अस्वस्थ डायरीचा उहापोह आवडला. लेख वाचल्यानंतर असंख्य प्रश्नांनी अस्वस्थ केले, अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे, अशी घालमेल मनात झाली. मुळ लेखांबरोबर अनेक प्रतिसादही आवडले. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता हे आणि इतर अनेक प्रश्नांचा वेध घेणे कठीन वाटते. अजूनही लेखातील काही मुद्यांवर विवेचन करता आले असते असे वाटले, असो, मुळ लेखांबरोबर विकासरावांचे प्रतिसादही आवडले. डॉन भाय, विचार करायला लावणारे असेच लेखन येऊ दे !!!

सहज 13/06/2008 - 07:44
लेख आवडला. वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे मुळ लेखातील सर्व मुद्यांचा एकत्रीत विचार करण्याऐवजी "शांत डोक्याने" एकेका मुद्द्यावर ही चर्चा सुरु रहावी असे वाटते.

छोटा डॉन यांचा मूळ लेख उत्तम, त्यावरच्या विकास यांच्या दोन्ही प्रतिक्रिया आवडल्या... .... खूप मोठा विषय आहे , त्यामुळे एकदम काय लिहावे , कुठून सुरुवात करावी सुचत नाहीये.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

hsodaye 13/06/2008 - 10:51
लेख आवडला, मुद्दयावर चर्चा चागलि गोष्ट आहे, पण देशामधे या वाइट गोष्टिना आपणच खत देतो. या सर्व गोस्टि घालवण्यासाठि आपण आयुष्यात काय केले हे चचेपेक्श्या जास्त मह्त्वाचे. दुसर्याकडे बोट दाखवताना तिन बोटे आपल्याकडे असतात हे देशबाधवाना कळ्णे ज्ररुरि आहे.

आजानुकर्ण 15/06/2008 - 19:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. आपला, (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 15/06/2008 - 21:20
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे. अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील. ते झाले तुमचे विचार थोडक्यात "तुम्हाला तसे" वाटते... इतरांना तसे वाटत असेलच अशातला भाग नाही आणि आपण तसा हट्ट करत नसावात अशी आशा करतो. बाकी छोटा डॉन चा मूळ लेख हा ते पुस्तक वाचल्यावर जे काही "भारतात आजच्या काळात जे चालते आहे" त्या बद्दल वाटत गेले त्या संदर्भातील होता. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. आज भारतात धार्मिक, जातीय आणि प्रादेशीक अस्मितेचा जो गैरवापर होतो त्याबद्दलचा उहापोह करणारा तो लेख होता - पुस्तक परीक्षण नव्हते हे जे कोणी नेहमी पुस्तके वाचते त्यांना सहज समजू शकेल... पण त्या बद्दल काही बोलावेसे न वाटणे आणि चष्मे वापरत तिरस्काराची भाषा लिहीणे हे आपल्यासारख्या वाचका कडून होताना पाहून खेद वाटला... व्यक्ती तितक्या प्रकृती असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे पण प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का?

मुक्तसुनीत 15/06/2008 - 21:51
मला 'कर्ण यांना सुचवावेसे वाटते की , त्यांनी आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ काही लिहावे , थोडे दाखले द्यावेत. धर्माधिकारी यानी नव्वदीच्या दशकामधे भाजप चे तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे. परंतु पुस्तक १९८७ च्या आधीचे/त्या सुमाराचे आहे. मला आता नेमके संदर्भ आठवत नाही , पण पुस्तकात त्यानी आपल्या स्वत:च्या राजकीय प्रवासाचे - उथळ उपहासाकडून समजून घेण्याच्या भूमिकेकडे जाण्याचे - जे वर्णन केले ते मला त्या काळात हृदयस्पर्शी वाटले होते इतके आठवते. पुस्तक एकांगी असू शकते , पूर्वग्रहदूषितसुद्धा. पण "भंपक" म्हणून त्याची वासलात लावायच्या आधी थोडी मीमांसा आवश्यक आहे. अजानुकर्ण एक अभ्यस्त, जबाबदार सदस्य आहेत. त्यांची अनेक पोस्ट्स् माहितीपूर्ण असतात. मतेमतांतरे कितीही झाली एरवी त्यांचे लिखाण भरपूर दाखले-पुरावे-मुद्दे-मीमांसा यांनी परिपूर्ण असतात. या खेपेला सुद्धा त्यानी तसे करावे.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 17/06/2008 - 11:17
"आजानुकर्णसाहेब" आपल्यासारख्या हुशार व अभ्यासू माणसाने २ ओळीत पुस्तक हे एकांगी व भंकस आहे हे म्हणणे हे आपल्या इमेजनुसार नाही ... आपण डितेलमध्ये लिहा आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते ... बाय द वे, मी काही "पुस्तकाचे परिक्षण" वगैरे लिहलेले नाही, अशा पुस्तकांचे परिक्षण लिहणारे आम्ही कोण ??? असो. आपले अभ्यासपुर्ण व संदर्भ स्पष्ट करणारे विवेचन वाचायला आवडेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का? सहमत आहे. 'बुद्धीवाद्यांनी विचारकलहास घाबरु नये, वाटेल त्याच्यावर मते व्यक्त करावीत. पण हे भंकप आहे, म्हणुन थांबू नये असे वाटते. त्याच्यातला भंपकपणा आपण दाखवावा वाचायला आवडेल. जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक प्रश्नात भारतीय माणूस गुरफटून गेला आहे. त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे, किमान प्रयत्न तरी लेखाच्या निमित्ताने झाला पाहिजे असे वाटते. अवांतर : शेषराव मो-यांचे 'विचारकलह' चाळत होतो. त्यात' कुरुंदकरांनी राजकारण हे धर्माच्या जुनाट चौकटीतून चालते असे म्हटल्यावर त्यांचे विवेचन कोणाला तरी सेक्युलर म्हणुन दाखवायचे होते का ? त्याचा परखड समाचार पळशीकर, शेषराव मोरे घेतात. ते विवेचन वाचण्यासारखे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झंप्या 17/06/2008 - 09:05
आमचा डॉन्या असली वैचारीक पुस्तके वगैरे वाचतो हाच धक्का आहे. तसेही लेखापेक्षा काही प्रतिसादच जास्त आवडले ह्या बाकिच्यांच्या म्हणण्याशी सहमत आहोत. :)
गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे.

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

अविनाश ओगले ·

चतुरंग 11/06/2008 - 20:48
सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग

इनोबा म्हणे 11/06/2008 - 22:21
काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 11/06/2008 - 22:49
खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..

बेसनलाडू 12/06/2008 - 02:27
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू

विसोबा खेचर 12/06/2008 - 08:07
ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II 01/07/2008 - 09:45
हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

पुष्कराज 12/06/2008 - 11:07
मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज

जयवी 12/06/2008 - 11:54
अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे

मिसळपाव 30/06/2008 - 22:02
का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.

बहुगुणी 01/07/2008 - 09:30
...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.

मनिष 01/07/2008 - 11:21
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष

प्राजु 01/07/2008 - 12:41
ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 11/06/2008 - 20:48
सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग

इनोबा म्हणे 11/06/2008 - 22:21
काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 11/06/2008 - 22:49
खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..

बेसनलाडू 12/06/2008 - 02:27
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू

विसोबा खेचर 12/06/2008 - 08:07
ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II 01/07/2008 - 09:45
हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

पुष्कराज 12/06/2008 - 11:07
मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज

जयवी 12/06/2008 - 11:54
अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे

मिसळपाव 30/06/2008 - 22:02
का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.

बहुगुणी 01/07/2008 - 09:30
...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.

मनिष 01/07/2008 - 11:21
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष

प्राजु 01/07/2008 - 12:41
ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं? कोपर्‍यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं? तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर? हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं? डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे? मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं? वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? -अविनाश ओगले

मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

चतुरंग ·

कुंदन 11/06/2008 - 20:41
प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! स्वानंद किरकिरे चे सेहेर मधील पलके झुकाओ ना जबरदस्तच ...

विकास 11/06/2008 - 20:42
ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.

इनोबा म्हणे 11/06/2008 - 22:43
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा 12/06/2008 - 12:07
क्या बात है! शाब्बास रे पठ्ठ्यांनो ! मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे | मनापासुन अभिनंदन!!!!!

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 12/06/2008 - 13:23
- हेच म्हणते. *सर्वांचे अभिनंदन* अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्‍यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II 12/06/2008 - 12:46
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

कुंदन 11/06/2008 - 20:41
प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! स्वानंद किरकिरे चे सेहेर मधील पलके झुकाओ ना जबरदस्तच ...

विकास 11/06/2008 - 20:42
ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.

इनोबा म्हणे 11/06/2008 - 22:43
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा 12/06/2008 - 12:07
क्या बात है! शाब्बास रे पठ्ठ्यांनो ! मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे | मनापासुन अभिनंदन!!!!!

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 12/06/2008 - 13:23
- हेच म्हणते. *सर्वांचे अभिनंदन* अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्‍यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II 12/06/2008 - 12:46
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
लेखनविषय:
५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला. मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! चतुरंग

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

भोचक ·

ध्रुव 11/06/2008 - 19:24
सुरेख लेख. या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. ह्म्म हे सांगीतले ते बरे झाले. म्हणजे पुढच्या वेलेला जर कधी तिकडे जायची वेळ आली तर लक्षात ठेवायला. हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. सहमत आहे. हजार कशाला अहो ४०० वर्षापुर्वीचे टिकले नाही (इंग्रजांची कृपा) तर हजार वर्षापुर्वीचे अवघडच आहे. बाकी तुम्ही फोटो नक्कीच काढले असतील या जागांचे. जर चिकतवाना इथे अथवा लिंक पाठवा. -- ध्रुव

कवटी 11/06/2008 - 19:25
अत्यंत माहितीपूर्ण लेख. आवडला. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. खरे आहे. एक जुनी म्हण आठवली. "इतिहासातून आपण फक्त एकच शिकतो ते म्हणजे 'इतिहासातून आपण काहीही शिकत नाही'..." भोचकराव आजुन येउ द्या.

मदनबाण 11/06/2008 - 20:12
भोचकराव्,,ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... बर्‍याच वेळा इंदूरला आलो आहे,,राजवाडा,शिशमहल इ. पाहिले आहे,पण या स्थळाबद्दल माहित नव्हते !!!!! परत इंदूरला येण्याचा योग आला तर याही ठिकाणी भेट देण्याचा जरुर प्रयत्न करीन..... मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. भग्न झालेले द्वारावरचे हत्ती,,विद्रुप झालेल्या नर्तिका....असे प्रकार बर्‍याच ठिकाणी पहावयास मिळतात आणि हे कलावैभव गतकाळात किती रम्य असेल हा विचार मनात घोळत राहतो...खरच हे सर्व व्यथितच करणार आहे.. (शिल्पकला प्रेमी) मदनबाण.....

प्रियाली 11/06/2008 - 20:32
भोचकराव लेख आवडला.
भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही.
ज्या मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू भारतात सापडत नाहीत त्या कुठे मिळतात हे वेगळे सांगायला नकोच, तर अनेकांच्या मते ही मूर्ती ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. परंतु ब्रिटिश म्युझियमच्या संकेतस्थळावर ही माहिती मिळाली.

भोचकराव, लेख आवडला. तुमची इतिहासाबद्दलची आस्था आणि मुद्दाम अशी स्थळे जाऊन बघणे वगैरे ग्रेट. बाकी आपण भारतियांच्या इतिहासाबद्दलच्या आस्थेबद्दल काय बोलावे? किंबहुना बोलूच नये. विशेषतः परकिय आक्रमकांनी केलेल्या अत्त्याचारांबद्दल तर नकोच नको. आणि हा प्रश्न केवळ मुसलमान शासकांनी केलेल्या प्रकारांबद्दल नाही आहे. आता तर पूर्ण स्वातंत्र्य आहे, भारत हा एक प्रगत देश होतो आहे. आपण हा वारसा जपण्यांबद्दल काय करतो? शून्य. People who dont respect History soon become part of it... बिपिन.

विसोबा खेचर 11/06/2008 - 23:34
भोचकगुरुजी, आपले लेखन नेहमीच सुरेख असते! हा लेखही अतिशय चांगला उतरला आहे. एकंदरीतच जुन्या वास्तूंबद्दल आपली बेपर्वाई पाहिली की वाईटही वाटतं आणि संतापही येतो. असो, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेखन वाचायला आवडेल. आपला हा लेख म्हणजे मध्यप्रदेशाची एक छानशी सफर घडवणारा आहे. माझी एक विनंती - एकदा आपल्या लेखणीतून आम्हाला मांडू, महेश्वरी, जबलपूर घडवून आणा बुवा! ही सगळी माझी अत्यंत आवडती स्थानं आहेत. उज्जैन-इंदौरबद्दल तर बोलायलाच नको. ९२ की ९३ साली शरदातल्या पौर्णिमेच्या रात्री जबलपूरचा हो अनुभव घेतला आहे त्याची याद आजही तेवढीच सुखद आहे! कुठल्याश्या एका डाकबंगल्यात उस्ताद शाहीद परवेजची रंगलेली सतार आजही कानात साठवलेली आहे. अहो काय सांगू तुम्हाला भोचकगुरुजी, ऐकायला आम्ही फक्त इनमिन तिघंचौघच जण! जबलपूरच्या पौर्णिमेची रात्र, मस्त माहोल जमून आला होता आणि रात्री सव्वा बारा, साडे बाराच्या सुमाराला शाहीदभाईंनी मला प्रश्न केला, "क्या बजाए अब?"! "उस्तादजी, अगर आपका मूड हो तो कौशीकानडा बजाईये! बस, इस वक्त सिर्फ वही राग का माहोल जमा है" अशी मी फर्माईश केली! माझ्या फर्माईशीला, "अरे, क्या केहेने!" अशी दाद देत शाहीदभाईंनी जो कौशीकानडा जमवला होता म्हणता! क्या बात है! आपला, (जबलपूरप्रेमी) तात्याभैय्या देवासकर, बापूभैय्या देवासकरांची कोठी, इंदौर.

भोचक 12/06/2008 - 10:37
तात्या, तुमची आज्ञा शिरसावंद्य. मांडू, महेश्वर, सांचीबद्दल लिहायचंच आहे. मांडू इतकं सुंदर आहे, की ते नेमकेपणाने मांडणं हेच आव्हान आहे. अप्रतिम जागा आहे ही. आयुष्यात एकदा तरी मांडू पाहिलंच पाहिजे. शिवाय इतरही काही जागा आहेत. जबलपूर, ग्वाल्हेर हा भाग फिरायचा आहे. मुख्य म्हणजे बुंदेलखंड पहायची जाम इच्छा आहे. बघू या कसं जमतंय ते. बाकी तुमचा जबलपूरचा अनुभव अप्रतिम. एवढ्या मोठ्या कलावंतांचे सानिध्य लाभणं हे भाग्यच. तुम्ही त्या अर्थाने खरोखरच भाग्यवान आहात.

नीलकांत 12/06/2008 - 10:55
पवारांचे धार असं म्हणून आम्ही धार मार्गे मांडूच्या (मांडवगढ) च्या किल्याला भेट द्यायला गेलो होतो ते आठवतं. किल्ला पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे धारच्या सरस्वती मंदीराला भेट द्यायचे राहीले. त्याच काळात जवळच झाबुआ जिल्ह्यात शबरी कुंभ मेळ्याची तयारी चाललेली होती असं वातावरण धार मधे होतं. मांडूच्या संग्राहलायाची अवस्था खरोखर भोचकराव म्हणतात तशीच आहे. स्थानिकांची अनास्था आपल्याला नाराज करावी इतपत आहे. बाकी मांडूच्या किल्ल्यावर एक शिवलिंग आहे. तेथे एक शिलालेख आहे, की इस मंदिर को मोगलो द्वारा उध्द्वस्त किया गया था. मराठा सरदार पेशवा बाजीराव ने इसका जिर्नोध्दार करवाया. हे वाचून खुप छान वाटलं. नीलकांत

ध्रुव 11/06/2008 - 19:24
सुरेख लेख. या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. ह्म्म हे सांगीतले ते बरे झाले. म्हणजे पुढच्या वेलेला जर कधी तिकडे जायची वेळ आली तर लक्षात ठेवायला. हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. सहमत आहे. हजार कशाला अहो ४०० वर्षापुर्वीचे टिकले नाही (इंग्रजांची कृपा) तर हजार वर्षापुर्वीचे अवघडच आहे. बाकी तुम्ही फोटो नक्कीच काढले असतील या जागांचे. जर चिकतवाना इथे अथवा लिंक पाठवा. -- ध्रुव

कवटी 11/06/2008 - 19:25
अत्यंत माहितीपूर्ण लेख. आवडला. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. खरे आहे. एक जुनी म्हण आठवली. "इतिहासातून आपण फक्त एकच शिकतो ते म्हणजे 'इतिहासातून आपण काहीही शिकत नाही'..." भोचकराव आजुन येउ द्या.

मदनबाण 11/06/2008 - 20:12
भोचकराव्,,ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... बर्‍याच वेळा इंदूरला आलो आहे,,राजवाडा,शिशमहल इ. पाहिले आहे,पण या स्थळाबद्दल माहित नव्हते !!!!! परत इंदूरला येण्याचा योग आला तर याही ठिकाणी भेट देण्याचा जरुर प्रयत्न करीन..... मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. भग्न झालेले द्वारावरचे हत्ती,,विद्रुप झालेल्या नर्तिका....असे प्रकार बर्‍याच ठिकाणी पहावयास मिळतात आणि हे कलावैभव गतकाळात किती रम्य असेल हा विचार मनात घोळत राहतो...खरच हे सर्व व्यथितच करणार आहे.. (शिल्पकला प्रेमी) मदनबाण.....

प्रियाली 11/06/2008 - 20:32
भोचकराव लेख आवडला.
भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही.
ज्या मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू भारतात सापडत नाहीत त्या कुठे मिळतात हे वेगळे सांगायला नकोच, तर अनेकांच्या मते ही मूर्ती ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. परंतु ब्रिटिश म्युझियमच्या संकेतस्थळावर ही माहिती मिळाली.

भोचकराव, लेख आवडला. तुमची इतिहासाबद्दलची आस्था आणि मुद्दाम अशी स्थळे जाऊन बघणे वगैरे ग्रेट. बाकी आपण भारतियांच्या इतिहासाबद्दलच्या आस्थेबद्दल काय बोलावे? किंबहुना बोलूच नये. विशेषतः परकिय आक्रमकांनी केलेल्या अत्त्याचारांबद्दल तर नकोच नको. आणि हा प्रश्न केवळ मुसलमान शासकांनी केलेल्या प्रकारांबद्दल नाही आहे. आता तर पूर्ण स्वातंत्र्य आहे, भारत हा एक प्रगत देश होतो आहे. आपण हा वारसा जपण्यांबद्दल काय करतो? शून्य. People who dont respect History soon become part of it... बिपिन.

विसोबा खेचर 11/06/2008 - 23:34
भोचकगुरुजी, आपले लेखन नेहमीच सुरेख असते! हा लेखही अतिशय चांगला उतरला आहे. एकंदरीतच जुन्या वास्तूंबद्दल आपली बेपर्वाई पाहिली की वाईटही वाटतं आणि संतापही येतो. असो, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेखन वाचायला आवडेल. आपला हा लेख म्हणजे मध्यप्रदेशाची एक छानशी सफर घडवणारा आहे. माझी एक विनंती - एकदा आपल्या लेखणीतून आम्हाला मांडू, महेश्वरी, जबलपूर घडवून आणा बुवा! ही सगळी माझी अत्यंत आवडती स्थानं आहेत. उज्जैन-इंदौरबद्दल तर बोलायलाच नको. ९२ की ९३ साली शरदातल्या पौर्णिमेच्या रात्री जबलपूरचा हो अनुभव घेतला आहे त्याची याद आजही तेवढीच सुखद आहे! कुठल्याश्या एका डाकबंगल्यात उस्ताद शाहीद परवेजची रंगलेली सतार आजही कानात साठवलेली आहे. अहो काय सांगू तुम्हाला भोचकगुरुजी, ऐकायला आम्ही फक्त इनमिन तिघंचौघच जण! जबलपूरच्या पौर्णिमेची रात्र, मस्त माहोल जमून आला होता आणि रात्री सव्वा बारा, साडे बाराच्या सुमाराला शाहीदभाईंनी मला प्रश्न केला, "क्या बजाए अब?"! "उस्तादजी, अगर आपका मूड हो तो कौशीकानडा बजाईये! बस, इस वक्त सिर्फ वही राग का माहोल जमा है" अशी मी फर्माईश केली! माझ्या फर्माईशीला, "अरे, क्या केहेने!" अशी दाद देत शाहीदभाईंनी जो कौशीकानडा जमवला होता म्हणता! क्या बात है! आपला, (जबलपूरप्रेमी) तात्याभैय्या देवासकर, बापूभैय्या देवासकरांची कोठी, इंदौर.

भोचक 12/06/2008 - 10:37
तात्या, तुमची आज्ञा शिरसावंद्य. मांडू, महेश्वर, सांचीबद्दल लिहायचंच आहे. मांडू इतकं सुंदर आहे, की ते नेमकेपणाने मांडणं हेच आव्हान आहे. अप्रतिम जागा आहे ही. आयुष्यात एकदा तरी मांडू पाहिलंच पाहिजे. शिवाय इतरही काही जागा आहेत. जबलपूर, ग्वाल्हेर हा भाग फिरायचा आहे. मुख्य म्हणजे बुंदेलखंड पहायची जाम इच्छा आहे. बघू या कसं जमतंय ते. बाकी तुमचा जबलपूरचा अनुभव अप्रतिम. एवढ्या मोठ्या कलावंतांचे सानिध्य लाभणं हे भाग्यच. तुम्ही त्या अर्थाने खरोखरच भाग्यवान आहात.

नीलकांत 12/06/2008 - 10:55
पवारांचे धार असं म्हणून आम्ही धार मार्गे मांडूच्या (मांडवगढ) च्या किल्याला भेट द्यायला गेलो होतो ते आठवतं. किल्ला पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे धारच्या सरस्वती मंदीराला भेट द्यायचे राहीले. त्याच काळात जवळच झाबुआ जिल्ह्यात शबरी कुंभ मेळ्याची तयारी चाललेली होती असं वातावरण धार मधे होतं. मांडूच्या संग्राहलायाची अवस्था खरोखर भोचकराव म्हणतात तशीच आहे. स्थानिकांची अनास्था आपल्याला नाराज करावी इतपत आहे. बाकी मांडूच्या किल्ल्यावर एक शिवलिंग आहे. तेथे एक शिलालेख आहे, की इस मंदिर को मोगलो द्वारा उध्द्वस्त किया गया था. मराठा सरदार पेशवा बाजीराव ने इसका जिर्नोध्दार करवाया. हे वाचून खुप छान वाटलं. नीलकांत
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

मक्‍याचा खरवस

योगिता_ताई ·

ऋचा 11/06/2008 - 17:15
मक्याचं पण असं करता येत हे माहीत नव्हतं खरच सोपी आणि साधी पा.कृ. आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ 11/06/2008 - 17:37
याला कॉर्न पूडींग असेही म्हणतात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

कॉर्न पुडिंगचे धर्मांतरित नाव आवडले,पुडिंगही आवडते.:) योगिता मिपावर स्वागत.. स्वाती

यशोधरा 14/06/2008 - 08:07
हे करुन बघेन आज.. सोप्पं आहे करायला! योगिताताई, धन्यवाद या पाककृतीबद्दल

ऋचा 11/06/2008 - 17:15
मक्याचं पण असं करता येत हे माहीत नव्हतं खरच सोपी आणि साधी पा.कृ. आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ 11/06/2008 - 17:37
याला कॉर्न पूडींग असेही म्हणतात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

कॉर्न पुडिंगचे धर्मांतरित नाव आवडले,पुडिंगही आवडते.:) योगिता मिपावर स्वागत.. स्वाती

यशोधरा 14/06/2008 - 08:07
हे करुन बघेन आज.. सोप्पं आहे करायला! योगिताताई, धन्यवाद या पाककृतीबद्दल
साहित्य - एक वाटी मक्‍याचे दाणे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, वेलचीपूड, केशर. कृती - मक्‍याचे दाणे व दूध एकत्र मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. त्यात गूळ विरघळवून घ्यावा. वेलचीपूड व केशर घालावे. एरवी खरवसासाठी चीक उकडून घेतो त्याप्रमाणे शिटी न लावता कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. सध्या जवळजवळ वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध असल्याने झटपट करता येण्याजोगा हा पदार्थ आहे. लहान मुलांनाही आवडेल.

उद्या संत तात्याबा पुण्यात!

विसोबा खेचर ·

महेश हतोळकर 11/06/2008 - 16:44
वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...! बाकिच्यांनी दिली तर चालणार नाही का?

In reply to by महेश हतोळकर

विसोबा खेचर 11/06/2008 - 16:52
बाकिच्यांनी दिली तर चालणार नाही का? अवश्य चालेल. आम्ही फक्त वानगीदाखल काही नांवे घेतली होती.. अवश्य भेटूया उद्या.. तात्या. अरे धमाल मुला, अरे क्षमा कर. आमचा बेत अचानक ठरला! पुढच्या वेळेस निश्चित आगाऊ कल्पना देऊ! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 11/06/2008 - 17:01
च्छ्या! कै च्या कै काय तात्या? क्षमा वगैरे कसली मागताय? उगाच लाजवू नका ह्या लेकराला! आपल्याला काय हो, पुण्यात नायतर ठाण्यात करु कट्टा :) कसें? (स्वगतः ह्म्म...पि'ण्यात' ला असल्याने पु'ण्यात' ठा'ण्यात' असे यमक जुळताहेत की काय?)

धमाल मुलगा 11/06/2008 - 16:48
तात्याबा...ये नाइन्साफी है| मी काल रात्रीपर्यंत पुण्यातच होतो. कालच फाफलत मुंबईला परत आलोय :( ह्यॅट्ट....एक झक्कास कट्टा चुकणार माझा :(( असो...मंडळी, मज्जा करो ! खुप खुप गप्पा मारो...तात्याशेठ मुडमध्ये असतील तर उनसे गाणं-बिणं ऐको!!!! आम्ही आपले बसतो भांडूपात एकटेच भाकरतुकडे मोडत :( नेक्श्टैम तात्याबा, मेरेको लवकर सांगो, म्हणजे मेरेको थोडा सेटींग करने को येगा! क्या?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 11/06/2008 - 18:20
हा तात्यांच्या "अचानक तरुण मंडळाचा" कट्टा आहे ... माझे तात्यांशी बोलणे झाले आहे, मी पुण्यात आल्यावर साधारणता "२१,२२" जेव्हा जमेल तेव्हा "तात्या" वेळ काढून आपल्या "खास सात्विक [ हसु का जोरात ?] कट्ट्याला" येणार आहेत.... तेव्हा आपल्या "हौसखास मंडळ, वर्ष ९१ " चा कट्टा जोरदार होणारच ... आत्ता मारु दे ह्या मंडळींना मजा !!! अवांतर : ह्यावेळी मी " काडी टाकून " पळून जाणार नाही ... अतिअवांतर : तु काय ठरवलेस, आहेस की फिरंग्यानी पकडून ठेवले मुंबापुरीत ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 12/06/2008 - 12:20
है शाब्बास रे!!! थोडीफार सेटींग लावायला सुरुवात केलेलीच आहे मीही! हौसखास मंडळ देऊ जोरात दणाणून! मी काय ठरवायचंय आत्तापासून? मेंबरं फिक्स होऊदेत आधी. मग स्थळ, तजवीज ठरवू ;) तजवीज म्हणजे, तुळशीच्या बिया, दूध, गवती चहा, भजनी मंडळ, बादशाहीतून जेवणाची पार्सलं, भरपूर गुलकंद घातलेली बिन-सुपारीची मसाला पानं, इ.इ. (आता खास सात्वीक कट्टा म्हणतोय म्हणून हो! नाहीतर आमची तयारी वेगळीच असते. आम्ही साले गुत्त्यावरचे पडीक बेवडे!) आणि हो, मस्त ग़जला, गाणी-बजावणी पण होऊन जाऊ द्या हौसखासच्या कट्ट्याला, मास्तर येणार असतील तर सोन्याहून पिवळं! नाट्यचर्चाही घडेल :) क्काय?

ऋचा 11/06/2008 - 16:59
बाकिच्यांना यायच असेल तर काय करायच???? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:04
बाकिच्यांना यायच असेल तर काय करायच???? आम्हाला सगळ्याच मिपाकर पुणेकरांना भेटायची इच्छा आहे. परंतु उद्या कार्यालयीन दिवस आसल्यामुळे सर्वांनाच जमेल, सवड होईल असे नाही याची कल्पना आहे... ऋचाताई, तुम्ही मांसाहार करत असाल तर अवश्य या. 'पुरेपूर कोल्हापूर' या हॉटेलात फार छान स्वयंपाक करतात.. :) तात्या.

In reply to by कुंदन

राजे 11/06/2008 - 17:08
मला प्रचंड त्रास होत आहे.... सुदैव तुमचे की आम्ही पुण्यात नाही आहोत.... ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मनिष 11/06/2008 - 17:04
संध्याकाळी ८ नंतर असेल तर मी नक्की भेटतो! कुठे आहे हे 'पुरेपूर कोल्हापूर'?

In reply to by मनिष

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:07
कुठे आहे हे 'पुरेपूर कोल्हापूर'? ते मलाही नीटसं माहीत नाही. खरं तर मी तेथे दोनतीनदा गेलो आहे पण रिक्षाने गेल्यामुळे मला नेमका पत्ता सांगता नाही येणार! ते तुम्हाला कुणीतरी पुणेकरच सांगतील.. :) आपला, (रस्ते हमखास चुकणारा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 11/06/2008 - 18:12
तुम्हाला "स.प. महाविद्यालय" माहित आहे ना ??? त्याच्यासमोर थोडी खालच्या म्हणजे डेक्कन साईडला एक गल्ली जाते ती सरळ "लक्ष्मी रस्त्या" कडे ... त्याच रस्तावर आहे ... पहिल्यांदा "दुर्गा नॉनव्हेज" लागेल, त्यानंतर ५० पावलांच्या आत "पुरेपुर कोल्हापुर " ... लक्ष्मी रस्त्याकडून आलात तर पहिल्यांदा "सेटी प्राईड शूज" हे दुकान हुडका ... त्याच्यासमोरुन सरळ चालत "टिळक रोडकडे" निघा, ३५-४० पावलात "पुरेपुर" लागेल ... पण, हम्म् , काय उपयोग ? आम्ही नसणार तिथे !!! पुणेकर मंडळी ऐश करा, चांगले शिकरण खावा, मटार उसळ खावा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 11/06/2008 - 18:53
याला म्हणायचे अस्सल सदाशिवपेठी पुणेकर पुणे ३० वाले लोकाना चुकीचे पत्ते सांगुन पुणे दर्शन घडवण्याचे पुण्य पदरात पाडुन घेतात तू सांगतो ते नुस्ते कोल्हापुर. " "पुरेपुर कोल्हापुर हे मेहेंदळे गॅरेज जवळ आहे. नळ स्टॉप जवळ. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

ध्रुव 11/06/2008 - 19:05
पुरेपुर कोल्हापुर यांची दोन दुकाने आहेत एक स.प. महाविद्यालयाच्या समोरच्या गल्लीत व दुसरे मेहेंदळे गॅरेज एरंडवणे येथे. तुम्ही कुठे जमणार आहात आणि किती वाजता?? -- ध्रुव

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 11/06/2008 - 19:08
आयला मे त्या "पुणे - ३० " वाल्याला एवढ्या दिवस "पुरेपुर" समजून हाणत होतो ... पण कोल्हापुरी साज आहे खाण्यात !!! स्वगत : घातला की "विजूभाऊंनी" शेवटी धोतराला हात ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 11/06/2008 - 17:06
तात्या उद्या तो रीपोर्टिंग साहेब येणार आहे. खडुस लौकर गेला तर लै बरे होईल. अन्यथा मला यायला थोडा उशीर होईल. हाटेल कोठे आहे ते सांगा . मी येईन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

जी गल्ली बादशाही बोर्डींग किंवा टिळकस्मारक मंदिरासमोर आहे जी पेरूगेट कडे जाते. त्याच गल्लीत आहे 'पुरेपूर कोल्हापूर'. त्यांची एक शाखा मेहेंदळे गॅरेज समोर 'अभिषेक प्युअर व्हेज' शेजारी आहे. (माहीतगार) पुण्याचे पेशवे

मनस्वी 11/06/2008 - 17:23
'अचानक कट्ट्याला' शुभेच्छा. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा 11/06/2008 - 17:13
नक्की कुठे आहे म्हणजे मेहेंदळे गॅरेज आहे ना तिथुन सरळ पुढे यायच आणि तिथे अभिषेक नावाच भलं मोठं हॉटेल आहे. त्याच्या शेजारीच आहे "पुरे पुर कोल्हापुर" आवांतर : तिथे पांढरा रस्सा खुप छान मिळतो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by मनिष

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:19
थोडा घासफूस (व्हेज) मिळेल ना? मी येतो ८.१५ - ८.३० पर्यंत. हो, नक्की मिळेल. मीही तेथे ८.१५ पर्यंत पोहोचतो आहे! :) तात्या.

भोचक 11/06/2008 - 17:13
तात्या एकदा इंदुरात या. खायची मजा खरी इथे. डाळबाटीपासून काय वाट्टेल ते इथे छान मिळतं. कधी तरी इथेही कट्टा जमवायला या बुवा. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. विजूभौ हे वाक्य फार आवडलं.

धमाल मुलगा 11/06/2008 - 17:21
"पुरेपुर कोल्हापुर" ह्या नावाची पुण्यात २ हॉटेलं आहेत. १.पेरुगेट पोलिस चौकीपाशी. २.एरंडवणा, कोथरुड (दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाण्याच्या रस्त्यावर) तात्याबांनी ह्या २ पैकी नक्की कोणतं हे सांगितल्यास मंडळींना येणे/ठरवणे सोपे जाईल :) - (तांबडा-पांढरा रस्साप्रेमी) ध मा ल. स्वगतः च्यामारी, ह्या सगळ्यांना एकदा आमच्या हेमंतरावांच्या हातचं कोल्हापुरी मटन्/चिकन खिलवलं पाहिजे....रस्सा म्हणजे काय असतो त्याची व्याख्या ठरावी असा हेमंतरावांचा हातखंडा तांबड्या-पांढर्‍या रश्याबाबत!

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 11/06/2008 - 17:31
पेरुगेट पोलिस चौकीपाशी आहे ते नुस्ते "कोल्हापुर" आहे. "पुरेपुर कोल्हापुर" हे दिनानाथ हॉस्पिटलपाशीच आहे. (तरी बरे तात्यानी ते हाटेल कोणत्यातरी गणपतीच्या का मारुतीचा देवळापाशी आहे असे नाही सांगितले. केवढा घोळ झाला असता ना. पुण्यात अचानक मारुती पासुन सोन्या,जिलब्या, पत्र्या ...असे बरेच मारुती आहेत. माती, दगडी,हती,असे बरेच नावाचे गणपती आहेत्.एके ठिकाणी खुन्या मुरलीधर पण आहे.धन्य ते पुणे) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

ध्रुव 11/06/2008 - 19:09
अरे नाय रे विजुभाऊ... दोन्ही सेम आहेत. कुठल्याच दुकानात आमची शाखा नाही असे लिहीलेले नाही. अरे दोन्हीकडचे वाढपी अधुन्मधुन इकडे तिकडे येत जात असतात. -- (रेग्युलर मेंबर पुपुकोपु :) )ध्रुव

ऋचा 11/06/2008 - 17:24
घासफुस मिळेल पण बाकीचे लोक मस्त रस्सा भुरकत असतील :P "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

झकासराव 11/06/2008 - 17:30
असत ओ तिथे. मी एकदा तिथे भरली वांग्याची भाजी बोटे चाखत माखत खाल्ली आहे. :) तात्या नेमक कुठल दोन्हीतल?? उद्या कामाचा दिवस असल्याने जमेलच असे नाही पण जोरदार प्रयत्न करु. तात्या शेठ तुमचा फोन नं देवुन ठेवा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

इनोबा म्हणे 11/06/2008 - 17:43
हे हाटील माझ्या घराजवळच आहे. नळस्टॉप चौकातून म्हात्रे पुलाकडे जाताना एक सिग्नल आहे. तिथून उजव्या हाताला(मेहेंदळे गॅरेजकडे) वळायचे. सिग्नलपासून दोन मिनीटाच्या अंतरावर आहे. येणार असेल तेव्हा संपर्क करा, अर्थात आम्ही सद्ध्या पथ्य पाळत असल्यामुळे जेवण्याकरिता कंपनी देऊ शकत नाही. तरिही भेटण्यास आनंद होईल.आणखी कोण कोण येणार आहे? भ्रमणध्वनी: ९३७२ ९३७२ १८ कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 11/06/2008 - 17:48
पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल तुम्हाला लहान पडेल असे मला वाटते, कारण तेथे खुप गर्दी असते, (माझ्या नवर्‍या मुळे मला माहित) आणि मी पाहिली आहे गर्दी, खुप वेळ बसु देतील की नाही माहित नाही . पण पुण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा !

पुरेपुर कोल्हापुर नांवाने २-३ उपहारगृह पाहिली आहेत. त्या पैकी , मेहेदळे गॅरेज (ह्याचे नांव खरे तर 'मेहेंदळे मॅरेज' असे असायला हवे. तिथे लग्नाचा हॉल आहे) जवळचे उपहारगृह मला जवळ आहे. पण ते खरेच खूऽऽऽपच छोटेसे आहे. आरामात बसून गप्पा झोडता येत नाहीत. तात्या, आलात की मला फोन कराल? मी भेटेन. तसेच, उद्या दुपारी मी मुंबईला येतो आहे. दोघे बरोबरच जाऊ म्हणजे मामलेदार मिसळीचा कार्यक्रमही उरकता येईल. तुम्ही म्हणत असाल तर, तुमच्या सोयीनुसार, जाण्याची वेळ पुढे-मागे करता येईल.

वाहवा! काय योग आलाय! मी नक्की येणार. मात्र पुरेपुर कोल्हापूरात आपल्याला मैफल जमविणे मुष्किल आहे बर॑ का तात्या..एकतर तिथे जागा फार नाहिये आणि फार वेळ बूड टेकवून देत नाहीत, मग त्या केसमध्ये आपण एकतर समोरच 'अभिषेक नॉनव्हेज' मध्ये बसू शकतो कि॑वा जवळपास 'शा॑ग्रिला' मध्ये वगैरेपण जाऊ शकतो. तात्या॑च्या पुणे भेटीचा मॅणिजर कोन हायेत.. त्या॑नी कृपया ठरवावे (व आम्हा॑स तसे कळवावे)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

छोटा डॉन 11/06/2008 - 18:40
"शा॑ग्रिला" म्हणजे तेच का " गच्चीतल्या ओल्या पार्टी" वालं ... मागच्या कट्ट्याला ह्या हाटेलाच घोडं एकजण लै नाचवत होता ... नाव आता लक्षात नाही ... बाकी हाटेल मस्त निवांत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 11/06/2008 - 19:00
मीच की तो शांग्रीला चे घोडे नाचवणारा .............................. विजुभाऊ टांगेवाला ( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३० पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 11/06/2008 - 19:10
आरारा ... आमच्या [ कम्]नशिबाने ते घोडे नाचवणारे " विजूभाऊ" निघाले... मेलो आता ... आता स्वप्नात येऊन मनोसोक्त चावल्याशिवाय रहात नाहीत, आज रात्री झोपेलाच कल्टी ... बघु कसे येतात ते स्वप्नात !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 11/06/2008 - 19:27
आता स्वप्नात येऊन मनोसोक्त चावल्याशिवाय रहात नाहीत, आज रात्री झोपेलाच कल्टी ... बघु कसे येतात ते स्वप्नात !!! काळजी करु नकोस्.वत्सा...अम्ही "डॉन"च्या नव्हे तर "ऍन" च्या स्वप्नात तीला भेटायला जात असतो विजुभाऊ टांगेवाला ( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३०

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

नीलकांत 12/06/2008 - 10:38
चला या निमित्ताने डॉ.प्रसाद दाढे, विजुभाऊ आणि भेटुया भेटूया म्हणनार्‍या मनिष ला भेटता येईल. नवीन लोक येताहेत तेही उत्तमच. डॉ.प्रसाद दाढे म्हणतात त्याप्रमाणे पुरेपुर कोल्हापुर हॉटेल टाळावं असंच मला सुध्दा वाटतं. अर्थात मेहेंदळे गॅरेज समोरच्या शाखेत मी कधी गेलो नाही. आमची पेरूगेट जवळची म्हणजेच विजुभाऊंच्या शब्दात पुणे ३० ची शाखा आम्हाला जवळची, ओळखीची आणि मोक्याची. ;) मात्र आमचा जेवणासाठी पहिला प्राधान्यक्रम असतो तो आवारे मराठा खाणावळीला. तेथे सुध्दा खुप गर्दी असते. बसु देणार नाहीत. त्यामुळे जेथे थोडं निवांत बसता येईल. अश्या जागेची निवड करावी असं वाटते. नीलकांत

In reply to by नीलकांत

मनस्वी 12/06/2008 - 10:52
मी चांदणी चौकातील कावेरी सुचवीन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

राजे 11/06/2008 - 18:44
वा वा !!!! पार्टी.. कट्टा... ओसरी... सात्विक ओसरी असे काही लेख आले की प्रतीसादाचा पुर येतो मिपावर ;) खरं तर हेच ह्या संकेतस्थळाच्या जिंदादिलीचे कारण देखील आहे.... :) शुभेच्छा माझ्या ही !!!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

राजे 11/06/2008 - 18:44
वा वा !!!! पार्टी.. कट्टा... ओसरी... सात्विक ओसरी असे काही लेख आले की प्रतीसादाचा पुर येतो मिपावर ;) खरं तर हेच ह्या संकेतस्थळाच्या जिंदादिलीचे कारण देखील आहे.... :) शुभेच्छा माझ्या ही !!!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

शितल 11/06/2008 - 18:49
एन्.डी.ए.रोड वरचे गार्डन हॉटेल ही छान आहे. मस्त निवा॑त गप्पा होतील तुमच्या सगळ्या॑च्या आणि जेवणी उत्तम असते.

In reply to by शितल

भाग्यश्री 12/06/2008 - 00:05
गार्डन कोर्ट नाव त्याचं.. तिथे आहेत तशी चांगली हाटेलं.. अप न अबॉव्ह वगैरे.. पण लांब पडेल.. पूरेपूर कोल्हापूर लहान पडेल.. संध्याकाळी तिथे आणि अभिषेकला इतकी लांबलचक लाईन असते की प्रश्न पडावा पुणेकर घरी जेवतात की नाहीत.. त्यामुळे वेळेचं बघावं लागेल..श्या पुण्यात असते तर आले असते.. २मिनिटांच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून! :( असो.. तुम्ही मजा करा! आणि छान वृत्तांत टाका, फोटो टाका!! शुभेच्छा! http://bhagyashreee.blogspot.com/

आम्हीही वेळात वेळ काढून येत आहोत.... ... आज नेमका दुपारी मि पा वर आलो नाही आणि हे वाचतोय....... उद्या भडकमकर क्लासेस च्या इव्हीनिंग बॅचला सुट्टी देऊन आम्ही येतच आहोत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

डोमकावळा 12/06/2008 - 10:57
मस्त जमणार दिसतेय.... :) तात्या फोटो टाका बरका.... म्हणजे आम्ही आपली दुधाची तहान ताकावर भागवू... :D

मनिष 12/06/2008 - 11:20
चांदनी चौकात पंजाबी तडका पण चांगले आहे....मस्त ऐसपैस निवांत बराच वेळ बसता येते तिथे. नक्की जागा सांगा! मी कुठेही यायला तयार आहे! :) विजुभाऊ - एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका...बर्‍याच वेळा गैरसमजामुळे चुकीचा पता सांगितला जातो...त्यात इतर काही उद्देश नसतो. विचित्र नावे कुठल्याही गावात सापडतील... त्याला त्या गावाच्या इतिहासामधे कारण असतात...उगाच पुण्याला किती शिव्या घालणार. मी स्वतः पुणेरी नाही (जाज्वल्य अभिमान वगैरे अजिबात नाही), लहानपणापासून बर्‍याच शहरात राहिलो/वाढलो आहे...तसेच आता पुण्यात...प्रत्येक गावाची स्वतःची वैशिष्ट्य असतात...आपल्या मनातल्या गावाशी तुलना केल्यास फरक जाणवणारच....फक्त त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये. - मनिष बाकी बर्‍याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. इतरत्र आपल्यापेक्षा वेगळी, पण त्या परिसराच्या दृष्टीने परीपुर्ण/योग्य अशी सिस्टीम असू शकते हे ते समजवून का घेत नाही?

In reply to by मनिष

अमोल केळकर 12/06/2008 - 11:31
बाकी बर्‍याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. इतरत्र आपल्यापेक्षा वेगळी, पण त्या परिसराच्या दृष्टीने परीपुर्ण/योग्य अशी सिस्टीम असू शकते हे ते समजवून का घेत नाही? अमेरिकन लोकांचे माहित नाही पण मुंबईकर नाहीत हो असे. कदाचीत रोजच्या हालअपेष्टा सहन करणारे मुंबईकर कुठलिही सिस्टीम मस्त ऍन्जॉय करतात. हा पण मुंबईबाहेर जास्त नाही राहु शकत. या शहराची नशाच अशी आहे. कृपया वरील सर्व ह. घ्या. केवळ मुंबईप्रेमापोटी लिहिले. राग मानु नका. बाकी चांदणी चौकात बंजारा हील ही मस्त आपला ( पुण्याची पुर्ण माहिती असलेला मुंबईकर) केळकर

In reply to by अमोल केळकर

धमाल मुलगा 12/06/2008 - 11:49
श्री. केळकरांशी सहमत! मी गेली ८ वर्षं सदाशिव / शनवार पेठेत राहून अगदी पक्का नसलो तरी ८०-९० % पुणेरी झालो आहे असं बरेचजण म्हणतात. त्या अनुशंगाने बोलायचं झालं तर.... गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबईत आहे, पण मला ओळख-पाळख नसतानाही रस्त्यात चालता चालता येणारे जाणारे मदत करणारे बरेच भेटले. अगदी आजच उदाहरण सांगतो, बस-स्टॉपवर रांगेत उभा होतो, रांग बरीच मोठी असल्याने स्टॉपच्या शेडबाहेर बरीच पसरली होती. अचानक पाऊस यायला लागला, मी छत्री / रेनकोट काहीच बरोबर आणलं नव्हतं! भिजायला लागल्यावर वैतागून मी "आयच्चा घो! " असं पुर्ण म्हणेपर्यंत डोक्यावरचा पाऊस थांबला, वर पाहिलं तर छत्री! वळून पाहिलं तर रांगेतला मागचा माणूस स्वतःची छत्री माझ्याही डोक्यावर ऍडजेस्ट करुन मंद हसत माझ्याकडे पहात होता.... अगदी असाच पण उलटा अनुभव मला एकदा टिळक रोडवर आला होता. पावसात भिजायला लागलो म्हणून मागच्या काकांना म्हणालो, "तुमच्या छत्रीखाली मीही थांबू का २ मिनिटं?" एकाही अक्षरानं उत्तर न देता म्हातारा माझ्याकडं चपलेखाली चिरडलेला झुरळाकडं पहावं तसा पहात राहिला....छत्री थोडीशी माझ्यापासून दूर घेऊन... :) चलता है! गावागावाची पध्दत आपली. कोल्हापूर-सातारा-सांगली भागात गेलात तर आदरातिथ्य म्हणजे नेमकं काय ह्याचा अर्थ उमगतो, तर मुंबईत आल्यावर "वेळ" किती महत्वाची असते ते कळतं. मराठी सांस्कृतिक जगतात वावरायचं असेल तर पुण्याशिवाय पर्याय नाही :) अन् जोरदार भाऊबंदकी बघायची असेल तर या आमच्या बारामतीला. एकरभर बागायतीसाठी कसे भाऊ भावाच्या डोक्यात कुर्‍हाडी घालतात दाखवतो :)

In reply to by मनिष

श्री 12/06/2008 - 12:07
बाकी बर्‍याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. ======================================================= मनिष भाउ, बाकि काहिंचे माहित नाही, परंतु ज्यानी २६ जुलॅ व बोम्ब्स्फोटाच्या वेळी रस्त्यावर येउन अनुभव घेतला असेल ते कदाचीत आपल्या मतांशी सहमत होणार नाहीत.

विजुभाऊ 12/06/2008 - 11:55
मनिष भौ एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका शिव्या नाही घालत हो मीही पक्का पुणेकर आहे. त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये. पुण्यात काहीही उणे नाही.मी पुण्यात रहाणे एन्जॉय करतो. हिणवणे वगैरे माझ्या मनात नाही. पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर.... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

सायंकाळच्या अचानक मिपाकट्ट्याला शुभेच्छा !!! पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर.... रुकनेका नै विजुभौ, आम्हाला पुण्याची खरी ओळख होते आहे. येऊ द्या अजून पुण्याची काही वैशिष्टे :) ( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३० हाहाहाहाहा :)

नीलकांत 12/06/2008 - 14:05
संध्याकाळी साडेसात वाजता पुरेपुर कोल्हापुर समोर भेटूया. त्या नंतर ठरवूया की कुठे जायचे ते. कोण कोण येतंय ते सांगा म्हणजे उशीर झाल्यास ठरलेल्या जागेवरच येता येईल. तात्या, इनोबा ,डॉ. प्रसाद दाढे किंवा मला फोन करू शकता. पुरेपुर कोल्हापुर समोरचे डॉ. दाढेंनी सुचवलेले हॉटेल किंवा मग चांदणी चौकातील कुठलेही हॉटेल असा काहीसा विचार आहे. तुमचं मत काय? नीलकांत

कलंत्री 12/06/2008 - 17:41
प्रिय तात्या, आपण येणार आहात हे वाचुन बरे वाटले. गप्पा टप्पाच्या दृष्टिने चांदणी चौक बरे पडेल. तेथे बावधन चौपाटी आहे आणि निवांत गप्पाही मारता येतील. कार्यक्रम पत्रिका वितरीत केली तर अजून बरे होईल. १००% भेटणार. कलंत्री

विसोबा खेचर 13/06/2008 - 07:48
काल आम्हाला आमचे पुण्यातले काही मिपाकर मित्र वेळात वेळ काढून भेटले याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहेत. प्राजू, डॉ प्रसाद दाढे, भडकमकर मास्तर, इनोबा, गमभनकार ओंकार जोशी, मनिष, नीलकांत, आणि विजूभाऊ या मंडळींचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. या सर्व मित्रांना भेटून आम्हास आम्हास अत्यंत आनंद झाला. मिसळपावबद्दल सर्वांनी भरभरून प्रेम व्यक्त केले ही गोष्ट आम्ही मोलाची समजतो! काल जेवत असतांनाच अमेरिकेहून डांबिसकाकांचा फोन आला व त्यांनी प्रेमाने सर्वांची चौकशी केली. त्याचप्रमाणे धमालमुलगा व आनंदयात्री यांनीही सर्व कट्टेकरींची चौकशी केली! :) सध्या डॉक्टरांनी पूर्ण बंदी केली असून अण्णांना कुणासही भेटू देत नाहीयेत. तरीही त्यांच्या घरच्यांनी आम्हाला विशेष परवानगी दिली आणि आम्हाला आमचे मानसगुरू भीमण्णा यांचे दर्शन मिळाले. अण्णांनी हातात हात घेऊन आमची विचारपूस केली, जरा वेळ शेजारी बसवलं, यापरीस दुसरे भाग्य ते कोणते? असो.. एक दोन महत्वाची कामे आटपून आज संध्याकाळपर्यंत संत तात्याबा ठाण्याला परततील. पुन्हा एकवार सर्व मिपाकर पुणेकरांचे मनापासून आभार... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्वांना भेटून आम्हालाही फार बरे वाटले... ... क्लासला दिलेली सुट्टी कारणी लागली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

झकासराव 14/06/2008 - 08:14
आयला, इनोबाने माझी फिरकी घेतली की काय?? मग मी कोणाशी फोनवर बोल्लो तात्या म्हणून??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मलाही स॑त तात्याबा महाराजा॑चे सदेह दर्शन प्रथमच घडले, त्याचप्रमाणे नीलका॑त, मनिष व सर्वव्यापी प्राजूही पहिल्या॑दाच भेटले. विजूभाऊ॑नी रजनिशा॑चेही प्रत्यक्ष दर्शन घडविले (आता ते सर्व मिपाकरा॑नाही ते लवकरच मिळणार आहे. मला ठाऊक आहे, आ॑बटशौकीन आता जिभल्या चाटत असतील.. :) काल फक्त एकाच गोष्टीची रूखरूख लागली. तात्या॑चे गाणे राहूनच गेले.. ते स्थळ गाण्याच्या मैफिलीला योग्य नव्हते हे खरे आहे पण पुढच्या वेळेस मात्र ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. पण गप्पा मात्र पुष्कळ झाल्या (सविस्तर वृत्ता॑ताचा पोवाडा शाहिर ओमकार सादर करणारच आहेत..) बरीच म॑डळी काल फोटू काढत होती.. टाका की राव

सचीन जी 13/06/2008 - 11:53
अरेरे ! मिपा करांना भेटण्याची चांगली संधी आहे. पण काय करणार! आम्ही पडलो आहोत बंगळुरात. मजा करा पुणेकरांनो ! मिपा करांना भेटण्याकरीता तळमणारा, सचीन जी!

संजीव नाईक 13/06/2008 - 15:26
प्रेम विर तात्या. जेवणा बरोबर मिसळपाव पण मिळेल काय? त्यां अनुशंगाने मि.पा. चे नावचे सार्थक होईल. इतके दिवस संन्यास घेतलेला संजीव

महेश हतोळकर 11/06/2008 - 16:44
वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...! बाकिच्यांनी दिली तर चालणार नाही का?

In reply to by महेश हतोळकर

विसोबा खेचर 11/06/2008 - 16:52
बाकिच्यांनी दिली तर चालणार नाही का? अवश्य चालेल. आम्ही फक्त वानगीदाखल काही नांवे घेतली होती.. अवश्य भेटूया उद्या.. तात्या. अरे धमाल मुला, अरे क्षमा कर. आमचा बेत अचानक ठरला! पुढच्या वेळेस निश्चित आगाऊ कल्पना देऊ! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 11/06/2008 - 17:01
च्छ्या! कै च्या कै काय तात्या? क्षमा वगैरे कसली मागताय? उगाच लाजवू नका ह्या लेकराला! आपल्याला काय हो, पुण्यात नायतर ठाण्यात करु कट्टा :) कसें? (स्वगतः ह्म्म...पि'ण्यात' ला असल्याने पु'ण्यात' ठा'ण्यात' असे यमक जुळताहेत की काय?)

धमाल मुलगा 11/06/2008 - 16:48
तात्याबा...ये नाइन्साफी है| मी काल रात्रीपर्यंत पुण्यातच होतो. कालच फाफलत मुंबईला परत आलोय :( ह्यॅट्ट....एक झक्कास कट्टा चुकणार माझा :(( असो...मंडळी, मज्जा करो ! खुप खुप गप्पा मारो...तात्याशेठ मुडमध्ये असतील तर उनसे गाणं-बिणं ऐको!!!! आम्ही आपले बसतो भांडूपात एकटेच भाकरतुकडे मोडत :( नेक्श्टैम तात्याबा, मेरेको लवकर सांगो, म्हणजे मेरेको थोडा सेटींग करने को येगा! क्या?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 11/06/2008 - 18:20
हा तात्यांच्या "अचानक तरुण मंडळाचा" कट्टा आहे ... माझे तात्यांशी बोलणे झाले आहे, मी पुण्यात आल्यावर साधारणता "२१,२२" जेव्हा जमेल तेव्हा "तात्या" वेळ काढून आपल्या "खास सात्विक [ हसु का जोरात ?] कट्ट्याला" येणार आहेत.... तेव्हा आपल्या "हौसखास मंडळ, वर्ष ९१ " चा कट्टा जोरदार होणारच ... आत्ता मारु दे ह्या मंडळींना मजा !!! अवांतर : ह्यावेळी मी " काडी टाकून " पळून जाणार नाही ... अतिअवांतर : तु काय ठरवलेस, आहेस की फिरंग्यानी पकडून ठेवले मुंबापुरीत ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 12/06/2008 - 12:20
है शाब्बास रे!!! थोडीफार सेटींग लावायला सुरुवात केलेलीच आहे मीही! हौसखास मंडळ देऊ जोरात दणाणून! मी काय ठरवायचंय आत्तापासून? मेंबरं फिक्स होऊदेत आधी. मग स्थळ, तजवीज ठरवू ;) तजवीज म्हणजे, तुळशीच्या बिया, दूध, गवती चहा, भजनी मंडळ, बादशाहीतून जेवणाची पार्सलं, भरपूर गुलकंद घातलेली बिन-सुपारीची मसाला पानं, इ.इ. (आता खास सात्वीक कट्टा म्हणतोय म्हणून हो! नाहीतर आमची तयारी वेगळीच असते. आम्ही साले गुत्त्यावरचे पडीक बेवडे!) आणि हो, मस्त ग़जला, गाणी-बजावणी पण होऊन जाऊ द्या हौसखासच्या कट्ट्याला, मास्तर येणार असतील तर सोन्याहून पिवळं! नाट्यचर्चाही घडेल :) क्काय?

ऋचा 11/06/2008 - 16:59
बाकिच्यांना यायच असेल तर काय करायच???? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:04
बाकिच्यांना यायच असेल तर काय करायच???? आम्हाला सगळ्याच मिपाकर पुणेकरांना भेटायची इच्छा आहे. परंतु उद्या कार्यालयीन दिवस आसल्यामुळे सर्वांनाच जमेल, सवड होईल असे नाही याची कल्पना आहे... ऋचाताई, तुम्ही मांसाहार करत असाल तर अवश्य या. 'पुरेपूर कोल्हापूर' या हॉटेलात फार छान स्वयंपाक करतात.. :) तात्या.

In reply to by कुंदन

राजे 11/06/2008 - 17:08
मला प्रचंड त्रास होत आहे.... सुदैव तुमचे की आम्ही पुण्यात नाही आहोत.... ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मनिष 11/06/2008 - 17:04
संध्याकाळी ८ नंतर असेल तर मी नक्की भेटतो! कुठे आहे हे 'पुरेपूर कोल्हापूर'?

In reply to by मनिष

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:07
कुठे आहे हे 'पुरेपूर कोल्हापूर'? ते मलाही नीटसं माहीत नाही. खरं तर मी तेथे दोनतीनदा गेलो आहे पण रिक्षाने गेल्यामुळे मला नेमका पत्ता सांगता नाही येणार! ते तुम्हाला कुणीतरी पुणेकरच सांगतील.. :) आपला, (रस्ते हमखास चुकणारा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 11/06/2008 - 18:12
तुम्हाला "स.प. महाविद्यालय" माहित आहे ना ??? त्याच्यासमोर थोडी खालच्या म्हणजे डेक्कन साईडला एक गल्ली जाते ती सरळ "लक्ष्मी रस्त्या" कडे ... त्याच रस्तावर आहे ... पहिल्यांदा "दुर्गा नॉनव्हेज" लागेल, त्यानंतर ५० पावलांच्या आत "पुरेपुर कोल्हापुर " ... लक्ष्मी रस्त्याकडून आलात तर पहिल्यांदा "सेटी प्राईड शूज" हे दुकान हुडका ... त्याच्यासमोरुन सरळ चालत "टिळक रोडकडे" निघा, ३५-४० पावलात "पुरेपुर" लागेल ... पण, हम्म् , काय उपयोग ? आम्ही नसणार तिथे !!! पुणेकर मंडळी ऐश करा, चांगले शिकरण खावा, मटार उसळ खावा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 11/06/2008 - 18:53
याला म्हणायचे अस्सल सदाशिवपेठी पुणेकर पुणे ३० वाले लोकाना चुकीचे पत्ते सांगुन पुणे दर्शन घडवण्याचे पुण्य पदरात पाडुन घेतात तू सांगतो ते नुस्ते कोल्हापुर. " "पुरेपुर कोल्हापुर हे मेहेंदळे गॅरेज जवळ आहे. नळ स्टॉप जवळ. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

ध्रुव 11/06/2008 - 19:05
पुरेपुर कोल्हापुर यांची दोन दुकाने आहेत एक स.प. महाविद्यालयाच्या समोरच्या गल्लीत व दुसरे मेहेंदळे गॅरेज एरंडवणे येथे. तुम्ही कुठे जमणार आहात आणि किती वाजता?? -- ध्रुव

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 11/06/2008 - 19:08
आयला मे त्या "पुणे - ३० " वाल्याला एवढ्या दिवस "पुरेपुर" समजून हाणत होतो ... पण कोल्हापुरी साज आहे खाण्यात !!! स्वगत : घातला की "विजूभाऊंनी" शेवटी धोतराला हात ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 11/06/2008 - 17:06
तात्या उद्या तो रीपोर्टिंग साहेब येणार आहे. खडुस लौकर गेला तर लै बरे होईल. अन्यथा मला यायला थोडा उशीर होईल. हाटेल कोठे आहे ते सांगा . मी येईन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

जी गल्ली बादशाही बोर्डींग किंवा टिळकस्मारक मंदिरासमोर आहे जी पेरूगेट कडे जाते. त्याच गल्लीत आहे 'पुरेपूर कोल्हापूर'. त्यांची एक शाखा मेहेंदळे गॅरेज समोर 'अभिषेक प्युअर व्हेज' शेजारी आहे. (माहीतगार) पुण्याचे पेशवे

मनस्वी 11/06/2008 - 17:23
'अचानक कट्ट्याला' शुभेच्छा. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा 11/06/2008 - 17:13
नक्की कुठे आहे म्हणजे मेहेंदळे गॅरेज आहे ना तिथुन सरळ पुढे यायच आणि तिथे अभिषेक नावाच भलं मोठं हॉटेल आहे. त्याच्या शेजारीच आहे "पुरे पुर कोल्हापुर" आवांतर : तिथे पांढरा रस्सा खुप छान मिळतो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by मनिष

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:19
थोडा घासफूस (व्हेज) मिळेल ना? मी येतो ८.१५ - ८.३० पर्यंत. हो, नक्की मिळेल. मीही तेथे ८.१५ पर्यंत पोहोचतो आहे! :) तात्या.

भोचक 11/06/2008 - 17:13
तात्या एकदा इंदुरात या. खायची मजा खरी इथे. डाळबाटीपासून काय वाट्टेल ते इथे छान मिळतं. कधी तरी इथेही कट्टा जमवायला या बुवा. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. विजूभौ हे वाक्य फार आवडलं.

धमाल मुलगा 11/06/2008 - 17:21
"पुरेपुर कोल्हापुर" ह्या नावाची पुण्यात २ हॉटेलं आहेत. १.पेरुगेट पोलिस चौकीपाशी. २.एरंडवणा, कोथरुड (दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाण्याच्या रस्त्यावर) तात्याबांनी ह्या २ पैकी नक्की कोणतं हे सांगितल्यास मंडळींना येणे/ठरवणे सोपे जाईल :) - (तांबडा-पांढरा रस्साप्रेमी) ध मा ल. स्वगतः च्यामारी, ह्या सगळ्यांना एकदा आमच्या हेमंतरावांच्या हातचं कोल्हापुरी मटन्/चिकन खिलवलं पाहिजे....रस्सा म्हणजे काय असतो त्याची व्याख्या ठरावी असा हेमंतरावांचा हातखंडा तांबड्या-पांढर्‍या रश्याबाबत!

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 11/06/2008 - 17:31
पेरुगेट पोलिस चौकीपाशी आहे ते नुस्ते "कोल्हापुर" आहे. "पुरेपुर कोल्हापुर" हे दिनानाथ हॉस्पिटलपाशीच आहे. (तरी बरे तात्यानी ते हाटेल कोणत्यातरी गणपतीच्या का मारुतीचा देवळापाशी आहे असे नाही सांगितले. केवढा घोळ झाला असता ना. पुण्यात अचानक मारुती पासुन सोन्या,जिलब्या, पत्र्या ...असे बरेच मारुती आहेत. माती, दगडी,हती,असे बरेच नावाचे गणपती आहेत्.एके ठिकाणी खुन्या मुरलीधर पण आहे.धन्य ते पुणे) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

ध्रुव 11/06/2008 - 19:09
अरे नाय रे विजुभाऊ... दोन्ही सेम आहेत. कुठल्याच दुकानात आमची शाखा नाही असे लिहीलेले नाही. अरे दोन्हीकडचे वाढपी अधुन्मधुन इकडे तिकडे येत जात असतात. -- (रेग्युलर मेंबर पुपुकोपु :) )ध्रुव

ऋचा 11/06/2008 - 17:24
घासफुस मिळेल पण बाकीचे लोक मस्त रस्सा भुरकत असतील :P "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

झकासराव 11/06/2008 - 17:30
असत ओ तिथे. मी एकदा तिथे भरली वांग्याची भाजी बोटे चाखत माखत खाल्ली आहे. :) तात्या नेमक कुठल दोन्हीतल?? उद्या कामाचा दिवस असल्याने जमेलच असे नाही पण जोरदार प्रयत्न करु. तात्या शेठ तुमचा फोन नं देवुन ठेवा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

इनोबा म्हणे 11/06/2008 - 17:43
हे हाटील माझ्या घराजवळच आहे. नळस्टॉप चौकातून म्हात्रे पुलाकडे जाताना एक सिग्नल आहे. तिथून उजव्या हाताला(मेहेंदळे गॅरेजकडे) वळायचे. सिग्नलपासून दोन मिनीटाच्या अंतरावर आहे. येणार असेल तेव्हा संपर्क करा, अर्थात आम्ही सद्ध्या पथ्य पाळत असल्यामुळे जेवण्याकरिता कंपनी देऊ शकत नाही. तरिही भेटण्यास आनंद होईल.आणखी कोण कोण येणार आहे? भ्रमणध्वनी: ९३७२ ९३७२ १८ कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 11/06/2008 - 17:48
पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल तुम्हाला लहान पडेल असे मला वाटते, कारण तेथे खुप गर्दी असते, (माझ्या नवर्‍या मुळे मला माहित) आणि मी पाहिली आहे गर्दी, खुप वेळ बसु देतील की नाही माहित नाही . पण पुण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा !

पुरेपुर कोल्हापुर नांवाने २-३ उपहारगृह पाहिली आहेत. त्या पैकी , मेहेदळे गॅरेज (ह्याचे नांव खरे तर 'मेहेंदळे मॅरेज' असे असायला हवे. तिथे लग्नाचा हॉल आहे) जवळचे उपहारगृह मला जवळ आहे. पण ते खरेच खूऽऽऽपच छोटेसे आहे. आरामात बसून गप्पा झोडता येत नाहीत. तात्या, आलात की मला फोन कराल? मी भेटेन. तसेच, उद्या दुपारी मी मुंबईला येतो आहे. दोघे बरोबरच जाऊ म्हणजे मामलेदार मिसळीचा कार्यक्रमही उरकता येईल. तुम्ही म्हणत असाल तर, तुमच्या सोयीनुसार, जाण्याची वेळ पुढे-मागे करता येईल.

वाहवा! काय योग आलाय! मी नक्की येणार. मात्र पुरेपुर कोल्हापूरात आपल्याला मैफल जमविणे मुष्किल आहे बर॑ का तात्या..एकतर तिथे जागा फार नाहिये आणि फार वेळ बूड टेकवून देत नाहीत, मग त्या केसमध्ये आपण एकतर समोरच 'अभिषेक नॉनव्हेज' मध्ये बसू शकतो कि॑वा जवळपास 'शा॑ग्रिला' मध्ये वगैरेपण जाऊ शकतो. तात्या॑च्या पुणे भेटीचा मॅणिजर कोन हायेत.. त्या॑नी कृपया ठरवावे (व आम्हा॑स तसे कळवावे)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

छोटा डॉन 11/06/2008 - 18:40
"शा॑ग्रिला" म्हणजे तेच का " गच्चीतल्या ओल्या पार्टी" वालं ... मागच्या कट्ट्याला ह्या हाटेलाच घोडं एकजण लै नाचवत होता ... नाव आता लक्षात नाही ... बाकी हाटेल मस्त निवांत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 11/06/2008 - 19:00
मीच की तो शांग्रीला चे घोडे नाचवणारा .............................. विजुभाऊ टांगेवाला ( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३० पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 11/06/2008 - 19:10
आरारा ... आमच्या [ कम्]नशिबाने ते घोडे नाचवणारे " विजूभाऊ" निघाले... मेलो आता ... आता स्वप्नात येऊन मनोसोक्त चावल्याशिवाय रहात नाहीत, आज रात्री झोपेलाच कल्टी ... बघु कसे येतात ते स्वप्नात !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 11/06/2008 - 19:27
आता स्वप्नात येऊन मनोसोक्त चावल्याशिवाय रहात नाहीत, आज रात्री झोपेलाच कल्टी ... बघु कसे येतात ते स्वप्नात !!! काळजी करु नकोस्.वत्सा...अम्ही "डॉन"च्या नव्हे तर "ऍन" च्या स्वप्नात तीला भेटायला जात असतो विजुभाऊ टांगेवाला ( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३०

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

नीलकांत 12/06/2008 - 10:38
चला या निमित्ताने डॉ.प्रसाद दाढे, विजुभाऊ आणि भेटुया भेटूया म्हणनार्‍या मनिष ला भेटता येईल. नवीन लोक येताहेत तेही उत्तमच. डॉ.प्रसाद दाढे म्हणतात त्याप्रमाणे पुरेपुर कोल्हापुर हॉटेल टाळावं असंच मला सुध्दा वाटतं. अर्थात मेहेंदळे गॅरेज समोरच्या शाखेत मी कधी गेलो नाही. आमची पेरूगेट जवळची म्हणजेच विजुभाऊंच्या शब्दात पुणे ३० ची शाखा आम्हाला जवळची, ओळखीची आणि मोक्याची. ;) मात्र आमचा जेवणासाठी पहिला प्राधान्यक्रम असतो तो आवारे मराठा खाणावळीला. तेथे सुध्दा खुप गर्दी असते. बसु देणार नाहीत. त्यामुळे जेथे थोडं निवांत बसता येईल. अश्या जागेची निवड करावी असं वाटते. नीलकांत

In reply to by नीलकांत

मनस्वी 12/06/2008 - 10:52
मी चांदणी चौकातील कावेरी सुचवीन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

राजे 11/06/2008 - 18:44
वा वा !!!! पार्टी.. कट्टा... ओसरी... सात्विक ओसरी असे काही लेख आले की प्रतीसादाचा पुर येतो मिपावर ;) खरं तर हेच ह्या संकेतस्थळाच्या जिंदादिलीचे कारण देखील आहे.... :) शुभेच्छा माझ्या ही !!!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

राजे 11/06/2008 - 18:44
वा वा !!!! पार्टी.. कट्टा... ओसरी... सात्विक ओसरी असे काही लेख आले की प्रतीसादाचा पुर येतो मिपावर ;) खरं तर हेच ह्या संकेतस्थळाच्या जिंदादिलीचे कारण देखील आहे.... :) शुभेच्छा माझ्या ही !!!! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

शितल 11/06/2008 - 18:49
एन्.डी.ए.रोड वरचे गार्डन हॉटेल ही छान आहे. मस्त निवा॑त गप्पा होतील तुमच्या सगळ्या॑च्या आणि जेवणी उत्तम असते.

In reply to by शितल

भाग्यश्री 12/06/2008 - 00:05
गार्डन कोर्ट नाव त्याचं.. तिथे आहेत तशी चांगली हाटेलं.. अप न अबॉव्ह वगैरे.. पण लांब पडेल.. पूरेपूर कोल्हापूर लहान पडेल.. संध्याकाळी तिथे आणि अभिषेकला इतकी लांबलचक लाईन असते की प्रश्न पडावा पुणेकर घरी जेवतात की नाहीत.. त्यामुळे वेळेचं बघावं लागेल..श्या पुण्यात असते तर आले असते.. २मिनिटांच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून! :( असो.. तुम्ही मजा करा! आणि छान वृत्तांत टाका, फोटो टाका!! शुभेच्छा! http://bhagyashreee.blogspot.com/

आम्हीही वेळात वेळ काढून येत आहोत.... ... आज नेमका दुपारी मि पा वर आलो नाही आणि हे वाचतोय....... उद्या भडकमकर क्लासेस च्या इव्हीनिंग बॅचला सुट्टी देऊन आम्ही येतच आहोत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

डोमकावळा 12/06/2008 - 10:57
मस्त जमणार दिसतेय.... :) तात्या फोटो टाका बरका.... म्हणजे आम्ही आपली दुधाची तहान ताकावर भागवू... :D

मनिष 12/06/2008 - 11:20
चांदनी चौकात पंजाबी तडका पण चांगले आहे....मस्त ऐसपैस निवांत बराच वेळ बसता येते तिथे. नक्की जागा सांगा! मी कुठेही यायला तयार आहे! :) विजुभाऊ - एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका...बर्‍याच वेळा गैरसमजामुळे चुकीचा पता सांगितला जातो...त्यात इतर काही उद्देश नसतो. विचित्र नावे कुठल्याही गावात सापडतील... त्याला त्या गावाच्या इतिहासामधे कारण असतात...उगाच पुण्याला किती शिव्या घालणार. मी स्वतः पुणेरी नाही (जाज्वल्य अभिमान वगैरे अजिबात नाही), लहानपणापासून बर्‍याच शहरात राहिलो/वाढलो आहे...तसेच आता पुण्यात...प्रत्येक गावाची स्वतःची वैशिष्ट्य असतात...आपल्या मनातल्या गावाशी तुलना केल्यास फरक जाणवणारच....फक्त त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये. - मनिष बाकी बर्‍याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. इतरत्र आपल्यापेक्षा वेगळी, पण त्या परिसराच्या दृष्टीने परीपुर्ण/योग्य अशी सिस्टीम असू शकते हे ते समजवून का घेत नाही?

In reply to by मनिष

अमोल केळकर 12/06/2008 - 11:31
बाकी बर्‍याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. इतरत्र आपल्यापेक्षा वेगळी, पण त्या परिसराच्या दृष्टीने परीपुर्ण/योग्य अशी सिस्टीम असू शकते हे ते समजवून का घेत नाही? अमेरिकन लोकांचे माहित नाही पण मुंबईकर नाहीत हो असे. कदाचीत रोजच्या हालअपेष्टा सहन करणारे मुंबईकर कुठलिही सिस्टीम मस्त ऍन्जॉय करतात. हा पण मुंबईबाहेर जास्त नाही राहु शकत. या शहराची नशाच अशी आहे. कृपया वरील सर्व ह. घ्या. केवळ मुंबईप्रेमापोटी लिहिले. राग मानु नका. बाकी चांदणी चौकात बंजारा हील ही मस्त आपला ( पुण्याची पुर्ण माहिती असलेला मुंबईकर) केळकर

In reply to by अमोल केळकर

धमाल मुलगा 12/06/2008 - 11:49
श्री. केळकरांशी सहमत! मी गेली ८ वर्षं सदाशिव / शनवार पेठेत राहून अगदी पक्का नसलो तरी ८०-९० % पुणेरी झालो आहे असं बरेचजण म्हणतात. त्या अनुशंगाने बोलायचं झालं तर.... गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबईत आहे, पण मला ओळख-पाळख नसतानाही रस्त्यात चालता चालता येणारे जाणारे मदत करणारे बरेच भेटले. अगदी आजच उदाहरण सांगतो, बस-स्टॉपवर रांगेत उभा होतो, रांग बरीच मोठी असल्याने स्टॉपच्या शेडबाहेर बरीच पसरली होती. अचानक पाऊस यायला लागला, मी छत्री / रेनकोट काहीच बरोबर आणलं नव्हतं! भिजायला लागल्यावर वैतागून मी "आयच्चा घो! " असं पुर्ण म्हणेपर्यंत डोक्यावरचा पाऊस थांबला, वर पाहिलं तर छत्री! वळून पाहिलं तर रांगेतला मागचा माणूस स्वतःची छत्री माझ्याही डोक्यावर ऍडजेस्ट करुन मंद हसत माझ्याकडे पहात होता.... अगदी असाच पण उलटा अनुभव मला एकदा टिळक रोडवर आला होता. पावसात भिजायला लागलो म्हणून मागच्या काकांना म्हणालो, "तुमच्या छत्रीखाली मीही थांबू का २ मिनिटं?" एकाही अक्षरानं उत्तर न देता म्हातारा माझ्याकडं चपलेखाली चिरडलेला झुरळाकडं पहावं तसा पहात राहिला....छत्री थोडीशी माझ्यापासून दूर घेऊन... :) चलता है! गावागावाची पध्दत आपली. कोल्हापूर-सातारा-सांगली भागात गेलात तर आदरातिथ्य म्हणजे नेमकं काय ह्याचा अर्थ उमगतो, तर मुंबईत आल्यावर "वेळ" किती महत्वाची असते ते कळतं. मराठी सांस्कृतिक जगतात वावरायचं असेल तर पुण्याशिवाय पर्याय नाही :) अन् जोरदार भाऊबंदकी बघायची असेल तर या आमच्या बारामतीला. एकरभर बागायतीसाठी कसे भाऊ भावाच्या डोक्यात कुर्‍हाडी घालतात दाखवतो :)

In reply to by मनिष

श्री 12/06/2008 - 12:07
बाकी बर्‍याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. ======================================================= मनिष भाउ, बाकि काहिंचे माहित नाही, परंतु ज्यानी २६ जुलॅ व बोम्ब्स्फोटाच्या वेळी रस्त्यावर येउन अनुभव घेतला असेल ते कदाचीत आपल्या मतांशी सहमत होणार नाहीत.

विजुभाऊ 12/06/2008 - 11:55
मनिष भौ एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका शिव्या नाही घालत हो मीही पक्का पुणेकर आहे. त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये. पुण्यात काहीही उणे नाही.मी पुण्यात रहाणे एन्जॉय करतो. हिणवणे वगैरे माझ्या मनात नाही. पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर.... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

सायंकाळच्या अचानक मिपाकट्ट्याला शुभेच्छा !!! पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर.... रुकनेका नै विजुभौ, आम्हाला पुण्याची खरी ओळख होते आहे. येऊ द्या अजून पुण्याची काही वैशिष्टे :) ( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३० हाहाहाहाहा :)

नीलकांत 12/06/2008 - 14:05
संध्याकाळी साडेसात वाजता पुरेपुर कोल्हापुर समोर भेटूया. त्या नंतर ठरवूया की कुठे जायचे ते. कोण कोण येतंय ते सांगा म्हणजे उशीर झाल्यास ठरलेल्या जागेवरच येता येईल. तात्या, इनोबा ,डॉ. प्रसाद दाढे किंवा मला फोन करू शकता. पुरेपुर कोल्हापुर समोरचे डॉ. दाढेंनी सुचवलेले हॉटेल किंवा मग चांदणी चौकातील कुठलेही हॉटेल असा काहीसा विचार आहे. तुमचं मत काय? नीलकांत

कलंत्री 12/06/2008 - 17:41
प्रिय तात्या, आपण येणार आहात हे वाचुन बरे वाटले. गप्पा टप्पाच्या दृष्टिने चांदणी चौक बरे पडेल. तेथे बावधन चौपाटी आहे आणि निवांत गप्पाही मारता येतील. कार्यक्रम पत्रिका वितरीत केली तर अजून बरे होईल. १००% भेटणार. कलंत्री

विसोबा खेचर 13/06/2008 - 07:48
काल आम्हाला आमचे पुण्यातले काही मिपाकर मित्र वेळात वेळ काढून भेटले याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहेत. प्राजू, डॉ प्रसाद दाढे, भडकमकर मास्तर, इनोबा, गमभनकार ओंकार जोशी, मनिष, नीलकांत, आणि विजूभाऊ या मंडळींचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. या सर्व मित्रांना भेटून आम्हास आम्हास अत्यंत आनंद झाला. मिसळपावबद्दल सर्वांनी भरभरून प्रेम व्यक्त केले ही गोष्ट आम्ही मोलाची समजतो! काल जेवत असतांनाच अमेरिकेहून डांबिसकाकांचा फोन आला व त्यांनी प्रेमाने सर्वांची चौकशी केली. त्याचप्रमाणे धमालमुलगा व आनंदयात्री यांनीही सर्व कट्टेकरींची चौकशी केली! :) सध्या डॉक्टरांनी पूर्ण बंदी केली असून अण्णांना कुणासही भेटू देत नाहीयेत. तरीही त्यांच्या घरच्यांनी आम्हाला विशेष परवानगी दिली आणि आम्हाला आमचे मानसगुरू भीमण्णा यांचे दर्शन मिळाले. अण्णांनी हातात हात घेऊन आमची विचारपूस केली, जरा वेळ शेजारी बसवलं, यापरीस दुसरे भाग्य ते कोणते? असो.. एक दोन महत्वाची कामे आटपून आज संध्याकाळपर्यंत संत तात्याबा ठाण्याला परततील. पुन्हा एकवार सर्व मिपाकर पुणेकरांचे मनापासून आभार... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्वांना भेटून आम्हालाही फार बरे वाटले... ... क्लासला दिलेली सुट्टी कारणी लागली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

झकासराव 14/06/2008 - 08:14
आयला, इनोबाने माझी फिरकी घेतली की काय?? मग मी कोणाशी फोनवर बोल्लो तात्या म्हणून??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मलाही स॑त तात्याबा महाराजा॑चे सदेह दर्शन प्रथमच घडले, त्याचप्रमाणे नीलका॑त, मनिष व सर्वव्यापी प्राजूही पहिल्या॑दाच भेटले. विजूभाऊ॑नी रजनिशा॑चेही प्रत्यक्ष दर्शन घडविले (आता ते सर्व मिपाकरा॑नाही ते लवकरच मिळणार आहे. मला ठाऊक आहे, आ॑बटशौकीन आता जिभल्या चाटत असतील.. :) काल फक्त एकाच गोष्टीची रूखरूख लागली. तात्या॑चे गाणे राहूनच गेले.. ते स्थळ गाण्याच्या मैफिलीला योग्य नव्हते हे खरे आहे पण पुढच्या वेळेस मात्र ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. पण गप्पा मात्र पुष्कळ झाल्या (सविस्तर वृत्ता॑ताचा पोवाडा शाहिर ओमकार सादर करणारच आहेत..) बरीच म॑डळी काल फोटू काढत होती.. टाका की राव

सचीन जी 13/06/2008 - 11:53
अरेरे ! मिपा करांना भेटण्याची चांगली संधी आहे. पण काय करणार! आम्ही पडलो आहोत बंगळुरात. मजा करा पुणेकरांनो ! मिपा करांना भेटण्याकरीता तळमणारा, सचीन जी!

संजीव नाईक 13/06/2008 - 15:26
प्रेम विर तात्या. जेवणा बरोबर मिसळपाव पण मिळेल काय? त्यां अनुशंगाने मि.पा. चे नावचे सार्थक होईल. इतके दिवस संन्यास घेतलेला संजीव
राम राम मंडळी, उद्या आम्ही काही महत्वाच्या कामाकरता पुण्यात येत आहोत. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी आम्हाला थोडी सवड मिळेल. तेव्हा मिसळपाव डॉट कॉमचे तंत्रविभाग प्रमूख नीलकांत यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे काही मित्र धमाल मुलगा, डॉ दाढे, आनंदयात्री, पेठकरशेठ, इनोबा यांचीही भेट घ्यायची आमची इच्छा आहे. अर्थात, सदर मंडळींना आपापले उद्योगधंदे आहेत याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे कुणावरही सक्ति नाही. 'पुरेपूर कोल्हापूर' या नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे. संध्याकाळचे भोजन आम्ही त्या हॉटेलात घेऊ. वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...!

संडे स्पेशल (खव्याच्या पोळ्या)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:25
७.तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावी. अहो स्वातीताई, का असा छळ मांडला आहात? अहो नुसती पाकृ वाचूनच जीवाला खूप त्रास झाला! बाय द वे, आमची म्हातारीही या पोळ्या फार सुरेख करते बर्र का! आता सांगतोच तिला करायला...! :) असो, स्वातीताई, आपल्या उत्तमोत्तम पाकृंमुळे मिपा अधिकाधिक श्रीमंत व्हावे, हीच इच्छा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गिरिजा 11/06/2008 - 18:15
अहो स्वातीताई, का असा छळ मांडला आहात? अहो नुसती पाकृ वाचूनच जीवाला खूप त्रास झाला!
सहमत.. :P -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

शितल 11/06/2008 - 17:35
स्वाती ताई तुमचे मनःपुर्वक आभार. मला हवी असलेली पाककृती आपण मला सा॑गितलीत. मला ह्या पोळ्या प्रच्॑ड आवडतात. पण सध्या एक प्रश्न आहे इथे (अमेरिकेत )खवा मिळेल काय ? कि॑वा खवा मला घरी बनवता येईल काय.(असेल तर मला सा॑गा )

In reply to by शितल

मी घरी खवा बनवून पेढे केले होते पण पोळ्या काही केल्या नाहीत... पण त्याची तुला रेसिपी देते, पण खूप वेळखाऊ काम आहे. ४ कप होलमिल्क दुध घे,मध्यम आचेवर सतत ढवळत राहा, पहिले १ तास ३-४ मिनिटाच्या अंतरावर ढ्वळ पण नंतर सतत ढवळत राहा. साधारण तीन तासांनी दुध घट्ट होऊन १ कप झाले कि, त्यात १ कप साखर टाकते. रिकोस्टा चिज वापरून पण करतात असे कुठेतरी वाचले आहे आंतरजलावरच...:)मिळाले कि तुला शेअर करेन...:)

In reply to by स्वाती राजेश

मोठ्ठा तवा गरम करत ठेवायचा. डाव्या बाजूला 'डबल फॅट' दूध पातेल्यात घ्यायचे. उजव्या हातात कलथा तयार ठेवायचा. तवा व्यवस्थित तापला की छोट्या वाटीने एक वाटी दूध तव्यावर ओतायचे. उजव्या हातातील कलथ्याने ते भराभर परतून त्यातील पाण्याचा अंश काढून टाकायचा. दूध घट्ट झाले (पाणी आटून गेले)की कलथ्याने ते काढून घ्यायचे. पुन्हा दुसरी वाटी दूध तव्यावर ओतायचे. ही प्रक्रिया वापरून पातेल्यातील सर्व दूध संपवायचे. की झाला 'घरगुती खवा' तयार. काम त्रासाचे आहे. आणि इथे तयार खवा मिळत असल्यामुळे वरील प्रक्रिया घरी करून पाहिलेली नाही. (वाचलेली आहे.).

In reply to by स्वाती राजेश

वरदा 11/06/2008 - 19:30
करुन पाहिलाय घरी खवा करुन पोळ्या... आनोडाईज्ड नॉन स्टीक च्या कढईसारख्या मोठ्या पसरट भांड्यात केला की लवकर होईल आणि खाली लागणार नाही...तरीही सतत ढवळावा मात्र लागतोच....आणि पोळ्या करण्यासाठी चांगला सुकवावा लागतो ..मोदकांसाठी किंचित मऊ राहीला तरी चालतो..... अगं तू न्यु जर्सीत येतेस ना शितल? ओक ट्री रोड वर सुखाडीया आहे (भवानी च्या बाजूचं हिल्टॉप जवळचं नाही) तिथे झक्कास मिळतो तयार खवा... स्वाती मस्त रेसिपी मी सेम अश्शाच केल्या होत्या...सह्ही एकदम्.... रिकोस्टा चिज वापरून पण करतात असे कुठेतरी वाचले आहे आंतरजलावरच...:) माझ्या मते हितगुज वर वाचलय्...पण एका मैत्रीणीने ट्राय केलं होतं चवीत खूप फरक पडतो.... (खवाभक्त) वरदा

वरील कृती ही साटोरीची अर्धी रेसिपी आहे... वरील प्रमाणे पोळ्या कराव्यात पण पो़ळीवर डाग पडू देऊ नये. नंतर तुपामधे त्यापोळ्या तळाव्यात किंवा शॅलो फ्राय कराव्यात.... तळल्या तर जास्त दिवस टिकतात या साटोर्‍या...:)

चतुरंग 11/06/2008 - 19:45
खव्याच्या पोळ्या खाऊन खूप दिवस झाले. आता योग कधी ते बघायला हवे! (अवांतर - अहमदनगर हे उत्तम खव्यासाठी प्रसिद्ध आहे. कधी गेलात तर चितळे रोड विचारा - नवीपेठ आणी चितळे रोड ह्याच्या कॉर्नरला खव्याचे दुकान आहे (आत्ता नाव आठवत नाहीये). सकाळी ७.३० पासून सकाळी ११-११.३० वाजेपर्यंत मिळतो. त्यानंतर शक्यता कमी. खरपूस भाजलेल्या खव्याचा रंग किंचित तांबूस असतो. सुपारीएवढा खाऊन पहावा किंचित गोडुस, तुपट चव लागायला हवी.) चतुरंग

मदनबाण 11/06/2008 - 19:47
अरे व्वा... नुसता खवा खायलाच इतकी मजा येते तर खवापोळी खायला किती मजा येईल..... :) (घरी खवा आणल्यावर आधी ताव मारणारा) मदनबाण.....

जयवी 15/06/2008 - 19:05
स्वाती.......मज्जा आली खव्याच्या पोळ्यांची रेसिपी वाचून. मला प्रचंड आवडतात. आयत्या खायला जास्त आवडतात ;) शितल, आम्हाला आखातात पण खवा मिळत नाही गं...... म्हणून आम्ही एक उपाय शोधून काढलाय. इथे Nedo म्हणून Milk Powder मिळते. त्यात दूध घालून इडलीच्या पीठासारखं पातळ करायचं आणि मायक्रोवेव्ह ओव्हन मधे २-२ मिनिटं फ़िरवायचं. साधारण गोळा झाला मी बारीक किसणीनं किसून कढईत खमंग भाजून घ्यायचं...... मस्त खवा तयार होतो. आम्ही खव्याच्या करंज्या, मोदक वगैरे अशाच खव्याचे करतो पण अजून पोळ्या मात्र नाही करुन बघितल्या.

विसोबा खेचर 11/06/2008 - 17:25
७.तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावी. अहो स्वातीताई, का असा छळ मांडला आहात? अहो नुसती पाकृ वाचूनच जीवाला खूप त्रास झाला! बाय द वे, आमची म्हातारीही या पोळ्या फार सुरेख करते बर्र का! आता सांगतोच तिला करायला...! :) असो, स्वातीताई, आपल्या उत्तमोत्तम पाकृंमुळे मिपा अधिकाधिक श्रीमंत व्हावे, हीच इच्छा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गिरिजा 11/06/2008 - 18:15
अहो स्वातीताई, का असा छळ मांडला आहात? अहो नुसती पाकृ वाचूनच जीवाला खूप त्रास झाला!
सहमत.. :P -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

शितल 11/06/2008 - 17:35
स्वाती ताई तुमचे मनःपुर्वक आभार. मला हवी असलेली पाककृती आपण मला सा॑गितलीत. मला ह्या पोळ्या प्रच्॑ड आवडतात. पण सध्या एक प्रश्न आहे इथे (अमेरिकेत )खवा मिळेल काय ? कि॑वा खवा मला घरी बनवता येईल काय.(असेल तर मला सा॑गा )

In reply to by शितल

मी घरी खवा बनवून पेढे केले होते पण पोळ्या काही केल्या नाहीत... पण त्याची तुला रेसिपी देते, पण खूप वेळखाऊ काम आहे. ४ कप होलमिल्क दुध घे,मध्यम आचेवर सतत ढवळत राहा, पहिले १ तास ३-४ मिनिटाच्या अंतरावर ढ्वळ पण नंतर सतत ढवळत राहा. साधारण तीन तासांनी दुध घट्ट होऊन १ कप झाले कि, त्यात १ कप साखर टाकते. रिकोस्टा चिज वापरून पण करतात असे कुठेतरी वाचले आहे आंतरजलावरच...:)मिळाले कि तुला शेअर करेन...:)

In reply to by स्वाती राजेश

मोठ्ठा तवा गरम करत ठेवायचा. डाव्या बाजूला 'डबल फॅट' दूध पातेल्यात घ्यायचे. उजव्या हातात कलथा तयार ठेवायचा. तवा व्यवस्थित तापला की छोट्या वाटीने एक वाटी दूध तव्यावर ओतायचे. उजव्या हातातील कलथ्याने ते भराभर परतून त्यातील पाण्याचा अंश काढून टाकायचा. दूध घट्ट झाले (पाणी आटून गेले)की कलथ्याने ते काढून घ्यायचे. पुन्हा दुसरी वाटी दूध तव्यावर ओतायचे. ही प्रक्रिया वापरून पातेल्यातील सर्व दूध संपवायचे. की झाला 'घरगुती खवा' तयार. काम त्रासाचे आहे. आणि इथे तयार खवा मिळत असल्यामुळे वरील प्रक्रिया घरी करून पाहिलेली नाही. (वाचलेली आहे.).

In reply to by स्वाती राजेश

वरदा 11/06/2008 - 19:30
करुन पाहिलाय घरी खवा करुन पोळ्या... आनोडाईज्ड नॉन स्टीक च्या कढईसारख्या मोठ्या पसरट भांड्यात केला की लवकर होईल आणि खाली लागणार नाही...तरीही सतत ढवळावा मात्र लागतोच....आणि पोळ्या करण्यासाठी चांगला सुकवावा लागतो ..मोदकांसाठी किंचित मऊ राहीला तरी चालतो..... अगं तू न्यु जर्सीत येतेस ना शितल? ओक ट्री रोड वर सुखाडीया आहे (भवानी च्या बाजूचं हिल्टॉप जवळचं नाही) तिथे झक्कास मिळतो तयार खवा... स्वाती मस्त रेसिपी मी सेम अश्शाच केल्या होत्या...सह्ही एकदम्.... रिकोस्टा चिज वापरून पण करतात असे कुठेतरी वाचले आहे आंतरजलावरच...:) माझ्या मते हितगुज वर वाचलय्...पण एका मैत्रीणीने ट्राय केलं होतं चवीत खूप फरक पडतो.... (खवाभक्त) वरदा

वरील कृती ही साटोरीची अर्धी रेसिपी आहे... वरील प्रमाणे पोळ्या कराव्यात पण पो़ळीवर डाग पडू देऊ नये. नंतर तुपामधे त्यापोळ्या तळाव्यात किंवा शॅलो फ्राय कराव्यात.... तळल्या तर जास्त दिवस टिकतात या साटोर्‍या...:)

चतुरंग 11/06/2008 - 19:45
खव्याच्या पोळ्या खाऊन खूप दिवस झाले. आता योग कधी ते बघायला हवे! (अवांतर - अहमदनगर हे उत्तम खव्यासाठी प्रसिद्ध आहे. कधी गेलात तर चितळे रोड विचारा - नवीपेठ आणी चितळे रोड ह्याच्या कॉर्नरला खव्याचे दुकान आहे (आत्ता नाव आठवत नाहीये). सकाळी ७.३० पासून सकाळी ११-११.३० वाजेपर्यंत मिळतो. त्यानंतर शक्यता कमी. खरपूस भाजलेल्या खव्याचा रंग किंचित तांबूस असतो. सुपारीएवढा खाऊन पहावा किंचित गोडुस, तुपट चव लागायला हवी.) चतुरंग

मदनबाण 11/06/2008 - 19:47
अरे व्वा... नुसता खवा खायलाच इतकी मजा येते तर खवापोळी खायला किती मजा येईल..... :) (घरी खवा आणल्यावर आधी ताव मारणारा) मदनबाण.....

जयवी 15/06/2008 - 19:05
स्वाती.......मज्जा आली खव्याच्या पोळ्यांची रेसिपी वाचून. मला प्रचंड आवडतात. आयत्या खायला जास्त आवडतात ;) शितल, आम्हाला आखातात पण खवा मिळत नाही गं...... म्हणून आम्ही एक उपाय शोधून काढलाय. इथे Nedo म्हणून Milk Powder मिळते. त्यात दूध घालून इडलीच्या पीठासारखं पातळ करायचं आणि मायक्रोवेव्ह ओव्हन मधे २-२ मिनिटं फ़िरवायचं. साधारण गोळा झाला मी बारीक किसणीनं किसून कढईत खमंग भाजून घ्यायचं...... मस्त खवा तयार होतो. आम्ही खव्याच्या करंज्या, मोदक वगैरे अशाच खव्याचे करतो पण अजून पोळ्या मात्र नाही करुन बघितल्या.
खव्याच्या पोळ्या साहित्यः १/२ किलो खवा २ वाट्या कणिक, कणिक भाजायला ३ टे.स्पून तूप २ मोठे चमचे खसखस ७-८ वेलदोड्याची पूड ४ वाट्या पिठीसाखर ४ वाट्या कणिक, १ चिमूट मीठ १ वाटी मैदा १ वाटी बारीक रवा १२ टे.स्पून तेल तांदुळाची पिठी १.प्रथम कढईत खवा गुलाबी रंगावर भाजावा. २.२ वाट्या कणिक तुपावर खमंग भाजावी. ३.खसखस भाजून कुटून घ्यावी. ४.वरील सर्व,पिठीसाखर,वेलदोडा पूड घालून चांगले मळावे. ५.कणिक, मैदा,बारीक रवा तेलाचे कडकडीत मोहन घालून भिजवणे,(फार घट्ट नको).

मनोगत

काळा_पहाड ·

मन 11/06/2008 - 15:55
पुनश्च स्वागत! (बाकी, लेखाचं नाव वाचुन आता पुन्हा धमाकेदार वाचायला मिळणार किंवा लेख/चर्चेचं रणमैदान होणार असं वाटलं होतं.मग कळलं ते नाव डिक्शनरी तील अर्थानच वापरलय म्हणुन;"विशेष नाम" म्हणुन नाही. :-) ) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर 11/06/2008 - 16:56
शीर्षक वाचून अंमळ गंमत वाटली. असो, मिपाच्या नावाची जरी काही ठिकाणी ऍलर्जी असली तरी मिपावर कुठल्याच नावाची ऍलर्जी नाही! :) काळ्या पहाडा, पुनरागमनाबद्दल तुझं अभिनंदन रे! :) आपला, (एक्स मनोगती, आता कट्टर मिपाकर!) तात्या.

मन 11/06/2008 - 15:55
पुनश्च स्वागत! (बाकी, लेखाचं नाव वाचुन आता पुन्हा धमाकेदार वाचायला मिळणार किंवा लेख/चर्चेचं रणमैदान होणार असं वाटलं होतं.मग कळलं ते नाव डिक्शनरी तील अर्थानच वापरलय म्हणुन;"विशेष नाम" म्हणुन नाही. :-) ) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर 11/06/2008 - 16:56
शीर्षक वाचून अंमळ गंमत वाटली. असो, मिपाच्या नावाची जरी काही ठिकाणी ऍलर्जी असली तरी मिपावर कुठल्याच नावाची ऍलर्जी नाही! :) काळ्या पहाडा, पुनरागमनाबद्दल तुझं अभिनंदन रे! :) आपला, (एक्स मनोगती, आता कट्टर मिपाकर!) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
;) X( याहू ! याहू मिपावरचे माझे खाते पुन्हा उघडले. आनंद अत्यानंद आणि काय काय ते!!!! मिपाचा विरह! संपुर्ण महिन्यासाठी !!! जसा धरित्रीला वरूणराजाचा अमावस्येला चांदण्यांना चंद्राचा ग्रीष्मात वृक्षांना पानांचा आणि नद्यांना पाण्याचा. लिहायला मिळत नाही. लिहायचं मरू द्यात पण प्रतिक्रिया द्यायचही लायकी नाही. छ्या ह्या जगण्याला काय अर्थ ?????? फार सहन केले. आता पुन्हा नको ते दीनवाणेपण. सर्वांना सहर्ष नमस्कार.

पुपुर्झा

पुष्कराज ·

अरुण मनोहर 11/06/2008 - 18:20
>>>मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, मी सहमत नाही. आई हा एकच नाते असे आहे जे निरपेक्ष अस काही देते. निरपेक्ष तर जाऊच द्या, स्वतःला वाटेल तो त्रास सहन करून सुद्धा आई मुलांसाठी आपले सर्वस्व द्यायला तयार असते.

अरुण मनोहर 11/06/2008 - 18:20
>>>मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, मी सहमत नाही. आई हा एकच नाते असे आहे जे निरपेक्ष अस काही देते. निरपेक्ष तर जाऊच द्या, स्वतःला वाटेल तो त्रास सहन करून सुद्धा आई मुलांसाठी आपले सर्वस्व द्यायला तयार असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.

या वाटेवर

रामराजे ·

अरुण मनोहर 11/06/2008 - 14:51
>>>>जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे केवळ निराशे खेरीज कवीला आणखी काही सांगायचे आहे असा भास शेवटचे कडवे वाचून होतो. हा भास आहे असे मला भासले ते पुढच्या दोन अकारण ओळी वाचून. कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे. (अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!) अवांतर- तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता असते.

अरुण मनोहर 11/06/2008 - 14:51
>>>>जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे केवळ निराशे खेरीज कवीला आणखी काही सांगायचे आहे असा भास शेवटचे कडवे वाचून होतो. हा भास आहे असे मला भासले ते पुढच्या दोन अकारण ओळी वाचून. कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे. (अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!) अवांतर- तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता असते.
लेखनविषय:
दिप मिळाले जे मजला, आकांक्षाची होळी करुनी राख राख चेतवुन मी, तेच जाळिले रस्त्यांवरुनी इथे घाव माझेच पुराने, या वाटेवर ना कुठे चांदणे नको रुसु त्या बहरांवरती, फसवुन ज्यांनी ग्रीष्मात नेले वळणावरती होउ वेगळे, घेउन हिस्से आपआपुले इथे प्रेम ही केविलवाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे मळभ उरातील नैराश्येचे, माथ्यावरती आले भरुनी धुळीत मिळुनी स्वप्नफुले ती, वेड्यावानी गेली विरुनी इथे दु:खाचे झुलती पाळणे, या वाटेवर ना कुठे चांदणे जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे कृपया