सुरेख लेख.
या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत.
ह्म्म हे सांगीतले ते बरे झाले. म्हणजे पुढच्या वेलेला जर कधी तिकडे जायची वेळ आली तर लक्षात ठेवायला.
हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत.
सहमत आहे. हजार कशाला अहो ४०० वर्षापुर्वीचे टिकले नाही (इंग्रजांची कृपा) तर हजार वर्षापुर्वीचे अवघडच आहे.
बाकी तुम्ही फोटो नक्कीच काढले असतील या जागांचे. जर चिकतवाना इथे अथवा लिंक पाठवा.
--
ध्रुव
अत्यंत माहितीपूर्ण लेख. आवडला.
आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो.
खरे आहे. एक जुनी म्हण आठवली.
"इतिहासातून आपण फक्त एकच शिकतो ते म्हणजे 'इतिहासातून आपण काहीही शिकत नाही'..."
भोचकराव आजुन येउ द्या.
भोचकराव्,,ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
बर्याच वेळा इंदूरला आलो आहे,,राजवाडा,शिशमहल इ. पाहिले आहे,पण या स्थळाबद्दल माहित नव्हते !!!!!
परत इंदूरला येण्याचा योग आला तर याही ठिकाणी भेट देण्याचा जरुर प्रयत्न करीन.....
मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं.
भग्न झालेले द्वारावरचे हत्ती,,विद्रुप झालेल्या नर्तिका....असे प्रकार बर्याच ठिकाणी पहावयास मिळतात आणि हे कलावैभव गतकाळात किती रम्य असेल हा विचार मनात घोळत राहतो...खरच हे सर्व व्यथितच करणार आहे..
(शिल्पकला प्रेमी)
मदनबाण.....
भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही.
ज्या मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू भारतात सापडत नाहीत त्या कुठे मिळतात हे वेगळे सांगायला नकोच, तर अनेकांच्या मते ही मूर्ती ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. परंतु ब्रिटिश म्युझियमच्या संकेतस्थळावर ही माहिती मिळाली.
भोचकराव, लेख आवडला. तुमची इतिहासाबद्दलची आस्था आणि मुद्दाम अशी स्थळे जाऊन बघणे वगैरे ग्रेट. बाकी आपण भारतियांच्या इतिहासाबद्दलच्या आस्थेबद्दल काय बोलावे? किंबहुना बोलूच नये. विशेषतः परकिय आक्रमकांनी केलेल्या अत्त्याचारांबद्दल तर नकोच नको. आणि हा प्रश्न केवळ मुसलमान शासकांनी केलेल्या प्रकारांबद्दल नाही आहे. आता तर पूर्ण स्वातंत्र्य आहे, भारत हा एक प्रगत देश होतो आहे. आपण हा वारसा जपण्यांबद्दल काय करतो? शून्य.
People who dont respect History soon become part of it...
बिपिन.
भोचकगुरुजी,
आपले लेखन नेहमीच सुरेख असते! हा लेखही अतिशय चांगला उतरला आहे.
एकंदरीतच जुन्या वास्तूंबद्दल आपली बेपर्वाई पाहिली की वाईटही वाटतं आणि संतापही येतो.
असो, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेखन वाचायला आवडेल. आपला हा लेख म्हणजे मध्यप्रदेशाची एक छानशी सफर घडवणारा आहे.
माझी एक विनंती -
एकदा आपल्या लेखणीतून आम्हाला मांडू, महेश्वरी, जबलपूर घडवून आणा बुवा! ही सगळी माझी अत्यंत आवडती स्थानं आहेत. उज्जैन-इंदौरबद्दल तर बोलायलाच नको.
९२ की ९३ साली शरदातल्या पौर्णिमेच्या रात्री जबलपूरचा हो अनुभव घेतला आहे त्याची याद आजही तेवढीच सुखद आहे! कुठल्याश्या एका डाकबंगल्यात उस्ताद शाहीद परवेजची रंगलेली सतार आजही कानात साठवलेली आहे.
अहो काय सांगू तुम्हाला भोचकगुरुजी, ऐकायला आम्ही फक्त इनमिन तिघंचौघच जण! जबलपूरच्या पौर्णिमेची रात्र, मस्त माहोल जमून आला होता आणि रात्री सव्वा बारा, साडे बाराच्या सुमाराला शाहीदभाईंनी मला प्रश्न केला,
"क्या बजाए अब?"!
"उस्तादजी, अगर आपका मूड हो तो कौशीकानडा बजाईये! बस, इस वक्त सिर्फ वही राग का माहोल जमा है"
अशी मी फर्माईश केली!
माझ्या फर्माईशीला,
"अरे, क्या केहेने!"
अशी दाद देत शाहीदभाईंनी जो कौशीकानडा जमवला होता म्हणता! क्या बात है!
आपला,
(जबलपूरप्रेमी)
तात्याभैय्या देवासकर,
बापूभैय्या देवासकरांची कोठी, इंदौर.
तात्या,
तुमची आज्ञा शिरसावंद्य. मांडू, महेश्वर, सांचीबद्दल लिहायचंच आहे. मांडू इतकं सुंदर आहे, की ते नेमकेपणाने मांडणं हेच आव्हान आहे. अप्रतिम जागा आहे ही. आयुष्यात एकदा तरी मांडू पाहिलंच पाहिजे. शिवाय इतरही काही जागा आहेत. जबलपूर, ग्वाल्हेर हा भाग फिरायचा आहे. मुख्य म्हणजे बुंदेलखंड पहायची जाम इच्छा आहे. बघू या कसं जमतंय ते. बाकी तुमचा जबलपूरचा अनुभव अप्रतिम. एवढ्या मोठ्या कलावंतांचे सानिध्य लाभणं हे भाग्यच. तुम्ही त्या अर्थाने खरोखरच भाग्यवान आहात.
पवारांचे धार असं म्हणून आम्ही धार मार्गे मांडूच्या (मांडवगढ) च्या किल्याला भेट द्यायला गेलो होतो ते आठवतं. किल्ला पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे धारच्या सरस्वती मंदीराला भेट द्यायचे राहीले. त्याच काळात जवळच झाबुआ जिल्ह्यात शबरी कुंभ मेळ्याची तयारी चाललेली होती असं वातावरण धार मधे होतं.
मांडूच्या संग्राहलायाची अवस्था खरोखर भोचकराव म्हणतात तशीच आहे. स्थानिकांची अनास्था आपल्याला नाराज करावी इतपत आहे. बाकी मांडूच्या किल्ल्यावर एक शिवलिंग आहे. तेथे एक शिलालेख आहे, की इस मंदिर को मोगलो द्वारा उध्द्वस्त किया गया था. मराठा सरदार पेशवा बाजीराव ने इसका जिर्नोध्दार करवाया. हे वाचून खुप छान वाटलं.
नीलकांत
प्रतिक्रिया
सुरेख लेख
भोचक प्रवास
सुंदर वर्णन...
भोचकराव्,,ह
सरस्वतीची मूर्ती
भोचकराव...
सुरेख...
आज्ञा शिरसावंद्य
धार आणि मांडू
छान