मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देव आणि धर्माचे चेताविज्ञान

युयुत्सु ·

निपा Tue, 08/26/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु Wed, 08/27/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक Wed, 08/27/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म Wed, 08/27/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़

निपा Tue, 08/26/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु Wed, 08/27/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक Wed, 08/27/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म Wed, 08/27/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़
लेखनविषय:
लेखनप्रकार
देव आणि धर्माचे चेताविज्ञान =============== -राजीव उपाध्ये "देवदानवा नरे निर्मिले हे मत कळवू द्या काठोकाठ भरूनी द्या पेला फेस भराभर उसळूं द्या" - केशवसुत, स्फूर्ति  एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे. हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो.

आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय

हेमंतकुमार ·

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 08:52
जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला. प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला.... नाश्ता....लंच....डिनर...

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 11:49
सामना लखनौत
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
नाश्ता....लंच....डिनर...
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . . ?

In reply to by हेमंतकुमार

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 12:50
सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 14:24
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.

मस्त लेख
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे. असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 16:13
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो. नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते. अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे. मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 17:16
1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 18:58
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी. 1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज. दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते. मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
"आता आपल्या शाळेचे ब्रह्मचर्य संपले",
असे गमतीने जाहीर केले. आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 14:44
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा. चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

सुधीर कांदळकर Sat, 08/30/2025 - 17:03
ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे. अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो. आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 19:06
मुंबई दिनांक वाचली तेव्हा
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो. तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे. त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.

छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)

हेमंतकुमार Sun, 08/31/2025 - 07:59
*मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! * शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.

चामुंडराय गुरुवार, 09/18/2025 - 18:36
गेल्या पन्नास वर्षातील ठळक घटनांचा छान आढावा. भारतात Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८० च्या आसपास असावा. बॉलिवूडने धरमपाजी आणि अम्मामालिनीला घेऊन त्याची हिंदी कॉपी काढली होती असे देखील आठवते आहे. सामना, शोले बरेच उशिरा बघितले. शोलेच्या संवादाची LP record आली होती हे आठवते आहे. एखाद्या चित्रपटाच्या संवादाची LP निघण्याची पहिलीच वेळ असावी.

हेमंतकुमार गुरुवार, 09/18/2025 - 19:06
Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८०
बरोबर ! त्याकाळी परदेशातले चित्रपट त्यांच्याकडे पुरेसा धंदा झाल्यानंतरच मग अन्य देशांना पाठवत असावेत. त्यावरून एक आठवले. आमचा एक मित्र आम्हाला तेव्हा नेहमी म्हणायचं की अरे इंग्लिश बघत जा, कारण त्यांच्याकडे जे चांगले चाललेले असतात तेच ते परदेशी पाठवणार ना ! असा त्याचा साधा तर्क होता. जेव्हा Jaws पाहिला त्या वयात 'स्पिलबर्ग' वगैरे काही समजतही नव्हते. त्यांची महती गेल्या दहा वीस वर्षांमध्ये समजली; Schindler's List, The Terminal व Munich, इ. पाहिल्यानंतर. Jaws हिंदी आवृत्तीबद्दल काही माहीत नव्हते. धन्यवाद !

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 08:52
जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला. प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला.... नाश्ता....लंच....डिनर...

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 11:49
सामना लखनौत
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
नाश्ता....लंच....डिनर...
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . . ?

In reply to by हेमंतकुमार

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 12:50
सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 14:24
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.

मस्त लेख
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे. असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 16:13
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो. नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते. अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे. मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 17:16
1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.

हेमंतकुमार Mon, 08/25/2025 - 18:58
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी. 1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज. दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते. मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
"आता आपल्या शाळेचे ब्रह्मचर्य संपले",
असे गमतीने जाहीर केले. आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 14:44
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा. चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

सुधीर कांदळकर Sat, 08/30/2025 - 17:03
ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे. अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो. आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार Sat, 08/30/2025 - 19:06
मुंबई दिनांक वाचली तेव्हा
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो. तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे. त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.

छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)

हेमंतकुमार Sun, 08/31/2025 - 07:59
*मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! * शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.

चामुंडराय गुरुवार, 09/18/2025 - 18:36
गेल्या पन्नास वर्षातील ठळक घटनांचा छान आढावा. भारतात Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८० च्या आसपास असावा. बॉलिवूडने धरमपाजी आणि अम्मामालिनीला घेऊन त्याची हिंदी कॉपी काढली होती असे देखील आठवते आहे. सामना, शोले बरेच उशिरा बघितले. शोलेच्या संवादाची LP record आली होती हे आठवते आहे. एखाद्या चित्रपटाच्या संवादाची LP निघण्याची पहिलीच वेळ असावी.

हेमंतकुमार गुरुवार, 09/18/2025 - 19:06
Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८०
बरोबर ! त्याकाळी परदेशातले चित्रपट त्यांच्याकडे पुरेसा धंदा झाल्यानंतरच मग अन्य देशांना पाठवत असावेत. त्यावरून एक आठवले. आमचा एक मित्र आम्हाला तेव्हा नेहमी म्हणायचं की अरे इंग्लिश बघत जा, कारण त्यांच्याकडे जे चांगले चाललेले असतात तेच ते परदेशी पाठवणार ना ! असा त्याचा साधा तर्क होता. जेव्हा Jaws पाहिला त्या वयात 'स्पिलबर्ग' वगैरे काही समजतही नव्हते. त्यांची महती गेल्या दहा वीस वर्षांमध्ये समजली; Schindler's List, The Terminal व Munich, इ. पाहिल्यानंतर. Jaws हिंदी आवृत्तीबद्दल काही माहीत नव्हते. धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदा म्हणजेच 2025मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. यातील काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही लेखात समावेश केला आहे. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल.

स्ट्रिंग थिअरीचा पाया

अनन्त्_यात्री ·

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म Fri, 08/29/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि गुरुवार, 09/04/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म Fri, 08/29/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि गुरुवार, 09/04/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी
लेखनविषय:
काव्यरस
(FunU)वादी लेखनाची होता उर्मी अनावर ब्रह्मलीन असूनही प्रकटू का मिपावर? बादरायणी संबंध येतील का माझ्या कामी? (एन्ट्रॉपीचे ॐकाराशी करू कलम कसे मी?) "जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? ओव्या, अभंग, सूक्तांची लेखा जोडू का शेपटी? डिस्क्लेमर टाकावा का स्वांत:सुखाचा शेवटी? असिधारा व्रत माझे (FunU)वादी लेखनाचे जरी गायबलो सध्या लोड नका घेऊ त्याचे ! एक शिक्रेट सांगतो कोणालाही सांगू नका (FunU)वादी लेखनाचा माझा आ-मिपांत* ठेका ! ~~~~~~~~~~~~ *आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

Bhakti ·

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti Sun, 08/24/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 06:02
ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 08/25/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 17:45
Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

सुधीर कांदळकर Tue, 08/26/2025 - 17:49
आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti Sun, 08/24/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 06:02
ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 08/25/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 17:45
Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

सुधीर कांदळकर Tue, 08/26/2025 - 17:49
आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण १ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श्वेता२४ ·

खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:17
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.

In reply to by श्वेता२४

गणेशा Sun, 08/24/2025 - 09:35
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 20:53
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.

कर्नलतपस्वी Sun, 08/24/2025 - 06:45
आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 14:15
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 06:29
असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल

In reply to by हेमंतकुमार

आग्या१९९० Mon, 08/25/2025 - 08:47
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.

In reply to by आग्या१९९०

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 15:06
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद

युयुत्सु Mon, 08/25/2025 - 09:08
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.

In reply to by युयुत्सु

चावटमेला गुरुवार, 08/28/2025 - 00:37
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.

धर्मराजमुटके Mon, 08/25/2025 - 09:22
चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.

Bhakti Tue, 08/26/2025 - 16:39
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)

पर्णिका गुरुवार, 08/28/2025 - 02:04
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2025 - 11:28
आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/31/2025 - 14:54
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.

In reply to by श्वेता२४

पर्णिका Sat, 09/06/2025 - 04:02
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.

सिरुसेरि Mon, 09/08/2025 - 17:30
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .

श्वेता२४ Mon, 09/08/2025 - 19:32
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 15:31
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 09/15/2025 - 11:30
मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प

श्वेता२४ Wed, 09/10/2025 - 21:45
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!

खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:17
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.

In reply to by श्वेता२४

गणेशा Sun, 08/24/2025 - 09:35
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 20:53
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.

कर्नलतपस्वी Sun, 08/24/2025 - 06:45
आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 14:15
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 06:29
असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल

In reply to by हेमंतकुमार

आग्या१९९० Mon, 08/25/2025 - 08:47
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.

In reply to by आग्या१९९०

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 15:06
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद

युयुत्सु Mon, 08/25/2025 - 09:08
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.

In reply to by युयुत्सु

चावटमेला गुरुवार, 08/28/2025 - 00:37
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.

धर्मराजमुटके Mon, 08/25/2025 - 09:22
चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.

Bhakti Tue, 08/26/2025 - 16:39
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)

पर्णिका गुरुवार, 08/28/2025 - 02:04
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2025 - 11:28
आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/31/2025 - 14:54
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.

In reply to by श्वेता२४

पर्णिका Sat, 09/06/2025 - 04:02
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.

सिरुसेरि Mon, 09/08/2025 - 17:30
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .

श्वेता२४ Mon, 09/08/2025 - 19:32
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 15:31
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 09/15/2025 - 11:30
मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प

श्वेता२४ Wed, 09/10/2025 - 21:45
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)

अनन्त्_यात्री ·

कर्नलतपस्वी Fri, 08/29/2025 - 17:29
उम्र ढल गयी, मगर बल अभी बाकी है, दिल धड़कता है, मुकम्मल अभी बाकी है। खिज़ाब ही तो है बालों में, दुनियावालों, इश्क़ का हिसाब अभी बाक़ी है|

अभ्या.. Fri, 08/29/2025 - 17:59
साल्टपेपराची येता शान वाजवीत फिफ्टीचा डंका प्लेबॉयाच्या कव्हरावरती स्थान मिळतसे नवहंका . साल्टपेपराची: सोमण्याच्या मिलिंदाची १० वर्षापूर्वीची मिठमिरी केशकथा. नवहंका: "हॅन्डसम नका ना म्हणू, हंक म्हणा' म्हणणारी पिढी.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. Fri, 08/29/2025 - 18:59
नको नको. सोप्पं सोप्पं काही लिहिलं की अनंतयात्रींना वाईट वाटतं. ;) . (अनंतयात्रीशास्त्री: राग मानू नका बरका. आपल्या काव्याचे आणि काव्यप्रसवचिकाटीचे आम्ही फ्यान हावोत)

कर्नलतपस्वी Fri, 08/29/2025 - 17:29
उम्र ढल गयी, मगर बल अभी बाकी है, दिल धड़कता है, मुकम्मल अभी बाकी है। खिज़ाब ही तो है बालों में, दुनियावालों, इश्क़ का हिसाब अभी बाक़ी है|

अभ्या.. Fri, 08/29/2025 - 17:59
साल्टपेपराची येता शान वाजवीत फिफ्टीचा डंका प्लेबॉयाच्या कव्हरावरती स्थान मिळतसे नवहंका . साल्टपेपराची: सोमण्याच्या मिलिंदाची १० वर्षापूर्वीची मिठमिरी केशकथा. नवहंका: "हॅन्डसम नका ना म्हणू, हंक म्हणा' म्हणणारी पिढी.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. Fri, 08/29/2025 - 18:59
नको नको. सोप्पं सोप्पं काही लिहिलं की अनंतयात्रींना वाईट वाटतं. ;) . (अनंतयात्रीशास्त्री: राग मानू नका बरका. आपल्या काव्याचे आणि काव्यप्रसवचिकाटीचे आम्ही फ्यान हावोत)
लेखनविषय:
केस पांढरे तरी हा डाय लावतो हिरवा पाखरांनो सावधान घुमे टेचात पारवा केस पांढरे तरी हा डाय गुलाबी लावतो पाखरांनो उडलात तरी पिसे हा मोजतो केस पांढरे तरी हा काळा कलप लावतो पाखरांनो सावध हा दाणे दुरून टाकतो केस पांढरे तरी हा अंतर्यामी अतरंगी पाखरांनो नका भिऊ निर्विष याची हो नांगी (#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

असं कुठं लिहिलंय?

कर्नलतपस्वी ·

राघव Fri, 08/22/2025 - 13:27
हाहाहा..
मागे वळून बघू नये.
पण काही ठिकाणी मागे वळून पाहायलाच लागतंय तपस्वी शेठ!! ;-)

चित्रगुप्त Fri, 08/22/2025 - 19:56
वा कर्नल सायेब. मस्त रचना केलीत. यावरून हे आठवले: घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय। जौहरि की गति जौहर जाणै, की जिन जौहर होय॥ 'पेर्णा' वाली कविता 'आचरट' रसातली आहे. तुमच्या कवितेचा रस कोणता म्हणायचा ?

अभ्या.. Fri, 08/22/2025 - 20:45
छान वाटली तरी प्रतिसाद द्यायचाच, . असं कुठे लिहिलंय? ;)

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:43
भक्ती-कांचनसंध्या कवीवर्य बोरकरांचा शब्द आहे. मेहेंदळे सो. मुळ शेर काही वेगळाच आहे. अभ्याशेठ-सृजनशील प्रतिसाद, आवडला. चित्रगुप्त-पिकल्या पानाचा रस आहे.

चिखलू Sat, 08/30/2025 - 23:26
एकदम सुंदर. ईतना दौडके क्या करोगे गालिब ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो हा प्रतिसाद पण खूप आवडला

राघव Fri, 08/22/2025 - 13:27
हाहाहा..
मागे वळून बघू नये.
पण काही ठिकाणी मागे वळून पाहायलाच लागतंय तपस्वी शेठ!! ;-)

चित्रगुप्त Fri, 08/22/2025 - 19:56
वा कर्नल सायेब. मस्त रचना केलीत. यावरून हे आठवले: घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय। जौहरि की गति जौहर जाणै, की जिन जौहर होय॥ 'पेर्णा' वाली कविता 'आचरट' रसातली आहे. तुमच्या कवितेचा रस कोणता म्हणायचा ?

अभ्या.. Fri, 08/22/2025 - 20:45
छान वाटली तरी प्रतिसाद द्यायचाच, . असं कुठे लिहिलंय? ;)

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:43
भक्ती-कांचनसंध्या कवीवर्य बोरकरांचा शब्द आहे. मेहेंदळे सो. मुळ शेर काही वेगळाच आहे. अभ्याशेठ-सृजनशील प्रतिसाद, आवडला. चित्रगुप्त-पिकल्या पानाचा रस आहे.

चिखलू Sat, 08/30/2025 - 23:26
एकदम सुंदर. ईतना दौडके क्या करोगे गालिब ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो हा प्रतिसाद पण खूप आवडला
लेखनविषय:
पेरणा मागे वळून बघू नये, म्हातार्‍याने चळू नये, आठवणीत जळू नये, असं कुठं लिहिलंय? अवचिता परिमळू नये, शरदी मेघांनी पळू नये, अवकाळी झरू नये, असं कुठं लिहिलंय? कातरवेळी झुरू नये, कांचनसंध्यी उमलू नये, गजरा भाळी माळू नये, असं कुठं लिहिलंय? एकांताशी बोलू नये, भरल्या डोळी डोलू नये, ओल्या शब्दीं भिजू नये, असं कुठं लिहिलंय? उंबऱ्याशी थांबू नये, गवाक्षी झांकू नये, प्रेमागंधी गंधू नये, असं कुठं लिहिलंय? सावलीं मागे धावू नये, भूतकाळाशी भांडू नये, शब्द मागे फिरवू नये , असं कुठं लिहिलंय? हसू ओठी बांधू नये, आंसू कुणा

एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे

युयुत्सु ·

आग्या१९९० गुरुवार, 08/21/2025 - 11:50
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.

कंजूस गुरुवार, 08/21/2025 - 12:05
बरोबर आहे. पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/21/2025 - 12:37
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे. १. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात. २. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो. ३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग. ४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात. ५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही. तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/21/2025 - 13:23
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले. बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!

विवेकपटाईत गुरुवार, 08/21/2025 - 19:50
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.

सुबोध खरे गुरुवार, 08/21/2025 - 20:00
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली. दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही. त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले. शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत. बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो. सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात

आग्या१९९० गुरुवार, 08/21/2025 - 11:50
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.

कंजूस गुरुवार, 08/21/2025 - 12:05
बरोबर आहे. पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/21/2025 - 12:37
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे. १. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात. २. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो. ३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग. ४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात. ५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही. तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/21/2025 - 13:23
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले. बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!

विवेकपटाईत गुरुवार, 08/21/2025 - 19:50
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.

सुबोध खरे गुरुवार, 08/21/2025 - 20:00
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली. दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही. त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले. शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत. बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो. सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे =================== -राजीव उपाध्ये (निमित्त - अमरेंन्द्र बाहुबली यांचा धागा.) घर भाड्याचे की स्वत:च्या मालकीचे याची अलिकडे वारंवार चर्चा होत असते. योग्य नियोजन केल्यास भाड्याचे घर हा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पर्याय असला तरी मानसिक स्वास्थ्य हा निकष असेल तर मात्र स्वत:चे घर केव्हाही योग्य... गेले ~५० वर्षे मी स्वत:च्या मालकीच्या घरात (टु बी प्रिसाईज "बंगल्यात") राहात आहे. हा अनेकांच्या वैषम्याचा विषय आहे. पण स्वत:ची जमीन आणि स्वत:चे आकाश या सुखाबरोबरच काही प्रश्न बरेच गंभीर आहेत.

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

चित्रगुप्त ·

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 19:12
आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

In reply to by कंजूस

चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2025 - 14:24
कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

राघव Fri, 08/22/2025 - 03:51
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 19:12
आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

In reply to by कंजूस

चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2025 - 14:24
कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

राघव Fri, 08/22/2025 - 03:51
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )
काव्यरस
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.