मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिमण्यांना सांभाळतांना

Bhakti ·

खरं बोललात. कदाचित वेगळा विषय वाटू शकेल पण माझी मुलगी ज्या पाळणाघरात जायची, तिकडे एक पुस्तक होतं(खास लहान मुलांकरता तयार केलेलं) ज्यात मूल कसं होतं ती सगळी प्रक्रिया चित्रांसकट दिली होती. नेमकं एकदा मुलीनी ते उचललं आणि छान वाचून काढलं. त्यात तिला काहीही वावगं वाटलं नाही. उलट घरी येऊन मला सांगितलं काय काय लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये ! त्या पुस्तकातही असंच दिलेलं होतं की, आधी लग्नं होतं, नंतर आईबाबा होतात :) त्यामुळे जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सांगायची वेळ येईल तेव्हा ते पुस्तक विकत घेऊन चांगलं समजावता येईल असं वाटतंय.

In reply to by नचिकेत जवखेडकर

Bhakti 29/08/2025 - 10:33
तेच तर या पिढीत सहजता वाटते.मी ठरवलं होतं,मी मुलीच्या बाबतीत असं करेन तसं करेन! But all plan fails ;) (चांगल्या अर्थाने) इतक्या लहान वयात मुलींचे मत किती स्वच्छ आणि प्रामाणिक,ठाम आहेत याचं आश्चर्य वाटते.

असेल व मन मोकळे संवाद असतील तर बदलाची प्रक्रिया सहज पार होते. यात आईची भुमिका महत्वाची तर वडलांनी कुठलेही आश्चर्य न दाखवता मर्यादित सहज संवाद साधला पाहिजे. तसेही मुले आईवडिलांचे वेगवेगळे क्षेत्र व नाते समजतात. आणी त्या प्रमाणेच संवाद साधतात.

कंजूस 29/08/2025 - 11:47
यावरून आठवलं की मिपाचे महिलांसाठी फक्त असे एक सदर होते. फक्त महिलांसाठीच धागे असायचे आणि ते फक्त महिला सभासदांनाच दिसायचे. ते सदर ( नाव विसरलो त्याचे) बंद झाले. चालू करवून घ्या.

श्वेता२४ 31/08/2025 - 15:02
नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळते सध्याचे पालकत्व खूप आव्हानात्मक आहे. मुलांना कोणत्या गोष्टी,कधी , किती आणि कशा सांगाव्यात हे खर तर खूप मोठं आव्हान आहे.

सुबोध खरे 02/09/2025 - 19:16
पालकत्व पूर्वी सुद्धा आव्हानात्मकच होतं पण तेंव्हा मुलांना गप्प बसायला "शिकवत". यातून मुलं आपल्या मोठ्या भावंडांकडून जे आणि जसा मिळेल तसं शिकत असत. बऱ्याच वेळेस ते चुकीचं सुद्धा असे. तेंव्हा पालक दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत असल्यामुळे असल्या "क्षुल्लक" गोष्टींकडे लक्ष देत नसत आता बापच नव्हे तर आया सुद्धा सुशिक्षित झाल्या आणि कमवायला लागल्या त्यामुळे त्यांना आपल्याला काय गोष्टी मिळाल्या नाहीत याची जाणीव जास्त प्रकर्षाने होऊ लागली. यामुळे आता आईबाप मुलांकडे जास्त जागरूकपणे पाहू लागले आहेत. पण त्याच वेळेस जालावरून इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा धबधबा घरात येऊ लागला कि मुलांना त्यातील चांगला आणि वाईट काय आणि कसं समजवावं हा एक यक्ष प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडिलांनी मुलांना जास्त वेळ देणें आवश्यक झाले आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळेस आईबाप सुद्धा फार वेळ भ्रमणध्वनीला चिकटलेले दिसतात. मागच्या वर्षी श्रावणात नाशिक ला गेलो होतो तेंव्हा संध्याकाळी एका हॉटेलात जेवायला गेलो होतो तिथे दोन बहिणी आपल्या तीन शाळकरी मुलांना घेऊन जेवायला आल्या होत्या. ती तिन मुले आपसात गप्पा मार्ट होतोय आणि दोन्ही आया जेवण येईपर्यंत भ्रमणध्वनी मध्ये डोकं खुपसून बसलेल्या होत्या. मी आणि पत्नी हतबुद्ध होऊन पाहत राहिलो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

Bhakti 03/09/2025 - 20:25
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.
+१ या सुखाची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही.आमची बडबडी बाहुली खुप एक्स्प्रेस आहे,तिला थांब म्हणावं लागत ;) गप्पांमधून हवा तो संवाद साधते.

खरंच मुलांना कसं कधी काय समजावून सांगायचं हे आव्हानच आहे, फक्त श्राव्य नाही तर द्रुक माध्यमातही हा प्रश्न आहेच, लहान मुले सुद्धा बघत असताना टीव्हीवर कधी काय जाहिराती लागतील याचा नेम नसतो आणि घरातील ज्येष्ठांना टीव्ही बंद करून बसायला सांगू शकत नाही. सगळी माध्यमे इतकी त्यांच्या आवाक्यात आहेत की कुठे आणि किती सांभाळणार या चिमण्यांना याची काळजीच लागून राहते.

सौन्दर्य 04/09/2025 - 08:42
काही दिवसांपूर्वी अटलांटाला सहकुटुंब जाण्याचा योग्य आला. बरोबर मेहुणी, तिचा नवरा व त्यांची दहा वर्षांची मुलगी होती. आम्ही एक दिवस तेथील प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो. तेथे एका एनक्लोजर मध्ये आठ दहा कासवे होती. त्यातील एक नर - मादी मेटींग करत होती. बरोबर दहा वर्षांची मुलगी होती, म्हणून आम्ही तेथून काढता पाय घेण्याच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात ती मुलगी म्हणाली, "मम्मी लूक दे आर मेटींग". आम्ही काही क्षण तेथे थांबलो व गुपचूप निघून दुसऱ्या पिंजऱ्याजवळ गेलो.

कपिलमुनी 05/09/2025 - 11:34
मुले ८-१० वर्षाची आहे तोवर काय पहायचे काय नाही यावर पालकांचा कंट्रोल असतो .. नंतर अवघड टास्क आहे . वयापेक्षा मोठ्या असलेल्या मित्रांकडे असलेले फोन , अभ्यासा साठी घेतलेले लॅप्टॉप , २४ तास उपलब्ध वाय फाय यातून लैंगिकतेचा भडीमार होतो .. मुलांच्या मनात वेग वेगळ्या कल्पना निर्माण होतात .त्यांना योग्य दिशा दाखवायला खुला संवाद फार गरजेचा आहे.

खरं बोललात. कदाचित वेगळा विषय वाटू शकेल पण माझी मुलगी ज्या पाळणाघरात जायची, तिकडे एक पुस्तक होतं(खास लहान मुलांकरता तयार केलेलं) ज्यात मूल कसं होतं ती सगळी प्रक्रिया चित्रांसकट दिली होती. नेमकं एकदा मुलीनी ते उचललं आणि छान वाचून काढलं. त्यात तिला काहीही वावगं वाटलं नाही. उलट घरी येऊन मला सांगितलं काय काय लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये ! त्या पुस्तकातही असंच दिलेलं होतं की, आधी लग्नं होतं, नंतर आईबाबा होतात :) त्यामुळे जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सांगायची वेळ येईल तेव्हा ते पुस्तक विकत घेऊन चांगलं समजावता येईल असं वाटतंय.

In reply to by नचिकेत जवखेडकर

Bhakti 29/08/2025 - 10:33
तेच तर या पिढीत सहजता वाटते.मी ठरवलं होतं,मी मुलीच्या बाबतीत असं करेन तसं करेन! But all plan fails ;) (चांगल्या अर्थाने) इतक्या लहान वयात मुलींचे मत किती स्वच्छ आणि प्रामाणिक,ठाम आहेत याचं आश्चर्य वाटते.

असेल व मन मोकळे संवाद असतील तर बदलाची प्रक्रिया सहज पार होते. यात आईची भुमिका महत्वाची तर वडलांनी कुठलेही आश्चर्य न दाखवता मर्यादित सहज संवाद साधला पाहिजे. तसेही मुले आईवडिलांचे वेगवेगळे क्षेत्र व नाते समजतात. आणी त्या प्रमाणेच संवाद साधतात.

कंजूस 29/08/2025 - 11:47
यावरून आठवलं की मिपाचे महिलांसाठी फक्त असे एक सदर होते. फक्त महिलांसाठीच धागे असायचे आणि ते फक्त महिला सभासदांनाच दिसायचे. ते सदर ( नाव विसरलो त्याचे) बंद झाले. चालू करवून घ्या.

श्वेता२४ 31/08/2025 - 15:02
नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळते सध्याचे पालकत्व खूप आव्हानात्मक आहे. मुलांना कोणत्या गोष्टी,कधी , किती आणि कशा सांगाव्यात हे खर तर खूप मोठं आव्हान आहे.

सुबोध खरे 02/09/2025 - 19:16
पालकत्व पूर्वी सुद्धा आव्हानात्मकच होतं पण तेंव्हा मुलांना गप्प बसायला "शिकवत". यातून मुलं आपल्या मोठ्या भावंडांकडून जे आणि जसा मिळेल तसं शिकत असत. बऱ्याच वेळेस ते चुकीचं सुद्धा असे. तेंव्हा पालक दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत असल्यामुळे असल्या "क्षुल्लक" गोष्टींकडे लक्ष देत नसत आता बापच नव्हे तर आया सुद्धा सुशिक्षित झाल्या आणि कमवायला लागल्या त्यामुळे त्यांना आपल्याला काय गोष्टी मिळाल्या नाहीत याची जाणीव जास्त प्रकर्षाने होऊ लागली. यामुळे आता आईबाप मुलांकडे जास्त जागरूकपणे पाहू लागले आहेत. पण त्याच वेळेस जालावरून इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा धबधबा घरात येऊ लागला कि मुलांना त्यातील चांगला आणि वाईट काय आणि कसं समजवावं हा एक यक्ष प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडिलांनी मुलांना जास्त वेळ देणें आवश्यक झाले आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळेस आईबाप सुद्धा फार वेळ भ्रमणध्वनीला चिकटलेले दिसतात. मागच्या वर्षी श्रावणात नाशिक ला गेलो होतो तेंव्हा संध्याकाळी एका हॉटेलात जेवायला गेलो होतो तिथे दोन बहिणी आपल्या तीन शाळकरी मुलांना घेऊन जेवायला आल्या होत्या. ती तिन मुले आपसात गप्पा मार्ट होतोय आणि दोन्ही आया जेवण येईपर्यंत भ्रमणध्वनी मध्ये डोकं खुपसून बसलेल्या होत्या. मी आणि पत्नी हतबुद्ध होऊन पाहत राहिलो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

Bhakti 03/09/2025 - 20:25
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.
+१ या सुखाची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही.आमची बडबडी बाहुली खुप एक्स्प्रेस आहे,तिला थांब म्हणावं लागत ;) गप्पांमधून हवा तो संवाद साधते.

खरंच मुलांना कसं कधी काय समजावून सांगायचं हे आव्हानच आहे, फक्त श्राव्य नाही तर द्रुक माध्यमातही हा प्रश्न आहेच, लहान मुले सुद्धा बघत असताना टीव्हीवर कधी काय जाहिराती लागतील याचा नेम नसतो आणि घरातील ज्येष्ठांना टीव्ही बंद करून बसायला सांगू शकत नाही. सगळी माध्यमे इतकी त्यांच्या आवाक्यात आहेत की कुठे आणि किती सांभाळणार या चिमण्यांना याची काळजीच लागून राहते.

सौन्दर्य 04/09/2025 - 08:42
काही दिवसांपूर्वी अटलांटाला सहकुटुंब जाण्याचा योग्य आला. बरोबर मेहुणी, तिचा नवरा व त्यांची दहा वर्षांची मुलगी होती. आम्ही एक दिवस तेथील प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो. तेथे एका एनक्लोजर मध्ये आठ दहा कासवे होती. त्यातील एक नर - मादी मेटींग करत होती. बरोबर दहा वर्षांची मुलगी होती, म्हणून आम्ही तेथून काढता पाय घेण्याच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात ती मुलगी म्हणाली, "मम्मी लूक दे आर मेटींग". आम्ही काही क्षण तेथे थांबलो व गुपचूप निघून दुसऱ्या पिंजऱ्याजवळ गेलो.

कपिलमुनी 05/09/2025 - 11:34
मुले ८-१० वर्षाची आहे तोवर काय पहायचे काय नाही यावर पालकांचा कंट्रोल असतो .. नंतर अवघड टास्क आहे . वयापेक्षा मोठ्या असलेल्या मित्रांकडे असलेले फोन , अभ्यासा साठी घेतलेले लॅप्टॉप , २४ तास उपलब्ध वाय फाय यातून लैंगिकतेचा भडीमार होतो .. मुलांच्या मनात वेग वेगळ्या कल्पना निर्माण होतात .त्यांना योग्य दिशा दाखवायला खुला संवाद फार गरजेचा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कु..कू..कू..डीजेवर गाणं दणाणून वाजत होती.इकडे १० वर्षांची लेक काय बीट्स म्हणत कू..कू..कू..म्हणू लागली.मी म्हटलं,"अगं गप्प बस,नको म्हणू हे गाणं, हे चांगलं गाणं नाही." आधीच लेक एकपाठी आहे.थांबवल नसतं तर गाणं पाठ करून,घर दारी हेच गाणं गात बसली असती "चांगलं नाही.काय वाईट आहे यात?" तिला ह्याच गाण्याचा द्वयार्थ ,गाण्यावरची बंदी सांगितले.ती म्हणाली " गाणं लिहिणाऱ्याला हे कळत नव्हतं का?त्याने असं का गाणं लिहिलं." मनात म्हटलं,बाई बरं झालं तुमची पिढी मराठी जुने गाणं ऐकत नाही.नाहीतर दादा कोंडकेंची द्वयीअर्थी गाणी समजायला लागली तेव्हा लाजाने कससं व्हायचं.रविवारी दादा कोंडकेंचा सिनेमा असेल तर तो बंद करून ख

नंदनवनात सिद्धू भाग २

भागो ·

भागो 28/08/2025 - 13:09
“ time to say goodbye“ ओरिजिनल इथे आहे https://www.youtube.com/watch?v=TdWEhMOrRpQ&list=RDTdWEhMOrRpQ&start_rad... Time to say goodbye sax https://www.youtube.com/watch?v=aSzEPAhpneo&list=RDaSzEPAhpneo&start_rad... मुद्दाम वेळ काढून ऐकावे असे काही. ऐकले तर एक गोष्ट नोट करा तो गायक Andrea Bocelli आंधळा आहे.

भागो 28/08/2025 - 13:09
“ time to say goodbye“ ओरिजिनल इथे आहे https://www.youtube.com/watch?v=TdWEhMOrRpQ&list=RDTdWEhMOrRpQ&start_rad... Time to say goodbye sax https://www.youtube.com/watch?v=aSzEPAhpneo&list=RDaSzEPAhpneo&start_rad... मुद्दाम वेळ काढून ऐकावे असे काही. ऐकले तर एक गोष्ट नोट करा तो गायक Andrea Bocelli आंधळा आहे.
लेखनविषय:
“बाबा, आपण सिद्धूच्या घरी जाउया, त्याच्या बाबांची बदली झाली आहे. उद्या तो निघून जाईल, त्याच्यासाठी गिफ्ट घेऊया. “ मला कुठेही जायची इच्छा नव्हती. पण आरुने हट्ट धरला. बायकोला बोललो, “जायचे तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. मोकळ्या हाताने जाणे चांगले दिसणार नाही. आपल्या खिशाला परवडेल अशी काहीतरी. तुला ह्या गोष्टी बरोबर समजतात, विचार करून सांग.” शेवटी हजार एक रुपये टाकून ड्राय फ्रुट बॉक्स घेतली. सिद्धूचा फ्लॅट म्हणजे काहीच्या काही होता, मी असा फ्लॅट आयुष्यात प्रथमच बधत होतो. एकेक गोष्ट नजरेत सामावून नोट करत होतो. विचार केला वेळ आली तर एखाद्या कथेत टाकता येईल. माझ्या धुवाधारला मी असा फ्लॅट देईन.

नंदनवनात सिद्धू भाग १

भागो ·

नेहमीप्रमाणेच मस्त. एका श्वासात वाचली. पुढे काय होणार याची उत्सुकता वाक्यागणिक वाढत होती पण...... पुढील भागाची वाट बघतोय.

नेहमीप्रमाणेच मस्त. एका श्वासात वाचली. पुढे काय होणार याची उत्सुकता वाक्यागणिक वाढत होती पण...... पुढील भागाची वाट बघतोय.
लेखनविषय:
माझं नाव अच्युत भिडे. माझं नाव तुम्हाला माहित असणार नाही म्हणून थोडी ओळख करून देतो. मी रहस्य कथा लिहितो. तुम्ही अर्थात छावा, स्वामी ययाति आणि काय ते रायगडाला जेव्हा जाग येते किंवा सध्याचे विद्रोही साहित्य असे मर्मभेदी वाचणारे लोक, तुम्हाला माझे नाव माहित नसणार ह्यात नवल ते काय. पण एकदा कधी तुम्ही रिक्षात बसलात तर रिक्षावाल्याला विचारा की अच्युत भिडेची ताजी कथा वाचलीत काय हो? म्हणजे तुम्हाला समजेल. मी आहे ना, धुवाधार नावाचा , सॉर्ट ऑफ सुपर हिरो निर्माण केला आहे. माझ्या वाचक वर्गाला तो प्रचंड भावला आहे. आता ह्या क्षणी मी त्याचीच एक कथा लिहिण्यात गर्क आहे.

विश्वगुरु, म्हासत्ता इ०

युयुत्सु ·

पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. त्यांचा उद्देश वेगळा आहे, संघातील लोक आपली मूले विदेशात पाठवतात नी इतरांच्या मुलाना इथे देशसेवेच्या नावाखाली नको टू उद्योग करायला लावतात ज्यात देशाचे काडीचेही हित नसते!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ही ढोंगबाजी अनेक वर्षे चालु आहे. गेल्या १५/२० वर्षात स्व्तःच्या मुलांना बारावीनंतरच बाहेर(अमेरिका/ब्रितन)ला शिकायला पाठवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्य्मंत्री 'मामाजी' शिवराज सिंग चौहान ह्यांचा एक पुत्र बारावी नंतरच शिक्षणसाठी बाहेर. जयशंकर ह्यांना तीन मुले. एक जण वॉशिंग्टनमध्ये तर एक लॉस एंजेलिसमध्ये. गुजरातचे एक दिवंगत मुख्यमंत्री- एक मुलगी लंडनमध्ये स्थायिक , मुलगा सॅन डिएगोमध्ये. अजित दोवालांचे दोन्ही पुत्र भारताबाहेरच आहेत. गेल्यावर्षी पंकजा मुंडे ह्यांनीही स्थानिकांना 'जय श्रीराम' करायला लावुन स्व्तःच्या मुलाला बारावी नंतर अमेरिकेत शिकायला पाठवले.. असे वाचले होते. मोहनरावांनी आधी न्यु जर्सी/लंडन्/बे एरिया येथे जावे आणि तेथील परिवारातील लोकांना भारतात आणावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई इतक्या दूर कशाला जायचे? अनेक लोक आहेत विदेशात बसून देशात हिंदुनी काय करायला हवे ह्याचे पो टाकत असतात! इतकेच देशप्रेम नी हिंदुत्व उतू चाललेय तर ये की म्हणा इकडे!

युयुत्सु 03/09/2025 - 09:14
मोदी-शहांवर सतत खोटं बोलण्याचा आरोप होत असतो. त्यातील तथ्य मी कधी तपासले नाही. पण अलिकडे लक्षात आलेली एक ठळक गोष्ट म्ह० हा आरोप जर खरा असेल तर त्याची मुळे त्यांच्या संघ-संस्कारात आहेत याची आता खात्री पटली आहे. संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. खोटं उघडं पडलं सतत गोलपोस्ट हलवत राहायचे इतकंच त्यांना येतं. अलिकडे पंचाहत्तरीच्या निवृत्तीवर घेतलेला यु-टर्न हे असंच एक हलवलेलं गोलपोस्ट...

In reply to by युयुत्सु

संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. +1 त्यांना स्वातंत्र्यलढावेळी संघ किथे होता विचारले की पळ काढतात! :)

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 03/09/2025 - 17:03
ही मुलाखत पहा. संघ, त्यांची ध्येयं, त्यांचे लोक... या विषयावरच आहे. RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दाभोळकर म्हणतात

In reply to by स्वधर्म

मारवा 12/09/2025 - 18:19
विवेकानंद दांभिक होते. अमेरिकेने विवेकानंदां वर मोठा प्रभाव पाडला. अमेरिकन संस्कृती ने विवेकानंदाना फार प्रभावित केले. मात्र अस्सल भारतीय दांभिकता ते सोडू शकले नाही.

युयुत्सु 06/09/2025 - 18:19
श्री० पटाईत, मुद्देसूद प्रतिवाद केला असता तर जास्त आवडले असते. पण तुमच्याकडे मुद्दे नसावेत असे वाटते.

युयुत्सु 12/09/2025 - 07:54
परत गोलपोस्ट हलवलेले आहे. पण या व्यक्तव्यात बिट्विन द लाईन्स बरेच काही आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने बुधवार को कहा कि भारत का चरित्र सेवा या निस्वार्थ सेवा में निहित है।भारत की यही भावना आज की महाशक्तियों की तरह बनने के बजाय तटस्थता से विश्व की सेवा करने में विश्वास रखता है।उन्होंने इस बात पर खेद व्यक्त किया कि विज्ञान और ज्ञानके अन्य क्षेत्रों में प्रगति और मानव के पास सब कुछ होने के बावजूद दुनिया में अभी भी झगड़े जारी हैं। https://www.jagran.com/news/national-india-will-not-become-like-today-superpowers-says-mohan-bhagwat-24042849.html रघुवंशाच्या २ र्‍या सर्गात 'प्रसाद चिन्हानि पुरः फलानि' असं एक वचन आहे. पुढे काय घडणार आहे याची चिन्हे अगोदरच दिसू लागतात. संघाला अभिप्रेत असलेली भारतीय समाजावरील पकड घेता आली नसल्याने हे वैफल्योद्गार बाहेर पडले आहेत. कालबाह्य सिंद्धातांची पुनःर्स्थापना करायचे प्रयत्न फसले आहेत आणि फसणार आहेत. नुकताच ३ हिंदू धर्मांचार्यांमधला (रामभद्राचार्य, प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद) पातळी सोडून केलेल्या टिपण्यामुळे निर्माण झालेला वाद याचा पुरेस्स निदर्शक आहे.

सोहम७ 12/09/2025 - 12:08
मी काही तज्ञ नाही पण 2025 मध्ये भारत सरकारने विकसित भारत 2047 (विकसित भारत@2047) या दृष्टीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत. या योजनांचा उद्देश 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे. महत्त्वाचे टप्पे आणि उपाय पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, आणि शाश्वत विकास यावर केंद्रित गुंतवणूक आर्थिक वाढीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व विभागांमध्ये धोरणात्मक सुधारणा ऊर्जा सुरक्षा, हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी), आणि शहरी–ग्रामीण विकास यावर भर युवक, महिलावर्ग, शेतकरी आणि गरीब घटक यांचा उत्थान हे केंद्रस्थानी नागरिकांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी ‘मायगव्ह’सारखे उपक्रम उद्दिष्टे 2047 पर्यंत $30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे 100% स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करणे अगस्त 2025 मध्ये पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर राजीव गौबा व. टी. व्ही. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली दोन उच्चस्तरीय सुधारणा समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत. या समित्यांनी विकसित भारत 2047 योजनेसाठी पुढील पिढीच्या सुधारणांवर अंतर्गत बैठका सुरू केल्या आहेत प्राथमिकतेने सुधारणा आवश्यक असलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत - सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका किंवा गैरव्यवहारांसाठी जबाबदार ठरविण्याच्या यंत्रणांना अधिक मजबूत करणे हे पारदर्शक आणि परिणामकारक शासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.उदा. मुंबईत नवीन रस्ते केवळ २-३ दिवसांमध्येच वापरण्यासयोग्य राहत नाहीत. हे मुद्दे नक्कीच सोडवावे लागतील. न्यायिक सुधारणा: प्रणालीगत विलंब, न्यायिक क्षमतेत वाढ, प्रक्रियांना आधुनिक स्वरूप देणे आणि प्रकरणांची प्रतीक्षा कमी करून वेळोवेळी न्याय मिळवून देणे ही महत्त्वाची चालू आव्हाने आहेत. मी कट्टर भाजप समर्थक नाही, पण शेवटी केवळ भाजपच या सुधारणा करण्यास सक्षम आहेत्यांना त्या साठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.

In reply to by सोहम७

सरकार १०० स्मार्ट सिटी देखील बनवणार होते, काय झाले त्याचे? त्या योजनेची तिरडी उठली. जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 12/09/2025 - 18:47
स्मार्ट सिटी... वॉव आमचे सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत येते बरं का. परवाच मुख्यमंत्र्यानी शब्द दिलाय की सोलापुरात आयटी हब चालू करु. प्रशासनाकडून जागेचा शोध चालू आहे. सोलापुरातूनच ६९०० इंजिनिअर दरवर्षी बाहेर पडतात मग आयटी हब होणारच सोलापुरात. ह्या हबात नोकर्‍यांचा सुकाळ असणार आहे. इच्छुकांनी तयारी ठेवावी बरं का. . काय तयारी करताल? कमीत कामी १० निळे बॅरल्स प्लास्टीकचे (सोलापुरात पाणी दर ५ दिवसांनी येते बरं का. आणि हे गेले १० वर्षे सलग. उन्हाळा पावसाळा असो की कीहीही आणि सर्व शहरात) . ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक?

In reply to by अभ्या..

युयुत्सु 13/09/2025 - 09:17
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक? सोलापुरात कोकणातली भाषा बघून आनंद झाला!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु 13/09/2025 - 09:23
जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे. सुशिक्षित लोक सत्तेत येऊन फार चमत्कार होईल असे वाटत नाही. कारण अडाणी जनता सुशिक्षित, विवेकी जनतेला संख्येच्या जोरावर पराभूत करते. कडवट सत्य असे आहे की जो पर्यंत अडाणी जनता मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन करत आहे तो पर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार! त्यात सुशिक्षित, विवेकी लोकांमध्ये लग्न नको आणि मुले नकोत हा ट्रेण्ड वाढत आहे. हे सर्वात जास्त गंभीर आहे. पण हे समजून घ्यायची क्षमता आहे कुणाकडे?

शाम भागवत 29/09/2025 - 22:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या माणसाने.

In reply to by युयुत्सु

मी मुलाखत उडत उडत पाहिली. मला भाटियांच्या सरसकटीकरणावर प्रचंड आक्षेप आहे. शिक्षणाच्या बाबतीत देखील. माझे उदाहरण देतो : इयत्ता सहावीत विज्ञानाच्या तासाला मुले असे प्रश्न सरांना विचारत : आपण जी हवा खातो ती कुठे जाते? खाल्लेले अन्न वेगळे आणि विष्ठा वेगळी तर मध्ये काय होते आणि सो ऑन. इयत्ता नववीत जेव्हा नागरिकशास्त्र शिकवले जात होते तेव्हा हे प्रश्न आम्हि विद्यार्थ्यानी विचारले आहेत : १. भारतात प्रत्येकाला धर्म सांगावा लागतो तर निधर्मी होणे संविधानाला मान्य आहे का? २. माझी जात ही आहे पण मला हा धर्म नको तर मी काय करू? ३. मला दहावीनंतर शीख व्ह्यायचे आहे तर मी काय करु? आणि सो ऑन. हे प्रश्न मुलभूत आहेत. आणि ते विद्यार्थ्यांनीच विचारले आहेत. मी माझ्या मनाचे सांगत नाही. अगदीच गयी गुजरी सिस्टीम असल्याची बतावणी भाटिया करत आहेत ती चुकीची आहे. माझी शाळा तालुक्याच्या गावी असते तशी सर्वसामान्य अनुदानित शाळा होती, जिथे २००० विद्यार्थी शिकत. एकाही शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारायला बंदी आणली नाही. मुलांनी अवघड प्रश्न जरी विचारले तरी शिक्षकांनी त्यांना सोपी उत्तरे अगदी माझे ग्रॅज्युएशन होईपर्यंत दिली आहेत.

युयुत्सु 01/01/2026 - 17:28
नवीन वर्षाचा विनोद  संदर्भ - https://economictimes.indiatimes.com/news/india/it-is-need-of-world-that-we-become-vishwaguru-rss-chief-mohan-bhagwat/articleshow/126216689.cms?fbclid=IwY2xjawPDQA9leHRuA2FlbQIxMABicmlkETFoZXl3VVRobXNaR3VqM2wwc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHpdxY8kO4nfuGHCzGtWej6h_6hKmvcjUiFUv6BeSJ1Q042E-foBLdzY36jf9_aem_KMsLfVBoCtiDtE7bD8x51w

पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. त्यांचा उद्देश वेगळा आहे, संघातील लोक आपली मूले विदेशात पाठवतात नी इतरांच्या मुलाना इथे देशसेवेच्या नावाखाली नको टू उद्योग करायला लावतात ज्यात देशाचे काडीचेही हित नसते!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ही ढोंगबाजी अनेक वर्षे चालु आहे. गेल्या १५/२० वर्षात स्व्तःच्या मुलांना बारावीनंतरच बाहेर(अमेरिका/ब्रितन)ला शिकायला पाठवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्य्मंत्री 'मामाजी' शिवराज सिंग चौहान ह्यांचा एक पुत्र बारावी नंतरच शिक्षणसाठी बाहेर. जयशंकर ह्यांना तीन मुले. एक जण वॉशिंग्टनमध्ये तर एक लॉस एंजेलिसमध्ये. गुजरातचे एक दिवंगत मुख्यमंत्री- एक मुलगी लंडनमध्ये स्थायिक , मुलगा सॅन डिएगोमध्ये. अजित दोवालांचे दोन्ही पुत्र भारताबाहेरच आहेत. गेल्यावर्षी पंकजा मुंडे ह्यांनीही स्थानिकांना 'जय श्रीराम' करायला लावुन स्व्तःच्या मुलाला बारावी नंतर अमेरिकेत शिकायला पाठवले.. असे वाचले होते. मोहनरावांनी आधी न्यु जर्सी/लंडन्/बे एरिया येथे जावे आणि तेथील परिवारातील लोकांना भारतात आणावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई इतक्या दूर कशाला जायचे? अनेक लोक आहेत विदेशात बसून देशात हिंदुनी काय करायला हवे ह्याचे पो टाकत असतात! इतकेच देशप्रेम नी हिंदुत्व उतू चाललेय तर ये की म्हणा इकडे!

युयुत्सु 03/09/2025 - 09:14
मोदी-शहांवर सतत खोटं बोलण्याचा आरोप होत असतो. त्यातील तथ्य मी कधी तपासले नाही. पण अलिकडे लक्षात आलेली एक ठळक गोष्ट म्ह० हा आरोप जर खरा असेल तर त्याची मुळे त्यांच्या संघ-संस्कारात आहेत याची आता खात्री पटली आहे. संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. खोटं उघडं पडलं सतत गोलपोस्ट हलवत राहायचे इतकंच त्यांना येतं. अलिकडे पंचाहत्तरीच्या निवृत्तीवर घेतलेला यु-टर्न हे असंच एक हलवलेलं गोलपोस्ट...

In reply to by युयुत्सु

संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. +1 त्यांना स्वातंत्र्यलढावेळी संघ किथे होता विचारले की पळ काढतात! :)

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 03/09/2025 - 17:03
ही मुलाखत पहा. संघ, त्यांची ध्येयं, त्यांचे लोक... या विषयावरच आहे. RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दाभोळकर म्हणतात

In reply to by स्वधर्म

मारवा 12/09/2025 - 18:19
विवेकानंद दांभिक होते. अमेरिकेने विवेकानंदां वर मोठा प्रभाव पाडला. अमेरिकन संस्कृती ने विवेकानंदाना फार प्रभावित केले. मात्र अस्सल भारतीय दांभिकता ते सोडू शकले नाही.

युयुत्सु 06/09/2025 - 18:19
श्री० पटाईत, मुद्देसूद प्रतिवाद केला असता तर जास्त आवडले असते. पण तुमच्याकडे मुद्दे नसावेत असे वाटते.

युयुत्सु 12/09/2025 - 07:54
परत गोलपोस्ट हलवलेले आहे. पण या व्यक्तव्यात बिट्विन द लाईन्स बरेच काही आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने बुधवार को कहा कि भारत का चरित्र सेवा या निस्वार्थ सेवा में निहित है।भारत की यही भावना आज की महाशक्तियों की तरह बनने के बजाय तटस्थता से विश्व की सेवा करने में विश्वास रखता है।उन्होंने इस बात पर खेद व्यक्त किया कि विज्ञान और ज्ञानके अन्य क्षेत्रों में प्रगति और मानव के पास सब कुछ होने के बावजूद दुनिया में अभी भी झगड़े जारी हैं। https://www.jagran.com/news/national-india-will-not-become-like-today-superpowers-says-mohan-bhagwat-24042849.html रघुवंशाच्या २ र्‍या सर्गात 'प्रसाद चिन्हानि पुरः फलानि' असं एक वचन आहे. पुढे काय घडणार आहे याची चिन्हे अगोदरच दिसू लागतात. संघाला अभिप्रेत असलेली भारतीय समाजावरील पकड घेता आली नसल्याने हे वैफल्योद्गार बाहेर पडले आहेत. कालबाह्य सिंद्धातांची पुनःर्स्थापना करायचे प्रयत्न फसले आहेत आणि फसणार आहेत. नुकताच ३ हिंदू धर्मांचार्यांमधला (रामभद्राचार्य, प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद) पातळी सोडून केलेल्या टिपण्यामुळे निर्माण झालेला वाद याचा पुरेस्स निदर्शक आहे.

सोहम७ 12/09/2025 - 12:08
मी काही तज्ञ नाही पण 2025 मध्ये भारत सरकारने विकसित भारत 2047 (विकसित भारत@2047) या दृष्टीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत. या योजनांचा उद्देश 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे. महत्त्वाचे टप्पे आणि उपाय पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, आणि शाश्वत विकास यावर केंद्रित गुंतवणूक आर्थिक वाढीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व विभागांमध्ये धोरणात्मक सुधारणा ऊर्जा सुरक्षा, हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी), आणि शहरी–ग्रामीण विकास यावर भर युवक, महिलावर्ग, शेतकरी आणि गरीब घटक यांचा उत्थान हे केंद्रस्थानी नागरिकांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी ‘मायगव्ह’सारखे उपक्रम उद्दिष्टे 2047 पर्यंत $30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे 100% स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करणे अगस्त 2025 मध्ये पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर राजीव गौबा व. टी. व्ही. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली दोन उच्चस्तरीय सुधारणा समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत. या समित्यांनी विकसित भारत 2047 योजनेसाठी पुढील पिढीच्या सुधारणांवर अंतर्गत बैठका सुरू केल्या आहेत प्राथमिकतेने सुधारणा आवश्यक असलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत - सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका किंवा गैरव्यवहारांसाठी जबाबदार ठरविण्याच्या यंत्रणांना अधिक मजबूत करणे हे पारदर्शक आणि परिणामकारक शासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.उदा. मुंबईत नवीन रस्ते केवळ २-३ दिवसांमध्येच वापरण्यासयोग्य राहत नाहीत. हे मुद्दे नक्कीच सोडवावे लागतील. न्यायिक सुधारणा: प्रणालीगत विलंब, न्यायिक क्षमतेत वाढ, प्रक्रियांना आधुनिक स्वरूप देणे आणि प्रकरणांची प्रतीक्षा कमी करून वेळोवेळी न्याय मिळवून देणे ही महत्त्वाची चालू आव्हाने आहेत. मी कट्टर भाजप समर्थक नाही, पण शेवटी केवळ भाजपच या सुधारणा करण्यास सक्षम आहेत्यांना त्या साठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.

In reply to by सोहम७

सरकार १०० स्मार्ट सिटी देखील बनवणार होते, काय झाले त्याचे? त्या योजनेची तिरडी उठली. जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 12/09/2025 - 18:47
स्मार्ट सिटी... वॉव आमचे सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत येते बरं का. परवाच मुख्यमंत्र्यानी शब्द दिलाय की सोलापुरात आयटी हब चालू करु. प्रशासनाकडून जागेचा शोध चालू आहे. सोलापुरातूनच ६९०० इंजिनिअर दरवर्षी बाहेर पडतात मग आयटी हब होणारच सोलापुरात. ह्या हबात नोकर्‍यांचा सुकाळ असणार आहे. इच्छुकांनी तयारी ठेवावी बरं का. . काय तयारी करताल? कमीत कामी १० निळे बॅरल्स प्लास्टीकचे (सोलापुरात पाणी दर ५ दिवसांनी येते बरं का. आणि हे गेले १० वर्षे सलग. उन्हाळा पावसाळा असो की कीहीही आणि सर्व शहरात) . ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक?

In reply to by अभ्या..

युयुत्सु 13/09/2025 - 09:17
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक? सोलापुरात कोकणातली भाषा बघून आनंद झाला!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु 13/09/2025 - 09:23
जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे. सुशिक्षित लोक सत्तेत येऊन फार चमत्कार होईल असे वाटत नाही. कारण अडाणी जनता सुशिक्षित, विवेकी जनतेला संख्येच्या जोरावर पराभूत करते. कडवट सत्य असे आहे की जो पर्यंत अडाणी जनता मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन करत आहे तो पर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार! त्यात सुशिक्षित, विवेकी लोकांमध्ये लग्न नको आणि मुले नकोत हा ट्रेण्ड वाढत आहे. हे सर्वात जास्त गंभीर आहे. पण हे समजून घ्यायची क्षमता आहे कुणाकडे?

शाम भागवत 29/09/2025 - 22:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या माणसाने.

In reply to by युयुत्सु

मी मुलाखत उडत उडत पाहिली. मला भाटियांच्या सरसकटीकरणावर प्रचंड आक्षेप आहे. शिक्षणाच्या बाबतीत देखील. माझे उदाहरण देतो : इयत्ता सहावीत विज्ञानाच्या तासाला मुले असे प्रश्न सरांना विचारत : आपण जी हवा खातो ती कुठे जाते? खाल्लेले अन्न वेगळे आणि विष्ठा वेगळी तर मध्ये काय होते आणि सो ऑन. इयत्ता नववीत जेव्हा नागरिकशास्त्र शिकवले जात होते तेव्हा हे प्रश्न आम्हि विद्यार्थ्यानी विचारले आहेत : १. भारतात प्रत्येकाला धर्म सांगावा लागतो तर निधर्मी होणे संविधानाला मान्य आहे का? २. माझी जात ही आहे पण मला हा धर्म नको तर मी काय करू? ३. मला दहावीनंतर शीख व्ह्यायचे आहे तर मी काय करु? आणि सो ऑन. हे प्रश्न मुलभूत आहेत. आणि ते विद्यार्थ्यांनीच विचारले आहेत. मी माझ्या मनाचे सांगत नाही. अगदीच गयी गुजरी सिस्टीम असल्याची बतावणी भाटिया करत आहेत ती चुकीची आहे. माझी शाळा तालुक्याच्या गावी असते तशी सर्वसामान्य अनुदानित शाळा होती, जिथे २००० विद्यार्थी शिकत. एकाही शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारायला बंदी आणली नाही. मुलांनी अवघड प्रश्न जरी विचारले तरी शिक्षकांनी त्यांना सोपी उत्तरे अगदी माझे ग्रॅज्युएशन होईपर्यंत दिली आहेत.

युयुत्सु 01/01/2026 - 17:28
नवीन वर्षाचा विनोद  संदर्भ - https://economictimes.indiatimes.com/news/india/it-is-need-of-world-that-we-become-vishwaguru-rss-chief-mohan-bhagwat/articleshow/126216689.cms?fbclid=IwY2xjawPDQA9leHRuA2FlbQIxMABicmlkETFoZXl3VVRobXNaR3VqM2wwc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHpdxY8kO4nfuGHCzGtWej6h_6hKmvcjUiFUv6BeSJ1Q042E-foBLdzY36jf9_aem_KMsLfVBoCtiDtE7bD8x51w
लेखनविषय:
लेखनप्रकार
 श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत.

गुल्लक

कर्नलतपस्वी ·

पर्णिका 28/08/2025 - 02:13
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.
शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन ! अगदी अस्संच असते मुली-वडिलांचे नातं ... मन हळवं झाले ! मुक्तक आवडलंच !

गणेशा 28/08/2025 - 11:30
मुलगी असण्या साठी परम भाग्य लागते असे माझे म्हणणे आहे. खुप्पच भावनात्मक पणे लिहिले आहे... मागे यावर काही लिहिलेले आठवले...पुन्हा लिहिल वेळ मिळाल्यावर

Bhakti 28/08/2025 - 19:24
सुंदर! आईवडिल देवदुतच असतात.मायाच्या सावलीचे प्रेमाचे मेघ असतात.आयुष्यभर मायेने बरसत राहतात.

पर्णिका 28/08/2025 - 02:13
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.
शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन ! अगदी अस्संच असते मुली-वडिलांचे नातं ... मन हळवं झाले ! मुक्तक आवडलंच !

गणेशा 28/08/2025 - 11:30
मुलगी असण्या साठी परम भाग्य लागते असे माझे म्हणणे आहे. खुप्पच भावनात्मक पणे लिहिले आहे... मागे यावर काही लिहिलेले आठवले...पुन्हा लिहिल वेळ मिळाल्यावर

Bhakti 28/08/2025 - 19:24
सुंदर! आईवडिल देवदुतच असतात.मायाच्या सावलीचे प्रेमाचे मेघ असतात.आयुष्यभर मायेने बरसत राहतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन. गुल्लक..... भातुकली खेळता,खेळता केंव्हा पुढे निघून गेली लक्षातच आले नाही. अचानक आला वादळाला घेऊन गेला जपून ठेवीन मनात काळजी करू नका कानात सांगुन गेला राजा राणीचा संसार. लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाबां आले. हरखून गेली. काय करू, काय नको असे झाले. तीचा आनंद तोच त्याचा परमानंद. जोडीने अदरातिथ्थ चालले होते. आई बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

देव आणि धर्माचे चेताविज्ञान

युयुत्सु ·

निपा 26/08/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु 27/08/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक 27/08/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म 27/08/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़

निपा 26/08/2025 - 18:51
नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु 27/08/2025 - 07:08
श्री० निपा मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.> "जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक 27/08/2025 - 17:47
स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात. तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात. गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही. विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म 27/08/2025 - 19:02
देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे. ही बातमी या बाबतीत रोचक आहे. 8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़
लेखनविषय:
लेखनप्रकार
देव आणि धर्माचे चेताविज्ञान =============== -राजीव उपाध्ये "देवदानवा नरे निर्मिले हे मत कळवू द्या काठोकाठ भरूनी द्या पेला फेस भराभर उसळूं द्या" - केशवसुत, स्फूर्ति  एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे. हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो.

आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय

हेमंतकुमार ·

जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला. प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला.... नाश्ता....लंच....डिनर...

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 25/08/2025 - 11:49
सामना लखनौत
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
नाश्ता....लंच....डिनर...
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . . ?

In reply to by हेमंतकुमार

सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.

श्वेता२४ 25/08/2025 - 14:24
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.

मस्त लेख
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे. असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 25/08/2025 - 16:13
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो. नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते. अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे. मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.

1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.

हेमंतकुमार 25/08/2025 - 18:58
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी. 1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज. दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते. मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
"आता आपल्या शाळेचे ब्रह्मचर्य संपले",
असे गमतीने जाहीर केले. आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !

हेमंतकुमार 30/08/2025 - 14:44
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा. चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे. अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो. आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 30/08/2025 - 19:06
मुंबई दिनांक वाचली तेव्हा
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो. तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे. त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.

छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)

हेमंतकुमार 31/08/2025 - 07:59
*मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! * शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.

चामुंडराय 18/09/2025 - 18:36
गेल्या पन्नास वर्षातील ठळक घटनांचा छान आढावा. भारतात Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८० च्या आसपास असावा. बॉलिवूडने धरमपाजी आणि अम्मामालिनीला घेऊन त्याची हिंदी कॉपी काढली होती असे देखील आठवते आहे. सामना, शोले बरेच उशिरा बघितले. शोलेच्या संवादाची LP record आली होती हे आठवते आहे. एखाद्या चित्रपटाच्या संवादाची LP निघण्याची पहिलीच वेळ असावी.

हेमंतकुमार 18/09/2025 - 19:06
Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८०
बरोबर ! त्याकाळी परदेशातले चित्रपट त्यांच्याकडे पुरेसा धंदा झाल्यानंतरच मग अन्य देशांना पाठवत असावेत. त्यावरून एक आठवले. आमचा एक मित्र आम्हाला तेव्हा नेहमी म्हणायचं की अरे इंग्लिश बघत जा, कारण त्यांच्याकडे जे चांगले चाललेले असतात तेच ते परदेशी पाठवणार ना ! असा त्याचा साधा तर्क होता. जेव्हा Jaws पाहिला त्या वयात 'स्पिलबर्ग' वगैरे काही समजतही नव्हते. त्यांची महती गेल्या दहा वीस वर्षांमध्ये समजली; Schindler's List, The Terminal व Munich, इ. पाहिल्यानंतर. Jaws हिंदी आवृत्तीबद्दल काही माहीत नव्हते. धन्यवाद !

जाॅज् जलंधर, समना लखनौ तर शोले मुंबई मधे बघीतला. प्रतिसाद डोक्यात आल्यावर १९७१ चा पाकड्यांचा तो डायलॉग आठवला.... नाश्ता....लंच....डिनर...

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 25/08/2025 - 11:49
सामना लखनौत
वा ! मस्तच. सामना लखनऊत पोचला होता याचा आनंद वाटला.
नाश्ता....लंच....डिनर...
हे पूर्वी ऐकले होते पण आता विसरलो. . . . ?

In reply to by हेमंतकुमार

सामान्यता छावणी शहरापासून दूर,शहरात जाण्यासाठी सैनिकांना परवानगी घ्यावी लागत असे. आता बरेच काही बदलले आहे. मनोरंजनार्थ खुले सिनेमागृह असायचे. विशेषता प्रशिक्षण केंद्रात तर हमखास असते,आजही आहे. घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना त्यांच्या भाषेतले चित्रपट पहाता यावे या साठी लँग्वेज पिक्चर (फौजी लिंगो) आठवडा,पंधरवड्यात एक दिवस लावले जात. तिथेच बरेच मराठी चित्रपट बघायला मिळाले. गणेशोत्सवात तर जरूर मराठी सिनेमा झळकायचा.

श्वेता२४ 25/08/2025 - 14:24
आणीबाणी सोडली तर या बाकीच्या घटना माहिती असल्या तरी त्या 75 सालच्या म्हणून संकलित होऊन समोर आल्यानंतर भारी वाटले.

मस्त लेख
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
ही माझ्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या वर्षी शिक्षण क्षेत्रात खूप दूरगामी परिणाम झाले होते ना? पूर्वी मनोगतवर एका ज्येष्ठ सदस्याचा अनुभव वाचल्याचा आठवतो. १९७४ मध्ये जुनी अकरावी आणि नवी दहावी असे दोन्ही बॅचचे विद्यार्थी एस.एस.सीला होते. त्यामुळे कॉलेजला प्रवेश घ्यायला त्या वर्षी दुप्पट विद्यार्थी होते. त्यावेळेस कॉलेजांची आणि त्यातील सीट्सची संख्या मर्यादित होती त्यामुळे अनेकांना कॉलेजात त्या वर्षी प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा एस.एस.सी या क्वालिफिकेशनवर टुकुटुकु करता येईल अशी एखादी सरकारी नोकरी मिळून जायची त्यामुळे ज्यांना कॉलेजात प्रवेश मिळाला नाही त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले नाहीत. तीच स्थिती दोन वर्षांनी १९७६ मध्ये झाली म्हणजे नवी बारावी आणि जुने इंटर सायन्सवाले विद्यार्थी एकदमच डिग्री कॉलेजात प्रवेश घ्यायला पात्र झाले. मनोगतवर ज्यांचा अनुभव वाचला होता त्या सदस्यांना इंजिनिअरींगला जायचे होते पण या कारणाने त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही आणि शेवटी ते बी.एस.सी केमिस्ट्रीला गेले. नंतर त्यांचे काही वाईट झाले नाही- केमिस्ट्रीत पी.एच.डी करून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. हा सगळा प्रकार वाचून जवळपास २० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे तपशील बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायला हवे. असे काही आताच्या काळात झाले तर लोक रस्त्यावर उतरून दंगलीच होतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 25/08/2025 - 16:13
अगदी बरोबर. विद्यार्थी दुप्पट झाल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही तो प्रश्नही उद्भवला. एमबीबीएस प्रवेशाला काय झाले ते सांगतो. नवी बारावी आणि जुने इंटर एकदम उत्तीर्ण होऊन तिकडे आल्याने महाराष्ट्रातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागा तात्पुरत्या त्या काळासाठी वाढवण्यात आल्या. माझ्या पुण्यातील कॉलेजला शंभर जागा वाढल्या, परंतु या 100 जागांचा प्रवेश मूळ प्रवेशानंतर सहा महिन्यांनी झाला. त्यामुळे त्या शंभर मुलांना सतत ‘अनियमित बॅच’ असे म्हटले गेले. ही अनियमित बॅच सतत आमच्या सहा महिने पुढे राहिल्यामुळे आम्हालाही रुग्णालय प्रशिक्षणादरम्यान काही गैरसोयी सहन करावा लागल्या ते आठवते. अजून एक महत्त्वाची नियमदुरुस्ती वैद्यकीय शाखेला करावी लागली. वैद्यकीयच्या मूलभूत ( बहुदा) जागतिक नियमानुसार वैद्यकीय प्रवाशाचे वेळी किंवा निदान त्या वर्षाखेरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित असते( कारण शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी प्रेतांचा सामना करायचा असतो) . परंतु आता या बारावीमुळे आम्हा सगळ्यांचे वय 17 होते. मग अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेला त्यासाठी तो नियम अठराचा सतरा करावा लागला, जो आजपर्यंत चालू आहे. मात्र अभियांत्रिकी प्रवेशाला तसा काही वयाचा नियम तेव्हा तरी नव्हता. आमच्याबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्यांपैकी काहींचे वय 17 देखील पूर्ण होत नव्हते. अशा मुलांची वैद्यकीय प्रवेशाची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली जाते. दरम्यान त्या वर्षात ते विद्यार्थी अन्य अभ्यासक्रम करू शकतात किंवा घरी बसू शकतात.

1975 पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. हि शिक्षण पद्धत इतर राज्यात ,विशेषत उत्तर भारतात आगोदर पासून प्रचलित होती. त्यामुळे मराठी,कनड्डिगा मुलांना एन डि ए, ए सी सी सारख्या स्पर्धा परिक्षेला बसण्यास अडथळा येत असे. प्रि डिग्री,पि यु सी पास झाल्यावरच ते या परीक्षां देण्यास योग्य असत. मराठी मुले मॅट्रिक नंतर सैन्यात भरती होत असल्याने त्यांना बहिस्थ परिक्षा देण्यास अडचणी येत व जन्मजात गुणवत्ता असूनही केवळ कागदी प्रमाणपत्राच्या आभावी नुकसान होत असे.

हेमंतकुमार 25/08/2025 - 18:58
नवी दहावीच्या निमित्ताने पुढे घडलेल्या काही रंजक आठवणी. 1975, 76 (आणि कदाचित 77) ला जे दहावी झाले त्यांच्या वेळेस अकरावीचे वर्ग आपापल्या शाळांमध्येच भरवण्यात आले. . पुढे फक्त बारावीला विज्ञान कॉलेजात होतो व त्यानंतर मेडिकल कॉलेज. दहावीपर्यंतची आमची शाळा फक्त मुलांची होती आणि शिकवायला सुद्धा फक्त आणि फक्त पुरुषच असायचे. किंबहुना शाळेच्या स्थापनेपासून शंभर वर्षांहून अधिक काळ ही पुरुषांची शाळा होती. आमच्याच शिक्षणसंस्थेची मुलींची शाळा वेगळी होती. परंतु जेव्हा नवा अभ्यासक्रम आला तेव्हा मुलींच्या शाळेत अकरावीची सोय करायला वर्गच नव्हते. मग विज्ञान शाखेच्या बाबतीत सुमारे 40 मुली आमच्या मुलांच्या शाळेत पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकरावीच्या विज्ञान वर्गांमध्ये प्रत्येक तुकडीतील एक रांग ही मुलींची होती. हा संस्थेच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय होता आणि मुख्याध्यापकांनी एका कार्यक्रमात,
"आता आपल्या शाळेचे ब्रह्मचर्य संपले",
असे गमतीने जाहीर केले. आता मुली शाळेत आल्यात म्हटल्यानंतर काही शिक्षिकांची देखील भरती करण्यात आली. अशा तऱ्हेने शाळा स्त्री-पुरुष मिश्र झाली !

हेमंतकुमार 30/08/2025 - 14:44
सामनाची प्रेरणा व निर्मितीकथा फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल. त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा. चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

ही मुलाखत छान आहे. गेल्याच आठवड्यात पाहिली. आणखी एक राजकीय विषयावरची एका पत्रकाराची मुलाखत देखील छान आहे. अरूण साधूंची मुंबई दिनांक वाचली तेव्हा आम्ही त्या वयात अगदी भारावून गेलो होतो. आठवणींना छान उजाळा. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 30/08/2025 - 19:06
मुंबई दिनांक वाचली तेव्हा
अगदी अगदी ! थरारून गेलो होतो. तिच्यावर आधारित सिंहासन चित्रपटाचे काही चित्रीकरण आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेले होते. सभागृहाचा उपयोग विधानसभा म्हणून वगैरे. त्यामुळे त्याबद्दल अधिक महत्त्व होतेच.

छान माहिती सिनेमाची! ह्या काळाचा मी साक्षी असू शकत नाही कारण उन्यापुर्या दोन तपानी मी जन्मलो! पण लहानपणी २००७ च्या आपसास शोले थेटरात लागलेला पाहिला होता, तेव्हा तो ३d मध्ये आला होता, पाहू पाहू म्हणे पर्यंत तो उतरलाही! नंतर सिडिप्लेयर वर शोले आणून पाहिला, अनेकवेळा पाहिला, शोले आवडला होता कारण क्वालिटी बॅकग्राउंड म्युझिक, डायलॉग्स वेळी संगीताचा प्रचंड मारा नाही, प्रत्येक डायलॉग स्पष्ट ऐकू येणे वगैरे, जुन्या सिनेमात ह्या गोष्टी अभावानेच दिसतात , मागे हृषिकेश गुप्ते ह्यांचे दिवालो २०१३ च्या अंकातील एक हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा मी ते मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! बाली सचिन पिळगावकरांनी त्या काळी अमजद खान ह्याना खालच्या की वरच्या पट्टीत डायलॉग शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)

हेमंतकुमार 31/08/2025 - 07:59
*मासिक ऑनलाईन मिळवून १०० रुपये देऊन वाचली! * शिकवले हे पाहून उर भरून आला! ;)
अरे वा ! छान आठवणी आहेत. आवडल्या.

चामुंडराय 18/09/2025 - 18:36
गेल्या पन्नास वर्षातील ठळक घटनांचा छान आढावा. भारतात Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८० च्या आसपास असावा. बॉलिवूडने धरमपाजी आणि अम्मामालिनीला घेऊन त्याची हिंदी कॉपी काढली होती असे देखील आठवते आहे. सामना, शोले बरेच उशिरा बघितले. शोलेच्या संवादाची LP record आली होती हे आठवते आहे. एखाद्या चित्रपटाच्या संवादाची LP निघण्याची पहिलीच वेळ असावी.

हेमंतकुमार 18/09/2025 - 19:06
Jaws बराच उशिरा आला बहुधा. १९८०
बरोबर ! त्याकाळी परदेशातले चित्रपट त्यांच्याकडे पुरेसा धंदा झाल्यानंतरच मग अन्य देशांना पाठवत असावेत. त्यावरून एक आठवले. आमचा एक मित्र आम्हाला तेव्हा नेहमी म्हणायचं की अरे इंग्लिश बघत जा, कारण त्यांच्याकडे जे चांगले चाललेले असतात तेच ते परदेशी पाठवणार ना ! असा त्याचा साधा तर्क होता. जेव्हा Jaws पाहिला त्या वयात 'स्पिलबर्ग' वगैरे काही समजतही नव्हते. त्यांची महती गेल्या दहा वीस वर्षांमध्ये समजली; Schindler's List, The Terminal व Munich, इ. पाहिल्यानंतर. Jaws हिंदी आवृत्तीबद्दल काही माहीत नव्हते. धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदा म्हणजेच 2025मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. यातील काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही लेखात समावेश केला आहे. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल.

स्ट्रिंग थिअरीचा पाया

अनन्त्_यात्री ·

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त 04/09/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म 29/08/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि 04/09/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त 04/09/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म 29/08/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि 04/09/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी
लेखनविषय:
काव्यरस
(FunU)वादी लेखनाची होता उर्मी अनावर ब्रह्मलीन असूनही प्रकटू का मिपावर? बादरायणी संबंध येतील का माझ्या कामी? (एन्ट्रॉपीचे ॐकाराशी करू कलम कसे मी?) "जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? ओव्या, अभंग, सूक्तांची लेखा जोडू का शेपटी? डिस्क्लेमर टाकावा का स्वांत:सुखाचा शेवटी? असिधारा व्रत माझे (FunU)वादी लेखनाचे जरी गायबलो सध्या लोड नका घेऊ त्याचे ! एक शिक्रेट सांगतो कोणालाही सांगू नका (FunU)वादी लेखनाचा माझा आ-मिपांत* ठेका ! ~~~~~~~~~~~~ *आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

Bhakti ·

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti 24/08/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/08/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti 24/08/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/08/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण १ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श्वेता२४ ·

खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्वेता२४ 24/08/2025 - 09:17
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.

In reply to by श्वेता२४

गणेशा 24/08/2025 - 09:35
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 08/09/2025 - 20:53
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.

आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 14:15
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....

असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल

In reply to by हेमंतकुमार

आग्या१९९० 25/08/2025 - 08:47
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.

In reply to by आग्या१९९०

श्वेता२४ 25/08/2025 - 15:06
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद

युयुत्सु 25/08/2025 - 09:08
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.

In reply to by युयुत्सु

चावटमेला 28/08/2025 - 00:37
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.

चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.

Bhakti 26/08/2025 - 16:39
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)

पर्णिका 28/08/2025 - 02:04
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)

आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 31/08/2025 - 14:54
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.

In reply to by श्वेता२४

पर्णिका 06/09/2025 - 04:02
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.

सिरुसेरि 08/09/2025 - 17:30
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .

श्वेता२४ 08/09/2025 - 19:32
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.

अभ्या.. 10/09/2025 - 15:31
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.

In reply to by अभ्या..

मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प

श्वेता२४ 10/09/2025 - 21:45
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!

खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्वेता२४ 24/08/2025 - 09:17
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.

In reply to by श्वेता२४

गणेशा 24/08/2025 - 09:35
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 08/09/2025 - 20:53
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.

आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 14:15
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....

असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल

In reply to by हेमंतकुमार

आग्या१९९० 25/08/2025 - 08:47
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.

In reply to by आग्या१९९०

श्वेता२४ 25/08/2025 - 15:06
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद

युयुत्सु 25/08/2025 - 09:08
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.

In reply to by युयुत्सु

चावटमेला 28/08/2025 - 00:37
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.

चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.

Bhakti 26/08/2025 - 16:39
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)

पर्णिका 28/08/2025 - 02:04
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)

आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 31/08/2025 - 14:54
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.

In reply to by श्वेता२४

पर्णिका 06/09/2025 - 04:02
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.

सिरुसेरि 08/09/2025 - 17:30
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .

श्वेता२४ 08/09/2025 - 19:32
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.

अभ्या.. 10/09/2025 - 15:31
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.

In reply to by अभ्या..

मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प

श्वेता२४ 10/09/2025 - 21:45
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?