मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चव

भृशुंडी ·

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:12
गुड वन. :) पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.

In reply to by कवितानागेश

भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 23:18
@नाव -पटलं! पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही. आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:00
"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:12
गुड वन. :) पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.

In reply to by कवितानागेश

भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 23:18
@नाव -पटलं! पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही. आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:00
"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.
लेखनविषय:
काव्यरस
सोडी केशसंभार विखुरला स्तनांवर दृश्य वेड लावी मला नग्न सावळ्या रूपाचे हात वेढले उराशी त्याचे होता युग्मपाश बोटे आतुर धावती तप्त देठांपाशी खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार चिंब ओल्या पाकळ्यांत होती जिव्हेचेच दंश माझ्या ओठांवर चव तुझ्या अमृताची

कहां गये वो लोग?--नाथा

राजेंद्र मेहेंदळे ·

चित्रगुप्त गुरुवार, 07/03/2014 - 17:43
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची
आणि
अँटेना बसवायचा आहे...
हे दोन्ही एकाच काळातील आहे काय ? बाकी लेख झकास.

In reply to by चित्रगुप्त

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/03/2014 - 18:34
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती..आणि बेल बसवली हे एका काळातील आहे. अँटेना नंतर आले आणि लोक टीव्हीला खिळुन एकमेकांकडे जायचे बंद झाले

In reply to by नित्य नुतन

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:05
थोडेसे प्रतिसाद इतर धाग्यांवरही वाटा की. सगळे इथेच टाकून दिलेन. ;-)

चित्रगुप्त गुरुवार, 07/03/2014 - 17:43
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची
आणि
अँटेना बसवायचा आहे...
हे दोन्ही एकाच काळातील आहे काय ? बाकी लेख झकास.

In reply to by चित्रगुप्त

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/03/2014 - 18:34
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती..आणि बेल बसवली हे एका काळातील आहे. अँटेना नंतर आले आणि लोक टीव्हीला खिळुन एकमेकांकडे जायचे बंद झाले

In reply to by नित्य नुतन

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:05
थोडेसे प्रतिसाद इतर धाग्यांवरही वाटा की. सगळे इथेच टाकून दिलेन. ;-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई आमचं ६-७ खोल्यांचं जुनं तिपाखी कौलारु घर होतं.दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि आम्ही पोरेटोरे दुपारी कुणाही एकाच्या घरी किंवा संध्याकाळी कुणाच्याही वाड्यात खेळत पडीक असायचो.आमचे घर मोठे असल्याने त्यातल्यात्यात आमच्याकडेच दुपारचा अड्डा असे.एकदा असेच एका कुठल्यातरी खोलीत पत्ते वगैरे खेळत असताना घरात चोरी झाली आणि चोराने

पाऊस आलाय...

माधुरी विनायक ·

एस गुरुवार, 07/03/2014 - 17:14
क्या बात है! पाऊस आला हे मिपावर कविता येऊ लागल्या की कळतं. :-) बाकी कविता मस्त.

निखळानंद गुरुवार, 07/03/2014 - 17:37
फक्त त्याला जास्त वेळ थांबवून ठेवू नका.. कंटाळून निघून गेला तर पंचाईत व्हायची ! आधीच त्याने फार वेळ तिष्ठत ठेवलं होतं.. तेंव्हाच तुमची तयारी करून घ्यायची होतीत ना ! असो. आता प्रत्यक्ष भिजाल त्या वेड्या संगे तेंव्हा तुम्हाला लागलेल्या वेडा बद्दलही लिहा..

एस गुरुवार, 07/03/2014 - 17:14
क्या बात है! पाऊस आला हे मिपावर कविता येऊ लागल्या की कळतं. :-) बाकी कविता मस्त.

निखळानंद गुरुवार, 07/03/2014 - 17:37
फक्त त्याला जास्त वेळ थांबवून ठेवू नका.. कंटाळून निघून गेला तर पंचाईत व्हायची ! आधीच त्याने फार वेळ तिष्ठत ठेवलं होतं.. तेंव्हाच तुमची तयारी करून घ्यायची होतीत ना ! असो. आता प्रत्यक्ष भिजाल त्या वेड्या संगे तेंव्हा तुम्हाला लागलेल्या वेडा बद्दलही लिहा..
लेखनविषय:
पाऊस आलाय सालाबादप्रमाणे वेड्या आठवणी जागवायला पुन्हा-पुन्हा मला लावतोय माझ्याच मनावर रागवायला वेडा पाऊस, वेडा... वेडावणारा पाऊस वेडा वेड लावतोय, वेडावतोय कृष्णमेघांच्या सावलीमागून आतुर होऊन बोलावतोय भिजायला... हो...भिजायचंय मलाही... पण थोडं थांबावं लागेल... हल्ली असंच करावं लागतं मनात आलं, तसं वागलं, मोकळं झालं, असं होतंच नाही... थांबावंच लागतं आणि मनालाही थांबवावं लागतं पण येणार मी, नक्की... मलाही भिजायचंय ना...

कृतार्थ !..... एक भयकथा !

मृणालिनी ·

एस गुरुवार, 07/03/2014 - 16:55
प्रवाही आहे. पण भय किंवा रहस्य असे फारसे वाटले नाही. रुचिताला विनय दिसतो तेव्हाच पुढे काय होणार याचा अंदाज येतो. पुलेशु.

In reply to by बॅटमॅन

रामपुरी गुरुवार, 07/03/2014 - 20:02
मला वाटलं होतं आता स्कूटी आणि बाईकची टक्कर होऊन बाईक नदीत पडणार. म्हणून वर जाऊन परत एकदा लेखकाचं नाव बघितलं. पण नशिब चांगलं (बाईक वाल्याचं) म्हणून तसं काही झालं नाही =))

In reply to by विजुभाऊ

भिकापाटील Sat, 07/05/2014 - 11:46
मला वाटले की या कथेत सुद्धा लुना .सायकल किंवा स्कूटीची टक्कर होऊन जीप / ट्रक नदीत पडेल.. =)) =)) =)) बेक्कार हसतोय.... अवांतर : भयकथा वाचून स्पा काकांची आठवण झाली. ;)

मृणालिनी गुरुवार, 07/03/2014 - 17:37
कथा वाचून सर्वांनी प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनपासून धन्यवाद ! खरंच, हि भयकथा नाही. हि 'भूतकथा' आहे. पण हेडिंग बदलता येत नाहीये.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 18:42
विनयच्या भेटीपासून कथा आपल्या मनांत आकार घेऊ लागते नंतर फक्त शब्दांच्या दगडांवर पाय ठेवत पुढे पुढे जात राहायचं. भय कथा नाही, रहस्य कथा नाही, उत्कंठावर्धकही नाही. शब्दरचना चांगली आहे. प्रयत्न चांगला आहे असे म्हणावयास हरकत नाही. पुढील कथांसाठी शुभेच्छा..!

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 23:08
१)रुचिताने ठामपणे निर्णय घेतल्यानंतर होणारे मनोवैज्ञानिक बदल छान दाखविले आहेत. २)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात! कथा आवडली. पुढिल कथांसाठी शुभेच्छा.

एस Fri, 07/04/2014 - 10:14
२)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात!
नाही, कस्सं काय जमतं हो तुम्हांला?

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:41
रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी एकटी चालत जाते आणि त्यात सुद्धा घाइनी घरी जाण्यापेक्षा आधी चहा पीत थांबते हे ह्या गोष्टीला हास्यास्पद बनवते. मोबाइल च्या जमान्यात ती कोणाला बोलवुन न घेता एकटी रात्री चालत निघते हे पण हास्यास्पद. तो विनय भेटल्यावर पण ती त्याला घरापर्यंत सोबत कर असे सांगत नाही हे ही हास्यास्पद. काय लिहले आहे तुम्ही मधुरा ताई. आधी एखाद्या ७ वर्षाच्या मुलाकडुन मत तरी घ्यायचे ना.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 11:18
ऋषिकेश, आयुर्हित, मनापासून धन्यवाद! प्रसाद, कथा नीट वाचलीत का? १.मोबाईल तिच्या जवळ नव्हता, हे पहिल्या काही ओळींतच स्पष्ट केलं आहे. २.चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण, यात मला तरी कुठे हास्यास्पद बाब आढळून येत नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, तसं बघायला गेल, तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. किव्हा या कथेत तशी तिला त्याच्या मदतीची गरज वाटली नसावी. बाकी ७ वर्षाच्या मुलाकडून मत घेण्याची मला गरज नाही... तुम्ही मात्र इतर कशावर काही मत देताना, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन नक्की घ्या. कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by मृणालिनी

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 12:17
एखाद्या घरात मदत मागायला जावं तर फटकन कोणीतरी अपमान करायची भिती.... “तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे, कि आत्ता ११ वाजलेत. आणि तेही रात्रीचे...आणि जनरली रात्री सगळे झोपलेले असतात. म्हणजे निदान आम्ही तरी झोपतो.. ह? तर तुम्हाला जे काय काम असेल ते उद्या...सकाळी ९ नंतर.” आणि वर तोंडावर दार लाऊन घेतात. आजकाल कोणीही मदत करत नाही स्वार्थ असल्याशिवाय... >>>>>>>> तुम्हीच लिहीले आहे की ती मदत शोधत होती म्हणुन. मोबाईल नव्हता बरोबर असे कधी असते का? रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.

In reply to by प्रसाद१९७१

असंका Fri, 07/04/2014 - 16:44
रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.
साधी मुलगी आहे का ती? नुकताच तिने एका माणसाचा जीव घेतलेला आहे! तिला-
जरा वाफाळलेला चहा घेऊ
असं वाटलं तर काय चुकलं? कायपण शंका काढताय! हे जे आजुबाजुला काय चाललंय अशी भीती घालायची ती सामान्य मुलींना.....यांच्यासारख्या (एका धक्क्यात बंद पडणार्‍या स्कुटीवरून) "हिट अँड रन" करू शकणार्‍यांना नाही!

In reply to by मृणालिनी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 13:19
मधुरा पहिला मुद्दा मान्य आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्याच्या स्पष्टीकरणा बद्दल जरा असहमती आहे. दुसरा मुद्दा >>>>चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण,...('वाटण' हा शब्द मसाल्याचे 'वाटण' ह्या अर्थाचा आहे. तो 'वाटणं' किंवा 'वाटणे' असा पाहिजे.) कथेतील >>>>सगळा आहे-नाही तो धीर एकवटून ती तुटकी चप्पल रेटत-रेटत अंतर कमी करत होती. ह्या वाक्यानुसार ती भयंकर घाबरलेली होती. कुठल्याही घाबरलेल्या व्यक्तीची नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भिती पासून दूर जाणे ही असते. अशा अत्यंतिक भितीच्या प्रसंगी कधी तहान-भूकेची जाणीव होत नाही तर, संकटाशी सामना करण्याच्या नैसर्गिक गरजेतून शरीर थकत नाही, त्याला अतिरिक्त बळ प्राप्त होतं. ती अगदी ८-१० किलोमिटर धावली असेल तर सांगता येत नाही, कोलमडून पडू शकते. पण चहा प्यायला जाणार नाही. निदानपक्षी, 'आपल्या हातून अपघात होऊन एक व्यक्ती पुलावरून खाली पडली आहे, आणि मृत्यू पावली असण्याची शक्यता पाहता कोणीही व्यक्ती आधी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचाच विचार करेल. तिसरा मुद्दा>>>>तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. कथेतीलच सुत्र धरून सांगायचे झाले तर (विनय.....रुचिताचा मित्र.) विनय हा रुचिताचा मित्र असतो. 'कोणीही' अनोळखी नसतो. उलट अशा प्रसंगी जुना मित्र देवासारखा भेटल्यामुळे तिला आधार वाटायला हवा आणि तिने त्याला तिच्या घरापर्यंत साथ देण्याची विनंती करायला पाहिजे होती. असो. ह्या चुका मलाही जाणवल्या परंतु, तितक्या गंभीर वाटल्या नाहीत. कथालेखनात लेखिकेने घेतलेले स्वातंत्र्य म्हणून मी तिथे दुर्लक्ष केलं. पण तुमचा वरील प्रतिसाद पाहिल्यावर ह्या मुद्द्यांवर चर्चा करावी असे वाटून हा प्रतिसाद टाकला आहे.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 12:28
प्रसाद, तिला ज्या मदतीची गरज होती, ती गरज एका वाहनाची होती. कि एखाद्याने तिला घरी 'गाडीवरून' सोडावं. विनय कडे त्यावेळी गाडी नव्हती. आणि त्याच्याकडे मदत मागायला तिला संकोच देखील वाटत असू शकतो न ! मोबाईल एखादे दिवशी माणूस घरी विसरू शकतो हि बाब तुम्हाला मान्य नसेल, पण अनेकदा आपण काही वस्तू विसरून घराबाहेर पडतो, हे तुम्हाला मान्य करावच लागेल. आणि 'घरी न जाता चहा प्यावा' अस का वाटलं तुम्हाला? कथेत ती दमल्यामुळे चहा प्यायला थोडावेळ थांबली होती. त्यानंतर ती घरीच जाणार होती. रस्ता चालायला चहा पिल्यामुळे उर्जा येईल, असं वाटलं असणार तिला. असो, तुम्हाला हि कथा आवडलेली नाही, हे कळले. त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊन, काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम !

मराठी कथालेखक Fri, 07/04/2014 - 13:35
मधूराजी तुम्ही छान प्रयत्न केला आहे. पण काही गोष्टी सूचवाव्याशा वाटतात. १) गूढाची उकल हाच शेवट हवा होता असे मला वाटते. म्हणजे वृत्तपत्रात रुचिताने विनयचा फोटो पाहिल्यावर कथा संपायला हवी. फारतर एका ओळीत रेश्माला भेटण्यासाठी रुचिता निघाली वगैरे...कारण गूढ उकलल्यावर पुढे कथा वाचाण्यात रस उरत नाही. २) "तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे..." हा काल्पनिक (आणि पुणेरी/खवचट ई) संवाद विनोदनिर्मितीसाठी चांगला आहे. पण गूढकथा, ते ही लघूकथेत विनोदनिर्मिती टाळलेलीच बरी असे माझे मत आहे. ३) बाकी वर इतरांनी म्हंटल्याप्रमाणे "....." खूप आहेत. तसेच रात्री एकट्या मुलीचे ओसाड ठिकाणी चहा प्यायला थांबणे , अशा ठिकाणी रात्री अकरा वाजता टपरी उघडी असणे (टपरीवाला ती बंद करत होता तरी इतक्या उशीरा ?) हे पटत नाही. ४)रुचिता विनयचा अंतिमसंस्कार परस्परच करुन टाकते हे पटत नाही, पण अर्थात आधी म्हंटल्याप्रमाणे गूढ उकलल्यानंतरचा सर्वच भाग अनावश्यक वाटतो. पुढिल लेखनास शुभेच्छा असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की पुन्हा एकदा अजून विचार करुन ह्याच कथेचे पुनर्लेखन करायचा प्रयत्न करा. कथा पुन्हा पुन्हा वाचून बघा, तुमच्या पुर्ण पसंतीस उतरली की पोस्ट करा. तुमच्या कथेच्या तुम्हीच पहिल्या वाचक, आस्वादक आणि टिकाकार असाव्यात. काही कमी जास्त लिहिले गेले असेल तस क्षमस्व.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 16:50
भयकथा वा गूढकथेचा फील जास्त आला नाही पण लिखाणशैली प्रवाही असल्याने वाचली गेली. अर्थात त्यातही बरेचदा जास्तीची टिंबे खटकली. लिहित राहाल तसे लिखाणात आणखी सुधारणा होत राहील, पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ! अवांतर - वर प्रतिसादांत "रात्री ११ वाजता एखादी मुलगी चहा प्यायला थांबणार नाही" अशी काही लोकांनी जी शंका काढली आहे त्याच्याशी सहमत. किंवा ते विश्वासार्ह वाटण्यासाठी त्या नायिकेची इमेज तशीच डॅशिंग उभारायला हवी होती जे तुम्ही नेमके उलट केले आहे. तरीही वाचण्याच्या ओघात माझ्या तरी ते लक्षात आले नाही हे ही नमूद करू इच्छितो. असो, या सूचना आणि सल्ले सकारात्मक घेतल्यास पुढील कथेत फायदाच होईल :)

In reply to by धन्या

प्रभाकर पेठकर Sun, 07/06/2014 - 20:08
मिपा सदस्य चोखंदळ आहेत. काहीही खपवून घेत नाहीत. तसेच, ह्या चिरफाडीचा फायदा लेककाला/लेखिकेला आपल्या लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते (निदान, मी तरी असे मानतो) आणि मिपावर ते अधिक कसदार लेखन करू शकतात.

भिंगरी Sun, 07/06/2014 - 19:40
बापले! मला तल एव्ल्यांचे पतीशाद वाचून घाब्र्याच वातली. गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रलेच मी. मी कायतली लिवायचं म्हनत होते. मिपावाले ,मला शान्भालून घ्याल?

शीर्षकातून भयकथा हे सांगण्याची गरज नव्हती त्यामुळे त वरून ताकभात ओळखणाऱ्या मिपाकरांना कथेचा आगाऊ अंदाज आला, नुसते कृतार्थ शीर्षक हे माहेर , वाहिनी सारख्या मासिकांमध्ये सहज शोभून दिसणारे तेव्हा त्या अनुषंगाने वाचकांनी कथा वाचण्यास घेतली असती तर शेवटी त्यांना सुखद धक्का बसला असता असे मला वाटते. हि मला भयकथा न वाटता गूढकथा वाटली.

एस गुरुवार, 07/03/2014 - 16:55
प्रवाही आहे. पण भय किंवा रहस्य असे फारसे वाटले नाही. रुचिताला विनय दिसतो तेव्हाच पुढे काय होणार याचा अंदाज येतो. पुलेशु.

In reply to by बॅटमॅन

रामपुरी गुरुवार, 07/03/2014 - 20:02
मला वाटलं होतं आता स्कूटी आणि बाईकची टक्कर होऊन बाईक नदीत पडणार. म्हणून वर जाऊन परत एकदा लेखकाचं नाव बघितलं. पण नशिब चांगलं (बाईक वाल्याचं) म्हणून तसं काही झालं नाही =))

In reply to by विजुभाऊ

भिकापाटील Sat, 07/05/2014 - 11:46
मला वाटले की या कथेत सुद्धा लुना .सायकल किंवा स्कूटीची टक्कर होऊन जीप / ट्रक नदीत पडेल.. =)) =)) =)) बेक्कार हसतोय.... अवांतर : भयकथा वाचून स्पा काकांची आठवण झाली. ;)

मृणालिनी गुरुवार, 07/03/2014 - 17:37
कथा वाचून सर्वांनी प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनपासून धन्यवाद ! खरंच, हि भयकथा नाही. हि 'भूतकथा' आहे. पण हेडिंग बदलता येत नाहीये.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 18:42
विनयच्या भेटीपासून कथा आपल्या मनांत आकार घेऊ लागते नंतर फक्त शब्दांच्या दगडांवर पाय ठेवत पुढे पुढे जात राहायचं. भय कथा नाही, रहस्य कथा नाही, उत्कंठावर्धकही नाही. शब्दरचना चांगली आहे. प्रयत्न चांगला आहे असे म्हणावयास हरकत नाही. पुढील कथांसाठी शुभेच्छा..!

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 23:08
१)रुचिताने ठामपणे निर्णय घेतल्यानंतर होणारे मनोवैज्ञानिक बदल छान दाखविले आहेत. २)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात! कथा आवडली. पुढिल कथांसाठी शुभेच्छा.

एस Fri, 07/04/2014 - 10:14
२)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात!
नाही, कस्सं काय जमतं हो तुम्हांला?

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:41
रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी एकटी चालत जाते आणि त्यात सुद्धा घाइनी घरी जाण्यापेक्षा आधी चहा पीत थांबते हे ह्या गोष्टीला हास्यास्पद बनवते. मोबाइल च्या जमान्यात ती कोणाला बोलवुन न घेता एकटी रात्री चालत निघते हे पण हास्यास्पद. तो विनय भेटल्यावर पण ती त्याला घरापर्यंत सोबत कर असे सांगत नाही हे ही हास्यास्पद. काय लिहले आहे तुम्ही मधुरा ताई. आधी एखाद्या ७ वर्षाच्या मुलाकडुन मत तरी घ्यायचे ना.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 11:18
ऋषिकेश, आयुर्हित, मनापासून धन्यवाद! प्रसाद, कथा नीट वाचलीत का? १.मोबाईल तिच्या जवळ नव्हता, हे पहिल्या काही ओळींतच स्पष्ट केलं आहे. २.चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण, यात मला तरी कुठे हास्यास्पद बाब आढळून येत नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, तसं बघायला गेल, तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. किव्हा या कथेत तशी तिला त्याच्या मदतीची गरज वाटली नसावी. बाकी ७ वर्षाच्या मुलाकडून मत घेण्याची मला गरज नाही... तुम्ही मात्र इतर कशावर काही मत देताना, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन नक्की घ्या. कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by मृणालिनी

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 12:17
एखाद्या घरात मदत मागायला जावं तर फटकन कोणीतरी अपमान करायची भिती.... “तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे, कि आत्ता ११ वाजलेत. आणि तेही रात्रीचे...आणि जनरली रात्री सगळे झोपलेले असतात. म्हणजे निदान आम्ही तरी झोपतो.. ह? तर तुम्हाला जे काय काम असेल ते उद्या...सकाळी ९ नंतर.” आणि वर तोंडावर दार लाऊन घेतात. आजकाल कोणीही मदत करत नाही स्वार्थ असल्याशिवाय... >>>>>>>> तुम्हीच लिहीले आहे की ती मदत शोधत होती म्हणुन. मोबाईल नव्हता बरोबर असे कधी असते का? रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.

In reply to by प्रसाद१९७१

असंका Fri, 07/04/2014 - 16:44
रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.
साधी मुलगी आहे का ती? नुकताच तिने एका माणसाचा जीव घेतलेला आहे! तिला-
जरा वाफाळलेला चहा घेऊ
असं वाटलं तर काय चुकलं? कायपण शंका काढताय! हे जे आजुबाजुला काय चाललंय अशी भीती घालायची ती सामान्य मुलींना.....यांच्यासारख्या (एका धक्क्यात बंद पडणार्‍या स्कुटीवरून) "हिट अँड रन" करू शकणार्‍यांना नाही!

In reply to by मृणालिनी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 13:19
मधुरा पहिला मुद्दा मान्य आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्याच्या स्पष्टीकरणा बद्दल जरा असहमती आहे. दुसरा मुद्दा >>>>चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण,...('वाटण' हा शब्द मसाल्याचे 'वाटण' ह्या अर्थाचा आहे. तो 'वाटणं' किंवा 'वाटणे' असा पाहिजे.) कथेतील >>>>सगळा आहे-नाही तो धीर एकवटून ती तुटकी चप्पल रेटत-रेटत अंतर कमी करत होती. ह्या वाक्यानुसार ती भयंकर घाबरलेली होती. कुठल्याही घाबरलेल्या व्यक्तीची नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भिती पासून दूर जाणे ही असते. अशा अत्यंतिक भितीच्या प्रसंगी कधी तहान-भूकेची जाणीव होत नाही तर, संकटाशी सामना करण्याच्या नैसर्गिक गरजेतून शरीर थकत नाही, त्याला अतिरिक्त बळ प्राप्त होतं. ती अगदी ८-१० किलोमिटर धावली असेल तर सांगता येत नाही, कोलमडून पडू शकते. पण चहा प्यायला जाणार नाही. निदानपक्षी, 'आपल्या हातून अपघात होऊन एक व्यक्ती पुलावरून खाली पडली आहे, आणि मृत्यू पावली असण्याची शक्यता पाहता कोणीही व्यक्ती आधी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचाच विचार करेल. तिसरा मुद्दा>>>>तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. कथेतीलच सुत्र धरून सांगायचे झाले तर (विनय.....रुचिताचा मित्र.) विनय हा रुचिताचा मित्र असतो. 'कोणीही' अनोळखी नसतो. उलट अशा प्रसंगी जुना मित्र देवासारखा भेटल्यामुळे तिला आधार वाटायला हवा आणि तिने त्याला तिच्या घरापर्यंत साथ देण्याची विनंती करायला पाहिजे होती. असो. ह्या चुका मलाही जाणवल्या परंतु, तितक्या गंभीर वाटल्या नाहीत. कथालेखनात लेखिकेने घेतलेले स्वातंत्र्य म्हणून मी तिथे दुर्लक्ष केलं. पण तुमचा वरील प्रतिसाद पाहिल्यावर ह्या मुद्द्यांवर चर्चा करावी असे वाटून हा प्रतिसाद टाकला आहे.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 12:28
प्रसाद, तिला ज्या मदतीची गरज होती, ती गरज एका वाहनाची होती. कि एखाद्याने तिला घरी 'गाडीवरून' सोडावं. विनय कडे त्यावेळी गाडी नव्हती. आणि त्याच्याकडे मदत मागायला तिला संकोच देखील वाटत असू शकतो न ! मोबाईल एखादे दिवशी माणूस घरी विसरू शकतो हि बाब तुम्हाला मान्य नसेल, पण अनेकदा आपण काही वस्तू विसरून घराबाहेर पडतो, हे तुम्हाला मान्य करावच लागेल. आणि 'घरी न जाता चहा प्यावा' अस का वाटलं तुम्हाला? कथेत ती दमल्यामुळे चहा प्यायला थोडावेळ थांबली होती. त्यानंतर ती घरीच जाणार होती. रस्ता चालायला चहा पिल्यामुळे उर्जा येईल, असं वाटलं असणार तिला. असो, तुम्हाला हि कथा आवडलेली नाही, हे कळले. त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊन, काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम !

मराठी कथालेखक Fri, 07/04/2014 - 13:35
मधूराजी तुम्ही छान प्रयत्न केला आहे. पण काही गोष्टी सूचवाव्याशा वाटतात. १) गूढाची उकल हाच शेवट हवा होता असे मला वाटते. म्हणजे वृत्तपत्रात रुचिताने विनयचा फोटो पाहिल्यावर कथा संपायला हवी. फारतर एका ओळीत रेश्माला भेटण्यासाठी रुचिता निघाली वगैरे...कारण गूढ उकलल्यावर पुढे कथा वाचाण्यात रस उरत नाही. २) "तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे..." हा काल्पनिक (आणि पुणेरी/खवचट ई) संवाद विनोदनिर्मितीसाठी चांगला आहे. पण गूढकथा, ते ही लघूकथेत विनोदनिर्मिती टाळलेलीच बरी असे माझे मत आहे. ३) बाकी वर इतरांनी म्हंटल्याप्रमाणे "....." खूप आहेत. तसेच रात्री एकट्या मुलीचे ओसाड ठिकाणी चहा प्यायला थांबणे , अशा ठिकाणी रात्री अकरा वाजता टपरी उघडी असणे (टपरीवाला ती बंद करत होता तरी इतक्या उशीरा ?) हे पटत नाही. ४)रुचिता विनयचा अंतिमसंस्कार परस्परच करुन टाकते हे पटत नाही, पण अर्थात आधी म्हंटल्याप्रमाणे गूढ उकलल्यानंतरचा सर्वच भाग अनावश्यक वाटतो. पुढिल लेखनास शुभेच्छा असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की पुन्हा एकदा अजून विचार करुन ह्याच कथेचे पुनर्लेखन करायचा प्रयत्न करा. कथा पुन्हा पुन्हा वाचून बघा, तुमच्या पुर्ण पसंतीस उतरली की पोस्ट करा. तुमच्या कथेच्या तुम्हीच पहिल्या वाचक, आस्वादक आणि टिकाकार असाव्यात. काही कमी जास्त लिहिले गेले असेल तस क्षमस्व.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 16:50
भयकथा वा गूढकथेचा फील जास्त आला नाही पण लिखाणशैली प्रवाही असल्याने वाचली गेली. अर्थात त्यातही बरेचदा जास्तीची टिंबे खटकली. लिहित राहाल तसे लिखाणात आणखी सुधारणा होत राहील, पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ! अवांतर - वर प्रतिसादांत "रात्री ११ वाजता एखादी मुलगी चहा प्यायला थांबणार नाही" अशी काही लोकांनी जी शंका काढली आहे त्याच्याशी सहमत. किंवा ते विश्वासार्ह वाटण्यासाठी त्या नायिकेची इमेज तशीच डॅशिंग उभारायला हवी होती जे तुम्ही नेमके उलट केले आहे. तरीही वाचण्याच्या ओघात माझ्या तरी ते लक्षात आले नाही हे ही नमूद करू इच्छितो. असो, या सूचना आणि सल्ले सकारात्मक घेतल्यास पुढील कथेत फायदाच होईल :)

In reply to by धन्या

प्रभाकर पेठकर Sun, 07/06/2014 - 20:08
मिपा सदस्य चोखंदळ आहेत. काहीही खपवून घेत नाहीत. तसेच, ह्या चिरफाडीचा फायदा लेककाला/लेखिकेला आपल्या लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते (निदान, मी तरी असे मानतो) आणि मिपावर ते अधिक कसदार लेखन करू शकतात.

भिंगरी Sun, 07/06/2014 - 19:40
बापले! मला तल एव्ल्यांचे पतीशाद वाचून घाब्र्याच वातली. गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रलेच मी. मी कायतली लिवायचं म्हनत होते. मिपावाले ,मला शान्भालून घ्याल?

शीर्षकातून भयकथा हे सांगण्याची गरज नव्हती त्यामुळे त वरून ताकभात ओळखणाऱ्या मिपाकरांना कथेचा आगाऊ अंदाज आला, नुसते कृतार्थ शीर्षक हे माहेर , वाहिनी सारख्या मासिकांमध्ये सहज शोभून दिसणारे तेव्हा त्या अनुषंगाने वाचकांनी कथा वाचण्यास घेतली असती तर शेवटी त्यांना सुखद धक्का बसला असता असे मला वाटते. हि मला भयकथा न वाटता गूढकथा वाटली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती. शेजारून एखाद वाहन जाईल, आणि आपण लिफ्ट घेऊन घरी जाऊ ; अस स्वप्नरंजन करत तिने जवळ-जवळ अर्धा रस्ता पायीच पूर्ण केला होता. पण दुर्दैव म्हणजे एकही गाडी या रस्त्यावरून गेली नव्हती. खरेतर, इतक्या रात्री अश्या या आड रस्त्यावरून कोण कशाला प्रवास करेल ?

माउलींच्या पालखी सोबत एक दिवस :- भाग २

ज्ञानोबाचे पैजार ·

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:53
तुझ्याबरोबर आमचीहि ई-वारी झाली त्याबद्दल थँक्यु. फोटो नेहमीप्रमाणेच सोज्वळ (कारण काहि प्रोसेसींग न करता जसे काढलेस तसेच डकवलेस).

मैत्र गुरुवार, 07/03/2014 - 12:08
माउली .. तुमचे आभार कसे मानावेत. तुमच्याबरोबर आम्हीही इ-वारी केली पुण्यापर्यंत. इंद्रायणी ते मुळा मुठे पर्यंत.. मी सश्रद्ध नाही पण हा वारीचा भोळा निष्काम भक्तिभाव आदर निर्माण करतो.

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 12:41
हा भाग जास्त आवडला. प्लॅस्टिकचा वापर कसा टाळ्ता/कमी करता येईल? यावर विचार आवश्यक आहे. पुणेकरांचे भाग्यच अपार की असा "निष्काम कर्मयोग" प्रत्येक वर्षी करण्याचे नशिबात आहे. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा | गाईन केशवा नाम तुझे || पांडुरंग पांडुरंग

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/03/2014 - 15:39
फोटो दिसत नाहीयेत :( ऑफीसात हे पेज ब्लॉक असावे बहुधा *cray2* असो . बाकी ...
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||
हा अनुभव अनुर्वाच्च असतो .... शब्दच नाहीत !!

भाते गुरुवार, 07/03/2014 - 20:09
दोन्ही धागे आवडले. आत्तापर्यंत कधी पालखीला जायला जमले नाही. पण तुमच्या या सचित्र माहितीमुळे तसे नक्कीच जाणवले.

अनन्या वर्तक गुरुवार, 07/03/2014 - 22:14
माउलींच्या पालखी सोबत हे दोन्ही भाग आवडले. वाचताना सतत वाटत होते मला कधीतरी मिळेल का वारी बरोबर चालण्याची संधी? इतक्या निस्वार्थी मानाने माउलींच्या नामस्मरणात स्वतःला विसरून फक्त त्या पांडुरंगाच्या ओढीने चालत राहावयाचे. एक वेगळाच अनुभव असेल नाही का?

In reply to by खटपट्या

कल्पना चांगली आहे. आळंदी पुणे किंवा पुणे सासवड हा टप्पा तर नक्कीच करता येईल. त्या टप्यांच्या यशापयशा नंतर दिंडीची कल्पना पुढे नेता येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या वर्षी १० जुलै २०१५ रोजी माउलींची पालखी पुण्यामधे येणार आहे. पालखीच्या स्वागता साठी मी सकाळी आठ वाजल्यापासून आळंदी रोडवरील भोसरी फाट्यावर असेन . पालखी आली की माउलींच्या सोबतीने (चालत) पुण्यापर्यंत येणार आहे. माझ्या ऑफिसमधले तीनचार सहकारी देखील माझ्या बरोबर यायचा विचार करत आहेत आहेत. सर्व मिपा करांना सस्नेह निमंत्रण..... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्रिवेणी Fri, 07/03/2015 - 11:21
त्याच area त राहत असल्याने सकाळ पासून च पालखी ची लगबग बघवयस मिळते.अगदी ते लोक चुल मांडून स्वयंपाक करतात ती तर खिड़कित बसून बघने आवडते मला.

त्रिवेणी Fri, 07/04/2014 - 11:45
नक्की करूया आपण मिपा दिंडी फोटो क्रमांक 37 मध्ये आमची सोसायटी दिसते आहे, ट्रीडम पार्क(पिवळा आणि हिरव्या रंगाची एक पट्टी दिसते आहे ती फेंट पिवळ्या कलरची बिल्डिंग) समस्त मिपाकरांना आताच निमंत्रण देते पुढच्या वर्षीच्या दिंडीसाठी.

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:53
तुझ्याबरोबर आमचीहि ई-वारी झाली त्याबद्दल थँक्यु. फोटो नेहमीप्रमाणेच सोज्वळ (कारण काहि प्रोसेसींग न करता जसे काढलेस तसेच डकवलेस).

मैत्र गुरुवार, 07/03/2014 - 12:08
माउली .. तुमचे आभार कसे मानावेत. तुमच्याबरोबर आम्हीही इ-वारी केली पुण्यापर्यंत. इंद्रायणी ते मुळा मुठे पर्यंत.. मी सश्रद्ध नाही पण हा वारीचा भोळा निष्काम भक्तिभाव आदर निर्माण करतो.

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 12:41
हा भाग जास्त आवडला. प्लॅस्टिकचा वापर कसा टाळ्ता/कमी करता येईल? यावर विचार आवश्यक आहे. पुणेकरांचे भाग्यच अपार की असा "निष्काम कर्मयोग" प्रत्येक वर्षी करण्याचे नशिबात आहे. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा | गाईन केशवा नाम तुझे || पांडुरंग पांडुरंग

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/03/2014 - 15:39
फोटो दिसत नाहीयेत :( ऑफीसात हे पेज ब्लॉक असावे बहुधा *cray2* असो . बाकी ...
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||
हा अनुभव अनुर्वाच्च असतो .... शब्दच नाहीत !!

भाते गुरुवार, 07/03/2014 - 20:09
दोन्ही धागे आवडले. आत्तापर्यंत कधी पालखीला जायला जमले नाही. पण तुमच्या या सचित्र माहितीमुळे तसे नक्कीच जाणवले.

अनन्या वर्तक गुरुवार, 07/03/2014 - 22:14
माउलींच्या पालखी सोबत हे दोन्ही भाग आवडले. वाचताना सतत वाटत होते मला कधीतरी मिळेल का वारी बरोबर चालण्याची संधी? इतक्या निस्वार्थी मानाने माउलींच्या नामस्मरणात स्वतःला विसरून फक्त त्या पांडुरंगाच्या ओढीने चालत राहावयाचे. एक वेगळाच अनुभव असेल नाही का?

In reply to by खटपट्या

कल्पना चांगली आहे. आळंदी पुणे किंवा पुणे सासवड हा टप्पा तर नक्कीच करता येईल. त्या टप्यांच्या यशापयशा नंतर दिंडीची कल्पना पुढे नेता येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या वर्षी १० जुलै २०१५ रोजी माउलींची पालखी पुण्यामधे येणार आहे. पालखीच्या स्वागता साठी मी सकाळी आठ वाजल्यापासून आळंदी रोडवरील भोसरी फाट्यावर असेन . पालखी आली की माउलींच्या सोबतीने (चालत) पुण्यापर्यंत येणार आहे. माझ्या ऑफिसमधले तीनचार सहकारी देखील माझ्या बरोबर यायचा विचार करत आहेत आहेत. सर्व मिपा करांना सस्नेह निमंत्रण..... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्रिवेणी Fri, 07/03/2015 - 11:21
त्याच area त राहत असल्याने सकाळ पासून च पालखी ची लगबग बघवयस मिळते.अगदी ते लोक चुल मांडून स्वयंपाक करतात ती तर खिड़कित बसून बघने आवडते मला.

त्रिवेणी Fri, 07/04/2014 - 11:45
नक्की करूया आपण मिपा दिंडी फोटो क्रमांक 37 मध्ये आमची सोसायटी दिसते आहे, ट्रीडम पार्क(पिवळा आणि हिरव्या रंगाची एक पट्टी दिसते आहे ती फेंट पिवळ्या कलरची बिल्डिंग) समस्त मिपाकरांना आताच निमंत्रण देते पुढच्या वर्षीच्या दिंडीसाठी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी|| मोक्षरेखे आला भाग्ये विनाटला| साधूंचा अंकीला हरिभक्त|| ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी| हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी|| फोटो क्र. ३१ फोटो क्र. ३१ या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.

मनमोहक बाली : ०७ : तळ्यातले मंदिर (उलुन दानू ब्रतान), राजमंदिर (तमान आयुन) आणि समुद्रातले मंदिर (ताना लोत)

डॉ सुहास म्हात्रे ·

खटपट्या Wed, 07/02/2014 - 22:20
सर्व फोटो जबरदस्त !! एकदम स्वप्नवत आहे सगळे. बऱ्यापैकी स्वच्छता देखील दिसतेय. सुंदर बागांमुळे अजुनच गारेगार वाटत असेल. नक्कीच फेरी मारली पाहिजे. वाचतोय

खासच. ते समुद्रातले मंदिर आणि अकरा मजल्यांची पेलिंग्गी विशेष आवडले. जपान मधल्या मंदिरांची आठवण झाली.

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 22:53
सर्व फोटो केवळ अद्भुत! अप्रतिम!! निसर्गरम्य!!! अवांतरः बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी पाहून माऊंट मेरु चे २००० वर्षापुर्वीचे एक चित्र जे हुबेहुब पार्टिकल अ‍ॅक्सलरेटरचे ब्लु प्रिंट सारखेच असल्याचे आठवले. Mount Meru पार्टिकल अ‍ॅक्सलरेटर

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:03
सुरक्षेच्या कारणाबद्दल वादच नाही. पण, अश्या काही अनवट जागांना कमीत कमी हात लावून यायला मिळावे अशी माझी नेहमीची उत्कट इच्छा असते !

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 00:34
.................................. बालीला जाणार म्ह. जाणारच!! लय झाला फटूंचा अत्याचार!!

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:09
विलासराव, मधुरा देशपांडे, चित्रगुप्त, मन्द्या आणि यशोधरा : धन्यवाद ! @ समुद्रातले मंदिर (पुरा ताना लोत) : हे मंदिर तर कायमचे मनात घर करून बसले आहे !

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:58
काय साला निसर्ग आहे. अगदि नतमस्तक. तो "सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्ग" चा फोटो तर फारच आवडलाय. विशेषत त्याच्या मागे असणारे डोंगर आणि त्यावर दाटलेले धुके. खरचं अश्या जागी किती निवांत वाटत असेल नाहि?? गोंधळ, कोलाहल, गजबटापासुन दुर....

मनुराणी गुरुवार, 07/03/2014 - 12:16
तनाह लॉट ला आम्ही गेलो होतो तेवा मंदिराजवळ एवढे पाणी नव्हते आणि मंदिरापर्यंत जाता येत होते. खाली एक छोटा गाभारा होता तिथे नमस्कार केल्यावर तिथे उगम असणारे गोडे पाणी प्रसाद म्हणून देत होते न कानाला एक फुल अडकवले होते. आमचा सूर्यास्त थोडक्यात हुकला होता कारण त्या वळणावळणाच्या रस्त्याने तिथे पोहोचेपर्यंत मी उलट्या करून हैराण झाले होते. इथे बाहेर खूप छान मार्केट आहे. स्वस्त आणि मस्त. बाली मध्ये बार्गेनिंगची हौस मस्त फिटते.

In reply to by मनुराणी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 13:48
नशीबवान आहात ! तुम्ही देलात तेव्हा मोठी ओहोटी असणार. आम्ही गेलो होतो तेव्हा समुद्र इतका खवळलेला होता की त्या बेटाला बोट लावणे केवळ अशक्य होते. तो तिथपर्यंत जाणारा रस्ताही भन्नाट आहे (अर्थात गाडी लागत नसली तर) !

प्यारे१ गुरुवार, 07/03/2014 - 12:52
ठरलं तर मग! जाणार, आम्ही बालीला जाणार.... -(रिमा लागू स्टाईल, म्हागुरुंच्या 'नवरा माझा नवसाचा' मधे)

शिद गुरुवार, 07/03/2014 - 17:44
कोरी अगुंग मस्तच दिसतेय. बालीचे निसर्ग सौंदर्य फोटोंमध्ये पाहून डोळ्याचे पारणे फिटलं; प्रत्यक्ष पाहताना काय होईल कुणास ठाऊक. ह्या भागात दिलेले सगळेच फोटो एक सो एक आले आहेत.

रेवती Sat, 07/05/2014 - 03:51
आता शब्द संपले हो! नेहमीप्रमाणेच छान, सुंदर असे म्हणते. तेथील स्थानिक लोक काही फार धनवंत प्रकारातील दिसत नाहीत. सगळे खाउन पिऊन सुखी वाटतायत पण त्यामानाने जत्रा सोडता फार कचरा कुठे दिसत नाहीये. ते तसेच आहे की खरे चित्र वेगळे आहे?

In reply to by रेवती

बाली (आणि इंडोनेशिया देश) विकसनशील प्रकारात मोडते... म्हणजे गरीबच. पण स्वच्छतेबाबत शहर-गावात लोक जागरूक दिसले. देवळांमध्ये देवाला प्रसाद-फुले वाहण्याच्या जागा सोडल्या तर सगळीकडे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा होता. पण तरीही तेथेही फुले वगैरे ताजी दिसत होती... आदल्या दिवशीची, कुजू लागलेलेली अशी नव्हती. म्हणजे तेथेही दिवसातून एकदा तरी नीट सफाई होत असणार. मुख्य म्हणजे, भिकारी अथवा अस्वच्छ, फाटके कपडे घातलेली मुले-माणसे देवळांशेजारी अथवा इतर ठिकाणी अजिबात दिसली नाहीत... हा पैश्यापेक्षा जास्त जाणीवेचा परिणाम असावा असे मला वाटते.

खटपट्या Wed, 07/02/2014 - 22:20
सर्व फोटो जबरदस्त !! एकदम स्वप्नवत आहे सगळे. बऱ्यापैकी स्वच्छता देखील दिसतेय. सुंदर बागांमुळे अजुनच गारेगार वाटत असेल. नक्कीच फेरी मारली पाहिजे. वाचतोय

खासच. ते समुद्रातले मंदिर आणि अकरा मजल्यांची पेलिंग्गी विशेष आवडले. जपान मधल्या मंदिरांची आठवण झाली.

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 22:53
सर्व फोटो केवळ अद्भुत! अप्रतिम!! निसर्गरम्य!!! अवांतरः बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी पाहून माऊंट मेरु चे २००० वर्षापुर्वीचे एक चित्र जे हुबेहुब पार्टिकल अ‍ॅक्सलरेटरचे ब्लु प्रिंट सारखेच असल्याचे आठवले. Mount Meru पार्टिकल अ‍ॅक्सलरेटर

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:03
सुरक्षेच्या कारणाबद्दल वादच नाही. पण, अश्या काही अनवट जागांना कमीत कमी हात लावून यायला मिळावे अशी माझी नेहमीची उत्कट इच्छा असते !

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 00:34
.................................. बालीला जाणार म्ह. जाणारच!! लय झाला फटूंचा अत्याचार!!

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:09
विलासराव, मधुरा देशपांडे, चित्रगुप्त, मन्द्या आणि यशोधरा : धन्यवाद ! @ समुद्रातले मंदिर (पुरा ताना लोत) : हे मंदिर तर कायमचे मनात घर करून बसले आहे !

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:58
काय साला निसर्ग आहे. अगदि नतमस्तक. तो "सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्ग" चा फोटो तर फारच आवडलाय. विशेषत त्याच्या मागे असणारे डोंगर आणि त्यावर दाटलेले धुके. खरचं अश्या जागी किती निवांत वाटत असेल नाहि?? गोंधळ, कोलाहल, गजबटापासुन दुर....

मनुराणी गुरुवार, 07/03/2014 - 12:16
तनाह लॉट ला आम्ही गेलो होतो तेवा मंदिराजवळ एवढे पाणी नव्हते आणि मंदिरापर्यंत जाता येत होते. खाली एक छोटा गाभारा होता तिथे नमस्कार केल्यावर तिथे उगम असणारे गोडे पाणी प्रसाद म्हणून देत होते न कानाला एक फुल अडकवले होते. आमचा सूर्यास्त थोडक्यात हुकला होता कारण त्या वळणावळणाच्या रस्त्याने तिथे पोहोचेपर्यंत मी उलट्या करून हैराण झाले होते. इथे बाहेर खूप छान मार्केट आहे. स्वस्त आणि मस्त. बाली मध्ये बार्गेनिंगची हौस मस्त फिटते.

In reply to by मनुराणी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 13:48
नशीबवान आहात ! तुम्ही देलात तेव्हा मोठी ओहोटी असणार. आम्ही गेलो होतो तेव्हा समुद्र इतका खवळलेला होता की त्या बेटाला बोट लावणे केवळ अशक्य होते. तो तिथपर्यंत जाणारा रस्ताही भन्नाट आहे (अर्थात गाडी लागत नसली तर) !

प्यारे१ गुरुवार, 07/03/2014 - 12:52
ठरलं तर मग! जाणार, आम्ही बालीला जाणार.... -(रिमा लागू स्टाईल, म्हागुरुंच्या 'नवरा माझा नवसाचा' मधे)

शिद गुरुवार, 07/03/2014 - 17:44
कोरी अगुंग मस्तच दिसतेय. बालीचे निसर्ग सौंदर्य फोटोंमध्ये पाहून डोळ्याचे पारणे फिटलं; प्रत्यक्ष पाहताना काय होईल कुणास ठाऊक. ह्या भागात दिलेले सगळेच फोटो एक सो एक आले आहेत.

रेवती Sat, 07/05/2014 - 03:51
आता शब्द संपले हो! नेहमीप्रमाणेच छान, सुंदर असे म्हणते. तेथील स्थानिक लोक काही फार धनवंत प्रकारातील दिसत नाहीत. सगळे खाउन पिऊन सुखी वाटतायत पण त्यामानाने जत्रा सोडता फार कचरा कुठे दिसत नाहीये. ते तसेच आहे की खरे चित्र वेगळे आहे?

In reply to by रेवती

बाली (आणि इंडोनेशिया देश) विकसनशील प्रकारात मोडते... म्हणजे गरीबच. पण स्वच्छतेबाबत शहर-गावात लोक जागरूक दिसले. देवळांमध्ये देवाला प्रसाद-फुले वाहण्याच्या जागा सोडल्या तर सगळीकडे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा होता. पण तरीही तेथेही फुले वगैरे ताजी दिसत होती... आदल्या दिवशीची, कुजू लागलेलेली अशी नव्हती. म्हणजे तेथेही दिवसातून एकदा तरी नीट सफाई होत असणार. मुख्य म्हणजे, भिकारी अथवा अस्वच्छ, फाटके कपडे घातलेली मुले-माणसे देवळांशेजारी अथवा इतर ठिकाणी अजिबात दिसली नाहीत... हा पैश्यापेक्षा जास्त जाणीवेचा परिणाम असावा असे मला वाटते.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

कहां गये वो लोग?--आजीबाई

राजेंद्र मेहेंदळे ·

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:13
चांगला जमलाय हाही भाग - पण तरीही काहीतरी अपुरं वाटलं यात. तुम्ही एका ठरावीक अंतराने भाग टाकलेत तर जास्त चांगलं होईल. काय आहे, सातत्याने चांगलं समोर आलं तरी ते सगळं वाचलं जात नाही अनेकदा - अतिपरिचयात अवज्ञा (दुर्लक्ष) असं काहीतरी होतं. (ही फक्त विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा. लेख कधी प्रसिद्ध करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:23
:-) कुणाच्या भावना कशाने दुखावतील याचा नेम नाही, म्हणून काळजी घेतलेली बरी इतका साधा विचार केला होता. व्यक्तिचित्रं चांगली येताहेत - जरूर लिहा आणखी. दुसरं म्हणजे भूतकाळात आपण डोकावून पाहतो तेव्हा किती लोकांनी आपल्याला काय काय दिलं आहे याची जाणीव होऊन आपण बदलून जातो थोडेसे!

अनिता ठाकूर Wed, 07/02/2014 - 19:18
तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्‍यातला कुंचा हातात घ्यायची. आम्हीही 'कुंचा'च म्हणतो. पण, सहसा हा शब्द वाचण्यात वा ऐकण्यात येत नाही.त्यामुळे, ह्या शब्दाशी अंमळ थांबलेच. बाकी, पु. ले. शु.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड Wed, 07/02/2014 - 19:35
>>कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे शब्द आहेत मराठीत. मुंबईच्या वातावरणात वाढलेलो असल्याने आम्हीही सगळ्याला सरकट झाडू म्हणत असू. त्यावर एकदा माझ्या मावसबहिणीने सांगितलेला फरक असा, 'रोज घरातला केर काढायला वापरतो ती केरसुणी, जळमटं काढायला लांब काठी लावून वापरतात तो झाडू, हिराच्या काड्या वापरुन केलेला तो खराटा'. तसंच कंगव्याला आम्ही फणीच म्हणत असू. त्यावर याच बहिणीकडून मिळालेली माहिती अशी की, "केस विंचरायचा तो कंगवा, केसात उवा वैगरे झाल्या असतील तर त्या काढायला वापरतात ती फणी. इथे फणी मागितलीस तर उवा वैगरे झाल्यात की काय असं वाटेल." तेव्हापासून फणी म्हणणं बंद केलं ते आजपर्यंत!!;)

In reply to by मधुरा देशपांडे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2014 - 14:36
आमच्याकडे देखील गवताचा असतो त्याला कुंचा म्हटले जाते. वेगळ्या गवताचाच पण चपटा आखूड आणि चांगला पसरट असतो त्या झाडूला लक्ष्मी म्हटले जाते. हिरांचा असतो त्याला खराटा.

एस Wed, 07/02/2014 - 19:44
अजून थोडे मोठे लेख लिहा. वाचकाला व्यक्तिरेखेची ओळख होऊन ते वाचक त्यात गुंगू लागेपर्यंत मध्येच लेख संपतो. सो, ये दिल मांगे मोर... :-)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड गुरुवार, 07/03/2014 - 14:25
कानात/नाकात घालायची बारीक सोन्याची तार!! भीकबाळी वैगरे घालण्याआधी कान या सुंकल्याने टोचतात, कारण जाड तारेने टोचलं तर जखम होऊन ती लवकर बरी न होण्याचा संभव असतो. सुंकलं टोचून जखम नीट बरी झाली की मग ते काढून भीकबाळी किंवा आणखी काही असेल ते!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 14:57
'कहाँ गये वो लोग' ह्या मिपावरील मालीकेला आगामी आकर्षणांसाठी अनेकानेक शुभेच्छा! अशी विविध व्यक्तिमत्वे आठवून लिहीताना/वाचताना त्या त्या व्यक्तिमत्वातील आपल्याला भावलेल्या गुणांना आपल्या आयुष्यात जोपासण्यचा मनोमन प्रयत्न करावा. ह्यातूनच पुढच्या पिढीला निदान लिहीण्यासाठी एक नवे व्यक्तिमत्व मिळेल. त्यांनाही तसे बनण्याची प्रेरणा मिळेल.

रेवती Fri, 08/01/2014 - 06:31
वाह! लेखन आवडले. आजीबाई डोळ्यासमोर उभी राहिली. घरचे सगळे व्यवस्थित असताना कोण कशाला लोकाकडे राबेल असे आधी वाटत असे पण माझ्या मावससाबांकडे स्वयंपाकाला ज्या बाई येत त्यांच्या हाताला चव चांगली होती आणि घरचे सगळे व्यवस्थित असतानाही केवळ हा गूण वाया जाऊ नये म्हणून त्या येत असत ते आठवले पण हे विरळाच असते.

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:13
चांगला जमलाय हाही भाग - पण तरीही काहीतरी अपुरं वाटलं यात. तुम्ही एका ठरावीक अंतराने भाग टाकलेत तर जास्त चांगलं होईल. काय आहे, सातत्याने चांगलं समोर आलं तरी ते सगळं वाचलं जात नाही अनेकदा - अतिपरिचयात अवज्ञा (दुर्लक्ष) असं काहीतरी होतं. (ही फक्त विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा. लेख कधी प्रसिद्ध करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:23
:-) कुणाच्या भावना कशाने दुखावतील याचा नेम नाही, म्हणून काळजी घेतलेली बरी इतका साधा विचार केला होता. व्यक्तिचित्रं चांगली येताहेत - जरूर लिहा आणखी. दुसरं म्हणजे भूतकाळात आपण डोकावून पाहतो तेव्हा किती लोकांनी आपल्याला काय काय दिलं आहे याची जाणीव होऊन आपण बदलून जातो थोडेसे!

अनिता ठाकूर Wed, 07/02/2014 - 19:18
तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्‍यातला कुंचा हातात घ्यायची. आम्हीही 'कुंचा'च म्हणतो. पण, सहसा हा शब्द वाचण्यात वा ऐकण्यात येत नाही.त्यामुळे, ह्या शब्दाशी अंमळ थांबलेच. बाकी, पु. ले. शु.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड Wed, 07/02/2014 - 19:35
>>कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे शब्द आहेत मराठीत. मुंबईच्या वातावरणात वाढलेलो असल्याने आम्हीही सगळ्याला सरकट झाडू म्हणत असू. त्यावर एकदा माझ्या मावसबहिणीने सांगितलेला फरक असा, 'रोज घरातला केर काढायला वापरतो ती केरसुणी, जळमटं काढायला लांब काठी लावून वापरतात तो झाडू, हिराच्या काड्या वापरुन केलेला तो खराटा'. तसंच कंगव्याला आम्ही फणीच म्हणत असू. त्यावर याच बहिणीकडून मिळालेली माहिती अशी की, "केस विंचरायचा तो कंगवा, केसात उवा वैगरे झाल्या असतील तर त्या काढायला वापरतात ती फणी. इथे फणी मागितलीस तर उवा वैगरे झाल्यात की काय असं वाटेल." तेव्हापासून फणी म्हणणं बंद केलं ते आजपर्यंत!!;)

In reply to by मधुरा देशपांडे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2014 - 14:36
आमच्याकडे देखील गवताचा असतो त्याला कुंचा म्हटले जाते. वेगळ्या गवताचाच पण चपटा आखूड आणि चांगला पसरट असतो त्या झाडूला लक्ष्मी म्हटले जाते. हिरांचा असतो त्याला खराटा.

एस Wed, 07/02/2014 - 19:44
अजून थोडे मोठे लेख लिहा. वाचकाला व्यक्तिरेखेची ओळख होऊन ते वाचक त्यात गुंगू लागेपर्यंत मध्येच लेख संपतो. सो, ये दिल मांगे मोर... :-)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड गुरुवार, 07/03/2014 - 14:25
कानात/नाकात घालायची बारीक सोन्याची तार!! भीकबाळी वैगरे घालण्याआधी कान या सुंकल्याने टोचतात, कारण जाड तारेने टोचलं तर जखम होऊन ती लवकर बरी न होण्याचा संभव असतो. सुंकलं टोचून जखम नीट बरी झाली की मग ते काढून भीकबाळी किंवा आणखी काही असेल ते!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 14:57
'कहाँ गये वो लोग' ह्या मिपावरील मालीकेला आगामी आकर्षणांसाठी अनेकानेक शुभेच्छा! अशी विविध व्यक्तिमत्वे आठवून लिहीताना/वाचताना त्या त्या व्यक्तिमत्वातील आपल्याला भावलेल्या गुणांना आपल्या आयुष्यात जोपासण्यचा मनोमन प्रयत्न करावा. ह्यातूनच पुढच्या पिढीला निदान लिहीण्यासाठी एक नवे व्यक्तिमत्व मिळेल. त्यांनाही तसे बनण्याची प्रेरणा मिळेल.

रेवती Fri, 08/01/2014 - 06:31
वाह! लेखन आवडले. आजीबाई डोळ्यासमोर उभी राहिली. घरचे सगळे व्यवस्थित असताना कोण कशाला लोकाकडे राबेल असे आधी वाटत असे पण माझ्या मावससाबांकडे स्वयंपाकाला ज्या बाई येत त्यांच्या हाताला चव चांगली होती आणि घरचे सगळे व्यवस्थित असतानाही केवळ हा गूण वाया जाऊ नये म्हणून त्या येत असत ते आठवले पण हे विरळाच असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन काल का नाही आलीस गे आजीबाई? येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती? तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची.

कहां गये वो लोग?--बाबूकाका

राजेंद्र मेहेंदळे ·

चित्रगुप्त Wed, 07/02/2014 - 20:54
सुंदर. आणखी अशीच व्यक्तिचित्रे येऊ द्या. आम्ही आर्टस्कूल मधे शिकत असताना नेहमी समोर बसवून पोर्टेट रंगवायला कुणीतरी मिळावे, या शोधात असायचो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या एक व्यक्तीची आज इतके वर्षांनंतर आठवण झाली. तुम्ही लिहिले आहे, असेच जीवन होते त्या व्यक्तीचे. त्याचे केलेले चित्र अजून असेल कदाचित कुठेतरी. शोधले पाहिजे.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:25
प्रत्येकाकडे अशाच आठवणी असतात फक्त सगळेच व्यक्त करु शकत नाही.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:30
माझ्या आठवणीतील अनेक व्यक्ती आहेत.कधीतरी त्यांच्याबद्दल लिहून हॉटेलात आलेल्यांना पकवणार आहे (अगदी शिजेपर्यंत.)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 02:57
मनस्वी लिखाण. आवडलं. बालपणीच्या कांही गोष्टी, कांही व्यक्ती आज ह्या लेखामुळे आठवल्या. माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत गुलाबताई नांवाची ७०-८० वर्षांची म्हातारी होती. त्यांना आम्ही अहो आजी म्हणायचो. आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या, खाऊ द्यायच्या. त्याना कोणीच नातेवाईक नव्हते. एकट्याच होत्या. जगजित सिंग ह्यांच्या 'ये दौलत भी लेलो, ये शोहारत भी लेलो|' ह्या गझलमधील खालील ओळी कानावर पडल्या की गुलाबताईंची आठवण होते. मुहल्ले की सबसे निशानी पुरानी वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी वो नानी की बातों में परियों का डेरा वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा भुलाए नहीं भूल सकता है कोई वो छोटी सी रातें वो लम्बी कहानी

पण लिखाण त्रोटक वाटतंय. व्यक्तीच्या लकबींचे बारकावे, तिच्या देहबोलीचं वर्णन आणि प्रसंग जणू डोळ्यासमोर घडतोयं, अशा आतून येणार्‍या लेखनाऐवजी, त्रयस्थपणे केलेलं धावतं वर्णन, असं चित्रण झालयं.

चित्रगुप्त Wed, 07/02/2014 - 20:54
सुंदर. आणखी अशीच व्यक्तिचित्रे येऊ द्या. आम्ही आर्टस्कूल मधे शिकत असताना नेहमी समोर बसवून पोर्टेट रंगवायला कुणीतरी मिळावे, या शोधात असायचो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या एक व्यक्तीची आज इतके वर्षांनंतर आठवण झाली. तुम्ही लिहिले आहे, असेच जीवन होते त्या व्यक्तीचे. त्याचे केलेले चित्र अजून असेल कदाचित कुठेतरी. शोधले पाहिजे.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:25
प्रत्येकाकडे अशाच आठवणी असतात फक्त सगळेच व्यक्त करु शकत नाही.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:30
माझ्या आठवणीतील अनेक व्यक्ती आहेत.कधीतरी त्यांच्याबद्दल लिहून हॉटेलात आलेल्यांना पकवणार आहे (अगदी शिजेपर्यंत.)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 02:57
मनस्वी लिखाण. आवडलं. बालपणीच्या कांही गोष्टी, कांही व्यक्ती आज ह्या लेखामुळे आठवल्या. माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत गुलाबताई नांवाची ७०-८० वर्षांची म्हातारी होती. त्यांना आम्ही अहो आजी म्हणायचो. आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या, खाऊ द्यायच्या. त्याना कोणीच नातेवाईक नव्हते. एकट्याच होत्या. जगजित सिंग ह्यांच्या 'ये दौलत भी लेलो, ये शोहारत भी लेलो|' ह्या गझलमधील खालील ओळी कानावर पडल्या की गुलाबताईंची आठवण होते. मुहल्ले की सबसे निशानी पुरानी वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी वो नानी की बातों में परियों का डेरा वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा भुलाए नहीं भूल सकता है कोई वो छोटी सी रातें वो लम्बी कहानी

पण लिखाण त्रोटक वाटतंय. व्यक्तीच्या लकबींचे बारकावे, तिच्या देहबोलीचं वर्णन आणि प्रसंग जणू डोळ्यासमोर घडतोयं, अशा आतून येणार्‍या लेखनाऐवजी, त्रयस्थपणे केलेलं धावतं वर्णन, असं चित्रण झालयं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे. लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

आयुर्हित ·

प्रभाकर पेठकर Wed, 07/02/2014 - 13:06
चांगला उपक्रम. श्री. भापकर गुरुजींचे कौतुक वाटले. मुंबई-पुण्यात असतो तर नक्कीच आलो असतो कांही बिया घेऊन. असो.

खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही . मी आंब्याच्या कोयी वाळवुन ठेवल्या होत्या , पावसाळ्यात रोपे करुन अजिंक्यतार्‍यावर लावायचा विचार होता . पण घरच्यांनी न सांगताच फेकुन दिल्या (थोड्याफार उरल्यात त्यांची रोपे करायचा प्लॅन आहे ) :( असो. घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही *biggrin* बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही ! (आमच्या घरात वड पिंपळ औदुंबर तिन्ही आहेत !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 13:41
मी हनिवेल मध्ये असतांना, दर वेळेला(वेगवेगळ्या)गडांवर ट्रेकिन्गला जातांना वेगवेगळ्या बिया पेरुन यायचो.

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Wed, 07/02/2014 - 13:43
बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
एकदम सहमत. आम्हीही वृक्षारोपणाला ह्याच झाडांच्या रोपांना प्राधान्य देतो. तसेच लावल्यानंतरच्या उन्हाळ्यातही ती रोपे तग धरतात. जांभळाचे झाड पाणी धरून ठेवत असावे असे लेखात म्हटलेले आहे. त्यामुळे जांभूळ लावायचा संकल्प सोडला आहे असे वाटते. जांभळाचा लाकूड म्हणून किंवा सरपण म्हणूनही तितका उपयोग नसतो, पण वन्यप्राण्यांना जांभूळबनाचा आसरा चांगला होतो.

In reply to by एस

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 13:53
फळदार झाडे लावलीत तर मनूष्यांबरोबर पशूपक्षांनाही फळे खायला मिळतिल. त्यांमूळे कोणतीही फळदार झाडे लावावीत. शक्यतो नदिच्या कडेला लावलीत तर चांगली वाढतील व मातीची धुपही होणार नाही, असे म्हणणे आहे गुरुजींचे!

In reply to by आयुर्हित

खटपट्या गुरुवार, 07/03/2014 - 02:25
फळझाडे लावल्यामुळे अजून हा फायदा हा कि पक्षी फळे खावून लांब जावून विष्ठा विसर्जन करतात ज्यात फळांच्या बिया असतात त्यामुळे परत वनीकरणाचा प्रसार होतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Wed, 07/02/2014 - 14:02
>>घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही फणसाच्या आठळ्या ठेवत नाही? असली मस्त भाजी होते त्या आठळ्यांची. फक्त काप्या फणसाच्या हव्या, बरक्याच्या का नको हे सुज्ञांस सांगणे न लगे. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

ऋषिकेश गुरुवार, 07/03/2014 - 10:48
झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
विशेष सहमती. इतरही कारणे आहेतः १. ही झाडे रात्रीसुद्धा ऑक्सीजनच उत्सर्जित करतात २. या झाडांवर अनेक पक्षी विसावा घेऊ शकतात. काहिशा पापुद्रा असलेल्या खोडांमुळे अधिक किटकांचीही सोय होते. या झाडांना फळे आली की बरेच पक्षी यावर घरटी बांधतात. (ही झाडे असलेल्या ठिकाणी पक्षांची बरीच विविधता दिसते) बाकी वरील जांभुळ-प्रकल्पालाही शुभेच्छा!

अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे. खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही. याला +१. जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!

सस्नेह Wed, 07/02/2014 - 14:37
मला आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला. पण नगर खूपच दूर आहे. इथे मीच असा एखादा उपक्रम काढेन कदाचित...

In reply to by सस्नेह

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 14:49
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो! आणि नाही आलात तर स्थानिक वनविभागाच्या अधिकार्‍याची मदती मदत घेवुन रोपे बनवुन घ्यावीत आणि त्याज कडुनच लावून घ्यावित, असा सल्ला आहे गुरुजींचा!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पाणी अडणार आहे का पण?
पाणी अडवण्यासाठी बि कुठे पेरावे लागेल ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन मा.पजित अवार करतील *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/02/2014 - 17:31
बी पेरण्याबद्दल की पाणी अडवण्याबद्दल, याबद्दल अंमळ गफलत होतेय का? बहुधा पाण्याशी संबंधित असावं, चूभूद्याघ्या ;)

रानवेडा सचिन गुरुवार, 07/03/2014 - 01:01
अतिशय स्तुत्य उपक्रम. आयुर्हित माहिती बद्द्ल धन्यवाद. गुरूजींना नक्की भेटणार...मी माझ्या बागेत आठवड्या पुर्वी जांभळाच्या जवळपास दोनतिनशे बिया पुरल्या आहेत रोप तयार झाले की इथल्या परिसरात लावणार आहे. गुरूजींच्या कार्यातुन प्रेरणा घेवुन प्रत्येकाने वृक्षरोपण नक्की करायला पाहीजे.

पुतळाचैतन्याचा गुरुवार, 07/03/2014 - 10:28
मी पण हा उपक्रम २००९ पासून करत आहे. मी फक्त मोठी झाडे लावतो. आत्ता पर्यंत तशी ६० मोठी झाडे लावली गेली आहेत. यात काही नवीन उपक्रम पण केले आहेत. उदा. अनेकदा आपण एखाद्या जुनाट भिंतीवर वडाचे, पिंपळाचे छोटे झाड उगवलेले पाहतो ते तिथून काढून जमिनीत "ग्राफ़्ट" करणे, अथवा उन्हाळ्यात नक्की फुलणारे गुलमोहोराचे झाड लावल्याने उन्हात मोठे रक्षण होते....सहसा कोणत्याही बागेत अशा झाडांच्या खाली त्याच्या बिया पडलेल्या असतात. जून महिन्यात आंबा घाटात सुमारे ४० मोठे वृक्ष अशा पद्धतीने ग्राफ़्ट केले आहेत...पण पाउस कमी झालाय ...बघू कसे जगतात आता..मोठी ५ प्रकारची झाडे फार उत्तम उदा. आंबा, वड, पिंपळ, उंबर, नारळ ..या झाडांना आपल्या संस्कृती मध्ये मनाचे स्थान आहे.

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 10:54
१)ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. स्वातंत्र्यानंतर आपण भारतियांनी त्याचा पुर्ण र्‍हास केलाय,हे गुरुजींनी पाहिलेले आहे. जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते, त्यामूळे नदी-नाल्यांच्या किनारी लावायला चांगली असतात. २)जांभळामध्ये लोह आणि विटॅमिन क भरपुर प्रमाणात असते, जे आरोग्यदायी जीवन जगण्यास उपयुक्त असते. ३)जांभळामध्ये मॅग्नेशियम भरपुर प्रमाणात असते, जे जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आणि आम्लाच्या विषारी परिणामांवर आणि दात निरोगी ठेवणे यासाठी हे खनिज उपयुक्त असते. आहारात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग,मायग्रेन, अस्थमा आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. ४)ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांना जांभुळ लोह व मॅग्नेशियमची पुर्तता करुन स्वास्थ दुरुस्त करते. ४)जांभळामध्ये गॅलिक अॅसिड, ऑक्झॅलिक अॅसिड, स्टेरोल्स, एलॅगिक अॅसिड व अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे कॉलेस्ट्रोल कमी करुन रक्तशर्करा प्रमाणात ठेवायला मदत करते. अशा प्रकारे मधुमेह आटोक्यात आणायला जांभुळ मदतच करते. जरी भारतदेश हा मधुमेहि रुग्णांची राजधानी मानला गेलाय पण निसर्गाने आपल्याला जांभुळ हे फळही दिले आहे. भारतिय उपखंडाचे नाव जंबूद्वीप असे आहे.याचा अर्थ येथे जांभळाची भरपुर झाडी होती. (चोच देण्याआधि दाण्याची सोय केलेली असते हे माझे एक विधान आठवले.) ५)जांभळा रंग हा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. वांगी, जांभळे, काळी द्राक्षे, करवंदे वगैरेच्या सेवनाने शरीरात या रंगाची गरज पूर्ण होते. ६)जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. ७)जांभूळ हे मोठमोठे कवी यांना स्फूरण देवुन गाणी व कविता करायला मदतच करतो. उदा: जैत रे जैत मधिल जांभुळ पिकल्या झाडाखाली....

In reply to by आयुर्हित

सूड गुरुवार, 07/03/2014 - 15:14
तुमचा प्रतिसाद वाचून बर्‍याच दिवसांनी हा निबंध आठवला: आवडता पक्षी--बदक !!.... बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..त्यांच्या हातात काठी पण असते

राही गुरुवार, 07/03/2014 - 14:42
मला वाटते ठाण्यातल्या हरियाली या संस्थेने किंवा/आणि पुण्यातल्या वनराई या संस्थेने असे उपक्रम पूर्वी राबवलेले आहेत. सध्या मुंबईतले अनेक ट्रेकिन्ग ग्रूप्स, समाजसंस्था, लायन, रोटरी आदि क्लब हा उपक्रम राबवीत असतात. 'अनाम प्रेम' चे लोक जिथे जिथे जातात तिथे बिया उधळतात. वर्षभर खाल्लेल्या फळांतल्या बिया जपून ठेवणे आणि पावसाळ्यात दूर कुठेतरी उघड्याबोडक्या टेकड्यांवर जाऊन त्या उधळणे हे काम अनेक कुटुंबे वैयक्तिक पातळीवर करत असतात. आम्हीसुद्धा. हा आपला खारीचा सहभाग, कारण टेकड्यांवर खड्दे खोदून त्यात रोपलावणी करणे सर्वांनाच जमते असे नाही. पण आता बहरलेली काही वने पहाताना यात आपण पूर्वी रोवलेली रोपेही असतील या विचाराने ऊर भरून येतो.

पैसा गुरुवार, 07/03/2014 - 21:02
अशा असंख्य वेड्या प्रयत्नांची आवष्यकता आहे. मात्र त्यांना एवढा पैसा खर्च करावा लागू नये. सरकारने लागेल ती मदत करावी ही अपेक्षा.

बहुगुणी Sat, 07/05/2014 - 08:41
चांगल्या उपक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद, आयुर्हित. आणि भापकर गुरूजींना आणि त्यांना मदत करणार्‍या सर्वांनाच शुभेच्छा! नदीकाठच्या मातीची झीज थांबवण्यासाठी सुगंधासाठी आपणां सर्वांच्या ओळखीच्या वाळा (खस/vetiver) या वनस्पतीचाही पूर्वापार वापर केला जातो. या रोपांची मुळं जमिनीखाली सरळ उभी अशी २००-४०० सेंटीमीटर इतकी खोल जाऊन माती धरून ठेवतात. कोकण रेल्वेने उतारावर पावसाने रूळाखालची माती घसरू नये म्हणून या रोपांची खुबीने लागवड केली आहे. त्याची रोपे कोठे मिळतात याची माहिती वाळे विकणार्‍यांकडून मिळू शकेल असं वाटतं.

प्रभाकर पेठकर Wed, 07/02/2014 - 13:06
चांगला उपक्रम. श्री. भापकर गुरुजींचे कौतुक वाटले. मुंबई-पुण्यात असतो तर नक्कीच आलो असतो कांही बिया घेऊन. असो.

खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही . मी आंब्याच्या कोयी वाळवुन ठेवल्या होत्या , पावसाळ्यात रोपे करुन अजिंक्यतार्‍यावर लावायचा विचार होता . पण घरच्यांनी न सांगताच फेकुन दिल्या (थोड्याफार उरल्यात त्यांची रोपे करायचा प्लॅन आहे ) :( असो. घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही *biggrin* बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही ! (आमच्या घरात वड पिंपळ औदुंबर तिन्ही आहेत !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 13:41
मी हनिवेल मध्ये असतांना, दर वेळेला(वेगवेगळ्या)गडांवर ट्रेकिन्गला जातांना वेगवेगळ्या बिया पेरुन यायचो.

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Wed, 07/02/2014 - 13:43
बाकी झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
एकदम सहमत. आम्हीही वृक्षारोपणाला ह्याच झाडांच्या रोपांना प्राधान्य देतो. तसेच लावल्यानंतरच्या उन्हाळ्यातही ती रोपे तग धरतात. जांभळाचे झाड पाणी धरून ठेवत असावे असे लेखात म्हटलेले आहे. त्यामुळे जांभूळ लावायचा संकल्प सोडला आहे असे वाटते. जांभळाचा लाकूड म्हणून किंवा सरपण म्हणूनही तितका उपयोग नसतो, पण वन्यप्राण्यांना जांभूळबनाचा आसरा चांगला होतो.

In reply to by एस

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 13:53
फळदार झाडे लावलीत तर मनूष्यांबरोबर पशूपक्षांनाही फळे खायला मिळतिल. त्यांमूळे कोणतीही फळदार झाडे लावावीत. शक्यतो नदिच्या कडेला लावलीत तर चांगली वाढतील व मातीची धुपही होणार नाही, असे म्हणणे आहे गुरुजींचे!

In reply to by आयुर्हित

खटपट्या गुरुवार, 07/03/2014 - 02:25
फळझाडे लावल्यामुळे अजून हा फायदा हा कि पक्षी फळे खावून लांब जावून विष्ठा विसर्जन करतात ज्यात फळांच्या बिया असतात त्यामुळे परत वनीकरणाचा प्रसार होतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Wed, 07/02/2014 - 14:02
>>घरी फणसाचे झाड आहे पण त्याच्या बिया सुध्दा आम्ही ठेवत नाही फणसाच्या आठळ्या ठेवत नाही? असली मस्त भाजी होते त्या आठळ्यांची. फक्त काप्या फणसाच्या हव्या, बरक्याच्या का नको हे सुज्ञांस सांगणे न लगे. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

ऋषिकेश गुरुवार, 07/03/2014 - 10:48
झाडे लावायचीच झाली तर वड पिंपळ औदुंबर पळस ह्यांची लावावीत असे आपले एक मत आहे ,लोकं ह्या झाडांना घाबरुन असतात ,एस्पीशियली औदुंबर , ते तोडायच्या नादाला सहसा कोणी जात नाही !
विशेष सहमती. इतरही कारणे आहेतः १. ही झाडे रात्रीसुद्धा ऑक्सीजनच उत्सर्जित करतात २. या झाडांवर अनेक पक्षी विसावा घेऊ शकतात. काहिशा पापुद्रा असलेल्या खोडांमुळे अधिक किटकांचीही सोय होते. या झाडांना फळे आली की बरेच पक्षी यावर घरटी बांधतात. (ही झाडे असलेल्या ठिकाणी पक्षांची बरीच विविधता दिसते) बाकी वरील जांभुळ-प्रकल्पालाही शुभेच्छा!

अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे. खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही. याला +१. जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!

सस्नेह Wed, 07/02/2014 - 14:37
मला आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला. पण नगर खूपच दूर आहे. इथे मीच असा एखादा उपक्रम काढेन कदाचित...

In reply to by सस्नेह

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 14:49
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो! आणि नाही आलात तर स्थानिक वनविभागाच्या अधिकार्‍याची मदती मदत घेवुन रोपे बनवुन घ्यावीत आणि त्याज कडुनच लावून घ्यावित, असा सल्ला आहे गुरुजींचा!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पाणी अडणार आहे का पण?
पाणी अडवण्यासाठी बि कुठे पेरावे लागेल ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन मा.पजित अवार करतील *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 07/02/2014 - 17:31
बी पेरण्याबद्दल की पाणी अडवण्याबद्दल, याबद्दल अंमळ गफलत होतेय का? बहुधा पाण्याशी संबंधित असावं, चूभूद्याघ्या ;)

रानवेडा सचिन गुरुवार, 07/03/2014 - 01:01
अतिशय स्तुत्य उपक्रम. आयुर्हित माहिती बद्द्ल धन्यवाद. गुरूजींना नक्की भेटणार...मी माझ्या बागेत आठवड्या पुर्वी जांभळाच्या जवळपास दोनतिनशे बिया पुरल्या आहेत रोप तयार झाले की इथल्या परिसरात लावणार आहे. गुरूजींच्या कार्यातुन प्रेरणा घेवुन प्रत्येकाने वृक्षरोपण नक्की करायला पाहीजे.

पुतळाचैतन्याचा गुरुवार, 07/03/2014 - 10:28
मी पण हा उपक्रम २००९ पासून करत आहे. मी फक्त मोठी झाडे लावतो. आत्ता पर्यंत तशी ६० मोठी झाडे लावली गेली आहेत. यात काही नवीन उपक्रम पण केले आहेत. उदा. अनेकदा आपण एखाद्या जुनाट भिंतीवर वडाचे, पिंपळाचे छोटे झाड उगवलेले पाहतो ते तिथून काढून जमिनीत "ग्राफ़्ट" करणे, अथवा उन्हाळ्यात नक्की फुलणारे गुलमोहोराचे झाड लावल्याने उन्हात मोठे रक्षण होते....सहसा कोणत्याही बागेत अशा झाडांच्या खाली त्याच्या बिया पडलेल्या असतात. जून महिन्यात आंबा घाटात सुमारे ४० मोठे वृक्ष अशा पद्धतीने ग्राफ़्ट केले आहेत...पण पाउस कमी झालाय ...बघू कसे जगतात आता..मोठी ५ प्रकारची झाडे फार उत्तम उदा. आंबा, वड, पिंपळ, उंबर, नारळ ..या झाडांना आपल्या संस्कृती मध्ये मनाचे स्थान आहे.

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 10:54
१)ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. स्वातंत्र्यानंतर आपण भारतियांनी त्याचा पुर्ण र्‍हास केलाय,हे गुरुजींनी पाहिलेले आहे. जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते, त्यामूळे नदी-नाल्यांच्या किनारी लावायला चांगली असतात. २)जांभळामध्ये लोह आणि विटॅमिन क भरपुर प्रमाणात असते, जे आरोग्यदायी जीवन जगण्यास उपयुक्त असते. ३)जांभळामध्ये मॅग्नेशियम भरपुर प्रमाणात असते, जे जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आणि आम्लाच्या विषारी परिणामांवर आणि दात निरोगी ठेवणे यासाठी हे खनिज उपयुक्त असते. आहारात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह, कर्करोग,मायग्रेन, अस्थमा आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. ४)ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांना जांभुळ लोह व मॅग्नेशियमची पुर्तता करुन स्वास्थ दुरुस्त करते. ४)जांभळामध्ये गॅलिक अॅसिड, ऑक्झॅलिक अॅसिड, स्टेरोल्स, एलॅगिक अॅसिड व अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे कॉलेस्ट्रोल कमी करुन रक्तशर्करा प्रमाणात ठेवायला मदत करते. अशा प्रकारे मधुमेह आटोक्यात आणायला जांभुळ मदतच करते. जरी भारतदेश हा मधुमेहि रुग्णांची राजधानी मानला गेलाय पण निसर्गाने आपल्याला जांभुळ हे फळही दिले आहे. भारतिय उपखंडाचे नाव जंबूद्वीप असे आहे.याचा अर्थ येथे जांभळाची भरपुर झाडी होती. (चोच देण्याआधि दाण्याची सोय केलेली असते हे माझे एक विधान आठवले.) ५)जांभळा रंग हा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. वांगी, जांभळे, काळी द्राक्षे, करवंदे वगैरेच्या सेवनाने शरीरात या रंगाची गरज पूर्ण होते. ६)जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. ७)जांभूळ हे मोठमोठे कवी यांना स्फूरण देवुन गाणी व कविता करायला मदतच करतो. उदा: जैत रे जैत मधिल जांभुळ पिकल्या झाडाखाली....

In reply to by आयुर्हित

सूड गुरुवार, 07/03/2014 - 15:14
तुमचा प्रतिसाद वाचून बर्‍याच दिवसांनी हा निबंध आठवला: आवडता पक्षी--बदक !!.... बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..त्यांच्या हातात काठी पण असते

राही गुरुवार, 07/03/2014 - 14:42
मला वाटते ठाण्यातल्या हरियाली या संस्थेने किंवा/आणि पुण्यातल्या वनराई या संस्थेने असे उपक्रम पूर्वी राबवलेले आहेत. सध्या मुंबईतले अनेक ट्रेकिन्ग ग्रूप्स, समाजसंस्था, लायन, रोटरी आदि क्लब हा उपक्रम राबवीत असतात. 'अनाम प्रेम' चे लोक जिथे जिथे जातात तिथे बिया उधळतात. वर्षभर खाल्लेल्या फळांतल्या बिया जपून ठेवणे आणि पावसाळ्यात दूर कुठेतरी उघड्याबोडक्या टेकड्यांवर जाऊन त्या उधळणे हे काम अनेक कुटुंबे वैयक्तिक पातळीवर करत असतात. आम्हीसुद्धा. हा आपला खारीचा सहभाग, कारण टेकड्यांवर खड्दे खोदून त्यात रोपलावणी करणे सर्वांनाच जमते असे नाही. पण आता बहरलेली काही वने पहाताना यात आपण पूर्वी रोवलेली रोपेही असतील या विचाराने ऊर भरून येतो.

पैसा गुरुवार, 07/03/2014 - 21:02
अशा असंख्य वेड्या प्रयत्नांची आवष्यकता आहे. मात्र त्यांना एवढा पैसा खर्च करावा लागू नये. सरकारने लागेल ती मदत करावी ही अपेक्षा.

बहुगुणी Sat, 07/05/2014 - 08:41
चांगल्या उपक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद, आयुर्हित. आणि भापकर गुरूजींना आणि त्यांना मदत करणार्‍या सर्वांनाच शुभेच्छा! नदीकाठच्या मातीची झीज थांबवण्यासाठी सुगंधासाठी आपणां सर्वांच्या ओळखीच्या वाळा (खस/vetiver) या वनस्पतीचाही पूर्वापार वापर केला जातो. या रोपांची मुळं जमिनीखाली सरळ उभी अशी २००-४०० सेंटीमीटर इतकी खोल जाऊन माती धरून ठेवतात. कोकण रेल्वेने उतारावर पावसाने रूळाखालची माती घसरू नये म्हणून या रोपांची खुबीने लागवड केली आहे. त्याची रोपे कोठे मिळतात याची माहिती वाळे विकणार्‍यांकडून मिळू शकेल असं वाटतं.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.

'चर्निंग ऑफ द सिटी' (पुस्तक परिचय)

आतिवास ·

आदूबाळ Wed, 07/02/2014 - 14:31
नक्की वाचणार. पुस्तकपरिचयासाठी धन्यवाद! अशा अमराठी भारतीय लेखकांची / पुस्तकांची ओळख करून दिल्यास आवडेल. भीष्म सहानी, सत्यजित रे (फेलूदा फेम) पलिकडे माहीतच नाही.

आदूबाळ Wed, 07/02/2014 - 14:31
नक्की वाचणार. पुस्तकपरिचयासाठी धन्यवाद! अशा अमराठी भारतीय लेखकांची / पुस्तकांची ओळख करून दिल्यास आवडेल. भीष्म सहानी, सत्यजित रे (फेलूदा फेम) पलिकडे माहीतच नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!) ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली? आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे. ‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे.