मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरले खेकडे

जागु ·

सौंदाळा Fri, 07/04/2014 - 13:18
बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.
आम्ही मात्र हे करतो. पाट्यावर खेकड्यांचे पाय थोडे पाणी टाकुन वाटतो आणि ते सर्व गाळुन रस्सा करताना वापरतो. मस्त चव येते. तुमची रेसिपी क्लासच जागुताई काय टायमिंग आहे. मागच्या रविवारीच खे़कडे केले होते. आता पावसाळा चालु झाला की आम्हा मत्स्यप्रेमींना खेकडे, सुकट वगैरेवर ३/४ महीने काढायला लागतात :) बाकी अमावस्येला पकडलेले खेकडे चांगले भरलेले असतात यात काही तथ्य आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जागु Fri, 07/04/2014 - 13:23
मला नाही वाटत कारण मी मध्ये कधी घेतले तरी भरलेले मिळतात. आणि अमावस्या पौर्णीमेलाही मला पोकळ मिळालेले आहेत.

In reply to by जागु

सौंदाळा Fri, 07/04/2014 - 13:35
स्वारी.. तुम्ही वरती लेखातदेखिल याचा उल्लेख केला आहे पण तोंडाला पाणी सुटल्यामुळे मी डायरेक्ट कृती आणि फोटोंवरच उडी मारली. आम्ही लाख काढुन टाकतो. आजी ठेऊन देत नाही. कशी लागते बघायला पाहीजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भिंगरी Sat, 07/05/2014 - 15:24
अमावास्येला भरलेले खेकडे मिळतात. म्हणजे साधारणपणे अमावास्येच्या दरम्यान मादी अंडी घालते असे म्हणतात म्हणून त्या दरम्यान भरलेले खेकडे मिळतात. कधी अंडी आधी सोडली असतील तर अमावास्येला पोकळ खेकडाच मिळेल.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 13:35
नेहमीप्रमाणे चित्ताकर्षक आणि जठराग्नी प्रज्वलीत करणारी अजून एक झणझणीत पाककृती. छायाचित्रांसाठी भांडी जरा दूसरी आणि स्वच्छ घ्यावीत हे जरा छायाचित्रकरणाच्या दृष्टीकोनातून सुचवत आहे. एव्हढी मस्त पाककृती, भांड्यांना कडेवर लागलेल्या खरकट्याने, रसभंग करते आहे. राग मानू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु Fri, 07/04/2014 - 16:57
प्रभाकरकाका तुम्हाला खरकटे कुठे दिसले छायाचित्रात? रस्सा ज्या पातेल्यात केलेला आहे त्याच पातेल्यात तो रस उकळून वर आलेला असल्याने त्या अन्नपदार्थाचे काही अंश तिथे लागलेले आहेत. ते सहाजीकच आहे दिसणे.

In reply to by जागु

यशोधरा Sat, 07/05/2014 - 19:12
जागू, पेठकरकाकांनी प्रेझेंटेशनच्या दृष्टीने लिहिले आहे. त्यांचा स्वतःचा हाच व्यवसाय असल्याने त्यांचा सल्ला मनावर घ्यावास असे सुचवावेसे वाटते. सानिका, दीपक, गणपा ह्यांचे धागे ह्या दृष्टीने जरुर पहा. तुझ्या पाकृ चांगल्या असतातच, थोडी प्रेझेंटेशनची अधिक काळजी घेतलीस तर त्यात फायदाच आहे. :)

In reply to by यशोधरा

जागु Mon, 07/07/2014 - 12:21
यशोधरा ताई प्रभाकर काकांच्या सुचनेचे स्वागतच आहे. पुढच्यावेळी नक्कीच लक्षात ठेवेन. आणि इतर वेळीही मी बर्‍याचदा करते. पण ही पाकृ अशी आहे की साफ करण्यापासुन ते पूर्णहोईपर्यंत वेळ आणि श्रम दोन्हीला चिकाटी लागते त्यामुळे शेवटी आहेत तसे फोटो टाकलेत. मला फक्त खरकट ह्या शब्दाविषयी म्हणायच आहे. खरकट म्हणजे जेऊन झाल्यानंतर जे काही अन्नकण सांडलेले असतात त्याला आमच्याइथे खरकट म्हणतात. वरील फोटो झाल्या झाल्या काढल्याचे आहेत. खरकट्याचा संबंध येत नाही.

In reply to by जागु

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 16:35
>>>> खरकट म्हणजे जेऊन झाल्यानंतर जे काही अन्नकण सांडलेले असतात त्याला आमच्याइथे खरकट म्हणतात. जागु, खरकटं आणि उष्टखरकटं हे दोन वेगळे प्रकार आहेत असं माझं मत आहे. जेवण शिजवलेले (खाल्लेले नाही) एखादे भांडे नुसते विसळून आपण ठेवत नाही कारण ते खरकटं असतं. 'उष्टी-खरकटी काढण्यातच जन्म गेला आमचा.' अशी वाक्य आपण ऐकतो. म्हणजे उष्टे सांडलेले आणि उष्टे नसलेले आणि सांडलेले अन्नकण असे दोन प्रकार अभिप्रेत आहेत्/असावेत. जेवण वाढताना ते जमिनीवर, टेबलावर सांडले असेल त्यालाही खरकटंच म्हणतात. अन्न शिजवताना गॅस भोवती, ओट्यावर सांडलेल्यालाही खरकटं म्हणतात. माझी शब्दयोजना चुकली असेल पण त्याला अशी पार्श्वभूमी आहे. माझ्या मते पातेल्याला आतून जे अन्न लागलेलं आहे ते खरकटंच आहे. पण तुम्हाला शब्द खुपला असेल तर माफी मागतो. पण छायाचित्र काढण्याआधी पातेल्याला, बाऊलला लागलेले अन्नकण साफ करुन घ्यावेत एवढेच सुचवायचे होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु गुरुवार, 07/17/2014 - 15:24
अहो राग नाही आला. उलट ह्यापुढे मी फोटो काढताना खबरदारी घेईन. फक्त तो खरकट शब्द मनाला खटकला. पण तुम्ही आता त्याच तुमच्या मनातल विश्लेशण दिलत आणि ते खटकणेही गेल.

केदार-मिसळपाव Fri, 07/04/2014 - 14:34
"आता बर्‍याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते" हे अती भयंकर वाटले. खाण्यासाठी हिम्मत करावी लागेल.

In reply to by गणपा

पण रस्सा करताना खेकडा जिवंत असतो की मेलेला ? मागे एकदा फुगु मासा बनवण्याचा व्हिडीयो पाहिला होता , त्याला तर अपटुन अर्धमेला करतात ... आणि मग सोलतात !! तसंही म्हणा आपल्याला काय फरक पडतो , चव मस्त झाल्याशी मतलब ! ! बाकी पाककृती अप्रतिम !!

In reply to by गणपा

केदार-मिसळपाव Sun, 07/06/2014 - 17:12
मी ती स्मायली टाकतांना पुर्ण बघुन नाही टाकली. लै वंगाळ आहे ती शेवटी शेवटी. संपादकांना व्यनी केला आहे. ते योग्य ते पाउल उचलतील.

शिद Fri, 07/04/2014 - 15:13
भन्नाट पाकॄ, असलं पाणी सुटलं आहे ना तोंडाला पाकृ पाहून. *crazy* आम्ही पण साधारण ह्याच पद्धतीनं खेकडा रस्सा बनवतो पण आमच्या घरी बेसन वापरत नाही. आता आईला सांगुन बनवायला हवं तुमच्या पद्धतीनं. डहाणुला आत्याकडे गेलो तर यथेच्छ खेकडे खायला मिळतात. आम्ही नुसते उकडुन पण खातो पण गाभोळी भरलेले खेकडे असतील तर मग मज्जाच मज्जा. खेकड्यांचे फांगडे देखील फोडून आतील मांस/गर खाता खाता गप्पा मारत मस्त टाईमपास होतो.
अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात.
अमावस्येला गडद काळोखात खेकडे अंडी घालतात म्हणून ते गाभोळी भरलेले असतात असं मानलं जाते. बाजारातून कधी खेकडे आणायचे असतील तर माझी आई अमावस्येच्या मागे-पुढे आणायची.

भावना कल्लोळ Fri, 07/04/2014 - 15:21
आमच्या कडे (माहेरी आणि सासरी सुद्धा) या जीवाला आमच्या ताटात प्रवेश निषिद्ध आहे, कारण कधी खरेच तसे काही आहे का शोधण्याचा प्रयत्न केला नाही … याला खाले कि कान फुटतात म्हणे ……. *wink*

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 15:22
लाळेने कीबोर्ड ओला झाला ;) बेसन भरण्याची पाकृ नवी.. येत्या पावसाळ्यात ट्राय करायला हवी.. आम्ही नांग्या मोडून परतून खातो .. समुद्री खेकडे आणि नदी - ओढ्यामधले खेकडे या मध्ये चवीला / कृतीमध्ये फरक आहे का ? ( मी फक्त नदी - ओढ्या मधलेच खाल्ले आहेत)

मस्त ! तेवढा खाताना कवचं काढायचा त्रास सोडला तर चव मात्र अनेक समुद्रान्नांच्या तोंडात मारणारी असते ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 16:14
तेवढा खाताना कवचं काढायचा त्रास सोडला तर चव मात्र अनेक समुद्रान्नांच्या तोंडात मारणारी असते !
समुद्री शहाळंच जणू!!!!! 'फणसाअंगी काटे(ऑर कवच, व्हॉटेव्हर), आत अमृताचे साठे' म्हणताना शेख महंमदांनी फणसाऐवजी खेकडा म्हटलं असतं तरी चाललं असतं, नै?

दिपक.कुवेत Sat, 07/05/2014 - 19:23
खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा. हे असे भरलेले खेकडे एकदा खाल्लेले पण समहाउ नाहि आवडले. ते बेसनाचं सारण घट्ट होतं आणि ते खेकड्याच्या पाठिला चिकटुन बसतं. त्यामुळे ते नुसतं खाव लागलं जे नाहि आवडलं. पण खेकड्यांचा रस्सा.....अहाहा. निव्वळ स्वर्गसुख. असा नुसता रस्सा, वाफाळणारा भात (तो सुद्धा जर का लाल, हातसडिचा मिळाला तर अतीउत्तम) आणि बाहेर कोसळणारा धो धो पाउस.....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

In reply to by दिपक.कुवेत

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 19:49
खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा. +७८६ खेकड्याचा बेत असेल तर मी तब्बल तास-दिड तास जेवतो. त्यातही चपाती-भाकरी नाहीच तर निव्वळ खेकड्याचे कालवण आणि भात. तसेच भरलेल्या खेकड्यात बेसणाचे सारण घट्ट होऊन चिकटून बसले आणि ते खेकड्याच्या चवीत विरघळले नाही तर मजा गेली हे ही खरेच. आमच्या घरीही चांगलेच होतात खेकडे पण तरीही खेकडे म्हटले की मित्राचे गाव आठवते, श्रीवर्धन .. चार दिवस राहिलो होतो पण रोजच संध्याकाळी ताजे खेकडे असायचे जेवणात, आणि नुसते असायचे नाही तर त्या आज्जी काय क्लास बनवायच्या. मी तिथेही तासभर जेवायचो. बरोबरचे बावळट मित्र चोच मारल्यासारखे खाऊन उठायचे पण त्यांच्यात खेकडा खायची आवड आणि अक्कल मला एकट्यालाच असल्याने (भले वासरांत लंगडी गाय शाणी) पण त्यामुळे त्याची आजीही मोठ्या कौतुकाने खाऊ घालायची मला.

अर्धवटराव Sun, 07/06/2014 - 00:03
खेकड्यासाठी जीव तळमळला... त्याचे तुकडे पडताना बघुन... व हि पाकृ आपल्या पानात पडण्याचे चान्सेस सध्यातरी नगण्य आहे या सत्याच्या जाणिवेने देखील :( असो. आता एखाद्या कोंबडीवर ताव मारतो. तसंही कोंबडी खेकड्यापेक्षा लाख बरी (आंबट द्राक्षांनी भरलेलं तोंड लपवायची स्मायली आहे का?? ;) ) जागु ताई... अप्रतीम जमलीय भट्टी. हॅट्स ऑफ्फ.

पेट थेरपी Sun, 07/06/2014 - 07:17
केलेल्या भांड्यातून वेगळ्या सर्विंग बोल मध्ये घेतले स्वच्छ टेबलक्लॉथवर तो बोल ठेवुन फोटो घेतला तर बरे पडेल. चव छानच असणार. ते पाय कापायचे आणि खेकड्याने मेहनतीने घातलेली अंडी ते उल्लेख वाचून कसे तरी झाले.

मदनबाण Sun, 07/06/2014 - 08:46
माझ्याच्याने काही झेपत नाही अशी पाकॄ पाहणे ! ;) पण अ‍ॅज गणपा सेठ इज ऑलरेडी सेड... फूड इज कप्लीट ब्रम्हा ! आय विल ट्राय टु नो मोअर अबाउट इट. ;) नाग्यां सुद्धा खातात ? कशा लागतात ? बादवे... मी जंगलातले खेकडे पकडले आहेत.पण खाण्यासाठी नाही हं, फकस्त कुतुहल म्हणुन ! एखाद्या बारीक काडीला गांडुळ बांधायच आणि ती काडी याच्या बिळात सरकवायची हा या खेकड्याला पकडायचा नुस्का ! ;) मला त्यावेळी आमच्या मित्रांपैकी कोणी सांगितले होते की त्यांच्या नांगित बोट अडकले तर तो ते तोडुन टाकु शकतो ! हे खरयं का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

भटक्या.. Mon, 07/07/2014 - 07:09
सुंदर पाककृती जागू ताई..आमची आज्जी पण असच बनवायची.. बाकी आम्बट शेरे देणार्या लोकानू..कोंबडी ची अंडी खाणे ..मृत कोंबड़ी चे पाय तोड़णे आणि हयात तात्विक दृष्ट्या फारसा फरक नाही.. बाक़ी चलने दो..

In reply to by भटक्या..

गोष्ट इतक्यावरच थांबत नाही ! भाज्या आणि फळे जमिनीतून उपटणारे, तोडणारे, कापणारे, कच्चे खाणारे, इ इ लोकांनी... हे वनस्पतींनाही भावना असतात जरूर वाचावे ! ;) :)

ब़जरबट्टू Mon, 07/07/2014 - 13:37
खेकडे कधी खाल्ले नाहीत.. पण तुमची केलेली पाककृती अप्रतीम आहे.. पाककृती शेयर केल्यबद्दल धन्यवाद.. बाकी ते फोटो प्रेझेंटेशनचे मनावर घ्याच... :) उपाशी बजरू.

रामपुरी Wed, 07/09/2014 - 22:57
जिवंतपणी पाय तोडून घेणे, उभे चिरले जाणे, उकळले जाणे वगैरे शिक्षा त्यांच्या नशिबात असतात. तेही त्यांचा काही गुन्हा नसताना. अतिशय वाईट वाटले. :( असो...

जासुश Tue, 07/15/2014 - 13:10
जागू मीच तुला ही रेसिपी मा बो वर विचारली होती....प्रतिसाद उशिरा देते य...तू तिथे सुद्धा रेसिपी दिली होतीस ..पण प्रतिसाद देऊ शकले नाही....खूप खूप धन्यवाद..मी हे खेक्डे एका ओळखीच्या व्यक्ती कडे खाल्ले होते..

म्हणतो आम्ही.करतो असंच बेसन व चिंच सोडून . खेकडे करणं कला आहे आणि खाणं पण. पायांचा रस टाकून चव मस्त होते

भटकंती अनलिमिटेड गुरुवार, 07/14/2016 - 15:14
तोंड को पाणी सुट्या! गेल्या आठवड्यातच तब्बल वीसेक खेकड्यांचा फडशा पाडलाय म्हणून कीबोर्ड ओला झाला नाही इतकंच. हरिश्चंद्रगडला काय खेकडे खाल्ले होते तीन दिवस. पाऊस सुरु व्हायच्या वेळी वीकडेला तीन दिवस गेलो होतो. कोकणकड्यालाच एका बळदात मुक्काम. सगळा गड आमचाच. भास्कर विचारायचा पंकजदादा चला खेकडे धरु. आम्ही त्याच्यामागे मोठं पातेलं घेऊन. अंधारात टॉर्च मारली की दोनतील खेकडे झोतात पळत यायचे. आपण फक्त उचलून पातेल्यात भरायचे. फक्त एक चमचाभर तेल, मीठ मिरची आणि पाण्यात कालवून ज्वारीचं पीठ एवढ्याच सामग्रीवर काय कालवण बनवायचा भास्कर. अजून जिभेवर चव रेंगाळते आहे. खाण्याची अक्कल फक्त मलाच. बाकी लोक फक्त रस्सा आणि अर्धी-चतकोर भाकरी खाऊन बाजूला व्हायचे आणि मी मात्र दोनेक तास मैफिल लावायचो. बळद लहान असल्याने झोपायला जागा न मिळाल्याने बाकीच्यांची चिडचिड. झोपल्यावर रात्री केव्हातरी कडकड आवाज आला की समजून घ्यायचे गुहेबाहेर कवच फोडायला कोल्हे-लांडगे आलेत. http://www.pankajz.com/2014/07/blog-post_3667.html

टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 07/14/2016 - 16:04
खेकडे जिवंत असताना तळतात,उकडतात ,शिजवतात हे मला आवडत नाही ,यासाठी जागुतैचा उपाय आणखी पुढे नेतो,खेकडे आणल्यावर आधी ते फ्रिजरच्या आईस कंपार्टमेंटमध्ये तासभर ठेवावेत ,ते मरुन जातात ,मग त्यांना शिजवावे.

पूर्वाविवेक गुरुवार, 07/14/2016 - 16:08
मस्त ग जागु, एवढे फोटो काढायचे म्हणजे भारी सयंमचाच काम आणि सजवून फोटो काढेपर्यत धीर कुणाला. रस्श्याच्या घमघमाटाने पोटात कावळ्यांची फौज जमा होते. आमच्याकडे पण असच करतात. पण चिंचेचा कोळ नाही वापरत. मी ते भरायचं पीठ अंमळ जास्तच करते. त्याचे गोळे रश्श्यात सोडते. लेकीला ते गोळे फार आवडतात.

जागु Mon, 07/18/2016 - 11:54
अरे धागा वर आला. (हाहा) धन्यवाद. भटकंती अनलिमिटेड मस्त वाटल वाचून. असे अनुभव भारीच असतात. पूर्वा मी पण पूर्वी नाही चिंचेचा कोळ टाकायचे. पण सासू म्हणते चिंचेच्या कोळाने वईस वास जातो. तेव्हापासून टाकते.

सौंदाळा Fri, 07/04/2014 - 13:18
बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.
आम्ही मात्र हे करतो. पाट्यावर खेकड्यांचे पाय थोडे पाणी टाकुन वाटतो आणि ते सर्व गाळुन रस्सा करताना वापरतो. मस्त चव येते. तुमची रेसिपी क्लासच जागुताई काय टायमिंग आहे. मागच्या रविवारीच खे़कडे केले होते. आता पावसाळा चालु झाला की आम्हा मत्स्यप्रेमींना खेकडे, सुकट वगैरेवर ३/४ महीने काढायला लागतात :) बाकी अमावस्येला पकडलेले खेकडे चांगले भरलेले असतात यात काही तथ्य आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जागु Fri, 07/04/2014 - 13:23
मला नाही वाटत कारण मी मध्ये कधी घेतले तरी भरलेले मिळतात. आणि अमावस्या पौर्णीमेलाही मला पोकळ मिळालेले आहेत.

In reply to by जागु

सौंदाळा Fri, 07/04/2014 - 13:35
स्वारी.. तुम्ही वरती लेखातदेखिल याचा उल्लेख केला आहे पण तोंडाला पाणी सुटल्यामुळे मी डायरेक्ट कृती आणि फोटोंवरच उडी मारली. आम्ही लाख काढुन टाकतो. आजी ठेऊन देत नाही. कशी लागते बघायला पाहीजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भिंगरी Sat, 07/05/2014 - 15:24
अमावास्येला भरलेले खेकडे मिळतात. म्हणजे साधारणपणे अमावास्येच्या दरम्यान मादी अंडी घालते असे म्हणतात म्हणून त्या दरम्यान भरलेले खेकडे मिळतात. कधी अंडी आधी सोडली असतील तर अमावास्येला पोकळ खेकडाच मिळेल.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 13:35
नेहमीप्रमाणे चित्ताकर्षक आणि जठराग्नी प्रज्वलीत करणारी अजून एक झणझणीत पाककृती. छायाचित्रांसाठी भांडी जरा दूसरी आणि स्वच्छ घ्यावीत हे जरा छायाचित्रकरणाच्या दृष्टीकोनातून सुचवत आहे. एव्हढी मस्त पाककृती, भांड्यांना कडेवर लागलेल्या खरकट्याने, रसभंग करते आहे. राग मानू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु Fri, 07/04/2014 - 16:57
प्रभाकरकाका तुम्हाला खरकटे कुठे दिसले छायाचित्रात? रस्सा ज्या पातेल्यात केलेला आहे त्याच पातेल्यात तो रस उकळून वर आलेला असल्याने त्या अन्नपदार्थाचे काही अंश तिथे लागलेले आहेत. ते सहाजीकच आहे दिसणे.

In reply to by जागु

यशोधरा Sat, 07/05/2014 - 19:12
जागू, पेठकरकाकांनी प्रेझेंटेशनच्या दृष्टीने लिहिले आहे. त्यांचा स्वतःचा हाच व्यवसाय असल्याने त्यांचा सल्ला मनावर घ्यावास असे सुचवावेसे वाटते. सानिका, दीपक, गणपा ह्यांचे धागे ह्या दृष्टीने जरुर पहा. तुझ्या पाकृ चांगल्या असतातच, थोडी प्रेझेंटेशनची अधिक काळजी घेतलीस तर त्यात फायदाच आहे. :)

In reply to by यशोधरा

जागु Mon, 07/07/2014 - 12:21
यशोधरा ताई प्रभाकर काकांच्या सुचनेचे स्वागतच आहे. पुढच्यावेळी नक्कीच लक्षात ठेवेन. आणि इतर वेळीही मी बर्‍याचदा करते. पण ही पाकृ अशी आहे की साफ करण्यापासुन ते पूर्णहोईपर्यंत वेळ आणि श्रम दोन्हीला चिकाटी लागते त्यामुळे शेवटी आहेत तसे फोटो टाकलेत. मला फक्त खरकट ह्या शब्दाविषयी म्हणायच आहे. खरकट म्हणजे जेऊन झाल्यानंतर जे काही अन्नकण सांडलेले असतात त्याला आमच्याइथे खरकट म्हणतात. वरील फोटो झाल्या झाल्या काढल्याचे आहेत. खरकट्याचा संबंध येत नाही.

In reply to by जागु

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 16:35
>>>> खरकट म्हणजे जेऊन झाल्यानंतर जे काही अन्नकण सांडलेले असतात त्याला आमच्याइथे खरकट म्हणतात. जागु, खरकटं आणि उष्टखरकटं हे दोन वेगळे प्रकार आहेत असं माझं मत आहे. जेवण शिजवलेले (खाल्लेले नाही) एखादे भांडे नुसते विसळून आपण ठेवत नाही कारण ते खरकटं असतं. 'उष्टी-खरकटी काढण्यातच जन्म गेला आमचा.' अशी वाक्य आपण ऐकतो. म्हणजे उष्टे सांडलेले आणि उष्टे नसलेले आणि सांडलेले अन्नकण असे दोन प्रकार अभिप्रेत आहेत्/असावेत. जेवण वाढताना ते जमिनीवर, टेबलावर सांडले असेल त्यालाही खरकटंच म्हणतात. अन्न शिजवताना गॅस भोवती, ओट्यावर सांडलेल्यालाही खरकटं म्हणतात. माझी शब्दयोजना चुकली असेल पण त्याला अशी पार्श्वभूमी आहे. माझ्या मते पातेल्याला आतून जे अन्न लागलेलं आहे ते खरकटंच आहे. पण तुम्हाला शब्द खुपला असेल तर माफी मागतो. पण छायाचित्र काढण्याआधी पातेल्याला, बाऊलला लागलेले अन्नकण साफ करुन घ्यावेत एवढेच सुचवायचे होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु गुरुवार, 07/17/2014 - 15:24
अहो राग नाही आला. उलट ह्यापुढे मी फोटो काढताना खबरदारी घेईन. फक्त तो खरकट शब्द मनाला खटकला. पण तुम्ही आता त्याच तुमच्या मनातल विश्लेशण दिलत आणि ते खटकणेही गेल.

केदार-मिसळपाव Fri, 07/04/2014 - 14:34
"आता बर्‍याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते" हे अती भयंकर वाटले. खाण्यासाठी हिम्मत करावी लागेल.

In reply to by गणपा

पण रस्सा करताना खेकडा जिवंत असतो की मेलेला ? मागे एकदा फुगु मासा बनवण्याचा व्हिडीयो पाहिला होता , त्याला तर अपटुन अर्धमेला करतात ... आणि मग सोलतात !! तसंही म्हणा आपल्याला काय फरक पडतो , चव मस्त झाल्याशी मतलब ! ! बाकी पाककृती अप्रतिम !!

In reply to by गणपा

केदार-मिसळपाव Sun, 07/06/2014 - 17:12
मी ती स्मायली टाकतांना पुर्ण बघुन नाही टाकली. लै वंगाळ आहे ती शेवटी शेवटी. संपादकांना व्यनी केला आहे. ते योग्य ते पाउल उचलतील.

शिद Fri, 07/04/2014 - 15:13
भन्नाट पाकॄ, असलं पाणी सुटलं आहे ना तोंडाला पाकृ पाहून. *crazy* आम्ही पण साधारण ह्याच पद्धतीनं खेकडा रस्सा बनवतो पण आमच्या घरी बेसन वापरत नाही. आता आईला सांगुन बनवायला हवं तुमच्या पद्धतीनं. डहाणुला आत्याकडे गेलो तर यथेच्छ खेकडे खायला मिळतात. आम्ही नुसते उकडुन पण खातो पण गाभोळी भरलेले खेकडे असतील तर मग मज्जाच मज्जा. खेकड्यांचे फांगडे देखील फोडून आतील मांस/गर खाता खाता गप्पा मारत मस्त टाईमपास होतो.
अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात.
अमावस्येला गडद काळोखात खेकडे अंडी घालतात म्हणून ते गाभोळी भरलेले असतात असं मानलं जाते. बाजारातून कधी खेकडे आणायचे असतील तर माझी आई अमावस्येच्या मागे-पुढे आणायची.

भावना कल्लोळ Fri, 07/04/2014 - 15:21
आमच्या कडे (माहेरी आणि सासरी सुद्धा) या जीवाला आमच्या ताटात प्रवेश निषिद्ध आहे, कारण कधी खरेच तसे काही आहे का शोधण्याचा प्रयत्न केला नाही … याला खाले कि कान फुटतात म्हणे ……. *wink*

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 15:22
लाळेने कीबोर्ड ओला झाला ;) बेसन भरण्याची पाकृ नवी.. येत्या पावसाळ्यात ट्राय करायला हवी.. आम्ही नांग्या मोडून परतून खातो .. समुद्री खेकडे आणि नदी - ओढ्यामधले खेकडे या मध्ये चवीला / कृतीमध्ये फरक आहे का ? ( मी फक्त नदी - ओढ्या मधलेच खाल्ले आहेत)

मस्त ! तेवढा खाताना कवचं काढायचा त्रास सोडला तर चव मात्र अनेक समुद्रान्नांच्या तोंडात मारणारी असते ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 16:14
तेवढा खाताना कवचं काढायचा त्रास सोडला तर चव मात्र अनेक समुद्रान्नांच्या तोंडात मारणारी असते !
समुद्री शहाळंच जणू!!!!! 'फणसाअंगी काटे(ऑर कवच, व्हॉटेव्हर), आत अमृताचे साठे' म्हणताना शेख महंमदांनी फणसाऐवजी खेकडा म्हटलं असतं तरी चाललं असतं, नै?

दिपक.कुवेत Sat, 07/05/2014 - 19:23
खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा. हे असे भरलेले खेकडे एकदा खाल्लेले पण समहाउ नाहि आवडले. ते बेसनाचं सारण घट्ट होतं आणि ते खेकड्याच्या पाठिला चिकटुन बसतं. त्यामुळे ते नुसतं खाव लागलं जे नाहि आवडलं. पण खेकड्यांचा रस्सा.....अहाहा. निव्वळ स्वर्गसुख. असा नुसता रस्सा, वाफाळणारा भात (तो सुद्धा जर का लाल, हातसडिचा मिळाला तर अतीउत्तम) आणि बाहेर कोसळणारा धो धो पाउस.....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

In reply to by दिपक.कुवेत

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 19:49
खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा. +७८६ खेकड्याचा बेत असेल तर मी तब्बल तास-दिड तास जेवतो. त्यातही चपाती-भाकरी नाहीच तर निव्वळ खेकड्याचे कालवण आणि भात. तसेच भरलेल्या खेकड्यात बेसणाचे सारण घट्ट होऊन चिकटून बसले आणि ते खेकड्याच्या चवीत विरघळले नाही तर मजा गेली हे ही खरेच. आमच्या घरीही चांगलेच होतात खेकडे पण तरीही खेकडे म्हटले की मित्राचे गाव आठवते, श्रीवर्धन .. चार दिवस राहिलो होतो पण रोजच संध्याकाळी ताजे खेकडे असायचे जेवणात, आणि नुसते असायचे नाही तर त्या आज्जी काय क्लास बनवायच्या. मी तिथेही तासभर जेवायचो. बरोबरचे बावळट मित्र चोच मारल्यासारखे खाऊन उठायचे पण त्यांच्यात खेकडा खायची आवड आणि अक्कल मला एकट्यालाच असल्याने (भले वासरांत लंगडी गाय शाणी) पण त्यामुळे त्याची आजीही मोठ्या कौतुकाने खाऊ घालायची मला.

अर्धवटराव Sun, 07/06/2014 - 00:03
खेकड्यासाठी जीव तळमळला... त्याचे तुकडे पडताना बघुन... व हि पाकृ आपल्या पानात पडण्याचे चान्सेस सध्यातरी नगण्य आहे या सत्याच्या जाणिवेने देखील :( असो. आता एखाद्या कोंबडीवर ताव मारतो. तसंही कोंबडी खेकड्यापेक्षा लाख बरी (आंबट द्राक्षांनी भरलेलं तोंड लपवायची स्मायली आहे का?? ;) ) जागु ताई... अप्रतीम जमलीय भट्टी. हॅट्स ऑफ्फ.

पेट थेरपी Sun, 07/06/2014 - 07:17
केलेल्या भांड्यातून वेगळ्या सर्विंग बोल मध्ये घेतले स्वच्छ टेबलक्लॉथवर तो बोल ठेवुन फोटो घेतला तर बरे पडेल. चव छानच असणार. ते पाय कापायचे आणि खेकड्याने मेहनतीने घातलेली अंडी ते उल्लेख वाचून कसे तरी झाले.

मदनबाण Sun, 07/06/2014 - 08:46
माझ्याच्याने काही झेपत नाही अशी पाकॄ पाहणे ! ;) पण अ‍ॅज गणपा सेठ इज ऑलरेडी सेड... फूड इज कप्लीट ब्रम्हा ! आय विल ट्राय टु नो मोअर अबाउट इट. ;) नाग्यां सुद्धा खातात ? कशा लागतात ? बादवे... मी जंगलातले खेकडे पकडले आहेत.पण खाण्यासाठी नाही हं, फकस्त कुतुहल म्हणुन ! एखाद्या बारीक काडीला गांडुळ बांधायच आणि ती काडी याच्या बिळात सरकवायची हा या खेकड्याला पकडायचा नुस्का ! ;) मला त्यावेळी आमच्या मित्रांपैकी कोणी सांगितले होते की त्यांच्या नांगित बोट अडकले तर तो ते तोडुन टाकु शकतो ! हे खरयं का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

भटक्या.. Mon, 07/07/2014 - 07:09
सुंदर पाककृती जागू ताई..आमची आज्जी पण असच बनवायची.. बाकी आम्बट शेरे देणार्या लोकानू..कोंबडी ची अंडी खाणे ..मृत कोंबड़ी चे पाय तोड़णे आणि हयात तात्विक दृष्ट्या फारसा फरक नाही.. बाक़ी चलने दो..

In reply to by भटक्या..

गोष्ट इतक्यावरच थांबत नाही ! भाज्या आणि फळे जमिनीतून उपटणारे, तोडणारे, कापणारे, कच्चे खाणारे, इ इ लोकांनी... हे वनस्पतींनाही भावना असतात जरूर वाचावे ! ;) :)

ब़जरबट्टू Mon, 07/07/2014 - 13:37
खेकडे कधी खाल्ले नाहीत.. पण तुमची केलेली पाककृती अप्रतीम आहे.. पाककृती शेयर केल्यबद्दल धन्यवाद.. बाकी ते फोटो प्रेझेंटेशनचे मनावर घ्याच... :) उपाशी बजरू.

रामपुरी Wed, 07/09/2014 - 22:57
जिवंतपणी पाय तोडून घेणे, उभे चिरले जाणे, उकळले जाणे वगैरे शिक्षा त्यांच्या नशिबात असतात. तेही त्यांचा काही गुन्हा नसताना. अतिशय वाईट वाटले. :( असो...

जासुश Tue, 07/15/2014 - 13:10
जागू मीच तुला ही रेसिपी मा बो वर विचारली होती....प्रतिसाद उशिरा देते य...तू तिथे सुद्धा रेसिपी दिली होतीस ..पण प्रतिसाद देऊ शकले नाही....खूप खूप धन्यवाद..मी हे खेक्डे एका ओळखीच्या व्यक्ती कडे खाल्ले होते..

म्हणतो आम्ही.करतो असंच बेसन व चिंच सोडून . खेकडे करणं कला आहे आणि खाणं पण. पायांचा रस टाकून चव मस्त होते

भटकंती अनलिमिटेड गुरुवार, 07/14/2016 - 15:14
तोंड को पाणी सुट्या! गेल्या आठवड्यातच तब्बल वीसेक खेकड्यांचा फडशा पाडलाय म्हणून कीबोर्ड ओला झाला नाही इतकंच. हरिश्चंद्रगडला काय खेकडे खाल्ले होते तीन दिवस. पाऊस सुरु व्हायच्या वेळी वीकडेला तीन दिवस गेलो होतो. कोकणकड्यालाच एका बळदात मुक्काम. सगळा गड आमचाच. भास्कर विचारायचा पंकजदादा चला खेकडे धरु. आम्ही त्याच्यामागे मोठं पातेलं घेऊन. अंधारात टॉर्च मारली की दोनतील खेकडे झोतात पळत यायचे. आपण फक्त उचलून पातेल्यात भरायचे. फक्त एक चमचाभर तेल, मीठ मिरची आणि पाण्यात कालवून ज्वारीचं पीठ एवढ्याच सामग्रीवर काय कालवण बनवायचा भास्कर. अजून जिभेवर चव रेंगाळते आहे. खाण्याची अक्कल फक्त मलाच. बाकी लोक फक्त रस्सा आणि अर्धी-चतकोर भाकरी खाऊन बाजूला व्हायचे आणि मी मात्र दोनेक तास मैफिल लावायचो. बळद लहान असल्याने झोपायला जागा न मिळाल्याने बाकीच्यांची चिडचिड. झोपल्यावर रात्री केव्हातरी कडकड आवाज आला की समजून घ्यायचे गुहेबाहेर कवच फोडायला कोल्हे-लांडगे आलेत. http://www.pankajz.com/2014/07/blog-post_3667.html

टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 07/14/2016 - 16:04
खेकडे जिवंत असताना तळतात,उकडतात ,शिजवतात हे मला आवडत नाही ,यासाठी जागुतैचा उपाय आणखी पुढे नेतो,खेकडे आणल्यावर आधी ते फ्रिजरच्या आईस कंपार्टमेंटमध्ये तासभर ठेवावेत ,ते मरुन जातात ,मग त्यांना शिजवावे.

पूर्वाविवेक गुरुवार, 07/14/2016 - 16:08
मस्त ग जागु, एवढे फोटो काढायचे म्हणजे भारी सयंमचाच काम आणि सजवून फोटो काढेपर्यत धीर कुणाला. रस्श्याच्या घमघमाटाने पोटात कावळ्यांची फौज जमा होते. आमच्याकडे पण असच करतात. पण चिंचेचा कोळ नाही वापरत. मी ते भरायचं पीठ अंमळ जास्तच करते. त्याचे गोळे रश्श्यात सोडते. लेकीला ते गोळे फार आवडतात.

जागु Mon, 07/18/2016 - 11:54
अरे धागा वर आला. (हाहा) धन्यवाद. भटकंती अनलिमिटेड मस्त वाटल वाचून. असे अनुभव भारीच असतात. पूर्वा मी पण पूर्वी नाही चिंचेचा कोळ टाकायचे. पण सासू म्हणते चिंचेच्या कोळाने वईस वास जातो. तेव्हापासून टाकते.
पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ. खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.

मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांची माहिती हवी (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स)

माहितगार ·

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 23:12
पण या विषयावर धाग्याच्या स्वरूपात माहिती मिळणे जरा अवघड दिसते. त्यापेक्षा तुम्ही त्या त्या संस्थळाच्या चालक्/मालक यांना थेट व्यनि कराल तर जास्त माहिती मिळू शकेल. मायबोली, मिपा याबद्दल तुम्ही लिहिलंत, तसेच मीमराठीचे राज जैन, ऐसी अक्षरेचे चालक मंडळ (मुक्तसुनीत, राजेश घासकडवी, ३-१४ विक्षिप्त अदिती, याशिवाय इतर कोणी असल्यास माहिती नाही) याशिवाय मनोगत आहे, उपक्रम आहे. उपक्रमचेच आणखी एक लहान संस्थळ आहे, त्याचे नाव आठवत नाही. मिपाचे पुस्तकविश्व आहे. आणखीही बरीच संस्थळे असावीत.

In reply to by पैसा

माहितगार Fri, 08/01/2014 - 08:41
त्यापेक्षा तुम्ही त्या त्या संस्थळाच्या चालक्/मालक यांना थेट व्यनि कराल तर जास्त माहिती मिळू शकेल.
हम्म तसेच काहिसे करावे लागेल असे वाटते. एखादी प्रश्नावली बनवून पाठवावी लागेल असे दिसते. अर्थात या सर्व संकेतस्थळांचे सदस्यत्वे घेणे मग व्यनी पाठवणे एक वेगळा प्रकल्पच होतो. एका पक्षा अधिक संकेतस्थळांचे सदस्य असलेल्या मंडळींनी एकेका संकेतस्थळाबद्दलची माहिती पाठवली असती तर काम जरा हलके झाले असते. पण तसे झाले नाही तेव्हा आपण म्हणता तोच मार्ग योग्य दिसतो हे खरे. प्रतिसादासाठी धन्यवाद

पैसा गुरुवार, 07/31/2014 - 23:12
पण या विषयावर धाग्याच्या स्वरूपात माहिती मिळणे जरा अवघड दिसते. त्यापेक्षा तुम्ही त्या त्या संस्थळाच्या चालक्/मालक यांना थेट व्यनि कराल तर जास्त माहिती मिळू शकेल. मायबोली, मिपा याबद्दल तुम्ही लिहिलंत, तसेच मीमराठीचे राज जैन, ऐसी अक्षरेचे चालक मंडळ (मुक्तसुनीत, राजेश घासकडवी, ३-१४ विक्षिप्त अदिती, याशिवाय इतर कोणी असल्यास माहिती नाही) याशिवाय मनोगत आहे, उपक्रम आहे. उपक्रमचेच आणखी एक लहान संस्थळ आहे, त्याचे नाव आठवत नाही. मिपाचे पुस्तकविश्व आहे. आणखीही बरीच संस्थळे असावीत.

In reply to by पैसा

माहितगार Fri, 08/01/2014 - 08:41
त्यापेक्षा तुम्ही त्या त्या संस्थळाच्या चालक्/मालक यांना थेट व्यनि कराल तर जास्त माहिती मिळू शकेल.
हम्म तसेच काहिसे करावे लागेल असे वाटते. एखादी प्रश्नावली बनवून पाठवावी लागेल असे दिसते. अर्थात या सर्व संकेतस्थळांचे सदस्यत्वे घेणे मग व्यनी पाठवणे एक वेगळा प्रकल्पच होतो. एका पक्षा अधिक संकेतस्थळांचे सदस्य असलेल्या मंडळींनी एकेका संकेतस्थळाबद्दलची माहिती पाठवली असती तर काम जरा हलके झाले असते. पण तसे झाले नाही तेव्हा आपण म्हणता तोच मार्ग योग्य दिसतो हे खरे. प्रतिसादासाठी धन्यवाद
मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोलीच्या स्थापनेला जवळपास १८ वर्षे होत आली आहेत. मराठी संस्थळांना तंत्रज्ञान, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यामध्ये मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांनी (वेब आर्कीटेक्ट्स/ डिझायनर्स /डेव्हेलपर्स) महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे. उल्लेखनीय मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांबद्दल आणि मराठी संकेतस्थळे विकासात कार्यरत व्यावसायिक आस्थापनांबद्दल माहिती हवी आहे.

चव

भृशुंडी ·

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:12
गुड वन. :) पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.

In reply to by कवितानागेश

भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 23:18
@नाव -पटलं! पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही. आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:00
"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:12
गुड वन. :) पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.

In reply to by कवितानागेश

भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 23:18
@नाव -पटलं! पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही. आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:00
"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.
लेखनविषय:
काव्यरस
सोडी केशसंभार विखुरला स्तनांवर दृश्य वेड लावी मला नग्न सावळ्या रूपाचे हात वेढले उराशी त्याचे होता युग्मपाश बोटे आतुर धावती तप्त देठांपाशी खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार चिंब ओल्या पाकळ्यांत होती जिव्हेचेच दंश माझ्या ओठांवर चव तुझ्या अमृताची

कहां गये वो लोग?--नाथा

राजेंद्र मेहेंदळे ·

चित्रगुप्त गुरुवार, 07/03/2014 - 17:43
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची
आणि
अँटेना बसवायचा आहे...
हे दोन्ही एकाच काळातील आहे काय ? बाकी लेख झकास.

In reply to by चित्रगुप्त

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/03/2014 - 18:34
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती..आणि बेल बसवली हे एका काळातील आहे. अँटेना नंतर आले आणि लोक टीव्हीला खिळुन एकमेकांकडे जायचे बंद झाले

In reply to by नित्य नुतन

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:05
थोडेसे प्रतिसाद इतर धाग्यांवरही वाटा की. सगळे इथेच टाकून दिलेन. ;-)

चित्रगुप्त गुरुवार, 07/03/2014 - 17:43
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची
आणि
अँटेना बसवायचा आहे...
हे दोन्ही एकाच काळातील आहे काय ? बाकी लेख झकास.

In reply to by चित्रगुप्त

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/03/2014 - 18:34
दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती..आणि बेल बसवली हे एका काळातील आहे. अँटेना नंतर आले आणि लोक टीव्हीला खिळुन एकमेकांकडे जायचे बंद झाले

In reply to by नित्य नुतन

एस गुरुवार, 07/03/2014 - 23:05
थोडेसे प्रतिसाद इतर धाग्यांवरही वाटा की. सगळे इथेच टाकून दिलेन. ;-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई आमचं ६-७ खोल्यांचं जुनं तिपाखी कौलारु घर होतं.दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि आम्ही पोरेटोरे दुपारी कुणाही एकाच्या घरी किंवा संध्याकाळी कुणाच्याही वाड्यात खेळत पडीक असायचो.आमचे घर मोठे असल्याने त्यातल्यात्यात आमच्याकडेच दुपारचा अड्डा असे.एकदा असेच एका कुठल्यातरी खोलीत पत्ते वगैरे खेळत असताना घरात चोरी झाली आणि चोराने

पाऊस आलाय...

माधुरी विनायक ·

एस गुरुवार, 07/03/2014 - 17:14
क्या बात है! पाऊस आला हे मिपावर कविता येऊ लागल्या की कळतं. :-) बाकी कविता मस्त.

निखळानंद गुरुवार, 07/03/2014 - 17:37
फक्त त्याला जास्त वेळ थांबवून ठेवू नका.. कंटाळून निघून गेला तर पंचाईत व्हायची ! आधीच त्याने फार वेळ तिष्ठत ठेवलं होतं.. तेंव्हाच तुमची तयारी करून घ्यायची होतीत ना ! असो. आता प्रत्यक्ष भिजाल त्या वेड्या संगे तेंव्हा तुम्हाला लागलेल्या वेडा बद्दलही लिहा..

एस गुरुवार, 07/03/2014 - 17:14
क्या बात है! पाऊस आला हे मिपावर कविता येऊ लागल्या की कळतं. :-) बाकी कविता मस्त.

निखळानंद गुरुवार, 07/03/2014 - 17:37
फक्त त्याला जास्त वेळ थांबवून ठेवू नका.. कंटाळून निघून गेला तर पंचाईत व्हायची ! आधीच त्याने फार वेळ तिष्ठत ठेवलं होतं.. तेंव्हाच तुमची तयारी करून घ्यायची होतीत ना ! असो. आता प्रत्यक्ष भिजाल त्या वेड्या संगे तेंव्हा तुम्हाला लागलेल्या वेडा बद्दलही लिहा..
लेखनविषय:
पाऊस आलाय सालाबादप्रमाणे वेड्या आठवणी जागवायला पुन्हा-पुन्हा मला लावतोय माझ्याच मनावर रागवायला वेडा पाऊस, वेडा... वेडावणारा पाऊस वेडा वेड लावतोय, वेडावतोय कृष्णमेघांच्या सावलीमागून आतुर होऊन बोलावतोय भिजायला... हो...भिजायचंय मलाही... पण थोडं थांबावं लागेल... हल्ली असंच करावं लागतं मनात आलं, तसं वागलं, मोकळं झालं, असं होतंच नाही... थांबावंच लागतं आणि मनालाही थांबवावं लागतं पण येणार मी, नक्की... मलाही भिजायचंय ना...

कृतार्थ !..... एक भयकथा !

मृणालिनी ·

एस गुरुवार, 07/03/2014 - 16:55
प्रवाही आहे. पण भय किंवा रहस्य असे फारसे वाटले नाही. रुचिताला विनय दिसतो तेव्हाच पुढे काय होणार याचा अंदाज येतो. पुलेशु.

In reply to by बॅटमॅन

रामपुरी गुरुवार, 07/03/2014 - 20:02
मला वाटलं होतं आता स्कूटी आणि बाईकची टक्कर होऊन बाईक नदीत पडणार. म्हणून वर जाऊन परत एकदा लेखकाचं नाव बघितलं. पण नशिब चांगलं (बाईक वाल्याचं) म्हणून तसं काही झालं नाही =))

In reply to by विजुभाऊ

भिकापाटील Sat, 07/05/2014 - 11:46
मला वाटले की या कथेत सुद्धा लुना .सायकल किंवा स्कूटीची टक्कर होऊन जीप / ट्रक नदीत पडेल.. =)) =)) =)) बेक्कार हसतोय.... अवांतर : भयकथा वाचून स्पा काकांची आठवण झाली. ;)

मृणालिनी गुरुवार, 07/03/2014 - 17:37
कथा वाचून सर्वांनी प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनपासून धन्यवाद ! खरंच, हि भयकथा नाही. हि 'भूतकथा' आहे. पण हेडिंग बदलता येत नाहीये.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 18:42
विनयच्या भेटीपासून कथा आपल्या मनांत आकार घेऊ लागते नंतर फक्त शब्दांच्या दगडांवर पाय ठेवत पुढे पुढे जात राहायचं. भय कथा नाही, रहस्य कथा नाही, उत्कंठावर्धकही नाही. शब्दरचना चांगली आहे. प्रयत्न चांगला आहे असे म्हणावयास हरकत नाही. पुढील कथांसाठी शुभेच्छा..!

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 23:08
१)रुचिताने ठामपणे निर्णय घेतल्यानंतर होणारे मनोवैज्ञानिक बदल छान दाखविले आहेत. २)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात! कथा आवडली. पुढिल कथांसाठी शुभेच्छा.

एस Fri, 07/04/2014 - 10:14
२)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात!
नाही, कस्सं काय जमतं हो तुम्हांला?

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:41
रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी एकटी चालत जाते आणि त्यात सुद्धा घाइनी घरी जाण्यापेक्षा आधी चहा पीत थांबते हे ह्या गोष्टीला हास्यास्पद बनवते. मोबाइल च्या जमान्यात ती कोणाला बोलवुन न घेता एकटी रात्री चालत निघते हे पण हास्यास्पद. तो विनय भेटल्यावर पण ती त्याला घरापर्यंत सोबत कर असे सांगत नाही हे ही हास्यास्पद. काय लिहले आहे तुम्ही मधुरा ताई. आधी एखाद्या ७ वर्षाच्या मुलाकडुन मत तरी घ्यायचे ना.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 11:18
ऋषिकेश, आयुर्हित, मनापासून धन्यवाद! प्रसाद, कथा नीट वाचलीत का? १.मोबाईल तिच्या जवळ नव्हता, हे पहिल्या काही ओळींतच स्पष्ट केलं आहे. २.चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण, यात मला तरी कुठे हास्यास्पद बाब आढळून येत नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, तसं बघायला गेल, तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. किव्हा या कथेत तशी तिला त्याच्या मदतीची गरज वाटली नसावी. बाकी ७ वर्षाच्या मुलाकडून मत घेण्याची मला गरज नाही... तुम्ही मात्र इतर कशावर काही मत देताना, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन नक्की घ्या. कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by मृणालिनी

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 12:17
एखाद्या घरात मदत मागायला जावं तर फटकन कोणीतरी अपमान करायची भिती.... “तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे, कि आत्ता ११ वाजलेत. आणि तेही रात्रीचे...आणि जनरली रात्री सगळे झोपलेले असतात. म्हणजे निदान आम्ही तरी झोपतो.. ह? तर तुम्हाला जे काय काम असेल ते उद्या...सकाळी ९ नंतर.” आणि वर तोंडावर दार लाऊन घेतात. आजकाल कोणीही मदत करत नाही स्वार्थ असल्याशिवाय... >>>>>>>> तुम्हीच लिहीले आहे की ती मदत शोधत होती म्हणुन. मोबाईल नव्हता बरोबर असे कधी असते का? रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.

In reply to by प्रसाद१९७१

असंका Fri, 07/04/2014 - 16:44
रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.
साधी मुलगी आहे का ती? नुकताच तिने एका माणसाचा जीव घेतलेला आहे! तिला-
जरा वाफाळलेला चहा घेऊ
असं वाटलं तर काय चुकलं? कायपण शंका काढताय! हे जे आजुबाजुला काय चाललंय अशी भीती घालायची ती सामान्य मुलींना.....यांच्यासारख्या (एका धक्क्यात बंद पडणार्‍या स्कुटीवरून) "हिट अँड रन" करू शकणार्‍यांना नाही!

In reply to by मृणालिनी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 13:19
मधुरा पहिला मुद्दा मान्य आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्याच्या स्पष्टीकरणा बद्दल जरा असहमती आहे. दुसरा मुद्दा >>>>चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण,...('वाटण' हा शब्द मसाल्याचे 'वाटण' ह्या अर्थाचा आहे. तो 'वाटणं' किंवा 'वाटणे' असा पाहिजे.) कथेतील >>>>सगळा आहे-नाही तो धीर एकवटून ती तुटकी चप्पल रेटत-रेटत अंतर कमी करत होती. ह्या वाक्यानुसार ती भयंकर घाबरलेली होती. कुठल्याही घाबरलेल्या व्यक्तीची नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भिती पासून दूर जाणे ही असते. अशा अत्यंतिक भितीच्या प्रसंगी कधी तहान-भूकेची जाणीव होत नाही तर, संकटाशी सामना करण्याच्या नैसर्गिक गरजेतून शरीर थकत नाही, त्याला अतिरिक्त बळ प्राप्त होतं. ती अगदी ८-१० किलोमिटर धावली असेल तर सांगता येत नाही, कोलमडून पडू शकते. पण चहा प्यायला जाणार नाही. निदानपक्षी, 'आपल्या हातून अपघात होऊन एक व्यक्ती पुलावरून खाली पडली आहे, आणि मृत्यू पावली असण्याची शक्यता पाहता कोणीही व्यक्ती आधी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचाच विचार करेल. तिसरा मुद्दा>>>>तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. कथेतीलच सुत्र धरून सांगायचे झाले तर (विनय.....रुचिताचा मित्र.) विनय हा रुचिताचा मित्र असतो. 'कोणीही' अनोळखी नसतो. उलट अशा प्रसंगी जुना मित्र देवासारखा भेटल्यामुळे तिला आधार वाटायला हवा आणि तिने त्याला तिच्या घरापर्यंत साथ देण्याची विनंती करायला पाहिजे होती. असो. ह्या चुका मलाही जाणवल्या परंतु, तितक्या गंभीर वाटल्या नाहीत. कथालेखनात लेखिकेने घेतलेले स्वातंत्र्य म्हणून मी तिथे दुर्लक्ष केलं. पण तुमचा वरील प्रतिसाद पाहिल्यावर ह्या मुद्द्यांवर चर्चा करावी असे वाटून हा प्रतिसाद टाकला आहे.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 12:28
प्रसाद, तिला ज्या मदतीची गरज होती, ती गरज एका वाहनाची होती. कि एखाद्याने तिला घरी 'गाडीवरून' सोडावं. विनय कडे त्यावेळी गाडी नव्हती. आणि त्याच्याकडे मदत मागायला तिला संकोच देखील वाटत असू शकतो न ! मोबाईल एखादे दिवशी माणूस घरी विसरू शकतो हि बाब तुम्हाला मान्य नसेल, पण अनेकदा आपण काही वस्तू विसरून घराबाहेर पडतो, हे तुम्हाला मान्य करावच लागेल. आणि 'घरी न जाता चहा प्यावा' अस का वाटलं तुम्हाला? कथेत ती दमल्यामुळे चहा प्यायला थोडावेळ थांबली होती. त्यानंतर ती घरीच जाणार होती. रस्ता चालायला चहा पिल्यामुळे उर्जा येईल, असं वाटलं असणार तिला. असो, तुम्हाला हि कथा आवडलेली नाही, हे कळले. त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊन, काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम !

मराठी कथालेखक Fri, 07/04/2014 - 13:35
मधूराजी तुम्ही छान प्रयत्न केला आहे. पण काही गोष्टी सूचवाव्याशा वाटतात. १) गूढाची उकल हाच शेवट हवा होता असे मला वाटते. म्हणजे वृत्तपत्रात रुचिताने विनयचा फोटो पाहिल्यावर कथा संपायला हवी. फारतर एका ओळीत रेश्माला भेटण्यासाठी रुचिता निघाली वगैरे...कारण गूढ उकलल्यावर पुढे कथा वाचाण्यात रस उरत नाही. २) "तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे..." हा काल्पनिक (आणि पुणेरी/खवचट ई) संवाद विनोदनिर्मितीसाठी चांगला आहे. पण गूढकथा, ते ही लघूकथेत विनोदनिर्मिती टाळलेलीच बरी असे माझे मत आहे. ३) बाकी वर इतरांनी म्हंटल्याप्रमाणे "....." खूप आहेत. तसेच रात्री एकट्या मुलीचे ओसाड ठिकाणी चहा प्यायला थांबणे , अशा ठिकाणी रात्री अकरा वाजता टपरी उघडी असणे (टपरीवाला ती बंद करत होता तरी इतक्या उशीरा ?) हे पटत नाही. ४)रुचिता विनयचा अंतिमसंस्कार परस्परच करुन टाकते हे पटत नाही, पण अर्थात आधी म्हंटल्याप्रमाणे गूढ उकलल्यानंतरचा सर्वच भाग अनावश्यक वाटतो. पुढिल लेखनास शुभेच्छा असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की पुन्हा एकदा अजून विचार करुन ह्याच कथेचे पुनर्लेखन करायचा प्रयत्न करा. कथा पुन्हा पुन्हा वाचून बघा, तुमच्या पुर्ण पसंतीस उतरली की पोस्ट करा. तुमच्या कथेच्या तुम्हीच पहिल्या वाचक, आस्वादक आणि टिकाकार असाव्यात. काही कमी जास्त लिहिले गेले असेल तस क्षमस्व.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 16:50
भयकथा वा गूढकथेचा फील जास्त आला नाही पण लिखाणशैली प्रवाही असल्याने वाचली गेली. अर्थात त्यातही बरेचदा जास्तीची टिंबे खटकली. लिहित राहाल तसे लिखाणात आणखी सुधारणा होत राहील, पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ! अवांतर - वर प्रतिसादांत "रात्री ११ वाजता एखादी मुलगी चहा प्यायला थांबणार नाही" अशी काही लोकांनी जी शंका काढली आहे त्याच्याशी सहमत. किंवा ते विश्वासार्ह वाटण्यासाठी त्या नायिकेची इमेज तशीच डॅशिंग उभारायला हवी होती जे तुम्ही नेमके उलट केले आहे. तरीही वाचण्याच्या ओघात माझ्या तरी ते लक्षात आले नाही हे ही नमूद करू इच्छितो. असो, या सूचना आणि सल्ले सकारात्मक घेतल्यास पुढील कथेत फायदाच होईल :)

In reply to by धन्या

प्रभाकर पेठकर Sun, 07/06/2014 - 20:08
मिपा सदस्य चोखंदळ आहेत. काहीही खपवून घेत नाहीत. तसेच, ह्या चिरफाडीचा फायदा लेककाला/लेखिकेला आपल्या लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते (निदान, मी तरी असे मानतो) आणि मिपावर ते अधिक कसदार लेखन करू शकतात.

भिंगरी Sun, 07/06/2014 - 19:40
बापले! मला तल एव्ल्यांचे पतीशाद वाचून घाब्र्याच वातली. गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रलेच मी. मी कायतली लिवायचं म्हनत होते. मिपावाले ,मला शान्भालून घ्याल?

शीर्षकातून भयकथा हे सांगण्याची गरज नव्हती त्यामुळे त वरून ताकभात ओळखणाऱ्या मिपाकरांना कथेचा आगाऊ अंदाज आला, नुसते कृतार्थ शीर्षक हे माहेर , वाहिनी सारख्या मासिकांमध्ये सहज शोभून दिसणारे तेव्हा त्या अनुषंगाने वाचकांनी कथा वाचण्यास घेतली असती तर शेवटी त्यांना सुखद धक्का बसला असता असे मला वाटते. हि मला भयकथा न वाटता गूढकथा वाटली.

एस गुरुवार, 07/03/2014 - 16:55
प्रवाही आहे. पण भय किंवा रहस्य असे फारसे वाटले नाही. रुचिताला विनय दिसतो तेव्हाच पुढे काय होणार याचा अंदाज येतो. पुलेशु.

In reply to by बॅटमॅन

रामपुरी गुरुवार, 07/03/2014 - 20:02
मला वाटलं होतं आता स्कूटी आणि बाईकची टक्कर होऊन बाईक नदीत पडणार. म्हणून वर जाऊन परत एकदा लेखकाचं नाव बघितलं. पण नशिब चांगलं (बाईक वाल्याचं) म्हणून तसं काही झालं नाही =))

In reply to by विजुभाऊ

भिकापाटील Sat, 07/05/2014 - 11:46
मला वाटले की या कथेत सुद्धा लुना .सायकल किंवा स्कूटीची टक्कर होऊन जीप / ट्रक नदीत पडेल.. =)) =)) =)) बेक्कार हसतोय.... अवांतर : भयकथा वाचून स्पा काकांची आठवण झाली. ;)

मृणालिनी गुरुवार, 07/03/2014 - 17:37
कथा वाचून सर्वांनी प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनपासून धन्यवाद ! खरंच, हि भयकथा नाही. हि 'भूतकथा' आहे. पण हेडिंग बदलता येत नाहीये.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 18:42
विनयच्या भेटीपासून कथा आपल्या मनांत आकार घेऊ लागते नंतर फक्त शब्दांच्या दगडांवर पाय ठेवत पुढे पुढे जात राहायचं. भय कथा नाही, रहस्य कथा नाही, उत्कंठावर्धकही नाही. शब्दरचना चांगली आहे. प्रयत्न चांगला आहे असे म्हणावयास हरकत नाही. पुढील कथांसाठी शुभेच्छा..!

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 23:08
१)रुचिताने ठामपणे निर्णय घेतल्यानंतर होणारे मनोवैज्ञानिक बदल छान दाखविले आहेत. २)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात! कथा आवडली. पुढिल कथांसाठी शुभेच्छा.

एस Fri, 07/04/2014 - 10:14
२)जवळची माणसे अचानक वर गेले असतिल तर कोणत्याही माध्यमाद्वारे असे निरोप्/संकेत येतात!
नाही, कस्सं काय जमतं हो तुम्हांला?

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:41
रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी एकटी चालत जाते आणि त्यात सुद्धा घाइनी घरी जाण्यापेक्षा आधी चहा पीत थांबते हे ह्या गोष्टीला हास्यास्पद बनवते. मोबाइल च्या जमान्यात ती कोणाला बोलवुन न घेता एकटी रात्री चालत निघते हे पण हास्यास्पद. तो विनय भेटल्यावर पण ती त्याला घरापर्यंत सोबत कर असे सांगत नाही हे ही हास्यास्पद. काय लिहले आहे तुम्ही मधुरा ताई. आधी एखाद्या ७ वर्षाच्या मुलाकडुन मत तरी घ्यायचे ना.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 11:18
ऋषिकेश, आयुर्हित, मनापासून धन्यवाद! प्रसाद, कथा नीट वाचलीत का? १.मोबाईल तिच्या जवळ नव्हता, हे पहिल्या काही ओळींतच स्पष्ट केलं आहे. २.चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण, यात मला तरी कुठे हास्यास्पद बाब आढळून येत नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, तसं बघायला गेल, तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. किव्हा या कथेत तशी तिला त्याच्या मदतीची गरज वाटली नसावी. बाकी ७ वर्षाच्या मुलाकडून मत घेण्याची मला गरज नाही... तुम्ही मात्र इतर कशावर काही मत देताना, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन नक्की घ्या. कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by मृणालिनी

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 12:17
एखाद्या घरात मदत मागायला जावं तर फटकन कोणीतरी अपमान करायची भिती.... “तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे, कि आत्ता ११ वाजलेत. आणि तेही रात्रीचे...आणि जनरली रात्री सगळे झोपलेले असतात. म्हणजे निदान आम्ही तरी झोपतो.. ह? तर तुम्हाला जे काय काम असेल ते उद्या...सकाळी ९ नंतर.” आणि वर तोंडावर दार लाऊन घेतात. आजकाल कोणीही मदत करत नाही स्वार्थ असल्याशिवाय... >>>>>>>> तुम्हीच लिहीले आहे की ती मदत शोधत होती म्हणुन. मोबाईल नव्हता बरोबर असे कधी असते का? रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.

In reply to by प्रसाद१९७१

असंका Fri, 07/04/2014 - 16:44
रात्री ११ वाजता सुनसान रस्त्यावर एका मुलीने घरी न जाता चहा प्यावा हे अजिबात पटण्यासारखे नाही. काय चालू आहे आजुबाजुला वाचत नसावी ती.
साधी मुलगी आहे का ती? नुकताच तिने एका माणसाचा जीव घेतलेला आहे! तिला-
जरा वाफाळलेला चहा घेऊ
असं वाटलं तर काय चुकलं? कायपण शंका काढताय! हे जे आजुबाजुला काय चाललंय अशी भीती घालायची ती सामान्य मुलींना.....यांच्यासारख्या (एका धक्क्यात बंद पडणार्‍या स्कुटीवरून) "हिट अँड रन" करू शकणार्‍यांना नाही!

In reply to by मृणालिनी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 13:19
मधुरा पहिला मुद्दा मान्य आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्याच्या स्पष्टीकरणा बद्दल जरा असहमती आहे. दुसरा मुद्दा >>>>चालताना थकल्यामुळे तिला चहा प्यावा वाटण,...('वाटण' हा शब्द मसाल्याचे 'वाटण' ह्या अर्थाचा आहे. तो 'वाटणं' किंवा 'वाटणे' असा पाहिजे.) कथेतील >>>>सगळा आहे-नाही तो धीर एकवटून ती तुटकी चप्पल रेटत-रेटत अंतर कमी करत होती. ह्या वाक्यानुसार ती भयंकर घाबरलेली होती. कुठल्याही घाबरलेल्या व्यक्तीची नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भिती पासून दूर जाणे ही असते. अशा अत्यंतिक भितीच्या प्रसंगी कधी तहान-भूकेची जाणीव होत नाही तर, संकटाशी सामना करण्याच्या नैसर्गिक गरजेतून शरीर थकत नाही, त्याला अतिरिक्त बळ प्राप्त होतं. ती अगदी ८-१० किलोमिटर धावली असेल तर सांगता येत नाही, कोलमडून पडू शकते. पण चहा प्यायला जाणार नाही. निदानपक्षी, 'आपल्या हातून अपघात होऊन एक व्यक्ती पुलावरून खाली पडली आहे, आणि मृत्यू पावली असण्याची शक्यता पाहता कोणीही व्यक्ती आधी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचाच विचार करेल. तिसरा मुद्दा>>>>तर कोणाचीही मदत अशी एकदम मागतली जात नाही. कथेतीलच सुत्र धरून सांगायचे झाले तर (विनय.....रुचिताचा मित्र.) विनय हा रुचिताचा मित्र असतो. 'कोणीही' अनोळखी नसतो. उलट अशा प्रसंगी जुना मित्र देवासारखा भेटल्यामुळे तिला आधार वाटायला हवा आणि तिने त्याला तिच्या घरापर्यंत साथ देण्याची विनंती करायला पाहिजे होती. असो. ह्या चुका मलाही जाणवल्या परंतु, तितक्या गंभीर वाटल्या नाहीत. कथालेखनात लेखिकेने घेतलेले स्वातंत्र्य म्हणून मी तिथे दुर्लक्ष केलं. पण तुमचा वरील प्रतिसाद पाहिल्यावर ह्या मुद्द्यांवर चर्चा करावी असे वाटून हा प्रतिसाद टाकला आहे.

मृणालिनी Fri, 07/04/2014 - 12:28
प्रसाद, तिला ज्या मदतीची गरज होती, ती गरज एका वाहनाची होती. कि एखाद्याने तिला घरी 'गाडीवरून' सोडावं. विनय कडे त्यावेळी गाडी नव्हती. आणि त्याच्याकडे मदत मागायला तिला संकोच देखील वाटत असू शकतो न ! मोबाईल एखादे दिवशी माणूस घरी विसरू शकतो हि बाब तुम्हाला मान्य नसेल, पण अनेकदा आपण काही वस्तू विसरून घराबाहेर पडतो, हे तुम्हाला मान्य करावच लागेल. आणि 'घरी न जाता चहा प्यावा' अस का वाटलं तुम्हाला? कथेत ती दमल्यामुळे चहा प्यायला थोडावेळ थांबली होती. त्यानंतर ती घरीच जाणार होती. रस्ता चालायला चहा पिल्यामुळे उर्जा येईल, असं वाटलं असणार तिला. असो, तुम्हाला हि कथा आवडलेली नाही, हे कळले. त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊन, काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम !

मराठी कथालेखक Fri, 07/04/2014 - 13:35
मधूराजी तुम्ही छान प्रयत्न केला आहे. पण काही गोष्टी सूचवाव्याशा वाटतात. १) गूढाची उकल हाच शेवट हवा होता असे मला वाटते. म्हणजे वृत्तपत्रात रुचिताने विनयचा फोटो पाहिल्यावर कथा संपायला हवी. फारतर एका ओळीत रेश्माला भेटण्यासाठी रुचिता निघाली वगैरे...कारण गूढ उकलल्यावर पुढे कथा वाचाण्यात रस उरत नाही. २) "तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे..." हा काल्पनिक (आणि पुणेरी/खवचट ई) संवाद विनोदनिर्मितीसाठी चांगला आहे. पण गूढकथा, ते ही लघूकथेत विनोदनिर्मिती टाळलेलीच बरी असे माझे मत आहे. ३) बाकी वर इतरांनी म्हंटल्याप्रमाणे "....." खूप आहेत. तसेच रात्री एकट्या मुलीचे ओसाड ठिकाणी चहा प्यायला थांबणे , अशा ठिकाणी रात्री अकरा वाजता टपरी उघडी असणे (टपरीवाला ती बंद करत होता तरी इतक्या उशीरा ?) हे पटत नाही. ४)रुचिता विनयचा अंतिमसंस्कार परस्परच करुन टाकते हे पटत नाही, पण अर्थात आधी म्हंटल्याप्रमाणे गूढ उकलल्यानंतरचा सर्वच भाग अनावश्यक वाटतो. पुढिल लेखनास शुभेच्छा असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की पुन्हा एकदा अजून विचार करुन ह्याच कथेचे पुनर्लेखन करायचा प्रयत्न करा. कथा पुन्हा पुन्हा वाचून बघा, तुमच्या पुर्ण पसंतीस उतरली की पोस्ट करा. तुमच्या कथेच्या तुम्हीच पहिल्या वाचक, आस्वादक आणि टिकाकार असाव्यात. काही कमी जास्त लिहिले गेले असेल तस क्षमस्व.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 16:50
भयकथा वा गूढकथेचा फील जास्त आला नाही पण लिखाणशैली प्रवाही असल्याने वाचली गेली. अर्थात त्यातही बरेचदा जास्तीची टिंबे खटकली. लिहित राहाल तसे लिखाणात आणखी सुधारणा होत राहील, पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ! अवांतर - वर प्रतिसादांत "रात्री ११ वाजता एखादी मुलगी चहा प्यायला थांबणार नाही" अशी काही लोकांनी जी शंका काढली आहे त्याच्याशी सहमत. किंवा ते विश्वासार्ह वाटण्यासाठी त्या नायिकेची इमेज तशीच डॅशिंग उभारायला हवी होती जे तुम्ही नेमके उलट केले आहे. तरीही वाचण्याच्या ओघात माझ्या तरी ते लक्षात आले नाही हे ही नमूद करू इच्छितो. असो, या सूचना आणि सल्ले सकारात्मक घेतल्यास पुढील कथेत फायदाच होईल :)

In reply to by धन्या

प्रभाकर पेठकर Sun, 07/06/2014 - 20:08
मिपा सदस्य चोखंदळ आहेत. काहीही खपवून घेत नाहीत. तसेच, ह्या चिरफाडीचा फायदा लेककाला/लेखिकेला आपल्या लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते (निदान, मी तरी असे मानतो) आणि मिपावर ते अधिक कसदार लेखन करू शकतात.

भिंगरी Sun, 07/06/2014 - 19:40
बापले! मला तल एव्ल्यांचे पतीशाद वाचून घाब्र्याच वातली. गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रलेच मी. मी कायतली लिवायचं म्हनत होते. मिपावाले ,मला शान्भालून घ्याल?

शीर्षकातून भयकथा हे सांगण्याची गरज नव्हती त्यामुळे त वरून ताकभात ओळखणाऱ्या मिपाकरांना कथेचा आगाऊ अंदाज आला, नुसते कृतार्थ शीर्षक हे माहेर , वाहिनी सारख्या मासिकांमध्ये सहज शोभून दिसणारे तेव्हा त्या अनुषंगाने वाचकांनी कथा वाचण्यास घेतली असती तर शेवटी त्यांना सुखद धक्का बसला असता असे मला वाटते. हि मला भयकथा न वाटता गूढकथा वाटली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती. शेजारून एखाद वाहन जाईल, आणि आपण लिफ्ट घेऊन घरी जाऊ ; अस स्वप्नरंजन करत तिने जवळ-जवळ अर्धा रस्ता पायीच पूर्ण केला होता. पण दुर्दैव म्हणजे एकही गाडी या रस्त्यावरून गेली नव्हती. खरेतर, इतक्या रात्री अश्या या आड रस्त्यावरून कोण कशाला प्रवास करेल ?

माउलींच्या पालखी सोबत एक दिवस :- भाग २

ज्ञानोबाचे पैजार ·

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:53
तुझ्याबरोबर आमचीहि ई-वारी झाली त्याबद्दल थँक्यु. फोटो नेहमीप्रमाणेच सोज्वळ (कारण काहि प्रोसेसींग न करता जसे काढलेस तसेच डकवलेस).

मैत्र गुरुवार, 07/03/2014 - 12:08
माउली .. तुमचे आभार कसे मानावेत. तुमच्याबरोबर आम्हीही इ-वारी केली पुण्यापर्यंत. इंद्रायणी ते मुळा मुठे पर्यंत.. मी सश्रद्ध नाही पण हा वारीचा भोळा निष्काम भक्तिभाव आदर निर्माण करतो.

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 12:41
हा भाग जास्त आवडला. प्लॅस्टिकचा वापर कसा टाळ्ता/कमी करता येईल? यावर विचार आवश्यक आहे. पुणेकरांचे भाग्यच अपार की असा "निष्काम कर्मयोग" प्रत्येक वर्षी करण्याचे नशिबात आहे. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा | गाईन केशवा नाम तुझे || पांडुरंग पांडुरंग

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/03/2014 - 15:39
फोटो दिसत नाहीयेत :( ऑफीसात हे पेज ब्लॉक असावे बहुधा *cray2* असो . बाकी ...
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||
हा अनुभव अनुर्वाच्च असतो .... शब्दच नाहीत !!

भाते गुरुवार, 07/03/2014 - 20:09
दोन्ही धागे आवडले. आत्तापर्यंत कधी पालखीला जायला जमले नाही. पण तुमच्या या सचित्र माहितीमुळे तसे नक्कीच जाणवले.

अनन्या वर्तक गुरुवार, 07/03/2014 - 22:14
माउलींच्या पालखी सोबत हे दोन्ही भाग आवडले. वाचताना सतत वाटत होते मला कधीतरी मिळेल का वारी बरोबर चालण्याची संधी? इतक्या निस्वार्थी मानाने माउलींच्या नामस्मरणात स्वतःला विसरून फक्त त्या पांडुरंगाच्या ओढीने चालत राहावयाचे. एक वेगळाच अनुभव असेल नाही का?

In reply to by खटपट्या

कल्पना चांगली आहे. आळंदी पुणे किंवा पुणे सासवड हा टप्पा तर नक्कीच करता येईल. त्या टप्यांच्या यशापयशा नंतर दिंडीची कल्पना पुढे नेता येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या वर्षी १० जुलै २०१५ रोजी माउलींची पालखी पुण्यामधे येणार आहे. पालखीच्या स्वागता साठी मी सकाळी आठ वाजल्यापासून आळंदी रोडवरील भोसरी फाट्यावर असेन . पालखी आली की माउलींच्या सोबतीने (चालत) पुण्यापर्यंत येणार आहे. माझ्या ऑफिसमधले तीनचार सहकारी देखील माझ्या बरोबर यायचा विचार करत आहेत आहेत. सर्व मिपा करांना सस्नेह निमंत्रण..... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्रिवेणी Fri, 07/03/2015 - 11:21
त्याच area त राहत असल्याने सकाळ पासून च पालखी ची लगबग बघवयस मिळते.अगदी ते लोक चुल मांडून स्वयंपाक करतात ती तर खिड़कित बसून बघने आवडते मला.

त्रिवेणी Fri, 07/04/2014 - 11:45
नक्की करूया आपण मिपा दिंडी फोटो क्रमांक 37 मध्ये आमची सोसायटी दिसते आहे, ट्रीडम पार्क(पिवळा आणि हिरव्या रंगाची एक पट्टी दिसते आहे ती फेंट पिवळ्या कलरची बिल्डिंग) समस्त मिपाकरांना आताच निमंत्रण देते पुढच्या वर्षीच्या दिंडीसाठी.

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:53
तुझ्याबरोबर आमचीहि ई-वारी झाली त्याबद्दल थँक्यु. फोटो नेहमीप्रमाणेच सोज्वळ (कारण काहि प्रोसेसींग न करता जसे काढलेस तसेच डकवलेस).

मैत्र गुरुवार, 07/03/2014 - 12:08
माउली .. तुमचे आभार कसे मानावेत. तुमच्याबरोबर आम्हीही इ-वारी केली पुण्यापर्यंत. इंद्रायणी ते मुळा मुठे पर्यंत.. मी सश्रद्ध नाही पण हा वारीचा भोळा निष्काम भक्तिभाव आदर निर्माण करतो.

आयुर्हित गुरुवार, 07/03/2014 - 12:41
हा भाग जास्त आवडला. प्लॅस्टिकचा वापर कसा टाळ्ता/कमी करता येईल? यावर विचार आवश्यक आहे. पुणेकरांचे भाग्यच अपार की असा "निष्काम कर्मयोग" प्रत्येक वर्षी करण्याचे नशिबात आहे. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा | गाईन केशवा नाम तुझे || पांडुरंग पांडुरंग

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/03/2014 - 15:39
फोटो दिसत नाहीयेत :( ऑफीसात हे पेज ब्लॉक असावे बहुधा *cray2* असो . बाकी ...
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||
हा अनुभव अनुर्वाच्च असतो .... शब्दच नाहीत !!

भाते गुरुवार, 07/03/2014 - 20:09
दोन्ही धागे आवडले. आत्तापर्यंत कधी पालखीला जायला जमले नाही. पण तुमच्या या सचित्र माहितीमुळे तसे नक्कीच जाणवले.

अनन्या वर्तक गुरुवार, 07/03/2014 - 22:14
माउलींच्या पालखी सोबत हे दोन्ही भाग आवडले. वाचताना सतत वाटत होते मला कधीतरी मिळेल का वारी बरोबर चालण्याची संधी? इतक्या निस्वार्थी मानाने माउलींच्या नामस्मरणात स्वतःला विसरून फक्त त्या पांडुरंगाच्या ओढीने चालत राहावयाचे. एक वेगळाच अनुभव असेल नाही का?

In reply to by खटपट्या

कल्पना चांगली आहे. आळंदी पुणे किंवा पुणे सासवड हा टप्पा तर नक्कीच करता येईल. त्या टप्यांच्या यशापयशा नंतर दिंडीची कल्पना पुढे नेता येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या वर्षी १० जुलै २०१५ रोजी माउलींची पालखी पुण्यामधे येणार आहे. पालखीच्या स्वागता साठी मी सकाळी आठ वाजल्यापासून आळंदी रोडवरील भोसरी फाट्यावर असेन . पालखी आली की माउलींच्या सोबतीने (चालत) पुण्यापर्यंत येणार आहे. माझ्या ऑफिसमधले तीनचार सहकारी देखील माझ्या बरोबर यायचा विचार करत आहेत आहेत. सर्व मिपा करांना सस्नेह निमंत्रण..... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्रिवेणी Fri, 07/03/2015 - 11:21
त्याच area त राहत असल्याने सकाळ पासून च पालखी ची लगबग बघवयस मिळते.अगदी ते लोक चुल मांडून स्वयंपाक करतात ती तर खिड़कित बसून बघने आवडते मला.

त्रिवेणी Fri, 07/04/2014 - 11:45
नक्की करूया आपण मिपा दिंडी फोटो क्रमांक 37 मध्ये आमची सोसायटी दिसते आहे, ट्रीडम पार्क(पिवळा आणि हिरव्या रंगाची एक पट्टी दिसते आहे ती फेंट पिवळ्या कलरची बिल्डिंग) समस्त मिपाकरांना आताच निमंत्रण देते पुढच्या वर्षीच्या दिंडीसाठी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी|| मोक्षरेखे आला भाग्ये विनाटला| साधूंचा अंकीला हरिभक्त|| ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी| हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी|| फोटो क्र. ३१ फोटो क्र. ३१ या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.

मनमोहक बाली : ०७ : तळ्यातले मंदिर (उलुन दानू ब्रतान), राजमंदिर (तमान आयुन) आणि समुद्रातले मंदिर (ताना लोत)

डॉ सुहास म्हात्रे ·

खटपट्या Wed, 07/02/2014 - 22:20
सर्व फोटो जबरदस्त !! एकदम स्वप्नवत आहे सगळे. बऱ्यापैकी स्वच्छता देखील दिसतेय. सुंदर बागांमुळे अजुनच गारेगार वाटत असेल. नक्कीच फेरी मारली पाहिजे. वाचतोय

खासच. ते समुद्रातले मंदिर आणि अकरा मजल्यांची पेलिंग्गी विशेष आवडले. जपान मधल्या मंदिरांची आठवण झाली.

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 22:53
सर्व फोटो केवळ अद्भुत! अप्रतिम!! निसर्गरम्य!!! अवांतरः बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी पाहून माऊंट मेरु चे २००० वर्षापुर्वीचे एक चित्र जे हुबेहुब पार्टिकल अ‍ॅक्सलरेटरचे ब्लु प्रिंट सारखेच असल्याचे आठवले. Mount Meru पार्टिकल अ‍ॅक्सलरेटर

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:03
सुरक्षेच्या कारणाबद्दल वादच नाही. पण, अश्या काही अनवट जागांना कमीत कमी हात लावून यायला मिळावे अशी माझी नेहमीची उत्कट इच्छा असते !

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 00:34
.................................. बालीला जाणार म्ह. जाणारच!! लय झाला फटूंचा अत्याचार!!

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:09
विलासराव, मधुरा देशपांडे, चित्रगुप्त, मन्द्या आणि यशोधरा : धन्यवाद ! @ समुद्रातले मंदिर (पुरा ताना लोत) : हे मंदिर तर कायमचे मनात घर करून बसले आहे !

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:58
काय साला निसर्ग आहे. अगदि नतमस्तक. तो "सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्ग" चा फोटो तर फारच आवडलाय. विशेषत त्याच्या मागे असणारे डोंगर आणि त्यावर दाटलेले धुके. खरचं अश्या जागी किती निवांत वाटत असेल नाहि?? गोंधळ, कोलाहल, गजबटापासुन दुर....

मनुराणी गुरुवार, 07/03/2014 - 12:16
तनाह लॉट ला आम्ही गेलो होतो तेवा मंदिराजवळ एवढे पाणी नव्हते आणि मंदिरापर्यंत जाता येत होते. खाली एक छोटा गाभारा होता तिथे नमस्कार केल्यावर तिथे उगम असणारे गोडे पाणी प्रसाद म्हणून देत होते न कानाला एक फुल अडकवले होते. आमचा सूर्यास्त थोडक्यात हुकला होता कारण त्या वळणावळणाच्या रस्त्याने तिथे पोहोचेपर्यंत मी उलट्या करून हैराण झाले होते. इथे बाहेर खूप छान मार्केट आहे. स्वस्त आणि मस्त. बाली मध्ये बार्गेनिंगची हौस मस्त फिटते.

In reply to by मनुराणी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 13:48
नशीबवान आहात ! तुम्ही देलात तेव्हा मोठी ओहोटी असणार. आम्ही गेलो होतो तेव्हा समुद्र इतका खवळलेला होता की त्या बेटाला बोट लावणे केवळ अशक्य होते. तो तिथपर्यंत जाणारा रस्ताही भन्नाट आहे (अर्थात गाडी लागत नसली तर) !

प्यारे१ गुरुवार, 07/03/2014 - 12:52
ठरलं तर मग! जाणार, आम्ही बालीला जाणार.... -(रिमा लागू स्टाईल, म्हागुरुंच्या 'नवरा माझा नवसाचा' मधे)

शिद गुरुवार, 07/03/2014 - 17:44
कोरी अगुंग मस्तच दिसतेय. बालीचे निसर्ग सौंदर्य फोटोंमध्ये पाहून डोळ्याचे पारणे फिटलं; प्रत्यक्ष पाहताना काय होईल कुणास ठाऊक. ह्या भागात दिलेले सगळेच फोटो एक सो एक आले आहेत.

रेवती Sat, 07/05/2014 - 03:51
आता शब्द संपले हो! नेहमीप्रमाणेच छान, सुंदर असे म्हणते. तेथील स्थानिक लोक काही फार धनवंत प्रकारातील दिसत नाहीत. सगळे खाउन पिऊन सुखी वाटतायत पण त्यामानाने जत्रा सोडता फार कचरा कुठे दिसत नाहीये. ते तसेच आहे की खरे चित्र वेगळे आहे?

In reply to by रेवती

बाली (आणि इंडोनेशिया देश) विकसनशील प्रकारात मोडते... म्हणजे गरीबच. पण स्वच्छतेबाबत शहर-गावात लोक जागरूक दिसले. देवळांमध्ये देवाला प्रसाद-फुले वाहण्याच्या जागा सोडल्या तर सगळीकडे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा होता. पण तरीही तेथेही फुले वगैरे ताजी दिसत होती... आदल्या दिवशीची, कुजू लागलेलेली अशी नव्हती. म्हणजे तेथेही दिवसातून एकदा तरी नीट सफाई होत असणार. मुख्य म्हणजे, भिकारी अथवा अस्वच्छ, फाटके कपडे घातलेली मुले-माणसे देवळांशेजारी अथवा इतर ठिकाणी अजिबात दिसली नाहीत... हा पैश्यापेक्षा जास्त जाणीवेचा परिणाम असावा असे मला वाटते.

खटपट्या Wed, 07/02/2014 - 22:20
सर्व फोटो जबरदस्त !! एकदम स्वप्नवत आहे सगळे. बऱ्यापैकी स्वच्छता देखील दिसतेय. सुंदर बागांमुळे अजुनच गारेगार वाटत असेल. नक्कीच फेरी मारली पाहिजे. वाचतोय

खासच. ते समुद्रातले मंदिर आणि अकरा मजल्यांची पेलिंग्गी विशेष आवडले. जपान मधल्या मंदिरांची आठवण झाली.

आयुर्हित Wed, 07/02/2014 - 22:53
सर्व फोटो केवळ अद्भुत! अप्रतिम!! निसर्गरम्य!!! अवांतरः बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी पाहून माऊंट मेरु चे २००० वर्षापुर्वीचे एक चित्र जे हुबेहुब पार्टिकल अ‍ॅक्सलरेटरचे ब्लु प्रिंट सारखेच असल्याचे आठवले. Mount Meru पार्टिकल अ‍ॅक्सलरेटर

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:03
सुरक्षेच्या कारणाबद्दल वादच नाही. पण, अश्या काही अनवट जागांना कमीत कमी हात लावून यायला मिळावे अशी माझी नेहमीची उत्कट इच्छा असते !

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 00:34
.................................. बालीला जाणार म्ह. जाणारच!! लय झाला फटूंचा अत्याचार!!

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 11:09
विलासराव, मधुरा देशपांडे, चित्रगुप्त, मन्द्या आणि यशोधरा : धन्यवाद ! @ समुद्रातले मंदिर (पुरा ताना लोत) : हे मंदिर तर कायमचे मनात घर करून बसले आहे !

दिपक.कुवेत गुरुवार, 07/03/2014 - 11:58
काय साला निसर्ग आहे. अगदि नतमस्तक. तो "सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्ग" चा फोटो तर फारच आवडलाय. विशेषत त्याच्या मागे असणारे डोंगर आणि त्यावर दाटलेले धुके. खरचं अश्या जागी किती निवांत वाटत असेल नाहि?? गोंधळ, कोलाहल, गजबटापासुन दुर....

मनुराणी गुरुवार, 07/03/2014 - 12:16
तनाह लॉट ला आम्ही गेलो होतो तेवा मंदिराजवळ एवढे पाणी नव्हते आणि मंदिरापर्यंत जाता येत होते. खाली एक छोटा गाभारा होता तिथे नमस्कार केल्यावर तिथे उगम असणारे गोडे पाणी प्रसाद म्हणून देत होते न कानाला एक फुल अडकवले होते. आमचा सूर्यास्त थोडक्यात हुकला होता कारण त्या वळणावळणाच्या रस्त्याने तिथे पोहोचेपर्यंत मी उलट्या करून हैराण झाले होते. इथे बाहेर खूप छान मार्केट आहे. स्वस्त आणि मस्त. बाली मध्ये बार्गेनिंगची हौस मस्त फिटते.

In reply to by मनुराणी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/03/2014 - 13:48
नशीबवान आहात ! तुम्ही देलात तेव्हा मोठी ओहोटी असणार. आम्ही गेलो होतो तेव्हा समुद्र इतका खवळलेला होता की त्या बेटाला बोट लावणे केवळ अशक्य होते. तो तिथपर्यंत जाणारा रस्ताही भन्नाट आहे (अर्थात गाडी लागत नसली तर) !

प्यारे१ गुरुवार, 07/03/2014 - 12:52
ठरलं तर मग! जाणार, आम्ही बालीला जाणार.... -(रिमा लागू स्टाईल, म्हागुरुंच्या 'नवरा माझा नवसाचा' मधे)

शिद गुरुवार, 07/03/2014 - 17:44
कोरी अगुंग मस्तच दिसतेय. बालीचे निसर्ग सौंदर्य फोटोंमध्ये पाहून डोळ्याचे पारणे फिटलं; प्रत्यक्ष पाहताना काय होईल कुणास ठाऊक. ह्या भागात दिलेले सगळेच फोटो एक सो एक आले आहेत.

रेवती Sat, 07/05/2014 - 03:51
आता शब्द संपले हो! नेहमीप्रमाणेच छान, सुंदर असे म्हणते. तेथील स्थानिक लोक काही फार धनवंत प्रकारातील दिसत नाहीत. सगळे खाउन पिऊन सुखी वाटतायत पण त्यामानाने जत्रा सोडता फार कचरा कुठे दिसत नाहीये. ते तसेच आहे की खरे चित्र वेगळे आहे?

In reply to by रेवती

बाली (आणि इंडोनेशिया देश) विकसनशील प्रकारात मोडते... म्हणजे गरीबच. पण स्वच्छतेबाबत शहर-गावात लोक जागरूक दिसले. देवळांमध्ये देवाला प्रसाद-फुले वाहण्याच्या जागा सोडल्या तर सगळीकडे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा होता. पण तरीही तेथेही फुले वगैरे ताजी दिसत होती... आदल्या दिवशीची, कुजू लागलेलेली अशी नव्हती. म्हणजे तेथेही दिवसातून एकदा तरी नीट सफाई होत असणार. मुख्य म्हणजे, भिकारी अथवा अस्वच्छ, फाटके कपडे घातलेली मुले-माणसे देवळांशेजारी अथवा इतर ठिकाणी अजिबात दिसली नाहीत... हा पैश्यापेक्षा जास्त जाणीवेचा परिणाम असावा असे मला वाटते.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

कहां गये वो लोग?--आजीबाई

राजेंद्र मेहेंदळे ·

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:13
चांगला जमलाय हाही भाग - पण तरीही काहीतरी अपुरं वाटलं यात. तुम्ही एका ठरावीक अंतराने भाग टाकलेत तर जास्त चांगलं होईल. काय आहे, सातत्याने चांगलं समोर आलं तरी ते सगळं वाचलं जात नाही अनेकदा - अतिपरिचयात अवज्ञा (दुर्लक्ष) असं काहीतरी होतं. (ही फक्त विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा. लेख कधी प्रसिद्ध करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:23
:-) कुणाच्या भावना कशाने दुखावतील याचा नेम नाही, म्हणून काळजी घेतलेली बरी इतका साधा विचार केला होता. व्यक्तिचित्रं चांगली येताहेत - जरूर लिहा आणखी. दुसरं म्हणजे भूतकाळात आपण डोकावून पाहतो तेव्हा किती लोकांनी आपल्याला काय काय दिलं आहे याची जाणीव होऊन आपण बदलून जातो थोडेसे!

अनिता ठाकूर Wed, 07/02/2014 - 19:18
तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्‍यातला कुंचा हातात घ्यायची. आम्हीही 'कुंचा'च म्हणतो. पण, सहसा हा शब्द वाचण्यात वा ऐकण्यात येत नाही.त्यामुळे, ह्या शब्दाशी अंमळ थांबलेच. बाकी, पु. ले. शु.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड Wed, 07/02/2014 - 19:35
>>कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे शब्द आहेत मराठीत. मुंबईच्या वातावरणात वाढलेलो असल्याने आम्हीही सगळ्याला सरकट झाडू म्हणत असू. त्यावर एकदा माझ्या मावसबहिणीने सांगितलेला फरक असा, 'रोज घरातला केर काढायला वापरतो ती केरसुणी, जळमटं काढायला लांब काठी लावून वापरतात तो झाडू, हिराच्या काड्या वापरुन केलेला तो खराटा'. तसंच कंगव्याला आम्ही फणीच म्हणत असू. त्यावर याच बहिणीकडून मिळालेली माहिती अशी की, "केस विंचरायचा तो कंगवा, केसात उवा वैगरे झाल्या असतील तर त्या काढायला वापरतात ती फणी. इथे फणी मागितलीस तर उवा वैगरे झाल्यात की काय असं वाटेल." तेव्हापासून फणी म्हणणं बंद केलं ते आजपर्यंत!!;)

In reply to by मधुरा देशपांडे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2014 - 14:36
आमच्याकडे देखील गवताचा असतो त्याला कुंचा म्हटले जाते. वेगळ्या गवताचाच पण चपटा आखूड आणि चांगला पसरट असतो त्या झाडूला लक्ष्मी म्हटले जाते. हिरांचा असतो त्याला खराटा.

एस Wed, 07/02/2014 - 19:44
अजून थोडे मोठे लेख लिहा. वाचकाला व्यक्तिरेखेची ओळख होऊन ते वाचक त्यात गुंगू लागेपर्यंत मध्येच लेख संपतो. सो, ये दिल मांगे मोर... :-)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड गुरुवार, 07/03/2014 - 14:25
कानात/नाकात घालायची बारीक सोन्याची तार!! भीकबाळी वैगरे घालण्याआधी कान या सुंकल्याने टोचतात, कारण जाड तारेने टोचलं तर जखम होऊन ती लवकर बरी न होण्याचा संभव असतो. सुंकलं टोचून जखम नीट बरी झाली की मग ते काढून भीकबाळी किंवा आणखी काही असेल ते!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 14:57
'कहाँ गये वो लोग' ह्या मिपावरील मालीकेला आगामी आकर्षणांसाठी अनेकानेक शुभेच्छा! अशी विविध व्यक्तिमत्वे आठवून लिहीताना/वाचताना त्या त्या व्यक्तिमत्वातील आपल्याला भावलेल्या गुणांना आपल्या आयुष्यात जोपासण्यचा मनोमन प्रयत्न करावा. ह्यातूनच पुढच्या पिढीला निदान लिहीण्यासाठी एक नवे व्यक्तिमत्व मिळेल. त्यांनाही तसे बनण्याची प्रेरणा मिळेल.

रेवती Fri, 08/01/2014 - 06:31
वाह! लेखन आवडले. आजीबाई डोळ्यासमोर उभी राहिली. घरचे सगळे व्यवस्थित असताना कोण कशाला लोकाकडे राबेल असे आधी वाटत असे पण माझ्या मावससाबांकडे स्वयंपाकाला ज्या बाई येत त्यांच्या हाताला चव चांगली होती आणि घरचे सगळे व्यवस्थित असतानाही केवळ हा गूण वाया जाऊ नये म्हणून त्या येत असत ते आठवले पण हे विरळाच असते.

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:13
चांगला जमलाय हाही भाग - पण तरीही काहीतरी अपुरं वाटलं यात. तुम्ही एका ठरावीक अंतराने भाग टाकलेत तर जास्त चांगलं होईल. काय आहे, सातत्याने चांगलं समोर आलं तरी ते सगळं वाचलं जात नाही अनेकदा - अतिपरिचयात अवज्ञा (दुर्लक्ष) असं काहीतरी होतं. (ही फक्त विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा. लेख कधी प्रसिद्ध करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:23
:-) कुणाच्या भावना कशाने दुखावतील याचा नेम नाही, म्हणून काळजी घेतलेली बरी इतका साधा विचार केला होता. व्यक्तिचित्रं चांगली येताहेत - जरूर लिहा आणखी. दुसरं म्हणजे भूतकाळात आपण डोकावून पाहतो तेव्हा किती लोकांनी आपल्याला काय काय दिलं आहे याची जाणीव होऊन आपण बदलून जातो थोडेसे!

अनिता ठाकूर Wed, 07/02/2014 - 19:18
तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्‍यातला कुंचा हातात घ्यायची. आम्हीही 'कुंचा'च म्हणतो. पण, सहसा हा शब्द वाचण्यात वा ऐकण्यात येत नाही.त्यामुळे, ह्या शब्दाशी अंमळ थांबलेच. बाकी, पु. ले. शु.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड Wed, 07/02/2014 - 19:35
>>कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे शब्द आहेत मराठीत. मुंबईच्या वातावरणात वाढलेलो असल्याने आम्हीही सगळ्याला सरकट झाडू म्हणत असू. त्यावर एकदा माझ्या मावसबहिणीने सांगितलेला फरक असा, 'रोज घरातला केर काढायला वापरतो ती केरसुणी, जळमटं काढायला लांब काठी लावून वापरतात तो झाडू, हिराच्या काड्या वापरुन केलेला तो खराटा'. तसंच कंगव्याला आम्ही फणीच म्हणत असू. त्यावर याच बहिणीकडून मिळालेली माहिती अशी की, "केस विंचरायचा तो कंगवा, केसात उवा वैगरे झाल्या असतील तर त्या काढायला वापरतात ती फणी. इथे फणी मागितलीस तर उवा वैगरे झाल्यात की काय असं वाटेल." तेव्हापासून फणी म्हणणं बंद केलं ते आजपर्यंत!!;)

In reply to by मधुरा देशपांडे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2014 - 14:36
आमच्याकडे देखील गवताचा असतो त्याला कुंचा म्हटले जाते. वेगळ्या गवताचाच पण चपटा आखूड आणि चांगला पसरट असतो त्या झाडूला लक्ष्मी म्हटले जाते. हिरांचा असतो त्याला खराटा.

एस Wed, 07/02/2014 - 19:44
अजून थोडे मोठे लेख लिहा. वाचकाला व्यक्तिरेखेची ओळख होऊन ते वाचक त्यात गुंगू लागेपर्यंत मध्येच लेख संपतो. सो, ये दिल मांगे मोर... :-)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सूड गुरुवार, 07/03/2014 - 14:25
कानात/नाकात घालायची बारीक सोन्याची तार!! भीकबाळी वैगरे घालण्याआधी कान या सुंकल्याने टोचतात, कारण जाड तारेने टोचलं तर जखम होऊन ती लवकर बरी न होण्याचा संभव असतो. सुंकलं टोचून जखम नीट बरी झाली की मग ते काढून भीकबाळी किंवा आणखी काही असेल ते!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 14:57
'कहाँ गये वो लोग' ह्या मिपावरील मालीकेला आगामी आकर्षणांसाठी अनेकानेक शुभेच्छा! अशी विविध व्यक्तिमत्वे आठवून लिहीताना/वाचताना त्या त्या व्यक्तिमत्वातील आपल्याला भावलेल्या गुणांना आपल्या आयुष्यात जोपासण्यचा मनोमन प्रयत्न करावा. ह्यातूनच पुढच्या पिढीला निदान लिहीण्यासाठी एक नवे व्यक्तिमत्व मिळेल. त्यांनाही तसे बनण्याची प्रेरणा मिळेल.

रेवती Fri, 08/01/2014 - 06:31
वाह! लेखन आवडले. आजीबाई डोळ्यासमोर उभी राहिली. घरचे सगळे व्यवस्थित असताना कोण कशाला लोकाकडे राबेल असे आधी वाटत असे पण माझ्या मावससाबांकडे स्वयंपाकाला ज्या बाई येत त्यांच्या हाताला चव चांगली होती आणि घरचे सगळे व्यवस्थित असतानाही केवळ हा गूण वाया जाऊ नये म्हणून त्या येत असत ते आठवले पण हे विरळाच असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन काल का नाही आलीस गे आजीबाई? येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती? तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची.

कहां गये वो लोग?--बाबूकाका

राजेंद्र मेहेंदळे ·

चित्रगुप्त Wed, 07/02/2014 - 20:54
सुंदर. आणखी अशीच व्यक्तिचित्रे येऊ द्या. आम्ही आर्टस्कूल मधे शिकत असताना नेहमी समोर बसवून पोर्टेट रंगवायला कुणीतरी मिळावे, या शोधात असायचो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या एक व्यक्तीची आज इतके वर्षांनंतर आठवण झाली. तुम्ही लिहिले आहे, असेच जीवन होते त्या व्यक्तीचे. त्याचे केलेले चित्र अजून असेल कदाचित कुठेतरी. शोधले पाहिजे.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:25
प्रत्येकाकडे अशाच आठवणी असतात फक्त सगळेच व्यक्त करु शकत नाही.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:30
माझ्या आठवणीतील अनेक व्यक्ती आहेत.कधीतरी त्यांच्याबद्दल लिहून हॉटेलात आलेल्यांना पकवणार आहे (अगदी शिजेपर्यंत.)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 02:57
मनस्वी लिखाण. आवडलं. बालपणीच्या कांही गोष्टी, कांही व्यक्ती आज ह्या लेखामुळे आठवल्या. माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत गुलाबताई नांवाची ७०-८० वर्षांची म्हातारी होती. त्यांना आम्ही अहो आजी म्हणायचो. आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या, खाऊ द्यायच्या. त्याना कोणीच नातेवाईक नव्हते. एकट्याच होत्या. जगजित सिंग ह्यांच्या 'ये दौलत भी लेलो, ये शोहारत भी लेलो|' ह्या गझलमधील खालील ओळी कानावर पडल्या की गुलाबताईंची आठवण होते. मुहल्ले की सबसे निशानी पुरानी वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी वो नानी की बातों में परियों का डेरा वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा भुलाए नहीं भूल सकता है कोई वो छोटी सी रातें वो लम्बी कहानी

पण लिखाण त्रोटक वाटतंय. व्यक्तीच्या लकबींचे बारकावे, तिच्या देहबोलीचं वर्णन आणि प्रसंग जणू डोळ्यासमोर घडतोयं, अशा आतून येणार्‍या लेखनाऐवजी, त्रयस्थपणे केलेलं धावतं वर्णन, असं चित्रण झालयं.

चित्रगुप्त Wed, 07/02/2014 - 20:54
सुंदर. आणखी अशीच व्यक्तिचित्रे येऊ द्या. आम्ही आर्टस्कूल मधे शिकत असताना नेहमी समोर बसवून पोर्टेट रंगवायला कुणीतरी मिळावे, या शोधात असायचो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या एक व्यक्तीची आज इतके वर्षांनंतर आठवण झाली. तुम्ही लिहिले आहे, असेच जीवन होते त्या व्यक्तीचे. त्याचे केलेले चित्र अजून असेल कदाचित कुठेतरी. शोधले पाहिजे.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:25
प्रत्येकाकडे अशाच आठवणी असतात फक्त सगळेच व्यक्त करु शकत नाही.

भिंगरी Wed, 07/02/2014 - 22:30
माझ्या आठवणीतील अनेक व्यक्ती आहेत.कधीतरी त्यांच्याबद्दल लिहून हॉटेलात आलेल्यांना पकवणार आहे (अगदी शिजेपर्यंत.)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 02:57
मनस्वी लिखाण. आवडलं. बालपणीच्या कांही गोष्टी, कांही व्यक्ती आज ह्या लेखामुळे आठवल्या. माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत गुलाबताई नांवाची ७०-८० वर्षांची म्हातारी होती. त्यांना आम्ही अहो आजी म्हणायचो. आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या, खाऊ द्यायच्या. त्याना कोणीच नातेवाईक नव्हते. एकट्याच होत्या. जगजित सिंग ह्यांच्या 'ये दौलत भी लेलो, ये शोहारत भी लेलो|' ह्या गझलमधील खालील ओळी कानावर पडल्या की गुलाबताईंची आठवण होते. मुहल्ले की सबसे निशानी पुरानी वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी वो नानी की बातों में परियों का डेरा वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा भुलाए नहीं भूल सकता है कोई वो छोटी सी रातें वो लम्बी कहानी

पण लिखाण त्रोटक वाटतंय. व्यक्तीच्या लकबींचे बारकावे, तिच्या देहबोलीचं वर्णन आणि प्रसंग जणू डोळ्यासमोर घडतोयं, अशा आतून येणार्‍या लेखनाऐवजी, त्रयस्थपणे केलेलं धावतं वर्णन, असं चित्रण झालयं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे. लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.