मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'विठोबा'

drsunilahirrao ·

सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे

सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! खास...!!! -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
काव्यरस
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा पारखोनी घे जरासे भक्त आता हे तुला विकतील व्यापारी, विठोबा शेवटी आलास ना गोत्यात तूही माणसे असतात थापाडी, विठोबा सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! डॉ.सुनील अहिरराव

गरुडघरटे

स्वाती दिनेश ·

सुंदर ! फोटो इतके लहान का टाकले ? लहान फोटोत बारकावे दिसत नाहीत आणि भव्य गोष्टीही तितक्या प्रभावी वाटत नाही. त्यामुळे मोठे फोटो असते तर जागेचे अजून चांगले दर्शन झाले असते.

हे ठिकाण भेट देण्याच्या यादीत आहेच. बघूया कधी जमतंय. ही अशी ठिकाणे पाहताना उदास व्हायला होतं खरं. पण तेवढाच अविस्मरणीय अनुभव असतो.

In reply to by मधुरा देशपांडे

ठरवा एखादा कट्टा. इस्पिकचा एक्का साहेब आहेतच, मीही येईन, निनाद, दिव्यश्री, स्वाती दिनेशही पुन्हा येतील (आपल्याला गाईड लागेलच) अजून कोणी येणार असेल तर उत्तमच. एक मस्त कट्टा करू.

In reply to by प्रभाकर पेठकर

कट्ट्याची कल्पना मस्तच. जर्मनीतले मिपाकर येतील आणि तुम्ही आणि इए काका, वाह. तुम्ही फक्त कधी येताय सांगा. इथल्या सगळ्यांना जमविण्याची आणि कट्टा नियोजनाची जबाबदारी माझी. :)

In reply to by रेवती

सखी 14/07/2014 - 17:51
वृत्तांत व फोटू आवडले. हिटलर आवडत नसल्याने तो सोडून बाकी सगळे चांगले आहे. आता प्रव लिहिणे थांबवू नकोस स्वातीताई. छान वाटते वाचायला! +१ अगदी रेवतीसारखेच म्हणते.

In reply to by रेवती

हिटलर बद्दल बोलायला सर्वसामान्य जर्मन नाखूष असतो. एकंदरीतच दुसर्‍या महायुध्दाचा विषय त्यामध्ये होरपळलेल्या जुन्या पिढीला नको असतो.. आणि तरुणांना त्यात फारसा रस नसतो..त्याचे छायाचित्र कोठेही दिसत नाही, लाइपझिशच्या एका टूअर मध्ये त्याचा आणि महायुध्दाचा नुसता पुसटसा विषय आला तरी तिथे असलेल्या लोकांची पांगापांग झाली.. बर्लिन मध्ये ज्या बंकरमध्ये त्याने स्वतःला संपवले तेथे त्या बंकर्सची एक ऐतिहासिक वास्तू म्हणून कसलीही नामोनिषाणी नाही तर तेथे चक्क एक हाउसिंग कॉप्लेक्स आहे.. अशा पार्श्वभूमीवर येथील बंकर्स, त्याचे मोठ्ठे छायाचित्र अशा दचकवून गेले आणि त्या खूणांचा हात धरुन आपोआपच त्या काळात मन पोहोचले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मिसळपाव 28/09/2017 - 17:40
आताच्या परिस्थितीत (मर्केल पुन्हा निवडून आल्येय पण त्याचबरोबर कडव्या उजव्यांच्या पाठीराख्यातपण चांगलीच भर पडल्येय) यात काही बदल तुम्हाला जाणवतो का? होपफूली, उजवे लोकं हिटलरचे पाठीराखे नसून दुसर्‍या युद्धातल्या जर्मनांच्या विजिगिषू वृत्तीचे पाठीराखे असतील.

मदनबाण 11/07/2014 - 07:25
लिहत राहा... फोटोत डीडींना पाहुन बरे वाटले. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

पैसा 01/08/2014 - 22:40
किती छान लिहिले आहेस ग! आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

रुपी 28/09/2017 - 02:39
छान लिहिले आहे. कुठल्याही गोष्टीचे वर्णन करायची स्वातीताईची शैली मस्तच... वाचणार्‍याला स्वतः तिथे असल्याचाच अनुभव येतो अगदी! या लेखाच्या दुव्यासाठी पद्मावतिला धन्यवाद.

सुंदर ! फोटो इतके लहान का टाकले ? लहान फोटोत बारकावे दिसत नाहीत आणि भव्य गोष्टीही तितक्या प्रभावी वाटत नाही. त्यामुळे मोठे फोटो असते तर जागेचे अजून चांगले दर्शन झाले असते.

हे ठिकाण भेट देण्याच्या यादीत आहेच. बघूया कधी जमतंय. ही अशी ठिकाणे पाहताना उदास व्हायला होतं खरं. पण तेवढाच अविस्मरणीय अनुभव असतो.

In reply to by मधुरा देशपांडे

ठरवा एखादा कट्टा. इस्पिकचा एक्का साहेब आहेतच, मीही येईन, निनाद, दिव्यश्री, स्वाती दिनेशही पुन्हा येतील (आपल्याला गाईड लागेलच) अजून कोणी येणार असेल तर उत्तमच. एक मस्त कट्टा करू.

In reply to by प्रभाकर पेठकर

कट्ट्याची कल्पना मस्तच. जर्मनीतले मिपाकर येतील आणि तुम्ही आणि इए काका, वाह. तुम्ही फक्त कधी येताय सांगा. इथल्या सगळ्यांना जमविण्याची आणि कट्टा नियोजनाची जबाबदारी माझी. :)

In reply to by रेवती

सखी 14/07/2014 - 17:51
वृत्तांत व फोटू आवडले. हिटलर आवडत नसल्याने तो सोडून बाकी सगळे चांगले आहे. आता प्रव लिहिणे थांबवू नकोस स्वातीताई. छान वाटते वाचायला! +१ अगदी रेवतीसारखेच म्हणते.

In reply to by रेवती

हिटलर बद्दल बोलायला सर्वसामान्य जर्मन नाखूष असतो. एकंदरीतच दुसर्‍या महायुध्दाचा विषय त्यामध्ये होरपळलेल्या जुन्या पिढीला नको असतो.. आणि तरुणांना त्यात फारसा रस नसतो..त्याचे छायाचित्र कोठेही दिसत नाही, लाइपझिशच्या एका टूअर मध्ये त्याचा आणि महायुध्दाचा नुसता पुसटसा विषय आला तरी तिथे असलेल्या लोकांची पांगापांग झाली.. बर्लिन मध्ये ज्या बंकरमध्ये त्याने स्वतःला संपवले तेथे त्या बंकर्सची एक ऐतिहासिक वास्तू म्हणून कसलीही नामोनिषाणी नाही तर तेथे चक्क एक हाउसिंग कॉप्लेक्स आहे.. अशा पार्श्वभूमीवर येथील बंकर्स, त्याचे मोठ्ठे छायाचित्र अशा दचकवून गेले आणि त्या खूणांचा हात धरुन आपोआपच त्या काळात मन पोहोचले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मिसळपाव 28/09/2017 - 17:40
आताच्या परिस्थितीत (मर्केल पुन्हा निवडून आल्येय पण त्याचबरोबर कडव्या उजव्यांच्या पाठीराख्यातपण चांगलीच भर पडल्येय) यात काही बदल तुम्हाला जाणवतो का? होपफूली, उजवे लोकं हिटलरचे पाठीराखे नसून दुसर्‍या युद्धातल्या जर्मनांच्या विजिगिषू वृत्तीचे पाठीराखे असतील.

मदनबाण 11/07/2014 - 07:25
लिहत राहा... फोटोत डीडींना पाहुन बरे वाटले. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

पैसा 01/08/2014 - 22:40
किती छान लिहिले आहेस ग! आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

रुपी 28/09/2017 - 02:39
छान लिहिले आहे. कुठल्याही गोष्टीचे वर्णन करायची स्वातीताईची शैली मस्तच... वाचणार्‍याला स्वतः तिथे असल्याचाच अनुभव येतो अगदी! या लेखाच्या दुव्यासाठी पद्मावतिला धन्यवाद.
(मागच्या वेळी भ्रमणमंडळ जेव्हा बेरेष्टेसगार्टनला गेले होते तेव्हा खराब हवेमुळे इगल्सनेस्ट ला भेट द्यायची राहिली होती, नंतर जेव्हा जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा मुद्दाम केहलष्टाइनहाउस ला जाऊन आलो..) ओबेरसाल्झबुर्ग आणि बेरेष्टेसगार्टन! पृथ्वीवरच्या स्वर्गातील एक बाग जणू.. ह्याच ओबेरसाल्झबुर्ग मध्ये केहलष्टाइन हाउसच्या पायथ्याशी लपले आहेत हिटलरचे बंकर्स.. तेथे परत जाउन नव्याने उमगल्या काही गोष्टी..

मनमोहक बाली : ०९ : महानाट्य बाली अगुंग आणि इतर काही थोडेसे... इकडचे-तिकडचे (समाप्त)

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस 11/07/2014 - 09:49
अतिशय सुंदर लेखमाला. सुरेख मंदिरे, भव्य पुतळे, देखणे समुद्रकिनारे, नेत्रसुखद हिरवाई, रंगेबिरंगी लोकनृत्ये खरंच कमालीचा सुंदर देश.

पामर 11/07/2014 - 10:19
खुप मस्त वर्णन! फोटो पण अप्रतिम ! अगदी घरबसल्या बाली अनुभवता आली...तुम्हाला पुढील प्रवासाला शुभेच्छा ! रामाचा पुतळा विशेष आवडला..त्याच्या शेजारचा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढव्य शरीरावर चढ्लेली लांब शेपटीची वानरं आहेत बहुतेक...

पामर 11/07/2014 - 10:38
एक्का साहेब खुप मस्त वर्णन..अगदी घरबसल्या बाली फिरवुन आणलीत की ! पुढील प्रवासाला शुभेच्छा!...रामाचा पुतळा विशेष आवडला !! पण तो दुसरा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढ्व्य शरीरावर चढ्लेली लांब शेपट्यांची वानरं आहेत बहुतेक...

एस 11/07/2014 - 12:34
काय मस्त लिहिलंय तुम्ही! प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रदेशाची नुसतीच कोरडी ओळख करून देणारी चकचकीत माहितीपुस्तिका आणि प्रवासवर्णनांमध्ये फरक असतो. प्रवासवर्णनात त्या व्यक्तीच्या डोळ्यांनी आपण तो प्रदेश, तिथले लोक, संस्कृती, निसर्ग इत्यादी बघत असतो. त्यामुळे यशस्वी प्रवासवर्णनात त्या व्यक्तीतील लेखकाचे लेखनकौशल्य जितके तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते तितकेच त्या व्यक्तीतला माणूस त्या प्रदेशाशी एकरूप होणे आणि ते समत्व मग लेखनातही उतरणे परिणामकारक असते. तरच मग प्रवासवर्णन हे वाचकांच्या हृदयात घर करू शकते. तुमच्या लेखमालांमधून आम्हांला किती लाभ होतोय हेवेसांनल. चला, पुलेमाप्र. :-)

In reply to by एस

सविस्तर उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक वाचकांमुळेच मला ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे.

दिपक.कुवेत 12/07/2014 - 15:12
आवडुन गेलेय आणि हे सगळं अनुभवायला एकदा तरी तीथे नक्कि जाणार. भाग ८ मधे सांगीतल्याप्रमाणे बाली पार्कची भेट संस्मरणीय का झाली ते सांगणार होतात ना???

मधुरा देशपांडे, रेवती, वल्ली, एसमाळी, स्पा, अजया, खटपट्या, स्वाती दिनेश, चित्रगुप्त, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद !

बॅटमॅन 14/07/2014 - 13:03
च्यामारी यांची लोकेषन्स भारी, लेखन भारी अन फटूबी भारीच! यांचं सगळंच लय भारी!!!! ही लेखमाला फार मनापासून अन निगुतीने लिहिलेली आहे हे जाणवतंय. फार आवडली.

प्यारे१ 14/07/2014 - 14:39
खूप खूप आभार! ह्या सगळ्या लेखमालांची पुस्तकं करावीत असं सुचवतो. (आधीच कुणी सुचवलं असल्यास त्याला सविनय अनुमोदन)

शिद 14/07/2014 - 15:19
झकासच झाली तुमची बाली ट्रिप आणि तुमच्या लेखनाद्वारे आमची सुध्दा... धन्यवाद.
खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !
क्या बात!!!

जय२७८१ 15/07/2014 - 15:28
तुमचे बालीचे वर्णन वाचून,फोटो पाहून बाली मला खूपच आवडले.तुमचे लिखाण हि अप्रतिमच ........बाली पाहण्याची मला हि इच्छा आहे.कृपया साधारण एका माणसाला किती खर्च आला मला सांगाल का ?

बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते. सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे... yatra.com MakeMyTrip.com windmillholidays.in बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या. जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.

सखी 15/07/2014 - 20:58
सुरेख लेखमाला, सगळे लेख आता निवांत वाचुन काढले, अनेक धन्यवाद. आयुष्यात एकदा जीवाची बाली करुन बघायची इच्छा आहे. वर्णन छानच, त्यांच्या संस्कृतीची डिटेल ओळख आवडली, निसर्ग भरभरुन असला तरी त्या लोकांनी त्याची घेतलेली काळजी, बहुतेक ठिकाणची स्वच्छता जाणवते. फोटो सगळे एक-से-एक आहेत. थोडं फार खादाडीचं वर्णन चाललं असतं, किंवा काही मिळतं नाही असं आहे का? मुख्य म्हणजे गवती पाला खाणा-यांना कारण त्यांच्याही जेवणात भात+मासे असं प्रमाण अधिक असतं ना?

In reply to by सखी

जेव्हा हा प्रवास केला तेव्हा मिपावर वावर नव्हता. त्यामुळे खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते :) यानंतर केल्या जाण्यार्‍या सहलींमध्ये ये गुस्ताखी नही होंगी... प्रॉमिस ! बालीनीज शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात, त्यामुळे काळजी नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी 16/07/2014 - 23:45
खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते - नाही फक्त त्यासाठीच नाही फक्त एक अंदाज यायला तिथलं जेवण कशाप्रकारचं असेल. दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात - धन्यवाद एक्कासाहेब.

एका सुंदर देशाची तेवढीच सुंदर ओळख. सर्व फोटो अतिशय सुंदर आणि त्या बरोबरीने येणारे वर्णन तर केवळ अप्रतिम. संपुर्ण लेख मालिका अत्यंत उत्कंठावर्धक होती. वाखु साठवल्यागेली आहे. पुलेशु पैजारबुवा,

कोट्या धीश 22/07/2014 - 14:09
नेहमी सारखीच सुरेख लेखमाला वाचल्याचे आणि अनुभवल्याचे सुख & संपल्याची खंत तुमच्या लिखाण मधला एकमेव न आवडणारा शब्द म्हणजे "(समाप्त)" एक्का काका , आता पर्यंत तुमचे सगळे प्रवासवर्णने वाचून काढली आहेत , १ विनंती आहे - तुम्ही जो आनंद फक्त MI PAकरांना देता, तो बाकी खूप लोकां पर्यंत का नाही पोचवत ?? तुमची लेखन शैली इतकी छान आहे कि तुम्ही तुमचे सर्व प्रवासवर्णने पुस्तक रुपात सर्वांच्या भेटीस का नाही आणत ?? अर्थात - हे माझे म्हणणे आहे , तुम्ही या वर विचार कराल ( माझ्या बद्दल काहीही राग न ठेवता ) अशी आशा करतो

In reply to by कोट्या धीश

तुमच्या खूपच उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! पुस्तकाबद्दल अजून काही नक्की नाही. अगदी मराठीत लिहीणेही दीडएक वर्षापूर्वी अगदी मनातही नसलेली गोष्ट होती. पण तुमच्यासारख्या रसिक वाचकांच्या प्रोत्साहनामुळे मिपावर लिहायला मजा येत आहे, त्यातच सध्या खूष आहे. नंतर केव्हा जर या लेखनात छापून प्रकाशित करण्या इतका दम आहे असा विश्वास वाटला तर बघू :)

प्रचेतस 11/07/2014 - 09:49
अतिशय सुंदर लेखमाला. सुरेख मंदिरे, भव्य पुतळे, देखणे समुद्रकिनारे, नेत्रसुखद हिरवाई, रंगेबिरंगी लोकनृत्ये खरंच कमालीचा सुंदर देश.

पामर 11/07/2014 - 10:19
खुप मस्त वर्णन! फोटो पण अप्रतिम ! अगदी घरबसल्या बाली अनुभवता आली...तुम्हाला पुढील प्रवासाला शुभेच्छा ! रामाचा पुतळा विशेष आवडला..त्याच्या शेजारचा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढव्य शरीरावर चढ्लेली लांब शेपटीची वानरं आहेत बहुतेक...

पामर 11/07/2014 - 10:38
एक्का साहेब खुप मस्त वर्णन..अगदी घरबसल्या बाली फिरवुन आणलीत की ! पुढील प्रवासाला शुभेच्छा!...रामाचा पुतळा विशेष आवडला !! पण तो दुसरा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढ्व्य शरीरावर चढ्लेली लांब शेपट्यांची वानरं आहेत बहुतेक...

एस 11/07/2014 - 12:34
काय मस्त लिहिलंय तुम्ही! प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रदेशाची नुसतीच कोरडी ओळख करून देणारी चकचकीत माहितीपुस्तिका आणि प्रवासवर्णनांमध्ये फरक असतो. प्रवासवर्णनात त्या व्यक्तीच्या डोळ्यांनी आपण तो प्रदेश, तिथले लोक, संस्कृती, निसर्ग इत्यादी बघत असतो. त्यामुळे यशस्वी प्रवासवर्णनात त्या व्यक्तीतील लेखकाचे लेखनकौशल्य जितके तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते तितकेच त्या व्यक्तीतला माणूस त्या प्रदेशाशी एकरूप होणे आणि ते समत्व मग लेखनातही उतरणे परिणामकारक असते. तरच मग प्रवासवर्णन हे वाचकांच्या हृदयात घर करू शकते. तुमच्या लेखमालांमधून आम्हांला किती लाभ होतोय हेवेसांनल. चला, पुलेमाप्र. :-)

In reply to by एस

सविस्तर उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक वाचकांमुळेच मला ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे.

दिपक.कुवेत 12/07/2014 - 15:12
आवडुन गेलेय आणि हे सगळं अनुभवायला एकदा तरी तीथे नक्कि जाणार. भाग ८ मधे सांगीतल्याप्रमाणे बाली पार्कची भेट संस्मरणीय का झाली ते सांगणार होतात ना???

मधुरा देशपांडे, रेवती, वल्ली, एसमाळी, स्पा, अजया, खटपट्या, स्वाती दिनेश, चित्रगुप्त, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद !

बॅटमॅन 14/07/2014 - 13:03
च्यामारी यांची लोकेषन्स भारी, लेखन भारी अन फटूबी भारीच! यांचं सगळंच लय भारी!!!! ही लेखमाला फार मनापासून अन निगुतीने लिहिलेली आहे हे जाणवतंय. फार आवडली.

प्यारे१ 14/07/2014 - 14:39
खूप खूप आभार! ह्या सगळ्या लेखमालांची पुस्तकं करावीत असं सुचवतो. (आधीच कुणी सुचवलं असल्यास त्याला सविनय अनुमोदन)

शिद 14/07/2014 - 15:19
झकासच झाली तुमची बाली ट्रिप आणि तुमच्या लेखनाद्वारे आमची सुध्दा... धन्यवाद.
खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !
क्या बात!!!

जय२७८१ 15/07/2014 - 15:28
तुमचे बालीचे वर्णन वाचून,फोटो पाहून बाली मला खूपच आवडले.तुमचे लिखाण हि अप्रतिमच ........बाली पाहण्याची मला हि इच्छा आहे.कृपया साधारण एका माणसाला किती खर्च आला मला सांगाल का ?

बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते. सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे... yatra.com MakeMyTrip.com windmillholidays.in बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या. जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.

सखी 15/07/2014 - 20:58
सुरेख लेखमाला, सगळे लेख आता निवांत वाचुन काढले, अनेक धन्यवाद. आयुष्यात एकदा जीवाची बाली करुन बघायची इच्छा आहे. वर्णन छानच, त्यांच्या संस्कृतीची डिटेल ओळख आवडली, निसर्ग भरभरुन असला तरी त्या लोकांनी त्याची घेतलेली काळजी, बहुतेक ठिकाणची स्वच्छता जाणवते. फोटो सगळे एक-से-एक आहेत. थोडं फार खादाडीचं वर्णन चाललं असतं, किंवा काही मिळतं नाही असं आहे का? मुख्य म्हणजे गवती पाला खाणा-यांना कारण त्यांच्याही जेवणात भात+मासे असं प्रमाण अधिक असतं ना?

In reply to by सखी

जेव्हा हा प्रवास केला तेव्हा मिपावर वावर नव्हता. त्यामुळे खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते :) यानंतर केल्या जाण्यार्‍या सहलींमध्ये ये गुस्ताखी नही होंगी... प्रॉमिस ! बालीनीज शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात, त्यामुळे काळजी नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी 16/07/2014 - 23:45
खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते - नाही फक्त त्यासाठीच नाही फक्त एक अंदाज यायला तिथलं जेवण कशाप्रकारचं असेल. दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात - धन्यवाद एक्कासाहेब.

एका सुंदर देशाची तेवढीच सुंदर ओळख. सर्व फोटो अतिशय सुंदर आणि त्या बरोबरीने येणारे वर्णन तर केवळ अप्रतिम. संपुर्ण लेख मालिका अत्यंत उत्कंठावर्धक होती. वाखु साठवल्यागेली आहे. पुलेशु पैजारबुवा,

कोट्या धीश 22/07/2014 - 14:09
नेहमी सारखीच सुरेख लेखमाला वाचल्याचे आणि अनुभवल्याचे सुख & संपल्याची खंत तुमच्या लिखाण मधला एकमेव न आवडणारा शब्द म्हणजे "(समाप्त)" एक्का काका , आता पर्यंत तुमचे सगळे प्रवासवर्णने वाचून काढली आहेत , १ विनंती आहे - तुम्ही जो आनंद फक्त MI PAकरांना देता, तो बाकी खूप लोकां पर्यंत का नाही पोचवत ?? तुमची लेखन शैली इतकी छान आहे कि तुम्ही तुमचे सर्व प्रवासवर्णने पुस्तक रुपात सर्वांच्या भेटीस का नाही आणत ?? अर्थात - हे माझे म्हणणे आहे , तुम्ही या वर विचार कराल ( माझ्या बद्दल काहीही राग न ठेवता ) अशी आशा करतो

In reply to by कोट्या धीश

तुमच्या खूपच उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! पुस्तकाबद्दल अजून काही नक्की नाही. अगदी मराठीत लिहीणेही दीडएक वर्षापूर्वी अगदी मनातही नसलेली गोष्ट होती. पण तुमच्यासारख्या रसिक वाचकांच्या प्रोत्साहनामुळे मिपावर लिहायला मजा येत आहे, त्यातच सध्या खूष आहे. नंतर केव्हा जर या लेखनात छापून प्रकाशित करण्या इतका दम आहे असा विश्वास वाटला तर बघू :)
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

दांभिक

प्रसाद गोडबोले ·

बॅटमॅन 11/07/2014 - 02:31
पाहिली नवकविता, नवकवी सांप्रत प्रसाद गोडबोले | चुरचुरीत म्याटर, जयात बहु स्फोटकांचेचि गो डबोले || राडे होता काडी टाकुनि, मज्जा इतरां डावळुनी पाहावी | तेही नसतां मग विडंबनहस्तेचि खुल्ली सारावी ||

भम्पक 12/07/2014 - 21:14
"मीही दांभिक अन तुही दांभिक ...दांभिक अवघे मिपा ..... हेतू मात्र पाक त्यामुळे त्यावरी सरस्वतिची कृपा II नावात गोड परंतु अति कडू शार हि वाचा ... नावावर अजून काही नाही पण प्रसाद मात्र साचा ....II एकेकाचे नाव ऐकण्या मौज वाटे कानी..... कुत्सित ,खडूस बोल ऐकल्या मात्र सपशेल येई ग्लानी....II अवघ्या मिपा करांची माफी मागून , खरे तर खूप खरडायचे मनात होते परंतु सुरुवातीलाच ग्लानी येऊ द्यायची नव्हती.प्रसाद्जींचे आभार .....अन वरून त्यांचीच खिल्ली उडवल्याबद्दल माफी.अपेक्षा हलके घ्याल.

पैसा 31/07/2014 - 23:24
गिर्जाकाकू, रन औट झालात की हो! योग्य लोकांना योग्य वेळी सुपारी दिली नाहीत काय!

In reply to by पैसा

छ्या: छ्या:छ्या:छ्या: ! सुपारी वगैरे नाही हो , बाण जिकडे जिकडे सोदले तिकडे तिकडे जाऊन लागले , बाकी मग प्रतिसाद आले नाहीत तरी आपली काही हरकत नाही *biggrin*

धन्या 01/08/2014 - 18:21
'सरळ' बिचारा 'गरीब' माणुस दिसती जिकडे तिकडे ते स्वतःला म्हणवती येथे "धनाजी" आणि "वाकडे "||६||
तुमचं आपलं काहीतरीच हा प्रगोकाका. आमच्या एका मित्राने आमचे नेमके वर्णन केले आहे. ते म्हणतात, "आम्ही म्हणजे नुसतीच दिड दोनशे पुस्तके वाचलेले, स्वतःचा काहीच अनुभव नसलेले, स्वतःपुरतेच पाहत असल्यामुळे स्वतःला आणि लोकांना समजून घेण्यासाठी लोकांशी शाब्दिक चकामकींची गरज असलेले आणि इगो कुरवाळण्यासाठी वांझोटया चर्चा करणारे असे लोकांनी गांभिर्याने घ्यायची मुळीच गरज नसलेले व्यक्तीमत्व". तरी बरं आहे की ते आम्हाला "रीमोटली" ओळखतात. विकांताआड जर भेट झाली असती तर त्यांना आमच्या सार्‍या अवगुणांची जाणिव होऊन त्यांनी आम्हाला भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट खलपुरुष ठरवले असते. असो. या निमित्ताने का होईना, आमच्यात सुधारणेला बराच वाव आहे हे कळतंय ही चांगलीच गोष्ट आहे. तुकोब्बारायांनी म्हटलेच आहे ना, "निंदकाचे घर असावे शेजारी" :)

बॅटमॅन 11/07/2014 - 02:31
पाहिली नवकविता, नवकवी सांप्रत प्रसाद गोडबोले | चुरचुरीत म्याटर, जयात बहु स्फोटकांचेचि गो डबोले || राडे होता काडी टाकुनि, मज्जा इतरां डावळुनी पाहावी | तेही नसतां मग विडंबनहस्तेचि खुल्ली सारावी ||

भम्पक 12/07/2014 - 21:14
"मीही दांभिक अन तुही दांभिक ...दांभिक अवघे मिपा ..... हेतू मात्र पाक त्यामुळे त्यावरी सरस्वतिची कृपा II नावात गोड परंतु अति कडू शार हि वाचा ... नावावर अजून काही नाही पण प्रसाद मात्र साचा ....II एकेकाचे नाव ऐकण्या मौज वाटे कानी..... कुत्सित ,खडूस बोल ऐकल्या मात्र सपशेल येई ग्लानी....II अवघ्या मिपा करांची माफी मागून , खरे तर खूप खरडायचे मनात होते परंतु सुरुवातीलाच ग्लानी येऊ द्यायची नव्हती.प्रसाद्जींचे आभार .....अन वरून त्यांचीच खिल्ली उडवल्याबद्दल माफी.अपेक्षा हलके घ्याल.

पैसा 31/07/2014 - 23:24
गिर्जाकाकू, रन औट झालात की हो! योग्य लोकांना योग्य वेळी सुपारी दिली नाहीत काय!

In reply to by पैसा

छ्या: छ्या:छ्या:छ्या: ! सुपारी वगैरे नाही हो , बाण जिकडे जिकडे सोदले तिकडे तिकडे जाऊन लागले , बाकी मग प्रतिसाद आले नाहीत तरी आपली काही हरकत नाही *biggrin*

धन्या 01/08/2014 - 18:21
'सरळ' बिचारा 'गरीब' माणुस दिसती जिकडे तिकडे ते स्वतःला म्हणवती येथे "धनाजी" आणि "वाकडे "||६||
तुमचं आपलं काहीतरीच हा प्रगोकाका. आमच्या एका मित्राने आमचे नेमके वर्णन केले आहे. ते म्हणतात, "आम्ही म्हणजे नुसतीच दिड दोनशे पुस्तके वाचलेले, स्वतःचा काहीच अनुभव नसलेले, स्वतःपुरतेच पाहत असल्यामुळे स्वतःला आणि लोकांना समजून घेण्यासाठी लोकांशी शाब्दिक चकामकींची गरज असलेले आणि इगो कुरवाळण्यासाठी वांझोटया चर्चा करणारे असे लोकांनी गांभिर्याने घ्यायची मुळीच गरज नसलेले व्यक्तीमत्व". तरी बरं आहे की ते आम्हाला "रीमोटली" ओळखतात. विकांताआड जर भेट झाली असती तर त्यांना आमच्या सार्‍या अवगुणांची जाणिव होऊन त्यांनी आम्हाला भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट खलपुरुष ठरवले असते. असो. या निमित्ताने का होईना, आमच्यात सुधारणेला बराच वाव आहे हे कळतंय ही चांगलीच गोष्ट आहे. तुकोब्बारायांनी म्हटलेच आहे ना, "निंदकाचे घर असावे शेजारी" :)
फारच कंटाळा आल्याने ही एक जिलबी पाडण्याची खुमखुमी आली आहे ...

स्वप्नातली ती

चैतू ·
काव्यरस
स्वर्गातून अवतरली तु, जणु मदनाची रती, लावण्यवती परी तु, पाहताक्षणी गुंग झाली मती तु येताच पक्षी, गातात स्वागतगीते, दवावरून चालते तु, तेव्हा गवतही शहारते केसांशी खेळत जेव्हा, वारा तुला झोंबी घालतो, मनातल्या मनात तेव्हा, त्याचाही हेवा वाटतो शृंगारासाठी तु एक, टवटवीत गूलाब हाती घेतला, पण सौँदर्य तुझे पाहुन, बिचारा गूलाबही लाजला तु जिथे ठेवते पाऊल, तिथे धरणीलाही प्रेमांकुर फूटतो, आणि तुझ्या बागडण्याने, प्रेमाचा सुगंध दरवळतो चिँब पावसात भिजताना, तु बेधुंद झाली, आणि तुझ्यासमवेत नशा, मलाही चढत गेली दाट धुक्याला लपेटून, हरवून गेली कुठे, वेडे फक्त स्वप्नातच येते, भेटायला सांग येशील कुठे

अर्थसंकल्प-२०१४

प्रसाद गोडबोले ·

नुकतेच काही मुद्दे वाचनात आले आहेत , त्यावरुन तरी हे बजेट अतिषय सुंदर वाटत आहे :) अपेक्षेप्रमाणे एफ डी आय आणि पी पी पी वर भर दिसतोय . सिगरेट वरील एक्साईज ड्युटी वाढवल्याने , तेही थोडीथोडकी नव्हेतर ११ टक्के वरुन तब्बल ७२ टक्के , सिगरेट व इरत तंबाखुजन्य पदार्थ महागतील... हे आपल्याला लय आवडलय :) इन्कम टॅक्स ची बकेट २.५ लाख , हाऊसिंग इन्टरेट वरील २ लाख ८० सी ची १.५ लाख केली आहे ! थोडक्यात पहिल्या सहा लाखांवर एक रुपायाही टॅक्स भरावा लागणार नाहीये .... हुर्रे :) ( ८० इ इ चे नक्की काय ते कळाले नाही पण तरीही) आता घर घ्यायला हव:)लवकरच !!:)

विटेकर 10/07/2014 - 14:49
ट्याक्सेबल इन्कम कमी झाला ! १. ५०,००० - स्तन्दर्द दिद्क्शन मध्ये वाढले २. ५०,०००- हाऊसिंग लोन इन्त्रेस्ट सबसिडी ३. ५०,००० - ८० सी सी मध्ये वाढविले म्हणजे एकूण १,५०,००० ट्याक्सेबल इन्कम कमी झाला म्हणजे ३० % वाल्यांसाठी सरळ ४५,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला आणि २० % वाल्यांसाठी ३०,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला असेच म्हणता येईल ना ? जाणकारांकडून खात्री करुन घ्यायला हवी . पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है !

In reply to by विटेकर

येस्स !! पण
पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है
! >>> असे कन्क्लुजन लगेच काढता येणार नाएही ... मलातर वाटतय की पुढील कठोर निर्णयांसाठीची ही तयारी आहे ... पुढे डीझेल , फर्टीलायझएर्स आणि अन्न धान्यावरील सबसीडी काढुन घ्यायचा विचार दिसतोय ... शिवाय ग्रोथरेटही ६% च्या खाली राहणार आहे आणि भरीत भर म्हणुन ह्या उशीराने येणार्‍या मान्सुन मुळे सर्वच अन्न धान्यांचे भाव कडाडणार आहेत ... सो लेट्स बी प्रीपेअर्ड ! हा वाचवलेला टॅक्स योग्यरीतीने इन्व्हेस्ट करायला हवा :)

विटेकर 10/07/2014 - 15:10
लै वेळा चालेल. कॉन्ग्रेसने काहीही न देता महागाई वाढविली होती !! वाचलेल्या ट्याक्स मध्ये महागाई ची भरपाई होईल असे म्हणु या !

विटेकर 10/07/2014 - 15:11
आणि सब्सिडी काढली हे अतिशय उत्तम केले.. स्साला कुणाच्य खांद्यावर कुणाचे ओझे ? सिग्रेटी अजून महाग करायला हव्या होत्या !

सौंदाळा 10/07/2014 - 15:45
त्यो कन्व्हेयन्स अलाऊन्स का काय म्हनत्यात तो वाढीवला का? मागच्या धा वरसापास्नं ८०० रु/महीना हाये. या बजेटात वाढनार म्हनत होते.

सिगारेट न ओढणार्‍या माणसांना सिगारेट महाग झाल्याने इतका आनंद का होत असावा ? कोणत्याही वस्तूवरील करआकारणी भावूक होवून केली जावू नये तर तार्किकतेच्या कसोटीवर व्हावी असे मला वाटते. अर्थतज्ञांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल. Practically स्मोकिंग करणारी व्यक्ती सिगरेट महाग झाली म्हणुन स्मोकिंग कमी करेल असे वाटत नाही, उलट त्यामूळे घरखर्चाकरिता घरी देत असलेली रक्कमच कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

In reply to by प्रचेतस

ऋषिकेश 10/07/2014 - 17:06
वर वर पाहता प्रत्येक बाबतीत काहितरी पैसा अलोकेटेड दिस्तोय. नुसती "टायटल्स" बघितली तर बजेट एखाद्याला बॅलन्स्डही वाटू शकेल. अजूनही मीही पूर्ण खोलात वाचले नाही, पण एक पापुद्रा उलगडताच रंग दिसू लागताहेतः देशासाठी अत्यंत गरजेच्या व अनेक महत्त्वाच्या योजनांना अलोकेटेड बजेट अगदीच तुटपुंजे आहे. उदा: एकट्या पश्चिमबंगालमध्ये मुलींच्या जन्म व शिक्षणासाठी हजार कोटी तरतूद राज्याच्या बजेटमध्ये असताना, अख्ख्या देशात (सगळी राज्ये व युनियन टेरीटरी मिळून) 'बेटी बचाव - बेटी बढाओ' ला फक्त १०० कोटी रुपये? नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! सरदार पटेलांच्या पुतळ्याला दोनशे कोटी!! नोकरदारांना टॅक्स वाचतोय असे वाटायला लावणे (व प्रत्यक्षात GST लागू करून त्याहून अधिक काढून घेणे) शिक्षण - सर्व शिक्षा अभियानासाठीचा आकडाही बहुदा घटलाय एकदा बघतो),आरोग्य (म्हणजे नुसते AIIMS उघडणे नव्हे :( ), कला, आर अ‍ॅण्ड डी वगैरे क्षेत्राच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. :(

In reply to by धन्या

ऋषिकेश 10/07/2014 - 17:18
गुड्स अँड सर्विस टॅक्स सध्याच्या सर्विस टॅक्सला रिप्लेस करेल. अजून मंत्रीमंडळाची मंजूरी बाकी पण ती याच वर्षात घेणार असे जेटलीजी म्हणाले आहेत.

In reply to by अनुप ढेरे

खरंतर सगळे टॅक्सेस झोल आहेत , ज्याला चुकवायचे तो कसेही करुन चुकवतोच , आम्ही बिचारे सामान्य मध्यमवर्गीय नोकदार मात्र फुकट गप गुमान भरत रहातो ... सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्स !!

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा 11/07/2014 - 09:07
सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्सजी जी एस टी तसाच कर असणार आहे. हा कर राज्ये गोळा करणार व त्याचा वाटा केंद्राला देणार . माझ्या माहितीप्रमाणे एक्साईज व्हॅट. एल बी टी हे सर्व इतिहास जमा होतील. सर्व भारत देशात एकच समान अशी करपद्धती निर्माण होईल. पण काही राज्याना वाटते त्यात आपला तोटा आहे. म्हणून हे घोंगडे भिजत पडले आहे. आत अर्थ संकल्य - ते एम्स आय आय एम या सामाजिक- राजकीय सोयी आहेत. त्या अर्थ घटना नव्हेत. अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. त्यात ३५ टक्क्याची नवी स्लॅब, इनहेरिटन्स कर, संपत्ती कर ई ई असू शकतात. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. ते ईझम पेक्षाही भयंकर प्रकरण आहे. कर वाढवला की श्रीमंतांचा उद्योग पाण्यातील रस संपतो हा एक भंपक सिद्धांत आहे. कोणताही उद्योगपति हा पंचविसावा तास निर्माण करून कारखाना चालवीत नाही. शेकडो हात त्या पाठीमागे असतात. भांडवल हा त्यातील एक फक्त घटक असतो. बास ! आयकर विवरण भरणे हे करदात्याने काम न ठेवता सर्व ठिकाणी पॅनचे कडक नियंत्रण ठेवून आयकराचे बील तयार करणे ही आयकर विभागानेच करावे. व वजावटीसाठीचा भाग फक्त करदात्याकडे द्यावा .हे १०० टक्के झाल्यास कदाचित केटरर्स , मोठे शेतकारी , वडापाववाले सुद्धा कराच्या पंखाखाली खेचता येतील. अनेक पगारदार वाले फॉर्म १६ ची कॉपी म्हणजे रिटर्न असा समज करून घेतलेले असतात त्यांचे पितळ उघडे पडेल. ( यात मोठ मोठे अधिकारीही असतात असे निरिक्षण आहे. ) लोकाना सरळ करण्याचीही तितकीच गरज आहे. एक उदाहरण असे की १३ वा १४ वा १५ वा १६ वा सिलिंडर १००० रुपयाला घ्यावा लागला तर माझी आर्थिक क्षमता आहे. मग की तो २५० ने वाढला तर बोंब का मारायची? आठवड्याला शनिवारी हजार रूपये जेवणाला खर्च करणारेच अशी बोंब ठोकणारे असतात. रेल्वे पासाचे भाडे वाढले म्हणून मुंबईकरानी तक्रार करून नये तर जादा गाड्या सोडा यावर आंदोलन केले पाहिजे. किमान दहा वर्षे तरी लोकांची क्रयशक्ती कमी केली पाहिजे तर महागाईवर नियंत्रण येईल. श्रींमंताना ४० टक्के कर लावायचा व ते रेल्वे त गुंतवले तर भरघोस सूट आयकरात द्यायची असे करून रेलेवे चा वहातुकीतला वाटा वाढवता येईल, परिणामी तेलाची आयात कमी होईल. आज मालवहातुकीत रेलेवेचा वाटा फक्त १० टक्के आहे असे म्हणतात. असो लोकानीही आर्थिक शिस्ती साठी काही किमत दिली पाहिजे ती फक्त तंबाखू खाणार्‍यानीच का द्यायची ?

In reply to by चौकटराजा

विकास 13/07/2014 - 17:22
अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. +१. महाराष्ट्र निवडणूक त्यात प्रामुख्याने आहे असे वाटते. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. गोडबोल्यांचा लेख कुठे आला आहे का? वाचायला आवडेल.

In reply to by ऋषिकेश

प्रचेतस 10/07/2014 - 17:50
धन्स रे. अजून बजेट पाहिलेच नाहीये. गंगा साफसफाई आवश्यक आहेच पण सरदार पटेलांचा पुतळा उभारणे हा विनाकारण खर्च आहे. किंबहुना पुतळ्यांचे राजकारण कुणीही करताच कामा नये. GST लागू झाल्यावरच त्याबाबतीत मत देता येऊ शकेल. पण इतर काही प्लस पॉइंट असतीलच.

In reply to by प्रचेतस

सरदार पटेलांच्या पुतळ्याने पर्यटन विकास होवू शकतो, पर्यटनाद्वारे उत्पन्नाचा लाभ होवू शकतो. पण हा अर्थिक लाभ केंद्राला होईल की राज्याला याबद्दल मला फारशी माहिती नाही. बाकी गंगा सफाई करिता दोन हजार कोटी खूप जास्त वाटत आहेत आणि गंगाच फक्त का ? बाकी दूषित नद्याही स्वच्छ व्हायला हव्यात ना...

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 10/07/2014 - 18:27
गंगासफाई बहुतेक उत्तराखंड, युपी पासून थेट बिहार, पश्चिम बंगालपर्यंत अपेक्षित असावी. बाकी कुठल्या पुतळ्याच्या उभारणीमुळे पर्यटन विकास होऊ शकतो असे मला वाटत नाही.

नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! गंगासफाईकडे (राजकारणाच्या चाललेल्या अतिरेकाने सहजपणे प्रथम मनात येणार्‍या विचारांमुळे) धार्मिक परिमाण लाऊन बधितले तरच तसे वाटेल. व्यापारी दृष्टीने पाहिल्यास या योजनेचे खालील फक्त काही फायदे लक्षात येऊन मतपरिवर्तन होईल असे वाटते... १. जलवाहतूक की जगातली सर्वात स्वस्त आणि पर्यावरणाचा कमीतकमी र्‍हास करणारी माणसे आणि मालाची वाहतूक करणारी व्यवस्था आहे. सर्व सुधारलेल्या आणि इतरही देशांत ही पद्धत यशस्वीपणे वापरात आणली गेली आहे. भारताने आतापर्यंत गंगेच्या रुपांत असलेल्या आपल्या याप्रकारच्या सर्वात मोठ्या संसाधनाकडे (अ‍ॅसेट) पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. २. वहातुकव्यवस्था सुधारण्याने एकंदर अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या वाहतुकीच्या सोईवर किती सखोल फायदेशीर परिणाम होतो हे सांगायलाच पाहिजे असे नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे उदाहरण समोर आहेच. ३. साधारण १००० किलोमीटर लांबीच्या गंगासफाईने भारताच्या काही कोटीच्या आसपास जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी आणि काही लाख एकर जमिनीला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच गंगेच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते समुद्रात जाण्याऐवजी वळवून इतर नद्यांत सोडता आले तर फायदे जमेस धरले तर या प्रकल्पाच्या फायद्यांची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. फक्त वरच्याच फायद्यांची गोळाबेरीज केली तरी दोन हजार कोटीची गुंतवणूक मोठी वाटू नये... किंबहुना हे बजेट पुढे योग्य तर्‍हेने वाढवावे लागेलही आणि त्यापासून होणारे फायदे त्याचे समर्थन करू शकतील. अजूनही संशयाचे निराकरण झाले नसल्यास तुलनेसाठी ९३ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी दशकभरापेक्षा जास्त पूर्वी ११,४६० कोटी खर्च केले होते हे ध्यानात घेण्याजोगे आणि पुरेसे आहे असे वाटते... (स्वगत : भारतात केवळ खर्चाच्या आधारे (expense-oriented) नसून फलनिष्पत्तीच्या आधारे (outcome-oriented) अर्थसंकल्प तयार करणे व त्याचे मूल्यमापन होणे सुरू होईल तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऋषिकेश 14/07/2014 - 16:20
माझा आक्षेप गंगेच्या सफाईला इतके बजेट का? असा नाहिये. मी अर्थसंकल्पाचे वर्णन "दिखाऊ" केले आहे. तसे का ते अधिक स्पष्ट करतो गंगेला दोन हजार कोटी देताना इतर अनेक योजनांना अगदीच पाने पुसली आहेत. शिक्षण, आरोग्य, कला, संशोधन वगैरे क्षेत्रात गुंतवणूक लगेच फळे देत नाही. काहि पिढ्या जाव्या लागतात हे आपण सारे जाणतो. सद्य सरकारने जी कामे हाती घेण्यास प्राथमिकता दिली आहे ती मात्र तुलनेने अल्पावधीत होणारी आहेत. मात्र ज्याचा देशाला अधिक फायदा आहे मात्र रिझल्ट्स यायला वेळ लागतो अश्या क्षेत्रातील गुंतवणूक अगदीच तुटपुंजी आहे. एखादे महत्त्वाचे काम करणे यापेक्षा काम करून "दाखवणे" याला प्राथमिकता आहे हे सहज लक्षात यावे. सद्य काळात हे भाजपाला (पाच वर्षांनी सत्ता टिकवण्यासाठी) गरजेचे आहे. मनमोहन सिंग सरकार हे करू न शकल्यानेच सत्ता टिकवू शकले नाही वगैरे संभाव्य प्रतिवाद आगाऊ मान्यच आहे. या गोष्टी करू नये असे नाही पण अ‍ॅट कॉस्ट ऑफ? आशा आहे मुद्दा अधिक स्पष्ट केला आहे.

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 14/07/2014 - 16:27
अधिक स्पष्ट करायला थोडे कॅल्क्युलेशन केले आहे. बेटीबढाओ, बेटी बचाओ ला १०० कोटी रुपये दिले आहेत. २०१२ला बर्थ रेट आहे २०.६ म्हणजे वर्षाला ~२.५ कोटी अपत्य जन्माला येतात पैकी अर्ध्या मुली आहेत असे समजू. तेव्हा १.२५ कोटी मुलींपैकी केवळ ३०% मुलींनाच सरकारने पाठबळ द्यायचे ठरवले (खरतंर आकडा बराच कमी आहे कारण इथे फक्त जन्माचे आकडे आहे, बेटी बचाव मध्ये गेल्या ५ वर्षात जन्मलेल्या मुली आहेत पण ते सोडून देऊ) आता त्या ~३८.६ लाख मुलींवर १०० कोटी खर्च करायचे तर पर मुलगी केवळ ~२६० रुपये येतात. इतके पुरेसे वाटते?

भाते 10/07/2014 - 20:49
आज वाचुन दाखवलेला अर्थसंकल्प हा सरकार राबवु इच्छित असलेल्या योजनांच्या घोषणा होत्या. अजुन हा अर्थसंकल्प दोन्हीकडे (लोकसभा आणि राज्यसभा) मान्य व्हायचा बाकी आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क ११% वरून ७२% इतके वाढवले आहे. साडेसहा पट! वेडयासारखी रेल्वे भाववाढ करून नंतर ती कमी करायला लागल्याच्या अनुभवावरून हे सरकार नक्कीच शहाणे झाले असेल. साडेसहापट वाढ हिदेखील अशीच धुळफेक आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क वाढवल्याने तंबाखु, तंबाखुमिश्रित पान, मावा, आणि सिगारेट या सगळ्यांचे भाव अचानक भरपुर वाढतील. या सगळ्या वस्तुंची विक्री बहुदा पानवाल्याकडे होते. हे बहुतांश पानवाले भैया युपीचे आहेत. इतकी भाववाढ झाल्यावर कोणीही या पदार्थांचे सेवन नक्कीच कमी करेल. कोणीही इतकी भयानक भाववाढ नक्कीच सहन करू शकणार नाही. मग सहाजिकच या भैयांच्या रोजगारावर परिणाम होईल. समस्त युपीची लॉबी याला नक्कीच विरोध करेल. सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांकडुनदेखिल (मालाची कमी विक्री, कामगार कपात या कारणांमुळे) याचा विरोध होईल. अखेर सरकार यापुढे नमते घेऊन ही भाववाढ कमी करेल. खांगेस महाराष्ट्रात समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा ऊभा करण्यात पैसे वाया घालवत आहे; तिच चुक सरदार पटेलांचा पुतळा ऊभारायला २०० कोटी देऊन केंद्र सरकार करत आहे.

विकास 11/07/2014 - 00:18
लोकसत्ता संपादक गिरीष कुबेर यांचे विश्लेषण बघण्यासारखे वाटले. महाराष्ट्रात पण आय आय एम चालू होणार आहे!

सुधीर 14/07/2014 - 11:22
बजेट वर भाष्य करणारे तज्ञांचे, लेखकांचे, बड्या व्यावसायिकांचे मत ऐकले-वाचले. प्रत्येकाचाच बजेटकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. परवाच्या दिवशी औद्योगिक उत्पादन वृद्धीचे आकडे प्रसिद्ध झाले, त्यावर विश्लेषणात्मक अधिक भाष्य करण्यासाठी नेहमीप्रमाणे बँक ऑफ बडोद्याच्या प्रमुख अर्थतज्ञ रुपा नितसुरे-रेगे यांना रेडिओवर बोलवले होते. त्यावेळी त्यांनी बजेटवर सुद्धा आपले मत मांडले जे मला आवडले. ते इथे ऐकता येईल ( ६ मिनटांपासून १८ मिनिटांपर्यंत). या बाईंचं विश्लेषण मला नेहमीच आवडते. त्यांना मागे एकदा लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात पाहून आनंद झाला होता. त्यांना लोकसत्ताने लिहिते करावे अस मनापासून वाटते.

एकूणच काही प्रतिसाद बघता मोदी पंतप्रधान झाल्याच्या धक्क्यातून विचारवंत मंडळी अजून सावरलेली दिसत नाहीत हे स्पष्टच दिसत आहे. असो. चालायचेच.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ऋषिकेश 14/07/2014 - 20:22
कोणाला विचारवंत ही शिवी दिलीये / म्हटलेय माहिती नाही. पण मोदीवर जाऊ द्या त्या सरकारवर नुसती टिका करण्याऐवजी व्यवस्थित म्हणणे मांडत मुद्देसूद टिका करूनही असे टोमणे हे प्रतिवाद शक्य नसल्याचे लक्षण समजावे लागेल. असो. चालायचेच.

आयुर्हित 14/07/2014 - 23:34
बजेट नेमका असा का? असा प्रश्न प्रत्येक सूज्ञ भारतीयाला पडला असेल.वित्तमंत्री अरुण जेटली यांना विचारले गेलेले प्रश्न व त्यावरील त्यांचे समर्पक उत्तरे हवी असतील तर पहा : आपकी अदालत आपकी अदालत http://www.youtube.com/watch?v=QwPqImDOQgs

नुकतेच काही मुद्दे वाचनात आले आहेत , त्यावरुन तरी हे बजेट अतिषय सुंदर वाटत आहे :) अपेक्षेप्रमाणे एफ डी आय आणि पी पी पी वर भर दिसतोय . सिगरेट वरील एक्साईज ड्युटी वाढवल्याने , तेही थोडीथोडकी नव्हेतर ११ टक्के वरुन तब्बल ७२ टक्के , सिगरेट व इरत तंबाखुजन्य पदार्थ महागतील... हे आपल्याला लय आवडलय :) इन्कम टॅक्स ची बकेट २.५ लाख , हाऊसिंग इन्टरेट वरील २ लाख ८० सी ची १.५ लाख केली आहे ! थोडक्यात पहिल्या सहा लाखांवर एक रुपायाही टॅक्स भरावा लागणार नाहीये .... हुर्रे :) ( ८० इ इ चे नक्की काय ते कळाले नाही पण तरीही) आता घर घ्यायला हव:)लवकरच !!:)

विटेकर 10/07/2014 - 14:49
ट्याक्सेबल इन्कम कमी झाला ! १. ५०,००० - स्तन्दर्द दिद्क्शन मध्ये वाढले २. ५०,०००- हाऊसिंग लोन इन्त्रेस्ट सबसिडी ३. ५०,००० - ८० सी सी मध्ये वाढविले म्हणजे एकूण १,५०,००० ट्याक्सेबल इन्कम कमी झाला म्हणजे ३० % वाल्यांसाठी सरळ ४५,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला आणि २० % वाल्यांसाठी ३०,००० ( नोन ट्याक्सेबल ) पगार वाढला असेच म्हणता येईल ना ? जाणकारांकडून खात्री करुन घ्यायला हवी . पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है !

In reply to by विटेकर

येस्स !! पण
पण जर असेच असेल तर अच्छे दिन तो आ ही गये है
! >>> असे कन्क्लुजन लगेच काढता येणार नाएही ... मलातर वाटतय की पुढील कठोर निर्णयांसाठीची ही तयारी आहे ... पुढे डीझेल , फर्टीलायझएर्स आणि अन्न धान्यावरील सबसीडी काढुन घ्यायचा विचार दिसतोय ... शिवाय ग्रोथरेटही ६% च्या खाली राहणार आहे आणि भरीत भर म्हणुन ह्या उशीराने येणार्‍या मान्सुन मुळे सर्वच अन्न धान्यांचे भाव कडाडणार आहेत ... सो लेट्स बी प्रीपेअर्ड ! हा वाचवलेला टॅक्स योग्यरीतीने इन्व्हेस्ट करायला हवा :)

विटेकर 10/07/2014 - 15:10
लै वेळा चालेल. कॉन्ग्रेसने काहीही न देता महागाई वाढविली होती !! वाचलेल्या ट्याक्स मध्ये महागाई ची भरपाई होईल असे म्हणु या !

विटेकर 10/07/2014 - 15:11
आणि सब्सिडी काढली हे अतिशय उत्तम केले.. स्साला कुणाच्य खांद्यावर कुणाचे ओझे ? सिग्रेटी अजून महाग करायला हव्या होत्या !

सौंदाळा 10/07/2014 - 15:45
त्यो कन्व्हेयन्स अलाऊन्स का काय म्हनत्यात तो वाढीवला का? मागच्या धा वरसापास्नं ८०० रु/महीना हाये. या बजेटात वाढनार म्हनत होते.

सिगारेट न ओढणार्‍या माणसांना सिगारेट महाग झाल्याने इतका आनंद का होत असावा ? कोणत्याही वस्तूवरील करआकारणी भावूक होवून केली जावू नये तर तार्किकतेच्या कसोटीवर व्हावी असे मला वाटते. अर्थतज्ञांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल. Practically स्मोकिंग करणारी व्यक्ती सिगरेट महाग झाली म्हणुन स्मोकिंग कमी करेल असे वाटत नाही, उलट त्यामूळे घरखर्चाकरिता घरी देत असलेली रक्कमच कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

In reply to by प्रचेतस

ऋषिकेश 10/07/2014 - 17:06
वर वर पाहता प्रत्येक बाबतीत काहितरी पैसा अलोकेटेड दिस्तोय. नुसती "टायटल्स" बघितली तर बजेट एखाद्याला बॅलन्स्डही वाटू शकेल. अजूनही मीही पूर्ण खोलात वाचले नाही, पण एक पापुद्रा उलगडताच रंग दिसू लागताहेतः देशासाठी अत्यंत गरजेच्या व अनेक महत्त्वाच्या योजनांना अलोकेटेड बजेट अगदीच तुटपुंजे आहे. उदा: एकट्या पश्चिमबंगालमध्ये मुलींच्या जन्म व शिक्षणासाठी हजार कोटी तरतूद राज्याच्या बजेटमध्ये असताना, अख्ख्या देशात (सगळी राज्ये व युनियन टेरीटरी मिळून) 'बेटी बचाव - बेटी बढाओ' ला फक्त १०० कोटी रुपये? नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! सरदार पटेलांच्या पुतळ्याला दोनशे कोटी!! नोकरदारांना टॅक्स वाचतोय असे वाटायला लावणे (व प्रत्यक्षात GST लागू करून त्याहून अधिक काढून घेणे) शिक्षण - सर्व शिक्षा अभियानासाठीचा आकडाही बहुदा घटलाय एकदा बघतो),आरोग्य (म्हणजे नुसते AIIMS उघडणे नव्हे :( ), कला, आर अ‍ॅण्ड डी वगैरे क्षेत्राच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. :(

In reply to by धन्या

ऋषिकेश 10/07/2014 - 17:18
गुड्स अँड सर्विस टॅक्स सध्याच्या सर्विस टॅक्सला रिप्लेस करेल. अजून मंत्रीमंडळाची मंजूरी बाकी पण ती याच वर्षात घेणार असे जेटलीजी म्हणाले आहेत.

In reply to by अनुप ढेरे

खरंतर सगळे टॅक्सेस झोल आहेत , ज्याला चुकवायचे तो कसेही करुन चुकवतोच , आम्ही बिचारे सामान्य मध्यमवर्गीय नोकदार मात्र फुकट गप गुमान भरत रहातो ... सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्स !!

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा 11/07/2014 - 09:07
सगळे टॅक्स रद्द करुन एकच एप्नेडीचर टॅक्स लागु केला पाहिजे बस्सजी जी एस टी तसाच कर असणार आहे. हा कर राज्ये गोळा करणार व त्याचा वाटा केंद्राला देणार . माझ्या माहितीप्रमाणे एक्साईज व्हॅट. एल बी टी हे सर्व इतिहास जमा होतील. सर्व भारत देशात एकच समान अशी करपद्धती निर्माण होईल. पण काही राज्याना वाटते त्यात आपला तोटा आहे. म्हणून हे घोंगडे भिजत पडले आहे. आत अर्थ संकल्य - ते एम्स आय आय एम या सामाजिक- राजकीय सोयी आहेत. त्या अर्थ घटना नव्हेत. अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. त्यात ३५ टक्क्याची नवी स्लॅब, इनहेरिटन्स कर, संपत्ती कर ई ई असू शकतात. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. ते ईझम पेक्षाही भयंकर प्रकरण आहे. कर वाढवला की श्रीमंतांचा उद्योग पाण्यातील रस संपतो हा एक भंपक सिद्धांत आहे. कोणताही उद्योगपति हा पंचविसावा तास निर्माण करून कारखाना चालवीत नाही. शेकडो हात त्या पाठीमागे असतात. भांडवल हा त्यातील एक फक्त घटक असतो. बास ! आयकर विवरण भरणे हे करदात्याने काम न ठेवता सर्व ठिकाणी पॅनचे कडक नियंत्रण ठेवून आयकराचे बील तयार करणे ही आयकर विभागानेच करावे. व वजावटीसाठीचा भाग फक्त करदात्याकडे द्यावा .हे १०० टक्के झाल्यास कदाचित केटरर्स , मोठे शेतकारी , वडापाववाले सुद्धा कराच्या पंखाखाली खेचता येतील. अनेक पगारदार वाले फॉर्म १६ ची कॉपी म्हणजे रिटर्न असा समज करून घेतलेले असतात त्यांचे पितळ उघडे पडेल. ( यात मोठ मोठे अधिकारीही असतात असे निरिक्षण आहे. ) लोकाना सरळ करण्याचीही तितकीच गरज आहे. एक उदाहरण असे की १३ वा १४ वा १५ वा १६ वा सिलिंडर १००० रुपयाला घ्यावा लागला तर माझी आर्थिक क्षमता आहे. मग की तो २५० ने वाढला तर बोंब का मारायची? आठवड्याला शनिवारी हजार रूपये जेवणाला खर्च करणारेच अशी बोंब ठोकणारे असतात. रेल्वे पासाचे भाडे वाढले म्हणून मुंबईकरानी तक्रार करून नये तर जादा गाड्या सोडा यावर आंदोलन केले पाहिजे. किमान दहा वर्षे तरी लोकांची क्रयशक्ती कमी केली पाहिजे तर महागाईवर नियंत्रण येईल. श्रींमंताना ४० टक्के कर लावायचा व ते रेल्वे त गुंतवले तर भरघोस सूट आयकरात द्यायची असे करून रेलेवे चा वहातुकीतला वाटा वाढवता येईल, परिणामी तेलाची आयात कमी होईल. आज मालवहातुकीत रेलेवेचा वाटा फक्त १० टक्के आहे असे म्हणतात. असो लोकानीही आर्थिक शिस्ती साठी काही किमत दिली पाहिजे ती फक्त तंबाखू खाणार्‍यानीच का द्यायची ?

In reply to by चौकटराजा

विकास 13/07/2014 - 17:22
अजूनही काही राजकीय मजबुर्‍या शिल्लक असल्याने कडू गोळी राखून ठेवण्यात आली असावी. +१. महाराष्ट्र निवडणूक त्यात प्रामुख्याने आहे असे वाटते. मला अच्यूत गोडबोले हे अभ्यासक खरे अभ्यासक वाटले. बाकी सारे काही ईझम्सनी पछाडलेले वाटतात. राजकीय पक्षाचे प्रवक्ते यांच्याबद्द्ल उल्लेख न केलेलाच बरा. गोडबोल्यांचा लेख कुठे आला आहे का? वाचायला आवडेल.

In reply to by ऋषिकेश

प्रचेतस 10/07/2014 - 17:50
धन्स रे. अजून बजेट पाहिलेच नाहीये. गंगा साफसफाई आवश्यक आहेच पण सरदार पटेलांचा पुतळा उभारणे हा विनाकारण खर्च आहे. किंबहुना पुतळ्यांचे राजकारण कुणीही करताच कामा नये. GST लागू झाल्यावरच त्याबाबतीत मत देता येऊ शकेल. पण इतर काही प्लस पॉइंट असतीलच.

In reply to by प्रचेतस

सरदार पटेलांच्या पुतळ्याने पर्यटन विकास होवू शकतो, पर्यटनाद्वारे उत्पन्नाचा लाभ होवू शकतो. पण हा अर्थिक लाभ केंद्राला होईल की राज्याला याबद्दल मला फारशी माहिती नाही. बाकी गंगा सफाई करिता दोन हजार कोटी खूप जास्त वाटत आहेत आणि गंगाच फक्त का ? बाकी दूषित नद्याही स्वच्छ व्हायला हव्यात ना...

In reply to by मराठी कथालेखक

प्रचेतस 10/07/2014 - 18:27
गंगासफाई बहुतेक उत्तराखंड, युपी पासून थेट बिहार, पश्चिम बंगालपर्यंत अपेक्षित असावी. बाकी कुठल्या पुतळ्याच्या उभारणीमुळे पर्यटन विकास होऊ शकतो असे मला वाटत नाही.

नी त्याच वेळी दुसरीकडे गंगा साफसफाईला दोन हजार कोटी+ बजेट!! गंगासफाईकडे (राजकारणाच्या चाललेल्या अतिरेकाने सहजपणे प्रथम मनात येणार्‍या विचारांमुळे) धार्मिक परिमाण लाऊन बधितले तरच तसे वाटेल. व्यापारी दृष्टीने पाहिल्यास या योजनेचे खालील फक्त काही फायदे लक्षात येऊन मतपरिवर्तन होईल असे वाटते... १. जलवाहतूक की जगातली सर्वात स्वस्त आणि पर्यावरणाचा कमीतकमी र्‍हास करणारी माणसे आणि मालाची वाहतूक करणारी व्यवस्था आहे. सर्व सुधारलेल्या आणि इतरही देशांत ही पद्धत यशस्वीपणे वापरात आणली गेली आहे. भारताने आतापर्यंत गंगेच्या रुपांत असलेल्या आपल्या याप्रकारच्या सर्वात मोठ्या संसाधनाकडे (अ‍ॅसेट) पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. २. वहातुकव्यवस्था सुधारण्याने एकंदर अर्थव्यवस्थेवर आणि जनतेच्या वाहतुकीच्या सोईवर किती सखोल फायदेशीर परिणाम होतो हे सांगायलाच पाहिजे असे नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे उदाहरण समोर आहेच. ३. साधारण १००० किलोमीटर लांबीच्या गंगासफाईने भारताच्या काही कोटीच्या आसपास जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी आणि काही लाख एकर जमिनीला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच गंगेच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते समुद्रात जाण्याऐवजी वळवून इतर नद्यांत सोडता आले तर फायदे जमेस धरले तर या प्रकल्पाच्या फायद्यांची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. फक्त वरच्याच फायद्यांची गोळाबेरीज केली तरी दोन हजार कोटीची गुंतवणूक मोठी वाटू नये... किंबहुना हे बजेट पुढे योग्य तर्‍हेने वाढवावे लागेलही आणि त्यापासून होणारे फायदे त्याचे समर्थन करू शकतील. अजूनही संशयाचे निराकरण झाले नसल्यास तुलनेसाठी ९३ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी दशकभरापेक्षा जास्त पूर्वी ११,४६० कोटी खर्च केले होते हे ध्यानात घेण्याजोगे आणि पुरेसे आहे असे वाटते... (स्वगत : भारतात केवळ खर्चाच्या आधारे (expense-oriented) नसून फलनिष्पत्तीच्या आधारे (outcome-oriented) अर्थसंकल्प तयार करणे व त्याचे मूल्यमापन होणे सुरू होईल तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऋषिकेश 14/07/2014 - 16:20
माझा आक्षेप गंगेच्या सफाईला इतके बजेट का? असा नाहिये. मी अर्थसंकल्पाचे वर्णन "दिखाऊ" केले आहे. तसे का ते अधिक स्पष्ट करतो गंगेला दोन हजार कोटी देताना इतर अनेक योजनांना अगदीच पाने पुसली आहेत. शिक्षण, आरोग्य, कला, संशोधन वगैरे क्षेत्रात गुंतवणूक लगेच फळे देत नाही. काहि पिढ्या जाव्या लागतात हे आपण सारे जाणतो. सद्य सरकारने जी कामे हाती घेण्यास प्राथमिकता दिली आहे ती मात्र तुलनेने अल्पावधीत होणारी आहेत. मात्र ज्याचा देशाला अधिक फायदा आहे मात्र रिझल्ट्स यायला वेळ लागतो अश्या क्षेत्रातील गुंतवणूक अगदीच तुटपुंजी आहे. एखादे महत्त्वाचे काम करणे यापेक्षा काम करून "दाखवणे" याला प्राथमिकता आहे हे सहज लक्षात यावे. सद्य काळात हे भाजपाला (पाच वर्षांनी सत्ता टिकवण्यासाठी) गरजेचे आहे. मनमोहन सिंग सरकार हे करू न शकल्यानेच सत्ता टिकवू शकले नाही वगैरे संभाव्य प्रतिवाद आगाऊ मान्यच आहे. या गोष्टी करू नये असे नाही पण अ‍ॅट कॉस्ट ऑफ? आशा आहे मुद्दा अधिक स्पष्ट केला आहे.

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 14/07/2014 - 16:27
अधिक स्पष्ट करायला थोडे कॅल्क्युलेशन केले आहे. बेटीबढाओ, बेटी बचाओ ला १०० कोटी रुपये दिले आहेत. २०१२ला बर्थ रेट आहे २०.६ म्हणजे वर्षाला ~२.५ कोटी अपत्य जन्माला येतात पैकी अर्ध्या मुली आहेत असे समजू. तेव्हा १.२५ कोटी मुलींपैकी केवळ ३०% मुलींनाच सरकारने पाठबळ द्यायचे ठरवले (खरतंर आकडा बराच कमी आहे कारण इथे फक्त जन्माचे आकडे आहे, बेटी बचाव मध्ये गेल्या ५ वर्षात जन्मलेल्या मुली आहेत पण ते सोडून देऊ) आता त्या ~३८.६ लाख मुलींवर १०० कोटी खर्च करायचे तर पर मुलगी केवळ ~२६० रुपये येतात. इतके पुरेसे वाटते?

भाते 10/07/2014 - 20:49
आज वाचुन दाखवलेला अर्थसंकल्प हा सरकार राबवु इच्छित असलेल्या योजनांच्या घोषणा होत्या. अजुन हा अर्थसंकल्प दोन्हीकडे (लोकसभा आणि राज्यसभा) मान्य व्हायचा बाकी आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क ११% वरून ७२% इतके वाढवले आहे. साडेसहा पट! वेडयासारखी रेल्वे भाववाढ करून नंतर ती कमी करायला लागल्याच्या अनुभवावरून हे सरकार नक्कीच शहाणे झाले असेल. साडेसहापट वाढ हिदेखील अशीच धुळफेक आहे. तंबाखुवरील अबकारी कर/उत्पादन शुल्क वाढवल्याने तंबाखु, तंबाखुमिश्रित पान, मावा, आणि सिगारेट या सगळ्यांचे भाव अचानक भरपुर वाढतील. या सगळ्या वस्तुंची विक्री बहुदा पानवाल्याकडे होते. हे बहुतांश पानवाले भैया युपीचे आहेत. इतकी भाववाढ झाल्यावर कोणीही या पदार्थांचे सेवन नक्कीच कमी करेल. कोणीही इतकी भयानक भाववाढ नक्कीच सहन करू शकणार नाही. मग सहाजिकच या भैयांच्या रोजगारावर परिणाम होईल. समस्त युपीची लॉबी याला नक्कीच विरोध करेल. सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांकडुनदेखिल (मालाची कमी विक्री, कामगार कपात या कारणांमुळे) याचा विरोध होईल. अखेर सरकार यापुढे नमते घेऊन ही भाववाढ कमी करेल. खांगेस महाराष्ट्रात समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा ऊभा करण्यात पैसे वाया घालवत आहे; तिच चुक सरदार पटेलांचा पुतळा ऊभारायला २०० कोटी देऊन केंद्र सरकार करत आहे.

विकास 11/07/2014 - 00:18
लोकसत्ता संपादक गिरीष कुबेर यांचे विश्लेषण बघण्यासारखे वाटले. महाराष्ट्रात पण आय आय एम चालू होणार आहे!

सुधीर 14/07/2014 - 11:22
बजेट वर भाष्य करणारे तज्ञांचे, लेखकांचे, बड्या व्यावसायिकांचे मत ऐकले-वाचले. प्रत्येकाचाच बजेटकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. परवाच्या दिवशी औद्योगिक उत्पादन वृद्धीचे आकडे प्रसिद्ध झाले, त्यावर विश्लेषणात्मक अधिक भाष्य करण्यासाठी नेहमीप्रमाणे बँक ऑफ बडोद्याच्या प्रमुख अर्थतज्ञ रुपा नितसुरे-रेगे यांना रेडिओवर बोलवले होते. त्यावेळी त्यांनी बजेटवर सुद्धा आपले मत मांडले जे मला आवडले. ते इथे ऐकता येईल ( ६ मिनटांपासून १८ मिनिटांपर्यंत). या बाईंचं विश्लेषण मला नेहमीच आवडते. त्यांना मागे एकदा लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात पाहून आनंद झाला होता. त्यांना लोकसत्ताने लिहिते करावे अस मनापासून वाटते.

एकूणच काही प्रतिसाद बघता मोदी पंतप्रधान झाल्याच्या धक्क्यातून विचारवंत मंडळी अजून सावरलेली दिसत नाहीत हे स्पष्टच दिसत आहे. असो. चालायचेच.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ऋषिकेश 14/07/2014 - 20:22
कोणाला विचारवंत ही शिवी दिलीये / म्हटलेय माहिती नाही. पण मोदीवर जाऊ द्या त्या सरकारवर नुसती टिका करण्याऐवजी व्यवस्थित म्हणणे मांडत मुद्देसूद टिका करूनही असे टोमणे हे प्रतिवाद शक्य नसल्याचे लक्षण समजावे लागेल. असो. चालायचेच.

आयुर्हित 14/07/2014 - 23:34
बजेट नेमका असा का? असा प्रश्न प्रत्येक सूज्ञ भारतीयाला पडला असेल.वित्तमंत्री अरुण जेटली यांना विचारले गेलेले प्रश्न व त्यावरील त्यांचे समर्पक उत्तरे हवी असतील तर पहा : आपकी अदालत आपकी अदालत http://www.youtube.com/watch?v=QwPqImDOQgs
आज श्री.अरुण जेटली संसदेत बजेट सादर करत आहे . अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा !!

चित्रवीणा

मितान ·

सुबोध खरे 10/07/2014 - 10:26
लेख उत्तम बाकीबाब बोरकरांची कविता अनुभवण्यासाठी गोव्यात असताना एक दिवस मी मुद्दाम त्यांच्या गावी बोरीला गेलो होतो.(नौदलात असताना मी साडेचार वर्षे गोव्यात होतो) पावसाळा संपत असताना (ओगस्ट महिना अखेर). त्यांच्या निवडक कविता असलेले एक पुस्तक मला आमच्या स्नेह्यांनी वाचायला दिले होते ते पुस्तक तिथल्याच एका शेताच्या बांधावर उभे राहून मी चालत असताना त्याची खरी अनुभूती झाली. त्यांचे गाव पाहिल्यावर त्यांच्या प्रतिभेला इतका बहर कसा आला असेल याची प्रचीती येते. अर्थात हे वर्णन शब्दात करणे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाला शक्य नाही. परत त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एस 10/07/2014 - 10:26
निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते. एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
मला निळा रंग अजिबात आवडत नाही, पण या रंगाचे कौतुक मात्र वाटते. आणि बाकिबाबनी काय सुंदर लिहिलंय निळ्याबद्द्ल... तितकंच अनवटपणे तुमची ले़खणीही उतरलीय. मस्त लेख. खूप दिवसांनी असं काही वाचायला मिळालं.

चित्रविणा हे शीर्षक वाचताच लंपन आठवला... ती चित्रविणा दिडदा दिडदा वाजू लागली मनात... बाकीबाब माझेही आवडते कवी. खूप सुरेख रसग्रहण केलंय तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता तीन वेळा वाचला हा लेख. प्रत्येक वेळी अधाशासारखा. लेखाची एक विंडो सुरूच ठेवलीय... मला राहवणारच नाही. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण...

फार सुंदर, तरल! खूप आवडला लेख.. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण... सहमत! स्वाती

सखी 10/07/2014 - 14:09
सुरेख लेख मितान! अगदी परवाच परत निळा रंग अनुभवला आणि बाकीबाब आठवले. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले - या गाण्याला श्रीधर फडक्यांनी सुरेख संगीत दिले आहे आणि पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात आहे, मला वाटते २ कविता एकत्र केल्या आहेत. किती वेळा ऐकले तरी परत, परत ऐकावेसे वाटते, ह्यात अर्थातच कविच्या मुळ शब्दांचीही ताकद आहे पण सगळ्याच गोष्टी छान जुळुन आल्यात.

चित्रगुप्त 10/07/2014 - 14:29
निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !
.... सुंदर. लेख आवडला, आणि बर्‍याच काळानंतर बोरकरांच्या कविता वाचायला मिळाल्या.

नंदन 10/07/2014 - 14:44
लेख आवडला. नेहमीच्या रहाटगाडग्यात बोरकरांच्या कविता म्हणजे - त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर - 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले; माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले' सारख्या आनंदयात्रेत सामील करून घेणार्‍या.

In reply to by नंदन

प्रदीप 10/07/2014 - 18:36
ह्याउप्पर अजून काय म्हणणार? इतकेच लिहीतो: लेखिकेने लिहीले आहे "....तरीही मोह आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच". ह्या तुमच्या मोह न आवरण्यामुळे आमचे भाग्य मात्र फळाला आले. धन्यवाद.

राही 11/07/2014 - 12:16
मधुराधिपते: अखिलं मधुरम् | तद्वतच, बोरकरांची कविता अतिसुंदर, त्याचे रसग्रहणही तितकेच सुंदर. लेख आवडला, मितान.

चौकटराजा 13/07/2014 - 12:00
आपल्याकडे ज्या तीन कविना शब्द वश होते असे माडगूळकर, बोरकर व शिरवाडकर ! मलाही स्वॅप यांच्या प्रमाणेच निळा रंग आवडत नाही तरीही बोरकरांच्या प्रतिभेतून त्याचे वर्णन आले की वाटते का बरे आपल्याला पिवळा रंग सर्वात जास्त आवडावा ? निळ्याने काय पाप केलेय ? आपण एक मेजवानी चे ताटच समोर ठेवलेय हो !

मितान 13/07/2014 - 16:42
मिपाच्या लपंडावामुळे आभार मानायला उशीर झाला मंडळी ! येथे मिळालेले कौतुक माझे नसून कवितांचे आहे याची नम्र जाणीव मला आहेच. कारण लेख म्हणावा असं काहीही या लेखात नाही. मला भावलेल्या बोरकरांच्या कविता तुमच्यासोबत शेअर करताना आनंद वाटला. मनःपूर्वक आभार !

सुनील 14/07/2014 - 10:45
लेख आवडला. गेयता हे त्यांच्या कवितेचे अजून एक वैशिष्ट्य. तलम त्वचेसाठी "सटीनकांती" असा शब्द अगदी सहजपणे घडवणारे बोरकर शब्दप्रभूही होतेच. उभे आयुष्य भरभरून जगणार्‍या ह्या कवीच्या आयुष्यातील तीन गोष्टींची मात्र खंत वाटते. उतार वयात त्यांना डॉक्टरांनी दिलेली "पेयान्त प्रायश्चित्ताची" शिक्षा! गांधीच्या जीवनावर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेले परंतु अपूर्ण राहिलेले "महात्मायन"!! आणि क्षूद्र भाषिक राजकारणामुळे त्यांना कधिच न मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद!!!

जुलै महिन्याच्या, भर दुपारी बाहेर रणरणते ऊन असताना, हा लेख वाचला. बोरकरांच्या कविता पुन्हा वाचताना पुन्हा एकदा गोव्याच्या समुद्रात डुंबून आलो आणि हिरवाईचा थंडावा अनुभवला!

सुबोध खरे 10/07/2014 - 10:26
लेख उत्तम बाकीबाब बोरकरांची कविता अनुभवण्यासाठी गोव्यात असताना एक दिवस मी मुद्दाम त्यांच्या गावी बोरीला गेलो होतो.(नौदलात असताना मी साडेचार वर्षे गोव्यात होतो) पावसाळा संपत असताना (ओगस्ट महिना अखेर). त्यांच्या निवडक कविता असलेले एक पुस्तक मला आमच्या स्नेह्यांनी वाचायला दिले होते ते पुस्तक तिथल्याच एका शेताच्या बांधावर उभे राहून मी चालत असताना त्याची खरी अनुभूती झाली. त्यांचे गाव पाहिल्यावर त्यांच्या प्रतिभेला इतका बहर कसा आला असेल याची प्रचीती येते. अर्थात हे वर्णन शब्दात करणे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाला शक्य नाही. परत त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एस 10/07/2014 - 10:26
निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते. एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
मला निळा रंग अजिबात आवडत नाही, पण या रंगाचे कौतुक मात्र वाटते. आणि बाकिबाबनी काय सुंदर लिहिलंय निळ्याबद्द्ल... तितकंच अनवटपणे तुमची ले़खणीही उतरलीय. मस्त लेख. खूप दिवसांनी असं काही वाचायला मिळालं.

चित्रविणा हे शीर्षक वाचताच लंपन आठवला... ती चित्रविणा दिडदा दिडदा वाजू लागली मनात... बाकीबाब माझेही आवडते कवी. खूप सुरेख रसग्रहण केलंय तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता तीन वेळा वाचला हा लेख. प्रत्येक वेळी अधाशासारखा. लेखाची एक विंडो सुरूच ठेवलीय... मला राहवणारच नाही. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण...

फार सुंदर, तरल! खूप आवडला लेख.. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण... सहमत! स्वाती

सखी 10/07/2014 - 14:09
सुरेख लेख मितान! अगदी परवाच परत निळा रंग अनुभवला आणि बाकीबाब आठवले. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले - या गाण्याला श्रीधर फडक्यांनी सुरेख संगीत दिले आहे आणि पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात आहे, मला वाटते २ कविता एकत्र केल्या आहेत. किती वेळा ऐकले तरी परत, परत ऐकावेसे वाटते, ह्यात अर्थातच कविच्या मुळ शब्दांचीही ताकद आहे पण सगळ्याच गोष्टी छान जुळुन आल्यात.

चित्रगुप्त 10/07/2014 - 14:29
निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !
.... सुंदर. लेख आवडला, आणि बर्‍याच काळानंतर बोरकरांच्या कविता वाचायला मिळाल्या.

नंदन 10/07/2014 - 14:44
लेख आवडला. नेहमीच्या रहाटगाडग्यात बोरकरांच्या कविता म्हणजे - त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर - 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले; माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले' सारख्या आनंदयात्रेत सामील करून घेणार्‍या.

In reply to by नंदन

प्रदीप 10/07/2014 - 18:36
ह्याउप्पर अजून काय म्हणणार? इतकेच लिहीतो: लेखिकेने लिहीले आहे "....तरीही मोह आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच". ह्या तुमच्या मोह न आवरण्यामुळे आमचे भाग्य मात्र फळाला आले. धन्यवाद.

राही 11/07/2014 - 12:16
मधुराधिपते: अखिलं मधुरम् | तद्वतच, बोरकरांची कविता अतिसुंदर, त्याचे रसग्रहणही तितकेच सुंदर. लेख आवडला, मितान.

चौकटराजा 13/07/2014 - 12:00
आपल्याकडे ज्या तीन कविना शब्द वश होते असे माडगूळकर, बोरकर व शिरवाडकर ! मलाही स्वॅप यांच्या प्रमाणेच निळा रंग आवडत नाही तरीही बोरकरांच्या प्रतिभेतून त्याचे वर्णन आले की वाटते का बरे आपल्याला पिवळा रंग सर्वात जास्त आवडावा ? निळ्याने काय पाप केलेय ? आपण एक मेजवानी चे ताटच समोर ठेवलेय हो !

मितान 13/07/2014 - 16:42
मिपाच्या लपंडावामुळे आभार मानायला उशीर झाला मंडळी ! येथे मिळालेले कौतुक माझे नसून कवितांचे आहे याची नम्र जाणीव मला आहेच. कारण लेख म्हणावा असं काहीही या लेखात नाही. मला भावलेल्या बोरकरांच्या कविता तुमच्यासोबत शेअर करताना आनंद वाटला. मनःपूर्वक आभार !

सुनील 14/07/2014 - 10:45
लेख आवडला. गेयता हे त्यांच्या कवितेचे अजून एक वैशिष्ट्य. तलम त्वचेसाठी "सटीनकांती" असा शब्द अगदी सहजपणे घडवणारे बोरकर शब्दप्रभूही होतेच. उभे आयुष्य भरभरून जगणार्‍या ह्या कवीच्या आयुष्यातील तीन गोष्टींची मात्र खंत वाटते. उतार वयात त्यांना डॉक्टरांनी दिलेली "पेयान्त प्रायश्चित्ताची" शिक्षा! गांधीच्या जीवनावर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेले परंतु अपूर्ण राहिलेले "महात्मायन"!! आणि क्षूद्र भाषिक राजकारणामुळे त्यांना कधिच न मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद!!!

जुलै महिन्याच्या, भर दुपारी बाहेर रणरणते ऊन असताना, हा लेख वाचला. बोरकरांच्या कविता पुन्हा वाचताना पुन्हा एकदा गोव्याच्या समुद्रात डुंबून आलो आणि हिरवाईचा थंडावा अनुभवला!
लेखनप्रकार
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला. कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं. एकेक कविता वाचायला घेतली.

निवांत

भृशुंडी ·

In reply to by आतिवास

भृशुंडी 16/07/2014 - 01:22
बरेचदा आपल्या आजूबाजूला अनेक लोक निवांत असतात (मुंबईच्या जीवघेण्या गरदीसाठी रिकामटेकडे) तर अशाच एखाद्या रिकामटेकड्याने एखाद्या आळसावलेल्या दुपारी, कट्टासदृश सेटिंगमध्ये एखादी भलतीच कहाणी सांगायला सुरूवात केली तर (ऐकणार्याचं) काय होईल? बहुतेक सगळ्यांना असलं काही- बहुतांशी निरर्थक- ऐकलेलं विचित्रच वाटेल. अस्लं काहीसं सांगायचं होतं, मुद्द्लात contentwise लेखात काहीच नाहीये.

In reply to by आतिवास

भृशुंडी 16/07/2014 - 01:22
बरेचदा आपल्या आजूबाजूला अनेक लोक निवांत असतात (मुंबईच्या जीवघेण्या गरदीसाठी रिकामटेकडे) तर अशाच एखाद्या रिकामटेकड्याने एखाद्या आळसावलेल्या दुपारी, कट्टासदृश सेटिंगमध्ये एखादी भलतीच कहाणी सांगायला सुरूवात केली तर (ऐकणार्याचं) काय होईल? बहुतेक सगळ्यांना असलं काही- बहुतांशी निरर्थक- ऐकलेलं विचित्रच वाटेल. अस्लं काहीसं सांगायचं होतं, मुद्द्लात contentwise लेखात काहीच नाहीये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
खच्चून भरलेल्या लोकलमागे रिकाम्या लोकलची वाट न बघणार्या लोकांसाठी ही गोष्ट नाहीये. बागेत जाउन उगाच तास दीडतास बसणं ज्यांना शि़क्षा वाटते त्या लोकांसाठीपण ही गोष्ट नाहीये. तासन्तास चहाच्या कपाच्या कडेवर एकच माशी घोंघावताना बघण्याची कल्पनाच ज्यांना भयानक वाटते अशा लोकांसाठीसुद्धा ही गोष्ट नाहिये. ==== तर १९९० सालची गोष्ट. खरं तर असलं काही सांगायची गरज नाही, पण एक गोष्टीचा फील येतो. तर डिसेंबर महिन्याची सकाळ होती. नाही, दुपार. बहुतेक ३ वाजले होते. म्हणजे संध्याकाळच म्हणा ना. अस्सल चहाबाजांची ३रा चहा घ्यायची वेळ. दुकानावर गरदी नव्हती.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

शशिकांत ओक ·

प्रयोग आवडला. ज्या भाज्या गॅलरीत कुंड्या ठेवून तयार करता येतील त्या करण्याची हौस आणि इच्छा मलाही आहे. अजून प्रयत्न नाही केला पण जरूर करणार आहे. लवंगी मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पाती कांदा, पाती चहा, वांगी, फरसबी इ.इ.इ. भाज्या पिकविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

[सदर धाग्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न विचारयचा मोह होत आहे. काहीसे विषयांतर असल्याने क्षमस्व] मी मध्यंतरी ebay वरुन चंदनाच्या बिया विकत घेतल्या, काही बिया पेरुन रोपटे बनविण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मग काही बिया शेती करणार्‍या एका नातेवाईकास दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या मात्र ते म्हणाले की "चंदनाची रोपे अशी येत नाहीत, या बिया पक्षांनी खावून नंतर त्यांच्या विष्ठेवाटे जमिनीत मिसळल्या गेल्या तरच त्यांची रोपे येतात" हे खरे आहे काय ? असल्यास याला काही पर्याय देखील आहे का ? म्हणजे पक्ष्यांच्या पोटात जावून विष्ठेतून बाहेर येताना त्या बियांवर जी काही रासायनिक/जैविक प्रक्रिया होत असेल ती कृत्रिमरीत्या घडवून आणणे शक्य आहे काय ?

तुम्हाला एवढा उत्साह आहे तर मग बाकी पण अनेक लहान लहान रोपं लावता येतील.. कोथिंबिर, गवती चहा, कढीपत्ता वगैरे.. फुलझाडं तर किती तरी लावता येतील.. नक्की करा आणि आम्हाला सांगा माहिती...

प्रशंसनिय उपक्रम. यात मुलांना खूप मजा आली असणारच पण त्या बरोबर त्यांचे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण पण झाले ! अशीच खिडकीत ठेवलेल्या वाळूच्या ट्रेमध्ये मेथी उगवून छोट्या कुटुंबासाठी ताजी भाजी पिकवता येते. आमची खिडकीतली भाजीपाला शेती... आणि हे अंतिम उत्पादन ...

In reply to by प्रभाकर पेठकर

१. सुपरमार्केटमध्ये मिळणार्‍या फळांचे (किंवा इतर प्रकारचे) छिद्रे नसणारे प्लास्टीकचे ट्रे वापरावे. २. बारीक रेती थोडीशी घुवून स्वच्छ करून त्यात भरा. ३. मेथीचे दाणे वाळूत पसरून त्यांना वाळूने वरवर झाकून टाका. ४. वाळू नीट ओली होईल पण ट्रेच्या तळाशी पाणी साचणार नाही इतपत पाणी टाका. ५. वरच्या इतकेच पाणी सतत राहील असे पाणी देत रहा. उन्हाळ्यात रोज तर हिवाळ्यात (किंवा एसी असल्यास) दोन दिवसातून एकदा पाणी घालावे लागेल. मात्र तळाशी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, नाहीतर दाणे / रुजलेल्या दाण्यांची मुळे कुजतात. ६. हवामानाप्रमाणे ७ ते १० दिवसात फोटोत दाखविल्याइतकी मोठी मेथी वाढते... मला अश्या कोवळ्या मेथीची भाजी जास्त आवडते. मेथी पाण्यात साफ घुवून कोरडी करून प्लास्टीकच्या पिशवीत अर्ध-हवाबंद करून फ्रिजमध्ये ठेवल्यास पाच-सहा दिवस छान राहते. स्वतंत्र भाजी तर करता येतेच पण थोडीशी ताजी मेथी इतर भाज्यांत कुस्करून टाकल्यास मस्त युम्म स्वाद येतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहाहाहा...!!! नक्की करुन पाहीन आणि तुम्हाला कळवेन.. गुरुदक्षिणा म्हणुन हवं तर पहिली मेथीची जुडी तुम्हाला कुरिअर करेन!!!

अर्धवटराव 11/07/2014 - 06:56
शुण्याचा भागाकर करत बसण्यापेक्षा एखादी छानशी फुलबाग लावावी... काय सहज पण अफाट तत्वज्ञान होतं पु.लं.च त्याचीच आठवण आली.

रमताराम 14/07/2014 - 18:01
ते सगळं ठीक आहे हो, पण त्या लाल मिरचीच्या बिया रुजवून आलेल्या झाडांना हिरव्या मिरच्या लागल्या की लाल ते नाही सांगितलंत.

In reply to by रमताराम

रमताराम 14/07/2014 - 18:02
मिरच्यांच्या पण 'पट्ट्या' असतात का? असल्यास त्यात पाहून बिया किती हे सांगता आलं नसतं का.

शशिकांत ओक 15/07/2014 - 01:34
मृगनयनी जी, काहींना नाडीच्या मिरचीचा झटका बसला आहे. ते फोटो बद्दल नाव काढत नाहीत. काहींना नाडीच्या विषयाचा खाट नाकाच जाऊन सारखा उबळ आणतो असे दिसते आहे. काही हरकत नाही. निदान पुर्व लेखनाचा प्रभाव किती प्रखर आहे याची अशी सहज प्रचिती येते

प्रयोग आवडला. ज्या भाज्या गॅलरीत कुंड्या ठेवून तयार करता येतील त्या करण्याची हौस आणि इच्छा मलाही आहे. अजून प्रयत्न नाही केला पण जरूर करणार आहे. लवंगी मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पाती कांदा, पाती चहा, वांगी, फरसबी इ.इ.इ. भाज्या पिकविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

[सदर धाग्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न विचारयचा मोह होत आहे. काहीसे विषयांतर असल्याने क्षमस्व] मी मध्यंतरी ebay वरुन चंदनाच्या बिया विकत घेतल्या, काही बिया पेरुन रोपटे बनविण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मग काही बिया शेती करणार्‍या एका नातेवाईकास दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या मात्र ते म्हणाले की "चंदनाची रोपे अशी येत नाहीत, या बिया पक्षांनी खावून नंतर त्यांच्या विष्ठेवाटे जमिनीत मिसळल्या गेल्या तरच त्यांची रोपे येतात" हे खरे आहे काय ? असल्यास याला काही पर्याय देखील आहे का ? म्हणजे पक्ष्यांच्या पोटात जावून विष्ठेतून बाहेर येताना त्या बियांवर जी काही रासायनिक/जैविक प्रक्रिया होत असेल ती कृत्रिमरीत्या घडवून आणणे शक्य आहे काय ?

तुम्हाला एवढा उत्साह आहे तर मग बाकी पण अनेक लहान लहान रोपं लावता येतील.. कोथिंबिर, गवती चहा, कढीपत्ता वगैरे.. फुलझाडं तर किती तरी लावता येतील.. नक्की करा आणि आम्हाला सांगा माहिती...

प्रशंसनिय उपक्रम. यात मुलांना खूप मजा आली असणारच पण त्या बरोबर त्यांचे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण पण झाले ! अशीच खिडकीत ठेवलेल्या वाळूच्या ट्रेमध्ये मेथी उगवून छोट्या कुटुंबासाठी ताजी भाजी पिकवता येते. आमची खिडकीतली भाजीपाला शेती... आणि हे अंतिम उत्पादन ...

In reply to by प्रभाकर पेठकर

१. सुपरमार्केटमध्ये मिळणार्‍या फळांचे (किंवा इतर प्रकारचे) छिद्रे नसणारे प्लास्टीकचे ट्रे वापरावे. २. बारीक रेती थोडीशी घुवून स्वच्छ करून त्यात भरा. ३. मेथीचे दाणे वाळूत पसरून त्यांना वाळूने वरवर झाकून टाका. ४. वाळू नीट ओली होईल पण ट्रेच्या तळाशी पाणी साचणार नाही इतपत पाणी टाका. ५. वरच्या इतकेच पाणी सतत राहील असे पाणी देत रहा. उन्हाळ्यात रोज तर हिवाळ्यात (किंवा एसी असल्यास) दोन दिवसातून एकदा पाणी घालावे लागेल. मात्र तळाशी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, नाहीतर दाणे / रुजलेल्या दाण्यांची मुळे कुजतात. ६. हवामानाप्रमाणे ७ ते १० दिवसात फोटोत दाखविल्याइतकी मोठी मेथी वाढते... मला अश्या कोवळ्या मेथीची भाजी जास्त आवडते. मेथी पाण्यात साफ घुवून कोरडी करून प्लास्टीकच्या पिशवीत अर्ध-हवाबंद करून फ्रिजमध्ये ठेवल्यास पाच-सहा दिवस छान राहते. स्वतंत्र भाजी तर करता येतेच पण थोडीशी ताजी मेथी इतर भाज्यांत कुस्करून टाकल्यास मस्त युम्म स्वाद येतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहाहाहा...!!! नक्की करुन पाहीन आणि तुम्हाला कळवेन.. गुरुदक्षिणा म्हणुन हवं तर पहिली मेथीची जुडी तुम्हाला कुरिअर करेन!!!

अर्धवटराव 11/07/2014 - 06:56
शुण्याचा भागाकर करत बसण्यापेक्षा एखादी छानशी फुलबाग लावावी... काय सहज पण अफाट तत्वज्ञान होतं पु.लं.च त्याचीच आठवण आली.

रमताराम 14/07/2014 - 18:01
ते सगळं ठीक आहे हो, पण त्या लाल मिरचीच्या बिया रुजवून आलेल्या झाडांना हिरव्या मिरच्या लागल्या की लाल ते नाही सांगितलंत.

In reply to by रमताराम

रमताराम 14/07/2014 - 18:02
मिरच्यांच्या पण 'पट्ट्या' असतात का? असल्यास त्यात पाहून बिया किती हे सांगता आलं नसतं का.

शशिकांत ओक 15/07/2014 - 01:34
मृगनयनी जी, काहींना नाडीच्या मिरचीचा झटका बसला आहे. ते फोटो बद्दल नाव काढत नाहीत. काहींना नाडीच्या विषयाचा खाट नाकाच जाऊन सारखा उबळ आणतो असे दिसते आहे. काही हरकत नाही. निदान पुर्व लेखनाचा प्रभाव किती प्रखर आहे याची अशी सहज प्रचिती येते
लेखनविषय:
लेखनप्रकार

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.

जडण-घडण...5

माधुरी विनायक ·

एस 09/07/2014 - 18:39
इतकं प्रांजळपणे लिहिलेलं वाचून खरंच छान वाटलं. तुमच्यासोबत या जडणघडणीचा चलत्चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहतोय इतकं सुरेख, प्रवाही, अभिनिवेशरहीत, साधं लिहिता आपण. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

थोडा उशीरा प्रतिसाद देतेय, पण तुम्हा साऱ्यांचे मनापासून आभार. हो, चांगली माणसं भेटण्याच्या बाबतीत मी सुदैवी आहे खरी आणि प्रांजळपणाबद्दल बोलायचं तर हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझा स्वत:शीही संवाद सुरूच आहे. हे सारे क्षण पुन्हा अनुभवतेय. आणि तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मला या प्रवासात पुरेपूर साथ देताहेत. पुन्हा एकदा आभार...

एस 09/07/2014 - 18:39
इतकं प्रांजळपणे लिहिलेलं वाचून खरंच छान वाटलं. तुमच्यासोबत या जडणघडणीचा चलत्चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहतोय इतकं सुरेख, प्रवाही, अभिनिवेशरहीत, साधं लिहिता आपण. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

थोडा उशीरा प्रतिसाद देतेय, पण तुम्हा साऱ्यांचे मनापासून आभार. हो, चांगली माणसं भेटण्याच्या बाबतीत मी सुदैवी आहे खरी आणि प्रांजळपणाबद्दल बोलायचं तर हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझा स्वत:शीही संवाद सुरूच आहे. हे सारे क्षण पुन्हा अनुभवतेय. आणि तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मला या प्रवासात पुरेपूर साथ देताहेत. पुन्हा एकदा आभार...
लेखनविषय:
लेखनप्रकार
गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.