मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वडापावची कहाणी

अत्रुप्त आत्मा ·

पैसा 19/06/2011 - 22:49
कल्पनेचा विस्तार छान केलाय. जरा लहान परिच्छेद केले असते तर वाचायला सोपं झालं असतं.

अर्धवटराव 20/06/2011 - 00:50
मित्रा, आपल्या खाद्यसंस्कृतीला बहार आणणार्‍या या पदार्थांना असलं काहितरी चवदार-चटकदार साहित्यीक दान मिळालं पाहिजे. मस्त वाटलं. अर्धवटराव

प्रचेतस 20/06/2011 - 09:02
मस्त रे एकदम. झकास लिहिले आहे. आज हापिसातून घरी जाता जाता वडापाव खाउनच जावे म्हणतोय. अवांतरः सुरुवातीला शीर्षक वाचून आमचे येथील एक मित्र वपाडाव यांच्यावर हा लेख आहे की काय असे क्षणभर वाटून गेले. :)

In reply to by प्रचेतस

माझी त्यांची ओळख सुधा नाही...मग कस लिहिन मी?...तो वपाडाव आहे...हा वडापाव आहे...आणी ईथे आमचे जन्मोजन्मींचे नाते आहे...

In reply to by अमोल केळकर

इरसाल 20/06/2011 - 11:19
अमोल तुला कर्जतचा दगड्याचा वडा म्हणायचा का? दिवाडकरचा म्हणजे जो ठेश्नात मिळतो तो बेचव, पुचाट.

५० फक्त 20/06/2011 - 10:49
मस्त रे, छान लिहिलंय, ब-याच ठिकाणी पुलंचा पानवाला आठवला, एकच विनंती - प्रकाशित करायच्या आधी पॅरॅग्राफ करुन घ्या, आता पण संपादन करुन करता येईल.

मृत्युन्जय 20/06/2011 - 10:54
वपाडाव वाचतो आहेस ना रे बाबा? बाकी लेख चांगला जमलेला आहे. काही पंचेस उत्तम. खालील गोष्टींचा विचार करावा असे वाटते: १. पैसातैंनी सांगितल्याप्रमाणे छोटेछोटे परिच्छेद करावेत. २. शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष द्यावे. ३. थोडाफार अनावश्यक मजकूर काढुन टाकावा. लेख थोडास्सा मोठा वाटत आहे. अर्थात लेख चांगलाच आहे हे मात्र आवर्जुन सांगु इच्छितो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बस्स आपल्या पिढीमधे कॉन्फिडन्स आहे कारण YES आपल्या हाथात इन्टरनेट आहे. म्हणूनच आपले आयडीलॉजीम वेगळे आहे. लव्ह यू टू. -पंढरपुरी जर्दा

गणेशा 20/06/2011 - 17:39
अप्रतिम लेख ... आता लेख वाचला अआणि आता थोड्याच वेळात जावुन खालच्या टपरीवरील वडापाव खावुन येतो आता राहवत नाहि.. वाचनखुण साठवण्यात आली आहे.. तुमचे मी वाचलेले पहिलेच ललित लेखन, खुप आवडले असेच लिहित रहा .. वाचत आहे

पैसा 19/06/2011 - 22:49
कल्पनेचा विस्तार छान केलाय. जरा लहान परिच्छेद केले असते तर वाचायला सोपं झालं असतं.

अर्धवटराव 20/06/2011 - 00:50
मित्रा, आपल्या खाद्यसंस्कृतीला बहार आणणार्‍या या पदार्थांना असलं काहितरी चवदार-चटकदार साहित्यीक दान मिळालं पाहिजे. मस्त वाटलं. अर्धवटराव

प्रचेतस 20/06/2011 - 09:02
मस्त रे एकदम. झकास लिहिले आहे. आज हापिसातून घरी जाता जाता वडापाव खाउनच जावे म्हणतोय. अवांतरः सुरुवातीला शीर्षक वाचून आमचे येथील एक मित्र वपाडाव यांच्यावर हा लेख आहे की काय असे क्षणभर वाटून गेले. :)

In reply to by प्रचेतस

माझी त्यांची ओळख सुधा नाही...मग कस लिहिन मी?...तो वपाडाव आहे...हा वडापाव आहे...आणी ईथे आमचे जन्मोजन्मींचे नाते आहे...

In reply to by अमोल केळकर

इरसाल 20/06/2011 - 11:19
अमोल तुला कर्जतचा दगड्याचा वडा म्हणायचा का? दिवाडकरचा म्हणजे जो ठेश्नात मिळतो तो बेचव, पुचाट.

५० फक्त 20/06/2011 - 10:49
मस्त रे, छान लिहिलंय, ब-याच ठिकाणी पुलंचा पानवाला आठवला, एकच विनंती - प्रकाशित करायच्या आधी पॅरॅग्राफ करुन घ्या, आता पण संपादन करुन करता येईल.

मृत्युन्जय 20/06/2011 - 10:54
वपाडाव वाचतो आहेस ना रे बाबा? बाकी लेख चांगला जमलेला आहे. काही पंचेस उत्तम. खालील गोष्टींचा विचार करावा असे वाटते: १. पैसातैंनी सांगितल्याप्रमाणे छोटेछोटे परिच्छेद करावेत. २. शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष द्यावे. ३. थोडाफार अनावश्यक मजकूर काढुन टाकावा. लेख थोडास्सा मोठा वाटत आहे. अर्थात लेख चांगलाच आहे हे मात्र आवर्जुन सांगु इच्छितो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बस्स आपल्या पिढीमधे कॉन्फिडन्स आहे कारण YES आपल्या हाथात इन्टरनेट आहे. म्हणूनच आपले आयडीलॉजीम वेगळे आहे. लव्ह यू टू. -पंढरपुरी जर्दा

गणेशा 20/06/2011 - 17:39
अप्रतिम लेख ... आता लेख वाचला अआणि आता थोड्याच वेळात जावुन खालच्या टपरीवरील वडापाव खावुन येतो आता राहवत नाहि.. वाचनखुण साठवण्यात आली आहे.. तुमचे मी वाचलेले पहिलेच ललित लेखन, खुप आवडले असेच लिहित रहा .. वाचत आहे
वडापाव-ललित लेख शेवाळ्याचा दगडाला चिकटुन रहाणे,हा स्थाईभाव आहे.त्याच प्रकारचा स्थाईभाव घेऊन हा पदार्थ जन्माला आला.वडा हा भारतीय खाद्य संस्क्रुतितला पदार्थ पावाला ईंग्रजांच्या आमदानीत चिकटला असावा.हे दोन्ही पदार्थ एकमेकाला असे काही चिकटले,की त्यांच वेगवेगळ अस्तित्व ,हे एकमेकाशिवाय सिद्ध करता येत नाही.किंवा सिद्ध करायला गेलं,तर काही ठिकाणी सिद्ध करणाय्राचा वडाच झाला असं दिसुन येईल.

येस ,वी आर ...

विनायक पाचलग ·

In reply to by चेतन

विसुनाना 10/06/2011 - 17:49
'सदर लेखक मिपावर नवे आहेत' हे भूतकाळातील वाक्य आहे. :) त्यामुळे उल्लेखलेला लेख (निवेदन) येथे लागू होत नसावा. ;) लगे रहो, कोदाभाई.

In reply to by चेतन

गेला बाजार २.५ वर्ष मिपावर आहे बघा .... किंवा अस म्हणा की ,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ... बरेच दिवस ती किक बसली नव्हती, म्हणुन वरच लिहिलय अस समजायला काहीही हरकत नाही :)

In reply to by विनायक पाचलग

टारझन 10/06/2011 - 22:08
गेला बाजार २.५ वर्ष मिपावर आहे बघा ....
तेंव्हा देखील ह्याच गुणवत्तेचा लेख लिहायचात बरं तुम्ही :) अगदी एवढाच छाण :) सुरुवातीपासुन सेम कॉलिटी मेंटेण आहे :)
किंवा अस म्हणा की ,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...
सगळ्याच वाचकांना तुमचा लेख वाचल्यावर किक बसते. काहिंना नुसतं नाव पाहुनही किक बसते .. :) :) खिक :)

In reply to by टारझन

सुरुवातीपासुन सेम कॉलिटी मेंटेण आहे मी चुकून सुरवातीपासून सेम कॉलिटी मटण आहे असं वाचलं!!! काय करणार, वीकेन्ड जवळ आला ना!!! :)

आत्मशून्य 10/06/2011 - 17:37
बरच काही लिहलय, पण नक्की काय सांगायचय उमजलं नाही.

श्रावण मोडक 10/06/2011 - 17:58
आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत
काय विधान आहे हे! शक्ती विसरलेला हनुमान म्हणजे... जाऊदे...

In reply to by श्रावण मोडक

टारझन 10/06/2011 - 18:17
मेलो .. =)) =)) लेख वाचायचं अजुन तरी रिकामपण ( पक्षी धाडस) झालं नाही .. पण प्रतिसाद वाचुन मेल्या गेले आहे =)) =)) जेवढा लेख वाचला त्यात एवढे हास्य फवारे उडाले आहेत की एक विडंबण मनात रुळते आहे . खुप दिवसांनी इतका विनोदी लेख वाचला :)
सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता .
चुचु ने एक पातेलं जिंकलं होतं .. तिच्याकडे तो कॉन्फिडन्स पुर्वी पासुन होता ... तसेच लेखकाने पुर्वीच्या पिढीच्या कॉण्फिडन्स वर जे अपमानाचे शिंतोडे उडवले आहेत, त्यामुळे पुर्वीचे लोकं काय रिप्लाय देतात ते पहाणे रोचक ठरेल :) असो .. कोद्या फक्त लेख गाळायला येत असला , आणि कधी कोणाचं वाचत नसला तरी त्याच्या विनोदी लेखांमुळे त्याला ते क्षम्य आहे :)

गोगोल 10/06/2011 - 19:49
>> 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच याचा काय संदर्भ? विनायक जन्माला येतानाच ४५ वर्षांचा माईंड सेट घेउन आला होता. प्रत्येक गोष्टीच निबंधीकरण केलच पाहीजे का? कुठ्ल्याही गोष्टीचा फक्त आनंद घेण्यासाठीच म्हणून ती तु करू शकत नाहीस का? कुठलाही नवीन अनुभव घेताना तुला याचा निबंध कसा पाड्ता येईल हेच फक्त डोक्यात चालू असत का रे? उद्या तुझा हनिमून चालू असताना पण तुझ्या डोक्यात हेच चालू असणार का रे?

आपल्याला आपले प्रश्न कोणते, आपल्या समस्या कोणत्या तेच माहित नाही आहे.
मला वाटतं या वाक्यातच लेखाचा अर्क आहे. त्या वाक्याच्या अलिकडचे आणि पलिकडचे परिच्छेद व त्यांतील शब्द हाच संदेश अधोरेखित करण्यासाठी आहेत. प्रभावी कलाकृतीमध्ये माध्यम हाच संदेश म्हणून वापरला जातो. एकंदरीत आकारबंध मूळ संदेशाशी अनुरूप करणं हे थोर कलाकाराचं लक्षण आहे. त्याच खुबीने लेखकाने तरुण पिढीच्या मनातली विस्कळितता लेखातल्या विस्कळित विचारमांडणीतून दाखवली आहे. म्हणून ही उच्च कलाकृती आहे. थोडं यमक वगैरे साधलं असतं तर कविताच म्हणता आली असती.

प्रदीप 10/06/2011 - 20:23
लेखातील भाव समजला. पण लेख बराच विस्कळीत झाला आहे, तो बंदिस्त केला असता तर बरे झाले असते असे वाटले.
,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ... बरेच दिवस ती किक बसली नव्हती, म्हणुन वरच लिहिलय अस समजायला काहीही हरकत नाही
लेखक म्हणून तुम्ही येथे काही लिहीणार, व तरीही येथील समस्त वाचकांविषयी इतकी छ्द्मी प्रतिक्रिया का असावी? हा आमचा अपमान आहे असे आम्हास वाटले तर ते गैर नाही.

In reply to by विनायक पाचलग

प्रदीप 10/06/2011 - 20:57
इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...
हे सरसकट विधान आहे, काही विशीष्ट सभासदांविषयी नव्हे, हेही तुम्हाला समजत नाही काय? आणि भाषा जरा जपून वापरा. एकतर तुमचे drivel वाचायचे व नंतर तुमच्या उर्मट प्रतिक्रिया!

In reply to by प्रदीप

त्या विधानाने तुम्ही इतके का उचकलात ते अजिबात कळले नाही. हे विधान सकारात्मक दृष्टीनेपण घेता येईल की :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

टारझन 13/06/2011 - 13:59
त्या विधानाने तुम्ही इतके का उचकलात ते अजिबात कळले नाही
बहुतेक त्यांनी ते विश्वनात मेहेंदळे ह्यांना कळण्यासाठी लिहीलं नसावं :) - रोटीनाथ गहुदळे

अनामिक 10/06/2011 - 20:31
या लेखातून तु फेसबुक सॅवी आहेस एवढंच कळलं. आणि "येस, वुई आर..." ह्या उत्तराचा प्रश्न लेखात आहे का? कि ओबामाच्या 'येस, वुई कॅन'ची री ओढतोयेस? मी 'लास्ट बट नॉट द लिस्ट...' नंतरचा निबंध वाचला नाही म्हणून विचारतोय.

सहज 11/06/2011 - 06:03
फक्त एकच उणीव भासली, कमतरता जाणवली. ..नाही म्हणजे लेखात काहीही कमतरता नाही. तेवढं फक्त मिपाच्या लेखन प्रकारात 'पौगंड' प्रकार पाहीजे. तेवढा दिसला असता की फिट्ट आहे लेख!! पुलेशु!

विजुभाऊ 11/06/2011 - 07:26
अशा प्रकारच्या लेखन शैलीला ' मुक्तछंद ' असे म्हणतात ढण्यवाद हो भौ. तो "मुक्त्छन्द " हा शब्द नीट टायपल्याबद्दल. शब्द मागे फुडे जाले आस्ते तर लेइ घ्वाटाळा जाला आस्ता

रणजित चितळे 11/06/2011 - 10:31
आपला लेख वाचला. छान आहे ............. आपली पिढी ही 'कॉन्फिडन्ट' आहे व जग जिंकायची ताकद आहे हे सांगायचे आहे आपल्याला असे वाटते. माझे मत मी देत आहे, वाचून बघावे पटते का आपल्याला. ......23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता............. प्रत्येक पिढीला तरुण वयात आपली पूर्वीची पिढी बुद्धू वाटते. थोड्या अजून (जिवन जगण्याच्या) वर्षांच्या अनुभवानंतर खरे चित्र लक्षात येते. असो आपल्या पण येईल. कदाचित कॉन्फिडन्स व स्ट्रिट स्मार्ट ह्या दोन शब्दांमध्ये गफलत तर होत नाही हे बघावे. ...............आणि, हे कमी का काय, .................. कधीतरी कोणी C.S............ ..आणि पालकांचा खुन व्हायचा बाकी राहतो ..................... हे काही अंशी बरोबर वाटते ............. ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणा-या व चांगले संस्कार करवणा-या शाळेबाहेरील शाळा अजुनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळां मधुन आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे. ।।। पुर्ण लेख येथे आहे वाचून बघा वेळ मिळाला तर .. http://www.misalpav.com/node/15453 ...................बॉस, आणि एवढं काय टेन्शन........... .. ते मिळाल की योग्य दिशा घेणं.. मग, एमटीव्ही चा रिव्हेंज किंवा स्पार्टव्हिला जो संस्कार करतो. त्याला आपण नक्कीच पुरून उरू.,.................... ह्या वयात हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो... ह्या वर मला एक अनंत फंदींचा फटका आठवतो तो वाचून बघा आपल्याला आवडेल. बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||....................छान आहे ..................तसं बघायला गेलं ...............होणार आहे.. गंमत अशी.......... आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत.. तेवढी शक्ती कळालीय आता.. मग, जग बदलु आपण.. आणि म्हणूनच शेवटी म्हणावं वाटतं.. शेवटी रबिंद्रबाबूंनी लिहिले तसे ..एकला चालोरे ... आपणच असतो आपल्याला सावरणारे. शक्ती हरवलेल्या हनुमानाला जांबूवंता सारखी दिशा दाखवणारी आधीची पिढी आहे असे माझे म्हणणे आहे. बाकी अवांतर मराठी लेख लिहिताना इंग्रजी शब्द कमी आले तर वाचायला आवडेल जास्ती.

श्रावण मोडक 11/06/2011 - 10:52
जाताजाता एक महत्त्वाचे - विशिष्ट मुद्याला धरून विशिष्ट अंकासाठी केलेले लेखन असे इतरत्र बेधडक प्रसिद्ध करताना किमान लेखनाच्या शेवटी दिलेली सूचना सुरवातीलाच द्यावी हे उत्तम (आत्ताची सूचना म्हणजे सिगरेटच्या पाकिटावरील इशाऱ्यासारखी आहे). हा लेख पौगंडावस्थेविषयीच्या विशेषांकासाठीचा आहे. त्या वयातील घालमेल अशीही असते हे आहेच. पण अशा लेखांचे स्थान त्याच अंकात असते. ते इतरत्र आणू नये. क्रिकेटचा बॉल घेऊन फुटबॉल खेळत नसतात. तू कोल्हापूरचा आहेस, हे तुला लगेच कळेल.

In reply to by श्रावण मोडक

शाहरुख 11/06/2011 - 11:11
दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे चिकटवायचे का नाही ते माहित नाही पण तरीही प्रतिसाद रोचक वगैरे काय म्हणतात तसा वाटला. विनायक भावड्या, लिव रे तू रिफिल संपेस्तोवर !

In reply to by शाहरुख

श्रावण मोडक 11/06/2011 - 12:56
दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे प्रसिद्ध करू नये, असे माझ्या लेखनातून वाटत असेल तर माफी असावी. अशा लेखनाबाबतचा निर्णय या संस्थळाचे व्यवस्थापन करेल. माझा (काहीसा आगाऊ) सल्ला फक्त विनायक पाचलग यांच्यासाठी होता. ती धोरणात्मक टिप्पणी नव्हती.

In reply to by श्रावण मोडक

शाहरुख 11/06/2011 - 15:04
सर, माफी नको..तुम्ही मिपा धोरणावर टिपण्णी करताय असे अजिबात नव्हते मला म्हणायचे. तुम्ही पाचलगला दिलेला सल्ला (...ते इतरत्र आणू नये...) वाचूनच मला प्रतिसाद द्यावासा वाटला..

धन्या 11/06/2011 - 11:01
नमस्कार दोस्ता, मागे तू तुझ्या आय आय टी च्या जे ई ई परिक्षेबद्दल लिहून जो गायब झालास तो आता उगवलास. बहुतेक अभ्यासात गुंतला असावास. बरं वाटलं, खुप दिवसानंतर तुझा लेख पाहून. असो. तुझ्या या निबंधाच्या सुरुवातीचेच दोन ईंग्रजी शब्द पाहून तुझा जे ई ई मध्ये निकाल लागला असावा असं वाटतं. तू पुण्यात बहुतेक सिम्बायोसिसला प्रवेश घेतला असावास असंही असावं कदाचित. या तुझ्या लेखाला निबंधच म्हणावंसं वाटलं. बारावीच्या मराठीच्या (तेच ते युवकभारतीच्या) पेपराला जो पहिला निबंधाचा प्रश्न असतो ना, त्यातल्या "आम्ही कोण म्हणूनी काय पुससी?" या विषयावर लिहिलेला निबंध. पहिल्याच परीच्छेदात अगदी भारदस्त शब्दरचना करुन जबरदस्त टेम्पो आणला आहे. (मायबाप वाचकांनी एकापेक्षा एक प्रतिक्रिया देऊन तुझ्या निबंधाला त्याच टेम्पोत बसवला ही गोष्ट वेगळी.) अगदी लेखाचं शिर्षकच ओबामांच्या "येस वी कॅन" ची नक्कल आहे. सुरुवातीलाच एमायटी, सिम्बायोसिस या पुण्यातल्या नामवंत शिक्षणसंस्थांची नावे, जोशी, कुलकर्णी आणि पाटील अशा अभिजनांमध्ये मोडणार्‍या (निदान तुला तरी इथे तेच अभिप्रेत असावं) आडनावांचे उल्लेख, "APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारताचे शिलेदार" तसेच "संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह" सगळंच भारी... तू पुढे जे म्हणतोयस ते अगदी खरं आहे. आजचा युवा वर्ग हेच देशाचं उदयाचं भवितव्य आहे. वादच नाही. आज देश भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेल्या तुझ्या पिढीकडून खुप अपेक्षा आहेत यातही शंका नाही. मेणबत्ती लावून का होईना, ही फेसबुक आणि ट्वीटरवाली पिढी आपण जागे आहोत हे दाखवून देत आहे. खरं तर असं चौकाचौकात मेणबत्त्या लावून काहीच होणार नाही. ही व्यवस्था खुप निबर झाली आहे (मला असं म्हणायचं होतं की ही सिस्टीम नॉन रीस्पॉन्सिव झाली आहे. :) ) आता गरज आहे ती या देशात सुजाण नागरीक घडण्याची. सुजाण नागरीकांचा देशही सुजाणच असेल... पण... याचा अर्थ असा नाही की तुम्ही भूतकाळाला नावे ठेवाल. जगाच्या ईतिहासाला अश्मयुगापासून फेसबुकयुगात आणण्यात प्रत्येक पिढीचा छोटा मोठा वाटा आहे. मागच्या पिढीला "ही धमक तुमच्यात होती का?" असा प्रश्न विचारणे हा उर्मटपणा झाला. आणि हे सुजाणपणाचे लक्षण नाही... प्रत्येक पिढीला काळाची बंधने पाळावी लागतात, निदान ही बंधने झुगारुन देणारे महामानव समाजात जन्म घेत नाहीत तोपर्यंत तरी... "कोहं..." हा प्रश्न तुझ्याही पिढीला पडला आहे, चांगली गोष्ट आहे. "चिदानंद रुपोशिवोहम..." हे उत्तर मिळायला तुम्हाला आयुष्याची अजून बरीच वर्ष घालवावी लागतील. सध्या हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून फक्त एक सुजाण नागरीक कसं बनता येईल हे पाहा, या देशाचं कल्याण होईल... हा लेख किंवा निबंध वरवर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आजची युवा पिढी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली आहे. आज ब्लॉगर आणि वर्डप्रेससारख्या मोफत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे काही गोष्टींची जाणिवच नाही असं वाटत आहे. जुन्या लेखकांच्या प्रस्तावना वाचताना त्यांचे पुस्तकासाठी प्रकाशक मिळवण्यासाठी जी दिव्यं पार केली ती वाचली की अंगावर काटे येतात. आज मात्र बडव कीबोर्ड आणि पाड लेख असं झालंय. फेसबुकवरचं एखादं पेज, एखादी कम्युनिटी जॉईन केली की आपण फार मोठं देशकार्य केलं असं ज्याला त्याला वाटू लागलं आहे... मित्रा, तुझ्या आजच्या पिढीच्या युवकाने एखादा दोन चार पानांचा लेख लिहिला, तो साधनामध्ये वगैरे छापून आला की आपण कुणीतरी खास आहोत असं त्याला वाटू लागतं... जरा ज्ञानदेवाचं चरीत्र वाचा. त्याच्याबद्दल सांगितल्या जाणार्‍या रेडयामुखी वेद बोलविले, भिंत चालवली वगैरे चमत्कार कथा बाजूला ठेवा. समाजाने आईवडीलांना वाळीत टाकलेलं, त्यानंतर आई वडीलांच्या आत्महत्या, समाजाने "संन्याशाची पोरं" म्हणून केलेली हेटाळणी हे सारं बाजूला ठेवलं त्याने. वयाच्या सोळाव्या वर्षी या मुलाने भगवदगीतेवर निरुपणात्मक अशी नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. आज आठशे वर्षानंतरही हा उभा महाराष्ट्र त्याला माऊली म्हणतो, त्याच्या ज्ञानेश्वरीची "एक तरी ओवी अनुभवावी" म्हणतो... या बाललेखकाने ज्ञानेश्वरी संपवताना जी फलश्रुती लिहिली ती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. दुरीतांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्मे सुर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ॥ ... हा महाराष्ट्र तुमच्यात त्याच्या आठशे वर्षांपूर्वी होउन गेलेल्या ज्ञानदेवाला पाहतोय.

In reply to by धन्या

टारझन 11/06/2011 - 11:36
तुम्ही कोदेश्वराचा अपमान करत आहात . कोदा हे जालिय ज्ञानेश्वर आहेत , असे वक्तव्य ह्या पुर्वी संस्थळावर कोणी करुन गेला आहे. कोदा ह्यांचे मराठी भाषेवर , साहित्यावर एवढे उपकार आहेत की त्यांना सगळ्या जगाला कमी लेखण्याचा अलिखीत अधिकार आहे असे जाता जाता णमुद करावेसे वाटते. कोदेश्वरांचा अपमान म्हणजे मिसळपाव वरच्या सगळ्या रेड्यांचा अपमाण आहे :) - रेडेश्वर कोदामुखी निबंध वदविला || रेडेश्वरु नामे प्रसिद्ध जाहला || जग जि़कण्या असे सामर्थ्य || येस वी आर ||

In reply to by धन्या

रणजित चितळे 11/06/2011 - 12:09
.................हा लेख किंवा निबंध वरवर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आजची युवा पिढी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली आहे मी असे म्हणेन की प्रचंड अवाजवी घाईत आहे आजची पिढी

छोटा डॉन 11/06/2011 - 12:15
बहुत काय लिहणे ? वरचे बहुसंख्य प्रतिसाद बरेच बोलके आहेत, विनायकाने त्यावर सिरियसली विचार करावा असे सांगतो. लिहण्याची ताकद आहेच, मात्र ती विचार करुन योग्य त्या प्रकारे वापरावी, अभिनिवेष टाळावाच असा सल्ला देऊ इच्छितो :) पुलेशु - छोटा डॉन

साला आमचा विनायक म्हणजे आंतरजालावरचा चेतन भगत आहे. विन्या अबे भोसडीच्या स्वतःच्या हातानी लेखाचे मातेरे केले आहेस रे. विषय छान होता पण तू तो इतका रटाळ केला आहेस की काय सांगावे. प्रत्येक विषयात, प्रत्येक कृतीत तू काहीतरी 'लै भारी' का शोधत असतोस ? जरा साध्या सरळपणे, तुझ्या वयाची पोरं लिहितात तसे लिही ना सोन्या. चार शिव्या लिही, दोन पाचकळ जोक लिही .. ते पण एकवेळ क्षम्य आहे. पण असले काही तरी लिहू नको. नै तर हाणतो बघ तिकडे येऊन. च्यायला मी म्हणले अलिबागला जाउन आलाय काहितरी रोंमॅटिक किंवा पावसाळ्यावर वैग्रे लिहिल असशील ... तर कसल काय ! च्छ्या !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला मी म्हणले अलिबागला जाउन आलाय काहितरी रोंमॅटिक किंवा पावसाळ्यावर वैग्रे लिहिल असशील ... तर कसल काय ! च्छ्या !!
अरे, हे अलिबाग कालच ...ह्यो लेख आधीचा आहे ...आल्यापासुन मिपा नीट चालु दिसल ...पण नवीन काहीच लिहित नव्हतो ..अंक समोर होता.. म्हटले हा लेख नेटवर लिहिलेलाच नाही ..तुर्तास हा लेख तरी प्रकाशित करु ..बाकी विचार केला नाही ..असो , आता करीन ....

चतुरंग 13/06/2011 - 09:57
मस्त लेख आहे रे विनायका! एकदम सुम्माट सुटलीये गाडी तुझी पहिल्या ओळीपासून ते शेवटी येस वी आर म्हणतच थांबली! ओबामाला त्याचं जिंकल्यानंतरचं भाषण तूच का रे लिहून दिलं होतंस? जळ्ळं ते मिपा. मधे मधे बंद पडत होतं त्यामुळे इतका सुंदर निबंध वाचायला किती वेळ की रे गेला! लोक ते काय अर्धं हळ्कुंड वगैरे म्हणताहेत ना, नकोस लक्ष देऊ तू! अरे थोर माणसं का कधी टीकेकडे लक्ष देतात? तू ते मोबाईल, अन फेस्बुक, अन नेट अन काय काय सांगत बसलास ना कसलं गरगरलायला लागलं मला, अरे काय करणार जरा मागल्या पिढीचा ना रे मी. काय कपॅकिटीच नाय रे आमची. तुम्ही नवीन जमान्याची मुलं कसली फास्ट रे १० मिन्टात उत्तर काढता नेटवरुन! काय सक्सेस्फुली गोंधळवून टाकलायस रे तू वाचणार्‍याला? जवाब नहीं! लेखात काय म्हणायचंय याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही ह्याला म्हणतात निबंध. नाहीतर ते निबंधमाला वाले कोणी भोपटकर की कोण होते ना, त्यांचे कसले रे निबंध ते छ्या! अर्थ समजतो रे, प्रश्न काय मांडायचाय ते कळतं रे त्यांच्या निबंधातून. तसं उपयोगाचं नाय, हे असं हवं! लिहीत रहा बाबा, नाहीतर ह्या जगाचं कसं होणार? इतके प्रचंड प्रश्न आहेत ते कोण आणि कसे सोडवणार? उद्या ५० वर्षांनतर आंतरजालाचा इतिहास जर लिहिला तर त्यात तुझे हे निबंध सोन्याहून पिवळे ठरतील ह्यात शंका नाही! -(येस, वी गार...)चतुरंग

साबु 13/06/2011 - 10:43
विनायक (वयाने लहान आहे म्हणुन एकेरी उल्लेख) चे लेख छान असतात. पण का कुणास ठाउक त्याचे लेख वाचले कि पु. ल. न्च्या गटणे ची आठवण होते. बोळा निघुन पाणी कधी वाहते होणार कुणास ठाउक?

In reply to by चेतन

विसुनाना 10/06/2011 - 17:49
'सदर लेखक मिपावर नवे आहेत' हे भूतकाळातील वाक्य आहे. :) त्यामुळे उल्लेखलेला लेख (निवेदन) येथे लागू होत नसावा. ;) लगे रहो, कोदाभाई.

In reply to by चेतन

गेला बाजार २.५ वर्ष मिपावर आहे बघा .... किंवा अस म्हणा की ,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ... बरेच दिवस ती किक बसली नव्हती, म्हणुन वरच लिहिलय अस समजायला काहीही हरकत नाही :)

In reply to by विनायक पाचलग

टारझन 10/06/2011 - 22:08
गेला बाजार २.५ वर्ष मिपावर आहे बघा ....
तेंव्हा देखील ह्याच गुणवत्तेचा लेख लिहायचात बरं तुम्ही :) अगदी एवढाच छाण :) सुरुवातीपासुन सेम कॉलिटी मेंटेण आहे :)
किंवा अस म्हणा की ,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...
सगळ्याच वाचकांना तुमचा लेख वाचल्यावर किक बसते. काहिंना नुसतं नाव पाहुनही किक बसते .. :) :) खिक :)

In reply to by टारझन

सुरुवातीपासुन सेम कॉलिटी मेंटेण आहे मी चुकून सुरवातीपासून सेम कॉलिटी मटण आहे असं वाचलं!!! काय करणार, वीकेन्ड जवळ आला ना!!! :)

आत्मशून्य 10/06/2011 - 17:37
बरच काही लिहलय, पण नक्की काय सांगायचय उमजलं नाही.

श्रावण मोडक 10/06/2011 - 17:58
आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत
काय विधान आहे हे! शक्ती विसरलेला हनुमान म्हणजे... जाऊदे...

In reply to by श्रावण मोडक

टारझन 10/06/2011 - 18:17
मेलो .. =)) =)) लेख वाचायचं अजुन तरी रिकामपण ( पक्षी धाडस) झालं नाही .. पण प्रतिसाद वाचुन मेल्या गेले आहे =)) =)) जेवढा लेख वाचला त्यात एवढे हास्य फवारे उडाले आहेत की एक विडंबण मनात रुळते आहे . खुप दिवसांनी इतका विनोदी लेख वाचला :)
सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता .
चुचु ने एक पातेलं जिंकलं होतं .. तिच्याकडे तो कॉन्फिडन्स पुर्वी पासुन होता ... तसेच लेखकाने पुर्वीच्या पिढीच्या कॉण्फिडन्स वर जे अपमानाचे शिंतोडे उडवले आहेत, त्यामुळे पुर्वीचे लोकं काय रिप्लाय देतात ते पहाणे रोचक ठरेल :) असो .. कोद्या फक्त लेख गाळायला येत असला , आणि कधी कोणाचं वाचत नसला तरी त्याच्या विनोदी लेखांमुळे त्याला ते क्षम्य आहे :)

गोगोल 10/06/2011 - 19:49
>> 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच याचा काय संदर्भ? विनायक जन्माला येतानाच ४५ वर्षांचा माईंड सेट घेउन आला होता. प्रत्येक गोष्टीच निबंधीकरण केलच पाहीजे का? कुठ्ल्याही गोष्टीचा फक्त आनंद घेण्यासाठीच म्हणून ती तु करू शकत नाहीस का? कुठलाही नवीन अनुभव घेताना तुला याचा निबंध कसा पाड्ता येईल हेच फक्त डोक्यात चालू असत का रे? उद्या तुझा हनिमून चालू असताना पण तुझ्या डोक्यात हेच चालू असणार का रे?

आपल्याला आपले प्रश्न कोणते, आपल्या समस्या कोणत्या तेच माहित नाही आहे.
मला वाटतं या वाक्यातच लेखाचा अर्क आहे. त्या वाक्याच्या अलिकडचे आणि पलिकडचे परिच्छेद व त्यांतील शब्द हाच संदेश अधोरेखित करण्यासाठी आहेत. प्रभावी कलाकृतीमध्ये माध्यम हाच संदेश म्हणून वापरला जातो. एकंदरीत आकारबंध मूळ संदेशाशी अनुरूप करणं हे थोर कलाकाराचं लक्षण आहे. त्याच खुबीने लेखकाने तरुण पिढीच्या मनातली विस्कळितता लेखातल्या विस्कळित विचारमांडणीतून दाखवली आहे. म्हणून ही उच्च कलाकृती आहे. थोडं यमक वगैरे साधलं असतं तर कविताच म्हणता आली असती.

प्रदीप 10/06/2011 - 20:23
लेखातील भाव समजला. पण लेख बराच विस्कळीत झाला आहे, तो बंदिस्त केला असता तर बरे झाले असते असे वाटले.
,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ... बरेच दिवस ती किक बसली नव्हती, म्हणुन वरच लिहिलय अस समजायला काहीही हरकत नाही
लेखक म्हणून तुम्ही येथे काही लिहीणार, व तरीही येथील समस्त वाचकांविषयी इतकी छ्द्मी प्रतिक्रिया का असावी? हा आमचा अपमान आहे असे आम्हास वाटले तर ते गैर नाही.

In reply to by विनायक पाचलग

प्रदीप 10/06/2011 - 20:57
इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...
हे सरसकट विधान आहे, काही विशीष्ट सभासदांविषयी नव्हे, हेही तुम्हाला समजत नाही काय? आणि भाषा जरा जपून वापरा. एकतर तुमचे drivel वाचायचे व नंतर तुमच्या उर्मट प्रतिक्रिया!

In reply to by प्रदीप

त्या विधानाने तुम्ही इतके का उचकलात ते अजिबात कळले नाही. हे विधान सकारात्मक दृष्टीनेपण घेता येईल की :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

टारझन 13/06/2011 - 13:59
त्या विधानाने तुम्ही इतके का उचकलात ते अजिबात कळले नाही
बहुतेक त्यांनी ते विश्वनात मेहेंदळे ह्यांना कळण्यासाठी लिहीलं नसावं :) - रोटीनाथ गहुदळे

अनामिक 10/06/2011 - 20:31
या लेखातून तु फेसबुक सॅवी आहेस एवढंच कळलं. आणि "येस, वुई आर..." ह्या उत्तराचा प्रश्न लेखात आहे का? कि ओबामाच्या 'येस, वुई कॅन'ची री ओढतोयेस? मी 'लास्ट बट नॉट द लिस्ट...' नंतरचा निबंध वाचला नाही म्हणून विचारतोय.

सहज 11/06/2011 - 06:03
फक्त एकच उणीव भासली, कमतरता जाणवली. ..नाही म्हणजे लेखात काहीही कमतरता नाही. तेवढं फक्त मिपाच्या लेखन प्रकारात 'पौगंड' प्रकार पाहीजे. तेवढा दिसला असता की फिट्ट आहे लेख!! पुलेशु!

विजुभाऊ 11/06/2011 - 07:26
अशा प्रकारच्या लेखन शैलीला ' मुक्तछंद ' असे म्हणतात ढण्यवाद हो भौ. तो "मुक्त्छन्द " हा शब्द नीट टायपल्याबद्दल. शब्द मागे फुडे जाले आस्ते तर लेइ घ्वाटाळा जाला आस्ता

रणजित चितळे 11/06/2011 - 10:31
आपला लेख वाचला. छान आहे ............. आपली पिढी ही 'कॉन्फिडन्ट' आहे व जग जिंकायची ताकद आहे हे सांगायचे आहे आपल्याला असे वाटते. माझे मत मी देत आहे, वाचून बघावे पटते का आपल्याला. ......23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता............. प्रत्येक पिढीला तरुण वयात आपली पूर्वीची पिढी बुद्धू वाटते. थोड्या अजून (जिवन जगण्याच्या) वर्षांच्या अनुभवानंतर खरे चित्र लक्षात येते. असो आपल्या पण येईल. कदाचित कॉन्फिडन्स व स्ट्रिट स्मार्ट ह्या दोन शब्दांमध्ये गफलत तर होत नाही हे बघावे. ...............आणि, हे कमी का काय, .................. कधीतरी कोणी C.S............ ..आणि पालकांचा खुन व्हायचा बाकी राहतो ..................... हे काही अंशी बरोबर वाटते ............. ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणा-या व चांगले संस्कार करवणा-या शाळेबाहेरील शाळा अजुनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळां मधुन आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे. ।।। पुर्ण लेख येथे आहे वाचून बघा वेळ मिळाला तर .. http://www.misalpav.com/node/15453 ...................बॉस, आणि एवढं काय टेन्शन........... .. ते मिळाल की योग्य दिशा घेणं.. मग, एमटीव्ही चा रिव्हेंज किंवा स्पार्टव्हिला जो संस्कार करतो. त्याला आपण नक्कीच पुरून उरू.,.................... ह्या वयात हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो... ह्या वर मला एक अनंत फंदींचा फटका आठवतो तो वाचून बघा आपल्याला आवडेल. बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||....................छान आहे ..................तसं बघायला गेलं ...............होणार आहे.. गंमत अशी.......... आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत.. तेवढी शक्ती कळालीय आता.. मग, जग बदलु आपण.. आणि म्हणूनच शेवटी म्हणावं वाटतं.. शेवटी रबिंद्रबाबूंनी लिहिले तसे ..एकला चालोरे ... आपणच असतो आपल्याला सावरणारे. शक्ती हरवलेल्या हनुमानाला जांबूवंता सारखी दिशा दाखवणारी आधीची पिढी आहे असे माझे म्हणणे आहे. बाकी अवांतर मराठी लेख लिहिताना इंग्रजी शब्द कमी आले तर वाचायला आवडेल जास्ती.

श्रावण मोडक 11/06/2011 - 10:52
जाताजाता एक महत्त्वाचे - विशिष्ट मुद्याला धरून विशिष्ट अंकासाठी केलेले लेखन असे इतरत्र बेधडक प्रसिद्ध करताना किमान लेखनाच्या शेवटी दिलेली सूचना सुरवातीलाच द्यावी हे उत्तम (आत्ताची सूचना म्हणजे सिगरेटच्या पाकिटावरील इशाऱ्यासारखी आहे). हा लेख पौगंडावस्थेविषयीच्या विशेषांकासाठीचा आहे. त्या वयातील घालमेल अशीही असते हे आहेच. पण अशा लेखांचे स्थान त्याच अंकात असते. ते इतरत्र आणू नये. क्रिकेटचा बॉल घेऊन फुटबॉल खेळत नसतात. तू कोल्हापूरचा आहेस, हे तुला लगेच कळेल.

In reply to by श्रावण मोडक

शाहरुख 11/06/2011 - 11:11
दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे चिकटवायचे का नाही ते माहित नाही पण तरीही प्रतिसाद रोचक वगैरे काय म्हणतात तसा वाटला. विनायक भावड्या, लिव रे तू रिफिल संपेस्तोवर !

In reply to by शाहरुख

श्रावण मोडक 11/06/2011 - 12:56
दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे प्रसिद्ध करू नये, असे माझ्या लेखनातून वाटत असेल तर माफी असावी. अशा लेखनाबाबतचा निर्णय या संस्थळाचे व्यवस्थापन करेल. माझा (काहीसा आगाऊ) सल्ला फक्त विनायक पाचलग यांच्यासाठी होता. ती धोरणात्मक टिप्पणी नव्हती.

In reply to by श्रावण मोडक

शाहरुख 11/06/2011 - 15:04
सर, माफी नको..तुम्ही मिपा धोरणावर टिपण्णी करताय असे अजिबात नव्हते मला म्हणायचे. तुम्ही पाचलगला दिलेला सल्ला (...ते इतरत्र आणू नये...) वाचूनच मला प्रतिसाद द्यावासा वाटला..

धन्या 11/06/2011 - 11:01
नमस्कार दोस्ता, मागे तू तुझ्या आय आय टी च्या जे ई ई परिक्षेबद्दल लिहून जो गायब झालास तो आता उगवलास. बहुतेक अभ्यासात गुंतला असावास. बरं वाटलं, खुप दिवसानंतर तुझा लेख पाहून. असो. तुझ्या या निबंधाच्या सुरुवातीचेच दोन ईंग्रजी शब्द पाहून तुझा जे ई ई मध्ये निकाल लागला असावा असं वाटतं. तू पुण्यात बहुतेक सिम्बायोसिसला प्रवेश घेतला असावास असंही असावं कदाचित. या तुझ्या लेखाला निबंधच म्हणावंसं वाटलं. बारावीच्या मराठीच्या (तेच ते युवकभारतीच्या) पेपराला जो पहिला निबंधाचा प्रश्न असतो ना, त्यातल्या "आम्ही कोण म्हणूनी काय पुससी?" या विषयावर लिहिलेला निबंध. पहिल्याच परीच्छेदात अगदी भारदस्त शब्दरचना करुन जबरदस्त टेम्पो आणला आहे. (मायबाप वाचकांनी एकापेक्षा एक प्रतिक्रिया देऊन तुझ्या निबंधाला त्याच टेम्पोत बसवला ही गोष्ट वेगळी.) अगदी लेखाचं शिर्षकच ओबामांच्या "येस वी कॅन" ची नक्कल आहे. सुरुवातीलाच एमायटी, सिम्बायोसिस या पुण्यातल्या नामवंत शिक्षणसंस्थांची नावे, जोशी, कुलकर्णी आणि पाटील अशा अभिजनांमध्ये मोडणार्‍या (निदान तुला तरी इथे तेच अभिप्रेत असावं) आडनावांचे उल्लेख, "APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारताचे शिलेदार" तसेच "संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह" सगळंच भारी... तू पुढे जे म्हणतोयस ते अगदी खरं आहे. आजचा युवा वर्ग हेच देशाचं उदयाचं भवितव्य आहे. वादच नाही. आज देश भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेल्या तुझ्या पिढीकडून खुप अपेक्षा आहेत यातही शंका नाही. मेणबत्ती लावून का होईना, ही फेसबुक आणि ट्वीटरवाली पिढी आपण जागे आहोत हे दाखवून देत आहे. खरं तर असं चौकाचौकात मेणबत्त्या लावून काहीच होणार नाही. ही व्यवस्था खुप निबर झाली आहे (मला असं म्हणायचं होतं की ही सिस्टीम नॉन रीस्पॉन्सिव झाली आहे. :) ) आता गरज आहे ती या देशात सुजाण नागरीक घडण्याची. सुजाण नागरीकांचा देशही सुजाणच असेल... पण... याचा अर्थ असा नाही की तुम्ही भूतकाळाला नावे ठेवाल. जगाच्या ईतिहासाला अश्मयुगापासून फेसबुकयुगात आणण्यात प्रत्येक पिढीचा छोटा मोठा वाटा आहे. मागच्या पिढीला "ही धमक तुमच्यात होती का?" असा प्रश्न विचारणे हा उर्मटपणा झाला. आणि हे सुजाणपणाचे लक्षण नाही... प्रत्येक पिढीला काळाची बंधने पाळावी लागतात, निदान ही बंधने झुगारुन देणारे महामानव समाजात जन्म घेत नाहीत तोपर्यंत तरी... "कोहं..." हा प्रश्न तुझ्याही पिढीला पडला आहे, चांगली गोष्ट आहे. "चिदानंद रुपोशिवोहम..." हे उत्तर मिळायला तुम्हाला आयुष्याची अजून बरीच वर्ष घालवावी लागतील. सध्या हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून फक्त एक सुजाण नागरीक कसं बनता येईल हे पाहा, या देशाचं कल्याण होईल... हा लेख किंवा निबंध वरवर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आजची युवा पिढी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली आहे. आज ब्लॉगर आणि वर्डप्रेससारख्या मोफत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे काही गोष्टींची जाणिवच नाही असं वाटत आहे. जुन्या लेखकांच्या प्रस्तावना वाचताना त्यांचे पुस्तकासाठी प्रकाशक मिळवण्यासाठी जी दिव्यं पार केली ती वाचली की अंगावर काटे येतात. आज मात्र बडव कीबोर्ड आणि पाड लेख असं झालंय. फेसबुकवरचं एखादं पेज, एखादी कम्युनिटी जॉईन केली की आपण फार मोठं देशकार्य केलं असं ज्याला त्याला वाटू लागलं आहे... मित्रा, तुझ्या आजच्या पिढीच्या युवकाने एखादा दोन चार पानांचा लेख लिहिला, तो साधनामध्ये वगैरे छापून आला की आपण कुणीतरी खास आहोत असं त्याला वाटू लागतं... जरा ज्ञानदेवाचं चरीत्र वाचा. त्याच्याबद्दल सांगितल्या जाणार्‍या रेडयामुखी वेद बोलविले, भिंत चालवली वगैरे चमत्कार कथा बाजूला ठेवा. समाजाने आईवडीलांना वाळीत टाकलेलं, त्यानंतर आई वडीलांच्या आत्महत्या, समाजाने "संन्याशाची पोरं" म्हणून केलेली हेटाळणी हे सारं बाजूला ठेवलं त्याने. वयाच्या सोळाव्या वर्षी या मुलाने भगवदगीतेवर निरुपणात्मक अशी नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. आज आठशे वर्षानंतरही हा उभा महाराष्ट्र त्याला माऊली म्हणतो, त्याच्या ज्ञानेश्वरीची "एक तरी ओवी अनुभवावी" म्हणतो... या बाललेखकाने ज्ञानेश्वरी संपवताना जी फलश्रुती लिहिली ती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. दुरीतांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्मे सुर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ॥ ... हा महाराष्ट्र तुमच्यात त्याच्या आठशे वर्षांपूर्वी होउन गेलेल्या ज्ञानदेवाला पाहतोय.

In reply to by धन्या

टारझन 11/06/2011 - 11:36
तुम्ही कोदेश्वराचा अपमान करत आहात . कोदा हे जालिय ज्ञानेश्वर आहेत , असे वक्तव्य ह्या पुर्वी संस्थळावर कोणी करुन गेला आहे. कोदा ह्यांचे मराठी भाषेवर , साहित्यावर एवढे उपकार आहेत की त्यांना सगळ्या जगाला कमी लेखण्याचा अलिखीत अधिकार आहे असे जाता जाता णमुद करावेसे वाटते. कोदेश्वरांचा अपमान म्हणजे मिसळपाव वरच्या सगळ्या रेड्यांचा अपमाण आहे :) - रेडेश्वर कोदामुखी निबंध वदविला || रेडेश्वरु नामे प्रसिद्ध जाहला || जग जि़कण्या असे सामर्थ्य || येस वी आर ||

In reply to by धन्या

रणजित चितळे 11/06/2011 - 12:09
.................हा लेख किंवा निबंध वरवर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आजची युवा पिढी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली आहे मी असे म्हणेन की प्रचंड अवाजवी घाईत आहे आजची पिढी

छोटा डॉन 11/06/2011 - 12:15
बहुत काय लिहणे ? वरचे बहुसंख्य प्रतिसाद बरेच बोलके आहेत, विनायकाने त्यावर सिरियसली विचार करावा असे सांगतो. लिहण्याची ताकद आहेच, मात्र ती विचार करुन योग्य त्या प्रकारे वापरावी, अभिनिवेष टाळावाच असा सल्ला देऊ इच्छितो :) पुलेशु - छोटा डॉन

साला आमचा विनायक म्हणजे आंतरजालावरचा चेतन भगत आहे. विन्या अबे भोसडीच्या स्वतःच्या हातानी लेखाचे मातेरे केले आहेस रे. विषय छान होता पण तू तो इतका रटाळ केला आहेस की काय सांगावे. प्रत्येक विषयात, प्रत्येक कृतीत तू काहीतरी 'लै भारी' का शोधत असतोस ? जरा साध्या सरळपणे, तुझ्या वयाची पोरं लिहितात तसे लिही ना सोन्या. चार शिव्या लिही, दोन पाचकळ जोक लिही .. ते पण एकवेळ क्षम्य आहे. पण असले काही तरी लिहू नको. नै तर हाणतो बघ तिकडे येऊन. च्यायला मी म्हणले अलिबागला जाउन आलाय काहितरी रोंमॅटिक किंवा पावसाळ्यावर वैग्रे लिहिल असशील ... तर कसल काय ! च्छ्या !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला मी म्हणले अलिबागला जाउन आलाय काहितरी रोंमॅटिक किंवा पावसाळ्यावर वैग्रे लिहिल असशील ... तर कसल काय ! च्छ्या !!
अरे, हे अलिबाग कालच ...ह्यो लेख आधीचा आहे ...आल्यापासुन मिपा नीट चालु दिसल ...पण नवीन काहीच लिहित नव्हतो ..अंक समोर होता.. म्हटले हा लेख नेटवर लिहिलेलाच नाही ..तुर्तास हा लेख तरी प्रकाशित करु ..बाकी विचार केला नाही ..असो , आता करीन ....

चतुरंग 13/06/2011 - 09:57
मस्त लेख आहे रे विनायका! एकदम सुम्माट सुटलीये गाडी तुझी पहिल्या ओळीपासून ते शेवटी येस वी आर म्हणतच थांबली! ओबामाला त्याचं जिंकल्यानंतरचं भाषण तूच का रे लिहून दिलं होतंस? जळ्ळं ते मिपा. मधे मधे बंद पडत होतं त्यामुळे इतका सुंदर निबंध वाचायला किती वेळ की रे गेला! लोक ते काय अर्धं हळ्कुंड वगैरे म्हणताहेत ना, नकोस लक्ष देऊ तू! अरे थोर माणसं का कधी टीकेकडे लक्ष देतात? तू ते मोबाईल, अन फेस्बुक, अन नेट अन काय काय सांगत बसलास ना कसलं गरगरलायला लागलं मला, अरे काय करणार जरा मागल्या पिढीचा ना रे मी. काय कपॅकिटीच नाय रे आमची. तुम्ही नवीन जमान्याची मुलं कसली फास्ट रे १० मिन्टात उत्तर काढता नेटवरुन! काय सक्सेस्फुली गोंधळवून टाकलायस रे तू वाचणार्‍याला? जवाब नहीं! लेखात काय म्हणायचंय याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही ह्याला म्हणतात निबंध. नाहीतर ते निबंधमाला वाले कोणी भोपटकर की कोण होते ना, त्यांचे कसले रे निबंध ते छ्या! अर्थ समजतो रे, प्रश्न काय मांडायचाय ते कळतं रे त्यांच्या निबंधातून. तसं उपयोगाचं नाय, हे असं हवं! लिहीत रहा बाबा, नाहीतर ह्या जगाचं कसं होणार? इतके प्रचंड प्रश्न आहेत ते कोण आणि कसे सोडवणार? उद्या ५० वर्षांनतर आंतरजालाचा इतिहास जर लिहिला तर त्यात तुझे हे निबंध सोन्याहून पिवळे ठरतील ह्यात शंका नाही! -(येस, वी गार...)चतुरंग

साबु 13/06/2011 - 10:43
विनायक (वयाने लहान आहे म्हणुन एकेरी उल्लेख) चे लेख छान असतात. पण का कुणास ठाउक त्याचे लेख वाचले कि पु. ल. न्च्या गटणे ची आठवण होते. बोळा निघुन पाणी कधी वाहते होणार कुणास ठाउक?
MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्‍या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ...

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

शशिकांत ओक ·

द्रवीड भाषाभ्यासक डॉ. सॅम्युएल आणि वकीलसाहेबांच्या एका भेटीचे वर्णन झकास झाले आहे. बाकी, नाडीपट्टीवरुन भविष्याचा वेध घेण्याऐवजी पट्टीवरील लिपीचा भाषिक दृष्टीकोनातून अभ्यासाचा विचार मला बॉ पटला.........! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 29/05/2011 - 11:30
नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...
विचार मला बॉ पटला.........!
.... चला प्रा. डॉ. ना तरी आत्ता पटले.... इतरांना आणखी काही काळाने ... हे ही नसे थोडके!

In reply to by शशिकांत ओक

>>>इतक्या उशीरा ? नाडीपट्टीवरील असलेल्या लेखनाचा म्हणजे लिपीचा भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून व्याकरण-उच्चाराचे शास्त्र, वगैरे अभ्यास करावा असे म्हटले आहे, माझ्या प्रतिसादातून 'नाडीपट्टीवरुन भविष्य कथन प्रकाराचा ' अभ्यास व्हावा किंवा अशा गोष्टीला मान्यता आहे, असा अर्थ घेऊ नये एवढीच नम्र विनंती. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 07/06/2011 - 12:34
प्रा. डॉ. बिरुटे सर,
'नाडीपट्टीवरुन भविष्य कथन प्रकाराचा ' अभ्यास व्हावा किंवा अशा गोष्टीला मान्यता आहे, असा अर्थ घेऊ नये एवढीच नम्र विनंती.
ऐतिहासिक रुमालातून लिपी अभ्यासकांचे एका मोडीपत्रावर शोधकार्य चालले होते. त्यातील मजकुराचा अर्थ लावल्यावर कळले की त्यातील मजकूर मुत्सुद्देगिरीचा अद्वितीय नमुना म्हणून नंतर मानला गेला. भाषेच्या अंगाने अभ्यासकार्यातून मजकुराचा जो काय शोध लागेल तो देखील अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हे आपल्याला मान्य होईल. म्हणून आपल्याला नाडीग्रंथांतील भविष्यकथन मान्य आहे असे मी घाईने म्हणणार नाही. काही काळाने अधिक अभ्यासांती आपले मत बदलले तरी हरकत नाही आणि बदलले नाही तरी हरकत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 29/05/2011 - 11:40
नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...
विचार मला बॉ पटला.........!
.... चला प्रा. डॉ. ना तरी आत्ता पटले.... इतरांना आणखी काही काळाने ... हे ही नसे थोडके!

In reply to by टारझन

शशिकांत ओक 07/06/2011 - 12:37
यथेच्च गप्पा झाल्या. नाडीवरील संभ्रम दूर झाले असे पारंब्यावर झोके घेत म्हटले गेले. माझा वेळ बरा गेला....

द्रवीड भाषाभ्यासक डॉ. सॅम्युएल आणि वकीलसाहेबांच्या एका भेटीचे वर्णन झकास झाले आहे. बाकी, नाडीपट्टीवरुन भविष्याचा वेध घेण्याऐवजी पट्टीवरील लिपीचा भाषिक दृष्टीकोनातून अभ्यासाचा विचार मला बॉ पटला.........! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 29/05/2011 - 11:30
नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...
विचार मला बॉ पटला.........!
.... चला प्रा. डॉ. ना तरी आत्ता पटले.... इतरांना आणखी काही काळाने ... हे ही नसे थोडके!

In reply to by शशिकांत ओक

>>>इतक्या उशीरा ? नाडीपट्टीवरील असलेल्या लेखनाचा म्हणजे लिपीचा भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून व्याकरण-उच्चाराचे शास्त्र, वगैरे अभ्यास करावा असे म्हटले आहे, माझ्या प्रतिसादातून 'नाडीपट्टीवरुन भविष्य कथन प्रकाराचा ' अभ्यास व्हावा किंवा अशा गोष्टीला मान्यता आहे, असा अर्थ घेऊ नये एवढीच नम्र विनंती. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 07/06/2011 - 12:34
प्रा. डॉ. बिरुटे सर,
'नाडीपट्टीवरुन भविष्य कथन प्रकाराचा ' अभ्यास व्हावा किंवा अशा गोष्टीला मान्यता आहे, असा अर्थ घेऊ नये एवढीच नम्र विनंती.
ऐतिहासिक रुमालातून लिपी अभ्यासकांचे एका मोडीपत्रावर शोधकार्य चालले होते. त्यातील मजकुराचा अर्थ लावल्यावर कळले की त्यातील मजकूर मुत्सुद्देगिरीचा अद्वितीय नमुना म्हणून नंतर मानला गेला. भाषेच्या अंगाने अभ्यासकार्यातून मजकुराचा जो काय शोध लागेल तो देखील अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हे आपल्याला मान्य होईल. म्हणून आपल्याला नाडीग्रंथांतील भविष्यकथन मान्य आहे असे मी घाईने म्हणणार नाही. काही काळाने अधिक अभ्यासांती आपले मत बदलले तरी हरकत नाही आणि बदलले नाही तरी हरकत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शशिकांत ओक 29/05/2011 - 11:40
नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...
विचार मला बॉ पटला.........!
.... चला प्रा. डॉ. ना तरी आत्ता पटले.... इतरांना आणखी काही काळाने ... हे ही नसे थोडके!

In reply to by टारझन

शशिकांत ओक 07/06/2011 - 12:37
यथेच्च गप्पा झाल्या. नाडीवरील संभ्रम दूर झाले असे पारंब्यावर झोके घेत म्हटले गेले. माझा वेळ बरा गेला....
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

मृगनयनी ·

टारझन 21/05/2011 - 03:45
अभिनंदन .. पत्रकार झाल्या की वो तुम्ही :) आगड्या वेगळ्या विषयावर आगळं वेगळं लेखन .. व्यायाम प्रकार असाही असु शकतो ? :) आवडले . - इकडुन तिकडुन .. व्यायामाकडे(च)

In reply to by टारझन

मृगनयनी 21/05/2011 - 04:03
धन्यु धन्यु!!! ... आणि हो!... आप्ला आजचा सामना'तलाच "त्रिमितीचाही अनुभव" आम्ही घेतला बरं का!!!!.... ;) :) हिन्दुस्तानात ३ डी लैपटौप येत असल्याची बातमी आपल्याकडून समजल्यामुळे आपलेही अभिनन्दन!! :) :)

शशिकांत ओक 23/05/2011 - 11:28
मृगनयनी, एका आगळ्यावेगळ्या विषयावर अर्थपुर्ण आणि वेधक माहिती. सवितर विवरणाने समाधान वाटले. १४५अंशाचा कोन करताना मोजमाप करून त्या नृत्य-व्यायाम प्रकाराला गणिती काटेकोरपणा आला आहे. सध्या रामदेव बाबांनी योग व्यायामांना नवे परिमाण देऊन त्याला जागतिक लोकप्रियता मिळवून दिली. तशीच सध्याच्या कवायतखोर, अंगचटी नाचांऐवजी या नृत्यप्रकारांना पुढे आणणाऱ्या स्पर्धा आयोजित करून भारतीय पारंपारिक नृत्यांबद्द्ल गोडी पुन्हा उत्पन्न करता येईल.

टारझन 21/05/2011 - 03:45
अभिनंदन .. पत्रकार झाल्या की वो तुम्ही :) आगड्या वेगळ्या विषयावर आगळं वेगळं लेखन .. व्यायाम प्रकार असाही असु शकतो ? :) आवडले . - इकडुन तिकडुन .. व्यायामाकडे(च)

In reply to by टारझन

मृगनयनी 21/05/2011 - 04:03
धन्यु धन्यु!!! ... आणि हो!... आप्ला आजचा सामना'तलाच "त्रिमितीचाही अनुभव" आम्ही घेतला बरं का!!!!.... ;) :) हिन्दुस्तानात ३ डी लैपटौप येत असल्याची बातमी आपल्याकडून समजल्यामुळे आपलेही अभिनन्दन!! :) :)

शशिकांत ओक 23/05/2011 - 11:28
मृगनयनी, एका आगळ्यावेगळ्या विषयावर अर्थपुर्ण आणि वेधक माहिती. सवितर विवरणाने समाधान वाटले. १४५अंशाचा कोन करताना मोजमाप करून त्या नृत्य-व्यायाम प्रकाराला गणिती काटेकोरपणा आला आहे. सध्या रामदेव बाबांनी योग व्यायामांना नवे परिमाण देऊन त्याला जागतिक लोकप्रियता मिळवून दिली. तशीच सध्याच्या कवायतखोर, अंगचटी नाचांऐवजी या नृत्यप्रकारांना पुढे आणणाऱ्या स्पर्धा आयोजित करून भारतीय पारंपारिक नृत्यांबद्द्ल गोडी पुन्हा उत्पन्न करता येईल.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.

तुला काय व्हायला आवडेल?

अत्रुप्त आत्मा ·

आत्मशून्य 12/05/2011 - 01:04
When we were five, they asked us what we wanted to be when we grew up. Our things were answers like astronaut, president, or in my case, princess… When we were ten, they asked us again. We answered - rock star, cowboy, or in my case, gold medalist… But now that we’ve grown up, they want a more serious answer. Well, how about this… Who the hell knows? This isn’t a time to make hard and fast decisions. This is the time to make mistakes. Take the wrong train and get stuck somewhere chill. Fall in love - a lot. Major in philosophy because there’s no way to make a career out of that. Change your mind. Then change it again because nothing is permanent. So make as many mistakes as you can. That way, someday, when they ask again what we want to be… We won’t have to guess. We’ll know.” :)

In reply to by आत्मशून्य

पॅरा आवडला.. लेखही छान. - (ट्रायल अ‍ॅन्ड एरर मधुन स्वताचे करीअर चॉईस केलेला) इंटेश्वर.

आत्मशून्य 12/05/2011 - 01:04
When we were five, they asked us what we wanted to be when we grew up. Our things were answers like astronaut, president, or in my case, princess… When we were ten, they asked us again. We answered - rock star, cowboy, or in my case, gold medalist… But now that we’ve grown up, they want a more serious answer. Well, how about this… Who the hell knows? This isn’t a time to make hard and fast decisions. This is the time to make mistakes. Take the wrong train and get stuck somewhere chill. Fall in love - a lot. Major in philosophy because there’s no way to make a career out of that. Change your mind. Then change it again because nothing is permanent. So make as many mistakes as you can. That way, someday, when they ask again what we want to be… We won’t have to guess. We’ll know.” :)

In reply to by आत्मशून्य

पॅरा आवडला.. लेखही छान. - (ट्रायल अ‍ॅन्ड एरर मधुन स्वताचे करीअर चॉईस केलेला) इंटेश्वर.
"तुला काय व्हायला अवडेल?"हा प्रश्न आपल्याला बालवाडीपासुन अनेकदा विचारला जातो.फक्त जे आपल्याला व्हायला अवडेल,तसं आपण होणं ईतरांना कधिच रुचत नाहि,हे नंतरहुन दिसुन येत.म्हणजे वरपांगि या प्रश्नाचं स्वरुप,हे आपलि आवड जाणवुन घेणारं वाटलं,तरी अंर्तयामि कारभार निराळाचा असतो.कसा?..तर हा संवाद पहा--पात्र क्रमांक-१)बालाक.पात्र क्रमांक-२)पालक... पालाक:- बबन्या,खरं खरं संग हं,तुला काय व्हायला अवडेल?

मिशन काश्मीर - २ (श्रीनगर)

मृत्युन्जय ·

वाह खुप सुंदर लेखन प्रत्येक शब्द वाचुन चित्र दिसु लागली. तसेच डकवलेली पिक्चर्स पन छानच. शिकारा वर राहने खुपच मस्त अनुभव असेल ना. पंचसुत्री सही लक्षात ठेविलच कारन १दा तरी जायची इच्छा आहे काश्मिर ला :)
माझी खुप इच्छा होती की काश्मीर की कली सारखी एखादी शर्मिला गालावर गोड खळ्या पाडत आपल्याला फुले विकायला येइल, मग मी तिच्याकडुन सगळीच्या सगळी फुले विकत घेइन. मग ती दुसर्‍या दिवशी परत येइल
. ओह्ह. तु तुझ्या शर्मिलाला सोबत नव्हता घेउन गेलास का?

गवि 10/05/2011 - 15:24
लगेचच जायची इच्छा होतेय एकदम. वर्णनही मस्त खुसखुशीत.. ....हाऊसबोट बनवायला एक खोका (म्हणजे एक कोटी ना?!) हे ऐकून मी चाट पडलो आहे.. एक कोटी तर एका आयुष्यात ब्रेक इव्हन व्हायचे नाहीत... विचारच करता येत नाहीये. कोण करेल असा खर्च? नवीन कोणी बनवतच नसेल. मला वाटते पूर्वीच्या हाऊसबोटीच केवळ तग धरून राहिल्या असतील..

हा भाग सुद्धा छान. आता काश्मिरमधली परिस्थीती बदलत आहे हे वाचून बरे वाटले. फोटोपण सुंदर आहेत.

मन१ 10/05/2011 - 15:34
फक्त एक विचारतोयः- कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली. खरय. खरं तर मागील दोन दशके, त्यातही मक्बूल भटला फाशी दिल्यापासुन आणि करणसिंगांना(राजा हरीसिंग ह्यांचे चिरंजीव) राज्यपाल केल्यापासुन काश्मीर प्रश्न भडकतच चाललेला आहे. अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. म्हणजे अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली. महत्वाचं पाउल. . आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट अ‍ॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही केवळ सात दिवसावरुन "आता" तसं नाही असं म्हणणं धाडसाचं वाटत. कुठल्याही दहशतवादी कार्यात, सरकार विरोधी लढ्यात, क्रांतिकार्यात, बंडामध्ये अधुन मधुन एक dormanted phase येतच असते. त्या अवधीत दोन्ही बाजु आपापल्या तयारीला लागुन पुढल्या लढाइला तयार होतात. युद्ध संपलेलं नसतं. सात दिवसात काहीच झालं नाही म्हणण्यापेक्षा,सात दिवसात तुमच्या पाहण्यात काहीच आलं नाही, असं म्हणणं योग्य ठरेल. आपण एक अल्पकालीन पर्यटक असल्यानं आख्ख्या राज्याच्या स्थितीचं दर्शन होणं आपणास शक्यही नाही आणि अपेक्षितही नाही. काश्मीर वर इथे मिपावरच शेकडो प्रतिसाद देणारे धागे आणि त्यातले काही दीर्घांकी प्रतिक्रिया वाचल्यात तर बरं होइल. काश्मीरचा घोटाळा पहिल्यापेक्षा कैकपट किचकट झालाय सध्या. (काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.) तेच म्हणतोय. ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं. त्यातही सरकार सोयीस्कररित्या हल्ली प्रसारमाध्यमं काबुत ठेवत असल्यानं, तिथला जाळ्,तिथली धग आता साअमान्य भारतीयापर्यंत पोचत नाही असही म्हटलं जातय. धग आहे तिथच आहे, गुंता तसाच आहे. दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे. सहमत नाही. आपण गेलात हे उत्तम. लेख मस्त जमलाय. --मनोबा.

In reply to by मन१

मृत्युन्जय 10/05/2011 - 15:58
आता परिस्थिती बदलली आहे असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा मी पर्यटनाचाच संदर्भ घेतला होता. ९० च्या दशकात पर्यटनासाठीदेखील काश्मीरला जाणे अशक्य होते. ते आता शक्य आहे. नंतर राजा राणी ने पर्यटकांना न्यायला सुरुवात केली तेव्हा मिलीटरीच्या गाड्यांच्या संरक्षणाशिवाय ते शक्य नव्हते. आता पर्यटकांना तेव्हढे भय नाही. म्हणुन परिस्थिती आता बदलली आहे असे मी म्हणालो. ते फक्त त्याच संदर्भात. काश्मीर थंड झाला आहे असे मी म्हणालो ते ही याच संदर्भात. त्यामानाने थंड झाला आहे. दहशतवादी कारवाया अजुनही चालुच आहेत. ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं. मिलीटरीमुळेच आज काश्मीर अजुनही भारताचा भाग आहे नाहितर मधल्या फळीतील चोरांनी आणि देशद्रोह्यांनी आतापावेतो काश्मीर विकुन खाल्ला असता. काश्मीरी माणसाच्या मनात इतके विष भरले आहे की मिलीटरीमुळे २ निवांत क्षण तरी मिळु शकतात हेच त्यांना पटत नाही. असो. बाकी संदर्भ पुढच्या लेखात येतीलच.

रेवती 10/05/2011 - 17:17
छानच लेखन आणि फोटू! माझं धाडस होणार नाही तिथे जाण्याचं.......... हाऊसबोट बांधायचा खर्च जरा जास्तच वाटतो. सगळ्या बोटमालकांचे व्यवसाय चालतात का? त्यांचे भाडेही जास्तच असणार. पाण्यावर तरंगणारा बाजार आवडला.

In reply to by रेवती

मृत्युन्जय 10/05/2011 - 17:45
हाउस बोट बांधायचा खर्च जरा जास्त वाटतो खरे. पण तो तेवढा आहे हे २-३ जणांनी सांगितले. आमच्या हाउसबोटचा मालकही म्हणत होता म्हणजे खरेच असेल. अंतर्गत सजावाटीसाठीही बराच खर्च येत असावा. एका बोटीचे आयुष्य साधारण २५-३० वर्षे असते. त्यानंतर अर्थात पाण्यात राहुन राहुन लाकुड कुजत असणार. म्हणजे अगदीच लाकडाची आहुती नसेल द्यायला लागत. पण डागडुजीची गरज असणार. हाउसबोटीचे भाडे हॉटेल पेक्षा कमीच होते. साधारण ३ ते ४ हजारात चांगल्या हाउसबोटीत खोली मिळु शकते. काही हाउसबोटीत ८ हजारापर्यंत टॅरिफ आहे. हा उद्योग परवडणारा आहे की नाही ते नाही माहिती. पण ज्या संख्येने हाउसबोटी आहेत ते बघता परवडत असावा. रुम टॅरिफ वगळता हाउस बोटीच्या माध्यमातुन उत्पन्नाचा काही स्त्रोत वाटला नाही. बहुतेक सगळ्या हाउसबोटीतुन केवळ राहण्याची सोय होते. खाण्यापिण्याची नाही. सोय असेल तरी तिथे खाण्याचे लोक टाळतात कारण अन्न जर दल लेकच्या पाण्यात शिजवले असेल तर भगवान मालिक. पाण्याला खुपच वाईट वास असतो. साधारण विचार करता हाउस बोटीतुन वर्षाला १२ लाखाचे उत्पन्न मिळाले तरच तो फायद्याचा व्यवसाय ठरावा. ३ ते ४ हजार रुपये रोजी भाडे लक्षात घेता आणि साधारण ३ शयनगृहे गृहीत धरुन एका दिवसाचे उत्पन्न ९ ते १२ हजार रुपये होते. म्हणजे महिना किमान १० ते १२ दिवस तरी हाउस बोट पुर्ण ओक्युपाय झाली पाहिजे. हे गणित जुळते की नाही ते माहित नाही. पण बहुधा अशक्यही नसावे. शिवाय ज्या हाउसबोटी जुन्या आहेत त्यांचा ब्रेक एव्हन झाला असेल तर फारसे अवघड नसावे.

स्मिता. 10/05/2011 - 17:58
मिशन काश्मिर एकदम मस्त चाल्लंय. वर्णन आणि फोटो दोन्हीही खासच!

शब्दचित्रे आवडली. ते बाजाराचे फटू जरा मोठे करुन टाक ना बे. आणि मुख्य म्हणजे पुढच्या भागात मदिरा आणि हुक्का ह्यावर जरा लिहा ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 10/05/2011 - 19:54
आणि मुख्य म्हणजे पुढच्या भागात मदिरा आणि हुक्का ह्यावर जरा लिहा साहेब मदिराक्षींवर लिहु शकतो. मदिरेवर नाही लिहिता येणार. तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही.

In reply to by मृत्युन्जय

सुनील 10/05/2011 - 21:45
तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही हे काश्मिरबाबत खरे आहे पण जम्मूत मदिरा मिळते (अगदी वाइन शॉपमध्ये!). तुम्ही जर का खुश्कीच्या मार्गाने गेला असतात तर, जिथे जम्मू प्रांत संपत येतो तिथे बरीच दुकाने आहेत. रस्त्याने जाणारे बहुसंख्य पर्यटक तिथूनच "स्टॉ़क" भरून घेतात! बाकी, मिशन छान चालले आहे. फोटोही चांगले. (पुराव्यानिशी) सुनील

In reply to by सुनील

विलासराव 24/05/2011 - 10:47
>>>>>तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही हे काश्मिरबाबत खरे आहे पण जम्मूत मदिरा मिळते (अगदी वाइन शॉपमध्ये!). मी स्वतः श्रीनगरला वाईनशॉपमधुन व्हिस्की खरेदी केली आहे २००४ ला. त्यावेळेस मिळालेल्या माहितीवरुन श्रीनगरमधे २ वाईनशॉप होते. एक दल लेकशेजारी होते. हो पण ती फक्त आम्ही आमच्या लॉजवर जाउन प्यायलो कारण कोठेही रेस्टॉरंटमधे प्यायला परवानगी नाही

In reply to by विलासराव

मृत्युन्जय 24/05/2011 - 10:51
मी शोधक नजरेने बघितले असता कुठे सापडले नाहीत म्हणुन आमच्या वाहनचालकाला विचारले त्यावर त्याने दिलेली माहिती आहे ही. मी मदिराक्षींनीच भारावुन गेलेलो असल्यामुळे आणि मदिरेचे आणि माझे असेही सख्य नसल्यामुळे अजुन खोलात जाउन विचारपूस केली नाही. पण मोठ्या हॉटेलात आणि ब्लॅक मार्केट मधुन पिण्याची व्यवस्था होउ शकते असे टुर ऑपरेटर म्हणाला होता.

सखी 10/05/2011 - 19:11
लेख, माहीती, फोटु आवडले. त्या तळ्याचे पाणी इतके खराब झाल्याचे वाटुन वाईट वाटले. पर्यटनाबाबत तरी परिस्थिती सुधारते आहे, हे चांगलेच आहे. पण मनोबा म्हणतात त्यातही तथ्य वाटते.

राही 10/05/2011 - 20:26
गेल्या वर्षी एप्रिलमधे आम्ही जम्मू,कश्मीर(स्रीनगर,पहलगाम,गुलमर्ग,सोनमर्ग,वैष्नोदेवी आणि अनेक ठिकाणं..) इथे गेलो होतो. जम्मू,कटरा(वैष्नोदेवी यात्रेचं प्रारंभस्थान) त्यामानाने गलिच्छ आहे. पण कश्मीर खोर्‍याचं निसर्गसौंदर्य मात्र दृष्ट लागेल इतकं सुंदर आहे . दल तलाव,पार्श्वभूमीवर शंकराचार्य टेकडी (जिथे पर्यटकांना जायला मिळते,जाऊ दिले जाते,अशा अगदी तुरळक हिंदू धार्मिक स्थळांपैकी एक),भोवती पसरलेलं धुकं,झेलमचं संथ पाणी,त्यात मिसळलेली आकाशाची निळाई सगळंच स्वर्गीय आहे. छोट्याशा शिकार्‍यात गादीवर पाय पसरून आरामात पहुडावं,शिकार्‍यात फक्त वल्हवणारा पोरगेलासा मुलगा,त्याच्या वल्ह्याचा सप सप आवाज,झेलमचं चुळबुळणारं पाणी,कानाला किंचितसा झोंबणारा थंड वारा,अगदी समाधी लागते. नवीन केलेली ट्युलिप्सची बागही बहरली होती. हॉलंड इतकं नाही पण दृश्य खूप सुंदर होतं. जास्त तपशील लिहित नाही . नाही तर 'क्रमशः' मधली खुमारी निघून जाईल.

फोटोही सुरेख. आमच्या काश्मिर सहलीची आठवण झाली. १९८४ च्या ऑक्टोबर मध्ये गेलो होतो. त्या वेळची मुख्य घटना आठवत असेल तर आम्ही श्रीनगरच्या वाटेवर असताना इंदीरा गांधी हत्या बातमी कळली होती,श्रीनगर मध्ये संचारबंदी म्हणुन सहा दिवसांचा मुक्काम करावा लागला होता.मिलिटरीची ये-जा चालु झाली होति पण एवढ टेन्शन नव्हतं. बाकी काश्मीर दर्शन छान झालं होतं. आपला लेख वाचुन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. -मयुरा.

हरिप्रिया_ 11/05/2011 - 14:19
काश्मीरच्या वर्णनाने मला खरच पुन्हा एकदा काश्मीर फिरून यावास वाटू लागलंय...खूप छान लिहिल आहे.. पुढचे लवकर लवकर लिहा..पेहेलागामच वर्णन तुमच्या शब्दात ऐकायला आवडेल... अवांतर : खर तुम्ही म्हणता तस मिलीटरीवाल्याना एक नंबरचे चोर म्हणारे मला कोणी दिसलं नाही, आमच्या ट्रीप मध्ये तरी... मात्र आम्ही गाडीने काश्मीर फिरत होतो, आणि त्या गाडीवाल्यानी आम्हाला आम्ही ठरवलेल्या काही ठिकाणी (नेहमीच्या पर्यटन ठिकाणांपेक्षा वेगळ्या ठिकाणी) घेऊन जायला मात्र साफ नाकारलं.. आणि एक माणूस भेटला होता गुलमर्ग मध्ये..आम्ही त्याच्या कडून काही विकत घेत नव्हतो तर आम्हाला तत्वज्ञान शिकवायला लागला, "तुम इंडिया के लोग हमे मदत नाही करोगे तो हम क्यु ना पाकिस्तान मे जाये?" असली जाम चिडचिड झाली म्हणुन सांगू..

दोन्ही भाग वाचले. छान! खुमासदार वर्णन, आवडले. स्वाती (मिपा सारखं गंडत असल्याने प्रतिक्रिया २/३ दा पुसली गेली..:( )

In reply to by मृत्युन्जय

गणपा 11/05/2011 - 23:17
जवळपास कोणत्याच लेखका/कवीशी/भविष्यवेत्त्याशी माझे वाकडे नाही रे. :) विकासजींनी नमुद केलेले हे विषय काळजात धडकी भरवतात हल्ली.

किशोरअहिरे 13/05/2011 - 09:40
ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं. >>>>>> जेंव्हा कश्मिर वेगळे राष्ट्र निर्माण करुन देऊ अशी फितुरी पाकिस्तानने कश्मिर मधल्या मुस्लिम लोकांना दिली आणी मग ह्याच &*&*(&*(&*(&)(&(&()& कश्मिरी लोकांनी पाकिस्तानातुन धाडण्यात आलेल्या आतंकवाद्याना स्वता:च्या घरात आश्रय दिला ... तेंव्हा कुठे गेले होते ह्यांचे अमनप्रेम नालायक कुठले.. जेंव्हा लाखो कश्मिरी पंडीताना एक एक करुन मारले जाऊ लागले आणी तिथुनच पुढे त्यांना श्रीनगर वरुन जम्मु ला हाकलुन दिले.. आणी कित्येक स्त्रियांचे बलात्कार आणि हत्या ह्याच कश्मीरी लोकांच्या मदतीने केल्या गेल्या तेंव्हा कुठे गेले अमन प्रेम साले तोंड वर करुन बोलु तरी कसे शकतात तेच कळत नाही... जेंव्हा पाकिस्तान ने धोरण जाहीर केले की कश्मिर वेगळे राष्ट्र नाही होणार तेंव्हा ह्याच कश्मीरी लोकांची तनतनलि आणी ह्यांच्यात मग फुट पडली.. तेंव्हा दहशतवाद ताब्यात घेण्यासाठी भारतातील आर्मी पुढे एकच पर्याय होता तो म्हणजे दहशवादाला सपोर्ट करणारी कश्मीरी जनता ह्यांच्या मुस्क्या आवळने.. ते अत्यंत आवश्यकच होते असे म्हणेल मी.. आणी मिलीट्री ची पॉलिसी पण बरोबरच होती.. एका कश्मीरी नागरिकाला बंदुकी समोर ठेऊनच त्यांनी घरा घरात जाऊन दहशद वादी पकडवलेत.. अर्थात ह्या मधे मोठे नुकसान तिथल्या नागरिकांचेच झाले नो डाऊट.. पण जैसी करणी वैसी भरणी... आणी आता अमन प्रेमी म्हनून आणी मिलीट्री ला दहशतवादी म्हणु पाहत आहेत.. कठिण आहे सगळे :(

यशोधरा 14/05/2015 - 09:31
सुरेख लिहिलं आहे! मस्त! दल लेकचं बॅकवॉटर पाहिलंस की नाही? तिथे कमळांची शेती चालते. शेतंच्या शेतं आणि कमळं पाण्यावर तरंगत असतात, इथून तिथे वहात असतात. मी गेले होते तेहा कमळांचा मौसम संपला होता पण तरीही पाच पन्नास कमळं प्रत्येक शेतात तरंगत होती. समोरच हिरवा, निळा पहाड, रिमझिम पावसातले पहाडभर पसरलेले इंदधनुष्य, रिमझिम पाऊस, संध्याकाळचे मृदूमुलायम उन, दलचे चमकणारे पाणी आणि समोर गुलाबी, पांढरी ,पिवळी कमळं! काश्मीरमधला पहिलाच दिवस आणि संध्याकाळची दलची सफर अशा तर्‍हेने सार्थकी लागली होती :) नावाडी म्हणाला होता, असे इंद्रधनुष्य आल्या आल्या दिसणे अच्छा शगुन हय, आपका काम हो जायेगा! मला शॉपिंग्मधे रस नाही म्हटल्यावर त्याला फारच आश्चर्य वाटून राहिले होते! =)) आज ह्या लेखामुळे पुन्हा एकदा आठवले सगळे. धन्यवाद.

मृत्युन्जय 14/05/2015 - 11:51
मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957 मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973 मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019 मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061 मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085 मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104 मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162 मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309

वाह खुप सुंदर लेखन प्रत्येक शब्द वाचुन चित्र दिसु लागली. तसेच डकवलेली पिक्चर्स पन छानच. शिकारा वर राहने खुपच मस्त अनुभव असेल ना. पंचसुत्री सही लक्षात ठेविलच कारन १दा तरी जायची इच्छा आहे काश्मिर ला :)
माझी खुप इच्छा होती की काश्मीर की कली सारखी एखादी शर्मिला गालावर गोड खळ्या पाडत आपल्याला फुले विकायला येइल, मग मी तिच्याकडुन सगळीच्या सगळी फुले विकत घेइन. मग ती दुसर्‍या दिवशी परत येइल
. ओह्ह. तु तुझ्या शर्मिलाला सोबत नव्हता घेउन गेलास का?

गवि 10/05/2011 - 15:24
लगेचच जायची इच्छा होतेय एकदम. वर्णनही मस्त खुसखुशीत.. ....हाऊसबोट बनवायला एक खोका (म्हणजे एक कोटी ना?!) हे ऐकून मी चाट पडलो आहे.. एक कोटी तर एका आयुष्यात ब्रेक इव्हन व्हायचे नाहीत... विचारच करता येत नाहीये. कोण करेल असा खर्च? नवीन कोणी बनवतच नसेल. मला वाटते पूर्वीच्या हाऊसबोटीच केवळ तग धरून राहिल्या असतील..

हा भाग सुद्धा छान. आता काश्मिरमधली परिस्थीती बदलत आहे हे वाचून बरे वाटले. फोटोपण सुंदर आहेत.

मन१ 10/05/2011 - 15:34
फक्त एक विचारतोयः- कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली. खरय. खरं तर मागील दोन दशके, त्यातही मक्बूल भटला फाशी दिल्यापासुन आणि करणसिंगांना(राजा हरीसिंग ह्यांचे चिरंजीव) राज्यपाल केल्यापासुन काश्मीर प्रश्न भडकतच चाललेला आहे. अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. म्हणजे अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली. महत्वाचं पाउल. . आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट अ‍ॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही केवळ सात दिवसावरुन "आता" तसं नाही असं म्हणणं धाडसाचं वाटत. कुठल्याही दहशतवादी कार्यात, सरकार विरोधी लढ्यात, क्रांतिकार्यात, बंडामध्ये अधुन मधुन एक dormanted phase येतच असते. त्या अवधीत दोन्ही बाजु आपापल्या तयारीला लागुन पुढल्या लढाइला तयार होतात. युद्ध संपलेलं नसतं. सात दिवसात काहीच झालं नाही म्हणण्यापेक्षा,सात दिवसात तुमच्या पाहण्यात काहीच आलं नाही, असं म्हणणं योग्य ठरेल. आपण एक अल्पकालीन पर्यटक असल्यानं आख्ख्या राज्याच्या स्थितीचं दर्शन होणं आपणास शक्यही नाही आणि अपेक्षितही नाही. काश्मीर वर इथे मिपावरच शेकडो प्रतिसाद देणारे धागे आणि त्यातले काही दीर्घांकी प्रतिक्रिया वाचल्यात तर बरं होइल. काश्मीरचा घोटाळा पहिल्यापेक्षा कैकपट किचकट झालाय सध्या. (काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.) तेच म्हणतोय. ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं. त्यातही सरकार सोयीस्कररित्या हल्ली प्रसारमाध्यमं काबुत ठेवत असल्यानं, तिथला जाळ्,तिथली धग आता साअमान्य भारतीयापर्यंत पोचत नाही असही म्हटलं जातय. धग आहे तिथच आहे, गुंता तसाच आहे. दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे. सहमत नाही. आपण गेलात हे उत्तम. लेख मस्त जमलाय. --मनोबा.

In reply to by मन१

मृत्युन्जय 10/05/2011 - 15:58
आता परिस्थिती बदलली आहे असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा मी पर्यटनाचाच संदर्भ घेतला होता. ९० च्या दशकात पर्यटनासाठीदेखील काश्मीरला जाणे अशक्य होते. ते आता शक्य आहे. नंतर राजा राणी ने पर्यटकांना न्यायला सुरुवात केली तेव्हा मिलीटरीच्या गाड्यांच्या संरक्षणाशिवाय ते शक्य नव्हते. आता पर्यटकांना तेव्हढे भय नाही. म्हणुन परिस्थिती आता बदलली आहे असे मी म्हणालो. ते फक्त त्याच संदर्भात. काश्मीर थंड झाला आहे असे मी म्हणालो ते ही याच संदर्भात. त्यामानाने थंड झाला आहे. दहशतवादी कारवाया अजुनही चालुच आहेत. ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं. मिलीटरीमुळेच आज काश्मीर अजुनही भारताचा भाग आहे नाहितर मधल्या फळीतील चोरांनी आणि देशद्रोह्यांनी आतापावेतो काश्मीर विकुन खाल्ला असता. काश्मीरी माणसाच्या मनात इतके विष भरले आहे की मिलीटरीमुळे २ निवांत क्षण तरी मिळु शकतात हेच त्यांना पटत नाही. असो. बाकी संदर्भ पुढच्या लेखात येतीलच.

रेवती 10/05/2011 - 17:17
छानच लेखन आणि फोटू! माझं धाडस होणार नाही तिथे जाण्याचं.......... हाऊसबोट बांधायचा खर्च जरा जास्तच वाटतो. सगळ्या बोटमालकांचे व्यवसाय चालतात का? त्यांचे भाडेही जास्तच असणार. पाण्यावर तरंगणारा बाजार आवडला.

In reply to by रेवती

मृत्युन्जय 10/05/2011 - 17:45
हाउस बोट बांधायचा खर्च जरा जास्त वाटतो खरे. पण तो तेवढा आहे हे २-३ जणांनी सांगितले. आमच्या हाउसबोटचा मालकही म्हणत होता म्हणजे खरेच असेल. अंतर्गत सजावाटीसाठीही बराच खर्च येत असावा. एका बोटीचे आयुष्य साधारण २५-३० वर्षे असते. त्यानंतर अर्थात पाण्यात राहुन राहुन लाकुड कुजत असणार. म्हणजे अगदीच लाकडाची आहुती नसेल द्यायला लागत. पण डागडुजीची गरज असणार. हाउसबोटीचे भाडे हॉटेल पेक्षा कमीच होते. साधारण ३ ते ४ हजारात चांगल्या हाउसबोटीत खोली मिळु शकते. काही हाउसबोटीत ८ हजारापर्यंत टॅरिफ आहे. हा उद्योग परवडणारा आहे की नाही ते नाही माहिती. पण ज्या संख्येने हाउसबोटी आहेत ते बघता परवडत असावा. रुम टॅरिफ वगळता हाउस बोटीच्या माध्यमातुन उत्पन्नाचा काही स्त्रोत वाटला नाही. बहुतेक सगळ्या हाउसबोटीतुन केवळ राहण्याची सोय होते. खाण्यापिण्याची नाही. सोय असेल तरी तिथे खाण्याचे लोक टाळतात कारण अन्न जर दल लेकच्या पाण्यात शिजवले असेल तर भगवान मालिक. पाण्याला खुपच वाईट वास असतो. साधारण विचार करता हाउस बोटीतुन वर्षाला १२ लाखाचे उत्पन्न मिळाले तरच तो फायद्याचा व्यवसाय ठरावा. ३ ते ४ हजार रुपये रोजी भाडे लक्षात घेता आणि साधारण ३ शयनगृहे गृहीत धरुन एका दिवसाचे उत्पन्न ९ ते १२ हजार रुपये होते. म्हणजे महिना किमान १० ते १२ दिवस तरी हाउस बोट पुर्ण ओक्युपाय झाली पाहिजे. हे गणित जुळते की नाही ते माहित नाही. पण बहुधा अशक्यही नसावे. शिवाय ज्या हाउसबोटी जुन्या आहेत त्यांचा ब्रेक एव्हन झाला असेल तर फारसे अवघड नसावे.

स्मिता. 10/05/2011 - 17:58
मिशन काश्मिर एकदम मस्त चाल्लंय. वर्णन आणि फोटो दोन्हीही खासच!

शब्दचित्रे आवडली. ते बाजाराचे फटू जरा मोठे करुन टाक ना बे. आणि मुख्य म्हणजे पुढच्या भागात मदिरा आणि हुक्का ह्यावर जरा लिहा ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 10/05/2011 - 19:54
आणि मुख्य म्हणजे पुढच्या भागात मदिरा आणि हुक्का ह्यावर जरा लिहा साहेब मदिराक्षींवर लिहु शकतो. मदिरेवर नाही लिहिता येणार. तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही.

In reply to by मृत्युन्जय

सुनील 10/05/2011 - 21:45
तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही हे काश्मिरबाबत खरे आहे पण जम्मूत मदिरा मिळते (अगदी वाइन शॉपमध्ये!). तुम्ही जर का खुश्कीच्या मार्गाने गेला असतात तर, जिथे जम्मू प्रांत संपत येतो तिथे बरीच दुकाने आहेत. रस्त्याने जाणारे बहुसंख्य पर्यटक तिथूनच "स्टॉ़क" भरून घेतात! बाकी, मिशन छान चालले आहे. फोटोही चांगले. (पुराव्यानिशी) सुनील

In reply to by सुनील

विलासराव 24/05/2011 - 10:47
>>>>>तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही हे काश्मिरबाबत खरे आहे पण जम्मूत मदिरा मिळते (अगदी वाइन शॉपमध्ये!). मी स्वतः श्रीनगरला वाईनशॉपमधुन व्हिस्की खरेदी केली आहे २००४ ला. त्यावेळेस मिळालेल्या माहितीवरुन श्रीनगरमधे २ वाईनशॉप होते. एक दल लेकशेजारी होते. हो पण ती फक्त आम्ही आमच्या लॉजवर जाउन प्यायलो कारण कोठेही रेस्टॉरंटमधे प्यायला परवानगी नाही

In reply to by विलासराव

मृत्युन्जय 24/05/2011 - 10:51
मी शोधक नजरेने बघितले असता कुठे सापडले नाहीत म्हणुन आमच्या वाहनचालकाला विचारले त्यावर त्याने दिलेली माहिती आहे ही. मी मदिराक्षींनीच भारावुन गेलेलो असल्यामुळे आणि मदिरेचे आणि माझे असेही सख्य नसल्यामुळे अजुन खोलात जाउन विचारपूस केली नाही. पण मोठ्या हॉटेलात आणि ब्लॅक मार्केट मधुन पिण्याची व्यवस्था होउ शकते असे टुर ऑपरेटर म्हणाला होता.

सखी 10/05/2011 - 19:11
लेख, माहीती, फोटु आवडले. त्या तळ्याचे पाणी इतके खराब झाल्याचे वाटुन वाईट वाटले. पर्यटनाबाबत तरी परिस्थिती सुधारते आहे, हे चांगलेच आहे. पण मनोबा म्हणतात त्यातही तथ्य वाटते.

राही 10/05/2011 - 20:26
गेल्या वर्षी एप्रिलमधे आम्ही जम्मू,कश्मीर(स्रीनगर,पहलगाम,गुलमर्ग,सोनमर्ग,वैष्नोदेवी आणि अनेक ठिकाणं..) इथे गेलो होतो. जम्मू,कटरा(वैष्नोदेवी यात्रेचं प्रारंभस्थान) त्यामानाने गलिच्छ आहे. पण कश्मीर खोर्‍याचं निसर्गसौंदर्य मात्र दृष्ट लागेल इतकं सुंदर आहे . दल तलाव,पार्श्वभूमीवर शंकराचार्य टेकडी (जिथे पर्यटकांना जायला मिळते,जाऊ दिले जाते,अशा अगदी तुरळक हिंदू धार्मिक स्थळांपैकी एक),भोवती पसरलेलं धुकं,झेलमचं संथ पाणी,त्यात मिसळलेली आकाशाची निळाई सगळंच स्वर्गीय आहे. छोट्याशा शिकार्‍यात गादीवर पाय पसरून आरामात पहुडावं,शिकार्‍यात फक्त वल्हवणारा पोरगेलासा मुलगा,त्याच्या वल्ह्याचा सप सप आवाज,झेलमचं चुळबुळणारं पाणी,कानाला किंचितसा झोंबणारा थंड वारा,अगदी समाधी लागते. नवीन केलेली ट्युलिप्सची बागही बहरली होती. हॉलंड इतकं नाही पण दृश्य खूप सुंदर होतं. जास्त तपशील लिहित नाही . नाही तर 'क्रमशः' मधली खुमारी निघून जाईल.

फोटोही सुरेख. आमच्या काश्मिर सहलीची आठवण झाली. १९८४ च्या ऑक्टोबर मध्ये गेलो होतो. त्या वेळची मुख्य घटना आठवत असेल तर आम्ही श्रीनगरच्या वाटेवर असताना इंदीरा गांधी हत्या बातमी कळली होती,श्रीनगर मध्ये संचारबंदी म्हणुन सहा दिवसांचा मुक्काम करावा लागला होता.मिलिटरीची ये-जा चालु झाली होति पण एवढ टेन्शन नव्हतं. बाकी काश्मीर दर्शन छान झालं होतं. आपला लेख वाचुन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. -मयुरा.

हरिप्रिया_ 11/05/2011 - 14:19
काश्मीरच्या वर्णनाने मला खरच पुन्हा एकदा काश्मीर फिरून यावास वाटू लागलंय...खूप छान लिहिल आहे.. पुढचे लवकर लवकर लिहा..पेहेलागामच वर्णन तुमच्या शब्दात ऐकायला आवडेल... अवांतर : खर तुम्ही म्हणता तस मिलीटरीवाल्याना एक नंबरचे चोर म्हणारे मला कोणी दिसलं नाही, आमच्या ट्रीप मध्ये तरी... मात्र आम्ही गाडीने काश्मीर फिरत होतो, आणि त्या गाडीवाल्यानी आम्हाला आम्ही ठरवलेल्या काही ठिकाणी (नेहमीच्या पर्यटन ठिकाणांपेक्षा वेगळ्या ठिकाणी) घेऊन जायला मात्र साफ नाकारलं.. आणि एक माणूस भेटला होता गुलमर्ग मध्ये..आम्ही त्याच्या कडून काही विकत घेत नव्हतो तर आम्हाला तत्वज्ञान शिकवायला लागला, "तुम इंडिया के लोग हमे मदत नाही करोगे तो हम क्यु ना पाकिस्तान मे जाये?" असली जाम चिडचिड झाली म्हणुन सांगू..

दोन्ही भाग वाचले. छान! खुमासदार वर्णन, आवडले. स्वाती (मिपा सारखं गंडत असल्याने प्रतिक्रिया २/३ दा पुसली गेली..:( )

In reply to by मृत्युन्जय

गणपा 11/05/2011 - 23:17
जवळपास कोणत्याच लेखका/कवीशी/भविष्यवेत्त्याशी माझे वाकडे नाही रे. :) विकासजींनी नमुद केलेले हे विषय काळजात धडकी भरवतात हल्ली.

किशोरअहिरे 13/05/2011 - 09:40
ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं. >>>>>> जेंव्हा कश्मिर वेगळे राष्ट्र निर्माण करुन देऊ अशी फितुरी पाकिस्तानने कश्मिर मधल्या मुस्लिम लोकांना दिली आणी मग ह्याच &*&*(&*(&*(&)(&(&()& कश्मिरी लोकांनी पाकिस्तानातुन धाडण्यात आलेल्या आतंकवाद्याना स्वता:च्या घरात आश्रय दिला ... तेंव्हा कुठे गेले होते ह्यांचे अमनप्रेम नालायक कुठले.. जेंव्हा लाखो कश्मिरी पंडीताना एक एक करुन मारले जाऊ लागले आणी तिथुनच पुढे त्यांना श्रीनगर वरुन जम्मु ला हाकलुन दिले.. आणी कित्येक स्त्रियांचे बलात्कार आणि हत्या ह्याच कश्मीरी लोकांच्या मदतीने केल्या गेल्या तेंव्हा कुठे गेले अमन प्रेम साले तोंड वर करुन बोलु तरी कसे शकतात तेच कळत नाही... जेंव्हा पाकिस्तान ने धोरण जाहीर केले की कश्मिर वेगळे राष्ट्र नाही होणार तेंव्हा ह्याच कश्मीरी लोकांची तनतनलि आणी ह्यांच्यात मग फुट पडली.. तेंव्हा दहशतवाद ताब्यात घेण्यासाठी भारतातील आर्मी पुढे एकच पर्याय होता तो म्हणजे दहशवादाला सपोर्ट करणारी कश्मीरी जनता ह्यांच्या मुस्क्या आवळने.. ते अत्यंत आवश्यकच होते असे म्हणेल मी.. आणी मिलीट्री ची पॉलिसी पण बरोबरच होती.. एका कश्मीरी नागरिकाला बंदुकी समोर ठेऊनच त्यांनी घरा घरात जाऊन दहशद वादी पकडवलेत.. अर्थात ह्या मधे मोठे नुकसान तिथल्या नागरिकांचेच झाले नो डाऊट.. पण जैसी करणी वैसी भरणी... आणी आता अमन प्रेमी म्हनून आणी मिलीट्री ला दहशतवादी म्हणु पाहत आहेत.. कठिण आहे सगळे :(

यशोधरा 14/05/2015 - 09:31
सुरेख लिहिलं आहे! मस्त! दल लेकचं बॅकवॉटर पाहिलंस की नाही? तिथे कमळांची शेती चालते. शेतंच्या शेतं आणि कमळं पाण्यावर तरंगत असतात, इथून तिथे वहात असतात. मी गेले होते तेहा कमळांचा मौसम संपला होता पण तरीही पाच पन्नास कमळं प्रत्येक शेतात तरंगत होती. समोरच हिरवा, निळा पहाड, रिमझिम पावसातले पहाडभर पसरलेले इंदधनुष्य, रिमझिम पाऊस, संध्याकाळचे मृदूमुलायम उन, दलचे चमकणारे पाणी आणि समोर गुलाबी, पांढरी ,पिवळी कमळं! काश्मीरमधला पहिलाच दिवस आणि संध्याकाळची दलची सफर अशा तर्‍हेने सार्थकी लागली होती :) नावाडी म्हणाला होता, असे इंद्रधनुष्य आल्या आल्या दिसणे अच्छा शगुन हय, आपका काम हो जायेगा! मला शॉपिंग्मधे रस नाही म्हटल्यावर त्याला फारच आश्चर्य वाटून राहिले होते! =)) आज ह्या लेखामुळे पुन्हा एकदा आठवले सगळे. धन्यवाद.

मृत्युन्जय 14/05/2015 - 11:51
मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957 मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973 मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019 मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061 मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085 मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104 मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162 मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309
3

सदाबहार नाना

निनाद ·

डावखुरा 04/05/2011 - 13:38
निनाद मस्त काम केलंस... मी पण प्रभाकर पण्शीकरांच्या लेखामध्ये विकीवर भर घातली होती..

प्रचेतस 04/05/2011 - 17:57
निनाद, उत्तम संकलन, माहितीपूर्ण लेख. त्याबरोबरच खेबूडकरांसारख्या महान शब्दप्रभूला श्रद्धांजली.

गणेशा 04/05/2011 - 18:03
जगदीश खेबुडकरांना भावपुर्ण श्रद्धांजली .... "पिंजरा" या चित्रपट म्हणजे त्यांचा मास्टरपीस असे म्हणले जाते. कालच स्टार माझा वर त्यांचे यातील गाण्यांबद्दलचे आणि संगितकार राम कदम यांच्याबद्दल्चे मत पुन्हा ऐकले... तुम्हावर केली मी मर्जी बहाल.. नका सोडुन जाऊ रंग महाल ... मस्तच एकदम ... शब्दांची एक नवी दुनिया जगाला देवुन नाना अमर झाले

मस्त कलंदर 04/05/2011 - 22:12
शाळेत असताना वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. माझ्यासाठी तर आतापर्यंत रेडिओवरून फक्त नांव माहित असलेली व्यक्ती प्रत्यक्षात कशी दिसते कशी बोलते हेच कौतुक होतं. तेव्हा त्यांनी पहिली कविता त्यांच्याकडून कशी लिहिली गेली हे ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले होते. अर्थात आता शब्दशः आठवत नसले तरी, "घर जळत होतं. ठिणग्या उडत होत्या. त्या ठिणग्यांनी मनात अंगार फुलवला आणि त्या अंगाराची कागदावर कविता फुलून आली " असं काहीसं ते वर्णन होतं. गाण्यांच्या जन्मकथा, कधी गाण्यावरून चाल तर कधी चालीवरून गाणं कसं तयार होई, राम कदमांसोबत केलेल्या आणि गाजलेल्या लावण्या हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे बहार होती. ते नेहमी टाय लावत. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले होते की त्यांना त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व भारदस्त वाटत नसे. त्यामुळे बरेच प्रयोग करून ते शेवटी टाय लावल्यावर आपण त्यातल्या त्यात बरे दिसतो या निष्कर्षाप्रत आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने वाईट वाटले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!!!

विकास 05/05/2011 - 05:55
लेख आवडला. सकाळमधली जानेवारीतील त्यांचे वक्तव्य आत्ताच वाचले... त्यातील एक भाग खाली देत आहे:
"पूर्वी कोठेही पाठविल्या तरी माझ्या सर्व कविता साभार परत येत. त्यामुळे मी त्या फाडून टाकत होतो; परंतु माझा भाऊ ओरडल्यावर मी त्या पुन्हा लिहून आकाशवाणीसाठी दिल्या. वसंत पवार यांनी माझे गाणे ऐकले व मला "रंगल्या रात्री अशा', या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी अनेक चित्रपट गीते, कविता, लावण्या लिहिल्या. "पिंजरा' या चित्रपटासाठी 110 गीतांमधून फक्त दहा गीतांची निवड झाली. लावण्या तमाशात गेल्या. मात्र, कधी तमाशा पाहिला नाही. मी फक्त भूमिकेत शिरून माझे काव्य लिहितो. गीत लेखनाबरोबरच पटकथा, संवाद लिहिले. चित्रपटांची निर्मितीही केली,'' असे खेबुडकर यांनी सांगितले.

पाषाणभेद 05/05/2011 - 06:32
संग्राह्य लेख. त्यांनी लिहीलेल्या गीतांमुळे मराठी कायम त्यांची ॠणी राहील. अलौकिक प्रतिभाशक्तीचे दैवी देणगी असलेले गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. नानांना भावपुर्ण आदरांजली.

डावखुरा 04/05/2011 - 13:38
निनाद मस्त काम केलंस... मी पण प्रभाकर पण्शीकरांच्या लेखामध्ये विकीवर भर घातली होती..

प्रचेतस 04/05/2011 - 17:57
निनाद, उत्तम संकलन, माहितीपूर्ण लेख. त्याबरोबरच खेबूडकरांसारख्या महान शब्दप्रभूला श्रद्धांजली.

गणेशा 04/05/2011 - 18:03
जगदीश खेबुडकरांना भावपुर्ण श्रद्धांजली .... "पिंजरा" या चित्रपट म्हणजे त्यांचा मास्टरपीस असे म्हणले जाते. कालच स्टार माझा वर त्यांचे यातील गाण्यांबद्दलचे आणि संगितकार राम कदम यांच्याबद्दल्चे मत पुन्हा ऐकले... तुम्हावर केली मी मर्जी बहाल.. नका सोडुन जाऊ रंग महाल ... मस्तच एकदम ... शब्दांची एक नवी दुनिया जगाला देवुन नाना अमर झाले

मस्त कलंदर 04/05/2011 - 22:12
शाळेत असताना वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. माझ्यासाठी तर आतापर्यंत रेडिओवरून फक्त नांव माहित असलेली व्यक्ती प्रत्यक्षात कशी दिसते कशी बोलते हेच कौतुक होतं. तेव्हा त्यांनी पहिली कविता त्यांच्याकडून कशी लिहिली गेली हे ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले होते. अर्थात आता शब्दशः आठवत नसले तरी, "घर जळत होतं. ठिणग्या उडत होत्या. त्या ठिणग्यांनी मनात अंगार फुलवला आणि त्या अंगाराची कागदावर कविता फुलून आली " असं काहीसं ते वर्णन होतं. गाण्यांच्या जन्मकथा, कधी गाण्यावरून चाल तर कधी चालीवरून गाणं कसं तयार होई, राम कदमांसोबत केलेल्या आणि गाजलेल्या लावण्या हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे बहार होती. ते नेहमी टाय लावत. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले होते की त्यांना त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व भारदस्त वाटत नसे. त्यामुळे बरेच प्रयोग करून ते शेवटी टाय लावल्यावर आपण त्यातल्या त्यात बरे दिसतो या निष्कर्षाप्रत आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने वाईट वाटले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!!!

विकास 05/05/2011 - 05:55
लेख आवडला. सकाळमधली जानेवारीतील त्यांचे वक्तव्य आत्ताच वाचले... त्यातील एक भाग खाली देत आहे:
"पूर्वी कोठेही पाठविल्या तरी माझ्या सर्व कविता साभार परत येत. त्यामुळे मी त्या फाडून टाकत होतो; परंतु माझा भाऊ ओरडल्यावर मी त्या पुन्हा लिहून आकाशवाणीसाठी दिल्या. वसंत पवार यांनी माझे गाणे ऐकले व मला "रंगल्या रात्री अशा', या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी अनेक चित्रपट गीते, कविता, लावण्या लिहिल्या. "पिंजरा' या चित्रपटासाठी 110 गीतांमधून फक्त दहा गीतांची निवड झाली. लावण्या तमाशात गेल्या. मात्र, कधी तमाशा पाहिला नाही. मी फक्त भूमिकेत शिरून माझे काव्य लिहितो. गीत लेखनाबरोबरच पटकथा, संवाद लिहिले. चित्रपटांची निर्मितीही केली,'' असे खेबुडकर यांनी सांगितले.

पाषाणभेद 05/05/2011 - 06:32
संग्राह्य लेख. त्यांनी लिहीलेल्या गीतांमुळे मराठी कायम त्यांची ॠणी राहील. अलौकिक प्रतिभाशक्तीचे दैवी देणगी असलेले गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. नानांना भावपुर्ण आदरांजली.
इतक्यातच विकीवरच्या माहितीत भर घालून त्याचा लेख केला, तो येथे देत आहे. अधिक माहिती इतर सदस्य देतीलच त्यानुसार विकीवरचा लेखातही भर घालता येईल. ---- जगदीश खेबूडकर (जन्म १० मे इ.स. १९३२ - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी) हे मराठी ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना नाना असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, (की हळदी?) या गावी झाला.

सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे

चिंतामणी ·

प्रास 24/04/2011 - 15:23
चिंतामणीकाका, एका चांगल्या भाषणाच्या नव्याने दिलेल्या गोषवार्‍याबद्दल आभारी आहे. यातला प्रत्येक विचार अगदी झणझणीत अंजन आहे. धन्यवाद!

सुधीर१३७ 24/04/2011 - 15:30
वक्ता आणि ज्याव्यक्तिबद्दल भाषण केले गेले या दोन्ही व्यक्तिंबद्दल केवळ आपल्या आचरणातूनच आपण आदर व्यक्त करु शकतो. .....चिंतामणी, धन्यवाद!!

चतुरंग 24/04/2011 - 16:41
सुरेख विचार. तात्यारावांबद्दल इतके समर्पक शब्दात आणि नेटकेपणाने विचार मांडणे सोपे नव्हे. अतिशय सुंदर भाषण इथे उधृत केल्याबद्दल धन्यवाद! -रंगा

नितिन थत्ते 25/04/2011 - 09:04
भाषण इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 26/04/2011 - 01:10
सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.
माफ करा, पण या आख्ख्या लांबलचक भाषणात सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचा उल्लेख करणारी दोन ते तीनपेक्षा* अधिक वाक्ये मला शोधूनदेखील सापडू शकली नाहीत. तो या भाषणाचा फोकस नसावा. * "विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून." बस, एवढेच. (परिच्छेद २मधून उद्धृत.) त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" (परिच्छेद ४मधून उद्धृत.) या वाक्याचा अर्थ लागू शकला नाही**. गणिताच्या नेमक्या कोणत्या शाखेत हे शक्य होते? शिवाय, 'आत्मा' आणि 'वैज्ञानिक पद्धत' हे दोन शब्द एकाच वाक्यात पाहून मौज वाटली. ** अर्थात, वैज्ञानिक पद्धतीबद्दलच्या माझ्या अज्ञानाची पातळी सर्वज्ञात आहे. त्यामुळे केवळ कॉमन सेन्स***च्या आधारावर अर्थ लावणे भाग पडले. जमले नाही. तरी तज्ज्ञांनी कृपया - इच्छा असल्यास, आणि मुख्य म्हणजे जमल्यास - खुलासा करावा. *** याला विद्वज्जनांत 'धादान्तवाद'**** की कायसेसे म्हणतात, असे ऐकून आहे. (सावरकरांना आवडण्यासारखा प्रतिशब्द!) **** नुसता पोकळ शब्दांचा डोलारा! 'कॉमन सेन्स' सारखा साधासोपा आणि पब्लिकच्या तोंडात रुळलेला शब्द सोडून 'धादान्तवादा'सारखा फारसा कोणाच्या तोंडी नसलेला शब्द ओढूनताणून वापरायचा झाले.***** ***** तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय?

In reply to by पंगा

नितिन थत्ते 27/04/2011 - 08:28
मला हे पण सापडले....
सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते. यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत.
>>तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय? (विद्वज्जन या शब्दातून पंगा यांना काय अभिप्रेत आहे माहिती नाही) सावरकरवादी असण्याची अनेक कारणे असावीत. प्रत्येक विद्वान किंवा सामान्य मनुष्य त्या सर्वच कारणांसाठी सावरकरवादी असणार नाही. अवांतर: दलितांनी जयोस्तुते शुद्ध व अस्खलित म्हणण्यात सावरकरांच्या दलितोद्धाराचे सार्थक असू नये याच्याशी सहमत.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 27/04/2011 - 20:13
सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.
यात 'रूढींच्या अंधानुकरणास विरोध' आहे, मान्य. 'बुद्धिनिष्ठा'ही समजू शकतो. 'विज्ञाननिष्ठा' कुठे आली? 'विद्युद्दाहिनी वापरण्याचा आग्रह' हा फार तर 'अद्ययावत गोष्ट वापरण्याचा कंझ्युमेरिस्ट अट्टाहास किंवा हव्यास' म्हणता येईल. म्हणजे घरातला जुना पिच्चर ट्यूबवाला टीव्ही व्यवस्थित चालत असताना 'आम्हाला लेटेष्ट मॉडेलचा फ्ल्याटस्क्रीन एलसीडी टीव्ही पाहिजे' म्हणण्यासारखे. (त्यात काही गैर आहे असा दावा नाही. माणसाला नवनवीन वस्तूंची हौस असू शकते.) पण त्यात जोपर्यंत तो फ्ल्याट स्क्रीन एलसीडी टीव्ही (किंवा विद्युद्दाहिनी) नेमका कसा चालतो (/चालते) याचे वैयक्तिक ज्ञान किंवा संशोधन नाही, त्यातील पुढील सुधारणांसंबंधी (प्रॉडक्ट डेवलपमेंट किंवा इंप्रोवायझेशन अशा अर्थी) संशोधनाकरिता काही वैयक्तिक इन्पुट किंवा योगदान नाही, तोपर्यंत त्याला 'विज्ञाननिष्ठा' म्हणता येईल काय? मुंबई ते ठाणे जी पहिली झुकझुकगाडी धावली, तेव्हा तिला 'चाक्या म्हसोबा' म्हणून तिच्यासमोर नारळ फोडणारांपैकी अनेकांनी पुढे 'साहेबाचा पोर्‍या मोठा अकली, बिनबैलाची गाडी कशी ढकली' म्हणतम्हणत का होईना, पण (तिकीट काढून किंवा विनातिकीट) ती झुकझुकगाडी पुढे प्रवासाकरिताही वापरली असेल. अट्टाहासाने वापरली असेल. (सोयिस्कर असेल, तर का नाही वापरणार?) ते सगळे 'विज्ञाननिष्ठ' झाले काय? 'रेल्वेचे जे काय दीडदोन पैशाचे किंवा त्या काळी जे काही भाडे असेल तितक्या पैशांचे तिकीट विकत घेणे' एवढ्या भांडवलावर स्वतःला 'विज्ञाननिष्ठ' म्हणवून घेता यावे काय? झुकझुकगाडीचे तिकीट हे विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचेही तिकीट ठरावे काय? 'उपभोक्तावाद' ही ऑपॉप 'विज्ञाननिष्ठा' कशी काय होऊ शकते? ('उपभोक्तावादा'त नेमके गैर असे काही असावेच असे नाही हे मान्य करूनही.) बाकी, 'विद्युद्दाहिनी' हा शब्द बनवणे हे सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या ध्येयाशी सुसंगत असेलही, परंतु असा एखादा शब्द बनवणे यातही 'विज्ञाननिष्ठा' नेमकी कोठे आली? (त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" यांसारखी वाक्ये केवळ अनाकलनीय. कोनाड्यातल्या हिंदमातेची आठवण आल्यावाचून राहिली नाही.)

In reply to by पंगा

पंगा शेठ अहो त्याकाळात अनेक लोक रूढी व परंपरा म्हणून पारंपारिक पद्धतीने आपला अंत्यसंस्कार करत व नंतर उर्वरीत सोपस्कार करत .ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले . .( पूर्वी दूरदर्शन वर ७ दिवस आणीबाणी लादून राष्ट्रीय नेते चंदनच्या लाकडांवर तुपाचे ढीग ओतून आपला शेवटचा सार्वजनिक सोहळा समस्त भारतीय जनतेला दाखवायचे .त्यांचे आप्त स्वकीय काळा गॉगल लावून रीन की सफेदी दाखवायचे .त्या काळात सावरकरांचा निर्णय हा तत्कालीन जुनाट रूढी विरुद्ध होता व पर्यावरणाला पोषक होता .असे मला वाटते . बाकी एक शब्द असतांना दुसरा शब्द अनेक भाषांमध्ये असतो ( सावरकरांनी मराठी माषेत समानार्थी शब्द वाढवले व त्याने भाषेच्या शब्द भांडारात भर पडली .लोकांना ती वापर्यांचे पर्याय उपलब्ध झाले .

In reply to by निनाद मुक्काम …

पंगा 27/04/2011 - 22:24
ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले .
वीज कोठून येते? Long tailpipe theoryबद्दल आपण ऐकलेले नाही काय? (विजेच्या वापराला माझा व्यक्तिशः विरोध नाही, पण) पर्यावरणवादच जर यात मध्ये आणायचा असेल, तर मग विजेचा वापर हा ऑपॉप पर्यावरणवादी होतो, हे गृहीतक तपासल्याशिवाय तसेच स्वीकारता येईल काय? वीजनिर्मिती ही सामान्यतः एक तर लाकूड किंवा कोळसा यांसारखी इंधने जाळून व्हावी (म्हणजे प्रदूषण आले आणि लाकडाच्या पर्यायात वृक्षतोड आली.) किंवा धरणांतून, पाण्याचा कडेलोट करून त्यावर जनरेटर ('जनित्रे') चालवून व्हावी (म्हणजे धरणे बांधण्यासाठी गावांचे विस्थापन वगैरे आले आणि कदाचित त्याबरोबर वृक्षतोडही आली.). (अणुऊर्जेतून वीजनिर्मिती वगैरे प्रकार सावरकरांच्या काळी असावेत का, याबद्दल साशंक आहे.) म्हणजे, वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास वगैरे बाबी फक्त उपभोक्त्याच्या ठिकाणापासून दूर होऊन इतरत्र गेल्या. म्हणजे विजेच्या वापरातून पर्यावरणाचा र्‍हास टळला वगैरे नाही. दृष्टीआड झाला, इतकेच. हं, आता हा (वीज न वापरल्याने) जागच्याजागी होणारा र्‍हास विरुद्ध (वीजनिर्मितीतून झालेला) इतरत्र गेलेला र्‍हास यांचे गणित मांडून तुलना करता येईल. त्यातून कोणता पर्याय अधिक पर्यावरणवादी, वगैरे निष्कर्ष काढता येतील. कोण जाणे, कदाचित Long tailpipe theoryत फारसे तथ्य नाही, असेही कदाचित या गणितातून सिद्ध होईल. हे गणित मी केलेले नाही, त्यामुळे नक्की काय ते मला माहीत नाही. मुद्दा हा आहे, की (१) सावरकरांनी हे गणित केलेले होते काय? तसे गणित त्यांनी स्वतः केलेले असल्याबद्दल काही माहिती आहे काय? की (२) 'विद्युद्दाहिनीच्या वापरात वृक्षतोड ही डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय वरकरणी पर्यावरणवादी वाटतो' या 'फीलगुड फ्याक्टर'वर आपले गृहीतक आधारलेले होते? की (३) विजेचा वापर हा अद्ययावत पर्याय आहे, त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीचे लक्षण म्हणून बाय डिफॉल्ट 'विज्ञाननिष्ठ' पर्याय आहे, असे काही गृहीतक होते? (२) हा पर्याय असल्यास काही आक्षेप नाही, शेवटी मानवी स्वभाव आहे आणि सावरकरही मानव होते. पण त्या परिस्थितीत त्यांचा विद्युद्दाहिनीचा आग्रह हा त्यांच्या विज्ञाननिष्ठेचे द्योतक म्हणता येईल का, याबद्दल साशंक आहे. (३) हा पर्याय 'विज्ञाननिष्ठ' पर्याय ठरू शकतो की नाही, याबद्दल खात्री नाही, परंतु निदान पर्यावरणाच्या कारणावरून तरी तो 'विज्ञाननिष्ठ' ठरू नये (कारण त्या दृष्टीने पुरेशी चिकित्सा झालेली नाही). (१) हा पर्याय योग्य आहे याबद्दल काही खात्रीलायक माहिती असल्याखेरीज या आग्रहामागे पुरेशी वैज्ञानिक चिकित्सा झालेली असल्याचे माझ्या मर्यादित समजशक्तीस तरी जाणवत नाही, त्यामुळे अशा खात्रीलायक माहितीअभावी 'विज्ञाननिष्ठे'चे लेबल लावण्याची घाई मला तरी करवत नाही. बाकी चालू द्या. (अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)

In reply to by पंगा

भौतिकशास्त्राचा उर्जेविषयीचा अतिशय महत्वाचा नियम आहे की, Energy cannot be created or destroyed, it can only be changed from one form to other. तुम्ही उर्जा कुठल्याही स्वरुपात वापरा. तीच्या स्वरुपात बदल होतं जाणारचं. पण प्रत्येक उर्जेच्या स्थित्यंतरणामधे एफिशीएन्सी किती आहे हा मुद्दा विचार करण्याजोगा नक्कीच आहे. किती तरी वेळा एंड अ‍ॅप्लिकेशन किंवा पद्धत बदललं गेलं तर उर्जेची गरज कमी सुद्धा होऊ शकते.

In reply to by पंगा

चिंतामणी 26/02/2013 - 23:14
(अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)
असा डिसक्लेमर टाकुन दिलात. त्यामुळे वरच्या पोस्टची समीक्षा करणे शक्य नाही. असो. पु.ल. यांच्या एका भाषणात तुम्हाला सापडणे अवघड आहे. कारण ते पु.ल. यांचे मत आहे आणि अतीशय योग्य आहे. ते योग्य कसे हे समजायला अभ्यास करायला हवा. स्वा.सावरकरांचे लिखाण वाचा. त्यात अनेक गोष्टी दिसतील. थोडी तसदी घेतल्यास दुस-याकोणी समजावुन सांगायची गरज पडणार नाही.

गेंडा 25/04/2011 - 09:07
महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्वाने केलेले महाराष्ट्राच्या महान व्यक्तीमत्वाचे वर्णन फारच सुंदर. अवांतर- +१ अथवा -१ प्रतिक्रीया टाकताना कसे करायचे?? याची महिती कोठे मिळेल???

ऋषिकेश 25/04/2011 - 09:32
वा,, सुरेख भाषण सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेबाबत तसेच अंधश्रद्धानिर्मुलन, अस्पृश्यतानिवारण वगैरेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्याबद्द्ल खूप आदर वाटतोच.

चिंतामणी 25/04/2011 - 15:05
किसन शिंदे, प्रास, सुधीर१३७, अप्पा जोगळेकर, सर्वसाक्षी, चतुरंग, स्वाती२, ५० फक्त, नितिन थत्ते, गेंडा आणि ऋषिकेश आपणा सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्स.

लेख आधी पु.लं. च्या संस्थळावर वाचला होता आणि मराठीजगतवर. आपल्या मिपाचे सदस्य दीपक ह्यांनी देखील तो आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करुन दिला आहे. तरी देखील धन्यवाद. अवांतर :- ह्या संस्थळांचा उल्लेख सदर लेखनाच्या शेवटी आला असता तर बरे वाटले असते :)

पंगा 25/04/2011 - 20:10
स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.
'सेक्युलर' तुरुंग??? खरोखरच त्या तुरुंगाचे असे नाव आहे? हिंदुस्थानातील सेक्युलरिझमचे मूळ इंग्रजी सत्तेत आहे, असे यातून समजावे काय? की यात स्वातंत्र्योत्तर काळात गावोगावच्या 'मेन स्ट्रीट'चे 'महात्मा गांधी मार्ग' असे पुनर्नामकरण करणार्‍या हरामखोर काँग्रेसचा काही हात आहे? (सावरकरांसारख्या हिंदुत्वाभिमानी महापुरुषाला 'हिंदू तुरुंगा'त ठेवण्याऐवजी जाणूनबुजून 'सेक्युलर तुरुंगा'त त्यांची रवानगी करून त्यांना यातना देऊ पाहणार्‍या अधिक त्यांचा अपमान करू पाहणार्‍या इंग्रज सरकारचा त्रिवार निषेध! कोलूचा अपमान यापुढे काहीच नव्हे.)

पंगा 26/04/2011 - 00:25
अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या.
दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये? यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे?
एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.
हा भाग तर मुळीच कळला नाही. सावरकरांचे पुण्य "दलितांना 'शुद्ध' बोलायला शिकवणे" यात होते काय? (नाही म्हणजे, सावरकरांच्या कार्याबद्दल - विशेषतः दलितांसंबंधी केलेल्या कार्याबद्दल - प्रशंसा समजू शकतो. पण हे म्हणजे थोडेसे चुकीच्या गृहीतकांवरून भलत्याच गोष्टींची प्रशंसा केल्यासारखे होत नाही काय? आणि तेही बहुधा स्वतःच्याच पूर्वग्रहांतून? "दलितांची भाषा'शुद्धी'" वगैरे विचार सावरकरांच्या मनातही नसावेत, किंवा असलेच तर ते त्यांचे मुख्य उद्दिष्ट नसावे, असे मानावयास जागा आहे. शिवाय, "दलितांची भाषा, त्यांचे उच्चार शुद्ध नसतात" हे गृहीतक या वाक्यांमागे दडलेले आहे, जे अस्थानी आहे आणि तसेही तपासून पहावे लागेल. अशा परिस्थितीत अशी 'प्रशंसात्मक' वाक्ये - मग भले ती पु.लं.ची का असेनात - अनवधानाने का होईना, पण भलतेच काहीतरी सुचवून जात नाहीत काय? दुर्दैवाने, ही विधाने बहुधा प्रामाणिकपणे केलेली असावीत, यास बहुधा अनवधान कारणीभूत असावे, असे मानावयास जागा असल्याने, याला 'वामहस्त प्रशंसा'ही म्हणवत नाही. भाषणास उपस्थित अपेक्षित श्रोतृवर्ग - टार्गेट ऑडियन्स - नेमका कोणता होता, याची कल्पना नाही, परंतु भाषण निर्विघ्नपणे पार पडले असल्यास, एवढेच नव्हे, तर श्रोतृवर्गाच्या प्रशंसेचे धनी ठरले असल्यास, आश्चर्य वाटणार नाही.)
जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे!
सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते. (हा ब्याकड्राप लक्षात घेता, ते गाणे कोणीतरी बिनचूकपणे गाऊ शकते हे कौतुकास्पद आहे असे कोणाला वाटल्यास, ते क्षम्य असावे का, असा विचार मनात येऊ लागतो.) बाकी, उर्वरित भाषण उतरवून काढतानाही टंकलेखनाच्या चुका पदोपदी, मुबलक,आणि रसभंग करणार्‍या आहेत, ज्या पु.लं.नी स्वतः केल्या नसाव्यात, असे मानावयास जागा आहे. (हा बर्टुड रसेल कोण?) पुढील लेखनास शुभेच्छा.

In reply to by पंगा

चिंतामणी 26/04/2011 - 01:09
हा प्रतिसाद म्हणजे उगीचच पंगा घेण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ह्या प्रश्णांची उत्तरे मिळवायला खरे तर तुमची पु.लं.शी भेट व्हायला हवी. कारण त्याना तसे का वाटले हे तेच जास्त उत्तम रितीने सांगु शकतील. माझ्या अल्पमतीला जे समजले ते सांगायचा प्रयत्न करतो. दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये? यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे? अरेरे. पु.ल.वर केलेला हा आरोप आपली मनोवृती दर्शवतो. जो अर्थ त्या वाक्यात नाही तो आपण तेथे बळाने कोंबत आहात. असो. पु.लं.नी त्या दलीत महिलांच्या पुर्वस्थितीचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या परिस्थीतीत (आर्थिक आणि मानसीक) जो बदल त्यांना जाणवला त्यामुळे त्यांच्या अंगावर काटा आला. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला. स्वा.सावरकरांनी द्लितोध्दारासाठी, समाजसुधारणेसाठी जे काम केले आहे त्याची आपल्याला माहिती नसणार. ती आधी करून घ्या. म्हणजे असली शेरेबाजी करणार नाहीत तुम्ही. स्वा.सावरकरांनी केलेल्या कामामुळे दलीतांची आर्थीक आणि मानसीक स्थिती सुधारली (त्यांचा आत्मविश्वास त्या महिलांमधील बदलामुळेच कळला) हे त्या कामाचे फळ आहे असे पु.लं.ना म्हणायचे आहे. सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते. ओ हो हो. असे आहे होय. हे सांगण्यासाठी एव्हढे पांडित्य दाखवले होय. मग बरोबर. आपली छिद्रान्वेशीवृती यामुळ प्रकट झाली हे ही नसे थोडके.

@प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. आभासी जगतात सावकारांचे कार्य मिपावर उत्तमरीत्या चालले आहे , चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो . लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद . सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते. + १ विज्ञान हाच एकमेव धर्म आहे .अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्य

In reply to by निनाद मुक्काम …

पंगा 26/04/2011 - 01:55
चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो .
उदाहरण तितकेसे चपखल नाही. चेहरापुस्तक, खरडवही हे शब्द नको तितके सुटसुटीत आहेत. (शिवाय, नक्की खात्री नाही, पण 'चेहरा' हा शब्द बहुधा 'यावनी' - म्हणजे काय कोण जाणे - आहे. याने की आक्षेपार्ह.) फेसबुकसाठी 'वदनग्रंथ'सारखे पर्याय अधिक सयुक्तिक ठरले असते. (खरडवहीसाठी प्रतिशब्दाबद्दल विचार करावा लागेल.)
अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्य
गायीला खाद्य करण्यासाठी सावरकरवादाची (किंवा गायीचीही) कास धरावी लागत नाही. (स्वानुभवाने सांगतो.) (अतिअवांतर: केरळमधील हिंदुबांधवांत गोमांसभक्षण निषिद्ध मानले जात नाही, किंबहुना केरळबाहेरील 'मेनस्ट्रीम' हिंदुत्वात असा काही निषेध आहे, असे त्यांच्या अनेकदा गावीही नसते, असाही अनुभव आलेला आहे.)

@पंगा आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे आम्ही सर्व उपकृत होऊ गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही . बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ? आपल्या महाराष्ट्रात जेथे माझे व बहुदा तुमचे बालपण गेले तेथे ज्या रूढी पाळल्या जातात त्याच्या अनुषंगाने मी लिहिले .

In reply to by निनाद मुक्काम …

पंगा 27/04/2011 - 18:27
आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे आम्ही सर्व उपकृत होऊ
'चेहरापुस्तक' वगैरे शब्दांस माझा आक्षेप नाही. (मला ते बर्‍यापैकी सुटसुटीत आणि मराठीस त्या मानाने बरेच जवळचे वाटतात.) मुद्दा एवढाच आहे, की असे सुटसुटीत मराठीकरण हे 'सावरकरी' वाटत नाही. आणि 'यावनी' वगैरे आक्षेप माझे नाहीत. सावरकरांचे असू शकतात. तेव्हा, 'गटणेछाप' शब्दांकरिता माझे उपकार मानू नका. ते श्रेय योग्य ठिकाणीच गेलेले बरे. ('वार्ताहर' वगैरे शब्दांचे एवढे काय कौतुक ते कळत नाही. 'खबर्‍या', किंवा गेला बाजार 'बातमीदार' वगैरे शब्दांत काय वाईट आहे? 'बातमीदार' तर मराठीत छान रुळलेला आहे. त्या मानाने 'वार्ताहर' हा छापील मराठी वगळता एरवी कोण कुठे वापरतो? आणि तिथेदेखील - म्हणजे छापील मराठीत - 'बातमीदार' हा शब्द आजमितीस जवळपास तेवढ्याच प्रमाणात वापरला जात असावा. मग 'वार्ताहर'चे एवढे काय अप्रूप? 'हुंडी'सारखे शब्द-संकल्पना मराठीत अगोदरपासून असताना 'धनादेश' कशासाठी? (आणि तसेही छापील मराठी वगळता 'धनादेश' कोण वापरतो?) 'खाणावळ' असताना 'उपाहारगृह' कशासाठी? 'आपल्याला संस्कृत शब्द माहीत आहेत, आणि आपण त्यांची जुळवाजुळव करू शकतो' हे दाखवण्यासाठी? 'महापौर' हे तर सरळसरळ 'फर्स्ट सिटिझन'चे रूपांतर वाटते. अर्थात, रूपांतरात काही गैर नाही, आणि 'मेयर' हा शब्द मराठीत अनैसर्गिक वाटतो हे खरेच आहे, पण 'महापौर' तरी आपण खर्‍या अर्थाने अंगीकारला आहे का? अनेकदा तो बोलीत ओढूनताणून 'म्हापौर' होतो, काहीतरी अनैसर्गिक - म्हणजे मराठीत अनैसर्गिक - शब्द उच्चारल्यासारखा. त्यातून 'शहराचा प्रमुख नागरिक' हा अर्थ किती जणांना चटकन लक्षात येतो? 'मेयर' ओढूनताणून म्हणायचा तसाच 'महापौर' - 'म्हापौर' ओढूनताणून म्हणायचा, इतकेच. तो शब्द म्हणताना त्या शब्दाबद्दल आपुलकीची भावना खरोखरच किती जणांना येते? त्यापेक्षा 'पाटला'च्या किंवा 'पुढार्‍या'च्या धर्तीवरचा पण शहरी पातळीवरचा एखादा मराठी सुटसुटीत शब्द नसता का बनवता आला? 'म्होरक्या'ही एक वेळ चालू शकला असता. पण तो सोडून देऊ. 'शहरप्रमुख', किंवा 'शहर' यावनी वाटतो तर 'नगरप्रमुख', 'नगरमुख्य', 'नगरनायक' किंवा 'नगरनाईक' वगैरे नसते चालू शकले? सुटसुटीतही झाले असते, 'मराठी'ही झाले असते आणि त्यातून सुचवायचा अर्थ लोकांना चटकन सुचलाही असता. 'महापौर'ने नेमका कोणाला काय अर्थबोध होतो? किंवा, तसेच बघायला गेले, तर 'वार्ताहर'मधून 'वार्ता खेचून आणणारा' हा अर्थ कोणाला सांगितल्याशिवाय लक्षात येतो? 'बातमीदार'मधून 'बातमी देणारा' हे चटकन समजते तरी. अतिअवांतर: 'वार्ता खेचून आणणारा' मध्ये एका प्रकारची 'वार्ता बाहेर येत नसली, घडत नसली, तरी खेचून, म्हणजे शब्दशः "ओढून किंवा ताणून" अर्थात "ओढूनताणून" आणणारा' अशी छटा येते. 'बातमीदार'मधून 'घडते तशी बातमी निमूटपणे देणारा' असा अर्थ प्रतीत होतो. सावरकरांना 'तहलका'छाप पत्रकारिता अभिप्रेत होती काय? सावरकर द्रष्टे असल्याबद्दल ऐकलेले आहे, पण इतकेही द्रष्टे असतील असे वाटले नव्हते. आदर वाढला.)
गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही .
मला सोयीच्या नसतील तर जुन्या रूढी मीही पाळत नाही. पण त्याकरिता सावरकरांना मध्ये का आणायचे?
बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ?
तो मुद्दा थोडा अवांतर होता. पण नाही म्हटले तरी त्याला प्रयोजन आहे. केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे. थोडक्यात, (हिंदू असूनही) गोमांसभक्षण करण्याकरिता सावरकरवादाची आवश्यकता नसावी, एवढाच मुद्दा आहे.

In reply to by पंगा

चिंतामणी 28/04/2011 - 02:01
केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे. काय तर्कवाद आहे आपला. वाह रे वाह. आपण महान आहात. मला माहीत आहे की झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला करता येत नाही. तरिही मी पुन्हा एकदा विनंती करतो की "विज्ञाननिष्ठ निबंध" (भाग पहीला ५ आणि भाग दोन ८ निबंध), जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख (पूर्वार्ध) व (उत्तरार्ध), जात्युच्छेदक निबंध (सुमरे ३८ निबंध), क्ष किरणे (१५ लेख) हे स्वा.सावरकरांनी १९२२ पासुन १९४० पर्यन्त लिहीले वैचारीक निबंध त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर वाचा. आपण आज जे (उरफाटे) प्रतिसाद देत आहात ते २०११ मधे याचे ध्यान असू द्यात. त्यांनी विचार ज्या काळात मांडले आणि त्याचा पाया ह्याबद्दल माहिती करून घ्या आणि मग पुन्हा एकदा प्रतीसाद द्या. महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार. कप्पाळ. अवांतर- विश्वास कल्याणकर हे सध्या पुर्वाचलाबद्दल छान लेख लिहीत आहेत आणि तेथे होणा-या कार्याची माहिती देत असतात. ते जी परीस्थीती वर्णन करतात ( विषेशतः धर्मांतरबद्दल) ते वाचताना स्वा.सावरकरांच्या दोन लेखांची प्रकर्शाने आठवण झाली. हिंदू नागलोक ख्रिश्चन का होतात (१९३१)नाग लोकांची सद्यस्थिती हे लेख सर्वांनीच वाचावेत.

In reply to by चिंतामणी

पंगा 28/04/2011 - 02:12
महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार.
माझ्या समजुतीकरिता विचारतो. केरळीय हे महाराष्ट्रीयांपेक्षा, खास करून महाराष्ट्रातील सुशिक्षितांपेक्षा (खास करून समजुतीत) कमी प्रतीचे असतात, असा आपला दावा आहे काय? (अरेरे! हीच का ती 'आसिन्धुसिन्धुपर्यन्त हिन्दुबान्धवां'बद्दलची आत्मीयता? आणि तीसुद्धा (सावरकर न कळतासुद्धा) 'गाय हा एक उपयुक्त (खाद्य)पशू आहे' हे सावरकरतत्त्व नीट कळणार्‍या हिन्दुबान्धवांबद्दल??? सावरकरांचा आत्मा आपल्या विद्युद्दाहिनीत गरगर फिरू लागेल ना हे ऐकून!)

In reply to by पंगा

अहो पंगा शेठ निव्वळ पंगा ह्यायचा म्हणून कशाला मुद्दे मांडत आहात . मुळात आपण केरळ वाशियांचे उदाहरण चुकीच्या मुद्यावर देत आहात . त्यांच्यात गोमास खात असतील ( ह्यात सावरकरांचा संबंध येत नाही ) हे मलाही मान्य आहे . पण महारष्ट्रात जेथे तुम्ही आम्ही जन्मलो तेथे अजूनही स्वस्त असून भावनिक व धार्मिक मुद्यावरून गोमास भक्षण होत नाही .हीच परिस्थिती बहुसंख्य हिंदूची आहे .ह्यात सावरकरांचे गाय ही उपयुक्त पशु आहे हे विधान आजही महाराष्ट्रातील काय पण बहुसंख्य हिंदू समाजाला जड जाते .( ही आजची परिस्थिती तर त्या काळात त्यांचे विचार नक्कीच ....) तुम्हाला माझे म्हणणे पटावे हा आग्रह नाहे . परत दुसरा मुद्दा कि वीज .......... अहो एक साधी गोष्ट आहे .तुम्ही चुलीवर पाणी तापवायला लाकडे वापरा नी तेवढेच पाणी हिटर मधून ध्या .( स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून तुम्ही हिटर ची निवड कराल ) स्वतः तुमच्या घरात आंघोळीला पाणी हे बंबात लाकडे न घालता एकत्र गिझर किंवा नैसर्गिक वायूवर तापत असेल कारण ह्यात प्रदूषण कमी होते व ते तुलनात्मक रीत्या वापरायला सुलभ असते .) आज मुंबईत बहुसंख्य स्मशानात विद्युत दाहिनी आहे .कारण लाकडापेक्षा तो पर्याय सुलभ आहे म्हणूनच ना . ही साधी गोष्ट लक्षात न घेता उगाच कीस काढण्यात काय अर्थ आहे . महाराष्ट्रातील अवांतर ( पंगा शेठ आता पर्यत आमचे मुद्दे खोडण्यात तुम्ही धन्यता मनात आला तुम्हाला एक प्रश्न ) गायीबद्दल तुमचे मत काय ? तुम्ही अभक्ष भक्षण करतात का ? मते मत मी आधीच मांडले आहे .ह्याबाबतीत ( तुम्ही तुमचे मत मात्र गुलदस्त्यात ठेवून ......)

In reply to by पंगा

अहो पंगा शेठ निव्वळ पंगा ह्यायचा म्हणून कशाला मुद्दे मांडत आहात . मुळात आपण केरळ वाशियांचे उदाहरण चुकीच्या मुद्यावर देत आहात . त्यांच्यात गोमास खात असतील ( ह्यात सावरकरांचा संबंध येत नाही ) हे मलाही मान्य आहे . पण महारष्ट्रात जेथे तुम्ही आम्ही जन्मलो तेथे अजूनही स्वस्त असून भावनिक व धार्मिक मुद्यावरून गोमास भक्षण होत नाही .हीच परिस्थिती बहुसंख्य हिंदूची आहे .ह्यात सावरकरांचे गाय ही उपयुक्त पशु आहे हे विधान आजही महाराष्ट्रातील काय पण बहुसंख्य हिंदू समाजाला जड जाते .( ही आजची परिस्थिती तर त्या काळात त्यांचे विचार नक्कीच ....) तुम्हाला माझे म्हणणे पटावे हा आग्रह नाहे . परत दुसरा मुद्दा कि वीज .......... अहो एक साधी गोष्ट आहे .तुम्ही चुलीवर पाणी तापवायला लाकडे वापरा नी तेवढेच पाणी हिटर मधून ध्या .( स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून तुम्ही हिटर ची निवड कराल ) स्वतः तुमच्या घरात आंघोळीला पाणी हे बंबात लाकडे न घालता एकत्र गिझर किंवा नैसर्गिक वायूवर तापत असेल कारण ह्यात प्रदूषण कमी होते व ते तुलनात्मक रीत्या वापरायला सुलभ असते .) आज मुंबईत बहुसंख्य स्मशानात विद्युत दाहिनी आहे .कारण लाकडापेक्षा तो पर्याय सुलभ आहे म्हणूनच ना . ही साधी गोष्ट लक्षात न घेता उगाच कीस काढण्यात काय अर्थ आहे . महाराष्ट्रातील अवांतर ( पंगा शेठ आता पर्यत आमचे मुद्दे खोडण्यात तुम्ही धन्यता मनात आला तुम्हाला एक प्रश्न ) गायीबद्दल तुमचे मत काय ? तुम्ही अभक्ष भक्षण करतात का ? मते मत मी आधीच मांडले आहे .ह्याबाबतीत ( तुम्ही तुमचे मत मात्र गुलदस्त्यात ठेवून ......)

In reply to by पंगा

हुप्प्या 02/05/2011 - 06:56
भाषा ही नव्या शब्दांमुळे समृद्ध होते. आता ते शब्द लोकप्रिय होतात की नाही हे लोकांवर अवलंबून आहे. सावरकर आणि सावरकरवादाची पराकोटीची अ‍ॅलर्जी असणारे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नाक मुरडतात. पण मराठी भाषा इतकी पूर्वग्रहदूषित नाही. म्हणूनच महापौर, कॉलम करता स्तंभ असे शब्द रुळले आहेत. बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला? किंवा रायटर असताना ऑथर कशाला असे विचारण्यासारखे मूर्खपणाचे आहे. हे शब्द वापरणारा आपली व ऐकणार्‍याची वा वाचणार्‍याची कुवत बघून शब्द निवडतो/ते आणि वापरतो/ते. सावरकरांचा फारसी विरोध आणि संस्कृत प्रेम सगळ्यांनी आपलासा करावा असे नाही. पण ह्या प्रेरणेतून सावरकरांनी जे उत्तम शब्द निर्माण केले तेही नाकारणे हे आंधळ्या द्वेषाचे उदाहरण आहे. संस्कृतवर असणारे प्रभुत्व, भाषेची प्रतिभा ह्यातूनच चांगले नवे शब्द बनू शकतात. नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे. शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्‍यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.

In reply to by हुप्प्या

सुनील 02/05/2011 - 07:18
सावरकरांचा फारसी विरोध आणि संस्कृत प्रेम सगळ्यांनी आपलासा करावा असे नाही. सहमत! त्याची काहीही आवश्यकता नाही. पण ह्या प्रेरणेतून सावरकरांनी जे उत्तम शब्द निर्माण केले तेही नाकारणे हे आंधळ्या द्वेषाचे उदाहरण आहे. दिनांक आणि क्रमांक ह्या दोन शब्दांचे उदाहरण घेऊ. हे दोन्हीही शब्द आजदेखिल बव्हंशी लेखी मराठीतच वापरले जातात. बोली मराठीतून तारीख आणि नंबर हे शब्द अजिबात हद्दपार झालेले नाहीत. संस्कृतवर असणारे प्रभुत्व, भाषेची प्रतिभा ह्यातूनच चांगले नवे शब्द बनू शकतात. मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.

In reply to by सुनील

प्रदीप 02/05/2011 - 12:28
मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.
किंबहुना जी भाषा आम जनतेची भाषा होऊ शकली नाही (किंवा तसे तिला मुद्दामच होऊ दिले नाही) तिच्या कुबड्या मराठीस कशाला हव्यात? आपल्या माथ्यावर जी शासकीय मराठी मारली जात आहे, ती असल्या उद्योगाचे उत्तम उदाहरण आहे. 'शासन' काय, 'संपन्न' काय, 'प्रभावित' काय...!!

In reply to by प्रदीप

पंगा 02/05/2011 - 21:51
अगदी नेमके. आणि हे मराठीच्याच बाबतीत होते अशातलाही भाग नाही. 'ठंडा पानी' असे छान कोणालाही कळेल अशा हिंदीत लिहिता येत असताना, 'शीतल जल' कशासाठी? पण (उत्तरेतल्या) रेल्वे स्टेशनांवर असल्या पाट्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे, हा सरसकट 'बाबू मेंट्यालिटी'चा भाग असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by प्रदीप

मैत्र 03/05/2011 - 10:48
सार्वत्रिक भाषा होऊ दिली नाही वगैरे जरी खरं असलं तरी म्हणून भाषा म्हणून संस्कृत ला बाजूला सारणे आणि कुबड्या म्हणणं तितकंच संकुचित आहे. भारतातल्या बहुतेक भाषांमध्ये (अगदी द्राविड सुद्धा) बरेच संस्कृतोतद्भव शब्द आहेत. दक्षिणेत अनेक शब्द बोली भाषेत आजही अतिशुद्ध स्वरुपात वापरले जातात. त्यात कोणाला काही अडथळा येत नाही. यापद्धतीने मराठीतले जे काही 'तत्सम' शब्द आहेत ते काढून टाकावे लागतील. संस्कृत बोली भाषा होऊ शकली नाही / होऊ दिली नाही म्हणून शब्दांना विरोध करण्यात काहीच हशील नाही. ते घनगोल गट्टू आणि लोहरथ असले शब्द फक्त त्या फालतू विनोदापुरतेच असतात. वार्ताहर नाही पण महापौर हा शब्द चांगलाच रुळला आहे. मग जसं त्यांनी विरोधासाठी विरोध केला तसंच करण्यात अर्थ नाही. शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.

In reply to by मैत्र

प्रदीप 03/05/2011 - 19:47
शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.
शासकीय मराठी व हिंदीही, विनाकारण संस्कृताळलेली आहे, असे नाही वाटत आपणास? ही वर आपण सर्वांनी दिलेली उदाहरणे संकृतशी नाळ जोडूनच तर आहेत की! ही असली शब्दावळ निर्माण करणार्‍यांची प्रेरणा व सावरकरांची प्रेरणा एकच असतील असे कुणी म्हणत नाही. सावरकरांनी त्यांच्या विशीष्ट निष्ठेमुळे हे केले, इथे काही बाबू लोक स्वतःसाठी कामे निर्माण करण्यसाठी व ती सुरू ठेवण्यासाठी करताहेत हा फरक आहे खरा, पण शेवटी परिणाम एकच.

In reply to by सुनील

हुप्प्या 03/05/2011 - 06:38
>>मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे. संस्कृत ही मराठीची आई म्हणण्याइतकी त्या भाषेची मराठीशी जवळिक आहे. असे असताना संस्कृतचा आधार घेणे काहीही चूक नाही. इंग्रजी शब्द बनवताना सर्रास लॅटिनचा आधार घेतला जातो. इंग्रजीतील मेडिकल संज्ञा बघा. मुळात मराठी ही तशी अर्वाचीन भाषा आहे त्यामुळे काही बाबतीत तिला मर्यादा आहेत. संस्कृतचा आधार घेणे आजिबात चुकीचे वाटत नाही. तुम्हाला संस्कृतचा तिटकारा असेल तर तो तुमचा दृष्टीकोन. तो तुम्हाला लखलाभ असो.

In reply to by हुप्प्या

पंगा 02/05/2011 - 22:10
बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला?
'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत.
नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे.
'वार्ताहर' हा (किंवा अन्य कुठलाही) शब्द मराठी(!)त बनवण्यास per se आक्षेप नाही. 'बातमीदार' सारखा शब्द मराठीत असताना, लोकांच्या तोंडी रुळलेला असताना, केवळ त्याचे मूळ 'यावनी' (पक्षी: 'त्यांचे') आहे एवढ्याच कारणास्तव तो हटवण्याच्या आणि त्याजागी ओढूनताणून जुळवलेला संस्कृतोद्भव (पक्षी: 'आपला') शब्द घुसडण्याच्या अट्टाहासाला विरोध आहे. (आजमितीस पाव खाल्ल्याने - किंवा शर्टप्यांट घातल्याने - जसा माणूस बाटू नये, तशीच रुळलेला 'परकीय' शब्द वापरण्याने भाषाही बाटू नये.)
शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्‍यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.
नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा? 'जगरनॉट', 'शांपू' असे शब्द वापरण्याने इंग्रजांचे स्फुल्लिंग (म्हणजे काय कोण जाणे!) विझते काय? बाकी चालू द्या.

In reply to by पंगा

हुप्प्या 03/05/2011 - 06:48
>>नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा? सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. संस्कृत ही स्थानिक भाषा आहे. मराठीला ती आईसारखी आहे म्हणून संस्कृत शब्दांचे पर्याय उपलब्ध असावेत. त्याकरता त्यांनी आपली प्रतिभा, आपले संस्कृत प्रभुत्व पणाला लावले आणि काही चांगले शब्द निर्माण केले. ते स्वीकारायला आडकाठी का? तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का? नवे शब्द बनवायला प्रतिभा लागते. नव्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते ह्याविषयी दुमत नसावे. व्यक्तीशः मला फारसी शब्दांची आलर्जी नाही. पण तरी सावरकरांनी निर्माण केलेले अनेक शब्द मला आवडतात. सावरकरांनी निर्माण केलेले असे अनेक शब्द आहेत जे लोकांच्या पचनी पडले नाहीत. हे चालायचेच. >>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत. असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.

In reply to by हुप्प्या

नितिन थत्ते 03/05/2011 - 09:36
>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे. कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे. जुनीच शंका पुन्हा विचारतो. इस्पात हा शब्द संस्कृतात वापरला जात होता का? वापरला असेल तर हल्ली इस्पातपुरुष न म्हणता लोहपुरुष असे का म्हटले जाते? विचारण्याचे कारण लोह म्हणजे शुद्ध लोखंड हे इस्पातापेक्षा फारच कमकुवत आणि बहुतांशी निरुपयोगी असते. (काळेकाका कन्फर्मेशन देतीलच). [की वर दिलेल्या लोह आणि इस्पात मधील फरकानुसार इस्पातपुरूषा पेक्षा लोहपुरूष हे त्या संबोधनाने सूचित होणार्‍या व्यक्तीचे अधिक अचूक वर्णन आहे?] *सौजन्याची ऐशीतैशी असे एक नाटक पूर्वी आलेले होते. त्यात नाना बेरके यांचे एरवी शेजार्‍यांशी भांडणारे कुटुंब सौजन्य सप्ताह पाळण्याचे ठरवते. त्यात ते "गांडीवर लाथ मारीन" ऐवजी "गुदद्वारावर लत्ताप्रहार करीन" असा शब्दप्रयोग करतात. तसे काहीसे या प्रेरणेबाबत वाटते.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 03/05/2011 - 12:19
त्यात ते "गांडीवर लाथ मारीन" ऐवजी "गुदद्वारावर लत्ताप्रहार करीन" असा शब्दप्रयोग करतात. तसे काहीसे या प्रेरणेबाबत वाटते. स्वा.सावरकरांना या पातळीवर आणून ठेवल्याबद्दल त्रिवार प्रणाम. ___/\___ ___/\___ ___/\___ आपल्या महान विचारश्क्तीला सलाम.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 03/05/2011 - 16:59
कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे.
'अधिनियम' म्हणजे 'कायदा' किंवा कसे याबद्दल खात्री नाही, पण आजकाल 'विधी' हा शब्द त्या अर्थी वापरला जात असावा, असे वाटते. म्हणजे, निदान कायदेमंडळाला तरी 'विधीमंडळ' म्हणतात बॉ. यावरून, विधीमंडळात सकाळीसकाळी पास झालेल्या कायद्याला 'प्रातर्विधी' आणि दिवसाअखेरीस पास झालेल्या कायद्याला 'अंत्यविधी' म्हणावे किंवा कसे, हे कळत नाही.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 03/05/2011 - 17:10
>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे.
नेमके! (किंवदंतेवरून) 'साहेब' हा शब्द यावनी आहे, त्याऐवजी 'राव' वापरावा. 'बाळासाहेब' नाही म्हणायचे, 'बाळाराव' म्हणायचे, असा अट्टाहास. म्हणजे बहुधा 'आईसाहेब' म्हटलेले चालू नये, 'आईराव' म्हणावे लागावे. "म्हणजे यांना 'आई'मागे 'साहेब' लागलेला चालत नाही, 'राव' लागलेला चालतो" असे कोणी का म्हणू नये?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 03/05/2011 - 18:16
---------खुलासा सुरू ------------ माझ्या प्रतिसादातील वाक्य हे मला "सावरकरांच्या कुठे लाथ घालावी असे वाटून" लिहिले असल्याचा समज झालेला दिसतो. माझे मराठी लेखन इतके सुमार नसावे. साध्या शब्दांऐवजी संस्कृताळलेले शब्द वापरले की ते स्वीकारार्ह होतात या प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून ते नाटकातील वाक्य लिहिलेले आहे. --------- खुलासा संपला. --------- अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का? बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे.

In reply to by नितिन थत्ते

अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का?
हॅ हॅ हॅ ते नसते तर तुम्ही हे वाक्य लिहिले असते का?

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 03/05/2011 - 18:39
माझ्या प्रतिसादातील वाक्य हे मला "सावरकरांच्या कुठे लाथ घालावी असे वाटून" लिहिले असल्याचा समज झालेला दिसतो. माझे मराठी लेखन इतके सुमार नसावे. गैरसमज नसावा. आपली प्रतीभा उत्तुंग भरा-या मारत आहे हे सगळेजण बघतच आहेत. आपण आपल्या प्रतीभेने स्वा.सावरकरांच्या भाषासुध्दी मोहीमेला ज्या पातळीवर आणून ठेवले आहेत त्याला आक्षेप आहे. बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे. स्वा. सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्माण झालेल्या कुठकुठल्या काव्याचे, पुस्तकाचे, लेखन प्रकाराचे वाचन केले आहेत?????????? त्यांची " प्रतिभा " योग्य स्थानी कुठेच खर्च झाली नाही असे आपले मत आहे का?

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 03/05/2011 - 19:12
>>त्यांची " प्रतिभा " योग्य स्थानी कुठेच खर्च झाली नाही असे आपले मत आहे का? असा दावा मी केला असल्याचे आठवत नाही. >>स्वा. सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्माण झालेल्या कुठकुठल्या काव्याचे, पुस्तकाचे, लेखन प्रकाराचे वाचन केले आहेत?????????? १. १८५७ चे स्वातंत्र्य समर २. विज्ञाननिष्ठ निबंध ३. माझी जन्मठेप धन्यवाद. सावरकरांच्या प्रतिभेविषयी कुठलीही शंका नाही. केवळ परकीय भाषेतले शब्द आहेत म्हणून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिभा खर्च करण्यावर आक्षेप आहे. मी आंधळा गांधीभक्त असल्याचा आरोप माझ्यावर अनेकदा होतो. पण गांधींच्या ग्रामस्वराज्य, निसर्गोपचार, दलितविषयक दृष्टीकोण आदि गोष्टींवर कोणी टीका केली तर मी त्याचा प्रतिवाद करीत नाही. पक्षी आंधळी भक्ती नाही. तसेच सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेला नेहमीच सलाम करीत आलो आहे. परंतु इथे आंधळी सावरकरभक्ती उघड दिसू लागली आहे. आणि सावरकरांच्या कुठल्याच गोष्टीवर टीका करायची नाही असा दृष्टीकोन दिसतो आहे.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 03/05/2011 - 19:48
परन्तु "बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे" ह्या वाक्यातुन तेच ध्वनीत होत आहे. बाकी तीन पुस्तकांची नावे दिलीत. धन्यु. अजून वाचण्यासारखे खूप बाकी आहे. समग्र सावकर वाङमय याचे एकुन ८ खंड आहेत. त्यातील तीसरा खंड वाचल्यास आपणास सुमारे १०० विविध विषयावरील निबंध / स्फुटे/ लेख वाचता येतील. त्यात १९३१ साली लिहीलेले " हिंदु नाग लोक ख्रिस्चन का होतात, नाग लोकांची सद्यस्थिती, माझ्या सनातन नाशीककर बंधुना अनावृत्त पत्र, चित्तपावन शिक्षण सहाय्यक संघ आणि बॅ.सावरकर असे काळाच्या आधी केलेले लिखाण (जे समजायला समाजाला अनेक वर्षे लागली) वाचायला मिळेल. चौथ्या खंडात सहा सोनेरी पाने, मनुस्मृतीतील महीला (५ लेख), बालपणाचे निबंध, लंडनची बातमीपत्रे, त्यांची विविध भाषणे इत्यादी वाचायला मिळेल. या भाषणात १९३७ साली भाषासुध्दी विषयीची दोन भाषणे आहेत ती जरूर वाचावीत. बाकी कमला काव्य, तनुवेल अशी रोमँटीक काव्ये, सिंहगड, बाजीप्रभु यांचे पोवाडे, शिवरायांची आरती, हिंदू नृसिंह इत्यादी अनेक विविध विषयांवरील काव्यांचा आस्वाद घ्यावा.

In reply to by हुप्प्या

पंगा 03/05/2011 - 17:30
>>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत. असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.
न्यूजरिपोर्टर हा बहुधा जर्नालिस्टामध्ये मोडावा, परंतु प्रत्येक जर्नालिस्ट हा न्यूजरिपोर्टर असेलच, असे नाही. 'केसरी'-'मराठा'कार लोकमान्य टिळक हे जर्नालिस्ट होते. न्यूजरिपोर्टर बहुधा नसावेत.
मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.
हेही वरकरणी पटण्यासारखे वाटत नाही. थोडा विचार करावा लागेल. सामान्य अर्थाने 'ऑथर' हा बहुधा 'रायटर'चा उपसंच मानता यावा. याशिवाय 'ऑथर'ला (लिखाणाशी थेट संबंध नसलेल्या) इतरही अर्थच्छटा आहेत. (पहा: writer आणि author.) 'रायटर' हा बहुधा काहीही लिहिणारा व्हावा. (म्हणजे, ऐन परीक्षेच्या वेळी जर एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, तर त्याची परीक्षा बुडू नये म्हणून त्याने सांगितलेली उत्तरे सांगितल्याबरहुकुम लिहिणारा जो लेखनिक अनेकदा दिला जातो, त्यालाही 'रायटर' म्हणतात. तो त्या लेखनाचा 'ऑथर' होऊ शकत नाही.) 'ऑथर'मध्ये लेखनस्वामित्व अभिप्रेत असते. तसेच 'ऑथर' हा कोणत्याही निर्मितीचा कर्ता असू शकतो; लेखनाचाच, असे नव्हे. थोड्या व्यापक अर्थाने, एखाद्या कृतीचे निर्मितीस्वामित्व ज्याला दिले जाऊ शकते, तो त्या कृतीचा 'ऑथर' ठरू शकतो. वरील दुव्यावरील 'ऑथर ऑफ अ क्राइम'ऐवजी 'रायटर ऑफ अ क्राइम' म्हणता येणार नाही.

In reply to by हुप्प्या

पंगा 03/05/2011 - 17:54
तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का?
या शब्दांचा द्वेष नाही. या शब्दांना, आणि अशा शब्दांमागच्या रुळलेले शब्द केवळ परकीय (विशेषतः फारसी-अरबी) भाषांतून उद्भवलेले आहेत म्हणून त्यांच्या उच्चाटनामागील द्वेषभावनेला, विरोध जरूर आहे. शब्दाचा उगम फारसीतून असो किंवा अरबीतून असो किंवा इंग्रजीतून, एकदा तो शब्द मराठीने स्वीकारला, तो मराठीत रुळला, की तो मराठी. मग अशा मराठी शब्दांचे उच्चाटन करून त्याजागी दुसरा एखादा स्वनिर्मित शब्द लादण्याला विरोध आहे. फारसी, अरबी शब्द हे जर मराठीत यावनी बलात्काराने आले असतील, तर त्याच न्यायाने हे कृत्रिम संस्कृतोद्भव शब्द मराठीत सावरकरी बलात्काराने आलेले आहेत, असे म्हणावे लागेल. (मराठीत परंपरेने आलेल्या तत्सम, तद्भव शब्दांना विरोध नाही. नवीन संकल्पनांकरिता, जोपर्यंत त्या संकल्पना नवीन आहेत आणि त्यांसाठी एखादा शब्द - कोणतेही मूळ असलेला - रूढ नाही तोपर्यंत आणि तोपर्यंतच, नवीन शब्द बनवायलाही तितकासा* आक्षेप नाही. विरोध आहे तो रूढ शब्दांच्या ठिकाणी असल्या लादलेल्या शब्दांना.) * अशा संकल्पनांकरितासुद्धा एखादा शब्द मुद्दाम बनवण्याऐवजी सामान्य वापरातून नैसर्गिकरीत्या आलेला कधीही बरा. पण बनवायचाच झाला, तर तो मराठीच्या स्वभावाशी शक्यतो मिळताजुळता असावा. केवळ संस्कृत ही आपली पुरातनभाषा आहे म्हणून संस्कृतातून ओढूनताणून बनवलेला नसावा. 'रेस्तराँ'(मराठीत 'रेष्टॉरंट')करिता 'उपाहारगृह' किंवा 'भोजनालया'ऐवजी 'खाणावळ' हा शब्द त्या दृष्टीने मराठीशी मिळताजुळता आणि अधिक जवळचा आहे. बहुधा आधीपासून रूढ असावा आणि नैसर्गिकतःही बनला असावा. (खात्री नाही.) मग मुद्दाम 'उपाहारगृह' कशासाठी? कोणालातरी भारदस्त वाटते म्हणून?

नितिन थत्ते 27/04/2011 - 10:05
"दलितांनी अस्खलित जयोस्तुते म्हणण्याच्या" वर्णनात आम्हाला मेकॉले साहेब दिसला.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 27/04/2011 - 19:04
नीटसे कळले नाही. (अंधुकसे कळल्यासारखे वाटत आहे, पण खात्री नाही.) म्हणजे भेदनीती वगैरे?

In reply to by पंगा

नितिन थत्ते 27/04/2011 - 22:36
मेकॉले साहेबांच्या नावावर एक ढकलपत्र जालावर फिरत असते त्या ढकलपत्रानुसार मेकॉले साहेबांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊन "इंग्रज बनवण्याचा" प्ल्यान आखला होता. तसे शिक्षण दिल्यावर हे शिकलेले भारतीय इंग्रजांसारखाच विचार करतील आणि ते शिक्षण दिल्याबद्दल आपले ऋणी राहून आपल्याला हवे तसे करतील अशी काहीशी योजना होती. त्याच प्रकारचा काही प्ल्यान सदरहु गृहस्थांनी चालवला होता की काय अशी शंका आली.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 27/04/2011 - 23:32
पु.लं.च्या भाषणातील त्या विवक्षित मजकुराचा हा अभावित परिणाम (unintended consequence) समजावा काय? (माझ्याही मनाला ती शंका चाटून गेली. पण बहुधा पु.लं.ना तसे सुचवायचे नसावे असे वाटते.) मला वाटते आपण नेमके काय सुचवीत आहोत हे बहुधा पु.लं.च्याही लक्षात आले नसावे. (श्रोत्यांच्या तर नसावेच नसावे.) समाजाच्या एका विवक्षित स्तरातील नैसर्गिक विचारपद्धतीतून (या स्तरात पु.ल.ही आले आणि श्रोतेही आले.) हे अभावितपणे होत असावे. कितीही सुधारणावादी म्हटले, तरी शेवटी 'आपल्या' विरुद्ध 'त्यांच्या' स्तरांतील 'फरका'ची जाणीव आणि त्यातून 'त्यांच्या'बद्दल सद्भावनेनेही विचार करायचा झाला तरी त्यात येणारा एका प्रकारचा कॉंडेसेंडिंग टोन किंवा विचार हा कितीही नाही म्हटले तरी अभावितपणे डोकावत असावा. (हे विधान मी पु.लं.च्या विधानाच्या संदर्भात करत आहे; सावरकरांची तशी विचारसरणी होतीच, असा दावा नाही. असेलही, किंवा नसेलही. येथे तो मुद्दा नाही.) हा नैसर्गिक मनुष्यस्वभाव आहे, आणि याला अपवाद फारसे नसावेत. (इंग्रजांचे - मेकॉलेचेसुद्धा - इतरवर्णीयांबाबत नेमके हेच झाले असावे.) ('सावरकरांची - विशेष करून संस्कृतातील - पदे अस्खलितपणे म्हणता येऊ शकणे' याचे महत्त्व - आणि त्याची दालित्यलक्षणांशी सांगड - हे पु.लं.च्या किंवा श्रोतृवर्गाच्या स्तरात अभावितपणे होऊ शकते. सावरकरांचे विचार तसे असतीलच, असे सांगता येत नाही.) (समाजाच्या त्या विवक्षित स्तरातसुद्धा सुधारणावादी म्हणवण्याची विविध उपगटांत अहमहमिका असली, तरी शेवटी थोड्याफार फरकाने सगळे सारखेच असावेत. 'स्तर वेगळे आहेत आणि आपण त्यापैकी तथाकथित उच्च स्तराचे घटक आहोत' याची जोपर्यंत जाणीव आहे - मग 'ते स्तर वेगळे असू नयेत' ही भावना असली तरी - तोपर्यंत हे अभावितपणे व्हायचेच. त्याला इलाज नाही. मनुष्यस्वभाव आहे.) थोडक्यात, पु.लं.ना जाणूनबुजून तसे सुचवायचे नसावे - कदाचित येथे पु.लं.च्या स्वत:च्या अभावित विचारपद्धतीचे सावरकर बळी होत असावेत - असे मानायला जागा आहे. परंतु तसे सूचित होत आहे, हे निश्चित. अर्थात, त्याकरिता सावरकरांना दोष देता येणार नाही. (तसा तो देण्याचा माझा उद्देश नाही, आणि आपलाही नसावा, याची खात्री आहे.)

In reply to by पंगा

नितिन थत्ते 28/04/2011 - 08:36
दोष सावरकरांना नाहीच. पुलंनाही पूर्ण दोष नाही. परंतु संस्कृतात असलेले धृवपद अस्खलित म्हणता येणे ही दलितोद्धार झाल्याची खूण समजली जाण्याला आहे . त्या विशिष्ट संस्थेच्या चालकांची काय मनोधारणा होती हे माहिती नाही त्यामुळे ते मेकॉलेगिरी करीत होते असे म्हणता येईलच असे नाही. पण मेकॉले आठवला हे मात्र खरे.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 03/05/2011 - 10:33
अवांतर : मेकॉले बद्दलचं ढकल पत्र त्यातला ठराविक छापाचा मजकूर पाहता तुम्हाला ज्या विचार धारणेची अ‍ॅलर्जी आहे अशा लोकांचा नेहमीचा propaganda असावा असं वाटतं. अमर्त्य सेन यांनी An Argumentative Indian या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात याचा संदर्भ दिला आहे (लॉर्ड मेकॉले च्या धोरणाचा - ढकलपत्राचा नव्हे). अमर्त्य सेन हे नेहरू आणि त्यांची धोरणे जास्त पसंत करत असावेत असं त्यांच्या लेखनावरून आणि भाजप विरोधी लेखनावरून वाटतं. तेव्हा ते विनाकारण असं विधान करतील असं वाटत नाही. तसंच अमर्त्य सेन बहुतेक गोष्टी त्यांच्या प्रबंधाच्या पद्धतीने कुठले तरी जुने पुराणे संदर्भ देऊन लिहितात तेव्हा हे खरं असावं. वरील प्रतिसादात ढकल पत्रा इतकाच ठराविक छापाचा शिक्का मारण्याच्या पद्धतीचा कल जाणवला ...

प्यारे१ 28/04/2011 - 16:34
सुंदर भाषण. अवांतर : अपेक्षित व्यक्तींच्या अपेक्षित प्रतिक्रिया. त्यावर अपेक्षित चर्चाचक्र. स्वप्रांता/ देशाबाहेर राहणारे लोक जास्त भारतीय होतात (मिपा च्या केसमध्ये महाराष्ट्रीय- मराठी) हे पुन्हा दिसून आले. अकारण वाद करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे कळत नाही. मडके आधीच भरलेले असेल तर त्यात नवीन पाणी ग्रहण करण्याची क्षमता नसते त्यामुळे नवीन आलेले/ मिळालेले ज्ञानजल आधीच्या मडक्यात साचलेल्या पाण्याबरोबर कलुषित होऊन वाहताना दिसते आहे. पुन्हा एकदा मलाव्यंचे भाषण सुंदर आहे. आणि क्रांतिसूर्यांबद्दल बोलण्याची पात्रता नाही.

चिंतामणी 28/04/2011 - 18:42
अवांतर : अपेक्षित व्यक्तींच्या अपेक्षित प्रतिक्रिया. त्यावर अपेक्षित चर्चाचक्र. स्वप्रांता/ देशाबाहेर राहणारे लोक जास्त भारतीय होतात (मिपा च्या केसमध्ये महाराष्ट्रीय- मराठी) हे पुन्हा दिसून आले. अकारण वाद करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे कळत नाही. मडके आधीच भरलेले असेल तर त्यात नवीन पाणी ग्रहण करण्याची क्षमता नसते त्यामुळे नवीन आलेले/ मिळालेले ज्ञानजल आधीच्या मडक्यात साचलेल्या पाण्याबरोबर कलुषित होऊन वाहताना दिसते आहे. ___/\___ ___/\___ ___/\___

पैसा 28/04/2011 - 19:04
सावरकर हा विषय, आणि पु.ल. वक्ते म्हणजे सोने पे सुहागा. लेख सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता, त्याचं सार्थक झालं.

In reply to by पैसा

आनंदयात्री 29/04/2011 - 02:11
लेख अत्यंत आवडला. >>सावरकर हा विषय, आणि पु.ल. वक्ते म्हणजे सोने पे सुहागा. लेख सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता, त्याचं सार्थक झालं. आणि प्रतिसाद वाचुन त्यावर पो पडला तिचायला.

प्यारे१ 03/05/2011 - 17:39
धागाकर्ता, धागाविषय आणि धाग्यातील व्यक्ती सोडून बाकी फक्त 'विद्वज्जनांना' (इतरांनी उगाच 'झगा' ;) ओढवून घेऊ नये) कृतानेक शिरसाष्टांग णमस्कार विणंती विशेष.

साहीत्य : मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, अशा बिनडोक माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे. २) ज्या दुकानदाराकडून हा लेख आणलेला आहे त्याचा मेंदू. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या दुकानदाराला मेंद/अक्कलू नाही या वर आपला ठाम विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे. पण आपण आणलेला मेंदू निघाला तर मग काय, मज्जाच मजा.... हा भाग आणताना तो नीट निवडून आणावा. त्यात भावना, विचार असले दगड असता कामा नयेत. मेंदू कसा असावा ......या मेंदूचा व लेखाचा खिमा ठो़ऊन आणावा. लेखाच्या व मेंदूच्या कशा ठिकर्‍या उडाल्या पाहिजेत ! शक्य झाल्यास ठोकणार्‍यास बाजूला सारून आपण स्वतःच ठोकावा. कदाचित त्याला कींव येऊन तो हळू ठोकेल. तशा खीम्याचा काय उपयोग ? शक्यतो जिवंत दुकानदाराचा मेंदू ठोकता आला तर फारच बरं ( हालाल !) हे करताना बरेच मित्र गोळा करावेत व त्या प्रसंगाचा आनंद घ्यावा. म्हणजे जेवताना याची आठवण करून करून डोळ्यात पाणी येईल. ३) जहाल शब्द, मसालेदार शब्द, व अजब तर्कशास्त्र. या खड्या मसाल्यांनी पदार्थ अधिक रुचकर बनतो. याच्यातला तिसरा मसाला फार महत्वाचा आहे आणि तो गुपचूप वापरायचा आहे. म्हणजे दुसर्‍याला वापरता येणार नाही व आपल्यालाच सारख्या ऑर्डर मिळत राहतील. ४) झिणझिण्या : हा एक वेगळा मसाला आहे. हा भारत देश सोडून सर्व देशात मिळतो. हा मसाला टाकला की पदार्थ खाताच खाणार्‍याच्या डोक्याला मुंग्या येतात व त्याचा तोल सुटतो. असे झाल्यास आपल्या रेसिपीला पहिले बक्षिस निश्चित मिळणार हे गृहीत धरावे. ५) लूप : हा एक तुपासारखा पदार्थ आहे. संगणक क्षेत्रात काम करणार्‍यांना याचा उपयोग चांगलाच माहीत असणार. हा तळण्यासाठी वापरला की तळणे ही प्रक्रीया थांबतच नाही. तळत रहा.. तळत रहा... अर्थात हे आपण टाकले नाही तरी चालेल . कारण हा या पदार्थाचाच एक बाय प्रॉडक्ट आहे आणि तो मुळ पदार्थात मिसळत राहतो... ६) नकारात्मकता: अत्यंत महत्वाचा मसाला. प्रत्येक वस्तूकडे नकारात्मक डृष्टीने बघता यायला पाहिजे. पण याची काळजी करू नका. आपण हा पदार्थ करायला घेतलाय म्हणजे ही आपल्याकडे भरपूर असणार. ७) व्याकरण : पदार्थ बिघडायला लागल्यास आपल्या मदतीस येणारा मसाला. याचा साठा भरपूर ठेवा. हा आपल्याला कायम लागणारच आहे. उपकरणे : १) एक किसणी. तुम्हाला वाटेल की याला कसलीही किसणी चालेल. पण नाही. ही काही विशिष्ट दुकानातच मिळते. याला दोन्हीकडून धार असते. याचा फायदा असा की लेख कसाही किसला तरी त्याचा कीसच पडतो. बर नुसते एवढेच नाही. याला काही मोठी भोके, काही मध्यम तर काही केसाच्या अग्राएवढी सुक्ष्म असतात. आणि या भोकांचा वापर हा क्रमाने करायचा असतो. याच्या प्रशिक्षणाची सोय काही तज्ञांकडे उपलब्ध आहे. पण थोडक्यात सांगणे झाल्यास ज्यांना या पदार्थाची रुची वाढवण्यात रस आहे त्यांनी पाळीपाळीने ही किसणी हाती घेऊन वेगवेगळ्या भोकातून हा लेख किसावा. किसताना खाली काय पडते आहे ते आजिबात बघू नये. किसत रहावे. थांबावे कधी ? यासे उत्तर फारच सोपे आहे. अशाच पदार्थाची दुसरी ऑर्डर मिळाली की किसणे थांबवावे. याने हातालाही चांगला व्यायाम होतो व मेंदूलाही आराम मिळतो. आता तुम्ही विचाराल की दुसरी ऑर्डर नाही मिळाली तर काय ? तसे झाल्यास खाणारे उठून गेले की थांबावे. व शेवटी आपण करणारेच राहीलो की हा पदार्थ ओरपून खावा. असा उरलेला पदार्थ खाण्यास फारच रुचकर लागतो व बर्‍याच दिवस पुरतो. २) असंख्य शब्दकोष. ( मोठे भांडे व चाळणी) याचा उपयोग फारच होतो. प्रमूख साहित्यातील प्रत्येक कण या चाळणीत चाळून घ्यावा. शक्यतो इतक्यावेळा चाळावा की त्याचा भूगा झाला पाहिजे. अर्थात यात सर्व भाषेचे शब्दकोष लागतील. कधी कुठला लागेल याचा नेम नाही. ३) सगळ्या साहित्याचे तुकडे, भुगा, पीठ, मैदा करता येईल अशी सगळी उपकरणे. आपल्याकडे नसतील तर ही भाड्यानेही मिळतात. कृती : फारच सोपी. सगळे गोळा केलेले साहित्य एकत्र केले की आपल्याला पुढची कृती आपोआप कळायला लागेल. आपला आनंद द्विगुणीत, त्रिगुणीत होत जाईल... तयार झालेल्या पदार्थावर आपल्या अगाध ज्ञानाचा चुरा पेरावा व मिपाच्या साईटवर ठेवून सर्व्ह केला तर हा पदार्थ दिसण्यास व खाण्यास अधिक रुचकर लागतो. आमच्या कॅमेर्‍यात या पदार्थाची ( न मावल्यामुळे) प्रतीमा घेता आली नाही म्हणून छायाचित्र टाकता आले नाही त्याबद्दल क्षमस्व. हलके घेणे हे वेगळ्याने सांगायला नको. :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

चिंतामणी 03/05/2011 - 20:38
जयंत कुलकर्णी पाककृती - शब्दांचा खीमा या पाकृ मधून मिपावरच्या वरिष्ठ आणि विद्वान लोकांच्या पाककृतीतील बारकावे सर्वांना समजेल अश्या भाषेत (ज्यात संस्कृत प्रचुर शब्द नाहीत) मांडल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. धन्यु. ___/\___

तर्री 27/02/2013 - 09:33
पु.लं.चे नेहमी प्रमाणे उत्तम भाषण वाचवायला मिळाले. सोने पे सुहागा बाकी चर्चा हे खास मिपा चे लक्षण .

हेच भाषण पु लं च्या आवाजात mp3रुपात माझ्याकडे उपलब्ध आहे. मिपावर mp3 कसे अपलोड करावे मला माहिती नाही. तरी कुणाला हवे असल्यास मेल/व्यनि करावा अथवा अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करावे

नानबा 03/03/2013 - 13:01
पु.लं. चं भाषण अप्रतिम.. फक्त आपण लिहीलेल्या लेखाबद्दल एक सुधारणा..
अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील
असे लिहीले आहे. ते सेल्युलर जेल आहे... बाकी सुंदरच..

केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा
जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते.
या दोन वाक्यांसाठी चिंतामणीला मनःपूर्वक धन्यवाद! (आणि अर्थात मृत्युंजयावरच्या या अप्रतिम लेखासाठी पुलंना विनम्र अभिवादन)

चिंतामणी 26/02/2015 - 15:07
आज या महानायकाचा "आत्मार्पण दिन" आहे. त्या निमीत्ताने पुन्हा एकदा आदरांजली.

साहीत्य : मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, अशा बिनडोक माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख हे बिनडोक तर आपण कोन?

भाते 26/02/2015 - 20:24
धन्यवाद चिंतामणी! _ _/\_ _ लेखापध्दल आणि हा धागा पुन्हा वरती काढल्या पध्दल. केवळ अप्रतिम!

प्रास 24/04/2011 - 15:23
चिंतामणीकाका, एका चांगल्या भाषणाच्या नव्याने दिलेल्या गोषवार्‍याबद्दल आभारी आहे. यातला प्रत्येक विचार अगदी झणझणीत अंजन आहे. धन्यवाद!

सुधीर१३७ 24/04/2011 - 15:30
वक्ता आणि ज्याव्यक्तिबद्दल भाषण केले गेले या दोन्ही व्यक्तिंबद्दल केवळ आपल्या आचरणातूनच आपण आदर व्यक्त करु शकतो. .....चिंतामणी, धन्यवाद!!

चतुरंग 24/04/2011 - 16:41
सुरेख विचार. तात्यारावांबद्दल इतके समर्पक शब्दात आणि नेटकेपणाने विचार मांडणे सोपे नव्हे. अतिशय सुंदर भाषण इथे उधृत केल्याबद्दल धन्यवाद! -रंगा

नितिन थत्ते 25/04/2011 - 09:04
भाषण इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 26/04/2011 - 01:10
सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.
माफ करा, पण या आख्ख्या लांबलचक भाषणात सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचा उल्लेख करणारी दोन ते तीनपेक्षा* अधिक वाक्ये मला शोधूनदेखील सापडू शकली नाहीत. तो या भाषणाचा फोकस नसावा. * "विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून." बस, एवढेच. (परिच्छेद २मधून उद्धृत.) त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" (परिच्छेद ४मधून उद्धृत.) या वाक्याचा अर्थ लागू शकला नाही**. गणिताच्या नेमक्या कोणत्या शाखेत हे शक्य होते? शिवाय, 'आत्मा' आणि 'वैज्ञानिक पद्धत' हे दोन शब्द एकाच वाक्यात पाहून मौज वाटली. ** अर्थात, वैज्ञानिक पद्धतीबद्दलच्या माझ्या अज्ञानाची पातळी सर्वज्ञात आहे. त्यामुळे केवळ कॉमन सेन्स***च्या आधारावर अर्थ लावणे भाग पडले. जमले नाही. तरी तज्ज्ञांनी कृपया - इच्छा असल्यास, आणि मुख्य म्हणजे जमल्यास - खुलासा करावा. *** याला विद्वज्जनांत 'धादान्तवाद'**** की कायसेसे म्हणतात, असे ऐकून आहे. (सावरकरांना आवडण्यासारखा प्रतिशब्द!) **** नुसता पोकळ शब्दांचा डोलारा! 'कॉमन सेन्स' सारखा साधासोपा आणि पब्लिकच्या तोंडात रुळलेला शब्द सोडून 'धादान्तवादा'सारखा फारसा कोणाच्या तोंडी नसलेला शब्द ओढूनताणून वापरायचा झाले.***** ***** तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय?

In reply to by पंगा

नितिन थत्ते 27/04/2011 - 08:28
मला हे पण सापडले....
सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते. यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत.
>>तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय? (विद्वज्जन या शब्दातून पंगा यांना काय अभिप्रेत आहे माहिती नाही) सावरकरवादी असण्याची अनेक कारणे असावीत. प्रत्येक विद्वान किंवा सामान्य मनुष्य त्या सर्वच कारणांसाठी सावरकरवादी असणार नाही. अवांतर: दलितांनी जयोस्तुते शुद्ध व अस्खलित म्हणण्यात सावरकरांच्या दलितोद्धाराचे सार्थक असू नये याच्याशी सहमत.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 27/04/2011 - 20:13
सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.
यात 'रूढींच्या अंधानुकरणास विरोध' आहे, मान्य. 'बुद्धिनिष्ठा'ही समजू शकतो. 'विज्ञाननिष्ठा' कुठे आली? 'विद्युद्दाहिनी वापरण्याचा आग्रह' हा फार तर 'अद्ययावत गोष्ट वापरण्याचा कंझ्युमेरिस्ट अट्टाहास किंवा हव्यास' म्हणता येईल. म्हणजे घरातला जुना पिच्चर ट्यूबवाला टीव्ही व्यवस्थित चालत असताना 'आम्हाला लेटेष्ट मॉडेलचा फ्ल्याटस्क्रीन एलसीडी टीव्ही पाहिजे' म्हणण्यासारखे. (त्यात काही गैर आहे असा दावा नाही. माणसाला नवनवीन वस्तूंची हौस असू शकते.) पण त्यात जोपर्यंत तो फ्ल्याट स्क्रीन एलसीडी टीव्ही (किंवा विद्युद्दाहिनी) नेमका कसा चालतो (/चालते) याचे वैयक्तिक ज्ञान किंवा संशोधन नाही, त्यातील पुढील सुधारणांसंबंधी (प्रॉडक्ट डेवलपमेंट किंवा इंप्रोवायझेशन अशा अर्थी) संशोधनाकरिता काही वैयक्तिक इन्पुट किंवा योगदान नाही, तोपर्यंत त्याला 'विज्ञाननिष्ठा' म्हणता येईल काय? मुंबई ते ठाणे जी पहिली झुकझुकगाडी धावली, तेव्हा तिला 'चाक्या म्हसोबा' म्हणून तिच्यासमोर नारळ फोडणारांपैकी अनेकांनी पुढे 'साहेबाचा पोर्‍या मोठा अकली, बिनबैलाची गाडी कशी ढकली' म्हणतम्हणत का होईना, पण (तिकीट काढून किंवा विनातिकीट) ती झुकझुकगाडी पुढे प्रवासाकरिताही वापरली असेल. अट्टाहासाने वापरली असेल. (सोयिस्कर असेल, तर का नाही वापरणार?) ते सगळे 'विज्ञाननिष्ठ' झाले काय? 'रेल्वेचे जे काय दीडदोन पैशाचे किंवा त्या काळी जे काही भाडे असेल तितक्या पैशांचे तिकीट विकत घेणे' एवढ्या भांडवलावर स्वतःला 'विज्ञाननिष्ठ' म्हणवून घेता यावे काय? झुकझुकगाडीचे तिकीट हे विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचेही तिकीट ठरावे काय? 'उपभोक्तावाद' ही ऑपॉप 'विज्ञाननिष्ठा' कशी काय होऊ शकते? ('उपभोक्तावादा'त नेमके गैर असे काही असावेच असे नाही हे मान्य करूनही.) बाकी, 'विद्युद्दाहिनी' हा शब्द बनवणे हे सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या ध्येयाशी सुसंगत असेलही, परंतु असा एखादा शब्द बनवणे यातही 'विज्ञाननिष्ठा' नेमकी कोठे आली? (त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" यांसारखी वाक्ये केवळ अनाकलनीय. कोनाड्यातल्या हिंदमातेची आठवण आल्यावाचून राहिली नाही.)

In reply to by पंगा

पंगा शेठ अहो त्याकाळात अनेक लोक रूढी व परंपरा म्हणून पारंपारिक पद्धतीने आपला अंत्यसंस्कार करत व नंतर उर्वरीत सोपस्कार करत .ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले . .( पूर्वी दूरदर्शन वर ७ दिवस आणीबाणी लादून राष्ट्रीय नेते चंदनच्या लाकडांवर तुपाचे ढीग ओतून आपला शेवटचा सार्वजनिक सोहळा समस्त भारतीय जनतेला दाखवायचे .त्यांचे आप्त स्वकीय काळा गॉगल लावून रीन की सफेदी दाखवायचे .त्या काळात सावरकरांचा निर्णय हा तत्कालीन जुनाट रूढी विरुद्ध होता व पर्यावरणाला पोषक होता .असे मला वाटते . बाकी एक शब्द असतांना दुसरा शब्द अनेक भाषांमध्ये असतो ( सावरकरांनी मराठी माषेत समानार्थी शब्द वाढवले व त्याने भाषेच्या शब्द भांडारात भर पडली .लोकांना ती वापर्यांचे पर्याय उपलब्ध झाले .

In reply to by निनाद मुक्काम …

पंगा 27/04/2011 - 22:24
ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले .
वीज कोठून येते? Long tailpipe theoryबद्दल आपण ऐकलेले नाही काय? (विजेच्या वापराला माझा व्यक्तिशः विरोध नाही, पण) पर्यावरणवादच जर यात मध्ये आणायचा असेल, तर मग विजेचा वापर हा ऑपॉप पर्यावरणवादी होतो, हे गृहीतक तपासल्याशिवाय तसेच स्वीकारता येईल काय? वीजनिर्मिती ही सामान्यतः एक तर लाकूड किंवा कोळसा यांसारखी इंधने जाळून व्हावी (म्हणजे प्रदूषण आले आणि लाकडाच्या पर्यायात वृक्षतोड आली.) किंवा धरणांतून, पाण्याचा कडेलोट करून त्यावर जनरेटर ('जनित्रे') चालवून व्हावी (म्हणजे धरणे बांधण्यासाठी गावांचे विस्थापन वगैरे आले आणि कदाचित त्याबरोबर वृक्षतोडही आली.). (अणुऊर्जेतून वीजनिर्मिती वगैरे प्रकार सावरकरांच्या काळी असावेत का, याबद्दल साशंक आहे.) म्हणजे, वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास वगैरे बाबी फक्त उपभोक्त्याच्या ठिकाणापासून दूर होऊन इतरत्र गेल्या. म्हणजे विजेच्या वापरातून पर्यावरणाचा र्‍हास टळला वगैरे नाही. दृष्टीआड झाला, इतकेच. हं, आता हा (वीज न वापरल्याने) जागच्याजागी होणारा र्‍हास विरुद्ध (वीजनिर्मितीतून झालेला) इतरत्र गेलेला र्‍हास यांचे गणित मांडून तुलना करता येईल. त्यातून कोणता पर्याय अधिक पर्यावरणवादी, वगैरे निष्कर्ष काढता येतील. कोण जाणे, कदाचित Long tailpipe theoryत फारसे तथ्य नाही, असेही कदाचित या गणितातून सिद्ध होईल. हे गणित मी केलेले नाही, त्यामुळे नक्की काय ते मला माहीत नाही. मुद्दा हा आहे, की (१) सावरकरांनी हे गणित केलेले होते काय? तसे गणित त्यांनी स्वतः केलेले असल्याबद्दल काही माहिती आहे काय? की (२) 'विद्युद्दाहिनीच्या वापरात वृक्षतोड ही डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय वरकरणी पर्यावरणवादी वाटतो' या 'फीलगुड फ्याक्टर'वर आपले गृहीतक आधारलेले होते? की (३) विजेचा वापर हा अद्ययावत पर्याय आहे, त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीचे लक्षण म्हणून बाय डिफॉल्ट 'विज्ञाननिष्ठ' पर्याय आहे, असे काही गृहीतक होते? (२) हा पर्याय असल्यास काही आक्षेप नाही, शेवटी मानवी स्वभाव आहे आणि सावरकरही मानव होते. पण त्या परिस्थितीत त्यांचा विद्युद्दाहिनीचा आग्रह हा त्यांच्या विज्ञाननिष्ठेचे द्योतक म्हणता येईल का, याबद्दल साशंक आहे. (३) हा पर्याय 'विज्ञाननिष्ठ' पर्याय ठरू शकतो की नाही, याबद्दल खात्री नाही, परंतु निदान पर्यावरणाच्या कारणावरून तरी तो 'विज्ञाननिष्ठ' ठरू नये (कारण त्या दृष्टीने पुरेशी चिकित्सा झालेली नाही). (१) हा पर्याय योग्य आहे याबद्दल काही खात्रीलायक माहिती असल्याखेरीज या आग्रहामागे पुरेशी वैज्ञानिक चिकित्सा झालेली असल्याचे माझ्या मर्यादित समजशक्तीस तरी जाणवत नाही, त्यामुळे अशा खात्रीलायक माहितीअभावी 'विज्ञाननिष्ठे'चे लेबल लावण्याची घाई मला तरी करवत नाही. बाकी चालू द्या. (अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)

In reply to by पंगा

भौतिकशास्त्राचा उर्जेविषयीचा अतिशय महत्वाचा नियम आहे की, Energy cannot be created or destroyed, it can only be changed from one form to other. तुम्ही उर्जा कुठल्याही स्वरुपात वापरा. तीच्या स्वरुपात बदल होतं जाणारचं. पण प्रत्येक उर्जेच्या स्थित्यंतरणामधे एफिशीएन्सी किती आहे हा मुद्दा विचार करण्याजोगा नक्कीच आहे. किती तरी वेळा एंड अ‍ॅप्लिकेशन किंवा पद्धत बदललं गेलं तर उर्जेची गरज कमी सुद्धा होऊ शकते.

In reply to by पंगा

चिंतामणी 26/02/2013 - 23:14
(अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)
असा डिसक्लेमर टाकुन दिलात. त्यामुळे वरच्या पोस्टची समीक्षा करणे शक्य नाही. असो. पु.ल. यांच्या एका भाषणात तुम्हाला सापडणे अवघड आहे. कारण ते पु.ल. यांचे मत आहे आणि अतीशय योग्य आहे. ते योग्य कसे हे समजायला अभ्यास करायला हवा. स्वा.सावरकरांचे लिखाण वाचा. त्यात अनेक गोष्टी दिसतील. थोडी तसदी घेतल्यास दुस-याकोणी समजावुन सांगायची गरज पडणार नाही.

गेंडा 25/04/2011 - 09:07
महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्वाने केलेले महाराष्ट्राच्या महान व्यक्तीमत्वाचे वर्णन फारच सुंदर. अवांतर- +१ अथवा -१ प्रतिक्रीया टाकताना कसे करायचे?? याची महिती कोठे मिळेल???

ऋषिकेश 25/04/2011 - 09:32
वा,, सुरेख भाषण सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेबाबत तसेच अंधश्रद्धानिर्मुलन, अस्पृश्यतानिवारण वगैरेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्याबद्द्ल खूप आदर वाटतोच.

चिंतामणी 25/04/2011 - 15:05
किसन शिंदे, प्रास, सुधीर१३७, अप्पा जोगळेकर, सर्वसाक्षी, चतुरंग, स्वाती२, ५० फक्त, नितिन थत्ते, गेंडा आणि ऋषिकेश आपणा सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्स.

लेख आधी पु.लं. च्या संस्थळावर वाचला होता आणि मराठीजगतवर. आपल्या मिपाचे सदस्य दीपक ह्यांनी देखील तो आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करुन दिला आहे. तरी देखील धन्यवाद. अवांतर :- ह्या संस्थळांचा उल्लेख सदर लेखनाच्या शेवटी आला असता तर बरे वाटले असते :)

पंगा 25/04/2011 - 20:10
स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.
'सेक्युलर' तुरुंग??? खरोखरच त्या तुरुंगाचे असे नाव आहे? हिंदुस्थानातील सेक्युलरिझमचे मूळ इंग्रजी सत्तेत आहे, असे यातून समजावे काय? की यात स्वातंत्र्योत्तर काळात गावोगावच्या 'मेन स्ट्रीट'चे 'महात्मा गांधी मार्ग' असे पुनर्नामकरण करणार्‍या हरामखोर काँग्रेसचा काही हात आहे? (सावरकरांसारख्या हिंदुत्वाभिमानी महापुरुषाला 'हिंदू तुरुंगा'त ठेवण्याऐवजी जाणूनबुजून 'सेक्युलर तुरुंगा'त त्यांची रवानगी करून त्यांना यातना देऊ पाहणार्‍या अधिक त्यांचा अपमान करू पाहणार्‍या इंग्रज सरकारचा त्रिवार निषेध! कोलूचा अपमान यापुढे काहीच नव्हे.)

पंगा 26/04/2011 - 00:25
अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या.
दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये? यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे?
एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.
हा भाग तर मुळीच कळला नाही. सावरकरांचे पुण्य "दलितांना 'शुद्ध' बोलायला शिकवणे" यात होते काय? (नाही म्हणजे, सावरकरांच्या कार्याबद्दल - विशेषतः दलितांसंबंधी केलेल्या कार्याबद्दल - प्रशंसा समजू शकतो. पण हे म्हणजे थोडेसे चुकीच्या गृहीतकांवरून भलत्याच गोष्टींची प्रशंसा केल्यासारखे होत नाही काय? आणि तेही बहुधा स्वतःच्याच पूर्वग्रहांतून? "दलितांची भाषा'शुद्धी'" वगैरे विचार सावरकरांच्या मनातही नसावेत, किंवा असलेच तर ते त्यांचे मुख्य उद्दिष्ट नसावे, असे मानावयास जागा आहे. शिवाय, "दलितांची भाषा, त्यांचे उच्चार शुद्ध नसतात" हे गृहीतक या वाक्यांमागे दडलेले आहे, जे अस्थानी आहे आणि तसेही तपासून पहावे लागेल. अशा परिस्थितीत अशी 'प्रशंसात्मक' वाक्ये - मग भले ती पु.लं.ची का असेनात - अनवधानाने का होईना, पण भलतेच काहीतरी सुचवून जात नाहीत काय? दुर्दैवाने, ही विधाने बहुधा प्रामाणिकपणे केलेली असावीत, यास बहुधा अनवधान कारणीभूत असावे, असे मानावयास जागा असल्याने, याला 'वामहस्त प्रशंसा'ही म्हणवत नाही. भाषणास उपस्थित अपेक्षित श्रोतृवर्ग - टार्गेट ऑडियन्स - नेमका कोणता होता, याची कल्पना नाही, परंतु भाषण निर्विघ्नपणे पार पडले असल्यास, एवढेच नव्हे, तर श्रोतृवर्गाच्या प्रशंसेचे धनी ठरले असल्यास, आश्चर्य वाटणार नाही.)
जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे!
सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते. (हा ब्याकड्राप लक्षात घेता, ते गाणे कोणीतरी बिनचूकपणे गाऊ शकते हे कौतुकास्पद आहे असे कोणाला वाटल्यास, ते क्षम्य असावे का, असा विचार मनात येऊ लागतो.) बाकी, उर्वरित भाषण उतरवून काढतानाही टंकलेखनाच्या चुका पदोपदी, मुबलक,आणि रसभंग करणार्‍या आहेत, ज्या पु.लं.नी स्वतः केल्या नसाव्यात, असे मानावयास जागा आहे. (हा बर्टुड रसेल कोण?) पुढील लेखनास शुभेच्छा.

In reply to by पंगा

चिंतामणी 26/04/2011 - 01:09
हा प्रतिसाद म्हणजे उगीचच पंगा घेण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ह्या प्रश्णांची उत्तरे मिळवायला खरे तर तुमची पु.लं.शी भेट व्हायला हवी. कारण त्याना तसे का वाटले हे तेच जास्त उत्तम रितीने सांगु शकतील. माझ्या अल्पमतीला जे समजले ते सांगायचा प्रयत्न करतो. दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये? यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे? अरेरे. पु.ल.वर केलेला हा आरोप आपली मनोवृती दर्शवतो. जो अर्थ त्या वाक्यात नाही तो आपण तेथे बळाने कोंबत आहात. असो. पु.लं.नी त्या दलीत महिलांच्या पुर्वस्थितीचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या परिस्थीतीत (आर्थिक आणि मानसीक) जो बदल त्यांना जाणवला त्यामुळे त्यांच्या अंगावर काटा आला. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला. स्वा.सावरकरांनी द्लितोध्दारासाठी, समाजसुधारणेसाठी जे काम केले आहे त्याची आपल्याला माहिती नसणार. ती आधी करून घ्या. म्हणजे असली शेरेबाजी करणार नाहीत तुम्ही. स्वा.सावरकरांनी केलेल्या कामामुळे दलीतांची आर्थीक आणि मानसीक स्थिती सुधारली (त्यांचा आत्मविश्वास त्या महिलांमधील बदलामुळेच कळला) हे त्या कामाचे फळ आहे असे पु.लं.ना म्हणायचे आहे. सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते. ओ हो हो. असे आहे होय. हे सांगण्यासाठी एव्हढे पांडित्य दाखवले होय. मग बरोबर. आपली छिद्रान्वेशीवृती यामुळ प्रकट झाली हे ही नसे थोडके.

@प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. आभासी जगतात सावकारांचे कार्य मिपावर उत्तमरीत्या चालले आहे , चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो . लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद . सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते. + १ विज्ञान हाच एकमेव धर्म आहे .अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्य

In reply to by निनाद मुक्काम …

पंगा 26/04/2011 - 01:55
चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो .
उदाहरण तितकेसे चपखल नाही. चेहरापुस्तक, खरडवही हे शब्द नको तितके सुटसुटीत आहेत. (शिवाय, नक्की खात्री नाही, पण 'चेहरा' हा शब्द बहुधा 'यावनी' - म्हणजे काय कोण जाणे - आहे. याने की आक्षेपार्ह.) फेसबुकसाठी 'वदनग्रंथ'सारखे पर्याय अधिक सयुक्तिक ठरले असते. (खरडवहीसाठी प्रतिशब्दाबद्दल विचार करावा लागेल.)
अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्य
गायीला खाद्य करण्यासाठी सावरकरवादाची (किंवा गायीचीही) कास धरावी लागत नाही. (स्वानुभवाने सांगतो.) (अतिअवांतर: केरळमधील हिंदुबांधवांत गोमांसभक्षण निषिद्ध मानले जात नाही, किंबहुना केरळबाहेरील 'मेनस्ट्रीम' हिंदुत्वात असा काही निषेध आहे, असे त्यांच्या अनेकदा गावीही नसते, असाही अनुभव आलेला आहे.)

@पंगा आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे आम्ही सर्व उपकृत होऊ गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही . बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ? आपल्या महाराष्ट्रात जेथे माझे व बहुदा तुमचे बालपण गेले तेथे ज्या रूढी पाळल्या जातात त्याच्या अनुषंगाने मी लिहिले .

In reply to by निनाद मुक्काम …

पंगा 27/04/2011 - 18:27
आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे आम्ही सर्व उपकृत होऊ
'चेहरापुस्तक' वगैरे शब्दांस माझा आक्षेप नाही. (मला ते बर्‍यापैकी सुटसुटीत आणि मराठीस त्या मानाने बरेच जवळचे वाटतात.) मुद्दा एवढाच आहे, की असे सुटसुटीत मराठीकरण हे 'सावरकरी' वाटत नाही. आणि 'यावनी' वगैरे आक्षेप माझे नाहीत. सावरकरांचे असू शकतात. तेव्हा, 'गटणेछाप' शब्दांकरिता माझे उपकार मानू नका. ते श्रेय योग्य ठिकाणीच गेलेले बरे. ('वार्ताहर' वगैरे शब्दांचे एवढे काय कौतुक ते कळत नाही. 'खबर्‍या', किंवा गेला बाजार 'बातमीदार' वगैरे शब्दांत काय वाईट आहे? 'बातमीदार' तर मराठीत छान रुळलेला आहे. त्या मानाने 'वार्ताहर' हा छापील मराठी वगळता एरवी कोण कुठे वापरतो? आणि तिथेदेखील - म्हणजे छापील मराठीत - 'बातमीदार' हा शब्द आजमितीस जवळपास तेवढ्याच प्रमाणात वापरला जात असावा. मग 'वार्ताहर'चे एवढे काय अप्रूप? 'हुंडी'सारखे शब्द-संकल्पना मराठीत अगोदरपासून असताना 'धनादेश' कशासाठी? (आणि तसेही छापील मराठी वगळता 'धनादेश' कोण वापरतो?) 'खाणावळ' असताना 'उपाहारगृह' कशासाठी? 'आपल्याला संस्कृत शब्द माहीत आहेत, आणि आपण त्यांची जुळवाजुळव करू शकतो' हे दाखवण्यासाठी? 'महापौर' हे तर सरळसरळ 'फर्स्ट सिटिझन'चे रूपांतर वाटते. अर्थात, रूपांतरात काही गैर नाही, आणि 'मेयर' हा शब्द मराठीत अनैसर्गिक वाटतो हे खरेच आहे, पण 'महापौर' तरी आपण खर्‍या अर्थाने अंगीकारला आहे का? अनेकदा तो बोलीत ओढूनताणून 'म्हापौर' होतो, काहीतरी अनैसर्गिक - म्हणजे मराठीत अनैसर्गिक - शब्द उच्चारल्यासारखा. त्यातून 'शहराचा प्रमुख नागरिक' हा अर्थ किती जणांना चटकन लक्षात येतो? 'मेयर' ओढूनताणून म्हणायचा तसाच 'महापौर' - 'म्हापौर' ओढूनताणून म्हणायचा, इतकेच. तो शब्द म्हणताना त्या शब्दाबद्दल आपुलकीची भावना खरोखरच किती जणांना येते? त्यापेक्षा 'पाटला'च्या किंवा 'पुढार्‍या'च्या धर्तीवरचा पण शहरी पातळीवरचा एखादा मराठी सुटसुटीत शब्द नसता का बनवता आला? 'म्होरक्या'ही एक वेळ चालू शकला असता. पण तो सोडून देऊ. 'शहरप्रमुख', किंवा 'शहर' यावनी वाटतो तर 'नगरप्रमुख', 'नगरमुख्य', 'नगरनायक' किंवा 'नगरनाईक' वगैरे नसते चालू शकले? सुटसुटीतही झाले असते, 'मराठी'ही झाले असते आणि त्यातून सुचवायचा अर्थ लोकांना चटकन सुचलाही असता. 'महापौर'ने नेमका कोणाला काय अर्थबोध होतो? किंवा, तसेच बघायला गेले, तर 'वार्ताहर'मधून 'वार्ता खेचून आणणारा' हा अर्थ कोणाला सांगितल्याशिवाय लक्षात येतो? 'बातमीदार'मधून 'बातमी देणारा' हे चटकन समजते तरी. अतिअवांतर: 'वार्ता खेचून आणणारा' मध्ये एका प्रकारची 'वार्ता बाहेर येत नसली, घडत नसली, तरी खेचून, म्हणजे शब्दशः "ओढून किंवा ताणून" अर्थात "ओढूनताणून" आणणारा' अशी छटा येते. 'बातमीदार'मधून 'घडते तशी बातमी निमूटपणे देणारा' असा अर्थ प्रतीत होतो. सावरकरांना 'तहलका'छाप पत्रकारिता अभिप्रेत होती काय? सावरकर द्रष्टे असल्याबद्दल ऐकलेले आहे, पण इतकेही द्रष्टे असतील असे वाटले नव्हते. आदर वाढला.)
गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही .
मला सोयीच्या नसतील तर जुन्या रूढी मीही पाळत नाही. पण त्याकरिता सावरकरांना मध्ये का आणायचे?
बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ?
तो मुद्दा थोडा अवांतर होता. पण नाही म्हटले तरी त्याला प्रयोजन आहे. केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे. थोडक्यात, (हिंदू असूनही) गोमांसभक्षण करण्याकरिता सावरकरवादाची आवश्यकता नसावी, एवढाच मुद्दा आहे.

In reply to by पंगा

चिंतामणी 28/04/2011 - 02:01
केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे. काय तर्कवाद आहे आपला. वाह रे वाह. आपण महान आहात. मला माहीत आहे की झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला करता येत नाही. तरिही मी पुन्हा एकदा विनंती करतो की "विज्ञाननिष्ठ निबंध" (भाग पहीला ५ आणि भाग दोन ८ निबंध), जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख (पूर्वार्ध) व (उत्तरार्ध), जात्युच्छेदक निबंध (सुमरे ३८ निबंध), क्ष किरणे (१५ लेख) हे स्वा.सावरकरांनी १९२२ पासुन १९४० पर्यन्त लिहीले वैचारीक निबंध त्याकाळाच्या पार्श्वभूमीवर वाचा. आपण आज जे (उरफाटे) प्रतिसाद देत आहात ते २०११ मधे याचे ध्यान असू द्यात. त्यांनी विचार ज्या काळात मांडले आणि त्याचा पाया ह्याबद्दल माहिती करून घ्या आणि मग पुन्हा एकदा प्रतीसाद द्या. महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार. कप्पाळ. अवांतर- विश्वास कल्याणकर हे सध्या पुर्वाचलाबद्दल छान लेख लिहीत आहेत आणि तेथे होणा-या कार्याची माहिती देत असतात. ते जी परीस्थीती वर्णन करतात ( विषेशतः धर्मांतरबद्दल) ते वाचताना स्वा.सावरकरांच्या दोन लेखांची प्रकर्शाने आठवण झाली. हिंदू नागलोक ख्रिश्चन का होतात (१९३१)नाग लोकांची सद्यस्थिती हे लेख सर्वांनीच वाचावेत.

In reply to by चिंतामणी

पंगा 28/04/2011 - 02:12
महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार.
माझ्या समजुतीकरिता विचारतो. केरळीय हे महाराष्ट्रीयांपेक्षा, खास करून महाराष्ट्रातील सुशिक्षितांपेक्षा (खास करून समजुतीत) कमी प्रतीचे असतात, असा आपला दावा आहे काय? (अरेरे! हीच का ती 'आसिन्धुसिन्धुपर्यन्त हिन्दुबान्धवां'बद्दलची आत्मीयता? आणि तीसुद्धा (सावरकर न कळतासुद्धा) 'गाय हा एक उपयुक्त (खाद्य)पशू आहे' हे सावरकरतत्त्व नीट कळणार्‍या हिन्दुबान्धवांबद्दल??? सावरकरांचा आत्मा आपल्या विद्युद्दाहिनीत गरगर फिरू लागेल ना हे ऐकून!)

In reply to by पंगा

अहो पंगा शेठ निव्वळ पंगा ह्यायचा म्हणून कशाला मुद्दे मांडत आहात . मुळात आपण केरळ वाशियांचे उदाहरण चुकीच्या मुद्यावर देत आहात . त्यांच्यात गोमास खात असतील ( ह्यात सावरकरांचा संबंध येत नाही ) हे मलाही मान्य आहे . पण महारष्ट्रात जेथे तुम्ही आम्ही जन्मलो तेथे अजूनही स्वस्त असून भावनिक व धार्मिक मुद्यावरून गोमास भक्षण होत नाही .हीच परिस्थिती बहुसंख्य हिंदूची आहे .ह्यात सावरकरांचे गाय ही उपयुक्त पशु आहे हे विधान आजही महाराष्ट्रातील काय पण बहुसंख्य हिंदू समाजाला जड जाते .( ही आजची परिस्थिती तर त्या काळात त्यांचे विचार नक्कीच ....) तुम्हाला माझे म्हणणे पटावे हा आग्रह नाहे . परत दुसरा मुद्दा कि वीज .......... अहो एक साधी गोष्ट आहे .तुम्ही चुलीवर पाणी तापवायला लाकडे वापरा नी तेवढेच पाणी हिटर मधून ध्या .( स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून तुम्ही हिटर ची निवड कराल ) स्वतः तुमच्या घरात आंघोळीला पाणी हे बंबात लाकडे न घालता एकत्र गिझर किंवा नैसर्गिक वायूवर तापत असेल कारण ह्यात प्रदूषण कमी होते व ते तुलनात्मक रीत्या वापरायला सुलभ असते .) आज मुंबईत बहुसंख्य स्मशानात विद्युत दाहिनी आहे .कारण लाकडापेक्षा तो पर्याय सुलभ आहे म्हणूनच ना . ही साधी गोष्ट लक्षात न घेता उगाच कीस काढण्यात काय अर्थ आहे . महाराष्ट्रातील अवांतर ( पंगा शेठ आता पर्यत आमचे मुद्दे खोडण्यात तुम्ही धन्यता मनात आला तुम्हाला एक प्रश्न ) गायीबद्दल तुमचे मत काय ? तुम्ही अभक्ष भक्षण करतात का ? मते मत मी आधीच मांडले आहे .ह्याबाबतीत ( तुम्ही तुमचे मत मात्र गुलदस्त्यात ठेवून ......)

In reply to by पंगा

अहो पंगा शेठ निव्वळ पंगा ह्यायचा म्हणून कशाला मुद्दे मांडत आहात . मुळात आपण केरळ वाशियांचे उदाहरण चुकीच्या मुद्यावर देत आहात . त्यांच्यात गोमास खात असतील ( ह्यात सावरकरांचा संबंध येत नाही ) हे मलाही मान्य आहे . पण महारष्ट्रात जेथे तुम्ही आम्ही जन्मलो तेथे अजूनही स्वस्त असून भावनिक व धार्मिक मुद्यावरून गोमास भक्षण होत नाही .हीच परिस्थिती बहुसंख्य हिंदूची आहे .ह्यात सावरकरांचे गाय ही उपयुक्त पशु आहे हे विधान आजही महाराष्ट्रातील काय पण बहुसंख्य हिंदू समाजाला जड जाते .( ही आजची परिस्थिती तर त्या काळात त्यांचे विचार नक्कीच ....) तुम्हाला माझे म्हणणे पटावे हा आग्रह नाहे . परत दुसरा मुद्दा कि वीज .......... अहो एक साधी गोष्ट आहे .तुम्ही चुलीवर पाणी तापवायला लाकडे वापरा नी तेवढेच पाणी हिटर मधून ध्या .( स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून तुम्ही हिटर ची निवड कराल ) स्वतः तुमच्या घरात आंघोळीला पाणी हे बंबात लाकडे न घालता एकत्र गिझर किंवा नैसर्गिक वायूवर तापत असेल कारण ह्यात प्रदूषण कमी होते व ते तुलनात्मक रीत्या वापरायला सुलभ असते .) आज मुंबईत बहुसंख्य स्मशानात विद्युत दाहिनी आहे .कारण लाकडापेक्षा तो पर्याय सुलभ आहे म्हणूनच ना . ही साधी गोष्ट लक्षात न घेता उगाच कीस काढण्यात काय अर्थ आहे . महाराष्ट्रातील अवांतर ( पंगा शेठ आता पर्यत आमचे मुद्दे खोडण्यात तुम्ही धन्यता मनात आला तुम्हाला एक प्रश्न ) गायीबद्दल तुमचे मत काय ? तुम्ही अभक्ष भक्षण करतात का ? मते मत मी आधीच मांडले आहे .ह्याबाबतीत ( तुम्ही तुमचे मत मात्र गुलदस्त्यात ठेवून ......)

In reply to by पंगा

हुप्प्या 02/05/2011 - 06:56
भाषा ही नव्या शब्दांमुळे समृद्ध होते. आता ते शब्द लोकप्रिय होतात की नाही हे लोकांवर अवलंबून आहे. सावरकर आणि सावरकरवादाची पराकोटीची अ‍ॅलर्जी असणारे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नाक मुरडतात. पण मराठी भाषा इतकी पूर्वग्रहदूषित नाही. म्हणूनच महापौर, कॉलम करता स्तंभ असे शब्द रुळले आहेत. बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला? किंवा रायटर असताना ऑथर कशाला असे विचारण्यासारखे मूर्खपणाचे आहे. हे शब्द वापरणारा आपली व ऐकणार्‍याची वा वाचणार्‍याची कुवत बघून शब्द निवडतो/ते आणि वापरतो/ते. सावरकरांचा फारसी विरोध आणि संस्कृत प्रेम सगळ्यांनी आपलासा करावा असे नाही. पण ह्या प्रेरणेतून सावरकरांनी जे उत्तम शब्द निर्माण केले तेही नाकारणे हे आंधळ्या द्वेषाचे उदाहरण आहे. संस्कृतवर असणारे प्रभुत्व, भाषेची प्रतिभा ह्यातूनच चांगले नवे शब्द बनू शकतात. नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे. शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्‍यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.

In reply to by हुप्प्या

सुनील 02/05/2011 - 07:18
सावरकरांचा फारसी विरोध आणि संस्कृत प्रेम सगळ्यांनी आपलासा करावा असे नाही. सहमत! त्याची काहीही आवश्यकता नाही. पण ह्या प्रेरणेतून सावरकरांनी जे उत्तम शब्द निर्माण केले तेही नाकारणे हे आंधळ्या द्वेषाचे उदाहरण आहे. दिनांक आणि क्रमांक ह्या दोन शब्दांचे उदाहरण घेऊ. हे दोन्हीही शब्द आजदेखिल बव्हंशी लेखी मराठीतच वापरले जातात. बोली मराठीतून तारीख आणि नंबर हे शब्द अजिबात हद्दपार झालेले नाहीत. संस्कृतवर असणारे प्रभुत्व, भाषेची प्रतिभा ह्यातूनच चांगले नवे शब्द बनू शकतात. मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.

In reply to by सुनील

प्रदीप 02/05/2011 - 12:28
मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.
किंबहुना जी भाषा आम जनतेची भाषा होऊ शकली नाही (किंवा तसे तिला मुद्दामच होऊ दिले नाही) तिच्या कुबड्या मराठीस कशाला हव्यात? आपल्या माथ्यावर जी शासकीय मराठी मारली जात आहे, ती असल्या उद्योगाचे उत्तम उदाहरण आहे. 'शासन' काय, 'संपन्न' काय, 'प्रभावित' काय...!!

In reply to by प्रदीप

पंगा 02/05/2011 - 21:51
अगदी नेमके. आणि हे मराठीच्याच बाबतीत होते अशातलाही भाग नाही. 'ठंडा पानी' असे छान कोणालाही कळेल अशा हिंदीत लिहिता येत असताना, 'शीतल जल' कशासाठी? पण (उत्तरेतल्या) रेल्वे स्टेशनांवर असल्या पाट्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे, हा सरसकट 'बाबू मेंट्यालिटी'चा भाग असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by प्रदीप

मैत्र 03/05/2011 - 10:48
सार्वत्रिक भाषा होऊ दिली नाही वगैरे जरी खरं असलं तरी म्हणून भाषा म्हणून संस्कृत ला बाजूला सारणे आणि कुबड्या म्हणणं तितकंच संकुचित आहे. भारतातल्या बहुतेक भाषांमध्ये (अगदी द्राविड सुद्धा) बरेच संस्कृतोतद्भव शब्द आहेत. दक्षिणेत अनेक शब्द बोली भाषेत आजही अतिशुद्ध स्वरुपात वापरले जातात. त्यात कोणाला काही अडथळा येत नाही. यापद्धतीने मराठीतले जे काही 'तत्सम' शब्द आहेत ते काढून टाकावे लागतील. संस्कृत बोली भाषा होऊ शकली नाही / होऊ दिली नाही म्हणून शब्दांना विरोध करण्यात काहीच हशील नाही. ते घनगोल गट्टू आणि लोहरथ असले शब्द फक्त त्या फालतू विनोदापुरतेच असतात. वार्ताहर नाही पण महापौर हा शब्द चांगलाच रुळला आहे. मग जसं त्यांनी विरोधासाठी विरोध केला तसंच करण्यात अर्थ नाही. शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.

In reply to by मैत्र

प्रदीप 03/05/2011 - 19:47
शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.
शासकीय मराठी व हिंदीही, विनाकारण संस्कृताळलेली आहे, असे नाही वाटत आपणास? ही वर आपण सर्वांनी दिलेली उदाहरणे संकृतशी नाळ जोडूनच तर आहेत की! ही असली शब्दावळ निर्माण करणार्‍यांची प्रेरणा व सावरकरांची प्रेरणा एकच असतील असे कुणी म्हणत नाही. सावरकरांनी त्यांच्या विशीष्ट निष्ठेमुळे हे केले, इथे काही बाबू लोक स्वतःसाठी कामे निर्माण करण्यसाठी व ती सुरू ठेवण्यासाठी करताहेत हा फरक आहे खरा, पण शेवटी परिणाम एकच.

In reply to by सुनील

हुप्प्या 03/05/2011 - 06:38
>>मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे. संस्कृत ही मराठीची आई म्हणण्याइतकी त्या भाषेची मराठीशी जवळिक आहे. असे असताना संस्कृतचा आधार घेणे काहीही चूक नाही. इंग्रजी शब्द बनवताना सर्रास लॅटिनचा आधार घेतला जातो. इंग्रजीतील मेडिकल संज्ञा बघा. मुळात मराठी ही तशी अर्वाचीन भाषा आहे त्यामुळे काही बाबतीत तिला मर्यादा आहेत. संस्कृतचा आधार घेणे आजिबात चुकीचे वाटत नाही. तुम्हाला संस्कृतचा तिटकारा असेल तर तो तुमचा दृष्टीकोन. तो तुम्हाला लखलाभ असो.

In reply to by हुप्प्या

पंगा 02/05/2011 - 22:10
बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला?
'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत.
नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे.
'वार्ताहर' हा (किंवा अन्य कुठलाही) शब्द मराठी(!)त बनवण्यास per se आक्षेप नाही. 'बातमीदार' सारखा शब्द मराठीत असताना, लोकांच्या तोंडी रुळलेला असताना, केवळ त्याचे मूळ 'यावनी' (पक्षी: 'त्यांचे') आहे एवढ्याच कारणास्तव तो हटवण्याच्या आणि त्याजागी ओढूनताणून जुळवलेला संस्कृतोद्भव (पक्षी: 'आपला') शब्द घुसडण्याच्या अट्टाहासाला विरोध आहे. (आजमितीस पाव खाल्ल्याने - किंवा शर्टप्यांट घातल्याने - जसा माणूस बाटू नये, तशीच रुळलेला 'परकीय' शब्द वापरण्याने भाषाही बाटू नये.)
शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्‍यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.
नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा? 'जगरनॉट', 'शांपू' असे शब्द वापरण्याने इंग्रजांचे स्फुल्लिंग (म्हणजे काय कोण जाणे!) विझते काय? बाकी चालू द्या.

In reply to by पंगा

हुप्प्या 03/05/2011 - 06:48
>>नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा? सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. संस्कृत ही स्थानिक भाषा आहे. मराठीला ती आईसारखी आहे म्हणून संस्कृत शब्दांचे पर्याय उपलब्ध असावेत. त्याकरता त्यांनी आपली प्रतिभा, आपले संस्कृत प्रभुत्व पणाला लावले आणि काही चांगले शब्द निर्माण केले. ते स्वीकारायला आडकाठी का? तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का? नवे शब्द बनवायला प्रतिभा लागते. नव्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते ह्याविषयी दुमत नसावे. व्यक्तीशः मला फारसी शब्दांची आलर्जी नाही. पण तरी सावरकरांनी निर्माण केलेले अनेक शब्द मला आवडतात. सावरकरांनी निर्माण केलेले असे अनेक शब्द आहेत जे लोकांच्या पचनी पडले नाहीत. हे चालायचेच. >>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत. असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.

In reply to by हुप्प्या

नितिन थत्ते 03/05/2011 - 09:36
>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे. कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे. जुनीच शंका पुन्हा विचारतो. इस्पात हा शब्द संस्कृतात वापरला जात होता का? वापरला असेल तर हल्ली इस्पातपुरुष न म्हणता लोहपुरुष असे का म्हटले जाते? विचारण्याचे कारण लोह म्हणजे शुद्ध लोखंड हे इस्पातापेक्षा फारच कमकुवत आणि बहुतांशी निरुपयोगी असते. (काळेकाका कन्फर्मेशन देतीलच). [की वर दिलेल्या लोह आणि इस्पात मधील फरकानुसार इस्पातपुरूषा पेक्षा लोहपुरूष हे त्या संबोधनाने सूचित होणार्‍या व्यक्तीचे अधिक अचूक वर्णन आहे?] *सौजन्याची ऐशीतैशी असे एक नाटक पूर्वी आलेले होते. त्यात नाना बेरके यांचे एरवी शेजार्‍यांशी भांडणारे कुटुंब सौजन्य सप्ताह पाळण्याचे ठरवते. त्यात ते "गांडीवर लाथ मारीन" ऐवजी "गुदद्वारावर लत्ताप्रहार करीन" असा शब्दप्रयोग करतात. तसे काहीसे या प्रेरणेबाबत वाटते.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 03/05/2011 - 12:19
त्यात ते "गांडीवर लाथ मारीन" ऐवजी "गुदद्वारावर लत्ताप्रहार करीन" असा शब्दप्रयोग करतात. तसे काहीसे या प्रेरणेबाबत वाटते. स्वा.सावरकरांना या पातळीवर आणून ठेवल्याबद्दल त्रिवार प्रणाम. ___/\___ ___/\___ ___/\___ आपल्या महान विचारश्क्तीला सलाम.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 03/05/2011 - 16:59
कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे.
'अधिनियम' म्हणजे 'कायदा' किंवा कसे याबद्दल खात्री नाही, पण आजकाल 'विधी' हा शब्द त्या अर्थी वापरला जात असावा, असे वाटते. म्हणजे, निदान कायदेमंडळाला तरी 'विधीमंडळ' म्हणतात बॉ. यावरून, विधीमंडळात सकाळीसकाळी पास झालेल्या कायद्याला 'प्रातर्विधी' आणि दिवसाअखेरीस पास झालेल्या कायद्याला 'अंत्यविधी' म्हणावे किंवा कसे, हे कळत नाही.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 03/05/2011 - 17:10
>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे.
नेमके! (किंवदंतेवरून) 'साहेब' हा शब्द यावनी आहे, त्याऐवजी 'राव' वापरावा. 'बाळासाहेब' नाही म्हणायचे, 'बाळाराव' म्हणायचे, असा अट्टाहास. म्हणजे बहुधा 'आईसाहेब' म्हटलेले चालू नये, 'आईराव' म्हणावे लागावे. "म्हणजे यांना 'आई'मागे 'साहेब' लागलेला चालत नाही, 'राव' लागलेला चालतो" असे कोणी का म्हणू नये?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 03/05/2011 - 18:16
---------खुलासा सुरू ------------ माझ्या प्रतिसादातील वाक्य हे मला "सावरकरांच्या कुठे लाथ घालावी असे वाटून" लिहिले असल्याचा समज झालेला दिसतो. माझे मराठी लेखन इतके सुमार नसावे. साध्या शब्दांऐवजी संस्कृताळलेले शब्द वापरले की ते स्वीकारार्ह होतात या प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून ते नाटकातील वाक्य लिहिलेले आहे. --------- खुलासा संपला. --------- अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का? बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे.

In reply to by नितिन थत्ते

अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का?
हॅ हॅ हॅ ते नसते तर तुम्ही हे वाक्य लिहिले असते का?

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 03/05/2011 - 18:39
माझ्या प्रतिसादातील वाक्य हे मला "सावरकरांच्या कुठे लाथ घालावी असे वाटून" लिहिले असल्याचा समज झालेला दिसतो. माझे मराठी लेखन इतके सुमार नसावे. गैरसमज नसावा. आपली प्रतीभा उत्तुंग भरा-या मारत आहे हे सगळेजण बघतच आहेत. आपण आपल्या प्रतीभेने स्वा.सावरकरांच्या भाषासुध्दी मोहीमेला ज्या पातळीवर आणून ठेवले आहेत त्याला आक्षेप आहे. बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे. स्वा. सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्माण झालेल्या कुठकुठल्या काव्याचे, पुस्तकाचे, लेखन प्रकाराचे वाचन केले आहेत?????????? त्यांची " प्रतिभा " योग्य स्थानी कुठेच खर्च झाली नाही असे आपले मत आहे का?

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 03/05/2011 - 19:12
>>त्यांची " प्रतिभा " योग्य स्थानी कुठेच खर्च झाली नाही असे आपले मत आहे का? असा दावा मी केला असल्याचे आठवत नाही. >>स्वा. सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्माण झालेल्या कुठकुठल्या काव्याचे, पुस्तकाचे, लेखन प्रकाराचे वाचन केले आहेत?????????? १. १८५७ चे स्वातंत्र्य समर २. विज्ञाननिष्ठ निबंध ३. माझी जन्मठेप धन्यवाद. सावरकरांच्या प्रतिभेविषयी कुठलीही शंका नाही. केवळ परकीय भाषेतले शब्द आहेत म्हणून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिभा खर्च करण्यावर आक्षेप आहे. मी आंधळा गांधीभक्त असल्याचा आरोप माझ्यावर अनेकदा होतो. पण गांधींच्या ग्रामस्वराज्य, निसर्गोपचार, दलितविषयक दृष्टीकोण आदि गोष्टींवर कोणी टीका केली तर मी त्याचा प्रतिवाद करीत नाही. पक्षी आंधळी भक्ती नाही. तसेच सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेला नेहमीच सलाम करीत आलो आहे. परंतु इथे आंधळी सावरकरभक्ती उघड दिसू लागली आहे. आणि सावरकरांच्या कुठल्याच गोष्टीवर टीका करायची नाही असा दृष्टीकोन दिसतो आहे.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 03/05/2011 - 19:48
परन्तु "बाकी नवे शब्द बनवण्यात प्रतिभा तर आहेच. पण ती अस्थानी खर्च झाली आहे असे माझे मत आहे" ह्या वाक्यातुन तेच ध्वनीत होत आहे. बाकी तीन पुस्तकांची नावे दिलीत. धन्यु. अजून वाचण्यासारखे खूप बाकी आहे. समग्र सावकर वाङमय याचे एकुन ८ खंड आहेत. त्यातील तीसरा खंड वाचल्यास आपणास सुमारे १०० विविध विषयावरील निबंध / स्फुटे/ लेख वाचता येतील. त्यात १९३१ साली लिहीलेले " हिंदु नाग लोक ख्रिस्चन का होतात, नाग लोकांची सद्यस्थिती, माझ्या सनातन नाशीककर बंधुना अनावृत्त पत्र, चित्तपावन शिक्षण सहाय्यक संघ आणि बॅ.सावरकर असे काळाच्या आधी केलेले लिखाण (जे समजायला समाजाला अनेक वर्षे लागली) वाचायला मिळेल. चौथ्या खंडात सहा सोनेरी पाने, मनुस्मृतीतील महीला (५ लेख), बालपणाचे निबंध, लंडनची बातमीपत्रे, त्यांची विविध भाषणे इत्यादी वाचायला मिळेल. या भाषणात १९३७ साली भाषासुध्दी विषयीची दोन भाषणे आहेत ती जरूर वाचावीत. बाकी कमला काव्य, तनुवेल अशी रोमँटीक काव्ये, सिंहगड, बाजीप्रभु यांचे पोवाडे, शिवरायांची आरती, हिंदू नृसिंह इत्यादी अनेक विविध विषयांवरील काव्यांचा आस्वाद घ्यावा.

In reply to by हुप्प्या

पंगा 03/05/2011 - 17:30
>>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत. असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.
न्यूजरिपोर्टर हा बहुधा जर्नालिस्टामध्ये मोडावा, परंतु प्रत्येक जर्नालिस्ट हा न्यूजरिपोर्टर असेलच, असे नाही. 'केसरी'-'मराठा'कार लोकमान्य टिळक हे जर्नालिस्ट होते. न्यूजरिपोर्टर बहुधा नसावेत.
मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.
हेही वरकरणी पटण्यासारखे वाटत नाही. थोडा विचार करावा लागेल. सामान्य अर्थाने 'ऑथर' हा बहुधा 'रायटर'चा उपसंच मानता यावा. याशिवाय 'ऑथर'ला (लिखाणाशी थेट संबंध नसलेल्या) इतरही अर्थच्छटा आहेत. (पहा: writer आणि author.) 'रायटर' हा बहुधा काहीही लिहिणारा व्हावा. (म्हणजे, ऐन परीक्षेच्या वेळी जर एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, तर त्याची परीक्षा बुडू नये म्हणून त्याने सांगितलेली उत्तरे सांगितल्याबरहुकुम लिहिणारा जो लेखनिक अनेकदा दिला जातो, त्यालाही 'रायटर' म्हणतात. तो त्या लेखनाचा 'ऑथर' होऊ शकत नाही.) 'ऑथर'मध्ये लेखनस्वामित्व अभिप्रेत असते. तसेच 'ऑथर' हा कोणत्याही निर्मितीचा कर्ता असू शकतो; लेखनाचाच, असे नव्हे. थोड्या व्यापक अर्थाने, एखाद्या कृतीचे निर्मितीस्वामित्व ज्याला दिले जाऊ शकते, तो त्या कृतीचा 'ऑथर' ठरू शकतो. वरील दुव्यावरील 'ऑथर ऑफ अ क्राइम'ऐवजी 'रायटर ऑफ अ क्राइम' म्हणता येणार नाही.

In reply to by हुप्प्या

पंगा 03/05/2011 - 17:54
तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का?
या शब्दांचा द्वेष नाही. या शब्दांना, आणि अशा शब्दांमागच्या रुळलेले शब्द केवळ परकीय (विशेषतः फारसी-अरबी) भाषांतून उद्भवलेले आहेत म्हणून त्यांच्या उच्चाटनामागील द्वेषभावनेला, विरोध जरूर आहे. शब्दाचा उगम फारसीतून असो किंवा अरबीतून असो किंवा इंग्रजीतून, एकदा तो शब्द मराठीने स्वीकारला, तो मराठीत रुळला, की तो मराठी. मग अशा मराठी शब्दांचे उच्चाटन करून त्याजागी दुसरा एखादा स्वनिर्मित शब्द लादण्याला विरोध आहे. फारसी, अरबी शब्द हे जर मराठीत यावनी बलात्काराने आले असतील, तर त्याच न्यायाने हे कृत्रिम संस्कृतोद्भव शब्द मराठीत सावरकरी बलात्काराने आलेले आहेत, असे म्हणावे लागेल. (मराठीत परंपरेने आलेल्या तत्सम, तद्भव शब्दांना विरोध नाही. नवीन संकल्पनांकरिता, जोपर्यंत त्या संकल्पना नवीन आहेत आणि त्यांसाठी एखादा शब्द - कोणतेही मूळ असलेला - रूढ नाही तोपर्यंत आणि तोपर्यंतच, नवीन शब्द बनवायलाही तितकासा* आक्षेप नाही. विरोध आहे तो रूढ शब्दांच्या ठिकाणी असल्या लादलेल्या शब्दांना.) * अशा संकल्पनांकरितासुद्धा एखादा शब्द मुद्दाम बनवण्याऐवजी सामान्य वापरातून नैसर्गिकरीत्या आलेला कधीही बरा. पण बनवायचाच झाला, तर तो मराठीच्या स्वभावाशी शक्यतो मिळताजुळता असावा. केवळ संस्कृत ही आपली पुरातनभाषा आहे म्हणून संस्कृतातून ओढूनताणून बनवलेला नसावा. 'रेस्तराँ'(मराठीत 'रेष्टॉरंट')करिता 'उपाहारगृह' किंवा 'भोजनालया'ऐवजी 'खाणावळ' हा शब्द त्या दृष्टीने मराठीशी मिळताजुळता आणि अधिक जवळचा आहे. बहुधा आधीपासून रूढ असावा आणि नैसर्गिकतःही बनला असावा. (खात्री नाही.) मग मुद्दाम 'उपाहारगृह' कशासाठी? कोणालातरी भारदस्त वाटते म्हणून?

नितिन थत्ते 27/04/2011 - 10:05
"दलितांनी अस्खलित जयोस्तुते म्हणण्याच्या" वर्णनात आम्हाला मेकॉले साहेब दिसला.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 27/04/2011 - 19:04
नीटसे कळले नाही. (अंधुकसे कळल्यासारखे वाटत आहे, पण खात्री नाही.) म्हणजे भेदनीती वगैरे?

In reply to by पंगा

नितिन थत्ते 27/04/2011 - 22:36
मेकॉले साहेबांच्या नावावर एक ढकलपत्र जालावर फिरत असते त्या ढकलपत्रानुसार मेकॉले साहेबांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊन "इंग्रज बनवण्याचा" प्ल्यान आखला होता. तसे शिक्षण दिल्यावर हे शिकलेले भारतीय इंग्रजांसारखाच विचार करतील आणि ते शिक्षण दिल्याबद्दल आपले ऋणी राहून आपल्याला हवे तसे करतील अशी काहीशी योजना होती. त्याच प्रकारचा काही प्ल्यान सदरहु गृहस्थांनी चालवला होता की काय अशी शंका आली.

In reply to by नितिन थत्ते

पंगा 27/04/2011 - 23:32
पु.लं.च्या भाषणातील त्या विवक्षित मजकुराचा हा अभावित परिणाम (unintended consequence) समजावा काय? (माझ्याही मनाला ती शंका चाटून गेली. पण बहुधा पु.लं.ना तसे सुचवायचे नसावे असे वाटते.) मला वाटते आपण नेमके काय सुचवीत आहोत हे बहुधा पु.लं.च्याही लक्षात आले नसावे. (श्रोत्यांच्या तर नसावेच नसावे.) समाजाच्या एका विवक्षित स्तरातील नैसर्गिक विचारपद्धतीतून (या स्तरात पु.ल.ही आले आणि श्रोतेही आले.) हे अभावितपणे होत असावे. कितीही सुधारणावादी म्हटले, तरी शेवटी 'आपल्या' विरुद्ध 'त्यांच्या' स्तरांतील 'फरका'ची जाणीव आणि त्यातून 'त्यांच्या'बद्दल सद्भावनेनेही विचार करायचा झाला तरी त्यात येणारा एका प्रकारचा कॉंडेसेंडिंग टोन किंवा विचार हा कितीही नाही म्हटले तरी अभावितपणे डोकावत असावा. (हे विधान मी पु.लं.च्या विधानाच्या संदर्भात करत आहे; सावरकरांची तशी विचारसरणी होतीच, असा दावा नाही. असेलही, किंवा नसेलही. येथे तो मुद्दा नाही.) हा नैसर्गिक मनुष्यस्वभाव आहे, आणि याला अपवाद फारसे नसावेत. (इंग्रजांचे - मेकॉलेचेसुद्धा - इतरवर्णीयांबाबत नेमके हेच झाले असावे.) ('सावरकरांची - विशेष करून संस्कृतातील - पदे अस्खलितपणे म्हणता येऊ शकणे' याचे महत्त्व - आणि त्याची दालित्यलक्षणांशी सांगड - हे पु.लं.च्या किंवा श्रोतृवर्गाच्या स्तरात अभावितपणे होऊ शकते. सावरकरांचे विचार तसे असतीलच, असे सांगता येत नाही.) (समाजाच्या त्या विवक्षित स्तरातसुद्धा सुधारणावादी म्हणवण्याची विविध उपगटांत अहमहमिका असली, तरी शेवटी थोड्याफार फरकाने सगळे सारखेच असावेत. 'स्तर वेगळे आहेत आणि आपण त्यापैकी तथाकथित उच्च स्तराचे घटक आहोत' याची जोपर्यंत जाणीव आहे - मग 'ते स्तर वेगळे असू नयेत' ही भावना असली तरी - तोपर्यंत हे अभावितपणे व्हायचेच. त्याला इलाज नाही. मनुष्यस्वभाव आहे.) थोडक्यात, पु.लं.ना जाणूनबुजून तसे सुचवायचे नसावे - कदाचित येथे पु.लं.च्या स्वत:च्या अभावित विचारपद्धतीचे सावरकर बळी होत असावेत - असे मानायला जागा आहे. परंतु तसे सूचित होत आहे, हे निश्चित. अर्थात, त्याकरिता सावरकरांना दोष देता येणार नाही. (तसा तो देण्याचा माझा उद्देश नाही, आणि आपलाही नसावा, याची खात्री आहे.)

In reply to by पंगा

नितिन थत्ते 28/04/2011 - 08:36
दोष सावरकरांना नाहीच. पुलंनाही पूर्ण दोष नाही. परंतु संस्कृतात असलेले धृवपद अस्खलित म्हणता येणे ही दलितोद्धार झाल्याची खूण समजली जाण्याला आहे . त्या विशिष्ट संस्थेच्या चालकांची काय मनोधारणा होती हे माहिती नाही त्यामुळे ते मेकॉलेगिरी करीत होते असे म्हणता येईलच असे नाही. पण मेकॉले आठवला हे मात्र खरे.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 03/05/2011 - 10:33
अवांतर : मेकॉले बद्दलचं ढकल पत्र त्यातला ठराविक छापाचा मजकूर पाहता तुम्हाला ज्या विचार धारणेची अ‍ॅलर्जी आहे अशा लोकांचा नेहमीचा propaganda असावा असं वाटतं. अमर्त्य सेन यांनी An Argumentative Indian या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात याचा संदर्भ दिला आहे (लॉर्ड मेकॉले च्या धोरणाचा - ढकलपत्राचा नव्हे). अमर्त्य सेन हे नेहरू आणि त्यांची धोरणे जास्त पसंत करत असावेत असं त्यांच्या लेखनावरून आणि भाजप विरोधी लेखनावरून वाटतं. तेव्हा ते विनाकारण असं विधान करतील असं वाटत नाही. तसंच अमर्त्य सेन बहुतेक गोष्टी त्यांच्या प्रबंधाच्या पद्धतीने कुठले तरी जुने पुराणे संदर्भ देऊन लिहितात तेव्हा हे खरं असावं. वरील प्रतिसादात ढकल पत्रा इतकाच ठराविक छापाचा शिक्का मारण्याच्या पद्धतीचा कल जाणवला ...

प्यारे१ 28/04/2011 - 16:34
सुंदर भाषण. अवांतर : अपेक्षित व्यक्तींच्या अपेक्षित प्रतिक्रिया. त्यावर अपेक्षित चर्चाचक्र. स्वप्रांता/ देशाबाहेर राहणारे लोक जास्त भारतीय होतात (मिपा च्या केसमध्ये महाराष्ट्रीय- मराठी) हे पुन्हा दिसून आले. अकारण वाद करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे कळत नाही. मडके आधीच भरलेले असेल तर त्यात नवीन पाणी ग्रहण करण्याची क्षमता नसते त्यामुळे नवीन आलेले/ मिळालेले ज्ञानजल आधीच्या मडक्यात साचलेल्या पाण्याबरोबर कलुषित होऊन वाहताना दिसते आहे. पुन्हा एकदा मलाव्यंचे भाषण सुंदर आहे. आणि क्रांतिसूर्यांबद्दल बोलण्याची पात्रता नाही.

चिंतामणी 28/04/2011 - 18:42
अवांतर : अपेक्षित व्यक्तींच्या अपेक्षित प्रतिक्रिया. त्यावर अपेक्षित चर्चाचक्र. स्वप्रांता/ देशाबाहेर राहणारे लोक जास्त भारतीय होतात (मिपा च्या केसमध्ये महाराष्ट्रीय- मराठी) हे पुन्हा दिसून आले. अकारण वाद करण्याच्या वृत्तीला काय म्हणावे कळत नाही. मडके आधीच भरलेले असेल तर त्यात नवीन पाणी ग्रहण करण्याची क्षमता नसते त्यामुळे नवीन आलेले/ मिळालेले ज्ञानजल आधीच्या मडक्यात साचलेल्या पाण्याबरोबर कलुषित होऊन वाहताना दिसते आहे. ___/\___ ___/\___ ___/\___

पैसा 28/04/2011 - 19:04
सावरकर हा विषय, आणि पु.ल. वक्ते म्हणजे सोने पे सुहागा. लेख सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता, त्याचं सार्थक झालं.

In reply to by पैसा

आनंदयात्री 29/04/2011 - 02:11
लेख अत्यंत आवडला. >>सावरकर हा विषय, आणि पु.ल. वक्ते म्हणजे सोने पे सुहागा. लेख सावकाश वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता, त्याचं सार्थक झालं. आणि प्रतिसाद वाचुन त्यावर पो पडला तिचायला.

प्यारे१ 03/05/2011 - 17:39
धागाकर्ता, धागाविषय आणि धाग्यातील व्यक्ती सोडून बाकी फक्त 'विद्वज्जनांना' (इतरांनी उगाच 'झगा' ;) ओढवून घेऊ नये) कृतानेक शिरसाष्टांग णमस्कार विणंती विशेष.

साहीत्य : मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, अशा बिनडोक माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे. २) ज्या दुकानदाराकडून हा लेख आणलेला आहे त्याचा मेंदू. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या दुकानदाराला मेंद/अक्कलू नाही या वर आपला ठाम विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे. पण आपण आणलेला मेंदू निघाला तर मग काय, मज्जाच मजा.... हा भाग आणताना तो नीट निवडून आणावा. त्यात भावना, विचार असले दगड असता कामा नयेत. मेंदू कसा असावा ......या मेंदूचा व लेखाचा खिमा ठो़ऊन आणावा. लेखाच्या व मेंदूच्या कशा ठिकर्‍या उडाल्या पाहिजेत ! शक्य झाल्यास ठोकणार्‍यास बाजूला सारून आपण स्वतःच ठोकावा. कदाचित त्याला कींव येऊन तो हळू ठोकेल. तशा खीम्याचा काय उपयोग ? शक्यतो जिवंत दुकानदाराचा मेंदू ठोकता आला तर फारच बरं ( हालाल !) हे करताना बरेच मित्र गोळा करावेत व त्या प्रसंगाचा आनंद घ्यावा. म्हणजे जेवताना याची आठवण करून करून डोळ्यात पाणी येईल. ३) जहाल शब्द, मसालेदार शब्द, व अजब तर्कशास्त्र. या खड्या मसाल्यांनी पदार्थ अधिक रुचकर बनतो. याच्यातला तिसरा मसाला फार महत्वाचा आहे आणि तो गुपचूप वापरायचा आहे. म्हणजे दुसर्‍याला वापरता येणार नाही व आपल्यालाच सारख्या ऑर्डर मिळत राहतील. ४) झिणझिण्या : हा एक वेगळा मसाला आहे. हा भारत देश सोडून सर्व देशात मिळतो. हा मसाला टाकला की पदार्थ खाताच खाणार्‍याच्या डोक्याला मुंग्या येतात व त्याचा तोल सुटतो. असे झाल्यास आपल्या रेसिपीला पहिले बक्षिस निश्चित मिळणार हे गृहीत धरावे. ५) लूप : हा एक तुपासारखा पदार्थ आहे. संगणक क्षेत्रात काम करणार्‍यांना याचा उपयोग चांगलाच माहीत असणार. हा तळण्यासाठी वापरला की तळणे ही प्रक्रीया थांबतच नाही. तळत रहा.. तळत रहा... अर्थात हे आपण टाकले नाही तरी चालेल . कारण हा या पदार्थाचाच एक बाय प्रॉडक्ट आहे आणि तो मुळ पदार्थात मिसळत राहतो... ६) नकारात्मकता: अत्यंत महत्वाचा मसाला. प्रत्येक वस्तूकडे नकारात्मक डृष्टीने बघता यायला पाहिजे. पण याची काळजी करू नका. आपण हा पदार्थ करायला घेतलाय म्हणजे ही आपल्याकडे भरपूर असणार. ७) व्याकरण : पदार्थ बिघडायला लागल्यास आपल्या मदतीस येणारा मसाला. याचा साठा भरपूर ठेवा. हा आपल्याला कायम लागणारच आहे. उपकरणे : १) एक किसणी. तुम्हाला वाटेल की याला कसलीही किसणी चालेल. पण नाही. ही काही विशिष्ट दुकानातच मिळते. याला दोन्हीकडून धार असते. याचा फायदा असा की लेख कसाही किसला तरी त्याचा कीसच पडतो. बर नुसते एवढेच नाही. याला काही मोठी भोके, काही मध्यम तर काही केसाच्या अग्राएवढी सुक्ष्म असतात. आणि या भोकांचा वापर हा क्रमाने करायचा असतो. याच्या प्रशिक्षणाची सोय काही तज्ञांकडे उपलब्ध आहे. पण थोडक्यात सांगणे झाल्यास ज्यांना या पदार्थाची रुची वाढवण्यात रस आहे त्यांनी पाळीपाळीने ही किसणी हाती घेऊन वेगवेगळ्या भोकातून हा लेख किसावा. किसताना खाली काय पडते आहे ते आजिबात बघू नये. किसत रहावे. थांबावे कधी ? यासे उत्तर फारच सोपे आहे. अशाच पदार्थाची दुसरी ऑर्डर मिळाली की किसणे थांबवावे. याने हातालाही चांगला व्यायाम होतो व मेंदूलाही आराम मिळतो. आता तुम्ही विचाराल की दुसरी ऑर्डर नाही मिळाली तर काय ? तसे झाल्यास खाणारे उठून गेले की थांबावे. व शेवटी आपण करणारेच राहीलो की हा पदार्थ ओरपून खावा. असा उरलेला पदार्थ खाण्यास फारच रुचकर लागतो व बर्‍याच दिवस पुरतो. २) असंख्य शब्दकोष. ( मोठे भांडे व चाळणी) याचा उपयोग फारच होतो. प्रमूख साहित्यातील प्रत्येक कण या चाळणीत चाळून घ्यावा. शक्यतो इतक्यावेळा चाळावा की त्याचा भूगा झाला पाहिजे. अर्थात यात सर्व भाषेचे शब्दकोष लागतील. कधी कुठला लागेल याचा नेम नाही. ३) सगळ्या साहित्याचे तुकडे, भुगा, पीठ, मैदा करता येईल अशी सगळी उपकरणे. आपल्याकडे नसतील तर ही भाड्यानेही मिळतात. कृती : फारच सोपी. सगळे गोळा केलेले साहित्य एकत्र केले की आपल्याला पुढची कृती आपोआप कळायला लागेल. आपला आनंद द्विगुणीत, त्रिगुणीत होत जाईल... तयार झालेल्या पदार्थावर आपल्या अगाध ज्ञानाचा चुरा पेरावा व मिपाच्या साईटवर ठेवून सर्व्ह केला तर हा पदार्थ दिसण्यास व खाण्यास अधिक रुचकर लागतो. आमच्या कॅमेर्‍यात या पदार्थाची ( न मावल्यामुळे) प्रतीमा घेता आली नाही म्हणून छायाचित्र टाकता आले नाही त्याबद्दल क्षमस्व. हलके घेणे हे वेगळ्याने सांगायला नको. :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

चिंतामणी 03/05/2011 - 20:38
जयंत कुलकर्णी पाककृती - शब्दांचा खीमा या पाकृ मधून मिपावरच्या वरिष्ठ आणि विद्वान लोकांच्या पाककृतीतील बारकावे सर्वांना समजेल अश्या भाषेत (ज्यात संस्कृत प्रचुर शब्द नाहीत) मांडल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. धन्यु. ___/\___

तर्री 27/02/2013 - 09:33
पु.लं.चे नेहमी प्रमाणे उत्तम भाषण वाचवायला मिळाले. सोने पे सुहागा बाकी चर्चा हे खास मिपा चे लक्षण .

हेच भाषण पु लं च्या आवाजात mp3रुपात माझ्याकडे उपलब्ध आहे. मिपावर mp3 कसे अपलोड करावे मला माहिती नाही. तरी कुणाला हवे असल्यास मेल/व्यनि करावा अथवा अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करावे

नानबा 03/03/2013 - 13:01
पु.लं. चं भाषण अप्रतिम.. फक्त आपण लिहीलेल्या लेखाबद्दल एक सुधारणा..
अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील
असे लिहीले आहे. ते सेल्युलर जेल आहे... बाकी सुंदरच..

केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा
जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते.
या दोन वाक्यांसाठी चिंतामणीला मनःपूर्वक धन्यवाद! (आणि अर्थात मृत्युंजयावरच्या या अप्रतिम लेखासाठी पुलंना विनम्र अभिवादन)

चिंतामणी 26/02/2015 - 15:07
आज या महानायकाचा "आत्मार्पण दिन" आहे. त्या निमीत्ताने पुन्हा एकदा आदरांजली.

साहीत्य : मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, अशा बिनडोक माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख हे बिनडोक तर आपण कोन?

भाते 26/02/2015 - 20:24
धन्यवाद चिंतामणी! _ _/\_ _ लेखापध्दल आणि हा धागा पुन्हा वरती काढल्या पध्दल. केवळ अप्रतिम!
--------------------------------------------------------------------- 'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती' --------------------------------------------------------------------- नुकताच किसन शिंदे यांनी पु.ल.देशपांडे यांच्या एका भाषणाचा संदर्भ दिला होता. ते भाषण वाचताना आणि त्यातील स्वा.सावरकरांच्या उल्लेखाने त्यांच्याच अजून एका सुंदर भाषणाची आठवण जागी झाले. स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.

हे जग मी सुंदर करून जाईन....

किसन शिंदे ·

In reply to by मृत्युन्जय

नरेशकुमार 22/04/2011 - 07:12
पुलं बद्दल बोलन्याची माझ्या लायकीची सुद्दा लायकी नाही. बाकी भाषन वाचेनच . . . पण हे जग मी सुंदर करून जाईन..... हे जाईन कशाला ? जग सुंदर करायचं आनी आपनच (सगळे) त्यात रहायचं की !

In reply to by नरेशकुमार

पंगा 22/04/2011 - 09:04
हे जग मी सुंदर करून जाईन..... हे जाईन कशाला ? जग सुंदर करायचं आनी आपनच (सगळे) त्यात रहायचं की !
भाषण मीही अजून वाचलेले नाही, वाचेनच, पण... 'मी हे जग सोडेपर्यंत माझ्या कृतींतून, मी जगात येताना ज्या स्थितीतल्या जगात आलो, त्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणेन' असे ध्येय ठेवावे, असे पु.लं.ना सुचवायचे असावे काय? विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात हे सयुक्तिक वाटते. (अर्थात नेमके काय ते भाषण वाचूनच कळेल. तोपर्यंत हा पो - आपले, अंदाज.)

In reply to by मृत्युन्जय

नरेशकुमार 22/04/2011 - 07:12
पुलं बद्दल बोलन्याची माझ्या लायकीची सुद्दा लायकी नाही. बाकी भाषन वाचेनच . . . पण हे जग मी सुंदर करून जाईन..... हे जाईन कशाला ? जग सुंदर करायचं आनी आपनच (सगळे) त्यात रहायचं की !

In reply to by नरेशकुमार

पंगा 22/04/2011 - 09:04
हे जग मी सुंदर करून जाईन..... हे जाईन कशाला ? जग सुंदर करायचं आनी आपनच (सगळे) त्यात रहायचं की !
भाषण मीही अजून वाचलेले नाही, वाचेनच, पण... 'मी हे जग सोडेपर्यंत माझ्या कृतींतून, मी जगात येताना ज्या स्थितीतल्या जगात आलो, त्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणेन' असे ध्येय ठेवावे, असे पु.लं.ना सुचवायचे असावे काय? विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात हे सयुक्तिक वाटते. (अर्थात नेमके काय ते भाषण वाचूनच कळेल. तोपर्यंत हा पो - आपले, अंदाज.)
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...