मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. म्हणजे मित्र आहेत बरेच, पण ते सगळे नेहमीच्या भाषेत दुसऱ्या वर्तुळातले. जय-वीरू टाईप किंवा दो हंसो का जोडा टाईप मित्र आजपर्यंत तरी मला नाही. निकोप नसलेली स्पर्धा, शालेय राजकारण, संशयी वातावरण आणि या सगळयातुन हरवलेली निखळता अशी अनेक कारणे त्याला आहेत, आणि त्याची जाणीवही मला आहे. पण, तरीही असा कोणीतरी मित्र नसल्याची खंत कुठे ना कुठे तरी मला आहे, आणि का असु नये?