अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

लेखनप्रकार
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।

वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ... गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,...

लेखन स्पर्धा २०१०

लेखनप्रकार
नमस्कार, गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.

'बाभुळझाड' एक सल!

लेखनविषय:
लेखनप्रकार
थोरल्या आईंकडून एक म्हण ऐकली होती,' आउली सारी माया , अन बाभळी सारी छाया असावी' . मोठ आश्चर्य वाटल मला. आता आईची माया सर्वशृत आहे. अन ती कधीच कमी होत नाही हे ही तितकच खर ! पण ,छाया ? बाभळीची? थोरल्या आईंच स्पष्टीकरण मोठ मार्मिक ! "बाभळीला पान गळली तरी काट्या मुळ सावली राहते. सगळी बाभळ जरी बोडकी झाली तरी तिची सावली कायम तश्शीच राहते , असं म्हणत्यात बाय पूर्वीची माणस." थोरल्या आई कधीच कुठल्या ज्ञानाचा हक्क स्वत: जवळ ठेवीत नाहीत. 'असं म्हणत्यात बाई पूर्वीची माणस' म्हणून त्या रिकाम्या होतात. बाभळी कड पहायची नजर अगदी सर्वात पाहिला बदलली ती या म्हणी मुळ !

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

लेखनप्रकार
अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस. अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच!

दडपलेल्या पोह्यांची कहाणी..

लेखनप्रकार
"आय वॉन्ट येल्लो पोहाज फॉर लंच इन माय टिफिन, दॅट्स ईट!" पिल्लू इरेला पेटलं होतं. का? तर त्याला डब्यात पोहे हवे होते. इतके दिवस, सकाळी ७.४५ ला केलेले कांदेपोहे/बटाटे पोहे दुपारी १२.२० ला हा खाईपर्यत ते नको इतके गार होणार आणि ते ही सध्याच्या थंडीच्या दिवसांत ते हडकून जातील , नो डाऊट! या विचाराने मी त्याला डब्यात पोहे देणे टाळत होते. पण गेल्या आठवड्यात शाळेतून घरी आल्या आल्या रणशिंग फुंकलं गेलं आणि पोह्यावरून आकाश पाताळ एक झालं! "आय वॉन्ट यल्लो पोहाज.. दॅट्स इट!" पिलू हेका सोडत नव्हत आणि मी उगाचच त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत होते..

पुरस्काराचा भुलभुलैया

लेखनप्रकार
पुरस्काराचा भुलभुलैया “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा. (संदर्भ :- http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख.

गुंजग्रामीचे दिवस

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

एखादा झकास लेख....

लेखनविषय:
लेखनप्रकार
रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा... एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे.. आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण... पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात.. त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते.. मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात..
Subscribe to साहित्यिक