मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

दोन मनिष

सनईचौघडा ·

जगप्रवासी 06/01/2016 - 18:44
त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. आता तो लहाणपणीचा मंदार राहिला नव्हता. >>>> नावं बदलली आहेत ती संपादित करून घ्या.

In reply to by जगप्रवासी

मंदार माहीत नाही का ? कमालच आहे ! रच्याकने लेखन आवडलं . दुसऱ्या मनिषविषयी वाचायला आवडेल . (स्वगत:आजकाल मिपावर मंदार , मंदाकिनी जरा जास्तच दिसतायेत . लोल)

जगप्रवासी 06/01/2016 - 18:44
त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. आता तो लहाणपणीचा मंदार राहिला नव्हता. >>>> नावं बदलली आहेत ती संपादित करून घ्या.

In reply to by जगप्रवासी

मंदार माहीत नाही का ? कमालच आहे ! रच्याकने लेखन आवडलं . दुसऱ्या मनिषविषयी वाचायला आवडेल . (स्वगत:आजकाल मिपावर मंदार , मंदाकिनी जरा जास्तच दिसतायेत . लोल)
ही कहांणी आहे माझ्या समोर घडलेल्या समान नावे असणार्‍या दोन मुलांची. त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. या कुटंबाची घडी कधी नीट बसलीच नाही. सारखे काही ना काही संकट त्यांच्यावर येत गेले. मी जेव्हा ७ वीत होतो तेव्हा तो चौथीत होता. त्यामुळे तो तसा आम्हाला लिंबुटिंबु होता. तब्येतीने बारिक, सडपातळ, खाण्यापिण्याचा कंटाळा. जेवताना अन्न चिवडत बसायचा आई बाजुला बसुन भरवायची त्याला. लहानपणी त्याला जावळं येत नव्हते तेव्हा त्याच्या माऊलीने हरतर्‍हेचे उपाय योजले.

मै तो चला

नितीनचंद्र ·

खेडूत 05/01/2016 - 06:21
:) आवडला.. लै जिव्हाळ्याचा विषय !

खेडूत 05/01/2016 - 06:21
:) आवडला.. लै जिव्हाळ्याचा विषय !
जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत. जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

खेडूत ·

'काडीची कसर' या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती प्रथमच कळली. आपण आपल्या वडिलांच्या पंचाहत्तरीचे कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने नेटके व कल्पकतेने यशस्वीपणे आयोजित केलेत याबद्दल आपले अभिनंदन. इथल्या मराठी मंडळाचा (माजी) पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या पद्धती वापरतो त्याबाबत थोडक्यात माहिती वेळ मिळताच लिहीन.

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे आणि शास्त्रही ! 'काडीची कसर' या वाक्प्रचाराची सुरुवात कशी झाली ते माहीत नव्हते, ती कसर भरून निघाली ! :)

बोका-ए-आझम 31/12/2015 - 23:06
आपल्याला असे आयोजनाचे अनुभव असतील तर काय करावे अन काय टाळावे हे नक्की सांगा. त्यामुळे इतरांना उपयोग होईल.
लोक काय म्हणतील, कार्यक्रम त्यांना आवडेल का? वगैरे विचार करणे टाळावे. लोक काही ना काहीतरी म्हणणारच. त्यांना पौड, शीळ, इत्यादी ठिकाणांचे पत्ते द्यावेत. उत्सवमूर्ती खुश तर सगळं वसूल. पु.लं. चा ' एकसष्टावं वर्ष काय फक्त पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये ? ' असं ठणकवणारा परोपकारी गंपू हा आदर्श मानावा.

रेवती 01/01/2016 - 04:52
लेखन आवडले. खूप छान. काडीचीही कसर न ठेवता कार्य पार पडल्यास त्याला फडणविसी कार्य म्हणण्याची पद्धत आहे हे ऐकून होते पण नाना फडणविसांची गोष्ट आवडली, ती आधी माहित नव्हती. तुम्ही अनेकवेळा कार्यक्रम वेळेवर सुरु होण्याबद्दल सांगितलेले होते व मंडळीही वेळेवर आली हे चांगले झाले.

माझ्या मते, कुठलाही कार्यक्रम यशस्वी यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी हव्या असतात : १) अर्थ २) साहाय्य २अ) आयोजन २ब) सहभाग दोन्ही ३) रूपरेषा 4) इच्छाशक्ती याऊपर, बाकी सर्व बाधक गोष्टींसाठी वर बोका-ए-आझम म्हणतात त्याप्रमाणे पौड फाटा वगैरेंचा पत्ता तयार ठेवावा! Sandy

चतुरंग 01/01/2016 - 20:08
फडणविशी कार्य इतकेच ऐकून होतो ही समईत 'काड्या सारण्याची' गोष्ट माहीत नव्हती! (काड्या सारणे - हा वाक्प्रचारही तिथूनच आला असावा काय? ;) ) तुमचा अनुभव आवडला. १ - योग्य नियोजनासाठी पुरेशी पूर्वतयारी - जसे कामांच्या याद्या करणे, पैशाचे नियोजन, जबाबदार व्यक्तींमध्ये कामाची विभागणी, पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ इ. आवश्यक असतेच. २ - संबंधित व्यक्तींमध्ये समन्वय आणि कम्युनिकेशन गरजेचे ३ - आपल्या आणि/किंवा इतरांच्या पूर्वानुभववावरुन शिकलेल्या गोष्टींबाबत जागरुक असणे - काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत बॅकप प्लॅन असणे आवश्यक असते जसे की विजेसाठी जनरेटर असणे, पुरणपोळीचे जेवण देणार्‍या केटररच्या पोळ्या आयत्यावेळी कमी पडल्या तर तयार पोळ्या कुठून मिळतात याची नोंद आधीच ठेवून तिथून त्या तातडीने आणण्याची व्यवस्था करणे इत्यादी! :) (फडणविशीकार्याचाचाहता)रंगा

'काडीची कसर' या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती प्रथमच कळली. आपण आपल्या वडिलांच्या पंचाहत्तरीचे कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने नेटके व कल्पकतेने यशस्वीपणे आयोजित केलेत याबद्दल आपले अभिनंदन. इथल्या मराठी मंडळाचा (माजी) पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या पद्धती वापरतो त्याबाबत थोडक्यात माहिती वेळ मिळताच लिहीन.

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे आणि शास्त्रही ! 'काडीची कसर' या वाक्प्रचाराची सुरुवात कशी झाली ते माहीत नव्हते, ती कसर भरून निघाली ! :)

बोका-ए-आझम 31/12/2015 - 23:06
आपल्याला असे आयोजनाचे अनुभव असतील तर काय करावे अन काय टाळावे हे नक्की सांगा. त्यामुळे इतरांना उपयोग होईल.
लोक काय म्हणतील, कार्यक्रम त्यांना आवडेल का? वगैरे विचार करणे टाळावे. लोक काही ना काहीतरी म्हणणारच. त्यांना पौड, शीळ, इत्यादी ठिकाणांचे पत्ते द्यावेत. उत्सवमूर्ती खुश तर सगळं वसूल. पु.लं. चा ' एकसष्टावं वर्ष काय फक्त पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये ? ' असं ठणकवणारा परोपकारी गंपू हा आदर्श मानावा.

रेवती 01/01/2016 - 04:52
लेखन आवडले. खूप छान. काडीचीही कसर न ठेवता कार्य पार पडल्यास त्याला फडणविसी कार्य म्हणण्याची पद्धत आहे हे ऐकून होते पण नाना फडणविसांची गोष्ट आवडली, ती आधी माहित नव्हती. तुम्ही अनेकवेळा कार्यक्रम वेळेवर सुरु होण्याबद्दल सांगितलेले होते व मंडळीही वेळेवर आली हे चांगले झाले.

माझ्या मते, कुठलाही कार्यक्रम यशस्वी यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी हव्या असतात : १) अर्थ २) साहाय्य २अ) आयोजन २ब) सहभाग दोन्ही ३) रूपरेषा 4) इच्छाशक्ती याऊपर, बाकी सर्व बाधक गोष्टींसाठी वर बोका-ए-आझम म्हणतात त्याप्रमाणे पौड फाटा वगैरेंचा पत्ता तयार ठेवावा! Sandy

चतुरंग 01/01/2016 - 20:08
फडणविशी कार्य इतकेच ऐकून होतो ही समईत 'काड्या सारण्याची' गोष्ट माहीत नव्हती! (काड्या सारणे - हा वाक्प्रचारही तिथूनच आला असावा काय? ;) ) तुमचा अनुभव आवडला. १ - योग्य नियोजनासाठी पुरेशी पूर्वतयारी - जसे कामांच्या याद्या करणे, पैशाचे नियोजन, जबाबदार व्यक्तींमध्ये कामाची विभागणी, पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ इ. आवश्यक असतेच. २ - संबंधित व्यक्तींमध्ये समन्वय आणि कम्युनिकेशन गरजेचे ३ - आपल्या आणि/किंवा इतरांच्या पूर्वानुभववावरुन शिकलेल्या गोष्टींबाबत जागरुक असणे - काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत बॅकप प्लॅन असणे आवश्यक असते जसे की विजेसाठी जनरेटर असणे, पुरणपोळीचे जेवण देणार्‍या केटररच्या पोळ्या आयत्यावेळी कमी पडल्या तर तयार पोळ्या कुठून मिळतात याची नोंद आधीच ठेवून तिथून त्या तातडीने आणण्याची व्यवस्था करणे इत्यादी! :) (फडणविशीकार्याचाचाहता)रंगा
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

खुर्ची

सस्नेह ·

नाखु 23/12/2015 - 16:18
साहेबाला आणि हाफीसला थेट समोर उभे केलेत. कनीष्ठांना त्रास देणे हा वरिष्ठांचा "पद"सिद्ध हक्क असावा असे सध्या (खाजगीत) असूनही अनुभवतो आहे. चाकरमानी नाखु

अभ्या.. 23/12/2015 - 16:20
स्वतःच्या अधिकाराला योग्य सन्मान प्राप्त करायचा असेल तर दुसर्‍याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता त्याच्या अधिकाराचा सन्मान ठेवला पाहिजे. अगदी पटले. सर्वजण असे वागतील तो सुदीन.

मृत्युन्जय 23/12/2015 - 17:05
मी जिथे काम करतो तिथले सीएमडी हे पथ्य पाळतात. ते एखाद्याच्या केबिन मध्ये गेले तर कधीच त्याची खुर्ची वापरणार नाहित. अर्थात आमचे सरकारी ऑफिस नाही खाजगी कंपनी आहे, पण तरीही....;.

माझ्याकडे आला तर उभा राहून बोलतो, अन् मी बसून :) सुरुवातीला काही वेळा मी उभा राहायचो, पण तुमच्या तुळतुळीत बॉस सारखा हा सुद्धा मला बसायला लावायचा. एखाद्या मिनिटाचं काम असेल, तर उभं राहून बोलतो अन् जातो. जास्त वेळ लागणार असेल, तर स्वतः एखादी खुर्ची ओढतो व बसतो. त्याचा बॉस (माझा एन+२). एकदम विरुद्ध. मी जर त्याच्याशी काही कम्युनिकेशन केले तर, त्याला कमीपणा वाटतो. 'हा माझ्याशी थेट कसा बोलतो' म्हणुन. जर कधी एखादी मेल त्याला टू ठेवून पाठवली, तर त्याचा १ मिनिटात माझ्या एन+१ला फोन येतो, 'तू का नाही पाठवली?' अन् आमचे साईट जीएम! त्यांना माहिती असतं, हापिसात कुणाच्या ड्रॉवरमध्ये बिस्किटांचे पुडे असतात. (कुणाकडे कोणते असतात ते पण!) मग जाऊन हक्काने मागून घेतात. तेसुद्धा कुणाच्याही जागेवर गेल्यावर, त्याला उठून देत नाहीत.

आदूबाळ 23/12/2015 - 17:51
माझ्या पहिल्या नोकरीत जे नमुने भेटले ते फारच थोर होते. चांगले वाईट दोन्ही. त्यानंतर बर्‍याच नोकर्‍या बदलल्या, पण तसे लोक काही अजून भेटले नाहीत. हा किस्सा वरून नं० २ असलेल्या बॉसचा. म्हणजे माझ्या डोक्यावर चार लेव्हल. याला आपल्या टेबलावर पाट्या ठेवायचा नाद होता. त्यातली एक पाटी: "इन माय केबिन, देअर इज अ स्टँडिंग इन्स्ट्रक्शन टु सिट डाऊन." आता पाटी ठेवणे वगैरे चमत्कारिकपणा वगळता भावना चांगली होती. [अवांतर - आणखी एक पाटी. "टु अर इज ह्युमन. टु ऑडिट - डिव्हाईन." ही तर खास संगमरवरी पट्टीवर कोरून घेतली होती!]

सुबोध खरे 23/12/2015 - 18:42
पदाचा/ खुर्चीचा मान मी लष्करात असताना किंवा कॉर्पोरेट रुग्णालयात असताना जरी विभागप्रमुख होतो तरीही आपल्या कनिष्ठाच्या खुर्चीत कधीच बसलो नाही. गरज असेल तेंव्हा दुसरी खुर्ची मागवून बसत असे. फार काय माझ्या दवाखान्याच्या शेजारीच सौ. चा दवाखाना आहे. तिथे सुद्धा मी तिच्या खुर्चीत सहसा बसत नाही. फक्त जर ती नसेल आणि मी तिच्या जागी रुग्ण पाहत असेन तरच त्या खुर्चीत बसून रुग्ण तपासतो. माझ्या दवाखान्यात स्वागत सहायीकेच्या खुर्चीत( ती नसताना) मी स्वतः बसत नाही किंवा कोणा रुग्णालाही बसू देत नाही. प्रत्येक माणसाचा व्यक्ती म्हणून (आणि त्याच्या पदाचा/ खुर्चीचा) सन्मान असतो, मग तो तुमचा कनिष्ठ असेल किंवा अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल. लष्करात तुम्हाला तुमच्या कनिष्ठाने सलाम केला तर तुम्ही त्याला उलट सलाम केला पाहिजे हा दंडक आहे. हि प्रत्येक माणसाला मान देण्याची पद्धत/ परंपरा आहे आणि तुम्ही त्याला उलट सलाम न करणे हा त्या माणसाचा अपमान समजला जातो. मग तो लष्कर प्रमुख असो आणि त्याला सलाम करणारा नुकताच भरती झालेला रिक्रूट असो.

बोका-ए-आझम 23/12/2015 - 23:30
कामं करत असल्यामुळे खुर्ची आणि तिचा मान याचा कधी संबंध आला नाही. फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात दिग्दर्शकाच्या खुर्चीला प्रचंड मान असतो. तो एक-दोन वेळा अनुभवायला मिळालेला आहे. बाकी लेख छानच. चांगला बाॅस मिळणं हा योगच म्हणावा लागेल. मला शिक्षणक्षेत्रात फार चांगल्या बाॅस मिळाल्या. दुर्दैवाने याच वर्षी जून महिन्यात त्या गेल्या पण कुणीही हेवा करावा अशी लोकप्रियता त्यांना त्यांच्या सहका-यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्येही लाभलेली होती.

कुसुमिता१ 24/12/2015 - 09:40
आवडल लिखाण!! "माझा मान राखा..मला महत्व द्या" अशा वृत्तीच्या लोकांबद्द्ल खरच कधी खरा आदर वाटूच शकत नाही. तुमच्या बॉससारख्या व्यक्ती दुर्मिळ असतात खरोखर..

नाखु 23/12/2015 - 16:18
साहेबाला आणि हाफीसला थेट समोर उभे केलेत. कनीष्ठांना त्रास देणे हा वरिष्ठांचा "पद"सिद्ध हक्क असावा असे सध्या (खाजगीत) असूनही अनुभवतो आहे. चाकरमानी नाखु

अभ्या.. 23/12/2015 - 16:20
स्वतःच्या अधिकाराला योग्य सन्मान प्राप्त करायचा असेल तर दुसर्‍याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता त्याच्या अधिकाराचा सन्मान ठेवला पाहिजे. अगदी पटले. सर्वजण असे वागतील तो सुदीन.

मृत्युन्जय 23/12/2015 - 17:05
मी जिथे काम करतो तिथले सीएमडी हे पथ्य पाळतात. ते एखाद्याच्या केबिन मध्ये गेले तर कधीच त्याची खुर्ची वापरणार नाहित. अर्थात आमचे सरकारी ऑफिस नाही खाजगी कंपनी आहे, पण तरीही....;.

माझ्याकडे आला तर उभा राहून बोलतो, अन् मी बसून :) सुरुवातीला काही वेळा मी उभा राहायचो, पण तुमच्या तुळतुळीत बॉस सारखा हा सुद्धा मला बसायला लावायचा. एखाद्या मिनिटाचं काम असेल, तर उभं राहून बोलतो अन् जातो. जास्त वेळ लागणार असेल, तर स्वतः एखादी खुर्ची ओढतो व बसतो. त्याचा बॉस (माझा एन+२). एकदम विरुद्ध. मी जर त्याच्याशी काही कम्युनिकेशन केले तर, त्याला कमीपणा वाटतो. 'हा माझ्याशी थेट कसा बोलतो' म्हणुन. जर कधी एखादी मेल त्याला टू ठेवून पाठवली, तर त्याचा १ मिनिटात माझ्या एन+१ला फोन येतो, 'तू का नाही पाठवली?' अन् आमचे साईट जीएम! त्यांना माहिती असतं, हापिसात कुणाच्या ड्रॉवरमध्ये बिस्किटांचे पुडे असतात. (कुणाकडे कोणते असतात ते पण!) मग जाऊन हक्काने मागून घेतात. तेसुद्धा कुणाच्याही जागेवर गेल्यावर, त्याला उठून देत नाहीत.

आदूबाळ 23/12/2015 - 17:51
माझ्या पहिल्या नोकरीत जे नमुने भेटले ते फारच थोर होते. चांगले वाईट दोन्ही. त्यानंतर बर्‍याच नोकर्‍या बदलल्या, पण तसे लोक काही अजून भेटले नाहीत. हा किस्सा वरून नं० २ असलेल्या बॉसचा. म्हणजे माझ्या डोक्यावर चार लेव्हल. याला आपल्या टेबलावर पाट्या ठेवायचा नाद होता. त्यातली एक पाटी: "इन माय केबिन, देअर इज अ स्टँडिंग इन्स्ट्रक्शन टु सिट डाऊन." आता पाटी ठेवणे वगैरे चमत्कारिकपणा वगळता भावना चांगली होती. [अवांतर - आणखी एक पाटी. "टु अर इज ह्युमन. टु ऑडिट - डिव्हाईन." ही तर खास संगमरवरी पट्टीवर कोरून घेतली होती!]

सुबोध खरे 23/12/2015 - 18:42
पदाचा/ खुर्चीचा मान मी लष्करात असताना किंवा कॉर्पोरेट रुग्णालयात असताना जरी विभागप्रमुख होतो तरीही आपल्या कनिष्ठाच्या खुर्चीत कधीच बसलो नाही. गरज असेल तेंव्हा दुसरी खुर्ची मागवून बसत असे. फार काय माझ्या दवाखान्याच्या शेजारीच सौ. चा दवाखाना आहे. तिथे सुद्धा मी तिच्या खुर्चीत सहसा बसत नाही. फक्त जर ती नसेल आणि मी तिच्या जागी रुग्ण पाहत असेन तरच त्या खुर्चीत बसून रुग्ण तपासतो. माझ्या दवाखान्यात स्वागत सहायीकेच्या खुर्चीत( ती नसताना) मी स्वतः बसत नाही किंवा कोणा रुग्णालाही बसू देत नाही. प्रत्येक माणसाचा व्यक्ती म्हणून (आणि त्याच्या पदाचा/ खुर्चीचा) सन्मान असतो, मग तो तुमचा कनिष्ठ असेल किंवा अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल. लष्करात तुम्हाला तुमच्या कनिष्ठाने सलाम केला तर तुम्ही त्याला उलट सलाम केला पाहिजे हा दंडक आहे. हि प्रत्येक माणसाला मान देण्याची पद्धत/ परंपरा आहे आणि तुम्ही त्याला उलट सलाम न करणे हा त्या माणसाचा अपमान समजला जातो. मग तो लष्कर प्रमुख असो आणि त्याला सलाम करणारा नुकताच भरती झालेला रिक्रूट असो.

बोका-ए-आझम 23/12/2015 - 23:30
कामं करत असल्यामुळे खुर्ची आणि तिचा मान याचा कधी संबंध आला नाही. फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात दिग्दर्शकाच्या खुर्चीला प्रचंड मान असतो. तो एक-दोन वेळा अनुभवायला मिळालेला आहे. बाकी लेख छानच. चांगला बाॅस मिळणं हा योगच म्हणावा लागेल. मला शिक्षणक्षेत्रात फार चांगल्या बाॅस मिळाल्या. दुर्दैवाने याच वर्षी जून महिन्यात त्या गेल्या पण कुणीही हेवा करावा अशी लोकप्रियता त्यांना त्यांच्या सहका-यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्येही लाभलेली होती.

कुसुमिता१ 24/12/2015 - 09:40
आवडल लिखाण!! "माझा मान राखा..मला महत्व द्या" अशा वृत्तीच्या लोकांबद्द्ल खरच कधी खरा आदर वाटूच शकत नाही. तुमच्या बॉससारख्या व्यक्ती दुर्मिळ असतात खरोखर..
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस. दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त. कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

साहित्य संपादक ·

कपिलमुनी 16/12/2015 - 11:50
कृषी म्हणजे शेती विषयक म्हणजे शेतीची मशागत करतानाची ईई छायाचित्रे चालतील का ? की केवळ पिकांचीच हवी आहेत याचा खुलासा / विवेचन / डिटेल्स अपेक्षित

श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400 Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0; Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7 Flash not used डहाणू येथील एक आंब्याची बाग या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात. पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती भात-लावणी/ पेरणी डिटेल्स: कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्‌.एम्‌ लेन्स टॅमेरॉन; आय्‌.एस्‌. ओ. - १०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग स्थळ- सिंहगड पायथा विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र राजुरी येथील द्राक्षबाग कॅमेरा - सॅमसंग e७ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४) EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु रत्नागिरी मधील पारंपारीक शेती तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे. टीपः चित्रे मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रांना क्रमांक मतदानाच्या धाग्यात देण्याची योजना आहे. त्या धाग्यातला अनुक्रम वेगळा असू शकतो.

कपिलमुनी 16/12/2015 - 11:50
कृषी म्हणजे शेती विषयक म्हणजे शेतीची मशागत करतानाची ईई छायाचित्रे चालतील का ? की केवळ पिकांचीच हवी आहेत याचा खुलासा / विवेचन / डिटेल्स अपेक्षित

श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400 Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0; Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7 Flash not used डहाणू येथील एक आंब्याची बाग या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात. पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती भात-लावणी/ पेरणी डिटेल्स: कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्‌.एम्‌ लेन्स टॅमेरॉन; आय्‌.एस्‌. ओ. - १०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग स्थळ- सिंहगड पायथा विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र राजुरी येथील द्राक्षबाग कॅमेरा - सॅमसंग e७ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४) EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु रत्नागिरी मधील पारंपारीक शेती तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे. टीपः चित्रे मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रांना क्रमांक मतदानाच्या धाग्यात देण्याची योजना आहे. त्या धाग्यातला अनुक्रम वेगळा असू शकतो.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत. मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात.

कडेमनी कंपाऊंड

शिव कन्या ·

राही 12/12/2015 - 10:01
जी.ए. मूड नेमका पकडलाय जो पकडल्यासारखा वाटत असताना निसटून गेलाय असे भल्याभल्यांचे झालेय.

भानिम 12/12/2015 - 11:15
साॅल्लिड.... तुमचं मुक्तक वाचुन मेंदूतल्या 'जीए' सेंटरला जाग आली परत... आता लायब्रीत जाऊन जीए घेऊन येणे क्रमप्राप्त आले....

राही 12/12/2015 - 10:01
जी.ए. मूड नेमका पकडलाय जो पकडल्यासारखा वाटत असताना निसटून गेलाय असे भल्याभल्यांचे झालेय.

भानिम 12/12/2015 - 11:15
साॅल्लिड.... तुमचं मुक्तक वाचुन मेंदूतल्या 'जीए' सेंटरला जाग आली परत... आता लायब्रीत जाऊन जीए घेऊन येणे क्रमप्राप्त आले....
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.

विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध

माहितगार ·

अजया 11/12/2015 - 17:02
जाहीर तीव्र निषेध तर आहेच.
अशा प्रकारे समुह,गाव,शहर,प्रांत,जात,धर्म,भाषा,वर्ण असे कोणतेही कारण देऊन त्या समुहातील स्त्रीयांना विशीष्टपणे कॅटेगराईज करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सर्वथा गैर आणि निषेधार्ह आहे.
विनोद करणे हि वेगळी गोष्ट आहे पुर्वग्रह करून शिक्के मारणे हा चांगला विचारही नाही चांगला विनोदही नाही.
अत्यंत सहमत.

मितान 11/12/2015 - 17:17
लेखन विषयाशी अत्यंत सहमत ! त्याच प्रमाणे, स्त्रीयांकडूनही पुरुषांसदर्भात असे पूर्वग्रह पोसले व पसरवले जातात ते ही डोक्यात जातं. उदा: टिपिकल, पुरूष म्हणजे 'एका माळेचे मणी' या अर्थाचे जोक्स वगैरे ! मी अशा स्त्रीयांच्याही वर्तनाचा निषेध करते !

बोका-ए-आझम 11/12/2015 - 17:22
असं मत हे त्याच त्या वर्तुळात आणि परीघात फिरणाऱ्या आणि संकुचित मानसिकता असणाऱ्या लोकांकडून होतं आणि दुर्दैवाने चित्रपटांत केल्या जाणाऱ्या stereotypical चित्रणाने त्याला हातभार लागतो.

पैसा 11/12/2015 - 17:31
स्टिरिओटाईप समजुतींचा निषेध. पुण्यामुंबईतल्या स्त्रियांबाबत असा विचार होतो याचा अनुभव सुद्धा आहे. एकदा मुंबईहून वर्धेला जात होते. जळगाव की भुसावळ कुठेतरी रिझर्व्हेशनच्या डब्यात काही शहरी नोकरदार दिसणारे लोक चढले. त्यानी मी आणि माझी चुलतबहीण आम्हाला चक्क सीटवरून झोपलेले उठवले आणि आपण बसू लागले. विरोध केला तर हे आमचे रुटीन आहे, इथे टीसी पोलीस कोणी येणार नाही वगैरे भाषा सुरू केली. सगळ्यात वाईट म्हणजे त्यातल्या एकाने "मुंबई पुण्याच्या बाया लै शान्या समजतात स्वतःला" अशी कॉमेंट मारली. बाकी लोक नुसते बघत राहिले. ते उतरून गेले तशी आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की त्या भागात हे नेहमीच चालतं. पुरुष म्हणजे असेच हा स्टिरोटाईप विचार काही बायकाच नव्हे तर अनेक पुरुषही करतात आणि त्यात काही चूक आहे असे त्यांना जाणवतही नाही. ही आपले संस्कार आणि शिक्षण कमी पडत आहे याची खूण म्हणावी का?

अभ्या.. 11/12/2015 - 18:36
असल्या होलसेल निषेधाच्या धाग्याचा निषेध. माहीतगारांनी नेहमीच्या माहीतीपूर्ण धाग्या ऐवजी असा अपेक्शाभंग केल्याबद्दल त्यांचा निषेध. . . निषेधाचे बोर्ड आमच्याकडून बनवून न घेतल्याबद्दल अजूनच निषेध.

सूड 11/12/2015 - 18:46
स्त्री अमुक एक पोषख करते अथवा अमुक पद्धतीने वागते, पुरुषांशी मोकळेपणाने बोलते वावरते, किंवा तिची स्वतःची व्यक्तीगत जिवनातील निवड अमूक राहिली आहे म्हणून तिच्या बाबत अपमानास्पद विचार बाळगणे सर्वस्वी निषेधार्ह आहे. विश्वभरातील असा अन्याय्य विचार
हे पुरुषांच्या बाबतीत पण होतं हो, काय सांगायचं आता!! असो.

In reply to by सूड

नाखु 12/12/2015 - 09:15
सहमत. मागे कुठल्यातरी धाग्यात शाळेला सोडायला आलेल्या पुरुष पालकाशी वितंडवाद व हीन आरोप करणार्या स्त्रीला, त्याच सोसायटीतील स्त्रीयांनी जाब विचारणे सोडाच साधा अटकाव ही केला नव्हता असे प्रतिसाद कर्त्याने सांगीतले. घाऊक प्रमाणात विचार करणे आणि मुलांना त्यांच्या कळत्या वयातच असे करण्यापासून परावृत्त करणे.वेशभूषेवरून्,किंवा फक्त विशीष्ठ प्रांत /समूह्/जात्/देशाची व्यक्ती म्हणून काही पूर्वग्रह दूषीत मते बनवू नयेत म्हणून आपणच घरापासून काळजी घ्यायला हवी.. अगदी ताजे उदाहरण आहे मी मुलासोबत चिंचवडहून पुण्याला गाडीवरून चाललो होतो,पिंपळे सौदागरच्या चौकात (बर्याच मॉल व आय टी मुळे हा भाग पूर्णतः कॉस्मोपॉलीटीन झाला आहे. सिग्नलला काही पूर्वांचल भागातील तरूण तरूणी चालले होते.मुलाने उन्त्सुकतेने म्हटले "बाबा हे चिनी लोक भारतात येतात शिकायला नोकरीला ?" मला त्यांच्या पेहरावावरून आणि एकून तोंडावळ्यावरून ते चिनी नाहीत तर भारतातल्याच सप्त्कन्या प्रदेशातून आहेत हे जाणवले.(मिझोराम-त्रिपुरा ई). आणि मी मुलाला लगेच म्हटले तुला जर भारतातल्या दुसर्या राज्यात अगदी आंन्ध्र/ओरिसात गेला आणि त्यांनी तू पाकीस्तानी/इतर देशातला आहेस असे म्हटले तर काय वाटेल (तुझी भाषा त्यांना व त्यांची भाषा तुला कळत नसल्याने). तो रागाने उसळून म्हणाला "नाही आवडणार मी भारतीय आहे आणि महाराष्ट्रातून आहे हे त्यांना सांगीन आणि त्यांनी मला मराठी+भारतीय समजावे अशीच अपेक्षा ठेवीन." योगायोगाने नंतर टीव्हीवर त्याला एका सांस्क्रुतीक कार्यक्रमात दोन चार राज्यांचे नृत्य पाहायला मिळाले त्यात असेच पूर्वांचल भागातील्ही एक होते आणि आपोआप उत्तर मिळाले.
दुर्दैवाने आजही सुशिक्षीत+शहरी लोक सर्व स्वेटर विकणार्या आणि पूर्वांचल भागातील युवक युवतींना नेपाळी-चिनी म्हणून संबोधतात आणि त्याचा त्यांना काय त्रास होत असेल त्याचा कोणीही विचार करीत नाहित
हिंदुस्तान मेरा वतन नुस्ते अंमलात आणणार्या सोन्याबाप्पुंचा पंखा नाखु

In reply to by नाखु

पैसा 12/12/2015 - 19:41
पुरुषांनी घरकाम करणे म्हणजे कमीपणा, बायकांना आर्थिक निर्णय, प्रॉपर्टीच्या बाबत वगैरे कळत नाही, असे अनेक स्टिरिओटाईप सर्वत्र बघायला मिळतात. त्यात बायकांचे बायकांबद्दल आणि पुरुषांचे पुरुषांबद्दल गैरसमज हा अजून एक मोठा विषय. पूर्वांचलातील लोकांना नेपाळी समजणे हे तर खरेच खूपदा घडते. मीच परवा अशी चूक केली होती. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार्‍या मुलीचा चेहरा बघून विचारले होते "तुम नेपाल से आयी हो?" त्यावर ती जरा हसली आणि म्हणाली "नहीं, आसामसे." ऐकून "इतनी दूर से आयी हो क्या," म्हणत तिथून निघाले खरी. पण आसामी लोकाणा सरसकट नेपाळी समजायची चूकच आहे. दिल्लीत मधे एका मुलाचा असाच विनाकारण खून झाल्याची घटना आठवली.

अजया 11/12/2015 - 19:12
पुरुषांबाबतही होतं खरं.मान्य आहे. बायकांचे पण पुरुषांबाबत उगाचच अनेक पूर्वग्रह असतात हे अनुभवले आहे.मी स्वतःही त्याला अपवाद नाही.मला केसांचा पोनी घालून फिरणारे बुवा लोक उगाच थिल्लर फालतु वाटत असत.ते नंतर अनुभवाने बदलले!

पद्मावति 11/12/2015 - 22:54
उत्तम विषय. सरसकटीकरण वाईटच. स्टीरिओटाइपचं अजुन एक उदाहरण म्हणजे युरोपियन, अमेरिकेन ( श्वेतवर्णीय) स्त्री किंवा पुरूष सर्रास लग्नाबाहेर अफेअर्स करतात, त्यांना कुटुंबसंस्थेची अजिबात किंमत नसते, त्यांची मुलं बिघडलेली असतात.. वगैरे वगैरे.

१००% सहमत! रच्याकने सरसगटीकरण चुकच! मग ते पुण्यामुंबईच्या मुलींच्या बाबतीत असो की त्या भलत्या पुढारलेल्या ,ॲडव्हान्स असतात असे किंवा ग्रामीण भागातील मुली अशा नसतातच असेही.

स्रुजा 12/12/2015 - 01:04
सरसकटीकरण अनेक प्रकारचं असतं. घरात बायकोला मदत करणारा नवरा असला की बायको आळशीच असली पाहिजे. आमच्याकडे नाही बाई अशी सवय असं बायकाच म्हणतात. हाऊसवाईव्ज ना काम नसतं अस नोकरदार म्हणतात, नोकरी करणार्‍या बाईचं घराकडे लक्ष नसतं असं गृहिणी म्हणतात. बाहेरच्या देशांत संस्कार, मुल्यं, कुटुंबवत्सल भावना नसतात असा उगीच च भारतीयांचा गैरसमज आहे. आमची संस्कृती आमची संस्कृती करत बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा दुटप्पीपणा आपण आपोआप च करतो. इथुन भारतात जाताना लसीकरण करुन जाणारे भारतीय बघितले की काय म्हणायचं कळत नाही. बरं येऊन एक च वर्ष झालेलं असतं भारतीय नोकरदार नुसती ओझी वाहतो, पार्कांमध्ये फिरायला जाणे, शहराबाहेर जाणे, मित्रांबरोबर एंजॉय करणे असले प्रकार त्यांच्या गावी ही नसतात असा इथे काम करणार्‍या भारतीयांचा उगाचच समज असतो. बाहेर राहणारे भारतीय खोर्‍याने पैसा ओढतात हा इथल्यांचा स्टीरीओटाईप. आम्ही कट्यार स्क्रीन करतो आहोत आमच्या शहरात . थिएटर वाल्याने सुरुवातीपासुन इतका त्रास दिला की विचारता सोय नाही. अगदी ठरवुन नियमांवर बोट ठेवुन अडवुन पाहत होता. ब्युरॉक्रसी चा अर्क ! परवा आय सी एम ए कडुन फिल्म मिळाल्यावर थिएटर मध्ये गेलो. त्याचं टेस्टिंग करत होतो. एक एक करत त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत गेलो तसं त्याला आम्ही तांत्रिक बाजु समजणार्‍यांपैकी आहोत हे कळलं आणि मग आम्हाला म्हणे मागच्या एका भारतीय सिनेमाच्या वेळेस त्रास झाला म्हणे फार तेंव्हापासून आम्ही भारतीय सिनेमे लावत नाही !! सिनेमा कोणता ? तर म्हणे लंच् बॉक्स आणि म्हणे एवढा त्रास सहन करुन २० च लोकं बघुन गेले . काय बोलणार कप्पाळ? पण हा देखील स्टीरीओटाईप च. भारतीय कारभार असाच भोंगळ हे त्याने आम्हाला जरा गोड शब्दात म्हणजे "तुम्ही नाही हां तसे" अशा थाटात बोलुन दाखवला. या दिडशहाण्याने लंच बॉकच्स च्या वेळी झालेला लॉस आमच्या कडुन भरुन घेतला असावा.

अजया 11/12/2015 - 17:02
जाहीर तीव्र निषेध तर आहेच.
अशा प्रकारे समुह,गाव,शहर,प्रांत,जात,धर्म,भाषा,वर्ण असे कोणतेही कारण देऊन त्या समुहातील स्त्रीयांना विशीष्टपणे कॅटेगराईज करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सर्वथा गैर आणि निषेधार्ह आहे.
विनोद करणे हि वेगळी गोष्ट आहे पुर्वग्रह करून शिक्के मारणे हा चांगला विचारही नाही चांगला विनोदही नाही.
अत्यंत सहमत.

मितान 11/12/2015 - 17:17
लेखन विषयाशी अत्यंत सहमत ! त्याच प्रमाणे, स्त्रीयांकडूनही पुरुषांसदर्भात असे पूर्वग्रह पोसले व पसरवले जातात ते ही डोक्यात जातं. उदा: टिपिकल, पुरूष म्हणजे 'एका माळेचे मणी' या अर्थाचे जोक्स वगैरे ! मी अशा स्त्रीयांच्याही वर्तनाचा निषेध करते !

बोका-ए-आझम 11/12/2015 - 17:22
असं मत हे त्याच त्या वर्तुळात आणि परीघात फिरणाऱ्या आणि संकुचित मानसिकता असणाऱ्या लोकांकडून होतं आणि दुर्दैवाने चित्रपटांत केल्या जाणाऱ्या stereotypical चित्रणाने त्याला हातभार लागतो.

पैसा 11/12/2015 - 17:31
स्टिरिओटाईप समजुतींचा निषेध. पुण्यामुंबईतल्या स्त्रियांबाबत असा विचार होतो याचा अनुभव सुद्धा आहे. एकदा मुंबईहून वर्धेला जात होते. जळगाव की भुसावळ कुठेतरी रिझर्व्हेशनच्या डब्यात काही शहरी नोकरदार दिसणारे लोक चढले. त्यानी मी आणि माझी चुलतबहीण आम्हाला चक्क सीटवरून झोपलेले उठवले आणि आपण बसू लागले. विरोध केला तर हे आमचे रुटीन आहे, इथे टीसी पोलीस कोणी येणार नाही वगैरे भाषा सुरू केली. सगळ्यात वाईट म्हणजे त्यातल्या एकाने "मुंबई पुण्याच्या बाया लै शान्या समजतात स्वतःला" अशी कॉमेंट मारली. बाकी लोक नुसते बघत राहिले. ते उतरून गेले तशी आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की त्या भागात हे नेहमीच चालतं. पुरुष म्हणजे असेच हा स्टिरोटाईप विचार काही बायकाच नव्हे तर अनेक पुरुषही करतात आणि त्यात काही चूक आहे असे त्यांना जाणवतही नाही. ही आपले संस्कार आणि शिक्षण कमी पडत आहे याची खूण म्हणावी का?

अभ्या.. 11/12/2015 - 18:36
असल्या होलसेल निषेधाच्या धाग्याचा निषेध. माहीतगारांनी नेहमीच्या माहीतीपूर्ण धाग्या ऐवजी असा अपेक्शाभंग केल्याबद्दल त्यांचा निषेध. . . निषेधाचे बोर्ड आमच्याकडून बनवून न घेतल्याबद्दल अजूनच निषेध.

सूड 11/12/2015 - 18:46
स्त्री अमुक एक पोषख करते अथवा अमुक पद्धतीने वागते, पुरुषांशी मोकळेपणाने बोलते वावरते, किंवा तिची स्वतःची व्यक्तीगत जिवनातील निवड अमूक राहिली आहे म्हणून तिच्या बाबत अपमानास्पद विचार बाळगणे सर्वस्वी निषेधार्ह आहे. विश्वभरातील असा अन्याय्य विचार
हे पुरुषांच्या बाबतीत पण होतं हो, काय सांगायचं आता!! असो.

In reply to by सूड

नाखु 12/12/2015 - 09:15
सहमत. मागे कुठल्यातरी धाग्यात शाळेला सोडायला आलेल्या पुरुष पालकाशी वितंडवाद व हीन आरोप करणार्या स्त्रीला, त्याच सोसायटीतील स्त्रीयांनी जाब विचारणे सोडाच साधा अटकाव ही केला नव्हता असे प्रतिसाद कर्त्याने सांगीतले. घाऊक प्रमाणात विचार करणे आणि मुलांना त्यांच्या कळत्या वयातच असे करण्यापासून परावृत्त करणे.वेशभूषेवरून्,किंवा फक्त विशीष्ठ प्रांत /समूह्/जात्/देशाची व्यक्ती म्हणून काही पूर्वग्रह दूषीत मते बनवू नयेत म्हणून आपणच घरापासून काळजी घ्यायला हवी.. अगदी ताजे उदाहरण आहे मी मुलासोबत चिंचवडहून पुण्याला गाडीवरून चाललो होतो,पिंपळे सौदागरच्या चौकात (बर्याच मॉल व आय टी मुळे हा भाग पूर्णतः कॉस्मोपॉलीटीन झाला आहे. सिग्नलला काही पूर्वांचल भागातील तरूण तरूणी चालले होते.मुलाने उन्त्सुकतेने म्हटले "बाबा हे चिनी लोक भारतात येतात शिकायला नोकरीला ?" मला त्यांच्या पेहरावावरून आणि एकून तोंडावळ्यावरून ते चिनी नाहीत तर भारतातल्याच सप्त्कन्या प्रदेशातून आहेत हे जाणवले.(मिझोराम-त्रिपुरा ई). आणि मी मुलाला लगेच म्हटले तुला जर भारतातल्या दुसर्या राज्यात अगदी आंन्ध्र/ओरिसात गेला आणि त्यांनी तू पाकीस्तानी/इतर देशातला आहेस असे म्हटले तर काय वाटेल (तुझी भाषा त्यांना व त्यांची भाषा तुला कळत नसल्याने). तो रागाने उसळून म्हणाला "नाही आवडणार मी भारतीय आहे आणि महाराष्ट्रातून आहे हे त्यांना सांगीन आणि त्यांनी मला मराठी+भारतीय समजावे अशीच अपेक्षा ठेवीन." योगायोगाने नंतर टीव्हीवर त्याला एका सांस्क्रुतीक कार्यक्रमात दोन चार राज्यांचे नृत्य पाहायला मिळाले त्यात असेच पूर्वांचल भागातील्ही एक होते आणि आपोआप उत्तर मिळाले.
दुर्दैवाने आजही सुशिक्षीत+शहरी लोक सर्व स्वेटर विकणार्या आणि पूर्वांचल भागातील युवक युवतींना नेपाळी-चिनी म्हणून संबोधतात आणि त्याचा त्यांना काय त्रास होत असेल त्याचा कोणीही विचार करीत नाहित
हिंदुस्तान मेरा वतन नुस्ते अंमलात आणणार्या सोन्याबाप्पुंचा पंखा नाखु

In reply to by नाखु

पैसा 12/12/2015 - 19:41
पुरुषांनी घरकाम करणे म्हणजे कमीपणा, बायकांना आर्थिक निर्णय, प्रॉपर्टीच्या बाबत वगैरे कळत नाही, असे अनेक स्टिरिओटाईप सर्वत्र बघायला मिळतात. त्यात बायकांचे बायकांबद्दल आणि पुरुषांचे पुरुषांबद्दल गैरसमज हा अजून एक मोठा विषय. पूर्वांचलातील लोकांना नेपाळी समजणे हे तर खरेच खूपदा घडते. मीच परवा अशी चूक केली होती. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार्‍या मुलीचा चेहरा बघून विचारले होते "तुम नेपाल से आयी हो?" त्यावर ती जरा हसली आणि म्हणाली "नहीं, आसामसे." ऐकून "इतनी दूर से आयी हो क्या," म्हणत तिथून निघाले खरी. पण आसामी लोकाणा सरसकट नेपाळी समजायची चूकच आहे. दिल्लीत मधे एका मुलाचा असाच विनाकारण खून झाल्याची घटना आठवली.

अजया 11/12/2015 - 19:12
पुरुषांबाबतही होतं खरं.मान्य आहे. बायकांचे पण पुरुषांबाबत उगाचच अनेक पूर्वग्रह असतात हे अनुभवले आहे.मी स्वतःही त्याला अपवाद नाही.मला केसांचा पोनी घालून फिरणारे बुवा लोक उगाच थिल्लर फालतु वाटत असत.ते नंतर अनुभवाने बदलले!

पद्मावति 11/12/2015 - 22:54
उत्तम विषय. सरसकटीकरण वाईटच. स्टीरिओटाइपचं अजुन एक उदाहरण म्हणजे युरोपियन, अमेरिकेन ( श्वेतवर्णीय) स्त्री किंवा पुरूष सर्रास लग्नाबाहेर अफेअर्स करतात, त्यांना कुटुंबसंस्थेची अजिबात किंमत नसते, त्यांची मुलं बिघडलेली असतात.. वगैरे वगैरे.

१००% सहमत! रच्याकने सरसगटीकरण चुकच! मग ते पुण्यामुंबईच्या मुलींच्या बाबतीत असो की त्या भलत्या पुढारलेल्या ,ॲडव्हान्स असतात असे किंवा ग्रामीण भागातील मुली अशा नसतातच असेही.

स्रुजा 12/12/2015 - 01:04
सरसकटीकरण अनेक प्रकारचं असतं. घरात बायकोला मदत करणारा नवरा असला की बायको आळशीच असली पाहिजे. आमच्याकडे नाही बाई अशी सवय असं बायकाच म्हणतात. हाऊसवाईव्ज ना काम नसतं अस नोकरदार म्हणतात, नोकरी करणार्‍या बाईचं घराकडे लक्ष नसतं असं गृहिणी म्हणतात. बाहेरच्या देशांत संस्कार, मुल्यं, कुटुंबवत्सल भावना नसतात असा उगीच च भारतीयांचा गैरसमज आहे. आमची संस्कृती आमची संस्कृती करत बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा दुटप्पीपणा आपण आपोआप च करतो. इथुन भारतात जाताना लसीकरण करुन जाणारे भारतीय बघितले की काय म्हणायचं कळत नाही. बरं येऊन एक च वर्ष झालेलं असतं भारतीय नोकरदार नुसती ओझी वाहतो, पार्कांमध्ये फिरायला जाणे, शहराबाहेर जाणे, मित्रांबरोबर एंजॉय करणे असले प्रकार त्यांच्या गावी ही नसतात असा इथे काम करणार्‍या भारतीयांचा उगाचच समज असतो. बाहेर राहणारे भारतीय खोर्‍याने पैसा ओढतात हा इथल्यांचा स्टीरीओटाईप. आम्ही कट्यार स्क्रीन करतो आहोत आमच्या शहरात . थिएटर वाल्याने सुरुवातीपासुन इतका त्रास दिला की विचारता सोय नाही. अगदी ठरवुन नियमांवर बोट ठेवुन अडवुन पाहत होता. ब्युरॉक्रसी चा अर्क ! परवा आय सी एम ए कडुन फिल्म मिळाल्यावर थिएटर मध्ये गेलो. त्याचं टेस्टिंग करत होतो. एक एक करत त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत गेलो तसं त्याला आम्ही तांत्रिक बाजु समजणार्‍यांपैकी आहोत हे कळलं आणि मग आम्हाला म्हणे मागच्या एका भारतीय सिनेमाच्या वेळेस त्रास झाला म्हणे फार तेंव्हापासून आम्ही भारतीय सिनेमे लावत नाही !! सिनेमा कोणता ? तर म्हणे लंच् बॉक्स आणि म्हणे एवढा त्रास सहन करुन २० च लोकं बघुन गेले . काय बोलणार कप्पाळ? पण हा देखील स्टीरीओटाईप च. भारतीय कारभार असाच भोंगळ हे त्याने आम्हाला जरा गोड शब्दात म्हणजे "तुम्ही नाही हां तसे" अशा थाटात बोलुन दाखवला. या दिडशहाण्याने लंच बॉकच्स च्या वेळी झालेला लॉस आमच्या कडुन भरुन घेतला असावा.
"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे.

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

गंगाधर मुटे ·

कै. खैरनार यांना श्रद्धांजली.
काहीकेल्या मिठी सैल होतच नव्हती आणि डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रूही थांबायचे नाव घेत नव्हते.
भाग्यवान आहात तुम्ही. ‘आठवड्याचा ग्यानबा’तून बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न कसा केला ह्याबद्दल अधिक वाचयला आवडेल.

माहितगार 08/12/2015 - 10:00
आपण केलेले व्यक्ती चित्रण भावले. मुरलीधर खैरनारांची ज्ञानकोशीय दखल घेणे आवडेल. त्यांचे पुर्ण नाव, जन्म दिनांक, थोडी अधिक व्यक्तीगत माहिती जसे शिक्षण आणि कारकीर्द या बद्दल अधिक माहिती आणि संदर्भ उपलब्ध झाल्यास आभारी राहीन.

मुरलीची माझी प्रत्यक्ष भेट केवळ एकदाच. तीसुद्धा ग्रुपमध्ये. माणूस अत्यंत लक्षात राहाण्याजोगा. बडबड्या. विविध विषयात गती असलेला. 'शोध' लिहित होता तेव्हा कादंबरी लेखनाची रोजनिशी लिहायची भन्नाट आयडीया तो फेसबुकवर राबवित होता. तेव्हा नियमित संपर्क होत असे. तो गेल्याचे कळल्यावर, त्याने आजाराशी कसा सामना केला ती हकिकत कळली. केवळ स्तिमित करणारी कहाणी. आमची भेट झाली तेव्हा तो आजारीच होता हे परवा कळले. सांगूनही खरं वाटत नाहीये आता. जगला स्वतःच्या मस्तीत, मृत्यूलाही डोळे भिडवून नजर देत गेला.

बॅटमॅन 08/12/2015 - 23:50
श्रद्धांजली. शोध या कादंबरीच्या फेसबुक पेजवर झालेल्या दोनतीन फुटकळ संभाषणांचेही स्मरण ठेवून वर कादंबरीत ऋणनिर्देश करण्याचे कष्ट घेणारा माणूस विरळाच. खूप काही लिहू शकले असते अजून. असो....

एस 09/12/2015 - 13:09
खैरनार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या अकाली जाण्यामुळे मराठी साहित्यविश्वाचे नुकसानच झाले आहे!

प्रास 09/12/2015 - 14:05
तुम्ही खैरनारजींचा फारच सुंदर ढंगाने परिचय करून दिलात. आपलं आयुष्य संपन्न करणार्‍या जिंदादिल व्यक्तींच्या निधनाने निर्माण झालेल्या पोकळीचं दर्शन तुमच्या लिखाणातून दिसतंय. ईश्वर खैरनारांच्या आत्म्यास सद्गति देवो....

कै. खैरनार यांना श्रद्धांजली.
काहीकेल्या मिठी सैल होतच नव्हती आणि डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रूही थांबायचे नाव घेत नव्हते.
भाग्यवान आहात तुम्ही. ‘आठवड्याचा ग्यानबा’तून बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न कसा केला ह्याबद्दल अधिक वाचयला आवडेल.

माहितगार 08/12/2015 - 10:00
आपण केलेले व्यक्ती चित्रण भावले. मुरलीधर खैरनारांची ज्ञानकोशीय दखल घेणे आवडेल. त्यांचे पुर्ण नाव, जन्म दिनांक, थोडी अधिक व्यक्तीगत माहिती जसे शिक्षण आणि कारकीर्द या बद्दल अधिक माहिती आणि संदर्भ उपलब्ध झाल्यास आभारी राहीन.

मुरलीची माझी प्रत्यक्ष भेट केवळ एकदाच. तीसुद्धा ग्रुपमध्ये. माणूस अत्यंत लक्षात राहाण्याजोगा. बडबड्या. विविध विषयात गती असलेला. 'शोध' लिहित होता तेव्हा कादंबरी लेखनाची रोजनिशी लिहायची भन्नाट आयडीया तो फेसबुकवर राबवित होता. तेव्हा नियमित संपर्क होत असे. तो गेल्याचे कळल्यावर, त्याने आजाराशी कसा सामना केला ती हकिकत कळली. केवळ स्तिमित करणारी कहाणी. आमची भेट झाली तेव्हा तो आजारीच होता हे परवा कळले. सांगूनही खरं वाटत नाहीये आता. जगला स्वतःच्या मस्तीत, मृत्यूलाही डोळे भिडवून नजर देत गेला.

बॅटमॅन 08/12/2015 - 23:50
श्रद्धांजली. शोध या कादंबरीच्या फेसबुक पेजवर झालेल्या दोनतीन फुटकळ संभाषणांचेही स्मरण ठेवून वर कादंबरीत ऋणनिर्देश करण्याचे कष्ट घेणारा माणूस विरळाच. खूप काही लिहू शकले असते अजून. असो....

एस 09/12/2015 - 13:09
खैरनार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या अकाली जाण्यामुळे मराठी साहित्यविश्वाचे नुकसानच झाले आहे!

प्रास 09/12/2015 - 14:05
तुम्ही खैरनारजींचा फारच सुंदर ढंगाने परिचय करून दिलात. आपलं आयुष्य संपन्न करणार्‍या जिंदादिल व्यक्तींच्या निधनाने निर्माण झालेल्या पोकळीचं दर्शन तुमच्या लिखाणातून दिसतंय. ईश्वर खैरनारांच्या आत्म्यास सद्गति देवो....

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व


            "मुरली खैरनार गेलेत" असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले "हे राम!"

२६/११

_मनश्री_ ·

एस 26/11/2015 - 19:09
श्रद्धांजली! आज सात वर्षांनी आपल्या शहरांची सुरक्षितता कितपत सुधारली आहे हे व्यथित करणारे आहे...!

In reply to by नाव आडनाव

नाव आडनाव 26/11/2015 - 21:21
२००४ साली पेपरमधे एक बातमी वाचली होती. ती बातमी होती की अरूण गवळी मतदानाला गेला नाही कारण तो एका इनस्पेक्टर ला घाबरला. ते इनस्पेक्टर होते विजय साळस्कर. इतका मोठा गुंड ज्यांना घाबरतो त्यांचा फोटो बघण्याची इच्छा होती. हे नाव लक्षात होतं. २७ तारखेला (हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी) मुंबईला जायचं होतं, तेंव्हा निघण्या आधी टीव्ही लावून बघितला तर फोटो आणि खाली नाव अशी बातमी चालू होती - "अशोक कामठे शहीद, "हेमंत करकरे शहीद, "विजय साळस्कर शहीद"... http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Arun-Gawli-shoots-down-encounter-fears/articleshow/890559.cms

नाखु 27/11/2015 - 17:02
या हल्ल्यातून नक्की काय धडा घेतला स्र्व स्तरावर यावर कुठेही चर्चा-लेख दिसलेच नाहीत अमिरच्या किरणोस्तारामुळे कदाचित दर्शक आणि सर्कसवाले यांना हा टीआरपी वाला विशञ नसावा..

एस 26/11/2015 - 19:09
श्रद्धांजली! आज सात वर्षांनी आपल्या शहरांची सुरक्षितता कितपत सुधारली आहे हे व्यथित करणारे आहे...!

In reply to by नाव आडनाव

नाव आडनाव 26/11/2015 - 21:21
२००४ साली पेपरमधे एक बातमी वाचली होती. ती बातमी होती की अरूण गवळी मतदानाला गेला नाही कारण तो एका इनस्पेक्टर ला घाबरला. ते इनस्पेक्टर होते विजय साळस्कर. इतका मोठा गुंड ज्यांना घाबरतो त्यांचा फोटो बघण्याची इच्छा होती. हे नाव लक्षात होतं. २७ तारखेला (हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी) मुंबईला जायचं होतं, तेंव्हा निघण्या आधी टीव्ही लावून बघितला तर फोटो आणि खाली नाव अशी बातमी चालू होती - "अशोक कामठे शहीद, "हेमंत करकरे शहीद, "विजय साळस्कर शहीद"... http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Arun-Gawli-shoots-down-encounter-fears/articleshow/890559.cms

नाखु 27/11/2015 - 17:02
या हल्ल्यातून नक्की काय धडा घेतला स्र्व स्तरावर यावर कुठेही चर्चा-लेख दिसलेच नाहीत अमिरच्या किरणोस्तारामुळे कदाचित दर्शक आणि सर्कसवाले यांना हा टीआरपी वाला विशञ नसावा..
1 2
आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सात वर्षे पूर्ण झाली , या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली