मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

दोन मनिष

सनईचौघडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही कहांणी आहे माझ्या समोर घडलेल्या समान नावे असणार्‍या दोन मुलांची. त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. या कुटंबाची घडी कधी नीट बसलीच नाही. सारखे काही ना काही संकट त्यांच्यावर येत गेले. मी जेव्हा ७ वीत होतो तेव्हा तो चौथीत होता. त्यामुळे तो तसा आम्हाला लिंबुटिंबु होता. तब्येतीने बारिक, सडपातळ, खाण्यापिण्याचा कंटाळा. जेवताना अन्न चिवडत बसायचा आई बाजुला बसुन भरवायची त्याला. लहानपणी त्याला जावळं येत नव्हते तेव्हा त्याच्या माऊलीने हरतर्‍हेचे उपाय योजले.

मै तो चला

नितीनचंद्र ·
जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत. जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

खेडूत ·
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

खुर्ची

सस्नेह ·
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस. दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त. कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

साहित्य संपादक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत. मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात.

कडेमनी कंपाऊंड

शिव कन्या ·
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.

विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध

माहितगार ·
"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे.

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व


            "मुरली खैरनार गेलेत" असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले "हे राम!"

२६/११

_मनश्री_ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 2
आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सात वर्षे पूर्ण झाली , या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली