मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

अशी सजेल दिवाळी

नूतन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ.

जप

निनाद ·
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी.

हमारा स्टेशन हमारी शान

वेल्लाभट ·
लेखनविषय:
'बोरीवली स्टेशनचा कायापालट' अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं.

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर ·
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

पावन

निओ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पहाट झाली होती. आभाळ सर्वदूर व्यापून होते. रप् रप् पाऊस झाडा झुडुपात, चिखलात वाजत होता. घोडखिंडीतील पाणी आता लाल होऊन वाहत होतं. वरनं पावसानं आणि खालनं मावळ्यांनी घोडखिंडीत झुंबड उडवली होती. तलवारींच्या खण् खणाटांनी आणि आरोळ्यांनी खिंड दणाणून गेली होती. हबशी सिद्दी मसूद आणि त्याची रानटी फौज पुढे घुसायचा प्रयत्न करीत होती. बांदलसेना हर प्रकारे तो हाणून पाडत होती. मराठयांच्या राजाचा जीव धोक्यात होता. तो वाचवण्यासाठी मावळे पराक्रमाची शर्थ करत होते तर आपल्या सरदाराची अब्रू वाचवण्यासाठी मसूदची फौज झगडत होती. हिरडस मावळातील बांदलसेना जीवावर उदार होऊन लढत होती.

ईती स्थितप्रज्ञ लक्षणं – स्थितप्रज्ञम - इदं न मम !!

ज्याक ऑफ ऑल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थितप्रज्ञ म्हणजे काय याची अनेक लक्षणं वेळोवेळी संत-महात्म्यांनी सांगून ठेवलेलीच आहेत. आता मी सांगतो (म्हणजे मला पहा फुलं वहा). तर.. जसा जसा मानव “डार्विन काकांनी” म्हंटल त्या प्रमाणे उत्क्रांत का काय ते होत गेला , तशी तशी त्यातली स्थितप्रज्ञ लक्षणं पण बहुदा बदलायला लागली. सबब , कलीयुगातले स्थितप्रद्न्य म्हणजे एक वेगळी जमातच आहे महाराजा !!
चेहऱ्यावरी मंद भावे , निवांतपणे जो कान खाजवे , ना कोणाशी हेवे दावे , तो एक स्थितप्रद्न्य !!
ई.स. २०१६ संत ज्याक (ग्रंथ-ज्याकाई मधून) (म्हणजे मीच्तो) तर मी आणि असे स्थितप्रज्ञ , आमचं अन यांचं फार जुनं नातं आहे.

मोहिम-ए-संपादक

रातराणी ·
लेखनविषय:
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.

भक्तिमॉन गो!

वेल्लाभट ·
लेखनप्रकार
bg सदर लेख लोकमत हॅलो ठाणे पुरवणीर १४-०९-१६ रोजी प्रकाशित झाला

नलेश पाटील गेले.....

उदय ४२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुसळधार गुंत्यातून सोडवून आणलेला माझ्यापाशी आहे एक दोरा पावसाचा... धुक्यातल्या दिवसाचा, आभाळाच्या नवसाचा विणत राहीन म्हणतो, एक शेला झऱ्याचा... घेईल जो अवतार कधी काळी नदीचा आशय ज्याचा असेल कबीराच्या दोह्याचा... - नलेश पाटील कवी नलेश पाटील कालवश झाले. आदरांजली

बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

मार्गी ·
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.