जिव्हाळघरटी
मनाच्या काचेवर कापरासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडून जाते, ते उडूच नये असे वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र इथूनच ते हरवून द्यायला..
पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते.
नातं व्हावं कसं.. जराही उत्तम नको, तर मनावर काच ठेवून दिसत राहिलं नुसतं तरी निखळ..
ते नको नातं ज्यात नावाचे रकाने भरावेत, वंशाची जबाबदारी घेत.
छंदबद्ध तारे खुणावत राहावेत नात्यात, फुलांचा देठापर्यंतचा मागोसा जाणवत-घेत-शेवटत जाणारे.