ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या !
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥

दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं. तेव्हा आज परत धर्मवीर गड-पेडगाव, भीमेच्या काठावरचे सौंदर्य पाहायला गेले.
पुस्तक परिचय
पुस्तक : लढा आळशीपणाशी
लेखक: चकोर शाह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस.
परिचय कर्ता : चकोर शाह.
रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात
भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री:
इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः

लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे."
ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?"
मनातल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)"
तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय"
सुखदुःखविवेक -भाग-१
#सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते.
व्याख्या १.
नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत.
व्याख्या-२
मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल.
-आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची
सिंधूनदी

कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा.. गंमत म्हणजे जे काही आकलन ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.
असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते.
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात.
#गीतारहस्य
प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र
"तस्मादयोगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०)
"म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात."
योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे.
कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार.
' तस्मादद्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय.