मनोगत
खिशात माझ्या घेऊनि फिरतो
वादळ घोंघावते
इंद्रधनू भवताली माझ्या
सतरंग पसरते
भावनांचा लाव्हा जिभेवर
आस नाही मज कसली
यमकांची मोळी बांधुनी
मी विस्तवात टाकली
जान्हवी जणू डोळे माझे
जिथे तिथे पोहोचते
अनुभवाची लाट उसळुनी
मनसागरात धडकते
लखलखतो तो सूर्य हाती
शब्द जाळत फिरतो
विसरतो मी रीत सारी
आठवेल ते लिहितो
कधी बरसतो मेघ सावळा
थेंबे थेंबे पाणी
काव्य नसे हे अव्वल मित्रा
हि तर अनुभवाची कहाणी ....
हि तर अनुभवांची कहाणी .................