मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Sense of Humour

kurlekaar ·

In reply to by कंजूस

kurlekaar 13/03/2014 - 15:52
मला वाटतं Admin साहेबांनी Respond व Comment या दोन शब्दांचं भाषांतर करून प्रतिसाद व प्रतिक्रिया या शब्दांचा वापर केलेला दिसतोय. Response चं भाषांतर ‘प्रतिसाद’ होऊ शकतं पण मला वाटतं Respond चं भाषांतर ‘प्रतिक्रिया द्या’ असं व्हायला हवं. Comment चं भाषांतर मात्र ‘प्रतिक्रिया’ करणं योग्य आहे जरी ते १००% fit होत नसलं तरी. ‘प्रतिक्रिया’ हा एकच शब्द पुरेसा झाला असता. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by आदूबाळ

kurlekaar 13/03/2014 - 16:21
आपण ज्यांना classic किंवा अभिजात म्हणतो त्या कांही गोष्टी सोडून इतर सर्व कांही कालबाह्य होऊ शकते. आमचे हायस्कुलातले कांही शिक्षक व शिक्षिका चक्क धोतर व नऊवारी साडी नेसून यायच्या. शाळा सोडून कांही वर्षं झाल्यानंतर त्यांना त्याच वेशभूषेत पाह्यला थोडं विनोदी वाटायचं कारण आमच्या दृष्टीने ते कालबाह्य होतं. आता कुणी पंधरा विस पूर्वी प्रचलित असलेल्या flares bottom trousers घातलेलं पाहिलं की कसं वाटतं? या इतर गोष्टींप्रमाणे विनोद हा साहित्य-प्रकार सुद्धा कालबाह्य होऊ शकतो. तेंव्हा कांहीतरी सेलीब्रेट करायला बंडू स्नेहलतेला घेऊन रेस्तराँ मध्ये जातो व अर्धा डझन आईसक्रीम व आम्लेट मागवतो काय किंवा आईस्क्रीम खात खात उभ्या असलेल्या हमालगाडी वरून चालत येतो काय. तेंव्हाचे लेखक व वाचक या सर्वांचे सर्वच सामाजिक संदर्भ वेगळे होते आत्ता क्वचित मी तेवढा हसणार नाहीं पण तेंव्हा निश्चितच खूप हसलो होतो.

वडापाव 13/03/2014 - 15:49
Roman Holiday मध्ये देखिल Gregory Peck ला Audrey Hepburn ही एक राजकन्या आहे हे ""शेवटपर्यंत"" माहित नसतं व तिला तो एक गरीब बिचारी समजून दिवसभर रोम दाखवीत फिरतो. please watch the movie again!!

In reply to by वडापाव

kurlekaar 13/03/2014 - 16:42
ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न ही एक राजकन्या असते हे कधी कळतं या बाबतीत गफलत होऊ शकते पण माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे ती ग्रेगरी पेक ची शेवटची प्रतिक्रिया. एका अशक्यप्राय प्रेमसंबंधातून तो कसा हसत हसत बाहेर पडतो ते. I do not think I need to see that movie again for that. Thanks for your comments.

चित्रगुप्त 13/03/2014 - 16:14
विनोदबुद्धीवर याहून अधिक व्यापक आणि मूलगामी लिखाणाची अपेक्षा ठेवणे वावगे ठरू नये. उदाहरणे आंग्ल चित्रपटांऐवजी चिमणराव वगैरेंची, किंवा स्वतःच्या जीवनातील प्रसंगांची दिलीत, तर जास्त भावतील.

सुनील 13/03/2014 - 16:21
मला वाटतं, सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी) ही आपण स्वतः किती विनोद करतो अथवा आपणाला किती समजतो यापेक्षाही, दुसर्‍याने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे.

In reply to by सुनील

kurlekaar 13/03/2014 - 16:56
यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे” अगदी बरोबर. पण इथं तुम्ही ‘विनोदबुद्धी’ या शब्दाचं प्रयोजन विनोदाशी संलग्न राहून केलेलं आहे. क्वचित मला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलेलं दिसत नाहीं पण मी इथं विनोदबुद्धी व विनोद यांची फारकत करून विनोदबुद्धी हे कसं आयुष्याचं तत्वज्ञान होऊ शकतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

In reply to by सुनील

kurlekaar 13/03/2014 - 16:56
यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे” अगदी बरोबर. पण इथं तुम्ही ‘विनोदबुद्धी’ या शब्दाचं प्रयोजन विनोदाशी संलग्न राहून केलेलं आहे. क्वचित मला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलेलं दिसत नाहीं पण मी इथं विनोदबुद्धी व विनोद यांची फारकत करून विनोदबुद्धी हे कसं आयुष्याचं तत्वज्ञान होऊ शकतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

In reply to by kurlekaar

kurlekaar 13/03/2014 - 18:26
अगदी बरोबर म्हणून तुम्हाला मी पोच दिली असली तरी थोडसं hindsightने पाह्यला गेलं तर ‘आपल्या समाजावर’ केलेले विनोद आपण आपल्या चांगल्या ‘विनोदबुद्धी’ खाली स्वीकारावेत हे तितकसं पटत नाहीं. स्वतःवरचे-वैयक्तिक- विनोद स्वीकारणं वेगळ पण आपल्या समाजांत दुसऱ्या व्यक्ति देखिल घटक असतात तेंव्हा तुम्ही तुमच्या विनोद्बुद्धीसाठी तुम्ही तुमच्या समाजावर केलेला विनोद स्वीकारणं या इतर व्यक्तींचा विचार केला तर ते खुपच unfair वाटतं; असे विनोद स्वीकारण्याचा आपणांस कांहीच अधिकार नसतो.

मनीषा 13/03/2014 - 16:39
जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा humour आपल्या स्वतःच्या Humour च्या चौकटीत बसत असेल तरच आपण म्हणतो की “ या अमुक अमुक व्यक्तीला चांगला sense of humour आहे“, नाहींतर नाहीं.
हे अगदी खरं .. विनोद्बुद्धी ही सापेक्ष असते .. म्हणजे आपण स्वतः दुसर्‍यावर विनोद केला, चेष्टा केली तर ती चांगली विनोद्बुद्धी असं म्हणायचं... आणि दुसर्‍याने जर चेष्टा केली तर त्याला टवाळखोर म्हणायचं . बाकी विनोद या विषयावर इतक गंभीर लेखन केलत हे विशेषच. "रोमन हॉलीडे" परत एकदा पहावा ही विनंती.

In reply to by मनीषा

kurlekaar 13/03/2014 - 17:36
विनोदबुद्धी सर्वसाधारणता सापेक्ष असते हे अगदी बरोबर ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न ही एक राजकन्या असते हे कधी कळतं या बाबतीत गफलत होऊ शकते.या व्यतिरिक्त या post मध्ये त्रुटी असल्यास ज्याने आपणास वाटतं की मी तो चित्रपट पुन्हा पहावा ते जरूर कळविणे.माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे ती ग्रेगरी पेक ची शेवटची प्रतिक्रिया. एका अशक्यप्राय प्रेमसंबंधातून तो कसा हसत हसत बाहेर पडतो ते. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by kurlekaar

मनीषा 13/03/2014 - 20:35
तुमच्या लेखात, नायकाला सत्यं शेवटी कळतं पण तो ते हसत हसत स्विकारतो.. पण ते तसं नाहीये ना? त्याला जर सत्यं आधीच माहिती आहे... (पण ते माहिती नाही असं तो भासवतो), तर मग घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात ना? (कारण इथे गृहितकच चूकीचे आहे). आणि मग त्या संदर्भाला धरून आलेल्या तुमच्या कल्पना, निष्कर्षं निकाली निघतात. बाकी काही नाही.. (आणि तो हसत बाहेर पडला हा त्याचा "सेन्स ऑफ ह्युमर" आहे असं तुम्हाला का वाटलं कळलं नाही. )

In reply to by मनीषा

kurlekaar 13/03/2014 - 22:14
हा चित्रपट मी १९६० नंतर पाहिलेला आहे व आठवणीतल्या सगळ्या gaps गुगल भरून काढू शकणार नाहीं. ग्रेगरी पेक त्याच्या संपादकाबरोबर या राजकन्येचा एक exclusive interview घ्यायची पैज स्वीकारतो पण तेन्व्हापर्यंत त्याला कांहीच ठाऊक नसतं, पण त्याला ते नंतर समजतं. तिच्याबरोबर रोम बघतांना त्याला हे ठाऊक झालेलं असावं. त्याला तिचे फोटो त्याच्या वृत्तपत्राला विकत देता आले असते पण तो तसं शेवटी करत नाहीं व ते तिलाच परत करतो व your secret is safe with me असं कांहीतरी पुटपुटतो. यांत तिच्या वरचं बसू लागलेलंत्याचं प्रेम असतंच पण त्यापेक्षा तो एक gentleman होता हे आहे. sense of humour ची व्याख्या मी इथं थोडीशी बदललीय व या विनोदबुद्धीला मी विनोदापासून वेगळे केलंय. sense of humour म्हणजे आयुष्याचं तत्वज्ञान असं कांहीतरी. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिक ब्रह्मदेशावर हल्ला करून येत असतांना जेंव्हा ब्रिटीश सैनिकांना याची बातमी लागली तेंव्हा त्यांनी जपानी आक्रमणापासून थोडसं दूर अशा ठिकाणी चाललेला त्यांचा क्रिकेट चा सामना थांबविला नाहीं कारण त्याच्या मते सामना संपेपर्यंत जपानी तिथं पोहोचणं असंभव होतं. दुर्देवाने sense of humour ची व्याख्या जेवढी विस्तृत आहे तेवढी विनोदबुद्धीची नांहीय.

In reply to by kurlekaar

kurlekaar 13/03/2014 - 22:31
"Gallows humor is humor in the face of or about very unpleasant, serious, or painful circumstances. Any humor that treats serious matters, such as death, war, disease, crime, etc., in a light, silly or satirical fashion is considered gallows humor. Gallows humor has been described as a witticism in the face of – and in response to – a hopeless situation" From Internet.

In reply to by कंजूस

kurlekaar 13/03/2014 - 15:52
मला वाटतं Admin साहेबांनी Respond व Comment या दोन शब्दांचं भाषांतर करून प्रतिसाद व प्रतिक्रिया या शब्दांचा वापर केलेला दिसतोय. Response चं भाषांतर ‘प्रतिसाद’ होऊ शकतं पण मला वाटतं Respond चं भाषांतर ‘प्रतिक्रिया द्या’ असं व्हायला हवं. Comment चं भाषांतर मात्र ‘प्रतिक्रिया’ करणं योग्य आहे जरी ते १००% fit होत नसलं तरी. ‘प्रतिक्रिया’ हा एकच शब्द पुरेसा झाला असता. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by आदूबाळ

kurlekaar 13/03/2014 - 16:21
आपण ज्यांना classic किंवा अभिजात म्हणतो त्या कांही गोष्टी सोडून इतर सर्व कांही कालबाह्य होऊ शकते. आमचे हायस्कुलातले कांही शिक्षक व शिक्षिका चक्क धोतर व नऊवारी साडी नेसून यायच्या. शाळा सोडून कांही वर्षं झाल्यानंतर त्यांना त्याच वेशभूषेत पाह्यला थोडं विनोदी वाटायचं कारण आमच्या दृष्टीने ते कालबाह्य होतं. आता कुणी पंधरा विस पूर्वी प्रचलित असलेल्या flares bottom trousers घातलेलं पाहिलं की कसं वाटतं? या इतर गोष्टींप्रमाणे विनोद हा साहित्य-प्रकार सुद्धा कालबाह्य होऊ शकतो. तेंव्हा कांहीतरी सेलीब्रेट करायला बंडू स्नेहलतेला घेऊन रेस्तराँ मध्ये जातो व अर्धा डझन आईसक्रीम व आम्लेट मागवतो काय किंवा आईस्क्रीम खात खात उभ्या असलेल्या हमालगाडी वरून चालत येतो काय. तेंव्हाचे लेखक व वाचक या सर्वांचे सर्वच सामाजिक संदर्भ वेगळे होते आत्ता क्वचित मी तेवढा हसणार नाहीं पण तेंव्हा निश्चितच खूप हसलो होतो.

वडापाव 13/03/2014 - 15:49
Roman Holiday मध्ये देखिल Gregory Peck ला Audrey Hepburn ही एक राजकन्या आहे हे ""शेवटपर्यंत"" माहित नसतं व तिला तो एक गरीब बिचारी समजून दिवसभर रोम दाखवीत फिरतो. please watch the movie again!!

In reply to by वडापाव

kurlekaar 13/03/2014 - 16:42
ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न ही एक राजकन्या असते हे कधी कळतं या बाबतीत गफलत होऊ शकते पण माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे ती ग्रेगरी पेक ची शेवटची प्रतिक्रिया. एका अशक्यप्राय प्रेमसंबंधातून तो कसा हसत हसत बाहेर पडतो ते. I do not think I need to see that movie again for that. Thanks for your comments.

चित्रगुप्त 13/03/2014 - 16:14
विनोदबुद्धीवर याहून अधिक व्यापक आणि मूलगामी लिखाणाची अपेक्षा ठेवणे वावगे ठरू नये. उदाहरणे आंग्ल चित्रपटांऐवजी चिमणराव वगैरेंची, किंवा स्वतःच्या जीवनातील प्रसंगांची दिलीत, तर जास्त भावतील.

सुनील 13/03/2014 - 16:21
मला वाटतं, सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी) ही आपण स्वतः किती विनोद करतो अथवा आपणाला किती समजतो यापेक्षाही, दुसर्‍याने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे.

In reply to by सुनील

kurlekaar 13/03/2014 - 16:56
यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे” अगदी बरोबर. पण इथं तुम्ही ‘विनोदबुद्धी’ या शब्दाचं प्रयोजन विनोदाशी संलग्न राहून केलेलं आहे. क्वचित मला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलेलं दिसत नाहीं पण मी इथं विनोदबुद्धी व विनोद यांची फारकत करून विनोदबुद्धी हे कसं आयुष्याचं तत्वज्ञान होऊ शकतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

In reply to by सुनील

kurlekaar 13/03/2014 - 16:56
यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे” अगदी बरोबर. पण इथं तुम्ही ‘विनोदबुद्धी’ या शब्दाचं प्रयोजन विनोदाशी संलग्न राहून केलेलं आहे. क्वचित मला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलेलं दिसत नाहीं पण मी इथं विनोदबुद्धी व विनोद यांची फारकत करून विनोदबुद्धी हे कसं आयुष्याचं तत्वज्ञान होऊ शकतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

In reply to by kurlekaar

kurlekaar 13/03/2014 - 18:26
अगदी बरोबर म्हणून तुम्हाला मी पोच दिली असली तरी थोडसं hindsightने पाह्यला गेलं तर ‘आपल्या समाजावर’ केलेले विनोद आपण आपल्या चांगल्या ‘विनोदबुद्धी’ खाली स्वीकारावेत हे तितकसं पटत नाहीं. स्वतःवरचे-वैयक्तिक- विनोद स्वीकारणं वेगळ पण आपल्या समाजांत दुसऱ्या व्यक्ति देखिल घटक असतात तेंव्हा तुम्ही तुमच्या विनोद्बुद्धीसाठी तुम्ही तुमच्या समाजावर केलेला विनोद स्वीकारणं या इतर व्यक्तींचा विचार केला तर ते खुपच unfair वाटतं; असे विनोद स्वीकारण्याचा आपणांस कांहीच अधिकार नसतो.

मनीषा 13/03/2014 - 16:39
जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा humour आपल्या स्वतःच्या Humour च्या चौकटीत बसत असेल तरच आपण म्हणतो की “ या अमुक अमुक व्यक्तीला चांगला sense of humour आहे“, नाहींतर नाहीं.
हे अगदी खरं .. विनोद्बुद्धी ही सापेक्ष असते .. म्हणजे आपण स्वतः दुसर्‍यावर विनोद केला, चेष्टा केली तर ती चांगली विनोद्बुद्धी असं म्हणायचं... आणि दुसर्‍याने जर चेष्टा केली तर त्याला टवाळखोर म्हणायचं . बाकी विनोद या विषयावर इतक गंभीर लेखन केलत हे विशेषच. "रोमन हॉलीडे" परत एकदा पहावा ही विनंती.

In reply to by मनीषा

kurlekaar 13/03/2014 - 17:36
विनोदबुद्धी सर्वसाधारणता सापेक्ष असते हे अगदी बरोबर ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न ही एक राजकन्या असते हे कधी कळतं या बाबतीत गफलत होऊ शकते.या व्यतिरिक्त या post मध्ये त्रुटी असल्यास ज्याने आपणास वाटतं की मी तो चित्रपट पुन्हा पहावा ते जरूर कळविणे.माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे ती ग्रेगरी पेक ची शेवटची प्रतिक्रिया. एका अशक्यप्राय प्रेमसंबंधातून तो कसा हसत हसत बाहेर पडतो ते. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by kurlekaar

मनीषा 13/03/2014 - 20:35
तुमच्या लेखात, नायकाला सत्यं शेवटी कळतं पण तो ते हसत हसत स्विकारतो.. पण ते तसं नाहीये ना? त्याला जर सत्यं आधीच माहिती आहे... (पण ते माहिती नाही असं तो भासवतो), तर मग घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात ना? (कारण इथे गृहितकच चूकीचे आहे). आणि मग त्या संदर्भाला धरून आलेल्या तुमच्या कल्पना, निष्कर्षं निकाली निघतात. बाकी काही नाही.. (आणि तो हसत बाहेर पडला हा त्याचा "सेन्स ऑफ ह्युमर" आहे असं तुम्हाला का वाटलं कळलं नाही. )

In reply to by मनीषा

kurlekaar 13/03/2014 - 22:14
हा चित्रपट मी १९६० नंतर पाहिलेला आहे व आठवणीतल्या सगळ्या gaps गुगल भरून काढू शकणार नाहीं. ग्रेगरी पेक त्याच्या संपादकाबरोबर या राजकन्येचा एक exclusive interview घ्यायची पैज स्वीकारतो पण तेन्व्हापर्यंत त्याला कांहीच ठाऊक नसतं, पण त्याला ते नंतर समजतं. तिच्याबरोबर रोम बघतांना त्याला हे ठाऊक झालेलं असावं. त्याला तिचे फोटो त्याच्या वृत्तपत्राला विकत देता आले असते पण तो तसं शेवटी करत नाहीं व ते तिलाच परत करतो व your secret is safe with me असं कांहीतरी पुटपुटतो. यांत तिच्या वरचं बसू लागलेलंत्याचं प्रेम असतंच पण त्यापेक्षा तो एक gentleman होता हे आहे. sense of humour ची व्याख्या मी इथं थोडीशी बदललीय व या विनोदबुद्धीला मी विनोदापासून वेगळे केलंय. sense of humour म्हणजे आयुष्याचं तत्वज्ञान असं कांहीतरी. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिक ब्रह्मदेशावर हल्ला करून येत असतांना जेंव्हा ब्रिटीश सैनिकांना याची बातमी लागली तेंव्हा त्यांनी जपानी आक्रमणापासून थोडसं दूर अशा ठिकाणी चाललेला त्यांचा क्रिकेट चा सामना थांबविला नाहीं कारण त्याच्या मते सामना संपेपर्यंत जपानी तिथं पोहोचणं असंभव होतं. दुर्देवाने sense of humour ची व्याख्या जेवढी विस्तृत आहे तेवढी विनोदबुद्धीची नांहीय.

In reply to by kurlekaar

kurlekaar 13/03/2014 - 22:31
"Gallows humor is humor in the face of or about very unpleasant, serious, or painful circumstances. Any humor that treats serious matters, such as death, war, disease, crime, etc., in a light, silly or satirical fashion is considered gallows humor. Gallows humor has been described as a witticism in the face of – and in response to – a hopeless situation" From Internet.
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ३

स्पार्टाकस ·

पैसा 21/03/2014 - 20:53
वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटतंय वाचताना!

पैसा 21/03/2014 - 20:53
वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटतंय वाचताना!
२२ एप्रिलच्या दुपारी स्कॉट फिशरच्या तुकडीतील शेर्पा नवांग तोपचे याला 'हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा' ने ग्रासलं. फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहक सराव आणि अ‍ॅक्लमटायझेशन मध्ये मग्न होते. तीन दिवसांपासून नवांग वरच्या कँपवर सामान वाहून नेण्याचं काम करत होता. फिशर कँप २ वरून बेस कँपला परत येताना त्याला एका दगडावर बसलेला नवांग दिसला होता. दोन दिवसांपासून आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्याने फिशरपाशी कबूल केलं. फिशरने त्याला ताबडतोब बेस कँपला परतण्याची आज्ञा केली. नवांगची मात्र त्या गोष्टीला बिलकूल तयारी नव्हती.

ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश.

बॅटमॅन ·

तिमा 12/03/2014 - 20:31
हे शेवटचे वर्णन ऐकून मति गुंग झाली. लेखन एकदम पॉली काला! का कुणास ठाऊक, पण लहानपणापासून ही स्टोरी ऐकल्यावर ट्रोजनांविषयी कायम सहानुभूति वाटली होती. आत्ता हे वाचताना देखील ग्रीक हरावेत असेच वाटत होते.

चित्रगुप्त 12/03/2014 - 21:02
वा छान. आता सावकाशीने वाचतो. यावेळी खूपशी चित्रे टाकलीत हे फार आवडले. लाओकूनचे शिल्प मिशेलअँजेलोच्या सांगण्यावरून पोपने व्हॅटिकनसाठी घेतले होते, असे वाचल्याचे आठवते. आत्ताच नवा "३०० राईज ऑफ अ‍ॅन एम्पायर" बघून आलो. जबरदस्त आहे.

In reply to by चित्रगुप्त

आत्मशून्य 12/03/2014 - 21:50
टिका झाली. यावेळी ती कसर सर्वकश सूत्रधार हुशारिने अथेनियं दाखवून भरुन काढली . बाकी स्ट्राइक ब्याक सिरिअल मधेच यातील हिरोने प्रचंड दंगा केल्या असल्याने हां300 बघ्णार्च होतो. अन्यथा तोंडात मावा दाबुन ठेवल्या प्रमाने डोय्लोग बोलताना चेहरा करणारा हिरोंचे चित्रपट तसेही फ़ाट्यावरच मारल्या असता

प्रचेतस 12/03/2014 - 21:17
जबरदस्त. कत्तलीचे वर्णन लै भयानक आहे. अश्वत्थाम्याने केलेल्या रात्रीच्या कत्तलीची आठवण झाली. ह्या ट्रोजन हॉर्सच्या लढाईत ग्रीकांची कितपत हानी झाली? ग्रीकआंचे कोणी नामवंत सेनानी ह्या लढाईत मारले गेल्याचे दिसले नाही.

बॅटमॅन 13/03/2014 - 01:54
तिमा सरः बहुत धन्यवाद! ट्रोजनांबद्दल सहानुभूतीच वाटते खरी. पण यापुढच्या भागात ग्रीकांची कशी वाताहत झाली ते तपशीलवारपणे येणारच आहे. चित्रगुप्तः धन्यवाद! लाओकूनबद्दल सहमत आहे. बरीचशी चित्रे टाकली कारण हा कथाभाग सर्वांत फेमस अन इन्स्पिरेशनल आहे. ३००-राईज ऑफ अ‍ॅन एंपायर मीही आजच पाहून आलो. पूर्ण पिच्चरभर किमान २०००-३००० लिटर रक्त सांडलेले आहे. तसा चांगला, पण मूळ इतिहास थोडा वाचल्याने त्यातल्या असंख्य अतिढोबळ चुका डोक्यात गेल्या. त्या सर्व लढायांबद्दल तपशीलवारपणे लिहावयाचे म्हणजे ट्रोजन युद्धासारखीच मोठी एक ग्रीको-पर्शियन युद्धाची सेरीज होईल. वेळ मिळेल तेव्हा तो इतिहास जमेल तसा मांडायचा विचार आहे. आत्मशून्यः धन्यवाद! वल्ली: धन्यवाद! या लढाईत ग्रीकांचे कोणी महत्त्वाचे माणूस मेले नाही. त्यांची मनुष्यहानी पुढील भागात विस्ताराने येईल. अश्वत्थाम्याने केलेल्या कत्तलीचे वर्णन आता मुळातून वाचावयाची इच्छा झालीये. :) मन उधाण वार्याचे अन इस्पीकचा एक्का: भौत धन्यवाद :)

इरसाल 13/03/2014 - 13:09
पुन्हा एकदा लै भारी. जरा लव्कर लवकर टाका भाग. नायतर मौसम तुटतो ना भौ ! लेखचित्रमाला जबराट

चित्रगुप्त 13/03/2014 - 17:34
युद्धात कोणी कुणाला कसे मारले, वगैरे इतके तपशीलवार वर्णन कसे काय उपलब्ध झाले असेल? की हे सर्व कल्पनेने लिहिलेले असेल? या सर्व घटना खरोखर घडलेल्या आहेत का?

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 13/03/2014 - 17:45
या सर्व घटना खरोखर घडलेल्या आहेत का?
सद्यस्थितीत धडपणे काही सांगता येणार नाही. पण एका दुसर्‍या सारख्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. ट्रॉय, महाभारत, इ. गोष्टी लैच जुन्या, सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या. तुलनेने शिवाजीमहाराज अगदी परवापरवाचे. त्यांच्या वेळचे जे काव्य उपलब्ध आहे- विशेषतः पोवाडे- त्यात बर्‍यापैकी तपशीलवार वर्णन सापडते. त्यामुळे सर्व काही अगदीच काल्पनिक असेल असे म्हणवत नाही. निव्वळ तपशील जास्त आहेत म्हणून काल्पनिक नाही असेही नाही. लॉर्ड ऑफ द रिंग्ज काय नैतर हॅरी पॉटर काय, सगळे काल्पनिक पण प्रचंड तपशीलवार. पण ट्रोजन युद्धाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे सापडलेले आहेत, तस्मात कल्पना नसावी असे वाटते. तत्कालीन प्रथेप्रमाणे मोरल बूस्टर म्हणून २-४ शाहीरही सैन्याबरोबर असावेत असे वाटते. त्यांनी काही कवने एकदम फ्रेशलि रचली असावीत अन मग तीच पुढे कंटिन्यू झाली असावीत. अर्थातच त्यात कल्पनेचे मिश्रण असणारच, उदा. एखाद्या कवितेतले कच्चे दुवे म्ह. अनएक्स्प्लेन्ड भाग काही वर्षांनी पुढच्या पिढीला उमगले की मग त्यांचे काव्यात्मक स्पष्टीकरण करणे इ.इ. प्रकार सुरू होऊन काही नावे घुसडली गेली असणे अगदी शक्य आहे. पण किमान मुख्य वर्णने तरी कन्सिस्टंट असावयास हरकत नसावी असे वाटते.

इशा१२३ 13/03/2014 - 18:03
ट्रोय पुर्ण नष्ट झाले....पण तिथे गाडल्या गेलेल्या अगणित सोन्यासाठी ,खजिन्यासाठी उत्खनन होउन असंख्य वस्तू,.सोन्याचे मुखवटे,हिरे इ.सापडले.यातील बरेचसे अथेन्स(अ‍ॅगामेम्नन चा सुवर्णमुखवटा दखील) म्युझियम मधे आहे.एवढे वैभवशाली रज्याची वाताहत वाचुन कसेसेच वाटले.बाकी ट्रोयच्या शोधासंदर्भात तपशील वार माहीती असल्यास जरुर लिहा.

In reply to by इशा१२३

बॅटमॅन 13/03/2014 - 18:13
धन्यवाद इशा. :) ही लेखमाला आत्ता ४०% पूर्ण झालीये फक्त. यानंतर ग्रीक लीडर्स घरी परत जाणे, ओडीसिअसचा १० वर्षांचा प्रवास हे येईल. हे झाल्यावर कथाभाग संपेल. कथाभाग संपला, की मग तुम्ही म्हणताहात ते उत्खनन इ.सगळेच येईल. तसा बराच वेळ लागेल या सर्वांना, पण येईल हे नक्की. हेन्रिख श्लीमान, विलियम डोर्पफेल्ड, कार्ल ब्लेगन, आर्थुर ईव्हान्स या चार लोकांचे काम जमेल तितक्या डीटेलमध्ये देण्याचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 14/03/2014 - 17:59
:) तरी यू आर इन लक, आत्ता वाचणे सुरू केले तर कमीतकमी एक पूर्ण स्टोरी एकसंध वाचायला मिळेल ते एक बरेच आहे. यापुढे रिटर्न्स आणि ओडिसी हा कथाभाग वेगळा आहे.

विवेकपटाईत 13/03/2014 - 19:58
कुणाला ही कीव येईल पण त्या काळी असंच चालायचे. प्रभास क्षेत्री सर्व यादव ही असेच नष्ट झाले होते. त्यांच्या बायका पोरांना अहीर लुटारूंनी आपल्या ताब्यात घेतल......बाकी कथा सुंदर रंगविली आहे....

अर्धवटराव 14/03/2014 - 18:49
एका नादान राजकुमारापाई हकनाक बळी गेला एव्हढ्या सुंदर राज्याचा :( आणि बॅट्या तर अगदी संजय बनुन युद्धाचं वर्णन करतो. आता ग्रीकांची वाट कशी लागली याची उत्सुकता लागली आहे.

In reply to by अर्धवटराव

चित्रगुप्त 16/03/2014 - 16:53
एका नादान राजकुमारापाई हकनाक बळी गेला एव्हढ्या सुंदर राज्याचा
यावर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. म्हणजे समजा पॅरिसने हेलनीस पळवले नसते, तर हे युद्ध झालेच नसते का? की युद्धाची अन्य कारणेही होतीच, त्यात हेलनचे अपहरण एक निमित्त घडले, असे आहे ? महाभारताप्रमाणेच विविध घटनांची कारणमीमासा दैवी शाप-वरदान उदा. पॅरिसने आफ्रोदितीची निवड करणे वगैरे होमरच्या काव्यात आहे का? जजमेंट ऑफ पॅरिस हा चित्रकारांचा आवडता विष्यः . १. चित्रकारः Sandro Botticelli (1445–1510) . २. चित्रकारः George Frederick Folingsby (1828 – 1891, Irish) , ३. चित्रकारः Claude Lorrain, c. 1645-1646 . ४. चित्रकारः John Flaxman (1755 – 1826). . ५. चित्रकारः Angelica Kauffman (1741–1807) ग्रीक पुराणकथांवरील अनेक सुंदर रेखाचित्रे खालील दुव्यावर बघा: http://www.maicar.com/GML/000PhotoArchive/ScenesIliad/index.html

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 16/03/2014 - 18:07
रेखाचित्रांच्या दुव्याबद्दल अनेक आभार. जजमेंट ऑफ पॅरिस हे आदिकारण म्हणून मानले जातेच. युद्धाचे दैवी स्पष्टीकरण म्हणून ते सांगतातच. तदुपरि हेलेन हे एक निमित्त ठरले असे म्हणायला वाव आहे खराच. ग्रीसवर राज्य करणारे मायसीनी इथले ग्रीक राज्य (आगामेम्नॉनचा राजवंश), तुर्कीच्या पश्चिम किनार्‍यावरील शहरांचे एक फेडरेशन आणि मुख्य तुर्कीवर वर्चस्व असलेले हिटाईट साम्राज्य यांमध्ये कायम लढाया होत असत. तशा समकालीन लिखित नोंदी आहेत. त्यांपैकीच एक लढाई म्हणजे ही असावी-रादर लै लांबलेले युद्ध असावे. त्यासंबंधी कैक विखुरलेले पुरावे सापडतात पण एकच एक युद्धाबद्दल असे सापडत नाहीत. तत्कालीन राजकीय परिस्थितीसंदर्भात पाहिल्यास, ट्रॉयचे लोकेशन अतिशय मोक्याचे होते. समुद्र तिथे अगदी अरुंद होता आणि त्यामुळे ब्लॅक सी मध्ये जाणार्‍या सर्व जहाजांपासून टोल टॅक्स इ. घेऊन ट्रॉय अतिशय प्रबळ झाले होते. त्या ट्रेड रूटवर कब्जा करणे हे महत्त्वाचे कारण त्यामागे असू शकते. हेलेनचे निमित्त पुढे करून तिथे अख्ख्या ग्रीसची आर्मी ओतून त्यावर कब्जा करणे हा उद्देश बर्‍यापैकी पटण्यासारखा वाटतो. त्या परिसरात अविरत चाललेल्या उत्खननाचा परिणाम म्हणून समकालीन शेकडो लिखित पुरावे सापडलेले आहेत. हिटाईट साम्राज्याचे अख्खे फॉरेन करस्पाँडन्स आर्काईव्ह सापडले आहे. तिथे ग्रीसबरोबरच्या कैक मिशन्सचा लेखाजोखा दिलेला आहे. ट्रोजन लेखमालेच्या अखेरच्या पर्वात याचा शक्य तितक्या डीटेलवारी समावेश केला जाईल. सध्या इतकेच सांगतो, की पॅरिस, प्रिआम यांच्या नावाचे लिखित पुरावे शिलालेखांतून सापडलेले आहेत. एतेओक्लेस नामक एक राजा, झालंच तर खुद्द आगामेम्नॉनच्या बापाच्या-आत्रेउसच्या नावाचे शिलालेखही सापडलेले आहेत. इजिप्तमध्ये तिथल्या देवळांच्या शिलालेखांतून समुद्री चाच्यांमध्ये ग्रीकांचे नावही आहे. अन सरतेशेवटी खुद्द ग्रीसभर लिनिअर बी लिपीत अन मायसीनियन ग्रीक भाषेत लिहिलेल्या मातीच्या टॅबलेट्समधून तत्कालीन देवांची, सर्वसामान्य नागरिकांची अन गुलामांची नावेही कैक सापडतात. हे देव म्हणजे झ्यूस, अथीना, अपोलो, इ. च आहेत. अन तत्कालीन नावांत एका धनगराचे 'अकिलीस' नावही सापडते. त्यावरून ते तत्कालीन खरेच नाव होते याची खात्री पटते. ट्रोजन युद्धाचा तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आढावा पुढे एकदा घेतला जाईल तेव्हा हे सर्व मुद्दे ब्रीफलि तिथे येतीलच.

पैसा 28/03/2014 - 18:08
सगळी कत्तल वाचताना शहारे येत होते. हेलनमुळे ट्रॉयचा विनाश झाला याची तुलना महाभारत आणि रामायणातील द्रौपदीचा अपमान आणि सीताहरण यांच्याशी केलेली वाचली आहे. पण हेलन पॅरिस जिवंत असेपर्यंत खुशीने ट्रॉयमधे रहात होती असं दिसतं. सीता आणि द्रौपदी यांची हेलनबरोबर तुलना होऊ शकत नाही.

In reply to by पैसा

बॅटमॅन 28/03/2014 - 18:50
बहुत धन्यवाद! हेलनला फारसा विधिनिषेध असल्याचे दिसत नाही हे तर खरेच आहे. ट्रोजन हॉर्समधील वीरांना तिने गाईड केले असाही एक उल्लेख आहे, पण तो तितका विश्वसनीय न वाटल्याने इन्क्लूड केला नाही. सीता अन द्रौपदीची केस जरा वेगळी आहे.

पद्मावति 25/09/2015 - 17:48
अप्रतिम लेखमालीका. काल हा धागा वरती आल्यापासून एका मागोमाग एक असे सर्व भाग वाचून काढले. अफाट डीटेलिंग. ट्रोजन युद्धाविषयी इतक्या व्यापक प्रमाणावर माहिती मी तरी कधीच ऐकलेली, वाचलेली नव्हती. ही प्रचंड माहिती इतक्या इण्टरेस्टिंग लेखन शैलीत आमच्या समोर सादर केल्याबद्दल बॅटमॅन तुमचे खुप आभार. खिळवून टाकणारं चित्रदर्शी वर्णन. शेवटी ट्रॉय चा नाशाचं वर्णन वाचून तर खुप हळहळ वाटली. पुढचा भाग वाचण्याची खूप उत्सुकता लागलीय.

बॅटमॅन 25/09/2015 - 19:22
जेपी, प्रगो, बोकाशेठ अन पद्मावति: अनेक अनेक आभार!!!! पुढच्या भागांकरिताचे मट्रियल तयार आहे, परंतु आंजावर लिहिण्याचा प्लॅन सध्या तरी नाही. नीट काय ते ठरले की नक्कीच कळवेन.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 25/09/2015 - 19:43
खाटुक सरांनी लेखमाला अशी अर्धवट सोडू नये, त्यांनी परत लिहितं व्हावं अशी त्यांना त्यांच्या समस्त चाहत्यांतर्फ़े आग्रहाची विनंती.

चित्रगुप्त 25/09/2015 - 20:49
ट्रोजन युद्धाचा तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आढावा पुढे एकदा घेतला जाईल
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आता मनावर घ्याच पंत. . हेलनचे अपहरण

तिमा 12/03/2014 - 20:31
हे शेवटचे वर्णन ऐकून मति गुंग झाली. लेखन एकदम पॉली काला! का कुणास ठाऊक, पण लहानपणापासून ही स्टोरी ऐकल्यावर ट्रोजनांविषयी कायम सहानुभूति वाटली होती. आत्ता हे वाचताना देखील ग्रीक हरावेत असेच वाटत होते.

चित्रगुप्त 12/03/2014 - 21:02
वा छान. आता सावकाशीने वाचतो. यावेळी खूपशी चित्रे टाकलीत हे फार आवडले. लाओकूनचे शिल्प मिशेलअँजेलोच्या सांगण्यावरून पोपने व्हॅटिकनसाठी घेतले होते, असे वाचल्याचे आठवते. आत्ताच नवा "३०० राईज ऑफ अ‍ॅन एम्पायर" बघून आलो. जबरदस्त आहे.

In reply to by चित्रगुप्त

आत्मशून्य 12/03/2014 - 21:50
टिका झाली. यावेळी ती कसर सर्वकश सूत्रधार हुशारिने अथेनियं दाखवून भरुन काढली . बाकी स्ट्राइक ब्याक सिरिअल मधेच यातील हिरोने प्रचंड दंगा केल्या असल्याने हां300 बघ्णार्च होतो. अन्यथा तोंडात मावा दाबुन ठेवल्या प्रमाने डोय्लोग बोलताना चेहरा करणारा हिरोंचे चित्रपट तसेही फ़ाट्यावरच मारल्या असता

प्रचेतस 12/03/2014 - 21:17
जबरदस्त. कत्तलीचे वर्णन लै भयानक आहे. अश्वत्थाम्याने केलेल्या रात्रीच्या कत्तलीची आठवण झाली. ह्या ट्रोजन हॉर्सच्या लढाईत ग्रीकांची कितपत हानी झाली? ग्रीकआंचे कोणी नामवंत सेनानी ह्या लढाईत मारले गेल्याचे दिसले नाही.

बॅटमॅन 13/03/2014 - 01:54
तिमा सरः बहुत धन्यवाद! ट्रोजनांबद्दल सहानुभूतीच वाटते खरी. पण यापुढच्या भागात ग्रीकांची कशी वाताहत झाली ते तपशीलवारपणे येणारच आहे. चित्रगुप्तः धन्यवाद! लाओकूनबद्दल सहमत आहे. बरीचशी चित्रे टाकली कारण हा कथाभाग सर्वांत फेमस अन इन्स्पिरेशनल आहे. ३००-राईज ऑफ अ‍ॅन एंपायर मीही आजच पाहून आलो. पूर्ण पिच्चरभर किमान २०००-३००० लिटर रक्त सांडलेले आहे. तसा चांगला, पण मूळ इतिहास थोडा वाचल्याने त्यातल्या असंख्य अतिढोबळ चुका डोक्यात गेल्या. त्या सर्व लढायांबद्दल तपशीलवारपणे लिहावयाचे म्हणजे ट्रोजन युद्धासारखीच मोठी एक ग्रीको-पर्शियन युद्धाची सेरीज होईल. वेळ मिळेल तेव्हा तो इतिहास जमेल तसा मांडायचा विचार आहे. आत्मशून्यः धन्यवाद! वल्ली: धन्यवाद! या लढाईत ग्रीकांचे कोणी महत्त्वाचे माणूस मेले नाही. त्यांची मनुष्यहानी पुढील भागात विस्ताराने येईल. अश्वत्थाम्याने केलेल्या कत्तलीचे वर्णन आता मुळातून वाचावयाची इच्छा झालीये. :) मन उधाण वार्याचे अन इस्पीकचा एक्का: भौत धन्यवाद :)

इरसाल 13/03/2014 - 13:09
पुन्हा एकदा लै भारी. जरा लव्कर लवकर टाका भाग. नायतर मौसम तुटतो ना भौ ! लेखचित्रमाला जबराट

चित्रगुप्त 13/03/2014 - 17:34
युद्धात कोणी कुणाला कसे मारले, वगैरे इतके तपशीलवार वर्णन कसे काय उपलब्ध झाले असेल? की हे सर्व कल्पनेने लिहिलेले असेल? या सर्व घटना खरोखर घडलेल्या आहेत का?

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 13/03/2014 - 17:45
या सर्व घटना खरोखर घडलेल्या आहेत का?
सद्यस्थितीत धडपणे काही सांगता येणार नाही. पण एका दुसर्‍या सारख्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. ट्रॉय, महाभारत, इ. गोष्टी लैच जुन्या, सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या. तुलनेने शिवाजीमहाराज अगदी परवापरवाचे. त्यांच्या वेळचे जे काव्य उपलब्ध आहे- विशेषतः पोवाडे- त्यात बर्‍यापैकी तपशीलवार वर्णन सापडते. त्यामुळे सर्व काही अगदीच काल्पनिक असेल असे म्हणवत नाही. निव्वळ तपशील जास्त आहेत म्हणून काल्पनिक नाही असेही नाही. लॉर्ड ऑफ द रिंग्ज काय नैतर हॅरी पॉटर काय, सगळे काल्पनिक पण प्रचंड तपशीलवार. पण ट्रोजन युद्धाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे सापडलेले आहेत, तस्मात कल्पना नसावी असे वाटते. तत्कालीन प्रथेप्रमाणे मोरल बूस्टर म्हणून २-४ शाहीरही सैन्याबरोबर असावेत असे वाटते. त्यांनी काही कवने एकदम फ्रेशलि रचली असावीत अन मग तीच पुढे कंटिन्यू झाली असावीत. अर्थातच त्यात कल्पनेचे मिश्रण असणारच, उदा. एखाद्या कवितेतले कच्चे दुवे म्ह. अनएक्स्प्लेन्ड भाग काही वर्षांनी पुढच्या पिढीला उमगले की मग त्यांचे काव्यात्मक स्पष्टीकरण करणे इ.इ. प्रकार सुरू होऊन काही नावे घुसडली गेली असणे अगदी शक्य आहे. पण किमान मुख्य वर्णने तरी कन्सिस्टंट असावयास हरकत नसावी असे वाटते.

इशा१२३ 13/03/2014 - 18:03
ट्रोय पुर्ण नष्ट झाले....पण तिथे गाडल्या गेलेल्या अगणित सोन्यासाठी ,खजिन्यासाठी उत्खनन होउन असंख्य वस्तू,.सोन्याचे मुखवटे,हिरे इ.सापडले.यातील बरेचसे अथेन्स(अ‍ॅगामेम्नन चा सुवर्णमुखवटा दखील) म्युझियम मधे आहे.एवढे वैभवशाली रज्याची वाताहत वाचुन कसेसेच वाटले.बाकी ट्रोयच्या शोधासंदर्भात तपशील वार माहीती असल्यास जरुर लिहा.

In reply to by इशा१२३

बॅटमॅन 13/03/2014 - 18:13
धन्यवाद इशा. :) ही लेखमाला आत्ता ४०% पूर्ण झालीये फक्त. यानंतर ग्रीक लीडर्स घरी परत जाणे, ओडीसिअसचा १० वर्षांचा प्रवास हे येईल. हे झाल्यावर कथाभाग संपेल. कथाभाग संपला, की मग तुम्ही म्हणताहात ते उत्खनन इ.सगळेच येईल. तसा बराच वेळ लागेल या सर्वांना, पण येईल हे नक्की. हेन्रिख श्लीमान, विलियम डोर्पफेल्ड, कार्ल ब्लेगन, आर्थुर ईव्हान्स या चार लोकांचे काम जमेल तितक्या डीटेलमध्ये देण्याचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 14/03/2014 - 17:59
:) तरी यू आर इन लक, आत्ता वाचणे सुरू केले तर कमीतकमी एक पूर्ण स्टोरी एकसंध वाचायला मिळेल ते एक बरेच आहे. यापुढे रिटर्न्स आणि ओडिसी हा कथाभाग वेगळा आहे.

विवेकपटाईत 13/03/2014 - 19:58
कुणाला ही कीव येईल पण त्या काळी असंच चालायचे. प्रभास क्षेत्री सर्व यादव ही असेच नष्ट झाले होते. त्यांच्या बायका पोरांना अहीर लुटारूंनी आपल्या ताब्यात घेतल......बाकी कथा सुंदर रंगविली आहे....

अर्धवटराव 14/03/2014 - 18:49
एका नादान राजकुमारापाई हकनाक बळी गेला एव्हढ्या सुंदर राज्याचा :( आणि बॅट्या तर अगदी संजय बनुन युद्धाचं वर्णन करतो. आता ग्रीकांची वाट कशी लागली याची उत्सुकता लागली आहे.

In reply to by अर्धवटराव

चित्रगुप्त 16/03/2014 - 16:53
एका नादान राजकुमारापाई हकनाक बळी गेला एव्हढ्या सुंदर राज्याचा
यावर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. म्हणजे समजा पॅरिसने हेलनीस पळवले नसते, तर हे युद्ध झालेच नसते का? की युद्धाची अन्य कारणेही होतीच, त्यात हेलनचे अपहरण एक निमित्त घडले, असे आहे ? महाभारताप्रमाणेच विविध घटनांची कारणमीमासा दैवी शाप-वरदान उदा. पॅरिसने आफ्रोदितीची निवड करणे वगैरे होमरच्या काव्यात आहे का? जजमेंट ऑफ पॅरिस हा चित्रकारांचा आवडता विष्यः . १. चित्रकारः Sandro Botticelli (1445–1510) . २. चित्रकारः George Frederick Folingsby (1828 – 1891, Irish) , ३. चित्रकारः Claude Lorrain, c. 1645-1646 . ४. चित्रकारः John Flaxman (1755 – 1826). . ५. चित्रकारः Angelica Kauffman (1741–1807) ग्रीक पुराणकथांवरील अनेक सुंदर रेखाचित्रे खालील दुव्यावर बघा: http://www.maicar.com/GML/000PhotoArchive/ScenesIliad/index.html

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 16/03/2014 - 18:07
रेखाचित्रांच्या दुव्याबद्दल अनेक आभार. जजमेंट ऑफ पॅरिस हे आदिकारण म्हणून मानले जातेच. युद्धाचे दैवी स्पष्टीकरण म्हणून ते सांगतातच. तदुपरि हेलेन हे एक निमित्त ठरले असे म्हणायला वाव आहे खराच. ग्रीसवर राज्य करणारे मायसीनी इथले ग्रीक राज्य (आगामेम्नॉनचा राजवंश), तुर्कीच्या पश्चिम किनार्‍यावरील शहरांचे एक फेडरेशन आणि मुख्य तुर्कीवर वर्चस्व असलेले हिटाईट साम्राज्य यांमध्ये कायम लढाया होत असत. तशा समकालीन लिखित नोंदी आहेत. त्यांपैकीच एक लढाई म्हणजे ही असावी-रादर लै लांबलेले युद्ध असावे. त्यासंबंधी कैक विखुरलेले पुरावे सापडतात पण एकच एक युद्धाबद्दल असे सापडत नाहीत. तत्कालीन राजकीय परिस्थितीसंदर्भात पाहिल्यास, ट्रॉयचे लोकेशन अतिशय मोक्याचे होते. समुद्र तिथे अगदी अरुंद होता आणि त्यामुळे ब्लॅक सी मध्ये जाणार्‍या सर्व जहाजांपासून टोल टॅक्स इ. घेऊन ट्रॉय अतिशय प्रबळ झाले होते. त्या ट्रेड रूटवर कब्जा करणे हे महत्त्वाचे कारण त्यामागे असू शकते. हेलेनचे निमित्त पुढे करून तिथे अख्ख्या ग्रीसची आर्मी ओतून त्यावर कब्जा करणे हा उद्देश बर्‍यापैकी पटण्यासारखा वाटतो. त्या परिसरात अविरत चाललेल्या उत्खननाचा परिणाम म्हणून समकालीन शेकडो लिखित पुरावे सापडलेले आहेत. हिटाईट साम्राज्याचे अख्खे फॉरेन करस्पाँडन्स आर्काईव्ह सापडले आहे. तिथे ग्रीसबरोबरच्या कैक मिशन्सचा लेखाजोखा दिलेला आहे. ट्रोजन लेखमालेच्या अखेरच्या पर्वात याचा शक्य तितक्या डीटेलवारी समावेश केला जाईल. सध्या इतकेच सांगतो, की पॅरिस, प्रिआम यांच्या नावाचे लिखित पुरावे शिलालेखांतून सापडलेले आहेत. एतेओक्लेस नामक एक राजा, झालंच तर खुद्द आगामेम्नॉनच्या बापाच्या-आत्रेउसच्या नावाचे शिलालेखही सापडलेले आहेत. इजिप्तमध्ये तिथल्या देवळांच्या शिलालेखांतून समुद्री चाच्यांमध्ये ग्रीकांचे नावही आहे. अन सरतेशेवटी खुद्द ग्रीसभर लिनिअर बी लिपीत अन मायसीनियन ग्रीक भाषेत लिहिलेल्या मातीच्या टॅबलेट्समधून तत्कालीन देवांची, सर्वसामान्य नागरिकांची अन गुलामांची नावेही कैक सापडतात. हे देव म्हणजे झ्यूस, अथीना, अपोलो, इ. च आहेत. अन तत्कालीन नावांत एका धनगराचे 'अकिलीस' नावही सापडते. त्यावरून ते तत्कालीन खरेच नाव होते याची खात्री पटते. ट्रोजन युद्धाचा तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आढावा पुढे एकदा घेतला जाईल तेव्हा हे सर्व मुद्दे ब्रीफलि तिथे येतीलच.

पैसा 28/03/2014 - 18:08
सगळी कत्तल वाचताना शहारे येत होते. हेलनमुळे ट्रॉयचा विनाश झाला याची तुलना महाभारत आणि रामायणातील द्रौपदीचा अपमान आणि सीताहरण यांच्याशी केलेली वाचली आहे. पण हेलन पॅरिस जिवंत असेपर्यंत खुशीने ट्रॉयमधे रहात होती असं दिसतं. सीता आणि द्रौपदी यांची हेलनबरोबर तुलना होऊ शकत नाही.

In reply to by पैसा

बॅटमॅन 28/03/2014 - 18:50
बहुत धन्यवाद! हेलनला फारसा विधिनिषेध असल्याचे दिसत नाही हे तर खरेच आहे. ट्रोजन हॉर्समधील वीरांना तिने गाईड केले असाही एक उल्लेख आहे, पण तो तितका विश्वसनीय न वाटल्याने इन्क्लूड केला नाही. सीता अन द्रौपदीची केस जरा वेगळी आहे.

पद्मावति 25/09/2015 - 17:48
अप्रतिम लेखमालीका. काल हा धागा वरती आल्यापासून एका मागोमाग एक असे सर्व भाग वाचून काढले. अफाट डीटेलिंग. ट्रोजन युद्धाविषयी इतक्या व्यापक प्रमाणावर माहिती मी तरी कधीच ऐकलेली, वाचलेली नव्हती. ही प्रचंड माहिती इतक्या इण्टरेस्टिंग लेखन शैलीत आमच्या समोर सादर केल्याबद्दल बॅटमॅन तुमचे खुप आभार. खिळवून टाकणारं चित्रदर्शी वर्णन. शेवटी ट्रॉय चा नाशाचं वर्णन वाचून तर खुप हळहळ वाटली. पुढचा भाग वाचण्याची खूप उत्सुकता लागलीय.

बॅटमॅन 25/09/2015 - 19:22
जेपी, प्रगो, बोकाशेठ अन पद्मावति: अनेक अनेक आभार!!!! पुढच्या भागांकरिताचे मट्रियल तयार आहे, परंतु आंजावर लिहिण्याचा प्लॅन सध्या तरी नाही. नीट काय ते ठरले की नक्कीच कळवेन.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 25/09/2015 - 19:43
खाटुक सरांनी लेखमाला अशी अर्धवट सोडू नये, त्यांनी परत लिहितं व्हावं अशी त्यांना त्यांच्या समस्त चाहत्यांतर्फ़े आग्रहाची विनंती.

चित्रगुप्त 25/09/2015 - 20:49
ट्रोजन युद्धाचा तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आढावा पुढे एकदा घेतला जाईल
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आता मनावर घ्याच पंत. . हेलनचे अपहरण
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५ भाग ३.१ भाग ३.२ भाग ३.३ प्रस्तावना हा भाग सर्वांत नाट्यपूर्ण, थरारक अन तितकाच करुण आहे.

काही प्रश्र्न......

मुक्त विहारि ·

आदूबाळ 12/03/2014 - 20:31
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात? हिंदूंचे प्रमाण स्थलांतरामुळे कमी झाले असावे. क्रिकेट संघात हिंदू व्यक्ती असतात ना. पाकिस्तान संघातला जुना विकेटकीपर अनिल दलपत आणि सध्याच्या संघातला फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया ही चटकन आठवणारी उदाहरणं. १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? हा प्रश्न नीट कळला नाही. रुपया बलवान म्हणजे नक्की काय? "स्थिर" याअर्थी बलवान का? डॉलर/पाऊंड/युरोच्या तुलनेत दुसर्‍या चलनाचे किती युनिट्स मिळतात हा बलवानतेचा निकष नाही. [समजा, उद्या "होन" असं नवीन चलन काढून त्याची किंमत ठेवली आजचे शंभर रुपये, तर १ होन = $०.६५ अशी किंमत होईल. पण याचा अर्थ होन हे रुपयापेक्षा सरस चलन ठरत नाही.] एका येनची डॉलरच्या तुलनेत किंमत खूपच कमी आहे, पण येन हे जगातले एक बलवान चलन आहे. तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की.

In reply to by आदूबाळ

"स्थिर" याअर्थी बलवान का? हो. बहूदा अर्थ कारणात, एखादे चलन "स्थिर" असणे, म्हणजेच ते चलन "बलवान" असते, असे मला वाटते.नक्की असेच असते का? हे इथले अर्थ तज्ञ सांगतीलच. तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की. म्हणजेच, आजच्या घडीला, जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो) आणि जो सोन्यात गुंतवणूक करत नाही तो राष्ट्राभिमानी होवू शकतो का?

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ 12/03/2014 - 22:52
बलवान ही सापेक्ष (रिलेटिव) कल्पना आहे. कशाच्या तुलनेत बलवान? दुसरं चलन हा मापदंड होऊ शकत नाही. मग दुसरा काही मापदंड असू शकतो का? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी), बिग मॅक इंडेक्स असे काही मापदंड सुचवले जातात. पण प्रत्येकाला आपापले फायदे-तोटे आहेतच. -
जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो)
मानवतावादी आहे असं म्हणता येईल. राष्ट्राभिमान आर्थिक बाबींत आणणं गैर आहे असं मला वाटतं. "स्वदेशी वापरा" हा सल्ला आजच्या जगात आत्मघातकी ठरेल.

In reply to by आदूबाळ

आत्मघातकी कधीच ठरणार नाही. किंबहूना "जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्‍या स्वदेशी वस्तू वापरणे तर अजिबातच नाही."

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ 13/03/2014 - 00:22
दुरुस्ती: स्वदेशी वापरा हा आग्रह आत्मघातकी ठरेल. त्यानिमित्ताने: स्वदेशी म्हणजे नेमकं काय? भारतीय उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (नॅनो) परदेशी उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (बकार्डी) भारतीय उत्पादकाने परदेशात बनवलेली वस्तू (लँड रोव्हर) ?? "जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्‍या कोणत्याही वस्तू वापरणे तर अजिबातच आत्मघातकी ठरणार नाही" यात स्वदेशी/परदेशी किंवा राष्ट्राभिमान वगैरेचा काहीच संबंध नाही. नसावा.

In reply to by आदूबाळ

गेल्या ५०/६० वर्षांत झालेला निर्यात प्रधान (ज्यांची निर्यात, आयाती पेक्षा जास्त आहे) देशांचा आर्थिक महासत्तेत झालेला उदय (उदा. साउथ कोरिया.जर्मनी,जपान) हेच दाखवते. आणि मनापासून धन्यवाद....मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.

In reply to by मुक्त विहारि

सुनील 13/03/2014 - 08:38
मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.
बकार्डी पिऊन नॅनो चालवली की आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो (असे म्हणतात) बाकी मुवी, हे प्रश्णबिश्ण सोडा आणि एखादी पाकृ टाका नाहीतर कट्ट्याचं जमवा!

In reply to by सुनील

आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो (आणि मग अपघात झाला, की माणूस त्याच्या कुवती प्रमाणे शिक्षा भोगतो किंवा मग महानायक तरी होतो.)

श्रीगुरुजी 12/03/2014 - 20:49
प्रश्न क्र. (१) ते (९) ची खरी उत्तरे जो देईल त्याला/तिला "जातीयवादी", "हिंदुत्ववादी", "संघाचा हस्तक", "पुराणमतवादी", "प्रतिगामी", "फूट पाडणारा" इ. शेलक्या विशेषणांनी झोडले जाईल. या प्रश्नांची जे खोटी/चुकीची उत्तरे देतील त्यांचा "निधर्मी", "सर्वधर्मसमभावी", "उदारमतवादी", "पुरोगामी" इ. विशेषणांनी गौरव केला जाईल. >>> १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? आयात कमी करून रूपया बलवान होणार नाही. आयात ही वाईटच असते व निर्यात ही चांगलीच असते हा गैरसमज आहे. तेलाची आयात कमी झाली तरी तेलाचे देशांतर्गत भाव वाढतील. त्यामुळे इतर सर्व वस्तूंचे भाव वाढून व्याजदर वाढतील. त्यामुळे चलनफुगवटा होऊन प्रत्यक्षात रूपया कमजोर होईल. याचा अर्थ आयात वाढवून रूपया मजबूत होईल असे पण नाही. आयात निर्यातील समतोल असणे महत्त्वाचे आहे.

विकास 12/03/2014 - 20:49
फारच मोठा आवाका आहे! बिरबलाची गोष्ट आठवली... बादशहा विचारतो की, "भाकरी का करपली?, घोडा का अडला?, पान का सडलं?" सगळ्याचे उत्तर एकच - न फिरवल्याने. तसेच काहीसे या सगळ्याचे समान उत्तर आहे असे वाटते.

संपत 12/03/2014 - 22:17
माझेदेखील काही प्रश्न: १. ९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का? २. आज काल हिंदी सिनेमांतील मुस्लीम नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? पूर्वी खान मंडळींचे राज्य होते.. आता जुने नायक सोडल्यास नवीन नायकात मुस्लीम चेहरा अभावानेच दिसतो. ३. भारताच्या क्रिकेटच्या संघात मुस्लीम, ख्रिश्चन व्यक्ती लोकसंख्येच्या मानाने इतक्या कमी का असतात? ४, आर्थिक गुन्हेगारीत गुजराती व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात भाग खूप जास्त का असतो?विशेषतः शेअर बाजार प्रकरणात बाकी प्रश्न सुचतील तसे..

In reply to by संपत

विकास 12/03/2014 - 22:50
९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का? कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून. प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने असे वाटत असावे. अशाच (स्युडोसेक्यूलर) वृत्तीने गांधीहत्येनंतर एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासाठी समाजाच्या एका घटकासच गुन्हेगार समजले गेले, इंदीरा हत्येनंतर हजारो शिखांचे हत्याकांड झाले, गोध्रानंतरच्या दंगलीत केवळ एकाच धर्माच्या लोकांची झालेली हत्या दिसली, वगैरे वगैरे...

In reply to by विकास

संपत 12/03/2014 - 23:06
प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर..
कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून
आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात.

In reply to by संपत

विकास 12/03/2014 - 23:23
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर.. स्युडोसेक्यूलर्स कसे बघतात हे सांगितले आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्हालाच माहीत. :) कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात. माझे अर्धेच वाक्य घेऊन तुम्ही निष्कर्ष काढत आहात यात सर्व काही आले. त्यापुढे मी "आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून. " असे देखील म्हणले होते. पण ते अजून पचायला अवघड जातयं असे दिसते. असो, मी फक्त इतिहास बघतोय. तो न लक्षात न घेता अथवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून स्युडोसेक्यूलर्सप्रमाणे निष्कर्ष काढत नाही आहे.

In reply to by विकास

मदनबाण 13/03/2014 - 10:40
मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का? माझ्या वाचना नुसार बाबरी मस्जिद पाडली गेली नसुन,तो फक्त बाबरी ढाचा होता.{गुगलबाबा वर या बाबतीत शोध घेतला जाउ शकतो.या वर अधिक वाचायला नक्कीच आवडेल.} एक असाच दुवा देतो :- सहमति में ही है समाधान मुवि यांनी त्यांना पडलेले प्रश्न दिलेलच आहेत त्यात भर टाकतो. १) काश्मिर मधे गेल्या दोन दशकात २०८ पेक्षा अधिक मंदिरे पाडली गेली, त्यावर या देशातील किती {तथा कथित धर्मनिरपेक्ष्}पक्षांनी, वॄत्तवाहिन्यांनी,वॄत्तपत्रांनी आरडा-ओरड केली ?कोणत्या हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आंदोलन केले ? ते किती सफल झाले आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली ?किती मुस्लिम संघटनांनी,मुल्ला /मौलविंनी यांची निंदा केली ?इतके झाल्यावर सुद्धा तिथे दंगली झाल्या का ? {या पैकी काही देवळांची यादी :- List of Temples Destroyed by the Islamic Terrorists }

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/03/2014 - 02:12
१९९२ च्या दंगलीला श्रीकृष्ण आयोगाच्या रिपोर्टानुसार जबाबदार असलेले मुसलमान गुंड व बाळ ठाकरे, मधुकर सरपोतदार वगैरे शिवसैनिक आणि हिंदू गुंड ही सर्व मंडळी स्युडोसेक्युलर आहेत ही नवी माहिती या प्रतिसादातून मिळाली.

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/03/2014 - 17:59
तसे फरक बरेच आहेत... गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे. किंवा एका नरराक्षसाचे विकास*पुरुषात रुपांतर होणे.... किंवा भारताच्या आद्य लोहपुरुषांनी ज्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याच संघटनेची 'पूर्वपीठिका' असणाऱ्यांना ते आद्य लोहपुरुष अचानक सरकारी पैसा खर्च करुन पुतळा उभारण्याइतके प्रातःस्मरणीय होणे... किंवा भारताच्या आद्य राष्ट्रपित्यावर आडून आडून वा उघडपणे टीका** करणाऱ्यांना सोयीस्कररीत्या त्या राष्ट्रपित्याचा गौरव करावा लागणे असे अनेक फरक सृष्टीत होतच असतात. The Only Thing That Is Constant Is Change * यात वैयक्तिक उल्लेख नाही. ** टीका म्हणजे हत्या नाही.

In reply to by आजानुकर्ण

विकास 14/03/2014 - 18:37
** टीका म्हणजे हत्या नाही. मस्तच की हो! अजून एक सुधारणा! गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे. वाक्य बरोबर लिहीले आहे. कदाचीत चुकून हे कोणी वाचले तर त्यातील फरक कळणार नाही म्हणून लिहीतो. गुजरात दंगलीची चौकशी ही न्यायालयीन कामकाज (कोर्ट केस) म्हणून झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व आले. मुंबईच्या संदर्भात तुम्ही म्हणत असलेले न्यायमूर्ती म्हणजे बी. एन. श्रीकृष्ण यांचा केवळ आयोग होता. कोर्ट केस नव्हती. ज्यांच्यावर कोर्ट केसेस झाल्या त्यात ते अडकले, (उदा. सरपोतदार) शिक्षा मिळाली वगैरे. आणि हो मुंबईच्या त्या दंगलीबद्द्ल (१९९३ जाने-फेब) बोलताना राधाबाईचाळ पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/03/2014 - 20:11
असो शब्दच्छलासाठी तुमचा मुद्दा योग्य असला तरी अद्याप श्रीकृष्ण आयोगाच्या लेजिटिमसीबाबत कोणी शंका उत्पन्न केलेली नाही. मात्र तुमचा मूळ दावा हा खालीलप्रमाणे होता. आयोगाच्या अहवालानुसार तुमच्या दाव्यात काही तथ्य दिसत नाही. आयोगाने कुठेही या (अगदी राधाबाईचाळीसकट) दंगलीसाठी बाबर किंवा सेटलवाड-आझमी वगैरे स्युडोसेक्युलरिस्ट लोकांना जबाबदार धलेले नाही.
कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून.
अर्थात तेंडुलकर-पाध्ये-लागू यांना त्रास देणारे, पाध्यांची राडासारखी पुस्तके जाळणारे, सखाराम बाईंडरला त्रास देणारे (किंवा साहित्यिकांना बैल म्हणणारे, पुलंना झक मारुन जसाकाय स्वतःच्याच खिशातून पुरस्कार दिला असा अविर्भाव गाजवणारे) कै. शिवसेनाप्रमुख हे जसे हे सर्व करुनही कलेचे भोक्ते मानले जातात (प्लीज णोट- इथे हुसेनचे नाव नाही. सर्वजण हिंदू-म्हराटीच कलाकार आहेत..) तसेच अतिरेकी हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करुनही ते स्युडोसेक्युलर मानले जावेत असा तुमचा दावा असेल तर ते एकंदर प्रतिसादाशी तर्कसुसंगत ठरेल.

अवघड प्रश्न विचारु नका हो , आधीच काँग्रेसी लोकांची गोची झालीये ... शिवाय इथे बरेच गांधीवाद लोक आहेत , त्यांना का बरे कोंडीत पकडता ?? ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? >>> मला इथे उपप्रश्न आहेत . बामियान बुध्द मुर्ती नाशाबद्दल बौध्दांची काय भुमिका होती ? किंवा बोधगया येथील बॉम्बस्फोटाबद्दल बौध्द लोकांचे काय मत आहे ? ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? >>> माझ्यामतेतरी भाव अचानक बाढलेले नाहीत , रीयल इस्टेट ही नेहमीच महाग होती ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? >>>अस्थिर म्हणजे ? १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? >>> हा खरा अवघड प्रश्न आहे . आणि हो , जर आपण तेलाचे आणि सोन्याचे एक्सेस उत्पादन करुशकलो तर नक्कीच ह्या निमित्ताने देशाबाहेर जाणारा करन्सी फ्लो कमी होईल आणि रुपया खचितच बलवान होईल !! किंबहुना ,माझ्यामाहीती नुसार, करन्सी बलवान की कमकुवत हे त्या देशाच्या जीडीपी अर्थात ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट वरुन ठरत असते ... जितका जीडीपो जास्त तितकी करन्सी बलवान !! बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत आहेतच , फक्त ती गांधीवाद्यांच्या तोंडुन ऐकायला मिळतात का ते पाहुया :)

बाळकराम 13/03/2014 - 02:46
तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे इथली तज्ञ मंडळी काय ते देतीलच, पण तुम्हाला प्रश्न पडायला लागले ते बघून मला मात्र आनंद झाला. आज प्रश्न पडू लागले, म्हणजे उद्या तुम्ही विचारही करु लागाल आणि कोणी सांगावे, हळूहळू तुम्ही अगदी तर्कसुसंगत सुद्धा विचार करु लागाल, हू नोज? उम्मीद पे दुनिया कायम है! पण तुम्हाला हे असले प्रश्न वगैरे पडणं अलाऊड आहे का तेही एकदा मोदीबागेतून वा रेशीमबागेतून कन्फर्म करुन घ्या म्हणजे झालं. नाही म्हणजे, "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" वगैरे करायला काही विचारशक्ती असायची/ बुद्धी असायची गरज नाही पण तुम्ही एकदा प्रश्न विचारायला लागलात, विचार करायला लागलात की तुमचे संघजंती वरिष्ठ "मुवी विचार करायला लागला म्हणजे आता हा आता आपल्यातला राहिला नाही" असा काहीतरी विचार करुन तुमचा महात्मा गांधी करुन टाकायचे आणि मिपाकरांचं हक्काचं "गिर्‍हाईक" जाईल ही भीती आम्हाला वाटते म्हणून हा आगाऊ प्रपंच!

In reply to by बाळकराम

सौंदाळा 13/03/2014 - 10:21
तुमचा संघजंती शब्द काही लोकांना आवडला म्हणुन प्रत्येक प्रतिसादात तो ओढुनताणुन पेरण्याचा अट्टाहास आवडला.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बाळकराम 15/03/2014 - 01:33
हे ही काही कमी नाही, कुठूनतरी सुरुवात झाली. तुम्हाला आता चांगल्या गोष्टी कळायला सुद्धा लागतील हा विश्वास वाटतो. धन्यवाद. अरे हो, एक राहिलंच की- संघजंती सौंदाळा! हे कसं झ्याक वाटतंय! अगदी फिरंगोजी नरसाळा सारखं वाटतंय.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण 14/03/2014 - 02:14
बाळकराम, मस्त! तुम्ही तेंडुलकर आहात की गावसकर? नुसती दणकेबाज फटकेबाजी करताय म्हणून म्हटलं.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बाळकराम 15/03/2014 - 01:44
तुम्ही जाणते हा शब्द वापरणार नाहीच- तुम्हाला थोडंच माहितीये जाणतेपणा म्हणजे काय ते? आणि जातीयवादाने, "सेल-बाय-डेट" उलटून गेलेल्या तत्त्वज्ञानाने "बुरसटलेलं" असण्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने शिकून योग्य वेळी "जुनं" झालेलं असलं कधीही चांगलं, नाही का? :)

भाते 13/03/2014 - 10:01
प्रश्र्न कसले हि तर १०० मार्कांची प्रश्र्नपत्रिकाच आहे! १० मार्कांचे १० प्रश्र्न. म्हणजे सगळे प्रश्र्न कम्पलसरी, ऑप्शनला एकही नाही. जाऊदे, हा विषयच मी ऑप्शनला टाकला आहे, त्यामुळे माझ्याकडुन पास. अवांतर : मुवि, ऊन्हाळा नुकताच सुरु झाला आहे. अजुन पुढले किमान तिन महिने काढायचे आहेत. इतक्यात वैतागलात? चला, आणखी एक बियर कट्टा करूयात. ह. घ्या. :)

चिरोटा 13/03/2014 - 12:01
बादशाहीत कोण येणार जेवायला?
जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
अचानक? मला नाही वाटत. ३० वर्षापूर्वीही जागा घेणे,फ्लॅट घेणे महागच होते.स्वतःच्या आर्थिक बळावर फ्लॅट घ्यायचा तर त्यावेळीही तीशी सहज उलटायची.आता दर जरा जास्त वेगाने वाढत आहेत कारण स्थानिक धंदे,व्यवसाय बरेच वाढले आहेत व काळ्या पैशाचे प्रमाणही बरेच वाढले आहे. त्यामुळे गरज नसताना फ्लॅट घेणे हा प्र्कार व्यवसाय्,धंदे करणार्‍या लोकांमध्ये दिसून येतो.

ऋषिकेश 13/03/2014 - 14:36
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?
कल्पना नाही. झालीही असती किंवा नसतीही. जर द्वेष असेल तर हे किंवा ते कोणतेही तत्कालिन कारण पुरते! १८५७चा उठाव काडतुसांना डुकराची चरबी लावली नसती तरी झालाच असता असे वाटते कारण सैनिकांत असंतोष होता. तसेच इथे आहे. दोन समाजात द्वेष असला की कारणाची वाट बघत दोन्ही समाजातील कंटक टपून बसलेले असतात.
३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?
तसे काही वाटत नाही. तितकेच असावे.
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घटनेची निंदा केली होती. (बातमी)
५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?
काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला, कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले.
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
कोणत्या दृष्टीकोनातून अस्थिर आहेत? तिथे एवढ्यात इमारती कोसळल्या त्याबद्दल बोलताय का? ते कच्च्या बांधकामामुळे झाले असे म्हणतात.
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?
फाळणीमुळे तेथील हिंदूंचे प्रमाण कमी झाले. क्रिकेट संघात तेथील हिंदूच्या प्रमाणात क्वचित हिंदु खेळाडू दिसले आहेत. शिवाय ते भारतासारखे धर्मनिरपेक्ष देश नसल्याने त्यांच्याकडे अल्पसंख्यांवर अन्यायही होतो व त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बरेच मर्यादित असते.
९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.
कशावरून म्हणताय? काही विदा आहे काय? बघायला आवडेल
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
बरेच विस्ताराने उत्तर द्यावे लागेल! माझ्यापेक्षा इतर काही तज्ज्ञ मिपाकर या बाबतीत उत्तम उत्तर देऊ शकतील असे वाटते.

In reply to by ऋषिकेश

विकास 13/03/2014 - 21:23
काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात? कदाचीत मूळ प्रश्न वाचताना वेगळेच विश्लेषण केलेले दिसतयं. :) मूळ प्रश्न "काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?" असा आहे. अर्थात काश्मीरमधे हिंदू अल्पसंख्य आहेत/होते/झाले असा त्यात मुद्दा नसून जी काही संख्या होती ती का घटली हा मुद्दा आहे. मला वाटते त्याचा संदर्भ १९९० च्या सुमारापासून जे दहशतवादी वाढले आणि काश्मिरी पंडीतांना स्थलांतरीत व्हावे लागले त्या आकडेवारीशी असावा. नाहीतर असाच मुद्दा कोणत्याही अल्पसंख्य समाजावर काश्मिरीपंडीतांसारखेच अथवा हिटलरने ज्यूंवर केले तसे अत्याचार करून स्थलांतरीत करून त्या संदर्भातील आकडेवारीशी करता येईल. तेंव्हा तुमचे विश्लेषण हे दुधारी शस्त्र ठरू शकते, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.

In reply to by ऋषिकेश

"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला." कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती? माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?

In reply to by मुक्त विहारि

नितिन थत्ते 15/03/2014 - 11:10
>>माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? मी १९९७ मध्ये जागा घेतली तेव्हा १० लाखाला घेतला आज त्याची (म्हणजे आमच्या एरियात सिमिलर फ़्लॅटची- पण बेसिक अ‍ॅमेनिटीज पेक्षा बर्‍याच जास्त अ‍ॅमेनिटीज असलेल्या फ्लॅटची) किंमत सुमारे ५० लाख आहे. या हिशेबाने दरवाढीचा दर दरवर्षी १०.५४% होतो जो चलनवाढीच्या दरापेक्षा फार जास्त नाही. साधारणतः जागांचे दर स्पर्टसमध्ये वाढतात. काहीपिरियडमध्ये भसाभस वाढतात तर काही पिरियडमध्ये स्थिरसुद्धा राहतात.

In reply to by ऋषिकेश

"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला." कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती? माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?

श्रीगुरुजी 13/03/2014 - 23:24
>>> १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? गोध्रा येथील काही स्थानिक मुस्लिमांनी अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांचा डबा पेटवून दिला. त्यात ५९ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे दंगल पेटली. डबा पेटवलाच नसता तर दंगल झालीच नसती. >>> २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? जाट मुलीची छेड काढली नसती तर तिचे भाऊ छेड काढणार्‍यांना जाब विचारायला गेलेच नसते. त्यामुळे त्यांचे खून झालेच नसते व पुढील सर्व घटना टळल्या असत्या. >>> ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? हिंदू नायकांचे प्रमाण कमी झालेले नाही. >>> ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? भारताने अधिकृत निषेध नोंदविला होता. >>> ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते. श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली. >>> ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? जागेचे भाव कायम वाढतच असतात. >>> ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? सामाजिक शांततेच्या दृष्टीने अस्थिर असे तुम्हाला म्हणायचे असावे. भिवंडीला दंगलींचा जुना इतिहास आहे. दोन्हीकडे मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. मुम्ब्र्यात तर अनेक बेकायदेशीर बांगलादेशी आहेत (म्हणे). सर्वसाधारणपणे मुस्लिम जिथे जास्त आहेत तिथे जास्त दंगे होतात. >>> ८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात? पाकिस्तान व बांगलातील दडपशाहीमुळे अनेक हिंदू भारतात आले. काही जणांनी गळचेपीमुळे नाईलाजाने धर्म बदलला तर काही जणांवर धर्मबदलाची सक्ती झाली. त्यामुळे हिंदूंची संख्या कमी झाली. मुख्य कारण देश सोडणे हे आहे. पाकिस्तान व बांगलामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदू खेळाडू नसतात कारण तिथल्या बहुसंख्य क्षेत्रात फक्त मुस्लिमांनाच संधी मिळते. तस्लिमा नसरीन च्या "लज्जा" पुस्तकाच याचा सविस्तर उल्लेख आहे. निव्वळ क्रीडाक्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात धर्म आडवा येतो. श्रीलंकेमध्ये सुद्धा १५ टक्के तामिळ आहेत. परंतु आजतगायत मुरलीधरन हा एकमेव तामिळ त्या संघात होता. बाकी सर्व सिंहली होते. >>> ९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड. सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ऋषिकेश 14/03/2014 - 10:55
काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते.
काश्मिर म्हणजे काश्मिर खोरे म्हणताय की जम्मी आणु काश्मिर राज्य? नुसत्या काश्मिर खोर्‍यात ~९७% मुस्लिम होते - आहेत. अख्खे राज्य म्हणत असाल तर माहिती ढोबळ मानाने योग्य आहे.
श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली.
आकडेवारीत घोळ आहे. जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा.

In reply to by ऋषिकेश

श्रीगुरुजी 14/03/2014 - 13:23
>>> जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा. ४ लाख हा आकडा बरोबर आहे, पण ४ लाख म्हणजे १० टक्के हा आकडा चुकलेला दिसतोय. खरं तर २५ टक्क्यांहून अधिक हिंदूंनी काश्मिर राज्यातून स्थलांतर केलेलं दिसतंय.

In reply to by श्रीगुरुजी

पोटे 16/03/2014 - 12:50
सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अडाणी लोक खून , मारामार्‍या, बलात्कार असे सामान्य गुन्हे करतात. उच्चशिक्षित लोक शेअर बाजार बुडवणे, ब्यान्क बुडवणे, बोगस विक्री करुन एकच फ्लॅट चार लोकाना विकणे, लैंगिक शोषण करणे , असे असामान्य गुन्हे करतात. अशिक्षित लोकाना वकिल करणे परवडत नाही, त्यामुळे ते सापडले की अडकतातच. शिक्षित लोकांना वकील करणे परवडते, त्यामुळे निर्दोष सुटू शकतात.

कल्पक 14/03/2014 - 10:21
प्रश्न क्र. ५ साठी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल श्री. जगमोहन यांचे 'धुमसते बर्फ' हे पुस्तक नक्की वाचा. प्रश्न क्र. ८ साठी तस्लिमा नसरीन यांचे 'लज्जा' हे पुस्तक तसेच ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा हा लेख (http://www.esakal.com/esakal/20120822/4791804341115950977.htm) वाचा.

कल्पक 14/03/2014 - 10:44
प्रश्न क्र. १०: मध्यंतरी असं वाचलं होतं कि चिदम्बरम यांनी भारतीय लोकांना सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं. कारण आपण जे सोनं खरेदी करतो ते पूर्णतः परदेशातून आयात केलं जातं, म्हणजेच परकीय चलनातून हा व्यवहार होतो आणि म्हणून रुपया कमजोर होतो. आणि जे सोनं भारतात आहे ते सरकार विक्रीसाठी उपलब्ध होऊ देत नाही नाही. मध्यंतरी असंही वाचलं होतं की भारत सरकारने देशाच्या तिजोरीतील ४६% (साधारणतः २६५ टन) सोनं प्रसिद्धीमाध्यमांपासून लपवून परदेशातील बँकेत कर्जासाठी तारण म्हणून ठेवलं जे भारतीय कायद्याच्या (८५% सोनं देशात ठेवावं असं सांगणाऱ्या) विरोधात आहे. याविषयी खटले सुद्धा चालू आहेत. सरकारच्या अशा धोरणाचा सुद्धा रुपयावर परिणाम होतो. मलेशियात असताना मला असं कळलं होतं कि जगातल्या कोणत्याही दोन देशातील चलन रुपांतर हे डॉलर द्वारेच होतं. म्हणजे भारतीय रुपया > डॉलर > मलेशिअन रिंगीट्स. या गोष्टीमुळे सुद्धा अमेरीकेतर चलनांवर परिणाम होतो.

मृत्युन्जय 14/03/2014 - 13:34
च्यायला मुवि चालले मुसलमानांच्या सौदीत आणि इथे हिंदु मुसलमान पर्श्नांच्या काड्या टाकुन राह्यले. थांबा सौदीतल्या उंटांनाच सांगतो तुम्हाला पाठीवरुन वाळुत पाडायला. ;)

रमेश आठवले 14/03/2014 - 20:05
आपल्या सगळ्या प्रश्नामधेच त्यांचे उत्तर ही आहे. अश्या प्रश्नाना उपरोधिक किंवा इंग्लिश भाषेत rhetoric प्रश्न असे म्हणता येईल. प्रश्नांची निवड करण्यात आपण दाखविलेली मार्मिकता स्तुत्य आहे.

आदूबाळ 12/03/2014 - 20:31
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात? हिंदूंचे प्रमाण स्थलांतरामुळे कमी झाले असावे. क्रिकेट संघात हिंदू व्यक्ती असतात ना. पाकिस्तान संघातला जुना विकेटकीपर अनिल दलपत आणि सध्याच्या संघातला फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया ही चटकन आठवणारी उदाहरणं. १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? हा प्रश्न नीट कळला नाही. रुपया बलवान म्हणजे नक्की काय? "स्थिर" याअर्थी बलवान का? डॉलर/पाऊंड/युरोच्या तुलनेत दुसर्‍या चलनाचे किती युनिट्स मिळतात हा बलवानतेचा निकष नाही. [समजा, उद्या "होन" असं नवीन चलन काढून त्याची किंमत ठेवली आजचे शंभर रुपये, तर १ होन = $०.६५ अशी किंमत होईल. पण याचा अर्थ होन हे रुपयापेक्षा सरस चलन ठरत नाही.] एका येनची डॉलरच्या तुलनेत किंमत खूपच कमी आहे, पण येन हे जगातले एक बलवान चलन आहे. तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की.

In reply to by आदूबाळ

"स्थिर" याअर्थी बलवान का? हो. बहूदा अर्थ कारणात, एखादे चलन "स्थिर" असणे, म्हणजेच ते चलन "बलवान" असते, असे मला वाटते.नक्की असेच असते का? हे इथले अर्थ तज्ञ सांगतीलच. तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की. म्हणजेच, आजच्या घडीला, जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो) आणि जो सोन्यात गुंतवणूक करत नाही तो राष्ट्राभिमानी होवू शकतो का?

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ 12/03/2014 - 22:52
बलवान ही सापेक्ष (रिलेटिव) कल्पना आहे. कशाच्या तुलनेत बलवान? दुसरं चलन हा मापदंड होऊ शकत नाही. मग दुसरा काही मापदंड असू शकतो का? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी), बिग मॅक इंडेक्स असे काही मापदंड सुचवले जातात. पण प्रत्येकाला आपापले फायदे-तोटे आहेतच. -
जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो)
मानवतावादी आहे असं म्हणता येईल. राष्ट्राभिमान आर्थिक बाबींत आणणं गैर आहे असं मला वाटतं. "स्वदेशी वापरा" हा सल्ला आजच्या जगात आत्मघातकी ठरेल.

In reply to by आदूबाळ

आत्मघातकी कधीच ठरणार नाही. किंबहूना "जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्‍या स्वदेशी वस्तू वापरणे तर अजिबातच नाही."

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ 13/03/2014 - 00:22
दुरुस्ती: स्वदेशी वापरा हा आग्रह आत्मघातकी ठरेल. त्यानिमित्ताने: स्वदेशी म्हणजे नेमकं काय? भारतीय उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (नॅनो) परदेशी उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (बकार्डी) भारतीय उत्पादकाने परदेशात बनवलेली वस्तू (लँड रोव्हर) ?? "जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्‍या कोणत्याही वस्तू वापरणे तर अजिबातच आत्मघातकी ठरणार नाही" यात स्वदेशी/परदेशी किंवा राष्ट्राभिमान वगैरेचा काहीच संबंध नाही. नसावा.

In reply to by आदूबाळ

गेल्या ५०/६० वर्षांत झालेला निर्यात प्रधान (ज्यांची निर्यात, आयाती पेक्षा जास्त आहे) देशांचा आर्थिक महासत्तेत झालेला उदय (उदा. साउथ कोरिया.जर्मनी,जपान) हेच दाखवते. आणि मनापासून धन्यवाद....मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.

In reply to by मुक्त विहारि

सुनील 13/03/2014 - 08:38
मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.
बकार्डी पिऊन नॅनो चालवली की आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो (असे म्हणतात) बाकी मुवी, हे प्रश्णबिश्ण सोडा आणि एखादी पाकृ टाका नाहीतर कट्ट्याचं जमवा!

In reply to by सुनील

आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो (आणि मग अपघात झाला, की माणूस त्याच्या कुवती प्रमाणे शिक्षा भोगतो किंवा मग महानायक तरी होतो.)

श्रीगुरुजी 12/03/2014 - 20:49
प्रश्न क्र. (१) ते (९) ची खरी उत्तरे जो देईल त्याला/तिला "जातीयवादी", "हिंदुत्ववादी", "संघाचा हस्तक", "पुराणमतवादी", "प्रतिगामी", "फूट पाडणारा" इ. शेलक्या विशेषणांनी झोडले जाईल. या प्रश्नांची जे खोटी/चुकीची उत्तरे देतील त्यांचा "निधर्मी", "सर्वधर्मसमभावी", "उदारमतवादी", "पुरोगामी" इ. विशेषणांनी गौरव केला जाईल. >>> १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? आयात कमी करून रूपया बलवान होणार नाही. आयात ही वाईटच असते व निर्यात ही चांगलीच असते हा गैरसमज आहे. तेलाची आयात कमी झाली तरी तेलाचे देशांतर्गत भाव वाढतील. त्यामुळे इतर सर्व वस्तूंचे भाव वाढून व्याजदर वाढतील. त्यामुळे चलनफुगवटा होऊन प्रत्यक्षात रूपया कमजोर होईल. याचा अर्थ आयात वाढवून रूपया मजबूत होईल असे पण नाही. आयात निर्यातील समतोल असणे महत्त्वाचे आहे.

विकास 12/03/2014 - 20:49
फारच मोठा आवाका आहे! बिरबलाची गोष्ट आठवली... बादशहा विचारतो की, "भाकरी का करपली?, घोडा का अडला?, पान का सडलं?" सगळ्याचे उत्तर एकच - न फिरवल्याने. तसेच काहीसे या सगळ्याचे समान उत्तर आहे असे वाटते.

संपत 12/03/2014 - 22:17
माझेदेखील काही प्रश्न: १. ९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का? २. आज काल हिंदी सिनेमांतील मुस्लीम नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? पूर्वी खान मंडळींचे राज्य होते.. आता जुने नायक सोडल्यास नवीन नायकात मुस्लीम चेहरा अभावानेच दिसतो. ३. भारताच्या क्रिकेटच्या संघात मुस्लीम, ख्रिश्चन व्यक्ती लोकसंख्येच्या मानाने इतक्या कमी का असतात? ४, आर्थिक गुन्हेगारीत गुजराती व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात भाग खूप जास्त का असतो?विशेषतः शेअर बाजार प्रकरणात बाकी प्रश्न सुचतील तसे..

In reply to by संपत

विकास 12/03/2014 - 22:50
९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का? कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून. प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने असे वाटत असावे. अशाच (स्युडोसेक्यूलर) वृत्तीने गांधीहत्येनंतर एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासाठी समाजाच्या एका घटकासच गुन्हेगार समजले गेले, इंदीरा हत्येनंतर हजारो शिखांचे हत्याकांड झाले, गोध्रानंतरच्या दंगलीत केवळ एकाच धर्माच्या लोकांची झालेली हत्या दिसली, वगैरे वगैरे...

In reply to by विकास

संपत 12/03/2014 - 23:06
प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर..
कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून
आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात.

In reply to by संपत

विकास 12/03/2014 - 23:23
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर.. स्युडोसेक्यूलर्स कसे बघतात हे सांगितले आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्हालाच माहीत. :) कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात. माझे अर्धेच वाक्य घेऊन तुम्ही निष्कर्ष काढत आहात यात सर्व काही आले. त्यापुढे मी "आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून. " असे देखील म्हणले होते. पण ते अजून पचायला अवघड जातयं असे दिसते. असो, मी फक्त इतिहास बघतोय. तो न लक्षात न घेता अथवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून स्युडोसेक्यूलर्सप्रमाणे निष्कर्ष काढत नाही आहे.

In reply to by विकास

मदनबाण 13/03/2014 - 10:40
मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का? माझ्या वाचना नुसार बाबरी मस्जिद पाडली गेली नसुन,तो फक्त बाबरी ढाचा होता.{गुगलबाबा वर या बाबतीत शोध घेतला जाउ शकतो.या वर अधिक वाचायला नक्कीच आवडेल.} एक असाच दुवा देतो :- सहमति में ही है समाधान मुवि यांनी त्यांना पडलेले प्रश्न दिलेलच आहेत त्यात भर टाकतो. १) काश्मिर मधे गेल्या दोन दशकात २०८ पेक्षा अधिक मंदिरे पाडली गेली, त्यावर या देशातील किती {तथा कथित धर्मनिरपेक्ष्}पक्षांनी, वॄत्तवाहिन्यांनी,वॄत्तपत्रांनी आरडा-ओरड केली ?कोणत्या हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आंदोलन केले ? ते किती सफल झाले आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली ?किती मुस्लिम संघटनांनी,मुल्ला /मौलविंनी यांची निंदा केली ?इतके झाल्यावर सुद्धा तिथे दंगली झाल्या का ? {या पैकी काही देवळांची यादी :- List of Temples Destroyed by the Islamic Terrorists }

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/03/2014 - 02:12
१९९२ च्या दंगलीला श्रीकृष्ण आयोगाच्या रिपोर्टानुसार जबाबदार असलेले मुसलमान गुंड व बाळ ठाकरे, मधुकर सरपोतदार वगैरे शिवसैनिक आणि हिंदू गुंड ही सर्व मंडळी स्युडोसेक्युलर आहेत ही नवी माहिती या प्रतिसादातून मिळाली.

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/03/2014 - 17:59
तसे फरक बरेच आहेत... गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे. किंवा एका नरराक्षसाचे विकास*पुरुषात रुपांतर होणे.... किंवा भारताच्या आद्य लोहपुरुषांनी ज्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याच संघटनेची 'पूर्वपीठिका' असणाऱ्यांना ते आद्य लोहपुरुष अचानक सरकारी पैसा खर्च करुन पुतळा उभारण्याइतके प्रातःस्मरणीय होणे... किंवा भारताच्या आद्य राष्ट्रपित्यावर आडून आडून वा उघडपणे टीका** करणाऱ्यांना सोयीस्कररीत्या त्या राष्ट्रपित्याचा गौरव करावा लागणे असे अनेक फरक सृष्टीत होतच असतात. The Only Thing That Is Constant Is Change * यात वैयक्तिक उल्लेख नाही. ** टीका म्हणजे हत्या नाही.

In reply to by आजानुकर्ण

विकास 14/03/2014 - 18:37
** टीका म्हणजे हत्या नाही. मस्तच की हो! अजून एक सुधारणा! गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे. वाक्य बरोबर लिहीले आहे. कदाचीत चुकून हे कोणी वाचले तर त्यातील फरक कळणार नाही म्हणून लिहीतो. गुजरात दंगलीची चौकशी ही न्यायालयीन कामकाज (कोर्ट केस) म्हणून झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व आले. मुंबईच्या संदर्भात तुम्ही म्हणत असलेले न्यायमूर्ती म्हणजे बी. एन. श्रीकृष्ण यांचा केवळ आयोग होता. कोर्ट केस नव्हती. ज्यांच्यावर कोर्ट केसेस झाल्या त्यात ते अडकले, (उदा. सरपोतदार) शिक्षा मिळाली वगैरे. आणि हो मुंबईच्या त्या दंगलीबद्द्ल (१९९३ जाने-फेब) बोलताना राधाबाईचाळ पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by विकास

आजानुकर्ण 14/03/2014 - 20:11
असो शब्दच्छलासाठी तुमचा मुद्दा योग्य असला तरी अद्याप श्रीकृष्ण आयोगाच्या लेजिटिमसीबाबत कोणी शंका उत्पन्न केलेली नाही. मात्र तुमचा मूळ दावा हा खालीलप्रमाणे होता. आयोगाच्या अहवालानुसार तुमच्या दाव्यात काही तथ्य दिसत नाही. आयोगाने कुठेही या (अगदी राधाबाईचाळीसकट) दंगलीसाठी बाबर किंवा सेटलवाड-आझमी वगैरे स्युडोसेक्युलरिस्ट लोकांना जबाबदार धलेले नाही.
कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून.
अर्थात तेंडुलकर-पाध्ये-लागू यांना त्रास देणारे, पाध्यांची राडासारखी पुस्तके जाळणारे, सखाराम बाईंडरला त्रास देणारे (किंवा साहित्यिकांना बैल म्हणणारे, पुलंना झक मारुन जसाकाय स्वतःच्याच खिशातून पुरस्कार दिला असा अविर्भाव गाजवणारे) कै. शिवसेनाप्रमुख हे जसे हे सर्व करुनही कलेचे भोक्ते मानले जातात (प्लीज णोट- इथे हुसेनचे नाव नाही. सर्वजण हिंदू-म्हराटीच कलाकार आहेत..) तसेच अतिरेकी हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करुनही ते स्युडोसेक्युलर मानले जावेत असा तुमचा दावा असेल तर ते एकंदर प्रतिसादाशी तर्कसुसंगत ठरेल.

अवघड प्रश्न विचारु नका हो , आधीच काँग्रेसी लोकांची गोची झालीये ... शिवाय इथे बरेच गांधीवाद लोक आहेत , त्यांना का बरे कोंडीत पकडता ?? ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? >>> मला इथे उपप्रश्न आहेत . बामियान बुध्द मुर्ती नाशाबद्दल बौध्दांची काय भुमिका होती ? किंवा बोधगया येथील बॉम्बस्फोटाबद्दल बौध्द लोकांचे काय मत आहे ? ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? >>> माझ्यामतेतरी भाव अचानक बाढलेले नाहीत , रीयल इस्टेट ही नेहमीच महाग होती ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? >>>अस्थिर म्हणजे ? १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का? >>> हा खरा अवघड प्रश्न आहे . आणि हो , जर आपण तेलाचे आणि सोन्याचे एक्सेस उत्पादन करुशकलो तर नक्कीच ह्या निमित्ताने देशाबाहेर जाणारा करन्सी फ्लो कमी होईल आणि रुपया खचितच बलवान होईल !! किंबहुना ,माझ्यामाहीती नुसार, करन्सी बलवान की कमकुवत हे त्या देशाच्या जीडीपी अर्थात ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट वरुन ठरत असते ... जितका जीडीपो जास्त तितकी करन्सी बलवान !! बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत आहेतच , फक्त ती गांधीवाद्यांच्या तोंडुन ऐकायला मिळतात का ते पाहुया :)

बाळकराम 13/03/2014 - 02:46
तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे इथली तज्ञ मंडळी काय ते देतीलच, पण तुम्हाला प्रश्न पडायला लागले ते बघून मला मात्र आनंद झाला. आज प्रश्न पडू लागले, म्हणजे उद्या तुम्ही विचारही करु लागाल आणि कोणी सांगावे, हळूहळू तुम्ही अगदी तर्कसुसंगत सुद्धा विचार करु लागाल, हू नोज? उम्मीद पे दुनिया कायम है! पण तुम्हाला हे असले प्रश्न वगैरे पडणं अलाऊड आहे का तेही एकदा मोदीबागेतून वा रेशीमबागेतून कन्फर्म करुन घ्या म्हणजे झालं. नाही म्हणजे, "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" वगैरे करायला काही विचारशक्ती असायची/ बुद्धी असायची गरज नाही पण तुम्ही एकदा प्रश्न विचारायला लागलात, विचार करायला लागलात की तुमचे संघजंती वरिष्ठ "मुवी विचार करायला लागला म्हणजे आता हा आता आपल्यातला राहिला नाही" असा काहीतरी विचार करुन तुमचा महात्मा गांधी करुन टाकायचे आणि मिपाकरांचं हक्काचं "गिर्‍हाईक" जाईल ही भीती आम्हाला वाटते म्हणून हा आगाऊ प्रपंच!

In reply to by बाळकराम

सौंदाळा 13/03/2014 - 10:21
तुमचा संघजंती शब्द काही लोकांना आवडला म्हणुन प्रत्येक प्रतिसादात तो ओढुनताणुन पेरण्याचा अट्टाहास आवडला.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बाळकराम 15/03/2014 - 01:33
हे ही काही कमी नाही, कुठूनतरी सुरुवात झाली. तुम्हाला आता चांगल्या गोष्टी कळायला सुद्धा लागतील हा विश्वास वाटतो. धन्यवाद. अरे हो, एक राहिलंच की- संघजंती सौंदाळा! हे कसं झ्याक वाटतंय! अगदी फिरंगोजी नरसाळा सारखं वाटतंय.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण 14/03/2014 - 02:14
बाळकराम, मस्त! तुम्ही तेंडुलकर आहात की गावसकर? नुसती दणकेबाज फटकेबाजी करताय म्हणून म्हटलं.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बाळकराम 15/03/2014 - 01:44
तुम्ही जाणते हा शब्द वापरणार नाहीच- तुम्हाला थोडंच माहितीये जाणतेपणा म्हणजे काय ते? आणि जातीयवादाने, "सेल-बाय-डेट" उलटून गेलेल्या तत्त्वज्ञानाने "बुरसटलेलं" असण्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने शिकून योग्य वेळी "जुनं" झालेलं असलं कधीही चांगलं, नाही का? :)

भाते 13/03/2014 - 10:01
प्रश्र्न कसले हि तर १०० मार्कांची प्रश्र्नपत्रिकाच आहे! १० मार्कांचे १० प्रश्र्न. म्हणजे सगळे प्रश्र्न कम्पलसरी, ऑप्शनला एकही नाही. जाऊदे, हा विषयच मी ऑप्शनला टाकला आहे, त्यामुळे माझ्याकडुन पास. अवांतर : मुवि, ऊन्हाळा नुकताच सुरु झाला आहे. अजुन पुढले किमान तिन महिने काढायचे आहेत. इतक्यात वैतागलात? चला, आणखी एक बियर कट्टा करूयात. ह. घ्या. :)

चिरोटा 13/03/2014 - 12:01
बादशाहीत कोण येणार जेवायला?
जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
अचानक? मला नाही वाटत. ३० वर्षापूर्वीही जागा घेणे,फ्लॅट घेणे महागच होते.स्वतःच्या आर्थिक बळावर फ्लॅट घ्यायचा तर त्यावेळीही तीशी सहज उलटायची.आता दर जरा जास्त वेगाने वाढत आहेत कारण स्थानिक धंदे,व्यवसाय बरेच वाढले आहेत व काळ्या पैशाचे प्रमाणही बरेच वाढले आहे. त्यामुळे गरज नसताना फ्लॅट घेणे हा प्र्कार व्यवसाय्,धंदे करणार्‍या लोकांमध्ये दिसून येतो.

ऋषिकेश 13/03/2014 - 14:36
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?
कल्पना नाही. झालीही असती किंवा नसतीही. जर द्वेष असेल तर हे किंवा ते कोणतेही तत्कालिन कारण पुरते! १८५७चा उठाव काडतुसांना डुकराची चरबी लावली नसती तरी झालाच असता असे वाटते कारण सैनिकांत असंतोष होता. तसेच इथे आहे. दोन समाजात द्वेष असला की कारणाची वाट बघत दोन्ही समाजातील कंटक टपून बसलेले असतात.
३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?
तसे काही वाटत नाही. तितकेच असावे.
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घटनेची निंदा केली होती. (बातमी)
५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?
काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला, कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले.
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
कोणत्या दृष्टीकोनातून अस्थिर आहेत? तिथे एवढ्यात इमारती कोसळल्या त्याबद्दल बोलताय का? ते कच्च्या बांधकामामुळे झाले असे म्हणतात.
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?
फाळणीमुळे तेथील हिंदूंचे प्रमाण कमी झाले. क्रिकेट संघात तेथील हिंदूच्या प्रमाणात क्वचित हिंदु खेळाडू दिसले आहेत. शिवाय ते भारतासारखे धर्मनिरपेक्ष देश नसल्याने त्यांच्याकडे अल्पसंख्यांवर अन्यायही होतो व त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बरेच मर्यादित असते.
९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.
कशावरून म्हणताय? काही विदा आहे काय? बघायला आवडेल
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
बरेच विस्ताराने उत्तर द्यावे लागेल! माझ्यापेक्षा इतर काही तज्ज्ञ मिपाकर या बाबतीत उत्तम उत्तर देऊ शकतील असे वाटते.

In reply to by ऋषिकेश

विकास 13/03/2014 - 21:23
काश्मिरात हिंदु नेहमीच अल्पसंख्य होते. अचानक कधी कमी झाले? कोणत्या सालाबद्दल म्हणत आहात? कदाचीत मूळ प्रश्न वाचताना वेगळेच विश्लेषण केलेले दिसतयं. :) मूळ प्रश्न "काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?" असा आहे. अर्थात काश्मीरमधे हिंदू अल्पसंख्य आहेत/होते/झाले असा त्यात मुद्दा नसून जी काही संख्या होती ती का घटली हा मुद्दा आहे. मला वाटते त्याचा संदर्भ १९९० च्या सुमारापासून जे दहशतवादी वाढले आणि काश्मिरी पंडीतांना स्थलांतरीत व्हावे लागले त्या आकडेवारीशी असावा. नाहीतर असाच मुद्दा कोणत्याही अल्पसंख्य समाजावर काश्मिरीपंडीतांसारखेच अथवा हिटलरने ज्यूंवर केले तसे अत्याचार करून स्थलांतरीत करून त्या संदर्भातील आकडेवारीशी करता येईल. तेंव्हा तुमचे विश्लेषण हे दुधारी शस्त्र ठरू शकते, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.

In reply to by ऋषिकेश

"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला." कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती? माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?

In reply to by मुक्त विहारि

नितिन थत्ते 15/03/2014 - 11:10
>>माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? मी १९९७ मध्ये जागा घेतली तेव्हा १० लाखाला घेतला आज त्याची (म्हणजे आमच्या एरियात सिमिलर फ़्लॅटची- पण बेसिक अ‍ॅमेनिटीज पेक्षा बर्‍याच जास्त अ‍ॅमेनिटीज असलेल्या फ्लॅटची) किंमत सुमारे ५० लाख आहे. या हिशेबाने दरवाढीचा दर दरवर्षी १०.५४% होतो जो चलनवाढीच्या दरापेक्षा फार जास्त नाही. साधारणतः जागांचे दर स्पर्टसमध्ये वाढतात. काहीपिरियडमध्ये भसाभस वाढतात तर काही पिरियडमध्ये स्थिरसुद्धा राहतात.

In reply to by ऋषिकेश

"लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला." कुठल्या आणि किती लोकांच्या हातात लिक्वीड मनी वाढला?समाजांत ह्या लोकांचे प्रमाण किती? माझ्या अंदाजाने एक आयटी क्षेत्र सोडले तर इतर क्षेत्रांतील पगार चलनवाढीच्या प्रमाणांतच वाढळेला आहे.जागेचे भाव मात्र चलनवाढीच्या किमान तिप्पट प्रमाणांत वाढलेले आहेत.हा पैसा नक्की कुणाकडे गेला? कर्जे स्वस्तही झाली व मिळणे सुकरही झाले. =====> म्हणून बिल्डर लॉबीने त्याचा फायदा उठवणे कितपत योग्य आहे?सरकार बिल्डर लॉबी बनवते हे सत्य आहे की सरकार सामान्य जनता बनवते हे सत्य?

श्रीगुरुजी 13/03/2014 - 23:24
>>> १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? गोध्रा येथील काही स्थानिक मुस्लिमांनी अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांचा डबा पेटवून दिला. त्यात ५९ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे दंगल पेटली. डबा पेटवलाच नसता तर दंगल झालीच नसती. >>> २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? जाट मुलीची छेड काढली नसती तर तिचे भाऊ छेड काढणार्‍यांना जाब विचारायला गेलेच नसते. त्यामुळे त्यांचे खून झालेच नसते व पुढील सर्व घटना टळल्या असत्या. >>> ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? हिंदू नायकांचे प्रमाण कमी झालेले नाही. >>> ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? भारताने अधिकृत निषेध नोंदविला होता. >>> ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते. श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली. >>> ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? जागेचे भाव कायम वाढतच असतात. >>> ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? सामाजिक शांततेच्या दृष्टीने अस्थिर असे तुम्हाला म्हणायचे असावे. भिवंडीला दंगलींचा जुना इतिहास आहे. दोन्हीकडे मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. मुम्ब्र्यात तर अनेक बेकायदेशीर बांगलादेशी आहेत (म्हणे). सर्वसाधारणपणे मुस्लिम जिथे जास्त आहेत तिथे जास्त दंगे होतात. >>> ८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात? पाकिस्तान व बांगलातील दडपशाहीमुळे अनेक हिंदू भारतात आले. काही जणांनी गळचेपीमुळे नाईलाजाने धर्म बदलला तर काही जणांवर धर्मबदलाची सक्ती झाली. त्यामुळे हिंदूंची संख्या कमी झाली. मुख्य कारण देश सोडणे हे आहे. पाकिस्तान व बांगलामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदू खेळाडू नसतात कारण तिथल्या बहुसंख्य क्षेत्रात फक्त मुस्लिमांनाच संधी मिळते. तस्लिमा नसरीन च्या "लज्जा" पुस्तकाच याचा सविस्तर उल्लेख आहे. निव्वळ क्रीडाक्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात धर्म आडवा येतो. श्रीलंकेमध्ये सुद्धा १५ टक्के तामिळ आहेत. परंतु आजतगायत मुरलीधरन हा एकमेव तामिळ त्या संघात होता. बाकी सर्व सिंहली होते. >>> ९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड. सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ऋषिकेश 14/03/2014 - 10:55
काश्मिरमध्ये १९९० मध्ये ६५ टक्के मुस्लिम व अंदाजे ३० टक्के हिंदू होते.
काश्मिर म्हणजे काश्मिर खोरे म्हणताय की जम्मी आणु काश्मिर राज्य? नुसत्या काश्मिर खोर्‍यात ~९७% मुस्लिम होते - आहेत. अख्खे राज्य म्हणत असाल तर माहिती ढोबळ मानाने योग्य आहे.
श्रीनगर खोर्‍यातील ४ लाखांहून अधिक (म्हणजे एकूण १० टक्क्यांहून अधिक) हिंदूंना अतिरेक्यांच्या धमक्यांमुळे घरे सोडून दिल्लीत यावे लागले. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या आपोआप कमी झाली.
आकडेवारीत घोळ आहे. जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा.

In reply to by ऋषिकेश

श्रीगुरुजी 14/03/2014 - 13:23
>>> जर ४ लाख म्हणजे १०% हिंदू असा तुमचा दावा असेल तर काश्मिर खोर्‍यात मुळातच ४०लाख हिंदु होते असा तुमचा दावा आहे का? एकुण काश्मिर खोर्‍याची लोकसंख्याच रफली ५५लाख आहे. त्यापैकी ४०लाख हिंदु आहेत/होते? असा खरंच तुमचा दावा असेल तर स्रोतही द्यावा. ४ लाख हा आकडा बरोबर आहे, पण ४ लाख म्हणजे १० टक्के हा आकडा चुकलेला दिसतोय. खरं तर २५ टक्क्यांहून अधिक हिंदूंनी काश्मिर राज्यातून स्थलांतर केलेलं दिसतंय.

In reply to by श्रीगुरुजी

पोटे 16/03/2014 - 12:50
सर्वसाधारणपणे व्यक्ती सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असली तर अशा व्यक्ती स्वतःच्या प्रतिष्ठेला जपून असतात व त्या कायद्याला भिऊन वागतात. इतर धर्मियांच्या तुलनेत विशेषतः मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू जास्त समृद्ध व शिकलेले असतात म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अडाणी लोक खून , मारामार्‍या, बलात्कार असे सामान्य गुन्हे करतात. उच्चशिक्षित लोक शेअर बाजार बुडवणे, ब्यान्क बुडवणे, बोगस विक्री करुन एकच फ्लॅट चार लोकाना विकणे, लैंगिक शोषण करणे , असे असामान्य गुन्हे करतात. अशिक्षित लोकाना वकिल करणे परवडत नाही, त्यामुळे ते सापडले की अडकतातच. शिक्षित लोकांना वकील करणे परवडते, त्यामुळे निर्दोष सुटू शकतात.

कल्पक 14/03/2014 - 10:21
प्रश्न क्र. ५ साठी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल श्री. जगमोहन यांचे 'धुमसते बर्फ' हे पुस्तक नक्की वाचा. प्रश्न क्र. ८ साठी तस्लिमा नसरीन यांचे 'लज्जा' हे पुस्तक तसेच ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा हा लेख (http://www.esakal.com/esakal/20120822/4791804341115950977.htm) वाचा.

कल्पक 14/03/2014 - 10:44
प्रश्न क्र. १०: मध्यंतरी असं वाचलं होतं कि चिदम्बरम यांनी भारतीय लोकांना सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं. कारण आपण जे सोनं खरेदी करतो ते पूर्णतः परदेशातून आयात केलं जातं, म्हणजेच परकीय चलनातून हा व्यवहार होतो आणि म्हणून रुपया कमजोर होतो. आणि जे सोनं भारतात आहे ते सरकार विक्रीसाठी उपलब्ध होऊ देत नाही नाही. मध्यंतरी असंही वाचलं होतं की भारत सरकारने देशाच्या तिजोरीतील ४६% (साधारणतः २६५ टन) सोनं प्रसिद्धीमाध्यमांपासून लपवून परदेशातील बँकेत कर्जासाठी तारण म्हणून ठेवलं जे भारतीय कायद्याच्या (८५% सोनं देशात ठेवावं असं सांगणाऱ्या) विरोधात आहे. याविषयी खटले सुद्धा चालू आहेत. सरकारच्या अशा धोरणाचा सुद्धा रुपयावर परिणाम होतो. मलेशियात असताना मला असं कळलं होतं कि जगातल्या कोणत्याही दोन देशातील चलन रुपांतर हे डॉलर द्वारेच होतं. म्हणजे भारतीय रुपया > डॉलर > मलेशिअन रिंगीट्स. या गोष्टीमुळे सुद्धा अमेरीकेतर चलनांवर परिणाम होतो.

मृत्युन्जय 14/03/2014 - 13:34
च्यायला मुवि चालले मुसलमानांच्या सौदीत आणि इथे हिंदु मुसलमान पर्श्नांच्या काड्या टाकुन राह्यले. थांबा सौदीतल्या उंटांनाच सांगतो तुम्हाला पाठीवरुन वाळुत पाडायला. ;)

रमेश आठवले 14/03/2014 - 20:05
आपल्या सगळ्या प्रश्नामधेच त्यांचे उत्तर ही आहे. अश्या प्रश्नाना उपरोधिक किंवा इंग्लिश भाषेत rhetoric प्रश्न असे म्हणता येईल. प्रश्नांची निवड करण्यात आपण दाखविलेली मार्मिकता स्तुत्य आहे.
गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत. १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? ८.

कॅलीडोस्कोप

kurlekaar ·

kurlekaar 13/03/2014 - 10:07
For Aparna Akshay. खूप छान. सुखापेक्षा दुःखच जास्त खोलवर जातं व तिथपर्यंत आपल्याबरोबर दुसरं कोणीहि पोचू शकत नाही. म्हणूनच दुःखाच्या संदर्भात ‘सहानुभुती’ या शब्दाने देखिल मुळचा गर्भित अर्थ –सह-अनुभूती –बदलून घेतलाय. माणसांचच इथं असं मग शब्दाना कां दोष द्यावा? माणसांना जवळ आणण्याचं व तसंच एकमेकापासून दूर नेण्याचं काम हे शब्द अचूक करतात—अगदी अचूक नाहीं कारण याच शब्दांमुळे कधीकधी हव्या असलेल्या व्यक्तीनादेखील आपण दूर ढकलतो. शब्दांबद्दल बरंच कांही लिहिता येईल. तुमच्या अर्थपूर्ण प्रतिक्रियेसाठी आभार

आदूबाळ 14/03/2014 - 23:10
आवडलं :) अवांतरः तुमच्या आयडीविषयी उगाचच कुतूहल वाटतंय. "कुर्ले गाव वसवणारे" या अर्थाने कुर्लेकार आहे का? (शुद्धलेखनाची चूक निश्चित नाही, कारण इतर ठिकाणी बरोबर शुद्धलेखन आहे.) फारच वैयक्तिक असेल तर सोडून द्या.

kurlekaar 14/03/2014 - 23:43
मुंबईमधील मुळचे मध्यमवर्गीय म्हणजे सोमवंशीय क्षात्र प्रभू.(S K P). म्हणूनच बहुधा यातल्या कांहींचि आडनावं दादरकर, चेंबुरकर, कुर्लेकर अशी असावीत. आम्ही त्यातले नाहीं पण आमची पांचवी पिढी आज कुर्ल्यात आहे. कोकणात आमच्या मुळगांवी आमच्या कुटुंबाला “कुर्लेकर” व कधीकधी “कुर्लेकार” म्हणून संबोधितात. या पैकी मी दुसरं नांव घेतलं; यांत 'कर' ऎवजी 'कार' असल्याने ते थोडसं जास्त ‘हेल’ काढल्यासारखं वाटतं, म्हणजेच जरा जास्त कोकणातलं वाटतं. शिवाय त्यामुळे कुर्लेकर या typical एस के पी नावाशी होऊ शकणारा mix up देखिल टळला.

kurlekaar 13/03/2014 - 10:07
For Aparna Akshay. खूप छान. सुखापेक्षा दुःखच जास्त खोलवर जातं व तिथपर्यंत आपल्याबरोबर दुसरं कोणीहि पोचू शकत नाही. म्हणूनच दुःखाच्या संदर्भात ‘सहानुभुती’ या शब्दाने देखिल मुळचा गर्भित अर्थ –सह-अनुभूती –बदलून घेतलाय. माणसांचच इथं असं मग शब्दाना कां दोष द्यावा? माणसांना जवळ आणण्याचं व तसंच एकमेकापासून दूर नेण्याचं काम हे शब्द अचूक करतात—अगदी अचूक नाहीं कारण याच शब्दांमुळे कधीकधी हव्या असलेल्या व्यक्तीनादेखील आपण दूर ढकलतो. शब्दांबद्दल बरंच कांही लिहिता येईल. तुमच्या अर्थपूर्ण प्रतिक्रियेसाठी आभार

आदूबाळ 14/03/2014 - 23:10
आवडलं :) अवांतरः तुमच्या आयडीविषयी उगाचच कुतूहल वाटतंय. "कुर्ले गाव वसवणारे" या अर्थाने कुर्लेकार आहे का? (शुद्धलेखनाची चूक निश्चित नाही, कारण इतर ठिकाणी बरोबर शुद्धलेखन आहे.) फारच वैयक्तिक असेल तर सोडून द्या.

kurlekaar 14/03/2014 - 23:43
मुंबईमधील मुळचे मध्यमवर्गीय म्हणजे सोमवंशीय क्षात्र प्रभू.(S K P). म्हणूनच बहुधा यातल्या कांहींचि आडनावं दादरकर, चेंबुरकर, कुर्लेकर अशी असावीत. आम्ही त्यातले नाहीं पण आमची पांचवी पिढी आज कुर्ल्यात आहे. कोकणात आमच्या मुळगांवी आमच्या कुटुंबाला “कुर्लेकर” व कधीकधी “कुर्लेकार” म्हणून संबोधितात. या पैकी मी दुसरं नांव घेतलं; यांत 'कर' ऎवजी 'कार' असल्याने ते थोडसं जास्त ‘हेल’ काढल्यासारखं वाटतं, म्हणजेच जरा जास्त कोकणातलं वाटतं. शिवाय त्यामुळे कुर्लेकर या typical एस के पी नावाशी होऊ शकणारा mix up देखिल टळला.
कॅलीडोस्कोप --१-- श्रावणातला सत्यनारायण. तिची नवी कोरी साडी व माझे बऱ्याच दिवसांत न घातलेले सदरा व सुरवार. चौरंग, केळीचे खुंट; श्रीगणेश व लंगडा बाळकृष्ण मूर्तिमय, पण सुपाऱ्यात मांडलेले नवग्रह आणि कलश व श्रीफल मिळून केलेला प्रतिकात्मक सत्यनारायण. ओळखीचे साधू वाणी व त्याचा जावई, लीलावती व कलावती. पंचामृत, व आमच्या हिचा केवळ शिरा म्हणून करतांना कधीकधी चुकणारा पण प्रसादाच्या रूपांत नेहमीच अचूक व हवाहवासा वाटणारा.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ६ : महामंदिर अंगकोर वट

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by विवेकपटाईत

@तुमच्या लेखात खरोखर फिरण्याचा आनंद मिळतो आहे. ++++++++१११११११११११ उठावचित्रं आणि शेवटचा व्हिडिओ __/\__ आणि पु भा प्र...

शिद 12/03/2014 - 19:24
संपुर्ण लेखमाला संपल्यानंतर सविस्तर प्रतिसाद देणार होतो पण हा भाग बघुन राहवले नाही... मस्तचं हो एक्का सर... जाम भारी वाटतेय एक-एक भाग वाचताना. पु.भा.प्र. आणि पु.ले.शु.

बॅटमॅन 12/03/2014 - 20:36
आई शप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पथ!!!!!!!!!!!!!!!!!! पारणे फिटले.

प्रचेतस 12/03/2014 - 20:59
खरोखरच महामंदिर आहे. निव्वळ अद्भूत. गजारूढ इन्द्र ओळखू आला. रावणकैलासउत्थापन मूर्तीची शैली थोडी वेगळी आहे. आपल्याकडील शैलीत नेहमीच रावणाच्या पाठीचा भाग दर्शकाच्या समोर असतो. तर इकडे मात्र रावण दर्शकाच्या समोरच तोंड करून म्हणजे उलट्या दिशेने कैलास उचलण्याच्या प्रयत्न करतोय. त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात?

In reply to by प्रचेतस

आमच्या सहल कंपनीच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे म्हणा पण ह्या मंदिरातील सगळी चित्रं बघता आली नाही ही रुखरूख आहेच. हिंदू संस्कृतीचा प्रबळ प्रभाव असला तरी ख्मेर साम्राज्याचा मोठा आवाका आणि राजकिय व आर्थिक ताकद बघता त्यांच्या चालिरिती, स्थापत्य आणि कलाकृतींमध्ये स्थानिक प्रभाव असणे सहाजिकच होते. मात्र मूळ पौराणीक कथांना फारसा धक्का लागलेला दिसत नाही. शिवाय १३ व्या शतकापासून बौद्ध धर्माचा प्रभाव सुरू होऊन आणि १५व्या शतकापासून जवळ जवळ १००% बौद्ध जनता असूनही सर्वसामान्य लोकांची हिंदू धर्माबद्दल आस्थाच दिसली. मुख्य म्हणजे हिंदू (विशेषतः महाभारत आणि रामायण) आणि बौद्ध प्रथा एकमेकात नैसर्गिकपणे मिसळून गेल्या आहेत, त्यांत सर्वसामान्य कंबोडियन माणसाला काही विशेष वाटत नाही. त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात? काही ठिकाणी तुटलेल्या दगडी पायर्‍यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आणि / किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाकडी पायर्‍या बसवल्या आहेत. चित्रातल्या पायर्‍या अशा प्रकारे डागडूजी केलेल्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 13/03/2014 - 10:43
धन्यवाद. अंगकोर वटच्या अतिभव्य मंदिरासाठी फक्त अर्धा दिवसच दिला म्हणजे रूखरूख वाटणारच. :( स्थानिक प्रभाव तर अवश्य असणारच. पौराणिक कथांचा गाभा तसाच राहून काही प्रसंग, शैली तिकडच्या पद्धतीने आल्या असाव्यात. शिल्पांची चेहरेपट्टी तर तिकडील लोकांशी मिळतीजुळती आहेच. बाकी तुम्ही धाग्यात म्हणालात तसे संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे. हे पंचायतन स्वरूपाचे मंदिर आहे का? म्हणजे त्या बाजूच्या चार शिखरांत उपदेवतांची स्थापना केली आहे का ती फक्त नुसतीच शिखरे आहेत?

In reply to by प्रचेतस

आता ते बुद्धमंदिर झालेले असल्याने विष्णू किंवा इतर हिंदू देवतांच्या पूजेसाठी ठेवलेल्या मूर्ती नाहीत. काही सज्जांमध्ये साध्या बुद्धमूर्ती आहेत. मंदिरमध्यात ही मूर्ती होती पण ती प्राचीन नसावी असे समजते...   जालावर खालच्या चित्रातली विष्णूची मूर्ती अंगकोर वट मधिल असल्याचे वाचले. पण सद्या ती कोठे आहे ते माहित नाही...

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 13/03/2014 - 14:49
एक खुस्पट. त्या पोजमध्ये पैल्यांदा विष्णूची मूर्ती कोरली जात असे की बुद्धाची? की एकावरून दुसरा असे कै नै? हा प्रश्न फक्त या अंगकोर वटबद्दल नाही, इन जण्रल आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 13/03/2014 - 14:57
माझ्या माहितीप्रमाणे तरी विष्णूची. बुद्धाची तशा प्रकारची मूर्ती माझ्या पाहण्यात नाही. बुद्धमूर्ती कायम उभ्या अथवा ध्यानमग्न अवस्थेत बसलेल्या आढळतात. अपवाद म्हणजे अजिंठा आणि नाशिकलेणीतील महायानकालीन महापरिनिर्वाण मूर्तीचा पण हे महापरिनिर्वाण असल्याने शैली अत्यंत भिन्न आहे याउलट अनंतशयनी मूर्ती अगदी निवांतपणे डोके उंचावून झोपलेल्या अवस्थेत दिसते. ह्या अजिंठ्याच्या महायानमूर्तीच्या आधीच्या गुप्त काळातील कित्येक मूर्ती अनंतशयनी विष्णूच्या आहेत.

In reply to by प्रचेतस

पहुडलेला बुद्ध (reclining Buddha) ही कल्पना पहुडलेल्या विष्णूवरून आली असावी. पहुडलेल्या बुद्धाचे डोळे बंद असले तर त्याच्या पायांच्या अवस्थेप्रमाणे दोन अर्थ होऊ शकतात: (अ) पाय पुढेमागे असल्यास ती निद्रावस्थेतील मूर्ती...   (आ) पाय एकमेकाला समांतर असले तर ती निर्वाणावस्थेतील मूर्ती...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 13/03/2014 - 15:13
फॅण्टास्टिक. ह्या भव्य मूर्ती कुठल्या देशातल्या आहेत? तुमच्याच आधीच्या लेखनात हे बघितल्यासारखे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

नाही. या जालावरच्या आहेत. चुकून जालावरून साभार असे टाकायचे राहीले :( या बुद्धमूर्ती ब्रम्हदेशातल्या आहेत... अजून बघायच्या राहिल्या आहेत (पण सहलिंच्या यादीतल्या आहेत ;) ).

विवेकपटाईत, अत्रुप्त आत्मा, शिद, सूड, बॅटमॅन, खटपट्या, संजय क्षीरसागर, आत्मशून्य आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद ! खरं तर त्या देवळाची भव्यता आणि सौंदर्य दाखवण्यात माझे शब्द आणि फोटो तुटपुंजे ठरले आहेत. हा विनय नाही, हे प्रत्यक्ष तेथे गेल्यावर काही मिनीटातच लक्षात येईल ! अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी आनंद देउन आश्चर्यचकीत करणारी ठिकाणे बघितली आहेत... पण याबाबतीत अंगकोरच्या तोडीस येणारे ठिकाण अजून तरी पाहिले नाही. अजून तेथिल आश्चर्ये संपली नाहीत :) ती पुढच्या भागांत येतीलच.

मदनबाण 13/03/2014 - 22:18
भाग १ मधे तुम्ही दिलेला बोरोबुदूर स्तुपाचा फोटो, आणि त्यामुळे आलेला मंडलाचा संदर्भ मग भाग ३ मधे तुम्ही दिलेला अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा त्यातच माझ्या प्रतिसादातली सॅटेलाईट इमेज आणि आजच्या या धाग्यातले संदर्भासाठी दिलेले फोटो यांचा विचार केला. या धाग्यातले पहिले ४ फोटो यावरुन मंडल रचनेतील Square Grid लक्षात आली आहे,खरं तर पाण्याच्या चौकोनाच्या बाजुला भुपुराचे काही संदर्भ दिसत आहेत का ते मला या वरील सर्व फोटोतुन पहायचे आणि समजुन घ्यायचे होते, कारण एकंदर रचना ही एखाद्या यंत्राप्रमाणेच भासत / दिसत आहे,एकंदर यंत्रांमधे मध्य बिंदुला फार महत्व असते.परंतु याच्या फक्त दोनच बाजुला बाहेरच्या बाजुस जाणारे मार्ग दिसतात {म्हणजे पाण्यातुन बाहेरच्या बाजुला जाणारे, परंतु मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र जे चित्र आहे ते बरेचसे भूपुराच्या जवळपास जाणारे प्रथमदर्शनी वाटते. ४ दिशांना ४ दारे असे भूपुराचे डिझाइन असते. { मला यातली नक्की आणि संपूर्ण माहिती नाही. } असो... या संदर्भात एक दुवा देतो :- Maṇḍalas and Yantras यात navapadmamanḍ ̣चे डिझाइन पहा मग भाग ३ मधली सॅटेलाइट इमेज पहा पाण्यात {जास्त करुन उजवीकडेच} काही रेषा दिसतात,परंतु त्या कमळाकॄती नसुन वेगळ्याच दिसत आहेत. { हा माझा एकंदर अंदाजच आहे, जो या डिझाइच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो.}

In reply to by मदनबाण

मंडल आणि यंत्र याबाबत माझा स्वतःचा काहीच अभ्यास नाही. जे काही लिहीले आहे ते संदर्भांतून वाचले तसे लिहिले आहे. अंगकोर वट बद्दल वाचताना त्याच्या स्थापत्यात खगोलशास्त्राचा संबद्ध असल्याचे उल्लेख येतात. मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील. अंगकोर वट हे राजधानीचे ठिकाण असल्याने पाण्याच्या संरक्षक खंदकावर दोनापेक्षा जास्त बंधारे नसणे ही संरक्षणाच्या दृष्टीने केलेली व्यवस्था असावी असे वाटते.

मदनबाण 14/03/2014 - 20:34
मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील. हो मला देखील सापडले तर आवडेलच.बाकी वरचा फक्त अंदाजच होता. :)

In reply to by विवेकपटाईत

@तुमच्या लेखात खरोखर फिरण्याचा आनंद मिळतो आहे. ++++++++१११११११११११ उठावचित्रं आणि शेवटचा व्हिडिओ __/\__ आणि पु भा प्र...

शिद 12/03/2014 - 19:24
संपुर्ण लेखमाला संपल्यानंतर सविस्तर प्रतिसाद देणार होतो पण हा भाग बघुन राहवले नाही... मस्तचं हो एक्का सर... जाम भारी वाटतेय एक-एक भाग वाचताना. पु.भा.प्र. आणि पु.ले.शु.

बॅटमॅन 12/03/2014 - 20:36
आई शप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पथ!!!!!!!!!!!!!!!!!! पारणे फिटले.

प्रचेतस 12/03/2014 - 20:59
खरोखरच महामंदिर आहे. निव्वळ अद्भूत. गजारूढ इन्द्र ओळखू आला. रावणकैलासउत्थापन मूर्तीची शैली थोडी वेगळी आहे. आपल्याकडील शैलीत नेहमीच रावणाच्या पाठीचा भाग दर्शकाच्या समोर असतो. तर इकडे मात्र रावण दर्शकाच्या समोरच तोंड करून म्हणजे उलट्या दिशेने कैलास उचलण्याच्या प्रयत्न करतोय. त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात?

In reply to by प्रचेतस

आमच्या सहल कंपनीच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे म्हणा पण ह्या मंदिरातील सगळी चित्रं बघता आली नाही ही रुखरूख आहेच. हिंदू संस्कृतीचा प्रबळ प्रभाव असला तरी ख्मेर साम्राज्याचा मोठा आवाका आणि राजकिय व आर्थिक ताकद बघता त्यांच्या चालिरिती, स्थापत्य आणि कलाकृतींमध्ये स्थानिक प्रभाव असणे सहाजिकच होते. मात्र मूळ पौराणीक कथांना फारसा धक्का लागलेला दिसत नाही. शिवाय १३ व्या शतकापासून बौद्ध धर्माचा प्रभाव सुरू होऊन आणि १५व्या शतकापासून जवळ जवळ १००% बौद्ध जनता असूनही सर्वसामान्य लोकांची हिंदू धर्माबद्दल आस्थाच दिसली. मुख्य म्हणजे हिंदू (विशेषतः महाभारत आणि रामायण) आणि बौद्ध प्रथा एकमेकात नैसर्गिकपणे मिसळून गेल्या आहेत, त्यांत सर्वसामान्य कंबोडियन माणसाला काही विशेष वाटत नाही. त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात? काही ठिकाणी तुटलेल्या दगडी पायर्‍यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आणि / किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाकडी पायर्‍या बसवल्या आहेत. चित्रातल्या पायर्‍या अशा प्रकारे डागडूजी केलेल्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 13/03/2014 - 10:43
धन्यवाद. अंगकोर वटच्या अतिभव्य मंदिरासाठी फक्त अर्धा दिवसच दिला म्हणजे रूखरूख वाटणारच. :( स्थानिक प्रभाव तर अवश्य असणारच. पौराणिक कथांचा गाभा तसाच राहून काही प्रसंग, शैली तिकडच्या पद्धतीने आल्या असाव्यात. शिल्पांची चेहरेपट्टी तर तिकडील लोकांशी मिळतीजुळती आहेच. बाकी तुम्ही धाग्यात म्हणालात तसे संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे. हे पंचायतन स्वरूपाचे मंदिर आहे का? म्हणजे त्या बाजूच्या चार शिखरांत उपदेवतांची स्थापना केली आहे का ती फक्त नुसतीच शिखरे आहेत?

In reply to by प्रचेतस

आता ते बुद्धमंदिर झालेले असल्याने विष्णू किंवा इतर हिंदू देवतांच्या पूजेसाठी ठेवलेल्या मूर्ती नाहीत. काही सज्जांमध्ये साध्या बुद्धमूर्ती आहेत. मंदिरमध्यात ही मूर्ती होती पण ती प्राचीन नसावी असे समजते...   जालावर खालच्या चित्रातली विष्णूची मूर्ती अंगकोर वट मधिल असल्याचे वाचले. पण सद्या ती कोठे आहे ते माहित नाही...

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 13/03/2014 - 14:49
एक खुस्पट. त्या पोजमध्ये पैल्यांदा विष्णूची मूर्ती कोरली जात असे की बुद्धाची? की एकावरून दुसरा असे कै नै? हा प्रश्न फक्त या अंगकोर वटबद्दल नाही, इन जण्रल आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 13/03/2014 - 14:57
माझ्या माहितीप्रमाणे तरी विष्णूची. बुद्धाची तशा प्रकारची मूर्ती माझ्या पाहण्यात नाही. बुद्धमूर्ती कायम उभ्या अथवा ध्यानमग्न अवस्थेत बसलेल्या आढळतात. अपवाद म्हणजे अजिंठा आणि नाशिकलेणीतील महायानकालीन महापरिनिर्वाण मूर्तीचा पण हे महापरिनिर्वाण असल्याने शैली अत्यंत भिन्न आहे याउलट अनंतशयनी मूर्ती अगदी निवांतपणे डोके उंचावून झोपलेल्या अवस्थेत दिसते. ह्या अजिंठ्याच्या महायानमूर्तीच्या आधीच्या गुप्त काळातील कित्येक मूर्ती अनंतशयनी विष्णूच्या आहेत.

In reply to by प्रचेतस

पहुडलेला बुद्ध (reclining Buddha) ही कल्पना पहुडलेल्या विष्णूवरून आली असावी. पहुडलेल्या बुद्धाचे डोळे बंद असले तर त्याच्या पायांच्या अवस्थेप्रमाणे दोन अर्थ होऊ शकतात: (अ) पाय पुढेमागे असल्यास ती निद्रावस्थेतील मूर्ती...   (आ) पाय एकमेकाला समांतर असले तर ती निर्वाणावस्थेतील मूर्ती...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 13/03/2014 - 15:13
फॅण्टास्टिक. ह्या भव्य मूर्ती कुठल्या देशातल्या आहेत? तुमच्याच आधीच्या लेखनात हे बघितल्यासारखे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

नाही. या जालावरच्या आहेत. चुकून जालावरून साभार असे टाकायचे राहीले :( या बुद्धमूर्ती ब्रम्हदेशातल्या आहेत... अजून बघायच्या राहिल्या आहेत (पण सहलिंच्या यादीतल्या आहेत ;) ).

विवेकपटाईत, अत्रुप्त आत्मा, शिद, सूड, बॅटमॅन, खटपट्या, संजय क्षीरसागर, आत्मशून्य आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद ! खरं तर त्या देवळाची भव्यता आणि सौंदर्य दाखवण्यात माझे शब्द आणि फोटो तुटपुंजे ठरले आहेत. हा विनय नाही, हे प्रत्यक्ष तेथे गेल्यावर काही मिनीटातच लक्षात येईल ! अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी आनंद देउन आश्चर्यचकीत करणारी ठिकाणे बघितली आहेत... पण याबाबतीत अंगकोरच्या तोडीस येणारे ठिकाण अजून तरी पाहिले नाही. अजून तेथिल आश्चर्ये संपली नाहीत :) ती पुढच्या भागांत येतीलच.

मदनबाण 13/03/2014 - 22:18
भाग १ मधे तुम्ही दिलेला बोरोबुदूर स्तुपाचा फोटो, आणि त्यामुळे आलेला मंडलाचा संदर्भ मग भाग ३ मधे तुम्ही दिलेला अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा त्यातच माझ्या प्रतिसादातली सॅटेलाईट इमेज आणि आजच्या या धाग्यातले संदर्भासाठी दिलेले फोटो यांचा विचार केला. या धाग्यातले पहिले ४ फोटो यावरुन मंडल रचनेतील Square Grid लक्षात आली आहे,खरं तर पाण्याच्या चौकोनाच्या बाजुला भुपुराचे काही संदर्भ दिसत आहेत का ते मला या वरील सर्व फोटोतुन पहायचे आणि समजुन घ्यायचे होते, कारण एकंदर रचना ही एखाद्या यंत्राप्रमाणेच भासत / दिसत आहे,एकंदर यंत्रांमधे मध्य बिंदुला फार महत्व असते.परंतु याच्या फक्त दोनच बाजुला बाहेरच्या बाजुस जाणारे मार्ग दिसतात {म्हणजे पाण्यातुन बाहेरच्या बाजुला जाणारे, परंतु मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र जे चित्र आहे ते बरेचसे भूपुराच्या जवळपास जाणारे प्रथमदर्शनी वाटते. ४ दिशांना ४ दारे असे भूपुराचे डिझाइन असते. { मला यातली नक्की आणि संपूर्ण माहिती नाही. } असो... या संदर्भात एक दुवा देतो :- Maṇḍalas and Yantras यात navapadmamanḍ ̣चे डिझाइन पहा मग भाग ३ मधली सॅटेलाइट इमेज पहा पाण्यात {जास्त करुन उजवीकडेच} काही रेषा दिसतात,परंतु त्या कमळाकॄती नसुन वेगळ्याच दिसत आहेत. { हा माझा एकंदर अंदाजच आहे, जो या डिझाइच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो.}

In reply to by मदनबाण

मंडल आणि यंत्र याबाबत माझा स्वतःचा काहीच अभ्यास नाही. जे काही लिहीले आहे ते संदर्भांतून वाचले तसे लिहिले आहे. अंगकोर वट बद्दल वाचताना त्याच्या स्थापत्यात खगोलशास्त्राचा संबद्ध असल्याचे उल्लेख येतात. मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील. अंगकोर वट हे राजधानीचे ठिकाण असल्याने पाण्याच्या संरक्षक खंदकावर दोनापेक्षा जास्त बंधारे नसणे ही संरक्षणाच्या दृष्टीने केलेली व्यवस्था असावी असे वाटते.

मदनबाण 14/03/2014 - 20:34
मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील. हो मला देखील सापडले तर आवडेलच.बाकी वरचा फक्त अंदाजच होता. :)
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .

राजघराणं ·

विटेकर 12/03/2014 - 17:06
श्री दलवाई यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे.वाटत राहील. ह्म्म.. एकेकाळी शरद पवार हे खरेच यशवंतरावांना आदर्श मानत असावेत असे म्हणायला भरपूर वाव आहे.

@पण हि मंडळी सुद्धा इस्लाम परिपूर्ण आहे अशीच री ओढतात . लोकशाही , समाजवाद , धर्म निरपेक्षता, अहिंसा , स्त्री पुरुष समता आणि बुरख्याच्या सक्तीला विरोध अशी सर्व आधुनिक मुल्ये इस्लाम मध्येच ठासून भरली आहेत. कालविसंगत असे इस्लाम मध्ये काहीच नाही अशी यांची भूमिका आहे. हि मंडळी प्रामाणिक आहेत.(जुन्या) इस्लाम चा विरोध (नव्या ) इस्लामने ! धर्माचा उपयोग धर्माविरुद्धची तलवार म्हणून करत आहेत . धर्माचे काही बिघडले नाही . तलवार मात्र बोथट झालेली आहे !(1-160)>>> हे सर्वधर्मीयांच्या लक्षात येणे आवश्यक आणि अगत्याचे! बाकि दलवाईंबद्द्ल पूर्वी वाचलेले होतेच आज त्या सगळ्याचा कनेक्ट परिणामकारकपणे साधला गेला.

लेख प्रचंड वादग्रस्त ...कित्येक मते ब्लासफेमस ... धर्मनिंदा करणारा लेख ! जोरदार निषेध !
निषेध !

निषेध !

निषेध !

हा लेख उडवावा , किमान 'दीन'वर टीका करणारी मते उडवावीत अशी संपादक मंडळाला विनंती ! बाकी सावरकर , गोळवलकर ब्राह्मण समाज आणि हिंदु धर्माविषयीच्या मतांबाबत , ती अज्ञानमुलक/पुर्वग्रहदुषित असल्याने , मी वैयक्तीक दृष्ट्या माफ करीत आहे .

खटपट्या 13/03/2014 - 01:21
माझ्यासाठी अत्यंत माहितीपुर्ण लेख. धन्यवाद विषयांतर होईल पण खालील लिंक पाकिस्तानी मुस्लिमांची सद्य स्थिती दाखवणारी आहे. http://www.youtube.com/watch?v=9rbWC34wP6w

आयुर्हित 13/03/2014 - 02:10
"भारतातील मुस्लिम संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला लाज वाटते. मुस्लिमांच्या हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे" "मुस्लिमांचे भले करण्यासाठी आमची अति धार्मिकता आणि जमातवाद बंद केला पाहिज" काश! सारे भारतीय असाच विचार करतील का? यांत आपले थोर? महान? राष्ट्रपिता? महात्मा? गांधी ही आले असते तर कित्ती तरी बरे झाले असते. धर्माच्या नावाने देशाची फाळणी करून त्यांनी सर्व हिंदू आणि मुसलमान यातच फाळणी करून टाकली आहे.त्यामुळेच आज "भारतीय अस्मिता असलेले मुसलमान" बोटावर मोजून सापडतील. जे काही आहेत ते फक्त पाक/दुबई/अरब राष्ट्र धार्जिणेच आहेत. यात मी त्यांना दोष देणार नाही, पण त्यांच्या धर्मगुरूंना व जवाहरलाल नेहरूंनाच दोष देईल. ज्या पंडित? जवाहरलाल नेहरूंनी आपल्या आयुष्याची तब्बल १२ वर्षे हिंदूसाठी कायदा बनवण्यात घालविला त्यांनी किमान १/२ वर्षे जरी मुसलमान कायदा बनवण्यात घालविला असता तर अशी वाईट परिस्थिती मुसलमान स्त्रियांवर आलीच नसती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. येत्या निवडणुकीत चांगला प्रधानमंत्री देशाला मिळो, जो अश्या वाईट परिस्थितीतून सर्व देशाला चांगला मार्ग दाखवील. भारतीय मुसलमानांचे भले करण्यासाठी काही पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.

सुहासदवन 13/03/2014 - 10:48
भारतीय मुसलमानांचे भले करण्यासाठी काही पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.
बहुतेक सारे जण हे वाक्य बोलायला तयारच असतात...आतुन जरी तयार नसले तरी..... ज्याची काहीच गरज नाहीये.... तुम्ही किंवा मी, ही मदत नाही केली तरी त्यांची मदत त्यांचे धर्म बांधव इथुन नाही तर तिथुन करतीलच..... आज खरी गरज आहे ती
भारतीयांचे भले करण्यासाठी काही पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.
ह्या वाक्याची! कशाला त्याला धर्माचा, जातीचा रंग द्यायला हवा. अवांतर..... आपण कितीही त्यांची (मुस्लिमांची) बाजू घेण्याचा, त्यांच्या उन्नतीचा प्रयत्न केला, तरी कधीतरी त्यांनी भारतीयांची (हिंदुंची नव्हे) बाजू घेतली आहे का, आजपर्यंत?

अर्धवटराव 14/03/2014 - 00:12
असे दलवाई अंधाराच्या विरोधात आपली पणती घेऊन लढत राहतील, दु:ख भोगत राहतील, आणि ज्यांच्या भल्यासाठी हे सर्व चाललय ति मंडळी दलवाईंना पाण्यात पाहात राहतील. हे केवळ धर्माच्या बाबतीत नाहि. पर्यावरणाचा विनाश्याविरुद्ध दंड थोपटणारे, शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्याची इच्छा असणारे, इंधनाची काळजी वाहणारे, जैवीक-आण्वीक शस्त्रांच्या विरुद्ध प्रचार करणारे... सगळ्याचं रडगाणं हेच आहे. परिस्थिती अनुकुल असताना दलवाईंच्या संप्रदायाची लेबलं मिरवणं फार सोपं आहे. पण त्याच वेळी अनेक बाबतीतला बुडाखालचा अंधार बघायची हिम्मत दाखवणं फार कठीण. चालायचच.

पैसा 14/03/2014 - 17:03
स्वतःच्याच मुस्लिम धर्माविरोधात बोलायचं धाडस करणारे आणि त्याप्रमाणे वागून दाखवणारे हमीद दलवाई हे दुर्मिळ व्यक्तिमत्व. त्यांची ओळख आवडली. मुस्लिम समाजाच्या स्थितीबद्दल डॉ. आंबेडकरांची परखड मतं बर्‍याच जणांचे डोळे उघडणारी ठरावीत. मात्र सावरकरंचं हिंदुत्व समजण्यात हमीद दलवाईंची चूक झाली होती असं दिसतंय.

अवतार 14/03/2014 - 21:37
काही मुद्दे:- १. धर्म ढोंगी नसतो [हे केवळ सुरुवात म्हणून. तुम्ही तसे लिहिलेले नाही हे मान्य]. माणसे ढोंगी असतात. गैर मुस्लिमांबरोबर कसा व्यवहार करावा ह्याच्या स्पष्ट आज्ञा कुराणात आहेत. केवळ कुराणच नव्हे तर जवळपास प्रत्येक धर्मग्रंथाची हीच कहाणी आहे. मनुस्मृतीतही शुद्रांशी कसे वागावे ह्याबद्दल अत्यंत नि:संदिग्ध शब्दांत मार्गदर्शन केलेले आहे. धर्म आपली महत्वाकांक्षा कधीच लपवून ठेवत नाही. तसे करणे हे कोणत्याही धर्माला परवडण्यासारखे नाही. पण त्या धर्माचा आधार घेऊन स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्यांना मात्र त्यांच्या महत्वाकांक्षा आधुनिकतेच्या तलम आवरणाखाली झाकून ठेवाव्या लागतात. कोणताही धर्म अन्य धर्मीयांवर वर्चस्व लादू पाहतो हे अर्धसत्य झाले. पूर्ण सत्य हे आहे की धर्म ही संकल्पना परधर्मियांबरोबरच स्वधर्मियांनाही गुलाम बनवत असते. २. काळाबरोबर आधुनिक होणे हे धर्माचे लक्षण नव्हे. धर्म हा अपरिवर्तनीय असावाच लागतो. ज्याला धर्मातील परिवर्तन म्हटले जाते त्या धर्माच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाईलाजाने केलेल्या तडजोडी असतात. वैचारिक परिवर्तन घडवणे हा धर्माचा मूळ उद्देश नसून ते रोखणे हा खरा उद्देश असतो. कोणतीही विचारप्रणाली जी माणसांना काळाप्रमाणे सुसंगत विचार करू देत नाही अश्या विचारप्रणालीत आधुनिकता रुजवता येईल असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. ३. मुस्लिम जातीयवादाची प्रतिक्रिया म्हणून हिंदू जातीयवाद प्रबळ झाला हे तितकेसे पटत नाही. [मुळात मुस्लिम आणि हिंदू ह्या जाती नसून धर्म आहेत. त्यामुळे ह्या संदर्भात "जातीयवाद" ह्याऐवजी "धर्मांधता" हा शब्द उचित ठरावा.] मुस्लिमांच्या आक्रमक धर्मांधतेचा उपयोग पद्धतशीरपणे हिंदूंच्या मनांत धार्मिक कट्टरता भरवण्यासाठी करण्यात आला. हाती शस्त्रे केवळ धर्माच्या रक्षणासाठीच घ्यावी लागतात हे खरे नाही. आज भारताचे लाखोंचे खडे सैन्य हाती शस्त्रे घेऊन कोणत्याही धर्माचे नव्हे तर धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे रक्षण करत आहे. शस्त्रे हाती घ्यायची ती नेमक्या कोणत्या विचारप्रणालीच्या रक्षणासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जी विचारप्रणाली आपल्या दास्यत्वाचे समर्थन करते तिच्यासाठी की जी विचारप्रणाली आपल्याला दास्यत्वातून मुक्त करते तिच्यासाठी?

विटेकर 12/03/2014 - 17:06
श्री दलवाई यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे.वाटत राहील. ह्म्म.. एकेकाळी शरद पवार हे खरेच यशवंतरावांना आदर्श मानत असावेत असे म्हणायला भरपूर वाव आहे.

@पण हि मंडळी सुद्धा इस्लाम परिपूर्ण आहे अशीच री ओढतात . लोकशाही , समाजवाद , धर्म निरपेक्षता, अहिंसा , स्त्री पुरुष समता आणि बुरख्याच्या सक्तीला विरोध अशी सर्व आधुनिक मुल्ये इस्लाम मध्येच ठासून भरली आहेत. कालविसंगत असे इस्लाम मध्ये काहीच नाही अशी यांची भूमिका आहे. हि मंडळी प्रामाणिक आहेत.(जुन्या) इस्लाम चा विरोध (नव्या ) इस्लामने ! धर्माचा उपयोग धर्माविरुद्धची तलवार म्हणून करत आहेत . धर्माचे काही बिघडले नाही . तलवार मात्र बोथट झालेली आहे !(1-160)>>> हे सर्वधर्मीयांच्या लक्षात येणे आवश्यक आणि अगत्याचे! बाकि दलवाईंबद्द्ल पूर्वी वाचलेले होतेच आज त्या सगळ्याचा कनेक्ट परिणामकारकपणे साधला गेला.

लेख प्रचंड वादग्रस्त ...कित्येक मते ब्लासफेमस ... धर्मनिंदा करणारा लेख ! जोरदार निषेध !
निषेध !

निषेध !

निषेध !

हा लेख उडवावा , किमान 'दीन'वर टीका करणारी मते उडवावीत अशी संपादक मंडळाला विनंती ! बाकी सावरकर , गोळवलकर ब्राह्मण समाज आणि हिंदु धर्माविषयीच्या मतांबाबत , ती अज्ञानमुलक/पुर्वग्रहदुषित असल्याने , मी वैयक्तीक दृष्ट्या माफ करीत आहे .

खटपट्या 13/03/2014 - 01:21
माझ्यासाठी अत्यंत माहितीपुर्ण लेख. धन्यवाद विषयांतर होईल पण खालील लिंक पाकिस्तानी मुस्लिमांची सद्य स्थिती दाखवणारी आहे. http://www.youtube.com/watch?v=9rbWC34wP6w

आयुर्हित 13/03/2014 - 02:10
"भारतातील मुस्लिम संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला लाज वाटते. मुस्लिमांच्या हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह निर्माण होणे गरजेचे आहे" "मुस्लिमांचे भले करण्यासाठी आमची अति धार्मिकता आणि जमातवाद बंद केला पाहिज" काश! सारे भारतीय असाच विचार करतील का? यांत आपले थोर? महान? राष्ट्रपिता? महात्मा? गांधी ही आले असते तर कित्ती तरी बरे झाले असते. धर्माच्या नावाने देशाची फाळणी करून त्यांनी सर्व हिंदू आणि मुसलमान यातच फाळणी करून टाकली आहे.त्यामुळेच आज "भारतीय अस्मिता असलेले मुसलमान" बोटावर मोजून सापडतील. जे काही आहेत ते फक्त पाक/दुबई/अरब राष्ट्र धार्जिणेच आहेत. यात मी त्यांना दोष देणार नाही, पण त्यांच्या धर्मगुरूंना व जवाहरलाल नेहरूंनाच दोष देईल. ज्या पंडित? जवाहरलाल नेहरूंनी आपल्या आयुष्याची तब्बल १२ वर्षे हिंदूसाठी कायदा बनवण्यात घालविला त्यांनी किमान १/२ वर्षे जरी मुसलमान कायदा बनवण्यात घालविला असता तर अशी वाईट परिस्थिती मुसलमान स्त्रियांवर आलीच नसती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. येत्या निवडणुकीत चांगला प्रधानमंत्री देशाला मिळो, जो अश्या वाईट परिस्थितीतून सर्व देशाला चांगला मार्ग दाखवील. भारतीय मुसलमानांचे भले करण्यासाठी काही पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.

सुहासदवन 13/03/2014 - 10:48
भारतीय मुसलमानांचे भले करण्यासाठी काही पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.
बहुतेक सारे जण हे वाक्य बोलायला तयारच असतात...आतुन जरी तयार नसले तरी..... ज्याची काहीच गरज नाहीये.... तुम्ही किंवा मी, ही मदत नाही केली तरी त्यांची मदत त्यांचे धर्म बांधव इथुन नाही तर तिथुन करतीलच..... आज खरी गरज आहे ती
भारतीयांचे भले करण्यासाठी काही पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.
ह्या वाक्याची! कशाला त्याला धर्माचा, जातीचा रंग द्यायला हवा. अवांतर..... आपण कितीही त्यांची (मुस्लिमांची) बाजू घेण्याचा, त्यांच्या उन्नतीचा प्रयत्न केला, तरी कधीतरी त्यांनी भारतीयांची (हिंदुंची नव्हे) बाजू घेतली आहे का, आजपर्यंत?

अर्धवटराव 14/03/2014 - 00:12
असे दलवाई अंधाराच्या विरोधात आपली पणती घेऊन लढत राहतील, दु:ख भोगत राहतील, आणि ज्यांच्या भल्यासाठी हे सर्व चाललय ति मंडळी दलवाईंना पाण्यात पाहात राहतील. हे केवळ धर्माच्या बाबतीत नाहि. पर्यावरणाचा विनाश्याविरुद्ध दंड थोपटणारे, शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्याची इच्छा असणारे, इंधनाची काळजी वाहणारे, जैवीक-आण्वीक शस्त्रांच्या विरुद्ध प्रचार करणारे... सगळ्याचं रडगाणं हेच आहे. परिस्थिती अनुकुल असताना दलवाईंच्या संप्रदायाची लेबलं मिरवणं फार सोपं आहे. पण त्याच वेळी अनेक बाबतीतला बुडाखालचा अंधार बघायची हिम्मत दाखवणं फार कठीण. चालायचच.

पैसा 14/03/2014 - 17:03
स्वतःच्याच मुस्लिम धर्माविरोधात बोलायचं धाडस करणारे आणि त्याप्रमाणे वागून दाखवणारे हमीद दलवाई हे दुर्मिळ व्यक्तिमत्व. त्यांची ओळख आवडली. मुस्लिम समाजाच्या स्थितीबद्दल डॉ. आंबेडकरांची परखड मतं बर्‍याच जणांचे डोळे उघडणारी ठरावीत. मात्र सावरकरंचं हिंदुत्व समजण्यात हमीद दलवाईंची चूक झाली होती असं दिसतंय.

अवतार 14/03/2014 - 21:37
काही मुद्दे:- १. धर्म ढोंगी नसतो [हे केवळ सुरुवात म्हणून. तुम्ही तसे लिहिलेले नाही हे मान्य]. माणसे ढोंगी असतात. गैर मुस्लिमांबरोबर कसा व्यवहार करावा ह्याच्या स्पष्ट आज्ञा कुराणात आहेत. केवळ कुराणच नव्हे तर जवळपास प्रत्येक धर्मग्रंथाची हीच कहाणी आहे. मनुस्मृतीतही शुद्रांशी कसे वागावे ह्याबद्दल अत्यंत नि:संदिग्ध शब्दांत मार्गदर्शन केलेले आहे. धर्म आपली महत्वाकांक्षा कधीच लपवून ठेवत नाही. तसे करणे हे कोणत्याही धर्माला परवडण्यासारखे नाही. पण त्या धर्माचा आधार घेऊन स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्यांना मात्र त्यांच्या महत्वाकांक्षा आधुनिकतेच्या तलम आवरणाखाली झाकून ठेवाव्या लागतात. कोणताही धर्म अन्य धर्मीयांवर वर्चस्व लादू पाहतो हे अर्धसत्य झाले. पूर्ण सत्य हे आहे की धर्म ही संकल्पना परधर्मियांबरोबरच स्वधर्मियांनाही गुलाम बनवत असते. २. काळाबरोबर आधुनिक होणे हे धर्माचे लक्षण नव्हे. धर्म हा अपरिवर्तनीय असावाच लागतो. ज्याला धर्मातील परिवर्तन म्हटले जाते त्या धर्माच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाईलाजाने केलेल्या तडजोडी असतात. वैचारिक परिवर्तन घडवणे हा धर्माचा मूळ उद्देश नसून ते रोखणे हा खरा उद्देश असतो. कोणतीही विचारप्रणाली जी माणसांना काळाप्रमाणे सुसंगत विचार करू देत नाही अश्या विचारप्रणालीत आधुनिकता रुजवता येईल असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. ३. मुस्लिम जातीयवादाची प्रतिक्रिया म्हणून हिंदू जातीयवाद प्रबळ झाला हे तितकेसे पटत नाही. [मुळात मुस्लिम आणि हिंदू ह्या जाती नसून धर्म आहेत. त्यामुळे ह्या संदर्भात "जातीयवाद" ह्याऐवजी "धर्मांधता" हा शब्द उचित ठरावा.] मुस्लिमांच्या आक्रमक धर्मांधतेचा उपयोग पद्धतशीरपणे हिंदूंच्या मनांत धार्मिक कट्टरता भरवण्यासाठी करण्यात आला. हाती शस्त्रे केवळ धर्माच्या रक्षणासाठीच घ्यावी लागतात हे खरे नाही. आज भारताचे लाखोंचे खडे सैन्य हाती शस्त्रे घेऊन कोणत्याही धर्माचे नव्हे तर धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे रक्षण करत आहे. शस्त्रे हाती घ्यायची ती नेमक्या कोणत्या विचारप्रणालीच्या रक्षणासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जी विचारप्रणाली आपल्या दास्यत्वाचे समर्थन करते तिच्यासाठी की जी विचारप्रणाली आपल्याला दास्यत्वातून मुक्त करते तिच्यासाठी?
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान . हमीद दलवाई आणि माझा स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा एकच आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां चष्मा माझ्या नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह मात्र हमिदचाच .

फ्लाईट १९ : मिस्टरी ऑन विंग्स (भाग-१)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

कुसुमावती 12/03/2014 - 15:45
मलेशिअन एअरलाईन्स्च्या विमानाच्या गायब होण्याची बातमी पहिल्यावर हीच घटना आठवली. ह्या घटनेचा बर्म्युडा ट्रॅन्गलशी संबध जोडला जातो. या विषयावर वाचायला आवडेल. पु भा प्र.

स्पार्टाकस 12/03/2014 - 19:58
फ्लाईट १९ बेपत्ता झाल्यावर त्यांच्या शोधात गेलेलं हॅरी कोनचं मार्टीन मरिनर हे विमान पण गायब झालं. अर्थात पुढे त्याचा उल्लेख असेलच अशी अपेक्षा.

कुसुमावती 12/03/2014 - 15:45
मलेशिअन एअरलाईन्स्च्या विमानाच्या गायब होण्याची बातमी पहिल्यावर हीच घटना आठवली. ह्या घटनेचा बर्म्युडा ट्रॅन्गलशी संबध जोडला जातो. या विषयावर वाचायला आवडेल. पु भा प्र.

स्पार्टाकस 12/03/2014 - 19:58
फ्लाईट १९ बेपत्ता झाल्यावर त्यांच्या शोधात गेलेलं हॅरी कोनचं मार्टीन मरिनर हे विमान पण गायब झालं. अर्थात पुढे त्याचा उल्लेख असेलच अशी अपेक्षा.
नुकतचं दिनांक ८ मार्च २०१४ रोजी एम.एह.३७० ही कुलालंपुर-बिजींग हे विमानं कुठलेही सबळ पुरावे नं देता गायब झालय. चीन, मलेशिया आणि इतर अश्या सुमारे १० देशांच्या संयुक्त शोधपथकांना सुमारे ३२,००० चौरस कि.मी. चा परिसर चाळुन काढल्यानंतरही २७७ प्रवासी, मलेशिया एअरलाईन्स चे १२ कर्मचारी आणि बोईंग ७७७ ह्या प्रचंड विमानाचं नक्की काय झालं ह्याचा काही पत्ता नाही. कुठलेही अवशेष, मृतदेह किंवा ईतर पुरावे मागे नं ठेवता गायब झालेल्या ह्या घटनेनंतर दुसर्या महायुद्धाच्या काळात अश्याच गुढ रितीनी गायब झालेल्या फ्लाईट नं. १९ ची आठवण झाली नाही तरच नवल.

भरतपूर व भिंडावास

जयंत कुलकर्णी ·

सौंदाळा 12/03/2014 - 13:34
अतीव सुंदर फोटो. हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी--हे माहिती नव्ह्ते. धन्यवाद.

चलत मुसाफिर 13/03/2014 - 10:39
अतिशय सुंदर चित्रे. एका नव्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बघू कधी जाता येते....

सौंदाळा 12/03/2014 - 13:34
अतीव सुंदर फोटो. हरियाल- महाराष्ट्राचा राज्यपक्षी--हे माहिती नव्ह्ते. धन्यवाद.

चलत मुसाफिर 13/03/2014 - 10:39
अतिशय सुंदर चित्रे. एका नव्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बघू कधी जाता येते....
चलत मुसाफिर यांचा धागा बघून दोन वर्षापूर्वी केलेल्या सहलीची आठवण झाली. इतर माहिती त्यांनी दिलीच असल्यामुळे मला फक्त छायाचित्र टाकायचे काम बाकी आहे....:-) पण हरियानात भिंडावास नावाचा एक मस्त ठिकाण आहे ज्यात पाण्याभोवती १२ कि.मीचा चालण्याचा मातीचा रस्ता आहे. मधे पक्षी व आपण रस्त्यावरुन ते बघायचे असा कार्यक्रम फारच छान असतो. हे पाणे कृत्रीमरित्या साठवले आहे.

'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा

चित्रगुप्त ·

मला त आत्तापर्यंत कंगना बद्दल जेवढे ऐकायला मिळाले त्या वरुन तिचे सगळे चित्रपट बघावेसे वाटतात पण सवड मिळत नाही. ती खुप चांगली कलाकार आहे.

चलत मुसाफिर 12/03/2014 - 12:03
'क्वीन'बद्दल सर्व समीक्षक इतके भरभरून लिहीत आहेत, की हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अपार वाढली आहे. लवकरच योग येईल अशी आशा करतो.

In reply to by सुहास झेले

सुहास झेले 14/03/2014 - 13:44
काल बघितला... निव्वळ अप्रतिम. उगाच काही बडेजावपणा नाही. गाणीसुद्धा श्रवणीय. कंगनाच्या फिल्मी करिअरला जबरदस्त वळण मिळणार ह्या सिनेमानंतर. आवर्जून बघा आणि थेटरात बघा :)

सूड 12/03/2014 - 17:00
एकदा तरी बघावा असा नक्कीच आहे, पण बरेच प्रश्न शेवट येईपर्यंत अनुत्तरित राहतात. तिने शेवटी तरी थोडा कणखरपणा दाखवावा असं सारखं वाटत होतं. आपल्याला धुडकावून लावणार्‍याशी इतकं गोडगोड कसं बोलू शकतं कोण!!

In reply to by स्पंदना

सूड 18/03/2014 - 16:01
>>राग येतो तो अपेक्षा असली तर. नसेलच अपेक्षा तर कसला राग? हा विचार केलाच नाही राव!! मी बहुतेक तो प्रसंग कशाशी तरी कम्पेअर करुन घोळ घातला. उत्तरासाठी धन्यवाद. :)

In reply to by मुक्त विहारि

चित्रगुप्त 12/03/2014 - 20:36
पैसे देवून अजिबात बघणार नाही.....
पैसे देवून बघण्यासारखे जे थोडेसेच सिनेमे असतात, त्यापैकी हा नक्कीच आहे. पैसे वाया जाणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 15/03/2014 - 05:19
इंग्लिश विंग्लिश मध्ये आहेत असं म्हणणं असेल तर तीव्र असहमती.
अतिशय सहमत. चांगल्या कथेच कसे मातेर करावं याचा उत्तम नमूना म्हणजे इम्ग्लिश विन्ग्लिश. ते सुधा एका मराठी व स्त्रीने दिग्दर्शित केलेला बघून एक मिपाकर म्हनूण महा शरम वाटली :(

स्पंदना 14/03/2014 - 13:18
एका साध्या प्रोटेक्टीव्ह घरातुन आलेली अन उध्वस्त झाल्यासारखी वाटणारी मुलगी. जी समोर आलेल्या आव्हांनांनमुले बदलत जाते अस काहीस चित्रण आहे. यात कोठेही फिरुन्न्कोणाला जिंकण्याचा अट्टाहास नाही. फक्त समोर ठरवलेली वाट हरवल्याने गोंधळुन जाऊन त्याच वाटेचा अट्टाहास धरलेली एक व्यक्तीरेखा कंगनाने अतिशय सुरेखरित्या उभी केली आहे. स्वतःच काहीही मत नसलेली एक मुलगी, तिचं ते हास्य, निरागस चेहरा. खुप दिवसांनी काहीतरी साधंसुधं सुरेख पाहिलं.

परवाच बायकोने हा चित्रपट चांगला आहे बघूया का असा विषय काढला तेव्हा हम्म बघू (म्हणजे ठरवू) असे म्हणालो, आणि आता हे परीक्षण आणि खालचे पेड नसलेले ओरिजिनल प्रतिसाद. लागलीच माहेरी असलेल्या तिला फोन लावला आणि ऑनलाईन बूकींग चेक केले. अगदी हाऊसफुल्ल असा नाहीये, करंट बूकींग मध्येही जमेल आरामात, तर लेट टू लेट पुढच्या विकांताबद्दल जमवू नक्कीच.. बाकी आवडो न आवडो, या परीक्षणाबद्दल धन्यवाद :)

In reply to by भडकमकर मास्तर

रेवती 18/03/2014 - 20:35
ओक्के, मग थेट्रात जाऊन बघते. ती मजा वेगळीच! अवांतर: हसी तो फसी बघते बघते म्हणत अजून र्‍हायलाय.

ऋषिकेश 18/03/2014 - 16:48
'क्वीन' आवडला. त्याबद्दल बरेच बोलुन झाले आहे त्यामुळे अधिक लिहित नाही फक्त कंगनाच्या अभिनयापेक्षा संवादलेखनाने जिंकले आहे असे वाटले. पटकथेवर यथाप्रथा अधिक काम करायला हवेच होते. दुसर्‍या भागात कास्टिंगही सुधारता आले असते. तरी चित्रपटाची कथावस्तु व फ्रेश कल्पनाच इतकी रोचक आहे की अभिनयादी अंगांतील किंचित कमतरता झाकली जाते. संगीत पीसेसमध्ये चांगले, तरी चित्रपट एकुणात स्मरणीय झाला आहे. नक्की बघा.

मला त आत्तापर्यंत कंगना बद्दल जेवढे ऐकायला मिळाले त्या वरुन तिचे सगळे चित्रपट बघावेसे वाटतात पण सवड मिळत नाही. ती खुप चांगली कलाकार आहे.

चलत मुसाफिर 12/03/2014 - 12:03
'क्वीन'बद्दल सर्व समीक्षक इतके भरभरून लिहीत आहेत, की हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अपार वाढली आहे. लवकरच योग येईल अशी आशा करतो.

In reply to by सुहास झेले

सुहास झेले 14/03/2014 - 13:44
काल बघितला... निव्वळ अप्रतिम. उगाच काही बडेजावपणा नाही. गाणीसुद्धा श्रवणीय. कंगनाच्या फिल्मी करिअरला जबरदस्त वळण मिळणार ह्या सिनेमानंतर. आवर्जून बघा आणि थेटरात बघा :)

सूड 12/03/2014 - 17:00
एकदा तरी बघावा असा नक्कीच आहे, पण बरेच प्रश्न शेवट येईपर्यंत अनुत्तरित राहतात. तिने शेवटी तरी थोडा कणखरपणा दाखवावा असं सारखं वाटत होतं. आपल्याला धुडकावून लावणार्‍याशी इतकं गोडगोड कसं बोलू शकतं कोण!!

In reply to by स्पंदना

सूड 18/03/2014 - 16:01
>>राग येतो तो अपेक्षा असली तर. नसेलच अपेक्षा तर कसला राग? हा विचार केलाच नाही राव!! मी बहुतेक तो प्रसंग कशाशी तरी कम्पेअर करुन घोळ घातला. उत्तरासाठी धन्यवाद. :)

In reply to by मुक्त विहारि

चित्रगुप्त 12/03/2014 - 20:36
पैसे देवून अजिबात बघणार नाही.....
पैसे देवून बघण्यासारखे जे थोडेसेच सिनेमे असतात, त्यापैकी हा नक्कीच आहे. पैसे वाया जाणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 15/03/2014 - 05:19
इंग्लिश विंग्लिश मध्ये आहेत असं म्हणणं असेल तर तीव्र असहमती.
अतिशय सहमत. चांगल्या कथेच कसे मातेर करावं याचा उत्तम नमूना म्हणजे इम्ग्लिश विन्ग्लिश. ते सुधा एका मराठी व स्त्रीने दिग्दर्शित केलेला बघून एक मिपाकर म्हनूण महा शरम वाटली :(

स्पंदना 14/03/2014 - 13:18
एका साध्या प्रोटेक्टीव्ह घरातुन आलेली अन उध्वस्त झाल्यासारखी वाटणारी मुलगी. जी समोर आलेल्या आव्हांनांनमुले बदलत जाते अस काहीस चित्रण आहे. यात कोठेही फिरुन्न्कोणाला जिंकण्याचा अट्टाहास नाही. फक्त समोर ठरवलेली वाट हरवल्याने गोंधळुन जाऊन त्याच वाटेचा अट्टाहास धरलेली एक व्यक्तीरेखा कंगनाने अतिशय सुरेखरित्या उभी केली आहे. स्वतःच काहीही मत नसलेली एक मुलगी, तिचं ते हास्य, निरागस चेहरा. खुप दिवसांनी काहीतरी साधंसुधं सुरेख पाहिलं.

परवाच बायकोने हा चित्रपट चांगला आहे बघूया का असा विषय काढला तेव्हा हम्म बघू (म्हणजे ठरवू) असे म्हणालो, आणि आता हे परीक्षण आणि खालचे पेड नसलेले ओरिजिनल प्रतिसाद. लागलीच माहेरी असलेल्या तिला फोन लावला आणि ऑनलाईन बूकींग चेक केले. अगदी हाऊसफुल्ल असा नाहीये, करंट बूकींग मध्येही जमेल आरामात, तर लेट टू लेट पुढच्या विकांताबद्दल जमवू नक्कीच.. बाकी आवडो न आवडो, या परीक्षणाबद्दल धन्यवाद :)

In reply to by भडकमकर मास्तर

रेवती 18/03/2014 - 20:35
ओक्के, मग थेट्रात जाऊन बघते. ती मजा वेगळीच! अवांतर: हसी तो फसी बघते बघते म्हणत अजून र्‍हायलाय.

ऋषिकेश 18/03/2014 - 16:48
'क्वीन' आवडला. त्याबद्दल बरेच बोलुन झाले आहे त्यामुळे अधिक लिहित नाही फक्त कंगनाच्या अभिनयापेक्षा संवादलेखनाने जिंकले आहे असे वाटले. पटकथेवर यथाप्रथा अधिक काम करायला हवेच होते. दुसर्‍या भागात कास्टिंगही सुधारता आले असते. तरी चित्रपटाची कथावस्तु व फ्रेश कल्पनाच इतकी रोचक आहे की अभिनयादी अंगांतील किंचित कमतरता झाकली जाते. संगीत पीसेसमध्ये चांगले, तरी चित्रपट एकुणात स्मरणीय झाला आहे. नक्की बघा.
. 'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा.