मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अहमदाबाद-गांधीनगर_2

अमितसांगली ·

क्लिंटन 11/03/2014 - 15:45
फोटो आवडले. तुम्ही कांकरिया तलाव बघणे ४० मिनिटात कसे पूर्ण करू शकलात याचीच उत्सुकता आहे.मला वाटते की कांकरिया पूर्ण बघायचा असेल तर किमान ३-४ तास हवेत.तलावाला चालत प्रदक्षिणा घालायची असेल आणि मध्येमध्ये विविध स्टॉलवर खायचे असेल आणि मधली इतर आकर्षणे बघायची असतील तर तितका वेळ हवाच. संध्याकाळच्या वेळी तिथे लेसर शो असतो.तो पण चांगला असतो.मी त्या ठिकाणी ४ वर्षांपूर्वी गेलो होतो.आता तिथे हॉट एअर बलून राईड पण सुरू झाली आहे असे ऐकले आहे. बाकी अहमदाबाद तर एकदम छान शहर आहे--विशेषतः तिथले गुजराती खाणे :)

प्रचेतस 11/03/2014 - 16:19
सुरेख. पुन्हा एका प्राचीन मशिदीच्या बांधकामात टिपिकल चालुक्य शैलीचे स्तंभ आणि छताचा भाग..........

क्लिंटन 11/03/2014 - 15:45
फोटो आवडले. तुम्ही कांकरिया तलाव बघणे ४० मिनिटात कसे पूर्ण करू शकलात याचीच उत्सुकता आहे.मला वाटते की कांकरिया पूर्ण बघायचा असेल तर किमान ३-४ तास हवेत.तलावाला चालत प्रदक्षिणा घालायची असेल आणि मध्येमध्ये विविध स्टॉलवर खायचे असेल आणि मधली इतर आकर्षणे बघायची असतील तर तितका वेळ हवाच. संध्याकाळच्या वेळी तिथे लेसर शो असतो.तो पण चांगला असतो.मी त्या ठिकाणी ४ वर्षांपूर्वी गेलो होतो.आता तिथे हॉट एअर बलून राईड पण सुरू झाली आहे असे ऐकले आहे. बाकी अहमदाबाद तर एकदम छान शहर आहे--विशेषतः तिथले गुजराती खाणे :)

प्रचेतस 11/03/2014 - 16:19
सुरेख. पुन्हा एका प्राचीन मशिदीच्या बांधकामात टिपिकल चालुक्य शैलीचे स्तंभ आणि छताचा भाग..........
दिवस दुसरा: प्रवासाची रूपरेषा १. कांकरिया लेक (तलाव) : (लागणारा कालावधी : ४० मि.) २. सिद्दी सय्यद मस्जिद: कांकरिया लेकपासून १५ मि. च्या अंतरावर (लागणारा कालावधी: ३० मि. ) ३. जुम्मा मस्जिद: सिद्दी सय्यद मस्जिदपासून १५ मि. (लागणारा कालावधी: ४० मि.) ४. साबरमती आश्रम: लाल दरवाजापासून ३० मि. (लागणारा कालावधी: ३ तास ) ५. सायन्स सिटी: साबरमतीपासून ४५ मि. (लागणारा कालावधी: ३ तास ) १. कांकरिया लेक : संध्याकाळी सहाची बस पकडायची असल्याने दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय कांकरिया लेकवरच बघण्याचे नियोजन होते. पण नेहमीच उठण्याच रडगाण पाठ सोडायला नको.

क्षितिज

सार्थबोध ·
लेखनविषय:
मन विलाप जाणते धरतीचा सागरतिरी सूर्याचे ओझरणे प्रतिसाद लाटांवरुनी ll १ ll विहंग एकला प्रवासी समांतर अवकाशी धरतीस व्‍याकुळलेल्या साथ क्षणापुरती ll २ ll संध्येस का छळतो उनाड अल्लड वारा मावळत्या कातरवेळी जीव एकल्या विहारा ll ३ ll क्षितिजाचे रूप विलोभी उतरे गगनावरुनी डोळ्यादेखत माझ्या मिसळे पाण्यामधुनी ll ४ ll - सार्थबोध

हे लोकं बोलतात तरी काय / कसे.

अत्रन्गि पाउस ·

कै नै...च्या बिस्कुट हान्त्यात...पाऊस पाण्याच्या गप्पा हानत्यात. ज्याला च्या-भिस्कुटाचं बिलं द्यावं लागत नाही त्याच्या देशात छापत्यात, अमुक अमुक नी अमुक अमुक ला मुत्सद्दीपणे हाताळला :)...!! विनोदाचा भाग सोडुन द्या. आपला मुद्दा सोडायचा नाही. आपले पंतप्रधान "चर्चा" करतात ही अफवा असेल का?

मनो 11/03/2014 - 10:15
इथे इराण बरोबर झालेल्या वाटाघाटीमध्ये तुम्हाला हे राजकारण कसे चालते ते दिसेल. एका भेटीमागे कित्येक वर्षांचे प्रयत्न असतात, भेट म्हणजे बर्याचदा या प्रयत्नाची शेवटची पायरी असते, त्यामुळे काय बोलायचे ते खालच्या पातळीवर आधीच ठरलेले असते. http://www.youtube.com/watch?v=Cf3fcoXx0pI अशोक जैन यांच्या "राजधानीतून" मध्ये एक किस्सा आहे. बाबासाहेब भोसले (महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्यमंत्री) इंदिरा गांधीना भेटायला दिल्लीला गेले होते. त्या वेळी भेटीनंतर ते पत्रकारांना म्हणाले "इंदिराजींबरोबर चांगली तासभर गहन चर्चा झाली असं लिहा". खरी गोष्ट अशी होती की या तासापैकी ५५ मिनिटे प्रतीक्षालयात (waiting room ) गेली होती. बाकीची पाच मिनिटे बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर "इंदिराजी बोलत होत्या आणि आम्ही फक्त हो म्हणायचं". तर खरी चर्चा अशी होते. बातम्यात छापून येतो तो अधिकृत वृतान्त, त्याचा सत्याशी काही संबंध असतोच असं नाही.

ज्ञानव 11/03/2014 - 11:19
आमचे एक आय ए एस झालेले साहेब होते त्यांना नेमका हाच प्रश्न आम्ही विचारला होता की दोन उच्च पदस्थ जेव्हा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने भेटी ठरवतात तेव्हा सुरवात कशी होते म्हणजे "नमस्कार, कसे आहात?" "सध्या काय चाललंय ? " इतक्या हलक्या फुलक्या गप्पांनी सुरवात होते का ? त्यावर ते म्हणाले कि आम्ही कमी बोलतो आणि आमच्या बरोबर असलेले ऑफिसर्स, सचिव इत्यादी लोक विषय ओपन करतात तसेच मिटींगच्या आधी बरीच पत्रा - पत्री झालेली असते. अजेंडा दोन्हीकडच्या स्टाफकडे असतो ते मुद्दे वाचतात आणि "आम्ही" त्यावर बोलतो. साहेबांनी सांगितले आम्ही ऐकले ह्या पलीकडे ह्याला प्रत्यक्ष उपस्थित कुणाकडून काही पुष्टी कधी मिळाली नाही.

भाते 11/03/2014 - 13:59
जपानचे प्रधानमंत्री मोर्री हे अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यातली चर्चा मिपावरच या धाग्यात झाली आहे.

कै नै...च्या बिस्कुट हान्त्यात...पाऊस पाण्याच्या गप्पा हानत्यात. ज्याला च्या-भिस्कुटाचं बिलं द्यावं लागत नाही त्याच्या देशात छापत्यात, अमुक अमुक नी अमुक अमुक ला मुत्सद्दीपणे हाताळला :)...!! विनोदाचा भाग सोडुन द्या. आपला मुद्दा सोडायचा नाही. आपले पंतप्रधान "चर्चा" करतात ही अफवा असेल का?

मनो 11/03/2014 - 10:15
इथे इराण बरोबर झालेल्या वाटाघाटीमध्ये तुम्हाला हे राजकारण कसे चालते ते दिसेल. एका भेटीमागे कित्येक वर्षांचे प्रयत्न असतात, भेट म्हणजे बर्याचदा या प्रयत्नाची शेवटची पायरी असते, त्यामुळे काय बोलायचे ते खालच्या पातळीवर आधीच ठरलेले असते. http://www.youtube.com/watch?v=Cf3fcoXx0pI अशोक जैन यांच्या "राजधानीतून" मध्ये एक किस्सा आहे. बाबासाहेब भोसले (महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्यमंत्री) इंदिरा गांधीना भेटायला दिल्लीला गेले होते. त्या वेळी भेटीनंतर ते पत्रकारांना म्हणाले "इंदिराजींबरोबर चांगली तासभर गहन चर्चा झाली असं लिहा". खरी गोष्ट अशी होती की या तासापैकी ५५ मिनिटे प्रतीक्षालयात (waiting room ) गेली होती. बाकीची पाच मिनिटे बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर "इंदिराजी बोलत होत्या आणि आम्ही फक्त हो म्हणायचं". तर खरी चर्चा अशी होते. बातम्यात छापून येतो तो अधिकृत वृतान्त, त्याचा सत्याशी काही संबंध असतोच असं नाही.

ज्ञानव 11/03/2014 - 11:19
आमचे एक आय ए एस झालेले साहेब होते त्यांना नेमका हाच प्रश्न आम्ही विचारला होता की दोन उच्च पदस्थ जेव्हा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने भेटी ठरवतात तेव्हा सुरवात कशी होते म्हणजे "नमस्कार, कसे आहात?" "सध्या काय चाललंय ? " इतक्या हलक्या फुलक्या गप्पांनी सुरवात होते का ? त्यावर ते म्हणाले कि आम्ही कमी बोलतो आणि आमच्या बरोबर असलेले ऑफिसर्स, सचिव इत्यादी लोक विषय ओपन करतात तसेच मिटींगच्या आधी बरीच पत्रा - पत्री झालेली असते. अजेंडा दोन्हीकडच्या स्टाफकडे असतो ते मुद्दे वाचतात आणि "आम्ही" त्यावर बोलतो. साहेबांनी सांगितले आम्ही ऐकले ह्या पलीकडे ह्याला प्रत्यक्ष उपस्थित कुणाकडून काही पुष्टी कधी मिळाली नाही.

भाते 11/03/2014 - 13:59
जपानचे प्रधानमंत्री मोर्री हे अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यातली चर्चा मिपावरच या धाग्यात झाली आहे.
दोन राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा तत्सम अत्युच्च पदस्थ लोकं जेव्हा अधिकृत कामासाठी भेटतात तेव्हा ते जी चर्चा वाटाघाटी करतात त्याचा गोषवारा / औटकम आपल्याला नंतर कळतो..आपण नेहेमी ऐकतो वाचतो कि अमुक नेत्याने अतिशय मुत्सद्दीपणे अमुक एक परिस्थिती हाताळली / आपलं मुद्दा गळी उतरवला वगैरे वगैरे.. परंतु हे लोकं प्रत्यक्ष बैठकीत / बोलण्यांमध्ये ते काय /कसे बोलत असावेत ? विशेषतः बंद दाराआड चर्चेत जेव्हा प्रत्येक शब्द, हालचाल, मौन सगळे सगळे महत्वाचे असेल त्यावेळी आपलं मुद्दा मांडतांना, रेटतांना, सोडतांना शिष्टचारांचा डोलारा सांभाळत .. ते एक्झाकटली 'बोलत' काय/कसे असावेत?

मृगगड - उंबरखिंड - भाग १

वेल्लाभट ·

एस 11/03/2014 - 09:45
पुणे जिल्ह्यातला हा एकच किल्ला करायचा राहिलाय. यंदाच्या पावसाळ्यात मोहिम फत्ते केली जाईल. आणि प्रतिमा अप्रतिम बरं का! :-)

झकासराव 11/03/2014 - 14:23
हायला!!!!!!!! हा मृगगड आहे होय. पालीला, सुधागडला जाता हा वेगळ्या घुमटाकार डोंगर लक्ष वेधुन घेतोच की. मस्त :)

वेल्लाभट 11/03/2014 - 19:40
@ खटपट्या, प्रमोद देर्देकर, स्वॅप्स, मुवि साहेब, आत्मा, बाबा, केदार, आनंद, पिंगू, झकास आणि सूड धन्यवाद्स !

बॅटमॅन 11/03/2014 - 20:10
जबरी प्रकार आहे सगळा. तो रॉकपॅच पाहून विसापूरला जाताना वाट चुकून अर्धवट चढलेल्या रॉकपॅचची आठवण झाली आणि अंग अंमळ शहारले. फटूतला रॉकपॅच अवघड दिसतोय! सराव असल्याने जमलं की कसं? आय मीन लै औघड नै ना?

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/03/2014 - 20:19
ज्या फोटोत दोन व्यक्ती वर चढलेल्या दिसतायत तो रॉकपॅच नव्हे. तो डेड एन्ड होता आणि फोटोत दिसतायत ते केवळ स्टंट आहेत. जो रॉकपॅच खरोखर चढायचा होता तिथे आम्ही फोटो काढायच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत नव्हतोच :P संभ्रमाबद्दल क्षमस्व.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/03/2014 - 21:25
होता ना राव. ब-यापैकी चॅलेंजिंग होता (आमच्यासाठी असेल). आणि त्यात ऊन. दगडाला टच केलं की चटका ! नाउ दॅट्स.... री...यली टफ आय टेल यू !

पैसा 21/03/2014 - 19:44
वर्णन आणि फोटो मस्तच आहेत! किल्ल्याचे फोटो पुढच्या भागात का?

एस 11/03/2014 - 09:45
पुणे जिल्ह्यातला हा एकच किल्ला करायचा राहिलाय. यंदाच्या पावसाळ्यात मोहिम फत्ते केली जाईल. आणि प्रतिमा अप्रतिम बरं का! :-)

झकासराव 11/03/2014 - 14:23
हायला!!!!!!!! हा मृगगड आहे होय. पालीला, सुधागडला जाता हा वेगळ्या घुमटाकार डोंगर लक्ष वेधुन घेतोच की. मस्त :)

वेल्लाभट 11/03/2014 - 19:40
@ खटपट्या, प्रमोद देर्देकर, स्वॅप्स, मुवि साहेब, आत्मा, बाबा, केदार, आनंद, पिंगू, झकास आणि सूड धन्यवाद्स !

बॅटमॅन 11/03/2014 - 20:10
जबरी प्रकार आहे सगळा. तो रॉकपॅच पाहून विसापूरला जाताना वाट चुकून अर्धवट चढलेल्या रॉकपॅचची आठवण झाली आणि अंग अंमळ शहारले. फटूतला रॉकपॅच अवघड दिसतोय! सराव असल्याने जमलं की कसं? आय मीन लै औघड नै ना?

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/03/2014 - 20:19
ज्या फोटोत दोन व्यक्ती वर चढलेल्या दिसतायत तो रॉकपॅच नव्हे. तो डेड एन्ड होता आणि फोटोत दिसतायत ते केवळ स्टंट आहेत. जो रॉकपॅच खरोखर चढायचा होता तिथे आम्ही फोटो काढायच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत नव्हतोच :P संभ्रमाबद्दल क्षमस्व.

In reply to by बॅटमॅन

वेल्लाभट 11/03/2014 - 21:25
होता ना राव. ब-यापैकी चॅलेंजिंग होता (आमच्यासाठी असेल). आणि त्यात ऊन. दगडाला टच केलं की चटका ! नाउ दॅट्स.... री...यली टफ आय टेल यू !

पैसा 21/03/2014 - 19:44
वर्णन आणि फोटो मस्तच आहेत! किल्ल्याचे फोटो पुढच्या भागात का?
’मृगगड??? हा कुठे आला? ऐकलं नाही कधी याबद्दल! मोठा आहे का? किती कठीण आहे? काय विशेष आहे त्या किल्ल्यावर?’ इत्यादी असंख्य प्रश्न उपस्थित झाले, जेंव्हा मृगगडाचं नाव सुचवलं गेल. तसा हा अपरिचितच किल्ला म्हणायला हवा. इंटरनेटवरही याची म्हणावी तेवढी मुबलक माहिती मिळत नाही. सुधागड, राजगड ही नावं शर्यतीत होती पण शेवटी एक दिवसाचाच ट्रेक करायचा ठरल्याने ती बाद झाली. मग कोहोज, टकमक गड, घनगड आणि हा मृगगड अशी काही नावं पुढे आली. मृगगड त्यातल्या त्यात जवळ, छोटा, फार कठीण नसलेला, (ही सगळी विशेषणं पुढे बदलली. कशी ते कळेलच) असा होता आणि नवीन होता त्यामुळे ‘होऊदे ट्रेक !’ असं म्हणून मंडळी ट्रेक ला तय्यार झाली.

बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा

माहितगार ·

ज्ञानव 11/03/2014 - 12:40
आत्त्ताच अर्धा तर अर्धा म्हणून संपवला...... आता काही सुधरत नाहीये तुम्ही फार गहन लिहिले आहे का?....थोड्या वेळाने बघतो.

In reply to by स्पा

माहितगार 11/03/2014 - 13:33
@ज्ञानव;! मी आत्ता लिही पर्यंत ३८० वाचनं झाली (तशी ३८१ पण त्यातल १ माझच होत) प्रत्येक वाचकाच्या प्रत्येक वाचनाकरता अर्धा भरून ठेवत आहे. पण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट पॉलीसीनुसार त्याला अर्धा म्हटला की त्याचा (ग्लासाचा) अपमान होतो बरंका फूल म्हणायच फूल; नाहीतर हा रिकामा का ठेवला ?.. असं म्हणून विचारायच असा धाग्याचा अरध आहे..! आणि @ स्पा;! ३८० मधले शील्लक किती आणि शीलकीतले रिचवले किती हे मोजण्याच्या स्थितीत आम्ही सध्या नाही. (खोटा) आकडा हवा असल्यास ते स्वतः प्रत्यक्षप्रमाणाने मोजून आपण आम्हास धागा तळाला गेल्यावर सांगावे. आपले अनुमानीत प्रमाण आम्हास मान्य असेण्याची शक्यता आहे :) (ह. घ्या.) खरा आकडा ज्ञानव यांना विचारावा कारण ते रिकाम्या आणि पूर्ण ग्लासांना अर्धा म्हणूनच मोजत आहेत. त्यांचे मोजमापाचे प्रमाण त्यांच्या करता प्रत्यक्ष आमच्या करता शब्दप्रमाण (काय म्हणतोय मी ज्ञानवांप्रमाणेच मलाही सूचत नाही आहे. सम्जूण घेण्याचा प्रयास करावा हि तीविंन :) ) (ज्ञानव आपण पण ह. घ्या.) आणि हो घाटपांडे मागच्याच धाग्यावर राहीले कुणी घेऊन येता का या नव्या पार्टीला त्यांना येताना चकणाबी घेऊन येवा हि विनंती (घाटपांडेजी आल्यावर आपण पण हलकेच घ्या बबरे )

मारकुटे 11/03/2014 - 13:41
अजुन खुप अभ्यास करावा लागेल तुम्हाला... इतक्यात भारतीय तत्वज्ञान समजलं अशी मनाची समजुत करुन घेऊ नका. थोडक्यात काय तर आमचे मित्र कै.श्रामो यांच्या भाषेत "मोठे व्हा !"

In reply to by मारकुटे

माहितगार 11/03/2014 - 13:49
अभ्यासतर करावा लागेल हे खरे (आम्हास तसा तो नाही हे आम्ही वर लेखातच कबुल केले आहे; भारतीय तत्वज्ञानाच्या सुर्यप्रकाशापुढे आम्ही काजव्या एवढे सुद्धा चमकू शकत नाही हे अमंळ खरेच आहे ), पण आम्ही तो मिसळपाव आणि इतर मराठी संकेतस्थळांवरून ऑनलाइन करू इच्छितो ज्यामुळे आमच्या सोबत इतरांचाही फायदा होईल. आम्हास अपरिचीत आपले मित्र कै.श्रामो यांना आदरपुर्वक वंदन. आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. (ज्ञानी लोकांच्या हाताचे बोट धरून मोठा होऊ इच्छिणारा)

In reply to by माहितगार

मारकुटे 11/03/2014 - 13:57
http://books.google.co.in/books/about/A_History_of_Indian_Philosophy.html?id=-_1oMgEACAAJ&redir_esc=y आणि राधाकृष्णन तसेच http://en.wikipedia.org/wiki/M_Hiriyanna यांची पुस्तके वाचा... थोडं फार कळेल... वाचा.. चर्चेपेक्षा वाचन मनन आणि चिंतन या भारतीय पद्धतीचा लाभ होईल. नुसतीच चर्चा बाष्कळ होते अशा विषयांसाठी... आणि अखेर बुद्ध म्हणतो तसं बुद्धीला पटेल तेच स्विकारा... :)

In reply to by मारकुटे

माहितगार 11/03/2014 - 14:25
मा.र. कुटे साहेब दुव्यांकरता धन्यवाद . सवडीने जरूर वाचेन. राजहंसाप्रमाणे पोहता आले नाही म्हणून बदकांनी बगळ्यांनी आणि इतर जीवमात्रांनी ज्ञानाच्या तलावातले ओंजळभर पाणि पिण्याचा प्रयासही करू नये हे कितपत न्याय्य ठरते ? ज्ञान ग्रहणाचे आणि ज्ञानप्रसाराचे आमचे प्रयास थोर विद्वान ऋषी मुनींप्रमाणे नसतील पण आम्ही (मी) विकिपीडिया संस्कृतीतून येतो प्रत्येक व्यक्ती कडे काही ना काही देण्यासाराखे घेण्यासारखे ज्ञान आहे यावर आमचा अढळ विश्वास आहे तो आमच्या धाग्यांना आणि चर्चांना कुणी बाष्फळ म्हटल्याने तुटणारा नाही. या धाग्यांचा उद्देश किमान परिचय स्वरूपाचा आहे. मराठी आंतरजालावरील लेखन आणि चर्चांना तर्कसुसंगतता यावी म्हणून तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र या बद्दल मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून अधिक लेखन करून हवे आहे. हा धागाच काढला नसता तर आपण एवढ्या चांगल्या माहितीचा दुवाही शेअर करू शकला असता का ते या निमीत्ताने होते आहे. मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर कुणी पिएचड्या करण्या साठी येत नाही. होणारी विषयांची ओळख चर्चा ओझरती असते बाकी मुख्य विषय अधिक सखोल अभ्यासावयाचे असतात याची सर्वांना कल्पना असते. धाग्यात किंवा चर्चेतील मुद्यात कुठे सुधारणा असतील काही चुकले असेल तर ते चर्चेत सहभागी होऊन जरूर दर्शवावे. इतरांनी विषयांतर केले तरीही रंजनात सुद्धा सुप्तपणे मुख्य मुद्दा इन्क्लुड करण्याचा प्रयास केला आहेच. भारतीय तवज्ञान केवळ पोथ्या मंध्ये जपून ठेवावे आणि काही लोकांनीच ते वाचावे स्वतः सोबत अस्तंगत व्हावे सर्वसामन्यांनी ज्ञानी लोकांची नुसतीच वाहवा करून डोक्यावर घेऊन ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर न केला जाणे न होऊ देणे हे गेली कैक हजारो वर्षे होत आले आहे. आमचे हे प्रयासही त्यास फार पुढे नेतील असे नव्हे पण प्रयत्न न करण्या पेक्षा प्रयत्न करणे महत्वाचे असते असे वाटते. मा.र. कुटे साहेब आपला विवीध विषयांवर चौफेर अभ्यास आहे तेव्हा मराठी विकिपीडियावर येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर लेखन केल्यास आनंदच असेल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाकरीता धन्यवाद.

In reply to by माहितगार

मारकुटे 11/03/2014 - 18:41
>>>मा.र. कुटे साहेब आपला विवीध विषयांवर चौफेर अभ्यास आहे तेव्हा मराठी विकिपीडियावर येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर लेखन केल्यास आनंदच असेल. क्षमा असावी. आम्हास लेखनकला अवगत नाही.

ज्ञानव 11/03/2014 - 12:40
आत्त्ताच अर्धा तर अर्धा म्हणून संपवला...... आता काही सुधरत नाहीये तुम्ही फार गहन लिहिले आहे का?....थोड्या वेळाने बघतो.

In reply to by स्पा

माहितगार 11/03/2014 - 13:33
@ज्ञानव;! मी आत्ता लिही पर्यंत ३८० वाचनं झाली (तशी ३८१ पण त्यातल १ माझच होत) प्रत्येक वाचकाच्या प्रत्येक वाचनाकरता अर्धा भरून ठेवत आहे. पण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट पॉलीसीनुसार त्याला अर्धा म्हटला की त्याचा (ग्लासाचा) अपमान होतो बरंका फूल म्हणायच फूल; नाहीतर हा रिकामा का ठेवला ?.. असं म्हणून विचारायच असा धाग्याचा अरध आहे..! आणि @ स्पा;! ३८० मधले शील्लक किती आणि शीलकीतले रिचवले किती हे मोजण्याच्या स्थितीत आम्ही सध्या नाही. (खोटा) आकडा हवा असल्यास ते स्वतः प्रत्यक्षप्रमाणाने मोजून आपण आम्हास धागा तळाला गेल्यावर सांगावे. आपले अनुमानीत प्रमाण आम्हास मान्य असेण्याची शक्यता आहे :) (ह. घ्या.) खरा आकडा ज्ञानव यांना विचारावा कारण ते रिकाम्या आणि पूर्ण ग्लासांना अर्धा म्हणूनच मोजत आहेत. त्यांचे मोजमापाचे प्रमाण त्यांच्या करता प्रत्यक्ष आमच्या करता शब्दप्रमाण (काय म्हणतोय मी ज्ञानवांप्रमाणेच मलाही सूचत नाही आहे. सम्जूण घेण्याचा प्रयास करावा हि तीविंन :) ) (ज्ञानव आपण पण ह. घ्या.) आणि हो घाटपांडे मागच्याच धाग्यावर राहीले कुणी घेऊन येता का या नव्या पार्टीला त्यांना येताना चकणाबी घेऊन येवा हि विनंती (घाटपांडेजी आल्यावर आपण पण हलकेच घ्या बबरे )

मारकुटे 11/03/2014 - 13:41
अजुन खुप अभ्यास करावा लागेल तुम्हाला... इतक्यात भारतीय तत्वज्ञान समजलं अशी मनाची समजुत करुन घेऊ नका. थोडक्यात काय तर आमचे मित्र कै.श्रामो यांच्या भाषेत "मोठे व्हा !"

In reply to by मारकुटे

माहितगार 11/03/2014 - 13:49
अभ्यासतर करावा लागेल हे खरे (आम्हास तसा तो नाही हे आम्ही वर लेखातच कबुल केले आहे; भारतीय तत्वज्ञानाच्या सुर्यप्रकाशापुढे आम्ही काजव्या एवढे सुद्धा चमकू शकत नाही हे अमंळ खरेच आहे ), पण आम्ही तो मिसळपाव आणि इतर मराठी संकेतस्थळांवरून ऑनलाइन करू इच्छितो ज्यामुळे आमच्या सोबत इतरांचाही फायदा होईल. आम्हास अपरिचीत आपले मित्र कै.श्रामो यांना आदरपुर्वक वंदन. आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. (ज्ञानी लोकांच्या हाताचे बोट धरून मोठा होऊ इच्छिणारा)

In reply to by माहितगार

मारकुटे 11/03/2014 - 13:57
http://books.google.co.in/books/about/A_History_of_Indian_Philosophy.html?id=-_1oMgEACAAJ&redir_esc=y आणि राधाकृष्णन तसेच http://en.wikipedia.org/wiki/M_Hiriyanna यांची पुस्तके वाचा... थोडं फार कळेल... वाचा.. चर्चेपेक्षा वाचन मनन आणि चिंतन या भारतीय पद्धतीचा लाभ होईल. नुसतीच चर्चा बाष्कळ होते अशा विषयांसाठी... आणि अखेर बुद्ध म्हणतो तसं बुद्धीला पटेल तेच स्विकारा... :)

In reply to by मारकुटे

माहितगार 11/03/2014 - 14:25
मा.र. कुटे साहेब दुव्यांकरता धन्यवाद . सवडीने जरूर वाचेन. राजहंसाप्रमाणे पोहता आले नाही म्हणून बदकांनी बगळ्यांनी आणि इतर जीवमात्रांनी ज्ञानाच्या तलावातले ओंजळभर पाणि पिण्याचा प्रयासही करू नये हे कितपत न्याय्य ठरते ? ज्ञान ग्रहणाचे आणि ज्ञानप्रसाराचे आमचे प्रयास थोर विद्वान ऋषी मुनींप्रमाणे नसतील पण आम्ही (मी) विकिपीडिया संस्कृतीतून येतो प्रत्येक व्यक्ती कडे काही ना काही देण्यासाराखे घेण्यासारखे ज्ञान आहे यावर आमचा अढळ विश्वास आहे तो आमच्या धाग्यांना आणि चर्चांना कुणी बाष्फळ म्हटल्याने तुटणारा नाही. या धाग्यांचा उद्देश किमान परिचय स्वरूपाचा आहे. मराठी आंतरजालावरील लेखन आणि चर्चांना तर्कसुसंगतता यावी म्हणून तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र या बद्दल मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून अधिक लेखन करून हवे आहे. हा धागाच काढला नसता तर आपण एवढ्या चांगल्या माहितीचा दुवाही शेअर करू शकला असता का ते या निमीत्ताने होते आहे. मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर कुणी पिएचड्या करण्या साठी येत नाही. होणारी विषयांची ओळख चर्चा ओझरती असते बाकी मुख्य विषय अधिक सखोल अभ्यासावयाचे असतात याची सर्वांना कल्पना असते. धाग्यात किंवा चर्चेतील मुद्यात कुठे सुधारणा असतील काही चुकले असेल तर ते चर्चेत सहभागी होऊन जरूर दर्शवावे. इतरांनी विषयांतर केले तरीही रंजनात सुद्धा सुप्तपणे मुख्य मुद्दा इन्क्लुड करण्याचा प्रयास केला आहेच. भारतीय तवज्ञान केवळ पोथ्या मंध्ये जपून ठेवावे आणि काही लोकांनीच ते वाचावे स्वतः सोबत अस्तंगत व्हावे सर्वसामन्यांनी ज्ञानी लोकांची नुसतीच वाहवा करून डोक्यावर घेऊन ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर न केला जाणे न होऊ देणे हे गेली कैक हजारो वर्षे होत आले आहे. आमचे हे प्रयासही त्यास फार पुढे नेतील असे नव्हे पण प्रयत्न न करण्या पेक्षा प्रयत्न करणे महत्वाचे असते असे वाटते. मा.र. कुटे साहेब आपला विवीध विषयांवर चौफेर अभ्यास आहे तेव्हा मराठी विकिपीडियावर येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर लेखन केल्यास आनंदच असेल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाकरीता धन्यवाद.

In reply to by माहितगार

मारकुटे 11/03/2014 - 18:41
>>>मा.र. कुटे साहेब आपला विवीध विषयांवर चौफेर अभ्यास आहे तेव्हा मराठी विकिपीडियावर येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर लेखन केल्यास आनंदच असेल. क्षमा असावी. आम्हास लेखनकला अवगत नाही.
लेखनविषय:
भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा हा संबंधीत विषयातील तज्ञांनी हाताळावयाचा विस्तृत विषय आहे.

मोदी वगेरे ठीक आहे…महाराष्ट्राला काय ते बोला

पुतळाचैतन्याचा ·
मराठी माणसाचा शुद्ध स्वार्थ या भुमिके मधून हा लेख लिहिला आहे.मोदी पंतप्रधान होणे हे देशाच्या भल्याचे वगेरे आहे हे ठीक पण ते पंतप्रधान झाले तर मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील आणि महाराष्ट्राचे नेहमीचे रेल्वे, सरकारी नोकर्या, उसाच्या शेतकरी, सहकार, मुंबई शहर, इतर औद्योगिक वसाहती यांना काय मिळणार? का नुसता मन मोठा करून बाकी प्रदेशाची प्रगती पहायची आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने गप्प बसायचे? सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत.

गेली १४+ वर्षे राज्यात अन १० वर्षे केंद्रात एकाच आघाडीचे सरकार असुनही आपल्या राज्याची प्रगती यथातथाच आहे याबाबत दुमत नाहीच. बाकी मुंबईतून केंद्राला जाणारा कर व राज्याला केंद्राकडून मिळणारा निधी हा घासून गुळगुळीत झालेला मुद्दा अर्थशास्त्रिय निकषांवर किती तकलादू आहे हे मिपावर पूर्वी अनेकदा चर्चिले गेले आहे. त्याखेरीज महाराष्ट्राने थेट परदेशी गुंतवणुकीत आजवर कधीच प्रथम क्रमांक सोडलेला नाही असे आजवरचे वाचन आहे. तुमचे निरिक्षण याविरुद्ध दिसत आहे. कृपया माहितीचा स्रोत सांगावा.

In reply to by श्रीरंग_जोशी

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून जाणारा कर हा मुद्दा एवढा गुळगुळीत झालेला नाही. गुडगाव सारख्या छपरी गावात पालिकेचे पाणी येत नसेल पण मेट्रो झाली आहे. असले अर्थाशात्रीय मुद्दे हे केवळ फसवण्या साठी असतत. मुंबई/पुणे/ नागपूर ला सरळ सरळ डावलले जाते. हा स्त्रोत वाचा. असा लिहिण्याची हिम्मत कशी होते लोकांची…परकीय गुंतवणूक वगेरे विसरा।तो नंबर आपण कधीच गमावून बसलो आहोत…ह्युमन डेव. निर्देशांक पहा…आपन लांब फेकलो गेलो आहोत.प्रश्न कोणाचे सरकार येणार/ कोण चांगले कोण वाईट हा नसून आपल्याला काय मिळणार हा आहे? स्वार्थी/विकासाच्या नजरेतून सांगा.

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून जाणारा कर हा मुद्दा एवढा गुळगुळीत झालेला नाही. गुडगाव सारख्या छपरी गावात पालिकेचे पाणी येत नसेल पण मेट्रो झाली आहे. असले अर्थाशात्रीय मुद्दे हे केवळ फसवण्या साठी असतत. मुंबई/पुणे/ नागपूर ला सरळ सरळ डावलले जाते. हा स्त्रोत वाचा. असा लिहिण्याची हिम्मत कशी होते लोकांची…परकीय गुंतवणूक वगेरे विसरा।तो नंबर आपण कधीच गमावून बसलो आहोत…ह्युमन डेव. निर्देशांक पहा…आपन लांब फेकलो गेलो आहोत.प्रश्न कोणाचे सरकार येणार/ कोण चांगले कोण वाईट हा नसून आपल्याला काय मिळणार हा आहे? स्वार्थी/विकासाच्या नजरेतून सांगा.

In reply to by इरसाल

गुडगावचा बराच भाग हा कुपानालीकेवर अवलंबून आहे. (मी स्वत: तिथे काही वर्ष राहिलो आहे…पण ते जाऊ द्या) मुद्दा हा आहे कि स्थानिक प्रशाशन कितीही फालतू असले तरीही केंद्र सरकारने तिथे एवढा पैसा ओतला आहे…जावयांनी मोठ्या विकासकान बरोबर ते शहर वसवले आहे…तसच पैसा केंद्र सरकार अनेक राज्यात घालत आहे… आपल्याला काय मिळणार? निदान रेल्वे चा जाल तरी मिळू दे. गुडगावच्या मिलेनिअम सिटी चा भाग सोडून जर दुन्दाहेडा, कापसाहेडा, सोहना रोड ला बघा काय अवस्था आहे. मला तरी ते बेताल शहरीकरण म्हणून छपरी वाटले

In reply to by इरसाल

तुमचे मत वेगळे असु शकते. माझी तुलना फक्त केन्द्राने दिलेला निधि किती आणी आपल्य वाट्याला विकास का येत नाहिये यासाठी आहे.

आत्मशून्य 11/03/2014 - 10:45
फक्त पुरेशी विज मिळावी हीच अपेक्षा आहे. मगच विकासाचे वगैरे प्रश्न मार्गी लागतील. पण त्याबाबत कोणीच अवाक्षरही बोलत नाही :(

विटेकर 11/03/2014 - 11:03
महाराष्ट्राचा विकास केंद्र सरकार कसे काय करणार ? तो महाराष्ट्र शासन करणार ना ? मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील मराठी मंत्री असले की महाराष्ट्राचा विकास होतो असा तुमचा समज आहे का? मग आत्ता ही आहेतच की मराठी मंत्री ! का होत नाही विकास? म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही झाला , त्यांच्या पुतण्याचा , लेकीचा आणि त्यापुढील काही पिढ्यांचा दणदणीत विकास झाला आहे !

In reply to by विटेकर

तुमचा थोडा गैरसमज दिसतो. थोडी आधी माहिती देतो. भारताच्या घटने मध्ये ३ याद्या आहेत १) फक्त केंद्राने हाताळायचे विषय(काम) उदा. रेल्वे, सुरक्षा, खाणी, आंतरराष्ट्रीय संबंध वगेरे २) फक्त राज्याने हाताळायचे विषय उदा. इरिगेशन, वने ३) दोघांचा पण अधिकार असणारे विषय ऊदा. रस्ते, धरणे, वीज, उद्योग, जमीन अधिग्रहण वगेरे. जे विषय पूर्ण केंद्राच्या हातात आहेत त्यात महाराष्ट्राचा विकास अतिशय कमी झालेला आहे. जे अधिकार दोघांचे आहेत त्यात केंद्र ठरवते कि कुठे किती पैसे वाटायचे आणि केंद्र या मध्ये भेदभाव करून शकते... नव्हे करते।!!! राज्याच्या हातात जे विषय आहेत तेवढाच विकास आपण करू शकतो. भारतीय राज्य हे लोकशाही आणि प्रबळ केंद्र सरकार असे आहे(Federal structure with strong centre). म्हणून रेल्वे, वगेरे खाती महाराष्ट्र मिळणे महत्वाचे आहे

अपेक्षा हीच आहे कि जर समजा गडकरी मंत्री झाले तर मागे जो रस्त्यांचा विकास झाला तसा खाणी, रेल्वे, शहरी वाहतूक यात दिसेल का? (सामान्य माणसाला वेडी आशा असते).

चिरोटा 11/03/2014 - 11:58
जास्त विकास पाहिजे कशाला? ईतर राज्यांतले लोंढे जास्त येतील व आपल्या सरकारने बनवलेल्या उत्तम सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडेल्.!!(ह्.घ्या.) मंत्रीमंडळात दिसणार्‍या चेहर्‍यांचा आणि विकासाचा संबंध असतोच असे नाही. अन्यथा उ.प्र्.,(पूर्वीचा)बिहारचा केव्हाच विकास झाला असता.
या बाबतीत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवाले जोरात आहेत. कोणाचाही सरकार आला तरी यांच्या राज्यात विकास होताच आहे.
ही दोन्ही राज्ये पाहिली नसतील तर एकदा पाहून या.गेल्या वीस वर्षात कर्नाटक्,आंध्र,तामिळनाडूने बरीच प्रगती केली आहे(प्रगती ह्याचा अर्थ येथे गुंतवणूक असा आहे).कर्नाटक्,आंध्रमधील प्रशासन महाराष्ट्राच्या तुलनेत कमी भ्रष्ट्राचारी आहे असा एकंदरीत अनुभव आहे(विदा,ग्राफ्स्,चार्ट्स,इंडेक्स वगैरे मागू नका.गुंतवणूक करणार्‍या लोकांना विचारा). दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या राज्यांमध्ये होणारी गुंतवणूक सर्वत्र आहे.फक्त राजधानी वा मोठी शहरे ह्यापुरती मर्यादीत नाही. ह्याचा अर्थ महाराष्ट्र मागे पडला वगैरे म्हणायचे का? नाही. ४७-ते २००० ह्या कालात महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झालेली दिसेल. गुंतवणूक करताना जमीन्,पाणी,मनुष्यबळ्,कर,रस्ते हे सगळे विचारात घ्यावे लागते.पायाभूत सुविधा केवळ असून चालत नाही तर त्या परवडणार्‍याही असाव्या लागतात. अशा पायाभूत सुविधांमध्ये ही राज्ये सध्या महाराष्ट्रापुढे आहेत असा अनुभव आहे.

In reply to by चिरोटा

विकास झालाच पाहिजे. मागे पडून चालणार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कि बाकी राज्यांचा विकास झाला आहे. तिथे पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण होत आहेत. माझा मुद्दा हा आहे कि आपल्या मागण्या कोणत्या? त्या एकत्रित करून कोणाचेही सरकार आले तरी त्या मान्य करून घेत आल्या पाहिजेत. एखादा ऑनलाइन फोरम काढून अथवा मि. पा. च्या माध्यमातून दबावगट तयार होऊ शकतो ना…लोण्ढे येतील वगेरे भीतीत काही अर्थ नाही. लोकशाही आयुध वापरूनच ते थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. खळ्ळ खट्याकवाले एकही भैय्याला हाकलू शकत नाहीत. हे आपण कधी समजणार का केवळ लोंढे येतील म्हणून विकास नको हे चुकीचे वाटते.

नितिन थत्ते 11/03/2014 - 22:37
महाराष्ट्रात नाकर्ते सरकार बरीच वर्षे असल्याने सर्व उद्योग धंदे मुंबई/महाराष्ट्रातून इतरत्र स्थलांतरित होत आहेत असे ऐकतो. त्यामुळे आता मुंबईतील गर्दी लवकरच कमी होणार आहे. इतकी वर्षे ठाकरे प्रभृती हेच तर (परप्रांतीयांचे लोंढे आवरा) सांगत आहेत. ठाकर्‍यांच्या मनाप्रमाणे कार्य करणार्‍या याच सरकारला आणखी पंधरा वीस वर्षे निवडून द्यायला हवे म्हणजे मुंबई ओस पडली की मग मराठी माणसांना तिथे सुखाने राहता येईल. तसेच मुंबईत मराठी माणसांची बहुसंख्या होईल. मग मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायचा विचार कोणी करणार नाही. :)

दिल्ली महाराष्ट्राला काही देत नाही हे जरी खर असल तरी हे साखर सम्राट विदर्भ ,मराठवाडा आणी खांदेशाला महत्व देत नाही हेही तितकेच खरे,ह्यावर खडसेंच विधानसभेत झालेल भाषण ऐकण्या सारख आहे,https://www.facebook.com/photo.php?v=706322732753341

माझा रामदास आठवल्यांवर विश्वास आहे , एकदा का त्यांना केंद्रात खाते पिते खाते मिळाले की ते महाराष्ट्राला कुठच्या कुठे नेतील. मांजरेकर बॉलीवूड मध्ये मराठी कलाकार आरक्षण आणतील.

सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत.http://www.sherv.net/cm/emo/funny/1/stickman-rope-swing-smiley-emoticon.gif

विवेकपटाईत 24/03/2014 - 19:39
महाराष्ट्रात ४८ खासदार निवडून देतो. पण खासदार फक्त दरबारात नाक घासण्यापेक्षा जास्त काही ही करत नाही. दरबारात आणि संसदेत प्रश्न ही करत नाही. शेवटी जोर जोरात रडणार्या मुलाला दूध मिळते. काही तक्रार न करणाऱ्या मुलाला काय मिळेल. उदा: स्वर्णिम चतुर्भूजा बाबत निर्णय सुरु होता, पूर्व-पश्चिम भुजा मुबई- नागपूर रस्ते कलकत्या पर्यंत पोहचायला पाहिजे होती. पण त्या वेळी महाराष्ट्राचे मंत्री, खासदार सर्वच चूप होते आणि संपूर्ण मध्य प्रदेश सरकार मंत्री आणि दिल्लीत लॉबिंग करण्यात व्यस्त होते. परिणाम राजमार्ग मध्यप्रदेश रस्ते गेला. याला केंद्र सरकार काय करणार.

महाराष्ट्राला काही केळं मिळणार नाही मग मोदी पंतप्रधान होवो की राहुलबाबा .... आमचे खासदारच परधार्जिण्या मनोवृत्तीचे हायकमांडचा आदेशाने चालणारे वरुन आला आदेश की बदलला गृहमंत्री ! इतकंच काय तर ....वरुन आला आदेश की बदलला आमचा मुख्यमंत्री ! अहो इतकंच काय तर वरुन आला आदेश की गडकरी जातात अन राजनाथ येतात (आणि हो 'आपले' मोहन भागवत काहीही करु शकत नाहीत . ) एकुणच काय तर मराठी माणसाचा स्वाभिमानाचा कणा मोडला आहे .... दिल्लीतील आज्ञांचे गपगुमान पालन करणे हेच महाराष्ट्राला जमते बस्स "अन दिल्लीचे तख्त फोडतो महाराष्ट्र माझा" पासुन सुरुवात झाली मग "अन दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा " झाले अन सध्या "अन दिल्लीचे पाय चाटतो ....." इथवर येवुन पोहचलो आहोत आपण :(

गेली १४+ वर्षे राज्यात अन १० वर्षे केंद्रात एकाच आघाडीचे सरकार असुनही आपल्या राज्याची प्रगती यथातथाच आहे याबाबत दुमत नाहीच. बाकी मुंबईतून केंद्राला जाणारा कर व राज्याला केंद्राकडून मिळणारा निधी हा घासून गुळगुळीत झालेला मुद्दा अर्थशास्त्रिय निकषांवर किती तकलादू आहे हे मिपावर पूर्वी अनेकदा चर्चिले गेले आहे. त्याखेरीज महाराष्ट्राने थेट परदेशी गुंतवणुकीत आजवर कधीच प्रथम क्रमांक सोडलेला नाही असे आजवरचे वाचन आहे. तुमचे निरिक्षण याविरुद्ध दिसत आहे. कृपया माहितीचा स्रोत सांगावा.

In reply to by श्रीरंग_जोशी

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून जाणारा कर हा मुद्दा एवढा गुळगुळीत झालेला नाही. गुडगाव सारख्या छपरी गावात पालिकेचे पाणी येत नसेल पण मेट्रो झाली आहे. असले अर्थाशात्रीय मुद्दे हे केवळ फसवण्या साठी असतत. मुंबई/पुणे/ नागपूर ला सरळ सरळ डावलले जाते. हा स्त्रोत वाचा. असा लिहिण्याची हिम्मत कशी होते लोकांची…परकीय गुंतवणूक वगेरे विसरा।तो नंबर आपण कधीच गमावून बसलो आहोत…ह्युमन डेव. निर्देशांक पहा…आपन लांब फेकलो गेलो आहोत.प्रश्न कोणाचे सरकार येणार/ कोण चांगले कोण वाईट हा नसून आपल्याला काय मिळणार हा आहे? स्वार्थी/विकासाच्या नजरेतून सांगा.

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून जाणारा कर हा मुद्दा एवढा गुळगुळीत झालेला नाही. गुडगाव सारख्या छपरी गावात पालिकेचे पाणी येत नसेल पण मेट्रो झाली आहे. असले अर्थाशात्रीय मुद्दे हे केवळ फसवण्या साठी असतत. मुंबई/पुणे/ नागपूर ला सरळ सरळ डावलले जाते. हा स्त्रोत वाचा. असा लिहिण्याची हिम्मत कशी होते लोकांची…परकीय गुंतवणूक वगेरे विसरा।तो नंबर आपण कधीच गमावून बसलो आहोत…ह्युमन डेव. निर्देशांक पहा…आपन लांब फेकलो गेलो आहोत.प्रश्न कोणाचे सरकार येणार/ कोण चांगले कोण वाईट हा नसून आपल्याला काय मिळणार हा आहे? स्वार्थी/विकासाच्या नजरेतून सांगा.

In reply to by इरसाल

गुडगावचा बराच भाग हा कुपानालीकेवर अवलंबून आहे. (मी स्वत: तिथे काही वर्ष राहिलो आहे…पण ते जाऊ द्या) मुद्दा हा आहे कि स्थानिक प्रशाशन कितीही फालतू असले तरीही केंद्र सरकारने तिथे एवढा पैसा ओतला आहे…जावयांनी मोठ्या विकासकान बरोबर ते शहर वसवले आहे…तसच पैसा केंद्र सरकार अनेक राज्यात घालत आहे… आपल्याला काय मिळणार? निदान रेल्वे चा जाल तरी मिळू दे. गुडगावच्या मिलेनिअम सिटी चा भाग सोडून जर दुन्दाहेडा, कापसाहेडा, सोहना रोड ला बघा काय अवस्था आहे. मला तरी ते बेताल शहरीकरण म्हणून छपरी वाटले

In reply to by इरसाल

तुमचे मत वेगळे असु शकते. माझी तुलना फक्त केन्द्राने दिलेला निधि किती आणी आपल्य वाट्याला विकास का येत नाहिये यासाठी आहे.

आत्मशून्य 11/03/2014 - 10:45
फक्त पुरेशी विज मिळावी हीच अपेक्षा आहे. मगच विकासाचे वगैरे प्रश्न मार्गी लागतील. पण त्याबाबत कोणीच अवाक्षरही बोलत नाही :(

विटेकर 11/03/2014 - 11:03
महाराष्ट्राचा विकास केंद्र सरकार कसे काय करणार ? तो महाराष्ट्र शासन करणार ना ? मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील मराठी मंत्री असले की महाराष्ट्राचा विकास होतो असा तुमचा समज आहे का? मग आत्ता ही आहेतच की मराठी मंत्री ! का होत नाही विकास? म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही झाला , त्यांच्या पुतण्याचा , लेकीचा आणि त्यापुढील काही पिढ्यांचा दणदणीत विकास झाला आहे !

In reply to by विटेकर

तुमचा थोडा गैरसमज दिसतो. थोडी आधी माहिती देतो. भारताच्या घटने मध्ये ३ याद्या आहेत १) फक्त केंद्राने हाताळायचे विषय(काम) उदा. रेल्वे, सुरक्षा, खाणी, आंतरराष्ट्रीय संबंध वगेरे २) फक्त राज्याने हाताळायचे विषय उदा. इरिगेशन, वने ३) दोघांचा पण अधिकार असणारे विषय ऊदा. रस्ते, धरणे, वीज, उद्योग, जमीन अधिग्रहण वगेरे. जे विषय पूर्ण केंद्राच्या हातात आहेत त्यात महाराष्ट्राचा विकास अतिशय कमी झालेला आहे. जे अधिकार दोघांचे आहेत त्यात केंद्र ठरवते कि कुठे किती पैसे वाटायचे आणि केंद्र या मध्ये भेदभाव करून शकते... नव्हे करते।!!! राज्याच्या हातात जे विषय आहेत तेवढाच विकास आपण करू शकतो. भारतीय राज्य हे लोकशाही आणि प्रबळ केंद्र सरकार असे आहे(Federal structure with strong centre). म्हणून रेल्वे, वगेरे खाती महाराष्ट्र मिळणे महत्वाचे आहे

अपेक्षा हीच आहे कि जर समजा गडकरी मंत्री झाले तर मागे जो रस्त्यांचा विकास झाला तसा खाणी, रेल्वे, शहरी वाहतूक यात दिसेल का? (सामान्य माणसाला वेडी आशा असते).

चिरोटा 11/03/2014 - 11:58
जास्त विकास पाहिजे कशाला? ईतर राज्यांतले लोंढे जास्त येतील व आपल्या सरकारने बनवलेल्या उत्तम सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडेल्.!!(ह्.घ्या.) मंत्रीमंडळात दिसणार्‍या चेहर्‍यांचा आणि विकासाचा संबंध असतोच असे नाही. अन्यथा उ.प्र्.,(पूर्वीचा)बिहारचा केव्हाच विकास झाला असता.
या बाबतीत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवाले जोरात आहेत. कोणाचाही सरकार आला तरी यांच्या राज्यात विकास होताच आहे.
ही दोन्ही राज्ये पाहिली नसतील तर एकदा पाहून या.गेल्या वीस वर्षात कर्नाटक्,आंध्र,तामिळनाडूने बरीच प्रगती केली आहे(प्रगती ह्याचा अर्थ येथे गुंतवणूक असा आहे).कर्नाटक्,आंध्रमधील प्रशासन महाराष्ट्राच्या तुलनेत कमी भ्रष्ट्राचारी आहे असा एकंदरीत अनुभव आहे(विदा,ग्राफ्स्,चार्ट्स,इंडेक्स वगैरे मागू नका.गुंतवणूक करणार्‍या लोकांना विचारा). दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या राज्यांमध्ये होणारी गुंतवणूक सर्वत्र आहे.फक्त राजधानी वा मोठी शहरे ह्यापुरती मर्यादीत नाही. ह्याचा अर्थ महाराष्ट्र मागे पडला वगैरे म्हणायचे का? नाही. ४७-ते २००० ह्या कालात महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झालेली दिसेल. गुंतवणूक करताना जमीन्,पाणी,मनुष्यबळ्,कर,रस्ते हे सगळे विचारात घ्यावे लागते.पायाभूत सुविधा केवळ असून चालत नाही तर त्या परवडणार्‍याही असाव्या लागतात. अशा पायाभूत सुविधांमध्ये ही राज्ये सध्या महाराष्ट्रापुढे आहेत असा अनुभव आहे.

In reply to by चिरोटा

विकास झालाच पाहिजे. मागे पडून चालणार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कि बाकी राज्यांचा विकास झाला आहे. तिथे पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण होत आहेत. माझा मुद्दा हा आहे कि आपल्या मागण्या कोणत्या? त्या एकत्रित करून कोणाचेही सरकार आले तरी त्या मान्य करून घेत आल्या पाहिजेत. एखादा ऑनलाइन फोरम काढून अथवा मि. पा. च्या माध्यमातून दबावगट तयार होऊ शकतो ना…लोण्ढे येतील वगेरे भीतीत काही अर्थ नाही. लोकशाही आयुध वापरूनच ते थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. खळ्ळ खट्याकवाले एकही भैय्याला हाकलू शकत नाहीत. हे आपण कधी समजणार का केवळ लोंढे येतील म्हणून विकास नको हे चुकीचे वाटते.

नितिन थत्ते 11/03/2014 - 22:37
महाराष्ट्रात नाकर्ते सरकार बरीच वर्षे असल्याने सर्व उद्योग धंदे मुंबई/महाराष्ट्रातून इतरत्र स्थलांतरित होत आहेत असे ऐकतो. त्यामुळे आता मुंबईतील गर्दी लवकरच कमी होणार आहे. इतकी वर्षे ठाकरे प्रभृती हेच तर (परप्रांतीयांचे लोंढे आवरा) सांगत आहेत. ठाकर्‍यांच्या मनाप्रमाणे कार्य करणार्‍या याच सरकारला आणखी पंधरा वीस वर्षे निवडून द्यायला हवे म्हणजे मुंबई ओस पडली की मग मराठी माणसांना तिथे सुखाने राहता येईल. तसेच मुंबईत मराठी माणसांची बहुसंख्या होईल. मग मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायचा विचार कोणी करणार नाही. :)

दिल्ली महाराष्ट्राला काही देत नाही हे जरी खर असल तरी हे साखर सम्राट विदर्भ ,मराठवाडा आणी खांदेशाला महत्व देत नाही हेही तितकेच खरे,ह्यावर खडसेंच विधानसभेत झालेल भाषण ऐकण्या सारख आहे,https://www.facebook.com/photo.php?v=706322732753341

माझा रामदास आठवल्यांवर विश्वास आहे , एकदा का त्यांना केंद्रात खाते पिते खाते मिळाले की ते महाराष्ट्राला कुठच्या कुठे नेतील. मांजरेकर बॉलीवूड मध्ये मराठी कलाकार आरक्षण आणतील.

सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत.http://www.sherv.net/cm/emo/funny/1/stickman-rope-swing-smiley-emoticon.gif

विवेकपटाईत 24/03/2014 - 19:39
महाराष्ट्रात ४८ खासदार निवडून देतो. पण खासदार फक्त दरबारात नाक घासण्यापेक्षा जास्त काही ही करत नाही. दरबारात आणि संसदेत प्रश्न ही करत नाही. शेवटी जोर जोरात रडणार्या मुलाला दूध मिळते. काही तक्रार न करणाऱ्या मुलाला काय मिळेल. उदा: स्वर्णिम चतुर्भूजा बाबत निर्णय सुरु होता, पूर्व-पश्चिम भुजा मुबई- नागपूर रस्ते कलकत्या पर्यंत पोहचायला पाहिजे होती. पण त्या वेळी महाराष्ट्राचे मंत्री, खासदार सर्वच चूप होते आणि संपूर्ण मध्य प्रदेश सरकार मंत्री आणि दिल्लीत लॉबिंग करण्यात व्यस्त होते. परिणाम राजमार्ग मध्यप्रदेश रस्ते गेला. याला केंद्र सरकार काय करणार.

महाराष्ट्राला काही केळं मिळणार नाही मग मोदी पंतप्रधान होवो की राहुलबाबा .... आमचे खासदारच परधार्जिण्या मनोवृत्तीचे हायकमांडचा आदेशाने चालणारे वरुन आला आदेश की बदलला गृहमंत्री ! इतकंच काय तर ....वरुन आला आदेश की बदलला आमचा मुख्यमंत्री ! अहो इतकंच काय तर वरुन आला आदेश की गडकरी जातात अन राजनाथ येतात (आणि हो 'आपले' मोहन भागवत काहीही करु शकत नाहीत . ) एकुणच काय तर मराठी माणसाचा स्वाभिमानाचा कणा मोडला आहे .... दिल्लीतील आज्ञांचे गपगुमान पालन करणे हेच महाराष्ट्राला जमते बस्स "अन दिल्लीचे तख्त फोडतो महाराष्ट्र माझा" पासुन सुरुवात झाली मग "अन दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा " झाले अन सध्या "अन दिल्लीचे पाय चाटतो ....." इथवर येवुन पोहचलो आहोत आपण :(

ही ती चित्रे ...

चित्रगुप्त ·

पैसा 10/03/2014 - 19:27
प्रसाद गोडबोलेने कोणतं चित्र घेतलं माहिती नाही. बाकीची दोन्ही चित्रं सध्या वल्लीच्या ताब्यात आहेत. मी येत्या ८ दिवसात पुण्याला जाणार आहे, तेव्हा वल्लीकडून मला पाहिजे ते चित्र घेईन. ;) इतकी सुंदर चित्रं दिल्याबद्दल चित्रगुप्त यांना पुन्हा एकदा धन्यवाद!

सूड 10/03/2014 - 19:32
तिसर्‍या क्रमांकाचं चित्र पाह्यलं आहे. इतर दोन पाहायला मिळाल्याबद्दल बरं वाटलं आणि ज्या तिघांना ती मिळालीयेत त्यांचा हेवा वाटला. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त 10/03/2014 - 20:07
ज्या तिघांना ती मिळालीयेत त्यांचा हेवा वाटला.
चला, तर मग आणखी एकाद्या विषयावर ठेऊया पुन्हा लेखनस्पर्धा.

बॅटमॅन 10/03/2014 - 20:36
क्र. १ व ३ वाली चित्रे जास्त आवडली. क्र. १ चे चित्र द हॉबिट मधील डोल गुल डूरच्या ओसाड किल्ल्याची आठवण करून देतेय. क्र. ३ मध्येही नदीतीराचे चित्रण मस्त वाटले, पण क्र. १ चे चित्र खरेच जास्त आवडले. क्र. २ बद्दल म्हणाल तर तुलनेने इतके अपील झाले नै. पण कमी चितारून जास्त सूचकपणे सांगितले हा प्रकार मला आवडला.

शशिकांत ओक 10/03/2014 - 20:41
चित्रगुप्त, आपण नवनव्या विचारांची व प्रथांची फीत कापून सुरवात करता. त्यावरून एक सुचवावेसे वाटले . पुर्वी जत्रेत, उरुसात काही ठिकाणी 3-5 रिंगा हाता घेऊन समोर ठेवलेल्या हव्या त्या वस्तू मिळवायला त्या लांबून फेकून हस्तगत करायची मुभा असलेला खेळ चाले. त्या धरतीवर आपण काही आपल्या चित्रांचे फोटो आधी मीपा धाग्यावर लाऊन ते हस्तगत करायला प्रवृत्त होतील असे, "सांगा हे सगळं तुम्हाला करायला आवडेल का?" असा काहीसा कल्पनाविलासाला प्रवृत्त करणारा धागा काढून सदस्यांना आवाहन करून स्पर्धेसाठी उतरवावे.... पहा विचार करून...

धन्या 10/03/2014 - 23:16
सुंदर चित्रे. वल्ली आणि गिरीजा काकूंच्या कॄपेने तिसरे चित्र पाहण्याचा योग आला होता. :)

धाग्याचं शीर्षक वाचून कुणी एखादी नवी सीकेपी नटी आलीये की काय असं वाटून धागा उघडला! असो. ही "चित्रे"ही छान आहेत! आवडली!!!! :)

चौकटराजा 11/03/2014 - 10:29
पहिले चित्र हे तुंग किल्याचे उत्तरेकडून पाहिलेले वाटते आहे. तिसरे चित्र दुधीवरे खिंडीचे दक्षिणेकडून पाहिलेले वाटते आहे.

कंस 13/03/2014 - 00:41
अप्रतीम चित्रे !! नं१ आणी नं ३ कशी पेंट केली असावीत ह्या विचारात पडलोय.

पैसा 10/03/2014 - 19:27
प्रसाद गोडबोलेने कोणतं चित्र घेतलं माहिती नाही. बाकीची दोन्ही चित्रं सध्या वल्लीच्या ताब्यात आहेत. मी येत्या ८ दिवसात पुण्याला जाणार आहे, तेव्हा वल्लीकडून मला पाहिजे ते चित्र घेईन. ;) इतकी सुंदर चित्रं दिल्याबद्दल चित्रगुप्त यांना पुन्हा एकदा धन्यवाद!

सूड 10/03/2014 - 19:32
तिसर्‍या क्रमांकाचं चित्र पाह्यलं आहे. इतर दोन पाहायला मिळाल्याबद्दल बरं वाटलं आणि ज्या तिघांना ती मिळालीयेत त्यांचा हेवा वाटला. ;)

In reply to by सूड

चित्रगुप्त 10/03/2014 - 20:07
ज्या तिघांना ती मिळालीयेत त्यांचा हेवा वाटला.
चला, तर मग आणखी एकाद्या विषयावर ठेऊया पुन्हा लेखनस्पर्धा.

बॅटमॅन 10/03/2014 - 20:36
क्र. १ व ३ वाली चित्रे जास्त आवडली. क्र. १ चे चित्र द हॉबिट मधील डोल गुल डूरच्या ओसाड किल्ल्याची आठवण करून देतेय. क्र. ३ मध्येही नदीतीराचे चित्रण मस्त वाटले, पण क्र. १ चे चित्र खरेच जास्त आवडले. क्र. २ बद्दल म्हणाल तर तुलनेने इतके अपील झाले नै. पण कमी चितारून जास्त सूचकपणे सांगितले हा प्रकार मला आवडला.

शशिकांत ओक 10/03/2014 - 20:41
चित्रगुप्त, आपण नवनव्या विचारांची व प्रथांची फीत कापून सुरवात करता. त्यावरून एक सुचवावेसे वाटले . पुर्वी जत्रेत, उरुसात काही ठिकाणी 3-5 रिंगा हाता घेऊन समोर ठेवलेल्या हव्या त्या वस्तू मिळवायला त्या लांबून फेकून हस्तगत करायची मुभा असलेला खेळ चाले. त्या धरतीवर आपण काही आपल्या चित्रांचे फोटो आधी मीपा धाग्यावर लाऊन ते हस्तगत करायला प्रवृत्त होतील असे, "सांगा हे सगळं तुम्हाला करायला आवडेल का?" असा काहीसा कल्पनाविलासाला प्रवृत्त करणारा धागा काढून सदस्यांना आवाहन करून स्पर्धेसाठी उतरवावे.... पहा विचार करून...

धन्या 10/03/2014 - 23:16
सुंदर चित्रे. वल्ली आणि गिरीजा काकूंच्या कॄपेने तिसरे चित्र पाहण्याचा योग आला होता. :)

धाग्याचं शीर्षक वाचून कुणी एखादी नवी सीकेपी नटी आलीये की काय असं वाटून धागा उघडला! असो. ही "चित्रे"ही छान आहेत! आवडली!!!! :)

चौकटराजा 11/03/2014 - 10:29
पहिले चित्र हे तुंग किल्याचे उत्तरेकडून पाहिलेले वाटते आहे. तिसरे चित्र दुधीवरे खिंडीचे दक्षिणेकडून पाहिलेले वाटते आहे.

कंस 13/03/2014 - 00:41
अप्रतीम चित्रे !! नं१ आणी नं ३ कशी पेंट केली असावीत ह्या विचारात पडलोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही काळापूर्वी मिपाकरांसाठी 'सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र' नावाची एक लेखन स्पर्धा मी जाहीर केली होती, त्याला मिपाकरांनी उत्तम प्रतिसाद दिला, आणि पैसा, वल्ली आणि प्रसाद गोडबोले, यांना एकेक चित्र भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तीन चित्रे एकत्रित पाठवली, ती सर्वांना बघायला मिळावीत म्हणून इथे देतो आहे. यापैकी कोणते चित्र कोणी घेतले ? कळवावे.

टाईमपास

बबन ताम्बे ·

संपत 11/03/2014 - 13:16
लेख उत्तम वगैरे सालं नेहमीचे झाले. हे वाचून बऱ्याच दिवसांनी नाक्यावर उभा राहून टाईमपास करतोय असे वाटले. जीवाला थंड वाटले. पुल वगैरे लाडके लेखक खरे, पण आपला वाटणारा लेखक म्हणजे भाऊ पाध्ये. तुमचा लेख वाचून तसेच वाटले. असेच लेख येवू द्यात.

In reply to by संपत

बबन ताम्बे 11/03/2014 - 14:33
श्री. संपत राव. पु.ल. हे तर महाराष्ट्राचं दैवत आणि भाऊ पाध्ये माझेही अतिशय आवडते लेखक आहेत. आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद !

आसिफ 21/03/2014 - 22:32
वाकड-हिंजवडी गावठाणाच्या कट्ट्यावर बसल्यासारखे वाटले. बाकी यांचे कुठेही भररस्त्यात गाडी थांबवुन पिचकार्‍या मारणे,गाडीत बसुन दारु पिणे, उगाच कुणालाही शिवीगाळ करणे, भर वेगात गर्दीतुन वेडी वाकडी करत गाडी दामटणे सुरु आहेच. ~ आसिफ.

In reply to by बबन ताम्बे

ब़जरबट्टू 09/04/2014 - 09:26
हेच म्हणायला आल्तो बघा.. च्यामारी ते हिन्जेवाडीच्या चैकातले पोस्टूर पाहुन डोक्तातच जाते.,.. च्यामायला... :)

In reply to by ब़जरबट्टू

बबन ताम्बे 09/04/2014 - 10:56
त्यापेक्षा तुम्ही येरवडा, वड्गाव शेरी इकडे चक्कर मारा. एव्ह्ढा अंगावर सोन्याचा भार सोसुन "आमचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान वगैरे..." फोटोसाठी उभी कसे काय राहीले हा प्रश्न पडावा.

चौथा कोनाडा 09/04/2014 - 09:02
बबन ताम्बे, टाईमपास छान जमलाय. छान बोले ती एकदम झकास ! आवडेश बरयाच दिवसांनी जरा चमचमीत वाचलं ! वाचताना डोळ्यापुढे चित्र उभे राहिले. विविध पात्रे म्हंजे एक-एक नमुना दिसतोय. उत्कृष्ट निरिक्षणामुळे छान मेळ साधलाय! प्रसंगांचे वर्णन मस्त ! “तारक मेहताका उल्टा चष्मा” किंवा “नुक्कड” सारखी छान मालिका होऊ शकेल. दाबेलीची गाडी लावता येणे" अशी ईच्छा असलेल्या हिरो गित्याची " असाच टाईमपास करत दिवस घालवायचे" असा प्रश्न टाकून पुढील लेखाची देखील तुमी सोय करून ठेवलेली दिसतेय …. . . . . मग कधी टाकताय पुढचा भाग?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 09/04/2014 - 10:48
श्री. चौथा कोनाडा , अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद. मालीकेबद्दल आत्ताच काही सांगता येणार नही. :-) पुढचा भाग लवकरच येईल मि.पा. वर. पुन्हा एकदा थँक यु. आपला, बबन तांबे

In reply to by ब़जरबट्टू

बबन ताम्बे 09/04/2014 - 10:50
श्री. ब़जरबट्टू, धन्यवाद. अ‍ॅक्चुली, सर्व मि. पा.च्या वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपला, बबन तांबे

संपत 11/03/2014 - 13:16
लेख उत्तम वगैरे सालं नेहमीचे झाले. हे वाचून बऱ्याच दिवसांनी नाक्यावर उभा राहून टाईमपास करतोय असे वाटले. जीवाला थंड वाटले. पुल वगैरे लाडके लेखक खरे, पण आपला वाटणारा लेखक म्हणजे भाऊ पाध्ये. तुमचा लेख वाचून तसेच वाटले. असेच लेख येवू द्यात.

In reply to by संपत

बबन ताम्बे 11/03/2014 - 14:33
श्री. संपत राव. पु.ल. हे तर महाराष्ट्राचं दैवत आणि भाऊ पाध्ये माझेही अतिशय आवडते लेखक आहेत. आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद !

आसिफ 21/03/2014 - 22:32
वाकड-हिंजवडी गावठाणाच्या कट्ट्यावर बसल्यासारखे वाटले. बाकी यांचे कुठेही भररस्त्यात गाडी थांबवुन पिचकार्‍या मारणे,गाडीत बसुन दारु पिणे, उगाच कुणालाही शिवीगाळ करणे, भर वेगात गर्दीतुन वेडी वाकडी करत गाडी दामटणे सुरु आहेच. ~ आसिफ.

In reply to by बबन ताम्बे

ब़जरबट्टू 09/04/2014 - 09:26
हेच म्हणायला आल्तो बघा.. च्यामारी ते हिन्जेवाडीच्या चैकातले पोस्टूर पाहुन डोक्तातच जाते.,.. च्यामायला... :)

In reply to by ब़जरबट्टू

बबन ताम्बे 09/04/2014 - 10:56
त्यापेक्षा तुम्ही येरवडा, वड्गाव शेरी इकडे चक्कर मारा. एव्ह्ढा अंगावर सोन्याचा भार सोसुन "आमचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान वगैरे..." फोटोसाठी उभी कसे काय राहीले हा प्रश्न पडावा.

चौथा कोनाडा 09/04/2014 - 09:02
बबन ताम्बे, टाईमपास छान जमलाय. छान बोले ती एकदम झकास ! आवडेश बरयाच दिवसांनी जरा चमचमीत वाचलं ! वाचताना डोळ्यापुढे चित्र उभे राहिले. विविध पात्रे म्हंजे एक-एक नमुना दिसतोय. उत्कृष्ट निरिक्षणामुळे छान मेळ साधलाय! प्रसंगांचे वर्णन मस्त ! “तारक मेहताका उल्टा चष्मा” किंवा “नुक्कड” सारखी छान मालिका होऊ शकेल. दाबेलीची गाडी लावता येणे" अशी ईच्छा असलेल्या हिरो गित्याची " असाच टाईमपास करत दिवस घालवायचे" असा प्रश्न टाकून पुढील लेखाची देखील तुमी सोय करून ठेवलेली दिसतेय …. . . . . मग कधी टाकताय पुढचा भाग?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 09/04/2014 - 10:48
श्री. चौथा कोनाडा , अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद. मालीकेबद्दल आत्ताच काही सांगता येणार नही. :-) पुढचा भाग लवकरच येईल मि.पा. वर. पुन्हा एकदा थँक यु. आपला, बबन तांबे

In reply to by ब़जरबट्टू

बबन ताम्बे 09/04/2014 - 10:50
श्री. ब़जरबट्टू, धन्यवाद. अ‍ॅक्चुली, सर्व मि. पा.च्या वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपला, बबन तांबे
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता

माहितगार ·
वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे.

घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत

प्रचेतस ·

कंजूस 10/03/2014 - 10:16
फारच छान झाला कार्यक्रम .वल्ली च्या माहितीमुळे लेणी नीट समजली .पुन्हा कधी गेल्यावर हा लेख उपयोगी पडणारच आहे . आता दरवर्षी एकदा कार्ले भाजे कट्टा होऊ द्या .

सौंदाळा 10/03/2014 - 10:28
सुंदर. वल्ली पुस्तक काढच, तुझे सर्व लेख संग्रहित करुन. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्या-त्या ठिकाणचे पुस्तक घेण्यापेक्षा एकच पुस्तक हँडी होईल एकदम.

सूड 10/03/2014 - 10:47
>>आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे. इथे पति हवंय का?

बॅटमॅन 10/03/2014 - 10:59
वाह!!! अप्रतिम झालेय घारापुरीदर्शन. भग्नावस्थेतही शिल्पे अतीव देखणी आहेत- विशेषतः अंधकासुरवध, अर्धनारीनटेश्वर आणि गंगावतरण ही शिल्पे. अंधकासुरवधाचे शिल्प वेरूळच्या शिल्पाशी एकदम पर्फेक्ट म्याच होतेय. दोन्ही शिल्पे कोरणारा एकच कारागीर असेल की काय असे वाटतेय खरेच. अन वल्लीदृष्टी म्हणजे काय ते असे लेख वाचून नीटच समजते. यावरून एक कल्पना डोक्यात आली, ती म्ह. शक्यतोवर सगळीकडे हे कशाचे/कुणाचे शिल्प आहे याची माहिती देणारा फलक लावला तर बाकी आमच्यासारख्या अज्ञजनांना अधिक नेमकेपणे आस्वाद घेता येईल. नैतर आम्ही काय, कोरलंय कैतरी मस्त इतकेच बोलणार.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 10/03/2014 - 18:01
धन्स रे. अंधकासुरवधाचे शिल्प बहुधा बर्‍याच ठिकाणी एकाच धाटणीचे दिसते. अर्थात वेरूळ आणि घारापुरीतील शिल्प बरेच सारखे आहे पण वेरूळ येथील लेणी ही राष्ट्रकूटांची निर्मिती पण घारापुरीचा निर्माता शिलालेखाअभावी अज्ञातच आहे. बरेचसे अभ्यासक हे घारापुरीचे लेणी वेरूळच्या धुमार लेणीच्या आधीची मानतात.

इरसाल 10/03/2014 - 11:11
अप्रतिम सुंदर, मस्त अजुन काय बोलणार. फक्त हे " आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे." बदलता का ?

वाचनखूण साठवली आहे. सुंदर माहीती पुर्ण लेख. @आतिवास:- या लेखाची प्रत जवळ ठेवून आता लेणी पाहायला जाईन!>> अगदि हेच म्हणतोय. या कोरीव लेण्यांना वल्लीदृष्टी लाभल्यानेच आज त्यांचे महत्व कळले.

शशिकांत ओक 10/03/2014 - 12:24
वल्ली, आपल्या समावेत पाहिलेली लेणी हीच का असा प्रश्न पडावा असा आपला धागा अर्थ पूर्ण माहिती व सूक्ष्म निरीक्षणाने नटला आहे. त्यात विविधांगी छायाचित्रांमुळे कथा भाग व शिल्पातील भावभंगिमांचे मनोहारी दर्शन घारापुरच्या लेण्यापहायला पुन्हापुन्हा जाऊन आल्याचे समाधान व आत्मिक आनंद देतो. आपल्या मूर्ति शास्त्र व मंदिर - लेण्यांचा गहन अभ्यास व सुयोग्य भारदस्त भाषेतील मांडणीने धागा आभूषणांनी सजलेल्या ललनेसमान भासतो... पुढील काळात असेच धागे काढून माहितीची गंगा मिपावर उतरू दे...

पैसा 10/03/2014 - 12:25
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर छायाचित्रांनी नटलेला लेख. मस्तच! गोव्याचा इतिहास अभ्यासल्यामुळे मी पोर्तुगीजांचा पुरेपूर द्वेष करते. आता या लेण्यांच्या विध्वंसाबद्दल वाचून तर पोर्तुगीज या शब्दाबद्दल राग येतो आहे! शिल्पकारांनी एकेक शिल्प कोरायला वर्षानुवर्षे घालवली असतील, आणि एका एका बंदुकीच्या गोळीने त्याचा क्षणात नाश? आग लागो त्या पोर्तुगालला. सराव करायला आणखी काहीच शिल्लक नव्हते काय हलकटांना?

In reply to by पैसा

अशी भग्न लेणी पाहिली की खरोखर मन विषण्ण होते. पण पुरातत्व खात्याच्या मदतीने कोणी यांना पुर्ववत करायचा प्रयत्न का करत नसावे? विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. जिथे नैसर्गीक झिज होत आहे ती रोखण्या साठी होणारे प्रयत्न दिसतात. भग्न मुर्तींबाबत काही करता येणार नाही का? उदा. ज्या मुर्तीचे हात नसतील तीथे साधारण अंदाजाने नवे हात बनवुन जोडता येणार नाही का? तसेच लेण्याच्या इतर भग्न भागांबद्दल. उपलब्ध मुळ रचनेत कोणताही बदल न करता.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 10/03/2014 - 17:58
किमान अजिंठ्यामध्येही तरी असा प्रयत्न होतोय. जयंतकाकांनी ह्या लेखात वर्णिल्याप्रमाणे पुरातत्व खात्याचे श्री. वसंत पगारे हे जीर्णोद्धाराचे काम मोठ्या आत्मीयतेने करत आहेत.

In reply to by प्यारे१

वरच्या सगळ्यांशी सहमत
ह्यास 100 वेळा अजुन सहमत हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत , वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!! रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!! संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय !!! मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली.... सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!

असा प्रश्र्न आमच्या एका मित्राने विचारला होता. त्याला आता हा लेख दाखवतो. बादवे, श्री.वल्ली हे शिल्पांच्या बाबतीत , शेरलॉक होम्सला, पण मागे टाकतील. एखाद्या दगडाच्या उंचवट्या वरून पण ते बरेच काही सांगू शकतात. मी आत्ता पर्यंत बरेच कट्टे केले, पण रामदास आणि वल्ली, यांच्या बरोबर फिरता कट्टा केला की बरेच काही तरी नक्की समजते. वल्ली आणि संपादक मंडळींना जाहीर विनंती, की हे असेच फिरते कट्टे दर ४ महिन्यांनी एकदा तरी होवू द्यात.

शशिकांत ओक 10/03/2014 - 13:06
दोन्ही हात वरकरून,अश्रुपूर्ण नयनांनी मनातल्या मनात प्रार्थना करत करत म्हणतोय... हे अद्वितीय कलाकारांनो, माझ्याकडून आपल्या कष्टांचा. कलेाचा घोर अपमान झाला आहे. अनेकविध हातांच्या, अविरत श्रमांच्या, असंख्य रात्रंदिनांच्या कार्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला जे कोणी जन येतील त्यासर्वांचे दूषणांकृत तळतळाट ऐकून माझ्याकडून झालेल्या घोर दुष्ट कृत्याच्या मला अपराध बोध माझे ह्रदय भग्न करतेय. वास्तूच्या विद्रूपीकरणाला माझ्याकडून पडलेल्या प्रत्येक घावाची आठवण मला एक मानव म्हणून लज्जित करतेय...

पुन्हा लेणी दर्शनाचा आनंद मिळाला. आणि तो शांतपणे घेता आला. कारण, तिथे लेण्यात असलेली वर्दळ..वल्ली समजाऊन सांगत असताना... त्या शिल्पपटांसह फोटो काढून घेणार्‍यांची पळापळ..यामुळे या माहितीचा नीट आस्वाद मिळाला नव्हता...(मला आपले ते रावणानुग्रह शिवमूर्ती आणि शांकर पार्वती विवाह सोहळा..हेच बर्‍यापैकी लक्षात राहिले होते.) आता इथे नीट "रवंथ" करायला मिळाल्यानी वाचता वाचता समाधी लागते आहे... __/\__ ====================================================== @ही मूर्ती प्रचंड मोठी आहे. इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दृश्य तिन्ही मुखे शिवाच्या चेहर्‍यावरील तीन वेगळे भाव दाखवतात. डावीकडचे अघोर मुख, मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते.>>> ही अजुन एक संगती लागली.आमच्या भस्मधारणाच्या विधिमधे, हे पाच नाम-देवता-मंत्र आलेले आहेत. मान्स्तोके ह्या मंत्रानी भस्म हतात घेऊन पाणिमिश्रीत करून ह्यातल्या एकेका मंत्रानी ते शरीराला(अवयवांना) लावतात. १)ईशानः सर्व विद्या नामिश्वरः सर्व भूतानां,ब्रम्हाधिपति: ब्रम्हणोधिपति: ब्रम्हा-शिवो..मे..अस्तु..सदा..शिवो..म्। -(शिरसी) २)तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धिमही। तन्नो रुद्रः प्रचोदयात्। - (मुखे) ३)अघोरेभ्यो थगोरेभ्यो घोर..घोर..तरेभ्यः। सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः॥ - (हृदये) ४)वामदेवाय नमोज्येष्ठाय...नमः श्रेष्ठाय..नमो रुद्राय..नमः कालाय..नमः कलविकरणाय..नमो बलाय..नमो बलप्रमथनाय..नमः सर्वभूतदमनाय..नमो मनोन्-मनाय नमः। - (गुह्ये..अपउपस्पृश्य) ५)सद्योजातंप्रपद्यामी सद्योजायाय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्ममां भवोद्भवाय नमः। - (पादयो:) =========== हे मुद्दाम इथे देण्याचं कारण म्हणजे जेंव्हा जेंव्हा आंम्ही अश्या लेण्या/मंदिरं पहायला जातो..तेंव्हा वल्ली माहिती सांगत असताना,माझं त्यातल्या देवदैवतांच्या नामोल्लेखांवर बारीक लक्ष असतं. नाव ऐकली की मला मंत्र आणि काहि धर्मविधींमधले संदर्भ अठवतात.. लागत जातात. ( आणि हे मला दुसरीकडे कुठ्ठेही शोधुनपण मिळालेलं नाही.) याचाच मला झालेला सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे पाटेश्वरातली अग्निची धार्मिक मंत्र वर्णनाबरहुकुम केलेली जगातली एकमेव मूर्ती.. आंम्ही लग्गेच तिथेच--- वल्ली माहिती सांगणार आणि मी मंत्राच्या तुकड्यांसह स्पष्टीकरण कराणार..अशी व्हिडिओ फीत तयार केली. त्यामुळे वल्लीबरोबर (माहिती काढत..त्याला बोलवत..) फिरल्यानी काय काय हाती लागेल..ते सांगता येणे शक्य नाही! :) अतिशय सुंदर स्पष्टीकरणांसह असलेल्या (आणखि एका) धाग्याबद्दल वल्लींचे पुन्हा एकवार आभार.

In reply to by आत्मशून्य

@न्यास ? >>> =)) अरे आत्म शून्या.. ते प्रकरण न्यासा'चे नाही.. भस्मास शरीरावर धारण करीतेवेळी वरील प्रत्येक मंत्र म्हणत हाताने भस्म त्या त्या ठिकाणी लावावयाचे असते रे. :D असो..आणखि स्पष्टीकरणास खरडवहीत भेट रे महामानवा.. :D येथे अवांतर नको. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य 10/03/2014 - 16:46
विवीध गोष्टी सुरु करताना न्यास करुन शरीराच्या त्या त्या भागामधे देवतेची स्थापना केली जाते त्यावेळी असेच मंत्रोच्चार व क्रिया असतात. खवत भेटा!.

कंजूस 10/03/2014 - 14:51
पोतृगिजांनी निशाणेबाजीसाठी मूर्तीँचा उपयोग केला परंतु त्रिमूर्तीवर काहीच खूण नाही .त्या शिल्पाला घाबरले की काय ? बैटमन ,फलक लावायची सुचना आवडली .खरं म्हणजे कर्नाटकात सर्व ठिकाणी खात्याने फलक लावले आहेत .इकडचे गंजतात काय ? (चुकलेला शब्द दुरूस्ती/ संपादनची कळ कुठे आहे ?प्रतिसादपण संपादन करता येतो का ?)

अप्रतिम माहिती आणि फोटो ! वाचनखूण साठवली आहे. घारापूरीला जाताना प्रिंटआऊट घेऊन जाणे आवश्यक आहे !! हा कट्टा चुकल्याची हळहळ वाटत आहे हेवेसांन. :(

भाते 10/03/2014 - 16:10
का, हा कट्टा मी मिस केला? या कट्टयापेक्षा हापिस महत्वाचे होते का मला? 'दाताची ट्रीटमेंट' हे कारण मला आधी का सुचले नाही?

In reply to by सूड

भाते 11/03/2014 - 13:48
'दाताची ट्रीटमेंट' हा तुम्ही आणि मोदक यांनी मिपाला बहाल केलेला वाकप्रचार मला माहित नाही असे मी म्हणालो तर सगळे मिपाकर 'अरे ये पी.एस.पी.ओ. नही जानता' किंवा 'नया है वह' म्हणुन बोंब मारतील.

तसं पाहिलं तर निव्वळ एक गुफा ...पण वल्ली माहिती देत असल्याने त्या एका गुहेतील चित्रे समजुन घेण्याचा अनुभवही इतका संदर होता की बस्स ! मजा आला !! वल्ली चे विशेष आभार ! अवांतर : मला आत्ता असे वाटले की वल्लींबरोबर घारापुरीची एक गुहा पाहताना समजुन घेताना इतका वेळ लागला ...कधी अजंठा वेरुळ करायचे असल्यास टेन्ट घेवुन जावे .. २ -३ दिवस लेण्यांमध्ये स्टे करावा लागेल इतकी माहीती आहे ह्या वल्ली कडे एकेका शिल्पा बाबत !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सह्याद्री , डोंगर दर्‍या घाटवाटा लेण्या असे परत वाचत असताना हा लेख परत दिसला ! कसला योगायोग आहे राव , आज करेक्ट तब्बल चार वर्षं झाली ह्या ट्रिपला ! हा माझा मिपाकरांसोबतची बहुतेक पहिलाच कट्टा होता! एकदा वेव्हलेन्ठ जुळली की दोस्ती जमते ! ह्या नंतर मिपाकरांसोबत कित्येक ट्रेक ट्रिप झाल्या त्या सार्‍या आठवल्या एकदम ... भरपावसात महाबळेश्वर , ताम्हीणी, भीमाशंकर , निर्हेतुक केलेल्या मावळातील भटकंत्या , अर्धवट राहुन गेलेला तोरणा , आरामसे केलेला राजगड , किसनाचा फेवरेट ट्रेक कोरीगड , वल्लीसरांनी आवर्जुन दाखवलेल्या सर्व लेण्या वेरुळ , भुलेश्वर , खिद्रापुर , मग मित्रांच्या लग्नाच्या निमित्ताने झालेल्या ट्रिपा मिरज ... गोवा !! सगळे आठवले हे ह्या एका लेखाच्या निमित्ताने !! मजा आली !!

In reply to by प्रसाद गोडबोले

किसन शिंदे 12/03/2018 - 13:40
सह्याद्रीच्या ऐन माथ्यावर एका मिपाकरावर देवाची अवकृपा झाली अन् पाण्याच्या बाटल्या मिळाल्या नाहीत, आणि म्हणून बियरच्या काळ्या पिशव्यांनी केलेला जुगाडही यानिमित्ताने आठवला. =))

चौकटराजा 10/03/2014 - 19:11
माहिती व फोटो.यांचा सुरेख संगम म्हणून हा लेख बर्‍याच जणांसाठी वाचनखूण होणार. काही शिल्पे भग्न झालेली आहेत हे खरे पण तरीही काहीतरी अर्थ सांगणारी अशी आहेत.वल्लीनी त्याचा संगतवार आढावा घेतलेला आहे. मस्करी मोड ऑन- १२० रूपयात ३० अधिक टाकून वयस्क रसिक मंडळीना काही फायदा होतो का ? त्या सीगल्याचा फोटो चांगला आलाय पण त्यावरील " मंडळाचा" फोटो काढताना फ्लॅश मारला असता तर त्याचा उपयोग सिनेमातील रिफ्लेक्टर सारखा झाला आता. " मंडळाचे" पदाधिकारी अधिक स्पष्ट दिसले असते. मस्करी मोड ऑफ या सहलीला ओक काका आले त्यातून मिपावर टीका निरागस पणे स्वीकारणारी माणसे आहेत.हे दिसून येते. धाग्यावरील मस्ती, कुस्तीवेगळी कट्यातील दोस्ती वेगळी हे यातून दिसून येते. या बद्द्ल श ओ याना धन्यवाद !

In reply to by चौकटराजा

शशिकांत ओक 14/03/2014 - 12:21
अधिकारी व्यक्ती समावेत असेल तर अशा वास्तूंचा कला आस्वाद घ्यायला एक वेगळा आनंद मिळतो. आसपासचा कलकलाट, बाष्कळ गप्पा यासोडून काही जे पदरात पडले, ते वल्लींच्या कॅमेऱ्याच्या नजरे टिपून त्यातील सौंदर्यमर्मे लेखणीतून दाखवून त्या सहलीचा आनंद द्विगुणीत झाला. पैजारांनी व्यक्त केलेली मुर्तीभंगाची हळहळ 'भग्न ह्रदय' मधून वर व्यक्त केली गेली ती आपण वाचली असेल...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 14/04/2025 - 23:00
हा कट्टा २० पेक्षा जास्त सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. वल्लींच्या नजरेतून पाषाणातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही सुखद गोष्ट आहे. पुन्हा एकदा फोटो पाहून आठवणींना उजाळा मिळाला.

सुहास झेले 10/03/2014 - 19:38
वल्लीसाहेब, दंडवत.. काय ते बारकावे रे. जबरदस्त लिहिलंय...परत जायचंय इथे, अर्थात तू सोबत असायला हवास :) :)

In reply to by धन्या

प्रचेतस 11/03/2014 - 10:31
:) रस्त्यावरचे उघडेबोडके डोंगर आणि कातळात निर्माण केलेली शिल्पे हे तुला सारखेच वाटत असताना तू आमच्याबरोबर येतोस हेच महत्वाचे आहे. :)

In reply to by प्रचेतस

स्पा 11/03/2014 - 11:34
धन्या आणि त्याचा भाचा बिचारे कडेला कोपर्यात बसलेले होते , भाचा साबणाचे फुगे उडवत होता, धन्य कुठल्यातरी तत्वज्ञानात हरवलेला होता आणि आम्ही भाचाचे फटू काढत होतो :)

घारापुरीला सहलीनिमित्त अनेकदा गेलो आहे. पण प्रत्येक वेळी सोबत हिरवळ असल्यामुळे सारे लक्ष हिरवळीवर असे. चित्रे पाहतांना प्रथम त्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. लेण्यातील अर्ध-अंधारात बारकावे दिसले नव्हते. अंधकासुर, कल्याणसुंदरम आणि गंगावतरण रसपूर्ण वाटले. पुराणातल्या कथांसह लेखातून लेणी वाचतांना वेळ कसा गेला कळलेही नाही. वाटले अंधकासुर वध डोळ्यासमोर घडतो आहे, इतके प्रत्ययकारी आहे. नुकताच यूटीव्ही वर्ल्डमूव्ही वर एक मूकपट पाहिला. त्यात एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला काही फोटो दाखवीत असते. पण ते सर्व फोटो ही चलत्चित्रेच असतात. तसा काहीसा प्रत्यय आला. लेख अदभुतच आहे. अत्रुप्त आत्मा यांनी उद्धृत केलेल्या वचनांनी जास्तच मजा आली. तू-नळीची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. पोर्तुगीजांबद्दल पैसाताईंची प्रतिक्रिया जशी झाली तश्शीच आता माझी झाली. बामयान बुद्धाची मुर्ती तालिबान्यांनी फोडली तेव्हाही तसेच वाटले. धन्यवाद.

किसन शिंदे 14/03/2014 - 10:33
ह्या लेण्यांच्या प्रांगणातच पूर्वी भव्य असे दोन दगडी हत्ती होते त्यावरूनच पोर्तुगीजांनी ह्या बेटाला 'एलेफंटा' असे नाव दिले. ह्यातील एक हत्ती आज पूर्णपणे नष्ट झालाय तर दुसरा हत्ती मुंबैतल्या कुठल्यातरी बागेत आहे.
हे वाचलं आणि लगेच राणीच्या बागेत भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बाजूला ठेवलेला प्रचंड मोठा दगडी हत्ती आठवला. मला वाटतं तो हत्ती नक्कीच एलिफंटा इथला असावा. पुढे मागे कधीतरी गोर्‍यांनी त्याला राणीच्या बागेत आणून टाकले असावे असा अंदाज आहे. बाकी वल्ल्याच्या या माहितीपूर्ण लिखानाबद्दल प्रत्येक वेळा तेच तेच काय बोलायचे? :) याच्याबरोबर फिरण्याचा एक चांगला फायदा असा झाला की, अशा ठिकाणी सहकुटूंब फिरायला गेल्यानंतर त्यांच्या मनातल्या शंकांना आता मला व्यवस्थित उत्तरे देता येऊ लागलीत. :)

सस्नेह 15/03/2014 - 12:20
नयनरम्य लेणी अन व वल्लीचे कथन म्हणजे दुग्धशर्करा योग. शिवाची मुर्तीरूपे शिल्पांमध्ये दुर्मिळ आहेत. सहसा लिंगच असते. ही शिवाची विविध मुर्तीरूपे म्हणजे खरोखर डोळ्यांना पर्वणीच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मिपावल्ली
शब्द लाइकण्यात येत आहे. काय आहे ना,की मुळात वल्ली हाच शब्द चांगला आहे . पण ... एकदा का माणसे प्र चेतसू लागाली, की... https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतसबरोबर लेणी पाहताना त्या दगडांनाही कंठ फुटतो आणि तेही बोलायला लागतात.. अलीकडेच भाजे लेणी कट्ट्यामध्ये याचा अनुभव आला आहे. @प्रचेतस : मग आता अजिंठा-वेरूळ कधी? वाट पाहतो आहे.

कंजूस 10/03/2014 - 10:16
फारच छान झाला कार्यक्रम .वल्ली च्या माहितीमुळे लेणी नीट समजली .पुन्हा कधी गेल्यावर हा लेख उपयोगी पडणारच आहे . आता दरवर्षी एकदा कार्ले भाजे कट्टा होऊ द्या .

सौंदाळा 10/03/2014 - 10:28
सुंदर. वल्ली पुस्तक काढच, तुझे सर्व लेख संग्रहित करुन. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्या-त्या ठिकाणचे पुस्तक घेण्यापेक्षा एकच पुस्तक हँडी होईल एकदम.

सूड 10/03/2014 - 10:47
>>आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे. इथे पति हवंय का?

बॅटमॅन 10/03/2014 - 10:59
वाह!!! अप्रतिम झालेय घारापुरीदर्शन. भग्नावस्थेतही शिल्पे अतीव देखणी आहेत- विशेषतः अंधकासुरवध, अर्धनारीनटेश्वर आणि गंगावतरण ही शिल्पे. अंधकासुरवधाचे शिल्प वेरूळच्या शिल्पाशी एकदम पर्फेक्ट म्याच होतेय. दोन्ही शिल्पे कोरणारा एकच कारागीर असेल की काय असे वाटतेय खरेच. अन वल्लीदृष्टी म्हणजे काय ते असे लेख वाचून नीटच समजते. यावरून एक कल्पना डोक्यात आली, ती म्ह. शक्यतोवर सगळीकडे हे कशाचे/कुणाचे शिल्प आहे याची माहिती देणारा फलक लावला तर बाकी आमच्यासारख्या अज्ञजनांना अधिक नेमकेपणे आस्वाद घेता येईल. नैतर आम्ही काय, कोरलंय कैतरी मस्त इतकेच बोलणार.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 10/03/2014 - 18:01
धन्स रे. अंधकासुरवधाचे शिल्प बहुधा बर्‍याच ठिकाणी एकाच धाटणीचे दिसते. अर्थात वेरूळ आणि घारापुरीतील शिल्प बरेच सारखे आहे पण वेरूळ येथील लेणी ही राष्ट्रकूटांची निर्मिती पण घारापुरीचा निर्माता शिलालेखाअभावी अज्ञातच आहे. बरेचसे अभ्यासक हे घारापुरीचे लेणी वेरूळच्या धुमार लेणीच्या आधीची मानतात.

इरसाल 10/03/2014 - 11:11
अप्रतिम सुंदर, मस्त अजुन काय बोलणार. फक्त हे " आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे." बदलता का ?

वाचनखूण साठवली आहे. सुंदर माहीती पुर्ण लेख. @आतिवास:- या लेखाची प्रत जवळ ठेवून आता लेणी पाहायला जाईन!>> अगदि हेच म्हणतोय. या कोरीव लेण्यांना वल्लीदृष्टी लाभल्यानेच आज त्यांचे महत्व कळले.

शशिकांत ओक 10/03/2014 - 12:24
वल्ली, आपल्या समावेत पाहिलेली लेणी हीच का असा प्रश्न पडावा असा आपला धागा अर्थ पूर्ण माहिती व सूक्ष्म निरीक्षणाने नटला आहे. त्यात विविधांगी छायाचित्रांमुळे कथा भाग व शिल्पातील भावभंगिमांचे मनोहारी दर्शन घारापुरच्या लेण्यापहायला पुन्हापुन्हा जाऊन आल्याचे समाधान व आत्मिक आनंद देतो. आपल्या मूर्ति शास्त्र व मंदिर - लेण्यांचा गहन अभ्यास व सुयोग्य भारदस्त भाषेतील मांडणीने धागा आभूषणांनी सजलेल्या ललनेसमान भासतो... पुढील काळात असेच धागे काढून माहितीची गंगा मिपावर उतरू दे...

पैसा 10/03/2014 - 12:25
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर छायाचित्रांनी नटलेला लेख. मस्तच! गोव्याचा इतिहास अभ्यासल्यामुळे मी पोर्तुगीजांचा पुरेपूर द्वेष करते. आता या लेण्यांच्या विध्वंसाबद्दल वाचून तर पोर्तुगीज या शब्दाबद्दल राग येतो आहे! शिल्पकारांनी एकेक शिल्प कोरायला वर्षानुवर्षे घालवली असतील, आणि एका एका बंदुकीच्या गोळीने त्याचा क्षणात नाश? आग लागो त्या पोर्तुगालला. सराव करायला आणखी काहीच शिल्लक नव्हते काय हलकटांना?

In reply to by पैसा

अशी भग्न लेणी पाहिली की खरोखर मन विषण्ण होते. पण पुरातत्व खात्याच्या मदतीने कोणी यांना पुर्ववत करायचा प्रयत्न का करत नसावे? विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. जिथे नैसर्गीक झिज होत आहे ती रोखण्या साठी होणारे प्रयत्न दिसतात. भग्न मुर्तींबाबत काही करता येणार नाही का? उदा. ज्या मुर्तीचे हात नसतील तीथे साधारण अंदाजाने नवे हात बनवुन जोडता येणार नाही का? तसेच लेण्याच्या इतर भग्न भागांबद्दल. उपलब्ध मुळ रचनेत कोणताही बदल न करता.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 10/03/2014 - 17:58
किमान अजिंठ्यामध्येही तरी असा प्रयत्न होतोय. जयंतकाकांनी ह्या लेखात वर्णिल्याप्रमाणे पुरातत्व खात्याचे श्री. वसंत पगारे हे जीर्णोद्धाराचे काम मोठ्या आत्मीयतेने करत आहेत.

In reply to by प्यारे१

वरच्या सगळ्यांशी सहमत
ह्यास 100 वेळा अजुन सहमत हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत , वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!! रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!! संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय !!! मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली.... सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!

असा प्रश्र्न आमच्या एका मित्राने विचारला होता. त्याला आता हा लेख दाखवतो. बादवे, श्री.वल्ली हे शिल्पांच्या बाबतीत , शेरलॉक होम्सला, पण मागे टाकतील. एखाद्या दगडाच्या उंचवट्या वरून पण ते बरेच काही सांगू शकतात. मी आत्ता पर्यंत बरेच कट्टे केले, पण रामदास आणि वल्ली, यांच्या बरोबर फिरता कट्टा केला की बरेच काही तरी नक्की समजते. वल्ली आणि संपादक मंडळींना जाहीर विनंती, की हे असेच फिरते कट्टे दर ४ महिन्यांनी एकदा तरी होवू द्यात.

शशिकांत ओक 10/03/2014 - 13:06
दोन्ही हात वरकरून,अश्रुपूर्ण नयनांनी मनातल्या मनात प्रार्थना करत करत म्हणतोय... हे अद्वितीय कलाकारांनो, माझ्याकडून आपल्या कष्टांचा. कलेाचा घोर अपमान झाला आहे. अनेकविध हातांच्या, अविरत श्रमांच्या, असंख्य रात्रंदिनांच्या कार्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला जे कोणी जन येतील त्यासर्वांचे दूषणांकृत तळतळाट ऐकून माझ्याकडून झालेल्या घोर दुष्ट कृत्याच्या मला अपराध बोध माझे ह्रदय भग्न करतेय. वास्तूच्या विद्रूपीकरणाला माझ्याकडून पडलेल्या प्रत्येक घावाची आठवण मला एक मानव म्हणून लज्जित करतेय...

पुन्हा लेणी दर्शनाचा आनंद मिळाला. आणि तो शांतपणे घेता आला. कारण, तिथे लेण्यात असलेली वर्दळ..वल्ली समजाऊन सांगत असताना... त्या शिल्पपटांसह फोटो काढून घेणार्‍यांची पळापळ..यामुळे या माहितीचा नीट आस्वाद मिळाला नव्हता...(मला आपले ते रावणानुग्रह शिवमूर्ती आणि शांकर पार्वती विवाह सोहळा..हेच बर्‍यापैकी लक्षात राहिले होते.) आता इथे नीट "रवंथ" करायला मिळाल्यानी वाचता वाचता समाधी लागते आहे... __/\__ ====================================================== @ही मूर्ती प्रचंड मोठी आहे. इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दृश्य तिन्ही मुखे शिवाच्या चेहर्‍यावरील तीन वेगळे भाव दाखवतात. डावीकडचे अघोर मुख, मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते.>>> ही अजुन एक संगती लागली.आमच्या भस्मधारणाच्या विधिमधे, हे पाच नाम-देवता-मंत्र आलेले आहेत. मान्स्तोके ह्या मंत्रानी भस्म हतात घेऊन पाणिमिश्रीत करून ह्यातल्या एकेका मंत्रानी ते शरीराला(अवयवांना) लावतात. १)ईशानः सर्व विद्या नामिश्वरः सर्व भूतानां,ब्रम्हाधिपति: ब्रम्हणोधिपति: ब्रम्हा-शिवो..मे..अस्तु..सदा..शिवो..म्। -(शिरसी) २)तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धिमही। तन्नो रुद्रः प्रचोदयात्। - (मुखे) ३)अघोरेभ्यो थगोरेभ्यो घोर..घोर..तरेभ्यः। सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः॥ - (हृदये) ४)वामदेवाय नमोज्येष्ठाय...नमः श्रेष्ठाय..नमो रुद्राय..नमः कालाय..नमः कलविकरणाय..नमो बलाय..नमो बलप्रमथनाय..नमः सर्वभूतदमनाय..नमो मनोन्-मनाय नमः। - (गुह्ये..अपउपस्पृश्य) ५)सद्योजातंप्रपद्यामी सद्योजायाय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्ममां भवोद्भवाय नमः। - (पादयो:) =========== हे मुद्दाम इथे देण्याचं कारण म्हणजे जेंव्हा जेंव्हा आंम्ही अश्या लेण्या/मंदिरं पहायला जातो..तेंव्हा वल्ली माहिती सांगत असताना,माझं त्यातल्या देवदैवतांच्या नामोल्लेखांवर बारीक लक्ष असतं. नाव ऐकली की मला मंत्र आणि काहि धर्मविधींमधले संदर्भ अठवतात.. लागत जातात. ( आणि हे मला दुसरीकडे कुठ्ठेही शोधुनपण मिळालेलं नाही.) याचाच मला झालेला सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे पाटेश्वरातली अग्निची धार्मिक मंत्र वर्णनाबरहुकुम केलेली जगातली एकमेव मूर्ती.. आंम्ही लग्गेच तिथेच--- वल्ली माहिती सांगणार आणि मी मंत्राच्या तुकड्यांसह स्पष्टीकरण कराणार..अशी व्हिडिओ फीत तयार केली. त्यामुळे वल्लीबरोबर (माहिती काढत..त्याला बोलवत..) फिरल्यानी काय काय हाती लागेल..ते सांगता येणे शक्य नाही! :) अतिशय सुंदर स्पष्टीकरणांसह असलेल्या (आणखि एका) धाग्याबद्दल वल्लींचे पुन्हा एकवार आभार.

In reply to by आत्मशून्य

@न्यास ? >>> =)) अरे आत्म शून्या.. ते प्रकरण न्यासा'चे नाही.. भस्मास शरीरावर धारण करीतेवेळी वरील प्रत्येक मंत्र म्हणत हाताने भस्म त्या त्या ठिकाणी लावावयाचे असते रे. :D असो..आणखि स्पष्टीकरणास खरडवहीत भेट रे महामानवा.. :D येथे अवांतर नको. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य 10/03/2014 - 16:46
विवीध गोष्टी सुरु करताना न्यास करुन शरीराच्या त्या त्या भागामधे देवतेची स्थापना केली जाते त्यावेळी असेच मंत्रोच्चार व क्रिया असतात. खवत भेटा!.

कंजूस 10/03/2014 - 14:51
पोतृगिजांनी निशाणेबाजीसाठी मूर्तीँचा उपयोग केला परंतु त्रिमूर्तीवर काहीच खूण नाही .त्या शिल्पाला घाबरले की काय ? बैटमन ,फलक लावायची सुचना आवडली .खरं म्हणजे कर्नाटकात सर्व ठिकाणी खात्याने फलक लावले आहेत .इकडचे गंजतात काय ? (चुकलेला शब्द दुरूस्ती/ संपादनची कळ कुठे आहे ?प्रतिसादपण संपादन करता येतो का ?)

अप्रतिम माहिती आणि फोटो ! वाचनखूण साठवली आहे. घारापूरीला जाताना प्रिंटआऊट घेऊन जाणे आवश्यक आहे !! हा कट्टा चुकल्याची हळहळ वाटत आहे हेवेसांन. :(

भाते 10/03/2014 - 16:10
का, हा कट्टा मी मिस केला? या कट्टयापेक्षा हापिस महत्वाचे होते का मला? 'दाताची ट्रीटमेंट' हे कारण मला आधी का सुचले नाही?

In reply to by सूड

भाते 11/03/2014 - 13:48
'दाताची ट्रीटमेंट' हा तुम्ही आणि मोदक यांनी मिपाला बहाल केलेला वाकप्रचार मला माहित नाही असे मी म्हणालो तर सगळे मिपाकर 'अरे ये पी.एस.पी.ओ. नही जानता' किंवा 'नया है वह' म्हणुन बोंब मारतील.

तसं पाहिलं तर निव्वळ एक गुफा ...पण वल्ली माहिती देत असल्याने त्या एका गुहेतील चित्रे समजुन घेण्याचा अनुभवही इतका संदर होता की बस्स ! मजा आला !! वल्ली चे विशेष आभार ! अवांतर : मला आत्ता असे वाटले की वल्लींबरोबर घारापुरीची एक गुहा पाहताना समजुन घेताना इतका वेळ लागला ...कधी अजंठा वेरुळ करायचे असल्यास टेन्ट घेवुन जावे .. २ -३ दिवस लेण्यांमध्ये स्टे करावा लागेल इतकी माहीती आहे ह्या वल्ली कडे एकेका शिल्पा बाबत !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सह्याद्री , डोंगर दर्‍या घाटवाटा लेण्या असे परत वाचत असताना हा लेख परत दिसला ! कसला योगायोग आहे राव , आज करेक्ट तब्बल चार वर्षं झाली ह्या ट्रिपला ! हा माझा मिपाकरांसोबतची बहुतेक पहिलाच कट्टा होता! एकदा वेव्हलेन्ठ जुळली की दोस्ती जमते ! ह्या नंतर मिपाकरांसोबत कित्येक ट्रेक ट्रिप झाल्या त्या सार्‍या आठवल्या एकदम ... भरपावसात महाबळेश्वर , ताम्हीणी, भीमाशंकर , निर्हेतुक केलेल्या मावळातील भटकंत्या , अर्धवट राहुन गेलेला तोरणा , आरामसे केलेला राजगड , किसनाचा फेवरेट ट्रेक कोरीगड , वल्लीसरांनी आवर्जुन दाखवलेल्या सर्व लेण्या वेरुळ , भुलेश्वर , खिद्रापुर , मग मित्रांच्या लग्नाच्या निमित्ताने झालेल्या ट्रिपा मिरज ... गोवा !! सगळे आठवले हे ह्या एका लेखाच्या निमित्ताने !! मजा आली !!

In reply to by प्रसाद गोडबोले

किसन शिंदे 12/03/2018 - 13:40
सह्याद्रीच्या ऐन माथ्यावर एका मिपाकरावर देवाची अवकृपा झाली अन् पाण्याच्या बाटल्या मिळाल्या नाहीत, आणि म्हणून बियरच्या काळ्या पिशव्यांनी केलेला जुगाडही यानिमित्ताने आठवला. =))

चौकटराजा 10/03/2014 - 19:11
माहिती व फोटो.यांचा सुरेख संगम म्हणून हा लेख बर्‍याच जणांसाठी वाचनखूण होणार. काही शिल्पे भग्न झालेली आहेत हे खरे पण तरीही काहीतरी अर्थ सांगणारी अशी आहेत.वल्लीनी त्याचा संगतवार आढावा घेतलेला आहे. मस्करी मोड ऑन- १२० रूपयात ३० अधिक टाकून वयस्क रसिक मंडळीना काही फायदा होतो का ? त्या सीगल्याचा फोटो चांगला आलाय पण त्यावरील " मंडळाचा" फोटो काढताना फ्लॅश मारला असता तर त्याचा उपयोग सिनेमातील रिफ्लेक्टर सारखा झाला आता. " मंडळाचे" पदाधिकारी अधिक स्पष्ट दिसले असते. मस्करी मोड ऑफ या सहलीला ओक काका आले त्यातून मिपावर टीका निरागस पणे स्वीकारणारी माणसे आहेत.हे दिसून येते. धाग्यावरील मस्ती, कुस्तीवेगळी कट्यातील दोस्ती वेगळी हे यातून दिसून येते. या बद्द्ल श ओ याना धन्यवाद !

In reply to by चौकटराजा

शशिकांत ओक 14/03/2014 - 12:21
अधिकारी व्यक्ती समावेत असेल तर अशा वास्तूंचा कला आस्वाद घ्यायला एक वेगळा आनंद मिळतो. आसपासचा कलकलाट, बाष्कळ गप्पा यासोडून काही जे पदरात पडले, ते वल्लींच्या कॅमेऱ्याच्या नजरे टिपून त्यातील सौंदर्यमर्मे लेखणीतून दाखवून त्या सहलीचा आनंद द्विगुणीत झाला. पैजारांनी व्यक्त केलेली मुर्तीभंगाची हळहळ 'भग्न ह्रदय' मधून वर व्यक्त केली गेली ती आपण वाचली असेल...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 14/04/2025 - 23:00
हा कट्टा २० पेक्षा जास्त सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. वल्लींच्या नजरेतून पाषाणातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही सुखद गोष्ट आहे. पुन्हा एकदा फोटो पाहून आठवणींना उजाळा मिळाला.

सुहास झेले 10/03/2014 - 19:38
वल्लीसाहेब, दंडवत.. काय ते बारकावे रे. जबरदस्त लिहिलंय...परत जायचंय इथे, अर्थात तू सोबत असायला हवास :) :)

In reply to by धन्या

प्रचेतस 11/03/2014 - 10:31
:) रस्त्यावरचे उघडेबोडके डोंगर आणि कातळात निर्माण केलेली शिल्पे हे तुला सारखेच वाटत असताना तू आमच्याबरोबर येतोस हेच महत्वाचे आहे. :)

In reply to by प्रचेतस

स्पा 11/03/2014 - 11:34
धन्या आणि त्याचा भाचा बिचारे कडेला कोपर्यात बसलेले होते , भाचा साबणाचे फुगे उडवत होता, धन्य कुठल्यातरी तत्वज्ञानात हरवलेला होता आणि आम्ही भाचाचे फटू काढत होतो :)

घारापुरीला सहलीनिमित्त अनेकदा गेलो आहे. पण प्रत्येक वेळी सोबत हिरवळ असल्यामुळे सारे लक्ष हिरवळीवर असे. चित्रे पाहतांना प्रथम त्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. लेण्यातील अर्ध-अंधारात बारकावे दिसले नव्हते. अंधकासुर, कल्याणसुंदरम आणि गंगावतरण रसपूर्ण वाटले. पुराणातल्या कथांसह लेखातून लेणी वाचतांना वेळ कसा गेला कळलेही नाही. वाटले अंधकासुर वध डोळ्यासमोर घडतो आहे, इतके प्रत्ययकारी आहे. नुकताच यूटीव्ही वर्ल्डमूव्ही वर एक मूकपट पाहिला. त्यात एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला काही फोटो दाखवीत असते. पण ते सर्व फोटो ही चलत्चित्रेच असतात. तसा काहीसा प्रत्यय आला. लेख अदभुतच आहे. अत्रुप्त आत्मा यांनी उद्धृत केलेल्या वचनांनी जास्तच मजा आली. तू-नळीची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. पोर्तुगीजांबद्दल पैसाताईंची प्रतिक्रिया जशी झाली तश्शीच आता माझी झाली. बामयान बुद्धाची मुर्ती तालिबान्यांनी फोडली तेव्हाही तसेच वाटले. धन्यवाद.

किसन शिंदे 14/03/2014 - 10:33
ह्या लेण्यांच्या प्रांगणातच पूर्वी भव्य असे दोन दगडी हत्ती होते त्यावरूनच पोर्तुगीजांनी ह्या बेटाला 'एलेफंटा' असे नाव दिले. ह्यातील एक हत्ती आज पूर्णपणे नष्ट झालाय तर दुसरा हत्ती मुंबैतल्या कुठल्यातरी बागेत आहे.
हे वाचलं आणि लगेच राणीच्या बागेत भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बाजूला ठेवलेला प्रचंड मोठा दगडी हत्ती आठवला. मला वाटतं तो हत्ती नक्कीच एलिफंटा इथला असावा. पुढे मागे कधीतरी गोर्‍यांनी त्याला राणीच्या बागेत आणून टाकले असावे असा अंदाज आहे. बाकी वल्ल्याच्या या माहितीपूर्ण लिखानाबद्दल प्रत्येक वेळा तेच तेच काय बोलायचे? :) याच्याबरोबर फिरण्याचा एक चांगला फायदा असा झाला की, अशा ठिकाणी सहकुटूंब फिरायला गेल्यानंतर त्यांच्या मनातल्या शंकांना आता मला व्यवस्थित उत्तरे देता येऊ लागलीत. :)

सस्नेह 15/03/2014 - 12:20
नयनरम्य लेणी अन व वल्लीचे कथन म्हणजे दुग्धशर्करा योग. शिवाची मुर्तीरूपे शिल्पांमध्ये दुर्मिळ आहेत. सहसा लिंगच असते. ही शिवाची विविध मुर्तीरूपे म्हणजे खरोखर डोळ्यांना पर्वणीच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मिपावल्ली
शब्द लाइकण्यात येत आहे. काय आहे ना,की मुळात वल्ली हाच शब्द चांगला आहे . पण ... एकदा का माणसे प्र चेतसू लागाली, की... https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतसबरोबर लेणी पाहताना त्या दगडांनाही कंठ फुटतो आणि तेही बोलायला लागतात.. अलीकडेच भाजे लेणी कट्ट्यामध्ये याचा अनुभव आला आहे. @प्रचेतस : मग आता अजिंठा-वेरूळ कधी? वाट पाहतो आहे.
a बरेच दिवस घारापुरी भ्रमंतीसाठी योजना आखणेच चालले होते पण प्रत्यक्ष जाणे काही दृष्टीपथात येत नव्हते. अचानक मुविंच्या एका मुंबई कट्ट्याच्या धाग्याच्या निमित्ताने उचल खाल्ली आणि मुविंशी संपर्क करून १ किंवा ८ मार्च अशी दोलायमान अवस्थेत असलेली भ्रमंतीची तारीख १ मार्च २०१४ अशी पक्की ठरवली आणि या निमित्ताने पुणेकर आणि मुंबईकरांच्या हृद्य भेटीचा योग जुळवला गेला. शेवटी १ तारखेची पहाट उजाडली.