मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्रवाद- एक उन्माद !

मारवा ·

धन्या Wed, 05/07/2014 - 17:58
एक वेगळाच विचार मांडला आहे तुम्ही. राष्ट्रवाद ही त्या मानाने खुपच व्यापक संकल्पना आहे. इथे तर प्रांतवादही नको ईतका फोफावला आहे. अस्मितेच्या नावाखाली आपल्याच "राष्ट्र"बांधवांना परप्रांतीय असे नामाभिधान चिकटवून त्यांना सळो की पळो केले जात आहे.

पगला गजोधर Wed, 05/07/2014 - 18:01
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 18:45
'विप्लवा ' या अरूण साधू यानी लिहिलेल्या कादंबरीची आठवण झाली. परग्रहावरची काही माणसे इथे येतात मोठ्या आशेने की त्याना त्यांच्या पेक्षा प्रगत मानसिकता दिसेल.पण येथील लढाया, शत्रूत्वे पाहून ते व्यथित होतात. राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन Wed, 05/07/2014 - 18:50
राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.
राष्ट्र काय किंवा धर्म काय, लोकसमुदाय एकवटण्याची साधने आहेत. ती जर नसली तर पशू आणि माणूस यात काहीच फरक नाही. आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.

In reply to by बॅटमॅन

सुबोध खरे Wed, 05/07/2014 - 19:53
सकृतदर्शनी राष्ट्रवाद हा अतिरेकी वाटतो आणि वसुधैव कुटुंबकम हे छान वाटते. पण जेंव्हा परका माणूस तुमच्या स्वार्थावर घाला घालत असेल तर परमार्थ सुचेल कसा? जर मुंबईत येणारे बांगलादेशी घुसखोर तुमची सर्व व्यवस्था कोलमडून टाकणार असतील तर त्यांना अटकाव करणे हा रास्थ्र्वाद स्वार्थी असेल तरीही बरोबर आहे. तुम्हाला रोज पाण्य्साठी वणवण करायला लागली तर त्याच लोकांना तुम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणून या म्हणणार आहात काय? स्वार्थ हा संकुचित असला तरी तो प्राणीमात्राच्या जगण्याचे प्रयोजन आहे हि वस्तुस्थिती असते. मी, माझे कुटुंब, माझे आप्त, माझे जाती/धर्म बांधव , माझे राष्ट्र बांधव अशी वर्तुळे असतात यात केंद्रस्थानी स्वतः ठेवून माणूस जगात असतो. जोवर केंद्राला धक्का लागणार नाही तोवर वर्तुळ तो मोठे करू शकतो किंवा इच्छितो. पण जर केंद्राला धक्का लागणार असेल त्याचा तो जोरदार विरोध करू लागतो. राखीव जागात म्हणूनच दुसर्या जातीचा अंतर्भाव करायला त्यामुळेच मोठा विरोध उफाळून येतो. उच्च विचारसरणी हि शेवटी विचार्वांतानाच झेपणारी असते सर्वसामान्य माणसाना नाही. दोन ऐवजी चार वेळेस जेवून ढेकर दिल्यावर उच्च विचारसरणी ठीक आहे.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 19:55
लोक एकवटण्यासाठी कॉमन स्वार्थ हेच साधन असते. म्हणून युनो ची ही स्थापना झाली आहे, नाटोची आणि नामची सुद्धा ! या राष्ट या संकल्पनेपेक्षाही प्रगत संकल्यना आहेत .तरीही त्या मानवसंहार थांबवू शकलेल्या नाहीत. मग राष्ट्र या संकल्पनेची वा धर्म या संकल्पनेची काय कथा ? कुरघोडी हा पाशवी जगताचा स्थायीभाव आहे. मानव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 13:17
नव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.
अपरंपार नरसंहार जरी झाला असला तरी ज्याला संस्कृती इ.इ. म्हणतो ती विकसित होण्यामागे या दोन खुळांचा बराच वाटा आहे. राष्ट्र म्ह. युरोपियन अर्थानेच पाहिजे असे नाही. राजकीय संघटनेचा कुठलाही आविष्कार असे समजू. जर तसा समाज एकवटायचा प्रयत्न कुणी केला नसता तर आजही आपण जंगलात अर्धनग्न अवस्थेत प्राण्यांपासून जगत फिरलो असतो. एक अवस्था दुसरीपेक्षा सर्वार्थाने चांगली नसली म्हणून तिचे महत्त्व आजिबात कमी होत नै.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा गुरुवार, 05/08/2014 - 17:06
आपण जंगलातून समाजात आलो याला धर्म व राष्ट्र कारणीभूत नाही झाले. आपण जंगलचाच कायदा वापरून राह्यला लागलो तर मोठी कठीण अवस्था होईल म्हणून काही नियम मानवी समाजाने घालून घेतले. धर्म व राष्ट्र या संकल्पना त्यावेळी टोळ्यांच्या टकुर्‍यातही नव्हत्या. संस्कृति चा पाहिला उदगार निघाला मग धर्माचा. हळूहळू काही प्रमाणात युरोपात " वसुधैव " चा प्रयोग होउ लागला आहे.वैज्ञानिक शोधाच्या उपयोगीतेचे वाटप व्हायला फार पूर्वीच सुरूवात झाली होती. ते काय राष्ट्र वा धर्म यानी घडवून आणलेले नाही. मानवी समाजाचेही एक मन असते.ते उत्क्रांत होत आहे. वेळ लागेल. काही शतकेही जातील पण जगाच्या इतिहासात धर्म व राष्ट्र या कल्पना उन्मळून पडतील. पण...... पण त्यापूर्वीच या दोन घातक कल्पनांनी मानवी जगाचा बळी घेतला तर ,,,?

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 23:11
धर्म अन राष्ट्र या संकल्पनांना लिटरली पाहू नका. पोलिटिकल संघटनेचा एक आविष्कार म्हणून राष्ट्राकडे पहा. ते नसतं तर समाज कुठे गेला असता? असो, परत कधीतरी बोलूच विस्ताराने या विषयावर.

In reply to by बॅटमॅन

आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.
>>> आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 05:46
या सुभाषितातला धर्म आणि हिंदू-मुसलमानादि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. बाकी चालू द्या.

सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते.
हे तर एकदम लोल आहे =)))) एकदा जरा न्याय-अन्याय, कर्म-अकर्म-विकर्म-कुकर्म, सत्य-असत्य , व्याख्या तपासुन घेतल्यात तर भगवद्गीता समजुन घेताना असले गैरसमज होणार नाहीत ! वाढीव अभ्यासासाठी शुभेच्छा !!

In reply to by मूकवाचक

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2014 - 10:48
वर खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे विचारवंती वसुधावाद (राष्ट्रवादाच्या विरुद्ध टोक) ही ४ वेळा सुखाने जेऊन दिल्यावर द्यायची ढेकर आहे.

पैसा Wed, 05/07/2014 - 19:54
हे लिहिलेलं वाचताना छान वाटतंय. पण यावर विश्वास ठेवून उद्या जर का आपल्याला सैन्य नको असं कोणी म्हणाला तर हेच तत्त्वज्ञान पाकिस्तान्यांना कळणार का हा मोठ्ठा प्रश्न आहे. बाकी या लेखावरही हिब्रू आणि तमिळ भाषेतले बरेच संवाद वाचायला मिळतील याची खात्री आहे! *mail1*

In reply to by पैसा

विकास Wed, 05/07/2014 - 21:07
להס ஒப்புக்கொள்கிறேன் त्या कम्युनिस्टांनी देखील "जगातल्या कामगारांनो एक व्हा" म्हणून पाहीले. पण नाही जम्या! बाकी माझे म्हणणे तर अजून पुढचे आहे, सैन्य तर नकोच, पण कड्या-कुलपे देखील नकोत. विशेष करून बँकांना. किंवा पैसा (आयडी नाही) हा प्रकारच नको! कारण धर्मा इतकेच पैशामुळे वर्गीकरण होते. मिसळपाव मालकांना एक विनंती: या आदर्श (का अ‍ॅनार्कीस्ट?) जगण्याची सुरवात करण्यासाठी म्हणून मिसळपाव वरील आयडी ही संकल्पनाच रद्द करा. सगळे एकच. लेखक-प्रतिसादक-संपादक-सल्लागार आणि हो मालक देखील. *biggrin* *pleasantry*

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 19:01
इथे तर आधीच अनाहिताची वेगळी चूल आहे
ह्यावरुन एक कविता सुचत आहे >>> चाल : मी कात टाकली मी चुल मांडली ...मी चुल मांडली , मी वेगळ्या अनाहिताची बै चुल मांडली =)))) (अपुर्ण)

In reply to by पैसा

होकाका Fri, 05/09/2014 - 14:01
अरे काय चालू आहे हे? वास्तवाची दखल न घेता ढगात हरवून जाऊन लोकांना शहाणपणा शिकवणं हेच विचारवंतांचं खरं लक्षण असतं हे माहीत नाही का आपल्याला?

यसवायजी Wed, 05/07/2014 - 21:19
Imagine no possessions I wonder if you can No need for greed or hunger A brotherhood of man याला औषध नाही. अन्ड सो डू राष्ट्रवादाला. आणी मग दुसरा पर्याय काय?

असाच पंचशीलचाही उदोउदो करत सैन्य मोडीत काढावे असा विचार चालला होता काही वर्षांपूर्वी आणि काय इतिहास घडला त्याची आठवण आली. सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करून असा एकांगी विचार सुचणे हे एखाद्या संरक्षित राष्ट्रात चार वेळ भरपेट खावून ढेकर देत देतच शक्य असते. शिवाय अश्या राष्ट्रात असे विचार करण्याचे स्वातंत्र्यही असतेच म्हणा ! तेव्हा चालू द्या !! (मला का उगाचच संशय येत आहे की हा लेख उपहासपूर्ण आहे?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास Wed, 05/07/2014 - 22:57
चिनी हल्ल्या आधीची गोष्ट आहे. तत्कालीन गांधीवादी आणि काँग्रेसनेते शंकरराव देव (ते देखील पंचा नेसायचे), हे देखील नेहरूंच्या मागे लागले होते की गांधीजींच्या भारताला सैन्याची गरज नाही. त्याचा परमार्ष घेताना अत्रे म्हणाले, की "सैन्य नको म्हणणे हे त्या महात्म्याला शोभले असेल, पण उद्या चीन्यांनी हल्ला केला तर त्यांचे सैन्य काय शंकररावांच्या पंच्यात गुंडाळायचे का? "*fool*

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 22:52
राष्ट्रवाद जर Xenophobia चं उत्क्रांत रूप असेल तर तो मानवनिर्मीत असुन देखील अटळ म्हणावा लागेल. इन फॅक्ट मानव 'निर्मीत' न म्हणता 'घटीत' म्हणावा लागेल. इथुन तिथुन प्रश्न एकच उरतो कि माणुस आपली बुद्धी विनाशकारी कृत्ये करण्यात का घालवतो. हि विध्वंसक वृत्ती बाजुला काढली तर राष्ट्रवाद देखील बहुविधतेचा अविष्कार  म्हणुन गोंजारल्या जाईल.

नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 05:50
राष्ट्रवाद हा मोठ्याप्रमाणावरचा टोळीवाद आहे आणि टोळ्या करून राहणे हा माणसाचा सहजधर्म आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचे प्रमाण उपलब्ध ऊर्जा संसाधनांना झेपणार नाही तेव्हा आपोआप संपेल आणि विघटन होत होत पुन्हा छोट्या-छोट्या टोळ्या होतील. आपली सहजप्रवृत्ती सोडून माणूस आधीच राष्ट्रवाद सोडेल इतकी माणसाची माणूस म्हणून प्रगती झालेली नाही आणि होणारही नाही. पण लेख आवडला. पुलेशु.

फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 10:05
पाश्चात्य देशांतील विचारवंतांच्या दृष्टिकोनातून हे मांडलेले दिसते. हिटरलच्या काळात जर्मनीचे व सध्याच्या काळात पुतिन च्या रशियाचे उदाहरण बघता काही विचारवंतांना त्यात का धोका दिसतो हे ही समजण्यासारखे आहे. पण भारताचे याच्या विरूद्ध जाणारे ढळढळीत उदाहरण याबाबतीत का घेतले जात नाही? स्वातंत्र्यानंतर सुमारे ६५ वर्षांच्या इतिहासात भारताने राष्ट्रवाद प्रबळ असूनही इतर कोणत्याही देशावर हल्ला वगैरे केलेला नाही. किंबहुना पहिली १५ वर्षे हीच तत्त्वे अनुसरण्याचा प्रयत्न केलेला असताना चीनकडून झालेल्या विश्वासघातामुळे शस्त्रसज्ज होण्याशिवाय पर्याय राहिला नाही, नाहीतर आस्तित्वाचाच प्रश्न होता. पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत. तेव्हा निव्वळ राष्ट्रवाद धोकादायक नाही. मात्र एखादा देश स्वतःला सुपरपॉवर समजू लागतो तेव्हा मात्र जगातील परिस्थिती आपल्या इंटरेस्ट मधे असली पाहिजे या हट्टातून इतर ठिकाणी काड्या करणे चालू होते.

In reply to by फारएन्ड

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:09
पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत.
हेच तर चुकलय ना.. बसा आता त्यां चिमुरड्यांना चिनला आसरा देताना बघत. धाक म्हणून नाही कुणाचा कशावर :(

बाळ सप्रे गुरुवार, 05/08/2014 - 10:24
राष्ट्र, राज्य, प्रांत, जिल्हा, तालुका... अशी रचना प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा राष्ट्रवाद, प्रांतवाद हा असणारच. फक्त त्याचा अतिरेक नको. राज्य राष्ट्र विस्ताराची/ विघटनाची तीव्र लालसा ही अशाप्रकारच्या अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालते.. त्यातही धर्माधारीत राष्ट्ररचना असल्यास द्वेष आणखी वाढतो व सामंजस्याने तोडगा काढण्याची शक्यता फार कमी होते.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:31
प्रांतवाद भाषावाद म्हणुन एक प्रश्न आहे... एका मराठी व्यक्तीला दुसरी मराठी व्यक्ती कधीच कुल/ओसम का वाटत नाही ? (पण इतर भाषक मात्र तसे वाटु शकतात ?)

आतिवास गुरुवार, 05/08/2014 - 10:34
माणसांचा उन्माद कमी व्हायला हवा ही गोष्ट मान्य. राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंसा होते हेही मान्य. पण समाजातील विविध घटकांचा आपापसातील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रवादाचं नाणं राजकीय नेते वापरतात हे वारंवार दिसून येतं. आपण आपला समाज एकसंध कसा राखणार हा खरा प्रश्न आहे. आणि तो एकसंध राखताना एक गट वर्चस्ववादी बनून अन्य गटांचे शोषण करणार नाही याची खात्री कशी देणार हा प्रश्न आहे. समाजातल्या विविध घटकांचे हित एका वेळी साधता येते की ते एकमेकांच्या विरोधी असते हा खरा प्रश्न आहे .... असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्याची युक्ती आपल्याला कळली तर कदाचित उन्मादी राष्ट्रवादाची गरज आपल्याला राहणार नाही!

क्लिंटन गुरुवार, 05/08/2014 - 13:54
लेख आणि मते भयंकर गंडलेली आहेत. हे असले तत्वज्ञान इथे येऊन लिहू नका.इथल्या कोणालाही भारत देशावर प्रेम म्हणजे इतरांचा द्वेष असा सिनॉनिमस अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही (आणि तसा असेल तर ते चुकीचे आहे).ही असली मते भारतातच कशी फोफावतात कोणाला माहिती. सगळे जग एकत्र यावे, देशांमधील सीमा हा प्रकार इतिहासजमा व्हावा इत्यादी सगळ्या गोष्टी झाल्या तर ते मलाही नक्कीच आवडेल पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? फार दूर नको जायला.अगदी आपल्या दिवट्या शेजार्‍याशी संबंध सुधारावे म्हणून आपण काय कमी प्रयत्न केले काय?तरीही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच.आपले पंतप्रधान बस घेऊन लाहोरला गेले तर तीच बस त्यांनी कारगीलला नेली.आग्रा शिखर परिषद झाल्यावर सहा महिन्यांच्या आत आपल्या संसदेवरच हल्ला झाला (आणि त्यातल्या मुख्य सुत्रधाराला फाशी दिल्यानंतर बिनडोक मानवाधिकारवाल्यांनी केलेले आकांडतांडव इतर कोणी विसरले असेल तरी मला तरी ते विसरणे अशक्य आहे).मागे ओर्कूटवर भारत-पाक फ्रेंडशीप क्लब म्हणून एक प्रकार होता. हल्ली ओर्कूट मागे पडल्यामुळे तो क्लब अजूनही अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही पण २००७ मध्ये मी जेव्हा ते वेबपेज बघितले होते त्यावेळी त्यातले ९०% पेक्षा जास्त सदस्य भारतीयच होते.तुम्ही स्वतःला लाख मानवतेचे पुजारी म्हणवत असाल पण जोपर्यंत आपल्या दिवट्या शेजारी देशात भारत देश हा 'काफिरांचा' म्हणून आपले अस्तित्वच खुपणारे लोक आहेत तोपर्यंत ते तुम्हाला भारतीय आणि काफिर म्हणूनच ओळखणार एवढी साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही हेच समजत नाही. तेव्हा हे असले दिवास्वप्नी तत्वज्ञान इथे पाजळू नका.आम्हाला कोणावरही विनाकारण हल्ला करायचा नाही.मैत्रीचे भरते पहिल्यांदा त्यांच्याकडून येऊ दे मग सुरवातीला भारत आणि पाकिस्तानमधली सीमा पुसू आणि तीच प्रक्रीया सगळ्या जगभर पुढे नेऊ.
राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात.
हे अगाध तत्वज्ञान नक्की कुठून शिकलात हो? तुमच्या भाषेत माणसं मारणारे सैनिक तिथे सीमेवर नसते तर तुम्ही घरी बसून आरामात असले लिहू शकलात का?
सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.
धन्य.
राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे.
आणि राष्ट्रवाद नाकारणार्‍या डाव्या विचारसरणीने त्याहूनही अधिक माणसांचा बळी घेतला आहे. असो. याविषयी अधिक चर्चा रंगल्यास निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच भाग घेईन. अगदीच राहवले नाही म्हणून आताच एवढे लिहिले.

In reply to by क्लिंटन

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 15:44
महात्मा गांधी अंहिसेचेच समर्थक होते पण सोबत राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यांचे उत्तर साधे सोपे होते. इतरांशी संवादाकरता माझ्या घराला खिडक्या दरवाजे असतील पण माझ्या घराला भिंतींची गरज आहे. आमच घर इतरांनी येऊन चालवण्या पेक्षा आम्ही आमच घर चालवतो. स्वतःच घर स्वतः चालवण यात दुसर्‍यांच्या द्वेषाचा संबंध नाही. बाकी सवडी नुसार लिहू (सध्या आमची जांभई आणि चुटकी).

In reply to by क्लिंटन

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:15
बर्ट्रांड रसेल ची लिंक वाचण्याची तसदी घेतली असती तरी मला वाटत माझा पॉइंट ऑफ़ व्ह्यु लक्षात यायला हरकत नव्हती. असो आता उदाहरणार्थ जॉर्ज ऑरवेल ला घेउया ( हा रसेल शी अनेक ठीकाणी डायगोनली अपोझीट आहे खास करुन कम्युनिझम संदर्भात ) तर दुरगामी खोलवर विचार करणारया विचारवंतांच्या विचारांची एक खासियत असते ती अशी की अनेक वर्षांनंतर ही त्यांचे विचार समकालीन स्थितीचा व मानसिकतेचा अचुक वेध घेतात. उदा. जॉर्ज ऑरवेल यांनी अनेक वर्षापुर्वी कीती विलक्षण अचुकतेने राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याचे नेमके वर्णन केलेले आहे. हा परीच्छेद राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते या संदर्भात क्लिंटन यांच्या प्रतिसादा च्या संदर्भात बघावा. क्लिंटन यांच्यावीषयी नितांत आदराची भावना माझ्या मनात आहे. त्यांच्या मानसिकतेचा उल्लेख अत्यंत नम्रपणे केवळ चिकीत्से साठी व ऑरवेल च्या राष्ट्रवादी व्यक्तीच्या मानसिकते संदर्भात च कृपया बघावा ही कळकळीची विनंती ! तर खालील परीच्छेद मुळ ऑरवेल चा व जेथे जेथे क्लिंटन यांचा निर्देश मराठी त केलेला आहे तो माझा. As nearly as possible, no nationalist (क्लिंटन) ever thinks, talks, or writes about anything except the superiority of his(क्लिंटनच्या) own power unit. It is difficult if not impossible for any nationalist (क्लिंटन) to conceal his (क्लिंटनच्या) allegiance. The smallest slur upon his (क्लिंटनच्या ) own unit, or any implied praise of a rival organization, fills him with uneasiness which he (क्लिंटन) can relieve only by making some sharp retort. If the chosen unit is an actual country, such as Ireland or India, he(क्लिंटन) will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. He(क्लिंटन) will show great sensitiveness about such things as the correct display of flags, relative size of headlines and the order in which different countries are named. All nationalists (क्लिंटन) consider it a duty to spread their own language to the detriment of rival languages, जॉर्ज ऑरवेल क्लिंटन यांचा प्रतिसाद अतिशय बोलका आणि उत्स्फ़ुर्त आहे. हा प्रतिसाद एका राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याची चिकीत्सा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. विशेषत: ऑरवेल जे म्हणतो स्मॉलेस्ट स्लर कींवा अगदी विरोधकाची इम्प्लाइड प्रेज जरी असली तरी राष्ट्रवादी व्यक्तीला ही स्तुती १- fills him with uneasiness ( क्लिंटन यांच्या प्रतिसादातील अस्वस्थता बघावी) २- can relieve only by making some sharp retort (क्लिंटन यांचा तीव्र रीटॉर्ट बघावा) वरील दोन अवलोकनार्थ होते इतर मुद्दे उदा. ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. इतर राष्ट्रवादी प्रतिसांदा मध्ये ही आढळुन येतात उदा. श्री. फ़ारएन्ड यांचा प्रतिसाद अभ्यासावा. तर जॉर्ज ऑरवेल यांनी अचुकतेने मांडलेली राष्ट्रवादी मानसिकता आपण आज इथे या प्रतिसांदा मध्ये ही अभ्यासु शकता. कृपया व्यक्तीगत घेउ नये माझ्या प्रतिसादाचा हेतु अभ्यासात्मक आहे व्यक्तीगत नाही.

In reply to by मारवा

फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 21:45
माझ्या ज्या प्रतिसादाचा उल्लेख केलाय त्यात वरची #३ ची लक्षणे कोठे आहेत? ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. >>> माझा प्रतिसाद व हा मुद्दा याची कशी सांगड घातलीत ते विचारतो आहे. माझा मुद्दा तुम्हाला मान्य आहे की नाही तेही कळाले नाही.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:51
सर मोड़ ऑन खेळा पासून संभोगा पर्यंत सर्व मानवी जीवन उन्मादानेच व्यापीयले असा. पण मुळात उन्माद ही एक प्रक्रिया आहे, वस्थिस्थिति न्हवे याचे आकलन एकदा तुमच्या मनाला झाले की हां लेख टाकायचे प्रयोजन उरत नाही. सर मोड़ ऑफ

In reply to by आत्मशून्य

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 15:00
म्हणजे काय? आणि याचा उच्चार कसा करायचा? (राँर्बट याचा उच्चार आता मला करता येतो). *ROFL*

कवितानागेश गुरुवार, 05/08/2014 - 16:04
माझा जरा गोंधळ होतोय... 'राष्ट्र संकल्पना' वेगळे न मानणारे, एकाच देवाला मानणारे लोक्स, आणि त्याच 'तत्त्वज्ञाना'चा हिंसेच्या सहाय्यानी जगभर प्रचार करणारे, जगात फक्त आपण सर्व समान देवानी पाळलेले 'ठराविक प्रकारचे पाळीव पशू' किंवा देवाचे गुलाम वगरै समजणारे लोक्स जास्त उन्मादात असतात असं माझे आजपर्यंतचे निरिक्षण आहे.

In reply to by कवितानागेश

राघव Sat, 05/10/2014 - 23:56
अगो माय, साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद यामधे सगळा घोळ झालाय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. वर चौरा म्हणतात त्याप्रमाणे जंगलातून माणूस आला. त्यात उत्क्रांतीच्या अनेक पायर्‍या पार केल्यानंतर आत्ताची वेळ दिसते आहे. आता ही राष्ट्र संकल्पना काय लोकांनी गांजा पिऊन मांडली काय? दोन राष्ट्रांत युद्ध नको म्हणून राष्ट्र संकल्पनाच रद्द करून टाकली तर कित्ती छान? माझे घर अन् दुसर्‍याचे घर यामुळे सगळे वाद होतात.. घरेच पाडून टाकू.. वाद मिटला.. हाय काय अन् नाय काय?? अर्रे जरी वसुधैव कुटुंबकम् याचा अर्थ सगळे एक कुटुंब असा होतो.. तरी सध्या एकत्र कुटुंब हीच संकल्पना मोडीत निघते आहे त्याचे काय? बरं सोबत राहू म्हणजे एकाच घरात एकाच खोलीत सगळ्या कुटुंबानं राहायचं असं चालेल काय? सध्या जे असे राहतात त्यात तसे राहण्याची इच्छा असणारे किती अन् दुसरा पर्याय नसल्यानं तसे राहणारे किती?? आणि वसुधैव कुटुंबकम् याचा भावार्थ असा घेतला की सगळे एकमेकांचा आदर करत, एकमेकांना मदत करत आनंदानं राहू तर चुकलं कुठे? तो चाणक्य आज असता ना तर डोक्यात जाणारी नसती जळमटं काढून फेकल्याशिवाय शेंडीला गांठ मारणार नाही अशी काहीशी प्रतिज्ञा केली असती त्यानं !!

असंका गुरुवार, 05/08/2014 - 18:52
आपण एक विचार देत आहात की कसलातरी प्रचार करत आहात? कारण आपली भाषा नि:पक्षपाती वाटत नाही. विचार हा साकल्याने -साधक बाधक अशा दोन्ही अंगाने करायचा असतो. आणि हा विचार आपल्या वाचकाला केंद्रस्थानी ठेवून मांडला पाहिजे. आपण एकांगीपणे वरील विचार मांडला आहे, असे वाटते. एखादे मत आपण कसे तयार केले, हेही सांगणे योग्य आहे. उदा. कुठलाही संदर्भ न देता काही विशिष्ट विचारसरणीला आपण अनेकवेळा नकारात्मक वगैरे ठरवले आहे. ती नकारात्मक कशी, हे सांगणे भाग असूनही ते आपण सरळ गृहित धरले आहे, आणि वाचकानेही गृहित धरावे अशी अपेक्षा केली आहे. पराकोटीच्या अन्यायातून एखादा समाज उठू बघतो, अन्यायाला वाचा फोडतो, अगदी सशस्त्र प्रतिकार करतो, यात नकारात्मक काय आहे? आपला तर्क दिलात तर आपण माडलेल्या या विचारांवर विचार करण्यात अर्थ आहे.

In reply to by असंका

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:20
मारवांजींच्या आधीच्या समतोल लेखनाच्या भरवशावर हा धागा उघडला होता. मारवाजींच्या नेहमीच्या समतोल लेखनशैलीला हा धागा लेख जरासा अपवाद वाटतोय. या वेळी प्रचाराकी हेतु आला आहे का किंवा असे अचानक काय झाले हे मारवाजीच सांगू शकतील.

In reply to by माहितगार

असंका Fri, 05/09/2014 - 12:06
आम्हाला कधीतरी इतिहासाच्या तासाला "युरोपातील राष्ट्रवाद वाढीला लागला" (-कुठल्यातरी कालखंडात!) असे शिकवले गेले. राष्ट्रवाद या शब्दाशी तो माझा पहिला परीचय होता. राष्ट्रवाद म्हणजे काय हे तेव्हा कळले नाही. ते न कळण्याची कारणे काय ते जाऊ द्या. कदाचित मी पुरेसा अभ्यास केला नसेल, किंवा मला पुरेशी समज नसेल. पण ते मागे राहिलेले कधीतरी समजून घ्यायची इच्छा आहे. ते नीट सांगतील तर इथे ऐकायची तयारी आहे. विचार करायचीही तयारी आहे. माझं चुकतं कुठे हे कळलं तर चूक मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. पण ते ज्या पद्धतीने सांगत आहात ती पद्धत थोडी बदलली तर बरं होइल असं वाटतं. १. ते अनेक गोष्टी एकाच वेळी सांगत आहेत. क्रांतिकारी विचार थोडक्यात मांडायला हवा. नाहितर मग लक्ष कशावर केंद्रीत करायचं तेच लवकर कळत नाही. २. एका भाषेतून (मराठी) दुसर्‍या भाषेत(इंग्रजी) जात आहेत. खरे म्हणजे एकदाही असे केल्याने वाचण्यात अडथळा येतो. त्यांनी तर अनेक वेळा तसे केले आहे. ३. मध्येच कवितेच्या ओळी देत आहेत. हे काय भाषण आहे का? ४. मध्येच इतरांची मते देत आहेत. व इतरांनी तीही मुळापासून वाचावी अशी अपेक्षा ठेवत आहेत. विचार साहेब स्वतः मांडत आहेत. अभ्यास करून इथे ते थोडक्यात मांडणे त्यांचे काम आहे. इतरांनी का तसदी घ्यायची? वादात शेवटचा शब्दा माझा हवा इतकाच उद्देश असेल तर असे करणे ठिक आहे- तेव्हा या पद्धतीने वागता येते. कारण मग लोक वाद सोडून देतात - म्हणतात, कोण ती लिंक वाचत बसेल! त्यांची ही अपेक्षा असेल का?

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:22
INDIFFERENCE TO REALITY. All nationalists have the power of not seeing resemblances between similar sets of facts. A British Tory will defend self-determination in Europe and oppose it in India with no feeling of inconsistency. Actions are held to be good or bad, not on their own merits, but according to who does them, and there is almost no kind of outrage--torture, the use of hostages, forced labour, mass deportations, imprisonment without trial, forgery, assassination, the bombing of civilians--which does not change its moral colour when it is committed by 'our' side. The Liberal NEWS CHRONICLE published, as an example of shocking barbarity, photographs of Russians hanged by the Germans, and then a year or two later published with warm approval almost exactly similar photographs of Germans hanged by the Russians. It is the same with historical events. History is thought of largely in nationalist terms, and such things as the Inquisition, the tortures of the Star Chamber, the exploits of the English buccaneers (Sir Francis Drake, for instance, who was given to sinking Spanish prisoners alive), the Reign of Terror, the heroes of the Mutiny blowing hundreds of Indians from the guns, or Cromwell's soldiers slashing Irishwomen's faces with razors, become morally neutral or even meritorious when it is felt that they were done in the 'right' cause. If one looks back over the past quarter of a century, one finds that there was hardly a single year when atrocity stories were not being reported from some part of the world; and yet in not one single case were these atrocities--in Spain, Russia, China, Hungary, Mexico, Amritsar, Smyrna--believed in and disapproved of by the English intelligentsia as a whole. Whether such deeds were reprehensible, or even whether they happened, was always decided according to political predilection.

In reply to by मारवा

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:34
(मारवाजी माझ्याकरता जॉर्ज ऑर्वेल आणि हा विषय दोन्ही अंगांनी बर्‍या पैकी (यापुर्वी इतरत्र) चघळून झालाय. या विशीष्ट उन्हाळ्याच्यावेळी हा धागा विषय म्हणजे गार ताकही पाहीजे पिले तर खोकला होईल नाही पिलेतर गरमी , ताकाला(धाग्याला) जायचे पण बिचकत बिचकत भांडे लपवणे असा नाहीएना असला तर असू द्यात बापडे मी कोण सांगणारा. :) बाकी भारतीय लोकशाही चांगली प्रबळ आहे आपोआप समतोल साधते. खूप काळजीही करू नका जस्ट रिलॅक्स एवढेच म्हणू शकेन.)

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:33
मी कोणाचा प्रचार करत आहे असे वाटत असल्यास मी इतकेच म्हणेन की मी तरी कुणाचा प्रचार करीत नाहीये हे मी माझ्या बाजुने स्पष्ट करतो. (आणि आश्चर्य म्हणजे माझे मत इतक्या स्पष्टपणे व विरोध कशाला आहे ते इतके उघड असुनही तो कशाचा प्रचार आहे असे कुणाला वाटते याचच मला आश्चर्य वाटत आहे व विशेष बाब म्हणजे मी नेमका कशाचा प्रचार करत आहे याचा उल्लेख कोणीही केलेला नाहीये ) मी कशाचा प्रचार करत आहे असे आपल्याला म्हणायचे आहे कृपया स्पष्ट करा माझ्या माहीतीप्रमाणे मी केवळ राष्ट्रवाद या उन्मादाला विरोध करीत आहे. असो.

In reply to by मारवा

असंका Fri, 05/09/2014 - 11:20
प्रचार शब्द वरती मी वापरला होता. मला असं म्हणायचं होतं की, आपण जे लिहिलं आहे, त्याच्या मागचा तर्क पुरेसा विकसित न करता, इथे तो तर्कसंगत विचार न मांडता आपण थेट आपला विचार सर्वोत्तम असल्याचा प्रचार चालू केला आहे. आपण आपला विचार पहिले स्पष्ट करा. तो विचार सर्वोत्तम कसा, त्याच्या आड कुठल्या गोष्टी (आक्षेप) येत होत्या, त्याला समर्पक उत्तरे कुठली (आक्षेपांचे निराकरण) हे सांगा. नुसते संघर्षाला नकारात्मक ठरवून कसे चालेल? आपण अनेक वेळा असे थेट निष्कर्षाला पोचले आहात वरच्या लेखात. आणखी सांगायचे तर अर्जुनाला युद्धावेळी जे विचार मनात आले त्याला आपण विवेक म्हणून मोकळे झालात. आजवर त्याला आम्ही संभ्रम मानत आलो. जर आपण त्या विचारांना विवेक म्हणू इच्छिता, तर ते कसे हे सांगणे भाग आहे. ते न सांगता आपण निष्कर्ष काढला आहे की अर्जुनाला विवेक सुचला आणि कृष्णाने जे केले ते म्हणजे ब्रेनवॉशिंग. असे कसे गृहित धरायचे हो साहेब आम्ही?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Fri, 05/09/2014 - 12:10
माणसाला माणूस न कळण्याचे कारण माणसाला राष्ट्र व प्रशासन एक आहे असे वाटते. पण तेसे नाही. प्रशासनाशिवाय समूहाला पर्याय नाही व प्राणीमात्राला समूहाशिवाय पर्याय नाही. मिपा हे एक राष्ट्र नाही पण ते चालते.विनाशाविना चालते कारण त्यातील वादाची शत्रूत्वात रूपांतर व्हायची सोय नाही. मिपा हे राष्ट्र नाही तरीही इथे प्रशासन आहे. यंत्रणा आहे. मिपाचे व मायबोलीचे व ऐसी अक्षरेचे वैर नाही कारण त्यांचे प्रमुख राष्ट्र प्रमुखाप्रमाणे प्रजांमधे आपल्या स्वर्थासाठी वैर निर्माण करीत नाहीत. दोन प्रजांमधे राजेच वैर निर्माण करतात कोतवाल वा सेनानी नाही. व्यापारी वा नाभिक तर नाहीच नाही.

अन्या दातार गुरुवार, 05/08/2014 - 22:55
घर म्हणलं की १-२ खोल्या भिंतींनी/पार्टिशनने वेगळ्या होतातच. नुसत्याच ४ भिंती बांधल्या तर धर्मशाळा होते! अख्ख्या जगाला सीमामुक्त कसे करावयाचे??

आयुर्हित Fri, 05/09/2014 - 02:23
वरील लेख हा खोटा/नकली(pseudo)राष्ट्रवादावरचा आहे. वरील लेख हा अमेरिकेत, पाकिस्तानात किंवा बांग्लादेशात जावून तेथल्या लोकांना वाचून/समजवून सांगावा अशाच अर्थाचा आहे, कारण वरील लेखात सांगितलेला राष्ट्रवाद(?) पाळणारे हे तिन्ही घाणेरडे देश आहेत. तथाकथित विचारवंतांचे(की विचारजंताचे?) विचार वाचून "राष्ट्रवाद" या शब्दाचीच ठासली आहे असे दिसते. राष्ट्रवाद म्हणजे इतर देशांवर(राष्ट्रांवर किंवा राष्ट्रहितांवर)हल्ला असा त्याचा कधीही अर्थ होत नाही. राष्ट्रवाद एक विश्वास, पन्थ या राजनीतिक विचारधारा है जिसके द्वारा व्यक्ति अपने गृह राष्ट्र के साथ अपनी पहचान बनाता या लगाव व्यक्त करता है। यह एक ऐसी अवधारणा है जिसमें राष्ट्र को सबसे अधिक प्राथमिकता दी जाती है। लहानपणी वाचलेली एक सत्यघटना आठवते. दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी(उच्च अधिकारी)व्यक्ती भारतात येते, तीला भारतीय(राष्ट्रपती वा उच्च अधिकारी)व्यक्ती आंबा खायला देते. तेव्हा ती व्यक्ती ते नाकारते व म्हणते मी आंबा खाणार नाही कारण जपानमध्ये आंबे पिकवले जात नाही. जर मी आंबा खाल्ला आणि तो मला आवडला तर मला तो नेहमी खावासा वाटेन. व नंतर मी आंब्यासाठी माझे येन(जपानी चलन/Japanese Yen)त्यासाठी खर्च करेन. आणि हे माझ्या गरीब देशाला मुळीच परवडणार नाही. त्यावेळी अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर अणुस्फोट करून जपान बेचिराख करण्यात आला होता! याचा अर्थ अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही राष्ट्राचे हित जपणे याला म्हणतात राष्ट्रवाद! लेखकाला नम्र विनंती की असे काही उच्च दर्जाचे लेख चुकीच्या पद्धतीने लिहायचे असेल तर अमेरिकेत किवा पाकिस्तानात जावून राहावे. लेखकाचे विचार आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे नाहीत. भारतात अशी चूक खपवून घेतली जाणार नाही!

In reply to by आयुर्हित

मारवा Fri, 05/09/2014 - 07:45
आपण च वर दिलेल्या राष्ट्रवाद या दुव्यातुन एक महाख्यान के तौर पर राष्ट्रवाद छोटी पहचानों को दबा कर पृष्ठभूमि में धकेल देता है। अंग्रेज़ों के ख़िलाफ़ चले राष्ट्रवादी आंदोलन के दौरान रवींद्रनाथ ठाकुर जैसी हस्तियाँ इस विचार को संदेह की निगाह से देखती थीं। आपण च वर दिलेल्या प्रतिसादातुन १-कारण वरील लेखात सांगितलेला राष्ट्रवाद(?) पाळणारे हे तिन्ही घाणेरडे देश आहेत. २-तथाकथित विचारवंतांचे(की विचारजंताचे?) विचार वाचून ३-भारतात अशी चूक खपवून घेतली जाणार नाही! आपल्याच स्वाक्षरीतुन कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ रवींद्रनाथ ठाकुर यांचे विचार त्यांना व्यक्त करु देण्यासाठी व त्यांना भारतातच राहु देण्यासाठी आपले अनेक आभार !

मारवा Fri, 05/09/2014 - 07:56
I am not against one nation in particular, but against the general idea of all nations. What is the Nation? It is the aspect of a whole people as an organized power. This organization incessantly keeps up the insistence of the population on becoming strong and efficient. But this strenuous effort after strength and efficiency drains man's energy from his higher nature where he is self-sacrificing and creative. For thereby man's power of sacrifice is diverted from his ultimate object, which is moral, to the maintenance of this organization, which is mechanical. Yet in this he feels all the satisfaction of moral exaltation and therefore becomes supremely dangerous to humanity. He feels relieved of the urging of his conscience when he can transfer his responsibility to this machine which is the creation of his intellect and not of his complete moral personality. By this device the people which loves freedom perpetuates slavery in a large portion of the world with the comfortable feeling of pride of having done its duty; men who are naturally just can be cruelly unjust both in their act and their thought, accompanied by a feeling that they are helping the world in receiving its deserts; men who are honest can blindly go on robbing others of their human rights for self-aggrandizement, all the while abusing the deprived for not deserving better treatment. We have seen in our everyday life even small organizations of business and profession produce callousness of feeling in men who are not naturally bad, and we can well imagine what a moral havoc it is causing in a world where whole peoples are furiously organizing themselves for gaining wealth and power. Nationalism is a great menace. It is the particular thing which for years has been at the bottom of India's troubles. And inasmuch as we have been ruled and dominated by a nation that is strictly political in its attitude, we have tried to develop within ourselves, despite our inheritance from the past, a belief in our eventual political destiny.

In reply to by मारवा

मारवा Fri, 05/09/2014 - 08:26
वरील विचार ज्या मुळ निबंधातील आहेत तो रवींद्रनाथ ठाकुर यांचा मुळ निबंध वाचण्यासाठी व रवींद्रनाथ ठाकुर यांच्या इतरही अनेक विषयांवरील सुंदर लेखासाठी ही वेबसाइट अतिशय सुंदर आहे. कविता गाणी तर फार च सुंदर आहेत बरेच मटेरीयल बंगालीत असले तरी इंग्रजी त ही आहे. एकवेळ अवश्य भेट द्या. http://tagoreweb.in/Render/ShowContent.aspx?ct=Essays&bi=72EE92F5-BE50-40D7-8E6E-0F7410664DA3&ti=72EE92F5-BE50-4A47-2E6E-0F7410664DA3&ch=1

दिपोटी Fri, 05/09/2014 - 09:31
उत्तम विचार मांडणारा एक उत्तम लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! मारवा यांचे विचार आजच्या घडीला अंमलात आणताना येणार्‍या अनेक अडचणी वर अनेकांनी आपापल्या प्रतिसादात मांडल्या आहेत. त्यांच्याशी पण निश्चित सहमत आहे, पण मात्र यामुळे मारवा यांच्या विचारांना सरळ हिणवणे वा केराची टोपली दाखवणे उचित होणार नाही. काहीजणांनी वर 'विचार चांगला वा आदर्श आहे पण आजच्या काळात अंमलात आणता येणार नाही' असा काहीसा निराशावादी सूर लावला आहे. माझ्या मते या विचाराकडे एक आदर्श असे अंतिम साध्य (ideal target/goal) म्हणून बघावे. याचा अर्थ आज लगेच ही विचारप्रणाली पूर्णपणे अंमलात आणावी असे नाही, पण भविष्यात ही आदर्श विचारसरणी - हळूहळू का होईना - अनुसरण्यासाठी जागतिक पातळीवर जी विचारांची परिपक्वता लागेल, ती आपापल्या मनात बिंबवण्याची सुरुवात - या परिवर्तनाची फक्त एक सुरुवात (start of the transition process) - आज करणे तर नक्कीच शक्य आहे. 'आदर्श' शब्द वापरल्यावर लगेच 'not practical' असा सूर येऊ शकतो ... पण आपले साध्य हे नेहमीच आदर्श असायला हवे, मग त्या साध्यापर्यंत आपण १००% न पोहोचता जरी ८०-९०% पोहोचले तरी एकंदर परिस्थितीमध्ये ती सुधारणाच असेल. We do not ditch a solution to a problem just and only because we see obstacles in implementing the solution. Obstacles are meant to be overcome. 'येणार्‍या संभाव्य अडचणींमुळे मूळ चांगला विचारच सोडून देणे' आणि 'येणार्‍या संभाव्य अडचणींचा काहीही विचार न करता एखाद्या चांगल्या विचाराची सरधोपट अंमलबजावणी करणे' दोन्ही पर्याय घातकच ठरतील. याउलट संभाव्य अडचणींवर मात करुन व त्यातून मार्ग काढून सर्वांच्या हिताच्या अशा एका आदर्श व अंतिम साध्याच्या दिशेने वाटचाल करणे ही आपली प्रगती-उत्क्रांती होईल. राष्ट्रवाद मोडून काढण्याने होणारे फायदे (प्रचंड मनुष्यसंहार, विस्थापित कुटुंबे, संरक्षणावर होणारा अमाप खर्च व त्यामुळे इतर विधायक व मूलभूत गरजेच्या प्रकल्पांना न मिळणारा निधी, द्वेष-तिरस्कार या सर्व नकारात्मक गोष्टींना मिळणारा चाप) पहाता 'राष्ट्रवाद मोडून काढण्यात येंणार्‍या संभाव्य अडचणींवर मात करणे' हा पर्याय 'राष्ट्रवाद पोसत बसणे' या पर्यायापेक्षा मानवजातीसाठी जास्त हिताचा ठरतो. 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेला विचारजंती वा चार वेळा जेवून ढेकर देताना मांडलेला विचार असे म्हणुन उडवून लावणे अगदी सोपे आहे, पण अंतिमतः आपापले वैविध्य-वैशिष्ट्य जोपासून एकत्र रहाणे (to co-exist within a culturally diverse environment) ही विचारसरणीच आपल्याला पुढे नेईल ही वस्तुस्थिती मागे उरते. - दिपोटी

In reply to by दिपोटी

चौकटराजा Fri, 05/09/2014 - 13:33
राष्ट्र वा धर्म यानी मानव समाज एक आणला की त्यानी त्याची छकले केली ते सगळ्यानाच ठाउक आहे. अनेकाना असे वाटते की या कल्पना नाश पावणे शक्य नाही. पण मला ते शक्य वाटते. जाती निर्मूलन जनांच्या मनात वसत असताना त्यांची पुनः पुन्हा स्थापना आजकालचे " राजे रजवाडे' करीत आहेत. या राजांनीच विटनाम चे युद्ध विनाकारण खेळले.शीतयुद्धाची मजा चाखली. तिथे एक राजा उदयाला आला म्हणाला " अरे आपल्या पासून आठ हजार मैलापलिकडील राजाशी आपल्याला शत्रूत्व हवे आहे की टूथपेस्ट ?

पोटे Fri, 05/09/2014 - 12:34
राष्ट्र, धर्म आणि प्रांत या विषयावर भोळ्या माणसांना लढवून लबाड माणसे मजा मारतात.

गुलाम Fri, 05/09/2014 - 13:57
सर्वप्रथम तुमचं अभिनंदन एवढा वेगळा विचार इथे मांडण्याचं धाडस दाखवल्याबद्दल!! पण आपला (म्हणजे फक्त भारताचा नव्हे) समाज अजुन हा विचार समजण्याएवढा नक्कीच प्रगल्भ नाहिये. मिपासारख्या तुलनेने प्रगल्भ संस्थळावरच्या या तिखट प्रतिक्रीया पाहून तर याची खात्री पटते. पण हा विचार मांडायला सुरुवात तर केलीच पाहिजे तेही विरोध होणार हे गृहीत धरुन. आपल्याकडे देशप्रेम नेहमीच पवित्र गाय (होली काऊ) मानल्यामुळे त्याच्याविरोधात काहिही ऐकुन घेणं अवघड जातं. शिवाय आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर आंतरदेशीय संबंधात भारत नेहमीच रिसिव्हींग एण्डवर राहिला असल्यामुळे राष्ट्रवादात काही चुकीचं आहे असं आपल्याला वाटतच नाही किंबहुना होस्टाईल शेजारी देशांमुळे तो आवश्यक बनतो. पण याच राष्ट्रवादामुळे जर्मनीने जगावर महासंहारक दुसरं महायुध्द लादलं किंवा अलिकडे अमेरिकेने व्हिएतनाम, ईराक वगैरेवर हल्ला चढवला हे आपल्या लक्षात येत नाही आणि आलंच तरी त्याबद्दल कौतुकच वाटतं. याच राष्ट्रवादाच्या पायात अगणित माणसे आणि उर्जा आत्तापर्यंत खर्च झालीय आणि अजूनपण होत राहील. ती उर्जा मानवतेच्या कल्याणासाठी वापरली गेली असती तर जगात कधीच कुणाला उपाशी झोपावं लागलं नसतं. मला मान्य आहे की हा विचार अत्यंत आदर्शवादी आहे आणि जमिनीवरची वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे. पण हा विचार भरल्यापोटी करायचा विचार आहे हे मात्र मला अजिबात मान्य नाही. कारण कुठल्याही युध्दात पहिला (डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट) बळी जातो तो अर्धपोटी गरिबांचाच. उद्या जर भारताने पाकिस्तान विरुध्द युध्द पुकारले आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाट लागून महागाई वाढली तर त्याचा परिणाम मध्यमवर्गीय विचारवंतांवर जास्त होईल की हातावर पोट असलेल्या गरिब मजुरावर??

दिनेश सायगल Fri, 05/09/2014 - 14:14
राष्ट्रवादाने बळी घेतले, हे मान्य करतो. अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात बळी धर्मयुद्धातून, क्रुसेड्समधून घेतले गेले आहेत. धर्म सर्वात आधी, देश त्यानंतर अशी किंवा तत्सम शिकवण मानणार्‍या आणि त्याचे निमित्त करून संहार करणार्‍या धर्मांधांना तुम्ही हा विचार कसा पटवून देणार आहात? 'दार उल इस्लाम' आणि 'दार उल हरब' अशी जगाची विभागणी करणार्‍यांना तुम्ही कोणता संदेश देणार आहात?

मारवा Fri, 05/09/2014 - 15:39
कन्फ़्युज्ड अकाउंटंट मी माझी मते सुत्ररुपात मांडण्याचा एक प्रयत्न करतो. पण यात सर्व मते कव्हर झालेली नाहीत. कदाचित याने मला नेमक काय म्हणायचय ते स्पष्ट होण्यास मदत होइल. बघा ट्राय करुन ! १ राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे. त्यात नैसर्गिक वा दैवी असा कुठलाही भाग नाही. हीच्या मुळाशी माणसाच्या स्व=(वंश-वर्ण-जमात-धर्म-संस्कृती इ.) च श्रेष्ठ आहेत व त्यासाठी हा असलेल्या माणसांच्या समुहाचे (टोळीचेच) स्वतंत्र राष्ट्र असण्याचा आग्रह आहे. व त्याच बरोबर त्या वैशिष्ट्याच्या वर्चस्वासाठी चा ही आग्रह आहे. झेनोफ़ोबीया म्हणजे च जे वरील प्रमाणे स्व=(वंश-वर्ण इ.) नसलेले “इतर” आहेत त्यांच्याप्रति असलेली भीती व द्वेष ही अजुन एक नकारात्मक प्रेरणा या मागे आहेत. २ राष्ट्रवाद मुळात माणसांना माणसांपासुन तोडण्याचे काम करतो. स्व-वर्चस्व वा स्व-संरक्षण या दोन्ही प्रेरणांनी प्रत्येक राष्ट्र सैन्य निर्मीती व युद्ध सज्जतेवर अमुल्य प्रचंड अशी मानवी व इतर संसाधनांची गुंतवणुक करतात. जी बहुतांश शिक्षण/आरोग्य/विकास या अत्यंत निकडीच्या क्षेत्रांना डावलुन च होते. ३ व्यक्तीगत स्तरावर माणुस जो विवेक सर्वसाधारणपणे बाळगतो तो राष्ट्र या संकल्पने च्या नावाखाली पायदळी तुडवला जातो. माणुस माणसाला मारायला एका पायावर तयार होतो. मारण्या मरण्यासाठी एक आग्रही प्रोत्साहन व बधिरतेने आदेशाचे पालन करण्याचा आग्रह सैनिका ला केला जातो. राष्ट्रवाद एक असे लायसन्स टु कील सैनिकाला देते की जे पुर्णपणे अनैतिक असे असते. ४ राष्ट्रवादा ची चौकट एकदा मिळाली की वंश-वर्ण-धर्म-संस्कृती हा केवळ एक स्वाभाविक वेगळेपणा न राहता वा जीवनशैली न राहता ही एक इतरांवर वर्चस्व गाजविण्याची वा इतरांपासुन संरक्षण करण्याची बाब बनते. या साठी मग हिंसाचार हा नैतिक व कायदे संमत होतो. व “इतर” जे आहेत ते शत्रु बनतात. ५ राष्ट्रवाद हा मुळात मानवनिर्मीत व कृत्रीम असल्यानेच त्याला राष्ट्रीय( झेंडा-चलन-पशु-पक्षी-सील-भाषा) आदिंची निर्मीती/जोपासना व महत्वाचं म्हणजे प्रचार करणे ही एक अत्यंत गरजेची अशी बाब बनते. या सर्व प्रतिकांना पावित्र्य बहाल करणं हा आवश्यक असा उपचार बनतो. वरील सर्व घटकांचा एकत्रीत परीणाम मनावर ( गारुड) झाल्यावर एक राष्ट्रवादा चा मनावर खोलवर परीणाम करणारा उन्माद निर्माण होतो. ६ दुहेरी नकली नीतीमुल्ये राष्ट्रवाद निर्माण करतो. एखादी गोष्ट तथ्यात्मक पातळीवर योग्य की अयोग्य हे विवेक बुद्धीप्रामाण्य नैतिकता आदि कसोटींवर घासुन न पाहता ते प्रथम विशीष्ट राष्ट्राच्या संदर्भात कशी आहे यावर निर्णय घेतला जातो. हा नैतिक निर्णयांचा क्रायटेरीया जाणीवपुर्वक संकुचीत केला जातो जे पुर्णपणे चुकीचे व अ-मानवीय असे आहे. गुलामगीरी संदर्भातील वसाहतवाद्यांची भुमिका बघावी. यात अनेक विरोधाभास जे दिसतात त्याच्या मुळाशी राष्ट्रवादा ने निर्माण केलेली दुहेरी नीतीमुल्ये च आहेत. ७ मुलत: अहंकाराधिष्ठीत असलेला राष्ट्रवाद (टोळीवाद) हा कॉम्पीटीशन स्पर्धे वर आधारीत असलेल्या मानवतेचे खुरटे रुप दाखवितो. मात्र सर्वात वाईट बाब म्हणजे प्रेमाधिष्ठीत को-ऑपरेशन सहकार यावर आधारीत असलेल्या मानवी सर्जनशीलतेच्या कळ्यांना तो पुर्णपणे फ़ुलु देत नाही. परस्पर मानवी सहकार, सिनर्जी यांची अगदी छोटी झलक आपल्याला सर्न ने अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने केलेल्या विश्वनिर्मीतीचे गुढ उकलु पाहणारया असामान्य प्रयोगात, संयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड हेरीटेज च्या संदर्भात अवघ्या विश्वाचा वारसा असणारया गोष्टींना जपण्याच्या प्रयत्नात दिसुन येते.

In reply to by मारवा

असंका Fri, 05/09/2014 - 18:07
आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळलं. मला आपलं म्हणणं असं आहे असं वाटतं- १. एकसंध मानवसमाज हे आपले दीर्घकालीन उद्दीष्ट/स्वप्न हवे. त्यात राष्ट्र ही संकल्पना हा एक अडथळा आहे/ठरेल. मूळात राष्ट्र ह्या संकल्पनेत काहीही दैवी नसल्याने त्याविरुद्ध जाणे हे शक्य आहे. तसेच त्या संकल्पनेत निसर्गाच्या नियमांचा काहीही सहभाग नसल्याने, ही संकल्पना जेव्हा मानवसमाज सोडेल, तेव्हा ते अनैसर्गिक असणार नाही. २. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सद्ध्याच्या व्यवस्थेतील तोटे/दोष यांची यादी आपण दिली आहे. हा लेख चांगला मुद्देसूद आणि भावनांना कमीत कमी उत्तेजित करणारा असा होता. सारांश : अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम| उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम...|| (बघा आम्ही भारतीय किती श्रेष्ठ- पूर्वीपासूनच हेच सांगत नव्हतो? ;-) ) (या दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!)

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 18:21
श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. आता मानवी संस्कृती प्रगत असावी कि नसावी? तंत्रज्ञानाच्या प्रगतीला मानवाच्या कल्याणासाठी वापरले जावे कि नाही?(मी १०,००० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत म्हणतोय.)Rephrasing, what I want to ask is whether cutural and scientific advancedment should be there in first place and if yes, should it be put to use for benevolent ends. या प्रश्नांची उत्तरे नि:शंकपणे हो अशी असावीत असे मानू. आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या - १. राष्ट्रे नसली तर, आजच्या मानवतेसाठी, कोणत्याही प्रकारचे प्रशासनच आवश्यक आहे का? मानवजात प्रशासित असावी कि अप्रशासित? आजघडीच्या मानवी आंतरसंबंधांची किचकटता पाहता कोणतेही प्रशासन नको व कोणत्याही मुद्द्यावर कितीही प्रमाणात एकत्र आलेला एक गट (जसे एक कंपनी) आणि असाच दुसरा गट (जसे तिचे सप्लायर वा ग्राहक) मध्यस्थांच्या अभावी (in the absence of a government or similar recognized body)सहजजीवन करू शकतात असे आपणांस वाटते काय? बहुधा नसावे. २. मग प्रश्न येतो ज्याला केंद्रिय म्हणता येईल असे जगात एकच सरकार असावे. या सरकारमधे सत्तेचे (न्यायिक, वैधानिक, प्रशासकीय अधिकारांचे) विकेंद्रीकरण झालेले नसावे असे आपल्याला म्हणायचे आहे का? सारे निर्णय राजधानीत घेतले पाहिजेत? बहुधा नसावे. ३. म्हणजे पुन्हा अशा जगात भिन्न सत्ताशक्ती असणारी वर्तुळे निर्माण करणे आले. यात केंद्राच्या अखत्यारित काय काय असावे? समजा असे जगत्सरकार लंडनमधून चालले. जगातल्या सर्व लोकांनी (आपण ते सगळे चांगले मतदाते आहेत असे मानू) मिळून, उदाहरणादाखल, भारताबद्दल काय काय ठरवावे? नकाशा? भाषा? झेंडा? आदरस्थाने? आज केंद्र सरकारला जे जे अधिकार आहेत ते सारे असावेत असे म्हणत असाल तर सवत्याने प्रतिसाद देईन. ४. सर्व राज्यकर्त्यांचा नि सर्वमतदात्यांचा सदुद्देश असूनही, असे सरकार, जगातल्या लोकांच्या राजकीय इच्छा पूर्ण करेल काय? सदुद्देश नसला तर? ५. असे सरकार कसे निवडावे? कोणती राज्यपद्धती असावी? कोणती चयनपद्धती असावी? टुंड्रामधल्या लोकांनी भारत वा ईंडीया हे नाव देखिल ऐकलेले नसताना त्यांनी भारतावर, भारताच्या लोकांवर प्रचंड परिणाम करणारे सरकार निवडावे का? ६. प्रचंड मानवतावाद पुढे ठेउन मतदान करणारे ते प्रचंड पॅरोकियल मतदान करणारे असे लोक असतील. त्यांचे रिलेटिव प्रमाण काय असेल? कोणते मुद्दे एखादे सरकार बनण्याचे 'खरे कारण' असतील? (इथे सरकार म्हणजे सरकारच नाही, पण कोणतीही निती बनवणारी नि राबवणारी संस्था.) इथे नवेच, आजपेक्षा भयानक राजकारण होणार नाही, असे आपणांस वाटते काय? अशी खात्री आहे का? ७. जगातल्या प्रत्येक देशात स्थानिक माणूस आपापल्याला सर्वात सुरक्षित महसूस करतो. वरच्या मॉडेलमधे आंतरिक सुरक्षेचे काय? कोणीही कोणत्याही जाऊ लागला (सैन्य नाही म्हणत मी, टोळ्यापण नाही, फक्त गुंड लोक, एकट्याने, ४-५ च्या गटांत) तर देश सुरक्षित उरतील का? ८. अवांतर नको म्हणून फालतू उदाहरण देत आहे. समजा अ ठिकाणी बूट घालणे पाप मानतात. ब ठिकाणी मोठे पुण्य मानतात. मग कायदा काय असावा? उलटसुलट असेल तर त्यामागचे कारण काय म्हणून सांगावे? ९. बाकी सगळे ठिक मानू. म्हणजे जे नियम, संस्था काढून फेकता येतात, त्या आरामात करू. आता हे पाहा. आज काय कमी आहे? १. युद्धे - जगात किती देश आहेत. ३०० माना. तर ३००*२९९ इतक्या शत्रूंच्या जोड्या आहेत का? २. व्यापार - व्यापार, संपत्ती, इ चा मुद्दा घेतला तर जग जवळजवळ एक देशच आहे. भारताचा ट्रेड जीडीपी रेशो ४०% आहे!!! ३. सीमा नसणे - इतिहासातही नि आजही सीमा जलदछायेप्रमाणे बदलतात. १५-०८-४७ पासून भारतातच किती सीमाबदल चालू आहेत? २०-३० तरी असतील. यातले बरेच शांतीपूर्ण नव्हते हे मान्य आहे. आजही भारत नि बांगलादेश स्थानिकांच्या सुखासाठी त्यांचे नागरिकत्व बदलण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत नाही आहेत का? ४. इमिग्रशन - भारतीय जगभरात कुठे कुठे, किती किती नि कसे कसे जगत आहेत हे पहा. राष्ट्रवादाने काय बिघडावले? ५. संपत्ती - जगातल्या नागरिकांची इतर देशातील संपत्तीची क्रॉस होल्डिंग चकित करणारी आहे. ६. नागरिकत्व - फारच इच्छा असेल तर (आखात इ वगळता) कुठेही जाऊन पिढ्यान पिढ्या राहता येते. ७. लोकभावना - राजनेत्यांच्या शत्रूभावनेला लोक सहसा तितकीशी दाद देत नाहीत. ८. संस्कृती - लोकांनी स्वतःच्याही नकळत जगातलं कूठलं काय काय घेतलं आहे याला सीमा नाही. बहुधा माणसाच्या मुक्तभावनेची वलये असतात. म्हणून कुटुंबासह माणूस कडी कुलूप लावून घरात राहतो. मग तो पोलिसांच्या सुरक्षेखाली नगरात वावरतो. तिथे त्याचे वलय अजून मोठे झालेले असते. त्यानंतर मात्र सैन्याचे वलय गरजेचे असते. कारण बर्‍याच गोष्टी सुरक्षित ठेवायच्या असतात. लक्षात घ्या - १. जिथे युद्धेच होत नाहीत तिथे सीमेवर सैनिक बिड्या फुकत (सॉरी, बिअर पीत) पडलेले असतात. जगातल्या बहुतांश सीमा अश्याच आहेत. २. ताण कमी झाला कि सैनिक कमी केले जातात. ३. जिवित हानी, तिही सिविल, कमीत कमी असावी हा संकेतच नसून, नियम आहे. ४. शस्त्रे बनवायची नि विकायची याची वाणिज्यिक लॉबी आहे. ती वापरायची नाहीत हा ही संकेत आहे. ५. मानवतेत एक "किमान विकृतेतेचे प्रमाण" तसेच "किमान गुन्हेगारीचे प्रमाण" असते. कोणतीही पद्धत आणा, ते दिसणारच. त्याचे खापर असलेल्या 'व्यवस्थेवरच' फोडू नये. शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्‍या आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत.

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 18:39
ज्या वाचकांना इतके मोठे प्रतिसाद वाचायची सवय नाही - राष्ट्र ही संकल्पनाच कचर्‍यात काढणे अव्यवहार्य, कठिण वा कदाचित असंभव असावे, पक्षी 'आंतरराष्ट्रीय संबंध' कसे जास्त सलोख्याचे असतील यावर फोकस असावा.

In reply to by arunjoshi123

मारवा Sat, 05/10/2014 - 18:01
अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. अशी एक प्राचीन चायनीज म्हण आहे. व स्टीफ़न कोव्हे हे विख्यात लेखक त्यांच्या टाइम मॅनेजमेंट च्या सिद्धांताला एक नाव देतात. फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट. तर मला अस म्हणावयाचे आहे की एक एक मुद्दा क्रमा क्रमा ने शिस्तीत लयीत घेत पुढे सरकलो तरच आपल्या चर्चेला काही अर्थ आकार येउ शकतो व ती काही निर्णायक बिंदु वर पोहोचु शकते. हाच कुठल्याही चांगल्या चर्चेचा हेतु असतो असे मला वाटते. कीमान आपण त्या दिशेने प्रयास तरी करायलाच हवा. मी आपला जुना वाचक आणि चाहता आहे .आपल्या व्यासंगाच्या ,मेहनतीच्या, तळमळीच्या विषयी मी नितांत आदर बाळगुन ही माझे एक मत निर्भीड व प्रांजळपणे मांडतो की आपला प्रतिसाद १-अत्यंत विस्कळीत आहे. २-अनेक परस्पर विरोधी विधानांनी युक्त असा आहे. ३-ज्याचा परीणाम मुळ विषय भरकटवण्यात व कन्फ़्युजन निर्माण करण्यात होतो. माझ्या वरील विधानांच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या प्रतिसादातील एक उदाहरण घेउ आपल्या प्रतिसादाची सुरुवातच आपण या विधानाने करतात विधान क्र.१ श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. अरुण जी नंतर अनेक वळणे घेत आपले खालील दुसरे विधान येते. विधान क्र.२ शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. अरुण जी या विरोधाभासाची कृपया अगोदर विल्हेवाट लावु या म्हणजे तुमची राष्ट्रवादा वरची भुमिका नेमकी काय आहे ते मला स्पष्ट कळेल. तसेच आणखी काही गुढ अनाकलनीय विधाने तुमच्या प्रतिसादात आहेत उदा. हे विधान घेउ या विधान क्र,३ मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्याा आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत. अरुण जी या संकल्पना खरया कशा ? नैसर्गिक कशा ? रेंजबाउंड अर्थाने म्हणजे नेमक काय व आवश्यक कशा ? हे मला तरी अतिशय गुढ असे विधान वाटते अध्यात्मिक निर्वाण वा माया अशा संकल्पनांसारखे कृपया अगोदर हे क्लिअर करावे वरील गोष्टी क्लिअर करण ही मला वाटत आपल्या दोघांसाठी टु पुट फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट असेल, आणि आपल्या थाउजंड माइल्स जर्नी मधील पहीली च स्टेप आहे. अगोदर ही स्टेप ओलांडु या. मग कीतीही वेळ का लागेना. एकंदरीत प्रतिसादातुन व मुळ लेखातुन आपल्या हे लक्षात आलेलेच असेल की मुळात राष्ट्रवाद हा एक उन्माद आहे या पहील्या स्टेप लाच कीती रेसीस्टन्स आहे. अजुन पुढे सरकायला बराच अवकाश आहे. आपण राष्ट्रवाद हा मुळात काय कसा आहे छान छान आहे की वाइट आहे आवश्य्क की अनावश्यक आहे या निश्चीतीच्या पहील्या केवळ पहील्या पायरी वरच घट्ट पाय रोवुन चर्चा करत आहोत. या पहील्याच पायरीला योग्य न्याय दिल्याशीवाय पुढे जाणं सरकणं हे करु शकतो मात्र ते कीती निरर्थक व निरुपयोगी आहे. हे उघड आहे. अगदी गावठी उदाहरण म्हणजे एखादा अट्टल मद्यपी माझ्या ड्रींक चा काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही उगाचच बाउ करताय इतक्याशा ने काही होतच नसतं इतक्या प्राथमिक डीनायल( ल्कोहोलिक्स अनोनिमस फ़ेम) स्टेज मध्ये आहे. त्याला या पुढील स्टेजेस विषयी बोलण्यात काही अर्थ आहे का अनलेस तो हे मान्य करतो की येस अल्कोहोल इज एव्हील आणि मी त्याच्या गर्तेत अडकलोय. काही प्रश्न ही कुटील असतात जसे ब्रिटीश भारतीयांना स्वातंत्र्या च्या मागणीच्या प्रत्युत्तरात विचारत की तुम्ही अगोदर हे सांगा की आम्ही गेल्यावर तुम्ही हा देश चालवणार कसा ? मग तुमच्या स्वातंत्र्याच काय ते बघु. इथे सर्वात कुटील भाग असा होता की प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामागे तेव्हाची स्वातंत्र्याची जी अत्यंत न्याय्य अशी मागणी होती ते देण्याच्या जबाबदारी पासुन हात झटकण्याचा होता. मुळ मागणी कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष=अवहेलना=टाळण=भरकटवणं असा होता. तुम्ही असे कुटील आहात असे मी म्हणत नाहीये कृपया गैरसमज नसावा. ते प्रश्न पुढील पायरीचे आहेत. इथे अजुन पहीली वरच मारामारी खुप आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की ते प्रश्न अनावश्यक वा चुकीचे आहेत मात्र अस्थानी व चुकीच्या क्रमाने अगोदर उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे ही निश्चीतच देण व त्यावर विचार मंथन होण ही मात्र निश्चीतच पुढील पायरी आहे. पण कृपया हे बघा की मुळ विचार अगोदर क्लिअर होण मान्य होण हेच कीती कठीण व तितकच अत्यावश्यक आहे. अरुण जी आपण संवेदनशीलतेने माझ्या भावना व्यक्तीगत न घेता समजुन घ्याल या खात्रीसहीत आपला मारवा

In reply to by arunjoshi123

मारवा Sat, 05/10/2014 - 18:02
अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. अशी एक प्राचीन चायनीज म्हण आहे. व स्टीफ़न कोव्हे हे विख्यात लेखक त्यांच्या टाइम मॅनेजमेंट च्या सिद्धांताला एक नाव देतात. फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट. तर मला अस म्हणावयाचे आहे की एक एक मुद्दा क्रमा क्रमा ने शिस्तीत लयीत घेत पुढे सरकलो तरच आपल्या चर्चेला काही अर्थ आकार येउ शकतो व ती काही निर्णायक बिंदु वर पोहोचु शकते. हाच कुठल्याही चांगल्या चर्चेचा हेतु असतो असे मला वाटते. कीमान आपण त्या दिशेने प्रयास तरी करायलाच हवा. मी आपला जुना वाचक आणि चाहता आहे .आपल्या व्यासंगाच्या ,मेहनतीच्या, तळमळीच्या विषयी मी नितांत आदर बाळगुन ही माझे एक मत निर्भीड व प्रांजळपणे मांडतो की आपला प्रतिसाद १-अत्यंत विस्कळीत आहे. २-अनेक परस्पर विरोधी विधानांनी युक्त असा आहे. ३-ज्याचा परीणाम मुळ विषय भरकटवण्यात व कन्फ़्युजन निर्माण करण्यात होतो. माझ्या वरील विधानांच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या प्रतिसादातील एक उदाहरण घेउ आपल्या प्रतिसादाची सुरुवातच आपण या विधानाने करतात विधान क्र.१ श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. अरुण जी नंतर अनेक वळणे घेत आपले खालील दुसरे विधान येते. विधान क्र.२ शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. अरुण जी या विरोधाभासाची कृपया अगोदर विल्हेवाट लावु या म्हणजे तुमची राष्ट्रवादा वरची भुमिका नेमकी काय आहे ते मला स्पष्ट कळेल. तसेच आणखी काही गुढ अनाकलनीय विधाने तुमच्या प्रतिसादात आहेत उदा. हे विधान घेउ या विधान क्र,३ मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्याा आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत. अरुण जी या संकल्पना खरया कशा ? नैसर्गिक कशा ? रेंजबाउंड अर्थाने म्हणजे नेमक काय व आवश्यक कशा ? हे मला तरी अतिशय गुढ असे विधान वाटते अध्यात्मिक निर्वाण वा माया अशा संकल्पनांसारखे कृपया अगोदर हे क्लिअर करावे वरील गोष्टी क्लिअर करण ही मला वाटत आपल्या दोघांसाठी टु पुट फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट असेल, आणि आपल्या थाउजंड माइल्स जर्नी मधील पहीली च स्टेप आहे. अगोदर ही स्टेप ओलांडु या. मग कीतीही वेळ का लागेना. एकंदरीत प्रतिसादातुन व मुळ लेखातुन आपल्या हे लक्षात आलेलेच असेल की मुळात राष्ट्रवाद हा एक उन्माद आहे या पहील्या स्टेप लाच कीती रेसीस्टन्स आहे. अजुन पुढे सरकायला बराच अवकाश आहे. आपण राष्ट्रवाद हा मुळात काय कसा आहे छान छान आहे की वाइट आहे आवश्य्क की अनावश्यक आहे या निश्चीतीच्या पहील्या केवळ पहील्या पायरी वरच घट्ट पाय रोवुन चर्चा करत आहोत. या पहील्याच पायरीला योग्य न्याय दिल्याशीवाय पुढे जाणं सरकणं हे करु शकतो मात्र ते कीती निरर्थक व निरुपयोगी आहे. हे उघड आहे. अगदी गावठी उदाहरण म्हणजे एखादा अट्टल मद्यपी माझ्या ड्रींक चा काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही उगाचच बाउ करताय इतक्याशा ने काही होतच नसतं इतक्या प्राथमिक डीनायल( ल्कोहोलिक्स अनोनिमस फ़ेम) स्टेज मध्ये आहे. त्याला या पुढील स्टेजेस विषयी बोलण्यात काही अर्थ आहे का अनलेस तो हे मान्य करतो की येस अल्कोहोल इज एव्हील आणि मी त्याच्या गर्तेत अडकलोय. काही प्रश्न ही कुटील असतात जसे ब्रिटीश भारतीयांना स्वातंत्र्या च्या मागणीच्या प्रत्युत्तरात विचारत की तुम्ही अगोदर हे सांगा की आम्ही गेल्यावर तुम्ही हा देश चालवणार कसा ? मग तुमच्या स्वातंत्र्याच काय ते बघु. इथे सर्वात कुटील भाग असा होता की प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामागे तेव्हाची स्वातंत्र्याची जी अत्यंत न्याय्य अशी मागणी होती ते देण्याच्या जबाबदारी पासुन हात झटकण्याचा होता. मुळ मागणी कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष=अवहेलना=टाळण=भरकटवणं असा होता. तुम्ही असे कुटील आहात असे मी म्हणत नाहीये कृपया गैरसमज नसावा. ते प्रश्न पुढील पायरीचे आहेत. इथे अजुन पहीली वरच मारामारी खुप आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की ते प्रश्न अनावश्यक वा चुकीचे आहेत मात्र अस्थानी व चुकीच्या क्रमाने अगोदर उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे ही निश्चीतच देण व त्यावर विचार मंथन होण ही मात्र निश्चीतच पुढील पायरी आहे. पण कृपया हे बघा की मुळ विचार अगोदर क्लिअर होण मान्य होण हेच कीती कठीण व तितकच अत्यावश्यक आहे. अरुण जी आपण संवेदनशीलतेने माझ्या भावना व्यक्तीगत न घेता समजुन घ्याल या खात्रीसहीत आपला मारवा

कवितानागेश Fri, 05/09/2014 - 19:20
मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे. आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. 'राष्ट्र' त्यातूनच निर्माण होतं. 'वाद' निर्माण होतो, तो "काही" लोकांच्या सत्तापिपासू वृत्तीतून होतो. आणि कुठलाही सत्तापिपासू माणूस ती लालसा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या कुठल्याही भावनेला हात घालू शकतोच. कधी राष्ट्र, कधी धर्म, कधी वर्ण, कधी रक्त, कधी विचार ....

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे Fri, 05/09/2014 - 19:35
आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे
जन्मभूमी कुठपर्यंत.. गाव, शहर, जिल्हा,जिथे आपण वावरलो त्या भागाबाबत नैसर्गिक आहे.. पण जिथे कधी आयुष्यात पाउल टाकलं नाही, किंवा भविष्यात टाकायची शक्यता नाही.. त्याभूमीबाबत जन्मभूमी म्हणून प्रेम इतकं आत्यंतिक कसं होउ शकतं..

In reply to by कवितानागेश

आयुर्हित Sat, 05/10/2014 - 00:31
बाळ सप्रेंच्या पुस्तकातील प्रतिज्ञा अशी होती: पुणे(जिल्हा)माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव आहेत. माझ्या पुण्यावर माझे प्रेम आहे. पुणे देशातील सर्व नागरिकांवर माझे प्रेम आहे. माझ्या पुण्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पेठांचा(!) मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता(?)माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझे पुणे आणि माझे पुणेकर देश बांधव यांच्याशीच निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मनोरंजन,पर्यटन,देवदर्शन,व्यवसाय,नोकरीसाठी मी माझ्या पुणे देशातच राहीन व येथे नोकरी न मिळाल्यास इतर देशांकडे ढुंकूनही पाहणार नाही. मी पुणे सोडून कधीही बाहेरच्या मुंबई,सातारा,सांगली,कोल्हापूर,गोवा या इतर देशात पायही ठेवणार नाही. आणि माझ्या पुढच्या पिढीलाही पाय ठेवू देणार नाही! जय पुणे! जय जय पुणे!!

In reply to by आयुर्हित

विकास Sat, 05/10/2014 - 20:02
प्रतिज्ञेसंदर्भात एकच प्रश्न पडला आहे: मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. यातील सौजन्याने म्हणजे नक्की काय आणि कसे? ;)

In reply to by विकास

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 20:51
सकाळी ९ ते १ आणि ४ ते ९ ह्या वेळेत दृष्टी आणि चेहरा क्षितीजाशी समांतर ठेवणं (इतर वेळी २२अंश आकाशाकडं), बोलताना पूर्ण वाक्यात बोलणं, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणं ऐकून घेणं, जमल्यास क्वचित प्रसंगी ओठांना दोन्ही बाजूंनी वरच्या दिशेनं ७.२५ अंशात वळवणं ह्या सगळ्यास सौजन्य म्हणत असावेत.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Sat, 05/10/2014 - 19:22
मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे.
इतिहास पाहिला तर वरील वाक्य किती चुकीचे आहे ते वेगळे सांगायला नको. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

मारवा Sat, 05/10/2014 - 19:57
बॅटमॅन जी आपण जे म्हणताय त्याचा किंचीत विस्तार करुन इतिहासातील एखादे उदाहरण देउन मांडल्यास आपणास नेमके काय म्हणायचे आहे याचे आकलन सुलभ होइल.

पोटे Sat, 05/10/2014 - 10:33
राज्य धर्म देव या संकल्पना या देशात लबाड लोकांनी भोळ्या लोकांना फसवण्यासाठीच वापरलेल्या आहेत. अगदी रामायण महाभारत काळातही सत्यवतीने भीष्माला ब्रह्मचारी ठेवणं , कैकेयीने कुणाला तरी वनवास घडवणं , धृवाच्या सावत्र आईने त्याला जंगलात ( की डयरेक्ट स्वर्गात पाठवून देवानं वर पाठवला अशी हूल उठवणं ) , हस्तिनापूरसाठी झालेला संग्राम ... अशा घटनांमधून हेच दिसतं की राष्ट्र चालवून त्यात्ण नफा मिळवणे, आणि ऐषो आरामात जगणे, हाच राजघराण्यांचा धंदा होता. अगदी मोघल , मोघलांना आधी दहा पिढ्या सलाम करणारे आणि नंतर स्वतःची टीचभर राज्ये स्थापन करणारे ... या सगळ्यातून राज्य करणे आणि गोळा होणारा ट्याक्स स्वतःच्या खजिन्यात भरणे इतकेच साध्य केले गेले आहे. जनता मात्र राष्ट्र प्रेम, धर्म प्रेम इ इ च्या नावानं झुंजत राहिली, पण राजाला जाब विचारायचे स्वातंत्र्य जनतेला नव्हते.

विकास Sat, 05/10/2014 - 20:05
वर श्री. मारवा यांनी म्हणले आहे की: अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. तर मग आता पहीले पाऊल काय असावे, ते आपण (म्हणजे मारवा) कसे आचरणात आणत आहोत आणि इतरांनी देखील त्याचे कसे अनुकरण करावे, हे पण त्यांनी सांगितले तर या विषयाला अजून सक्रीय चालना मिळेल.

मारवा Mon, 05/12/2014 - 10:36
बंटवारे के दो-तीन साल बाद पाकिस्तान और हिंदुस्तान की हुकूमतों को ख़याल आया कि सामान्य क़ैदियों की तरह पागलों का भी तबादला होना चाहिए, यानी जो मुसलमान पागल हिंदुस्तान के पागलख़ानों में हैं, उन्हें पाकिस्तान पहुँचा दिया जाए और जो हिंदू और सिख पाकिस्तान के पागलख़ानो में हैं, उन्हें हिंदुस्तान के हवाले कर दिया जाए। मालूम नहीं, यह बात माक़ूल थी या गै़र माकूल़, बहरहाल दानिशमंदों के फ़ैसले के मुताबिक़ इधर-उधर ऊँची सतह की कान्फ़ेंस हुई और बिल आख़िर पागलों के तबादले के लिए एक दिन मुक़र्रर हो गया। अच्छी तरह छानबीन की गई - वे मुसलमान पागल जिनके संबंधी हिंदुस्तान ही में थे, वहीं रहने दिए गए, बाक़ी जो बचे, उनको सरहद पर रवाना कर दिया गया। पाकिस्तान से चूँकि क़रीब-क़रीब तमाम हिंदू-सिख जा चुके थे, इसलिए किसी को रखने-रखाने का सवाल ही पैदा नहीं हुआ, जितने हिंदू-सिख पागल थे, सबके-सब पुलिस की हिफ़ाज़त में बॉर्डर पर पहुँचा दिए गए। उधर का मालूम नहीं लेकिन इधर लाहौर के पागलख़ाने में जब इस तबादले की ख़बर पहुँची तो बड़ी दिलचस्प गपशप होने लगी। एक मुसलमान पागल जो बारह बरस से, हर रोज़, बाक़ायदगी के साथ 'ज़मींदार' पढ़ता था, उससे जब उसके एक दोस्त ने पूछा, "मौलवी साब, यह पाकिस्तान क्या होता है?" तो उसने बड़े गौरो-फ़िक्र के बाद जवाब दिया, "हिंदुस्तान में एक ऐसी जगह है जहाँ उस्तरे बनते हैं!" यह जवाब सुनकर उसका दोस्त संतुष्ट हो गया। इसी तरह एक सिख पागल ने एक दूसरे सिख पागल से पूछा, "सरदार जी, हमें हिंदुस्तान क्यों भेजा जा रहा है, हमें तो वहाँ की बोली नहीं आती।" दूसरा मुस्कराया, "मुझे तो हिंदुस्तोड़ों की बोली आती है, हिंदुस्तानी बड़े शैतानी आकड़ आकड़ फिरते हैं।" एक दिन, नहाते-नहाते, एक मुसलमान पागल ने 'पाकिस्तान ज़िंदाबाद' का नारा इस ज़ोर से बुलंद किया कि फ़र्श पर फिसलकर गिरा और बेहोश हो गया। बाज़ पागल ऐसे भी थे जो पागल नहीं थे, उनमें बहुतायत ऐसे क़ातिलों की थी जिनके रिश्तेदारों ने अफ़सरों को कुछ दे दिलाकर पागलख़ाने भिजवा दिया था कि वह फाँसी के फंदे से बच जाएँ, यह पागल कुछ-कुछ समझते थे कि हिंदुस्तान क्यों तक़्सीम हुआ है और यह पाकिस्तान क्या है, लेकिन सही वाक़िआत से वह भी बेख़बर थे, अख़बारों से उन्हें कुछ पता नहीं चलता था और पहरेदार सिपाही अनपढ़ और जाहिल थे, जिनकी गुफ़्तगू से भी वह कोई नतीजा बरामद नहीं कर सकते थे। उनको सिर्फ़ इतना मालूम था कि एक आदमी मुहम्मद अली जिन्नाह है जिसको क़ायदे-आज़म कहते हैं, उसने मुसलमानी के लिए एक अलहदा मुल्क बनाया है जिसका नाम पाकिस्तान है, यह कहाँ हैं, इसकी भौगोलिक स्थिति क्या है, इसके मुताल्लिक़ वह कुछ नहीं जानते थे - यही वजह है कि वह सब पागल जिनका दिमाग पूरी तरह बिगड़ा हुआ नहीं हुआ था, इस मखमसे में गिरफ़्तार थे कि वह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, अगर हिंदुस्तान में हैं तो पाकिस्तान कहाँ हैं, अगर वह पाकिस्तान में हैं तो यह कैसे हो सकता है कि वह कुछ अर्से पहले यहीं रहते हुए हिंदुस्तान में थे। एक पागल तो हिंदुस्तान और पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान और हिंदुस्तान के चक्कर में कुछ ऐसा गिरफ़्तार हुआ कि और ज़्यादा पागल हो गया। झाडू देते-देते वह एक दिन दरख्त़ पर चढ़ गया और टहने पर बैठकर दो घंटे मुसलसल तक़रीर करता रहा, जो पाकिस्तान और हिंदुस्तान के नाज़ुक मसले पर थी, सिपाहियों ने जब उसे नीचे उतरने को कहा तो वह और ऊपर चढ़ गया। जब उसे डराया-धमकाया गया तो उसने कहा, "मैं हिंदुस्तान में रहना चाहता हूँ न पाकिस्तान में, मैं इस दरख़्त पर रहूँगा।" बड़ी देर के बाद जब उसका दौरा सर्द पड़ा तो वह नीचे उतरा और अपने हिंदू-सिख दोस्तों से गले मिल-मिलकर रोने लगा - इस ख़याल से उसका दिल भर आया था कि वह उसे छोड़कर हिंदुस्तान चले जाएँगे। एक एम.एस-सी. पास रेडियो इंजीनियर में जो मुसलमान था और दूसरे पागलों से बिलकुल अलग-थलग बाग की एक खास पगडंडी पर सारा दिन ख़ामोश टहलता रहता था, यह तब्दीली ज़ाहिर हुई कि उसने अपने तमाम कपड़े उतारकर दफादार के हवाले कर दिए और नंग-धड़ंग सारे बाग में चलना-फिरना शुरू कर दिया। चियौट के एक मोटे मुसलमान ने, जो मुस्लिम लीग का सरगर्म कारकुन रह चुका था और दिन में पंद्रह-सोलह मर्तबा नहाया करता था, एकदम यह आदत तर्क कर दी - उसका नाम मुहम्मद अली था, चुनांचे उसने एक दिन अपने जंगले में एलान कर दिया कि वह क़ायदे-आज़म मुहम्मद अली जिन्नाह है, उसकी देखा-देखी एक सिख पागल मास्टर तारा सिंह बन गया - इससे पहले कि खून-ख़राबा हो जाए, दोनों को ख़तरनाक पागल क़रार देकर अलहदा-अलहदा बंद कर दिया गया। लाहौर का एक नौजवान हिंदू वकील मुहब्बत में नाकाम होकर पागल हो गया था, जब उसने सुना कि अमृतसर हिंदुस्तान में चला गया है तो उसे बहुत दुख हुआ। अमृतसर की एक हिंदू लड़की से उसे मुहब्बत थी जिसने उसे ठुकरा दिया था मगर दीवानगी की हालत में भी वह उस लड़की को नहीं भूला था - वह उन तमाम हिंदू और मुसलमान लीडरों को गालियाँ देने लगा जिन्होंने मिल-मिलाकर हिंदुस्तान के दो टुकडे कर दिए हैं, और उसकी महबूबा हिंदुस्तानी बन गई है और वह पाकिस्तानी। जब तबादले की बात शुरू हुई तो उस वकील को कई पागलों ने समझाया कि वह दिल बुरा न करे, उसे हिंदुस्तान भेज दिया जाएगा, उसी हिंदुस्तान में जहाँ उसकी महबूबा रहती है - मगर वह लाहौर छोड़ना नहीं चाहता था, उसका ख़याल था कि अमृतसर में उसकी प्रैक्टिस नहीं चलेगी। युरोपियन वार्ड में दो एंग्लो इंडियन पागल थे। उनको जब मालूम हुआ कि हिंदुस्तान को आज़ाद करके अंग्रेज़ चले गए हैं तो उनको बहुत सदमा हुआ, वह छुप-छुपकर घंटों आपस में इस अहम मसले पर गुफ़्तगू करते रहते कि पागलख़ाने में अब उनकी हैसियत किस किस्म की होगी, योरोपियन वार्ड रहेगा या उड़ा दिया जाएगा, ब्रेक-फास्ट मिला करेगा या नहीं, क्या उन्हें डबल रोटी के बजाय ब्लडी इंडियन चपाटी तो ज़बरदस्ती नहीं खानी पड़ेगी? एक सिख था, जिसे पागलख़ाने में दाखिल हुए पंद्रह बरस हो चुके थे। हर वक्त उसकी जुबान से यह अजीबो-गरीब अल्फ़ाज़ सुनने में आते थे, "औपड़ दि गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मूँग दि दाल ऑफ दी लालटेन!" वह दिन को सोता था न रात को। पहरेदारों का यह कहना था कि पंद्रह बरस के तबील अर्से में वह एक लहज़े के लिए भी नहीं सोया था, वह लेटता भी नहीं था, अलबत्ता कभी-कभी किसी दीवार के साथ टेक लगा लेता था - हर वक्त खड़ा रहने से उसके पाँव सूज गए थे और पिंडलियाँ भी फूल गई थीं, मगर जिस्मानी तकलीफ़ के बावजूद वह लेटकर आराम नहीं करता था। हिंदुस्तान, पाकिस्तान और पागलों के तबादले के मुताल्लिक़ जब कभी पागलख़ानों में गुफ़्तगू होती थी तो वह गौर से सुनता था, कोई उससे पूछता कि उसका क्या ख़याल है तो वह बड़ी संजीदगी से जवाब देता, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान गवर्नमेंट!" लेकिन बाद में 'आफ दि पाकिस्तान गवर्नमेंट' की जगह 'आफ दि टोबा टेक सिंह गवर्नमेंट' ने ले ली, और उसने दूसरे पागलों से पूछना शुरू कर दिया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जहाँ का वह रहनेवाला है। किसी को भी मालूम नहीं था कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, जो बताने की कोशिश करते थे वह खुद इस उलझाव में गिरफ़्तार हो जाते थे कि सियालकोट पहले हिंदुस्तान में होता था, पर अब सुना है कि पाकिस्तान में हैं, क्या पता है कि लाहौर जो आज पकिस्तान में हैं, कल हिंदुस्तान में चला जाए या सारा हिंदुस्तान ही पाकिस्तान बन जाए और यह भी कौन सीने पर हाथ रखकर कह सकता है कि हिंदुस्तान और पाकिस्तान, दोनों किसी दिन सिरे से गायब ही हो जाएँ! इस सिख पागल के केश छिदरे होकर बहुत मुख्त़सर रह गए थे, चूँकि बहुत कम नहाता था, इसलिए दाढ़ी और सिर के बाल आपस में जम गए थे जिसके बायस उसकी शक्ल बड़ी भयानक हो गई थी, मगर आदमी हिंसक नहीं था - पंद्रह बरसों में उसने कभी किसी से झगड़ा-फ़साद नहीं किया था। पागलख़ाने के जो पुराने मुलाज़िम थे, वह उसके मुताल्लिक़ इतना जानते थे कि टोबा टेक सिंह में उसकी कई ज़मीनें थी, अच्छा खाता-पीता ज़मींदार था कि अचानक दिमाग उलट गया, उसके रिश्तेदार उसे लोहे की मोटी-मोटी ज़ंजीरों में बाँधकर लाए और पागलख़ाने में दाखिल करा गए। महीने में एक बार मुलाक़ात के लिए यह लोग आते थे और उसकी खैर-ख़ैरियत दरयाफ़्त करके चले जाते थे, एक मुश्त तक यह सिलसिला जारी रहा, पर जब पाकिस्तान, हिंदुस्तान की गड़बड़ शुरू हुई तो उनका आना-जाना बंद हो गया। उसका नाम बिशन सिंह था मगर सब उसे टोबा टेक सिंह कहते थे। उसको यह बिलकुल मालूम नहीं था कि दिन कौन-सा है या कितने साल बीत चुके हैं, लेकिन हर महीने जब उसके निकट संबंधी उससे मिलने के लिए आने के क़रीब होते तो उसे अपने आप पता चल जाता, चुनांचे वह दफादार से कहता कि उसकी मुलाकात आ रही है, उस दिन वह अच्छी तरह नहाता, बदन पर ख़ूब साबुन घिसता और बालों में तेल डालकर कंघा करता, अपने वह कपड़े जो वह कभी इस्तेमाल नहीं करता था, निकलवाकर पहनता और यों सज-बनकर मिलनेवालों के पास जाता। वह उससे कुछ पूछते तो वह ख़ामोश रहता या कभी-कभार 'औपड़ दि गड़ गड़ अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी लालटेन' कह देता। उसकी एक लड़की थी जो हर महीने एक उँगली बढ़ती-बढ़ती पंद्रह बरसों में जवान हो गई थी। बिशन सिंह उसको पहचानता ही नहीं था - वह बच्ची थी जब भी अपने आप को देखकर रोती थी, जवान हुई तब भी उसकी आँखों से आँसू बहते थे। पाकिस्तान और हिंदुस्तान का किस्सा शुरू हुआ तो उसने दूसरे पागलों से पूछना शुरू किया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जब उसे इत्मीनानबख्श़ जवाब न मिला तो उसकी कुरेद दिन-ब-दिन बढ़ती गई। अब मुलाक़ात भी नहीं होती थी, पहले तो उसे अपने आप पता चल जाता था कि मिलनेवाले आ रहे हैं, पर अब जैसे उसके दिल की आवाज़ भी बंद हो गई थी जो उसे उनकी आमद की ख़बर दे दिया करती थी - उसकी बड़ी ख़्वाहिश थी कि वह लोग आएं जो उससे हमदर्दी का इज़हार करते थे और उसके लिए फल, मिठाइयाँ और कपड़े लाते थे। वह आएँ तो वह उनसे पूछे कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, वह उसे यकीनन बता देंगे कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में - उसका ख़याल था कि वह टोबा टेक सिंह ही से आते हैं जहाँ उसकी ज़मीनें हैं। पागलख़ाने में एक पागल ऐसा भी था जो खुद़ को ख़ुदा कहता था। उससे जब एक रोज़ बिशन सिंह ने पूछा कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में तो उसने हस्बे-आदत कहकहा लगाया और कहा, "वह पाकिस्तान में हैं न हिंदुस्तान में, इसलिए कि हमने अभी तक हुक्म ही नहीं दिया!" बिशन सिंह ने उस ख़ुदा से कई मर्तबा बड़ी मिन्नत-समाजत से कहा कि वह हुक़्म दे दें ताकि झंझट ख़त्म हो, मगर ख़ुदा बहुत मसरूफ़ था, इसलिए कि उसे और बे-शुमार हुक़्म देने थे। एक दिन तंग आकर बिशन सिंह खुद़ा पर बरस पड़ा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ वाहे गुरु जी दा खालस एंड वाहे गुरु जी दि फ़तह!" इसका शायद मतलब था कि तुम मुसलमानों के ख़ुदा हो, सिखों के खुद़ा होते तो ज़रूर मेरी सुनते। तबादले से कुछ दिन पहले टोबा टेक सिंह का एक मुसलमान जो बिशन सिंह का दोस्त था, मुलाक़ात के लिए आया, मुसलमान दोस्त पहले कभी नहीं आया था। जब बिशन सिंह ने उसे देखा तो एक तरफ़ हट गया, फिर वापस जाने लगा मगर सिपाहियों ने उसे रोका, "यह तुमसे मिलने आया है, तुम्हारा दोस्त फज़लदीन है!" बिशन सिंह ने फज़लदीन को एक नज़र देखा और कुछ बड़बड़ाने लगा। फज़लदीन ने आगे बढ़कर उसके कंधे पर हाथ रखा, "मैं बहुत दिनों से सोच रहा था कि तुमसे मिलूँ लेकिन फ़ुरसत ही न मिली, तुम्हारे सब आदमी ख़ैरियत से हिंदुस्तान चले गए थे, मुझसे जितनी मदद हो सकी, मैंने की तुम्हारी बेटी रूपकौर..." वह कहते-कहते रुक गया। बिशन सिंह कुछ याद करने लगा, "बेटी रूपकौर..." फज़लदीन ने रुक-रुककर कहा, "हाँ, वह, वह भी ठीक-ठाक है, उनके साथ ही चली गई थी!" बिशन सिंह खामोश रहा। फज़लदीन ने फिर कहना शुरू किया, "उन्होंने मुझे कहा था कि तुम्हारी ख़ैर-ख़ैरियत पूछता रहूँ, अब मैंने सुना है कि तुम हिंदुस्तान जा रहे हो, भाई बलबीर सिंह और भाई वधावा सिंह से मेरा सलाम कहना और बहन अमृतकौर से भी, भाई बलबीर से कहना कि फज़लदीन राजीखुशी है, दो भूरी भैंसे जो वह छोड़ गए थे, उनमें से एक ने कट्टा दिया है, दूसरी के कट्टी हुई थी, पर वह छ: दिन की होके मर गई और मेरे लायक जो खिदमत हो, कहना, मैं हर वक्त तैयार हूँ, और यह तुम्हारे लिए थोड़े-से मरोंडे लाया हूँ!" बिशन सिंह ने मरोंडों की पोटली लेकर पास खड़े सिपाही के हवाले कर दी और फज़लदीन से पूछा, "टोबा टेक सिंह कहाँ है?" फज़लदीन ने कदरे हैरत से कहा, "कहाँ है? वहीं है, जहाँ था!" बिशन सिंह ने फिर पूछा, "पाकिस्तान में है या हिंदुस्तान में?" "हिंदुस्तान में, नहीं, नहीं पाकिस्तान में!" फज़लदीन बौखला-सा गया। बिशन सिंह बड़बड़ाता हुआ चला गया, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान एंड हिंदुस्तान आफ दी दुर फिटे मुँह!" तबादले की तैयारियाँ मुकम्मल हो चुकी थीं, इधर से उधर और उधर से इधर आनेवाले पागलों की फ़ेहरिस्तें पहुँच चुकी थीं और तबादले का दिन भी मुक़र्रर हो चुका था। सख्त़ सर्दियाँ थीं जब लाहौर के पागलख़ाने से हिंदू-सिख पागलों से भरी हुई लारियाँ पुलिस के रक्षक दस्ते के साथ रवाना हुई, संबंधित अफ़सर भी हमराह थे - वागह(एक गाँव) के बॉर्डर पर तरफीन (दोनों तरफ़) के सुपरिटेंडेंट एक-दूसरे से मिले और प्रारंभिक कार्रवाई ख़त्म होने के बाद तबादला शुरू हो गया, जो रात-भर जारी रहा। पागलों को लारियों से निकालना और उनको दूसरे अफ़सरों के हवाले करना बड़ा कठिन काम था, बाज़ तो बाहर निकलते ही नहीं थे, जो निकलने पर रज़ामंद होते थे, उनको सँभालना मुश्किल हो जाता था, क्योंकि वह इधर-उधर भाग उठते थे, जो नंगे थे, उनको कपड़े पहनाए जाते तो वह उन्हें फाड़कर अपने तन से जुदा कर देते - कोई गालियाँ बक रहा है, कोई गा रहा है क़ुछ आपस में झगड़ रहे हैं क़ुछ रो रहे हैं, बिलख रहे हैं - कान पड़ी आवाज़ सुनाई नहीं देती थी - पागल औरतों का शोर-शराबा अलग था, और सर्दी इतनी कड़ाके की थी कि दाँत से दाँत बज रहे थे। पागलों की अक्सरीयत इस तबादले के हक़ में नहीं थी, इसलिए कि उनकी समझ में नहीं आ रहा था कि उन्हें अपनी जगह से उखाड़कर कहाँ फेंका जा रहा है, वह चंद जो कुछ सोच-समझ सकते थे, 'पाकिस्तान : जिंदाबाद' और 'पाकिस्तान : मुर्दाबाद' के नारे लगा रहे थे, दो-तीन मर्तबा फ़साद होते-होते बचा, क्योंकि बाज मुसलमानों और सिखों को यह नारे सुनकर तैश आ गया था। जब बिशन सिंह की बारी आई और वागह के उस पार का मुताल्लिक़ अफ़सर उसका नाम रजिस्टर में दर्ज करने लगा तो उसने पूछा : "टोबा टेक सिंह कहाँ है, पाकिस्तान में या हिंदुस्तान में?" यह सुनकर बिशन सिंह उछलकर एक तरफ़ हटा और दौड़कर अपने बचे हुए साथियों के पास पहुँच गया। पाकिस्तानी सिपाहियों ने उसे पकड़ लिया और दूसरी तरफ़ ले जाने लगे, मगर उसने चलने से इनकार कर दिया, "टोबा टेक सिंह यहाँ है!" और ज़ोर-ज़ोर से चिल्लाने लगा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी टोबा टेक सिंह एंड पाकिस्तान!" उसे बहुत समझाया गया कि देखो, अब टोबा टेक सिंह हिंदुस्तान में चला गया है, अगर नहीं गया है तो उसे फौरन वहाँ भेज दिया जाएगा, मगर वह न माना! जब उसको ज़बर्दस्ती दूसरी तरफ़ ले जाने की कोशिश की गई तो वह दरमियान में एक जगह इस अंदाज़ में अपनी सूजी हुई टांगों पर खड़ा हो गया जैसे अब उसे कोई ताकत नहीं हिला सकेगी, आदमी चूँकि सीधा था, इसलिए उससे ज़्यादा ज़बर्दस्ती न की गई, उसको वहीं खड़ा रहने दिया गया, और तबादले का बाक़ी काम होता रहा। सूरज निकलने से पहले शांत पड़े बिशन सिंह के हलक के एक गगन भेदी चीख़ निकली। इधर-उधर से कई दौड़े आए और उन्होने देखा कि वह आदमी जो पंद्रह बरस तक दिन-रात अपनी टाँगों पर खड़ा रहा था, औंधे मुँह लेटा है - उधर खरदार तारों के पीछे हिंदुस्तान था, इधर वैसे ही तारों के पीछे पाकिस्तान, दरमियान में ज़मीन के उस टुकड़े पर जिसका कोई नाम नहीं था, टोबा टेक सिंह पड़ा था।

विटेकर Tue, 05/13/2014 - 16:45
बरीच गडबड आहे संकल्पना समजावून घेण्यात असे वाटते ! राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात , राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे,आणि म्हणून राष्ट्र्वाद हा शब्द संस्कृतीवाचक आहे ! मात्र राज्याला सीमा असतात, असायला हव्यात.राज्य अथवा देश हे प्रशासकीय सोयीसाठी बनविलेले असतात. बाकी सारी पृथ्वी ( विश्व ) एकच आहे आपण अशी प्रार्थना देखील करतो ....पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळीती.... असो टंकायचा कंटाळा आला...... उदा. युरोप हे एक राष्ट्र ( देश नाही ) असू शकेल पण एक राज्य नव्हे ! आपण रुढार्थाने भारतीय उपखंड असे ज्याला म्हणतो ते रुढार्थाने भारत - राष्ट्र आहे.

मारवा Tue, 05/13/2014 - 19:17
देश=राष्ट्र=कंट्री=नेशन उदा. भारत-फ्रान्स-चीन इ. देश म्हणा राष्ट्र म्हणा नेशन म्हणा कंट्री म्हणा या संदर्भात वरील विवेचन आहे हे नमुद करतो. तुम्ही म्हणता राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत मान्य मी राज्य या संकल्पने संदर्भात चकार शब्द ही काढत नाही महाराष्ट्र गुजरात बंगाल आदि राज्य आहेत अशी माझी माहीती आहे त्यांचे मिळुन एकत्र बनलेला भारत हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे. या राष्ट्र संदर्भात वरील मांडणी आहे. उदा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे त्यातील राज्ये टेक्सास इ. मिळुन तो बनला आहे. देशीवाद असे म्हणावयाचे टाळले कारण तो नेटीव्हीझम अथवा साहीत्यातील देशीवाद या संकल्पनेशी गल्लत गैरसमज करु शकतो म्हणुन राष्ट्रवाद हा शब्द नेशनलिझम या अर्थाने वापरला. या नेंतर आपण म्हणतात की राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात आता यावर काय बोलायच याने सुन्न झालोय बधिर झालोय हा धक्का पचण फारच अवघड आहे. असो

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 12:53
तुम्ही तुमच्या प्रतिसादात म्हट्ले आहे त्याप्रमाणे .. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे असू शकते.. कारण तो अनेक संस्कृतींनी बनलेला देश आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी असले काही अस्तित्वात च नव्हते. १८७६ ( चू. भू द्या.घ्या) नंतर हा " देश" म्हणून जन्माला आला.. सोयीसाठी म्हणून! असो. जर तुम्ही झी मराठी वरची मालीका 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' पहात असाल तर त्यातील कृत्रिम कुटुंबासारखी.. परस्परांच्या सोयी ने एकत्र आलेले.. अश्या लोकांचे राष्ट्र नसते.. राष्ट्र बनण्याची प्रक्रिया ही काही हजार वर्षांची असावी लागते... भारताचे ( अथवा ग्रीक , युनान ,रोमन)तसे नाही . अनादी अनंत कालापासून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. राजकीय आक्रमणामुळे काही तुकडे पड्ले. काही स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले - हे अर्थात आजच्या संदर्भात !कदाचित पुढच्या २-५०० वर्षात ते पुन्हा एक होतील ही ! कारण या सार्यांचा "आत्मा" एक आहे. एका समान सांस्कृतिक धाग्याने हे सारे बांधलेले आहेत. आणि म्हनून युनायटेड स्टेत्स ऑफ भारत असा शब्दप्रयोग केला जात नाही. कारण तो चुकीचाच आहे. धर्म हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. ( धर्म म्हणजे उपासना पद्धती ( रिलीजन ) नव्हे , तो वैयक्तिक भाग आहे !) धर्म हा समाजाची धारणा करतो. धर्म आणि राष्ट्र हे दोन शब्द राजकारणी अतिशय मुक्त हस्ते वापरतात आणि त्यामुळे ते वापरुन अतिशय गुळगुळीत झाले आहेत ! आणखी एक उदाहरण म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम .. असो अशी अनेक उदाहरणे असतील. जाता- जाता : महाराष्ट्रातील " राष्ट्रवादी " या शब्दाचा वापर करणार्‍या राजकीय पक्षाचा आणि राष्ट्रवादाचा सुतराम संबंध नाही!! त्यांना ' राष्ट्र-खा-खा-खाती " हे नांव अधिक संयुक्तिक आहे ! असो, काही शब्दाचा वापर करण्यावर कायद्याने बंदी आणायला हवी आहे ! (निळी अक्षरे संपादित करायला हरकत नाही..धरण भरु शकणारे दादा आणि त्यांचे हस्तक अफाट ताकदीचे आहेत,ते मिपावर पोहोचू शकतात !)

धन्या Wed, 05/07/2014 - 17:58
एक वेगळाच विचार मांडला आहे तुम्ही. राष्ट्रवाद ही त्या मानाने खुपच व्यापक संकल्पना आहे. इथे तर प्रांतवादही नको ईतका फोफावला आहे. अस्मितेच्या नावाखाली आपल्याच "राष्ट्र"बांधवांना परप्रांतीय असे नामाभिधान चिकटवून त्यांना सळो की पळो केले जात आहे.

पगला गजोधर Wed, 05/07/2014 - 18:01
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 18:45
'विप्लवा ' या अरूण साधू यानी लिहिलेल्या कादंबरीची आठवण झाली. परग्रहावरची काही माणसे इथे येतात मोठ्या आशेने की त्याना त्यांच्या पेक्षा प्रगत मानसिकता दिसेल.पण येथील लढाया, शत्रूत्वे पाहून ते व्यथित होतात. राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन Wed, 05/07/2014 - 18:50
राष्ट्र व धर्म या कल्पना पूर्णपणे बाद होईपर्यंत माणूस दोन पायावर उभे रहाणारे जनावरच रहाणार आहे.
राष्ट्र काय किंवा धर्म काय, लोकसमुदाय एकवटण्याची साधने आहेत. ती जर नसली तर पशू आणि माणूस यात काहीच फरक नाही. आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.

In reply to by बॅटमॅन

सुबोध खरे Wed, 05/07/2014 - 19:53
सकृतदर्शनी राष्ट्रवाद हा अतिरेकी वाटतो आणि वसुधैव कुटुंबकम हे छान वाटते. पण जेंव्हा परका माणूस तुमच्या स्वार्थावर घाला घालत असेल तर परमार्थ सुचेल कसा? जर मुंबईत येणारे बांगलादेशी घुसखोर तुमची सर्व व्यवस्था कोलमडून टाकणार असतील तर त्यांना अटकाव करणे हा रास्थ्र्वाद स्वार्थी असेल तरीही बरोबर आहे. तुम्हाला रोज पाण्य्साठी वणवण करायला लागली तर त्याच लोकांना तुम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणून या म्हणणार आहात काय? स्वार्थ हा संकुचित असला तरी तो प्राणीमात्राच्या जगण्याचे प्रयोजन आहे हि वस्तुस्थिती असते. मी, माझे कुटुंब, माझे आप्त, माझे जाती/धर्म बांधव , माझे राष्ट्र बांधव अशी वर्तुळे असतात यात केंद्रस्थानी स्वतः ठेवून माणूस जगात असतो. जोवर केंद्राला धक्का लागणार नाही तोवर वर्तुळ तो मोठे करू शकतो किंवा इच्छितो. पण जर केंद्राला धक्का लागणार असेल त्याचा तो जोरदार विरोध करू लागतो. राखीव जागात म्हणूनच दुसर्या जातीचा अंतर्भाव करायला त्यामुळेच मोठा विरोध उफाळून येतो. उच्च विचारसरणी हि शेवटी विचार्वांतानाच झेपणारी असते सर्वसामान्य माणसाना नाही. दोन ऐवजी चार वेळेस जेवून ढेकर दिल्यावर उच्च विचारसरणी ठीक आहे.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 19:55
लोक एकवटण्यासाठी कॉमन स्वार्थ हेच साधन असते. म्हणून युनो ची ही स्थापना झाली आहे, नाटोची आणि नामची सुद्धा ! या राष्ट या संकल्पनेपेक्षाही प्रगत संकल्यना आहेत .तरीही त्या मानवसंहार थांबवू शकलेल्या नाहीत. मग राष्ट्र या संकल्पनेची वा धर्म या संकल्पनेची काय कथा ? कुरघोडी हा पाशवी जगताचा स्थायीभाव आहे. मानव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 13:17
नव हा ही एक पशूच आहे. त्यामुळे हा स्थायीभाव त्यालाही लागू होतो. राष्ट्र वा धर्माने आतापर्यंत काहीही कल्याण साधलेले नाही.उलट प्रचंड नरसंहार झाल्याचा इतिहास या दोन खुळांच्या नावे जमा आहे.
अपरंपार नरसंहार जरी झाला असला तरी ज्याला संस्कृती इ.इ. म्हणतो ती विकसित होण्यामागे या दोन खुळांचा बराच वाटा आहे. राष्ट्र म्ह. युरोपियन अर्थानेच पाहिजे असे नाही. राजकीय संघटनेचा कुठलाही आविष्कार असे समजू. जर तसा समाज एकवटायचा प्रयत्न कुणी केला नसता तर आजही आपण जंगलात अर्धनग्न अवस्थेत प्राण्यांपासून जगत फिरलो असतो. एक अवस्था दुसरीपेक्षा सर्वार्थाने चांगली नसली म्हणून तिचे महत्त्व आजिबात कमी होत नै.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा गुरुवार, 05/08/2014 - 17:06
आपण जंगलातून समाजात आलो याला धर्म व राष्ट्र कारणीभूत नाही झाले. आपण जंगलचाच कायदा वापरून राह्यला लागलो तर मोठी कठीण अवस्था होईल म्हणून काही नियम मानवी समाजाने घालून घेतले. धर्म व राष्ट्र या संकल्पना त्यावेळी टोळ्यांच्या टकुर्‍यातही नव्हत्या. संस्कृति चा पाहिला उदगार निघाला मग धर्माचा. हळूहळू काही प्रमाणात युरोपात " वसुधैव " चा प्रयोग होउ लागला आहे.वैज्ञानिक शोधाच्या उपयोगीतेचे वाटप व्हायला फार पूर्वीच सुरूवात झाली होती. ते काय राष्ट्र वा धर्म यानी घडवून आणलेले नाही. मानवी समाजाचेही एक मन असते.ते उत्क्रांत होत आहे. वेळ लागेल. काही शतकेही जातील पण जगाच्या इतिहासात धर्म व राष्ट्र या कल्पना उन्मळून पडतील. पण...... पण त्यापूर्वीच या दोन घातक कल्पनांनी मानवी जगाचा बळी घेतला तर ,,,?

In reply to by चौकटराजा

बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 23:11
धर्म अन राष्ट्र या संकल्पनांना लिटरली पाहू नका. पोलिटिकल संघटनेचा एक आविष्कार म्हणून राष्ट्राकडे पहा. ते नसतं तर समाज कुठे गेला असता? असो, परत कधीतरी बोलूच विस्ताराने या विषयावर.

In reply to by बॅटमॅन

आणि तसाही पशू आणि माणूस यात गुणात्मक फरक कैकदा नसतोच, असतो तो फक्त प्रमाणाचा फरक.
>>> आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 05:46
या सुभाषितातला धर्म आणि हिंदू-मुसलमानादि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. बाकी चालू द्या.

सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते.
हे तर एकदम लोल आहे =)))) एकदा जरा न्याय-अन्याय, कर्म-अकर्म-विकर्म-कुकर्म, सत्य-असत्य , व्याख्या तपासुन घेतल्यात तर भगवद्गीता समजुन घेताना असले गैरसमज होणार नाहीत ! वाढीव अभ्यासासाठी शुभेच्छा !!

In reply to by मूकवाचक

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2014 - 10:48
वर खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे विचारवंती वसुधावाद (राष्ट्रवादाच्या विरुद्ध टोक) ही ४ वेळा सुखाने जेऊन दिल्यावर द्यायची ढेकर आहे.

पैसा Wed, 05/07/2014 - 19:54
हे लिहिलेलं वाचताना छान वाटतंय. पण यावर विश्वास ठेवून उद्या जर का आपल्याला सैन्य नको असं कोणी म्हणाला तर हेच तत्त्वज्ञान पाकिस्तान्यांना कळणार का हा मोठ्ठा प्रश्न आहे. बाकी या लेखावरही हिब्रू आणि तमिळ भाषेतले बरेच संवाद वाचायला मिळतील याची खात्री आहे! *mail1*

In reply to by पैसा

विकास Wed, 05/07/2014 - 21:07
להס ஒப்புக்கொள்கிறேன் त्या कम्युनिस्टांनी देखील "जगातल्या कामगारांनो एक व्हा" म्हणून पाहीले. पण नाही जम्या! बाकी माझे म्हणणे तर अजून पुढचे आहे, सैन्य तर नकोच, पण कड्या-कुलपे देखील नकोत. विशेष करून बँकांना. किंवा पैसा (आयडी नाही) हा प्रकारच नको! कारण धर्मा इतकेच पैशामुळे वर्गीकरण होते. मिसळपाव मालकांना एक विनंती: या आदर्श (का अ‍ॅनार्कीस्ट?) जगण्याची सुरवात करण्यासाठी म्हणून मिसळपाव वरील आयडी ही संकल्पनाच रद्द करा. सगळे एकच. लेखक-प्रतिसादक-संपादक-सल्लागार आणि हो मालक देखील. *biggrin* *pleasantry*

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 19:01
इथे तर आधीच अनाहिताची वेगळी चूल आहे
ह्यावरुन एक कविता सुचत आहे >>> चाल : मी कात टाकली मी चुल मांडली ...मी चुल मांडली , मी वेगळ्या अनाहिताची बै चुल मांडली =)))) (अपुर्ण)

In reply to by पैसा

होकाका Fri, 05/09/2014 - 14:01
अरे काय चालू आहे हे? वास्तवाची दखल न घेता ढगात हरवून जाऊन लोकांना शहाणपणा शिकवणं हेच विचारवंतांचं खरं लक्षण असतं हे माहीत नाही का आपल्याला?

यसवायजी Wed, 05/07/2014 - 21:19
Imagine no possessions I wonder if you can No need for greed or hunger A brotherhood of man याला औषध नाही. अन्ड सो डू राष्ट्रवादाला. आणी मग दुसरा पर्याय काय?

असाच पंचशीलचाही उदोउदो करत सैन्य मोडीत काढावे असा विचार चालला होता काही वर्षांपूर्वी आणि काय इतिहास घडला त्याची आठवण आली. सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करून असा एकांगी विचार सुचणे हे एखाद्या संरक्षित राष्ट्रात चार वेळ भरपेट खावून ढेकर देत देतच शक्य असते. शिवाय अश्या राष्ट्रात असे विचार करण्याचे स्वातंत्र्यही असतेच म्हणा ! तेव्हा चालू द्या !! (मला का उगाचच संशय येत आहे की हा लेख उपहासपूर्ण आहे?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकास Wed, 05/07/2014 - 22:57
चिनी हल्ल्या आधीची गोष्ट आहे. तत्कालीन गांधीवादी आणि काँग्रेसनेते शंकरराव देव (ते देखील पंचा नेसायचे), हे देखील नेहरूंच्या मागे लागले होते की गांधीजींच्या भारताला सैन्याची गरज नाही. त्याचा परमार्ष घेताना अत्रे म्हणाले, की "सैन्य नको म्हणणे हे त्या महात्म्याला शोभले असेल, पण उद्या चीन्यांनी हल्ला केला तर त्यांचे सैन्य काय शंकररावांच्या पंच्यात गुंडाळायचे का? "*fool*

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 22:52
राष्ट्रवाद जर Xenophobia चं उत्क्रांत रूप असेल तर तो मानवनिर्मीत असुन देखील अटळ म्हणावा लागेल. इन फॅक्ट मानव 'निर्मीत' न म्हणता 'घटीत' म्हणावा लागेल. इथुन तिथुन प्रश्न एकच उरतो कि माणुस आपली बुद्धी विनाशकारी कृत्ये करण्यात का घालवतो. हि विध्वंसक वृत्ती बाजुला काढली तर राष्ट्रवाद देखील बहुविधतेचा अविष्कार  म्हणुन गोंजारल्या जाईल.

नगरीनिरंजन गुरुवार, 05/08/2014 - 05:50
राष्ट्रवाद हा मोठ्याप्रमाणावरचा टोळीवाद आहे आणि टोळ्या करून राहणे हा माणसाचा सहजधर्म आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचे प्रमाण उपलब्ध ऊर्जा संसाधनांना झेपणार नाही तेव्हा आपोआप संपेल आणि विघटन होत होत पुन्हा छोट्या-छोट्या टोळ्या होतील. आपली सहजप्रवृत्ती सोडून माणूस आधीच राष्ट्रवाद सोडेल इतकी माणसाची माणूस म्हणून प्रगती झालेली नाही आणि होणारही नाही. पण लेख आवडला. पुलेशु.

फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 10:05
पाश्चात्य देशांतील विचारवंतांच्या दृष्टिकोनातून हे मांडलेले दिसते. हिटरलच्या काळात जर्मनीचे व सध्याच्या काळात पुतिन च्या रशियाचे उदाहरण बघता काही विचारवंतांना त्यात का धोका दिसतो हे ही समजण्यासारखे आहे. पण भारताचे याच्या विरूद्ध जाणारे ढळढळीत उदाहरण याबाबतीत का घेतले जात नाही? स्वातंत्र्यानंतर सुमारे ६५ वर्षांच्या इतिहासात भारताने राष्ट्रवाद प्रबळ असूनही इतर कोणत्याही देशावर हल्ला वगैरे केलेला नाही. किंबहुना पहिली १५ वर्षे हीच तत्त्वे अनुसरण्याचा प्रयत्न केलेला असताना चीनकडून झालेल्या विश्वासघातामुळे शस्त्रसज्ज होण्याशिवाय पर्याय राहिला नाही, नाहीतर आस्तित्वाचाच प्रश्न होता. पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत. तेव्हा निव्वळ राष्ट्रवाद धोकादायक नाही. मात्र एखादा देश स्वतःला सुपरपॉवर समजू लागतो तेव्हा मात्र जगातील परिस्थिती आपल्या इंटरेस्ट मधे असली पाहिजे या हट्टातून इतर ठिकाणी काड्या करणे चालू होते.

In reply to by फारएन्ड

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:09
पण शस्त्रसज्ज व अण्वस्त्रसज्जही झाल्यावर उगाच कोठे श्रीलंकेचीच जमीन घे, कोठे भूतानचा एखादा तुकडा गिळ असले प्रकार तुलनेने जास्त शक्तिशाली असूनही केलेले नाहीत.
हेच तर चुकलय ना.. बसा आता त्यां चिमुरड्यांना चिनला आसरा देताना बघत. धाक म्हणून नाही कुणाचा कशावर :(

बाळ सप्रे गुरुवार, 05/08/2014 - 10:24
राष्ट्र, राज्य, प्रांत, जिल्हा, तालुका... अशी रचना प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा राष्ट्रवाद, प्रांतवाद हा असणारच. फक्त त्याचा अतिरेक नको. राज्य राष्ट्र विस्ताराची/ विघटनाची तीव्र लालसा ही अशाप्रकारच्या अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालते.. त्यातही धर्माधारीत राष्ट्ररचना असल्यास द्वेष आणखी वाढतो व सामंजस्याने तोडगा काढण्याची शक्यता फार कमी होते.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:31
प्रांतवाद भाषावाद म्हणुन एक प्रश्न आहे... एका मराठी व्यक्तीला दुसरी मराठी व्यक्ती कधीच कुल/ओसम का वाटत नाही ? (पण इतर भाषक मात्र तसे वाटु शकतात ?)

आतिवास गुरुवार, 05/08/2014 - 10:34
माणसांचा उन्माद कमी व्हायला हवा ही गोष्ट मान्य. राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंसा होते हेही मान्य. पण समाजातील विविध घटकांचा आपापसातील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रवादाचं नाणं राजकीय नेते वापरतात हे वारंवार दिसून येतं. आपण आपला समाज एकसंध कसा राखणार हा खरा प्रश्न आहे. आणि तो एकसंध राखताना एक गट वर्चस्ववादी बनून अन्य गटांचे शोषण करणार नाही याची खात्री कशी देणार हा प्रश्न आहे. समाजातल्या विविध घटकांचे हित एका वेळी साधता येते की ते एकमेकांच्या विरोधी असते हा खरा प्रश्न आहे .... असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्याची युक्ती आपल्याला कळली तर कदाचित उन्मादी राष्ट्रवादाची गरज आपल्याला राहणार नाही!

क्लिंटन गुरुवार, 05/08/2014 - 13:54
लेख आणि मते भयंकर गंडलेली आहेत. हे असले तत्वज्ञान इथे येऊन लिहू नका.इथल्या कोणालाही भारत देशावर प्रेम म्हणजे इतरांचा द्वेष असा सिनॉनिमस अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही (आणि तसा असेल तर ते चुकीचे आहे).ही असली मते भारतातच कशी फोफावतात कोणाला माहिती. सगळे जग एकत्र यावे, देशांमधील सीमा हा प्रकार इतिहासजमा व्हावा इत्यादी सगळ्या गोष्टी झाल्या तर ते मलाही नक्कीच आवडेल पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? फार दूर नको जायला.अगदी आपल्या दिवट्या शेजार्‍याशी संबंध सुधारावे म्हणून आपण काय कमी प्रयत्न केले काय?तरीही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच.आपले पंतप्रधान बस घेऊन लाहोरला गेले तर तीच बस त्यांनी कारगीलला नेली.आग्रा शिखर परिषद झाल्यावर सहा महिन्यांच्या आत आपल्या संसदेवरच हल्ला झाला (आणि त्यातल्या मुख्य सुत्रधाराला फाशी दिल्यानंतर बिनडोक मानवाधिकारवाल्यांनी केलेले आकांडतांडव इतर कोणी विसरले असेल तरी मला तरी ते विसरणे अशक्य आहे).मागे ओर्कूटवर भारत-पाक फ्रेंडशीप क्लब म्हणून एक प्रकार होता. हल्ली ओर्कूट मागे पडल्यामुळे तो क्लब अजूनही अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही पण २००७ मध्ये मी जेव्हा ते वेबपेज बघितले होते त्यावेळी त्यातले ९०% पेक्षा जास्त सदस्य भारतीयच होते.तुम्ही स्वतःला लाख मानवतेचे पुजारी म्हणवत असाल पण जोपर्यंत आपल्या दिवट्या शेजारी देशात भारत देश हा 'काफिरांचा' म्हणून आपले अस्तित्वच खुपणारे लोक आहेत तोपर्यंत ते तुम्हाला भारतीय आणि काफिर म्हणूनच ओळखणार एवढी साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही हेच समजत नाही. तेव्हा हे असले दिवास्वप्नी तत्वज्ञान इथे पाजळू नका.आम्हाला कोणावरही विनाकारण हल्ला करायचा नाही.मैत्रीचे भरते पहिल्यांदा त्यांच्याकडून येऊ दे मग सुरवातीला भारत आणि पाकिस्तानमधली सीमा पुसू आणि तीच प्रक्रीया सगळ्या जगभर पुढे नेऊ.
राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात.
हे अगाध तत्वज्ञान नक्की कुठून शिकलात हो? तुमच्या भाषेत माणसं मारणारे सैनिक तिथे सीमेवर नसते तर तुम्ही घरी बसून आरामात असले लिहू शकलात का?
सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.
धन्य.
राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे.
आणि राष्ट्रवाद नाकारणार्‍या डाव्या विचारसरणीने त्याहूनही अधिक माणसांचा बळी घेतला आहे. असो. याविषयी अधिक चर्चा रंगल्यास निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच भाग घेईन. अगदीच राहवले नाही म्हणून आताच एवढे लिहिले.

In reply to by क्लिंटन

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 15:44
महात्मा गांधी अंहिसेचेच समर्थक होते पण सोबत राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यांचे उत्तर साधे सोपे होते. इतरांशी संवादाकरता माझ्या घराला खिडक्या दरवाजे असतील पण माझ्या घराला भिंतींची गरज आहे. आमच घर इतरांनी येऊन चालवण्या पेक्षा आम्ही आमच घर चालवतो. स्वतःच घर स्वतः चालवण यात दुसर्‍यांच्या द्वेषाचा संबंध नाही. बाकी सवडी नुसार लिहू (सध्या आमची जांभई आणि चुटकी).

In reply to by क्लिंटन

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:15
बर्ट्रांड रसेल ची लिंक वाचण्याची तसदी घेतली असती तरी मला वाटत माझा पॉइंट ऑफ़ व्ह्यु लक्षात यायला हरकत नव्हती. असो आता उदाहरणार्थ जॉर्ज ऑरवेल ला घेउया ( हा रसेल शी अनेक ठीकाणी डायगोनली अपोझीट आहे खास करुन कम्युनिझम संदर्भात ) तर दुरगामी खोलवर विचार करणारया विचारवंतांच्या विचारांची एक खासियत असते ती अशी की अनेक वर्षांनंतर ही त्यांचे विचार समकालीन स्थितीचा व मानसिकतेचा अचुक वेध घेतात. उदा. जॉर्ज ऑरवेल यांनी अनेक वर्षापुर्वी कीती विलक्षण अचुकतेने राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याचे नेमके वर्णन केलेले आहे. हा परीच्छेद राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते या संदर्भात क्लिंटन यांच्या प्रतिसादा च्या संदर्भात बघावा. क्लिंटन यांच्यावीषयी नितांत आदराची भावना माझ्या मनात आहे. त्यांच्या मानसिकतेचा उल्लेख अत्यंत नम्रपणे केवळ चिकीत्से साठी व ऑरवेल च्या राष्ट्रवादी व्यक्तीच्या मानसिकते संदर्भात च कृपया बघावा ही कळकळीची विनंती ! तर खालील परीच्छेद मुळ ऑरवेल चा व जेथे जेथे क्लिंटन यांचा निर्देश मराठी त केलेला आहे तो माझा. As nearly as possible, no nationalist (क्लिंटन) ever thinks, talks, or writes about anything except the superiority of his(क्लिंटनच्या) own power unit. It is difficult if not impossible for any nationalist (क्लिंटन) to conceal his (क्लिंटनच्या) allegiance. The smallest slur upon his (क्लिंटनच्या ) own unit, or any implied praise of a rival organization, fills him with uneasiness which he (क्लिंटन) can relieve only by making some sharp retort. If the chosen unit is an actual country, such as Ireland or India, he(क्लिंटन) will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. He(क्लिंटन) will show great sensitiveness about such things as the correct display of flags, relative size of headlines and the order in which different countries are named. All nationalists (क्लिंटन) consider it a duty to spread their own language to the detriment of rival languages, जॉर्ज ऑरवेल क्लिंटन यांचा प्रतिसाद अतिशय बोलका आणि उत्स्फ़ुर्त आहे. हा प्रतिसाद एका राष्ट्रवादी व्यक्तीची मानसिकता कशी असते याची चिकीत्सा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. विशेषत: ऑरवेल जे म्हणतो स्मॉलेस्ट स्लर कींवा अगदी विरोधकाची इम्प्लाइड प्रेज जरी असली तरी राष्ट्रवादी व्यक्तीला ही स्तुती १- fills him with uneasiness ( क्लिंटन यांच्या प्रतिसादातील अस्वस्थता बघावी) २- can relieve only by making some sharp retort (क्लिंटन यांचा तीव्र रीटॉर्ट बघावा) वरील दोन अवलोकनार्थ होते इतर मुद्दे उदा. ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. इतर राष्ट्रवादी प्रतिसांदा मध्ये ही आढळुन येतात उदा. श्री. फ़ारएन्ड यांचा प्रतिसाद अभ्यासावा. तर जॉर्ज ऑरवेल यांनी अचुकतेने मांडलेली राष्ट्रवादी मानसिकता आपण आज इथे या प्रतिसांदा मध्ये ही अभ्यासु शकता. कृपया व्यक्तीगत घेउ नये माझ्या प्रतिसादाचा हेतु अभ्यासात्मक आहे व्यक्तीगत नाही.

In reply to by मारवा

फारएन्ड गुरुवार, 05/08/2014 - 21:45
माझ्या ज्या प्रतिसादाचा उल्लेख केलाय त्यात वरची #३ ची लक्षणे कोठे आहेत? ३- will generally claim superiority for it not only in military power and political virtue, but in art, literature, sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants, and perhaps even in climate, scenery and cooking. >>> माझा प्रतिसाद व हा मुद्दा याची कशी सांगड घातलीत ते विचारतो आहे. माझा मुद्दा तुम्हाला मान्य आहे की नाही तेही कळाले नाही.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:51
सर मोड़ ऑन खेळा पासून संभोगा पर्यंत सर्व मानवी जीवन उन्मादानेच व्यापीयले असा. पण मुळात उन्माद ही एक प्रक्रिया आहे, वस्थिस्थिति न्हवे याचे आकलन एकदा तुमच्या मनाला झाले की हां लेख टाकायचे प्रयोजन उरत नाही. सर मोड़ ऑफ

In reply to by आत्मशून्य

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 15:00
म्हणजे काय? आणि याचा उच्चार कसा करायचा? (राँर्बट याचा उच्चार आता मला करता येतो). *ROFL*

कवितानागेश गुरुवार, 05/08/2014 - 16:04
माझा जरा गोंधळ होतोय... 'राष्ट्र संकल्पना' वेगळे न मानणारे, एकाच देवाला मानणारे लोक्स, आणि त्याच 'तत्त्वज्ञाना'चा हिंसेच्या सहाय्यानी जगभर प्रचार करणारे, जगात फक्त आपण सर्व समान देवानी पाळलेले 'ठराविक प्रकारचे पाळीव पशू' किंवा देवाचे गुलाम वगरै समजणारे लोक्स जास्त उन्मादात असतात असं माझे आजपर्यंतचे निरिक्षण आहे.

In reply to by कवितानागेश

राघव Sat, 05/10/2014 - 23:56
अगो माय, साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद यामधे सगळा घोळ झालाय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. वर चौरा म्हणतात त्याप्रमाणे जंगलातून माणूस आला. त्यात उत्क्रांतीच्या अनेक पायर्‍या पार केल्यानंतर आत्ताची वेळ दिसते आहे. आता ही राष्ट्र संकल्पना काय लोकांनी गांजा पिऊन मांडली काय? दोन राष्ट्रांत युद्ध नको म्हणून राष्ट्र संकल्पनाच रद्द करून टाकली तर कित्ती छान? माझे घर अन् दुसर्‍याचे घर यामुळे सगळे वाद होतात.. घरेच पाडून टाकू.. वाद मिटला.. हाय काय अन् नाय काय?? अर्रे जरी वसुधैव कुटुंबकम् याचा अर्थ सगळे एक कुटुंब असा होतो.. तरी सध्या एकत्र कुटुंब हीच संकल्पना मोडीत निघते आहे त्याचे काय? बरं सोबत राहू म्हणजे एकाच घरात एकाच खोलीत सगळ्या कुटुंबानं राहायचं असं चालेल काय? सध्या जे असे राहतात त्यात तसे राहण्याची इच्छा असणारे किती अन् दुसरा पर्याय नसल्यानं तसे राहणारे किती?? आणि वसुधैव कुटुंबकम् याचा भावार्थ असा घेतला की सगळे एकमेकांचा आदर करत, एकमेकांना मदत करत आनंदानं राहू तर चुकलं कुठे? तो चाणक्य आज असता ना तर डोक्यात जाणारी नसती जळमटं काढून फेकल्याशिवाय शेंडीला गांठ मारणार नाही अशी काहीशी प्रतिज्ञा केली असती त्यानं !!

असंका गुरुवार, 05/08/2014 - 18:52
आपण एक विचार देत आहात की कसलातरी प्रचार करत आहात? कारण आपली भाषा नि:पक्षपाती वाटत नाही. विचार हा साकल्याने -साधक बाधक अशा दोन्ही अंगाने करायचा असतो. आणि हा विचार आपल्या वाचकाला केंद्रस्थानी ठेवून मांडला पाहिजे. आपण एकांगीपणे वरील विचार मांडला आहे, असे वाटते. एखादे मत आपण कसे तयार केले, हेही सांगणे योग्य आहे. उदा. कुठलाही संदर्भ न देता काही विशिष्ट विचारसरणीला आपण अनेकवेळा नकारात्मक वगैरे ठरवले आहे. ती नकारात्मक कशी, हे सांगणे भाग असूनही ते आपण सरळ गृहित धरले आहे, आणि वाचकानेही गृहित धरावे अशी अपेक्षा केली आहे. पराकोटीच्या अन्यायातून एखादा समाज उठू बघतो, अन्यायाला वाचा फोडतो, अगदी सशस्त्र प्रतिकार करतो, यात नकारात्मक काय आहे? आपला तर्क दिलात तर आपण माडलेल्या या विचारांवर विचार करण्यात अर्थ आहे.

In reply to by असंका

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:20
मारवांजींच्या आधीच्या समतोल लेखनाच्या भरवशावर हा धागा उघडला होता. मारवाजींच्या नेहमीच्या समतोल लेखनशैलीला हा धागा लेख जरासा अपवाद वाटतोय. या वेळी प्रचाराकी हेतु आला आहे का किंवा असे अचानक काय झाले हे मारवाजीच सांगू शकतील.

In reply to by माहितगार

असंका Fri, 05/09/2014 - 12:06
आम्हाला कधीतरी इतिहासाच्या तासाला "युरोपातील राष्ट्रवाद वाढीला लागला" (-कुठल्यातरी कालखंडात!) असे शिकवले गेले. राष्ट्रवाद या शब्दाशी तो माझा पहिला परीचय होता. राष्ट्रवाद म्हणजे काय हे तेव्हा कळले नाही. ते न कळण्याची कारणे काय ते जाऊ द्या. कदाचित मी पुरेसा अभ्यास केला नसेल, किंवा मला पुरेशी समज नसेल. पण ते मागे राहिलेले कधीतरी समजून घ्यायची इच्छा आहे. ते नीट सांगतील तर इथे ऐकायची तयारी आहे. विचार करायचीही तयारी आहे. माझं चुकतं कुठे हे कळलं तर चूक मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. पण ते ज्या पद्धतीने सांगत आहात ती पद्धत थोडी बदलली तर बरं होइल असं वाटतं. १. ते अनेक गोष्टी एकाच वेळी सांगत आहेत. क्रांतिकारी विचार थोडक्यात मांडायला हवा. नाहितर मग लक्ष कशावर केंद्रीत करायचं तेच लवकर कळत नाही. २. एका भाषेतून (मराठी) दुसर्‍या भाषेत(इंग्रजी) जात आहेत. खरे म्हणजे एकदाही असे केल्याने वाचण्यात अडथळा येतो. त्यांनी तर अनेक वेळा तसे केले आहे. ३. मध्येच कवितेच्या ओळी देत आहेत. हे काय भाषण आहे का? ४. मध्येच इतरांची मते देत आहेत. व इतरांनी तीही मुळापासून वाचावी अशी अपेक्षा ठेवत आहेत. विचार साहेब स्वतः मांडत आहेत. अभ्यास करून इथे ते थोडक्यात मांडणे त्यांचे काम आहे. इतरांनी का तसदी घ्यायची? वादात शेवटचा शब्दा माझा हवा इतकाच उद्देश असेल तर असे करणे ठिक आहे- तेव्हा या पद्धतीने वागता येते. कारण मग लोक वाद सोडून देतात - म्हणतात, कोण ती लिंक वाचत बसेल! त्यांची ही अपेक्षा असेल का?

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:22
INDIFFERENCE TO REALITY. All nationalists have the power of not seeing resemblances between similar sets of facts. A British Tory will defend self-determination in Europe and oppose it in India with no feeling of inconsistency. Actions are held to be good or bad, not on their own merits, but according to who does them, and there is almost no kind of outrage--torture, the use of hostages, forced labour, mass deportations, imprisonment without trial, forgery, assassination, the bombing of civilians--which does not change its moral colour when it is committed by 'our' side. The Liberal NEWS CHRONICLE published, as an example of shocking barbarity, photographs of Russians hanged by the Germans, and then a year or two later published with warm approval almost exactly similar photographs of Germans hanged by the Russians. It is the same with historical events. History is thought of largely in nationalist terms, and such things as the Inquisition, the tortures of the Star Chamber, the exploits of the English buccaneers (Sir Francis Drake, for instance, who was given to sinking Spanish prisoners alive), the Reign of Terror, the heroes of the Mutiny blowing hundreds of Indians from the guns, or Cromwell's soldiers slashing Irishwomen's faces with razors, become morally neutral or even meritorious when it is felt that they were done in the 'right' cause. If one looks back over the past quarter of a century, one finds that there was hardly a single year when atrocity stories were not being reported from some part of the world; and yet in not one single case were these atrocities--in Spain, Russia, China, Hungary, Mexico, Amritsar, Smyrna--believed in and disapproved of by the English intelligentsia as a whole. Whether such deeds were reprehensible, or even whether they happened, was always decided according to political predilection.

In reply to by मारवा

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:34
(मारवाजी माझ्याकरता जॉर्ज ऑर्वेल आणि हा विषय दोन्ही अंगांनी बर्‍या पैकी (यापुर्वी इतरत्र) चघळून झालाय. या विशीष्ट उन्हाळ्याच्यावेळी हा धागा विषय म्हणजे गार ताकही पाहीजे पिले तर खोकला होईल नाही पिलेतर गरमी , ताकाला(धाग्याला) जायचे पण बिचकत बिचकत भांडे लपवणे असा नाहीएना असला तर असू द्यात बापडे मी कोण सांगणारा. :) बाकी भारतीय लोकशाही चांगली प्रबळ आहे आपोआप समतोल साधते. खूप काळजीही करू नका जस्ट रिलॅक्स एवढेच म्हणू शकेन.)

मारवा गुरुवार, 05/08/2014 - 19:33
मी कोणाचा प्रचार करत आहे असे वाटत असल्यास मी इतकेच म्हणेन की मी तरी कुणाचा प्रचार करीत नाहीये हे मी माझ्या बाजुने स्पष्ट करतो. (आणि आश्चर्य म्हणजे माझे मत इतक्या स्पष्टपणे व विरोध कशाला आहे ते इतके उघड असुनही तो कशाचा प्रचार आहे असे कुणाला वाटते याचच मला आश्चर्य वाटत आहे व विशेष बाब म्हणजे मी नेमका कशाचा प्रचार करत आहे याचा उल्लेख कोणीही केलेला नाहीये ) मी कशाचा प्रचार करत आहे असे आपल्याला म्हणायचे आहे कृपया स्पष्ट करा माझ्या माहीतीप्रमाणे मी केवळ राष्ट्रवाद या उन्मादाला विरोध करीत आहे. असो.

In reply to by मारवा

असंका Fri, 05/09/2014 - 11:20
प्रचार शब्द वरती मी वापरला होता. मला असं म्हणायचं होतं की, आपण जे लिहिलं आहे, त्याच्या मागचा तर्क पुरेसा विकसित न करता, इथे तो तर्कसंगत विचार न मांडता आपण थेट आपला विचार सर्वोत्तम असल्याचा प्रचार चालू केला आहे. आपण आपला विचार पहिले स्पष्ट करा. तो विचार सर्वोत्तम कसा, त्याच्या आड कुठल्या गोष्टी (आक्षेप) येत होत्या, त्याला समर्पक उत्तरे कुठली (आक्षेपांचे निराकरण) हे सांगा. नुसते संघर्षाला नकारात्मक ठरवून कसे चालेल? आपण अनेक वेळा असे थेट निष्कर्षाला पोचले आहात वरच्या लेखात. आणखी सांगायचे तर अर्जुनाला युद्धावेळी जे विचार मनात आले त्याला आपण विवेक म्हणून मोकळे झालात. आजवर त्याला आम्ही संभ्रम मानत आलो. जर आपण त्या विचारांना विवेक म्हणू इच्छिता, तर ते कसे हे सांगणे भाग आहे. ते न सांगता आपण निष्कर्ष काढला आहे की अर्जुनाला विवेक सुचला आणि कृष्णाने जे केले ते म्हणजे ब्रेनवॉशिंग. असे कसे गृहित धरायचे हो साहेब आम्ही?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Fri, 05/09/2014 - 12:10
माणसाला माणूस न कळण्याचे कारण माणसाला राष्ट्र व प्रशासन एक आहे असे वाटते. पण तेसे नाही. प्रशासनाशिवाय समूहाला पर्याय नाही व प्राणीमात्राला समूहाशिवाय पर्याय नाही. मिपा हे एक राष्ट्र नाही पण ते चालते.विनाशाविना चालते कारण त्यातील वादाची शत्रूत्वात रूपांतर व्हायची सोय नाही. मिपा हे राष्ट्र नाही तरीही इथे प्रशासन आहे. यंत्रणा आहे. मिपाचे व मायबोलीचे व ऐसी अक्षरेचे वैर नाही कारण त्यांचे प्रमुख राष्ट्र प्रमुखाप्रमाणे प्रजांमधे आपल्या स्वर्थासाठी वैर निर्माण करीत नाहीत. दोन प्रजांमधे राजेच वैर निर्माण करतात कोतवाल वा सेनानी नाही. व्यापारी वा नाभिक तर नाहीच नाही.

अन्या दातार गुरुवार, 05/08/2014 - 22:55
घर म्हणलं की १-२ खोल्या भिंतींनी/पार्टिशनने वेगळ्या होतातच. नुसत्याच ४ भिंती बांधल्या तर धर्मशाळा होते! अख्ख्या जगाला सीमामुक्त कसे करावयाचे??

आयुर्हित Fri, 05/09/2014 - 02:23
वरील लेख हा खोटा/नकली(pseudo)राष्ट्रवादावरचा आहे. वरील लेख हा अमेरिकेत, पाकिस्तानात किंवा बांग्लादेशात जावून तेथल्या लोकांना वाचून/समजवून सांगावा अशाच अर्थाचा आहे, कारण वरील लेखात सांगितलेला राष्ट्रवाद(?) पाळणारे हे तिन्ही घाणेरडे देश आहेत. तथाकथित विचारवंतांचे(की विचारजंताचे?) विचार वाचून "राष्ट्रवाद" या शब्दाचीच ठासली आहे असे दिसते. राष्ट्रवाद म्हणजे इतर देशांवर(राष्ट्रांवर किंवा राष्ट्रहितांवर)हल्ला असा त्याचा कधीही अर्थ होत नाही. राष्ट्रवाद एक विश्वास, पन्थ या राजनीतिक विचारधारा है जिसके द्वारा व्यक्ति अपने गृह राष्ट्र के साथ अपनी पहचान बनाता या लगाव व्यक्त करता है। यह एक ऐसी अवधारणा है जिसमें राष्ट्र को सबसे अधिक प्राथमिकता दी जाती है। लहानपणी वाचलेली एक सत्यघटना आठवते. दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी(उच्च अधिकारी)व्यक्ती भारतात येते, तीला भारतीय(राष्ट्रपती वा उच्च अधिकारी)व्यक्ती आंबा खायला देते. तेव्हा ती व्यक्ती ते नाकारते व म्हणते मी आंबा खाणार नाही कारण जपानमध्ये आंबे पिकवले जात नाही. जर मी आंबा खाल्ला आणि तो मला आवडला तर मला तो नेहमी खावासा वाटेन. व नंतर मी आंब्यासाठी माझे येन(जपानी चलन/Japanese Yen)त्यासाठी खर्च करेन. आणि हे माझ्या गरीब देशाला मुळीच परवडणार नाही. त्यावेळी अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर अणुस्फोट करून जपान बेचिराख करण्यात आला होता! याचा अर्थ अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही राष्ट्राचे हित जपणे याला म्हणतात राष्ट्रवाद! लेखकाला नम्र विनंती की असे काही उच्च दर्जाचे लेख चुकीच्या पद्धतीने लिहायचे असेल तर अमेरिकेत किवा पाकिस्तानात जावून राहावे. लेखकाचे विचार आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे नाहीत. भारतात अशी चूक खपवून घेतली जाणार नाही!

In reply to by आयुर्हित

मारवा Fri, 05/09/2014 - 07:45
आपण च वर दिलेल्या राष्ट्रवाद या दुव्यातुन एक महाख्यान के तौर पर राष्ट्रवाद छोटी पहचानों को दबा कर पृष्ठभूमि में धकेल देता है। अंग्रेज़ों के ख़िलाफ़ चले राष्ट्रवादी आंदोलन के दौरान रवींद्रनाथ ठाकुर जैसी हस्तियाँ इस विचार को संदेह की निगाह से देखती थीं। आपण च वर दिलेल्या प्रतिसादातुन १-कारण वरील लेखात सांगितलेला राष्ट्रवाद(?) पाळणारे हे तिन्ही घाणेरडे देश आहेत. २-तथाकथित विचारवंतांचे(की विचारजंताचे?) विचार वाचून ३-भारतात अशी चूक खपवून घेतली जाणार नाही! आपल्याच स्वाक्षरीतुन कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ रवींद्रनाथ ठाकुर यांचे विचार त्यांना व्यक्त करु देण्यासाठी व त्यांना भारतातच राहु देण्यासाठी आपले अनेक आभार !

मारवा Fri, 05/09/2014 - 07:56
I am not against one nation in particular, but against the general idea of all nations. What is the Nation? It is the aspect of a whole people as an organized power. This organization incessantly keeps up the insistence of the population on becoming strong and efficient. But this strenuous effort after strength and efficiency drains man's energy from his higher nature where he is self-sacrificing and creative. For thereby man's power of sacrifice is diverted from his ultimate object, which is moral, to the maintenance of this organization, which is mechanical. Yet in this he feels all the satisfaction of moral exaltation and therefore becomes supremely dangerous to humanity. He feels relieved of the urging of his conscience when he can transfer his responsibility to this machine which is the creation of his intellect and not of his complete moral personality. By this device the people which loves freedom perpetuates slavery in a large portion of the world with the comfortable feeling of pride of having done its duty; men who are naturally just can be cruelly unjust both in their act and their thought, accompanied by a feeling that they are helping the world in receiving its deserts; men who are honest can blindly go on robbing others of their human rights for self-aggrandizement, all the while abusing the deprived for not deserving better treatment. We have seen in our everyday life even small organizations of business and profession produce callousness of feeling in men who are not naturally bad, and we can well imagine what a moral havoc it is causing in a world where whole peoples are furiously organizing themselves for gaining wealth and power. Nationalism is a great menace. It is the particular thing which for years has been at the bottom of India's troubles. And inasmuch as we have been ruled and dominated by a nation that is strictly political in its attitude, we have tried to develop within ourselves, despite our inheritance from the past, a belief in our eventual political destiny.

In reply to by मारवा

मारवा Fri, 05/09/2014 - 08:26
वरील विचार ज्या मुळ निबंधातील आहेत तो रवींद्रनाथ ठाकुर यांचा मुळ निबंध वाचण्यासाठी व रवींद्रनाथ ठाकुर यांच्या इतरही अनेक विषयांवरील सुंदर लेखासाठी ही वेबसाइट अतिशय सुंदर आहे. कविता गाणी तर फार च सुंदर आहेत बरेच मटेरीयल बंगालीत असले तरी इंग्रजी त ही आहे. एकवेळ अवश्य भेट द्या. http://tagoreweb.in/Render/ShowContent.aspx?ct=Essays&bi=72EE92F5-BE50-40D7-8E6E-0F7410664DA3&ti=72EE92F5-BE50-4A47-2E6E-0F7410664DA3&ch=1

दिपोटी Fri, 05/09/2014 - 09:31
उत्तम विचार मांडणारा एक उत्तम लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! मारवा यांचे विचार आजच्या घडीला अंमलात आणताना येणार्‍या अनेक अडचणी वर अनेकांनी आपापल्या प्रतिसादात मांडल्या आहेत. त्यांच्याशी पण निश्चित सहमत आहे, पण मात्र यामुळे मारवा यांच्या विचारांना सरळ हिणवणे वा केराची टोपली दाखवणे उचित होणार नाही. काहीजणांनी वर 'विचार चांगला वा आदर्श आहे पण आजच्या काळात अंमलात आणता येणार नाही' असा काहीसा निराशावादी सूर लावला आहे. माझ्या मते या विचाराकडे एक आदर्श असे अंतिम साध्य (ideal target/goal) म्हणून बघावे. याचा अर्थ आज लगेच ही विचारप्रणाली पूर्णपणे अंमलात आणावी असे नाही, पण भविष्यात ही आदर्श विचारसरणी - हळूहळू का होईना - अनुसरण्यासाठी जागतिक पातळीवर जी विचारांची परिपक्वता लागेल, ती आपापल्या मनात बिंबवण्याची सुरुवात - या परिवर्तनाची फक्त एक सुरुवात (start of the transition process) - आज करणे तर नक्कीच शक्य आहे. 'आदर्श' शब्द वापरल्यावर लगेच 'not practical' असा सूर येऊ शकतो ... पण आपले साध्य हे नेहमीच आदर्श असायला हवे, मग त्या साध्यापर्यंत आपण १००% न पोहोचता जरी ८०-९०% पोहोचले तरी एकंदर परिस्थितीमध्ये ती सुधारणाच असेल. We do not ditch a solution to a problem just and only because we see obstacles in implementing the solution. Obstacles are meant to be overcome. 'येणार्‍या संभाव्य अडचणींमुळे मूळ चांगला विचारच सोडून देणे' आणि 'येणार्‍या संभाव्य अडचणींचा काहीही विचार न करता एखाद्या चांगल्या विचाराची सरधोपट अंमलबजावणी करणे' दोन्ही पर्याय घातकच ठरतील. याउलट संभाव्य अडचणींवर मात करुन व त्यातून मार्ग काढून सर्वांच्या हिताच्या अशा एका आदर्श व अंतिम साध्याच्या दिशेने वाटचाल करणे ही आपली प्रगती-उत्क्रांती होईल. राष्ट्रवाद मोडून काढण्याने होणारे फायदे (प्रचंड मनुष्यसंहार, विस्थापित कुटुंबे, संरक्षणावर होणारा अमाप खर्च व त्यामुळे इतर विधायक व मूलभूत गरजेच्या प्रकल्पांना न मिळणारा निधी, द्वेष-तिरस्कार या सर्व नकारात्मक गोष्टींना मिळणारा चाप) पहाता 'राष्ट्रवाद मोडून काढण्यात येंणार्‍या संभाव्य अडचणींवर मात करणे' हा पर्याय 'राष्ट्रवाद पोसत बसणे' या पर्यायापेक्षा मानवजातीसाठी जास्त हिताचा ठरतो. 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेला विचारजंती वा चार वेळा जेवून ढेकर देताना मांडलेला विचार असे म्हणुन उडवून लावणे अगदी सोपे आहे, पण अंतिमतः आपापले वैविध्य-वैशिष्ट्य जोपासून एकत्र रहाणे (to co-exist within a culturally diverse environment) ही विचारसरणीच आपल्याला पुढे नेईल ही वस्तुस्थिती मागे उरते. - दिपोटी

In reply to by दिपोटी

चौकटराजा Fri, 05/09/2014 - 13:33
राष्ट्र वा धर्म यानी मानव समाज एक आणला की त्यानी त्याची छकले केली ते सगळ्यानाच ठाउक आहे. अनेकाना असे वाटते की या कल्पना नाश पावणे शक्य नाही. पण मला ते शक्य वाटते. जाती निर्मूलन जनांच्या मनात वसत असताना त्यांची पुनः पुन्हा स्थापना आजकालचे " राजे रजवाडे' करीत आहेत. या राजांनीच विटनाम चे युद्ध विनाकारण खेळले.शीतयुद्धाची मजा चाखली. तिथे एक राजा उदयाला आला म्हणाला " अरे आपल्या पासून आठ हजार मैलापलिकडील राजाशी आपल्याला शत्रूत्व हवे आहे की टूथपेस्ट ?

पोटे Fri, 05/09/2014 - 12:34
राष्ट्र, धर्म आणि प्रांत या विषयावर भोळ्या माणसांना लढवून लबाड माणसे मजा मारतात.

गुलाम Fri, 05/09/2014 - 13:57
सर्वप्रथम तुमचं अभिनंदन एवढा वेगळा विचार इथे मांडण्याचं धाडस दाखवल्याबद्दल!! पण आपला (म्हणजे फक्त भारताचा नव्हे) समाज अजुन हा विचार समजण्याएवढा नक्कीच प्रगल्भ नाहिये. मिपासारख्या तुलनेने प्रगल्भ संस्थळावरच्या या तिखट प्रतिक्रीया पाहून तर याची खात्री पटते. पण हा विचार मांडायला सुरुवात तर केलीच पाहिजे तेही विरोध होणार हे गृहीत धरुन. आपल्याकडे देशप्रेम नेहमीच पवित्र गाय (होली काऊ) मानल्यामुळे त्याच्याविरोधात काहिही ऐकुन घेणं अवघड जातं. शिवाय आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर आंतरदेशीय संबंधात भारत नेहमीच रिसिव्हींग एण्डवर राहिला असल्यामुळे राष्ट्रवादात काही चुकीचं आहे असं आपल्याला वाटतच नाही किंबहुना होस्टाईल शेजारी देशांमुळे तो आवश्यक बनतो. पण याच राष्ट्रवादामुळे जर्मनीने जगावर महासंहारक दुसरं महायुध्द लादलं किंवा अलिकडे अमेरिकेने व्हिएतनाम, ईराक वगैरेवर हल्ला चढवला हे आपल्या लक्षात येत नाही आणि आलंच तरी त्याबद्दल कौतुकच वाटतं. याच राष्ट्रवादाच्या पायात अगणित माणसे आणि उर्जा आत्तापर्यंत खर्च झालीय आणि अजूनपण होत राहील. ती उर्जा मानवतेच्या कल्याणासाठी वापरली गेली असती तर जगात कधीच कुणाला उपाशी झोपावं लागलं नसतं. मला मान्य आहे की हा विचार अत्यंत आदर्शवादी आहे आणि जमिनीवरची वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे. पण हा विचार भरल्यापोटी करायचा विचार आहे हे मात्र मला अजिबात मान्य नाही. कारण कुठल्याही युध्दात पहिला (डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट) बळी जातो तो अर्धपोटी गरिबांचाच. उद्या जर भारताने पाकिस्तान विरुध्द युध्द पुकारले आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाट लागून महागाई वाढली तर त्याचा परिणाम मध्यमवर्गीय विचारवंतांवर जास्त होईल की हातावर पोट असलेल्या गरिब मजुरावर??

दिनेश सायगल Fri, 05/09/2014 - 14:14
राष्ट्रवादाने बळी घेतले, हे मान्य करतो. अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात बळी धर्मयुद्धातून, क्रुसेड्समधून घेतले गेले आहेत. धर्म सर्वात आधी, देश त्यानंतर अशी किंवा तत्सम शिकवण मानणार्‍या आणि त्याचे निमित्त करून संहार करणार्‍या धर्मांधांना तुम्ही हा विचार कसा पटवून देणार आहात? 'दार उल इस्लाम' आणि 'दार उल हरब' अशी जगाची विभागणी करणार्‍यांना तुम्ही कोणता संदेश देणार आहात?

मारवा Fri, 05/09/2014 - 15:39
कन्फ़्युज्ड अकाउंटंट मी माझी मते सुत्ररुपात मांडण्याचा एक प्रयत्न करतो. पण यात सर्व मते कव्हर झालेली नाहीत. कदाचित याने मला नेमक काय म्हणायचय ते स्पष्ट होण्यास मदत होइल. बघा ट्राय करुन ! १ राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे. त्यात नैसर्गिक वा दैवी असा कुठलाही भाग नाही. हीच्या मुळाशी माणसाच्या स्व=(वंश-वर्ण-जमात-धर्म-संस्कृती इ.) च श्रेष्ठ आहेत व त्यासाठी हा असलेल्या माणसांच्या समुहाचे (टोळीचेच) स्वतंत्र राष्ट्र असण्याचा आग्रह आहे. व त्याच बरोबर त्या वैशिष्ट्याच्या वर्चस्वासाठी चा ही आग्रह आहे. झेनोफ़ोबीया म्हणजे च जे वरील प्रमाणे स्व=(वंश-वर्ण इ.) नसलेले “इतर” आहेत त्यांच्याप्रति असलेली भीती व द्वेष ही अजुन एक नकारात्मक प्रेरणा या मागे आहेत. २ राष्ट्रवाद मुळात माणसांना माणसांपासुन तोडण्याचे काम करतो. स्व-वर्चस्व वा स्व-संरक्षण या दोन्ही प्रेरणांनी प्रत्येक राष्ट्र सैन्य निर्मीती व युद्ध सज्जतेवर अमुल्य प्रचंड अशी मानवी व इतर संसाधनांची गुंतवणुक करतात. जी बहुतांश शिक्षण/आरोग्य/विकास या अत्यंत निकडीच्या क्षेत्रांना डावलुन च होते. ३ व्यक्तीगत स्तरावर माणुस जो विवेक सर्वसाधारणपणे बाळगतो तो राष्ट्र या संकल्पने च्या नावाखाली पायदळी तुडवला जातो. माणुस माणसाला मारायला एका पायावर तयार होतो. मारण्या मरण्यासाठी एक आग्रही प्रोत्साहन व बधिरतेने आदेशाचे पालन करण्याचा आग्रह सैनिका ला केला जातो. राष्ट्रवाद एक असे लायसन्स टु कील सैनिकाला देते की जे पुर्णपणे अनैतिक असे असते. ४ राष्ट्रवादा ची चौकट एकदा मिळाली की वंश-वर्ण-धर्म-संस्कृती हा केवळ एक स्वाभाविक वेगळेपणा न राहता वा जीवनशैली न राहता ही एक इतरांवर वर्चस्व गाजविण्याची वा इतरांपासुन संरक्षण करण्याची बाब बनते. या साठी मग हिंसाचार हा नैतिक व कायदे संमत होतो. व “इतर” जे आहेत ते शत्रु बनतात. ५ राष्ट्रवाद हा मुळात मानवनिर्मीत व कृत्रीम असल्यानेच त्याला राष्ट्रीय( झेंडा-चलन-पशु-पक्षी-सील-भाषा) आदिंची निर्मीती/जोपासना व महत्वाचं म्हणजे प्रचार करणे ही एक अत्यंत गरजेची अशी बाब बनते. या सर्व प्रतिकांना पावित्र्य बहाल करणं हा आवश्यक असा उपचार बनतो. वरील सर्व घटकांचा एकत्रीत परीणाम मनावर ( गारुड) झाल्यावर एक राष्ट्रवादा चा मनावर खोलवर परीणाम करणारा उन्माद निर्माण होतो. ६ दुहेरी नकली नीतीमुल्ये राष्ट्रवाद निर्माण करतो. एखादी गोष्ट तथ्यात्मक पातळीवर योग्य की अयोग्य हे विवेक बुद्धीप्रामाण्य नैतिकता आदि कसोटींवर घासुन न पाहता ते प्रथम विशीष्ट राष्ट्राच्या संदर्भात कशी आहे यावर निर्णय घेतला जातो. हा नैतिक निर्णयांचा क्रायटेरीया जाणीवपुर्वक संकुचीत केला जातो जे पुर्णपणे चुकीचे व अ-मानवीय असे आहे. गुलामगीरी संदर्भातील वसाहतवाद्यांची भुमिका बघावी. यात अनेक विरोधाभास जे दिसतात त्याच्या मुळाशी राष्ट्रवादा ने निर्माण केलेली दुहेरी नीतीमुल्ये च आहेत. ७ मुलत: अहंकाराधिष्ठीत असलेला राष्ट्रवाद (टोळीवाद) हा कॉम्पीटीशन स्पर्धे वर आधारीत असलेल्या मानवतेचे खुरटे रुप दाखवितो. मात्र सर्वात वाईट बाब म्हणजे प्रेमाधिष्ठीत को-ऑपरेशन सहकार यावर आधारीत असलेल्या मानवी सर्जनशीलतेच्या कळ्यांना तो पुर्णपणे फ़ुलु देत नाही. परस्पर मानवी सहकार, सिनर्जी यांची अगदी छोटी झलक आपल्याला सर्न ने अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने केलेल्या विश्वनिर्मीतीचे गुढ उकलु पाहणारया असामान्य प्रयोगात, संयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड हेरीटेज च्या संदर्भात अवघ्या विश्वाचा वारसा असणारया गोष्टींना जपण्याच्या प्रयत्नात दिसुन येते.

In reply to by मारवा

असंका Fri, 05/09/2014 - 18:07
आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळलं. मला आपलं म्हणणं असं आहे असं वाटतं- १. एकसंध मानवसमाज हे आपले दीर्घकालीन उद्दीष्ट/स्वप्न हवे. त्यात राष्ट्र ही संकल्पना हा एक अडथळा आहे/ठरेल. मूळात राष्ट्र ह्या संकल्पनेत काहीही दैवी नसल्याने त्याविरुद्ध जाणे हे शक्य आहे. तसेच त्या संकल्पनेत निसर्गाच्या नियमांचा काहीही सहभाग नसल्याने, ही संकल्पना जेव्हा मानवसमाज सोडेल, तेव्हा ते अनैसर्गिक असणार नाही. २. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सद्ध्याच्या व्यवस्थेतील तोटे/दोष यांची यादी आपण दिली आहे. हा लेख चांगला मुद्देसूद आणि भावनांना कमीत कमी उत्तेजित करणारा असा होता. सारांश : अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम| उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम...|| (बघा आम्ही भारतीय किती श्रेष्ठ- पूर्वीपासूनच हेच सांगत नव्हतो? ;-) ) (या दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!)

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 18:21
श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. आता मानवी संस्कृती प्रगत असावी कि नसावी? तंत्रज्ञानाच्या प्रगतीला मानवाच्या कल्याणासाठी वापरले जावे कि नाही?(मी १०,००० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत म्हणतोय.)Rephrasing, what I want to ask is whether cutural and scientific advancedment should be there in first place and if yes, should it be put to use for benevolent ends. या प्रश्नांची उत्तरे नि:शंकपणे हो अशी असावीत असे मानू. आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या - १. राष्ट्रे नसली तर, आजच्या मानवतेसाठी, कोणत्याही प्रकारचे प्रशासनच आवश्यक आहे का? मानवजात प्रशासित असावी कि अप्रशासित? आजघडीच्या मानवी आंतरसंबंधांची किचकटता पाहता कोणतेही प्रशासन नको व कोणत्याही मुद्द्यावर कितीही प्रमाणात एकत्र आलेला एक गट (जसे एक कंपनी) आणि असाच दुसरा गट (जसे तिचे सप्लायर वा ग्राहक) मध्यस्थांच्या अभावी (in the absence of a government or similar recognized body)सहजजीवन करू शकतात असे आपणांस वाटते काय? बहुधा नसावे. २. मग प्रश्न येतो ज्याला केंद्रिय म्हणता येईल असे जगात एकच सरकार असावे. या सरकारमधे सत्तेचे (न्यायिक, वैधानिक, प्रशासकीय अधिकारांचे) विकेंद्रीकरण झालेले नसावे असे आपल्याला म्हणायचे आहे का? सारे निर्णय राजधानीत घेतले पाहिजेत? बहुधा नसावे. ३. म्हणजे पुन्हा अशा जगात भिन्न सत्ताशक्ती असणारी वर्तुळे निर्माण करणे आले. यात केंद्राच्या अखत्यारित काय काय असावे? समजा असे जगत्सरकार लंडनमधून चालले. जगातल्या सर्व लोकांनी (आपण ते सगळे चांगले मतदाते आहेत असे मानू) मिळून, उदाहरणादाखल, भारताबद्दल काय काय ठरवावे? नकाशा? भाषा? झेंडा? आदरस्थाने? आज केंद्र सरकारला जे जे अधिकार आहेत ते सारे असावेत असे म्हणत असाल तर सवत्याने प्रतिसाद देईन. ४. सर्व राज्यकर्त्यांचा नि सर्वमतदात्यांचा सदुद्देश असूनही, असे सरकार, जगातल्या लोकांच्या राजकीय इच्छा पूर्ण करेल काय? सदुद्देश नसला तर? ५. असे सरकार कसे निवडावे? कोणती राज्यपद्धती असावी? कोणती चयनपद्धती असावी? टुंड्रामधल्या लोकांनी भारत वा ईंडीया हे नाव देखिल ऐकलेले नसताना त्यांनी भारतावर, भारताच्या लोकांवर प्रचंड परिणाम करणारे सरकार निवडावे का? ६. प्रचंड मानवतावाद पुढे ठेउन मतदान करणारे ते प्रचंड पॅरोकियल मतदान करणारे असे लोक असतील. त्यांचे रिलेटिव प्रमाण काय असेल? कोणते मुद्दे एखादे सरकार बनण्याचे 'खरे कारण' असतील? (इथे सरकार म्हणजे सरकारच नाही, पण कोणतीही निती बनवणारी नि राबवणारी संस्था.) इथे नवेच, आजपेक्षा भयानक राजकारण होणार नाही, असे आपणांस वाटते काय? अशी खात्री आहे का? ७. जगातल्या प्रत्येक देशात स्थानिक माणूस आपापल्याला सर्वात सुरक्षित महसूस करतो. वरच्या मॉडेलमधे आंतरिक सुरक्षेचे काय? कोणीही कोणत्याही जाऊ लागला (सैन्य नाही म्हणत मी, टोळ्यापण नाही, फक्त गुंड लोक, एकट्याने, ४-५ च्या गटांत) तर देश सुरक्षित उरतील का? ८. अवांतर नको म्हणून फालतू उदाहरण देत आहे. समजा अ ठिकाणी बूट घालणे पाप मानतात. ब ठिकाणी मोठे पुण्य मानतात. मग कायदा काय असावा? उलटसुलट असेल तर त्यामागचे कारण काय म्हणून सांगावे? ९. बाकी सगळे ठिक मानू. म्हणजे जे नियम, संस्था काढून फेकता येतात, त्या आरामात करू. आता हे पाहा. आज काय कमी आहे? १. युद्धे - जगात किती देश आहेत. ३०० माना. तर ३००*२९९ इतक्या शत्रूंच्या जोड्या आहेत का? २. व्यापार - व्यापार, संपत्ती, इ चा मुद्दा घेतला तर जग जवळजवळ एक देशच आहे. भारताचा ट्रेड जीडीपी रेशो ४०% आहे!!! ३. सीमा नसणे - इतिहासातही नि आजही सीमा जलदछायेप्रमाणे बदलतात. १५-०८-४७ पासून भारतातच किती सीमाबदल चालू आहेत? २०-३० तरी असतील. यातले बरेच शांतीपूर्ण नव्हते हे मान्य आहे. आजही भारत नि बांगलादेश स्थानिकांच्या सुखासाठी त्यांचे नागरिकत्व बदलण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत नाही आहेत का? ४. इमिग्रशन - भारतीय जगभरात कुठे कुठे, किती किती नि कसे कसे जगत आहेत हे पहा. राष्ट्रवादाने काय बिघडावले? ५. संपत्ती - जगातल्या नागरिकांची इतर देशातील संपत्तीची क्रॉस होल्डिंग चकित करणारी आहे. ६. नागरिकत्व - फारच इच्छा असेल तर (आखात इ वगळता) कुठेही जाऊन पिढ्यान पिढ्या राहता येते. ७. लोकभावना - राजनेत्यांच्या शत्रूभावनेला लोक सहसा तितकीशी दाद देत नाहीत. ८. संस्कृती - लोकांनी स्वतःच्याही नकळत जगातलं कूठलं काय काय घेतलं आहे याला सीमा नाही. बहुधा माणसाच्या मुक्तभावनेची वलये असतात. म्हणून कुटुंबासह माणूस कडी कुलूप लावून घरात राहतो. मग तो पोलिसांच्या सुरक्षेखाली नगरात वावरतो. तिथे त्याचे वलय अजून मोठे झालेले असते. त्यानंतर मात्र सैन्याचे वलय गरजेचे असते. कारण बर्‍याच गोष्टी सुरक्षित ठेवायच्या असतात. लक्षात घ्या - १. जिथे युद्धेच होत नाहीत तिथे सीमेवर सैनिक बिड्या फुकत (सॉरी, बिअर पीत) पडलेले असतात. जगातल्या बहुतांश सीमा अश्याच आहेत. २. ताण कमी झाला कि सैनिक कमी केले जातात. ३. जिवित हानी, तिही सिविल, कमीत कमी असावी हा संकेतच नसून, नियम आहे. ४. शस्त्रे बनवायची नि विकायची याची वाणिज्यिक लॉबी आहे. ती वापरायची नाहीत हा ही संकेत आहे. ५. मानवतेत एक "किमान विकृतेतेचे प्रमाण" तसेच "किमान गुन्हेगारीचे प्रमाण" असते. कोणतीही पद्धत आणा, ते दिसणारच. त्याचे खापर असलेल्या 'व्यवस्थेवरच' फोडू नये. शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्‍या आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत.

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 Fri, 05/09/2014 - 18:39
ज्या वाचकांना इतके मोठे प्रतिसाद वाचायची सवय नाही - राष्ट्र ही संकल्पनाच कचर्‍यात काढणे अव्यवहार्य, कठिण वा कदाचित असंभव असावे, पक्षी 'आंतरराष्ट्रीय संबंध' कसे जास्त सलोख्याचे असतील यावर फोकस असावा.

In reply to by arunjoshi123

मारवा Sat, 05/10/2014 - 18:01
अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. अशी एक प्राचीन चायनीज म्हण आहे. व स्टीफ़न कोव्हे हे विख्यात लेखक त्यांच्या टाइम मॅनेजमेंट च्या सिद्धांताला एक नाव देतात. फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट. तर मला अस म्हणावयाचे आहे की एक एक मुद्दा क्रमा क्रमा ने शिस्तीत लयीत घेत पुढे सरकलो तरच आपल्या चर्चेला काही अर्थ आकार येउ शकतो व ती काही निर्णायक बिंदु वर पोहोचु शकते. हाच कुठल्याही चांगल्या चर्चेचा हेतु असतो असे मला वाटते. कीमान आपण त्या दिशेने प्रयास तरी करायलाच हवा. मी आपला जुना वाचक आणि चाहता आहे .आपल्या व्यासंगाच्या ,मेहनतीच्या, तळमळीच्या विषयी मी नितांत आदर बाळगुन ही माझे एक मत निर्भीड व प्रांजळपणे मांडतो की आपला प्रतिसाद १-अत्यंत विस्कळीत आहे. २-अनेक परस्पर विरोधी विधानांनी युक्त असा आहे. ३-ज्याचा परीणाम मुळ विषय भरकटवण्यात व कन्फ़्युजन निर्माण करण्यात होतो. माझ्या वरील विधानांच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या प्रतिसादातील एक उदाहरण घेउ आपल्या प्रतिसादाची सुरुवातच आपण या विधानाने करतात विधान क्र.१ श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. अरुण जी नंतर अनेक वळणे घेत आपले खालील दुसरे विधान येते. विधान क्र.२ शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. अरुण जी या विरोधाभासाची कृपया अगोदर विल्हेवाट लावु या म्हणजे तुमची राष्ट्रवादा वरची भुमिका नेमकी काय आहे ते मला स्पष्ट कळेल. तसेच आणखी काही गुढ अनाकलनीय विधाने तुमच्या प्रतिसादात आहेत उदा. हे विधान घेउ या विधान क्र,३ मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्याा आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत. अरुण जी या संकल्पना खरया कशा ? नैसर्गिक कशा ? रेंजबाउंड अर्थाने म्हणजे नेमक काय व आवश्यक कशा ? हे मला तरी अतिशय गुढ असे विधान वाटते अध्यात्मिक निर्वाण वा माया अशा संकल्पनांसारखे कृपया अगोदर हे क्लिअर करावे वरील गोष्टी क्लिअर करण ही मला वाटत आपल्या दोघांसाठी टु पुट फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट असेल, आणि आपल्या थाउजंड माइल्स जर्नी मधील पहीली च स्टेप आहे. अगोदर ही स्टेप ओलांडु या. मग कीतीही वेळ का लागेना. एकंदरीत प्रतिसादातुन व मुळ लेखातुन आपल्या हे लक्षात आलेलेच असेल की मुळात राष्ट्रवाद हा एक उन्माद आहे या पहील्या स्टेप लाच कीती रेसीस्टन्स आहे. अजुन पुढे सरकायला बराच अवकाश आहे. आपण राष्ट्रवाद हा मुळात काय कसा आहे छान छान आहे की वाइट आहे आवश्य्क की अनावश्यक आहे या निश्चीतीच्या पहील्या केवळ पहील्या पायरी वरच घट्ट पाय रोवुन चर्चा करत आहोत. या पहील्याच पायरीला योग्य न्याय दिल्याशीवाय पुढे जाणं सरकणं हे करु शकतो मात्र ते कीती निरर्थक व निरुपयोगी आहे. हे उघड आहे. अगदी गावठी उदाहरण म्हणजे एखादा अट्टल मद्यपी माझ्या ड्रींक चा काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही उगाचच बाउ करताय इतक्याशा ने काही होतच नसतं इतक्या प्राथमिक डीनायल( ल्कोहोलिक्स अनोनिमस फ़ेम) स्टेज मध्ये आहे. त्याला या पुढील स्टेजेस विषयी बोलण्यात काही अर्थ आहे का अनलेस तो हे मान्य करतो की येस अल्कोहोल इज एव्हील आणि मी त्याच्या गर्तेत अडकलोय. काही प्रश्न ही कुटील असतात जसे ब्रिटीश भारतीयांना स्वातंत्र्या च्या मागणीच्या प्रत्युत्तरात विचारत की तुम्ही अगोदर हे सांगा की आम्ही गेल्यावर तुम्ही हा देश चालवणार कसा ? मग तुमच्या स्वातंत्र्याच काय ते बघु. इथे सर्वात कुटील भाग असा होता की प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामागे तेव्हाची स्वातंत्र्याची जी अत्यंत न्याय्य अशी मागणी होती ते देण्याच्या जबाबदारी पासुन हात झटकण्याचा होता. मुळ मागणी कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष=अवहेलना=टाळण=भरकटवणं असा होता. तुम्ही असे कुटील आहात असे मी म्हणत नाहीये कृपया गैरसमज नसावा. ते प्रश्न पुढील पायरीचे आहेत. इथे अजुन पहीली वरच मारामारी खुप आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की ते प्रश्न अनावश्यक वा चुकीचे आहेत मात्र अस्थानी व चुकीच्या क्रमाने अगोदर उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे ही निश्चीतच देण व त्यावर विचार मंथन होण ही मात्र निश्चीतच पुढील पायरी आहे. पण कृपया हे बघा की मुळ विचार अगोदर क्लिअर होण मान्य होण हेच कीती कठीण व तितकच अत्यावश्यक आहे. अरुण जी आपण संवेदनशीलतेने माझ्या भावना व्यक्तीगत न घेता समजुन घ्याल या खात्रीसहीत आपला मारवा

In reply to by arunjoshi123

मारवा Sat, 05/10/2014 - 18:02
अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. अशी एक प्राचीन चायनीज म्हण आहे. व स्टीफ़न कोव्हे हे विख्यात लेखक त्यांच्या टाइम मॅनेजमेंट च्या सिद्धांताला एक नाव देतात. फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट. तर मला अस म्हणावयाचे आहे की एक एक मुद्दा क्रमा क्रमा ने शिस्तीत लयीत घेत पुढे सरकलो तरच आपल्या चर्चेला काही अर्थ आकार येउ शकतो व ती काही निर्णायक बिंदु वर पोहोचु शकते. हाच कुठल्याही चांगल्या चर्चेचा हेतु असतो असे मला वाटते. कीमान आपण त्या दिशेने प्रयास तरी करायलाच हवा. मी आपला जुना वाचक आणि चाहता आहे .आपल्या व्यासंगाच्या ,मेहनतीच्या, तळमळीच्या विषयी मी नितांत आदर बाळगुन ही माझे एक मत निर्भीड व प्रांजळपणे मांडतो की आपला प्रतिसाद १-अत्यंत विस्कळीत आहे. २-अनेक परस्पर विरोधी विधानांनी युक्त असा आहे. ३-ज्याचा परीणाम मुळ विषय भरकटवण्यात व कन्फ़्युजन निर्माण करण्यात होतो. माझ्या वरील विधानांच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या प्रतिसादातील एक उदाहरण घेउ आपल्या प्रतिसादाची सुरुवातच आपण या विधानाने करतात विधान क्र.१ श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. अरुण जी नंतर अनेक वळणे घेत आपले खालील दुसरे विधान येते. विधान क्र.२ शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. अरुण जी या विरोधाभासाची कृपया अगोदर विल्हेवाट लावु या म्हणजे तुमची राष्ट्रवादा वरची भुमिका नेमकी काय आहे ते मला स्पष्ट कळेल. तसेच आणखी काही गुढ अनाकलनीय विधाने तुमच्या प्रतिसादात आहेत उदा. हे विधान घेउ या विधान क्र,३ मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्याा आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत. अरुण जी या संकल्पना खरया कशा ? नैसर्गिक कशा ? रेंजबाउंड अर्थाने म्हणजे नेमक काय व आवश्यक कशा ? हे मला तरी अतिशय गुढ असे विधान वाटते अध्यात्मिक निर्वाण वा माया अशा संकल्पनांसारखे कृपया अगोदर हे क्लिअर करावे वरील गोष्टी क्लिअर करण ही मला वाटत आपल्या दोघांसाठी टु पुट फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट असेल, आणि आपल्या थाउजंड माइल्स जर्नी मधील पहीली च स्टेप आहे. अगोदर ही स्टेप ओलांडु या. मग कीतीही वेळ का लागेना. एकंदरीत प्रतिसादातुन व मुळ लेखातुन आपल्या हे लक्षात आलेलेच असेल की मुळात राष्ट्रवाद हा एक उन्माद आहे या पहील्या स्टेप लाच कीती रेसीस्टन्स आहे. अजुन पुढे सरकायला बराच अवकाश आहे. आपण राष्ट्रवाद हा मुळात काय कसा आहे छान छान आहे की वाइट आहे आवश्य्क की अनावश्यक आहे या निश्चीतीच्या पहील्या केवळ पहील्या पायरी वरच घट्ट पाय रोवुन चर्चा करत आहोत. या पहील्याच पायरीला योग्य न्याय दिल्याशीवाय पुढे जाणं सरकणं हे करु शकतो मात्र ते कीती निरर्थक व निरुपयोगी आहे. हे उघड आहे. अगदी गावठी उदाहरण म्हणजे एखादा अट्टल मद्यपी माझ्या ड्रींक चा काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही उगाचच बाउ करताय इतक्याशा ने काही होतच नसतं इतक्या प्राथमिक डीनायल( ल्कोहोलिक्स अनोनिमस फ़ेम) स्टेज मध्ये आहे. त्याला या पुढील स्टेजेस विषयी बोलण्यात काही अर्थ आहे का अनलेस तो हे मान्य करतो की येस अल्कोहोल इज एव्हील आणि मी त्याच्या गर्तेत अडकलोय. काही प्रश्न ही कुटील असतात जसे ब्रिटीश भारतीयांना स्वातंत्र्या च्या मागणीच्या प्रत्युत्तरात विचारत की तुम्ही अगोदर हे सांगा की आम्ही गेल्यावर तुम्ही हा देश चालवणार कसा ? मग तुमच्या स्वातंत्र्याच काय ते बघु. इथे सर्वात कुटील भाग असा होता की प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामागे तेव्हाची स्वातंत्र्याची जी अत्यंत न्याय्य अशी मागणी होती ते देण्याच्या जबाबदारी पासुन हात झटकण्याचा होता. मुळ मागणी कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष=अवहेलना=टाळण=भरकटवणं असा होता. तुम्ही असे कुटील आहात असे मी म्हणत नाहीये कृपया गैरसमज नसावा. ते प्रश्न पुढील पायरीचे आहेत. इथे अजुन पहीली वरच मारामारी खुप आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की ते प्रश्न अनावश्यक वा चुकीचे आहेत मात्र अस्थानी व चुकीच्या क्रमाने अगोदर उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे ही निश्चीतच देण व त्यावर विचार मंथन होण ही मात्र निश्चीतच पुढील पायरी आहे. पण कृपया हे बघा की मुळ विचार अगोदर क्लिअर होण मान्य होण हेच कीती कठीण व तितकच अत्यावश्यक आहे. अरुण जी आपण संवेदनशीलतेने माझ्या भावना व्यक्तीगत न घेता समजुन घ्याल या खात्रीसहीत आपला मारवा

कवितानागेश Fri, 05/09/2014 - 19:20
मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे. आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. 'राष्ट्र' त्यातूनच निर्माण होतं. 'वाद' निर्माण होतो, तो "काही" लोकांच्या सत्तापिपासू वृत्तीतून होतो. आणि कुठलाही सत्तापिपासू माणूस ती लालसा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या कुठल्याही भावनेला हात घालू शकतोच. कधी राष्ट्र, कधी धर्म, कधी वर्ण, कधी रक्त, कधी विचार ....

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे Fri, 05/09/2014 - 19:35
आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे
जन्मभूमी कुठपर्यंत.. गाव, शहर, जिल्हा,जिथे आपण वावरलो त्या भागाबाबत नैसर्गिक आहे.. पण जिथे कधी आयुष्यात पाउल टाकलं नाही, किंवा भविष्यात टाकायची शक्यता नाही.. त्याभूमीबाबत जन्मभूमी म्हणून प्रेम इतकं आत्यंतिक कसं होउ शकतं..

In reply to by कवितानागेश

आयुर्हित Sat, 05/10/2014 - 00:31
बाळ सप्रेंच्या पुस्तकातील प्रतिज्ञा अशी होती: पुणे(जिल्हा)माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव आहेत. माझ्या पुण्यावर माझे प्रेम आहे. पुणे देशातील सर्व नागरिकांवर माझे प्रेम आहे. माझ्या पुण्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पेठांचा(!) मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता(?)माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझे पुणे आणि माझे पुणेकर देश बांधव यांच्याशीच निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मनोरंजन,पर्यटन,देवदर्शन,व्यवसाय,नोकरीसाठी मी माझ्या पुणे देशातच राहीन व येथे नोकरी न मिळाल्यास इतर देशांकडे ढुंकूनही पाहणार नाही. मी पुणे सोडून कधीही बाहेरच्या मुंबई,सातारा,सांगली,कोल्हापूर,गोवा या इतर देशात पायही ठेवणार नाही. आणि माझ्या पुढच्या पिढीलाही पाय ठेवू देणार नाही! जय पुणे! जय जय पुणे!!

In reply to by आयुर्हित

विकास Sat, 05/10/2014 - 20:02
प्रतिज्ञेसंदर्भात एकच प्रश्न पडला आहे: मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. यातील सौजन्याने म्हणजे नक्की काय आणि कसे? ;)

In reply to by विकास

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 20:51
सकाळी ९ ते १ आणि ४ ते ९ ह्या वेळेत दृष्टी आणि चेहरा क्षितीजाशी समांतर ठेवणं (इतर वेळी २२अंश आकाशाकडं), बोलताना पूर्ण वाक्यात बोलणं, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणं ऐकून घेणं, जमल्यास क्वचित प्रसंगी ओठांना दोन्ही बाजूंनी वरच्या दिशेनं ७.२५ अंशात वळवणं ह्या सगळ्यास सौजन्य म्हणत असावेत.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Sat, 05/10/2014 - 19:22
मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे.
इतिहास पाहिला तर वरील वाक्य किती चुकीचे आहे ते वेगळे सांगायला नको. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

मारवा Sat, 05/10/2014 - 19:57
बॅटमॅन जी आपण जे म्हणताय त्याचा किंचीत विस्तार करुन इतिहासातील एखादे उदाहरण देउन मांडल्यास आपणास नेमके काय म्हणायचे आहे याचे आकलन सुलभ होइल.

पोटे Sat, 05/10/2014 - 10:33
राज्य धर्म देव या संकल्पना या देशात लबाड लोकांनी भोळ्या लोकांना फसवण्यासाठीच वापरलेल्या आहेत. अगदी रामायण महाभारत काळातही सत्यवतीने भीष्माला ब्रह्मचारी ठेवणं , कैकेयीने कुणाला तरी वनवास घडवणं , धृवाच्या सावत्र आईने त्याला जंगलात ( की डयरेक्ट स्वर्गात पाठवून देवानं वर पाठवला अशी हूल उठवणं ) , हस्तिनापूरसाठी झालेला संग्राम ... अशा घटनांमधून हेच दिसतं की राष्ट्र चालवून त्यात्ण नफा मिळवणे, आणि ऐषो आरामात जगणे, हाच राजघराण्यांचा धंदा होता. अगदी मोघल , मोघलांना आधी दहा पिढ्या सलाम करणारे आणि नंतर स्वतःची टीचभर राज्ये स्थापन करणारे ... या सगळ्यातून राज्य करणे आणि गोळा होणारा ट्याक्स स्वतःच्या खजिन्यात भरणे इतकेच साध्य केले गेले आहे. जनता मात्र राष्ट्र प्रेम, धर्म प्रेम इ इ च्या नावानं झुंजत राहिली, पण राजाला जाब विचारायचे स्वातंत्र्य जनतेला नव्हते.

विकास Sat, 05/10/2014 - 20:05
वर श्री. मारवा यांनी म्हणले आहे की: अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. तर मग आता पहीले पाऊल काय असावे, ते आपण (म्हणजे मारवा) कसे आचरणात आणत आहोत आणि इतरांनी देखील त्याचे कसे अनुकरण करावे, हे पण त्यांनी सांगितले तर या विषयाला अजून सक्रीय चालना मिळेल.

मारवा Mon, 05/12/2014 - 10:36
बंटवारे के दो-तीन साल बाद पाकिस्तान और हिंदुस्तान की हुकूमतों को ख़याल आया कि सामान्य क़ैदियों की तरह पागलों का भी तबादला होना चाहिए, यानी जो मुसलमान पागल हिंदुस्तान के पागलख़ानों में हैं, उन्हें पाकिस्तान पहुँचा दिया जाए और जो हिंदू और सिख पाकिस्तान के पागलख़ानो में हैं, उन्हें हिंदुस्तान के हवाले कर दिया जाए। मालूम नहीं, यह बात माक़ूल थी या गै़र माकूल़, बहरहाल दानिशमंदों के फ़ैसले के मुताबिक़ इधर-उधर ऊँची सतह की कान्फ़ेंस हुई और बिल आख़िर पागलों के तबादले के लिए एक दिन मुक़र्रर हो गया। अच्छी तरह छानबीन की गई - वे मुसलमान पागल जिनके संबंधी हिंदुस्तान ही में थे, वहीं रहने दिए गए, बाक़ी जो बचे, उनको सरहद पर रवाना कर दिया गया। पाकिस्तान से चूँकि क़रीब-क़रीब तमाम हिंदू-सिख जा चुके थे, इसलिए किसी को रखने-रखाने का सवाल ही पैदा नहीं हुआ, जितने हिंदू-सिख पागल थे, सबके-सब पुलिस की हिफ़ाज़त में बॉर्डर पर पहुँचा दिए गए। उधर का मालूम नहीं लेकिन इधर लाहौर के पागलख़ाने में जब इस तबादले की ख़बर पहुँची तो बड़ी दिलचस्प गपशप होने लगी। एक मुसलमान पागल जो बारह बरस से, हर रोज़, बाक़ायदगी के साथ 'ज़मींदार' पढ़ता था, उससे जब उसके एक दोस्त ने पूछा, "मौलवी साब, यह पाकिस्तान क्या होता है?" तो उसने बड़े गौरो-फ़िक्र के बाद जवाब दिया, "हिंदुस्तान में एक ऐसी जगह है जहाँ उस्तरे बनते हैं!" यह जवाब सुनकर उसका दोस्त संतुष्ट हो गया। इसी तरह एक सिख पागल ने एक दूसरे सिख पागल से पूछा, "सरदार जी, हमें हिंदुस्तान क्यों भेजा जा रहा है, हमें तो वहाँ की बोली नहीं आती।" दूसरा मुस्कराया, "मुझे तो हिंदुस्तोड़ों की बोली आती है, हिंदुस्तानी बड़े शैतानी आकड़ आकड़ फिरते हैं।" एक दिन, नहाते-नहाते, एक मुसलमान पागल ने 'पाकिस्तान ज़िंदाबाद' का नारा इस ज़ोर से बुलंद किया कि फ़र्श पर फिसलकर गिरा और बेहोश हो गया। बाज़ पागल ऐसे भी थे जो पागल नहीं थे, उनमें बहुतायत ऐसे क़ातिलों की थी जिनके रिश्तेदारों ने अफ़सरों को कुछ दे दिलाकर पागलख़ाने भिजवा दिया था कि वह फाँसी के फंदे से बच जाएँ, यह पागल कुछ-कुछ समझते थे कि हिंदुस्तान क्यों तक़्सीम हुआ है और यह पाकिस्तान क्या है, लेकिन सही वाक़िआत से वह भी बेख़बर थे, अख़बारों से उन्हें कुछ पता नहीं चलता था और पहरेदार सिपाही अनपढ़ और जाहिल थे, जिनकी गुफ़्तगू से भी वह कोई नतीजा बरामद नहीं कर सकते थे। उनको सिर्फ़ इतना मालूम था कि एक आदमी मुहम्मद अली जिन्नाह है जिसको क़ायदे-आज़म कहते हैं, उसने मुसलमानी के लिए एक अलहदा मुल्क बनाया है जिसका नाम पाकिस्तान है, यह कहाँ हैं, इसकी भौगोलिक स्थिति क्या है, इसके मुताल्लिक़ वह कुछ नहीं जानते थे - यही वजह है कि वह सब पागल जिनका दिमाग पूरी तरह बिगड़ा हुआ नहीं हुआ था, इस मखमसे में गिरफ़्तार थे कि वह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, अगर हिंदुस्तान में हैं तो पाकिस्तान कहाँ हैं, अगर वह पाकिस्तान में हैं तो यह कैसे हो सकता है कि वह कुछ अर्से पहले यहीं रहते हुए हिंदुस्तान में थे। एक पागल तो हिंदुस्तान और पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान और हिंदुस्तान के चक्कर में कुछ ऐसा गिरफ़्तार हुआ कि और ज़्यादा पागल हो गया। झाडू देते-देते वह एक दिन दरख्त़ पर चढ़ गया और टहने पर बैठकर दो घंटे मुसलसल तक़रीर करता रहा, जो पाकिस्तान और हिंदुस्तान के नाज़ुक मसले पर थी, सिपाहियों ने जब उसे नीचे उतरने को कहा तो वह और ऊपर चढ़ गया। जब उसे डराया-धमकाया गया तो उसने कहा, "मैं हिंदुस्तान में रहना चाहता हूँ न पाकिस्तान में, मैं इस दरख़्त पर रहूँगा।" बड़ी देर के बाद जब उसका दौरा सर्द पड़ा तो वह नीचे उतरा और अपने हिंदू-सिख दोस्तों से गले मिल-मिलकर रोने लगा - इस ख़याल से उसका दिल भर आया था कि वह उसे छोड़कर हिंदुस्तान चले जाएँगे। एक एम.एस-सी. पास रेडियो इंजीनियर में जो मुसलमान था और दूसरे पागलों से बिलकुल अलग-थलग बाग की एक खास पगडंडी पर सारा दिन ख़ामोश टहलता रहता था, यह तब्दीली ज़ाहिर हुई कि उसने अपने तमाम कपड़े उतारकर दफादार के हवाले कर दिए और नंग-धड़ंग सारे बाग में चलना-फिरना शुरू कर दिया। चियौट के एक मोटे मुसलमान ने, जो मुस्लिम लीग का सरगर्म कारकुन रह चुका था और दिन में पंद्रह-सोलह मर्तबा नहाया करता था, एकदम यह आदत तर्क कर दी - उसका नाम मुहम्मद अली था, चुनांचे उसने एक दिन अपने जंगले में एलान कर दिया कि वह क़ायदे-आज़म मुहम्मद अली जिन्नाह है, उसकी देखा-देखी एक सिख पागल मास्टर तारा सिंह बन गया - इससे पहले कि खून-ख़राबा हो जाए, दोनों को ख़तरनाक पागल क़रार देकर अलहदा-अलहदा बंद कर दिया गया। लाहौर का एक नौजवान हिंदू वकील मुहब्बत में नाकाम होकर पागल हो गया था, जब उसने सुना कि अमृतसर हिंदुस्तान में चला गया है तो उसे बहुत दुख हुआ। अमृतसर की एक हिंदू लड़की से उसे मुहब्बत थी जिसने उसे ठुकरा दिया था मगर दीवानगी की हालत में भी वह उस लड़की को नहीं भूला था - वह उन तमाम हिंदू और मुसलमान लीडरों को गालियाँ देने लगा जिन्होंने मिल-मिलाकर हिंदुस्तान के दो टुकडे कर दिए हैं, और उसकी महबूबा हिंदुस्तानी बन गई है और वह पाकिस्तानी। जब तबादले की बात शुरू हुई तो उस वकील को कई पागलों ने समझाया कि वह दिल बुरा न करे, उसे हिंदुस्तान भेज दिया जाएगा, उसी हिंदुस्तान में जहाँ उसकी महबूबा रहती है - मगर वह लाहौर छोड़ना नहीं चाहता था, उसका ख़याल था कि अमृतसर में उसकी प्रैक्टिस नहीं चलेगी। युरोपियन वार्ड में दो एंग्लो इंडियन पागल थे। उनको जब मालूम हुआ कि हिंदुस्तान को आज़ाद करके अंग्रेज़ चले गए हैं तो उनको बहुत सदमा हुआ, वह छुप-छुपकर घंटों आपस में इस अहम मसले पर गुफ़्तगू करते रहते कि पागलख़ाने में अब उनकी हैसियत किस किस्म की होगी, योरोपियन वार्ड रहेगा या उड़ा दिया जाएगा, ब्रेक-फास्ट मिला करेगा या नहीं, क्या उन्हें डबल रोटी के बजाय ब्लडी इंडियन चपाटी तो ज़बरदस्ती नहीं खानी पड़ेगी? एक सिख था, जिसे पागलख़ाने में दाखिल हुए पंद्रह बरस हो चुके थे। हर वक्त उसकी जुबान से यह अजीबो-गरीब अल्फ़ाज़ सुनने में आते थे, "औपड़ दि गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मूँग दि दाल ऑफ दी लालटेन!" वह दिन को सोता था न रात को। पहरेदारों का यह कहना था कि पंद्रह बरस के तबील अर्से में वह एक लहज़े के लिए भी नहीं सोया था, वह लेटता भी नहीं था, अलबत्ता कभी-कभी किसी दीवार के साथ टेक लगा लेता था - हर वक्त खड़ा रहने से उसके पाँव सूज गए थे और पिंडलियाँ भी फूल गई थीं, मगर जिस्मानी तकलीफ़ के बावजूद वह लेटकर आराम नहीं करता था। हिंदुस्तान, पाकिस्तान और पागलों के तबादले के मुताल्लिक़ जब कभी पागलख़ानों में गुफ़्तगू होती थी तो वह गौर से सुनता था, कोई उससे पूछता कि उसका क्या ख़याल है तो वह बड़ी संजीदगी से जवाब देता, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान गवर्नमेंट!" लेकिन बाद में 'आफ दि पाकिस्तान गवर्नमेंट' की जगह 'आफ दि टोबा टेक सिंह गवर्नमेंट' ने ले ली, और उसने दूसरे पागलों से पूछना शुरू कर दिया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जहाँ का वह रहनेवाला है। किसी को भी मालूम नहीं था कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, जो बताने की कोशिश करते थे वह खुद इस उलझाव में गिरफ़्तार हो जाते थे कि सियालकोट पहले हिंदुस्तान में होता था, पर अब सुना है कि पाकिस्तान में हैं, क्या पता है कि लाहौर जो आज पकिस्तान में हैं, कल हिंदुस्तान में चला जाए या सारा हिंदुस्तान ही पाकिस्तान बन जाए और यह भी कौन सीने पर हाथ रखकर कह सकता है कि हिंदुस्तान और पाकिस्तान, दोनों किसी दिन सिरे से गायब ही हो जाएँ! इस सिख पागल के केश छिदरे होकर बहुत मुख्त़सर रह गए थे, चूँकि बहुत कम नहाता था, इसलिए दाढ़ी और सिर के बाल आपस में जम गए थे जिसके बायस उसकी शक्ल बड़ी भयानक हो गई थी, मगर आदमी हिंसक नहीं था - पंद्रह बरसों में उसने कभी किसी से झगड़ा-फ़साद नहीं किया था। पागलख़ाने के जो पुराने मुलाज़िम थे, वह उसके मुताल्लिक़ इतना जानते थे कि टोबा टेक सिंह में उसकी कई ज़मीनें थी, अच्छा खाता-पीता ज़मींदार था कि अचानक दिमाग उलट गया, उसके रिश्तेदार उसे लोहे की मोटी-मोटी ज़ंजीरों में बाँधकर लाए और पागलख़ाने में दाखिल करा गए। महीने में एक बार मुलाक़ात के लिए यह लोग आते थे और उसकी खैर-ख़ैरियत दरयाफ़्त करके चले जाते थे, एक मुश्त तक यह सिलसिला जारी रहा, पर जब पाकिस्तान, हिंदुस्तान की गड़बड़ शुरू हुई तो उनका आना-जाना बंद हो गया। उसका नाम बिशन सिंह था मगर सब उसे टोबा टेक सिंह कहते थे। उसको यह बिलकुल मालूम नहीं था कि दिन कौन-सा है या कितने साल बीत चुके हैं, लेकिन हर महीने जब उसके निकट संबंधी उससे मिलने के लिए आने के क़रीब होते तो उसे अपने आप पता चल जाता, चुनांचे वह दफादार से कहता कि उसकी मुलाकात आ रही है, उस दिन वह अच्छी तरह नहाता, बदन पर ख़ूब साबुन घिसता और बालों में तेल डालकर कंघा करता, अपने वह कपड़े जो वह कभी इस्तेमाल नहीं करता था, निकलवाकर पहनता और यों सज-बनकर मिलनेवालों के पास जाता। वह उससे कुछ पूछते तो वह ख़ामोश रहता या कभी-कभार 'औपड़ दि गड़ गड़ अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी लालटेन' कह देता। उसकी एक लड़की थी जो हर महीने एक उँगली बढ़ती-बढ़ती पंद्रह बरसों में जवान हो गई थी। बिशन सिंह उसको पहचानता ही नहीं था - वह बच्ची थी जब भी अपने आप को देखकर रोती थी, जवान हुई तब भी उसकी आँखों से आँसू बहते थे। पाकिस्तान और हिंदुस्तान का किस्सा शुरू हुआ तो उसने दूसरे पागलों से पूछना शुरू किया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जब उसे इत्मीनानबख्श़ जवाब न मिला तो उसकी कुरेद दिन-ब-दिन बढ़ती गई। अब मुलाक़ात भी नहीं होती थी, पहले तो उसे अपने आप पता चल जाता था कि मिलनेवाले आ रहे हैं, पर अब जैसे उसके दिल की आवाज़ भी बंद हो गई थी जो उसे उनकी आमद की ख़बर दे दिया करती थी - उसकी बड़ी ख़्वाहिश थी कि वह लोग आएं जो उससे हमदर्दी का इज़हार करते थे और उसके लिए फल, मिठाइयाँ और कपड़े लाते थे। वह आएँ तो वह उनसे पूछे कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, वह उसे यकीनन बता देंगे कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में - उसका ख़याल था कि वह टोबा टेक सिंह ही से आते हैं जहाँ उसकी ज़मीनें हैं। पागलख़ाने में एक पागल ऐसा भी था जो खुद़ को ख़ुदा कहता था। उससे जब एक रोज़ बिशन सिंह ने पूछा कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में तो उसने हस्बे-आदत कहकहा लगाया और कहा, "वह पाकिस्तान में हैं न हिंदुस्तान में, इसलिए कि हमने अभी तक हुक्म ही नहीं दिया!" बिशन सिंह ने उस ख़ुदा से कई मर्तबा बड़ी मिन्नत-समाजत से कहा कि वह हुक़्म दे दें ताकि झंझट ख़त्म हो, मगर ख़ुदा बहुत मसरूफ़ था, इसलिए कि उसे और बे-शुमार हुक़्म देने थे। एक दिन तंग आकर बिशन सिंह खुद़ा पर बरस पड़ा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ वाहे गुरु जी दा खालस एंड वाहे गुरु जी दि फ़तह!" इसका शायद मतलब था कि तुम मुसलमानों के ख़ुदा हो, सिखों के खुद़ा होते तो ज़रूर मेरी सुनते। तबादले से कुछ दिन पहले टोबा टेक सिंह का एक मुसलमान जो बिशन सिंह का दोस्त था, मुलाक़ात के लिए आया, मुसलमान दोस्त पहले कभी नहीं आया था। जब बिशन सिंह ने उसे देखा तो एक तरफ़ हट गया, फिर वापस जाने लगा मगर सिपाहियों ने उसे रोका, "यह तुमसे मिलने आया है, तुम्हारा दोस्त फज़लदीन है!" बिशन सिंह ने फज़लदीन को एक नज़र देखा और कुछ बड़बड़ाने लगा। फज़लदीन ने आगे बढ़कर उसके कंधे पर हाथ रखा, "मैं बहुत दिनों से सोच रहा था कि तुमसे मिलूँ लेकिन फ़ुरसत ही न मिली, तुम्हारे सब आदमी ख़ैरियत से हिंदुस्तान चले गए थे, मुझसे जितनी मदद हो सकी, मैंने की तुम्हारी बेटी रूपकौर..." वह कहते-कहते रुक गया। बिशन सिंह कुछ याद करने लगा, "बेटी रूपकौर..." फज़लदीन ने रुक-रुककर कहा, "हाँ, वह, वह भी ठीक-ठाक है, उनके साथ ही चली गई थी!" बिशन सिंह खामोश रहा। फज़लदीन ने फिर कहना शुरू किया, "उन्होंने मुझे कहा था कि तुम्हारी ख़ैर-ख़ैरियत पूछता रहूँ, अब मैंने सुना है कि तुम हिंदुस्तान जा रहे हो, भाई बलबीर सिंह और भाई वधावा सिंह से मेरा सलाम कहना और बहन अमृतकौर से भी, भाई बलबीर से कहना कि फज़लदीन राजीखुशी है, दो भूरी भैंसे जो वह छोड़ गए थे, उनमें से एक ने कट्टा दिया है, दूसरी के कट्टी हुई थी, पर वह छ: दिन की होके मर गई और मेरे लायक जो खिदमत हो, कहना, मैं हर वक्त तैयार हूँ, और यह तुम्हारे लिए थोड़े-से मरोंडे लाया हूँ!" बिशन सिंह ने मरोंडों की पोटली लेकर पास खड़े सिपाही के हवाले कर दी और फज़लदीन से पूछा, "टोबा टेक सिंह कहाँ है?" फज़लदीन ने कदरे हैरत से कहा, "कहाँ है? वहीं है, जहाँ था!" बिशन सिंह ने फिर पूछा, "पाकिस्तान में है या हिंदुस्तान में?" "हिंदुस्तान में, नहीं, नहीं पाकिस्तान में!" फज़लदीन बौखला-सा गया। बिशन सिंह बड़बड़ाता हुआ चला गया, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान एंड हिंदुस्तान आफ दी दुर फिटे मुँह!" तबादले की तैयारियाँ मुकम्मल हो चुकी थीं, इधर से उधर और उधर से इधर आनेवाले पागलों की फ़ेहरिस्तें पहुँच चुकी थीं और तबादले का दिन भी मुक़र्रर हो चुका था। सख्त़ सर्दियाँ थीं जब लाहौर के पागलख़ाने से हिंदू-सिख पागलों से भरी हुई लारियाँ पुलिस के रक्षक दस्ते के साथ रवाना हुई, संबंधित अफ़सर भी हमराह थे - वागह(एक गाँव) के बॉर्डर पर तरफीन (दोनों तरफ़) के सुपरिटेंडेंट एक-दूसरे से मिले और प्रारंभिक कार्रवाई ख़त्म होने के बाद तबादला शुरू हो गया, जो रात-भर जारी रहा। पागलों को लारियों से निकालना और उनको दूसरे अफ़सरों के हवाले करना बड़ा कठिन काम था, बाज़ तो बाहर निकलते ही नहीं थे, जो निकलने पर रज़ामंद होते थे, उनको सँभालना मुश्किल हो जाता था, क्योंकि वह इधर-उधर भाग उठते थे, जो नंगे थे, उनको कपड़े पहनाए जाते तो वह उन्हें फाड़कर अपने तन से जुदा कर देते - कोई गालियाँ बक रहा है, कोई गा रहा है क़ुछ आपस में झगड़ रहे हैं क़ुछ रो रहे हैं, बिलख रहे हैं - कान पड़ी आवाज़ सुनाई नहीं देती थी - पागल औरतों का शोर-शराबा अलग था, और सर्दी इतनी कड़ाके की थी कि दाँत से दाँत बज रहे थे। पागलों की अक्सरीयत इस तबादले के हक़ में नहीं थी, इसलिए कि उनकी समझ में नहीं आ रहा था कि उन्हें अपनी जगह से उखाड़कर कहाँ फेंका जा रहा है, वह चंद जो कुछ सोच-समझ सकते थे, 'पाकिस्तान : जिंदाबाद' और 'पाकिस्तान : मुर्दाबाद' के नारे लगा रहे थे, दो-तीन मर्तबा फ़साद होते-होते बचा, क्योंकि बाज मुसलमानों और सिखों को यह नारे सुनकर तैश आ गया था। जब बिशन सिंह की बारी आई और वागह के उस पार का मुताल्लिक़ अफ़सर उसका नाम रजिस्टर में दर्ज करने लगा तो उसने पूछा : "टोबा टेक सिंह कहाँ है, पाकिस्तान में या हिंदुस्तान में?" यह सुनकर बिशन सिंह उछलकर एक तरफ़ हटा और दौड़कर अपने बचे हुए साथियों के पास पहुँच गया। पाकिस्तानी सिपाहियों ने उसे पकड़ लिया और दूसरी तरफ़ ले जाने लगे, मगर उसने चलने से इनकार कर दिया, "टोबा टेक सिंह यहाँ है!" और ज़ोर-ज़ोर से चिल्लाने लगा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी टोबा टेक सिंह एंड पाकिस्तान!" उसे बहुत समझाया गया कि देखो, अब टोबा टेक सिंह हिंदुस्तान में चला गया है, अगर नहीं गया है तो उसे फौरन वहाँ भेज दिया जाएगा, मगर वह न माना! जब उसको ज़बर्दस्ती दूसरी तरफ़ ले जाने की कोशिश की गई तो वह दरमियान में एक जगह इस अंदाज़ में अपनी सूजी हुई टांगों पर खड़ा हो गया जैसे अब उसे कोई ताकत नहीं हिला सकेगी, आदमी चूँकि सीधा था, इसलिए उससे ज़्यादा ज़बर्दस्ती न की गई, उसको वहीं खड़ा रहने दिया गया, और तबादले का बाक़ी काम होता रहा। सूरज निकलने से पहले शांत पड़े बिशन सिंह के हलक के एक गगन भेदी चीख़ निकली। इधर-उधर से कई दौड़े आए और उन्होने देखा कि वह आदमी जो पंद्रह बरस तक दिन-रात अपनी टाँगों पर खड़ा रहा था, औंधे मुँह लेटा है - उधर खरदार तारों के पीछे हिंदुस्तान था, इधर वैसे ही तारों के पीछे पाकिस्तान, दरमियान में ज़मीन के उस टुकड़े पर जिसका कोई नाम नहीं था, टोबा टेक सिंह पड़ा था।

विटेकर Tue, 05/13/2014 - 16:45
बरीच गडबड आहे संकल्पना समजावून घेण्यात असे वाटते ! राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात , राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे,आणि म्हणून राष्ट्र्वाद हा शब्द संस्कृतीवाचक आहे ! मात्र राज्याला सीमा असतात, असायला हव्यात.राज्य अथवा देश हे प्रशासकीय सोयीसाठी बनविलेले असतात. बाकी सारी पृथ्वी ( विश्व ) एकच आहे आपण अशी प्रार्थना देखील करतो ....पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळीती.... असो टंकायचा कंटाळा आला...... उदा. युरोप हे एक राष्ट्र ( देश नाही ) असू शकेल पण एक राज्य नव्हे ! आपण रुढार्थाने भारतीय उपखंड असे ज्याला म्हणतो ते रुढार्थाने भारत - राष्ट्र आहे.

मारवा Tue, 05/13/2014 - 19:17
देश=राष्ट्र=कंट्री=नेशन उदा. भारत-फ्रान्स-चीन इ. देश म्हणा राष्ट्र म्हणा नेशन म्हणा कंट्री म्हणा या संदर्भात वरील विवेचन आहे हे नमुद करतो. तुम्ही म्हणता राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत मान्य मी राज्य या संकल्पने संदर्भात चकार शब्द ही काढत नाही महाराष्ट्र गुजरात बंगाल आदि राज्य आहेत अशी माझी माहीती आहे त्यांचे मिळुन एकत्र बनलेला भारत हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे. या राष्ट्र संदर्भात वरील मांडणी आहे. उदा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे त्यातील राज्ये टेक्सास इ. मिळुन तो बनला आहे. देशीवाद असे म्हणावयाचे टाळले कारण तो नेटीव्हीझम अथवा साहीत्यातील देशीवाद या संकल्पनेशी गल्लत गैरसमज करु शकतो म्हणुन राष्ट्रवाद हा शब्द नेशनलिझम या अर्थाने वापरला. या नेंतर आपण म्हणतात की राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात आता यावर काय बोलायच याने सुन्न झालोय बधिर झालोय हा धक्का पचण फारच अवघड आहे. असो

विटेकर गुरुवार, 05/15/2014 - 12:53
तुम्ही तुमच्या प्रतिसादात म्हट्ले आहे त्याप्रमाणे .. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे असू शकते.. कारण तो अनेक संस्कृतींनी बनलेला देश आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी असले काही अस्तित्वात च नव्हते. १८७६ ( चू. भू द्या.घ्या) नंतर हा " देश" म्हणून जन्माला आला.. सोयीसाठी म्हणून! असो. जर तुम्ही झी मराठी वरची मालीका 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' पहात असाल तर त्यातील कृत्रिम कुटुंबासारखी.. परस्परांच्या सोयी ने एकत्र आलेले.. अश्या लोकांचे राष्ट्र नसते.. राष्ट्र बनण्याची प्रक्रिया ही काही हजार वर्षांची असावी लागते... भारताचे ( अथवा ग्रीक , युनान ,रोमन)तसे नाही . अनादी अनंत कालापासून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. राजकीय आक्रमणामुळे काही तुकडे पड्ले. काही स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले - हे अर्थात आजच्या संदर्भात !कदाचित पुढच्या २-५०० वर्षात ते पुन्हा एक होतील ही ! कारण या सार्यांचा "आत्मा" एक आहे. एका समान सांस्कृतिक धाग्याने हे सारे बांधलेले आहेत. आणि म्हनून युनायटेड स्टेत्स ऑफ भारत असा शब्दप्रयोग केला जात नाही. कारण तो चुकीचाच आहे. धर्म हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. ( धर्म म्हणजे उपासना पद्धती ( रिलीजन ) नव्हे , तो वैयक्तिक भाग आहे !) धर्म हा समाजाची धारणा करतो. धर्म आणि राष्ट्र हे दोन शब्द राजकारणी अतिशय मुक्त हस्ते वापरतात आणि त्यामुळे ते वापरुन अतिशय गुळगुळीत झाले आहेत ! आणखी एक उदाहरण म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम .. असो अशी अनेक उदाहरणे असतील. जाता- जाता : महाराष्ट्रातील " राष्ट्रवादी " या शब्दाचा वापर करणार्‍या राजकीय पक्षाचा आणि राष्ट्रवादाचा सुतराम संबंध नाही!! त्यांना ' राष्ट्र-खा-खा-खाती " हे नांव अधिक संयुक्तिक आहे ! असो, काही शब्दाचा वापर करण्यावर कायद्याने बंदी आणायला हवी आहे ! (निळी अक्षरे संपादित करायला हरकत नाही..धरण भरु शकणारे दादा आणि त्यांचे हस्तक अफाट ताकदीचे आहेत,ते मिपावर पोहोचू शकतात !)
राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत.

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही.

कलंत्री ·

असंका Wed, 05/07/2014 - 16:27
"http://www.ndtv.com/article/india/marathi-made-compulsory-in-maharashtra-schools-4307" माझ्या आठवणीनुसार महाराष्ट्राने सर्वात प्रथंम असं काही केलं होतं....म्हणून मी थोडे शोधले गूगलवर- पण आणखी काही नाही सापडले अजून. सापडले तर अजून देतो.

पैसा Wed, 05/07/2014 - 16:43
कर्नाटक सरकारचा निर्णय हा मातृभाषेबद्दल होता की कन्नड या राज्याच्या अधिकृत भाषेची सक्ती करणारा होता? मला वाटते सीमाभागातील मराठी नागरिकांवर कन्नड भाषेची सक्ती करणारा राज्याचा निर्णय रद्द केला गेला आहे.

In reply to by पैसा

यसवायजी Wed, 05/07/2014 - 18:14
प्राथमिक शिक्षण देताना प्रादेशिक भाषा किंवा मातृभाषा ही राज्यातील भाषक अल्पसंख्याकांवर सरकार लादू शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (- लोकसत्ता)

In reply to by पैसा

सुनील Wed, 05/07/2014 - 18:13
मला वाटते सीमाभागातील मराठी नागरिकांवर कन्नड भाषेची सक्ती करणारा राज्याचा निर्णय रद्द केला गेला आहे
फक्त सीमाभागच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक राज्यातून. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील खासगी शाळांतूनदेखिल मराठीची हकालपट्टी होऊ शकते! ;)

माहितगार Wed, 05/07/2014 - 17:46
सध्याच्या बातम्याम्ची भाषा संदिग्ध वाटते. मला वाटते सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून कुणी निकालाचा दुवा देऊ शकल्यास नेमका निकाल काय ते वाचून मत बनवता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध होण्यास दोनचार दिवस लागतात. किंवा लिगल बॅकग्राऊंडच्या व्यक्तींनी केलेले विश्लेषणाचे दुवे असल्यास द्यावेत.

पगला गजोधर Wed, 05/07/2014 - 17:51
आप जबान पर मरते है, और हम खयालोंपे जान निसार करते है ।… गर हमी मकतब अस्त वई मुल्ला, कारे तिकलों तमाम ख्वाहद शुद । (अगर यही मकतब (शाळा) है और यही मौलवी (शिक्षक), तो समझो लडके पढ चुके ।)

सुबोध खरे Wed, 05/07/2014 - 18:44
सर्वोच्च न्यायालयाने मातृभाषा (किंवा राज्यभाषा) या माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याची सक्ती रद्द ठरविली आहे. म्हणजे महाराष्ट्रात मराठी माध्यमाचा असले पाहिजे हि सक्ती करता येणार नाही. याचा अर्थ असा नव्हे कि इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी हा "एक विषय' म्हणून माध्यमिक शाळेत सक्तीचा करता येणार नाही.( किंवा इंग्रजी माध्यमातील मुलांना कर्नाटकात कन्नड भाषा एक विषय म्हणून शिकणे सक्तीचे करता येईल पण तेथे तुम्ही प्राथमिक शिक्षण कन्नड माध्यमातूनच केले पाहिजे हि सक्ती करता येणार नाही. हि अट खाजगी शाळांना लागु करता येणार नाही परंतु हे सरकारी अनुदानित किंवा सरकारी मालकीच्या शाळात करता येईल. http://indianexpress.com/article/india/india-others/govt-can-not-impose-mother-tongue-for-teaching-children-at-primary-level-supreme-court/2/

In reply to by सुबोध खरे

माहितगार Wed, 05/07/2014 - 21:56
ओके मला वाटते http://www.udayavanienglish.com/news/470808L14-Activists-disappointed-over-SC-verdict-on-Kannada-medium.html हि बातमी थोडी अधिक व्यवस्थीत पुरवते कर्नाटक सरकारने प्राथमीक शिक्षण इंग्रजी भाषेच्या शाळेतून होऊ नये म्हणून कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न केला होता. एक तर कन्नड मधून शिक्षण घ्यावे अथवा आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावे कारण मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण मुलांच्या शैक्षणिक वाढीस अधिक चांगले असते. कर्नाटक सरकारचा पॉईंट बरोबर होता आणि माझ्यातरी मते बरोबर आहे सुद्धा. आपल्या पाल्याची मातृभाषा काय ते ठरवण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पालकांना आहे, असे गृहीत धरून असा (काही अजब ?)) निकाल पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापिठ पोहोचले असावे असे दिसते. निर्णयाचे मूळातन वाचन केल्या शिवाय काँमेट करणे बरोबर नाही. पन प्रथम दर्शनी लॉजीक मध्ये वाजवा रे वाजवा झालय अस दिसत. तसही सगळी कडे इंग्रजी प्रेमाच भरत आल आहे (सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही आल नसेल तर काय नवल रोज सगळे न्यायदान इंग्रजीतनच कराव लागत) तेव्हा उगाच कन्नड आणि मराठी करण्या पेक्षा केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळा ठेवाव्यात अशा सरळ सोट शब्दात निकाल असता तर अधिक बरे झाले असते.

In reply to by माहितगार

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2014 - 10:40
सहमत आहे. सर्व प्रादेशिक भाषांवर बंधन घालून सर्वत्र व्यवहाराची भाषा इंग्रजी आणि हिंदी करावी. लोकांच्या सोयीसाठी हिंग्लिश्ला उत्तेजन द्यावे. फारतर प्रादेशिक भाषेचा घरामधे वापर करण्याची मुभा द्यावी. मूळात भाषाच एक झाल्यामुळे भारतातले सगळे भेदाभेद, मतभेद दूर होऊन एकात्म भारत निर्माण होईल. आमेन...

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 12:34
सर्व प्रादेशिक भाषांवर बंधन घालून सर्वत्र व्यवहाराची भाषा इंग्रजी आणि हिंदी करावी. लोकांच्या सोयीसाठी हिंग्लिश्ला उत्तेजन द्यावे. फारतर प्रादेशिक भाषेचा घरामधे वापर करण्याची मुभा द्यावी. मूळात भाषाच एक झाल्यामुळे भारतातले सगळे भेदाभेद, मतभेद दूर होऊन एकात्म भारत निर्माण होईल. वाह ! पुपे तुमच्या राष्ट्रवादाच्या अतिरेकी विचार सरणीचा दॄष्टीकोन आवडला ! तसेही अस्मितेच्या नावाखाली आपल्याच "राष्ट्र"बांधवांना परप्रांतीय असे नामाभिधान चिकटवून त्यांना सळो की पळो केले जात असल्याने मुंबापुरीत भोजपुरी भाषेला प्राधान्य देउन त्याचा विकास कसा होइल हे प्रत्येक "मराठी" माणसाने कर्त्यव समजुन या बाबतीत लढा उभारावा असे वाटते. उद्या महाराष्ट्रातुन दुष्काळ,बेरोजगारी आणि सर्व एतिहासिक वास्तु विकल्या नंतर इथल्या लाखो "मराठी" लोकांवर इतर राज्यांमधे स्थलांतर होण्याची वेळ आली तर त्या बद्धल कोणीही एक चकार शब्द सुद्धा काढणार नाही अशी खात्री आहे. उलट हे दुसर्‍या राज्यांचे ओझे नसुन राष्ट्र बांधवच आहेत याची जाणीव त्यांना नक्कीच असेल. या सर्व भविष्यातील घटनांचा विचार करता... मराठी भाषिकांचे योग्य स्थलांतर होण्यासाठी आपल्या राज्यातुन स्थलांतरीत होणार्‍या राज्यात विशेष रेल्वेगाड्या नियोजीत केल्या जाव्यात अशी विनंती रेल्वे मंत्रालयात केली जावी, तसेही महाराष्ट्रात रेल्वे अपघातात मॄत्युमुखी पडणार्‍यांना दिली जाणारी तथाकथित नुकसान भरपाई ही इतर राज्यांत होणार्‍या रेल्वे अपघातात मिळणार्‍या नुकसान भरपाई पेक्षा कमी आहे ही "छोटीशी" बाब हल्लीच काही वॄत्तपत्रांनी / संकेतस्थळांनी दाखवुन दिली आहे, त्यामुळे इतर राज्यात जर दुर्दैवाने मराठी भाषिक ठार झाले तर निदान आर्थीक मदत तरी योग्य मिळेल अशी खात्री वाटते. या उपरही तुम्हाला स्वतःचा विकास करुन घ्यायचा असेल तर सरळ कॅथलिक होण्याचा मार्ग निवडावा.धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे आपल्या कोणी आणि का सांगितले होते त्याची आठवणही मनातुन पुसुन टाका म्हणजे तुम्ही १००% धर्मनिरपेक्ष आहात हे सहज सिद्ध करता येइल.तसेच आपल्या मधलाच एखादा सेंट अँटनीं होउन उच्च पद भुषवेल याची खात्री बाळगता येइल.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:54
एका मराठी व्यक्तीला दुसरी मराठी व्यक्ती कधीच कुल/ओसम वाटत नाही इतर भाषक मात्र तसे वाटु शकतात तो पर्यंत मराठी अशीच गंडत राहणार.. यो!

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 11:02
शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री असताना फक्त मराठी/कोंकणी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काँग्रेस सरकारने काही बाह्य दबावाखाली तो निर्णय बदलून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एका धार्मिक संस्थेच्या शाळा आतापर्यंत नावापुरत्या कोंकणी माध्यमाच्या होत्या. त्यांना अचानक त्या इंग्रजी माध्यमाच्या करून कोंकणी बंद करायची निकड भासली. त्यासाठी सगळ्या पालकांना आपल्या मुलाला कोणते माध्यम पाहिजे हे लिहून द्यायचे फर्मान काढण्यात आले. "या" विशिष्ट शाळांनी कोंकणी माध्यम पाहिजे असे लिहिलेले अर्ज घ्यायला नकार दिला आणि फक्त इंग्रजी माध्यम पाहिजे असे जबरदस्तीने लिहून घेतले. परिणामी कोंकणी माध्यम पाहिजे असे लिहून देणार्‍यांचे आकडे कन्नड आणि ऊर्दू माध्यम मागणार्‍यांपेक्षा कमी होते असे आठवते. या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी करण्यात आली. नंतरच्या अंकात, या सरकारच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करून सत्तेवर आलेल्या भाजप मगोप युती सरकारला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी माध्यम प्रश्नावर आपल्या निवडणूकपूर्व भूमिकेप्रमाणे निर्णय घेत आहोत असे सुचवताच आता रातोरात इंग्रजी माध्यमाच्या बनलेल्या या शाळांनी विरोध केला आणि अर्ध्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येऊ नये म्हणून पर्रीकर सरकारला आधीच्या सरकारचा निर्णय चालू ठेवणे भाग पडले. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. आपल्या मुलाला कोणते माध्यम द्यावे हा निर्णय सर्वस्वी पालकांचा असला पाहिजे. त्या त्या भागातल्या गरजेनुसार तशा शाळा निघतात आणि मुले तिथे शिकतात. पण जिथे जिथे अशी सरकारी मनमानी होते तिथे सगळाच सावळागोंधळ होतो. अशा विषयांमधे राज्य सरकारांना राजकीय स्वरूपाचे निर्णय घ्यायला बंदी घातली पाहिजे.

In reply to by पैसा

आजानुकर्ण गुरुवार, 05/08/2014 - 18:36
शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री असताना फक्त मराठी/कोंकणी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री नसून शिक्षणमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता.
गेल्या काँग्रेस सरकारने काही बाह्य दबावाखाली तो निर्णय बदलून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
'काही बाह्य दबाव' अशा संदिग्ध शब्दयोजनेमुळे गैरसमज होऊ नये म्हणून गोवा सरकारच्या अधिकृत परिपत्रकातील कारणमीमांसा थोडक्यात देत आहे. ते परिपत्रक येथे पाहता येईल. गोव्याचे वाढत्या नागरीकरणामुळे, परराज्यांतून गोव्यामध्ये होणाऱ्या स्थलांतरामुळे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या गोव्यात होणाऱ्या बदल्यांमुळे इंग्रजी माध्यमांतील शाळांची मागणी वाढू लागली. सुरुवातीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळा या फक्त श्रीमंत लोकांना परवडत होत्या. मात्र इंग्रजी माध्यम ह्या प्रगतीचा मार्गाचा हक्क मोठ्या गरीब लोकसंख्येला नाकारला जाऊ नये म्हणून पालकांच्या गटांच्या मागणीवरुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदानाचा निर्णय घेण्यात आला.

In reply to by आजानुकर्ण

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 18:45
ही सरकारची केवळ मखलाशी झाली. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला काहीतरी सपोर्ट दाखवणे गरजेचे होते. जर नेटवर शोधलेत तरी इंग्रजी पाहिजे म्हणून लिहून घेण्याची सक्ती कशी केली गेली हे सहज सापडेल. काँग्रेस सरकार पडायला माध्यम बदल हे मोठे कारण झाले होते. आणि हा निर्णय घेण्यामागची कारणे स्थानिक वर्तमानपत्रात (जुन्या अंकात) शोधल्यास आणि तिथे राहणार्‍या जनतेशी बोलल्यास सहज कळून येतील.

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:14
गोवा हा महाराष्ट्राचाच भाग असावयास हवा त्या शिवाय परिस्थितीत बदल होणार नाही अस माझ प्रांजळ मत आहे.

In reply to by पैसा

आजानुकर्ण गुरुवार, 05/08/2014 - 19:36
सदर 'मखलाशी' ही २०१२ नंतरची आहे असे परिपत्रकातील माहितीवरुन ठरवता येते. काँग्रेस सरकारच्या निर्णयाला भाजपाने सपोर्ट दाखवण्याची मखलाशी करण्याची गरज समजली नाही. शिवाय माध्यम बदल हे 'मोठे' कारण होते तर त्या अनुषंगाने पुढे काही 'वेगळा' निर्णय घेतल्याचे दिसले नाही. (निवडणुकांमध्ये एखादा मुद्द्यावर भावनिक आवाहन करुन मते मिळवण्यात काही पक्ष वाकबगार आहेत)

In reply to by आजानुकर्ण

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 19:41
त्याच प्रतिसादात लिहिले आहे.
या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी करण्यात आली. नंतरच्या अंकात, या सरकारच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करून सत्तेवर आलेल्या भाजप मगोप युती सरकारला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी माध्यम प्रश्नावर आपल्या निवडणूकपूर्व भूमिकेप्रमाणे निर्णय घेत आहोत असे सुचवताच आता रातोरात इंग्रजी माध्यमाच्या बनलेल्या या शाळांनी विरोध केला आणि अर्ध्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येऊ नये म्हणून पर्रीकर सरकारला आधीच्या सरकारचा निर्णय चालू ठेवणे भाग पडले.
मला वाटते इथली चर्चा माध्यमाबद्दल आहे. आणि मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधी न लिहिता सगळ्यांनी मिळून कसा बट्ट्याबोळ केला हेच लिहिले आहे. कोणत्याही पक्षावर टीका काढणारा स्वतंत्र धागा तुम्ही काढू शकता.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 05/09/2014 - 02:12
सगळ्यांनी मिळून कसा बट्ट्याबोळ केला हेच लिहिले आहे
मूळ प्रतिसादातून काँग्रेसने 'काही बाह्य शक्तींच्या' प्रभावाखाली हा निर्णय सहेतुकपणे घेतला होता. या 'विशिष्ट बाह्य शक्तींनी' दबावाचे राजकारण सुरु ठेवले. मात्र नंतर या मुद्द्यावर निवडणुका जिंकून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला या 'विशिष्ट शाळां'च्या दबावाखाली अगतिकपणे हा निर्णय पुढे चालू ठेवावा लागला असे प्रतीत होत आहे असा माझा गैरसमज झाला होता. मात्र सर्वांनीच बट्ट्याबोळ केला आहे हे स्पष्टीकरण पुरेसे व समाधानकारक वाटते. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

In reply to by आजानुकर्ण

पैसा Fri, 05/09/2014 - 11:43
माध्यमप्रश्नावर पर्रीकर सरकारने आपला शब्द पाळला नाही म्हणून त्यांच्यावर टीका होतेच आहे. आणि ते योग्यच आहे. पण
काँग्रेसने 'काही बाह्य शक्तींच्या' प्रभावाखाली हा निर्णय सहेतुकपणे घेतला होता. या 'विशिष्ट बाह्य शक्तींनी' दबावाचे राजकारण सुरु ठेवले.
हा मात्र गैरसमज नाही. http://www.goanewsonline.com/index.php?option=com_content&view=article&id=8011:queens-tongue-versus-mother-tongue-medium-of-instruction-debate http://aankari.wordpress.com/23-2/ http://www.hindu.com/2011/03/28/stories/2011032860890500.htm http://www.dnaindia.com/india/report-goa-priest-supports-the-cause-of-konkani-language-in-schools-1694427 या दुव्यांवरील माहिती वाचलीत तरी हे सगळे कसे घडत गेले हे समजून येईल. मात्र ते मान्य करायला बरेच चष्मे उतरवावे लागतील.

In reply to by पैसा

सुनील Fri, 05/09/2014 - 12:09
कुणालाही चश्मे काढायची वा घालायची गरज नाही! कारण ज्या "बाह्य शक्तींच्या" प्रभावाखाली काँग्रेस सरकारने निर्णय घेतला ह्या "त्याच" शक्ती आहेत ज्यांचामुळे भाजपा सरकार तो निर्णय बदलू शकत नाही! खरे तर भाजपा अधिक दोषी कारण त्यांनी काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना विरोध तर केला पण स्वतः सत्तेवर आल्यावरमात्र तोच निर्णय कायम ठेवला! स्वगत - कसल्या "बाह्य शक्ती" नी काय? सरळ किरिस्तांव समाज म्हणा की!

In reply to by सुनील

पैसा Fri, 05/09/2014 - 12:49
काही बाह्य दबावाखाली
यामध्ये सरकारबाह्य दबाव हा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. मूळ लेख माध्यमाबद्दल आहे. आणि इतर वादग्रस्त मुद्दे मला उकरून काढायची इच्छा नाही. फक्त कोणत्याही राज्यसरकारने घेतलेले निर्णय कसे असतात हे मला मांडायचे होते. "बाह्य शक्ती" "किरिस्तांव" इ शब्द मी वापरलेले नाहीत. जिथे आवश्यक असेल तिथे जरूर वापरीन. श्री. कलंत्री, माझ्यामुळे झालेल्या अवांतराबद्दल क्षमस्व. मला काय म्हणायचे होते ते पुरेसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या धाग्यावरून मी रजा घेत आहे.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 05/09/2014 - 20:02
तुम्ही दिलेले दुवे वाचले. 'भारतीय भाषा सुरक्षा मंच' या शशिकला काकोडकर यांच्या संघटनेची भलावण करणारी माहिती त्यात आहे. 'इंग्रजी ही 'परकीय' alien भाषा आहे', 'इंग्रजीचा पुरस्कार करणारे गोवन आहेत काय?', 'इंग्रजीचा पुरस्कार करणारे भारतीय आहेत काय?' वगैरे निव्वळ rhetorical प्रश्‍न व भावनिक युक्तिवाद तिथे दिसले. त्याच्या विरोधात असे काही दुवे मी शोधू शकतो. एक शोधून थांबलो मात्र भरपूर सापडतील याची खात्री आहे. http://www.thegoan.net/Goa/News/Medium-of-Instruction-Government-finally-gets-the-right-balance/07172.html शिवाय ऑलमोष्ट पंतप्रधान नमोजी यांच्या कालच्या विचारमौक्तिकांनुसार "We should trust only constitutional authorities", त्यामुळे राज्यशासनाचे परिपत्रक विश्वसनीय वाटण्यास काहीच प्रत्यवाय दिसत नाही. असो... भारतात सर्वत्र होणाऱ्या घटनांच्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रादेशिक भाषांमध्ये अगदी पुस्तक-कपड्यांसकट फुकट (शून्य खर्चाने) शिक्षण दिले तरी ते घेण्यास पालक तयार अाहेत असे दिसत नाही. गोव्यातही वेगळे होत नसावे असा अंदाज आहे. इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हे धर्म-भाषा-लिंगनिरपेक्ष आहे.
मूळ लेख माध्यमाबद्दल आहे
मात्र तुमच्या मूळ प्रतिसादात 'बाह्य दबाव' व '"या" विशिष्ट शाळा' अशी गुंतागुंतीची वाक्यरचना केल्यामुळे माध्यमांऐवजी वेगळ्या रुळावरुन कोकण रेल्वे धावू लागली असे दिसते. केवळ वेगवेगळ्या सरकारांची धोरणे कशी होती इतपत सांगितले असते तरी चालले असते असे माझे वैयक्तिक मत आहे. या धाग्यावरुन मीही तात्पुरती रजा घेत आहे.

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण Fri, 05/09/2014 - 20:07
एका प्रतिसादापुरते टॅम्प्लीज. आणखी एक दुवाः http://www.targetgoa.com/TOMAZINHO-CARDOZO/Government-Decision-on-Medium-of-Instruction/248 आता या दुव्यावरुन कायमची रजा घेत आहे.

सुबोध खरे गुरुवार, 05/08/2014 - 11:29
मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणे हे मुलाच्या मानसिक आणि बौद्धिक वाढीस नक्कीच जास्त चांगले असते हे आता सिद्ध झालेले आहे. मूळ प्रश्न हा आहे कि हि सक्ती सरकार करू शकते काय?तर तसे नाही. आपल्या पाल्याला कोणत्या माध्यमात शिक्षण द्यायचे हा मुलभूत अधिकार भारतीय घटनेत मान्य केलेला आहे आणि त्यात कोणतेही सरकार ढवळा ढवळ करू शकत नाही असा हा निर्णय आहे. मग कर्नाटक सरकारचे म्हणणे कितीही खरे असले तरीही (पाल्याने एकतर स्वतःच्या मातृभाषेत किंवा कर्नाटकात कन्नडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले पाहिजे) तरीही सरकार अशी सक्ती करू शकत नाही एवढेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मग त्याला कोणीही कितीही राजकीय किंवा भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करा.

In reply to by सुबोध खरे

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 13:28
सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अनावश्यक बाबीत अनावश्यक प्रमाणात टोकास नेली आहे ? सर्वोच्च न्यायालयाने पालकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पाल्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशी व्यख्या गृहीत धरली आहे का ? हे सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे प्रत्यक्षात वाचन केल्यावरच कळेल. काही पालकांनी एखाद्या पाल्याला भारतात आजिबात वापरल्या न जाणार्‍या भाषेत शिक्षण दिले तर नेमके काय होईल. पारसी पालकांनी समजा केवळ प्राचीन अवेस्तन भाषा आणि लिपीतच शिक्षण द्यावयाचे ठरवले एकही भारतीय भाषा शिकवली नाही तर त्या पाल्याचे नेमके काय होईल ? ते पाल्य शासनाच्या अनेक सुविधांना मुकणार नाही का ? मायनॉरिटींच्या व्यक्ती विकास आणि सामाजिक समरसतेत बाधा येणार नाही का आणि इत्यादी गोष्टींचा न्यायालयाने विचार केला असेल का ? हे पहावयास हवे.

In reply to by माहितगार

सुबोध खरे Sat, 05/10/2014 - 10:41
माहितगार साहेब, आपण कोणत्याही भाषेत शिक्षण घ्या पण ते डोळसपणे घेतले तर फायदा होतो. मुलुंड (प) मुंबई येथे सत्यध्यान विद्यापीठ येथे प्राथमिक पातळीपासून संस्कृत माध्यमाची शाळा गेली कित्येक वर्षे चालविली जात आहे. येथे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण दिले जाते. मुले पहाटे पाच वाजता उठून पाठांतर करताना दिसतात. पण संस्कृत मध्यम घेतले तरी इंग्रजी, संगणक शास्त्र असे सर्व विषय तेथे शिकवले जातात. तेथे शिकलेली अनेक मुले देशात आणि परदेशात विविध उच्चस्तरीय ठिकाणी आहेत असे ऐकतो. हे डोळ्यासमोरचे उदाहरण आहे. ( काहीच जमले नाही तरी मुले मंदिरात पौरोहित्य करण्यास पात्र होतात आपण आपल्या पाल्याला जर असामी किंवा मैथिली भाषेच्या शाळेत घातले आणि त्याला आधुनिक शिक्षणाची जोड दिली तर मुलाचा विकास होईल. पण दुसरी किंवातीसरी कोणतीच भाषा शिकला नाही तर तो अशिक्षित म्हणून गणला जाईल. मदरशात दिल्या जाणार्या शिक्षणात हे आधुनिक विषय(इंग्रजी, संगणक शास्त्र, भूगोल इ ) अंतर्भूत करा अशी सरकारची शिफारस आहे.(त्याची अंमलबजावणी न होण्याची करणे हा एक स्वतंत्र विषय आहे) कारण फक्त अरबी /फारसी भाषा आणि इस्लाम विषयक तत्वज्ञान शिकवून मुल जगात नोकरी करण्यास लायक होत नाही आणि शेवटी फक्त मशिदींच्या अनुषंगाने मिळणाऱ्या नोकर्या -मौलवी मुअज्जिन इ इ न पत्र राहतात. यात धर्माचा भाग नसून आपण म्हणता तसे केले तर काय होते याचे ढळढळीत दिसणारे उदाहरण म्हणून देत आहे

माझे मत काहीजांना विद्रोही वाटेल पण माझ्यामते स्वातंत्र्य मिळाल्यावर अखंड राहण्याच्या भ्रामक संकल्पनेने सगळा घोटाळा झाला. इंग्रजांच्या अगोदर आपण एकसंघ नव्हतो , त्यांनी त्यांच्या स्वार्था साठी आल्याला एकत्र दावणीला बांधले. आता भारतात राष्ट्रावादापेक्ष्या प्रादेशिक अस्मिता व धर्म ह्यांचा पगडा बहुतांशी भारतीयांवर आहे. तेव्हाच आपण भाषेनुसार वेगळे राज्य न होता वेगळे राष्ट्र झालो असतो तर प्रत्येक राष्ट्रात त्यांची स्वतःची एक मातृभाषा व स्वतःचा एक धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असते. आपले आजचे प्रत्येक राज्य हे युरोपातील कोणत्याही प्रगत राष्ट्राएवढे शेत्रफळ , लोकसंख्या व नैसर्गिक साधन सामुग्रीने तोडीसतोड आहे. किंबहुना उत्तर प्रदेश तर युके व फ्रांस ह्या दोघ्यांच्या एकत्र केले तरी त्याहून मोठे आहे. आणि मग काही वर्षाने झ्या धर्तीवर युरोपियन युनियन निर्माण झाली. तसे भारतात प्रगत राज्यांची युनियन निर्माण होऊन मग सामाईक चलन , विसा नियम शिथिल झाले असते. आज भारतात प्रगत राज्याच्या कडून मिळणारा कर दळभद्री राजकारामुळे बिमारू राज्यात खिरापती सारखा वाटला जातो. मग नाटो सारखी एखादी लष्करी संघटना स्थापन झाली असती. प्रत्येक राष्ट्राला शीत युद्धात कोणत्या गटात जायचे ह्याचे स्वातंत्र्य असते. आज युरोपातील बहुतांशी देशात त्यांच्या मातृभाषेत तुम्ही कोणत्याही विषयात पी एच डी करू शकतात आम्हाला मात्र शाळांत परीक्षेनंतर मातृभाषेपासून तोडले गेले. हे पूर्वी झाले असते तर बरे झाले असते. आजच्या काळात असे विभाजन होऊन अजिबात फायदा नाही. हे हि खरे आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 15:30
'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, व्यवस्थिथीत समजून घेतला पाहीजे.
पण माझ्यामते स्वातंत्र्य मिळाल्यावर अखंड राहण्याच्या भ्रामक संकल्पनेने सगळा घोटाळा झाला.
निष्कर्ष घाई ?
आपले आजचे प्रत्येक राज्य हे युरोपातील कोणत्याही प्रगत राष्ट्राएवढे शेत्रफळ , लोकसंख्या व नैसर्गिक साधन सामुग्रीने तोडीसतोड आहे.
नैसर्गीक साधन सामुग्री हि विकासा साठी पुरेशी बाब नसते सगळी आफ्रीकन राष्ट्र विकसीत झाली असती.
तेव्हाच आपण भाषेनुसार वेगळे राज्य न होता वेगळे राष्ट्र झालो असतो तर प्रत्येक राष्ट्रात त्यांची स्वतःची एक मातृभाषा व स्वतःचा एक धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
भारतातील बहुसंख्य जनतेत, भारतात विवीध अस्मीतांवर अवलंबून राजकारण होत, म्हणून राष्ट्रवादालाच तिलांजली द्यावी एवढा राष्ट्रवाद कधीच कमकुवत नव्हता. भारतीय राष्ट्रवाद एवढाही कमकुवत असता तर आपला देश एवढी वर्षेही सोबत चालू शकला नसता. भारतातील प्रत्येक व्यक्ती, कुटूंब आणि समाज असंख्य अस्मीतांच प्रतिनिधीत्व करतो. प्रत्येक प्रकारच्या अस्मीते करता तुकडे करत जायचे तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्ली पर्यंत तुकडे करूनही शक्य नाही. बहुतांश युरोप मध्ये एकच धर्म संकल्पना असलेल्या देशात भाषा वार विभागणी वेगळी , युरोपीयनांनी त्यांच्या सोई साठी धर्मानुसार राष्ट्र निर्मितीचा सिद्धांत राज्यशास्त्रातून पसरवला. भारतात प्रत्येक घराच्या बाजूच घर अगदी परस्पर टोकाच्या जाती,पंथ,विचार,भाषा यांनी विभाजीत आहे. त्याच वेळी त्याच सांस्कृतीक धाग्यांनी भारतभर विणलेलही आहे. राजे आपला इतिहासाचा अभ्यास कुठे कच्चा पडत नाहीए ना ? ज्यावेळी भारत विभक्त होता त्याकाळात परकीय आक्रमणांना तोंड देण्यास तो नेहमी अयशस्वी राहीला आहे. एकवेळ हुकूम शाहीचे समर्थन करा भारताच्या विभाजनाचे नको. इथे नेपाळ भारत श्रीलंकाची युनियन शक्य झालेली नाही. सगळ्या भारतातील राजे रजवाड्यांची राज्यांची युनियन आपणहून झाली असती का भारताची स्थिती आफ्रीका खंडा पेक्षा वाईट झाली असती ?
आज भारतात प्रगत राज्याच्या कडून मिळणारा कर दळभद्री राजकारामुळे बिमारू राज्यात खिरापती सारखा वाटला जातो.
बिमारु राज्यांची सुधारणा यशस्वीते व्हावयासच हवी यात वाद नाही. पण आपल वाक्य अर्थशास्त्राच्या नाण्याची एकच बाजूतर दाखवत नाहीए ना ? भारतातल्या उद्योग व्यापारात प्रगत राज्य आणि शहरातून जो कर गोळा केला जातो ते उत्पन्न त्यांच्या वस्तु अप्रगत राज्यात विकून तर आलेल नसत ना ?
प्रत्येक राष्ट्राला शीत युद्धात कोणत्या गटात जायचे ह्याचे स्वातंत्र्य असते.
:) खरच ?
आज युरोपातील बहुतांशी देशात त्यांच्या मातृभाषेत तुम्ही कोणत्याही विषयात पी एच डी करू शकतात आम्हाला मात्र शाळांत परीक्षेनंतर मातृभाषेपासून तोडले गेले.
बंन्धू हे घडण्यासाठी हिच इच्छा असलेल नेतृत्व आणि विचार महत्वाचा आहे. तुमच महाराष्ट्र राज्य एक होण्या साठी भाषिक एकात्मते साठी झगडल. स्वभाषेत पी एच डी करता तसा झगडा झाला असता शासने वाकलीच असती ना ? ज्या गोष्टीची पेटून उठण्या एवढी निकडच तुम्हाला वाटत नाही, तुम्ही (जनता जनार्दन) पी एच डी करता पेटून उठू नाही शकत , राज्यकर्ते स्वतःहून दिल्लीला बायांना सलामी देतात कारण त्यांच्या मतदार संघातली जनता दिल्लीतल्या बायांना सलामी देते. अशा लोकांच्या हातात स्वतंत्र राष्ट्र दिल असत तरी त्यांना ते डिफेंड करता आल असत ? =))

In reply to by माहितगार

@Smile खरच ? अगदी खरे बंगाल हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून कम्युनिस्ट रशियाच्या तर गुजरात व पंजाब हे भांडवलशाही अमेरिकेच्या गटात असते. माहितीगार आपण कोठे राहता हे माहिती नाही. पण मी ज्या जर्मनीत सध्या राहत आहे, तेथे दुसर्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनी हा रशियाच्या हातात जाऊन दरिद्री राहिला व आजही एकत्र आल्यावर तेथील जानेची मानसिकता न बदल्याने वेस्ट जर्मनीचा पैसा घेऊन त्यांची काही विशेष प्रगती झाली नाही. साधा विचार करा आर्थिक उदारीकरण गेल्या दशकात झाल्यावर जो झटापट विकास झाला मध्यमवर्ग वाढला व व आहे तो उच्च मध्यमवर्ग झाला टाटा सारख्या अनेक कंपन्या खर्या अर्थाने बहुराष्ट्रीय झाल्या तसे धोरण १९४७ पासून पंजाब व गुजरात , महाराष्ट्र मध्ये असते तर आपण एक दीड दशकात जगातील १० वी अर्थव्यवस्था आहोत ती सहा दशकात जगातील पहिल्या पाचात असतो. @आफ्रिकन राष्ट्रे विकसित तुम्ही एक साधा विचार करा भारत व आफ्रिका ह्या दोन्ही वसाहती होत्या. त्या पुढे स्वतंत्र झाल्या ,आता दोघाकडे नैसर्गिक सामुग्री, क्षेत्रफळ असून आज आफ्रिका अप्रगत व भारत विकसनशील व अंतराळ , आण्विक शेत्रात तर प्रगत राष्ट्रांच्या तोडीस तोड ,आफ्रिका कुठेच नाही. तेव्हा राज्ये असून भारत हा आफ्रिकेच्या आज कोसो पुढे आहे तेव्हा वेगवेगळी राष्ट्रे असतांना सुद्धा ते प्रगत असते. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका वेगळे झाले व आज उत्तर अमेरिका सार्या जगावर हुकुमत गाजवतो. ह्या उलट दक्षिण अमेरिका , कोकेन , गरिबी व बेकायदेशीर स्थलांतर ह्यामुळे जगात ओळखला जातो. एक गोष्ट लक्षात घ्या भारतात इंग्रज येण्यापूर्वी अगदी मोगल असे पर्यंत प्रत्येकाची राजवट म्हणजे मोगल , मराठा म्हणजे एक स्वत्रंत्र राष्ट्रे होते. एकमेकांचे भूभाग जिंकणे , स्वतःची नाणी होती. त्याकाळात भारत हा जगात महासत्ता होता , म्हणून युरोपातून युरोपियन भारतात व्यापारासाठी आले भारतीयांना जगात कुठेही वणवण करावी लागली नाही , युरोपात आद्योगिक क्रांती होण्याच्या आधी कितीतरी शतके भारत हा जगात सर्वच बाबतीत महासत्ता होता. आणि तेव्हा भारतात वेगवेगळ्या राजवटी म्हजे स्वतंत्र राष्ट्रे होते. म्हणूनच सिकदर भारतात आला त्याने मगध राष्ट्रावर स्वारी केली नाही तर मगध राष्ट्राने त्यांच्याशी पंगा घेतला नाही , सगळ्यात गंमत म्हणजे नेहरू व पुढे गांधी परिवाराचे त्यांच्या पक्षावर वर्चस्व होते. व त्यांनी भारताला शीत युद्धात रशियाच्या दावणीला बांधले. राजीव ह्यांचा मृत्यू व नरसिंह ह्यांचा मिळालेली संधी ह्यामुळे आर्थिक उदारीकरण झाले. नाहीतर मनमोहन व त्यांचा खास आलुवालीया एक सरकारी बाबू म्हणूनच जगले असते. @ 'राष्ट्रवाद कधीच कमकुवत क्रिकेट चे सामने वगळता एक भारतीय म्हणून आपण क्वचित एकत्र येतो. श्रीलंका व बांगला देश ह्यांच्याशी केंद्र सरकार आजच्या घडीला मैत्री ठेऊ पाहते ह्याला महाराष्ट्र ते बिहार ,गुजरात चा विरोध नाही मात्र अनुक्रमे तामिळनाडू व बंगाल मुळे भारत हे करू शकत नाही म्हुनुनच चीन चे फावते. अहो परदेशात सुद्धा महाराष्ट्र मंडळात हिंदी गाण्यांचे कायक्रम होत नाही सगळे भारतीय म्हणून एक मोठे मंडळ स्थापन करून सण साजरे करण्यापेक्ष्या प्रादेशिक मांडले स्थापन करतात. ही वस्तुस्थीति आहे. आमच्या जर्मनीत भारतीय आयटी वाल्यांचे मराठी व तेलगु असे समूह आहेत, आज मेक्सिकन लोकांच्या विरोधात उत्तर अमेरिकेत ते बेकायदेशीर रीत्या येउन काम व वास्तव्य करतात म्हणून शिमगा होतो पण ती वेगवेगळी राज्ये असल्याने अमेरिका कायद्याने त्यांना हाकलू शकते मात्र महाराष्ट्र मुंबईत असे करू शकत नाही. राहिला प्रश्न शिक्षणाचा तर आज जर्मनी ,फ्रांस येथे त्याच्या मातृ भाषेतून आयटी मध्ये शिकला तरी नोकरी मिळते ही सुविधा भारतात अस्तित्वात नाही , इंग्रजी शिवाय आपला तरणोपाय नाही हे मनावर बिंबवले जाते पण इंग्रजी तर आफ्रिकन शाळेमध्ये सुद्धा शिकवली जाते म्हणून ते काही प्रगत होत नाहीत. राज्यकर्ते स्वतःहून दिल्लीला बायांना सलामी देतात कारण त्यांच्या मतदार संघातली जनता दिल्लीतल्या बायांना सलामी देते. अशा लोकांच्या हातात स्वतंत्र राष्ट्र दिल असत तरी त्यांना ते डिफेंड करता आल असत ? Lol उत्तर द्या तुम्ही स्वताच्या विनोदी ,तर्कहीन मुद्यावर हस्त आहात असे दिसून येते. तुमच्यामते जनता जे ठरवते ते त्यांचा नेता ठरवतो , म्हणूनच जनता दिल्लींच्या बाई पुढे झुकते म्हणून नेते झुकतात.म्हुणुन अश्या लोकांच्या हाती ... अहो साहेब तुमच्या ह्या विनोदी तर्कानुसार भारत इंग्रजांनी एकत्र आणण्यापूर्वी दिल्लीतील मुघल सल्ल्त्तेपुढे महाराष्टार्तील जनता झुकली नाही म्हणून त्यांचे नेते शिवाजी राजे झुकले नाही असा होतो. नीट पहिले तर शिवाजी राजे ह्यांच्या पूर्वी महाराष्टार्त हेच मराठे होते तेच शौर्य होतो पण ते दिल्ली , विजापूर साठी लढत होते , भारतात राजपूत राजवटीत जेव्हा नेता राणा प्रताप लढला तेव्हा त्यांची जनता लढली , जेव्हा इतर राजपूत राजे मांडलिक झाले तेव्हा जनता राज्यांच्या विरुद्ध जाऊन दिल्लीशी लढली नाही. भारताचा जगातील निर्यातीत एकेकाळी ७० टक्के हिस्सा होता इंग्रज १९४७ साली गेले तेव्हा दोन टक्के होता म्हणूनच आपले घरदार सोडून भारतात युरोपियन आले ,एवढे नव्हे पुढे भारताशी व्यापार हे आजच्या अमेरिकन ड्रीम एवढे म्हत्वाचे युरोपला वाटत होते. एक मार्ग बंद झाला म्हणून भारतात जाण्यासाठी सागरी मार्ग शोधण्यासाठी युरोपात स्पर्धा सुरु झाली त्यातून कोलंबसला अमेरिका गावली. कुठल्याही प्रगत देशात लोकशाही च्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्या ते राष्ट्र च्लावतात जनतेला चंगळवाद दिला की ती खुश जनता देश डिफेंड करत नाही आज युरोपियन युनियन च्या प्रगत जनतेला दोन वेळ चे खायला मिळते व पैसा आहे ते आपल्या सरकारला तुम्ही म्हणजे नाटो नक्की अफगाण मध्ये काय करत आहेत हा प्रश्न विचारत नाही. इयु बाहेरील देश स्वीझ ह्याला दहशतवादाची भीती का वाटत नाही तो सैन्याशिवाय जगतो मग ब्रिटन व फ्रांस ला एवढे सैन्य व शस्त्र का हवे असा प्रश्न तेथील जनता विचारत नाही. भारतीय जनतेला दोष का द्यावा , जगभरात लोकशाही म्हणजे व्यापार्यांनी व्यापारासाठी चालवलेला मोठा व्यापार असे आहे. तस्मात वेगळी राष्ट असतो तर निदान भांडवल शाहीत ते टिकवणे हे तेथील बहुराष्ट्रीय कंपन्या व कम्युनिस्ट देशात जसे पूर्व युरोप दारिद्र्यात खोट्या समाजवादी थापांवर जगाला व आज इयु मध्ये येण्यासाठी तडफडत आहे तसे भारतात झाले असते. निदान महाराष्ट एक देश असता तर तो कम्युनिस्ट झाला नसता, असे मला वाटते. महाराष्ट्र हे राष्ट्र म्हणून निर्विवाद पणे हिंदू राष्ट्र असते व ते धर्म न मानणाऱ्या रशियाच्या नादी लागले नसते मुळात मुस्लिमांसाठी वेगळा देश न होता एक सलग पंजाब , सिधीस्थान , बलुचिस्तान अशी राष्ट्रे असती ज्यात व भारतातील सर्व छोट्या राष्तार्त हिंदू व मुस्लिम एकत्र राहिले असते. काश्मीर तेव्हा वेगळे राष्ट्र असते. भांडण हवेच कशाला एकेकाळी अफगाण ,नेपाल , श्रीलंका ह्यांच्या उल्लेख महाभारतात व रामायणात येतो आज ते भारतात नाही तरी आपण जगत आहोत ना. दुसर्या म्ह्युद्धानातर जर्मनी चे दोन भाग झाले तरी त्यांच्या अर्ध्या भागाने प्रगत राष्ट्र म्हणून नाव कमावले त्त्यांच्या प्पासून तोडून ऑस्ट्रिया एक स्वतंत्र देश झाला व आज तो प्रगत म्हणून ओळखला जातो व माझ्या पाहण्यात कुठलाही जर्मन ऑस्ट्रिया वेगळा का झाला म्हणून रडत बसलेला दिसत नाही , आहे त्या देशात त्यांनी व्यापारी कसबाने युद्धात हरून व्यापार्त कमावले व आज अव्वल आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

@निष्कर्ष घाई ? एक साधी गोष्ट करा जर तुम्ही अविवाहित असाल तर घरी सांगा अखंड भारतातील एक हिंदू आसामी मुलीवर माझे प्रेम आहे मग घरी काय उत्तर मिळते ते सांगा प्रखर राष्ट्रवाद तुम्हाला दिसेल की प्रादेशिक अस्मिता ह्याउलट फ्रांस , जर्मनी मध्ये असा प्रश्न ते वेगळे राष्ट्र आहे म्हणून येत नाही. आपल्याकडे जुळवून विवाह स्वजातीत करतात पण स्वजातीय वधू कोकणात असेल व वर पुण्यात असेल म्हणून काही नाही म्हणणार नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

माहितगार Fri, 05/09/2014 - 08:55
बंगाल हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून कम्युनिस्ट रशियाच्या तर गुजरात व पंजाब हे भांडवलशाही अमेरिकेच्या गटात असते. चीन चे फावते.
रशीया आणि आमेरीकेचे फावू द्यायचे आणि चीनचे नको असा चीनवर अन्याय का बरे ? तुमच्या तर्का नुसार इशान्येतल्या काही राज्यांची वेगळी राष्ट्रे असती त्यांना रशीया आमेरीकेच्या एवजी चीनचे फावू द्यायला आवडले असते कदाचित आसामला ब्रह्मदेशचे फावू द्यायला आवडले असते. आपल्या म्हणण्यानुसार हि छोटी छोटी राष्ट्रे वेगवेगळ्या गटात जाऊन किती गुण्या गोविंदानी राहिली असती नाही ! भारतात हुबेहुब युरोपीयन शीतयुद्धाचाच काळ आवतरला असता आपापसात आफ्रीका स्टाईल युद्धे झालीच नसती. आमेरीका रशीया कित्ती कित्ती गुणी राष्ट्रे आहेत त्यांनी स्वतःचे फावून घेतलेच नसते ! होय होय ! बांग्लादेशात मायनॉरिटी हिंदू कित्ती कित्ती म्हणून गुण्या गोविंदाने राहतात ना, अगदी तस्सेच सिंध बलुचीस्तान पश्चिम पाकीस्तानात त्यांनी हिंदूंची कित्ती कित्ती काळजी घेतली असती ! गुजराथ नावाच्या राष्ट्राने मुंबईकरता महाराष्ट्राशी लढाई केलीच नसती महाराष्ट्राने कर्नाटकशी मणिपूरने त्रिपूराशी तामीळनाडूने कावेरीवरुन कर्नाटकशी युद्धे केलीच नसती हिंदु आहेत ना सारे आपापल्या भाषिक राष्ट्रात कित्ती कित्ती म्हणून एक दिलाने राहिले असते. भांडण हवेच कशाला! काही प्रश्न उद्भवलेच असते तर आमेरीका रशीया कोणत्याही मोबदल्याशिवाय या छोट्या छोट्या राष्ट्रांना मदत करण्या साठी होतेच ना ! बांग्लादेश सारखे काही देश भांडवलशाही असूनही चुकीच्या धार्मीक संकल्पनात अडकल्या मुळे अविकसीत राहतात ! निजामाच हैदराबाद राज्य वेगळ राष्ट्र म्हणून कित्ती प्रगतीशील राहील असत. महाराष्ट्र कर्नाटक काही मराठवाडा उत्तर कर्नाटकाचा विकास करू शकले नाहीत निजामाच्या राजवटीने त्यांना कित्ती कित्ती विकास साधून दिला असता ! ती अर्जेंटीना फिलीपाईन्स सारखी अहो तीथले लोकच दळभद्री भांडवलशाही दिलीतरी अर्थशास्त्र कसे टिकवू ठेऊ शकतील. दक्षीण आमेरीकेतल्या आणि आफ्रीकेतल्या भांडवलशाही देशांचेही तेच त्यांची दळभद्री जनता तेवढी त्यांच्या विकासाच्या आड येते! भारतात वेगवेगळे राजे होते सीमा वेगवेगळ्या होत्या म्हणून त्यातला प्रत्येक राजा कसा महासत्ते प्रमाणे बलशाली होता! त्यांच्या आपपासातील न पटण्याचा इंग्रजांनी काही म्हणून फायदा घेतला नाही या राजे लोकांनीच स्वतःला गर्व नको म्हणून राजसन्यास घेतले होते! आख्खा भारत ब्रिटीशांनी एक केला या कारणाने भारताची निर्यात कमी झाली ! त्या टिळक नेहरू गांधींची भारत सांस्कृतीकरित्या एका धाग्यात बांधलेल एक राष्ट्र असू शकत हि कल्पनाच चुकीची होती नाही ! वल्लभभाई पटेल सुद्धा काय राहीले असते की छोटे छोटे राजे स्वतंत्र आणि साधला असता गुण्या गोविंदाने विकास! त्या शक्य विघटीत आदर्श भारतीय उपमहाद्वीपाची कल्पनेची आमची भरारी टोका टोकाला म्हणजेही इथ पर्यंतच जाईल बाकी आपले शिष्यत्व घेऊन गुरूंच्या कल्पना विलासी मार्गदर्शना साठी बाकी ठेवतो. बाकी आपणास युरोपच्या स्वंतत्र राष्ट्रांचा चांगला अनुभव आहे तेव्हा युरोपात विवीध कारणांनी गेलेल्या भारतीय वंशातील प्रत्येक गटा करता एक एक खेडे आंदण घेऊन त्यांचे युरोपीयन युनियन अंतर्गत स्वतंत्र राष्ट्रे करण्या बद्दल काय विचार आहे ? युरोपात एक छोटे महाराष्ट्र मंडळाचे ब्राह्मण हिंदू राष्ट्र, एक मराठा हिंदू राष्ट्र अशी अनेक छोटी राष्ट्रे युरोपात बनवता येतील की मस्तच कल्पनाय, निनदजी युरोप मराठी हिंदू राष्ट्र बनाने केलिए आगे बढो समस्त मराठी हिंदूओकी शुभेच्छाए आपके साथ है !

In reply to by निनाद मुक्काम …

पोटे Fri, 05/09/2014 - 12:42
भारताचा जगातील निर्यातीत एकेकाळी ७० टक्के हिस्सा होता इंग्रज १९४७ साली गेले तेव्हा दोन टक्के होता :) सत्तर टक्के भारताचा हिस्सा होता !!! काय काय निर्यात होत होते ? पुष्पक विमान आणि ब्रह्मास्त्र का?

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 16:55
त्यात युवराज म्हणाले इवन इंडिया इज बिगर दयान उएसे एंड चायना पुट टुगेदर. असो, असहमत. तिव्र बिरोधाभासी प्रतिक्रया.

In reply to by आत्मशून्य

भारतात सध्या विकसित झालेले प्रादेशिक पक्ष त्यांचे आपापल्या राज्यासाठी पाहणे ह्यामुळे देशासाठी पाहणारा नेता आज भारताला दुर्मिळ झाला आहे. दुर्दैवाने आज भारतात अशी परिस्थिती आहे की पंजाबात व तामिळनाडू मधील बहुतांशी जनता ज्यांना स्वातंत्र्य सैनिक मानते ते उर्वरीत भारताच्या दृष्टीने दहशतवादी आहेत. कारण अखंड भारतात ८० च्या दशकात केंद्र सरकारचे ह्या दोन्ही राज्यात जी धोरणे होती ह्याचा उर्वरीत भारताला काहीही पडले नव्हते. तामिळनाडू एक स्वतंत्र राष्ट्रे असते तर श्रीलंकेच्या तमिळ लोकांसाठी त्यांना हवे ते करावयास ते समर्थ होते पण ते तसे करू शकत नाहीत व उर्वरीत भारत श्रीलंकेशी मैत्री करू शकत नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 23:16
आपला मुद्दा ऑन पेपर पटतोय थोडाफार, पण अफगाण पेक्षा वेगळी स्थीती दिसली असती हे इम्याजीन करणे अजुनही अवघड जातयं.

साती Fri, 05/09/2014 - 22:21
पण यात काय नविन नाही म्हणा. असो. तर कलंत्रीकाका, आजकाल मातृभाषा या संकल्पनेला फारसा अर्थं नाही. आंतरराज्यीय आंतर्भाषीय लग्ने सर्रास होतात , नोकरी धंद्यानिमित्त गावोगाव जावे लागते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याच मातृभाषेत शिक्षण कसे मिळेल? आणि आमच्यासारख्या आंतर्भाषिय लग्न असणार्यांच्या मुलांचं काय? माझ्या मुलाने आई मराठी म्हणून मराठीत शिक्षण घ्यायचं की बाबा कानडी म्हणून कानडीत? (गंमत म्हणजे मुलाच्या शाळेत मातृभाषा कानडी लिहिल्येय)

In reply to by साती

साती Fri, 05/09/2014 - 22:25
इथे बॉर्डरवरच्या कुटुंबात आई कानडी बाबा तेलगू आज्जी मराठी असे खूप लोक असतात. मला तर एकाच कुटूंबातल्या तिघांशी तीन भाषेत बोलावे लागते (तेलगू येत नसल्याने हिंदीत). तर अश्या लोकांच्या मुलांनी कुठल्या भाषेत शिकावे?

असंका Wed, 05/07/2014 - 16:27
"http://www.ndtv.com/article/india/marathi-made-compulsory-in-maharashtra-schools-4307" माझ्या आठवणीनुसार महाराष्ट्राने सर्वात प्रथंम असं काही केलं होतं....म्हणून मी थोडे शोधले गूगलवर- पण आणखी काही नाही सापडले अजून. सापडले तर अजून देतो.

पैसा Wed, 05/07/2014 - 16:43
कर्नाटक सरकारचा निर्णय हा मातृभाषेबद्दल होता की कन्नड या राज्याच्या अधिकृत भाषेची सक्ती करणारा होता? मला वाटते सीमाभागातील मराठी नागरिकांवर कन्नड भाषेची सक्ती करणारा राज्याचा निर्णय रद्द केला गेला आहे.

In reply to by पैसा

यसवायजी Wed, 05/07/2014 - 18:14
प्राथमिक शिक्षण देताना प्रादेशिक भाषा किंवा मातृभाषा ही राज्यातील भाषक अल्पसंख्याकांवर सरकार लादू शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (- लोकसत्ता)

In reply to by पैसा

सुनील Wed, 05/07/2014 - 18:13
मला वाटते सीमाभागातील मराठी नागरिकांवर कन्नड भाषेची सक्ती करणारा राज्याचा निर्णय रद्द केला गेला आहे
फक्त सीमाभागच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक राज्यातून. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील खासगी शाळांतूनदेखिल मराठीची हकालपट्टी होऊ शकते! ;)

माहितगार Wed, 05/07/2014 - 17:46
सध्याच्या बातम्याम्ची भाषा संदिग्ध वाटते. मला वाटते सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून कुणी निकालाचा दुवा देऊ शकल्यास नेमका निकाल काय ते वाचून मत बनवता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध होण्यास दोनचार दिवस लागतात. किंवा लिगल बॅकग्राऊंडच्या व्यक्तींनी केलेले विश्लेषणाचे दुवे असल्यास द्यावेत.

पगला गजोधर Wed, 05/07/2014 - 17:51
आप जबान पर मरते है, और हम खयालोंपे जान निसार करते है ।… गर हमी मकतब अस्त वई मुल्ला, कारे तिकलों तमाम ख्वाहद शुद । (अगर यही मकतब (शाळा) है और यही मौलवी (शिक्षक), तो समझो लडके पढ चुके ।)

सुबोध खरे Wed, 05/07/2014 - 18:44
सर्वोच्च न्यायालयाने मातृभाषा (किंवा राज्यभाषा) या माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याची सक्ती रद्द ठरविली आहे. म्हणजे महाराष्ट्रात मराठी माध्यमाचा असले पाहिजे हि सक्ती करता येणार नाही. याचा अर्थ असा नव्हे कि इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी हा "एक विषय' म्हणून माध्यमिक शाळेत सक्तीचा करता येणार नाही.( किंवा इंग्रजी माध्यमातील मुलांना कर्नाटकात कन्नड भाषा एक विषय म्हणून शिकणे सक्तीचे करता येईल पण तेथे तुम्ही प्राथमिक शिक्षण कन्नड माध्यमातूनच केले पाहिजे हि सक्ती करता येणार नाही. हि अट खाजगी शाळांना लागु करता येणार नाही परंतु हे सरकारी अनुदानित किंवा सरकारी मालकीच्या शाळात करता येईल. http://indianexpress.com/article/india/india-others/govt-can-not-impose-mother-tongue-for-teaching-children-at-primary-level-supreme-court/2/

In reply to by सुबोध खरे

माहितगार Wed, 05/07/2014 - 21:56
ओके मला वाटते http://www.udayavanienglish.com/news/470808L14-Activists-disappointed-over-SC-verdict-on-Kannada-medium.html हि बातमी थोडी अधिक व्यवस्थीत पुरवते कर्नाटक सरकारने प्राथमीक शिक्षण इंग्रजी भाषेच्या शाळेतून होऊ नये म्हणून कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न केला होता. एक तर कन्नड मधून शिक्षण घ्यावे अथवा आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावे कारण मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण मुलांच्या शैक्षणिक वाढीस अधिक चांगले असते. कर्नाटक सरकारचा पॉईंट बरोबर होता आणि माझ्यातरी मते बरोबर आहे सुद्धा. आपल्या पाल्याची मातृभाषा काय ते ठरवण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पालकांना आहे, असे गृहीत धरून असा (काही अजब ?)) निकाल पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापिठ पोहोचले असावे असे दिसते. निर्णयाचे मूळातन वाचन केल्या शिवाय काँमेट करणे बरोबर नाही. पन प्रथम दर्शनी लॉजीक मध्ये वाजवा रे वाजवा झालय अस दिसत. तसही सगळी कडे इंग्रजी प्रेमाच भरत आल आहे (सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही आल नसेल तर काय नवल रोज सगळे न्यायदान इंग्रजीतनच कराव लागत) तेव्हा उगाच कन्नड आणि मराठी करण्या पेक्षा केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळा ठेवाव्यात अशा सरळ सोट शब्दात निकाल असता तर अधिक बरे झाले असते.

In reply to by माहितगार

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2014 - 10:40
सहमत आहे. सर्व प्रादेशिक भाषांवर बंधन घालून सर्वत्र व्यवहाराची भाषा इंग्रजी आणि हिंदी करावी. लोकांच्या सोयीसाठी हिंग्लिश्ला उत्तेजन द्यावे. फारतर प्रादेशिक भाषेचा घरामधे वापर करण्याची मुभा द्यावी. मूळात भाषाच एक झाल्यामुळे भारतातले सगळे भेदाभेद, मतभेद दूर होऊन एकात्म भारत निर्माण होईल. आमेन...

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 12:34
सर्व प्रादेशिक भाषांवर बंधन घालून सर्वत्र व्यवहाराची भाषा इंग्रजी आणि हिंदी करावी. लोकांच्या सोयीसाठी हिंग्लिश्ला उत्तेजन द्यावे. फारतर प्रादेशिक भाषेचा घरामधे वापर करण्याची मुभा द्यावी. मूळात भाषाच एक झाल्यामुळे भारतातले सगळे भेदाभेद, मतभेद दूर होऊन एकात्म भारत निर्माण होईल. वाह ! पुपे तुमच्या राष्ट्रवादाच्या अतिरेकी विचार सरणीचा दॄष्टीकोन आवडला ! तसेही अस्मितेच्या नावाखाली आपल्याच "राष्ट्र"बांधवांना परप्रांतीय असे नामाभिधान चिकटवून त्यांना सळो की पळो केले जात असल्याने मुंबापुरीत भोजपुरी भाषेला प्राधान्य देउन त्याचा विकास कसा होइल हे प्रत्येक "मराठी" माणसाने कर्त्यव समजुन या बाबतीत लढा उभारावा असे वाटते. उद्या महाराष्ट्रातुन दुष्काळ,बेरोजगारी आणि सर्व एतिहासिक वास्तु विकल्या नंतर इथल्या लाखो "मराठी" लोकांवर इतर राज्यांमधे स्थलांतर होण्याची वेळ आली तर त्या बद्धल कोणीही एक चकार शब्द सुद्धा काढणार नाही अशी खात्री आहे. उलट हे दुसर्‍या राज्यांचे ओझे नसुन राष्ट्र बांधवच आहेत याची जाणीव त्यांना नक्कीच असेल. या सर्व भविष्यातील घटनांचा विचार करता... मराठी भाषिकांचे योग्य स्थलांतर होण्यासाठी आपल्या राज्यातुन स्थलांतरीत होणार्‍या राज्यात विशेष रेल्वेगाड्या नियोजीत केल्या जाव्यात अशी विनंती रेल्वे मंत्रालयात केली जावी, तसेही महाराष्ट्रात रेल्वे अपघातात मॄत्युमुखी पडणार्‍यांना दिली जाणारी तथाकथित नुकसान भरपाई ही इतर राज्यांत होणार्‍या रेल्वे अपघातात मिळणार्‍या नुकसान भरपाई पेक्षा कमी आहे ही "छोटीशी" बाब हल्लीच काही वॄत्तपत्रांनी / संकेतस्थळांनी दाखवुन दिली आहे, त्यामुळे इतर राज्यात जर दुर्दैवाने मराठी भाषिक ठार झाले तर निदान आर्थीक मदत तरी योग्य मिळेल अशी खात्री वाटते. या उपरही तुम्हाला स्वतःचा विकास करुन घ्यायचा असेल तर सरळ कॅथलिक होण्याचा मार्ग निवडावा.धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे आपल्या कोणी आणि का सांगितले होते त्याची आठवणही मनातुन पुसुन टाका म्हणजे तुम्ही १००% धर्मनिरपेक्ष आहात हे सहज सिद्ध करता येइल.तसेच आपल्या मधलाच एखादा सेंट अँटनीं होउन उच्च पद भुषवेल याची खात्री बाळगता येइल.

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 10:54
एका मराठी व्यक्तीला दुसरी मराठी व्यक्ती कधीच कुल/ओसम वाटत नाही इतर भाषक मात्र तसे वाटु शकतात तो पर्यंत मराठी अशीच गंडत राहणार.. यो!

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 11:02
शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री असताना फक्त मराठी/कोंकणी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काँग्रेस सरकारने काही बाह्य दबावाखाली तो निर्णय बदलून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एका धार्मिक संस्थेच्या शाळा आतापर्यंत नावापुरत्या कोंकणी माध्यमाच्या होत्या. त्यांना अचानक त्या इंग्रजी माध्यमाच्या करून कोंकणी बंद करायची निकड भासली. त्यासाठी सगळ्या पालकांना आपल्या मुलाला कोणते माध्यम पाहिजे हे लिहून द्यायचे फर्मान काढण्यात आले. "या" विशिष्ट शाळांनी कोंकणी माध्यम पाहिजे असे लिहिलेले अर्ज घ्यायला नकार दिला आणि फक्त इंग्रजी माध्यम पाहिजे असे जबरदस्तीने लिहून घेतले. परिणामी कोंकणी माध्यम पाहिजे असे लिहून देणार्‍यांचे आकडे कन्नड आणि ऊर्दू माध्यम मागणार्‍यांपेक्षा कमी होते असे आठवते. या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी करण्यात आली. नंतरच्या अंकात, या सरकारच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करून सत्तेवर आलेल्या भाजप मगोप युती सरकारला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी माध्यम प्रश्नावर आपल्या निवडणूकपूर्व भूमिकेप्रमाणे निर्णय घेत आहोत असे सुचवताच आता रातोरात इंग्रजी माध्यमाच्या बनलेल्या या शाळांनी विरोध केला आणि अर्ध्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येऊ नये म्हणून पर्रीकर सरकारला आधीच्या सरकारचा निर्णय चालू ठेवणे भाग पडले. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. आपल्या मुलाला कोणते माध्यम द्यावे हा निर्णय सर्वस्वी पालकांचा असला पाहिजे. त्या त्या भागातल्या गरजेनुसार तशा शाळा निघतात आणि मुले तिथे शिकतात. पण जिथे जिथे अशी सरकारी मनमानी होते तिथे सगळाच सावळागोंधळ होतो. अशा विषयांमधे राज्य सरकारांना राजकीय स्वरूपाचे निर्णय घ्यायला बंदी घातली पाहिजे.

In reply to by पैसा

आजानुकर्ण गुरुवार, 05/08/2014 - 18:36
शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री असताना फक्त मराठी/कोंकणी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री नसून शिक्षणमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता.
गेल्या काँग्रेस सरकारने काही बाह्य दबावाखाली तो निर्णय बदलून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
'काही बाह्य दबाव' अशा संदिग्ध शब्दयोजनेमुळे गैरसमज होऊ नये म्हणून गोवा सरकारच्या अधिकृत परिपत्रकातील कारणमीमांसा थोडक्यात देत आहे. ते परिपत्रक येथे पाहता येईल. गोव्याचे वाढत्या नागरीकरणामुळे, परराज्यांतून गोव्यामध्ये होणाऱ्या स्थलांतरामुळे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या गोव्यात होणाऱ्या बदल्यांमुळे इंग्रजी माध्यमांतील शाळांची मागणी वाढू लागली. सुरुवातीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळा या फक्त श्रीमंत लोकांना परवडत होत्या. मात्र इंग्रजी माध्यम ह्या प्रगतीचा मार्गाचा हक्क मोठ्या गरीब लोकसंख्येला नाकारला जाऊ नये म्हणून पालकांच्या गटांच्या मागणीवरुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदानाचा निर्णय घेण्यात आला.

In reply to by आजानुकर्ण

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 18:45
ही सरकारची केवळ मखलाशी झाली. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला काहीतरी सपोर्ट दाखवणे गरजेचे होते. जर नेटवर शोधलेत तरी इंग्रजी पाहिजे म्हणून लिहून घेण्याची सक्ती कशी केली गेली हे सहज सापडेल. काँग्रेस सरकार पडायला माध्यम बदल हे मोठे कारण झाले होते. आणि हा निर्णय घेण्यामागची कारणे स्थानिक वर्तमानपत्रात (जुन्या अंकात) शोधल्यास आणि तिथे राहणार्‍या जनतेशी बोलल्यास सहज कळून येतील.

In reply to by पैसा

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 19:14
गोवा हा महाराष्ट्राचाच भाग असावयास हवा त्या शिवाय परिस्थितीत बदल होणार नाही अस माझ प्रांजळ मत आहे.

In reply to by पैसा

आजानुकर्ण गुरुवार, 05/08/2014 - 19:36
सदर 'मखलाशी' ही २०१२ नंतरची आहे असे परिपत्रकातील माहितीवरुन ठरवता येते. काँग्रेस सरकारच्या निर्णयाला भाजपाने सपोर्ट दाखवण्याची मखलाशी करण्याची गरज समजली नाही. शिवाय माध्यम बदल हे 'मोठे' कारण होते तर त्या अनुषंगाने पुढे काही 'वेगळा' निर्णय घेतल्याचे दिसले नाही. (निवडणुकांमध्ये एखादा मुद्द्यावर भावनिक आवाहन करुन मते मिळवण्यात काही पक्ष वाकबगार आहेत)

In reply to by आजानुकर्ण

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 19:41
त्याच प्रतिसादात लिहिले आहे.
या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी करण्यात आली. नंतरच्या अंकात, या सरकारच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करून सत्तेवर आलेल्या भाजप मगोप युती सरकारला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी माध्यम प्रश्नावर आपल्या निवडणूकपूर्व भूमिकेप्रमाणे निर्णय घेत आहोत असे सुचवताच आता रातोरात इंग्रजी माध्यमाच्या बनलेल्या या शाळांनी विरोध केला आणि अर्ध्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येऊ नये म्हणून पर्रीकर सरकारला आधीच्या सरकारचा निर्णय चालू ठेवणे भाग पडले.
मला वाटते इथली चर्चा माध्यमाबद्दल आहे. आणि मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधी न लिहिता सगळ्यांनी मिळून कसा बट्ट्याबोळ केला हेच लिहिले आहे. कोणत्याही पक्षावर टीका काढणारा स्वतंत्र धागा तुम्ही काढू शकता.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 05/09/2014 - 02:12
सगळ्यांनी मिळून कसा बट्ट्याबोळ केला हेच लिहिले आहे
मूळ प्रतिसादातून काँग्रेसने 'काही बाह्य शक्तींच्या' प्रभावाखाली हा निर्णय सहेतुकपणे घेतला होता. या 'विशिष्ट बाह्य शक्तींनी' दबावाचे राजकारण सुरु ठेवले. मात्र नंतर या मुद्द्यावर निवडणुका जिंकून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला या 'विशिष्ट शाळां'च्या दबावाखाली अगतिकपणे हा निर्णय पुढे चालू ठेवावा लागला असे प्रतीत होत आहे असा माझा गैरसमज झाला होता. मात्र सर्वांनीच बट्ट्याबोळ केला आहे हे स्पष्टीकरण पुरेसे व समाधानकारक वाटते. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

In reply to by आजानुकर्ण

पैसा Fri, 05/09/2014 - 11:43
माध्यमप्रश्नावर पर्रीकर सरकारने आपला शब्द पाळला नाही म्हणून त्यांच्यावर टीका होतेच आहे. आणि ते योग्यच आहे. पण
काँग्रेसने 'काही बाह्य शक्तींच्या' प्रभावाखाली हा निर्णय सहेतुकपणे घेतला होता. या 'विशिष्ट बाह्य शक्तींनी' दबावाचे राजकारण सुरु ठेवले.
हा मात्र गैरसमज नाही. http://www.goanewsonline.com/index.php?option=com_content&view=article&id=8011:queens-tongue-versus-mother-tongue-medium-of-instruction-debate http://aankari.wordpress.com/23-2/ http://www.hindu.com/2011/03/28/stories/2011032860890500.htm http://www.dnaindia.com/india/report-goa-priest-supports-the-cause-of-konkani-language-in-schools-1694427 या दुव्यांवरील माहिती वाचलीत तरी हे सगळे कसे घडत गेले हे समजून येईल. मात्र ते मान्य करायला बरेच चष्मे उतरवावे लागतील.

In reply to by पैसा

सुनील Fri, 05/09/2014 - 12:09
कुणालाही चश्मे काढायची वा घालायची गरज नाही! कारण ज्या "बाह्य शक्तींच्या" प्रभावाखाली काँग्रेस सरकारने निर्णय घेतला ह्या "त्याच" शक्ती आहेत ज्यांचामुळे भाजपा सरकार तो निर्णय बदलू शकत नाही! खरे तर भाजपा अधिक दोषी कारण त्यांनी काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना विरोध तर केला पण स्वतः सत्तेवर आल्यावरमात्र तोच निर्णय कायम ठेवला! स्वगत - कसल्या "बाह्य शक्ती" नी काय? सरळ किरिस्तांव समाज म्हणा की!

In reply to by सुनील

पैसा Fri, 05/09/2014 - 12:49
काही बाह्य दबावाखाली
यामध्ये सरकारबाह्य दबाव हा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. मूळ लेख माध्यमाबद्दल आहे. आणि इतर वादग्रस्त मुद्दे मला उकरून काढायची इच्छा नाही. फक्त कोणत्याही राज्यसरकारने घेतलेले निर्णय कसे असतात हे मला मांडायचे होते. "बाह्य शक्ती" "किरिस्तांव" इ शब्द मी वापरलेले नाहीत. जिथे आवश्यक असेल तिथे जरूर वापरीन. श्री. कलंत्री, माझ्यामुळे झालेल्या अवांतराबद्दल क्षमस्व. मला काय म्हणायचे होते ते पुरेसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या धाग्यावरून मी रजा घेत आहे.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 05/09/2014 - 20:02
तुम्ही दिलेले दुवे वाचले. 'भारतीय भाषा सुरक्षा मंच' या शशिकला काकोडकर यांच्या संघटनेची भलावण करणारी माहिती त्यात आहे. 'इंग्रजी ही 'परकीय' alien भाषा आहे', 'इंग्रजीचा पुरस्कार करणारे गोवन आहेत काय?', 'इंग्रजीचा पुरस्कार करणारे भारतीय आहेत काय?' वगैरे निव्वळ rhetorical प्रश्‍न व भावनिक युक्तिवाद तिथे दिसले. त्याच्या विरोधात असे काही दुवे मी शोधू शकतो. एक शोधून थांबलो मात्र भरपूर सापडतील याची खात्री आहे. http://www.thegoan.net/Goa/News/Medium-of-Instruction-Government-finally-gets-the-right-balance/07172.html शिवाय ऑलमोष्ट पंतप्रधान नमोजी यांच्या कालच्या विचारमौक्तिकांनुसार "We should trust only constitutional authorities", त्यामुळे राज्यशासनाचे परिपत्रक विश्वसनीय वाटण्यास काहीच प्रत्यवाय दिसत नाही. असो... भारतात सर्वत्र होणाऱ्या घटनांच्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रादेशिक भाषांमध्ये अगदी पुस्तक-कपड्यांसकट फुकट (शून्य खर्चाने) शिक्षण दिले तरी ते घेण्यास पालक तयार अाहेत असे दिसत नाही. गोव्यातही वेगळे होत नसावे असा अंदाज आहे. इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हे धर्म-भाषा-लिंगनिरपेक्ष आहे.
मूळ लेख माध्यमाबद्दल आहे
मात्र तुमच्या मूळ प्रतिसादात 'बाह्य दबाव' व '"या" विशिष्ट शाळा' अशी गुंतागुंतीची वाक्यरचना केल्यामुळे माध्यमांऐवजी वेगळ्या रुळावरुन कोकण रेल्वे धावू लागली असे दिसते. केवळ वेगवेगळ्या सरकारांची धोरणे कशी होती इतपत सांगितले असते तरी चालले असते असे माझे वैयक्तिक मत आहे. या धाग्यावरुन मीही तात्पुरती रजा घेत आहे.

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण Fri, 05/09/2014 - 20:07
एका प्रतिसादापुरते टॅम्प्लीज. आणखी एक दुवाः http://www.targetgoa.com/TOMAZINHO-CARDOZO/Government-Decision-on-Medium-of-Instruction/248 आता या दुव्यावरुन कायमची रजा घेत आहे.

सुबोध खरे गुरुवार, 05/08/2014 - 11:29
मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणे हे मुलाच्या मानसिक आणि बौद्धिक वाढीस नक्कीच जास्त चांगले असते हे आता सिद्ध झालेले आहे. मूळ प्रश्न हा आहे कि हि सक्ती सरकार करू शकते काय?तर तसे नाही. आपल्या पाल्याला कोणत्या माध्यमात शिक्षण द्यायचे हा मुलभूत अधिकार भारतीय घटनेत मान्य केलेला आहे आणि त्यात कोणतेही सरकार ढवळा ढवळ करू शकत नाही असा हा निर्णय आहे. मग कर्नाटक सरकारचे म्हणणे कितीही खरे असले तरीही (पाल्याने एकतर स्वतःच्या मातृभाषेत किंवा कर्नाटकात कन्नडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले पाहिजे) तरीही सरकार अशी सक्ती करू शकत नाही एवढेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मग त्याला कोणीही कितीही राजकीय किंवा भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करा.

In reply to by सुबोध खरे

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 13:28
सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अनावश्यक बाबीत अनावश्यक प्रमाणात टोकास नेली आहे ? सर्वोच्च न्यायालयाने पालकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पाल्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशी व्यख्या गृहीत धरली आहे का ? हे सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे प्रत्यक्षात वाचन केल्यावरच कळेल. काही पालकांनी एखाद्या पाल्याला भारतात आजिबात वापरल्या न जाणार्‍या भाषेत शिक्षण दिले तर नेमके काय होईल. पारसी पालकांनी समजा केवळ प्राचीन अवेस्तन भाषा आणि लिपीतच शिक्षण द्यावयाचे ठरवले एकही भारतीय भाषा शिकवली नाही तर त्या पाल्याचे नेमके काय होईल ? ते पाल्य शासनाच्या अनेक सुविधांना मुकणार नाही का ? मायनॉरिटींच्या व्यक्ती विकास आणि सामाजिक समरसतेत बाधा येणार नाही का आणि इत्यादी गोष्टींचा न्यायालयाने विचार केला असेल का ? हे पहावयास हवे.

In reply to by माहितगार

सुबोध खरे Sat, 05/10/2014 - 10:41
माहितगार साहेब, आपण कोणत्याही भाषेत शिक्षण घ्या पण ते डोळसपणे घेतले तर फायदा होतो. मुलुंड (प) मुंबई येथे सत्यध्यान विद्यापीठ येथे प्राथमिक पातळीपासून संस्कृत माध्यमाची शाळा गेली कित्येक वर्षे चालविली जात आहे. येथे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण दिले जाते. मुले पहाटे पाच वाजता उठून पाठांतर करताना दिसतात. पण संस्कृत मध्यम घेतले तरी इंग्रजी, संगणक शास्त्र असे सर्व विषय तेथे शिकवले जातात. तेथे शिकलेली अनेक मुले देशात आणि परदेशात विविध उच्चस्तरीय ठिकाणी आहेत असे ऐकतो. हे डोळ्यासमोरचे उदाहरण आहे. ( काहीच जमले नाही तरी मुले मंदिरात पौरोहित्य करण्यास पात्र होतात आपण आपल्या पाल्याला जर असामी किंवा मैथिली भाषेच्या शाळेत घातले आणि त्याला आधुनिक शिक्षणाची जोड दिली तर मुलाचा विकास होईल. पण दुसरी किंवातीसरी कोणतीच भाषा शिकला नाही तर तो अशिक्षित म्हणून गणला जाईल. मदरशात दिल्या जाणार्या शिक्षणात हे आधुनिक विषय(इंग्रजी, संगणक शास्त्र, भूगोल इ ) अंतर्भूत करा अशी सरकारची शिफारस आहे.(त्याची अंमलबजावणी न होण्याची करणे हा एक स्वतंत्र विषय आहे) कारण फक्त अरबी /फारसी भाषा आणि इस्लाम विषयक तत्वज्ञान शिकवून मुल जगात नोकरी करण्यास लायक होत नाही आणि शेवटी फक्त मशिदींच्या अनुषंगाने मिळणाऱ्या नोकर्या -मौलवी मुअज्जिन इ इ न पत्र राहतात. यात धर्माचा भाग नसून आपण म्हणता तसे केले तर काय होते याचे ढळढळीत दिसणारे उदाहरण म्हणून देत आहे

माझे मत काहीजांना विद्रोही वाटेल पण माझ्यामते स्वातंत्र्य मिळाल्यावर अखंड राहण्याच्या भ्रामक संकल्पनेने सगळा घोटाळा झाला. इंग्रजांच्या अगोदर आपण एकसंघ नव्हतो , त्यांनी त्यांच्या स्वार्था साठी आल्याला एकत्र दावणीला बांधले. आता भारतात राष्ट्रावादापेक्ष्या प्रादेशिक अस्मिता व धर्म ह्यांचा पगडा बहुतांशी भारतीयांवर आहे. तेव्हाच आपण भाषेनुसार वेगळे राज्य न होता वेगळे राष्ट्र झालो असतो तर प्रत्येक राष्ट्रात त्यांची स्वतःची एक मातृभाषा व स्वतःचा एक धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असते. आपले आजचे प्रत्येक राज्य हे युरोपातील कोणत्याही प्रगत राष्ट्राएवढे शेत्रफळ , लोकसंख्या व नैसर्गिक साधन सामुग्रीने तोडीसतोड आहे. किंबहुना उत्तर प्रदेश तर युके व फ्रांस ह्या दोघ्यांच्या एकत्र केले तरी त्याहून मोठे आहे. आणि मग काही वर्षाने झ्या धर्तीवर युरोपियन युनियन निर्माण झाली. तसे भारतात प्रगत राज्यांची युनियन निर्माण होऊन मग सामाईक चलन , विसा नियम शिथिल झाले असते. आज भारतात प्रगत राज्याच्या कडून मिळणारा कर दळभद्री राजकारामुळे बिमारू राज्यात खिरापती सारखा वाटला जातो. मग नाटो सारखी एखादी लष्करी संघटना स्थापन झाली असती. प्रत्येक राष्ट्राला शीत युद्धात कोणत्या गटात जायचे ह्याचे स्वातंत्र्य असते. आज युरोपातील बहुतांशी देशात त्यांच्या मातृभाषेत तुम्ही कोणत्याही विषयात पी एच डी करू शकतात आम्हाला मात्र शाळांत परीक्षेनंतर मातृभाषेपासून तोडले गेले. हे पूर्वी झाले असते तर बरे झाले असते. आजच्या काळात असे विभाजन होऊन अजिबात फायदा नाही. हे हि खरे आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

माहितगार गुरुवार, 05/08/2014 - 15:30
'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, व्यवस्थिथीत समजून घेतला पाहीजे.
पण माझ्यामते स्वातंत्र्य मिळाल्यावर अखंड राहण्याच्या भ्रामक संकल्पनेने सगळा घोटाळा झाला.
निष्कर्ष घाई ?
आपले आजचे प्रत्येक राज्य हे युरोपातील कोणत्याही प्रगत राष्ट्राएवढे शेत्रफळ , लोकसंख्या व नैसर्गिक साधन सामुग्रीने तोडीसतोड आहे.
नैसर्गीक साधन सामुग्री हि विकासा साठी पुरेशी बाब नसते सगळी आफ्रीकन राष्ट्र विकसीत झाली असती.
तेव्हाच आपण भाषेनुसार वेगळे राज्य न होता वेगळे राष्ट्र झालो असतो तर प्रत्येक राष्ट्रात त्यांची स्वतःची एक मातृभाषा व स्वतःचा एक धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
भारतातील बहुसंख्य जनतेत, भारतात विवीध अस्मीतांवर अवलंबून राजकारण होत, म्हणून राष्ट्रवादालाच तिलांजली द्यावी एवढा राष्ट्रवाद कधीच कमकुवत नव्हता. भारतीय राष्ट्रवाद एवढाही कमकुवत असता तर आपला देश एवढी वर्षेही सोबत चालू शकला नसता. भारतातील प्रत्येक व्यक्ती, कुटूंब आणि समाज असंख्य अस्मीतांच प्रतिनिधीत्व करतो. प्रत्येक प्रकारच्या अस्मीते करता तुकडे करत जायचे तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्ली पर्यंत तुकडे करूनही शक्य नाही. बहुतांश युरोप मध्ये एकच धर्म संकल्पना असलेल्या देशात भाषा वार विभागणी वेगळी , युरोपीयनांनी त्यांच्या सोई साठी धर्मानुसार राष्ट्र निर्मितीचा सिद्धांत राज्यशास्त्रातून पसरवला. भारतात प्रत्येक घराच्या बाजूच घर अगदी परस्पर टोकाच्या जाती,पंथ,विचार,भाषा यांनी विभाजीत आहे. त्याच वेळी त्याच सांस्कृतीक धाग्यांनी भारतभर विणलेलही आहे. राजे आपला इतिहासाचा अभ्यास कुठे कच्चा पडत नाहीए ना ? ज्यावेळी भारत विभक्त होता त्याकाळात परकीय आक्रमणांना तोंड देण्यास तो नेहमी अयशस्वी राहीला आहे. एकवेळ हुकूम शाहीचे समर्थन करा भारताच्या विभाजनाचे नको. इथे नेपाळ भारत श्रीलंकाची युनियन शक्य झालेली नाही. सगळ्या भारतातील राजे रजवाड्यांची राज्यांची युनियन आपणहून झाली असती का भारताची स्थिती आफ्रीका खंडा पेक्षा वाईट झाली असती ?
आज भारतात प्रगत राज्याच्या कडून मिळणारा कर दळभद्री राजकारामुळे बिमारू राज्यात खिरापती सारखा वाटला जातो.
बिमारु राज्यांची सुधारणा यशस्वीते व्हावयासच हवी यात वाद नाही. पण आपल वाक्य अर्थशास्त्राच्या नाण्याची एकच बाजूतर दाखवत नाहीए ना ? भारतातल्या उद्योग व्यापारात प्रगत राज्य आणि शहरातून जो कर गोळा केला जातो ते उत्पन्न त्यांच्या वस्तु अप्रगत राज्यात विकून तर आलेल नसत ना ?
प्रत्येक राष्ट्राला शीत युद्धात कोणत्या गटात जायचे ह्याचे स्वातंत्र्य असते.
:) खरच ?
आज युरोपातील बहुतांशी देशात त्यांच्या मातृभाषेत तुम्ही कोणत्याही विषयात पी एच डी करू शकतात आम्हाला मात्र शाळांत परीक्षेनंतर मातृभाषेपासून तोडले गेले.
बंन्धू हे घडण्यासाठी हिच इच्छा असलेल नेतृत्व आणि विचार महत्वाचा आहे. तुमच महाराष्ट्र राज्य एक होण्या साठी भाषिक एकात्मते साठी झगडल. स्वभाषेत पी एच डी करता तसा झगडा झाला असता शासने वाकलीच असती ना ? ज्या गोष्टीची पेटून उठण्या एवढी निकडच तुम्हाला वाटत नाही, तुम्ही (जनता जनार्दन) पी एच डी करता पेटून उठू नाही शकत , राज्यकर्ते स्वतःहून दिल्लीला बायांना सलामी देतात कारण त्यांच्या मतदार संघातली जनता दिल्लीतल्या बायांना सलामी देते. अशा लोकांच्या हातात स्वतंत्र राष्ट्र दिल असत तरी त्यांना ते डिफेंड करता आल असत ? =))

In reply to by माहितगार

@Smile खरच ? अगदी खरे बंगाल हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून कम्युनिस्ट रशियाच्या तर गुजरात व पंजाब हे भांडवलशाही अमेरिकेच्या गटात असते. माहितीगार आपण कोठे राहता हे माहिती नाही. पण मी ज्या जर्मनीत सध्या राहत आहे, तेथे दुसर्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनी हा रशियाच्या हातात जाऊन दरिद्री राहिला व आजही एकत्र आल्यावर तेथील जानेची मानसिकता न बदल्याने वेस्ट जर्मनीचा पैसा घेऊन त्यांची काही विशेष प्रगती झाली नाही. साधा विचार करा आर्थिक उदारीकरण गेल्या दशकात झाल्यावर जो झटापट विकास झाला मध्यमवर्ग वाढला व व आहे तो उच्च मध्यमवर्ग झाला टाटा सारख्या अनेक कंपन्या खर्या अर्थाने बहुराष्ट्रीय झाल्या तसे धोरण १९४७ पासून पंजाब व गुजरात , महाराष्ट्र मध्ये असते तर आपण एक दीड दशकात जगातील १० वी अर्थव्यवस्था आहोत ती सहा दशकात जगातील पहिल्या पाचात असतो. @आफ्रिकन राष्ट्रे विकसित तुम्ही एक साधा विचार करा भारत व आफ्रिका ह्या दोन्ही वसाहती होत्या. त्या पुढे स्वतंत्र झाल्या ,आता दोघाकडे नैसर्गिक सामुग्री, क्षेत्रफळ असून आज आफ्रिका अप्रगत व भारत विकसनशील व अंतराळ , आण्विक शेत्रात तर प्रगत राष्ट्रांच्या तोडीस तोड ,आफ्रिका कुठेच नाही. तेव्हा राज्ये असून भारत हा आफ्रिकेच्या आज कोसो पुढे आहे तेव्हा वेगवेगळी राष्ट्रे असतांना सुद्धा ते प्रगत असते. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका वेगळे झाले व आज उत्तर अमेरिका सार्या जगावर हुकुमत गाजवतो. ह्या उलट दक्षिण अमेरिका , कोकेन , गरिबी व बेकायदेशीर स्थलांतर ह्यामुळे जगात ओळखला जातो. एक गोष्ट लक्षात घ्या भारतात इंग्रज येण्यापूर्वी अगदी मोगल असे पर्यंत प्रत्येकाची राजवट म्हणजे मोगल , मराठा म्हणजे एक स्वत्रंत्र राष्ट्रे होते. एकमेकांचे भूभाग जिंकणे , स्वतःची नाणी होती. त्याकाळात भारत हा जगात महासत्ता होता , म्हणून युरोपातून युरोपियन भारतात व्यापारासाठी आले भारतीयांना जगात कुठेही वणवण करावी लागली नाही , युरोपात आद्योगिक क्रांती होण्याच्या आधी कितीतरी शतके भारत हा जगात सर्वच बाबतीत महासत्ता होता. आणि तेव्हा भारतात वेगवेगळ्या राजवटी म्हजे स्वतंत्र राष्ट्रे होते. म्हणूनच सिकदर भारतात आला त्याने मगध राष्ट्रावर स्वारी केली नाही तर मगध राष्ट्राने त्यांच्याशी पंगा घेतला नाही , सगळ्यात गंमत म्हणजे नेहरू व पुढे गांधी परिवाराचे त्यांच्या पक्षावर वर्चस्व होते. व त्यांनी भारताला शीत युद्धात रशियाच्या दावणीला बांधले. राजीव ह्यांचा मृत्यू व नरसिंह ह्यांचा मिळालेली संधी ह्यामुळे आर्थिक उदारीकरण झाले. नाहीतर मनमोहन व त्यांचा खास आलुवालीया एक सरकारी बाबू म्हणूनच जगले असते. @ 'राष्ट्रवाद कधीच कमकुवत क्रिकेट चे सामने वगळता एक भारतीय म्हणून आपण क्वचित एकत्र येतो. श्रीलंका व बांगला देश ह्यांच्याशी केंद्र सरकार आजच्या घडीला मैत्री ठेऊ पाहते ह्याला महाराष्ट्र ते बिहार ,गुजरात चा विरोध नाही मात्र अनुक्रमे तामिळनाडू व बंगाल मुळे भारत हे करू शकत नाही म्हुनुनच चीन चे फावते. अहो परदेशात सुद्धा महाराष्ट्र मंडळात हिंदी गाण्यांचे कायक्रम होत नाही सगळे भारतीय म्हणून एक मोठे मंडळ स्थापन करून सण साजरे करण्यापेक्ष्या प्रादेशिक मांडले स्थापन करतात. ही वस्तुस्थीति आहे. आमच्या जर्मनीत भारतीय आयटी वाल्यांचे मराठी व तेलगु असे समूह आहेत, आज मेक्सिकन लोकांच्या विरोधात उत्तर अमेरिकेत ते बेकायदेशीर रीत्या येउन काम व वास्तव्य करतात म्हणून शिमगा होतो पण ती वेगवेगळी राज्ये असल्याने अमेरिका कायद्याने त्यांना हाकलू शकते मात्र महाराष्ट्र मुंबईत असे करू शकत नाही. राहिला प्रश्न शिक्षणाचा तर आज जर्मनी ,फ्रांस येथे त्याच्या मातृ भाषेतून आयटी मध्ये शिकला तरी नोकरी मिळते ही सुविधा भारतात अस्तित्वात नाही , इंग्रजी शिवाय आपला तरणोपाय नाही हे मनावर बिंबवले जाते पण इंग्रजी तर आफ्रिकन शाळेमध्ये सुद्धा शिकवली जाते म्हणून ते काही प्रगत होत नाहीत. राज्यकर्ते स्वतःहून दिल्लीला बायांना सलामी देतात कारण त्यांच्या मतदार संघातली जनता दिल्लीतल्या बायांना सलामी देते. अशा लोकांच्या हातात स्वतंत्र राष्ट्र दिल असत तरी त्यांना ते डिफेंड करता आल असत ? Lol उत्तर द्या तुम्ही स्वताच्या विनोदी ,तर्कहीन मुद्यावर हस्त आहात असे दिसून येते. तुमच्यामते जनता जे ठरवते ते त्यांचा नेता ठरवतो , म्हणूनच जनता दिल्लींच्या बाई पुढे झुकते म्हणून नेते झुकतात.म्हुणुन अश्या लोकांच्या हाती ... अहो साहेब तुमच्या ह्या विनोदी तर्कानुसार भारत इंग्रजांनी एकत्र आणण्यापूर्वी दिल्लीतील मुघल सल्ल्त्तेपुढे महाराष्टार्तील जनता झुकली नाही म्हणून त्यांचे नेते शिवाजी राजे झुकले नाही असा होतो. नीट पहिले तर शिवाजी राजे ह्यांच्या पूर्वी महाराष्टार्त हेच मराठे होते तेच शौर्य होतो पण ते दिल्ली , विजापूर साठी लढत होते , भारतात राजपूत राजवटीत जेव्हा नेता राणा प्रताप लढला तेव्हा त्यांची जनता लढली , जेव्हा इतर राजपूत राजे मांडलिक झाले तेव्हा जनता राज्यांच्या विरुद्ध जाऊन दिल्लीशी लढली नाही. भारताचा जगातील निर्यातीत एकेकाळी ७० टक्के हिस्सा होता इंग्रज १९४७ साली गेले तेव्हा दोन टक्के होता म्हणूनच आपले घरदार सोडून भारतात युरोपियन आले ,एवढे नव्हे पुढे भारताशी व्यापार हे आजच्या अमेरिकन ड्रीम एवढे म्हत्वाचे युरोपला वाटत होते. एक मार्ग बंद झाला म्हणून भारतात जाण्यासाठी सागरी मार्ग शोधण्यासाठी युरोपात स्पर्धा सुरु झाली त्यातून कोलंबसला अमेरिका गावली. कुठल्याही प्रगत देशात लोकशाही च्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्या ते राष्ट्र च्लावतात जनतेला चंगळवाद दिला की ती खुश जनता देश डिफेंड करत नाही आज युरोपियन युनियन च्या प्रगत जनतेला दोन वेळ चे खायला मिळते व पैसा आहे ते आपल्या सरकारला तुम्ही म्हणजे नाटो नक्की अफगाण मध्ये काय करत आहेत हा प्रश्न विचारत नाही. इयु बाहेरील देश स्वीझ ह्याला दहशतवादाची भीती का वाटत नाही तो सैन्याशिवाय जगतो मग ब्रिटन व फ्रांस ला एवढे सैन्य व शस्त्र का हवे असा प्रश्न तेथील जनता विचारत नाही. भारतीय जनतेला दोष का द्यावा , जगभरात लोकशाही म्हणजे व्यापार्यांनी व्यापारासाठी चालवलेला मोठा व्यापार असे आहे. तस्मात वेगळी राष्ट असतो तर निदान भांडवल शाहीत ते टिकवणे हे तेथील बहुराष्ट्रीय कंपन्या व कम्युनिस्ट देशात जसे पूर्व युरोप दारिद्र्यात खोट्या समाजवादी थापांवर जगाला व आज इयु मध्ये येण्यासाठी तडफडत आहे तसे भारतात झाले असते. निदान महाराष्ट एक देश असता तर तो कम्युनिस्ट झाला नसता, असे मला वाटते. महाराष्ट्र हे राष्ट्र म्हणून निर्विवाद पणे हिंदू राष्ट्र असते व ते धर्म न मानणाऱ्या रशियाच्या नादी लागले नसते मुळात मुस्लिमांसाठी वेगळा देश न होता एक सलग पंजाब , सिधीस्थान , बलुचिस्तान अशी राष्ट्रे असती ज्यात व भारतातील सर्व छोट्या राष्तार्त हिंदू व मुस्लिम एकत्र राहिले असते. काश्मीर तेव्हा वेगळे राष्ट्र असते. भांडण हवेच कशाला एकेकाळी अफगाण ,नेपाल , श्रीलंका ह्यांच्या उल्लेख महाभारतात व रामायणात येतो आज ते भारतात नाही तरी आपण जगत आहोत ना. दुसर्या म्ह्युद्धानातर जर्मनी चे दोन भाग झाले तरी त्यांच्या अर्ध्या भागाने प्रगत राष्ट्र म्हणून नाव कमावले त्त्यांच्या प्पासून तोडून ऑस्ट्रिया एक स्वतंत्र देश झाला व आज तो प्रगत म्हणून ओळखला जातो व माझ्या पाहण्यात कुठलाही जर्मन ऑस्ट्रिया वेगळा का झाला म्हणून रडत बसलेला दिसत नाही , आहे त्या देशात त्यांनी व्यापारी कसबाने युद्धात हरून व्यापार्त कमावले व आज अव्वल आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

@निष्कर्ष घाई ? एक साधी गोष्ट करा जर तुम्ही अविवाहित असाल तर घरी सांगा अखंड भारतातील एक हिंदू आसामी मुलीवर माझे प्रेम आहे मग घरी काय उत्तर मिळते ते सांगा प्रखर राष्ट्रवाद तुम्हाला दिसेल की प्रादेशिक अस्मिता ह्याउलट फ्रांस , जर्मनी मध्ये असा प्रश्न ते वेगळे राष्ट्र आहे म्हणून येत नाही. आपल्याकडे जुळवून विवाह स्वजातीत करतात पण स्वजातीय वधू कोकणात असेल व वर पुण्यात असेल म्हणून काही नाही म्हणणार नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

माहितगार Fri, 05/09/2014 - 08:55
बंगाल हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून कम्युनिस्ट रशियाच्या तर गुजरात व पंजाब हे भांडवलशाही अमेरिकेच्या गटात असते. चीन चे फावते.
रशीया आणि आमेरीकेचे फावू द्यायचे आणि चीनचे नको असा चीनवर अन्याय का बरे ? तुमच्या तर्का नुसार इशान्येतल्या काही राज्यांची वेगळी राष्ट्रे असती त्यांना रशीया आमेरीकेच्या एवजी चीनचे फावू द्यायला आवडले असते कदाचित आसामला ब्रह्मदेशचे फावू द्यायला आवडले असते. आपल्या म्हणण्यानुसार हि छोटी छोटी राष्ट्रे वेगवेगळ्या गटात जाऊन किती गुण्या गोविंदानी राहिली असती नाही ! भारतात हुबेहुब युरोपीयन शीतयुद्धाचाच काळ आवतरला असता आपापसात आफ्रीका स्टाईल युद्धे झालीच नसती. आमेरीका रशीया कित्ती कित्ती गुणी राष्ट्रे आहेत त्यांनी स्वतःचे फावून घेतलेच नसते ! होय होय ! बांग्लादेशात मायनॉरिटी हिंदू कित्ती कित्ती म्हणून गुण्या गोविंदाने राहतात ना, अगदी तस्सेच सिंध बलुचीस्तान पश्चिम पाकीस्तानात त्यांनी हिंदूंची कित्ती कित्ती काळजी घेतली असती ! गुजराथ नावाच्या राष्ट्राने मुंबईकरता महाराष्ट्राशी लढाई केलीच नसती महाराष्ट्राने कर्नाटकशी मणिपूरने त्रिपूराशी तामीळनाडूने कावेरीवरुन कर्नाटकशी युद्धे केलीच नसती हिंदु आहेत ना सारे आपापल्या भाषिक राष्ट्रात कित्ती कित्ती म्हणून एक दिलाने राहिले असते. भांडण हवेच कशाला! काही प्रश्न उद्भवलेच असते तर आमेरीका रशीया कोणत्याही मोबदल्याशिवाय या छोट्या छोट्या राष्ट्रांना मदत करण्या साठी होतेच ना ! बांग्लादेश सारखे काही देश भांडवलशाही असूनही चुकीच्या धार्मीक संकल्पनात अडकल्या मुळे अविकसीत राहतात ! निजामाच हैदराबाद राज्य वेगळ राष्ट्र म्हणून कित्ती प्रगतीशील राहील असत. महाराष्ट्र कर्नाटक काही मराठवाडा उत्तर कर्नाटकाचा विकास करू शकले नाहीत निजामाच्या राजवटीने त्यांना कित्ती कित्ती विकास साधून दिला असता ! ती अर्जेंटीना फिलीपाईन्स सारखी अहो तीथले लोकच दळभद्री भांडवलशाही दिलीतरी अर्थशास्त्र कसे टिकवू ठेऊ शकतील. दक्षीण आमेरीकेतल्या आणि आफ्रीकेतल्या भांडवलशाही देशांचेही तेच त्यांची दळभद्री जनता तेवढी त्यांच्या विकासाच्या आड येते! भारतात वेगवेगळे राजे होते सीमा वेगवेगळ्या होत्या म्हणून त्यातला प्रत्येक राजा कसा महासत्ते प्रमाणे बलशाली होता! त्यांच्या आपपासातील न पटण्याचा इंग्रजांनी काही म्हणून फायदा घेतला नाही या राजे लोकांनीच स्वतःला गर्व नको म्हणून राजसन्यास घेतले होते! आख्खा भारत ब्रिटीशांनी एक केला या कारणाने भारताची निर्यात कमी झाली ! त्या टिळक नेहरू गांधींची भारत सांस्कृतीकरित्या एका धाग्यात बांधलेल एक राष्ट्र असू शकत हि कल्पनाच चुकीची होती नाही ! वल्लभभाई पटेल सुद्धा काय राहीले असते की छोटे छोटे राजे स्वतंत्र आणि साधला असता गुण्या गोविंदाने विकास! त्या शक्य विघटीत आदर्श भारतीय उपमहाद्वीपाची कल्पनेची आमची भरारी टोका टोकाला म्हणजेही इथ पर्यंतच जाईल बाकी आपले शिष्यत्व घेऊन गुरूंच्या कल्पना विलासी मार्गदर्शना साठी बाकी ठेवतो. बाकी आपणास युरोपच्या स्वंतत्र राष्ट्रांचा चांगला अनुभव आहे तेव्हा युरोपात विवीध कारणांनी गेलेल्या भारतीय वंशातील प्रत्येक गटा करता एक एक खेडे आंदण घेऊन त्यांचे युरोपीयन युनियन अंतर्गत स्वतंत्र राष्ट्रे करण्या बद्दल काय विचार आहे ? युरोपात एक छोटे महाराष्ट्र मंडळाचे ब्राह्मण हिंदू राष्ट्र, एक मराठा हिंदू राष्ट्र अशी अनेक छोटी राष्ट्रे युरोपात बनवता येतील की मस्तच कल्पनाय, निनदजी युरोप मराठी हिंदू राष्ट्र बनाने केलिए आगे बढो समस्त मराठी हिंदूओकी शुभेच्छाए आपके साथ है !

In reply to by निनाद मुक्काम …

पोटे Fri, 05/09/2014 - 12:42
भारताचा जगातील निर्यातीत एकेकाळी ७० टक्के हिस्सा होता इंग्रज १९४७ साली गेले तेव्हा दोन टक्के होता :) सत्तर टक्के भारताचा हिस्सा होता !!! काय काय निर्यात होत होते ? पुष्पक विमान आणि ब्रह्मास्त्र का?

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 16:55
त्यात युवराज म्हणाले इवन इंडिया इज बिगर दयान उएसे एंड चायना पुट टुगेदर. असो, असहमत. तिव्र बिरोधाभासी प्रतिक्रया.

In reply to by आत्मशून्य

भारतात सध्या विकसित झालेले प्रादेशिक पक्ष त्यांचे आपापल्या राज्यासाठी पाहणे ह्यामुळे देशासाठी पाहणारा नेता आज भारताला दुर्मिळ झाला आहे. दुर्दैवाने आज भारतात अशी परिस्थिती आहे की पंजाबात व तामिळनाडू मधील बहुतांशी जनता ज्यांना स्वातंत्र्य सैनिक मानते ते उर्वरीत भारताच्या दृष्टीने दहशतवादी आहेत. कारण अखंड भारतात ८० च्या दशकात केंद्र सरकारचे ह्या दोन्ही राज्यात जी धोरणे होती ह्याचा उर्वरीत भारताला काहीही पडले नव्हते. तामिळनाडू एक स्वतंत्र राष्ट्रे असते तर श्रीलंकेच्या तमिळ लोकांसाठी त्यांना हवे ते करावयास ते समर्थ होते पण ते तसे करू शकत नाहीत व उर्वरीत भारत श्रीलंकेशी मैत्री करू शकत नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 23:16
आपला मुद्दा ऑन पेपर पटतोय थोडाफार, पण अफगाण पेक्षा वेगळी स्थीती दिसली असती हे इम्याजीन करणे अजुनही अवघड जातयं.

साती Fri, 05/09/2014 - 22:21
पण यात काय नविन नाही म्हणा. असो. तर कलंत्रीकाका, आजकाल मातृभाषा या संकल्पनेला फारसा अर्थं नाही. आंतरराज्यीय आंतर्भाषीय लग्ने सर्रास होतात , नोकरी धंद्यानिमित्त गावोगाव जावे लागते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याच मातृभाषेत शिक्षण कसे मिळेल? आणि आमच्यासारख्या आंतर्भाषिय लग्न असणार्यांच्या मुलांचं काय? माझ्या मुलाने आई मराठी म्हणून मराठीत शिक्षण घ्यायचं की बाबा कानडी म्हणून कानडीत? (गंमत म्हणजे मुलाच्या शाळेत मातृभाषा कानडी लिहिल्येय)

In reply to by साती

साती Fri, 05/09/2014 - 22:25
इथे बॉर्डरवरच्या कुटुंबात आई कानडी बाबा तेलगू आज्जी मराठी असे खूप लोक असतात. मला तर एकाच कुटूंबातल्या तिघांशी तीन भाषेत बोलावे लागते (तेलगू येत नसल्याने हिंदीत). तर अश्या लोकांच्या मुलांनी कुठल्या भाषेत शिकावे?
आजच्या अनेक वर्तमानपत्रात "मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही". अशी बातमी वाचायला मिळाली.कर्नाटक शासनाने अश्या प्रकारचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता.

बोला, व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??

चित्रगुप्त ·

स्पंदना Wed, 05/07/2014 - 10:24
जराशी गल्लत होतेय का? शहीद अन आतंकवादी यांना एका तराजुत घातल्यासारखी भावना
प्रत्यक्ष वेतन, बक्षीस वगैरे खेरीज मरणोपरांत स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरेत चिरकाल सुखोपभोगात, ऐय्याशीत दंग राहण्याची संधी लाभणार असल्याचे आमिष त्या व्यक्तीला दिले गेलेले असणे.
या वाक्यात आली. की हा माझा भ्रम आहे? असो.

मदनबाण Wed, 05/07/2014 - 11:07
अच्छा ते "क्ष" ह्यांच्या मता प्रमाणे शहीद झाले ना ? मग ज्यांनी त्यांना शहीद केले त्यांच्या भेटी-गाठी कशाला घेतल्या ? संदर्भ :- I met my father's assassin: Priyanka

तुषार काळभोर Wed, 05/07/2014 - 16:07
सध्या भगतसिंग यांच्या निर्दोषत्वाचा मुद्दा पाकिस्तानात (आणि अर्थातच भारतात) गाजतोय. कुणीतरी तत्कालीन एफ आय आर ची एक प्रत मागवली आणि त्यात म्हणे भगतसिंग यांचे नावच नाही. अर्थात भगतसिंग हे निर्दोष होते. मग त्यांनी जे कॄत्य केले(जे तत्कालिन सरकारने व न्यायव्यवस्थेने गुन्हा ठरवले), व ज्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले, ते त्यांनी केलेच नव्हते का? मग तरीपण त्यांना देशभक्त/क्रांतिकारक म्हणायचे का? आणि जर या न केलेल्या कॄत्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले असेल, तर त्यांना 'शहीद' म्हणायचे का? महत्वाचे: मला भगतसिंग यांच्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहेच. पण हा जो त्यांना निर्दोष ठरवण्याचा अट्टाहास/प्रयत्न चालू आहे, त्याने काय साध्य होणार आहे ? जे कॄत्य त्यांनी केले म्हणुन अभिमान वाटतो, ते त्यांनी केलेच नाही, हे सिद्ध करून त्यांच्या विषयीचा अभिमान वाढेल की कमी होईल?

स्पंदना Wed, 05/07/2014 - 10:24
जराशी गल्लत होतेय का? शहीद अन आतंकवादी यांना एका तराजुत घातल्यासारखी भावना
प्रत्यक्ष वेतन, बक्षीस वगैरे खेरीज मरणोपरांत स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरेत चिरकाल सुखोपभोगात, ऐय्याशीत दंग राहण्याची संधी लाभणार असल्याचे आमिष त्या व्यक्तीला दिले गेलेले असणे.
या वाक्यात आली. की हा माझा भ्रम आहे? असो.

मदनबाण Wed, 05/07/2014 - 11:07
अच्छा ते "क्ष" ह्यांच्या मता प्रमाणे शहीद झाले ना ? मग ज्यांनी त्यांना शहीद केले त्यांच्या भेटी-गाठी कशाला घेतल्या ? संदर्भ :- I met my father's assassin: Priyanka

तुषार काळभोर Wed, 05/07/2014 - 16:07
सध्या भगतसिंग यांच्या निर्दोषत्वाचा मुद्दा पाकिस्तानात (आणि अर्थातच भारतात) गाजतोय. कुणीतरी तत्कालीन एफ आय आर ची एक प्रत मागवली आणि त्यात म्हणे भगतसिंग यांचे नावच नाही. अर्थात भगतसिंग हे निर्दोष होते. मग त्यांनी जे कॄत्य केले(जे तत्कालिन सरकारने व न्यायव्यवस्थेने गुन्हा ठरवले), व ज्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले, ते त्यांनी केलेच नव्हते का? मग तरीपण त्यांना देशभक्त/क्रांतिकारक म्हणायचे का? आणि जर या न केलेल्या कॄत्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले असेल, तर त्यांना 'शहीद' म्हणायचे का? महत्वाचे: मला भगतसिंग यांच्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहेच. पण हा जो त्यांना निर्दोष ठरवण्याचा अट्टाहास/प्रयत्न चालू आहे, त्याने काय साध्य होणार आहे ? जे कॄत्य त्यांनी केले म्हणुन अभिमान वाटतो, ते त्यांनी केलेच नाही, हे सिद्ध करून त्यांच्या विषयीचा अभिमान वाढेल की कमी होईल?
,., एकादी मृत व्यक्ती 'शहीद' ठरवली जाते, तेंव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी घडत असलेल्या दिसून येतातः १. त्या व्यक्तीचा मृत्यु हा कुणीतरी घडवून आणलेला असणे. २.

९० डिग्री साऊथ - ६

स्पार्टाकस ·

स्पंदना Wed, 05/07/2014 - 09:47
:( वर्णन वगैरे जाउ दे! नाही आवडल इमानी प्राण्यांना मारणं. ही स्लेजची कुत्री अतिशय म्हणजे अतिशय शहाणी असतात हो! अन त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव तर... असो.

In reply to by स्पंदना

स्पार्टाकस Wed, 05/07/2014 - 20:59
अ‍ॅमंडसेनने आपले कुत्रे मारणं किंवा स्कॉटने आपले घोडे मारणं आणि त्यांचा अन्नासाठी उपयोग करणं हे निश्चीतच क्रूरपणाचं असलं, तरीही धृवीय प्रदेशात त्या काळात त्यांना दुसरा उपायही नव्हता. खाद्यपदार्थांची आणि एकूणच सामग्रीची वाहतूक करणं हे तसं जिकीरीचंच होतं..

स्पंदना Wed, 05/07/2014 - 09:47
:( वर्णन वगैरे जाउ दे! नाही आवडल इमानी प्राण्यांना मारणं. ही स्लेजची कुत्री अतिशय म्हणजे अतिशय शहाणी असतात हो! अन त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव तर... असो.

In reply to by स्पंदना

स्पार्टाकस Wed, 05/07/2014 - 20:59
अ‍ॅमंडसेनने आपले कुत्रे मारणं किंवा स्कॉटने आपले घोडे मारणं आणि त्यांचा अन्नासाठी उपयोग करणं हे निश्चीतच क्रूरपणाचं असलं, तरीही धृवीय प्रदेशात त्या काळात त्यांना दुसरा उपायही नव्हता. खाद्यपदार्थांची आणि एकूणच सामग्रीची वाहतूक करणं हे तसं जिकीरीचंच होतं..
९० डिग्री साऊथ - ५ २५ ऑक्टोबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८० अंश दक्षिणेचा आपला डेपो कँप सोडला आणि पुढची दिशा पकडली. दिवसाला सुमारे १५-१६ मैलांची मजल मारत २९ ऑक्टोबरच्या दुपारी त्यांनी ८१ अंश दक्षिण अक्षवृत्तावर असलेला दुसरा डेपो गाठला. हॅन्सनच्या स्लेजला असलेल्या कुत्र्यांपैकी एक कुत्रा खूपच अशक्तं झाला होता. त्याला पुढे जाणं अशक्यं होणार होतं हे उघड होतं. निरुपायाने हॅन्सनने त्याला गोळी घातली.

माझी आजी

rakhee ·

निवेदिता-ताई Wed, 05/07/2014 - 16:05
तुझ्या आज्जीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना . माझ्या आजीची फार आठवण येतेय्...खूप मायाळू होती.

आशु जोग Wed, 05/07/2014 - 20:57
राखीताई, या धाग्यामधे २ मुद्दे दिसले १. आजीचा वाढदिवस २. आजीबद्दलचा निश्कर्ष ती CEO बनली असती वगैरे पण यातून काहीच अंदाज येत नाही असं का वाटतं याबाबतचे काही अनुभव लिहीले असत तर धाग्याला अधिक अर्थ आला असता आपल्या आजीला शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा पण ती इतर आज्यांपेक्षा वेगळी का आहे याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे

निवेदिता-ताई Wed, 05/07/2014 - 16:05
तुझ्या आज्जीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना . माझ्या आजीची फार आठवण येतेय्...खूप मायाळू होती.

आशु जोग Wed, 05/07/2014 - 20:57
राखीताई, या धाग्यामधे २ मुद्दे दिसले १. आजीचा वाढदिवस २. आजीबद्दलचा निश्कर्ष ती CEO बनली असती वगैरे पण यातून काहीच अंदाज येत नाही असं का वाटतं याबाबतचे काही अनुभव लिहीले असत तर धाग्याला अधिक अर्थ आला असता आपल्या आजीला शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा पण ती इतर आज्यांपेक्षा वेगळी का आहे याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी आजी माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख . गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे. ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली .

भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर (भाग १)

सुधांशुनूलकर ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

सुधांशुनूलकर Wed, 05/07/2014 - 09:55
अभयारण्यात गेलो होतो ना! मग प्राणिहत्या कशी करणार? म्हणून फक्त वरणभातच. भाग २मध्ये तर पिठलं येणार आहे... दुसरा भाग जरा विस्तॄत आहे. दुसरा भाग वाचून तुम्ही तॄप्त व्हाल, याची खातरी बाळगा.

In reply to by सुधांशुनूलकर

@मग प्राणिहत्या कशी करणार?>>> अवो सायेब.. म्या वेज/नानवेज मदी नै गेलू! जेवान सुरु जालं..आनी होतं नै कुटं..तर पयल्या वरानभातालाच आवारलं...असं म्हंन्तोय मी! *acute*

In reply to by अत्रुप्त आत्मा

सुधांशुनूलकर Wed, 05/07/2014 - 18:57
मीसुद्धा थोडी गंमत केली हो! दुसर्‍या भागात वनभटकंती आणि खादाडी यासारख्या 'झणझणीत' गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे, म्हणून पहिला भाग थोडक्यात आटोपला.

In reply to by कंजूस

सुधांशुनूलकर Wed, 05/07/2014 - 10:27
शिवतीर्थ रेस्टॉरंट (जुने एम.टी.डी.सी.) निसर्ग परिचय केंद्र आरक्षणासाठी ८२७५४६४११०, ९४२२६६६८०७, युवराज ९४०३६६१२८० वनविभागाच्या पुण्याच्या मुख्य कार्यालयातही आरक्षण करता येतं. ८ जणांसाठी डॉरमिट्री - प्रत्येकी २०० रु. २ जणांसाठी खोली - ८००-९०० रु., ४०० रु. अतिरिक्त खाटेसाठी जेवण : १०० रु., न्याहरी २५ रु., चहा १० रु. जेवणासाठी जवळच इतरही पर्याय उपलब्ध आहेत.

स्पंदना Wed, 05/07/2014 - 06:33
नीलमोहोर!! किती सुरेख दिसतात फुले ती. बाके वर्णन आवडले. सौ .मुवि, व चि. मुवि *dance4*

वाचतोय पुढील भागाच्या प्रतिक्षेत. भिमाशंकर मलाही आवडतं. पावसळ्यात गेलेलो खूप मजा आली होती. -दिलीप बिरुटे

सूड Wed, 05/07/2014 - 15:22
ह्म्म्म !! पुढल्या भागातली वनभटकंती वाचायला आवडेल. बाकी कधी न्हवे ते भटजींशी सहमत व्हावं लागतंय, हा भाग जरा जास्तच आटोपशीर झाला.

अजया Wed, 05/07/2014 - 15:31
एकतर ट्रीपला यायला जमले नाही,आता फोटो आणि वृत्तांत वाचुन जळून घेते !! नीलमोहोर बघायला न मिळाल्याने हळहळायला झाले.

भाते Wed, 05/07/2014 - 18:00
भीमाशंकर दौऱ्याचा वृत्तांत आणि फोटो आवडले. नीलमोहर तर केवळ अप्रतिम. पुभाप्र.

मोक्षदा गुरुवार, 05/08/2014 - 19:17
पुढच्या भटकंतीत जास्तीत जास्त मिपकार पुढच्या ट्रीपला सामील झाले तर जास्त मज्जा येईल

दोन तीन वेळा पुढे पुढे ढकललेला कार्यक्रम ११,१२,१३ एप्रिल ला संपन्न झाला.त्याची हि गोष्ट. जिजामाता कट्टा संपन्न झाल्यापासून सुधांशू आणि मी दोन तीन वेळा भ्रमण ध्वनी वर या विषयावर चर्चा करत होतो. सर्व पुढाकार सुधांशू यांचा होता. त्यात GMRT विषयी मिपावर आलेल्या एका लेखामुळे पाहिले पाहिजे असे आणखी एक ठिकाण वाढले. ११ एप्रिल हि तारीख नक्की झाली. ठरल्याप्रमाणे सुधांशू ,मोक्षदा ,स्वानंदी ,सौ.मु वि. ज्यू .मुवि उर्फ निहार ,माझी सौ स्मिता आणि आमची एक मैत्रीण सौ अनघा आणि मी असे आठ जण एका सुहान्या सफरीला निघालो. सुधांशू आणि कुटुंबीय कुर्ला येथून वेळेवर निघाले. बाकीची मंडळी डोंबिवली (या मध्यवर्ती ठिकाणी) येथे वेळेवर हजर झाली. डोंबिवली येथे जमलेल्या सर्वांचा परिचय होतोय तोवर गाडी डोंबिवली येथे आली. पुन्हा एकदा परीचय कार्यक्रम झाला.सुधांशू यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. या चमू मधील अनघा हि "मिपा" बद्दल पूर्ण अनभिज्ञ होती. स्मिता, स्वानंदी ,निहार हे मिपाचे सदस्य नसले तरी मिपा हि काय चीज आहे ते जाणून होते. कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताच आमचा सारथी दिनेश याने गाडीला वेग दिला.मोक्षदा आणि मनीषा यांनी नाश्त्यासाठी आणलेल्या इडली ,ठेपले यांचा समाचार घेत प्रवास सुरु ठेवला. कालच खेड हून आलो तेव्हा ओले काजूगर आणले होते ,त्यातील काही काजू स्मिताने सोलून आणले होते,त्यांचा पण फन्ना उडवला. आता गाडी माळशेज घाटातून जाऊ लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोहाची झाडे आपला नवा पर्णसंभार लेऊन स्वागत करत होती. मधूनच कुम्भ्याचे वृक्ष आपली शुभ्र फुले मिरवत होते. झाडे ,फुले, पक्षी, कीटक, या विषयात गाडीतील सर्वांनाच आवड असल्याने गप्पांना खंड पडत नव्हता. परत येताना घाटात थांबून फोटो काढायचे ठरवले आणि घाटात न थांबता प्रवास सुरु ठेवला. सुधांशू मधूनच भ्रमण ध्वनी वरून त्यांच्या मित्राशी संपर्क साधत होते. जुन्नर येथे आपटे साहेब (सुधांशू यांचे मित्र ) आमची वाट पहात होते. त्यांनी केलेल्या सूचने नुसार गाडी मार्गक्रमणा करत होती. इतक्यात एका वळणावर गाडी वळत असताना कोणाला तरी एक पूर्ण बहरलेला नीलमोहर दिसला. आणि गम्मत म्हणजे आपटे साहेबांच्या बंगल्याजवळ आम्ही पोहोचलो होतो. हा नीलमोहोर बंगल्याच्या कुंपणाला लागुनच उभा होता. गाडीतून उतरताच सर्वजण निलमोहर बघायला धावलो. झाडाच्या पायथ्याशी पडलेली फुले आणि वरच्या फुलांमधून झिरपणारे उन या मुळे झाडाखाली एक अनोख्या रंगाची रांगोळी काढल्यासारखे वाटत होते. बंगल्याच्या आवारात इतरही अनेक झाडे होती. आपटे साहेब झाडांची माहिती देत होते. आम्ही लहान मुलांसारखे झाडांखाली बागडत होतो. वावळ्याच्या झाडाखाली पडलेल्या पापड्या सोलून खल्य्या,बकुळीची फुले फांदीवरून हातानी काढली, पूर्ण पिकलेल्या चिंचा वेचल्या, परस बागेतील भाजीपाला पाहिला,चंदनाची झाडे पाहिली आणि व्हरांड्यात मांडलेल्या खुर्च्यात विसावलो. साहेबांचा मदतनीस एका ताटलीत केळ्यांचा फणा घेऊन आला. या केळ्यांचा रंग थोडासा विटकर होता. पण चव ,आहाहा ssss ,पूर्णपणे नैसर्गिक पणे पिकलेली अत्यंत मधुर अशी चव, मला आणखी एक केळे खाण्याचा मोह आवरला नाही. दुसरे केळे जिभेवर घोळवत घोळवत फस्त केले. माझे अनुकरण आणखी एक दोघांनी केले. इतक्यात मदतनीस मधुर चवीचे कोकम सरबत घेऊन आला. एकंदर सहलीची सुरवात मधुर झाली होती. आपटे साहेबांनी खूपच प्रेमाने आमचे स्वागत ,आदरातिथ्य केले होते. पुढील रस्त्याची माहिती घेऊन आम्ही आपटे साहेबांचा निरोप घेतला. पोट पूजा करून आम्हाला ०३.१५ पर्यंत GMRT गाठायची होती. साहेबांनी सुचवलेल्या "श्री हरी पांडुरंग'' या हॉटेल चा फलक कुठे दिसतोय हे बघत आमचा प्रवास सुरु होता. फलक दिसताच गाडी तिकडे वळवली. अस्सल मराठी चवीचे उत्तम जेवण आमची वाट पाहत होते. (या हॉटेल विषयी अधिक माहिती लेखाच्या पुढील भागात ) रसना आणि पोट यांना तृप्त करून खिसा अजिबात खाली न होता आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. हि सर्व आपटे साहेबांची योजना होती.आणि त्यासाठीच ते या हॉटेल चा पत्ता अगदी बारकाव्यांसकट सुधान्शुना देत होते. दुरूनच महाकाय दुर्बिणी दिसू लागल्या आणि थोड्याच वेळात आम्ही GMRT च्या प्रवेश द्वारात दाखल झालो. प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून एका झाडाच्या पारावर विसावलो. GMRT वरील लेखाच्या प्रती सुधांशू यांनी आणल्या होत्या त्या वाचायला घेतल्या. अजून एक गट दुर्बिणी पाहायला यायचा होता तो आल्यावर सर्वाना एकदम माहिती देण्यात येईल अशी माहिती गेट वर मिळाली. प्रवेश द्वारावरील अधिकार्यांनी प्रवेशद्वाराच्या आतील परिसरात फिरण्याची परवानगी दिली, मिपाकर लगेच कमळाच्या तळ्याशेजारी विसावले. बराच वेळ झाला तरी पुण्याहून येणारा गट काही आला नाही,शेवटी मार्गदर्शकाने आम्हाला चला असा इशारा केला आणि आम्ही महाकाय दुर्बिणी पाहायला निघालो. निहार आणि स्वानंदी यांनी बरेच फोटो काढले,सर्वांनी लक्षपूर्वक माहिती ऐकली,जिज्ञासूनी प्रश्न विचारले. भारतीय संशोधकांची अचाट कामगिरी पाहून खूप आनंद झाला. वाटेत एका ठिकाणी चहा पिउन भीमाशंकरच्या रस्त्याला लागलो. भीमाशंकरच्या सहलीचे वर्णन पुढील भागात. (नूलकर साहेबांनी मला वृत्तांत लिहायला सांगितला होता पण माझ्याने काही लिहून झाला नाही. शेवटी वाट पाहून त्यांनी सुंदर वृत्तांत लिहिला.)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सुधांशुनूलकर Wed, 05/07/2014 - 09:55
अभयारण्यात गेलो होतो ना! मग प्राणिहत्या कशी करणार? म्हणून फक्त वरणभातच. भाग २मध्ये तर पिठलं येणार आहे... दुसरा भाग जरा विस्तॄत आहे. दुसरा भाग वाचून तुम्ही तॄप्त व्हाल, याची खातरी बाळगा.

In reply to by सुधांशुनूलकर

@मग प्राणिहत्या कशी करणार?>>> अवो सायेब.. म्या वेज/नानवेज मदी नै गेलू! जेवान सुरु जालं..आनी होतं नै कुटं..तर पयल्या वरानभातालाच आवारलं...असं म्हंन्तोय मी! *acute*

In reply to by अत्रुप्त आत्मा

सुधांशुनूलकर Wed, 05/07/2014 - 18:57
मीसुद्धा थोडी गंमत केली हो! दुसर्‍या भागात वनभटकंती आणि खादाडी यासारख्या 'झणझणीत' गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे, म्हणून पहिला भाग थोडक्यात आटोपला.

In reply to by कंजूस

सुधांशुनूलकर Wed, 05/07/2014 - 10:27
शिवतीर्थ रेस्टॉरंट (जुने एम.टी.डी.सी.) निसर्ग परिचय केंद्र आरक्षणासाठी ८२७५४६४११०, ९४२२६६६८०७, युवराज ९४०३६६१२८० वनविभागाच्या पुण्याच्या मुख्य कार्यालयातही आरक्षण करता येतं. ८ जणांसाठी डॉरमिट्री - प्रत्येकी २०० रु. २ जणांसाठी खोली - ८००-९०० रु., ४०० रु. अतिरिक्त खाटेसाठी जेवण : १०० रु., न्याहरी २५ रु., चहा १० रु. जेवणासाठी जवळच इतरही पर्याय उपलब्ध आहेत.

स्पंदना Wed, 05/07/2014 - 06:33
नीलमोहोर!! किती सुरेख दिसतात फुले ती. बाके वर्णन आवडले. सौ .मुवि, व चि. मुवि *dance4*

वाचतोय पुढील भागाच्या प्रतिक्षेत. भिमाशंकर मलाही आवडतं. पावसळ्यात गेलेलो खूप मजा आली होती. -दिलीप बिरुटे

सूड Wed, 05/07/2014 - 15:22
ह्म्म्म !! पुढल्या भागातली वनभटकंती वाचायला आवडेल. बाकी कधी न्हवे ते भटजींशी सहमत व्हावं लागतंय, हा भाग जरा जास्तच आटोपशीर झाला.

अजया Wed, 05/07/2014 - 15:31
एकतर ट्रीपला यायला जमले नाही,आता फोटो आणि वृत्तांत वाचुन जळून घेते !! नीलमोहोर बघायला न मिळाल्याने हळहळायला झाले.

भाते Wed, 05/07/2014 - 18:00
भीमाशंकर दौऱ्याचा वृत्तांत आणि फोटो आवडले. नीलमोहर तर केवळ अप्रतिम. पुभाप्र.

मोक्षदा गुरुवार, 05/08/2014 - 19:17
पुढच्या भटकंतीत जास्तीत जास्त मिपकार पुढच्या ट्रीपला सामील झाले तर जास्त मज्जा येईल

दोन तीन वेळा पुढे पुढे ढकललेला कार्यक्रम ११,१२,१३ एप्रिल ला संपन्न झाला.त्याची हि गोष्ट. जिजामाता कट्टा संपन्न झाल्यापासून सुधांशू आणि मी दोन तीन वेळा भ्रमण ध्वनी वर या विषयावर चर्चा करत होतो. सर्व पुढाकार सुधांशू यांचा होता. त्यात GMRT विषयी मिपावर आलेल्या एका लेखामुळे पाहिले पाहिजे असे आणखी एक ठिकाण वाढले. ११ एप्रिल हि तारीख नक्की झाली. ठरल्याप्रमाणे सुधांशू ,मोक्षदा ,स्वानंदी ,सौ.मु वि. ज्यू .मुवि उर्फ निहार ,माझी सौ स्मिता आणि आमची एक मैत्रीण सौ अनघा आणि मी असे आठ जण एका सुहान्या सफरीला निघालो. सुधांशू आणि कुटुंबीय कुर्ला येथून वेळेवर निघाले. बाकीची मंडळी डोंबिवली (या मध्यवर्ती ठिकाणी) येथे वेळेवर हजर झाली. डोंबिवली येथे जमलेल्या सर्वांचा परिचय होतोय तोवर गाडी डोंबिवली येथे आली. पुन्हा एकदा परीचय कार्यक्रम झाला.सुधांशू यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. या चमू मधील अनघा हि "मिपा" बद्दल पूर्ण अनभिज्ञ होती. स्मिता, स्वानंदी ,निहार हे मिपाचे सदस्य नसले तरी मिपा हि काय चीज आहे ते जाणून होते. कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताच आमचा सारथी दिनेश याने गाडीला वेग दिला.मोक्षदा आणि मनीषा यांनी नाश्त्यासाठी आणलेल्या इडली ,ठेपले यांचा समाचार घेत प्रवास सुरु ठेवला. कालच खेड हून आलो तेव्हा ओले काजूगर आणले होते ,त्यातील काही काजू स्मिताने सोलून आणले होते,त्यांचा पण फन्ना उडवला. आता गाडी माळशेज घाटातून जाऊ लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोहाची झाडे आपला नवा पर्णसंभार लेऊन स्वागत करत होती. मधूनच कुम्भ्याचे वृक्ष आपली शुभ्र फुले मिरवत होते. झाडे ,फुले, पक्षी, कीटक, या विषयात गाडीतील सर्वांनाच आवड असल्याने गप्पांना खंड पडत नव्हता. परत येताना घाटात थांबून फोटो काढायचे ठरवले आणि घाटात न थांबता प्रवास सुरु ठेवला. सुधांशू मधूनच भ्रमण ध्वनी वरून त्यांच्या मित्राशी संपर्क साधत होते. जुन्नर येथे आपटे साहेब (सुधांशू यांचे मित्र ) आमची वाट पहात होते. त्यांनी केलेल्या सूचने नुसार गाडी मार्गक्रमणा करत होती. इतक्यात एका वळणावर गाडी वळत असताना कोणाला तरी एक पूर्ण बहरलेला नीलमोहर दिसला. आणि गम्मत म्हणजे आपटे साहेबांच्या बंगल्याजवळ आम्ही पोहोचलो होतो. हा नीलमोहोर बंगल्याच्या कुंपणाला लागुनच उभा होता. गाडीतून उतरताच सर्वजण निलमोहर बघायला धावलो. झाडाच्या पायथ्याशी पडलेली फुले आणि वरच्या फुलांमधून झिरपणारे उन या मुळे झाडाखाली एक अनोख्या रंगाची रांगोळी काढल्यासारखे वाटत होते. बंगल्याच्या आवारात इतरही अनेक झाडे होती. आपटे साहेब झाडांची माहिती देत होते. आम्ही लहान मुलांसारखे झाडांखाली बागडत होतो. वावळ्याच्या झाडाखाली पडलेल्या पापड्या सोलून खल्य्या,बकुळीची फुले फांदीवरून हातानी काढली, पूर्ण पिकलेल्या चिंचा वेचल्या, परस बागेतील भाजीपाला पाहिला,चंदनाची झाडे पाहिली आणि व्हरांड्यात मांडलेल्या खुर्च्यात विसावलो. साहेबांचा मदतनीस एका ताटलीत केळ्यांचा फणा घेऊन आला. या केळ्यांचा रंग थोडासा विटकर होता. पण चव ,आहाहा ssss ,पूर्णपणे नैसर्गिक पणे पिकलेली अत्यंत मधुर अशी चव, मला आणखी एक केळे खाण्याचा मोह आवरला नाही. दुसरे केळे जिभेवर घोळवत घोळवत फस्त केले. माझे अनुकरण आणखी एक दोघांनी केले. इतक्यात मदतनीस मधुर चवीचे कोकम सरबत घेऊन आला. एकंदर सहलीची सुरवात मधुर झाली होती. आपटे साहेबांनी खूपच प्रेमाने आमचे स्वागत ,आदरातिथ्य केले होते. पुढील रस्त्याची माहिती घेऊन आम्ही आपटे साहेबांचा निरोप घेतला. पोट पूजा करून आम्हाला ०३.१५ पर्यंत GMRT गाठायची होती. साहेबांनी सुचवलेल्या "श्री हरी पांडुरंग'' या हॉटेल चा फलक कुठे दिसतोय हे बघत आमचा प्रवास सुरु होता. फलक दिसताच गाडी तिकडे वळवली. अस्सल मराठी चवीचे उत्तम जेवण आमची वाट पाहत होते. (या हॉटेल विषयी अधिक माहिती लेखाच्या पुढील भागात ) रसना आणि पोट यांना तृप्त करून खिसा अजिबात खाली न होता आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. हि सर्व आपटे साहेबांची योजना होती.आणि त्यासाठीच ते या हॉटेल चा पत्ता अगदी बारकाव्यांसकट सुधान्शुना देत होते. दुरूनच महाकाय दुर्बिणी दिसू लागल्या आणि थोड्याच वेळात आम्ही GMRT च्या प्रवेश द्वारात दाखल झालो. प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून एका झाडाच्या पारावर विसावलो. GMRT वरील लेखाच्या प्रती सुधांशू यांनी आणल्या होत्या त्या वाचायला घेतल्या. अजून एक गट दुर्बिणी पाहायला यायचा होता तो आल्यावर सर्वाना एकदम माहिती देण्यात येईल अशी माहिती गेट वर मिळाली. प्रवेश द्वारावरील अधिकार्यांनी प्रवेशद्वाराच्या आतील परिसरात फिरण्याची परवानगी दिली, मिपाकर लगेच कमळाच्या तळ्याशेजारी विसावले. बराच वेळ झाला तरी पुण्याहून येणारा गट काही आला नाही,शेवटी मार्गदर्शकाने आम्हाला चला असा इशारा केला आणि आम्ही महाकाय दुर्बिणी पाहायला निघालो. निहार आणि स्वानंदी यांनी बरेच फोटो काढले,सर्वांनी लक्षपूर्वक माहिती ऐकली,जिज्ञासूनी प्रश्न विचारले. भारतीय संशोधकांची अचाट कामगिरी पाहून खूप आनंद झाला. वाटेत एका ठिकाणी चहा पिउन भीमाशंकरच्या रस्त्याला लागलो. भीमाशंकरच्या सहलीचे वर्णन पुढील भागात. (नूलकर साहेबांनी मला वृत्तांत लिहायला सांगितला होता पण माझ्याने काही लिहून झाला नाही. शेवटी वाट पाहून त्यांनी सुंदर वृत्तांत लिहिला.)
भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर (भाग १). कोणत्याही कारणाने (किंवा कारणाशिवायही) कट्टा करायचा आणि मिपावर त्याचा वृत्तान्त टाकायचा (आणि इतर मिपाकरांनी त्या धाग्यावर मनसोक्त धुडगूस घालायचा) हा तर मिपाकरांचा मिपासिद्ध हक्कच आहे. (आम्ही तर असंही ऐकलं आहे की काही जण आधी वृत्तान्त तयार करतात आणि मग कट्टा करतात. पण ते असो.) या हक्काला जागून अनेक कट्टे झाले. काही अनाहिता कट्टेही जोरदार झाले (असंही आम्ही ऐकलं आहे. पण तेही असो).

थरार : नको इतका जवळून !!

चिगो ·

आतिवास Tue, 05/06/2014 - 22:54
अवघड आहे. :-( प्रत्यक्ष काम करणं खरंच नेहमी अवघड असतं. काळजी घ्या स्वतःची. शुभेच्छा आहेतच नेहमी.

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:00
काळजी घ्यावी... खरं तर काहीही सुचत/समजत नाही. नशीब आपले साथ देत राहो हीच माझी इश्वराकडे प्रार्थना.

पैसा Tue, 05/06/2014 - 23:11
साहेबा, त्या दिवशी फेसबुकवर लिहिलं होतंस ती फक्त झलक होती! त्याच्या मागे एवढं रामायण... वाटलं होतंच की तू कोणाच्या तरी शेपटीवर पाय दिला असणार. मला तिथले पोलीस, राजकारणी, लोक कोणाचाच विश्वास वाटत नाही. कोणाचाही कसलाही दबाव टाकून परत यायचं बघ. ३/४ महिन्यात २ जिवावरचे हल्ले... दर वेळेला नशीब साथ देईल का? खड्ड्यात गेली ती नोकरी. दोन्ही वेळी पोलीस चोरीचा प्रयत्न म्हणतात म्हणजे त्यांना काही करायचं नाहीये. आणि "कल हो न हो" म्हणू नको. बायको पोराबरोबर अख्खं आयुष्य जायचंय अजून. तिथून कसं बाहेर पडता येईल हाच पहिला विचार कर.

In reply to by पैसा

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:31
एक तर स्ट्रेटेजिकली त्वरीत काही बंधने किंचीत सौम्य करुन (तातपुरत्या) माघारीचे Gesture द्यावे, त्यांना इतर कार्यात गुंतवता येइल ते बघावे. आणी बळकट सुरक्षा व्यवस्था बाळगुन ठेवीले अनंते तैसेची रहावे मानत फार बदल करायच्या फंदात न पडता चालु कालखंड व्यतीत करावा. जमेल ती चांगली कामे ताकतवान विरोधक निर्माण न करताच शक्य असेल तरच पार पाडुन संधी येताच बाजुला व्हावे. खरे तर साहेबांना सल्ला द्यायचा हक्कच/लायकीच नाही. अतिशय लहान तोंडी मोठा घास घेतलाय, अडखळलाय, ठसकाही आहे, पण त्यामागे फक्त भावनीकता आहे, साहेबांच्या अडचणीवर उपाय माहीत असल्याचे (चुकुनही) प्रदर्शन वा आशा नाही :(

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:44
ताबडतोप दिर्घ रजा टाकायला हवी. हा पळपुटेपणा नाहीये, पण जर सोबतची मोठी व्यवस्थाच(लोकंच) आपला पध्दतशीर बळीचा बकरा बनवु पहात आहे तर एकट्याने लढत देण्यात तरी काय उपयोग. कठीण आहे.

In reply to by आत्मशून्य

@आपला पध्दतशीर बळीचा बकरा बनवु पहात आहे तर एकट्याने लढत देण्यात तरी काय उपयोग. कठीण आहे.>>>> हेच...हेच मनात येतं आहे.

हे लिहितांना सगळ्या प्रसंगाची पुनरावृत्ती तुमच्या स्मृती पटलावरून तराळून गेली असेल. आमच्यापर्यंत हा अनुभव पोहोचवल्याबद्दल आभार.

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 01:23
सर्कारी लोक्स अगदी एकजात भ्रष्ट. म्हणुन तर एकदम नवी कोरी सिस्टीम आणणार आहोत आम्हि. अवांतर( खरं तर महत्वाचं) : सायबानु.. जरा जपुन. इथे सर्वच रात्री वैर्‍याच्या आहेत. :(

संदीप चित्रे Wed, 05/07/2014 - 01:32
असं आता आमच्या आय्.टी. क्षेत्रातला कुणीही म्हणाला की हा लेख आठवेल आणि त्या माणसाची कींव वाटेल! बाकी काळजी घ्या! सल्ला वगैरे देऊ शकत नाही कारण अशाप्रकारे काम करण्याचा अनुभवही नाहीये!

काय प्रतिक्रिया देणार खरंच. विचार करूनही अस्वस्थ वाटतं. आणि हा थरार इतका जवळून अनुभवून तुम्ही तो अत्यंत शांतपणे आणि संयमाने इथे मांडलाय यासाठी +१. अनेकानेक शुभेच्छा!

दिव्यश्री Wed, 05/07/2014 - 01:46
शिक्षण , अनुभव ई. सगळ्याच बाबतीत लहान आहे मी आपल्यापेक्षा . फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते कि स्वतःची काळजी घ्या . चेपुवर वाचायची हिम्मत सुद्धा झाली नाही माझी तर . देव करो माझ आयुष्य तुम्हाला लाभो .

बहुगुणी Wed, 05/07/2014 - 01:55
प्रतिकूल परिस्थितीतही चांगलं काम करणार्‍या 'आळश्यांचा राजा', तुम्ही, अशा ध्येयवादी आदर्श व्यक्तिंचा अभिमान वाटतो. पण तुम्ही लोकं असा जीवाला धोके गृहीत धरता याचं वाईटही वाटतं आणि खेदही वाटतो. आसाम-मेघालयातली परिस्थिती हळूहळू सुधारेलही कदाचित तुमच्यासारख्यांच्या कामाने, पण व्यक्तिशः तुमच्यापुरतं सामाजिक कर्तव्यपालन पुरेसं करून झालंय असं वाटतं. शिर सलामत तो पगडी पचास! ध्येय-निष्ठा वगैरे ठीक आहे, पण लहान मूल आणि वाट पहाणारे कुटुंबिय असतील तर मला वाटतं तुम्ही इतरत्र 'पोस्टींग' शोधावं जिथे तुमच्या कामाची किंमत ठेवणारे आणि तुमच्या मार्गात असे अडथळे न आणणारे वरिष्ठ/ पोलिस आधिकारी असतील.

In reply to by बहुगुणी

स्पंदना Wed, 05/07/2014 - 03:40
हो चिगो! तुमचच वाक्य तुम्हाला सांगते
गेलेल्या व्यक्तीची भरपाई कुठलाच आणि कितीही पैसा करु शकत नाही.
समाजाला मिळतील कार्यकर्ते पण घरच्यांना कोण हो? टाका रजा अन निघा तेथुन. वाचवत नाही आहे. प्रचंड राग येतो आहे नपुसंक शासनाचा. किती किती खाणार आहेत हे लोक?

निनाद Wed, 05/07/2014 - 05:23
बापरे! किती जबरदस्त काम करत आहात याचा प्रत्यय येतो आहे. मात्र यात पोलिस व्यवस्था तुमच्या बाजूने कशी उभी राहील हे पाहणेही जरूरीचे आहे असे वाटते. आपल्या बाजूने सिस्टिम नसेल तर काम करणे अजून कठीण कठीण आहे. घेतलेले कार्य अवघड आहे हे दिसतेच आहे. काही व्यक्तिगत बैठका घेऊन पोलिस दलास आपल्या बाजूला वळवणे, त्यांच्याशी चांगले संबंध राखणे अतिआवश्यक वाटते आहे. तसेही जिल्हाधिकारी या पदाने पोलिसदल आणि न्याय प्रशासन (काही प्रमाणात) तुमच्या अधिकारात असले पाहिजेत ना? मग त्यावर तुमचा दबाव असला पाहिजे. ते फक्त दरोड्या प्रयत्न असा गुन्हा नोंदवण्याची मनमानी कसे काय करू शकतात? दोन वेळा असा प्रयत्न झाल्याने आता 'खुनाचा प्रयत्न' हा गुन्हा नोंदवण्यासाठी तुम्ही आग्रही रहायला पाहिजे असे माझे मत आहे.

In reply to by निनाद

चिगो Wed, 05/07/2014 - 09:02
मान्य आहे, मित्रा.. दबाव आणू शकतो, पण आतापर्यंत तरी पोलिसांच्या कामात कधीच आडकाठी घातली नाही किंवा ढवळाढवळ केली नाही. जे मी माझ्या बाबतीत होणं नापसंत करतो, ते मी दुसर्‍यांच्या कामाच्या बाबतीत कसा करु? पण आता ढवळाढवळ नाही तरी किमान दखल घ्यायला लावावीच लागेल, हे कळतंय आणि वळतंय. बघुयात, काय करता येईल ते आणि होतंय ते.. धन्यवाद..

In reply to by चिगो

निनाद Wed, 05/07/2014 - 09:08
तुम्ही त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही आहात. ते तुम्च्या कामात करतायेत! गोळी तुमच्यावर झाडली गेली आहे. तुम्ही म्हणायला हवे की की हा खुनाचा प्रयत्न आहे. आता गोळी झाडली गेली आहे. तीही तुमच्या दिशेने. देवाच्या कृपेने वाचलात! अजून काय मोटिव्हेशन मिळायची वाट पाहायची खुनाचा प्रयत्न हा गुन्हा नोंदवण्यासाठी? (फक्त गवगवा टाळा किंवा करा - जे तुमच्या साठी त्या भागात योग्य असेल ते.)

In reply to by निनाद

चिगो Wed, 05/07/2014 - 09:40
आता पुन्हा एकदा सगळ्या एफ आर आय पाहिल्या.. केलीय. भादंवि कलम ३०७ खाली नोंद केलीय. (आता त्यासाठी स्वतः तक्रार करेपर्यंत वाट पाहीलीय, ही गोष्ट अलहीदा.. दोन्ही-तिन्ही गुन्हे दखलपात्र असल्याने पोलिस स्वतःच गुन्हा नोंदवू शकतात खरेतर) सरकारची मजबुरीपण समजू शकतो मी, धोका आहे हे उघडपणे मान्य न करण्याची.. आणि म्हणूनच प्रेससमोर ह्या दोन्ही घटना " किरकोळ गुन्हेगारांद्वारे केलेल्या दरोड्याच्या / वाटमारीच्या घटवाटमारीच्या दाखवण्यात आल्यात. आता पुढे काय करायचं आणि करतात, ते बघुयात. पुन्हा एकदा सांगतोय. ही काही कुण्या "प्रामाणिक अधिकार्‍याची सिस्टमविरुद्धची लढाई किंवा कैफीयत" नाहीये. मी सिस्टमचाच भाग आहे, आणि सिस्टमच्या क्षमते/कमतरतेनुसारच मला काम करावं लागेल हेपण ठाऊक आहे.. कदाचित हा असला काहीतरी लेख लिहीणे हे सुद्धा चुकीचे असेल. मुद्दा तोच आहे, जो शेवटी मांडलाय. कुणाहीबद्दल मत बनवतांना नाण्याला दुसरी बाजू असते, हे लक्षात ठेवावं. किंवा त्याही पेक्षा कुणीतरी बोलल्याप्रमाणे "Everything has three sides. Mine, yours and the true one.." धन्यवाद..

In reply to by चिगो

पैसा Wed, 05/07/2014 - 10:06
ही काही कुण्या "प्रामाणिक अधिकार्‍याची सिस्टमविरुद्धची लढाई किंवा कैफीयत" नाहीये. मी सिस्टमचाच भाग आहे,
अगदी मान्य आहे, आणि सिस्टीम बदलणे एकदुकट्याचं काम नव्हेच. हेच म्हणते, तू शक्य तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केलास, पण हुतात्मा व्हायची काही गरज नाही. सैन्यात जाणार्‍या मुलाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाचा जीव सतत संकटात असणार आहे, एका सरकारी अधिकार्‍याच्या आईने त्या टेन्शनखाली का रहावं? सरकारला काय आणि तिर्‍हाईताला काय अ च्या जागी ब एवढाच फरक पडणार असतो. काही झालं तर लोक जरा हळहळतात आणि आपल्या कामाला लागतात. परिणाम होतो तो जवळच्या माणसांवर. तिथल्या लोकांची अपेक्षाही जिल्ह्याला एक अधिकारी पाहिजे एवढीच असावी. शिवाय बांगला देश बॉर्डर, आणि चिन्यांचा हस्तक्षेप काय काय ब्रह्मांड असेल देवजाणे. || कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता? इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों || तू दगड मारून बघितलास. तो परत आपल्या अंगावर येऊन पडता कामा नये.

In reply to by पैसा

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 11:48
तू शक्य तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केलास, पण हुतात्मा व्हायची काही गरज नाही. पै ताय शी सहमत ! स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या... जाता जाता :- सिर सलामत तो पगडी पचास !

In reply to by चिगो

स्पंदना Wed, 05/07/2014 - 10:14
चिगो तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर असणारे तुमच्या सहकार्‍यांच्या जीवाला सुद्धा धोका नाही का? ही गोश्ट तुम्ही समजुन घेउन पोलीसांवर दबाव आणला पाहीजे. कारण आता म्हणु नये अन देव न करो पण त्या जागी हजर असणार्‍या सगळ्यांनाच धोका असणार आहे ना? म्हणुन तुमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीपण तुम्ही तुमचा अधिकार वापरला पाहिजे. सच्च्या बरोबर सच्च अन खोट्या बरोबर खोटच वर्तन ठेवा बा! त्याच्याशी कशाला सच्चं वागायच?

श्रीरंग_जोशी Wed, 05/07/2014 - 07:49
इशान्य भारतात एक कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी आपल्या अधिकारकक्षेत राहून मर्यादित साधनांच्या मदतीने न्याय्य कामे करू पाहतो ही खरच सकारात्मक बाब आहे. त्याच वेळी व्यवस्थेतील ज्या इतर घटकांनी त्याची साथ द्यायला हवी तेच आपल्या कर्तव्यात कसर ठेवताहेत हे अत्यंत दुर्दैवी. तुमचे अनुभवकथन वाचून एका तपापूर्वी वाचलेले ज्युलिओ रिबेरो यांचे बुलेट फॉर बुलेट हे पुस्तक आठवले.

अजया Wed, 05/07/2014 - 07:57
तुम्ही रोज दिसेपर्यंत किंवा तुमचा फोन येइपर्यंत घरच्यांचे काय होत असेल, कल्पनाच करवत नाही. काळजी घ्या ,स्वत:साठी आणि त्यांच्यासाठी देखिल.

साहेब, अनौपचारिक ग्प्पात चिगोवर हल्ला झाला असं कळलं होतं आणि चिंता लागलीच होती. लेख वाचला भीती, थरार, आणि जीवन मरणाचा अनुभव हे सर्व वेगळंच आहे...! साहेब, वर पैने जसा सल्ला दिला तसाच मीही देतो. मंत्री-संत्रीला भेटून वशीला लावून सुरक्षीत झोनमधे बदली करुनच घ्या. असं जीवावर बेतणा-याला प्रसंगाला सामोरं जायचं यापुढे कारण नाही. निनाद म्हणतो तसा पोलीस आपल्या ताब्यात आहेत, सुरक्षीतता याला आपण महत्त्व द्यावं अस्सच मला वाटतंय. साहेब, व्यवस्था साली लै बरबटलेली आहे, आपल्या एकट्याने आपण हे सर्व स्वच्छ करताय. केवळ सिंपली ग्रेट. पण कधी कधी वाटतं. आपलं आयुष्य धोक्यात घालून असल्या नसत्या झकमा-या नको, असं माझं मत आहे, हे नावडणारं मत आहे, हे मला माहिती आहे. साहेब, तब्येत सांभाळा. काळजी घ्या. मिपावर मनमोकळेपणाने बोललात...आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. पण असली रिस्क नको बस... आणि साहेब, तृतीयपुरुषी निवेदन उत्तम जमलंय. लिहित राहा. बोलत राहा. वी आर अल्वेज वीथ यु...! -दिलीप बिरुटे

चिगो Wed, 05/07/2014 - 10:48
धन्यवाद, दोस्तहो ! पैसातै, तू बोलतेयस ते अगदी योग्य आहे..
सैन्यात जाणार्‍या मुलाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाचा जीव सतत संकटात असणार आहे, एका सरकारी अधिकार्‍याच्या आईने त्या टेन्शनखाली का रहावं?
हेच मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, की साहेबलोक्स, गोळ्या खाणे हा माझा "ऑक्युपेशनल हजार्ड" नाहीये..
काही झालं तर लोक जरा हळहळतात आणि आपल्या कामाला लागतात.
मी जिथं आहे, तिथं लोकांच्या हळहळण्याची पण खात्री देता येत नाही. माझ्यासमोर इलेक्ट्रोक्युशननी मेलेल्या माणसाची भाऊ आणि बहीण पंधरा मिन्टात स्वतःला सावरुन त्याला गाडायला घेऊन गेले, पंचनामा झाल्या झाल्या.. मी अर्धा तास थरथरत होतो. रात्रीची झोप उडाली ती वेगळीच. मारणे आणि मरणे इज नॉट अ‍ॅट ऑल अ बिग डील, बॉस..
परिणाम होतो तो जवळच्या माणसांवर.
हे प्रत्यक्षच अनुभवतोय..
चिगो तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर असणारे तुमच्या सहकार्‍यांच्या जीवाला सुद्धा धोका नाही का?
हेच मला म्हणायचंय आणि सांगायचंय, अपर्णातै.. गोळी कुणासाठी होती आणि जखमी कोण झालंय? प्राडॉ, निनाद, पैतै, अर्धवटराव, आत्मशून्य आणि सगळ्या प्रतिसादक मित्र/मैत्रिणी/ ताई/माई/ दादा लोक्स.. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.. चला, येतो.. अजून निवडणुकीचा निकाल लावायचा आहे जिल्ह्यात बसून..

मृत्युन्जय Wed, 05/07/2014 - 11:51
तुम्हाला अनेक शुभेच्छा. तसा तुम्हाला काही धोका नाही म्हणा. पोलिसच तसे म्हणतात म्हणजे नसावाच ;). पण तरीही सांभाळुन रहा आणि हो आता ट्र्कपासुन १०० फूट लांब राहत जा :)

In reply to by मृत्युन्जय

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 17:43
पोलिसच तसे म्हणतात म्हणजे नसावाच ;-)
आक्षी बरुबर..
आणि हो आता ट्र्कपासुन १०० फूट लांब राहत जा
हा हा.. हे एकदम बरोबर बोललात.. आता मला "ट्रकोफोबिया" व्हायला लागलाय. ;-) म्हणजे, ट्रकच्या मागे गाडी थांबवायला लागली की आपोआप ठोके वाढतात आणि नर्व्हस व्हायला होतं. बघुया, किती दिवस राहतो हा फोबिया ते..

बाबा पाटील Wed, 05/07/2014 - 12:00
खर तर पहिले तुमच्या हिमतीला सलाम पण विनाकारण शहिद होण्याचा प्रयत्न करु नका स्वतःच्या सुरक्षिततेची अधिकादिक काळजी घ्या,तुम्ही डी.एम.च्या पोस्ट वर आहात तर एस.पी.तुमच्या अंडर काम करतात अश्या वेळी पोलिसखाते अश्याप्रकारे वागतय हे अनाकलनिय आहे कारण तुमच्या आदेशाशिवाय त्यांना काहीही काम करता येणे अवघड आहे,आता पुर्वांचल मध्ये कशा प्रकारे नियम आहेत याची मला कल्पना नाही. तरी जर तिथले पोलिस प्रशासन जिल्हाधिकारांची सुरक्षा करु शकत नसेल तर तुम्हाला सरळ तेथिल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करता येइल आणी माझ्या माहिती प्रमाणे त्याची अतिशय तातडीने त्याची दखल घेण्यात येइल. समजा जर मुख्यमंत्रीही जर कानाडोळा करत असतील तर तुम्ही दिल्लीत सरळ गृहमंत्र्यांना भेटता येइल.आणी जे आपल्या सुदैवाने महाराष्ट्रीयन आहेत व जे मराठी अधिकार्‍यांना सहजासहजी वार्‍यावर सोडत नाहीत.दुसरी गोष्ट समजा काही कारणाने त्यांचीही वेळ मिळु शकली नाही तर थोरल्या पवारांची नक्की वेळ मिळेल आणी हा माणुस त्यांच्या संपर्कात आलेल्या कुठल्याच मराठी अधिकार्‍याला बाहेरच्या ठिकाणी अडचणीत येवु देत नाही.असा आतापर्यंतचा तरी अनुभव आहे. समजा १७ नंतर सरकार जरी बदलले तरी गडकरी तेथे सत्तास्थानात असतील ते आणी पवार या बाबतीत सारखेच आहेत्,फक्त गडकरींच्या पुढे उभे राहिल्यावर थोड्याफार रांगड्या वर्‍हाडी शब्द एकण्याची तयारी ठेवावी. तुमच काम निच्छितच चांगल आहे फक्त सद्य परिस्थितीनुसार अस दिसतय की तुम्ही तुमचे अधिकार योग्य रित्या वापरत नाही. नाही तर अशी वेळ आली नसती. दुसरे म्हणजे जर आपली मराठी माणसे दिल्लीत अतिशय वरिष्ठ पदावर असताना त्यांच्या पदाचा योग्य दबाव तुम्ही निर्माण करत नसाल तर ते दुर्देव आहे.प्रशासनात जर तुम्हाला निर्भिड पणे काम करावयाचे असेल तर तुम्हाला या गोष्टी करण भाग आहे.तुमच्या पाठीवर कोनाचातरी वरदहस्त निर्माण केलाच पाहिजे.अन्यथा हकनाहक बळी पडाल दुसरे काही नाही. व त्याचा परिणाम त्या संपुर्ण जिल्ह्यावर नाही तर राज्यावर होइल. मग कुठलाच अधिकारी निर्भिडपणे काम करणार नाही. थोडासा भगवान कृष्ण आणी आपले शिवछत्रपती समजावुन घ्या योग्य उत्तरे मिळतील.त्यांच्या वर हल्ले झाले नाहीत का ? ,नक्कीच झाले होते पण ते हात त्यांच्या पर्यंत पोहचण्या आधीच कलम केले जायचे,याचा मतितार्थ समाजावुन घ्या. बाकी तुमच्या कार्यास सुयश मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

In reply to by बाबा पाटील

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 12:32
पाटील, तुम्ही म्हणता ते योग्य आहे.
फक्त सद्य परिस्थितीनुसार अस दिसतय की तुम्ही तुमचे अधिकार योग्य रित्या वापरत नाही.
असू शकेल, आता तुम्ही म्हणताच आहात तर. जेव्हा पोलिसांनी हा पण हल्ला हलक्यात घ्यायला पाहीलं, तेव्हा मी माझ्या अधिकारांचा योग्य तो वापर केला. आणि सिक्युरीटी वाढवून घेतली. कसं आहे ना, पाटील.. माणसानं जीवाला जपावं, नक्कीच जपावं. पण मी जर प्रत्येकाकडेच संशयानं पाहायला लागलो, तर ह्या नोकरीतरी काम करणं अशक्य आहे मला. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याची अक्षम्य चुक झाली म्हणा, पण ती सुधारावी म्हणतो आता.. रोखठोक प्रतिसादासाठी धन्यवाद..

In reply to by चिगो

बाबा पाटील गुरुवार, 05/08/2014 - 13:23
तुम्हा लोकांची या देशासाठी गरज आहे.माझ्या आयुष्यात मी फार कमी निस्पृह आणी धाडसी अधिकारी पाहिलेत्,आणी वेड धाडस करणार्‍यांच काय होत ते ही पाहिलय.काळजी वाटली म्हणुन लिहील.बाकी समर्थ आहातच.आई भवानी संभाळुन घेइल.

मैत्र Wed, 05/07/2014 - 12:11
तुमच्या जिद्दीला आणि कर्तव्यनिष्ठेला! आमच्यासारखे शहरी नोकरदार तुम्हाला काय सल्ला देणार? काळजी घ्या. स्ट्रॅटेजिकली भिडा. प्रत्येक वेळी थेट लढून मंजूनाथ शण्मुगम होऊन काय उपयोग.. तुमचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि मिपाकर हळहळतील. पण काम अपुरं राहील. माझ्या दुर्दैवाने तुमची लेखमाला आजवर वाचली नव्हती. ती वाचली आणि तुमच्या जिद्द आणि चिकाटीची कल्पना आली. त्यात एका प्रतिसादात तुम्ही स्वतः एक वाक्य लिहिलं आहे -- ," Success is not absence of failures. It means reaching your ultimate goal. It is about winning the War, not every battle." तुमचे श्रद्धास्थान तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि सामर्थ्य देवो ..

मृत्यू केव्हा आणि कसा यावा हे आपल्या हातात नाही. सबब, निडरपणे कार्यरत राहा. मागे हटणं एखाद्याच्या स्वभावातच नसतं आणि तू तसा आहेस. तस्मात, जोपर्यंत आहोत, तोपर्यंत विवेकबुद्धीला सार्थ वाटेल, ते करणं श्रेयस. अतिरेकी पैशासाठी काम करतो आणि तो मार्ग चुकलेला असतो. विकासाची संधी मिळाली तर कुणी हिंसक होणार नाही. निर्लज्ज नेत्यांना जनताच पदच्युत करू शकते ही जाणीव लोकांना व्ह्यायला हवी. गारो हिल्समध्ये, अतिरेकी चिगोला मित्र मानोत आणि हिंसेपासून परावृत्त होवोत, वंचीतांसाठी चिगो देव बनो आणि त्याच्या प्रयत्नातून त्या भूमीत शांतता आणि सौहार्द नांदो अशी अस्तित्वाकडे प्रार्थना करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 16:26
आशावादासाठी धन्यवाद, संक्षी.. पण
गारो हिल्समध्ये, अतिरेकी चिगोला मित्र मानोत आणि हिंसेपासून परावृत्त होवोत, वंचीतांसाठी चिगो देव बनो आणि त्याच्या प्रयत्नातून त्या भूमीत शांतता आणि सौहार्द नांदो
हे होणे नाही ! मागच्या तीन वर्षांपासून ह्या भागात काम करतोय आणि परिस्थिती बघतोय, तेव्हा ही भाबडी आशा मी तरी ठेऊ शकत नाही.. त्यातल्या त्यात इथे दिड वर्ष म्हणजे कुण्याही ऑफीसरच्या पोस्टींगच्या डोक्यावरुन पाणी! मी इथे जे काही करतोय, केलंय ते "स्वांतसुखाय" केलंय. त्यामागे ना देव बनण्याची इच्छा होती ना आहे.. देश आणि प्रदेश असे जादुची कांडी फिरवल्यासारखे बदलत नाही, हे पण चांगलंच ठावूक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सदिच्छेसाठी आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.. पर शहीद होके जंग जिती नहीं जाती, हेपण ठाऊक असल्याने "थॅन्क्स बट नो थॅन्क्स.."

In reply to by चिगो

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 18:26
पर शहीद होके जंग जिती नहीं जाती १०००% खरं. माझ्या अत्यंत आवडीचं जनरल पॅटनचं वाक्य... "No bastard wins war by dying for his country; but by making the other bastard die for his !" * यातली शिवीगाळ सोडा (पॅटन लईच फाटक्या तोंडाचा होता)... पण भावनाओंको समझो !

In reply to by चिगो

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/08/2014 - 21:34
हे मान्य. आणि मृत्यू आपल्या हाती नसला तरी चांगल्या कामासाठी कुणी शहीद व्हावं असाही प्रतिसादाचा अर्थ नाही. पण मग हे असंच चालायच का? How an officer like you looks at the situation?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/08/2014 - 23:43
एकदम `शहीदगी' किंवा मग `काहीही होणार नाही' या दोन पराकोटींमधे काही तरी पर्याय असायला हवा ना? माझा आशावाद दुर्दम्य असेल पण आशाच संपली तर मग हातात काय उरतं? आपणच निराश झालो तर बदल घडणं असंभव होणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो Fri, 05/09/2014 - 17:13
आपणच निराश झालो तर बदल घडणं असंभव होणार नाही का?
मान्य.. पण परिस्थिती फार आशादायी नाही, हे सत्य मी जवळून अनुभवतोय ना मालक.. असो. आशावाद आवडला, हे मान्यच आहे.. :-)

समीरसूर Wed, 05/07/2014 - 12:23
चिगोसाहेब, मानलं तुम्हाला. इतक्या दुर्गम भागातल्या अतिरेकी संघटना, तिथली स्थानिक मंडळी, मुख्यमंत्री, आमदार, गुंतागुंतीचं राजकारण आणि समाजकारण, तिथली हिंसा, मृत्यूचं भय, कुटुंबाची काळजी, अतिशय निराळं वातावरण आणि अतिशय वेगळी संस्कृती...आणि तिथल्या समस्या, तिथला भ्रष्टाचार, तिथले प्रश्न सोडवण्याची तुमच्या शिरावर (शीर सलामत राहिलच याची शाश्वती नसतांना) असलेली महाकर्मकठीण जबाबदारी! हिकमतीने तुम्ही हे सगळं करताय हे वाचून अभिमान वाटला. आयुष्यात काम करणे ही व्याख्या अक्षरशः जगताय तुम्ही. अर्थात तुमची कुवत, बुद्धिमत्ता, प्रशिक्षण सगळंच असामान्य असल्याने तुमच्याशिवाय ही जबाबदारी कुणी पेलू शकत नाही. वर दिलेल्या प्रतिसादांप्रमाणे मलादेखील असेच वाटते; आपली सिस्टीम बदलवण्याचा फार हट्ट धरणे म्हणजे जीवाला कायमाचा धोका! कुटुंबाला धोका! देव न करो, काही बरे-वाईट झाल्यास नंतर 'शहीद' म्हणून चार लोकांची कोरडी सहानुभूती! हा सौदा परवडत नाही. अजिबात परवडत नाही. आपल्या देशात याला सौदाच म्हणावे लागते यासारखे दुर्दैब नाही. आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने होणारा बदल बघणे खूप समाधानकारक असावे पण आपल्या देशात वृत्तीमधला बदल होण्यासाठी कित्येक दशके-शतके जाऊ द्यावी लागतील. इज इट वर्थ पुटींग युअर लाईफ अ‍ॅट रिस्क? इज इट वर्थ पुटींग युअर फॅमिलीज पीस ऑफ माईंड अ‍ॅट रिस्क? विचार करा...काही गोष्टी सोडून दिलेल्या बर्‍या असतात. काही बदल आपल्या स्वप्नांमधून काढून टाकणेच योग्य असते. बाकी तुमच्या कामाच्या आवाक्याची कल्पना आल्यावर मी काय करतोय याची लाज वाटली. मी सध्या बेंचवर आहे. टाईमपास चालू आहे. टिवल्या-बावल्या, टंगळ-मंगळ, टाईमपास असं सगळं चालू आहे. कुवत नसली की असं काम वाट्याला येतं. :-) तुम्हाला खूप शुभेच्छा! पण जरा जपून...

नि३सोलपुरकर Wed, 05/07/2014 - 12:52
काय प्रतिक्रिया देउ कळत नाहिय .... चिगो ,सलाम! तुमच्या जिद्दीला आणि कर्तव्यनिष्ठेला! केवळ _/\_. बाकी शब्द नाहीत.

पिलीयन रायडर Wed, 05/07/2014 - 13:18
अहो चिगो.. सांभाळुन हो.. तुमच्या मागे बायको पोरं आहेत.. माझा नवरा रोज २० किमी गाडी वर जातो तर मी रोज फोन करुन चेक करते की नीट पोहोचला ना.. तुमची बायको हे सगळं कसं सहन करतेय? त्यांना सलाम..!! घरात बसुन उगाच चिंता करत काळ घालवणं फार फार तापदायक असतं.. कितीही म्हणलं तरी मनात भलते सलते विचार येत रहातात.. घरच्यांच्या मनःस्वास्थ्याची काळजी घ्या..

माधुरी विनायक Wed, 05/07/2014 - 13:35
सलाम तुमच्या कर्तव्यनिष्ठेला आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा... वाट बिकट आहे, जपा...

प्यारे१ Wed, 05/07/2014 - 13:40
चिगो, मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू! :) >>> महायत्न सावधपणे| समई धारिष्ट धरणे| अद्भुतचि कार्य करणे| देणे ईश्वराचे|| दासबोध १८-६-१५ >>> जैशास तैसा जेव्हा भेटे| तेव्हा मज्यालसि धाटे| इतुके होते परी धनी कोठे| दृष्टीस न पडे|| दासबोध १९-०९-३१ बहुत काय लिहीणे, आपण सूज्ञ आहातच. चेपु वर अथवा इथं वाचताना तुम्हाला जीवावर बेतावं अथवा आपसुक धाक निर्माण होऊन तुम्ही 'बाजूला' व्हावं अशीच हल्लेखोरांच्या सूत्रधारांची इच्छा दिसतेय. थोडं बॅकफूटवर जाऊन आवश्यक तेवढ्या समाजसुधारणा कराव्यात. ज्या समाजामध्ये मंदिरा च्या समोरच्या चपला सुरक्षित रहात नाहीत त्या समाजाला नेता अथवा अधिकार्‍यांनी सुधारण्यापेक्षा घरातल्या आईबापांनी स्वतः सुधारण्याची जास्त गरज आहे. सावध आहातच. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असो. लायकी नसताना खूप लिहीलं.

In reply to by प्यारे१

चिगो Fri, 05/09/2014 - 17:23
मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू!
माझ्याकडून पार्टी तेव्हा तुला, दोस्ता..

In reply to by प्यारे१

मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू! मी तर म्हणेन, लवकर भेट व्हावीच एखाद्या कट्ट्याला आणि रिटायरमेण्टचा जंगी कट्टा तर १००% नक्की !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 18:37
सावित्री सत्यवान 'ष्टुरी' मध्ये यम सावित्रीला एकच वर माग म्हणतो... अंध सासूसासर्‍यांबरोबर राज्य गमावलेली निपुत्रिका असलेली सावित्री आपल्या पतीच्या शवाजवळ बसलेली असते. ती एकच वर मागते. म्हणते, माझ्या मुलांनी केलेलं राज्य माझ्या सासूसासर्‍यांनी बघू दे! वरची इच्छा अशीच मल्टी'पदरी' आहे. तू व्यवस्थित धडधाकट असावासच त्याबरोबर मी सुद्धा जिवंत असावं. खाता पिता असावा नि आपले संबंध पार्टी करण्याइतपत दृढ असावेत ;)

In reply to by प्यारे१

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 18:41
बाअकी लवकरात लवकर भेट होण्याबाबत सहमत असलो तरी गणपती किंवा दिवाळीपर्यंत थांबावं लागेलच असं दिसतंय. :( (मी भारताबाहेर असतो हे बराक ओबामाला आणि सूडला सुद्धा ;) माहिती आहे)

In reply to by प्यारे१

(मी भारताबाहेर असतो हे बराक ओबामाला आणि सूडला सुद्धा Wink माहिती आहे) काळजी करू नका हो. श्रीयूत Abdelaziz Bouteflika यांची ओळख काढू आपण.

चाणक्य Wed, 05/07/2014 - 14:23
सलाम तुम्हाला आणि तुमच्यासारख्या खरे नायक असणा-या अधिका-यांना. जपून रहा. अजून काय सांगणार.

गुलाम Wed, 05/07/2014 - 15:03
सलाम तुमच्या धैर्याला!! अजुन काय बोलु.. तुमच्यासारखे काही लोक आहेत म्हणुनच सिस्टीमवरचा विश्वास अजुन पुर्ण उडाला नाहिये. तुमची परवानगी असेल तर फेसबुकवर या लेखाची लिंक शेअर करावी म्हणतोय..

In reply to by गुलाम

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 16:31
तुझ्या सदिच्छेसाठी धन्यवाद, मित्रा, पण अजूनतरी "कंडक्ट रुल्स"च्या लफड्यात पडायची इच्छा नाही, म्हणून चेपुवर असूच दे. वाटल्यास मित्रांना वाचायला सांगू शकतोस मेसेजेसमधून.. धन्यवाद..

कुसुमावती Wed, 05/07/2014 - 15:29
तुम्हाला काही सल्ला देण्याची माझी लायकी नाही. _/\_ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

चतुरंग Wed, 05/07/2014 - 16:15
पेपरात अशा गोष्टी वाचतो तेव्हा त्याच्याशी इतके जोडलेले नसतो परंतु आपल्या ओळखीचा चेहेरा यात गुंतलेला असणे याचा धक्का काहीच्याकाही जास्त असतो. सलाम__/\__. काळजी घ्या. अगदी जवळचा नातेवाईक तुमच्यासारख्याच पोस्टमधून कामे केलेला असल्याने ताण काय असतो याची कल्पना आहे. आणखी काय सांगू? माझ्या मित्राने त्याच्या मावसभावाबद्दल सांगितलेली घटना आठवली. तो भाऊ आणि एक सहकारी काश्मीर बॉर्डरवर गस्त घालत होते. तिन्हीसांजेची वेळ. पाकिस्तान साईडने गोळीबार झाला. गोळ्यांचा आवाज ऐकताच दोघे जमिनीवर झेपावून आडवे पडले. पडत असतानाच दगडावरुन रिकोशे होऊन आलेली एक गोळी त्याच्या सहकार्‍याच्या उजव्या कानशिलावर लागली. तो जोरात ओरडला. काही मिनिटे गेल्यावर सहकारी हालचाल करत नाही हे बघून भावाने त्या पालथ्या शरीराला उताणे केले तर त्याच्या डोक्याचा डावा भाग पूर्णपणे उध्वस्त झालेला त्याला दिसला (रिकोशे झालेली गोळी फिरत जाते त्यामुळे ज्याबाजूने बाहेर पडते तो भाग पूर्ण फाटून निघतो!). त्याही स्थितीत सहकार्‍याला खांद्यावर टाकून हा पठ्ठ्या कसाबसा बेसला पोचला आणि अति मानसिक ताणाने आजारीच पडला. त्याला ताबडतोब महिन्याची रजा देऊन पुण्याला पाठवून दिला त्याच्या साहेबाने!:(

काळा पहाड गुरुवार, 05/08/2014 - 00:05
त्या अफझल गुरू ला अर्धवट राहिलेलं काम पुरं कर म्हणायला हवं होतं. साले निदान ५४४ हरामखोर तरी संपले असते. बाकी तुम्हाला मंत्र्याला/राजकारण्यांना भेटायला मिळत असेल ना? "गायब" करता येतं का बघा एखाद्याला दरोडा घातला होता म्हणून सांगून. तेवढीच देशसेवा.

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/08/2014 - 00:41
आपण वाचत आहोत ते थरारक प्रकरण सत्य आहे हे वाचाताना सतत जाणवत राहिले... फेबुवरती गाडीचे फोटो पाहिले होते ... अजून काय लिहिणार? .काळजी घ्या राव...

साती गुरुवार, 05/08/2014 - 08:47
तुमच्या धडाडीबद्दल कौतुक. काळजी घ्या. तुमच्या कार्याबद्दल आदर. पण सरकारी सेवेत कार्यरत असताना तुम्हाला अशी माहिती प्रसिद्ध करायला परवानगी आहे का? जर नसेल तर फेसबुक/ ब्लॉगवरचे लेखन वाचून तुमच्यावर कोणी कारवाई करू शकेल का? माझ्यामते इतके डिटेल्स पब्लिक फोरमवर टाकू नयेत. कोण त्यांचा आपल्याविरुद्ध कसा वापर करेल सांगता येत नाही. बाकी तुमच्याबद्दल काय म्हणणार? इतका पराक्रमी शिवाजी जन्माला यावा तर दुसर्यांच्या घरी असे वाटते. आमच्या मिपाकुटूंबातल्या कुणावर असा शिवाजी व्हायची वेळ आली तर मात्रं आमचं धाबं दणाणतं. काळजी घ्या. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतोय आणि अजून चांगले काम करायची इच्छा आहे तोपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात यश आणि सुरक्षितता मिळो ही सदिच्छा!

In reply to by साती

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 10:22
लिखाण कोणा साहेबाबद्दल आहे. फेसबुकवरची पोस्ट ही एखाद्या पेपरमधे बातमी येते तशी आणि तेवढीच होती. शिवाय साहेब, चिगो आणि फेसबुकवर लिहिणारा हे एकच आहेत असं कोणी म्हणू शकत नाही.

In reply to by पैसा

साती गुरुवार, 05/08/2014 - 12:53
चिगो यांच्या मिपा प्रोफाईलमध्ये त्यांचे खरे नाव आणि इतर काही खाजगी माहिती आहे. तसेच साहेबांवरच्या हल्ल्याचे डीटेल्स इथे तारीखवार गावासकट आहेत. खालील प्रश्नांना चिगोंनी स्वतः उत्तरे दिली आहेत. आणि अगदी टोपण्नावानेही हे प्रसिद्ध करणे रिस्कीच. पुरावा संपर्कातून पाठवत आहे.

In reply to by साती

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 15:48
सरकारी सेवेत कार्यरत असताना तुम्हाला अशी माहिती प्रसिद्ध करायला परवानगी आहे का?
जी माहिती जनतेला मिळायचा हक्क आहे ती इथे आली तर फार त्रास नसावा. तुम्ही स्वत: एफ आय आर ची प्रत पहायला मागु शकता. त्यामुळे इथे काही बोलले गेले तर फरक पड़त नसावा, राहिली गोष्ट सरकार दरबारी नोंद नसलेल्या माहितीची ती सुधा देशाच्या सुरक्षेला बाधा आणत नसेल तर आत्मचरित्र म्हणून साहेब उघड करू शकत असावेत

आतिवास Tue, 05/06/2014 - 22:54
अवघड आहे. :-( प्रत्यक्ष काम करणं खरंच नेहमी अवघड असतं. काळजी घ्या स्वतःची. शुभेच्छा आहेतच नेहमी.

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:00
काळजी घ्यावी... खरं तर काहीही सुचत/समजत नाही. नशीब आपले साथ देत राहो हीच माझी इश्वराकडे प्रार्थना.

पैसा Tue, 05/06/2014 - 23:11
साहेबा, त्या दिवशी फेसबुकवर लिहिलं होतंस ती फक्त झलक होती! त्याच्या मागे एवढं रामायण... वाटलं होतंच की तू कोणाच्या तरी शेपटीवर पाय दिला असणार. मला तिथले पोलीस, राजकारणी, लोक कोणाचाच विश्वास वाटत नाही. कोणाचाही कसलाही दबाव टाकून परत यायचं बघ. ३/४ महिन्यात २ जिवावरचे हल्ले... दर वेळेला नशीब साथ देईल का? खड्ड्यात गेली ती नोकरी. दोन्ही वेळी पोलीस चोरीचा प्रयत्न म्हणतात म्हणजे त्यांना काही करायचं नाहीये. आणि "कल हो न हो" म्हणू नको. बायको पोराबरोबर अख्खं आयुष्य जायचंय अजून. तिथून कसं बाहेर पडता येईल हाच पहिला विचार कर.

In reply to by पैसा

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:31
एक तर स्ट्रेटेजिकली त्वरीत काही बंधने किंचीत सौम्य करुन (तातपुरत्या) माघारीचे Gesture द्यावे, त्यांना इतर कार्यात गुंतवता येइल ते बघावे. आणी बळकट सुरक्षा व्यवस्था बाळगुन ठेवीले अनंते तैसेची रहावे मानत फार बदल करायच्या फंदात न पडता चालु कालखंड व्यतीत करावा. जमेल ती चांगली कामे ताकतवान विरोधक निर्माण न करताच शक्य असेल तरच पार पाडुन संधी येताच बाजुला व्हावे. खरे तर साहेबांना सल्ला द्यायचा हक्कच/लायकीच नाही. अतिशय लहान तोंडी मोठा घास घेतलाय, अडखळलाय, ठसकाही आहे, पण त्यामागे फक्त भावनीकता आहे, साहेबांच्या अडचणीवर उपाय माहीत असल्याचे (चुकुनही) प्रदर्शन वा आशा नाही :(

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 23:44
ताबडतोप दिर्घ रजा टाकायला हवी. हा पळपुटेपणा नाहीये, पण जर सोबतची मोठी व्यवस्थाच(लोकंच) आपला पध्दतशीर बळीचा बकरा बनवु पहात आहे तर एकट्याने लढत देण्यात तरी काय उपयोग. कठीण आहे.

In reply to by आत्मशून्य

@आपला पध्दतशीर बळीचा बकरा बनवु पहात आहे तर एकट्याने लढत देण्यात तरी काय उपयोग. कठीण आहे.>>>> हेच...हेच मनात येतं आहे.

हे लिहितांना सगळ्या प्रसंगाची पुनरावृत्ती तुमच्या स्मृती पटलावरून तराळून गेली असेल. आमच्यापर्यंत हा अनुभव पोहोचवल्याबद्दल आभार.

अर्धवटराव Wed, 05/07/2014 - 01:23
सर्कारी लोक्स अगदी एकजात भ्रष्ट. म्हणुन तर एकदम नवी कोरी सिस्टीम आणणार आहोत आम्हि. अवांतर( खरं तर महत्वाचं) : सायबानु.. जरा जपुन. इथे सर्वच रात्री वैर्‍याच्या आहेत. :(

संदीप चित्रे Wed, 05/07/2014 - 01:32
असं आता आमच्या आय्.टी. क्षेत्रातला कुणीही म्हणाला की हा लेख आठवेल आणि त्या माणसाची कींव वाटेल! बाकी काळजी घ्या! सल्ला वगैरे देऊ शकत नाही कारण अशाप्रकारे काम करण्याचा अनुभवही नाहीये!

काय प्रतिक्रिया देणार खरंच. विचार करूनही अस्वस्थ वाटतं. आणि हा थरार इतका जवळून अनुभवून तुम्ही तो अत्यंत शांतपणे आणि संयमाने इथे मांडलाय यासाठी +१. अनेकानेक शुभेच्छा!

दिव्यश्री Wed, 05/07/2014 - 01:46
शिक्षण , अनुभव ई. सगळ्याच बाबतीत लहान आहे मी आपल्यापेक्षा . फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते कि स्वतःची काळजी घ्या . चेपुवर वाचायची हिम्मत सुद्धा झाली नाही माझी तर . देव करो माझ आयुष्य तुम्हाला लाभो .

बहुगुणी Wed, 05/07/2014 - 01:55
प्रतिकूल परिस्थितीतही चांगलं काम करणार्‍या 'आळश्यांचा राजा', तुम्ही, अशा ध्येयवादी आदर्श व्यक्तिंचा अभिमान वाटतो. पण तुम्ही लोकं असा जीवाला धोके गृहीत धरता याचं वाईटही वाटतं आणि खेदही वाटतो. आसाम-मेघालयातली परिस्थिती हळूहळू सुधारेलही कदाचित तुमच्यासारख्यांच्या कामाने, पण व्यक्तिशः तुमच्यापुरतं सामाजिक कर्तव्यपालन पुरेसं करून झालंय असं वाटतं. शिर सलामत तो पगडी पचास! ध्येय-निष्ठा वगैरे ठीक आहे, पण लहान मूल आणि वाट पहाणारे कुटुंबिय असतील तर मला वाटतं तुम्ही इतरत्र 'पोस्टींग' शोधावं जिथे तुमच्या कामाची किंमत ठेवणारे आणि तुमच्या मार्गात असे अडथळे न आणणारे वरिष्ठ/ पोलिस आधिकारी असतील.

In reply to by बहुगुणी

स्पंदना Wed, 05/07/2014 - 03:40
हो चिगो! तुमचच वाक्य तुम्हाला सांगते
गेलेल्या व्यक्तीची भरपाई कुठलाच आणि कितीही पैसा करु शकत नाही.
समाजाला मिळतील कार्यकर्ते पण घरच्यांना कोण हो? टाका रजा अन निघा तेथुन. वाचवत नाही आहे. प्रचंड राग येतो आहे नपुसंक शासनाचा. किती किती खाणार आहेत हे लोक?

निनाद Wed, 05/07/2014 - 05:23
बापरे! किती जबरदस्त काम करत आहात याचा प्रत्यय येतो आहे. मात्र यात पोलिस व्यवस्था तुमच्या बाजूने कशी उभी राहील हे पाहणेही जरूरीचे आहे असे वाटते. आपल्या बाजूने सिस्टिम नसेल तर काम करणे अजून कठीण कठीण आहे. घेतलेले कार्य अवघड आहे हे दिसतेच आहे. काही व्यक्तिगत बैठका घेऊन पोलिस दलास आपल्या बाजूला वळवणे, त्यांच्याशी चांगले संबंध राखणे अतिआवश्यक वाटते आहे. तसेही जिल्हाधिकारी या पदाने पोलिसदल आणि न्याय प्रशासन (काही प्रमाणात) तुमच्या अधिकारात असले पाहिजेत ना? मग त्यावर तुमचा दबाव असला पाहिजे. ते फक्त दरोड्या प्रयत्न असा गुन्हा नोंदवण्याची मनमानी कसे काय करू शकतात? दोन वेळा असा प्रयत्न झाल्याने आता 'खुनाचा प्रयत्न' हा गुन्हा नोंदवण्यासाठी तुम्ही आग्रही रहायला पाहिजे असे माझे मत आहे.

In reply to by निनाद

चिगो Wed, 05/07/2014 - 09:02
मान्य आहे, मित्रा.. दबाव आणू शकतो, पण आतापर्यंत तरी पोलिसांच्या कामात कधीच आडकाठी घातली नाही किंवा ढवळाढवळ केली नाही. जे मी माझ्या बाबतीत होणं नापसंत करतो, ते मी दुसर्‍यांच्या कामाच्या बाबतीत कसा करु? पण आता ढवळाढवळ नाही तरी किमान दखल घ्यायला लावावीच लागेल, हे कळतंय आणि वळतंय. बघुयात, काय करता येईल ते आणि होतंय ते.. धन्यवाद..

In reply to by चिगो

निनाद Wed, 05/07/2014 - 09:08
तुम्ही त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही आहात. ते तुम्च्या कामात करतायेत! गोळी तुमच्यावर झाडली गेली आहे. तुम्ही म्हणायला हवे की की हा खुनाचा प्रयत्न आहे. आता गोळी झाडली गेली आहे. तीही तुमच्या दिशेने. देवाच्या कृपेने वाचलात! अजून काय मोटिव्हेशन मिळायची वाट पाहायची खुनाचा प्रयत्न हा गुन्हा नोंदवण्यासाठी? (फक्त गवगवा टाळा किंवा करा - जे तुमच्या साठी त्या भागात योग्य असेल ते.)

In reply to by निनाद

चिगो Wed, 05/07/2014 - 09:40
आता पुन्हा एकदा सगळ्या एफ आर आय पाहिल्या.. केलीय. भादंवि कलम ३०७ खाली नोंद केलीय. (आता त्यासाठी स्वतः तक्रार करेपर्यंत वाट पाहीलीय, ही गोष्ट अलहीदा.. दोन्ही-तिन्ही गुन्हे दखलपात्र असल्याने पोलिस स्वतःच गुन्हा नोंदवू शकतात खरेतर) सरकारची मजबुरीपण समजू शकतो मी, धोका आहे हे उघडपणे मान्य न करण्याची.. आणि म्हणूनच प्रेससमोर ह्या दोन्ही घटना " किरकोळ गुन्हेगारांद्वारे केलेल्या दरोड्याच्या / वाटमारीच्या घटवाटमारीच्या दाखवण्यात आल्यात. आता पुढे काय करायचं आणि करतात, ते बघुयात. पुन्हा एकदा सांगतोय. ही काही कुण्या "प्रामाणिक अधिकार्‍याची सिस्टमविरुद्धची लढाई किंवा कैफीयत" नाहीये. मी सिस्टमचाच भाग आहे, आणि सिस्टमच्या क्षमते/कमतरतेनुसारच मला काम करावं लागेल हेपण ठाऊक आहे.. कदाचित हा असला काहीतरी लेख लिहीणे हे सुद्धा चुकीचे असेल. मुद्दा तोच आहे, जो शेवटी मांडलाय. कुणाहीबद्दल मत बनवतांना नाण्याला दुसरी बाजू असते, हे लक्षात ठेवावं. किंवा त्याही पेक्षा कुणीतरी बोलल्याप्रमाणे "Everything has three sides. Mine, yours and the true one.." धन्यवाद..

In reply to by चिगो

पैसा Wed, 05/07/2014 - 10:06
ही काही कुण्या "प्रामाणिक अधिकार्‍याची सिस्टमविरुद्धची लढाई किंवा कैफीयत" नाहीये. मी सिस्टमचाच भाग आहे,
अगदी मान्य आहे, आणि सिस्टीम बदलणे एकदुकट्याचं काम नव्हेच. हेच म्हणते, तू शक्य तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केलास, पण हुतात्मा व्हायची काही गरज नाही. सैन्यात जाणार्‍या मुलाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाचा जीव सतत संकटात असणार आहे, एका सरकारी अधिकार्‍याच्या आईने त्या टेन्शनखाली का रहावं? सरकारला काय आणि तिर्‍हाईताला काय अ च्या जागी ब एवढाच फरक पडणार असतो. काही झालं तर लोक जरा हळहळतात आणि आपल्या कामाला लागतात. परिणाम होतो तो जवळच्या माणसांवर. तिथल्या लोकांची अपेक्षाही जिल्ह्याला एक अधिकारी पाहिजे एवढीच असावी. शिवाय बांगला देश बॉर्डर, आणि चिन्यांचा हस्तक्षेप काय काय ब्रह्मांड असेल देवजाणे. || कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता? इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों || तू दगड मारून बघितलास. तो परत आपल्या अंगावर येऊन पडता कामा नये.

In reply to by पैसा

मदनबाण गुरुवार, 05/08/2014 - 11:48
तू शक्य तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न केलास, पण हुतात्मा व्हायची काही गरज नाही. पै ताय शी सहमत ! स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या... जाता जाता :- सिर सलामत तो पगडी पचास !

In reply to by चिगो

स्पंदना Wed, 05/07/2014 - 10:14
चिगो तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर असणारे तुमच्या सहकार्‍यांच्या जीवाला सुद्धा धोका नाही का? ही गोश्ट तुम्ही समजुन घेउन पोलीसांवर दबाव आणला पाहीजे. कारण आता म्हणु नये अन देव न करो पण त्या जागी हजर असणार्‍या सगळ्यांनाच धोका असणार आहे ना? म्हणुन तुमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीपण तुम्ही तुमचा अधिकार वापरला पाहिजे. सच्च्या बरोबर सच्च अन खोट्या बरोबर खोटच वर्तन ठेवा बा! त्याच्याशी कशाला सच्चं वागायच?

श्रीरंग_जोशी Wed, 05/07/2014 - 07:49
इशान्य भारतात एक कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी आपल्या अधिकारकक्षेत राहून मर्यादित साधनांच्या मदतीने न्याय्य कामे करू पाहतो ही खरच सकारात्मक बाब आहे. त्याच वेळी व्यवस्थेतील ज्या इतर घटकांनी त्याची साथ द्यायला हवी तेच आपल्या कर्तव्यात कसर ठेवताहेत हे अत्यंत दुर्दैवी. तुमचे अनुभवकथन वाचून एका तपापूर्वी वाचलेले ज्युलिओ रिबेरो यांचे बुलेट फॉर बुलेट हे पुस्तक आठवले.

अजया Wed, 05/07/2014 - 07:57
तुम्ही रोज दिसेपर्यंत किंवा तुमचा फोन येइपर्यंत घरच्यांचे काय होत असेल, कल्पनाच करवत नाही. काळजी घ्या ,स्वत:साठी आणि त्यांच्यासाठी देखिल.

साहेब, अनौपचारिक ग्प्पात चिगोवर हल्ला झाला असं कळलं होतं आणि चिंता लागलीच होती. लेख वाचला भीती, थरार, आणि जीवन मरणाचा अनुभव हे सर्व वेगळंच आहे...! साहेब, वर पैने जसा सल्ला दिला तसाच मीही देतो. मंत्री-संत्रीला भेटून वशीला लावून सुरक्षीत झोनमधे बदली करुनच घ्या. असं जीवावर बेतणा-याला प्रसंगाला सामोरं जायचं यापुढे कारण नाही. निनाद म्हणतो तसा पोलीस आपल्या ताब्यात आहेत, सुरक्षीतता याला आपण महत्त्व द्यावं अस्सच मला वाटतंय. साहेब, व्यवस्था साली लै बरबटलेली आहे, आपल्या एकट्याने आपण हे सर्व स्वच्छ करताय. केवळ सिंपली ग्रेट. पण कधी कधी वाटतं. आपलं आयुष्य धोक्यात घालून असल्या नसत्या झकमा-या नको, असं माझं मत आहे, हे नावडणारं मत आहे, हे मला माहिती आहे. साहेब, तब्येत सांभाळा. काळजी घ्या. मिपावर मनमोकळेपणाने बोललात...आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. पण असली रिस्क नको बस... आणि साहेब, तृतीयपुरुषी निवेदन उत्तम जमलंय. लिहित राहा. बोलत राहा. वी आर अल्वेज वीथ यु...! -दिलीप बिरुटे

चिगो Wed, 05/07/2014 - 10:48
धन्यवाद, दोस्तहो ! पैसातै, तू बोलतेयस ते अगदी योग्य आहे..
सैन्यात जाणार्‍या मुलाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाचा जीव सतत संकटात असणार आहे, एका सरकारी अधिकार्‍याच्या आईने त्या टेन्शनखाली का रहावं?
हेच मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, की साहेबलोक्स, गोळ्या खाणे हा माझा "ऑक्युपेशनल हजार्ड" नाहीये..
काही झालं तर लोक जरा हळहळतात आणि आपल्या कामाला लागतात.
मी जिथं आहे, तिथं लोकांच्या हळहळण्याची पण खात्री देता येत नाही. माझ्यासमोर इलेक्ट्रोक्युशननी मेलेल्या माणसाची भाऊ आणि बहीण पंधरा मिन्टात स्वतःला सावरुन त्याला गाडायला घेऊन गेले, पंचनामा झाल्या झाल्या.. मी अर्धा तास थरथरत होतो. रात्रीची झोप उडाली ती वेगळीच. मारणे आणि मरणे इज नॉट अ‍ॅट ऑल अ बिग डील, बॉस..
परिणाम होतो तो जवळच्या माणसांवर.
हे प्रत्यक्षच अनुभवतोय..
चिगो तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर असणारे तुमच्या सहकार्‍यांच्या जीवाला सुद्धा धोका नाही का?
हेच मला म्हणायचंय आणि सांगायचंय, अपर्णातै.. गोळी कुणासाठी होती आणि जखमी कोण झालंय? प्राडॉ, निनाद, पैतै, अर्धवटराव, आत्मशून्य आणि सगळ्या प्रतिसादक मित्र/मैत्रिणी/ ताई/माई/ दादा लोक्स.. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.. चला, येतो.. अजून निवडणुकीचा निकाल लावायचा आहे जिल्ह्यात बसून..

मृत्युन्जय Wed, 05/07/2014 - 11:51
तुम्हाला अनेक शुभेच्छा. तसा तुम्हाला काही धोका नाही म्हणा. पोलिसच तसे म्हणतात म्हणजे नसावाच ;). पण तरीही सांभाळुन रहा आणि हो आता ट्र्कपासुन १०० फूट लांब राहत जा :)

In reply to by मृत्युन्जय

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 17:43
पोलिसच तसे म्हणतात म्हणजे नसावाच ;-)
आक्षी बरुबर..
आणि हो आता ट्र्कपासुन १०० फूट लांब राहत जा
हा हा.. हे एकदम बरोबर बोललात.. आता मला "ट्रकोफोबिया" व्हायला लागलाय. ;-) म्हणजे, ट्रकच्या मागे गाडी थांबवायला लागली की आपोआप ठोके वाढतात आणि नर्व्हस व्हायला होतं. बघुया, किती दिवस राहतो हा फोबिया ते..

बाबा पाटील Wed, 05/07/2014 - 12:00
खर तर पहिले तुमच्या हिमतीला सलाम पण विनाकारण शहिद होण्याचा प्रयत्न करु नका स्वतःच्या सुरक्षिततेची अधिकादिक काळजी घ्या,तुम्ही डी.एम.च्या पोस्ट वर आहात तर एस.पी.तुमच्या अंडर काम करतात अश्या वेळी पोलिसखाते अश्याप्रकारे वागतय हे अनाकलनिय आहे कारण तुमच्या आदेशाशिवाय त्यांना काहीही काम करता येणे अवघड आहे,आता पुर्वांचल मध्ये कशा प्रकारे नियम आहेत याची मला कल्पना नाही. तरी जर तिथले पोलिस प्रशासन जिल्हाधिकारांची सुरक्षा करु शकत नसेल तर तुम्हाला सरळ तेथिल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करता येइल आणी माझ्या माहिती प्रमाणे त्याची अतिशय तातडीने त्याची दखल घेण्यात येइल. समजा जर मुख्यमंत्रीही जर कानाडोळा करत असतील तर तुम्ही दिल्लीत सरळ गृहमंत्र्यांना भेटता येइल.आणी जे आपल्या सुदैवाने महाराष्ट्रीयन आहेत व जे मराठी अधिकार्‍यांना सहजासहजी वार्‍यावर सोडत नाहीत.दुसरी गोष्ट समजा काही कारणाने त्यांचीही वेळ मिळु शकली नाही तर थोरल्या पवारांची नक्की वेळ मिळेल आणी हा माणुस त्यांच्या संपर्कात आलेल्या कुठल्याच मराठी अधिकार्‍याला बाहेरच्या ठिकाणी अडचणीत येवु देत नाही.असा आतापर्यंतचा तरी अनुभव आहे. समजा १७ नंतर सरकार जरी बदलले तरी गडकरी तेथे सत्तास्थानात असतील ते आणी पवार या बाबतीत सारखेच आहेत्,फक्त गडकरींच्या पुढे उभे राहिल्यावर थोड्याफार रांगड्या वर्‍हाडी शब्द एकण्याची तयारी ठेवावी. तुमच काम निच्छितच चांगल आहे फक्त सद्य परिस्थितीनुसार अस दिसतय की तुम्ही तुमचे अधिकार योग्य रित्या वापरत नाही. नाही तर अशी वेळ आली नसती. दुसरे म्हणजे जर आपली मराठी माणसे दिल्लीत अतिशय वरिष्ठ पदावर असताना त्यांच्या पदाचा योग्य दबाव तुम्ही निर्माण करत नसाल तर ते दुर्देव आहे.प्रशासनात जर तुम्हाला निर्भिड पणे काम करावयाचे असेल तर तुम्हाला या गोष्टी करण भाग आहे.तुमच्या पाठीवर कोनाचातरी वरदहस्त निर्माण केलाच पाहिजे.अन्यथा हकनाहक बळी पडाल दुसरे काही नाही. व त्याचा परिणाम त्या संपुर्ण जिल्ह्यावर नाही तर राज्यावर होइल. मग कुठलाच अधिकारी निर्भिडपणे काम करणार नाही. थोडासा भगवान कृष्ण आणी आपले शिवछत्रपती समजावुन घ्या योग्य उत्तरे मिळतील.त्यांच्या वर हल्ले झाले नाहीत का ? ,नक्कीच झाले होते पण ते हात त्यांच्या पर्यंत पोहचण्या आधीच कलम केले जायचे,याचा मतितार्थ समाजावुन घ्या. बाकी तुमच्या कार्यास सुयश मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

In reply to by बाबा पाटील

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 12:32
पाटील, तुम्ही म्हणता ते योग्य आहे.
फक्त सद्य परिस्थितीनुसार अस दिसतय की तुम्ही तुमचे अधिकार योग्य रित्या वापरत नाही.
असू शकेल, आता तुम्ही म्हणताच आहात तर. जेव्हा पोलिसांनी हा पण हल्ला हलक्यात घ्यायला पाहीलं, तेव्हा मी माझ्या अधिकारांचा योग्य तो वापर केला. आणि सिक्युरीटी वाढवून घेतली. कसं आहे ना, पाटील.. माणसानं जीवाला जपावं, नक्कीच जपावं. पण मी जर प्रत्येकाकडेच संशयानं पाहायला लागलो, तर ह्या नोकरीतरी काम करणं अशक्य आहे मला. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याची अक्षम्य चुक झाली म्हणा, पण ती सुधारावी म्हणतो आता.. रोखठोक प्रतिसादासाठी धन्यवाद..

In reply to by चिगो

बाबा पाटील गुरुवार, 05/08/2014 - 13:23
तुम्हा लोकांची या देशासाठी गरज आहे.माझ्या आयुष्यात मी फार कमी निस्पृह आणी धाडसी अधिकारी पाहिलेत्,आणी वेड धाडस करणार्‍यांच काय होत ते ही पाहिलय.काळजी वाटली म्हणुन लिहील.बाकी समर्थ आहातच.आई भवानी संभाळुन घेइल.

मैत्र Wed, 05/07/2014 - 12:11
तुमच्या जिद्दीला आणि कर्तव्यनिष्ठेला! आमच्यासारखे शहरी नोकरदार तुम्हाला काय सल्ला देणार? काळजी घ्या. स्ट्रॅटेजिकली भिडा. प्रत्येक वेळी थेट लढून मंजूनाथ शण्मुगम होऊन काय उपयोग.. तुमचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि मिपाकर हळहळतील. पण काम अपुरं राहील. माझ्या दुर्दैवाने तुमची लेखमाला आजवर वाचली नव्हती. ती वाचली आणि तुमच्या जिद्द आणि चिकाटीची कल्पना आली. त्यात एका प्रतिसादात तुम्ही स्वतः एक वाक्य लिहिलं आहे -- ," Success is not absence of failures. It means reaching your ultimate goal. It is about winning the War, not every battle." तुमचे श्रद्धास्थान तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि सामर्थ्य देवो ..

मृत्यू केव्हा आणि कसा यावा हे आपल्या हातात नाही. सबब, निडरपणे कार्यरत राहा. मागे हटणं एखाद्याच्या स्वभावातच नसतं आणि तू तसा आहेस. तस्मात, जोपर्यंत आहोत, तोपर्यंत विवेकबुद्धीला सार्थ वाटेल, ते करणं श्रेयस. अतिरेकी पैशासाठी काम करतो आणि तो मार्ग चुकलेला असतो. विकासाची संधी मिळाली तर कुणी हिंसक होणार नाही. निर्लज्ज नेत्यांना जनताच पदच्युत करू शकते ही जाणीव लोकांना व्ह्यायला हवी. गारो हिल्समध्ये, अतिरेकी चिगोला मित्र मानोत आणि हिंसेपासून परावृत्त होवोत, वंचीतांसाठी चिगो देव बनो आणि त्याच्या प्रयत्नातून त्या भूमीत शांतता आणि सौहार्द नांदो अशी अस्तित्वाकडे प्रार्थना करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 16:26
आशावादासाठी धन्यवाद, संक्षी.. पण
गारो हिल्समध्ये, अतिरेकी चिगोला मित्र मानोत आणि हिंसेपासून परावृत्त होवोत, वंचीतांसाठी चिगो देव बनो आणि त्याच्या प्रयत्नातून त्या भूमीत शांतता आणि सौहार्द नांदो
हे होणे नाही ! मागच्या तीन वर्षांपासून ह्या भागात काम करतोय आणि परिस्थिती बघतोय, तेव्हा ही भाबडी आशा मी तरी ठेऊ शकत नाही.. त्यातल्या त्यात इथे दिड वर्ष म्हणजे कुण्याही ऑफीसरच्या पोस्टींगच्या डोक्यावरुन पाणी! मी इथे जे काही करतोय, केलंय ते "स्वांतसुखाय" केलंय. त्यामागे ना देव बनण्याची इच्छा होती ना आहे.. देश आणि प्रदेश असे जादुची कांडी फिरवल्यासारखे बदलत नाही, हे पण चांगलंच ठावूक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सदिच्छेसाठी आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.. पर शहीद होके जंग जिती नहीं जाती, हेपण ठाऊक असल्याने "थॅन्क्स बट नो थॅन्क्स.."

In reply to by चिगो

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 18:26
पर शहीद होके जंग जिती नहीं जाती १०००% खरं. माझ्या अत्यंत आवडीचं जनरल पॅटनचं वाक्य... "No bastard wins war by dying for his country; but by making the other bastard die for his !" * यातली शिवीगाळ सोडा (पॅटन लईच फाटक्या तोंडाचा होता)... पण भावनाओंको समझो !

In reply to by चिगो

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/08/2014 - 21:34
हे मान्य. आणि मृत्यू आपल्या हाती नसला तरी चांगल्या कामासाठी कुणी शहीद व्हावं असाही प्रतिसादाचा अर्थ नाही. पण मग हे असंच चालायच का? How an officer like you looks at the situation?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/08/2014 - 23:43
एकदम `शहीदगी' किंवा मग `काहीही होणार नाही' या दोन पराकोटींमधे काही तरी पर्याय असायला हवा ना? माझा आशावाद दुर्दम्य असेल पण आशाच संपली तर मग हातात काय उरतं? आपणच निराश झालो तर बदल घडणं असंभव होणार नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

चिगो Fri, 05/09/2014 - 17:13
आपणच निराश झालो तर बदल घडणं असंभव होणार नाही का?
मान्य.. पण परिस्थिती फार आशादायी नाही, हे सत्य मी जवळून अनुभवतोय ना मालक.. असो. आशावाद आवडला, हे मान्यच आहे.. :-)

समीरसूर Wed, 05/07/2014 - 12:23
चिगोसाहेब, मानलं तुम्हाला. इतक्या दुर्गम भागातल्या अतिरेकी संघटना, तिथली स्थानिक मंडळी, मुख्यमंत्री, आमदार, गुंतागुंतीचं राजकारण आणि समाजकारण, तिथली हिंसा, मृत्यूचं भय, कुटुंबाची काळजी, अतिशय निराळं वातावरण आणि अतिशय वेगळी संस्कृती...आणि तिथल्या समस्या, तिथला भ्रष्टाचार, तिथले प्रश्न सोडवण्याची तुमच्या शिरावर (शीर सलामत राहिलच याची शाश्वती नसतांना) असलेली महाकर्मकठीण जबाबदारी! हिकमतीने तुम्ही हे सगळं करताय हे वाचून अभिमान वाटला. आयुष्यात काम करणे ही व्याख्या अक्षरशः जगताय तुम्ही. अर्थात तुमची कुवत, बुद्धिमत्ता, प्रशिक्षण सगळंच असामान्य असल्याने तुमच्याशिवाय ही जबाबदारी कुणी पेलू शकत नाही. वर दिलेल्या प्रतिसादांप्रमाणे मलादेखील असेच वाटते; आपली सिस्टीम बदलवण्याचा फार हट्ट धरणे म्हणजे जीवाला कायमाचा धोका! कुटुंबाला धोका! देव न करो, काही बरे-वाईट झाल्यास नंतर 'शहीद' म्हणून चार लोकांची कोरडी सहानुभूती! हा सौदा परवडत नाही. अजिबात परवडत नाही. आपल्या देशात याला सौदाच म्हणावे लागते यासारखे दुर्दैब नाही. आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने होणारा बदल बघणे खूप समाधानकारक असावे पण आपल्या देशात वृत्तीमधला बदल होण्यासाठी कित्येक दशके-शतके जाऊ द्यावी लागतील. इज इट वर्थ पुटींग युअर लाईफ अ‍ॅट रिस्क? इज इट वर्थ पुटींग युअर फॅमिलीज पीस ऑफ माईंड अ‍ॅट रिस्क? विचार करा...काही गोष्टी सोडून दिलेल्या बर्‍या असतात. काही बदल आपल्या स्वप्नांमधून काढून टाकणेच योग्य असते. बाकी तुमच्या कामाच्या आवाक्याची कल्पना आल्यावर मी काय करतोय याची लाज वाटली. मी सध्या बेंचवर आहे. टाईमपास चालू आहे. टिवल्या-बावल्या, टंगळ-मंगळ, टाईमपास असं सगळं चालू आहे. कुवत नसली की असं काम वाट्याला येतं. :-) तुम्हाला खूप शुभेच्छा! पण जरा जपून...

नि३सोलपुरकर Wed, 05/07/2014 - 12:52
काय प्रतिक्रिया देउ कळत नाहिय .... चिगो ,सलाम! तुमच्या जिद्दीला आणि कर्तव्यनिष्ठेला! केवळ _/\_. बाकी शब्द नाहीत.

पिलीयन रायडर Wed, 05/07/2014 - 13:18
अहो चिगो.. सांभाळुन हो.. तुमच्या मागे बायको पोरं आहेत.. माझा नवरा रोज २० किमी गाडी वर जातो तर मी रोज फोन करुन चेक करते की नीट पोहोचला ना.. तुमची बायको हे सगळं कसं सहन करतेय? त्यांना सलाम..!! घरात बसुन उगाच चिंता करत काळ घालवणं फार फार तापदायक असतं.. कितीही म्हणलं तरी मनात भलते सलते विचार येत रहातात.. घरच्यांच्या मनःस्वास्थ्याची काळजी घ्या..

माधुरी विनायक Wed, 05/07/2014 - 13:35
सलाम तुमच्या कर्तव्यनिष्ठेला आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा... वाट बिकट आहे, जपा...

प्यारे१ Wed, 05/07/2014 - 13:40
चिगो, मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू! :) >>> महायत्न सावधपणे| समई धारिष्ट धरणे| अद्भुतचि कार्य करणे| देणे ईश्वराचे|| दासबोध १८-६-१५ >>> जैशास तैसा जेव्हा भेटे| तेव्हा मज्यालसि धाटे| इतुके होते परी धनी कोठे| दृष्टीस न पडे|| दासबोध १९-०९-३१ बहुत काय लिहीणे, आपण सूज्ञ आहातच. चेपु वर अथवा इथं वाचताना तुम्हाला जीवावर बेतावं अथवा आपसुक धाक निर्माण होऊन तुम्ही 'बाजूला' व्हावं अशीच हल्लेखोरांच्या सूत्रधारांची इच्छा दिसतेय. थोडं बॅकफूटवर जाऊन आवश्यक तेवढ्या समाजसुधारणा कराव्यात. ज्या समाजामध्ये मंदिरा च्या समोरच्या चपला सुरक्षित रहात नाहीत त्या समाजाला नेता अथवा अधिकार्‍यांनी सुधारण्यापेक्षा घरातल्या आईबापांनी स्वतः सुधारण्याची जास्त गरज आहे. सावध आहातच. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असो. लायकी नसताना खूप लिहीलं.

In reply to by प्यारे१

चिगो Fri, 05/09/2014 - 17:23
मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू!
माझ्याकडून पार्टी तेव्हा तुला, दोस्ता..

In reply to by प्यारे१

मध्ये भेट होईल न होईल, तुझ्या रिटायरमेण्टला नक्कीच भेटू! मी तर म्हणेन, लवकर भेट व्हावीच एखाद्या कट्ट्याला आणि रिटायरमेण्टचा जंगी कट्टा तर १००% नक्की !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 18:37
सावित्री सत्यवान 'ष्टुरी' मध्ये यम सावित्रीला एकच वर माग म्हणतो... अंध सासूसासर्‍यांबरोबर राज्य गमावलेली निपुत्रिका असलेली सावित्री आपल्या पतीच्या शवाजवळ बसलेली असते. ती एकच वर मागते. म्हणते, माझ्या मुलांनी केलेलं राज्य माझ्या सासूसासर्‍यांनी बघू दे! वरची इच्छा अशीच मल्टी'पदरी' आहे. तू व्यवस्थित धडधाकट असावासच त्याबरोबर मी सुद्धा जिवंत असावं. खाता पिता असावा नि आपले संबंध पार्टी करण्याइतपत दृढ असावेत ;)

In reply to by प्यारे१

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 18:41
बाअकी लवकरात लवकर भेट होण्याबाबत सहमत असलो तरी गणपती किंवा दिवाळीपर्यंत थांबावं लागेलच असं दिसतंय. :( (मी भारताबाहेर असतो हे बराक ओबामाला आणि सूडला सुद्धा ;) माहिती आहे)

In reply to by प्यारे१

(मी भारताबाहेर असतो हे बराक ओबामाला आणि सूडला सुद्धा Wink माहिती आहे) काळजी करू नका हो. श्रीयूत Abdelaziz Bouteflika यांची ओळख काढू आपण.

चाणक्य Wed, 05/07/2014 - 14:23
सलाम तुम्हाला आणि तुमच्यासारख्या खरे नायक असणा-या अधिका-यांना. जपून रहा. अजून काय सांगणार.

गुलाम Wed, 05/07/2014 - 15:03
सलाम तुमच्या धैर्याला!! अजुन काय बोलु.. तुमच्यासारखे काही लोक आहेत म्हणुनच सिस्टीमवरचा विश्वास अजुन पुर्ण उडाला नाहिये. तुमची परवानगी असेल तर फेसबुकवर या लेखाची लिंक शेअर करावी म्हणतोय..

In reply to by गुलाम

चिगो गुरुवार, 05/08/2014 - 16:31
तुझ्या सदिच्छेसाठी धन्यवाद, मित्रा, पण अजूनतरी "कंडक्ट रुल्स"च्या लफड्यात पडायची इच्छा नाही, म्हणून चेपुवर असूच दे. वाटल्यास मित्रांना वाचायला सांगू शकतोस मेसेजेसमधून.. धन्यवाद..

कुसुमावती Wed, 05/07/2014 - 15:29
तुम्हाला काही सल्ला देण्याची माझी लायकी नाही. _/\_ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

चतुरंग Wed, 05/07/2014 - 16:15
पेपरात अशा गोष्टी वाचतो तेव्हा त्याच्याशी इतके जोडलेले नसतो परंतु आपल्या ओळखीचा चेहेरा यात गुंतलेला असणे याचा धक्का काहीच्याकाही जास्त असतो. सलाम__/\__. काळजी घ्या. अगदी जवळचा नातेवाईक तुमच्यासारख्याच पोस्टमधून कामे केलेला असल्याने ताण काय असतो याची कल्पना आहे. आणखी काय सांगू? माझ्या मित्राने त्याच्या मावसभावाबद्दल सांगितलेली घटना आठवली. तो भाऊ आणि एक सहकारी काश्मीर बॉर्डरवर गस्त घालत होते. तिन्हीसांजेची वेळ. पाकिस्तान साईडने गोळीबार झाला. गोळ्यांचा आवाज ऐकताच दोघे जमिनीवर झेपावून आडवे पडले. पडत असतानाच दगडावरुन रिकोशे होऊन आलेली एक गोळी त्याच्या सहकार्‍याच्या उजव्या कानशिलावर लागली. तो जोरात ओरडला. काही मिनिटे गेल्यावर सहकारी हालचाल करत नाही हे बघून भावाने त्या पालथ्या शरीराला उताणे केले तर त्याच्या डोक्याचा डावा भाग पूर्णपणे उध्वस्त झालेला त्याला दिसला (रिकोशे झालेली गोळी फिरत जाते त्यामुळे ज्याबाजूने बाहेर पडते तो भाग पूर्ण फाटून निघतो!). त्याही स्थितीत सहकार्‍याला खांद्यावर टाकून हा पठ्ठ्या कसाबसा बेसला पोचला आणि अति मानसिक ताणाने आजारीच पडला. त्याला ताबडतोब महिन्याची रजा देऊन पुण्याला पाठवून दिला त्याच्या साहेबाने!:(

काळा पहाड गुरुवार, 05/08/2014 - 00:05
त्या अफझल गुरू ला अर्धवट राहिलेलं काम पुरं कर म्हणायला हवं होतं. साले निदान ५४४ हरामखोर तरी संपले असते. बाकी तुम्हाला मंत्र्याला/राजकारण्यांना भेटायला मिळत असेल ना? "गायब" करता येतं का बघा एखाद्याला दरोडा घातला होता म्हणून सांगून. तेवढीच देशसेवा.

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/08/2014 - 00:41
आपण वाचत आहोत ते थरारक प्रकरण सत्य आहे हे वाचाताना सतत जाणवत राहिले... फेबुवरती गाडीचे फोटो पाहिले होते ... अजून काय लिहिणार? .काळजी घ्या राव...

साती गुरुवार, 05/08/2014 - 08:47
तुमच्या धडाडीबद्दल कौतुक. काळजी घ्या. तुमच्या कार्याबद्दल आदर. पण सरकारी सेवेत कार्यरत असताना तुम्हाला अशी माहिती प्रसिद्ध करायला परवानगी आहे का? जर नसेल तर फेसबुक/ ब्लॉगवरचे लेखन वाचून तुमच्यावर कोणी कारवाई करू शकेल का? माझ्यामते इतके डिटेल्स पब्लिक फोरमवर टाकू नयेत. कोण त्यांचा आपल्याविरुद्ध कसा वापर करेल सांगता येत नाही. बाकी तुमच्याबद्दल काय म्हणणार? इतका पराक्रमी शिवाजी जन्माला यावा तर दुसर्यांच्या घरी असे वाटते. आमच्या मिपाकुटूंबातल्या कुणावर असा शिवाजी व्हायची वेळ आली तर मात्रं आमचं धाबं दणाणतं. काळजी घ्या. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतोय आणि अजून चांगले काम करायची इच्छा आहे तोपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात यश आणि सुरक्षितता मिळो ही सदिच्छा!

In reply to by साती

पैसा गुरुवार, 05/08/2014 - 10:22
लिखाण कोणा साहेबाबद्दल आहे. फेसबुकवरची पोस्ट ही एखाद्या पेपरमधे बातमी येते तशी आणि तेवढीच होती. शिवाय साहेब, चिगो आणि फेसबुकवर लिहिणारा हे एकच आहेत असं कोणी म्हणू शकत नाही.

In reply to by पैसा

साती गुरुवार, 05/08/2014 - 12:53
चिगो यांच्या मिपा प्रोफाईलमध्ये त्यांचे खरे नाव आणि इतर काही खाजगी माहिती आहे. तसेच साहेबांवरच्या हल्ल्याचे डीटेल्स इथे तारीखवार गावासकट आहेत. खालील प्रश्नांना चिगोंनी स्वतः उत्तरे दिली आहेत. आणि अगदी टोपण्नावानेही हे प्रसिद्ध करणे रिस्कीच. पुरावा संपर्कातून पाठवत आहे.

In reply to by साती

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 15:48
सरकारी सेवेत कार्यरत असताना तुम्हाला अशी माहिती प्रसिद्ध करायला परवानगी आहे का?
जी माहिती जनतेला मिळायचा हक्क आहे ती इथे आली तर फार त्रास नसावा. तुम्ही स्वत: एफ आय आर ची प्रत पहायला मागु शकता. त्यामुळे इथे काही बोलले गेले तर फरक पड़त नसावा, राहिली गोष्ट सरकार दरबारी नोंद नसलेल्या माहितीची ती सुधा देशाच्या सुरक्षेला बाधा आणत नसेल तर आत्मचरित्र म्हणून साहेब उघड करू शकत असावेत
लेखनविषय:
लेखनप्रकार
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

बागलाण भटकंती - भाग २

सह्यमित्र ·

In reply to by जयंत कुलकर्णी

सह्यमित्र Wed, 05/07/2014 - 11:20
धन्यवाद जयन्त. कॅमेरा निकॉन डी-३१०० आहे. व्हाईट बॅलन्स ऑटो वर ठेवला आहे. नन्तर फोटो एडिट करताना गरजे नुसार बदलला आहे.

शरभ Wed, 05/07/2014 - 12:04
मस्त. फोटो अमळ कमी टाकलेत असं वाटुन गेलं, पण मस्त लिहीलय.

In reply to by जयंत कुलकर्णी

सह्यमित्र Wed, 05/07/2014 - 11:20
धन्यवाद जयन्त. कॅमेरा निकॉन डी-३१०० आहे. व्हाईट बॅलन्स ऑटो वर ठेवला आहे. नन्तर फोटो एडिट करताना गरजे नुसार बदलला आहे.

शरभ Wed, 05/07/2014 - 12:04
मस्त. फोटो अमळ कमी टाकलेत असं वाटुन गेलं, पण मस्त लिहीलय.
बागलाण भटकंती - भाग १ साल्हेर वाडी मध्ये एका टपरी वजा दुकानात चहा मारला आणि त्याच्याच दारात गाडी लावली. साल्हेरवर गुहेत मुक्काम करायचा असल्याने त्या दृष्टीने लागणारी सामुग्री बरोबर घेतली आणि वाटेला लगलो. साल्हेरच्या बाजूला आल्यावर एक गोष्ट जाणविली ती म्हणजे वातावरणातील बदल. मुल्हेर च्या इथले दमट, वारा नसलेले दमाविणारे हवामान इथे नव्ह्ते. मस्त गार वारा वाहत होता. उन्हाचा कडाकाही विशेष नव्हता. गावातून साल्हेर चा सर्वोच्च माथा ढगात लपल्या मुळे दिसत नव्ह्ता. परत एकदा अनुप च्या मार्गदर्शन खाली वाटचाल सुरु केली.

शहीद म्हणजे काय ?

प्रसाद गोडबोले ·

आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.

In reply to by प्रकाश घाटपांडे

.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.
>>> मग अफजल गुरुलाही शहीद मानता येईल की .... रादर आजाद कश्मीर वाले तसे मानतातही :)

शहीद म्हणलं की सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर येतात ते मदनलाल धिंग्रा ... मग खुदीराम बोस ...अनंत कान्हेरे ! पण आज ह्या लोकांची कोणी आठवण ही काढत नाही.. ... आज आपल्याच तमीळ बाधवांच्या बाबत निष्ठुर वागणारे राजीव गांधी शहीद ठराहेत.... ....कालाय तस्मै नमः !

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण Tue, 05/06/2014 - 21:12
काय सांगता? आजकाल शहीद शब्द चालतो काय? शहीद हा शहादत म्हणजे इस्लामसाठी मृत्यू पत्करणारा या अर्थाने निर्माण झालेला शब्द आहे तो आपल्या हुतात्म्यांना वापरू नये असे वाटते. हुताशनीतील आहुती या अर्थाने मदनलाल धिंग्रा प्रभृतींना हुतात्मा म्हणावे!

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 00:21
कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता जो इतरांसाठी स्वतःचे प्राण देतो तो शहीद.
मग नथुराम पण शहीद ठरेल की !

In reply to by प्रसाद गोडबोले

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 01:14
म्हणताय की आणखी दुसरा अर्थ अभिप्रेत आहे ? असो शहीद म्हणजे अशी व्यक्ती जी देशासाठी, त्यातील लोकांसाठी माथेफिरु वैचारीकतेला बळी न पडता प्रसंगी स्वतःचे प्राणही अर्पून जाते ती व्यक्ती शहीद असा माझा समज आहे. (शब्दशः अर्थ माहीत नाही). शहीद विषयावर धागा तो सुधा "जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही .." असे लिहुन या विषयाचे गांभीर्य घालवायचा किळसवाणा प्रयत्न बघुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.

In reply to by प्रसाद गोडबोले

नथुराम शहिद
कसा हो?? जो इतरांसाठी प्राण देतो तो शहीद असे म्हंटलेलय , नथुराम कोणासाठी मेला? संघासाठी?... त्यांनी तर हात वर केले होते.आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असे सांगितले. सावरकरांसाठी??... त्यांचा गांधीहत्येशी कोणताही संबंध नाही असे तेच स्वतः कोर्टात म्हणाले होते. ब्राह्मण हिंदू वगैरेंसाठी??... त्यांनी तर असा कोणताही आदेश नथुरामला दिला नव्हता. स्वतःच्या अतिरेकी विचारातून इतरांचा निघृण खून करणे व त्याचा आळ इतर समाजावर यावा यासाठी दाढी वाढवून, सुंता करणे याला माथेफीरुपणा म्हणतात, शहिद होणे नव्हे.

In reply to by नानासाहेब नेफळे

अखंड भारत नावाचे एक हिंदुराष्ट्र होते ...त्या लोकांसाठी नथुराम हा शहीद होता ...पण आता ते राष्ट्रच उरले नाही त्यामुळे नथुराम शहीद ठरणार नाही ... अजुनही अखंडभारताचे वेडे स्वप्न पाहणारे काही लोक आहेत म्हणे त्यांच्या साठी कदाचित तो शहीद असावा ...नक्की कल्पना नाही . नोट : मी अखंड भारतवादी नाही उलट सावरकर-संघ आदी प्रभृतींना न जुमानता बापुंनी ज्या योग्य प्रकारे फाळणी घडवुन आणली त्याबद्दल त्यांच्या विषयी आदरच आहे ! इथे १५-२०% आवरत नाहीत ३५-४०% असते तर वाटच लागली असती !!

In reply to by नानासाहेब नेफळे

म्हणून ह्या अर्थी आत्मघाती हल्लेखोर तालिबान काही लोकांना शहीद वाटतात. पंजाबात व तामिळनाडू, महाराष्ट्र येथे तेथील लोकात शहीद म्हणून ओळखले जाणारे भारताच्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतात. मुशरफ म्हणूनच गेला आहे. एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. तेव्हा तुम्ही कोणत्या चष्म्यातून पाहतात ते महत्वाचे

In reply to by निनाद मुक्काम …

तुमचा अभिषेक Fri, 05/09/2014 - 00:05
एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. दहशतवादी हा स्वताच्या स्वातंत्र्यासाठीच लढत असेल असे गरजेचे नसते. समोरच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असेल आणि त्यात त्याचा बळी गेला तर त्याला शहीद नाही म्हणता येणार. कसाब हा कोणासाठीही शहीद झाला नाही. अगदी इस्लामसाठीही शहीद झाला नाही. कारण इस्लामच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली नाही की त्याविरुद्ध लढताना त्याने आपले प्राण गमावले. इस्लाम खतरेमे अशी आपणहूनच बांग देऊन आत्मघाताचा मार्ग स्विकारणार्‍यांना शहीद हा शब्द अनफिट !

जेपी Tue, 05/06/2014 - 20:43
ते गांधी परिवार स्वत:च्या चुकुने मेलय . फुकनीच काय शहिद बिहीद नाय. बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा

In reply to by जेपी

मंदार दिलीप जोशी गुरुवार, 05/08/2014 - 15:08
बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा >> (१) त्यासाठी पाक पोलिसांच्या सर्टीफिकेटची गरज नाही (२) निर्दोष याचा अर्थ त्याने सँडर्सचा खून केलाच नाही असा होतो. खून केला तरच तो हुतात्मा. त्याने खून केलाच आहे अशी आमची खात्री आहे. आणि तेच योग्य आहे (खून करणे त्याने)

In reply to by जेपी

तुषार काळभोर गुरुवार, 05/08/2014 - 17:07
सध्या भगतसिंग यांच्या निर्दोषत्वाचा मुद्दा पाकिस्तानात (आणि अर्थातच भारतात) गाजतोय. कुणीतरी तत्कालीन एफ आय आर ची एक प्रत मागवली आणि त्यात म्हणे भगतसिंग यांचे नावच नाही. अर्थात भगतसिंग हे निर्दोष होते. मग त्यांनी जे कॄत्य केले(जे तत्कालिन सरकारने व न्यायव्यवस्थेने गुन्हा ठरवले), व ज्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले, ते त्यांनी केलेच नव्हते का? मग तरीपण त्यांना देशभक्त/क्रांतिकारक म्हणायचे का? आणि जर या न केलेल्या कॄत्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले असेल, तर त्यांना 'शहीद' म्हणायचे का? महत्वाचे: मला भगतसिंग यांच्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहेच. पण हा जो त्यांना निर्दोष ठरवण्याचा अट्टाहास/प्रयत्न चालू आहे, त्याने काय साध्य होणार आहे ? जे कॄत्य त्यांनी केले म्हणुन अभिमान वाटतो, ते त्यांनी केलेच नाही, हे सिद्ध करून त्यांच्या विषयीचा अभिमान वाढेल की कमी होईल?

धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ... अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल Biggrin>>> *ROFL* ================== धाग्याची.. सुर..वात! http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-volley-smiley-emoticon.gif मध्य http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-smash-smiley-emoticon.gif अंत http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/game-set-match-smiley-emoticon.gif *lol* ========== . . . . . . . . . . . . . . . . http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-player-serving-smiley-emoticon.gif

In reply to by सूड

सूड Tue, 05/06/2014 - 21:37
आणि हो. जिलेबी नसून जिलबी असतंय ते!! .....आणखी किती अवांतर हवंय बोला. माताय अवांतर करण्यात तर आपण संक्षींना पण हार जाणार नाय !!

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 21:40
म्हणजे नक्कि काय झाले की तिथे शांतीसेना पाठवायचा निर्णय घ्यावा लागला ? कोणी उहापोह करेल काय ? मानवी हक्काचे कारण पुढे करत साधा श्रीलंका ताब्यात ठेवणे आपल्याला जमले नाही ?

राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे शांतीसेना पाठवली, आपल्याचं तमिळ लोकांना मारलं त्याचा बदला म्हणुन झाली. तस्मात शहीद होऊ शकत नाहीत. ईंदिरा गांधी हत्या= भिंद्रनवाले प्रकरण नडलं. शहिद नाही. म. गांधी= सतत हिंदुंच्या विरोधात भुमिका घेत राहीले. तुम्ही यंव केलं नाही तर मी उपोषण करीन तुम्ही त्यंव केलं नाही तर मी उपोषण करीन असं सतत ब्लॅकमेल केलं. पाकिस्तानला केलेली मदत भोवली. शहिद नाहीत. श. लाला लजपतराय= माझ्या माहितीमधला एकमेव शहिद कॉंग्रेस नेता. ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. शहीद आहेत कारण स्वत:च्या प्राणाची पर्वा नं करता ब्रिटिशांचा विरोध केला. श. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव- खरे शहिद. आत्मकेंद्रीत राजकारणाचे बळी. काँग्रेस चं आणि गांधी घराण्याचं कोणीही शहिद नाही. स्वतःच्या चुकांचे बळी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 01:05
मग या न्यायाने इंदीरागांधी सुधा देशाच्या अखंडतेसाठी बळी गेल्या असे ठरत नाही काय ?

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 07:12
शहीद काय , देशभक्त काय, देशद्रोही काय ही सर्व आपल्या दृष्टीकोनाची लीला आहे. माझ्या मताने कोणत्याही उद्देशाने कार्य करत असताना त्या कार्याची प्रतिक्रिया म्हणून मृत्यू आल्यास त्याला शहीद म्हणता येणार नाही. ही व्याख्या अनेकाना पटणार नाही.या दृष्टीकोनाने सैनिक, राजकारणी, क्रांतिकारक कोणीही शहीद ठरणार नाहीत. तर पंजाबमधे जे निरपराध लोक अतिरेक्यांकडून मारले गेले ते शहीद ठरू शकतात. कोणत्याही युद्धात मग ते सैनिकांचे असो वा क्रांतिकारकांचे वा राजकारण्यांचे दोन्ही बाजूनी युद्ध हा एक अपराधच आहे. त्यात दोन्ही बाजू दोषी असतात.त्याचवेळी युद्ध होत असते.

साती Wed, 05/07/2014 - 07:44
जास्तं वटवट करून संपादकांना रात्रपाळी घडवणारे आयडी अनेक संकेतस्थळावरून दुसर्या सकाळी गायब होतात त्याला 'शहीद होणे ' म्हणतात.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 05/08/2014 - 12:58
अप्रुव्ह कसे काय होतात? आणि लेजिटिमेट आयडी चार चार महिने रखडतात. मग मुळात इतर संस्थळांसारखे तत्काळ सदस्यत्व का देत नाही ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 13:15
+१ पुर्वी सुद्धा हे एकदा विचारुन झालय.. तरीही अजुन एकदा.. सरळ सरळ डु आयडी आहेत हे कळत असताना ते अप्रुव्ह कसे होतात?

In reply to by बाळ सप्रे

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:30
समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ?

In reply to by पैसा

प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 16:03
एका गंभीर धाग्यावर अशा प्रकारे अत्यंत ज्येष्ठ मिपाकरांकडून (बाकीचं अध्याहृत) विनोद केला गेलेला पाहून एक सामान्य मिपाकर म्हणून शरम वाटली. :(

In reply to by प्यारे१

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 16:34
आत्मलज्जा भये आपल्यास जो क्लेश झाला त्याबद्दल दिलगीरी म्हणून समस्त मिपाकरांनी 1 मिनिट शांतता पाळावि असा प्रस्ताव सुचवतो.

In reply to by बाळ सप्रे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/08/2014 - 19:15
@स्प्लिट पर्सनेलिटी http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif असेल तर ते डु आयडी आपापसातच http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif भांडतील ना!! >>> तुफ्फा..............न!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/super-excited-boy-smiley-emoticon.gif मारलय!

In reply to by आत्मशून्य

सूड गुरुवार, 05/08/2014 - 19:36
>>समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ? तुमचे आहेत का दोन आयडी??

मदनबाण Wed, 05/07/2014 - 10:55
हॅहॅहॅ... व्हॉट ए जोक ! ;) या सर्वाला अमेठीचा संदर्भ आहे ना ? गांधी कुटुंबियांच्या जिव्हाळ्याशी संबंध आहे ना अमेठीचा ? घ्या मग भाजपा चे उत्तर ! जाता जाता :- आता विचार करतोय कॉग्रेस,रागा आणि प्रियांका यांना नक्की "विकास" म्हणजे नक्की काय ? आणि याचा "अर्थ" तरी माहित आहे का ? तसेच अमेठी मधल्या लोकांना फक्त भावनात्मक आव्हानावर पोट भरायची इच्छा आहे की त्यांनाही विकास हवा आहे ते येणार्‍या काळात कळेलच. नविन म्हण सांगुन जातो :- यथा मूर्ख प्रजा तथा धुर्त राजा.

जेपी Wed, 05/07/2014 - 18:32
आता धागा निट वाचला . "शहिद मंजे नक्की कात" अस दिसतय. मंजे कात असुन बी धागा काय रंगला नाय.कुनीतरी चुना लावा रे. (मळकरी) जेपी

चित्रगुप्त गुरुवार, 05/08/2014 - 08:24
एकादी मृत व्यक्ती 'शहीद' ठरवली जाते, तेंव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी घडत असलेल्या दिसून येतातः १. त्या व्यक्तीचा मृत्यु हा कुणीतरी घडवून आणलेला असणे. २. सदर व्यक्ती ही अमूक एक देश, समाज वा गटातील लोकांच्या 'हिता'साठी काहीएक कार्य मृत्युपूर्वी करत होती, अशी एकंदरित लोकांची, आणि बहुतेकदा स्वतः त्या व्यक्तीचीही - समजूत असणे. ३. हे कार्य ती व्यक्ती स्वेच्छेने, 'कर्तव्य' भावनेने, निरपेक्षपणे करत असणे, किंवा 'मरावे परि कीर्तीरूपे उरावे' ही आकांक्षा. किंवा: ४. ते कार्य करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवण्यासाठी अन्य व्यक्ती, संस्था, सरकार, इ. ने त्याबद्दल काही वेतन, सुविधा, बक्षीस वगैरे देऊ केलेले असणे. ५. प्रत्यक्ष वेतन, बक्षीस वगैरे खेरीज मरणोपरांत स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरेत चिरकाल सुखोपभोगात, ऐय्याशीत दंग राहण्याची संधी लाभणार असल्याचे आमिष त्या व्यक्तीला दिले गेलेले असणे. ('हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम' अर्थात युद्धात तू मारला गेलास, तर तुला स्वर्ग लाभेल, आणि जिंकलास, तर पृथीचे राज्य भोगशील" ) *** अमूक एका गटातील लोकांनी 'शहीद' ठरवलेली व्यक्ती अन्य गटातील लोकांना अपराधी, पापी, समाजकंटक वगैरे वाटू शकते. बाकी एकंदर 'बघ्या' लोकांना या शहीदांचे काही सोयरसुतक नसते. जुन्या शहीदांच्या नावाने एकादी सुटी मिळते, तर नवीन शहीदांविषयी बातमी एक चटपटीत 'ब्रेकिंग न्यूज' असते. *** काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात. एकादा प्रसिद्ध नेता वा सत्ताधारी 'शहीद' झाला, तर या गोष्टीचे भांडवल करून त्याचे वारस, वंशज वा नामसादृश्याचा फायदा घेणारे बिलंदर त्या शहिदाचे चित्र नोटांवर छापून, गावोगावी रस्त्यांना त्याचे नाव देऊन समाजमानसात त्याची स्मृती जागृत ठेवून पिढ्यान पिढ्या सत्ता उपभोगतात. त्यातून त्या वंशात आणखी कुणी 'शहीद' झाले, तर मग विचारायलाच नको. त्या शहिदांची स्मारके उभी करणे, त्यांचा नावांच्या संस्था काढणे अश्या अनेक खटपटीतून भरपूर बेगमी करता येते. कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. "जरा आंख मे भरलो पानी" वगैरे गाणी रचणारे, गाणारे, ऐकताना डोळ्यातून टिपे काढणारे, कादंबर्‍या-नाटके लिहिणारे, पुतळे बनवणारे, चित्रे-सिनेमे काढणारे, या सर्वांना प्रसिद्धी मिळते ... एकंदरित दुसरे कुणीतरी 'शहीद' होणे, हा बर्‍याच लोकांसाठी 'फायदेमंद' सौदा असतो. ... राहता राहिले त्या शहीदांचे आप्त-स्वकीय. ते काही काळ दु:खी, अस्वस्थ रहातात, आणि शेवटी ते ही 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे' या सर्वव्यापी नियतीच्या अटळ गतीस प्राप्त होतात.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 22:27
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात. कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. याचा रोख या लेखावर्ही आहे असा सौंशय येतोय =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 22:40
सौंशय
>> आँ ? अजुन संशयच आहे ? अहो हा जिलबीचा घाणा थंड झालाय आम्ही आता लवकरच नवीन जिलबी टाकायची तयारी करतोय ...जिलबी. क्र. २ : गैरफायदा म्हणजे काय :D

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 22:54
संशय ? ऑं ? अजुन संशयच आहे होय ? इथे हा जिलबीचा घाणा थंड पडलाय म्हणुन आम्ही नवीन जिलबी टाकायच्या तयारीत आहोत जिलबी क्र. दोन = गैरफायदा म्हणजे काय ? :D

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 10:22
समजा, काही सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोहीमेवर गेले, मात्र ते सर्व दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून ठार झाले, आणि त्यांचा 'शहीद' म्हणून गौरव करण्यात आला. पुढे खात्रीलायक पुराव्यावरून (उदा व्हिडियो शूटिंग इ.) असे कळले, की प्रत्यक्षात ते सैनि़क समोरून मोठ्या संख्येने येणार्‍या दहशत वाद्यांना घाबरून शस्त्रे टाकून पळ काढत होते, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार केले गेले होते. अश्या स्थितीतही ते 'शहीद' झाले, म्हणवले जातील का? किंवा अश्या मोहीमेवर गेलेल्या शंभर सैनिकांपैकी काही गोळ्या लागून ठार झाले, काही बाँबस्फोटात, काही सर्पदंशामुळे, काही बर्फवृष्टीमुळे, तर काही अज्ञात कारणामुळे. यापैकी सर्वच 'शहीद' म्हणवले जातील का? नसल्यास कोणकोणते? किंवा एकाद्या गावातील अनेक लोक बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 10:22
समजा, काही सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोहीमेवर गेले, मात्र ते सर्व दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून ठार झाले, आणि त्यांचा 'शहीद' म्हणून गौरव करण्यात आला. पुढे खात्रीलायक पुराव्यावरून (उदा व्हिडियो शूटिंग इ.) असे कळले, की प्रत्यक्षात ते सैनि़क समोरून मोठ्या संख्येने येणार्‍या दहशत वाद्यांना घाबरून शस्त्रे टाकून पळ काढत होते, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार केले गेले होते. अश्या स्थितीतही ते 'शहीद' झाले, म्हणवले जातील का? किंवा अश्या मोहीमेवर गेलेल्या शंभर सैनिकांपैकी काही गोळ्या लागून ठार झाले, काही बाँबस्फोटात, काही सर्पदंशामुळे, काही बर्फवृष्टीमुळे, तर काही अज्ञात कारणामुळे. यापैकी सर्वच 'शहीद' म्हणवले जातील का? नसल्यास कोणकोणते? किंवा एकाद्या गावातील अनेक लोक बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Fri, 05/09/2014 - 11:08
बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?
हो. उदाहरणार्थ वाघाशी/ बिबट्याशी झालेल्या द्वंद्वात शहीद झालेल्या वीराचा हा वीरगळ बघा ;) a

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 12:24
वीरगळ आणि सतीचा दगड यांचेबद्दल अधिक माहिती आणी फोटो वगैरे देता येतील का? ज्याला हल्ली शहीद-स्मारक म्हणतात, त्यालाच वीरगळ म्हणायचे का? सती आणि शहीद यात काय साम्य/फरक आहे? माझ्या वरील प्रतिसादापैकी पहिल्या दोन मुद्द्यांबद्दल काय वाटते ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Fri, 05/09/2014 - 12:32
पहिल्या दोन मुद्द्यांबाबत काहीच म्हणायचे नाही. वीरगळ आणि गधेगाळांविषयी पूर्वीच लिहिले होते. ह्यात फोटो सुद्धा आहेत. वीरगळ म्हणजेच शहीद स्मारक म्हणणे उचित ठरावे. वीरगळ आणि गधेगाळ वीरगळांच्या अधिक फोटो साठी माझे लोणी भापकर आणि पांडेश्वर हे दोन लेख पाहावेत. सतीचा दगड म्हणजे सती गेलेल्या स्त्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारला जातो. सतीचा आशीर्वादपर मुद्रेतील हात त्याजवर कोरलेला असतो. ही पूर येथील सतीशिळा ह्यात बहुधा चार बायका सती गेल्या असाव्यात. a ही तिथलीच अजून एक सतीशिळा a तर ही कोथळे गावातील सतीशिळा a

In reply to by प्रचेतस

गब्रिएल Fri, 05/09/2014 - 13:30
हायला. आसा हात लईच येळापासून असाबी काडतात व्हय. आमाला वाटलं व्हतं की फकस्त विलेक्शन आल की गावाच्या भिंतिवर काडतात. ;)

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 13:23
छान. या सतीशिळा डिझाईनच्या दृष्टीने पिकासो व हुसेनला लाजवणार्‍या आहेत. अर्थात या पिकासोने आफ्रिकन आदिवासी कलेवरून, तर हुसेनने पिकासोच्या कलेवरून आपली कला बेतली होती.

सुधीर काळे Sat, 05/10/2014 - 17:21
शहीद अनेक प्रकारचे असतात. सामाजिक, राजकीय, सेनादले, पोलीसदले, 'बाबू' मंडळी इ.इ. सामाजिक कार्यकर्ते नेहमीच कार्यरत असतात मग ते कुठेही असोत. उदा. महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर. राजीव गांधी कांहीं सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक राजकीय नेता होते. समजा एकादा सैनिक सुटीवर गांवी गेलेला आहे व त्याचा कुणी वैयक्तिक वैमनस्यावरून खून केला किंवा तो एकाद्या अपघातात मरण पावला तर त्याला शहीद म्हणता येणार नाहीं. पण तो जर आपले कर्तव्य करताना मृत्यू पावला तर ते हौतात्म्य ठरेल. राजीव गांधींची हत्या करण्यात आली तेंव्हां ते कुठल्याही पदावर नव्हते उदा. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते वगैरे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला हौतात्म्य म्हणता येणार नाहीं असे मला वाटते. तसेच ज. वैद्य यांनाही (ते सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे) हुतात्मा म्हणता येणार नाहीं. हे आपलं माझं मत!

आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.

In reply to by प्रकाश घाटपांडे

.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.
>>> मग अफजल गुरुलाही शहीद मानता येईल की .... रादर आजाद कश्मीर वाले तसे मानतातही :)

शहीद म्हणलं की सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर येतात ते मदनलाल धिंग्रा ... मग खुदीराम बोस ...अनंत कान्हेरे ! पण आज ह्या लोकांची कोणी आठवण ही काढत नाही.. ... आज आपल्याच तमीळ बाधवांच्या बाबत निष्ठुर वागणारे राजीव गांधी शहीद ठराहेत.... ....कालाय तस्मै नमः !

In reply to by प्रसाद गोडबोले

आजानुकर्ण Tue, 05/06/2014 - 21:12
काय सांगता? आजकाल शहीद शब्द चालतो काय? शहीद हा शहादत म्हणजे इस्लामसाठी मृत्यू पत्करणारा या अर्थाने निर्माण झालेला शब्द आहे तो आपल्या हुतात्म्यांना वापरू नये असे वाटते. हुताशनीतील आहुती या अर्थाने मदनलाल धिंग्रा प्रभृतींना हुतात्मा म्हणावे!

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 00:21
कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता जो इतरांसाठी स्वतःचे प्राण देतो तो शहीद.
मग नथुराम पण शहीद ठरेल की !

In reply to by प्रसाद गोडबोले

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 01:14
म्हणताय की आणखी दुसरा अर्थ अभिप्रेत आहे ? असो शहीद म्हणजे अशी व्यक्ती जी देशासाठी, त्यातील लोकांसाठी माथेफिरु वैचारीकतेला बळी न पडता प्रसंगी स्वतःचे प्राणही अर्पून जाते ती व्यक्ती शहीद असा माझा समज आहे. (शब्दशः अर्थ माहीत नाही). शहीद विषयावर धागा तो सुधा "जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही .." असे लिहुन या विषयाचे गांभीर्य घालवायचा किळसवाणा प्रयत्न बघुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.

In reply to by प्रसाद गोडबोले

नथुराम शहिद
कसा हो?? जो इतरांसाठी प्राण देतो तो शहीद असे म्हंटलेलय , नथुराम कोणासाठी मेला? संघासाठी?... त्यांनी तर हात वर केले होते.आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असे सांगितले. सावरकरांसाठी??... त्यांचा गांधीहत्येशी कोणताही संबंध नाही असे तेच स्वतः कोर्टात म्हणाले होते. ब्राह्मण हिंदू वगैरेंसाठी??... त्यांनी तर असा कोणताही आदेश नथुरामला दिला नव्हता. स्वतःच्या अतिरेकी विचारातून इतरांचा निघृण खून करणे व त्याचा आळ इतर समाजावर यावा यासाठी दाढी वाढवून, सुंता करणे याला माथेफीरुपणा म्हणतात, शहिद होणे नव्हे.

In reply to by नानासाहेब नेफळे

अखंड भारत नावाचे एक हिंदुराष्ट्र होते ...त्या लोकांसाठी नथुराम हा शहीद होता ...पण आता ते राष्ट्रच उरले नाही त्यामुळे नथुराम शहीद ठरणार नाही ... अजुनही अखंडभारताचे वेडे स्वप्न पाहणारे काही लोक आहेत म्हणे त्यांच्या साठी कदाचित तो शहीद असावा ...नक्की कल्पना नाही . नोट : मी अखंड भारतवादी नाही उलट सावरकर-संघ आदी प्रभृतींना न जुमानता बापुंनी ज्या योग्य प्रकारे फाळणी घडवुन आणली त्याबद्दल त्यांच्या विषयी आदरच आहे ! इथे १५-२०% आवरत नाहीत ३५-४०% असते तर वाटच लागली असती !!

In reply to by नानासाहेब नेफळे

म्हणून ह्या अर्थी आत्मघाती हल्लेखोर तालिबान काही लोकांना शहीद वाटतात. पंजाबात व तामिळनाडू, महाराष्ट्र येथे तेथील लोकात शहीद म्हणून ओळखले जाणारे भारताच्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतात. मुशरफ म्हणूनच गेला आहे. एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. तेव्हा तुम्ही कोणत्या चष्म्यातून पाहतात ते महत्वाचे

In reply to by निनाद मुक्काम …

तुमचा अभिषेक Fri, 05/09/2014 - 00:05
एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. दहशतवादी हा स्वताच्या स्वातंत्र्यासाठीच लढत असेल असे गरजेचे नसते. समोरच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असेल आणि त्यात त्याचा बळी गेला तर त्याला शहीद नाही म्हणता येणार. कसाब हा कोणासाठीही शहीद झाला नाही. अगदी इस्लामसाठीही शहीद झाला नाही. कारण इस्लामच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली नाही की त्याविरुद्ध लढताना त्याने आपले प्राण गमावले. इस्लाम खतरेमे अशी आपणहूनच बांग देऊन आत्मघाताचा मार्ग स्विकारणार्‍यांना शहीद हा शब्द अनफिट !

जेपी Tue, 05/06/2014 - 20:43
ते गांधी परिवार स्वत:च्या चुकुने मेलय . फुकनीच काय शहिद बिहीद नाय. बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा

In reply to by जेपी

मंदार दिलीप जोशी गुरुवार, 05/08/2014 - 15:08
बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा >> (१) त्यासाठी पाक पोलिसांच्या सर्टीफिकेटची गरज नाही (२) निर्दोष याचा अर्थ त्याने सँडर्सचा खून केलाच नाही असा होतो. खून केला तरच तो हुतात्मा. त्याने खून केलाच आहे अशी आमची खात्री आहे. आणि तेच योग्य आहे (खून करणे त्याने)

In reply to by जेपी

तुषार काळभोर गुरुवार, 05/08/2014 - 17:07
सध्या भगतसिंग यांच्या निर्दोषत्वाचा मुद्दा पाकिस्तानात (आणि अर्थातच भारतात) गाजतोय. कुणीतरी तत्कालीन एफ आय आर ची एक प्रत मागवली आणि त्यात म्हणे भगतसिंग यांचे नावच नाही. अर्थात भगतसिंग हे निर्दोष होते. मग त्यांनी जे कॄत्य केले(जे तत्कालिन सरकारने व न्यायव्यवस्थेने गुन्हा ठरवले), व ज्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले, ते त्यांनी केलेच नव्हते का? मग तरीपण त्यांना देशभक्त/क्रांतिकारक म्हणायचे का? आणि जर या न केलेल्या कॄत्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले असेल, तर त्यांना 'शहीद' म्हणायचे का? महत्वाचे: मला भगतसिंग यांच्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहेच. पण हा जो त्यांना निर्दोष ठरवण्याचा अट्टाहास/प्रयत्न चालू आहे, त्याने काय साध्य होणार आहे ? जे कॄत्य त्यांनी केले म्हणुन अभिमान वाटतो, ते त्यांनी केलेच नाही, हे सिद्ध करून त्यांच्या विषयीचा अभिमान वाढेल की कमी होईल?

धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ... अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल Biggrin>>> *ROFL* ================== धाग्याची.. सुर..वात! http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-volley-smiley-emoticon.gif मध्य http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-smash-smiley-emoticon.gif अंत http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/game-set-match-smiley-emoticon.gif *lol* ========== . . . . . . . . . . . . . . . . http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-player-serving-smiley-emoticon.gif

In reply to by सूड

सूड Tue, 05/06/2014 - 21:37
आणि हो. जिलेबी नसून जिलबी असतंय ते!! .....आणखी किती अवांतर हवंय बोला. माताय अवांतर करण्यात तर आपण संक्षींना पण हार जाणार नाय !!

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 21:40
म्हणजे नक्कि काय झाले की तिथे शांतीसेना पाठवायचा निर्णय घ्यावा लागला ? कोणी उहापोह करेल काय ? मानवी हक्काचे कारण पुढे करत साधा श्रीलंका ताब्यात ठेवणे आपल्याला जमले नाही ?

राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे शांतीसेना पाठवली, आपल्याचं तमिळ लोकांना मारलं त्याचा बदला म्हणुन झाली. तस्मात शहीद होऊ शकत नाहीत. ईंदिरा गांधी हत्या= भिंद्रनवाले प्रकरण नडलं. शहिद नाही. म. गांधी= सतत हिंदुंच्या विरोधात भुमिका घेत राहीले. तुम्ही यंव केलं नाही तर मी उपोषण करीन तुम्ही त्यंव केलं नाही तर मी उपोषण करीन असं सतत ब्लॅकमेल केलं. पाकिस्तानला केलेली मदत भोवली. शहिद नाहीत. श. लाला लजपतराय= माझ्या माहितीमधला एकमेव शहिद कॉंग्रेस नेता. ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. शहीद आहेत कारण स्वत:च्या प्राणाची पर्वा नं करता ब्रिटिशांचा विरोध केला. श. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव- खरे शहिद. आत्मकेंद्रीत राजकारणाचे बळी. काँग्रेस चं आणि गांधी घराण्याचं कोणीही शहिद नाही. स्वतःच्या चुकांचे बळी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 01:05
मग या न्यायाने इंदीरागांधी सुधा देशाच्या अखंडतेसाठी बळी गेल्या असे ठरत नाही काय ?

चौकटराजा Wed, 05/07/2014 - 07:12
शहीद काय , देशभक्त काय, देशद्रोही काय ही सर्व आपल्या दृष्टीकोनाची लीला आहे. माझ्या मताने कोणत्याही उद्देशाने कार्य करत असताना त्या कार्याची प्रतिक्रिया म्हणून मृत्यू आल्यास त्याला शहीद म्हणता येणार नाही. ही व्याख्या अनेकाना पटणार नाही.या दृष्टीकोनाने सैनिक, राजकारणी, क्रांतिकारक कोणीही शहीद ठरणार नाहीत. तर पंजाबमधे जे निरपराध लोक अतिरेक्यांकडून मारले गेले ते शहीद ठरू शकतात. कोणत्याही युद्धात मग ते सैनिकांचे असो वा क्रांतिकारकांचे वा राजकारण्यांचे दोन्ही बाजूनी युद्ध हा एक अपराधच आहे. त्यात दोन्ही बाजू दोषी असतात.त्याचवेळी युद्ध होत असते.

साती Wed, 05/07/2014 - 07:44
जास्तं वटवट करून संपादकांना रात्रपाळी घडवणारे आयडी अनेक संकेतस्थळावरून दुसर्या सकाळी गायब होतात त्याला 'शहीद होणे ' म्हणतात.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 05/08/2014 - 12:58
अप्रुव्ह कसे काय होतात? आणि लेजिटिमेट आयडी चार चार महिने रखडतात. मग मुळात इतर संस्थळांसारखे तत्काळ सदस्यत्व का देत नाही ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 13:15
+१ पुर्वी सुद्धा हे एकदा विचारुन झालय.. तरीही अजुन एकदा.. सरळ सरळ डु आयडी आहेत हे कळत असताना ते अप्रुव्ह कसे होतात?

In reply to by बाळ सप्रे

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 14:30
समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ?

In reply to by पैसा

प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 16:03
एका गंभीर धाग्यावर अशा प्रकारे अत्यंत ज्येष्ठ मिपाकरांकडून (बाकीचं अध्याहृत) विनोद केला गेलेला पाहून एक सामान्य मिपाकर म्हणून शरम वाटली. :(

In reply to by प्यारे१

आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 16:34
आत्मलज्जा भये आपल्यास जो क्लेश झाला त्याबद्दल दिलगीरी म्हणून समस्त मिपाकरांनी 1 मिनिट शांतता पाळावि असा प्रस्ताव सुचवतो.

In reply to by बाळ सप्रे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/08/2014 - 19:15
@स्प्लिट पर्सनेलिटी http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif असेल तर ते डु आयडी आपापसातच http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif भांडतील ना!! >>> तुफ्फा..............न!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/super-excited-boy-smiley-emoticon.gif मारलय!

In reply to by आत्मशून्य

सूड गुरुवार, 05/08/2014 - 19:36
>>समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ? तुमचे आहेत का दोन आयडी??

मदनबाण Wed, 05/07/2014 - 10:55
हॅहॅहॅ... व्हॉट ए जोक ! ;) या सर्वाला अमेठीचा संदर्भ आहे ना ? गांधी कुटुंबियांच्या जिव्हाळ्याशी संबंध आहे ना अमेठीचा ? घ्या मग भाजपा चे उत्तर ! जाता जाता :- आता विचार करतोय कॉग्रेस,रागा आणि प्रियांका यांना नक्की "विकास" म्हणजे नक्की काय ? आणि याचा "अर्थ" तरी माहित आहे का ? तसेच अमेठी मधल्या लोकांना फक्त भावनात्मक आव्हानावर पोट भरायची इच्छा आहे की त्यांनाही विकास हवा आहे ते येणार्‍या काळात कळेलच. नविन म्हण सांगुन जातो :- यथा मूर्ख प्रजा तथा धुर्त राजा.

जेपी Wed, 05/07/2014 - 18:32
आता धागा निट वाचला . "शहिद मंजे नक्की कात" अस दिसतय. मंजे कात असुन बी धागा काय रंगला नाय.कुनीतरी चुना लावा रे. (मळकरी) जेपी

चित्रगुप्त गुरुवार, 05/08/2014 - 08:24
एकादी मृत व्यक्ती 'शहीद' ठरवली जाते, तेंव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी घडत असलेल्या दिसून येतातः १. त्या व्यक्तीचा मृत्यु हा कुणीतरी घडवून आणलेला असणे. २. सदर व्यक्ती ही अमूक एक देश, समाज वा गटातील लोकांच्या 'हिता'साठी काहीएक कार्य मृत्युपूर्वी करत होती, अशी एकंदरित लोकांची, आणि बहुतेकदा स्वतः त्या व्यक्तीचीही - समजूत असणे. ३. हे कार्य ती व्यक्ती स्वेच्छेने, 'कर्तव्य' भावनेने, निरपेक्षपणे करत असणे, किंवा 'मरावे परि कीर्तीरूपे उरावे' ही आकांक्षा. किंवा: ४. ते कार्य करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवण्यासाठी अन्य व्यक्ती, संस्था, सरकार, इ. ने त्याबद्दल काही वेतन, सुविधा, बक्षीस वगैरे देऊ केलेले असणे. ५. प्रत्यक्ष वेतन, बक्षीस वगैरे खेरीज मरणोपरांत स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरेत चिरकाल सुखोपभोगात, ऐय्याशीत दंग राहण्याची संधी लाभणार असल्याचे आमिष त्या व्यक्तीला दिले गेलेले असणे. ('हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम' अर्थात युद्धात तू मारला गेलास, तर तुला स्वर्ग लाभेल, आणि जिंकलास, तर पृथीचे राज्य भोगशील" ) *** अमूक एका गटातील लोकांनी 'शहीद' ठरवलेली व्यक्ती अन्य गटातील लोकांना अपराधी, पापी, समाजकंटक वगैरे वाटू शकते. बाकी एकंदर 'बघ्या' लोकांना या शहीदांचे काही सोयरसुतक नसते. जुन्या शहीदांच्या नावाने एकादी सुटी मिळते, तर नवीन शहीदांविषयी बातमी एक चटपटीत 'ब्रेकिंग न्यूज' असते. *** काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात. एकादा प्रसिद्ध नेता वा सत्ताधारी 'शहीद' झाला, तर या गोष्टीचे भांडवल करून त्याचे वारस, वंशज वा नामसादृश्याचा फायदा घेणारे बिलंदर त्या शहिदाचे चित्र नोटांवर छापून, गावोगावी रस्त्यांना त्याचे नाव देऊन समाजमानसात त्याची स्मृती जागृत ठेवून पिढ्यान पिढ्या सत्ता उपभोगतात. त्यातून त्या वंशात आणखी कुणी 'शहीद' झाले, तर मग विचारायलाच नको. त्या शहिदांची स्मारके उभी करणे, त्यांचा नावांच्या संस्था काढणे अश्या अनेक खटपटीतून भरपूर बेगमी करता येते. कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. "जरा आंख मे भरलो पानी" वगैरे गाणी रचणारे, गाणारे, ऐकताना डोळ्यातून टिपे काढणारे, कादंबर्‍या-नाटके लिहिणारे, पुतळे बनवणारे, चित्रे-सिनेमे काढणारे, या सर्वांना प्रसिद्धी मिळते ... एकंदरित दुसरे कुणीतरी 'शहीद' होणे, हा बर्‍याच लोकांसाठी 'फायदेमंद' सौदा असतो. ... राहता राहिले त्या शहीदांचे आप्त-स्वकीय. ते काही काळ दु:खी, अस्वस्थ रहातात, आणि शेवटी ते ही 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे' या सर्वव्यापी नियतीच्या अटळ गतीस प्राप्त होतात.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/08/2014 - 22:27
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात. कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. याचा रोख या लेखावर्ही आहे असा सौंशय येतोय =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 22:40
सौंशय
>> आँ ? अजुन संशयच आहे ? अहो हा जिलबीचा घाणा थंड झालाय आम्ही आता लवकरच नवीन जिलबी टाकायची तयारी करतोय ...जिलबी. क्र. २ : गैरफायदा म्हणजे काय :D

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2014 - 22:54
संशय ? ऑं ? अजुन संशयच आहे होय ? इथे हा जिलबीचा घाणा थंड पडलाय म्हणुन आम्ही नवीन जिलबी टाकायच्या तयारीत आहोत जिलबी क्र. दोन = गैरफायदा म्हणजे काय ? :D

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 10:22
समजा, काही सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोहीमेवर गेले, मात्र ते सर्व दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून ठार झाले, आणि त्यांचा 'शहीद' म्हणून गौरव करण्यात आला. पुढे खात्रीलायक पुराव्यावरून (उदा व्हिडियो शूटिंग इ.) असे कळले, की प्रत्यक्षात ते सैनि़क समोरून मोठ्या संख्येने येणार्‍या दहशत वाद्यांना घाबरून शस्त्रे टाकून पळ काढत होते, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार केले गेले होते. अश्या स्थितीतही ते 'शहीद' झाले, म्हणवले जातील का? किंवा अश्या मोहीमेवर गेलेल्या शंभर सैनिकांपैकी काही गोळ्या लागून ठार झाले, काही बाँबस्फोटात, काही सर्पदंशामुळे, काही बर्फवृष्टीमुळे, तर काही अज्ञात कारणामुळे. यापैकी सर्वच 'शहीद' म्हणवले जातील का? नसल्यास कोणकोणते? किंवा एकाद्या गावातील अनेक लोक बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 10:22
समजा, काही सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोहीमेवर गेले, मात्र ते सर्व दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून ठार झाले, आणि त्यांचा 'शहीद' म्हणून गौरव करण्यात आला. पुढे खात्रीलायक पुराव्यावरून (उदा व्हिडियो शूटिंग इ.) असे कळले, की प्रत्यक्षात ते सैनि़क समोरून मोठ्या संख्येने येणार्‍या दहशत वाद्यांना घाबरून शस्त्रे टाकून पळ काढत होते, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार केले गेले होते. अश्या स्थितीतही ते 'शहीद' झाले, म्हणवले जातील का? किंवा अश्या मोहीमेवर गेलेल्या शंभर सैनिकांपैकी काही गोळ्या लागून ठार झाले, काही बाँबस्फोटात, काही सर्पदंशामुळे, काही बर्फवृष्टीमुळे, तर काही अज्ञात कारणामुळे. यापैकी सर्वच 'शहीद' म्हणवले जातील का? नसल्यास कोणकोणते? किंवा एकाद्या गावातील अनेक लोक बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Fri, 05/09/2014 - 11:08
बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?
हो. उदाहरणार्थ वाघाशी/ बिबट्याशी झालेल्या द्वंद्वात शहीद झालेल्या वीराचा हा वीरगळ बघा ;) a

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 12:24
वीरगळ आणि सतीचा दगड यांचेबद्दल अधिक माहिती आणी फोटो वगैरे देता येतील का? ज्याला हल्ली शहीद-स्मारक म्हणतात, त्यालाच वीरगळ म्हणायचे का? सती आणि शहीद यात काय साम्य/फरक आहे? माझ्या वरील प्रतिसादापैकी पहिल्या दोन मुद्द्यांबद्दल काय वाटते ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस Fri, 05/09/2014 - 12:32
पहिल्या दोन मुद्द्यांबाबत काहीच म्हणायचे नाही. वीरगळ आणि गधेगाळांविषयी पूर्वीच लिहिले होते. ह्यात फोटो सुद्धा आहेत. वीरगळ म्हणजेच शहीद स्मारक म्हणणे उचित ठरावे. वीरगळ आणि गधेगाळ वीरगळांच्या अधिक फोटो साठी माझे लोणी भापकर आणि पांडेश्वर हे दोन लेख पाहावेत. सतीचा दगड म्हणजे सती गेलेल्या स्त्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारला जातो. सतीचा आशीर्वादपर मुद्रेतील हात त्याजवर कोरलेला असतो. ही पूर येथील सतीशिळा ह्यात बहुधा चार बायका सती गेल्या असाव्यात. a ही तिथलीच अजून एक सतीशिळा a तर ही कोथळे गावातील सतीशिळा a

In reply to by प्रचेतस

गब्रिएल Fri, 05/09/2014 - 13:30
हायला. आसा हात लईच येळापासून असाबी काडतात व्हय. आमाला वाटलं व्हतं की फकस्त विलेक्शन आल की गावाच्या भिंतिवर काडतात. ;)

चित्रगुप्त Fri, 05/09/2014 - 13:23
छान. या सतीशिळा डिझाईनच्या दृष्टीने पिकासो व हुसेनला लाजवणार्‍या आहेत. अर्थात या पिकासोने आफ्रिकन आदिवासी कलेवरून, तर हुसेनने पिकासोच्या कलेवरून आपली कला बेतली होती.

सुधीर काळे Sat, 05/10/2014 - 17:21
शहीद अनेक प्रकारचे असतात. सामाजिक, राजकीय, सेनादले, पोलीसदले, 'बाबू' मंडळी इ.इ. सामाजिक कार्यकर्ते नेहमीच कार्यरत असतात मग ते कुठेही असोत. उदा. महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर. राजीव गांधी कांहीं सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक राजकीय नेता होते. समजा एकादा सैनिक सुटीवर गांवी गेलेला आहे व त्याचा कुणी वैयक्तिक वैमनस्यावरून खून केला किंवा तो एकाद्या अपघातात मरण पावला तर त्याला शहीद म्हणता येणार नाहीं. पण तो जर आपले कर्तव्य करताना मृत्यू पावला तर ते हौतात्म्य ठरेल. राजीव गांधींची हत्या करण्यात आली तेंव्हां ते कुठल्याही पदावर नव्हते उदा. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते वगैरे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला हौतात्म्य म्हणता येणार नाहीं असे मला वाटते. तसेच ज. वैद्य यांनाही (ते सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे) हुतात्मा म्हणता येणार नाहीं. हे आपलं माझं मत!
नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला

पुष्पराज

शब्दानुज ·
लेखनविषय:
त्रिभुवन सुंदर पुष्पराज पर्णावर होते विराजले जणू माझ्या स्वागतासाठी आतुरलेले मिटलेल्या नयनांनी हसणारे सुगंध कुशीत ठेवणारे सायंकाळी सुंदरतेचा मुखवटा उतरला पुष्पराज सुगंधातुन दरवळत राहिला सुंदरतेचे अस्तित्वही नामशेष जाहले गुणरुपी सुगंधच स्मरणात राहिले