वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

लेखनविषय:
काव्यरस
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे? मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे? करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या? वगळून आशयाला चालेल का कधी रे? नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले दगडात देव आहे वाटेल का कधी रे? खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे? टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे? व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे? विशाल...

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

लेखनविषय:
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला

लेखनविषय:
काव्यरस
गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा? घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा ! वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा (इतरत्र पूर्वप्रकाशित) विशाल

कारुण्य टंकन

व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लु

आज जानेकी ज़िद ना करो (दोन)

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज जाने की ज़िद न करो (एक) ही गज़ल (म्हणजे तिचा काव्यविषय), जनसामन्यांसाठी कवि-कल्पना आहे. त्यामुळे, उर्दू शायरी ज्या प्रेमाची कहाणी आहे ते प्रेम, ती `उल्फ़त' काय आहे ते आधी सांगायला हवं. उर्दू गज़लेत प्रिया कधीही पत्नी होत नाही, ती फक्त एक ‘चाहत’ असते. पूरे-उम्र-भरकी चाहत. सार्‍या आयुष्याला पुरुन उरेल अशी अभिलाषा! म्हणजे प्रियकराचं प्रेम बेतहाशा असतं पण ती कधीही त्याला संमती देत नाही.

आज जाने की ज़िद न करो (एक)

लेखनविषय:
लेखनप्रकार
ही ग़ज़ल म्हणजे एक दुर्लभ योग आहे. खुद्द शायर एका अर्थानं शायरी लिहीतो, आणि गायिका ती गाते तेव्हा तिचं संपूर्ण परिमाण बदलून जातं! फैयाझ हाशमीनी ग़ज़ल लिहिलीय प्रियकराच्या भूमिकेतून आणि फ़रिदा ख़ानुमनं ती गायलीये प्रेयसीच्या आर्जवातून, त्यामुळे अर्थ तोच राहिला तरी, काव्यविषयच बदलून गेलायं. काव्यविषय इतका जीवघेणा आणि असा काही तरल झालायं की साधेसे शब्द देखिल काव्याला चिरंतन परिमाण देऊन गेलेत. हीच गज़ल आशा भोसलेनी सुद्धा गायलीये, पण तिथे संगीत, आर्जवाला फिकं करतं. आणि एआर रहेमानची ती अत्यंत आवडती ग़ज़ल आहे, पण तो देखिल फ़रिदाचा दिलकष माहौल जमवू शकलेला नाही.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखनविषय:
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

लेखनविषय:
काव्यरस
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

पोकळी

लेखनविषय:
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले
Subscribe to गझल