शायरी ...

लेखनविषय:
१. तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे , के तुझे धून्डते धून्डते मैने खुदको खो दिया ! और जब खुदको धून्डने निकला, , तो हर जगह सिर्फ तेरा चेहरा नजर आया ! ! २. तेरी आखो में खोकर कई ख्वाब देख लीये मैने , तेरी सांसो में मिलकर एक जिंदगी जी ली मैने , अब ना तेरी आखे है , ना तेरी सांसे है, , ना कोई ख्वाब है ,, बस्स एक जिंदगी है…. जो पिछा नही छोडती ! ! ३.तेरा ना मिलना तनहाई से क्या कम था , के अब जीने से मै घबराऊ ? तनहा जिंदगी नरक से क्या कम थी , के अब मरने से मै घबराऊ ??

मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना

लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे. इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला.

मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

लेखनविषय:
काव्यरस
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 ----- आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले , माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले , माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 -------- तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 -------- काही करू पहाता विपरीत होत आहे , माझे मला न उमगे

अस्थी कृषीवलांच्या

लेखनविषय:
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

तू मला वगळून उरणे शक्य नाही

लेखनविषय:
तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही तू सुखाच्या सोबतीने चाल राणी मी दगा दुःखास देणे शक्य नाही हे तुझे आंगण तुला लखलाभ आता ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही जीवना, हा छान बंदीवास आहे जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही .. तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या तू मला वगळून उरणे शक्य नाही डॉ.सुनील अहिरराव

पराचा पारवा होतो

लेखनविषय:
किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू - जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा .. तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो डॉ.सुनील अहिरराव

हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते

लेखनविषय:
हलकेच शिरशिरी मग .. प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते ! प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू माणूस जात साली जातीवरुन जाते सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते ! येशील का कधी तू, ते सांग आज राणी सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते आताच त्या सुखाने माझा लिलाव केला सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते मी कामगार आहे, मजला सुटी कशाला माझी सुटी तशीही घामावरुन जाते भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही खुर्चीवरुन येते

विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी

लेखनविषय:
तुझ्या न्यायालयी आता पुन्हा मी हारलो दावा पुरेसा धूर्त मी नाही, कुठे जमला मला कावा राज्ये ,तुझी सत्ता, तुझे हे कायदे सारे अता माझ्याविरोधी तू हवा तो फैसला द्यावा तुझ्या नावात रे दडला किती संहार हा देवा अता सारे मवाली हे तुझा बघ बोलती धावा ! जणू की उंट हे सगळे पटावर खेळती युद्धे कुणी येथे सरळ नाही, कुणी उजवा कुणी डावा ! विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी.. फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा प्रतीक्षेतुन या सार्या युगे आली युगे गेली तुझी वचने, तुझ्या शपथा : भरवसा काय सांगावा डॉ.सुनील अहिरराव

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

लेखनविषय:
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर

छन्दोरचना

लेखनविषय:
काव्यरस
प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ १९३७ मध्ये छापून प्रसिद्ध झाला.
Subscribe to गझल