नाटक वाटू नये

लेखनविषय:

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

जायचे आहेच तर जावेस आता ..

जायचे आहेच तर जावेस आता का असे वाटेत थांबावेस आता मी तुला द्यावे असे उरले न काही तू हवे तर दु:खही न्यावेस आता ही किती तलखी जिवाची होत आहे ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल जवळ थोडे आणखी यावेस आता अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही अडथळे मोडून काढावेस आता मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ तू युगे चालून ठरवावेस आता - डॉ.सुनील अहिरराव

एक जिलबी पाडायचीच

लेखनविषय:
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत,

अगर

लेखनविषय:
अगर तुम साथ देते तो आशियाँ हम सजा देते, यूँ बिखरी सी ज़िन्दगी को हम जीने की वजह देते. समज़ ये हम को भी है की हमारे तुम नहीं लेकिन, समज़ दिल को भी होती तो, हमसफर गम नही होते. - नेता

सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...

लेखनविषय:
खोल मी आहे किती पाहून घेतो मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो सावल्यांनी पोळलो आहे कधी मी ऊनही आता जरा फुंकून घेतो बेगडी आहे तुझी दुनियाच सारी मी अता रानीवनी भटकून घेतो मी उद्या होईनही काफर कदाचित ये, तुला थोडी फुले वाहून घेतो तू किती भिनलीस माझ्या आत राणी- ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो डॉ.सुनील अहिरराव

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

लेखनविषय:
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला "चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला .. आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला .. एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला .. हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला लेउनीया साज आली कामिनी थाटात ती तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

गलित आहे गात्र अजुनी

कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

मनगटावर मोगर्‍याचे हार आले

लेखनविषय:
लेखनप्रकार
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला.

काळजावर मोगर्‍याचे वार झाले

लेखनविषय:
काव्यरस
आज डोळा आसवांचे भार झाले वेदनांचे मोकळे कोठार झाले दुश्मनांची राहिली ना जरब काही ओळखीचे चोर येथे फार झाले देवभोळा साव आता मी न उरलो दैव माझे यारहो गद्दार झाले भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..? चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले? आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले काळजावर मोगर्‍याचे वार झाले वाचले जे झुंजले जगती 'विशाला' पाठ दावुन धावले ते ठार झाले ! *********************************** (वृत्त:मंजुघोषा)

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

लेखनविषय:
काव्यरस
*********************************** किती वाकुडे बोल बोलून झाले स्वत:च्याच सत्वास गाळून झाले धरा सांगताहे कथा पावसाची किती थेंब पदरात झेलून झाले ? जरी भोवती 'माणसे' फार झाली तरी एकट्यानेच 'खेळून' झाले नको रोकडा, दागिनेही नकोसे बियाण्यासवे सत्व तोलून झाले जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ? चकोरापरी प्राण उधळून झाले कसा रे मुरारी तुझा हा अबोला? सुरांवर तुझ्या आज भाळून झाले 'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे' पुन्हा आरशालाच टाळून झाले किती राहिले श्वास देहात बाकी ? 'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ? *********************************** विशाल
Subscribe to गझल