Skip to main content

गझल

भांडणानंतर...

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 25/10/2013 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही अबोला जरी धरून, आसमंत आज सारा अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही - चाणक्य २०/१०/२०१३
काव्यरस

प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखक psajid यांनी मंगळवार, 22/10/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे. ओढून ताणून आणलेल्या शब्दापेक्षा त्यामध्ये भावना याव्यात या हेतूने लिहलेली माझी ही पहिली गझल आहे. या गझल मध्ये मी ऱ्हस्व - दीर्घ, नुकता, रदीफ किंवा काफिया या पैकी कशाचाही योग्य वापर केला नाही याची मला कल्पना आहे.
काव्यरस

मी....

लेखक घन निल यांनी सोमवार, 21/10/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुखः माझे एकट्याचे एकलाच भोगतो मी … रात्रीस चांदण्यांसवे एकटाच जागतो मी … मी दिले तुला माझे आकाश चांदण्यांचे … कैफात निखळले जे रुपेरी तारे मोजतो मी …. माझ्या ओल्या जाणिवांची खुलीच होती कवाडे … आठवून तुझे धुमारे एकटाच लाजतो मी …. मकरंद तुझ्या ओष्टीचा अजुनी ओठांस आहे … ओलावल्या आठवांत एकटाच भिजतो मी … घनभार तुझ्या केसांची ती किरमिजी संध्याकाळ … प्राक्तनात माझ्या फुले वेचतो मी …. जगलो एकच पहाट जी तुझ्या मिठीत उगवली …. ओथंबल्या दवांत एकटाच नाचतो मी …
काव्यरस

तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …

लेखक घन निल यांनी मंगळवार, 15/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता … तुझा हात जेंव्हा माझ्या हातून सुटला होता …. तू थांबवलीस असावे तुझी , पण बांध तरीही फुटला होता … ऊन पिऊन अंगणात सुकला पारिजात माझ्या, निळा कोवळा पाऊस मी नियतीस विकला होता … ओंजळीत भरलेस तू श्वास तुझे सुगंधी, मी हात त्यावरी एक झाकला होता … मी न थांबलो तिथे , न वळून बघितले निघताना, विश्वास तुझा तरीही न थकला होता … मी चेतविल्या पुन्हा तुझ्या आठवणी, मी विझलो तेंव्हा त्यांचा उजेड फाकला होता …
काव्यरस

आईना - ए -गजल लेखक डॉक्टर विनय वाईकर/ डॉक्टर जरीना सानी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 08/09/2013 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
गजल ऐकताना काहीवेळा एखादा उर्दू शब्द कानी पडतो, त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो शेर मनाला भिडत नाही. "डॉक्टर जरीना सानी आणि डॉक्टर विनय वाईकर" यांनी लिहिलेले "आईना -ए -गजल" हे पुस्तक हाताशी असेल तर हा रसभंग टाळता येतो. या पुस्तकात ८५०० पेक्षा जास्त शब्द आणि ५५०० पेक्षा जास्त शेर अर्थासह दिले आहेत. अर्थ मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले आहेत. शेर निवडताना लेखक द्वयींनी अभ्यास पूर्ण निवड केली आहे. गजल ऐकताना आपल्याला जो शब्द समजत नाही तो शब्द शोधताना त्या शब्दा खाली नेमका आपण ऐकत असलेला शेर सापडतो असे बरच वेळा घडते. उदा.

वाटते मजला भिती - (गझल)

लेखक विदेश यांनी शनिवार, 27/07/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती सागरावर का उसळती जीवघेणी वादळे हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा देवळातिल शांततेची वाटते मजला भिती वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती ओळखेना आरसाही वाटते मजला भिती जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती .
काव्यरस

चीन विश्वासपात्र नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 20/07/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही

" हे असे चालायचेच!! "

लेखक निनाव यांनी गुरुवार, 18/07/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे! गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे ! काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे ! तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते मग तोच म्हणाला , जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !! बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
काव्यरस

कधीतरी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 17/07/2013 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
धुसफूस भावनांची विसरू कधीतरी जरी आठवून ढाळू अश्रू कधीतरी आणू कुठून सांगा शोधून एक मित्र जो ना म्हणेल कधीही 'भेटू कधीतरी' मग मोट अनुभवांची बांधू कधीतरी संधी पुढे आम्हीही साधू कधीतरी जैसे तुम्ही करावे, तैसेच भरावेही होईल हे तुम्हाला, लागू कधीतरी आम्हासही कधी, पुसतील लोक सारे आम्हीही मग अलिप्त, राहू कधीतरी कक्षा जरी स्वतःच्या जाणू सदा तरी आकाश बंधनांचे भेदू कधीतरी आहोत तेच आपण, जाणू कधीतरी 'तो' मी कधीतरी, 'तो' तू कधीतरी मागू आम्हास आम्ही काहीच ना अपूर्व कुण्या चेह-यास हासू मागू कधीतरी

राते- हिंदी रचना आणि भावानुवाद

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 15/07/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमरः जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु?
काव्यरस