Skip to main content

गझल

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 23/03/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 03/03/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.

आज जानेकि जिद ना करो

लेखक शरद यांनी मंगळवार, 25/02/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज जाने की ज़िद न करो यूं ही पहलू में बैठे रहो हाय मर जायेंगे हम तो लुट जायेंगे ऐसी बातें किया न करो तुम ही सोचो ज़रा क्यूँ न रोके तुम्हें जान जाती है जब उठके जाते हो तुम तुम को अपनी क़सम जान-ऐ-जान बात इतनी मेरी मान लो वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर चन्द घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं इन को खो कर मेरी जान-ऐ-जान उम्र भर न तरसते रहो कितना मासूम-ओ-रंगीन है ये समा हुस्न और इश्क की आज मैराज है कल की किस को खबर जान-ऐ-जान रोक लो आज की रात को जिद ..हट्ट, दुराग्रह. पहलू .. कूस. जान-ए-जान ..प्राणप्रिया. मासूम ..निष्पाप. समा ..दृष्य, देखावा हुस्न ... सौंदर्य, मैराज ...

वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 21/02/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो पानगळ असली तरी मधुमास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही ते तसे होईल तेंव्हा खास होतो तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो फायदा नात्यातला चंद्रास होतो केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो बंधने तुडवीत जातो सहज सारी हा तुझ्याइतका मलाही भास होतो प्रेम इतके काय कामाचे जिथे की, आपला वापर 'अजय' सर्रास होतो
काव्यरस

अमेठीची शेती

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 03/02/2014 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 10/01/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

बलिदान त्याविना हे ... (गझल)

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 30/12/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
असते मनात काही उमजून येत नाही वाटे किती फुलावे उगवून येत नाही घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी बलिदान त्याविना हे उजळून येत नाही तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला शब्दास अर्थ आता लगडून येत नाही -- अमेय

टिकले तुफान काही

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 28/12/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

मिर्झा ग़ालिब...........भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/12/2013 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, हातातील सर्व लिखाण बाजूला ठेवून हा लेख लिहायला घेतला आहे याचे कारण आज बरोबर २१६ वर्षापूर्वी एक थोर शायर या पृथ्वीतलावर परमेश्वराने धाडला आणि अगणित अक्षरश: अगणित रसिकांना त्याने त्याच्या शायरीने वेड लावले. नजिकच्या काळात वेड लागलेला मीही त्यातलाच. त्याच्यावर आज लिहिले नाही तर त्याच्या दरबारात क्षमा मिळेल की नाहे याची शंकाच आहे.

कवडसे

लेखक उपटसुंभ यांनी शनिवार, 21/12/2013 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊल माझे चालले रस्ता जिथे जाई तसे शोधायला येऊ नका माझ्या इराद्यांचे ठसे नाही दिली जन्मात या कोणासही मी सावली आयुष्यभर जपलेत मी माझ्या उन्हाचे वारसे विश्वास या दुनियेवरी ठेवायचा कोणी कसा एकाच खाणीच्या उरी यावे हिरे अन् कोळसे वाटेवरी माझ्या जिथे अंधार होता दाटला पेरीत मी गेलो तिथे माझ्या विजांचे कवडसे आयुष्य येथे भेटते प्रत्येक वळणावर नवे ताजी पुन्हा होते गझल धरते नव्याने बाळसे -- उपटसुंभ
काव्यरस