Skip to main content

धोरण

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/05/2024 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे, “मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं. जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे.

पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/05/2024 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या. काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो.

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी श्री समर्थांना म्हणालो, “बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो. मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे. परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट, अहंकारी आहे असं म्हणाली. ऐकून मला वाईट वाटलं “ असं म

चार दिवस मिळाले असतां हसू खेळून निभवावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे

समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/05/2024 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता, "समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा" सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले, "आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही. तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो.

(मी आणि बार)

लेखक अहिरावण यांनी मंगळवार, 07/05/2024 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - ओळखलेच असेल निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता.. मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते. मला असं वाटतं की बारकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही पनवेलला गेलो होतो,तो बार वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो. पण गावातला, माझ्या घरा जवळचा बार मला निराळा वाटायचा. पहाटपर्यंत बसु शकतो, सर्वत्र टेबल होते आणि खुर्च्या बेवड्यांनी भरलेल्या होता.

मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/05/2024 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं. मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?

एकटेपणा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/05/2024 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकटेपणा काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, “भाऊसाहेब,इंग्रजीत “Live me alone “ असं एखादा एखाद्याला म्हणतो. बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी पडून रहाण्याचा कल असतो. पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?” मला प्रो देसाई म्हणाले, “माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून, खिडकीजवळ बसून पाऊस पडतो ते पाहण्यापर्यंत एकटेपणाचे अनेक प्रकार असू शकतात.

आवेग हृदयाचा की मनाचा असावा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/05/2024 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
आवेग हृदयाचा की मनाचा असावा मी श्री समर्थांना म्हणालो, “कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात . तसंच असेही लोक असतात जे फक्त उदिष्ट सफल करण्याचा जुजबी प्रयत्न करत असतात.आणि नंतर ठराविक वेळ प्रयत्न करून झाल्यावर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि निश्चिंत होतात. खूप उशीर होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला बांधून ठेवत नाही. किंबहुना,त्याने कधी थांबायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो त्याची शक्ती, वेळ आणि स्वत:ची भावना ओळखून असतो.

कोचिंग उद्योग नियमावली

लेखक केदार भिडे यांनी बुधवार, 24/01/2024 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्र शासनाने नुकतेच कोचिंग उद्योगाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली प्रकाशीत केली. शिक्षण हा सामायिक सूचीतील विषय असल्याने त्याचे अंतिम स्वरूप देण्याचे काम राज्यांवर सोडले आहे. त्या निमित्ताने मनात आलेले काही विचार. १) मी सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली. त्या आधी १२वीच्या बोर्डाच्या मार्कांवर प्रवेश होत असत.