मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेड्या आईची वेडी माया

रानरेडा ·

गवि Mon, 02/16/2026 - 08:11
लिखाणात टिपीकल पॅटर्न्स आहेत गपट्याचे .. त्यामुळे नैसर्गिक वाटलं नाही.
काही वर्षांनी एकच जुन्या मित्राबरोबर थोडा संपर्क होता , त्याचा फोन आला. ती शांतपणे हॉस्पिटलमध्ये गेली होती — कोणताही नाट्य नाही, शेवटचे शब्द नाहीत — फक्त मॉनिटरवरील एक सरळ रेषा.
Em dashes, & "not x, not y, it's z" ऊर्फ "अ" नाही, "ब" नाही, फक्त "क"

कथा नाट्य चांगलं आहे, पण गविंची शक्यता वाटत असली तरी, तंत्र आणि सृजनशीलता याचा सुयोग्य मेळ घालता आला पाहिजे, असेही वाटले. कथानाट्य चांगले वाटले. -दिलीप बिरुटे

गवि Mon, 02/16/2026 - 08:11
लिखाणात टिपीकल पॅटर्न्स आहेत गपट्याचे .. त्यामुळे नैसर्गिक वाटलं नाही.
काही वर्षांनी एकच जुन्या मित्राबरोबर थोडा संपर्क होता , त्याचा फोन आला. ती शांतपणे हॉस्पिटलमध्ये गेली होती — कोणताही नाट्य नाही, शेवटचे शब्द नाहीत — फक्त मॉनिटरवरील एक सरळ रेषा.
Em dashes, & "not x, not y, it's z" ऊर्फ "अ" नाही, "ब" नाही, फक्त "क"

कथा नाट्य चांगलं आहे, पण गविंची शक्यता वाटत असली तरी, तंत्र आणि सृजनशीलता याचा सुयोग्य मेळ घालता आला पाहिजे, असेही वाटले. कथानाट्य चांगले वाटले. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा. खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता . रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची.

अभंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

In reply to by गणपा

मिसळपाव Mon, 02/16/2026 - 00:25
चक्क बल्लवाचार्य गणपा??? मित्रा, अरे अधनं मधनं तरी पाकृ टाकत जा. मान्य आहे की मी एकही ट्राय नाही केली. पण तुझ्या नीटनेटक्या पाकॄ वाचायचा / बघायचा काय मझा असतो यार. तब्येतपाणी, घरची मंडळी खुशाल?

In reply to by मिसळपाव

मिसळपाव Mon, 02/16/2026 - 00:26
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

अभ्या.. Sun, 02/15/2026 - 15:12
अहाहा, . बुडताचि वह्या । येई ते विमान । 'अभ्या' विनवी सरा । दीनवाणे ।।७८६।।

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 02/16/2026 - 13:40
दादानु,
बुडताचि वह्या
ऐवजी "काढताचि वह्या" असे असायला हवे असे वाटते. वह्या एकदा बुडवल्यावर विमानाची लगेच गरज पडत नसावी, हे माझे वैयक्तिक मत. सं - दी - प

Bhakti Sun, 02/15/2026 - 16:23
भक्त म्हणे विसरा नाव ते एपिस्टना पाहा आता आणला हा टिपू सुलताना!! :) :) प्लीज भक्त ऐवजी भक्ती चुकूनही वाचू नका,_/\_

In reply to by Bhakti

लै फॉर्मूले आणतात हे लोक. तर अभंगातील चरण असे. भक्त म्हणे नाव । सोडा एपिस्टन । आणला टिपू हा । सुलतान ।।९!! -दिलीप बिरुटे ( अभंगात रमलेला )

In reply to by गवि

असेच म्हणतो! @दिलीपराव मन की बात | असो मना आत | सांगाया सुरुवात | करो नये || काही मेंबर | जणू इको चेंबर | जाने ते डिसेंबर | भुंकिताती ||

आपले आभार । काय मी मानावे । डोळे हे भरून । आले आता ।। ​अभंग रचावे । ऐसे निरंतर । 'दिलीप' म्हणे हा । भाव मनी ।। -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (जालावरील 'वार'करी

मदनबाण Fri, 02/20/2026 - 13:30
स्वतःचीच आरती | करावी जाऊन सेल्फी काढावी | इव्हेंट पाहुन कोण दलित | कोण ब्राह्मण आपणच महान | सागंतसे अजैविक फेकावे जोरात | बोलावे मिठास जीएसटी लावोनी | लुटावे जनास कोणाता स्ट्रोक | कोण मारतो भिकेस लागतो | सामान्य माणुस हिंदूत्वाचे घेऊन सोंग | फसावावे जनास चढवतो चादर | ख्वाजा चरणी नौटंकी करावी | रोज नवनवी फुकावे कोट्यावधी | फीत कापोनी बाण म्हणे आज | ओळखावे सोंगास काळ योग्य पाहोन | हकलावे मुर्खास

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya... - (8K)

बाजीगर Sun, 02/22/2026 - 23:41
बंधूंच्या युती | आता ते फूटी| ढोंगाला सुटी | मराठी भाग्य || जनतेने नाकारले |संख्या ना साकारले | कडू कारले|विरोधी नेता || क्लिनचीट चे पेव |जज ऐकमेव| चालू द्या देवघेव | 'देव' आशिर्वाद || विमान अपघात | नाही घातपात | नको अन्य बात |वदले साहेब || करमचंद जासूस | तर्क मागमूस | रोज नवे ऊस | चर्चा गुऱ्हाळासी ||

In reply to by गणपा

मिसळपाव Mon, 02/16/2026 - 00:25
चक्क बल्लवाचार्य गणपा??? मित्रा, अरे अधनं मधनं तरी पाकृ टाकत जा. मान्य आहे की मी एकही ट्राय नाही केली. पण तुझ्या नीटनेटक्या पाकॄ वाचायचा / बघायचा काय मझा असतो यार. तब्येतपाणी, घरची मंडळी खुशाल?

In reply to by मिसळपाव

मिसळपाव Mon, 02/16/2026 - 00:26
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

अभ्या.. Sun, 02/15/2026 - 15:12
अहाहा, . बुडताचि वह्या । येई ते विमान । 'अभ्या' विनवी सरा । दीनवाणे ।।७८६।।

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 02/16/2026 - 13:40
दादानु,
बुडताचि वह्या
ऐवजी "काढताचि वह्या" असे असायला हवे असे वाटते. वह्या एकदा बुडवल्यावर विमानाची लगेच गरज पडत नसावी, हे माझे वैयक्तिक मत. सं - दी - प

Bhakti Sun, 02/15/2026 - 16:23
भक्त म्हणे विसरा नाव ते एपिस्टना पाहा आता आणला हा टिपू सुलताना!! :) :) प्लीज भक्त ऐवजी भक्ती चुकूनही वाचू नका,_/\_

In reply to by Bhakti

लै फॉर्मूले आणतात हे लोक. तर अभंगातील चरण असे. भक्त म्हणे नाव । सोडा एपिस्टन । आणला टिपू हा । सुलतान ।।९!! -दिलीप बिरुटे ( अभंगात रमलेला )

In reply to by गवि

असेच म्हणतो! @दिलीपराव मन की बात | असो मना आत | सांगाया सुरुवात | करो नये || काही मेंबर | जणू इको चेंबर | जाने ते डिसेंबर | भुंकिताती ||

आपले आभार । काय मी मानावे । डोळे हे भरून । आले आता ।। ​अभंग रचावे । ऐसे निरंतर । 'दिलीप' म्हणे हा । भाव मनी ।। -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (जालावरील 'वार'करी

मदनबाण Fri, 02/20/2026 - 13:30
स्वतःचीच आरती | करावी जाऊन सेल्फी काढावी | इव्हेंट पाहुन कोण दलित | कोण ब्राह्मण आपणच महान | सागंतसे अजैविक फेकावे जोरात | बोलावे मिठास जीएसटी लावोनी | लुटावे जनास कोणाता स्ट्रोक | कोण मारतो भिकेस लागतो | सामान्य माणुस हिंदूत्वाचे घेऊन सोंग | फसावावे जनास चढवतो चादर | ख्वाजा चरणी नौटंकी करावी | रोज नवनवी फुकावे कोट्यावधी | फीत कापोनी बाण म्हणे आज | ओळखावे सोंगास काळ योग्य पाहोन | हकलावे मुर्खास

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya... - (8K)

बाजीगर Sun, 02/22/2026 - 23:41
बंधूंच्या युती | आता ते फूटी| ढोंगाला सुटी | मराठी भाग्य || जनतेने नाकारले |संख्या ना साकारले | कडू कारले|विरोधी नेता || क्लिनचीट चे पेव |जज ऐकमेव| चालू द्या देवघेव | 'देव' आशिर्वाद || विमान अपघात | नाही घातपात | नको अन्य बात |वदले साहेब || करमचंद जासूस | तर्क मागमूस | रोज नवे ऊस | चर्चा गुऱ्हाळासी ||
लेखनविषय:
संसदेत नाही । फिरकले पायी । महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।। जुने मढे सारे । काढिले बाहेरी । नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।। एपस्टिन यादी । येईल बाहेरी । हीच भीती उरी । दाटलेली ।।३।। शिक्षण, बेकारी । तशी महागाई । बोलणेच नाही । विषयांवर ।।४।। आत्महत्या करी । राजा शेतकरी । जंगले व्यापारी । लुटविती ।।५।। निवडणुकीवेळी । गोड गोड बोली । वचनांची झोळी । रिकामीच ।।६।। सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव । जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।। संसदेचा वेळ । वायाचि गेला हा । 'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

भारत-म्यानमार फाळणी

केदार भिडे ·

मस्त लेख. याविषयी काहीही माहिती नव्हते. हे सॅम डॅरलिंपल विलिअम डॅरलिंपलचे कोणी नातेवाईक आहेत का? विलिअम डॅरलिंपलनी ब्रिटीश भारतावर लिहिलेले अ‍ॅनार्की हे पुस्तक मस्त आहे.

आफ्रिकेमध्ये म्यानमार मध्ये किंवा इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापारा निमित्त किंवा अन्य काही कारणांनी गेलेले भारतीय युद्धामुळे यादवीमुळे परत आले, कित्येक गेले मात्र त्यांच्या कुणाच्या स्टोरी फारशा मांडल्या गेलेल्या नाहीत. रंगून मंडाले सिलोन हे शब्द ब्रिटिश साम्राज्याची छाप भारतावरून जसजशी भेटली तसतसे गायब झाले. मेरे पिया गये रंगून किया है वहा से टेलीफोन अशी गाणी एके काळी भारतात लोकप्रिय होती. साऱ्या भारतीय उपखंडातील आणि दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियन सारखा प्रयोग करावा असे काही जुन्या विचारवंतांच्याही मनात येत असे एकेकाळी मात्र असे युनिफिकेशनचे विचार आता कोणीही करत नाही

वासुदेव बळवंत फडकेंना एडनला कारावासात ठेवले गेले होते आणि त्यांचा मृत्यू तिथेच झाला.
मुळातच त्या वातावरणातून आल्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा यशस्वी ठरले तर नवल ते काय. मारवाडी लोकांबद्दलही असे म्हणता येईल.
सहमत. मारवाड भागात वाळवंट असल्याने तिथे राहून काही होणार्‍यातले नव्हते. त्यामुळे मारवाडी लोकं तिथून बाहेर पडून सगळीकडे पसरले. अगदी बंगाल आणि आसामातही मारवाडी लोक सापडतात. आणि ही गोष्ट आजची नाही तर बरीच जुनी आहे. बंगालमधे जगत सेठ ही उपाधी असलेले प्रचंड श्रीमंत (अगदी दिल्लीच्या बादशाहला पैसे कर्जाऊ देणारे) पिढीजात मारवाडी सावकार होते. फर्रूखसिय्यर बादशाहला त्यांनी सत्तेवर यायला मदत केली होती म्हणून त्याने त्यांना जगत सेठ ही उपाधी दिली होती. मारवाडी लोकांना ते राहायचे तिथली प्रतिकूल परिस्थिती हे बाहेर पडण्यासाठी हातपाय मारायला कारण झाले असे म्हणता येईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Sun, 02/15/2026 - 08:55
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Sun, 02/15/2026 - 08:58
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

सोत्रि Sun, 02/15/2026 - 09:02
>> एवढे होऊनही कितीतरी भारतीय मलेशियात राहिले…. स्वतंत्र मलेशियात नंतर भारतीय लोक आणखीनच बाहेर फेकले गेले, बहुतेक चुकून मलेशिया टाइपलं गेलंय, संपादकांना सांगून तेवढं दुरूस्त करून घ्या! बाकी लेख उत्तम, शेवटचा परिच्छेद एकदम मस्त! - (मलेशिया कर्मभूमी असलेला) सोकाजी

चौथा कोनाडा गुरुवार, 02/19/2026 - 17:38
माहितीपुर्ण इतिहास... या बद्दल कधी वाचण्यात आले नव्हते ... जिज्ञासाही वाटली नवह्ती !
म्यानमारमधील भारतीय एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आजचा म्यानमार तत्कालीन ब्रिटिश वसाहतवादी आक्रमणात सापडला आणि तेव्हापासून ब्रिटिश भारताचा एक प्रांत झाला. त्यामुळेच भारतीयांची मुक्त ये-जा सुरु झाली. भारतातील लोकांना म्यानमारमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ती म्यानमारमधील वाढत्या तांदूळ उत्पादनामुळे. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे तिथून पुरवल्या जाणाऱ्या तांदुळावर परिणाम झाला. त्यामुळे तांदूळ उत्पादनासाठी नव्या प्रदेशाच्या शोधात ब्रिटिश होतेच. त्यातूनच म्यानमारमध्ये तांदूळ लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील शेतात कामगार म्हणून जाण्यासाठी भारतीयांनी सुरुवात केली, त्यात बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र येथील लोकांचा मुख्य समावेश होता. त्याकाळी बंगाल-बिहार येथील लोकांना जमिनीमार्गे म्यानमार मध्ये जाणे शक्य होते आणि समुद्रमार्गे जायचे तर चेन्नई येथून रंगूनला जाता येई त्यामुळे वरील प्रदेशातील कामगारांची संख्या जास्ती राहिली. यातूनच तामिळनाडू मधील चेट्टीयार जातीतील लोकांनी आपला बँकिंग व्यवसाय थाटला. त्यातूनच इंडियन ओव्हरसिज बँक आणि इंडियन बँक यांची स्थापना झाली. १९३१ साली १.४ करोड लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये १० लाखाहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. म्यानमारमध्ये त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात बंगाली, तामिळ आणि तेलगू यांची संख्या अधिक असून १५ हजार पंजाबी बोलणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. म्यानमारमधील तत्कालीन अर्थव्यवस्थेत अगदी मजुरांपासून वरिष्ठ पदांपर्यंत भारतीय लोक प्रस्थापित झालेले होते.
खुपच रोचक माहिती ! धन्यवाद !

खटपट्या Fri, 02/20/2026 - 03:24
स्थलांतरित लोक - हा परीच्छेद जास्त आवडला. आणि बर्‍याच अंशी सहमत आहे. रच्याकने - अभिनेत्री हेलन ही काही अपरीहार्य कारणास्तव रंगून पासून चालत भारतात आली असे ती एका मुलाखतीत म्हणाली. कदाचीत मोठ्या स्थलांतराच्या वेळेस हे झाले असावे.

In reply to by खटपट्या

खटपट्या Fri, 02/20/2026 - 03:28
नेटवर सर्च करता ती दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमणापासून वाचण्यासाठी चालत आली अशी माहीती मिळाली. Yes, the legendary Hindi cinema actress and dancer Helen (Helen Ann Richardson) walked from Burma (now Myanmar) to India as a young child to escape the Japanese occupation during World War II. Here are the details of her journey: The Trek: Following the death of her father during the war, Helen, her mother, and her brother trekked for months from Rangoon (now Yangon) to Dibrugarh in Assam, India, in 1943. Hardships: They traveled through forests and hundreds of villages, often starving and penniless, with Helen and her mother reduced to nearly "skeletons" by the time they reached India. Survival: They were helped occasionally by British soldiers who treated their blistered feet and provided food. Aftermath: After arriving in Assam, they later moved to Calcutta (now Kolkata), where her brother unfortunately passed away from smallpox

मस्त लेख. याविषयी काहीही माहिती नव्हते. हे सॅम डॅरलिंपल विलिअम डॅरलिंपलचे कोणी नातेवाईक आहेत का? विलिअम डॅरलिंपलनी ब्रिटीश भारतावर लिहिलेले अ‍ॅनार्की हे पुस्तक मस्त आहे.

आफ्रिकेमध्ये म्यानमार मध्ये किंवा इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापारा निमित्त किंवा अन्य काही कारणांनी गेलेले भारतीय युद्धामुळे यादवीमुळे परत आले, कित्येक गेले मात्र त्यांच्या कुणाच्या स्टोरी फारशा मांडल्या गेलेल्या नाहीत. रंगून मंडाले सिलोन हे शब्द ब्रिटिश साम्राज्याची छाप भारतावरून जसजशी भेटली तसतसे गायब झाले. मेरे पिया गये रंगून किया है वहा से टेलीफोन अशी गाणी एके काळी भारतात लोकप्रिय होती. साऱ्या भारतीय उपखंडातील आणि दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियन सारखा प्रयोग करावा असे काही जुन्या विचारवंतांच्याही मनात येत असे एकेकाळी मात्र असे युनिफिकेशनचे विचार आता कोणीही करत नाही

वासुदेव बळवंत फडकेंना एडनला कारावासात ठेवले गेले होते आणि त्यांचा मृत्यू तिथेच झाला.
मुळातच त्या वातावरणातून आल्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा यशस्वी ठरले तर नवल ते काय. मारवाडी लोकांबद्दलही असे म्हणता येईल.
सहमत. मारवाड भागात वाळवंट असल्याने तिथे राहून काही होणार्‍यातले नव्हते. त्यामुळे मारवाडी लोकं तिथून बाहेर पडून सगळीकडे पसरले. अगदी बंगाल आणि आसामातही मारवाडी लोक सापडतात. आणि ही गोष्ट आजची नाही तर बरीच जुनी आहे. बंगालमधे जगत सेठ ही उपाधी असलेले प्रचंड श्रीमंत (अगदी दिल्लीच्या बादशाहला पैसे कर्जाऊ देणारे) पिढीजात मारवाडी सावकार होते. फर्रूखसिय्यर बादशाहला त्यांनी सत्तेवर यायला मदत केली होती म्हणून त्याने त्यांना जगत सेठ ही उपाधी दिली होती. मारवाडी लोकांना ते राहायचे तिथली प्रतिकूल परिस्थिती हे बाहेर पडण्यासाठी हातपाय मारायला कारण झाले असे म्हणता येईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Sun, 02/15/2026 - 08:55
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Sun, 02/15/2026 - 08:58
मारवाडी लोकांना गुजराती लोकांसारखी पार्श्वभूमी आहे असे नाही. फार पुर्वी त्या भागात जमिनमार्गे काही व्यापार चालत असेल तर माहिती नाहि. मात्र तरी मारवाडी लोक देशभर पसरले हे खरे. बिर्ला कुटंब हे एक उदाहरण. हिंदुस्थान मोटर्स त्यांनी बंगालमध्ये काढली. मला वाटते आपल्यातील जाती, भाषा, प्रदेश यांच्या भिंतींमुळे अशा क्षेत्रातील जमा केलेले ज्ञान त्याच जात, भाषा, प्रदेश यांच्या भिंतीत राहते आणि अन्य लोक मग त्यात conspiracy पहायला लागतात, त्यांच्यावर राग धरतात.

सोत्रि Sun, 02/15/2026 - 09:02
>> एवढे होऊनही कितीतरी भारतीय मलेशियात राहिले…. स्वतंत्र मलेशियात नंतर भारतीय लोक आणखीनच बाहेर फेकले गेले, बहुतेक चुकून मलेशिया टाइपलं गेलंय, संपादकांना सांगून तेवढं दुरूस्त करून घ्या! बाकी लेख उत्तम, शेवटचा परिच्छेद एकदम मस्त! - (मलेशिया कर्मभूमी असलेला) सोकाजी

चौथा कोनाडा गुरुवार, 02/19/2026 - 17:38
माहितीपुर्ण इतिहास... या बद्दल कधी वाचण्यात आले नव्हते ... जिज्ञासाही वाटली नवह्ती !
म्यानमारमधील भारतीय एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आजचा म्यानमार तत्कालीन ब्रिटिश वसाहतवादी आक्रमणात सापडला आणि तेव्हापासून ब्रिटिश भारताचा एक प्रांत झाला. त्यामुळेच भारतीयांची मुक्त ये-जा सुरु झाली. भारतातील लोकांना म्यानमारमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ती म्यानमारमधील वाढत्या तांदूळ उत्पादनामुळे. अमेरिकेतील यादवी युद्धामुळे तिथून पुरवल्या जाणाऱ्या तांदुळावर परिणाम झाला. त्यामुळे तांदूळ उत्पादनासाठी नव्या प्रदेशाच्या शोधात ब्रिटिश होतेच. त्यातूनच म्यानमारमध्ये तांदूळ लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील शेतात कामगार म्हणून जाण्यासाठी भारतीयांनी सुरुवात केली, त्यात बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र येथील लोकांचा मुख्य समावेश होता. त्याकाळी बंगाल-बिहार येथील लोकांना जमिनीमार्गे म्यानमार मध्ये जाणे शक्य होते आणि समुद्रमार्गे जायचे तर चेन्नई येथून रंगूनला जाता येई त्यामुळे वरील प्रदेशातील कामगारांची संख्या जास्ती राहिली. यातूनच तामिळनाडू मधील चेट्टीयार जातीतील लोकांनी आपला बँकिंग व्यवसाय थाटला. त्यातूनच इंडियन ओव्हरसिज बँक आणि इंडियन बँक यांची स्थापना झाली. १९३१ साली १.४ करोड लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये १० लाखाहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. म्यानमारमध्ये त्यावेळी बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात बंगाली, तामिळ आणि तेलगू यांची संख्या अधिक असून १५ हजार पंजाबी बोलणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. म्यानमारमधील तत्कालीन अर्थव्यवस्थेत अगदी मजुरांपासून वरिष्ठ पदांपर्यंत भारतीय लोक प्रस्थापित झालेले होते.
खुपच रोचक माहिती ! धन्यवाद !

खटपट्या Fri, 02/20/2026 - 03:24
स्थलांतरित लोक - हा परीच्छेद जास्त आवडला. आणि बर्‍याच अंशी सहमत आहे. रच्याकने - अभिनेत्री हेलन ही काही अपरीहार्य कारणास्तव रंगून पासून चालत भारतात आली असे ती एका मुलाखतीत म्हणाली. कदाचीत मोठ्या स्थलांतराच्या वेळेस हे झाले असावे.

In reply to by खटपट्या

खटपट्या Fri, 02/20/2026 - 03:28
नेटवर सर्च करता ती दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमणापासून वाचण्यासाठी चालत आली अशी माहीती मिळाली. Yes, the legendary Hindi cinema actress and dancer Helen (Helen Ann Richardson) walked from Burma (now Myanmar) to India as a young child to escape the Japanese occupation during World War II. Here are the details of her journey: The Trek: Following the death of her father during the war, Helen, her mother, and her brother trekked for months from Rangoon (now Yangon) to Dibrugarh in Assam, India, in 1943. Hardships: They traveled through forests and hundreds of villages, often starving and penniless, with Helen and her mother reduced to nearly "skeletons" by the time they reached India. Survival: They were helped occasionally by British soldiers who treated their blistered feet and provided food. Aftermath: After arriving in Assam, they later moved to Calcutta (now Kolkata), where her brother unfortunately passed away from smallpox
लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.

पकडले हाथ रंगे

बाजीगर ·

चित्रगुप्त गुरुवार, 02/19/2026 - 05:54
महाराष्ट्रातले राजकारणी आणि त्यांच्या 'करतुती' याविषयी 'बेखबर' असल्याने मला तपशील समजले नसले, तरी रचना एकदम मस्त. लिहीत रहा बाजीगर ओ बाजीगर.

चित्रगुप्त गुरुवार, 02/19/2026 - 05:54
महाराष्ट्रातले राजकारणी आणि त्यांच्या 'करतुती' याविषयी 'बेखबर' असल्याने मला तपशील समजले नसले, तरी रचना एकदम मस्त. लिहीत रहा बाजीगर ओ बाजीगर.
लेखनविषय:
मंत्रालयात ढेरंगे, पकडले हाथ रंगे अन्न नागरीलिपिक, लाचखोरीचे पीक, असे इमान ना विक, पांडुरंगा || ३५ हजार रोकड आता शोधा बोकड, आरोपांचा हा फड कसा वाचवू मी गड एकनाथा || लाचखोरी शेवाळ, वदले ते झिरवाळ, लोक म्हणे कपाळ, धूर तिथेच जाळ, 'देवा' धाव || लाचखोरी प्रकरण, नाही चुकीचे करणं, हो तेच माझे दालन, राजीनामा हे मरण, नरहरी ||

जरा आगळे आज वाटते.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
जरा आगळे आज वाटते मनी काहीसे आज दाटते करमत नाही हुरहुर काही कुणी सारखे स्वप्नात येते. आज झऱ्याचा नाद वेगळा आज नभाला साज वेगळा वेगळ वाटतं नभातल चांदणं काळजा छेडती कुणाची पैंजण मना कुणीसे आज वेढते. आज उदासी मना भारुनी उरी कुणीसे येई फिरुनी कळेना असे का भिरभिरते मन मनी प्रीत कुणाची फुले क्षणक्षण प्रीत कुणाची मनी उमलते. https://youtu.be/8g_lRY-rduk

भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....

नागनिका ·

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 13:06
उत्तम आणि समयोचित (एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर) लेख!
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात.
_/!\_ - ('कोहम्'चा प्रवासी) सोकाजी

हा अत्यंत चुकीचा दावा आहे. बहुतेक भारतीयांना अलीकडे असे वाटत आहे की पाश्चात त्यांनी फक्त मटेरियल गोष्टींमध्ये आनंद शोधला आहे परंतु हे एका विवक्षित न्यूनगंडातून मांडले जाणारे अत्यंत उथळ असत्य. युरोपात अनेक ठिकाणी जुन्या मॉनेस्टरीज आहेत जिथे ऐहिक सुखांचा पूर्ण त्याग करून लोक अध्यात्म साधना करतात. पाश्चा त्यांनी एक प्रश्न सोडवले का तर सोडवले आणि त्यातून त्यांना आज उत्तम जीवनशैली मिळालेली आहे. एखाद्या खेडेगावात राहणारे युरोपियन कुटुंब आणि भारतात अगदी मोठ्या शहरात देखील राहणारे भारतीय कुटुंब यांच्यामध्ये युरोपियन कुटुंब हे जास्त सुखी आणि समाधानी आहे. शिवाय युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे. ला ग्रांडे बेलेजझा हा सोरिंतीनोचा चित्रपट पहा. त्यामधली नन म्हणते की मी दारिद्र्याचे व्रत घेतले आहे. एक फार सुंदर प्रसंग या चित्रपटात आहे. एका धन दांडग्या माणसाच्या घरात ही नन मुक्कामाला थांबलेली असते मात्र सुख सुखासीन बेडवरती न झोपता ती तिच्या सवयीने खाली फरशीवरच झोपते. पहाटे बाहेर बाल्कनीत येते तेव्हा तिथे बाल्कनीत अनेक फ्लेमिंगो उतरलेले असतात. काल झालेल्या रात्री झालेल्या अत्यंत lavish डिनर मध्ये उरलेले अन्नपदार्थ हे फ्लेमिंगो खात असतात. आणि ही नन एक हळुवार फुंकर घालते आणि हे फ्लेमिंगो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. ॲनी बेझंट त्यांनी भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली असे आम्ही शाळेत वाचले होते. यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही धर्मांच्या शिकवणुकीचा तौलनिक अभ्यास करणारी माणसे असावेत. पाश्चात्य तत्त्वज्ञ लोकांमध्ये तुम्ही म्हणता तशी मांडणी अजिबात दिसत नाही त्यामुळे तुमचे आकलन उथळ आहे एवढेच नमूद करू इच्छितो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 13:55
युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे.
जस्ट फॉर क्युरियोसिटी, कोणकोणते धर्म यात येतात की युरोपियन धर्म असा एक धर्म म्हणता आहात? - (क्युरियस) सोकाजी

In reply to by सोत्रि

जेव्हा आपण 'युरोपियन धर्म' म्हणतो, तेव्हा त्यात प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे विविध पंथ (कॅथोलिक, ऑर्थोडॉक्स इ.) येतात, कारण तिथल्या मॉनेस्टरीज किंवा मठांची परंपरा याच धर्माशी घट्ट जोडलेली आहे. (सेंट बेनेडिक्ट यांनी स्थापन केलेले मठ. येथील भिक्षूगरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकतेची शपथ घेतात, मी जिथे राहतो तिथून जवळच असा एक मोठा मठ आहे जिथे आजही अतिशय साधेपणाने जीवन घालवणारे लोक आहेत.) ऑर्थोडॉक्स यांच्यात उदाहरण ग्रीसमधील माउंट अ‍ॅथोस. सेंट फ्रान्सिस सारख्या लोकांनी तर होली पॉवर्टी सारखी तत्वे मांडून आयुष्यभर त्यांचा प्रसार केला. मात्र, ख्रिस्ती धर्माच्या आधीही युरोपमध्ये स्टोईक (Stoic) किंवा पायथागोरियन यांसारखे विचारप्रवाह होते, जे ऐहिक सुखांपेक्षा संयम आणि साधेपणाला जास्त महत्त्व देत असत. थोडक्यात सांगायचे तर, युरोपीय संस्कृतीत केवळ एका धर्माचा प्रभाव नसून, ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून ही 'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही. (धर्माचे ओरिजिन हा टेक्निकल मुद्दा इथे अपेक्षित नाही. नाहीतर ख्रिस्ती धर्म हा इस्रायली धर्म होईल. हेच बौद्ध धर्माच्य बाबतीत आहे. आज बौद्ध प्रामुख्याने पौर्वात्य देशांतला प्रबल धर्म आहे)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नागनिका गुरुवार, 02/12/2026 - 14:51
एका सिनेमाच्या एखाद्या प्रसंगावरून तुम्ही युरोपिय धर्माची तळी उचलत आहात? Annie Besant या भारतीय धर्मावरून प्रभावित होऊन त्यांनी फिलोसॉफीकल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचे प्रेरणा स्थान मूळ देशाच्या संस्कृतीशी नवते. Stoic पंथ वेद्निर्मिती नंतर सहस्रोवर्षानंतरचा आहे. तोपर्यंत वेदातील ज्ञान जवळ जवळ सर्व जगामध्ये पसरले होते. असो.. वैयक्तिक टिप्पणी करून ' झिरो सिव्हिक सेन्स' ट्रेंड तुम्ही फारच गांभीर्याने घेतलेला दिसतोय.

In reply to by नागनिका

>> पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. असे लिहिताना मात्र आपण एकदम ऑब्जेक्टिविटीची परिसीमाच गाठली आहे जणू. मी कुठल्यही धर्माची तळी वगैरे उचलत नाही. वेदांमधे फक्त ज्ञान आहे हा एक खूप मोठा गैरसमज अनेक लोक करून घेतात. वेदांमधील साधारण ९०% ते ९५% भाग हा कर्मकांडाचा आहे ज्यात सगळ्या भौतिक सुखांच्या याचना आणि गरजांसाठी केलेले यज्ञयाग मंत्रे कथा आणि असेच भरताड आहे. येस. इंद्रियसुखे. ऐहिक सुखे. केवळ ठराविक भाग निवडून ९५ टक्के भाग मात्र सोयीस्कर दुर्ल़क्षित करून तुम्ही काय वेगळे करत आहात? साधारणतः उर्वरित भागात आधिभैतिक प्रश्नांचा वेध घेतला आहे. शिवाय त्यातही मुळात केवळ आणि केवळ एत्तदेशियांच्या इन्जिनियसपणातून हे ज्ञान डिस्कस झाले असा फारच गोड गैरसमज करून घेतलेला दिसतो. मुळात आर्य पुरुष इथे कुठून आले? ज्याप्रमाणे अल्केमी या गोष्टींनी आयुर्वेदात रससिद्धांत वगैरे गोष्टी इन्ट्रोड्यूस झाल्या त्याच प्रमाणे वेद असोत किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञान, ज्ञान हे कोलॅब करून आणि कल्पना एक्सेंज करून विकसित झालेले असते. बाकी आपण केवळ न्यूनगंडात्मक आणि मुख्य म्हणजे अज्ञानमूलक आत्मस्तुतीतच मग्न राहणार असाला तर जो जो वांछील तो ते लाहो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विवेकपटाईत Fri, 02/13/2026 - 10:15
उत्तम लेख. स्वामी दयानंद यांची संपूर्ण विचारधारा विज्ञान निष्ठ होती. वेदांची विकृत व्याख्या करणाऱ्यांवर त्यांनी चपराक लावली. देशांत शुद्धी आंदोलन सुरू केले. शिक्षण संस्था उघडल्या. आज आर्य समाजाच्या १५०००० शाळा आणि कॉलेजेस आहेत. शेकडो गुरुकुल ही आहेत. याशिवाय स्वामी दयानंद चे शिष्य स्वामी रामदेव यांनी तर नवीन शिक्षा बोर्ड स्थापित केला आहे. आजच्या घटकाला पाचशेच्या जवळ शाळा भारती शिक्षा बोर्ड शी संबंधित झालेल्या आहेत. पुढील पाच-सात वर्षात ही संख्या काही हजारांवर जाईल. .बाकी अण्णा तुम्ही ही इतरांप्रमाणे निश्चित न्यूनगंडाने पछाडलेले आहात. ऋग्वेद तुम्ही वाचलेला नाही. बाकी आयुर्वेद पूर्णतः विज्ञान निष्ठा आहे. आज आयुर्वेदातील अनेक औषधी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर रिसर्च द्वारा प्रमाणेच झालेल्या आहेत. आजच्या घटकाला देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा जिथे सेल पासून ऍनिमल ट्रायल्स ची पूर्ण सुविधा आहे एका आयुर्वेदिक कंपनी जवळ आहे. असो. बाकी स्वामी दयानंद त्याकाळचे सर्वात मोठे प्रगतिशील आणि पुरोगामी व्यक्तित्व होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:04
ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून
धन्यवाद! हीच क्युरीयासिटी होती.
'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही.
ह्याबद्दल जरा वेगळं मत आहे माझं. कॅपिटलिझम आणि त्यावर आधारित सध्याची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांनी जगावर लादलेली इकॉनॉमिकल चौकट आहे. ज्याच मूळ भोगवाद किंवा इंद्रियसुखांची लोलुपता हे आहे. जगात कोणी समाधानी असता कामा नये हा या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. जर सगळे समाधानी झाले, कन्टेन्डेड झाले, तर उत्पादन कसं चालू राहणार आणी वाढणार आणी मग प्रचंड नफा कसा मिळणार? म्हणून 'अधिकचा हव्यास' सतत असेल अशी इकॉनॉमिकल चौकट राबवली आहे. त्या आत्यंतिक नफ्यातून येणार्‍या अफाट आणि अमर्याद पैशामुळे, इंद्रियसुखांची परीसीमा गाठण्याचा हव्यास वाढत जातोय. एप्स्टीन हे उघड झालेलं फक्त एक प्रकरण. पण म्हणून हे फक्त पाश्चिमात्य देशांतच होतंय का? तर नाही, जिथे जिथे अफाट आणि अमर्याद पैसा आहे तिथे तिथे हे आहेच. भारतीय तत्वज्ञानात, आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनशास्त्रांनी, सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पातळीवर केला आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानात 'त्याग आणि शिस्तीची' तत्व (उदा. होली पॉवर्टी सारखी) आहेत त्यांच्यामागे भारतीय तत्वज्ञानाइतका सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पारमार्थिक विचार नाहीयेय. हेच पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो असण्याचं कारण आहे. सुदैवाने आपला भारतीय तत्वज्ञानाचा वारसा हा पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा परिपक्व आहे. मी ह्या लेखातल्या फक्त ह्या गाभ्याशी सहमत आहे.
भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते.
हा तुमच्या आक्षेपाचा अजून एक बेस आहे की नाही ते माहिती नाही पण असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे. भावनिक होऊन अशी आत्यंतिक मतं मांडली जातात हे मान्य असल्याने मी पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा लेखातील काही काही मतं 'विथ पिंच ऑफ सॉल्ट' घेतली होती. - (संतुलित) सोकाजी

Bhakti गुरुवार, 02/12/2026 - 14:05
वेदांकडे चला स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन _/\_
एपिस्टन फाईलचे अनेक रील, त्याची माहिती एकामागून एक पाहिली.ते पाहताना अक्षरशः भडभडून ओकून द्यावं वाटल. जग हॆ सैतान प्रवृत्तीने भरलेलेच आहे. सत्ता, पैसा, व्यभिचार याने बरबटलेले आहे.तरीही या जगात आपल्याला जगायचं आहे. मी पण त्या दिवशी "ज्ञानयोग" पुस्तक वाचले .तेव्हा कुठे शांत झाले ... अशा वेळी मला वेदांत, अद्वैत यांचा खूप आधार होतो.विवेकानंद यांच्या भाषेतलं वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे.जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.

In reply to by Bhakti

एपस्टिनचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून एका वर्षाने म्हणजे साधारणः २०२० च्या आसपास पासून मी त्याच्या मागावर होतो. फॉर सो मेनी ऑदर रीजन्स. खूप मोठा रॅबिट होल आहे हा. आता वरती आले आहे हे फक्त केवळ वरवरचे अर्धवट सत्य आहे असे मला वाटते. त्याच्या फाइलस (एकूण संख्या चाळीस लाख) मधल्या काही फाइल्सची सर्वच्या सर्व पानेच्या पाने रिडॅक्ट केलेली आहेत म्हणजे अक्षरश: एकही शब्द खुला नाही. यावर कधीतरी विस्ताराने लिहिण्याचा विचार आहे मात्र वेळे अभावी ते कधी शक्य होईल कुणास ठाऊक.

In reply to by Bhakti

तो गुन्हेगार होता हे कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे त्याच्या अनैतिक कृत्याचे मी कोणतेही समर्थन करत नाही. मला फक्त इतकेच म्हणाय्चे होते की यात सर्व बाजूंचे लोक गुंतले आहेत त्यामुळे निष्पक्ष सत्य कधीही बाहेर येणार नाही.

In reply to by Bhakti

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:10
भक्तीतै, वेलकम बॅक!
वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे, जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.
हा बाउन्सर डोक्यावरून गेला. - (विचारात पडलेला) सोकाजी

In reply to by Bhakti

Bhakti Sun, 02/15/2026 - 09:53
अजून एक सांगायचं राहिल. एपिस्टिन फाईलमधली काही नाव बिल गेटस, स्टीफन हौकिंग!!!! बापरे एके काळी कदाचित आतापर्यन्त जे अनेकांचे आदर्श होते... त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. त्यामुळे हॆ प्रकरण "अंधश्रद्धा"ने घेरलेले आहे ही चर्चा आहे. आदर्श कोणालाच मानायचं नाही (ती भक्तगिरी असतें )आपली विचार क्षमता वाढवत न्यायची, हॆ आधीच ठरवलं होतं. अशा मोठ्या लोकांची नाव वाचून जे ठरवलं त्याला अजून बळकटी मिळाली.

In reply to by Bhakti

मी पुन्हा सांगतो आहे. एकूण फाइल्स ची संख्या चाळीस लाखांहून जास्त आहे. त्यात अनेक ईमेल्स, अगदी त्याच्या संग्रहातले न्यूजपेपर आर्टिकल वगैरे सगळेच आहे. केवळ त्याचे ईमेल्स वगैरे नाहीत. एपस्टाइन हा फिज़िक्सचा प्रोफेसर देखील होता. त्याने फिज़िक्स शिकवले होते. श्रीमंत झाल्यावर त्यांने त्याच्या बेटावर अनेक शास्त्रज्ञांना चर्चांना निमंत्रित केले होते. त्यातल्या कित्येकांना तो काय काळे धंदे करत होता हे माहीत असणे हे गृहीत धरू नका. स्टीफन हॉकिंग बरोबर एक गुंडाने फोटो काढला म्हणजे हॉकिंग गुंड ठरत नाहीत. स्टीफन हॉकिंग यांनी कोणतेही अत्याचार केले आहेत असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. >> त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती. स्टीफन हॉकिंग यांचे नाव आले आहे आणि त्यांचे फोटो असले म्हणजे ते गुन्हेगारच आहेत असा अर्थ काढणे अजिबात योग्य नाही. मी अगदी मोदींच्या चारित्र्यहननाचा देखील विरोध करतो. माझे आणि त्यांचे किती पटते हे सगळ्यांना ठाऊक आहेच मात्र त्यांना ठरकी म्हणणे, किंवा त्यांना देशद्रोही ठरवणे याला माझा विरोध आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

https://www.theguardian.com/us-news/2024/jan/05/prince-andrew-clinton-hawking-what-do-the-epstein-documents-say-about-key-people या मधे स्पष्ट सांगितले आहे की हॉकिंग यांच्यावर जी राळ उडत आहे ती पूर्णपणे बेसलेस आहे. पासिंग उल्लेख आले की गुन्हेगार ठरवावे ही कसली मनोवृत्ती आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti Sun, 02/15/2026 - 13:30
तरी मी अजून मोठी नाव लिहायचं टाळलं आहे. स्टीफन हॉकिंग तिथे असल्यामुळे अंधश्रद्धा या प्रकरणाशी जोडली जाण्याची जास्त शक्यता मला वाटत आहे. adrenochrome हार्वेस्टिंग करून लहान मुलाचा बळी दिला जातं असावा असा अनेकांनी दावा केलाय. कशाला ही अंधश्रद्धा??अमाप सत्ता "उपभोगायला" मिळावी म्हणून..
तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती.
माझ्याकडून अशा अपेक्षा नका करू. आणि मला माहितेय या शंका करोडो लोकांच्या आहेत, केवळ माझ्या नाही.

In reply to by Bhakti

कॉमी Mon, 02/16/2026 - 11:59
करोडो लोकांना असल्या म्हणजे त्या व्हॅलीड शंका आहेत असे नव्हे. हे ॲड्रेनोक्रॉम वैगेरे अत्यंत बॉटम ऑफ द बॅरल अर्थात अत्यंत बेसलेस अफवा आहेत.

In reply to by Bhakti

एपस्टिन फाईल्स हा प्रकार विशेष फॉलो करत नाहीये. मात्र एपस्टिन फाईल्समध्ये जे काही आहे हे धक्कादायक असले तरी नवीन नसावे. आणि भारतातही असे प्रकार होत नाहीत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे मंडळींच्या उपस्त्रिया, नाटकशाळा वगैरे असायच्याच. त्यांना लग्नाच्या बायकोचे स्थान थोडीच होते? ठेवलेल्या बायका सोडून त्यांची फार किंमत केली जात होती असे वाटत नाही. ती जुनी गोष्ट झाली म्हणून समजा सोडून दिली. पण आताच्या काळातही असे प्रकार चालत नाहीत असे आहे का? भारतातील एका मोठ्या बी-स्कूलमध्ये चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी असेल तर प्लेसमेंट कमिटीमधल्याबरोबर झोपावे लागेल अशी मागणी प्लेसमेंट कमिटीतील कोणत्या मुलाने केली किंवा अशी चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी म्हणून मुली झोपायला पुढे झाल्या असे दोन्ही बाजूंने चालणारे परस्परांना सहकार्य करणारे प्रकार झाल्याचे रेडिट आणि कोरावर कालपरवा वाचले. असले प्रकार पूर्वीही होत असले तरी नाकासमोर चालणार्‍या माझ्यासारख्याच्या ते लक्षात आले नसावेत. आपल्यासारख्यांना हे सगळे धक्कादायक वाटले तरी sex sells is a fact. मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये सेल्समध्ये क्लाएंटबरोबर बसून दारू प्यायली आणि मुलगी असेल तर दुसरे काही प्रकार केले तर मग कंपनीला जास्त बिझनेस आणता येतो आणि जास्त बिझनेस आणला की कॉर्पोरेट शिडी अधिक वेगाने चढता येते. दिसायला चांगली आणि ढिले कॅरॅक्टर असेल तर अशा मुली अशा ठिकाणी भरपूर प्रगती करतात. अर्थात भरपूर प्रगती झालेल्या सगळ्या तशाच असतात असे मला नक्कीच म्हणायचे नाही पण असे करणार्‍यांची भरपूर प्रगती होते हे पण तितकेच खरे. या सगळ्या गोष्टी सगळीकडे पडद्याआड चालूच असतील- केवळ एपस्टिन फाईलने ते बिंग फोडले म्हणून ते उघड झाले इतकेच. शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच असतात. तेव्हा या बाबतीत भारतीय लोक फार वेगळे असतील असे वाटत नाही. एपस्टिन फाईलमुळे पाश्चिमात्य लोक भोगवादात बुडलेले पण भारतीयांची सद्सदविवेकबुध्दी जागृत असते असे काही असेल असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti Sun, 02/15/2026 - 13:40
नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर भारतीय लोकांचीच मक्तेदारी नाही. अर्थात भारतातही हॆ प्रकार घडतात, काही तरी उजेडातही येत नाही. आसाराम आणि त्याच्या भक्तांचा किळसवाणा प्रकार कोणीच विसरले नाही. पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.

In reply to by Bhakti

पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही. कोणी कसला आधार घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. त्याविषयी इतरांना काही आक्षेप असायचे कारण नाही.पण हा मुद्दा जरा वेगळा आहे. मुद्दा हा की एपस्टिन फाईल्सच्या निमित्ताने पाश्चिमात्य (लोक/संस्कृती/तत्वज्ञान) भोगवादात बुडलेले आहे त्यापेक्षा भारतीय तत्वज्ञान अधिक चांगले आणि चुकीचे प्रकार करण्यापूर्वी भारतीय मन शंभरदा विचार करते आणि आपला त्यागवाद अधिक श्रेष्ठ आहे या दाव्यावर सगळी चर्चा आहे. कोणी कोणता मार्ग जोखाळावा याच्याशी त्याचा संबंध नाही.

विजुभाऊ गुरुवार, 02/12/2026 - 15:16
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का?

In reply to by विजुभाऊ

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:19
धर्म हा कुठल्यारती एका विचारसरणीवर (Dogma) आधारलेल्या संप्रदायाचं किंवा पंथाचं (Cult) दुकान असतं. दुकान चालवायचं म्हणजे गिर्‍हाइकं आकर्षित करावी लागतात. परलोकात सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असं हे दाखवलेलं गाजर असतं, मार्केटींग गिमीक. :=)) बोला, तुम्हाला काय हवय, रंभा उर्वशी की ७२ हूर?

😜

- (अधार्मिक) सोकाजी

In reply to by विजुभाऊ

मूकवाचक Fri, 02/13/2026 - 09:52
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात - आत्मिक आनंदाच्या तुलनेत कमी प्रतीचे मानत असतील, सरसकट पाप मानत नाहीत. परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. - अशा गोष्टींचा जेमेतेम बुद्धीमत्ता आणि सरासरीपेक्षा कमी विवेकबुद्धी असलेल्या लोकांवरच प्रभाव पडतो. उदा: अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल अशा पद्धतीने, ओरबाडून आज भोगले नाहीस, तर ते पुण्यकर्म ठरेल आणि परलोकात त्याचे बक्षिस मिळेल अशी लालूच दाखवणे. हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते.

In reply to by मूकवाचक

सुबोध खरे Sat, 02/14/2026 - 19:18
"एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते". कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे. म्हणजेच धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे. माणूस आयुष्यात शेवटी अशा एका टप्प्यावर येतो कि त्याला ऐहिक सुखे किंवा भोग यातील रस संपतो. (अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत होते असे नाही). विशेषतः स्वतःला दुर्धर आजार झाला किंवा स्वतःच्या गाडी जवळच्या माणसाचा मृत्यू/ दुर्धर रोग झाल्यास अशा वेळेस माणसाला धर्मच नव्हे तर कर्मकांडे सुद्धा मानसिक बळ देतात. त्यामुळे तरुणपणी धर्म आणि कर्मकांडे यांच्यावर प्रच्छन्न टीका करणारी माणसे सुद्धा शेवटी त्यांच्या आहारी जाताना दिसतात. एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत. मी आमच्या आई आणि वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर कोणतेही संस्कार ना करणारा असलो तरी मी सहसा कुणाच्या धार्मिकतेवर टीका करत नाही. कारण शेवटी माणसाला कोणती गोष्ट मानसिक आधार देऊ शकते हे सांगणे कठीण आहे मग ती कितीही पोकळ असली तरी.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Sat, 02/14/2026 - 20:24
कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे.
क्रूरतेचं मूळ अनेकदा अत्यंत कट्टर विचारसरणीत असतं ती धार्मिक असो वा राजकीय. जेव्हा एखादी विचारधारा स्वतःला “एकमेव सत्य” मानते आणि विरोधकांना अमानुष ठरवते, तेव्हा हिंसा सुलभ होते. इतिहास असंही दाखवतो की धर्मप्रेरित व्यक्तींनी महान मानवतावादी कार्यही केलं आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्थांनी मानवी हक्कांची जपणूकही केली आहे. म्हणून प्रश्न “कोण जास्त क्रूर?” असा नसून, “कट्टरता, सत्तेची लालसा आणि मानवीकरणाचा अभाव कुठे निर्माण होतो?” हा अधिक मूलभूत प्रश्न आहे.
कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे.
समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात. . बाकी उरलेला प्रतिसाद धर्म किंवा तत्वज्ञानापेक्षा मानसिक जपणूक किंवा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आहे.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Mon, 02/16/2026 - 19:58
"समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात." मूलभूत गल्लत आहे. एक हुकूमशहा आणि अक्खी विचारसरणी यात कम्युनिस्टांनी आपल्याच लोकांचे केवळ क्रांतीच्या विरोधात असल्याच्या संशयावरून कोट्यवधी लोकांचे शिरकाण केले आणि क्रांती साठी रक्त सांडणे यात काहीही चूक नाही असेच हे लोक मानतात. किंबहुना ते अपरिहार्य आहे असेच मानणारी हि शुद्ध हलकट जमात आहे. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 02/17/2026 - 17:52
इतिहासात काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही, हत्या आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाले हेही सत्य आहे. पण एखाद्या विचारसरणीचे सर्व अनुयायी “शुद्ध हलकट जमात” आहेत असे म्हणणे योग्य ठरत नाही. सैधांतिक मांडणी आणि त्याची अंमलबजावणी ह्यातील दरी हेही एक कारण असले तरी स्टालिन, माओ किंवा पॉल पॉट ह्यांच्या उदाहरणातही त्यातील अपराधांची जबाबदारी त्या राजवटींवर आणि नेत्यांवरच येते. पण संपूर्ण विचारसरणीचे सर्व अनुयायी एकसारखे आहेत असे म्हणणे वस्तुस्थितीशी जुळत नाही. कोणत्याही विचारसरणीचे मूल्यमापन करताना तिची तत्त्वे, तिची अंमलबजावणी, आणि त्या काळातील राजकीय-सामाजिक संदर्भ वेगळे करून पाहणे अधिक न्याय्य ठरते. तुमच्या मते "आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे जर शुध्द हलकट जमातीचे असतील" तर ह्या विधानाचा पुन्हा विचार करुन बघा. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही. निरपराध आदीवासी दोन्ही बाजूंनी नाडले आणि मारले गेले होते. अनेक आदिवासी भागांमध्ये जमीन, जंगल हक्क, विस्थापन, शोषण यांसारख्या प्रश्नांमुळे असंतोष वाढला. त्या पार्श्वभूमीवर काहींनी माओवादी चळवळीला पाठिंबा दिला. पण त्यामुळे निरपराधांवरील हिंसा योग्य ठरत नाही. पण ह्यातील ज्यांना पश्चाताप व्हायला हवा असे वाटते त्यांना शासन करतानाही कित्येक निरपराध आदीवासींचा बळी गेला आहे. त्याच वेळी, त्या प्रदेशांतील सामाजिक-आर्थिक समस्या आणि राज्याच्या धोरणांचाही विचार करणे आवश्यक ठरते. हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन कोणत्याही बाजूने झाले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 02/17/2026 - 20:02
काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये कोणत्या कम्युनिस्ट राजवटीत असं झालेलं नाही ते सांगा. आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे हलकट नाही तर दुसरं काय म्हणायचं हे आपणच सांगा सरकारने, सरकारचे, सरकारसाठी असलेले लोक म्हणजे कम्युनिझम अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

मूकवाचक Mon, 02/16/2026 - 11:04
तथाकथित निधर्मी लोक आणि त्यांचे निधर्मगुरू कट्टरपणा आणि क्रौर्य या बाबतीत तसूभरही कमी नाहीत. धार्मिक गुरू किंवा संस्था यांची चांगली बाजू हेतूपुरस्सर बघायचीच नाही, मात्र त्या संबंधातले भ्रष्टाचाराचे उदाहरण सापडले की आकाशपाताळ एक करायचे अशी वैचारिक फॅशन रूढ झाली आहे. तथाकथित समाजवादी, समतावादी, पुरोगामी वगैरेंना तोच मापदंड लावला जात नाही. असो. फरक एकाच बाबतीत आहे - पुरोगामी, समाजवादी लोक परलोकात काहीतरी मिळेल अशी लालूच दाखवत नाहीत. इहलोकातच आपल्या कामगिरीची बक्षिसी (राष्टीय/ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पैसा/ शिष्यवृत्त्या(!), आपल्या पाळीव माध्यमांमधून प्रतिष्ठा मिळवून देणे वगैरे) मिळेल अशी भक्कम 'इकोसिस्टीम' त्यांनी उभी केलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो.
अरे वाह, तुलनात्मक डेटा असेल इतिहास असेल तर वाचायला आवडेल.
एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत.
अरे वाह, एका अनुभवाने धार्मिक झाला म्हणायचा माणूस. वाचावे ते नवलच. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Tue, 02/17/2026 - 13:45
धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. @सुबोध खरे, आपले विचार, व्यासंग व अनुभव यांचा आदर आहे तथापि, या बाबतीत मी सहमत होण्याइतका माझ्याकडे डेटा नाही. माझ्या समजुतीनुसार एक समाज म्हणून धर्मांध असो वा निधर्मी असो, खरा हिंदू कधीही क्रूर असू शकत नाहीत. हं बाकी, इतर काही पंथीय लोक क्रूरपणाची परिसीमा गाठतात याच्या घटनांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त Mon, 02/16/2026 - 20:43
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का? मुळात व्यापक अर्थाने 'भोग' ही मनुष्यप्राण्याच्या अगदी मूलभूत गरजांपैकी एक आहेसे दिसते.

कॉमी गुरुवार, 02/12/2026 - 16:21
Epstein फाईल्स मध्ये नसलेल्या गोष्टी किंवा बादरायणी संबंध लाऊन अचाट दावे सध्या नेटवर पसरले आहेत. आपण काळजी घ्यावी. तुम्ही दिलेले उदाहरण घ्या. मेलमध्ये कॅनिबल हा शब्द आला म्हणजे एपस्टीन मानवी ऑर्गनचे बुफे भरून जेवायचा असा अर्थ होत नाही. त्या मेल्समध्ये casual मेल पण आहेत. उगाच शब्द त्यात आला म्हणजे काही गुन्हा घडला असे नाही. बाकी लेख अत्यंत एकसुरी वाटला. ह्यात मांडण्यासारख्या अनेक दुसऱ्या बाजू आहेत. पश्चिमी कसे खराब आणि आपण कसे हुच्च ह्याच्या अगदी विरोधी मत मांडणारा लेख सुद्धा सहज पाडता येईल.

अकिलिज Fri, 02/13/2026 - 19:23
चौकात लाल सिग्नल लावा. एक भारतात लावा. एक युरोपात लावा. फरक डोळ्यांनी बघा. कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार कसे व्यवस्थित करते. ते बघा. टोलच्या रांगात सगळे कसे व्यवस्थित लायनीत जातात. एकमेकांना कसे घूसू देतात. बघा मजा. लहान मुलांना कानफटवणे हे ज्यांच्या अंगवळणी पडले आहे त्यांना पेशन्सने बोलणे कसे शिकवणार. भारतवर्षाचा अभिमान जरूर वाटावा. पण जे चूक आहे ते मान्य तर करायला शिका.

एकदा खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून मी ट्रेकला जात होतो. जागा नसल्याने दोन सीटच्या गॅप मध्ये उभा होतो, एक कला अध्यात्म, धर्म, देव ह्याबद्दल दुसऱ्या काकाना सांगत होते, अतिशय मंत्रमुग्ध वातावरण होते, अर्ध्या एका तासाने त्या काकानी हातातली शेंगा खाऊन उरलेली टरफल्यांची पिशवी खिडीकी बाहेर टाकली.

स्वधर्म Fri, 02/13/2026 - 23:21
नागनिका जी, आपले चिंतन वाचले. लहानपणी मला आणि बहुतांश लोकांना आपण म्हणता तसेच वाटत आले आहे. शरीराच्या पलिकडे असलेल्या स्व व अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन भारतीय तत्वज्ञानात आहे, हे मान्य. पण जाण आल्यावर हळू हळू भारतीय संस्कृतीबाबतचा तथाकथीत अभिमान गळून पडला. इथे लिहिलेले विचार भाबडे आहेत की धूर्त आहेत असा प्रश्न पडला. त्यामुळे मनात आलेले काही प्रश्न आपल्यासमोर ठेवत आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते ते वाचायला आवडेल. १. भारतीय संस्कृती प्राचीन आहे त्यामुळे ती जास्त प्रगत असायला हवी होती. तसे काही सध्या आढळून येते का? आपला समाज जगातील इतर समाजांच्या तुलनेत अधिक सुखी समाधानी आहे का? भारताचा आनंद निर्देशांक जगात तळाला का असावा? २. भारतीय मनाची बैठक समरसतावादी आहे, समतावादी नाही. नेता अचानक गेल्यानंतर त्या पक्षातील सर्वात लायक माणसाला कधीच संधी मिळत नाही. नेत्यालाही ती विशिष्ट घराण्यातले असल्यामुळेच मिळाली होती. कितीही गैरप्रकार समोर आले तरी लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. उलट लोक असेच होणार हे मानून पुढे गेले. ही कसली महान संस्कृती? सर्व नागरीक समान आहेत असे मानणारी लोकशाही भारतात का रूजू शकली नसावी? ३. आर्थिक विषमता व वर्गाधारीत शोषण सर्वच समाजात आढळून येते. अधिक क्षमता असलेले लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ समाज गट तयार करतातच. पण 'जात' ही फक्त आणि फक्त जन्माधारीत संकल्पना फक्त दक्षिण पूर्व आशियातच का आढळून येत असावी? आपल्याच रक्तामासाच्या बांधवांचे केवळ जातीआधारित शोषण जगात इतर कुठेही नाही. तसेच स्त्रियांना जरूर देवी बनवून देव्हार्‍यात बसवले गेले पण तिला समान मानले का नसावे, तिचे शोषण हजारो वर्षे का झाले असावे? ४. भारतीय संस्कृतीतले सगळेच संत बंडखोर होते. त्यांचा तत्कालीन समाजाने छळच केला व नंतर त्यांची पूजा केली. हे अगदी ज्ञानेश्वरांपासून र धों कर्वे, महात्मा फुले यांच्यापर्यंत हे असेच आहे. एवढे सांस्कृतीक संचित असलेल्या भारतीय समाजाला चांगले काय हे वेळीच का ओळखता आले नसावे? ४. चांगल्या संस्कृतीचा सर्वात मोठा मानक न्याय असावा. पण भारतीय समाजात नेहमीच न्याय का नसावा? अगदी मर्यादा पुरूषोत्तम राम हाही न्यायासाठी नाही तर वडीलांच्या इच्छेचा मान म्हणून वनवासाला गेला. न्याय महत्वाचा असता तर त्याने वडीलांच्या इच्छेपेक्षा त्यांना तत्कालीन न्याय्य काय हे सांगायला हवे होते. सीतेशी राम जसा वागला (अग्नीपरिक्षा), तसे आजच्या काळात कोणी वागले तर तो माणूस वंदनीय ठरेल काय? न्यायापेक्षा वडीलधारे, परंपरा काय म्हणते हेच इथे का महत्वाचे आहे? न्यायासाठी भांडणारे आयुष्य खर्च करतात, पुस्तके लिहितात. आपल्या समाजात न्याय मुळीच सहज नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना सुखी समाधानी आयुष्य लाभते असे वाटत नाही. संघर्ष अटळ का?

In reply to by स्वधर्म

जेन झी शी बोलल्यावर मला एक लक्षात आले की या मुलांना खूप फ्रस्ट्रेशन आहे. पण त्यांना त्यांचा राग कुठेच काढता येत नाही. या मुलांना जगात काय चाललं आहे हे सगळी कडे दिसत असते. प्रगत समाजांत आपल्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बरोबर जगात अनेक जण सहज PDA करतात मात्र भारतीय मुलांना आपल्या प्रियकर प्रेयसी यांना स्पर्शही करता येत नाही. या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून त्यांच्यात अनेक न्यूनगंड तयार होतात आणि ते आपली व्यवस्था ही एक 'संस्कृती' असून कशी 'त्यांच्याहून' भारी आहे वगैरे जस्टिफिकेशन देत राहतात. मग त्यांना भूतकाळातून हे आधिभौतिकाचे तुकडे काढून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत राहण्याचा एक विचित्र न्यूनगंडात्मक छंद लागतो. प्रत्यक्षात बिचाऱ्याची बत्तीशीपर्यंत जातीबाहेर सोडाच जाती अंतर्गत देखील लग्ने होत नाहीत. जेन झी मुलाना आजकाल एका कसल्या तरी सनातन धर्माचे वेड लागले आहे. प्रत्यक्षात तो धर्म काय आहे आणि तो कशाशी खायचा हे त्यांना कळत नाही. कारण पदोपदी रोजच्या जगण्यात आणि त्या उदात्त आधिभौतिक प्रिंसिप्लस मधे नेहमीच टोकाची विसंगती दिसत राहते. एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात. मात्र त्या सनातन धर्माचे या आत्ताच्या जगातले ऐहिक मॅनिफिस्टेशन मात्र कसे वर येतात तर कॅफे मधे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे. कुठं कालिदास वगैरची उदबत्ती लावताय दोस्तांनो? अधिभौतिकाची आणि ज्ञानमार्गाची प्रचंड मोठी परंपरा असूनही आज सगळी कर्मकांडे प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात कंठाळी पद्धतीने सेलेब्रेट केले जातात. प्रत्येक देवस्थानाला अद्वैत लांबच राहिले, द्वैतही सोडा एकदम अंधश्रद्धेच्या आसपास जाणारी अनेक कर्मकांडेच मोठी करायचा छंद जडला आहे. एकेकाळी फक्त गणपती असणारा आज प्रत्येक गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. यात कुठेही मला ज्ञानमार्गाचा मोठेपणा दिसत नाहीच तर बहुतेक समाजाला केवळ ट्रांसॅक्शनल कर्मकांडातच गुंतून पडायचे आहे असे स्पष्ट दिसते. एकूण दिलको बेहलाने के लिए ये वेदांत अच्छा है असेच आहे बहुतेकांचे. ९९ टक्के लोक काही का करेनात, लिंचिंग वगैरे का करेनात आपण मात्र चार दोन सूक्ते काढून काहीतरी वैश्विक गफ्फा हाणत राहायच्या.

In reply to by स्वधर्म

सोत्रि Sat, 02/14/2026 - 07:17
स्वधर्म, तुमचा प्रश्न नागनिका यांना आहे आणि त्या/ते उत्तर देतीलंच. पण, मी माझं मत सांगण्यास तुमची हरकत नसावी हे गृहीत धरून माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. लेखातून मी इंटरप्रीट केलेला गाभा असा आहे की: कॅपीटलीस्ट पाश्चात्य देशांमधे भौतिक चंगळवादाचे प्रस्थ प्रचंड आहे; एपस्टीन प्रकरण त्यासाठी बॅकड्रॉप/वानगी म्हणून. अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन जे भारतीय तत्वज्ञानात आहे ते पाश्चात्य तत्वज्ञानात तितकं मुलभूत आणि सखोल नाहीयेय. त्यामुळे भौतिक चंगळवादातून बाहेर का पडायचे किंवा त्यापलीकडे काही आहे हेच माहिती होत नसल्याने अधिकाअधिक भौतिक चंगळवाद हेच धेय्य बहुतांशी पाश्चात्य देशांमधे आहे. सुदैवाने, सखोल भारतीय तत्वज्ञानामुळे आपल्याला एक दिशा किंवा मार्ग उपलब्ध आहे अधिभौतिकाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही 'भारतीय संस्कृती' हा मुद्दा सामाजिक अंगाने मांडताय, जो योग्य आहे आपल्यजागी, पण तो ह्या धाग्याचा विषय नाही, माझ्या आकलनानुसार. (डिस्क्लेमरः आधिच्या प्रतिसादात म्हटलं तसं धाग्याच्या फक्त ह्या गाभ्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.) - (मत मांडण्याचा अधिकार जपणारा) सोकाजी

In reply to by स्वधर्म

नागनिका Sat, 02/14/2026 - 09:09
स्वधर्मजी विस्तृत प्रतिसादाबद्दल आपले आभार ! संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. पण संस्कृती जितकी flexible तितकी लवकर रुजते, विस्तारते आणि टिकते ही. ज्या संस्कृती एकाच एका गोष्टीला चिकटून असतात, काळाप्रमाणे बदलत नाहीत त्या लोप पावतात.( उदा. सुमेरिअन, रोमन इ.) त्याचप्रमाणे न्यायाच्या संकल्पन बदलत जातात. पण व्याख्या तीच राहते. द्वापारात नियोग न्याय्य होता. पण सध्या नाही. तसेच त्रेतायुगात काही गोष्टी सामान्य होत्या, ज्याचे आज अप्रूप वाटते. द्वापारात राजपरिवारातील व्यक्ती ब्रह्मचारी असण्याचे प्रमाण नगण्यच होते. म्हणून भीष्माचे राजत्याग करून ब्रह्मचारी राहणे काहीतरी अद्भुत वाटले त्या लोकांना. तुमच्या तिसर्या मुद्याशी मी सहमत आहे. ककारण तोच तर विरोधाभास आहे. जे ज्ञान , संस्कृती पूर्वजांनी दिली त्याचा विसर पडला व भौतिक चंगळवाद सोकावला. त्यामुळे किंबहुना अज्ञानामुळे अशी परिस्थिती आहे. ( वरील काही प्रतिसादात सिग्नल, टरफले अशी काही उदाहरणे दिली आहेत. त्यालाही हेच म्हणणे लागू होते. चांगले वागणे म्हणजे काय ते माहित असते, पण ते का वागायचे हे माहित नसल्याने अशी कृती होते. सगळ्याचे मूळ अज्ञान आहे.) बाकी सोकाजींना धन्यवाद. त्यांनी लेखाचा गाभा योग्य सांगितला.

In reply to by नागनिका

स्वधर्म Sun, 02/15/2026 - 03:17
नागनिका जी, धन्यवाद, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रतिसादात नाहीत. >> संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. इथे आपल्या बोलण्यात विरोधाभास आहे. आपण रोमन, सुमेरियन वगैरे संस्कृती बदलल्या नाहीत म्हणून नष्ट झाल्या अशी उदाहरणे देत आहात, पण वैदिक संस्कृती (अपौरुषीय वेद, गीता इ.) रोमन, सुमेरियन संस्कृतीपेक्षाही प्राचीन आहे. ती कुठे बदलली? तुम्ही तर त्याच न बदललेल्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगत आहात ना? उलट पाश्चात्यांनी जुन्या रोमन वगैरे संस्कृती लवचिकपणे सोडून दिल्या व नवे विचार (रिनायसन्स इ.) बदल घडवले. त्यामुळे त्यांनी अधिक चांगल्या संस्कृती विकसित केल्या असा निष्कर्ष निघतो व म्हणून त्यांची संस्कृती श्रेष्ठ ठरत नाही का? तुंम्ही दिलेले नियोगाचे उदाहरण (अपत्यप्राप्ती कशी करावी?) हे न्यायाच्या बाबतीत मुळीच महत्वाचे वाटत नाही. एकतर ते पुराणातले उदाहरण आहे, इतिहासातले नाही. दुसरे म्हणजे कुणालातरी ब्रम्हचर्य अप्रूप वाटणे वगैरे मुळीच महत्वाचे नाही. न्यायाच्या बाबतीत सर्वांना एकाच गुन्ह्याला समान शिक्षा अपेक्षित आहे. ते भारतात कधीही नव्हते. कारण गीतेत सांगितलेले वर्णाश्रम व वर्णधर्म जे हजारो वर्षे समाज पाळत आला. या एका गोष्टीने भारताचं इतकं नुकसान केलं की आपण मागासच राहिलो व अजूनही आहोत. त्याचा कसला अभिमान बाळगायचा? >> सगळ्याचे मूळ अज्ञान आहे. हजारो वर्ष इतके महान ज्ञान उपलब्ध असूनही बहुसंख्य भारतीय समाज अज्ञानी असेल तर आपण ज्याला ज्ञान म्हणता ते ज्ञान तरी कसं म्हणायचं? @सोकाजी लेखाचा मूळ गाभा एपस्टीन सारखे लोक पाश्चात्य समाजात निर्माण होतात पण भारतीय समाजात तसे होत नाही कारण "... भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते ." असा आहे. पण हे खरे नाही कारण आपल्याकडे प्रज्वल रेवण्णा प्रकरण घडले जे तुम्हाला आठवत असेलच. त्याला निवडून द्या असे आवाहन गंगापुत्र, सनातन संस्कृतीपूजक महानेत्याने त्याच्या मतदारसंघात सभा घेताना केले होते. त्याच्यावर शेकडो स्त्रियांचे शोषण करून व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा आरोप सिध्दही झाला होता. त्याला शिक्षा झाली आहे. दुवा: https://www.bbc.co.uk/news/articles/c87edydwpv7o हा आपल्याकडचा एपस्टीनच नव्हे तर काय? असे अनेक असतील पण आपल्याकडे थोरामोठ्यांच्या भानगडी उजेडात येत नाहीत. आपण पाश्चात्य समाजात एपस्टीन घडतो त्याल्या घृणास्पद समजत आहात पण पाश्चात्य समाजात अनेकांना आपली पदे, संपत्ती एपस्टीन प्रकरणात नांव आल्यामुळे सोडावी लागली व त्यांना शिक्षा मिळाली. आपल्याकडे मात्र ज्यांचे नांव आले त्यांना अजून तरी काहीही झालेले नाही या वास्तवाकडे संपूर्ण डोळेझाक करत आहात. हा भेदभाव हेच तथाकथित सनातन संस्कृतीच्या अनुयायांचे मुख्य लक्षण आहे हे सिध्द होतंय. @हणमंत आण्णा शंकर यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने नागनिकाजी आपले आकलन न आवडणार्‍या वास्तवापेक्षा लहानपणापासून सांगितल्या गेलेल्या भावनिक अभिमानाने प्रेरित तर नाही ना, याचा विचार करावा ही विनंती. वरती हणमंत आण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे "...एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात." असे तुमचे झालेले नाही ना?

मला एक प्रश्न नेहमी पडतो. सध्याच्या काळातील पाश्चिमात्य तत्वज्ञ आपलेच तत्वज्ञान अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. वेन डायर, बॉब प्रॉक्टर, एकहार्ट टोली वगैरे बोलतात तेव्हा कुठेतरी जाणवते की निदान तेवढ्यापुरते तरी ते आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत. नॉर्मन व्हिन्सेंट पील हे तर ख्रिस्ती धर्मगुरूच होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात बायबलचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. त्याप्रमाणेच नेव्हिल गॉडर्ड यांच्या बोलण्यात आणि लिखाणातही जिससचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. मात्र इतरांच्या बोलण्यात/लिहिण्यात जिसस किंवा ख्रिस्ती धर्माचा उल्लेख क्वचितच येतो. तसेच ते कुठेतरी आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत पण अधिक सुलभ पद्धतीने असे जाणवते. उगीच कसलाही अभिमान नाही (ज्याला मी उपहासाने वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो), हे जग म्हणजे सगळी माया आहे, त्यात गुरफटून जाऊ नका आणि आपले चित्त प्रभूचरणी लीन ठेवा म्हणजे भवसागर तरून जाल वगैरे दिसायला भारदस्त दिसणारी पण त्यातून नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणारी भाषा वापरत नाहीत. उलट काय करणे अपेक्षित आहे हे अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. हे असे का होत असावे? दुसरे म्हणजे नॉर्मन व्हिन्सेंट पील किंवा नेव्हिल गॉडर्ड अगदी बायबलमधील भाषा बोलत जरी असले तरी ते जे काही बोलतात ते मला तरी नक्कीच पटते. बायबलमध्ये मला माहित नसलेल्या पण अनेकांना आक्षेप असलेल्या काही गोष्टी असतील त्याविषयी मला काहीच भाष्य करता येणार नाही कारण त्या गोष्टी माहित नाहीत. मात्र अगदी बायबलमध्ये जरी सकारात्मक विचारांविषयी काही उल्लेख असतील तर माझ्या 'सहिष्णू' हिंदू आणि भारतीय मनाला ते अजिबात खटकत नाही. तस्मात वेदांमध्ये किंवा भारतीय तत्वज्ञानात चांगल्या गोष्टी आहेत हे मान्य केले तरी मात्र भारतीय तत्वज्ञानातच सगळे काही आहे आणि इतर ठिकाणी भुसा भरला आहे अशी परिस्थिती कदाचित नसावी. दुसरे म्हणजे भारतीय तत्वज्ञान महान आहे असा दावा करणार्‍यांपैकी किती जणांंनी त्याचा खरोखरच अभ्यास केलेला असतो हा प्रश्नही पडतो. आणि आपले तत्वज्ञान पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा करायचा असेल तर दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. असे दावे करणार्‍या किती जणांनी तो खरोखरच केलेला असतो हा पण प्रश्न पडतो. ही एक जनरल गोष्ट लिहित आहे- इथल्या चर्चेतील कोणालाही उद्देशून ते नाही तेव्हा अकारण गैरसमज नसावा. भारतीय तत्वज्ञान म्हटले की आम्हीच काय ते श्रेष्ठ आणि इतरांना काही कळत नाही या गृहितकापासून सुरवात करून मग आपल्या गृहितकाला अनुसरून असलेली तेवढीच वाक्ये उचलणारे लोक वैयक्तिक चर्चेत बघितले आहेत. माझी जी काही थोड्याफार लोकांशी याविषयी चर्चा केली आहे त्या मर्यादीत सॅम्पल सेटवर आधारीत विधान आहे. ते सर्वांना लागू पडेल असा माझा अजिबात दावा नाही. असे लोक अर्थातच मिपावर नाहीत आणि त्यापैकी बरेच आता या जगातही नाहीत त्यामुळे त्यांना इथे चर्चेत बोलावता येणार नाही. पण अशा अ‍ॅप्रोचमधून वृथा अभिमान निर्माण होणे आणि आपलीच कॉलर ताठ करणे सोडून फार काही साध्य होते असे वाटत नाही. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन. आता आपण आपल्या भारतीय सखोल चिंतनाकडे वळूया. तत्त्वज्ञानामध्ये भारताकडे आता सांगण्यासारखं काय आहे? काहीच नाही. इथे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे आजही तत्त्वज्ञान मांडता येते याचा भारतीयांना विसर पडला आहे. आणि दुसरा मुद्दा आमच्याकडे ऑलरेडी सगळेच आहे अशी आत्मस्तुती करण्याचा जडलेला रोग. महाराष्ट्र पुरते बोलायचे तर गुलाबराव महाराज किंवा वाई मध्ये असलेली प्रज्ञशाळा अशा प्रकारचे प्रयत्न दिसतात. पूर्णवाद किंवा अविभक्त आत्मवाद या गोष्टी मागच्या शतकात मांडलेल्या दिसतात. मात्र त्या काही नोवेल गोष्टी नव्हत्या आणि त्यांना समकालीनत्व तर नव्हतेच नव्हते. पुन्हा या सगळ्या गोष्टी मेटा फिजिकल किंवा मेटामटा फिजिकल असल्याने वितंड घालायची आवड असणाऱ्या वादप्रवण भारतीयांना एवढेच जमले आहे. अमर्त्य सेन यांनी वादाळू भारतीयांवर एक पुस्तक लिहिले आहे परंतु त्यातून शालीतून जोडेच मारलेले आहेत अनेक लोकांना ते कौतुकपर पुस्तक वाटते. मात्र साहित्य असो किंवा राजकारण जर्मन तत्वज्ञांनी संपूर्ण जग उलथापालथ केले. अलीकडे मी अनेक तत्त्वज्ञांचे लेक्चर्स असतो आणि मार्कूस यांची लेक्चरे सध्या माझी अत्यंत आवडती आहेत. त्यात त्यांनी मांडलेला जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत किंवा नव नव वास्तववाद हे खूप महत्त्वाचे सिद्धांत असून त्याचा एकूण समाजावर किंवा वैज्ञानिक प्रगतीवर किंवा अतिवैज्ञानिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. यातील जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत आपल्या जग मिथ्या आहे या सिद्धांत यापेक्षा वेगळा आहे कृपया त्यांची गल्लत करून घेऊ नका. नाहीतर पुन्हा आत्मवस्तुतीचे एक रान तुम्हाला मोकळे झाल्यासारखे वाटेल. मात्र अशा दर्जाचे काम मला भारतातील कुठल्याही तत्त्वज्ञाने मग ते आध्यात्मिक क्षेत्रातून असो किंवा अकादमी क्षेत्रातून असो मांडल्याचे दिसत नाही. मग समृद्ध ज्ञानमार्गी परंपरा असलेल्या भारतामध्ये एवढे स्टॅगनेशन का आले आहे? याचे कारण भारत सामाजिक प्रश्नांमध्ये एवढा गुरफटून गेलेला आहे की कोणताही पंथ जात पाहत वगैरे न पाहता जन्माला येणारी बुद्धिमत्ता ही आयुष्यभर त्याच गोष्टींशी झुंजण्यात खर्ची होते. आणि त्यातूनही काही उरलंच तर ते आत्मस्तुती किंवा भारतीय अध्यात्माने आणि धर्मांनी तत्त्वज्ञानाच्या बुरख्या आडून घालून दिलेली कर्मकांडे करण्यातच खर्च होतात. चंद्र सूर्यकुमार यांचे म्हणणे मला पटते. यात पुन्हा भारतीयांना जडलेली व्हॅलीडेशनची सवय द्रुगोचरच होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन.
धन्यवाद. मार्कस गॅब्रिएल यांच्याविषयी माहित नव्हते. त्यांचे पण व्हिडिओ बघतोच. मी आतापर्यंत अभारतीय तत्वज्ञांपैकी जास्त करून अमेरिकन तत्वज्ञ फॉलो करत आलो आहे (अपवाद फक्त एकहार्ट टोली- ते पण मुळचे जर्मनीचे). मार्कस गॅब्रिएल यांच्याच पिढीतील अमेरिकन गॅब्रिएल (गॅब्रिएला?) उर्फ गॅबी बर्नस्टीनची पुस्तके आणि व्हिडिओ पण आवडतात. बाकी वेन डायर, नॉर्मन व्हिन्सेंट पील, लुईज हे, नेव्हिल गॉडर्ड, इस्थर-जेरी हिक्स वगैरे माझे अगदी ऑल टाईम फेव्हरेट आहेत. धन्यवाद.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वर म्हटल्याप्रमाणे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील, नेव्हिल गॉडर्ड यांची पुस्तके/व्हिडिओ मला आवडतात. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी केवळ बायबलमधील आहेत आणि आपल्या कोणत्या स्त्रोतात नाहीत म्हणून पटल्या तरी ते नाकारणे मला तरी आवडत नाहीत. उदाहरणार्थः १. Isaiah 41:10 – “Fear thou not; for I am with thee…” याची मला फारशी गरज पडते असे नाही पण अक्कलकोट स्वामींचे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे वचन किती वेगळे आहे? २. Romans 12:2 – “Be ye transformed by the renewing of your mind…” विचार बदला- आयुष्य बदलेल हे केवळ बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून नाकारायचे का? ३. Proverbs 23:7 – “For as he thinketh in his heart, so is he.”- जसा विचार कराल तसे बनाल हा कॉमन सेन्स नाही का? बायबलमध्ये लिहिले म्हणून तो कॉमन सेन्स नाकारायचा? ४. Matthew 21:22 – “And all things, whatsoever ye shall ask in prayer, believing, ye shall receive.”, Mark 11:24 - “Therefore I say unto you, What things soever ye desire, when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them.” अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही. तरीही हे तत्वतः पटते. ५. Matthew 21:21 - “…If ye have faith, and doubt not… if ye shall say unto this mountain, Be thou removed… it shall be done.” Luke 17:6 - “If ye had faith as a grain of mustard seed, ye might say unto this sycamine tree, Be thou plucked up by the root… and it should obey you.” - आपल्याकडे मुकं करोति वाचालम... पेक्षा हे वेगळे आहे असे मला तरी वाटत नाही. (स्पष्टीकरणः ही सगळी वचने मला तोंडपाठ आहेत असे नक्कीच नाही. अशाप्रकारचे वर उल्लेख केलेल्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये वाचले होते ते आठवले आणि मग नक्की वचन कोणते, ते बायबलमधील कोणत्या पुस्तकात आहे वगैरे चॅटजीपीटीला विचारले). तेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हे नक्कीच- त्यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हा अ‍ॅटिट्यूड थोडा संक्षींप्रमाणे वाटतो. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/14/2026 - 16:24
अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही.
चंसुकु तुम्ही वर कोट केलेली वचनं म्हणात असाल तर, भगवत गीता ही सगळी वचनं कव्हर करते.
मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडेच आहेत, आपल्याकडे चांगल्याच गोष्टी आहेत आणि आपल्याकडेच चांगल्या गोष्टी आहेत
असंं न म्हणता, त्यांच्याकडेही चांगल्या गोष्टी आहेत असं म्हणणं जास्त सयुक्तिक असेल, पण चांगल्याच आहेत असं म्हणता येत नाही. माझ्या दृष्टीने त्याची कारणमिमांसा देतो, जरा शब्दबंबाळ असेल पण भावना समजून घ्या अशी विनंती. पाश्चिमात्य तत्वज्ञ प्रामुख्याने भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याबद्दल (पर्सनल डेवलपमेंट) बोलतात. ज्यामुळे ते स्पष्टीकरण आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेटेबल होऊन सोपे वाटते आणि समजते. उदाहरणार्थ नॉर्मन व्हिन्सेंट पील यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं.
  • The Power of Positive Thinking
  • True Joy of Positive Living: An Autobiography
  • You Can If You Think You Can
  • Positive Thinking Every Day: An Inspiration for Each Day of the Year
  • A Guide to Confident Living
  • Six Attitudes for Winners
  • Confidence
  • Reaching Your Potential
नेव्हिल गॉडर्ड यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं
  • Your Faith is Your Fortune
  • The Power of Awareness
  • Feeling Is the Secret
  • The Power of Imagination: The Neville Goddard Treasury
  • Relax More, Try Less: The Easy Path to Abundance
  • The Wealth Mindset: Understanding the Mental Path to Wealth
  • Imagination Creates Reality
पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
अगदी सहज शक्य आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकू- लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वगैरे हे सांगतात. ते अधिक रिलेटेबल वाटत असावे.
शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे- ते शब्दात व्यक्त करता येणार नाही हे अगदी १००% मान्य. पण मग अशी अनुभूती ज्यांना खरोखरच होत असेल ते लोक 'आमचेच काय ते सगळे चांगले आणि इतरांकडे भुसा भरला आहे' असा अ‍ॅटिट्यूड ठेवतील का? माझ्या मर्यादित सॅम्पल सेटमध्ये मी ज्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांच्या आर्ग्युमेंटची सुरवातच भारतीय तत्वज्ञान श्रेष्ठ किंवा पाश्चिमात्यांच्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ इथपासून झालेली बघितलेली आहे. असेलही. अजिबात नाकारत नाही. पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे. अभ्यासाअंती जे अनुमान निघायला हवे तेच प्रिमाईस म्हणून वापरले तर कसे चालेल? माझे अशा बहुसंख्य लोकांशी पटत नाही ते त्या कारणाने. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/14/2026 - 19:17
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही
नक्कीच! भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे हे सगळं आणि तत्सम तत्वज्ञान जोपर्यंत ध्यानमार्गाने प्रत्यक्ष अनुभवत नाही तोपर्यंत कळणं, उलगडणं कठीण आहे. ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी
हे इंद्रियजन्य असं असायला हवं कारण पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही.
तुम्ही कशाच्या शोधात आहात (seeking) त्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन' वगैरे ह्या संदर्भात शोधत असाल तर ते time and space ह्या मितीतच आहे. जर शोध 'beyond time and space' च्या उलगड्याचा असेल तरच भारतिय तत्वज्ञान रिलेटेबल वाटेल. स्वानुभवाचं उदाहरण देतो, मी विपश्यना ध्यानमार्गावर जाण्याआधि इस्कॉनच्या गीता सेशन्सला जायचो. एका बौद्धिक लेवलपर्यंत गोष्टी कळत होत्या, समज येत होती पण आकलन अथवा उअलगडा होत नव्हता. म्हणजे, रागावर ताबा ठेवा, कामावर (इंद्रियांवर) विजय मिळवा, कुठल्याही परिस्थिरतीत समअवस्थेत रहा. उपदेश म्हणून हे पटत होतं. पण म्हणजे त्यासाठी नेमकं काय करा ? त्यासाठीचा मार्ग, तंत्र, एक्झॅक्ट प्रकिया हे काही त्या सेशन्समधे नव्हतं. सगळं कृष्णावर सोपवा आणि निष्काम कर्म करा, तो सगळा भवसागर पार करून नेण्यास समर्थ आहे, भक्ती करा, नामस्मरण, कीर्तन करा हे असं सगळं असायच. पण दुसरा काही योग्य मार्ग माहिती नसल्याने त्यातच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, उलगडा होत नव्हता तरीही. पण विपश्यना ध्यानमार्गाची माहिती झाल्यावर, त्या मार्गावर चालल्यावर गीतेतल्या श्लोकांचे अर्थ वाचताना साकार होऊन आपोआप उलगडायला लागले (आणि विपश्यना ही अप्लाईड गीता आहे हे कळलं). त्यामुळे ते रिलेटेबल वाटणं हे काय शोधता आहात त्यावर अवलंबून आहे.
पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे.
अर्थातच! विपश्यना धानप्रणालीची उपयुक्तता कळल्यावर ती इतकी मुलभूत कशी आणि इतर तत्वज्ञानात त्याच्या रिलेटेड, जवळ जाणारं काही आहे का हे अभ्यासण्यासाठी मी बहुतेक सगळ्या धानप्रणालींचा (इनर इंजीनियरिंग, सुदर्शन क्रिया, ट्रान्स्डेंटल मेडिटेशन, ओशोंच डायनॅमिक मेडीटेशन, ब्रम्हकुमारी राजयोग, सहज योग, एखार्ट टोल्लींच Present Moment मेडीटेशन, Landmark Forum, Natural Language Processing (NLP)) अवलंब करून बघितला. त्याने जो तुलनात्मक अभ्यास झाला त्यावरच माझी जी मतं आहेत ही बेतलेली आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
प्रश्न हा की एकहार्ट टोलींसारखे अभारतीय लोक तीच गोष्ट सोप्या भाषेत सांगतात पण आपलेच लोक शाब्दिक अवडंबरात का अडकतात?
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
तसे नसावे. वेन डायर अनेकदा हायर सेल्फ चा उल्लेख करतात. Your sacred self हे त्यांचे पुस्तकच आहे. त्यात लिहिलेले beyond time and space असेच आहे. वर म्हटल्याप्रमाणे असे पाश्चिमात्य तत्वज्ञ बोलतात किंवा लिहितात तेव्हा ते आपलेच तत्वज्ञान मांडत असतात हे जाणवते. पण ते विनाकारण जडजंबाल नसल्याने आणि नक्की काय करायचे हे सांगितले असल्याने अधिक रिलेटेबल वाटते. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या (म्हणजे भारतीय) लोकांना याविषयी बोलायला लागल्यावर नक्की काय करायचे या प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा आपली भारतीय संस्कृती किती महान, आपले तत्वज्ञान किती महान असले अभिमान लगेच चावतात. त्यामुळे मग आपोआप वेदकालीन जंगलात भटकणे सुरू होते. त्यापेक्षा मग सिधी बात नो बकवास असा अ‍ॅप्रोच असलेले वेन डायर, एकहार्ट टोली, नेव्हिल गॉडर्ड हे मला तरी अधिक भावतात.

नेहरूंचे सचिव एम.ओ.मथाईंचे Reminiscences of the Nehru Age हे पुस्तक आहे. मला वाटते ते भारतात मिळत नाही. ते पुस्तक मी अमेरिकेतील विद्यापीठाच्या ग्रंथालयातून वाचले होते. त्यात एक उल्लेख होता. आंतरजालावर त्या पुस्तकाचे पी.डी.एफ अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यात आपले दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही उल्लेख आहेत. राधाकृष्णन हे मोठे तत्वज्ञ होते आणि भारतीय तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता हे तर सर्वमान्य आहे. १९५२ ते १९६२ या काळात राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती असताना राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्याकाळी सुरवातीला पदांची हायरारकी- राष्ट्रपती- पंतप्रधान यानंतर तिसर्‍या क्रमांकावर उपराष्ट्रपती होते. तेव्हा राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे आग्रह धरला होता की हायरारकी राष्ट्रपती-उपराष्ट्रपती-पंतप्रधान अशी हवी. म्हणजे थोडक्यात मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे असा त्यांचा आग्रह होता. इतकेच नाही तर त्यावेळेस सुरवातीला राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनाच हवाई दलाची विमाने वापरायचा अधिकार होता. तो अधिकार उपराष्ट्रपतींनाही- म्हणजे स्वतःला मिळाला पाहिजे असा आग्रह राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे धरला होता. हे दोन्ही आग्रह नेहरूंनी मान्य केले. १९५७ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परत राष्ट्रपती पदाची निवडणुक होती तेव्हा राधाकृष्णन यांना राष्ट्रपती व्हायचे होते पण तेव्हाही उपराष्ट्रपती पदावर समाधान मानावे लागले म्हणून ते रूसून बसले होते. तेव्हा नेहरूंनी तुम्हाला पुढच्या वेळेस राष्ट्रपती करू असे आश्वासन दिले. हा सगळा विरोधाभास वाटत नाही का? एकीकडे भारतीय तत्वज्ञान beyond body and time जाते पण त्याचवेळेस मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे, पहिल्या क्रमांकाचे पद मिळाले नाही म्हणून रुसून बसायचे, मला हवाईदलाची विमाने वापरायला मिळाली पाहिजेत हा आग्रह धरायचा हे काही समजले नाही. त्यापेक्षा- हो मला श्रीमंत व्हायचे आहे म्हणून मला लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वापरायचा आहे आणि त्यासाठी गरजेचे असेल इतके आध्यात्म मी वापरेन असा अ‍ॅप्रोच असलेले बॉब प्रॉक्टर अधिक श्रेष्ठ नाहीत का? निदान जगासमोर दाखवायला दोन वेगळे चेहरे तरी नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sun, 02/15/2026 - 10:05
चंसुकु, ५०% सहमती ५०% असहमती. डिटेलमधे प्रतिसाद लिहीतो पण २-३ दिवसांनी, लॅान्ग विकेंड आहे, ट्रीपवर आहे. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

जरूर. वाट बघत आहे. ५०% असहमती कशामुळे असावी? याविषयी माझा अंदाज असा की तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्तीने ऐहिक सुख नाकारावेच असे काही नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला वाटते की ऐहिक सुख नाकारू नये ही अपेक्षा ठीक आहे पण एखादी गोष्ट मिळाली किंवा मिळाली नाही तरी त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही फरक पडला नाही पाहिजे- शेवटी beyond body and time हा अनुभव अधिक महत्वाचा नाही का? तेव्हा एखादी गोष्ट (अमुक एका क्रमांकाचे पद आणि त्या पदाला नसलेले अधिकार) आपल्याला मिळाली पाहिजे हा आग्रह जर धरला गेला असेल तर मग त्या व्यक्तीला ती गोष्ट हवी आहे असाच अर्थ होतो- तस्मात मिळाली किंवा मिळाली नाही तरी काहीही फरक पडत नाही अशी परिस्थिती नसावी. दुसरे म्हणजे beyond body and time असा अनुभव जेन्युईनली आलेले किती लोक असतील? फार नसावेत. पृथ्वीवरील बहुसंख्य लोक मी, माझे पैसे, माझे मानमरातब, माझी गाडीघोडा वगैरेंमध्येच गुरफटलेले असतात. समजा आपल्याकडे beyond body and time वर बरेच काही असेल पण ९९% लोक ज्या स्थितीत असतात त्यांच्यासाठी काहीच नाही का? काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे याविषयी लिहित नाहीये. काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे त्याविषयी जी पुस्तके/भाषणे आताच्या काळात असतात त्याविषयी लिहित आहे. की मग परत भवसागर तरून जायला प्रभूचरणी लीन व्हा अशी दिसायला भारदस्त दिसणारी पण कसलाही अर्थबोध न होणारी तीच भाषा?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 12:32
एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास असणे आणि ते तत्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणणे यात काहीच फरक नाही का ? हे 'एखादा माणूस डॉकटर असतो ततरी तो व्यसनी कसा, तो आजारी का पडतो, तो जंक फूड का खातो' असे विचारण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख श्रीमान योगी किंवा उपभोगशून्य स्वामी असा केला जातो किंवा भगवान श्रीराम यांचा मर्यादा पुरुषोत्तम असा उल्लेख होतो त्यामागे या व्यक्तींचे प्रत्यक्ष वर्तन तपासले जाते अभ्यास नाही. एवढे लांब कशाला जा मनमोहन सिंग साहेब जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्री होते तेंव्हा भारताने कशा पद्धतीने तेलरोखे उभारून ठेवले होते हे सगळ्यांना माहिती आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

यात एक मोठा फरक आहे. तुम्ही मांडलेली इतर उदाहरणे करायच्या गोष्टी आहेत तर अध्यात्म - तत्वज्ञान या अनुभवायचा गोष्टी आहेत. एखादी गोष्ट करायची कशी हे स्वतः न करता इतरांना उत्तम प्रकारे शिकवता येऊ शकते. रमाकांत आचरेकरांनी सचिन घडवला. ते एक उत्तम शिक्षक होते पण सचिनप्रमाणे त्यांनी शतके ठोकली होती का? पण जर एखादी गोष्ट अनुभवायची असेल तर ती इतरांना सांगण्यापूर्वी स्वतः न अनुभवता कशी सांगता येईल हे समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Sun, 02/15/2026 - 16:42
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतचा वाङमयचौर्‍याचा खटला अत्यंत प्रसिध्द आहे. जदुनाथ सिन्हा यांच्या डॉक्टरेटसाठीच्या प्रबंधातील ११० परिच्छेद जसे च्या तसे राधाकृष्णन यांनी आपल्या 'इंडीयन फिलॉसॉफी भाग २' या पुस्तकात वापरले असा खटला १९२८ साली गाजला होता. त्यात अखेर दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या बाहेर तडजोड केली. राधाकृष्णन हे बडे प्रस्थ होते तर सिन्हा हे विद्यार्थी होते. अशा परिस्थितीत जर राधाकृष्णन यांना न्यायालयाबाहेर तडजोड करावी लागली असेल तर ते त्यांच्या इंटीग्रिटीवर पुरेसे प्रकाश टाकणारे आहे. त्यांनी आपल्या मुलींची लग्नेही बालवयात केली होती असे वाचले होते. एकूण ते पुस्तके आदर्शांवर लिहीत होते तरी आचरण अजिबात तसे नव्हते असे म्हणावे लागते. अशा व्यक्तीचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवसच शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे खूप फॉरवर्ड्स वाचले आहेत. पण आपल्या समाजात बोलण्याला आचरणापेक्षा जास्त महत्व आहे हे वारंवार दिसते.

चित्रगुप्त Mon, 02/16/2026 - 20:19
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते .
फक्त दोनचार दिवस 'क्राईम पॅट्रॉल' चे काही भाग बघा. भारतातल्या सर्वसाधारण, अगदी निरुपद्रवी वाटणार्‍या व्यक्ती देखील किती अमानुष, भयंकर गुन्हे करत असतात, याचे आश्चर्य वाटेल. थोड्याफार फरकाने जगभरातल्या मनुष्यप्राण्याचे अंतरंग सारखेच असल्याचे आढळून येते.

कांदा लिंबू Mon, 02/16/2026 - 22:26
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते. . कोणतेही कुकर्म करताना हिंदू मन शंभर वेळा विचार करते. असं म्हणायला हवं. बातम्यांतून, आजूबाजूच्या सामाजिक वर्तनातून दिसणारे अपवाद वगळा. "सर्वे संतु सुखिनः, सर्वे संतु निरामया" व "जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||" असं म्हणणारे हिंदू संस्कृती आणि "काफिरांना संधी मिळताच ठार मारा, त्यांची संपत्ती लुटा, स्वर्गप्राप्ती होईल" असं म्हणणारी परकीय संस्कृती यापैकी काय खरोखर श्रेष्ठ असणार हे निश्चितपणे ठरवता येत नसेल त्यांच्याकडून अध्यात्म,भोग, त्याग इत्यादी वरच्या मताची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे ?

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 13:06
उत्तम आणि समयोचित (एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर) लेख!
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात.
_/!\_ - ('कोहम्'चा प्रवासी) सोकाजी

हा अत्यंत चुकीचा दावा आहे. बहुतेक भारतीयांना अलीकडे असे वाटत आहे की पाश्चात त्यांनी फक्त मटेरियल गोष्टींमध्ये आनंद शोधला आहे परंतु हे एका विवक्षित न्यूनगंडातून मांडले जाणारे अत्यंत उथळ असत्य. युरोपात अनेक ठिकाणी जुन्या मॉनेस्टरीज आहेत जिथे ऐहिक सुखांचा पूर्ण त्याग करून लोक अध्यात्म साधना करतात. पाश्चा त्यांनी एक प्रश्न सोडवले का तर सोडवले आणि त्यातून त्यांना आज उत्तम जीवनशैली मिळालेली आहे. एखाद्या खेडेगावात राहणारे युरोपियन कुटुंब आणि भारतात अगदी मोठ्या शहरात देखील राहणारे भारतीय कुटुंब यांच्यामध्ये युरोपियन कुटुंब हे जास्त सुखी आणि समाधानी आहे. शिवाय युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे. ला ग्रांडे बेलेजझा हा सोरिंतीनोचा चित्रपट पहा. त्यामधली नन म्हणते की मी दारिद्र्याचे व्रत घेतले आहे. एक फार सुंदर प्रसंग या चित्रपटात आहे. एका धन दांडग्या माणसाच्या घरात ही नन मुक्कामाला थांबलेली असते मात्र सुख सुखासीन बेडवरती न झोपता ती तिच्या सवयीने खाली फरशीवरच झोपते. पहाटे बाहेर बाल्कनीत येते तेव्हा तिथे बाल्कनीत अनेक फ्लेमिंगो उतरलेले असतात. काल झालेल्या रात्री झालेल्या अत्यंत lavish डिनर मध्ये उरलेले अन्नपदार्थ हे फ्लेमिंगो खात असतात. आणि ही नन एक हळुवार फुंकर घालते आणि हे फ्लेमिंगो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. ॲनी बेझंट त्यांनी भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली असे आम्ही शाळेत वाचले होते. यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही धर्मांच्या शिकवणुकीचा तौलनिक अभ्यास करणारी माणसे असावेत. पाश्चात्य तत्त्वज्ञ लोकांमध्ये तुम्ही म्हणता तशी मांडणी अजिबात दिसत नाही त्यामुळे तुमचे आकलन उथळ आहे एवढेच नमूद करू इच्छितो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 13:55
युरोपियन धर्मांमध्ये सुद्धा देखील ऐहिक सुखांची निर्भत्सनासच केलेली आहे.
जस्ट फॉर क्युरियोसिटी, कोणकोणते धर्म यात येतात की युरोपियन धर्म असा एक धर्म म्हणता आहात? - (क्युरियस) सोकाजी

In reply to by सोत्रि

जेव्हा आपण 'युरोपियन धर्म' म्हणतो, तेव्हा त्यात प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे विविध पंथ (कॅथोलिक, ऑर्थोडॉक्स इ.) येतात, कारण तिथल्या मॉनेस्टरीज किंवा मठांची परंपरा याच धर्माशी घट्ट जोडलेली आहे. (सेंट बेनेडिक्ट यांनी स्थापन केलेले मठ. येथील भिक्षूगरिबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकतेची शपथ घेतात, मी जिथे राहतो तिथून जवळच असा एक मोठा मठ आहे जिथे आजही अतिशय साधेपणाने जीवन घालवणारे लोक आहेत.) ऑर्थोडॉक्स यांच्यात उदाहरण ग्रीसमधील माउंट अ‍ॅथोस. सेंट फ्रान्सिस सारख्या लोकांनी तर होली पॉवर्टी सारखी तत्वे मांडून आयुष्यभर त्यांचा प्रसार केला. मात्र, ख्रिस्ती धर्माच्या आधीही युरोपमध्ये स्टोईक (Stoic) किंवा पायथागोरियन यांसारखे विचारप्रवाह होते, जे ऐहिक सुखांपेक्षा संयम आणि साधेपणाला जास्त महत्त्व देत असत. थोडक्यात सांगायचे तर, युरोपीय संस्कृतीत केवळ एका धर्माचा प्रभाव नसून, ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून ही 'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही. (धर्माचे ओरिजिन हा टेक्निकल मुद्दा इथे अपेक्षित नाही. नाहीतर ख्रिस्ती धर्म हा इस्रायली धर्म होईल. हेच बौद्ध धर्माच्य बाबतीत आहे. आज बौद्ध प्रामुख्याने पौर्वात्य देशांतला प्रबल धर्म आहे)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नागनिका गुरुवार, 02/12/2026 - 14:51
एका सिनेमाच्या एखाद्या प्रसंगावरून तुम्ही युरोपिय धर्माची तळी उचलत आहात? Annie Besant या भारतीय धर्मावरून प्रभावित होऊन त्यांनी फिलोसॉफीकल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचे प्रेरणा स्थान मूळ देशाच्या संस्कृतीशी नवते. Stoic पंथ वेद्निर्मिती नंतर सहस्रोवर्षानंतरचा आहे. तोपर्यंत वेदातील ज्ञान जवळ जवळ सर्व जगामध्ये पसरले होते. असो.. वैयक्तिक टिप्पणी करून ' झिरो सिव्हिक सेन्स' ट्रेंड तुम्ही फारच गांभीर्याने घेतलेला दिसतोय.

In reply to by नागनिका

>> पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. असे लिहिताना मात्र आपण एकदम ऑब्जेक्टिविटीची परिसीमाच गाठली आहे जणू. मी कुठल्यही धर्माची तळी वगैरे उचलत नाही. वेदांमधे फक्त ज्ञान आहे हा एक खूप मोठा गैरसमज अनेक लोक करून घेतात. वेदांमधील साधारण ९०% ते ९५% भाग हा कर्मकांडाचा आहे ज्यात सगळ्या भौतिक सुखांच्या याचना आणि गरजांसाठी केलेले यज्ञयाग मंत्रे कथा आणि असेच भरताड आहे. येस. इंद्रियसुखे. ऐहिक सुखे. केवळ ठराविक भाग निवडून ९५ टक्के भाग मात्र सोयीस्कर दुर्ल़क्षित करून तुम्ही काय वेगळे करत आहात? साधारणतः उर्वरित भागात आधिभैतिक प्रश्नांचा वेध घेतला आहे. शिवाय त्यातही मुळात केवळ आणि केवळ एत्तदेशियांच्या इन्जिनियसपणातून हे ज्ञान डिस्कस झाले असा फारच गोड गैरसमज करून घेतलेला दिसतो. मुळात आर्य पुरुष इथे कुठून आले? ज्याप्रमाणे अल्केमी या गोष्टींनी आयुर्वेदात रससिद्धांत वगैरे गोष्टी इन्ट्रोड्यूस झाल्या त्याच प्रमाणे वेद असोत किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञान, ज्ञान हे कोलॅब करून आणि कल्पना एक्सेंज करून विकसित झालेले असते. बाकी आपण केवळ न्यूनगंडात्मक आणि मुख्य म्हणजे अज्ञानमूलक आत्मस्तुतीतच मग्न राहणार असाला तर जो जो वांछील तो ते लाहो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विवेकपटाईत Fri, 02/13/2026 - 10:15
उत्तम लेख. स्वामी दयानंद यांची संपूर्ण विचारधारा विज्ञान निष्ठ होती. वेदांची विकृत व्याख्या करणाऱ्यांवर त्यांनी चपराक लावली. देशांत शुद्धी आंदोलन सुरू केले. शिक्षण संस्था उघडल्या. आज आर्य समाजाच्या १५०००० शाळा आणि कॉलेजेस आहेत. शेकडो गुरुकुल ही आहेत. याशिवाय स्वामी दयानंद चे शिष्य स्वामी रामदेव यांनी तर नवीन शिक्षा बोर्ड स्थापित केला आहे. आजच्या घटकाला पाचशेच्या जवळ शाळा भारती शिक्षा बोर्ड शी संबंधित झालेल्या आहेत. पुढील पाच-सात वर्षात ही संख्या काही हजारांवर जाईल. .बाकी अण्णा तुम्ही ही इतरांप्रमाणे निश्चित न्यूनगंडाने पछाडलेले आहात. ऋग्वेद तुम्ही वाचलेला नाही. बाकी आयुर्वेद पूर्णतः विज्ञान निष्ठा आहे. आज आयुर्वेदातील अनेक औषधी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर रिसर्च द्वारा प्रमाणेच झालेल्या आहेत. आजच्या घटकाला देशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा जिथे सेल पासून ऍनिमल ट्रायल्स ची पूर्ण सुविधा आहे एका आयुर्वेदिक कंपनी जवळ आहे. असो. बाकी स्वामी दयानंद त्याकाळचे सर्वात मोठे प्रगतिशील आणि पुरोगामी व्यक्तित्व होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:04
ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान या दोघांच्या मिश्रणातून
धन्यवाद! हीच क्युरीयासिटी होती.
'त्याग आणि शिस्तीची' तत्त्वे आकाराला आली आहेत. त्यामुळे ती केवळ भोगवादाला प्राधान्य देतात हा दावा पटत नाही.
ह्याबद्दल जरा वेगळं मत आहे माझं. कॅपिटलिझम आणि त्यावर आधारित सध्याची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांनी जगावर लादलेली इकॉनॉमिकल चौकट आहे. ज्याच मूळ भोगवाद किंवा इंद्रियसुखांची लोलुपता हे आहे. जगात कोणी समाधानी असता कामा नये हा या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. जर सगळे समाधानी झाले, कन्टेन्डेड झाले, तर उत्पादन कसं चालू राहणार आणी वाढणार आणी मग प्रचंड नफा कसा मिळणार? म्हणून 'अधिकचा हव्यास' सतत असेल अशी इकॉनॉमिकल चौकट राबवली आहे. त्या आत्यंतिक नफ्यातून येणार्‍या अफाट आणि अमर्याद पैशामुळे, इंद्रियसुखांची परीसीमा गाठण्याचा हव्यास वाढत जातोय. एप्स्टीन हे उघड झालेलं फक्त एक प्रकरण. पण म्हणून हे फक्त पाश्चिमात्य देशांतच होतंय का? तर नाही, जिथे जिथे अफाट आणि अमर्याद पैसा आहे तिथे तिथे हे आहेच. भारतीय तत्वज्ञानात, आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनशास्त्रांनी, सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पातळीवर केला आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञानात 'त्याग आणि शिस्तीची' तत्व (उदा. होली पॉवर्टी सारखी) आहेत त्यांच्यामागे भारतीय तत्वज्ञानाइतका सूक्ष्म, खोल आणि इंद्रियातीत शाश्वत पारमार्थिक विचार नाहीयेय. हेच पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो असण्याचं कारण आहे. सुदैवाने आपला भारतीय तत्वज्ञानाचा वारसा हा पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा परिपक्व आहे. मी ह्या लेखातल्या फक्त ह्या गाभ्याशी सहमत आहे.
भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते.
हा तुमच्या आक्षेपाचा अजून एक बेस आहे की नाही ते माहिती नाही पण असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे. भावनिक होऊन अशी आत्यंतिक मतं मांडली जातात हे मान्य असल्याने मी पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा लेखातील काही काही मतं 'विथ पिंच ऑफ सॉल्ट' घेतली होती. - (संतुलित) सोकाजी

Bhakti गुरुवार, 02/12/2026 - 14:05
वेदांकडे चला स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन _/\_
एपिस्टन फाईलचे अनेक रील, त्याची माहिती एकामागून एक पाहिली.ते पाहताना अक्षरशः भडभडून ओकून द्यावं वाटल. जग हॆ सैतान प्रवृत्तीने भरलेलेच आहे. सत्ता, पैसा, व्यभिचार याने बरबटलेले आहे.तरीही या जगात आपल्याला जगायचं आहे. मी पण त्या दिवशी "ज्ञानयोग" पुस्तक वाचले .तेव्हा कुठे शांत झाले ... अशा वेळी मला वेदांत, अद्वैत यांचा खूप आधार होतो.विवेकानंद यांच्या भाषेतलं वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे.जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.

In reply to by Bhakti

एपस्टिनचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून एका वर्षाने म्हणजे साधारणः २०२० च्या आसपास पासून मी त्याच्या मागावर होतो. फॉर सो मेनी ऑदर रीजन्स. खूप मोठा रॅबिट होल आहे हा. आता वरती आले आहे हे फक्त केवळ वरवरचे अर्धवट सत्य आहे असे मला वाटते. त्याच्या फाइलस (एकूण संख्या चाळीस लाख) मधल्या काही फाइल्सची सर्वच्या सर्व पानेच्या पाने रिडॅक्ट केलेली आहेत म्हणजे अक्षरश: एकही शब्द खुला नाही. यावर कधीतरी विस्ताराने लिहिण्याचा विचार आहे मात्र वेळे अभावी ते कधी शक्य होईल कुणास ठाऊक.

In reply to by Bhakti

तो गुन्हेगार होता हे कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे त्याच्या अनैतिक कृत्याचे मी कोणतेही समर्थन करत नाही. मला फक्त इतकेच म्हणाय्चे होते की यात सर्व बाजूंचे लोक गुंतले आहेत त्यामुळे निष्पक्ष सत्य कधीही बाहेर येणार नाही.

In reply to by Bhakti

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:10
भक्तीतै, वेलकम बॅक!
वेदान्त म्हणजे "व्यावहारिक सत्य"प्राचीन ज्ञानाने उलगडणे, जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.
हा बाउन्सर डोक्यावरून गेला. - (विचारात पडलेला) सोकाजी

In reply to by Bhakti

Bhakti Sun, 02/15/2026 - 09:53
अजून एक सांगायचं राहिल. एपिस्टिन फाईलमधली काही नाव बिल गेटस, स्टीफन हौकिंग!!!! बापरे एके काळी कदाचित आतापर्यन्त जे अनेकांचे आदर्श होते... त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. त्यामुळे हॆ प्रकरण "अंधश्रद्धा"ने घेरलेले आहे ही चर्चा आहे. आदर्श कोणालाच मानायचं नाही (ती भक्तगिरी असतें )आपली विचार क्षमता वाढवत न्यायची, हॆ आधीच ठरवलं होतं. अशा मोठ्या लोकांची नाव वाचून जे ठरवलं त्याला अजून बळकटी मिळाली.

In reply to by Bhakti

मी पुन्हा सांगतो आहे. एकूण फाइल्स ची संख्या चाळीस लाखांहून जास्त आहे. त्यात अनेक ईमेल्स, अगदी त्याच्या संग्रहातले न्यूजपेपर आर्टिकल वगैरे सगळेच आहे. केवळ त्याचे ईमेल्स वगैरे नाहीत. एपस्टाइन हा फिज़िक्सचा प्रोफेसर देखील होता. त्याने फिज़िक्स शिकवले होते. श्रीमंत झाल्यावर त्यांने त्याच्या बेटावर अनेक शास्त्रज्ञांना चर्चांना निमंत्रित केले होते. त्यातल्या कित्येकांना तो काय काळे धंदे करत होता हे माहीत असणे हे गृहीत धरू नका. स्टीफन हॉकिंग बरोबर एक गुंडाने फोटो काढला म्हणजे हॉकिंग गुंड ठरत नाहीत. स्टीफन हॉकिंग यांनी कोणतेही अत्याचार केले आहेत असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. >> त्यांची नाव पाहून हादरलेच.स्टीफन हौकिंग???त्याची शारीरिक अवस्था "हावस का पुजारीकी आग " विझेल अशी नव्हती. तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती. स्टीफन हॉकिंग यांचे नाव आले आहे आणि त्यांचे फोटो असले म्हणजे ते गुन्हेगारच आहेत असा अर्थ काढणे अजिबात योग्य नाही. मी अगदी मोदींच्या चारित्र्यहननाचा देखील विरोध करतो. माझे आणि त्यांचे किती पटते हे सगळ्यांना ठाऊक आहेच मात्र त्यांना ठरकी म्हणणे, किंवा त्यांना देशद्रोही ठरवणे याला माझा विरोध आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

https://www.theguardian.com/us-news/2024/jan/05/prince-andrew-clinton-hawking-what-do-the-epstein-documents-say-about-key-people या मधे स्पष्ट सांगितले आहे की हॉकिंग यांच्यावर जी राळ उडत आहे ती पूर्णपणे बेसलेस आहे. पासिंग उल्लेख आले की गुन्हेगार ठरवावे ही कसली मनोवृत्ती आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

Bhakti Sun, 02/15/2026 - 13:30
तरी मी अजून मोठी नाव लिहायचं टाळलं आहे. स्टीफन हॉकिंग तिथे असल्यामुळे अंधश्रद्धा या प्रकरणाशी जोडली जाण्याची जास्त शक्यता मला वाटत आहे. adrenochrome हार्वेस्टिंग करून लहान मुलाचा बळी दिला जातं असावा असा अनेकांनी दावा केलाय. कशाला ही अंधश्रद्धा??अमाप सत्ता "उपभोगायला" मिळावी म्हणून..
तुमच्याकडून कोणतीही शहानिशा न करता असे थेट आरोप करण्याची किंवा ते सोशल मीडियाच्या क्लिकबेटी बातम्या आणि पोस्टने तशी समजूत करून घेण्याची अपेक्षा नव्हती.
माझ्याकडून अशा अपेक्षा नका करू. आणि मला माहितेय या शंका करोडो लोकांच्या आहेत, केवळ माझ्या नाही.

In reply to by Bhakti

कॉमी Mon, 02/16/2026 - 11:59
करोडो लोकांना असल्या म्हणजे त्या व्हॅलीड शंका आहेत असे नव्हे. हे ॲड्रेनोक्रॉम वैगेरे अत्यंत बॉटम ऑफ द बॅरल अर्थात अत्यंत बेसलेस अफवा आहेत.

In reply to by Bhakti

एपस्टिन फाईल्स हा प्रकार विशेष फॉलो करत नाहीये. मात्र एपस्टिन फाईल्समध्ये जे काही आहे हे धक्कादायक असले तरी नवीन नसावे. आणि भारतातही असे प्रकार होत नाहीत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे मंडळींच्या उपस्त्रिया, नाटकशाळा वगैरे असायच्याच. त्यांना लग्नाच्या बायकोचे स्थान थोडीच होते? ठेवलेल्या बायका सोडून त्यांची फार किंमत केली जात होती असे वाटत नाही. ती जुनी गोष्ट झाली म्हणून समजा सोडून दिली. पण आताच्या काळातही असे प्रकार चालत नाहीत असे आहे का? भारतातील एका मोठ्या बी-स्कूलमध्ये चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी असेल तर प्लेसमेंट कमिटीमधल्याबरोबर झोपावे लागेल अशी मागणी प्लेसमेंट कमिटीतील कोणत्या मुलाने केली किंवा अशी चांगल्या कंपनीत शॉर्टलिस्ट हवी म्हणून मुली झोपायला पुढे झाल्या असे दोन्ही बाजूंने चालणारे परस्परांना सहकार्य करणारे प्रकार झाल्याचे रेडिट आणि कोरावर कालपरवा वाचले. असले प्रकार पूर्वीही होत असले तरी नाकासमोर चालणार्‍या माझ्यासारख्याच्या ते लक्षात आले नसावेत. आपल्यासारख्यांना हे सगळे धक्कादायक वाटले तरी sex sells is a fact. मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये सेल्समध्ये क्लाएंटबरोबर बसून दारू प्यायली आणि मुलगी असेल तर दुसरे काही प्रकार केले तर मग कंपनीला जास्त बिझनेस आणता येतो आणि जास्त बिझनेस आणला की कॉर्पोरेट शिडी अधिक वेगाने चढता येते. दिसायला चांगली आणि ढिले कॅरॅक्टर असेल तर अशा मुली अशा ठिकाणी भरपूर प्रगती करतात. अर्थात भरपूर प्रगती झालेल्या सगळ्या तशाच असतात असे मला नक्कीच म्हणायचे नाही पण असे करणार्‍यांची भरपूर प्रगती होते हे पण तितकेच खरे. या सगळ्या गोष्टी सगळीकडे पडद्याआड चालूच असतील- केवळ एपस्टिन फाईलने ते बिंग फोडले म्हणून ते उघड झाले इतकेच. शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच असतात. तेव्हा या बाबतीत भारतीय लोक फार वेगळे असतील असे वाटत नाही. एपस्टिन फाईलमुळे पाश्चिमात्य लोक भोगवादात बुडलेले पण भारतीयांची सद्सदविवेकबुध्दी जागृत असते असे काही असेल असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti Sun, 02/15/2026 - 13:40
नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर भारतीय लोकांचीच मक्तेदारी नाही. अर्थात भारतातही हॆ प्रकार घडतात, काही तरी उजेडातही येत नाही. आसाराम आणि त्याच्या भक्तांचा किळसवाणा प्रकार कोणीच विसरले नाही. पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.

In reply to by Bhakti

पण याचा अर्थ जो चिंतनशील व्यक्ती या काळात शांत /hope साठी वेदांतचा आधार घेऊ पाहतो.त्याला सस्पेशल बधिर ठरवावा. सुखात आपल्याला तत्वज्ञान आठवणारही नाही पण दुःखातच अशा विविध तत्वज्ञानांची जगाला गरज असते. कर्मकांड सोडून द्यायला या ज्ञानाच्या अरण्यात शिरू तरी द्या. कुठवर पोहचायचे त्याचे तो ठरवेल.
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही. कोणी कसला आधार घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. त्याविषयी इतरांना काही आक्षेप असायचे कारण नाही.पण हा मुद्दा जरा वेगळा आहे. मुद्दा हा की एपस्टिन फाईल्सच्या निमित्ताने पाश्चिमात्य (लोक/संस्कृती/तत्वज्ञान) भोगवादात बुडलेले आहे त्यापेक्षा भारतीय तत्वज्ञान अधिक चांगले आणि चुकीचे प्रकार करण्यापूर्वी भारतीय मन शंभरदा विचार करते आणि आपला त्यागवाद अधिक श्रेष्ठ आहे या दाव्यावर सगळी चर्चा आहे. कोणी कोणता मार्ग जोखाळावा याच्याशी त्याचा संबंध नाही.

विजुभाऊ गुरुवार, 02/12/2026 - 15:16
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का?

In reply to by विजुभाऊ

सोत्रि गुरुवार, 02/12/2026 - 17:19
धर्म हा कुठल्यारती एका विचारसरणीवर (Dogma) आधारलेल्या संप्रदायाचं किंवा पंथाचं (Cult) दुकान असतं. दुकान चालवायचं म्हणजे गिर्‍हाइकं आकर्षित करावी लागतात. परलोकात सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असं हे दाखवलेलं गाजर असतं, मार्केटींग गिमीक. :=)) बोला, तुम्हाला काय हवय, रंभा उर्वशी की ७२ हूर?

😜

- (अधार्मिक) सोकाजी

In reply to by विजुभाऊ

मूकवाचक Fri, 02/13/2026 - 09:52
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात - आत्मिक आनंदाच्या तुलनेत कमी प्रतीचे मानत असतील, सरसकट पाप मानत नाहीत. परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. - अशा गोष्टींचा जेमेतेम बुद्धीमत्ता आणि सरासरीपेक्षा कमी विवेकबुद्धी असलेल्या लोकांवरच प्रभाव पडतो. उदा: अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल अशा पद्धतीने, ओरबाडून आज भोगले नाहीस, तर ते पुण्यकर्म ठरेल आणि परलोकात त्याचे बक्षिस मिळेल अशी लालूच दाखवणे. हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते.

In reply to by मूकवाचक

सुबोध खरे Sat, 02/14/2026 - 19:18
"एका बाजूने ते जेमतेम बुद्धीमत्तेच्या आणि विवेक नसलेल्या माणसाने अन्याय किंवा शोषण न करता संयमी रहावे अशा दृष्टीने कामी येऊ शकते, उलटपक्षी अशाच स्वरूपाची लालूच दाखवून त्याला पापकृत्ये करायला लावण्याच्या देखील कामी येऊ शकते". कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे. म्हणजेच धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. अन्याय आणि शोषण करून, समाजाची घडी विस्कळीत होईल कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे. माणूस आयुष्यात शेवटी अशा एका टप्प्यावर येतो कि त्याला ऐहिक सुखे किंवा भोग यातील रस संपतो. (अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत होते असे नाही). विशेषतः स्वतःला दुर्धर आजार झाला किंवा स्वतःच्या गाडी जवळच्या माणसाचा मृत्यू/ दुर्धर रोग झाल्यास अशा वेळेस माणसाला धर्मच नव्हे तर कर्मकांडे सुद्धा मानसिक बळ देतात. त्यामुळे तरुणपणी धर्म आणि कर्मकांडे यांच्यावर प्रच्छन्न टीका करणारी माणसे सुद्धा शेवटी त्यांच्या आहारी जाताना दिसतात. एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत. मी आमच्या आई आणि वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर कोणतेही संस्कार ना करणारा असलो तरी मी सहसा कुणाच्या धार्मिकतेवर टीका करत नाही. कारण शेवटी माणसाला कोणती गोष्ट मानसिक आधार देऊ शकते हे सांगणे कठीण आहे मग ती कितीही पोकळ असली तरी.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Sat, 02/14/2026 - 20:24
कोणताच धर्म ना मानणाऱ्या कम्युनिस्ट देशात यापेक्षा जास्त आणि भयंकर नरसंहार झालेला आहे हा गेल्या शतकातील ज्वलंत आणि काळा कुट्ट इतिहास आहे.
क्रूरतेचं मूळ अनेकदा अत्यंत कट्टर विचारसरणीत असतं ती धार्मिक असो वा राजकीय. जेव्हा एखादी विचारधारा स्वतःला “एकमेव सत्य” मानते आणि विरोधकांना अमानुष ठरवते, तेव्हा हिंसा सुलभ होते. इतिहास असंही दाखवतो की धर्मप्रेरित व्यक्तींनी महान मानवतावादी कार्यही केलं आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्थांनी मानवी हक्कांची जपणूकही केली आहे. म्हणून प्रश्न “कोण जास्त क्रूर?” असा नसून, “कट्टरता, सत्तेची लालसा आणि मानवीकरणाचा अभाव कुठे निर्माण होतो?” हा अधिक मूलभूत प्रश्न आहे.
कम्युनिझम ने त्या त्या देशातील संपूर्ण समाजच विस्कटून टाकला आहे.
समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात. . बाकी उरलेला प्रतिसाद धर्म किंवा तत्वज्ञानापेक्षा मानसिक जपणूक किंवा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आहे.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Mon, 02/16/2026 - 19:58
"समस्या केवळ “कम्युनिझम” या सिद्धांतात नव्हती, तर एकपक्षीय हुकूमशाही, सत्तेचं अति-केंद्रीकरण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अभाव, अर्थव्यवस्थेतील कठोर केंद्रीकृत नियंत्रण ह्या अंमलबजावणीत होती ही वैशिष्ट्यं इतर विचारधारांच्या हुकूमशाहीतही दिसतात." मूलभूत गल्लत आहे. एक हुकूमशहा आणि अक्खी विचारसरणी यात कम्युनिस्टांनी आपल्याच लोकांचे केवळ क्रांतीच्या विरोधात असल्याच्या संशयावरून कोट्यवधी लोकांचे शिरकाण केले आणि क्रांती साठी रक्त सांडणे यात काहीही चूक नाही असेच हे लोक मानतात. किंबहुना ते अपरिहार्य आहे असेच मानणारी हि शुद्ध हलकट जमात आहे. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 02/17/2026 - 17:52
इतिहासात काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही, हत्या आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाले हेही सत्य आहे. पण एखाद्या विचारसरणीचे सर्व अनुयायी “शुद्ध हलकट जमात” आहेत असे म्हणणे योग्य ठरत नाही. सैधांतिक मांडणी आणि त्याची अंमलबजावणी ह्यातील दरी हेही एक कारण असले तरी स्टालिन, माओ किंवा पॉल पॉट ह्यांच्या उदाहरणातही त्यातील अपराधांची जबाबदारी त्या राजवटींवर आणि नेत्यांवरच येते. पण संपूर्ण विचारसरणीचे सर्व अनुयायी एकसारखे आहेत असे म्हणणे वस्तुस्थितीशी जुळत नाही. कोणत्याही विचारसरणीचे मूल्यमापन करताना तिची तत्त्वे, तिची अंमलबजावणी, आणि त्या काळातील राजकीय-सामाजिक संदर्भ वेगळे करून पाहणे अधिक न्याय्य ठरते. तुमच्या मते "आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे जर शुध्द हलकट जमातीचे असतील" तर ह्या विधानाचा पुन्हा विचार करुन बघा. भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही. निरपराध आदीवासी दोन्ही बाजूंनी नाडले आणि मारले गेले होते. अनेक आदिवासी भागांमध्ये जमीन, जंगल हक्क, विस्थापन, शोषण यांसारख्या प्रश्नांमुळे असंतोष वाढला. त्या पार्श्वभूमीवर काहींनी माओवादी चळवळीला पाठिंबा दिला. पण त्यामुळे निरपराधांवरील हिंसा योग्य ठरत नाही. पण ह्यातील ज्यांना पश्चाताप व्हायला हवा असे वाटते त्यांना शासन करतानाही कित्येक निरपराध आदीवासींचा बळी गेला आहे. त्याच वेळी, त्या प्रदेशांतील सामाजिक-आर्थिक समस्या आणि राज्याच्या धोरणांचाही विचार करणे आवश्यक ठरते. हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन कोणत्याही बाजूने झाले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 02/17/2026 - 20:02
काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये कोणत्या कम्युनिस्ट राजवटीत असं झालेलं नाही ते सांगा. आपल्याला हव्या त्या बदलासाठी रक्त सांडणे ह्यात काहीही चूक नाही असे मानणारे हलकट नाही तर दुसरं काय म्हणायचं हे आपणच सांगा सरकारने, सरकारचे, सरकारसाठी असलेले लोक म्हणजे कम्युनिझम अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

मूकवाचक Mon, 02/16/2026 - 11:04
तथाकथित निधर्मी लोक आणि त्यांचे निधर्मगुरू कट्टरपणा आणि क्रौर्य या बाबतीत तसूभरही कमी नाहीत. धार्मिक गुरू किंवा संस्था यांची चांगली बाजू हेतूपुरस्सर बघायचीच नाही, मात्र त्या संबंधातले भ्रष्टाचाराचे उदाहरण सापडले की आकाशपाताळ एक करायचे अशी वैचारिक फॅशन रूढ झाली आहे. तथाकथित समाजवादी, समतावादी, पुरोगामी वगैरेंना तोच मापदंड लावला जात नाही. असो. फरक एकाच बाबतीत आहे - पुरोगामी, समाजवादी लोक परलोकात काहीतरी मिळेल अशी लालूच दाखवत नाहीत. इहलोकातच आपल्या कामगिरीची बक्षिसी (राष्टीय/ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पैसा/ शिष्यवृत्त्या(!), आपल्या पाळीव माध्यमांमधून प्रतिष्ठा मिळवून देणे वगैरे) मिळेल अशी भक्कम 'इकोसिस्टीम' त्यांनी उभी केलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो.
अरे वाह, तुलनात्मक डेटा असेल इतिहास असेल तर वाचायला आवडेल.
एक शल्यक्रियेच्या अगोदर ताठ्याने वागणारे निधर्मी आणि अतिपुरोगामी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृदयाची बायपास शल्यक्रिया झाल्यावर हृदय नीट काम करत नसताना कुणाचा तरी अंगारा लावून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला हात जोडून नमस्कार करताना पाहिले आहेत.
अरे वाह, एका अनुभवाने धार्मिक झाला म्हणायचा माणूस. वाचावे ते नवलच. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Tue, 02/17/2026 - 13:45
धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो. @सुबोध खरे, आपले विचार, व्यासंग व अनुभव यांचा आदर आहे तथापि, या बाबतीत मी सहमत होण्याइतका माझ्याकडे डेटा नाही. माझ्या समजुतीनुसार एक समाज म्हणून धर्मांध असो वा निधर्मी असो, खरा हिंदू कधीही क्रूर असू शकत नाहीत. हं बाकी, इतर काही पंथीय लोक क्रूरपणाची परिसीमा गाठतात याच्या घटनांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त Mon, 02/16/2026 - 20:43
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना कमी प्रतीचे किंवा पाप मानतात. मात्र परलोकात गेल्यावर पुण्य मिळवले असेल तर हेच सारे भोग सुखसुविधा म्हणून मिळतील असे सांगतात. हे असे का? मुळात व्यापक अर्थाने 'भोग' ही मनुष्यप्राण्याच्या अगदी मूलभूत गरजांपैकी एक आहेसे दिसते.

कॉमी गुरुवार, 02/12/2026 - 16:21
Epstein फाईल्स मध्ये नसलेल्या गोष्टी किंवा बादरायणी संबंध लाऊन अचाट दावे सध्या नेटवर पसरले आहेत. आपण काळजी घ्यावी. तुम्ही दिलेले उदाहरण घ्या. मेलमध्ये कॅनिबल हा शब्द आला म्हणजे एपस्टीन मानवी ऑर्गनचे बुफे भरून जेवायचा असा अर्थ होत नाही. त्या मेल्समध्ये casual मेल पण आहेत. उगाच शब्द त्यात आला म्हणजे काही गुन्हा घडला असे नाही. बाकी लेख अत्यंत एकसुरी वाटला. ह्यात मांडण्यासारख्या अनेक दुसऱ्या बाजू आहेत. पश्चिमी कसे खराब आणि आपण कसे हुच्च ह्याच्या अगदी विरोधी मत मांडणारा लेख सुद्धा सहज पाडता येईल.

अकिलिज Fri, 02/13/2026 - 19:23
चौकात लाल सिग्नल लावा. एक भारतात लावा. एक युरोपात लावा. फरक डोळ्यांनी बघा. कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार कसे व्यवस्थित करते. ते बघा. टोलच्या रांगात सगळे कसे व्यवस्थित लायनीत जातात. एकमेकांना कसे घूसू देतात. बघा मजा. लहान मुलांना कानफटवणे हे ज्यांच्या अंगवळणी पडले आहे त्यांना पेशन्सने बोलणे कसे शिकवणार. भारतवर्षाचा अभिमान जरूर वाटावा. पण जे चूक आहे ते मान्य तर करायला शिका.

एकदा खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून मी ट्रेकला जात होतो. जागा नसल्याने दोन सीटच्या गॅप मध्ये उभा होतो, एक कला अध्यात्म, धर्म, देव ह्याबद्दल दुसऱ्या काकाना सांगत होते, अतिशय मंत्रमुग्ध वातावरण होते, अर्ध्या एका तासाने त्या काकानी हातातली शेंगा खाऊन उरलेली टरफल्यांची पिशवी खिडीकी बाहेर टाकली.

स्वधर्म Fri, 02/13/2026 - 23:21
नागनिका जी, आपले चिंतन वाचले. लहानपणी मला आणि बहुतांश लोकांना आपण म्हणता तसेच वाटत आले आहे. शरीराच्या पलिकडे असलेल्या स्व व अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन भारतीय तत्वज्ञानात आहे, हे मान्य. पण जाण आल्यावर हळू हळू भारतीय संस्कृतीबाबतचा तथाकथीत अभिमान गळून पडला. इथे लिहिलेले विचार भाबडे आहेत की धूर्त आहेत असा प्रश्न पडला. त्यामुळे मनात आलेले काही प्रश्न आपल्यासमोर ठेवत आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते ते वाचायला आवडेल. १. भारतीय संस्कृती प्राचीन आहे त्यामुळे ती जास्त प्रगत असायला हवी होती. तसे काही सध्या आढळून येते का? आपला समाज जगातील इतर समाजांच्या तुलनेत अधिक सुखी समाधानी आहे का? भारताचा आनंद निर्देशांक जगात तळाला का असावा? २. भारतीय मनाची बैठक समरसतावादी आहे, समतावादी नाही. नेता अचानक गेल्यानंतर त्या पक्षातील सर्वात लायक माणसाला कधीच संधी मिळत नाही. नेत्यालाही ती विशिष्ट घराण्यातले असल्यामुळेच मिळाली होती. कितीही गैरप्रकार समोर आले तरी लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. उलट लोक असेच होणार हे मानून पुढे गेले. ही कसली महान संस्कृती? सर्व नागरीक समान आहेत असे मानणारी लोकशाही भारतात का रूजू शकली नसावी? ३. आर्थिक विषमता व वर्गाधारीत शोषण सर्वच समाजात आढळून येते. अधिक क्षमता असलेले लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ समाज गट तयार करतातच. पण 'जात' ही फक्त आणि फक्त जन्माधारीत संकल्पना फक्त दक्षिण पूर्व आशियातच का आढळून येत असावी? आपल्याच रक्तामासाच्या बांधवांचे केवळ जातीआधारित शोषण जगात इतर कुठेही नाही. तसेच स्त्रियांना जरूर देवी बनवून देव्हार्‍यात बसवले गेले पण तिला समान मानले का नसावे, तिचे शोषण हजारो वर्षे का झाले असावे? ४. भारतीय संस्कृतीतले सगळेच संत बंडखोर होते. त्यांचा तत्कालीन समाजाने छळच केला व नंतर त्यांची पूजा केली. हे अगदी ज्ञानेश्वरांपासून र धों कर्वे, महात्मा फुले यांच्यापर्यंत हे असेच आहे. एवढे सांस्कृतीक संचित असलेल्या भारतीय समाजाला चांगले काय हे वेळीच का ओळखता आले नसावे? ४. चांगल्या संस्कृतीचा सर्वात मोठा मानक न्याय असावा. पण भारतीय समाजात नेहमीच न्याय का नसावा? अगदी मर्यादा पुरूषोत्तम राम हाही न्यायासाठी नाही तर वडीलांच्या इच्छेचा मान म्हणून वनवासाला गेला. न्याय महत्वाचा असता तर त्याने वडीलांच्या इच्छेपेक्षा त्यांना तत्कालीन न्याय्य काय हे सांगायला हवे होते. सीतेशी राम जसा वागला (अग्नीपरिक्षा), तसे आजच्या काळात कोणी वागले तर तो माणूस वंदनीय ठरेल काय? न्यायापेक्षा वडीलधारे, परंपरा काय म्हणते हेच इथे का महत्वाचे आहे? न्यायासाठी भांडणारे आयुष्य खर्च करतात, पुस्तके लिहितात. आपल्या समाजात न्याय मुळीच सहज नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना सुखी समाधानी आयुष्य लाभते असे वाटत नाही. संघर्ष अटळ का?

In reply to by स्वधर्म

जेन झी शी बोलल्यावर मला एक लक्षात आले की या मुलांना खूप फ्रस्ट्रेशन आहे. पण त्यांना त्यांचा राग कुठेच काढता येत नाही. या मुलांना जगात काय चाललं आहे हे सगळी कडे दिसत असते. प्रगत समाजांत आपल्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बरोबर जगात अनेक जण सहज PDA करतात मात्र भारतीय मुलांना आपल्या प्रियकर प्रेयसी यांना स्पर्शही करता येत नाही. या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून त्यांच्यात अनेक न्यूनगंड तयार होतात आणि ते आपली व्यवस्था ही एक 'संस्कृती' असून कशी 'त्यांच्याहून' भारी आहे वगैरे जस्टिफिकेशन देत राहतात. मग त्यांना भूतकाळातून हे आधिभौतिकाचे तुकडे काढून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत राहण्याचा एक विचित्र न्यूनगंडात्मक छंद लागतो. प्रत्यक्षात बिचाऱ्याची बत्तीशीपर्यंत जातीबाहेर सोडाच जाती अंतर्गत देखील लग्ने होत नाहीत. जेन झी मुलाना आजकाल एका कसल्या तरी सनातन धर्माचे वेड लागले आहे. प्रत्यक्षात तो धर्म काय आहे आणि तो कशाशी खायचा हे त्यांना कळत नाही. कारण पदोपदी रोजच्या जगण्यात आणि त्या उदात्त आधिभौतिक प्रिंसिप्लस मधे नेहमीच टोकाची विसंगती दिसत राहते. एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात. मात्र त्या सनातन धर्माचे या आत्ताच्या जगातले ऐहिक मॅनिफिस्टेशन मात्र कसे वर येतात तर कॅफे मधे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे. कुठं कालिदास वगैरची उदबत्ती लावताय दोस्तांनो? अधिभौतिकाची आणि ज्ञानमार्गाची प्रचंड मोठी परंपरा असूनही आज सगळी कर्मकांडे प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात कंठाळी पद्धतीने सेलेब्रेट केले जातात. प्रत्येक देवस्थानाला अद्वैत लांबच राहिले, द्वैतही सोडा एकदम अंधश्रद्धेच्या आसपास जाणारी अनेक कर्मकांडेच मोठी करायचा छंद जडला आहे. एकेकाळी फक्त गणपती असणारा आज प्रत्येक गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. यात कुठेही मला ज्ञानमार्गाचा मोठेपणा दिसत नाहीच तर बहुतेक समाजाला केवळ ट्रांसॅक्शनल कर्मकांडातच गुंतून पडायचे आहे असे स्पष्ट दिसते. एकूण दिलको बेहलाने के लिए ये वेदांत अच्छा है असेच आहे बहुतेकांचे. ९९ टक्के लोक काही का करेनात, लिंचिंग वगैरे का करेनात आपण मात्र चार दोन सूक्ते काढून काहीतरी वैश्विक गफ्फा हाणत राहायच्या.

In reply to by स्वधर्म

सोत्रि Sat, 02/14/2026 - 07:17
स्वधर्म, तुमचा प्रश्न नागनिका यांना आहे आणि त्या/ते उत्तर देतीलंच. पण, मी माझं मत सांगण्यास तुमची हरकत नसावी हे गृहीत धरून माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. लेखातून मी इंटरप्रीट केलेला गाभा असा आहे की: कॅपीटलीस्ट पाश्चात्य देशांमधे भौतिक चंगळवादाचे प्रस्थ प्रचंड आहे; एपस्टीन प्रकरण त्यासाठी बॅकड्रॉप/वानगी म्हणून. अस्तित्वावर अत्यंत सखोल चिंतन जे भारतीय तत्वज्ञानात आहे ते पाश्चात्य तत्वज्ञानात तितकं मुलभूत आणि सखोल नाहीयेय. त्यामुळे भौतिक चंगळवादातून बाहेर का पडायचे किंवा त्यापलीकडे काही आहे हेच माहिती होत नसल्याने अधिकाअधिक भौतिक चंगळवाद हेच धेय्य बहुतांशी पाश्चात्य देशांमधे आहे. सुदैवाने, सखोल भारतीय तत्वज्ञानामुळे आपल्याला एक दिशा किंवा मार्ग उपलब्ध आहे अधिभौतिकाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही 'भारतीय संस्कृती' हा मुद्दा सामाजिक अंगाने मांडताय, जो योग्य आहे आपल्यजागी, पण तो ह्या धाग्याचा विषय नाही, माझ्या आकलनानुसार. (डिस्क्लेमरः आधिच्या प्रतिसादात म्हटलं तसं धाग्याच्या फक्त ह्या गाभ्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.) - (मत मांडण्याचा अधिकार जपणारा) सोकाजी

In reply to by स्वधर्म

नागनिका Sat, 02/14/2026 - 09:09
स्वधर्मजी विस्तृत प्रतिसादाबद्दल आपले आभार ! संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. पण संस्कृती जितकी flexible तितकी लवकर रुजते, विस्तारते आणि टिकते ही. ज्या संस्कृती एकाच एका गोष्टीला चिकटून असतात, काळाप्रमाणे बदलत नाहीत त्या लोप पावतात.( उदा. सुमेरिअन, रोमन इ.) त्याचप्रमाणे न्यायाच्या संकल्पन बदलत जातात. पण व्याख्या तीच राहते. द्वापारात नियोग न्याय्य होता. पण सध्या नाही. तसेच त्रेतायुगात काही गोष्टी सामान्य होत्या, ज्याचे आज अप्रूप वाटते. द्वापारात राजपरिवारातील व्यक्ती ब्रह्मचारी असण्याचे प्रमाण नगण्यच होते. म्हणून भीष्माचे राजत्याग करून ब्रह्मचारी राहणे काहीतरी अद्भुत वाटले त्या लोकांना. तुमच्या तिसर्या मुद्याशी मी सहमत आहे. ककारण तोच तर विरोधाभास आहे. जे ज्ञान , संस्कृती पूर्वजांनी दिली त्याचा विसर पडला व भौतिक चंगळवाद सोकावला. त्यामुळे किंबहुना अज्ञानामुळे अशी परिस्थिती आहे. ( वरील काही प्रतिसादात सिग्नल, टरफले अशी काही उदाहरणे दिली आहेत. त्यालाही हेच म्हणणे लागू होते. चांगले वागणे म्हणजे काय ते माहित असते, पण ते का वागायचे हे माहित नसल्याने अशी कृती होते. सगळ्याचे मूळ अज्ञान आहे.) बाकी सोकाजींना धन्यवाद. त्यांनी लेखाचा गाभा योग्य सांगितला.

In reply to by नागनिका

स्वधर्म Sun, 02/15/2026 - 03:17
नागनिका जी, धन्यवाद, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रतिसादात नाहीत. >> संस्कृती जितकी प्राचीन तितकी प्रगत असे काही नसते. इथे आपल्या बोलण्यात विरोधाभास आहे. आपण रोमन, सुमेरियन वगैरे संस्कृती बदलल्या नाहीत म्हणून नष्ट झाल्या अशी उदाहरणे देत आहात, पण वैदिक संस्कृती (अपौरुषीय वेद, गीता इ.) रोमन, सुमेरियन संस्कृतीपेक्षाही प्राचीन आहे. ती कुठे बदलली? तुम्ही तर त्याच न बदललेल्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगत आहात ना? उलट पाश्चात्यांनी जुन्या रोमन वगैरे संस्कृती लवचिकपणे सोडून दिल्या व नवे विचार (रिनायसन्स इ.) बदल घडवले. त्यामुळे त्यांनी अधिक चांगल्या संस्कृती विकसित केल्या असा निष्कर्ष निघतो व म्हणून त्यांची संस्कृती श्रेष्ठ ठरत नाही का? तुंम्ही दिलेले नियोगाचे उदाहरण (अपत्यप्राप्ती कशी करावी?) हे न्यायाच्या बाबतीत मुळीच महत्वाचे वाटत नाही. एकतर ते पुराणातले उदाहरण आहे, इतिहासातले नाही. दुसरे म्हणजे कुणालातरी ब्रम्हचर्य अप्रूप वाटणे वगैरे मुळीच महत्वाचे नाही. न्यायाच्या बाबतीत सर्वांना एकाच गुन्ह्याला समान शिक्षा अपेक्षित आहे. ते भारतात कधीही नव्हते. कारण गीतेत सांगितलेले वर्णाश्रम व वर्णधर्म जे हजारो वर्षे समाज पाळत आला. या एका गोष्टीने भारताचं इतकं नुकसान केलं की आपण मागासच राहिलो व अजूनही आहोत. त्याचा कसला अभिमान बाळगायचा? >> सगळ्याचे मूळ अज्ञान आहे. हजारो वर्ष इतके महान ज्ञान उपलब्ध असूनही बहुसंख्य भारतीय समाज अज्ञानी असेल तर आपण ज्याला ज्ञान म्हणता ते ज्ञान तरी कसं म्हणायचं? @सोकाजी लेखाचा मूळ गाभा एपस्टीन सारखे लोक पाश्चात्य समाजात निर्माण होतात पण भारतीय समाजात तसे होत नाही कारण "... भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते ." असा आहे. पण हे खरे नाही कारण आपल्याकडे प्रज्वल रेवण्णा प्रकरण घडले जे तुम्हाला आठवत असेलच. त्याला निवडून द्या असे आवाहन गंगापुत्र, सनातन संस्कृतीपूजक महानेत्याने त्याच्या मतदारसंघात सभा घेताना केले होते. त्याच्यावर शेकडो स्त्रियांचे शोषण करून व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा आरोप सिध्दही झाला होता. त्याला शिक्षा झाली आहे. दुवा: https://www.bbc.co.uk/news/articles/c87edydwpv7o हा आपल्याकडचा एपस्टीनच नव्हे तर काय? असे अनेक असतील पण आपल्याकडे थोरामोठ्यांच्या भानगडी उजेडात येत नाहीत. आपण पाश्चात्य समाजात एपस्टीन घडतो त्याल्या घृणास्पद समजत आहात पण पाश्चात्य समाजात अनेकांना आपली पदे, संपत्ती एपस्टीन प्रकरणात नांव आल्यामुळे सोडावी लागली व त्यांना शिक्षा मिळाली. आपल्याकडे मात्र ज्यांचे नांव आले त्यांना अजून तरी काहीही झालेले नाही या वास्तवाकडे संपूर्ण डोळेझाक करत आहात. हा भेदभाव हेच तथाकथित सनातन संस्कृतीच्या अनुयायांचे मुख्य लक्षण आहे हे सिध्द होतंय. @हणमंत आण्णा शंकर यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने नागनिकाजी आपले आकलन न आवडणार्‍या वास्तवापेक्षा लहानपणापासून सांगितल्या गेलेल्या भावनिक अभिमानाने प्रेरित तर नाही ना, याचा विचार करावा ही विनंती. वरती हणमंत आण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे "...एका काळानंतर ते पूर्ण इम्यून आणि बधिरच होऊन जातात आणि त्या एकदम abstract आणि धूसर सनातन धर्माच्या प्रेमातच पडतात." असे तुमचे झालेले नाही ना?

मला एक प्रश्न नेहमी पडतो. सध्याच्या काळातील पाश्चिमात्य तत्वज्ञ आपलेच तत्वज्ञान अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. वेन डायर, बॉब प्रॉक्टर, एकहार्ट टोली वगैरे बोलतात तेव्हा कुठेतरी जाणवते की निदान तेवढ्यापुरते तरी ते आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत. नॉर्मन व्हिन्सेंट पील हे तर ख्रिस्ती धर्मगुरूच होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात बायबलचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. त्याप्रमाणेच नेव्हिल गॉडर्ड यांच्या बोलण्यात आणि लिखाणातही जिससचा उल्लेख येतो ते सोडून देऊ. मात्र इतरांच्या बोलण्यात/लिहिण्यात जिसस किंवा ख्रिस्ती धर्माचा उल्लेख क्वचितच येतो. तसेच ते कुठेतरी आपलेच तत्वज्ञान सांगत आहेत पण अधिक सुलभ पद्धतीने असे जाणवते. उगीच कसलाही अभिमान नाही (ज्याला मी उपहासाने वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो), हे जग म्हणजे सगळी माया आहे, त्यात गुरफटून जाऊ नका आणि आपले चित्त प्रभूचरणी लीन ठेवा म्हणजे भवसागर तरून जाल वगैरे दिसायला भारदस्त दिसणारी पण त्यातून नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणारी भाषा वापरत नाहीत. उलट काय करणे अपेक्षित आहे हे अधिक सोप्या पध्दतीने उलगडून सांगतात. हे असे का होत असावे? दुसरे म्हणजे नॉर्मन व्हिन्सेंट पील किंवा नेव्हिल गॉडर्ड अगदी बायबलमधील भाषा बोलत जरी असले तरी ते जे काही बोलतात ते मला तरी नक्कीच पटते. बायबलमध्ये मला माहित नसलेल्या पण अनेकांना आक्षेप असलेल्या काही गोष्टी असतील त्याविषयी मला काहीच भाष्य करता येणार नाही कारण त्या गोष्टी माहित नाहीत. मात्र अगदी बायबलमध्ये जरी सकारात्मक विचारांविषयी काही उल्लेख असतील तर माझ्या 'सहिष्णू' हिंदू आणि भारतीय मनाला ते अजिबात खटकत नाही. तस्मात वेदांमध्ये किंवा भारतीय तत्वज्ञानात चांगल्या गोष्टी आहेत हे मान्य केले तरी मात्र भारतीय तत्वज्ञानातच सगळे काही आहे आणि इतर ठिकाणी भुसा भरला आहे अशी परिस्थिती कदाचित नसावी. दुसरे म्हणजे भारतीय तत्वज्ञान महान आहे असा दावा करणार्‍यांपैकी किती जणांंनी त्याचा खरोखरच अभ्यास केलेला असतो हा प्रश्नही पडतो. आणि आपले तत्वज्ञान पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा करायचा असेल तर दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. असे दावे करणार्‍या किती जणांनी तो खरोखरच केलेला असतो हा पण प्रश्न पडतो. ही एक जनरल गोष्ट लिहित आहे- इथल्या चर्चेतील कोणालाही उद्देशून ते नाही तेव्हा अकारण गैरसमज नसावा. भारतीय तत्वज्ञान म्हटले की आम्हीच काय ते श्रेष्ठ आणि इतरांना काही कळत नाही या गृहितकापासून सुरवात करून मग आपल्या गृहितकाला अनुसरून असलेली तेवढीच वाक्ये उचलणारे लोक वैयक्तिक चर्चेत बघितले आहेत. माझी जी काही थोड्याफार लोकांशी याविषयी चर्चा केली आहे त्या मर्यादीत सॅम्पल सेटवर आधारीत विधान आहे. ते सर्वांना लागू पडेल असा माझा अजिबात दावा नाही. असे लोक अर्थातच मिपावर नाहीत आणि त्यापैकी बरेच आता या जगातही नाहीत त्यामुळे त्यांना इथे चर्चेत बोलावता येणार नाही. पण अशा अ‍ॅप्रोचमधून वृथा अभिमान निर्माण होणे आणि आपलीच कॉलर ताठ करणे सोडून फार काही साध्य होते असे वाटत नाही. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन. आता आपण आपल्या भारतीय सखोल चिंतनाकडे वळूया. तत्त्वज्ञानामध्ये भारताकडे आता सांगण्यासारखं काय आहे? काहीच नाही. इथे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे आजही तत्त्वज्ञान मांडता येते याचा भारतीयांना विसर पडला आहे. आणि दुसरा मुद्दा आमच्याकडे ऑलरेडी सगळेच आहे अशी आत्मस्तुती करण्याचा जडलेला रोग. महाराष्ट्र पुरते बोलायचे तर गुलाबराव महाराज किंवा वाई मध्ये असलेली प्रज्ञशाळा अशा प्रकारचे प्रयत्न दिसतात. पूर्णवाद किंवा अविभक्त आत्मवाद या गोष्टी मागच्या शतकात मांडलेल्या दिसतात. मात्र त्या काही नोवेल गोष्टी नव्हत्या आणि त्यांना समकालीनत्व तर नव्हतेच नव्हते. पुन्हा या सगळ्या गोष्टी मेटा फिजिकल किंवा मेटामटा फिजिकल असल्याने वितंड घालायची आवड असणाऱ्या वादप्रवण भारतीयांना एवढेच जमले आहे. अमर्त्य सेन यांनी वादाळू भारतीयांवर एक पुस्तक लिहिले आहे परंतु त्यातून शालीतून जोडेच मारलेले आहेत अनेक लोकांना ते कौतुकपर पुस्तक वाटते. मात्र साहित्य असो किंवा राजकारण जर्मन तत्वज्ञांनी संपूर्ण जग उलथापालथ केले. अलीकडे मी अनेक तत्त्वज्ञांचे लेक्चर्स असतो आणि मार्कूस यांची लेक्चरे सध्या माझी अत्यंत आवडती आहेत. त्यात त्यांनी मांडलेला जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत किंवा नव नव वास्तववाद हे खूप महत्त्वाचे सिद्धांत असून त्याचा एकूण समाजावर किंवा वैज्ञानिक प्रगतीवर किंवा अतिवैज्ञानिक प्रगतीवर परिणाम होणार आहे. यातील जग अस्तित्वात नाही हा सिद्धांत आपल्या जग मिथ्या आहे या सिद्धांत यापेक्षा वेगळा आहे कृपया त्यांची गल्लत करून घेऊ नका. नाहीतर पुन्हा आत्मवस्तुतीचे एक रान तुम्हाला मोकळे झाल्यासारखे वाटेल. मात्र अशा दर्जाचे काम मला भारतातील कुठल्याही तत्त्वज्ञाने मग ते आध्यात्मिक क्षेत्रातून असो किंवा अकादमी क्षेत्रातून असो मांडल्याचे दिसत नाही. मग समृद्ध ज्ञानमार्गी परंपरा असलेल्या भारतामध्ये एवढे स्टॅगनेशन का आले आहे? याचे कारण भारत सामाजिक प्रश्नांमध्ये एवढा गुरफटून गेलेला आहे की कोणताही पंथ जात पाहत वगैरे न पाहता जन्माला येणारी बुद्धिमत्ता ही आयुष्यभर त्याच गोष्टींशी झुंजण्यात खर्ची होते. आणि त्यातूनही काही उरलंच तर ते आत्मस्तुती किंवा भारतीय अध्यात्माने आणि धर्मांनी तत्त्वज्ञानाच्या बुरख्या आडून घालून दिलेली कर्मकांडे करण्यातच खर्च होतात. चंद्र सूर्यकुमार यांचे म्हणणे मला पटते. यात पुन्हा भारतीयांना जडलेली व्हॅलीडेशनची सवय द्रुगोचरच होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

21व्या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा तत्वज्ञ असे जर कोणी मला विचारले तर मी निस संशय मार्कूस गब्रिएल यांचे नाव घेईन.
धन्यवाद. मार्कस गॅब्रिएल यांच्याविषयी माहित नव्हते. त्यांचे पण व्हिडिओ बघतोच. मी आतापर्यंत अभारतीय तत्वज्ञांपैकी जास्त करून अमेरिकन तत्वज्ञ फॉलो करत आलो आहे (अपवाद फक्त एकहार्ट टोली- ते पण मुळचे जर्मनीचे). मार्कस गॅब्रिएल यांच्याच पिढीतील अमेरिकन गॅब्रिएल (गॅब्रिएला?) उर्फ गॅबी बर्नस्टीनची पुस्तके आणि व्हिडिओ पण आवडतात. बाकी वेन डायर, नॉर्मन व्हिन्सेंट पील, लुईज हे, नेव्हिल गॉडर्ड, इस्थर-जेरी हिक्स वगैरे माझे अगदी ऑल टाईम फेव्हरेट आहेत. धन्यवाद.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वर म्हटल्याप्रमाणे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील, नेव्हिल गॉडर्ड यांची पुस्तके/व्हिडिओ मला आवडतात. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी केवळ बायबलमधील आहेत आणि आपल्या कोणत्या स्त्रोतात नाहीत म्हणून पटल्या तरी ते नाकारणे मला तरी आवडत नाहीत. उदाहरणार्थः १. Isaiah 41:10 – “Fear thou not; for I am with thee…” याची मला फारशी गरज पडते असे नाही पण अक्कलकोट स्वामींचे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे वचन किती वेगळे आहे? २. Romans 12:2 – “Be ye transformed by the renewing of your mind…” विचार बदला- आयुष्य बदलेल हे केवळ बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून नाकारायचे का? ३. Proverbs 23:7 – “For as he thinketh in his heart, so is he.”- जसा विचार कराल तसे बनाल हा कॉमन सेन्स नाही का? बायबलमध्ये लिहिले म्हणून तो कॉमन सेन्स नाकारायचा? ४. Matthew 21:22 – “And all things, whatsoever ye shall ask in prayer, believing, ye shall receive.”, Mark 11:24 - “Therefore I say unto you, What things soever ye desire, when ye pray, believe that ye receive them, and ye shall have them.” अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही. तरीही हे तत्वतः पटते. ५. Matthew 21:21 - “…If ye have faith, and doubt not… if ye shall say unto this mountain, Be thou removed… it shall be done.” Luke 17:6 - “If ye had faith as a grain of mustard seed, ye might say unto this sycamine tree, Be thou plucked up by the root… and it should obey you.” - आपल्याकडे मुकं करोति वाचालम... पेक्षा हे वेगळे आहे असे मला तरी वाटत नाही. (स्पष्टीकरणः ही सगळी वचने मला तोंडपाठ आहेत असे नक्कीच नाही. अशाप्रकारचे वर उल्लेख केलेल्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये वाचले होते ते आठवले आणि मग नक्की वचन कोणते, ते बायबलमधील कोणत्या पुस्तकात आहे वगैरे चॅटजीपीटीला विचारले). तेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हे नक्कीच- त्यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत हा अ‍ॅटिट्यूड थोडा संक्षींप्रमाणे वाटतो. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/14/2026 - 16:24
अशाप्रकारचे आपल्याकडे कोणी आणि कुठे लिहिले आहे याची कल्पना नाही.
चंसुकु तुम्ही वर कोट केलेली वचनं म्हणात असाल तर, भगवत गीता ही सगळी वचनं कव्हर करते.
मात्र चांगल्या गोष्टी आपल्याकडेच आहेत, आपल्याकडे चांगल्याच गोष्टी आहेत आणि आपल्याकडेच चांगल्या गोष्टी आहेत
असंं न म्हणता, त्यांच्याकडेही चांगल्या गोष्टी आहेत असं म्हणणं जास्त सयुक्तिक असेल, पण चांगल्याच आहेत असं म्हणता येत नाही. माझ्या दृष्टीने त्याची कारणमिमांसा देतो, जरा शब्दबंबाळ असेल पण भावना समजून घ्या अशी विनंती. पाश्चिमात्य तत्वज्ञ प्रामुख्याने भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याबद्दल (पर्सनल डेवलपमेंट) बोलतात. ज्यामुळे ते स्पष्टीकरण आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेटेबल होऊन सोपे वाटते आणि समजते. उदाहरणार्थ नॉर्मन व्हिन्सेंट पील यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं.
  • The Power of Positive Thinking
  • True Joy of Positive Living: An Autobiography
  • You Can If You Think You Can
  • Positive Thinking Every Day: An Inspiration for Each Day of the Year
  • A Guide to Confident Living
  • Six Attitudes for Winners
  • Confidence
  • Reaching Your Potential
नेव्हिल गॉडर्ड यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं
  • Your Faith is Your Fortune
  • The Power of Awareness
  • Feeling Is the Secret
  • The Power of Imagination: The Neville Goddard Treasury
  • Relax More, Try Less: The Easy Path to Abundance
  • The Wealth Mindset: Understanding the Mental Path to Wealth
  • Imagination Creates Reality
पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
अगदी सहज शक्य आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकू- लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वगैरे हे सांगतात. ते अधिक रिलेटेबल वाटत असावे.
शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं.
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे- ते शब्दात व्यक्त करता येणार नाही हे अगदी १००% मान्य. पण मग अशी अनुभूती ज्यांना खरोखरच होत असेल ते लोक 'आमचेच काय ते सगळे चांगले आणि इतरांकडे भुसा भरला आहे' असा अ‍ॅटिट्यूड ठेवतील का? माझ्या मर्यादित सॅम्पल सेटमध्ये मी ज्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांच्या आर्ग्युमेंटची सुरवातच भारतीय तत्वज्ञान श्रेष्ठ किंवा पाश्चिमात्यांच्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ इथपासून झालेली बघितलेली आहे. असेलही. अजिबात नाकारत नाही. पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे. अभ्यासाअंती जे अनुमान निघायला हवे तेच प्रिमाईस म्हणून वापरले तर कसे चालेल? माझे अशा बहुसंख्य लोकांशी पटत नाही ते त्या कारणाने. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sat, 02/14/2026 - 19:17
माझी सुरवातही हे सगळे नक्की काय आहे हे समजून घ्यावे या उत्सुकतेतून झाली. पण भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे वगैरे उल्लेख आल्यावर त्यातून कसलाही उलगडा झाला नाही
नक्कीच! भवसागर तरून जाणे, जग ही माया आहे हे सगळं आणि तत्सम तत्वज्ञान जोपर्यंत ध्यानमार्गाने प्रत्यक्ष अनुभवत नाही तोपर्यंत कळणं, उलगडणं कठीण आहे. ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी बोलत असले तरी
हे इंद्रियजन्य असं असायला हवं कारण पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
आणि ते अजिबात रिलेटेबल वाटले नाही.
तुम्ही कशाच्या शोधात आहात (seeking) त्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन' वगैरे ह्या संदर्भात शोधत असाल तर ते time and space ह्या मितीतच आहे. जर शोध 'beyond time and space' च्या उलगड्याचा असेल तरच भारतिय तत्वज्ञान रिलेटेबल वाटेल. स्वानुभवाचं उदाहरण देतो, मी विपश्यना ध्यानमार्गावर जाण्याआधि इस्कॉनच्या गीता सेशन्सला जायचो. एका बौद्धिक लेवलपर्यंत गोष्टी कळत होत्या, समज येत होती पण आकलन अथवा उअलगडा होत नव्हता. म्हणजे, रागावर ताबा ठेवा, कामावर (इंद्रियांवर) विजय मिळवा, कुठल्याही परिस्थिरतीत समअवस्थेत रहा. उपदेश म्हणून हे पटत होतं. पण म्हणजे त्यासाठी नेमकं काय करा ? त्यासाठीचा मार्ग, तंत्र, एक्झॅक्ट प्रकिया हे काही त्या सेशन्समधे नव्हतं. सगळं कृष्णावर सोपवा आणि निष्काम कर्म करा, तो सगळा भवसागर पार करून नेण्यास समर्थ आहे, भक्ती करा, नामस्मरण, कीर्तन करा हे असं सगळं असायच. पण दुसरा काही योग्य मार्ग माहिती नसल्याने त्यातच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, उलगडा होत नव्हता तरीही. पण विपश्यना ध्यानमार्गाची माहिती झाल्यावर, त्या मार्गावर चालल्यावर गीतेतल्या श्लोकांचे अर्थ वाचताना साकार होऊन आपोआप उलगडायला लागले (आणि विपश्यना ही अप्लाईड गीता आहे हे कळलं). त्यामुळे ते रिलेटेबल वाटणं हे काय शोधता आहात त्यावर अवलंबून आहे.
पण हे अनुमान तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काढता यायला हवे.
अर्थातच! विपश्यना धानप्रणालीची उपयुक्तता कळल्यावर ती इतकी मुलभूत कशी आणि इतर तत्वज्ञानात त्याच्या रिलेटेड, जवळ जाणारं काही आहे का हे अभ्यासण्यासाठी मी बहुतेक सगळ्या धानप्रणालींचा (इनर इंजीनियरिंग, सुदर्शन क्रिया, ट्रान्स्डेंटल मेडिटेशन, ओशोंच डायनॅमिक मेडीटेशन, ब्रम्हकुमारी राजयोग, सहज योग, एखार्ट टोल्लींच Present Moment मेडीटेशन, Landmark Forum, Natural Language Processing (NLP)) अवलंब करून बघितला. त्याने जो तुलनात्मक अभ्यास झाला त्यावरच माझी जी मतं आहेत ही बेतलेली आहेत. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्या ध्यानमार्गात काहीही दैवी, डिवाइन, स्पिरिच्युअल नाही, मन आणि शरिर यांच्या परस्पर संबंधांची प्युअर शास्त्रीय प्रक्रिया आहे ती. पण शाब्दिक अवडंबरामधे ते लोप पावलं त्यामूळे तुम्हाला जे वाटलं ते सहाजिकच आहे.
प्रश्न हा की एकहार्ट टोलींसारखे अभारतीय लोक तीच गोष्ट सोप्या भाषेत सांगतात पण आपलेच लोक शाब्दिक अवडंबरात का अडकतात?
पाश्चिमात्य तत्वज्ञ इंद्रियातीत गोष्टी (beyond time and space) बोलत नाही.
तसे नसावे. वेन डायर अनेकदा हायर सेल्फ चा उल्लेख करतात. Your sacred self हे त्यांचे पुस्तकच आहे. त्यात लिहिलेले beyond time and space असेच आहे. वर म्हटल्याप्रमाणे असे पाश्चिमात्य तत्वज्ञ बोलतात किंवा लिहितात तेव्हा ते आपलेच तत्वज्ञान मांडत असतात हे जाणवते. पण ते विनाकारण जडजंबाल नसल्याने आणि नक्की काय करायचे हे सांगितले असल्याने अधिक रिलेटेबल वाटते. दुसरे म्हणजे अनेकदा आपल्या (म्हणजे भारतीय) लोकांना याविषयी बोलायला लागल्यावर नक्की काय करायचे या प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा आपली भारतीय संस्कृती किती महान, आपले तत्वज्ञान किती महान असले अभिमान लगेच चावतात. त्यामुळे मग आपोआप वेदकालीन जंगलात भटकणे सुरू होते. त्यापेक्षा मग सिधी बात नो बकवास असा अ‍ॅप्रोच असलेले वेन डायर, एकहार्ट टोली, नेव्हिल गॉडर्ड हे मला तरी अधिक भावतात.

नेहरूंचे सचिव एम.ओ.मथाईंचे Reminiscences of the Nehru Age हे पुस्तक आहे. मला वाटते ते भारतात मिळत नाही. ते पुस्तक मी अमेरिकेतील विद्यापीठाच्या ग्रंथालयातून वाचले होते. त्यात एक उल्लेख होता. आंतरजालावर त्या पुस्तकाचे पी.डी.एफ अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यात आपले दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही उल्लेख आहेत. राधाकृष्णन हे मोठे तत्वज्ञ होते आणि भारतीय तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता हे तर सर्वमान्य आहे. १९५२ ते १९६२ या काळात राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती असताना राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्याकाळी सुरवातीला पदांची हायरारकी- राष्ट्रपती- पंतप्रधान यानंतर तिसर्‍या क्रमांकावर उपराष्ट्रपती होते. तेव्हा राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे आग्रह धरला होता की हायरारकी राष्ट्रपती-उपराष्ट्रपती-पंतप्रधान अशी हवी. म्हणजे थोडक्यात मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे असा त्यांचा आग्रह होता. इतकेच नाही तर त्यावेळेस सुरवातीला राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनाच हवाई दलाची विमाने वापरायचा अधिकार होता. तो अधिकार उपराष्ट्रपतींनाही- म्हणजे स्वतःला मिळाला पाहिजे असा आग्रह राधाकृष्णन यांनी नेहरूंकडे धरला होता. हे दोन्ही आग्रह नेहरूंनी मान्य केले. १९५७ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परत राष्ट्रपती पदाची निवडणुक होती तेव्हा राधाकृष्णन यांना राष्ट्रपती व्हायचे होते पण तेव्हाही उपराष्ट्रपती पदावर समाधान मानावे लागले म्हणून ते रूसून बसले होते. तेव्हा नेहरूंनी तुम्हाला पुढच्या वेळेस राष्ट्रपती करू असे आश्वासन दिले. हा सगळा विरोधाभास वाटत नाही का? एकीकडे भारतीय तत्वज्ञान beyond body and time जाते पण त्याचवेळेस मला दुसर्‍या क्रमांकाचे पद हवे, पहिल्या क्रमांकाचे पद मिळाले नाही म्हणून रुसून बसायचे, मला हवाईदलाची विमाने वापरायला मिळाली पाहिजेत हा आग्रह धरायचा हे काही समजले नाही. त्यापेक्षा- हो मला श्रीमंत व्हायचे आहे म्हणून मला लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन वापरायचा आहे आणि त्यासाठी गरजेचे असेल इतके आध्यात्म मी वापरेन असा अ‍ॅप्रोच असलेले बॉब प्रॉक्टर अधिक श्रेष्ठ नाहीत का? निदान जगासमोर दाखवायला दोन वेगळे चेहरे तरी नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि Sun, 02/15/2026 - 10:05
चंसुकु, ५०% सहमती ५०% असहमती. डिटेलमधे प्रतिसाद लिहीतो पण २-३ दिवसांनी, लॅान्ग विकेंड आहे, ट्रीपवर आहे. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

जरूर. वाट बघत आहे. ५०% असहमती कशामुळे असावी? याविषयी माझा अंदाज असा की तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्तीने ऐहिक सुख नाकारावेच असे काही नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला वाटते की ऐहिक सुख नाकारू नये ही अपेक्षा ठीक आहे पण एखादी गोष्ट मिळाली किंवा मिळाली नाही तरी त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही फरक पडला नाही पाहिजे- शेवटी beyond body and time हा अनुभव अधिक महत्वाचा नाही का? तेव्हा एखादी गोष्ट (अमुक एका क्रमांकाचे पद आणि त्या पदाला नसलेले अधिकार) आपल्याला मिळाली पाहिजे हा आग्रह जर धरला गेला असेल तर मग त्या व्यक्तीला ती गोष्ट हवी आहे असाच अर्थ होतो- तस्मात मिळाली किंवा मिळाली नाही तरी काहीही फरक पडत नाही अशी परिस्थिती नसावी. दुसरे म्हणजे beyond body and time असा अनुभव जेन्युईनली आलेले किती लोक असतील? फार नसावेत. पृथ्वीवरील बहुसंख्य लोक मी, माझे पैसे, माझे मानमरातब, माझी गाडीघोडा वगैरेंमध्येच गुरफटलेले असतात. समजा आपल्याकडे beyond body and time वर बरेच काही असेल पण ९९% लोक ज्या स्थितीत असतात त्यांच्यासाठी काहीच नाही का? काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे याविषयी लिहित नाहीये. काही हजार वर्षांपूर्वी काय लिहिले आहे त्याविषयी जी पुस्तके/भाषणे आताच्या काळात असतात त्याविषयी लिहित आहे. की मग परत भवसागर तरून जायला प्रभूचरणी लीन व्हा अशी दिसायला भारदस्त दिसणारी पण कसलाही अर्थबोध न होणारी तीच भाषा?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 12:32
एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास असणे आणि ते तत्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणणे यात काहीच फरक नाही का ? हे 'एखादा माणूस डॉकटर असतो ततरी तो व्यसनी कसा, तो आजारी का पडतो, तो जंक फूड का खातो' असे विचारण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख श्रीमान योगी किंवा उपभोगशून्य स्वामी असा केला जातो किंवा भगवान श्रीराम यांचा मर्यादा पुरुषोत्तम असा उल्लेख होतो त्यामागे या व्यक्तींचे प्रत्यक्ष वर्तन तपासले जाते अभ्यास नाही. एवढे लांब कशाला जा मनमोहन सिंग साहेब जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्री होते तेंव्हा भारताने कशा पद्धतीने तेलरोखे उभारून ठेवले होते हे सगळ्यांना माहिती आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

यात एक मोठा फरक आहे. तुम्ही मांडलेली इतर उदाहरणे करायच्या गोष्टी आहेत तर अध्यात्म - तत्वज्ञान या अनुभवायचा गोष्टी आहेत. एखादी गोष्ट करायची कशी हे स्वतः न करता इतरांना उत्तम प्रकारे शिकवता येऊ शकते. रमाकांत आचरेकरांनी सचिन घडवला. ते एक उत्तम शिक्षक होते पण सचिनप्रमाणे त्यांनी शतके ठोकली होती का? पण जर एखादी गोष्ट अनुभवायची असेल तर ती इतरांना सांगण्यापूर्वी स्वतः न अनुभवता कशी सांगता येईल हे समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Sun, 02/15/2026 - 16:42
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतचा वाङमयचौर्‍याचा खटला अत्यंत प्रसिध्द आहे. जदुनाथ सिन्हा यांच्या डॉक्टरेटसाठीच्या प्रबंधातील ११० परिच्छेद जसे च्या तसे राधाकृष्णन यांनी आपल्या 'इंडीयन फिलॉसॉफी भाग २' या पुस्तकात वापरले असा खटला १९२८ साली गाजला होता. त्यात अखेर दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या बाहेर तडजोड केली. राधाकृष्णन हे बडे प्रस्थ होते तर सिन्हा हे विद्यार्थी होते. अशा परिस्थितीत जर राधाकृष्णन यांना न्यायालयाबाहेर तडजोड करावी लागली असेल तर ते त्यांच्या इंटीग्रिटीवर पुरेसे प्रकाश टाकणारे आहे. त्यांनी आपल्या मुलींची लग्नेही बालवयात केली होती असे वाचले होते. एकूण ते पुस्तके आदर्शांवर लिहीत होते तरी आचरण अजिबात तसे नव्हते असे म्हणावे लागते. अशा व्यक्तीचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवसच शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे खूप फॉरवर्ड्स वाचले आहेत. पण आपल्या समाजात बोलण्याला आचरणापेक्षा जास्त महत्व आहे हे वारंवार दिसते.

चित्रगुप्त Mon, 02/16/2026 - 20:19
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते .
फक्त दोनचार दिवस 'क्राईम पॅट्रॉल' चे काही भाग बघा. भारतातल्या सर्वसाधारण, अगदी निरुपद्रवी वाटणार्‍या व्यक्ती देखील किती अमानुष, भयंकर गुन्हे करत असतात, याचे आश्चर्य वाटेल. थोड्याफार फरकाने जगभरातल्या मनुष्यप्राण्याचे अंतरंग सारखेच असल्याचे आढळून येते.

कांदा लिंबू Mon, 02/16/2026 - 22:26
कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते. . कोणतेही कुकर्म करताना हिंदू मन शंभर वेळा विचार करते. असं म्हणायला हवं. बातम्यांतून, आजूबाजूच्या सामाजिक वर्तनातून दिसणारे अपवाद वगळा. "सर्वे संतु सुखिनः, सर्वे संतु निरामया" व "जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||" असं म्हणणारे हिंदू संस्कृती आणि "काफिरांना संधी मिळताच ठार मारा, त्यांची संपत्ती लुटा, स्वर्गप्राप्ती होईल" असं म्हणणारी परकीय संस्कृती यापैकी काय खरोखर श्रेष्ठ असणार हे निश्चितपणे ठरवता येत नसेल त्यांच्याकडून अध्यात्म,भोग, त्याग इत्यादी वरच्या मताची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे.

डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने

युयुत्सु ·

तिता Tue, 02/10/2026 - 00:30
मी एकदाच चीनला गेलो होतो ते पण १२ वर्षांपूर्वी. त्यांचे scale बघूनच अवाक झालो. माझ्या मते चीनला कमी लेखणारे एकतर चीनबद्दल अद्न्यानी असतात किंवा खोटे बोलत असतात.

गामा पैलवान Tue, 02/10/2026 - 01:51
युयुत्सु, तुम्ही तुमच्या आकलनाच्या आधारे हिंदू सनातन धर्म आणि संस्कृतीस बोल लावलेत. यांत एक तथ्य निसटून गेलेलं दिसतंय. ते म्हणजे चीनमध्ये लोकशाही नसून हुकूमशाही आहे. तस्मात भारतीय लोकशाहीस बोल लावायला विसरलांत. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:48
मी चीनला गेलेलो नाही, हांगाश्शी चीन मध्ये प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सरकारी ऍप डिफॉल्ट म्हणून येते आणि ते इतर मोबाईल शी सतत संपर्कात येते. यामुळे प्रत्येक माणूस काय करतो हे सरकारला पूर्णपणे माहिती असते नि तुमच्यावर सरकारचे पूर्ण लक्ष असते. . याशिवाय या देशातून बाहेर येणारी प्रत्येक माहिती सरकारने वेचूनच पाठ्वलेली असते. चीनने काही क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे हि वस्तुस्थिती. पण आज चीन मध्ये आपल्याला साधी जमीन सुद्धा विकत घेता येत नाही. तेथे रस्ता रुंद करायचा असेल तर तुम्हाला १५ दिवसांची नोटीस दिली जाते आणि आपले घर खाली करायलाच लागते मग तुम्ही तेथे सात पिढ्या राहत असलात तरी. मानवी हक्क म्हणजे काय हे तिथीला जनतेला माहिती सुद्धा नाही. बीजिंग मध्ये जोडप्याने राहायचे असेल तर बायकोला नोकरी करावीच लागते पण बायकांना पुरुषांच्या एक चतुर्थांश पगार असतो यामुळे स्वस्त मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होते. इथे तुम्ही पंतप्रधानांना आई बापावरून शिव्या देता आणि कुणी काही बोलले तर लगेच गळा काढून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच म्हणून टाहो फोडता तेथे असे बोललात तर आपली उच्च आय आय टी ची डिग्री चुलीत घालून आपल्याला डुक्कर पालन केंद्रावर साधा कामगार म्हणून पाठवले जाईल. इथे बाबरी मशीद पडल्यावर ३४ वर्षे रडारड आणि गदारोळ चालू आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतात हजारो मशिदी सरळ बुलडोझर ने पडून टाकल्या आहेत आणि १० लाख उईगुर मुसलमानांना "प्रशिक्षणासाठी" कॅम्प किंवा तुरुंगात पाठवले आहे. याबद्दल कुणी काही बोलायचे नाही. बाकी चीनच्या पी एल १५ या सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांना, त्यांच्या एच क्यू ९ रडार आणि एच क्यू १६ क्षेपणास्त्राने भारतीय वायू दलाने कुचकामी कसे ठरवले याबद्दल बोलायचे नाही. (कारण डी आर डी ओ, इसरो मध्ये आय आय टी यन नाहीतच म्हणून असेल कदाचित). आणि या अपयशामुळे चीनने त्यांच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. https://www.orfonline.org/expert-speak/dual-fault-lines-in-china-s-military-weapons-fail-generals-jailed त्यांचे JF १७ किंवा ज १० विमानांची इंजिने अजून चीन सरकारला बनवता आलेली नाहीत याचे कारण काय असेल? आपण भारताला, सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे दिल्याशिवाय काही लोकांना रोजचे जेवण पचतच नाही. सतत चीनशी तुलना करताना तेथील परिस्थीती काय आहे याच्या कडे कानाडोळा करता राहायचे. असे केल्याशिवाय तुम्ही इंटेलेक्युअल पुरोगामी सिद्ध होणार नाही अशी कायम भीती वाटत राहते हा खरा तर न्यूनगंड आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Tue, 02/10/2026 - 19:50
'मी चीनला गेलेलो नाही,' हांगाश्शी दुसर्‍यांच्या अनेक मुद्द्यातील एकच फट काढून सगळं फोल ठरवण्याची स्टाईल आवडली डॉक्टर! फक्त एक राहिलं: तुंम्ही चीनला गेला होतात का ते सांगायचं राहिलं. त्याने तुमचे सगळे मुद्दे सिध्द होतील बघा.

पंतश्री Tue, 02/10/2026 - 17:59
मुद्दा भरकतो आहे. इथे सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे वगैरे काही नाही आहे. तुम्ही इतकं छान सांगितलं भारताबद्दल त्या बद्दल धन्यवाद. मोदींच्या कामाबद्दल किंवा भारत करत असलेल्या प्रगती बद्दलहि लेख नाही आहे. भारत करत असलेली प्रगती हि भूषणावह आहेच. इथे लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. सुबोध सर तुम्ही भावनेच्या ओघात विचारलेले मूलभूत प्रश्न दुर्लक्षले आहेत. मुख्य प्रश्न ना बगल देत भारतापुढील आव्हाने आणि भारताने केली प्रगती तसेच राजकारण्यामुळे भारत किती प्रगत झाला किंवा कुठल्याहि धर्मावर आधारित चर्चा अपेक्षी नाही आहे असं मला वाटते आहे. मुख्य मुद्दा आणि प्रश्न होता कि १. आपल्याला नि=ओबेल पुरस्कार का मिळत नाही आहेत? २. आपले पेटंट रेजिस्ट्रेशन का वाढत नाही आहेत? ह्यात आपण कुठे आणि का कमी पडत आहोत? ३. भारत कल्पकतेच्या मानकात कमी पडतो आहे का? ४. जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आणि सगळ्यात मोठी लोकशाही तसेच आशियातील उदयोन्मुख मुख्य सत्ताकेंद्र असूनही आपण आपली छाप कल्पकतेत का पडू शकत नाही आहोत? हे काही मुख्य मुद्दे इथे चर्चा करण्यासारखे आहेत. कल्पकता आणि संशोधन ह्या दोन्ही अगदी विरुद्ध बाजू आहेत असे मला वाटते. तुम्ही हे तर प्रमाणित केलेच आहे कि भारताने संशोधनात कशी बाजी मारली आहे तर मुख्य मुद्द्याला धरून भारत ने कल्पकतेत अशीच काही बाजी मारली असेल तर तेही प्रमाणित करावे. मी मागच्या १५ वर्षांपासून design क्षेत्रात काम करतो आहे. पण एक मुख्य निरीक्षण आहेत कि सरकारी क्षेत्राला कल्पकतेचे वावडे आहे. संषधां भले ढीग असेल पण कल्पकता शून्य आहे. बाकी जाता जाता युयुत्सुची टीप ची आठवण करून देतो परत. ai ने प्रतिप्रश्न दिला आहेच कि "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा"

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 19:30
लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. काय सांगताय? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत असणाऱ्या असंख्य चिनी वंशाच्या नागरिकांना तेथील संशोधन किंवा तंत्रज्ञान चोरून चीनला पाठवण्यासाठी कसे वेठीस धरले जाते याची आपल्याला सुतराम कल्पना नसावी. चिनी माणसांच्या जवळच्या नातेवाईकाना कुठल्या तरी खोट्या केसेस मध्ये अडकवले जाते काहीच सापडलं नाही तर तैवानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप तर आहेच. मग त्यांच्याशी वाटाघाटी होतात. तिकडनं तंत्रज्ञान पाठवण्याची तयारी झाली कि नातेवाईक सन्मानाने घरी परत येतात. याशिवाय साम दाम दंड भेद इ सर्व गोष्टी वापरल्या जातात. इतिहासातील चिनी संपन्नतेचे धडे देऊन इमोशनल ब्लॅक मेलिंग केलं जातं. हनी ट्रेपिंग सुद्धा सर्रास वापरलं जातं Chinese intelligence services, particularly the Ministry of State Security (MSS), have been accused of employing "honey trapping"—using romantic or sexual relationships for espionage—to target individuals in the United States, including members of the overseas Chinese diaspora, tech workers, and researchers. These operations often focus on acquiring sensitive intellectual property, technical data, and defense secrets, with a particular focus on Silicon Valley. तिथल्या विद्यापीठात काम करणारे प्राध्यपक पासून तेथे गेलेले विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेले उच्च पदस्थ पासून सर्वाना गळाला लावायचा प्रयत्न चीनचे सरकार करते. भारताने असं करणं तुमच्या कल्पनेतही येणार नाही. चीनने जिकडे तिकडे रिव्हर्स इंजिनियरींग करून आपले जहाज धक्क्याला लावण्याचं प्रयत्न केला. इलेकट्रोनिक्स केमिकल उत्पादनात चीनने बऱ्यापैकी यश मिळवलं पण म्हणूनच चिनी मालाबद्दल चला तो चांद तक नाही तो शाम तक असं का म्हटलं जातं? Former Google Engineer Found Guilty of Economic Espionage and Theft of Confidential AI Technology https://www.justice.gov/opa/pr/former-google-engineer-found-guilty-economic-espionage-and-theft-confidential-ai-technology This updated survey is based on publicly available information and lists 224 reported instances of Chinese espionage directed at the United States since 2000. https://www.csis.org/programs/strategic-technologies-program/survey-chinese-espionage-united-states-2000 https://www.fbi.gov/investigate/counterintelligence/the-china-threat अमेरिकी गुप्तचर खात्याचे २१५ अहवाल आहेत ज्यात चिनी नागरिकांनी केलेली हेरगिरी, तंत्रज्ञान चोरी, हॅकिंग इ चे अहवाल आहेत. As of early 2026, the European Union is moving toward a mandatory, phased-out ban of Huawei and ZTE from 5G networks due to security concerns. Poland has banned Chinese-made electric vehicles from entering specific military bases. Concerns regarding data security, espionage, and digital surveillance via sensors are driving these restrictions, with potential for broader,EU-wide regulations. Reverse engineering in the Chinese chemical industry is part of a broader, state-driven strategy to achieve technological self-sufficiency, often focusing on bypassing intellectual property (IP) restrictions and accelerating innovation in sectors ranging from specialty chemicals to advanced materials. As China's chemical industry is the largest in the world by revenue,, this approach helps rapidly bridge the technology gap with Western firms. बर्फाचा पहाड जितका वरून दिसतो त्याच्या ९/१० खाली असतो. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सोत्रि Wed, 02/11/2026 - 06:35
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सोत्रि Wed, 02/11/2026 - 06:48
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. बाकी सगळ चालू राहतंच, निसर्गक्रमाने, कोणाच्या परवानगीची गरज न लागता. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 09:54
चला तो चांद तक नाही तो शाम तक PL १५ क्षेपणास्त्रे, HQ ९ , HQ १६ ,JF १७, J १० हे सर्वच्या सर्व भारतीय शस्त्रास्त्रांविरुद्ध साफ अपयशी का ठरले? आजही चीनची रिव्हर्स इंजिनियरिंग केलेली J १७ J १० ची इंजिने चालत का नाहीत? चीनने जबरदस्त प्रगती केलेली आहे यात शंका नाही. यामुळेच भारत चीनला आपला प्रतिस्पर्धी समजतो यात शंका नाही. परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का? डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते. व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही. सरळसरळ पूर्वग्रह आणि हिंदू द्वेष दाखवणारी आहेत ज्याचा कल्पकतेशी संबंध नाही. जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? पाश्चात्य लोकांच्या तुलनेत जपानला किती नोबेल पारितोषिके मिळाली आहेत? कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली कि त्यावर उपलब्ध असलेलीच माहिती मिळेल एक तर ओवी अनुभवावी या उक्तीनुसार मी दिलेल्या दुव्यांपैकी एक तरी दुवा पूर्णपणे वाचला का? याच कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारा चीनमध्ये मानवी हक्क म्हणजे काय? आणि चीन शी आपली तुलना करुन आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला शिव्या घालताना आपण इतिहास विसरतो आहे हे सर्वज्ञ लोक विसरतात. इस्लामच्या रेट्यामधून भारत आणि चीन हे का वाचले याचा नीट अभ्यास करून पहा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्राचीन संस्कृती मुळेच. हे लक्षात न घेता पुढचे पाठ मागचे सपाट झाल्यामुळे अशी परिस्थिती येते. आज भारताने सर्व लोकांची मालमत्ता सरकार जमा करून घेतली कि आपल्याकडे सुद्धा सिंगूर पासून बुलेट ट्रेन मुंबईच्या लोकलचे सहा पदरी करण.सारखे सर्व पायाभूत प्रकल्प चुटकीसरशी पुढे जातील कारण त्यातील सर्वात मोठा जमीन अधिग्रहणाचा मुद्दाच निकाली निघेल. आणि सर्व अल्पसंख्याकांना मानसिक परिवर्तनासाठी पाठवले तर हेच डावे फुरोगामी सर्वज्ञ लोक खुश होतील का ? केवळ कल्पनाविलास करून होत नाही. भारताने चांद्रयान, मंगळयान, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, यु पि आय सारखे अनेक प्रयोग फार मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले आहेत ते रिव्हर्स इंजिनियरिंग करून नव्हे तर आपल्याच शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने. तेंव्हा केवळ द्वेषाची द्वेष न करता वस्तुस्थितीची जाणीव व्हावी यासाठी मी लिहिले आहे यात आपल्याला गोलपोस्ट हलवण्याचे दिसते स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे. असो आपले भले होवो.

In reply to by सुबोध खरे

पंतश्री Wed, 02/11/2026 - 10:44
सुबोध दादा, परत तेच. मुद्दा काय तुम्ही सांगताय काय? "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" ह्याचे उत्तर असे मी माझा राजकारणही दुरान्वयेहि काही संबंध नाही. संघ काय चीझ आहे आणि त्यांची विचारधारा काय हे हि मुख्यतः मला पूर्णतः समजलेले नाही. पण एक नक्की कि तुम्ही नक्कीच संघ द्वेषी आणि आम्ही म्हणू तेच बरोबर ह्यातले आहेत. मी एक design profeshional म्हणून माझे म्हणणे मांडतो आहे. तुम्ही जसे बोलताय त्यावर पण काही design theory आहेतच ज्या आम्ही वापरतो आमच्या रोजच्या कामात. तुमचे profeshion काही असो जे मंदाटी ते nutral होऊन मांडा , भांडण्यासाठी अमी माझा मुद्दा खोडण्यासाठी नाही. इथे चर्चा आपल्या भारतात कल्पकता कशी वाढवता येईल ह्यावर चर्चा करा करा. एक उधाहरण मी पण देतो कल्पकतेकला धरून. मोर हा कल्पकतेचा आणि सौंदर्याचा राजा आहे. मग आपण हे बोलूया का कि हा जगातील सगळ्यात बिनडोक, वाया गेलेला प्राणी आहे कारण ह्याचे ना निसर्गात काही योगदान आहे नि त्याचा काही फायदा. बहुतेक प्राणी हायला खात नाहीत आणि हा नुसता पिसारा फुलवऊन निश्चत बसतो नाच्या. फालतू जनावर आलेत तेव्हा हा नाश्ता झाला तरी चालण्या सारख आहे. तुम्हीच म्हणालात "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." बदल काय निसर्गाप्रमाणे आपोआप घडतात का?? जर तुम्ही आपले म्हणजेच रेटत राहिला मूळ मुद्दा सोडून तर काय बदलणारी संस्कृती तयार करणार? तुम्ही भरकटत राजकारण, जागतिक अर्थकारण आणि बाकी बरेच गोष्टी ओढत आहात . ह्याचा कल्पकता वाढण्यास काही उपयोग होत नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये हे असे काही शिकवले जात नाही जिथून निघणारे मोठे मोठे कल्पक कलाकार आहेत. मुख्य प्रश्न हा आहे कि आपण चीनशी बरोबरी न करता आपली कल्पकता कशी वाढवोउ शकतो. तुमचे म्हणणे असे आहे का कि हुकुमशी आली को कल्पकता वाढते? दुसऱ्याचे संशोधन चोरले कि कल्पकता वाढीस लागते? जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? हा प्रश्नच चुकीचा आहे. फक्त कल्पकता आणि जपान हा search टाका म्हणजे कल्पकता काय असते समजेल. आता विषय निघालाच आहे तर फक्त जपान आणि अपंग हे शेअरच करून बघा. जगात सगळ्यात जास्त उजव्या हाताचे असतात म्हणून आपली कात्री पण उजव्या हाता नुसार असते. पण डाव्यांचे काय?? हा विचं जपान ने केला आहे. तिकडे डाव्या हितासाठी कात्री मिळते. जपानची टॉय ट्रेन बघा. व्हायची सैर तर एगदी ८० वर्षांचा म्हातारा पण करेल कारण हि आपले बालपण जागवते. ह्यात तुम्ही सांगितलेले जगातील समीकरणे कुठे दिसत नाही आहे किंवा मला समजत नाही आहेत कि ती कशी बसत आहेत ह्यात. कल्पकतेचा वय, धर्म, सरकार कशाही हि संभांड नसतो. कल्पकता हि आपल्या शिकवणुकीतून आणि आसपास च्या वातावरणातून निर्माण होते. तुम्ही बरेच मोठे वाटत वयाने. तेव्हा मला एक सांगा फक्त. लहानपणापासून आपल्या वाडवडिलांनी काही कल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे का? प्राधान्य नेहमी पुस्तकी शिक्षणाला राहिले आहे भारतात. हा मुख्य मुद्दा आहे. जर design चे ज्ञान नसेल तर कृपया फालतू मुद्दे उगाळून ढग वाया घालवू नका. आता तुमच्या मुलांची , नातवंडांची कल्पकता अश्या भारतीय, जागतिक राजकारणाने वाढत असेल तर ती कल्पकता तुम्हालाच लखलाभ होवो. अशी कल्पकता मलातरी माझ्या मुलांना द्यायची इच्छा नक्कीच नाही.

In reply to by पंतश्री

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:50
श्री० पंतश्री तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 12:22
त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. हायला दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो असली भंपक विधाने केल्यावर मी तुम्हाला आव्हान दिले त्याच्यावर तुम्ही पळ काढता आणि कसल्या फालतू पैजा हरायला तयार आहात? मुळात इंग्रजी स्पेलिंग चा आणि या लेखाचा संबंध नाही. सुदैवाने माझे इंग्रजी उच्च दर्जाचे आहे. पण एखाद्याचे इंग्रजी खरोखरच चांगले नसले तर त आपली हि टिप्पणी अत्यंत खालच्या दर्जाची आहे एवढे मी नमूद करू इच्छितो. महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत पासून सगळे चित्पावन ज्यू लोकांचे वंशज कि तत्सम काहीतरी भंपक विधाने करून तुम्ही नक्की काय सिद्ध करायला जाताय.

In reply to by युयुत्सु

योगी९०० Wed, 02/11/2026 - 21:07
तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. तुम्हाला डॉ. खरेंचे मुद्दे पटले नाहीत म्हणून अशी खालच्या दर्जाची टिका करणे हे पटले नाही. भारतीय लष्करात काम केलेल्या व पेशाने डॉ. असलेल्या व्यक्तीचा हा अपमान झाला आहे. तीव्र निषेध. ज्या लोकांना मुद्देसुद उत्तरे देता येत नाहीत ते असे करतात. तुम्ही त्यातले नाही हे आतापर्यंत समजत होतो. पण माझ्या समजुतीला तडे गेले.

In reply to by पंतश्री

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 12:01
@ पंतश्री लेखकाची वाक्ये मी "चुकीची" म्हणून उद्धृत केलेली आहेत. "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" त "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." हि वाक्ये माझी नाहित. ती तुम्ही माझ्या तोंडी घालून अत्यंत चुकीचा वाद घालत आहात. बाकी डाव्या हाताची कात्री भारतातही सर्रास मिळते. डावरया दंतवैद्यांना हातातील ड्रिल मशीन पूर्वी (४० वर्षांपूर्वी) भारतात तयार झालेले मिळत नसे तेही मिळायला लागले. ७५ वर्षात तुम्ही एकदम ३०० वर्षांची प्रगती अपेक्सह करता आहेत म्हणून हि तुलना होते. चीनच्या बहुसंख्य तंत्रज्ञानात कल्पकतेऐवजी रिव्हर्स इंजिनियरिंग वापरले गेलेले आहे हे आपण विसरता आहात. चीनची जबरदस्त प्रगती त्यांच्या कल्पकतेमुळे झाली आहे असे कुठेही दिसत नाही. तसे दाखवून द्या मग मी माझे विधान मागे घेईन. बाकी राजकारण किंवा हिंदू द्वेष हा संदर्भ तुमच्यासाठी नव्हताच तो युयुत्सु यांच्याबद्दल आहे. तुम्ही का स्वतःला चिकटवून घेताय> बाकी केवळ तुम्ही डिझाईन मध्ये आहेत म्हणून इतरांनी त्याबद्दल बोलायचेच नाही असा असेल तर बोलणेच संपले. ] हे म्हणजे तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच शकत नाही. किंवा तुम्ही शेती करत नाही तर तुम्ही शेतीबद्दल बोलायचे नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आहे

In reply to by सुबोध खरे

सोत्रि Wed, 02/11/2026 - 11:42
हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे.
ज्या रंगाचा चष्मा आपण लावतो त्याच रंगाचं जग आपल्याला दिसू लागतं.

😎

असो, अजून काहीही अवांतर न करता मी थांबतो! - (वस्तुनिष्ठ) सोकाजी

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:38
वर केल्या गेलेल्या थयथयाटामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. चीनमधली हूकूमशाही राजवट अलिकडची काही वर्षातली आहे, चीनमधल्या कल्पकतेच्या संस्कृतीचा इतिहास अनेक शतकांचा आहे. भारताने चीनची कितीही मिसाईल पाडली, चीनने बाधलेले पूल पडले तरी त्यांनी निर्माण केलेल्या पेंटटच्या एव्हरेस्टला बारीकशी पण चीर पडलेली नाही. आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 11:44
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली? धर्माचार्यांचा नोबेल पारितोषिकही संबंध काय? पोप ला नोबेल मिळालंय का ? ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांना ढिगाने नोबेल मिळाली आहेत आणि पैशाला पासरी पेटंट्स आहेत. artificial intelligence is no match for natural stupidity

पंतश्री Wed, 02/11/2026 - 10:58
सुबोध भाऊ, खास तुमच्या आग्रहास्तव जपानच्या नोबेल पारितोषिकांची लिस्ट तारखे सकट खाली देत आहे. आता तुम्ही सुचवलेच आहेत मम्हणून ai आणि गुगळतो आहे. लिस्ट जरा जास्तच छोटी आहे. जास्त माहिती साठी तुम्ही हे reference टाकून सत्यता नक्कीच पडताळून पाहू शकता. 1949 – Physics: Hideki Yukawa (1907–1981) Yukawa, a physicist from Kyoto University, predicted the existence of mesons (subatomic particles that mediate nuclear forces) through theoretical models. This laid groundwork for particle physics and was Japan's first Nobel. Rationale: "for his prediction of the existence of mesons on the basis of theoretical work on nuclear forces." 1965 – Physics: Shin'ichirō Tomonaga (1906–1979) Tomonaga, also from Kyoto, advanced quantum electrodynamics (QED), reconciling quantum mechanics with special relativity for electromagnetic interactions. Shared with Americans Schwinger and Feynman. Rationale: "for their fundamental work in quantum electrodynamics, with deep-ploughing consequences for the physics of elementary particles." 1968 – Literature: Yasunari Kawabata (1899–1972) Kawabata, a novelist from University of Tokyo, captured Japanese aesthetics and human fragility in works like Snow Country. First Japanese literature winner. Rationale: "for his narrative mastery, which with great sensibility expresses the essence of the Japanese mind." 1973 – Physics: Leo Esaki (1925–) Esaki, from University of Tokyo, discovered electron tunneling in semiconductors, leading to the Esaki diode—key for modern electronics. Shared with Giaever and Josephson. Rationale: "for their experimental discoveries regarding tunneling phenomena in semiconductors and superconductors, respectively." 1974 – Peace: Eisaku Satō (1901–1975) Satō, former PM and University of Tokyo alum, pushed nuclear non-proliferation and Pacific stability via Japan's three non-nuclear principles. Shared with MacBride. Rationale: "for his contribution to stabilize conditions in the Pacific rim area and for signing the Nuclear Non-Proliferation Treaty." 1981 – Chemistry: Kenichi Fukui (1918–1998) Fukui, from Kyoto, developed frontier orbital theory to predict chemical reaction paths. First Asian chemistry winner. Shared with Hoffmann. Rationale: "for their theories, developed independently, concerning the course of chemical reactions." 1987 – Physiology or Medicine: Susumu Tonegawa (1939–) Tonegawa, Kyoto alum, uncovered how genes rearrange to produce diverse antibodies, revolutionizing immunology. Rationale: "for his discovery of the genetic principle for generation of antibody diversity." 1994 – Literature: Kenzaburō Ōe (1935–2023) Ōe, from University of Tokyo, wrote poetic, myth-infused novels on human struggles, influenced by his disabled son. Rationale: "who with poetic force creates an imagined world, where life and myth condense to form a disconcerting picture of the human predicament today." 2000 – Chemistry: Hideki Shirakawa (1936–) Shirakawa, Tokyo Tech alum, co-discovered conductive polymers (plastics that conduct electricity), enabling flexible electronics. Shared with MacDiarmid and Heeger. Rationale: "for their discovery and development of conductive polymers." 2001 – Chemistry: Ryōji Noyori (1938–) Noyori, from Kyoto, pioneered chiral catalysis for hydrogenation, crucial for drug synthesis. Shared with Knowles and Sharpless. Rationale: "for their work on chirally catalysed hydrogenation reactions." 2002 – Physics: Masatoshi Koshiba (1926–2020) Koshiba, University of Tokyo, detected cosmic neutrinos with the Kamiokande detector, confirming supernova theories. Shared with Davis and Giacconi. Rationale: "for pioneering contributions to astrophysics, in particular for the detection of cosmic neutrinos." 2002 – Chemistry: Koichi Tanaka (1959–) Tanaka, Tohoku alum, invented soft laser desorption for mass spectrometry, aiding protein analysis. Shared with Fenn and Wüthrich. Rationale: "for their development of soft desorption ionisation methods for mass spectrometric analyses of biological macromolecules." 2008 – Physics: Yoichiro Nambu (1921–2015) Nambu, Japanese-born (University of Tokyo), explained spontaneous symmetry breaking in particle physics, foundational for the Standard Model. US citizen at award. Shared half the prize (other half to Kobayashi and Maskawa). Rationale: "for the discovery of the mechanism of spontaneous broken symmetry in subatomic physics." 2008 – Physics: Makoto Kobayashi (1944–) Kobayashi, Nagoya alum, co-proposed the CKM matrix explaining CP violation and quark families. Shared with Maskawa. Rationale: "for the discovery of the origin of the broken symmetry which predicts the existence of at least three families of quarks in nature." 2008 – Physics: Toshihide Maskawa (1940–2021) Maskawa, Nagoya alum, same as Kobayashi on quark symmetry breaking. Rationale: same as above. 2008 – Chemistry: Osamu Shimomura (1928–2018) Shimomura, Nagasaki alum, isolated green fluorescent protein (GFP) from jellyfish, now a biotech staple for imaging. Shared with Chalfie and Tsien. US citizen later, but listed as Japanese. Rationale: "for the discovery and development of the green fluorescent protein, GFP." 2010 – Chemistry: Ei-ichi Negishi (1935–2021) Negishi, University of Tokyo, developed palladium-catalyzed cross-coupling for carbon bonds, vital for pharma. Shared with Heck and Suzuki. Rationale: "for palladium-catalyzed cross couplings in organic synthesis." 2010 – Chemistry: Akira Suzuki (1930–) Suzuki, Hokkaido alum, same cross-coupling method (Suzuki reaction). Rationale: same as above. 2012 – Physiology or Medicine: Shinya Yamanaka (1962–) Yamanaka, Kobe alum, created induced pluripotent stem cells (iPS) from adult cells, bypassing embryos for regenerative medicine. Shared with Gurdon. Rationale: "for the discovery that mature cells can be reprogrammed to become pluripotent." 2014 – Physics: Isamu Akasaki (1929–2021) Akasaki, Kyoto alum, invented blue LEDs for efficient lighting. Shared with Amano and Nakamura. Rationale: "for the invention of efficient blue light-emitting diodes which has enabled bright and energy-saving white light sources." 2014 – Physics: Hiroshi Amano (1960–) Amano, Nagoya alum, same blue LED breakthrough. Rationale: same as above. 2014 – Physics: Shuji Nakamura (1954–) Nakamura, University of Tokushima, co-invented blue LEDs while at Nichia Corp. US citizen at award, Japanese-born. Rationale: same as above. 2015 – Physics: Takaaki Kajita (1959–) Kajita, Saitama alum, proved neutrino oscillations (they have mass) via Super-Kamiokande. Shared with McDonald. Rationale: "for the discovery of neutrino oscillations, which shows that neutrinos have mass." 2015 – Physiology or Medicine: Satoshi Ōmura (1935–) Ōmura, University of Yamanashi, discovered avermectin from soil bacteria, leading to ivermectin for parasitic diseases. Shared with Campbell and Tu. Rationale: "for their discoveries concerning a novel therapy against infections caused by roundworm parasites." 2016 – Physiology or Medicine: Yoshinori Ohsumi (1945–) Ohsumi, University of Tokyo, elucidated autophagy (cell self-eating for recycling), key for disease research. Rationale: "for his discoveries of mechanisms for autophagy." 2018 – Physiology or Medicine: Tasuku Honjo (1942–) Honjo, Kyoto alum, found PD-1 protein, enabling immune checkpoint inhibitors for cancer therapy. Shared with Allison. Rationale: "for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation." 2019 – Chemistry: Akira Yoshino (1948–) Yoshino, Kyoto alum, developed lithium-ion batteries, powering modern devices. Shared with Goodenough and Whittingham. Rationale: "for the development of lithium ion batteries." 2021 – Physics: Syukuro Manabe (1931–) Manabe, Japanese-born (University of Tokyo), modeled Earth's climate systems, foundational for global warming predictions. US citizen at award. Shared with Hasselmann and Parisi. Rationale: "for the physical modelling of Earth’s climate, quantifying variability and reliably predicting global warming." 2024 – Peace: Nihon Hidankyo Grassroots group of Hiroshima/Nagasaki survivors advocating nuclear abolition through testimonies. Rationale: "for its efforts to achieve a world free of nuclear weapons and for demonstrating through witness testimony that nuclear weapons must never be used again." 2025 – Chemistry: Susumu Kitagawa (1951–) Kitagawa, Kyoto alum, pioneered metal-organic frameworks (MOFs) for gas storage, separation, and catalysis. Shared with Robson and Yaghi. Rationale: "for the development of metal-organic frameworks." 2025 – Physiology or Medicine: Shimon Sakaguchi (1951–) Sakaguchi, Kyoto alum, discovered regulatory T cells for immune tolerance, impacting autoimmunity and transplant medicine. Shared with Brunkow and Ramsdell. Rationale: "for their discoveries concerning peripheral immune tolerance."

In reply to by पंतश्री

इच्छुकांनी जपानी टॉप इन्वेशन्स हे एन एच के कृत भाग जरूर पाहावेत. https://www3.nhk.or.jp/nhkworld/en/shows/topinventions/ मी नेहमी अगदी नियमित पणे पाहत असतो. प्रचंड कष्टाळू लोक आणि ध्यासाच्या मागे धावण्यात कुणीही हात धरू शकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीतही जपानी लोक इन्वेशन्स करत असतात सतत.

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 12:56
महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत, या माझ्या सिद्धांतावर मी अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. पण तो या धाग्याचा विषय नसल्याने जास्त अटेंशन मिळणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 19:17
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो. या माझ्या सिद्धांतावर अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. यावर अजूनही ठाम आहात का? का आता शेपूट घालणार?

अर्धवटराव Wed, 02/11/2026 - 19:13
संघोटे काय, कम्युनीच काय.. शेवटी टिपर्‍याच खेळायच्या आहेत ना. चांगलय कि. बाकी आपल्या मानवी भावनांना ए आय कडुन व्हेरिफाय करायला लागण्याइतपत अधोगती झालेली बघुन भारतात डिसाइन इकॉनॉमीची काय दुर्गती होणार याची चिंता वाटायला लागली आहे.

गामा पैलवान गुरुवार, 02/12/2026 - 02:31
लोकहो, एक रोचक तथ्य नोंदवायचं आहे. आधुनिक काळातली पहिली अभियांत्रिकी महाजत्रा इ.स. १८५१ साली लंडनमध्ये भरली होती. तिला ग्रेट एक्झिबिशन म्हणतात. विकिवर इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Great_Exhibition या जत्रेस जगभरातले अभियांत्रिकी व तांत्रज्ञानिक नमुने मागवले होते. तर, मौजेची बाब अशी की भारताचे दालन सर्वांत मोते व आकर्षक होते. साहजिकंच भारत व चीन यांची तुलना लोकं करीत होते. या तुलनेविषयी गुग्गुळाचार्य बघा काय म्हणताहेत : https://i.postimg.cc/hvsZktxb/india-china-in-great-exhibition.png ऐन व्हिक्टोरियन कालखंडात जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली होती तेव्हाही जगात भारत हाच तंत्रज्ञानात व कल्पकतेत प्रथम क्रमांकावर होता. आज ते स्थान कुठे गेलंय? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी गुरुवार, 02/12/2026 - 18:08
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???

In reply to by कॉमी

अभ्या.. गुरुवार, 02/12/2026 - 19:34
ते सोडा, गापै ना फारसे कुणी मनावर घेत नसतात. त्यांचे ते त्यांचा प्राचीन भारत आणि त्यांनीच निर्माण केलेले मराठीतले प्रतिशब्द ह्यांच्यात मग्न असतात. ;) . हे बघा, इंटरेस्टिंग ह्याच प्रदर्शनात ससेक्सचे विल्यम चेंबरलिन ज्युनियर यांनी जगातील पहिले मतदान यंत्र (voting machine) प्रदर्शित केले, जे आपोआप मते मोजत असे आणि जास्त मतदान रोखण्यासाठी इंटरलॉकिंग सिस्टम वापरत असे.

In reply to by अभ्या..

हा हा लोल. गामा पैलवान म्हणजे दुसरे सावरकर आहेत बहुतेक. मराठीला त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. मला तरी त्यांचे प्रतिशब्द आवडतात. गापै, करत राहा नवे शब्द.

अप्पा जोगळेकर गुरुवार, 02/12/2026 - 20:52
एकाच व्यक्तीने दोन आयडी घेऊन स्वतःच स्वतःला प्रतिसाद दिले आहेत. गंगाधर ही शक्तिमान है. पूर्वी संक्षी काकांच्या धाग्यावर असले प्रकार चालायचे.

गामा पैलवान Fri, 02/13/2026 - 02:00
कॉमी,
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???
यावरून तत्कालीन ब्रिटीश समाजची विज्ञान व तंत्रज्ञान याबद्दलची आस्था दिसून येते. आ.न., -गा.पै.

कालच शांघायमध्ये विमानतळाजवळ रस्ता खचला. नक्की काय झाले ते पुढील व्हिडिओमध्ये बघता येईल. https://www.youtube.com/watch?v=CR8iydhzRRI अशा इतर काही घटनाही घडल्या आहेत. उदाहरणार्थ सबवे ट्रेनमध्ये पाणी घुसणे https://www.youtube.com/watch?v=VjwsEnZOqSg वगैरे. बर्‍याच गोष्टींमध्ये चीन आपल्या कितीतरी पुढे आहे हे कोणीच नाकारत नाही. मात्र चीनमध्ये कसे सगळे मस्त मस्त आणि भारतात कशी सगळी घाण अशी परिस्थिती नसावी.

गामा पैलवान Fri, 02/13/2026 - 20:57
अवांतर : चीनमधल्या अल्पसंख्य जमातींविषयी एक रोचक लेख ( इंग्रजी दुवा ) : https://www.theguardian.com/commentisfree/2021/jun/10/china-celebrating-diversity-suppressing-xinjiang-communist-party वरील लेखांत वर्णिलेले धोरण ही चिनी कल्पकता मानवी का ? चर्चा व्हावी. -गा.पै.

तिता Tue, 02/10/2026 - 00:30
मी एकदाच चीनला गेलो होतो ते पण १२ वर्षांपूर्वी. त्यांचे scale बघूनच अवाक झालो. माझ्या मते चीनला कमी लेखणारे एकतर चीनबद्दल अद्न्यानी असतात किंवा खोटे बोलत असतात.

गामा पैलवान Tue, 02/10/2026 - 01:51
युयुत्सु, तुम्ही तुमच्या आकलनाच्या आधारे हिंदू सनातन धर्म आणि संस्कृतीस बोल लावलेत. यांत एक तथ्य निसटून गेलेलं दिसतंय. ते म्हणजे चीनमध्ये लोकशाही नसून हुकूमशाही आहे. तस्मात भारतीय लोकशाहीस बोल लावायला विसरलांत. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:48
मी चीनला गेलेलो नाही, हांगाश्शी चीन मध्ये प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सरकारी ऍप डिफॉल्ट म्हणून येते आणि ते इतर मोबाईल शी सतत संपर्कात येते. यामुळे प्रत्येक माणूस काय करतो हे सरकारला पूर्णपणे माहिती असते नि तुमच्यावर सरकारचे पूर्ण लक्ष असते. . याशिवाय या देशातून बाहेर येणारी प्रत्येक माहिती सरकारने वेचूनच पाठ्वलेली असते. चीनने काही क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे हि वस्तुस्थिती. पण आज चीन मध्ये आपल्याला साधी जमीन सुद्धा विकत घेता येत नाही. तेथे रस्ता रुंद करायचा असेल तर तुम्हाला १५ दिवसांची नोटीस दिली जाते आणि आपले घर खाली करायलाच लागते मग तुम्ही तेथे सात पिढ्या राहत असलात तरी. मानवी हक्क म्हणजे काय हे तिथीला जनतेला माहिती सुद्धा नाही. बीजिंग मध्ये जोडप्याने राहायचे असेल तर बायकोला नोकरी करावीच लागते पण बायकांना पुरुषांच्या एक चतुर्थांश पगार असतो यामुळे स्वस्त मनुष्यबळ आपोआप उपलब्ध होते. इथे तुम्ही पंतप्रधानांना आई बापावरून शिव्या देता आणि कुणी काही बोलले तर लगेच गळा काढून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच म्हणून टाहो फोडता तेथे असे बोललात तर आपली उच्च आय आय टी ची डिग्री चुलीत घालून आपल्याला डुक्कर पालन केंद्रावर साधा कामगार म्हणून पाठवले जाईल. इथे बाबरी मशीद पडल्यावर ३४ वर्षे रडारड आणि गदारोळ चालू आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतात हजारो मशिदी सरळ बुलडोझर ने पडून टाकल्या आहेत आणि १० लाख उईगुर मुसलमानांना "प्रशिक्षणासाठी" कॅम्प किंवा तुरुंगात पाठवले आहे. याबद्दल कुणी काही बोलायचे नाही. बाकी चीनच्या पी एल १५ या सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांना, त्यांच्या एच क्यू ९ रडार आणि एच क्यू १६ क्षेपणास्त्राने भारतीय वायू दलाने कुचकामी कसे ठरवले याबद्दल बोलायचे नाही. (कारण डी आर डी ओ, इसरो मध्ये आय आय टी यन नाहीतच म्हणून असेल कदाचित). आणि या अपयशामुळे चीनने त्यांच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. https://www.orfonline.org/expert-speak/dual-fault-lines-in-china-s-military-weapons-fail-generals-jailed त्यांचे JF १७ किंवा ज १० विमानांची इंजिने अजून चीन सरकारला बनवता आलेली नाहीत याचे कारण काय असेल? आपण भारताला, सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे दिल्याशिवाय काही लोकांना रोजचे जेवण पचतच नाही. सतत चीनशी तुलना करताना तेथील परिस्थीती काय आहे याच्या कडे कानाडोळा करता राहायचे. असे केल्याशिवाय तुम्ही इंटेलेक्युअल पुरोगामी सिद्ध होणार नाही अशी कायम भीती वाटत राहते हा खरा तर न्यूनगंड आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Tue, 02/10/2026 - 19:50
'मी चीनला गेलेलो नाही,' हांगाश्शी दुसर्‍यांच्या अनेक मुद्द्यातील एकच फट काढून सगळं फोल ठरवण्याची स्टाईल आवडली डॉक्टर! फक्त एक राहिलं: तुंम्ही चीनला गेला होतात का ते सांगायचं राहिलं. त्याने तुमचे सगळे मुद्दे सिध्द होतील बघा.

पंतश्री Tue, 02/10/2026 - 17:59
मुद्दा भरकतो आहे. इथे सनातन धर्माला, मोदी सरकारला इथल्या प्रगतीला दूषणे वगैरे काही नाही आहे. तुम्ही इतकं छान सांगितलं भारताबद्दल त्या बद्दल धन्यवाद. मोदींच्या कामाबद्दल किंवा भारत करत असलेल्या प्रगती बद्दलहि लेख नाही आहे. भारत करत असलेली प्रगती हि भूषणावह आहेच. इथे लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. सुबोध सर तुम्ही भावनेच्या ओघात विचारलेले मूलभूत प्रश्न दुर्लक्षले आहेत. मुख्य प्रश्न ना बगल देत भारतापुढील आव्हाने आणि भारताने केली प्रगती तसेच राजकारण्यामुळे भारत किती प्रगत झाला किंवा कुठल्याहि धर्मावर आधारित चर्चा अपेक्षी नाही आहे असं मला वाटते आहे. मुख्य मुद्दा आणि प्रश्न होता कि १. आपल्याला नि=ओबेल पुरस्कार का मिळत नाही आहेत? २. आपले पेटंट रेजिस्ट्रेशन का वाढत नाही आहेत? ह्यात आपण कुठे आणि का कमी पडत आहोत? ३. भारत कल्पकतेच्या मानकात कमी पडतो आहे का? ४. जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आणि सगळ्यात मोठी लोकशाही तसेच आशियातील उदयोन्मुख मुख्य सत्ताकेंद्र असूनही आपण आपली छाप कल्पकतेत का पडू शकत नाही आहोत? हे काही मुख्य मुद्दे इथे चर्चा करण्यासारखे आहेत. कल्पकता आणि संशोधन ह्या दोन्ही अगदी विरुद्ध बाजू आहेत असे मला वाटते. तुम्ही हे तर प्रमाणित केलेच आहे कि भारताने संशोधनात कशी बाजी मारली आहे तर मुख्य मुद्द्याला धरून भारत ने कल्पकतेत अशीच काही बाजी मारली असेल तर तेही प्रमाणित करावे. मी मागच्या १५ वर्षांपासून design क्षेत्रात काम करतो आहे. पण एक मुख्य निरीक्षण आहेत कि सरकारी क्षेत्राला कल्पकतेचे वावडे आहे. संषधां भले ढीग असेल पण कल्पकता शून्य आहे. बाकी जाता जाता युयुत्सुची टीप ची आठवण करून देतो परत. ai ने प्रतिप्रश्न दिला आहेच कि "अशा लोकांशी वाद घालायचा की सोडून द्यायचा"

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 19:30
लोकशाही कि हुकूमशाही, व्यक्ती स्वातंत्र्य भारतात किती आणि चीन मध्ये किती हाही मुद्दा नाही. काय सांगताय? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत असणाऱ्या असंख्य चिनी वंशाच्या नागरिकांना तेथील संशोधन किंवा तंत्रज्ञान चोरून चीनला पाठवण्यासाठी कसे वेठीस धरले जाते याची आपल्याला सुतराम कल्पना नसावी. चिनी माणसांच्या जवळच्या नातेवाईकाना कुठल्या तरी खोट्या केसेस मध्ये अडकवले जाते काहीच सापडलं नाही तर तैवानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप तर आहेच. मग त्यांच्याशी वाटाघाटी होतात. तिकडनं तंत्रज्ञान पाठवण्याची तयारी झाली कि नातेवाईक सन्मानाने घरी परत येतात. याशिवाय साम दाम दंड भेद इ सर्व गोष्टी वापरल्या जातात. इतिहासातील चिनी संपन्नतेचे धडे देऊन इमोशनल ब्लॅक मेलिंग केलं जातं. हनी ट्रेपिंग सुद्धा सर्रास वापरलं जातं Chinese intelligence services, particularly the Ministry of State Security (MSS), have been accused of employing "honey trapping"—using romantic or sexual relationships for espionage—to target individuals in the United States, including members of the overseas Chinese diaspora, tech workers, and researchers. These operations often focus on acquiring sensitive intellectual property, technical data, and defense secrets, with a particular focus on Silicon Valley. तिथल्या विद्यापीठात काम करणारे प्राध्यपक पासून तेथे गेलेले विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेले उच्च पदस्थ पासून सर्वाना गळाला लावायचा प्रयत्न चीनचे सरकार करते. भारताने असं करणं तुमच्या कल्पनेतही येणार नाही. चीनने जिकडे तिकडे रिव्हर्स इंजिनियरींग करून आपले जहाज धक्क्याला लावण्याचं प्रयत्न केला. इलेकट्रोनिक्स केमिकल उत्पादनात चीनने बऱ्यापैकी यश मिळवलं पण म्हणूनच चिनी मालाबद्दल चला तो चांद तक नाही तो शाम तक असं का म्हटलं जातं? Former Google Engineer Found Guilty of Economic Espionage and Theft of Confidential AI Technology https://www.justice.gov/opa/pr/former-google-engineer-found-guilty-economic-espionage-and-theft-confidential-ai-technology This updated survey is based on publicly available information and lists 224 reported instances of Chinese espionage directed at the United States since 2000. https://www.csis.org/programs/strategic-technologies-program/survey-chinese-espionage-united-states-2000 https://www.fbi.gov/investigate/counterintelligence/the-china-threat अमेरिकी गुप्तचर खात्याचे २१५ अहवाल आहेत ज्यात चिनी नागरिकांनी केलेली हेरगिरी, तंत्रज्ञान चोरी, हॅकिंग इ चे अहवाल आहेत. As of early 2026, the European Union is moving toward a mandatory, phased-out ban of Huawei and ZTE from 5G networks due to security concerns. Poland has banned Chinese-made electric vehicles from entering specific military bases. Concerns regarding data security, espionage, and digital surveillance via sensors are driving these restrictions, with potential for broader,EU-wide regulations. Reverse engineering in the Chinese chemical industry is part of a broader, state-driven strategy to achieve technological self-sufficiency, often focusing on bypassing intellectual property (IP) restrictions and accelerating innovation in sectors ranging from specialty chemicals to advanced materials. As China's chemical industry is the largest in the world by revenue,, this approach helps rapidly bridge the technology gap with Western firms. बर्फाचा पहाड जितका वरून दिसतो त्याच्या ९/१० खाली असतो. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सोत्रि Wed, 02/11/2026 - 06:35
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सोत्रि Wed, 02/11/2026 - 06:48
डॅाक, डार्ट बोर्डावर डार्ट मारून त्याभोवती वर्तुळं काढून ‘बुल्स आय‘ केल्यासारखं होतंय. धाग्याचा मुळ मुद्दा डिझाईन ईकॅानॅामी आणि त्यापुढची आव्हाने हा आहे, चीनच्या अंतर्गत बाबींबद्दल नाही.
चला तो चांद तक नाही तो शाम तक
हे गृहीतक बाबा आदमच्या जमान्यात ठीक होतं. आताच्या एकविसाव्या शतकातला चीन हा डिझाईन ईकॅानॅामीला एम्ब्रेस करून अनेरिकेला टक्कर देऊन जागतिक महासत्ता होण्यची ताकद बाळगून आहे. हे माझं मत, स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे. बाकी सगळ चालू राहतंच, निसर्गक्रमाने, कोणाच्या परवानगीची गरज न लागता. - (सो कॅाल्ड सॅाफ्टवेयर डिझाईनर) सोकाजी

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 09:54
चला तो चांद तक नाही तो शाम तक PL १५ क्षेपणास्त्रे, HQ ९ , HQ १६ ,JF १७, J १० हे सर्वच्या सर्व भारतीय शस्त्रास्त्रांविरुद्ध साफ अपयशी का ठरले? आजही चीनची रिव्हर्स इंजिनियरिंग केलेली J १७ J १० ची इंजिने चालत का नाहीत? चीनने जबरदस्त प्रगती केलेली आहे यात शंका नाही. यामुळेच भारत चीनला आपला प्रतिस्पर्धी समजतो यात शंका नाही. परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची प्रत्येकाने हिंदू धर्मियांचे नोबेल पुरस्कार आणि पेटंटमध्ये नगण्य योगदान का? डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते. व्यक्तीच्या आयुष्यात अतिरेकी ढवळाढवळ करणारी संस्कृती म्हणूनच कल्पकतेबरोबर सोहार्दाचे नाते निर्माण करू शकत नाही. सरळसरळ पूर्वग्रह आणि हिंदू द्वेष दाखवणारी आहेत ज्याचा कल्पकतेशी संबंध नाही. जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? पाश्चात्य लोकांच्या तुलनेत जपानला किती नोबेल पारितोषिके मिळाली आहेत? कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली कि त्यावर उपलब्ध असलेलीच माहिती मिळेल एक तर ओवी अनुभवावी या उक्तीनुसार मी दिलेल्या दुव्यांपैकी एक तरी दुवा पूर्णपणे वाचला का? याच कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारा चीनमध्ये मानवी हक्क म्हणजे काय? आणि चीन शी आपली तुलना करुन आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला शिव्या घालताना आपण इतिहास विसरतो आहे हे सर्वज्ञ लोक विसरतात. इस्लामच्या रेट्यामधून भारत आणि चीन हे का वाचले याचा नीट अभ्यास करून पहा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्राचीन संस्कृती मुळेच. हे लक्षात न घेता पुढचे पाठ मागचे सपाट झाल्यामुळे अशी परिस्थिती येते. आज भारताने सर्व लोकांची मालमत्ता सरकार जमा करून घेतली कि आपल्याकडे सुद्धा सिंगूर पासून बुलेट ट्रेन मुंबईच्या लोकलचे सहा पदरी करण.सारखे सर्व पायाभूत प्रकल्प चुटकीसरशी पुढे जातील कारण त्यातील सर्वात मोठा जमीन अधिग्रहणाचा मुद्दाच निकाली निघेल. आणि सर्व अल्पसंख्याकांना मानसिक परिवर्तनासाठी पाठवले तर हेच डावे फुरोगामी सर्वज्ञ लोक खुश होतील का ? केवळ कल्पनाविलास करून होत नाही. भारताने चांद्रयान, मंगळयान, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, यु पि आय सारखे अनेक प्रयोग फार मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले आहेत ते रिव्हर्स इंजिनियरिंग करून नव्हे तर आपल्याच शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने. तेंव्हा केवळ द्वेषाची द्वेष न करता वस्तुस्थितीची जाणीव व्हावी यासाठी मी लिहिले आहे यात आपल्याला गोलपोस्ट हलवण्याचे दिसते स्वतः चीनला दोनदा जाऊन आल्यानंतरचं आहे.हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे. असो आपले भले होवो.

In reply to by सुबोध खरे

पंतश्री Wed, 02/11/2026 - 10:44
सुबोध दादा, परत तेच. मुद्दा काय तुम्ही सांगताय काय? "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" ह्याचे उत्तर असे मी माझा राजकारणही दुरान्वयेहि काही संबंध नाही. संघ काय चीझ आहे आणि त्यांची विचारधारा काय हे हि मुख्यतः मला पूर्णतः समजलेले नाही. पण एक नक्की कि तुम्ही नक्कीच संघ द्वेषी आणि आम्ही म्हणू तेच बरोबर ह्यातले आहेत. मी एक design profeshional म्हणून माझे म्हणणे मांडतो आहे. तुम्ही जसे बोलताय त्यावर पण काही design theory आहेतच ज्या आम्ही वापरतो आमच्या रोजच्या कामात. तुमचे profeshion काही असो जे मंदाटी ते nutral होऊन मांडा , भांडण्यासाठी अमी माझा मुद्दा खोडण्यासाठी नाही. इथे चर्चा आपल्या भारतात कल्पकता कशी वाढवता येईल ह्यावर चर्चा करा करा. एक उधाहरण मी पण देतो कल्पकतेकला धरून. मोर हा कल्पकतेचा आणि सौंदर्याचा राजा आहे. मग आपण हे बोलूया का कि हा जगातील सगळ्यात बिनडोक, वाया गेलेला प्राणी आहे कारण ह्याचे ना निसर्गात काही योगदान आहे नि त्याचा काही फायदा. बहुतेक प्राणी हायला खात नाहीत आणि हा नुसता पिसारा फुलवऊन निश्चत बसतो नाच्या. फालतू जनावर आलेत तेव्हा हा नाश्ता झाला तरी चालण्या सारख आहे. तुम्हीच म्हणालात "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." बदल काय निसर्गाप्रमाणे आपोआप घडतात का?? जर तुम्ही आपले म्हणजेच रेटत राहिला मूळ मुद्दा सोडून तर काय बदलणारी संस्कृती तयार करणार? तुम्ही भरकटत राजकारण, जागतिक अर्थकारण आणि बाकी बरेच गोष्टी ओढत आहात . ह्याचा कल्पकता वाढण्यास काही उपयोग होत नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये हे असे काही शिकवले जात नाही जिथून निघणारे मोठे मोठे कल्पक कलाकार आहेत. मुख्य प्रश्न हा आहे कि आपण चीनशी बरोबरी न करता आपली कल्पकता कशी वाढवोउ शकतो. तुमचे म्हणणे असे आहे का कि हुकुमशी आली को कल्पकता वाढते? दुसऱ्याचे संशोधन चोरले कि कल्पकता वाढीस लागते? जपान हा निश्चित आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमानी आणि पुरस्कर्ता आहे. म्हणून त्यांची अधोगती झाली का? हा प्रश्नच चुकीचा आहे. फक्त कल्पकता आणि जपान हा search टाका म्हणजे कल्पकता काय असते समजेल. आता विषय निघालाच आहे तर फक्त जपान आणि अपंग हे शेअरच करून बघा. जगात सगळ्यात जास्त उजव्या हाताचे असतात म्हणून आपली कात्री पण उजव्या हाता नुसार असते. पण डाव्यांचे काय?? हा विचं जपान ने केला आहे. तिकडे डाव्या हितासाठी कात्री मिळते. जपानची टॉय ट्रेन बघा. व्हायची सैर तर एगदी ८० वर्षांचा म्हातारा पण करेल कारण हि आपले बालपण जागवते. ह्यात तुम्ही सांगितलेले जगातील समीकरणे कुठे दिसत नाही आहे किंवा मला समजत नाही आहेत कि ती कशी बसत आहेत ह्यात. कल्पकतेचा वय, धर्म, सरकार कशाही हि संभांड नसतो. कल्पकता हि आपल्या शिकवणुकीतून आणि आसपास च्या वातावरणातून निर्माण होते. तुम्ही बरेच मोठे वाटत वयाने. तेव्हा मला एक सांगा फक्त. लहानपणापासून आपल्या वाडवडिलांनी काही कल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे का? प्राधान्य नेहमी पुस्तकी शिक्षणाला राहिले आहे भारतात. हा मुख्य मुद्दा आहे. जर design चे ज्ञान नसेल तर कृपया फालतू मुद्दे उगाळून ढग वाया घालवू नका. आता तुमच्या मुलांची , नातवंडांची कल्पकता अश्या भारतीय, जागतिक राजकारणाने वाढत असेल तर ती कल्पकता तुम्हालाच लखलाभ होवो. अशी कल्पकता मलातरी माझ्या मुलांना द्यायची इच्छा नक्कीच नाही.

In reply to by पंतश्री

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:50
श्री० पंतश्री तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 12:22
त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. हायला दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो असली भंपक विधाने केल्यावर मी तुम्हाला आव्हान दिले त्याच्यावर तुम्ही पळ काढता आणि कसल्या फालतू पैजा हरायला तयार आहात? मुळात इंग्रजी स्पेलिंग चा आणि या लेखाचा संबंध नाही. सुदैवाने माझे इंग्रजी उच्च दर्जाचे आहे. पण एखाद्याचे इंग्रजी खरोखरच चांगले नसले तर त आपली हि टिप्पणी अत्यंत खालच्या दर्जाची आहे एवढे मी नमूद करू इच्छितो. महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत पासून सगळे चित्पावन ज्यू लोकांचे वंशज कि तत्सम काहीतरी भंपक विधाने करून तुम्ही नक्की काय सिद्ध करायला जाताय.

In reply to by युयुत्सु

योगी९०० Wed, 02/11/2026 - 21:07
तुम्ही त्यांच्याकडून भलतीच अपेक्षा करताय. त्यांना 'डिझाईन आणि इनोव्हेशन' चे स्पेलींग डिक्शनरी बघून सांगता आले तरी मी पैज हरायला तयार आहे. तुम्हाला डॉ. खरेंचे मुद्दे पटले नाहीत म्हणून अशी खालच्या दर्जाची टिका करणे हे पटले नाही. भारतीय लष्करात काम केलेल्या व पेशाने डॉ. असलेल्या व्यक्तीचा हा अपमान झाला आहे. तीव्र निषेध. ज्या लोकांना मुद्देसुद उत्तरे देता येत नाहीत ते असे करतात. तुम्ही त्यातले नाही हे आतापर्यंत समजत होतो. पण माझ्या समजुतीला तडे गेले.

In reply to by पंतश्री

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 12:01
@ पंतश्री लेखकाची वाक्ये मी "चुकीची" म्हणून उद्धृत केलेली आहेत. "परंतु माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची" त "डिझाइन इकॉनॉमीला मात्र सतत बदलणारी संस्कृती लागते." हि वाक्ये माझी नाहित. ती तुम्ही माझ्या तोंडी घालून अत्यंत चुकीचा वाद घालत आहात. बाकी डाव्या हाताची कात्री भारतातही सर्रास मिळते. डावरया दंतवैद्यांना हातातील ड्रिल मशीन पूर्वी (४० वर्षांपूर्वी) भारतात तयार झालेले मिळत नसे तेही मिळायला लागले. ७५ वर्षात तुम्ही एकदम ३०० वर्षांची प्रगती अपेक्सह करता आहेत म्हणून हि तुलना होते. चीनच्या बहुसंख्य तंत्रज्ञानात कल्पकतेऐवजी रिव्हर्स इंजिनियरिंग वापरले गेलेले आहे हे आपण विसरता आहात. चीनची जबरदस्त प्रगती त्यांच्या कल्पकतेमुळे झाली आहे असे कुठेही दिसत नाही. तसे दाखवून द्या मग मी माझे विधान मागे घेईन. बाकी राजकारण किंवा हिंदू द्वेष हा संदर्भ तुमच्यासाठी नव्हताच तो युयुत्सु यांच्याबद्दल आहे. तुम्ही का स्वतःला चिकटवून घेताय> बाकी केवळ तुम्ही डिझाईन मध्ये आहेत म्हणून इतरांनी त्याबद्दल बोलायचेच नाही असा असेल तर बोलणेच संपले. ] हे म्हणजे तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच शकत नाही. किंवा तुम्ही शेती करत नाही तर तुम्ही शेतीबद्दल बोलायचे नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आहे

In reply to by सुबोध खरे

सोत्रि Wed, 02/11/2026 - 11:42
हि टिप्पणी यात वस्तुस्थिती कमी आणि स्कोअर सेटलिंगची शक्यता जास्त आहे.
ज्या रंगाचा चष्मा आपण लावतो त्याच रंगाचं जग आपल्याला दिसू लागतं.

😎

असो, अजून काहीही अवांतर न करता मी थांबतो! - (वस्तुनिष्ठ) सोकाजी

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:38
वर केल्या गेलेल्या थयथयाटामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. चीनमधली हूकूमशाही राजवट अलिकडची काही वर्षातली आहे, चीनमधल्या कल्पकतेच्या संस्कृतीचा इतिहास अनेक शतकांचा आहे. भारताने चीनची कितीही मिसाईल पाडली, चीनने बाधलेले पूल पडले तरी त्यांनी निर्माण केलेल्या पेंटटच्या एव्हरेस्टला बारीकशी पण चीर पडलेली नाही. आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 11:44
आपल्याकडे किती धर्माचार्यांनी भारताला नोबेल पुरस्कार का मिळत नाही याची चिंता वाहीली? धर्माचार्यांचा नोबेल पारितोषिकही संबंध काय? पोप ला नोबेल मिळालंय का ? ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांना ढिगाने नोबेल मिळाली आहेत आणि पैशाला पासरी पेटंट्स आहेत. artificial intelligence is no match for natural stupidity

पंतश्री Wed, 02/11/2026 - 10:58
सुबोध भाऊ, खास तुमच्या आग्रहास्तव जपानच्या नोबेल पारितोषिकांची लिस्ट तारखे सकट खाली देत आहे. आता तुम्ही सुचवलेच आहेत मम्हणून ai आणि गुगळतो आहे. लिस्ट जरा जास्तच छोटी आहे. जास्त माहिती साठी तुम्ही हे reference टाकून सत्यता नक्कीच पडताळून पाहू शकता. 1949 – Physics: Hideki Yukawa (1907–1981) Yukawa, a physicist from Kyoto University, predicted the existence of mesons (subatomic particles that mediate nuclear forces) through theoretical models. This laid groundwork for particle physics and was Japan's first Nobel. Rationale: "for his prediction of the existence of mesons on the basis of theoretical work on nuclear forces." 1965 – Physics: Shin'ichirō Tomonaga (1906–1979) Tomonaga, also from Kyoto, advanced quantum electrodynamics (QED), reconciling quantum mechanics with special relativity for electromagnetic interactions. Shared with Americans Schwinger and Feynman. Rationale: "for their fundamental work in quantum electrodynamics, with deep-ploughing consequences for the physics of elementary particles." 1968 – Literature: Yasunari Kawabata (1899–1972) Kawabata, a novelist from University of Tokyo, captured Japanese aesthetics and human fragility in works like Snow Country. First Japanese literature winner. Rationale: "for his narrative mastery, which with great sensibility expresses the essence of the Japanese mind." 1973 – Physics: Leo Esaki (1925–) Esaki, from University of Tokyo, discovered electron tunneling in semiconductors, leading to the Esaki diode—key for modern electronics. Shared with Giaever and Josephson. Rationale: "for their experimental discoveries regarding tunneling phenomena in semiconductors and superconductors, respectively." 1974 – Peace: Eisaku Satō (1901–1975) Satō, former PM and University of Tokyo alum, pushed nuclear non-proliferation and Pacific stability via Japan's three non-nuclear principles. Shared with MacBride. Rationale: "for his contribution to stabilize conditions in the Pacific rim area and for signing the Nuclear Non-Proliferation Treaty." 1981 – Chemistry: Kenichi Fukui (1918–1998) Fukui, from Kyoto, developed frontier orbital theory to predict chemical reaction paths. First Asian chemistry winner. Shared with Hoffmann. Rationale: "for their theories, developed independently, concerning the course of chemical reactions." 1987 – Physiology or Medicine: Susumu Tonegawa (1939–) Tonegawa, Kyoto alum, uncovered how genes rearrange to produce diverse antibodies, revolutionizing immunology. Rationale: "for his discovery of the genetic principle for generation of antibody diversity." 1994 – Literature: Kenzaburō Ōe (1935–2023) Ōe, from University of Tokyo, wrote poetic, myth-infused novels on human struggles, influenced by his disabled son. Rationale: "who with poetic force creates an imagined world, where life and myth condense to form a disconcerting picture of the human predicament today." 2000 – Chemistry: Hideki Shirakawa (1936–) Shirakawa, Tokyo Tech alum, co-discovered conductive polymers (plastics that conduct electricity), enabling flexible electronics. Shared with MacDiarmid and Heeger. Rationale: "for their discovery and development of conductive polymers." 2001 – Chemistry: Ryōji Noyori (1938–) Noyori, from Kyoto, pioneered chiral catalysis for hydrogenation, crucial for drug synthesis. Shared with Knowles and Sharpless. Rationale: "for their work on chirally catalysed hydrogenation reactions." 2002 – Physics: Masatoshi Koshiba (1926–2020) Koshiba, University of Tokyo, detected cosmic neutrinos with the Kamiokande detector, confirming supernova theories. Shared with Davis and Giacconi. Rationale: "for pioneering contributions to astrophysics, in particular for the detection of cosmic neutrinos." 2002 – Chemistry: Koichi Tanaka (1959–) Tanaka, Tohoku alum, invented soft laser desorption for mass spectrometry, aiding protein analysis. Shared with Fenn and Wüthrich. Rationale: "for their development of soft desorption ionisation methods for mass spectrometric analyses of biological macromolecules." 2008 – Physics: Yoichiro Nambu (1921–2015) Nambu, Japanese-born (University of Tokyo), explained spontaneous symmetry breaking in particle physics, foundational for the Standard Model. US citizen at award. Shared half the prize (other half to Kobayashi and Maskawa). Rationale: "for the discovery of the mechanism of spontaneous broken symmetry in subatomic physics." 2008 – Physics: Makoto Kobayashi (1944–) Kobayashi, Nagoya alum, co-proposed the CKM matrix explaining CP violation and quark families. Shared with Maskawa. Rationale: "for the discovery of the origin of the broken symmetry which predicts the existence of at least three families of quarks in nature." 2008 – Physics: Toshihide Maskawa (1940–2021) Maskawa, Nagoya alum, same as Kobayashi on quark symmetry breaking. Rationale: same as above. 2008 – Chemistry: Osamu Shimomura (1928–2018) Shimomura, Nagasaki alum, isolated green fluorescent protein (GFP) from jellyfish, now a biotech staple for imaging. Shared with Chalfie and Tsien. US citizen later, but listed as Japanese. Rationale: "for the discovery and development of the green fluorescent protein, GFP." 2010 – Chemistry: Ei-ichi Negishi (1935–2021) Negishi, University of Tokyo, developed palladium-catalyzed cross-coupling for carbon bonds, vital for pharma. Shared with Heck and Suzuki. Rationale: "for palladium-catalyzed cross couplings in organic synthesis." 2010 – Chemistry: Akira Suzuki (1930–) Suzuki, Hokkaido alum, same cross-coupling method (Suzuki reaction). Rationale: same as above. 2012 – Physiology or Medicine: Shinya Yamanaka (1962–) Yamanaka, Kobe alum, created induced pluripotent stem cells (iPS) from adult cells, bypassing embryos for regenerative medicine. Shared with Gurdon. Rationale: "for the discovery that mature cells can be reprogrammed to become pluripotent." 2014 – Physics: Isamu Akasaki (1929–2021) Akasaki, Kyoto alum, invented blue LEDs for efficient lighting. Shared with Amano and Nakamura. Rationale: "for the invention of efficient blue light-emitting diodes which has enabled bright and energy-saving white light sources." 2014 – Physics: Hiroshi Amano (1960–) Amano, Nagoya alum, same blue LED breakthrough. Rationale: same as above. 2014 – Physics: Shuji Nakamura (1954–) Nakamura, University of Tokushima, co-invented blue LEDs while at Nichia Corp. US citizen at award, Japanese-born. Rationale: same as above. 2015 – Physics: Takaaki Kajita (1959–) Kajita, Saitama alum, proved neutrino oscillations (they have mass) via Super-Kamiokande. Shared with McDonald. Rationale: "for the discovery of neutrino oscillations, which shows that neutrinos have mass." 2015 – Physiology or Medicine: Satoshi Ōmura (1935–) Ōmura, University of Yamanashi, discovered avermectin from soil bacteria, leading to ivermectin for parasitic diseases. Shared with Campbell and Tu. Rationale: "for their discoveries concerning a novel therapy against infections caused by roundworm parasites." 2016 – Physiology or Medicine: Yoshinori Ohsumi (1945–) Ohsumi, University of Tokyo, elucidated autophagy (cell self-eating for recycling), key for disease research. Rationale: "for his discoveries of mechanisms for autophagy." 2018 – Physiology or Medicine: Tasuku Honjo (1942–) Honjo, Kyoto alum, found PD-1 protein, enabling immune checkpoint inhibitors for cancer therapy. Shared with Allison. Rationale: "for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation." 2019 – Chemistry: Akira Yoshino (1948–) Yoshino, Kyoto alum, developed lithium-ion batteries, powering modern devices. Shared with Goodenough and Whittingham. Rationale: "for the development of lithium ion batteries." 2021 – Physics: Syukuro Manabe (1931–) Manabe, Japanese-born (University of Tokyo), modeled Earth's climate systems, foundational for global warming predictions. US citizen at award. Shared with Hasselmann and Parisi. Rationale: "for the physical modelling of Earth’s climate, quantifying variability and reliably predicting global warming." 2024 – Peace: Nihon Hidankyo Grassroots group of Hiroshima/Nagasaki survivors advocating nuclear abolition through testimonies. Rationale: "for its efforts to achieve a world free of nuclear weapons and for demonstrating through witness testimony that nuclear weapons must never be used again." 2025 – Chemistry: Susumu Kitagawa (1951–) Kitagawa, Kyoto alum, pioneered metal-organic frameworks (MOFs) for gas storage, separation, and catalysis. Shared with Robson and Yaghi. Rationale: "for the development of metal-organic frameworks." 2025 – Physiology or Medicine: Shimon Sakaguchi (1951–) Sakaguchi, Kyoto alum, discovered regulatory T cells for immune tolerance, impacting autoimmunity and transplant medicine. Shared with Brunkow and Ramsdell. Rationale: "for their discoveries concerning peripheral immune tolerance."

In reply to by पंतश्री

इच्छुकांनी जपानी टॉप इन्वेशन्स हे एन एच के कृत भाग जरूर पाहावेत. https://www3.nhk.or.jp/nhkworld/en/shows/topinventions/ मी नेहमी अगदी नियमित पणे पाहत असतो. प्रचंड कष्टाळू लोक आणि ध्यासाच्या मागे धावण्यात कुणीही हात धरू शकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीतही जपानी लोक इन्वेशन्स करत असतात सतत.

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 12:56
महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत, या माझ्या सिद्धांतावर मी अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. पण तो या धाग्याचा विषय नसल्याने जास्त अटेंशन मिळणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/11/2026 - 19:17
दरमहा १२% चक्रवाढ व्याजाने दर साल २३२% नफा शेअर बाजारात वर्षनुवर्षे मिळवता येतो. या माझ्या सिद्धांतावर अजुनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहीन. यावर अजूनही ठाम आहात का? का आता शेपूट घालणार?

अर्धवटराव Wed, 02/11/2026 - 19:13
संघोटे काय, कम्युनीच काय.. शेवटी टिपर्‍याच खेळायच्या आहेत ना. चांगलय कि. बाकी आपल्या मानवी भावनांना ए आय कडुन व्हेरिफाय करायला लागण्याइतपत अधोगती झालेली बघुन भारतात डिसाइन इकॉनॉमीची काय दुर्गती होणार याची चिंता वाटायला लागली आहे.

गामा पैलवान गुरुवार, 02/12/2026 - 02:31
लोकहो, एक रोचक तथ्य नोंदवायचं आहे. आधुनिक काळातली पहिली अभियांत्रिकी महाजत्रा इ.स. १८५१ साली लंडनमध्ये भरली होती. तिला ग्रेट एक्झिबिशन म्हणतात. विकिवर इथे माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Great_Exhibition या जत्रेस जगभरातले अभियांत्रिकी व तांत्रज्ञानिक नमुने मागवले होते. तर, मौजेची बाब अशी की भारताचे दालन सर्वांत मोते व आकर्षक होते. साहजिकंच भारत व चीन यांची तुलना लोकं करीत होते. या तुलनेविषयी गुग्गुळाचार्य बघा काय म्हणताहेत : https://i.postimg.cc/hvsZktxb/india-china-in-great-exhibition.png ऐन व्हिक्टोरियन कालखंडात जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली होती तेव्हाही जगात भारत हाच तंत्रज्ञानात व कल्पकतेत प्रथम क्रमांकावर होता. आज ते स्थान कुठे गेलंय? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी गुरुवार, 02/12/2026 - 18:08
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???

In reply to by कॉमी

अभ्या.. गुरुवार, 02/12/2026 - 19:34
ते सोडा, गापै ना फारसे कुणी मनावर घेत नसतात. त्यांचे ते त्यांचा प्राचीन भारत आणि त्यांनीच निर्माण केलेले मराठीतले प्रतिशब्द ह्यांच्यात मग्न असतात. ;) . हे बघा, इंटरेस्टिंग ह्याच प्रदर्शनात ससेक्सचे विल्यम चेंबरलिन ज्युनियर यांनी जगातील पहिले मतदान यंत्र (voting machine) प्रदर्शित केले, जे आपोआप मते मोजत असे आणि जास्त मतदान रोखण्यासाठी इंटरलॉकिंग सिस्टम वापरत असे.

In reply to by अभ्या..

हा हा लोल. गामा पैलवान म्हणजे दुसरे सावरकर आहेत बहुतेक. मराठीला त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. मला तरी त्यांचे प्रतिशब्द आवडतात. गापै, करत राहा नवे शब्द.

अप्पा जोगळेकर गुरुवार, 02/12/2026 - 20:52
एकाच व्यक्तीने दोन आयडी घेऊन स्वतःच स्वतःला प्रतिसाद दिले आहेत. गंगाधर ही शक्तिमान है. पूर्वी संक्षी काकांच्या धाग्यावर असले प्रकार चालायचे.

गामा पैलवान Fri, 02/13/2026 - 02:00
कॉमी,
ऑ??? तांत्रिकी प्रदर्शन आणि आपले प्रमुख आकर्षण भुस्सा भरलेला हत्ती आणि हौदा???
यावरून तत्कालीन ब्रिटीश समाजची विज्ञान व तंत्रज्ञान याबद्दलची आस्था दिसून येते. आ.न., -गा.पै.

कालच शांघायमध्ये विमानतळाजवळ रस्ता खचला. नक्की काय झाले ते पुढील व्हिडिओमध्ये बघता येईल. https://www.youtube.com/watch?v=CR8iydhzRRI अशा इतर काही घटनाही घडल्या आहेत. उदाहरणार्थ सबवे ट्रेनमध्ये पाणी घुसणे https://www.youtube.com/watch?v=VjwsEnZOqSg वगैरे. बर्‍याच गोष्टींमध्ये चीन आपल्या कितीतरी पुढे आहे हे कोणीच नाकारत नाही. मात्र चीनमध्ये कसे सगळे मस्त मस्त आणि भारतात कशी सगळी घाण अशी परिस्थिती नसावी.

गामा पैलवान Fri, 02/13/2026 - 20:57
अवांतर : चीनमधल्या अल्पसंख्य जमातींविषयी एक रोचक लेख ( इंग्रजी दुवा ) : https://www.theguardian.com/commentisfree/2021/jun/10/china-celebrating-diversity-suppressing-xinjiang-communist-party वरील लेखांत वर्णिलेले धोरण ही चिनी कल्पकता मानवी का ? चर्चा व्हावी. -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने ============== --राजीव उपाध्ये चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्‍या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात.

तरीही....(विडंबन)

श्वेता२४ ·

श्वेता२४ Wed, 02/11/2026 - 11:32
मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद

श्वेता२४ Wed, 02/11/2026 - 11:32
मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद
लेखनविषय:
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

सैल धागे

गणेशा ·

चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... अहाहा..! सुंदर कविता आवडली. काही तरी राहून गेलं अशा आशयाची कविता थेट पोहोचली. प्रेमात काही राहून जाण्याची हुरहूर आंनदायी असते. अपूर्व राजपूत या कवी मित्राच्या चार ओळी टाकण्याचा मोह होतो. याच एका विचारात पुन्हा भिजली गे दिठी युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी -दिलीप बिरुटे ( गोड मिठीतला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणेशा Tue, 02/10/2026 - 23:09
युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी.. काय सुंदर ओळी... मी कधीच असा विचार केला नव्हता, वा

श्वेता२४ Fri, 02/06/2026 - 13:14
अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही.

चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... अहाहा..! सुंदर कविता आवडली. काही तरी राहून गेलं अशा आशयाची कविता थेट पोहोचली. प्रेमात काही राहून जाण्याची हुरहूर आंनदायी असते. अपूर्व राजपूत या कवी मित्राच्या चार ओळी टाकण्याचा मोह होतो. याच एका विचारात पुन्हा भिजली गे दिठी युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी -दिलीप बिरुटे ( गोड मिठीतला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणेशा Tue, 02/10/2026 - 23:09
युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी.. काय सुंदर ओळी... मी कधीच असा विचार केला नव्हता, वा

श्वेता२४ Fri, 02/06/2026 - 13:14
अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही.
लेखनविषय:
काव्यरस
मी: शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं, स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं... चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... ती: अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही. मी: माळले नवकिरणांनी नभाचे हार, रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं... बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी, तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं... ती: चंद्र विसावला अंतरी तरी, अंतरात हे कसले अंतर? अंतरात खोल दडले, तुझे माझे सैल धागे - शब्दमेघ (६ फेब्रुवारी २०२६)

टवाळी

युयुत्सु ·

विजुभाऊ Mon, 02/09/2026 - 16:24
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये. नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे . या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे. त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही. गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत. पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये

आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली

युयुत्सु Tue, 02/10/2026 - 09:58
श्री० गा०पै० खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे. विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे. हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:08
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा. जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत. बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात. भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच. वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत. पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते). असो. आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.

In reply to by युयुत्सु

शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्‍या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्‍या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का? बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे. (एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:14
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात. न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही. जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अ‍ॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे? मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:29
श्री० चंद्रसूर्यकुमार तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते. नारळीकरांच्या थिअरीला कचर्‍याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल. बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्‍या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल. बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल. असो...

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 11:08
आता आयुर्मान वाढले आहे. निवृत्ती नंतर अनेक जणांच्या आयुष्यात रिकामपण येते आणि ते २०,२५ वर्षे टिकते. काल परवा पर्यंत साहेब साहेब करत पुढे मागे करणाऱ्या मंडळींचा गोतावळा नसतो. निवृत्ती जसजशी जुनी होत जाते तसतशी घरात फारशी किंमत राहत नाही, वयोमानाप्रमाणे आदर दिला जातो पण दिलेले मत हे सल्ला म्हणून विचारात घेतले जात नाही. यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी (सगळी नाही, अपवाद असतात) माणसे काही ना काही तर्हेवाईकपण करतात. जुन्या काळातल्या कर्तबगारीच्या खऱ्या किंवा खोट्या कथा एकत्र करून आजूबाजूच्या लोकांना सांगत राहतात, मोठ्या लोकांवर,सरकारवर, व्यवस्थेवर दुगाण्या झाडत राहतात. आता सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बढाया मारण्यासाठी नवीन मंच उपलब्ध असतो आणि माणूस कोणालाही answerable सुद्धा नसतो. प्रशासनाने 'ज्येष्ठ नागरिक' मंडळींसाठी वेगळे सदरच सुरु करावे आणि असे धागे त्या सदरात हलवावेत म्हणजे सगळ्यांसाठी सोयीचे होईल.

गामा पैलवान Mon, 02/16/2026 - 23:39
लोकहो, युयुत्सु हे सदस्य आता इतिहासजमा झालेले आहेत. त्यांची दोन विधानं भाष्य करण्याजोगी वाटली. त्याबद्दल माझी मतं सांगतो. १.
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही.
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची रुदरफोर्ड आणि सॉडी यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र खुद्द आईनस्टाईनची कोणीही खिल्ली उडवीत नाही. २.
"आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - ....
माझ्या माहितीप्रमाणे जयंत नारळीकर स्वत: आंख्याशा म्हणून बिरूद मिरवीत नसंत. मात्र याबद्दल चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Wed, 02/18/2026 - 19:07
फोटूतला दंताडा बाबाजी कोण, भटकरबाबा कोण, गोविंदस्वरूप कोण, हे मजसारख्या अडाण्याला ठाऊक नसणे सहाजिकच आहे (तसेच सहाजिक जयंत नारळीकर कोण हे ठाऊक असणेही आहे) पण ते सगळ्याच मिपाकरांना ठाऊक असावे, असे लेखकर्त्याला वाटते आहे का ? -- म्हणजे या लेखात जे काही लिहीले आहे, ते कळण्यासाठीही आयायटीयनच हवेत की काय ? -- मुळात ही जिलबी सोडण्यात मूळ हेतु काय आहे, काहीच समजले नाही. .

In reply to by चित्रगुप्त

गामा पैलवान Wed, 02/18/2026 - 20:15
फोटोतले गृहस्थ प्रा. गोविंद स्वरूप आहेत. पुण्यानजीक खोडद गावांत जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोप ( = GMRT ) उभारणारे प्रभृती. -गा.पै.

विजुभाऊ Mon, 02/09/2026 - 16:24
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये. नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे . या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे. त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही. गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत. पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये

आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली

युयुत्सु Tue, 02/10/2026 - 09:58
श्री० गा०पै० खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे. विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे. हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:08
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा. जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत. बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात. भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच. वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत. पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते). असो. आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.

In reply to by युयुत्सु

शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्‍या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्‍या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का? बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे. (एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:14
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात. न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही. जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अ‍ॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे? मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:29
श्री० चंद्रसूर्यकुमार तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते. नारळीकरांच्या थिअरीला कचर्‍याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल. बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्‍या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल. बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल. असो...

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 11:08
आता आयुर्मान वाढले आहे. निवृत्ती नंतर अनेक जणांच्या आयुष्यात रिकामपण येते आणि ते २०,२५ वर्षे टिकते. काल परवा पर्यंत साहेब साहेब करत पुढे मागे करणाऱ्या मंडळींचा गोतावळा नसतो. निवृत्ती जसजशी जुनी होत जाते तसतशी घरात फारशी किंमत राहत नाही, वयोमानाप्रमाणे आदर दिला जातो पण दिलेले मत हे सल्ला म्हणून विचारात घेतले जात नाही. यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी (सगळी नाही, अपवाद असतात) माणसे काही ना काही तर्हेवाईकपण करतात. जुन्या काळातल्या कर्तबगारीच्या खऱ्या किंवा खोट्या कथा एकत्र करून आजूबाजूच्या लोकांना सांगत राहतात, मोठ्या लोकांवर,सरकारवर, व्यवस्थेवर दुगाण्या झाडत राहतात. आता सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बढाया मारण्यासाठी नवीन मंच उपलब्ध असतो आणि माणूस कोणालाही answerable सुद्धा नसतो. प्रशासनाने 'ज्येष्ठ नागरिक' मंडळींसाठी वेगळे सदरच सुरु करावे आणि असे धागे त्या सदरात हलवावेत म्हणजे सगळ्यांसाठी सोयीचे होईल.

गामा पैलवान Mon, 02/16/2026 - 23:39
लोकहो, युयुत्सु हे सदस्य आता इतिहासजमा झालेले आहेत. त्यांची दोन विधानं भाष्य करण्याजोगी वाटली. त्याबद्दल माझी मतं सांगतो. १.
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही.
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची रुदरफोर्ड आणि सॉडी यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र खुद्द आईनस्टाईनची कोणीही खिल्ली उडवीत नाही. २.
"आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - ....
माझ्या माहितीप्रमाणे जयंत नारळीकर स्वत: आंख्याशा म्हणून बिरूद मिरवीत नसंत. मात्र याबद्दल चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Wed, 02/18/2026 - 19:07
फोटूतला दंताडा बाबाजी कोण, भटकरबाबा कोण, गोविंदस्वरूप कोण, हे मजसारख्या अडाण्याला ठाऊक नसणे सहाजिकच आहे (तसेच सहाजिक जयंत नारळीकर कोण हे ठाऊक असणेही आहे) पण ते सगळ्याच मिपाकरांना ठाऊक असावे, असे लेखकर्त्याला वाटते आहे का ? -- म्हणजे या लेखात जे काही लिहीले आहे, ते कळण्यासाठीही आयायटीयनच हवेत की काय ? -- मुळात ही जिलबी सोडण्यात मूळ हेतु काय आहे, काहीच समजले नाही. .

In reply to by चित्रगुप्त

गामा पैलवान Wed, 02/18/2026 - 20:15
फोटोतले गृहस्थ प्रा. गोविंद स्वरूप आहेत. पुण्यानजीक खोडद गावांत जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोप ( = GMRT ) उभारणारे प्रभृती. -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
 टवाळी -- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी - फेसबुक) १९९३-९४ च्या सुमारास भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला. माझी बढती रखडवण्याची जी कारणे होती त्यातले एक ठळक कारण म्हणजे भटकरांनी पाळलेले एक मांजर मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझ्या मागे हात धुवून लागले होते.