मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी कोण? - एक प्रयोग

युयुत्सु ·

सुबोध खरे गुरुवार, 02/05/2026 - 19:33
दरमहा १० % चक्रवाढ व्याजाने वर्षानुवर्षे पैसे मिळवणे शक्य आहे का हे कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारून पहा कि. का तेवढं धैर्य नाहीये?

युयुत्सु Fri, 02/06/2026 - 08:39
श्री० अभ्या मजेशीर टिप्प्णी आवडली. श्री० कंजूस इतर (आजुबाजुचे) कर्मदरिद्री, अर्धवट डोक्याचे किंवा मंदबुद्धीचे असतील तर काहीही उपयोग नाही. पण वरील प्रयोगाला आणखी एक पूरक प्रयोग करणे आवश्यक ठरते. तो असा- माणसाच्या कर्तबगारीवर दोन गोष्टी प्रामुख्याने प्रभाव पाडतात - इतरांनी आयुष्यात केलेली ढवळाढवळ आणि त्या व्यक्तीचे "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स". "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स" म्हणजे स्वतःला जखडून टाकणार्‍या धारणा/श्रद्धा/बेड्या. या कळणे पण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक ठरते. यासाठी पण ए०आय० चा उपयोग मानवी समुपदेशकापेक्षा चांगला होतो. कारण ए०आय० माणसासारखा मूलतः दूष्ट नाही.

सुबोध खरे गुरुवार, 02/05/2026 - 19:33
दरमहा १० % चक्रवाढ व्याजाने वर्षानुवर्षे पैसे मिळवणे शक्य आहे का हे कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारून पहा कि. का तेवढं धैर्य नाहीये?

युयुत्सु Fri, 02/06/2026 - 08:39
श्री० अभ्या मजेशीर टिप्प्णी आवडली. श्री० कंजूस इतर (आजुबाजुचे) कर्मदरिद्री, अर्धवट डोक्याचे किंवा मंदबुद्धीचे असतील तर काहीही उपयोग नाही. पण वरील प्रयोगाला आणखी एक पूरक प्रयोग करणे आवश्यक ठरते. तो असा- माणसाच्या कर्तबगारीवर दोन गोष्टी प्रामुख्याने प्रभाव पाडतात - इतरांनी आयुष्यात केलेली ढवळाढवळ आणि त्या व्यक्तीचे "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स". "सेल्फ-लिमिटींग बिलिफ्स" म्हणजे स्वतःला जखडून टाकणार्‍या धारणा/श्रद्धा/बेड्या. या कळणे पण स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक ठरते. यासाठी पण ए०आय० चा उपयोग मानवी समुपदेशकापेक्षा चांगला होतो. कारण ए०आय० माणसासारखा मूलतः दूष्ट नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
 मी कोण? - एक प्रयोग ============ -राजीव उपाध्ये मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा. इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!

क्लीन बोल्ड

बाजीगर ·
लेखनविषय:
क्लीन बोल्ड महाराष्ट्र क्रिकेट संघटना, सर्वोच्च कोर्टात ली घटना || MCA निवडणूक प्रकरण, सदस्यवाढ हे कारण || सरन्यायाधीश संतापले, MCA प्रमुख असावा माजी खेळाडू, इथे घराणेशाही नका काढू. MCA चे सदस्य १६४, काकांच्या नातू नं , गुपचुप पक्ष धार्जिणे ४०० सदस्य वाढविले आतून || ही कृती बेकायदेशीर, मी डीसमिस करू का, का करताय उशीर?? जर सदस्यसंख्या वाढवायची, तर माजी खेळाडूंसाठी राखीव काढवायची || ज्यांना धरता येत नाही बॅट , त्यांची का सदस्य म्हणून करतात बात?! न्यायाधीशांचा यॉर्कर होता अफलातून, क्लीन बोल्ड झाले काका,नातू मनातून || काकांचा चाललाय बॅड पॅच , सारखे विरोधक घेतायत कॅच ||

गोल्डमेडल

युयुत्सु ·

सोत्रि Wed, 02/04/2026 - 13:19
छान, प्रा. अभ्यंकर यांची ओळख आवडली! पण, शेवटच्या परिच्छेदाची गरज नव्हती, त्याने लेखाला गालबोट लागलं असं वाटून गेलं! - (गणितात अनप्युअर आणि ढ असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु Wed, 02/04/2026 - 13:29
मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. पण प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

In reply to by सोत्रि

सुबोध खरे Wed, 02/04/2026 - 18:38
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. त्यांचे एकंदर काम पाहिल्यास हे नक्की जाणवते.

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Wed, 02/04/2026 - 19:32
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. पिपाणी सापडलेले बालक थोरामोठ्यांचा मुलाहिजा न बाळगता त्यांच्या कानाजवळ जाऊन कर्कश्य आवाज करते.

धर्मराजमुटके Wed, 02/04/2026 - 18:56
मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) ह्या पाचकळ विनोदावर आपणास हसू नाही आले तरी चालेल पण राग येणार नाही अशी अपेक्षा आहे बाकी हा लेख छान आहे. आवडला. लिहित रहा.

In reply to by धर्मराजमुटके

कांदा लिंबू Wed, 02/04/2026 - 19:38
एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) या चिनी डाव्यांची सवयच असते, "हे चांगलं आहे" असं नुसतं सांगून त्यांचं समाधान होत नाही; "आमचं हे चांगलं आहे पण तुमचं ते वाईट आहे" असा त्यांचा नेहमी सूर असतो.

गामा पैलवान गुरुवार, 02/05/2026 - 02:38
युयुत्सु, मला वाटतं की नारळीकरांनी लिहिलेल्या परीकथा नसून विज्ञानकथा आहेत. बाकी, तुमच्या मनातला भयगंड घालवणे ही नारळीकरांची जबाबदारी नाही. अभ्यंकरांचीही नाही. ती केवळ तुमचीच आहे. ती तुम्ही पार पाडलीत त्याबद्दल अभिनंदन. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ गुरुवार, 02/05/2026 - 17:44
भारतात इतकी विद्यापीठे आहेत. दरवर्षे त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. हे सगळे संशोधक आहेत. आणि त्यानी काहीतरी संशोधन केलेले असते. जर भारतात इतके सगळे संशोधन होत असेल तर आपण त्याचा व्यवहारात उपयोग का करत नाही. या संशोधनाच्या पेपर्स चे रद्दी या व्यक्तिरीक्त इतर काय उपयोग केले जातात ?

सुबोध खरे गुरुवार, 02/05/2026 - 19:03
त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. त्यातले बहुसंख्य मास्तरकी करतात आणि उरल्या वेळात देशाच्या संरक्षण प्रणाली वर किंवा विमान कसे चालवू नये यावर सार्वजनिक न्यासावर विशेष टिप्पण्या करतात. आता खान्देशातील वांग्याच्या पिकावरील पिसवांचा प्रादुर्भाव आणि मराठी साहित्यातील त्याचा संदर्भ यांचा तौलनिक अभ्यास यावर पी एच डी केल्यावर अजून काय अपेक्षा आहेत?. हा का ना का

सोत्रि Wed, 02/04/2026 - 13:19
छान, प्रा. अभ्यंकर यांची ओळख आवडली! पण, शेवटच्या परिच्छेदाची गरज नव्हती, त्याने लेखाला गालबोट लागलं असं वाटून गेलं! - (गणितात अनप्युअर आणि ढ असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

युयुत्सु Wed, 02/04/2026 - 13:29
मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. पण प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

In reply to by सोत्रि

सुबोध खरे Wed, 02/04/2026 - 18:38
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. त्यांचे एकंदर काम पाहिल्यास हे नक्की जाणवते.

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू Wed, 02/04/2026 - 19:32
प्रा जयंत नारळीकर यांच्या वर अशी टीका करणे अनाठायी आहे याबद्दल प्रचंड सहमत. पिपाणी सापडलेले बालक थोरामोठ्यांचा मुलाहिजा न बाळगता त्यांच्या कानाजवळ जाऊन कर्कश्य आवाज करते.

धर्मराजमुटके Wed, 02/04/2026 - 18:56
मानवी लेखक प्रांमाणिकपणे लिहू लागला की गहजब होतो आणी त्याने ए०आय० सारखे लिहावे अशी अपेक्षा निर्माण होते. एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) ह्या पाचकळ विनोदावर आपणास हसू नाही आले तरी चालेल पण राग येणार नाही अशी अपेक्षा आहे बाकी हा लेख छान आहे. आवडला. लिहित रहा.

In reply to by धर्मराजमुटके

कांदा लिंबू Wed, 02/04/2026 - 19:38
एकंदरीत सगळीकडेच आई (Artificial intelligence) घालायची म्हटल्यास अवघड आहे :) या चिनी डाव्यांची सवयच असते, "हे चांगलं आहे" असं नुसतं सांगून त्यांचं समाधान होत नाही; "आमचं हे चांगलं आहे पण तुमचं ते वाईट आहे" असा त्यांचा नेहमी सूर असतो.

गामा पैलवान गुरुवार, 02/05/2026 - 02:38
युयुत्सु, मला वाटतं की नारळीकरांनी लिहिलेल्या परीकथा नसून विज्ञानकथा आहेत. बाकी, तुमच्या मनातला भयगंड घालवणे ही नारळीकरांची जबाबदारी नाही. अभ्यंकरांचीही नाही. ती केवळ तुमचीच आहे. ती तुम्ही पार पाडलीत त्याबद्दल अभिनंदन. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ गुरुवार, 02/05/2026 - 17:44
भारतात इतकी विद्यापीठे आहेत. दरवर्षे त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. हे सगळे संशोधक आहेत. आणि त्यानी काहीतरी संशोधन केलेले असते. जर भारतात इतके सगळे संशोधन होत असेल तर आपण त्याचा व्यवहारात उपयोग का करत नाही. या संशोधनाच्या पेपर्स चे रद्दी या व्यक्तिरीक्त इतर काय उपयोग केले जातात ?

सुबोध खरे गुरुवार, 02/05/2026 - 19:03
त्यातून काही हजार लोक पि एच डी होतात. त्यातले बहुसंख्य मास्तरकी करतात आणि उरल्या वेळात देशाच्या संरक्षण प्रणाली वर किंवा विमान कसे चालवू नये यावर सार्वजनिक न्यासावर विशेष टिप्पण्या करतात. आता खान्देशातील वांग्याच्या पिकावरील पिसवांचा प्रादुर्भाव आणि मराठी साहित्यातील त्याचा संदर्भ यांचा तौलनिक अभ्यास यावर पी एच डी केल्यावर अजून काय अपेक्षा आहेत?. हा का ना का
लेखनविषय:
लेखनप्रकार
 "गोल्डमेडल" ======================== - राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी ऑक्टोबर २०१३) ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची... तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला, "तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल.

वि 'लीन' करण

बाजीगर ·
लेखनविषय:
एप्रिल मध्ये काकांची, संपतीय मुदत, मग बदलावीच, लागणार आदत || राज्यसभेत नाही प्रवेश, म्हणून हा नाट्यप्रवेश || नुसती भावनिक पाजा वाईन, पाळीव पत्रकार देती हेडलाइन || अपुरी संख्याबळे मग बोला बळेबळे || देऊन आवळा (१० आमदार) पाहिजे कोहळा (४१ आमदार) || प्रत्येक चाली ला, काटशह देऊन, नानांनी केलंय दीन-लीनकरण || लोक राहिले नाहीत पूर्वीसारखे अडाणी, आता काय उपयोग भेटायला येऊन अदानी || रीटायर चा ढोंगीपणा, वर्षापूर्वी नसता केला, ६० वर्षाचा सन्मान असहाय्य नसता गेला ||

ब्रेक के बाद..

आजी ·

गवि Tue, 02/03/2026 - 18:21
रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

विजुभाऊ Tue, 02/03/2026 - 19:11
गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो. याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात. आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते. त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

In reply to by विजुभाऊ

सोत्रि Fri, 02/06/2026 - 13:38
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ!

I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान Tue, 02/03/2026 - 19:48
पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत. दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. -गा.पै.

In reply to by प्रचेतस

मूकवाचक Fri, 02/06/2026 - 14:10
'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद गुरुवार, 02/05/2026 - 11:15
८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय? खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही.. नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही. गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला. त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं. त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची. अवांतराबद्दल क्षमस्व!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/05/2026 - 12:45
वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा. बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो. माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/05/2026 - 14:22
गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

गणेशा गुरुवार, 02/05/2026 - 15:28
छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा. बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको.. परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत.. बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

आजी Tue, 02/10/2026 - 22:12
माझ्या पोस्टचं तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून स्वागत केलंत की माझ्या मनात आलं की मी पुन्हा लिहायला लागून "कोई गलती नहीं की" (हे वाक्य शोलेतल्या संजीव कुमार च्या आवाजात वाचावं.) मित्रमैत्रिणींनो हजाराच्या पार पोहोचणारी वाचने, आणि पंधराच्या आसपास प्रतिसाद या पोस्ट ला आले.तुमच्या मैत्रीपूर्ण,स्नेहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार मानते. यांत अनेकांनी स्वतःच्या अनुभवांबद्दलही लिहिलं. त्यांचीही विशेष दखल घ्यावीशी वाटते. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार मानते आणि लवकरच एक गंमतीदार लेख घेऊन येते आहे.

गवि Tue, 02/03/2026 - 18:21
रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

विजुभाऊ Tue, 02/03/2026 - 19:11
गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो. याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात. आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते. त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

In reply to by विजुभाऊ

सोत्रि Fri, 02/06/2026 - 13:38
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ!

I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान Tue, 02/03/2026 - 19:48
पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत. दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये. -गा.पै.

In reply to by प्रचेतस

मूकवाचक Fri, 02/06/2026 - 14:10
'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद गुरुवार, 02/05/2026 - 11:15
८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय? खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही.. नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही. गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला. त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं. त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची. अवांतराबद्दल क्षमस्व!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/05/2026 - 12:45
वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा. बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो. माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/05/2026 - 14:22
गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

गणेशा गुरुवार, 02/05/2026 - 15:28
छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा. बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको.. परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत.. बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

आजी Tue, 02/10/2026 - 22:12
माझ्या पोस्टचं तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून स्वागत केलंत की माझ्या मनात आलं की मी पुन्हा लिहायला लागून "कोई गलती नहीं की" (हे वाक्य शोलेतल्या संजीव कुमार च्या आवाजात वाचावं.) मित्रमैत्रिणींनो हजाराच्या पार पोहोचणारी वाचने, आणि पंधराच्या आसपास प्रतिसाद या पोस्ट ला आले.तुमच्या मैत्रीपूर्ण,स्नेहपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार मानते. यांत अनेकांनी स्वतःच्या अनुभवांबद्दलही लिहिलं. त्यांचीही विशेष दखल घ्यावीशी वाटते. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार मानते आणि लवकरच एक गंमतीदार लेख घेऊन येते आहे.
लेखनप्रकार
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती! या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे. माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

विवेकपटाईत ·

कॉमी Sat, 02/07/2026 - 13:11
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.

कॉमी Sat, 02/07/2026 - 13:11
टॉल्किन साहेबांचे एक पुस्तक नुकतेच (मृत्यूपश्चात) प्रकाशित झाले - The Bovadium Fragments ह्यात गाड्या व्हीलन आहेत.
As scholars pour over fragments unearthed from the archeological site at Bovadium, a handful of documents written in two languages reveal the secrets of this ancient place, which have lain buried for centuries. Evidently once upon a time a Daemon arose in nearby Vaccipratum, who by his cunning devised abominable machines, which he called Motores. The people of Bovadium first became enamoured of these machines, but soon became their slaves; and as the roads were gridlocked and the city polluted by their fumes, the end of Bovadium was nigh.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.” तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.” ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.

अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"

गणेशा ·

खूप छान लिहिले आहे! खरोखर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून ईच्छा होती. शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण शरद पवार ह्यांच्या नंतर पुरोगामित्वाचा वारसा पुढे अजितदादांनीच चालवला असता, नव्हे तो चालवला होता, सत्तेत असूनही कधीही संघ परिवाराला थारा न देणारे, आताच झालेल्या महापालिका निवडणुकीत निर्भयपणे भाजपवर टीका करणारे दादा पाहिल्यावर त्यांची पुढील वाटचाल लक्षात येत होती, लोकनेता म्हणावा असा मंत्री दादा एकमेव होते असे वाटते. अजितदादा मुख्यमंत्री असते तर लोकांची कामे नी महाराष्ट्राचा विकास भरभर झाला असता. कुठेतरी सिंधुताई सपकाळांचे वाक्य वाचले की ह्या महाराष्ट्रात मोठ होण्यासाठी मरावं लागतं! मेल्यानंतर दादांचे महत्व महाराष्ट्राला कळले!

अभ्या.. Tue, 02/03/2026 - 20:58
दादा भारी माणूस होता. एक छोटी आठवण होती. आमच्या पार्टनरचे इलेक्षन च्या कामाचे एक बिल सोलापूर राष्ट्रवादीकडे अडलेले होते. ज्या कार्यकर्त्याने काम आणलेले तो चालढकल करत होता. दादा सोलापूरला आले तेंव्हा पार्टनर आणी मी भेटायला गेलो. पार्किंगलाच कार्यकर्ता थांबला होता. हात जोडून दादांना बिलाचे काहीएक बोलू नका म्हणून विनंती केली. बिलही दिले यथावकाश. . शालेय वयात चित्रकलेतले पहिले बक्षीस मिळाले मा. शरद पवारांच्या हस्ते.. मधल्या कालावधीत स्व. प्रमोद महाजनापासून स्व. बाबाहेब पुरंदर्‍यापासून..स्व. मुंडेसाहेबापर्यंत सगळे झाले पण शेवटचे अजितदादांच्या.... . बहुतेक आता कुणी चित्राबद्दल मला बक्षीसही देणार नाही. ;)

स्वधर्म Tue, 02/03/2026 - 21:55
अजित पवार हे तुमचे आवडते नेते होते व त्यांचा दुर्दैवी अंत झाला, त्याचे वाईट वाटते. बारामती, पिंपरी चिंचवड भागात त्यांचे काम होते. तुमच्या सारख्या चाहत्यांच्या भावना समजू शकतो. पण... आर आर पाटील (आबा) यांचे नांव या लेखात आले आहे, मात्र ते संपूर्णपणे वेगळ्या श्रेणीचे नेते होते असे वाटते. ते वंशपरंपरेतून नव्हे, तर तळागाळातून आलेले उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत ना कधी त्यांनी सत्तेसाठी इकडे तिकडे उड्या मारल्या. त्यांचे व्यक्तीगत चारित्र्य स्वच्छ व निर्णय लोककेंद्री (उदा, डान्सबार बंदी) होते, कंत्राटदार केंद्री नव्हते. त्यांनी कधी गुंडांना तिकीटे वाटल्याचे समोर आले नाही. मला तर वाटते राष्ट्रवादी पक्षात ते आजिबात फीट होत नव्हते. बाकी ठीक आहे.

कांदा लिंबू Tue, 02/03/2026 - 22:41
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.” त्या दिवशी सकाळी मीही जिममध्येच होतो. तेवढ्यात आमच्या साडूंचा फोन आला— “अजित दादा गेले.” लगेच मी माझ्या मोठ्या भावाला फोन लावला. तो गावाकडच्या राजकारणात आहे. एक-दोन मित्रांनी फोन लावले. सर्वच खरोखर निःशब्द झालेले होते. एव्हाना वेगवेगळ्या ग्रुप्सवर शोकसंदेश यायला सुरू झाले होते. ‌ --- मी स्वतः राजकारणात नाही, पण घर परिवारातले सगळेच राजकारणात आहेत. अजित दादांना भेटण्याचा सात-आठ वर्षांपूर्वी मोठ्या भावासोबत एकदा योग आला होता. त्यांच्याबद्दल "कुशल प्रशासक, लोकनेता, रोखठोक माणूस" हे शब्द केवळ बातम्यांमध्ये लिहिण्यापुरतेच नव्हते याचा अनुभव आला.‌

धर्मराजमुटके Wed, 02/04/2026 - 19:17
छान श्रद्धांजली लेख ! अजित दादा जाण्यामुळे मला देखील दु:ख झाले आणि मुळात म्हणजे मी त्या घटनेवर चक्क विचार करत होतो. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणी कामाची तडफ कायमच जाणवायची. त्यांचं एक विधान फार गाजले होते. (धरणात पाणी नाही तर आता मुतायचं का काय त्याच्यात ?) मी देखील त्या वाक्यावर इथे मिसळपाववरच टीका केली होती. त्यानंतर त्यांनी एक दिवस आत्मक्लेश देखील करुन घेतला होता. (म्हणजे माझ्या टीकेमुळे नव्हे). पण आता असं वाटतं की त्यावेळी टीका करायला नको होती. आजकाल लोकांना इतकं स्पष्ट बोलल्याशिवाय समजत नाही. शरद पवारांसारखा वटवृक्ष गुरु असतानाही अजित पवारांनी आपली स्वतंत्र ओळख आणि स्वतःची शैली निर्माण केली. हे सोपं नक्कीच नव्हतं ह्याच्याशी सहमत. थोरल्या पवारांच वर्तन या बाबतीत लाज आणणारचं होतं. आपलं वय झाले, आपल्या स्वतःच्या मुलीपेक्षा पुतण्या अधिक सरस असेल तर त्याच्यामागे आपलं बळ उभं करणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नाही. बाळासाहेब आणी शरद पवार दोघांनीही आपल्या पुतण्यांवर अन्यायच केला. दुर्दैवाने नियतीने देखील दादांना आणि राज ठाकरेंना न्याय दिला नाही. नियती म्हणा, देव म्हणा ते जे काही करतात ते योग्यच करतात, भल्यासाठीच करतात ह्या गोष्टीवर माझा आता विश्वास राहिला नाही. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली की आपल्या पक्षाचा शेवट बघण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. पक्ष ऐन शिखरावर असताना त्यांनी एक्स्झिट घेतली. ते जिथे कुठे असतील आणि तिथे सु:ख दु:खाची जाणीव होत असेल तर ते सुखात राहोत हीच अपेक्षा ! विनम्र श्रद्धांजली !

Sandeep Shejwalkar Sat, 02/07/2026 - 16:21
तुम्ही बारामतीकर असल्यामुळे तुम्हला वाईट वाटले असेल , मला वैयक्तिक रित्या वाईट वाटले नाही , धक्का मात्र जरूर बसला, सत्तेला हपापलेले बरेच नेते आहेत, त्यापैकी एक नेता लयाला गेला इतकेच.....

खूप छान लिहिले आहे! खरोखर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून ईच्छा होती. शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण शरद पवार ह्यांच्या नंतर पुरोगामित्वाचा वारसा पुढे अजितदादांनीच चालवला असता, नव्हे तो चालवला होता, सत्तेत असूनही कधीही संघ परिवाराला थारा न देणारे, आताच झालेल्या महापालिका निवडणुकीत निर्भयपणे भाजपवर टीका करणारे दादा पाहिल्यावर त्यांची पुढील वाटचाल लक्षात येत होती, लोकनेता म्हणावा असा मंत्री दादा एकमेव होते असे वाटते. अजितदादा मुख्यमंत्री असते तर लोकांची कामे नी महाराष्ट्राचा विकास भरभर झाला असता. कुठेतरी सिंधुताई सपकाळांचे वाक्य वाचले की ह्या महाराष्ट्रात मोठ होण्यासाठी मरावं लागतं! मेल्यानंतर दादांचे महत्व महाराष्ट्राला कळले!

अभ्या.. Tue, 02/03/2026 - 20:58
दादा भारी माणूस होता. एक छोटी आठवण होती. आमच्या पार्टनरचे इलेक्षन च्या कामाचे एक बिल सोलापूर राष्ट्रवादीकडे अडलेले होते. ज्या कार्यकर्त्याने काम आणलेले तो चालढकल करत होता. दादा सोलापूरला आले तेंव्हा पार्टनर आणी मी भेटायला गेलो. पार्किंगलाच कार्यकर्ता थांबला होता. हात जोडून दादांना बिलाचे काहीएक बोलू नका म्हणून विनंती केली. बिलही दिले यथावकाश. . शालेय वयात चित्रकलेतले पहिले बक्षीस मिळाले मा. शरद पवारांच्या हस्ते.. मधल्या कालावधीत स्व. प्रमोद महाजनापासून स्व. बाबाहेब पुरंदर्‍यापासून..स्व. मुंडेसाहेबापर्यंत सगळे झाले पण शेवटचे अजितदादांच्या.... . बहुतेक आता कुणी चित्राबद्दल मला बक्षीसही देणार नाही. ;)

स्वधर्म Tue, 02/03/2026 - 21:55
अजित पवार हे तुमचे आवडते नेते होते व त्यांचा दुर्दैवी अंत झाला, त्याचे वाईट वाटते. बारामती, पिंपरी चिंचवड भागात त्यांचे काम होते. तुमच्या सारख्या चाहत्यांच्या भावना समजू शकतो. पण... आर आर पाटील (आबा) यांचे नांव या लेखात आले आहे, मात्र ते संपूर्णपणे वेगळ्या श्रेणीचे नेते होते असे वाटते. ते वंशपरंपरेतून नव्हे, तर तळागाळातून आलेले उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत ना कधी त्यांनी सत्तेसाठी इकडे तिकडे उड्या मारल्या. त्यांचे व्यक्तीगत चारित्र्य स्वच्छ व निर्णय लोककेंद्री (उदा, डान्सबार बंदी) होते, कंत्राटदार केंद्री नव्हते. त्यांनी कधी गुंडांना तिकीटे वाटल्याचे समोर आले नाही. मला तर वाटते राष्ट्रवादी पक्षात ते आजिबात फीट होत नव्हते. बाकी ठीक आहे.

कांदा लिंबू Tue, 02/03/2026 - 22:41
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.” त्या दिवशी सकाळी मीही जिममध्येच होतो. तेवढ्यात आमच्या साडूंचा फोन आला— “अजित दादा गेले.” लगेच मी माझ्या मोठ्या भावाला फोन लावला. तो गावाकडच्या राजकारणात आहे. एक-दोन मित्रांनी फोन लावले. सर्वच खरोखर निःशब्द झालेले होते. एव्हाना वेगवेगळ्या ग्रुप्सवर शोकसंदेश यायला सुरू झाले होते. ‌ --- मी स्वतः राजकारणात नाही, पण घर परिवारातले सगळेच राजकारणात आहेत. अजित दादांना भेटण्याचा सात-आठ वर्षांपूर्वी मोठ्या भावासोबत एकदा योग आला होता. त्यांच्याबद्दल "कुशल प्रशासक, लोकनेता, रोखठोक माणूस" हे शब्द केवळ बातम्यांमध्ये लिहिण्यापुरतेच नव्हते याचा अनुभव आला.‌

धर्मराजमुटके Wed, 02/04/2026 - 19:17
छान श्रद्धांजली लेख ! अजित दादा जाण्यामुळे मला देखील दु:ख झाले आणि मुळात म्हणजे मी त्या घटनेवर चक्क विचार करत होतो. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणी कामाची तडफ कायमच जाणवायची. त्यांचं एक विधान फार गाजले होते. (धरणात पाणी नाही तर आता मुतायचं का काय त्याच्यात ?) मी देखील त्या वाक्यावर इथे मिसळपाववरच टीका केली होती. त्यानंतर त्यांनी एक दिवस आत्मक्लेश देखील करुन घेतला होता. (म्हणजे माझ्या टीकेमुळे नव्हे). पण आता असं वाटतं की त्यावेळी टीका करायला नको होती. आजकाल लोकांना इतकं स्पष्ट बोलल्याशिवाय समजत नाही. शरद पवारांसारखा वटवृक्ष गुरु असतानाही अजित पवारांनी आपली स्वतंत्र ओळख आणि स्वतःची शैली निर्माण केली. हे सोपं नक्कीच नव्हतं ह्याच्याशी सहमत. थोरल्या पवारांच वर्तन या बाबतीत लाज आणणारचं होतं. आपलं वय झाले, आपल्या स्वतःच्या मुलीपेक्षा पुतण्या अधिक सरस असेल तर त्याच्यामागे आपलं बळ उभं करणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नाही. बाळासाहेब आणी शरद पवार दोघांनीही आपल्या पुतण्यांवर अन्यायच केला. दुर्दैवाने नियतीने देखील दादांना आणि राज ठाकरेंना न्याय दिला नाही. नियती म्हणा, देव म्हणा ते जे काही करतात ते योग्यच करतात, भल्यासाठीच करतात ह्या गोष्टीवर माझा आता विश्वास राहिला नाही. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली की आपल्या पक्षाचा शेवट बघण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. पक्ष ऐन शिखरावर असताना त्यांनी एक्स्झिट घेतली. ते जिथे कुठे असतील आणि तिथे सु:ख दु:खाची जाणीव होत असेल तर ते सुखात राहोत हीच अपेक्षा ! विनम्र श्रद्धांजली !

Sandeep Shejwalkar Sat, 02/07/2026 - 16:21
तुम्ही बारामतीकर असल्यामुळे तुम्हला वाईट वाटले असेल , मला वैयक्तिक रित्या वाईट वाटले नाही , धक्का मात्र जरूर बसला, सत्तेला हपापलेले बरेच नेते आहेत, त्यापैकी एक नेता लयाला गेला इतकेच.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.” पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता. घरी गेल्यावरही कशातच मन लागलं नाही.

दाटलेली हुरहूर.

Deepak Pawar ·

गणेशा Tue, 02/10/2026 - 23:07
रंग न्हाली सांज येई कुणाची ही भूल पडे गंध ओल्या वाऱ्यातून कुठे मन दूर उडे
प्रेमाचे शब्दातून पडलेले कवडसे आवडले..

गणेशा Tue, 02/10/2026 - 23:07
रंग न्हाली सांज येई कुणाची ही भूल पडे गंध ओल्या वाऱ्यातून कुठे मन दूर उडे
प्रेमाचे शब्दातून पडलेले कवडसे आवडले..
लेखनविषय:
दाटलेली हुरहूर मन असं सैरभैर कुणाचे हे रंग सारे पसरले मनभर काय झाले असे मन वेडेपिसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. रंग न्हाली सांज येई कुणाची ही भूल पडे गंध ओल्या वाऱ्यातून कुठे मन दूर उडे शोधिते कुणाला कळेना मनाला झाडातून पानातून कोण आता दिसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. उमललेल्या पहाटेस सपनात येई कोण बहरल्या वेलीपरी मोहरुन जाई मन कुणाचे हे रूप मनभर धूप पसरून दिसभर गंधाळते जसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. https://youtu.be/RBXDiuu3qT8

मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन -राजीव उपाध्ये २०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.

आंब्याच्या झाडवरचे सरडे

विवेकपटाईत ·

तुर्रमखान Sun, 02/01/2026 - 16:49
चाट जीपीटीच्या मदतीने पुढच्या ओळी. ;) स्वातंत्र्याची तारीख बदलली, घोषणा नवी झाली, पण सामान्य माणसाची व्यथा आजही तशीच राहिली. भक्तीच्या घोषणांनी भ्रष्टाचार पुसला जात नाही, झेंडे बदलले म्हणून लूट कधी थांबत नाही.

तुर्रमखान Sun, 02/01/2026 - 16:49
चाट जीपीटीच्या मदतीने पुढच्या ओळी. ;) स्वातंत्र्याची तारीख बदलली, घोषणा नवी झाली, पण सामान्य माणसाची व्यथा आजही तशीच राहिली. भक्तीच्या घोषणांनी भ्रष्टाचार पुसला जात नाही, झेंडे बदलले म्हणून लूट कधी थांबत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.