मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड

आकाश खोत ·

पर्णिका Mon, 03/16/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.

पर्णिका Mon, 03/16/2026 - 02:17
मस्त भटकंती अन सुरेख वर्णन ! आम्ही बरेच वर्षांपूर्वी पिंक सिटीला भेट दिली होती, आमेरगढ फारच आवडला होता... तिथे रात्री laser show असतो, ऐतिहासिक माहिती देणारा तो शो अगदी must watch होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली. आमेर जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत. राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते.

साधी सुकी भेळ

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. आमच्या इकडे यांना मुरमुरेच म्हणतात. अगदी ओपेक पांढरे नसतात. त्यामुळे ही भेळ वेगळीच लागते. विडिओ इथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. गुरुवार, 02/26/2026 - 20:22
ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्‍यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्‍यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्‍याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्‍याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.

In reply to by अभ्या..

गवि गुरुवार, 02/26/2026 - 20:40
भत्ता हा शब्द हा लेख वाचल्यावर आठवला होता. पुलंच्या खाद्यजीवनमध्ये बहुधा भत्त्याचा उल्लेख आहे. इतका विषय निघालाच आहे तर पुण्यात बाजीराव रोडला कोणते थिएटर होते (रतन का?) त्याच्या समोर घाटगे चिवडावाले एक गाडी लावायचे. विविध चिवडे मिक्स करून त्यावर कांदा, वेगवेगळे मसाले वगैरे शिंपडून कागदात द्रोण करून द्यायचे. फार वर्षे, म्हणजे पंचवीस सव्वीस झाली. घाटगे नावात काही चूक असेल तर चुभुदेघे. मुख्य म्हणजे फारच टेस्टी आणि ॲडिक्टिव्ह चिवडा मिक्सचर असायचे ते. अजून मिळते का? बहुधा अनिल अवचट यांनी या चिवड्याबद्दल कुठेतरी लिहीलं होतं.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:34
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं दुकान अगदी आत्तापर्यंत चालू होतं, कोविडच्या काळात कधीतरी बंद पडलं ते. परत सुरुही झालं होतं नंतर पण हल्ली दिसत नाही, दुसरीछ टपरी सुरु झालीय आता. आणि ते बाजीराव रोडवर नव्हे तर फरासखान्यापाशी होतं.

गवि गुरुवार, 02/26/2026 - 08:20
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात म्हणजे तुम्ही देखील. कोब्रा, कॅनन १००००*, खजुराहो यांचा उल्लेख नसल्याने खिन्नता आली. बाकी तुमची भेळ फक्कड दिसते आहे. आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग. त्यात कांदा टोमॅटो घालून अधिकच भारी. त्यातही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, विशिष्ट लोकल, गल्लीतल्या खास काही नेहमीच्या दुकानांतून आणलेले भडंग. गेले ते दिवस.. * आकडा जितका जास्त तितकी स्ट्राँग अधिक असेल अशी मानसिक प्रतिमा होण्याचे ते दिवस. प्रत्यक्ष कायद्यानुसार आठ टक्केपर्यंत हीच मर्यादा, हे तेव्हा लक्षात येत नसे.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 02/26/2026 - 16:34
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली नंतर झिंगारो आणि खजुराहो कधी कधी पण कॅननची मज्जा वेगळीच होती. एकदा भंडारदर्‍याला एका खोपटात कॅनन १०००० मागतली तर नुसतीच १०००० असलेली कोणतीतरी बिअर दिली होती. मुसळधार पावसात अंधार्‍या खोपटात १०००० आणि खेकडा भजी आणि जेवायला अंडा भूर्जी आणि गरमा गरम चपाती अजून लक्षात आहे. किंगफिशर, ट्युबोर्ग, बडवायजर वगैरे आल्यावर कॅनन वगैरे गायब झाली आणि हेवर्डसपण आता मिळते का माहीती नाही. आता बिअर सोडून ७-८ वर्षे झाली. सध्या काळ्या कुत्र्यावर खूष आहे.

In reply to by गवि

चावटमेला गुरुवार, 02/26/2026 - 16:44
तही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, भोरे भडंग मला कायम बकवास वाटला. गोरे चांगला आहे. कपाले बेश्ट. जयसिंगपूर चा अंबा पण काही खास नाही.

कांदा लिंबू गुरुवार, 02/26/2026 - 13:58
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! विडिओ पहिला; चांगलीच लोकप्रिय दिसतेय. त्या भागात गेलो तर खाईन नक्की.
आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग.
हा सांगलीचा* सुप्रसिद्ध कपाले भडंग एकदा खाण्यात आला होता. अतिऽशय आवडला होता. खाऊन झाल्यावर कव्हर चा मुद्दाम फोटो काढून ठेवलाय.  कपाले भडंग  कपाले भडंग --- *विभक्तीचा प्रत्यय बरोबर आहे का?

In reply to by गवि

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:42
गवि आपण गावच्या आठवणी काढून हळवं केलंत बघा. कपाले हा बहुधा खूप वर्षांपूर्वी (३०-३५) पद्मा टॉकीज समोर एका खोक्यात सुरू झालेला ब्रँड असावा असे वाटते. गोरे आणि भोरे मात्र त्याहूनही जुने. गोरे भोरे खूप गोड करतात असं वाटतं. अगदी आमच्या शाळेसमोरेही पार्ले बिस्किटांच्या पत्र्यांच्या जोड डब्यात असा भडंग विकला जायचा. ओल्या भेळेच्या निम्म्या किमतीत. जुने आंबट गोड दिवस.

In reply to by स्वधर्म

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:03
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे गडकरी भडंग मिळते . के डब्लु सी कॉलेज कडे जाताना सांगली बेकरी या दुकाना मधे "सांगली भडंग " मिळते . ते ही चवीला चांगले आहे .

In reply to by कांदा लिंबू

मदनबाण Fri, 02/27/2026 - 12:41
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]- कोल्हापूरला जाणे झाले की अंबा भडंग आठवते, ती बी लईच फेमस हाय. कपाले ट्राय मारायला हवी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:24
मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो. दोनही वेळेला अर्धा ग्लास घेतल्यावर डोके कोणीतरी दगडाने हाणले असावे इतके दुखायला लागले. तेंव्हापासून असल्या १०००० वगैरेच्या भानगडीत कधी पडलो नाही. बाकी भेळेबद्दल म्हणाल तर नगर पुणे रस्त्यावर सगळीकडे अशीच भेळ मिळते. सोबत झकास तळलेली मिर्ची.

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:58
भेळेसारखा साधा विषय... परंतु तुंम्ही भेळेप्रमाणेच खुसखुशीत आणि चटकदार करून मांडला आहे. आवडला. मी काही वर्षांपूर्वी अनुभव मासिकात संपत मोरे यांचा एक लेख वाचला होता. जतजवळच्या संख आणि उमदी या दोन गांवांतील पारंपारिक वैराबाबत. अनेक दशकांपासून दोन्ही गावचे गांवकरी काही झाले तरी परस्परांशी कसलाही व्यवहार ठेवत नाहीत. खूपच मजेदार लेख होता. तुंम्हाला त्यावर काही माहिती असेल तर नक्की लिहा.

In reply to by स्वधर्म

या वैराबद्दल ऐकले आहे परंतु आम्ही कधी ते प्रत्यक्ष अनुभवले नाही. हा लेख मी वाचला नाही, आता मिळेल का ते माहित नाही. धन्यवाद, मिळवायचा प्रयत्न करतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:06
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी "कलगीवाले" अशा दोन गटांमधे दिवाळीच्या काळात एका ठराविक दिवशी दगडफेकीचा सामना रंगतो , असे पुर्वी कधी तरी वाचले आहे .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Tue, 03/17/2026 - 20:24
दोन्ही गावातील लोक एकमेकांच्या गावात पाणीही पीत नाहीत, कधीही मुक्काम करत नाहीत. मुली देण्याचे, सोयरिक करण्याचे तर दूरच. संपत मोरे यांचा लेख मनोरंजक होता व त्यांनी दोन्ही गावच्या गावकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मूळ वाद कैक दशकांपूर्वी कदाचित तालुक्याचे ठिकाण कुठले असावे यावरून किंवा देवस्थानाच्या यात्रेवरून झाला असावा अशी काहीशी माहिती होती.

Bhakti गुरुवार, 02/26/2026 - 16:37
सुकी भेळीचे आपले एक चाहते असतात.आमच्या ह्याना सुकी आणि मला ओलीच भेळ आवड्ते. नगराची आशा भेळ ,पुण्यातही आता मिळते.https://ashabhel.in/ नेप्ती भेळ्ही प्रसिध्द आहे.

१. एक लांबडे भातासारखेच पांढरे ओपेक २. एक गोल स्फेरिकल किंवा लहान पपईच्या आकाराचे जे सांगली भागात भडंगांसाठी वापरतात ३. एक ट्रान्स्परंट फोड असलेले हलके मुरमुरे चुरमुरे ==== कोण कशालाही मुरमुरे म्हणतात. भडगांचे गोलसर चुरमुरे हे मी पंढरपुरी चुरमुरे म्हणून समजत होतो. जर्मन लोकांनी हे सर्व कन्फ्युजन घालवण्यासाठी यांचे स्पष्ट प्रकार करून यांना अतिशय स्वयंस्पष्ट नावं दिली असती आणि हा गोंधळ कायमचा मिटवून टाकला असता. ====== एकदाचे मिपाकर बसून आपण ही नावं ठरवून मोकळं होऊ. गावांची किंवा प्रोसेसची नावे देण्यापेक्षा काहीतरी अनअ‍ॅम्बिग्युअस अशी नावे देऊ. किंवा कुणी व्यापारी लोकांनी केले आहे का असे नोमेनक्लेचर?

विंजिनेर Fri, 02/27/2026 - 02:23
वा! लेख आणि प्रतिसादात उघडलेले स्मृतीकोश - सगळेच चटकदार! वाचून तोंडात पातेलंभर लाळ जमा झाली (बर्‍याच दिवसांनी मिपा पेश्शल वाक्प्रयोग करायला मिळाला) जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय? आता म्हणे त्या मूळ भेळवाल्याचा नातू चालवतो स्टॉल...

In reply to by विंजिनेर

गवि Fri, 02/27/2026 - 03:44
जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय?
आठवते. फार पूर्वीची गोष्ट. आणि फार वेळा जाणं झालं नसलं तरी आठवतं आहे. ते वृद्ध गृहस्थ भेळेत चमच्याने एकेक घटक, मसाला किंवा चटणी घालताना अंगाला झटके देत देत घालायचे असे स्मरते. त्यावेळी कोणीतरी मला सांगितलं होतं की त्यांना काही व्याधी असल्याने असे होते. मुद्दाम करत नाहीत. खरं काय ते माहीत नाही. मला तर स्वारगेट स्थानकावर एक विशिष्ट भेळ नेहमी खात असल्याचं आठवतं. वेळी अवेळी कधीही बसने प्रवास असो, ही भेळ नेहमी घेतली जायची. नाव विसरलो.

In reply to by विंजिनेर

सौंदाळा Fri, 02/27/2026 - 11:20
हो आठवते ना प्लॅट्फॉर्मवर एका कट्ट्यावर तो माणूस बसायचा आणि भेळ मिक्स करताना हाताला लकवा मारल्यासारखा झटका द्यायचा. आता स्टेशनच्या बाहेर ते दुकान आहे आणि त्यांचा नातूच चालवतो असे ऐकले होते पण अजून पण तिकडे कधी गेलो नाही.

In reply to by विंजिनेर

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:37
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा स्टेशनच्या आवारातच होते, मात्र प्लॅटफॉर्मवर नव्हते. स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या ४ पायर्‍या चढून आल्यावर उजव्या हातास होते. आता मात्र ते पूर्णपणे स्टेशनच्या बाहेर एका टपरीवजा खोक्यात आहे. क्वालिटी मात्र खालावलीय.

अभ्या.. Wed, 03/18/2026 - 00:26
परवाच इथल्या एशियन स्टोअर मध्ये कल्याण भेळीचा पॅक मिळाला. चुरमुरे फरसाण आणि दोन चटण्या ची पाकिटे असा सरंजाम होता. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे आपले आपण घालायचे होते. तिघांना चौघांना एकेक डिश येईल इतके प्रमाण होते. पुण्यात खाल्लेली कल्याण भेळ जवळपास तशीच चव होती. चार भेळीसाठी चार युरो मोजले. अधिकचे सामान आणि कष्ट मोजले तर दिडशे रुपयाला एक प्लेट पडली.

ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. आमच्या इकडे यांना मुरमुरेच म्हणतात. अगदी ओपेक पांढरे नसतात. त्यामुळे ही भेळ वेगळीच लागते. विडिओ इथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. गुरुवार, 02/26/2026 - 20:22
ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्‍यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्‍यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्‍याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्‍याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.

In reply to by अभ्या..

गवि गुरुवार, 02/26/2026 - 20:40
भत्ता हा शब्द हा लेख वाचल्यावर आठवला होता. पुलंच्या खाद्यजीवनमध्ये बहुधा भत्त्याचा उल्लेख आहे. इतका विषय निघालाच आहे तर पुण्यात बाजीराव रोडला कोणते थिएटर होते (रतन का?) त्याच्या समोर घाटगे चिवडावाले एक गाडी लावायचे. विविध चिवडे मिक्स करून त्यावर कांदा, वेगवेगळे मसाले वगैरे शिंपडून कागदात द्रोण करून द्यायचे. फार वर्षे, म्हणजे पंचवीस सव्वीस झाली. घाटगे नावात काही चूक असेल तर चुभुदेघे. मुख्य म्हणजे फारच टेस्टी आणि ॲडिक्टिव्ह चिवडा मिक्सचर असायचे ते. अजून मिळते का? बहुधा अनिल अवचट यांनी या चिवड्याबद्दल कुठेतरी लिहीलं होतं.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:34
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं दुकान अगदी आत्तापर्यंत चालू होतं, कोविडच्या काळात कधीतरी बंद पडलं ते. परत सुरुही झालं होतं नंतर पण हल्ली दिसत नाही, दुसरीछ टपरी सुरु झालीय आता. आणि ते बाजीराव रोडवर नव्हे तर फरासखान्यापाशी होतं.

गवि गुरुवार, 02/26/2026 - 08:20
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात म्हणजे तुम्ही देखील. कोब्रा, कॅनन १००००*, खजुराहो यांचा उल्लेख नसल्याने खिन्नता आली. बाकी तुमची भेळ फक्कड दिसते आहे. आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग. त्यात कांदा टोमॅटो घालून अधिकच भारी. त्यातही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, विशिष्ट लोकल, गल्लीतल्या खास काही नेहमीच्या दुकानांतून आणलेले भडंग. गेले ते दिवस.. * आकडा जितका जास्त तितकी स्ट्राँग अधिक असेल अशी मानसिक प्रतिमा होण्याचे ते दिवस. प्रत्यक्ष कायद्यानुसार आठ टक्केपर्यंत हीच मर्यादा, हे तेव्हा लक्षात येत नसे.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 02/26/2026 - 16:34
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली नंतर झिंगारो आणि खजुराहो कधी कधी पण कॅननची मज्जा वेगळीच होती. एकदा भंडारदर्‍याला एका खोपटात कॅनन १०००० मागतली तर नुसतीच १०००० असलेली कोणतीतरी बिअर दिली होती. मुसळधार पावसात अंधार्‍या खोपटात १०००० आणि खेकडा भजी आणि जेवायला अंडा भूर्जी आणि गरमा गरम चपाती अजून लक्षात आहे. किंगफिशर, ट्युबोर्ग, बडवायजर वगैरे आल्यावर कॅनन वगैरे गायब झाली आणि हेवर्डसपण आता मिळते का माहीती नाही. आता बिअर सोडून ७-८ वर्षे झाली. सध्या काळ्या कुत्र्यावर खूष आहे.

In reply to by गवि

चावटमेला गुरुवार, 02/26/2026 - 16:44
तही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, भोरे भडंग मला कायम बकवास वाटला. गोरे चांगला आहे. कपाले बेश्ट. जयसिंगपूर चा अंबा पण काही खास नाही.

कांदा लिंबू गुरुवार, 02/26/2026 - 13:58
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! विडिओ पहिला; चांगलीच लोकप्रिय दिसतेय. त्या भागात गेलो तर खाईन नक्की.
आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग.
हा सांगलीचा* सुप्रसिद्ध कपाले भडंग एकदा खाण्यात आला होता. अतिऽशय आवडला होता. खाऊन झाल्यावर कव्हर चा मुद्दाम फोटो काढून ठेवलाय.  कपाले भडंग  कपाले भडंग --- *विभक्तीचा प्रत्यय बरोबर आहे का?

In reply to by गवि

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:42
गवि आपण गावच्या आठवणी काढून हळवं केलंत बघा. कपाले हा बहुधा खूप वर्षांपूर्वी (३०-३५) पद्मा टॉकीज समोर एका खोक्यात सुरू झालेला ब्रँड असावा असे वाटते. गोरे आणि भोरे मात्र त्याहूनही जुने. गोरे भोरे खूप गोड करतात असं वाटतं. अगदी आमच्या शाळेसमोरेही पार्ले बिस्किटांच्या पत्र्यांच्या जोड डब्यात असा भडंग विकला जायचा. ओल्या भेळेच्या निम्म्या किमतीत. जुने आंबट गोड दिवस.

In reply to by स्वधर्म

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:03
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे गडकरी भडंग मिळते . के डब्लु सी कॉलेज कडे जाताना सांगली बेकरी या दुकाना मधे "सांगली भडंग " मिळते . ते ही चवीला चांगले आहे .

In reply to by कांदा लिंबू

मदनबाण Fri, 02/27/2026 - 12:41
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]- कोल्हापूरला जाणे झाले की अंबा भडंग आठवते, ती बी लईच फेमस हाय. कपाले ट्राय मारायला हवी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:24
मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो. दोनही वेळेला अर्धा ग्लास घेतल्यावर डोके कोणीतरी दगडाने हाणले असावे इतके दुखायला लागले. तेंव्हापासून असल्या १०००० वगैरेच्या भानगडीत कधी पडलो नाही. बाकी भेळेबद्दल म्हणाल तर नगर पुणे रस्त्यावर सगळीकडे अशीच भेळ मिळते. सोबत झकास तळलेली मिर्ची.

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:58
भेळेसारखा साधा विषय... परंतु तुंम्ही भेळेप्रमाणेच खुसखुशीत आणि चटकदार करून मांडला आहे. आवडला. मी काही वर्षांपूर्वी अनुभव मासिकात संपत मोरे यांचा एक लेख वाचला होता. जतजवळच्या संख आणि उमदी या दोन गांवांतील पारंपारिक वैराबाबत. अनेक दशकांपासून दोन्ही गावचे गांवकरी काही झाले तरी परस्परांशी कसलाही व्यवहार ठेवत नाहीत. खूपच मजेदार लेख होता. तुंम्हाला त्यावर काही माहिती असेल तर नक्की लिहा.

In reply to by स्वधर्म

या वैराबद्दल ऐकले आहे परंतु आम्ही कधी ते प्रत्यक्ष अनुभवले नाही. हा लेख मी वाचला नाही, आता मिळेल का ते माहित नाही. धन्यवाद, मिळवायचा प्रयत्न करतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:06
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी "कलगीवाले" अशा दोन गटांमधे दिवाळीच्या काळात एका ठराविक दिवशी दगडफेकीचा सामना रंगतो , असे पुर्वी कधी तरी वाचले आहे .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Tue, 03/17/2026 - 20:24
दोन्ही गावातील लोक एकमेकांच्या गावात पाणीही पीत नाहीत, कधीही मुक्काम करत नाहीत. मुली देण्याचे, सोयरिक करण्याचे तर दूरच. संपत मोरे यांचा लेख मनोरंजक होता व त्यांनी दोन्ही गावच्या गावकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मूळ वाद कैक दशकांपूर्वी कदाचित तालुक्याचे ठिकाण कुठले असावे यावरून किंवा देवस्थानाच्या यात्रेवरून झाला असावा अशी काहीशी माहिती होती.

Bhakti गुरुवार, 02/26/2026 - 16:37
सुकी भेळीचे आपले एक चाहते असतात.आमच्या ह्याना सुकी आणि मला ओलीच भेळ आवड्ते. नगराची आशा भेळ ,पुण्यातही आता मिळते.https://ashabhel.in/ नेप्ती भेळ्ही प्रसिध्द आहे.

१. एक लांबडे भातासारखेच पांढरे ओपेक २. एक गोल स्फेरिकल किंवा लहान पपईच्या आकाराचे जे सांगली भागात भडंगांसाठी वापरतात ३. एक ट्रान्स्परंट फोड असलेले हलके मुरमुरे चुरमुरे ==== कोण कशालाही मुरमुरे म्हणतात. भडगांचे गोलसर चुरमुरे हे मी पंढरपुरी चुरमुरे म्हणून समजत होतो. जर्मन लोकांनी हे सर्व कन्फ्युजन घालवण्यासाठी यांचे स्पष्ट प्रकार करून यांना अतिशय स्वयंस्पष्ट नावं दिली असती आणि हा गोंधळ कायमचा मिटवून टाकला असता. ====== एकदाचे मिपाकर बसून आपण ही नावं ठरवून मोकळं होऊ. गावांची किंवा प्रोसेसची नावे देण्यापेक्षा काहीतरी अनअ‍ॅम्बिग्युअस अशी नावे देऊ. किंवा कुणी व्यापारी लोकांनी केले आहे का असे नोमेनक्लेचर?

विंजिनेर Fri, 02/27/2026 - 02:23
वा! लेख आणि प्रतिसादात उघडलेले स्मृतीकोश - सगळेच चटकदार! वाचून तोंडात पातेलंभर लाळ जमा झाली (बर्‍याच दिवसांनी मिपा पेश्शल वाक्प्रयोग करायला मिळाला) जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय? आता म्हणे त्या मूळ भेळवाल्याचा नातू चालवतो स्टॉल...

In reply to by विंजिनेर

गवि Fri, 02/27/2026 - 03:44
जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय?
आठवते. फार पूर्वीची गोष्ट. आणि फार वेळा जाणं झालं नसलं तरी आठवतं आहे. ते वृद्ध गृहस्थ भेळेत चमच्याने एकेक घटक, मसाला किंवा चटणी घालताना अंगाला झटके देत देत घालायचे असे स्मरते. त्यावेळी कोणीतरी मला सांगितलं होतं की त्यांना काही व्याधी असल्याने असे होते. मुद्दाम करत नाहीत. खरं काय ते माहीत नाही. मला तर स्वारगेट स्थानकावर एक विशिष्ट भेळ नेहमी खात असल्याचं आठवतं. वेळी अवेळी कधीही बसने प्रवास असो, ही भेळ नेहमी घेतली जायची. नाव विसरलो.

In reply to by विंजिनेर

सौंदाळा Fri, 02/27/2026 - 11:20
हो आठवते ना प्लॅट्फॉर्मवर एका कट्ट्यावर तो माणूस बसायचा आणि भेळ मिक्स करताना हाताला लकवा मारल्यासारखा झटका द्यायचा. आता स्टेशनच्या बाहेर ते दुकान आहे आणि त्यांचा नातूच चालवतो असे ऐकले होते पण अजून पण तिकडे कधी गेलो नाही.

In reply to by विंजिनेर

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:37
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा स्टेशनच्या आवारातच होते, मात्र प्लॅटफॉर्मवर नव्हते. स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या ४ पायर्‍या चढून आल्यावर उजव्या हातास होते. आता मात्र ते पूर्णपणे स्टेशनच्या बाहेर एका टपरीवजा खोक्यात आहे. क्वालिटी मात्र खालावलीय.

अभ्या.. Wed, 03/18/2026 - 00:26
परवाच इथल्या एशियन स्टोअर मध्ये कल्याण भेळीचा पॅक मिळाला. चुरमुरे फरसाण आणि दोन चटण्या ची पाकिटे असा सरंजाम होता. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे आपले आपण घालायचे होते. तिघांना चौघांना एकेक डिश येईल इतके प्रमाण होते. पुण्यात खाल्लेली कल्याण भेळ जवळपास तशीच चव होती. चार भेळीसाठी चार युरो मोजले. अधिकचे सामान आणि कष्ट मोजले तर दिडशे रुपयाला एक प्लेट पडली.
लेखनप्रकार
आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ. एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले. आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती ✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली ✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं ✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं! ✪ पहाड़ाची नानाविध रूपं! ✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ ९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

आकाश खोत ·

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल. प्याज कचोरी जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले.

दरम्यान

जव्हेरगंज ·

चित्रदर्शी वर्णन. मला देखील कधी कधी अगदी असेच वाटते. >> शांततेशिवाय दुसरं काही मला सापडतच नाही. इतकी घनदाट शांतता बधीर करून सोडते. अगदी असेच होते. परंतु मला त्याबद्दल वैज्ञानिक कुतूहल देखील वाटते. यावरून मला खरेतर डीप स्पेस किती भयंकर असू शकतो मानवी मनांसाठी असा नेहमी प्रश्न पडतो. तुम्हाला एक सुचवतो. तुमच्या लेखातली फीलिंग पकडून ठेवा. काही दिवस अशीच. आणि कृपया three body problem या मालिकेतली तीनही पुस्तकं वाचा. नाही वाचलीत तरी किमान त्यांची ऑडिओ बूक ऐका. किंवा विस्तृत जिस्ट तरी ऐका. विशेषतः तिसरे पुस्तक. ही पुस्तके चढत्या क्रमाने नशीली आहेत. यानंतर काही दिवस तुम्हला खरोखर झपाटल्य सारखे होउन जाइल. कदाचित प्रचंड भीती देखील वाटेल पण एकदा त्या कल्पनेला थोडासा वेळ देऊन पाहा. कोणती कल्पना तर डार्क फॉरेस्टची. एकूण मला तुमचे लेखन आवडले, आवर्जून लिहित जा. असा स्वर या फोरमवर सापडणे दुर्मिळ आहे. मी वाचेन.

चित्रदर्शी वर्णन. मला देखील कधी कधी अगदी असेच वाटते. >> शांततेशिवाय दुसरं काही मला सापडतच नाही. इतकी घनदाट शांतता बधीर करून सोडते. अगदी असेच होते. परंतु मला त्याबद्दल वैज्ञानिक कुतूहल देखील वाटते. यावरून मला खरेतर डीप स्पेस किती भयंकर असू शकतो मानवी मनांसाठी असा नेहमी प्रश्न पडतो. तुम्हाला एक सुचवतो. तुमच्या लेखातली फीलिंग पकडून ठेवा. काही दिवस अशीच. आणि कृपया three body problem या मालिकेतली तीनही पुस्तकं वाचा. नाही वाचलीत तरी किमान त्यांची ऑडिओ बूक ऐका. किंवा विस्तृत जिस्ट तरी ऐका. विशेषतः तिसरे पुस्तक. ही पुस्तके चढत्या क्रमाने नशीली आहेत. यानंतर काही दिवस तुम्हला खरोखर झपाटल्य सारखे होउन जाइल. कदाचित प्रचंड भीती देखील वाटेल पण एकदा त्या कल्पनेला थोडासा वेळ देऊन पाहा. कोणती कल्पना तर डार्क फॉरेस्टची. एकूण मला तुमचे लेखन आवडले, आवर्जून लिहित जा. असा स्वर या फोरमवर सापडणे दुर्मिळ आहे. मी वाचेन.
लेखनविषय:
गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय? चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा. झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार. मला घाम फुटतो.

दोसतारः शाळेत लग्न लागते २

विजुभाऊ ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:33
मला ही म्याड की असे होते. बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे. त्या वेळेस मुद्दाम होऊन प्रयत्न न करता सहजगत्या लिहू शकलो. त्या पात्रांची निरागसता राखून लिहीणे कितपत जमतेय माहीत नाही. पाहुया लिहायचा प्रयत्न करतोय. तुम्हा लोकांचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:33
मला ही म्याड की असे होते. बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे. त्या वेळेस मुद्दाम होऊन प्रयत्न न करता सहजगत्या लिहू शकलो. त्या पात्रांची निरागसता राखून लिहीणे कितपत जमतेय माहीत नाही. पाहुया लिहायचा प्रयत्न करतोय. तुम्हा लोकांचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो. फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती. हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53531 इतके कंटाळलो होतो की रोजच्यासारखे जित्या बोलावत असतानाही ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो नाही.

संध्येच्या व्याकूळ छाया.

Deepak Pawar ·

गणेशा Wed, 02/25/2026 - 14:18
छान... करून... ____________ कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी --- गणेशा

गणेशा Wed, 02/25/2026 - 14:18
छान... करून... ____________ कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी --- गणेशा
लेखनविषय:
काव्यरस
संध्येच्या व्याकूळ छाया अंधार माखुनी येती हा डोह अंतरीचा दुःखाने ढवळून जाती. मी व्याकूळ होतो जेव्हा दुःखाने मेघही झरती अश्रूंनी विझुनी गेल्या नभीच्या चांदणं ज्योती. सावली उन्हाची व्हावी तशीच शीतल माया गेले प्रहर निघुनी छळती स्मृतींच्या छाया. अंधार भारल्या राती नभी चांदणे झरते अंधाऱ्या डोही दुःखाच्या सुख तसे पाझरते. https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa

राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

आकाश खोत ·

आकाश खोत Sun, 02/22/2026 - 18:08
मला हा लेख "भटकंती" सदरात टाकायचा होता, पण भटकंतीवर क्लिक केल्यावर "Access Denied" असा एरर आला. यासंदर्भात कोणाला काही माहित असल्यास सांगावे.

जुइ Mon, 02/23/2026 - 02:57
अशा ठिकाणी किती खर्च येऊ शकतो ही माहिती देत आहात हे चांगले केले. फोटो तेवढे अधिक टाकावेत.

मस्त सुरुवात!! पाचव्या प्रचि मधला तो महाल डोंगरातुन उगवुन बाहेर आल्यासारखा वाटतोय. :) मी मागच्या वर्षी सहकुटूंब राजस्थान ला गेलो होतो. पण आठाव्ड्यात पूर्ण होण्यासारखी ही जागा नाहीच. त्यामुळे जयपूर, जोधपूर करुन जैसलमेर केले आणि तिथुन दिल्ली आणि पुणे. त्यामुळे कुनो, उदयपूर ,नाथ द्वारा, चित्तोड गढ, माऊंट अबु सगळे राहीलेच आहे. चित्र भरपूर टाका आणि येउंद्या पटापट पुढचे भाग.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आकाश खोत Tue, 02/24/2026 - 09:51
आम्ही तिथे ८ दिवस फिरलो तरीही भरपुर काही शिल्लक आहे. त्यामुळेच आम्हीही "कव्हर" करत सुटायची गडबड न करता जिथे जाऊ ते व्यवस्थित बघायचं ठरवुन फिरलो. 

आकाश खोत Sun, 02/22/2026 - 18:08
मला हा लेख "भटकंती" सदरात टाकायचा होता, पण भटकंतीवर क्लिक केल्यावर "Access Denied" असा एरर आला. यासंदर्भात कोणाला काही माहित असल्यास सांगावे.

जुइ Mon, 02/23/2026 - 02:57
अशा ठिकाणी किती खर्च येऊ शकतो ही माहिती देत आहात हे चांगले केले. फोटो तेवढे अधिक टाकावेत.

मस्त सुरुवात!! पाचव्या प्रचि मधला तो महाल डोंगरातुन उगवुन बाहेर आल्यासारखा वाटतोय. :) मी मागच्या वर्षी सहकुटूंब राजस्थान ला गेलो होतो. पण आठाव्ड्यात पूर्ण होण्यासारखी ही जागा नाहीच. त्यामुळे जयपूर, जोधपूर करुन जैसलमेर केले आणि तिथुन दिल्ली आणि पुणे. त्यामुळे कुनो, उदयपूर ,नाथ द्वारा, चित्तोड गढ, माऊंट अबु सगळे राहीलेच आहे. चित्र भरपूर टाका आणि येउंद्या पटापट पुढचे भाग.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आकाश खोत Tue, 02/24/2026 - 09:51
आम्ही तिथे ८ दिवस फिरलो तरीही भरपुर काही शिल्लक आहे. त्यामुळेच आम्हीही "कव्हर" करत सुटायची गडबड न करता जिथे जाऊ ते व्यवस्थित बघायचं ठरवुन फिरलो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता. ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली. जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती. मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो.

मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक

कंजूस ·
याना _गोकर्ण _ मुर्डेश्वर सहलीतील तिसरा आणि अंतिम भाग

मागील लेख
१. उत्तर कर्नाटकातील याना शिखरे. | https://www.misalpav.com/node/53526
२. गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक | https://www.misalpav.com/node/53532

प्रचेतस Sun, 02/22/2026 - 09:23
मस्त भटकंती झाली ही. गोपुरावरून दिसणारे दृश्य अप्रतिम. मुर्डेश्वरचे मुख्य मंदिर किती जुने आहे? सगळेच उद्योजकानेच बांधलेय की जीर्णोद्धार केला आहे? भटकळ दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्समुळे बदनाम झालेले आहे, तिथं फिरताना तसे काही जाणवलं का? बाकी असेच फिरत राहा आणि लिहीत राहा.

In reply to by प्रचेतस

कंजूस Sun, 02/22/2026 - 11:31
मुर्डेश्वराचं छोटंसं देऊळ असावं कधीतरी पण आता सगळा कायापालट आहे.नेटवरच शोधावं लागेल. ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते पर्यटकांच्या फायद्याचे झाले आहे हे निश्चित. तसं पाहिलं तर कुमटा येथे आणि बरेच ठिकाणी अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत कर्नाटकात. बेंगळुरूतल्या युवावर्गास जवळचा समुद्र हाच आहे. ब्रिटिश काळात ते लोक पूर्व किनाऱ्यावरील मछलीपट्टणम येथे घोड्यावरून जात आणि तिथून विलायतेला जहाजातून. थोडी पुस्तकं वाचेन म्हणजे कळेल. कारवारबद्दल माहीत आहे. १८५७ नंतर ब्रिटिशांनी कारवार हे आरमार बंदर म्हणून वाढवले. वसाहत वाढवली. त्या अगोदर कादवाड नावाची स्थानिक वस्ती होती. रविंद्रनाथ टागोरांचा भाऊ तिकडे गवर्नर म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून आला होता आणि त्याच्याकडे येऊन राहिले होते. तो समुद्र किनारा त्यांना फार आवडला होता. ( कोलकात्याच्या हुगळी नदीच्यामुळे गाळाने भरलेल्या किनाऱ्यांपेक्षा वेगळा). त्यामुळे टागोर बीच नाव पडले कारवार बीचला. भटकळ बद्दल काही सांगता येत नाही. आता दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडू फिरलो तर प्रत्येक शहराचे दोन भाग आहेत हे जाणवते. आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात . ते सर्व धंद्यात आहेत. ट्रान्सपोर्ट, हॉटेलिंग, फ्रूट मर्चंट, बेकरी उद्योग. सामान्य माणसास गरज लागणाऱ्या सर्व वस्तूंचे व्यापार.[ इथे अधिक लिहू शकत नाही.] बॅगा जवळ नसत्या तर भटकळ गावात फिरलो असतो. हा जो बस स्टँड आहे तो मुख्य रस्ता NH 66 वर आहे, भटकळ गाव किनाऱ्याकडे पसरले आहे. ठाण्याजवळच्या मुंब्र्याशी तुलना भटकळची होईल का सांगता येत नाही. सगळं गुप्तपणे चाललेलं असतं. आपल्याला समजत नाही. पण काही राजकीय सामाजिक उलथापालथी झाल्या की पेपरात बातमी येते. मंगळुरुच्या पुढे दक्षिणेला केरळमध्ये तीन जिल्हे हे मोपले चळवळीचे धरले जात असत. तिकडे केरळचे पर्यटक जात नाहीत. हल्ली वायनाडच्या प्रसिद्धीमुळे कोळ्हीकोडला ( जुने कालिकत) पर्यटक जातात. भाषा - कारवार ते भटकळपर्यंत कारवारी कोकणी बोलली जाते. ती ऐंशी टक्के मराठी आहे. पण पुढे उडुपी पर्यंतची ख्रिश्चन मुसलमानांची लोकांची हीच भाषा आहे. उडुपी मंगळुरुचे हिंदू मात्र तुळु बोलतात. शेट्टी हॉटेलवाले तुळूच. पण ते खरे म्हणजे मदुराई जवळच्या चेट्टीनाड इथले आहेत. काही आणखी खात्रीची माहिती सापडली तर लिहीनच.

In reply to by कंजूस

कानडाऊ योगेशु Tue, 02/24/2026 - 10:09
आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात .
येस. चेनै मध्येही मला अस्खलित हिंदी बोलणारे दुकानदार भेटले होते व सर्व मुस्लीम होते. प्रादेशिक अस्मिता,धर्म वगैरे बद्दल कितीही डोकेफोड केली तरी परमुलखात कमीतकमी आपली समस्या तरी समजणारा कोणी समोर असला तर फार बरे वाटते.

सुबोध खरे Mon, 02/23/2026 - 18:58
भटकळ मध्ये ७५ % लोकसंख्या मुस्लिमांची आहे आणि तेथील बरेच तरुण आखाती प्रदेशात नोकरीला असत. यामुळे या लोकांमध्ये थोडी फार सुबत्ता आलेली होती त्याचबरोबर तस्करी आणि गुन्हेगारी पण आली होती आणि नंतरच्या काळात इस्लामी मूलतत्त्ववाद हि वाढीस लागलेला होता. मुंबईत फोर्ट भागात जसे तस्करीने आणलेले सामान मिळत असे ( मुंबईत मल्याळी मुसलमान जास्त होते) तसेच भटकळला सुद्धा या सामानाचे मार्केट होते (भटकळ दुबई मार्केट) पण त्या बाजारात तिथल्याच मुसलमानांचा जास्त सहभाग होता. अगदी नुकत्याच आंतराष्ट्रीय बाजारात आलेल्या वस्तू तेथे सहज मिळत असत. १९९० -९१ च्या आसपास येथे सोने चांदी अमली पदार्थ आणि इलेकट्रोनिक सामानाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असे. माझे अनेक मित्र नौदलात विविध जहाजांवर होते त्यांच्याकडून अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकलेल्या आहेत. १९९९-२००० या काळात मी तटरक्षक दलात तैनातीवर होतो त्यावेळेस तटरक्षक दल या भागावर "नजर" ठेवून होते.

प्रचेतस Sun, 02/22/2026 - 09:23
मस्त भटकंती झाली ही. गोपुरावरून दिसणारे दृश्य अप्रतिम. मुर्डेश्वरचे मुख्य मंदिर किती जुने आहे? सगळेच उद्योजकानेच बांधलेय की जीर्णोद्धार केला आहे? भटकळ दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्समुळे बदनाम झालेले आहे, तिथं फिरताना तसे काही जाणवलं का? बाकी असेच फिरत राहा आणि लिहीत राहा.

In reply to by प्रचेतस

कंजूस Sun, 02/22/2026 - 11:31
मुर्डेश्वराचं छोटंसं देऊळ असावं कधीतरी पण आता सगळा कायापालट आहे.नेटवरच शोधावं लागेल. ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते पर्यटकांच्या फायद्याचे झाले आहे हे निश्चित. तसं पाहिलं तर कुमटा येथे आणि बरेच ठिकाणी अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत कर्नाटकात. बेंगळुरूतल्या युवावर्गास जवळचा समुद्र हाच आहे. ब्रिटिश काळात ते लोक पूर्व किनाऱ्यावरील मछलीपट्टणम येथे घोड्यावरून जात आणि तिथून विलायतेला जहाजातून. थोडी पुस्तकं वाचेन म्हणजे कळेल. कारवारबद्दल माहीत आहे. १८५७ नंतर ब्रिटिशांनी कारवार हे आरमार बंदर म्हणून वाढवले. वसाहत वाढवली. त्या अगोदर कादवाड नावाची स्थानिक वस्ती होती. रविंद्रनाथ टागोरांचा भाऊ तिकडे गवर्नर म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून आला होता आणि त्याच्याकडे येऊन राहिले होते. तो समुद्र किनारा त्यांना फार आवडला होता. ( कोलकात्याच्या हुगळी नदीच्यामुळे गाळाने भरलेल्या किनाऱ्यांपेक्षा वेगळा). त्यामुळे टागोर बीच नाव पडले कारवार बीचला. भटकळ बद्दल काही सांगता येत नाही. आता दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडू फिरलो तर प्रत्येक शहराचे दोन भाग आहेत हे जाणवते. आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात . ते सर्व धंद्यात आहेत. ट्रान्सपोर्ट, हॉटेलिंग, फ्रूट मर्चंट, बेकरी उद्योग. सामान्य माणसास गरज लागणाऱ्या सर्व वस्तूंचे व्यापार.[ इथे अधिक लिहू शकत नाही.] बॅगा जवळ नसत्या तर भटकळ गावात फिरलो असतो. हा जो बस स्टँड आहे तो मुख्य रस्ता NH 66 वर आहे, भटकळ गाव किनाऱ्याकडे पसरले आहे. ठाण्याजवळच्या मुंब्र्याशी तुलना भटकळची होईल का सांगता येत नाही. सगळं गुप्तपणे चाललेलं असतं. आपल्याला समजत नाही. पण काही राजकीय सामाजिक उलथापालथी झाल्या की पेपरात बातमी येते. मंगळुरुच्या पुढे दक्षिणेला केरळमध्ये तीन जिल्हे हे मोपले चळवळीचे धरले जात असत. तिकडे केरळचे पर्यटक जात नाहीत. हल्ली वायनाडच्या प्रसिद्धीमुळे कोळ्हीकोडला ( जुने कालिकत) पर्यटक जातात. भाषा - कारवार ते भटकळपर्यंत कारवारी कोकणी बोलली जाते. ती ऐंशी टक्के मराठी आहे. पण पुढे उडुपी पर्यंतची ख्रिश्चन मुसलमानांची लोकांची हीच भाषा आहे. उडुपी मंगळुरुचे हिंदू मात्र तुळु बोलतात. शेट्टी हॉटेलवाले तुळूच. पण ते खरे म्हणजे मदुराई जवळच्या चेट्टीनाड इथले आहेत. काही आणखी खात्रीची माहिती सापडली तर लिहीनच.

In reply to by कंजूस

कानडाऊ योगेशु Tue, 02/24/2026 - 10:09
आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात .
येस. चेनै मध्येही मला अस्खलित हिंदी बोलणारे दुकानदार भेटले होते व सर्व मुस्लीम होते. प्रादेशिक अस्मिता,धर्म वगैरे बद्दल कितीही डोकेफोड केली तरी परमुलखात कमीतकमी आपली समस्या तरी समजणारा कोणी समोर असला तर फार बरे वाटते.

सुबोध खरे Mon, 02/23/2026 - 18:58
भटकळ मध्ये ७५ % लोकसंख्या मुस्लिमांची आहे आणि तेथील बरेच तरुण आखाती प्रदेशात नोकरीला असत. यामुळे या लोकांमध्ये थोडी फार सुबत्ता आलेली होती त्याचबरोबर तस्करी आणि गुन्हेगारी पण आली होती आणि नंतरच्या काळात इस्लामी मूलतत्त्ववाद हि वाढीस लागलेला होता. मुंबईत फोर्ट भागात जसे तस्करीने आणलेले सामान मिळत असे ( मुंबईत मल्याळी मुसलमान जास्त होते) तसेच भटकळला सुद्धा या सामानाचे मार्केट होते (भटकळ दुबई मार्केट) पण त्या बाजारात तिथल्याच मुसलमानांचा जास्त सहभाग होता. अगदी नुकत्याच आंतराष्ट्रीय बाजारात आलेल्या वस्तू तेथे सहज मिळत असत. १९९० -९१ च्या आसपास येथे सोने चांदी अमली पदार्थ आणि इलेकट्रोनिक सामानाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असे. माझे अनेक मित्र नौदलात विविध जहाजांवर होते त्यांच्याकडून अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकलेल्या आहेत. १९९९-२००० या काळात मी तटरक्षक दलात तैनातीवर होतो त्यावेळेस तटरक्षक दल या भागावर "नजर" ठेवून होते.