मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...

कंजूस ·
मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी... कवितेची काही कडवी असतात आणि दोन कडव्यांमध्ये समजा चार किंवा अधिक ओळींचे अंतर ठेवायचे आहे तर असे लिहिता येईल. [<br /> किंवा <p> </p> यांचा उपयोग होत नाही.]

रिकाम्या ओळींसाठी &nbsp; type करणे.

Ready template
कवितेच्या ओळी

श्वेता२४ Sun, 03/08/2026 - 15:31
काल मी अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.. आज आपण नवीन धागाच काढला ते बरं झालं. जेणेकरून सर्वांनाच यापुढे ही माहिती उपयुक्त ठरेल. आपण सांगितल्याप्रमाणे कविता प्रतिसादात पाठवून बघते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!

In reply to by श्वेता२४

कंजूस Sun, 03/08/2026 - 19:12
लिहायचं आहे , फोटो टाकायचे आहेत पण कसे ते माहीत नसल्याने अडून राहायला नको. मलाही पूर्वी अडचणी येत होत्या. मग W3schools आणि इतर अशाच वेबसाइट्स धुंडाळून html tags तसेच CSS पाहून यातलं काय उपयोगी आहे हे शोधलं. परंतू आता मिसळपाव तसेच इतर मराठी संस्थळांवरून यांचा वापर मर्यादित केला आहे. त्यामुळे परत तपसावं लागतं.

चौथा कोनाडा Mon, 03/09/2026 - 22:01
क्शी वाटतेय टाईमपास जिलेबी ?       ओळ पहिली
उन्हाची काहिली
त्रस्त सावली
लपूनच राहिली
    मैत्रीण दुसरी
खूप हसरी
सतत स्वमग्न
नाव विसरी
    गर्लफ्रेंड पाचवी
तालावर नाचवी
कैच्याकै सुचवी
पेग-पेग रिचवी

श्वेता२४ Sun, 03/08/2026 - 15:31
काल मी अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.. आज आपण नवीन धागाच काढला ते बरं झालं. जेणेकरून सर्वांनाच यापुढे ही माहिती उपयुक्त ठरेल. आपण सांगितल्याप्रमाणे कविता प्रतिसादात पाठवून बघते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!

In reply to by श्वेता२४

कंजूस Sun, 03/08/2026 - 19:12
लिहायचं आहे , फोटो टाकायचे आहेत पण कसे ते माहीत नसल्याने अडून राहायला नको. मलाही पूर्वी अडचणी येत होत्या. मग W3schools आणि इतर अशाच वेबसाइट्स धुंडाळून html tags तसेच CSS पाहून यातलं काय उपयोगी आहे हे शोधलं. परंतू आता मिसळपाव तसेच इतर मराठी संस्थळांवरून यांचा वापर मर्यादित केला आहे. त्यामुळे परत तपसावं लागतं.

चौथा कोनाडा Mon, 03/09/2026 - 22:01
क्शी वाटतेय टाईमपास जिलेबी ?       ओळ पहिली
उन्हाची काहिली
त्रस्त सावली
लपूनच राहिली
    मैत्रीण दुसरी
खूप हसरी
सतत स्वमग्न
नाव विसरी
    गर्लफ्रेंड पाचवी
तालावर नाचवी
कैच्याकै सुचवी
पेग-पेग रिचवी

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४ ·

बाजीगर Sun, 03/08/2026 - 09:50
आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.

कंजूस Sun, 03/08/2026 - 11:36
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

श्वेता२४ Mon, 03/09/2026 - 12:39
आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

बाजीगर Sun, 03/08/2026 - 09:50
आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.

कंजूस Sun, 03/08/2026 - 11:36
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

श्वेता२४ Mon, 03/09/2026 - 12:39
आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.
लेखनविषय:
अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

खेळ मांडला...

बाजीगर ·
लेखनविषय:
युद्धाचा भडका, सामान्यांना धडका || तेलासाठी खेळ, अवघड वेळ || उच्च तंत्र युद्ध, सामान्य हतबुद्ध || काय चांगले, काय वाईट, मिडिया ला पाहिजे, फक्त बाईट || बुडाला एकदाचा, खामेनेई कातील, अमेरिका जगाचा पोलिस पाटील

भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

kvponkshe ·

ईंटरव्ह्युला चांगली तयारी करुन , चांगले फॉर्मल कपडे घालुन, वेळे आधीच पोचावे हे खरे , पण नाहीच सिलेक्शन झाले तर "है फिदा तो, आ xx नही तो तेरी xxx" म्हणुन पुढे जावे. माझ्या बाबतीत एका नामांकीत आय टी कंपनीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोझिशन साठी मुलाखती झाल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि ते मला तिथेच कळले होते. शेवटी मी कानाला खडा लावला की वडापावची गाडी टाकेन पण या कंपनीत नोकरी करणार किवा मागणार नाही.

विजुभाऊ Sun, 03/08/2026 - 17:42
मला एका इन्टर्व्ह्यू मधे फारच विचित्र अनुभव आला होता. मुलाखत घेणारा हा पक्का पुणेरी इसम होता. थेट मुलाखात होती. माझे आडनाव वाचून मी नोकरी कशाला करतो त्यापेक्षा बिझनेस का नाही करत असे थेट विचारले. या आडनावाच्या माणसाला नोकरी कशाला हवी असे बोलून अत्यंत कुजकट हसला. आणि मी तुम्हाला रीजेक्ट करतो आहे.असे सांगितले. त्या वेळेस कामाची खूपच गरज होती. म्हणून माज दाखवू शकलो नाही. पण इतके वर्षानंतर आजही मी त्या इसमाची तक्रार त्या एच आर कडे करायला हवी होती असे वाटते.

पाषाणभेद Mon, 03/09/2026 - 12:35
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो. त्यातही तो दिसतो कसा, बाह्यरूप कसे आहे, कपडे कसे आहेत या कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. (ते महत्वाचे असते पण अगदी गरजेचे नसते.) त्यातही भारतात आडनाव, नाव, जात, लिंग, धर्म, वर्ण इत्यादींना अवास्तव महत्व दिले जाते. जे काम आहे ते जर येत असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर ठिक असते. पण अगदी बेसीक प्रश्न अनुभवी उमेदवाराला विचारले जातात. अभ्यासबाह्य, कामाच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारतात. ट्रांन्सपरंट मुलाखत हवी असेल तर मुलाखत घेणारा, देणारा दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवा. उमेदवाराला टोकन नंबर द्या अन त्यानेच ओळखा. चेहेरा न दिसता, पाहता काही राऊंड घ्या अन मगच पुढे जा असे हवे. आयटीतल्या मुलाखतीत भयंकर अडवणूक होते.

In reply to by पाषाणभेद

कानडाऊ योगेशु Mon, 03/09/2026 - 20:27
बरोबर बोललात. मी गेली कित्येक वर्षे आय.टी क्षेत्रात काम करत आहे व इंटरव्यु टेबलच्या दोन्ही बाजुचा बराच अनुभव आहे. करिअरच्या सुरवातीला एका अगदीच साधारण कंपनीत निवड झाली होती व त्यावेळी तशी परिस्थिती असल्याने ती कंपनी जॉईन केली होती तिथे मिळालेला अनुभव अजुनही कामास येतो त्याविरूद्ध त्यानंतर त्याच कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर एका नामांकित कंपनीत इंटरव्यु देऊन निवड झाली होती तिथे काम तसे बरे होते पण राजकारण भरपूर असा प्रकार होता.तिथे जेमतेम १ वर्ष टिकलो. बरेच जण अश्या कंपनीत केवळ एच-१ विसासाठी काम करत होते. पुढे जेव्हा इंटरव्यु पॅनेल मध्ये उमेदवार निवडीसाठी बसु लागलो तिथे तर मुलाखतीत उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत अगदीच साधारण होते.नंतर नंतर केवळ कमीत कमी निकष पूर्ण करणार्या एक दोघांना टेक्निकल मध्ये जास्त खोलात न जाता निवडले तर ते तुलनेने चांगले काम करत होते असे आढळले.उत्कृष्ठ रिज्युमे असणारे उमेदवार कंपनीत जास्त दिवस टिकत नाहीत. बरेच जण त्यांच्या कंपनीत नोटीस पिरियड वर असतात व केवळ पॅकेज वाढवुन मिळावे म्हणुन त्याअवधीत वेगवेगळ्या कंपन्यात मुलाखती देतात. असे उमेदवार लगेल कळून येतात त्यांना बर्याच वेळेला वाटेला लावावे लागते. मुलाखत हा बर्याच वेळेला फार्सच असतो. मी ही एखादा उमेदवार जर कमीत कमी निकष पूर्ण करणारा असेल तर बाकीचे फॅक्टर्स पाहतो. (सौदेंडियन जसे स्वतःच्या लोकांना प्राथमिकता देतात तसाच प्रकार.)

In reply to by पाषाणभेद

अभ्यासबाह्य किंवा कामाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणे आणि त्यावरून निकाल देणे हे चूकच आहे परंतु अनुभवी उमेदवाराला बेसिक प्रश्न विचारायला हरकत नसावी. भले तो माणूस त्या विशिष्ट डोमेन मध्ये १० वर्ष कार्यरत असेल पण ग्राउंड लेवल ला काय होतं हे माहिती असलंच पाहिजे. हां, अनुभवी व्यक्तीला फक्त बेसिक प्रश्न विचारून लगेच ऑफर दिली तर मात्र बरोबर नाही.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या Wed, 03/11/2026 - 21:24
मला मात्र उलटा अनुभव आला होता. फार वर्षापुर्वी मुलाखत दीली होती. एक तर मी मुलाखतीला तयार नव्हतो कारण त्यांना ज्या कामासाठी माणूस हवा होता ते काम मी गेले वर्षभर केले नव्हते. पण त्यावेळी दुर्मीळ असलेले सर्टिफिकेशन मी केले होते. त्यामुळेच मी त्यांनी दोन दोन वेळा कॉल करुन मी तीसर्‍या वेळी तयार झालो. मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगुन टाकले की मी सर्टिफिकेशन केले आहे पण गेले एक वर्ष त्यावर अजिबात काम करायची संधी मिळालेली नाही. आणि तुम्ही एकदम डीप डाइव्ह करुन टेक्नीकल प्रश्न विचाराल ती मी उत्तरे देउ शकणार नाही. त्यांना कसेही करुन माणूस हवाच होता आणि त्यांना सर्टिफिकेशन वालाच हवा होता त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे आपण बघुया, येत नसेल तर तुम्हाला आठवत नाही असे समजू कारण तुम्हाला थेयरी येतेय हे सर्टिफिकेशन वरुन दिसतय. त्यांना बहुतेक माझे सर्टिफिकेट क्लायंट ला दाखवायचे होते. मुलाखतीच्या सुरवातीला त्यानी बेसीक प्रश्न विचारुन माझा पाया पक्का आहे याची खात्री करुन घेतली. नंतर हळू हळू डीप डाइव्ह करायला लागले. डीप डाइव्ह मधे मी उत्तर द्यायला वेळ लावतोय असे पाहिल्यावर ते चक्क मला हिंट देउन लागले. मुलाखत टेलीफोन वर चालु होती. त्यांनी हींट देउन देउन माझ्याकडून उत्तरे काढून घेतली. मला कळत नव्हते काय चालु आहे, प्रश्न विचारला जायचा आणि मी गप्प बसल्यावर दोन तीन हींट दिल्या जायच्या. मग मी अपेक्षित उत्तर देत होतो. शेवटी त्या तिन मुलाखत घेणार्‍यानी मला दोन दिवसात सिलेक्ट केलानी. माझे सर्टिफिकेट मागवुन घेतलानी. क्लायंट ला पाठवलानी. मी रुजु झालो आणि एक वर्ष काम केले. खुप काही शिकलो. नंतर विचारले की अशी कशी मुलाखत घेतली तुम्ही. मला तर काही येत नसताना तुम्ही मला सिलेक्ट पन केलात. ते म्हणाले की आम्ही तुझा बाकीचा रेजुमे पाहीला त्यात बरेच काही होते, तुझ्या पहील्या कंपनितल्या एच आर सोबत बोललो. चांग्ला फिडबैक मिळाला. आणि तू येत नसताना सरळ येत नाही म्हणून सांगत होतास ते खूप प्रामाणिक वाटले. खरे तर मला त्या कंपनीत जायची इच्छा नव्हती. पण भक्कम पगार वाढ मिळाली म्हणून गेलो. थोड्क्यात - उगाच द्यायची म्हणून मुलाखत द्यायची अशा ज्या ज्या मुलाखती मी बेफिकीरीने दिल्या त्यात उत्तीर्ण झालो. आणि जिथे खुप इच्छा होती आणि तयारी करुन बसलो तिथे अनुतीर्ण झालो. काही कंपन्या टेक्नीकल बघतात, काही जण अटिट्युड बघतात.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 12:36
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो.
. हे असे सरसकट नसते. मी मुलाखत घेण्याचेही काम केले आहे मुलाखत घेताना जॉब डिस्क्रिप्शन जे डी मधे जे लिहीलेले आहे त्या नुसार प्रश्नांचा रोख असावा लागतो. दुसरे म्हणजे कंपनीला कामासाठी उमेदवार हवा असतो. त्यामुले सरसकट रीजेक्ट केले जात नाही. कमीअधीक स्किल्स असतील तरी त्याचा विचार केला जातो. कंपन्याना शक्यतो लवकर जॉईन करेल असा उमेदवार हवा असतो. दुसरे म्हणजे बरेचदा हैदराबाद येथील उमेदवारांचा आनुभव अग्दी विचित्र आला आहे. यात सी व्ही मधे अनुभव वाढवून लिहीणे, खोटा ( न केलेला ) अनुभव लिहीणे. फोनकॉलवर मुलाखत असेल तर दुसर्‍याच कोणीतरी उत्तरे देणे. ( हे अगदी व्होडीओ कॉल मधेही केले जाते) . बरेचदा समाधान मुलाखती नंतरह उमेदवाराने जॉईन केल्या नंतर उमेदवाराला आवश्यक स्कील्स चे अत्यल्प ज्ञान आहे किंवा नाहीच असे आढळून आलेले आहे. बर्‍याच भारतीय कंपन्या बॅग्राऊंड चेक / व्हेरीफिकेशन चा आग्रह धरतात ते या साठीच.

हैद्राबाद मधुन बरेच फेक उमेदवार येत असल्याने आमच्याकडे तेथील उमेदवारांना फक्त ऑफिसमध्ये मुलाखतीला बोलावतात, व्हिडिओवर नाही. बाकी मी आतापर्यंत आय टी मध्ये शेकडो मुलाखती घेतल्या आहेत (प्रत्यक्ष आणि व्हिडिओ). पण उमेदवार रिजेक्ट करणे हा क्रायटेरिआ कधीच नसतो. रेझ्युम मधे जी टेक्नॉलॉजी लिहिलेय आणि जित्क्या वर्षाचा अनुभव दाखवलाय तेव्हढे येत आहे की नाही, संभाषण कौशल्य आहे की नाही हेच मी तरी बघतो. जात पात धर्म लिंग यांचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा पहिल्या काही मिनिटातच मुलाखतीचा रोख समजतो आणि उमेदवाराचा अंदाज येतो. पण कधी कधी मध्यातच मुलाखतीचा रोख पालटतो आणि ती ईंटरेस्टिंग किवा बोरिंग ही बनु शकते. कधी कंपनीला जास्त गरज असते, कधी उमेदवार लवकर रुजु होउ शकतो अशा कारणामुळे तडजोडही करावी लागते. मागे एकदा माझ्या प्रोजेक्ट मध्ये गरज होती म्हणुन मी लिंक्ड ईन वर पोस्ट केले तर ५०-६० रेझ्युम आले. ते रेक्रुटमेंट टीमला दिले. त्यातले बरेच त्यांच्या नियमात न बसल्याने रिजेक्ट झाले, उरलेल्यांमधील बरेच जण मुलाखतीत रिजेक्ट झाले. ४-५ ऑफर गेल्या आणि शेवटी त्यातील एकच जण जॉइन झाला.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 17:48
सध्या बर्‍याच आय टी कंपन्यात ९० दिवस नोटीस पिरीयड असतो. त्यामुळे उमेदवार बरेचदा एक इन्टरव्ह्यू घेऊन राजिनामा देतात. आणि आणखी एखादी नवी ऑफर येतेय का याची चाचपणी करतात. जास्त पगार मिळेल तेथे जॉईन करतात. वाईट म्हणजे ज्या कम्पनीने पहिली ऑफर दिली त्या कंपनीला तसे कळवायचे कष्टही घेत नाहीत. अर्थात एच आर जसे तुम्हाला रिजेक्ट केल्याचे कळवत नाहीत तसेच काहीसे हे.

In reply to by विजुभाऊ

कानडाऊ योगेशु Tue, 03/10/2026 - 18:02
एच.आर गमतीशीर प्रकरण आहे. बेंगलोरमधल्या एका नामांकित कंपनी १ वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा तिथल्या एका महिला एच.आर ने कोपच्यात घेऊन माझे बौध्दिक घेतले व असे एका वर्षानंतर कंपनी सोडणे मॉरली इथिकली राँग आहे वगैरे डोस पाजले.माझाही निर्णय डळमळीत होऊ लागला होता पण तिथे असलेले राजकारण इतके तीव्र होते कि तिथे जॉब कंटीन्यु करणे अशक्य होते. पुढे मी नोटीस पिरियड मध्ये असतानाच कळले कि ज्या एच.आर ने माझी भलामण केली होती तिने कंपनी सोडली होती म्हणजे ती बया जेव्हा मला मोरॅलिटीचे डोस पाजत होती तेव्हा ती स्वतःच नोटीस पिरियड मध्ये होती.

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 03/12/2026 - 07:11
मी चेन्नई ला काम करत असतानाची गोष्टं . 2 वर्षे काढल्यावर पुण्यात यायची खटपट चालू केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखत झाली, त्यांनी सिलेक्ट पण केलं पण नोटीस पिरियड च्या मुद्द्यांमध्ये माशी शिंकली. ती कंपनी 3 महिने थांबायला तयार नव्हती आणि चेन्नईची कंपनी लवकर सोडायला तयार नव्हती(बाय आऊट फक्त नावाला आहे असं सांगितलं). नाईलाजाने मी पुण्यातील कंपनीला परिस्थिती सांगितली तर तिकडचा एचआर मला म्हणे की तू ऍब्सकॉन्ड करून ये. त्याला म्हटलं ए बाबा, मला असलं काही जमणार नाही आणि मुळात मी 2 वर्ष झाली इकडे काम करतोय तर उगाच गालबोट नाही लावायचं माझ्या अनुभवाला. तर मला शिकवत बसला की, आमची कंपनी इतकी छान आहे की तू थेट निवृत्त होऊनच बाहेर जाशील, बाकी कुठे नोकरी करायचीच गरज नाही. तरी पण मी अडून बसलो म्हटल्यावर मला म्हणे उद्यापर्यंत विचार कर आणि मला सांग. दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला जमणार नाही तर ओके वगैरे काहीही ना म्हणता थेट फोन बंद करून टाकला. मजा म्हणजे मला त्या कंपनीकडून इतक्या वेळेला मुलाखतीसाठी बोलावलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होऊन निवड नाही झालेली :)

एकुलता एक डॉन Sat, 03/14/2026 - 08:37
माझ्या बाबतीत झाले होते धिंगाणा मध्ये 2012 मध्ये ऑफर होती मी 1 लाख तर ते 95 वर अडकून बसले शेवटी ceo- स्वतः कॉल केला आणि म्हणाला कि तुला कोण एवढा पगार देणार आहे आहे तिथेच शांत बसलो गुगल मध्ये

ईंटरव्ह्युला चांगली तयारी करुन , चांगले फॉर्मल कपडे घालुन, वेळे आधीच पोचावे हे खरे , पण नाहीच सिलेक्शन झाले तर "है फिदा तो, आ xx नही तो तेरी xxx" म्हणुन पुढे जावे. माझ्या बाबतीत एका नामांकीत आय टी कंपनीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोझिशन साठी मुलाखती झाल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि ते मला तिथेच कळले होते. शेवटी मी कानाला खडा लावला की वडापावची गाडी टाकेन पण या कंपनीत नोकरी करणार किवा मागणार नाही.

विजुभाऊ Sun, 03/08/2026 - 17:42
मला एका इन्टर्व्ह्यू मधे फारच विचित्र अनुभव आला होता. मुलाखत घेणारा हा पक्का पुणेरी इसम होता. थेट मुलाखात होती. माझे आडनाव वाचून मी नोकरी कशाला करतो त्यापेक्षा बिझनेस का नाही करत असे थेट विचारले. या आडनावाच्या माणसाला नोकरी कशाला हवी असे बोलून अत्यंत कुजकट हसला. आणि मी तुम्हाला रीजेक्ट करतो आहे.असे सांगितले. त्या वेळेस कामाची खूपच गरज होती. म्हणून माज दाखवू शकलो नाही. पण इतके वर्षानंतर आजही मी त्या इसमाची तक्रार त्या एच आर कडे करायला हवी होती असे वाटते.

पाषाणभेद Mon, 03/09/2026 - 12:35
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो. त्यातही तो दिसतो कसा, बाह्यरूप कसे आहे, कपडे कसे आहेत या कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. (ते महत्वाचे असते पण अगदी गरजेचे नसते.) त्यातही भारतात आडनाव, नाव, जात, लिंग, धर्म, वर्ण इत्यादींना अवास्तव महत्व दिले जाते. जे काम आहे ते जर येत असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर ठिक असते. पण अगदी बेसीक प्रश्न अनुभवी उमेदवाराला विचारले जातात. अभ्यासबाह्य, कामाच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारतात. ट्रांन्सपरंट मुलाखत हवी असेल तर मुलाखत घेणारा, देणारा दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवा. उमेदवाराला टोकन नंबर द्या अन त्यानेच ओळखा. चेहेरा न दिसता, पाहता काही राऊंड घ्या अन मगच पुढे जा असे हवे. आयटीतल्या मुलाखतीत भयंकर अडवणूक होते.

In reply to by पाषाणभेद

कानडाऊ योगेशु Mon, 03/09/2026 - 20:27
बरोबर बोललात. मी गेली कित्येक वर्षे आय.टी क्षेत्रात काम करत आहे व इंटरव्यु टेबलच्या दोन्ही बाजुचा बराच अनुभव आहे. करिअरच्या सुरवातीला एका अगदीच साधारण कंपनीत निवड झाली होती व त्यावेळी तशी परिस्थिती असल्याने ती कंपनी जॉईन केली होती तिथे मिळालेला अनुभव अजुनही कामास येतो त्याविरूद्ध त्यानंतर त्याच कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर एका नामांकित कंपनीत इंटरव्यु देऊन निवड झाली होती तिथे काम तसे बरे होते पण राजकारण भरपूर असा प्रकार होता.तिथे जेमतेम १ वर्ष टिकलो. बरेच जण अश्या कंपनीत केवळ एच-१ विसासाठी काम करत होते. पुढे जेव्हा इंटरव्यु पॅनेल मध्ये उमेदवार निवडीसाठी बसु लागलो तिथे तर मुलाखतीत उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत अगदीच साधारण होते.नंतर नंतर केवळ कमीत कमी निकष पूर्ण करणार्या एक दोघांना टेक्निकल मध्ये जास्त खोलात न जाता निवडले तर ते तुलनेने चांगले काम करत होते असे आढळले.उत्कृष्ठ रिज्युमे असणारे उमेदवार कंपनीत जास्त दिवस टिकत नाहीत. बरेच जण त्यांच्या कंपनीत नोटीस पिरियड वर असतात व केवळ पॅकेज वाढवुन मिळावे म्हणुन त्याअवधीत वेगवेगळ्या कंपन्यात मुलाखती देतात. असे उमेदवार लगेल कळून येतात त्यांना बर्याच वेळेला वाटेला लावावे लागते. मुलाखत हा बर्याच वेळेला फार्सच असतो. मी ही एखादा उमेदवार जर कमीत कमी निकष पूर्ण करणारा असेल तर बाकीचे फॅक्टर्स पाहतो. (सौदेंडियन जसे स्वतःच्या लोकांना प्राथमिकता देतात तसाच प्रकार.)

In reply to by पाषाणभेद

अभ्यासबाह्य किंवा कामाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणे आणि त्यावरून निकाल देणे हे चूकच आहे परंतु अनुभवी उमेदवाराला बेसिक प्रश्न विचारायला हरकत नसावी. भले तो माणूस त्या विशिष्ट डोमेन मध्ये १० वर्ष कार्यरत असेल पण ग्राउंड लेवल ला काय होतं हे माहिती असलंच पाहिजे. हां, अनुभवी व्यक्तीला फक्त बेसिक प्रश्न विचारून लगेच ऑफर दिली तर मात्र बरोबर नाही.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या Wed, 03/11/2026 - 21:24
मला मात्र उलटा अनुभव आला होता. फार वर्षापुर्वी मुलाखत दीली होती. एक तर मी मुलाखतीला तयार नव्हतो कारण त्यांना ज्या कामासाठी माणूस हवा होता ते काम मी गेले वर्षभर केले नव्हते. पण त्यावेळी दुर्मीळ असलेले सर्टिफिकेशन मी केले होते. त्यामुळेच मी त्यांनी दोन दोन वेळा कॉल करुन मी तीसर्‍या वेळी तयार झालो. मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगुन टाकले की मी सर्टिफिकेशन केले आहे पण गेले एक वर्ष त्यावर अजिबात काम करायची संधी मिळालेली नाही. आणि तुम्ही एकदम डीप डाइव्ह करुन टेक्नीकल प्रश्न विचाराल ती मी उत्तरे देउ शकणार नाही. त्यांना कसेही करुन माणूस हवाच होता आणि त्यांना सर्टिफिकेशन वालाच हवा होता त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे आपण बघुया, येत नसेल तर तुम्हाला आठवत नाही असे समजू कारण तुम्हाला थेयरी येतेय हे सर्टिफिकेशन वरुन दिसतय. त्यांना बहुतेक माझे सर्टिफिकेट क्लायंट ला दाखवायचे होते. मुलाखतीच्या सुरवातीला त्यानी बेसीक प्रश्न विचारुन माझा पाया पक्का आहे याची खात्री करुन घेतली. नंतर हळू हळू डीप डाइव्ह करायला लागले. डीप डाइव्ह मधे मी उत्तर द्यायला वेळ लावतोय असे पाहिल्यावर ते चक्क मला हिंट देउन लागले. मुलाखत टेलीफोन वर चालु होती. त्यांनी हींट देउन देउन माझ्याकडून उत्तरे काढून घेतली. मला कळत नव्हते काय चालु आहे, प्रश्न विचारला जायचा आणि मी गप्प बसल्यावर दोन तीन हींट दिल्या जायच्या. मग मी अपेक्षित उत्तर देत होतो. शेवटी त्या तिन मुलाखत घेणार्‍यानी मला दोन दिवसात सिलेक्ट केलानी. माझे सर्टिफिकेट मागवुन घेतलानी. क्लायंट ला पाठवलानी. मी रुजु झालो आणि एक वर्ष काम केले. खुप काही शिकलो. नंतर विचारले की अशी कशी मुलाखत घेतली तुम्ही. मला तर काही येत नसताना तुम्ही मला सिलेक्ट पन केलात. ते म्हणाले की आम्ही तुझा बाकीचा रेजुमे पाहीला त्यात बरेच काही होते, तुझ्या पहील्या कंपनितल्या एच आर सोबत बोललो. चांग्ला फिडबैक मिळाला. आणि तू येत नसताना सरळ येत नाही म्हणून सांगत होतास ते खूप प्रामाणिक वाटले. खरे तर मला त्या कंपनीत जायची इच्छा नव्हती. पण भक्कम पगार वाढ मिळाली म्हणून गेलो. थोड्क्यात - उगाच द्यायची म्हणून मुलाखत द्यायची अशा ज्या ज्या मुलाखती मी बेफिकीरीने दिल्या त्यात उत्तीर्ण झालो. आणि जिथे खुप इच्छा होती आणि तयारी करुन बसलो तिथे अनुतीर्ण झालो. काही कंपन्या टेक्नीकल बघतात, काही जण अटिट्युड बघतात.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 12:36
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो.
. हे असे सरसकट नसते. मी मुलाखत घेण्याचेही काम केले आहे मुलाखत घेताना जॉब डिस्क्रिप्शन जे डी मधे जे लिहीलेले आहे त्या नुसार प्रश्नांचा रोख असावा लागतो. दुसरे म्हणजे कंपनीला कामासाठी उमेदवार हवा असतो. त्यामुले सरसकट रीजेक्ट केले जात नाही. कमीअधीक स्किल्स असतील तरी त्याचा विचार केला जातो. कंपन्याना शक्यतो लवकर जॉईन करेल असा उमेदवार हवा असतो. दुसरे म्हणजे बरेचदा हैदराबाद येथील उमेदवारांचा आनुभव अग्दी विचित्र आला आहे. यात सी व्ही मधे अनुभव वाढवून लिहीणे, खोटा ( न केलेला ) अनुभव लिहीणे. फोनकॉलवर मुलाखत असेल तर दुसर्‍याच कोणीतरी उत्तरे देणे. ( हे अगदी व्होडीओ कॉल मधेही केले जाते) . बरेचदा समाधान मुलाखती नंतरह उमेदवाराने जॉईन केल्या नंतर उमेदवाराला आवश्यक स्कील्स चे अत्यल्प ज्ञान आहे किंवा नाहीच असे आढळून आलेले आहे. बर्‍याच भारतीय कंपन्या बॅग्राऊंड चेक / व्हेरीफिकेशन चा आग्रह धरतात ते या साठीच.

हैद्राबाद मधुन बरेच फेक उमेदवार येत असल्याने आमच्याकडे तेथील उमेदवारांना फक्त ऑफिसमध्ये मुलाखतीला बोलावतात, व्हिडिओवर नाही. बाकी मी आतापर्यंत आय टी मध्ये शेकडो मुलाखती घेतल्या आहेत (प्रत्यक्ष आणि व्हिडिओ). पण उमेदवार रिजेक्ट करणे हा क्रायटेरिआ कधीच नसतो. रेझ्युम मधे जी टेक्नॉलॉजी लिहिलेय आणि जित्क्या वर्षाचा अनुभव दाखवलाय तेव्हढे येत आहे की नाही, संभाषण कौशल्य आहे की नाही हेच मी तरी बघतो. जात पात धर्म लिंग यांचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा पहिल्या काही मिनिटातच मुलाखतीचा रोख समजतो आणि उमेदवाराचा अंदाज येतो. पण कधी कधी मध्यातच मुलाखतीचा रोख पालटतो आणि ती ईंटरेस्टिंग किवा बोरिंग ही बनु शकते. कधी कंपनीला जास्त गरज असते, कधी उमेदवार लवकर रुजु होउ शकतो अशा कारणामुळे तडजोडही करावी लागते. मागे एकदा माझ्या प्रोजेक्ट मध्ये गरज होती म्हणुन मी लिंक्ड ईन वर पोस्ट केले तर ५०-६० रेझ्युम आले. ते रेक्रुटमेंट टीमला दिले. त्यातले बरेच त्यांच्या नियमात न बसल्याने रिजेक्ट झाले, उरलेल्यांमधील बरेच जण मुलाखतीत रिजेक्ट झाले. ४-५ ऑफर गेल्या आणि शेवटी त्यातील एकच जण जॉइन झाला.

विजुभाऊ Tue, 03/10/2026 - 17:48
सध्या बर्‍याच आय टी कंपन्यात ९० दिवस नोटीस पिरीयड असतो. त्यामुळे उमेदवार बरेचदा एक इन्टरव्ह्यू घेऊन राजिनामा देतात. आणि आणखी एखादी नवी ऑफर येतेय का याची चाचपणी करतात. जास्त पगार मिळेल तेथे जॉईन करतात. वाईट म्हणजे ज्या कम्पनीने पहिली ऑफर दिली त्या कंपनीला तसे कळवायचे कष्टही घेत नाहीत. अर्थात एच आर जसे तुम्हाला रिजेक्ट केल्याचे कळवत नाहीत तसेच काहीसे हे.

In reply to by विजुभाऊ

कानडाऊ योगेशु Tue, 03/10/2026 - 18:02
एच.आर गमतीशीर प्रकरण आहे. बेंगलोरमधल्या एका नामांकित कंपनी १ वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा तिथल्या एका महिला एच.आर ने कोपच्यात घेऊन माझे बौध्दिक घेतले व असे एका वर्षानंतर कंपनी सोडणे मॉरली इथिकली राँग आहे वगैरे डोस पाजले.माझाही निर्णय डळमळीत होऊ लागला होता पण तिथे असलेले राजकारण इतके तीव्र होते कि तिथे जॉब कंटीन्यु करणे अशक्य होते. पुढे मी नोटीस पिरियड मध्ये असतानाच कळले कि ज्या एच.आर ने माझी भलामण केली होती तिने कंपनी सोडली होती म्हणजे ती बया जेव्हा मला मोरॅलिटीचे डोस पाजत होती तेव्हा ती स्वतःच नोटीस पिरियड मध्ये होती.

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 03/12/2026 - 07:11
मी चेन्नई ला काम करत असतानाची गोष्टं . 2 वर्षे काढल्यावर पुण्यात यायची खटपट चालू केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखत झाली, त्यांनी सिलेक्ट पण केलं पण नोटीस पिरियड च्या मुद्द्यांमध्ये माशी शिंकली. ती कंपनी 3 महिने थांबायला तयार नव्हती आणि चेन्नईची कंपनी लवकर सोडायला तयार नव्हती(बाय आऊट फक्त नावाला आहे असं सांगितलं). नाईलाजाने मी पुण्यातील कंपनीला परिस्थिती सांगितली तर तिकडचा एचआर मला म्हणे की तू ऍब्सकॉन्ड करून ये. त्याला म्हटलं ए बाबा, मला असलं काही जमणार नाही आणि मुळात मी 2 वर्ष झाली इकडे काम करतोय तर उगाच गालबोट नाही लावायचं माझ्या अनुभवाला. तर मला शिकवत बसला की, आमची कंपनी इतकी छान आहे की तू थेट निवृत्त होऊनच बाहेर जाशील, बाकी कुठे नोकरी करायचीच गरज नाही. तरी पण मी अडून बसलो म्हटल्यावर मला म्हणे उद्यापर्यंत विचार कर आणि मला सांग. दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला जमणार नाही तर ओके वगैरे काहीही ना म्हणता थेट फोन बंद करून टाकला. मजा म्हणजे मला त्या कंपनीकडून इतक्या वेळेला मुलाखतीसाठी बोलावलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होऊन निवड नाही झालेली :)

एकुलता एक डॉन Sat, 03/14/2026 - 08:37
माझ्या बाबतीत झाले होते धिंगाणा मध्ये 2012 मध्ये ऑफर होती मी 1 लाख तर ते 95 वर अडकून बसले शेवटी ceo- स्वतः कॉल केला आणि म्हणाला कि तुला कोण एवढा पगार देणार आहे आहे तिथेच शांत बसलो गुगल मध्ये
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग ३ - इंटरव्ह्यू चे काही अनुभव ! अनुभव १: साधारण १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच CISSP ही सायबर सेक्युरिटी मधील अत्यंत मानाची मानली जाणारी परीक्षा पास झालो होतो. मग एका ओपनिंग साठी एका मल्टी नॅशनल कंपनीत माझा एक इंटरव्ह्यू झालेला. पोझीशन मिड मॅनॅजमेण्ट ची होती. मी अगदी वेळेच्या आधी त्या कंपनीत पोहोचलो. अजून एक दोन जण होते. ते बहुदा बिग ४ मधून आलेले असावेत. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. मुलाखत घेणारे पॅनल ३ का चार जणांचे होते. मी आत जाताच त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेतून पहिले, आणि काही क्षण माझ्याकडे पाहून मग मला बसायला सांगितले. इंटरव्ह्यू झाला. चांगला म्हणता येईल असा गेला.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ ध्वज मंदिराची रमणीय पायवाट ✪ धुक्याचा समुद्र आणि पर्वतांची रांग ✪ उतरताना नवीन वाटेचा अनुभव ✪ गावातल्या लोकांसोबत संवाद ✪ सत्गड़मधून आकाश दर्शनाची शेवटची रात्र ✪ पहाड़ाचा निरोप घेण्याचा कठिण प्रसंग १० डिसेंबर! सत्गड़! अगदी स्वप्नातलं टुमदार गाव! रात्रीप्रमाणेच पहाटेही आकाश सुंदर आहे! पहाटे सप्तर्षी पूर्ण उगवून किंचित पश्चिमेला झुकलेलेही दिसत आहेत! आज सत्गड़मधला शेवटचा दिवस. आज दुपारी भाचा- आदित्य शाळेतून आल्यावर त्याच्यासोबत ध्वज मंदिराचा ट्रेक करणार आहे. पण सकाळीसुद्धा फिरावसं वाटलं. सत्गड़मध्ये कुठेही फिरताना ट्रेकिंग होतंच!

गालावरी लाली नभाची.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
गालावरी लाली नभाची ओठावरी मधाळ शब्द या काजळी केसात तुझिया माझे गुंतले प्रारब्ध. घेती चुंबन सागर लाटा वाळूवरच्या पाऊल खुणा स्पर्श करण्या पिसाट वारा हा येई धावत पुन्हा पुन्हा पाहून तुजला या नभाचे तारे अता हे झाले बेधुंद. तू असता बघ बहर फुलांना तू नसताना विराण जसे माझ्या क्षणा क्षणा वरती आता तुझे उमटले ठसे वाटे मला आता तुझीया सहवासात अपार आनंद. काचवटी ही तुझी कंकणे खणखण करुनी गाती गाणे शुध्द रुपेरी तुझी पैंजणे सूर छेडूनी करी दिवाणे येथे तुला मी पाहुनी आता का होतोसे निशब्द. https://youtu.be/W8HVgfbmvvU

राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा दिवस उदयपुरच्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली.

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

आकाश खोत ·

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 

अरे वा. मस्तच. उदयपूर आणि चित्तोडगड एकदम मस्त भाग आहे. चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत. राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही. बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते. kachori kachori उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात. उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही. आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही. एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाश खोत Wed, 03/04/2026 - 13:07
धन्यवाद. खरं आहे. इतिहासाबद्दल थोडी माहिती आधी असेल तर ती जागा बघण्यात आणखी रस येतो.  इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. 
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली. मराठी पर्यटक चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या.

राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ. यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं.

एका रेषेत सहा ग्रह?

मार्गी ·

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर Sat, 03/07/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी Sat, 03/07/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर Sat, 03/07/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी Sat, 03/07/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती ✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील? ✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल ✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील ✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश ✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो? ✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल ✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया.