मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐकार ·

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय गुरुवार, 12/20/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय गुरुवार, 12/20/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु Fri, 12/21/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.
3

बोलीभाषेची गोडी

धोंडोपंत ·

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:59
फारच उत्तम विषय. मला चटकन सुचलेला एक विचार म्हणजे भाषा -विशेषतः बोलीभाषा ही एक सतत बदलणारी गोष्ट आहे. दशकामागून दशके उलटतात तसे रोजचे वापरातील शब्द बदलतात. काही शब्द "एक्सिंक्ट" होतात. माजघराचे दर्शन आज जिथे दुर्मिळ , तिथे त्या शब्दामधून प्रतीत होणार्‍या ओलाव्याचा अनुभव घेऊ शकणार्‍या व्यक्ति दिवसागणिक कमी होणार हे खरेच. नवे यायचे आणि त्याने जुन्याची जागा घ्यायची हे इतर गोष्टींप्रमाणे बोलीभाषेच्या बाबतीतही होणार.

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 11:40
धोंड्या, उत्तम विषय मांडलास. आम्ही पहिल्यापासूनच बोलीभाषेचे समर्थक आहोत. काही ठिकाणी छापील, पुसतकी भाषा वापरणे भाग असते याची आम्हाला कल्पना आहे, परंतु बोलीभाषेचा गोडवा काही औरच! पडवी, ओटी, अंगण, माजघर, माडी (घरातली!), वाडी इत्यादी शब्द आपल्या कोकणात नेहमीच्या वापरातले. कोकणी बोलीभाषेत इतरही काही अस्सल शब्द आहेत तेही हळूहळू इथे येऊ द्यात. मीही देण्याचा प्रयत्न करीन. कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! जनावर - म्हणजे साधारणपणे कोणताही प्राणी. (माणूस सोडून! अर्थात, काही माणसं जनावरासारखंही वागताना आपण पाहतो तो भाग निराळा!) परंतु कोकणी बोलीभाषेत सापाकरता, नागाकरता 'जनावर' हाच शब्द सर्रास वापरला जातो. आंगण्यातून (कोकणात बोलीभाषेत 'अंगणातून' असं सहसा म्हणत नाहीत,), आंब्यापोफळीतून साप किंवा नाग सरपटत जाताना कुणी पाहिला की पटकन 'तिथे साप आहे हो!' असं न म्हणता, 'तिथे जनावर आहे हो, सांभाळा!' असं म्हणतात! :) मुंबईपुण्यात ज्याला शहाळं म्हणतात त्याला आमच्या देवगडात 'असोला' म्हणतात. 'रांडेचा भिक्कंभट ना, शिंचे २१ रुप्ये (रुपये नव्हे!) आणि एक असोला दिला की झक्कत पूजा सांगायला येईल!' असं म्हणतात! :) असो, कोकणी बोलीभाषेतल्या शिव्यांबद्दल आम्ही काही बोलत नाही कारण आधीच आम्ही शिवराळ म्हणून प्रसिद्ध आहोत. नाहीतर गंमतीत म्हणून आमच्या वेलणकरलाशेठला प्रेमाने रांडेची एखादी शिवी द्यायला जायचो आणि आमच्या मनोगती मैतरांचा पुन्हा एकदा राग ओढवून घ्यायचो! :) मिपावर इतरही काही प्रांतातली मंडळी आहेत (देश, विदर्भ, मराठवाडा) त्यांनीही या चर्चेत सहभागी होऊन आपापल्या प्रांतातले बोलीभाषेतले खास खास शब्द इथे आम्हा सर्वांना माहीत करून द्यावेत ही विनंती! धोंड्या, तुझ्या त्या चरवीच्या दुधाची आणि म्हातारीची कथा इथे सांग रे! :) आपला, (बोलघेवडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:23
शहाळ्याच्या आतील खोबरे कोवळे असते. असोल्यातील जून. देठ किती वाळला आहे इ. बाबीवरून गावातील मंडळी तो नारळ आहे की शहाळे हे ओळखतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 19:14
पंत, हा विषय कधीही न संपणारा आहे, आपला चर्चा प्रस्ताव आम्हाला आवडला. खरे तर आमच्या मराठवाड्याला एक बोली नाही, असे आमचे वयक्तिक मत आहे. त्याचे कारण असे असावे, की इथे मात्र वेगवेगळ्या बोली एकत्र झालेल्या दिसतात तरीही बोलतांना एक वेगळा ताल, लय मराठवाड्याच्या भाषेत दिसते. भाषेच्या प्रमुख बोली पुढील प्रमाणे मानतात. त्या अंगाने चर्चा पुढे जावी, असे वाटते. १) कोकणी २)व-हाडी ३) डांगी ४) अहिराणी ५) हळबी ( पण त्याचे बोली भाषेतील शब्द कोणते सांगता येणार नाही बॉ आम्हाला ) कोकणी ही मराठीची प्रमुख बोली आहे, ( असे मानत असलो तरी, ती मराठीची बोली नाही. असेही एक मत आमच्या वाचनात आहे. ) असेच आम्ही माननारे आहोत. उत्तर कोकणी आणि दक्षिण कोकणी असे प्रकार आहेत म्हणतात.आता त्या शब्दात होणारे बदल तर कोकणी बोलणा-यांनीच इथे टंकले पाहिजेत. कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतात, कोणत्या शब्दांचा लोप होतो........वगैरे इत्यादी :) राहण्याची खोली = कुड थट्टा = फकाणा असे किती तरी शब्द आहेत. जे प्रमाणभाषेत दिसत नाही. तिकडेच कुठेतरे कुडाळी भाषाही बोलली जाते म्हणतात. व-हाडीत बोलतांना बापाला = बापाले, मले = मला, मानसाले = मानसाला , माणसांना= माणसाईले, काय= काव्हून, काम्हून ( काम्हून मराठवाड्यात बोलतात) रांग = कतार आणि इत्यादी. अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. डांगी बोली तंबाकू = ताम्बोका, महिना=मिहिना, लसून= लोसुन्ड इत्यादी. असे बरेच बोली भाषेतील गोडवा असणारे अनेक शब्द अनेकांना माहित असतील. त्या त्या विभागातील माणसांनी आपापल्या बोलीतील इथे शब्द दिले तर या चर्चेत अधिक मजा येईल असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:53
बहिणाबाईंच्या कविता वाचताना अहिराणी (अहिराणीच ना ?) भाषेतले पहिल्यांदा भेटले असे आठवते. फार छान अनुभव होता तो. मराठवाड्याकडचे अजून शब्द येऊ द्यात !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:21
बिरुटेसाहेब, सुंदर प्रतिसाद. आपल्या व्यासंगाला दाद देतो! अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. अहिराणी भाषेबद्दल अधिक लिहा. मला ही भाषा फार आवडते. खूप छान नादमाधुर्य आहे या भाषेत! डांगीसुद्धा कानाला गोड लागली! :) आपला, (अहिराणीप्रेमी) तात्या.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:49
>>>>>कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा >>>>>>म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:42
तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ? असेच वाटते! अर्थात, अद्याप ती कादंबरी मी वाचलेली नाही. वाचल्यास पटकन संदर्भ लागेल... तात्या.

धोंडोपंत Fri, 12/21/2007 - 11:46
चर्चा फार चांगली चालली आहे. प्राध्यापक साहेब, आपण म्हणता त्या प्रमाणे कोकणीचे उत्तर आणि दक्षिण प्रकार आहेत. उत्तरेकडे मराठी शब्द जास्त आहेत तर दक्षिण कोकणीत कानडी शब्दांचा भरणा अधिक आहे. तीच पुढे उत्तरेकडे आल्यावर मालवणी होते. रत्नागिरी जिल्ह्यात केलंनीत, सांगितलंनीत ह्याप्रकारे क्रियापदे वापरली जातात. तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:59
फारच उत्तम विषय. मला चटकन सुचलेला एक विचार म्हणजे भाषा -विशेषतः बोलीभाषा ही एक सतत बदलणारी गोष्ट आहे. दशकामागून दशके उलटतात तसे रोजचे वापरातील शब्द बदलतात. काही शब्द "एक्सिंक्ट" होतात. माजघराचे दर्शन आज जिथे दुर्मिळ , तिथे त्या शब्दामधून प्रतीत होणार्‍या ओलाव्याचा अनुभव घेऊ शकणार्‍या व्यक्ति दिवसागणिक कमी होणार हे खरेच. नवे यायचे आणि त्याने जुन्याची जागा घ्यायची हे इतर गोष्टींप्रमाणे बोलीभाषेच्या बाबतीतही होणार.

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 11:40
धोंड्या, उत्तम विषय मांडलास. आम्ही पहिल्यापासूनच बोलीभाषेचे समर्थक आहोत. काही ठिकाणी छापील, पुसतकी भाषा वापरणे भाग असते याची आम्हाला कल्पना आहे, परंतु बोलीभाषेचा गोडवा काही औरच! पडवी, ओटी, अंगण, माजघर, माडी (घरातली!), वाडी इत्यादी शब्द आपल्या कोकणात नेहमीच्या वापरातले. कोकणी बोलीभाषेत इतरही काही अस्सल शब्द आहेत तेही हळूहळू इथे येऊ द्यात. मीही देण्याचा प्रयत्न करीन. कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! जनावर - म्हणजे साधारणपणे कोणताही प्राणी. (माणूस सोडून! अर्थात, काही माणसं जनावरासारखंही वागताना आपण पाहतो तो भाग निराळा!) परंतु कोकणी बोलीभाषेत सापाकरता, नागाकरता 'जनावर' हाच शब्द सर्रास वापरला जातो. आंगण्यातून (कोकणात बोलीभाषेत 'अंगणातून' असं सहसा म्हणत नाहीत,), आंब्यापोफळीतून साप किंवा नाग सरपटत जाताना कुणी पाहिला की पटकन 'तिथे साप आहे हो!' असं न म्हणता, 'तिथे जनावर आहे हो, सांभाळा!' असं म्हणतात! :) मुंबईपुण्यात ज्याला शहाळं म्हणतात त्याला आमच्या देवगडात 'असोला' म्हणतात. 'रांडेचा भिक्कंभट ना, शिंचे २१ रुप्ये (रुपये नव्हे!) आणि एक असोला दिला की झक्कत पूजा सांगायला येईल!' असं म्हणतात! :) असो, कोकणी बोलीभाषेतल्या शिव्यांबद्दल आम्ही काही बोलत नाही कारण आधीच आम्ही शिवराळ म्हणून प्रसिद्ध आहोत. नाहीतर गंमतीत म्हणून आमच्या वेलणकरलाशेठला प्रेमाने रांडेची एखादी शिवी द्यायला जायचो आणि आमच्या मनोगती मैतरांचा पुन्हा एकदा राग ओढवून घ्यायचो! :) मिपावर इतरही काही प्रांतातली मंडळी आहेत (देश, विदर्भ, मराठवाडा) त्यांनीही या चर्चेत सहभागी होऊन आपापल्या प्रांतातले बोलीभाषेतले खास खास शब्द इथे आम्हा सर्वांना माहीत करून द्यावेत ही विनंती! धोंड्या, तुझ्या त्या चरवीच्या दुधाची आणि म्हातारीची कथा इथे सांग रे! :) आपला, (बोलघेवडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 20:23
शहाळ्याच्या आतील खोबरे कोवळे असते. असोल्यातील जून. देठ किती वाळला आहे इ. बाबीवरून गावातील मंडळी तो नारळ आहे की शहाळे हे ओळखतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2007 - 19:14
पंत, हा विषय कधीही न संपणारा आहे, आपला चर्चा प्रस्ताव आम्हाला आवडला. खरे तर आमच्या मराठवाड्याला एक बोली नाही, असे आमचे वयक्तिक मत आहे. त्याचे कारण असे असावे, की इथे मात्र वेगवेगळ्या बोली एकत्र झालेल्या दिसतात तरीही बोलतांना एक वेगळा ताल, लय मराठवाड्याच्या भाषेत दिसते. भाषेच्या प्रमुख बोली पुढील प्रमाणे मानतात. त्या अंगाने चर्चा पुढे जावी, असे वाटते. १) कोकणी २)व-हाडी ३) डांगी ४) अहिराणी ५) हळबी ( पण त्याचे बोली भाषेतील शब्द कोणते सांगता येणार नाही बॉ आम्हाला ) कोकणी ही मराठीची प्रमुख बोली आहे, ( असे मानत असलो तरी, ती मराठीची बोली नाही. असेही एक मत आमच्या वाचनात आहे. ) असेच आम्ही माननारे आहोत. उत्तर कोकणी आणि दक्षिण कोकणी असे प्रकार आहेत म्हणतात.आता त्या शब्दात होणारे बदल तर कोकणी बोलणा-यांनीच इथे टंकले पाहिजेत. कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतात, कोणत्या शब्दांचा लोप होतो........वगैरे इत्यादी :) राहण्याची खोली = कुड थट्टा = फकाणा असे किती तरी शब्द आहेत. जे प्रमाणभाषेत दिसत नाही. तिकडेच कुठेतरे कुडाळी भाषाही बोलली जाते म्हणतात. व-हाडीत बोलतांना बापाला = बापाले, मले = मला, मानसाले = मानसाला , माणसांना= माणसाईले, काय= काव्हून, काम्हून ( काम्हून मराठवाड्यात बोलतात) रांग = कतार आणि इत्यादी. अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. डांगी बोली तंबाकू = ताम्बोका, महिना=मिहिना, लसून= लोसुन्ड इत्यादी. असे बरेच बोली भाषेतील गोडवा असणारे अनेक शब्द अनेकांना माहित असतील. त्या त्या विभागातील माणसांनी आपापल्या बोलीतील इथे शब्द दिले तर या चर्चेत अधिक मजा येईल असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:53
बहिणाबाईंच्या कविता वाचताना अहिराणी (अहिराणीच ना ?) भाषेतले पहिल्यांदा भेटले असे आठवते. फार छान अनुभव होता तो. मराठवाड्याकडचे अजून शब्द येऊ द्यात !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:21
बिरुटेसाहेब, सुंदर प्रतिसाद. आपल्या व्यासंगाला दाद देतो! अहिराणी भाषेत सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी. अहिराणी भाषेबद्दल अधिक लिहा. मला ही भाषा फार आवडते. खूप छान नादमाधुर्य आहे या भाषेत! डांगीसुद्धा कानाला गोड लागली! :) आपला, (अहिराणीप्रेमी) तात्या.

मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 20:49
>>>>>कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा >>>>>>म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो! तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:42
तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ? असेच वाटते! अर्थात, अद्याप ती कादंबरी मी वाचलेली नाही. वाचल्यास पटकन संदर्भ लागेल... तात्या.

धोंडोपंत Fri, 12/21/2007 - 11:46
चर्चा फार चांगली चालली आहे. प्राध्यापक साहेब, आपण म्हणता त्या प्रमाणे कोकणीचे उत्तर आणि दक्षिण प्रकार आहेत. उत्तरेकडे मराठी शब्द जास्त आहेत तर दक्षिण कोकणीत कानडी शब्दांचा भरणा अधिक आहे. तीच पुढे उत्तरेकडे आल्यावर मालवणी होते. रत्नागिरी जिल्ह्यात केलंनीत, सांगितलंनीत ह्याप्रकारे क्रियापदे वापरली जातात. तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
लोकहो !!! मागे श्री. नामदेव ढसाळ यांच्यावरील लेखनाच्या अभिप्रायात "गोलपिठा' हा मैलाचा दगड या शब्दावरून काही चर्चा झाली. आता मैलाचे अंतर कोणी वापरत नाही आता किलोमीटर आले. त्यामुळे मैलाचा दगड हा शब्द टाकाऊ झाला आहे असा सूर तिथे दिसला. लोकहो, एक लक्षात घ्या की भाषेला सौंदर्य हे परंपरेनुसार येत असते. सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा असते. ती खरी सुंदर असते. कारण ती थेट माणसाच्या हृदयातून आलेली असते. तिला मेकअप केलेला नसतो. त्यामुळे काही वस्तूंची परिमाणे काळानुसार बदलली तरी भाषेने स्विकारलेले शब्द अत्यंत शुद्ध स्वरूपात राहतात.

हात तुझा हातात......

अगस्ती ·

विसोबा खेचर Wed, 12/19/2007 - 22:12
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला वा अगस्ती महाराज! फारच सुरेख. वरील ओळी विशेष भावल्या... -- तात्या.

सर्किट Wed, 12/19/2007 - 23:10
अगस्ती, कविता आवडली. नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या येथे कारा म्हणजे काय ? किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला ही द्विपदी खूप आवडली. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Wed, 12/19/2007 - 23:38
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला कविवर्य, गझल फार आवडली. सर्कीटकाका, कारा = तुरुंग; कुंपण कारा = कुंपणासारखी कारा ; कुंपणरूपी कारा ; कुंपण किंवा/आणि कोणत्याही प्रकारचे बंधन या अर्थी? (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु गुरुवार, 12/20/2007 - 00:09
अतिशय सुंदर आहे गझल... खूप आवडली.. खास करून खालील ओळी, किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला आणखीही येऊद्यात अशाच एकापेक्षा एक सरस गझला... -प्राजु.

नंदन गुरुवार, 12/20/2007 - 06:00
गझल. शेवटच्या द्विपदी विशेष आवडल्या. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

ध्रुव गुरुवार, 12/20/2007 - 11:38
फार सुरेख कविता... अजुनही येऊद्यत!!! -- ध्रुव

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 17:34
अगस्तीशेठ, बर्‍याच दिवसांनी आपली सुंदर कविता वाचायला मिळाली... कविता आवडली..अशीच वरचे वर हजेरी लावत रहा हि विनंती. आमचा दुसरा प्रतिसादइथे वाचा केशवसुमार

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:52
गझल आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अगस्ती शेवटून दुसरा शेर नीट वाचावा. वर वर जरी तो इश्किया वाटला तरी त्यात खूप खोल अर्थ आहे. ते मृत्यूला केलेले आवाहन आहे. अगस्ती

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:46
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:15
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला हा शेर तर मस्तच आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला... ये मरणा,येरे ये मरणा तुजवाचून मज वाटे जगण्याचे हे भय.

विसोबा खेचर Wed, 12/19/2007 - 22:12
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला वा अगस्ती महाराज! फारच सुरेख. वरील ओळी विशेष भावल्या... -- तात्या.

सर्किट Wed, 12/19/2007 - 23:10
अगस्ती, कविता आवडली. नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या येथे कारा म्हणजे काय ? किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला ही द्विपदी खूप आवडली. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Wed, 12/19/2007 - 23:38
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला कविवर्य, गझल फार आवडली. सर्कीटकाका, कारा = तुरुंग; कुंपण कारा = कुंपणासारखी कारा ; कुंपणरूपी कारा ; कुंपण किंवा/आणि कोणत्याही प्रकारचे बंधन या अर्थी? (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु गुरुवार, 12/20/2007 - 00:09
अतिशय सुंदर आहे गझल... खूप आवडली.. खास करून खालील ओळी, किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला आणखीही येऊद्यात अशाच एकापेक्षा एक सरस गझला... -प्राजु.

नंदन गुरुवार, 12/20/2007 - 06:00
गझल. शेवटच्या द्विपदी विशेष आवडल्या. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

ध्रुव गुरुवार, 12/20/2007 - 11:38
फार सुरेख कविता... अजुनही येऊद्यत!!! -- ध्रुव

केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 17:34
अगस्तीशेठ, बर्‍याच दिवसांनी आपली सुंदर कविता वाचायला मिळाली... कविता आवडली..अशीच वरचे वर हजेरी लावत रहा हि विनंती. आमचा दुसरा प्रतिसादइथे वाचा केशवसुमार

अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:52
गझल आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अगस्ती शेवटून दुसरा शेर नीट वाचावा. वर वर जरी तो इश्किया वाटला तरी त्यात खूप खोल अर्थ आहे. ते मृत्यूला केलेले आवाहन आहे. अगस्ती

स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:46
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला ह्या ओळी विशेष आवडल्या.

प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:15
किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला हा शेर तर मस्तच आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला... ये मरणा,येरे ये मरणा तुजवाचून मज वाटे जगण्याचे हे भय.
लेखनविषय:
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला ----अगस्ती

आर. एन. पराडकर एम्.पी. ३

संजय अभ्यंकर ·

संजय अभ्यंकर Sat, 12/22/2007 - 06:35
मित्रहो, आर. एन. पराडकर हे ग्रीक अथवा लॅटिन नाव नाही. एके काळी त्यांची गाणी मंगलप्रभात कार्यक्रमात वाजत. खास करुन गुरुवारी. त्यांची श्री दत्ताची भजने प्रासादिक असत. ते अनुनासिक गात. एम्.पी. ३ नाही, परंतु कोठे कॅसेट तरी मिळतात काय? कि, कालौघात त्यांचे कार्य नष्ट झाले? संजय अभ्यंकर

पुणेरी Sat, 12/22/2007 - 07:58
खालील पत्त्यावरुन उतरवून घेता येतील. नवीन खाते उघडल्यास ५० गाणी फुकट आहेत. http://www.emusic.com/artist/R-N-Paradkar-MP3-Download/11574578.html

संजय अभ्यंकर Sun, 12/23/2007 - 22:42
सुशील साहेब, पुणेरीजीनि माहिती दिल्यावर, पुन्हा एकदा महाजाल चाळले, म्युझिक इन्डिया, दिशान्त तसेच इतरहि संकेतस्थळान्व्रर आर.एन्.पी. उपलब्ध आहेत. परंतु ह्या स्थळान्वर आपण केवळ गाणी ऐकू शकतो. संगणकावार ही गाणी उतरवायला काही शक्कल लढवावी लागेल. तोवर वाट पाहा. ता.क. : सुधा मल्होत्राहि सापड्ली (दिशांत वर). संजय अभ्यंकर.

संजय अभ्यंकर Sat, 12/22/2007 - 06:35
मित्रहो, आर. एन. पराडकर हे ग्रीक अथवा लॅटिन नाव नाही. एके काळी त्यांची गाणी मंगलप्रभात कार्यक्रमात वाजत. खास करुन गुरुवारी. त्यांची श्री दत्ताची भजने प्रासादिक असत. ते अनुनासिक गात. एम्.पी. ३ नाही, परंतु कोठे कॅसेट तरी मिळतात काय? कि, कालौघात त्यांचे कार्य नष्ट झाले? संजय अभ्यंकर

पुणेरी Sat, 12/22/2007 - 07:58
खालील पत्त्यावरुन उतरवून घेता येतील. नवीन खाते उघडल्यास ५० गाणी फुकट आहेत. http://www.emusic.com/artist/R-N-Paradkar-MP3-Download/11574578.html

संजय अभ्यंकर Sun, 12/23/2007 - 22:42
सुशील साहेब, पुणेरीजीनि माहिती दिल्यावर, पुन्हा एकदा महाजाल चाळले, म्युझिक इन्डिया, दिशान्त तसेच इतरहि संकेतस्थळान्व्रर आर.एन्.पी. उपलब्ध आहेत. परंतु ह्या स्थळान्वर आपण केवळ गाणी ऐकू शकतो. संगणकावार ही गाणी उतरवायला काही शक्कल लढवावी लागेल. तोवर वाट पाहा. ता.क. : सुधा मल्होत्राहि सापड्ली (दिशांत वर). संजय अभ्यंकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, आर. एन. पराडकरांची एम्.पी. ३ हवीत. कोणाकडे असल्यास कळवा. "गगनीते नंदादीप जळती" ऐकून बराच काळ लोटला. संजय अभ्यंकर

विष्णुगुप्त - १

पुष्कर ·

अवलिया Tue, 12/18/2007 - 14:37
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:40
नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.

In reply to by अवलिया

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:16
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by अवलिया

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:53
हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by अवलिया

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:40
परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:31
छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:22
तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर Tue, 12/18/2007 - 18:41
पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर

In reply to by सागर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:09
सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर

In reply to by पुष्कर

सागर Wed, 12/26/2007 - 13:15
पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर

In reply to by सागर

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:33
उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 20:37
वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश

सुनील Tue, 12/18/2007 - 20:57
सुरुवात छान झाली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सहज

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:26
स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:50
छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

In reply to by देवदत्त

जुना अभिजित गुरुवार, 12/20/2007 - 14:06
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:04
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना

In reply to by देवदत्त

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:41
छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

धनंजय Wed, 12/19/2007 - 00:45
आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.

In reply to by धनंजय

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:47
हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर

प्राजु Wed, 12/19/2007 - 01:35
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.

In reply to by प्राजु

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:50
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:11
कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

पुष्कर Fri, 07/02/2010 - 11:26
सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २

अवलिया Tue, 12/18/2007 - 14:37
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे. चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही. चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य .... विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले. आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. शुभेच्छा नाना

In reply to by अवलिया

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:40
नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला... आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते. पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते! तात्या.

In reply to by अवलिया

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:16
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते." नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by अवलिया

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:53
हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by अवलिया

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:40
परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल. चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 15:31
छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... अवांतर - गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते! असो, आपला, (मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:22
तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला. सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल... हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच. पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर Tue, 12/18/2007 - 18:41
पुष्कर महोदय, खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा. तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल. बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो. कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.) अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :( असो... वाटले म्हणून लिहीले... (चाणक्यभक्त ) सागर

In reply to by सागर

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:09
सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही. तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल. -पुष्कर

In reply to by पुष्कर

सागर Wed, 12/26/2007 - 13:15
पुष्कर, ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल. आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते). तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते. या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते... धन्यवाद सागर

In reply to by सागर

अप्पा जोगळेकर Sat, 07/03/2010 - 11:33
उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 20:37
वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा! (उत्सुक) ऋषिकेश

सुनील Tue, 12/18/2007 - 20:57
सुरुवात छान झाली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सहज

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:26
स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो. -(उत्साही) पुष्कर

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:50
छान विषय निवडलात. ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. एक शंका: काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

In reply to by देवदत्त

जुना अभिजित गुरुवार, 12/20/2007 - 14:06
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. घागरः घडे ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

अवलिया गुरुवार, 12/27/2007 - 18:04
नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता. पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत नाना

In reply to by देवदत्त

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:41
छान विषय निवडलात. धन्यवाद. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर. लवकरच आणतो. नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा. त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'. मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

धनंजय Wed, 12/19/2007 - 00:45
आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) लगे रहिए.

In reply to by धनंजय

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:47
हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.) हे वाक्य खूप आवडलं. :-) -(चावट) पुष्कर

प्राजु Wed, 12/19/2007 - 01:35
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... - प्राजु.

In reply to by प्राजु

पुष्कर Wed, 12/26/2007 - 09:50
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. माझं अहोभाग्य. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका... खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-) -(आळशी) पुष्कर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:11
कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते. छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

पुष्कर Fri, 07/02/2010 - 11:26
सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २
लेखनविषय:
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं.

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

ॐकार ·

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 10:32
ओंकारशेठ, सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं! मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी मस्तच आहे हे गाणं! :) त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे. गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय. 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :) ह्याचे शब्द खालीलप्रमाणे - 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात! असो.. आपला, (माळरानातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 10:37
गोट्याचे नाव जॉय घाणेकर. या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची. देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो. संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या. तेजस्पर्शाने दूर हो अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार शिल्पास जैसा आकारी शिल्पकार मना घडवी संस्कार (सुसंस्कृत)बेसनलाडू

देवदत्त Tue, 12/18/2007 - 21:50
ॐकार, छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे. तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो. त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे. संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते. गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो. आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

In reply to by देवदत्त

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:41
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;) सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

In reply to by देवदत्त

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 23:05
धनंजय = मोहन जोशीच! त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार. (स्मरणशील)बेसनलाडू

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:42
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो. ससा रे ससा तो कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली... हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 10:32
ओंकारशेठ, सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं! मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी मस्तच आहे हे गाणं! :) त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे. गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय. 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :) ह्याचे शब्द खालीलप्रमाणे - 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात! असो.. आपला, (माळरानातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 10:37
गोट्याचे नाव जॉय घाणेकर. या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची. देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो. संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या. तेजस्पर्शाने दूर हो अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार शिल्पास जैसा आकारी शिल्पकार मना घडवी संस्कार (सुसंस्कृत)बेसनलाडू

देवदत्त Tue, 12/18/2007 - 21:50
ॐकार, छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे. तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो. त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे. संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते. गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो. आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

In reply to by देवदत्त

देवदत्त Tue, 12/18/2007 - 22:41
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;) सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

In reply to by देवदत्त

बेसनलाडू Tue, 12/18/2007 - 23:05
धनंजय = मोहन जोशीच! त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार. (स्मरणशील)बेसनलाडू

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:42
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो. ससा रे ससा तो कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली... हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

नेमेची येतो मग संकल्प

देवदत्त ·

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:27
केलेले सगळे संकल्प वाया जातात, म्हणून यापुढे कुठलाही संकल्प न करणे हाच माझा संकल्प.. (मी नववर्षाला संकल्प करत नाहीच. माझ्या वाढदिवसाला संकल्प करायचो. पण आता तेही करणे सोडले आहे..) कुठलेही संकल्प करायला काहीही लागत नाही, तो संकल्प पाळायला मात्र धैर्य लागते. छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे संकल्प लांबणीवर टाकून संकल्पांबद्दल आणिबाणी घोषित करावी लागते.. एवढे सगळे हवेच कशाला ? त्यापेक्षा संकल्प करणे सोडणे, हेच उत्तम ! - सर्किट

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:07
देददत्तराव, गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही! हे आमचं ब्रीद असल्यामुळे आम्हीही कधी कुठला संकल्प करत नाही! आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे चुपचाप त्याचा हात धरून त्याच्यासोबत जातो! :) तात्या.

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:31
एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प. असा असावा संकल्प, कारण संकल्प पुर्ण झाला नाही म्हणत दु:ख करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी सामना करून नेमके काय करावे याचा विचार करावा. -विजय

सर्किट Tue, 12/18/2007 - 07:27
केलेले सगळे संकल्प वाया जातात, म्हणून यापुढे कुठलाही संकल्प न करणे हाच माझा संकल्प.. (मी नववर्षाला संकल्प करत नाहीच. माझ्या वाढदिवसाला संकल्प करायचो. पण आता तेही करणे सोडले आहे..) कुठलेही संकल्प करायला काहीही लागत नाही, तो संकल्प पाळायला मात्र धैर्य लागते. छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे संकल्प लांबणीवर टाकून संकल्पांबद्दल आणिबाणी घोषित करावी लागते.. एवढे सगळे हवेच कशाला ? त्यापेक्षा संकल्प करणे सोडणे, हेच उत्तम ! - सर्किट

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:07
देददत्तराव, गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही! हे आमचं ब्रीद असल्यामुळे आम्हीही कधी कुठला संकल्प करत नाही! आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे चुपचाप त्याचा हात धरून त्याच्यासोबत जातो! :) तात्या.

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:31
एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प. असा असावा संकल्प, कारण संकल्प पुर्ण झाला नाही म्हणत दु:ख करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी सामना करून नेमके काय करावे याचा विचार करावा. -विजय
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प. १५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?" आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच. हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो.

आपण यांना पाहिलंय का?

ऋषिकेश ·

सर्किट Tue, 12/18/2007 - 02:07
ऋषिकेश, (शिळी असली तरी) कविता आवडली. - सर्किट

मुक्तसुनीत Tue, 12/18/2007 - 02:09
मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-) मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे ! खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ? आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 08:44
केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का?? डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का? क्या बात है... ऋषिकेशा, सुंदरच लिहिलं आहेस रे!

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:37
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण... खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं... एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं.... ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का? मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का?? मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

सर्किट Tue, 12/18/2007 - 02:07
ऋषिकेश, (शिळी असली तरी) कविता आवडली. - सर्किट

मुक्तसुनीत Tue, 12/18/2007 - 02:09
मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-) मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे ! खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ? आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 08:44
केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का?? डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का? क्या बात है... ऋषिकेशा, सुंदरच लिहिलं आहेस रे!

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:37
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण... खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं... एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं.... ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का? मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का?? मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय.. आपण यांना पाहिलंय का? ********* अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं.. तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं... जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण... माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का? रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का?? चिंब पावसात भिजुन..

समभागांची चर्चा..

संजय अभ्यंकर ·

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:20
तात्या, आपण केलेला बदल, हा स्वागतार्ह आहे. त्याची सान्गड आणिबाणीशी घालू नाका. आपल्या सारख्या तज्ञ व्यक्तिने समभाग या विषयावर स्तंभ सुरू केला हे उत्तम झाले. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:36
तात्या, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. जे.पी. असोसिएट्स, हा मी घेतलेला अलिकडल्या काळातला उत्क्रुष्ट समभाग, त्याने मला केवळ ८ महिन्यात २३०% परतावा दिला होता. आज त्याचा भाव पाहुन हादरलो (रॅनबॅक्सीची आठवण झाली). आपण केलेला खुलासा दिलासा देऊन गेला. संजय अभ्यंकर.

In reply to by संजय अभ्यंकर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:16
खुलासा दिलासा देऊन गेला. वाह!! वाक्यात नाद आहे. संजय तुम्ही आय्सीआय्सीआय डायरेक्ट वापरत असाल तर पोर्टफोलिओ मध्ये स्वतः शेअरची संख्या आणि किंमत बदलावी लागेल. सध्या तुम्हाला जुनीच खरेदी किंमत दिसत असेल. तुमच्या डीमॅट अकाउंटला स्प्लिट झालेले शेअर म्हणजे २ असतील तर एकूण दहा असे १ महिन्यात जमा होतील. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अवलिया गुरुवार, 12/20/2007 - 10:13
आय एफ सी आय कोसळ्ला माझ्याकडे १२ रु चे १०००० १८ चे ५००० आहेत काय करु?

In reply to by अवलिया

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 12:12
पैशांची निकड नसेल तर राहू द्यात, नका विकू! किंवा अगदीच जर काही प्रमाणात प्रॉफिट बुक करायचा असेल तर अर्धा माल विका. मी तुमच्या जागी असतो तर अर्धा माल विकून टाकला असता. तात्या.

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/03/2008 - 22:25
अल्पकालीन गुन्तवणुकीला बरेच सल्लागार भेटतात. हल्ली टी.वी. वर यांचा सुकाळ आहे. बहुदा त्याना या कामाचे बरेच पैसे मिळत असावेत. एकाहून आधिक अर्थविषयक चॅनल्स पाहिल्यास हि मंडळी आपल्याला गोन्धळात टाकतात असे अनुभवास येते. अल्पकालिन गुन्तवणुकीला, बाजाराचे उत्तम ज्ञान, गाठीशी पुरेसा पैसा आणि प्रसंगी जबर नुकसान सहन करायची क्षमता असावी लागते. तसेच, योग्य सल्लागार (broker) जोडिशी असावा लागतो. अन्यथा लाखाचे बाराहजार व्हायला वेळ लागत नाही. जनसामन्य, शेअर बाजाराला जुगार मानतात, कारण, अशी नुकसानीत गेलेलि अनेक उदाहरणे समाजात आहेत. माझ्या मते, सामान्य गुन्तवणुकदारानी दीर्घ कालिन गुन्तवणुक करावी. अश्या गुन्तवणुकीत, बाजाराच्या रोज होणार्‍या चढ उताराचे फारसे चटके आपल्याला बसत नाहित. पुन्हा एकदा मी Peter Lynch ची पुस्तक वाचायची शिफारस करेन. पीटर लिन्च हा दीर्घकालीन गुन्तवणुकीचा खंदा पुरस्कर्ता आहे. मी दी.का. गु. ची सतत प्रचीती घेत आहे. मी १९८६ सालापासुन समभाग खरेदी करित आहे. त्यातले काही समभाग आजहि (काही अपवाद वगळता) विकलेले नाहीत. आज हेलकावणारा बाजार, माझ्या गुन्तवणुकीवर व नफ्यावर फारसा परिणाम करित नाहीत. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Tue, 01/15/2008 - 23:03
हा रिलायन्स पॉवरचा परिणाम कि बाजारात आलेला सुधार (correction)? NSE चा पी/ई अजुनहि २७ च्या वर आहे. म्हणजे बाजार फारच वर आहे! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:01
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे. आणि काही दिवसातच ते कार्यान्वित देखिल होईल. सध्या बरेचसे शब्द डोक्यावरुन जात असले तरी हळु हळु यांची पण माहिती कळायला लागेल. आपण सगळे माझ्या ज्ञानात भर टाकालच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

अवलिया Wed, 01/16/2008 - 16:19
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे धोंडोपंताचे एवढे जर ऐकता तर कर असताना नवीन काम सुरु करु नये हे त्यांचे वाक्य विसरले काः) असो बुधवारची लक्ष्मी तुम्हाआम्हाला प्रसन्न होवो नाना

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 16:32
बहुरंगीजी, आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. १) केवळ कोणी टिप दिली म्हणुन एखाद्या समभागात पैसे गुन्तवू नये. शेअर बाजाराच्या सुचकांका पेक्षा कंपनीचा ताळेबंद ज्यास्त महत्वाचा. २) कंपनीची तिमाहि, सहामाहि, वार्षिक प्रगती याचा अभ्यास पैसे गुन्तवण्यापूर्वी करावा. ३) कंपनीच्या जबाबदार्‍या, देणी, येणी व करोत्तर नफा अभ्यासावा. ४) कंपनीचा प्रामाणिकपणा, बोनस, लाभांशाचा इतिहास आदी पडताळावेत. ५)एकाच कंपनी विषयी किमान दोन अथवा तीन वेबसाईट्सचे मत पहावे. ६) उत्पन्ना बद्दल दीर्घकालिन उद्दिष्टे ठेवावित. उठसुट समभाग विकु नयेत. संयमाने फायदा होतो. योग्यकाळ नफ्यासाठि थांबावे. ७) समभाग या विषयावर जितके वाचाल तितके थोडे. ८) समभाग सल्लागार हा भविष्यवेत्ता नव्हे, त्याचा सल्ला हा त्याच्या अभ्यास व अनुभवावर आधारित असतो. त्याचा सल्ला वरिल निकषांवर घासावा. आपणांस पटल्यास त्या समभागात पैसे गुन्तवावे. शेवटी: दोन चारदा आपटल्या शिवाय शहाणपण येत नाही. ती क्लासची फी समजावि. आपणास सुयश लाभो! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:49
धन्यवाद संजय अभ्यंकर आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. मान्य .... अगदी पहिल्या पायरी वर आहे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. जरुर .... पंत, तात्या, संजय, मोठा डॉन, नाना इ. यांच्या मुळे .... या मायजालात उतरलो तर आहे .... आपटलो किंवा उडालो तरी आपणांस कळेलच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 22:20
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकविध विषयात त्या त्या क्षेत्रातिल तज्ञ व्यक्ति लेखन करतात. समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. Peter Lynch च्या पुस्तकांची शिफारस मी पुर्वी केलेली आहे. त्या शिवाय समभाग बाजारातला गुरु Warren Buffet ह्याने स्वतः काहि लेखन केलेले नजरेस पडले नाही. परंतु, याच्या कार्य पद्धतिबद्दल इतरांनी लिहिलेलि काही पुस्तके उपलब्ध आहेत. शेअर महर्षि Benjamin Graham (हा Warren Buffet चा गुरु) ह्याने मैलाचे दगड ठरतिल अशी दोन पुस्तके लिहिलि. पैकी पहिले पुस्तक Security Analysis फार दुर्मिळ आहे. दुसरे Intelligent Invester उपलब्ध आहे. मला अलिकडेच त्याची नविन आव्रुत्ती (टिके सहित) डेक्कनच्या फुटपाथवर सापडलि. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:07
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे माफ करा पण आमचा या विधानास आक्षेप आहे पेटंट, लायसन्स, प्रोप्रायटरी कोड वगैरे अमेरिकेने दिलेला रोग आहे जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हि हिंदु संस्कृती आहे समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. प्रत्येक देशाची खासियत असते आपल्याकडे धार्मिक विषयांवर प्रचंड (विपुल विपुल असे अनेक वेळा म्हणजे प्रचंड ) लेखन होत असते युरोपात सुद्धा विविध भाषांमधे समभागां विषयी लेखन होत असते व ते कित्येक वेळेस अमेरीकन लोकांपेक्षा जास्त दर्जेदार असते. कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल्यामुळे तो आनंद मिळाला नसेल. असो बाकि तुमचे म्हणणे योग्य आहे (जर्मन, फ्रेंच, स्पेनीश) नाना

In reply to by अवलिया

संजय अभ्यंकर Fri, 01/18/2008 - 10:14
नाना, आपले मुद्दे बरेचशे पटणारे आहेत. परंतु, पेटंट इ. प्रकार सोडले तर आंग्ल लेखनाने मला बरेच काही लाभले. मी जर्मन भाषा बर्‍यापैकी वाचु व समजु शकतो (बोलण्याचा सराव नाही). भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). (फ्रेन्च, स्पॅनीशशी माझा दुरन्वयेही संबंध नाही). धन्यवाद! संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया Fri, 01/18/2008 - 10:45
भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). तुम्ही न्याहाळख उघडा ( आय.इ किंवा फायरफोक्स) गुगल.कौम वर जा लैग्वेज टुल्स वर टिचकी मारा किंवा सरळ इथे क्लिक करा पुढे बघा सुचना बघा तुम्हाला कमीतकमी श्रमात भरपुर हव्या त्या भाषेतील पाने मिळतील नाना

रिलायंस पेट्रो मधे सट्टेबाजारी होवू नये याकरता तो Futures & Options Ban मधे आहे, अशी बातमी कळाली. माझ्याकडे आर. पी. एल. चे समभाग आहेत. (ईक्विटि मार्केट मधून घेतलेले) Futures & Options Ban मुळे काय परिणाम होतो? आर. पी. एल. चे भवितव्य काय? कोणी याबद्दलचे मत / माहीती शेअर कराल?

In reply to by यशोदेचा घनश्याम

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:46
Theoritically, derivatives market हे spot market वर अवलम्बून असते. (अनुस्वार कसा देतात ?) पण, derivatives च्या किमतीवरून आपण short-term spot च्या trend बद्दल अन्दाज करू शकतो. आर पी एल ban झाला कारण त्याच्या derivative market open position (खरेदी/विक्री झालेली contracts) market capitalization च्या तुलनेत खूप जास्त होती. याचा काही अर्थ काढायचा तर असा काढता येईल की आर पी एल नजिकच्या भविश्यात (New to Devnagri typing) खूप volatile असेल.

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 21:59
मला त्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स बद्दल काही कळत नाहि. त्या बाबतित वाचनहि नाहि. ह्या विषयावर सविस्तर वाचन आवश्यक आहे. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/17/2008 - 09:00
रिलायंस पॉवरच्या समभागांकडे लोकांची झुम्बड उडाल्याच्या बातम्या व्रुत्तपत्रात येत आहेत. हे कळपाच्या मनोव्रुत्तीचे एक उदाहरणा आहे. लोक असलेले समभाग विकुन, रि.पॉ. घेत आहेत. ह्या मुळे बाजार खाली उतरायला हातभारच लागत आहे. मी रि.पॉ. वर एक कपर्दिकहि खर्चलेली नाही. जेव्हा जेव्हा असे मेगा ईश्यु येतात, तेव्हा तेव्हा ही कळप मनोव्रुत्ती दिसुन येते. काही वर्षांपुर्वी, इन्डो गल्फ फर्टिलायझरचा मेगा इश्यु आला होता, तेव्हाहि लोकांनी तो शेकड्याने घेतला. आज इन्डो गल्फ कुठे आहे? ह्या वेळेस, बाजार खालि आल्याचा फायदा घेवुन, रि.पॉ. च्या मागे न धावता, चांगले समभाग कमी किमतित विकत घेणे हा शहाणपाणाचा मार्ग ठरेल असे माझे मत आहे. बाजारात नोन्दणी झाल्यावर, बहुदा, रि.पॉ. खालि येइल, तेव्हा तो घेणे इष्ट. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 09:46
अभ्यंकर साहेबांच्या वरील मताशी मी पूर्णत: सहमत आहे...! तात्या. अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

यशोदेचा घनश्याम गुरुवार, 01/17/2008 - 10:47
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... ---- आम्ही प्रतिक्षेत आहोत. -- यशोदेचा घनश्याम

In reply to by विसोबा खेचर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:13
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या सवडीने म्हणजे कधी? कारण तुमची सवड म्हणजे कपिलाषष्ठी प्रमाणे दुर्मिळ आहे. सह्या बोलावुन ठेवल्या म्हणे सवडीने सांगतो ... अजुन काय मुहुर्त नाही. रोशनी दोन तीन महिन्याने एक झलक.... पुढे .. आनंद त्यामुळे न मागता एक सल्ला कुठलीहि वाच्यता न करता गुपचुप लिहा व प्रसिद्ध करा. तुम्ही सांगता आता लिहित आहे... आम्ही वाट पहात रहातो टांगुन... पार चक्का होतो पण ... सवड मिळेल तर शपथ.. असो राग मानु नका नाना

मनिष Fri, 01/18/2008 - 11:33
दीर्घकालीन गुंतवणुकीकरता हे समभाग चांगले आहेत (1) TTML (Tata Teleservices (Mah) Ltd. -- 54-56 (2) India Cements - 260 - 265 (3) Tata Steel - 800-820 निदान १ वर्ष तरी गुंतवणुक करावी. ३ वर्षात खुप फायदा होईल असा अंदाज आहे!

संजय अभ्यंकर Wed, 02/13/2008 - 13:24
मित्रहो, शेअर बाजार गडगडतोय. लोकही हवालदिल झालेत. परंतु दीर्घकालिन गुंतवणुक करणार्‍यांनी शांत रहावे. जे लोक दीर्घकालिन गुंतवणुक करत नाहीत, त्यांनी त्याकडे वळावे म्हणुन पिटर लिंचचे वाक्य खाली उद्धृत करत आहे. आपले पुस्तक One Up on Wall Street च्या प्रस्तावनेत त्याने हा उतार लिहिला आहे. "The basic story remains simple and never-ending. Stocks aren't lottery tickets. There's a company attached to every share. Companies do better or they do worse. If a company does worse than before, its stock will fall. If a company does better, its stock will rise. If you own good companies that continue to increase their earnings, you'll do well. Corporate profits are up fifty-five-fold since World War II, and the stock market is up sixtyfold. Four wars, nine recessions, eight presidents, and one impeachment didn't change that." Peter Lynch संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:59
No offence, but I remember reading in one up on wall street or beating the street, by Peter Lynch himself where he admits, की जे २९ मधे जे आपले शेअर पकडून बसले होते, त्यान्चे नुकसान भरून निघायला ४० वर्शे [:)] लागली. स्वत: लिन्च ने काय ८७ मधे शेअर विकले नाहीत? दीर्घकालीन गुन्तवणुकदार जर risk-averse असतील तर अश्या crash मध्ये कसे गप बसणार? This reminds me of when I was a kid and played cricket with big boys. They'd always made me field all day while they batted and bowled. I think the situation of retail investors is the same now, and is always going to be the same :D :D

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:20
तात्या, आपण केलेला बदल, हा स्वागतार्ह आहे. त्याची सान्गड आणिबाणीशी घालू नाका. आपल्या सारख्या तज्ञ व्यक्तिने समभाग या विषयावर स्तंभ सुरू केला हे उत्तम झाले. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 23:36
तात्या, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. जे.पी. असोसिएट्स, हा मी घेतलेला अलिकडल्या काळातला उत्क्रुष्ट समभाग, त्याने मला केवळ ८ महिन्यात २३०% परतावा दिला होता. आज त्याचा भाव पाहुन हादरलो (रॅनबॅक्सीची आठवण झाली). आपण केलेला खुलासा दिलासा देऊन गेला. संजय अभ्यंकर.

In reply to by संजय अभ्यंकर

जुना अभिजित Wed, 12/19/2007 - 09:16
खुलासा दिलासा देऊन गेला. वाह!! वाक्यात नाद आहे. संजय तुम्ही आय्सीआय्सीआय डायरेक्ट वापरत असाल तर पोर्टफोलिओ मध्ये स्वतः शेअरची संख्या आणि किंमत बदलावी लागेल. सध्या तुम्हाला जुनीच खरेदी किंमत दिसत असेल. तुमच्या डीमॅट अकाउंटला स्प्लिट झालेले शेअर म्हणजे २ असतील तर एकूण दहा असे १ महिन्यात जमा होतील. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अवलिया गुरुवार, 12/20/2007 - 10:13
आय एफ सी आय कोसळ्ला माझ्याकडे १२ रु चे १०००० १८ चे ५००० आहेत काय करु?

In reply to by अवलिया

विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 12:12
पैशांची निकड नसेल तर राहू द्यात, नका विकू! किंवा अगदीच जर काही प्रमाणात प्रॉफिट बुक करायचा असेल तर अर्धा माल विका. मी तुमच्या जागी असतो तर अर्धा माल विकून टाकला असता. तात्या.

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/03/2008 - 22:25
अल्पकालीन गुन्तवणुकीला बरेच सल्लागार भेटतात. हल्ली टी.वी. वर यांचा सुकाळ आहे. बहुदा त्याना या कामाचे बरेच पैसे मिळत असावेत. एकाहून आधिक अर्थविषयक चॅनल्स पाहिल्यास हि मंडळी आपल्याला गोन्धळात टाकतात असे अनुभवास येते. अल्पकालिन गुन्तवणुकीला, बाजाराचे उत्तम ज्ञान, गाठीशी पुरेसा पैसा आणि प्रसंगी जबर नुकसान सहन करायची क्षमता असावी लागते. तसेच, योग्य सल्लागार (broker) जोडिशी असावा लागतो. अन्यथा लाखाचे बाराहजार व्हायला वेळ लागत नाही. जनसामन्य, शेअर बाजाराला जुगार मानतात, कारण, अशी नुकसानीत गेलेलि अनेक उदाहरणे समाजात आहेत. माझ्या मते, सामान्य गुन्तवणुकदारानी दीर्घ कालिन गुन्तवणुक करावी. अश्या गुन्तवणुकीत, बाजाराच्या रोज होणार्‍या चढ उताराचे फारसे चटके आपल्याला बसत नाहित. पुन्हा एकदा मी Peter Lynch ची पुस्तक वाचायची शिफारस करेन. पीटर लिन्च हा दीर्घकालीन गुन्तवणुकीचा खंदा पुरस्कर्ता आहे. मी दी.का. गु. ची सतत प्रचीती घेत आहे. मी १९८६ सालापासुन समभाग खरेदी करित आहे. त्यातले काही समभाग आजहि (काही अपवाद वगळता) विकलेले नाहीत. आज हेलकावणारा बाजार, माझ्या गुन्तवणुकीवर व नफ्यावर फारसा परिणाम करित नाहीत. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर Tue, 01/15/2008 - 23:03
हा रिलायन्स पॉवरचा परिणाम कि बाजारात आलेला सुधार (correction)? NSE चा पी/ई अजुनहि २७ च्या वर आहे. म्हणजे बाजार फारच वर आहे! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:01
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे. आणि काही दिवसातच ते कार्यान्वित देखिल होईल. सध्या बरेचसे शब्द डोक्यावरुन जात असले तरी हळु हळु यांची पण माहिती कळायला लागेल. आपण सगळे माझ्या ज्ञानात भर टाकालच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

अवलिया Wed, 01/16/2008 - 16:19
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे धोंडोपंताचे एवढे जर ऐकता तर कर असताना नवीन काम सुरु करु नये हे त्यांचे वाक्य विसरले काः) असो बुधवारची लक्ष्मी तुम्हाआम्हाला प्रसन्न होवो नाना

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 16:32
बहुरंगीजी, आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. १) केवळ कोणी टिप दिली म्हणुन एखाद्या समभागात पैसे गुन्तवू नये. शेअर बाजाराच्या सुचकांका पेक्षा कंपनीचा ताळेबंद ज्यास्त महत्वाचा. २) कंपनीची तिमाहि, सहामाहि, वार्षिक प्रगती याचा अभ्यास पैसे गुन्तवण्यापूर्वी करावा. ३) कंपनीच्या जबाबदार्‍या, देणी, येणी व करोत्तर नफा अभ्यासावा. ४) कंपनीचा प्रामाणिकपणा, बोनस, लाभांशाचा इतिहास आदी पडताळावेत. ५)एकाच कंपनी विषयी किमान दोन अथवा तीन वेबसाईट्सचे मत पहावे. ६) उत्पन्ना बद्दल दीर्घकालिन उद्दिष्टे ठेवावित. उठसुट समभाग विकु नयेत. संयमाने फायदा होतो. योग्यकाळ नफ्यासाठि थांबावे. ७) समभाग या विषयावर जितके वाचाल तितके थोडे. ८) समभाग सल्लागार हा भविष्यवेत्ता नव्हे, त्याचा सल्ला हा त्याच्या अभ्यास व अनुभवावर आधारित असतो. त्याचा सल्ला वरिल निकषांवर घासावा. आपणांस पटल्यास त्या समभागात पैसे गुन्तवावे. शेवटी: दोन चारदा आपटल्या शिवाय शहाणपण येत नाही. ती क्लासची फी समजावि. आपणास सुयश लाभो! संजय अभ्यंकर

बहुरंगी Wed, 01/16/2008 - 16:49
धन्यवाद संजय अभ्यंकर आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे. मान्य .... अगदी पहिल्या पायरी वर आहे. खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात. जरुर .... पंत, तात्या, संजय, मोठा डॉन, नाना इ. यांच्या मुळे .... या मायजालात उतरलो तर आहे .... आपटलो किंवा उडालो तरी आपणांस कळेलच. आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 22:20
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकविध विषयात त्या त्या क्षेत्रातिल तज्ञ व्यक्ति लेखन करतात. समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. Peter Lynch च्या पुस्तकांची शिफारस मी पुर्वी केलेली आहे. त्या शिवाय समभाग बाजारातला गुरु Warren Buffet ह्याने स्वतः काहि लेखन केलेले नजरेस पडले नाही. परंतु, याच्या कार्य पद्धतिबद्दल इतरांनी लिहिलेलि काही पुस्तके उपलब्ध आहेत. शेअर महर्षि Benjamin Graham (हा Warren Buffet चा गुरु) ह्याने मैलाचे दगड ठरतिल अशी दोन पुस्तके लिहिलि. पैकी पहिले पुस्तक Security Analysis फार दुर्मिळ आहे. दुसरे Intelligent Invester उपलब्ध आहे. मला अलिकडेच त्याची नविन आव्रुत्ती (टिके सहित) डेक्कनच्या फुटपाथवर सापडलि. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:07
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे माफ करा पण आमचा या विधानास आक्षेप आहे पेटंट, लायसन्स, प्रोप्रायटरी कोड वगैरे अमेरिकेने दिलेला रोग आहे जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हि हिंदु संस्कृती आहे समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात. प्रत्येक देशाची खासियत असते आपल्याकडे धार्मिक विषयांवर प्रचंड (विपुल विपुल असे अनेक वेळा म्हणजे प्रचंड ) लेखन होत असते युरोपात सुद्धा विविध भाषांमधे समभागां विषयी लेखन होत असते व ते कित्येक वेळेस अमेरीकन लोकांपेक्षा जास्त दर्जेदार असते. कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल्यामुळे तो आनंद मिळाला नसेल. असो बाकि तुमचे म्हणणे योग्य आहे (जर्मन, फ्रेंच, स्पेनीश) नाना

In reply to by अवलिया

संजय अभ्यंकर Fri, 01/18/2008 - 10:14
नाना, आपले मुद्दे बरेचशे पटणारे आहेत. परंतु, पेटंट इ. प्रकार सोडले तर आंग्ल लेखनाने मला बरेच काही लाभले. मी जर्मन भाषा बर्‍यापैकी वाचु व समजु शकतो (बोलण्याचा सराव नाही). भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). (फ्रेन्च, स्पॅनीशशी माझा दुरन्वयेही संबंध नाही). धन्यवाद! संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

अवलिया Fri, 01/18/2008 - 10:45
भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?). तुम्ही न्याहाळख उघडा ( आय.इ किंवा फायरफोक्स) गुगल.कौम वर जा लैग्वेज टुल्स वर टिचकी मारा किंवा सरळ इथे क्लिक करा पुढे बघा सुचना बघा तुम्हाला कमीतकमी श्रमात भरपुर हव्या त्या भाषेतील पाने मिळतील नाना

रिलायंस पेट्रो मधे सट्टेबाजारी होवू नये याकरता तो Futures & Options Ban मधे आहे, अशी बातमी कळाली. माझ्याकडे आर. पी. एल. चे समभाग आहेत. (ईक्विटि मार्केट मधून घेतलेले) Futures & Options Ban मुळे काय परिणाम होतो? आर. पी. एल. चे भवितव्य काय? कोणी याबद्दलचे मत / माहीती शेअर कराल?

In reply to by यशोदेचा घनश्याम

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:46
Theoritically, derivatives market हे spot market वर अवलम्बून असते. (अनुस्वार कसा देतात ?) पण, derivatives च्या किमतीवरून आपण short-term spot च्या trend बद्दल अन्दाज करू शकतो. आर पी एल ban झाला कारण त्याच्या derivative market open position (खरेदी/विक्री झालेली contracts) market capitalization च्या तुलनेत खूप जास्त होती. याचा काही अर्थ काढायचा तर असा काढता येईल की आर पी एल नजिकच्या भविश्यात (New to Devnagri typing) खूप volatile असेल.

संजय अभ्यंकर Wed, 01/16/2008 - 21:59
मला त्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स बद्दल काही कळत नाहि. त्या बाबतित वाचनहि नाहि. ह्या विषयावर सविस्तर वाचन आवश्यक आहे. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/17/2008 - 09:00
रिलायंस पॉवरच्या समभागांकडे लोकांची झुम्बड उडाल्याच्या बातम्या व्रुत्तपत्रात येत आहेत. हे कळपाच्या मनोव्रुत्तीचे एक उदाहरणा आहे. लोक असलेले समभाग विकुन, रि.पॉ. घेत आहेत. ह्या मुळे बाजार खाली उतरायला हातभारच लागत आहे. मी रि.पॉ. वर एक कपर्दिकहि खर्चलेली नाही. जेव्हा जेव्हा असे मेगा ईश्यु येतात, तेव्हा तेव्हा ही कळप मनोव्रुत्ती दिसुन येते. काही वर्षांपुर्वी, इन्डो गल्फ फर्टिलायझरचा मेगा इश्यु आला होता, तेव्हाहि लोकांनी तो शेकड्याने घेतला. आज इन्डो गल्फ कुठे आहे? ह्या वेळेस, बाजार खालि आल्याचा फायदा घेवुन, रि.पॉ. च्या मागे न धावता, चांगले समभाग कमी किमतित विकत घेणे हा शहाणपाणाचा मार्ग ठरेल असे माझे मत आहे. बाजारात नोन्दणी झाल्यावर, बहुदा, रि.पॉ. खालि येइल, तेव्हा तो घेणे इष्ट. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 09:46
अभ्यंकर साहेबांच्या वरील मताशी मी पूर्णत: सहमत आहे...! तात्या. अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

यशोदेचा घनश्याम गुरुवार, 01/17/2008 - 10:47
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... ---- आम्ही प्रतिक्षेत आहोत. -- यशोदेचा घनश्याम

In reply to by विसोबा खेचर

अवलिया गुरुवार, 01/17/2008 - 12:13
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे... तात्या सवडीने म्हणजे कधी? कारण तुमची सवड म्हणजे कपिलाषष्ठी प्रमाणे दुर्मिळ आहे. सह्या बोलावुन ठेवल्या म्हणे सवडीने सांगतो ... अजुन काय मुहुर्त नाही. रोशनी दोन तीन महिन्याने एक झलक.... पुढे .. आनंद त्यामुळे न मागता एक सल्ला कुठलीहि वाच्यता न करता गुपचुप लिहा व प्रसिद्ध करा. तुम्ही सांगता आता लिहित आहे... आम्ही वाट पहात रहातो टांगुन... पार चक्का होतो पण ... सवड मिळेल तर शपथ.. असो राग मानु नका नाना

मनिष Fri, 01/18/2008 - 11:33
दीर्घकालीन गुंतवणुकीकरता हे समभाग चांगले आहेत (1) TTML (Tata Teleservices (Mah) Ltd. -- 54-56 (2) India Cements - 260 - 265 (3) Tata Steel - 800-820 निदान १ वर्ष तरी गुंतवणुक करावी. ३ वर्षात खुप फायदा होईल असा अंदाज आहे!

संजय अभ्यंकर Wed, 02/13/2008 - 13:24
मित्रहो, शेअर बाजार गडगडतोय. लोकही हवालदिल झालेत. परंतु दीर्घकालिन गुंतवणुक करणार्‍यांनी शांत रहावे. जे लोक दीर्घकालिन गुंतवणुक करत नाहीत, त्यांनी त्याकडे वळावे म्हणुन पिटर लिंचचे वाक्य खाली उद्धृत करत आहे. आपले पुस्तक One Up on Wall Street च्या प्रस्तावनेत त्याने हा उतार लिहिला आहे. "The basic story remains simple and never-ending. Stocks aren't lottery tickets. There's a company attached to every share. Companies do better or they do worse. If a company does worse than before, its stock will fall. If a company does better, its stock will rise. If you own good companies that continue to increase their earnings, you'll do well. Corporate profits are up fifty-five-fold since World War II, and the stock market is up sixtyfold. Four wars, nine recessions, eight presidents, and one impeachment didn't change that." Peter Lynch संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

अनिकेत Wed, 02/13/2008 - 13:59
No offence, but I remember reading in one up on wall street or beating the street, by Peter Lynch himself where he admits, की जे २९ मधे जे आपले शेअर पकडून बसले होते, त्यान्चे नुकसान भरून निघायला ४० वर्शे [:)] लागली. स्वत: लिन्च ने काय ८७ मधे शेअर विकले नाहीत? दीर्घकालीन गुन्तवणुकदार जर risk-averse असतील तर अश्या crash मध्ये कसे गप बसणार? This reminds me of when I was a kid and played cricket with big boys. They'd always made me field all day while they batted and bowled. I think the situation of retail investors is the same now, and is always going to be the same :D :D
नमस्कार संजय अभ्यंकर साहेब, तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला? तो कितीने स्प्लीट होतोय? संजय अभ्यंकर आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल. असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.. आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे.

खूप काही हरवलं आहे!

विसोबा खेचर ·

विसुनाना Mon, 12/17/2007 - 19:40
आम्हीही अगदी त्याच काळातले. 'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच. गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :) असेच असेच...!

नंदन Mon, 12/17/2007 - 19:46
पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. -- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे. असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 19:47
तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही. अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत. किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा. संजय अभ्यंकर.

प्राजु Mon, 12/17/2007 - 20:01
पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे. गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा. - प्राजु.

तात्या, आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत..... मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो------- (विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही ) मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून किराणा किंवा भाजीपाला घेत नाही. तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो. तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात माझी खरेदी सुरु होते. सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी- लागल्यासारखं वाटतं मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो. न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन भांडण वगैरे होत पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही. (महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Mon, 12/17/2007 - 21:26
वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन" आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात. तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे. एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

In reply to by सहज

सर्किट Tue, 12/18/2007 - 01:43
आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले. जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ? फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ? (हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.) - सर्किट

आजानुकर्ण Mon, 12/17/2007 - 21:35
केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही. 'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस. (गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय Mon, 12/17/2007 - 22:40
मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात. तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट Mon, 12/17/2007 - 22:32
"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे. सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती. इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या. - सर्किट

ऋषिकेश Mon, 12/17/2007 - 22:37
बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख. मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :) -ऋषिकेश

स्वाती दिनेश Tue, 12/18/2007 - 00:51
तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,) स्वाती

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:01
सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो... विसुनाना, गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. क्या बात है, खरं आहे! :) नंदनशेठ, तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. खल्लास! प्राजू, गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात! बिरुटेशेठ, मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:) सहजराव, बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. क्या बात है! असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार... आपला, (जुनापुराणा!) तात्या.

प्रशांतकवळे Tue, 12/18/2007 - 10:18
खरच तात्या, ते दिवस गेले. परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या. महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत. असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या. प्रशान्त.

अवलिया Tue, 12/18/2007 - 13:43
वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं..... (कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....) नाना

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 14:00
मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा). सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या. -विजय

धोंडोपंत Tue, 12/18/2007 - 16:22
वा वा वा वा वा तात्या, अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास. सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा. त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती. पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे. अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे. आपला, (आतूर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

अवलिया Tue, 12/18/2007 - 16:29
पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. येवढे हताश होवु नका. पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही. थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे) बदल हा स्थायी भाव आहे जगाचा नियम आहे तरी हताश होवु नका नाना

विजुभाऊ गुरुवार, 01/28/2010 - 09:52
रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत. त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते. याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी. टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि गुरुवार, 01/28/2010 - 10:12
सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

महेशकुळकर्णी गुरुवार, 01/28/2010 - 11:07
सगळं अगदी मनातलं लिखाण.... (B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...) महेश

भानस गुरुवार, 01/28/2010 - 11:25
मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

सुधीर काळे गुरुवार, 01/28/2010 - 11:50
आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल? हाहाहा! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे गुरुवार, 01/28/2010 - 12:52
खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच ! अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच ! एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते ! अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच..... प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....) तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील..... "आम्ही चालवू हा पुढे वारसा !" तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार? रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा ! उदय सप्रे

ज्ञानेश... गुरुवार, 01/28/2010 - 13:13
तात्यासो, काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला. असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

भडकमकर मास्तर गुरुवार, 01/28/2010 - 14:35
रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे... आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय गुरुवार, 01/28/2010 - 15:00
तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु Fri, 01/29/2010 - 03:00
अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता.... सुंदर गाणी असतात..... पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद Fri, 01/29/2010 - 03:49
वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला. बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो. नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड Fri, 01/29/2010 - 07:06
एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति Fri, 01/29/2010 - 08:45
तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो. लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :) क्रान्ति अग्निसखा

अमोल केळकर Sat, 01/30/2010 - 12:11
मस्त लेख साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे. बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब Fri, 09/03/2010 - 10:39
हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते... प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात... आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल... लेख छान.

स्पा Fri, 09/03/2010 - 14:27
माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात ............. हल्ली नाही तसं होत ....... एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच... सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली... हसून हसून वाट लागली माझी .......

विसुनाना Mon, 12/17/2007 - 19:40
आम्हीही अगदी त्याच काळातले. 'गेले ते दिन गेले...' असं म्हणत नॉस्टाल्जिया कुरवाळण्याइतके जुनेपुराणे झालो नसलो तरी निर्भेळ आनंद देणार्‍या गोष्टी कमी होत चालल्या आहेत हे मात्र नक्कीच. गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :) असेच असेच...!

नंदन Mon, 12/17/2007 - 19:46
पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. -- अगदी. पूर्ण सहमत. इतका की, माझ्या डोक्यातलंच इथे कसं लिहिलं गेलं हा प्रश्न पडावा :). माझं आजोळ आमच्याच कॉलनीत होतं. आजोबांना आवडणारी माशांच्या आमटीची वाटी घरून तिकडे पोचवली की, ही दुसरी आजी जेवायलाच थांबवून घ्यायची. रेडिओवर हमखास बारा वाजताचा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू असायचा. तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. हा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. योगायोग म्हणजे 'सातच्या आत घरात' या चित्रपटातही एका प्रसंगात (सुहास जोशींची अंगणात तुळशीची पूजा सुरू असताना) हेच गाणं (केतकीच्या वनी...) पार्श्वभूमीवर ऐकू येतं. जुना, सात्विक काळ सूचित करणारं. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग लगेच त्या आत आल्यावर नात इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दाखवली आहे. असो. जुन्या काळी सारंच काही चांगलं होतं, असं अर्थातच नाही. पण सध्या आलेला कोरडेपणा, बाजारूपणा नव्हता हे मात्र खरं.

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 19:47
तात्या मी तुमच्याशी सहमत आहे. मी कित्येक दिवस टि.वी. चालु करित नाही. मला ते सहन होत नाही. अलिकडेच मी माझेशब्दवर सुमन कल्यापूरची काही गाणी लोड केली आहेत. किमान महाजालावरतरी सुखाने भ्रमण करतायावे हि अपेक्षा. संजय अभ्यंकर.

प्राजु Mon, 12/17/2007 - 20:01
पण.. वरती जी काहि साधेपणा संपल्याची तक्रार आहे ती मात्र मान्य नाही. इथे परदेशांत राहताना आजूबजूला राहणारी भारतीय मंडळी इतकी एकमेकाला धरून असतात की आपण कुठे तरी वेगळ्या ठिकाणि आहोत असे नाही वाटत. हां, मॉल संस्कृतिविषयी म्हणाल तर मि म्हणेन कदाचित ती सध्याची गरज आहे. गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आणि आकाशवाणीचे म्हणाल तर मी स्वतः आकशवाणीची निवेदिका होते. आणि आजही आकाशवाणी ऐकणारा खूप मोठा वर्ग समाजात आहे. अगदि नव्या पिढितसुद्धा. - प्राजु.

तात्या, आमच्याकडे औरंगाबाद-परभणी केंद्रावर आम्हीही कधीही असेच कार्यक्रम ऐकायचो. पण, हल्ली ते तुमचे एफ. एम. वाले आमच्याकडेही आले, त्यामुळे सरकारी आकाशवाणीची प्रसारण क्षमता कमी झाली आणि रेडियो क्लियर चालत नाही. मुंबईच्या कार्यक्रमातील अकरा की साडे अकराचे वेळेतील मराठी गाणी ऐकायला आम्हालाही आवडायचे. बाकी, आपण व्यक्त केलेल्या शब्दभावनेशी आपल्या इतकाच सहमत..... मॊल...त्या सुंदर तरुण्या.....याबद्दल आमचा एक कवी मित्र म्हणतो------- (विषयांतराबद्दल क्षमस्व पण लिहिल्यावाचून होत नाही ) मी अलिकडं दुकानातून वा भाजीमंडईतून किराणा किंवा भाजीपाला घेत नाही. तिथला भाजीपाला स्वस्त आणि ताजा असतो म्हणून किंवा हातात पिशवी घेऊन बाजारात फिरणं मनाला वेदनादायी आणि प्रतिष्ठेला धोक्याचंअसतं म्हणून मी मॊल किंवा बिग-बझार मधे जातो. तिथल्या थंडगार आणि प्रसन्न वातावरणात माझी खरेदी सुरु होते. सुंदर अशा सेल्सगर्ल्स ने अगत्यानं स्वागत केलं की, आयुष्य सार्थकी- लागल्यासारखं वाटतं मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... माझी खरेदी संपते कॊम्प्युटरवरचं बील हाता येतं मी पैसे देतो....आनंदानं घरी येतो. न आणलेल्या किंवा आणलेल्या सामानावरुन भांडण वगैरे होत पण तेही सवयीचं झाल्यामुळे काही वाटत नाही. (महानगरातला मी: या कवितेतल्या वरील काही ओळी. कवी: पी.विठ्ठ्ल : महाराष्ट्र प्रतिभा, दिवाळी अंक २००७)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Mon, 12/17/2007 - 21:26
वा तात्या लहानपणच्या आठवणीत नेलेत. "श्रृतिका" "बिनाका गीतमाला-अमीन सायानी" "बालोद्यान" "बातम्या" रविवार संध्याकाळी लागणारे "किर्तन" आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. आठवड्यातून एक दिवस टिव्हीवर सिनेमा असायचा. आता २४/७/३६५ तरी समाधान नाही. आता लोक दुसर्‍यांकडे आली तरी त्यांच्या घरी येऊन आपल्या आवडत्या मालीका बघतात. तेव्हा काय होते आणि आता काय आहे हे कायमच असणार आहे....आपण भाग्यवान ते दिवस आपल्या मिळाले म्हणुन ते दिवस आपण कोरून जपून ठेवले आहेत. कधीतरी, आज तुम्ही एक जुनी पेटी उघडलीत तशी उघडून खुश व्हायचे. एका मित्राकडे जमून बाहेर जायचा प्रोग्रम केला असतो, नेमकी सर येते एक-दोन मित्र जमायला उशीर होतो. बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. असाच कधीतरी आपल्या लोकांच्यात उघडायला. शेयर करायला.

In reply to by सहज

सर्किट Tue, 12/18/2007 - 01:43
आठवतेय, परगावचे पाहूणे अचानक आलेले , आई-आजी स्वयपाकघरातच अडकलेल्या. आता ते चुकीचे वाटते. तेव्हाही ते चुकीचेच होते, फक्त आता वाटायला लागले. जात्यावर दळताना आजी ओव्या करायची, म्हणून आज बायकोला जात्यावर दळायला लावणे कितपत योग्य आहे ? फक्त मराठी साहित्यात ओव्या निर्माण होत नाहीत म्हणून ? (हे उदाहरण स्मृतिरंजनात रमणार्‍या पुलंनी दिलेले आहे, मी फक्त टंकले.) - सर्किट

आजानुकर्ण Mon, 12/17/2007 - 21:35
केतकीच्या बनी सारखीच आठवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी गाणी म्हणजे वाट इथे स्वप्नातील संपली जणू आणि सखी मंद झाल्या तारका ही. 'आपली आवड' सारखे कार्यक्रमही आठवतात आणि संध्याकाळचा सहासाडेसहाला (कामगार विश्व च्या आधी लागणारा) "१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, १०० साई सुट्ट्यो.. ललला ललला ललला" वगैरे धून असलेला एक छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. गेले ते दिवस. (गहिवरलेला) आजानुकर्ण

धनंजय Mon, 12/17/2007 - 22:40
मलाही मराठी भावगीते तर एकदम हळवी करतात... त्या काळची चित्रपटांतली हिंदी गाणी फार आवडतात. तरी आजच्या काळातलेही काही तपशील सुखाचे म्हणून मनात नोंदवण्याचा मी आवर्जून प्रयत्न करतो. आजच्या बालकांची पिढी त्यांच्या मोठेपणी आजच्या परिस्थितीबद्दल अशाच हळहळ-युक्त प्रेमाने बोलेल. तेव्हा, माझ्या म्हातारपणात, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला पाहिजे ना!

सर्किट Mon, 12/17/2007 - 22:32
"केतकीच्या बनी तिथे" हे माझे अत्यंत आवडते गाणे. सुधीर मोघेंच्या "मित्रा, एका जागी नाही, असे फार थांबायचे" ह्या कवितेला ह्या गाण्याची चाल मी बसवली होती. इतक्या सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या. - सर्किट

ऋषिकेश Mon, 12/17/2007 - 22:37
बहोत खुब! नॉस्टॅल्जिक करून हुरहुर वाटायला लावणार लेख. मला रेडियो बरोबरच लहानपणी सकाळी "बालचित्रवाणी" लागायचं त्याचं संगीत, सुरभी चं संगीत, फिल्म्स डिविजन की भेट वाले कार्यक्रम, अगदी आपण यांना पाहिलत का हे ही आठवतं :) -ऋषिकेश

स्वाती दिनेश Tue, 12/18/2007 - 00:51
तात्या,ह्या तुझ्या लेखाने परत त्या 'मंतरलेल्या दिवसात ' मनाने जाऊन पोहोचले, हातातून निसटून जाणार्‍या वाळू सारखे ते दिवस ही निसटून गेले आहेत..खूपच नॉस्टाल्जिक व्हायला झालं..(बर्‍याच जणांचं असंच झालं आहे हे वरील प्रतिसादांतून जाणवत आहेच,) स्वाती

विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:01
सर्व वाचकांचे मनापासून आभार मानतो... विसुनाना, गावागावातही बस, कारच्यामागून पळणारी, टाटा करणारी नागडी,उघडी पोरे नाहीत आता... पण अंगभर कपडे घातलेल्या नव्या पोरांचा निरागसपणा मात्र नाहीसा झालाय. क्या बात है, खरं आहे! :) नंदनशेठ, तो कार्यक्रम आणि पाटावर बसून होणारं ते बटाट्याची भाजी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच-गुळाची आमटी, सुधारस आणि मऊसूत पोळ्यांचं जेवण या दोन गोष्टी एकमेकांपासून अजूनही वेगळ्या काढता येत नाहीत. खल्लास! प्राजू, गाणी आजही खूप चांगलि येताहेत. कदाचित तुमच्या अपेक्षा नाहि पूर्ण होणार त्यानी. याचा अर्थ आधीची गाणी चांगली नव्हती असा कोणी घेऊ नये. ती तर उत्तमच होती. आधीची बरीचशी उत्तमच होती, हल्लीचीही काही काही बरी असतात, नाही असं नाही. परंतु प्रमाण खूप कमी झालंय एवढं मात्र मला जाणवतं! नाही म्हणायला, संदीप खरेची गाणी मला आवडतात! बिरुटेशेठ, मग नको असलेल्या वस्तूंचीही मी मनमुराद शॊपींग करतो जिलेट,सॊस, क्रिम,परफ्युम एक ना दोन..... तुमच्या मित्राची कविता पुरेशी बोलकी आहे! मस्त आहे...:) सहजराव, बाकीचे सगळे वाट बघत असताना ज्याच्या घरी जमलो आहे त्याची मायमाउली मस्त चहा व गरमगरम भजीचे ताट समोर आणून ठेवते. भजीला तशी चव परत कधी येत नाही, चहाचा स्वाद बेंच मार्क बनतो. न मागता अचानक मिळालेला व आयुष्यभराकरता तृप्त केलेला क्षण आपल्याला लाभला असतो. क्या बात है! असो! कर्ण, ऋषिकेश, धन्याशेठ, बिपिनराव, सर्कीट, सर्व मंडळींचे पुन्हा एकदा आभार... आपला, (जुनापुराणा!) तात्या.

प्रशांतकवळे Tue, 12/18/2007 - 10:18
खरच तात्या, ते दिवस गेले. परवा सन्ध्याकाळी "हा खेळ सावल्यान्चा", "जगाच्या पाठीवर", "पिन्जरा" ह्या जुन्या सिनेमान्ची गाणी लावली आणि शान्तपणे ऐकत बसलो. १० मिनीटात ८० च्या दशकात पोहोचलो. कामगार विश्व --- खरच सुन्दर, त्यात ए गाणे अगदी नेहमी लागायचे "चान्दणे टिपूर हालतो वारा", अगदी आवर्जून ऐकायचो. दूरदर्शन वरच्या बातम्या पण सुन्दर वाटायच्या. महिन्यातून एकदा गावातल्या करमरकरान्च्या बन्गल्याला भेट ठरलेली असायची, ते सुन्दर पुतळे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत. आता गावात जातो पण वेळ नाही मिळत. असो, ते दिन गेले, फक्त आठवणी राहील्या. प्रशान्त.

अवलिया Tue, 12/18/2007 - 13:43
वा तात्या व इतर सर्व मंडळी अतिशय सुंदर.......मन भरुन आलं..... (कोण रे तो तिकडे याला मध्यम वर्गीय रडगाणे म्हणतोय.... ठोक द्या चांगला त्याला.... हात रे....) नाना

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 14:00
मलाही आठवते कि मीही रोज सकाळी सात ते दहा (कधी कधी सहा ) या वेळेत आकाशवाणी मुंबई व सांगली यावरील कार्यक्रम नेहमी आवडायचे (९० ते ९७ च्या काळातले कारण मी ८५ चा). सकाळचे अभंग, गीरवाणवाणी,बातम्या खुप आवडत होत्या. -विजय

धोंडोपंत Tue, 12/18/2007 - 16:22
वा वा वा वा वा तात्या, अप्रतिम लेख. अतिशय सुंदर कथन. अरे आमच्या मनातल्या गोष्टी तू शब्दात मांडल्यास. सात पाचला लागणार्‍या बातम्या आठवल्या ' आकाशवाणी पुणे....सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत". वा वा वा वा. त्या आधी सकाळी ६.०० वाजता मंगल प्रभात. त्यात अण्णांनी गायलेले अभंग, काय मजा होती. पुन्हा प्रपंच ही मालिका होती. त्यात टेकाडे भावजी, मीनावहिनी आणि प्रभाकरपंत असायचे. अनेक गोड गाणी ऐकायला मिळायची, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरं बरोबर, नाविका रे वारा वाहे रे..., तुला ते आठवेल का सारे?... गेलं यार गेलं सगळं पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. फारच सुंदर लेख झालाय. अजून या स्वरूपाचे लेखन येऊ दे. आपला, (आतूर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

अवलिया Tue, 12/18/2007 - 16:29
पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आपली संस्कृती चिरडली गेली याची खंत आहे. येवढे हताश होवु नका. पुणे मुंबइ म्हणजे महाराष्ट्र नाही. थोडे थांबा काजळी धरली म्हणजे विस्तव संपला असे नाही भारतीय संस्कृती सर्व पचवुन पुनश्चः तेजाने झळकेल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे. हा थोडा त्याग करावा लागेल, जीवनशैली बदलावी लागेल. ती तशी पण बदलावी लागेलच (अमेरीकेची ग्रहस्थिती काय सुचवितेः, भैरवी सुरु होत आहे) बदल हा स्थायी भाव आहे जगाचा नियम आहे तरी हताश होवु नका नाना

विजुभाऊ गुरुवार, 01/28/2010 - 09:52
रेडीओवर पुरुषोत्तम जोशी या नावाचे खणखणीत आवाजाचे एक व्यक्तीमत्व होते. शृतीका त्या आवाजाशिवाय पूर्णच होत नसत. त्यांची "वाटसरू" शृतीका अजूनही पुणे केंद्रावर जपून ठेवली आहे. कधीमधी ती लावली जाते तेंव्हा देव पावल्यासारखे वाटते. याकूब सईद गजरा सादर करायचे त्याचे लज्जत विसरली न जाणारी. टीव्हीवर "लोकू सन्याल" त्यांच्या स्पेश्यल आवाजात इंग्रजी बातम्या द्यायच्या तेवढा खर्जातला आवाज आजतागायत ऐकायला मिळाला नाही

शुचि गुरुवार, 01/28/2010 - 10:12
सगळ मान्य. पण हे लक्षात घ्या - त्या गाण्यानी आपल्या मेन्दूचा जो भाग उत्तेजीत झाला, महाराजा , आजकालच्या नव्या गाण्यानी , नव्या पीढीच तोच मेन्दूचा भाग उत्तेजीत होतो. शेवटी अनुभव सन्कलन प्रक्रिया तीच. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

महेशकुळकर्णी गुरुवार, 01/28/2010 - 11:07
सगळं अगदी मनातलं लिखाण.... (B T W अजूनही सकाळी आकाशवाणीच्या 'अस्मिता' वाहिनीवर यातलं बरच काही ऐकता येतं.... मी ऐकतो...) महेश

भानस गुरुवार, 01/28/2010 - 11:25
मी पुन्हा लहान झालेय. :) अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान लेख.

सुधीर काळे गुरुवार, 01/28/2010 - 11:50
आता तुम्हा 'नववृद्धां'ना असे वाटत असेल तर आम्हा 'अतिवृद्धां'ना कसे वाटत असेल? हाहाहा! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

उदय सप्रे गुरुवार, 01/28/2010 - 12:52
खूपश्या गोष्टी मला पण जाणवतात , पण म्हणून नवीन सर्वच टाकाऊ नाहिये हो ! अजून सुध्दा रात्री ११ ला बेला के फूल आम्ही ऐकतो, अजूनसुध्दा एफ्.एम.१०० वर शनिवार रविवार अतिशय सुंदर अशी मराठी गाणे सुरेख निवेदनासह ऐकायला मिळतात्.अजून्सुध्दा झी.मराठी वर "सार्वजनीक महाआरत्यांची संचालिका गेली कित्येक तपे बरळणारे निवेदन आणि क्ष्क्ष्क्ष्क्ष म्हणून एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात , असे म्हणते" पण अभिलाषा चेल्लम , राहुल सक्सेना सारखे जन्माने अमराठी असून सुरेख गाणारे आवाज ऐकू येतातच ! अजूनसुध्दा अजय अतुल चा नटरंग जीवनात रंग भरतोच ! अजून्सुध्दा किंचित् अश्लील्पणाचा टच असणारा थ्री ईडियट्स दुसर्‍यांदा पहावासा वाटतोच ! अजून्सुध्दा रात्री १० ल मुंबई "ब" लागते , अजून्सुध्दा बुधवारी नाट्यपराग लागतोच्.....अजून्सुध्दा गुरू ठाकूर सारखे उमदे कवी , संदीप खरे-सलील कुलकर्णी सारखी मंडळी छान काम करताना ऐकू येतातच ! एकच झालय तात्या , सध्ध्या जाहिरातीचा जमाना आलाय , त्यातून अगदी स्तार वरील मुकाबला मधे श्रेया घोषाल्-शंकर महादेवन सारखे गुणी कलाकार सुध्दा सुटत नाहीत ! त्यामुळे तुमच्या - आमच्यासारख्या चोखंदळ वाचक्-चाहत्या वर्गाची फारच पंचाईत होते ! अजून्सुध्दा मातीच्या चुली , आनंदाचे झाड, तू तिथं मी , यंदा कर्तव्य आहे, पा सारखे सिनेमे होतातच..... प्रश्न इतकाच आहे की दोन डोळे, दोन कान यांनी नेमकं कसं काय टिपावं ? अजून्सुध्दा सामाजिक जाणीव असणारी "श्रियुत गंगाधर टिपरे" काळजाला हात घालतेच (झी टी.व्ही. ने दिलेली एकमेव मालिका ज्यात सगळी पात्र आपल्याच घरची वाटली ! श्यामला पण आमच्या आईसरखीच साधी सुती साडी नेसून स्व्यंपाक करते , कपाळावरचा घाम उलट्या हाताने टिपते.....) तेंव्हा तात्या.....कालाय तस्मै नमः म्हणायचं , पण आपलं ते चांगलं सोडायचं नाही आणि नवीन चांगलं असेल ते आवर्जून प्रशंसा करायची आणि मग जे वाईट आहे ते वाईट आहे हे पण म्हणायचं , सगळेच जण वाईट मार्ग आवडणारे नाहियेत तात्या , त्यांना तुमच्यासारख्या बुजुर्ग मार्गदर्शनाची आत्यंतिक आवश्यकता आहे.तरच ते म्हणतील..... "आम्ही चालवू हा पुढे वारसा !" तात्या, तुमची तळमळ जाणवली आणि नवीन पिढीची जळजळ पण जाणवली , पण आमच्या धाकट्या चिन्मय ने जेंव्हा "पुकारता चला हूं मैं" शाळेत म्हटले तेंव्हा पटले , काय ऐकायचे ते आपणच घडवायला हवे तर, आणि तरच ना त्यांना कळणार? रागावू नका तात्या , तुमच्यावर , तुमच्या सखोल वाचन, लेखनावर अपार जीव जडलाय म्हणून हे लिहिण्याचं धाडस करतोय , नसेल पटत तर "वेडा आहे हा उदय सप्रे!" असं म्हणून सोडून द्या , पण पटलं तर ते पण नक्की कळवा ! उदय सप्रे

ज्ञानेश... गुरुवार, 01/28/2010 - 13:13
तात्यासो, काही संदर्भ लागले नाहीत, मात्र एकूण लेख आवडला. असे लिखाण वाचले म्हणजे आमच्या पिढीने खूप काही मिस केले आहे की काय, असे वाटते.

भडकमकर मास्तर गुरुवार, 01/28/2010 - 14:35
रेडिओवरचा प्रभातवंदन हा कार्यक्रम सातच्या शाळेत जायच्या गडबडीत कायम ऐकू येत असे... आणि रात्री ९ ३० ला असणार्‍या श्रुतिका ..... ( त्यातल्या काहींना मी स्थानिक रडकथा म्हणायचो पण ऐकायचोच... त्यातला तो टिपिकल डोअरबेलचा आवाज अजून ऐकू येतो) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

अन्वय गुरुवार, 01/28/2010 - 15:00
तात्या लइ भारी वाटलं वाचून. जुंन ते सोनच तात्या. आजच्या युगाला त्या काळाची सर कुठून येणार?

प्रशु Fri, 01/29/2010 - 03:00
अजुनही रोज सकाळी आई आकाशवाणी चालु करते, ५:३० वाजता.... सुंदर गाणी असतात..... पण झोपमोड होते म्हणुन मी आरडा ओरडा करायाचो. पण आता नाही करणार. कोण जाणे काहि दिवसांनी ते सुख सुद्धा दुरापास्त होईल...

पाषाणभेद Fri, 01/29/2010 - 03:49
वा तात्या. तुमचा जुना लेख परत वरती आला अन तो वाचून मनाचा ठाव घेतला. बिपिन कार्यकर्ते म्हणतात तसे हे माझेच बालपण आहे हो. नव्या पिढीचा एक आनंदाचा ठेवा हिरावला गेलाय या ग्लोबलायझेशन मुळे. ते दिवस पुन्हा येणे नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

फारएन्ड Fri, 01/29/2010 - 07:06
एकदम आवडले! पुण्यात ते सकाळी ६ ला 'अ' वर लागायची अशी बरीच गाणी (भक्तिगीते). सुधा नरवणेंबाबत एकदम सहमत :)

क्रान्ति Fri, 01/29/2010 - 08:45
तात्या, अगदी बालपणात घेऊन गेला लेख. स्वगृहातला रेडिओ तर माझ्याच माहेरचा वाटला! त्या काळातल्या मनाच्या श्रीमंतीवर आणि समृद्धीवर पोसलो आहोत, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो. लेखावरचे सगळ्या मंडळींचे प्रतिसादही पुरेसे बोलके आहेत. बर्‍याच दिवसांनी मनातलं, मनासारखं वाचायला मिळालं. :) क्रान्ति अग्निसखा

अमोल केळकर Sat, 01/30/2010 - 12:11
मस्त लेख साधारण २ वर्ष पुर्वीचा लेख असुनही आजची परिस्थितीही लेखात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे. बर्‍याच जुन्या ( चांगल्या ) गोष्टी हरवत चालल्या आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब Fri, 09/03/2010 - 10:39
हम्म..मलाही nostalgic व्हायला होतं..मी तुमच्यापेक्षा बरीच लहान असूनही आमचे दिवस किती छान असेच वाटते... प्रत्येक माणसाला तसेच वाटत असेल...आपल्या आठवणी असतात त्या काळात... आताच्या मुलांना सुद्धा काही काळाने तसेच वाटेल... लेख छान.

स्पा Fri, 09/03/2010 - 14:27
माझ्या लहानपणी रामायण ,महाभारत ,लागल्यावर रस्ते ओस पडलेले मला आठवतात ............. हल्ली नाही तसं होत ....... एकता कपूर चे महाभारत सर्वांना माहित असेलच... सध्या कुठल्याश्या मराठी वाहिनीवर कर्णाची मालिका बघितली... हसून हसून वाट लागली माझी .......
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.