मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मलमूत्र व संस्कृती

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 22:56
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्‍यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल. खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्‍या की वाईट हे ठरूच नये! सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:)) अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:02
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे? आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली. विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा. >> अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद..... झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही. (तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 23:09
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल! तात्या.

धनंजय Fri, 12/14/2007 - 23:26
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत. थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही. उदा: झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा. पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल. गोवर्‍या थापणारीला, आपले घर सारवणार्‍या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.) मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:31
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत. मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते. एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का? शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?

In reply to by आजानुकर्ण

मनोज Fri, 12/14/2007 - 23:59
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे . तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले? मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!! ह्.भ्.प. मनोज महाराज

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Sat, 12/15/2007 - 05:32
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे. म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे. गवत खाणार्‍या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो. बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच. आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते. मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्‍या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!) असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)

In reply to by आजानुकर्ण

सहज Sat, 12/15/2007 - 07:50
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात. जरा ह्यावर विचार करावा.

In reply to by धनंजय

विकास Sat, 12/15/2007 - 01:15
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले). विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.

In reply to by विकास

सर्किट Sat, 12/15/2007 - 08:13
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:18
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.

In reply to by विकास

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:17
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्‍यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्‍यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.

आजानुकर्ण शी सहमत आहे. १) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही. २) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे. ३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे. ४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे. (चविष्ट) प्रकाश घाटपांडे

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:15
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

वारकर्‍यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एकाने किस्सा सांगितला. वारकर्‍यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्‍यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते. शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.

utkarsh shah Fri, 07/30/2010 - 22:51
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते. जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 22:56
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्‍यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल. खरं आहे! मलमूत्रासारख्या नैसर्गिक मानवोत्सर्जित पदर्थांमुळे संस्कृती, शिष्टाचार, सभ्यता इत्यादी गोष्टी बर्‍या की वाईट हे ठरूच नये! सत्यनारायनाच्या पूजेच्या दिवशीही दारावर आंब्याच्या टाळ्याऐवजी स्वत:चंच किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहातून आणलेलं मानवी मलमूत्र फासलं तरी चालेल! ते शुभचिन्ह मानायला हरकत नाही/नसावी!:)) अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद वाटला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:02
सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा सणासुदीच्या दिवशी सारवायला गायीचे मलमूत्र चालते मग मानवी मलमूत्राने काय घोडे मारले आहे? आमची मनोवृत्ती चंचल असल्याच्या संशयावरून मागे आमची ग्रहशांती केली तेव्हा टम्म ढेरी फुगलेल्या एका भटोबाने आम्हाला गोमय व गोमूत्र (अमृताचा अंश हो!...( अमृता नाही अमृत!))खायला लावले होते. मात्र आमच्या मनोवृत्तीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. गाय बिचारी अस्थिर व चंचल झाली. विनोदाचा भाग सोडा. पण लेखाचा मूळ हेतू आपल्या बंदिस्त विचारसरणीमुळे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा होता. कदाचित तो सफलही झाला नसावा. >> अवांतर - लहानमोठी पेल्यातली वादळे होऊनही लोकं अजूनही आमच्या मिपावरच हौशीहौशीने लिहीत आहेत याचा आनंद..... झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. मात्र त्याचा अर्थ तत्त्वांना मुरड घालणे हा नाही. (तत्त्वनिष्ठ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 23:09
झालेली वादळे पेल्यातीलच रहावीत अशीच आमचीही इच्छा आहे. ती राहतीलच! त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल! तात्या.

धनंजय Fri, 12/14/2007 - 23:26
मला वाटते की त्या विनोदाचे उद्दिष्ट या पुढील वैचित्र्यपूर्ण तर्काने हसू उत्पन्न करणे असे होते : पातळ मळ हा पातळ वांतीसारखा भासत असेल, तर द्रवाचे स्रोत कुल्ले हे ओठांसारखे भासावेत. थोडीतरी किळस वाटल्याशिवाय तो विनोद आहे हे समजूच येत नाही. उदा: झणझणीत मिसळ आठवून खवैय्याने तोंड गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. झणझणीत मिसळ खाऊन लेचापेचाने डोळे गच्च मिटले तरी पाणी गळू लागले. इथे किळस वाटली नसल्यामुळे "विनोद" असा काहीच वाटत नाही. अगदी फिकट कोटी म्हणा. पाणी गळण्याबाबतच, "बुधवार येताच तिच्या संगतीने" आणि "गुरुवार येताच तिच्या गरमीने" म्हटले तर लगेच ओंगळ विनोद होतो. विनोद समजण्यासाठी इथे मुळात किळस असणे मानसशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे. रोज पछाडलेली इंद्रिये बघणारा डॉक्टर तुम्हाला सांगेल की त्यात ओंगळ असे काही नाही, पण त्या डॉक्टराला त्यात विनोदीसुद्धा काही दिसणार नाही, केवळ फिकट कोटीच दिसेल. गोवर्‍या थापणारीला, आपले घर सारवणार्‍या आमच्या जुन्या लोकांना शेणात किळस वाटत नव्हती पण विनोदही वाटत नव्हता. तस्मात् तसल्या प्रकारचे किस्से विनोदी वाटण्यासाठी किळस वाटणे हे गृहीतक. तुम्हीही विचार करा. तुमच्या ओळखीचा कुंभार "गाढवाची लीद" ऐकल्यावर हसायचा का? (बहुतेक नाही, असे मला वाटते.) मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. संस्कृतीविषयीचा तुमचा मुद्दा कुठल्यातरी विशाल संदर्भात खराच आहे हे पटले. पण या संदर्भात गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:31
सारासार विचार न करता मनात आलेले विचार येथे टंकले आहेत. तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत. मला वेगळ्या दृष्टीकोणातून या विषयावर चर्चा करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत असे वाटत होते. एकंदर मलमूत्राला ओंगळ समजण्याची सुरुवात केव्हापासून झाली याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे का? शरीरातून बाहेर पडणारे सर्व उत्सर्जन यांना श्रेणीवार ओंगळ समजले जाते असे वाटते. घाम आला तर तितका ओंगळ नाही मात्र विष्ठा आली तर ती ओंगळ असे असण्याचे कारण काय असावे?

In reply to by आजानुकर्ण

मनोज Fri, 12/14/2007 - 23:59
फार पुर्वीची गोष्ट आहे . गुरू आपल्या शिष्याला म्हणतात - "या जागत सगळ्यात घान गोष्ट काय आहे?" शिष्य खुप विचर करतो पण त्याला काही सुचत नाही. मग सकली प्रतःविधिला गेल्यावर त्याच्या लक्षात येते - आरे आपली विष्ठा हिच ती गोष्ट आहे . तो गुरु काडे आपले उत्तर घेउन जातो. गुरु म्हणतात - आरे पण ही विष्ठा तर काल परियन्ता छान सुन्दर अन्न होते? मग त्याचे असे रुपांतर कसे झाले? मग शिष्याला बोध होतो - हा मनुष्य देह सगळ्यात घान गोष्ट आहे !!! ह्.भ्.प. मनोज महाराज

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Sat, 12/15/2007 - 05:32
साधारणपणे जे प्राणी आपल्यासारखे खाद्य खातात, ज्यांची आतडी आपल्यासारखी असतात, त्यांच्या विष्ठेचा आपल्याला दुर्गंध सहन होत नाही, असे माझे (अभ्यास नसलेले) निरीक्षण आहे. म्हणजे कुत्रा, मांजर, डुक्कर, माकड यांच्या विष्ठेचा दुर्गंध फार वाटतो. आपल्याकडच्या मोकाट चरायला सोडलेली गुरे मात्र मनुष्यविष्ठा सहज खातात, त्यामुळे त्यांना त्याचे वावडे नसावे. गवत खाणार्‍या गुराच्या शेणाचा वास आपल्याला दुर्गंधी वाटत नाही, तीच बाब घोडे, गाढव यांबाबत, हा थोडा घाण वाटतो पण फार नव्हे. (मका आणि मांस खायला दिलेल्या गुरांच्या शेणाला मात्र भयंकर दुर्गंध येतो.) माशांचे आतडे, पक्ष्यांची शीट, (झिंगी) सुंगटातला काळा धागा यांचा "विष्ठेसारखा दुर्गंध" कोणाला वाटल्याचे ऐकिवात नाही. (माशाच्या पोटातला कडवटपणा, उग्र वास त्याच्या पित्ताचा असतो, "विष्ठेचा" नव्हे.) प्राणीसृष्टीत दूर जावे, तर मधमाशांचा मध हा तर बहुतेक सर्व संस्कृतीत खातात (हा माशीच्या पोटातून पुन्हा तोंडात येतो, माशीची ही विष्ठा नव्हे - पण ते असो...) - दुर्गंधाऐवजी आपण त्याला सुगंधच मानतो. बहुतेक प्राण्यांना स्वतःच्या विष्ठेचा तिटकारा असतो. हे मांजराबाबत प्रसिद्धच आहे. पण गुरेदेखील शेण खात नाहीत. डुकरे निसर्गतः स्वतःची विष्ठा खात नाहीत. म्हशी शेणाच्या डबक्यात बसून राहातात, ही बाब माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध आहे, पण हे अपवादात्मकच. आईच्या दुधावरच असलेल्या बाळाच्या लंगोटीला तितका दुर्गंध येत नाही, पण त्याला नेहमीचे अन्न देऊ लागल्यानंतर घाण येऊ लागते. मी असा तर्क करतो आहे, की आपल्यासारखे पदार्थ खाणार्‍या प्राण्याची विष्ठा ही आपल्या आरोग्याला हानीकारक असण्याची शक्यता जास्त असावी, कारण त्यातले जंतू आपल्या पोटातही तगू शकतील. त्यामुळे त्या वासाचा तिटकारा प्राण्यांना नैसर्गिकच असावा. पण खूपच वेगळ्या प्राण्याच्या विष्ठेतील/पोटातील/आतड्यातील जंतू आपल्याला बहुतेक हानीकारक नसतात. अगदी घ्यायचा तर मधच घ्या! (तरी अगदी लहान बाळाला मध देऊ नये. त्यात कधीकधी बॉट्युलिझमचे जंतू असतात, ज्यांचा मुलांना/मोठ्यांना काही त्रास होत नाही, पण लहान बाळांना होऊ शकतो!) असो. या विषयावर हा माझा केवळ कल्पनाविलास आहे... (दिलेली बारीक सारीक माहिती ठोस आहे. तर्क मात्र कोणी सिद्ध केलेला नाही.)

In reply to by आजानुकर्ण

सहज Sat, 12/15/2007 - 07:50
सारासार विचार न करता मनात आलेले विचार टंकले गेले व टंकतच राहीले की वादळे उत्पन्न होऊ शकतात. जरा ह्यावर विचार करावा.

In reply to by धनंजय

विकास Sat, 12/15/2007 - 01:15
मलमूत्रवायूच्या विनोदांनी मला अगदी लहानपणी हसू येत असे, पण काही विशेष प्रयत्न न करता माध्यमिक शाळेपर्यंत हसू यायचे थांबले (असा माझा त्या ठिकाणी प्रतिसाद होता.) माझ्या बाबतीत तरी हा सांस्कृतिक बदल नसून वयानुसार अभिरुची बदलल्याचा फरक होता असे वाटते. आपला सर्वच प्रतिसाद पटला, पण त्यातले वरील वाक्य मह्त्वाचे वाटले. मिपावर सध्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना घेउन कधी कधी ओंगळपणा वाटेल असे लिहीलेले दिसते. (मी अजानुकर्णांच्या लेखा बाबत म्हणत नाही, त्यानी त्याची भुमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे आहे ते कळले). विनोद हा मॅचुरीटीप्रमाणे बदलला पाहीजे असे वाटते. उ.दा. - मुंगीचे विनोद जर येथे परत कोणी लिहू लागले तर बालीश वाटेल तसेच पौंगाडावस्थेत जे काही बोलले जाते त्याचा पुनरूच्चार हा पण येथे पोरकटपणा वाटू शकेल.

In reply to by विकास

सर्किट Sat, 12/15/2007 - 08:13
मॅच्युरिटी असती, तर ह्या स्वातंत्र्याला मातेसमान वागवले गेले असते. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा वाट्टेल तसा उपयोग करणे, म्हणजे आईने आपले स्तन चोखायला दिले म्हणून त्यांची चित्रे प्रकाशित करून आपल्या इतर चित्रप्रेक्षक मित्रांचा आंबटशौक पूर्ण करण्यासारखे झाले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:18
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव असणे महत्त्वाचे. तीव्र शब्दात आपण हेच सांगितले आहे.

In reply to by विकास

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:17
स्वातंत्र्याच्या कल्पना चुकीच्या घेणे चुकीचे तर आहेच. पण स्वतःच्या कल्पना दुसर्‍यांवर लादणेही चुकीचे आहे. किंबहुना मिसळपावावर ठिकाणी (मला ओंगळ वाटलेले) लेखन चालले मग इथे दुसर्‍यांना ओंगळ वाटलेले लेखन का काढले हा महत्त्वाचा प्रश्न होता. मला व्यनिद्वारे अनेकांनी विचारणा केल्याने मी माझ्या भाषेत स्पष्टीकरण दिले. वाचकांची म्यॅच्युरिटी वाढली पाहिजे हे तर अत्त्यावश्यक आहे.

आजानुकर्ण शी सहमत आहे. १) घरी अंगणात व ओट्यावर सडा, माड्या ओसरी स्वयंपाकघर वगैरे ठीकाणी मात्र सारवणे यात कधी घाण वाटली नाही. वर्गात प्रत्येक जण आपापला पट्टा सारवत असे. शेण घमेल्यातून गोळा करुन आणण्यात कधिच घाण वाटली नाही. २) गोमुत्र शिंपडताना घाण वाटली नाही पण पिताना मात्र तोंड कडू वाटे , श्रावणीत पंचगव्य खावेच लागे. ३) शेणात पाय भरला तर घाण वाटायची नाही, पण माणसाच्या विष्टेत पाय पडला तर घाण वाटे. "आरारा ग्वॉत पाय भरला जा धुन ये. " असे म्हटले जायचे. ४) शेतात, विशेषतः केळीत माणसाच्या विष्टेला "सोनखत" म्हटले जायचे. (चविष्ट) प्रकाश घाटपांडे

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:15
रोचक व सद्यपरिस्थितीवर नेमके भाष्य (काय हा द्रष्टेपणा!) करणारा लेख. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

वारकर्‍यांसाठी वैद्यकीय पथकात काम करणार्‍या एकाने किस्सा सांगितला. वारकर्‍यांचे मलमूत्र विसर्जनासाठी एका शेतकरी कुटुंबाने शेतात चर खांडुन व्यवस्था करुन ठेवली होती. यातुन वारकर्‍यांची सोय तर झाली पण त्याचे धान्योत्पादन खुप वाढले. एवढ उत्तम खत फुकट मिळाले होते. शहरातल्या सगळ्या लोकांच्या मलमुत्राचे सोनखत झाले तर काय होईल असा विचार डोकावुन गेला.

utkarsh shah Fri, 07/30/2010 - 22:51
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ ओंगलपना हा आपल्या संस्कारावर पन अवलंबून असतो. चिंचेच अथवा लिंबाच नाव घेताच अनेकांच्या तोन्डाला पाणी सुटते. जे आपल्या मनात घट्ट रुजुन बसले आहे ते एवढ्या सहज टाळता येने शक्य नाही....
लेखनप्रकार
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली. पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले. फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.

रेड आणि व्हाईट वाईन्स

संजय अभ्यंकर ·

राजे Fri, 12/14/2007 - 22:13
ती लाल असते व ती पांढरी असते.... ईतकेच मला तर माहीत आहे बुआ..... ;} राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

राजे Fri, 12/14/2007 - 22:24
वर उल्लेखलेल्या विनोदी प्रतिसादानंतर एकदम माहीतीपुर्ण प्रतिसाद. दोन्ही प्रकारच्या वाईन मध्ये जे उपलब्ध घटक [केलोरीज] आहेत ते सारखेच आहेत / असतात. [असला तरी थोडा फार फरक असतो..] उदा. येथे पाहा.. http://www.annecollins.com/calories/calories-wine.htm दोन्ही मध्ये काहीच फरक नसतो व सला तरी तो फक्त रंगाचाच असावा असा कयास. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सुनील Fri, 12/14/2007 - 22:25
चार जाणकारांनी जरी तुम्हाला सांगितले की अमुक-तमुक वाईन उत्तम आहे, आणि तरी ती तुम्हाला चवीला आवडली नाही तर? तेव्हा वाईनच्या बाटल्यांवरील लेबले वाचा (खिशातील पाकीट्देखील चाचपून पहा) आणि विविध वाईन्स खरेदी करून चाखा. त्यातून तुमची आवड तुम्हाला लक्षात येईल. माझे वैयक्तिक मत - व्हाईट वाईनमध्ये Chardonnay आणि रेड वाईनमध्ये Shiraz. अर्थात तुम्हालाही त्या आवडण्याची सक्ती नाही आणि मलादेखील त्याचा का आवडतात त्याची कारणे देण्याची गरज नाही. (सावध तळीराम) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन Sat, 12/15/2007 - 07:27
जाणकारांद्वारे बर्‍याच वाईन्सना १०० पैकी पॉइंट्स दिले जातात. वाईनच्या बाटलीवर मग ९१ पॉईंट, ९३ पॉईंट इ. माहिती तुम्हांला पहायला मिळेल. वाईनमध्ये असणार्‍या घटकांबरोबरच ती किती काळ मुरवलेली आहे, यावर तिची चव आणि पर्यायाने किंमत ठरते. दुसरं म्हणजे, जेवणात रेड मीट असेल तर सोबत रेड वाईन घ्यावी, कारण या वेळी मांसाच्या तीव्र चवीसमोर व्हाईट वाईनची चव फिकी पडू शकते. व्हाईट मीट (उदा. चिकन) किंवा मासे जेवणात असतील तर व्हाईट वाईन उत्तम. सुनील यांनी सांगितल्याप्रमाणेच शार्डने आणि शिराझ या दोन उत्तम प्रकारच्या वाईन्स आहेत (अनु. व्हाईट/रेड) शार्डने जरी मूळची फ्रेंच असली तरी सध्या कॅलिफोर्नियन शार्डनेज अधिक लोकप्रिय आहेत. (रॉबर्ट मोन्डावी, सोनोमा व्हॅली, केन्डॉल जॅक्सन इ. वाइनरीजच्या शार्डनेज चांगल्या असतात.) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Sat, 12/15/2007 - 07:41
ज्यांना हृदयविकार आहेत, अथवा मधुमेह आहे, त्यांनी पांढरी वाईन शक्यतो घेऊ नये. ह्याचे कारण की अँटी ऑक्सिडण्ट्स ह्या वाईन मध्ये कमी असतात. लाल वाईन मध्ये जास्त. डॉक्टर लोकांनी काढलेले हे निष्कर्ष आहेत, मी नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाल वाईन अधिक चांगली. असो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:57
अँटी ऑक्सिडण्ट्सचा संबंध शरीरातील "फ्री रॅडिकल्स" मुक्त करण्याशी व पर्यायाने कर्करोगाशी असावा. हृदयविकार वा मधुमेहाशी नाही. लाल वाईनपेक्षा जास्त अँटी ऑक्सिडण्ट्स हे फळांमध्ये व (दूध न घातलेल्या) चहामध्ये असतात. त्यामुळे केवळ अँटी ऑक्सीडण्ट्स हवे असतील तर हे अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.

सहज Sat, 12/15/2007 - 07:38
एका चांगल्या दुकानात जा, (किंवा विमानतळावर ड्यूटी फ्री) तिथे वाईनच्या किंमती बघा काही बाटल्या महाग असतील. (ब्रॅन्ड नेम मुळे, टॅक्स मुळे काही बाटल्या महाग असतील. पण "माल" चांगला असण्याच्या शक्यता जास्त) त्या महाग बाटल्यांकी एक उचला. चांगली वाईन असण्याची शक्यता ९५%(बर्‍याचदा असते) (तुम्हाला आवडेल की नाही हा भाग वेगळा :-))

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:08
चर्चा विषय चांगला आहे. पण या क्षेत्रातील आमचे ज्ञान अत्यंत तोकडे असल्याने आम्ही फक्त वाचनाचे काम करतो. आपले चालू द्या. आपला, (अनभिज्ञ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

संजय अभ्यंकर Sat, 12/15/2007 - 18:30
आपल्या प्रतिक्रियातून बरीच माहिती मिळ्त आहे. शलाकाजीनी विकिपेडियाकडे ल़क्ष्य वेधल्या बद्दल आभ।री आहे. भारतात इतर अल्कोहोलिक पेयान्पेक्ष्या वाईन्सचा खप केवळ ०.००५% आहे (सन्दर्भ www.hdfcsec.com म्हणुन त्यानि वर्षभरापूर्वि Champagne Indage ची शिफारस केली होती. आता पर्यन्त मा़झे Champagne Indage, १३९% वाढलेत). जेन्व्हा मी फिरन्ग्यान बरोबर जेवतो, तेन्व्हा त्यान्चा वाईन्स बाबतचा चोखन्दळपणा पहावयास मीळ्तो. दर्दि खवय्याला ज्याप्रमाणे ऊकडिचे मोदक किन्वा पुरणपोळित उन्निस बिस चालत नाही, त्याचप्रमाणे त्याना वाईन्स मधे उन्निस बिस चालत नाही. वाईनचे तापमान, वास (बुचाचा वास वाईन मध्ये असल्यास ती वाईन जुनी आणि पिण्यास अयोग्य मानतात), after test इ.चि खात्री पटली की मगच ती पितात. सन्जय अभ्यन्कर

In reply to by संजय अभ्यंकर

नंदन Sat, 12/15/2007 - 20:02
वाईन पिताना/पिण्यापूर्वी साईट (वाईनमधे बुचाचे कण तर तरंगत नाहीत ना, पेल्यातील द्रवाची पेल्याला स्पर्शणारी सर्वात वरची कड पारदर्शक आहे ना {यामागचे कारण विसरलो} हे तपासण्यासाठी ), स्वर्ल (ऑक्सिडेशन होऊन वाईनचा स्वाद नीट यावा म्हणून), स्मेल (त्या विशिष्ट वाईनचा गंध जर तुम्हांला आवडला नाही, तर बव्हंशी तिची चवही आवडण्याची शक्यता कमी असते -- म्हणून सामान्यांसाठी; तर त्या वाईनचा जुनेपणा, तिच्यातले घटक इ. इ. ओळखता यावे म्हणून तज्ञांसाठी) आणि सिप (एक लहानसा घोट जिभेखाली ठेवून त्याचा आस्वाद घेणे) असे चार महत्त्वाचे 'एस' आहेत. [काही महिन्यांपूर्वी जाऊन आलेल्या वाईन टेस्टिंग टूरमधील लक्षात राहिलेले काही माहितीचे थेंब :)] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:19
माझ्या माहितीप्रमाणे विदेशात "वाईन " बरोबर ऊत्तम प्रतीचे "खारवलेले चीज " चकणा म्हणून खातात. हो पण या गोष्टीसाठी वाईन मात्र "रेड च " हवी .....

In reply to by छोटा डॉन

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 22:43
आपले म्हणणे खरे आहे. वाईन बद्दल चर्चा करताना लक्षात आलेल्या काही गोष्टि म्हणजे, भारतात, वाईनला फारसे महत्व नाही. विदेशात, वाईनमधॅ मुरवलेल्या तंबाखूपासुन सिगार तथा पाईपची तंबाखु बनवितात. तसेच, केक, पॅस्ट्रिज, चॉकलेट्स, वाईनमध्ये मुरविलेल्या मांसाचे पदार्थ ही बनवितात. रेड वाईन्सच्या कोलेस्टेरॉल प्रतिबंधक गुणांमुळे त्याचे सेवनहि भारतच्या तुलनेत ज्यास्त आहे. जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

सुनील Mon, 12/17/2007 - 23:15
भारतात, वाईनला फारसे महत्व नाही. खरे आहे. आम्हाला झटकन कीक देणारी पेयेच जास्त आवडतात!! (अशुभस्य शीघ्रम्) केक, पॅस्ट्रिज, चॉकलेट्स, वाईनमध्ये मुरविलेल्या मांसाचे पदार्थ ही बनवितात. खरे आहे. आयुष्यभर मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणार्‍या माझ्या आजोबांना अनवधानाने (वाईन चॉकलेट मार्फत) "पाजण्याचे" पातक माझ्या डोक्यावर आहे! परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे. हे देखील खरे. वाईन द्राक्षाचीच असते असे नाही. प्लम आणि बेरींपासूनदेखील वाईन बनवितात (पण ती कितपत "उत्तम" असते त्याची कल्पना नाही) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय Tue, 12/18/2007 - 04:38
वाईनसाठी (द्राक्षासवासाठी) वापरल्या जाणार्‍या लाल (काळ्या) द्राक्षांचा गर पांढराच असतो. साले सोलून गराचा रस काढून आंबवला तर आसव पांढरे होते. द्राक्षासव आंबत असताना काही काळ साले त्यात राहू दिलीत तर सालातील रंग आणि फिनॉलिक रसायने द्राक्षासवात उतरतात आणि आसव लाल होते. त्यामुळे रंगाबरोबर चवीत, तुरटपणात फरक पडतो. लाल रंगाच्या मांसाबरोबर लाल आसव, पांढर्‍या रंगाच्या मांसाबरोबर पांढरे, हे फार ढोबळ झाले. मध्ये मी लाल भोपळ्याची पातळ आमटी सूप म्हणून वाढली, आणि तिच्याबरोबर कॅबर्ने सोव्हिन्यों (लाल) द्राक्षासव जोडले, तसेच साल्मन माशाबरोबर लाल रियोहा; खाणार्‍यांना आवडले असे त्यांनी मनापासून सांगितले. "तिखट" (म्हणजे सौम्य-ते-मध्यम) भारतीय जेवणासाठी थोडेसे गोडसर द्राक्षासव देण्याची पद्धत (उदा. पिनो ग्री, रिएस्लिंग, वगैरे) ठीक आहे, पण कल्पनाशक्तीला इतकीही तोकडी ठेवू नये. बुचाचा वास घेऊन इतकेच कळते की ते सडले आहे की नाही. वर नंदन यांनी चार "स"कारांचे चांगले वर्णन केलेलेच आहे. माझ्या अनुभवात भारतीय मित्रांना सफेतमध्ये सुरुवात करायला आवडते. कारण लालमधली टॅनिक चव ही आवडायची असते असे पहिल्या चुसकीत कळत नाही. (टॅनिन तुरट असतात, जिभेवर त्यांचा राप चढल्यासारखा भास होतो.) आणि आवड नसली तर नाक दाबून "शिकण्यासाठी" काहीही प्राशन करण्यात काय हशील? त्यातल्या त्यात माझ्या भारतीय मित्रांना सुरुवातीला गोडकडे झुकणारी पेये आवडतात. मग त्यांना अगोड शार्दोनेच्या "Oakच्या लाकडाच्या वासाचे" मनापासून कौतुक नसते. सवय झाली की मग ही कौतुके सुरू होतात. त्यापेक्षा आवडीने प्यालेली लांब नावाची गोड जर्मन द्राक्षासवे बरी - गेवुर्त्झरामिनेर, लिएबफ्रौझमिल्ख (लांब कुठलेही नाव!) त्यातल्या त्यात रिएसलिंग इतकी गोड नसते, तरी गोड असते. (ओळख वाढल्यानंतर ही गोड पेये भलतीच कंटाळवाणी, एकसुरी वाटू लागतात...) पांढर्‍या द्राक्षासवामधला आंबटपणा प्रसंगाला साजेसा असावा. एखाद्या ऊन दुपारी, पार्कमध्ये वनविहार करत असताना पेय जरा आंबट असले तर तजेलदार असते. जेवताना एखाद्या खाद्याच्या जोडीने थोडे कमी आंबट चांगले लागते. आवडीला सुरुवात करण्यासाठी लालमध्ये शिराझ चांगली आहे, हे खरे. अगदी कळे-न-कळे गोड असते, आणि "दाट". ही ऑस्ट्रेलियामधली बहुतेक वेळा बरी असते. फ्रान्समध्ये हिलाच "सिरा" असेही म्हणतात. तिथून सुरू करून अन्य लाल प्रकारात जरूर आवड जोखावी. शिराझ ही "सोपी" असते. आवड वाढेल तशा आणखी गुंतागुंतीच्या चवी आवडू लागतील. अर्थात "क्ष" कंपनीची शिराझ उत्तम असू शकते, आणि "य" कंपनीची शिराझ एकदम भंकस. त्यामुळे एखाद्या उत्पादकाचे पेय आपल्याला आवडू लागले, तर ती खूणगाठ बांधावी! अवांतर : मावळावर मोहाची दारू लोक इतक्या दर्दीपणे पीतात की विदेशी लोकांच्या व्हिस्कीप्रेमाने तोंडात बोटे घालावीत. मला ती दारू आवडली नसल्यामुळे त्याची जाणकारी मी मिळवली नाही. पण या बाबतीत दर्दीपणा फक्त विदेशी लोकांत असतो हे फारसे पटत नाही. मध्यमवर्गीय मराठी माणसात नसतो, ते ठीकच आहे - हे नेहमीचे पेय नव्हे, तर जाण कधी येणार?

स्वाती दिनेश Tue, 12/18/2007 - 13:05
जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे. हे तर आहेच,हेसन मध्ये सफरचंदाची वाईन फार प्रसिध्द आहे पण ती सर्वांना आवडतेच असे नाही.तसेच नाताळच्या सुमाराला इथे ग्लु वाईन चे फार प्रस्थ असते.ग्लु वाईन म्हणजे रेड वाईन मध्ये विविध मसाले घालून ती उकळवतात आणि कपातून गरम गरम पितात.ऍपल वाईन सुध्दा नाताळ पार्ट्यांमध्ये गरम पितात. वर नंदनने म्हटल्याप्रमाणे ४ एस तर महत्त्वाचे आहेतच, पण वाईनचे तापमानही विशिष्ट असावे याबद्दल फिरंग्यांचा कटाक्ष असतो. सेक्ट/शँपेन: चिल्ड सर्व करतात.(उंच निमुळता पेला) व्हाईट वाईन: कोल्ड सर्व करतात.(गोल आणि वर थोडा उभट, उंच दांडीचा पेला) रेड वाईनः रुम टेंपरेचरला सर्व करतात.(अर्थात येथे कक्ष तापमान २० ते २२ अंश से असते म्हणा!)(व्हाईट वाईन सारखाच, पण आकाराने मोठा आणि अगदी गोल ,वर उभट नसणारा पेला) ग्लु वाईनः गरम(चहासारखी गरम) सर्व करतात.(कप/मग) ऍपल वाईनः रुम टेंप ला किवा गरम सर्व करतात.उसाच्या गुर्‍हाळात जो पेला असतो ना,तसाच काहीसा पेला त्यासाठी वापरतात. कोणती वाईन कोणत्या पेल्यातून सर्व करावी हे सुध्दा काटेकोरपणे पाहतात. स्वाती

संजय अभ्यंकर Tue, 12/18/2007 - 20:15
आपल्या लिखणावरुन आपण जर्मनित रहता असे वाटते. युरोपातील (तसेच जगातिल अनेक देश) देश, आपापल्या देशातील वाईन्सची वैशिष्ट्ये जपतो. जर्मनही त्याला अपवाद नाहीत. ते स्ट्रॉबेरीची वाईन अप्रतिम बनवितात. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/10/2008 - 00:25
सुनीलजी, नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे. नाशिक परिसरात, स्पेन, फ्रान्स आणि इटालियन कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य-करार (Collabaration) करून वाईन बनवणार्‍या कंपन्या आहेत. उत्तम प्रतीच्या वाईन्स वाजवि दरात मिळण्याचे भारतातिल एकमेव ठिकाण म्हणजे नाशिक (१/२ बाटली रु. १४०/- रु. २५०/-). आमचे गोरे फिरंगी नाशिकमध्ये जायला नेहमी खुश असतात. मात्र भरपेट जेवल्या (प्यायल्यावर), त्यांची ती एस्प्रेस्सो कॉफि काही सापडत नाही. नाशिक मध्ये "कॅफे कॉफी डे" कुठे आहेत? संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

सुनील गुरुवार, 01/10/2008 - 00:36
नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे. मान्य. पण वाईन पिण्याचे "कल्चर" भारतीयांनी अजूनतरी आपलेसे केलेले नाही. भारतीय हे मूळातच "पेग्"बहाद्दर!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा गुरुवार, 01/10/2008 - 13:31
एकदाच रेड वाईन घेतली होती, आवडली ही होती, पण पुन्हा तशी क॑पनी न मिळाल्याने पुन्हा काही योग जुळून नाही आला. अन सुनीलभौ, 'पेग' बहाद्दर तसे शेरातच थोडेफार घावनार, तशी तर आपल्याकडे 'क्वाट्टर' शिष्टीमच जोरात चालते, न्हाई का? असो, आपला, - (ताम्र वारूणी साधक) धमाल.

बहुरंगी गुरुवार, 01/10/2008 - 16:41
आम्ही तर बुवा क्वार्टर वाले. चकणा शाकाहारी असेल तर काही पण चालतो. या मिसळ पाव वर वाईनची इतकी माहिती मिळाली, पुढल्या खेपेला क्वार्टर नाही बाटलीच आणतो, ज्या रंगाची मिळेल त्या रंगाची .... चढेल ना पण? .... नाहीतर बिसलेरी वाटायची. बाय द वे ..... ति पोर्ट वाईन का काय ती, ती कुठल्या पोर्ट वर भेटेल ....???

संजय अभ्यंकर Fri, 01/11/2008 - 00:16
बहुरंगी साहेब, पोर्ट वाईन म्हणजे पोर्तुगीज पद्धतीची वाईन. तीचे चाहते फार नाहित, कारण ती गोड असते (अल्कोहोल मिश्रीत सरबत). वाईन हा खाद्यान्नाचा एक भाग मानला जातो. म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात). वाईन हे पेताडांचे पेय मानले जात नाही. तरीही त्याला अपवाद सर्वत्र आहेत. संजय अभ्यंकर

बहुरंगी Fri, 01/11/2008 - 10:50
वा वा, धन्यवाद. हि माहिती मोलाची .... म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात). आम्ही सध्यातरी भारतातच असल्याने कधी वाईन घ्यायची वेळ आल्यास भारतिय चकणाच बरा. आपला, बहुरंगी मिसळे

राजे Fri, 12/14/2007 - 22:13
ती लाल असते व ती पांढरी असते.... ईतकेच मला तर माहीत आहे बुआ..... ;} राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

राजे Fri, 12/14/2007 - 22:24
वर उल्लेखलेल्या विनोदी प्रतिसादानंतर एकदम माहीतीपुर्ण प्रतिसाद. दोन्ही प्रकारच्या वाईन मध्ये जे उपलब्ध घटक [केलोरीज] आहेत ते सारखेच आहेत / असतात. [असला तरी थोडा फार फरक असतो..] उदा. येथे पाहा.. http://www.annecollins.com/calories/calories-wine.htm दोन्ही मध्ये काहीच फरक नसतो व सला तरी तो फक्त रंगाचाच असावा असा कयास. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सुनील Fri, 12/14/2007 - 22:25
चार जाणकारांनी जरी तुम्हाला सांगितले की अमुक-तमुक वाईन उत्तम आहे, आणि तरी ती तुम्हाला चवीला आवडली नाही तर? तेव्हा वाईनच्या बाटल्यांवरील लेबले वाचा (खिशातील पाकीट्देखील चाचपून पहा) आणि विविध वाईन्स खरेदी करून चाखा. त्यातून तुमची आवड तुम्हाला लक्षात येईल. माझे वैयक्तिक मत - व्हाईट वाईनमध्ये Chardonnay आणि रेड वाईनमध्ये Shiraz. अर्थात तुम्हालाही त्या आवडण्याची सक्ती नाही आणि मलादेखील त्याचा का आवडतात त्याची कारणे देण्याची गरज नाही. (सावध तळीराम) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन Sat, 12/15/2007 - 07:27
जाणकारांद्वारे बर्‍याच वाईन्सना १०० पैकी पॉइंट्स दिले जातात. वाईनच्या बाटलीवर मग ९१ पॉईंट, ९३ पॉईंट इ. माहिती तुम्हांला पहायला मिळेल. वाईनमध्ये असणार्‍या घटकांबरोबरच ती किती काळ मुरवलेली आहे, यावर तिची चव आणि पर्यायाने किंमत ठरते. दुसरं म्हणजे, जेवणात रेड मीट असेल तर सोबत रेड वाईन घ्यावी, कारण या वेळी मांसाच्या तीव्र चवीसमोर व्हाईट वाईनची चव फिकी पडू शकते. व्हाईट मीट (उदा. चिकन) किंवा मासे जेवणात असतील तर व्हाईट वाईन उत्तम. सुनील यांनी सांगितल्याप्रमाणेच शार्डने आणि शिराझ या दोन उत्तम प्रकारच्या वाईन्स आहेत (अनु. व्हाईट/रेड) शार्डने जरी मूळची फ्रेंच असली तरी सध्या कॅलिफोर्नियन शार्डनेज अधिक लोकप्रिय आहेत. (रॉबर्ट मोन्डावी, सोनोमा व्हॅली, केन्डॉल जॅक्सन इ. वाइनरीजच्या शार्डनेज चांगल्या असतात.) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Sat, 12/15/2007 - 07:41
ज्यांना हृदयविकार आहेत, अथवा मधुमेह आहे, त्यांनी पांढरी वाईन शक्यतो घेऊ नये. ह्याचे कारण की अँटी ऑक्सिडण्ट्स ह्या वाईन मध्ये कमी असतात. लाल वाईन मध्ये जास्त. डॉक्टर लोकांनी काढलेले हे निष्कर्ष आहेत, मी नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाल वाईन अधिक चांगली. असो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:57
अँटी ऑक्सिडण्ट्सचा संबंध शरीरातील "फ्री रॅडिकल्स" मुक्त करण्याशी व पर्यायाने कर्करोगाशी असावा. हृदयविकार वा मधुमेहाशी नाही. लाल वाईनपेक्षा जास्त अँटी ऑक्सिडण्ट्स हे फळांमध्ये व (दूध न घातलेल्या) चहामध्ये असतात. त्यामुळे केवळ अँटी ऑक्सीडण्ट्स हवे असतील तर हे अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.

सहज Sat, 12/15/2007 - 07:38
एका चांगल्या दुकानात जा, (किंवा विमानतळावर ड्यूटी फ्री) तिथे वाईनच्या किंमती बघा काही बाटल्या महाग असतील. (ब्रॅन्ड नेम मुळे, टॅक्स मुळे काही बाटल्या महाग असतील. पण "माल" चांगला असण्याच्या शक्यता जास्त) त्या महाग बाटल्यांकी एक उचला. चांगली वाईन असण्याची शक्यता ९५%(बर्‍याचदा असते) (तुम्हाला आवडेल की नाही हा भाग वेगळा :-))

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:08
चर्चा विषय चांगला आहे. पण या क्षेत्रातील आमचे ज्ञान अत्यंत तोकडे असल्याने आम्ही फक्त वाचनाचे काम करतो. आपले चालू द्या. आपला, (अनभिज्ञ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

संजय अभ्यंकर Sat, 12/15/2007 - 18:30
आपल्या प्रतिक्रियातून बरीच माहिती मिळ्त आहे. शलाकाजीनी विकिपेडियाकडे ल़क्ष्य वेधल्या बद्दल आभ।री आहे. भारतात इतर अल्कोहोलिक पेयान्पेक्ष्या वाईन्सचा खप केवळ ०.००५% आहे (सन्दर्भ www.hdfcsec.com म्हणुन त्यानि वर्षभरापूर्वि Champagne Indage ची शिफारस केली होती. आता पर्यन्त मा़झे Champagne Indage, १३९% वाढलेत). जेन्व्हा मी फिरन्ग्यान बरोबर जेवतो, तेन्व्हा त्यान्चा वाईन्स बाबतचा चोखन्दळपणा पहावयास मीळ्तो. दर्दि खवय्याला ज्याप्रमाणे ऊकडिचे मोदक किन्वा पुरणपोळित उन्निस बिस चालत नाही, त्याचप्रमाणे त्याना वाईन्स मधे उन्निस बिस चालत नाही. वाईनचे तापमान, वास (बुचाचा वास वाईन मध्ये असल्यास ती वाईन जुनी आणि पिण्यास अयोग्य मानतात), after test इ.चि खात्री पटली की मगच ती पितात. सन्जय अभ्यन्कर

In reply to by संजय अभ्यंकर

नंदन Sat, 12/15/2007 - 20:02
वाईन पिताना/पिण्यापूर्वी साईट (वाईनमधे बुचाचे कण तर तरंगत नाहीत ना, पेल्यातील द्रवाची पेल्याला स्पर्शणारी सर्वात वरची कड पारदर्शक आहे ना {यामागचे कारण विसरलो} हे तपासण्यासाठी ), स्वर्ल (ऑक्सिडेशन होऊन वाईनचा स्वाद नीट यावा म्हणून), स्मेल (त्या विशिष्ट वाईनचा गंध जर तुम्हांला आवडला नाही, तर बव्हंशी तिची चवही आवडण्याची शक्यता कमी असते -- म्हणून सामान्यांसाठी; तर त्या वाईनचा जुनेपणा, तिच्यातले घटक इ. इ. ओळखता यावे म्हणून तज्ञांसाठी) आणि सिप (एक लहानसा घोट जिभेखाली ठेवून त्याचा आस्वाद घेणे) असे चार महत्त्वाचे 'एस' आहेत. [काही महिन्यांपूर्वी जाऊन आलेल्या वाईन टेस्टिंग टूरमधील लक्षात राहिलेले काही माहितीचे थेंब :)] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

छोटा डॉन Mon, 12/17/2007 - 20:19
माझ्या माहितीप्रमाणे विदेशात "वाईन " बरोबर ऊत्तम प्रतीचे "खारवलेले चीज " चकणा म्हणून खातात. हो पण या गोष्टीसाठी वाईन मात्र "रेड च " हवी .....

In reply to by छोटा डॉन

संजय अभ्यंकर Mon, 12/17/2007 - 22:43
आपले म्हणणे खरे आहे. वाईन बद्दल चर्चा करताना लक्षात आलेल्या काही गोष्टि म्हणजे, भारतात, वाईनला फारसे महत्व नाही. विदेशात, वाईनमधॅ मुरवलेल्या तंबाखूपासुन सिगार तथा पाईपची तंबाखु बनवितात. तसेच, केक, पॅस्ट्रिज, चॉकलेट्स, वाईनमध्ये मुरविलेल्या मांसाचे पदार्थ ही बनवितात. रेड वाईन्सच्या कोलेस्टेरॉल प्रतिबंधक गुणांमुळे त्याचे सेवनहि भारतच्या तुलनेत ज्यास्त आहे. जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

सुनील Mon, 12/17/2007 - 23:15
भारतात, वाईनला फारसे महत्व नाही. खरे आहे. आम्हाला झटकन कीक देणारी पेयेच जास्त आवडतात!! (अशुभस्य शीघ्रम्) केक, पॅस्ट्रिज, चॉकलेट्स, वाईनमध्ये मुरविलेल्या मांसाचे पदार्थ ही बनवितात. खरे आहे. आयुष्यभर मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणार्‍या माझ्या आजोबांना अनवधानाने (वाईन चॉकलेट मार्फत) "पाजण्याचे" पातक माझ्या डोक्यावर आहे! परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे. हे देखील खरे. वाईन द्राक्षाचीच असते असे नाही. प्लम आणि बेरींपासूनदेखील वाईन बनवितात (पण ती कितपत "उत्तम" असते त्याची कल्पना नाही) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय Tue, 12/18/2007 - 04:38
वाईनसाठी (द्राक्षासवासाठी) वापरल्या जाणार्‍या लाल (काळ्या) द्राक्षांचा गर पांढराच असतो. साले सोलून गराचा रस काढून आंबवला तर आसव पांढरे होते. द्राक्षासव आंबत असताना काही काळ साले त्यात राहू दिलीत तर सालातील रंग आणि फिनॉलिक रसायने द्राक्षासवात उतरतात आणि आसव लाल होते. त्यामुळे रंगाबरोबर चवीत, तुरटपणात फरक पडतो. लाल रंगाच्या मांसाबरोबर लाल आसव, पांढर्‍या रंगाच्या मांसाबरोबर पांढरे, हे फार ढोबळ झाले. मध्ये मी लाल भोपळ्याची पातळ आमटी सूप म्हणून वाढली, आणि तिच्याबरोबर कॅबर्ने सोव्हिन्यों (लाल) द्राक्षासव जोडले, तसेच साल्मन माशाबरोबर लाल रियोहा; खाणार्‍यांना आवडले असे त्यांनी मनापासून सांगितले. "तिखट" (म्हणजे सौम्य-ते-मध्यम) भारतीय जेवणासाठी थोडेसे गोडसर द्राक्षासव देण्याची पद्धत (उदा. पिनो ग्री, रिएस्लिंग, वगैरे) ठीक आहे, पण कल्पनाशक्तीला इतकीही तोकडी ठेवू नये. बुचाचा वास घेऊन इतकेच कळते की ते सडले आहे की नाही. वर नंदन यांनी चार "स"कारांचे चांगले वर्णन केलेलेच आहे. माझ्या अनुभवात भारतीय मित्रांना सफेतमध्ये सुरुवात करायला आवडते. कारण लालमधली टॅनिक चव ही आवडायची असते असे पहिल्या चुसकीत कळत नाही. (टॅनिन तुरट असतात, जिभेवर त्यांचा राप चढल्यासारखा भास होतो.) आणि आवड नसली तर नाक दाबून "शिकण्यासाठी" काहीही प्राशन करण्यात काय हशील? त्यातल्या त्यात माझ्या भारतीय मित्रांना सुरुवातीला गोडकडे झुकणारी पेये आवडतात. मग त्यांना अगोड शार्दोनेच्या "Oakच्या लाकडाच्या वासाचे" मनापासून कौतुक नसते. सवय झाली की मग ही कौतुके सुरू होतात. त्यापेक्षा आवडीने प्यालेली लांब नावाची गोड जर्मन द्राक्षासवे बरी - गेवुर्त्झरामिनेर, लिएबफ्रौझमिल्ख (लांब कुठलेही नाव!) त्यातल्या त्यात रिएसलिंग इतकी गोड नसते, तरी गोड असते. (ओळख वाढल्यानंतर ही गोड पेये भलतीच कंटाळवाणी, एकसुरी वाटू लागतात...) पांढर्‍या द्राक्षासवामधला आंबटपणा प्रसंगाला साजेसा असावा. एखाद्या ऊन दुपारी, पार्कमध्ये वनविहार करत असताना पेय जरा आंबट असले तर तजेलदार असते. जेवताना एखाद्या खाद्याच्या जोडीने थोडे कमी आंबट चांगले लागते. आवडीला सुरुवात करण्यासाठी लालमध्ये शिराझ चांगली आहे, हे खरे. अगदी कळे-न-कळे गोड असते, आणि "दाट". ही ऑस्ट्रेलियामधली बहुतेक वेळा बरी असते. फ्रान्समध्ये हिलाच "सिरा" असेही म्हणतात. तिथून सुरू करून अन्य लाल प्रकारात जरूर आवड जोखावी. शिराझ ही "सोपी" असते. आवड वाढेल तशा आणखी गुंतागुंतीच्या चवी आवडू लागतील. अर्थात "क्ष" कंपनीची शिराझ उत्तम असू शकते, आणि "य" कंपनीची शिराझ एकदम भंकस. त्यामुळे एखाद्या उत्पादकाचे पेय आपल्याला आवडू लागले, तर ती खूणगाठ बांधावी! अवांतर : मावळावर मोहाची दारू लोक इतक्या दर्दीपणे पीतात की विदेशी लोकांच्या व्हिस्कीप्रेमाने तोंडात बोटे घालावीत. मला ती दारू आवडली नसल्यामुळे त्याची जाणकारी मी मिळवली नाही. पण या बाबतीत दर्दीपणा फक्त विदेशी लोकांत असतो हे फारसे पटत नाही. मध्यमवर्गीय मराठी माणसात नसतो, ते ठीकच आहे - हे नेहमीचे पेय नव्हे, तर जाण कधी येणार?

स्वाती दिनेश Tue, 12/18/2007 - 13:05
जर्मनीत, परसदारी उगवणारी विविध फळे, गावच्या ब्रुअरित देवुन, घरच्यापुरती वाईन बनवुन घेण्याची प्रथा पुर्वापार आहे. हे तर आहेच,हेसन मध्ये सफरचंदाची वाईन फार प्रसिध्द आहे पण ती सर्वांना आवडतेच असे नाही.तसेच नाताळच्या सुमाराला इथे ग्लु वाईन चे फार प्रस्थ असते.ग्लु वाईन म्हणजे रेड वाईन मध्ये विविध मसाले घालून ती उकळवतात आणि कपातून गरम गरम पितात.ऍपल वाईन सुध्दा नाताळ पार्ट्यांमध्ये गरम पितात. वर नंदनने म्हटल्याप्रमाणे ४ एस तर महत्त्वाचे आहेतच, पण वाईनचे तापमानही विशिष्ट असावे याबद्दल फिरंग्यांचा कटाक्ष असतो. सेक्ट/शँपेन: चिल्ड सर्व करतात.(उंच निमुळता पेला) व्हाईट वाईन: कोल्ड सर्व करतात.(गोल आणि वर थोडा उभट, उंच दांडीचा पेला) रेड वाईनः रुम टेंपरेचरला सर्व करतात.(अर्थात येथे कक्ष तापमान २० ते २२ अंश से असते म्हणा!)(व्हाईट वाईन सारखाच, पण आकाराने मोठा आणि अगदी गोल ,वर उभट नसणारा पेला) ग्लु वाईनः गरम(चहासारखी गरम) सर्व करतात.(कप/मग) ऍपल वाईनः रुम टेंप ला किवा गरम सर्व करतात.उसाच्या गुर्‍हाळात जो पेला असतो ना,तसाच काहीसा पेला त्यासाठी वापरतात. कोणती वाईन कोणत्या पेल्यातून सर्व करावी हे सुध्दा काटेकोरपणे पाहतात. स्वाती

संजय अभ्यंकर Tue, 12/18/2007 - 20:15
आपल्या लिखणावरुन आपण जर्मनित रहता असे वाटते. युरोपातील (तसेच जगातिल अनेक देश) देश, आपापल्या देशातील वाईन्सची वैशिष्ट्ये जपतो. जर्मनही त्याला अपवाद नाहीत. ते स्ट्रॉबेरीची वाईन अप्रतिम बनवितात. संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/10/2008 - 00:25
सुनीलजी, नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे. नाशिक परिसरात, स्पेन, फ्रान्स आणि इटालियन कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य-करार (Collabaration) करून वाईन बनवणार्‍या कंपन्या आहेत. उत्तम प्रतीच्या वाईन्स वाजवि दरात मिळण्याचे भारतातिल एकमेव ठिकाण म्हणजे नाशिक (१/२ बाटली रु. १४०/- रु. २५०/-). आमचे गोरे फिरंगी नाशिकमध्ये जायला नेहमी खुश असतात. मात्र भरपेट जेवल्या (प्यायल्यावर), त्यांची ती एस्प्रेस्सो कॉफि काही सापडत नाही. नाशिक मध्ये "कॅफे कॉफी डे" कुठे आहेत? संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

सुनील गुरुवार, 01/10/2008 - 00:36
नाशिक हि भारतातली वाईन पंढरी आहे. मान्य. पण वाईन पिण्याचे "कल्चर" भारतीयांनी अजूनतरी आपलेसे केलेले नाही. भारतीय हे मूळातच "पेग्"बहाद्दर!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा गुरुवार, 01/10/2008 - 13:31
एकदाच रेड वाईन घेतली होती, आवडली ही होती, पण पुन्हा तशी क॑पनी न मिळाल्याने पुन्हा काही योग जुळून नाही आला. अन सुनीलभौ, 'पेग' बहाद्दर तसे शेरातच थोडेफार घावनार, तशी तर आपल्याकडे 'क्वाट्टर' शिष्टीमच जोरात चालते, न्हाई का? असो, आपला, - (ताम्र वारूणी साधक) धमाल.

बहुरंगी गुरुवार, 01/10/2008 - 16:41
आम्ही तर बुवा क्वार्टर वाले. चकणा शाकाहारी असेल तर काही पण चालतो. या मिसळ पाव वर वाईनची इतकी माहिती मिळाली, पुढल्या खेपेला क्वार्टर नाही बाटलीच आणतो, ज्या रंगाची मिळेल त्या रंगाची .... चढेल ना पण? .... नाहीतर बिसलेरी वाटायची. बाय द वे ..... ति पोर्ट वाईन का काय ती, ती कुठल्या पोर्ट वर भेटेल ....???

संजय अभ्यंकर Fri, 01/11/2008 - 00:16
बहुरंगी साहेब, पोर्ट वाईन म्हणजे पोर्तुगीज पद्धतीची वाईन. तीचे चाहते फार नाहित, कारण ती गोड असते (अल्कोहोल मिश्रीत सरबत). वाईन हा खाद्यान्नाचा एक भाग मानला जातो. म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात). वाईन हे पेताडांचे पेय मानले जात नाही. तरीही त्याला अपवाद सर्वत्र आहेत. संजय अभ्यंकर

बहुरंगी Fri, 01/11/2008 - 10:50
वा वा, धन्यवाद. हि माहिती मोलाची .... म्हणुन बहुदा ती जेवताना (अथवा त्याआधी) पितात (चकण्या बरोबर केवळ भारतात). आम्ही सध्यातरी भारतातच असल्याने कधी वाईन घ्यायची वेळ आल्यास भारतिय चकणाच बरा. आपला, बहुरंगी मिसळे
उत्तम रेड आणि व्हाईट वाईन्स ओळ्खण्याचे निकष कोणते? सन्जय अभ्यन्कर

आजचा सुधारक ची कोंडी - प्रतिक्रिया १ व २ वर लेखकाचे प्रत्युत्तर

प्रकाश घाटपांडे ·

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 19:11
ह्यांचे म्हणणे योग्यच आहे. आपण बर्‍याच गोष्टींचा उगीचच बाऊ करतो. श्लील-अश्लील ह्यांच्या व्याख्या आता बदलायला हव्यात असे वाटायला लागलेय. पुनरुत्पादन हा जगाचा नियमच आहे आणि त्याबद्दलची माणसाच्या शरीरात असलेली यंत्रणा ही फार महत्वाची आहे. त्याबद्दलच्या गैरसमजूती दूर करणे हे केव्हांही योग्यच ठरते आणि ते डॉ. पाटील ह्यांच्यासारखे त्या विषयातले तज्ञ करत आहेत ही चांगली बाब आहे. प्रकाशराव हे इथे प्रसिद्ध करून आपणही एक सत्कृत्य केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.

विकास Fri, 12/14/2007 - 20:28
लैंगीक शिक्षणाबद्दल आणि डॉ. राहूल पाटील यांनी ज्या पद्धतीने माहीती दिली आहे त्याबद्दल अश्लील वाटायचा प्रश्न नाही. पण उदाहरण म्हणून ज्या भाषेत तरूण मुले हेच शिक्षण एकमेकांना देतात त्याला आणि आ.सु. मधील लेखाला समान तोलणे मात्र बरोबर वाटणार नाही. थोडक्यात लेख आणि अश्लीलपणा यात फरक आहे.
अवांतरः हा किस्सा आधी पण कधीतरी लिहीला आहे. कॉलेजमधे असताना, डॉ. आनंद नाडकर्णींचे "कामसंवाद" म्हणून एक व्याख्यान आयोजीत केले होते. तमाम प्राध्यापक मंडळी कावरीबावरी झाली होती, आडून विरोध करून तो कार्यक्रम टाळायचा प्रयत्न ही करून पाहीला. पण शेवटी कार्यक्रम झाला. मराठी मंडळाचा कार्यक्रम असूनही त्यात तमाम अमराठी (जे इतर वेळेस मराठी येत नाही म्हणायचे असेही!) आले होते. हॉल ठिच्च भरला होता. मुलांकडून तमाम प्रश्न नंतर विचारले गेले, सावधपणा म्हणून ते लिहून आणि वाचून नंतर विचारले. त्यात प्रश्नांमधून सेक्स या विषयावरील उत्सुकता नक्कीच दिसत होती, पण त्यात एकही प्रश्न "चीप"/"पांचट"/"अश्लील" नव्हता. थोडक्यात कुठेही वेडावाकडा प्रकार न होता तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सुरवातीपासून तो ज्या पद्धतीने चालू झाला, त्याला शेप केले गेले हे होते. त्यात विनोद होते, हसत खेळत होता, एरंडेल प्यायल्यासारखे कोणाचेही चेहरे नव्हते तरी देखील सभ्यतेच्या घरसगुंडीवर कोणीही बसले नव्हते...पण तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गोष्टी बिघडू शकतात, एकदा कारण घसरगुंडीवरून घसरणे खालीच होते....मग तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो.
अर्थात ह्या सर्वगोष्टींमधे "कलेक्टीव्ह बॅलन्सिंग ऍक्ट" लागते, अशक्य नाही, पण त्यासाठी प्रत्येकाचीच काहीना काहीतरी जबाबदारी आहे असे वाटते..

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 19:11
ह्यांचे म्हणणे योग्यच आहे. आपण बर्‍याच गोष्टींचा उगीचच बाऊ करतो. श्लील-अश्लील ह्यांच्या व्याख्या आता बदलायला हव्यात असे वाटायला लागलेय. पुनरुत्पादन हा जगाचा नियमच आहे आणि त्याबद्दलची माणसाच्या शरीरात असलेली यंत्रणा ही फार महत्वाची आहे. त्याबद्दलच्या गैरसमजूती दूर करणे हे केव्हांही योग्यच ठरते आणि ते डॉ. पाटील ह्यांच्यासारखे त्या विषयातले तज्ञ करत आहेत ही चांगली बाब आहे. प्रकाशराव हे इथे प्रसिद्ध करून आपणही एक सत्कृत्य केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.

विकास Fri, 12/14/2007 - 20:28
लैंगीक शिक्षणाबद्दल आणि डॉ. राहूल पाटील यांनी ज्या पद्धतीने माहीती दिली आहे त्याबद्दल अश्लील वाटायचा प्रश्न नाही. पण उदाहरण म्हणून ज्या भाषेत तरूण मुले हेच शिक्षण एकमेकांना देतात त्याला आणि आ.सु. मधील लेखाला समान तोलणे मात्र बरोबर वाटणार नाही. थोडक्यात लेख आणि अश्लीलपणा यात फरक आहे.
अवांतरः हा किस्सा आधी पण कधीतरी लिहीला आहे. कॉलेजमधे असताना, डॉ. आनंद नाडकर्णींचे "कामसंवाद" म्हणून एक व्याख्यान आयोजीत केले होते. तमाम प्राध्यापक मंडळी कावरीबावरी झाली होती, आडून विरोध करून तो कार्यक्रम टाळायचा प्रयत्न ही करून पाहीला. पण शेवटी कार्यक्रम झाला. मराठी मंडळाचा कार्यक्रम असूनही त्यात तमाम अमराठी (जे इतर वेळेस मराठी येत नाही म्हणायचे असेही!) आले होते. हॉल ठिच्च भरला होता. मुलांकडून तमाम प्रश्न नंतर विचारले गेले, सावधपणा म्हणून ते लिहून आणि वाचून नंतर विचारले. त्यात प्रश्नांमधून सेक्स या विषयावरील उत्सुकता नक्कीच दिसत होती, पण त्यात एकही प्रश्न "चीप"/"पांचट"/"अश्लील" नव्हता. थोडक्यात कुठेही वेडावाकडा प्रकार न होता तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सुरवातीपासून तो ज्या पद्धतीने चालू झाला, त्याला शेप केले गेले हे होते. त्यात विनोद होते, हसत खेळत होता, एरंडेल प्यायल्यासारखे कोणाचेही चेहरे नव्हते तरी देखील सभ्यतेच्या घरसगुंडीवर कोणीही बसले नव्हते...पण तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गोष्टी बिघडू शकतात, एकदा कारण घसरगुंडीवरून घसरणे खालीच होते....मग तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो.
अर्थात ह्या सर्वगोष्टींमधे "कलेक्टीव्ह बॅलन्सिंग ऍक्ट" लागते, अशक्य नाही, पण त्यासाठी प्रत्येकाचीच काहीना काहीतरी जबाबदारी आहे असे वाटते..
3

आजचा सुधारक ची कोंडी

प्रकाश घाटपांडे ·

आजच्या सुधारक ने हा लेख छापल्यावर मला र. धो. कर्वे यांच्या संततीनियमनावर असलेल्या समाजस्वास्थ्य ची आठवण आली. यावर सल्लागार मंडळावर असलेल्या श्री प्रभाकर नानावटी व श्री टी बी खिलारे यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादकाने लेखक डॉ राहुल पाटील यांना पाठवल्या. त्या प्रतिक्रिया व त्यावरील डॉ राहुल पाटील यांचे उत्तर हे डिसेंबरच्या अंकात आले आहे. ते मी पुढील पोस्टवर टाकत आहे. थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? अवांतर- सुधारक मध्ये लेखाचे वरती लेखकाचे नांव असते. खाली नव्हे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 17:16
थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? खरं आहे! बाकी, मिसळपावच्या मालकापेक्षा मिपाच्या हितचिंतकांनाच मिसळपावची जास्त चिंता पडली आहे ही मात्र समाधानाची बाब आहे! :) तुम्ही चिकटवलेल्या पोष्ट बाकी जबरा आहेत, माहितीपूर्ण आहेत! धन्यवाद घाटपांडे साहेब! तात्या.

आजच्या सुधारक ने हा लेख छापल्यावर मला र. धो. कर्वे यांच्या संततीनियमनावर असलेल्या समाजस्वास्थ्य ची आठवण आली. यावर सल्लागार मंडळावर असलेल्या श्री प्रभाकर नानावटी व श्री टी बी खिलारे यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादकाने लेखक डॉ राहुल पाटील यांना पाठवल्या. त्या प्रतिक्रिया व त्यावरील डॉ राहुल पाटील यांचे उत्तर हे डिसेंबरच्या अंकात आले आहे. ते मी पुढील पोस्टवर टाकत आहे. थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? अवांतर- सुधारक मध्ये लेखाचे वरती लेखकाचे नांव असते. खाली नव्हे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 17:16
थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? खरं आहे! बाकी, मिसळपावच्या मालकापेक्षा मिपाच्या हितचिंतकांनाच मिसळपावची जास्त चिंता पडली आहे ही मात्र समाधानाची बाब आहे! :) तुम्ही चिकटवलेल्या पोष्ट बाकी जबरा आहेत, माहितीपूर्ण आहेत! धन्यवाद घाटपांडे साहेब! तात्या.
3

निवेदन...

विसोबा खेचर ·

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 14:58
कळावे, लोभ आहेच, तो जमल्यास वाढावा, न वाढल्यासही उत्तमच! :) किंबहुना, काही मंडळींशी आता तो न वाढल्यासच अधिक उत्तम होईल असंही आता वाटायला लागलं आहे! राहता राहिला प्रश्न मिसळपावच्या भविष्याचा आणि मिसळपावचं पुढे काय होणार याचा, तर त्याबद्दल मला काडीचीही फिकीर नाही हेही सांगू इच्छितो! मला जे निवांतपणे लिहायचं आहे ते मी इथे लिहीन, कुणी वाचल्यास चांगलंच आहे! नाहीतरी सुरवातीला इथे एकटाच आलो होतो त्यामुळे पुन्हा एकटं रहाणंही फारसं जड जाऊ नये असं वाटतं! तात्या.

राजे Fri, 12/14/2007 - 14:59
लेखन नष्ट होण्याची अडचण / तांत्रिक गडबड ही ड्रुपल ४.७ मध्ये होती पंण ५.१ वर ती गडबड दुर केली गेली आहे असे मी वाचले आहे, तरी ही अशी काही अडचण असेल तर संकेतस्थळ दोन एक दिवसाठी बंद ठेऊन डाटाबेस तथा ईतर कोडींग तपासून घ्या, ही विनंती. तसेच नवीन काही उपडेट्स आले आहेत ४.१ साठी ते चढवा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 15:09
तात्या, जाहीर निवेदनाबद्दल अनेक आभार (आभारी)बेसनलाडू माझ्यासह अनेकांनी तुमच्यावरचा घेतलेला संशय केवळ निवेदनामुळे पूर्ण दूर होण्यास मदत होईल, असे वाटत नसल्याने तसेच तुमचा निवेदनातला एकूण नाराजीचा सूर बघता तुम्हांला तसेच लोकनियुक्त पंचायत समितीला काही सूचना कराव्याशा वाटल्या. त्या येथे जाहीरच आणि कोणताही आडपडदा न ठेवता, स्पष्टपणे करतो आहे.
  1. तुम्ही नीलकांताला सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा छडा लागला, की त्या तपासाचे निष्कर्ष त्वरीत येथे सर्व सभासदांसमोर जाहीर व्हावेत.
  2. पंचायत समितीचेच एक सभासद असलेल्या विकासरावांचा परवलीचा शब्द चोरण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रकरणाचा आणि प्रतिसाद उडवण्याच्या प्रकरणाचा परस्परसंबंध लक्षात घेऊन त्या दृष्टीने एकूण प्रकरणाचा छडा लावावा
  3. तुम्हाला मागे मी लिहिलेला व्य नि मिसळपावाच्या हितासंबंधी आहे, असे सांगून जगजाहीर केल्यानंतर माझ्यासह येथील बर्‍याच सदस्यांची त्याबाबत स्पष्ट नाराजी सगळ्यांनाच दिसली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी (अगदी पंचायत समितीचे सदस्यही) व्य नि वगैरे लिहून विश्वासात बिश्वासात घेऊन संवाद साधण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. त्यामुळे कुणाकडून तशी अपेक्षा न ठेवाल तरच बरे! निदान मी तरी पुन्हा अशा व्य नि च्या फंदात स्वतःहून पडण्यास तयार नाही. ज्यांनी त्या प्रकरणानंरही व्य नि तून संपर्क साधला असेल, त्या सदस्यांच्या सहनशीलतेचे मला कौतुकच वाटते.
  4. नियुक्त पंचायत समितीने 'ना काम' आंदोलन थांबवले की मिसळपावावरील मार्गदर्शक लेखनाबाबत काही बाबी सुस्पष्ट कराव्यात. जसे प्रतिसाद उडवले जाण्यासाठीचे निकष; अश्लील,ओंगळवाणे,हिडीस काय आहे, काय नाही; इत्यादी. त्याबाबत संकेतस्थळाचे मालक म्हणून तुमचा हस्तक्षेप नसला, तरी योग्य पाठपुरावा असावा. त्याबाबत सदस्यांना माहिती दिली जावी.
  5. तुमचे किंवा प्रमोदकाकांचे उडालेले साधेसुधे प्रतिसाद उडणे आणि येथील बाळासाहेबांचा आणि त्यावरील काही प्रतिसाद उडणे, यातील अपघात काय आणि खोडी काय हे न कळण्याइतके मिसळपावचे सभासद मूढमती नसावेत, असे वाटते. त्यामुळे तुमच्या किंवा प्रमोदकाकांच्या प्रतिसादांच्या उडण्याची आणि बाळासाहेबांचे व संबंधित इतर प्रतिसाद उडण्याची तुलना करूच नकात.
  6. सध्याच्या वस्तुनिष्ठ समस्येला निवेदनातून वैयक्तिक हितसंबंधांची, वैयक्तिक भावनांची झालर लावू नकात (कोण कसे आहे, कोणाला कोणाची किती पडली आहे, कुणाला आपले नि परके समजायचे वगैरे) त्यामुळे एक तर विषय भरकटू शकतो आणि दुसरे, असे करून सदस्यांची संकेतस्थळाबद्दलची, येथील कामकाजाबद्दलची अपेक्षा, तक्रार जे काही असेल ते - सहानुभूतीत बदलू शकेल, जे कोणासाठीच हितावह नसेल; मिसळपावसाठी तर नाहीच नाही
असो. तुमचे निवेदन वाचून जे मनात आले ते प्रामाणिकपणे मांडले. मिसळपावच्या यापुढील वाटचालीसाठी मालक म्हणून तुम्हाला, पंचायत समितीला आणि सर्व सदस्यांना अनेकोत्तम शुभेच्छा. (प्रामाणिक शुभेच्छुक)बेसनलाडू

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 15:56
तात्याचा स्वभाव बघता हा खुलासा पटण्यासारखा आहे. आजही ते लेखन इथे शाबूत आहे ज्यात तात्यावर सरळ सरळ टीका आहे. तात्याची टिंगलटवाळी केलेले प्रतिसाद अजूनही दिसताहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे ’बालबुद्धी’ विनोद तात्यांनी उडवले असतील असे मला तरी वाटत नाही. मध्यंतरी माझेही अतिशय साधेच एकदोन प्रतिसाद उडवले गेले होते.त्याचेही कारण कळले नव्हते. मिपाच्या सुरवातीला ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून ज्या मंडळींना येथील काळजीवाहू समिती सदस्य म्हणून नेमले होते आणि पुढे ती मंडळी बिनविरोध निवडून आली त्यापैकी एकानेही माझ्यावर जाहीर आरोप किंवा संशय घेण्यापूर्वी (तसा ते अवश्य घेऊ शकतात, त्याबद्दल ना नाही!) मला विश्वासात घेऊन किंवा एखादे पोष्टकार्ड पाठवून 'काय तात्या, काय भानगड झाली आहे? किंवा काय प्रॉब्लेम असावा?' असे विचारले नाही याचे मला राहून राहून वाईट वाटत आहे. ह्या तात्याच्या मताशी मी सहमत आहे. ह्या पंचायत समितीमधल्या मंडळींनी अशा तर्‍हेची तक्रार आल्यावर जाहीर निवेदन देऊन आपापली बाजू मांडली. त्यामुळे असा एक समज झाला की हे सगळे तात्यानेच केले असावे. मलाही तसेच वाटत होते आणि मी ते तात्याजवळ बोलूनही दाखवले. त्याऐवजी पंच मंडळींनी आधी आपापसात आणि तात्याशी बोलून जर का एखादे संयुक्त निवेदन दिले असते तर कदाचित हे इतके रामायण घडले नसते. चूक कुणाकडूनही होऊ शकते अथवा ती एखादी तांत्रिक चूकही असू शकेल. पण संपादक मंडळी आणि मालक ह्यांनी जर एकमेकांशी सुसंवाद न ठेवता जर कोणता व्यवहार केला तर मग अशी पाळी येते. इथे ह्या सर्व मंडळींचे चुकले. अर्थात ही काही फार जीवघेणी चूक नव्हती पण त्यामुळे आधीच्याच गढुळ वातावरणात भरच पडली. म्हणून म्हणतो की ह्या बाबतीत नेवेदन देणार्‍या संपादक मंडळातील सगळ्यांनी थोडी काळजी घेतली असती तर कदाचित आज निर्माण झालेली कटुता निर्माण झाली नसती. बाकी ह्या प्रकरणातील कुणाच्याही मनात मिपा बद्दल अथवा वैयक्तिक तात्याबद्दल आकस नाही हेही मी पूर्णपणे जाणतो. फक्त थोडी घाई झाली. ती जर टाळता आली असती तर... असो. झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा नव्या जोमाने सगळ्यांनी कामाला लागावे म्हणजे आपोआप हे मळभ दूर होईल.

In reply to by प्रमोद देव

सहज Fri, 12/14/2007 - 19:33
तात्याचा हा खुलासा काहींना पटेल व काहींना नाही. तांत्रीक बिघाड म्हणले तर आता काय बोलायचे. काहीच बोलायला रहात नाही. बरेच जण जाऊ द्या म्हणुन सोडून देतील. आम्ही आम सदस्य तर काहीच करू शकत नाहीत. ३ गोष्टी महत्वाच्या १) कर्णाने आधी इतर इतर पंचायत सदस्यांशी बोलून तात्याशी चर्चा करून मगच काही जाहीर वक्तव्य करायला पाहीजे होते. पंचायत-मालक यांच्यात सुसंवाद नाही हे सिद्ध झाले व ते योग्य नव्हे. संबधीत सर्वांनी जबाबदारीने हे प्रकरण हाताळायला पाहीजे होते. पंचायत सदस्य ही जबाबदारी ओळखून कर्णाने असा जनता दरबार सुरू करणे योग्य नव्ह्ते. जरी वैयक्तीक पळवाटा शोधता आल्या तरी मिसळपावचे नाव खराब न होऊ देण्याची जबाबदारी झटकु शकत नाही. २) जे लेखन उडवले गेले त्याबद्दल एखादी-दुसरी व्यक्ति सोडली तर बहुसंख्यांचा (उडवायला)पाठींबा होता त्यामुळे (तांत्रीक बिघाड सोडला तर) ज्या कोणी हा प्रतिसाद उडवला होता त्याने योग्य तेच केले फक्त तसे लगेच खुलेपणाने सांगायला पाहीजे होते. मला वाटते आक्षेप दुटप्पी धोरणाला होता "चीकाचा उल्लेख" देखील तितकाच निषेधार्ह होता. बहुसंख्य लोक हेच म्हणतील. जर ते चालते तर हे पण चालायला हरकत नव्हती किंवा दोन्ही चालायला नाही पाहीजे. माझ्या मते दोन्ही निषेधार्ह. पण इथे लोकांना स्वातंत्र्य, तत्व, लोकशाही जिंदाबाद, प्रशासक शब्द ही शिवी आहे, असे बोलायला हवे असते व मिळालेले स्वातंत्र्य असले आक्षेपार्ह वाटेल ते म्हणण्यात घालवायचे असते. कदाचित तसले (चीक) लिखाण आले नसते तर अजुन घाणेरडे विनोद आले नसते. ३) असो झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा नव्या जोमाने सगळ्यांनी कामाला लागावे म्हणजे आपोआप हे मळभ दूर होईल. हे म्हणल्यावाचून रहावत नाही की फक्त तात्याला डिवचण्यासाठी जे लेखन होते त्यावर जरा विशेष लक्ष पंचायतीने द्यावे. तसेच तात्याला विनंती आहे की सतत काही लोकांचा उद्धार करणे बंद कर जर त्याला इतर लोक त्याच्या नावाने "शंख" करायला नको असतील तर त्याने देखील संयम बाळगला पाहीजे. काय सुंदर सुंदर लेखन करु शकतो तात्या. तात्यावर फक्त टिका करणार्‍यांनी इथे चांगले लेखन करुन दाखवावे. हा विषय सोडुन देण्यात यावा तसेच लगेच बेसनलाडू वरची कविता ताबडतोब काढली जावी ही मी पंचायतीला विनंती करतो. एखादा टोमणा, एखादे वाक्य पकडून खिल्ली उडवणे ठीक पण अशी आख्खी कविता एका सदस्यावर करणे योग्य नाही. काहीही असले तरी मिसळपाव सारखे पारदर्शक चर्चा होणारे दुसरे संकेतस्थळ नसावे!! पेरले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते.

In reply to by सहज

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 19:55
तसेच लगेच बेसनलाडू वरची कविता ताबडतोब काढली जावी ही मी पंचायतीला विनंती करतो. असहमत आहे, ती कविता इथेच राहू द्यावी असे मला वाटते! तात्या.

प्रियाली Fri, 12/14/2007 - 17:05
१. मी त्या प्रतिसादांच्या संपादनात नाही म्हणजे तात्या आहे असे माझ्या कोणत्याही प्रतिसादांतून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतीत होत नाही. २. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. ३. मला स्वतःला संपादनाची कामगिरी सांभाळणे शक्य नाही यांत कोणाचा विश्वासघात करणे इ. नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील जबाबदार्‍यांत गेल्या १-दीड महिन्यांत अचानक अतिशय वाढ झाली आहे आणि त्या नेटापेक्षा प्रथम येतात त्यामुळे मला हे सांभाळणे शक्य नाही. कधीतरी प्रतिसाद लिहिणे किंवा दोन चार मतांच्या पिंका टाकणे शक्य असते पण सर्व प्रतिसाद वाचून, लेख वाचून संपादन करणे मला शक्य नाही. ४. हे काम जमेल का नाही याबाबत डोक्यात विचार सुरु होतेच, पण चटकन 'आता जमणार नाही' असे कळवले नाही ती माझी चूक झाली. माझ्या मुळे कोणाची गैरसोय होत असल्यास/ झाली असल्यास कृपया माफ करा.

In reply to by प्रियाली

किमयागार Fri, 12/14/2007 - 19:55
प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. हा हा हा!! आमच्या प्रमोद आजोबांईतकी इथली सगळीच मंडळी दुधखुळी नाहीत म्हणायचं तर! अध्यक्षांचा १६ भुमिका असणारा एकपात्री प्रयोग मात्र आता चांगलाच रंगात आला आहे. वा अध्यक्ष परफॉरम्न्स पाहून "मझा आ गया!!" -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 16:58
बरं झालं तात्या तू निवेदन दिलंस. पण त्या बाळासाहेब चौगुल्याच्या ओंगळवाण्या लेखनावरील माझा आक्षेप कायम आहे आणि तो जेव्हा जेव्हा असले काही लिहील, तेव्हा तेव्हा मी त्याला विरोध करून त्याचे लेखन काढून टाकण्याची मागणी जाहीरपणे करेन. लोकशाहीच्या पडद्यामागे लपून पंचायत समितीच्या एका सदस्याने बाळासाहेबाच्या गलिच्छ लेखनाचे समर्थन करावे ही गोष्ट मलाच काय कोणत्याही सुसंस्कृत माणसाला पटणारी नाही. त्यामुळे तुझ्या त्या पंचायत समिती सदस्याला योग्य ती समज तू दे. बापू

In reply to by गारंबीचा बापू

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 17:02
>>लोकशाहीच्या पडद्यामागे लपून पंचायत समितीच्या एका सदस्याने बाळासाहेबाच्या गलिच्छ लेखनाचे समर्थन करावे ही गोष्ट मलाच काय कोणत्याही सुसंस्कृत माणसाला पटणारी नाही. बाळासाहेबांचे लेखन गलिच्छ आहे की नाही ही व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे. सदर लेखनाचे थेट समर्थन मी केलेले नाही, लेखन ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. असो.

In reply to by आजानुकर्ण

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 18:16
बाळासाहेबांचे लेखन गलिच्छ आहे की नाही ही व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे. अहो महाशय, सामाजिक संकेतस्थळावर सामाजिक संकेत हे वैयक्तिक मतापेक्षा महत्वाचे आहेत. उद्या कोणी नागडे फोटो इथे चिकटवले तर तुम्ही व्यक्तिसापेक्ष म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार की गलिच्छ म्हणून ते काढून टाकणार? समितीवर आहात तर जरा जबाबदारीने बोला की. सदर लेखनाचे थेट समर्थन मी केलेले नाही, लेखन ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तुम्ही व्यक्तिसापेक्षता आणि लोकशाहीच्या टिमक्या वाजवत होतात. तेव्हा खरं तर तुमचं हे काम होतं की ते लेखन ताबडतोब उडवणं आणि तशा स्वरूपाचे लेखन पुन्हा त्याकडून होणार नाही यासाठी तातडीने त्याच्यावर कारवाई करणं. त्याला व्यनि पाठवून तंबी देणं, पुन्हा असलं लेखन त्याच्याकडून आलं तर त्याचा आयडी ब्लॉक होईल हे सांगणं, हे तुमचं काम होतं. पण आपलं काम सोडून तुम्ही भलतीकडेच लक्ष घालत बसलात. तुमच्या 'प्रतिष्ठित' मित्रांना तुम्ही असल्या धर्तीचे विनोद कसे ऐकवले त्याची उदाहरणे तुम्ही देत होतात. बापू तुम्ही जो व्यक्तिनिरपेक्षता असा शब्द वापरला आहे तो चुकीचा आहे. तो व्यक्तिसापेक्षता असा हवा. धर्मनिरपेक्षता शब्दावरून तुम्ही हा शब्द बनविला आहे असे वाटते.

In reply to by गारंबीचा बापू

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 18:17
व्यक्तिनिरपेक्षता व व्यक्तिस्वातंत्र्याची तुमची व्याख्या जर तसले फोटो चिकटवणे व ओंगळवाणे लेखन इतकीच असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. माझी व्याख्या तशी नाही. असो. हा माझा या चर्चेवरचा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by आजानुकर्ण

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 18:23
अहो तुमची व्याख्या काहीही असो. इथे प्रश्न आहे की समितीचा एक सदस्य म्हणून तुमची जबाबदारी काय होती? तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर असले ओंगळवाणे लेखन आवडत असले तरी संकेतस्थळावर तुमच्या आवडीनिवडी न राबवता, सामाजिक मूल्यांचा मान राखणे हे तुमचे कर्तव्य होते. ते तुम्ही केले नाहीत हेच आम्ही सांगतोय. तुमच्या व्याख्या काय आहेत याच्याशी आम्हाला काय करायचायं? त्या असू द्यात तुमच्यापाशीच. समितीचा सदस्य म्हणून तुमची काय जबाबदारी आहे याच्याशी आम्हाला मतलब. बापू

In reply to by गारंबीचा बापू

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 17:04
बापूसाहेब, त्यामुळे तुझ्या त्या पंचायत समिती सदस्याला योग्य ती समज तू दे. आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद, परंतु एक तर मी कुणालाही समज वगैरे देऊ शकत नाही/इच्छित नाही आणि दुसरे म्हणजे यापुढे पंचायत समितीवरील कुणाशिही काहीही भाष्य करण्याची माझी इच्छा नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

किमयागार Fri, 12/14/2007 - 20:06
आपलीच प्यादी आपल्यावरच उलटली. आता आमचे ओरिजीनल पात्र त्यांना उत्तर देणार नाही! त्यांना आमचे कलापथक बघून घेईल. -कि'गार ****************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

विकास Fri, 12/14/2007 - 17:38
तात्या, तुमचा प्रतिसाद आत्ता सकाळी उठल्या उठल्या वाचला! आपण असे स्पष्ट उत्तर लिहील्यावर ते पटण्यासारखे आहे आणि आपल्यावर विश्वासही आहे. आता प्रश्न आम्ही (मिसळपाव पंचायत समिती सदस्य) तुमच्याशी का संपर्क साधला नाही तो. माझ्या पुरते बोलायचे तर मला काल (माझ्या) सकाळी हा प्रकार समजला पण मी संध्याकाळी तो बघू शकलो. कालच मला हे पण समजले की माझे अकांऊट कोणीतरी फोडण्याचा प्रयत्न केला ते. ज्या कोणी केला त्याने माझ्याबाबतीत असे का केले हा प्रश्न पडला आणि आत्ता पर्यंत आलेल्या प्रतिसादावरून तसा अनुभव इतर कोणाला आला असे वाटत नाही. मला काळजी त्याची जास्त होती, की माझ्या नावाने कोणी काही दिवे लावलेत का ते... त्या संदर्भात आणि मी "इतरांचे प्रतिसाद उडवले नाहीत" असे सांगणारी प्रतिक्रीया मी लिहीली आणि त्याचा दुवा आपल्या खरडवहीत दिलापण.. माझे नंतरचे प्रतिसाद पाहीले तरी त्यात आपल्यावर आणि "फॉर दॅट मॅटर" इतरांवर पण मी काही उलटसुलट लिहीले नाही. नंतर सर्कीटरावांनी त्यांच्या थिअरी प्रमाणे आपण केले असावे असे नवीन लेखन केले. त्यावर आपण बराच वेळ (आमच्या रात्रीच्या) आलेले असूनही जेंव्हा पटकन किमान "तो मी नव्हेच" इतके उत्तर दिले नाहीत. तेंव्हा झोपायला जायच्या आधी मी लिहीले की "सायलेन्स कॅन बी मिसइंटरप्रीटेड ऍज ऍक्सेप्टन्स" असे लिहीले आणि आपल्याला उत्तर लिहायची विनंती केली. त्यावर आपला वरील खुलासा आपण जवळ जवळ पाच-सहा तासांनी केलात. संवादाचा अभाव हा विसंवाद होण्यास कारणीभूत असतो. या सर्व घटनेत हाच प्रकार परत दिसला. जसे आमच्या पैकी कोणी आपल्यास व्य. नि. लिहीला नसेल तर ते आपल्यातील विसंवादास कारण असले, तसेच आपले ताबडतोब उत्तर नसणे (आलेले दिसून) हे घडणे पण सार्वजनीक विसंवादास कारण आहे, विशेष करून इंटरनेटच्या काळात जेंव्हा "इन्स्टंट रिस्पॉन्सेस"ची अपेक्षा असते तेंव्हा. त्यात आपण ज्या पद्धतीने हे स्थळ चालू केले त्याप्रमाणे हे व्हर्चुअल असले तरी ती पब्लीक सर्व्हीस आहे. (त्यात आम्ही पण सदस्य म्हणून आहोतच) आणि येथे म्हणतात त्या प्रमाणे तुमच्या साठी आणि पंचायतसमितीसाठी पण Public Service is a thankless job... Damned if you do and damned if you don't!

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 17:49
संवादाचा अभाव हा विसंवाद होण्यास कारणीभूत असतो. या सर्व घटनेत हाच प्रकार परत दिसला. विकासरावांच्या ह्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे.

चित्रा Fri, 12/14/2007 - 18:37
तात्या, तुमचे निवेदन स्पष्ट आहे, ते खरेही असावे असे समजून चालते. पण हे सर्व चालले आहे या सर्वाचे मूळ कारण माझ्या मते मागची ओझी कोणीच टाकून देत नाही हे आहे. निदान तुम्ही आतातरी ती टाकून द्या हा न मागता दिलेला सल्ला. आणि बाकीही सर्वांना अशीच विनंती/सल्ला. दुसरे - नीलकांतांना वेळ होत नसला तर एक उपाय आहे - तुम्हालाही या संकेतस्थळावर थोडेफार बदल करता येतील इतपत संगणकीय ज्ञान मिळवायला हरकत नाही. कठीण वाटेल पण कठीण नाही(माझ्या स्वतःच्या अनुभवातून ). ते काही रॉकेट सायन्स नाही. याप्रमाणे निदान तुम्ही जेव्हा नीलकांतला शक्य नाही तेव्हा त्याला सांगून तुम्ही काही बदल करू शकता. ते बदल काय आहेत हे सर्वांना कळावे म्हणून ते नोंदवण्याची एक पब्लिक स्पेस असली तर हे अजिबात कठीण नाही आणि त्यात पारदर्शकता राहू शकते. तेही होत नसल्यास नीलकांतांशिवाय अजून कोणाला वेळ असल्यास त्यांच्याकडून तात्पुरती मदत घेऊ शकता. हा वेळेचा सदुपयोग होईल. त्याहूनही महत्त्वाचे - पहिल्याने इथे काय लिखाण चालेल, याच्या स्पष्ट कल्पना / स्पष्ट धोरण असल्या/असले पाहिजे - हे मी मागे उपक्रमाच्या संपादकांनाही लिहीले होते - त्यांचे त्यावर मला तरी उत्तर आले नव्हते. सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी संपादक मंडळाने ही धोरणे लिहीणे जरूरीचे आहे. हे माझ्या ओळखीतील संपादकांना मी सांगितलेले आहे. पण ते एकदा सर्वांना उद्देशून लिहीते (उशीर झाला असला तरी). हे लिहायला उशीर केला याची शिक्षा म्हणून हवे तर त्या तयार करायला सध्याच्या मंडळावरील कोणी तयार असल्यास त्यांना मी मदत करू शकते - डिसें. च्या शेवटच्या आठवड्यात २-३ दिवस मला वेळ आहे. मात्र त्यानंतर त्या कशा प्रकारे वापरल्या जातात हे पहायला कोणीतरी लागेलच - ती जबाबदारी मी स्विकारू शकत नाही. दुसरे, मिपाची ओळख "नक्की" काय म्हणून ठेवायची याचाही विचार तुम्ही मालक म्हणून करावा हा (अजून एक जाता जाता दिलेला) सल्ला. लोकशाहीने चालणारी चावडी असल्यासारखे ऐसपैस संकेतस्थळ अशी ओळख असली तरी हरकत नाही, पण मग ती ओळख कायम असू देत. असो.

In reply to by चित्रा

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 19:27
चित्राताई, आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.. पहिल्याने इथे काय लिखाण चालेल, याच्या स्पष्ट कल्पना / स्पष्ट धोरण असल्या/असले पाहिजे सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी संपादक मंडळाने ही धोरणे लिहीणे जरूरीचे आहे. मिपाच्या पंचायत समितीची निवड झाल्यावर लगेचंच मिपाची घटना लिहा, ध्येयधोरणं लिहा, तुम्ही लिहाल ती ध्येयधोरण मला मान्य आहेत, तो ड्राफ्ट मला दाखवायचीही गरज नाही असंच मी पंचायतीच्या सर्व मंडळींना सांगितलं होतं. मला आठवतंय, विकासरावांनी थोडाफार पुढाकार घेतलाही होता पण पुढे काहीच झालं नाही! हे लिहायला उशीर केला याची शिक्षा म्हणून हवे तर त्या तयार करायला सध्याच्या मंडळावरील कोणी तयार असल्यास त्यांना मी मदत करू शकते मदतीचा हात पुढे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद... दुसरे, मिपाची ओळख "नक्की" काय म्हणून ठेवायची याचाही विचार तुम्ही मालक म्हणून करावा हा (अजून एक जाता जाता दिलेला) सल्ला. लोकशाहीने चालणारी चावडी असल्यासारखे ऐसपैस संकेतस्थळ अशी ओळख असली तरी हरकत नाही, पण मग ती ओळख कायम असू देत. खरं सांगायचं तर यापुढे मी या कशातच लक्ष घालणार नाही. एखाद्या गोष्टीचा उगिचंच विनाकारण डोक्याला ताप होऊ लागला तर मी तो जास्त करून न घेता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मोकळा होतो! माझी हौस म्हणून मी हे संस्थळ सुरू केलं. त्यामुळे आता फक्त इथे भरभरून लिहायचं काम मी करीन! इतरांनीही इथे अवश्य यावं, मिपा आवडलं तर इथे वाचावं, लिहावं! मी त्यांच्या लेखनाचाही आस्वाद घेईन, आवडलं तर भरभरून दादही देईन! राहता राहिला प्रश्न लोकांनी माझे दोष काढण्याचा, मला नांवे ठेवण्याचा, तर त्याचीही मला सवय आहे! कारण काही लोक फक्त तोच उद्योग करत वावरत असतात ही वस्तुस्थिती आहे! बाकी, मिसळपावचं जे काही व्हायचं असेल ते होईल. चामारी फार फार तर काय होईल? लोकं मिसळपाववर वैतागून इथे येईनाशी होतील आणि मिपा बंदच पडेल ना? पडू देत तिच्यायला! आगे अल्ला मालिक! :) आपला, (बेफिकीर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा Fri, 12/14/2007 - 21:10
बाकी, मिसळपावचं जे काही व्हायचं असेल ते होईल. चामारी फार फार तर काय होईल? लोकं मिसळपाववर वैतागून इथे येईनाशी होतील आणि मिपा बंदच पडेल ना? पडू देत तिच्यायला! असे असल्यास प्रश्नच नाही. हे होऊ नये म्हणून वरील सूचना होत्या.

ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 20:11
आत्ता हे निवेदन वाचलं. खरं सांगायचं तर हे सगळं बघुन वाईट वाटलं. हे फार वैयक्तीक पातळीवर चालू आहे असं वाटलं (जरी सगळे वैयक्तिक काही नाहि म्हणून सांगत असले तरी). म्हणजे एखाद्याचं म्हणणं पटलं तरी केवळ पुर्वी एखाद्याने आपल्याला डिवचलं आहे त्याला असा सोडायचा नाही हा आवेश दिसला याचं वाईट वाटतं. आता झालं गेलं विसरून पंचायत समितीने आणि तात्यांनी मनावर घेऊन पारदर्शक घटना लिहावी कारण इथे स्वातंत्र्य याचा अर्थ कही जणांकडून स्वैराचार असा घेतला जातो आहे असं गेल्या महिनाभर असलेल्या प्रेक्षकाच्या भुमिकेतून वाटलं. काहि मदत लागल्यास सांगा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. मी... तुम्ही.. खरंतर आपण सगळेच बाकी काहि मदत नाहि करू शकलो तर इथे नियमीत लेखन करून हे स्थळ नक्कीच फुलवू शकतो. लोकशाही म्हटली की असे क्षण यायचेच. तेव्हा कात टाकून हे स्थळ बहरास आणूया कारण प्रशासकांच्या टाचेखाली नसलेलं आपलं असं हेच एक स्थळ आहे. कात टाकू पाहणार्‍या मिसळपावच्या वाटचालीला शुभेच्छा! -(मिसळप्रेमी)ऋषिकेश

खरे तर या विषयावर आम्ही बोलणार नव्हतो. पण, तात्यांनी केलेला खूलासा पटणारा होता. म्हणुन या विषयावर लिहावे वाटले. त्याचे कारण असे की, सन्माननीय सदस्य श्री चौगुले यांच्या लेखनावर आमचाही प्रतिसाद उडविल्या गेला होता.( पंचायत समितीचे सदस्य अशा लेखनाकडे लक्ष देतील काय ? असे आम्ही विचारले होते. ) अर्थात आमचा हा प्रतिसाद उडविण्यासारखा नसावा असे आम्हाला तरी वाटते. ती काही तरी तांत्रिक गडबड असेल असे आम्हाला तरी वाटते. बाकी, श्री चौगुले यांचे लेखन आम्हाला तरी आवडले नव्हते. सार्वजनिक संकेतस्थळावर असे लेखन येऊ नये असे आमचे मत आहे. खरे तर पंचायत समितीचे अशा लेखनाकडे आणि मागील काही लेखनांकडे दुर्लक्ष झाले असे आम्हास वाटते. अर्थात त्यांना वयक्तिक कार्यबाहुल्यामुळे तितका वेळ सदस्यांचे लेखन आणि प्रतिक्रिया वाचण्यास वेळ मिळत नाही, यावरही आमचा विश्वास आहे. लोकशाही आहे, याचा अर्थ कोणतेही आणि कितीही घाणेरडे लेखन करावे असा त्याचा अर्थ होत नसावा असे वाटते. पण, का कोणास ठाऊक मिसळपाव हे संस्थळ नीट चालू नये...........असेच काही मंडळी प्रयत्न करतांना दिसतात, कदाचित आमचा गैरसमजही असेल. पण, अधिकाधिक वेळ आम्ही मिसळपाववर वावरतो म्हणुन तसे वाटते. अर्थात आमचे हे निरिक्षण चुकीचे देखील असू शकते. मात्र येणा-या काळात पंचायत समितीचे सदस्य वाढवले पाहिजे असे वाटते. (कॉ. मेंबर असतात तसे ) जेणे करुन संकेस्थळावर कोणत्यातरी सदस्याचे सतत लक्ष राहील . दर्जेदार लेखन व्हावे, जराशी खेचाखेची व्हावी, जरासे मनोरंजन व्हावे आणि बरेच काही....मात्र हे होतांना पंचायत समिती सदस्यांचा जरासा धाकही असावा ....अर्थात संस्थळाच्या मालकांनी ठरवायचे आहे, काय बदल करावे ते. आणि या बाबतीत संस्थळावर काहीतरी बदल केलेच पाहिजेत, करावेच लागतील. आम्हीही वाटल्यास काही मदत करु. ते बदल काय असावेत हे संस्थळावर वावरणा-या आणि दुनियादारीची ओळख असलेल्या दादा माणसाला आम्ही तरी सांगण्याची गरज नाही हेही आम्हाला ज्ञात आहे. आपला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. (मिसळपावचा चाहता.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 21:13
अर्थात संस्थळाच्या मालकांनी ठरवायचे आहे, काय बदल करावे ते. आणि या बाबतीत संस्थळावर काहीतरी बदल केलेच पाहिजेत, करावेच लागतील. आम्हीही वाटल्यास काही मदत करु. बिरुटेसाहेब, आपल्या आस्थेबद्दल धन्यवाद, मदतीच्या हाताबद्दलही धन्यवाद. परंतु आम्हाला सध्या तरी काहीही करावेसे वाटत नाही, कुणाला काहीही सांगावेसे वाटत नाही! परमेश्वराची आणि आपल्यासारख्या हितचिंतकाची इच्छा असेल तर मिपा अगदी अवश्य सुरू राहील, दणक्यात सुरू राहील! नाहीतर आपली मैत्री आहेच, मला तुमचा आणि तुमचा मला, ब्लॉगही माहिती आहे, तिथे भेटत जाऊ. आपणही कधी अवश्य मुंबईत या, मीही कधी औरंगाबादला आलो तर आपल्याला जरूर भेटेन! मजा करू तिच्यामारी! :) अहो नाहीतरी एवीतेवी ही सगळी आभासी दुनिया! संगणक बंद की सगळं बंद! :) आमच्या सुदैवाने आमची इतरही दुनिया, दोस्त मंडळींची दुनिया, गाण्यातल्या लोकांची दुनिया खूप मोठी आहे, खूप समृद्ध आहे. आम्ही तिथे मन रमवू, धमाल करू! :) तात्या.

राजे Fri, 12/14/2007 - 20:57
येथे झालेल्या गोधळातून काही शिकलो व माझे शब्द वर नियम व अटी लागू केल्या आहेत त्या येथे पाहा व काही सुचना असतील तर तेथे लिहा ही विनंती. माझे तर मत असे आहे की हेच नियम व अटी येथे देखील लागू करावेत फक्त संकेतस्थळाचे नाव बदला ;} http://mazeshabd.ekbhasha.com/node/74 राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

देवदत्त Fri, 12/14/2007 - 21:51
परमेश्वराची आणि आपल्यासारख्या हितचिंतकाची इच्छा असेल तर मिपा अगदी अवश्य सुरू राहील, दणक्यात सुरू राहील! अहो तात्या, मिपा सुरू राहिलच. त्यास काही नाही होणार असा विश्वास आहे आणि आमच्या शुभेच्छाही. भरपूर काही वाचायचे (आणि लिहायचेही) असताना अचानक मिपा बंद होण्याची भाषा वाचून वाईट वाचले. अहो, माझ्या ब्लॉग वर काही ना काही लिहिण्याचा विचार (?) मिसळपाव मुळेच तर बळावला. आधी फक्त विचार होते, पण कृती ह्या २ महिन्यात झाली. अहो नाहीतरी एवीतेवी ही सगळी आभासी दुनिया! संगणक बंद की सगळं बंद! :) मॅट्रिक्स सिनेमाची आठवण झाली हो. :)

मनोज Fri, 12/14/2007 - 22:05
मुद्दइ लाख बुरा चाहे तो क्या होता है ? वही होता है जो मंजूर ए खुदा होता है ! मिसलपाव ला भावी वाटचालीला खुप सार्‍या शुभेच्छा!!! एक मराठी माणुस - मन्या :)

सुनील Fri, 12/14/2007 - 22:13
या सर्व वाद-विवादातून, आरोप-प्रत्यारोपातून, समज-गैर-समजातून मिपा पुन्हा बाहेर येओ हीच शुभेच्छा आणि तसा तो येईल असा विश्वासही!! (सदैव आशावादी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट Sat, 12/15/2007 - 02:12
तात्यासारख्या मनमोकळ्या स्वभावाच्या माणसाकडून हेच अपेक्षित होते. नेहमी अशा प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी तात्याकडून लगेचच खुलासे होतात. ह्या खुलाशाला वेळ लागल्याने "दाल में कुछ काला है" असे सदस्यांना वाटणे हे साहजिकच आहे. परंतु आता, झाले-गेले वसरून ह्या स्थळाला बहर आणण्याच्या कामात सर्व सदस्यांची मदत होईल, ही अपेक्षा. ह्या स्थळाची घटना लिहिण्यासाठी पंचायत समितीच्या व्यतिरीक्त धनंजय आणि गुंडोपंतांची मदत घ्यावी, असे सुचवतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 02:31
परंतु आता, झाले-गेले वसरून ह्या स्थळाला बहर आणण्याच्या कामात सर्व सदस्यांची मदत होईल, ही अपेक्षा. हे तुम्ही म्हणताय? नवल आहे..! या संस्थळाला बहार यावी असं तुम्हाला वाटतंय यावर विश्वास बसत नाहीये परंतु आनंद नक्कीच वाटतो आहे! ह्या स्थळाची घटना लिहिण्यासाठी पंचायत समितीच्या व्यतिरीक्त धनंजय आणि गुंडोपंतांची मदत घ्यावी, असे सुचवतो. गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. अर्थात, ते लोकनियुक्त सभासद असल्यामुळे आमचा नाईलाज आहे हा भाग वेगळा! धनंजयाच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमच्या 'मालकीच्या' अधिकारात आम्ही प्रा. डॉ, दिलीप बिरुटे, श्री प्रकाश घाटपांडे, व श्री प्रमोद देव या वरीष्ठ सभासदांनाही घटनेच्या कामात सहभागी होण्याची विनंती करू! अवांतर - गेले दोन दिवस 'मालक!', 'मालक!', 'मालक कुठे आहेत?', 'मालकांचा खुलासा हवा आहे!' असा आमचा एवढा उदो उदो झाला की आता आम्हीही थोडंसं 'मालकासारखं' वागायचा प्रयत्न करणार आहोत! (आजपर्यंत कधी तसे वागलो नाही हेही तितकंच खरं!) असो, आपला, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Sat, 12/15/2007 - 02:35
अवांतर - गेले दोन दिवस 'मालक!', 'मालक!', 'मालक कुठे आहेत?', 'मालकांचा खुलासा हवा आहे!' असा आमचा एवढा उदो उदो झाला की आता आम्हीही थोडंसं 'मालकासारखं' वागायचा प्रयत्न करणार आहोत! (आजपर्यंत कधी तसे वागलो नाही हेही तितकंच खरं!) म्हणजे, मिसळपावाचे दुसरे मनोगत करायचे असा निर्णय घेतला आहेस का तात्या ? तसे स्पष्ट सांग ! आम्ही येथे का येतो, याचा जरा विचार कर, म्हणजे मग आम्ही काय म्हणतो, त्यावर विश्वास बसेल. - सर्किट

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sat, 12/15/2007 - 02:51
त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. मुळात आपण आमचा समावेश केलात हे जितके 'अनपेक्षीत' होते तितकेच हे लिखाण 'अपेक्षीत' होते. आम्ही आमचा राजीनामा आधीच दिला आहे. तेव्हा तुमच्या 'मालक' ह्या भुमिकेतुन योग्य ती कारवाई करा. गेल्या ४८ तासात पाहायला मिळालेले मनुष्यस्वभावाचे पैलू मात्र बरेच काही शिकवून गेले. बर्‍याच गृहितकांना तडा गेला. तेव्हा आमचा निरोप घ्यावा. -कोलबेर नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा नळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा -बा. भ. बोरकर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 11:06
माझेही मत असेच आहे. मिसळपावच नव्हे तर इतर कोणत्याही संकेतस्थळाला संपादकांची काय गरज आहे? एकमेकांवर विश्वास ठेवून, म्याच्युरिटीने आपण का वागू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मात्र आम्ही इथे सर्वांना पिडत राहूच.

In reply to by विसोबा खेचर

गारंबीचा बापू Sat, 12/15/2007 - 11:56
गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! सहमत. त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. श्री कोलबेर यांच्याबाबतीत मी काही बोलत नाही. पण आजानुकर्णांची असमंजस वृत्ती कोणत्याही संकेतस्थळाला घातक ठरेल यात शंका नाही. त्यांनी स्वत:च सांगितले आहे की ते इथे लोकांना 'पिडण्यासाठी' येणार आहेत. अशा मनोवृत्तीच्या माणसाला धोरणात्मक बाबींपासून दूर ठेवावे. कारण त्यांचा उपयोग होण्यापेक्षा उपद्रवच जास्त होईल. धनंजयाच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमच्या 'मालकीच्या' अधिकारात आम्ही प्रा. डॉ, दिलीप बिरुटे, श्री प्रकाश घाटपांडे, व श्री प्रमोद देव या वरीष्ठ सभासदांनाही घटनेच्या कामात सहभागी होण्याची विनंती करू! चारही नावांशी सहमत. १००% पाठिंबा बापू

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:43
गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! हे मात्र योग्यच आहे तात्या. जर मी येथे येवून तितका वेळ देवू शकत नसेल हे स्पष्ट दिसते आहे अशा वेळी जबाबदारी देण्यात काय अर्थ आहे? शिवाय मलाही वाटत नाही की मी इतके काम करू शकेन. आळस हा महत्वाचा मुद्दा नि दारूचा अंमल नसतांना मिळणारा वेळ हा दुसरा महत्वाचा मुद्दा. मी कविता लिहिण्यापुरताच येथे येतो असे म्हणणे मात्र योग्य नाही. मी येथे येत जात असतोच... तसेच असते तर कविता तिकडे मैत्रीपार्कात नसती का टाकता आली? आणि असेही मी काय माहितीपूर्ण तरी लिखाण करतोय हो ? ;))) मला संपादन वगैरे जबाबदारी नको हे मी मागेही जाहीर सांगितले आहेच, आताही सांगतो. मी आपला मवाली म्हणूनच बराय! संपादनाची पोलिसी कामे मला नाही जमणार... आपला मवाली, आळशी नि दारूड्या गुंडोपंत

गारंबीचा बापू Sat, 12/15/2007 - 11:31
मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मात्र आम्ही इथे सर्वांना पिडत राहूच. बरं झालं तुम्हीच ही कबुली दिलीत. तुमच्या येथिल वर्तणुकीबद्दल आमच्या व्याख्या नाही विचारल्यात. बापू

उत्तर शोधत आहे Sat, 12/15/2007 - 22:21
ईतरांना माहीत नसावे की ड्रुपल काय चीझ आहे पण मला व येथील काही सदस्यांना द्रुपल वापरणे येते व ह्यातील कमी व कमजोरी आम्हाला माहीत आहेत. उदा. देवदत्त राजे >> मी प्रतिसाद लिहीत होतो... मी नाही हो नष्ट केले ते लेखन टिकाराम किमयागार मनोज व्यंकट वेळ शक्यतो ... आसपास [( शनी, 2007-12-15 १०:०७) .] हे सद्स्य जेव्हा येथे उपलब्ध होते.......... जेव्हा मी किमयागार ह्यांच्या एका लेखनाला " बेसनलाडूच्या वरील कविता कोठे गेली" हे विचारना करणारे लेखन होते... व मी प्रतिसाद लिहला [जो सर्वात पर्थम} व त्यांचे पुर्व-परिक्षण करु पर्यंत तो लेख / लेखन नष्ट केला गेला ... का हे सोडाच... पण कसे हे सांगा पहिल्यादां. उत्तर हवे... लेखन कोठे गेले व माझा प्रतिसाद कूठे गेला ते. राज जैन

In reply to by उत्तर शोधत आहे (verified= न पडताळणी केलेला)

राजे Sat, 12/15/2007 - 22:29
जर तुम्ही खोटे नाही आहात अथवा संकेतस्थळावरील तुमचे "लोकशाही" नियुक्त सदस्य ह्यामध्ये नाही आहे असे तुम्हाला वाटत असेल तर काही ही फेरफार न करता.. व्यवस्थापन आयडीचा पासवर्ड व सद्स्य नाव मला व्यनी. ने अथवा दुरध्वनी द्वारे द्यावी ही विंनती. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

उत्तर शोधत आहे Sat, 12/15/2007 - 23:16
काही तरी ठीक करता करता.... मीच बिघडलो आहे.... कोणाला तरी सपोर्ट करता करता... मीच बिन सपोर्ट राहीलो आहे... काही व्यक्तीरेखांना व्यक्ति समजता समजता.... मीच हरवलो आहे... काही प्रश्नांची उत्तरे देता देता..... मीच काही प्रश्न विचारत आहे... कधी कधी प्रश्न शोधता शोधता....... मीच उत्तर शोधत आहे.. मीच उत्तर शोधत आहे...... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

गारंबीचा बापू Sat, 12/15/2007 - 23:36
अरे आता पुरे सकाळ संध्याकाळ इथे कधीही आलो तरी नुसती भांडणं. लोकशाही , सरपंच, पंचायत समिती, ते एक येड** त्या पंचायत समितीतलं.... वीट आलाय आता. आता पूर्णविराम द्या या सगळ्या गोष्टींना आणि काहीतरी चांगलं लिहा. जे काही भांडायचं असेल ते एकमेकांना इमेल पाठवून भांडा. आयमाय काढा एकमेकांची. पण ते इथे नको. आम्ही इथे आल्या आल्या आमच्या मूडची वाट लावू नका. बापू

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:06
तात्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे. ज्यांना जे लिहायचे ते लिहूदेत. पण लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की आपल्या मिसळपावच्या "घरात" आमच्या सारख्या मैत्रिणीही आहेत. कोणतेही लेखन करताना जर तुम्हाला स्वतःला लाज किंवा घृणा वाटत असेल तर असे लेखन करण्याआधीच दहावेळा विचार करावा. तुमच्या कुटुंबीयांनी असे लेखन वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही विचार करावा. असे केल्याने कदाचित ओंगळ आणि गलिच्छ लेखन कमी होईल. या कामी कोणत्याही तात्याची गरज नाही. गरज आहे फक्त स्वपरिक्षणाची . आणि तरिही अशाप्रकारचे लेखन आलेच तर पंचायत समितीने कोणताही विचार न करता किंवा आप्-पर भाव न ठेवता ते लेखन उडवावे. आणि मग त्यासाठी कोणीही आक्षेप घेऊ नये. सगळे वाद विसरून नव्याने घर बांधू आपण. रुसलेल्या लाडवाची समजूत काढून त्यालाही मदतीला घेऊ. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर.. जरा विसावू या वळणावर... या वळणावर... - प्राजु. (होमसिक)

In reply to by प्राजु

सुशील Sun, 12/16/2007 - 07:54
आम्हाला तात्या जसा आहे तसा त्याच्या शिव्यांसकट आवडतो. कुटुंबियांनी लिहिले तर काय वाटेल वगैरे वाटणार्‍यांसाठी मनोगत वगैरे स्थळे आहेतच की. इथले स्वरूप कसे असणार हे तात्याने आधीच स्पष्ट केले आह आणि ते मिसळपाव.कॉम ह्या नावातुनच प्रतित होते. ही साइट वरणभात.कॉम नव्हे. रुसलेल्या लाडवाची समजूत काढून त्यालाही मदतीला घेऊ. ह्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. लाडू तसाही येतच राहतो. एकाची समजूत काढली की सगळेच लाडावतील. फक्त न्युसन्स असणार्‍या किमयागाराचे अकाउंट डीलिट केले आह मग त्याची पण समजुत काढायची का?

मुक्तसुनीत Sun, 12/16/2007 - 06:15
पण लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की आपल्या मिसळपावच्या "घरात" आमच्या सारख्या मैत्रिणीही आहेत. कोणतेही लेखन करताना जर तुम्हाला स्वतःला लाज किंवा घृणा वाटत असेल तर असे लेखन करण्याआधीच दहावेळा विचार करावा. तुमच्या कुटुंबीयांनी असे लेखन वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही विचार करावा. मनातले बोललात. शिवीगाळ, निंदानालस्ती या सर्व गोष्टी "मर्दाना" समजल्या जातात हे खरे. पण त्यात कसले पौरुष नेमके आहे ते मला नक्की समजले नाही अद्याप. इन एनी केस, अपशब्दांच्या मंत्रपुष्पाचा कंटाळा पुरुषानाही येऊ शकतो हे येथे नमूद व्हावे. मैत्रिणींइतक्याच मित्रानाही हे प्रकार नको आहेत. ही साईट आवडते कारण ती मनमोकळ्या संवादाचे वचन देते. "मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:24
"मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच. हे अगदी माझ्या मनातले बोललात.. - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 06:35
मैत्रिणींइतक्याच मित्रानाही हे प्रकार नको आहेत... +१ "मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच. ++१ गरज आहे फक्त स्वपरिक्षणाची +++१ आणि चारोळी तर आहाहा!!!! मनातलं बोललात!

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 14:58
कळावे, लोभ आहेच, तो जमल्यास वाढावा, न वाढल्यासही उत्तमच! :) किंबहुना, काही मंडळींशी आता तो न वाढल्यासच अधिक उत्तम होईल असंही आता वाटायला लागलं आहे! राहता राहिला प्रश्न मिसळपावच्या भविष्याचा आणि मिसळपावचं पुढे काय होणार याचा, तर त्याबद्दल मला काडीचीही फिकीर नाही हेही सांगू इच्छितो! मला जे निवांतपणे लिहायचं आहे ते मी इथे लिहीन, कुणी वाचल्यास चांगलंच आहे! नाहीतरी सुरवातीला इथे एकटाच आलो होतो त्यामुळे पुन्हा एकटं रहाणंही फारसं जड जाऊ नये असं वाटतं! तात्या.

राजे Fri, 12/14/2007 - 14:59
लेखन नष्ट होण्याची अडचण / तांत्रिक गडबड ही ड्रुपल ४.७ मध्ये होती पंण ५.१ वर ती गडबड दुर केली गेली आहे असे मी वाचले आहे, तरी ही अशी काही अडचण असेल तर संकेतस्थळ दोन एक दिवसाठी बंद ठेऊन डाटाबेस तथा ईतर कोडींग तपासून घ्या, ही विनंती. तसेच नवीन काही उपडेट्स आले आहेत ४.१ साठी ते चढवा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 15:09
तात्या, जाहीर निवेदनाबद्दल अनेक आभार (आभारी)बेसनलाडू माझ्यासह अनेकांनी तुमच्यावरचा घेतलेला संशय केवळ निवेदनामुळे पूर्ण दूर होण्यास मदत होईल, असे वाटत नसल्याने तसेच तुमचा निवेदनातला एकूण नाराजीचा सूर बघता तुम्हांला तसेच लोकनियुक्त पंचायत समितीला काही सूचना कराव्याशा वाटल्या. त्या येथे जाहीरच आणि कोणताही आडपडदा न ठेवता, स्पष्टपणे करतो आहे.
  1. तुम्ही नीलकांताला सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा छडा लागला, की त्या तपासाचे निष्कर्ष त्वरीत येथे सर्व सभासदांसमोर जाहीर व्हावेत.
  2. पंचायत समितीचेच एक सभासद असलेल्या विकासरावांचा परवलीचा शब्द चोरण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रकरणाचा आणि प्रतिसाद उडवण्याच्या प्रकरणाचा परस्परसंबंध लक्षात घेऊन त्या दृष्टीने एकूण प्रकरणाचा छडा लावावा
  3. तुम्हाला मागे मी लिहिलेला व्य नि मिसळपावाच्या हितासंबंधी आहे, असे सांगून जगजाहीर केल्यानंतर माझ्यासह येथील बर्‍याच सदस्यांची त्याबाबत स्पष्ट नाराजी सगळ्यांनाच दिसली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी (अगदी पंचायत समितीचे सदस्यही) व्य नि वगैरे लिहून विश्वासात बिश्वासात घेऊन संवाद साधण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. त्यामुळे कुणाकडून तशी अपेक्षा न ठेवाल तरच बरे! निदान मी तरी पुन्हा अशा व्य नि च्या फंदात स्वतःहून पडण्यास तयार नाही. ज्यांनी त्या प्रकरणानंरही व्य नि तून संपर्क साधला असेल, त्या सदस्यांच्या सहनशीलतेचे मला कौतुकच वाटते.
  4. नियुक्त पंचायत समितीने 'ना काम' आंदोलन थांबवले की मिसळपावावरील मार्गदर्शक लेखनाबाबत काही बाबी सुस्पष्ट कराव्यात. जसे प्रतिसाद उडवले जाण्यासाठीचे निकष; अश्लील,ओंगळवाणे,हिडीस काय आहे, काय नाही; इत्यादी. त्याबाबत संकेतस्थळाचे मालक म्हणून तुमचा हस्तक्षेप नसला, तरी योग्य पाठपुरावा असावा. त्याबाबत सदस्यांना माहिती दिली जावी.
  5. तुमचे किंवा प्रमोदकाकांचे उडालेले साधेसुधे प्रतिसाद उडणे आणि येथील बाळासाहेबांचा आणि त्यावरील काही प्रतिसाद उडणे, यातील अपघात काय आणि खोडी काय हे न कळण्याइतके मिसळपावचे सभासद मूढमती नसावेत, असे वाटते. त्यामुळे तुमच्या किंवा प्रमोदकाकांच्या प्रतिसादांच्या उडण्याची आणि बाळासाहेबांचे व संबंधित इतर प्रतिसाद उडण्याची तुलना करूच नकात.
  6. सध्याच्या वस्तुनिष्ठ समस्येला निवेदनातून वैयक्तिक हितसंबंधांची, वैयक्तिक भावनांची झालर लावू नकात (कोण कसे आहे, कोणाला कोणाची किती पडली आहे, कुणाला आपले नि परके समजायचे वगैरे) त्यामुळे एक तर विषय भरकटू शकतो आणि दुसरे, असे करून सदस्यांची संकेतस्थळाबद्दलची, येथील कामकाजाबद्दलची अपेक्षा, तक्रार जे काही असेल ते - सहानुभूतीत बदलू शकेल, जे कोणासाठीच हितावह नसेल; मिसळपावसाठी तर नाहीच नाही
असो. तुमचे निवेदन वाचून जे मनात आले ते प्रामाणिकपणे मांडले. मिसळपावच्या यापुढील वाटचालीसाठी मालक म्हणून तुम्हाला, पंचायत समितीला आणि सर्व सदस्यांना अनेकोत्तम शुभेच्छा. (प्रामाणिक शुभेच्छुक)बेसनलाडू

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 15:56
तात्याचा स्वभाव बघता हा खुलासा पटण्यासारखा आहे. आजही ते लेखन इथे शाबूत आहे ज्यात तात्यावर सरळ सरळ टीका आहे. तात्याची टिंगलटवाळी केलेले प्रतिसाद अजूनही दिसताहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे ’बालबुद्धी’ विनोद तात्यांनी उडवले असतील असे मला तरी वाटत नाही. मध्यंतरी माझेही अतिशय साधेच एकदोन प्रतिसाद उडवले गेले होते.त्याचेही कारण कळले नव्हते. मिपाच्या सुरवातीला ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून ज्या मंडळींना येथील काळजीवाहू समिती सदस्य म्हणून नेमले होते आणि पुढे ती मंडळी बिनविरोध निवडून आली त्यापैकी एकानेही माझ्यावर जाहीर आरोप किंवा संशय घेण्यापूर्वी (तसा ते अवश्य घेऊ शकतात, त्याबद्दल ना नाही!) मला विश्वासात घेऊन किंवा एखादे पोष्टकार्ड पाठवून 'काय तात्या, काय भानगड झाली आहे? किंवा काय प्रॉब्लेम असावा?' असे विचारले नाही याचे मला राहून राहून वाईट वाटत आहे. ह्या तात्याच्या मताशी मी सहमत आहे. ह्या पंचायत समितीमधल्या मंडळींनी अशा तर्‍हेची तक्रार आल्यावर जाहीर निवेदन देऊन आपापली बाजू मांडली. त्यामुळे असा एक समज झाला की हे सगळे तात्यानेच केले असावे. मलाही तसेच वाटत होते आणि मी ते तात्याजवळ बोलूनही दाखवले. त्याऐवजी पंच मंडळींनी आधी आपापसात आणि तात्याशी बोलून जर का एखादे संयुक्त निवेदन दिले असते तर कदाचित हे इतके रामायण घडले नसते. चूक कुणाकडूनही होऊ शकते अथवा ती एखादी तांत्रिक चूकही असू शकेल. पण संपादक मंडळी आणि मालक ह्यांनी जर एकमेकांशी सुसंवाद न ठेवता जर कोणता व्यवहार केला तर मग अशी पाळी येते. इथे ह्या सर्व मंडळींचे चुकले. अर्थात ही काही फार जीवघेणी चूक नव्हती पण त्यामुळे आधीच्याच गढुळ वातावरणात भरच पडली. म्हणून म्हणतो की ह्या बाबतीत नेवेदन देणार्‍या संपादक मंडळातील सगळ्यांनी थोडी काळजी घेतली असती तर कदाचित आज निर्माण झालेली कटुता निर्माण झाली नसती. बाकी ह्या प्रकरणातील कुणाच्याही मनात मिपा बद्दल अथवा वैयक्तिक तात्याबद्दल आकस नाही हेही मी पूर्णपणे जाणतो. फक्त थोडी घाई झाली. ती जर टाळता आली असती तर... असो. झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा नव्या जोमाने सगळ्यांनी कामाला लागावे म्हणजे आपोआप हे मळभ दूर होईल.

In reply to by प्रमोद देव

सहज Fri, 12/14/2007 - 19:33
तात्याचा हा खुलासा काहींना पटेल व काहींना नाही. तांत्रीक बिघाड म्हणले तर आता काय बोलायचे. काहीच बोलायला रहात नाही. बरेच जण जाऊ द्या म्हणुन सोडून देतील. आम्ही आम सदस्य तर काहीच करू शकत नाहीत. ३ गोष्टी महत्वाच्या १) कर्णाने आधी इतर इतर पंचायत सदस्यांशी बोलून तात्याशी चर्चा करून मगच काही जाहीर वक्तव्य करायला पाहीजे होते. पंचायत-मालक यांच्यात सुसंवाद नाही हे सिद्ध झाले व ते योग्य नव्हे. संबधीत सर्वांनी जबाबदारीने हे प्रकरण हाताळायला पाहीजे होते. पंचायत सदस्य ही जबाबदारी ओळखून कर्णाने असा जनता दरबार सुरू करणे योग्य नव्ह्ते. जरी वैयक्तीक पळवाटा शोधता आल्या तरी मिसळपावचे नाव खराब न होऊ देण्याची जबाबदारी झटकु शकत नाही. २) जे लेखन उडवले गेले त्याबद्दल एखादी-दुसरी व्यक्ति सोडली तर बहुसंख्यांचा (उडवायला)पाठींबा होता त्यामुळे (तांत्रीक बिघाड सोडला तर) ज्या कोणी हा प्रतिसाद उडवला होता त्याने योग्य तेच केले फक्त तसे लगेच खुलेपणाने सांगायला पाहीजे होते. मला वाटते आक्षेप दुटप्पी धोरणाला होता "चीकाचा उल्लेख" देखील तितकाच निषेधार्ह होता. बहुसंख्य लोक हेच म्हणतील. जर ते चालते तर हे पण चालायला हरकत नव्हती किंवा दोन्ही चालायला नाही पाहीजे. माझ्या मते दोन्ही निषेधार्ह. पण इथे लोकांना स्वातंत्र्य, तत्व, लोकशाही जिंदाबाद, प्रशासक शब्द ही शिवी आहे, असे बोलायला हवे असते व मिळालेले स्वातंत्र्य असले आक्षेपार्ह वाटेल ते म्हणण्यात घालवायचे असते. कदाचित तसले (चीक) लिखाण आले नसते तर अजुन घाणेरडे विनोद आले नसते. ३) असो झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा नव्या जोमाने सगळ्यांनी कामाला लागावे म्हणजे आपोआप हे मळभ दूर होईल. हे म्हणल्यावाचून रहावत नाही की फक्त तात्याला डिवचण्यासाठी जे लेखन होते त्यावर जरा विशेष लक्ष पंचायतीने द्यावे. तसेच तात्याला विनंती आहे की सतत काही लोकांचा उद्धार करणे बंद कर जर त्याला इतर लोक त्याच्या नावाने "शंख" करायला नको असतील तर त्याने देखील संयम बाळगला पाहीजे. काय सुंदर सुंदर लेखन करु शकतो तात्या. तात्यावर फक्त टिका करणार्‍यांनी इथे चांगले लेखन करुन दाखवावे. हा विषय सोडुन देण्यात यावा तसेच लगेच बेसनलाडू वरची कविता ताबडतोब काढली जावी ही मी पंचायतीला विनंती करतो. एखादा टोमणा, एखादे वाक्य पकडून खिल्ली उडवणे ठीक पण अशी आख्खी कविता एका सदस्यावर करणे योग्य नाही. काहीही असले तरी मिसळपाव सारखे पारदर्शक चर्चा होणारे दुसरे संकेतस्थळ नसावे!! पेरले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते.

In reply to by सहज

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 19:55
तसेच लगेच बेसनलाडू वरची कविता ताबडतोब काढली जावी ही मी पंचायतीला विनंती करतो. असहमत आहे, ती कविता इथेच राहू द्यावी असे मला वाटते! तात्या.

प्रियाली Fri, 12/14/2007 - 17:05
१. मी त्या प्रतिसादांच्या संपादनात नाही म्हणजे तात्या आहे असे माझ्या कोणत्याही प्रतिसादांतून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतीत होत नाही. २. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. ३. मला स्वतःला संपादनाची कामगिरी सांभाळणे शक्य नाही यांत कोणाचा विश्वासघात करणे इ. नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील जबाबदार्‍यांत गेल्या १-दीड महिन्यांत अचानक अतिशय वाढ झाली आहे आणि त्या नेटापेक्षा प्रथम येतात त्यामुळे मला हे सांभाळणे शक्य नाही. कधीतरी प्रतिसाद लिहिणे किंवा दोन चार मतांच्या पिंका टाकणे शक्य असते पण सर्व प्रतिसाद वाचून, लेख वाचून संपादन करणे मला शक्य नाही. ४. हे काम जमेल का नाही याबाबत डोक्यात विचार सुरु होतेच, पण चटकन 'आता जमणार नाही' असे कळवले नाही ती माझी चूक झाली. माझ्या मुळे कोणाची गैरसोय होत असल्यास/ झाली असल्यास कृपया माफ करा.

In reply to by प्रियाली

किमयागार Fri, 12/14/2007 - 19:55
प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. हा हा हा!! आमच्या प्रमोद आजोबांईतकी इथली सगळीच मंडळी दुधखुळी नाहीत म्हणायचं तर! अध्यक्षांचा १६ भुमिका असणारा एकपात्री प्रयोग मात्र आता चांगलाच रंगात आला आहे. वा अध्यक्ष परफॉरम्न्स पाहून "मझा आ गया!!" -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 16:58
बरं झालं तात्या तू निवेदन दिलंस. पण त्या बाळासाहेब चौगुल्याच्या ओंगळवाण्या लेखनावरील माझा आक्षेप कायम आहे आणि तो जेव्हा जेव्हा असले काही लिहील, तेव्हा तेव्हा मी त्याला विरोध करून त्याचे लेखन काढून टाकण्याची मागणी जाहीरपणे करेन. लोकशाहीच्या पडद्यामागे लपून पंचायत समितीच्या एका सदस्याने बाळासाहेबाच्या गलिच्छ लेखनाचे समर्थन करावे ही गोष्ट मलाच काय कोणत्याही सुसंस्कृत माणसाला पटणारी नाही. त्यामुळे तुझ्या त्या पंचायत समिती सदस्याला योग्य ती समज तू दे. बापू

In reply to by गारंबीचा बापू

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 17:02
>>लोकशाहीच्या पडद्यामागे लपून पंचायत समितीच्या एका सदस्याने बाळासाहेबाच्या गलिच्छ लेखनाचे समर्थन करावे ही गोष्ट मलाच काय कोणत्याही सुसंस्कृत माणसाला पटणारी नाही. बाळासाहेबांचे लेखन गलिच्छ आहे की नाही ही व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे. सदर लेखनाचे थेट समर्थन मी केलेले नाही, लेखन ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. असो.

In reply to by आजानुकर्ण

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 18:16
बाळासाहेबांचे लेखन गलिच्छ आहे की नाही ही व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे. अहो महाशय, सामाजिक संकेतस्थळावर सामाजिक संकेत हे वैयक्तिक मतापेक्षा महत्वाचे आहेत. उद्या कोणी नागडे फोटो इथे चिकटवले तर तुम्ही व्यक्तिसापेक्ष म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार की गलिच्छ म्हणून ते काढून टाकणार? समितीवर आहात तर जरा जबाबदारीने बोला की. सदर लेखनाचे थेट समर्थन मी केलेले नाही, लेखन ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तुम्ही व्यक्तिसापेक्षता आणि लोकशाहीच्या टिमक्या वाजवत होतात. तेव्हा खरं तर तुमचं हे काम होतं की ते लेखन ताबडतोब उडवणं आणि तशा स्वरूपाचे लेखन पुन्हा त्याकडून होणार नाही यासाठी तातडीने त्याच्यावर कारवाई करणं. त्याला व्यनि पाठवून तंबी देणं, पुन्हा असलं लेखन त्याच्याकडून आलं तर त्याचा आयडी ब्लॉक होईल हे सांगणं, हे तुमचं काम होतं. पण आपलं काम सोडून तुम्ही भलतीकडेच लक्ष घालत बसलात. तुमच्या 'प्रतिष्ठित' मित्रांना तुम्ही असल्या धर्तीचे विनोद कसे ऐकवले त्याची उदाहरणे तुम्ही देत होतात. बापू तुम्ही जो व्यक्तिनिरपेक्षता असा शब्द वापरला आहे तो चुकीचा आहे. तो व्यक्तिसापेक्षता असा हवा. धर्मनिरपेक्षता शब्दावरून तुम्ही हा शब्द बनविला आहे असे वाटते.

In reply to by गारंबीचा बापू

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 18:17
व्यक्तिनिरपेक्षता व व्यक्तिस्वातंत्र्याची तुमची व्याख्या जर तसले फोटो चिकटवणे व ओंगळवाणे लेखन इतकीच असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. माझी व्याख्या तशी नाही. असो. हा माझा या चर्चेवरचा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by आजानुकर्ण

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 18:23
अहो तुमची व्याख्या काहीही असो. इथे प्रश्न आहे की समितीचा एक सदस्य म्हणून तुमची जबाबदारी काय होती? तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर असले ओंगळवाणे लेखन आवडत असले तरी संकेतस्थळावर तुमच्या आवडीनिवडी न राबवता, सामाजिक मूल्यांचा मान राखणे हे तुमचे कर्तव्य होते. ते तुम्ही केले नाहीत हेच आम्ही सांगतोय. तुमच्या व्याख्या काय आहेत याच्याशी आम्हाला काय करायचायं? त्या असू द्यात तुमच्यापाशीच. समितीचा सदस्य म्हणून तुमची काय जबाबदारी आहे याच्याशी आम्हाला मतलब. बापू

In reply to by गारंबीचा बापू

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 17:04
बापूसाहेब, त्यामुळे तुझ्या त्या पंचायत समिती सदस्याला योग्य ती समज तू दे. आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद, परंतु एक तर मी कुणालाही समज वगैरे देऊ शकत नाही/इच्छित नाही आणि दुसरे म्हणजे यापुढे पंचायत समितीवरील कुणाशिही काहीही भाष्य करण्याची माझी इच्छा नाही! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

किमयागार Fri, 12/14/2007 - 20:06
आपलीच प्यादी आपल्यावरच उलटली. आता आमचे ओरिजीनल पात्र त्यांना उत्तर देणार नाही! त्यांना आमचे कलापथक बघून घेईल. -कि'गार ****************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

विकास Fri, 12/14/2007 - 17:38
तात्या, तुमचा प्रतिसाद आत्ता सकाळी उठल्या उठल्या वाचला! आपण असे स्पष्ट उत्तर लिहील्यावर ते पटण्यासारखे आहे आणि आपल्यावर विश्वासही आहे. आता प्रश्न आम्ही (मिसळपाव पंचायत समिती सदस्य) तुमच्याशी का संपर्क साधला नाही तो. माझ्या पुरते बोलायचे तर मला काल (माझ्या) सकाळी हा प्रकार समजला पण मी संध्याकाळी तो बघू शकलो. कालच मला हे पण समजले की माझे अकांऊट कोणीतरी फोडण्याचा प्रयत्न केला ते. ज्या कोणी केला त्याने माझ्याबाबतीत असे का केले हा प्रश्न पडला आणि आत्ता पर्यंत आलेल्या प्रतिसादावरून तसा अनुभव इतर कोणाला आला असे वाटत नाही. मला काळजी त्याची जास्त होती, की माझ्या नावाने कोणी काही दिवे लावलेत का ते... त्या संदर्भात आणि मी "इतरांचे प्रतिसाद उडवले नाहीत" असे सांगणारी प्रतिक्रीया मी लिहीली आणि त्याचा दुवा आपल्या खरडवहीत दिलापण.. माझे नंतरचे प्रतिसाद पाहीले तरी त्यात आपल्यावर आणि "फॉर दॅट मॅटर" इतरांवर पण मी काही उलटसुलट लिहीले नाही. नंतर सर्कीटरावांनी त्यांच्या थिअरी प्रमाणे आपण केले असावे असे नवीन लेखन केले. त्यावर आपण बराच वेळ (आमच्या रात्रीच्या) आलेले असूनही जेंव्हा पटकन किमान "तो मी नव्हेच" इतके उत्तर दिले नाहीत. तेंव्हा झोपायला जायच्या आधी मी लिहीले की "सायलेन्स कॅन बी मिसइंटरप्रीटेड ऍज ऍक्सेप्टन्स" असे लिहीले आणि आपल्याला उत्तर लिहायची विनंती केली. त्यावर आपला वरील खुलासा आपण जवळ जवळ पाच-सहा तासांनी केलात. संवादाचा अभाव हा विसंवाद होण्यास कारणीभूत असतो. या सर्व घटनेत हाच प्रकार परत दिसला. जसे आमच्या पैकी कोणी आपल्यास व्य. नि. लिहीला नसेल तर ते आपल्यातील विसंवादास कारण असले, तसेच आपले ताबडतोब उत्तर नसणे (आलेले दिसून) हे घडणे पण सार्वजनीक विसंवादास कारण आहे, विशेष करून इंटरनेटच्या काळात जेंव्हा "इन्स्टंट रिस्पॉन्सेस"ची अपेक्षा असते तेंव्हा. त्यात आपण ज्या पद्धतीने हे स्थळ चालू केले त्याप्रमाणे हे व्हर्चुअल असले तरी ती पब्लीक सर्व्हीस आहे. (त्यात आम्ही पण सदस्य म्हणून आहोतच) आणि येथे म्हणतात त्या प्रमाणे तुमच्या साठी आणि पंचायतसमितीसाठी पण Public Service is a thankless job... Damned if you do and damned if you don't!

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 17:49
संवादाचा अभाव हा विसंवाद होण्यास कारणीभूत असतो. या सर्व घटनेत हाच प्रकार परत दिसला. विकासरावांच्या ह्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे.

चित्रा Fri, 12/14/2007 - 18:37
तात्या, तुमचे निवेदन स्पष्ट आहे, ते खरेही असावे असे समजून चालते. पण हे सर्व चालले आहे या सर्वाचे मूळ कारण माझ्या मते मागची ओझी कोणीच टाकून देत नाही हे आहे. निदान तुम्ही आतातरी ती टाकून द्या हा न मागता दिलेला सल्ला. आणि बाकीही सर्वांना अशीच विनंती/सल्ला. दुसरे - नीलकांतांना वेळ होत नसला तर एक उपाय आहे - तुम्हालाही या संकेतस्थळावर थोडेफार बदल करता येतील इतपत संगणकीय ज्ञान मिळवायला हरकत नाही. कठीण वाटेल पण कठीण नाही(माझ्या स्वतःच्या अनुभवातून ). ते काही रॉकेट सायन्स नाही. याप्रमाणे निदान तुम्ही जेव्हा नीलकांतला शक्य नाही तेव्हा त्याला सांगून तुम्ही काही बदल करू शकता. ते बदल काय आहेत हे सर्वांना कळावे म्हणून ते नोंदवण्याची एक पब्लिक स्पेस असली तर हे अजिबात कठीण नाही आणि त्यात पारदर्शकता राहू शकते. तेही होत नसल्यास नीलकांतांशिवाय अजून कोणाला वेळ असल्यास त्यांच्याकडून तात्पुरती मदत घेऊ शकता. हा वेळेचा सदुपयोग होईल. त्याहूनही महत्त्वाचे - पहिल्याने इथे काय लिखाण चालेल, याच्या स्पष्ट कल्पना / स्पष्ट धोरण असल्या/असले पाहिजे - हे मी मागे उपक्रमाच्या संपादकांनाही लिहीले होते - त्यांचे त्यावर मला तरी उत्तर आले नव्हते. सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी संपादक मंडळाने ही धोरणे लिहीणे जरूरीचे आहे. हे माझ्या ओळखीतील संपादकांना मी सांगितलेले आहे. पण ते एकदा सर्वांना उद्देशून लिहीते (उशीर झाला असला तरी). हे लिहायला उशीर केला याची शिक्षा म्हणून हवे तर त्या तयार करायला सध्याच्या मंडळावरील कोणी तयार असल्यास त्यांना मी मदत करू शकते - डिसें. च्या शेवटच्या आठवड्यात २-३ दिवस मला वेळ आहे. मात्र त्यानंतर त्या कशा प्रकारे वापरल्या जातात हे पहायला कोणीतरी लागेलच - ती जबाबदारी मी स्विकारू शकत नाही. दुसरे, मिपाची ओळख "नक्की" काय म्हणून ठेवायची याचाही विचार तुम्ही मालक म्हणून करावा हा (अजून एक जाता जाता दिलेला) सल्ला. लोकशाहीने चालणारी चावडी असल्यासारखे ऐसपैस संकेतस्थळ अशी ओळख असली तरी हरकत नाही, पण मग ती ओळख कायम असू देत. असो.

In reply to by चित्रा

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 19:27
चित्राताई, आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.. पहिल्याने इथे काय लिखाण चालेल, याच्या स्पष्ट कल्पना / स्पष्ट धोरण असल्या/असले पाहिजे सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी संपादक मंडळाने ही धोरणे लिहीणे जरूरीचे आहे. मिपाच्या पंचायत समितीची निवड झाल्यावर लगेचंच मिपाची घटना लिहा, ध्येयधोरणं लिहा, तुम्ही लिहाल ती ध्येयधोरण मला मान्य आहेत, तो ड्राफ्ट मला दाखवायचीही गरज नाही असंच मी पंचायतीच्या सर्व मंडळींना सांगितलं होतं. मला आठवतंय, विकासरावांनी थोडाफार पुढाकार घेतलाही होता पण पुढे काहीच झालं नाही! हे लिहायला उशीर केला याची शिक्षा म्हणून हवे तर त्या तयार करायला सध्याच्या मंडळावरील कोणी तयार असल्यास त्यांना मी मदत करू शकते मदतीचा हात पुढे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद... दुसरे, मिपाची ओळख "नक्की" काय म्हणून ठेवायची याचाही विचार तुम्ही मालक म्हणून करावा हा (अजून एक जाता जाता दिलेला) सल्ला. लोकशाहीने चालणारी चावडी असल्यासारखे ऐसपैस संकेतस्थळ अशी ओळख असली तरी हरकत नाही, पण मग ती ओळख कायम असू देत. खरं सांगायचं तर यापुढे मी या कशातच लक्ष घालणार नाही. एखाद्या गोष्टीचा उगिचंच विनाकारण डोक्याला ताप होऊ लागला तर मी तो जास्त करून न घेता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मोकळा होतो! माझी हौस म्हणून मी हे संस्थळ सुरू केलं. त्यामुळे आता फक्त इथे भरभरून लिहायचं काम मी करीन! इतरांनीही इथे अवश्य यावं, मिपा आवडलं तर इथे वाचावं, लिहावं! मी त्यांच्या लेखनाचाही आस्वाद घेईन, आवडलं तर भरभरून दादही देईन! राहता राहिला प्रश्न लोकांनी माझे दोष काढण्याचा, मला नांवे ठेवण्याचा, तर त्याचीही मला सवय आहे! कारण काही लोक फक्त तोच उद्योग करत वावरत असतात ही वस्तुस्थिती आहे! बाकी, मिसळपावचं जे काही व्हायचं असेल ते होईल. चामारी फार फार तर काय होईल? लोकं मिसळपाववर वैतागून इथे येईनाशी होतील आणि मिपा बंदच पडेल ना? पडू देत तिच्यायला! आगे अल्ला मालिक! :) आपला, (बेफिकीर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा Fri, 12/14/2007 - 21:10
बाकी, मिसळपावचं जे काही व्हायचं असेल ते होईल. चामारी फार फार तर काय होईल? लोकं मिसळपाववर वैतागून इथे येईनाशी होतील आणि मिपा बंदच पडेल ना? पडू देत तिच्यायला! असे असल्यास प्रश्नच नाही. हे होऊ नये म्हणून वरील सूचना होत्या.

ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 20:11
आत्ता हे निवेदन वाचलं. खरं सांगायचं तर हे सगळं बघुन वाईट वाटलं. हे फार वैयक्तीक पातळीवर चालू आहे असं वाटलं (जरी सगळे वैयक्तिक काही नाहि म्हणून सांगत असले तरी). म्हणजे एखाद्याचं म्हणणं पटलं तरी केवळ पुर्वी एखाद्याने आपल्याला डिवचलं आहे त्याला असा सोडायचा नाही हा आवेश दिसला याचं वाईट वाटतं. आता झालं गेलं विसरून पंचायत समितीने आणि तात्यांनी मनावर घेऊन पारदर्शक घटना लिहावी कारण इथे स्वातंत्र्य याचा अर्थ कही जणांकडून स्वैराचार असा घेतला जातो आहे असं गेल्या महिनाभर असलेल्या प्रेक्षकाच्या भुमिकेतून वाटलं. काहि मदत लागल्यास सांगा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. मी... तुम्ही.. खरंतर आपण सगळेच बाकी काहि मदत नाहि करू शकलो तर इथे नियमीत लेखन करून हे स्थळ नक्कीच फुलवू शकतो. लोकशाही म्हटली की असे क्षण यायचेच. तेव्हा कात टाकून हे स्थळ बहरास आणूया कारण प्रशासकांच्या टाचेखाली नसलेलं आपलं असं हेच एक स्थळ आहे. कात टाकू पाहणार्‍या मिसळपावच्या वाटचालीला शुभेच्छा! -(मिसळप्रेमी)ऋषिकेश

खरे तर या विषयावर आम्ही बोलणार नव्हतो. पण, तात्यांनी केलेला खूलासा पटणारा होता. म्हणुन या विषयावर लिहावे वाटले. त्याचे कारण असे की, सन्माननीय सदस्य श्री चौगुले यांच्या लेखनावर आमचाही प्रतिसाद उडविल्या गेला होता.( पंचायत समितीचे सदस्य अशा लेखनाकडे लक्ष देतील काय ? असे आम्ही विचारले होते. ) अर्थात आमचा हा प्रतिसाद उडविण्यासारखा नसावा असे आम्हाला तरी वाटते. ती काही तरी तांत्रिक गडबड असेल असे आम्हाला तरी वाटते. बाकी, श्री चौगुले यांचे लेखन आम्हाला तरी आवडले नव्हते. सार्वजनिक संकेतस्थळावर असे लेखन येऊ नये असे आमचे मत आहे. खरे तर पंचायत समितीचे अशा लेखनाकडे आणि मागील काही लेखनांकडे दुर्लक्ष झाले असे आम्हास वाटते. अर्थात त्यांना वयक्तिक कार्यबाहुल्यामुळे तितका वेळ सदस्यांचे लेखन आणि प्रतिक्रिया वाचण्यास वेळ मिळत नाही, यावरही आमचा विश्वास आहे. लोकशाही आहे, याचा अर्थ कोणतेही आणि कितीही घाणेरडे लेखन करावे असा त्याचा अर्थ होत नसावा असे वाटते. पण, का कोणास ठाऊक मिसळपाव हे संस्थळ नीट चालू नये...........असेच काही मंडळी प्रयत्न करतांना दिसतात, कदाचित आमचा गैरसमजही असेल. पण, अधिकाधिक वेळ आम्ही मिसळपाववर वावरतो म्हणुन तसे वाटते. अर्थात आमचे हे निरिक्षण चुकीचे देखील असू शकते. मात्र येणा-या काळात पंचायत समितीचे सदस्य वाढवले पाहिजे असे वाटते. (कॉ. मेंबर असतात तसे ) जेणे करुन संकेस्थळावर कोणत्यातरी सदस्याचे सतत लक्ष राहील . दर्जेदार लेखन व्हावे, जराशी खेचाखेची व्हावी, जरासे मनोरंजन व्हावे आणि बरेच काही....मात्र हे होतांना पंचायत समिती सदस्यांचा जरासा धाकही असावा ....अर्थात संस्थळाच्या मालकांनी ठरवायचे आहे, काय बदल करावे ते. आणि या बाबतीत संस्थळावर काहीतरी बदल केलेच पाहिजेत, करावेच लागतील. आम्हीही वाटल्यास काही मदत करु. ते बदल काय असावेत हे संस्थळावर वावरणा-या आणि दुनियादारीची ओळख असलेल्या दादा माणसाला आम्ही तरी सांगण्याची गरज नाही हेही आम्हाला ज्ञात आहे. आपला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. (मिसळपावचा चाहता.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 21:13
अर्थात संस्थळाच्या मालकांनी ठरवायचे आहे, काय बदल करावे ते. आणि या बाबतीत संस्थळावर काहीतरी बदल केलेच पाहिजेत, करावेच लागतील. आम्हीही वाटल्यास काही मदत करु. बिरुटेसाहेब, आपल्या आस्थेबद्दल धन्यवाद, मदतीच्या हाताबद्दलही धन्यवाद. परंतु आम्हाला सध्या तरी काहीही करावेसे वाटत नाही, कुणाला काहीही सांगावेसे वाटत नाही! परमेश्वराची आणि आपल्यासारख्या हितचिंतकाची इच्छा असेल तर मिपा अगदी अवश्य सुरू राहील, दणक्यात सुरू राहील! नाहीतर आपली मैत्री आहेच, मला तुमचा आणि तुमचा मला, ब्लॉगही माहिती आहे, तिथे भेटत जाऊ. आपणही कधी अवश्य मुंबईत या, मीही कधी औरंगाबादला आलो तर आपल्याला जरूर भेटेन! मजा करू तिच्यामारी! :) अहो नाहीतरी एवीतेवी ही सगळी आभासी दुनिया! संगणक बंद की सगळं बंद! :) आमच्या सुदैवाने आमची इतरही दुनिया, दोस्त मंडळींची दुनिया, गाण्यातल्या लोकांची दुनिया खूप मोठी आहे, खूप समृद्ध आहे. आम्ही तिथे मन रमवू, धमाल करू! :) तात्या.

राजे Fri, 12/14/2007 - 20:57
येथे झालेल्या गोधळातून काही शिकलो व माझे शब्द वर नियम व अटी लागू केल्या आहेत त्या येथे पाहा व काही सुचना असतील तर तेथे लिहा ही विनंती. माझे तर मत असे आहे की हेच नियम व अटी येथे देखील लागू करावेत फक्त संकेतस्थळाचे नाव बदला ;} http://mazeshabd.ekbhasha.com/node/74 राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

देवदत्त Fri, 12/14/2007 - 21:51
परमेश्वराची आणि आपल्यासारख्या हितचिंतकाची इच्छा असेल तर मिपा अगदी अवश्य सुरू राहील, दणक्यात सुरू राहील! अहो तात्या, मिपा सुरू राहिलच. त्यास काही नाही होणार असा विश्वास आहे आणि आमच्या शुभेच्छाही. भरपूर काही वाचायचे (आणि लिहायचेही) असताना अचानक मिपा बंद होण्याची भाषा वाचून वाईट वाचले. अहो, माझ्या ब्लॉग वर काही ना काही लिहिण्याचा विचार (?) मिसळपाव मुळेच तर बळावला. आधी फक्त विचार होते, पण कृती ह्या २ महिन्यात झाली. अहो नाहीतरी एवीतेवी ही सगळी आभासी दुनिया! संगणक बंद की सगळं बंद! :) मॅट्रिक्स सिनेमाची आठवण झाली हो. :)

मनोज Fri, 12/14/2007 - 22:05
मुद्दइ लाख बुरा चाहे तो क्या होता है ? वही होता है जो मंजूर ए खुदा होता है ! मिसलपाव ला भावी वाटचालीला खुप सार्‍या शुभेच्छा!!! एक मराठी माणुस - मन्या :)

सुनील Fri, 12/14/2007 - 22:13
या सर्व वाद-विवादातून, आरोप-प्रत्यारोपातून, समज-गैर-समजातून मिपा पुन्हा बाहेर येओ हीच शुभेच्छा आणि तसा तो येईल असा विश्वासही!! (सदैव आशावादी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट Sat, 12/15/2007 - 02:12
तात्यासारख्या मनमोकळ्या स्वभावाच्या माणसाकडून हेच अपेक्षित होते. नेहमी अशा प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी तात्याकडून लगेचच खुलासे होतात. ह्या खुलाशाला वेळ लागल्याने "दाल में कुछ काला है" असे सदस्यांना वाटणे हे साहजिकच आहे. परंतु आता, झाले-गेले वसरून ह्या स्थळाला बहर आणण्याच्या कामात सर्व सदस्यांची मदत होईल, ही अपेक्षा. ह्या स्थळाची घटना लिहिण्यासाठी पंचायत समितीच्या व्यतिरीक्त धनंजय आणि गुंडोपंतांची मदत घ्यावी, असे सुचवतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 02:31
परंतु आता, झाले-गेले वसरून ह्या स्थळाला बहर आणण्याच्या कामात सर्व सदस्यांची मदत होईल, ही अपेक्षा. हे तुम्ही म्हणताय? नवल आहे..! या संस्थळाला बहार यावी असं तुम्हाला वाटतंय यावर विश्वास बसत नाहीये परंतु आनंद नक्कीच वाटतो आहे! ह्या स्थळाची घटना लिहिण्यासाठी पंचायत समितीच्या व्यतिरीक्त धनंजय आणि गुंडोपंतांची मदत घ्यावी, असे सुचवतो. गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. अर्थात, ते लोकनियुक्त सभासद असल्यामुळे आमचा नाईलाज आहे हा भाग वेगळा! धनंजयाच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमच्या 'मालकीच्या' अधिकारात आम्ही प्रा. डॉ, दिलीप बिरुटे, श्री प्रकाश घाटपांडे, व श्री प्रमोद देव या वरीष्ठ सभासदांनाही घटनेच्या कामात सहभागी होण्याची विनंती करू! अवांतर - गेले दोन दिवस 'मालक!', 'मालक!', 'मालक कुठे आहेत?', 'मालकांचा खुलासा हवा आहे!' असा आमचा एवढा उदो उदो झाला की आता आम्हीही थोडंसं 'मालकासारखं' वागायचा प्रयत्न करणार आहोत! (आजपर्यंत कधी तसे वागलो नाही हेही तितकंच खरं!) असो, आपला, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Sat, 12/15/2007 - 02:35
अवांतर - गेले दोन दिवस 'मालक!', 'मालक!', 'मालक कुठे आहेत?', 'मालकांचा खुलासा हवा आहे!' असा आमचा एवढा उदो उदो झाला की आता आम्हीही थोडंसं 'मालकासारखं' वागायचा प्रयत्न करणार आहोत! (आजपर्यंत कधी तसे वागलो नाही हेही तितकंच खरं!) म्हणजे, मिसळपावाचे दुसरे मनोगत करायचे असा निर्णय घेतला आहेस का तात्या ? तसे स्पष्ट सांग ! आम्ही येथे का येतो, याचा जरा विचार कर, म्हणजे मग आम्ही काय म्हणतो, त्यावर विश्वास बसेल. - सर्किट

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sat, 12/15/2007 - 02:51
त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. मुळात आपण आमचा समावेश केलात हे जितके 'अनपेक्षीत' होते तितकेच हे लिखाण 'अपेक्षीत' होते. आम्ही आमचा राजीनामा आधीच दिला आहे. तेव्हा तुमच्या 'मालक' ह्या भुमिकेतुन योग्य ती कारवाई करा. गेल्या ४८ तासात पाहायला मिळालेले मनुष्यस्वभावाचे पैलू मात्र बरेच काही शिकवून गेले. बर्‍याच गृहितकांना तडा गेला. तेव्हा आमचा निरोप घ्यावा. -कोलबेर नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा नळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा -बा. भ. बोरकर

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 11:06
माझेही मत असेच आहे. मिसळपावच नव्हे तर इतर कोणत्याही संकेतस्थळाला संपादकांची काय गरज आहे? एकमेकांवर विश्वास ठेवून, म्याच्युरिटीने आपण का वागू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मात्र आम्ही इथे सर्वांना पिडत राहूच.

In reply to by विसोबा खेचर

गारंबीचा बापू Sat, 12/15/2007 - 11:56
गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! सहमत. त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. श्री कोलबेर यांच्याबाबतीत मी काही बोलत नाही. पण आजानुकर्णांची असमंजस वृत्ती कोणत्याही संकेतस्थळाला घातक ठरेल यात शंका नाही. त्यांनी स्वत:च सांगितले आहे की ते इथे लोकांना 'पिडण्यासाठी' येणार आहेत. अशा मनोवृत्तीच्या माणसाला धोरणात्मक बाबींपासून दूर ठेवावे. कारण त्यांचा उपयोग होण्यापेक्षा उपद्रवच जास्त होईल. धनंजयाच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमच्या 'मालकीच्या' अधिकारात आम्ही प्रा. डॉ, दिलीप बिरुटे, श्री प्रकाश घाटपांडे, व श्री प्रमोद देव या वरीष्ठ सभासदांनाही घटनेच्या कामात सहभागी होण्याची विनंती करू! चारही नावांशी सहमत. १००% पाठिंबा बापू

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 14:43
गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! हे मात्र योग्यच आहे तात्या. जर मी येथे येवून तितका वेळ देवू शकत नसेल हे स्पष्ट दिसते आहे अशा वेळी जबाबदारी देण्यात काय अर्थ आहे? शिवाय मलाही वाटत नाही की मी इतके काम करू शकेन. आळस हा महत्वाचा मुद्दा नि दारूचा अंमल नसतांना मिळणारा वेळ हा दुसरा महत्वाचा मुद्दा. मी कविता लिहिण्यापुरताच येथे येतो असे म्हणणे मात्र योग्य नाही. मी येथे येत जात असतोच... तसेच असते तर कविता तिकडे मैत्रीपार्कात नसती का टाकता आली? आणि असेही मी काय माहितीपूर्ण तरी लिखाण करतोय हो ? ;))) मला संपादन वगैरे जबाबदारी नको हे मी मागेही जाहीर सांगितले आहेच, आताही सांगतो. मी आपला मवाली म्हणूनच बराय! संपादनाची पोलिसी कामे मला नाही जमणार... आपला मवाली, आळशी नि दारूड्या गुंडोपंत

गारंबीचा बापू Sat, 12/15/2007 - 11:31
मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मात्र आम्ही इथे सर्वांना पिडत राहूच. बरं झालं तुम्हीच ही कबुली दिलीत. तुमच्या येथिल वर्तणुकीबद्दल आमच्या व्याख्या नाही विचारल्यात. बापू

उत्तर शोधत आहे Sat, 12/15/2007 - 22:21
ईतरांना माहीत नसावे की ड्रुपल काय चीझ आहे पण मला व येथील काही सदस्यांना द्रुपल वापरणे येते व ह्यातील कमी व कमजोरी आम्हाला माहीत आहेत. उदा. देवदत्त राजे >> मी प्रतिसाद लिहीत होतो... मी नाही हो नष्ट केले ते लेखन टिकाराम किमयागार मनोज व्यंकट वेळ शक्यतो ... आसपास [( शनी, 2007-12-15 १०:०७) .] हे सद्स्य जेव्हा येथे उपलब्ध होते.......... जेव्हा मी किमयागार ह्यांच्या एका लेखनाला " बेसनलाडूच्या वरील कविता कोठे गेली" हे विचारना करणारे लेखन होते... व मी प्रतिसाद लिहला [जो सर्वात पर्थम} व त्यांचे पुर्व-परिक्षण करु पर्यंत तो लेख / लेखन नष्ट केला गेला ... का हे सोडाच... पण कसे हे सांगा पहिल्यादां. उत्तर हवे... लेखन कोठे गेले व माझा प्रतिसाद कूठे गेला ते. राज जैन

In reply to by उत्तर शोधत आहे (verified= न पडताळणी केलेला)

राजे Sat, 12/15/2007 - 22:29
जर तुम्ही खोटे नाही आहात अथवा संकेतस्थळावरील तुमचे "लोकशाही" नियुक्त सदस्य ह्यामध्ये नाही आहे असे तुम्हाला वाटत असेल तर काही ही फेरफार न करता.. व्यवस्थापन आयडीचा पासवर्ड व सद्स्य नाव मला व्यनी. ने अथवा दुरध्वनी द्वारे द्यावी ही विंनती. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

उत्तर शोधत आहे Sat, 12/15/2007 - 23:16
काही तरी ठीक करता करता.... मीच बिघडलो आहे.... कोणाला तरी सपोर्ट करता करता... मीच बिन सपोर्ट राहीलो आहे... काही व्यक्तीरेखांना व्यक्ति समजता समजता.... मीच हरवलो आहे... काही प्रश्नांची उत्तरे देता देता..... मीच काही प्रश्न विचारत आहे... कधी कधी प्रश्न शोधता शोधता....... मीच उत्तर शोधत आहे.. मीच उत्तर शोधत आहे...... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

गारंबीचा बापू Sat, 12/15/2007 - 23:36
अरे आता पुरे सकाळ संध्याकाळ इथे कधीही आलो तरी नुसती भांडणं. लोकशाही , सरपंच, पंचायत समिती, ते एक येड** त्या पंचायत समितीतलं.... वीट आलाय आता. आता पूर्णविराम द्या या सगळ्या गोष्टींना आणि काहीतरी चांगलं लिहा. जे काही भांडायचं असेल ते एकमेकांना इमेल पाठवून भांडा. आयमाय काढा एकमेकांची. पण ते इथे नको. आम्ही इथे आल्या आल्या आमच्या मूडची वाट लावू नका. बापू

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:06
तात्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे. ज्यांना जे लिहायचे ते लिहूदेत. पण लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की आपल्या मिसळपावच्या "घरात" आमच्या सारख्या मैत्रिणीही आहेत. कोणतेही लेखन करताना जर तुम्हाला स्वतःला लाज किंवा घृणा वाटत असेल तर असे लेखन करण्याआधीच दहावेळा विचार करावा. तुमच्या कुटुंबीयांनी असे लेखन वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही विचार करावा. असे केल्याने कदाचित ओंगळ आणि गलिच्छ लेखन कमी होईल. या कामी कोणत्याही तात्याची गरज नाही. गरज आहे फक्त स्वपरिक्षणाची . आणि तरिही अशाप्रकारचे लेखन आलेच तर पंचायत समितीने कोणताही विचार न करता किंवा आप्-पर भाव न ठेवता ते लेखन उडवावे. आणि मग त्यासाठी कोणीही आक्षेप घेऊ नये. सगळे वाद विसरून नव्याने घर बांधू आपण. रुसलेल्या लाडवाची समजूत काढून त्यालाही मदतीला घेऊ. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर.. जरा विसावू या वळणावर... या वळणावर... - प्राजु. (होमसिक)

In reply to by प्राजु

सुशील Sun, 12/16/2007 - 07:54
आम्हाला तात्या जसा आहे तसा त्याच्या शिव्यांसकट आवडतो. कुटुंबियांनी लिहिले तर काय वाटेल वगैरे वाटणार्‍यांसाठी मनोगत वगैरे स्थळे आहेतच की. इथले स्वरूप कसे असणार हे तात्याने आधीच स्पष्ट केले आह आणि ते मिसळपाव.कॉम ह्या नावातुनच प्रतित होते. ही साइट वरणभात.कॉम नव्हे. रुसलेल्या लाडवाची समजूत काढून त्यालाही मदतीला घेऊ. ह्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. लाडू तसाही येतच राहतो. एकाची समजूत काढली की सगळेच लाडावतील. फक्त न्युसन्स असणार्‍या किमयागाराचे अकाउंट डीलिट केले आह मग त्याची पण समजुत काढायची का?

मुक्तसुनीत Sun, 12/16/2007 - 06:15
पण लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की आपल्या मिसळपावच्या "घरात" आमच्या सारख्या मैत्रिणीही आहेत. कोणतेही लेखन करताना जर तुम्हाला स्वतःला लाज किंवा घृणा वाटत असेल तर असे लेखन करण्याआधीच दहावेळा विचार करावा. तुमच्या कुटुंबीयांनी असे लेखन वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही विचार करावा. मनातले बोललात. शिवीगाळ, निंदानालस्ती या सर्व गोष्टी "मर्दाना" समजल्या जातात हे खरे. पण त्यात कसले पौरुष नेमके आहे ते मला नक्की समजले नाही अद्याप. इन एनी केस, अपशब्दांच्या मंत्रपुष्पाचा कंटाळा पुरुषानाही येऊ शकतो हे येथे नमूद व्हावे. मैत्रिणींइतक्याच मित्रानाही हे प्रकार नको आहेत. ही साईट आवडते कारण ती मनमोकळ्या संवादाचे वचन देते. "मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:24
"मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच. हे अगदी माझ्या मनातले बोललात.. - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 06:35
मैत्रिणींइतक्याच मित्रानाही हे प्रकार नको आहेत... +१ "मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच. ++१ गरज आहे फक्त स्वपरिक्षणाची +++१ आणि चारोळी तर आहाहा!!!! मनातलं बोललात!
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आजपर्यंत पंचायतसमितीच्या कामामध्ये तसेच येथील लेखन संपादित करण्यामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही/करत नाही हे सर्वप्रथम नमूद करतो. आणि तसं मी अनेकदा जाहीरपणे सांगितलंही आहे! आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर अवश्य ठेवा किंवा ठेवू नका, ही आपली मर्जी! आपण जर येथील काही लेखन पुन्हा एकदा चाळलेत तर माझी थट्टामस्करी, माझ्यावर जाहीर आरोप, असले अनेक प्रकार इथे केलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व लेखन आजही येथे शाबूत आहे!

उत्तरे

बेसनलाडू ·

सर्किट Fri, 12/14/2007 - 11:06
योग्य वेळ येताच, तुम्हा लहान मुलांच्या भाबड्या बोलांना, आम्हा मोठ्यांकडून उत्तेजन मिळेलच. तोवर मोठे बोलताहेत त्यात कृपया अडथळा आणू नये. ज्या विषयावर चर्चा सुरू आहे, तो गंभीर विषय आहे. लहान मुलांनी मध्ये मध्ये बोलल्यास, चर्चा करणार्‍यांतील एक बाजू त्याचा फायदा घेऊन विषयांतर करायला तयार असेल. तेव्हा, माझा पुन्हा एकदा सल्ला (होय, आता लहानमुलांनाही सल्लाच द्यावा लागतो, धाकदपटशा देता येत नाही ;-) गप्प !!!! पंचायत समितीच्या आडून त्यांच्या नकळत कुणी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे कळल्याखेरीज मी गप्प बसणार नाही, तेव्हा, तू कृपया गप्प बसशील का ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 11:11
पंचायत समितीच्या आडून त्यांच्या नकळत कुणी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे कळल्याखेरीज मी गप्प बसणार नाही, --- तुमच्याकडून हे आश्वासन जाहीर मिळाल्याने आता निर्धास्त आहे. (निर्धास्त)बेसनलाडू तेव्हा, तू कृपया गप्प बसशील का ? --- व्यक्तिगत स्तरावरील, अतार्किक तसेच विनाकारण आणि निंदनीय आरोप झाले नाहीत, तर नक्कीच. खात्री बाळगा. पण सार्वजनिक मुद्द्यांवर मते मांडणे, तत्त्वांमधला आणि धोरणांमधला विरोधाभास अधोरेखित करणे सुद्धा सोडायचे का? तिसरेच कोणीतरी विषयांतर करेल या भीतीने? अशा विषयांतराकडे यथायोग्य दुर्लक्ष करून मूळ मुद्दा लावून धरण्याचे कामही नाही करायचे का? कृपया या प्रश्नावर मार्गदर्शन करावे. (कन्फ्यूज्ड)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 12/14/2007 - 11:16
अशा विषयांतराकडे यथायोग्य दुर्लक्ष करून मूळ मुद्दा लावून धरण्याचे कामही नाही करायचे का? तुला उत्तर हवे आहे की नाही ? मग स्वतः शांत राहणे आवश्यक. वाटल्यास मी केलाय तसा खरडवहीतून तात्याला उत्तराचा आग्रह कर. रात्रभर मिसळपाव रिलोड कर वाटल्यास ! पण तुझ्या लेखनाला नेहमी "पोष्ट्यागजानाचा पित्तु" असा उल्लेख करून घ्यायचा नसेल, आणि विषयांतर करवायचे नसेल, तर गप्प बसणे, हेच श्रेयस्कर ! विनाकारण आणि निंदनीय आरोपांचे उत्तर म्हणजे ते आरोप विनाकारण आणि निंदनीय आहेत, असे सिद्ध करणे. हेच माझे मार्गदर्शन ! - सर्किट

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 11:33
बेसनलाडु पुचका निघाला दम नाही आहे तिथेच रहाणार गां* मे नही गु और चले हग्गु आता कोणाला द्यावा पाठींबा हे ठरवतोः) नाना हे ही तू वाचायला हवं होतंस आणि या लेखात याची लिंकही द्यायला हवी होतीस. ज्या अविर्भावात तू हा विषय पुढे रेटत आहेस, त्यावरून तुझ्यात फार धमक आहे असा समज माझाच नव्हे तर इतरांचाही झाला. नाना चेंगटाचा वरचा अभिप्राय हेच सांगतोय ना? पण आयत्या वेळेस तू पळपुटेपणाचीपणाची भूमिका स्विकारलीस. १. समिती लोकनियुक्त आहे. मतदानाचे नियम, स्वरूप स्पष्ट असून त्यांनुसार निवडून आलेली आहे. तुम्हांला माहीत नसल्यास सांगतो. २. माझ्या नावाने आगे बढोच्या घोषणा देणे निरर्थक, खोडसाळ आणि तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण माझा समितीवर अविश्वास आहे, असे मी कोठेही म्हटलेले नाही. बाकी तुमचे मोर्चे वगैरे चालू द्यात. धन्यवाद. (खुलासेवार)बेसनलाडू तुझे या संदर्भातील आजपर्यंतचे लेखन आणि तुझा वरील अभिप्राय यात किती तफावत आहे ते तूच ठरव. "तुम्ही लढा.....मी कपडे सांभाळतो" या अवसानघातकीपणाला साध्या कोकणी मराठीत 'पुचाट' म्हणतात. बापू.

In reply to by गारंबीचा बापू

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 11:40
मी स्वतःचेच म्हणणे कुठेही कॉन्ट्राडिक्ट केलेले नाही. मी जो विषय रेटला तो माझ्या मुद्द्यावर, माझ्या मुद्द्यासाठी. कोणाच्या वतीने, कोणीतरी सांगितले म्हणून, कोणासाठी वगैरे नाही. पुढारीपणा, नेतेगिरी केलेली नाही. ती केलेली नाही, हेही स्पष्ट त्याच ठिकाणी सांगितले होतेच. तुमचा जो काय समजबिमज झाला, त्याची जबाबदारी माझी राहत नाही. मात्र या (गैर)समजाची कोणतीही शहानिशा न करता बेलगाम वैयक्तिक आरोप करण्याच्या नीचपणाची जबाबदरी तुमची. त्यामुळे त्याला अनुसरून दिलेल्या "माझ्या नावाचा उल्लेख होता कामा नये" वाली धमकी तुम्हालाही लागू होतेच आहे. तीच मीही दिली. कृपया तफावतीचा तुमचा मुद्दा अधिक स्पष्ट करावा. कळलेला नाही. जितका कळलेला आहे, केवळ त्यावरूनच मला कोणत्याही निष्कर्षाप्रत जायचे नाही, म्हणून हा प्रतिसादप्रपंच. (खुलासेवार)बेसनलाडू

मुक्तसुनीत Fri, 12/14/2007 - 11:41
माझ्या आवडत्या बनू पाहणार्‍या या संकेतस्थळावर आज इंटरेस्टिंग , चांगलं वाटण्याजोगं एक अक्षरही मिळालं नाही वाचायला आज. आता मालकानी यावे आणि जे काय झालं (किंवा नाही झालं) त्याची मनमोकळी उत्तरे द्यावी. आणि सर्वानी हा अत्यंत बोरिंग प्रकार मागे टाकून काहीतरी नवे (किंवा जुन्यापैकी काहीतरी छानसे पुन्हा नव्याने ) लिहीणे चालू करावे अशी माझी प्रार्थना राहील. कुठल्याही जबाबदार सदस्यांच्या भावनाना कमी लेखायचा हेतू नाही. But I really wish we get to move on. Enough this @#@#@.

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 11:57
सुनीत, मी तुमच्याशी सहमत आहे. पण अनेकदा विनंत्या झाल्या तरी हा नाठाळ बेसनलाडू गप्प बसत नाही. काही कारण नसतांना वादाचे विषय निर्माण करून माझ्यासारख्यांना त्यात 'अवतीर्ण' करून घेतो आहे. नवीन नवीन पोस्ट निर्माण करून मूळ मुद्द्यांना फाटे फोडतो आहे. मी देखिल तुमच्यासारखाच आनंद मिळवण्यासाठी इथे येतो पण उगाच कोणी धोतराला हात घातला तर वहाण हातात घ्यावी लागते. काय करणार?असो. मी या विषयावर अधिक काही लिहिणार नाही. हा विषय माझ्यापुरता संपलेला आहे. बापू

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 12:49
मी देखिल तुमच्यासारखाच आनंद मिळवण्यासाठी इथे येतो पण उगाच कोणी धोतराला हात घातला तर वहाण हातात घ्यावी लागते. --- मलाही! काय करणार?असो. मी या विषयावर अधिक काही लिहिणार नाही. हा विषय माझ्यापुरता संपलेला आहे. --- अहो लिहायला काही उरलेच कुठे आहे तुमच्याकडे! तेव्हा संपवलेत हेच उत्तम! आम्हाला सर्किटकाकांनी मार्गदर्शन केले आहे आरोप खोडून काढण्याचे! त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार. (समाधानी)बेसनलाडू

नाना फडणवीस Fri, 12/14/2007 - 13:42
या विषयावरील लेखन वाचल्यावर, बेसनलाडू करतांना पाक बिघडला असावा असे दिसते. पाक फार चिकट झाला. नाना फडणवीस

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:32
जुन्या काळातील मोकळ्या जीवनशैलीविषयी काही निष्कर्ष या धाग्यावरून काढता येतात. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

सर्किट Fri, 12/14/2007 - 11:06
योग्य वेळ येताच, तुम्हा लहान मुलांच्या भाबड्या बोलांना, आम्हा मोठ्यांकडून उत्तेजन मिळेलच. तोवर मोठे बोलताहेत त्यात कृपया अडथळा आणू नये. ज्या विषयावर चर्चा सुरू आहे, तो गंभीर विषय आहे. लहान मुलांनी मध्ये मध्ये बोलल्यास, चर्चा करणार्‍यांतील एक बाजू त्याचा फायदा घेऊन विषयांतर करायला तयार असेल. तेव्हा, माझा पुन्हा एकदा सल्ला (होय, आता लहानमुलांनाही सल्लाच द्यावा लागतो, धाकदपटशा देता येत नाही ;-) गप्प !!!! पंचायत समितीच्या आडून त्यांच्या नकळत कुणी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे कळल्याखेरीज मी गप्प बसणार नाही, तेव्हा, तू कृपया गप्प बसशील का ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 11:11
पंचायत समितीच्या आडून त्यांच्या नकळत कुणी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे कळल्याखेरीज मी गप्प बसणार नाही, --- तुमच्याकडून हे आश्वासन जाहीर मिळाल्याने आता निर्धास्त आहे. (निर्धास्त)बेसनलाडू तेव्हा, तू कृपया गप्प बसशील का ? --- व्यक्तिगत स्तरावरील, अतार्किक तसेच विनाकारण आणि निंदनीय आरोप झाले नाहीत, तर नक्कीच. खात्री बाळगा. पण सार्वजनिक मुद्द्यांवर मते मांडणे, तत्त्वांमधला आणि धोरणांमधला विरोधाभास अधोरेखित करणे सुद्धा सोडायचे का? तिसरेच कोणीतरी विषयांतर करेल या भीतीने? अशा विषयांतराकडे यथायोग्य दुर्लक्ष करून मूळ मुद्दा लावून धरण्याचे कामही नाही करायचे का? कृपया या प्रश्नावर मार्गदर्शन करावे. (कन्फ्यूज्ड)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 12/14/2007 - 11:16
अशा विषयांतराकडे यथायोग्य दुर्लक्ष करून मूळ मुद्दा लावून धरण्याचे कामही नाही करायचे का? तुला उत्तर हवे आहे की नाही ? मग स्वतः शांत राहणे आवश्यक. वाटल्यास मी केलाय तसा खरडवहीतून तात्याला उत्तराचा आग्रह कर. रात्रभर मिसळपाव रिलोड कर वाटल्यास ! पण तुझ्या लेखनाला नेहमी "पोष्ट्यागजानाचा पित्तु" असा उल्लेख करून घ्यायचा नसेल, आणि विषयांतर करवायचे नसेल, तर गप्प बसणे, हेच श्रेयस्कर ! विनाकारण आणि निंदनीय आरोपांचे उत्तर म्हणजे ते आरोप विनाकारण आणि निंदनीय आहेत, असे सिद्ध करणे. हेच माझे मार्गदर्शन ! - सर्किट

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 11:33
बेसनलाडु पुचका निघाला दम नाही आहे तिथेच रहाणार गां* मे नही गु और चले हग्गु आता कोणाला द्यावा पाठींबा हे ठरवतोः) नाना हे ही तू वाचायला हवं होतंस आणि या लेखात याची लिंकही द्यायला हवी होतीस. ज्या अविर्भावात तू हा विषय पुढे रेटत आहेस, त्यावरून तुझ्यात फार धमक आहे असा समज माझाच नव्हे तर इतरांचाही झाला. नाना चेंगटाचा वरचा अभिप्राय हेच सांगतोय ना? पण आयत्या वेळेस तू पळपुटेपणाचीपणाची भूमिका स्विकारलीस. १. समिती लोकनियुक्त आहे. मतदानाचे नियम, स्वरूप स्पष्ट असून त्यांनुसार निवडून आलेली आहे. तुम्हांला माहीत नसल्यास सांगतो. २. माझ्या नावाने आगे बढोच्या घोषणा देणे निरर्थक, खोडसाळ आणि तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण माझा समितीवर अविश्वास आहे, असे मी कोठेही म्हटलेले नाही. बाकी तुमचे मोर्चे वगैरे चालू द्यात. धन्यवाद. (खुलासेवार)बेसनलाडू तुझे या संदर्भातील आजपर्यंतचे लेखन आणि तुझा वरील अभिप्राय यात किती तफावत आहे ते तूच ठरव. "तुम्ही लढा.....मी कपडे सांभाळतो" या अवसानघातकीपणाला साध्या कोकणी मराठीत 'पुचाट' म्हणतात. बापू.

In reply to by गारंबीचा बापू

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 11:40
मी स्वतःचेच म्हणणे कुठेही कॉन्ट्राडिक्ट केलेले नाही. मी जो विषय रेटला तो माझ्या मुद्द्यावर, माझ्या मुद्द्यासाठी. कोणाच्या वतीने, कोणीतरी सांगितले म्हणून, कोणासाठी वगैरे नाही. पुढारीपणा, नेतेगिरी केलेली नाही. ती केलेली नाही, हेही स्पष्ट त्याच ठिकाणी सांगितले होतेच. तुमचा जो काय समजबिमज झाला, त्याची जबाबदारी माझी राहत नाही. मात्र या (गैर)समजाची कोणतीही शहानिशा न करता बेलगाम वैयक्तिक आरोप करण्याच्या नीचपणाची जबाबदरी तुमची. त्यामुळे त्याला अनुसरून दिलेल्या "माझ्या नावाचा उल्लेख होता कामा नये" वाली धमकी तुम्हालाही लागू होतेच आहे. तीच मीही दिली. कृपया तफावतीचा तुमचा मुद्दा अधिक स्पष्ट करावा. कळलेला नाही. जितका कळलेला आहे, केवळ त्यावरूनच मला कोणत्याही निष्कर्षाप्रत जायचे नाही, म्हणून हा प्रतिसादप्रपंच. (खुलासेवार)बेसनलाडू

मुक्तसुनीत Fri, 12/14/2007 - 11:41
माझ्या आवडत्या बनू पाहणार्‍या या संकेतस्थळावर आज इंटरेस्टिंग , चांगलं वाटण्याजोगं एक अक्षरही मिळालं नाही वाचायला आज. आता मालकानी यावे आणि जे काय झालं (किंवा नाही झालं) त्याची मनमोकळी उत्तरे द्यावी. आणि सर्वानी हा अत्यंत बोरिंग प्रकार मागे टाकून काहीतरी नवे (किंवा जुन्यापैकी काहीतरी छानसे पुन्हा नव्याने ) लिहीणे चालू करावे अशी माझी प्रार्थना राहील. कुठल्याही जबाबदार सदस्यांच्या भावनाना कमी लेखायचा हेतू नाही. But I really wish we get to move on. Enough this @#@#@.

गारंबीचा बापू Fri, 12/14/2007 - 11:57
सुनीत, मी तुमच्याशी सहमत आहे. पण अनेकदा विनंत्या झाल्या तरी हा नाठाळ बेसनलाडू गप्प बसत नाही. काही कारण नसतांना वादाचे विषय निर्माण करून माझ्यासारख्यांना त्यात 'अवतीर्ण' करून घेतो आहे. नवीन नवीन पोस्ट निर्माण करून मूळ मुद्द्यांना फाटे फोडतो आहे. मी देखिल तुमच्यासारखाच आनंद मिळवण्यासाठी इथे येतो पण उगाच कोणी धोतराला हात घातला तर वहाण हातात घ्यावी लागते. काय करणार?असो. मी या विषयावर अधिक काही लिहिणार नाही. हा विषय माझ्यापुरता संपलेला आहे. बापू

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 12:49
मी देखिल तुमच्यासारखाच आनंद मिळवण्यासाठी इथे येतो पण उगाच कोणी धोतराला हात घातला तर वहाण हातात घ्यावी लागते. --- मलाही! काय करणार?असो. मी या विषयावर अधिक काही लिहिणार नाही. हा विषय माझ्यापुरता संपलेला आहे. --- अहो लिहायला काही उरलेच कुठे आहे तुमच्याकडे! तेव्हा संपवलेत हेच उत्तम! आम्हाला सर्किटकाकांनी मार्गदर्शन केले आहे आरोप खोडून काढण्याचे! त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार. (समाधानी)बेसनलाडू

नाना फडणवीस Fri, 12/14/2007 - 13:42
या विषयावरील लेखन वाचल्यावर, बेसनलाडू करतांना पाक बिघडला असावा असे दिसते. पाक फार चिकट झाला. नाना फडणवीस

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:32
जुन्या काळातील मोकळ्या जीवनशैलीविषयी काही निष्कर्ष या धाग्यावरून काढता येतात. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.
लेखनविषय:
सर्किटकाकांना कबूल केल्याप्रमाणे माझ्यावरील आरोपांची स्वतंत्र उत्तरे या लेखाद्वारे देत आहे - सर्वश्री गा. बापूसाहेब, 'विनोद' या लेखावरील प्रतिसादात विनाकारण आणि अनाकलनीयरित्या आमचा उल्लेख 'पुचाट'असा केल्यावर, शेपूट घातलीन म्हटल्यावर तुमचा उल्लेख आमच्याकडून होता कामा नये, अशी धमकी देण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही. सबब, अशी धमकी देण्याआधी आधी स्वतःचे कर्तृत्त्व कसे कुठे पाजळले आहेत, हे बघावे :) कसें? सर्वश्री सर्किटकाका, तात्यांनी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याचे खापर माझ्या प्रतिसादांवर फोडू नये.

यातना

सहज ·

सर्किट Fri, 12/14/2007 - 09:14
माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा माय मराठी ची आणि ला कुणालाही तमा असण्याचे किंवा खेद असण्याचे कारण मला तरी दिसत नाही ! कुणी कुणाचे पासवर्ड (शुद्ध मराठीत) चोरणे, ह्याचे माय मराठी ला काय घेणे देणे ? माय मराठीला ह्या चोरांना आपली मुले म्हणून नाकारणे हेच योग्य ठरेल. (आपली चोरी माय मराठीच्य नावावर कुणीतरी खपवतील, हे नक्कीच ! माय मराठीच्य नावावर आपले गुन्हे आजवर आचार्य अत्र्यांपासून ते शक्तिवेलूंपर्यंत सर्वांनी खपवले आहेत.) - सर्किट

गुंडोपंत Fri, 12/14/2007 - 09:21
वा! भारी कविता केलीत सहजराव! मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना हे विषेश आवडले. यमकात बोलायचे तर; " 'इतर सगळ्या' सदस्यांची हीच खंत असे काही खास सदस्यांचा हाच आनंद " आपला या सार्‍याला वैतागलेला गुंडोपंत

ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 09:26
वा ! कविता आवडली.. फर्मास आहे :) >>माय मराठी काय म्हणेल >>कोणास नाही याची तमा हे तर ध्रुपद व्हावे असे आहे ;).. आणि सत्यतेमुळे अढळ ध्रुवपद :)) -ऋषिकेश

जुना अभिजित Fri, 12/14/2007 - 09:27
सहजरावांची सहज कविता...सहमत आहे. आनंदी रहा. आनंद इकडून मिळत नसेल तर दुसरीकडून मिळवा. चांगलं लिहिणारे दूर जात आहेत. या गदारोळात नक्की कुठं आणि कुणासाठी लिहायचं हे त्यांना समजेनासं झालंय. तसा मी खुप लहान आहे तुम्हाला सल्ला द्यायला पण लहान तोंडी मोठा घास म्हणून सोडून द्या. आपल्याला आवडतात तेच लेख वाचणे, चर्चा करणे आणि प्रतिसाद देणे. तेव्हा नको त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. लोड नाही घ्यायचा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 09:31
सहजराव अगदी तुमच्या नावाप्रमाणेच अतिशय सहजतेने तुम्ही इथल्या परिस्थितीबद्दलची खंत व्यक्त केलेली आहे. कविता आवडलीच पण अशी कविता तुम्हाला करावी लागली हे काही चांगले झालेले नाही. म्हणूनच म्हणतो की लवकरात लवकर इथले वातावरण शुद्ध होऊन इथल्या कवींना/लेखकांना चांगल्या कल्पना सूचून त्यावरील छान छान कविता/लेख आमच्यासारख्या वाचकांना वाचायला मिळोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

झकास कविता! >>शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा शत्रू कोण? आणि कुणाचे? तात्याचे की मिसळपावचे? ;))) अर्थात, शत्रू कुणीही असले तरी त्यांची फार चिंता नको. तात्या त्यांना एक हाती सांभाळू शकेल असे वाटते! अजानुकर्णांचा, >>माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समितीच्या इतर सदस्यांपैकी नीलकांत सध्या एकूणच आंतरजालावर नाही. विकास व कोलबेर गेले काही दिवस मिसळपावावर दिसलेले नाहीत. मी स्वतः हे लेखन उडवलेले नाही. सदर लेखन उडवण्यामागे पाकिस्तान, आयएसआय वगैरे परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यताही नाही. मात्र संपादकीय मंडळाबाहेरील व्यक्तींचा यात हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे. उपरोल्लिखित सदस्यांव्यतिरिक्त आणखी कोणी संपादक मंडळावर आहे का? हा प्रतिसाद पाहिल्यास शत्रू कोण याची कल्पना येते. ज्या तात्याने या माणसाला मोठ्या विश्वासाने (किंबहुना आंधळेपणाने!) काळजीवाहू संपादक नेमले, तसेच इतरही चार पंचायत सदस्यांची नांवे जाहीर करून त्यांच्या हाती संपादनाचे सर्व अधिकार देऊन तात्या मोकळा झाला, त्या माणसाने मानभावीपणाने, उपरोल्लिखित सदस्यांव्यतिरिक्त आणखी कोणी संपादक मंडळावर आहे का? असा प्रश्न विचारणे यावरून शत्रू कोण? आणि असलेच तर ते अंतर्गत शत्रूच असावेत याची सहज कल्पना येते, यावी! ;)))) अर्थात, मिसळपावला अश्या पेल्यातल्या वादळांचं काही नाही कारण एका वादळी व्यक्तिमत्वानेच हे संकेतस्थळ सुरू केले आहे! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

In reply to by राजीव अनंत भिडे

सर्किट Fri, 12/14/2007 - 09:40
हा प्रतिसाद पाहिल्यास शत्रू कोण याची कल्पना येते. आपल्या शत्रूंची पूर्ण कल्पना नसणे हे आपल्याशीच शत्रुत्व आहे. संपदकमंडळांशी उगाच युद्ध पुकारताहात तुम्ही. त्या आधी. जरा महाजालाचा वेध घ्या. - सर्किट

In reply to by राजीव अनंत भिडे

सहज Fri, 12/14/2007 - 09:41
भिडेसाहेब शब्दाला शब्द फूटतात, थांबवायचेय का वाढवायचेय? मिसळपाव हे तुम्हाला वाटते तसे मोठे संकेतस्थळ व्हावे ह्या इच्छेने प्रयत्न व्हावेत. तुम्ही म्हणता तसे "संवाद" चालू ठेवले तर हे वादळ-पेला करत "एकच प्याला" उरेल. कृपया लक्षात घ्या. अवांतर - हायकोर्टातले वकील भिडे आपणच का? :-)

In reply to by राजीव अनंत भिडे

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 09:45
तात्या व माझे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध अशा घटनेनंतर चांगलेच राहतील. याआधी झालेले संपादन हे पूर्ण विचारांती झालेले होते. मी याआधीही स्पष्ट केले आहे की पंचायत समितीच्या कोणत्याही कार्याची जबाबदारी एक सदस्य म्हणून माझीही आहे. दुसर्‍यांच्या अवधानाने/अनवधानाने झालेल्या कृत्यामुळे पंचायत समिती व मंडळातील सदस्यांची विश्वासार्हता पणाला लागत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे हे शत्रुत्व घेणे असा विचार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे मला हितावह वाटते. संपादन मंडळ म्हणजे मालकाची मर्जी सांभाळणे हे (मालकांना नसले तरी) येथील सदस्यांना जर अभिप्रेत असेल तर ते मला शक्य नाही. लोकशाहीत मला तो अधिकार असावा.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Fri, 12/14/2007 - 09:50
तात्या व माझे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध अशा घटनेनंतर चांगलेच राहतील माझे ही ! संपादन मंडळ म्हणजे मालकाची मर्जी सांभाळणे हे (मालकांना नसले तरी) येथील सदस्यांना जर अभिप्रेत असेल तर ते मला शक्य नाही. लोकशाहीत मला तो अधिकार असावा. माझ्या "निवडणूक आयुक्त" ह्या अधिकाराविषयीदेखील मला असेच म्हणायचे आहे. - (तात्याकडून खुलाश्याच्या अपेक्षेत) सर्किट

चित्रा Fri, 12/14/2007 - 10:22
सहजराव, तुमची कविता चांगली आहे. बर्‍याच लोकांच्या भावना व्यक्त करते असे वाटले. याच संदर्भात एक सामान्य वाचक म्हणून माझेही मत द्यावेसे वाटले. कोणाला त्याची काही पर्वा आहे असे वाटत नाही, पण सांगितले नाही तर लोकशाहीतील अधिकार/कर्तव्य बजावले नाही असे म्हणावे लागेल. मला हे जे अनेक दिवस चालले आहे ते सर्व पाहून कंटाळा आला आहे. इथे वाचायला येते मी - सर्वांना आता ओळखतेही, आणि सवय झाली आहे म्हणून आपोआप हातून हे पान उघडले जाते - पण सततची भांडणेही बघवत नाहीत. हे असेच चालू राहिले तर तेही येणे बंद होईल. (ही धमकी वगैरे नाही, कृपया असे समजू नये. पण नेहमी येणार्‍या व्यक्तींचेही असे होत असेल तर नव्यांचे काय? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्‍या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे).

In reply to by चित्रा

सर्किट Fri, 12/14/2007 - 10:27
सहमत आहे... माझ्याने येणे बंद होणार नाही, पण लिहिणे मात्र नक्कीच बंद होईल.. आणि हो, ही धमकीच समजावी ! ह्या संकेतस्थळाकडून माझ्या खूपच अपेक्षा आहेत. इथल्या संपादकीय धोरणांइतकी पारदर्शक धोरणे इतर कुठल्याही संकेतस्थळाची नाहीत, म्हणून. हल्ली घडलेल्या घडामोडींमुळे संपादकमंडळाच्या पारदर्शकतेवर डाग पडलाय, हे कबूल व्हावे. हा डाग स्वच्छ व्हावा, हीच मनापासून इच्छा ! - सर्किट

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 10:30
नव्यांचे काय? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्‍या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे. --- सहमत आहे. याबाबतीत तात्यांशी बोलणे झाले आहे माझे मागे एकदा व्य नि तून. तो व्य. नि आणि त्याला तात्यांचे उत्तर आणि नवीन सदस्यांचे काय होत असेल, या प्रश्नाला तात्यांचे उत्तर येथे वाचता येईल. सहजराव, तुमच्या कवितेतील प्रश्नांची उत्तरेही त्याच दुव्यावर मिळतील, असे मला वाटते. तुमची आणि इतर सदस्यांचीही व्यथा अगदी समर्पकपणे, समयोचितपणे मोजक्या शब्दांत मांडलीत, याबद्दल तुमचे कौतुक वाटते. (दुवादार)बेसनलाडू

सहजराव, कविता आवडली. कळतील कुणा यातना होतात आमच्या मना मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा आणि का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा. कवीच्या या भावना अनेकांच्या आहेत. कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा तेच तर काय कळत नाही ना, सहजराव.......! लेखन-वाचनाचा आनंद मिळेना माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा माय मराठीचा विचार करणारे, जोपर्यंत आपल्यासारखे सदस्य लिहीताहेत तो पर्यंत काही आनंद आणि काही यातना सर्वांनीच सोसाव्यात, सहजराव ! बाकी अशाच 'सहज' सोप्या कविता येऊ द्या !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 12/16/2007 - 09:37
मानले तुम्हाला.. मिसळपावच्या सगळ्याच हितचिंतकांच्या मनातले विचार आहेत हे. चित्राने सांगितल्याप्रमाणे कदाचित चांगल्या लेखकांचेच काय पण वाचकांचेही इथे येणे बंद होईल. हे थांबायला हवे. प्राजु. (मिसळपावची नियमित वाचक.)

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 13:42
मिसळपावच्या सगळ्याच हितचिंतकांच्या मनातले विचार आहेत हे. चित्राने सांगितल्याप्रमाणे कदाचित चांगल्या लेखकांचेच काय पण वाचकांचेही इथे येणे बंद होईल. हे थांबायला हवे. मीही सहमत विजय

सर्किट Fri, 12/14/2007 - 09:14
माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा माय मराठी ची आणि ला कुणालाही तमा असण्याचे किंवा खेद असण्याचे कारण मला तरी दिसत नाही ! कुणी कुणाचे पासवर्ड (शुद्ध मराठीत) चोरणे, ह्याचे माय मराठी ला काय घेणे देणे ? माय मराठीला ह्या चोरांना आपली मुले म्हणून नाकारणे हेच योग्य ठरेल. (आपली चोरी माय मराठीच्य नावावर कुणीतरी खपवतील, हे नक्कीच ! माय मराठीच्य नावावर आपले गुन्हे आजवर आचार्य अत्र्यांपासून ते शक्तिवेलूंपर्यंत सर्वांनी खपवले आहेत.) - सर्किट

गुंडोपंत Fri, 12/14/2007 - 09:21
वा! भारी कविता केलीत सहजराव! मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना हे विषेश आवडले. यमकात बोलायचे तर; " 'इतर सगळ्या' सदस्यांची हीच खंत असे काही खास सदस्यांचा हाच आनंद " आपला या सार्‍याला वैतागलेला गुंडोपंत

ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 09:26
वा ! कविता आवडली.. फर्मास आहे :) >>माय मराठी काय म्हणेल >>कोणास नाही याची तमा हे तर ध्रुपद व्हावे असे आहे ;).. आणि सत्यतेमुळे अढळ ध्रुवपद :)) -ऋषिकेश

जुना अभिजित Fri, 12/14/2007 - 09:27
सहजरावांची सहज कविता...सहमत आहे. आनंदी रहा. आनंद इकडून मिळत नसेल तर दुसरीकडून मिळवा. चांगलं लिहिणारे दूर जात आहेत. या गदारोळात नक्की कुठं आणि कुणासाठी लिहायचं हे त्यांना समजेनासं झालंय. तसा मी खुप लहान आहे तुम्हाला सल्ला द्यायला पण लहान तोंडी मोठा घास म्हणून सोडून द्या. आपल्याला आवडतात तेच लेख वाचणे, चर्चा करणे आणि प्रतिसाद देणे. तेव्हा नको त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. लोड नाही घ्यायचा. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रमोद देव Fri, 12/14/2007 - 09:31
सहजराव अगदी तुमच्या नावाप्रमाणेच अतिशय सहजतेने तुम्ही इथल्या परिस्थितीबद्दलची खंत व्यक्त केलेली आहे. कविता आवडलीच पण अशी कविता तुम्हाला करावी लागली हे काही चांगले झालेले नाही. म्हणूनच म्हणतो की लवकरात लवकर इथले वातावरण शुद्ध होऊन इथल्या कवींना/लेखकांना चांगल्या कल्पना सूचून त्यावरील छान छान कविता/लेख आमच्यासारख्या वाचकांना वाचायला मिळोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

झकास कविता! >>शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा शत्रू कोण? आणि कुणाचे? तात्याचे की मिसळपावचे? ;))) अर्थात, शत्रू कुणीही असले तरी त्यांची फार चिंता नको. तात्या त्यांना एक हाती सांभाळू शकेल असे वाटते! अजानुकर्णांचा, >>माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समितीच्या इतर सदस्यांपैकी नीलकांत सध्या एकूणच आंतरजालावर नाही. विकास व कोलबेर गेले काही दिवस मिसळपावावर दिसलेले नाहीत. मी स्वतः हे लेखन उडवलेले नाही. सदर लेखन उडवण्यामागे पाकिस्तान, आयएसआय वगैरे परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यताही नाही. मात्र संपादकीय मंडळाबाहेरील व्यक्तींचा यात हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे. उपरोल्लिखित सदस्यांव्यतिरिक्त आणखी कोणी संपादक मंडळावर आहे का? हा प्रतिसाद पाहिल्यास शत्रू कोण याची कल्पना येते. ज्या तात्याने या माणसाला मोठ्या विश्वासाने (किंबहुना आंधळेपणाने!) काळजीवाहू संपादक नेमले, तसेच इतरही चार पंचायत सदस्यांची नांवे जाहीर करून त्यांच्या हाती संपादनाचे सर्व अधिकार देऊन तात्या मोकळा झाला, त्या माणसाने मानभावीपणाने, उपरोल्लिखित सदस्यांव्यतिरिक्त आणखी कोणी संपादक मंडळावर आहे का? असा प्रश्न विचारणे यावरून शत्रू कोण? आणि असलेच तर ते अंतर्गत शत्रूच असावेत याची सहज कल्पना येते, यावी! ;)))) अर्थात, मिसळपावला अश्या पेल्यातल्या वादळांचं काही नाही कारण एका वादळी व्यक्तिमत्वानेच हे संकेतस्थळ सुरू केले आहे! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

In reply to by राजीव अनंत भिडे

सर्किट Fri, 12/14/2007 - 09:40
हा प्रतिसाद पाहिल्यास शत्रू कोण याची कल्पना येते. आपल्या शत्रूंची पूर्ण कल्पना नसणे हे आपल्याशीच शत्रुत्व आहे. संपदकमंडळांशी उगाच युद्ध पुकारताहात तुम्ही. त्या आधी. जरा महाजालाचा वेध घ्या. - सर्किट

In reply to by राजीव अनंत भिडे

सहज Fri, 12/14/2007 - 09:41
भिडेसाहेब शब्दाला शब्द फूटतात, थांबवायचेय का वाढवायचेय? मिसळपाव हे तुम्हाला वाटते तसे मोठे संकेतस्थळ व्हावे ह्या इच्छेने प्रयत्न व्हावेत. तुम्ही म्हणता तसे "संवाद" चालू ठेवले तर हे वादळ-पेला करत "एकच प्याला" उरेल. कृपया लक्षात घ्या. अवांतर - हायकोर्टातले वकील भिडे आपणच का? :-)

In reply to by राजीव अनंत भिडे

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 09:45
तात्या व माझे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध अशा घटनेनंतर चांगलेच राहतील. याआधी झालेले संपादन हे पूर्ण विचारांती झालेले होते. मी याआधीही स्पष्ट केले आहे की पंचायत समितीच्या कोणत्याही कार्याची जबाबदारी एक सदस्य म्हणून माझीही आहे. दुसर्‍यांच्या अवधानाने/अनवधानाने झालेल्या कृत्यामुळे पंचायत समिती व मंडळातील सदस्यांची विश्वासार्हता पणाला लागत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे हे शत्रुत्व घेणे असा विचार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे मला हितावह वाटते. संपादन मंडळ म्हणजे मालकाची मर्जी सांभाळणे हे (मालकांना नसले तरी) येथील सदस्यांना जर अभिप्रेत असेल तर ते मला शक्य नाही. लोकशाहीत मला तो अधिकार असावा.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Fri, 12/14/2007 - 09:50
तात्या व माझे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध अशा घटनेनंतर चांगलेच राहतील माझे ही ! संपादन मंडळ म्हणजे मालकाची मर्जी सांभाळणे हे (मालकांना नसले तरी) येथील सदस्यांना जर अभिप्रेत असेल तर ते मला शक्य नाही. लोकशाहीत मला तो अधिकार असावा. माझ्या "निवडणूक आयुक्त" ह्या अधिकाराविषयीदेखील मला असेच म्हणायचे आहे. - (तात्याकडून खुलाश्याच्या अपेक्षेत) सर्किट

चित्रा Fri, 12/14/2007 - 10:22
सहजराव, तुमची कविता चांगली आहे. बर्‍याच लोकांच्या भावना व्यक्त करते असे वाटले. याच संदर्भात एक सामान्य वाचक म्हणून माझेही मत द्यावेसे वाटले. कोणाला त्याची काही पर्वा आहे असे वाटत नाही, पण सांगितले नाही तर लोकशाहीतील अधिकार/कर्तव्य बजावले नाही असे म्हणावे लागेल. मला हे जे अनेक दिवस चालले आहे ते सर्व पाहून कंटाळा आला आहे. इथे वाचायला येते मी - सर्वांना आता ओळखतेही, आणि सवय झाली आहे म्हणून आपोआप हातून हे पान उघडले जाते - पण सततची भांडणेही बघवत नाहीत. हे असेच चालू राहिले तर तेही येणे बंद होईल. (ही धमकी वगैरे नाही, कृपया असे समजू नये. पण नेहमी येणार्‍या व्यक्तींचेही असे होत असेल तर नव्यांचे काय? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्‍या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे).

In reply to by चित्रा

सर्किट Fri, 12/14/2007 - 10:27
सहमत आहे... माझ्याने येणे बंद होणार नाही, पण लिहिणे मात्र नक्कीच बंद होईल.. आणि हो, ही धमकीच समजावी ! ह्या संकेतस्थळाकडून माझ्या खूपच अपेक्षा आहेत. इथल्या संपादकीय धोरणांइतकी पारदर्शक धोरणे इतर कुठल्याही संकेतस्थळाची नाहीत, म्हणून. हल्ली घडलेल्या घडामोडींमुळे संपादकमंडळाच्या पारदर्शकतेवर डाग पडलाय, हे कबूल व्हावे. हा डाग स्वच्छ व्हावा, हीच मनापासून इच्छा ! - सर्किट

बेसनलाडू Fri, 12/14/2007 - 10:30
नव्यांचे काय? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्‍या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे. --- सहमत आहे. याबाबतीत तात्यांशी बोलणे झाले आहे माझे मागे एकदा व्य नि तून. तो व्य. नि आणि त्याला तात्यांचे उत्तर आणि नवीन सदस्यांचे काय होत असेल, या प्रश्नाला तात्यांचे उत्तर येथे वाचता येईल. सहजराव, तुमच्या कवितेतील प्रश्नांची उत्तरेही त्याच दुव्यावर मिळतील, असे मला वाटते. तुमची आणि इतर सदस्यांचीही व्यथा अगदी समर्पकपणे, समयोचितपणे मोजक्या शब्दांत मांडलीत, याबद्दल तुमचे कौतुक वाटते. (दुवादार)बेसनलाडू

सहजराव, कविता आवडली. कळतील कुणा यातना होतात आमच्या मना मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा आणि का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा. कवीच्या या भावना अनेकांच्या आहेत. कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा तेच तर काय कळत नाही ना, सहजराव.......! लेखन-वाचनाचा आनंद मिळेना माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा माय मराठीचा विचार करणारे, जोपर्यंत आपल्यासारखे सदस्य लिहीताहेत तो पर्यंत काही आनंद आणि काही यातना सर्वांनीच सोसाव्यात, सहजराव ! बाकी अशाच 'सहज' सोप्या कविता येऊ द्या !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 12/16/2007 - 09:37
मानले तुम्हाला.. मिसळपावच्या सगळ्याच हितचिंतकांच्या मनातले विचार आहेत हे. चित्राने सांगितल्याप्रमाणे कदाचित चांगल्या लेखकांचेच काय पण वाचकांचेही इथे येणे बंद होईल. हे थांबायला हवे. प्राजु. (मिसळपावची नियमित वाचक.)

विजय पाटील Tue, 12/18/2007 - 13:42
मिसळपावच्या सगळ्याच हितचिंतकांच्या मनातले विचार आहेत हे. चित्राने सांगितल्याप्रमाणे कदाचित चांगल्या लेखकांचेच काय पण वाचकांचेही इथे येणे बंद होईल. हे थांबायला हवे. मीही सहमत विजय
Taxonomy upgrade extras
कळतील कुणा यातना होतात आमच्या मना मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना पंचायत-मालक कोण कूठे समजेना कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा लेखन-वाचनाचा आनंद मिळेना साहित्यप्रेमाच्या मोठ्या वल्गना माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा

सोडुन गाव मी माझा ...

मनोज ·

ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 05:11
अतिशय सुंदर भावगर्भ कविता. प्रत्येक कडवं हृदयस्पर्शी आहे. पु. ले. शु. -ऋषिकेश

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 11:14
मन्याशेठ, अतिशय सुरेख कविता! प्रत्येक कडव्याला अगदी भरभरून दाद द्यावी अशी! तुमच्या प्रतेय्क शब्दासोबत तुम्ही आम्हालाही तुमच्या गावाला घेऊन गेलात, तिकडचं सगळं चित्र आमच्यासमोर उभं केलंत! क्या बात है... आपला, (हळवा) तात्या.

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:25
साधी सोपी तरी चित्रमय कविता आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

विजय पाटील Sat, 12/15/2007 - 14:14
अतिशय साध्या पध्दतीने मनाला भुरळ घालणारी व आपल्या गावची मनापासुन आठवण काढावी अशी ही भावपूर्ण कविता खरच खुप आवडली. -विजय

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:33
वा वा. सुंदर कविता. आवडली. जरा वृत्तात बसवून घेतली नीट, तर अधिक मजा येईल. गणवृत्तापेक्षा किंवा छंदापेक्षा जातींमध्ये ही रचना मस्त होईल. उदाहरणार्थ, उद्धव वापरून बघा. एकूण-१४ मात्रा. ....खंड २ + ८ + ४ त्या | पारावरच्या | गप्पा जो | श्यांची सुन्दर | पारू २ | ८ | ४ या पद्धतीने. या ओळी कशा चपखल वृत्तात आलेत तशा इतरही आल्यास फार सुंदर रचना होईल..... अगदी जोश्यांच्या पारूसारखी...... गोरी, घारी, लाजरी, नखरेल.... आपला, (आस्वादक) धोंडोपंत ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी अप्रतिम. फारच छान. लिहीत रहा. थांबू नका. आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:45
केश्या, झकास विडंबन टाक. इतका चांगला माल आलाय बंदरावर. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ऋषिकेश Fri, 12/14/2007 - 05:11
अतिशय सुंदर भावगर्भ कविता. प्रत्येक कडवं हृदयस्पर्शी आहे. पु. ले. शु. -ऋषिकेश

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 11:14
मन्याशेठ, अतिशय सुरेख कविता! प्रत्येक कडव्याला अगदी भरभरून दाद द्यावी अशी! तुमच्या प्रतेय्क शब्दासोबत तुम्ही आम्हालाही तुमच्या गावाला घेऊन गेलात, तिकडचं सगळं चित्र आमच्यासमोर उभं केलंत! क्या बात है... आपला, (हळवा) तात्या.

आजानुकर्ण Fri, 12/14/2007 - 23:25
साधी सोपी तरी चित्रमय कविता आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

विजय पाटील Sat, 12/15/2007 - 14:14
अतिशय साध्या पध्दतीने मनाला भुरळ घालणारी व आपल्या गावची मनापासुन आठवण काढावी अशी ही भावपूर्ण कविता खरच खुप आवडली. -विजय

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:33
वा वा. सुंदर कविता. आवडली. जरा वृत्तात बसवून घेतली नीट, तर अधिक मजा येईल. गणवृत्तापेक्षा किंवा छंदापेक्षा जातींमध्ये ही रचना मस्त होईल. उदाहरणार्थ, उद्धव वापरून बघा. एकूण-१४ मात्रा. ....खंड २ + ८ + ४ त्या | पारावरच्या | गप्पा जो | श्यांची सुन्दर | पारू २ | ८ | ४ या पद्धतीने. या ओळी कशा चपखल वृत्तात आलेत तशा इतरही आल्यास फार सुंदर रचना होईल..... अगदी जोश्यांच्या पारूसारखी...... गोरी, घारी, लाजरी, नखरेल.... आपला, (आस्वादक) धोंडोपंत ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी अप्रतिम. फारच छान. लिहीत रहा. थांबू नका. आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:45
केश्या, झकास विडंबन टाक. इतका चांगला माल आलाय बंदरावर. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
लेखनविषय:
सोडुन गाव मी माझा उडून आलो यैसा पश्चिम स्वप्न उराशी अन डोळ्या समोर पैसा प्रफुल्ल रान ते हिरवे अन २० घरांची वाडी विसरून पार ते गेलो भरधाव हाकतो गाडी बेधुंद रांगडा पाउस कस्तुरी गंध मातीचा ते हरवून बसलो सगले आवडे श्वास येसीचा त्या पारावरच्या गप्पा जोश्यांची सुन्दर पारू मिटउन टाकले सारे जोडीला डिस्को अन दारू ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी