मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावाची घटना : लोकशाही संस्था : "लोक" म्हणजे कोण?

धनंजय ·

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 05:25
सर्वप्रथम धनंजय यांचे इतक्या मुद्देसुद सुरवाती बद्दल अभिनंदन आणि आभार. प्रश्न खुप मोलाचे आहेत अणि भरपूर चर्चा होईलच. हे वाचल्यावाचल्या काही सैल मुद्दे डोक्यत आले ते मांडतो आहे. पुढिल चर्चेनंतर चित्र स्पष्ट होईलच १. मिसळपावाचे उद्दिष्ट हे कुठलीतरी सेवा पुरवणे (मराठी लेखन-वाचन करायला स्थळ) हे आहे काय? - तशी रजिस्टर करायची म्हणत नाही! तरी विचारांची ती चौकट वापरावी काय? तपशील घटनेत यावेत. ===> अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ अशी ओळख मुखपृष्ठावर दिअसते. त्यावरून मराठी भाषेमधुन लेखन, वाचन, चर्चा, वाद, काव्य आदिंद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी असलेलं एक मोफत संकेतस्थळ अशी संज्ञा करता यावी. २. मिसळपावाचे उद्दिष्ट सफल झाले/नाही, बदल सुचवणे, अशा प्रकारचा जाब अंततोगत्वा विचारणारे कोण? उपभोक्ते काय? (येथे अंततोगत्वा म्हणजे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे, अगदी अंततोगत्वा मिसळपावावरून चालते होऊन कोणीही "उद्दिष्ट सफल झाले नाही" असे गर्भितार्थाने सांगू शकतो.) उपभोक्ता ते कसे करेल ते तपशील घटनेत येतील. ===> याबाबत माझ्या मते विभाग पाडता येतील. प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी घोषित करता येईल आणि तो त्या विभागाच्या निगडित प्रश्नांना उत्तरदायी असेल. याशिवाय पंचायत समिती सदस्य हे उपभोक्त्यांचे प्रतिनिधी असतील व तेच केवळ प्रश्न विचारण्यास पात्र असतील. जर विभाग प्रमुख समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत तर मालक त्यांच्या अधिकारात निर्णय घेतील नी तो सगळ्यांना बंधनकारक ठरेल. बाकी सभासद त्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच पंचायत समितीकडे स्थळ/धोरणांविषयी आक्षेप/मते नोंदवतील. (अर्थात सदस्यास वाटले की आपले प्रतिनिधी काम नीट करत नाही आहेत तर ते मालकांकडे तक्रार् व्यनी मधून करू शकतील) ३. उपभोक्त्याचे एकक काय? ===>माझ्या मते जो मिसळपावचा कमित कमि ३ महिने सभासद आहे व यावेळेत कमितकमी 'क्ष' वेळा लिखाण (यात प्रतिसादही धरले जावेत) केले आहे त्याला सामान्य उपभोक्ता म्हणता यावे. तर विभाग प्रमुख पदासाठी त्या विषयातील ज्ञान निकष असावा. तर प्रतिनिधी पदासाठी उपभोक्त्यापेक्षा अधिक महिने सभासद व अधिक लिखाण याची अट असावी (विचारमग्न) ऋषिकेश

सुशील Sun, 12/16/2007 - 05:50
लोकशाही दील्यावर लोक कशी वाट लावतात हे मिसळपाववर सिद्ध झाले आहे. कशाला पाहिजे ती लोकशाही? माझ्या मते ही वेबसाइट तात्यानेच चालवावी. मिसळपावचे मनोगत झाले म्हणून रडणार्‍यांनी एक लक्षात ठेवावे की मनोगत ही महेश वेलणकरने चालवलेली वेबसाईट आहे आणि मिसळपाव ही तात्या अभ्यंकरने चालवलेली वेबसाईट आहे. हा दोनीतला मुख्य फरक आहे. त्यामुळे मनोगतात आणि मिसळपावमध्ये फरक काय? असे विचारू नये. ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील.

In reply to by सुशील

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:46
लोकशाहीची वाट लोक लावतात, त्यांना तो अधिकारच आहे. येथे लोकनियुक्त समितीच्या अधिकारांचे उल्लंघन हुकूमशहाकडून होत असेल, तर त्याला लोकशाही कृपया म्हणू नये. हे दुसरे मनोगत आहे, असे जाहीर करावे, म्हनजे सर्वांनाच सोपे पडेल. हे संकेतस्थळ सुरू केल्यापासून आजवर तात्या हे लोकशाही म्हणून चालवतो आहे, असे मला वाटते. येथे लोकनियुक्त पंचायत समिती आहे. त्यांची नावे जाहीर आहेत. आणि आजवर ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने येथील कारभार चालवत आहेत. हे असेच सुरू रहावे, असे येथील सदस्यांना वाटणे साहजिकच आहे. लोकशाशी कठीण आहे. येथील सदस्य हुकुमशाहीसारख्या सोप्या शाहीशी अगदी परिचीत आहेत. त्यांना हे समजणे कठीण जाणारच ! जानम समझा करो ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:58
मिसळपावचा केवळ द्वेष करणे ह्या एकमेव उद्देशाने येणार्‍या किमयागाराचे अकाउंत डीलिट केलेले दिसते. मला सांगा हे लोकशाहीत शक्य असते का? तेव्हा ही साइट तात्यानेच चालवावी.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:19
दोन तास झाले नाहीत तुम्हाला इथे येऊन पण मिसळपावचे पूर्वजन्मीचे ज्ञान तुम्हाला बरेच दिसते. मिसळपाववर केवळ उपद्रव निर्माण करून या संकेतस्थळाची वाट लावणार्‍यांवर कारवाई न करता त्यांचा उपद्रव सहन करत बसणे म्हणजे ' लोकशाही' का? जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:58
जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? अहो तात्या तेच तर म्हणतोय ना मी पण!! पण हे त्या लोकशाहीत शक्य होते का? उलट इतके दिवस त्या किमयागाराला शेफारुनच ठेवले होते ना लोकशाहीने! आता आहे हे बरे आहे.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:22
ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. हे म्हणणे नाही पटले. कारण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी मिसळपाव ही एक चांगली मराठी साईट म्हणून ओळख करून दिली आहे. सभासद नसले तरी कहीतरी चांगले वाचण्याच्या उद्देशाने हे सर्व इथे येतात. भारताबाहेर राहून मराठी लेखनाशी किंवा वाचनाशी संपर्कात राहण्यासाठी सगळे येतात इथे. अशावेळी इथे एकमेकांवर शिंतोडे उडवणे, गलिच्छ लेखन किंवा शिव्या वाचताना त्यांना कौतुक नक्किच वाटत नसेल. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये बराच फरक आहे. तो समजून घेणे आणि आचरणांत आणणे हे महत्त्वाचे. मग तात्या मालक असो किंवा वेलणकर असोत... लिहायचे ते थांबतिलच पण वाचकांशिवाय लेखन काय उपयोगाचे? आणि कोणताही सूज्ञ वाचक गलिच्छ साहित्य वाचणे पसंत करणार नाही. - प्राजु (सूज्ञ वाचक)

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:59
लोकशाही वरील आपले भाष्य स्वागतार्ह आहे. परंतु, मला एक खुलासा हवा आहे. ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्याअ राष्ह्ट्रात लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? मग ते राष्ट्र उत्तर कोरिया अथवा चीन पेक्षा फारसे वेगळे आहे का ? लोकशाही कठीण आहे. ती पार पाडायला, मन घट्ट करणे आवश्यक आहे. शुभेच्छा ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:59
आपण कोणीही इथे पैशे भरून येत नाही तेव्हा इथे काय असावे आणि काय नाही ह्याचा हट्ट धरणारे आपण कोण? ह्याचा सुधा विचार करा

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:17
तुम्ही वर केलेली विधाने आणि हे विधान यात बरीच विसंगती आहे. तुम्ही दोन्ही बाजूंनी ढोल वाजवून भांडणांची आणि वादविवादांची भट्टी चालू ठेवण्याची जबाबदारी पार पाडत आहात. बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:23
तात्या तुम्ही आता 'विसोबा खेचर' ह्या आयडीतून उत्तरे द्या बघू. हे बापू नाना आता बस झाले.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:30
विषयाला फाटे फोडू नकोस. लोकांची दिशाभूल करू नकोस. किमयागाराची तुला माहिती आहे आणि बापूची नाही? वेड पांघरून पेडगावला चाललायसं? का तुझा खरा उद्देश इथे मांडला म्हणून काही तरी बळरतो आहेस? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:49
तात्या, असे मांजर डोळे मिटून दूध पित असल्यासारखे का करताय? सगळ्यांना माहित आहेत तुमचे आयडी. मी खरंच तुमची बाजू घ्यायला आलो आहे. मला तुमचे लेखन खूप आवडते. तुम्ही असा गैरसमज का करताय?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sun, 12/16/2007 - 10:39
>ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, > तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः > मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्या राष्ट्रात > लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? योग्य नाही. मुशर्रफ हे राष्ट्र-प्रमुख असल्यामुळे, त्यांचे असे म्हणणे योग्य नव्हे, केवळ दांडगाई आहे, कारण राष्ट्र हे मालकीहक्काचे नसते. मालकीहक्काच्या या संकेतस्थळावर शेवटी कायदा काय ते मालकच सांगणार. मालकाने "माझी ब्याट, माझी ब्याटिंग" म्हटले तर चालेल, पण ते स्पष्ट म्हटले पाहिजे. पण मिसळपावाच्या मालकाने असे म्हटल्यास - स्पष्ट म्हटल्यास - काहीही चुकले नाही. ज्या लोकांना आवडणार नाही, ते लोक मिसळपावावर येणार नाहीत, किंवा मालकाच्या मर्जीने येतील; ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी मालकाने मानले, की माझी ब्याट असली तरी अंपायरचे म्हणणे मानले जाईल, तर मग अंपायरिंगचे नियम प्रसिद्ध व्हावेत. अंपायरच्या नेमणुकीबाबत खेळाडूंना, प्रेक्षकांना, पूर्ण माहिती द्यावी, वगैरे... राष्ट्र नसलेल्या संस्थेसाठी राष्ट्रीय लोकशाहीची वैचारिक चौकट योग्य नाही. एक तर मालकीशाही (एका व्यक्तीची, किंवा समभागमालकांची) चौकट वापरता येईल, किंवा सेवाभावी संस्थेची "उपभोक्त्यास बांधीलकी" ही चौकट वापरता येईल. कुठली चौकट वापरावी हे सर्वस्वी मालकाच्या स्वाधीन आहे. "लोकशाही" शब्दाचा सैल वापर सोडून, "उपभोक्त्याच्या सेवेची बांधीलकी" हा त्यातल्या त्यात व्यवहार्य कल्पना स्वीकारली जावी, असा एक विचार मी पुढे करतो आहे. माझे म्हणणे आहे, की मिसळपावावर "लोकशाही" आहे की नाही असे म्हणण्यापूर्वी "लोक" कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. राष्ट्रीय लोकशाहीत लोक म्हणजे मतदार (शक्यतोवर राष्ट्राचे सर्व प्रौढ निवासी.) आंतरजालावरचे मराठी "लोक" कोण, त्यांची ओळख काय, त्यांचा आकडा काय, त्यांच्यापैकी ५१% मते मिळालीत असे कधी समजणार... या चर्चा संपणार्‍या नाहीत, आणि कदाचित भाकड आहेत. उपभोक्त्यांची सेवा करणारी संस्था, आणि उपभोक्त्यांपाशी बांधीलकी असणारी सेवा, असे मानल्यास, उपभोक्ता कोण? वगैरे व्यवहार्य प्रश्न विचारले जाऊ शकतील. मला "लोकशाही" या निसरड्या शब्दापासून दूर जायचे आहे, आणि चर्चा करणार्‍यांच्या मनात जे काही प्रिय तत्त्व "लोकशाही" या शब्दाखाली दडले आहे, त्याच्यापाशी पोचायचे आहे. व्याख्येसह, घट्ट, व्यवहार्य अर्थासकट पोचायचे आहे. सारांश : "लोकशाही" शब्दापासून तात्पुरते दूर जावे, आणि त्या संकल्पनेचे मिसळपावास लागू होईल असे स्पष्टीकरण करावे. त्या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळ जावे. त्याचे नियम निश्चित केल्यावर, त्या व्यवहार्य चौकटीला कोणी "लोकशाही" असे पुन्हा म्हणू लागल्यास काही हरकत नाही. ती चौकट कोणती, याबाबत ही चर्चा.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 08:30
धनंजयरावांच्या या अभ्यासपूर्ण लेखावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतू ये रे माझ्या मागल्या.. पुन्हा वैयक्तीक आरोप प्रत्यारोप सुरु झालेले दिसताहेत.. कृपया लेखनाच्या विषयावर चर्चा घडेल काय? ज्यांना वेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे / वैयक्तीक टिप्पणी करायची आहे त्यांनी कृपया नवी चर्चा सुरू करावी असे वाटते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:40
हेच म्हणतो. पण दोन तासापूर्वी पूर्वजन्मीचे ज्ञान घेऊन आलेले लोक विषयाला फाटे फोडत आहेत. तसे होऊ नये. धनंजयरावांचे मुद्देच चर्चेत रहावेत म्हणून या कैवार्‍यांना सांगावे लागले. बापू

धनंजय Mon, 12/17/2007 - 05:49
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 08:41
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या. जरूर करू धन्याशेठ. तुम्ही दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल मनापासून धन्यवाद! काही मंडळी जरा अतीच इंटरेस्ट दाखवायला लागली होती त्यामुळे तूर्तास ही चर्चा थांबवली आहे... तात्या.

In reply to by धनंजय

सुशील Mon, 12/17/2007 - 10:00
अहो नको ते आता. पून्हा त्या कटू आठवणी काढू नका. आहे हे खूप छान वाटते आहे.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 23:26
लेख आवडला. -(जुन्या क्लासिक्सची पुनर्मुद्रीते आवडीने वाचणारा) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 23:31
हाहाहा... कोण आहेत ही सुशील, बापू वगैरे मंडळी? क्रेमरनी वर आणलेल्या धाग्यात एवढे मृत आयडी का आहेत? आयडी मरून गेल्याने त्यांची भूते झाल्यासारखे वाटते. असो..मस्त टाईमपास आहे..उत्खनन चालू ठेवावे :-)

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 05:25
सर्वप्रथम धनंजय यांचे इतक्या मुद्देसुद सुरवाती बद्दल अभिनंदन आणि आभार. प्रश्न खुप मोलाचे आहेत अणि भरपूर चर्चा होईलच. हे वाचल्यावाचल्या काही सैल मुद्दे डोक्यत आले ते मांडतो आहे. पुढिल चर्चेनंतर चित्र स्पष्ट होईलच १. मिसळपावाचे उद्दिष्ट हे कुठलीतरी सेवा पुरवणे (मराठी लेखन-वाचन करायला स्थळ) हे आहे काय? - तशी रजिस्टर करायची म्हणत नाही! तरी विचारांची ती चौकट वापरावी काय? तपशील घटनेत यावेत. ===> अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ अशी ओळख मुखपृष्ठावर दिअसते. त्यावरून मराठी भाषेमधुन लेखन, वाचन, चर्चा, वाद, काव्य आदिंद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी असलेलं एक मोफत संकेतस्थळ अशी संज्ञा करता यावी. २. मिसळपावाचे उद्दिष्ट सफल झाले/नाही, बदल सुचवणे, अशा प्रकारचा जाब अंततोगत्वा विचारणारे कोण? उपभोक्ते काय? (येथे अंततोगत्वा म्हणजे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे, अगदी अंततोगत्वा मिसळपावावरून चालते होऊन कोणीही "उद्दिष्ट सफल झाले नाही" असे गर्भितार्थाने सांगू शकतो.) उपभोक्ता ते कसे करेल ते तपशील घटनेत येतील. ===> याबाबत माझ्या मते विभाग पाडता येतील. प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी घोषित करता येईल आणि तो त्या विभागाच्या निगडित प्रश्नांना उत्तरदायी असेल. याशिवाय पंचायत समिती सदस्य हे उपभोक्त्यांचे प्रतिनिधी असतील व तेच केवळ प्रश्न विचारण्यास पात्र असतील. जर विभाग प्रमुख समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत तर मालक त्यांच्या अधिकारात निर्णय घेतील नी तो सगळ्यांना बंधनकारक ठरेल. बाकी सभासद त्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच पंचायत समितीकडे स्थळ/धोरणांविषयी आक्षेप/मते नोंदवतील. (अर्थात सदस्यास वाटले की आपले प्रतिनिधी काम नीट करत नाही आहेत तर ते मालकांकडे तक्रार् व्यनी मधून करू शकतील) ३. उपभोक्त्याचे एकक काय? ===>माझ्या मते जो मिसळपावचा कमित कमि ३ महिने सभासद आहे व यावेळेत कमितकमी 'क्ष' वेळा लिखाण (यात प्रतिसादही धरले जावेत) केले आहे त्याला सामान्य उपभोक्ता म्हणता यावे. तर विभाग प्रमुख पदासाठी त्या विषयातील ज्ञान निकष असावा. तर प्रतिनिधी पदासाठी उपभोक्त्यापेक्षा अधिक महिने सभासद व अधिक लिखाण याची अट असावी (विचारमग्न) ऋषिकेश

सुशील Sun, 12/16/2007 - 05:50
लोकशाही दील्यावर लोक कशी वाट लावतात हे मिसळपाववर सिद्ध झाले आहे. कशाला पाहिजे ती लोकशाही? माझ्या मते ही वेबसाइट तात्यानेच चालवावी. मिसळपावचे मनोगत झाले म्हणून रडणार्‍यांनी एक लक्षात ठेवावे की मनोगत ही महेश वेलणकरने चालवलेली वेबसाईट आहे आणि मिसळपाव ही तात्या अभ्यंकरने चालवलेली वेबसाईट आहे. हा दोनीतला मुख्य फरक आहे. त्यामुळे मनोगतात आणि मिसळपावमध्ये फरक काय? असे विचारू नये. ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील.

In reply to by सुशील

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:46
लोकशाहीची वाट लोक लावतात, त्यांना तो अधिकारच आहे. येथे लोकनियुक्त समितीच्या अधिकारांचे उल्लंघन हुकूमशहाकडून होत असेल, तर त्याला लोकशाही कृपया म्हणू नये. हे दुसरे मनोगत आहे, असे जाहीर करावे, म्हनजे सर्वांनाच सोपे पडेल. हे संकेतस्थळ सुरू केल्यापासून आजवर तात्या हे लोकशाही म्हणून चालवतो आहे, असे मला वाटते. येथे लोकनियुक्त पंचायत समिती आहे. त्यांची नावे जाहीर आहेत. आणि आजवर ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने येथील कारभार चालवत आहेत. हे असेच सुरू रहावे, असे येथील सदस्यांना वाटणे साहजिकच आहे. लोकशाशी कठीण आहे. येथील सदस्य हुकुमशाहीसारख्या सोप्या शाहीशी अगदी परिचीत आहेत. त्यांना हे समजणे कठीण जाणारच ! जानम समझा करो ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:58
मिसळपावचा केवळ द्वेष करणे ह्या एकमेव उद्देशाने येणार्‍या किमयागाराचे अकाउंत डीलिट केलेले दिसते. मला सांगा हे लोकशाहीत शक्य असते का? तेव्हा ही साइट तात्यानेच चालवावी.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:19
दोन तास झाले नाहीत तुम्हाला इथे येऊन पण मिसळपावचे पूर्वजन्मीचे ज्ञान तुम्हाला बरेच दिसते. मिसळपाववर केवळ उपद्रव निर्माण करून या संकेतस्थळाची वाट लावणार्‍यांवर कारवाई न करता त्यांचा उपद्रव सहन करत बसणे म्हणजे ' लोकशाही' का? जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:58
जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं? अहो तात्या तेच तर म्हणतोय ना मी पण!! पण हे त्या लोकशाहीत शक्य होते का? उलट इतके दिवस त्या किमयागाराला शेफारुनच ठेवले होते ना लोकशाहीने! आता आहे हे बरे आहे.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:22
ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. हे म्हणणे नाही पटले. कारण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी मिसळपाव ही एक चांगली मराठी साईट म्हणून ओळख करून दिली आहे. सभासद नसले तरी कहीतरी चांगले वाचण्याच्या उद्देशाने हे सर्व इथे येतात. भारताबाहेर राहून मराठी लेखनाशी किंवा वाचनाशी संपर्कात राहण्यासाठी सगळे येतात इथे. अशावेळी इथे एकमेकांवर शिंतोडे उडवणे, गलिच्छ लेखन किंवा शिव्या वाचताना त्यांना कौतुक नक्किच वाटत नसेल. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये बराच फरक आहे. तो समजून घेणे आणि आचरणांत आणणे हे महत्त्वाचे. मग तात्या मालक असो किंवा वेलणकर असोत... लिहायचे ते थांबतिलच पण वाचकांशिवाय लेखन काय उपयोगाचे? आणि कोणताही सूज्ञ वाचक गलिच्छ साहित्य वाचणे पसंत करणार नाही. - प्राजु (सूज्ञ वाचक)

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:59
लोकशाही वरील आपले भाष्य स्वागतार्ह आहे. परंतु, मला एक खुलासा हवा आहे. ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्याअ राष्ह्ट्रात लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? मग ते राष्ट्र उत्तर कोरिया अथवा चीन पेक्षा फारसे वेगळे आहे का ? लोकशाही कठीण आहे. ती पार पाडायला, मन घट्ट करणे आवश्यक आहे. शुभेच्छा ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुशील Sun, 12/16/2007 - 07:59
आपण कोणीही इथे पैशे भरून येत नाही तेव्हा इथे काय असावे आणि काय नाही ह्याचा हट्ट धरणारे आपण कोण? ह्याचा सुधा विचार करा

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:17
तुम्ही वर केलेली विधाने आणि हे विधान यात बरीच विसंगती आहे. तुम्ही दोन्ही बाजूंनी ढोल वाजवून भांडणांची आणि वादविवादांची भट्टी चालू ठेवण्याची जबाबदारी पार पाडत आहात. बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:23
तात्या तुम्ही आता 'विसोबा खेचर' ह्या आयडीतून उत्तरे द्या बघू. हे बापू नाना आता बस झाले.

In reply to by सुशील

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:30
विषयाला फाटे फोडू नकोस. लोकांची दिशाभूल करू नकोस. किमयागाराची तुला माहिती आहे आणि बापूची नाही? वेड पांघरून पेडगावला चाललायसं? का तुझा खरा उद्देश इथे मांडला म्हणून काही तरी बळरतो आहेस? बापू

In reply to by गारंबीचा बापू

सुशील Sun, 12/16/2007 - 08:49
तात्या, असे मांजर डोळे मिटून दूध पित असल्यासारखे का करताय? सगळ्यांना माहित आहेत तुमचे आयडी. मी खरंच तुमची बाजू घ्यायला आलो आहे. मला तुमचे लेखन खूप आवडते. तुम्ही असा गैरसमज का करताय?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Sun, 12/16/2007 - 10:39
>ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, > तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः > मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्या राष्ट्रात > लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ? योग्य नाही. मुशर्रफ हे राष्ट्र-प्रमुख असल्यामुळे, त्यांचे असे म्हणणे योग्य नव्हे, केवळ दांडगाई आहे, कारण राष्ट्र हे मालकीहक्काचे नसते. मालकीहक्काच्या या संकेतस्थळावर शेवटी कायदा काय ते मालकच सांगणार. मालकाने "माझी ब्याट, माझी ब्याटिंग" म्हटले तर चालेल, पण ते स्पष्ट म्हटले पाहिजे. पण मिसळपावाच्या मालकाने असे म्हटल्यास - स्पष्ट म्हटल्यास - काहीही चुकले नाही. ज्या लोकांना आवडणार नाही, ते लोक मिसळपावावर येणार नाहीत, किंवा मालकाच्या मर्जीने येतील; ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी मालकाने मानले, की माझी ब्याट असली तरी अंपायरचे म्हणणे मानले जाईल, तर मग अंपायरिंगचे नियम प्रसिद्ध व्हावेत. अंपायरच्या नेमणुकीबाबत खेळाडूंना, प्रेक्षकांना, पूर्ण माहिती द्यावी, वगैरे... राष्ट्र नसलेल्या संस्थेसाठी राष्ट्रीय लोकशाहीची वैचारिक चौकट योग्य नाही. एक तर मालकीशाही (एका व्यक्तीची, किंवा समभागमालकांची) चौकट वापरता येईल, किंवा सेवाभावी संस्थेची "उपभोक्त्यास बांधीलकी" ही चौकट वापरता येईल. कुठली चौकट वापरावी हे सर्वस्वी मालकाच्या स्वाधीन आहे. "लोकशाही" शब्दाचा सैल वापर सोडून, "उपभोक्त्याच्या सेवेची बांधीलकी" हा त्यातल्या त्यात व्यवहार्य कल्पना स्वीकारली जावी, असा एक विचार मी पुढे करतो आहे. माझे म्हणणे आहे, की मिसळपावावर "लोकशाही" आहे की नाही असे म्हणण्यापूर्वी "लोक" कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. राष्ट्रीय लोकशाहीत लोक म्हणजे मतदार (शक्यतोवर राष्ट्राचे सर्व प्रौढ निवासी.) आंतरजालावरचे मराठी "लोक" कोण, त्यांची ओळख काय, त्यांचा आकडा काय, त्यांच्यापैकी ५१% मते मिळालीत असे कधी समजणार... या चर्चा संपणार्‍या नाहीत, आणि कदाचित भाकड आहेत. उपभोक्त्यांची सेवा करणारी संस्था, आणि उपभोक्त्यांपाशी बांधीलकी असणारी सेवा, असे मानल्यास, उपभोक्ता कोण? वगैरे व्यवहार्य प्रश्न विचारले जाऊ शकतील. मला "लोकशाही" या निसरड्या शब्दापासून दूर जायचे आहे, आणि चर्चा करणार्‍यांच्या मनात जे काही प्रिय तत्त्व "लोकशाही" या शब्दाखाली दडले आहे, त्याच्यापाशी पोचायचे आहे. व्याख्येसह, घट्ट, व्यवहार्य अर्थासकट पोचायचे आहे. सारांश : "लोकशाही" शब्दापासून तात्पुरते दूर जावे, आणि त्या संकल्पनेचे मिसळपावास लागू होईल असे स्पष्टीकरण करावे. त्या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळ जावे. त्याचे नियम निश्चित केल्यावर, त्या व्यवहार्य चौकटीला कोणी "लोकशाही" असे पुन्हा म्हणू लागल्यास काही हरकत नाही. ती चौकट कोणती, याबाबत ही चर्चा.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 08:30
धनंजयरावांच्या या अभ्यासपूर्ण लेखावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतू ये रे माझ्या मागल्या.. पुन्हा वैयक्तीक आरोप प्रत्यारोप सुरु झालेले दिसताहेत.. कृपया लेखनाच्या विषयावर चर्चा घडेल काय? ज्यांना वेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे / वैयक्तीक टिप्पणी करायची आहे त्यांनी कृपया नवी चर्चा सुरू करावी असे वाटते. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 08:40
हेच म्हणतो. पण दोन तासापूर्वी पूर्वजन्मीचे ज्ञान घेऊन आलेले लोक विषयाला फाटे फोडत आहेत. तसे होऊ नये. धनंजयरावांचे मुद्देच चर्चेत रहावेत म्हणून या कैवार्‍यांना सांगावे लागले. बापू

धनंजय Mon, 12/17/2007 - 05:49
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 08:41
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या. जरूर करू धन्याशेठ. तुम्ही दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल मनापासून धन्यवाद! काही मंडळी जरा अतीच इंटरेस्ट दाखवायला लागली होती त्यामुळे तूर्तास ही चर्चा थांबवली आहे... तात्या.

In reply to by धनंजय

सुशील Mon, 12/17/2007 - 10:00
अहो नको ते आता. पून्हा त्या कटू आठवणी काढू नका. आहे हे खूप छान वाटते आहे.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 23:26
लेख आवडला. -(जुन्या क्लासिक्सची पुनर्मुद्रीते आवडीने वाचणारा) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 23:31
हाहाहा... कोण आहेत ही सुशील, बापू वगैरे मंडळी? क्रेमरनी वर आणलेल्या धाग्यात एवढे मृत आयडी का आहेत? आयडी मरून गेल्याने त्यांची भूते झाल्यासारखे वाटते. असो..मस्त टाईमपास आहे..उत्खनन चालू ठेवावे :-)
आजकाल मिसळपावाची "घटना" किंवा "नियमावली" लिहिण्याबाबत चर्चा होत आहे. या बाबतीत "लोकशाही" हा शब्द पुष्कळदा वापरात आलेला दिसतो. देशांच्या/राज्यांच्या बाबतीत लोकशाही म्हणजे काय, याबद्दल आपण नागरिकशास्त्रात शिकलेलो आहोत, आणि जगातील विविध उदाहरणांनी "राज्यात लोकशाही म्हणजे काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो. राज्यातले "लोक" कोण? याबद्दल एकमत नसेल तरी जवळजवळ एकमत आहे. राज्यात हक्काचे रहिवासी हे त्या राज्यातले लोक.

निःश्‍वास

दिनेश५७ ·

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:40
दिनेशराव, अतिशय उत्तम लेख... मी समतोलबद्दल उडत उडत ऐकले होते, परंतु इतकी डिटेल माहिती मलाही नव्हती. ती इथे पुरवल्याबद्दल आपले अनेक आभार. अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येथे करावे हीच विनंती! समतोलशी संपर्क साधून यथाशक्ति मदत करण्याचा प्रयत्न करेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Sun, 12/16/2007 - 00:45
हेच म्हणतो. उत्तम प्रकारे चांगली माहीती दिल्याबद्दल आभार.

प्राजु Sun, 12/16/2007 - 05:37
एका अतिशय चांगल्या संस्थेची माहीती दिली आहे आपण. भारतात आल्यावर इथे आवश्य जाईन मी. माणुसकीला खतपाणी घालणा-या संस्थेमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्य त्या मुलांच्या पदरी पडेल. लेख अतिशय माहिती पूर्ण आहे. धन्यवाद. - प्राजु.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:40
दिनेशराव, अतिशय उत्तम लेख... मी समतोलबद्दल उडत उडत ऐकले होते, परंतु इतकी डिटेल माहिती मलाही नव्हती. ती इथे पुरवल्याबद्दल आपले अनेक आभार. अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येथे करावे हीच विनंती! समतोलशी संपर्क साधून यथाशक्ति मदत करण्याचा प्रयत्न करेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Sun, 12/16/2007 - 00:45
हेच म्हणतो. उत्तम प्रकारे चांगली माहीती दिल्याबद्दल आभार.

प्राजु Sun, 12/16/2007 - 05:37
एका अतिशय चांगल्या संस्थेची माहीती दिली आहे आपण. भारतात आल्यावर इथे आवश्य जाईन मी. माणुसकीला खतपाणी घालणा-या संस्थेमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्य त्या मुलांच्या पदरी पडेल. लेख अतिशय माहिती पूर्ण आहे. धन्यवाद. - प्राजु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
निःश्‍वास दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.

एक दिवस...

दिनेश५७ ·

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:43
कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:09
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु.

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:43
कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या.

प्राजु Sun, 12/16/2007 - 06:09
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु.
लेखनविषय:
पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास...

जाहिर आवाहन

महेन्द्र ·

सुशील Sun, 12/16/2007 - 08:53
तात्या मिसळपाव हे तुमचेच आहे. तुम्ही ह्या सगळ्या भांडणांकडे दुर्लक्ष का करत नाही? मी रौशनीच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे. मला चुकिचे समजू नका.

सुशील Sun, 12/16/2007 - 08:53
तात्या मिसळपाव हे तुमचेच आहे. तुम्ही ह्या सगळ्या भांडणांकडे दुर्लक्ष का करत नाही? मी रौशनीच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे. मला चुकिचे समजू नका.
श्रीमंत तात्या साहेब (मिसळपाववाले) यांना जाहिर आवाहन तात्या..... पुन्हा एकदा सर्वांकडुन हस्ताक्षर गोळा करुन आपले अनमोल बहुमोल विनामोल निष्कर्ष जाहिर करावेत महेन्द्र

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 18:43
पंत, भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे. आपल्या या संकल्पाचे सहर्ष स्वागत आहे! तांब्यांच्या कविता मिसळपाववर जतन करायच्या असे आपण ठरवले आहे, ही गोष्ट मिसळपावला निश्चितच वैभवाशाली बनवणारी आहे! वरील कविता हे एक आम्हाला आवडणारं अतिशय सुंदर गाणं आहे. दिदीचा हृदयाला हात घालणारा आवाज, सहजसुंदर चाल, मोहक ठेक्यातला केरवा यामुळे हे गाणं अतिशय श्रवणीय झालं आहे! आपलाच, तात्या.

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 19:04
वा! हा संकल्प बघुन कोण आनंद झाला आहे म्हनून सांगु! आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे हे खरेच. त्यामुळे असा अमोल ठेवा देऊ केल्याबद्दल धोंडोपंतांचे अनेक आभार आणि अनेकोत्तम शुभेच्छा!! श्रीगणेशाही माझ्या एका आवडत्या गाण्याने केल्याबद्दल आभार! काहि (आगाउ)सुचना, १. गाणे दिल्यावर जर ते ऐकण्यासठी एखादा दुवा देता आला तर बहार येईल. अर्थात जेव्हा शक्य असेल तेव्हाच संपादक मंडळ, २. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का? (या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 19:19
२. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का? (या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश ऋषिकेशराव, मिसळपाववरील प्रेमाबद्दल आणि आस्थेबद्दल मनापासून आभार. लवकरच यातील तांत्रिक तज्ञ मंडळींना भेटून मिसळपावचे मुखपृष्ठ, साठवणीचे स्वरुप, रंगरूप, इत्यादी बाबतीत काही बदल करायचे ठरवले आहे. तात्या.

विकास Sat, 12/15/2007 - 19:06
चांगला संकल्प आहे. भा. रा. तांब्यांच्या कवितेत कधी कधी गर्भितार्थ फारच वेगळा असे, तसे माहीत असल्यास ती माहीती देखील येथे द्यावी. उ.दा. नववधू प्रिया मी बावरते ही प्रसिद्ध कविता आणि गाणे....

नंदन Sat, 12/15/2007 - 19:54
उत्तम उपक्रम, धोंडोपंत. या कवितांबरोबरच तुमचे त्यांच्यावरील भाष्यही वाचायला आवडेल. तात्याने म्हटल्याप्रमाणे, हे गाणंही अतिशय सुंदर आहे. खासकरून 'संध्याछाया भिवविती हृदया'चं आर्त कडवं. कदाचित थोडं अवांतर होईल, पण 'करीं' वरील अनुस्वार पाहून सत्त्वशीला सामंतांची काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत आलेली (दोन लेखांची) लेखमाला आठवली. जुन्या पद्धतीप्रमाणे, उच्चारानुसार अनुस्वार द्यायची पद्धत महाराष्ट्र राज्यशासनाने नेमलेल्या शुद्धलेखनविषयक समितीने १९६५ च्या आसपास कधीतरी काढून टाकली. यामुळे, विशेषकरून जुन्या गाण्यांच्या/कवितांच्या झालेल्या अर्थहानीबद्दल लिहिताना, त्यांनी या गाण्यातील 'मधु पिळण्यापरी बळ न करीं' या ओळीतील श्लेषाचे सुरेख उदाहरण दिले होते. माझ्या हातांत मध पिळण्याइतपत बळ नाही हा एक अर्थ, आणि मध पिळण्यासाठी बळ(जबरी) करू नकोस असा दुसरा. तुम्ही मूळ कविता तशीच लिहिलीत म्हणून आठवले. (त्या लेखातले, दुसरे उदाहरण म्हणजे -- 'तुझ्या गळां, माझ्या गळां'चे झालेले 'तुझ्या गळा, माझ्या गळा' हे भ्रष्ट रूप). [ विषयांतर वाटल्यास क्षमस्व.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

प्रमोद देव Sat, 12/15/2007 - 20:55
नंदनशी सहमत आहे. अतिशय उत्तम संकल्प आहे. माझ्या तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. अता मधुचे नाव कासया ह्या मध्ये कासया चा अर्थ काय असावा? का सया असे तर नसावे?

धोंडोपंत, भा.रा. तांबे यांच्या कवितांचे 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आपण जो संकल्प आहे, त्यास आमच्या शुभेच्छा आहेतच. पण, नंदन म्हणतात तसे, त्या कवितांवर आपले भाष्य आले तर खूप आनंद होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 21:57
वर अभिप्राय दिलेल्या सर्वांना धन्यवाद. आपल्याला हा संकल्प आवडला हे बघून आमचाही हुरूप वाढला. १) तात्या - मिसळपाववर दर्जेदार साहित्य जतन व्हावं म्हणून आम्ही आमच्या कुवतीनुसार प्रयत्न करीत आहोत आणि करत राहू. २) ऋषिकेश - गाणे ऐकण्यासाठी दुवा देणे या बाबतीत आम्ही फारच अडाणी आहोत. गाण्य़ांच्या दुव्यासंदर्भात जे तज्ञ आहेत त्यांनी यासंबंधी काही केले तरच. ३)विकासराव - सूचना स्वागतार्ह आहे. एकदा एखादी कविता येथे आली की त्यावर चर्चा करता येईल. ४)संजयराव - धन्यवाद ५)नंदनराव - आपल्या विचारांशी १००% सहमत. शासकीय नियम जेव्हा साहित्यात लुडबुडायला लागले तेव्हापासून मराठीची मोठी हानी झाली आहे. आम्ही मात्र येथे भास्कररावांनी जसे लिहिले तसेच लिहू. कारण आम्ही फक्त भारवाही म्हणून हे काम करीत आहोत. भास्कररावांनी लिहिलेले एक टिंबही वगळण्याचा प्रमाद आम्ही करायला धजावणार नाही. आपण लिहिलेले विषयांतर मुळीच नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा यात आहे जो लोकांपर्यत पोहोचला नसता. ६)प्रमोद राव - क्या बात कही है | नाव कासया आणि नाव का सया वर येथे चर्चा व्हावी. त्यातून सर्वांच्या जाणीवा समृद्ध होतील. ७) प्राध्यापक साहेब - आपली थाप पाठीवर असली म्हणजे झाले. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 23:10
या कवितेबद्दल थोडेसे:- या कवितेची माधव ज्युलियन यांच्या का उठता खाली बसा तरूण मंडळी, उपचार ठेविता का हा? समताच योग्य ह्या स्थळी या कवितेशी जवळी़क वाटते. याचे कारण असे आहे की , माधव ज्युलियन यांनी या कवितेत त्यांचा काव्यदीप लयाला चालला असल्याची खंत व्यक्त केली आहे. आणि 'क्रांतीचे पुढील सौंदर्य" हे तरूण कविंवरच अवलंबून आहे असे म्हटले आहे. तांब्यांनी हीच खंत अत्यंत भावुकपणे या कवितेत मांडलेली आहे की आजपर्यंत तुला हा काव्यरूपी मध मी देत आलो पण आता माझेच घट रिकामे होऊ लागलेत. कविता १९३३ ची आहे आणि तांब्यांचा मृत्यू १९४१ चा. आयुष्याच्य़ा अखेरच्या पर्वात लिहिलेली . म्हणून ते म्हणतातआजवरी कमळाच्या द्रोणी तुला हे रसपान घडवले ती पूर्वीची सेवा आठव आणि आता रागावू नकोस. आता जे आहे ते शेवटची राहिलेली एकच दुधाची वाटी ती देवपु़जेसाठी उरलेली आहे. आता जे काही उरले आहे ते ईश्वरार्पण. ती एकमेव वाटी (थोडासा काव्यरस) कसाबसा धेऊन मी पुढचा प्रवास करणार आहे. तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल? आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:30
तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. वा पंत! अतिशय सुरेख रसग्रहण... तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल? क्या बात है! अगदी खरं... पंत, आपल्याकडून तांब्यांच्या, कुसुमाग्रजांच्या आणि इतरही उत्तमोत्तम कवींच्या कवितांचे उत्तम रसग्रहण इथे लिहिले जावो आणि आम्हा रसिक मिसळप्रेमींना ते वाचावयास मिळो हीच शुभकामना.. तात्या.

सुनील Sat, 12/15/2007 - 22:52
ह्या कवितेचा जन्म एका पोस्टकार्डावर झाला होता असे कुठेतरी वाचल्याचे अंधुकसे स्मरते (चु भू द्या घ्या). भास्कररावांच्या एका स्नेह्याने, "बर्‍याच दिवसात तुमची नवी कविता आली नाही तेव्हा आता एक येऊद्यात" असे पत्र पाठवले. त्याला उत्तर देताना भास्कररावांनी ही कविताच पाठवली. अशी कथा आहे. बाकी भा रा तांब्यांच्या कविता इथे देण्याचा संकल्प छानच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by बाबुराव

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:41
बाबूराव, भास्कररावांच्या कवितांवर प्रगल्भ प्रतिसाद अपेक्षित आहेत. कृपया आमचा नाही पण त्यांचा मान राखा. प्लीईईईईईईईईईईईईईईईज. धोंडोपंत

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:39
धोंडोपंत, मिसळपावावर आपल्यासारख्यांचा वावर ही मिसळपावाला अभिमान वाटावा अशी गोष्ह्ट आहे ! तांब्याम्च्या कवितांचे इतके सुंदर रसग्रहण आपण करताहात, की क्या कहने ! आपला हा उपक्रम हा असाच सुरू रहावा, ही शुभेच्छा ! - सर्किट

मुक्तसुनीत Sun, 12/16/2007 - 06:59
भा रा तांबे यांच्या कविता आमच्या पिढीपर्यंत पोचल्या त्याचे श्रेय मंगेशकर भावंडाना जाते. किंबहुना वसंत प्रभु आणि मंगेशकर यानी त्यांच्या कवितेतील उत्तमोत्तम धन गाण्यांच्या रूपाने जतन केले , लोकांपर्यंत पोचविले. वसंत प्रभुंनी दिलेली तांब्यांची गाणी साठीच्या दशकाच्या आगेमागे मनामनात पोचली. त्यात रेडीयोचा वाटा फार मोठा होता. "देवानाही हेवा वाटावा" असे प्रेम या गाण्याना , गायकाना आणि संगीतकाराना उभ्या महाराष्ट्राने दिले. आणि त्या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे रेडीयो ऐकणार्‍या लाखो लोकांपैकी तांब्यांच्या पुस्तकांकडे वळले. राजकवी तांबे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकानी लोकांपर्यंत पोचले. त्या गाण्यातील आणि संगीतातील गोडी इतकी की, आजच्या भीषण वेगवान जगात सुद्धा कुणाला त्याची आठवणा जतन करावीशी वाटते; आणि कित्येक जणांची दाद त्याला मिळते. व्यक्तिशः मला मंगेशकरानी केलेली तांब्यांची गाणी फार आवडतात. "मावळत्या दिनकरा" सारख्या कवितेने मंगेशकराना आपल्या स्वतःच्या वडीलांच्या आठवणीपर्यंत नेले आणि एका उत्कृष्ट सांगितिक रचना जन्माला आली. "दे मला गे चंद्रिके" हे देखील (कलावती रागातील ?) फार सुंदर गाणे आहे.

प्राजु Sun, 12/16/2007 - 09:44
सुंदर आहे ही कल्पना.. आणखीही येऊदेत तांब्यांच्या कविता... खूप दिवसांनी वाचते आहे या कविता. - प्राजु.

पंत, कवितेचे रसग्रहण आवडले. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. मस्त !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:29
वा! मस्त प्रकल्प आहे. कविता वाचायला मिळाव्यात हे आमचे भाग्यच आहे. आपल्याला या कार्यासाठी शुभेच्छा! आपला गुंडोपंत

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:17
धोंडोपंत, हा ही संकल्प अतिउत्तम.. अभिनंदन आणि शुभेच्छा.. सगळे संकल्प खंड न पाडता लगेच हता वेगळे करा.. अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना) (आतूर) केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 19:59
अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना) हम्म! अवश्य करू सुमार साहेब. आत्ताच जरा कुठे काही नवीन लेखन करण्यास निवांतपणा मिळाला आहे! :) आता भरभरून लिहीन...:) तात्या.

कर्नलतपस्वी Mon, 10/27/2025 - 11:27
राजकवी भा रा तांबे एक अफलातून कवी होते. बालगीत प्रेम,शृंगार ते अध्यात्म सर्व क्षेत्रात त्यांची लेखणी अश्वमेध यज्ञाच्या अश्वा समान निर्विवाद चालली. शंभर वर्षापुर्वी त्यांनी लिहीलेले बालगीत आज मस्त रॅप संगीत होऊ शकते. २७ ऑक्टोबर १८७३,जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून खाली रसिकांच्या माहितीसाठी देत आहे. हे कोण गे आई? नदीच्या शेजारी । गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत । वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी । जांभळी अंधारी मोडके देऊळ । त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठायी। राहते गे आई ? ॥ १ ॥ चिंचांच्या शेंड्यांना । वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी । कोण गे पालवी ? कोण गे जोरानें। मोठ्याने मोठ्याने शीळ गे वाजवी । पांखरां लाजवी ? सारखी किती वेळ । ऐकू ये ती शीळ ? ॥ २ ॥ वाळली सोनेरी। पानें गे चौफेरी मंडळ धरोनी । नाचती ऐकोनी ! किती मी पाहिलें । इतकेची देखिलें - -झाडांच्या साउल्या । नदीत कांपल्या ! हांका मी मारिल्या । वांकोल्या ऐकिल्या ॥ ३ ॥ उरांत धडधडे । धांवतां मी पडे पळालो तेथून । कोण गे ये मागून ? ॥ ४ ॥ राजकवी भा. रा. तांबे

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 10/27/2025 - 13:29
ही कविता माझ्या मुलीला बालभारती पुस्तकात (चौथीला)होती.मी तिला शिकवली होती.तिच्या बालमनात आले की मंदिर मोडकं कसं काय असू शकते :)पण मला मात्र गावाकडचं एक मंदिर आठवलं जिथे मूर्ती नाही,असेच पिंपळ त्यावर उगवली आहे.

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 18:43
पंत, भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे. आपल्या या संकल्पाचे सहर्ष स्वागत आहे! तांब्यांच्या कविता मिसळपाववर जतन करायच्या असे आपण ठरवले आहे, ही गोष्ट मिसळपावला निश्चितच वैभवाशाली बनवणारी आहे! वरील कविता हे एक आम्हाला आवडणारं अतिशय सुंदर गाणं आहे. दिदीचा हृदयाला हात घालणारा आवाज, सहजसुंदर चाल, मोहक ठेक्यातला केरवा यामुळे हे गाणं अतिशय श्रवणीय झालं आहे! आपलाच, तात्या.

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 19:04
वा! हा संकल्प बघुन कोण आनंद झाला आहे म्हनून सांगु! आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे हे खरेच. त्यामुळे असा अमोल ठेवा देऊ केल्याबद्दल धोंडोपंतांचे अनेक आभार आणि अनेकोत्तम शुभेच्छा!! श्रीगणेशाही माझ्या एका आवडत्या गाण्याने केल्याबद्दल आभार! काहि (आगाउ)सुचना, १. गाणे दिल्यावर जर ते ऐकण्यासठी एखादा दुवा देता आला तर बहार येईल. अर्थात जेव्हा शक्य असेल तेव्हाच संपादक मंडळ, २. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का? (या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 19:19
२. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का? (या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश ऋषिकेशराव, मिसळपाववरील प्रेमाबद्दल आणि आस्थेबद्दल मनापासून आभार. लवकरच यातील तांत्रिक तज्ञ मंडळींना भेटून मिसळपावचे मुखपृष्ठ, साठवणीचे स्वरुप, रंगरूप, इत्यादी बाबतीत काही बदल करायचे ठरवले आहे. तात्या.

विकास Sat, 12/15/2007 - 19:06
चांगला संकल्प आहे. भा. रा. तांब्यांच्या कवितेत कधी कधी गर्भितार्थ फारच वेगळा असे, तसे माहीत असल्यास ती माहीती देखील येथे द्यावी. उ.दा. नववधू प्रिया मी बावरते ही प्रसिद्ध कविता आणि गाणे....

नंदन Sat, 12/15/2007 - 19:54
उत्तम उपक्रम, धोंडोपंत. या कवितांबरोबरच तुमचे त्यांच्यावरील भाष्यही वाचायला आवडेल. तात्याने म्हटल्याप्रमाणे, हे गाणंही अतिशय सुंदर आहे. खासकरून 'संध्याछाया भिवविती हृदया'चं आर्त कडवं. कदाचित थोडं अवांतर होईल, पण 'करीं' वरील अनुस्वार पाहून सत्त्वशीला सामंतांची काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत आलेली (दोन लेखांची) लेखमाला आठवली. जुन्या पद्धतीप्रमाणे, उच्चारानुसार अनुस्वार द्यायची पद्धत महाराष्ट्र राज्यशासनाने नेमलेल्या शुद्धलेखनविषयक समितीने १९६५ च्या आसपास कधीतरी काढून टाकली. यामुळे, विशेषकरून जुन्या गाण्यांच्या/कवितांच्या झालेल्या अर्थहानीबद्दल लिहिताना, त्यांनी या गाण्यातील 'मधु पिळण्यापरी बळ न करीं' या ओळीतील श्लेषाचे सुरेख उदाहरण दिले होते. माझ्या हातांत मध पिळण्याइतपत बळ नाही हा एक अर्थ, आणि मध पिळण्यासाठी बळ(जबरी) करू नकोस असा दुसरा. तुम्ही मूळ कविता तशीच लिहिलीत म्हणून आठवले. (त्या लेखातले, दुसरे उदाहरण म्हणजे -- 'तुझ्या गळां, माझ्या गळां'चे झालेले 'तुझ्या गळा, माझ्या गळा' हे भ्रष्ट रूप). [ विषयांतर वाटल्यास क्षमस्व.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

प्रमोद देव Sat, 12/15/2007 - 20:55
नंदनशी सहमत आहे. अतिशय उत्तम संकल्प आहे. माझ्या तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. अता मधुचे नाव कासया ह्या मध्ये कासया चा अर्थ काय असावा? का सया असे तर नसावे?

धोंडोपंत, भा.रा. तांबे यांच्या कवितांचे 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आपण जो संकल्प आहे, त्यास आमच्या शुभेच्छा आहेतच. पण, नंदन म्हणतात तसे, त्या कवितांवर आपले भाष्य आले तर खूप आनंद होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 21:57
वर अभिप्राय दिलेल्या सर्वांना धन्यवाद. आपल्याला हा संकल्प आवडला हे बघून आमचाही हुरूप वाढला. १) तात्या - मिसळपाववर दर्जेदार साहित्य जतन व्हावं म्हणून आम्ही आमच्या कुवतीनुसार प्रयत्न करीत आहोत आणि करत राहू. २) ऋषिकेश - गाणे ऐकण्यासाठी दुवा देणे या बाबतीत आम्ही फारच अडाणी आहोत. गाण्य़ांच्या दुव्यासंदर्भात जे तज्ञ आहेत त्यांनी यासंबंधी काही केले तरच. ३)विकासराव - सूचना स्वागतार्ह आहे. एकदा एखादी कविता येथे आली की त्यावर चर्चा करता येईल. ४)संजयराव - धन्यवाद ५)नंदनराव - आपल्या विचारांशी १००% सहमत. शासकीय नियम जेव्हा साहित्यात लुडबुडायला लागले तेव्हापासून मराठीची मोठी हानी झाली आहे. आम्ही मात्र येथे भास्कररावांनी जसे लिहिले तसेच लिहू. कारण आम्ही फक्त भारवाही म्हणून हे काम करीत आहोत. भास्कररावांनी लिहिलेले एक टिंबही वगळण्याचा प्रमाद आम्ही करायला धजावणार नाही. आपण लिहिलेले विषयांतर मुळीच नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा यात आहे जो लोकांपर्यत पोहोचला नसता. ६)प्रमोद राव - क्या बात कही है | नाव कासया आणि नाव का सया वर येथे चर्चा व्हावी. त्यातून सर्वांच्या जाणीवा समृद्ध होतील. ७) प्राध्यापक साहेब - आपली थाप पाठीवर असली म्हणजे झाले. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 23:10
या कवितेबद्दल थोडेसे:- या कवितेची माधव ज्युलियन यांच्या का उठता खाली बसा तरूण मंडळी, उपचार ठेविता का हा? समताच योग्य ह्या स्थळी या कवितेशी जवळी़क वाटते. याचे कारण असे आहे की , माधव ज्युलियन यांनी या कवितेत त्यांचा काव्यदीप लयाला चालला असल्याची खंत व्यक्त केली आहे. आणि 'क्रांतीचे पुढील सौंदर्य" हे तरूण कविंवरच अवलंबून आहे असे म्हटले आहे. तांब्यांनी हीच खंत अत्यंत भावुकपणे या कवितेत मांडलेली आहे की आजपर्यंत तुला हा काव्यरूपी मध मी देत आलो पण आता माझेच घट रिकामे होऊ लागलेत. कविता १९३३ ची आहे आणि तांब्यांचा मृत्यू १९४१ चा. आयुष्याच्य़ा अखेरच्या पर्वात लिहिलेली . म्हणून ते म्हणतातआजवरी कमळाच्या द्रोणी तुला हे रसपान घडवले ती पूर्वीची सेवा आठव आणि आता रागावू नकोस. आता जे आहे ते शेवटची राहिलेली एकच दुधाची वाटी ती देवपु़जेसाठी उरलेली आहे. आता जे काही उरले आहे ते ईश्वरार्पण. ती एकमेव वाटी (थोडासा काव्यरस) कसाबसा धेऊन मी पुढचा प्रवास करणार आहे. तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल? आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 00:30
तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. वा पंत! अतिशय सुरेख रसग्रहण... तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल? क्या बात है! अगदी खरं... पंत, आपल्याकडून तांब्यांच्या, कुसुमाग्रजांच्या आणि इतरही उत्तमोत्तम कवींच्या कवितांचे उत्तम रसग्रहण इथे लिहिले जावो आणि आम्हा रसिक मिसळप्रेमींना ते वाचावयास मिळो हीच शुभकामना.. तात्या.

सुनील Sat, 12/15/2007 - 22:52
ह्या कवितेचा जन्म एका पोस्टकार्डावर झाला होता असे कुठेतरी वाचल्याचे अंधुकसे स्मरते (चु भू द्या घ्या). भास्कररावांच्या एका स्नेह्याने, "बर्‍याच दिवसात तुमची नवी कविता आली नाही तेव्हा आता एक येऊद्यात" असे पत्र पाठवले. त्याला उत्तर देताना भास्कररावांनी ही कविताच पाठवली. अशी कथा आहे. बाकी भा रा तांब्यांच्या कविता इथे देण्याचा संकल्प छानच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by बाबुराव

धोंडोपंत Sun, 12/16/2007 - 11:41
बाबूराव, भास्कररावांच्या कवितांवर प्रगल्भ प्रतिसाद अपेक्षित आहेत. कृपया आमचा नाही पण त्यांचा मान राखा. प्लीईईईईईईईईईईईईईईईज. धोंडोपंत

सर्किट Sun, 12/16/2007 - 06:39
धोंडोपंत, मिसळपावावर आपल्यासारख्यांचा वावर ही मिसळपावाला अभिमान वाटावा अशी गोष्ह्ट आहे ! तांब्याम्च्या कवितांचे इतके सुंदर रसग्रहण आपण करताहात, की क्या कहने ! आपला हा उपक्रम हा असाच सुरू रहावा, ही शुभेच्छा ! - सर्किट

मुक्तसुनीत Sun, 12/16/2007 - 06:59
भा रा तांबे यांच्या कविता आमच्या पिढीपर्यंत पोचल्या त्याचे श्रेय मंगेशकर भावंडाना जाते. किंबहुना वसंत प्रभु आणि मंगेशकर यानी त्यांच्या कवितेतील उत्तमोत्तम धन गाण्यांच्या रूपाने जतन केले , लोकांपर्यंत पोचविले. वसंत प्रभुंनी दिलेली तांब्यांची गाणी साठीच्या दशकाच्या आगेमागे मनामनात पोचली. त्यात रेडीयोचा वाटा फार मोठा होता. "देवानाही हेवा वाटावा" असे प्रेम या गाण्याना , गायकाना आणि संगीतकाराना उभ्या महाराष्ट्राने दिले. आणि त्या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे रेडीयो ऐकणार्‍या लाखो लोकांपैकी तांब्यांच्या पुस्तकांकडे वळले. राजकवी तांबे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकानी लोकांपर्यंत पोचले. त्या गाण्यातील आणि संगीतातील गोडी इतकी की, आजच्या भीषण वेगवान जगात सुद्धा कुणाला त्याची आठवणा जतन करावीशी वाटते; आणि कित्येक जणांची दाद त्याला मिळते. व्यक्तिशः मला मंगेशकरानी केलेली तांब्यांची गाणी फार आवडतात. "मावळत्या दिनकरा" सारख्या कवितेने मंगेशकराना आपल्या स्वतःच्या वडीलांच्या आठवणीपर्यंत नेले आणि एका उत्कृष्ट सांगितिक रचना जन्माला आली. "दे मला गे चंद्रिके" हे देखील (कलावती रागातील ?) फार सुंदर गाणे आहे.

प्राजु Sun, 12/16/2007 - 09:44
सुंदर आहे ही कल्पना.. आणखीही येऊदेत तांब्यांच्या कविता... खूप दिवसांनी वाचते आहे या कविता. - प्राजु.

पंत, कवितेचे रसग्रहण आवडले. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. मस्त !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत Sun, 12/16/2007 - 13:29
वा! मस्त प्रकल्प आहे. कविता वाचायला मिळाव्यात हे आमचे भाग्यच आहे. आपल्याला या कार्यासाठी शुभेच्छा! आपला गुंडोपंत

केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:17
धोंडोपंत, हा ही संकल्प अतिउत्तम.. अभिनंदन आणि शुभेच्छा.. सगळे संकल्प खंड न पाडता लगेच हता वेगळे करा.. अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना) (आतूर) केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Sun, 12/16/2007 - 19:59
अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना) हम्म! अवश्य करू सुमार साहेब. आत्ताच जरा कुठे काही नवीन लेखन करण्यास निवांतपणा मिळाला आहे! :) आता भरभरून लिहीन...:) तात्या.

कर्नलतपस्वी Mon, 10/27/2025 - 11:27
राजकवी भा रा तांबे एक अफलातून कवी होते. बालगीत प्रेम,शृंगार ते अध्यात्म सर्व क्षेत्रात त्यांची लेखणी अश्वमेध यज्ञाच्या अश्वा समान निर्विवाद चालली. शंभर वर्षापुर्वी त्यांनी लिहीलेले बालगीत आज मस्त रॅप संगीत होऊ शकते. २७ ऑक्टोबर १८७३,जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून खाली रसिकांच्या माहितीसाठी देत आहे. हे कोण गे आई? नदीच्या शेजारी । गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत । वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी । जांभळी अंधारी मोडके देऊळ । त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठायी। राहते गे आई ? ॥ १ ॥ चिंचांच्या शेंड्यांना । वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी । कोण गे पालवी ? कोण गे जोरानें। मोठ्याने मोठ्याने शीळ गे वाजवी । पांखरां लाजवी ? सारखी किती वेळ । ऐकू ये ती शीळ ? ॥ २ ॥ वाळली सोनेरी। पानें गे चौफेरी मंडळ धरोनी । नाचती ऐकोनी ! किती मी पाहिलें । इतकेची देखिलें - -झाडांच्या साउल्या । नदीत कांपल्या ! हांका मी मारिल्या । वांकोल्या ऐकिल्या ॥ ३ ॥ उरांत धडधडे । धांवतां मी पडे पळालो तेथून । कोण गे ये मागून ? ॥ ४ ॥ राजकवी भा. रा. तांबे

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 10/27/2025 - 13:29
ही कविता माझ्या मुलीला बालभारती पुस्तकात (चौथीला)होती.मी तिला शिकवली होती.तिच्या बालमनात आले की मंदिर मोडकं कसं काय असू शकते :)पण मला मात्र गावाकडचं एक मंदिर आठवलं जिथे मूर्ती नाही,असेच पिंपळ त्यावर उगवली आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
3

गोफ - २

ऋषिकेश ·

धनंजय Sat, 12/15/2007 - 04:38
देवगिरीला गरजत होती कोटावरची मेंढा तोफ तरी किल्ला गारद झाला नियती विणते मुश्किल गोफ (चारोळी हा प्रकार मला अजून समजलेला नाही, गोखल्यांच्या बहुतेक रचना मला आवडलेल्या नाहीत :-( तरी या वाटेला मी बहुधा जात नाही... मागे एकदा चार लिहिल्या होत्या तितक्याच...)

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 05:13
वरवर कोरड्या वाटणार्‍या नारळात थंड मधूर पाणी असतं मृगजळ का असेना, अहो वाळवंटातही पाणी असतं

प्रमोद देव Sat, 12/15/2007 - 09:40
ऋषिकेशराव गोफ बाकी मस्त विणलाय तुम्ही आणि इथल्या समस्त कवींनी. मस्त आहे हा खेळ. चालू द्या.

सहज Sat, 12/15/2007 - 09:55
आहे तर खरच आहे काय? नाही तर खरच नाही काय? पंचायत समीती आहे काय? नाहीतर पंचाईत झालीय काय?

In reply to by सहज

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:34
आम्ची पंचाईत झाली अशी इथली पंचायत गेली तशी आहे आमचा क्रमांक चार पण कोण करतो आमचा विचार ? आमच्या नावावर येते लिहून ते असेल कुणाही कडून पण त्याचा आम्ही करता निषेध देती आम्हाला भावनात्मक छेद.. (च्यामारी हे चारोळी लिहिणे वाटले तितके सोपे नाही हो !) - सर्किट

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 10:27
वा वा, गोफ अगदी छान विणलाय सर्वांनी. आम्हालाही लिहायची इच्छा आहे. पण हा काव्यप्रकार आम्ही कधी हाताळलेला नाही. बघतो प्रयत्न करुन काही जमताय का? आपला, (नवखा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 10:31
प्रकाशरावांच्या सुचनेनुसार एक पाचोळीचा प्रयत्न.... आता चोरि बंद करा! अशी मुजोरी बंद करा! अश्लीलता बंद करा! पंचायत, मालक बंद करा! अहो मग बंद करा की बंद करा.. आरडाओरड करून हे सगळं चालू कोण ठेवतय? (झालं गेलं विसरू पाहणारा) ऋषिकेश

In reply to by शलाका पेंडसे

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:37
कंटक कुणाला म्हणावे ? ज्यांनी आजवर केली सेवा, समाजाची, पण कुणीतरी, समजते मालक समाजाचा, कंटकांचा कंटक, कुणीतरी ? (ही मराठी साहित्यप्रकारांच्या विष्ठावळीतील, आमची पाचोळी) - सर्किट

प्राजु Sun, 12/16/2007 - 05:26
का समाजाच्या नावने बोंबलायचे.. तो ही माणसांनीच बनवलेला.. केला कितीही आरडाओरडा तरी गांव तिथे उकिरडा........! - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:57
मी आहे समाजसेवक* असेच सारे म्हणतात कर्तृत्व त्यांचं पाहून ते समाजसेवक** ठरतात *अर्थः समाजाची सेवा करणारा **संधीविग्रहः माजासहित असलेले सेवक ;)

प्राजु Mon, 12/17/2007 - 19:52
समाजाचे नितीनियम आणि संस्कृतीची जाणीव पाळणा-यांसाठी सर्वकाही.. नाहीतर सगळ्याचीच उणीव.. - प्राजु.

मिसळपाववर खोदलेले खड्डे बुजवतांना आम्ही दक्ष राहिलो होतो. म्हणतात की, प्रत्येक खड्ड्यात त्यांनी सुरुंग पेरले होते. ( कोणता प्रकार हाताळला आम्ही कोणास ठाऊक )

ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 06:06
मोकळ्या स्वच्छंदी गगनातही पेरू शकतात सुरुंग.. स्वातंत्र्य झेपत नाही, कारण सवयीचे असती तुरुंग!

प्राजु Tue, 12/18/2007 - 21:54
मंडालेच्या तुरूंगात घडले गीतारहस्य.. सुखावल्या त्या भित्ती अन गजांवर उमटले हास्य.. - प्राजु.

धनंजय Sat, 12/15/2007 - 04:38
देवगिरीला गरजत होती कोटावरची मेंढा तोफ तरी किल्ला गारद झाला नियती विणते मुश्किल गोफ (चारोळी हा प्रकार मला अजून समजलेला नाही, गोखल्यांच्या बहुतेक रचना मला आवडलेल्या नाहीत :-( तरी या वाटेला मी बहुधा जात नाही... मागे एकदा चार लिहिल्या होत्या तितक्याच...)

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 05:13
वरवर कोरड्या वाटणार्‍या नारळात थंड मधूर पाणी असतं मृगजळ का असेना, अहो वाळवंटातही पाणी असतं

प्रमोद देव Sat, 12/15/2007 - 09:40
ऋषिकेशराव गोफ बाकी मस्त विणलाय तुम्ही आणि इथल्या समस्त कवींनी. मस्त आहे हा खेळ. चालू द्या.

सहज Sat, 12/15/2007 - 09:55
आहे तर खरच आहे काय? नाही तर खरच नाही काय? पंचायत समीती आहे काय? नाहीतर पंचाईत झालीय काय?

In reply to by सहज

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:34
आम्ची पंचाईत झाली अशी इथली पंचायत गेली तशी आहे आमचा क्रमांक चार पण कोण करतो आमचा विचार ? आमच्या नावावर येते लिहून ते असेल कुणाही कडून पण त्याचा आम्ही करता निषेध देती आम्हाला भावनात्मक छेद.. (च्यामारी हे चारोळी लिहिणे वाटले तितके सोपे नाही हो !) - सर्किट

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 10:27
वा वा, गोफ अगदी छान विणलाय सर्वांनी. आम्हालाही लिहायची इच्छा आहे. पण हा काव्यप्रकार आम्ही कधी हाताळलेला नाही. बघतो प्रयत्न करुन काही जमताय का? आपला, (नवखा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 10:31
प्रकाशरावांच्या सुचनेनुसार एक पाचोळीचा प्रयत्न.... आता चोरि बंद करा! अशी मुजोरी बंद करा! अश्लीलता बंद करा! पंचायत, मालक बंद करा! अहो मग बंद करा की बंद करा.. आरडाओरड करून हे सगळं चालू कोण ठेवतय? (झालं गेलं विसरू पाहणारा) ऋषिकेश

In reply to by शलाका पेंडसे

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:37
कंटक कुणाला म्हणावे ? ज्यांनी आजवर केली सेवा, समाजाची, पण कुणीतरी, समजते मालक समाजाचा, कंटकांचा कंटक, कुणीतरी ? (ही मराठी साहित्यप्रकारांच्या विष्ठावळीतील, आमची पाचोळी) - सर्किट

प्राजु Sun, 12/16/2007 - 05:26
का समाजाच्या नावने बोंबलायचे.. तो ही माणसांनीच बनवलेला.. केला कितीही आरडाओरडा तरी गांव तिथे उकिरडा........! - प्राजु.

ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:57
मी आहे समाजसेवक* असेच सारे म्हणतात कर्तृत्व त्यांचं पाहून ते समाजसेवक** ठरतात *अर्थः समाजाची सेवा करणारा **संधीविग्रहः माजासहित असलेले सेवक ;)

प्राजु Mon, 12/17/2007 - 19:52
समाजाचे नितीनियम आणि संस्कृतीची जाणीव पाळणा-यांसाठी सर्वकाही.. नाहीतर सगळ्याचीच उणीव.. - प्राजु.

मिसळपाववर खोदलेले खड्डे बुजवतांना आम्ही दक्ष राहिलो होतो. म्हणतात की, प्रत्येक खड्ड्यात त्यांनी सुरुंग पेरले होते. ( कोणता प्रकार हाताळला आम्ही कोणास ठाऊक )

ऋषिकेश Tue, 12/18/2007 - 06:06
मोकळ्या स्वच्छंदी गगनातही पेरू शकतात सुरुंग.. स्वातंत्र्य झेपत नाही, कारण सवयीचे असती तुरुंग!

प्राजु Tue, 12/18/2007 - 21:54
मंडालेच्या तुरूंगात घडले गीतारहस्य.. सुखावल्या त्या भित्ती अन गजांवर उमटले हास्य.. - प्राजु.
लेखनविषय:
3

लहान मुलांची आकलन क्षमता/शक्ती

देवदत्त ·

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 02:42
अगदी खरय.. यावर डिस्कव्हरीवरील आपण म्हणताय तो कार्य्क्रम मी देखील पाहिला आहे. माझं निरिक्षण असं की आताची मुले धड बोलायला यायच्या आत डिव्हीडी प्लेअर चालू बंद करताना मी स्वतः पाहिले आहे.. त्यांना हवे ते कार्टुन ही मुले लावायचा हट्ट देखील करतात :) अशी अनेक छोटी छोटी उदा. आहेत. या "स्मार्ट" मुलांकडे पाहून मी लहानपणी फारच "येडपट" होतो असे वाटू लागले आहे :) (कोण रे तो.. अजूनही फरक नाही पडलाय फार तुझ्यात म्हणतोय ;) ) (येडू) ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 18:23
एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो. देवदत्तराव, आपला छोट्यांच्या मानसशास्त्राचा दांडगा अभ्यास दिसतो आहे! :) सुंदर लेख... अजूनही लिहा ही विनंती! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Sat, 12/15/2007 - 20:37
नाही हो तात्या... दांडगा अभ्यास असे काही नाही. जे आहे ते आतापर्यंतचे निरीक्षण. आता त्या पडण्याच्या प्रकाराचा मित्राच्या मुलावर आम्ही प्रयोग करतो. तो जर पडला, तर खास लक्ष दिल्याचे दाखवत नाही. जर का तो जास्तच रडायला लागला किंवा वाटले की त्याला खरोखरीच लागले असेल, तर मग (आपण जे नेहमी करतो तसे) त्याला सांगतो की काही नाही झाले, किंवा त्या जागेवर त्यालाच चापटी मारायला लावतो. तो ही चापटी मारता मारताच हसायला लागतो.

प्राजु Mon, 12/17/2007 - 09:05
सध्या माझ्या घरात घडताना मी रोज पाहते आहे. माझ्या वयाच्या १८ व्या वर्षी मी काँप्युटर ला प्रथम हात लावला. तेव्हा बोंबलायला इंटरनेट नावाचा काही प्रकार असतो हे माहिती हि नव्हते. आज माझा ४ वर्षांचा मुलगा इंटरनेट एक्सप्लोररच्या ऍड्रेसबार मध्ये www.starfall.com असे टाईप करून ती साईट चालू करून त्यावर मस्त खेळत बसतो.. इतकेच नव्हे तर.. क्रेडिट कार्डवर शॉपिंग करायचे हे ही त्याला माहीती आहे. तो वॉलमार्ट च्या काऊंटरवरचा बिलिंग करणारा माणूस आणि मी शॉपिंग करून त्याच्याकडे बिलिंग साठी यायचे आणि मग कार्ड स्वाईप करून पेमेंट... असा रोजचा खेळ आहे आमचा. - प्राजु (खेळून दमलेली )

सोनम Sun, 03/29/2009 - 16:44
तुम्ही लेख छान लिहिला आहे. :) :) :) माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्यावेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. माझी भाची १ वर्षाची आहे. पण तिला मोबाईल दिला की ती ही कोणते ही बटन दाबून कोणालाही फोन लावते. तिची आकलन शक्ती पाहून मला तर खूप नवल वाटते तिला एवढ्या लहान वयात किती समजते. एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो. लहान मुले कधी पडली तर रडत नाही. स्वत : हा खेळता खेळता पडली तर रडत नाही. आणि आजूबाजूला कोणी असेल तर लगेच रडायला सुरुवात करतात.

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 02:42
अगदी खरय.. यावर डिस्कव्हरीवरील आपण म्हणताय तो कार्य्क्रम मी देखील पाहिला आहे. माझं निरिक्षण असं की आताची मुले धड बोलायला यायच्या आत डिव्हीडी प्लेअर चालू बंद करताना मी स्वतः पाहिले आहे.. त्यांना हवे ते कार्टुन ही मुले लावायचा हट्ट देखील करतात :) अशी अनेक छोटी छोटी उदा. आहेत. या "स्मार्ट" मुलांकडे पाहून मी लहानपणी फारच "येडपट" होतो असे वाटू लागले आहे :) (कोण रे तो.. अजूनही फरक नाही पडलाय फार तुझ्यात म्हणतोय ;) ) (येडू) ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 18:23
एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो. देवदत्तराव, आपला छोट्यांच्या मानसशास्त्राचा दांडगा अभ्यास दिसतो आहे! :) सुंदर लेख... अजूनही लिहा ही विनंती! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Sat, 12/15/2007 - 20:37
नाही हो तात्या... दांडगा अभ्यास असे काही नाही. जे आहे ते आतापर्यंतचे निरीक्षण. आता त्या पडण्याच्या प्रकाराचा मित्राच्या मुलावर आम्ही प्रयोग करतो. तो जर पडला, तर खास लक्ष दिल्याचे दाखवत नाही. जर का तो जास्तच रडायला लागला किंवा वाटले की त्याला खरोखरीच लागले असेल, तर मग (आपण जे नेहमी करतो तसे) त्याला सांगतो की काही नाही झाले, किंवा त्या जागेवर त्यालाच चापटी मारायला लावतो. तो ही चापटी मारता मारताच हसायला लागतो.

प्राजु Mon, 12/17/2007 - 09:05
सध्या माझ्या घरात घडताना मी रोज पाहते आहे. माझ्या वयाच्या १८ व्या वर्षी मी काँप्युटर ला प्रथम हात लावला. तेव्हा बोंबलायला इंटरनेट नावाचा काही प्रकार असतो हे माहिती हि नव्हते. आज माझा ४ वर्षांचा मुलगा इंटरनेट एक्सप्लोररच्या ऍड्रेसबार मध्ये www.starfall.com असे टाईप करून ती साईट चालू करून त्यावर मस्त खेळत बसतो.. इतकेच नव्हे तर.. क्रेडिट कार्डवर शॉपिंग करायचे हे ही त्याला माहीती आहे. तो वॉलमार्ट च्या काऊंटरवरचा बिलिंग करणारा माणूस आणि मी शॉपिंग करून त्याच्याकडे बिलिंग साठी यायचे आणि मग कार्ड स्वाईप करून पेमेंट... असा रोजचा खेळ आहे आमचा. - प्राजु (खेळून दमलेली )

सोनम Sun, 03/29/2009 - 16:44
तुम्ही लेख छान लिहिला आहे. :) :) :) माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्यावेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. माझी भाची १ वर्षाची आहे. पण तिला मोबाईल दिला की ती ही कोणते ही बटन दाबून कोणालाही फोन लावते. तिची आकलन शक्ती पाहून मला तर खूप नवल वाटते तिला एवढ्या लहान वयात किती समजते. एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो. लहान मुले कधी पडली तर रडत नाही. स्वत : हा खेळता खेळता पडली तर रडत नाही. आणि आजूबाजूला कोणी असेल तर लगेच रडायला सुरुवात करतात.
3

नियंत्रणा बाहेर चाललेला ड्रुपल

कोलबेर ·

बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 02:31
प्रियालीताईंच्या पुढील प्रतिसादावरून ड्रुपलच्या चावटपणाची कल्पना सदस्यांना हळूहळू येत आहे असे वाटते - २. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. (चावट!)बेसनलाडू

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:07
मिसळपावाची पत्रिका आताच पाहिली रवी कुंभेत, शनी मकरेत आणि गुरू मसणात असून त्याच्या निराकरणासाठी मालकांनी पारंब्या नसलेल्या वडाला सोवळ्याने १००१ प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे असे आपोआप येणारे प्रतिसाद बंद होतील असे वाटते. किंवा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:20
वा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें? नक्की ! मिसळपावाचे एक सदस्य, आणि मालकांनी ज्यांना घटनासमितीत नेमले आहे, ते श्री. प्रकाश घाटपांडे पोलिसात ड्रुपॅलविरुद्ध केस करण्यात आपल्याला मदत करतील.. कैच्या कैच ! खोटे लिहिण्यास तांत्रिक कारण (मी होमवर्क केले होते गुरुजी, पण मायक्रोसॉफ्ट वर्डने सगळे खाऊन टाकले...) ही कारणे लहान मुले देतात.. प्रकाश काका तुम्हाला सांगतीलच, तांत्रिक कारणे "ऍलिबी" म्हणून दिलीत तर न्यायाधीश किती संतापतात ते.. - (संतप्त न्यायाधीश) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:33
मं इथून प्रतिसाद "आपोआप" उडणे आणि काही प्रतिसाद आपोआप "अवतीर्ण" होणे याचे कारण काय?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:41
आपले मित्र (आदरणीय सरपंच) येथील तांत्रिक सर्वेसर्वा आहेत, त्यांची परीक्षा होऊ द्या आणि मग विचारा की ! ते सांगतील आपल्याला की मानवी दखलांदाजीखेरीज हे होणे शक्य नाही ! (असा आमचा एक अंदाज, बरं का..) - (मानवी) सर्किट (ता. क. तुम्हाला एक खाजगी सांगतो, मानवी डोक्यातून जशा कल्पना निघतात, तशा ह्या ड्रुपॅल सारख्या तांत्रिक डोक्यांतून निघत नाहीत.)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:46
सरपंचांनी आधीच निवेदन दिले आहे आणि या विषयावर अधिक काही बोलणार नाही हे स्पष्टही केले आहे. त्या निवेदनावर विश्वास ठेवला तर इथे होणारे प्रकार हे केवळ "भुताटकी" मध्येच मोडतात. त्यामुळे "भूत दाखवा, १ लाख रुपये मिळवा" या नरेंद्र दाभोळकरांच्या च्यालेंजला आम्ही काउंटर च्यालेंज करत आहोत. कृपया आम्हाला १ लाख रुपये देताना क्याश द्यावी. नसती इन्कमट्याक्सची लफडी नकोत.

ॐकार Sat, 12/15/2007 - 15:14
ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली. आक्षेप१: ड्रुपलने अशी सोय दिलेली नाही :). आक्षेप २: जी सुधारणा, विचार, तंत्र सामन्य माणसापर्यंत पोहोचत नाही त्याला क्रांतीचे लेबल लावण्यात अर्थ नाही :) त्यामुळे ही क्रंती वगैरे नाही :)

बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 02:31
प्रियालीताईंच्या पुढील प्रतिसादावरून ड्रुपलच्या चावटपणाची कल्पना सदस्यांना हळूहळू येत आहे असे वाटते - २. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. (चावट!)बेसनलाडू

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:07
मिसळपावाची पत्रिका आताच पाहिली रवी कुंभेत, शनी मकरेत आणि गुरू मसणात असून त्याच्या निराकरणासाठी मालकांनी पारंब्या नसलेल्या वडाला सोवळ्याने १००१ प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे असे आपोआप येणारे प्रतिसाद बंद होतील असे वाटते. किंवा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:20
वा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें? नक्की ! मिसळपावाचे एक सदस्य, आणि मालकांनी ज्यांना घटनासमितीत नेमले आहे, ते श्री. प्रकाश घाटपांडे पोलिसात ड्रुपॅलविरुद्ध केस करण्यात आपल्याला मदत करतील.. कैच्या कैच ! खोटे लिहिण्यास तांत्रिक कारण (मी होमवर्क केले होते गुरुजी, पण मायक्रोसॉफ्ट वर्डने सगळे खाऊन टाकले...) ही कारणे लहान मुले देतात.. प्रकाश काका तुम्हाला सांगतीलच, तांत्रिक कारणे "ऍलिबी" म्हणून दिलीत तर न्यायाधीश किती संतापतात ते.. - (संतप्त न्यायाधीश) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:33
मं इथून प्रतिसाद "आपोआप" उडणे आणि काही प्रतिसाद आपोआप "अवतीर्ण" होणे याचे कारण काय?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Sat, 12/15/2007 - 10:41
आपले मित्र (आदरणीय सरपंच) येथील तांत्रिक सर्वेसर्वा आहेत, त्यांची परीक्षा होऊ द्या आणि मग विचारा की ! ते सांगतील आपल्याला की मानवी दखलांदाजीखेरीज हे होणे शक्य नाही ! (असा आमचा एक अंदाज, बरं का..) - (मानवी) सर्किट (ता. क. तुम्हाला एक खाजगी सांगतो, मानवी डोक्यातून जशा कल्पना निघतात, तशा ह्या ड्रुपॅल सारख्या तांत्रिक डोक्यांतून निघत नाहीत.)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:46
सरपंचांनी आधीच निवेदन दिले आहे आणि या विषयावर अधिक काही बोलणार नाही हे स्पष्टही केले आहे. त्या निवेदनावर विश्वास ठेवला तर इथे होणारे प्रकार हे केवळ "भुताटकी" मध्येच मोडतात. त्यामुळे "भूत दाखवा, १ लाख रुपये मिळवा" या नरेंद्र दाभोळकरांच्या च्यालेंजला आम्ही काउंटर च्यालेंज करत आहोत. कृपया आम्हाला १ लाख रुपये देताना क्याश द्यावी. नसती इन्कमट्याक्सची लफडी नकोत.

ॐकार Sat, 12/15/2007 - 15:14
ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली. आक्षेप१: ड्रुपलने अशी सोय दिलेली नाही :). आक्षेप २: जी सुधारणा, विचार, तंत्र सामन्य माणसापर्यंत पोहोचत नाही त्याला क्रांतीचे लेबल लावण्यात अर्थ नाही :) त्यामुळे ही क्रंती वगैरे नाही :)
ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली. पण आता त्याही पूढे जाऊन ड्रुपलमध्ये नुसतेच मराठी लिहिण्याची सोय नसून ड्रुपल स्वत:च मराठीत बोलू लागला आहे. तांत्रिक बिघाडामूळे तो जे प्रतिसाद उडवतो त्यावर ड्रुपल आता, ' पंचायतीवरील सदस्यांकडे काही सदस्यांनी व्य नि पाठवून तक्रार केल्यामुळे पंचायतीने आपल्या अधिकारांचा वापर करत येथील काही लेखन आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत!' कळावे, (लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती अशी सही देखिल ठोकून देतो.

विनोद

मनोज ·

सर्किट Sat, 12/15/2007 - 07:43
हल्ली "विनोदावरून" झालेल्या युद्धांमुळे, हा "विनोद" घाबरत घाबरतच उघडला.. छान आहे हो विनोद ! - सर्किट

स्वाती राजेश Sat, 12/15/2007 - 22:04
मी आणि माझ्या मुलाने (वय १० वर्षे) मस्त एजॉय केला. असेच आणखी ..(निखळ विनोद) वाट पाहात आहे.

देवदत्त Sat, 12/15/2007 - 22:52
चांगले आहे... ह्यावरून आणखी एक विनोद आठवला. २ माणसे (नेहमी सरदारच का असतात हो विनोदात?) संग्रहालयात इजिप्तमधील मम्मी (mummy) बघत असतात. पहिला: बघ, केवढ्या पट्ट्या लावल्यात. नक्की ट्रक अपघात झाला असेल. दुसरा: हो रे, खरेच. बघ ट्रक चा नंबर ही लिहिलाय BC-१७६०.

सर्किट Sat, 12/15/2007 - 07:43
हल्ली "विनोदावरून" झालेल्या युद्धांमुळे, हा "विनोद" घाबरत घाबरतच उघडला.. छान आहे हो विनोद ! - सर्किट

स्वाती राजेश Sat, 12/15/2007 - 22:04
मी आणि माझ्या मुलाने (वय १० वर्षे) मस्त एजॉय केला. असेच आणखी ..(निखळ विनोद) वाट पाहात आहे.

देवदत्त Sat, 12/15/2007 - 22:52
चांगले आहे... ह्यावरून आणखी एक विनोद आठवला. २ माणसे (नेहमी सरदारच का असतात हो विनोदात?) संग्रहालयात इजिप्तमधील मम्मी (mummy) बघत असतात. पहिला: बघ, केवढ्या पट्ट्या लावल्यात. नक्की ट्रक अपघात झाला असेल. दुसरा: हो रे, खरेच. बघ ट्रक चा नंबर ही लिहिलाय BC-१७६०.
लेखनविषय:
(मैल वरुन साभार) गुरूजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? चिंटु: माहित नाही गुरूजी. गुरूजी: अरे असे काय करतोस पुस्तकात लिहिले आहे की....१५४२-१६०५ चिंटु: मला वाटले तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

मनोज Sat, 12/15/2007 - 00:10
लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:10
छायाचित्रे छान आहेत. लेख वाचून सवडीने प्रतिसाद देतो.

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:16
बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.

धनंजय Sat, 12/15/2007 - 03:18
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 03:27
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!

सहज Sat, 12/15/2007 - 08:15
अप्रतिम लेख!! सुंदर छायाचित्रे!! प्रा. डॉ. यांनी असेच अनेक गड फत्ते करावेत!!

नंदन Sat, 12/15/2007 - 08:56
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?

आनंदयात्री Sat, 12/15/2007 - 13:30
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 13:55
वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:02
संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती दिनेश Sun, 12/16/2007 - 18:39
लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती

ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:42
अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव

जुना अभिजित Mon, 12/17/2007 - 13:45
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा Fri, 12/21/2007 - 17:57
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.

In reply to by नाना चेंगट

सुहास.. Tue, 06/05/2012 - 04:07
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )

प्रचेतस Mon, 06/04/2012 - 15:06
उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे

सुनील Tue, 06/05/2012 - 01:19
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!

मनोज Sat, 12/15/2007 - 00:10
लेख महीतीपुर्ण आहे. आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत. (फोटोप्रेमी) मन्या

आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:10
छायाचित्रे छान आहेत. लेख वाचून सवडीने प्रतिसाद देतो.

विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:16
बिरुटेशेठ, केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे! औरभी आने दो.. तात्या.

धनंजय Sat, 12/15/2007 - 03:18
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो. मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!

ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 03:27
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!! बाकी लेख उत्तम!

सहज Sat, 12/15/2007 - 08:15
अप्रतिम लेख!! सुंदर छायाचित्रे!! प्रा. डॉ. यांनी असेच अनेक गड फत्ते करावेत!!

नंदन Sat, 12/15/2007 - 08:56
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे. >>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात - हे वाक्य विशेष आवडले. आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?

आनंदयात्री Sat, 12/15/2007 - 13:30
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 13:55
वा वा प्राध्यापक साहेब, अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !! खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले. आपला, (हर्षभरित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sat, 12/15/2007 - 14:02
संपादक मंडळास विनंती, अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते. महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते. अर्थात ही एक सुचवण आहे. आपला, (पर्यायसूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती दिनेश Sun, 12/16/2007 - 18:39
लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली. स्वाती

ध्रुव Mon, 12/17/2007 - 10:42
अहो अप्रतिम..... वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला. -- ध्रुव

जुना अभिजित Mon, 12/17/2007 - 13:45
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे. गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा Fri, 12/21/2007 - 17:57
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान. लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.

In reply to by नाना चेंगट

सुहास.. Tue, 06/05/2012 - 04:07
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>> झाल तुझं बोलुन ?? आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;) (अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )

प्रचेतस Mon, 06/04/2012 - 15:06
उत्तम आणि तपशीलवार लिखाण. देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा. अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली. एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी. -दिलीप बिरुटे

सुनील Tue, 06/05/2012 - 01:19
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला. चांगली माहिती. एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.