मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-)
मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे !
खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ?
आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण...
खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं...
एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं....
ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का?
मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का??
मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
आवडली
वा !
सुंदर!
अती उत्तम