मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रसिकतेसाठी गुणांची आवश्यकता ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 13:41
बिरुटेशेठ, लय भारी चर्चाप्रस्ताव...आवडला आपल्याला! आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे... या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!! ही घ्या आमची काही उत्तरे.. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? संबंधित कलेसंदर्भातील माहिती, अनुभव किंवा ज्ञान जर वाचकाकडे/श्रोत्याकडे असेल तर त्या कलेतील त्याचा आस्वादाचा आनंद निश्चितच दुणावतो. एकवेळ माहिती, अनुभव किंवा ज्ञान हे नसले तरी चालेल, परंतु किमान रसिकता हा गुण मात्र त्याच्याकडे असणे आवश्यकच आहे असे मला वाटते! रसिकताच जर नसेल तर मात्र सगळेच मुसळ केरात! :) उदाहरणार्थ, यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, 'क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. परंतु जो श्रोता जाणकार नाही परंतु रसिक आहे तो नुसतीच, 'क्या बात है!' अशी मनमोकळी दाद देईल! परंतु आनंद मात्र त्यालाही तेवढाच होईल. आणि जो जाणकारही नाही, आणि रसिकही नाही तो काहीच प्रतिक्रिया देणार नाही! :) आमचे काकाजी देवासकर त्याला 'स्थितप्रज्ञ' असं म्हणायचे बरं का! जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ! :) अवांतर - बरं का बिरुटेशेठ, काही मराठी संस्थळांवर तुम्हाला असे बरेच स्थितप्रज्ञ बघायला मिळतील! :)) लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? उतरू शकते, पण नॉट नेसेसरिली! वाचता वाचता, वाचकाच्या मनातली, वाचकाच्या अनुभवविश्वातलीही एखादी कलाकृती वाचकाच्या डोळ्यासमोर उभी राहू शकते/शकत असावी! असे वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याचदा! जसं कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसंच रसिक हा देखील जन्मावाच लागतो असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरू नये! विकसीत करावी लागते ? करता येते! काही प्रमाणात विकसित होऊ शकते! उदाहरणच द्यायचं झालं तर बिरुटेशेठ, आपल्यासारखी मंडळी अगदी अभ्यासपूर्वक आणि भरभरून लोककलेबद्दल लिहितात. ते वाचून त्या कलेबद्दल एखाद्याची रसिकता ही निश्चितच विकसित होऊ शकते असे म्हणण्यास वाव आहे. अस्मादिकांची 'बसंतचं लग्न' ही लेखमाला वाचून काही वाचक गण, जे आधी विशेष ऐकत नव्हते त्यांनी आता हिंदुस्थानी अभिजात संगीत आवडीने ऐकायला सुरवात केली आहे, त्यांच्यात तशी आवड निर्माण झाल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे! वि सू - इथे आमच्या बसंतच्या लग्नाची टिमकी वाजवायचा हेतू नसून केवळ उदाहरणादाखल हे लिहिले आहे असे नम्रतेने नमूद करतो! :) वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? नक्कीच असावा लागतो! असो, बिरुटेशेठ, खरंच चांगला चर्चाप्रस्ताव. या निमित्ताने आपण आम्हाला आमचेही विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला थँक्यू! :) आपला, बापुभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, (जिथे आग्रेवाली रोशन पुरिया गायली होती!) इंदौर! :)

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 23:47
वाह, क्या बात है !!!!!!!! मान गये ऊस्ताद .... "तात्या" कसले जबरदस्त "विश्लेषण करणारे विवेचन" लिहले आहे तुम्ही .... ताते, त्वाडा जवाब नही ..... आमची सुध्धा आपल्या मताच्या आसपास जाणरी मते आहेत ........ नुसताच रसीक .... छोता डॉन

तात्या,चर्चेच्या प्रोत्साहानाबद्द्ल,आवडीबद्दल थँक्स.....!!! :) बाकी रसिकतेच्या बाबतीत आमचे एक ढोबळ मत असे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. असे जरी असले तरी प्रत्येकाला काहीना काही आवडत असतेच. तो त्या कलेचा आस्वाद घेतो. आता आपण दिलेले उदाहरण पाहा....... >>यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. आता आम्हाला यातले यमन माहितच नाही, तेव्हा त्यातले शुध्द मध्यम ही गोष्ट आमच्या डोक्यावरुन जाईल. याचा अर्थ असा झाला की आम्हाला यमनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कलेच्या बाबतीत आस्वादाचेही भिन्न स्वरुप असले पाहिजे असे वाटते ? (अनुष्काचे ) किंवा एखादे सुंदर चित्र पाहिले की, लगेच आपण सुंदर म्हणतो, यमनाचे आरोह-अवरोह समजून मग दाद द्यावी लागेल त्याऐवजी लावणी असेल तर फार बारकावे पाहण्याची गरज नसते ;) मनाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक जण आस्वाद घेत असतो त्याच्याकडे असलेली अभिरुची चोखंदळ व्हावी यासाठी त्या त्या कलेचे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत, म्हणजे चांगली कला चांगल्या वाचकांवर संस्कार करते व त्यास रसिक बनवते तर तो रसिक बनेल रसिकता विकसीत होत असते असे वाटते. बाकी आपल्या मताशी सहमत !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग Sun, 02/10/2008 - 15:56
आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? नक्कीच आहेत. कारण ज्याप्रमाणे कलाकृती निर्माण करण्यासाठी गुणांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना रसिकाचे त्या कलाकृतीसोबत एकरुप होणे गरजेचे असते. ते जेवढ्या जास्त प्रमाणात साधेल तेवढा आस्वाद उच्च दर्जाचा ठरतो. रसिकाला "क्षणस्थ" होता आले पाहिजे. म्हणजे काय? आपण काही उदाहरणे पाहू. प्रभाकर पणशीकर रंगमंचावर 'तो मी नव्हेच' सादर करीत आहेत. त्यांच्या भरदार आवाजात ते एखादे वाक्य असे काही फेकतात की बस! निर्लज्ज लखोबाला पायातली काढून मारावी असे तुम्हाला वाटले तर ती मोठी दाद असते! पण तसे होण्यासाठी प्रेक्षक त्या संवादात, त्या प्रसंगात लखोबाच्या बरोबरीने जात असले पाहिजेत, म्हणजेच ते त्या 'क्षणात स्थित' असायला हवेत. छोटा गंधर्वांचं 'वद जाउ कुणाला' सुरु आहे, एखादीच जागा अशी काही येते की माझ्यासारख्या संगीतातल्या जाणकार नसलेल्यालासुध्दा बालगंधर्वांचा भास होऊन जातो आणि अंगावर रोमांच उभे राहतात. मग तात्यांसारख्या, गाणार्‍यांच्या डोळ्यात पाणी आलं तर नवल नाही. इथेही श्रोता त्या पदातल्या शब्दांबरोबर, तानेबरोबर जात असायला हवा. भाईकाकांचे 'चितळे मास्तर' वाचताना पहाटेच्या वेळी मास्तरांच्या ओसरीवर चालणारा अभ्यासवर्ग आणि त्यात 'रघुवंश' म्हणणारे मास्तर डोळ्यांसमोर आणता यायला हवेत. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? कोणतीच कलाकृती जशीच्यातशी रसिकाच्या मनात उतरू शकेल असे मला वाटत नाही. कारण कलाकार आणि रसिक ह्या मुळात दोन वेगळ्या व्यक्ती असतात. त्यांचे अनुभव, त्यांचे त्या गोष्टीतले ज्ञान वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते; त्यामुळे त्यांना जाणवणार्‍या गोष्टीत फरक हा असणारच. शिवाय निर्मिती ही बरीचशी अमूर्त असते त्यामुळे त्यामागे कार्य करणार्‍या गोष्टी ह्या अव्यक्तच असतात. त्यामुळेही निर्मिती आणि आस्वाद ह्यात अंतर असणे स्वाभाविक वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याच प्रमाणात असावी असे वाटते. कारण ज्याप्रमाणे कलाकाराला काही गोष्टी ह्या जन्मतः असाव्या लागतात तसेच कलाकृती बद्द्लची ओढ ही मूलतः असावीच लागते. त्याशिवाय तुम्हाला ती अनुभूती घेण्याची इच्छा होणार नाही. विकसीत करावी लागते ? हो निश्चीतच. अनुभवाने, अभ्यासाने रसिकता विकसित होते. कलेचे मर्म कशात आहे हे समजण्यासाठी रसिकांनासुद्धा अभ्यास आवश्यकच. चांगल्या मैफिली, नाटके, सवाईगंधर्व सारखे महोत्सव ह्यातून ह्यातून अनुभव समृध्द होतो आणि आस्वाद घेण्याची क्षमता विकसित होते. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? चांगला वाचक म्हणून मोठे व्हायचे असले तर असावाच लागतो. हे खरे तर कुठल्याही कलेच्या बाबतीत खरे आहे. संवेदनशील असणे ही कलाकार आणि रसिक होण्यातली पहिली पायरी आहे असे मला वाटते. चतुरंग

भडकमकर मास्तर Sun, 02/10/2008 - 16:06
पुण्याला एफ्टीआयाय फिल्म इन्स्टित्युट मध्ये एक फिल्म ऍप्रिसिएशन चा कोर्स आहे ...... सिनेमाचे आस्वादन.... The curriculum includes theoretical and practical study of the art and history of film and the development of cinema as a medium of art and communication. Film classics both Indian and International will be used for critical analysis and study. _________________________________ "आता कलेचे आस्वादन शिकवून येते का? " असा प्रश्न काही लोक नक्कीच विचारणार... माझ्या मते रसिक माणसाला अधिकाधिक थिअरी शिकल्यास कलेच्या आस्वादनात अधिक खोली यायला मदत होते....मात्र आधी निदान विषयाची आवड आणि समजून घ्यायची इच्छा हवी तरच अधिक चांगला रसिक शिकवून बनवता येऊ शकतो, असे माझे स्वतःचे मत आहे... अवांतर : आता हेच पहा ना, क्रिकेट पाहताना एखादा फलंदाज यॉर्क होतो आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतो, मजा येते...पण चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो ते शिकल्यास रिव्हर्स स्विंग होत असताना योर्कर वर बोल्ड करणार्या गोलंदाजाच्या कलेचे , मेहेनतीचे अधिक आस्वादन करता येते... म्हणजे क्रिकेट ची मुळात आवड असणार्याने ही अधिकाधिक माहिती करून घेतली तर तो चांगला क्रिकेट आस्वादक होऊ शकतो...!! (कुठे ही क्रिकेट चे उदाहरण द्यायची आवड असणारा ) स. भडकमकर

सहज Sun, 02/10/2008 - 17:40
रसीकता विकसीत करावी लागते ? एकदम महत्वाचा विषय आहे माझ्यासाठी. इथे मातब्बर लोक आहेत त्यांनी कृपया शिकवणी घ्यावी. तात्यांनी संगीत विषयात एक भाग लिहला होता, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत बरेच जण आहेत. १) कविता कळत नाही. पण विडंबन सुचते, बर्‍यापैकी समजते. २) तसेच शिल्पकला, चित्रकला, मॉडर्न आर्ट च्या नावाने बोंब मला वाटते शालेय अभ्यासक्रमात जमले तर हे सगळे समजवून सांगीतले पाहीजे. नाहीतर कुठेतरी लिहुन येते की अमुक चित्र, शिल्प चोरीला गेले त्याची किंमत इतकी लाख डॉलर्स आहे की मगच धस्स होते. चित्र/ शिल्प पाहुन "हे काय आहे?" असेच होते. बरेच लेखक व काही गुणी रसीक यांना नेहमी प्रश्र पडत असतो की अरे इतका चांगला लेख पण प्रतिसाद इतके अल्प... पण कारण असेलच ना. जसे सुग्रास भोजन खायला आवडते तितकेच कधीतरी फक्त आमटी भात फारतर पापड देखील "आहाहा" वाटु शकतो. पण तो भात, ती आमटी विशिष्ट प्रकारे केलेली असावी लागते. सरसकट कुठलाही आमटी भात नाही. सगळ्यात महत्वाची कला व त्याचे सादरीकरण. एका विशिष्ट विषयावर अनेक चित्रपट येतात पण सगळेच सुपरहीट होत नाहीत. का बरे? रसिकता ही जन्मजात असते ? कोणालाही त्यांचे मत अगदी समोरासमोर विचारले तर ९९% लोक सुरवात हीच करतील की, "मी काही तज्ञ नाही पण मला असे वाटते.." रसिकता म्हणण्यापेक्षा आवड, मते सगळ्यांची असतात. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? लेखकावर अवलंबुन. तोच तसा प्रयत्न करु शकतो. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? प्रत्येक वाचक हा संवेदनाक्षम असतोच. कोणाच्या मते जादा तर कोणाच्या कमी. :-) एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? हो किंवा नाही. हो ह्या करता की काही क्लीष्ट विषय जसे शास्त्रीय संशोधन (अंतराळ विज्ञान) किंवा कुठली अभिजात कला (क्लासीक आर्ट??) जसे शास्त्रीय संगीत समजायला त्या विषयातील थोडेसे ज्ञान/माहिती / पुर्व परिचय थोडासा पाहीजे. ललीत लेखनात तसा वाचकाकडे नसला तरी लेखकाने जास्त संभ्रम होउ शकेल असे लिहता कामा नये, जरी एखादा धागा नीट बांधला गेला नाही लेखात/ काव्यात तरि लेख/काव्य संपायच्या आता त्या विणी घट्ट केल्या पाहीजे.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 17:41
१. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. म्हणून तर अनेक श्रीमंत लोकांकडे घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवलेली असतात. परंतु ब-याच वेळा चिकटलेली पाने विलग केलेली नसतात. असे लोक शैक्षणिक काळात भरपूर वाचतात. परंतु त्यांच्या नजरेसमोर प्रश्नोत्तरे असतात. आम्हाला ११+४ बी एस सी च्या १ल्या वर्षी पु भा भाव्यांची १७वे वर्ष ही कथा होती. ब-याच मुलांना ती कळली नाही. २. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. खरे आहे. म्हणूनच काहीहि साहित्यमूल्य नसलेल्या शृंगारिक कादंब-या भरपूर खपतात आणि चांगले कवितासंग्रह फारसे खपत नाहीत. ३. एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? होय. नाहीतर मला मर्ढेकरांची कविता एकदा वाचून जाणकारांचे मत वाचल्याशिवाय कळली असती. जी. ए. ची कथा पंचविशीत वाचतांना वेगळी वाटते व चाळिशीनंतर वेगळी वाटते. याचा अनुभव आपल्याला चाळिशीनंतरच घेता येईल. ४. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. लेखकाचे अनुभवविश्व व वाचकाचे अनुभवविश्व वेगळे असण्याची शक्यता जास्त असते. खास करून जेव्हा आपण एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवरील चित्रपट पाहतांना याचा अनुभव येतो. लेखकाला चित्रपट बहुधा आवडत नाही. कारण त्याच्या मनातील प्रतिमा वेगळी, दिग्दर्शकाच्या मनातील वेगळी, कॅमेरामनच्या मनातील वेगळी आणि प्रेक्षकाच्या मनातील वेगळी असते. लेखकाचे काही अनुभव वाचकाला ठाऊक नसण्याची शक्यता असते. उदा. अमेरिकेतील वा युरोपातील लेखकाच्या मनातील ट्रॅफिक उजव्या बाजूने जाणार व भारतातील वाचकाच्या मनातील डावीकडून. आयर्व्हिंग वॉलेसची 'फर्स्ट लेडी' वा 'सेव्हन्थ सीक्रेट' किंवा ' ऑर्थर हॅले ची 'मनीचेंजर' किंवा 'हॉटेल' (मुळातील. भाषांतरित नव्हे) वाचावी. ५. रसिकता ही जन्मजात असते ? होय. ६. विकसीत करावी लागते ? होय. शिकल्याशिवाय आणि अनुभवाशिवाय कळणारच नाही. शास्त्रीय संगीत तर शिकल्याशिवाय कळणारच नाही. ७. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? हा प्रश्नच खरे म्हणजे मला कळला नाही. वाचक हा साहित्याचा वाचक हे मी गृहीत धरले आहे. वकिलाची नोटीस अथवा सरकारी/व्यावसायिक पत्र वाचणारी व्यक्ती म्हणजे वाचक नव्हे. संवेदना नसेल तर शब्दाला/वाक्याला काही अर्थच राहणार नाही. नाहीतर फार शहाणा आहेस असे म्हटले तर कोणीहि खूश होईल. साहित्यातील नवरस संवेदनेशिवाय कसे कळणार?

सर्वच प्रतिसाद आवडले. मात्र रसिकांकडे कोणते गुण आवश्यक आहेत त्याचीही जरा चर्चा व्हावी असे वाटते. आम्ही काही प्वॉइंट काढले आहेत ? ते सायंकाळी टंकतो :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:48
रसिक होण्यासाठी एक महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे पेशन्स... समोरची व्यक्ती जे लिहिते, बोलते ते समजून घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. गाणे ऐकणे, कविता वाचणे, सिनेमा पाहणे, लेख वाचणे, जोक समजणे या सगळ्यांसाठी थोडीफार उपजत रसिकता अंगी असावी लागते. पण ती नसेल तर अंगी बाणवता येते. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, वावरतो तिथल्या वातावरणानुसार एखाद्या विषयांत रूची वाटू लागते. आमच्या घरी माझी आतेबहीण शिकण्यासाठी रहात होती. ती कोकणांतली आहे. तिला क्रिकेट मध्ये विशेष रस नव्हता. पण जेव्हा वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा आमच्या घरी सतत त्याच चर्चा आणि विषय.. यामुळे तिलाही क्रिकेट आवडू लागले. ती न चुकता आमच्या बरोबरीने मॅचेस् पाहू लागली. - प्राजु

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 10:23
हे मूळ गुण असल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. एक उदाहरण घेऊ. विनोद सगळ्यांनाच आवडतात(टवाळा आवडे विनोद.. असे समर्थ म्हणाले होते. त्याचा संदर्भ वेगळा आहे बरंका) पण विनोद जर का डोक्यावरून गेला आणि त्याची चिरफाड करायचा प्रयत्न केला गेला तर काय गंमत उरेल? म्हणजे जसे विनोद समजायला विनोदी बुद्धीची आवश्यकता आहे तसेच तिथे शाब्दिक आणि भाषिक ज्ञानही आवश्यक आहे. संगीत समजायला तसा कान लागतो असे म्हणतात. म्हणजे खरे तर जे काही सुश्राव्य आहे त्याला संगीत म्हणायला काय हरकत असावी? पण सुश्राव्यतेबरोबर जर संगीतशास्त्राची जाण असेल तर ती दुधात साखर ठरेल. आता कुणी म्हणेल की बासुंदी गोड आहे किंवा मस्त झालेय हे सांगायला ती कशी करतात हे ठाऊक असण्याची काय जरूर? तर हेही तितकेच बरोबर आहे. बासुंदी मस्त झालेय इतके सांगितले आणि चवीने ती खाल्ली(की प्यायली?) की झाले. त्यातच सगळी पावती मिळाली. आता हे झाले सामान्य रसिकाचे मत. पण एखादा संगीतज्ञ गाणे नुसतेच श्राव्य नव्हते तर 'अमूक एका ठिकाणी घेतलेली तान अथवा सरगम काय बहारीची होती' हे सांगतो तेव्हा ती रसिकता जास्त दाद देऊन आणि घेऊन जाते. तेव्हा मला असे वाटते की कोणत्याही क्षेत्रातल्या रसिकांचे ढोबळ मानाने दोन गट करता येतील. एक सर्वसामान्य रसिक जो केवळ 'आवडले, छान आहे अथवा खास नाही, दम नाही ' असे म्हणेल आणि दुसरा दर्दी रसिक जो 'छान आहे, आवडले अथवा खास नाही, दम नाही' हे नेमके कशामुळे ते सांगू शकेल. रसिकता ही नैसर्गिकपणे सगळ्यांकडेच असते. मात्र ती काही विषयांपुरती सिमीत असण्याचीही शक्यता असू शकते. कुणाला काव्य आवडते.कुणाला गद्य आवडते. कुणाला संगीत मग ते कोणतेही असो, तर कुणाला निव्वळ सुगम, कुणाला फक्त गजल वगैरे असे रसिकतेच्या बाबतीत फरक आढळतील. कुणाला नर्तन आवडत असेल, त्यातही पोटभेद असू शकतात. शिल्पकला,चित्रकला अशा कितीतरी कला अजून आहेत की ज्यात आवड असणारीही असंख्य माणसे आहेत. थोडक्यात काय तर रसिकता प्रत्येकात असते. पण ती नेमक्या कोणत्या बाबतीत हे सांगणे कठीण आहे. एखाद्या बाबतीत रसिकता दाखवणारा माणूस दुसर्‍या एखाद्या बाबीबाबत साफ 'औरंगजेब' असू शकेल. पण तरीही तो रसिक आहेच. कारण रसिक म्हणजे तरी काय हो? एखाद्या गोष्टीत जो रस घेतो अथवा दाखवतो तोच रसिक. म्हणजे कशातच रस नाही असा माणूस मिळणे दूर्मिळच असावा नाही का? (मला वाटतेय की मला काय म्हणायचे आहे ते मला नेमकेपणाने मांडता आलेले नाहीये तरीही इथले 'रसिक' वाचक ते नक्कीच समजून घेतील ह्याची खात्री आहे.)

धनंजय Mon, 02/11/2008 - 12:29
साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? होय. समजण्याची इच्छा पाहिजे, कलाकाराचे मन जाणण्याची सह-अनुभूती-क्षमता पाहिजे, कलाकाराचे माध्यम थोडेफार समजले पाहिजे. समजण्याची इच्छा : कलेचा आस्वाद घेण्याची इच्छा नसल्यास तो बळेच घेता येत नाही. दहाएक दिवसांपूर्वी येथे एका संगीताच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मन कुठल्यातरी काळजीत व्यस्त होते, पण तिकीट आधीच विकत घेतल्यामुळे तसाच गेलो. पहिला एक तास वाद्यवृंदाचे वाजवणे नीट ऐकले नाही, उगाच समोर काही संगीतमय गोंगाट होत असल्यासारखा वाटला. मग मन शांत झाले, आणि कार्यक्रमाचा पुढचा भाग आवडला. सह-अनुभूती-क्षमता : कला (प्रस्तुत केली तर - कलाकाराच्या स्वांतसुखाय नव्हे) ही कलाकाराचा रसिकाशी संवादरूप असते. स्वकेंद्रित व्यक्ती तो संवाद समजून घेऊ शकत नाही. माध्यम थोडेफार समजणे : एक उदाहरण घेऊन बघूया. बेटहोवन च्या नवव्या सिंफोनीचे. लहानपणी कोरलचा गानमेळ मी केवळ गोव्यात चर्चमध्येच ऐकला होता. त्यामुळे पाश्चिमात्त्य गानमेळ ऐकला की मला केवळ एकच विचार मनात येई - ही प्रभूच्या भव्यदिव्यतेची आळवणी आहे. त्यामुळे नवव्या सिंफोनीचा गानमेळाचा भाग ऐकला की माझ्याकडून साधारण त्याच अर्थाचे रसग्रहण होई. खालील यूट्यूब फितीत ऐकावे : आता खालील यूट्यूब फितीत ३:४० मिनिटे बर्नस्टाइन मास्तर भूमिका त्यांची समजावतात. मग वाद्यमेळ/गायन सुरू ५:३०. पण रेकॉर्डिंगचा दर्जा तितका चांगला नाही - तरी बर्नस्टाईनचे म्हणून वाटल्यास ऐकावे. जेव्हा मला प्रथम समजले की ही धुन त्या काळातल्या मद्यालयात गंमत म्हणून गायची धुन आहे, जी बेटहोवनने उचलून घेतली, तेव्हा माझा विश्वासच बसेना. पदाचे जे शब्द आहेत ते शिलरचे आहेत की मानवांनी मित्र म्हणून एकत्र यावे वगैरे... म्हणजे तेही चर्चमधले नाही! अर्थात हे संगीत, काव्य दारुड्यांच्या बरळलेल्या गाण्यापेक्षा खूपच उदात्त झालेले आहे, भावगर्भ झालेले आहे, पण "प्रभू किती भव्यदिव्य" हा तो भावगर्भ नाही, आणि संगीताचे बीजही नाही. अशा प्रकारे संगीताची नीट ओळख होण्यापूर्वीही मी काही रसास्वाद घेत होतो, मला आनंद होत होता, परंतु त्या कलाकाराचे माध्यम ओळखीचे होईपर्यंत माझा रसास्वाद आणि कलाकाराचा मनातला संदेश यांत जमीन-आस्मानाचा फरक होता. असेच लेखनाबाबत, अन्य कलांबाबत. असले पाहिजेत का ? होय. माझ्या वतीने याचे उत्तर मी वरती दिलेले आहे. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. त्या कलाकृतीशी लेखकाचे एक भावविश्व आणि अनुभवविश्व जडलेले असते. ते सर्व त्या तोकड्या शब्दांत उतरू शकणार नाही. त्यातील अनेक तपशील लेखक गृहीत धरतो - ते लिहीत नाही, पण ते तपशील वाचकापाशी नसतात. वाचकाकडे त्याचे आपले भावविश्व आणि अनुभवविश्व असते. तो त्यांचा संदर्भ घेऊन त्यांचा अर्थ लावतो. कधीकधी आपल्या अनुभवविश्वात तफावत आहे हे कळूनसुद्धा वाचकाला अर्थ पूर्ण तपशीलवार भावनांसकट लावता येत नाही. उदाहरणार्थ नाटक "संगीत शारदा" घेऊया. यात एक जरठ-कन्या विवाह नाटकाचे कथानक आहे. मुलीचा गरीब बाप पैशाच्या लालसेने एका जख्ख म्हातार्‍या श्रीमंताशी लग्नाचे ठरवतो. त्यात तरुण तडफदार नायक अनेक परीने प्रयत्न करतो पण लग्न रोखण्यात अपेशी ठरतो. नाटकाच्या अगदी शेवटी अंतरपाटावर असे लक्षात येते की लग्नाच्या हावेने श्रीमंत म्हातार्‍याने आपले गोत्र खोटे सांगितले आहे. खरे गोत्र मुलीशी एकच असते, आणि भटजी सगोत्र विवाह लावण्यास ना करतात. अशा प्रकारे हे भयंकर लग्न टळते. मी माझ्या कुटुंबात/मित्रमंडळीत अनेक सगोत्र विवाह बघितले आहेत. माझ्या मते या अंताने काहीच खरे साध्य होत नाही. उलट खरा मुद्दा, जरठ-कन्या विवाह, हा बाजूला पडतो. इथे कन्येची विक्री थांबवायला रूढी बदलण्याऐवजी, या एकाच लग्नाला लागू असलेली आणखी पुरातन रूढी वापरली आहे, हे माझ्या मते चूक आहे. आता त्या काळाचा संदर्भ घेऊन मी नाटकाचा अर्थ लावतो, पण ते म्हणजे मारून मुटकून समज पटवणे. त्या नाटकाच्या लेखनाच्या काळी तो अंत प्रेक्षका-वाचकांना मनापासून योग्य वाटत असे. माझे अनुभवविश्व इतके वेगळे आहे की मला ती कलाकृती त्या अर्थाने अनुभवणे शक्यच राहिलेले नाही. कमीअधिक प्रमाणात अशी दरी प्रत्येक लेखका-वाचकात असते. रसिकता ही जन्मजात असते ? होय आणि नाही. दुसर्‍या मनुष्यांबरोबर सह-अनुभूती प्रस्थापित करण्याची ओढ जन्मजात असते. पण कलेच्या एखाद्या आविष्कारातून आपल्याला कलाकाराच्या मनःस्थितीची अनुभूती होणे जन्मजात नसते. कलाकाराच्या अनुभवविश्वाशी ओळख लागते, आणि त्या कलामाध्यमातले "गृहीत आहेत म्हणून सांगणार नाही" असे तपशील काही प्रमाणात शिकावे लागतात. कथक नाचात "शिखर" मुद्रा करून हात वरती नेला म्हणजे "धनुष्य" अर्थ समजतो, हे शिकल्याशिवाय कळायचे नाही. (शिखर मुद्रा केलेला हात कपाळाजवळ वरती नेला की "टिळा लावणे" हा अर्थ होतो, तो बहुतेक भारतीयांना कळतो, बिगरभारतीयांना नाही.) विकसीत करावी लागते ? होय. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? होय.

तुम्ही लोक इतके जड शब्द वापरत आहात ते माझ्यासारख्या अज्ञ जीवास उमगत नाहीत. त्यापेक्षा भाऊसाहेबांनी कसे २ ओळीत सांगून टाकले आहे 'दोस्तहो मैफील आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे''जिन्दादिली ' नुसती हवी" -रसि़क डॅनी पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 23:11
सर्वप्रथम , बिरुटेसरांचे धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन. पहिल्या दर्जाचे दोन्ही : चर्चाविषयही आणि चर्चाही. "रसिकता" या विषयाची व्याप्ति आणि खोली फार मोठी ; माणूसपणाच्या काही महत्त्वाच्या खुणांपैकी ही एक ; यात शंका नाही. मला असे वाटते की रसिकता हा एक प्रकारचा परकायाप्रवेश आहे : आपल्या माध्यमाद्वारे लेखक/चित्रकार/गायक/संगीतकार/कवी/ शिल्पकार जे मांडतात ते समजून घेण्याकरता आपल्याला त्याच्या डोळ्यानी पहाण्याची, त्याच्या कानांनी ऐकण्याची , त्याच्याशी समधात होण्याची क्षमता असायला हवी. जितका हा परकायाप्रवेश रसिकाच्या अंगात भिनेल तितकी कलाकृती कळायला मदत होणार. रसिकतेचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे तिची सार्वभौमता. एखादी गोष्ट एखाद्याला आवड्ण्याची अनेक कारणे असतील ; इतराना ती कारणे प्रसंगी पटोत न पटोत. अणि कुठल्याही कारणाशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल रस वाटण्याचे स्वातंत्र्य रसिकाना असतेच ! या बाबतीत खूप मागे वाचलेले एक वाक्य मनावर कोरल्यासारखे झालेय : "प्रत्येक कलाकृती नव्या वाचक/प्रेक्षक/रसिकाच्या मनात नव्याने जन्म घेते !" सांस्कृतिक संदर्भांची आवश्यकता : कदाचित अमूर्त कलाप्रकारांबद्दल हा मुद्दा लागू होणार नाही. पण काँक्रीट आर्टीफॅक्ट्स बद्दल (मराठी शब्द) हे निश्चित खरे आहे की, ज्या वातावरणामधे , "अवकाशामधे" एखादी कलाकृती आकार घेते, रसिकाला त्याचा कुठेतरी स्पर्श व्हावा लागतो. शेवटी कुठलीही कलाकृती एका पातळीवर "मेक्-बिलिव्ह" (मराठी शब्द?) असते. हे "मेक्-बिलिव्ह" यशस्वी होण्याकरता तुम्हाला अनेक संदर्भांचे ज्ञान उपयोगी , प्रसंगी आवश्यकही ठरते.

असे जेव्हा रंगमंचावर पडद्यामागुन आवाज येतो, तेव्हा रसिकाची किम्मत आम्हाला कळते. वरील सर्वच सुंदर प्रतिसादात रसिकाविषयी मत व्यक्त झालेच आहे तरी अजून काही सांगण्याचा मोह आवरत नाही. रसिकाच्या ठिकाणी जिज्ञासा हवी:- म्हणजे कलेचा, अनुभव पुन्हा घेता यावा किंवा त्या पातळीवर जाता यावे. मनाची पवित्रता हवी :- कलाकृतीचा आस्वादाच्या वेळी रसिकाचे मन शुद्ध, असले पाहिजे. रसिकाची पाटी आस्वादाच्या वेळी कोरी असली पाहिजे म्हणजे पुर्वग्रह नको. कलेची जाण असली पाहिजे:- कलेच्या आस्वादासाठी ज्ञानाची गरज आहे. रसिकाला वेगवेगळ्या क्षेत्राविषयी ज्ञान असले पाहिजे, जसे भाषा, दैनंदिन व्यवहार, विज्ञान, राजकारण, समाज, संस्कृती,चे ज्ञान असले पाहिजे. कलेविषयी आपूलकी,सहानुभूती असली पाहिजे. संवेदनक्षमता सर्वांमधे असते पण त्याची तीव्रताही महत्त्वाची आहे. सुचकता रसिकाला आस्वादाच्या पातळीवर नेण्यास मदत करते. संवेदनक्षमतेमुळे कलेच्या सौंदर्याचा शोध घेता येतो. आस्वादकाने कलेचा सन्मान केला पाहिजे. कलेकडे सह्दयेतेने पाहता आले पाहिजे. आणि शेवटी आस्वाद घ्यायचा कशासाठी ,तर नुसता आनंदासाठीच ना !!! तो घेता आला पाहिजे. कधी-कधी आस्वादकाकडूनच कलेचे वेगवेगळे अर्थ समजत असतात. म्हणुन नेहमी म्हटल्या जाते की "" कवी म्हणजे बोलका रसिक, तर रसिक म्हणजे मुका कवी " कल्पनाशक्ती, एकाग्रता, हे आणि असे अनेक गुण रसिकाच्या ठिकाणी असले पाहिजेत असे म्हणता येईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 02:39
ही एकाने लिहिलेली ऒर्कुट वरील कविता माझी ताई तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देते वडीलान सारखे प्रेम देते आजोबान सारखा मुका देते अज्जी सारखा खाऊ देते कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई भाऊबिजेला खुप Dairymilk आणायचिस मला छान छान खेल्णी द्यायाचिस मला रक्षा बन्धन ला शोधून शोधून रखी आणायचिस मला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई पिक्चर बघायला पैसे द्यायाचिस तू रात्रि अपरात्री चोरून घरात घ्यायाचिस तू माझ्या मैत्रिनिंचे फ़ोन घ्यायाचिस तू स्वताच्या नावा खाली पचवायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई सुख दुखात सम्भालुन घ्यायाचिस तू माझे पोट भरन्या साठी उपाशी राहिलिस तू माझ्या साठी आई बाबान चा ओरडा खाल्लास तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई खुप खुप दंगा मस्ती करायचो आपण आई बाबान बरोबर खुप फिरयाचो आपण आज्जी अजोबंच्या बरोबर पिझ्झा खायचो आपण खुप खुप त्रास द्यायाचो आपण कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई मला खोटे सांगून धोक्याचा इशारा द्यायचिस तू बाबाना राग आला की मला लपून घ्यायाचिस तू आई बरोबर जाउंन भाजी आनायाचिस तू माझ्या आव्डिची भाजी करायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देत रहा तू मला बाबान सारखे प्रेमदेत रहा तू मला आजोबान सारखा मुका देत रहा तू मला आज्जी सारखा खाऊ देत रहा तू मला बस एवढेच सन्गायाचे आहे तुला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई >>>>>>>>>>>>>>>>>>> त्यावर अभिप्राय मागितला होता... ..आम्ही लिहिले की भावना योग्य आहेत, पण ओळी एकापुढे एक लिहिल्या तर निबंध उत्तम होईल... आणि खूप जणांनी छान आहे असे लिहिले...ही कविता ( ?) आवडली??? आता इथे रसिक कोण? ...कवीची संकल्पना उमजलेले रसिक की टीका करणारे आम्ही अरसिक???

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 02/13/2008 - 03:20
यात एका प्रकारची लय आहे, म्हणून ही कविता आहे असे मला पटते. हा मुक्तछंद आहे. ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते. पण लिखाणाचा दर्जा मात्र सुमार वाटला. म्हणजे "कविता आहे, पण छान नाही" म्हणणारा मी या रसिक-अरसिक वर्गीकरणात त्या ऑर्कुट मित्रमंडळात कुठे पडेन? (उलट इथेच मागे तात्या यांनी लिहिलेले "कुणी मत देता का मत" हे प्रकटन कविता नसून दर्जेदार आहे, असे वाटले. रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 09:14
ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते अगदीच गद्य नाही,अर्थात कवितेच्या दर्जाने वैतागून मी तसे लिहिले होते... पण मी आता विचार करतो की मी कोण दर्जा ठरवणारा??खूप लोकांना आवडली कविता...( म्हणजे भ्रमणध्वनी संदेश पाठवून गायक ठरवण्यासाऱखे ..संख्येवर बरे वाईट ठरवणे..)ज्यांना ही कविता खरंच आवडली, त्यांच्यासाठी मी एक अतिशहाणा मुजोर माणूस असणार, इतक्या चांगल्या भावनेला आणि कवितेला नावे ठेवणारा....आणि मी स्वतः मनातून हायसे मानणार की मला असल्या कविता आवडत नाहीत...मग संदीप खरेची एखादी आवडलेली कविता म्हणणार, मला बरे वाटणार्..मग त्याला शिव्या घालणारे लोक मला अजाण रसिक समजणार आणि स्वतः मर्ढेकर/ चित्रे/ग्रेस इ. तेच फक्त महान कवी आहेत असे म्हणणार...वगैरे...म्हणजे ही रसिकतेची उतरंड तयार होते, पण रसास्वाद हा प्रत्येकाचा निराळा असतो का? माझी ताई या कवितेने काहींना खूप आनंद दिला असेल, तो आनंद कालिदासाच्या रचना समजून घेताना होणार्या रसास्वादाच्या आनंदापेक्षा कमी मानायचा का? हेच सगळे संगीताच्या बाबतीत....शास्त्रीय संगीत ऐकणारे, जाणणारे या रसिकतेच्या उतरंडीवर सर्वात वरती बसून आहेत असा एक लोकप्रिय समज...मग पॉप , फिल्म वाले....पण रसास्वादाचा आनंद प्रत्येकाचा समान नाहीका ? मला फक्त शास्त्रीय संगीत आवडतं असं म्हणणारा रसिक इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो का? रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.) हे अगदी पटले.... म्हणजे पुन्हा जे काही लिहिले आहे ते चांगले आहे की वाईट इतकेच उरते... ( इथे सिनेमाचे समांतर उदाहरण किंवा समांतर सिनेमाचे समांतर उदाहरण आठवते.... आता आर्ट फिल्म असा शब्द सर्रास वापरतात लोक, मग उरलेल्या फिल्म काय नॉन-आर्ट / अकलात्मक असतात काय? बर्या /वाईट असतील पण त्यांची कलाच नाही?. हे अन्यायकारक आहे.....तरी आता ही समांतर नाटके आणि फिल्म्स यातली दरी थोडी का होईना, कमी होतेय)..असो फिल्म चांगली तरी असते किंवा वाईट तरी...

In reply to by भडकमकर मास्तर

अमित.कुलकर्णी Fri, 02/15/2008 - 07:09
अहो, शास्त्रीय संगीत ऐकणार्‍यांमध्ये पण एक उप-उतरंड आहे असे मी बघितले आहे. उदाहरणार्थ 'ज' या एका गायकाची गाणी ऐकणारा रसिक हा 'क' किंवा 'भ' या गायकांची गाणी ऐकणार्‍यांपेक्षा कमी दर्जाचा ठरवला जातो. थोडक्यात म्हणजे, ज्याला जे आवडते, ते त्याने करावे / ऐकावे / बघावे असे आम्ही हल्ली करतो. अमित ------------------------------------------ Doing what you don't like is -being employed and not liking what you do is common human nature!

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 21:39
अ पासून ज, क, भ सहित ज्ञ पर्यंत सर्वांना भिडते ते अभिजात अशी माझी अभिजाततेची व्याख्या आहे. दिल क्या चीज है ... हे गाणे मुज-याचे आहे म्हणून कोणत्याहि बड्या ख्यालाच्या तोडीचे नाही असे कोणहि म्हणू शकत नाही. एखादी ढंगदार लावणी एखाद्या तथाकथित उच्च दर्जाच्या कविते एवढी किंवा जास्त श्रेष्ठ असू शकते. कांहीची उंची सुबोध तर काहीची दुर्बोध. परंतु निव्वळ दुर्बोधता म्हणजे अभिजातता नव्हे. कांही ढोंगी सवंग दुर्बोधतेलाच अभिजाततेचा मुलामा देतात. उतरंड वगैरे ठराविक उंचीपर्यंत ठीक आहेत. त्यापलीकडील दिव्य उंचीवर नाही. प्रा. साहेबांस ही चर्चा चालू केल्याबद्दल व चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 13:41
बिरुटेशेठ, लय भारी चर्चाप्रस्ताव...आवडला आपल्याला! आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे... या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!! ही घ्या आमची काही उत्तरे.. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? संबंधित कलेसंदर्भातील माहिती, अनुभव किंवा ज्ञान जर वाचकाकडे/श्रोत्याकडे असेल तर त्या कलेतील त्याचा आस्वादाचा आनंद निश्चितच दुणावतो. एकवेळ माहिती, अनुभव किंवा ज्ञान हे नसले तरी चालेल, परंतु किमान रसिकता हा गुण मात्र त्याच्याकडे असणे आवश्यकच आहे असे मला वाटते! रसिकताच जर नसेल तर मात्र सगळेच मुसळ केरात! :) उदाहरणार्थ, यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, 'क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. परंतु जो श्रोता जाणकार नाही परंतु रसिक आहे तो नुसतीच, 'क्या बात है!' अशी मनमोकळी दाद देईल! परंतु आनंद मात्र त्यालाही तेवढाच होईल. आणि जो जाणकारही नाही, आणि रसिकही नाही तो काहीच प्रतिक्रिया देणार नाही! :) आमचे काकाजी देवासकर त्याला 'स्थितप्रज्ञ' असं म्हणायचे बरं का! जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ! :) अवांतर - बरं का बिरुटेशेठ, काही मराठी संस्थळांवर तुम्हाला असे बरेच स्थितप्रज्ञ बघायला मिळतील! :)) लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? उतरू शकते, पण नॉट नेसेसरिली! वाचता वाचता, वाचकाच्या मनातली, वाचकाच्या अनुभवविश्वातलीही एखादी कलाकृती वाचकाच्या डोळ्यासमोर उभी राहू शकते/शकत असावी! असे वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याचदा! जसं कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसंच रसिक हा देखील जन्मावाच लागतो असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरू नये! विकसीत करावी लागते ? करता येते! काही प्रमाणात विकसित होऊ शकते! उदाहरणच द्यायचं झालं तर बिरुटेशेठ, आपल्यासारखी मंडळी अगदी अभ्यासपूर्वक आणि भरभरून लोककलेबद्दल लिहितात. ते वाचून त्या कलेबद्दल एखाद्याची रसिकता ही निश्चितच विकसित होऊ शकते असे म्हणण्यास वाव आहे. अस्मादिकांची 'बसंतचं लग्न' ही लेखमाला वाचून काही वाचक गण, जे आधी विशेष ऐकत नव्हते त्यांनी आता हिंदुस्थानी अभिजात संगीत आवडीने ऐकायला सुरवात केली आहे, त्यांच्यात तशी आवड निर्माण झाल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे! वि सू - इथे आमच्या बसंतच्या लग्नाची टिमकी वाजवायचा हेतू नसून केवळ उदाहरणादाखल हे लिहिले आहे असे नम्रतेने नमूद करतो! :) वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? नक्कीच असावा लागतो! असो, बिरुटेशेठ, खरंच चांगला चर्चाप्रस्ताव. या निमित्ताने आपण आम्हाला आमचेही विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला थँक्यू! :) आपला, बापुभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, (जिथे आग्रेवाली रोशन पुरिया गायली होती!) इंदौर! :)

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 23:47
वाह, क्या बात है !!!!!!!! मान गये ऊस्ताद .... "तात्या" कसले जबरदस्त "विश्लेषण करणारे विवेचन" लिहले आहे तुम्ही .... ताते, त्वाडा जवाब नही ..... आमची सुध्धा आपल्या मताच्या आसपास जाणरी मते आहेत ........ नुसताच रसीक .... छोता डॉन

तात्या,चर्चेच्या प्रोत्साहानाबद्द्ल,आवडीबद्दल थँक्स.....!!! :) बाकी रसिकतेच्या बाबतीत आमचे एक ढोबळ मत असे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. असे जरी असले तरी प्रत्येकाला काहीना काही आवडत असतेच. तो त्या कलेचा आस्वाद घेतो. आता आपण दिलेले उदाहरण पाहा....... >>यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता, क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल. आता आम्हाला यातले यमन माहितच नाही, तेव्हा त्यातले शुध्द मध्यम ही गोष्ट आमच्या डोक्यावरुन जाईल. याचा अर्थ असा झाला की आम्हाला यमनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कलेच्या बाबतीत आस्वादाचेही भिन्न स्वरुप असले पाहिजे असे वाटते ? (अनुष्काचे ) किंवा एखादे सुंदर चित्र पाहिले की, लगेच आपण सुंदर म्हणतो, यमनाचे आरोह-अवरोह समजून मग दाद द्यावी लागेल त्याऐवजी लावणी असेल तर फार बारकावे पाहण्याची गरज नसते ;) मनाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक जण आस्वाद घेत असतो त्याच्याकडे असलेली अभिरुची चोखंदळ व्हावी यासाठी त्या त्या कलेचे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत, म्हणजे चांगली कला चांगल्या वाचकांवर संस्कार करते व त्यास रसिक बनवते तर तो रसिक बनेल रसिकता विकसीत होत असते असे वाटते. बाकी आपल्या मताशी सहमत !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग Sun, 02/10/2008 - 15:56
आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. सहमत आहे. प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? नक्कीच आहेत. कारण ज्याप्रमाणे कलाकृती निर्माण करण्यासाठी गुणांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना रसिकाचे त्या कलाकृतीसोबत एकरुप होणे गरजेचे असते. ते जेवढ्या जास्त प्रमाणात साधेल तेवढा आस्वाद उच्च दर्जाचा ठरतो. रसिकाला "क्षणस्थ" होता आले पाहिजे. म्हणजे काय? आपण काही उदाहरणे पाहू. प्रभाकर पणशीकर रंगमंचावर 'तो मी नव्हेच' सादर करीत आहेत. त्यांच्या भरदार आवाजात ते एखादे वाक्य असे काही फेकतात की बस! निर्लज्ज लखोबाला पायातली काढून मारावी असे तुम्हाला वाटले तर ती मोठी दाद असते! पण तसे होण्यासाठी प्रेक्षक त्या संवादात, त्या प्रसंगात लखोबाच्या बरोबरीने जात असले पाहिजेत, म्हणजेच ते त्या 'क्षणात स्थित' असायला हवेत. छोटा गंधर्वांचं 'वद जाउ कुणाला' सुरु आहे, एखादीच जागा अशी काही येते की माझ्यासारख्या संगीतातल्या जाणकार नसलेल्यालासुध्दा बालगंधर्वांचा भास होऊन जातो आणि अंगावर रोमांच उभे राहतात. मग तात्यांसारख्या, गाणार्‍यांच्या डोळ्यात पाणी आलं तर नवल नाही. इथेही श्रोता त्या पदातल्या शब्दांबरोबर, तानेबरोबर जात असायला हवा. भाईकाकांचे 'चितळे मास्तर' वाचताना पहाटेच्या वेळी मास्तरांच्या ओसरीवर चालणारा अभ्यासवर्ग आणि त्यात 'रघुवंश' म्हणणारे मास्तर डोळ्यांसमोर आणता यायला हवेत. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? कोणतीच कलाकृती जशीच्यातशी रसिकाच्या मनात उतरू शकेल असे मला वाटत नाही. कारण कलाकार आणि रसिक ह्या मुळात दोन वेगळ्या व्यक्ती असतात. त्यांचे अनुभव, त्यांचे त्या गोष्टीतले ज्ञान वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते; त्यामुळे त्यांना जाणवणार्‍या गोष्टीत फरक हा असणारच. शिवाय निर्मिती ही बरीचशी अमूर्त असते त्यामुळे त्यामागे कार्य करणार्‍या गोष्टी ह्या अव्यक्तच असतात. त्यामुळेही निर्मिती आणि आस्वाद ह्यात अंतर असणे स्वाभाविक वाटते. रसिकता ही जन्मजात असते? बर्‍याच प्रमाणात असावी असे वाटते. कारण ज्याप्रमाणे कलाकाराला काही गोष्टी ह्या जन्मतः असाव्या लागतात तसेच कलाकृती बद्द्लची ओढ ही मूलतः असावीच लागते. त्याशिवाय तुम्हाला ती अनुभूती घेण्याची इच्छा होणार नाही. विकसीत करावी लागते ? हो निश्चीतच. अनुभवाने, अभ्यासाने रसिकता विकसित होते. कलेचे मर्म कशात आहे हे समजण्यासाठी रसिकांनासुद्धा अभ्यास आवश्यकच. चांगल्या मैफिली, नाटके, सवाईगंधर्व सारखे महोत्सव ह्यातून ह्यातून अनुभव समृध्द होतो आणि आस्वाद घेण्याची क्षमता विकसित होते. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? चांगला वाचक म्हणून मोठे व्हायचे असले तर असावाच लागतो. हे खरे तर कुठल्याही कलेच्या बाबतीत खरे आहे. संवेदनशील असणे ही कलाकार आणि रसिक होण्यातली पहिली पायरी आहे असे मला वाटते. चतुरंग

भडकमकर मास्तर Sun, 02/10/2008 - 16:06
पुण्याला एफ्टीआयाय फिल्म इन्स्टित्युट मध्ये एक फिल्म ऍप्रिसिएशन चा कोर्स आहे ...... सिनेमाचे आस्वादन.... The curriculum includes theoretical and practical study of the art and history of film and the development of cinema as a medium of art and communication. Film classics both Indian and International will be used for critical analysis and study. _________________________________ "आता कलेचे आस्वादन शिकवून येते का? " असा प्रश्न काही लोक नक्कीच विचारणार... माझ्या मते रसिक माणसाला अधिकाधिक थिअरी शिकल्यास कलेच्या आस्वादनात अधिक खोली यायला मदत होते....मात्र आधी निदान विषयाची आवड आणि समजून घ्यायची इच्छा हवी तरच अधिक चांगला रसिक शिकवून बनवता येऊ शकतो, असे माझे स्वतःचे मत आहे... अवांतर : आता हेच पहा ना, क्रिकेट पाहताना एखादा फलंदाज यॉर्क होतो आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतो, मजा येते...पण चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो ते शिकल्यास रिव्हर्स स्विंग होत असताना योर्कर वर बोल्ड करणार्या गोलंदाजाच्या कलेचे , मेहेनतीचे अधिक आस्वादन करता येते... म्हणजे क्रिकेट ची मुळात आवड असणार्याने ही अधिकाधिक माहिती करून घेतली तर तो चांगला क्रिकेट आस्वादक होऊ शकतो...!! (कुठे ही क्रिकेट चे उदाहरण द्यायची आवड असणारा ) स. भडकमकर

सहज Sun, 02/10/2008 - 17:40
रसीकता विकसीत करावी लागते ? एकदम महत्वाचा विषय आहे माझ्यासाठी. इथे मातब्बर लोक आहेत त्यांनी कृपया शिकवणी घ्यावी. तात्यांनी संगीत विषयात एक भाग लिहला होता, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत बरेच जण आहेत. १) कविता कळत नाही. पण विडंबन सुचते, बर्‍यापैकी समजते. २) तसेच शिल्पकला, चित्रकला, मॉडर्न आर्ट च्या नावाने बोंब मला वाटते शालेय अभ्यासक्रमात जमले तर हे सगळे समजवून सांगीतले पाहीजे. नाहीतर कुठेतरी लिहुन येते की अमुक चित्र, शिल्प चोरीला गेले त्याची किंमत इतकी लाख डॉलर्स आहे की मगच धस्स होते. चित्र/ शिल्प पाहुन "हे काय आहे?" असेच होते. बरेच लेखक व काही गुणी रसीक यांना नेहमी प्रश्र पडत असतो की अरे इतका चांगला लेख पण प्रतिसाद इतके अल्प... पण कारण असेलच ना. जसे सुग्रास भोजन खायला आवडते तितकेच कधीतरी फक्त आमटी भात फारतर पापड देखील "आहाहा" वाटु शकतो. पण तो भात, ती आमटी विशिष्ट प्रकारे केलेली असावी लागते. सरसकट कुठलाही आमटी भात नाही. सगळ्यात महत्वाची कला व त्याचे सादरीकरण. एका विशिष्ट विषयावर अनेक चित्रपट येतात पण सगळेच सुपरहीट होत नाहीत. का बरे? रसिकता ही जन्मजात असते ? कोणालाही त्यांचे मत अगदी समोरासमोर विचारले तर ९९% लोक सुरवात हीच करतील की, "मी काही तज्ञ नाही पण मला असे वाटते.." रसिकता म्हणण्यापेक्षा आवड, मते सगळ्यांची असतात. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? लेखकावर अवलंबुन. तोच तसा प्रयत्न करु शकतो. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? प्रत्येक वाचक हा संवेदनाक्षम असतोच. कोणाच्या मते जादा तर कोणाच्या कमी. :-) एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? हो किंवा नाही. हो ह्या करता की काही क्लीष्ट विषय जसे शास्त्रीय संशोधन (अंतराळ विज्ञान) किंवा कुठली अभिजात कला (क्लासीक आर्ट??) जसे शास्त्रीय संगीत समजायला त्या विषयातील थोडेसे ज्ञान/माहिती / पुर्व परिचय थोडासा पाहीजे. ललीत लेखनात तसा वाचकाकडे नसला तरी लेखकाने जास्त संभ्रम होउ शकेल असे लिहता कामा नये, जरी एखादा धागा नीट बांधला गेला नाही लेखात/ काव्यात तरि लेख/काव्य संपायच्या आता त्या विणी घट्ट केल्या पाहीजे.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 17:41
१. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. म्हणून तर अनेक श्रीमंत लोकांकडे घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवलेली असतात. परंतु ब-याच वेळा चिकटलेली पाने विलग केलेली नसतात. असे लोक शैक्षणिक काळात भरपूर वाचतात. परंतु त्यांच्या नजरेसमोर प्रश्नोत्तरे असतात. आम्हाला ११+४ बी एस सी च्या १ल्या वर्षी पु भा भाव्यांची १७वे वर्ष ही कथा होती. ब-याच मुलांना ती कळली नाही. २. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे. खरे आहे. म्हणूनच काहीहि साहित्यमूल्य नसलेल्या शृंगारिक कादंब-या भरपूर खपतात आणि चांगले कवितासंग्रह फारसे खपत नाहीत. ३. एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? होय. नाहीतर मला मर्ढेकरांची कविता एकदा वाचून जाणकारांचे मत वाचल्याशिवाय कळली असती. जी. ए. ची कथा पंचविशीत वाचतांना वेगळी वाटते व चाळिशीनंतर वेगळी वाटते. याचा अनुभव आपल्याला चाळिशीनंतरच घेता येईल. ४. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. लेखकाचे अनुभवविश्व व वाचकाचे अनुभवविश्व वेगळे असण्याची शक्यता जास्त असते. खास करून जेव्हा आपण एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवरील चित्रपट पाहतांना याचा अनुभव येतो. लेखकाला चित्रपट बहुधा आवडत नाही. कारण त्याच्या मनातील प्रतिमा वेगळी, दिग्दर्शकाच्या मनातील वेगळी, कॅमेरामनच्या मनातील वेगळी आणि प्रेक्षकाच्या मनातील वेगळी असते. लेखकाचे काही अनुभव वाचकाला ठाऊक नसण्याची शक्यता असते. उदा. अमेरिकेतील वा युरोपातील लेखकाच्या मनातील ट्रॅफिक उजव्या बाजूने जाणार व भारतातील वाचकाच्या मनातील डावीकडून. आयर्व्हिंग वॉलेसची 'फर्स्ट लेडी' वा 'सेव्हन्थ सीक्रेट' किंवा ' ऑर्थर हॅले ची 'मनीचेंजर' किंवा 'हॉटेल' (मुळातील. भाषांतरित नव्हे) वाचावी. ५. रसिकता ही जन्मजात असते ? होय. ६. विकसीत करावी लागते ? होय. शिकल्याशिवाय आणि अनुभवाशिवाय कळणारच नाही. शास्त्रीय संगीत तर शिकल्याशिवाय कळणारच नाही. ७. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? हा प्रश्नच खरे म्हणजे मला कळला नाही. वाचक हा साहित्याचा वाचक हे मी गृहीत धरले आहे. वकिलाची नोटीस अथवा सरकारी/व्यावसायिक पत्र वाचणारी व्यक्ती म्हणजे वाचक नव्हे. संवेदना नसेल तर शब्दाला/वाक्याला काही अर्थच राहणार नाही. नाहीतर फार शहाणा आहेस असे म्हटले तर कोणीहि खूश होईल. साहित्यातील नवरस संवेदनेशिवाय कसे कळणार?

सर्वच प्रतिसाद आवडले. मात्र रसिकांकडे कोणते गुण आवश्यक आहेत त्याचीही जरा चर्चा व्हावी असे वाटते. आम्ही काही प्वॉइंट काढले आहेत ? ते सायंकाळी टंकतो :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Mon, 02/11/2008 - 09:48
रसिक होण्यासाठी एक महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे पेशन्स... समोरची व्यक्ती जे लिहिते, बोलते ते समजून घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. गाणे ऐकणे, कविता वाचणे, सिनेमा पाहणे, लेख वाचणे, जोक समजणे या सगळ्यांसाठी थोडीफार उपजत रसिकता अंगी असावी लागते. पण ती नसेल तर अंगी बाणवता येते. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, वावरतो तिथल्या वातावरणानुसार एखाद्या विषयांत रूची वाटू लागते. आमच्या घरी माझी आतेबहीण शिकण्यासाठी रहात होती. ती कोकणांतली आहे. तिला क्रिकेट मध्ये विशेष रस नव्हता. पण जेव्हा वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा आमच्या घरी सतत त्याच चर्चा आणि विषय.. यामुळे तिलाही क्रिकेट आवडू लागले. ती न चुकता आमच्या बरोबरीने मॅचेस् पाहू लागली. - प्राजु

प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 10:23
हे मूळ गुण असल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. एक उदाहरण घेऊ. विनोद सगळ्यांनाच आवडतात(टवाळा आवडे विनोद.. असे समर्थ म्हणाले होते. त्याचा संदर्भ वेगळा आहे बरंका) पण विनोद जर का डोक्यावरून गेला आणि त्याची चिरफाड करायचा प्रयत्न केला गेला तर काय गंमत उरेल? म्हणजे जसे विनोद समजायला विनोदी बुद्धीची आवश्यकता आहे तसेच तिथे शाब्दिक आणि भाषिक ज्ञानही आवश्यक आहे. संगीत समजायला तसा कान लागतो असे म्हणतात. म्हणजे खरे तर जे काही सुश्राव्य आहे त्याला संगीत म्हणायला काय हरकत असावी? पण सुश्राव्यतेबरोबर जर संगीतशास्त्राची जाण असेल तर ती दुधात साखर ठरेल. आता कुणी म्हणेल की बासुंदी गोड आहे किंवा मस्त झालेय हे सांगायला ती कशी करतात हे ठाऊक असण्याची काय जरूर? तर हेही तितकेच बरोबर आहे. बासुंदी मस्त झालेय इतके सांगितले आणि चवीने ती खाल्ली(की प्यायली?) की झाले. त्यातच सगळी पावती मिळाली. आता हे झाले सामान्य रसिकाचे मत. पण एखादा संगीतज्ञ गाणे नुसतेच श्राव्य नव्हते तर 'अमूक एका ठिकाणी घेतलेली तान अथवा सरगम काय बहारीची होती' हे सांगतो तेव्हा ती रसिकता जास्त दाद देऊन आणि घेऊन जाते. तेव्हा मला असे वाटते की कोणत्याही क्षेत्रातल्या रसिकांचे ढोबळ मानाने दोन गट करता येतील. एक सर्वसामान्य रसिक जो केवळ 'आवडले, छान आहे अथवा खास नाही, दम नाही ' असे म्हणेल आणि दुसरा दर्दी रसिक जो 'छान आहे, आवडले अथवा खास नाही, दम नाही' हे नेमके कशामुळे ते सांगू शकेल. रसिकता ही नैसर्गिकपणे सगळ्यांकडेच असते. मात्र ती काही विषयांपुरती सिमीत असण्याचीही शक्यता असू शकते. कुणाला काव्य आवडते.कुणाला गद्य आवडते. कुणाला संगीत मग ते कोणतेही असो, तर कुणाला निव्वळ सुगम, कुणाला फक्त गजल वगैरे असे रसिकतेच्या बाबतीत फरक आढळतील. कुणाला नर्तन आवडत असेल, त्यातही पोटभेद असू शकतात. शिल्पकला,चित्रकला अशा कितीतरी कला अजून आहेत की ज्यात आवड असणारीही असंख्य माणसे आहेत. थोडक्यात काय तर रसिकता प्रत्येकात असते. पण ती नेमक्या कोणत्या बाबतीत हे सांगणे कठीण आहे. एखाद्या बाबतीत रसिकता दाखवणारा माणूस दुसर्‍या एखाद्या बाबीबाबत साफ 'औरंगजेब' असू शकेल. पण तरीही तो रसिक आहेच. कारण रसिक म्हणजे तरी काय हो? एखाद्या गोष्टीत जो रस घेतो अथवा दाखवतो तोच रसिक. म्हणजे कशातच रस नाही असा माणूस मिळणे दूर्मिळच असावा नाही का? (मला वाटतेय की मला काय म्हणायचे आहे ते मला नेमकेपणाने मांडता आलेले नाहीये तरीही इथले 'रसिक' वाचक ते नक्कीच समजून घेतील ह्याची खात्री आहे.)

धनंजय Mon, 02/11/2008 - 12:29
साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? होय. समजण्याची इच्छा पाहिजे, कलाकाराचे मन जाणण्याची सह-अनुभूती-क्षमता पाहिजे, कलाकाराचे माध्यम थोडेफार समजले पाहिजे. समजण्याची इच्छा : कलेचा आस्वाद घेण्याची इच्छा नसल्यास तो बळेच घेता येत नाही. दहाएक दिवसांपूर्वी येथे एका संगीताच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मन कुठल्यातरी काळजीत व्यस्त होते, पण तिकीट आधीच विकत घेतल्यामुळे तसाच गेलो. पहिला एक तास वाद्यवृंदाचे वाजवणे नीट ऐकले नाही, उगाच समोर काही संगीतमय गोंगाट होत असल्यासारखा वाटला. मग मन शांत झाले, आणि कार्यक्रमाचा पुढचा भाग आवडला. सह-अनुभूती-क्षमता : कला (प्रस्तुत केली तर - कलाकाराच्या स्वांतसुखाय नव्हे) ही कलाकाराचा रसिकाशी संवादरूप असते. स्वकेंद्रित व्यक्ती तो संवाद समजून घेऊ शकत नाही. माध्यम थोडेफार समजणे : एक उदाहरण घेऊन बघूया. बेटहोवन च्या नवव्या सिंफोनीचे. लहानपणी कोरलचा गानमेळ मी केवळ गोव्यात चर्चमध्येच ऐकला होता. त्यामुळे पाश्चिमात्त्य गानमेळ ऐकला की मला केवळ एकच विचार मनात येई - ही प्रभूच्या भव्यदिव्यतेची आळवणी आहे. त्यामुळे नवव्या सिंफोनीचा गानमेळाचा भाग ऐकला की माझ्याकडून साधारण त्याच अर्थाचे रसग्रहण होई. खालील यूट्यूब फितीत ऐकावे : आता खालील यूट्यूब फितीत ३:४० मिनिटे बर्नस्टाइन मास्तर भूमिका त्यांची समजावतात. मग वाद्यमेळ/गायन सुरू ५:३०. पण रेकॉर्डिंगचा दर्जा तितका चांगला नाही - तरी बर्नस्टाईनचे म्हणून वाटल्यास ऐकावे. जेव्हा मला प्रथम समजले की ही धुन त्या काळातल्या मद्यालयात गंमत म्हणून गायची धुन आहे, जी बेटहोवनने उचलून घेतली, तेव्हा माझा विश्वासच बसेना. पदाचे जे शब्द आहेत ते शिलरचे आहेत की मानवांनी मित्र म्हणून एकत्र यावे वगैरे... म्हणजे तेही चर्चमधले नाही! अर्थात हे संगीत, काव्य दारुड्यांच्या बरळलेल्या गाण्यापेक्षा खूपच उदात्त झालेले आहे, भावगर्भ झालेले आहे, पण "प्रभू किती भव्यदिव्य" हा तो भावगर्भ नाही, आणि संगीताचे बीजही नाही. अशा प्रकारे संगीताची नीट ओळख होण्यापूर्वीही मी काही रसास्वाद घेत होतो, मला आनंद होत होता, परंतु त्या कलाकाराचे माध्यम ओळखीचे होईपर्यंत माझा रसास्वाद आणि कलाकाराचा मनातला संदेश यांत जमीन-आस्मानाचा फरक होता. असेच लेखनाबाबत, अन्य कलांबाबत. असले पाहिजेत का ? होय. माझ्या वतीने याचे उत्तर मी वरती दिलेले आहे. लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? नाही. त्या कलाकृतीशी लेखकाचे एक भावविश्व आणि अनुभवविश्व जडलेले असते. ते सर्व त्या तोकड्या शब्दांत उतरू शकणार नाही. त्यातील अनेक तपशील लेखक गृहीत धरतो - ते लिहीत नाही, पण ते तपशील वाचकापाशी नसतात. वाचकाकडे त्याचे आपले भावविश्व आणि अनुभवविश्व असते. तो त्यांचा संदर्भ घेऊन त्यांचा अर्थ लावतो. कधीकधी आपल्या अनुभवविश्वात तफावत आहे हे कळूनसुद्धा वाचकाला अर्थ पूर्ण तपशीलवार भावनांसकट लावता येत नाही. उदाहरणार्थ नाटक "संगीत शारदा" घेऊया. यात एक जरठ-कन्या विवाह नाटकाचे कथानक आहे. मुलीचा गरीब बाप पैशाच्या लालसेने एका जख्ख म्हातार्‍या श्रीमंताशी लग्नाचे ठरवतो. त्यात तरुण तडफदार नायक अनेक परीने प्रयत्न करतो पण लग्न रोखण्यात अपेशी ठरतो. नाटकाच्या अगदी शेवटी अंतरपाटावर असे लक्षात येते की लग्नाच्या हावेने श्रीमंत म्हातार्‍याने आपले गोत्र खोटे सांगितले आहे. खरे गोत्र मुलीशी एकच असते, आणि भटजी सगोत्र विवाह लावण्यास ना करतात. अशा प्रकारे हे भयंकर लग्न टळते. मी माझ्या कुटुंबात/मित्रमंडळीत अनेक सगोत्र विवाह बघितले आहेत. माझ्या मते या अंताने काहीच खरे साध्य होत नाही. उलट खरा मुद्दा, जरठ-कन्या विवाह, हा बाजूला पडतो. इथे कन्येची विक्री थांबवायला रूढी बदलण्याऐवजी, या एकाच लग्नाला लागू असलेली आणखी पुरातन रूढी वापरली आहे, हे माझ्या मते चूक आहे. आता त्या काळाचा संदर्भ घेऊन मी नाटकाचा अर्थ लावतो, पण ते म्हणजे मारून मुटकून समज पटवणे. त्या नाटकाच्या लेखनाच्या काळी तो अंत प्रेक्षका-वाचकांना मनापासून योग्य वाटत असे. माझे अनुभवविश्व इतके वेगळे आहे की मला ती कलाकृती त्या अर्थाने अनुभवणे शक्यच राहिलेले नाही. कमीअधिक प्रमाणात अशी दरी प्रत्येक लेखका-वाचकात असते. रसिकता ही जन्मजात असते ? होय आणि नाही. दुसर्‍या मनुष्यांबरोबर सह-अनुभूती प्रस्थापित करण्याची ओढ जन्मजात असते. पण कलेच्या एखाद्या आविष्कारातून आपल्याला कलाकाराच्या मनःस्थितीची अनुभूती होणे जन्मजात नसते. कलाकाराच्या अनुभवविश्वाशी ओळख लागते, आणि त्या कलामाध्यमातले "गृहीत आहेत म्हणून सांगणार नाही" असे तपशील काही प्रमाणात शिकावे लागतात. कथक नाचात "शिखर" मुद्रा करून हात वरती नेला म्हणजे "धनुष्य" अर्थ समजतो, हे शिकल्याशिवाय कळायचे नाही. (शिखर मुद्रा केलेला हात कपाळाजवळ वरती नेला की "टिळा लावणे" हा अर्थ होतो, तो बहुतेक भारतीयांना कळतो, बिगरभारतीयांना नाही.) विकसीत करावी लागते ? होय. वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? होय.

तुम्ही लोक इतके जड शब्द वापरत आहात ते माझ्यासारख्या अज्ञ जीवास उमगत नाहीत. त्यापेक्षा भाऊसाहेबांनी कसे २ ओळीत सांगून टाकले आहे 'दोस्तहो मैफील आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे''जिन्दादिली ' नुसती हवी" -रसि़क डॅनी पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 23:11
सर्वप्रथम , बिरुटेसरांचे धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन. पहिल्या दर्जाचे दोन्ही : चर्चाविषयही आणि चर्चाही. "रसिकता" या विषयाची व्याप्ति आणि खोली फार मोठी ; माणूसपणाच्या काही महत्त्वाच्या खुणांपैकी ही एक ; यात शंका नाही. मला असे वाटते की रसिकता हा एक प्रकारचा परकायाप्रवेश आहे : आपल्या माध्यमाद्वारे लेखक/चित्रकार/गायक/संगीतकार/कवी/ शिल्पकार जे मांडतात ते समजून घेण्याकरता आपल्याला त्याच्या डोळ्यानी पहाण्याची, त्याच्या कानांनी ऐकण्याची , त्याच्याशी समधात होण्याची क्षमता असायला हवी. जितका हा परकायाप्रवेश रसिकाच्या अंगात भिनेल तितकी कलाकृती कळायला मदत होणार. रसिकतेचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे तिची सार्वभौमता. एखादी गोष्ट एखाद्याला आवड्ण्याची अनेक कारणे असतील ; इतराना ती कारणे प्रसंगी पटोत न पटोत. अणि कुठल्याही कारणाशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल रस वाटण्याचे स्वातंत्र्य रसिकाना असतेच ! या बाबतीत खूप मागे वाचलेले एक वाक्य मनावर कोरल्यासारखे झालेय : "प्रत्येक कलाकृती नव्या वाचक/प्रेक्षक/रसिकाच्या मनात नव्याने जन्म घेते !" सांस्कृतिक संदर्भांची आवश्यकता : कदाचित अमूर्त कलाप्रकारांबद्दल हा मुद्दा लागू होणार नाही. पण काँक्रीट आर्टीफॅक्ट्स बद्दल (मराठी शब्द) हे निश्चित खरे आहे की, ज्या वातावरणामधे , "अवकाशामधे" एखादी कलाकृती आकार घेते, रसिकाला त्याचा कुठेतरी स्पर्श व्हावा लागतो. शेवटी कुठलीही कलाकृती एका पातळीवर "मेक्-बिलिव्ह" (मराठी शब्द?) असते. हे "मेक्-बिलिव्ह" यशस्वी होण्याकरता तुम्हाला अनेक संदर्भांचे ज्ञान उपयोगी , प्रसंगी आवश्यकही ठरते.

असे जेव्हा रंगमंचावर पडद्यामागुन आवाज येतो, तेव्हा रसिकाची किम्मत आम्हाला कळते. वरील सर्वच सुंदर प्रतिसादात रसिकाविषयी मत व्यक्त झालेच आहे तरी अजून काही सांगण्याचा मोह आवरत नाही. रसिकाच्या ठिकाणी जिज्ञासा हवी:- म्हणजे कलेचा, अनुभव पुन्हा घेता यावा किंवा त्या पातळीवर जाता यावे. मनाची पवित्रता हवी :- कलाकृतीचा आस्वादाच्या वेळी रसिकाचे मन शुद्ध, असले पाहिजे. रसिकाची पाटी आस्वादाच्या वेळी कोरी असली पाहिजे म्हणजे पुर्वग्रह नको. कलेची जाण असली पाहिजे:- कलेच्या आस्वादासाठी ज्ञानाची गरज आहे. रसिकाला वेगवेगळ्या क्षेत्राविषयी ज्ञान असले पाहिजे, जसे भाषा, दैनंदिन व्यवहार, विज्ञान, राजकारण, समाज, संस्कृती,चे ज्ञान असले पाहिजे. कलेविषयी आपूलकी,सहानुभूती असली पाहिजे. संवेदनक्षमता सर्वांमधे असते पण त्याची तीव्रताही महत्त्वाची आहे. सुचकता रसिकाला आस्वादाच्या पातळीवर नेण्यास मदत करते. संवेदनक्षमतेमुळे कलेच्या सौंदर्याचा शोध घेता येतो. आस्वादकाने कलेचा सन्मान केला पाहिजे. कलेकडे सह्दयेतेने पाहता आले पाहिजे. आणि शेवटी आस्वाद घ्यायचा कशासाठी ,तर नुसता आनंदासाठीच ना !!! तो घेता आला पाहिजे. कधी-कधी आस्वादकाकडूनच कलेचे वेगवेगळे अर्थ समजत असतात. म्हणुन नेहमी म्हटल्या जाते की "" कवी म्हणजे बोलका रसिक, तर रसिक म्हणजे मुका कवी " कल्पनाशक्ती, एकाग्रता, हे आणि असे अनेक गुण रसिकाच्या ठिकाणी असले पाहिजेत असे म्हणता येईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 02:39
ही एकाने लिहिलेली ऒर्कुट वरील कविता माझी ताई तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देते वडीलान सारखे प्रेम देते आजोबान सारखा मुका देते अज्जी सारखा खाऊ देते कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई भाऊबिजेला खुप Dairymilk आणायचिस मला छान छान खेल्णी द्यायाचिस मला रक्षा बन्धन ला शोधून शोधून रखी आणायचिस मला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई पिक्चर बघायला पैसे द्यायाचिस तू रात्रि अपरात्री चोरून घरात घ्यायाचिस तू माझ्या मैत्रिनिंचे फ़ोन घ्यायाचिस तू स्वताच्या नावा खाली पचवायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई सुख दुखात सम्भालुन घ्यायाचिस तू माझे पोट भरन्या साठी उपाशी राहिलिस तू माझ्या साठी आई बाबान चा ओरडा खाल्लास तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई खुप खुप दंगा मस्ती करायचो आपण आई बाबान बरोबर खुप फिरयाचो आपण आज्जी अजोबंच्या बरोबर पिझ्झा खायचो आपण खुप खुप त्रास द्यायाचो आपण कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई मला खोटे सांगून धोक्याचा इशारा द्यायचिस तू बाबाना राग आला की मला लपून घ्यायाचिस तू आई बरोबर जाउंन भाजी आनायाचिस तू माझ्या आव्डिची भाजी करायाचिस तू कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई आई सारखी माया देत रहा तू मला बाबान सारखे प्रेमदेत रहा तू मला आजोबान सारखा मुका देत रहा तू मला आज्जी सारखा खाऊ देत रहा तू मला बस एवढेच सन्गायाचे आहे तुला कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई >>>>>>>>>>>>>>>>>>> त्यावर अभिप्राय मागितला होता... ..आम्ही लिहिले की भावना योग्य आहेत, पण ओळी एकापुढे एक लिहिल्या तर निबंध उत्तम होईल... आणि खूप जणांनी छान आहे असे लिहिले...ही कविता ( ?) आवडली??? आता इथे रसिक कोण? ...कवीची संकल्पना उमजलेले रसिक की टीका करणारे आम्ही अरसिक???

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 02/13/2008 - 03:20
यात एका प्रकारची लय आहे, म्हणून ही कविता आहे असे मला पटते. हा मुक्तछंद आहे. ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते. पण लिखाणाचा दर्जा मात्र सुमार वाटला. म्हणजे "कविता आहे, पण छान नाही" म्हणणारा मी या रसिक-अरसिक वर्गीकरणात त्या ऑर्कुट मित्रमंडळात कुठे पडेन? (उलट इथेच मागे तात्या यांनी लिहिलेले "कुणी मत देता का मत" हे प्रकटन कविता नसून दर्जेदार आहे, असे वाटले. रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 02/13/2008 - 09:14
ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते अगदीच गद्य नाही,अर्थात कवितेच्या दर्जाने वैतागून मी तसे लिहिले होते... पण मी आता विचार करतो की मी कोण दर्जा ठरवणारा??खूप लोकांना आवडली कविता...( म्हणजे भ्रमणध्वनी संदेश पाठवून गायक ठरवण्यासाऱखे ..संख्येवर बरे वाईट ठरवणे..)ज्यांना ही कविता खरंच आवडली, त्यांच्यासाठी मी एक अतिशहाणा मुजोर माणूस असणार, इतक्या चांगल्या भावनेला आणि कवितेला नावे ठेवणारा....आणि मी स्वतः मनातून हायसे मानणार की मला असल्या कविता आवडत नाहीत...मग संदीप खरेची एखादी आवडलेली कविता म्हणणार, मला बरे वाटणार्..मग त्याला शिव्या घालणारे लोक मला अजाण रसिक समजणार आणि स्वतः मर्ढेकर/ चित्रे/ग्रेस इ. तेच फक्त महान कवी आहेत असे म्हणणार...वगैरे...म्हणजे ही रसिकतेची उतरंड तयार होते, पण रसास्वाद हा प्रत्येकाचा निराळा असतो का? माझी ताई या कवितेने काहींना खूप आनंद दिला असेल, तो आनंद कालिदासाच्या रचना समजून घेताना होणार्या रसास्वादाच्या आनंदापेक्षा कमी मानायचा का? हेच सगळे संगीताच्या बाबतीत....शास्त्रीय संगीत ऐकणारे, जाणणारे या रसिकतेच्या उतरंडीवर सर्वात वरती बसून आहेत असा एक लोकप्रिय समज...मग पॉप , फिल्म वाले....पण रसास्वादाचा आनंद प्रत्येकाचा समान नाहीका ? मला फक्त शास्त्रीय संगीत आवडतं असं म्हणणारा रसिक इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो का? रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.) हे अगदी पटले.... म्हणजे पुन्हा जे काही लिहिले आहे ते चांगले आहे की वाईट इतकेच उरते... ( इथे सिनेमाचे समांतर उदाहरण किंवा समांतर सिनेमाचे समांतर उदाहरण आठवते.... आता आर्ट फिल्म असा शब्द सर्रास वापरतात लोक, मग उरलेल्या फिल्म काय नॉन-आर्ट / अकलात्मक असतात काय? बर्या /वाईट असतील पण त्यांची कलाच नाही?. हे अन्यायकारक आहे.....तरी आता ही समांतर नाटके आणि फिल्म्स यातली दरी थोडी का होईना, कमी होतेय)..असो फिल्म चांगली तरी असते किंवा वाईट तरी...

In reply to by भडकमकर मास्तर

अमित.कुलकर्णी Fri, 02/15/2008 - 07:09
अहो, शास्त्रीय संगीत ऐकणार्‍यांमध्ये पण एक उप-उतरंड आहे असे मी बघितले आहे. उदाहरणार्थ 'ज' या एका गायकाची गाणी ऐकणारा रसिक हा 'क' किंवा 'भ' या गायकांची गाणी ऐकणार्‍यांपेक्षा कमी दर्जाचा ठरवला जातो. थोडक्यात म्हणजे, ज्याला जे आवडते, ते त्याने करावे / ऐकावे / बघावे असे आम्ही हल्ली करतो. अमित ------------------------------------------ Doing what you don't like is -being employed and not liking what you do is common human nature!

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 21:39
अ पासून ज, क, भ सहित ज्ञ पर्यंत सर्वांना भिडते ते अभिजात अशी माझी अभिजाततेची व्याख्या आहे. दिल क्या चीज है ... हे गाणे मुज-याचे आहे म्हणून कोणत्याहि बड्या ख्यालाच्या तोडीचे नाही असे कोणहि म्हणू शकत नाही. एखादी ढंगदार लावणी एखाद्या तथाकथित उच्च दर्जाच्या कविते एवढी किंवा जास्त श्रेष्ठ असू शकते. कांहीची उंची सुबोध तर काहीची दुर्बोध. परंतु निव्वळ दुर्बोधता म्हणजे अभिजातता नव्हे. कांही ढोंगी सवंग दुर्बोधतेलाच अभिजाततेचा मुलामा देतात. उतरंड वगैरे ठराविक उंचीपर्यंत ठीक आहेत. त्यापलीकडील दिव्य उंचीवर नाही. प्रा. साहेबांस ही चर्चा चालू केल्याबद्दल व चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद.
आस्वाद हा शब्द भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथामधे वापरल्याचे वाचनात आहे. खरे तर आस्वाद हा शब्द पाकशास्त्राशी संबंधीत असावा,. चव घेणे, असा त्याचा सरळ अर्थ. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.

व्हेलेंटाईन्स डे...२

प्राजु ·

इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 01:42
मलाही सय झाली आहे तूझ्याशिवाय जगायची कारण तूही करुन घेतली आहेस कोरडेपणाने वागायची -इनोबा सय=सवय

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:47
छान आहे चारोळी ... पण .. मला वाटतं , सय याचा अर्थ आठवण. (उदास कविता लिहू नयेत, असे मी पहिल्या भागांत लिहिले होते इथे वेगळे लिहावे लागेल बहुतेक.)

In reply to by प्राजु

प्राजु आम्हाला आपल्या चारोळ्या आवडतात. अरे, पण आम्हाला उदास,हताश, निराश, रडणे,पडणे, अशा वेदनेच्याच चारोळ्या सुचतात ना ( सुचल्या तर ) तुम्ही आमच्यासारख्या एका प्रतिभावंत कवीला प्रतिबंध केलाय बॊ इथे :) ( ह. घे. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 20:24
अहो, व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्त संत व्हॅलेंटाईनच्या चरणी या सगळ्या चारोळ्या अर्पण. मग त्यात उदासवाण्या चारोळ्या कशाला? आपल्याला ही छान लिहिता येतात.. अपण नक्की लिहाल दिलिपजी, याची खात्री आहे मला. - प्राजु

In reply to by प्राजु

आम्हाला कितीही हरब-याच्या झाडावर बसवले तरी आम्हाला आनंदाच्या चारोळ्या सुचणार नाही.
संत व्हॅलेंटाईन बाबाची जत्रा संपली की आम्ही लिहू आमच्या आरोळ्या :)
तो पर्यंत आम्ही आपल्या सर्वांच्या सुरेख चारोळ्या वाचत राहू  !!!!
परप्रांतिय दिलीपजी :(

प्राजु Sun, 02/10/2008 - 02:01
तुझ्या ओठीचे गीत होऊन मला झंकारून जाऊदे तुझ्या नयनी आशेची ज्योत लावून जाऊ दे - प्राजु

प्राजु Sun, 02/10/2008 - 03:21
हिमफुलांचा दुलईवरती कोवळी किरणे पसरली स्पर्शाने त्या मोहरून फुले लाजेत विरघळली - प्राजु

प्राजु Sun, 02/10/2008 - 20:32
फुलांनी फुलावे तरूवरी खगांनी भुलावे नभावरी पतंग जळतो ज्योतीवरी काय लिहावे या प्रितीवरी??? - प्राजु

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 23:20
तात्या दिवाना अनुष्कावर मरतो अनुष्कासाठीच अहोरात्र झुरतो.. आपला, (अनुष्का प्रेमी) तात्या. प्राजु, तुझ्या आवाहनाने खरंच कमाल केली एका वधस्तंभाला काव्याची पालवी फुटली.. -खोडकर डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

रविराज Mon, 02/11/2008 - 05:05
खरे तर मला अजुन मराठी टाइप करण्यात मी पुरेसा पारंगत नाहीये. त्यामुळे चारोळी आवडली तरी मी कमेंट द्यायचा आळस करतो. पण खोडकर डांबिसकाकांची चारोळी वाचुन अ़क्षरशः हसता हसता पुरेवाट झाली. :-)

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:04
अलका, अचला, विश्वमोहिनी रूप गर्विता गजगामिनी मुग्धा, कामिनी, अभिसारिणी प्रेमसवरूप तू, जगत् जननी...... - प्राजु

किशोरी Mon, 02/11/2008 - 16:13
तुझ्या एका नजरेने अशी काय जादु घडली तुझ्या प्रेमाची धुंदी माझ्या मनावर चढली

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 03:08
घोट दोनच उरले होते तेही होते दु:खाश्रु तुच नवा हा चषक भरला हिंदकळती आनंदाश्रु (ही थोडी पाडलेली चारोळी वाटतेय नाहि;) ) -ऋषिकेश

तू सहजच येऊन येथे भरलास चषक मदिरेचा त्या मदिरेतून भिनतच जाई हा कैफ जवानीचा. (पाडलेल्या चारोळीनंतर केलेली 'बळचं' चारोळी) पुण्याचे पेशवे

रविराज Tue, 02/12/2008 - 05:26
भरलेला विलोभनीय तो पुन्हा एकदा रिकामा झाला वेडे मन माझे विचारी घेउ का मी अजुन एकच प्याला. -रविराज (माझा ही एक प्रयत्न)

In reply to by रविराज

रविराज Tue, 02/12/2008 - 07:14
अतीव सुंदर पाहुन तो प्याला एकच हल्लकल्लोळ झाला संडे आहे, उद्याचे टेंशन कशाला मनसोक्त घे तू, नको आवरु स्वतःला -रविराज

प्राजु Tue, 02/12/2008 - 08:42
नकोस पाहू अशी राणी, नशा चढेल गं.. काळोख्या अमावसेत चांदणं पडेल गं.. - प्राजु

किशोरी Tue, 02/12/2008 - 10:26
आमावस्येच्या चांदण्यांना लागली चंद्राची चाहुल जेव्हा माझ्या आयुष्यात तु टाकलेस प्रेममय पाऊल (जमल की!!लग्न नाही हो,चारोळी लिहीणे जमले,मला आता थोड थोड जमायला लागल आहे :)) धन्यवाद वरदा,प्राजु !!)

प्राजु Tue, 02/12/2008 - 19:45
चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते. "अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय.. - प्राजु

अव्यक्त Wed, 02/13/2008 - 00:45
तु मम अधराची बासुरी... घेशि लकेरि नानापरी अन गाशी सुस्वरी, तव झन्कारीशी तारा मम अन्तरि... सान्ग ना केव्ह होशि तु मम ह्रुदयाची अन्तुरी...

प्राजु Wed, 02/13/2008 - 00:53
अव्यक्त, आपण आपली चारोळी संपादन केलित त्याबद्दल मी आभारी आहे. आपण चांगले लिहिता, ही चारोळी सुंदर आहे. अशिच तुमची प्रतिभा फुलत राहुदे. वरचेवर इथे येत रहा आणि हा गोफ विणायला मदत करत रहा. - प्राजु

अव्यक्त Wed, 02/13/2008 - 01:22
ती स्फोटक, ती दाहक... ती भेदक, ती मारक नव्हे ती मोहक, ती प्रेरक ती उद्बोधक, ती स्मारक... ...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त

प्राजु Wed, 02/13/2008 - 01:33
चारोळि तर सुंदरच आहे पण त्यापेक्षाही.. ...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त हे जास्ती छान वाटले. - प्राजु

नंदन Wed, 02/13/2008 - 04:03
सुधीर मोघे यांच्या 'लय' पुस्तकातील ही चारोळी. येथे स्वरचित चारोळ्या द्यायच्या असल्या, तरीही या धाग्याच्या संदर्भात चपखल वाटली म्हणून देण्याचा मोह आवरला नाही. ना सांगताच तू मला उमगते सारे कळतात तुलाही मौनातील इशारे दोघात कशाला मग शब्दांचा बांध? कळण्याचा चाले कळण्याशी संवाद नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

वरदा Wed, 02/13/2008 - 04:55
डोळ्यांनी तुझ्या प्रेमतुषार उधळले पापण्यांनी माझ्याही ते अलगद झेलले.....

किशोरी Wed, 02/13/2008 - 17:23
>>चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते. "अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय.. हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद आठव पहिली भेट आपुली नयन गुजगोष्टी करी मनातील भाव बोलुन गेल्या बरसणार्‍या श्रावण सरी

In reply to by किशोरी

प्राजु Wed, 02/13/2008 - 21:19
हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद जी मत कहिये जी... वैसे तो आजकल बिस्कीट को भी पारले-जी कहते है... पर आप मुझे प्राजक्ता या प्राजु ही कहिये किशोरीजी । ( - प्राजु (जी) - प्राजी... :)))

स्वाती राजेश Wed, 02/13/2008 - 19:41
प्रथम प्राजुला धन्यवाद. वरदा, किशोरी यानाही प्राजुला साथ दिल्याबद्दल. नंदन, अव्यक्त,अभिजीत, रविराज, धनंजय, विनायक आणि ऋषिकेश यांना धन्यवाद. तुमच्या मुळे इतक्या सुंदर चारोळ्या वाचायला मिळाल्या.:)

सागर Wed, 02/13/2008 - 20:24
वर्षाव प्रेमाचा आज व्हावा असा दिवस हा अति खास व्हावा बघुनि आपले प्रेम ते ... स्वर्गातुनि व्हेलेंटाईन संत तो अवतरावा .... - सागर

In reply to by वरदा

सागर गुरुवार, 02/14/2008 - 19:17
सगळेच एकदम प्रोफेशनल झालेत आता वरदा, तुमच्या मनात सगळ्या ओळी (खरेतर चारोळ्या) उतरल्या म्हणजे सगळे प्रोफेशनल समजायला हरकत नाही ... दर्दीपणा असेल तरच त्या कविता...तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते.... तेव्हा प्रोफेशनल कॅटेगरीत आल्यामुळे आनंद झाला... (चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठीच्या ऑफरची वाट पाहणारा ) सागर

प्राजु Wed, 02/13/2008 - 21:20
सागर, किती छान लिहिल्या आहेत चारोळ्या तुम्ही. खरचं खूप आवडल्या.. - प्राजु

In reply to by प्राजु

सागर गुरुवार, 02/14/2008 - 18:54
धन्यवाद प्राजु, खरंतर चारोळ्या हा माझा प्रांत नव्हता. पण म्हटलं पहावं करुन :) आता चारोळ्याही करायला हरकत नाही.... (म्हणजे मी अजून त्रास देणार सगळ्यांना.... हा हा हा....) (स्वयंघोषित कवी) सागर

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 19:06
तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते अगदी पटलं आणि तुमच्या चारोळ्यात ते स्किल अगदी खरंच छान दिसतंय.. मी उगाच टाईमपास म्हणून लिहायला लागले..तुम्ही आणि किशोरीचं तसं नाही असं म्हणायचं होतं मला...तुम्ही अगदी प्राजु सारखाच छान चारोळ्या करायला लागलात असं म्हणत होते.....

In reply to by वरदा

सागर गुरुवार, 02/14/2008 - 19:25
स्तुतिबद्दल धन्यवाद वरदा, पण मला अजूनही असे वाटते की मी अजून तितका मुरलेला कवी नाहीये... ती पातळी गाठण्यासाठी अजून बरीच मोठी वाटचाल करायची आहे. सध्या मी केवळ बाल्यावस्थेतील कवी आहे. बाळसे धरायला थोडा वेळ लागेल... आणि प्राजुंशी माझी तुलना होणे तर अशक्य आहे. त्यांच्या कविता वा लेखन बरेच प्रगल्भ असते.... मी येथे फक्त मिसळपावाच्या सागरात तरंगण्याचा प्रयत्न करतोय.... पट्टीचा पोहायला वेळ तर लागेलच आणि तुम्हीही खरेच छान लिहितात. सतत लिहित गेलात तर नक्की नावाजलेल्या कवयित्री वा लेखिका व्हाल... शेवटी वाचकांना मनापासून जे लिहिलेले असते ते भावते हेच खरे... तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून खूप खूप आभार.... तुमच्यासारख्या रसिकांमुळे तर कवी जन्मतात.... :) धन्यवाद सागर

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 19:35
अहो तुम्ही पहीलीत तरी पोचलात मी अजुन शिशुवर्गात आहे कवितेच्या... पण मी रसिक म्हणून छान आहे हे बाकी ऐकून बरं वाट्लं थँक्यू..... ठीक तर आता अशाच छान चारोळ्या करत राहा...मी ही प्रयत्न करतेच.....

In reply to by वरदा

सागर गुरुवार, 02/14/2008 - 20:44
मी ही प्रयत्न करतेच..... वरदा, मग येऊ द्यात की अजून चारोळ्या (या वाक्यावरुनही चारोळी करायचा मोह आवरत नाही....) ऐकून तुमच्या आरोळ्या वाटाव्या वाघाच्या डरकाळ्या येऊ द्यात की अजून चारोळ्या त्या व्हॅलेंटाईनच्या उडो चिरफाळ्या..... - सागर

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Mon, 02/18/2008 - 15:45
सुधीरकाका, अरे हो की..... मी हा विचारच नव्हता केला... अस्सल मिसळपावी झणझणीत चारोळी नाही हाणणार तर कोण? :) मनापासून अनेक धन्यवाद सागर

पुष्कर गुरुवार, 02/14/2008 - 20:36
चित्रात तव त्या रंग माझे एकदा रंगून जा, कुंचला घेऊन हाती चित्र ते माखून जा

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 06:33
ते प्रतिभा की काय म्हणतात ते कुठून आणायचे... असो. चारोळी नाही तरी मी केलेला उखाणा देत आहे. एक अधिक एक मिळवेन, संसाराचे गणित नीट जुळवेन, मनात मात्र भिती एकच कोणीतरी ह्यांना पळवेल.

अनिला Tue, 02/19/2008 - 09:57
चरोळी लहान आणी चवही नाही खास पण भावाचे(पैसे नाही) रन्ग उधळून आलेल्या या ओळी लाम्बलचक सन्स्कारभारती रान्गोळ्याची याद देऊन दाद घेऊन जातात. सन्त व्हलेन्ताईन बाबा पर्य न्त जातीलच सर्व ओळीन्मधे पाय गुन्तलेली

इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 01:42
मलाही सय झाली आहे तूझ्याशिवाय जगायची कारण तूही करुन घेतली आहेस कोरडेपणाने वागायची -इनोबा सय=सवय

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:47
छान आहे चारोळी ... पण .. मला वाटतं , सय याचा अर्थ आठवण. (उदास कविता लिहू नयेत, असे मी पहिल्या भागांत लिहिले होते इथे वेगळे लिहावे लागेल बहुतेक.)

In reply to by प्राजु

प्राजु आम्हाला आपल्या चारोळ्या आवडतात. अरे, पण आम्हाला उदास,हताश, निराश, रडणे,पडणे, अशा वेदनेच्याच चारोळ्या सुचतात ना ( सुचल्या तर ) तुम्ही आमच्यासारख्या एका प्रतिभावंत कवीला प्रतिबंध केलाय बॊ इथे :) ( ह. घे. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 20:24
अहो, व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्त संत व्हॅलेंटाईनच्या चरणी या सगळ्या चारोळ्या अर्पण. मग त्यात उदासवाण्या चारोळ्या कशाला? आपल्याला ही छान लिहिता येतात.. अपण नक्की लिहाल दिलिपजी, याची खात्री आहे मला. - प्राजु

In reply to by प्राजु

आम्हाला कितीही हरब-याच्या झाडावर बसवले तरी आम्हाला आनंदाच्या चारोळ्या सुचणार नाही.
संत व्हॅलेंटाईन बाबाची जत्रा संपली की आम्ही लिहू आमच्या आरोळ्या :)
तो पर्यंत आम्ही आपल्या सर्वांच्या सुरेख चारोळ्या वाचत राहू  !!!!
परप्रांतिय दिलीपजी :(

प्राजु Sun, 02/10/2008 - 02:01
तुझ्या ओठीचे गीत होऊन मला झंकारून जाऊदे तुझ्या नयनी आशेची ज्योत लावून जाऊ दे - प्राजु

प्राजु Sun, 02/10/2008 - 03:21
हिमफुलांचा दुलईवरती कोवळी किरणे पसरली स्पर्शाने त्या मोहरून फुले लाजेत विरघळली - प्राजु

प्राजु Sun, 02/10/2008 - 20:32
फुलांनी फुलावे तरूवरी खगांनी भुलावे नभावरी पतंग जळतो ज्योतीवरी काय लिहावे या प्रितीवरी??? - प्राजु

पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 23:20
तात्या दिवाना अनुष्कावर मरतो अनुष्कासाठीच अहोरात्र झुरतो.. आपला, (अनुष्का प्रेमी) तात्या. प्राजु, तुझ्या आवाहनाने खरंच कमाल केली एका वधस्तंभाला काव्याची पालवी फुटली.. -खोडकर डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

रविराज Mon, 02/11/2008 - 05:05
खरे तर मला अजुन मराठी टाइप करण्यात मी पुरेसा पारंगत नाहीये. त्यामुळे चारोळी आवडली तरी मी कमेंट द्यायचा आळस करतो. पण खोडकर डांबिसकाकांची चारोळी वाचुन अ़क्षरशः हसता हसता पुरेवाट झाली. :-)

प्राजु Mon, 02/11/2008 - 20:04
अलका, अचला, विश्वमोहिनी रूप गर्विता गजगामिनी मुग्धा, कामिनी, अभिसारिणी प्रेमसवरूप तू, जगत् जननी...... - प्राजु

किशोरी Mon, 02/11/2008 - 16:13
तुझ्या एका नजरेने अशी काय जादु घडली तुझ्या प्रेमाची धुंदी माझ्या मनावर चढली

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 03:08
घोट दोनच उरले होते तेही होते दु:खाश्रु तुच नवा हा चषक भरला हिंदकळती आनंदाश्रु (ही थोडी पाडलेली चारोळी वाटतेय नाहि;) ) -ऋषिकेश

तू सहजच येऊन येथे भरलास चषक मदिरेचा त्या मदिरेतून भिनतच जाई हा कैफ जवानीचा. (पाडलेल्या चारोळीनंतर केलेली 'बळचं' चारोळी) पुण्याचे पेशवे

रविराज Tue, 02/12/2008 - 05:26
भरलेला विलोभनीय तो पुन्हा एकदा रिकामा झाला वेडे मन माझे विचारी घेउ का मी अजुन एकच प्याला. -रविराज (माझा ही एक प्रयत्न)

In reply to by रविराज

रविराज Tue, 02/12/2008 - 07:14
अतीव सुंदर पाहुन तो प्याला एकच हल्लकल्लोळ झाला संडे आहे, उद्याचे टेंशन कशाला मनसोक्त घे तू, नको आवरु स्वतःला -रविराज

प्राजु Tue, 02/12/2008 - 08:42
नकोस पाहू अशी राणी, नशा चढेल गं.. काळोख्या अमावसेत चांदणं पडेल गं.. - प्राजु

किशोरी Tue, 02/12/2008 - 10:26
आमावस्येच्या चांदण्यांना लागली चंद्राची चाहुल जेव्हा माझ्या आयुष्यात तु टाकलेस प्रेममय पाऊल (जमल की!!लग्न नाही हो,चारोळी लिहीणे जमले,मला आता थोड थोड जमायला लागल आहे :)) धन्यवाद वरदा,प्राजु !!)

प्राजु Tue, 02/12/2008 - 19:45
चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते. "अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय.. - प्राजु

अव्यक्त Wed, 02/13/2008 - 00:45
तु मम अधराची बासुरी... घेशि लकेरि नानापरी अन गाशी सुस्वरी, तव झन्कारीशी तारा मम अन्तरि... सान्ग ना केव्ह होशि तु मम ह्रुदयाची अन्तुरी...

प्राजु Wed, 02/13/2008 - 00:53
अव्यक्त, आपण आपली चारोळी संपादन केलित त्याबद्दल मी आभारी आहे. आपण चांगले लिहिता, ही चारोळी सुंदर आहे. अशिच तुमची प्रतिभा फुलत राहुदे. वरचेवर इथे येत रहा आणि हा गोफ विणायला मदत करत रहा. - प्राजु

अव्यक्त Wed, 02/13/2008 - 01:22
ती स्फोटक, ती दाहक... ती भेदक, ती मारक नव्हे ती मोहक, ती प्रेरक ती उद्बोधक, ती स्मारक... ...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त

प्राजु Wed, 02/13/2008 - 01:33
चारोळि तर सुंदरच आहे पण त्यापेक्षाही.. ...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त हे जास्ती छान वाटले. - प्राजु

नंदन Wed, 02/13/2008 - 04:03
सुधीर मोघे यांच्या 'लय' पुस्तकातील ही चारोळी. येथे स्वरचित चारोळ्या द्यायच्या असल्या, तरीही या धाग्याच्या संदर्भात चपखल वाटली म्हणून देण्याचा मोह आवरला नाही. ना सांगताच तू मला उमगते सारे कळतात तुलाही मौनातील इशारे दोघात कशाला मग शब्दांचा बांध? कळण्याचा चाले कळण्याशी संवाद नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

वरदा Wed, 02/13/2008 - 04:55
डोळ्यांनी तुझ्या प्रेमतुषार उधळले पापण्यांनी माझ्याही ते अलगद झेलले.....

किशोरी Wed, 02/13/2008 - 17:23
>>चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते. "अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय.. हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद आठव पहिली भेट आपुली नयन गुजगोष्टी करी मनातील भाव बोलुन गेल्या बरसणार्‍या श्रावण सरी

In reply to by किशोरी

प्राजु Wed, 02/13/2008 - 21:19
हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद जी मत कहिये जी... वैसे तो आजकल बिस्कीट को भी पारले-जी कहते है... पर आप मुझे प्राजक्ता या प्राजु ही कहिये किशोरीजी । ( - प्राजु (जी) - प्राजी... :)))

स्वाती राजेश Wed, 02/13/2008 - 19:41
प्रथम प्राजुला धन्यवाद. वरदा, किशोरी यानाही प्राजुला साथ दिल्याबद्दल. नंदन, अव्यक्त,अभिजीत, रविराज, धनंजय, विनायक आणि ऋषिकेश यांना धन्यवाद. तुमच्या मुळे इतक्या सुंदर चारोळ्या वाचायला मिळाल्या.:)

सागर Wed, 02/13/2008 - 20:24
वर्षाव प्रेमाचा आज व्हावा असा दिवस हा अति खास व्हावा बघुनि आपले प्रेम ते ... स्वर्गातुनि व्हेलेंटाईन संत तो अवतरावा .... - सागर

In reply to by वरदा

सागर गुरुवार, 02/14/2008 - 19:17
सगळेच एकदम प्रोफेशनल झालेत आता वरदा, तुमच्या मनात सगळ्या ओळी (खरेतर चारोळ्या) उतरल्या म्हणजे सगळे प्रोफेशनल समजायला हरकत नाही ... दर्दीपणा असेल तरच त्या कविता...तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते.... तेव्हा प्रोफेशनल कॅटेगरीत आल्यामुळे आनंद झाला... (चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठीच्या ऑफरची वाट पाहणारा ) सागर

प्राजु Wed, 02/13/2008 - 21:20
सागर, किती छान लिहिल्या आहेत चारोळ्या तुम्ही. खरचं खूप आवडल्या.. - प्राजु

In reply to by प्राजु

सागर गुरुवार, 02/14/2008 - 18:54
धन्यवाद प्राजु, खरंतर चारोळ्या हा माझा प्रांत नव्हता. पण म्हटलं पहावं करुन :) आता चारोळ्याही करायला हरकत नाही.... (म्हणजे मी अजून त्रास देणार सगळ्यांना.... हा हा हा....) (स्वयंघोषित कवी) सागर

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 19:06
तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते अगदी पटलं आणि तुमच्या चारोळ्यात ते स्किल अगदी खरंच छान दिसतंय.. मी उगाच टाईमपास म्हणून लिहायला लागले..तुम्ही आणि किशोरीचं तसं नाही असं म्हणायचं होतं मला...तुम्ही अगदी प्राजु सारखाच छान चारोळ्या करायला लागलात असं म्हणत होते.....

In reply to by वरदा

सागर गुरुवार, 02/14/2008 - 19:25
स्तुतिबद्दल धन्यवाद वरदा, पण मला अजूनही असे वाटते की मी अजून तितका मुरलेला कवी नाहीये... ती पातळी गाठण्यासाठी अजून बरीच मोठी वाटचाल करायची आहे. सध्या मी केवळ बाल्यावस्थेतील कवी आहे. बाळसे धरायला थोडा वेळ लागेल... आणि प्राजुंशी माझी तुलना होणे तर अशक्य आहे. त्यांच्या कविता वा लेखन बरेच प्रगल्भ असते.... मी येथे फक्त मिसळपावाच्या सागरात तरंगण्याचा प्रयत्न करतोय.... पट्टीचा पोहायला वेळ तर लागेलच आणि तुम्हीही खरेच छान लिहितात. सतत लिहित गेलात तर नक्की नावाजलेल्या कवयित्री वा लेखिका व्हाल... शेवटी वाचकांना मनापासून जे लिहिलेले असते ते भावते हेच खरे... तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून खूप खूप आभार.... तुमच्यासारख्या रसिकांमुळे तर कवी जन्मतात.... :) धन्यवाद सागर

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 19:35
अहो तुम्ही पहीलीत तरी पोचलात मी अजुन शिशुवर्गात आहे कवितेच्या... पण मी रसिक म्हणून छान आहे हे बाकी ऐकून बरं वाट्लं थँक्यू..... ठीक तर आता अशाच छान चारोळ्या करत राहा...मी ही प्रयत्न करतेच.....

In reply to by वरदा

सागर गुरुवार, 02/14/2008 - 20:44
मी ही प्रयत्न करतेच..... वरदा, मग येऊ द्यात की अजून चारोळ्या (या वाक्यावरुनही चारोळी करायचा मोह आवरत नाही....) ऐकून तुमच्या आरोळ्या वाटाव्या वाघाच्या डरकाळ्या येऊ द्यात की अजून चारोळ्या त्या व्हॅलेंटाईनच्या उडो चिरफाळ्या..... - सागर

In reply to by सुधीर कांदळकर

सागर Mon, 02/18/2008 - 15:45
सुधीरकाका, अरे हो की..... मी हा विचारच नव्हता केला... अस्सल मिसळपावी झणझणीत चारोळी नाही हाणणार तर कोण? :) मनापासून अनेक धन्यवाद सागर

पुष्कर गुरुवार, 02/14/2008 - 20:36
चित्रात तव त्या रंग माझे एकदा रंगून जा, कुंचला घेऊन हाती चित्र ते माखून जा

सृष्टीलावण्या Tue, 02/19/2008 - 06:33
ते प्रतिभा की काय म्हणतात ते कुठून आणायचे... असो. चारोळी नाही तरी मी केलेला उखाणा देत आहे. एक अधिक एक मिळवेन, संसाराचे गणित नीट जुळवेन, मनात मात्र भिती एकच कोणीतरी ह्यांना पळवेल.

अनिला Tue, 02/19/2008 - 09:57
चरोळी लहान आणी चवही नाही खास पण भावाचे(पैसे नाही) रन्ग उधळून आलेल्या या ओळी लाम्बलचक सन्स्कारभारती रान्गोळ्याची याद देऊन दाद घेऊन जातात. सन्त व्हलेन्ताईन बाबा पर्य न्त जातीलच सर्व ओळीन्मधे पाय गुन्तलेली
पहिल्या भागात पान उलटावे लागत असल्यामुळे इथे सुरू करत आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा भरभरून लिहावे हीच विनंती.. तुझ्या डोळ्यांतल्या नभी माझे स्वच्छंदी विहरणे निळ्या मेघात दाटूनी सरीतूनी बरसणे.. - प्राजु

दिशा, वाट अन् `वाट'

आपला अभिजित ·

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:44
चांगलं आहे विडंबन. मुळ कविताच मला इतकी नाही भावली. पण तुमचं विडंबन चांगलं आहे... - प्राजु.

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:44
चांगलं आहे विडंबन. मुळ कविताच मला इतकी नाही भावली. पण तुमचं विडंबन चांगलं आहे... - प्राजु.
लेखनविषय:
बिनचेहर्‍याच्या अफाट शहरात होता मला एक जीवलग मित्र जणू हरवलेल्या माणसांमधलं माझं रंगभरलं हिरवं चित्र तो मला आवडायचा अन मीही, त्याला आवडायचो फार चर्चा, मस्करी, थट्टेला पूर यायचा अपार... पण हळूहळू दिवस सरले... पाहता पाहता वर्षही सरलं... माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं हे तेव्हा कुठे मला आठवलं! आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...

"जनरल मोटर्स" विरूध्द " मायक्रोसॉफ्ट "

छोटा डॉन ·

चतुरंग Sat, 02/09/2008 - 22:04
हसून हसून खल्लास! एक विनोद - न्यूयॉर्कमधे एकदा एक हेलिकॉप्टर दाट धुक्यात सापडते. त्यांना उतरण्यासाठी हेलीपॅड दिसत नसते. बर्‍याच वेळ ते एका मोठ्या बिल्डिंगच्या भोवती घिरट्या घालत असतात. त्या बिल्डिंगमधले लोक खिडकीतून बघायला लागतात. शेवटी हेलिकॉप्टरमधला एक जण मोठ्या पेपरवर एक मेसेज लिहितो आणि त्या लोकांना दाखवतो - "WHERE ARE WE?" थोड्याच वेळात खिडकीत मेसेज झळकतो - "YOU ARE IN A HELICOPTER!" चालक ताबडतोब हेलिकॉप्टर योग्य जागी नेऊन उतरवतो. दुसरा माणूस त्याला विचारतो अरे अचानक तुला कसे समजले की हेलीपॅड कुठे आहे ते. चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो! त्यामुळे मला लगेच आपलं लोकेशन लक्षात आलं आणि मी उतरलो! चतुरंग

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:19
खूप च हसले... 6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light. 7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying. एकदम मज्जा आली.. - प्राजु

"चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!" सहीच. पुण्याचे पेशवे

वरदा Wed, 02/13/2008 - 01:22
The airbag system would ask "Are you sure?" before deploying. झकास आहे एकदम. ह. ह. पु. वा.

चतुरंग Sat, 02/09/2008 - 22:04
हसून हसून खल्लास! एक विनोद - न्यूयॉर्कमधे एकदा एक हेलिकॉप्टर दाट धुक्यात सापडते. त्यांना उतरण्यासाठी हेलीपॅड दिसत नसते. बर्‍याच वेळ ते एका मोठ्या बिल्डिंगच्या भोवती घिरट्या घालत असतात. त्या बिल्डिंगमधले लोक खिडकीतून बघायला लागतात. शेवटी हेलिकॉप्टरमधला एक जण मोठ्या पेपरवर एक मेसेज लिहितो आणि त्या लोकांना दाखवतो - "WHERE ARE WE?" थोड्याच वेळात खिडकीत मेसेज झळकतो - "YOU ARE IN A HELICOPTER!" चालक ताबडतोब हेलिकॉप्टर योग्य जागी नेऊन उतरवतो. दुसरा माणूस त्याला विचारतो अरे अचानक तुला कसे समजले की हेलीपॅड कुठे आहे ते. चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो! त्यामुळे मला लगेच आपलं लोकेशन लक्षात आलं आणि मी उतरलो! चतुरंग

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:19
खूप च हसले... 6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light. 7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying. एकदम मज्जा आली.. - प्राजु

"चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!" सहीच. पुण्याचे पेशवे

वरदा Wed, 02/13/2008 - 01:22
The airbag system would ask "Are you sure?" before deploying. झकास आहे एकदम. ह. ह. पु. वा.
पुढे ढकललेल्या "विरोपातून " आलेला एक मस्त 'मेल' देत आहे. मुळात तो "इंग्लिश" मध्ये आहे पण त्यातील "तांत्रिक बाबींना पर्यायी मराठी शब्द" मला माहीत नसल्याने मुळ ऊतारा आहे तसा इंग्रजी मधून देत आहे.... At a recent computer expo (COMDEX), Bill Gates reportedly compared the computer industry with the auto industry and stated, "If GM had kept up with technology like the computer industry has, we would all be driving $25.00 cars that got 1,000 miles to the gallon." In response to Bill's comments, General Motors issued a press release Stat

परीचे पशुधन

धनंजय ·

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 10:10
हि दोन्ही पद्ये खूप खूप आवडली... :)) एकदम मस्त!!! शब्द इतके सहज, नादमय, सोपे आहेत की लगेच तोंडात बसतात :) पुलेशु -ऋषि़केश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:01
शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय हा हा हा! मस्तच... :) तात्या.

प्राजु Sun, 02/10/2008 - 00:43
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा खूपच छान... एकदम छानच. - प्राजु

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 10:10
हि दोन्ही पद्ये खूप खूप आवडली... :)) एकदम मस्त!!! शब्द इतके सहज, नादमय, सोपे आहेत की लगेच तोंडात बसतात :) पुलेशु -ऋषि़केश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:01
शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय हा हा हा! मस्तच... :) तात्या.

प्राजु Sun, 02/10/2008 - 00:43
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा खूपच छान... एकदम छानच. - प्राजु
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
परीचे पशुधन ***************** परीच्या गोठ्यात गोगलगाय तिच्या दुधाची चंदेरी साय शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय *** परीच्या छतातलं चिमणीचं घरटं लखलख काचेचं चकचक करतं चिमणीच्या चालतो आराम मस्त गरजेच्या वेळी तेलच नसतं *** परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा *** परीच्या झाडावर पराचा कावळा नका रे समजू कावळ्याला बावळा कोकलतो कोहळा असल्यास आवळा मागून माजतो गोंधळ सावळा *****************

महामानवाला प्रणाम!

विसोबा खेचर ·

प्राजु Sat, 02/09/2008 - 09:25
आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! अगदी मनातलं बोललात तात्या.. कोटी कोटी प्रणाम बाबांना..! - प्राजु

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 10:04
आमचीही आदरांजली... अवांतर : आत्ता जालावर आल्यावर कळले...आज सकाळच्या वर्तमानपत्रांत दिसली नाही बातमी... ते आज पहाटे गेले का?

झकासराव Sat, 02/09/2008 - 12:11
असताना एकदा आनंवनात जावुन त्यांच्यासोबत ताडोबा फिरण्याची एक वेडी इच्छा आणि आशा होती मनात. ती राहुनच गेली की. :( बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. अमर आणि चिरंजिव झालात तुम्ही तुमच्या अफाट कार्यातुन.

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 16:35
कालच एका निराळ्या संदर्भात त्यांच्या काव्यपंक्ति 'क्वोट' केल्या आणि आज ही अशुभ बातमी समजली. :( बाबांच्या स्म्रूतींना सहस्र प्रणाम! दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती. (शोकाकुल) पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 21:37
त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली. कुष्ठे झडता अंगहि सगळे वाळित पडता 'माणुस' तो, त्याला उचलुन घेउन सदनी महामानव हा येइ जो, अविचल निष्ठा, अथक श्रमांनी करे 'साधना', मुनीच तो, 'वनीआनंदी' स्मृति ह्या ठेवुनी वैकुंठाला जातो तो. चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 22:53
महामानव बाबा आमटे या॑चे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बाबा॑ची मृत्युशी शेवटची झु॑ज स॑पली. आत्ता पर्य॑त बाबा॑नी यमदूता॑ना किती तरी वेळा हसत हसत परतवून लावले होते..लग्नाच्या वेळी, वरोर्‍याच्या ज॑गलात, ऑपरेशन टेबलवर (हे तर कित्येकदा..). कितीही स॑कटे उभी राहिली तरी निर्धाराने इप्सित साध्य करणार्‍या बाबा॑ना साक्षात मृत्युनेही कुर्निसात केला असेल..

सर्किट Mon, 02/11/2008 - 12:53
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही... - सर्किट

मानस Mon, 02/11/2008 - 23:56
महामानव श्री. बाबा आमटे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कुसूमाग्रजांची "संत" ही कविता येथे देत आहे. “साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा” आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण - उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी? कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही - माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्नि-रेषा. अशाच शंभर आभासात पहाट रात्रीच्या नि:शब्दातून मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही. सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्या विराट वृक्षावर अपराजित कुर्हारड मारणारा तू सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निभेर्ळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू - अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर - सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर - आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्याचा जयजयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा, आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे तुमच्या मेलेल्या मतांचे, आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार - एखादा गुच्छ एखादा हार - तीस पायांवर सरपटणार्याा कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार. पण तरीही - त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं - आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी जुने पडते आहे नवे घडते आहे काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे तांबडेलाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून काळाच्या किनार्या वरून धावणारं संग्रामशील माणूसपण. '' तुम्ही जाता तुमच्या गावा अमुचा रामराम घ्यावा.'' हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गानं जा मागे वळून पाहू नकोस जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथसोबत आम्ही करणार नाही आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण... '' जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती चालवील हाती - धरोनिया.''

प्राजु Sat, 02/09/2008 - 09:25
आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! अगदी मनातलं बोललात तात्या.. कोटी कोटी प्रणाम बाबांना..! - प्राजु

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 10:04
आमचीही आदरांजली... अवांतर : आत्ता जालावर आल्यावर कळले...आज सकाळच्या वर्तमानपत्रांत दिसली नाही बातमी... ते आज पहाटे गेले का?

झकासराव Sat, 02/09/2008 - 12:11
असताना एकदा आनंवनात जावुन त्यांच्यासोबत ताडोबा फिरण्याची एक वेडी इच्छा आणि आशा होती मनात. ती राहुनच गेली की. :( बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. अमर आणि चिरंजिव झालात तुम्ही तुमच्या अफाट कार्यातुन.

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 16:35
कालच एका निराळ्या संदर्भात त्यांच्या काव्यपंक्ति 'क्वोट' केल्या आणि आज ही अशुभ बातमी समजली. :( बाबांच्या स्म्रूतींना सहस्र प्रणाम! दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती. (शोकाकुल) पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 21:37
त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली. कुष्ठे झडता अंगहि सगळे वाळित पडता 'माणुस' तो, त्याला उचलुन घेउन सदनी महामानव हा येइ जो, अविचल निष्ठा, अथक श्रमांनी करे 'साधना', मुनीच तो, 'वनीआनंदी' स्मृति ह्या ठेवुनी वैकुंठाला जातो तो. चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 22:53
महामानव बाबा आमटे या॑चे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बाबा॑ची मृत्युशी शेवटची झु॑ज स॑पली. आत्ता पर्य॑त बाबा॑नी यमदूता॑ना किती तरी वेळा हसत हसत परतवून लावले होते..लग्नाच्या वेळी, वरोर्‍याच्या ज॑गलात, ऑपरेशन टेबलवर (हे तर कित्येकदा..). कितीही स॑कटे उभी राहिली तरी निर्धाराने इप्सित साध्य करणार्‍या बाबा॑ना साक्षात मृत्युनेही कुर्निसात केला असेल..

सर्किट Mon, 02/11/2008 - 12:53
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही... - सर्किट

मानस Mon, 02/11/2008 - 23:56
महामानव श्री. बाबा आमटे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कुसूमाग्रजांची "संत" ही कविता येथे देत आहे. “साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा” आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण - उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी? कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही - माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्नि-रेषा. अशाच शंभर आभासात पहाट रात्रीच्या नि:शब्दातून मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही. सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्या विराट वृक्षावर अपराजित कुर्हारड मारणारा तू सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निभेर्ळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू - अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर - सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर - आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्याचा जयजयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा, आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे तुमच्या मेलेल्या मतांचे, आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार - एखादा गुच्छ एखादा हार - तीस पायांवर सरपटणार्याा कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार. पण तरीही - त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं - आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी जुने पडते आहे नवे घडते आहे काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे तांबडेलाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून काळाच्या किनार्या वरून धावणारं संग्रामशील माणूसपण. '' तुम्ही जाता तुमच्या गावा अमुचा रामराम घ्यावा.'' हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गानं जा मागे वळून पाहू नकोस जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथसोबत आम्ही करणार नाही आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण... '' जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती चालवील हाती - धरोनिया.''
लेखनविषय:
लेखनप्रकार
समस्त मिसळपाव परिवारातर्फे बाबा आमटे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आदरांजली! या महामानवाला आमचे कोटी कोटी प्रणाम! बाबा आमटे ही व्यक्ति नसून एक संस्था होती. व्यक्ति येतात, जातात, परंतु संस्था ही नेहमी कायमस्वरुपी असते/असावी! आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! (नतमस्तक) तात्या.

शेजारचे जातियवाद व राजकारण

सतीश वळीव ·

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 02:46
सर्वप्रथम या मिपाच्या कट्ट्यावर आपले स्वागत!..
मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.
या स्थळावर येत रहा . इथे खूप दिलदार मंडळी आहेत. या दिलखुलास स्थळाने मनात कोणाविषयी दुराग्रह/तेढ बाळगून होणारे वर्तन/लेखन होऊ दिलेले नाहि तेव्हा इथे आपले विचार खुशाल प्रकट करावेत. इथे इतरांच्याही लिखाणाचा आस्वाद घ्या आणि तुमचेही विचार बोलून दाखवा ... बोले तो बिंदास!! ;) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:38
म्हणतो..! सतीशरावांचे मिपावर मनापासून स्वागत! आजपासून सतीशराव मिपाचे आहेत, मिपा सतीशरावांचं आहे... बरं का सतीशराव, जातीपातींचे जात, पोटजात, उपजात आणि कुठली कुठली जात असे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे धर्मही अनेक आहेत. परंतु आपल्या मिसळपाव या संस्थळापुरतं बोलायचं झालं तर इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! हां, परंतु जर का आपल्याला मिसळपाव हा पदार्थ आवडत नसेल आणि जर आपलं या पदार्थावर प्रेम नसेल तर मात्र आपल्या येथील सभासदत्वाबद्दल मिसळपावला फेरविचार करावा लागेल! :)) (ह घ्या!) आपला, (जातीने मिसळपावप्रेमी आणि धर्माने मिसळपावधर्मी !) संत तात्याबा महाराज, संस्थापक - मिसळपावधर्म! -- मिसळपाव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा! :) तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

आपल्या वेदना वाचून दःख झाले. आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागात? शहरी भागात सध्यातरी जातीयता कमी आहे असे मी मानतो. तरी आपण धीर सोडला नाहीत हे वाचून आनंद वाटला. देव तुम्हाला या ही परीस्थितीतून नक्की बाहेर काढेल. -आशावादी. पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 03:31
प्रिय सतीशराव, सर्वात आधी तुम्ही मनमोकळे लिहील्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! जातीयवादाची समस्या उग्र आहे हे तर सत्यच आहे. त्यापायी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना होणारया त्रासाबद्दल अत्यंत खेद होतो. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार. तुम्ही म्हणता ते पूर्णपणे खरे आहे. पण तुम्ही जर तुमचा चांगुलपणा सोडून दिलात तर तो तुम्हाला कमी लेखणारयांचा विजय नाही का? तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवावे अशी तुम्हाला विनंती आहे. सतत प्रयत्न करणारयाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. "जाको राखे साईंया, मार सके ना कोय!" आणखी एक, तुम्ही मागासवर्गीय असल्याबद्द्ल मुळीच न्यूनगंड मनात बाळगू नये. माणसाची लायकी त्याच्या जन्मावर अवलंबून नसते. तुकोबांनी म्हटलंच आहे, "बरे झाले कुणबी केलो, नाहितर दंभेची असतो मेलो" तुकोबांना तथाकथित उच्चवर्णियांनी काय कमी त्रास दिला? पण आज तीनशे वर्षे झाली, तुकोबा माहित नसलेला मराठी माणूस सापडणार नाही, आणि त्यांना त्रास देणारयांची नांवेही राहिली नाहीत. बाबा आमट्यांनी म्हटल्याप्रमाणे, "सत्ता असते महंतांची, नांवे राहतात ती संतांची, पण महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत" तुमचे विचार निर्भीडपणे मांडत रहा. आपला स्नेहाभिलाषी, पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 04:15
आपले अनुभव वाचून दु:ख झाले पण आपली आणि आपल्या कुटुंबियांची वेदना खरी आहे. आपल्या समाजाचा हा रोग आपल्या सर्वांच्या प्रयत्नानेच एक दिवस जाईल. "मिसळपाव"च्या ह्या कट्टयावर जगातल्या अनेक देशातून लोक मनमोकळ्या गप्पा मारायला इथे येतात. सगळ्यांची इथली भाषा "मराठी" आणि जात एकच "मिसळपाववाले भारतीय!" "चांगले वागणे सोडू का? मदत करणे थांबवू का?" असे तुम्ही विचारता आहात - तसे करु नका कारण तीच तुमच्या मनाची शक्ती आहे - पण फसवणार्‍या माणसांशी, तुमची मदत घेऊन तुम्हालाच खेचणार्‍याशी सावधपणेच वागा, नाहीतर तुमचा गैरफायदा घेतला जाईल, असे सांगावेसे वाटते. तेव्हा असेच या, लिहीत रहा, वाचत रहा. पुन्हा एकदा आपले स्वागत! चतुरंग

सतीशराव, आपले इथे स्वागत आहे, आपले लेखन या संस्थळावर वाचायला आम्हाला आवडेल. बाकी आपला अनुभव वाचला, वाईटच वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:13
बघा बरं.. इथे किती लोक आहेत तुम्हाला आपलं मानणारे..! तुम्ही हे जातियवाद... सगळं डोक्यातून काढोन टाका. इथे या गप्पाटप्पा करा.. तुमचे विचार मांडा, इतरांचे ऐका. मिसळीवर ताव मारा.. बाकी सगळं विसरून जा. - प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:24
इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! असे म्हणणे आहे. एक काम करा. जगातील सगळे धर्म, जाती, उपजाती, पोटजाती एकत्र करा आणि यंदा होळीत जाळा. तेवढा धीर नसेल तर मस्त थंडी पडली आहे. शेकोटी पेटवा व त्यात जाळा. मी ते लहानणीच जाळले.

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 02:46
सर्वप्रथम या मिपाच्या कट्ट्यावर आपले स्वागत!..
मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.
या स्थळावर येत रहा . इथे खूप दिलदार मंडळी आहेत. या दिलखुलास स्थळाने मनात कोणाविषयी दुराग्रह/तेढ बाळगून होणारे वर्तन/लेखन होऊ दिलेले नाहि तेव्हा इथे आपले विचार खुशाल प्रकट करावेत. इथे इतरांच्याही लिखाणाचा आस्वाद घ्या आणि तुमचेही विचार बोलून दाखवा ... बोले तो बिंदास!! ;) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:38
म्हणतो..! सतीशरावांचे मिपावर मनापासून स्वागत! आजपासून सतीशराव मिपाचे आहेत, मिपा सतीशरावांचं आहे... बरं का सतीशराव, जातीपातींचे जात, पोटजात, उपजात आणि कुठली कुठली जात असे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे धर्मही अनेक आहेत. परंतु आपल्या मिसळपाव या संस्थळापुरतं बोलायचं झालं तर इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! हां, परंतु जर का आपल्याला मिसळपाव हा पदार्थ आवडत नसेल आणि जर आपलं या पदार्थावर प्रेम नसेल तर मात्र आपल्या येथील सभासदत्वाबद्दल मिसळपावला फेरविचार करावा लागेल! :)) (ह घ्या!) आपला, (जातीने मिसळपावप्रेमी आणि धर्माने मिसळपावधर्मी !) संत तात्याबा महाराज, संस्थापक - मिसळपावधर्म! -- मिसळपाव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा! :) तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

आपल्या वेदना वाचून दःख झाले. आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागात? शहरी भागात सध्यातरी जातीयता कमी आहे असे मी मानतो. तरी आपण धीर सोडला नाहीत हे वाचून आनंद वाटला. देव तुम्हाला या ही परीस्थितीतून नक्की बाहेर काढेल. -आशावादी. पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 03:31
प्रिय सतीशराव, सर्वात आधी तुम्ही मनमोकळे लिहील्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! जातीयवादाची समस्या उग्र आहे हे तर सत्यच आहे. त्यापायी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना होणारया त्रासाबद्दल अत्यंत खेद होतो. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार. तुम्ही म्हणता ते पूर्णपणे खरे आहे. पण तुम्ही जर तुमचा चांगुलपणा सोडून दिलात तर तो तुम्हाला कमी लेखणारयांचा विजय नाही का? तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवावे अशी तुम्हाला विनंती आहे. सतत प्रयत्न करणारयाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. "जाको राखे साईंया, मार सके ना कोय!" आणखी एक, तुम्ही मागासवर्गीय असल्याबद्द्ल मुळीच न्यूनगंड मनात बाळगू नये. माणसाची लायकी त्याच्या जन्मावर अवलंबून नसते. तुकोबांनी म्हटलंच आहे, "बरे झाले कुणबी केलो, नाहितर दंभेची असतो मेलो" तुकोबांना तथाकथित उच्चवर्णियांनी काय कमी त्रास दिला? पण आज तीनशे वर्षे झाली, तुकोबा माहित नसलेला मराठी माणूस सापडणार नाही, आणि त्यांना त्रास देणारयांची नांवेही राहिली नाहीत. बाबा आमट्यांनी म्हटल्याप्रमाणे, "सत्ता असते महंतांची, नांवे राहतात ती संतांची, पण महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत" तुमचे विचार निर्भीडपणे मांडत रहा. आपला स्नेहाभिलाषी, पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 04:15
आपले अनुभव वाचून दु:ख झाले पण आपली आणि आपल्या कुटुंबियांची वेदना खरी आहे. आपल्या समाजाचा हा रोग आपल्या सर्वांच्या प्रयत्नानेच एक दिवस जाईल. "मिसळपाव"च्या ह्या कट्टयावर जगातल्या अनेक देशातून लोक मनमोकळ्या गप्पा मारायला इथे येतात. सगळ्यांची इथली भाषा "मराठी" आणि जात एकच "मिसळपाववाले भारतीय!" "चांगले वागणे सोडू का? मदत करणे थांबवू का?" असे तुम्ही विचारता आहात - तसे करु नका कारण तीच तुमच्या मनाची शक्ती आहे - पण फसवणार्‍या माणसांशी, तुमची मदत घेऊन तुम्हालाच खेचणार्‍याशी सावधपणेच वागा, नाहीतर तुमचा गैरफायदा घेतला जाईल, असे सांगावेसे वाटते. तेव्हा असेच या, लिहीत रहा, वाचत रहा. पुन्हा एकदा आपले स्वागत! चतुरंग

सतीशराव, आपले इथे स्वागत आहे, आपले लेखन या संस्थळावर वाचायला आम्हाला आवडेल. बाकी आपला अनुभव वाचला, वाईटच वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:13
बघा बरं.. इथे किती लोक आहेत तुम्हाला आपलं मानणारे..! तुम्ही हे जातियवाद... सगळं डोक्यातून काढोन टाका. इथे या गप्पाटप्पा करा.. तुमचे विचार मांडा, इतरांचे ऐका. मिसळीवर ताव मारा.. बाकी सगळं विसरून जा. - प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:24
इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! असे म्हणणे आहे. एक काम करा. जगातील सगळे धर्म, जाती, उपजाती, पोटजाती एकत्र करा आणि यंदा होळीत जाळा. तेवढा धीर नसेल तर मस्त थंडी पडली आहे. शेकोटी पेटवा व त्यात जाळा. मी ते लहानणीच जाळले.
लेखनविषय:
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.

नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ? (मटामधील बातमी)

इनोबा म्हणे ·

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:02
वाचून अतिशय आन॑द जाहला... आता आपापली गाठोडी काठीच्या टोकाला बा॑धून मराठी माणसाने "ॐ भवति .." करत फिरायची तयारी सुरू करावी. की छानपैकी काशीयात्रेला निघून तिकडेच ग॑गामाईच्या तिरी टाचा घासून प्राण सोडावेत? ह॑...कदाचित लवकरच यातला योग्य तो उपाय आपले दूरदृष्टीशून्य राजकीय नेते स्वतःच्या बुडाखालची खुर्ची वाचवताना एखादी दळभद्री युती करून आपल्या समोर सादर करतीलच, यात श॑का नसावी. राज ठाकरे॑च्या नावाने गळे काढणार्‍याना योग्य त्या वेळी कळेलच, काय योग्य अन् काय अयोग्य ते. चला म्हणजे आता "मुक्त"राज्याचा टे॑भा फक्त बिहारनेच मिरवायला नको, महाराष्ट्राचाही लवकरच न॑बर लागेल हो !!!. आपला - (भैय्याप्रेमी(?), पराकोटीचा पुरोगामी (यडxx)विचारव॑त) ध मा ल.

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 21:31
हा लेख एकांगी आणि एक खास दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्यासारखा वाटतो आहे. पण त्यात मतदारसंघ पुनर्रचना अंमलात येत असल्याचं वाचून आनंद झाला. (असे झाले तरीही महाराष्ट्रात बिगरमराठी मुख्यमंत्री होणे कठीण वाटते. हे आपलं माझं मत) असो. या पुनर्रचनेचा मुख्य फायदा असा की आता पुन्हा प्रत्येक मतदार संघात साधारण सारखेच मतदार झाले आहेत. उपनगरात अशा छोट्या मतदारसंघांची गरजच होती. जितका मतदार संघ छोटा तितके प्रशासन नेटके होऊ शकते. आणि चांगले प्रशासन हे व्यक्तीचा प्रांत, धर्म, जातस आदि बघून दिले जात नाहि (उदा. गुजरातेत प्रत्येक गावात वीज आली ती, हा गुजराती आहे, हा हिंदु आहे त्यांनाच वीज असा प्रकार नव्हता.) अश्या पुर्रचनेने (जर झाला तर) विकास हा सगळ्यांचाच होणार आहे. मराठी मंडळींचा आणि बिगरमराठी लोकांचाहि! -ऋषिकेश

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 18:34
बिगर मराठी ग्रुह मन्त्री क्रुपा शन्कर सिंह होतच ना........ त्याना मराठी भाशा समजत नाही...... आपल्या द्ळ्भद्री ( खास् थोरल्या ठाकर्यान्चा अवडता शब्द) सहिश्णु व्रुत्तिमुळे हे सगळे होतेय.

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:02
वाचून अतिशय आन॑द जाहला... आता आपापली गाठोडी काठीच्या टोकाला बा॑धून मराठी माणसाने "ॐ भवति .." करत फिरायची तयारी सुरू करावी. की छानपैकी काशीयात्रेला निघून तिकडेच ग॑गामाईच्या तिरी टाचा घासून प्राण सोडावेत? ह॑...कदाचित लवकरच यातला योग्य तो उपाय आपले दूरदृष्टीशून्य राजकीय नेते स्वतःच्या बुडाखालची खुर्ची वाचवताना एखादी दळभद्री युती करून आपल्या समोर सादर करतीलच, यात श॑का नसावी. राज ठाकरे॑च्या नावाने गळे काढणार्‍याना योग्य त्या वेळी कळेलच, काय योग्य अन् काय अयोग्य ते. चला म्हणजे आता "मुक्त"राज्याचा टे॑भा फक्त बिहारनेच मिरवायला नको, महाराष्ट्राचाही लवकरच न॑बर लागेल हो !!!. आपला - (भैय्याप्रेमी(?), पराकोटीचा पुरोगामी (यडxx)विचारव॑त) ध मा ल.

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 21:31
हा लेख एकांगी आणि एक खास दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्यासारखा वाटतो आहे. पण त्यात मतदारसंघ पुनर्रचना अंमलात येत असल्याचं वाचून आनंद झाला. (असे झाले तरीही महाराष्ट्रात बिगरमराठी मुख्यमंत्री होणे कठीण वाटते. हे आपलं माझं मत) असो. या पुनर्रचनेचा मुख्य फायदा असा की आता पुन्हा प्रत्येक मतदार संघात साधारण सारखेच मतदार झाले आहेत. उपनगरात अशा छोट्या मतदारसंघांची गरजच होती. जितका मतदार संघ छोटा तितके प्रशासन नेटके होऊ शकते. आणि चांगले प्रशासन हे व्यक्तीचा प्रांत, धर्म, जातस आदि बघून दिले जात नाहि (उदा. गुजरातेत प्रत्येक गावात वीज आली ती, हा गुजराती आहे, हा हिंदु आहे त्यांनाच वीज असा प्रकार नव्हता.) अश्या पुर्रचनेने (जर झाला तर) विकास हा सगळ्यांचाच होणार आहे. मराठी मंडळींचा आणि बिगरमराठी लोकांचाहि! -ऋषिकेश

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 18:34
बिगर मराठी ग्रुह मन्त्री क्रुपा शन्कर सिंह होतच ना........ त्याना मराठी भाशा समजत नाही...... आपल्या द्ळ्भद्री ( खास् थोरल्या ठाकर्यान्चा अवडता शब्द) सहिश्णु व्रुत्तिमुळे हे सगळे होतेय.
महाराष्ट्र टाईम्स मधील 'नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ?' ही बातमी वाचा. अटकेपार झेंडे रोवणार्‍या मराठ्यांवर आता परप्रांतीय राज्य करणार काय?

सोड असले नाद सगळे

केशवसुमार ·

इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53
केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26
लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31
सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.

वरदा Fri, 02/08/2008 - 17:45
काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43
आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34
सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश

केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53
केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26
लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31
सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.

वरदा Fri, 02/08/2008 - 17:45
काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43
आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34
सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश

केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
लेखनविषय:
आमची प्रेरणा अदितीताईंची कविता काल सांगावा मिळाला.... घालते डोळा मला ती दाबते ओठास दाती काय रे येतोस का तू सोबतीला सांग राती पाहुनी घायाळ झालो पण पुढे झाली न छाती वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती --केशवसुमार (माघ शु.१ शके १९२९, ८ फेब्रु. २००८)