मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ...

छोटा डॉन ·

वरदा Tue, 02/12/2008 - 22:46
कितीतरी मुलींचही होतंच की..मुलाचे आईवडील लग्नाला होकार देत नाहीत..मग तो शेवटी नाही म्हणतो लग्नाला...शिवाय लग्न करून त्याचे आईवडील छळ करतात ते मुलींचेच... मुलाने त्यांचं न ऐकता प्रेमविवाह केला म्हणुन... आता त्याने प्रेम केलं तसंच तिनंही प्रेम केलं असेल पण ते प्रॅक्टीकल नव्हतं..तिला वाढवलेल्या आई वडिलांच्या इच्छेचा तिने आदर केला ही तिची चूक का? मग तिथूनही बोलणार कशा या मुली पळून जातात म्हणून.. हे कुणाच्याही बाबतीत होतं कितीतरी मुलं खूप भटकल्यावर सांगतात माझ्या घरी कधीच चालणार नाही टाटा बाय बाय... स्वाती म्हणते तेच खरं हेच आयुष्य आहे...लोक भेटत रहातात कधी चांगले तर कधी वाईट वागत रहातात आणि आपण पुढे जात रहातो..जमेल तेव्हा मदत करतो पण म्हणून परतफेडीची अपेक्षाच करणं चुकीचं असतं ह्यात मुलं आणि मुली असा सुर नका हो लावू...तुमच्याच ओळखीत कितीतरी साध्या आणि असं न करणार्‍या मुली असतील की.....

In reply to by वरदा

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 20:55
आपण वर व्यक्त केलेली सर्व मते मला मान्य आहेत पण हे सर्व होणार ही शक्यता जवळजवळ माहीत असून सुध्धा मुलाकडून अथवा मुलीकडून ही चूक घडतेच. हे पण बरोबर आहे की 'प्रेमाच्या कल्पनेच्या मनोराज्यात रमणे""प्रॅक्टिकल लाईफ " यात खूप अंतर आहे. कारण शेवटी "लाईफ इज ऍन ऍडजस्टमेंट ". प्रत्येक केलेल्या मदतीबद्दल परतफेडीची अपेक्षा करणे चूकच आहे. पण मला असे वाटते की "जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ......

वरदा Wed, 02/13/2008 - 21:27
जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ...... आता हे समोरच्या व्यक्तीला माहीत आहे हे कशावरून हा पहीला प्रश्न मला पडतो..काही जण अगदी सहज मैत्रीण म्हणूनही मदत करणारे भेटतात्...आणि खरोखर खूप मदत करतातही..तिने कसं समजावं की नक्की हा आपल्यावर प्रेम करतो... दुसरी गोष्ट ती कदाचीत तितकंच प्रेम करतही असेल त्याच्यावर पण तिला माहीती आहे की ह्याचा अंजाम चांगला होणार नाहीये...तिला माहितेय की हे सगळं अजिबात शक्यच नाहीये..मग हेच रडून आहे रे माझही प्रेम पण हे नाही जमणार असं सांगितलं की तो म्हणणार तू तयार असशील तर आपण पळून जाऊ जे तिला करायचं नाहीये...काही मुलं त्याही वर जाऊन तिला प्रेशराईज करू शकतात्...त्यातुन तिच्या आई वडिलांना मनस्ताप होऊ शकतो..तिच्या घरी कुणी हार्ट पेशंट असु शकतं....त्यासाठी तिला हे सगळं टाळायचंय्....मग ती काय करेल? सांगेल माझं प्रेमच नाहीये...मग हे जास्तं सोप्प होईल ना.... ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही...

In reply to by वरदा

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 21:58
वरदा, तुझे दोन्ही प्रतिसाद आवडले, छान मनमोकळे वाटले. छोट्या डॉन साहेबांनीही छान लिहिलं आहे. स्वातीताईशी सहमत.. छोटे डॉनराव, और भी लिख्खो.. तात्या.

In reply to by वरदा

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 23:40
तू मांडलेल्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ..... जन्मभर मनस्ताप करून घेण्यापेक्षा एकदा खोटे बोलणे कधीही उत्तम .....

प्राजु Wed, 02/13/2008 - 22:58
ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही... हे मात्र अगदी खरं आहे. बर्‍याच वेळेला खोटं बोलावं लागतं. वरदाच प्रतिसाद आवडला. - प्राजु

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/14/2008 - 09:49
'त्याने' आणि 'तिने' डोळस प्रेम करावे. जेंव्हा तो तिच्यासाठी इतकं काही करतो आहे आणि तीही आनंदाने ते करवून घेते आहे तेंव्हा (आजकालच्या जमान्यात तरी) 'तिला' 'त्याच्या' भावनांची अजिबात कल्पना नव्हती, नसेल असे मानणे दांभिकपणाचे होईल. मुलांपेक्षा मुलींना 'सिग्नल्स' जास्त झटकन कळतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. जो पर्यंत 'त्याने' प्रेम शब्दांत व्यक्त केलेले नाही तो पर्यंत आपणही 'नकार' शब्दात व्यक्त करायचा नाही. पण त्याच्या 'त्या' भावनांचा पुरेपुर फायदा मात्र करून घ्यायचा ह्याला स्वार्थ ह्या शिवाय दूसरा पर्यायी शब्द नाही. हे असे ,मुलाने किंवा मुलीने, कोणीही वागणे गैरच ठरावे. आपल्या घरात ज्याचा/जिचा स्विकार होऊ शकेल किंवा होऊ शकणार नाही, आपल्या घरातील एखाद्याला हार्टचा त्रास आहे किंवा नाही ह्याची त्याला/तिला पूर्वकल्पना असतेच. त्यानुसारच स्वतःचे वर्तन ठेवावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. ज्याचे/ जिचे ज्याच्यावर/जिच्यावर प्रेम असते त्याने/तिने त्याच्या/तिच्या जवळ ते लवकरात लवकर व्यक्त करावे आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जात नाही आहोत ह्याची खात्री करून घ्यावी. प्रत्यक्ष आयुष्यातही एखादा पत्ता शोधताना आपण इतरांना विचारत विचारत आपण चूकीच्या रस्त्यावर तर जात नाही नं ह्याची खात्री करीत पुढे जातो. प्रेमाच्या गावी जातानाही 'त्या' व्यक्तीला विचारुन आपण योग्य त्या वाटेवर आहोत ह्याची खात्री करून घ्यावी म्हणजे अतिदूर गेल्यावर 'पत्ता चुकल्याच्या' भावनेला आपण अडखळून तोंडघशी पडत नाही. मुलींनीही जो मुलगा आवडत नाही, ज्याला आपल्या घरात स्विकारणार नाहीत किंवा आवडत असला तरी ज्याच्याशी लग्न केल्याने आपल्या घरातील कोणास हार्ट ऍटॅक येण्याचा ECG रिपोर्ट आपल्या हाती असेल तर, त्या मुलास उभयतांच्या नात्यातील स्वतःच्या भूमिकेची स्व्च्छ कल्पना द्यावी, अंधारात ठेवू नये. शुद्ध मैत्रीचे प्रपोजल मांडावे. ते स्विकारले तर उत्तमच आहे आणि नाकारले तर भिन्न मार्ग (दोघांनीही) अनुषंगावे. मुलांनीही ज्या मुलीत त्यांना तसा इंटरेस्ट असतो त्यांनी लवकरात लवकर आपल्या भावना स्पष्ट शब्दात तिच्या जवळ व्यक्त करून तिचा कल समजून घ्यावा. तिने तुम्हास प्रियकर म्हणून स्विकारले तर नंतरची कांही वर्षेतरी दोघांनाही स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असा अनुभव येईल परंतु कुठल्याही कारणाने तिने नकार दिला तर खचून जाऊ नये. मनात राग धरून आपल्या तथाकथित प्रेमातील उथळपणाचे प्रदर्शन तर अजिबात करू नये. तुमच्या इतकीच तीही एक व्यक्ती आहे आणि तिलाही तिची स्वतःची मते आहेत. (कदाचीत तुम्हाला न पटणारी) त्यांचा आदर करावा. मुलीने नुसत्या मैत्रीचा आग्रह धरला तर, ती म्हणाली नाही तरी त्यात, शारीरिक सुखाला यत्किंचितही जागा नसते/नसावी हे ध्यानात असू द्यावे. पण त्या मैत्रीच्या नात्यात मुलीने जर शारीरिक संबंधांना हिरवा सिग्नल दाखवला तर मात्र अशा मुली पासून चार हात दूरच राहावे. (इथे मनाचा निग्रह भयंकर लागतो) एवंच काय तर प्रेम डोळे उघडे ठेवून करा.

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 18:27
की एक कुणी दोशी असेल असं नाही...फक्त मुलीच असं करतात हे म्हणणं चूक आहे. माझ्या कॉलेजमधल्या एका मुलाचे ३ वर्षे एका मुलीबरोबर अफेअर होते आणि शेवटच्या वर्षात अचानक तो दुसर्‍या मुलीशी लग्न करून कॉलेजला आला. सगळेच चमकले. का तर म्हणे त्याची आजी खूप म्हातारी होती आणि तिला नातवाचं लग्न बघायचं होतं तेही त्यांच्याच नात्यातल्या कुणी मुलीशी...त्याने तिला साधी कल्पनाही दिली नाही की तो लग्न करणारे ह्याची. हे असं मुलंही करतात..तिचं बिचारीचं अभ्यासातंलं लक्ष एवढं उडालं की १ वर्ष वाया गेलं...

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 20:26
त्याने प्रथम ही मदत सौजन्य म्हणून देखील केली असेल. ती शहरात नवीन असल्यामुळे. तिचे रूप, तिचे विचार, तिचा स्वभाव त्याला आवडले की नाही हे दिलेले नाही. केवळ मुलगी आहे म्हणून कोण उठसूठ प्रेमात पडत नाही. त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा. हे विचित्र वाटले. पुरूष एवढा बदलू शकतो? तो एवढा कणाहीन आहे? तिने त्याच्यासाठी काय केले? काही नाही? मग ती स्वार्थी आहे. आणि तो मूर्ख आहे. आणि तिचा निर्णय अपेक्षितच आहे.

वरदा Tue, 02/12/2008 - 22:46
कितीतरी मुलींचही होतंच की..मुलाचे आईवडील लग्नाला होकार देत नाहीत..मग तो शेवटी नाही म्हणतो लग्नाला...शिवाय लग्न करून त्याचे आईवडील छळ करतात ते मुलींचेच... मुलाने त्यांचं न ऐकता प्रेमविवाह केला म्हणुन... आता त्याने प्रेम केलं तसंच तिनंही प्रेम केलं असेल पण ते प्रॅक्टीकल नव्हतं..तिला वाढवलेल्या आई वडिलांच्या इच्छेचा तिने आदर केला ही तिची चूक का? मग तिथूनही बोलणार कशा या मुली पळून जातात म्हणून.. हे कुणाच्याही बाबतीत होतं कितीतरी मुलं खूप भटकल्यावर सांगतात माझ्या घरी कधीच चालणार नाही टाटा बाय बाय... स्वाती म्हणते तेच खरं हेच आयुष्य आहे...लोक भेटत रहातात कधी चांगले तर कधी वाईट वागत रहातात आणि आपण पुढे जात रहातो..जमेल तेव्हा मदत करतो पण म्हणून परतफेडीची अपेक्षाच करणं चुकीचं असतं ह्यात मुलं आणि मुली असा सुर नका हो लावू...तुमच्याच ओळखीत कितीतरी साध्या आणि असं न करणार्‍या मुली असतील की.....

In reply to by वरदा

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 20:55
आपण वर व्यक्त केलेली सर्व मते मला मान्य आहेत पण हे सर्व होणार ही शक्यता जवळजवळ माहीत असून सुध्धा मुलाकडून अथवा मुलीकडून ही चूक घडतेच. हे पण बरोबर आहे की 'प्रेमाच्या कल्पनेच्या मनोराज्यात रमणे""प्रॅक्टिकल लाईफ " यात खूप अंतर आहे. कारण शेवटी "लाईफ इज ऍन ऍडजस्टमेंट ". प्रत्येक केलेल्या मदतीबद्दल परतफेडीची अपेक्षा करणे चूकच आहे. पण मला असे वाटते की "जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ......

वरदा Wed, 02/13/2008 - 21:27
जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ...... आता हे समोरच्या व्यक्तीला माहीत आहे हे कशावरून हा पहीला प्रश्न मला पडतो..काही जण अगदी सहज मैत्रीण म्हणूनही मदत करणारे भेटतात्...आणि खरोखर खूप मदत करतातही..तिने कसं समजावं की नक्की हा आपल्यावर प्रेम करतो... दुसरी गोष्ट ती कदाचीत तितकंच प्रेम करतही असेल त्याच्यावर पण तिला माहीती आहे की ह्याचा अंजाम चांगला होणार नाहीये...तिला माहितेय की हे सगळं अजिबात शक्यच नाहीये..मग हेच रडून आहे रे माझही प्रेम पण हे नाही जमणार असं सांगितलं की तो म्हणणार तू तयार असशील तर आपण पळून जाऊ जे तिला करायचं नाहीये...काही मुलं त्याही वर जाऊन तिला प्रेशराईज करू शकतात्...त्यातुन तिच्या आई वडिलांना मनस्ताप होऊ शकतो..तिच्या घरी कुणी हार्ट पेशंट असु शकतं....त्यासाठी तिला हे सगळं टाळायचंय्....मग ती काय करेल? सांगेल माझं प्रेमच नाहीये...मग हे जास्तं सोप्प होईल ना.... ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही...

In reply to by वरदा

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 21:58
वरदा, तुझे दोन्ही प्रतिसाद आवडले, छान मनमोकळे वाटले. छोट्या डॉन साहेबांनीही छान लिहिलं आहे. स्वातीताईशी सहमत.. छोटे डॉनराव, और भी लिख्खो.. तात्या.

In reply to by वरदा

छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 23:40
तू मांडलेल्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ..... जन्मभर मनस्ताप करून घेण्यापेक्षा एकदा खोटे बोलणे कधीही उत्तम .....

प्राजु Wed, 02/13/2008 - 22:58
ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही... हे मात्र अगदी खरं आहे. बर्‍याच वेळेला खोटं बोलावं लागतं. वरदाच प्रतिसाद आवडला. - प्राजु

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/14/2008 - 09:49
'त्याने' आणि 'तिने' डोळस प्रेम करावे. जेंव्हा तो तिच्यासाठी इतकं काही करतो आहे आणि तीही आनंदाने ते करवून घेते आहे तेंव्हा (आजकालच्या जमान्यात तरी) 'तिला' 'त्याच्या' भावनांची अजिबात कल्पना नव्हती, नसेल असे मानणे दांभिकपणाचे होईल. मुलांपेक्षा मुलींना 'सिग्नल्स' जास्त झटकन कळतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. जो पर्यंत 'त्याने' प्रेम शब्दांत व्यक्त केलेले नाही तो पर्यंत आपणही 'नकार' शब्दात व्यक्त करायचा नाही. पण त्याच्या 'त्या' भावनांचा पुरेपुर फायदा मात्र करून घ्यायचा ह्याला स्वार्थ ह्या शिवाय दूसरा पर्यायी शब्द नाही. हे असे ,मुलाने किंवा मुलीने, कोणीही वागणे गैरच ठरावे. आपल्या घरात ज्याचा/जिचा स्विकार होऊ शकेल किंवा होऊ शकणार नाही, आपल्या घरातील एखाद्याला हार्टचा त्रास आहे किंवा नाही ह्याची त्याला/तिला पूर्वकल्पना असतेच. त्यानुसारच स्वतःचे वर्तन ठेवावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. ज्याचे/ जिचे ज्याच्यावर/जिच्यावर प्रेम असते त्याने/तिने त्याच्या/तिच्या जवळ ते लवकरात लवकर व्यक्त करावे आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जात नाही आहोत ह्याची खात्री करून घ्यावी. प्रत्यक्ष आयुष्यातही एखादा पत्ता शोधताना आपण इतरांना विचारत विचारत आपण चूकीच्या रस्त्यावर तर जात नाही नं ह्याची खात्री करीत पुढे जातो. प्रेमाच्या गावी जातानाही 'त्या' व्यक्तीला विचारुन आपण योग्य त्या वाटेवर आहोत ह्याची खात्री करून घ्यावी म्हणजे अतिदूर गेल्यावर 'पत्ता चुकल्याच्या' भावनेला आपण अडखळून तोंडघशी पडत नाही. मुलींनीही जो मुलगा आवडत नाही, ज्याला आपल्या घरात स्विकारणार नाहीत किंवा आवडत असला तरी ज्याच्याशी लग्न केल्याने आपल्या घरातील कोणास हार्ट ऍटॅक येण्याचा ECG रिपोर्ट आपल्या हाती असेल तर, त्या मुलास उभयतांच्या नात्यातील स्वतःच्या भूमिकेची स्व्च्छ कल्पना द्यावी, अंधारात ठेवू नये. शुद्ध मैत्रीचे प्रपोजल मांडावे. ते स्विकारले तर उत्तमच आहे आणि नाकारले तर भिन्न मार्ग (दोघांनीही) अनुषंगावे. मुलांनीही ज्या मुलीत त्यांना तसा इंटरेस्ट असतो त्यांनी लवकरात लवकर आपल्या भावना स्पष्ट शब्दात तिच्या जवळ व्यक्त करून तिचा कल समजून घ्यावा. तिने तुम्हास प्रियकर म्हणून स्विकारले तर नंतरची कांही वर्षेतरी दोघांनाही स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असा अनुभव येईल परंतु कुठल्याही कारणाने तिने नकार दिला तर खचून जाऊ नये. मनात राग धरून आपल्या तथाकथित प्रेमातील उथळपणाचे प्रदर्शन तर अजिबात करू नये. तुमच्या इतकीच तीही एक व्यक्ती आहे आणि तिलाही तिची स्वतःची मते आहेत. (कदाचीत तुम्हाला न पटणारी) त्यांचा आदर करावा. मुलीने नुसत्या मैत्रीचा आग्रह धरला तर, ती म्हणाली नाही तरी त्यात, शारीरिक सुखाला यत्किंचितही जागा नसते/नसावी हे ध्यानात असू द्यावे. पण त्या मैत्रीच्या नात्यात मुलीने जर शारीरिक संबंधांना हिरवा सिग्नल दाखवला तर मात्र अशा मुली पासून चार हात दूरच राहावे. (इथे मनाचा निग्रह भयंकर लागतो) एवंच काय तर प्रेम डोळे उघडे ठेवून करा.

वरदा गुरुवार, 02/14/2008 - 18:27
की एक कुणी दोशी असेल असं नाही...फक्त मुलीच असं करतात हे म्हणणं चूक आहे. माझ्या कॉलेजमधल्या एका मुलाचे ३ वर्षे एका मुलीबरोबर अफेअर होते आणि शेवटच्या वर्षात अचानक तो दुसर्‍या मुलीशी लग्न करून कॉलेजला आला. सगळेच चमकले. का तर म्हणे त्याची आजी खूप म्हातारी होती आणि तिला नातवाचं लग्न बघायचं होतं तेही त्यांच्याच नात्यातल्या कुणी मुलीशी...त्याने तिला साधी कल्पनाही दिली नाही की तो लग्न करणारे ह्याची. हे असं मुलंही करतात..तिचं बिचारीचं अभ्यासातंलं लक्ष एवढं उडालं की १ वर्ष वाया गेलं...

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 20:26
त्याने प्रथम ही मदत सौजन्य म्हणून देखील केली असेल. ती शहरात नवीन असल्यामुळे. तिचे रूप, तिचे विचार, तिचा स्वभाव त्याला आवडले की नाही हे दिलेले नाही. केवळ मुलगी आहे म्हणून कोण उठसूठ प्रेमात पडत नाही. त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा. हे विचित्र वाटले. पुरूष एवढा बदलू शकतो? तो एवढा कणाहीन आहे? तिने त्याच्यासाठी काय केले? काही नाही? मग ती स्वार्थी आहे. आणि तो मूर्ख आहे. आणि तिचा निर्णय अपेक्षितच आहे.
"अभिजीत" ने छेडलेल्या "तसल्या नजरा" व त्याला पडलेले अनेक प्रतिसाद याच्या अनुषंगाने हा लेख. मला आलेल्या " विरोपाचे " स्वैर मराठी भाषांतर ......... [ हे मी लिहलेले नाही ..] [ वेळ सकाळी ६ च्या दरम्यान ....] तो : वाढदिवसाच्या शूभेच्छा ... ती : ओह .. हो . थँक यू सो मच . मी अजून झोपेतून उठत आहे ... तो : ओह, म्हणजे तुला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन केला ... ती : नाही ना ! "त्या" ने मला रात्री १२ वाजताच 'विश' केले. तो : हा 'तो' कोण ? ती : कमॉन यार , अजून कोण ?

काय होणार आपले??

वडापाव ·

बुध्दू बैल Tue, 02/12/2008 - 22:44
खरोखर भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. पण नुसतं 'आलीया भोगासी असावे सादर' असे न म्हणता अनिष्ट घटनांना विरोध केला गेला पाहिजे. आज भारताला हे युध्द मिटवायचे आहे. कदाचित पाकिस्तानालाही मिटवायचे असेल, पण नाक खुपसणा-यांच्या चिथावणीमुळे युध्द व मतभेद आजही टिकून आहेत हे खरे.

वरदा Tue, 02/12/2008 - 22:47
अमेरिका चीन जपान कुणीतरी ह्याचा फायदा घेईल कदाचित......

In reply to by नितिन५८८

चैतन्य ईन्या Fri, 11/20/2015 - 15:19
भलताच आशावाद बुवा. त्या विन्ग्रजांनी १५० वर्ष राज्य करण्या आधी एकाच होते कि? कोण घाबरले ? कोणी पण येवून टप्पू मारून जातंय.

In reply to by बॅटमॅन

गॅरी ट्रुमन Fri, 11/20/2015 - 15:33
काही झाले तरी काश्मीरप्रश्न आणि त्याहीपेक्षा बेळगाव प्रश्न काही सुटणार नाही.
कोणीतरी म्हटले आहे-- मला अमर कर असा वर मनुष्यप्राणी देवाकडे मागू शकत नाही. मग त्यावर उपाय काय? तर मला याची देही याची डोळा पॅलेस्टाईन, काश्मीर आणि बेळगाव हे तीनही प्रश्न सुटलेले बघायचे आहेत :)

In reply to by बॅटमॅन

नाखु Fri, 11/20/2015 - 16:22
मिपावरही बरेच न सुट्टणारे (आणि बिचारे मिपाकर त्यातूनही न सुटणारे ) प्र्शन आहेत की??? त्यांचं काय करायचं (साठे तुमचा मुलगा काय करतो या चालीवर वाचा)

In reply to by नाखु

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 16:44
काही होणार नाही. जान्हवी एकदाची बाळंत झाली की सर्व प्रश्न सुटतील. "अनंतकाळची स्युडोमाता" हा किताब बाकी तिला एकदम परफेक्ट लागू पडेल.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव Fri, 11/20/2015 - 17:47
आयला ती शिरेल एक काय संपायला तयार नाही. २ वर्षामागे जानेवारीत २१ इंची सीआरटी टीव्ही बिघडला म्हणून नवीन ३९ इंची एलईडी टीव्ही घेतला होता. पहिल्याच दिवशी हट्टंगडी काकू एकदम क्लोजअप मधे दिसल्या. एव्हढ्या भल्यामोठ्या टीव्हीवर हट्टंगडी काकू ईतक्या क्लोजअप मधे बघून घाबरलो. त्यांचा फक्त चेहराच दिसायचा अख्ख्या टीव्हीत. टीव्ही घेतल्या दिवशीच गंडला का काय असा विचार करून रात्र भर झोप नाही आली. दुसर्‍या दिवशी सकाळीच दुकानदाराला फोन केला. तो म्हणाला एकतर सीआरटीचा स्क्रीन रेशो ४:३ असतो, एकदम एलईडीचा १६:९ बघायची सवय नसते आणि त्यात शिरेलिंंमधे नको इतका क्लोजअप असतो. एखादा ईंग्लिश पिच्चर चेक करा. तसं चेक केल्यावर कळलं - काही गंडलेलं नाही :) तोपर्यंत मात्र हट्टंगडी काकूंनी घाबरवून दिलं होतं :)

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम Fri, 11/20/2015 - 16:56
मला सलमान खानच्या लग्नात मनमोहन सिंगजींशी गप्पा मारायच्या आहेत असं पण ऐकलेलं - कधीही पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांमध्ये.

तिमा Fri, 11/20/2015 - 16:39
'भाग्यसंकेत' या भविष्याला वाहिलेल्या दिवाळी अंकाचे संपादकीय वाचले. त्यानुसार २०१६ पासून फक्त भारतच नव्हे, तर जगभर अराजक माजणार. पुण्याच्या श्रीराम भटांनी लिहिले आहे.

In reply to by नाव आडनाव

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 18:19
शेजारच्यांचे काय हाल झाले असतील त्याची कल्पना करवत नाही. अर्थात हे "उत्तमे ढमढमे" मधले अणुबाँब की "फुस्कुली राणी" वाले अणुबाँब असतील त्यावर नासिकाकेशसंपत्तीच्या नुकसानाचे प्रमाण अवलंबून आहे म्हणा.

बुध्दू बैल Tue, 02/12/2008 - 22:44
खरोखर भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. पण नुसतं 'आलीया भोगासी असावे सादर' असे न म्हणता अनिष्ट घटनांना विरोध केला गेला पाहिजे. आज भारताला हे युध्द मिटवायचे आहे. कदाचित पाकिस्तानालाही मिटवायचे असेल, पण नाक खुपसणा-यांच्या चिथावणीमुळे युध्द व मतभेद आजही टिकून आहेत हे खरे.

वरदा Tue, 02/12/2008 - 22:47
अमेरिका चीन जपान कुणीतरी ह्याचा फायदा घेईल कदाचित......

In reply to by नितिन५८८

चैतन्य ईन्या Fri, 11/20/2015 - 15:19
भलताच आशावाद बुवा. त्या विन्ग्रजांनी १५० वर्ष राज्य करण्या आधी एकाच होते कि? कोण घाबरले ? कोणी पण येवून टप्पू मारून जातंय.

In reply to by बॅटमॅन

गॅरी ट्रुमन Fri, 11/20/2015 - 15:33
काही झाले तरी काश्मीरप्रश्न आणि त्याहीपेक्षा बेळगाव प्रश्न काही सुटणार नाही.
कोणीतरी म्हटले आहे-- मला अमर कर असा वर मनुष्यप्राणी देवाकडे मागू शकत नाही. मग त्यावर उपाय काय? तर मला याची देही याची डोळा पॅलेस्टाईन, काश्मीर आणि बेळगाव हे तीनही प्रश्न सुटलेले बघायचे आहेत :)

In reply to by बॅटमॅन

नाखु Fri, 11/20/2015 - 16:22
मिपावरही बरेच न सुट्टणारे (आणि बिचारे मिपाकर त्यातूनही न सुटणारे ) प्र्शन आहेत की??? त्यांचं काय करायचं (साठे तुमचा मुलगा काय करतो या चालीवर वाचा)

In reply to by नाखु

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 16:44
काही होणार नाही. जान्हवी एकदाची बाळंत झाली की सर्व प्रश्न सुटतील. "अनंतकाळची स्युडोमाता" हा किताब बाकी तिला एकदम परफेक्ट लागू पडेल.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव Fri, 11/20/2015 - 17:47
आयला ती शिरेल एक काय संपायला तयार नाही. २ वर्षामागे जानेवारीत २१ इंची सीआरटी टीव्ही बिघडला म्हणून नवीन ३९ इंची एलईडी टीव्ही घेतला होता. पहिल्याच दिवशी हट्टंगडी काकू एकदम क्लोजअप मधे दिसल्या. एव्हढ्या भल्यामोठ्या टीव्हीवर हट्टंगडी काकू ईतक्या क्लोजअप मधे बघून घाबरलो. त्यांचा फक्त चेहराच दिसायचा अख्ख्या टीव्हीत. टीव्ही घेतल्या दिवशीच गंडला का काय असा विचार करून रात्र भर झोप नाही आली. दुसर्‍या दिवशी सकाळीच दुकानदाराला फोन केला. तो म्हणाला एकतर सीआरटीचा स्क्रीन रेशो ४:३ असतो, एकदम एलईडीचा १६:९ बघायची सवय नसते आणि त्यात शिरेलिंंमधे नको इतका क्लोजअप असतो. एखादा ईंग्लिश पिच्चर चेक करा. तसं चेक केल्यावर कळलं - काही गंडलेलं नाही :) तोपर्यंत मात्र हट्टंगडी काकूंनी घाबरवून दिलं होतं :)

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम Fri, 11/20/2015 - 16:56
मला सलमान खानच्या लग्नात मनमोहन सिंगजींशी गप्पा मारायच्या आहेत असं पण ऐकलेलं - कधीही पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांमध्ये.

तिमा Fri, 11/20/2015 - 16:39
'भाग्यसंकेत' या भविष्याला वाहिलेल्या दिवाळी अंकाचे संपादकीय वाचले. त्यानुसार २०१६ पासून फक्त भारतच नव्हे, तर जगभर अराजक माजणार. पुण्याच्या श्रीराम भटांनी लिहिले आहे.

In reply to by नाव आडनाव

बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 18:19
शेजारच्यांचे काय हाल झाले असतील त्याची कल्पना करवत नाही. अर्थात हे "उत्तमे ढमढमे" मधले अणुबाँब की "फुस्कुली राणी" वाले अणुबाँब असतील त्यावर नासिकाकेशसंपत्तीच्या नुकसानाचे प्रमाण अवलंबून आहे म्हणा.
पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमूळे पाकिस्तान हा एक वादग्रस्त विषय झाला होता. त्यात पाकिस्तानाने निर्माण केलेल्या विध्वंसक अणूऊर्जा-निर्मित शस्त्रांबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल? अ) भारत- पाकिस्तान युध्दात पाकिस्तानाचा सर्वनाश होईल.

आज़ जाने की जि़द ना करो...

विसोबा खेचर ·

संजय अभ्यंकर Tue, 02/12/2008 - 20:24
वा तात्या! बहुत खुब! शांत आणी सुंदर गाणे. फरिदा खानुम इतकी सुंदर गाते हे माहीत नव्हते. फरिदाच्या आणखी काही लिंक असतील तर कृपया येथे संलग्न कराव्यात ही विनंती. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

वरदा Tue, 02/12/2008 - 20:33
किती छान सांगितलंत तात्या...एवढं सगळं शास्त्रीय कळत नसलं तरी तुम्ही त्यातली खरी जान समजावलीत्...मी एकदाच हे गाणं फरीदांच्या आवाजात ऐकलं होतं तेही अर्धवट आणि नंतर आशा भोसलेंच्या आवाजात...खूपच छान गाणं आहे...इथे दिल्याबद्दल धन्यवाद...

प्राजु Tue, 02/12/2008 - 20:34
अप्रतिम... आहे हे गाणं आणि तात्या, त्याचं रसग्रहणही उत्तम केले आहे. अगदी हर एक सूर इथे दिला आहे त्यातला अस वाटलं. खूपच छान. इतके दिवस ऐकताना केवळ यमन आणि शब्दांसाठीच ऐकत होते पण आत एक वेगळी दृष्टी दिली आहेत तुम्ही... - प्राजु

मानस Tue, 02/12/2008 - 20:41
केवळ अप्रतिम, शब्दच नाहीत. खास गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 20:43
हे गाणे आम्ही सुद्धा ऐकत आलो. आणि त्यावर प्रेम केले. पण त्याचे सौंदर्य इतक्या हळुवारपणे , आणि इतक्या मर्मज्ञतेने उलगडवून दाखवणारे तुम्हीच ! शास्त्राला रसिकतेची जोड नसती तर ते रुक्ष झाले असते आणि मूळच्या सौंदर्यासक्त वृतीला मर्म जाणण्याची जोड मिळाल्यावर ..... सोन्याला सुगंध ! आज हे गाणे पुन्हा नव्याने भेटले. त्याला तुम्ही चढविलेल्या साजामुळे ते आणखी सुंदर बनले आहे. तुमच्या रसिकतेला आमचा सलाम. असेच लिहा. अजून खूप खूप.

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:49
मला गायकीतील काहि कळत नाहि पण हे गाण मात्र फार फार आवडतं हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!! मधला हाय हा पंचम आहे की काय हे कळत नसलं तरी हाय बेचैन करतो हे नक्कीच. इतकं आवडतं गाणं सुंदरपणे इथे उलगडल्याबद्दल अनेक आभार. फार छान लिहिलं आहे -ऋषिकेश

मनिष Wed, 02/13/2008 - 00:22
जीवघेणा आवाज आणि तसेच गाणे. काय बोलावे? असेच येशुदासचे "ज़िद न करो" आठ्वले, ते येथे ऐकता येईल.

नंदन Wed, 02/13/2008 - 01:12
मूळ गाण्याइतकेच त्याचे रसग्रहणही सुरेख झाले आहे. वर मुक्तसुनीतांनी आणि ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे, हे गाणे आधी आवडत होतेच पण आता पुन्हा गाणं ऐकताना या जागा अधिक ओळखीच्या वाटू लागतील. 'ज्ञात्याचे पाहणे' म्हणतात तसे 'ज्ञात्याचे ऐकणे' म्हणजे काय, ते हा लेख वाचून समजतं, आणि 'वक्त की कैद' मधून अशाच 'चंद आजाद घडियाँ' मिळतात :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:30
आणि 'वक्त की कैद' मधून अशाच 'चंद आजाद घडियाँ' मिळतात :) क्या बात है नंदनसायबा, गाण्यातल्या शब्दांचा फार सुंदर वापर केलास..! :)

चतुरंग Wed, 02/13/2008 - 01:13
आप तो छा गये! हे गाणं ऐकून किती दिवस झाले होते आज तुम्ही ते इथं दिलंत आणि नुसतं नाही तर तुमच्या सुंदर, मर्मग्राही शब्दात लपेटून. काळजाला हात घातलात. खल्लास! बसल्या बैठकीला तीनदा ऐकलं. मला शास्त्रीय संगीतातलं ज्ञान नाही पण आपण सांगितलेल्या जागा 'ऐकण्याचा' प्रयत्न केला तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं. मला वाटतं 'चितचोर' मधलं 'जब दीप जले आना' हे येसुदासचं सुध्दा यमन मधेच असावं - कारण सुरावट कानांना सारखी वाटते(चूभूदेघे). हे माझं फार आवडतं गाणं दुव्यात ऐका. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:27
मला वाटतं 'चितचोर' मधलं 'जब दीप जले आना' हे येसुदासचं सुध्दा यमन मधेच असावं - कारण सुरावट कानांना सारखी वाटते यू गॉट इट करेक्टली! रंगराव, असा कुणी प्रतिसाद दिला की हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या ज्या महान कार्यातला खारीचा वाटा आम्ही उचलला आहे त्याचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं! जियो.. आपला, तात्या, प्रचारक आणि प्रसारक, हिंदुस्थानी अभिजात संगीत. हे माझं फार आवडतं गाणं दुव्यात ऐका. नक्की ऐकतो..! माझंही हे फार आवडतं गाणं आहे. येशुदास खूपच सुरेल आहे. क्या बात है..! अवांतर - चितचोर हा शिणेमाही मला फार आवडला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब ही कुणीही प्रेमात पडावं अशीच! आपण पण साला तेव्हा तिच्या पिरेमात पडलो होतो! :) असो, छ्या साला! गेले ते दिवस तिच्यायला. तात्या, आता तरी सुधारा! नाही म्हटलं, चाळीशी आली हो! (स्वगत!) :) तात्या.

केशवसुमार Wed, 02/13/2008 - 03:30
तात्याशेठ.. गाण्याच्या दुवा बद्दल धन्यवाद.. लेख वाचून पिरंगुटच्या कट्ट्याच्या आठवण झाली.. आम्ही मायदेशी परत आल्यावर लगेच मैफिल भरवा म्हणजे झाले.. (कानसेन)केशवसुमार

धोंडोपंत Wed, 02/13/2008 - 08:28
तात्या................ अप्रतिम लेख. केवळ अप्रतिम. आजपर्यंत मराठी संकेतस्थळांवर वाचलेल्या संगीतविषयक लेखातील हा सर्वात उत्तम लेख. हार्दिक अभिनंदन...... यमनचं विश्व तू या लेखातून उघड केलंसं. त्याचे विविध कंगोरे दाखवलेस. आम्ही भरून पावलो. आम्ही तुझ्या संगीतव्यासंगाची दाद देतोच पण ते इतक्या सुंदर रीतीने शब्दबद्ध केल्याबद्दल तुझ्या लेखनकौशल्याची सुद्धा दाद देतो. हा लेख एका वेगळ्या कप्प्यात कायमस्वरूपी सेव्ह करण्यात यावा असे आम्हाला वाटते. उत्तरोत्तर असेच लेखन तुझ्या हातून होवो या शुभेच्छा. आपला, (तृप्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रमोद देव Wed, 02/13/2008 - 09:10
तात्या तुझे संगीतविषयक विचार खूपच प्रगल्भ आहेत आणि ते तू तितक्याच समर्थपणे लेखनातही मांडू शकतो. पण माझे दुर्दैव हे की ते 'मध्यम,गांधार' वगैरे शब्दशः मला कळत असले तरी ते तू दाखवल्यावरही डोक्यावरून गेले(तो तुझा दोष नव्हे; माझ्या समज शक्तीचा आहे). पण एक मात्र आहे की गाण्यातले काहीही न कळता ही मी ते गाणं अनुभवू शकलो. मस्त गायलेय. अवांतरः फ़रिदा खा़नुम सारखेच हे गाणे आशा भोसले ह्यांनीही गायलेले आहे आणि दोघींच्या गाण्याची तुलना करता मला आशाताईंचे गायन जास्त आवडले.

सर्किट Wed, 02/13/2008 - 09:21
हा यमन म्हणजे "पदर सोडून" गायलेला यमन आहे.. स्वतःशी प्रामाणिक राहून, उगाच ऐर्‍आगैर्‍यांना शास्त्रीय संगितकडे ओढून आणण्याचा प्रयत्न न करता, ह्या गाण्यतील यमनाची "ज्योति कलश झलके" शी तुलना कर रे जरा.. पदर दूर करून, यमनचा पोर्नोग्राफिक प्रयत्न तू ह्या रसग्रहणाने वर आणतो आहेस, असे वाटते. (तू तारीफ केलेला शुद्ध मध्यम हा "ब्लेटंट" अहे.. हसलर किंवा पेंटहाऊस मधल्या छायाचित्रांत सौंदर्य दिसतं असं वाटणार्‍यांना कदाचित तो आवडेलही..) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 10:37
मिलिंद, हा यमन म्हणजे "पदर सोडून" गायलेला यमन आहे.. प्रत्येकाचं मत! तुझ्या मताचा मी आदर करतो..! इथे इतक्या लोकांना यातला यमन आवडला आणि भावला! तुला नाही आवडला! किंबहुना 'पोर्नोग्राफिक' वाटला! चलता है...! अवांतर - बाय द वे, यमनसारख्या रागातही काही पोर्नोग्राफिक असू शकतं हे वाचून गंमत वाटली. माझी सांगितिक समज तुझ्याइतकी प्रगल्भ(?) नाही, त्यामुळे यमन हा मला नेहमी हळवा आणि प्रसन्नच वाटत आलेला आहे! उगाच ऐर्‍आगैर्‍यांना शास्त्रीय संगितकडे ओढून आणण्याचा प्रयत्न न करता, हे तू नक्की कुणाबद्दल बोलतो आहेस? मिपावरील रसिक श्रोत्यांबद्दल आणि वाचकांबद्दल हे तू बोलतो आहेस का? तसं असेल तर तुझं वरील विधान हे अत्यंत हलकटपणाचं आहे असंच मी म्हणेन. तुला माझा लेख आवडला किंवा नाही, याबद्दल तू अवश्य लिहू शकतोस परंतु मिपावरील रसिकांचा 'ऐर्‍यागैर्‍या' असा उल्लेख करण्याचा तुला काहीही अधिकार नाही! आणि अरे तुझ्यासारख्या यमनसारख्या रागातदेखील अश्लीलता दिसणार्‍यांपेक्षा, अभिजात संगीताची विशेष काही तोंडओळख नसलेले मिपावरचे ऐरेगैरे वाचक-श्रोते कितीतरी अधिक रसिक आणि दिलखुलास म्हटले पाहिजेत! ह्या गाण्यतील यमनाची "ज्योति कलश झलके" शी तुलना कर रे जरा.. काय संबंध? दोन्ही गाणी पूर्णत: वेगळी आहेत, त्यातले भाव वेगळे आहेत, राग वेगळा आहे! अर्थात, ज्याला यमन मध्ये पोर्नोग्राफी दिसते त्याला 'ज्योती कलश' मधला भूप कसा दिसत असेल हा एक प्रश्नच आहे! आणि मुळात आज़ 'जा़नेकी.. ' हे यमन मध्ये आहे आ़णि ज्योती कलश हे भूपात आहे हा मूलभूत फरक तुझ्यासारख्या प्रगल्भ (?) सांगितिक समज असलेल्याला कळू नये हेदेखील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे! अवांतर - 'ज्योती कलश हे गाणं काय आहे, कसं आहे, त्याची तुलना कुणाशी करायची आणि कुणाशी नाही हे मला तू नाही सांगितलंस तर बरं होईल. कारण तुझ्या दुर्दैवाने म्हणा, किंवा माझ्या सुदैवाने म्हणा, हे गाणं मला एकट्याला खुद्द बाबुजींनी त्यांच्या घरी पेटी घेऊन प्रेमाने ऐकवलं आहे, शिकवलं आहे! आमच्या ललितामावशी त्या घटनेच्या आजही साक्षिदार आहेत! बाबुजींनी स्वत: म्हटलेलं याच गाण्याचं एक ध्वनिमुद्रणही मला स्वत:च्या हाताने भेट म्हणून दिलं आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे ते मी तुलाही याहू निरोपकावर पाठवलेलं आहे! असो.. (तू तारीफ केलेला शुद्ध मध्यम हा "ब्लेटंट" अहे.. हसलर किंवा पेंटहाऊस मधल्या छायाचित्रांत सौंदर्य दिसतं असं वाटणार्‍यांना कदाचित तो आवडेलही..) प्रत्येकाची मतं! प्रतिसादाबद्दल धन्यवाद... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुक्तसुनीत Wed, 02/13/2008 - 10:55
खरे म्हणजे कुणाच्या इंटरप्रीटेशनबद्दल आणखी वर मल्लिनाथी करू नये इतपत शहाणपण मला(ही) आहे. पण सर्कीटरावांच्या प्रतिसादातून मी जो बोध घेतला तो असा : विंदा करंदीकरानी एका निबंधात म्हण्टले आहे : "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" आता प्रथमदर्शनी पाहता , या विधानात अश्लीलता आहेच. पण त्यामागचा करंदीकरांचा एक अतिशय आदिम , निखळ असा दृष्टीकोन आहे. एखाद्या कवितेला आपण "कपडे काढून" भोगावे याचा अर्थच रूढ संकल्पनाना , प्रसंगी दुसर्‍यांच्या प्रस्थापित अशा दृष्टिकोनाना बाजूला ठेवून सामोरे जावे; स्वतःचे , स्वायत्त असे आकलन करावे. सर्कीट यानी यमन रागाच्या वेगवेगळ्या रूपांचे इंटरप्रीटेशन करताना रूढ पावित्र्य वगैरे संकल्पनाना बाजूला ठेवून, सरळ त्याना कळले त्या भाषेत आडपडदा न ठेवता आपले मत मांडले असे मला तरी वाटले. ("ज्योती कलश झलके" च्याबाबतीत त्यांची सरळसरळ तांत्रिक चूक झाली आहे. "फॉ पा " का काय म्हणतात ते :-) )

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Wed, 02/13/2008 - 11:10
ज्योतिकलश मधे "बादलके.." च्या शेवटी जो मद्ध्यम येतो, त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. तुला ते सांगायला नको.. मला म्हणायचे आहे ते एवढेच, की ज्या गाण्याची तू एवढी मनसोक्त तारीफ केली आहेस, त्या गाण्याच्या मांडणीत, "हल्ली लोकांना शास्रीय म्हटलेले गाणे आवडते.. म्हणून आपण त्यातील शास्त्रीय पदर उघडवून दाखवूयात." असे स्पष्ट दिसते. ह्या गाण्यातही तेच दिसते.. (आणि हे फक्त माझे -प्रगल्भ- मत नही. नव्हे फक्त काधी शतके वर्षांपासून चालत आलेल्या एखद्या कलेविषयी आपले मत प्रगल्भ आहे, असे म्हणणार्‍या लोकांना वेड्यंच्या इस्पितळात घालवे, असे माझे मत आहे.. हेच मोनालिसाविषयी बोलणार्‍यंसाठी, हेच शेक्सपियरविषयी..) ऐर्‍यागैर्‍यांना म्हणण्याचा उद्देश एवढच, की "जिद न करो" हे गाणे, फक्त तात्याने लिहिलेले रसग्रहण आवडले, म्हणून आपण आता जबरा संगीतविशारद झालो, असे म्हणणार्‍यांसाठी. तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. म्हणून तुझी ही लेखणीरूपी तलवार जरा आवरती घे. एवढेच सांगणे. बाकी तुझे तू बघण्यास समर्थ आहेस. - सर्किट खानुम

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 19:31
ज्योतिकलश मधे "बादलके.." च्या शेवटी जो मद्ध्यम येतो, त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. तुला ते सांगायला नको.. ??? माझ्या माहितीप्रमाणे 'बादलके...' च्या शेवटी कुठलाही मध्यम येत नाही! तुला तसं ऐकू येत असेल तर त्यावर मला काहीच बोलायचं नाही! त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. ???? मिलिंद, आता मला असं वाटू लागलं आहे की तू खरंच वाट्टेल ते बरळतो आहेस! 'ज्योती कलश छलके...' हे गाणं यमनात नसून भूपात आहे आणि यापूर्वीच्या प्रतिसादात केलेली तांत्रिक चूक तू आता काहीही करून, येनकेन प्रकारे या गाण्याचा यमनशी संबंध जोडून पुढे रेटायचा प्रयत्न करतो आहेस हे खरोखरंच हास्यास्पद आणि पोरकटपणाचं वाटतं आहे! असो.. बरं एक वेळ त्या गाण्यात मध्यम आहे असं मान्य करून मी तात्पुरता तुझा बालहट्ट पुरवतो, परंतु... १) त्या गाण्यात (ज्योती कलश..) शुद्ध निषाद कुठे आलाय हे जरा सांगशील का? २) थेट मध्यम, निषादाची नातं सांगणारी अशी यमन रागातली कोणती स्वरसंगती तुला दिसली हे सांगशील का? म्हणजे मग आपण, त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. हे तुझं बेधडक परंतु धादांत चुकीचं विधान अवश्य मान्य करू! असो, माझ्या मते तरी 'ज्योती कलश..' या सर्वांगसुंदर गाण्यात भूपाचं आणि फक्त भूपाचंच दर्शन होतं! किंबहुना, या गाण्यामुळे भूपाचा मान वाढला आहे असंही मी रसिकतेने म्हणेन! आपली चूक किंवा अज्ञान जर मोकळेपणाने मान्यच करायचं नसेल आणि केवळ फक्त विरोधाकरताच जर विरोध करायचा असेल तर मग या गाण्यात (ज्योती कलश..) यमनच काय, परंतु मारवाही दिसतो असं म्हटलं म्हणून तरी बिघडलं कुठे? मला म्हणायचे आहे ते एवढेच, की ज्या गाण्याची तू एवढी मनसोक्त तारीफ केली आहेस, खरं आहे. माझ्या मते ते गाणं मनमुराद तारीफ करावी, दाद द्यावी असंच आहे! त्या गाण्याच्या मांडणीत, "हल्ली लोकांना शास्रीय म्हटलेले गाणे आवडते.. म्हणून आपण त्यातील शास्त्रीय पदर उघडवून दाखवूयात." असे स्पष्ट दिसते. ह्या गाण्यातही तेच दिसते.. बरं मग? मी माझ्या परिने मिपावरील रसिक वाचकांना त्यातले थोडेफार सांगितिक स्वरांचे पदर उलगडून दाखवले, त्यातलं सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे?? की "जिद न करो" हे गाणे, फक्त तात्याने लिहिलेले रसग्रहण आवडले, म्हणून आपण आता जबरा संगीतविशारद झालो, असे म्हणणार्‍यांसाठी. तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. ??? मिलिंदा, तू नक्की कुठल्या गैरसमजात वावरतो आहेस हे आता मला खरंच कळेनासे झाले आहे! तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. इज इट? माझ्याकरता तर ही न्यूजच आहे!... :) तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. इज इट? असं झालं तर फारच उत्तम होईल...! :) बाय द वे, मराठी आंतरजालीय जगतात माझा फ्यॅन क्लब आहे हे वाचून बरे वाटले! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट गुरुवार, 02/14/2008 - 00:01
इंटरेस्टिंग.. मूळ गाण्यात तो मध्यम कुठेच दिसत नाही. तू मला बाबुजींनी गायलेल्या ज्योति कलश ची एम पी ३ दिली आहे त्यात त्यांच्या गळ्यातून आणि पेटीवर दोन्हींत मध्यमाचा शिरकाव आहे. निषाद नाही हे नक्की. त्यामुळे तो यमन होत नाही हेही नक्की. माझ्या आधीच्या विधानाबद्दल माफी मागतो. आता मूळ मुद्द्यावर. "क्लासिकल-बेस्ड" गाण्यांतली स्थित्यंतरे मी सांगितली आहेत. ("जागा" ह्या जागा वाटू नयेत, असं तलम मृदु "ज्योति कलश", आणि, "ही बघा जागा दाखवतो/ते", म्हणून किमोनो उघडणारे "जिद ना करो", हा मूळ मुद्दा आहे.) त्याबद्दल तुझे काय मत आहे ? - सर्किट

प्राजु Wed, 02/13/2008 - 09:36
अवांतरः फ़रिदा खा़नुम सारखेच हे गाणे आशा भोसले ह्यांनीही गायलेले आहे आणि दोघींच्या गाण्याची तुलना करता मला आशाताईंचे गायन जास्त आवडले. मला फरिदा खानुम यांचेच जास्ती आवडले. (प्रामाणिक मत) - प्राजु

प्रभाकर पेठकर Wed, 02/13/2008 - 13:39
'जिया ले गयो जी मोरा सावरीया', 'जा रे बदरा बैरी जा' मधला अवखळ यमन, 'समाधी साधन' मधला सात्विक यमन, 'जेथे सागरा धरणी मिळते' मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, 'दैवजात दु:खे भरता' मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि 'रंजिश ही सही' किंवा 'आज़ जा़ने की जि़द ना करो' सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! 'यू ही पेहेलू मे बैठे रहो..' मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! 'पेहेलू' या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! 'कानडाउ विठ्ठलू..' आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! 'हाये' मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा 'हाये' हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! 'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' मधील 'जाएंगे' या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! ह्यातलं काहीही कळलं नाही तात्या, पण फरिदा खानुम ह्यांच्या आवाजाचा पोत (ही माझी भाषा आहे हं!) आणि त्यातील आर्जव ह्याला तुलना नाही. जी अस्वस्थ करण्याची ताकद गाण्याच्या शब्दांमध्ये, गायिकेच्या आवाजात आणि सुरावटीत आहे हे अनुभवायला गाण्याचे व्याकरण समजण्याची आवश्यकता, निदान मला तरी भासत नाही. आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे हे बाकी लै झालं. तबियतदार रसिकांसाठी, ते अत्यवस्थ होऊ नयेत म्हणून, आवश्यक.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 13:57
हे अनुभवायला गाण्याचे व्याकरण समजण्याची आवश्यकता, निदान मला तरी भासत नाही. नक्कीच नाही! कुठलेही गाणे हे कानाला चांगले लागल्याशी कारण! मी फक्त ज्यांना स्वरांचीही थोडीफार ओळख/तोंडओळख आहे त्यांच्याकरताच केवळ स्वरांविषयीही थोडेसे लिहिले आहे इतकेच. बाकी, गाण्याचा आनंद कुणीही घेऊ शकतो, त्याकरता त्यातल्या व्याकरणाची/स्वरांची जाण असणे मुळीच आवश्यक नाही, असेच माझेही म्हणणे आहे... तबियतदार रसिकांसाठी, ते अत्यवस्थ होऊ नयेत म्हणून, आवश्यक. पेठकरशेठ, या वाक्याचा मतलब ध्यानी नाही आला. जरा उलगडून सांगता का? लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात माझं काही चुकलं आहे का? असो... आपला, (सिंगल-माल्ट मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Wed, 02/13/2008 - 14:30
लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात माझं काही चुकलं आहे का? अजिबात नाही तात्या. उलट मला असे म्हणायचे आहे की, जे रसिक एखाद्या कलेचा आस्वाद अगदी 'तब्येतीत' घेतात (मनस्वितेने घेतात) अशांच्या हाती (आणि ज्यांना 'ते' निषिद्ध नाही), सोनेरी रंगाचे द्रव्य नसेल तर ते अत्यवस्थच होतील म्हणून त्यांनी गाण्याचा आस्वाद घेताना चषक भरून फरीदा खानुमच्या ह्या गाण्याच्या सुरांवर तरंगण्याचा अनुभव घ्यावा.

तात्या, शास्त्रीय संगितातले आम्ही "ढ" विद्यार्थी. पण गाण्यातील सौंदर्यस्थळे, समजावण्याची कुशलता, रागांची ओळख  आणि  सांगण्याची तळमळ ''आज़ जा़ने की जि़द ना करो " च्या निमित्ताने  एका उत्तम जाणकाराने आमच्यापर्यंत पोहचवली. त्याचबरोबर आमच्या सारख्यां ( ऐरे-गैरे ) च्या मनात  शास्त्रीय संगिताबद्दल जिज्ञासा निर्माण करणे , हेच आपल्या लेखाचे / लेखनाचे  यश आहे असे आम्हाला वाटते,  पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!!

 

 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश Fri, 02/15/2008 - 12:06
उशिरा लक्ष गेलं ह्या लेखाकडे,पण आजच्या दिवसाची सुरुवात सुरिली झाली,:-) तात्या,मस्त! स्वाती

विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 12:39
प्रतिसाददात्या सर्व रसिक वाचकवरांपाशी मी कृतज्ञता व्यक्त करतो.. केशवसुमाराच्या ष्टाईल मध्ये - प्रतिसाद न देणार्‍यांचेही आभार.. :) आपला, (गाण्यातला) तात्या.

संजय अभ्यंकर Tue, 02/12/2008 - 20:24
वा तात्या! बहुत खुब! शांत आणी सुंदर गाणे. फरिदा खानुम इतकी सुंदर गाते हे माहीत नव्हते. फरिदाच्या आणखी काही लिंक असतील तर कृपया येथे संलग्न कराव्यात ही विनंती. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

वरदा Tue, 02/12/2008 - 20:33
किती छान सांगितलंत तात्या...एवढं सगळं शास्त्रीय कळत नसलं तरी तुम्ही त्यातली खरी जान समजावलीत्...मी एकदाच हे गाणं फरीदांच्या आवाजात ऐकलं होतं तेही अर्धवट आणि नंतर आशा भोसलेंच्या आवाजात...खूपच छान गाणं आहे...इथे दिल्याबद्दल धन्यवाद...

प्राजु Tue, 02/12/2008 - 20:34
अप्रतिम... आहे हे गाणं आणि तात्या, त्याचं रसग्रहणही उत्तम केले आहे. अगदी हर एक सूर इथे दिला आहे त्यातला अस वाटलं. खूपच छान. इतके दिवस ऐकताना केवळ यमन आणि शब्दांसाठीच ऐकत होते पण आत एक वेगळी दृष्टी दिली आहेत तुम्ही... - प्राजु

मानस Tue, 02/12/2008 - 20:41
केवळ अप्रतिम, शब्दच नाहीत. खास गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 20:43
हे गाणे आम्ही सुद्धा ऐकत आलो. आणि त्यावर प्रेम केले. पण त्याचे सौंदर्य इतक्या हळुवारपणे , आणि इतक्या मर्मज्ञतेने उलगडवून दाखवणारे तुम्हीच ! शास्त्राला रसिकतेची जोड नसती तर ते रुक्ष झाले असते आणि मूळच्या सौंदर्यासक्त वृतीला मर्म जाणण्याची जोड मिळाल्यावर ..... सोन्याला सुगंध ! आज हे गाणे पुन्हा नव्याने भेटले. त्याला तुम्ही चढविलेल्या साजामुळे ते आणखी सुंदर बनले आहे. तुमच्या रसिकतेला आमचा सलाम. असेच लिहा. अजून खूप खूप.

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:49
मला गायकीतील काहि कळत नाहि पण हे गाण मात्र फार फार आवडतं हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!! मधला हाय हा पंचम आहे की काय हे कळत नसलं तरी हाय बेचैन करतो हे नक्कीच. इतकं आवडतं गाणं सुंदरपणे इथे उलगडल्याबद्दल अनेक आभार. फार छान लिहिलं आहे -ऋषिकेश

मनिष Wed, 02/13/2008 - 00:22
जीवघेणा आवाज आणि तसेच गाणे. काय बोलावे? असेच येशुदासचे "ज़िद न करो" आठ्वले, ते येथे ऐकता येईल.

नंदन Wed, 02/13/2008 - 01:12
मूळ गाण्याइतकेच त्याचे रसग्रहणही सुरेख झाले आहे. वर मुक्तसुनीतांनी आणि ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे, हे गाणे आधी आवडत होतेच पण आता पुन्हा गाणं ऐकताना या जागा अधिक ओळखीच्या वाटू लागतील. 'ज्ञात्याचे पाहणे' म्हणतात तसे 'ज्ञात्याचे ऐकणे' म्हणजे काय, ते हा लेख वाचून समजतं, आणि 'वक्त की कैद' मधून अशाच 'चंद आजाद घडियाँ' मिळतात :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:30
आणि 'वक्त की कैद' मधून अशाच 'चंद आजाद घडियाँ' मिळतात :) क्या बात है नंदनसायबा, गाण्यातल्या शब्दांचा फार सुंदर वापर केलास..! :)

चतुरंग Wed, 02/13/2008 - 01:13
आप तो छा गये! हे गाणं ऐकून किती दिवस झाले होते आज तुम्ही ते इथं दिलंत आणि नुसतं नाही तर तुमच्या सुंदर, मर्मग्राही शब्दात लपेटून. काळजाला हात घातलात. खल्लास! बसल्या बैठकीला तीनदा ऐकलं. मला शास्त्रीय संगीतातलं ज्ञान नाही पण आपण सांगितलेल्या जागा 'ऐकण्याचा' प्रयत्न केला तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं. मला वाटतं 'चितचोर' मधलं 'जब दीप जले आना' हे येसुदासचं सुध्दा यमन मधेच असावं - कारण सुरावट कानांना सारखी वाटते(चूभूदेघे). हे माझं फार आवडतं गाणं दुव्यात ऐका. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:27
मला वाटतं 'चितचोर' मधलं 'जब दीप जले आना' हे येसुदासचं सुध्दा यमन मधेच असावं - कारण सुरावट कानांना सारखी वाटते यू गॉट इट करेक्टली! रंगराव, असा कुणी प्रतिसाद दिला की हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या ज्या महान कार्यातला खारीचा वाटा आम्ही उचलला आहे त्याचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं! जियो.. आपला, तात्या, प्रचारक आणि प्रसारक, हिंदुस्थानी अभिजात संगीत. हे माझं फार आवडतं गाणं दुव्यात ऐका. नक्की ऐकतो..! माझंही हे फार आवडतं गाणं आहे. येशुदास खूपच सुरेल आहे. क्या बात है..! अवांतर - चितचोर हा शिणेमाही मला फार आवडला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब ही कुणीही प्रेमात पडावं अशीच! आपण पण साला तेव्हा तिच्या पिरेमात पडलो होतो! :) असो, छ्या साला! गेले ते दिवस तिच्यायला. तात्या, आता तरी सुधारा! नाही म्हटलं, चाळीशी आली हो! (स्वगत!) :) तात्या.

केशवसुमार Wed, 02/13/2008 - 03:30
तात्याशेठ.. गाण्याच्या दुवा बद्दल धन्यवाद.. लेख वाचून पिरंगुटच्या कट्ट्याच्या आठवण झाली.. आम्ही मायदेशी परत आल्यावर लगेच मैफिल भरवा म्हणजे झाले.. (कानसेन)केशवसुमार

धोंडोपंत Wed, 02/13/2008 - 08:28
तात्या................ अप्रतिम लेख. केवळ अप्रतिम. आजपर्यंत मराठी संकेतस्थळांवर वाचलेल्या संगीतविषयक लेखातील हा सर्वात उत्तम लेख. हार्दिक अभिनंदन...... यमनचं विश्व तू या लेखातून उघड केलंसं. त्याचे विविध कंगोरे दाखवलेस. आम्ही भरून पावलो. आम्ही तुझ्या संगीतव्यासंगाची दाद देतोच पण ते इतक्या सुंदर रीतीने शब्दबद्ध केल्याबद्दल तुझ्या लेखनकौशल्याची सुद्धा दाद देतो. हा लेख एका वेगळ्या कप्प्यात कायमस्वरूपी सेव्ह करण्यात यावा असे आम्हाला वाटते. उत्तरोत्तर असेच लेखन तुझ्या हातून होवो या शुभेच्छा. आपला, (तृप्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रमोद देव Wed, 02/13/2008 - 09:10
तात्या तुझे संगीतविषयक विचार खूपच प्रगल्भ आहेत आणि ते तू तितक्याच समर्थपणे लेखनातही मांडू शकतो. पण माझे दुर्दैव हे की ते 'मध्यम,गांधार' वगैरे शब्दशः मला कळत असले तरी ते तू दाखवल्यावरही डोक्यावरून गेले(तो तुझा दोष नव्हे; माझ्या समज शक्तीचा आहे). पण एक मात्र आहे की गाण्यातले काहीही न कळता ही मी ते गाणं अनुभवू शकलो. मस्त गायलेय. अवांतरः फ़रिदा खा़नुम सारखेच हे गाणे आशा भोसले ह्यांनीही गायलेले आहे आणि दोघींच्या गाण्याची तुलना करता मला आशाताईंचे गायन जास्त आवडले.

सर्किट Wed, 02/13/2008 - 09:21
हा यमन म्हणजे "पदर सोडून" गायलेला यमन आहे.. स्वतःशी प्रामाणिक राहून, उगाच ऐर्‍आगैर्‍यांना शास्त्रीय संगितकडे ओढून आणण्याचा प्रयत्न न करता, ह्या गाण्यतील यमनाची "ज्योति कलश झलके" शी तुलना कर रे जरा.. पदर दूर करून, यमनचा पोर्नोग्राफिक प्रयत्न तू ह्या रसग्रहणाने वर आणतो आहेस, असे वाटते. (तू तारीफ केलेला शुद्ध मध्यम हा "ब्लेटंट" अहे.. हसलर किंवा पेंटहाऊस मधल्या छायाचित्रांत सौंदर्य दिसतं असं वाटणार्‍यांना कदाचित तो आवडेलही..) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 10:37
मिलिंद, हा यमन म्हणजे "पदर सोडून" गायलेला यमन आहे.. प्रत्येकाचं मत! तुझ्या मताचा मी आदर करतो..! इथे इतक्या लोकांना यातला यमन आवडला आणि भावला! तुला नाही आवडला! किंबहुना 'पोर्नोग्राफिक' वाटला! चलता है...! अवांतर - बाय द वे, यमनसारख्या रागातही काही पोर्नोग्राफिक असू शकतं हे वाचून गंमत वाटली. माझी सांगितिक समज तुझ्याइतकी प्रगल्भ(?) नाही, त्यामुळे यमन हा मला नेहमी हळवा आणि प्रसन्नच वाटत आलेला आहे! उगाच ऐर्‍आगैर्‍यांना शास्त्रीय संगितकडे ओढून आणण्याचा प्रयत्न न करता, हे तू नक्की कुणाबद्दल बोलतो आहेस? मिपावरील रसिक श्रोत्यांबद्दल आणि वाचकांबद्दल हे तू बोलतो आहेस का? तसं असेल तर तुझं वरील विधान हे अत्यंत हलकटपणाचं आहे असंच मी म्हणेन. तुला माझा लेख आवडला किंवा नाही, याबद्दल तू अवश्य लिहू शकतोस परंतु मिपावरील रसिकांचा 'ऐर्‍यागैर्‍या' असा उल्लेख करण्याचा तुला काहीही अधिकार नाही! आणि अरे तुझ्यासारख्या यमनसारख्या रागातदेखील अश्लीलता दिसणार्‍यांपेक्षा, अभिजात संगीताची विशेष काही तोंडओळख नसलेले मिपावरचे ऐरेगैरे वाचक-श्रोते कितीतरी अधिक रसिक आणि दिलखुलास म्हटले पाहिजेत! ह्या गाण्यतील यमनाची "ज्योति कलश झलके" शी तुलना कर रे जरा.. काय संबंध? दोन्ही गाणी पूर्णत: वेगळी आहेत, त्यातले भाव वेगळे आहेत, राग वेगळा आहे! अर्थात, ज्याला यमन मध्ये पोर्नोग्राफी दिसते त्याला 'ज्योती कलश' मधला भूप कसा दिसत असेल हा एक प्रश्नच आहे! आणि मुळात आज़ 'जा़नेकी.. ' हे यमन मध्ये आहे आ़णि ज्योती कलश हे भूपात आहे हा मूलभूत फरक तुझ्यासारख्या प्रगल्भ (?) सांगितिक समज असलेल्याला कळू नये हेदेखील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे! अवांतर - 'ज्योती कलश हे गाणं काय आहे, कसं आहे, त्याची तुलना कुणाशी करायची आणि कुणाशी नाही हे मला तू नाही सांगितलंस तर बरं होईल. कारण तुझ्या दुर्दैवाने म्हणा, किंवा माझ्या सुदैवाने म्हणा, हे गाणं मला एकट्याला खुद्द बाबुजींनी त्यांच्या घरी पेटी घेऊन प्रेमाने ऐकवलं आहे, शिकवलं आहे! आमच्या ललितामावशी त्या घटनेच्या आजही साक्षिदार आहेत! बाबुजींनी स्वत: म्हटलेलं याच गाण्याचं एक ध्वनिमुद्रणही मला स्वत:च्या हाताने भेट म्हणून दिलं आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे ते मी तुलाही याहू निरोपकावर पाठवलेलं आहे! असो.. (तू तारीफ केलेला शुद्ध मध्यम हा "ब्लेटंट" अहे.. हसलर किंवा पेंटहाऊस मधल्या छायाचित्रांत सौंदर्य दिसतं असं वाटणार्‍यांना कदाचित तो आवडेलही..) प्रत्येकाची मतं! प्रतिसादाबद्दल धन्यवाद... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मुक्तसुनीत Wed, 02/13/2008 - 10:55
खरे म्हणजे कुणाच्या इंटरप्रीटेशनबद्दल आणखी वर मल्लिनाथी करू नये इतपत शहाणपण मला(ही) आहे. पण सर्कीटरावांच्या प्रतिसादातून मी जो बोध घेतला तो असा : विंदा करंदीकरानी एका निबंधात म्हण्टले आहे : "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" आता प्रथमदर्शनी पाहता , या विधानात अश्लीलता आहेच. पण त्यामागचा करंदीकरांचा एक अतिशय आदिम , निखळ असा दृष्टीकोन आहे. एखाद्या कवितेला आपण "कपडे काढून" भोगावे याचा अर्थच रूढ संकल्पनाना , प्रसंगी दुसर्‍यांच्या प्रस्थापित अशा दृष्टिकोनाना बाजूला ठेवून सामोरे जावे; स्वतःचे , स्वायत्त असे आकलन करावे. सर्कीट यानी यमन रागाच्या वेगवेगळ्या रूपांचे इंटरप्रीटेशन करताना रूढ पावित्र्य वगैरे संकल्पनाना बाजूला ठेवून, सरळ त्याना कळले त्या भाषेत आडपडदा न ठेवता आपले मत मांडले असे मला तरी वाटले. ("ज्योती कलश झलके" च्याबाबतीत त्यांची सरळसरळ तांत्रिक चूक झाली आहे. "फॉ पा " का काय म्हणतात ते :-) )

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Wed, 02/13/2008 - 11:10
ज्योतिकलश मधे "बादलके.." च्या शेवटी जो मद्ध्यम येतो, त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. तुला ते सांगायला नको.. मला म्हणायचे आहे ते एवढेच, की ज्या गाण्याची तू एवढी मनसोक्त तारीफ केली आहेस, त्या गाण्याच्या मांडणीत, "हल्ली लोकांना शास्रीय म्हटलेले गाणे आवडते.. म्हणून आपण त्यातील शास्त्रीय पदर उघडवून दाखवूयात." असे स्पष्ट दिसते. ह्या गाण्यातही तेच दिसते.. (आणि हे फक्त माझे -प्रगल्भ- मत नही. नव्हे फक्त काधी शतके वर्षांपासून चालत आलेल्या एखद्या कलेविषयी आपले मत प्रगल्भ आहे, असे म्हणणार्‍या लोकांना वेड्यंच्या इस्पितळात घालवे, असे माझे मत आहे.. हेच मोनालिसाविषयी बोलणार्‍यंसाठी, हेच शेक्सपियरविषयी..) ऐर्‍यागैर्‍यांना म्हणण्याचा उद्देश एवढच, की "जिद न करो" हे गाणे, फक्त तात्याने लिहिलेले रसग्रहण आवडले, म्हणून आपण आता जबरा संगीतविशारद झालो, असे म्हणणार्‍यांसाठी. तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. म्हणून तुझी ही लेखणीरूपी तलवार जरा आवरती घे. एवढेच सांगणे. बाकी तुझे तू बघण्यास समर्थ आहेस. - सर्किट खानुम

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 19:31
ज्योतिकलश मधे "बादलके.." च्या शेवटी जो मद्ध्यम येतो, त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. तुला ते सांगायला नको.. ??? माझ्या माहितीप्रमाणे 'बादलके...' च्या शेवटी कुठलाही मध्यम येत नाही! तुला तसं ऐकू येत असेल तर त्यावर मला काहीच बोलायचं नाही! त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. ???? मिलिंद, आता मला असं वाटू लागलं आहे की तू खरंच वाट्टेल ते बरळतो आहेस! 'ज्योती कलश छलके...' हे गाणं यमनात नसून भूपात आहे आणि यापूर्वीच्या प्रतिसादात केलेली तांत्रिक चूक तू आता काहीही करून, येनकेन प्रकारे या गाण्याचा यमनशी संबंध जोडून पुढे रेटायचा प्रयत्न करतो आहेस हे खरोखरंच हास्यास्पद आणि पोरकटपणाचं वाटतं आहे! असो.. बरं एक वेळ त्या गाण्यात मध्यम आहे असं मान्य करून मी तात्पुरता तुझा बालहट्ट पुरवतो, परंतु... १) त्या गाण्यात (ज्योती कलश..) शुद्ध निषाद कुठे आलाय हे जरा सांगशील का? २) थेट मध्यम, निषादाची नातं सांगणारी अशी यमन रागातली कोणती स्वरसंगती तुला दिसली हे सांगशील का? म्हणजे मग आपण, त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. हे तुझं बेधडक परंतु धादांत चुकीचं विधान अवश्य मान्य करू! असो, माझ्या मते तरी 'ज्योती कलश..' या सर्वांगसुंदर गाण्यात भूपाचं आणि फक्त भूपाचंच दर्शन होतं! किंबहुना, या गाण्यामुळे भूपाचा मान वाढला आहे असंही मी रसिकतेने म्हणेन! आपली चूक किंवा अज्ञान जर मोकळेपणाने मान्यच करायचं नसेल आणि केवळ फक्त विरोधाकरताच जर विरोध करायचा असेल तर मग या गाण्यात (ज्योती कलश..) यमनच काय, परंतु मारवाही दिसतो असं म्हटलं म्हणून तरी बिघडलं कुठे? मला म्हणायचे आहे ते एवढेच, की ज्या गाण्याची तू एवढी मनसोक्त तारीफ केली आहेस, खरं आहे. माझ्या मते ते गाणं मनमुराद तारीफ करावी, दाद द्यावी असंच आहे! त्या गाण्याच्या मांडणीत, "हल्ली लोकांना शास्रीय म्हटलेले गाणे आवडते.. म्हणून आपण त्यातील शास्त्रीय पदर उघडवून दाखवूयात." असे स्पष्ट दिसते. ह्या गाण्यातही तेच दिसते.. बरं मग? मी माझ्या परिने मिपावरील रसिक वाचकांना त्यातले थोडेफार सांगितिक स्वरांचे पदर उलगडून दाखवले, त्यातलं सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे?? की "जिद न करो" हे गाणे, फक्त तात्याने लिहिलेले रसग्रहण आवडले, म्हणून आपण आता जबरा संगीतविशारद झालो, असे म्हणणार्‍यांसाठी. तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. ??? मिलिंदा, तू नक्की कुठल्या गैरसमजात वावरतो आहेस हे आता मला खरंच कळेनासे झाले आहे! तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. इज इट? माझ्याकरता तर ही न्यूजच आहे!... :) तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. इज इट? असं झालं तर फारच उत्तम होईल...! :) बाय द वे, मराठी आंतरजालीय जगतात माझा फ्यॅन क्लब आहे हे वाचून बरे वाटले! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट गुरुवार, 02/14/2008 - 00:01
इंटरेस्टिंग.. मूळ गाण्यात तो मध्यम कुठेच दिसत नाही. तू मला बाबुजींनी गायलेल्या ज्योति कलश ची एम पी ३ दिली आहे त्यात त्यांच्या गळ्यातून आणि पेटीवर दोन्हींत मध्यमाचा शिरकाव आहे. निषाद नाही हे नक्की. त्यामुळे तो यमन होत नाही हेही नक्की. माझ्या आधीच्या विधानाबद्दल माफी मागतो. आता मूळ मुद्द्यावर. "क्लासिकल-बेस्ड" गाण्यांतली स्थित्यंतरे मी सांगितली आहेत. ("जागा" ह्या जागा वाटू नयेत, असं तलम मृदु "ज्योति कलश", आणि, "ही बघा जागा दाखवतो/ते", म्हणून किमोनो उघडणारे "जिद ना करो", हा मूळ मुद्दा आहे.) त्याबद्दल तुझे काय मत आहे ? - सर्किट

प्राजु Wed, 02/13/2008 - 09:36
अवांतरः फ़रिदा खा़नुम सारखेच हे गाणे आशा भोसले ह्यांनीही गायलेले आहे आणि दोघींच्या गाण्याची तुलना करता मला आशाताईंचे गायन जास्त आवडले. मला फरिदा खानुम यांचेच जास्ती आवडले. (प्रामाणिक मत) - प्राजु

प्रभाकर पेठकर Wed, 02/13/2008 - 13:39
'जिया ले गयो जी मोरा सावरीया', 'जा रे बदरा बैरी जा' मधला अवखळ यमन, 'समाधी साधन' मधला सात्विक यमन, 'जेथे सागरा धरणी मिळते' मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, 'दैवजात दु:खे भरता' मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि 'रंजिश ही सही' किंवा 'आज़ जा़ने की जि़द ना करो' सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! 'यू ही पेहेलू मे बैठे रहो..' मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! 'पेहेलू' या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! 'कानडाउ विठ्ठलू..' आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! 'हाये' मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा 'हाये' हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! 'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' मधील 'जाएंगे' या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! ह्यातलं काहीही कळलं नाही तात्या, पण फरिदा खानुम ह्यांच्या आवाजाचा पोत (ही माझी भाषा आहे हं!) आणि त्यातील आर्जव ह्याला तुलना नाही. जी अस्वस्थ करण्याची ताकद गाण्याच्या शब्दांमध्ये, गायिकेच्या आवाजात आणि सुरावटीत आहे हे अनुभवायला गाण्याचे व्याकरण समजण्याची आवश्यकता, निदान मला तरी भासत नाही. आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे हे बाकी लै झालं. तबियतदार रसिकांसाठी, ते अत्यवस्थ होऊ नयेत म्हणून, आवश्यक.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 13:57
हे अनुभवायला गाण्याचे व्याकरण समजण्याची आवश्यकता, निदान मला तरी भासत नाही. नक्कीच नाही! कुठलेही गाणे हे कानाला चांगले लागल्याशी कारण! मी फक्त ज्यांना स्वरांचीही थोडीफार ओळख/तोंडओळख आहे त्यांच्याकरताच केवळ स्वरांविषयीही थोडेसे लिहिले आहे इतकेच. बाकी, गाण्याचा आनंद कुणीही घेऊ शकतो, त्याकरता त्यातल्या व्याकरणाची/स्वरांची जाण असणे मुळीच आवश्यक नाही, असेच माझेही म्हणणे आहे... तबियतदार रसिकांसाठी, ते अत्यवस्थ होऊ नयेत म्हणून, आवश्यक. पेठकरशेठ, या वाक्याचा मतलब ध्यानी नाही आला. जरा उलगडून सांगता का? लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात माझं काही चुकलं आहे का? असो... आपला, (सिंगल-माल्ट मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Wed, 02/13/2008 - 14:30
लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात माझं काही चुकलं आहे का? अजिबात नाही तात्या. उलट मला असे म्हणायचे आहे की, जे रसिक एखाद्या कलेचा आस्वाद अगदी 'तब्येतीत' घेतात (मनस्वितेने घेतात) अशांच्या हाती (आणि ज्यांना 'ते' निषिद्ध नाही), सोनेरी रंगाचे द्रव्य नसेल तर ते अत्यवस्थच होतील म्हणून त्यांनी गाण्याचा आस्वाद घेताना चषक भरून फरीदा खानुमच्या ह्या गाण्याच्या सुरांवर तरंगण्याचा अनुभव घ्यावा.

तात्या, शास्त्रीय संगितातले आम्ही "ढ" विद्यार्थी. पण गाण्यातील सौंदर्यस्थळे, समजावण्याची कुशलता, रागांची ओळख  आणि  सांगण्याची तळमळ ''आज़ जा़ने की जि़द ना करो " च्या निमित्ताने  एका उत्तम जाणकाराने आमच्यापर्यंत पोहचवली. त्याचबरोबर आमच्या सारख्यां ( ऐरे-गैरे ) च्या मनात  शास्त्रीय संगिताबद्दल जिज्ञासा निर्माण करणे , हेच आपल्या लेखाचे / लेखनाचे  यश आहे असे आम्हाला वाटते,  पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!!

 

 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश Fri, 02/15/2008 - 12:06
उशिरा लक्ष गेलं ह्या लेखाकडे,पण आजच्या दिवसाची सुरुवात सुरिली झाली,:-) तात्या,मस्त! स्वाती

विसोबा खेचर Fri, 02/15/2008 - 12:39
प्रतिसाददात्या सर्व रसिक वाचकवरांपाशी मी कृतज्ञता व्यक्त करतो.. केशवसुमाराच्या ष्टाईल मध्ये - प्रतिसाद न देणार्‍यांचेही आभार.. :) आपला, (गाण्यातला) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल! फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं!

आता पुढे काय?

रम्या ·

व्यंकट Tue, 02/12/2008 - 18:36
सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली >> असहमत. एकदा रम आली की ती जात नाही हो.

चतुरंग Tue, 02/12/2008 - 22:17
'सौदामिनी'! म्हणजे झटका बसून सगळे खाडकन जागेवर येतील आणि 'फार पुढचा' विचार करणार नाहीत! चतुरंग

स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 22:37
mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? परत नऊवारी कारण मुली पुर्वी परकर पोलके घालत होत्या काही काळ गेल्यानंतर परत परकर पोलके आले पण वेगळ्यानावाने ..लाँग स्कर्ट. तेव्हा काळजी करू नका मला वाटते "जुने ते सोने"

व्यंकट Tue, 02/12/2008 - 18:36
सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली >> असहमत. एकदा रम आली की ती जात नाही हो.

चतुरंग Tue, 02/12/2008 - 22:17
'सौदामिनी'! म्हणजे झटका बसून सगळे खाडकन जागेवर येतील आणि 'फार पुढचा' विचार करणार नाहीत! चतुरंग

स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 22:37
mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? परत नऊवारी कारण मुली पुर्वी परकर पोलके घालत होत्या काही काळ गेल्यानंतर परत परकर पोलके आले पण वेगळ्यानावाने ..लाँग स्कर्ट. तेव्हा काळजी करू नका मला वाटते "जुने ते सोने"
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओर्कुटवर आलेली कविता!! आत्ता पुढे काय ? आर्य आले द्रविड़ गेले ....द्रविड़ गेले मुग़ल आले मुग़ल गेले इन्ग्रज़ आले .....इन्ग्रज़ गेले कांग्रेस आले कांग्रेस गेले NDA आले ....NDA गेले UPA आले आत्ता पुढे काय .....? सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली whisky गेली scotch आली.....scotch गेली champagne आली आत्ता पुढे काय .... ? नौवारि गेले सहावारी आले .......सहावारी गेले mandakini वारी आले mandakini वारी गेले midi आला.......midi गेला mini आला mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? (पुढचा विचार करणारा) रम्या

फिरनी

प्रभाकर पेठकर ·

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:46
दाट झाल्यावर खवा,साखर, वेलची पावडर आणि बदाम-पिस्ता काप त्यात मिसळा. आता गॅस बंद करून फिरनी खाली उतरवा. आवडीनुसार गुलाब एसेन्स किंवा गुलाब जल मिसळा. थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा. आहाहा! क्या बात है पेठकरशेठ.. लय भारी रेशिपी सांगितलीत बाकी! आणि तशी सोपी वाटते आहे, आता लौकरच करून पाहतो...! :) फिरनीचा फोटूही सुरेख आला आहे. परंतु त्यात तो चमचा नसता ठेवलात तर बरं झालं असतं! तो चमचा उचलण्याकरता संगणकाच्या पडद्याकडे नकळत गेलेला माझा हात काचेवर आपटून परत आला! :)) फिरनी हा खास मुसुलमानी पदार्थ! जुन्या लखनवात उत्तम बिर्याणीनंतर मी उत्तम फिरनीही खाल्ली आहे! :) पा कृ बद्दल अनेक धन्यवाद... आपला, तात्यामिया. पेठकरशेठ, आमची अजून एक फर्माईश बरं का! आम्हाला बालूशाही अतिशय आवडते. मिपावर जमल्यास बालुशाहीचीही पा कृ आपण द्यावी ही इनंती..! आपला, (मारवाडी) तात्या.

स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 15:39
चित्र पाहून पाणी सुटले तोंडाला.. दिल तो पागल है..चित्रात शाहरुख खान खात असलेली फिरनी आठवली,:) स्वाती

केशवसुमार Tue, 02/12/2008 - 21:25
पेठकरशेठ, सुंदर पाककृती आणि सुंदर फोटू.. तोंडाला पाणी सुटल.. आमच्या कडे रव्याची खीर श्राद्धाला करतात त्यामुळे मी फेरनी जरा वेगळ्या पध्दतीने करतो.. रव्याच्या एवजी मी मोकळा शिजवलेला बासमती भात घेतो.. कजू-बदाम-किशमीश- भरपूर प्रमाणात बाकी सगळी प्रक्रिया तुमच्या सारखीच.. अहाहा.. (सुग्रण)केशवसुमार

प्राजु Tue, 02/12/2008 - 19:55
आहाहा.............. वा.. काय सुंदर फोटो आहे. आणि पाककृतीही उत्तम. सोपीही आहे. करेन लवकरच. पण केशव म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडेही तांदूळाच्या रव्याची खीर श्राद्धाला करतात. त्यामुळे मी ही मोकळा शिजवलेला भातच घालेन. इकडे भारतीय हॉटेल्स मध्ये, स्वीट म्हणून गुलाबजाम आणि राईस खीर असते. ती ही बहुधा अशीच करत असावेत. - प्राजु

चतुरंग Tue, 02/12/2008 - 21:40
बराचवेळ तोंडातून शब्द येईना त्यामुळे असे झाले! प्रभाकरपंत, फारच छान कृती आणि सुंदर प्रकाशचित्र! धन्यवाद!! (आपण उत्तम प्रकाशचित्रकारही आहात - चांदीचा वर्ख, पिस्ते आणि बदामाच्या कापांवरचा कॅमेर्‍याचा फोकस इतका अचूक आहे की क्या कहेने!) थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा. ह्यातल्या मातीच्या वाट्यांमधे तर खासच. बंगालकडे 'मिष्टी दोही' (खापरात लावलेले गोड दही) असा एक प्रकार मिळतो - 'फिरनी' हा त्याच जातकुळीतला पण खवा, सुकामेवा, चांदीचा वर्ख ह्यामुळे आणखी राजस गुणाकडे जाणारा. हा पदार्थ करुन खायलाच हवा! चतुरंग

प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 22:00
श्री. तात्या, फिरनी लागते बाकी झकासच. उत्तरप्रदेशातील फिरनी, आपली तांदूळाची खीर, दक्षिणेतील पायसम ही विविध प्रदेशांमधील छोटी मोठी भावंडेच आहेत. बालूशाही मी एकदाच बनवली होती. मिसळपाववर पाककृती देण्याआधी पुन्हा एकदा करून पाहावी लागेल. जमली की ताबडतोब टाकतोच मिपावर. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. umavaidya, प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. धन्यवाद स्वाती दिनेश, फिरनी करून पाहा (म्हणजेच, खा!) मस्त लागते. घरगुती पार्टीसाठी मातीच्या मटक्यात (चित्रात दाखविल्याप्रमाणे) घालून सजवून थंड फिरनी सादर करावी. पाहुणे 'गाऽऽर' पडतील. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. श्री. केशवसुमार, आमच्या कडे रव्याची खीर श्राद्धाला करतात. ही रव्याची खीर नाही. तांदूळाचा रवा (इडली रवा) वापरलेला आहे. तांदूळाचा रवा न मिळाल्यास, आपला रोजचा बासमती तांदूळ भिजवून मिक्सरवर भरडसर दळून घ्यावा. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. प्राजु, ही सुद्धा राईस खीरच आहे. तांदूळाचा रवा न मिळाल्यास, आपला रोजचा बासमती तांदूळ भिजवून मिक्सरवर भरडसर दळून घ्यावा. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. श्री.चतुरंग, प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.

वरदा Tue, 02/12/2008 - 22:18
मस्तच आहे आमचं अगदी उलट. आम्ही भाताची खीर श्राद्धाला करतो त्यामुळे अशीच करुन पाहीन....पण साधा रवा आणि इडलीचा रवा ह्याच्या चवीत खूप फरक असतो का? अवांतर- कुणाला बदाम हलव्याची रेसिपि माहीत असेल तर सांगा ना मला...

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 22:22
साधा रवा आणि इडलीचा रवा ह्याच्या चवीत खूप फरक असतो का? साधा रवा हा गव्हाचा रवा असतो, इडली रवा हा तांदूळाचा रवा असतो. त्यामुळे, इडली रव्याच्या खीरीची चव भाताच्या खीरीसारखीच असते.

स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 22:27
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.:) तोंडाला पाणी सुटले. आणि त्यात तो फोटो म्हणजे काही विचारुच नका.:) अगदी पौष्टीक आणि सोपी आहे. पण फोटो काढून मत्र आम्हाला जळवले. खाताना आमची आठवण काढून खा.:)))

वरदा Tue, 02/12/2008 - 22:33
आता कळ्ळं मग करतेच नक्कि..थँक्यु पेठकर काका...खूप छान आणि सोपी रेसिपी सांगितलीत्...सहज करता येईल अर्ध्या तासात....

नंदन Wed, 02/13/2008 - 13:34
पाककृती आणि छायाचित्र. एक शंका - खव्याच्या ऐवजी रिकोटा चीजचा वापर करता येणे शक्य आहे का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:33
मातीच्या वाटीसकट खायला तयार आहोत. जर मिळाली तर. आमच्या एका कोकणी मुस्लिम मित्राकडे पण (वाटीशिवाय) खाल्ली होती. त्याची आठवण आली. आणखी अशाच अनवट पाककृति येऊ द्यात. मजा येईल.

मनिष Mon, 02/18/2008 - 17:53
मी सुद्धा करून पाहिली - फारच सुरेख झाली होती. मी थोडा (आगाऊपणे) बदल केला - तांदुळाच्या रव्यात ८-१० काजू टाकले आणि वर्खाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या. अफलातुन चव होती! :)

In reply to by मनिष

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 19:12
धन्यवाद मनिष, मी थोडा (आगाऊपणे) बदल केला - तांदुळाच्या रव्यात ८-१० काजू टाकले आणि वर्खाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या. अफलातुन चव होती! :) ह्यात आगाऊपणा काय? कुठलीही पाककृती आपल्या आवडीनुसार बदलून करून पाहावी. शक्यतो, पदार्थाच्या चवीचे जे सौंदर्य असते त्याला बिघाड येईल असे करून नये. (तसे केले तरी चालते. पण.....) त्याने त्याचे मुळच्या पाककृतीशी नाते तुटून एक सर्वस्वी नविन पाककॄती जन्म घेते. चांगली झाली तर उत्तमच. नाही झाली तर, 'ती मजा नाही आली...' असे इतरांना वाटते. (वाटेना का!) काहीतरी वेगळे करून पाहण्याच्या छंदातूनच पाकशास्त्रात प्रगल्भता येत गेलेली आहे.

सूड Mon, 12/09/2013 - 17:20
तांदळाची खीर आमच्याकडे करतात ती नारळ वाटून घालून...अगदीच वेळ असेल हाताशी तर नारळाचं दूध घालतात. पण बहुतेकदा श्राद्धासारख्या प्रसंगीच करतात, सणावाराप्रसंगी नाही. एरवी लहर आली की करुन खात असतो. आता दूध घालून करुन पाहायला हवी.

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:46
दाट झाल्यावर खवा,साखर, वेलची पावडर आणि बदाम-पिस्ता काप त्यात मिसळा. आता गॅस बंद करून फिरनी खाली उतरवा. आवडीनुसार गुलाब एसेन्स किंवा गुलाब जल मिसळा. थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा. आहाहा! क्या बात है पेठकरशेठ.. लय भारी रेशिपी सांगितलीत बाकी! आणि तशी सोपी वाटते आहे, आता लौकरच करून पाहतो...! :) फिरनीचा फोटूही सुरेख आला आहे. परंतु त्यात तो चमचा नसता ठेवलात तर बरं झालं असतं! तो चमचा उचलण्याकरता संगणकाच्या पडद्याकडे नकळत गेलेला माझा हात काचेवर आपटून परत आला! :)) फिरनी हा खास मुसुलमानी पदार्थ! जुन्या लखनवात उत्तम बिर्याणीनंतर मी उत्तम फिरनीही खाल्ली आहे! :) पा कृ बद्दल अनेक धन्यवाद... आपला, तात्यामिया. पेठकरशेठ, आमची अजून एक फर्माईश बरं का! आम्हाला बालूशाही अतिशय आवडते. मिपावर जमल्यास बालुशाहीचीही पा कृ आपण द्यावी ही इनंती..! आपला, (मारवाडी) तात्या.

स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 15:39
चित्र पाहून पाणी सुटले तोंडाला.. दिल तो पागल है..चित्रात शाहरुख खान खात असलेली फिरनी आठवली,:) स्वाती

केशवसुमार Tue, 02/12/2008 - 21:25
पेठकरशेठ, सुंदर पाककृती आणि सुंदर फोटू.. तोंडाला पाणी सुटल.. आमच्या कडे रव्याची खीर श्राद्धाला करतात त्यामुळे मी फेरनी जरा वेगळ्या पध्दतीने करतो.. रव्याच्या एवजी मी मोकळा शिजवलेला बासमती भात घेतो.. कजू-बदाम-किशमीश- भरपूर प्रमाणात बाकी सगळी प्रक्रिया तुमच्या सारखीच.. अहाहा.. (सुग्रण)केशवसुमार

प्राजु Tue, 02/12/2008 - 19:55
आहाहा.............. वा.. काय सुंदर फोटो आहे. आणि पाककृतीही उत्तम. सोपीही आहे. करेन लवकरच. पण केशव म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडेही तांदूळाच्या रव्याची खीर श्राद्धाला करतात. त्यामुळे मी ही मोकळा शिजवलेला भातच घालेन. इकडे भारतीय हॉटेल्स मध्ये, स्वीट म्हणून गुलाबजाम आणि राईस खीर असते. ती ही बहुधा अशीच करत असावेत. - प्राजु

चतुरंग Tue, 02/12/2008 - 21:40
बराचवेळ तोंडातून शब्द येईना त्यामुळे असे झाले! प्रभाकरपंत, फारच छान कृती आणि सुंदर प्रकाशचित्र! धन्यवाद!! (आपण उत्तम प्रकाशचित्रकारही आहात - चांदीचा वर्ख, पिस्ते आणि बदामाच्या कापांवरचा कॅमेर्‍याचा फोकस इतका अचूक आहे की क्या कहेने!) थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा. ह्यातल्या मातीच्या वाट्यांमधे तर खासच. बंगालकडे 'मिष्टी दोही' (खापरात लावलेले गोड दही) असा एक प्रकार मिळतो - 'फिरनी' हा त्याच जातकुळीतला पण खवा, सुकामेवा, चांदीचा वर्ख ह्यामुळे आणखी राजस गुणाकडे जाणारा. हा पदार्थ करुन खायलाच हवा! चतुरंग

प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 22:00
श्री. तात्या, फिरनी लागते बाकी झकासच. उत्तरप्रदेशातील फिरनी, आपली तांदूळाची खीर, दक्षिणेतील पायसम ही विविध प्रदेशांमधील छोटी मोठी भावंडेच आहेत. बालूशाही मी एकदाच बनवली होती. मिसळपाववर पाककृती देण्याआधी पुन्हा एकदा करून पाहावी लागेल. जमली की ताबडतोब टाकतोच मिपावर. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. umavaidya, प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. धन्यवाद स्वाती दिनेश, फिरनी करून पाहा (म्हणजेच, खा!) मस्त लागते. घरगुती पार्टीसाठी मातीच्या मटक्यात (चित्रात दाखविल्याप्रमाणे) घालून सजवून थंड फिरनी सादर करावी. पाहुणे 'गाऽऽर' पडतील. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. श्री. केशवसुमार, आमच्या कडे रव्याची खीर श्राद्धाला करतात. ही रव्याची खीर नाही. तांदूळाचा रवा (इडली रवा) वापरलेला आहे. तांदूळाचा रवा न मिळाल्यास, आपला रोजचा बासमती तांदूळ भिजवून मिक्सरवर भरडसर दळून घ्यावा. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. प्राजु, ही सुद्धा राईस खीरच आहे. तांदूळाचा रवा न मिळाल्यास, आपला रोजचा बासमती तांदूळ भिजवून मिक्सरवर भरडसर दळून घ्यावा. प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद. श्री.चतुरंग, प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद.

वरदा Tue, 02/12/2008 - 22:18
मस्तच आहे आमचं अगदी उलट. आम्ही भाताची खीर श्राद्धाला करतो त्यामुळे अशीच करुन पाहीन....पण साधा रवा आणि इडलीचा रवा ह्याच्या चवीत खूप फरक असतो का? अवांतर- कुणाला बदाम हलव्याची रेसिपि माहीत असेल तर सांगा ना मला...

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर Tue, 02/12/2008 - 22:22
साधा रवा आणि इडलीचा रवा ह्याच्या चवीत खूप फरक असतो का? साधा रवा हा गव्हाचा रवा असतो, इडली रवा हा तांदूळाचा रवा असतो. त्यामुळे, इडली रव्याच्या खीरीची चव भाताच्या खीरीसारखीच असते.

स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 22:27
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.:) तोंडाला पाणी सुटले. आणि त्यात तो फोटो म्हणजे काही विचारुच नका.:) अगदी पौष्टीक आणि सोपी आहे. पण फोटो काढून मत्र आम्हाला जळवले. खाताना आमची आठवण काढून खा.:)))

वरदा Tue, 02/12/2008 - 22:33
आता कळ्ळं मग करतेच नक्कि..थँक्यु पेठकर काका...खूप छान आणि सोपी रेसिपी सांगितलीत्...सहज करता येईल अर्ध्या तासात....

नंदन Wed, 02/13/2008 - 13:34
पाककृती आणि छायाचित्र. एक शंका - खव्याच्या ऐवजी रिकोटा चीजचा वापर करता येणे शक्य आहे का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:33
मातीच्या वाटीसकट खायला तयार आहोत. जर मिळाली तर. आमच्या एका कोकणी मुस्लिम मित्राकडे पण (वाटीशिवाय) खाल्ली होती. त्याची आठवण आली. आणखी अशाच अनवट पाककृति येऊ द्यात. मजा येईल.

मनिष Mon, 02/18/2008 - 17:53
मी सुद्धा करून पाहिली - फारच सुरेख झाली होती. मी थोडा (आगाऊपणे) बदल केला - तांदुळाच्या रव्यात ८-१० काजू टाकले आणि वर्खाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या. अफलातुन चव होती! :)

In reply to by मनिष

प्रभाकर पेठकर Mon, 02/18/2008 - 19:12
धन्यवाद मनिष, मी थोडा (आगाऊपणे) बदल केला - तांदुळाच्या रव्यात ८-१० काजू टाकले आणि वर्खाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या. अफलातुन चव होती! :) ह्यात आगाऊपणा काय? कुठलीही पाककृती आपल्या आवडीनुसार बदलून करून पाहावी. शक्यतो, पदार्थाच्या चवीचे जे सौंदर्य असते त्याला बिघाड येईल असे करून नये. (तसे केले तरी चालते. पण.....) त्याने त्याचे मुळच्या पाककृतीशी नाते तुटून एक सर्वस्वी नविन पाककॄती जन्म घेते. चांगली झाली तर उत्तमच. नाही झाली तर, 'ती मजा नाही आली...' असे इतरांना वाटते. (वाटेना का!) काहीतरी वेगळे करून पाहण्याच्या छंदातूनच पाकशास्त्रात प्रगल्भता येत गेलेली आहे.

सूड Mon, 12/09/2013 - 17:20
तांदळाची खीर आमच्याकडे करतात ती नारळ वाटून घालून...अगदीच वेळ असेल हाताशी तर नारळाचं दूध घालतात. पण बहुतेकदा श्राद्धासारख्या प्रसंगीच करतात, सणावाराप्रसंगी नाही. एरवी लहर आली की करुन खात असतो. आता दूध घालून करुन पाहायला हवी.
Taxonomy upgrade extras
साहित्यः दूध (म्हशीचे अथवा फुल्-क्रिम) - २ लिटर तांदूळाचा रवा (इडली रवा) - १५० ग्रॅम (चहाचा एक कप किंवा एक मोठी वाटी) खवा - १२५ ग्रॅम (पाऊण वाटी) साखर - १ कप वेलची पावडर - १/२ टी स्पून गुलाब एसेन्स अथवा गुलाब जल - अंदाजाने बदाम-पिस्ता काप - थोडेसे चांदीचा वर्ख - सुशोभीकरणासाठी (वैकल्पिक -[Optional]) कृती: खवा कुस्करून मोकळा करून ठेवा. तांदूळाचा रवा पाण्यात एक तास भिजवून ठेवा (पाणी रव्याच्या पातळीच्या वर राहिले पाहिजे.) २ लिटर दूध उकळण्यास ठेवा.

प्रेम करायला जागा नसलेली मुंबई

हैदर अली ·

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:11
तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ? अवश्य असावीत! आम्ही पुन्हा एकदा याचा खंदा पुरस्कार आणि पुनरोच्चार करतो! हैदरराव, काही काळापूर्वी आम्ही याच संदर्भात एक चर्चाप्रस्ताव उपक्रमावर मांडला होता, त्यात आम्ही आमचे मतही नोंदवले होते. इतर सभासदांनीही त्यात आपापली मते नोंदवली आहेत. ही चर्चा आपल्याला इथे पाहता येईल... आपला, (कधीकाळी कॉलेज जीवनात बागेतल्या अंधारात मजा केलेला!) तात्या.

प्रेम करायचे असेल तर त्याला कुठल्याही जागेचे वेळेचे बंधन नाही. अनेक जोडपी अशी आहेत की जी बसमधे लोकल मधे एकमेकांना मदत करत सावरत कदाचित चेष्टामस्करी करत असतात. कदाचित त्याना ते प्रेम करत्तात असे म्हणता येईल. पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. कारण असे पार्क उघडले आणि आमच्यासारखे चावट लोक हळूच इकडून तिकडून लपून छपून त्या क्रीडा बघणार नाहीत का?बागा शक्यतो उघड्या असतात त्यामुळे तिथे तो धोका अधिक... जर प्रश्न 'मुंबईचा जावई' या प्रमाणे एकांत मिळण्याचा असेल तर त्यासाठी वेगळी हॉटेले उघडावीत. त्यामुळे वरील धोके टळतील असे वाटते(हॉटेल मधे छुपे कॅमेरे नसतील हे गृहीत धरुन). वरील मते माझी अंतिम मते नाहीत. कदाचित चर्चेतून अधिक चांगले पर्याय उपलब्ध होउ शकतील. पण ही प्रथमदर्शनी मते आहेत. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:00
पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. मुक्तचुंबने हा शब्द अतिशय आवडला.. :) आपला, (मुक्त!) तात्या.

ऋषिकेश Wed, 02/13/2008 - 01:15
असल्या पार्कांना माझा विरोध आहे. कारण इथे अपेक्षित असलेले मुक्त "मैत्री पार्क" होणार नाहि. ते स्थळ लवकरच "बाजार" होऊन जाईल याची खात्री बाळगा. मनापासून चार घटका एकांतात बोलायला, गुजगोष्टी करायला कोणत्याहि बागेत जाता येते. पण शारिरिक जवळीक करण्यासाठी अशी मुक्त सार्वजनिक ठिकाणे चालू करणे मात्र धोकादायक वाटते.
मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात
हे पटले :) -ऋषिकेश

व्यंकट Wed, 02/13/2008 - 01:16
>>एकाच वेळी ग्लोबल आणि संकुचित अशा द्विधा मनस्थितीत असलेले काय संस्कृतीचं रक्षण करणार? बरं >> अहो ह्या संस्कृतीरक्षकांच्या पूर्वजांच्या गेल्या पाचशे पिढ्यांनी प्रेम केले नसते तर आज हे अस्तित्त्वात तरी असते का ? हम्म, बरं बरं >> तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ? प्रेमी युगुलांसाठी अशी ठिकाणे किंवा उद्याने आहेतच असे मला वाटते, पण ती कामातुरांकरिता सुद्धा खुली करावीत असे आम्हांस वाटते.

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:11
तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ? अवश्य असावीत! आम्ही पुन्हा एकदा याचा खंदा पुरस्कार आणि पुनरोच्चार करतो! हैदरराव, काही काळापूर्वी आम्ही याच संदर्भात एक चर्चाप्रस्ताव उपक्रमावर मांडला होता, त्यात आम्ही आमचे मतही नोंदवले होते. इतर सभासदांनीही त्यात आपापली मते नोंदवली आहेत. ही चर्चा आपल्याला इथे पाहता येईल... आपला, (कधीकाळी कॉलेज जीवनात बागेतल्या अंधारात मजा केलेला!) तात्या.

प्रेम करायचे असेल तर त्याला कुठल्याही जागेचे वेळेचे बंधन नाही. अनेक जोडपी अशी आहेत की जी बसमधे लोकल मधे एकमेकांना मदत करत सावरत कदाचित चेष्टामस्करी करत असतात. कदाचित त्याना ते प्रेम करत्तात असे म्हणता येईल. पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. कारण असे पार्क उघडले आणि आमच्यासारखे चावट लोक हळूच इकडून तिकडून लपून छपून त्या क्रीडा बघणार नाहीत का?बागा शक्यतो उघड्या असतात त्यामुळे तिथे तो धोका अधिक... जर प्रश्न 'मुंबईचा जावई' या प्रमाणे एकांत मिळण्याचा असेल तर त्यासाठी वेगळी हॉटेले उघडावीत. त्यामुळे वरील धोके टळतील असे वाटते(हॉटेल मधे छुपे कॅमेरे नसतील हे गृहीत धरुन). वरील मते माझी अंतिम मते नाहीत. कदाचित चर्चेतून अधिक चांगले पर्याय उपलब्ध होउ शकतील. पण ही प्रथमदर्शनी मते आहेत. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 01:00
पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. मुक्तचुंबने हा शब्द अतिशय आवडला.. :) आपला, (मुक्त!) तात्या.

ऋषिकेश Wed, 02/13/2008 - 01:15
असल्या पार्कांना माझा विरोध आहे. कारण इथे अपेक्षित असलेले मुक्त "मैत्री पार्क" होणार नाहि. ते स्थळ लवकरच "बाजार" होऊन जाईल याची खात्री बाळगा. मनापासून चार घटका एकांतात बोलायला, गुजगोष्टी करायला कोणत्याहि बागेत जाता येते. पण शारिरिक जवळीक करण्यासाठी अशी मुक्त सार्वजनिक ठिकाणे चालू करणे मात्र धोकादायक वाटते.
मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात
हे पटले :) -ऋषिकेश

व्यंकट Wed, 02/13/2008 - 01:16
>>एकाच वेळी ग्लोबल आणि संकुचित अशा द्विधा मनस्थितीत असलेले काय संस्कृतीचं रक्षण करणार? बरं >> अहो ह्या संस्कृतीरक्षकांच्या पूर्वजांच्या गेल्या पाचशे पिढ्यांनी प्रेम केले नसते तर आज हे अस्तित्त्वात तरी असते का ? हम्म, बरं बरं >> तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ? प्रेमी युगुलांसाठी अशी ठिकाणे किंवा उद्याने आहेतच असे मला वाटते, पण ती कामातुरांकरिता सुद्धा खुली करावीत असे आम्हांस वाटते.
आज पेपरात बातमी वाचली, 'भरतीच्या वेळी पाण्यात बुडून प्रेमी युगुलाचा मृत्यू', 'प्रेम उद्यानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..', म्हटलं... बघुया तर हा प्रश्न खरोखर ऐरणीवर आणून.... म्हणूनच हा काथ्याकूट प्रपंच... मुंबईतल्या तरुणाईसाठी खरोखरच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या दांभिक मुजोरपणापुढे नमून मुंबईचे पोलीसखाते जणु काय मुंबईतली सगळी गुन्हेगारी नष्ट झाल्यामुळे, आता दुसरे काहीच काम नसल्याच्या थाटात संस्कृतीरक्षणाचा विडा उचलल्याप्रमाणे प्रेम करणा-यांवर उठले आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या प्रेमी युगुलांवर पोलीसी कारवाई केली जाते.

काही सुभाषिते

वडापाव ·

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:03
पाणीपुरीराव, आपण रचलेल्या संस्कृत सुभाषितांचे मिपावर स्वागत! परंतु या सुभाषितांचा मराठीतूनही अर्थ दिलात तर आमच्यासारख्या संस्कृतातलं शष्पही न समजणार्‍यांकरताही त्याचा फायदा होईल! अवांतर - मूळ शब्द काय आहे? शष्प की शश्प? की आणखी काही? आम्ही आपलं ऐकीव माहितीच्या आधारे तो शब्द लिहिला आहे! :) तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:36
मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय? जाऊ द्या पेठकरसाहेब, आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू! :) मिपावर आता या विषयावर अधिक चर्चा करणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही...:) तात्या.

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:24
अस॑च काहीस॑ म्हणतात ना स॑स्कृतात "छान" ला? हे आपल॑ प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून, नाहीतर बाकी त्यातल॑ ओ की ठो कळल॑ नाही बॉ आपल्याला... स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला. असो, आपला -(गिर्वाणभारती न झेपणारा क्षुद्रातिक्षुद्र) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:34
स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला. सही बोल्लासा धमालभौ, आपल्याला बी संस्कृतातलं काय बी समजत नै! :) आपला, (संस्कृतला जाम टरकून असणारा) तात्या.

प्राजु Tue, 02/12/2008 - 20:03
मला संस्कृत भाषा आवडते. पण तुमच्या इतका अभ्यास नाहिये. मार्क मात्र मी दहावीत संस्कृतला एकदम छान मिळवले होते. मला सुभाषितांचं संग्रह करायला आवडतो. आपण या सुभाषितांचा अर्थ सांगितलात तर बरे होईल. मला आवडेल आणखी काही सुभाषिते आपल्याकडून शिकायला. - प्राजु

वरदा Tue, 02/12/2008 - 20:52
मलाही दहावीत ९८ मिळाले पण त्यानंतर काहीच नाही केला अभ्यास..तुम्ही काही महत्वाचे शब्द सांगितलेत तर जास्तं छान समजुन घेता येतील ही सुभाषितं...

रागा विषयी संस्कृत सुभाषीत
About Anger.
उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटी
कनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने.
=============================
अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट
स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:03
पाणीपुरीराव, आपण रचलेल्या संस्कृत सुभाषितांचे मिपावर स्वागत! परंतु या सुभाषितांचा मराठीतूनही अर्थ दिलात तर आमच्यासारख्या संस्कृतातलं शष्पही न समजणार्‍यांकरताही त्याचा फायदा होईल! अवांतर - मूळ शब्द काय आहे? शष्प की शश्प? की आणखी काही? आम्ही आपलं ऐकीव माहितीच्या आधारे तो शब्द लिहिला आहे! :) तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 14:36
मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय? जाऊ द्या पेठकरसाहेब, आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू! :) मिपावर आता या विषयावर अधिक चर्चा करणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही...:) तात्या.

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:24
अस॑च काहीस॑ म्हणतात ना स॑स्कृतात "छान" ला? हे आपल॑ प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून, नाहीतर बाकी त्यातल॑ ओ की ठो कळल॑ नाही बॉ आपल्याला... स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला. असो, आपला -(गिर्वाणभारती न झेपणारा क्षुद्रातिक्षुद्र) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 12:34
स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला. सही बोल्लासा धमालभौ, आपल्याला बी संस्कृतातलं काय बी समजत नै! :) आपला, (संस्कृतला जाम टरकून असणारा) तात्या.

प्राजु Tue, 02/12/2008 - 20:03
मला संस्कृत भाषा आवडते. पण तुमच्या इतका अभ्यास नाहिये. मार्क मात्र मी दहावीत संस्कृतला एकदम छान मिळवले होते. मला सुभाषितांचं संग्रह करायला आवडतो. आपण या सुभाषितांचा अर्थ सांगितलात तर बरे होईल. मला आवडेल आणखी काही सुभाषिते आपल्याकडून शिकायला. - प्राजु

वरदा Tue, 02/12/2008 - 20:52
मलाही दहावीत ९८ मिळाले पण त्यानंतर काहीच नाही केला अभ्यास..तुम्ही काही महत्वाचे शब्द सांगितलेत तर जास्तं छान समजुन घेता येतील ही सुभाषितं...

रागा विषयी संस्कृत सुभाषीत
About Anger.
उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटी
कनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने.
=============================
अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट
स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.
लेखनविषय:
संस्कृत सुभाषितांपासून प्रेरणा घेऊन मीदेखील काही सुभाषिते तयार केली आहेत, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चूका मनावर घेऊ नका. अजून मी संस्कृत शिकत आहे.

संत - कुसुमाग्रज (एक विलक्षण अनुभव)

मानस ·

नंदन Tue, 02/12/2008 - 04:52
कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट Tue, 02/12/2008 - 08:05
आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते. बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत. त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ? - सर्किट

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट Tue, 02/12/2008 - 08:35
उत्तरे स्वतंत्र लोकांकडून मिळाली असती तर अधिक विश्वासार्ह ठरली असती. माझे बाबांच्या जवळिकीतून आरोप, आणि शिरवाडकरांच्या प्रतिश्ठानाकडून मिळालेली "तथ्ये". जरा तिसर्‍या बाजूने संशोधन हवे. नाही का ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 09:02
मी दिलेली उत्तरे मला आंतरजालावरून मिळाली तशी दिली. त्याचा मथळाच "काही उत्तरे" असा होता. हा वकिली युक्तिवाद नव्हे. (तसे करायला जाणे म्हणजे कुसुमाग्रजांकरता थोडे कमीपणाचे ठरेल.) असो.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट Tue, 02/12/2008 - 09:28
शिरवाडकर हा मोठा माणूस.. बाबा हा देखील मोठा माणूस.. माझ्यासारख्या लहान व्यक्तीने असे आरोप करणे चुकीचे आहे.. पण मोठी माणसे इतर मोठ्या माणसांचे वागणे समजून घेतात.. माझ्यासारखे लहान लोकच अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात ठसवून घेऊन त्यांचे अवडंबर करतात.. माफ करा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 10:25
आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते. May be! बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. ??? माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू – आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. !!! बाबांविषयी अशी कविता कुणीही लिहू शकतो?? May be...!! :) मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत. आपलीही कविता वाचायला आवडेल! त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ? प्रत्येकालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही! असो, सर्कीटराव आपल्या प्रतिसादातून कुसुमांग्रजांविषयी विनाकारण कडवटपणा जाणवतो आहे, नव्हे अनादरही जाणवतो आहे त्याचा मी निषेध करतो! आपला, (कुसुमाग्रजप्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:15
प्रत्येकाालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही! अगदी बरोबर अहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमतेच असे नाही. शिरवाडकरांचा मीही चाहता अहे, त्यांच्या काव्याच्या गोडीत मीही अशा छोट्या छोट्या बाबी जमेस धरत नाही.. अणि समजा धरल्यात तरी, त्यामुळे त्यांचे कवीत्व कमी होत नाही. ते कवी म्हणून श्रेष्ठच राहतात. असो. - (कुसुमाग्रजांचा चाहता) सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:17
द्विरुक्तीबद्दल क्षमस्व. प्रकाटाआ. - सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:36
कडवटपणा आहे, नक्कीच... पण कुसुमाग्रज, एक कवी, ह्यांच्याबदलचे प्रेम त्यामुळे कणानेही कमी होत नाही.. आजवर काय थोड्या कवी, लेखकांनी आपापल्या तुंबड्या भरल्या आहेत, बोटावर मोजण्याइतक्या समाजसेवकांविषयी लिहून ? मुळात बाबा आणि शिरवाडकरांचे विचार जुळले होते. दोघेही नास्तिक, पण आस्तिकतेचा पगडा कधीही गेला नाही.. मर्यादा पुरुषोत्तम रामाला बाबांनी "मर्यादित पुरुषोत्तम" केले.. शिरवाडकरांना ते नकीच भावले असणार.. - सर्किट

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 08:19
मानसराव, कुसुमाग्रजांची कविता इथे स्वतंत्ररित्या दिल्याबद्दल आभार... माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. सहमत आहे. कविता, खास करून कुसुमाग्रजांच्या कविता भाऊ अतिशय सुरेख सादर करतात! तात्या.

मानस Tue, 02/12/2008 - 09:57
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. सर्किटराव मला कोणी काय केलं, किंवा काय केलं नाही ह्या बद्दल काही म्हणायचे नाही. कुसुमाग्रज ह्यांच्या विषयी काही बोलायची माझी तरी लायकी नाही. ही कविता देण्यामागे फक्त 'सद्भावना' एवढीच एक इच्छा होती. कुसुमाग्रजांच्या शब्दांची ताकद आणि त्यांचा बाबांवरचा आदर या कवितेत स्पष्ट दिसून येतो. बाबांच्या निधनाची बातमी वाचल्यावर सर्व प्रथम मला हीच कविता आठवली, हे माझं दुर्भाग्य!! दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे मनापासुन वाटणार्‍या दोन महान व्यक्ती, एक बाबा व दुसरे कुसुमाग्रज हा विषय मी इथेच संपवत आहे. धन्यवाद

In reply to by मानस

सर्किट Tue, 02/12/2008 - 10:12
मोठ्या लोकांचे मोठे विचारच आपण आजवर लक्षात ठेवत आलो आहोत.. आणि तेच योग्य आहे.. कुसुमाग्रज मोठेच आहेत.. माझ्यासारख्या लहानांनी कितीही अकांडतांडव केले, तरी काय फरक पडतो.. आम्ही लहान लोक फक्त छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देऊन आपल्या छोट्या विचारांना पुढे आणतो झाले.. बाबा गेल्यावर त्यांच्या विषयीच्या मोठ्या मोठ्या लोकांनी व्यक्त केलेल्या (तेही मटा सारख्या महान दैनिकात) विचारांना आम्ही आमच्या तथ्याने काय बाधा आणणार आहोत ? छे.. पण तरीही.. केचे, पुलं, कुसुमाग्रज, ह्या सगळ्यांनी बाबांच्या कार्याविषयी इतके सुंदर लिहून ठेवले आहे, की त्यांनी प्रत्यक्ष आनंदवनकडे पाठ फिरवली हे नगण्य.. - सर्किट

नंदन Tue, 02/12/2008 - 04:52
कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट Tue, 02/12/2008 - 08:05
आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते. बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत. त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ? - सर्किट

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट Tue, 02/12/2008 - 08:35
उत्तरे स्वतंत्र लोकांकडून मिळाली असती तर अधिक विश्वासार्ह ठरली असती. माझे बाबांच्या जवळिकीतून आरोप, आणि शिरवाडकरांच्या प्रतिश्ठानाकडून मिळालेली "तथ्ये". जरा तिसर्‍या बाजूने संशोधन हवे. नाही का ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 09:02
मी दिलेली उत्तरे मला आंतरजालावरून मिळाली तशी दिली. त्याचा मथळाच "काही उत्तरे" असा होता. हा वकिली युक्तिवाद नव्हे. (तसे करायला जाणे म्हणजे कुसुमाग्रजांकरता थोडे कमीपणाचे ठरेल.) असो.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट Tue, 02/12/2008 - 09:28
शिरवाडकर हा मोठा माणूस.. बाबा हा देखील मोठा माणूस.. माझ्यासारख्या लहान व्यक्तीने असे आरोप करणे चुकीचे आहे.. पण मोठी माणसे इतर मोठ्या माणसांचे वागणे समजून घेतात.. माझ्यासारखे लहान लोकच अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात ठसवून घेऊन त्यांचे अवडंबर करतात.. माफ करा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 10:25
आणि ह्या शिरवाडकरांना मुक्तांगणात मित्रमेळाव्याला दिलेले आमंत्रण त्यांनी काहीतरी क्षुल्लक कारणे देऊन नाकारले होते. May be! बाबांविषयी कविता कुणीही लिहू शकतो. ??? माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू – आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. !!! बाबांविषयी अशी कविता कुणीही लिहू शकतो?? May be...!! :) मीही साहित्य संमेलनात बाबांवरच्या कवितेवर टाळ्या मिळवलेल्या आहेत. आपलीही कविता वाचायला आवडेल! त्यांनी आनंदवनासाठी काय केलंय ते बोला ! कधी एकातरी महारोग्यची झडलेली बोटे हातात धरून दिलासा दिला आहे ? प्रत्येकालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही! असो, सर्कीटराव आपल्या प्रतिसादातून कुसुमांग्रजांविषयी विनाकारण कडवटपणा जाणवतो आहे, नव्हे अनादरही जाणवतो आहे त्याचा मी निषेध करतो! आपला, (कुसुमाग्रजप्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:15
प्रत्येकाालाच या गोष्टी जमतात असे नव्हे! पण म्हणून काय कुसुमाग्रंजांसारखा कुणी असा एकदम असा नाकाम, नाकर्ता ठरत नाही! अगदी बरोबर अहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमतेच असे नाही. शिरवाडकरांचा मीही चाहता अहे, त्यांच्या काव्याच्या गोडीत मीही अशा छोट्या छोट्या बाबी जमेस धरत नाही.. अणि समजा धरल्यात तरी, त्यामुळे त्यांचे कवीत्व कमी होत नाही. ते कवी म्हणून श्रेष्ठच राहतात. असो. - (कुसुमाग्रजांचा चाहता) सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:17
द्विरुक्तीबद्दल क्षमस्व. प्रकाटाआ. - सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 02/12/2008 - 11:36
कडवटपणा आहे, नक्कीच... पण कुसुमाग्रज, एक कवी, ह्यांच्याबदलचे प्रेम त्यामुळे कणानेही कमी होत नाही.. आजवर काय थोड्या कवी, लेखकांनी आपापल्या तुंबड्या भरल्या आहेत, बोटावर मोजण्याइतक्या समाजसेवकांविषयी लिहून ? मुळात बाबा आणि शिरवाडकरांचे विचार जुळले होते. दोघेही नास्तिक, पण आस्तिकतेचा पगडा कधीही गेला नाही.. मर्यादा पुरुषोत्तम रामाला बाबांनी "मर्यादित पुरुषोत्तम" केले.. शिरवाडकरांना ते नकीच भावले असणार.. - सर्किट

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 08:19
मानसराव, कुसुमाग्रजांची कविता इथे स्वतंत्ररित्या दिल्याबद्दल आभार... माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. सहमत आहे. कविता, खास करून कुसुमाग्रजांच्या कविता भाऊ अतिशय सुरेख सादर करतात! तात्या.

मानस Tue, 02/12/2008 - 09:57
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. सर्किटराव मला कोणी काय केलं, किंवा काय केलं नाही ह्या बद्दल काही म्हणायचे नाही. कुसुमाग्रज ह्यांच्या विषयी काही बोलायची माझी तरी लायकी नाही. ही कविता देण्यामागे फक्त 'सद्भावना' एवढीच एक इच्छा होती. कुसुमाग्रजांच्या शब्दांची ताकद आणि त्यांचा बाबांवरचा आदर या कवितेत स्पष्ट दिसून येतो. बाबांच्या निधनाची बातमी वाचल्यावर सर्व प्रथम मला हीच कविता आठवली, हे माझं दुर्भाग्य!! दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे मनापासुन वाटणार्‍या दोन महान व्यक्ती, एक बाबा व दुसरे कुसुमाग्रज हा विषय मी इथेच संपवत आहे. धन्यवाद

In reply to by मानस

सर्किट Tue, 02/12/2008 - 10:12
मोठ्या लोकांचे मोठे विचारच आपण आजवर लक्षात ठेवत आलो आहोत.. आणि तेच योग्य आहे.. कुसुमाग्रज मोठेच आहेत.. माझ्यासारख्या लहानांनी कितीही अकांडतांडव केले, तरी काय फरक पडतो.. आम्ही लहान लोक फक्त छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देऊन आपल्या छोट्या विचारांना पुढे आणतो झाले.. बाबा गेल्यावर त्यांच्या विषयीच्या मोठ्या मोठ्या लोकांनी व्यक्त केलेल्या (तेही मटा सारख्या महान दैनिकात) विचारांना आम्ही आमच्या तथ्याने काय बाधा आणणार आहोत ? छे.. पण तरीही.. केचे, पुलं, कुसुमाग्रज, ह्या सगळ्यांनी बाबांच्या कार्याविषयी इतके सुंदर लिहून ठेवले आहे, की त्यांनी प्रत्यक्ष आनंदवनकडे पाठ फिरवली हे नगण्य.. - सर्किट
लेखनविषय:
लेखनप्रकार
रसिक मिसळपावकरांनो, ही कविता मी "महामानवाला प्रणाम!" ह्या अंतर्गत प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. एका वरिष्ठ मित्राच्या बर्‍याच आग्रहामुळे येथे पुन्हा देत आहे. थोडे फार फेरबदल (जसे आठवले, तसे) केले आहेत. माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. बाबांच्या निर्वाणाची बातमी वाचली, तेव्हा ह्या कवितेची खूप आठवण झाली आणि म्हणुनच हा सगळा अट्टाहास. काही वर्षांपुर्वी (खूप वर्षांपुर्वी) कुसुमाग़्रजांनी नाशिकमध्ये श्री. बाबा आमटे ह्यांचा सत्कार घडवून आणला होता.

शिशिरमासी

चतुरंग ·

प्राजु Mon, 02/11/2008 - 23:44
चतुरंग, बालकवींचा वरदहस्त आहे तुमच्यावर.. असे वाटले तुमच्या या कवितेवरून. केवळ अप्रतिम. बघता बघता नभ हे सारे झाकोळुन मग जात असे, सूर्यबिंबही केविलवाणे ढगांतुनी त्या मग हासे, शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते, ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते, नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती, पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती, सगळे माझ्यासमोर आहे... अगदी परिस्थितिचे यथार्थ वर्णन. - (निसर्गवेडी)प्राजु

स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 01:39
अशाच कविता येऊ देत. कवितेच्या ओळी मस्त आहेत. वर्णन खूप मस्त केले आहे. थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी, विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी! यामधील फक्त "विजीगिषा" चा अर्थ सांगाल का?

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 01:49
नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती, पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती, .....गोठुन गेला काळ असा जणु उदास वाटे आज तरी, थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी, विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी! वा वा वा.. 'नेमक्या' शब्दांतील वर्णन!!! अतिशय चित्रदर्शी कविता.. आवडली -ऋषिकेश

नंदन Tue, 02/12/2008 - 02:54
कविता. शुभ्र गालिचे, हिमपर्णे, गोठून गेलेला काळ इ. विशेष आवडले. शीर्षकावरुन मर्ढेकरांची शिशिरागम कविता आठवली. (शिशिरऋतुच्या पुनरागमे,एकेक पान गळावया, कां लागता मज येतसे, न कळे उगाच रडावया) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

उत्तम वर्णन .. कदाचित अमेरीकेत येऊन असे प्रत्यक्ष पाहीले नसते तर आम्हास या काव्याचा आनंद संपूर्णपणे लुटता आला नसता. आपण उत्तमपणे हे आमच्या आजूबाजूचे चित्र शब्दबद्ध केले आहे. मस्तच. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:04
वा चतुरंगा, फारच सुरेख कविता केली आहेस, वाचून निखळ आनंद मिळाला, समाधान मिळाले! शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते, ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते, उदास मन हे झाले मग तरि आनंदी हे नाचतसे, निसर्गचक्रे स्तिमित असा मी काव्यरंग हा उधळितसे. वा वा! सुरेख...! तात्या.

वरदा Tue, 02/12/2008 - 21:07
शिशिरमासी शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे, क्षणात असते थंड हि वारे क्षणात फिरुनी हिम हि पडे अगदी असंच चाल्लंय सद्ध्या...फारच छान वर्णन....

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 21:13
तुमची ही कविता खूप आवडली. वृत्तबद्ध रचनेचा डौल तुम्ही सावरला आहे आणि सगळे वर्णन चित्रदर्शी झाले आहे. या दृष्टीने, तीन-चार पिढ्यांमागच्या कवि माधव, बालकवी, ना.वा. टिळक यांच्या प्रभावळीतल्या उत्कृष्ट निसर्गकवितेशी , ही कविता आपले नाते सांगते. "शिशिरमासी" हा प्रयोग अर्थाच्या दृष्टीने किंचित चुकीचा आहे (शिशिर हा ऋतू ; "मास" नव्हे. ) आणि सगळ्या कवितेमधे साधलेला वृत्ताचा तोल केवळ या एका ठिकाणी ढळलाय. त्या ऐवजी "शिशिरमौसमी" हा शब्द बसू शकेल. (मात्र असे करण्याने एक फारशी शब्द वापरावा लागतो , जो प्रस्तुत कवितेच्या प्रकृतीशी आणि भाषेशी विसंगत आहे.)

In reply to by मुक्तसुनीत

तुमची ही कविता खूप आवडली.  सगळे वर्णन चित्रदर्शी झाले आहे. या दृष्टीने, तीन-चार पिढ्यांमागच्या कवि माधव, बालकवी, ना.वा. टिळक यांच्या प्रभावळीतल्या उत्कृष्ट निसर्गकवितेशी , ही कविता आपले नाते सांगते.

असेच म्हणतो !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग Tue, 02/12/2008 - 21:23
आपल्या परीक्षणाबद्दल धन्यवाद! आपण सांगितलेली "शिशिरमास" शब्दातली चूक मलाही खटकली, तसेच आणखीही सदस्यांनी त्याबद्दल मला सूचित केले. शिशिरऋतूतिल शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे, असेही चालू शकेल. असो. सुधारणेस वाव आहे हे समजून आनंद वाटला. चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 21:30
"शिशिरऋतूतिल " ही अगदी योग्य अशी दुरुस्ती आहे. (असे केल्याने, तुमच्या कवितेचे नाते एकदम, बालकवींच्या १-२ पिढ्यांनंतरच्या एका प्रसिद्ध कवितेशी जोडले गेले ; हे तुम्हाला जाणवले की नाही ? :-) )

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Tue, 02/12/2008 - 21:49
आणि बालकवींच्या कवितातल्या सहजसुंदर आणि ओघवत्या शब्दांच्या प्रभावाखाली वृत्तबध्द, तालबद्ध आणि चित्रदर्शी असं आपण काही लिहू शकतो अशी जाणीवही झाली. पण इतक्या थोरामोठ्यांशी नाते जोडणं काही बरोबर नाही असं वाटतंय. आपल्या सगळ्याच्या लोभामुळे असेच काही सर्जन होत रहावे. चतुरंग

प्राजु Mon, 02/11/2008 - 23:44
चतुरंग, बालकवींचा वरदहस्त आहे तुमच्यावर.. असे वाटले तुमच्या या कवितेवरून. केवळ अप्रतिम. बघता बघता नभ हे सारे झाकोळुन मग जात असे, सूर्यबिंबही केविलवाणे ढगांतुनी त्या मग हासे, शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते, ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते, नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती, पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती, सगळे माझ्यासमोर आहे... अगदी परिस्थितिचे यथार्थ वर्णन. - (निसर्गवेडी)प्राजु

स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 01:39
अशाच कविता येऊ देत. कवितेच्या ओळी मस्त आहेत. वर्णन खूप मस्त केले आहे. थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी, विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी! यामधील फक्त "विजीगिषा" चा अर्थ सांगाल का?

ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 01:49
नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती, पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती, .....गोठुन गेला काळ असा जणु उदास वाटे आज तरी, थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी, विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी! वा वा वा.. 'नेमक्या' शब्दांतील वर्णन!!! अतिशय चित्रदर्शी कविता.. आवडली -ऋषिकेश

नंदन Tue, 02/12/2008 - 02:54
कविता. शुभ्र गालिचे, हिमपर्णे, गोठून गेलेला काळ इ. विशेष आवडले. शीर्षकावरुन मर्ढेकरांची शिशिरागम कविता आठवली. (शिशिरऋतुच्या पुनरागमे,एकेक पान गळावया, कां लागता मज येतसे, न कळे उगाच रडावया) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

उत्तम वर्णन .. कदाचित अमेरीकेत येऊन असे प्रत्यक्ष पाहीले नसते तर आम्हास या काव्याचा आनंद संपूर्णपणे लुटता आला नसता. आपण उत्तमपणे हे आमच्या आजूबाजूचे चित्र शब्दबद्ध केले आहे. मस्तच. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:04
वा चतुरंगा, फारच सुरेख कविता केली आहेस, वाचून निखळ आनंद मिळाला, समाधान मिळाले! शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते, ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते, उदास मन हे झाले मग तरि आनंदी हे नाचतसे, निसर्गचक्रे स्तिमित असा मी काव्यरंग हा उधळितसे. वा वा! सुरेख...! तात्या.

वरदा Tue, 02/12/2008 - 21:07
शिशिरमासी शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे, क्षणात असते थंड हि वारे क्षणात फिरुनी हिम हि पडे अगदी असंच चाल्लंय सद्ध्या...फारच छान वर्णन....

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 21:13
तुमची ही कविता खूप आवडली. वृत्तबद्ध रचनेचा डौल तुम्ही सावरला आहे आणि सगळे वर्णन चित्रदर्शी झाले आहे. या दृष्टीने, तीन-चार पिढ्यांमागच्या कवि माधव, बालकवी, ना.वा. टिळक यांच्या प्रभावळीतल्या उत्कृष्ट निसर्गकवितेशी , ही कविता आपले नाते सांगते. "शिशिरमासी" हा प्रयोग अर्थाच्या दृष्टीने किंचित चुकीचा आहे (शिशिर हा ऋतू ; "मास" नव्हे. ) आणि सगळ्या कवितेमधे साधलेला वृत्ताचा तोल केवळ या एका ठिकाणी ढळलाय. त्या ऐवजी "शिशिरमौसमी" हा शब्द बसू शकेल. (मात्र असे करण्याने एक फारशी शब्द वापरावा लागतो , जो प्रस्तुत कवितेच्या प्रकृतीशी आणि भाषेशी विसंगत आहे.)

In reply to by मुक्तसुनीत

तुमची ही कविता खूप आवडली.  सगळे वर्णन चित्रदर्शी झाले आहे. या दृष्टीने, तीन-चार पिढ्यांमागच्या कवि माधव, बालकवी, ना.वा. टिळक यांच्या प्रभावळीतल्या उत्कृष्ट निसर्गकवितेशी , ही कविता आपले नाते सांगते.

असेच म्हणतो !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग Tue, 02/12/2008 - 21:23
आपल्या परीक्षणाबद्दल धन्यवाद! आपण सांगितलेली "शिशिरमास" शब्दातली चूक मलाही खटकली, तसेच आणखीही सदस्यांनी त्याबद्दल मला सूचित केले. शिशिरऋतूतिल शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे, असेही चालू शकेल. असो. सुधारणेस वाव आहे हे समजून आनंद वाटला. चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत Tue, 02/12/2008 - 21:30
"शिशिरऋतूतिल " ही अगदी योग्य अशी दुरुस्ती आहे. (असे केल्याने, तुमच्या कवितेचे नाते एकदम, बालकवींच्या १-२ पिढ्यांनंतरच्या एका प्रसिद्ध कवितेशी जोडले गेले ; हे तुम्हाला जाणवले की नाही ? :-) )

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Tue, 02/12/2008 - 21:49
आणि बालकवींच्या कवितातल्या सहजसुंदर आणि ओघवत्या शब्दांच्या प्रभावाखाली वृत्तबध्द, तालबद्ध आणि चित्रदर्शी असं आपण काही लिहू शकतो अशी जाणीवही झाली. पण इतक्या थोरामोठ्यांशी नाते जोडणं काही बरोबर नाही असं वाटतंय. आपल्या सगळ्याच्या लोभामुळे असेच काही सर्जन होत रहावे. चतुरंग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बालकवींची अप्रतिम निसर्गकविता "श्रावणमासी हर्ष मानसी" ही आमची प्रेरणा.

वाट फुटेल तिथे १

सुधीर कांदळकर ·

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 22:39
...आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिविशेषांबद्दलच्या तपशीलामुळे अत्यंत वाचनीय असे लिखाण. खूप मजा येते आहे. लगे रहो "कालू" भाई ! :-)

ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 23:43
जबरदस्त!!! ही मारुती ८०० ची मुशाफीरी भन्नाट वाटली. नर्मविनोदी भाषाशैली आणि व्यक्तीपरिचयाची हातोटी प्रचंड आवडली. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत :) -(प्रवास आणि प्रवासवर्णनाचा चाहता) ऋषिकेश

चतुरंग Tue, 02/12/2008 - 00:41
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. (आपल्या नावात जरी 'धीर' असला तरी पुढचा भाग वाचायला आमचा धीर निघत नाहीये!:) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:28
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. रंगरावांशी सहमत आहे.. सुधीरराव, और भी आने दो. आपले प्रवासवर्णन वाचायला मौज वाटली! आपला, (प्रवासी) तात्या.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 02:21
मस्त्...व्यक्तींच्या वर्णनामुळे तर बहार आलीय..... ...आता तुमच्याबरोबर दक्षिण भारताची सफर करणारच... ...पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 12:06
मस्त सुरुवात झाली आहे,तुमच्या दक्षिण सफरीची उत्सुकता वाढली आहे.वरील सर्वांप्रमाणेच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. स्वाती

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:15
मजा आली वाचताना, सगळे किस्से थोड्याथोडक्या प्रमाणात आपल्याशीच स॑ब॑धीत असल्यासारख॑ वाटल॑. सुधीरशेठ, झकास वाटतय हे वाचताना... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आपला, - भटक्या ध मा ल.

प्रमोद देव Tue, 02/12/2008 - 16:12
कांदळकर साहेब तुमची लेखन शैली मस्त आहे . मित्रांच्या स्वभावाचे वर्णन वाचून एकूण एक नमूने डोळ्यासमोर उभी राहिले. आता पुढील प्रवासातील गमती जमतीकडे लक्ष लागून राहिलेय.

केशवसुमार Tue, 02/12/2008 - 16:18
सुधीरशेठ, मस्त लेख.. काही वर्षा पूर्वी मी फटफटी वरून पुणे- कन्याकुमारी- पुणे असा दौरा केला होता त्याची आठवण झाली..५ दिवसात ३३०० कि.मी फटफटीचा प्रवास संपला तेव्हा '*डिचा फणस होणे 'म्हणजे काय ते समजले होते पण मजा आली होती.. आयुषातला एक अविस्मर्णीय प्रवास होता तो.. पण सला आम्हाल तुमच्या सारखा हे पान पान खरडायला जमत नाही ना..ते आपला शब्दांची आदला बदल करून विडंबनेच बरी.. असो.. पुढचा भाग लवकर येऊद्या.. (फटफटी वर प्रेम करणारा) केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 16:27
५ दिवसा॑त पुणे- कन्याकुमारी- पुणे...तेही फटफटीवरून ??? महाराज, कुठायत तुमचे पाय? फोटो पाठवा..देव्हार्‍यात ठेवतो !!! बाकी '*डिचा फणस होणे' हे लय भारी :)) नवीन शब्द कळला, आमचा साध्या पुणे-कोल्हापुराच्या प्रवासातच फणस झाला होता !!! त्यात सुद्धा इथ॑ था॑ब तिथ॑ था॑ब करत ९-१० तास लागले कोल्हापुरात पोचायला. -आपला (फटफटी वर प्रेम करणारा, पण *डिची फणसपोळी होत असलेला) ध मा ल.

In reply to by केशवसुमार

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:23
चरणकमल धरायला पाहिजेत. आम्हीदेखील तरूण वयात फटफटीवरून ५ - १० पिकनिक्स केल्या. पण फणस होईपर्यंत नाही. दिवसाला जेमतेम २५० - ३०० कि.मी. मी अर्थात पिलियनवर. परंतु आपल्याकडे असामान्य प्रतिभा आहे जी माझ्याजवळ नाही. आपण ज्याला शब्दांची अदलाबदल म्हणता ते आज किती जणांना जमते? मी कां नाही करूं शकत? आपण देखील छान लिहू शकाल. फक्त मनांतील गंड काढून टाका. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील साहित्या साठी शुभेच्छा.

सख्याहरि Tue, 02/12/2008 - 17:14
मि पा वरील फणसा सार्खि माणसे पहून मन अग्दी भरून येतंय.. -कोंकण प्रेमी सख्याहरी

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:34
जिवंत प्रवास वर्णन. मीही त्यातलाच एक आहे अस कुठेतरी वाटु लागलय इतक जिवंत. म्हणुन पुढील भाग लवकर येउद्यात. मनीष पाठक

मुक्तसुनीत Mon, 02/11/2008 - 22:39
...आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिविशेषांबद्दलच्या तपशीलामुळे अत्यंत वाचनीय असे लिखाण. खूप मजा येते आहे. लगे रहो "कालू" भाई ! :-)

ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 23:43
जबरदस्त!!! ही मारुती ८०० ची मुशाफीरी भन्नाट वाटली. नर्मविनोदी भाषाशैली आणि व्यक्तीपरिचयाची हातोटी प्रचंड आवडली. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत :) -(प्रवास आणि प्रवासवर्णनाचा चाहता) ऋषिकेश

चतुरंग Tue, 02/12/2008 - 00:41
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. (आपल्या नावात जरी 'धीर' असला तरी पुढचा भाग वाचायला आमचा धीर निघत नाहीये!:) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 02/12/2008 - 11:28
अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन. रंगरावांशी सहमत आहे.. सुधीरराव, और भी आने दो. आपले प्रवासवर्णन वाचायला मौज वाटली! आपला, (प्रवासी) तात्या.

भडकमकर मास्तर Tue, 02/12/2008 - 02:21
मस्त्...व्यक्तींच्या वर्णनामुळे तर बहार आलीय..... ...आता तुमच्याबरोबर दक्षिण भारताची सफर करणारच... ...पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

स्वाती दिनेश Tue, 02/12/2008 - 12:06
मस्त सुरुवात झाली आहे,तुमच्या दक्षिण सफरीची उत्सुकता वाढली आहे.वरील सर्वांप्रमाणेच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. स्वाती

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 12:15
मजा आली वाचताना, सगळे किस्से थोड्याथोडक्या प्रमाणात आपल्याशीच स॑ब॑धीत असल्यासारख॑ वाटल॑. सुधीरशेठ, झकास वाटतय हे वाचताना... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आपला, - भटक्या ध मा ल.

प्रमोद देव Tue, 02/12/2008 - 16:12
कांदळकर साहेब तुमची लेखन शैली मस्त आहे . मित्रांच्या स्वभावाचे वर्णन वाचून एकूण एक नमूने डोळ्यासमोर उभी राहिले. आता पुढील प्रवासातील गमती जमतीकडे लक्ष लागून राहिलेय.

केशवसुमार Tue, 02/12/2008 - 16:18
सुधीरशेठ, मस्त लेख.. काही वर्षा पूर्वी मी फटफटी वरून पुणे- कन्याकुमारी- पुणे असा दौरा केला होता त्याची आठवण झाली..५ दिवसात ३३०० कि.मी फटफटीचा प्रवास संपला तेव्हा '*डिचा फणस होणे 'म्हणजे काय ते समजले होते पण मजा आली होती.. आयुषातला एक अविस्मर्णीय प्रवास होता तो.. पण सला आम्हाल तुमच्या सारखा हे पान पान खरडायला जमत नाही ना..ते आपला शब्दांची आदला बदल करून विडंबनेच बरी.. असो.. पुढचा भाग लवकर येऊद्या.. (फटफटी वर प्रेम करणारा) केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा Tue, 02/12/2008 - 16:27
५ दिवसा॑त पुणे- कन्याकुमारी- पुणे...तेही फटफटीवरून ??? महाराज, कुठायत तुमचे पाय? फोटो पाठवा..देव्हार्‍यात ठेवतो !!! बाकी '*डिचा फणस होणे' हे लय भारी :)) नवीन शब्द कळला, आमचा साध्या पुणे-कोल्हापुराच्या प्रवासातच फणस झाला होता !!! त्यात सुद्धा इथ॑ था॑ब तिथ॑ था॑ब करत ९-१० तास लागले कोल्हापुरात पोचायला. -आपला (फटफटी वर प्रेम करणारा, पण *डिची फणसपोळी होत असलेला) ध मा ल.

In reply to by केशवसुमार

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 19:23
चरणकमल धरायला पाहिजेत. आम्हीदेखील तरूण वयात फटफटीवरून ५ - १० पिकनिक्स केल्या. पण फणस होईपर्यंत नाही. दिवसाला जेमतेम २५० - ३०० कि.मी. मी अर्थात पिलियनवर. परंतु आपल्याकडे असामान्य प्रतिभा आहे जी माझ्याजवळ नाही. आपण ज्याला शब्दांची अदलाबदल म्हणता ते आज किती जणांना जमते? मी कां नाही करूं शकत? आपण देखील छान लिहू शकाल. फक्त मनांतील गंड काढून टाका. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील साहित्या साठी शुभेच्छा.

सख्याहरि Tue, 02/12/2008 - 17:14
मि पा वरील फणसा सार्खि माणसे पहून मन अग्दी भरून येतंय.. -कोंकण प्रेमी सख्याहरी

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:34
जिवंत प्रवास वर्णन. मीही त्यातलाच एक आहे अस कुठेतरी वाटु लागलय इतक जिवंत. म्हणुन पुढील भाग लवकर येउद्यात. मनीष पाठक
लेखनविषय:
लेखनप्रकार
3